पंतप्रधानांकडून विशेषाधिकारांचा भंग
काँग्रेस नेते वेणुगोपालांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विशेषाधिकार भंगाच्या नोटीससाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी 18 एप्रिल रोजी राष्ट्राच्या नावाने स्वत:च्या संबोधनात लोकसभेच्या सदस्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यांच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी स्वत:च्या पत्रात केला [...]
रशियासोबत युद्धाची भीती, पोलंड सोनं विकून शस्त्र खरेदी करण्याच्या तयारीत
युरोपमध्ये पुन्हा एकदा मोठ्या युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. रशियासोबत असलेल्या जुन्या वैमनस्यामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलंड सरकारने आपल्या राखीव साठ्यातील सोनं विकून आधुनिक शस्त्रे खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. रशियाची नजर पोलंडवर असून, संभाव्य धोका ओळखून पोलंड सरकार आता आपल्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याच्या विचारात आहे, असे वृत्त टीव्ही९ भारतवर्षने दिले आहे. पोलंड […]
एप्रिलमध्येच उन्हाचा हाहाकार! जगातील २० सर्वाधिक उष्ण शहरांपैकी १९ हिंदुस्थानातील, पारा ४४ अंशांवर
हिंदुस्थान सध्या भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, ही परिस्थिती केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. ‘एक्यूआई.इन’ (AQI.in) च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील २० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तब्बल १९ शहरे एकट्या हिंदुस्थानातील आहेत. हवामान विभागाने २२ ते २४ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत […]
सौदीतून सायबर खंडणी प्रकरण उघड, खेड पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला मुंबईत अटक
सायबर माध्यमातून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. सौदी अरेबियात वास्तव्यास असलेला आरोपी मुंबईत आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम […]
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव फॉर्च्यूनर थेट घर, हॉटेलमध्ये घुसली; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव फॉर्च्यूनर कारचे नियंत्रण सुटून ती थेट महामार्गालगत असलेल्या घर व हॉटेलमध्ये घुसल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी फॉर्च्यूनर कार प्रचंड वेगात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण […]
तेलाचा पुरवठा अखंडित राखण्यासाठी हिंदुस्थानचे मोठे पाऊल; रशियन विमा कंपन्यांच्या संख्येत वाढ
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव तसेच होर्मुझ सामुद्रधुनीवरील संभाव्य नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रशियन तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना विमा संरक्षण पुरवणाऱ्या रशियन कंपन्यांच्या संख्येत हिंदुस्थान सरकारने मोठी वाढ केली आहे. नौवहन महासंचालनालयाने (DGS) घेतलेल्या या […]
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावातील ग्रामस्थांना तब्बल तीन महिने रेशनवर धान्य मिळाले नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी चांदोर गावातील शेकडो महिला जिल्हा पुरवठा कार्यालयात धडकल्या आणि त्यांनी रेशनवर धान्य मिळत नसल्याची व्यथा मांडली. चांदोर येथील ग्रामस्थांना रेशन दुकानावर धान्य मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर २७ मार्च […]
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने अवलंबलेल्या आपल्या शांततावादी धोरणात आता मोठा बदल केला आहे. पंतप्रधान सनाई तकाईची यांच्या मंत्रिमंडळाने शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर दशकांपासून असलेली बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे आता जपान फायटर जेट, क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांसारखी घातक शस्त्रे इतर देशांना विकू शकणार आहे, असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधान […]
कॅनडातून हजारो हिंदुस्थानी निर्वासित होणार? बिल सी-12 मुळे टांगती तलवार
कॅनडातील एक प्रमुख स्थलांतर सुधारणा कायदा, बिल सी-१२, आता अंमलात आला आहे. देशाची स्थलांतर प्रणाली अधिक नियमबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते, असा सरकारचा दावा आहे. मात्र, मानवाधिकार संघटनांनी निर्वासितांच्या हक्कांवर गंभीर परिणाम होत असल्याबद्दल यावर टीका केली आहे. हा कायदा विशेषतः आश्रय प्रणाली, व्हिसा प्रक्रिया आणि स्थलांतराशी संबंधित प्रशासकीय अधिकारांमध्ये मोठे बदल […]
शरद पवार बारामतीत मतदान करणार नाहीत, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले. उपचार आणि सक्तीची विश्रांतीसाठी डॉक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बातमतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याने त्यांनी एक्सवर पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, […]
नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे; शरद पवार यांनी व्यक्त केली खंत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले. उपचार आणि सक्तीची विश्रांतीसाठी डॉक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बातमतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याने त्यांनी एक्सवर पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, […]
केरळमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 13 ठार, 5 जणांची प्रकृती गंभीर
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोटाची घटना घडली. या स्फोटात किमान 13 लोकांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंडाथिकोड येथील फटाके कारखान्यात दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली. कापणीनंतर ओसाड झालेल्या एका शेतजमिनीत हा कारखाना उभारण्यात आला होता. स्फोटाची […]
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या चढाया-पकडींच्या संघर्षात मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि आयएसपीएलसह (इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि.)ठाणे महानगर पालिका या संघांनी थरारक विजयासह आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली. महिला गटातही अंगावर शहारे आणणार्या रोमहर्षक लढतीनंतर मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि […]
मी शस्त्रसंधीची मुदत वाढवणार नाही, शांतता करार होणारच; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीची मुदत आता लवकरच संपणार आहे. ही मुदत संपण्यापूर्वी शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानला भेट देतील असे संकेत मिळत आहेत. तसेच या भेटीत शांतता करार होणारच आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. […]
Photo –भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सभेला उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
भारतीय कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. स्वर्गीय शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भारतीय कामगार सेनेने लाखो कामगारांच्या आयुष्य घडवलं असून भविष्यातही तेच कार्य सुरु राहिल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. […]
पंतप्रधान मोदींविरोधात के.सी. वेणुगोपाल यांची हक्कभंगाची नोटीस; भाषणाविरोधात काँग्रेस आक्रमक
काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभा खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संसदेत हक्कभंगाची नोटीस सादर केली आहे. १८ एप्रिल रोजी संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत ही नोटीस देण्यात आली आहे. के.सी. वेणुगोपाल यांनी आपल्या नोटीसमध्ये पंतप्रधानांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला अनैतिक आणि सत्तेचा गैरवापर, असल्याचे […]
सावंतवाडी प्रतिनिधी मळगाव घाटीत स्पोर्ट कार आणि मारुती इको यांच्यात अपघात होऊन मारुती इको कार सुमारे 20 फूट खाली कोसळून गाडीचा चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.गाडीतील रजत मंगेश शिरसाट ( 68 ), श्रीधर रंजन शिरसाठ (30) जयश्री विश्वनाथ शिरसाठ (65 ) हर्ष महेश शिरसाठ (18 ) उमा मंगेश शिरसाठ [...]
विधान परिषदेवर संधी देण्याची रामदास कोळगे यांची भाजपा पक्ष श्रेष्ठीकडे मागणी
धाराशिव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी आपणास विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागासाठी निवडणुक होत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाटयाला पाच जागा असल्याने यामध्ये आपणास धाराशिव जिल्हयामधुन संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे पक्षश्रेष्ठीना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लहानपणापासून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडत, 1982-83 पासून संघकार्याची सुरुवात केली आणि 1990 सालापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला या प्रदीर्घ प्रवासात पक्षाने विविध जबाबदाऱ्या देत घडवले. अगदी शाखा सरचिटणीस (रुईभर), तालुका सरचिटणीस व अध्यक्ष (धाराशिव), जिल्हाध्यक्ष (भाजपा युवा मोर्चा), प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस (भाजपा), तसेच किसान मोर्चामध्ये मराठवाडा एफपीओ प्रमुख व प्रदेश सचिव अशी अनेक पदे सांभाळण्याची संधी मिळाली. सामाजिक व लोकप्रतिनिधी म्हणूनही कार्य करताना पंचायत समिती सदस्य म्हणून सलग तीन वेळा (1997-2012), उपसभापती (2002-2004), तसेच जिल्हा परिषद सदस्य (2012-2017) म्हणून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच विविध सहकारी व कृषी संस्थांमध्ये जबाबदाऱ्या पार पाडत ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि संघटन बळकटीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहिलो आहे.या सर्व कार्यकाळात आपण पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आजपर्यंत दिलेल्या प्रत्येक संधीचे सोने करत पक्षवृद्धी आणि जनसेवा हेच ध्येय ठेवले आहे. माझा दीर्घकालीन अनुभव, संघटनात्मक बांधिलकी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्य करण्याची संधी आपणास मिळावी, अशी मागणी कोळगे यांनी केली आहे.
महाराष्ट्राने दर वेळेला देशाला दिशा दाखवलेली आहे. प्रत्येक वेळी देशावर संकट आल्यानंतर महाराष्ट्र धावून गेलेला आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय होत असेल तर मी म्हणेन जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिलेला आहे, तमिळनाडूमध्ये तमिळ उभा राहिलेला आहे तसा, मराठी माणसाला महाराष्ट्रीय म्हणून उभं राहावंच लागेल, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]
जिल्ह्यात सिंचन प्रकल्पात 37.56 टक्के उपयुक्त जलसाठा
धाराशिव (प्रतिनिधी)- एप्रिल महिना उजाडताच सुर्यनारायण आग ओकू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी 37.56 टक्के इतकी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्याची पावसाची सरासरी 770.07 मिमी असताना जिल्ह्यात सरासरी 1294.64 इतका पाऊस झाला होता. एकूण 167.98 टक्के इतका पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. तर दुसरीकडे पाण्याचा वापरही वाढत आहे. परिणामी प्रकल्पात आता 373.73 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदा अलनिनोमुळे मान्सूनमध्ये वार्षिक सरासरी इतकाच पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन स्तरावर पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला असून, बाष्पीभवनही होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा दिवसेंदिवस खालावू लागला आहे. 226 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे पडले आहेत. 14 प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. 62 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. 125 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठी आहे. 20 प्रकल्पात 51 ते 75 टक्के उपयुक्त पाणी आहे. केवळ दोन प्रकल्पात 75 टकक्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. एक प्रकल्प आजही भरलेला आहे. या प्रकल्पांमध्ये 273.73 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त पाण्याची टक्केवारी 37.56 टक्के इतकी आहे. सध्या पाणीसाठा पुरेसा असला तरी यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाकडून सप्टेंबरपर्यंत पाणीसाठा पुरेल याची खबरदारी घेतली जात आहे. पाणीसाठा आरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. र्गींवर्षीपेक्षा पाणी अधिक असले तरी नियोजनावर भर दिला जात आहे.
फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, धाराशिवचा दहावीचा निकाल 100 टक्के
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नामांकित आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने आपल्या यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शाळेच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदाकडून कौतुक करण्यात आले . तर या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी आणि उपप्राचार्या जेकब मॅम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कष्टाला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील प्रशासकीय अधिकारी सौ.मंजुळा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ड्रग्ज माफियांचे कर्दनकाळ ‘समिर वानखेडे लाईव्ह-शो’चे कुडाळात 23 रोजी आयोजन बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, दै. तरुण भारत संवाद आणि साई जळवी फिल्म्सचे संयुक्त आयोजन त. भा. प्रतिनिधी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काळात ड्रग्सचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. तरुण पिढीपर्यंत पोहोचलेले हे जाळे किती [...]
Photo –बिग बॉसच्या फिनालेनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आली रेवा कौरासे
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनच्या फिनालेच्या एक आठवडा आधी घराबाहेर पडलेली अभिनेत्री रेवा कौरासे हिने नुकतेच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर तिने मंदिरातले तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रेवा कौरासे, संस्कृती आणि संकेत पाठक या तिघांनी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती.
IPL 2026 –चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, आयुष म्हात्रे आयपीएलमधून बाहेर
इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम रंगात आलेला असताना पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला चेन्नईचा युवा खेळाडू आयुष म्हात्रे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लढतीत त्याच्या डाव्या पायाच्या स्नायुंना गंभीर दुखापत झाली होती. Official Announcement Ayush Mhatre has been ruled out of the remainder of IPL […]
Mumbai News –पैशांच्या वादातून नागपाड्यात धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या; आरोपीला अटक
पैशांच्या वादातून मुंबईतील नागपाडा परिसरात वृद्ध नागरिकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद इक्बाल इब्राहिम सेलीया असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीने केलेल्या फिर्यादीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सादिक आकिब जवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नागपाड्यातील […]
शरद पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली. पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. चिंतेचे कोणतेही […]
Solapur Accident News |सोलापुरात बोर्ड लावताना भीषण अपघात! कंटेनरवरून पडून २० वर्षीय तरुण गंभीर जखमी
सोलापुरात बोर्ड लावताना तरुण पडून जखमी सोलापूर : शहरातील ऐश्वर्या हॉटेलसमोर कंटेनरला बोर्ड लावत असताना तोल जाऊन पडून तरूण जखमी झाला. अन्वर राजू शेख (बय २०, रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. १८ एप्रिल रोजी रात्री [...]
फार्मर आयडी शिवाय खत मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय सोलापूर – केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही, असे धोरण प्रशासनाकडून घेण्यात आले [...]
CSMT स्थानकाजवळ एकाच ट्रॅकवर दोन लोकल, ‘मरे’चा सावळा गोंधळ सुरूच; प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेचा सावळा गोंधळ सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ दोन लोकल एकाच ट्रॅकवर आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सीएसएमटीच्या दिशेने निघालेली जलद मार्गावरील लोकल आणि स्थानकावर थांबलेली लोकल समोरासमोर आली. ही घटना साधारण सव्वा तीनच्या सुमारास घडल्याची माहिती मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने दिली. सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचा डबा […]
सोलापुरात घरगुती गॅससाठी पाईपलाईन योजना वेगात सोलापूर -आखाती देशातील युद्धामुळे गॅस बितरणाबर परिणाम झाला. त्यामुळे याचा फटका वेशाला बसला. घरगुती गॅस बितरणात अधिक सुलभता निर्माण व्हावी व भविष्यात गॅराची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सोलापुरातील घरगुती ग्राहकांना पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचा [...]
तीर्थक्षेत्र तुळजापुरात गढूळ पाणी वितरण
तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्या पार्श्वभूमीवर - अक्षय तृतीया दिनापासुन शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांसह भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. स्थानिक नागरिकांनाही गढूळ पाण्यामुळे त्रास सहन करावा लागला. गढूळ पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्गजन्य रोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही शहरात गढूळ पाणीपुरवठा झाल्यानंतर नगरपरिषदेकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा त्याच समस्या उद्भवल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात टाक्या स्वच्छ करूनही गढूळ पाणी येत असल्याने तुरटीसह शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी दर्जेदार रसायनांचा वापर करून पाणी शुद्ध करावे, अशी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत गढूळ पाणीपुरवठा सुरूच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
टर्फ ग्राउंड पहिल्याच अवकाळी पावसात पाण्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर खुर्द येथील नगरपालिकेच्या वतीने सुमारे 1 कोटी 60 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले मल्टिपर्पज टर्फ ग्राउंड पहिल्याच अवकाळी पावसात अक्षरशः पाण्यात गेले असून, या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ग्राउंडवरील कृत्रिम गवत (टर्फ) उखडले गेले असून अनेक ठिकाणी पृष्ठभाग पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. तसेच, मैदानाभोवती उभारलेली सुरक्षा जाळी तुटली असून काही लोखंडी संरचनाही वाकल्या किंवा कोसळल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात आलेले ग्राउंड इतक्या लवकर खराब होणे हे धक्कादायक असून कामाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य अँकरिंग, मजबूत बेस आणि दर्जेदार साहित्याचा वापर न झाल्यास अशा प्रकारचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी व ग्राउंडची दुरुस्ती करून खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दिव्यांगाचे दोन महिन्यापासून थकलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने भुम तहसीलदार जयवंतराव पाटील भूम यांच्या मार्फत दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरम्यान अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. परंतु दोन महिने झाले दिव्यांगाच्या खात्यावर पैसे जमा नसल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी तत्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, राज्य समन्वयक रामहरी चव्हाण, बापूसाहेब मुळे, विश्वनाथ माळी, दादासाहेब डंमरे, हनुमंत बोराडे,फयाज बेग,भाग्यश्री क्षिरसागर,रतन जाधव, सिंधूबाई टाळके, वैभव शेळवणे, शिवाजी शेटे, उत्तम बोटे, संतोष बोंद्रे, रमेश साठे, औदुंबर भारती, सुग्रीव शेटे समाधान भोरे, रत्नदिप चव्हाण,सागर झोंबाडे उपस्थित होते.
नागावमध्ये शेतात तरुणाचा मृतदेह आढळला नागाव – ता.हातकणंगले येथील आंबेडकर नगर- नागाव मुख्य रस्त्यालगत काकासो समडोळे यांच्या शेतामध्ये घुणकी येथील युवकाचा मृतदेह रविवारी रात्री निदर्शनास आला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बंडू केरबा वड्ड ,वय ३९ , रा. डाळे गल्ली, [...]
काटगाव जनता दरबार वादाच्या भोवऱ्यात; तक्रारींचा पाऊस
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील पंचायत समितीच्या पुढाकारातून काटगाव गणात आयोजित करण्यात आलेला जनता दरबार हा प्रश्न सोडवण्याऐवजी वादाचा विषय ठरला आहे. सभापतींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दरबारात ग्रामस्थांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. मात्र तक्रारीचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती माळी, बालाजी शिंदे, विजय शिंगाडे, पंडित जोकार, वसंत वाडगावे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी पाणी, घरकुल, शेती, जलसंधारण अशा विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने “जनता दरबार फक्त नावालाच आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. केंद्र व राज्य स्तरावर महिला सन्मान, महिला प्रतिनिधित्व यावर भर दिला जात असताना, निवडून आलेल्या महिला पंचायत समिती सदस्यां भाग्यश्री नागनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चर्चेत आला. यामुळे “महिलांना संधी देऊनही त्या उपस्थित राहत नसतील, तर ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय मिळणार कसा?” अशी टीका होत आहे. दरबारात अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला.
तुळजापूर (प्रतिनिधी)- समृद्ध परंपरा, कष्टाळू माणसं आणि विकासाची उर्मी असलेल्या धाराशिव जिल्ह्यात आज हरित ऊर्जेचा नवा अध्याय आकार घेत आहे. धाराशिव प्रकल्प अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या पवनचक्क्या आता कार्यरत होत असून एक हरित क्रांतीचा नवा अध्याय सुरु होत आहे. या परिवर्तनाच्या प्रवासात सेरेंटिका रिन्यूएबल्स ने केवळ पवनऊर्जा प्रकल्प उभारला नाही, तर स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि शेतकरी यांना सोबत घेत विकासाचा एक मजबूत आणि विश्वासार्ह आदर्श निर्माण केला आहे. सेरेंटिका रिन्यूएबल्स चे स्पष्ट ध्येय आहे लोकांची सेवा करणे, समुदायांना बळकट करणे आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणे. कंपनी उभारत असलेला प्रत्येक प्रकल्प हा केवळ अभियांत्रिकी कर्तृत्व नसून विकास, सुलभता आणि सन्मान यांचा मिलाप आहे. सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि पारदर्शक कार्यपद्धती हीच त्यांच्या कामाची ओळख आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी, भुम आणि कळंब तालुक्यांमध्ये हरित ऊर्जा निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम करत, सेरेंटिका रिन्यूएबल्स ने 5 बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. प्रकल्पाच्या नियोजनापासून ते अंतिम कार्यान्वयनापर्यंत, समुदायाचे कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि संवाद यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारून राष्ट्राला ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढ्यांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याचा कंपनीचा निर्धार आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही आव्हाने समोर आली काही ठिकाणी साहित्य चोरीच्या घटना, खंडणीच्या मागण्या, आणि प्रकल्पासंदर्भात निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे आंदोलनांची परिस्थिती. अशा प्रसंगांनी प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, कंपनीने या परिस्थितीकडे संघर्ष म्हणून नाही, तर संवादाची संधी म्हणून पाहिलं. सेरेंटिका रिन्यूएबल्स चा ठाम विश्वास आहे की, खऱ्या प्रगतीचा अर्थ केवळ पायाभूत सुविधा उभारणे नसून जीवनमान उंचावणे, समुदाय मजबूत करणे आणि अधिक समृद्ध, समावेशक व शाश्वत भारताच्या निर्मितीत योगदान देणे हा आहे. या संपूर्ण प्रवासात स्थानिक लोकांचा सहभाग हा सर्वात मोठा बळ ठरला. प्रशासन, ग्रामस्थ आणि कंपनी यांच्यातील समन्वयामुळे अडचणींवर मात करत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मदत झाली. आज धाराशिवच्या माळरानावर उभ्या असलेल्या पवनचक्क्या केवळ वाऱ्यावर फिरत नाहीत त्या फिरत आहेत विकास, विश्वास, सहकार्य आणि जिद्दीच्या बळावर. प्रत्येक फिरणारं पात म्हणजे प्रगतीच्या दिशेने टाकलेलं एक ठाम पाऊल आहे. “आव्हाने प्रत्येक प्रकल्पात असतात, पण धाराशिवमध्ये आम्हाला लोकांचा जो पाठिंबा मिळाला, त्याने प्रत्येक अडथळा पार करणे शक्य झाले. हा प्रवास आमच्यासाठी खूप खास आहे.” असे कंपनीचे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण ह्यांनी सांगितले.ही कथा केवळ एका कंपनीच्या यशाची नाही, तर सकारात्मक दृष्टिकोन, संवाद आणि सामूहिक प्रयत्नांची आहे. धाराशिव आज हरित ऊर्जेच्या माध्यमातून विकासाच्या नव्या उंचीवर झेप घेत आहे. अशी हि हरित क्रांती धाराशिवला जगाच्या पाठीवर एक अनोखी ओळख निर्माण करून देईल आणि ह्याचा सार्थ अभिमान प्रत्येक धाराशिवकरला असेल. या संपूर्ण प्रवासाची खरी ओळख एकाच वाक्यात अन विकासाचं पात फिरलं!
समग्र शिक्षा अभियान या योजनेची धाराशिव तालुकास्तरीय जणसुनावणी संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मार्फत दिनांक 09 मार्च ते 07 एप्रिल या कालावधीत धाराशिव तालुक्यातील एकूण- 225 शाळांचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सोसायटी कडून नियुक्त करण्यात आलेल्या साधन व्यक्ती मार्फत प्रत्येक शाळेत जाऊन समग्र शिक्षा संदर्भात असणारे सर्व अभिलेख्यांची पडताळणी केली तसेच तेथे भौतिक सुविधाची पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी पुरेसे फर्निचर , मुलींसाठी पुरेशी वेगळी शौचालये, शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, विद्युत उपकरणे, खेळाचे मैदान, शाळेची इमारत सीमा भिंत किंवा कुंपण द्वारे सुरक्षित, खेळ आणि क्रीडा उपकरणे, शिक्षण साहित्य, डिजिटल पायाभूत सुविधा, औषध पेटी/प्रथमोपचार संच, पाहणी करण्यात आली. त्यांचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती च्या बैठकीमध्ये त्या अहवालाचे वाचन करण्यात आले. अंकेक्षण प्रक्रियेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर दिनांक 20 एप्रिल रोजी कन्या प्रशाला धाराशिव येथे जणसुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीत सर्व 225 मुद्द्याचे वाचन करून त्यावर पॅनलने योग्य असे निर्णय दिले. यामध्ये गटशिक्षण अधिकारी आसरार, सामाजिक संस्था प्रतिनिधी लोमटे, बचत गट प्रतिनिधी धायगुडे मॅडम, तसेच जिल्हा साधन व्यक्ती सुशील थोरात यांनी कामकाज पहिले. या सुनावणीसाठी गटशिक्षणाधिकारी संबंधित केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व नितीन इंगळे, खंडू आल्ठे, शरद पवार, इतर साधन व्यक्ती उपस्थित होते.
परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा
धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश काकडे हे बुधवार 15 एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून खाजगी वाहनाने बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) व अन्य एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. यावेळी संबंधितांनी मोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाहनाच्या काचांवर जोरजोरात मारत तहसीलदारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. चांदणी नदीकडे जात असताना देखील संबंधितांनी गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. ‘मी दिलेल्या निवेदनावर कारवाई का केली नाही?’ असा जाब विचारत त्यांनी हुज्जत घालत तत्काळ कारवाई न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदारांकडे विविध विषयांवरील निवेदने नियमित येत असतात. संबंधित विषयानुसार ती निवेदने संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची प्रशासकीय पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारे असंविधानिक मार्गाचा अवलंब करत तालुका दंडाधिकाऱ्याला धमकावणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार उपाध्यक्ष संतोष पाटील, नायब तहसीलदार महिला प्रतिनिधी विशाखा बलकवडे, नायब तहसीलदार, सचिव सचिन पाटील नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष महादेव शिंदे नायब तहसिलदार, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, रणजितसिंह कोळेकर, जयवंत पाटील, हेमंत ढोकले, निलेश काकडे, दत्तात्रय गायकवाड व नायब तहसीलदार स्वामी जी. एस. , आर. एल. बंगाळे, पूजा गोरे, प्रियंका लोखंडे, विजयकुमार बाडकर, आदींच्या सह्या आहेत.
वाढत्या तापमानामुळे मेगा एल निनोची धास्ती; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
यंदाचे तापमानवाढीचे वर्ष असून एल निनोचा परिणामही दिसणार आहे. त्यामुळे या वर्षी पर्जन्यमान सरासारीपेक्षा कमी राहणार आहे. तसेच या वर्षीचा उन्हाळा अतितीव्र असण्याची शक्यता आहे. त्यातच एलनिनोबाबत तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. १८७७ नंतरची सर्वात शक्तिशाली म्हणजेच मेगाएल निनोची प्रक्रिया होत आहे. 1877 चा मेगा एल निनोच्या परिणामामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि साथीचे रोग […]
साताऱ्यात दुचाकी घसरून अपघात सातारा : शिरढोण येथून साताराशहराकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सयाजी मारूती धनवे (रा. शिरढोण, ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याची फिर्याद पुतण्या यश संभाजी धनवे (वय २२) यानेशहर पोलिसांत दिली आहे. याबाबत मिळालेल्या [...]
मोगर्यांच्या दरवळात लईराईच्या भक्तांचा मेळा
जत्रोत्सवासाठी शिरगावसह राज्यभरातील धोंडगण सज्ज: चौगुले धोंडगणांसह सर्व धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात रविराज च्यारी/डिचोली बहिणी-भावाच्या वादातून आपल्याला उच्चारलेल्या अपशब्दामुळे रागावलेली लहान बहीण म्हणजे देवी श्री लईराईने आपल्या भावंडांसमोर केलेला अग्निदिव्य करण्याचा ‘पण’ देवी आज पूर्ण करणार आहे. गोव्यातील आगळावेगळा श्रद्धेने भारलेला हा भव्यदिव्य जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून सर्वत्र उत्साह आणि चैतन्य पसरले [...]
ढेबेवाडी मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कराड : ढेबेवाडी मार्गावर वाहतूकवळवण्यात आलेल्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर घहक होऊन रिक्षाचालकासह दोन महिला व एक लहान मुलगी जखमी झाली. यामध्ये रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार [...]
गौतम खट्टरविरुद्ध राज्यभरात तक्रारी
माफी मागण्याची, अटक करण्याची मागणी : गोव्यात येण्यावरही बंदी घालावी : मंत्री, आमदार, आयोजकांकडून खेद व्यक्त वास्को : वास्कोतील टिळक मैदानावर भगवान परशुराम जन्मोत्सवात सेंट फ्रांसिस झेवियर यांची निंदा करण्याच्या प्रकरणाचे वास्कोसह संपूर्ण गोव्यात पडसाद उमटले. काल सोमवारी काही ख्रिश्चन बांधवांनी वास्कोत मोर्चा काढून पोलिसस्थानकात जमाव केला. निंदा करणाऱ्या गौतम खट्टर यांच्याविरुद्ध वास्कोत सहा तक्रारी [...]
राज्यात विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय सातारा : राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनकरित्या बाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच शहरी भागातील पोलीस आयुक्त [...]
चित्ररथ मिरवणुकीतून साकारणार सजीव देखावे : मंडळांकडून तयारीला वेग बेळगाव : बेळगावमधील शिवजयंतीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि. 21 रोजी शिवजयंती निमित्ताने भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सजीव देखावे, ढोल-ताशांचा गजर, ध्वजपथकांची सलामी, मर्दानी खेळांचे शौर्य शिवभक्तांना अनुभवता येणार आहे. यासाठी शिवजयंती उत्सव मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी रात्रभर शिवसृष्टी अवतरल्याची [...]
Latur News –औराद शहाजानीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी; शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू
निलंगा तालुक्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून औराद शहाजानी येथे उष्माघाताने एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे या मृत शेतकर्याचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. शेतात काम करताना ही दुर्दैवी घटना घडली. निलंगा तालुक्यासह औराद शहाजनी […]
आजच्या मिरवणुकीसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त
परजिल्ह्यांतून आलेल्या अधिकारी-पोलिसांना पोलीस परेड मैदानावर मार्गदर्शन बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातून आलेल्या अधिकारी व पोलिसांना सोमवारी पोलीस परेड मैदानावर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आदी अधिकाऱ्यांनी बंदोबस्तासाठी आलेल्या अधिकारी व पोलिसांना मार्गदर्शन [...]
शिवजयंती मिरवणुकीनिमित्त आज शहरातील वाहतूक मार्गात बदल
बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 21 एप्रिलपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी सुचवले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, कॉलेज रोड, पिंपळकट्टा आदी मार्गावरून येणारे चित्ररथ मुख्य मिरवणुकीत येतात. नरगुंदकर भावे चौक, मारुती [...]
तुरमुरी कचरा डेपोची समस्या सुटणार कधी?
करार संपण्यास दोन वर्षे शिल्लक, मात्र अद्याप पर्यायी जागेची निश्चिती नाही बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेला कचरा विल्हेवाट व्यवस्थापनात येत असलेल्या अपयशामुळे बेळगावकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुरमुरी गावातील घनकचरा प्रकल्पाचा 20 वर्षांचा भाडेकरार 2028 मध्ये संपणार आहे. याची जाणीव असूनही महानगरपालिकेकडून पर्यायी जागा शोधून दुसऱ्या कंपनीला भाडेकरार देण्याबाबत [...]
Mumbai News –मुंबई विमानतळावरील विमानसेवा 6 तासांसाठी स्थगित राहणार
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा सहा तासांसाठी स्थगित करण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 7 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या पूर्णपणे बंद राहतील. लोकमत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी 9/27 आणि 14/32 या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. धावपट्टीच्या पृष्ठभागाची झीज तपासण्यासाठी एक विशेष पथक […]
महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा भाजपचा डाव विरोधकांनी उधळून लावला. त्यानंतर विरोधक महिला विरोधी असल्याची आगपाखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याचा आता काँग्रेसने खरपूस समचार घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी नरेंद्र मोदी यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2017 मध्ये लिहिलेल्या पत्राची आठवण करून दिली. महिला आरक्षणाच्या मागणीवर मोदी […]
मार्ग बदला किंवा माघारी फिरा; इराणच्या नाकेबंदीमुळे अमेरिकेने 27 जहाजे परत पाठवली
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या सागरी मार्गांवरील नाकेबंदीचा भाग म्हणून अनेक जहाजे अडवली आहेत. या जहाजांना मार्ग बदलण्याचे किंवा मागे फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नाकेबंदीचाच एक भाग म्हणून, अरबी समुद्रातील ‘यूएसएस त्रिपोली’ या जहाजावर तैनात असलेल्या नौसैनिकांनी ‘तुस्का’ या इराणी मालवाहू जहाजावर चढून ते ताब्यात घेतले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) म्हटले आहे की, गेल्या […]
महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा भारतीय जनता पक्षाचा डाव होता. हा डाव विरोधकांनी उधळून लावला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत केला. यावेळी त्यांनी एक सादरीकरणही केले. यात त्यांनी 2023 मध्ये मंजूर करण्यात आलेला नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण कायदा) याबाबतही माहिती दिली. तसेच […]
रानमेवा गोळा करत असताना बिबट्याचा हल्ला; 8 वर्षीय बालकाचा मृत्यू
कसाराजवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाद्याची वाडी येथील कृष्णा भागा आगीवले असे मृत बालकाचे नाव आहे. झाडावरील आंबे वा करवंदे गोळा करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर झडप घातली. या झटापटीत फरपटत नेलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण […]
आष्टा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; मेंढी ठार आष्टाः बाळबा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात बिबट्याचा बाबर पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, रबिबारी रात्री विवट्याने केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली आहे. या घटनेमुळे धनगर मला परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. तांदुळवाडी येथील धनगर मळा [...]
विशाल पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल सांगली : महिला आरक्षणविधेयकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर थेट “योजनाबद्ध षडयंत्र” रचल्याचा गंभीर आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपला थेट आव्हान देत, ५४३ सदस्यसंख्येवर तात्काळ महिला आरक्षण [...]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय रुग्णांसाठी आधार सांगली : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षात २००८ रुग्णांना सुमारे १४ कोटी ४० लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत [...]
सर्व समुदायाला घेऊन वाटचाल करणे गरजेचे
मंत्री जारकीहोळींनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया बेळगाव : पक्षाने सर्व समुदायाला घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदाय काँग्रेस पक्षाचा मजबूत पाया असून त्यांना योग्य न्याय व प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, असे आपले मत असल्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. शहरात सोमवारी माध्यमांसमोर ते बोलत होते. बेंगळूरमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची [...]
सुवर्णविधानसौधजवळ तिहेरी अपघात
दोघांचा बळी, अन्य दोघे जखमी बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्णविधानसौधजवळ झालेल्या तिहेरी अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. रविवारी ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. अभिषेक सोमचंद्र रायकर (वय 25) राहणार पाटील गल्ली, खासबाग, आसिफ मौलासाब हेब्बळ्ळी (वय 29) राहणार वीरापूर, ता. [...]
मिरजमध्ये झुंडशाहीचा कहर; दोघांना बेदम मारहाण मिरज – मिरज शहरातील कमानवेस आणि मिरज जंक्शन परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जमावाने झुंडशाही करत दोघांना अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली. कमानवेस येथे रविवारी रात्री उदय माने या तरुणाचा पाठलाग करुन जमावाने कोयत्याने [...]
वनविभागाकडून ट्रेकिंगसाठी एसओपी जारी
टेकर्सच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना : सरकारच्या नियमानुसार करावे लागणार ट्रेकिंग बेळगाव : राज्यातील वन क्षेत्रांमध्ये वाढत्या गिर्यारोहण (टेकिंग) उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर टेकर्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अलीकडच्या काळात विविध टेकिंग मार्गांवर घडलेले अपघात आणि बेपत्ता होण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनमंत्री ईश्वर खंडे यांनी टेकिंगसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर [...]
वडगावमध्ये चित्ररथ मिरवणुकीला तुफान प्रतिसाद : सर्वच मंडळांचा देखाव्यांवर भर
बेळगाव : वडगावमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सोमवारी रात्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग हुबेहूब सादर करण्यात आले. त्यामुळे चित्ररथांनी शिवभक्तांचे डोळे दिपवून टाकले. मध्यरात्रीपर्यंत वडगावमधील गल्ल्या शिवभक्तांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र दिसून आले. बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या एक दिवस आधी वडगावमध्ये चित्ररथ मिरवणूक काढली जाते. [...]
कोल्हापुरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा कोल्हापूर – बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब बाहिनीचे कामामुळे सोमवारी बालिंगा जल उपसा केंद्रावरुन पाणी उपसा झाला नाही. परिणामी, शहरातील काही उंच भागात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. महापालिका प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नाही. [...]
शिवभक्तांसाठी मेकॅनिक असोसिएशन सरसावले
बेळगाव : बेळगावमध्ये होणारी पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, तसेच कर्नाटकातील अनेक शिवभक्त येतात. यावेळी त्यांच्या दुचाकी नादुरुस्त होऊन समस्या निर्माण होत असतात. यासाठी बेळगाव स्कूटर अॅण्ड मोटार मेकॅनिक ओनर्स असोसिएशन पुढे आली आहे. कोणतीही नादुरुस्त झालेली दुचाकी दुरुस्तीची सेवा विनामूल्य करून दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. दरवर्षी हजारो भाविक चित्ररथ मिरवणूक [...]
चव्हाट गल्ली मंडळाकडून संयुक्त महाराष्ट्र चौकात सादर केला जाणार देखावा
शिवभक्तांच्या सोयीसाठी मंडळाचा निर्णय बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत चित्ररथ सर्वांना पाहता यावा यासाठी चव्हाट गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळाने यावर्षी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे भव्य मंडप उभारून या ठिकाणी सजीव देखावा सादर केला जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शिवभक्तांनी हा चित्ररथ देखावा पाहावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे यांनी केले [...]
जिल्हा प्रशासनातर्फे जगद्गुरु बसवेश्वर जयंती
बेळगाव : शहरात जगद्गुरु बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका, कन्नड व संस्कृती विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते विश्वगुरु बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगद्गुरु बसवेश्वर यांच्या विचारांचा आणि त्यांच्या समाजसुधारणेतील योगदानाचा गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी [...]
Jaysingrao Pawar |आमदार रोहित पवारांनी घेतली डॉ. जयसिंगराव पवारांच्या परिवाराची भेट
रोहित पवार यांची डॉ. जयसिंगराव पवार कुटुंबीयांना भेट कोल्हापूर – ज्येष्ठ इतिहासकारडॉ. जयसिंगराव पवार यांचे २६ मार्च रोजी कोल्हापुरात निधन झाले. आमदार रोहित पवार यांनी सोमवारी कोल्हापूर दौरा करत डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी डॉ. पवार यांच्या [...]
संत बसवेश्वरांचे साहित्य मानवतेचा संदेश देणारे : किरण जाधव
बेळगाव : संत बसवेश्वरांचे साहित्य मानवतेचा संदेश देणारे असल्याने त्यांच्या विचारांचे अनुसरण गरजेचे असल्याचे मत सकल मराठा समाजाचे नेते व भाजपचे युवा नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले. बसव जयंतीचे औचित्य साधून किरण जाधव गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानातील बसवश्वरांच्या पुतळ्याचे पूजन करून बोलत होते. जगद्ज्योती बसवेश्वरांनी भक्ती आणि विचारांच्या माध्यमातून समाजाला मानवतेचा, समतेचा संदेश दिला. [...]
वरिष्ठांना न कळवता दांडी मारणाऱ्याला कामावरुन काढणे योग्य; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना न कळवता गैरहजर राहणे आता चांगलेच महागात पडणार आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अर्थात कार्यालयात कोणतीही पूर्वसूचना न देता दीर्घकाळ कामावर गैरहजर राहणे हा गंभीर गैरप्रकार आहे. अशा प्रकरणांत संबंधित कर्मचाऱ्याला शिस्तभंगाची कारवाई म्हणून कामावरुन काढणेच योग्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ सहाय्यक महिलेची याचिका फेटाळून […]
जगद्गुरु बसवेश्वरांमुळे समाजाला नवी दिशा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी : महांतेशनगरमध्ये बसव जयंती कार्यक्रम बेळगाव : जगद्गुरु बसवेश्वर यांचे आदर्श व विचार हे आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. ते केवळ एका धर्माचे संस्थापक नव्हते तर ते एक क्रांतिकारी विचारवंत होते. विश्वगुरु बसवेश्वरांनी 12 व्या शतकातच समाजातील अंधश्र्रद्धा, अन्याय व विषमता याविरोधात लढा उभारला. समानतेचा संदेश देत त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. आजच्या [...]
<< गोपाळ पवार आदिवासीबहुल तालुका असलेल्या मुरबाडमध्ये ऐन वैशाख वणव्यात 54 गावपाड्यांमध्ये ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचे तीनतेरा वाजल्याने हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनींना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. मुरबाडमधील 22 गावे व 34 पाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत असून जलजीवन मिशन योजनेंतर्गत 40 योजना पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या योजनेची […]
आखाती देशात शांततेचे संकेत; शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स, निफ्टीने घेतली उसळी
अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्याआधी दोन्ही देशात शांतता चर्चेची दुसरी फेरी होत आहे. त्यामुळे आखाती देशात शांतता प्रस्थापित होण्याचे संकेत मिळत आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात मिळणारे हे संकेत आणि जागतिक शेअर बाजारातील तेजी यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारानेही चांगली उसळी घेतली आहे. आखाती देशात शांतता प्रस्थापित होण्याच्या शक्यतेने मंगळवारी शेअर बाजारात तेजी […]
भरधाव वाहनांमुळे काँग्रेस रोडवर गतिरोधकांची मागणी
अपघातांमध्ये वाढ झाल्याने टिळकवाडीतील नागरिक त्रस्त : मनपानेही लक्ष देण्याची गरज बेळगाव : काँग्रेस रोडवर भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत आहेत. यामुळे टिळकवाडीच्या स्वामी विवेकानंद कॉलनी, मराठा कॉलनी या परिसरातून काँग्रेस रोडवर जाणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे या परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधकामुळे वाहनांचा वेग कमी होईल. त्यामुळे टिळकवाडी येथील नागरिकांना ये-जा [...]
केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कायदेशीर कारवाई
प्रसिद्ध ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, आता मंदिर परिसरात मोबाईल फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मंदिराची पवित्रता, आध्यात्मिक शांतता आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय विचारात घेऊन मंदिर समितीने हे पाऊल उचलले आहे. मंदिर समितीचे सदस्य विनीत पोस्ती यांनी या संदर्भात माहिती दिली. At the Kedarnath Temple, […]
कणबर्गी येथे विकासकामांचे भूमिपूजन
बेळगाव : कणबर्गी येथील मदकरी नायक चौक परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्ते आणि गटार विकासकामांचे भूमिपूजन आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरात दर्जेदार रस्त्यांची उभारणी तसेच मजबूत गटार व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. यामुळे स्वच्छतेत सुधारणा होणार असून नागरिकांच्या दैनंदिन हालचाली सुलभ होणार आहेत. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येलाही आळा बसणार आहे. [...]
पालघरमध्ये पाणीटंचाई, कुपोषण, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, प्रदूषण यासह अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला असून 18 मे रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा या तालुक्यातील हजारो शिवसैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध समस्या […]
खानापूर पोलीस निरीक्षकांच्या सखोल चौकशीची ब्लॉक काँग्रेसची मागणी
खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लालसाब गवंडी यांचे वर्तन तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासारखे नसून रौडी शिटर तसेच गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचा पोलीस ठाण्यात वावर वाढला असून यांचीच उठ-बस पोलीस ठाण्यात असल्याने पोलीस आणि रौडी शिटर लोकांचे साटेलोटे आहे. का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अंगडी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा [...]
वसईत सुसाट कार विहिरीत कोसळली, कारचालकाचे नियंत्रण सुटले
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे भरधाव वेगात जाणारी कार विहिरीत पडून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी नालासोपाऱ्याच्या वालईपाडा येथील विहिरीत सुसाट सॅण्ट्रो कार कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. विहिरीत पाणी नसल्यामुळे दोघेजण बालबाल बचावले. या अपघातात कारचालकासह दोघेही जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. नालासोपारा पूर्वेच्या वालईपाडा […]
शाहरुख खानच्या ‘किंग’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले इतके कोटी
बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुक आहेत. ‘जवान’च्या प्रचंड यशानंतर, किंग खान पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. ४०० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २०२६ च्या ख्रिसमस वीकेंडमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘किंग’बद्दलची उत्सुकता इतकी आहे की, पाच महिन्यांपूर्वी त्याच्या टायटल रिव्हिल व्हिडिओला यूट्यूबवर ४४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते आणि […]
एकसंबा आंबेडकर नगरातील गटारींची समस्या मार्गी लावा
रहिवाशांची एकसंबा नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी बेळगाव : आंबेडकरनगर, यादनवाडी, एकसंबा (ता. चिकोडी) येथे गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत जात आहे. परिणामी डास, माशांची पैदास वाढली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने गटारींचे काम हाती घेऊन समस्या मार्गी लावाव्यात, अशा मागणीचे निवेदन रहिवाशांनी एकसंबा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. आंबेडकरनगर येथे गटारी नसल्याने रहिवाशांना [...]
कॅनडामध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या कार्तिक वासुदेव याच्यासह अन्य एकाची 2022 मध्ये गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी रिचर्ड एडविन याला न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी टोरंटो न्यायालयाने हा निर्णय दिला. यामुळे चार वर्षानंतर कार्तिकच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. मूळचा गाझियाबादचा असलेला कार्तिक वासुदेव जानेवारी 2022 […]
ट्रॅक्टरला रोजगार…आदिवासी बेरोजगार, माळशेजजवळील 33 आदिवासी पाड्यांना पोटासाठी सोडावे लागते गाव
उन्हाळ्यात रोजगारापासून कुणी वंचित राहू नये यासाठी वन, कृषी, सामाजिक वनीकरण विभागाकडून मुरबाड तालुक्यात आदिवासी, शेतमजूर, गोरगरीबांना रोजगार दिला जातो. यावर्षी मात्र ही कामे ट्रॅक्टर तसेच अन्य यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सुरू आहेत. ‘ट्रॅक्टरला रोजगार आणि आदिवासी बेरोजगार’ अशी स्थिती तालुक्यात आहे. मजुरांच्या व्यथेकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने माळशेज परिसरातील 33 आदिवासी पाड्यातील कुटुंबांना पोटासाठी गाव सोडून […]
Chandrapur News –चौथीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू, ब्रह्मपुरीच्या देलनवाडी येथील घटना
शाळेची तयारी करत असतानाच चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली. ईशान सत्यपाल आत्राम असे मयत मुलाचे नाव असून तो ब्रम्हपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ईशान आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला. अंघोळ आटोपून तो शाळेची तयारी करत असतानाच […]
Kolhapur SP |मोठी बातमी : आता नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक
नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक कोल्हापूर -राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना पदोन्नती देत गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक पदावर नियुक्त [...]
>> विजय जोशी नांदेड-निसर्गाचा लहरीपणा आणि आभाळाची अवकृपा याचा दुर्दैवी संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला असून, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर पावसाने अक्षरशः नांगर फिरवला आहे. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह तुटून पडलेल्या अवकाळी पावसाने शिवारातील वाळत घातलेली हळद भिजवून चिंब केली असून, ताडपत्रीवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. नांदेड […]
शिरसी येथे आयुर्वेदिक डॉक्टरचा भीषण खून
12 तासातच मारेकरी ताब्यात : डॉक्टराच्या घरातून लुटलेली रोख रक्कम-सोन्याचे दागिने जप्त कारवार : लग्नाच्या अगोदर एक दिवस आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या नवरदेवाचा भीषण खून करण्यात आल्याची घटना शिरसी येथील के.एच.बी. कॉलनीच्या नवव्या क्रॉसवर घडली आहे. खून झालेल्या डॉक्टराचे नाव रमेश फकीरप्पा कलगुटकर (वय 52) असे आहे. या घटनेने शिरसी नगरात खळबळ माजली आहे. समाधानाची बाब [...]
राज्यात ५६ हजार ६२१ हेक्टर जमीन क्षारपड
बेळगाव जिल्ह्यात 1271 हेक्टर जमीन नापिक : केंद्र-राज्य सरकारने उपाययोजना करण्याची गरज बेळगाव : राज्यात यंदा वेळेवर पाऊस पडून तलाव व जलसाठे भरले असले तरी जमिनीची सुपिकता घटल्यामुळे क्षारपड जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी येत्याकाळात कृषी उत्पादन घटण्याची शक्मयता व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी [...]
ठाणे पालिकेत शिंदे गटाविरोधात भाजपच्या नारीशक्तीची घोषणाबाजी, महिला नगरसेवकांची निदर्शने
ठाणे पालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या भाजप, शिंदे गटामधील धुसफूस काही कमी होताना दिसत नाही. पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी नामंजूर झालेल्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकावरून सभा तहकूब करण्याची मागणी केली होती. मात्र सभा तहकूब करण्यास नकार दिल्याने शिंदे गटाविरोधात भाजपच्या महिला नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत सभागृहाबाहेर निदर्शने केली. तसेच […]
मनरेगा कामगारांसाठी कामाच्या वेळेत बदलाची मागणी
उष्णतेचा तडाखा वाढला : घोषणा न झाल्याने कामगारांमध्ये असंतोष, उपाययोजना करण्याची आवश्यकता बेळगाव : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे मजुरांचे हाल होत आहेत. यामुळे मनरेगा अंतर्गत कामाच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. यावषी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने उष्णतेत काम करणाऱ्या मजुरांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. 2020 ते 2024 या कालावधीत प्रशासनाने [...]
उल्हासनगर महापालिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची रक्कम थकवलेली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन सुरू केले आहे. महिन्याला दोन हजार रुपयांची भीक नको तर मरण्यापूर्वी एकरकमी थकबाकी द्या, अशी मागणी आंदोलकांची आहे. थकबाकी, निवृत्ती उपदान व रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी यासाठी उल्हासनगर पालिकेच्या आयुक्त मनीषा […]

29 C