देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकवणारे ‘जल्लाद’: हर्षवर्धन सपकाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब व नथुरामसारखा थंड डोक्याने कारस्थाने करणारा आहे. फडणवीस हे केवळ दरिंदे (क्रूर) नाहीत तर आता ते लोकशाही, माणुसकी, संस्कृती व भारताच्या संविधानाला फाशी देत आहेत. देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकणारे जल्लाद आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. […]
सरकारच्या तिजोरीतले पैसे कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटीतले नाही, ओमराजेंनी अजित पवारांना सुनावले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एका प्रचारसभेत बोलताना थेट ‘तुमच्या हातात मत आहे तर माझ्या हातात निधी आहे’, असे मतदारांना सुनावले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देखील यावरून अजित पवारांना चांगलेच सुनावले. View this post on Instagram A […]
हिंदुस्थानला २० वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2030) आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जनरल असेम्बलीच्या बैठकीत हिंदुस्थानला २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थानने शेवटची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० मध्ये दिल्ली येथे आयोजित केली होती. यावेळी ही स्पर्धा अहमदाबादमध्ये आयोजित केली जाणार आहे. […]
हिवाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हिवाळ्याच्या दिवसात खजूर हे एक सुपरफूड मानले जाते. खजूरात कॅलरीज, नैसर्गिक साखर, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, तसेच B6 सारखे आवश्यक पोषक घटक असतात. बीटाच्या रसामध्ये आले घालून पिण्याचे हे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहीत आहेत का, वाचा खजूर खाण्यामुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात. थंड हवामानामुळे ऊर्जेची पातळी खालावते. अशावेळी खजूर हा […]
Karad : शंभर टक्के मतदान करणारच ; मलकापुरातील बचत गटाच्या महिलांचा एकमुखी निर्धार
महिलांना मतदान जनजागृती उपक्रमातून लोकशाही प्रक्रियेची माहिती कराड : मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी बचत गटातील महिलांनी १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला. निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाच्या मध्यवर्ती अधिकारी प्रतिभा लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एनयुएलएम अंतर्गत स्थापित बसुंधरा शहर संघामार्फत महिला बचत [...]
हे भाकरी खातात की नोटा? संजय शिरसाट यांची अशोक चव्हाण यांच्यावर जहरी टीका
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नांदेड शहरात देखील प्रचारादरम्यान मिंधे गटाचे आमदार व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नांदेडमध्ये प्रत्येक क्षेत्रातून पैसा जमवायचे काम अशोक चव्हाण यांनी केले असून मला नेहमी प्रश्न पडतो की हे भाकरी खातात की नोटा? अशी […]
पखरूडची लेक पूजा चव्हाणचा आणखी एक विक्रम; सायबर जगतात झळकले पखरूड गावाचे नाव
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पखरूड सारख्या छोट्याशा गावाने महाराष्ट्राच्या नकाशावर पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील लाडकी लेक पूजा चव्हाण हिने केवळ २३ व्या वर्षी सायबर क्षेत्रात विक्रम घडवून आणत संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. इ.डी. ऑफिस, मुंबई येथे सायबर अॅडव्हायझर म्हणून कार्यरत असलेल्या पूजाने नुकताच एक महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला—पेसमेकरला लागणारे अत्यावश्यक सॉफ्टवेअर विकसित केले, ज्यामुळे पूर्वी ३ ते ४ लाख रुपये किमतीची असणारी उपकरणे आता फक्त ४० ते ५० हजार रुपयांत उपलब्ध होणार आहेत. हे कार्य आरोग्य क्षेत्रातील क्रांती मानले जात असून पूजाच्या तांत्रिक कौशल्याची देशभरात प्रशंसा होत आहे. साध्या कुटुंबातील—आई लता आणि वडील आश्रुबा रघुनाथ चव्हाण (माटकर)—यांच्या मुलीने कमी संसाधनांतून मोठी झेप घेतली आहे. तिच्या नावावर ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार, सावित्रीबाई फुले महाराष्ट्र मम्मग्ररिक पुरस्कार यांसह अनेक सन्मान नोंदले गेले आहेत. भारतामधील सर्वात लहान वयाची CISO (चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर) म्हणूनही पूजाची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये व शाळांमध्ये तिने युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले असून तिची जिद्द, मेहनत आणि धडाडी तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे. पूजा चव्हाणच्या या अद्वितीय यशाचा गौरव करण्यासाठी पखरूड गावातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या मते, “पूजा ही आमची लाडकी लेक, गावाची शान, तालुक्याची बाण आणि महाराष्ट्राची जान आहे.” पखरूड हे गाव स्वतःच्या शौर्यपरंपरेसाठी ओळखले जाते—महाराष्ट्रात सर्वाधिक आर्मी ऑफिसर्स घडवणारे गाव म्हणून त्याची ख्याती आहे. आता त्याच मातीतून पूजा चव्हाणसारखा हिरे जन्माला आल्याचा गावकऱ्यांना अभिमान वाटतो. पूजाच्या ‘टीम जगदंबा’च्या भावी वाटचालीसाठी संपूर्ण गावकऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. गाव, तालुका आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात नेण्यासाठी पूजा अशीच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा समस्त गावकऱ्यांनी केली आहे.
Satara : सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन अॅक्शन मोडवर; ६३ गुन्हेगार हद्दपार
निवडणूक शांततेसाठी सातारा पोलिसांचे कडक उपाय सातारा : सातारा शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, कोणताही तणाव, गोंधळ किंवा गुन्हेगारीला वाव मिळू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग अॅक्शन मोडवर आले [...]
संविधान नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण करते - डॉ.शहाजी चंदनशिवे
परंडा (प्रतिनिधी)- दि.26 नोव्हेंबर 2025 संविधान नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करते असे मत डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे सांस्कृतिक विभाग राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, वरिष्ठ प्राध्यापक डॉ.गजेंद्र रंदिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक तोडकरी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत गायकवाड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विशाल जाधव ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ. विशाल जाधव यांनी मानले.
हिवाळ्यात आहारामध्ये मका, बाजरी यापैकी कोणते धान्य खायला हवे, जाणून घ्या
हिवाळ्याच्या काळात, बहुतेक लोक शरीराला उबदार ठेवणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात आणि त्यात भरड धान्यांचा समावेश सर्वात वर असतो. ते शरीराला उबदार ठेवतात आणि दिवसभर शरीराला ऊर्जा देतात. भरड धान्यांमध्ये मका आणि बाजरी हे सर्वात लोकप्रिय आहेत. दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि असंख्य फायदे देतात. ही धान्ये आता केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी […]
धाराशिव शहरात संविधान जनजागृती रॅली
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिन व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली,रॅलीत सहभागी शाळा नर्सिंग कॉलेज विद्यार्थी यांना जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले सामाजिक संस्था,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वतंत्र मजुर युनियन सामाजिक संस्थेच्या वतीने बिस्किटे,मोतीचुर लाडु, राजगिरा लाडू,केळी देऊन खाऊचे वाटप करण्यात आले. दरवर्षी संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात येते, भारतीय संविधान दिन हा राष्ट्रीय सण उत्सव असुन हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव,संजय मंत्री अमित मोदाणी,अझहर शेख, सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव भोसले,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरणताई निंबाळकर, युनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष शेख रौफ, सहसचिव बाबासाहेब गुळीग, उपाध्यक्ष सचिन चौधरी, सल्लागार बलभीम कांबळे, सदस्य श्रीकांत मटकिवाले, अमर आगळे सह समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदार जनजागरण समितीच्या वतीने एम. डी. देशमुख यांनी आभार मानले.
Karad News : सुप्रिया सुळेंसह मान्यवरांची यशवंतरावांना आदरांजली
कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा स्मरणसोहळा कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळावर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. समाधीस्थळी नगरपालिकेच्यावतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार शशिकांत [...]
भूम (प्रतिनिधी)- संविधान दिनाच्या निमित्ताने श्री. गुरुदेव दत्त हायस्कूल भूम येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी भूम न्यायालयातून जागृती रॅली काढली. त्या रॅलीला जिल्हा न्यायाधीश धर्माधिकारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पंडित, डांगे, जाधव तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जोंधळे मॅडम आणि मते मॅडम यांनी हिरवा झेंडा दाखवला. विद्यार्थी व शिक्षक यांचे भूम वकील मंडळाचे अध्यक्ष पंडित ढगे व सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्व न्यायाधीश आणि वकील मंडळातील सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी मिळून विध्यार्थ्यांच्या विचार रॅलीमध्ये समाविष्ट होऊन संविधानाची जागृती संदर्भात संदेश दिला. त्यानंतर न्यायालयामध्ये सत्र न्यायालयाच्या बिल्डिंग समोर न्यायाधीश व वकील मंडळी आणी कर्मचारी यांना संविधानाच्या प्रती देऊन संविधानाचे संयुक्त वाचन करण्यात आले, तत्पूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश धर्माधिकारी यांनी संविधानाचे महत्त्व सर्वांना सांगितले.
संविधानाला 75 वर्षे पूर्ण; बेंबळी येथे भव्य संविधान सन्मान रॅली
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे भारतीय संविधानाला आज 75 वर्षे पूर्ण झाली. संविधान 1949 रो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आणि 26 जानेवारी 1950 रो. लागू झाले. संविधान अर्पणाच्या कार्यक्रमात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक निमित्ताने बेंबळी येथे भव्य संविधान सन्मान रॅली आयोजित कढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व माजी सरपंच बाळासाहेब माने यांनी केले. नागरिकांनी निळ्या ध्वजांनी, संविधानिक बॅनर आणि आंबेडकरी विचारांच्या फलकांनी गाव सजवले. रॅलीदरम्यान सतत जय भीम, जय संविधान, भारतीय संविधान अमर राहो, लोकशाही जिंदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहें आणि सामाजिक न्याय जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. गावातील महिला, पुरुष, तरुण, विद्यार्थी आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, ज्यांनी उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला आणि संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. रॅलीदरम्यान पोलीस बंदोबस्ताची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्याबद्दल ग्रामस्थ आणि आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले. समारोपाला मिठाई वाटप करून संविधान दिनाचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला गेला. बेंबळीतील ही संविधान सन्मान रॅली निळ्या ध्वजांच्या लहरी, “जयभीमजयसंविधान”च्या घोषणांचा गजर आणि गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली. रॅलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, त्यांच्या सोबत ॲड. प्रशांत माने, आप्पासाहेब माने, नेताजी लोंढे, अंगूल माने, राहुल मोहिते, बाळू मस्के, सुरज माने, लखन चव्हाण, इंद्रजीत होळकर, करण गायकवाड, जयपाल माने, दादा वाळवे, शशिकांत होळकर, दयानंद गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Sangli News : मणेराजुरीत हॉटेलवर छापा, वेश्या व्यवसाय उघडकीस
डॉल्फीनमध्ये जबरदस्तीने वेश्या व्यवसाय तासगाव : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील हॉटेल डॉल्फीन हॉटेलवरील वेश्या व्यवसाय उघडकीस. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून हॉटेल मालक, मॅनेजर, तसेच दोन ग्राहक अशा चौघांना ताब्यात घेऊन अटकेची [...]
मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस, २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदित्य ठाकरे यांची आदरांजली
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “२६ नोव्हेंबर २००८… मुंबईवर झालेला तो भीषण दहशतवादी हल्ला, ज्याच्या आठवणीने आजही प्रत्येक मुंबईकराच्या मनात उद्वेग दाटून […]
Jalna News वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा, चार जणांना अटक; तीन पीडीत महिलांची सुटका
जालना ते मंठा जाणाऱ्या रोडवर रामनगर साखर कारखाना येथील साईच्छा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार पुरुषांना अटक करण्यात आली असून तीन पीडीत महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली आहे. जालना ते मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना येथील साईच्छा हॉटेलचे मालक सुधाकर यादव हे […]
Sangli : उरूण–ईश्वरपूरमध्ये महायुतीची सत्ता निश्चित
ईश्वरपूरात महायुतीची ‘पूर्ण बहुमत’ची घोषणा; ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूरमध्ये महायुतीची सत्ता निश्चित येणार असून राज्य व केंद्रात महायुतीची सत्ता असल्याने पुढील पाच वर्षात भरीव निधी आणून विकास साधू नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ [...]
भाजपकडून मिंधे आणि अजित पवार गटाचे नेते फोडण्याचे काम सुरूच, अंबादास दानवे यांची टीका
एकमेकांचे नेते फोडायचे नाही असा भाजप आणि मिंधे गटात करार झाला आहे, असे असले तरी भाजपकडून मिंधे गटातील नेते फोडण्याचे काम सुरूच आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच या कराराचे उल्लंघन सुरू असल्याचेही दानवे म्हणाले. अंबादास दानवे म्हणाले की दानवे म्हणाले की, संभाजीनगर महापौरपदाचा उमेदवार शिंदे गटाचा असूनही […]
Sangli : तानंगमध्ये चारचाकी वाहनाची धडक : पती, पत्नी जखमी
तानंग तासगाव फाट्यावर भीषण अपघात कुपवाड : तानंगमध्ये तासगाव फाट्यावर मिरजेकडे जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी जखमी झाले आहेत. ही चारचाकी सुभाषनगर मार्गे तानंगकडे जात होती. यामध्ये [...]
हिवाळ्यात व्हिटॅमिन डी साठी दररोज किती अंडी खाणे गरजेचे आहे, वाचा
हिवाळ्यात आपल्या आहारात अंडी समाविष्ट करणे हे खूप गरजेचे असते. कारण हिवाळ्यात आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज ही फार मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीराच्या स्नायूंच्या प्रणालीमध्ये, हाडांच्या निर्मितीमध्ये आणि झीज दुरुस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मज्जासंस्थेच्या (मेंदू) सुरळीत कार्यासाठी आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी देखील व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हिवाळ्यात अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक […]
स्मृतीची खास मैत्रीण राधाने पलाश मुच्छलला केले अनफॉलो
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान या लग्नाबाबत तसेच स्मृती व पलाशच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या दरम्यान स्मृतीने देखील लग्नाच्या सर्व पोस्ट डिलीट केल्याचे देखील बोलले जात आहे. अशातच आता स्मृतीची […]
बुधवारी गुवाहाटी कसोटीत हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला, जो धावांच्या बाबतीत सर्वात मोठा कसोटी पराभव होता. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत ०-२ असा व्हाईटवॉश झाला आणि २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाला पहिली मालीका गमवावी लागली. यातच गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा पराभव झाल्यानंतर घरच्या मालिकेत हिंदुस्थानी संघाचा हा […]
HR88B8888 हा क्रमांक ठरला देशातील सर्वात महागडा कार नंबर; रक्कम ऐकून हैराण व्हाल
‘HR88B8888’ हा नंबर प्लेट क्रमांक अधिकृतपणे देशातील सर्वात महागडा कार नोंदणी क्रमांक ठरला आहे. हा क्रमांक बुधवारी हरियाणामध्ये तब्बल १.१७ कोटी रुपयांना विकला गेला. हरियाणामध्ये व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर प्लेट्ससाठी दर आठवड्याला ऑनलाइन लिलाव आयोजित केले जातात. बोली लावणारे शुक्रवार सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांना हवा असलेल्या क्रमांकासाठी अर्ज करू शकतात. आणि […]
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या
देवगड / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुणगे शाखा व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर (५१, मूळ रा. आरे बौद्धवाडी, सध्या रा. मुणगे) यांनी आरे जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक असलेल्या तळ्यात आत्महत्या केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले [...]
Satara News : साताऱ्यात बिबट्याचा हल्ला परतवणाऱ्या ‘राजा’ बैलाची शूर झुंज चर्चेत
साताऱ्यात बिबट्याचा बैलावर हल्ला कास : आसनगाव खोऱ्यातील पिलाणी (खालची) ता. सातारा येथे शनिवारी दुपारी बिबट्या अन् बैलामध्ये निकराची झुंज झाली. यात बिबट्याचा हल्ला परतवण्यात बैल यशस्वी झाला. मात्र, बिबट्याशी झुंज देताना झालेल्या जखमा व शिंग मोडल्याने बैल [...]
Sangli Crime : गंभीर गुन्ह्यांमुळे कडेगावात पितापुत्रावर हद्दपारीची कारवाई
सांगली जिल्ह्यातून माळी पिता-पुत्रांना हद्दपार कडेगांव : कडेगांवातील शिवाजी गणपती माळी (वय ६३) व उमेश शिवाजी माळी (वय २८, दोघे रा. कडेगाव) या पिता पुत्रावर पलूस-कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी हद्दपारची कारवाई केली आहे. सहायक निरीक्षक गणेश कोकाटे, [...]
राष्ट्रवादी–शाहू आघाडीची कागलमध्ये एकजूट कागल : एका ऐतिहासिक वळणावर कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक आसलेले दोन प्रबळ गट एकत्र आले आहेत म्हणून कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत गाफील राहू नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी [...]
हिवाळ्यात अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे काय आहेत, वाचा
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. मुख्यत्वे हिवाळ्यात आपल्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करावेत, ज्यायोगे आपल्या शरीराला चांगला उबदारपणा मिळेल. हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे हे सर्वात उत्तम मानले जाते. परंतु यामध्ये सर्वात उत्तम म्हणजे अंजीर खाणे. हिवाळ्यात अंजीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे पोषक घटक मिळतात. हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून […]
नागिरकांना आवाहन करणारे पंतप्रधान मोदी कर्तव्यांचे पालन करतात का? संविधान दिनी काँग्रेसचा सवाल
नागरिकांनी आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे पालन करावे, असे पंतप्रधानांनी नुकतेच आवाहन केले. मात्र कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी या वक्तव्यावर प्रत्त्युत्तर देत पंतप्रधानांनाच सवाल केला आहे. एक्सवर पोस्ट करून जयराम रमेश यांनी म्हणाले की, संविधानातील भाग IV-A मधील कलम 51-A मध्ये नागरिकांसाठी 11 मूलभूत कर्तव्ये नमूद केली आहेत. “पण पंतप्रधान स्वतः ही कर्तव्ये पाळतात का?” असा […]
kolhapur : बुधवारच्या चिन्ह वाटपाकडे वडगावातील उमेदवारांचे लक्ष
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड खोची : हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी चिन्ह वाटप होणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी तिरंगी व अन्यत्र दुरंगी लढत होणार आहे. यासाठी तिन्ही आघाड्यांकडून एका चिन्हाची [...]
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. ‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले आहेत की, दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे बाहेर चालणे देखील कठीण झाले आहे. ५५ मिनिटे चालल्यानंतर अस्वस्थ वाटू लागेल, असेही ते म्हणाले. असल्याचे त्याने सांगितले. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सुनावणीतून सूट मागितली, यावरच […]
मोटार सायकल चोरांना रंगेहाथ पकडले
भुम (प्रतिनिधी)- चोरी केलेल्या दुचाकीला दुस-या व्यक्तीच्या नावे असलेल्या दुचाकीच्या नंबरची प्लेट लावून चोरी करीत असताना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने तीन चोरट्यांना रंगेहात पकडून चोरलेली दुचाकी जप्त केली आहे. सदरची घटना दि. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर धूळे राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शिवारतील साहील पेट्रोल पंपावर घडली असून तीन जणांच्या विरोधात पोका. अमोल शिवाजी गोडगे यांचे तक्रारीवरून वाशी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रोहित युवराज ओव्हाळ, साहिल जब्बार शेख, अमीर अन्वर शेख सर्व रा. भूम ता. भूम जि. धाराशिव यानी त्याचे कडील शाईन कंपनीची काळया रंगाची दुचाकी जीचा चेसिस नं. 4657070204 इजीन नं. 6572108255 या चोरी केलेल्या दुचाकीला गुन्हा करण्याचे उद्देशाने धनराज गौतम चेडे रा. वाशी यांचे नावे आर टी ओ धाराशिव मध्य नोंद असलेल्या दुचाकी क्र. एम एच 25 ए एम 5456 या दुचाकीच्या क्रमांकाची नंबर प्लेट तयार करून चोरलेल्या दुचाकीला बसवून चो-या करण्याच्या उद्देशाने धनराज चेडे याचा मानसन्मान नाव लौकिकास बाधा निर्माण हाईल असे कृत्य करून फसवणुक केली व मौजे इंदापुर शिवारातील साहिल पेट्रोल पंपामध्ये लावण्यात आलेल्या मोटारसायकल मधील पेट्रोल चोरी करत असताना तीघे इसम मिळुन आल्याने त्याचे विरुद फिर्यादी यांची भा. न्या. सं. कलम 318 (2), 336 (3), 336 (4), 303 (2), 3 (5) नुसार फिर्यादीनुसार पोनि शंकर शिंदे यांचे आदेशावरून दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका बाबा जाधवर हे करीत आहेत.
संविधान समजून घेणे ही काळाची गरज - अपर्णा कुचेकर
धाराशिव (प्रतिनिधी)- संविधानातील मूल्ये हक्क व कर्तव्य समजून घेऊन आपण वागले पाहिजे. संविधानामुळे आपण सुखी जीवन जगतो. त्यासाठी संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे असे न. प. शाळा क्र. 23 च्या मुख्याध्यापिका अपर्णा कुचेकर यांनी व्यक्त केले. त्या न. प. शाळा क्र. 14 येथील शाळेत संविधान दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. अपर्णा कुचेकर यांनी फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,सांगोला. जिल्हा सोलापूर येथे विभागप्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलेले आहे. त्यांनी संविधानावर अधिक विस्तारीत बोलून मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंडित कांबळे हे होते. त्यांनीही संविधान निर्मितीची प्रक्रिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यामधील कार्यभाग यावर माहिती दिली. शाळेतील युवा प्रशिक्षणार्थी शेख सदफ शारमिन यांचा कार्यकाल संपत आल्यामुळे त्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रिया नरवडे व सुनीता धोत्रे यांनी सहकार्य केले. तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा वाकडे यांनी केले. तर आभार शेख सदफ शारमिन यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ज्ञानपर्वाने परिपूर्ण अशा प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संविधानाबद्दल विद्यार्थी जागरूकता वाढवणे, लोकशाही मूल्यांची जपणूक करणे आणि तरुण पिढीला संविधानाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच तरुण पिढीची समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. हरी महामुनी यांनी उपस्थित राहून स्पर्धेचे संयोजन आणि परिक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. या वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाच्या मूल्यांची पुनःप्रेरणा निर्माण झाली. त्यानंतर संविधानाशी संबंधित इतिहास, प्रमुख कलमे, दुरुस्त्या, निर्मिती प्रक्रिया आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे या विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेची रंगतदार सुरुवात झाली. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, निरोगी स्पर्धा आणि संविधानाबद्दलची जिज्ञासा स्पष्ट जाणवत होती. अतिशय बारकाईने निवडलेले प्रश्न विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची उत्तम चाचणी घेणारे ठरले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. मोहन राठोड यांनी उत्साही शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. धनश्री पिंपरे यांनी मान्यवर, शिक्षकवर्ग आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतात आणि भारतीय राज्यघटनेविषयी आदराची भावना वाढीस लागते, असे मत व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम ज्ञान, जागरुकता आणि मूल्यांची जोड देणारा ठरला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
बालविवाहमुक्तीसाठी 1098 ची प्रभावी जनजागृती ; शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ‘बालहक्क'चा आवाज
धाराशिव (प्रतिनिधी)- “बालविवाह मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाईन 1098 तर्फे 100 दिवसांच्या जनजागृती अभियानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. ए.बी.कोवे आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून संवेदनशील विषयांवर जागरूकता निर्माण करण्यात आली. धाराशिवमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघूचीवाडी आणि शांतीसागर माध्यमिक विद्यालय,भीमनगर येथे नुकतीच विद्यार्थ्यांसोबत बालहक्क,मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाची माहिती देण्यात आली.चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर अमर भोसले यांनी 1098 या जीवनरक्षक हेल्पलाईनची उपयुक्तता समजावून सांगितली.शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.प्रा.शाळा बावी,भैरवनाथ हायस्कूल धारूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारूर येथे देखील हा कार्यक्रम घेण्यात आला.या सत्रातही बालविवाहाचे दुष्परिणाम,मुलांचे संरक्षण हक्क आणि बालकांसाठीच्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. अमर भोसले आणि अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना 1098 वर मदत मागण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. हिप्परगा रावा व लोहारा परिसरातील जि.प.प्रा.शाळा हिप्परगा रावा, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय लोहारा, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा रवा आणि कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगुर येथेही जनजागृतीचे सत्र घेण्यात आले. या उपक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जयश्री पाटील,चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशिका वंदना कांबळे,केस वर्कर अभय काळे तसेच सखी वन-स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव आणि वैद्यकीय मदतनीस भाग्यश्री कोळी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना बालविवाह ही गुन्हा आहे,मुलींचे शिक्षण हीच खरी ताकद, आणि अडचणीत असताना 1098 हीच सुरक्षित आश्रयरेषा हे संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आले.शिक्षक,मुख्याध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत अभियानाला भक्कम पाठिंबा देत आहेत.
फुटबॉल खेळताना १३ वर्षीय मुलाला आला हृदयविकाराचा झटका, मैदानातच झाला मृत्यू
गुजरातमधील मेहसाणा येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मेहसाणा-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या तपोवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फुटबॉल खेताळताना एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा विद्यार्थी वांकानेरचा रहिवासी होता आणि तीन वर्षांपासून शाळेत शिकत होता. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांवर दुःखचं डोंगर कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास […]
ऊसतोड हंगामात वाहतुकीची सुरक्षितता वाढविण्यासाठी रिफ्लेक्टीव्ह टेपचा वापर अनिवार्य
धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 या कालावधीतील ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, ट्रेलर व बैलगाड्या राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रमुख मार्गांवरून संथ गतीने प्रवास करतात.यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अशा वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढते. यासाठी,ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टीव्ह टेप लावणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना आवाहन करण्यात येते की,आपल्या कारखान्यास ऊस वाहतूक करणारी ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व बैलगाड्या यावर रिफ्लेक्टर बसविल्याची खात्री करूनच ऊस वाहतूकीला परवानगी द्यावी. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार पुरेसे कापडी रिफ्लेक्टीव्ह बोर्ड छापून संबंधित वाहनधारकांना वितरित करावेत व त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन रस्ता सुरक्षा उद्दिष्ट साध्य होईल. दरम्यान,ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांना आवाहन करण्यात येते की वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करू नये,तसेच रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविल्याशिवाय रस्त्यावर वाहतूक करू नये.जर अशी वाहने रस्त्यावर आढळून आली तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी सांगितले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची ' 1800221251 या क्रमांकाची हेल्पलाइन 'सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पास मध्ये 66.66 % सवलत दिली जाते. तसेच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 'योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. तथापि, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या . तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते. विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. या पुढे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5-6 या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होतो अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बस मधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये, अशा सक्त सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.
व्ही. पी. शैक्षणिक संकुलामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील कृषि हाविद्यालय व श्री साई जनविकास आय टी आय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून झाली. विद्यार्थ्यांनी एकच स्वरात प्रास्ताविकेचे पठण करत लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता या संविधानिक मूल्यांबद्दल ठाम निष्ठा व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. क्रांतिकूमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. मोहसीन शेख यांनी “युवकांची संविधानिक कर्तव्ये” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले इंजिनिअरिंगचे प्राचार्य यांनी संविधान देशाला सार्वभौम ,समाजवाद ,धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्तक घोषित करते आणि न्याय स्वातंत्र, समता आणि बंधुता यासारख्या मूल्यांची हमी देते असे मौलिक विचार मांडले. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, डॉ. अमित गांधले प्रा. शेटे डी.एस. प्रा. दळवे एस. ए., प्रा. शिंदे ए. एस., प्रा. भालेकर एस. व्ही., प्रा. गोटे पी. पी., डॉ. घोडके बी. डी., प्रा. नवनाथ मुंडे, प्रा. प्रवीण माळी प्रा. सुतार आर. व्ही. ग्रंथपाल कांबळे ए.बी, ओंकार गिरी, तसेच आय टी आयचे व्यवस्थापक प्रा. डी. एम. घावटे ,एस.आर. पुदाले, एस. एस. भोरे, एस. एस. सुतार तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. डी. एम. घावटे यांनी केले.
धाराशिव जिल्ह्याची गुरूवारी निवड चाचणी
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन ची कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा 04 डिसेंबर ते 07 डिसेंबर 2025 दरम्यान बुऱ्हाणनगर (जिल्हा अहिल्यानगर)येथे होणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा गुरुवार दिनांक. 27 नोंव्हेबर 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट कॉलेज) येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या खेळाडूंची जन्मतारीख 05 जानेवारी रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत असे खेळाडू या स्पर्धेत पात्र आहेत. तरी या खेळाडूंनी दुपारी 4.00 वाजता वयाचा दाखला(आधार कार्ड,बोनाफाईड सर्टीफिकेट) घेवून उपस्थित राहावे. निवड समिती सदस्य म्हणून अभिजीत पाटील, रोहिणी सातपुते (आवारे), गौरी शिंदे काम पाहणार आहेत. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित रहावे. असे आवाहन सचिव प्रविण बागल यांनी केले.
इतिहासात काँग्रेस, शेकाप, नंतर राष्ट्रवादी, भाजप प्रभाव !
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला असून उमेदवार दारोदारी जाऊन मतदारांचा कौल मिळवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. तुळजापूरचा मतदार लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद या तिन्ही पातळ्यांवर वेगळे निर्णय देतो, याची प्रचिती मागील अनेक निवडणुकांत आली आहे. लोकसभेला येथे शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांना, तर विधानसभेला भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे यंदा नगरपरिषदेसाठी मतदार कोणत्या पक्षाला झुकत आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुळजापूरच्या मतदारांचा इतिहास पाहता एक काळ काँग्रेस, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष दीर्घकाळ, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्याकडे मतदारांचा कल होता. मात्र अलीकडच्या वर्षांत परिस्थिती बदलली असून हा मतदार कोणाला बहुमत देणार, यावर सर्वांचे लक्ष आहे. येथील मतदारांनी भूतकाळात मुस्लिम, ब्राह्मण, मराठा, दलित आणि अगदी महंतांनाही कारभार करण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिराशी निगडित मोठा पुजारी वर्ग असल्याने त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या गटाला नेहमीच ते सहकार्य करतात. गत 1015 वर्षांत मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारांची नोंद झाल्याने तुळजापूरचे मूळ राजकीय समीकरण ढवळून निघाले. या बदलानंतर निवडणुकीत धनशक्तीचा वापर वाढला असून निवडणूक लढती अधिक चुरशीच्या बनू लागल्या आहेत. नगरपरिषद क्षेत्र वाढले, समस्या जशाच्या तशाच तीर्थक्षेत्र तुळजापूर वेगाने वाढत असून भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधांवर ताण वाढला आहे. शहरवासीयांचे एकच म्हणणे “मूलभूत सुविधा द्या सत्ता हाती घ्या!” तरुणाई राजकारणात अग्रभागी पूर्वी अनुभवी मंडळींच्या हातात कारभार होता. मात्र वयोमानामुळे ती पिढी मागे हटली आणि नेतृत्वाची धुरा तरुणांच्या हातात आली आहे. यंदा मोठ्या संख्येने तरुण-तरुणी निवडणुकीत उभे आहेत निकाल ठरवतील तुळजापूरची भावी दिशा यंदा मतदारांसमोर नगराध्यक्षपदासाठी स्पष्ट पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल तुळजापूरच्या भावी राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारा ठरणार आहे.
योग प्राणायाम ध्यान सत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव (प्रतिनिधी)- सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यावश्यक असणारा योग प्राणायाम ध्यानसत्र भोसले हायस्कूल धाराशिवच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला. आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक लक्ष्मण काकडे जिल्हा समन्वयक कर्मयोग विभाग धाराशिव यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत व सहज समजेल अशा प्रकारे ध्यान योग प्राणायाम याचे प्रात्यक्षिक करून घेतले. सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये मनशांती व आनंदी मन ही प्रत्येकाची आवश्यकता आहे. सध्याचे शैक्षणिक जीवन व वाढता ताण तणाव यावरती उपाय म्हणून योग व ध्यान यावरती अतिशय प्रभावीपणे उपयुक्त ठरू शकतो असे मत यावेळी लक्ष्मण काकडे यांनी व्यक्त केले. प्रशालेच्यावतीने सर्व शिक्षक वृंदाने यामध्ये सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कार्यक्रम आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला व मनाची एकाग्रता वाढली. तसेच मन आनंदी झाले. अशा प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या.
अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन.
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टा जहागीर येथे दि.27 नोहेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत संतयोगी दामोदर मठ संस्थांनात मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ,किर्तन सोहळा अदिंचे अयोजन करण्यात आले असुन दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. पहाटे 4ते6 काकडा अरती, 6ते 7 विष्णूसहस्त्रनाम,7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण,11 ते 12 गाथा भजन ,12 ते 2 भोजन , 2:30 ते 5 श्री शिवपुराण कथा,5:30 ते 6: 30 हरिपाठ, 7 ते 9 किर्तन, 10 त 4 हरिजागर होणार असुन, दि.27 रोजी दीपप्रज्वलन नंदाताई व माजी प्रधान सचिव व्यंकटराव गायकवाड, ग्रंथ पुजन उषाताई व माजी खासदार रविंद्र गायकवाड, विणा पुजन दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सप्ताहाच्या अरंभापासुन ते सांगता पर्यंत व्यासपिठ अधिकारी हभप. बालाजी महाराज मुळे, हभप. विठ्ठल महाराज गायकवाड, गुरुचरित्र ग्रंथ वाचन अविनाश कुलकर्णी, व श्री शिवमहापुराण कथा सेवा, प्रवक्ते महंत तेजसनाथ महाराज अगजाप्पा देवस्थान कराळी यांची होणार आहे. गुरुवार दि.27 नोव्हेंबर रोजी हभप. भुषण महाराज तळणीकर, शुक्रवार दि 28 नोव्हेंबर रोजी हभप. श्रीपाद महाराज सातारा, शनिवार रोजी दि.29 नोव्हेंबर रोजी हभप. कृष्णा कुलकर्णी महाराज मुंबई, रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी हभप. निलेश महाराज चव्हाण कील्लारी,सोमवार 1 डिसेंबर रोजी हभप. राजेश पाटिल महाराज गुंजरगा, मंगळवार दि.2 डिसेंबर रोजी नितीन महाराज कवळी हिप्परगा, बुधवार दि.3 डिसेंबर रोजी 2 ते 4 दामोदर मठाचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. मठ संस्थानच्या वतिने सकाळी 10 पासुन सार्वजनिक महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज व आष्टा जहागीर येथील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
विद्यार्थी सुरक्षेला नवी दिशा- पोलीस निरीक्षक शंकर शिंदे
वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयावर दि. 25 नोव्हेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे होते. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी सुरक्षा, शिस्त, जागरूकता आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर या विषयांवर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात निरीक्षक शंकर शिंदे यांनी स्पष्ट केले की,समाजातील वाईट प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कटीबद्ध असते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासाकडे लक्ष देत विज्ञानतंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आत्मसुरक्षा व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयातील शिस्त, परस्पर समन्वय आणि सुरक्षित वातावरण विद्यार्थ्यांच्या भविष्यनिर्मितीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रभावी चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकतेचा नवा दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक सावंत, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कदम, प्रास्ताविक तिकटे, तर आभार प्रदर्शन शिंदे यांंनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
धनुष-कृतीच्या ‘तेरे इश्क में’चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाचा हिरवा कंदील
आनंद एल. राय यांचा नवीन चित्रपट, “तेरे इश्क में” चित्रपटाला सेन्सार बोर्डाकडून परवानगी मिळाली. धनुष आणि कृती सेनन अभिनीत या चित्रपटाने आधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केल्याची चर्चा आहे. दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवस आधी, केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) मंगळवारी या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले. दिग्दर्शकाच्या इच्छेनुसार […]
हरयाणात दोन दु:खद घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळणाऱ्या खेळाडूचा अंगावर खांब पडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहतकमधील लखन माजरा गावात घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत बास्केटबॉलचा खांब पडून त्यातीह खेळाडूचा मृत्यू झाला आहे. दोन्ही विद्यार्थी दहावीचे आहेत. दोघांनाही बास्केटबॉलमध्ये करिअर करायचे होते. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक राठी असे त्याचे […]
सर्वोच्च न्यायालयात आज निवडणूक आयोग (EC) आणि राज्य निवडणूक आयोग (SEC) यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. यापूर्वी इतर राज्यांशी संबंधित प्रकरणांचीही सुनावणी झाली. ज्यात मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR), पश्चिम बंगालमधील बीएलओंचे मृत्यू आणि केरळ, तामिळनाडूमधील मुद्दे यांचा समावेश होता. जे राजकीय पक्ष आणि एडीआरने उपस्थित केले होते. कपिल सिब्बल आणि प्रशांत […]
Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड, तरुणास अटक
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड; पोलिसांच्या तत्परतेने आरोपी जेरबंद कोल्हापूर : भरवस्तीमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणावर जुना राजबाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने दिली असून, यानुसार अरबाज फय्याज बागवान (वय २८ रा. [...]
Photo –राजापूरमध्ये मिंधे गटाला धक्का; पदाधिकारी, माजी जिल्हापरिषद सदस्य शिवसेनेत
राजापूरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हापरिषद सदस्य दिनेश जैतापकर यांनी बुधवारी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर, त्यांच्या तीन बहिणींनी तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्याची मागणी केली आहे. खान यांच्या बहिणी नोरिन खान, अलीमा खान आणि उझमा खान यांनी या आठवड्यात रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर एकत्र येत खान यांना भेटण्याची परवानगी मागितली. यावेळी त्यांना आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांना पोलिसांनी ‘क्रूरपणे मारहाण’ […]
जि. पं. निवडणूक आव्हान निकाल राखून
याचिकांबाबत सरकारकडून माहिती सादर : 28 नोव्हेंबरपूर्वीहिरवाझेंडामिळणेआवश्यक पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या 6 नोव्हेंबरच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आशिष चव्हाण यांनी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतरदारसंघ आरक्षणसंबंधी 6 नोव्हेंबरच्या [...]
काणकोणात सतर्कतेमुळे मोठा दरोडा फसला
गस्तीवरीलपोलिस, वेर्णेकरांचीसतर्कतायशस्वीचोरांचेपोलिसांवरदगडफेककरूनपलायन काणकोण : बायणा, वास्को येथील घरफोडींची प्रकरणे ताजे असतानाच 25 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान चावडी, काणकोण येथील प्रवीण वेर्णेकर यांच्या मालकीच्या एस. एम. ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गस्तीवर असलेल्या काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांच्या हाताला काहीच लागू शकले नाही. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर जवळच्या शेतातून [...]
SIR मागील खरा हेतू NRC आहे, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल
एसआयआरमागील खरा हेतू एनआरसी आहे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर बोल केला आहे. आज पश्चिम बंगालमध्ये संविधान दिनानिमित्त रेड रोडवर सभेत बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “आज जेव्हा लोकशाही आणि धर्मावर हल्ला होत आहे आणि नागरिकत्व, मतदानाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तेव्हा आपण […]
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधना हिचे आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. पण ऐन मुहूर्ताच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि लग्न पुढे ढकलण्यात आले. याचवेळी पलाशही रुग्णालयात दाखल झाल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांचे मोहोळ उठले. अशातच आता स्मृतीने एक मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. स्मृती मानधना ही […]
सोन्याच्या चेनसाठी मुलीने केली आईची हत्या, वाचा नेमकं काय घडलं?
केरळमधील थ्रीसूर येथे एका ७५ वर्षीय महिलेची तिच्या मुलीने आणि जोडीदाराने सोन्याच्या साखळीसाठी हत्या केली. योगायोगाने त्याच सोन साखळीमुळे पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यश मिळाले. रविवारी सकाळी मुंडूर येथे एका प्लॉटमध्ये शेजाऱ्यांना थानकमणि नावाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि सुरुवातीला पोलिसांना संशय होता की पडल्याने त्याचा मृत्यू झाला. परंतु पोस्टमार्टमनंतर हा खून […]
देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र, पण…; माजी सरन्यायाधीश गवई यांचे विधान चर्चेत
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणले की, देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र असली तरी तिच्या निर्णयांकडे अनेकदा राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. गवई यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली त्यात त्यांनी हे विधान केले आहे. गवई म्हणाले की, “आम्ही कोणासमोर पक्षकार म्हणून उभं आहे हे बघून निर्णय देत नाही. आमच्यासमोर ठेवलेल्या मुद्द्यांवरच निर्णय घेतो.” सरकारविषयीचे प्रकरण असो वा विरोधातील, […]
नगरपरिषद निवडणूक – 1 ते 3 डिसेंबर ‘ड्राय डे’
राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची राज्यभर रणधुमाळी सुरू असतानाच १ ते ३ डिसेंबर ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगरपरिषदा, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य व माडी […]
भाजप-आरएसएसचे लोक संविधानाचे तुकडे करण्यात व्यग्र आहेत –मल्लिकार्जुन खरगे
“भाजप-आरएसएसचे लोक संविधानाचे तुकडे करण्यात व्यग्र आहेत. म्हणूनच आज त्यांचा संविधानाबद्दलचा आदर हा फक्त एक दिखावा आहे”, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. आज संविधान दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. खरगे म्हणाले की, “आज नरेंद्र मोदी आपल्याला वसाहतवादाच्या धोक्यांवर व्याख्यान देत आहेत, परंतु हे त्याच विचारसरणीचे लोक आहेत ज्यांनी […]
HP Inc कडून 6 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड
एचपी इंक ने मंगळवारी घोषणा केली की, येत्या वर्षभरात जगभरात 4 ते 6 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी आता कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे धोरण (एआय) स्वीकारण्याचे योजले आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, उत्पादन विकासाला गती देणे, ग्राहकांचे समाधान वाढवणे आणि उत्पादकता सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा […]
निरवडे बस स्टॉपवरील बेंचवर अज्ञाताने ओतला मातीचा ढीग
ग्रामस्थांतून नाराजी ; कारवाई करण्याची ग्रामपंचायतकडे मागणी न्हावेली /वार्ताहर प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निरवडे येथील गावठणवाडी बस स्टॉपवर बसविण्यात आलेल्या बेंचवर अज्ञात व्यक्तीने मातीचा ढिग ओतून ठेवला आहे.गेल्या चार दिवसांपासून मातीचा ढीग तेथेच असल्याने बसची वाट पाहणार्या प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.अशा प्रवृतीचा शोध घेऊन ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी [...]
Kolhapur News : बालिंगा गर्भलिंग निदान प्रकरणात 15 जण पोलिसांच्या रडारवर!
बालिंगा येथे अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश कोल्हापूर : बालिंगा येथील अवैध गर्भलिंग निदानप्रकरणी एजंट, गर्भपात करणारे डॉक्टर असे १५ जण करवीर पोलिसांच्या रडारावर आहेत. मुख्य सुत्रधार सौरभकेरबा पाटील याच्यासह या १५ जणांचा शोध सुरु आहे. दरम्यान गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या कर्नाटक येथून खरेदी केल्याची [...]
विद्यार्थी – विद्यार्थिनींनी केलं ST रोको आंदोलन, नेमकं काय आहे कारण? वाचा सविस्तर
राजापूरमध्ये विद्यार्थ्यांनी एसटी रोको आंदोलन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,राजापूरहून सकाळी ६ वाजता सुटणारी राजापूर-ओझर गाडी ही ७:३० च्या कॉलेजला जाणाऱ्या ओझर व ओणी येथील विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवत होती. गेले अनेक वर्षे चालू असणारी ही गाडी अचानक बंद करून येरडव-राजापूर (व्हाया ओझर) अशी फेरी सुरू केली. ही गाडी आता ओझरला ८:१० ला येते. त्यामुळे मुलांना ७:३० […]
कोल्हापूर महापालिकेच्या मतदार यादीत मोठा गोंधळ उघड कोल्हापूर : प्रभाग क्रमांक आठ मधील शिवाजी पेठेतील एकाच कुटुंबात पतीचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. तर पत्नीचे नाव प्रभाग क्रमांक १० मध्ये तर मुलाचे नाव प्रभाग क्रमांक [...]
‘बे दुणे तीन’चा ट्रेलर झळकला, 05 डिसेंबर 2025 रोजी प्रीमियर
‘बे दुणे तीन’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे, ज्याचा प्रीमियर 05 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. वृषांक प्रॉडक्शन्स निर्मित आणि अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले दिग्दर्शित ही मालिका पालकत्व स्वीकारणाऱ्या एका तरुण जोडप्याच्या (अभय आणि नेहा) आयुष्यातील भावनिक आणि विनोदी प्रवासाची कथा आहे. या कथानकात अभय आणि नेहा यांना एक नव्हे, तर तीन बाळं होणार […]
गुवाहाटी कसोटीमध्ये हिंदुस्थानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानचा तब्बल 408 धावांनी दारूण पराभव केला. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 549 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे बॅटर 140 धावांमध्ये गारद झाले आणि आफ्रिकेने 25 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये मालिका विजय मिळवला. कोलकाता येथे झालेल्या कसोटीत आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला होता आणि आता गुवाहाटी कसोटीही खिशात […]
बाडमेरच्या वाळवंटी भागात SIR कामाचे मोठे आव्हान; उंटावरून घेत आहेत मतदारांचा शोध
राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदारयादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसाठी राजस्थानच्या वाळवंटी भागात मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या वाळवंटातील दुर्गम गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये मतदारांना शोधण्यासाठी BLO अनेक अडचणींचा सामना करत आहेत. तसेच दुर्गम भागामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ होत आहे. BLO आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना उत्साह यावा, यासाठी उपविभागीय […]
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे एक टॅंकर पलटी होऊन बुधवारी सकाळी अपघात झाला. हा टॅंकर कीटकनाशकाचे केमिकल घेऊन निघाला होता. अपघातानंतर केमिकल रस्त्यावर पसरले आहे. पलटी झालेला टॅंकर बाजूला करण्याचे काम सुरु असून दोन तास हातखंबा येथील वाहतूक ठप्प आहे. कीटकनाशकाचे केमिकल घेऊन हा टॅंकर गोवा येथून मुंबईला निघाला होता. बुधवारी सकाळी हातखंबा येथील चढावात टॅंकरवरचे […]
सोनखेड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकास 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
सोनखेड पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चक्क ठाण्यातच तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेण्याचा प्रताप केल्याने त्याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. पकडण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव गणपत गिते असे आहे. कारवाईने जिल्हा पोलिस दलाची मान शरमेने खाली झाली आहे. तक्रारदाराने सोनखेड पोलीस ठाण्यात दि.24 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली की, तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे जवळा (ता. […]
जन्मदात्रीने अर्भकाचा घोटला गळा
चौथ्यांदाहीमुलगीझाल्यानेकृत्य: रामदुर्गतालुक्यातीलघटना बेळगाव : तीन मुलींपाठोपाठ चौथीही मुलगीच झाल्याने नैराशेच्या भरात मातेने दोन दिवसांच्या स्त्रीजातीच्या अर्भकाचा गळा व नाक दाबून खून केल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि. 24 रोजी सकाळी मुदकवी ता. रामदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अश्विनी हणमंत हळकट्टी (वय 30) रा. मालगी ता. बदामी सध्या रा. हिरेमुलंगी ता. रामदुर्ग या [...]
मनमानीपणे भूभाडे वसूल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी
बेळगाव : शहर व उपनगरात रस्त्याच्या कडेला बसून दररोज हजारो बैठे विक्रेते व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. मात्र अशा बैठ्या विक्रेत्याकडून बेकायदेशीरित्या मनमानी पद्धतीने भूभाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बैठे विक्रेते समितीच्या सदस्यांकडून महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांना देण्यात आले. सोमवार दि. [...]
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
बेळगाव : प्रत्येक कुटुंबाला एलपीजी गॅस उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रधान मंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा तिसरा टप्पा मागील दोन दिवसांपासून सुरू झाला असून नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांना संपूर्ण कनेक्शन मोफत देण्यासोबतच सिलिंडर घेतल्यानंतर सबसिडीही देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आजही महिला चुलीवरच स्वयंपाक करतात. चुलीद्वारे [...]
तीन ठिकाणाहून चोरी गेलेले बाक मिळविण्यात मनपाला यश
बेळगाव : स्टेशन रोड, शिवचरित्र आणि शहापूर येथून चोरण्यात आलेल्या तीन बाकांचा शोध घेण्यात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना यश आले आहे. कपिलेश्वर तलावाच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत नागरिक उघड्यावर लघुशंका करत होते. त्यामुळे हा प्रकार थांबावा यासाठी तेथील काही युवकांनी महापालिकेला याची कल्पना देण्यापूर्वीच तेथील बाक उचलून नेले होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाक चोरीला जाण्याचे प्रकार [...]
विनाअनुदानित शाळा शिक्षकांचे अधिवेशनकाळात आंदोलन
राज्यभरातीलशिक्षकहोणारसहभागी बेळगाव : राज्यातील 1995 नंतरच्या प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व कॉलेजना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबत घर चालविण्यासाठी रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहे. काही शिक्षक निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आतातरी अनुदान द्या, या मागणीसाठी बेळगावच्या सुवर्णविधानसौध येथे येत्या अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा अखिल कर्नाटक विनाअनुदानित खासगी शिक्षण [...]
अंकोला-हुबळीराष्ट्रीयहमरस्त्यावरीलवज्रळ्ळीयेथेअपघात बेळगाव : केएसआरटीसी बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात उलटून 25 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील वज्रळ्ळी येथे मंगळवारी घडली. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवारहून रायचूरकडे निघालेल्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून अंकोला-हुबळी हमरस्त्यावरील [...]
यमकनमर्डी मतदारसंघातील दोनशे शाळांच्या विकासासाठी अनुदान
मंत्रीसतीशजारकीहोळीयांचेप्रतिपादन: भुतरामहट्टीयेथीलशाळेतकार्यक्रम बेळगाव : उत्तमरितीने शिक्षण घेतल्यास चांगली नोकरी, पद मिळणे शक्य आहे. शिक्षणानेच विकास शक्य आहे. शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन यमकनमर्डी मतदारसंघातील सुमारे 200 सरकारी शाळांच्या विकासासाठी अनुदान देण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मतदारसंघातील भुतरामहट्टी येथील सरकारी माध्यमिक शाळेमध्ये जिल्हा पंचायत, जिल्हा शिक्षण- साक्षरता खात्यामार्फत मंगळवारी (दि. 25) [...]
रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला धुळीचे ग्रहण लागले आहे. दोन वर्षांपासून हा धूळ खात पडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला लाखो रुपयांच्या वीज बिलाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर चार वर्षांपूर्वी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनानेही आपल्या इमारतीच्या छतावर सोलर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हा […]
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना यश, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके जप्त
मणिपूरमधील सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली आहेत. ही कारवाई चुराचंदपूर, कांगपोक्पी आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आले. चुराचाचंदपूर जिल्ह्यातील गेलमोल गावात शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एक लांब पल्ल्याचे रॉकेट, एक रॉकेट लाँचिंग स्टँड, बॅटरीचे तुकडे […]
जुगाराच्या प्रकरणी लाच मागणाऱ्या रामतीर्थ पोलीस ठाण्यातील ASI वर ACB ने कारवाई केली आहे. जुगाराच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी न मागण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर याच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर रोजी तक्रारदार पत्ते खेळताना आढळून आला. त्यामुळे रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक […]
एआय तंत्रज्ञानामुळे नवीन औद्योगिक क्रांती
इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए. एस. किरणकुमार : आरसीयूचा 14 वा दीक्षांत सोहळा उत्साहात : सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजन बेळगाव : जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी भारत देश एक आहे. येत्या काही वर्षात आपली अर्थव्यवस्था एक ट्रीलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भारताला अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी संधी आहे. सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान तयार केले जात असून [...]
राष्ट्रीय महामार्गावरील कशेळे ते वंजारवाडी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास कारवाई करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र खड्यांमुळे सतत अपघात होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरल्याने संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी श्रमदान करून जीवघेणे खड्डे बुजवले. कर्जत […]
आज चंपाषष्ठी, सोमवारी गीता जयंती; पुढील गुरुवारी दत्तात्रेय जन्मोत्सव बेळगाव : मार्गशीर्ष महिन्याला शुक्रवारपासून (दि. 21) सुरुवात झाली आहे. या महिन्यात लक्ष्मीचा वार म्हणून अनेक महिला गुरुवारचे व्रत करीत असतात. या व्रताला वैभवलक्ष्मी व्रत असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होते, अशी अनेकांची धारणा असून महिला आवर्जुन हे व्रत करीत असतात. [...]
Delhi Bomb Blast –बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणेची मोठी कारवाई, दहशतवादी उमरचा साथीदार शोएबला अटक
दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा फरिदाबादचा धौज येथील साथीदार शोएब याला अटक केली आहे. शोएब या प्रकरणातील सातवा आऱोपी आहे. तपास यंत्रणेच्या तपासात शोएबने स्फोटापूर्वी दहशतवादी उमरला आश्रय दिला होता आणि त्याला लॉजिस्टिक सपोर्ट देखील पुरवला होता. दिल्लीतील […]
लोककल्प फौंडेशनतर्पे कुसमळी येथील रुग्णांची मोतिबिंदू मोफत शस्त्रक्रिया
बेळगाव : लोककल्प फेंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल) यांच्या साहाय्याने कुसमळी (ता. खानापूर) गावातील दोन ऊग्णांची मोफत मोतिबिंदू व पेटेरिजियम शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. अवधूत वागळे यांनी केली. त्यांना नेत्रदर्शन हॉस्पिटलचे सहव्यवस्थापक उदय कुमार यांचे सहकार्य लाभले. लोककल्प फौंडेशनचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक हे संपूर्ण प्रक्रियेवेळी [...]
बेळगाव विमानतळामध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्यावतीने ‘एव्हिएशन सेफ्टी अवेअरनेस सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 28 नोव्हेंबरदरम्यान या निमित्ताने विविध सुरक्षा कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सोमवारी विमानतळ अधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सुरक्षासंदर्भात माहिती दिली. विमानतळावर सुरक्षा किती महत्त्वाची आहे, एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठी घटना कशी घडू शकते, या विषयी [...]
सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस-इंजिनियरिंगकडे ओढा
पदवीपूर्वकॉलेजमध्येसीईटीकोचिंगमुळेफायदा: पुढीलवर्षीनिकालवाढण्याचीशक्यता बेळगाव : खासगी पदवीपूर्व कॉलेजना टक्कर देत सरकारी कॉलेजमध्ये सध्या विज्ञान विभागात सीईटी व इतर स्पर्धात्मक परीक्षांचे शिक्षण दिले जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मागील वर्षी घेतलेल्या मेहनतीमुळे सरकारी कॉलेजचे अनेक विद्यार्थी इंजिनियरिंग व एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. बेळगाव जि. पं. सीईओ राहुल शिंदे [...]
वाढत्या प्रदूषणामुळे साथीच्या आजारांतून बरे होणे कठीण; रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये वाढलेले प्रमाण
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाचा परिणाम आता साथीच्या आजारांच्या रुग्णांवरही दिसू लागला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हवेतील सूक्ष्म कण श्वसनमार्गांना चिघळवतात आणि त्यामुळे साध्या सर्दी खोकल्यातूनही बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, कोणताही पूर्वीचा आजार नसलेल्या निरोगी लोकांनाही खोकला-श्वास घेण्यातील अडचणींमुळे तब्येत सुधारायला उशीर होतो आहे. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. अनेक रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये गर्दी वाढली […]
प्रसिद्ध पान मसाला व्यावसायिकाच्या सूनेने उचलले टोकाचे पाऊल, वाचा
कमला पसंद या पान मसाला व्यावसायिकाच्या सूनेने दीप्ती चौरसिया (४०) यांनी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी कुटूंबाने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे म्हटले आहे. दीप्तीने २०१० मध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसियाशी लग्न केले. त्यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. हरप्रीतची दोन लग्न झालेली असून, त्यांची दुसरी पत्नी ही […]
अजित पवारांनी केला चुकीचा शब्दप्रयोग, आता व्यक्त केली दिलगिरी
एका प्रचारसभेत बलोताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीचा शब्दप्रयोग केला होता. त्यावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. असा शब्द वापरायला नाही पाहिजे होता असे अजित पवार म्हणाले. एका प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की आपल्याला शहरांचा विकास करायचा आहे. काही नेते येतात आणि भाषण करतात की आम्ही शहरांचा विकास करू. पण विकास करत […]
नॅशनल क्रश बनल्यानंतर गिरिजा ओकला येऊ लागलेत अश्लील मेसेज, वाचा नेमकं काय घडलं?
सध्याच्या घडीला तुमचं वजन हे सोशल मीडियावर तुम्ही किती लोकप्रिय आहात यावरून ठरतं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हीच्या एका निळ्या साडीतील फोटोने सोशल मीडियावर वाहवा मिळवली. ही वाहवा फक्त एका वर्गापुरती न राहता गिरिजा ही अवघ्या काही तासांमध्ये नॅशनल क्रश बनली. परंतु नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरिजाला मात्र अतिशय वाईट अनुभव येऊ लागले आहेत. […]

29 C