खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम; हवामान विभागाचा पावसाचा इशारा
दिल्लीतील खराब हवामानामुळे मंगळवारी इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात खराब हवामानामुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. एअरलाइन्सने एक्स वर पोस्ट करत, दिल्लीवरील खराब हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी […]
Umarga News |वरनाळवाडीत भीषण आग; जनावरांच्या गोठ्यासह शेती साहित्य जळून खाक, ३ लाखांचे नुकसान!
वरनाळवाडीत आगीचे तांडव; गीर गाय, बैलगाडीसह धान्याची पोती भस्मसात उमरगा – वरनाळवाडी येथे अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यामध्ये गीर गाय, बैलगाडी , १५ पोते तूर, १५ पोते हरभरा, ज्वारी, ३ विदयुत मोटार, मोटारीचे केबल, कडबा, डिझेल इंजिन, ताडपत्री, [...]
दिल्ली विधानसभा घुसखोरी प्रकरण: एसयूव्ही चालकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी
दिल्ली विधानसभा परिसराच्या सुरक्षिततेचे उल्लंघन करून आपली एसयूव्ही गाडी आत घुसवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चालकाला दिल्ली न्यायालयाने मंगळवारी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे विधानसभा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सरबजीत सिंग याला मंगळवारी न्यायिक दंडाधिकारी कार्तिक तापारिया यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. तपासासाठी पोलिसांनी सुरुवातीला 10 दिवसांच्या कोठडीची मागणी […]
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयडियाथॉन 2026 स्पर्धेत 48 युवकांच्या नवीन आयडिया सादर
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे इनकुबेशन सेंटर फॉर अत्रप्रीनर , करिअर कट्टा आणि ENSIN फोरम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आयडियाथॉन आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धेला महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधून 48 युवक, विद्यार्थी, संशोधक यांनी सहभाग घेऊन आपल्या नवनवीन आयडिया चे सादरीकरण केले. संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता, सर्जनशील विचार आणि प्रभावी सादरीकरण कौशल्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि संशोधनाधिष्ठित विषयांवरील कल्पक संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील मॅनेजमेंट सायन्स विभागातील प्रा. डॉ. विक्रम शिंदे आणि डॉ. प्रा. सचिन बसैया तसेच संजय जगताप यांनी केले. नाविन्यता, मांडणी, सामाजिक उपयुक्तता, संशोधनाधिष्ठित दृष्टी आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक चव्हाण जगदीश यांनी पटकावले. त्यांना रु. 1,199 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक विभागून माने साक्षी आणि जाधव मनस्वी तसेच योगेश मुगळे यांना प्रत्येकी रु. 499 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तृतीय पारितोषिक चव्हाण आर. बी. यांनी मिळविले. त्यांना रु. 799 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मुरुगेंद्र वाली यांना रु. 499 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व युवक विद्यार्थ्यां मधून “यंग स्टुडंट आयडिया अवॉर्ड” कु. प्रियंका इंगळे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तर संशोधक विद्यार्थ्यां मधून “रिसर्च स्कॉलर इनोव्हेशन आयडिया अवॉर्ड” विजापूर येथील इराण्णा जबा यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षिस वितरण कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास इंगळे होते. त्यानी अध्यक्षीय समारोपात बोलताना या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार, संशोधनाधिष्ठित संकल्पना आणि नवकल्पना मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ मिळाले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संशोधनाभिमुखता आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होते, असे मत व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे तसेच मा. संजय जगताप यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा चे समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले, आणि प्रास्ताविक डॉ सी. डी करे यानी तर आभार प्रदर्शन डॉ एस टी. तोडकर यानी मानले.
मुंबइ (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-2026’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. 4) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-2026’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा क्षेत्रात राज्याने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शाश्वत व स्वस्त विजेसाठी ऊर्जा परिवर्तनाचा रिसोर्स ॲडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठी गती दिली आहे. सौर ऊर्जेच्या योजनांद्वारे सद्यस्थितीत 20 लाख 66 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. तर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आतापर्यंत 5 लाखांवर घरगुती ग्राहकांनी लाभ घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्र नाईक यांनी प्रदर्शनीतील महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध योजना, उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. त्यांचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी स्वागत केले व माहिती दिली. यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री. सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष श्री. देवांग ठाकूर, सरचिटणीस श्री. अमरनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. या तीन दिवसीय प्रदर्शनीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा मोहिमेचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी सोमवारी (दि. 6) विशेष सत्रात विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन केले. महावितरणच्या अभियानामध्ये सहभागी होत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमच्या वतीने देण्यात आली. महावितरण प्रदर्शनीद्वारे अधीक्षक अभियंता श्री. संजय खंदारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठौर यांच्यासह अभियंता, अधिकाऱ्यांनी महावितरणच्या विविध योजना व विद्युत सुरक्षेसंदर्भात नागरिकांना माहिती दिली.
आष्टा शाळेचा प्रधानमंत्री परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
भुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव आयोजित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय बक्षीस केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा शाळेने पटकावले. जिल्हास्तरीय पथकाने उपशिक्षणाधिकारी कथले यांच्या नेतृत्वाखाली शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. विद्यार्थ्यांना पोषण आहारात दररोज योग्य तितका प्रथिनयुक्त आहार मिळावा व आहारात स्थानिक पातळीवर भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेचे तात्कालिक मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी शाळास्तरावर परसबाग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार आष्टा शाळेतील परसबागेस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे व जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. परसबाग तयार करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, कार्यालयीन विस्ताराधिकारी साळुंखे, आष्टा बीटचे विस्तारअधिकारी टकले, केंद्रप्रमुख मुळे, शाळेचे माजी मुख्याध्यापक भोसले, माजी शिक्षक तांबे, नलावडे, नाईकवाडे, भैरु गोरे, उपळकर, जगताप, डांगे, नलवडे, स्वयंपाकी इंदुबाई दिवाने व मदतनीस मनीषा शिंदे यांचे सहकार्य लाभले.
मंदिर परिसरात अवैध धंद्याला विरोध म्हणून उपोषण
भुम (प्रतिनिधी)- माणकेश्वर येथील गट क्रमांक 318 मधील सरकारी जमिनीवर असलेल्या श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रशासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मंदिर परिसरात अवैध पद्धतीने मटण शिजवणे, मटणाचा नैवेद्य आणणे यावर प्रशासनाने बंदी घातली होती, मात्र आता पुन्हा हे प्रकार सुरू झाल्याने ह.भ.प. गणेश महाराज अंधारे यांनी दिनांक 06 एप्रिल 2026 पासून पुन्हा एकदा अन्नत्याग करून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने मंदिर परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी मांसाहार आणि अवैध कृत्यांवर बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे संपूर्ण हिंदू धर्मीय भाविक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले होते. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाला काही लोकांकडून हरताळ फासला जात असून, पुन्हा अवैध पद्धतीने मटणाचा नैवेद्य दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून महाराजांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उपोषणातील प्रमुख मागण्या मंदिर परिसरात मटणाचा नैवेद्य आणणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. राज्य संरक्षित स्मारक स्थळांवरील नियमांनुसार मंदिर परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. मंदिरात मांसाहार न करणाऱ्या सात्त्विक पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. श्री सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढून मूर्ती शास्त्रानुसार मूळ स्वरूपात दर्शन खुले करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच धाराशिवच्यावतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षीप्रमाणे धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे ठाणे हे फुले आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि तो फोडण्याचा मार्ग या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरविंद गोरे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव हे भूषवणार आहेत. दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी योगीराज बागुल ज्येष्ठ विचारवंत मुंबई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी या विषयावर विचार व्यक्त करून व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. प्रदीप रोडे नालंदा फाउंडेशन बीड हे भूषवणार आहेत. जगाने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखणाऱ्या व पुस्तकासाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती वैचारिक प्रबोधनात्मक रितीने साजरी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच धाराशिव यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला नालंदा फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्प्लेक्स विसर्जन विहिरीजवळ धाराशिव येथे सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे. धाराशिवकरांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे यांनी केले आहे.
मोरे यांनी उपनगराध्यक्ष वाघमारे यांची भेट
उमरगा (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांनी उपनगराध्यक्ष विजय वाघामारे यांची नगरपालिका कार्यालयात भेट घेतली. यावेळी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, नविन पाणीपुरवठा योजना व बंदिस्त गटारीचे कामाची माहिती घेण्यात आली. शहराच्या विविध विकास कामाबाबत चर्चा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे, नगरसेवक अभिजित मोरे, नरसेवक बाबा मस्के, नगरसेवक सचिन जाधव, विक्रम बापू बिराजदार, दत्ता चिंचोळे, प्रफुल्ल गायकवाड, बालाजी मिसाले, इम्रान शेख, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
आमदार स्वामी यांनी घेतली उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक
उमरगा (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोवण्याची सुचना आमदार स्व्ाामी यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आमदार प्रवीण स्वामी यांनी सोमवारी (दि.6) कामकाजाचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयातील कारभारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदारांनी प्रशासनाला दिले. शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचला पाहिजे. रुग्णालयातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील राहावे, जेणेकरून उमरगा तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयातील स्वच्छता राखणे व रुग्णांना औषध उपलब्ध करणेबाबत सुचेना दिल्या. रुग्णालयातील सेवा-सुविधांचा दर्जा सुधारून सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळावेत, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामध्ये आयसीयू विभाग तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. या संदर्भात बोलताना आमदार स्वामी म्हणाले की, आयसीयू विभाग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित अनुभवी स्टाफ आणि किमान दोन तज्ज्ञ फिजिशियन डॉक्टरांची तातडीने गरज आहे. या पदांच्या भरतीसाठी वरिष्ठ स्तरावर आणि शासन दरबारी पाठपुरावा करून या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील, पंचायत समिती सदस्य हरी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल जाधव, महावीर कोराळे, जगदीश सुरवसे, दत्ता शिंदे आदीची उपस्तीथी होती.
आष्टा (जहागीर) येथे हनुमान जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टा(जहागीर) येथे संतयोगी दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता किर्तनसेवा व दहिहंडी ने करुन हनुमान जयंती भक्ती मय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सायंकाळी 4 ते5 दरम्यान हणुमान मंदिर येथे 1008महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन ठेवण्यात आले होते 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांनी काल्याच्या किर्तनासाठी “उपजोनिया पुढती येवु/काला खावु दहीभात“ या काल्याच्या प्रसंगातील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग घेऊन उपस्थित भाविक भक्तांना संबोधुन अभंगाचे निरुपण करण्यात आले. तदनंतर 5:30वाजता दहिहंडी काल्याने हणुमान जयंतीचे सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच सतिष जमादार, उपसरपंच बापुराव गायकवाड, माजी उपसरपंच राधाताई गायकवाड,पोलीस पाटिल महेश जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद सुयर्यवंशी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैष्णवी जाधव, माजी सैनिक र्वषीकेत जाधव,माजी शालेय समीतीचे सभापती अशोकराव गायकवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रविकुमार मुळे,माधव पाटील श्रीराम कुलकर्णी,,ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा.मोहनराव गायकवाड, भजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड,जेष्ठ नागरिक अंबादास पाटील, हर्मोनियम वादक हिरानाथ गायकवाड, पखवाज वादक जयवंत (सोनाजी) जाधव,विणेकरी रमेश गायकवाड, पांडुरंग गायकवाड,गायनाचार्य उमेश जाधव, विश्वंभर जाधव,आशोक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, भगवान माने, नंदकुमार जाधव,युवानेते संभाजी गायकवाड, अनिल गायकवाड, शिवाजी गायकवाड, सचिन गायकवाड, विष्णू पाटील, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,किशोर जाधव,अदिसह भाविक भक्त गण समस्त ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना भोजन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
Kupwad Crime |कुपवाड हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून
कुपवाडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला कुपवाड : अनैतिक संबंधाचा संशय घेतअसल्याचा कारणातून पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. कुमवाडच्या कापसे प्लॉट परिसरातील विघ्नहर्ता कॉलनीत घटना घडली.यामध्ये दगडू सुखदेव केंगार (वय ४० रा. विघ्नहर्ता कॉलनी [...]
गोव्यात भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुणीचा मृत्यू
गोव्याची राजधानी पणजी येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. डोना पॉला परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दीक्षा परवाडकर असे मयत तरुणीचे नाव आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीक्षा एका पंचातारांकीत हॉटेलमध्ये कामाला होती. रविवारी रात्री आपली ड्युटी संपवून दीक्षा तिचे […]
९ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’वर बंदी: निवडणूक आयोग
या महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’ आयोजित करण्यास किंवा त्यांचे निकाल प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. आयोगाने असा इशाराही दिला आहे की, या कालावधीत एक्झिट पोल घेणे किंवा त्यांचे प्रक्षेपण करणे हे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६(अ) […]
इचलकरंजीत मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; इचलकरंजी : शहरातील आवळे मैदान परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यरात्री छापा टाकत ३४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ लाख ९८ हजार ६१० रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल हॅण्डसेट व [...]
JotibaYatra |जोतिबा चैत्र यात्रेत चोरट्यांचा हैदोस; गर्दीचा फायदा घेत २२ तोळे सोन्यावर मारला डल्ला!
जोतिबा चैत्र यात्रा मध्ये २२ तोळे सोन्याची चोरी वारणानगर – वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील जोतिबा चैत्र यात्रेमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी २२ तोळे सोन्यावर डल्ला मारला. यात विविध प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे [...]
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली. पाकिस्तानने 55 वर्षांपूर्वी, 1971 मध्ये एक चूक केली होती आणि त्याची किंमत दोन तुकड्यांमध्ये विभागले जाऊन चुकवावी […]
इस्तंबूलमधील इस्रायली दूतावासाजवळ गोळीबारात 3 जणांचा मृत्यू; दोन पोलीस जखमी
तुर्कीमधील इस्तंबूल येथील बेसिक्तास भागात इस्रायली दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याचे वृत्त आहे. दूतावासाला लक्ष्य करण्यात आले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दूतावास गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. या घटनेत तीन जण ठार झाले असून दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, […]
आरोग्याच्या दृष्टीने रोज कच्चा लसूण का खायला हवा, जाणून घ्या
आपल्याकडे आहारात लसूण हा हमखास वापरला जातो. लसूण हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या आहारात लसणाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. अर्ध्या पाकळीने सुरुवात करा आणि हळूहळू अख्ख्या पाकळीपर्यंत प्रमाण वाढवा. लसणाचा वास आणि चव तीव्र असल्यामुळे, तुम्ही त्याचे लहान तुकडे करूनही खाऊ शकता, ज्यामुळे ते खाण्यास सोपे जाते. तुम्ही ते मधात बुडवून […]
Satara |सदरबझारमध्ये हिंदू संस्कृतीचा जागर; शोभायात्रा आणि पोवाड्याने सातारकर मंत्रमुग्ध
साताऱ्यात सदरबझार येथे पहिले हिंदू संमेलन उत्साहात संपन्न सातारा – गेली अनेक दशके अनेक संघटना हिंदू समाजाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यातील एक महत्त्वाची संघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्षे हिंदूंचे संघटन करत [...]
Chandgad |साऊंड सिस्टीमवरून अडकूरमध्ये राडा; पिता-पुत्राला काठीने मारहाण
सिस्टीम बंद करण्याच्या वादातून हाणामारी; अडकूरमध्ये पिता-पुत्र जखमी चंदगड – साऊंड सिस्टीम वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना अडकूर येथे घडली. या घटनेत फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली असून दोघे जखमी झाले आहेत. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [...]
कळतंय पण वळत नाही! ५७.८ टक्के हिंदुस्थानींनी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे केलं मान्य –सर्वेक्षण
धावपळीच्या युगात आरोग्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. जीवनशैलीतील बदलामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आता व्यस्त जीवनशैलीच्या काळात तब्बल ‘४२.५ टक्के’ हिंदुस्थानी आपल्या आरोग्याला दुय्यम स्थान देतात अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात ‘५७.८ टक्के’ लोकांनी मान्य केले की त्यांना त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे समजते, परंतु प्रत्यक्ष […]
स्त्री-पुरुष समानतेसाठी अनेक कायदे झाले, ऐतिहासिक निकालही आले, तरीही समाजात पुरुषप्रधान संस्कृतीचे मूळ आजही खोलवर रुजलेले आहे. अनेक कायदे करूनही महिलांच्या जीवनावर पुरुषप्रधान संस्कृतीचे नियंत्रण कसे? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने राजस्थानमधील एका प्रकरणावर निकाल देताना ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. राजस्थानमधील 2011 मध्ये […]
Sangameshwar |संगमेश्वरमध्ये कोल्हापुरातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
कोल्हापूरच्या राजारामपुरीतील तरुणाचा कोकणात दुर्दैवी अंत संगमेश्वर -कोल्हापूरहून कोकण पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा तालुक्यातील सोनवी संगमेश्वर नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजय शंकर बोरगे (वय ३७ रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय [...]
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी फिजीशीयन रूजू
विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला यश सावंतवाडी : प्रतिनिधी गेली ५ वर्ष सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजीशीयन मिळावा म्हणून सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन मिळाला आहे. यासाठी रूग्णकल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक [...]
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांनी छापा टाकला आहे. पवन खेरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. रिनिकी भुईया सरमा यांच्याकडे तिहेरी पासपोर्ट असून विदेशात त्यांची मालमत्ता असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता. यानंतर रिनिकी भुईया सरमा यांनी पवन खेरा यांच्याविरुद्ध […]
Israel Iran War –हिंदुस्थानला मोठा दिलासा; रशियानंतर व्हेनेझुएलाहून येणार कच्चे तेल
आखाती युद्धामुळे जगभरात तेलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जवळपास ११२ डॉलरपर्यंत पोहोचली आहे. देशात इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी हिंदुस्थानने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी विविध पर्यायांवर विचार करत आहे. इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करत असतानाच आता हिंदुस्थानला व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळण्याची […]
DajipurSanctuary |पर्यटकांसाठी गूड न्यूज! दाजीपूर अभयारण्य उद्यापासून पर्यटनासाठी पुन्हा खुले
राधानगरी–दाजीपूर अभयारण्यात पर्यटन पुन्हा सुरू राधानगरी – दाजीपूर अभयारण्य गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. अभयारण्यात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.दरम्यान, संबंधित रस्त्याची दुरुस्तीची कामे आता पूर्ण झाली असून उद्या [...]
तुम्हालाही वारंवार चक्कर येते का? मग या गोष्टी तुम्ही करायलाच हव्यात
अनेकांना नेहमी चक्कर येण्याचा त्रास होतो. मात्र आपण या समस्येला दुर्लक्ष करतो. आपण घरगुती उपायांमुळे चक्कर येण्यापासून आराम मिळू शकतो का? चक्कर येणे ही कानाच्या आतील एक आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये सतत चक्कर येणे. बसताना किंवा झोपताना चक्कर येणे. यामध्ये सरळ उभे राहणे कठीण होते. चक्कर येण्याचे असे अनेक प्रकार आहेत. खरं तर, आजकाल मोबाईल […]
युद्धाच्या फटक्यामुळे एअर इंडियाने तिकीट दरात केली वाढ, 8 एप्रिलपासून नवे दर लागू
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. देशातील अग्रगण्य विमान कंपनी एअर इंडियाने वाढत्या खर्चाच्या दबावाला प्रतिसाद म्हणून आपल्या इंधन अधिभारात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीच्या या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. […]
माता न तू वैरिणी! दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या 11 महिन्यांच्या मुलाची हत्या, निर्दयी आईला अटक
पुण्यातील रांजणगावमध्ये मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नेहमी किरकिर करायचा आणि दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने आईने पोटच्या 11 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. पूजा रविंद्र पवार असे आरोपी महिलेचे नाव […]
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. गंगापूर रस्त्यावरील दीडशे वर्षांहून अधिक जुन्या दोन वटवृक्षांवर कुर्हाड चालवली जात आहे, याविरोधात आज संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले. त्यांना न जुमानता प्रशासनाने ही वृक्षतोड सुरूच ठेवली, तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरणारी […]
Gold Silver Rate –सोनेचांदीच्या दरात अस्थिरता कायम; जागतिक घडामोडींमुळे दरात घसरण
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक अशांतता वाढत आहे. आतापर्यंत युद्धाच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनेचांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र, हे युद्ध याला अपवाद ठरले आहे. या युद्धाच्या काळात सोने-चांदीचे दर वाढण्याऐवजी त्यात घसरण होत आहे. त्यांच्या उच्चांकापासून त्यात प्रंचड घसरण झाली आहे. तसेच जागतिक परिस्थितीचा परिणाम या दरांवर होत असल्याने त्यात चढउतार होत आहेत. मंगळवारी पुन्हा […]
रवींना स्मरून रितेशना विजयी करा!
फोंड्यातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : गोव्यात 2027 मध्येही डबल इंजिन सरकार येणार फोंडा : गोव्यातील बहुजनांचे लोकनेते, कुळ मुंडकारांचे कैवारी आणि फोंड्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार रवी नाईक यांच्या अकाली जाण्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. सामूहिक भावनेची किनार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गोव्यातील विरोधी पक्षांना राजकीय संस्कृतीचे उत्कृष्ट [...]
रवींना स्मऊन रितेशना विजयी करा!
फोंड्यातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : गोव्यात 2027 मध्येही डबल इंजिन सरकार येणार फोंडा : गोव्यातील बहुजनांचे लोकनेते, कुळ मुंडकारांचे कैवारी आणि फोंड्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार रवी नाईक यांच्या अकाली जाण्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. सामूहिक भावनेची किनार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गोव्यातील विरोधी पक्षांना राजकीय संस्कृतीचे उत्कृष्ट [...]
दिल्ली विधानसभेत कार का घुसवली? पोलीस चौकशीत सरबजीत सिंगचा धक्कादायक खुलासा
दिल्लीच्या विधानसभा परिसरात सोमवारी एका कारचालकाने थेट व्हीआयपी गेटमधून प्रवेश करत सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिले होते. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चौकशीमध्ये आरोपी सरबजीत सिंग याने धक्कादायक दावा केला आहे. बेपत्ता भाच्याच्या तपासाकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी हे धाडस उचलल्याचे सरबजीतने म्हटले आहे. मात्र या घटनेमुळे राजधानीत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला […]
राजपाल यादवच्या समर्थनार्थ उतरला बाॅलीवूडचा भाईजान.. वाचा नेमकं काय घडलं?
राजपाल यादव अलीकडेच ₹९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अडकला होता. यावेळी त्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. मात्र अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात राजपालची खिल्ली उडवण्यात आली. एका ज्येष्ठ पत्रकाराने राजपालला म्हटले की, डॉलरचा दर कितीही कमी-जास्त झाला तरी त्याला संपूर्ण कर्ज फेडावेच लागेल. राजपालने हा टोमणा विनोदाने घेतला. परंतु या टोमण्यावर भाईजान सलमान खान मात्र चांगलाच […]
अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारे हिंदुस्थानी वंशाचे डॉक्टर आणि त्यांच्या ‘ॲडवान्स युरोलॉजी’ (Advanced Urology) या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जितेश पटेल असे या डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर अनावश्यक वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया करून सरकारी तिजोरीची लूट केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर $14 दशलक्ष (सुमारे 116 कोटी रुपये) दंड आकारण्यात आला […]
चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मधमाशांच्या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या आत असलेल्या मैदानावर ही घटना घडली. मधुकर रंगारी (65) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते सिन्हाळा या गावातील रहिवासी आहे. डीजेच्या आवाजाने मधमाशांचे मोहोळ उठले आणि हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते. […]
सीमावासियांना महाराष्ट्राच्या सवलती
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा सांगली : मागील चाळीस-पंचेचाळीस वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना सीमाप्रश्न का सुटला नाही? याबाबत राजकारण करण्याचा माझा पिंड नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे, हा विषय सुप्रिम कोर्टात आहे. प्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला ज्या सवलती मिळतात, त्यात मेडिकलच्या जागांसह सर्व सवलती सीमाभागातील सर्व 865 गावांना मिळत राहतील, अशी घोषणा सांगलीचे [...]
डॉ. किरण ठाकुर यांचा आज सांगलीत नागरी सत्कार
डॉ. किरण ठाकुर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांच्यावतीने मंगळवारी 7 एप्रिलला कार्यक्रमस्थळी भव्य नागरी सत्कार होणार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी सभापती अतुल माने, सभागृहनेते संदीप आवटी, मनपा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते युवराज गायकवाड, युवराज बावडेकर, मैनुद्दीन बागवान, तसेच शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. [...]
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकमध्ये प्रस्तावित केलेल्या बदलांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या बदलांमुळे प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्क्यांनी वाढ होणार असून तो ११,३३२.८२ कोटी रुपयांवरून १८,१२०.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. तसेच, यापूर्वी निश्चित केलेल्या १,५८५ खारफुटींच्या (मॅन्ग्रोव्ह्ज) झाडांऐवजी आता १,७९९ झाडे हटवावी लागतील, अशी माहिती मिळत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी […]
प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांची सूचना : सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बेळगाव : उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्मयता असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन बेळगाव विभागातील समस्याग्रस्त गावांची ओळख पटवावी. स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी टँकर व जवळील खासगी कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा [...]
विनापरवाना डीजे लावणाऱ्या तिघांविरुद्ध मारिहाळ पोलिसात एफआयआर
सुळेभावीमध्ये लग्न समारंभात वाजविला डीजे बेळगाव : कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लग्न समारंभासाठी डीजे लावणाऱ्या तिघा जणांविरुद्ध मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साऊंड सिस्टीमही जप्त केली आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री मारिहाळ पोलीस स्थानकातील आय. एम. शिलवंतर यांनी फिर्याद दिली आहे. सुरेश रामाप्पा बंगन्नावर, राहणार सुळेभावी, वीरभद्र नागाप्पा यरगुद्दी, [...]
न्यायालयासमोर करण्यात आले हजर : इतर चौघांवरही गुन्हा दाखल बेळगाव : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवून नंतर तिला धोका दिल्याच्या आरोपावरून शहापूर पोलीस स्थानकात अखेर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईश्वरसिंग प्रेमसिंग बडगुज्जर (वय 32) याला पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले आहे. ईश्वरसिंग, त्याचा भाऊ गुरुचरण प्रेमसिंग [...]
कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा मनपाकडून शोध सुरू
दोन ठिकाणी पाहणी : मात्र जागांची निश्चिती नाही बेळगाव : तुरमुरी येथील कचरा डेपोला परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र विरोध केला जात आहे. कचरा डेपोमुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित बनण्यासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा डेपो बंद करून दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच 2029 मध्ये तुरमुरी कचरा डेपोचा करार [...]
कृषी सहसंचालक कार्यालयात खतविक्रेत्यांची बैठक : शेतकऱ्यांना भीती न बाळगण्याचे आवाहन :खतांचा गैरवापर-साठेबाजी रोखणार बेळगाव : आगामी खरीप हंगामात खतांचा पुरवठा सुरळीत राहावा, या उद्देशाने बेळगाव तालुक्मयातील सर्व खतविव्रेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी कृषी सहसंचालकांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत सुमारे 95 खत विव्रेते तसेच विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यासोबतच ग्रामपंचायतस्तरावर ‘धरती माता बचाओ’ [...]
दक्षिण-उत्तर विभागांतून होणार मॉडेल वॉर्डची निवड
मनपाच्या पर्यावरण विभागाकडून चाचपणी सुरू : प्रभाग निश्चितीनंतर नगरविकास खात्याला बेळगाव : महापालिकेकडून दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील प्रत्येकी एका प्रभागाची मॉडेल वॉर्ड म्हणून निवड केली जाणार आहे. सदर मॉडेल वॉर्डची माहिती राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिवांकडे दिली जाणार आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मॉडेल वॉर्डांची चाचपणी सुरू असून दक्षिण व उत्तर मतदारसंघांतील कोणत्या प्रभागांची यासाठी निवड करावी [...]
देवाचीहट्टी येथील नागरिकाला लोककल्प फौंडेशनचा आधार
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने नेत्रदर्शन आय हॉस्पिटलच्या साहाय्याने देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथील रुग्णाची मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अवधूत वागळे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यावेळी नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार आणि शशीकुमार उपस्थित हेते. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर [...]
क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित राडा, रन आऊटच्या वादातून पंचाची हत्या
क्रिकेट सामन्यादरम्यान रन आऊटच्या वादातून पंचाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोला अजित बाबू (21) असे हत्या केलेल्या पंचाचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेत आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक मैदानावर रविवारी सायंकाळी क्रिकेट […]
एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ‘ई-बीट’ व्यवस्था
‘आसरा’ योजना ठरतेय प्रभावी : जिल्ह्यात 214 ज्येष्ठ नागरिक बेळगाव : राज्यातील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटक पोलिसांनी राबविलेली ‘आसरा’ योजना प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून हजारो ज्येष्ठांना दिलासा मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ई-बीट केंद्रांची स्थापना करून पोलिसांनी नागरिकांभिमुख सेवेला नवे रुप दिले आहे. या सर्वेक्षणामुळे एकटे राहणाऱ्या 60 वर्षांवरील नागरिकांची अचूक माहिती [...]
प्रभाग क्र.29 मधील चरी बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव : शहरात 24 तास पाणी योजनेसाठी एलअॅण्डटी कंपनीकडून गल्लीबोळात खोदकाम करून जलवाहिनी घातली जात आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 29 मधील सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ आणि गुरुवारपेठ या ठिकाणी खोदाई करण्यात आली होती. सदर चरी तातडीने बुजविण्यात याव्यात यासाठी नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली रहिवाशांनी एलअॅण्डटी आणि केयुआयडीएफसीला निवेदन दिले होते. त्यानुसार या परिसरातील चरी बुजविण्याचे [...]
सव्यसाची पत्रकार…संपादक डॉ. किरणराव ठाकुर
एकेका गावाला त्याचा एक महिमा असतो. त्या त्या गावातील कर्तृत्ववान व्यक्तीमुळे त्या गावाचा नावलौकिक वाढत असतो. बेळगावची भूमी ही नररत्नांची खाणच आहे. पूर्वी ज्याप्रमाणे इंदिरा इज इंडिया असे म्हटले जायचे. तव्दतच बेळगाव म्हटले की अलीकडच्या काळात किरण ठाकुर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कारण त्यांचे योगदानच तितके भरीव आणि प्रभावी आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त काही आठवणी [...]
परवानाधारक सर्वेक्षकांचा एल्गार
राणी चन्नम्मा सर्कलमध्ये ठिय्या आंदोलन : विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : परवानाधारक सर्वेक्षकांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. समान कामासाठी समान वेतन तत्त्वानुसार वेतन, भत्ता, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्ती वेतन व सेवा सुरक्षा द्यावी. सध्याची प्रति फाईल मानधन पद्धत रद्द करून नियमित वेतन प्रणाली लागू करावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत नवीन भरती प्रक्रिया [...]
तृतीयपंथी सुधारणा कायदा रद्द करा
संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : बेळगावातील तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्या भेडसावत आहेत. तृतीयपंथीयांना न्याय, समानता व सन्मान मिळावा, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. राज्य सरकारने तृतीयपंथी हक्कांविरोधात असलेला ‘तृतीयपंथी सुधारणा कायदा 2026“ लागू केला आहे. या कायद्यामुळे विविध संकटांचा सामना करावा लागणार आहे. हा कायदा तृतीयपंथीयांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि अस्मितेवर गदा आणणारा आहे. यासाठी [...]
वाहतूक कोंडीमध्ये घुसमटतोय रुग्णांचा जीव
बेळगाव : बेळगाव शहरातील वाढत्या ट्रॉफिकमुळे रुग्णवाहिकाही अडकू लागल्या आहेत. यामुळे अनेकांना रुग्णवाहिकेमध्येच अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. सोमवारी राणी चन्नम्मा चौक येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे अशाचप्रकारे दोन रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. समाजमाध्यमांवर हा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहराच्या रहदारीवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शहरात पहाल तेथे वाहतूक कोंडीची समस्या सतावत आहे. काही ठिकाणी [...]
नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेने रचला इतिहास, चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण करून अंतराळवीर पृथ्वीकडे रवाना
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या आर्टेमिस 2 मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. या मोहिमेतील चार अंतराळवीरांनी चंद्राची यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असून, मानवी इतिहासात प्रथमच चंद्राच्या त्या ‘पलीकडच्या’ बाजूचे दर्शन घेतले आहे. हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून अंतराळवीरांनी सोमवारी रात्री आपले यान पुन्हा पृथ्वीच्या दिशेने वळवले आहे. या परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना अवकाशातून […]
हलशी-हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
नागरिकांत समाधानाचे वातावरण, महालक्ष्मी यात्रेला मिळणार सुकर मार्ग : यात्रेस 8 एप्रिलपासून होणार प्रारंभ वार्ताहर/हलशी हलशी-हलशीवाडी ते गुंडपी या महत्वाच्या मार्गाचे अखेर डांबरीकरण पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे [...]
मुनियप्पांच्या निवासस्थानाला घेराव
ऑटोरिक्षा चालकांचा एल्गार : गॅस टंचाईवर 10 एप्रिलपूर्वी तोडगा काढण्याचे आश्वासन बेंगळूर : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीची कमतरता भासत आहे. याचा फटका ऑटोरिक्षा चालकांनाही बसला आहे. एलपीजी उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या बेंगळुरातील ऑटोरिक्षा चालकांनी सोमवारी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांच्या निवासस्थानाला घेराव घालून निदर्शने केली. यावेळी मंत्री मुनियप्पा यांनी [...]
बारावीचा निकाल आज नाही; उद्या शक्य
निकालाबाबत परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण बेंगळूर : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत असलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 7 एप्रिल रोजी जाहीर होणार नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यांकन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश निट्टाली यांनी दिले आहे. बहुतेक बुधवार दि. 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात 28 फेब्रुवारी ते 17 मार्च [...]
अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री चहा पिण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बडनेरा येथील सात मित्रांच्या कारला बेलोरा विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन मित्र मृत्यूशी झुंज देत आहेत. अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा जुनी वस्ती येथील सात तरुण सोमवारी मध्यरात्री […]
आणखी दोन वर्षे सिद्धरामय्याच ‘सीएम’!
डॉ. परमेश्वर यांचे वक्तव्य : हायकमांडने स्पष्टीकरण देण्याची गरज नाही बेंगळूर : राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा बाजूला पडला आहे. असे असतानाच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या विषयावर भाष्य केले आहे. सिद्धरामय्या हे आणखी दोन वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहतील. 2023 मध्ये सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री अशी घोषणा पक्षाच्या हायकमांडने केली [...]
‘इंडिया स्किल्स’मध्ये कर्नाटकाला तिसरे स्थान
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी : विद्यार्थ्यांकडून 29 पदकांची लयलूट बेंगळूर : कर्नाटक राज्य आता कौशल्य क्षेत्रात देशात आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रेटर नोएडा येथील ‘इंडिया एक्स्पो मार्ट’मध्ये नुकत्याच झालेल्या ‘इंडिया स्किल्स 2025-2’ या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकने तिसरे स्थान पटकावले. 32 कौशल्य विभागांत झालेल्या या स्पर्धेत 48 स्पर्धकांनी भाग घेतला होता. कर्नाटकने 29 विभागांमध्ये उत्कृष्ट [...]
Iran Israel War –जीव वाचवायचा असेल, तर पुढील 12 तास ट्रेनमध्ये चढू नका; इस्रायलची इराणला उघड धमकी
इराणसाठी मंगळवार, ७ एप्रिल एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. एकीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करारासाठी दिलेली अंतिम मुदत आज संपत आहे, तर दुसरीकडे, इस्रायलने पुढील १२ तासांत इराणच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायली लष्कराने इराणी नागरिकांना रेल्वेचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. असे केल्यास तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल […]
मजगाव येथे गाडेयात्रेनिमित्त इंगळ्या, आज ओटी भरण्याचा कार्यक्रम
वार्ताहर/मजगाव मजगावची गाडेयात्रा रविवार दि. 5 पासून सुरू आहे. सोमवार दि. 6 रोजी सायंकाळी 6.30 वा. मंदिरासमोर इंगळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पार पडला. यावेळी मजगाव परिसरातील सुमारे 10 हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व उद्यमबाग पोलीस स्टेशनच्यावतीने कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पडला. मंगळवार दि. 7 रोजी ग्रामदेवी महालक्ष्मी [...]
वादग्रस्त ठिकाणी लावलेला फलक हटवा
खानापुरातील दलित संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : खानापुरातील केएसआरपी परिसरालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक 30, 38, 40 आणि 45 या शेतजमिनीबाबत सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या फलकामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्मयातील दलित नेत्यांनी खानापूर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन [...]
आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत इतर देशही होरपळून निघाले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला. यानंतर आता पाकिस्तानमध्येऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात कऱण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कठोर पावले उचलली आहेत. 7 एप्रिलपासून देशभरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि दुकाने रात्री 8 वाजता बंद करण्याचा […]
अरिअर्स न मिळाल्याने कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांची सीईओंकडे मागणी बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी सोमवारी कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार यांच्याकडे केली. नवा वेतन आयोग लागू होऊन 20 महिने उलटले तरी अद्याप याचा अरिअर्स कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, [...]
IPL 2026 –विजयरथावर आरूढ दिल्लीला मोठा धक्का; प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं पुनरागमन लांबलं
आयपीएल 2026 च्या हंगामाची धमाकेदार सुरूवात झाली असून आत्तापर्यंत 12 सामने खेळले गेले. उद्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मात्र यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सध्या खांदा आणि कोपरच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे किमान 20 एप्रिलपर्यंत तरी तो सामन्यात परतणार […]
महालक्ष्मी कॉलनीत ड्रेनेज समस्या
ड्रेनेजच्या पाण्यामुळे विहिरी दूषित : त्वरित समस्या सोडविण्याची मागणी बेळगाव : प्रभाग क्रमांक 41 मध्ये येणाऱ्या वडगाव, आदर्शनगर, महालक्ष्मी कॉलनी येथे ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहात आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक रहिवाशांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वडगाव, आदर्शनगर, [...]
मजगावात उद्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
भारत – रशिया, भारत – फ्रान्स अशी प्रमुख लढत बेळगाव : मजगाव येथे ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलीचे आयोजन बुधवार दि. 8 एप्रिल रोजी ब्रम्हदेव कुस्ती आखाडा तलाव आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मैदानाचे सपाटीकरण व जास्तीत जास्त कुस्तीशौकीन बसण्याची व्यवस्था करण्याकडे प्राधान्य दिले जात [...]
भातकांडे हायस्कूलच्या खेळाडूंचा गौरव
बेळगाव : येथील गजाननराव भातकांडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा नुकताच शाळेत मोठ्या उत्साहात झाला. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू प्रगतीवर भर दिला पाहिजे, असे प्रमुख [...]
आंतरक्लब जलतरण स्पर्धा 12 रोजी
बेळगाव : दर्शन गॅलेक्सी हॉल आंतरक्लब निमंत्रित जलतरण स्पर्धा रविवार 12 एप्रिल रोजी, दर्शन गॅलेक्सी स्विमिंग पूल, टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धात्मक जलतरणाला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात तळागाळातील खेळांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, विविध वयोगटांतील तऊण जलतरणपटूंसाठी (मुले आणि मुली) या रोमांचक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शहरातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी [...]
क्रिकेट स्पर्धेत हनुमान स्पोर्ट्स विजेता
वार्ताहर/कणकुंबी बेटणे येथील श्री हनुमान स्पोर्ट्स क्लब आयोजित जांबोटी विभागातील एक गाव एक संघ अशी मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा खास हनुमान जयंतीच्या निमित्ताने व्यवसायिक बबन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.या स्पर्धेत बेटणेच्या हनुमान क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. खानापूर तालुक्याच्या आमदारांच्या सौजन्याने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 40 हजार रुपये व चषक बेटणे [...]
कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजात सुसूत्रता येणार; हायकोर्टाकडून जनहित याचिकेची गंभीर दखल
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. ई-कोर्ट पोर्टलवर प्रकरणांची माहिती तसेच ‘रोजनामा’ अपडेट करण्यात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. यासंदर्भातील जनहित याचिकेची गंभीर दखल मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने घेतली आहे. याचवेळी जिल्हा न्यायाधीशांना ई-कोर्ट पोर्टलसंबंधी सविस्तर माहितीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे […]
भाताचं कोठार अशी ओळख असलेल्या अलिबागमधील पांढरा कांदासुद्धा राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. औषधी गुणधर्म असलेलं ‘पांढरं सोनं’ यंदा बक्कळ पिकलं आहे. पाऊस लांबल्याने पांढरा कांदा थोडा उशिराच बाजारात आला असला तरी त्याला बाजारात मोठी मागणी आहे. यावर्षी तालुक्यात 316 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यामधून 3 हजार 160 मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन […]
हिंदुस्थानातील विविध राज्यांमधील शाळा, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना बनावट बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवून दहशत पसरवणाऱ्या श्रीनिवास लुईस याच्याबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे उघड झाले आहे की, लुईसने केवळ हिंदुस्थानपुरत्या मर्यादित नसून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत. विशेष म्हणजे, त्याने पाकिस्तानातील शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांनाही […]
उल्हासनगरमध्ये खोदकामांनी प्रवाशांचा खिसा कापला
शहरात बहुतांश ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेने रस्त्यांचे खोदकाम सुरू केले आहे. या खोदकामांमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना लांबचा फेरा मारावा लागत असल्याने मीटरचे भाडेदेखील वाढले आहे. दरम्यान, उल्हासनगरातील रस्त्याच्या खोदकामांमुळे प्रवाशांचा खिसा कापला जात आहे तर व्यापाऱ्यांचे धंदे ठप्प पडले असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. लालचक्की चौक ते छत्रपती […]
चार हजार शेतकऱ्यांचा भात गेला कुठे? शहापुरातील 6 केंद्रांवर फक्त 66 हजार क्विंटल भात खरेदी
<<< नरेश जाधव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी राज्य शासन दरवर्षी आधारभूत खरेदी केंद्रांच्या माध्यमातून योग्य हमीभाव देऊन भात खरेदी करते. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र यावर्षी सरकारने बळीराजाला फसवले आहे. शहापूर तालुक्यातील 8374 शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवर भात विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र अवघ्या 4374 शेतकऱ्यांचाच भात खरेदी केला. त्यामुळे 4 हजार शेतकऱ्यांचा भात […]
उरण तालुक्यात डेंग्यूचे 15 रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क; औषध फवारणी सुरू
ऐन उन्हाळ्यात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणच्या कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. सध्याच्या घडीला डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावागावात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, साथीच्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अलर्ट राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील कोप्रोली आरोग्य केंद्राच्या […]
‘मरे’ठप्प; प्रवाशांचे हाल, कल्याण-टिटवाळादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड
कल्याण ते टिटवाळादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आंबिवली रेल्वे स्थानकापासून पुढे टिटवाळ्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर लोकल गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती. उन्हाचे चटके सहन करीत प्रवास करणारे हजारो जण घामाघूम झाले. दीड तासांनी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर ‘मरे’ची वाहतूक […]
Sangameshwar News –संगमेश्वर पंचायत समितीवर 34 लाखांच्या देणीचे संकट
संगमेश्वर पंचायत समितीचा कारभार गेल्या चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला आहे. मात्र,कारभाराची सूत्रे हाती घेताच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांसमोर 34 लाख रुपयांच्या थकीत दायित्वाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या काळात विविध योजना, विकासकामे आणि प्रशासकीय खर्चाचे नियोजन करताना ही 34 लाखांची देणी निर्माण […]
सावंतवाडीत आजपासून जयानंद मठकर व्याख्यानमाला
मठकर स्मृती पुरस्कार डॉ. महेंद्र मोहन यांना जाहीर सावंतवाडी : प्रतिनिधी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२६ मंगळवार ७ एप्रिल ते शनिवार ११ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. [...]
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धगधगत्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत अक्षम्य हेळसांड झाली. नगरविकास विभागाच्या इशाराऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने दालनाची भग्नावस्था करून ठेवली. ठिकठिकाणी पाण्याची गळती, भिंतीना बुरशी, कुबट […]
तोतया पोलिसांचा सापळा; ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटले, एकाच दिवशी दोन घटना घडल्याने भीतीचे वातावरण
पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लुटण्याचा सापळाच आखला आहे. एकाच दिवशी अशाच पद्धतीने तोतया पोलिसांनी दोन वृद्धांना लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल दहा लाखांचे दागिने लुटले. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोडबंदर रोड येथे […]
महानगर गॅस लाईनच्या कामासाठी बालकामगार जुंपले, शिवसेनेचा आरोप
महानगर गॅस लाईनच्या कामासाठी बालकामगार जुंपल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. पेंडसेनगर गल्ली क्रमांक 1 येथे महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस लाईन जोडणीचे काम सुरू आहे. हे काम बालकामगारांकडून केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख हेमंत गिमावकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त, महावितरणकडे लेखी तक्रार केली आहे. पेंडसेनगर रोड क्रमांक […]
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणही इरेस पेटला आहे. इराणने कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावर ड्रोन हल्ला केला असून यात किमान 15 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. दरम्यान, इराणने सौदी अरेबियाच्या पूर्व भागात सात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. टीव्ही 9 […]
मित्राने गुंतवणूकदारांना घातला 50 लाखांचा गंडा
मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणाने आपल्याच बालपणीच्या मित्रासह अन्य 10 जणांना तब्बल 49 लाख 54 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 5 ते 7 टक्के आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी सागर साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अभिजित […]
पनामा कालव्याच्या पॅसिफिक प्रवेशद्वारावर असलेल्या ऐतिहासिक ‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ जवळ सोमवारी एका इंधन टँकरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीचे लोट पुलाच्या मुख्य भागापर्यंत वेगाने पसरल्याने पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या […]
Virat Kohli on Dhurandhar 2- रणवीरच्या अभिनयावर ‘किंग’कोहली फिदा; म्हणाला, 4तास नजर हटलीच नाही!
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह स्टार ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या 20 दिवसांत छप्परफाड कमाई करत तब्बल 1 हजार 600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले असून सामान्यांपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनीच हा चित्रपट पाहिलाय. या यादीत आता टीम इंडियाचा […]

28 C