स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा समभाग वधारला
मुंबई : केबल उद्योगामध्ये असणाऱ्या स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा समभाग सोमवारी आठ टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. नोमुरा या संस्थेने सदरचा समभाग खरेदी करण्याबाबत आपला कल दर्शवला आहे. ब्रोकरेज फर्मने कंपनीचा समभागाचा भाव 200 पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये स्टरलाईट यांचा महसूल वेगाने वाढलेला असला तरी टेरिफ संदर्भातील अनिश्चित वातावरणाचा परिणाम समभागावर काही [...]
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सागर तांदळे १५२० मतांनी विजय झाले असून माझी सभापती जयसिंग माने यांचा त्यांनी दारुण पराभव केला. जयसिंग माने यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र साखरपा कोंडगाव येथील जनतेने शिवसेनाशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रामाणिक राहून स्वार्थासाठी पक्ष बदललेल्या मंडळींना या निवडणुकीत धडा शिकवला आहे. […]
माजी लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी लिहिलेल्या “फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी” या पुस्तकासंदर्भात वाद निर्माण झालेला आहे. प्रकाशनाआधीच पुस्तकासंदर्भात सोशल मीडियावर प्रसारणासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. तपासांती असे दिसून आले आहे की, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेल्या कथितपणे काही वेबसाइटवर […]
केसांच्या उत्तम वाढीसाठी कढीपत्त्याचा असा वापर करायलाच हवा, जाणून घ्या
कढीपत्ता म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. पण असं असलं तरी, कढीपत्ता आणि केस याचंही जवळचं नातं आहे. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा आहे. कढीपत्त्यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे समृद्ध पोषक घटक असतात जे केसांसाठी […]
शरद पवार यांना छातीत कफ; 5 दिवस अँटिबायोटिक उपचार आवश्यक, सुप्रिया सुळे यांची माहिती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या छातीत कफ झाल्याने त्यांना 5 दिवस अँटिबायोटिक उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, पवार यांच्या प्रकृतीत ठीक आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखी कोणतीही बाब नाही. त्यांनी शुभेच्छा आणि सातत्याने साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही […]
हा तर मुंबईकरांना लुटण्याचा भाजपचा डाव, कंजेशन टॅक्स प्रस्तावावरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ सुरू होण्याआधीच कंजेशन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि कुलाबा येथील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावण्याची मागणी […]
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. या नेतृत्वाखाली केलेल्या नियोजनबद्ध प्रचाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा निकालात स्पष्टपणे प्रत्यय आला आहे. मतदारांनी भाजप व महायुतीवर दाखवलेला विश्वास हा विकासकामांना मिळालेला कौल आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला, युवक व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेला हा विजय नेतृत्व, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गट व पंचायत समिती 16 गणांच्या मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या सहअधिकाऱ्यांच्या समावेत आज संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पार पडली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 8 गटांपैकी भाजप-शिंदे सेनेचे 6 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये भाजप-शिंदे सेना व उद्धव ठाकरे गट यांना प्रत्येकी 8 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना खातेही उघडता आले नाही.पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये भाजप-शिंदे सेना व उद्धव ठाकरे गट यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंना प्रत्येकी 8 जागा मिळाल्याने पंचायत समितीत सत्तेसाठी मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत जिल्हा परिषद गटांचे निकाल ईटकूर गट : शिंदे सेनेचे अनंत लंगडे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या पल्लवी तांबारे यांचा सुमारे 2000 मतांनी पराभव केला. मंगरूळ गट : भाजपचे जयवंत कुंभार यांनी उ बाटा गटाचे बाळासाहेब जाधवर यांना 887 मतांनी पराभूत केले. डिकसळ गटा तुन शिंदे सेनेची पूजा तुषार शिंदे यांनी उबाटा गटाच्या वर्षा मस्के यांचा 1396 मतांनी पराभव केला. शिराढोण गट : उद्धव ठाकरे गटाच्या कांचनमाला संगवे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नितीन यादव यांना अवघ्या 35 मतांनी हरवले. नायगाव गटामधून उद्धव ठाकरे गटाचे अनिल साळुंखे यांचा भाजपाचे उद्धव शितोळे पाटील यांनी 113 मतांनी पराभव केला. खामसवाडी गटातुन भाजपचे विश्वास कोकणे यांनी उबाटा गटाचे मनीषा वाघमारे यांना 459 मतांनी पराभूत केले. मोहा गटातून उद्धव ठाकरे गटाच्या रूपाली नाकटिळक यांनी अपक्ष उमेदवार सुजाता मडके यांचा 1275 मतांनी पराभव केला. येरमाळा गटातुन भाजपच्या अनुजा कोकाटे यांनी उबाटा च्या सुनंदा वाघमारे यांचा 1350 मतांनी हरवले. पंचायत समिती गणांचे निकाल ईटकूर : रामचंद्र सांगळे (भाजप) विजयी; मस्सा : राजश्री वरपे (शिंदे सेना) विजयी, मंगरूळ : प्रणिता चव्हाण (भाजप) विजयी, हसेगाव (के) : राणी राऊत (शिंदे सेना) विजयी, डिकसळ : नामदेव जाधव (शिंदे सेना) विजयी, लोटा (पूर्व) : इंदुबाई ओव्हाळ (भाजप) विजयी, शिराढोण : गजानन माकोडे (भाजप) विजयी, जवळा खुर्द : मनोज घोगरे (उद्धव गट) विजयी, नायगाव : सीमा टेकाळे (उद्धव गट) विजयी, रांजणी : योगेश्वरी पवार (उद्धव गट) विजयी; खामसवाडी : सुवर्णा पाटील (उद्धव गट) विजयी, देवळाली : उमाकांत एडके (उद्धव गट) विजयी, मोहा : अनुराधा दिघे ( उबाटागट) विजयी, गौर : श्याम देशमुख (उद्धव गट) विजय, येरमाळा : वृषाली पाटील (उद्धव गट) विजयी, चोराखळी : अलका खुणे (भाजप) विजयी; झाल्या आहेत. तालुक्यात बदलणारी राजकीय समीकरणे जिल्हा परिषदेत मिळालेल्या घवघवीत यशामुळे कळंब तालुक्यात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंचायत समितीत मात्र बरोबरी झाल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळला, तर पराभूत गटांमध्ये आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. कळंब तालुक्याच्या राजकारणात हा निकाल मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या निकालामुळे तालुक्यात भाजप-शिंदे सेनेने जिल्हा परिषदेत स्पष्ट वर्चस्व मिळवले असून पंचायत समितीत मात्र समसमान ताकद निर्माण झाली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला असून पुढील सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विजयी उमेदवारांनी मात्र शहरातून गुलाल उधळत जल्लोष साजरा केला तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळंब पोलिसांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकले,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पंडित जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद, श्रीमती मंजुषा गुरमे,निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी बीड हरीष धार्मिक व नायब तहसिलदार गोकुळ भराडीया ,नायब तहसीलदार गोपाळ तापडिया ,नायब तहसीलदार श्रीमती किरण फुले यांच्या नियंत्रणा खाली महेश माने, प्रदीप ठोंबरे, शंकर पाच भाई ,गणेश गपाट, दिनेश मंडलिक, खलील शेख यांनी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. पोलिस प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक-4, पोलीस उपनिरीक्षक-3, पोलीस कर्मचारी - 40एस .आर . पी . एफ . शिराढोण पोलीस , येरमाळा पोलीस, सायबर पोलीस ,बीड पोलीस , दंगल नियंत्रण पथक असे एकूण मिळून 117 पोलीस कर्मचारी यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर समाधान सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या २०२६ च्या निवडणुकीत भाजपने २३ जागांवर विजय मिळवून सत्तेत आपली पकड मजबूत केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना १३ जागांवर मर्यादित [...]
भूम (प्रतिनिधी)- भुम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मोठी अटीतटीची लढत पहावयास मिळाली. जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचा निकाल धाकधुकीमध्ये लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी निराशा आली. भूम तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटामध्ये तीन जिल्हा परिषद गट शिवसेना शिंदे गटाकडे तर दोन जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी गटाकडे आहेत. तर पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी एक, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चार व शिवसेना शिंदे गट पाच याप्रमाणे निवडून आले आहेत . यामध्ये ईट गटामधून शुभांगी सुनील देशमुख (राष्ट्रवादी अजित पवार गट - 4 931), पाथरूड अमोल भोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट 7562), सुकटा विजयमाला भाऊसाहेब मार्कड (शिवसेना शिंदे गट 7016), वालवड बालाजी काळे (शिवसेना शिंदे गट 6716), आष्टा साधना बापूसाहेब अंधारे (शिवसेना शिंदे गट 7746), दहा पंचायत समिती गणांमधील विजय उमेदवार पखरुड गण प्रियंका प्रवीण रणबागुल (वंचित बहुजन आघाडी -3065), लिमकर राजकन्या (शिवसेना शिंदे गट 2034), ईट गण बाळासाहेब खरवडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 3885) प्रवीण देशमुख (शिवसेना शिंदे 2253), सुकटा गण कृष्णा गोयकर (शिवसेना शिंदे गट 2748) दत्तात्रय लवटे (राष्ट्रवादी अजित पवार गट 2678), आरसोली गण प्रशांत मुंढेकर (शिवसेना शिंदे गट 3907) कुमार शाहूराव तांबे (अजित पवार गट 3034), पाथरूड गण प्रदीप शेळके (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2995) समाधान मोरे (शिवसेना शिंदे गट 2073), आंबी गण प्रियंका युवराज गटकळ (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 3398) रतन गायकवाड (भाजपा 2135), वालवड गण साधना सुबुगडे (शिवसेना शिंदे गट 3972 ) वैशाली बारस्कर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2783), चिंचोली गण श्रीलता संतोष लोखंडे (शिवसेना शिंदे गट 2783) आगारावती गायकवाड (वंचित बहुजन आघाडी 2535), आष्टा गण पूजा विशाल ढगे (शिवसेना शिंदे गट 4165) अश्विनी कदम (अजित पवार गट 2571), माणकेश्वर गण मनोज अंधारे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2856) बालाजी गुंजाळ (शिवसेना शिंदे गट 2600). अटीतटीच्या लढतीमध्ये जिल्हा परिषद मध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये समसमान जागा देत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही त्यामुळे पंचायत समिती साठी फोडाफोडीचे राजकारण पुढील काळामध्ये पहावयास मिळणार आहे .पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण साठी राखीव असल्याने मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होऊन मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती त्याप्रमाणेच आताही शिवसेना बाजी मारते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . मतमोजणी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी रैवायाह डोंगरे ,सहाय्यक निवडणूक अधिकारी जयवंत पाटील, प्रवीण जाधव, अमोल नरुटे, उपविभागी पोलीस अधिकारी अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी शांततेत व सुरळीत मतमोजणी पार पाडली.
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या जीवनात सन्मान, आनंद आणि आशेचा नवा अध्याय लिहिणारा क्षण म्हणजे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत आयोजित मोफत जिल्हास्तरीय बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा. रविवारी, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव येथे हा भावनिक व प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील छायादीप मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता शाही दिमाखात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात एकूण 26 जोडपे विवाहबंधनात अडकली. हुंडा, दिखावा आणि अनावश्यक खर्चाला ठाम फाटा देत सन्मानपूर्वक विवाहाचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर मांडण्यात आला. नवदांपत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राज्याचे माजी मंत्री व परंडाभूमवाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने यशस्वी झाला. संपूर्ण आयोजन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली काटेकोर नियोजनातून पार पाडण्यात आले. विवाहप्रसंगी वधू-वरांना मणी-मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधू-वरांचे वस्त्र तसेच रूखवत देऊन त्यांच्या संसाराला भक्कम आधार देण्यात आला. यासोबतच वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या मंगलप्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी,सुनील काकडे, भारत इंगळे,अनिल खोचरे,शमशुद्दीन शेख, ॲड अजित खोत, विनोद गपाट, संजय मुंडे,कुणाल निंबाळकर,पंकज भोसले मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुंड्याविना, सन्मानाने आणि सामूहिक आनंदात पार पडलेला हा विवाहसोहळा म्हणजे माणुसकी, समता आणि सामाजिक जबाबदारी यांचा भावनिक संगम ठरला.
उन्हाळ्यात आवळा का खायला हवा, जाणून घ्या
आवळ्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आवळा खाण्याचे खूप फायदे असल्याने, आवळ्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करणे खूप गरजेचे झालेले आहे. आवळ्यामुळे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आवळा कशा आणि कोणत्या पद्धतीने खायला हवा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, जाणून घ्या रोज सकाळी रिकाम्या […]
अपसिगा येथे धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा शिक्षण विभाग नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा व जिल्हा कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने अपसिगा तालुका तुळजापूर येथील नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा येथे दिनांक 9/2/2026 ते 11/2/2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे उद्घाटन दिनांक दुपारी ठीक 4.00 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाचे पाहुणे उद्घाटक धाराशिव जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ निलेशची काळेसाहेब, स्काऊट जिल्हा आयुक्त तथा धाराशिव जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय श्री नागेश मापारी साहेब, नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ आपसिंगा चे अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर, उपाध्यक्ष उमेश भोसले सदस्य कल्याण तोडकरी, नरेंद्र आर्य विद्यालय अपशिंगचे मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी यांचे अपसिंगा येथील स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याकडे ढोल ताशाच्या गजरात व आकर्षक लेझीम पथकाच्या माध्यमातून आगमन झाले. मिळण्याचे उद्घाटन स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यानंतर स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय धाराशिव चे जिल्हा संघटक आदरणीय श्री विक्रांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर स्काऊट जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी मापारी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर कब बुलबुल व स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर काही गीते साजरी केली तदनंतर नरेंद्र आर्य शिक्षण संस्था अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. शेवटी शेवटी ॲडिशनल सीईओ श्री काळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेची जान व्हावी यासाठी असे मिळावे आयोजित केले जातात असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता संजय पोतदार यांनी आभार प्रदर्शन करून करण्यात आली. त्या मेळाव्यासाठी एकूण 22 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून एकूण 450 विद्यार्थी सदर मेळाव्यास खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित आहेत. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी रीतसर गाईड पद्धतीने स्काऊटच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट जिल्हा कार्यालय धाराशिव चे जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे सर व जिल्हा मेळावा प्रमुख आदरणीय दिलीप चौधरी सर, गाईड मेळावा प्रमुख श्रीमती वटणे मॅडम व गाईड प्रशिक्षण आयुक्त श्रीमती सविता पांढरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स पार्टी म्हणून शुभांगी पाटीलव विविध शाळेतील शिक्षकांनी तसेच नरेंद्र आर्य माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या या तीन दिवसात विविध शाळेतील विद्यार्थी एकत्रित राहून तंबूत निवास करून एकमेकांसोबत जेवण करतात गप्पागोष्टी करतात खेळतात व वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक देवाणघेवाण इत्यादी गुणांची वाढ होते . मेळावा यशस्वी करण्यासाठी किरण वाघमारे. संजय पोद्दार सुरेश वाघमोडे वैजनाथ पाटील नागेश ढगे महादेव कुंभार उषा सर जे मॅडम ,सलीम शेख,कसबे सर, कस्पटे सर इत्यादीने परिश्रम घेतले अशी माहिती स्काऊट जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा श्री जयपाल शेरखाने सर यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात महायुतीला यश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गणाचा निवडणुकीचा निकाल लागला असून, यामध्ये जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. 55 पैकी 40 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व राहणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 55 व पंचायत समितीच्या 110 जागेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी प्रत्येक तालुकावाईज मतमोजणी केंद्रात करण्यात आली आहे. सायंकाळी हाती आलेल्या बातमीनुसार जिल्ह्यात 55 पैकी भाजपला 19, शिवसेना शिंदे गटा 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 6, तर शिवसेना ठाकरे गट 7, काँग्रेस पक्षाला 3 जागेवर समाधान मानावे लागले. तर 4 अपक्ष निवडून आले आहेत. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समाजावादी पार्टीने आपले खाते उघडले आहे. समाजवादी पार्टीचे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ जिल्हा परिषद गटातून सिमा माडजे विजयी झाल्या आहेत. महायुतीचे संख्याबळ जास्त असले तरी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चांगले राजकीय संबंध असले तरी जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येवून लढल्यामुळे आमदार सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात एका शेतकरी मेळाव्यात मोठे वक्तव्य केले होते. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडताना महायुती एकत्र राहिल असे सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यात काहीही बदल होवू शकतात. असे म्हणावे लागेल.
उमरगा, लोहारा तालुक्यात अपक्षांसह भाजप-काँग्रेसची सरशी
उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लागल्यानंतर लक्ष लागून असलेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील मतदारसंघाचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे स्पष्ट वर्चस्व दिसून आले नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये विजय मिळवला आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमधील विजय उमेदवार तुरोरी गट अर्चना युवराज जाधव अपक्ष, कुन्हाळी गट लताताई शिवाजीराव मोरे काँग्रेस, कदेर गट उषाताई रविंद्र गायकवाड शिवसेना शिंदे गट, दाळींब गट रफिक तांबोळी भाजप, येणेगुर गट रचना राठोड भाजप, कवठा गट महेश देशमुख काँग्रेस, बलसूर गट सविता सुरेश बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आलूर गट आप्पासाहेब पाटील अपक्ष, गुंजोटी गट शहाजी पाटील भाजप, माकणी गट अश्विनी जवळगे शिवसेना उबाठा गट, कानेगाव गट सुवर्णाताई पाटील शिवसेना शिंदे गट या प्रमाणे विजयी उमेदवारांची नावे आहेत. दाळींब, येणेगुर आणि गुंजोटी या महत्वाच्या गटांमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर कुन्हाळी आणि कवठा या गटात काँग्रेसने विजय मिळवत आपली ताकद कायम ठेवली आहे. शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाठा गट आणि अपक्ष उमेदवारांनी काही जागांवर धक्कादायक विजय मिळवत प्रस्थापित समीकरणांना सुरूंग लावला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार झाली आहेत. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून [...]
उन्हाळ्यामध्ये बेलफळ का खायला हवे, जाणून घ्या
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, शरीराला डिहायड्रेशन, उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही पदार्थ खाणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक हंगामी फळे मिळतात. या फळांमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो. उन्हाळा सुरु होताक्षणी बाजारामध्ये आपल्याला बेलफळ दिसू लागते. हे बेलफळ आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानले जाते. बेलफळामध्ये थंडावा असतो म्हणूनच त्याला उन्हाळी सुपरफ्रूट म्हणून ओळखले जाते. […]
सरकार आणि लोकसभा अध्यक्षांना सभागृह चालवण्यात काहीच रस नाही असे दिसतंय, शशी थरूर यांची टीका
लोकसभा सुरळीत चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होऊनही सोमवारी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर संसद चालवण्यात रस नसल्याचा आरोप केला. लोकसभेत वारंवार गोंधळ झाल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर बोलता आले नाही, असे […]
Shahuwadi Election Result |शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाची दमदार मुसंडी
शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रभाव वाढला शाहूवाडी : शाहुवाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत जनसुराज्य शक्ती पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे .दोन जिल्हा परिषद मतदार संघ व चार पंचायत समिती मतदारसंघ जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले [...]
Gadhinglaj Election Result |गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी ; भाजपचा धुव्वा
गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीची घवघवीत सरशी गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली असून भाजपचा पूर्ण धुवा उडाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या पाच जागेपैकी चार जागेवर राष्ट्रवादीने [...]
रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचा ऐतिहासिक विजय रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विरोधकांचा अक्षरशः ‘सुपडा साफ’ करत शिवसेनेने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. [...]
संसदेतील गदारोळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक खरमरीत पत्र लिहून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही सत्ताधारी भाजपच्या सततच्या दबावाखाली काम करत आहात,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका […]
Umerga Zilla Parishad Election |उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका
उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचा निकाल जाहीर उमरगा :- उमरगा तालुक्यातील ,9 जिल्हा परिषद गटाचा निकाल लागला असून, यात भाजपाला दाळींब- महमदरफी तांबोळी,येणेगूर – रचना राठोड,गुंजोटी- शहाजी पाटील यांनी यां गटात विजय प्राप्त केला असून, काॅंग्रेस पक्षाला महेश देशमुख यांच्या रुपाने कवठा [...]
HSC Exam |बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्तपणे परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील
साताऱ्यात बारावी परीक्षा शांततेत पार पाडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सातारा – सातारा जिल्ह्यात ५२ परीक्षा केंद्रांवर जवळपास ३३ हजार ५०० विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यामध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा’ हे अभियान जिल्हा परिषद शिक्षण विभाग, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. यश मिळवण्यासाठी विद्यार्थांनी [...]
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीविरोधात उभे राहिल्यामुळे झालेली निर्घृण हत्या होऊन 14 महिने उलटले तरीही बीडसह धाराशिव जिल्ह्यातील पवन ऊर्जा कंपन्यांकडून चोरी, खंडणी आणि तोडफोडीच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या सहा महिन्यांत धाराशिव पोलिसांनी 20 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले असून, तक्रारींचा ओघ सुरूच आहे. नोव्हेंबर महिन्यात […]
नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यावरून सरकारने मला बोलू दिले नाही; राहुल गांधींचा आरोप
लोकसभेतील कामकाजादरम्यान नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यावरून सरकारने मला बोलू दिले नाही आणि सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित केले, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा समोर आला. सरकारला तो मुद्दा चर्चेला घ्यायचाच नव्हता. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज रोखले आणि मला बोलू दिले नाही. हे तीन-चार […]
भाजप पर्यावरणाविरुद्ध का आहे, हा खरा प्रश्न आहे; ताडोबाजवळील खाणप्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांचा सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. विकासाच्या नावाखाली भाजप पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका असून प्रदूषणात वाढ होत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी घोडाझरीजवळील लोहारडोंगरी येथील खाण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी […]
जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला रोखले
धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालेल्या जोरदार यशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महायुतीची एकतर्फी सत्ता येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालांनी हा अंदाज फोल ठरवत महाविकास आघाडीने भाजपला रोखण्यात यश मिळवले आहे. असे जरी असले तरी शिंदे शिवसेना व भाजपा यांच्यात कितपत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून ताळमेळ जमतो का ? यावर जिल्ह्यातील राजकारण अवलंबून राहणार आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निर्णायक कामगिरी करत भाजपच्या एकहाती सत्तेचे स्वप्न भंग केले. काही ठिकाणी भाजप आघाडीवर असली, तरी अनेक महत्त्वाच्या गटांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत सत्ता संतुलन आपल्या बाजूने वळवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा एकतर्फी विजय रोखला गेला असून, निवडणूक निकालांनी संमिश्र आणि काट्याची राजकीय परिस्थिती समोर आणली आहे. विशेष म्हणजे भूम, परंडा, वाशी या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार तानाजी सावंत करत आहेत. शिंदे शिवसेनेचे असलेले आमदार सावंत यांच्या विरोधात नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय आघाडी काही ठिकाणी एकत्र आली होती. त्यामुळे आमदार सावंत हे भाजप ने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ठवलेल्या उमेदवारास पाठिंबा देतीलच असे होणार नाही.
राजकीय क्षेत्रात धर्म आला की लोकशाहीचे अवमूल्यन होते- डॉ. महादेव गव्हाणे
धाराशिव (प्रतिनिधी)- राजकीय क्षेत्रात धर्म आला की लोकशाहीचे अवमूल्यन होते असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ राजकीय अभ्यासक डॉ मोईन शाकीर व्याख्यानमालेचे दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी तिन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. रमेश चौगुले, संचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर,उपपरिसर धाराशिव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.महादेव गव्हाणे म्हणाले की, डॉ मोईन शाकीर यांनी आयुष्यभर लोकशाहीचे मूल्य जपण्याचे कार्य केले. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण आपल्या विचारांतुन समाजास दिली. त्यांच्या मते धर्म व विज्ञान यांचा समन्वय साधण्याची आज खूप आवश्यक आहे. तर द्वितीय सत्रात डॉ महेशकुमार मोटे, श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्म मिळाला ही बाब महत्त्वाची नसुन तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे. डॉ शाकीर हे लोकशाहीचे खंदे समर्थक होते. तर तृतीय सत्रामध्ये डॉ. आनंद करडे यांनी हमीद दलवाई, डॉ असगर अली, डॉ मौलाना आझाद यांचे कार्य भारतीयांना विसरता येणार नाही. डॉ मोईन शाकीर हे एक शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांशी जोडले गेले होते असे सांगितले. अध्यक्षीय समापन प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. सदर व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ बालाजी गुंड, डॉ. मंगेश भोसले यांच्या सह सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला. सदर प्रसंगी तिन्ही सत्रांचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार डॉ. गुंड यांनी मानले.
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून उभारण्यात आलेल्या नव्या शौचालय ब्लॉकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे व्यवस्थापक संजय पेटकर, वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय खामकर, हर्षला शिंदे व अशोक हुंडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्य धनंजय लोढे होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नव्या शौचालय ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता व सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दृष्टीने ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक वातावरणाबरोबर आरोग्याच्या सोयी सुविधा व इतर सुख सुविधा उपलब्ध करून देणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर या फंडाच्या साह्याने महाविद्यालयात विविध विकास कामे करण्यात आले.त्या विकास कामाचे आज लोकांकडून करण्यात आले. प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयात मूलभूत सुविधा बळकट करणे ही काळाची गरज असून आरसीएफ सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कापणीच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता आल्या आहेत. अध्यक्ष धनंजय लोढे यांनी आरसीएफचे विशेष आभार मानत, भविष्यातही अशा उपयुक्त प्रकल्पांद्वारे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. बी. क्षीरसागर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा .डॉ. बापूराव पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूम शहरात गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा
भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरामध्ये पहाटे अभिषेक पूजा ,ग्रंथराज पारायण करण्यात आले. नेकनूर येथील लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कीर्तन सेवा देताना महाराजांनी सांगितले की, गजानन महाराजांनी सांगून दिलेली देवाची भक्ती अशाप्रकारे करायची त्यामुळे आपल्या जीवनाचे कल्याण होते . यावेळी मेगडे महाराजांनी गजानन महाराजांच्या काळातील सर्व अशी सखोल माहिती आपल्या कीर्तन सेवेतून भाविक भक्तांना सांगितली. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक 6 ते 8 या कालावधीमध्ये मंदिरात भजन व जागर आयोजित करण्यात आले होते. मुक्ताई महिला भजनी मंडळ, सद्गुरु सोमनाथ भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळाच्या वतीने भजन व हरिजागर दोन दिवसाच्या कालावधीमध्ये करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, सचिव दिपक खराडे, अरविंद शिंदे, अतुल डिसले, अनिल जाधवर, प्रदीप मोरे, राम मुंडेकर, दत्ता गाढवे, आबा घुले, अनिल तोडकर, दीपक मैदर्गे, विकास माळवदे, अभय मनगिरे, अमोल तुळशी यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Sangamner News –शिवसेनाचे तीन उमेदवार जिल्हा परिषद गटात विजयी, दिग्गजांचा केला पराभव
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीन शिलेदार जिल्हा परिषद गटात विजयी झाले असून त्यांनी दिग्गज मंडळींचा पराभव केला आहे. संगमेश्वर तालुक्यात अजूनही शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करिष्मा कायम असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कडवई गटातून संतोष थेराडे, कसबा गटातून विशाखा कुवळेकर तर […]
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, आरोपी आकाशदीप सिंगला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या हत्या प्रकरणात जामीन मिळवणारा आकाशदीप हा पहिला आरोपी ठरला आहे. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आकाशदीप सिंगला जामीन देताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाचा खटला पूर्ण होत […]
बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून 70 हून अधिक विद्यार्थी आजारी, अन्नात पाल पडल्याचा संशय
बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 70 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली आहे. साहुगढ येथील उत्क्रमित मध्य विद्यालय कारू टोला येथे हा प्रकार घडला. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारल्यानंतर संध्याकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. अन्नात पाल पडल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शाळा […]
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलण्यापासून रोखले जाते, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधक करत आहे. त्यातच सोमवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याने लोकसभेत गदारोळ […]
खासदार पप्पू यादव यांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना सध्या तरी दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे पप्पू यादव यांना सध्या पाटणा येथील बेऊर कारागृहातच राहावे लागणार आहे. काय आहे प्रकरण? खासदार पप्पू यादव यांना शुक्रवारी उशिरा रात्री पोलिसांनी अटक केली होती. ही कारवाई एका ३५ वर्षे […]
Sharad Pawar शरद पवार यांची तब्येत बिघडली, तातडीने पुण्यात आणले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ANI ने याबाबत वृत्त दिले आहे. NCP SCP chief Sharad Pawar is being taken to Ruby Hall Clinic Hospital in Pune from Baramati […]
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) लोकसभा सचिवालयाला कळवले आहे की पीएम केअर्स फंड, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) आणि राष्ट्रीय संरक्षण निधी (NDF) यांच्याशी संबंधित प्रश्न आणि विषय लोकसभेतील कामकाजाच्या नियमांनुसार ग्राह्य धरता येणार नाहीत. ही माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. 30 जानेवारी रोजी पंतप्रधान कार्यालयाने लोकसभा सचिवालयाला कळवले की […]
विरोधकांना बोलू दिलं नाही तर संसद चालवण्यात अर्थ काय? अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर यांचा सवाल
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असताना शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मी त्या विरोधकांचा भाग नाही,” मात्र संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याबद्दल त्यांनी सरकार आणि अध्यक्षांवर टीका केली. हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, “गेल्या 18 वर्षांत मी या सभागृहाला […]
विलेपार्ले येथील इमारतीच्या 13 व्या मजल्याला आग, एका महिलेचा मृत्यू
मुंबईतील विलेपार्ले पश्चिममधील सुविधा पर्ल इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत एका 63 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, एक महिला जखमी झाली आहे. #WATCH | Mumbai: Fire breaks out in Suvidha Pearl Building at Vile Parle, East Mumbai area. Dousing operation underway. More details awaited. pic.twitter.com/BdMu3i9KWU — ANI (@ANI) February […]
आयसीसी टी-20 वर्ल्डकपला शनिवारपासून सुरूवात झाली असून पहिल्या दोन दिवसात सहा सामने पार पडले. पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेतील प्रमुख संघांना लिंबूटिंबू समजणाऱ्या जाणाऱ्या संघांनी चांगलेच आव्हान दिले. एकीकडे ही स्पर्धा पुढे सरकत असताना दुसरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष 15 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मात्र पाकिस्तानने आता नरमाईची […]
अजित पवार यांच्या निधनानंतर केंद्र सरकारला जाग, 400 अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी सुरू
28 जानेवारी रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली असून देशभरातील 400 अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी सुरू केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने देशभरातील सुमारे 400 अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी सुरू केली आहे. या ठिकाणांसाठी एकसमान कार्यपद्धती आणि देखरेख यंत्रणा तयार करण्याची प्रक्रिया […]
Drink And Drive तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत लॅम्बॉर्गिनीने सहा जणांना उडवले
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये तंबाखू व्यावसायिक केके मिश्रा यांच्या मुलाने त्याच्या लॅम्बॉर्गिनीने सहा जणांना उडवले.शुभम मिश्रा असे त्याचे नाव असून हा अपघात झाला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणी पोलिसांनी गाडी जप्त केली असून सहा जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. VIDEO | UP businessman’s son ploughs speeding Lamborghini into people in Kanpur; six injured. […]
आईवडिलांसाठी वेळ द्यायला हवाच!
सचिनपिळगावकरयांचेमत: पुस्तकमहोत्सवातीलसुसंवादझालारंगतदार पणजी : आईविषयीच्या प्रेम आणि पालकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा भाव सचिन पिळगावकर यांनी अतिशय साध्या पण अर्थपूर्ण शब्दांत मांडला. ‘मी आजही रात्रीचं जेवण आईसोबतच घेतो. आपल्या पालकांना आपल्याकडून फार काही नको असतं, फक्त थोडासा वेळ हवा असतो. तोच वेळ नसेल तर जगण्यात अर्थ काय? असा प्रŽ त्यांनी उपस्थित केला. पालकांसाठी वेळ काढणं गरजेचं असल्याचं [...]
गोवा वाचविण्यासाठी न्या. रिबेलो यांचे विधेयक
न्या. गवई, न्या. ओकयांच्याकडूनपाठिंबाजाहीर पणजी : नगरनियोजन (टीसीपी) कायद्यातील कलम 17 (2) आणि 39 ए रद्द करून त्याद्वारे गोवा वाचवावा, अशी मागणी करण्यासंबंधी निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी विधेयक तयार केले आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे गोव्यात पर्यावरण आणि जमीन संरक्षणासाठी रिबेलो यांनी सुरू केलेल्या चळवळीला भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि सर्वोच्च [...]
आजही वाचनाची आवड असल्याचे सिद्ध
गोवापुस्तकमहोत्सवालाभरघोसप्रतिसाद: देशभरातीलसाहित्यिक, वाचकांचामहासंगम पणजी : कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून चालू असलेल्या गोवा पुस्तक महोत्सवाचा दिमाखात व उत्साही वातावरणात समारोप झाला. गोव्यासह देशाच्या विविध भागातून या महोत्सवात अनेक साहित्यिक व पुस्तकप्रेमींनी सहभाग घेतला. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. गोव्यात झालेला हा पहिलाच पुस्तक महोत्सव कमालीचा यशस्वी झाला असून त्यास [...]
होनग्याजवळमहामार्गओलांडतानाअज्ञातवाहनाचीधडक: वाहनाचाशोधसुरू बेळगाव : अज्ञातवाहनानेठोकरल्यानेमहामार्ग ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री होनग्याजवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अपघातानंतर अज्ञात गुड्स वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. निला सदाशिव कोरे (वय 43) राहणार मारुतीनगर, मणगुत्ती, तिची बहीण महादेवी अशोक नावलगी (वय 52) राहणार लक्ष्मी गल्ली, [...]
आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकपमध्ये वानखेडे मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात नेपाळला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही नेपाळचा खेळाडू नंदन यादव माध्यमांशी संवाद साधला. या सामन्यातून संघाने महत्त्वाचे धडे घेतल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, त्याने यावेळी हिंदुस्थानला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आवर्जून उल्लेख केला. सामन्यानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ‘दैनिक सामना’चे […]
मोटारसायकलवरून पडल्यानंतर बसने चिरडल्याने शिक्षिकेचा अंत
अम्मीनभावीनजीकशिरगुप्पीच्यामहिलेचाबळी बेळगाव : अम्मीनभावी, ता. हुक्केरीजवळ मोटारसायकलवरून पडल्यानंतर परिवहन मंडळाची बस अंगावरून गेल्याने शिरगुप्पी, ता. कागवाड येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून संकेश्वर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. सुवर्णा मल्लाप्पा मोने (वय 37) राहणार शिरगुप्पी, ता. कागवाड असे त्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. मोटारसायकलवरून बेळगावकडे येताना अम्मीनभावीजवळ सुवर्णा मोटारसायकलवरून [...]
विजापूरजिल्ह्यातीलबबलेश्वरजवळदुर्घटना: कारणअस्पष्ट वार्ताहर/विजापूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी चर्चेत असतानाच विजापूर जिह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजापूर जिह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळुरू गावात हे प्रशिक्षण विमान इंधन संपल्यामुळे किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळल्याची माहिती आहे. [...]
आधी मैत्रिणीला मारलं मग् स्वत:वर झाडली गोळी; लॉ कॉलेजमधील थरार कॅमेऱ्यात कैद
पंजाबच्या तरन तारमा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. उसमा गावातील माई भागो लॉ कॉलेजमध्ये तास (क्लास) सुरू होत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदात स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवले.या घटनेमुळे संपूर्ण कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
सीमावासियांची एकजूट हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामध्ये 67 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. सीमाप्रश्नाचा लढा आजही सुरू आहे. त्यामुळे सीमावासियांची अभेद्य एकजूट हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी [...]
निपाणीतील दोन चोरट्यांकडून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त
एपीएमसीपोलिसांचीकारवाई: पोलीसआयुक्तबोरसेयांचीमाहिती बेळगाव : निपाणी येथील दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी एपीएमसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तीन मोटारसायकली, दोन स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सैफअली शेरअली नगारजी (वय 25) राहणार दर्गा गल्ली, निपाणी, नेहान ऊर्फ अनिश मोहसीन मुजावर (वय 18) [...]
विरोधक लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत; विरोधकांची आक्रमक भूमिका
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. गदारोळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर करावा लागला. लोकसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून लोकसभा अध्यक्ष […]
शाळांमधून ‘हसत-खेळत शिक्षण’ ला ब्रेक
पालकवर्गातूननाराजी: सरकारीशाळांतूनयोजनासुरूठेवण्याचीमागणी बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमधून सुरू असलेली ‘नली-कली’ अर्थात ‘हसत- खेळत शिक्षण’ ही योजना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगत असले तरी या निर्णयाबद्दल पालकवर्गातून नाराजीचा सूर आहे. सरकारी शाळांमधून पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने 2009 पासून हसत-खेळत शिक्षण ही [...]
बेळगाव-बेंगळूर रेल्वेप्रवास आता अधिक सोयीचा
एक्स्प्रेसनिघणाररात्री10 वाजता बेळगाव : बेळगाव-बेंगळूर रेल्वे आता रात्री सव्वा नऊ ऐवजी रात्री दहा वाजता बेळगावमधून निघणार आहे. तसेच ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीखातर प्लॅटफॉर्म नं. 1 वरून धावू लागली आहे. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिलेल्या निवेदनाचा नैर्त्रुत्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस यापूर्वी रात्री सव्वा नऊ वाजता बेळगावमधून निघत होती. [...]
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत 15 दिवसांत 9 कोटी जमा, पाणी बिल वसुली जोरात
पाणी बिल थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांत प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ९९ लाख १४ हजारांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांच्या पाण्याच्या नळाचे कनेक्शन कापणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना […]
चौकटीपलीकडे जाऊन अनुभवाचा परिघ विस्तारा
संमेलनाध्यक्षा कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा महिलांना सल्ला : वरेरकर नाट्या संघ येथे आयोजन : मंथन सोसायटी आयोजित 39 वे महिला साहित्य संमेलन उत्साहात बेळगाव : स्त्रियांच्या कवितांमध्ये सामाजिक, साहित्यिक, राजकीय प्रतिबिंब अंशत: उमटले आहे. कारण, स्त्रियांचे अनुभवविश्व एका चौकटीत मर्यादित राहिले. त्यांनी जे अनुभवले तेच त्यांनी लिहिले. स्त्राr लेखनावर समाजाची एक प्रकारची अदृश्य सेन्सॉरशीप राहिली [...]
जिल्हाधिकारीमोहम्मदरोशन: जितोतर्फेदहावीविद्यार्थ्यांसाठीकरिअरमार्गदर्शन बेळगाव : जितो बेळगावच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात शिस्त अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी करिअरबद्दल माहिती दिली. पहिल्या सत्रात प्रोबेशनरी जिल्हाधिकारी अभिनव जैन यांनी ‘स्पर्धात्मक परीक्षांमध्ये करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी [...]
बेलकॉन प्रदर्शनाची तुफान गर्दीत सांगता
प्रदर्शनातदीडशेहूनअधिकस्टॉल: ‘विकासमंथन’मधूनबेळगावच्याविकासावरचर्चा बेळगाव : गृहनिर्माण क्षेत्राविषयीच्या उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या क्रिडाई-बेलकॉन प्रदर्शनाची रविवारी तुफान गर्दीमध्ये सांगता झाली. साप्ताहिक सुटी असल्यामुळे केवळ बेळगावच नाही तर आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी प्रदर्शनातील अनेक स्टॉलची मदत झाली. क्रिडाई बेळगावच्यावतीने 5 ते 8 फेब्रुवारीदरम्यान बेलकॉन प्रदर्शनाचे सीपीएड मैदानावर आयोजन करण्यात आले [...]
वडगाव स्मशानभूमीजवळ कचरा डंप, वर्गीकरण करण्यास रहिवाशांचा विरोध
महापालिकेनेलक्षदेण्याचीमागणी बेळगाव : वडगाव आणि परिसरातून घरोघरी जाऊन गोळा केलेला कचरा वडगाव येथील ओमकार नगर स्मशानभूमीच्या खुल्या जागेत डंप केला जातो. त्यानंतर त्याठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. पण यामुळे परिसरात कचरा निर्माण होण्यासह दुर्गंधी पसरत आहे. इतकेच नव्हेतर भटक्या कुत्र्यांचा उपद्व्यापही वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी शनिवारी सदर ठिकाणी येणारी वाहने रोखून कचरा टाकण्यास विरोध [...]
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कलखांब येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
वार्ताहर/सांबरा कलखांब (ता. बेळगाव) येथे शुक्रवार दि. 6 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. गोकाक रोड ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत पेव्हर्स बसविण्यासाठी वीस लाख रुपये, मराठी शाळेच्या तीन खोल्यांसाठी 54 लाख रुपये, कन्नड शाळेच्या दोन खोल्यांसाठी 36 लाख [...]
Photo –अभिनेता विशाल निकमने अभिनेत्री अक्षया सोबत केला साखरपुडा
प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम याने त्यांची गर्लफ्रेंड अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याला अक्षयाने हिरव्या रंगाचा शालू नेसला होता. तर विशालने नारंगी रंगाची शेरवाणी घातलेली.
शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच विकासकामांना प्रोत्साहन
छत्रपतीशिवाजीमहाराजमूर्तीप्रतिष्ठापनासोहळ्यातमंत्रीलक्ष्मीहेब्बाळकरयांचेगौरवोद्गार वार्ताहर/हिंडलगा आंबेवाडी येथील शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील सायंकाळच्या सत्रात पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी युवा नेतृत्व मृणाल हेब्बाळकर,काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह ग्रा. पं. आंबेवाडीचे उपाध्यक्ष आनंद तुडयेकर, उद्योजक भूजंग ढोपे, सुनील राक्षे, रमेश रेडेकर, माधुरी तेरसे, जयवंत बाळेकुंद्री, तानाजी अतिवाडकर आदी मान्यवर [...]
Live – ZP, Panchayat smaiti Result –नागोठणे, खालापूरमध्ये मशाल धगधगली
शिवसेना सोडून अजित पवार गटात गेलेले नागोठणे जिल्हापरिषद गटाचे उमेदवार किशोर जैन यांचा पराभव नागोठणेत मशाल धगधगली नागोठणे सुकेळी पंचायत समिती – नागोठणे (सुकेळी) पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अरुणा जानू हंबीर या ५५४० मते मिळवून विजयी खालापूरमध्ये मशाल धगधगली चौक पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कमल भस्मा यांचा विजयी […]
महापौरांनी आयुक्तांना बजावले, ‘त्या’१४ गावांच्या विकासाचा भुर्दंड नवी मुंबईवर टाकू नका
नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांचा विकास करण्यासाठी महापालिका सक्षम आहे. मात्र त्यासाठी लागणारा निधी हा मोठा आहे. या गावांच्या विकासाचा भुर्दंड नवी मुंबईकरांवर पडू नये यासाठी आवश्यक असलेला विकास निधी मिळवण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी पहिल्याच बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे १४ […]
दिल्लीतील 9 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने ईमेल आल्याने खळबळ
दिल्लीतील नऊ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास हे धमकीचे मेल शाळांना मिळाले. लॉरेटो कॉन्व्हेंट, केंब्रिज स्कूल आणि बाल भारती यांसारख्या प्रमुख शाळांचा यात समावेश आहे. धमकीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू […]
नवी मुंबईत पोलिसांच्या जागा 527; अर्ज 50 हजार; बुधवारपासून मैदानी चाचणी
नवी मुंबई पोलीस दलातील शिपाई भरतीवर राज्यभरातून उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. ५२७ शिपयांची पदे रिक्त असून त्यासाठी ५० हजार ४६० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेत उमेदवारांना ५० गुणांची मैदानी चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी येत्या ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात होणार आहे. […]
माजी भाजप आमदाराच्या घरी झाली एसीची चोरी अन् रंगले राजकारण; जाणून घ्या रंगतदार चर्चा…
राजकारणात टीका, प्रतिटीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र, हे सर्व फक्त निवडणुकीपुरते असते. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे जनतेसाठी काम करणे लोकशाहीत अपेक्षित असते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्ये माजी भाजप आमदाराच्या घरी चोरी झाली. चोराने आमदाराच्या घराबाहेरील एसीचे युनीट चोरून नेले. या एसी चोरीवरून मध्य प्रदेशात राजकारण रंगले आहे. मध्य प्रदेशातील शेवपूर येथील काँग्रेस आमदार […]
भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची व समुद्रातील भरावाची कामे हाती घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाने जेएनपीएला बजावले होते. पण या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे येथील भूमिपुत्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पुन्हा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. वाढवण बंदर संघर्ष कृती […]
दारू पिऊन तर्राट असलेल्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने शनिवारी सायंकाळी करावे गाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. दारूच्या नशेत त्याने इनोव्हा कार सुसाट चालवून चार वाहनांना जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची एकच पळापळ उडाली. नागरिकांनी या पोलीस अधिकाऱ्याला कारमधून बाहेर काढून त्याची जोरदार धुलाई केली आणि त्याला एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने […]
>> महेंद्र पवार निसर्गरम्य डहाणूच्या समुद्रातील ‘धवल लक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने हजारो किमीचा प्रवास करीत अखेर ओमानचा समुद्र गाठला आहे. या कासवावर डहाणूतील वन्यप्रेमींनी व तज्ज्ञ अभ्यासकांनी सॅ टेलाइट टॅग लावल्यामुळे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. खोल समुद्रातील पर्यावरण, हालचाली, वनस्पती व अन्य बाबींचा अभ्यास करता येणार असून वन्यप्रेमी व अभ्यासकांना […]
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी रविवारी जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले. या दौऱयात त्यांनी सुभेदार परवेझ यांची भेट घेतली. लष्करप्रमुखांनी कार थांबवली आणि घरात जाऊन सुभेदार परवेझ (निवृत्त) यांची गळाभेट घेतली. ही ग्रेट भेट चर्चेत आली आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि कश्मीरमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी पूंछ जिल्ह्यातील काही विभागांना भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या सैन्याच्या ऑपरेशनल […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शेजारी बसलेल्या अनेक व्यक्ती देशविरोधी कृत्यात सहभागी झालेल्या आहेत. भाजप-संघाची राष्ट्रभक्ती ढोंग आणि पाखंड आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. संजय […]
कारवाईसाठी आरटीओची चार विशेष भरारी पथके, पनवेलमधील बेशिस्त रिक्षाचालकांना ‘ब्रेक
प्रवाशांची लूट व अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईसाठी आरटीओने चार विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पनवेल, खारघर आणि मानसरोवर परिसरातील गर्दीच्या स्थानकांवर ही पथके तैनात करण्यात येणार असून ते रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना ‘ब्रेक’ लागणार आहे. […]
Gold Silver Rate –सोने चांदीच्या दरात वाढ; तरीही खरेदीसाठी सुवर्णसंधी, उच्चांकापेक्षा अजूनही स्वस्त
गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दराने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. सोनेचांदी गेल्या आठवड्यात स्वस्त झाले होते. मात्र, शुक्रवारपासून सोनेचांदीचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी वायदे बाजार सुरू होताच सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरण थांबली. बाजार उघडताच दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून आली. मात्र, अजूनही सोनेचांदी त्यांच्या उच्चांकापासून स्वस्त असल्याने खरदी करण्यासाठी अजूनही चांगली संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी […]
खोटे सोने तारण ठेवले, आई निवडणूक लढवत असल्याचे सांगत सराफाला २८ लाखांचा गंडा
आई बदलापूरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीला उभी आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून भामट्याने सराफाला २८ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण पाटील असे भामट्याने नाव असून त्याने खोटे सोन्याचे दागिने तारण ठेवून अपहार केला. याप्रकरणी सराफ तरुण पोरीया याच्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी प्रवीण पाटील व त्याचा साथीदार रुपेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुण […]
शिळफाटा येथील खान कंपाऊंडमधील डबक्यात एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. कशफ खान असे या चिमुकलीचे नाव असून ती आशना हाईट्समध्ये राहते. तिचा मृतदेह सापडल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात की घातपात याचा तपास शीळ-डायघर पोलीस करत आहेत. खान कंपाऊंडच्या मागे असलेल्या डबक्यात सकाळी कशफचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत […]
‘हेअरकट’मध्ये चूक केली…महिलेला 25 लाखांची भरपाई
महिला म्हटले की सौंदर्याचा विषय येतोच. आपण सुंदर कसे दिसू याची नियमित काळजी महिला घेतात. सौंदर्य जपण्यात कुठलीही हयगय न करणाऱया महिला असतात. अशाच एका महिलेने हेअरकट आवडला नाही म्हणून सलून कंपनीविरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगापर्यंत कायदेशीर लढा दिला. आयोगाने तिला 2 कोटींची भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाला सलूनचे व्यवस्थापन हाताळणाऱया आयटीसी लिमिटेड […]
Share Market News –शेअर बाजार तेजीत, गुंतवणुकदारांचा उत्साह; नवे उच्चांक गाठण्याची शक्यता
हिंदुस्थान- अमेरिका व्यापार करार झाल्यानंतर शेअर बाजारातील मरगळ आणि दबाव दूर झाला आणि गेल्या आठवड्यात दोन दिवस बाजाराने चांगली तेजी दाखवली. मात्र, त्यानंतर आयटी सेक्टरवरील दबाब वाढला आणि पुन्हा बाजारात मंदी जाणवत होती. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांनी चांगलाच उत्साह दाखवला असून त्यामुळे शेअर बाजार चांगलाच तेजीत आला आहे. सोमवारी शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच […]
वृद्धांना गोड बोलून त्यांची संपत्ती नावावर करून घेण्याची अनेक प्रकरणे आजवर समोर आली आहेत. कर्नाटकमध्येही असेच एक प्रकरण घडले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने 84 वर्षीय व्यक्तीला दिलासा देत त्यांनी मुलींना केलेले गिफ्ट डीड रद्द केले आहे. मुलींना वडिलांकडून मालमत्ता मिळताच त्यांनी वृद्धाला वाऱयावर सोडले होते. वृद्धाला अन्न, निवारा आणि इतर गरजा पुरविण्यात असमर्थता दाखविल्यामुळे न्यायालयाने […]
हिमनदी बनली त्सुनामी, 93 लाख लोकांच्या जिवाला धोका
हिमालयातील बर्फाचा धोका वाढला असून हिमनदी त्सुनामी बनत चालली आहे. याने मोठी जीवित हानी होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. त्सुनामीचे केंद्रस्थान नेहमीच समुद्र राहिला आहे. मात्र पहिल्यांच नदीतून महात्सुनामी येणार असल्याचे भाकीत आहे. या महात्सुनामीने तब्बल 93 लाख लोकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये या हिमालयून त्सुनामीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. रवींद्र […]
…तर हिंदुस्थानला उत्तर देऊ! मोहसीन नक्वी यांची दर्पोक्ती,पाकड्यांचे शेपूट वाकडेच!
पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये शिया मशिदीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. या हल्ल्यांसाठी हिंदुस्थानला जबाबदार धरत आम्ही हिंदुस्थानला उत्तर देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केली आहे. इस्लामाबादच्या तुर्लाई कलान परिसरातील खादीजा तुल कुबरा मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान […]
‘सर्वम व्हिजन’चा डंका, हिंदुस्थानचे पहिले स्वदेशी एआय मॉडेल, जगाचे लक्ष
एआय तंत्रज्ञानाची जगभरात व्रेझ आहे. हिंदुस्थानही एआयच्या वापरात मागे नाही. हिंदुस्थानने पहिले स्वदेशी एआय मॉडेल विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. हे बहुभाषिक एआय मॉडेल ‘सर्वम व्हिजन’ आता चांगले परिणाम दाखवत आहे. या टेक्स्ट टू स्पीच मॉडेलला जागतिक स्तरावर प्रशंसा मिळत आहे. पेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘सर्वम व्हिजन’ या पहिल्या स्वदेशी एआय मॉडेलविषयी आज ट्विट […]
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा माझ्यासमोरच झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण व्हावे यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, असा दावा आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांनी केला होता. त्यात अभिनेते सयाजी शिंदे यांची आज भर पडली. राष्ट्रवादीचे एकत्रिकरण हे अजितदादांचे स्वप्न होते, आमच्या समोरच त्यासंदर्भात चर्चा झाली होती, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे अशी भावना एका वृत्तवाहिनीशी […]
दिवसा रुग्णसेवा अन् रात्री यूपीएससीची तयारी, डॉ. अक्षिता गुप्ताची प्रेरणादायी कहाणी
स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर मेहनतीला शिस्तीची आणि आत्मविश्वासाची जोड हवी. डॉ. अक्षिता गुप्ताच्या कहाणीतून हीच प्रेरणा मिळते. हरयाणाची डॉ. अक्षिता गुप्ता यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 69 वा रँक मिळवून यशस्वी झाली. पंचकुला येथे राहणाऱया अक्षिता चंदिगड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस करत होती, तेव्हापासून तिने यूपीएससीची तयारी सुरू केली होती. हॉस्पिटलमध्ये काम करताना ती […]
रशियातील चाकू हल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थी जखमी
रशियाच्या बाशकोर्तोस्तान प्रजासत्ताकातील एका विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शनिवारी चाकू हल्ला झाला. या चाकू हल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले, अशी माहिती मॉस्कोमधील हिंदुस्थानी दूतावासाने दिली. या घटनेत दोन पोलीसही जखमी झाले. बाशकोर्तोस्तानची राजधानी उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात हा हल्ला झाला. रशियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकू घेऊन सज्ज असलेल्या […]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्यापार करार कोणत्यातरी अनामिक भीतीपोटी केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. कलेत जगभरात धुमाकूळ घातलेल्या एपस्टिन फाईल्समध्येही मोदींचे नाव आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. […]
झोपडपट्ट्यातील शौचालयांची रोजच्या रोज सफाई करा, हायकोर्टाचे महापालिकेला महत्त्वपूर्ण आदेश
मुंबईतील सर्व झोपडपट्टीतील शौचालयांची दररोज सफाई करा. तेथे स्वच्छता ठेवली जात आहे की नाही याची शहानिशा करा, असे महत्त्वपूर्ण आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले. झोपडपट्टय़ांमधील शौचालयांची सफाई व तेथील स्वच्छतेचा रेकॉर्ड ठेवण्याची व यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सहायक महापालिका आयुक्तांची असेल. एखादे शौचालय मोडकळीस आले असल्यास त्याची दुरुस्ती पालिकेने करावी. झोपडपट्टीतील शौचालये स्वच्छ […]
मंदिरातील भंडारा खाऊन परतणाऱ्या 9 मुलींना भरधाव कारने उडविले; चौघींचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी
उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यात निर्माणाधीन गंगा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री भरधाव कारने पायी चाललेल्या नऊ मुलींना उडवले. यात 4 मुलींचा मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगतपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या चुली गावाजवळ हा अपघात झाला. चुली गावात काही दिवसांपूर्वीच उभारण्यात आलेल्या […]

25 C