सरकार जे करेल, त्याला साथ देणे, हेच आता ED चे काम उरले आहे –कपिल सिब्बल
आजच्या काळात इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ED) हे इन्फोर्समेंट राहिले नसून एन्डॉर्समेंट डिरेक्टोरेट झाले आहे. सरकार जे करेल, त्याला साथ देणे हेच त्यांचे काम उरले आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा […]
Ratnagiri News –भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाकडून सुटका
भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास वन विभागाला यश आले आहे.बिबट्या विहिरीच्या कपारीत जाऊन बसल्याने पिंजऱ्यात येत नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. वन विभागाने बिबट्याची सुखरुप सुटका करत त्याला जंगलात सोडून दिले.
जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, जो तुरुंगात जाईल तोच प्रामाणिक –अरविंद केजरीवाल
जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, जो तुरुंगात जाईल तोच प्रामाणिक आहे, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह […]
‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही- संजय राऊत
‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत. बातमी अपडेट […]
इराणने ट्रम्प यांचा दावा होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुडवला; अमेरिकेसोबत कोणतीही वाटाघाटी नाही!
मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धपूर्व स्थितीत परतणार नाही आणि ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता कायम राहील, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा वाटाघाटी सुरू असल्याचा दावाही इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इराणच्या ‘तसनीम’ या […]
Sangli News : सांगली-मिरज-कुपवाड शहरातील कचऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा?
भाजप नेते पृथ्वीराज पवार यांची चौकशीसाठी मागणी सांगली : कचरा हे सोनं मानलं जातं आणि सांगली-मिरज-कुपवाड शहरातील कचऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे काम सुरू आहे. आर्थिक संकटातील महापालिकेला उत्पन्न वाढीची संधी असलेला कचरा प्रकल्प ठेकेदाराचे कोटकल्याण करण्यासाठी चालवला जात आहे. ठेकेदार कंपनी कोटीत कमाई करत असून पालिकेच्या तिजोरी दरोडा टाकला जातोय. या प्रक्रिया कराराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत [...]
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीच्या 03 […]
प्रयागराजमध्ये मोठी दुर्घटना, शीतगृहाची भिंत कोसळली; अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील फाफामऊ येथे सोमवारी दुपारी एका शीतगृहाची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 8 ते 10 कामगार जखमी झाले आहेत. […]
अज्ञातांकडून लावलेल्या आगीत ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ जळून खाक; खेडमध्ये खळबळ
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला अज्ञात व्यक्तींने आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून सोमवारी रात्री […]
प्रत्येक संकटाचा बोजा जनतेवरच का? पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील विधानावर अरविंद केजरीवाल यांचा सवाल
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी तयार राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले होते. पंतप्रधानांच्या या विधानाचा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला असून, सरकारच्या अपयशाचा आणि प्रत्येक संकटाचा बोजा शेवटी सामान्य जनतेवरच का टाकला जातो, असा सवाल करत जोरदार पलटवार […]
आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने एका मोठ्या बदलाची घोषणा केली असून, संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यामुळे आता संघाची कमान युवा फलंदाज रियान परागकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयावर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपले मत व्यक्त केले आहे. अश्विनच्या मते, राजस्थान रॉयल्स हा संघ नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतो. रियान परागकडे आसामच्या घरगुती संघाचे […]
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. इराणने हार्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. जर या काळात इराणने सामुद्रधुनी खुली केली नाही तर त्यांच्या उर्जाक्षेत्रांवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. तर इराणनेही अमेरिकेला आक्रमक प्रत्युत्तर देत आमच्या उर्जा क्षेत्रावर हल्ला झाला तर आखाती देशातील सर्व उर्जा क्षेत्रावर हल्ला चढवण्याचा […]
सौर प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव?
धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जमीन बळकावून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणात सेरेनिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तुळजापूर येथील गट क्रमांक 284 व 285 मधील जमिनी संदर्भात सुमारे 400 एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विनापरवानगी जमिनीवर प्रवेश, मोजमाप व विविध कामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मालकी हक्कांवर गदा येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात शेतकरी रेणुका राजेश राठोड व रुक्मिणबाई निलाप्पा राठोड यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर तुळजापूर न्यायालयात दिवाणी दावा क्र. 556/2025 दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा तक्रार सादर करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाकडून गावच्या तलाठ्यामार्फत व्हॉट्सपद्वारे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून 18 मार्च रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुनावणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच 15 व 16 मार्च 2026 रोजी कंपनी प्रतिनिधींनी संबंधित जमिनीवर जाऊन मोजमाप करण्याचा प्रयत्न केल्याने महिला शेतकऱ्यांशी वाद निर्माण झाल्याचा तसेच दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही जबरदस्तीची कारवाई थांबवावी, संबंधित कंपनीच्या हालचालींची चौकशी करावी, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पाहणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रूक्मिणबाई राठोड, रेणुका राठोड यांची स्वाक्षरी आहे.
अशोक खरातसोबत फोटो असलेल्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची विधानसभेत मागणी
भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असून, त्याच्यासोबत ज्यांचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नियम १०१ अन्वये तातडीने चर्चा करण्याची विनंतीही त्यांनी अध्यक्षांना केली. विधानसभेत बोलताना […]
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे. इराणच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करण्यासाठी आखण्यात आलेला पॉवर प्लांटवरील हल्ल्याचा प्लॅन तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेला युद्धाचा मोठा धोका सध्यातरी टळल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला […]
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स या नामांकित कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन दि.25 मार्च 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता करण्यात आलेले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी दिली. या मुलाखतीसाठी दहावी पास व आयटीआय , बारावी पास व आयटीआय , डिप्लोमा, बी.ए., बी.कॉम , बी.एस्सी भाग तीन मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी या परिसर मुलाखतीसाठी पात्र समजले जाऊ शकतात. सदर मुलाखतीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/tPQMBq9vCS3gPCxbA या लिंक चा वापर करू शकता किंवा 9730961816 या क्रमांकावर संपर्क साधून प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती लोंढे यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मुलाखतीसाठी धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले आहे.
तुळजापूर भूमि अभिलेख कार्यालयातील बेफिकिरीचा कळस; जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार
तुळजापुर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या वाढत्या तक्रारींना आता संघटनात्मक पातळीवरून आवाज मिळू लागला आहे. कार्यालयातील अनियमितता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरिकांच्या कामांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे संतापाची लाट उसळत आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर स्वतः गणेश पाटील यांची स्वाक्षरी असून, कार्यालयातील सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे काही अधिकारी व कर्मचारी दीर्घकाळ मुख्यालयी राहत नसल्यामुळे कामकाज ठप्प होत आहे. नागरिकांना साध्या कामासाठीही अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, मात्र अपेक्षित सेवा मिळत नसल्याने प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे. ही बाब केवळ तक्रारींपुरती मर्यादित नसून, प्रत्यक्षात नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित कामे, नोंदी, उतारे आदी महत्त्वाच्या प्रक्रियांना विलंब होत असून, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत माहिती असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे “शासकीय शिस्तीचे धाबे दणाणले आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, गणेश पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकूणच, तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न आता गंभीर बनला असून, प्रशासनाने वेळ न दवडता ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविंद्र हायस्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल
भुम (प्रतिनिधी)- सिद्धी मोटे, बळे संजना, हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित, बोराडे राजलक्ष्मी, शरयू साठे, डोके अनुष्का, दुधाळ ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, चौरे स्नेहा, शिंदे क्षितिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. तर रविंद्र प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर, शिवाजी मद्देवाड, अमित भालेकर, सचिन कलमे यांचाही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापुरात अद्यावत वातानुकूलित नाट्यगृह उभारणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त असे पूर्णतः वातानुकूलित भव्य आणि अद्यावत नाट्यगृह उभारणार असल्याची अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तुळजापूर आणि परिसरातील नाट्य चळवळीला मोठी उभारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंचरंग प्रतिष्ठान आयोजित श्री क्षेत्र तुळजापूर राज्यस्तरीय पंचरंग करंडक एकांकिका लेखन स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण आणि निवडक एकांकिकांच्या “अंकुर“ या संग्रहाचा प्रकाशन सोहळा हॉटेल स्कायलँड येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहून नवोदित लेखकांच्या सृजनशीलतेचा गौरव केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख, ख्यातकीर्त सिने गीतकार तथा प्रसिद्ध कवी व नाट्य लेखक प्रा. डॉ. दासू वैद्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची अधिकच वाढली. व्यासपीठावर तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, शंतनू गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंचरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे, सचिव प्रा. संभाजीराव भोसले, उपाध्यक्ष सचिन घोडके, स्पर्धा संयोजक महेश धुमाळ आणि दिग्विजय भोसले यांच्यासह नाट्य व साहित्य क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्या लेखकांचे आणि अंकुर संग्रहात स्थान मिळवलेल्या साहित्याचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात लौकिकस्पद कामगिरी बजावल्याबद्दल सरोजा नरेश अमृतराव, नीता दिनेश क्षीरसागर डॉ. शिवतेज संभाजी भोसले, डॉ. निविता नारायण नन्नवरे कु. सृष्टी धनंजय पाटील, प्रा. ऋतुजा अनिल रोचकरी, कासिफ ख्वाजा सय्यद, स्वप्नील ऋषीकांत भोसले, डॉ. रिया राजेश शिंदे, भक्ती सुधाकर उळेकर, शिवतेज सुधाकर उळेकर, तुषार तुळसीदास साखरे, आदिती सचिन घोडके, रुहान शंतनू गंगणे, श्रुती राजेश चोपदार, आयुष राजेश जगताप वरील सर्व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा
धाराशिव (प्रतिनिधी)- रोजगारनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागातील तब्बल 45 विद्यार्थ्यांची पुणे येथील एजिओ या नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत निवड झाली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच औषधनिर्माण (फार्मसी) क्षेत्रातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वीही येथील विद्यार्थ्यांची रिलायन्स फार्मास्युटिकल, टीसीएस, वखार्ड, श्रेया लाइफ सायन्स, एमक्युर, लुपिन, सिप्ला यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. या यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगांना अपेक्षित असलेली कौशल्ये शिकवतो. याचा परिणाम म्हणून तांत्रिक पारंगतता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी दिवसेंदिवस नामांकित कंपन्या महाविद्यालयाच्या संपर्कात येत आहेत. येत्या महिन्यांत आणखी दहाहून अधिक फार्मसी कंपन्यांचे प्लेसमेंटसाठी प्रस्ताव आले असून, त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना सक्षम वेतनासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,“ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास या बाबींवर विशेष भर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर मुलाखतीच्या सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये धनश्री पावले, आकांक्षा कुलकर्णी, श्रेया धारुकर, सानिका वडणे, पवन माने, ओंकार गंजे, श्रावणी भोसले, संकेत वाघमारे, समृद्धी पाटील, अंकित क्षीरसागर, सोनल हिंगमिरे, विशाखा वाघमारे, रोहन करमाने, ज्ञानेश्वर जाधव, प्राजक्ता कुमटी, निकिता मुळे, माधुरी घुगे, समृद्धी जमदाडे, स्वप्नाली गडकर, कल्याणी शिंदे, सुनील डोळे, सायली खोपडे, ऋतुजा दिवाने, अंकिता गुजर, आकांक्षा देशमुख, पवन चव्हाण, श्रेया पाटील, अजित लांडगे, अश्विनी पालकर, नरेंद्र मंडीवाल, प्रतिमा कोळेकर, सृष्टी कोळी, वैष्णवी डोंगरे, आविष्कार हाके, अनिकेत साबळे, सोनू चव्हाण, प्रियंका शिंदे, प्राची इंगोले, आकांक्षा दंडनाईक, वैभव गुंजाळ, सलोनी सोनवणे, अमृता माने, सानिका पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.हा प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संभव फाउंडेशन, बंगलोर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अशोक जगताप, फार्मसी विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. चिवटे व श्री. मुंढे यांनी या ड्राइव्हसाठी विशेष परिश्रम घेतले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, उपाध्यक्ष तथा विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, फार्मसी विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
Solapur |सोलापूर पोलिसांचा मोठा दणका! आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, ६ दुचाकी जप्त
सोलापूरमध्ये आंतरराज्यीय दुचाकी चोर अटक; ६ मोटारसायकली जप्त सोलापूर -सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरराज्यीय दोन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून पावणे दोन लाखांच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.प्रमोद अर्जुन जेऊर (वय २१, रा. अतारगा ता. इंडी जि. विजयपूर) आणि अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय २६, रा. जाधव वरती, [...]
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नगर परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात
कळंब (प्रतिनिधी)- गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नगर परिषद शाळांमध्ये “प्रवेश वाढवा अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. पीएमश्री नगर परिषद शाळा क्रमांक 02 येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये प्रवेश वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते नव्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व गुढी पाडव्याचा पारंपरिक हार देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. पालक व नागरिकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. तसेच, नगर परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. याअंतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर तसेच आय.डी.एल. सेंटर यांचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळणार आहे. या कार्यक्रमाला नगर परिषद उपाध्यक्ष लखन गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनीरोद्दीन शेख, नगरसेवक सागर मुंडे, सौ. सफूरा काझी, सौ. अर्चना मोरे, प्रशांत लोमटे, हर्षद अंबुरे, भूषण करंजकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नगर परिषद शाळांमार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर हे केवळ कळंब शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. भविष्यात नगर परिषद शाळा पूर्णपणे डिजिटल व अद्ययावत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या उपक्रमामुळे नगरट परिषद शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असून, पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता व आधुनिकतेचा संगम घडवून आणण्याचा नगर परिषदेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
BCCI ने IPL 2026 च्या पहिल्या टप्प्यासाठी ‘फॅन पार्क’ची अधिकृत घोषणा केली आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये न जाताही तसाच रोमांचक अनुभव मिळावा, यासाठी 11 राज्यांमधील 15 शहरांची निवड करण्यात आली आहे. हे फॅन पार्क 28 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत एकूण तीन आठवड्यांच्या वीकेंडला (शनिवार-रविवार) आयोजित केले जातील. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही […]
Solapur |सोलापूरचा पारा चाळीशीपार, पण घसा कोरडाच; शहरात पाणपोई गायब झाल्याने तहानलेल्यांची वणवण
सोलापूर शहरात तहानलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय सोलापूर -मार्च महिन्यात सोलापूरचे तापमान चाळीशीच्या पुढे गेले. अंगाची लाही लाडी होत असताना घसा कोरडा पडलेल्या कष्टकऱ्यांची नजर पाणपोई शोधत आहे, पण शहरात मात्र त्यांच्या हाती निराशाच लागत आहे. अशा कडक उन्हाळ्यात तहानलेल्या प्रवासी आणि गरजू नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी उभारल्या [...]
अमेरिकी तळांना वीज पुरवल्यास खैर नाही; इराणच्या इशाऱ्याने आखाती देशांमध्ये धास्ती
येत्या 24 तासांत मध्य आखाती देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत मंगळवारी मध्यरात्री संपणार आहे. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील आपला ताबा सोडावा, अन्यथा त्यांच्या वीज प्रकल्पांवर हवाई हल्ले केले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. या धमकीमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग पसरले असून आता केवळ […]
इराणचा अमेरिकेला मोठा झटका, कुवेतमध्ये लढाऊ विमान पाडल्याचा दावा
इराण ब्रॉडकास्टिंगच्या एका अहवालानुसार, कुवेतमध्ये एका अमेरिकन लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यात आले आणि त्यानंतर ते कोसळले. मात्र हल्ला कसा झाला याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती अजूनही देण्यात आली नाही. या घटनेची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि परिस्थिती अस्पष्ट आहे. अमेरिकन लष्कराने या दाव्यावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. कुवेतमध्ये अमेरिकन लढाऊ विमान पाडल्याच्या दाव्याच्या […]
PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी
पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) 11 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत असतानाच, या स्पर्धेवर दहशतवादाचे मोठे सावट पसरले आहे. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि विशेषतः ‘जमात-उल-अहरार’ या सशस्त्र गटाने एक अधिकृत पत्रक काढून परदेशी खेळाडूंना थेट धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील सध्याची राजकीय आणि सुरक्षा स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगत, परदेशी खेळाडूंनी स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी या स्पर्धेतून त्वरित […]
गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी; प्रशासन केरोसिन वाटपावर लक्ष सोलापूर -आखाती देशांत सुरु असलेल्या युध्दांमुळे गॅस टंचाई प्रभावित झाल्याने आता रेशन कार्ड धारकांना केरोसिन वाटप करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहे. सध्यस्थितीत करोसीन वाटप केल्यास त्यासाठी आवश्यक स्टोव्ह किती उपलब्ध आहे, केरोशीन कशी उपलब्ध करायची याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, [...]
शिल्लक राहिलेला इंटरनेट डेटा पुढच्या दिवसासाठी रोलओव्हर करावा, खासदार राघव चड्ढा यांची संसदेत मागणी
डिजिटल युगात इंटरनेट ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज बनली असताना, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत सर्वसामान्य मोबाइल वापरकर्त्यांच्या हिताचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मोबाइल ग्राहकांना मिळणारा दैनंदिन डेटा जर त्या दिवशी पूर्ण वापरला गेला नाही, तर तो वाया न जाता पुढील दिवसासाठी वापरता यावा, म्हणजेच डेटा रोलओव्हरची (Data Rollover) सुविधा […]
सिंधुदुर्गात तळपत्या उन्हातही रस्त्यावर ठिय्या; आंबा, काजू बागायतदार नुकसान भरपाईसाठी आक्रमक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीच्या मागणीसाठी असलदे पेट्रोल पंप येथे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने 11.15 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी विविध नेत्यांनी भर उन्हात मार्गदर्शन केले. सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलन कालावधीत महामार्गावरील पर्यायी रस्त्यांमार्गे वाहतूक वळवली. त्यामुळे राजू शेट्टी यांनी अचानक […]
उंब्रजमध्ये शेताच्या बांधावरून रणकंदन! दोन कुटुंबांत रॉड आणि कोयत्याने हाणामारी
उंब्रज शेतातील बांधावरून कुटुंबात धक्काबुक्कीउंब्रज (ता. कराड) गाबच्या हद्दीत शेतातील बांधाच्या कारणाबरूत दोग कुटुंबात रॉड, कोषता, निळ्याने मारामारी झाली. पानष्पे पाच जण जखमी झाल्याची पटना १८ रोजी सकाळी ९ बाजण्याच्या सुमारास पडली. याप्रकरणी नऊ जणांबर उंब्रज पोलीस अण्पात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात আলা आहे. [...]
मिरचीच्या दराने गाठला उच्चांक, यावर्षी तिखट पावडर महिलांच्या डोळ्यात पाणी आणणार
अवकाळी पाऊस आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात मिरची उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम बाजार भावांवर जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखट-मसाल्यांची तयारी सुरू झाली असली, तरी मिरचीच्या वाढलेल्या दरांनी गृहिणींचे गणितच बिघडवले आहे. मिरची पासून तयार केल्या जाणाऱ्या तिखट पावडरचा दर थेट एक हजार पन्नास रुपये किलोवर पोहचल्यामुळे महिलांच्या […]
उंब्रजमध्ये काळाचा घाला! ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
पेरले येथील तरुणाचा उंब्रजमध्ये भीषण अपघातात अंत उंब्रज -भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची ट्रकला पाठीमागे धडक बसून झालेल्या अपघातात २७वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उंब्रज (ता. कराड) येथील पाटण तिकाटणे येथे ही घटना घडली. समाधान आनंदराव चव्हाण (वय २७, [...]
एलॉन मस्कची नव्या प्रकल्पाची घोषणा, ‘टेराफॅब’ AI चिप प्रकल्पाचे केले अनावरण
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी टेक्सासमधील ऑस्टिन येथे महत्त्वाकांक्षी टेराफॅब सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची आपली योजना जाहीर केली आहे. हा प्रकल्प टेस्ला आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाईल, तसेच त्याला त्यांच्या xAI या एआय कंपनीचेही सहकार्य लाभेल. डाउनटाउन ऑस्टिन येथील कार्यक्रमात बोलताना मस्क यांनी सांगितले की, ही सुविधा विविध प्रकारच्या चिप्सचे उत्पादन आणि […]
कोल्हापूर महापालिकेकडून दररोज ४२ दशलक्ष लिटर मैलापाणी थेट नदीत कुरुंदवाड -पंचगंगा व वारणा नद्यांमध्ये औद्योगिक व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोडल्या जाण्मया सांडपाण्यामुळे प्रदूषणाची समस्या तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यांच्या अहवालातून हा प्रकार समोर आला असून संबंधित विभागांना तातडीच्या कारवाईचे निर्देश देण्यात आले [...]
जोतिबा डोंगरावर हुल्लडबाज आणि पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी
जोतिबा डोंगरावर काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे दख्खनचा राजा श्रीजोतिबा मंदिरात पुजारी आणि त्या हुल्लडबाजांमध्ये काल रविवारी दुपारी जोरदार राडा झाला. त्यांनंतर भाविकांसह पुजाऱ्यांनी या हुल्लडबाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. चूक लक्षात येताच जेष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त करून, वादावर पडदा टाकला. पण मारहाणीचे चित्रिकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ […]
Gold Silver Rate –सुरक्षित गुंतवणूक तोट्यात गेली; सोने-चांदीत मोठी घसरण
गेल्या वर्षी सोने-चांदीत जबरदस्त तेजीची रॅली दिसून आली होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोनेचांदीच्या दरात मोठे चढउतार होत आहेत. अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाचाही सोनेचांदीच्या दरावर परिणाम होत आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार सोनेचांदीत गुंतवणूक करतात. मात्र, हे युद्ध याला अपवाद ठरत आहे. या युद्धाच्या काळात सोनेचांदीचे दर वाढण्याऐवजी मोठ्या प्रमाणात […]
दोन बायका 18 मुलं, सुमेरपूरच्या माजी सरपंचाची प्रेमप्रकरणातून हत्या; कालव्यात आढळला मृतदेह
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या गुलशन उर्फ मुन्ना हत्याकांड प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रेमसंबंध आणि त्यातून झालेल्या ब्लॅकमेलिंगमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुन्ना यांची प्रेयसी सुमन देवी आणि तिच्या भावाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना […]
सचिन बसैये यांना पीएच.डी. पदवी प्रदान
धाराशिव (प्रतिनिधी)- सचिन कचरुलाल बसैये यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शोधप्रबंधासाठी त्यांना डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सचिन बसैये यांच्या या यशाबद्दल डॉ. सुयोग अमृतराव, संचालक व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव तसेच डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे, वरुण कळसे, हेमंत बसैये, विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि मित्रपरिवाराने त्यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे शहीद दिनानिमित्त देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू या शहीदांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ विजयसिंह देशमुख यावेळी म्हणाले की, भगतसिंग यांच्यावर बालपणापासूनच देशाप्रती प्रेम होते. या तिन क्रांतिकारकांना ज्यावेळी फाशी देण्यात येत होती त्यावेळी फाशीचा दोर सुध्दा दुःखी होता. पण यांच्या चेहऱ्यावर हसू होते. जालियनवाला बाग हत्याकांड, लाला लजपतराय यांच्यावर झालेला अमानुष लाठीमार या घटनांमुळे हे तरुण पेटून उठले होते. भारत मातेच्या जमिनीची माती कपाळी लावुन हसतमुखाने फासावर गेलेले तरुण क्रांतिकारक यांना भारत कधीच विसरणार नाही. फक्त आजच्या तरुणांना या शहीदांची ते का शहीद झाले याची जाणीव असावी असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूरमध्ये गुटखा माफियांचे साम्राज्य
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरसह संपूर्ण पंचक्रोशीत गुटख्याची अवैध आयात व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे. तुळजापूर शहर व तालुक्यात कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात होत असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून तेथून होलसेल पद्धतीने गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठादार वेगळा आणि वितरक वेगळा अशी संपूर्ण साखळी तयार करून गुटखा माफिया राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही ती केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अवैध गुटखा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून या गुटखा माफियांना कोणाचे आर्थिक पाठबळ आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करून गुटखा माफियांवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आरळी खुर्द- काळेगाव रस्त्याची 25 वर्षांपासुन दुरवस्था
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी (खुर्द), आरळी (बु.), काळेगाव या अत्यंत महत्त्वाच्या प्रमुख जिल्हा मार्गाची गेल्या तब्बल 25 वर्षांपासून दुरवस्था कायम असून, या भागातील नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाकडून दीर्घकाळ कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. काही वर्षांपूर्वी हा रस्ता जिल्हा नकाशावरूनही गायब असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शासनस्तरावरून निधी मिळण्यात अडथळे आले. परिस्थिती असह्य झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून स्वखर्चातून रस्त्याची डागडुजी केली. मात्र ही तात्पुरती उपाययोजना ठरली आणि काही काळातच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब झाला. आता रस्ता नकाशावर समाविष्ट असूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्ह्यातील गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद या रस्त्याचा प्रश्न आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सभापती आदींकडे सातत्याने मांडण्यात आला. पण प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनी रस्ता प्राधान्याने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थाबाबत हा एकच प्रश्न विविध पक्ष नेते व प्रशासनाकडे मांडून मांडून स्थानिक लोकप्रतिनिधी ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आरळी बुद्रुकच्या या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या लाखों खोल खड्ड्यांमुळे या मार्गावरून दररोज जाणारी शेकडो वाहने नादुरुस्त होत असून, वाहनधारकांना सतत सर्व्हिसिंगचा खर्च सहन करावा लागत असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांना मोठे धक्के बसत असल्याने सस्पेन्शन, टायर, शॉकर, ब्रेक सिस्टीम यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, वारंवार पंचर होणे, वाहन घसरणे आणि अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. आरळी (खुर्द) आरळी (बु.) काळेगाव हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून, आता प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. बस सेवा बंद; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा काही काळ बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुळजापूरला जाणे कठीण झाले. अनेकांना शिक्षण सोडण्याची वेळ आली. खासगी वाहनांवर अवलंबित्व वाढले, ज्यामुळे खर्चही वाढला, ग्रामस्थांनी स्वतः रस्ता दुरुस्त केल्यानंतर काही प्रमाणात सेवा सुरू झाली, मात्र पुन्हा रस्ता खराब झाल्याने समस्या कायम आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे अवघड झाले असून गर्भवती महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. प्रवासादरम्यान होणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्याचे व सांध्यांचे आजार वाढले असून अनेक वेळा अपघात होऊन जखमींची संख्या वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बाजारपेठेवर परिणाम; आर्थिक फटका आरळी बुद्रुक हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या इंग्रजकालीन बाजारपेठेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या रस्त्याद्वारे परिसरातील दहा ते बारा गावांचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी आणि ग्राहकांची ये-जा कमी झाली. बाजारपेठेची उलाढाल घटली,स्थानिक व्यवसायांवर परिणाम झाला परिणामी, या भागातील अर्थचक्र मंदावल्याचे चित्र आहे. आमदारांकडे ठोस कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.“रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष यांची आढावा बैठक संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष, धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस प्रहार पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू झांजवळ, प्रहार दिव्यांगचे राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव, राज्य उपक्रम समन्वयक महेश बडे, तसेच धाराशिव संपर्क प्रमुख अमोल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सोलापूर प्रहार पक्षाचे सातलिंग स्वामी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्हा, तालुका व शाखास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील संघटना व पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संघटनात्मक बांधणी आणि प्रहारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आगामी आंदोलन व विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप बल्लू झांजवळ यांनी केला. बैठकीचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांचा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीस संघटनेचे सर्व जिल्हा, तालुका व शाखास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीचे आयोजन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले. या बैठकीसाठी जमीर शेख, महादेव चोपदार,अमोल शेळके, इंद्रजीत मिसाळ,बाबासाहेब भोयटे, औदुंबर भणगे, राजेंद्र आकाडे, सतिश कोळगे, पिंटू क्षीरसागर, शाहजी शेरखाने, रामभाऊ तांबे, दिपक गव्हाणे, कुमार नरवडे, अमोल पाडे पाटील, कृष्णा राऊत, मारुती कांबळे, पाडे बारीकराव माळी आदी उपस्थित होते.
Kolhapur News |पुलाची शिरोलीत ६५ वर्षीय वृद्धाची आत्महत्या; आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
पुलाची शिरोलीत वृद्धाची आत्महत्या; परिसरात खळबळ पुलाची शिरोली – येथील बालेचांद पीर दर्याजवळ एका ६५ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रामचंद्र राघू गावडे (वय ६५, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दीर्घकाळापासून असलेल्या [...]
बारा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवून मजुरीही दिलाचा प्रकार माहितीच्या आधारे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा ग्रामपंचायत मधील घटना आहे. मृतक ला गावातील कोंडवाड्यातील जनावरांना पाणी, चारा खायला देण्याच काम देण्यात आलं आणि या कामाची ग्रामपंचायतेने मजुरी दिली दिल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक आणि अकल्पित […]
Kolhapur News |उदगाव बायपासवर थरार! कारचा इंधन टाकाचा स्फोट होण्यापूर्वीच….
उदगावात धावत्या कारला आग; सात जणांचे थरारक बचाव उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील औद्योगिक वसाहतीच्या बायपास मार्गावर रविवारी दुपारी एक थरारक घटना घडली. नृसिंहवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एका सात आसनी चारचाकीला अचानक भीषण आग लागली. आगीचे लोट पाहून रस्त्यावरून जाणारे भाजप नेते सावकार मादनाईक आणि स्थानिक नागरिकांनी [...]
मार्क झुकरबर्ग बनवताहेत AI सीईओ एजंट, आता मेटाचे काम होणार अधिक गतिमान
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग हे त्यांचे काम अधिक सुलभ होण्यासाठी, एक ‘सीईओ एजंट’ तयार करत आहेत. अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी दिली आहे. हा एआय एजंट झुकरबर्ग यांच्या मदतीस सज्ज असणार आहे. जी माहिती मिळवण्यासाठी त्यांना अनेकांच्या संपर्कात राहायला लागत आहे. तिच माहिती आता हा एआय एजंट मिळवून देणार आहे. वृत्तानुसार, हा […]
पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की प्रकरण भोवले; सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री साताऱ्याचे पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मतदारांना रोखल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेत घेण्यात आली असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सातारा पोलीस प्रशासनावर कडक [...]
भाजपसोबतच्या युतीत कालसारखे कटू अनुभव आम्हालाही येत आहेत, शिंदेगटाच्या मंत्र्यांची सभागृहात कबुली
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत पाहायला मिळाले. या प्रकरणावरून विधानपरिषदेत भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांचे सूर उमटले.सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळावर भाष्य करताना मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपसोबतच्या युतीत आम्हालाही कटू अनुभव येत असल्याची कबुली सभागृहात दिली. विधान परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या स्थानिक […]
साताऱ्याचे राजकीय वातावरण तापले! सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून अध्यक्षपदासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत, निवडणूक [...]
दिल्ली विमानतळावर वन्यजीव तस्करीचा प्रयत्न उधळला; तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगेत आढळली हरणाची शिंगे
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीव तस्करीचा भांडाफोड करण्यास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) ला यश आले आहे. सीआयएसएफने बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून संशयास्पद हरणाची शिंगे जप्त केली आहेत. या प्रवाशाला वन्यजीव संरक्षण प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान सुरक्षा […]
मालवणात 24 मार्चला कृषी महोत्सवाचे आयोजन
मालवण प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत ओम साई गणेश मंगल कार्यालय ( मामा माडये हॉल),कट्टा बाजारपेठ मालवण येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची [...]
एतिहाद एअरवेजमध्ये हिंदुस्थानी व्यक्तीला मिळाली अविस्मरणीय क्षणांची अनुभूती
एतिहाद एअरवेजमध्ये एका हिंदुस्थानीला एका अविस्मरणीय अनुभवाची अनुभूती मिळाली. त्या व्यक्तीने केलेली एक साधी विनंती, अविस्मरणीय अनुभवामध्ये बदलली आहे. वंश मोटवानी नामक या व्यक्तीने फ्लाइट अटेंडंटला नम्रपणे विचारले की, मला कॉकपिटला भेट देण्याची काही संधी आहे का? फ्लाइट अटेंडंट सुरुवातीला सावधपणे प्रतिसाद देते, कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानात अशा विनंत्यांना सहसा परवानगी नसते. नंतर मात्र ती […]
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत आखाती देशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आखाती युद्धामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी हिंदुस्थान एक आहे. आमचे सर्व दूतावास अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यात गुंतली आहेत. हिंदुस्थानींच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे […]
मंत्री मार खाताहेत, आता सत्ता सोडण्याची हिंमत आहे का? अनिल परब सभागृहात आक्रमक
सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी झालेल्या राड्यात राज्याचे मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावरून आज विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. विधानपरिषदेत सकाळी या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना […]
जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सक्रिय नवी दिल्ली –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थान, ७ लोक कल्याण मार्ग येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला वरिष्ठ सरकारी मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पेट्रोलियम, कच्चे तेल, [...]
लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या रुग्णवाहिकांची जाळपोळ; पोलिसांकडून द्वेषपूर्ण गुन्ह्याची नोंद
उत्तर लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चार रुग्णवाहिका अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. गोल्डर्स ग्रीन भागात सोमवारी पहाटे 1.40 वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या हल्ल्याची नोंद ज्यूविरोधी द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून केली जात आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही […]
अशोक खरात या तथाकथित भोंदूबाबा प्रकरणात ज्यांचा कुणाचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यांना सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात दिले. अशोख खरात प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले. ”जे घडलंय ते गंभीर आहे या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत गुष्कृत्य केल्याचे समोर येतंय. यासंदर्भातील कारवाई आपल्या […]
दोघेही झुआरीनगरातील : कुयेलीजवळील अपघात वास्को : वेलसांवहून कुयेली गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत अरूंद रस्त्यावर काल रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दोघे युवक जागीच ठार झाले. दुचाकीचालकाच्या भरधाव वेगामुळे हा अपघात घडला. मूळ कर्नाटकी असलेले हे मयत युवक झुआरीनगरातील राहणारे होते. व्यंकटेश बसरी (24 वर्षे) व राकेश संकप्पनावर (26 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. उपलब्ध माहितीनुसार हा [...]
Sangli |सांगली-पेठ मार्गावर भीषण अपघात; ऊस ट्रॉलीला कारची धडक, सांगलीतील महिलेचा जागीच मृत्यू
सांगली-इस्लामपूर मार्गावर वेगामुळे अपघात आष्टा -सांगली-पेठ मार्गावर बाक्ची (ता. वाळवा) गावच्या हद्दीत पडवळवाडी फाट्याजवळील पैलवान ढाब्यासमोर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनार कारने उसाच्या ट्रैक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात युक्ता नारायण आपटे (वय ५०, रा. गणपती मंदिर शेजारी, सांगली) या महिलेचा जागीच [...]
कुडचडेत अखेर सोहम नाईकवर गुन्हा
अटकेची मागणी करत जमाव पोलिसस्थानकावर : तक्रार नसल्याच्या कारणावरुन पोलिसांची चालढकल कुडचडे : सोळापेक्षा जास्त अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचा आरोप असलेल्या माधेगाळ-कुडचडे येथील सोहम नाईक या युवकावर काल रविवारी रात्री कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी ज्या अल्पवयीन [...]
भाजपा, काँग्रेस, आपचे उमेदवार आज भरणार अर्ज
फोंडा पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता फोंडा : फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्व उमेदवार आज शेवटच्या दिवशी सोमवार दि. 23 रोजी अर्ज भरणार आहेत. भाजपातर्फे रितेश रवी नाईक, काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर तर आम आदमी पक्षाचे गितेश नाईक या आतापर्यंत अधिकृतपणे जाहीर झालेल्या उमेदवारांचा त्यात समावेश असेल. फोंड्याचे दिवंगत आमदार तथा [...]
Jyotiba |जोतिबा देवाचा अश्वारूढ रूपातील दिमाख! सुवर्णालंकारिक महापूजेने मंदिर परिसर उजळला
जोतिबा डोंगरावर प्रकट दिन सोहळ्याची जय्यत तयारी जोतिबा डोंगर -दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर श्री जोतिबाचा प्रकट दिन सोहळा मंगळवार, दि. २४ रोजी होणार आहे. यासाठी जोतिबा मंदिर परिसर सज्ज झाला आहे. यावेळी जोतिबा मंदिर परिसरात विविध धार्मिक सोहळे होणार आहेत. शनिवारी श्री जोतिबाची अश्वारुढ [...]
मुख्यमंत्री पुन्हा लागले कामाला!
ठणठणीत असल्याचे सांगत घेतला जनता दरबार डिचोली : खरा लोकनेता हा लोकांपासून व लोकांच्या भावनांपासून दूर कधीच राहू शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी रवींद्र भवनमध्ये सकाळी दाखल होऊन तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये रममाण होऊन जनता दरबार घेतला. या अनपेक्षित क्षणामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जनता व आपल्यामध्ये कधीही [...]
हवामान बदल : गोव्याच्या निसर्गासमोर नवे आव्हान
आज जागतिक हवामान दिवस गायत्री कुंकळ्येकर/पणजी दरवर्षी 23 मार्च रोजी ‘जागतिक हवामान दिन’ साजरा केला जातो. हवामानातील बदलांची तीव्रता, त्याचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावर उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा गोवासुद्धा आज हवामान बदलाचे परिणाम अधिकाधिक तीव्रतेने अनुभवत आहे. गेल्या [...]
जोतिबा मंदिर उत्तर दरवाजाची गिर्यारोहकांकडून स्वच्छता मोहीम कोल्हापूर -दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गिर्यारोहक संघटनांनी एकत्र येत जोतिबा मंदिराच्या उत्तर दरवाजाची स्वच्छता मोहीम रविवारी राबवली. चार तास ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू होती. यामागे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, हा उद्देश होता. कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या [...]
अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही कोणत्या आजारांची लक्षणे आहेत?
अनेकांना वरवर पाहता कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक वजन कमी होण्याचा आणि भूक कमी लागण्याच्या समस्या होतात. सुरुवातीला या गोष्टींकडे आपण एक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु असे सतत होणारे बदल शरीरासाठी चांगले नाही. यावर वेळेवर लक्ष दिल्यास मोठ्या समस्या टाळता येतात. कोणत्या आजारांमध्ये वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसतात? […]
अमेरिका-इराण युद्धाचा २४ वा दिवस सुरू असताना, प्रतिकूल हवामान आणि एकूणच युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह विदेशातील अनेक विमानकंपन्या प्रभावित झाल्या आहेत. यूएई एअरलाइन्स प्रमुख ठिकाणांसाठी मर्यादित उड्डाणे चालवत आहेत. याकरता प्रवाशांना प्रवासापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्याचा, एअरलाइनच्या अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचा आणि केवळ निश्चित बुकिंगसहच विमानतळावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या धोक्यांना […]
कचरा डेपो हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
तुरमुरी परिसरातील ग्रामस्थांचा मोर्चा : सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आश्वासन वार्ताहर/उचगाव तुरमुरी येथील कचरा डेपो हटविण्यासाठी फक्त आमदार पुरेसे नाहीत तर या भागाचे खासदार, जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, बेळगाव महानगरपालिका महापौर, उपमहापौर, नगरसेवक या सर्वांची एक व्यापक बैठक बोलावून सर्वांच्या प्रयत्नातून हा कचरा डेपो नक्की हलवूया. येथील जनतेची होत असलेली कुचंबणा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न याबद्दल मला जाणीव [...]
माथेरानमध्ये आज ‘घोडेबंद’आंदोलन; अश्वपाल संघटनेचा पेव्हर ब्लॉकला विरोध
निसर्गरम्य माथेरानमधील दस्तुरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यादरम्यानच्या ट्रेकिंग व अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकू नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तरीही प्रशासनाने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवले असून त्यामुळे घोड्यांना इजा होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन उद्या सोमवारी अश्वपाल संघटनेच्या वतीने ‘घोडेबंद’ आंदोलन करण्यात येणार आहे. पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे रस्त्यांवर […]
सायबर गुन्हेगारांची कोटीच्या कोटी उड्डाणे!
पोलीस दलाच्या जनजागृतीनंतरही फसवणूक प्रकरणे सुरूच : अडाणी लोकांपेक्षा उच्चशिक्षितच ठरताहेत सायबर गुन्हेगारांची शिकार बेळगाव : चोर-पोलिसांच्या खेळात सायबर गुन्हेगार वरचढ ठरू लागले आहेत. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून उद्योजकांना कोट्यावधी रुपयांना गंडवण्यात येत आहे. पोलीस दलाने सातत्याने जागृतीचे प्रयत्न करूनही गुन्हे थांबत नाहीत, अशी स्थिती आहे. टिळकवाडी येथील एका वृद्ध उद्योजकाला 15 कोटी 45 लाख रुपयांना [...]
महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे, खरात प्रकरणावरून राज ठाकरे यांची टीका
राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाइल्स उघडताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यात अनेक मंत्री व राजकीय नेत्यांची नावं देखील समोर येत आहेत. या बाबाच्या कारनाम्यांचे घृणास्पद व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशोक खराने गर्भवती महिलांचाही बलात्कार केला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. अशोक […]
सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नव्या टर्मिनल बिल्डींगच्या कामाचा आढावा
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डींगचे काम वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून नुकतेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या विभागीय संचालकांनी या कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत एनडीआरएफ, राज्य पोलीस तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नव्या टर्मिनल बिल्डींगमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भात आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत की नाही? याबाबत त्यांनी आढावा घेतला. नव्या [...]
किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात वाढ
अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने आवकेत घट बेळगाव : गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी भाजीची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारपेठेत भाजीचे दर वाढले आहेत. यापूर्वी 20 रुपये अर्धा किलोप्रमाणे मिळणारी भाजी 30 रुपये अर्धा किलोला विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. सोसाट्याचा वारा आणि [...]
चारित्र्याचा संशय घेत पतीकडून पत्नीचा खून
बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथील घटना : पतीला अटक बेळगाव : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गोवनकोप्प, ता. बैलहोंगल येथे शनिवारी घडली आहे. दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. शिवाक्का बसवराज जोडळी (वय 33) राहणार गोवनकोप्प असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पती बसवराज जोडळी याने [...]
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत खंड
पुन्हा जैसे थे परिस्थिती : कारवाई करण्याची मागणी बेळगाव : बाजारपेठेसह शहर आणि उपनगरात सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे पहावयास मिळत असून वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत. व्यापाऱ्यांसह बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांचा विळखा वाढला असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. शहरातील मुख्य [...]
‘पीएम श्री’च्या अंमलबजावणीत कर्नाटकची पीछेहाट
राज्यात 585 शाळा कार्यरत : 2 लाखांवर विद्यार्थी घेताहेत शिक्षण : बिहार, झारखंडपेक्षा स्थिती चांगली : काही राज्यांची उत्कृष्ट कामगिरी बेळगाव : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) योजना अंतर्गत कर्नाटकातील शाळांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील पीएम श्री शाळांनी अनिवार्य घटकांमध्ये 84 टक्के यश मिळविले असून ही [...]
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी मंडळांकडून तयारीला वेग
महिनाभराचा कालावधी शिल्लक : 21 एप्रिलला शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बेळगाव : भव्यदिव्य सजीव देखावे हे बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे वैशिष्ट्या आहे. त्यामुळेच महाराष्ट्रापेक्षाही मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात बेळगावमध्ये पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने मंडळांकडून चित्ररथांसाठी तयारीला वेग आला आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी [...]
शास्त्रीनगर येथील पथदीप बसविण्याचे काम रखडले
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्रीनगर नववा क्रॉस येथे पथदीप बसविण्याचे काम रखडले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. अंधारात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असल्याने महापालिकेने तात्काळ या ठिकाणी पथदीप बसवावेत, अशी मागणी केली जात आहे. चार ते पाच वर्षांपासून या ठिकाणी विद्युत पथदीप बसविण्याचे काम रखडले आहे. पाच [...]
न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक; 4 कर्मचारी गंभीर जखमी
कॅनडातील मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येणाऱ्या एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाचा ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना या विमानाची धडक अग्निशमन दलाच्या ट्रकला बसली, ज्यामध्ये चार अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. […]
राष्ट्रीय दंत आयोगाची केंद्राकडून स्थापना
दंत शिक्षणात सुधारणा करण्यासाठी पाऊल : डीसीआयची जागा एनडीसी घेणार बेळगाव : देशातील दंतवैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी आणि तो आंतरराष्ट्रीय मानकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राष्ट्रीय दंत आयोग (एनडीसी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील अधिसूचना 19 मार्च रोजी जारी करण्यात आली असून, नवीन आयोग तात्काळ अमलात आला आहे. आतापर्यंत कार्यरत असलेल्या [...]
आसाममधील भाजप म्हणजे वेगळे लेबल लावलेली काँग्रेसच; गौरव गोगोईंची टीका
आसाममध्ये आता ‘भाजप’ अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे माजी काँग्रेस नेत्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत, जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपात गेले आहे. त्यांनी फक्त निवडणुका लढवण्यासाठी पक्ष बदलला आहे, अशा शब्दांत आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांनी भाजपवर टीका केली आहे. आसाममधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आल्या असताना आणि काँग्रेसमधून अनेक बड्या […]
भोई गल्लीतील धोकादायक गटारीकडे मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : भोई गल्लीतील उघड्या स्थितीत असलेल्या धोकादायक गटारीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर गटार अपघातास आमंत्रण देणारी ठरली असल्याने याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून तातडीने गटारीवर फरशी घालावी, अशी मागणी केली जात आहे. महानगरपालिकेकडून भोई गल्लीत गटारीवर काँक्रीट घालण्यात आले आहे. गटारी स्वच्छ करता याव्यात, यासाठी ठिकठिकाणी चेंबर सोडण्यात आले आहेत. मात्र, त्यावर झाकण [...]
पाकिस्तानातील टी-२० लीग, ‘पाकिस्तान सुपर लीग’ ला आता मैदानाबाहेर पडून ‘इनडोअर’ खेळावे लागत आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे जनरेटर चालवणे आणि प्रकाशझोतांची व्यवस्था करणे अशक्य झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पीएसएलला चांगलेच धारेवर धरले आहे. जगभरात आता पाकिस्तानच्या क्रिकेट लीगला Petrol Shortage League म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहेत. ‘पाकिस्तान […]
वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेला वाद आज पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत उफाळून आला. म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला भाजपच्याच नगरसेवकांनी दुसऱ्यांदा थेट कात्रजचा घाट दाखवला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत नव्याने उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. […]
दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील रेल्वे स्थानके व सरकारी कार्यालयांचे चित्रीकरण केलेल्या अल्पवयीन मुलासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण हिंदुस्थानात कार्यरत असलेला प्रमुख सरदार उर्फ जोरा सिंग याने या तिघांना या नेटवर्कमध्ये ओढले, असे पोलिसांनी सांगितले. या ताज्या पोलीस कारवाईमुळे, ताब्यात असलेल्या संशयितांची संख्या १८ झाली असून, त्यात सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. रविवारी ताब्यात […]
आमच्या संघर्षातून राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, हाच या पुस्तकाचा हेतू –संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदीतील पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत माहिती दिली. तसेच आमच्या संघर्षातून राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, हाच या पुस्तकाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलाइकली पॅराडाईज हे इंग्रजी आणि नरक में स्वर्ग हे हिंदी या आपल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मावळणकर […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून भाजपला चांगलेच फटकारले आहे. तसेच आखाती युद्धामुळे धोकादायक परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची भऊमिका स्पष्ट केलेली नाही, ते नेमके कोणाला घाबरत आहेत? कोणाच्या दबावामुळे ते गप्प आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला. ऑपरेशन तुतारीपेक्षा भाजपने […]
काही लोकांना वाचवण्यासाठी फडणवीस गंभीर विषयाचे राजकारण करत आहे; संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून भाजप, त्यांचे मित्र पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आपले परखड मत व्यक्त केले. मंत्रिमंडळातील त्या बाबाच्या कडवड भक्तांनाही या प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदू बाबाचे कडवट भक्त आहेत. […]
तुरमुरी, उचगाव, सुळगा (हिं.), कल्लेहोळ भागात भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे भीती
वारंवार माणसांवर हल्ले होत असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वार्ताहर/उचगाव तुरमुरी, उचगाव ,सुळगा (हिं.) कल्लेहोळ या परिसरामध्ये तुरमुरी कचरा डेपो आणि इतरत्र होणाऱ्या मांसाहारी खाद्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. या कळपाकडून सातत्याने माणसावर व जनावरांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच वावरण्याची वेळ आली आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी [...]

32 C