दिल्ली डायरी –झारखंडमध्ये ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’!
>> नीलेश कुलकर्णी ज्या भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री असताना हेमंत सोरेन यांना ईडीकरवी तुरुंगात डांबले तेच हेमंत नजीकच्या भविष्यात भाजपचा ‘तीळगूळ’ खाणार का, असा सवाल सध्या राजधानीत विचारला जात आहे. हल्ली देशात सत्तेची समीकरणे उद्योगपती ठरवतात. त्यात हेमंत यांनी नुकतीच अहमदाबादची वारी केल्याने झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि भाजप यांच्यात ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे […]
विज्ञान रंजन –नववर्षातील कृत्रिम ऊर्जा!
>> विनायक नववर्षाची सुरुवात होऊन आठवडा उलटला आणि ‘विज्ञानरंजन’ लिहिताना गतवर्षी विज्ञानाने काय चांगलं प्राप्त केलं, असा प्रश्न पडला. कारण विज्ञानाचाच आधार घेऊन बनवलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी जग युद्धाच्या खाईकडे कसं लोटलं जातंय आणि जागतिक राजकारणाच्या जंजाळात कसं गुरफटतंय याची चाहूल वर्षारंभीच लागली आहे. कोणी म्हणतं याची परिणती तिसऱया महायुद्धात होईल. तसं झालं तर मात्र तो […]
भिवंडीत दगडफेक; भाजप आमदाराच्या समर्थकांनी केला माजी महापौरांच्या घरावर हल्ला, पोलिसांचा लाठीमार
भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता हाणामारी सुरू केली आहे. भाजप चे स्थानिक आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित यांचा पराभव झाल्याने संतप्त समर्थकांनी आज रात्री उशिरा कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर तुफान हल्ला केला. पाटील यांच्या घरावर दगडफेक करीत त्यांच्या कारच्या काचा देखील फोडल्या. या हल्ल्यात माजी […]
आपण करत असलेल्या कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करण्यातच आपले कसे भले आहे हे आपण समजून घेतले. पुढे भगवंत म्हणतात, प्रत्येकाला पूर्वकर्मानुसार ह्या जन्मीचा स्वभाव प्राप्त झालेला असतो. शिकलेला मनुष्यही त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. त्यामुळे शिक्षणाच्या बळावर त्याने त्याच्या इंद्रियांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला तर ती बळजबरी केल्यासारखे होते. ह्याचा उलटा परिणाम होऊन कोंडून ठेवलेली [...]
प्रमुख गोलंदाज आणि फलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या पाहुण्या न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला. रविवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर झालेल्या निर्णायक लढतील न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 41 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. हिंदुस्थानकडून विराट कोहली याने शतकी (124 धावा) खेळी करत एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा […]
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे आज ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले. नेरूळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार घेत असताना रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन बोरकर हे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय होते. त्यांनी ‘दगडाबाईची चाळ’, ‘मी वसंतराव’ सारख्या प्रसिद्ध मराठी […]
गुजरातमध्ये २०२७ च्या निवडणुकीत सत्तापालट होणार, आप बदल घडवून आणेल –अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अहमदाबादमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, २०२७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल होणार असून, आम आदमी पक्ष हा बदल घडवून आणेल. केजरीवाल म्हणाले, “गुजरातमध्ये गेल्या ३० वर्षांपासून भाजपचे शासन आहे. या काळात राज्याला […]
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, भाजप पदाधिकाऱ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम असे संशयिताचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेऊन गर्भवती केले. पीडित मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […]
मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल येथे ट्रक पलटी होवून अपघात, वाहतूक काही काळ विस्कळीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याने वाहतून काही काळ विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेत ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून साईटला बसलेला एक जण सुखरूप आहे. मात्र, एका किन्नरच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर […]
Tata Mumbai Marathon 2026 –मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाच्या खेळाडूंचे वर्चस्व
जगभरातील धावपटूंना आकर्षण असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ रविवार पार पडली. पहाटेच्या गार वाऱ्यात आणि उत्साहपूर्ण वातावरणात या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या स्पर्धेतइथिओपियाच्या ताडू अबाते डेमे आणि येशी कलायू चेकोले यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21व्या आवृत्तीमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एलिट गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांनी अनुक्रमे 50,000 अमेरिकन डॉलर्स, 25,000 अमेरिकन डॉलर्स […]
चांदीची सुसाट घोडदौड; वर्षभरात सोन्यापेक्षा जास्त परतावा, 3 लाखांचा टप्पा गाठणार
जागतिक अस्थिरतेच्या काळात आता सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढत आहेत. त्यात आता चीनने चांदी निर्यातीवर निर्बंध लादल्याने जगभरात चांदीची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे चांदीने आधीचे सर्व उच्चांक मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता लवकरच चांदी 3 लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चांदीने 9 महिन्यात तब्बल 200 टक्क्यांचा […]
आदर्श परिवाराचे मकर संक्रांत महोत्सवानिमित्त होम मिनीस्टर स्पर्धा दिमाखात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आदर्श परिवाराच्या वतीने मकर संक्रांती महोत्सवा अंतर्गत हळदी कुंकू सोहळ्याचे औचित्य साधत भव्य होम मिनीस्टर स्पर्धेचे आयोजन संस्थेचे सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. मंजुळाताई आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या भव्य मैदानावर आदर्श गाव निर्मित नगरीत संपन्न झाली. प्रसिद्ध निवेदक तथा सादरीकरण करणारे बळवंत जोशी यांच्या जबरदस्त अशा आगळ्यावेगळ्या शैलीत या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पहिले बक्षीस पैठणी ही वर्षा प्रविण मुळे विजेते यांना प्राप्त झाले. तर दुसरे बक्षीस प्रज्ञा चंदनशिवे कुकींग सेट हा यांना मिळाला. तर तिसरे बक्षीस मिक्सर हे वैष्णवी योगेश सोनसाळे यांना मिळाले. तर एकूण 18 आकर्षक बक्षीस भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत आदर्श माता पुरस्कार 2026 अंतर्गत शालन सत्यवान दारफळकर, सुनिता सूर्यकांत पाटील, सोनाली नितीन पडवळ यांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या स्पर्धेत 125 माहिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे पारंपारिक गाव देखाव्याची रचना केली होती. हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरीसह छायाचित्र घेण्याचा आनंद लुटला. या सर्व महिलांना आदर्श परिवाराच्या वतीने सन 2026 ची दिनदर्शिका व गूळ पावडरचे पॅकेट भेट म्हणून देण्यात आले. तर शेकडो महिलांनी होम मिनीस्टर स्पर्धेत उत्स्फूर्त भाग नोंदविला. तर त्यांनी बक्षीस पटकावली. कार्यक्रमात बहारदार गीताचे गायन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी सादर केले तर सुत्रसंचलन डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले . कार्यक्रम यशस्वतीते साठी यांची पर्यवेक्षिका भारती गुंड, शिक्षिका अर्चना देशमुख,संगिता शिंदे व सर्व माहिला शिक्षिकावृंद कलाशिक्षक शिवाजी भोसले, कलाध्यापक शेषनाथ वाघ, सुरज सपाटे, स्वप्निल पाटील, सेवक नायक सुहास काटे, सेवक उमेश पाटील, आबा घोडके सर्व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
रत्नागिरी पोलीस दलाने एआयचा वापर करून तयार केलेल्या रेडस ॲपला पहिले यश मिळाले आहे.रेडस ॲपच्या सहाय्याने हरवलेल्या मुलीचा शोध लागला आहे. 12 जानेवारी रोजी एक मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.त्यानंतर पोलिसांनी रेडस ॲपमध्ये मिसिंग पोर्टलला त्या मुलीचे छायाचित्र अपलोड केला.तिच्या वेगवेगळ्या वेशभूषेतील 108 छायाचित्रे तयार करण्यात आली.आणि तपास अधिक प्रभावी […]
दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी संतोष चोडणकर
सावंतवाडी:प्रतिनिधी दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी श्री संतोष वसंत चोडणकर , उपाध्यक्षपदी शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी गौरव कारेकर, खजिनदारपदी सुहास चिंदरकर यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये नवीन वर्षांमध्ये साजरे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मागील आणि नव्या वर्षांमध्ये [...]
मोदी हे गझनी आहेत, मनकर्णिका घाट, प्राचीन मंदिरं पाडली; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर निशाणा
काशीतील प्राचीन मंदिरं आणि मनकर्णिका घाटाच्या पाडकामावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. भाजपला देशातील प्राचीन मंदिरं तोडायची असून त्यांना देशाची इतिहास, ओळख पुसायची असून स्वतःचाच इतिहास रचायचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट […]
Photo –नवी मुंबईतील विजयी शिलेदारांचे उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. त्यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ठाण्यातील प्रभाग क्र. १३ मधून विजयी झालेले शिवसेनेचे नगरसेवक शहाजी ऊर्फ गणेश संपत खुस्पे […]
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अर्जुन पाचंगे ची दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी 2026 दिनी होणाऱ्या प्रजासताक संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या संबळ या कला प्रकारामध्ये त्याची महाराष्ट्राच्या मुलाच्या संघात निवड झाली आहे. मागच्या वर्षी सुद्धा 26 जानेवारी 2025 मध्ये महाविद्यालयातील कॅडेट वैभवी शेंडगेनी ड्रिल मधुन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या वर्षी सुद्धा अर्जुन पाचंगे हा सलग दिल्ली येथे परेडसाठी जाणारा दुसरा कॅडेटचा बहुमान मिळून एनसीसी विभागाचा इतिहास रचला आहे. आज पर्यंत लातूर बटालियन मधुन सलग दोन वर्ष दिल्ली परेडसाठी कोणत्याच महाविद्यालयाला हे यश प्राप्त झाले नाही. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाने हे सिद्ध करून दाखविले आहे.दिल्ली येथे प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन एकुण 17 निदेशालयातुन एनसीसी कॅडेटस ड्रिल, सांस्कृतिक,बेस्ट कॅडेट,गार्ड ऑफ ऑनर,लाईन एरिया अशा विविध प्रकारा मधुन विभिन्न सांस्कृतिक,परंपरा, वेशभुषाचे प्रदर्शन या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या राज्याचे नेतृत्व करत असतात.26 जानेवारी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिवस शिबीरासाठी अनेक कठिन चाचण्या,परीक्षा पूर्ण करून ते कॅडेटस इथपर्यंत पोहचतात. प्रत्येक कॅडेटसचे एनसीसी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर सर्वात मोठे ध्येय ,उदिष्ट,स्वप्न याच शिबीराचे असते. रांत्रदिवस एक करून हे कॅडेटस कँपची तयारी करत असतात.हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते.मौजे हिप्परगा ता.उमरगा जि.धाराशिव येथील छोट्याशा गावातुन कठिन अशा परिस्थितीताला सामोरे जाऊन सर्वसाधारण गरीब कुटुंबात जन्म घेतलेला वडिल दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम करतात. अर्जुने स्वतःच्या जिद्द,आत्मविश्वास,कठोर परिश्रमातुन हे यश पूर्ण करून दाखविले आहे.वंश परंपरागत घरामध्ये लोकगीत,लोकसंगीत गोंधळ, वाघ्या - मुरळी अशा कार्यक्रमातुन वडिल,मोठा भाऊ व स्वतः अर्जुन घर चालवतात खंडोबा,आई तुळजा भवानीचे संबळ वाजवुन पुजा व नामस्मरण करतात तसेच आज सुद्धा गावोगावी खंडोबा,देवीचे गोंधळ करून नविन गृहप्रवेश,नवदांपत्यास आशीर्वाद मिळावे यासाठी गोंधळ ,वाघ्या-मुरळी म्हणून या कार्यक्रमातुन त्याचे देवी - देवताचे स्त्वन - नवस करत असतात.याच कार्यक्रमा मध्ये संबळ वाद्य मोलाची भूमिका बजावतो व यावर्षी याच वाद्या मधुन आज त्याची महाराष्ट्राच्या संघातुन त्याची निवड झालेली आहे . एक्किवीसव्या शतका मध्ये आपण जरी नविन पाश्चात्य गीत, गायन , वाद्य या संस्कृतीला स्विकारत असलो तरी कुठे तरी त्याचे संरक्षण अशा व्यासपिठाचा माध्यमातून होत असते.वर्तमानात आज घडीला जुन्या,प्राचीन वाद्य, संगीत कला प्रकार लोप पावत आहेत परंतु अर्जुन ने दाखवुन दिले की ही कला , वाद्य किती महान आहेत . महाराष्ट्राची पारंपारिक,ऐतिहासिक हे वादय तो देशाच्या पटलावर तो संबळ या वादयाच्या माध्यमातून त्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे .महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेचे लोककला , लोकसंगीताचे जतन,संरक्षण, तो करत आहे. या यशबदल त्याचे सर्व स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव संपुर्ण धाराशिव जिल्हयातून,उमरगा तालुक्यातुन होत आहे.तसेच वाईपी म्हणजेच युथ एक्सचेंज प्रोग्राम या मध्ये सुद्धा त्याची संबळ वादयातुन भारताच्या संघात त्याची निवड झाली आहे.अर्जुनला 53 महाराष्ट्र एनसीसी बरालियन लातूरचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगन,ॲडम ऑफिसर कर्नल वाय बी सिंग,सुभेदार मेजर शंभु सिंग त्यांच्या सर्व सैन्यदलातील संघ, कार्यालयीन कर्मचारी व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी अर्जुन कडुन खुप मेहनत करून घेतली व त्याला मार्गदर्शन केले.या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे,सर्व संस्थेचे संचालक मंडळातील सदस्यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.तसेच या शिबीरात सहभागी झाल्या बदल प्राचार्य डॉ संजय अस्वले,उप्राचार्य डॉ विलास इंगळे,डॉ पदमाकर पिटले,प्रा गुंडाबापु मोरे,शैलेश महामुनी,श्री नितीन कोराळे, राजकुमार सोनवणे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका कॅडेटस,विद्यार्थी,शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्याच्या उत्तुंग यशिस्वेतेसाठी शुभेच्छा दिल्या .
तहसीलदारांच्या हस्ते श्री बालाजी मंदिरात सपत्नीक महाअभिषेक
कळंब (प्रतिनिधी)- येथील श्री बालाजी मंदिरात कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले व ॲड माधवी ढोकले यांच्या हस्ते भगवान श्री व्यंकटेश यांचा शुक्रवार महाअभिषेक संपन्न झाला. निमित्त होते वाढदिवसाचे विशेष म्हणजे तहसीलदार पती-पत्नीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. पहाटे पाच वाजता श्री गणेश पूजा ,विश्वसेन आराधना आणि नवग्रह पूजा करून दूध दही, लोणी,साखर, मध ,तूप आदी पंचामृत ने श्री बालाजी भगवान यांचा अभिषेक विधी मंदिराचे पुजारी श्री राम प्रपन्नाचार्य महाराज यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आला. नुकतेच श्री बालाजी मंदिरात झालेल्या वैकुंठ एकादशी आणि कल्याण उत्सव यांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहून तहसीलदारांना मंदिरास भेट देण्याची इच्छा झाली आणि श्री वेंकटेशाच्या भक्तीने वाढदिवस साजरा करण्याचा योग घडून आला. दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर बांधकाम , तिरुपती येथील खुद्द बालाजी देवस्थानाची मूर्ती आणि नित्य नियमित होत असलेले पूजा उपचार याने ते भारावून गेले. जन्मदिवस ,लग्नाच्या वाढदिवस किंवा अन्य औचित्य साधून मंदिरामध्ये दररोज भक्तांमार्फत आरती आणि प्रसादाचे आयोजन केले जाते . याप्रमाणे सर्वच बालाजी भक्तांना अभिषेक, आरती प्रसादाची संधी दिली जाते ,याचे कौतुक तहसीलदारांनी केले. यावेळी मा.तहसीलदारांचा शाल,श्रीफळ देऊन या यथोचित सन्मान करण्यात आला. समाजसेवे सोबत आध्यात्मिक जोड असलेले तहसीलदार कळंबला लाभले ,यासाठी बालाजी भक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
दारू उधार न दिल्याच्या कारणावरून बिअर बार मालकाला मारहाण
परंडा (प्रतिनिधी)- दारू उधार का दिली नाही असे म्हणून बिअर बार मालक व व्यवस्थापकाला लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शहरातील एका बिअर बारमधे घडली. या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 जानेवारी रोजी सायंकाळी काशीमबाग येथील एका बिअर बारमधे रोहित भानवसे, बापू भानवसे, महेश भानवसे, अशोक भानवसे यांनी व्यवस्थापक जनार्दन चंदर भोळे यांच्याशी वाद घालून दारू उधार का दिली नाही या कारणावरून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बिअर बार मालक बत्तीनी गौड हॉटेलमधे आले. त्यांनाही सदरील आरोपींनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.या घटनेत मालक आणि व्यवस्थापक दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा घडलेला प्रकार बिअर बारच्या हॉटेल च्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास परंडा पोलीस करित आहे.
मोहेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; वसुंधरा गुरव व साक्षी वटाणे प्रथम
कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित संस्थामाता कै. सुमनबाई (वहिनी) मोहेकर जिल्हास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. बीडचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर होते. या स्पर्धेत शालेय (42) आणि महाविद्यालयीन (16) अशा एकूण 58 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत,“ असे प्रतिपादन यावेळी रामराजे चांदणे यांनी केले. स्पर्धेचा निकाल शालेय गट- प्रथम: वसुंधरा संजय गुरव (धाराशिव), द्वितीय: राशी हनुमंत खोत (तेरखेडा), तृतीय: वीरेन गणपती आडसूळ (घारगाव), (उत्तेजनार्थ: रिया आडसूळ, ज्ञानेश्वरी धावडे, अमृता शिंदे, सुषमा मोरे, ईश्वरी बारस्कर) महाविद्यालय गट- प्रथम: साक्षी बाळासाहेब वटाणे (मोहेकर महाविद्यालय), द्वितीय: प्रतीक्षा शिवाजी लिमकर (परंडा), तृतीय: समर्थ लक्ष्मण लोंढे (नळदुर्ग), (उत्तेजनार्थ: ऋषिकेश वाघे, अश्विनी गिरी, आकाश बारस्कर, आदित्य चव्हाण, सिद्धी पाटील) परीक्षक म्हणून प्राचार्य महादेव गपाट, हरिश्चंद्र ओताडे, डॉ. गणेश पाटील, प्रा. सुनील भिसे, व्ही. एच. चेवले, सोपान पवार व मुस्तान मिर्झा यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. दीपक सूर्यवंशी , पारितोषिक वाचन डॉ. दादाराव गुंडरे यांनी केले, तर आभार श्री. अरविंद शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी किरण बारकुल , सारुख शेख, अक्षय खंडागाळे, संतोष मोरे, डॉ.जयवंत ढोले,डॉ.नामानंद साठे , डॉ. ज्ञानेश चिंते ,संदीप सूर्यवंशी , आदित्य मडके , उमेश साळुंके व महाविद्यालयातील विविध समित्यांनी परिश्रम घेतले.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ज्ञानशिदोरी उपक्रम उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे विवेकानंद सप्ताहतंर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानशिदोरी हा अभिनव उपक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत यशस्वीपणे राबविण्यात आला. या अभिनव उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वाचनीय ग्रंथ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सह विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख तसेच प्रभारी प्राचार्य डॉ संदीप देशमुख व ग्रंथपाल डॉ मदनसिंह गोलवाल यांच्या हस्ते भेट स्वरुपात देण्यात आले. तर यावेळी मा.प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विवेकानंद सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी तसेच जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी एकुण 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.सदर प्रसंगी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले,प्रा बबन सुर्यवंशी, डॉ बालाजी गुंड,प्रा सचिन चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी समरजितसिंह ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल परंडा येथे त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. ते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र असून जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रसंगी रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड तसेच जिल्हा परिषद, धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) यांनी समरजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पहार अर्पण करत अभिनंदन केले. त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त करण्यात आले. यावेळी अँड.गुंड यांनी उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून परंडा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचावे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयांमध्ये विवेकानंद सप्ताह अंतर्गत ते “स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक” यावर बोलत होते. पुढे डॉ. वायचळ म्हणाले की, स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये सकारात्मकता, सहजता, जाणवते. त्यांच्या जन्मापासून ते जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांचे कार्य वेद अभ्यास, अध्यात्म, हिंदू धर्मातील सकारात्मकता यांचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवक या विषयावर बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणारा भारतीय युवक या विषयी सांगताना त्यांनी श्रीमद् भगवद्गीता, वेद, उपनिषदे, त्यातील अध्याय श्लोक यासह उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले. की कोणत्याही मार्गाने कोणत्याही धर्मातील देवांची भक्ती, सेवा केली तरी शेवटी प्राप्त होणारा परमात्मा हा एकच असतो. प्रमुख उपस्थिती म्हणून मसला खुर्द येथील युवा उद्योजक रामेश्वर खराडे, डॉ. श्रीराम नरवडे यांचेही मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जीवन पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून जीवनात आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासावी. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आजच्या तरुण पिढीसाठी असलेले महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल नवात्रे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी जगताप यांनी मानले. सदर कार्यक्रमास विवेकानंद सप्ताहाचे संयोजक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे, डॉ. बापुराव पवार, डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, ग्रंथपाल डॉ. दीपक निकाळजे, प्रा. गोकुळ बाविस्कर, प्रा. निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, डॉ. तांबोळी मॅडम प्रा. सतीश वागतकर, प्रा. अनिल नवात्रे, प्रा. शिवाजी जगताप, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंधारण आणि पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक- डॉ. नितीन पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जलसंधारण आणि पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जल व मृदा व्यवस्थापन विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव डॉ. नितीन पाटील यांनी केले. काजळा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी अडवणे, साठवणे, जमिनीत मुरवणे आणि त्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे. आज अनेक भागांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून विहिरी, बोअरवेल कोरड्या पडत आहेत. यावर जलसंधारण हाच प्रभावी उपाय मानला जातो. पावसाचे पाणी साठवण, नाला बंडिंग, चेकडॅम, शेततळे, समतल चर, परकोलेशन टँक, तसेच ठिबक व तुषार सिंचन यांसारख्या उपायांमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होतो. या उपायांमुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेले स्रोत टिकवून ठेवता येतात. पाण्याच्या अभावामुळे, मृदा धूप, क्षारयुक्त जमीन, अति चराई, जंगलतोड आणि चुकीच्या शेती पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक होत आहे. पडीक जमीन म्हणजे जिथे शेती होत नाही किंवा उत्पादन क्षमता अत्यल्प आहे अशी जमीन. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते, बेरोजगारी वाढते आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होतो. पडीक जमिनीचा शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचवता, दीर्घकाळ उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्या जमिनीचा विकास करणे. यामध्ये जलसंधारण, मृदासंधारण, वृक्षारोपण, चारागाह विकास, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि बहुविध पीक पद्धती यांचा समावेश होतो. तर अध्यक्षीय समारोप करताना प्र प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मातिशी नाते अतूट राहीले पाहिजे. कारण माती मधुन अन्न निर्माण तर होतेच पण श्रमाचे मूल्य देखील मातीतूनच कळते. यावेळी रत्नाकर मस्के, गावचे प्रथम नागरिक प्रविण बाबुराव पाटील, किशोर लिंगे, विष्णुदास आहेर, मुख्याध्यापक शिवाजी वागतकर, कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ अवधूत नवले,प्रा मोहन राठोड, डॉ स्वाती जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायझिंग स्टारमध्ये बाल आनंद मेळावा
भूम (प्रतिनिधी)- रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल भूम, नुकतेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळावा (फन फेअर) या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मनोरंजनाबरोबरच विक्री कौशल्याचे धडे घेतले. रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आवारात राबवलेल्या या बाल आनंद मेळावा (फन फेअर) उपक्रमात नर्सरीच्या वर्गापासून ते इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत कांबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे 30हून अधिक स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतः सजवून त्यावर किमती लिहिल्या होत्या. ग्राहकांशी संवाद साधत विक्री करताना, विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण अनुभव मिळत होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांसह ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशाचे महत्त्व, खरेदी-विक्रीची पद्धत, नफा-तोटा याची ओळख करून देणे हा होता. दरम्यान या उपक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापक हरिष धायगुडे प्राचार्या भाग्य जैन, शीतल बावकर सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
हरिभाऊ घोगरे हायस्कूल, उपळे (मा.) येथे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये 17 जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून केले.यावेळी व्यासपीठावर प्रशाळेचे मुख्याध्यापक .टी.डी.कांबळे,शिक्षक ए.बी. क्षीरसागर,श्रीमती घोगरे व श्रीमती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक सचिन कांबळे यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. वैराग्य, धैर्य, धर्मसंरक्षण तसेच धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले महान बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच भारतीय समाजात मानवतावादी मूल्ये,सहिष्णुता व राष्ट्रनिष्ठेचा संदेश दृढ झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक सलोखा आणि मानवतेची जाणीव निर्माण झाली.उपस्थित सर्वांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार ए.बी.क्षीरसागर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, शिस्तबद्धता व प्रेरणादायी वातावरणात उत्साहपूर्वक पार पडला.
Video –एकनाथ शिंदेंच्या दारात मशाल धगधगली, शहाजी खुस्पे ठरले जायंट किलर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेची मशाल धगधगली. या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) खुस्पे यांनी इतिहास घडवला. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या 30 वर्षांच्या मक्तेदारीला खुस्पे यांनी सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खुस्पे हे जायंट किलर ठरले.
बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात का येत नाही? रोहित पवार यांचा सवाल
अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणुकीसाठी दावोसच्या दौऱ्यावर जात आहेत. तरीही राज्यात बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी का येत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजमा घेऊन दावोसला जात आहे. गेल्यावेळी ते दावोसला गेल्यावर मोठी गुंतवणूक आणि अनेक कंपन्या राज्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. […]
Video –लालबाग,परळ, काळाचौकीमध्ये गद्दारांना स्थान नाही- किरण तावडे
लालबाग- परळचा बालेकिल्ला शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिलेदाराने गाजवला; विजयानंतर किरण तावडे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईत सरोगसी रॅकेट, बँकॉकहून परतणाऱ्या दोन महिलांना अटक
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैध सरोगेसी आणि एग डोनेशनशी संबंधित आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन महिला प्रवाशांच्या यांच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. 16 जानेवारी 2026 रोजी बँकॉकहून इंडिगोच्या 6E-1052 या विमानाने मुंबईत आलेल्या दोन महिलांची इमिग्रेशन काउंटरवर नियमित चौकशी करण्यात आली. मात्र परदेश प्रवासाच्या उद्देशाबाबत […]
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात असलेल्या भागीरथपुरा भागात दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहोचली असून 338 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. या भीषण घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाला स्मार्ट सिटी बनवण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप करत त्यांनी […]
“पप्पा, मी अडकलोय..”, नाल्यात कार कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू, वडिलांनी सांगितला थरार
ग्रेअट नोएडातील सेक्टर 150 मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युवराज मेहता असे मृताचे नाव आहे. युवराजची भरधाव कार रस्त्यावरील नाल्याची भिंत तोडून निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये कोसळली. त्याला वेळीच बाहेर पडता आले नाही आणि कुणाची मदतही मिळाली नाही, यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त […]
खासदार मनोज तिवारी यांच्या घरातच चोरी, माजी कर्मचाऱ्यानेच हात साफ केल्याचे निष्पन्न
भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या मुंबईतील घरात झालेल्या चोरीप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. ही चोरी कोणत्याही बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर मनोज तिवारी यांच्या घरात पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अंधेरी पश्चिमेकडील शास्त्रीनगर परिसरातील सुंदरबन अपार्टमेंटमधील मनोज तिवारी यांच्या निवासस्थानी ही चोरी घडली होती. या प्रकरणी तिवारी यांचे व्यवस्थापक प्रमोद जोगेंदर […]
मळेवाड येथे २२ रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
न्हावेली /वार्ताहर गणपती मंदिर मळेवाड जकातनाका येथील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ७ वाजता गणेशयाग प्रारंभ,दुपारी १ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ६.३० वाजता माऊली भजन मंडळ,साटेली ( बुवा -सत्यनारायण कळंगुटकर ) यांचे भजन सायंकाळी ७ वाजता लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी पटवारी बुवा पुणे यांचे किर्तन [...]
याचा अर्थ मुंबईकरांनी भाजपला नाकारलं आहे, आप नेते अरविंद केजरीवाल यांची टीका
मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक असलेल्या केजरीवाल यांनी म्हटले की, भाजपला बहुमताचा आकडा गाठता न येणे हेच लोक भाजपच्या विरोधात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “इतक्या गोंधळ, गैरप्रकार आणि यंत्रणेचा वापर करूनही भाजप बहुमतापर्यंत […]
Jammu Kashmir –किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; लष्कराचा परिसराला घेराव
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून त्या भागात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंहपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती […]
दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. विमान हजारो फुटांवर असताना वॉशरुममध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिलेले होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमान तातडीने लखनौकडे वळवण्यात आले आणि तिथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रविवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. STORY | Bomb […]
Solapur news –अक्कलकोटला जाताना अनर्थ घडला, पनवेलच्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघातात 5 जण ठार
नवी मुंबईतील पनवेल येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील भाविक एरटिका गाडीने (गाडी क्र. एमएच 46, झेड 4536) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या […]
ट्रम्प यांच्या 10 टक्के टॅरिफला युरोपियनचे प्रत्युत्तर; व्यापार करार थांबवला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या या मनसुब्यांना युरोपियन युनियममधील देशांनी तीव्र विरोध केला आहे. या संघर्षात ट्रम्प यांनी डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड या आठ युरोपीय देशांवर १०% टॅरिफ लादला आहे, तो १ फेब्रुवारीपासून लागू होईल. तसेच ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, […]
वेत्ये येथे ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा
न्हावेली/वार्ताहर श्री कलेश्वर नाट्यमंडळ,वेत्ये वरची गावकरवाडी आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा शनिवार ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती १ वाजता महाप्रसाद, आणि संध्याकाळी ५.३० वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुढीलप्रमाणे या स्पर्धेतील सहभागी संघ — सायंकाळी ७ ते ७.४० वाजता गोठण प्रासादिक भजन,वजराट ( [...]
उबाठाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांचा राजीनामा
वेंगुर्ले (वार्ताहर)- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे दिला आहे. जि.प. व पं. स. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना अचानकपणे यशवंत परब यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.उबाठा सेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब यांनी जिल्हा [...]
प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या पवित्र पर्वणीला गालबोट लागल्याची घटना उघड झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा निषेध करत संगम स्नान न करण्याचा निर्णय घेतला आणि आपली पालखी अर्ध्यातूनच आखाड्याकडे परत नेली. उत्तर प्रदेश सरकारचे गृहसचिव मोहित गुप्ता आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या शिष्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप […]
महायुतीच्या जागावाटपासह जि. प अध्यक्षाचा फॉर्म्युला निश्चित !
जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर शिवसेना 19 जागा लढणार ; जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष भूषविणार. कणकवली / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती निश्चित झाल्यानंतर जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपा 31 तर शिवसेना 19 [...]
आज पारपोली श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे प्रतिनिधी पारपोली येथील जागृत देवस्थान श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी १८ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारा आणि माहेरवाशिणीचा पाठीराखा अशी घाडवस देवाची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री घाडवसला भरजरी वस्त्र व आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. आहे. त्यानंतर घाडवसच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची [...]
सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथी २० जानेवारीला
प्रतिनिधी बांदा इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज मठ येथे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पालखी सोहळा, भजनांचे कार्यक्रम आणि मालवणी नाटकाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.उत्सवाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल. श्री सद्गुरू राजाराम महाराजांच्या स्मारकाकडून त्यांच्या निवासस्थानापर्यंत नामघोषात पालखी [...]
इन्सुलीत २१ जानेवारीपासून माघी गणेश जयंतीचा उत्साह
प्रतिनिधी बांदा इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल [...]
मुंबईत उभारणार ‘बिहार भवन’, 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटी खर्च
राज्यात नुकतीच 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. महायुती आणि शिवशक्तीमध्ये बहुमताचा 114 हा जादुई आकडा गाठण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत राहिला. त्याच वेळी अमराठीबहुल भागातून भाजप आणि मिध्यांना बळ मिळाले, त्यामुळे 118 जागांसह महायुतीने काठावरचे बहुमत मिळवले. अशातच बिहारमध्ये भाजपच्या […]
मुंबई महापालिका निवडणुकीत 89 जागा जिंकूनही भाजपच्या राज्य नेतृत्वात नाराजी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समोर आले आहे. 2002 नंतर कोणत्याही एका पक्षाने स्वतंत्रपणे मिळवलेला हा सर्वाधिक आकडा असला, तरी तो अपेक्षेपेक्षा कमी ठरल्याची भावना पक्षात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. भाजपने सुरुवातीला किमान 110 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र निकाल त्यापेक्षा बऱ्याच खाली […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील महापौर आणि याबाबतचे राजकारण यावर महत्त्वाचे भाष्य केले. तसेच फडणवीस यांनी केलेले दावे खोडून काढत फडणवीसांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले. महायुतीचा महापौर होणार, याची फडणवीसांना खात्री आहे, तर त्यांच्या सहकारी गटाला त्यांचे 29 नगरसेवक का कोंडून ठेवावे लागत आहेत? असा सवालही त्यांनी केला. […]
आकडेवारीत फक्त चारचा फरक असल्याने पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत; संजय राऊत यांचे सूचक विधान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील महापौर आणि याबाबतचे राजकारण यावर महत्त्वाचे भाष्य केले.मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच आपल्याच राज्यात आपलेच नगरसेवक फुटण्याची भीती वाटणे, ही राज्याच्या राजकारणातील हास्यजत्रा आहे, असा […]
गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या, आरोपीने केले धक्कादायक खुलासे
गोव्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आली आहे. एलेक्सी लियोनोव असे आरोपीचे नाव असून त्याने अनेक हत्या केल्याचे कबूल केले आहे. एलेक्सी लियोनोव हा त्याच्या प्रेयसीसोबत गोव्यात लिव्ह इनमध्ये राहायचा. शुक्रवारी त्याची प्रेयसी एलेना कस्थनोवा […]
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि लेखक डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचिकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. रामचंद्र मोरवंचिकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल मध्ये यावेळी जोरदार कमबॅक करत पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनाही भरपूर मते मिळाली आहेत. समोर सत्ताधारी भाजपची धनशक्ती असताना शिवसेनेच्या १६ उमेदवारांना चार ते पाच हजार इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे निसटता विजय झालेल्या भाजप उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला […]
ठाण्यात महाविकास आघाडीची तगडी झुंज, अत्यंत कमी फरकाने विजय हुकला
महापालिका निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीविरोधात तगडी झुंज दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावरील २० उमेदवारांचा कमी फरकाने विजय हुकला आहे. प्रभाग क्रमांक ३, ९, ११, १२, १३, २०, २४, २६, ३१ व प्रभाग क्रमांक ३३ मधील महाविकास आघाडीतील उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे या […]
सत्तेवर डोळा ठेवून शिंदे गटाने शिवसेनेतून फोडलेल्या अनेक नगरसेवकांचा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी टांगा पलटी करून त्यांना घरी बसवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांनी या निवडणुकीत जोरदार लढत दिली. त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसला. अनेक ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा जनाधार मिळाल्यामुळे शिंदे गट आणि भाजपवाले […]
नवी मुंबईकरांनी केला गद्दारांचा सुपडा साफ; कुटुंबकबिल्याला दाखवला घरचा रस्ता
राजकीय स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेतून शिंदे गट आणि भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांचा नवी मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत पुरता सुपडा साफ केला. ऐरोलीतील एम. के. मढवी, सानपाड्यातील सोमनाथ वास्कर, कोपरीमधील विलास भोईर यांच्या कुटुंबकबिल्याला घरचा रस्ता दाखवला. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सुमारे २० माजी नगरसेवकांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या गद्दारांची अवस्था ना घर का ना घाट […]
ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये शेकडो लोक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन वाणिज्य दूतावासावर मोर्चा काढण्यात आला. डेन्मार्क आणि युरोपने नाटोची उपस्थिती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या अमेरिकेच्या विधानांमुळे मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या विधानांविरुद्ध ग्रीनलँडमध्ये मोठा निषेध व्यक्त करण्यात […]
ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात
ठाणे जिल्हा हा आमचाच बालेकिल्ला आहे अशा वल्गना करणाऱ्या शिंदे गटाला भाजपने पद्धतशीरपणे चेपले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली वगळता मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई-विरार आणि पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद कमी करत भाजपने त्यांचा शक्तीपात केला आहे. शिंदेंकडे नगरविकास खाते असल्याने एमएमआरडीए त्यांच्या ताब्यात असले तरी एमएमआर क्षेत्रावर शिंदेंचा नव्हे तर आमचाच ताबा राहील हे भाजपने महापालिका […]
हिंदुस्थानला 114 राफेल जेट्स मिळणार, फ्रान्ससोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी
हिंदुस्थानला अतिरिक्त 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण खरेदी मंडळ (डीपीबी) ने फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 114 राफेल जेट्स खरेदीसाठी एक टप्पा पार केला आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे हा प्रस्ताव आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ […]
देशात 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या धावणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
देशात लवकरच नवीन 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाडय़ा सुरू केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या नवीन गाडय़ांमुळे, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू येथील सामान्य प्रवाशांना फायदा होईल, असे ते म्हणाले. या गाडय़ांमध्ये आधुनिक डिझाइन, सुधारित शॉक अॅब्झॉर्बर आणि प्रगत […]
होऊ द्या खर्च! एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आपल्या सदस्यांना नव्या वर्षात एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून पीएफचे पैसे थेट यूपीआयद्वारे काढता येणार आहेत. हा नवीन सुविधा मिळणार असल्याने याचा थेट लाभ देशातील 8 कोटी सदस्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारने एक अशी सिस्टीम तयार केली आहे ज्याद्वारे सदस्य पीएफमधून थेट यूपीआयद्वारे पैसे […]
लॉरेन्स बिष्णोईची खंडणीसाठी पंजाबी गायकाला धमकी, पैसे न दिल्यास जिवे मारू
प्रसिद्ध पंजाबी गायक बी प्राक याला लॉरेन्स बिष्णोई गँगने 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. 10 कोटी रुपये जर मिळाले नाहीत तर जिवे मारू, अशी धमकी बिष्णोई गँगने दिली आहे. बी प्राकचा सहकारी गायक दिलनूर याच्यामार्फत ही धमकी देण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल […]
एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवला
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जमध्ये वाढ केली आहे. आता फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर दुसऱया बँकेच्या एटीएममधून कॅश काढणे आणि बॅलन्स चेक करणे आधीच्या तुलनेत महाग करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार, एटीएममधून कॅश काढल्यानंतर प्रति ट्रान्झॅक्शन 23 रुपये आणि बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट […]
स्वस्तात मस्त! टाटाची नवी पंच आली रे
टाटा मोटर्सने आपली प्रसिद्ध मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत केवळ 5.59 लाख रुपये आहे. या कारची थेट टक्कर ह्युंदाई एक्स्टर, निसान मॅग्नेट आणि रेनॉ कायगर या कारशी होईल. या कारमध्ये 90 हून अधिक ऑक्टिव आणि पॅसिव सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. या कारला एकूण सहा व्हेरियंटमध्ये आणले […]
रियलमी 16 प्रो सीरिज हिंदुस्थानात लाँच
रियलमीने आपली 16 प्रो सीरिज हिंदुस्थानात लाँच केली. या सीरिजअंतर्गत कंपनीने रियलमी 16 प्रो आणि रियलमी 16 प्रो प्लस हे दोन पह्न लाँच केले. रियलमी बड्स एयर 8 (3,799 रुपये) आणि रियलमी पॅड 3 (26,999 रुपये) ही लाँच केले. या दोन्ही फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी […]
उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून आज सायंकाळी चार वाजता शेतीसाठी कालव्याद्वारे 500 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने कालव्याचे पाणी वाढवले जाणार आहे. पाणीमागणी वाढल्यामुळे अखेर पाणी सोडण्यात आले आहे. आज सोडलेले पाणी 40 दिवस सुरू राहणार आहे. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे या हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. उजनीतून बोगद्यातून सोडण्यात आलेला विसर्ग […]
सज्जनगडावर दासनवमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू
सज्जनगड येथे दासनवमी उत्सवाची तयारी जोरात सुरू असून, यावर्षी भजन, कीर्तन, प्रवचनांबरोबरच भक्तिसंगीताची सेवा सादर करण्यासाठी नामांकित गायक-कलाकारांना पाचारण करण्यात आले आहे. दि. 1 फेब्रुवारीस उत्सवाला प्रारंभ होणार आहे. 11 फेब्रुवारी हा ‘दासनवमी’ उत्सवातील मुख्य दिवस असून, दशमीला 12 फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, समर्थांच्या समाधीची महापूजा, सांप्रदायिक […]
निवडून येताच कोल्हापुरातील महायुतीचे नगरसेवक झाले मालक? सत्कार सोहळ्यातच पत्रकारांना आला प्रत्यय
कोल्हापूर मनपा निवडणुकीत काल झालेल्या मतमोजणीत संख्या बळाच्या आधारावर महायुतीची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले. आज सकाळी एका हॉटेलमध्ये महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि पत्रकारांशी संवाद ठेवण्यात आला होता. मात्र, महायुतीचा हा पहिलाच कार्यक्रम दिखावा ठरला. महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचे दिसून आले, तर नवनिर्वाचित नगर‘सेवकां’चे मालक झाल्याचे दिसून आले. याचा प्रत्यय आज पत्रकारांना […]
मी महान पराक्रमी आहे, असं कुणी समजण्याचं कारण नाही! हतबल मुश्रीफांना सतेज पाटीलांविषयी पोटशूळ
एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, जिह्यातील दहा आमदार, खासदार, अशा सत्तेच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढणाऱया महायुतीला 45 जागांवर बहुमत मिळाले असले तरी त्या तुलनेत विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती 35 जागा जिंकल्याने महायुतीच्या नेत्यांना त्याचे चांगलेच पोटशूळ उठल्याचे दिसत आहे. यापूर्वी सतेज पाटील यांनी निवडणूक लढवण्यापेक्षा महायुतीला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले […]
दहा युवतींचा खात्मा केल्याचा संशय : गोवा हादरून सोडणारा प्रकार :पोलिसही गेले चक्रावून , पोलिसांसमोर मोठे आव्हान पेडणे /(प्रतिनिधी) मोरजी आणि हरमल येथे दोन रशियन महिलांचा निर्दयीपणे गळा चिरून खून करणारा रशियन संशयित आलेक्सेई लिओनोव या पर्यटकाने आणखी 10 पेक्षा जास्त युवतींचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्य [...]
दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्रपतींना पाच वर्षांची शिक्षा
दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. योल यांनी 2024 मध्ये पदावर असताना देशभरात मार्शल लॉ लागू करण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने याला सत्तेचा गैरवापर म्हणत त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. योल यांनी देशाला राजकीय संकटात ढकलले होते. यून यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःला आपल्या […]
दिल्लीत प्रदूषण वाढल्याने रस्ते बांधकामांवर बंदी
एनसीआरसह जवळपासच्या परिसरात वायुप्रदूषण प्रचंड वाढल्याने दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) वाढला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत ग्रेप-3 लागू करण्यात आला असून याअंतर्गत बोअरिंग आणि ड्रिलिंगसह उत्खनन काम थांबवण्यात आले आहे. तसेच रस्ते बांधकामावर बंदी घालण्यात आली असून गटार आणि पाण्याच्या पाइपलाइन, ड्रेनेज आणि इलेक्ट्रिक केबल्स टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. विटा आणि दगडी बांधकामावरसुद्धा […]
दहावी, बारावी परीक्षा केंद्रांतील प्रत्येक खोलीत ‘सीसीटीव्ही’
गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत. कोल्हापूर विभागातील 539 केंद्रांपैकी 324 म्हणजे 66 टक्के केंद्रांनी आजअखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित 215 परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याबाबत विभागीय मंडळाने सूचना दिल्या आहेत. यंदाही परीक्षा […]
क्रिकेटवारी –मिचेलच्या बॅटवर फुल्ली!
>> संजय कऱ्हाडे फार वर्षांपूर्वी एकदा क्रिकेटच्या गप्पा सुरू होत्या. संदीप पाटीलला आठवण आली होती एका टाइम्स शिल्ड सामन्याची. टाटा विरुद्ध निरलॉन, हिंदू जिमखाना. निरलॉनच्या पहिल्या डावातल्या धावा पार करण्यासाठी थोडय़ाच धावा आवश्यक असताना टाटाचा फलंदाज बाद झाला अन् फलंदाजीला आला एक वेगवान कसोटी गोलंदाज. तेव्हा आणखी एक फलंदाज बाद करता आला तर निरलॉनसाठी सामना […]
इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड, सीईओंना तंबी; गैरव्यवस्थापनावरून डीजीसीएची मोठी कारवाई
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात इंडिगोची हजारो उड्डाणे रद्द झाली होती. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान वाहतूक कंपनी इंडिगोवर मोठी कारवाई केली आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीत प्रचंड निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएने इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्स यांच्यासह कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱयांना तंबी दिली आहे. नियमांचे […]
मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास भाजपाला चिरडून टाकतील! –मनोज जरांगे
भाजपवाले फार कलाकार आहेत. त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजितदादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. परळीतील मिरवट येथे आज ते माध्यमांशी बोलत होते. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाकर भाष्य करताना त्यांनी अजित पकारांवर टीका केली. भाजपने […]
बांगलादेशच्या गाजीपूर जिल्ह्यात आज आणखी एका हिंदू व्यावसायिकाची मारहाण करून हत्या करण्यात आली. ठार झालेल्या व्यावसायिकाचे मिठाईचे दुकान आहे. दुकानात काम करणाऱया एका अल्पवयीन कर्मचाऱयाला वाचवण्यासाठी त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्यावरच जीवघेणा वार केला. लिटन चंद्र घोष ऊर्फ काली (55) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे बैशाखी स्वीटमीट अँड हॉटेल या नावाने […]
साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 18 जानेवारी 2026 ते शनिवार 24 जानेवारी 2026
>> नीलिमा प्रधान मेष – प्रगतीची संधी मिळेल सूर्य, नेपच्यून लाभयोग, बुध प्लुटो युती. अनेक कामांना गती मिळेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रकृती सुधारेल. सप्ताहाच्या शेवटी संयम ठेवा. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 19, 20 वृषभ – काम रेंगाळत ठेऊ नका रवि, बुध युती, मंगळ हर्षल त्रिकोणयोग. कोणतेही काम […]
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत
पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा : हावडा-गुवाहाटी हे 958 किमी अंतर 14 तासात पार करणार वृत्तसंस्था/ कोलकाता, मालदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या अतिजलद ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. सध्याच्या 17 तासांच्या तुलनेत ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते [...]
`भारत –न्यूझीलंड मालिकेतील आज निर्णायक सामना
वृत्तसंस्था/ इंदूर तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना आज रविवारी इंदूरच्या भरपूर धावसंख्या उभ्या राहणाऱ्या होळकर स्टेडियमवरील निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सामना एका दृढनिश्चयी न्यूझीलंडशी होईल तेव्हा मायदेशातील भारताच्या निर्विवाद वर्चत्वाची कसोटी लागेल. मार्च 2019, पासून भारताने मायदेशात कोणतीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 0-2 अशी पिछाडी भरून काढून दिल्लीतील निर्णायक [...]
प्रतिनिधी/ निपाणी देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. यानंतर लोकशाही मार्गाने सरकार चालवण्याचा विषय होता. संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या हाती सत्ता सोपवली. मात्र अलिकडच्या काळात जनतेने आपले अधिकार आणि कर्तव्ये विसरले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईत 106 आणि 70 हुतात्मे सीमाभागात झाले. तरीही अजून सीमाभागातील [...]
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
कंग्राळी खुर्द येथील अभिवादन कार्यक्रमात माजी आमदार मनोहर किणेकर यांचे विचार वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. परंतु भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभागातील 865 मराठी बहुभाषिक गावे कर्नाटकात डांबण्यात आली. या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र मारुती बेन्नाळकर हुतात्मा झाले. [...]
भाजपचे 24 सदस्यीय शिष्टमंडळ आज दिल्लीत
राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेत घेणार भाग प्रतिनिधी/ पणजी भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 24 सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी (ता. 18) दिल्लीला जाणार आहे.या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, माजी [...]
शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना अभिवादन
प्रतिनिधी/ बेळगाव कचेरी गल्ली, शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना शनिवारी आदरांजली वाहण्यात आली. शहर म. ए. समितीचे सदस्य किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे व शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते हुतात्मा मधू बांदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीची मागणी करण्यात आली.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, हुतात्मा मधू बांदेकर यांचे [...]
महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात प्रखरपणे भूमिका मांडून सीमाप्रश्न सोडवून घ्यावा
प्रतिनिधी/ खानापूर सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी 21 तारखेपासून होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन सर्वोच्च न्यायालयात, तसेच केंद्राकडे पाठपुरावा करून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही शेवटची सुवर्णसंधी असून महाराष्ट्राने हा प्रश्न आता गांभीर्याने घेतला पाहिजे. सीमाप्रश्नाची ही लढाई अंतिम लढाई आहे. कर्नाटकाच्या जोखडातून आम्हाला सिमावासियांना मुक्त करावे, [...]
नोरोव्हायरस संसर्गामुळे चीनमध्ये घबराट
वृत्तसंस्था/ बीजिंग चीनमध्ये पुन्हा एकदा विषाणूच्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. कोविड-19 नंतर आता नोरोव्हायरसमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरातील एका हायस्कूलमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एकूण 103 विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह चाचणी मिळाली आहे. तथापि, सर्व संक्रमित विद्यार्थ्यांची प्रकृती ठिकठाक असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. [...]
स्वदेशी ‘एआय’, विदेशीला ‘बाय बाय’
नवी दिल्ली येथे 19 आणि 20 फेब्रुवारीला एक जागतिक ‘एआय’ परिषद आयोजित केली जात आहे, जिथे भारत आपले ’स्वदेशी एआय तंत्रज्ञान‘ जगासमोर मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत एक गोलमेज बैठक आयोजित केली होती. भारतात होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ च्या पार्श्वभूमीवर या शिखर परिषदेमधील ‘एआय फॉर ऑल : ग्लोबल [...]
तृणमूल काँग्रेसकडून घुसखोरांची पाठराखण
पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल : केंद्र सरकारच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचाही आरोप वृत्तसंस्था/ कोलकाता, मालदा पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका सभेत पंतप्रधान मोदींनी शनिवारी केंद्र सरकारच्या योजना, भाजपचा विस्तार यावर प्रकाश टाकत एक मोठा राजकीय संदेश देतानाच तृणमूल काँग्रेस सरकारवर तीव्र हल्ला चढवला. बंगालमधील प्रत्येक गरीब कुटुंबाला कायमचे घर असावे, प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत [...]
तंत्रज्ञान –सर्जनशीलतेमध्ये ‘एआय’ची लक्ष्मणरेषा
>> शहाजी शिंदे मानवी सर्जनशीलतेवर ‘एआय’च्या आक्रमणाचे गंभीर धोके विविध क्षेत्रांत जाणवत आहेत. यामुळे सर्जनशीलतेच्या संदर्भात ‘एआय’ची लक्ष्मणरेषा नेमकी कुठे असावी, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असताना साहित्य आणि कला यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांत तो किती प्रमाणात स्वीकारार्ह असावा? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मानवी सर्जनशीलतेवर होणाऱ्या […]
उद्याची शेती –फलोत्पादनाच्या भवितव्यासाठी
>> रितेश पोपळघट, ritesh@the-farm.in सध्या जगभरातील शेती आणि विशेषत फलोत्पादन क्षेत्र अभूतपूर्व आव्हानांच्या काळातून जात आहे. याबाबत आपल्या देशानेही निर्णायक पाऊल उचलत शासनाद्वारे ‘क्लीन प्लांट प्रोग्राम’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. क्लीन प्लांट प्रोग्रामची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे धोक्याचे विश्लेषण आणि सर्वेक्षण आधारित अंमलबजावणी. द्राक्ष पिकासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात व्यापक सर्वेक्षण […]

22 C