बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; अनधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील दुकानांवर कारवाई
कुर्ला पश्चिममधील 71 बेकायदा बांधकामांवर पालिकेने बुलडोझर चालवत पाडकामाची कारवाई केली. पालिकेच्या ‘एल’ वॉर्डकडून करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील दुकाने आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. कुर्ला पश्चिम येथील कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार परिसर, विनोबा भावे नगर आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील […]
शिंदे गटासोबतची युती तोडा; भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे, कराड यांची गाडी अडवली
महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिकीट नाकारल्यामुळे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करीत राडा घातला. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी भाजप-मिंधे गटाची युती झाली असून सिल्लोड-सोयगावच्या 11 जागा वगळता भाजप 27 तर मिंधे गट 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. ही […]
मुंबई सेंट्रल, ग्रँट रोडमधील वाहतूककोंडी फुटणार ‘बेलासिस’ तयार, वाहतुकीसाठी सज्ज!
मुंबई सेंट्रल, ताडदेव-नागपाड्याला जोडणाऱ्या बेलासिस पुलाचे काम विक्रमी वेळेत म्हणजे अवघे 15 महिने आणि सहा दिवसांत पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठीचा निर्धारित कार्यकाळ अजून चार महिने शिल्लक आहे. दरम्यान, हा पूल 26 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड परिसरातील वाहतूककोंडीपासून सुटका होणार आहे. दक्षिण मुंबईतील जहांगीर […]
मालेगावात काँग्रेसच्या पाठिंब्याने इस्लाम पार्टीचा महापौर होणार
नुकत्याच पार पडलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसतानाच इस्लाम पार्टीने सर्वाधिक 35 जागा मिळवत आपले वर्चस्व राखले. त्यांनी समाजवादी पक्षाला सोबत घेत ‘सेक्युलर फ्रंट’ नावाची आघाडी घेत निवडणूक लढवली. मात्र बहुमतासाठी आघाडीला तीन जागांची आवश्यकता असताना अन्य पक्ष या आघाडीला पाठिंबा देणार का, याविषयी तर्कवितर्क लढविले जात असतानच आता काँग्रेस पक्षाने पुढाकार […]
पश्चिम रेल्वे विस्कळीत, ‘पीक अवर्स’ला प्रवाशांचे हाल; आजही 102 लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक मंगळवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. कांदिवली येथील कारशेडच्या कामाचा लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दिवसभरात 102 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या ‘पीक अवर्स’ला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी 102 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले.
अबू सालेमला पॅरोल दिल्यास तो पळून जाईल, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
अबू सालेमला पॅरोल दिल्यास तो पळून जाईल. ज्या देशातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते त्या पोर्तुगाल आणि हिंदुस्थान देशाच्या संबंधात समस्या निर्माण होऊ शकतात अशी माहिती देतानाच, राज्य सरकारने सालेमच्या पॅरोलला विरोध केला. तसे प्रतिज्ञापत्रच कारागृहाचे महानिरीक्षक सुहास वारके यांच्या वतीने दाखल करण्यात आले. गँगस्टर अबू सालेम हा नोव्हेंबर 2005 सालापासून तुरुंगात असून त्याचा सावत्र […]
फेरमतमोजणीसाठी हजारो नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, ‘हुकूमशाही मुर्दाबाद’च्या घोषणा
प्रभाग 27 (अ)मध्ये निकाल बदलण्यात आल्याने अजित पवार गटाच्या आशा खरात पराभूत, तर भाजपाच्या प्रियंका दोंदे विजयी झाल्या, असा आरोप करीत हजारो नागरिकांनी मंगळवारी खरात यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, फेरमतमोजणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. निकालातील घोळामुळे भाजपाविरोधात सत्तेतील मित्रपक्षच उभा ठाकल्याने वातावरण तापले आहे. प्रभाग […]
लाडक्या बहिणींची आता घरोघरी पडताळणी, ई-केवायसी चुकली तरी न घाबरण्याचे आवाहन
लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता व्यक्त होत असताना महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी चुकली तर नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र ई-केवायसी चुकली तरी घाबरून जाऊ नका, असे आवाहन सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींची आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने […]
ग्रीनलँड अमेरिकेचेच ट्रम्प यांच्या पोस्टने खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या अकाऊंटवर अमेरिकेचा नवा नकाशा शेअर केला. त्यात ग्रीनलँडसह व्हेनेझुएला व कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ग्रीनलँडवर अमेरिकेचा ध्वज फडकवतानाचा स्वतःचा फोटो ट्रम्प यांनी शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी ग्रीनलँड […]
अंधेरी गोळीबार प्रकरणी संभ्रम; गोळ्या झाडल्या कुठून, तिसऱ्या दिवशीही अस्पष्ट
अंधेरीच्या स्वामी समर्थ नगरातील नालंदा इमारतीच्या दोन घरांवर झालेला गोळीबार नेमका केला कोणी, कुठून केला आणि कसा केला याचे कोडे आज तिसऱ्या दिवशीदेखील सुटले नाही. काहीच समजून येत नसल्याने पोलीस अक्षरशः चक्रावून गेले आहेत. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रूमबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. भरदुपारी ही घटना घडल्याने लोखंडवाला […]
फ्रान्सवर 200 टक्के टॅरिफ लावण्याची ट्रम्प यांची धमकी, फ्रेंच वाईन आणि शॅम्पेन लक्ष्य
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धमकीसत्र सुरूच असून आता त्यांनी फ्रान्सला टॅरिफची धमकी दिली आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी न झाल्यास फ्रेंच वाईन व शॅम्पेनवर 200 टक्के टॅरिफ लावू, अशी धमकी ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना दिली आहे. पॅलेस्टाईनमधील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने एक योजना आखली आहे. त्यासाठी ‘बोर्ड ऑफ पीस’ या गटाची स्थापना […]
नोबेलची पर्वा नाही; लोकांचे जीव महत्त्वाचे, डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न
‘जगातली 8 युद्धे थांबवूनही मला नोबेल दिले नाही, आता माझ्याकडून जागतिक शांततेची अपेक्षा करू नका, असे म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांतच घूमजाव केले. ‘‘मला नोबेलची पर्वा नाही, लोकांच्या जिवाची चिंता आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी कालच नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरे यांना खरमरीत पत्र लिहून नोबेल न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावर […]
आरोपीच्या मूलभूत अधिकारांपेक्षा बलात्कार पीडितेचा न्यायाचा अधिकार मोठा आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका नराधमाच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. पीडिता अवघ्या 13 वर्षांची असताना आरोपी रमेश कालेलने तिच्यावर बलात्कार केला. औषध घेण्यासाठी पीडिता घरी आली होती. शाळेत परत जाताना कालेलने पीडितेला गाठले. तिला घरी घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पनवेल-रायगड अतिरिक्त […]
अमेरिकेत 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या
अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचे वादळ आले. या वादळामुळे रस्ते अपघात झाले. अमेरिकेतील एका आंतरराज्यीय महामार्गावर 100 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. तसेच अनेक गाड्या रस्त्यावरून घसरल्या. यामध्ये अनेक जखमी झाले असून नेमका आकडा समोर आला नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर बर्फात अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य जोरात सुरू आहे. कमी […]
अक्षय कुमारच्या सुरक्षा कारला अपघात
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा कारला अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी जखमी झाला आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घडल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे सोमवारी रात्री वाहनाने त्याच्या जुहू येथील घरी […]
आरटीओ एपिके फाईलने बँक खात्यावर डल्ला
आरटीओ ई-चलानची एपिके फाईल पाठवून ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून नऊ लाख रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांची केमिकल्स उत्पादनाची कंपनी आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार बँकेचे स्टेटमेंट पाहत होते तेव्हा त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या खात्यातून 9 लाख […]
नितीन नबीन माझे बॉस, मी कार्यकर्ता; पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले नितीन नबीन यांनी आज कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबीन यांचे अभिनंदन केले. ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. नितीन नबीन हे पक्षात माझे बॉस असतील,’ असे मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात नबीन यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नबीन यांचे नेतृत्व हे अनुभव […]
एका दिवसात रेल्वे अपघातामध्ये 13 जण ठार; आठवडाभरात 35 जणांचा अपघाती मृत्यू
रेल्वे अपघातात प्रवाशांचे बळी जाऊ नयेत याकरिता विविध उपाययोजना केल्या जात असतानाही रेल्वे अपघाती मृत्यूचे प्रकार दररोजच घडतच आहे. आठवडाभरात 35 जणांनी रेल्वे अपघातात आपले प्राण गमावले असून सोमवारी एका दिवशी 13 जण रेल्वे अपघातात बळी गेले. रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. वेळोवेळी जनजागृती […]
तपोवनमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोडीला बंदीच राहणार!
कुंभमेळ्यासाठी तपोवनसह नाशिकमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये, असे सक्त निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले आहेत. नाशिकमधील वृक्षतोडीसंदर्भात सुरू असणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे. नाशिकमध्ये तपोवनमधील वृक्षतोडीला वृक्षप्रेमी, नागरिकांनी जोरदार विरोध केल्यामुळे या ठिकाणच्या वृक्षतोडीला दोन आठवडय़ांपूर्वी अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भलावण : पंचेचाळीस वर्षांचे नितीन नबीन भाजपचे आजवरचे सर्वात तरुण अध्यक्ष ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारला आहे. सोमवारी ते या महत्त्वाच्या पदावर निर्विरोध निवडून आले आहेत. मंगळवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या येथील मुख्यालयात पक्षाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र [...]
भारत कोकिंग कोल 96 टक्क्यांवर सूचीबद्ध
आयपीओ 143 पट जादा झाला सबस्क्राइब मुंबई : भारत कोकिंग कोल (बीसीसीएल) सोमवारी 19 जानेवारी रोजी शेअर बाजारात 96 टक्क्यांवर प्रीमियमसह सूचीबद्ध झाला. कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 45 ला सूचीबद्ध झाला, जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तिच्या 23.95च्या इश्यू किमतीपेक्षा 95.65 टक्के जादा राहिला आहे.यानंतर, त्याचा शेअर थोडा घसरला आणि एनएसईवर 76.78 टक्के वाढीसह 40.66 [...]
भारत-न्यूझीलंड टी-20 मालिका आजपासून,
वृत्तसंस्था/ नागपूर भारत व न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आज बुधवारी येथे सुरू होणार असून यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्यातील आक्रमक फलंदाजाने पुढे येऊन न्यूझीलंडविऊद्धच्या मालिकेत आपल्या नेतृत्वाला बळकटी द्यावी अशी अपेक्षा असेल. ही मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाच्या बचावासाठी अंतिम रंगीत तालीम म्हणून काम करेल. 2024 मध्ये [...]
किम जोंग उनचे कृत्य : यांग सुंग- हो यांचा सार्वजनिक अपमान
वृत्तसंस्था/ प्योंगयांग उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने उपपंतप्रधान यांग सुंग-हो यांची हकालपट्टी केली आहे. किम ही योंगसोंग मशीन कॉम्प्लेक्समध्ये इंडस्ट्रियल प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी किम यांनी स्वत:च्या संबोधनात यांग सोंग-हो यांच्या हकालपट्टीचा आदेश दिला. किम यांनी उपपंतप्रधानांना फटकारत अधिक वेळ होण्यापूर्वी स्वत:च्या पायांवर स्वत:च येथून निघून जा असे सुनावले. यांग मोठ्या [...]
मुंबई इंडियन्सचा पराभवाचा चौकार
: दिल्ली कॅपिटल्स 7 गड्यांनी विजयी, जेमिमा रॉड्रिग्ज सामनावीर, वृत्तसंस्था / बडोदा महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे झालेल्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा चौथा पराभव आहे. अर्धशतक झळकविणाऱ्या कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या [...]
भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचा इतिहास सांगत आहेत
अध्याय चौथा माउली म्हणाले, आज आपल्या कानांचे भाग्य उजाडले आहे. कारण स्वप्नवत वाटणारे गीतेचे श्रवण यथार्थ म्हणजे जसे व्हायला पाहिजे तसे होत आहे. आधीच ही आत्मविचाराची गोष्ट आहे. ती भगवान श्रीकृष्ण स्वत: सांगत आहेत आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता म्हणजे एक उत्तम पर्वणीच. श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणून [...]
‘कॉकटेल 2’मध्ये शाहिदचा नवा अवतार
चालू वर्षात प्रदर्शित होणार चित्रपट होमी अदजानियाकडून दिग्दर्शित चित्रपट ‘कॉकटेल 2’ यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शाहिद कपूर, क्रीति सेनॉन आणि रश्मिका मंदाना हे यात मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट सप्टेंबरच्या आसपास प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. कॉकटेल 2 पूर्वी शाहिदचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा ओ रोमियो नंतरचा [...]
तामिळनाडू राज्यपालांचा विधानसभेतून वॉकआउट
राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा केला आरोप : स्टॅलिन यांच्याकडून राज्यपालांवर टीका वृत्तसंस्था/ चेन्नई तामिळनाडू विधानसभा अधिवेशनादरम्यान मंगळवारी सभागृहात पुन्हा हायलेव्हल ड्रामा झाला आहे. राज्यपाल आर.एन. रवि यांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत भाषण न करताच विधानसभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षाप्रमाणे राज्यपालांनी तमिळ गीतानंतर राष्ट्रगीत वाजविले जावे अशी सूचना केली. परंतु सभापती अप्पावु [...]
डीजीपी के. रामचंद्रराव यांचे निलंबन
कर्मचारी-प्रशासन सुधारणा खात्याच्या सचिवांचा आदेश प्रतिनिधी/ बेंगळूर रासलिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस महासंचालक के. रामचंद्रराव यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा हा आदेश जारी केला. सरकारी कार्यालयात गणवेशात असताना महिलेसोबत असभ्य वर्तन करतानाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता. त्यामुळे रामचंद्रराव 10 दिवसांच्या सक्तीच्या [...]
टाटा कॅपिटल तिमाहीमध्ये नफा कमाईत
सकारात्मक कामगिरीसह नफा 1285 कोटी रुपयावर : वार्षिक 39 टक्के वाढीची नोंद नवी दिल्ली : दिग्गज टाटा समूहातील नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) टाटा कॅपिटलने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 1,285 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 922 कोटी रुपयांचा नफा कमावला [...]
‘फोन पे’ आयपीओला सेबीची मान्यता
नवी दिल्ली : फोनपे या कंपनीला बाजारात आयपीओला आणण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यांनी या संदर्भात मंगळवारी माहिती दिली आहे. प्राप्त अहवालानुसार, कंपनी लवकरच अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल करणार आहे. फोनपे आयपीओ पूर्णपणे ओएफएस असेल हा आयपीओ विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे आणला जाईल. कंपनी या आयपीओद्वारे कोणतेही [...]
आतापर्यंत कोट्यावधीच्या बॅग खरेदी जगात अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात, काही जणांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा छंद असतो, तर कुणाला स्वयंपाकाची आवड असते. काही जण हिंडणे पसंत करतात, तर कुणाला घरात एकटे राहणे आवडते. परंतु काही जणांचा छंद चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल मीडियावर सध्या 26 वर्षीय कंटेंट क्रिएटर स्कॉट फेन्सोमेची चर्चा होत आहे. हा [...]
तिसऱ्या फेरीत गुकेश, अर्जुन यांच्यात बरोबरी
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी, नेदरलँड्स अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसी जागतिक विजेता डी. गुकेशच्या बचावाला भेदण्यात अपयशी ठरला या दोन भारतीय खेळाडूंनी येथे झालेल्या टाटा स्टील मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत बरोबरी पत्करली. कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मॅथियास ब्लूबाउमने या स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला, त्याने आपला देशबांधव व्हिन्सेंट कीमरला पराभूत केले. तो संभाव्य तीनपैकी दोन गुणांसह आघाडीच्या [...]
प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी 10 हजार अतिथी आमंत्रित
जनभागीदारी वाढविणे उद्देश असल्याचे सरकारचे वक्तव्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर आयोजित होणाऱ्या संचलनासाठी विविध क्षेत्रांमधून जवळपास 10 हजार विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. आमंत्रित अतिथींमध्ये उत्पन्न आणि रोजगारसृजनात अनुकरणीय कार्य करणारे, सर्वश्रेष्ठ नवोन्मेषक, संशोधक आणि स्टार्टअप, स्वयंसहाय्य समूह आणि प्रमुख सरकारी पुढाकारांच्या अंतर्गत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारे लोक सामील [...]
शबरीमला प्रकरणी तीन राज्यांमध्ये छापे
सोने चोरी प्रकरण : 21 ठिकाणी घेण्यात आली झडती वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम ईडीने मंगळवारी शबरीमला मंदिरातून सोने चोरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाच्या अंतर्गत तीन राज्यांमध्ये शोधमोहीम हाती घेतली आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत जवळपास 21 ठिकाणी पीएमएलएच्या तरतुदींच्या अंतर्गत छापे टाकण्यात आले आहेत. बेंगळूरमध्ये मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे माजी अध्यक्ष ए. पद्मकुमार [...]
मनेका गांधी यांना ‘सर्वोच्च’ इशारा
श्वानासंबंधीच्या आदेशावर टीका केल्याने ताशेरे वृत्तसंस्था / नवी दिल्ली भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर प्राणीप्रेभी नेत्या मनेका गांधी यांनी टीका केल्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले असून त्यांना इशाराही दिला आहे. आम्ही अत्यंत उदार असल्याने त्यांच्यावर न्यायालयाची अवमानना केल्याची कारवाई केलेली नाही. तथापि, मनेका गांधी यांनी मर्यादा ओलांडली आहे, अशा अर्थाची टिप्पणीही न्यायालयाने केली [...]
टी-20 मालिकेत अफगाणची विजयी सलामी
विंडीजचा 38 धावांनी पराभव, झेद्रान आणि रसूली यांची अर्धशतके वृत्तसंस्था / दुबई तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इब्राहीम झेद्रान आणि दार्विश रसूली यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर अफगाणने विंडीजचा 38 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 20 षटकांत 3 बाद 183 धावा जमविल्या. इब्राहीम झेद्रान आणि [...]
यूपी डॉमिनेटर्सचा दिल्ली वॉरियर्सवर विजय
वृत्तसंस्था / ग्रेटर नोएडा प्रो लीग कुस्ती स्पर्धेत प्रारंभी पिछाडीवर असलेल्या यूपी डॉमिनेटर्सने मुसंडी मारत दिल्ली दंगल वॉरियर्सचा 5-4 अशा गुणांनी पराभव केला.या लढतीतील पुरूषांच्या 86 किलो वजन गटात दिल्ली दंगलच्या हेदी बक्तीयारने यूपी डॉमिनेटर्सच्या मिखालोव्ह व्हॅसेलचा 7-4 अशा गुणांनी पराभव केला. त्यानंतर महिलांच्या 76 किलो वजन गटातच्या लढतीत दिल्ली दंगल वॉरियर्सच्या अॅनेस्टेसिया अल्पेव्हाने यूपी [...]
इजिप्तमध्ये मिळाले 4500 वर्षे जुने मंदिर
सूर्यदेवाची व्हायची पूजा : नाईल नदीच्या पाण्याने व्हायचा जलाभिषेक हिंदू धर्म केवळ भारतापुरती मर्यादित नसल्याचे पुरावे इजिप्तमध्ये मिळाले आहेत. भारतात अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते. अशाचप्रकारे बालीमध्sयही अनेक मंदिरे आहेत. आता पिरॅमिड्सचा देश इजिप्तमध्येही संशोधकांनी 4500 वर्षे जुने मंदिर शोधले आहे. इजिप्तच्या कैरोपासुन 14 किलोमीटर अंतरावरील अबू घुरबमध्ये या मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. हे मंदिर [...]
टोयोटाची पहिली ई-एसयूव्ही अर्बन क्रूझर अबेला लाँच
नवी दिल्ली : जपानी कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार ‘अर्बन क्रूझर अबेला’ अनावरण केली आहे. ही एक मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी मारुती सुझुकीच्या ‘इलेक्ट्रिक विटारा’ (ई विटारा)च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. भारतात, [...]
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन.. जो जे कर्म करतो त्याला याच जन्मात ते फेडावे लागते. अगदी त्याचप्रकारे हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, संघटित गुन्हेगारी आयुष्यभर चालवित स्वत:ला गुन्हेगारी क्षेत्राचा बेताब बादशहा समजले जाणाऱ्या अनेक गुंडाचा सध्या मुक्काम पोस्ट जेल आहे. परिस्थितीने गुन्हेगार बनविले. परिस्थिती असती तर आज तुमच्यासारखा आयपीएस अधिकारी असतो. हे वाक्य आहे एका कुख्यात [...]
नोएडातील इंजिनियर मृत्यूप्रकरणी बिल्डरला अटक
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील इंजिनियरच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत बिल्डर अभय कुमारला अटक केली आहे. इंजिनियरच्या मृत्यू प्रकरणी बिल्डरची भूमिका समोर आल्यारव ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे. प्राधिकरणात झालेल्या बैठकीनंतर एसआयटीने तपासाला वेग दिला आहे. बैठक संपताच एसआयटीने घटनास्थळाला भेट दिली आहे. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली असून मृत्युमुखी [...]
टिळा लावल्याने 8 वर्षीय मुलासोबत भेदभाव
लंडनमध्ये धार्मिक भेदभावाचा ठरला शिकार वृत्तसंस्था/लंडन लंडनच्या एका प्राथमिक शाळेत धार्मिक भेदभावाचे धक्कादायक प्रकरण घडले आहे. केवळ 8 वर्षांच्या हिंदू मुलाला टिळा लावल्याने शाळेतून बाहेर पडावे लागले आहे. इंसाइट युके नावाच्या या संघटनेने या प्रकरणी आवाज उठविला असून याला धर्माच्या आधारावर स्पष्ट भेदभाव संबोधिले आहे. हा मुलगा लंडनच्या विकर्स ग्रीन प्राथमिक शाळेत शिकतो. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी [...]
आजचे भविष्य बुधवार दि. 21 जानेवारी 2026
मेष: सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी मनाला उद्युक्त करा वृषभ: तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या मिथुन: दीर्घ आजारापासून सुटका, नवीन व्यवसाय सुरू करा कर्क: आनंद वाटल्याने आरोग्याला बहार येईल, मैत्रीपूर्ण सल्ला घ्याल सिंह: अध्यात्मिक व भौतिक लाभासाठी योग व ध्यानधारणा करा कन्या: नातेवाईकांकडून अनपेक्षित भेटवस्तूचा लाभ. तुळ: आत्मविश्वास वाढेल. नवे तंत्र व कौशल्यांचा वापर कराल वृश्चिक: सामानाकडे [...]
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविरोधात (ईव्हीएम) देशभरात प्रचंड संताप आहे. ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ईव्हीएम हटवून जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी आज मुंबईत उग्र आंदोलन झाले. आंदोलकांनी थेट मंत्रालयासमोरील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरच धडक दिली. या वेळी आंदोलकांनी आयोगाच्या सचिवांवर बांगड्या फेकून निषेध नोंदवला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच झालेल्या या आंदोलनाने […]
झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर आज सुनावणी, 50 टक्क्यांच्या आरक्षणाचा तिढा कसा सुटणार?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे निवडणुका न्यायालयाच्या रडारवर आल्या आहेत. आधीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित […]
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज सुनावणी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध केले आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या […]
सामना अग्रलेख –बालिशपणाची हद्द!
साऱ्या जगात आपणच भांडणे लावायची आणि वैर व वैरी निर्माण करून असंख्य देशांना शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करायचा हा अमेरिकेचा मूळ धंदा आहे. शिवाय हा देश ताब्यात घे, त्या देशावर हवाई हल्ले कर, हे अमेरिकेचे पारंपरिक उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अधिकच वाढले. तरीही ट्रम्प महाशयांना शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत हवा आहे व त्यासाठी त्यांनी […]
‘शिवसेना’ नावाचा चार अक्षरी मंत्र देऊन कोटय़वधी मनात मराठी अस्मितेचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष या 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुखांचे हे जन्मशताब्दी वर्ष तमाम मराठीजनांसाठी ‘उत्सवी वर्ष’ ठरणार असून याची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळय़ाने होणार आहे. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह […]
लेख –शेतकऱ्याला कोणी वाली आहे का?
>>प्रा. सुभाषबागल उत्पन्नाला लागलेली गळती, कर्जबाजारीपणा, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, युवकांचे दुरावलेपण, व्यवसायकर्त्यांचीच त्यातून बाहेर पडण्याची इच्छा, झाडंझुडपं, घरची, शेतातील माती विकून झाली. आता किडनी विकायची शेतकऱ्यावर आलेली वेळ ही कदचित मंदीची शास्त्रीय लक्षणे नसतीलही, परंतु शेती व्यवसायाची दुरवस्था करण्यासाठी पुरेशी आहेत. बियाणे, खते, मजुरी, मशागतीचा खर्च वेगाने वाढत असताना शेतमालाच्या भावात घट कशी, असा प्रश्न […]
दावोसला जाऊन करार कुणाशी केले…लोढा, रहेजा आणि पंचशीलसोबत, फडणवीस सरकारची अशी ही गंडवागंडवी
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी साडेचौदा लाख कोटींचे गुंतवणूक करार केल्याचा मोठा गाजावाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्या गुंतवणुकीतून 35 लाख नोकऱ्या मिळतील असा दावाही केला. पण फडणवीस सरकारने अक्षरशः गंडवागंडवी चालवल्याचे समोर आले आहे. हजारो कोस दूर दावोसला जाऊन फडणवीस यांनी करार मात्र मुंबई, महाराष्ट्रातील कंपन्यांबरोबर केले. त्यात […]
>>संकेत कुलकर्णी महाराष्ट्राला इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक मोठी परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील एक दीपस्तंभ म्हणजे डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर. 17 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी या थोर इतिहास संशोधकाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने केवळ गोदाकाठचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचिताचा वारसा उलगडून सांगणारा एक मोठा अभ्यासक हरपला […]
ऑस्ट्रेलियाची जपानवर एकतर्फी मात
न्यूझीलंड-बांगलादेश सामना रद्द ;यू-19 विश्वचषक स्पर्धा :सामनावीर विल मालाझुक : 55 चेंडूत 102 धावा वृत्तसंस्था / विंडहॉक (नामिबिया) आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 16 व्या सामन्यात अ गटात ऑस्ट्रेलियाने जपानचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. तर पावसामुळे न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द करावा लागल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 [...]
नागपूरमधील 70 वर्षीय महिलेला हार्ट अॅटॅक, उपचारादरम्यान निदर्शनास आले..
नागपूरमधील सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेला उजव्या बाजूला हृदय असल्याचे आढळून आले. यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. परंतु डॉक्टरांच्या मते, हा एक दुर्मिळ प्रकार आहे आणि तो डेक्स्ट्रोकार्डिया नावाच्या आजारामुळे होतो, जो जन्मजात आजार आहे. ही केस हृदयविकाराच्या झटक्यानंतर नोंदवण्यात आली होती. सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेला छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत […]
कारल्याची भाजी का खायला हवी, जाणून घ्या
कारलं म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु आपल्या आहारात कारल्याची भाजी समाविष्ट करण्याचे खूप फायदे आहेत. कारलेचा उल्लेख केल्यावरच अनेकांचे तोंड कडू होते. कारल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीराला अ, ब आणि क जीवनसत्त्वे मिळतात. आयुर्वेदात कारल्याला “करवेलक” असे म्हणतात, ज्यामध्ये अशुद्धता, उच्च रक्तातील साखर आणि अगदी जंत देखील शुद्ध करण्याची क्षमता असते. कारल्याची भाजी खाण्याचे […]
लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या
लिंबाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लिंबू आपल्याला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. संशोधनानुसार, लिंबाच्या साली देखील खूप फायदेशीर आहेत. आपल्या सर्वांना लिंबाच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती आहे. जेव्हा जेव्हा आपण लिंबू पिळतो तेव्हा आपण त्याची साल फेकून देतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हेच लिंबाचे साल सुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीच्या पानावर जेवण्याचे […]
गुहागर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी गुहागरमध्ये भगवे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी असगोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी […]
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत आहे. अशातच मुंबईत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यात आली. यानंतर आंदोलन करणाऱ्या चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकतही भाजपला […]
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडून आलेले तीन नगरसेवक हे विरोधी बाकावर बसून निर्भीडपणे जनतेची आणि शिवसेनेची बाजू मांडतील असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. विनायक राऊत यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित तीन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, […]
Ratnagiri Nagar Parishad –भाजपला दूर ठेवत महत्वाच्या समित्या शिंदे गटाने बळकावल्या
रत्नागिरी नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीत शिंदे गटाने सर्व विषय समित्या बळकावत भाजपला दूर लोटले आहे. भाजपला एकाही विषय समितीचे सभापतीपद मिळाले नाही. रत्नागिरी नगरपरिषदेत ३२ पैकी शिंदे गट आणि भाजप महायुतीचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शिंदेगटाचे २३ आणि भाजपचे ६ नगरसेवक आहेत. भाजपला उपनगराध्यक्ष पद देण्यात आले आहे. आज विषय समित्यांची निवडणूक […]
ग्रीनलँड आता अमेरिकेचाच एक भाग? डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला वादग्रस्त नकाशा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलॅंडवर हक्क सांगितला आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मंगळवारी अमेरिकेचा एक नवीन नकाशा शेअर केला. ज्यामध्ये ग्रीनलँडसह कॅनडा आणि व्हेनेझुएला या देशांना अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांच्या या कृतीमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक […]
IIT कानपूरमध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाच पाऊल, 22 दिवसांतील दुसरी घटना
IIT कानपूरमध्ये पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील 22 दिवसांत दुसऱ्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. मृत विद्यार्थी रामस्वरुप इशराम PHD करत होता. पत्नी आणि बारक्या मुलीसह तो IIT कॅम्पसमध्येच वास्तव्याला होता. अचानक रामस्वरुपने टोकाचं पाऊल उचलल्याने पत्नी आणि लहान मुलगी पोरकी झाली आहे. या प्रकारामुळे IIT कॅम्पसमध्ये […]
केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
आपल्या देशाच्या विविध भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. केळीच्या पानावर जेवणं हे आपल्या आरोग्यासाठी फार हितावह मानले जाते. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे ग्रीन टी आणि काही फळांमध्ये देखील आढळतात. जेव्हा पानावर गरम अन्न दिले जाते तेव्हा हे घटक अन्नात विरघळू शकतात. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते आणि […]
शिक्षण, कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीचा समतोल आवश्यक - डॉ. नारनवरे
धाराशिव (प्रतिनिधी) - वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही पदवी समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आदर्श व्यक्ती व रोल मॉडेल्सचा उल्लेख केला जातो. मात्र सध्याच्या काळात जागतिक पातळीवर आदर्शांची कमतरता जाणवत आहे. अनेक अभ्यासक व मानसशास्त्रज्ञांच्या मते, आजची पिढी पूर्वीच्या पिढ्यांनी भोगलेल्या संघर्षांचा अनुभव घेतलेली नसल्याने कष्टांचे महत्त्व कमी होत चालले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल महाराष्ट्र यांचे सचिव सनदी अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दि.२० जानेवारी रोजी केले. तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या १९ व्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कुलपती प्रा. डी पी सिंग, कुलपती प्रा बद्री नारायण तिवारी, कुलसचिव नरेंद्र मिश्रा, तुळजापूर निदेशक प्रा. बाळ नागोराव राक्षसे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ नारनवरे म्हणाले की पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध ठिकाणी जावे लागे, मोबाईलपासून दूर राहून शिस्तबद्ध जीवन जगावे लागे. आज ही परिस्थिती सर्वांसाठी तशी नसली तरी प्रत्येक पिढीवर सामूहिक जबाबदारी असते. जग पूर्णपणे समान नसले तरी एकत्रित प्रयत्नांतूनच प्रगती साधता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज संपूर्ण जगात तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही लोकसंख्या योग्य दिशेने वळवली गेली तर ती देशासाठी मोठी संपत्ती ठरू शकते. केवळ पदव्या पुरेशा नसून कौशल्यांना अधिक महत्त्व आहे. शिक्षणातून ज्ञान मिळते. मात्र त्या ज्ञानाचा प्रभावी वापर कौशल्यांवर अवलंबून असतो असे त्यांनी नमूद केले. तर सध्या अनेक विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांत शिक्षण घेत आहेत. तरीही रोजगाराची मोठी दरी कायम आहे. शाळेतील १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ २८ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र ठरतात. तर उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची कमतरता दिसून येत असल्यामुळे शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ वर्गातील व्याख्यानांपुरते शिक्षण न ठेवता प्रत्यक्ष अनुभव, उदाहरणे, चित्रे आणि जिज्ञासा निर्माण करणारी शिकवण अधिक परिणामकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि नवकल्पनांची वृत्ती विकसित होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी १६ हजार गटांमधून ५८ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. आज या कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावरून सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाची जाणीव करून देणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. कोणीही जन्मतः परिपूर्ण नसतो. मात्र समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे हीच खरी जबाबदारी आहे. इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप्स आणि नव्या कल्पनांमधून अनेक संधी निर्माण होऊ शकतात. स्टार्टअप्ससाठी मागवलेल्या कल्पनांपैकी निवडक कल्पनांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने संधी सर्वांसाठी खुल्या असल्याचे दिसून येते. आजचा विद्यार्थी केवळ स्वतःच्या भविष्यासाठी नव्हे, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या भविष्यासाठीही जबाबदार आहे. कोणालाही दुर्लक्षित समजू नये. वर्गात मागे बसलेला विद्यार्थीही उद्या मोठा उद्योजक, नेता किंवा समाजसेवक होऊ शकतो. कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली, तरी संघभावना महत्त्वाची असते. कधी नेतृत्व करावे लागते, तर कधी संघातील सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते. शेवटी, भारतातील प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. त्या सर्व आवाजांना ऐकून, समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करणे, हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक यशाची पावती असल्याचे डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
रविंद्र हायस्कूल, भूमच्या विद्यार्थ्यांनी ओलंपियाड परीक्षेत मिळविले घवघवीत यश
भुम (प्रतिनिधी)- International English Olympiad परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल तर 3 विद्यार्थी second level साठी पात्र. हाडुळे अनुज (second level eligible), सय्यद तनाज, गुंड यश,वाघमारे कीर्ती, तळेकर माही, कांबळे समृद्धी, शिंदे युगंधरा, शेटे प्रणव, गेडाम किन्शुक, काटे श्रावणी, चौरे स्नेहा (second level eligible), रेपाळ अपूर्वा second level eligible, गोफने अपेक्षा, बोराडे पार्थ. तर *नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत 11 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 3 विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र शहाणे श्रीनिवास (second level eligible), ओव्हाळ गौरंग, डोके प्रणव, वैष्णवी जानकर, बळे संजना (second level eligible), शिंदे युगंधरा, गायकवाड श्रीजा, वराळे गौरी, कवडे वेदांत (second level eligible), चौरे स्नेहा, रेपाळ अपूर्वा. इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड परीक्षेत 16 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 5 विद्यार्थी सेकंड लेव्हल साठी पात्र.* हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित (second level eligible), बोराडे राजलक्ष्मी (second level eligible), सिद्धी मोटे, शरयू साठे, डोके अनुष्का (second level eligible), बळे संजना, दुधाळ, ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, (second level eligible), चौरे स्नेहा, शिंदे किस्तिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी (second level eligible) तर *रविंद्र प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले.* समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर सर शिवाजी मद्देवाड सर, अमित भालेकर सर, सचिन कलमे सर यांचा केंद्रप्रमुख संजीवनी खांडेकर साहेब, थिटे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर तसेच धनंजय पवार सर, भागवत लोकरे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.
चांदीने इतिहास घडवून प्रतिकिलो ३ लाख रुपये ओलांडले कोल्हापुर : मोडिटी मार्केटमध्ये सोमवार, १९ रोजी चांदीच्या किमतीने इतिहास रचून प्रथमच ३ लाख रुपये प्रतिकिलोची पातळी ओलांडली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारादरम्यान सकाळच्या सत्रातच चांदी १३,५५३ रुपये किंवा ४.७१ टक्क्यांनी वाढून [...]
ऐन चाळीशीत डोक्याला ताप! अनुभव ठरतोय घातक,नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याचा धोका
एकेकाळी वयाची 40 वर्षे म्हणजे करिअरचे सुवर्णकाळ मानले जायचे. या टप्प्यावर प्रोफेशनल्सकडे अनुभवाची शिदोरी आणि नेतृत्व करण्याची क्षमता असते, असे मानले जात असे. मात्र, सध्याच्या कॉर्पोरेट जगतात चित्र बदलताना दिसत आहे. ज्या वयात करिअरची नवी शिखरे सर करायची असतात, तिथेच अनेक अनुभवी व्यक्तींसाठी संधीचे दरवाजे बंद होऊ लागले आहेत.अनुभवाला महत्त्व देण्याऐवजी त्याला एक प्रकारचा ‘अडथळा’ […]
धाराशिव, (प्रतिनिधी)- शिख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांनी धर्मस्वातंत्र्य,मानवी हक्क आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देत आपल्या प्राणांची आहुती दिली.प्रार्थना,परोपकार,सेवा,साधेपणा, निर्भीडपणा आणि इतरांच्या सेवेला महत्त्व देणारे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.त्यांच्या प्रवचनांचा व भजनांचा समावेश ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये करण्यात आला असून, 17 व्या शतकात दिलेल्या त्यांच्या बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे संरक्षण झाले. मुघल सत्तेच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी श्री गुरु तेग बहादुर यांच्या पवित्र पार्थिवाला आपल्या तांड्यातील घर जाळून अग्नी दिल्याची घटना भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते.या त्यागामुळे शौर्य व बलिदानाची परंपरा अधिक दृढ झाली. सन 2025 हे श्री गुरु तेग बहादुर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने,त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा व त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे,यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येत आहे. नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित बैठकीला जिल्हा क्षेत्रीय समितीचे सदस्य संतोष चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना कडवकर यांनी दिल्या. नांदेड येथील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहावेत,यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट व गीतांचे सादरीकरण,प्रभातफेरी,गायन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा,डॉक्युमेंटरी वाचन, जागरण बैठक,प्रचार रथ,लाईट अँड साउंड शो तसेच विविध शासकीय बैठकीतून प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण भागातील वाड्या- वस्त्यांपर्यंतही कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्ह्यात चित्ररथाच्या या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर यांच्या विचारांचा प्रचार व त्यांच्या बलिदानाचे स्मरण सर्वस्तरांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.अशी माहिती श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली.
हॉटेल व लॉजवर धाड टाकत दोन पिडित मुलींची सुटका
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हॉटेल मालकासह हॉटेलचा एक नोकर व इतर चार ग्राहकांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई दि. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता करण्यात आली. छापा कारवाईत नंतर दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती वाशी पोलिसांना मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी दि. 19 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकली. यावेळी सदरील हॉटेलच्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन महिला व इतर चार ग्राहक आढळून आले. यावेळी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पीडित दोन महिन्यांची सुटका केली व हॉटेलचा मालक श्रीपती उत्तमराव घुले, हॉटेलमधील नोकर महादेव विष्णू काळे दोघे राहणार पारगाव तालुका वाशी व ग्राहक म्हणून आलेले विशाल महादेव जुळे रा. भंडारवाडी ता. जि. बीड, भरत नवनाथ सुरवसे रा. वाकवड ता. भूम जि. धाराशिव, संदीप आबासाहेब गायकवाड रा. गिरवली ता. भूम जि. धाराशिव व अक्षय महादेव सालगुडे रा. नेकनूर ता. जि. बीड यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने कारवाई केली.
वजन कमी होण्यासाठी आहारात भाकरीचा समावेश गरजेचा, जाणून घ्या
आहारामध्ये भाकरी समाविष्ट करण्याचे खूप सारे फायदे आहेत. आपल्या आहारात भाकरीचा समावेश करणे म्हणजे अनेक रोगांवर मात करणे. भाकरी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टीक मानली जाते. भोपळ्याच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या वजन कमी कमी करण्यासाठी खूप प्रकारची विविध डाएट करण्यापेक्षा योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काहीच न खाण्यापेक्षा जे खातोय […]
कळंबच्या विकासासाठी एकत्र येवू- सुनंदा कापसे
कळंब (प्रतिनिधी)- कळंब च्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ,सर्वजण मला साथ देतील असा मला विश्वास आहे. व आदर्श गाव करण्यासाठी शहरातील जनतेने ही नगर परिषदला सहकार्य करावे, असे आवाहन नूतन नगराध्यक्षा सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी केले. कळंब येथील देशमुख प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगर अध्यक्ष यशवंत दशरथ हे होते.तर व्यासपीठावर अँड.दिलीप सिंह देशमुख, महादेव महाराज अडसूळ,पांडुरंग गुरव, सतीश टोणगे,दीपक हरकर,सौ.धनश्री ताई कवडे, उपस्थित होते.या वेळी शहराच्या विकासाठी आम्ही आपल्या सोबत असून,जनतेचे मूलभूत प्रश्न अग्रक्रमाने सोडवावेत असे अँड.दिलीप सिंह देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी देशमुख प्रतिष्ठान च्या वतीने नूतन नगराध्यक्षा व नगर सेवकांचा शाल, बुके, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी नूतन नगरसेवक उपाध्यक्ष लखन गायकवाड, बाबू चाऊस, रोहन पारख, हर्षद आंबुरे,भूषण करंजकर, शितल चोंदे, शीला पवार, आशाताई भवर, हरकर, योजना वाघमारे, रुकसाना बागवान, अर्चनाताई मोरे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचलन व आभार प्रतिष्ठानचे सचिव ॲड.पृथ्वीराज देशमुख यांनी मानले.
Republic Day 2026 –ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडवणारी ‘ही’घातक शस्त्रे दिसणार परेडमध्ये
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाला शौर्य, शिस्त आणि सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी जय्य्त तयारी सुरू आहे. यावर्षीची 77 व्या प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. ‘वंदे मातरम’चे 150 वे वर्ष आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित ही परेड असणार आहे. कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हिंदूस्थानने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतरची ही पहिली भव्य परेड असणार आहे. या […]
Kolhapur News : दुचाकी चोरी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला करवीर पोलिसांकडून अटक, ११ दुचाकी जप्त
पोलिसांच्या सापळ्यात चोरट्यांचा फसवटा उघडकीस कोल्हापूर : निवडणूक आणि जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये पुंगळ्या काढून फिरविण्यासाठी यामाहा आणि सुझुकीच्या दुचाकी चोरुन त्या भाड्याने देणाऱ्या तरुणास करवीर पोलिसांनी अटक केली. अभिषेक सुधीर कुरणे (वय २३. रा. शिये, ता. करवीर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी [...]
पळसप येथील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- पळसप येथील उबाठा शिवसेना पक्षाचे उपसरपंच राम लाकाळ, माजी सरपंच दगडू लाकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेश माळी, मोतीचंद फुटाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर, भाजपा महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तसेच सामाजिक समता, संघटनात्मक बळकटीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक सर्जेराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांच्यासह बालाजी कांबळे, गोरोबा ताटे, रवी लोंढे, ओंकार पेठे व सुनील शिंदे यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा दिला. या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे पळसप व परिसरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांचा भाजपा महायुती सरकारच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या प्रवेशप्रसंगी नितीन काळे, संपतराव डोके, विजय हाऊळ, प्रवीण माळी, प्रदीप शिंदे,अशोक वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने प्रजनन समस्या टाळू शकाल, वाचा
आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीत, वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढत आहे. ही समस्या आता महिलांपुरती मर्यादित नाही; मोठ्या संख्येने पुरुष देखील कमी शुक्राणूंची संख्या आणि यासंबंधी येणाऱ्या समस्यांशी झुंज देत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या सवयी आणि झोपेचा अभाव ही प्रमुख कारणे मानली जातात. बरेचजण शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी विविध पद्धती वापरतात, परंतु ते अनेकदा अपयशी ठरतात. […]
WPL 2026 मध्ये मुंबई इंडिनन्सची कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. मात्र, दोनच सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असून प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी संघाला दमदार पुनरागमन करावं लागणार आहे. अशातच मुंबईची विस्फोटक फलंदाज गुणालन कमलिनी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्याजागी […]
Satara News : सातारा नाट्य कलाकारांची राज्यस्तरीय महोत्सवात घवघवीत कामगिरी
साताऱ्याच्या पोकळ घिस्सा नाटकाला महोत्सवात मान्यता सातारा : पुण्याशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा यांनी नवनाट्य कलामंच संरथा, आजरा यांनी आयोजित केलेल्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव २०२६ (आजरा महोत्सव) येथे सादर केलेल्या जगदीश पवार लिखित आणि शरद लिमये दिग्दर्शित खानदानी या नाटकाने द्वितीय क्रमांक [...]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मर्यादीत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एफ, एम आणि जे व्हिसा श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या सर्वांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक करावे, असे अनेक नियम लागू केले. त्यामुळे परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली. आकडेवारीनुसार, अमेरिकन […]
Satara News : लोणंद शाळेत ‘बालबाजार’ उपक्रम ; ५० हजार रुपयांपर्यंत उलाढाल
लोणंदला मुलींच्या शाळेचा बालबाजार उत्साहात लोणंद : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद (मुली) येथे विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने बालबाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पालक, नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद [...]
केशेगाव व तेर जिल्हा परिषद गटातून अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी व संत गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने तेर व केशेगाव जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास, पारदर्शकता व लोकहित या मुद्द्यांवर ही निवडणुक आपण लढवणार असून, भाजपा महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त केला. आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दाखवलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गाला पूर्णत्व देण्यासाठी ही उमेदवारी निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभणार आहे. जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवून मतदारांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत ठाम व प्रभावी आवाज उठवला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी रेवणसिद्ध लामतुरे, लिंबराज टिकले, सुरेश देशमुख यांच्यासह तेर व केशेगाव गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठ उपपरीसर येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत कार्यक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह-2026 अंतर्गत यशस्वीरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुरक्षितते विषयी माहिती देण्यात आली. स्वयंपाक घर, रस्ते तसेच देशाची सुरक्षा याविषयी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यत्वे “रस्ता सुरक्षा” अंतर्गत वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. राहुल खोब्रागडे, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, अध्यक्ष डॉ. मनिषा असोरे विभागप्रमुख शिक्षण शास्त्र विभाग, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, कार्यक्रमा धिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. डॉ. मेघश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उद्देश त्यांनी स्पष्ट केला. रस्ता सुरक्षा नियम पाळल्यास अपघात टाळता येतील असे ते म्हणाले. तसेच इतर प्रकारच्या सुरक्षितेवरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी डॉ. राहुल खोब्रागडे यांनी रस्ता अपघाताची आकडेवारी मांडत त्याच्या परिणाम कुटुंबातील इतर घटकावर काय होतो हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण शास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.जितेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
काँग्रेसचे प्रकाश चव्हाण, अशोक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे प्रकाश चव्हाण व अशोक पाटील यांच्या या प्रवेशामुळे जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते सुनील चव्हाण, मल्हार दादा पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, संताजी काका चालूक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलियाबाद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्योतीताई चव्हाण, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा लक्ष्मण राठोड, सेवानिवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण यासह आजी - माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे आलियाबाद ग्रामपंचायतीवर आजवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रकाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या भागात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष प्रवेशावेळी बोलताना आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांनी भाजपाची विकासाची भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा उल्लेख करत नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एकत्र काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला निश्चितच बळ मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कळंबच्या भूमीपुत्राची सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी निवड
कळंब (प्रतिनिधी)- जिथे कष्ट, श्रम व मनोभावनेने जिद्द बाळगून परिश्रम केले जाते. त्यालाच त्याचे फळ मिळते ते म्हणजे कळंबचे भूमिपुत्र गोकुळ आशा विष्णुदास भराडिया (वय 32) यांनी आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. कोणताही शासकीय वारसा, राजकीय शिफारस किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेल्फ स्टडी,कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या भांडवलावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्यांदाच प्रयत्नात 26 वी रँक मिळवत घवघवीत यश मिळवत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (जी.एस.टी. विभाग),श्रेणी1 हे प्रतिष्ठेचे पद पटकावले आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोकुळ भराडिया यांचा प्रवास सोपा नव्हता. वडील कळंब येथे आडत दुकान चालवत होते. मात्र तोट्यात गेल्याने ते बंद पडले. तरीही परिस्थितीपुढे हार न मानता गोकुळ यांनी शिक्षणालाच आपले अस्त्र बनवले. अभ्यासासाठी कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत न घेता शहरातीलच सावित्रीबाई फुले विद्यालयात पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजश्री शाहू महाविद्यालयात अकरावी, बारावी शिक्षण घेतले. यानंतर पुणे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथून बी.टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन केली. नंतर त्यांनी 2020 साली एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 22 वी रँक मिळवून नायब तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली. नायब तहसीलदार म्हणून सोलापूर येथे सेवा बजावल्यानंतर कळंब तहसील कार्यालय (जि. धाराशिव) येथे कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतानाच, मर्यादित वेळेत त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीमध्ये यश संपादन करत सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली. प्रशासकीय सेवेत असूनही समाजाभिमूख कार्याची तळमळ त्यांच्या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते. गोकुळ भराडिया यांची यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
प्रियंका ताई गंगणे यांचा भव्य हळदी-कुंकू सोहळा; सर्वधर्मीय महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
तुळजापूर (प्रतिनिधी)- मकरसंक्रांतीचे औचित्य साधत शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी द स्कायलंड हॉटेल, नवीन बस स्थानक शेजारी महिलांच्या सन्मान व सबलीकरणासाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. प्रियंका ताई विजयसर गंगणे यांच्या वतीने करण्यात आले. प्रभाग क्रमांक 7 व 10 मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वधर्मीय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, यावेळी मुस्लिम महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती ही सामाजिक सलोख्याचे व महिला एकतेचे प्रतीक ठरली. या प्रसंगी नगरसेविका सौ. प्रियंका ताई गंगणे यांनी उपस्थित महिलांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांसाठी पालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उखाणे, संवाद आणि आपुलकीच्या गप्पांचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि स्नेहाचे वातावरण निर्माण झाले. जवाहर गल्ली, दीपक चौक, क्रांती गल्ली, गोपाळ नगर व लोहिया परिसरातील महिलांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना पांढरे, राजश्री शितोळे, आरती पांढरे, पल्लवी शिंदे, पूजा गंगणे, रोहिणी गंगणे, प्रतिक्षा गंगणे यांच्यासह सर्व महिला भगिनींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला भगिनींचे मनापासून आभार मानण्यात आले. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना सन्मान देत त्यांना सबल बनवण्याचा हा उपक्रम शहरात विशेष चर्चेचा विषय ठरत असून, महिलांमध्ये मोठ्या समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणार उमेदवारांची लगीनघाई !
मुहूर्त टळला तर हुकणार संधी ; जि. प आणि पंचायत समिती निवडणूक सावंतवाडी । प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार 21 जानेवारी आहे. या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची आणि अपक्षांची लगीनघाई होणार आहे. उमेदवारी अर्ज बुधवारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आह. तीन वाजण्याचा मुहूर्त टळला तर [...]
राजकारणावर मात करत ‘सोन्या किंग’ने जिंकली मने
भूम (प्रतिनिधी)- शहरातील पशुपालक वस्ताद अमोल वीर यांच्या ‘सोन्या किंग’ या रेड्याने महाराष्ट्र केसरी पशू पद पटकावून केवळ एक मानाचा किताब मिळवला नाही, तर माणुसकीचा विजयही शहरासमोर उभा केला आहे. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज व हजरत ख्वाजा शमशोदिन उरुसानिमित्त दरवर्षी भरणाऱ्या भव्य रेड्यांच्या प्रदर्शनात यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळाला. लातूर येथील अर्जुन या नामांकित रेड्याशी झालेल्या प्रदर्शनात सोन्या किंगने ताकद, डौल आणि दमदार कामगिरीच्या जोरावर बाजी मारली. या प्रदर्शनानंतर आयोजक व पशुपालकांच्या वतीने सोन्या किंगला ‘महाराष्ट्र केसरी पशू’ हा बहुमान देण्यात आला. या यशामुळे भूम शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून सोन्या किंग या रेड्याला प्रदर्शनात दमदार कामगिरी करण्यासाठी तयार केल्याने विविध भागात पशुप्रेमींकडून अमोल वीर यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीतील राजकीय कटुता या क्षणी बाजूला राहिली. प्रदर्शनाच्या ठिकाणी परस्पर विरोधी गटातील कार्यकर्तेही भूम शहराची शान असलेल्या सोन्या किंगचे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते. यात सोन्या किंग विजयी होताच शहरातील पशु प्रेमी भावुक झाले. व एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करताना दिसले. हे दृश्य शहरासाठी प्रेरणादायी ठरले. राजकारणापेक्षा माणुसकी मोठी असते, हे सोन्या किंगने बाजी मारल्याने भूम शहराला पाहण्यास मिळाले आहे. यावेळी अमोल वीर,मधुकर लोंढे,अमर जमादार, अक्षय गाढवे, अभी सावंत, सूरज स्वामी, उमेश वीर, राम वीर, अविनाश वीर, अतुल वीर, अवधूत गाढवे यांच्या सह पशु प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडोळी (आ.) गटातून ॲड. अजित गुंड यांची भाजपकडे जिल्हा परिषद उमेदवारीसाठी मागणी
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी 2026 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडोळी (आ.), ता. धाराशिव गटातून भारतीय जनता पक्षाकडे ॲड. अजित व्यंकटराव गुंड यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अधिकृत इच्छापत्र सादर केले आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजिसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितिन काळे, संताजी चालुक्य-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे राबवून पाडोळी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे ॲड. अजित गुंड यांनी स्पष्ट केले आहे. ॲड. अजित गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक असून शेती, सहकार, उद्योग, बँकिंग व शिक्षण या क्षेत्रांचा समन्वय साधत त्यांनी ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकासाचे कार्य उभे केले आहे. दूध प्रक्रिया, ऊस उत्पादन व अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकरी, दूध व ऊस उत्पादक तसेच लघुउद्योजकांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट व उद्योजकांना अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत असून समूहाच्या उपक्रमांमुळे धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत रोजगारनिर्मितीस चालना मिळाली आहे. तसेच पाडोळी, लासोना व धाराशिव येथे सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ॲड. अजित गुंड यांना भक्कम सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे चुलते सुधाकर गुंड गुरुजी हे जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष राहिले असून वडील ॲड. व्यंकटराव गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्य असून आजोबांपासून संपूर्ण कुटुंब जनसंघ-भाजप परिवाराशी निष्ठेने कार्यरत आहे.
परंडा येथे महाराणा प्रताप यांना अभिवादन
परंडा (प्रतिनिधी)- दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी शहरातील राजापुरा गल्ली व महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश उत्सव मैदान येथे श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला परंडा नगरपरिषदचे उपनगरअध्यक्ष समरजितसिंह ठाकूर व नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच महाराणा प्रतापसिंह चौकात प्रतिमेचे पूजन माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष समरजीत सिंह ठाकुर नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल ,उद्योजक धीरजसिंह ठाकूर, ॲड पृथ्वीराजसिंह सद्धीवाल, उद्योजक राहुलसिंह सद्धीवाल, हॉटेल मैत्री पार्कचे मालक पैलवान अतुल औसरे, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, व्यंकटेश दीक्षित,अमरसिंह ठाकूर, स्वरूपसिंह सद्धीवाल, अमितसिंह सद्धीवाल,अनुराग ठाकूर, सुरजसिंह ठाकूर, राज वळसंगकर ,ओमकार काशीद कुणाल जाधव,यश परदेशी, आयुषसिंह सद्धीवाल आकाश मदने, ओमकार तबेलदार, योगेश मस्के, आप्णा लोकरे ,आशिषसिंह ठाकूर, संतोष गवंडी,राणा सद्धीवाल,रोहन सुरवसे,आनंद मोहिते, मयुर लोखंडे, कार्तीक दीक्षित, बल्ली ठाकूर, सुभाष देशमाने, आर्यन देशमाने,विश्वजीत ठाकूर ,रुषीकेश आगरकर, हारीओम दीक्षित, ओम दीक्षित,आदिंची उपस्थिती होती.
Satara News : सातारा दहिवड बस स्टॉपजवळ दुचाकी अपघात, वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू
सातारा-पाठेघर रस्त्यावर भीषण दुचाकी अपघात सातारा : सातारा तालुक्यातील दहिवड बस स्टॉपनजीक सातारा-पाठेघर रस्त्यावर अत्पवयीन दुचाकी चालक युवतीमुळे झालेल्या भीषण अपघातात बयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी दुपारी १२ बाजण्याच्या सुमारास घडली आहे. तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरगहवाही (ता. जि. [...]
तुळजापूर येथे मानसशास्त्रीय कलचाचणी व समुपदेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत. या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे 16 जानेवारी 2026 रोजी मानसशास्त्रीय कलचाचणी व करिअर समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जागतिकस्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईलर ही मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतातील एकूण 52 प्रमुख करिअर क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या शेकडो जॉब रोल्सपैकी आपल्या आवडीनिवडी,क्षमता व कौशल्यांशी सुसंगत जॉब रोल निवडण्यास मदत होणार आहे.ही चाचणी जागतिक स्तरावर कार्यस्थळावरील मूल्ये (वर्किंग व्हॅल्यूज) ओळखण्यासाठी वापरली जाते.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू,कार्यमूल्ये तसेच त्यानुसार योग्य करिअर पथ निवडण्याबाबत स्पष्टता मिळाली. या मानसशास्त्रीय कलचाचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-ओळख निर्माण होऊन भविष्यातील करिअरविषयक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यास मदत झाली. श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 89 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक दत्तात्रय सुभाष कांबळे,मॉडेल करिअर सेंटर,लातूर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त संजय गुरव तसेच दत्ता चव्हाण (परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त,धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या उपक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके,शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, धाराशिव येथील बाबासाहेब शेटे व विद्या नाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शाळा, टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय,धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेग मर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच विविध रस्ता चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत धाराशिवसोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे, सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूर, वाहतूक पोलीस कर्मचारी, चे सावंत,तामलवाडी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते. सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभाग,महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व तामलवाडी टोल नाका प्रशासनाच्या वतीने अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करण्यात आली. यावेळी सुरतगाव,वडगावकाटी, सांगवीकाटी, मुक्तीनगर, गोंधळवाडी पाटी, कदमवाडी या ‘डेंजर झोन’ ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत टोल नाका प्रशासनाला निर्देश देण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगवी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून सभेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

24 C