मी ज्ञानमार्ग स्वीकारून, संन्यास घेतो म्हणजे मला कर्मत्याग करता येईल असे अर्जुन भगवंतांना म्हणू लागला. त्यात त्याची चूक कशी होत आहे हे भगवंत त्याला समजावून सांगत आहेत. ते म्हणाले संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे तर कर्मफळाचा त्याग. त्यासाठी आधी कर्ममार्गाचे आचरण करणे उचित आहे. संपूर्ण निरपेक्ष झालास की तुझी देहबुद्धी नष्ट होईल त्यामुळे तू आत्मस्वरूप आहेस [...]
केंद्र सरकारची भ्रष्टाचार विरोधी संस्था प्रवर्तन निदेशालय किंवा ईडी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात एक नवाच वाद भडकला आहे. तो आता कलकत्ता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहचला असून न्यायालये कोणता निर्णय देतात, यावर या वादाचे भवितव्य ठरणार आहे. घटना अशी आहे, की 8 जानेवारीला ईडीने ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रतीक जैन [...]
सोने आणि चांदी यांच्या दराचे उच्चांक हे भविष्य काळातील आर्थिक परिस्थिती अधिक आव्हानात्मक आणि बिकट होत जाण्याचे संकेत मानले जातात. भूराजकीय अनिश्चितता डॉलर कमकुवत होण्याची शक्यता तसेच जागतिक विकास दर मंदावण्याची शक्यता यातून 2026 हे वर्ष आर्थिक लाभाचे असण्याची शक्यता कमी करते. या पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक बदलाच्या पार्श्वभूमीवर तसेच ब्लॅक रॉकचे संचालक लॅरी [...]
केरळमध्ये दुखते तर बेळगावमध्ये का खुपते?
कासरगोडमधील कन्नड भाषिकांच्या संरक्षणासाठी कर्नाटकातील मंत्री, आमदार अधूनमधून केरळला जाऊन येतात. तेथील कन्नड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर मल्याळम लादणे गैर आहे, हे राज्य सरकारने केरळला दाखवून दिले आहे. कासरगोडमधील कन्नडिगांच्या हितरक्षणासाठी सरकार किती संवेदनशील आहे, हे यावरून स्पष्ट होते. हीच संवेदनशीलता बेळगाव येथील मराठी भाषिकांबद्दल का दाखवली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. बेळगावसंबंधी कर्नाटकाचा जसा महाराष्ट्राबरोबर [...]
कर्नाटकाला हरवून विदर्भ उपांत्य फेरीत
अमन मोखाडेचे दमदार शतक, दर्शनचे 5 बळी वृत्तसंस्था/बेंगळूर अमन मोखाडेचे दमदार शतक तसेच दर्शन नळकांडेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात विदर्भने विद्यमान विजेत्या कर्नाटकाचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत शुक्रवारी सौराष्ट्र आणि पंजाब यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना [...]
गुजरात जायंट्स-आरसीबी आज चुरशीची लढत
वृत्तसंस्था/नवी मुंबई 2026 च्या महिला प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. गुजरात जायंट्सने या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी करत पहिले दोन सामने जिंकले. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्यांना गेल्या मंगळवारी मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. त्याच प्रमाणे माजी विजेत्या आरसीबीने या [...]
गॉफ-व्हिनस यांची गाठ दुसऱ्या फेरीत शक्य
वृत्तसंस्थता/मेलबोर्न 2026 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे रविवार दि. 18 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार अमेरिकेच्या कोको गॉफ आणि व्हिनस विलियम्स यांची एकेरीतील गाठ दुसऱ्या फेरीत पडण्याची शक्यता आहे. 45 वर्षीय व्हिनस विलियम्सला यावेळी या ग्रँडस्लॅम स्पर्धेत आयोजकांनी व्हाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. तब्बल 5 वर्षांनंतर व्हिसनचे [...]
यू-19 विश्वचषक स्पर्धा : अमेरिका युवा संघावर 6 गड्यांनी मात, सामनावीर हेनिल पटेलचे 5 बळी वृत्तसंस्था/बुलावायो, झिम्बाब्वे सामनावीर हेनिल पटेलने भेदक गोलंदाजी करीत मिळविलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताच्या यू-19 संघाने विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना अमेरिका यू-19 संघावर सहा गड्यांनी विजय मिळविला. भारताने क्षेत्ररक्षण स्वीकाराल्यानंतर वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने 7 षटकांत 16 धावा देत 5 [...]
मेष : व्यापाऱ्यांना व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी खर्च होईल. वृषभ : योग्य ठिकाणी गुंतवलेला पैसा आर्थिक प्राप्ती करून देईल. मिथुन : जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कर्क : आपल्या कामाबाबत व दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. सिंह : आर्थिक जीवन आनंददायी. कर्जापासून मुक्ती मिळेल. कन्या : नातेवाईकांकडून अपेक्षित बातमी मिळाल्याने आनंद तुळ : स्वत:ची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये ऊर्जा खर्च [...]
महेंद्रसिंग धोनी बजाज पुणे ग्रँड टूरसाठी सदिच्छादूत
19 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार स्पर्धा : 35 देशातील 171 अव्वल सायकलपटूंचा सहभाग वृत्तसंस्था/पुणे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बहुप्रतिक्षित बजाज पुणे ग्रँड टूर 2026 साठी सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची रोड सायकलिंग स्पर्धा असून ती 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. [...]
वेगवान गोलंदाज हर्षित राणाचं नाव वारंवार भारतीय संघात झळकताना दिसतंय अन् त्याचं इंगित लपलंय ते त्याला लाभलेल्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या वरदहस्तात…याचा अर्थ राणानं अगदीच सुमार कामगिरी केलेली असतानाही त्याची निवड होतेय अशातला भाग नाहीये. त्यानं काही वेळा प्रभावी मारा करून, महत्त्वाचे बळी मिळवून आपल्याला संधी देण्याचा निर्णय सार्थ ठरविलाय…पण आता हर्षितच्या गोलंदाजीपुरतं मर्यादित न [...]
ऑफ-बिट…आणखी एक वादग्रस्त निवड…
भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सर्फराज खानसारख्या खेळाडूला संधी न देता आयुष बदोनीची निवड झाल्यानं अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहिलेला नाही…या निर्णयावर टीका होऊ लागली असून तो नितीशकुमार रे•ाrसारखा काहीसा वादात देखील सापडलाय… आयुष बदोनी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. तो प्रामुख्यानं फलंदाज असून ऑफस्पिन गोलंदाजीही टाकू शकतो. त्यानं काही प्रसंगी [...]
समुद्री जलतरणातील द्रोणाचार्य……टोनी फर्नांडिस
मडगाव : पाण्याशी मैत्री करा, पाण्यावर प्रेम करा, त्याला घाबरू नका आणि शांत राहा – असा सरळ आणि सोपा संदेश देणारे टोनी फर्नांडिस हे आता समुद्री जलतरणात पोहणाऱ्या तसेच या सागरी जलतरणामध्ये इच्छुकांचे एक देवदूतच बनले आहेत. सॅर्नाभाटी येथील 52 वर्षीय टोनी फर्नांडिस हे गोव्यातील मासेमारी करणाऱ्या खारवी समुदायात वाढलेले व्यक्तिमत्व. आपले बालपण त्यांनी समुद्राच्या [...]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदाना वेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्दय़ावरून तीव्र संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली आहे, हरलेल्या मानसिकतेतूनच त्यांना जिंकण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागत आहेत, शाई नव्हे लोकशाही पुसली जातेय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. इतका गोंधळ होतोय मग निवडणूक आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी […]
गोंधळ, बाचाबाची, संताप…मतदारांची दमछाक; मार्कर पुरविणाऱ्या कोरस कंपनीच्या चौकशीचे आदेश
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज अभूतपूर्व गडबडगोंधळ आणि गंडवागंडवी पाहायला मिळाली. बोटाला शाई लावण्याची जुनी पद्धत बंद करून थेट बोटावर खूण करण्यासाठी मार्करचा वापर करण्यात आला. ही खूण सहज पुसता येत होती. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. ही सरळसरळ लोक‘शाई’ फेक आहे. लोकशाहीची विटंबना आहे. फेक लोकशाही आहे, असा संताप जनमानसातून आणि समाजमाध्यमांतून व्यक्त झाला. […]
BMC Election 2026 –आयोगाची लपवाछपवी, मुंबईत अंदाजे 53 टक्के
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाचा टक्का 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2 ते 3 टक्क्यांनी घटल्याचे दिसते. मुंबईत अंदाजे 53 टक्के मतदान झाले. राज्यात अनेक शहरांत उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वादाच्या शक्यतेमुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत दिली नाही. या लपवाछपवीवर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला. 29 महापालिकांत सकाळी 9.30 वाजेपर्यंत सरासरी 7.03 […]
सकाळी 10 वाजल्यापासून 23 केंद्रांवर मतमोजणी!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची उद्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी 2 हजार 299 कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
छातीवर कमळ लावून रवींद्र चव्हाण यांचे मतदान
आचारसंहिता धाब्यावर बसवत भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. रवींद्र चव्हाण लुंगी लावून शर्टवर ठसठशीत कमळाचे चिन्ह लावून मतदान केंद्रात आले. मतदानाचे फोटो स्वतŠ रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर हा विषय अधिकच चिघळला. डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला. मतदानासाठी रांगेत उभे राहताना तसेच मतदान कक्षात प्रवेश करताना त्यांच्या […]
कसबा पेठ विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 25मधील शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रातील खोली क्रमांक 4मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. कोणतेही बटन दाबले तरी ‘कमळ’ चिन्हाची लाईट लागत असल्याचा आरोप करत उमेदवारांसह कार्यकर्ते थेट मतदान केंद्रात शिरले आणि त्यांनी मतदान प्रक्रिया बंद पाडली. मतदान प्रक्रिया […]
मतदार यादीतील घोळावरून गडकरींचा संताप
नागपूरमध्ये सर्वच प्रभागांत मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आढळून आले. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबातील चार ते पाच मते एका प्रभागात तर एक मत दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आले. यावरून गडकरी यांनी पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. नागपूर शहरातील अनेक उमेदवार व माजी नगरसेवकांनाही मतदार यादीतील घोळाचा फटका बसला. […]
गणेश नाईकांचे मतदान केंद्र हरवले
निवडणूक यंत्रणेच्या गलथान कारभाराचा जोरदार फटका आज वनमंत्री गणेश नाईक यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बसला. हरवलेले मतदान केंद्र शोधण्यासाठी नाईक यांना सुमारे तासभर फिरावे लागले. सुरुवातीला ते कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत गेले. मात्र तिथे नाव नसल्यामुळे त्यांना सेंट मेरी हायस्कूलमध्ये पाठवण्यात आले, परंतु तिथे त्यांचे नाव नसल्याने नाईकांच्या संतापाचा भडका उडाला. ते पुन्हा सीबीएसई शाळेत […]
सामना अग्रलेख –दुसऱ्या क्रांतीचे बिगुल, इराण का पेटला?
इराणच्या जनतेने 1979 मध्ये राजेशाहीविरुद्ध पहिली क्रांती करून देशात पहिल्या खोमेनींची इस्लामी राजवट आणली. तीच इराणी जनता आज दुसऱ्या खोमेनींच्या कट्टर इस्लामी राजवटीविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. ज्याला आधी घालवले त्याच राजाच्या अमेरिकेत बसलेल्या सुधारणावादी ‘प्रिन्स’ला सत्तेवर आणण्यासाठी इराणच्या जनतेने पुन्हा दुसऱ्या क्रांतीचे बिगुल फुंकले आहे. ‘इराण का पेटला?’ या प्रश्नापेक्षा त्या आगीत तेल ओतण्याचे अमेरिकेचे […]
जाऊ शब्दांच्या गावा –गोष्ट रुखवताची
>> साधना गोरे, sadhanagore2018@gmail.com महाराष्ट्रीय लग्नाचं एक आगळं वैशिष्टय़ म्हणजे, लग्नात मुलीला दिला जाणारा रुखवत. या रुखवतात विविध खाद्यपदार्थांपासून ते शोभेच्या, गृहोपयोगी विविध वस्तू असतात. प्रत्यक्ष लग्नाइतकाच, तर कधी त्याहून अधिक लक्षात राहतो तो मांडवातला रुखवत. रुखवतातील वस्तूंचं आगळेपण हे तर त्याचं कारण असतंच, पण त्यांची मांडणीही चित्तवेधक खुबीनं केलेली असते. जगण्याच्या आधुनिक साधनांबरोबर आपल्या […]
प्रासंगिक –मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन
>> बी. जी. गायकवाड, अध्यक्ष, भारतीय बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य बहुजन मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 या दिवशी मोहनगाव (ता. कल्याण) येथे मातंग समाजाच्या पहिला भव्य मेळावा घेतला. अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा समाज बारा बलुतेदारांपैकी एक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही स्वातंत्र्याचा प्रकाश कधीही […]
हेमा मालिनी यांना व्हीआयपी ट्रीटमेंट
जुहू येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. तास तासभर लोक मतदान केंद्रावर उभे होते. मात्र, भाजपच्या खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांना तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. अधिकाऱ्यांनी हेमा मालिनी यांना रांगेशिवाय आत सोडले. त्याही बिनदिक्कत आत जाऊन मतदान करून आल्या. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा पारा चढला. त्याने सर्वांसमोरच हेमा मालिनी […]
तुरुंगातील आरोपीच्या नावावर मतदान
पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येरवडा तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावे कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जे उमेदवार आहेत तसेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱयांना विचारणा करण्यात आली, मात्र आयोगाकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही.
क्रिकेट कधीच सोपं नसतं! मांजरेकरच्या विराट टीकेचा हरभजनकडून समाचार
विराट कोहली हे नाव घेताच हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये चर्चा आपोआप पेटते. त्यातच अलीकडे माजी कसोटीपटू संजय मांजरेकरच्या एका विधानाने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. कोहलीने कसोटी क्रिकेट सोडून एकदिवसीय प्रकार निवडला, कारण तो खेळायला सर्वात सोपा आहे, असे विधान त्याने केले. या वक्तव्यावर आता माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्यावर जोरदार हल्ला केला असून क्रिकेट कधीच सोपं […]
दिलप्रीत बाजवाच्या नेतृत्वाखाली कॅनडाची झेप, आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ जाहीर
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाने आपला संघ जाहीर केला असून दिलप्रीत बाजवाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा बाजवा कॅनडाच्या वर्ल्ड कप मोहिमेचा प्रमुख चेहरा असेल. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बाजवाने 133.22 च्या स्ट्राइक रेटने चार अर्धशतके झळकावली आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कॅनडाच्या सुपर सिक्स्टी टी-टेन स्पर्धेत त्याने 18 चेंडूंत […]
दुखापतीमुळे सुंदरचा वर्ल्ड कप वाईट होणार; आगामी मालिकेतून बाहेर, आता वर्ल्ड कपलाही मुकण्याची शक्यता
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून हिंदुस्थानचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडला आहे. 21 ते 31 जानेवारीदरम्यान खेळली जाणारी ही मालिका 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषकाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग मानली जात होती. त्यामुळे सुंदरच्या अनुपस्थितीमुळे त्याच्या विश्वचषकातील सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडोदऱयात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुंदरचा स्नायू […]
हिंदुस्थानसमोर अमेरिका नतमस्तक, दुबळ्या अमेरिकेवर 6 विकेट्सनी मात
अमेरिका जगात महासत्ता असली तरी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचीच सत्ता असल्याचे हिंदुस्थानच्या युवा संघाने दाखवून दिले. अत्यंत एकतर्फी सामन्यात हिंदुस्थानसमोर दुबळी अमेरिका अक्षरशः नतमस्तक झाली आणि 19 वर्षांखालील युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत माजी जगज्जेत्या हिंदुस्थानने अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला. बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचा डकवर्थ–लुईस नियमानुसार 6 विकेट्सने पराभव केला. […]
बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असून खेळाडूंनी आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. खेळाडूंविरोधात अपमानास्पद विधान करणारे क्रिकेट मंडळाचे संचालक नजमुल इस्लाम यांनी सार्वजनिक माफी मागितल्याशिवाय आपण खेळातील बहिष्कार मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा क्रिकेटपटूंनी दिला आहे. गुरुवारी संध्याकाळी खेळाडूंनी यासंदर्भात अधिपृत निवेदन प्रसिद्ध केले. या बहिष्कारामुळे याच दिवशी देशांतर्गत टी-20 स्पर्धा तसेच […]
ऑलिम्पिक तयारीसाठी नीरज चोप्राचा दक्षिण आफ्रिकेत सराव सुरू
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता हिंदुस्थानचा भालाफेक सुपरस्टार नीरज चोप्राने 2026 च्या क्रीडा हंगामासाठी सत्रपूर्व सरावाला अधिकृत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोटचेफस्टम येथे सुरू असलेल्या 32 दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलची मंजुरी मिळाली आहे. या नव्या पर्वात नीरज आपल्या मूळ प्रशिक्षक जय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. जय चौधरी […]
महाराष्ट्राच्या महिलाच भारी, पुरुष गटात रेल्वेच सुसाट, महाराष्ट्राचे पुरुष उपविजेते
काझीपेठ येथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली 58 वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. हिंदुस्थानी खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या महास्पर्धेत महाराष्ट्राने महिलांच्या गटात अजिंक्यपदाचा झेंडा फडकावला, तर रेल्वेच्या शिलेदारांनी पुरुष गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाला हरवले, तर पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वेने […]
डबेवाल्यांची साथ, मॅरेथॉनचा थरार द्विगुणित!
यंदाची मुंबई मॅरेथॉन मुंबईच्या डबेवाल्यांच्या अनोख्या सहभागामुळे रंगतदार ठरणार आहे. 21 व्या आवृत्तीत तब्बल 250 डबेवाले रविवारी अंतिम रेषेवर उभे राहून धावपटूंना अल्पोपाहार वाटत त्यांचा उत्साह वाढवतील. टीमवर्पसाठी जगभर प्रसिद्ध असलेले मुंबईचे डबेवाले मॅरेथॉनच्या मूल्यांशी अगदी सुसंगत ठरतात. शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात धावपटूंना मिळणारा हा पाठिंबा त्यांच्या मेहनतीला बळ देणारा असेल. नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर […]
दृष्टिबाधितांच्या जिद्दीला सलाम! सियारामच्या 12व्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ
मुंबईतील प्रतिष्ठत इस्लाम जिमखाना येथे सियारामच्या 12 व्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला. सर्वसमावेशक क्रीडेला चालना देणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ सामने नव्हेत, तर दृष्टिबाधित खेळाडूंच्या जिद्द, आत्मविश्वास आणि क्षमतेचा उत्सव ठरत आहे. उद्घाटना दिवशी खेळवण्यात आलेला पहिला सामना चुरशीचा आणि थरारक ठरला. देशाच्या विविध भागांतून आलेल्या दृष्टिबाधित क्रिकेटपटूंनी उत्पृष्ट फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि […]
गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीचा (SIR) भाग म्हणून निवडणूक आयोगाने मतदार यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जारी केलेल्या निर्देशात, आयोगाने स्पष्ट केले की, एसआयआर प्रक्रिया आता १९ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये १ जानेवारी २०२६ ही पात्रता तारीख […]
अमेरिकेने इराणविरुद्ध आणखी एक मोठी आर्थिक कारवाई केली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकी ट्रेझरी विभागाने (US Department of the Treasury) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार इराणच्या सुप्रीम लीडर आयतोल्लाह अली हुसैनी खामेनी यांच्या जवळच्या १८ उच्चाधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर नवीन प्रतिबंध लादले आहेत. हे प्रतिबंध इराणमध्ये डिसेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या देशव्यापी विरोध प्रदर्शनांना हिंसकपणे […]
Photo –मराठी कलाकारांनी केले मतदान…
BMC Election 2026 –जोगेश्वरीत सायंकाळी चुकीच्या पद्धतीने मतदान नाकारले; केंद्राबाहेर काही काळ गोंधळ
बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील गोंधळाची मालिका सायंकाळपर्यंत सुरुच राहिली. अनेक मतदारांना मतदानाचा हक्क न बजावताच माघारी परतावे लागले.जोगेश्वरी पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 77 अंतर्गत लालजी टेक्निकल स्कूलच्या मतदान केंद्रावर एका मतदाराला सायंकाळी 5.30 वाजताची वेळ संपल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. वास्तविक तो मतदार सायंकाळी 5.30 वाजण्यापूर्वीच मतदान केंद्रावर पोहोचला होता. मतदान अधिकाऱ्याच्या […]
BMC Election 2026 –महिलेच्या आडनावात घोळ; ‘मांडवकर’महिलेचे केले ‘जॉन’
निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराची नवनवीन उदाहरणे समोर आली आहेत. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदार याद्यांमध्ये नावे चुकवली गेली. मराठी महिलेचे आडनाव ‘मांडवकर’ आहे. मात्र तिच्या आडनावाच्या जागी ‘जॉन’ करण्यात आले. निवडणूक आयोगाची चूक असतानाही त्या मराठी महिलेला मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिलेचा सजग […]
Latur News –किनगाव-अहमदपूर महामार्गावर धावत्या कारला आग, शिक्षकाचा होरपळून जागीच मृत्यू
किनगाव-अहमदपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. काजळ हिप्परगा परिसरातील ‘डुक्कर बंदा’ येथे धावत्या कारने भीषण पेट घेतला. या घटनेत अहमदपूर येथील सहशिक्षक माधव श्रीवाड यांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वीच अशाच एका कार अपघातातून थोडक्यात बचावलेल्या श्रीवाड यांच्यावर आज त्याच महामार्गावर काळाने घाला घातला. मिळालेल्या […]
>> सतिश केंगार मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची वेळ संपली आहे. यातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भायखळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचा मोठा घोळ पकडला आहे. येथे मतदान प्रक्रियेची वेळ संपताच मतदान केंद्रातून ईव्हीएम (EVM) थेट टॅक्सीत जमा करण्यात आले. फक्त एक सुरक्षारक्षक असलेली ही टॅक्सी […]
Ratnagiri News –पत्रकार वारिशे हत्येतील आरोपी आंबेरकरला अल्पकालीन जामीन मंजूर
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला 6 आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आहे. वैद्यकीय कारणासाठी आंबेरकर याने जामीनासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याला सशर्थ जामीन मंजूर केला आहे. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत […]
एकिकडे महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके बिल्डर यांच्यात एक बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केल्यानंतर खळबळ उडाली आहे. ”आताची ताजी खबर: मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची व कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा […]
Municipal Election 2026 –नांदेड वाघाळा महापालिकेसाठी दुपारी साडेतीनपर्यंत 41.65 टक्के मतदान
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून 600 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाचा वेग हा थंडीमुळे कमी होता. मात्र दुपारी एक नंतर मतदानाला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 41.65 टक्के एवढे मतदान झाले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 81 उमेदवारांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. प्रशासनाने या […]
अहिल्यानगरात महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू; निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
अहिल्यानगर शहरात आज (ता. 15) महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची धामधूम सुरू असतानाच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूती सुरू असताना अर्भकाच्या डोक्याला कात्री लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माळीवाडा परिसरातील साठे (वैरागळ) कुटुंबीयांनी केला आहे. नगर शहरालगत ओळख गाव परिसरात राहणारे दीपक वैरागळ हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज […]
पानिपत एक शौर्यतीर्थ- प्रा. नितीन कोळेकर
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर वालवड येथे आयोजित केलेले आहे. पाचव्या दिनाचे पुष्पगुंपताना सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन हे शिव संकल्प प्रतिष्ठान वालवड व राष्ट्रीय सेवा योजना शंकराव पाटील महाविद्यालय भूम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेले होते. नंतर दुपारच्या सत्र मध्ये प्राध्यापक नितीन कोळेकर सर यांनी पानिपत ही एक पराभवाची मालिका नसून तर एक शौर्याची गाथा आहे. पानिपत हे एक शौर्यतीर्थ आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून पानिपत स्मृतीला उजाळा देऊन सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जगदाळे मॅडम, प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव डॉक्टर एस एस शिंदे सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ, टी आर बोराडे,शिव संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन मोहिते,सचिव सचिन धुमाळ, संदीप पाटील, प्रशांत शेळके , राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ नितीन पडवळ, प्रा. दिप्ती गिरी उपस्थित होते. या सूत्रसंचालन प्रा, एन आर जगदाळे यांनी केले तर आभार डॉ. नितीन पडवळ यांनी केले.
आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी
धाराशिव (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वजस्तंभाच्या कामाची तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी केली. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव न राहता शिवरायांच्या विचारांचे संस्कार समाजात रुजावेत, या हेतूने विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वधर्मीय सामुदायिक बिगरहुंडा विवाह सोहळा, समाजजागृतीपर उपक्रम व प्रेरणादायी कार्यक्रमांद्वारे शिवजयंती अधिक अर्थपूर्ण व स्मरणीय करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
देशाला जिजाऊंच्या विचारांची गरज आहे- प्रा.गंगाधर बनबरे
परंडा (प्रतिनिधी)- आज देशाला जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली तर प्रत्येक घरात एक शिवाजी घडेल असे प्रतिपादन प्रा.गंगाधर बनबरे पुणे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालय परांडा येथे आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व्याख्यानात व्यक्त केले. जिजाऊ संस्कार प्रबोधिनी परंडा व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा .गे. शिंदे महाविद्यालय परंडा याच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रा.गंगाधर बनबरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास घुमरे ,सचिव विद्या विकास मंडळ करमाळा तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर सौ. सुरजा बोबडे सरपंच टेंभुर्णी तथा सचिव माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व समाजसेवक मंडळ टेंभुर्णी, प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने सौ.मनीषा रणजीत पाटील, जिजाऊ संस्कार प्रबोधिनीचे संस्थापक भारत घोगरे गुरुजी, सौ.कल्पना रवी मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ तसेच परंडा शहर व तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील श्रीमती आशा मोरजकर, विमल भातलवंडे, अनिता रोडगे, देवानंद टकले, काकासाहेब साळुंखे, अंगद धुमाळ , पत्रकार सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, राजेंद्र कुमार निकाळजे, महावीर तनपुरे, तन्मय राम शिंदे, महावीर काशीद यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कु.अक्षता खराडे, रेहान बेग, प्राची गणगे या विद्यार्थिनींना एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार या करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संभाजी धनवे यांनी केले प्रास्ताविक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रा शंकर अंकुश यांनी आभार मानले.
श्री सिद्धेश्वर विद्यालय, वरवंटीची अविस्मरणीय शैक्षणिक सहल
धाराशिव (प्रतिनिधी)- ज्ञान आणि मनोरंजनाचा सुरेख संगम साधत श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय, वरवंटी यांची दोन दिवसीय शैक्षणिक सहल दि. 11 व 12 जानेवारी 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वेरूळ लेणीतील कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, बेबी का मकबरा, जायकवाडी प्रकल्प तसेच पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर अशा ऐतिहासिक, पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. या सहलीत एकूण 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासोबतच विद्यार्थ्यांना बीडकीन (छत्रपती संभाजीनगर) येथील मेसर्स मालखरे सिल्व्हर काँक्रीट प्रा. लि. च्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटला भेट देण्यात आली. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे, विविध संस्कृतींच्या पाऊलखुणा जाणून घेणे, औद्योगिक क्षेत्राची ओळख करून घेणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य व संघभावना वाढवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय व आनंददायी अनुभव ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुख्याध्यापक महादेव कांबळे, सहल विभाग प्रमुख गिरी एम. एन.चौरे बी.ए. तसेच शिक्षिका सौ. शितल झिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सहल यशस्वीपणे पार पडली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशराव मालखरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सचिव दिलीप गणेश, सहसचिव ॲड. सुग्रीव नेरे, बी.आर. सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले.
धाराशिव येथे मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त धाराशिव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नामविस्तार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मराठवाडा नामविस्तार आंदोलन हे केवळ नामविस्ताराचा नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा ऐतिहासिक लढा होता, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा लढा समता, स्वाभिमान व सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित होता. या आंदोलनात अन्याय व दडपशाहीविरोधात लढताना अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांच्या अमूल्य बलिदानामुळेच मराठवाड्याला स्वतंत्र व अभिमानास्पद ओळख मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शहीद भीमसैनिकांचे बलिदान हे केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या व भावी पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत सामाजिक अन्यायाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास आर.पी.(आय आठवले)महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओव्हाळ,आर.पी.आय (सचिन खरात) जिल्हाध्यक्ष मा.राजाभाऊ राऊत, आर.पी.आय (आठवले) जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे,रंजीत गायकवाड,सिद्धार्थ ओव्हाळ,सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे,अशोक बनसोडे, मुकेश मोठे,सूर्यनंद बनसोडे, श्रीकांत गायकवाड,अमित सोनवणे,पालाश माने,रामकृष्ण वाघमारे,धम्मपाल बनसोडे,सुहास झेंडे,राजाभाऊ माळी,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संघरत्न नगदेच्या प्रयोगास प्रथम क्रमांक
धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन येथील श्रीतुळजाभवानी सैनिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संघरत्न सुभाष नगदेच्या प्रयोगास प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, धाराशिव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन श्रीतुळजाभवानी सैनिक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या संघरत्न नगदे याच्या प्रयोगास प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या प्रदर्शनात संघरत्न नगदे याने कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रयोग सादर करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघरत्न नगदे या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास तहसीलदार अरविंद बोळंगे गटविकास अधिकारी महेंद्रकुमार भिंगारदेवे , सहाय्यक गटविकास अधिकारी सीमा गवळी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांच्यासह गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव, दिनकर होळकर, संतोष माळी, सुधाकर कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थी गौरव शिर्के यांचा मिलाग्रीस हायस्कूलच्यावतीने सन्मान
दशावतार कलेतील जागतिक स्तरावरील कामगिरीची दखल ओटवणे : प्रतिनिधी सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा माजी विद्यार्थी गौरव शिर्के यांच्या दशावतार कलेची जागतिक स्तरावर दखल घेतल्याचे औचित्य साधून गौरव शिर्के यांचा शाळेच्यावतीने शाल, सन्मानचिन्ह ,मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, शैलेश नाईक, हेजल पिंटो, हायस्कुलच्या पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका टीचर क्लिटा, मराठी [...]
निवडणूक आयोगाच्या घोळाचा नाहक फटका अनेक नागरिकांना सहन करावा लागत आहे. मतदार यादीत नाव नाही, या केंद्रावरून त्या केंद्रावर फेऱ्या मारून कंटाळलेले मतदार मतदान न करताच अखेर निवडणूक केंद्रातून घरी गेले. निवडणूक आयोगाविरोधात संताप व्यक्त करत धारावीतील शाहु नगरमध्ये अनेक मतदार मतदान न करताच परतले. धारावीतील शाहु नगरातील मतदान केंद्रांमध्ये प्रचंड सावळागोंधळ उडाला आहे. मतदारच […]
Solapur News: नदीध्वजांची हळद काढून योगदंड अन् पादुकास जलाभिषेक
बोला, बोला एकदा भक्तलिंग सोलापूर:सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील सम्मती कट्टयाजवळ हळद काढण्याचा सोहळ्यात खेळणे काढलेल्या सातही नंदीध्वजांना करमुटगी लावून गंगास्नान घालण्यात आले तसेच योगदंड अन् सिद्धरामाच्या पादुकांना जलाभिषेक करण्यात आला. हर्र बोला [...]
निवडणूक आयोगाची ‘शाईफेक’! मतदारांवरच फोडले खापर, दिला कारवाईचा इशारा
मुंबईत मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरांतून टीका होत असताना आता राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. शाई प्रकरणावर उलट्या बोंबा मारत आयोगाने मतदारांवरच त्याचे खापर फोडले आहे. शिवाय […]
Solapur News : सोलापूरात पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर महापालिका निवडणुकीत पैशांचा गैरवापर उघडकीस सोलापूर : मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड (दोघे, रा. सेटलमेंट, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भरारी पथकाचे अधिकारी [...]
महाडीबीटीवरील प्रलंबित 1,764 शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता इत्यादी योजनांसाठी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने महाडीबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डचे अवलोकन केले असता सन 2025- 26 करिता एकूण 5943 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून त्यापैकी 1764 अर्ज हे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत महाविद्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाही.तरी सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण छाननी करून पात्र अर्ज तात्काळ समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावेत,असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सन 2024- 25 च्या तुलनेत सन 2025- 26 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ज्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरावरून सूचित करून अर्ज भरण्यास प्रवृत्त करण्यात यावे. विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने अथवा अर्ज न भरल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व विद्यार्थ्याची राहील,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
कळंब येथे 19 जानेवारीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विशेष शिबीर
धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात सुलभता यावी,वेळ व खर्च वाचावा तसेच शासकीय सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामुळे वाहन नोंदणी, परवाने,विविध अर्ज प्रक्रिया,दुरुस्ती व मार्गदर्शन यासाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्याची गरज राहत नाही. या अनुषंगाने जानेवारी 2026 महिन्यातील वाढीव शिबीर कार्यालय तालुका कळंब येथे 19 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर त्या दिवशी नियोजित ठिकाणी तालुका कळंब येथे पार पडणार असून तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वाहन चालक परवाना,वाहन नोंदणी,हस्तांतरण, दुरुस्ती,विविध प्रमाणपत्रे,शुल्क भरणे तसेच परिवहन विभागाशी संबंधित अडचणींचे निराकरण एका ठिकाणी करता येणार आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून कार्यालयीन कामासाठी होणारी धावपळ कमी होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कळंब येथे आयोजित शिबीर कार्यालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुचाकींसाठी MH-25,BH, नवी मालिका सुरु
धाराशिव (प्रतिनिधी)- दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकृती व लिलाव कार्यपद्धती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयामार्फत लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH-25,BH ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक नागरिकांची गर्दी होते.त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास तो सुलभतेने मिळावा,यासाठी इच्छुक वाहनमालकांनी विहित शुल्क भरून सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 चे नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे नियम 5-अ नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत (उदा. आधारकार्ड,लाईट बिल,टेलिफोन बिल इ.) सादर करणे आवश्यक आहे.तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काचा डी.डी.अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे. सदर डी.डी.फक्त Deputy Regional Transport Officer, Dharashiv यांच्या नावे केवळ राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा.अन्य नावाचा डी.डी.बाद ठरविण्यात येईल. बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत. डी.डी.कमीत-कमी एक महिना वैध असावा. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.या यादीतील अर्जदारांनी अतिरिक्त रकमेचा डी.डी. सीलबंद लिफाफ्यात वेळापत्रकानुसार कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर होणारा अतिरिक्त डी.डी.किमान रुपये 300/- चा असावा व तोही वरीलप्रमाणेच वैध असावा.सदर लिफाफे अर्जदार/प्रतिनिधी यांच्या समक्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत उघडले जातील. ज्या अर्जदाराने अधिक रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांकाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल.दिलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही किंवा समायोजित केली जाणार नाही. विहित अर्ज नमुना व प्रतिनिधीचे प्राधिकरणपत्र कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपलब्ध आहे. MH-25,BH नवी दुचाकी मालिका वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. आकर्षक / पसंती क्रमांक अर्ज व डी.डी.स्वीकारणे 16 ते 19 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजतापर्यंत. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्जांची यादी प्रसिद्ध करणे,19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत.बंद लिफाफ्यात डी.डी.स्वीकारून लिलाव प्रक्रिया 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता होईल.
धाराशिव मध्ये नामांतरदिनी रंगला विद्रोही कवींचा एल्गार
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त दि.14 जानेवारी 2026 रोजी नालंदा फॅशन डिझायनिंग कॉलेज धाराशिव येथे विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी पंडित कांबळे यांनी आपल्या कवितेतून आजच्या समाजातील वास्तव मांडताना.... “वांझ घोषणा फसवे दावे वेळीच ओळखा वागणं हे असेच चालले तर... सामान्यांचे संपेल जगणं“ कयवित्री भाग्यश्री वाघमारे यांची “दिशा अंधारलेल्या मनुवाद्यांच्या विळख्यात बंदिस्त श्वास चोहोकडून चाललाय मानवतेचा ऱ्हास“ यातून मानवी मूल्य कसे पायदळी तुडविली जातात ते सांगितलेले आहे.आशा गायकवाड यांची “दिली तू वृक्षाची छाया कसे ऋण फेडू भीमराया“ गेय कविता सादर केली. प्रभाकर बनसोडे यांची एक भीमरावांचे विचार.. तर अनिता ठोकळे यांची लाखात एक होती माझ्या भीमाची लेखणी , प्रा. शिवराम अडसुळे यांनी आयुष्याची गाथा मांडली.शामल ताकपिरे यांच्या “सूर्याची सावली.. माता रमाई.. “ या गेय कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्रिशाला ठाणांबीर यांनी “साऊ“ ही कविता सादर केली. शीला पवार यांनी 14 तारखेचं बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्व आपल्या कवितेतून व्यक्त केले.उत्कर्षा वाघमारे यांनी “खूप खूप सोसलं आमच्या जातीनं..आ -आईच्या ऐवजी आरक्षणाचा शिकवलं जातं...“ हे सांगितलं. कवी शहाजी कांबळे यांची “अरे अरे माणसा जुन्याचा कशाला पुळका जग एकविसाव्या शतकाकडे तुम्हीच ओळखा..“ ही कविता भविष्याचा वेध सांगून गेली. तर विजय गायकवाड यांची “आम्ही पांथस्थ हाती निखारे आणि मशाली घेऊन निघालो क्रांतीकडे ...“ रविंद्र शिंदे यांची भीमाचा मी सैनिक आहे रक्तात माझ्या भीम बाणा आहे ..तर पृथ्वीराज चिलवंत यांनी“ माणुस की,माणूस प्राणी“ हे सांगितले. अभिमन्यू इंगळे यांनी असा क्रांतीसुर्य होता.अरुण कांबळे यांनी चला रे मुलांनो शाळेला.अश्विनी बनसोडे यांची शल्य ही कविता,दीपक केंगार यांचा विद्रोह के.व्ही.सरवदे यांची “पारख“ ॲड.अजय वागळे यांचे “न्याय दर्शन“ सोमनाथ लांडगे यांची बाबासाहेब होते म्हणून.. सौरभ लोखंडे यांचे बंडखोर वास्तव.. विकास काकडे यांची गौतम बुद्ध अशेचा किरण तू..सायुरी सूर्यवंशीचा लढा मनातला.. सचिन दिलपाक यांची भीम तुझ्याशी नाळ जोडताना...तर बाळू शिंदे यांनी भिरूड लागलय भिरुड..“ अशा वेगवेगळ्या संदर्भाने बाबासाहेबांचा विद्रोह कवितेतून मांडून रशीकश्रोत्यांना कवींनी मंत्रमुग्ध केले. आणि वेगळ्याच उंची वरती हे कवी संमेलन गेले. यावेळी बाबासाहेब मनोहर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. अंबादास कळासरे यांनी मानले. या कार्यक्रमास विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे,जगदीश जाकते, मारुती पवार, सुप्रसिद्ध कवी रवी केसकर, अमोल गडबडे, राजेंद्र अंगरखे, विकास काकडे ,चंद्रकांत मस्के, जयराज खुने, सुदेश माळाळे, सुनील बनसोडे, ॲड. अजित कांबळे यां यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील वाणिज्य विभाग वाणिज्य मंडळ क्वालिटी सर्कल आणि महाविद्यालयाच्या करिअर कट्ट्याच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा सप्ताह साजरा करताना युवक आणि युवतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले. मुलांनी स्वामी विवेकानंदांचे आदर्श संस्कार, मूल्य-संस्कृती आचरणात आणली तरच मुलींनी राजमाता जिजाऊ चे आदर्श घेऊन आपले संस्कार मूल्य संस्कृती जपावी तरच भावी आदर्श पिढी घडेल. श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेऊ नये. असे प्रतिपादन डॉ अस्वले यांनी उद्घाटन पर मार्गदर्शनात केले. दिनांक 12 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 असे दोन दिवसीय उपक्रमात रांगोळी स्पर्धा, निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये 16 विद्यार्थ्यानी, पोस्टर स्पर्धेमध्ये 11 तर पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये 22 आणि निबंध स्पर्धेमध्ये 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजित अष्टे सर, प्रमुख पाहुणे म्हणून करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा. डॉ. पसरकले सर आणि प्रा. डॉ. करे सर, वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी स्त्री सशक्तीकरण आणि युवा जनजागृती या विषयावर कुमारी सानिका जाधव, सना चौधरी, इंगळे प्रियांका, लक्ष्मी हिरमुखे, निकिता चांदोरे, प्रतिभा यादव, गणेश मोरे, प्रसाद मम्माले, सुरवसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी महापुरुषांचे विचार समोर ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करतेवेळी डॉ अजित अष्टे यांनी केले. यावेळी करिअर कट्टा विद्यार्थी संसद पदाधिकारी यानी बारामती येथील अधिवेशनातील अनुभव आणि उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज सूर्यवंशी यांनी केले तर आभार सौरभ पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून डॉ. श्रीशैल तोडकर प्रा. सूरज सूर्यवंशी यांनी काम पाहिले.तर कार्यक्रमासाठी डॉ. खंडू मुरळीकर डॉ. विजय मुळे ओमप्रकाश पवार, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. संध्या चौगुले, प्रा .विद्या गायकवाड आणि वाणिज्य मंडळ कल्चरल क्वालिटी सर्कल चे सदस्य आणि करिअर कट्टा चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
परंडा न.प.च्या सभेत उपनगराध्यक्षपदी सरमजितसिंह ठाकूर
परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगर परिषदेच्या पहिल्याच विशेष सभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष जाकीर सौदागार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.14 रोजी बैठक घेण्यात आली यात उपनगराध्यक्ष व रिक्त असलेल्या स्विकृत सदस्य यांची निवड करण्यात आले. उपनराध्यक्षपदी जनशक्ती नगर विकास आघाडीचे समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर, तर स्विकृत सदस्यपदी ईसमाइल कुरेशी, सेनेचे वाजीद दखनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशासकीय पारदर्शकता साठी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी काम पाहिले तर मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी निवडणूक प्रकियेत साहय्यक म्हणून होत्या.निवडणूकीत उपनगराध्यक्ष पदासाठी जनशक्ती आघाडी कडून समरजितसिंह ठाकूर व सेनेचे मन्नाबी जिनेरी यांनी अर्ज दाखल केले होते.यात आघाडीचे समरजितसिंह ठाकूर यांना 12 मते पडले तर सेनेचे मन्नाबी जिनेरी यांना 9 मते पडल्याने अधिक 3 मताने समरजितसिंह ठाकूर यांनी विजय मिळवला तर स्विकृत सदस्य पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.जनशक्ती नगरविकास आघाडी कडून ईसमाइल कुरेशी तर शिवसेना शिंदे गटाकडून वाजीद दखनी व मसरत काझी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मसरत काझी यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सेनेचे वाजीद दखनी यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. जनशक्ती आघाडीचे समरजितसिंह ठाकूर व ईसमाइल कुरेशी यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळून फटाक्यांच्य अतषबाजी करून शहरातून मिरवणूक काडण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष समरजिसिंह ठाकूर व स्विकृत सदस्य ईस्माइल कुरेशी यांचा सत्कार भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार केला. यावेळी उबाठाचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल तसेचआजी माजी नगरसेकसह आघाडीचे पदाधिकारी कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रह्मांड की उत्पत्ति और सौरमंडल की खोज, इस्रोची राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आयोजित “ब्रह्मांड की उत्पत्ति और सौरमंडल की खोज“ ही राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा राबवण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे आऊटरिच नोडल सेंटर म्हणून कार्य करते. या अंतर्गत इस्रो आयोजित विविध कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. याच अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेत बिग बँग सिद्धांत, आकाशगंगा, तारे आणि ग्रहांची निर्मिती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सूर्याची रचना, त्यातील अणुसंलयन प्रक्रिया, सूर्यकिरणांचे पृथ्वीवरील परिणाम तसेच सौरऊर्जा यांचे महत्त्व सोप्या भाषेत स्पष्ट केले. सौरमंडळातील ग्रह, उपग्रह, लघुग्रह तसेच अलीकडील अंतराळ मोहिमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर कार्यशाळेसाठी इस्रो देहरादून येथील डॉ. दिपांकर बॅनर्जी व डॉ. राघवेंद्र प्रताप सिंग हे शास्त्रज्ञ व अभ्यासक साधन व्यक्ती म्हणून लाभले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व इसरो नोडल सेंटर समन्वयक डॉ. कुणाल वनंजे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अभयसिंह खुणे यांनी केले तर आभार प्रा. संजय घोडके यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ. मंगेश भोसले, प्रा. अक्षय स्वामी, डॉ. अंकुश भोसले व प्रा. अविनाश कोकरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा धाराशिव हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, कायदेशीर चौकटीत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशानुसार जमावबंदी लागू करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वाशी यांच्या वतीने हद्दीतील सर्व नागरिक, मतदार व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर, भडकावू किंवा समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे वर्तन आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या वापराबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करताना WhatsApp, Facebook, Instagram, YouTube आदी माध्यमांवर जात, धर्म, पंथ किंवा वर्गद्वेष पसरवणारे संदेश, पोस्ट, व्हिडिओ, रील किंवा स्टेटस टाकण्यास सक्त मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मतदानाचे जात-धर्माधारित ध्रुवीकरण करणारी, चुकीची माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित केल्यास संबंधितांवर आयटी कायदा व निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ, तणाव किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी कृती सहन केली जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. उमेदवारांसाठीही स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून परवानगीशिवाय सभा, वाहनफेऱ्या, मोर्चे किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तसेच परवानगीशिवाय प्रचार साहित्य लावणे किंवा वाटप केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहिता व कायद्याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, आयटी कायदा व निवडणूक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन अटक, दंड किंवा तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. अखेर पोलिसांनी जनतेला आवाहन करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता, जात-धर्माचे राजकारण टाळून विवेकबुद्धीने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याची नम्र विनंती केली आहे.
उमरगा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी
उमरग्यात जिल्हा काँग्रेस कार्यालयात निवडणूक आढावा बैठक संपन्न धाराशिव उमरगा : स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच गर्दी आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमरगा तालुक्यातून इच्छुक असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय [...]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त वाशी येथे विशेष व्याख्यान
वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मिलिंद शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख व संयोजक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. मिलिंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या नामांतरासाठी सोळा वर्षे चाललेल्या संघर्षाचा इतिहास मांडत या लढ्यात राजा ढाले, रामदास आठवले, अरुण कांबळे, गंगाधर गाडे यांच्यासह गौतम वाघमारे या दलित तरुणांच्या बलिदानाचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेची लढाई असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कृष्णा थोरात, स्वप्निल शेळकांदे व नरसिंग ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवणमधील हॉटेल व्यवसायिकास ५० लाखांची कॉपीराईट नोटीस
मालवण । प्रतिनिधी मालवण शहरातील एका हॉटेल व्यवसायिकास थेट ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागणारी कॉपीराईट नोटीस प्राप्त झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये स्पिकरवर वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांचे कॉपीराईट आमच्या कंपनीकडे असून परवानगीशिवाय गाणी लावल्याचा आरोप करत ही नोटीस पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणाची माहिती नितीन वाळके यांनी पत्रकारांना दिली. संबंधित हॉटेल व्यवसायिकास [...]
सुरतेची मोहीम ही शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाची जिवंत साक्ष-केतन पुरी
धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची मोहीम ही लुट नव्हती, तर स्वराज्य उभारणीसाठी आवश्यक असलेली रसद आणि आर्थिक बळ उभे करण्याची ती दूरदृष्टीपूर्ण रणनीती होती. या मोहिमेच्या ऐतिहासिक संदर्भांकडे दुर्लक्ष करून, इतिहासाचा अभ्यास नसलेल्यांकडून महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा अपप्रचारातून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होतोय, याबाबत समाजाने सावध राहावे, असे आवाहन इतिहास अभ्यासक केतन पुरी यांनी केले. मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित भैरवाचा भंडारा व आग्रा स्वारी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई पंकज पाटील, सचिव डॉ. अस्मिता बुरगुटे यांच्यासह सुरेखा जगदाळे, चंद्रकांत बागल, कल्याण पवार, शरद मुंडे, पत्रकार हुंकार बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. केतन पुरी यांनी आग्रा स्वारीचा प्रसंग उलगडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर दाखवलेले अद्वितीय बुद्धीचातुर्य, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालून केलेला थरारक प्रवास आणि अपमानाला न झुकता दिलेले सडेतोड प्रत्युत्तर यांची प्रभावी मांडणी केली. इतिहासाच्या पानांत दडलेले, क्वचितच चर्चेत येणारे अनेक संदर्भ त्यांनी उलगडले. या कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. इतिहासाचा सखोल अभ्यास आणि मांडणीतील वेगळेपणाबद्दल आमदार कैलास पाटील यांनी केतन पुरी यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित बागल यांनी केले. सूत्रसंचलन दौलत निपाणीकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. अस्मिता बुरगुटे यांनी केले. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरण, दरम्यान, जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राजमाता जिजाऊ पुरस्काराने द्रौपदी नानासाहेब खोत यांचा सन्मान करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार अमरसिंह गोरे, छत्रपती शहाजी राजे क्रीडा भूषण पुरस्कार राम हिरापुरे, तर छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आत्माराम सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाने इतिहास, प्रेरणा आणि सन्मान यांचा संगम घडवत जिजाऊ जन्मोत्सवाची शोभा द्विगुणित केली.
जिल्ह्यात 15 ते 28 जानेवारीदरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात विविध यात्रा, जत्रा, ऊर्स, महापुरुष व राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती, धार्मिक कार्यक्रम तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना,पक्ष व गटांकडून धरणे,मोर्चे, आंदोलने,उपोषणे,बंद, निदर्शने, रास्तारोको, तालाठोको यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेपासून ते 28 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याला आहे प्रतिबंध अपर जिल्हादंडाधिकारी धाराशिव विद्याचरण कडवकर यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून खालील बाबींवर मनाई केली आहे. शस्त्र, सोटे, काठ्या, तलवारी, बंदुका जवळ बाळगणे, लाठ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा करू शकणाऱ्या वस्तू बाळगणे, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे,दगड,फेकण्यायोग्य साधने किंवा स्फोटक साहित्य साठवणे अथवा वापरणे, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन, विडंबनात्मक नकला, सभ्यता व नीतीमत्तेला बाधा आणणारे प्रकार,संविधानविरोधी, देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या घोषणा,गाणी,वाद्य वाजविणे किंवा कृती, व्यक्ती, मृतदेह, प्रेते किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव किंवा मोर्चा / मिरवणूक काढण्यास मनाई (परवानगीशिवाय) करण्यात आली आहे. मात्र हे आदेश अंत्ययात्रा,धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी तसेच सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे (सिनेमागृहे, रंगमंच इ.) यांना लागू राहणार नाहीत.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात नामविस्तार दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर विद्यापीठाचा 32 वा नामविस्तार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख आणि डॉक्टर सतीश कदम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले होते.. कनिष्ठ विभागाचे उपप्रचार्य बबन सूर्यवंशी यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ. बालाजी गुंड,कार्यालयीन प्रबंधक सुनील कांबळे, अधीक्षक सुभाष पिंगळे आदींसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.जिल्ह्यात या निवडणुकीदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही,याची दक्षता घ्यावी.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना पुजार बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, संतोष राऊत, अरुणा गायकवाड, श्रीकांत पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, दत्तू शेवाळे, गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, अनिल चोरमले, सुरेश राऊत, अरविंद शेलार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ यांची सभागृहात तर सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची ऑनलाईन उपस्थिती होती. पुजार म्हणाले की, अनधिकृत बॅनर व जाहिरात फलक काढण्यात यावे. शहरी भागात बॅनर लावण्यात येत असतील तर त्याची पूर्व परवानगी नगरपरिषदेकडून घेण्यात यावी. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. खोखर म्हणाल्या की,निवडणूक काळात पोलिसांकडे असलेल्या जबाबदारीची माहिती त्यांना आहे. उमेदवार व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या प्रचारार्थ देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या निःपक्षपातीपणे देण्यात याव्या. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असलेल्या विविध कलमांची तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली व काही सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
भारत–जपान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धेत सुमेध जोशी प्रथम
आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी मालवणचे सुपुत्र मालवण । प्रतिनिधी मालवण शहरातील रहिवासी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली येथील आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी यांनी भारत आणि जपानमधील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि तरुण संशोधकांचा सहभाग असलेल्या भारत–जपान आंतरराष्ट्रीय CAFE-PLUS 2025 (Presentation Learning for Young Scholars) या प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून रोख [...]
Solapur Breaking : ईव्हीएम बिघाड, मोबाईल बंदीवर वाद; मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ
सोलापूर महापालिका निवडणुकीत सुरुवातीला गोंधळ सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार (दि. १५) रोजी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत लोकशाहीचा हक्क बजावला; मात्र सुरुवातीलाच शहरातील काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही भागांत ईव्हीएम [...]
शिवशक्ती 120 जागा जिंकणार, ठाकरे बंधूंचाच महापौर होणार; संजय राऊत यांचा विश्वास
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळून 120 जागा जिंकतोय, लोकं तीन तीन तास वणवण करून ठाकरे ब्रँडला मतदान करतायत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर ठाकरेंचाच महापौर होणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी […]
Solapur : मंद्रूप येथे कृषी –पशुपक्षी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
पशुपक्षी प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण by समीर शेख मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्या संकल्पनेतून दिनांक १३, १४ व १५ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच [...]
Satara : कास-बामणोली रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत!
कास बामणोली रस्त्याचे डांबरीकरण पर्यटकांसाठी दिलासा ठरेल सातारा : जागतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या कास बामणोली परिसरात सकारात्मक बदल घडत असताना मात्र येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर देश विदेशातून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या रस्त्याचे [...]
Satara : साताऱ्यात बांधकाम व्यावसायिकास –खंडणी मागून मारहाण
साताऱ्यात व्यवसायिकाला मारहाणी व खंडणीची धमकी सातारा : बांधकाम व्यवसायासाठी दरमहा खंडणी आणि रक्कम न दिल्याने बांधकाम व्यावसायिकास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जबरी चोरी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [...]
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मतदान करताना शर्टाला कमळाचे चिन्ह लावले होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री […]
Sangli News : खानापूर रोडवर मोटारसायकल चोरणारे दोन संशयित जाळ्यात
सातारा पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे गुन्हे उघडकीस विटा : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना बिटा पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत उत्तम सोनवणे (२५), शुभम किसन भिसे (१९ बर्षे, दोघेही रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना बुधवारी १४ जानेवारी रोजी अटक केली आहे. [...]
Sangli News : कवलापूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड, दोघांना अटक
कवलापूरमधील लुटमार प्रकरणात दोघांना अटक सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे तोंडावर ये मारून मणेराजुरी येथील एकाला लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली. अनीकेत अरूण मोहीते (वय २६, [...]
कराटेपटू तेजस सुर्वेची गिनीज व बोधी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बाजी
वर्ल्ड कराटे मास्टर्स असोसिएशन आयोजित मास वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सिंधुपुत्राचा डंका ओटवणे: प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कराटेपटू तेजस भालचंद्र सुर्वे याने “The Largest Karate Display” या विक्रमात सहभागी होऊन हा विक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या कामगिरीची नोंद Guinness Book of World Records तसेच Bodhi World Records मध्ये करण्यात आली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याच्यावर विविध [...]
Sangli News : जत तालुक्यात ढाब्यावर जीवघेणा हल्ला
सिंगनहळ्ळी स्वस्तीक ढाबा परिसरात हिंसाचाराची गंभीर घटना जत : तालुक्यातील सिंगनहळ्ळी येथील स्वस्तीक ड्रायव्हर ढाबा परिसरात झालेल्या धारदार शस्त्रांनी व लोखंडी रॉडने केलेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी उत्तम शिवाजी हिप्परकर (वय ३६, [...]
चौके/प्रतिनीधी मालवण तालुक्यातील चौके वावळ्यांचे भरड येथील रहिवासी श्रीम. चंद्रिका पुटप्पा नाईक( 82) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले. चौके स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे ,दोन मुली ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. ट्रकचालक गोपी नाईक तसेच चौके वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळाचे विद्यमान सचिव श्रीधर नाईक यांच्या त्या [...]
वराडकर हायस्कूल कट्टाचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल 100%
मालवण : प्रतिनिधी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा प्रशालेचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेत एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यात चंदना बाळकृष्ण शेटये, देवांग नितीन नांदोसकर, हेमंत शशिकांत तिळवे या विद्यार्थ्यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. तसेच धनश्री वैभव [...]
Sangli : चिंचली मायाक्का यात्रेचा मतदानावर परिणाम होणार
मायाक्का देवी यात्रा बहुजन समाजासाठी धार्मिक महत्त्वाची सांगली : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचे मतदान पाच फेब्रुवारी रोजी म्हणजेच लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कर्नाटकातील चिंचली येथील मायाक्का देवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशीच जाहीर करण्यात आले आहे. त्याचा परिणाम मतदानावर होणार असून सांगली, सातारा, [...]
एक तास मतदार केंद्रांवर चकरा मारल्या, निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निवेदिता सराफ भडकल्या
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) सकाळपासून मतदान सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रेटीही हैराण झाले आहेत. मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील हा मनस्ताप सहन करावा लागला. मतदार यादीतील गोंधळामुळे निवेदिता सराफ यांना एक तास या केंद्रावरून त्या केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. याबाबत निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला […]
सत्तेची हवस असलेली अशी निर्लज्ज सरकार आजपर्यंत पाहिली नाही, उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मतदार याद्यांमधील गोंधळ व इंक घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी ”सत्तेची हवस असलेली अशी निर्लज्ज सरकार आजपर्यंत पाहिली नाही”, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”या सत्ताधाऱ्यांवर सत्ता प्राप्त करण्याची प्रचंड हवस आहे. अशी निर्लज्ज सरकार आम्ही कधी पाहिली नाही. यासाठीच यांना […]
ओटवणे: प्रतिनिधी सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील रहिवासी विद्योत्तमा उर्फ माई महादेव सगम (८५) यांचे बुधवारी १४ जानेवारी रोजी सकाळी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईस्थित राजेश सगम यांच्या त्या मातोश्री होत तर सावंतवाडी संस्थान या पुस्तकाचे लेखक कै महादेव सगम यांच्या त्या पत्नी होत. तसेच भोसले नॉलेज सिटी [...]
बोटावरची ‘शाई’नाही ‘लोकशाही’पुसली जातेय; निवडणुकीतील घोळावरून उद्धव ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीतील गोंधळ आणि गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरले. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. मोदींना जे वन-नेशन वन-इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की, एकावेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाट्टेल ते करा पण सत्ता काबीज करा. आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं […]

21 C