Budget 2026 –महाराष्ट्राच्या हातात भोपळा, संजय राऊत यांची अर्थसंकल्पावर परखड शब्दात प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी लोकसभेत 53.47 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या हातात नेहमीप्रमाणे भोपळा पडलेला आहे. या भोपळ्याची भाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फार चवदार लागल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसले, अशी खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत […]
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करा
डॉ. उमाकुलकर्णीयांचेप्रतिपादन: 20 वेबेळगुंदीमराठीसाहित्यसंमेलनउत्साहात वार्ताहर/किणये अलीकडे वाचनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मोबाईलचा अतिरेक वाढला आहे. वाचकांना दर्जेदार साहित्य देण्यासाठी साहित्यिकांनी वाचन, लेखन समृद्ध केले पाहिजे. साहित्यामुळे जीवनाचा अर्थ कळतो. वाचकांची गरज ओळखून आपण वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून लेखन केले पाहिजे. सध्याच्या काळात टिकून राहायचे असेल तर लेखकांनी गुणवत्ता वाढविली पाहिजे. समाजात परिवर्तन हे वाचन आणि [...]
लोककल्पतर्फे गोल्याळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे अरिहंत हॉस्पिटलच्या साहाय्याने खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजिण्यात आले. सुमारे 50 हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. दर्जेदार आरोग्य सुविधांची पूर्तता करून निदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अरिहंत हॉस्पिटलच्या तेजस्विनी पी., डॉ. चिन्मय दीक्षित आणि परिचारिका लक्ष्मी पाटील [...]
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा शहरात सुरळीत
बेळगाव : केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणारी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी बेळगाव शहरातील केंद्रांवर पार पडली. सरकारीसह अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील आठवीचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची धावपळ दिसून आली. गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा होते. रविवार दि. 1 रोजी सकाळी [...]
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ येथे अमेरिका आणि इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी नेत्यांची एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. इराणसोबतचा संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच या दोन मित्रराष्ट्रांनी लष्करी रणनीतीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीत अमेरिकेचे ‘चेअरमन ऑफ द जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’ जनरल डॅन केन आणि इस्रायलच्या सशस्त्र दलाचे […]
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी गेल्या 4 महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता, असा दावा केला होता. हा दावा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, […]
बारामती येथे 28 जानेवारी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असून अजित पवार यांच्या पक्षाचे नेतेच या अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढले आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 15 जानेवारीला […]
Budget 2026 ‘अन्यायकारक’अर्थसंकल्प! म्हणत हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी केले लक्ष्य
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या अर्थसंकल्पाने पहाडी राज्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, नैसर्गिक आपत्तीने होरपळलेल्या हिमाचल प्रदेशला कोणतीही विशेष मदत दिली नाही’, अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला ‘अन्यायकारक’ आणि ‘उपेक्षेचे चक्रव्यूह’ असे संबोधले. हा अर्थसंकल्प गरीब आणि […]
तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे ‘विकसित भारताचे’ सर्वात मोठे इंजिन असल्याचे वर्णन निर्मला सीतारामन यांनी केले. भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही तर त्याचे नेतृत्व करेल असे त्या म्हणाल्या.हिंदुस्थानातील ऑनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेट क्रिएटर प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली. यासाठी […]
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत या लोकांना अडचणींचा सामना करावाच लागेल; आपण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू, तेव्हाच ते राज्य सोडून जातील’, असे विधान सरमा यांनी केले आहे. एका शासकीय कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले […]
देशात महिला मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तेची चावी महिलांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी काही घोषणा केल्या आहेत. ‘शी–मार्ट’ निर्मला सीतारामन यांनी ‘शी-मार्ट’ या संकल्पनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून स्वयंसहायता गट, ग्रामीण महिला उद्योजक आणि स्टार्टअपशी संबंधित महिलांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. ही […]
आकड्यांची भेळ आणि सामान्यांच्या स्वप्नांचा खेळ, जयंत पाटील यांची अर्थसंकल्पावर टीका
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘आकड्यांची भेळ आणि सामान्यांच्या स्वप्नांचा खेळ’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ‘युवाशक्ती-ड्रिव्हन’ असे सरकारने या अर्थसंकल्पाला म्हटले असले तरी हा अर्थसंकल्प म्हणजे आभासी स्वप्नांचा डोलारा आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रीय आयुष मिशनच्या निधीत कपात आणि आयुष्मान भारत योजनेतील तरतूद न वाढवणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी क्रूर थट्टा […]
जहाज दुरुस्ती परिसंस्था वाराणसी आणि पाटणा येथे
जहाजांची देखभाल, दुरूस्ती, सुटे भाग पुरवठा, तांत्रिक सेवा देण्यासाठी आवश्यक असणारी बंदरे, गोदी, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान यांची एकत्रित व्यवस्था म्हणजे शिप रिपेअर इकोसिस्टीम (जहाज दुरूस्ती परिसंस्था) ही संस्था समुद्र किनाऱ्यालगतच्या मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात उभारता येते. मात्र, आता ही संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघ असलेल्या वाराणसी तसेच पाटणामध्ये उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वीज, सिमेंटसह पाच क्षेत्रांसाठी […]
…म्हणून वाढवला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले कारण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका घोषणेमुळे शेअर बाजारात भूकंप आला. सेन्सेक्स आणि निफ्टी धाडकन कोसळले. शेअर बाजारात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. मात्र हा निर्णय शेअर बाजारातील सट्टेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारामन यांनी […]
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रदूषण पसरवणाऱ्या ३४ बांधकाम प्रकल्पांवर पनवेल महापालिकेने बडगा उगारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेला जाग आली असून प्रशासनाने या प्रकल्पांचे काम तत्काळ थांबवले आहे. यापूर्वी महापालिकेने १६९ बांधकाम प्रकल्पांना उपाययोजना करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्यातील ३४ प्रकल्पांची तपासणी केली असता तेथे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे उघड झाले. […]
पर्यटकांचा सतत ओघ असलेल्या निसर्गरम्य दिवेआगरमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची घटना घडली आहे. मद्यपी कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार व त्याची पत्नी रस्त्यावर अक्षरशः फेकले गेले. जखमी अवस्थेतील दुचाकीस्वाराला कारचालकाने तब्बल दीड किमी फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महम्मद अर्जबेगी (५४) असे त्यांचे नाव असून पत्नी सिमीन या […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित ‘केनेडी सेंटर’ (Kennedy Center) कला केंद्र दोन वर्षांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. येत्या जुलै महिन्यापासून या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होणार असून, या निर्णयामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताना सांगितले की, हे केंद्र सध्या जीर्ण अवस्थेत असून […]
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी भरण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये तुफान राडा झाला. महिला रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाच्या डोक्यात लादी घातली. या हल्ल्यात रिक्षाचालक लहू टकळगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी महिला रिक्षाचालक रेखा हिच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वर्तकनगर परिसरात राहणारे लहू टकळगे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावदेवी मैदानाजवळील प्रणव को-ऑपरेटिव्ह हौसिंग […]
वर्षभरात तब्बल ११ हजार भिवंडीकरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून लहान मुले तर घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. दरम्यान भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याने चिमुकल्या हमीद खानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, […]
रायगड जिल्ह्यात महायुतीत बिघाडी; भाजप, शिंदे, अजित पवार गटाच्या उमेदवारांचा एकमेकांसमोर शड्डू
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ५९ गटांमध्ये १७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. दरम्यान महायुतीत अनेक तालुक्यांत बिघाडी झाली असून भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असूनही या तिन्ही पक्षांचे नेते निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना […]
दिवावासीयांचा जीवघेणा प्रवास; गर्दीमुळे उलट्या दिशेने घुसखोरी, रुळावर उतरून डब्यांमध्ये लटकंती
दिवा रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी रेल्वे लाइनमध्ये उतरून उलट्या दिशेने डब्यात चढत आहेत. आज मेगाब्लॉक आणि साप्ताहिक सुट्टीमुळे लोकल पकडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे मार्गात उतरले होते. लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून होत असलेल्या या जीवघेण्या कसरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षीच मुंब्रा ते दिवा रेल्वे […]
आंध्र प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि मंत्री नारा लोकेश यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर संतप्त टीडीपी कार्यकर्त्यांनी वायएसआरसीपी नेते आणि माजी मंत्री जोगी रमेश यांच्या इब्राहिमपटनम येथील निवासस्थानावर हल्ला केला. संतप्त आंदोलकांनी जोगी रमेश यांच्या घराचा घेराव केला आणि घराच्या काही भागाला आग लावली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण […]
पंजाबचा डाव 256 धावांवर संपला तेव्हा कर्नाटकचा संघ साखळीतच बाद होणार असे भाव कर्नाटक संघाच्या खेळाडूंच्या चेहर्यावर उमटले होते.. सामना अनिर्णित राहिल्यास कर्नाटकचा संघ साखळीतच बाद होणार होता आणि सौराष्ट्रला बाद फेरीत स्थान मिळणार होते. त्यातच कर्नाटकसमोर अवघ्या 30 षटकांत 250 धावांचे अवघड आव्हान होते, पण पडिक्कल कर्नाटकसाठी देवासारखे धावून आला आणि त्याने रणजी सामन्याला […]
T20 WC 2026 –पाकिस्तानवर बंदीची टांगती तलवार
हिंदुस्थानविरुद्ध सामना न खेळण्याचा पाकिस्तानचा हट्ट त्यांना चांगलाच महागात पडू शकतो. पीसीबीने इतर क्रिकेट मंडळांप्रमाणेच आयसीसीसोबत सदस्य सहभाग करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि हा करार कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक आहे. त्यामुळे स्पर्धा किंवा एखाद्या सामन्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे थेट आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन ठरते. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. केवळ पीसीबीवर कठोर निर्बंधच नव्हे, तर प्रसारण कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी […]
…तरीही हिंदुस्थानी संघ श्रीलंकेला जाणार
हिंदुस्थानविरुद्ध सामना न खेळण्याची पाकिस्तानची घोषणा झाली असली, तरी हिंदुस्थानी संघ आपला नियोजित कार्यक्रम आणि आयसीसीच्या नियमांनुसार सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करत श्रीलंकेत दाखल होणार आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या भूमिकेचा हिंदुस्थानी संघाच्या कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही. संघ नियोजित तारखेला श्रीलंकेत पोहोचेल, नियमित सराव सत्रे पार पाडेल, सामन्यापूर्वीची अनिवार्य पत्रकार परिषद घेईल आणि […]
Under 19 WC –हिंदुस्थान उपांत्य फेरीत, युवा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा उडवला धुव्वा
येत्या 15 फेब्रुवारीला हिंदुस्थानविरुद्ध होणाऱया लढतीवर पाकिस्तानी सरकारने बहिष्कार घातला असला तरी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानने त्यांच्या पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. दबावाच्या क्षणी पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाने हिंदुस्थानसमोर गुडघे टेकले आणि ‘जिंका किंवा मरा’च्या लढतीत हिंदुस्थानने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. पाकिस्तानसमोर 253 धावांचे आव्हान होते आणि ते […]
दिंडोशीकरांना धो-धो पाणी मिळणार, नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ
दिंडोशी विधानसभेतील महानगरपालिका वसाहत संतोष नगर, श्रीपृष्ण नगर, नागरी निवारा तसेच म्हाडा वसाहतीमधील रहिवासी अपुऱया व कमी दाबाने होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे त्रस्त झाले होते. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी 3 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे येथील हजारो पुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिंडोशी वसाहतीतील परिसर हा जास्त उंचीवर असल्याने गेल्या […]
देविकाने जिंकला पहिला सुपर किताब
हिंदुस्थानी बॅडमिंटनला आता नवा सुपरस्टार मिळालाय. हरियाणाची 20 वर्षीय युवा खेळाडू देविका सिहाग हिने थायलंड मास्टर्समध्ये धडाकेबाज कामगिरी करत महिला एकेरीचा किताब जिंकला. तिचा कारकीर्दीतील हा पहिला बीडब्ल्यूएफ सुपर 300 किताब होय, हे विशेष. तब्बल 2.5 लाख डॉलर बक्षिसाच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात देविकाने मलेशियाच्या गोह जिन वेईला दबावाखाली आणले. देविका 21-8, 6-3 अशी भक्कम […]
ऑस्ट्रेलियन ओपनच्या रात्रीने टेनिसइतिहासात पुन्हा एक हळवी रेघ ओढली. मेलबर्नच्या निळ्या कोर्टवर रविवारी अनुभवाचा किल्ला पुन्हा डगमगला आणि तरुणाईचा झेंडा पुन्हा ताठ मानेने उभा राहिला. पण या विजयाइतकाच, किंबहुना त्याहून अधिक, ही रात्र लक्षात राहील ती नोव्हाक जोकोविचच्या रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम स्वप्नाच्या पुन्हा एकदा अपूर्णतेमुळे. स्पेनच्या 22 वर्षीय कार्लोस अल्काराजने ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीतील चौथेही म्हणजेच ऑस्ट्रेलियन […]
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचारात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. फुटीरतावादी गटांनी केलेल्या समन्वित हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल १४५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या ४० तासांच्या संघर्षात सुरक्षा दलाचे १७ जवान आणि ३१ सामान्य नागरिकांसह एकूण ५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गट […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे आरोग्य – थकवा जाणवणार आहे आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी […]
महिला टी-20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड पात्र
धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या महिला संघाने थायलंडला 62 धावांनी नमवत महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवली. अर्लीन केली आणि लारा मॅकब्राइड यांच्या माऱयापुढे थायलंडचा निभावच लागला नाही. या विजयासह आयर्लंडने बांगलादेश आणि नेदरलँड्सच्या पंक्तीत स्थान मिळवले असून इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱया महास्पर्धेत प्रवेश निश्चित केला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने आठ विकेट गमावत 121 धावा […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. त्यांनी सलग नववा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला. याचा महाराष्ट्राला मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे, शहर आर्थिक क्षेत्र, 1 लाख कोटी शहरी आव्हान निधी, एमएसएमई प्रोत्साहन, गिग वर्कर्स सुरक्षा अशा प्रकारे लाभ मिळेल. गोव्याला आणि त्यामुळे शेजारी कोकणाला [...]
अल्कारेझ बनला ऑस्ट्रेलिया ओपनचा नवा चॅम्पियन
जेतेपदासह मिळविले करीअर ग्रँडस्लॅम व सातवे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद, जोकोविचचा पुन्हा स्वप्नभंग वृत्तसंस्था/ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया स्पेनचा अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून करिअर ग्रँडस्लॅम साधताना येथे झालेल्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचचा पराभव केला. या स्पर्धेचा नवा चॅम्पियन बनलेला 22 वर्षीय अल्कारेझ हा करीअर ग्रँडस्लॅम साधणारा सर्वात तरुण टेनिसपटू बनला आहे. जोकोविचने याआधी 10 वेळा [...]
नवी दिल्ली वास्तवाचे भान ठेवणारा पण सुधारणांना वाट देणारा आणि दीर्घकालीन प्रगतीचा पथ मोकळा करणार 2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्रंाr निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास आणि उपयोगाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच महिला, ,शेतकरी, गरीब आणि युवावर्ग यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 2047 पर्यंत भारताला एक [...]
कर्नाटकसाठी दोन हायस्पीड कॉरिडॉर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा : नारळ, चंदन, कॉफी उत्पादकांनाही होणार फायदा प्रतिनिधी/ बेंगळूर रविवारी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्नाटकच्या जनतेला मोठ्या आशा होत्या. भद्रा अप्पर योजनेसाठी निधी, वेगाने वाढणाऱ्या बेंगळूरच्या पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रकल्प यासह अनेक योजनांची खैरात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कर्नाटकासाठी केवळ 2 हायस्पीड [...]
एसटीटी करवाढीने शेअर बाजारात हाहाकार
सेन्सेक्स 1546, निफ्टी 495 अंकांनी घसरला वृत्तसंस्था/मुंबई भारतीय शेअर बाजारासाठी रविवारचे अर्थसंकल्पादिवशीचे सत्र मोठी पडझड घेऊन आला. शेअरबाजारातील फ्युचर अँड ऑप्शन व्यवहारावर एसटीटी करात वाढ करण्याच्या प्रस्तावाचा उल्लेख केल्याच्या निराशेतून बाजाराने मोठी घसरण नेंदवली. सेन्सेक्स तब्बल 1546 अंकांनी धडाम झाला तर सोबत राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही 495 अंकांनी कोसळला. दरम्यान व्यापारी, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपये [...]
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह स्थापन होणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लक्षवेधी घोषणा केल्या आहेत. अर्थसकंल्पात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. सरकारने महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता देत अनेक नव्या योजनांची घोषणा केली आहे. या घोषणांचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वरुपात मजबूत करणे अन् त्यांना सुरक्षित वातावरण देणे [...]
भारताच्या प्रगतीला ऊर्जा देणार ‘न्युक्लिर प्लँट प्रोग्राम’
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्राला मोठी चालना दिली आहे. सरकारने न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट्ससाठी आयात होणाऱ्या सामग्रीवरील बेसिक कस्टम ड्यूटी सूट आता 2035 पर्यंत वाढविली आहे. तसेच ही सूट सर्व अणुऊर्जा प्रकल्पांवर लागू होणार आहे, भले मग त्यांची क्षमता कितीही असो. पूर्वी ही सूट काही खास आण्विक प्रकल्पांकरता (मोठे रिअॅक्टर असलेले) मर्यादित होती. [...]
एमएसएमई क्षेत्राद्वारे ‘ऑरेंज इकॉनॉमी’ला चालना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती, एमएसएमई आणि औद्योगिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट रोजगार वाढवणे आणि लघु-मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रोत्साहन देणे तसेच देशातील औद्योगिक क्षेत्रांना पुनरुज्जीवित करणे आहे. ‘ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजेच गेमिंग, कॉमिक्स, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स (एव्हीजीसी) क्षेत्रात 2030 पर्यंत 20 लाख व्यावसायिकांची आवश्यकता [...]
क्रीडा क्षेत्राच्या सामग्रीसाठी ‘समर्थ पुढाकार’
खेलो इंडिया मिशन’समवेत क्रीडाक्षेत्राला मोठा बूस्ट केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मजबुती देण्याच्या दिशेने महत्त्वाच्या पुढाकाराची घोषणा केली आहे. क्रीडासाहित्याची निर्मिती आणि गुणवत्ता सुधारासाठी ‘समर्थ पहल’ नावाच्या नव्या पुढाकाराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या पावलाला भारतातील क्रीडा उद्योग आणि क्रीडासाहित्य निर्मिती क्षेत्रासाठी मोठे प्रोत्साहन मानण्यात येत आहे. अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा करत हे [...]
भारताच्या 17 वर्षांखालील मुली बांगलादेशविऊद्ध कठोर परीक्षेसाठी सज्ज
वृत्तसंस्था/ पोखरा पोखरा रंगासाला स्टेडियमवर आज सोमवारी पामेला कॉन्टीच्या 17 वर्षांखालील संघाचा सॅफ 19 वर्षांखालील महिला अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेशच्या मजबूत संघाशी होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषकाच्या तयारीचा भाग म्हणून भारताने 17 वर्षांखालील संघाला मैदानात उतरवले आहे. भारताने यजमान नेपाळवर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून आपल्या [...]
अर्थसंकल्पाचा राज्याला कोणताही फायदा नाही
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची टीका : बेंगळूरसाठी होत्या अपेक्षा प्रतिनिधी/ बेंगळूर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा राज्याला कोणताही फायदा नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सांगितले. अद्याप अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती घेतलेली नाही. आपल्या राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पाचा कोणताही फायदा नाही. मी ते पाहत होतो. महात्मा गांधीजींच्या नावावर असलेला मनरेगा [...]
‘सुखोई बिझनेस जेट 100’ भारत करणार निर्मिती
हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि रशियाच्या युनायटेड एअरक्रॉफ्टमध्ये होणार करार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत आणि रशिया संयुक्त विद्यमाने सुखाई बिझनेस सुपरजेट 100 अर्थात ‘एसबीजे 100’ ही प्रवासी वाहतूक विमाने तयार करणार आहे. या विमानांची निर्मिती भारतातच होणार आहे. भारताच्या सर्वात मोठ्या सिव्हिल एव्हिशन शो 2026 मध्ये याबाबत करार दृष्टीक्षेपामध्ये आला आहे. याकरता भारताची आघाडीची विमान निर्मिती कंपनी [...]
जानेवारीतील जीएसटी 1.93 लाख कोटी
वार्षिक आधारावर 6 टक्के महत्त्वपूर्ण वृद्धीची नोंद :डिसेंबरचे कलेक्शन 1.75 लाख कोटी होते. वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंदाजपत्रक सादर करताना जीएसटीचे जानेवारी महिन्यातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जानेवारीमधील जीएसटी कलेक्शन 1.93 लाख कोटी झाले आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीतील कलेक्शनपेक्षा हा आकडा 6.2 टक्क्यांनी वाढल आहे. तर गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये 1.75 लाख कोटी [...]
पाक आर्मीच्या हल्ल्यात 145 बलुच दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ क्वेट्टा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 145 बलूच दहशतवाद्यांना मारले आहे, अशी माहिती बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेटा येथे दिली. चाळीस तासाहून अधिक काळ पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ही मोहिम चालवली होती. तत्पूर्वी बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात 84 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. तर अनेक शासकीय कार्यालये, वाहनांचे जाळपोळीत नुकसान झाले होते. त्यानंतर [...]
राज्य सरकारच्या टीकेला अर्थसंकल्पातून उत्तर
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे स्पष्टीकरण प्रतिनिधी/ बेंगळूर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पातून राज्य काँग्रेस सरकारने केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आले आहे, असे केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. रविवारी अर्थसंकल्पावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कर वाट्यामध्ये अन्याय होत असल्याची तक्रार राज्य सरकारने [...]
लवकरच जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करू!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा : सर्व विषयांवरील चर्चेनंतर निर्णय प्रतिनिधी/ बेंगळूर आणखी एका महिन्यात जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. जास्तीत जास्त दोन महिन्यांत आम्ही जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करू. यापूर्वीच सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. अहवाल सादर करताच आम्ही ते स्वीकारून प्रसिद्ध करू. अहवालातील सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय [...]
विंडीजची द.आफ्रिकेवर 6 धावांनी मात
सामनावीर मोतीचे 3 बळी, डी कॉक मालिकावीर, द.आफ्रिकेचा मालिकाविजय वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग, द.आफ्रिका पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 6 धावांनी पराभव केला. 17 धावांत 3 बळी मिळविणाऱ्या विंडीजच्या गुडाकेश मोतीला सामनावीर तर मालिकेत 143 धावा करणाऱ्या क्विन्टन डी कॉकला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. ही मालिका द.आफ्रिकेने [...]
मटणाऐवजी दिले बीफ, कोलकात्तामधील घटना
वृत्तसंस्था/ कोलकात्ता कोलकात्तामधील प्रसिद्ध पार्क स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला मटणाऐवजी बीफ वाढण्यात आल्याने मोठा गदारोळ उडाला. याप्रकरणी वेटरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची धार्मिक ओळख पुढे आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. ओलीपब रेस्टारंटमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सायक चक्रवर्ती हा मित्रांसह येथे जेवणास गेला होता. त्यांनी मटन [...]
केवळ तीन कर्तव्यांचा अर्थसंकल्प : कृषी क्षेत्राला धत्तुरा
जगाच्या तिसऱ्या शक्तीच्या अर्थव्यवस्थेला काय आवश्यक आहे हे पाहणे उचित आहे. त्या दृष्टीने युवा शक्तीला प्राधान्य देण्याचे धोरण अर्थसंकल्पनामध्ये आहे. युवा शक्ती बजेट असा उल्लेख केलेला आहे. पण वास्तवामध्ये हे कसे साध्य होईल हे येणारा काळ ठरवेलच कारण त्या दृष्टीने अर्थव्यवस्था कशी मार्गदर्शन करेल हे पाहणे उचित ठरेल. शाश्वत आर्थिक वृद्धिसाठी उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे [...]
बलुचिस्तान हिंसाचाराबाबतचे पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामागे भारताचे षडयंत्र असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. पाकिस्तानने स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आरोप करु नयेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. बलूच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील 14 शहरांमध्ये केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026
मेष: कोर्टकचेरीत सरशी होईल, धनलाभाची दाट शक्यता वृषभ: अध्यात्मिक व्यक्तीच्या आशीर्वादामुळे मन:शांती लाभेल मिथुन: आर्थिक व्यवहार व वायदे काळजीपूर्वक हाताळा कर्क: महत्वाच्या योजना मार्गी लागल्याने फायदा होईल सिंह: घरातील सदस्यांना दिलेले पैसे परत मिळण्याची हमी कमी कन्या: घरातील आदरणीय व्यक्तीकडून समज दिली जाईल तुळ: नोकरीत लाभ होण्याची शक्यता, वादापासून दूर राहा वृश्चिक: अहंकार बाजूला ठेवून [...]
अळणी, पुळपुळीत आणि पचकवणी! बाजार कोसळला, सोने-चांदी घसरली! निर्मलाताईंनी फेकले आकडे, संकल्पाचे वाकडे
ना करांमध्ये कपात… ना सोने-चांदीच्या महागाईवर उतारा… ना बेरोजगारीवर ठोस उपाय… ना अमेरिकेच्या टॅरिफ नीतीला उत्तर, असा कुठलाही सुखद धक्का किंवा कठोर उपाययोजना नसलेला 2026-27 या वर्षाचा अळणी, पुळपुळीत आणि पचकवणी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. सुमारे दीड तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मलाताईंनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी लाखो कोटींच्या तरतुदीचे आकडे फेकले खरे, पण त्यांचे […]
परळमधून 3 वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, शिवसैनिक-मनसैनिकांनी दिला आरोपीला चोप
परळच्या गजबजलेल्या भागातून तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी हा प्रकार घडला. शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या सतर्पतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला. आरोपीला पकडून जमावाने चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. परळमधील डॉ. बाटलीवाला रोडवरील हरी बिल्डिंग येथून या तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. ही व्यक्ती अनोळखी असल्याने व हालचाली संशयास्पद […]
मुंबई, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, एकूण बजेटच्या पाव टक्केही तरतूद नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या तब्बल 53.47 लाख कोटींच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटय़ाला केवळ 12 हजार 355 कोटी रुपये आले आहेत. ही रक्कम एकूण बजेटच्या पाव टक्केही नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला कर रूपाने सर्वाधिक पैसा जात असतो. त्या बदल्यात महाराष्ट्राला पुरेसा वाटा मिळावा […]
पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष! भाजपने पुडी सोडली आणि पलटी मारली
अजित पवार यांच्या निधनानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पेंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयुष गोयल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याने अजितदादांच्या पक्षात खबळबळ उडाली. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आधी प्रफुल्ल पटेल आणि […]
मुंबईतील क्रीडांगणे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. मरिन ड्राईव्हच्या विल्सन जिमखान्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच ती जागा महसूल अधिकाऱयांनी जैन संस्थेला दिली आहे. त्याविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून विल्सन जिमखान्याची जागा परत मिळवण्यासाठी उद्या ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात विराट मोर्चा काढला जाणार आहे. विल्सन जिमखान्याच्या मैदानावर विल्सन महाविद्यालयातील […]
अजितदादा भाजपला सांगितल्याशिवाय एकत्रीकरणाची चर्चा करतील का? फडणवीसांचा सवाल
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आज प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, असा सवाल त्यांनी केला. दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली होती आणि तासभर आमच्या गप्पा झाल्या, पण या विषयावर काहीच बोलणे झाले नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपशी चर्चा करावी लागेल, अशी अजब […]
विमानातील सहावी व्यक्ती कुठे गेली?अजित पवार गटाच्या आमदाराने घेतला संशय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला की तो घातपात होता असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. त्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावा कुठे गेला, असा सवाल अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. अजितदादांच्या विमान […]
सामना अग्रलेख – लई वंगाळ राजकारण!
अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता […]
दिल्ली डायरी –‘संडे बजेट’ने काय साधले?
>> नीलेश कुलकर्णी तब्बल सव्वीस वर्षांनंतर म्हणजे 28 फेब्रुवारी 1999 नंतर पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला. त्याचबरोबर सलग नऊ वेळा देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱया त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मोरारजी देसाईंचा दहा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही त्या यथावकाश मोडीत काढतील. ते सर्व ठीक, पण या विक्रमामुळे व […]
चायनीज मांजा पक्ष्यांच्या जिवावर; मालाड, दहिसरमध्ये 500 पक्ष्यांचे पंख कापले
चायनीज मांजावर बंदी असतानाही मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चायनीज मांजा वापरला गेला. काचेचा लेप आणि धारदार मांजामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात पक्षी जखमी झाले असून हा मांजा शेकडो पक्ष्यांच्या जिवावर बेतला आहे. मालाड, दहिसर भागात 500 पक्षी या मांजामुळे जखमी झाले असून या मांजावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे. मकरसंक्रांतीच्या […]
वसईत पिण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा
शहरातील नौपाडा परिसरात असलेल्या बारपुल्या नावाच्या चाळीत पिण्याच्या टाकीमध्ये मानवी हाडांचा सापळा आढळून आला आहे. हे अवशेष सापडल्याने वसईत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी हा सापळा ताब्यात घेतला आहे. मानवी कवटी तसेच हातांच्या हाडांचा सांगाडा त्यात असून ही हत्या आहे की अपघात याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. नौपाडय़ातील चाळ सुमारे 30 वर्षे जुनी असून […]
घाटकोपर-भांडुपची वाहतूककोंडी सुटेना, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा
मानखुर्द येथील सिग्नलचा अडसर दूर झाल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर सुसाट येणारी वाहने, नव्याने खुला झालेला विक्रोळी उड्डाणपूल आणि त्या जोडीला ईस्टर्न फ्री वे ते ठाणे साकेत येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे विक्रोळी ते भांडुपदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस […]
कोस्टल रोडवरील स्पीडला आता ब्रेक लागणार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होणार
कोस्टल रोडवर भरधाव गाडी चालवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत कोस्टल रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट 140 चा स्पीड गाठल्याचेही कारवाईतून समोर आले. या पार्श्वभूमीवर स्पीड नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. […]
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षी समितीने खंड क्रमांक 1 मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेली लाभांची योजना तत्काळ लागू करण्यात यावी, सेवेत असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यांना वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदल देण्यात यावा तसेच अशा कर्मचाऱ्यांना पवित्र प्रणालीमधून वगळण्यात यावे यासह विविध मागण्यांचे ठराव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील अनुदानित माध्यमिक व […]
घरात सुगंध दरवळावा म्हणून…हे करून पहा
घरात सुगंध दरवळावा यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. घरात ताजी सुगंधी फुलं आणून ठेवल्यास घरात फुलांचा मंद सुगंध दरवळत राहातो. सेंटेड ऑइल, अर्धा कप व्हिनेगर आणि दोन कप पाणी घेऊन घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार करता येते. स्वयंपाकघरातला वास घालवण्यासठी कापूर वापरावा. लिंबू, संत्री, मोसंबी या सालांचा उपयोग रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी करता येतो. […]
शिक्षकाने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे; तो पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाने संपूर्ण वर्ग सजवला आहे. फुलांचा वर्षाव करून प्रत्येक विद्यार्थ्याला पेन भेट म्हणून दिला. त्यानंतर त्यांना टिक्का लावून खाणेसुद्धा दिले. त्यानंतर काही मोजक्या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्लेसुद्धा दिले. विद्यार्थी शिक्षकाचे प्रेम पाहून ढसाढसा रडताना दिसत आहेत. विद्यार्थी […]
असं झालं तर…नवीन अॅपद्वारे आधार कार्ड अपडेट करा
1 यूआयडीएआयने आधार कार्डचे नवीन अॅप आणले आहे. त्याद्वारे घरबसल्या आधार कार्ड अपडेट करता येते. मोबाईल नंबर, पत्ता असे बदल करता येतील. 2 नवीन आधार अॅपचा उद्देश डिजिटल ओळख मजबूत करणे आहे. हॉटेल चेक-इन, सिम कार्ड खरेदीसारख्या उद्देशांसाठी आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी लागणार नाही. 3 अॅपद्वारे फक्त नाव किंवा वय यांसारखी आवश्यक माहिती शेअर केली […]
…तर प्रादेशिक युद्ध सुरू होईल, अयातुल्ला अली खोमेनी यांचा ट्रम्प यांना इशारा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “जर अमेरिकेने इराणवर कोणताही लष्करी हल्ला केला, तर त्याचे रूपांतर मध्य पूर्व आशियातील प्रादेशिक युद्धात होईल,” असे खोमेनी यांनी रविवारी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर खोमेनी यांनी हे विधान केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील […]
टी20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघ कसून सराव करत आहेत. अशातच पाकिस्तान सराकराने घोषणा केली आहे की, 15 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानविरुद्ध होणारा सामना पाकिस्तान खेळणार नाही. पाकिस्तान स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. मात्र, हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. आयसीसीने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पाकिस्तान सरकारने ट्वीट करत […]
रत्नागिरी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक, शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीने उमेदवारांना बळ
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडीची साथ लाभली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायतीवर भगवा फडकणारा हे निश्चित झाले आहे. रत्नागिरी जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केल्यामुळे उमेदवारांना एक ताकद मिळाली आहे. वंचित […]
T20 World Cup 2026 –अखेर शेवटच्या संघाने आपली जागा पक्की केली, आता 12 देशांमध्ये द्वंद्वं रंगणार
ICC T20 World Cup 2026 चे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. 7 फेब्रुवारीपासून वर्ल्डकप विजेतेपदासाठी संघ आपआपासत भिडणार आहेत. एकीकडे पुरुषांच्या वर्ल्डकपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे महिलांच्या टी-20 वर्ल्डकपची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप पात्रता फेरीत स्कॉटलँडने अमेरिकेला धुळ चारत दुसऱ्यांदा वर्ल्डकपचं तिकीट मिळवलं आहे. सुपर सिक्सच्या पात्रता […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी लोकसभेत २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प आर्थिक रणनीती आणि नेतृत्व या दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पी. चिदंबरम म्हणाले की, […]
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानाच्या लँडिंगदरम्यान अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. यातच आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना, कागदपत्रे जळली कशी नाही?” असे […]
Sangli News : सांगलीत सुरश्री संगीत महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ
मधुरा दातार यांच्या ‘स्वरमधुरा’ मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध सांगली : सांगलीच्या सांस्कृतिक विश्वाची श्रीमंती वाढवणाऱ्या दोन दिवसीय सुरश्री संगीत महोत्सवाचा शनिवार ३१ जानेवारी रोजी कल्पद्रुम क्रीडांगणावर दिमाखात प्रारंभ झाला. दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून [...]
Sangli Crime : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक
वर्षभर महिलेवर फसवणूक करणाऱ्या संशयितावर पोलीस कारवाई सांगली : लग्राचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंधठेवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित विशाल ब-साप्पा आठवले (रा. दत्त मंदिर समोर, दत्त कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल [...]
Sangli Crime : संजयनगर मधून वृद्धेला हिसड्याने सोन्याचे चोरले दागिने !
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याची चोरी सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माधवनगर येथून एक वृध्दा घरी जात होती. तिच्याजवळ एकजण येवून त्यांने सोन्याचे दागिने काढुन आत ठेवा असे सांगितले. ती वृध्दा दागिने काढत असतानाच हिसडा [...]
कुंभार आणि प्रणिता चव्हाण यांच्या प्रचारात सभा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे जि. प. गटाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. जयवंत कुंभार आणि मंगरूळ पं. स. गणाच्या उमेदवार सौ. प्रणिता प्रणव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार सभा संपन्न झाली. प्रचारसभेच्या सुरुवातीलाच कै.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या सभेला मंगरूळ व परिसरातील नागरिकांनी दिलेला प्रचंड, उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण प्रतिसाद महायुतीच्या विकासनिष्ठ धोरणांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दर्शवणारा ठरला. गावागावांतून मिळणारा जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद पाहता या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दणदणीत विजय मिळवतील, असा ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण विश्वास आहे. महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन उभे करण्याचा निर्धार आहे. यासाठी आपली खंबीर साथ आवश्यक आहे. यावेळी श्री. अजित पिंगळे, श्री. सतीश दंडनाईक, श्री. सुनील काकडे, श्री. अरुण चौधरी, श्री. भागचंद बागरेचा, श्री. आर.के. भाऊ कोल्हे, श्री. प्रणव चव्हाण, श्री. संजय अडसूळ, श्री. गणेश भोसले यांच्यासह मंगरूळ व परिसरातील असंख्य प्रमुख कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचा झंझावात, आता मोहाचा होणार कायापालट
धाराशिव (प्रतिनिधी)- मोहा जिल्हा परिषद गटात महायुतीच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी भव्य प्रचार सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच राज्याचे लाडके नेते, कै. अजितदादा पवार (आजोबा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सौ. सिमाताई राजू झोरी (जि.प. उमेदवार) सौ. रत्नमाला कल्याण दिघे (पं.स. उमेदवार) महायुतीच्या या दोन्ही सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवारांना धनुष्यबाण-कमळ-घड्याळ या महायुतीच्या चिन्हाचे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे नम्र आवाहन केले. यावेळी मोहा गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी अजित पवार गट लागला प्रचाराला
धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबातील मार्गदर्शक, राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार (आजोबा) यांच्या निधनाच्या दुःखातून आपण अद्यापही सावरलेलो नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेलेच कार्यकर्ते लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात सहभाग घेऊन कर्तव्य पार पाडत आहे. याच अनुषंगाने खामसवाडी येथे जिल्हा परिषद गटाचे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार श्री. विश्वास कोकणे, पंचायत समितीचे उमेदवार श्री. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. देशात, राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून खामसवाडी गटातील विकासकामांना निधी मंजूर करून घेण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेतून जास्तीचा निधी आपल्या मतदारसंघात खेचून आणण्यासाठी या गटातील सदस्य हे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या विचारांचे असले पाहिजेत. ज्यांना समाजातील तळागाळातील लोकांच्या परिस्थितीची, त्यांच्या अडचणींची जाणीव आहे, असे महायुतीचे उमेदवार श्री. विश्वास कोकणे यांना भरभरून मतदान करून तुमच्यातील एक सहकारी आदरणीय राणादादांच्या सोबतीला पाठवा. त्यामुळे आपली कामे करण्यास कुठेही अडचण येणार नाही. यावेळी खामसवाडी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाडोळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे शिवाजीराव मस्के तसेच समुद्रवाणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ रविवारी पाडोळी येथे आकुबाई देवी मंदिरासमोर खासदार ओमराजे निंबाळकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आमोल गुंड हे उच्च शिक्षित, अभ्यासू व विकासाभिमुख उमेदवार असून त्यांना रुपामाता परिवाराचा ठाम पाठिंबा आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले हे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना (उबाठा) ची सत्ता आल्यास शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येतील, असे सांगताना त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी 500 नव्या वर्गखोल्यांची उभारणी, प्राथमिक शाळांमध्ये सेमी-इंग्रजी शिक्षण, तसेच शाळांचे डिजिटलीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यासोबतच शेतकरी, ऊस उत्पादक, दूध उत्पादक, असंघटित कामगार व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. याच सभेत रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा युवा नेते अँड. अजित गुंड-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून गुंड परिवाराने ऊस उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि विकासाची नवी दिशा दिली आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून उभारलेले औद्योगिक उपक्रम हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरले असून, यापुढील काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांना योग्य न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारांना आवाहन करताना खासदार निंबाळकर म्हणाले, “मशीनला दोष देऊ नका. शांततेत मतदान करा. गोंधळून जाऊ नका. चिन्ह पाहून मशालीला मतदान करा. एक-एक मत महत्त्वाचे आहे; ग्रामीण जनता सुज्ञ आहे.”या जाहीर सभेस व्यासपीठावर तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, रवींद्र देठे, सतीश जावळे, राजकुमार झिरमिरे, विकास ढवळे, मंगेश दळवे, उत्तम महाराज बोचरे अँड. शरद गुंड यांच्या सह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- आज सादर करण्यात आलेले केंद्रीय बजेट हे पूर्णपणे महाराष्ट्रविरोधी असून, सामान्य जनतेच्या अपेक्षांचा घोर अपमान करणारे आहे. या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग आणि तरुणांसाठी कोणतीही ठोस दिलासा देणारी तरतूद करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले असतानाही या राज्याला पुन्हा एकदा सापत्न वागणूक देण्यात आली आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाडा व कोकणातील पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी कोणतीही विशेष तरतूद न केल्याने केंद्र सरकारचा महाराष्ट्राबद्दलचा दुजाभाव स्पष्ट दिसतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पूर्णपणे मौन बाळगण्यात आले असून, महागाई कमी करण्यासाठी कोणतीही प्रभावी योजना जाहीर करण्यात आलेली नाही. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये कपात करून सरकारने गरीब आणि वंचित घटकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. हे बजेट फक्त मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी असून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांपासून केंद्र सरकार पूर्णपणे दूर गेलेले आहे. आम्ही या जनविरोधी बजेटचा तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्राच्या हक्कासाठी संसदेत व रस्त्यावर संघर्ष करणार आहोत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानच्या ऊर्जा धोरणाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हिंदुस्थान आता इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी करेल. या निर्णयावरून आता देशांतर्गत राजकारण तापले असून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे हिंदुस्थानला आता तिथून तेल […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ असून यात मध्यमवर्गीय, शेतकरी, देशातील युवा वर्गासाठी विशेष असे काहीही ठोस केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व वर्गांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. सर्वाधिक कर उत्पादन देणाऱ्या महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारची दुजाभावाची वागणूक याही वेळी कायम राहिली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार […]
पार्थसोबत काय चर्चा झाली? खुद्द शरद पवारांनी सांगितले
काल अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली असे आधी प्राथमिक वृत्त होते. पण पार्थसोबत अशी चर्चाच झाली नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प देशासमोरील मुख्य आर्थिक संकटांवर उपाय शोधण्यात अपयशी ठरला असून त्याने धोरणात्मक सुधारणांनाही नाकारले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. X वर एक पोस्ट करत […]
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (01 फेब्रुवारी 2026) संसदेमध्ये नवव्यांदा वर्ष 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मंदिरांसाठी 5 हजार कोटींचा तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या ‘देवां’चा विकास होणार? मंदिरांसाठी क्राएटिया काय लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केला […]
Kolhapur News : वडणगे परिसरात बिबट्याचा वावर ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पन्हाळ्यानंतर करवीर तालुक्यातही बिबट्याची दहशत कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथेआठवड्याभरापूर्वी बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, वडणगे (ता. करवीर) येथेही बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी गावातील जाधव मळा आणि शिवपार्वती तलाव परिसरात बिबट्याचे अस्तित्व जाणवले असून, या [...]

29 C