पश्चिम बंगालमध्ये सत्तेची हॅट्ट्रिक गाठल्यानंतर आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी टीएमसी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आपली पहिली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 291 उमेदवारांची नावे जाहीर केले असून यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही नावाचा समावेश आहे. त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने या जागेवर […]
बाहुबलीची ‘देवसेना’बोहल्यावर चढणार? अनुष्का शेट्टीच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुष्काच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, जी आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. वयाच्या 44 व्या वर्षी अनुष्काने लग्नाचा निर्णय घेतला असून ती एका प्रतिष्ठित व्यावसायिकासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. अनुष्का शेट्टीचे नाव गेल्या […]
“विकास की विनाश?” ; स्फोटांनी हादरले विलवडे गाव
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप ; छेडले जोरदार आंदोलन सावंतवाडी । प्रतिनिधी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेले सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गाव सध्या अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जगत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या क्रशर आणि क्वारीच्या कामांमुळे ग्रामस्थांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. दिवस-रात्र सुरू असलेले स्फोट, कानठळ्या बसवणारा आवाज आणि हवेत पसरलेली धूळ यामुळे गावातील प्रत्येक कुटुंब त्रस्त झाले [...]
Kolhapur News |महागाईचा ‘रडार’आता गावागावात; इंधन आणि खतांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना भीती
युद्ध दूर देशात… पण महागाईचा फटका गावागावात कळंबा (सागर पाटील ) : जगाच्या एका टोकाला सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम थेट भारतासह अनेक देशांवर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू [...]
नोरा फतेही-संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’या अश्लील गाण्यावर कारवाई, हिंदी गाणे यूट्यूबवरुन हटवले
नोरा फतेहीचे ‘सरके चुनर तेरी…’ हे आयटम साँग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहे. संजय दत्तच्या पॅन-इंडिया चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’मधील या गाण्याने चित्रपट आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोध आणि टीकेनंतर, निर्मात्यांनी अधिकृतपणे यूट्यूबवरून गाण्याची हिंदी आवृत्ती काढून टाकली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे इतर भाषांमध्ये अजूनही यूट्यूबवर उपलब्ध […]
भूमध्य समुद्रात रशियन तेल टँकर भरकटले, सागरी अधिकाऱ्यांकडून धोक्याचा इशारा
इटली आणि माल्टा दरम्यान भूमध्य समुद्रात एक रशियन तेल टँकर भरकटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांशिवाय हे भरकटत असून याबाबत सागरी अधिकाऱ्यांनी इशारा जारी केला आहे. या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन आणि वायू असल्याने याला पर्यावरणाचा ‘टाइम बॉम्ब’ म्हटले जात आहे. याचा कोणत्याही क्षणी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या दृश्यात या जहाजाचा […]
2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’
धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2020 हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीबाबतच्या पीक विमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 16 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कोणताही अंतिम निर्णय न देता पुढील सुनावणी 23 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विमा रकमेकरिता पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीकडून अत्यल्प रक्कम वितरित करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती रक्कम देण्याचे निर्देश दिले होते; परंतु आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले. प्रथम उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते. त्या अनुषंगाने सुमारे 376 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अजूनही अंदाजे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. विमा कंपनीने निकालाला आव्हान देत पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यावर 24 नोव्हेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 24 जानेवारी 2026 पर्यंत प्रलंबित रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले होते. तरीही निधी वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. विमा कंपनीने यापूर्वी 75 कोटी रुपये न्यायालयात जमा केले होते. त्या रकमेवरील सुमारे 17 कोटी रुपये व्याजासह एकूण 92.93 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून विमा कंपनीला देय असलेले 134 कोटी रुपये 11 फेब्रुवारी रोजी वर्ग केल्याचे पत्र देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष जमा होण्यात विलंब झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. विशेष म्हणजे, या 134 कोटी रुपयांवर कोणतीही स्थगिती नसताना त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. सुनावणी पुन्हा लांबल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “तारीख पे तारीख” अशी स्थिती निर्माण झाल्याने आता 23 मार्चच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अपघाती मृत्यू झालेल्याच्या वारसास 10 लाखाची मदत
मुरूम (प्रतिनिधी)- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मुरूम येथील उत्पादन विभागात कामावर असलेले कर्मचारी कै.महादेव शिवप्पा लामजने यांचे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे वारस पत्नी श्रीमती रेखाबाई महादेव लामजने यांना श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडून 10लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, चीप अकाउंटंट देशमुख, शरणप्पा कबाडे,संजय आमाशेट्टे ,केन अकाउंटंट राजेंद्र पाटील, सहाय्यक इंजिनिअर हेंडले, आदी उपस्थित होते.
शिक्षण घेतानाच उद्योगातील कौशल्य आत्मसात करावे- उद्योजक देशमाने
धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण घेतानाच उद्योगातील कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन उद्योजक संजय देशमाने यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथे व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या वतीने पी. एम. उषा अंतर्गत उद्योगातील आणि शिक्षण क्षेत्रातील अंतर कमी कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करताना आवश्यक कौशल्य मिळण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उप परिसर संचालक डॉ. रमेश चौगुले होते. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी विभागाचा प्रवास आणि भविष्यातील व्हिजन मांडले. कार्यशाळा समन्वयक डॉ. सचिन बस्सैये आणि डॉ. विक्रम शिंदे उपस्थित होते. प्रथम सत्रात नांदेड येथील डॉ. सचिन पवार यांनी उद्योगातील कौशल्य यावरती मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात धनंजय गोडबोले यांनी गुंतवणूक क्षेत्रातील संधी बाबत मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात एम. आय. टी. विद्यापीठातील डॉ. स्नेहल गोडबोले यांनी उद्योगातील मनुष्यबळ विकास आणि नवीन ट्रेंड बद्दल मार्गदर्शन केले. समारोपाला सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक प्रा. शीतलनाथ एखंडे, प्रा. शरद सावंत, प्रा. भाग्यश्री कुलकर्णी, प्रा. पुजा होणाळकर, विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळा ही विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता प्रा. डॉ. विना हुंबे, संचालक प्रा. डॉ. अभिजित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत वैष्णवी तांडेलचे सुयश
मालवण । प्रतिनिधी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी जयेश तांडेल हिने 160 गुणांसह सुवर्णपदक संपादन केले.वैष्णवी ही वीज वितरण कुडाळ येथे उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले श्री.जयेश विद्याधर तांडेल यांची कन्या आहे. वैष्णवीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, [...]
विद्यापीठ - उद्योग समिट 2026 उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथे व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या वतीने “विद्यापीठ - उद्योग समिट 2026“ चे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षीही इंडस्ट्रीमधील विविध थीम वरती याचे आयोजन केले जाते. या वर्षी “इन्शुरन्स“ या थीम वरती समिट घेण्यात आली. उद्घाटन तेरणा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. डी. बी. मोरे यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपपरिसर संचालक डॉ. रमेश चौगुले होते. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, डॉ. सचिन बस्सैये उपस्थित होते. पुढील सत्रात एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्सचे प्रसाद कस्तुरे, एल. आय. सी. चे ए. के. सय्यद आणि टाटा ए. आय. जी. चे पीयूष वेदलंकार यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात प्रश्न आणि उत्तरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सदर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक प्रा. शीतलनाथ एखंडे, प्रा. शरद सावंत, प्रा. भाग्यश्री कुलकर्णी, प्रा. पुजा होणाळकर, विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सदर विद्यापीठ - उद्योग समिट हा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता प्रा. डॉ. विना हुंबे, संचालक प्रा. डॉ. अभिजित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करा- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय पोषण आहारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी शिवाय याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत शिक्षण मंत्र्यांकडे केली. यावर शिक्षण मंत्री यांनी सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना ही राज्यामध्ये राबवली जात आहे. मात्र हिरवा वाटण्या ऐवजी पांढरा वाटाणा वितरित करून यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जवळपास दोन्ही वाटाण्यामध्ये शंभर रुपयाचा किलोमागे फरक येत आहे. त्यामुळे याच्या गैरव्यवहाराची रक्कम मोठी आहे. अत्यंत शांत डोक्याने अधिकारी व पुरवठादार यांच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या लक्षवेधी मध्ये सांगितले. निविदेमध्ये हिरवा वाटाणा व कार्यारंभ आदेश देताना फक्त वाटाणा असा उल्लेख केला आहे. मात्र वितरित करताना पांढरा वाटाणा देण्यात आला. हिरवा वाटाणा याची किंमत पांढरा वाटण्याला लावून हा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी असा प्रकार झाला असल्याचे मान्य केले व त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे मोघम उत्तर दिले. त्यावर आमदार कैलास पाटील आक्रमक होऊन मी स्वतः याची तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या संदर्भात आत्तापर्यंत काय कार्यवाही केली याची विचारणा केली. पुरवठादार हे सरकारचे जावई आहेत का त्यांना पाठीशी घालण्याचे कारण काय अशी प्रश्नांची सरबत्ती केल्याने काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार झाले. हे पाहताच दादा भुसे यांनी नरमाईची भूमिका घेत पहिल्यांदा आयुक्तांमार्फत व नंतर सचिवांमार्फत चौकशी करण्याची ग्वाही दिली. आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरत चौकशी करण्यास भाग पाडले.
राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथील एका पर्यटन स्थळाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पांढऱ्याशुभ्र बर्फासारख्या दिसणाऱ्या या ठिकाणाला पर्यटक ‘स्नो यार्ड’ समजून तिथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र, हा दिसणारा पांढरा थर बर्फ नसून अत्यंत विषारी रासायनिक कचरा असल्याचे समोर आले आहे. यामुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा इशारा दिला आहे. […]
“संस्कार” जीवन घडवणारी मूल्य व्यवस्था - डॉ. शहाजी चंदनशिवे
परंडा (प्रतिनिधी)- “संस्कार” हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संस्कार म्हणजे व्यक्तीच्या विचारांवर, वर्तनावर आणि जीवनशैलीवर होणारा सकारात्मक प्रभाव. माणूस जन्मतः काही गुण घेऊन येतो, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देणारे घटक म्हणजे संस्कार होय. भारतीय परंपरेनुसार, संस्कारांची सुरुवात कुटुंबातून होते.आई-वडील हे मुलाचे पहिले गुरु असतात. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम, शिस्त, आदर आणि नैतिक मूल्ये मुलाच्या आयुष्याची पायाभरणी करतात. “जशी संगत तसा रंग” या उक्तीनुसार, मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्यावर खोल परिणाम होत असतो. त्यामुळे चांगले संस्कार देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. संस्कार केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसतात. शाळा, समाज आणि शिक्षक यांचाही त्यामध्ये मोठा वाटा असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाहीत, तर त्यांना प्रामाणिकपणा, सहकार्य, शिस्त आणि जबाबदारी यांसारखी मूल्येही शिकवतात. समाजातील चांगले आचार-विचार, परंपरा आणि सण-उत्सव यांमधूनही संस्कार घडत जातात. संस्कारांचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो.चांगले संस्कार असलेली व्यक्ती प्रामाणिक, संयमी आणि समाजाभिमुख असते.ती आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून समाजाच्या विकासासाठी योगदान देते. उलट, वाईट संस्कार असलेली व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाऊ शकते. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात संस्कारांचे महत्त्व अधिक वाढले आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मुलांवर विविध प्रकारचे परिणाम होत आहेत. त्यामुळे योग्य दिशादर्शन आणि संस्कारांची गरज अधिक भासते. आधुनिक शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचे शिक्षण देणेही अत्यंत आवश्यक आहे. शेवटी, “संस्कार” हे व्यक्तीचे खरे धन आहे. तेच त्याला जीवनात योग्य दिशा देतात आणि एक आदर्श नागरिक बनवतात. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले संस्कार जोपासले पाहिजेत आणि पुढील पिढीपर्यंत ते पोहोचवले पाहिजेत.
मातंग समाजासाठी ऐतिहासिक निर्णय
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शासकीय दुध डेअरी येथील एक एकर जागेचा ताबा नगरपरिषद धाराशिव कडे सोपवण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर. लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटीलयांच्या अथक प्रयत्नामुळे मातंग समाजाची 40 वर्षापासून प्रलंबित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंबंधीची मागणी मंजूर. शासकीय दुध डेअरीची एक एकर जमीन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, धाराशिव येथे उभारण्यासंदर्भात लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे महायुती सरकारने शासकीय दुग्ध डेअरीची एक एकर जागा ज्याची शासकीय किंमत 2 कोटी 08 लाख रुपये असून ही रक्कम नगरपरिषद धाराशिव यांनी महाराष्ट्र शासनाला देणे अपेक्षित होते. परंतु नगरपरिषद धाराशिव यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लोकनायक राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी ही जागा शासनाकडून मोफत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे सातत्यपूर्ण प्रयत्न करून ही जागा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी विनामूल्य स्वरूपात मिळवून घेतली आहे.
गॅस व पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासन व संबंधित कंपन्यांकडून राज्यात एलपीजी गॅस तसेच पेट्रोल -डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असून पुरेसा साठा उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच गॅस सिलेंडर बुकिंग करावे. तसेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावी. गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. गॅस सिलेंडरचे वितरण नियमानुसार व बुकिंगनुसार केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पेट्रोल पंपांवर घाईगडबडीत रांगा लावणे किंवा मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवणे टाळावे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी शांतता व शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
जिल्ह्याला रस्ते आणि पुलांसाठी 62 कोटी- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात धाराशिव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातील विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसह नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल 62 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. परंडा, कळंब, तुळजापूरसह सर्वच तालुक्यांतील दळणवळण सुसाट होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातून.जाणाऱ्या राज्य महामार्गांचा कायापालट करण्यासाठी 28 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा राज्यमार्गांच्या सुधारणेसाठी 28 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने परंडा आणि कळंब तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. तर परंडा तालुक्यातील महारटाकळी-पाटोदा-भूम-वारदवाडी या राज्यमार्ग क्र. 62 वरील मोठ्या पुलाचे बांधकाम आणि रस्ता सुधारणेसाठीही मोठा निधी मिळाला आहे. कळंब तालुक्यात राज्यमार्ग-52 ते कळंब-लातूर या राज्यमार्ग क्र. 236 च्या सुमारे 14 किलो मीटर अंतराच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर धाराशिव तालुक्यात राज्य मार्ग-211 ते उपळा-तेर-जागजी या राज्यमार्ग क्र. 239 च्या सुधारणेचे कामही मार्गी लागणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. धाराशिव जिल्ह्यातील राज्य मार्गांसोबतच जिल्हा मार्गांसाठीही 34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून विविध जिल्हा मार्गावर पुलांचे जाळे विणले जाणार आहे. प्रमुख जिल्हा मार्गांच्या एकूण 9 कामांसाठी 34 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या निधीतून अनेक ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. तेर-डकवाडी-काजळा या मार्गावरील काजळा गावाजवळ आणि कोळेवाडीजवळ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तुळजापूर-धाराशिवसह तावरजखेडा, बेंबळी, आरणी आणि अणदूर परिसरातील तब्बल 86 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग मिळणार आहे. भूम तालुक्यात गिरवली-ईट-पाथु्रड-वालवड रस्ता क्र. 9 वरील वालवड येथे नवीन लहान पूल उभारला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
PNG वापर वाढवण्यावर भर, एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे आवाहन
एलपीजी (गॅस) तुटवड्याबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधनाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले असून पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वापर वाढवण्यावर भर दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सध्या घरगुती PNG आणि CNG ग्राहकांना पूर्ण पुरवठा होत आहे. तसेच व्यावसायिक एलपीजी विक्रीही काही प्रमाणात […]
सरपंच सेवा संघाची नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींना भेट
ग्रामपंचायतींच्या समस्यांवर केली चर्चा मालवण । प्रतिनिधी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सेवा संघ मालवण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण व उपसभापती घनश्याम झाड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या समस्या मांडत त्या तातडीने सोडवण्याची मागणी सरपंचांनी केली.या बैठकीत मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या [...]
इराणला मोठा धक्का, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुरक्षा प्रमुख अली लारिजानी ठार
इराणच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख सूत्रधार आणि सध्याच्या संघर्षात तेहरानचा महत्त्वाचा चेहरा मानले जाणारे अली लारिजानी यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी मंगळवारी दिली. या घटनेमुळे आधीच कमकुवत झालेल्या इराणी नेतृत्वाला आणखी मोठा धक्का बसला आहे. यापूर्वीच संघर्षाच्या पहिल्याच दिवशी (28 फेब्रुवारी) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू […]
LPG Gas Shortage –अक्षय कुमारच्या घरातही LPG गॅसचा तुटवडा? पत्नीने मागवले दोन इंडक्शन
आखातातील युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर दिसू लागले असून हिंदुस्थानलाही याचा मोठा फटका बसला आहे. सध्या देशात एलपीजी गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. लोक अक्षरश: दिवसदिवसभर गॅस सिलिंडरसाठी वणवण करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण यामुळे त्रस्त आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यालाही या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या […]
इंग्लंडमध्ये मेंदुज्वराचा प्रादुर्भाव; कॅन्टरबरीमध्ये एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू
केंटमधील कॅन्टरबरी येथे मेंदुज्वराचा (Meningitis) प्रादुर्भाव झाला आहे. मेंदुज्वरामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ केंट’ने विद्यार्थ्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या अहवालानुसार, या संसर्गाचा संबंध शहरातील ‘क्लब केमिस्ट्री’ या नाईट क्लबशी जोडला जात आहे. ज्यांनी 5, 6 किंवा 7 मार्च रोजी या क्लबला भेट […]
Solapur News |जय हिंद चौकात थरार! किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सळईचा वार
सोलापूर पोलिसांची तातडीने कारवाई सोलापूर – कुमठे गावाच्या परिसरातील जय हिंद चौकात तरुणास लोखंडी सळईने मारहाण करणाऱ्या चौघांबर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सर्वेश लक्ष्मण शास्त्रे (वय २९, रा. कुमठे गाव, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन सुमित [...]
मध्यवर्ती म.ए.समितीचा बुलंद आवाज हरपला, दिपक दळवी यांचे निधन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चळवळीतील मराठी भाषिकांच्या आवाज मध्यवर्ती तसेच शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक अर्जूनराव दळवी यांचे आज निधन झाले.मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगांव येथे टिळकवाडितील रहात्या घरी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समीतीची अपरिमित हानी झाली असून सीमाभाग दुखःसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे […]
Pandharpur |पंढरपूर सराफ लूट प्रकरणाचा छडा! ‘थार’ने धडक देऊन लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या
पंढरपुरात दोन आरोपी गजाआड पंढरपूर – पंढरपूर येथील सराफी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार आणि गुन्ह्यात बापरलेली पांढऱ्या रंगाची थार जीप लवकरच जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती पंढरपूर [...]
पोलिसांना धक्काबुक्की करणार्या दोघा तरुणांची निर्दोष मुक्तता करीत मुंबई सत्र न्यायालयाने सरकारी पक्ष आणि मुंबई पोलिसांना चपराक लगावली. जोपर्यंत एखाद्या गुन्ह्याच्या खटल्यात स्वतंत्र पुरावे उपलब्ध नसतील, तर केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबावर विसंबून कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोपींचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला आणि दोन आरोपी तरुणांची […]
Tv इंडस्ट्रीत अभिनय नाही तर ‘कुंडली’पाहून काम मिळतं; अभिनेत्री फलक नाझचा निर्मात्यावर खळबळजनक आरोप
मनोरंजन विश्वात कास्टिंगच्या पद्धतीवरून नेहमीच काहीना काही वाद झाल्याचे आपण ऐकले असेल. एखाद्या कलाकाराची मनोरंजन विश्वात निवड होण्यासाठी त्याच्या अभिनय पाहिला जातो, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र आता एका अभिनेत्रीने केलेल्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ फेम अभिनेत्री फलक नाझ हिने टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फलकच्या […]
सांगलीत परीक्षा केंद्रात कॉपीप्रकरणी योग्य ती कारवाई सुरु सांगली – दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १०० टक्के कॉपीमुक्ती करण्याच्या मोहिम सोमवारी खंडीत झाल्याचे स्पष्ट झाले. बाणिज्य पेपरमध्ये कॉपी करताना पथकाने एकाला पडले असून संबधित परीक्षार्थीवर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली [...]
धक्कादायक! पिस्तुल लोड केले आणि छातीवर रोखून स्वतःवरच गोळी झाडली, तरुणाने संपवले जीवन
सोशल मीडियासाठी काहीतरी वेगळे आणि थ्रिलिंग व्हिडिओ बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात एका 28 वर्षीय तरुणाने व्हिडिओ बनवताना स्वतःच्याच छातीवर लोडेड पिस्तूल ताणली आणि अचानक गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला. पवन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना 16 मार्च रोजी […]
Mumbai News –लाच घेताना वरिष्ठ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, पोलीस दलात खळबळ
लाचलुचपत विभागाने सहाय्य पोलीस निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकले. तुषार काळे असे लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो खार पोलीस ठाण्यात कार्यरत होता. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काळे याला एसीबीने अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. एका प्रॉपर्टीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने चौकशी अहवाल देण्यासाठी तुषार काळेने तीन लाख रुपयांची […]
लोकसभेत निलंबित 8 खासदारांना दिलासा, सर्वानुमते निलंबन रद्द
लोकसभेत कागद फाडून फेकण्याच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सात खासदारांसह एकूण आठ विरोधी खासदारांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आवाजी मतदानाने मंजूर झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तत्काळ प्रभावाने निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली. मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर अध्यक्षांनी हा प्रस्ताव मांडण्यास […]
समितीचे खंबीर नेतृत्व दीपक दळवी काळाच्या पडद्याआड
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तसेच सीमालढ्यातील ज्येष्ठ आणि आदरणीय नेते दीपक दळवी (वय ८४) यांचे आज मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ७.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत दीपक दळवी यांनी आयुष्यभर सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निःस्वार्थपणे संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीला नवे [...]
ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना महिन्याभरानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना रुग्णालयातून मंगळवार (17 मार्च) सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या प्रकृतीच्या समस्यांमुळे ९० वर्षीय सलीम खान यांना १७ फेब्रुवारीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात महिनाभर उपचार घेतल्यानंतर सलीम खान सुखरूप घरी परतले आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान […]
काबूलमध्ये झालेल्या कथित हवाई हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर तीव्र टीका करत या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यास “अमानुष, भ्याड आणि निंदनीय” कृत्य ठरवत आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, 16 मार्चच्या रात्री काबूलमधील ‘ओमिद अॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’वर झालेला हल्ला हा कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू […]
कोंबडीनं अंड कधी दिलं? विक्रेत्यांना द्यावी लागणार माहिती, नवे आदेश
आधी कोंबडी की आधी अंड? हा प्रश्न विचारून समोरच्याला अनुत्तरित करण्याचा खेळ अजूनही सुरू असतो. पण आता कोंबडीने अंड कधी दिलं या प्रश्नाचं उत्तर अंड विक्रेत्यांना देणं बंधनकारक असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने कुक्कुटपालनासाठी १ अप्रिलपासून प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट लिहिणं बंधनकारक केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की बाजारात विकिल्या […]
Sangli Municipal Corporation |सांगली मनपाचा मोठा निर्णय; वादग्रस्त ‘समुद्रा’कंपनी अखेर काळ्या यादीत!
सांगली महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा मास्टरप्लॅन; सांगली – महापालिकाक्षेत्रातील सार्बजनिक दिवाबत्ती देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या वादग्रस्त समुद्रा कंपनीला ब्लक लिस्टमध्ये टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेतील सत्ताधारी महायुतीने घेतला. मनपाच्या १८ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांची संयुक्त पार्टी मिटिंग [...]
पिक-अप वाहन पलटी झाल्याने आडीतील 11 जण जखमी
तिघे गंभीर : देवदर्शन करून परतताना आप्पाचीवाडी नजीक अपघात निपाणी प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग ते आप्पाचीवाडी मार्गावर श्री हालसिद्धनाथ कारी देवस्थाननजीक वळणावर देवदर्शन करून परतणाऱ्या पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात आडी (ता.निपाणी) येथील ११ जण जखमी झाले. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर व कणेरीमठ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल [...]
Ichalkaranji |इचलकरंजीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
इचलकरंजीत पाणीपुरवठा तात्पुरता बंद इचलकरंजी : विविध दुरूस्तीच्या कारणावरून इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा मंगळवार १७ रोजी सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत शुद्ध जलउपसा केंद्र [...]
अशी अपेक्षा नव्हती! ट्रम्प अस्वस्थ; इराणचे अमेरिकेच्या आखाती मित्रराष्ट्रांवर भीषण हल्ले सुरूच
अमेरिका, इस्रायलच्या सतत हल्ल्यानंतरही इराण पराभव मानायला तयार नाही. याउलट इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करत आहे. यामुळे मध्यपूर्वेतील देशांची लटकंती झाली आहे. त्यांचे व्यापार, पर्यटन, जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे देश थेट अमेरिका इस्रायलच्या सोबत उभे राहून इराणवर हल्ले करू शकत नाही, पण इराण मात्र या राष्ट्रांमधील अमेरिका इस्रायलशी निगडीत गोष्टींना लक्ष्य करण्यात […]
Balumama Temple |आदमापूरमध्ये भक्तीचा महासागर; २३ टन धान्यातून साकारला बाळूमामांचा महाप्रसाद
श्रीक्षेत्र आदमापूरमध्ये महाप्रसादाचा सोहळा संपन्न सरवडे – महाराष्ट्र, कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले (आदमापूर, ता. भुदरगड) येथील श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत लाखों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने एकूण १५ काहिलीत खीर प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद [...]
मूल दत्तक घेणाऱ्या महिलांना प्रसूती रजा नाकारता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
दत्तक मूल हे जैविक मुलापेक्षा वेगळे नसते या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देत, सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या हक्काबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. दिलेल्या निकालानुसार, तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाचे मुल दत्तक घेतल्यास, त्या महिलेला प्रसूती रजा नाकारता येणार नाही. यावर अधिक भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, मातृत्व संरक्षण हा एक मूलभूत मानवाधिकार आहे. तसेच अशा प्रकारचा भेदभाव संविधानाच्या […]
हायकोर्टातील खटल्यांचा आता झटपट निपटारा होणार; सर्वोच्च कोर्टाने दिले महत्वपूर्ण निर्देश
उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयांमधील खटल्यांचा झटपट निपटारा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी सोमवारी (16 मे) सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील ‘अॅमिकस […]
Sangli News |सांगलीत थरार! उभ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; प्रवाशांची थोडक्यात बचावली सुटका
सांगलीत ट्रॅव्हल्समध्ये भीषण आग; प्रवाशांना वाचवण्यात यश सांगली – सांगली येथील तरुण भारत स्टेडियम समोरील वैरण अड्डा परिसरात उभ्या असलेल्या प्रवाशी घेऊन उभ्या असलेल्या एमबी लिंक कंपनीच्या खासगी ट्रॅव्हल्सला सोमवारी सकाळी सहा वाजता भीषण आग लागली. प्रवाशांना तत्काळ आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, सर्व प्रवाशांचे [...]
संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानवर जोरदार टीका करत रमजान महिन्यात अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच अफगाण नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निर्वासनाबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. ‘इस्लामोफोबियाविरोधी आंतरराष्ट्रीय दिवस’ निमित्त आयोजित संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यक्रमात हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथानेनी हरीश यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला. हिंदुस्थानचा पश्चिमेकडील शेजारी इस्लामोफोबियाच्या नावाखाली काल्पनिक […]
हिंदुस्थानातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले, फेब्रुवारीतील आकडा चिंताजनक
हिंदुस्थानात तरुणांमध्ये बेरोजगारीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा ही बाब चिंतेचा विषय बनली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये 15–29 वयोगटातील बेरोजगारी दर 14.8% वर पोहोचला असून, हा मागील चार महिन्यांतील सर्वाधिक आकडा असल्याचे नुकतेच समोर आले आहे. जानेवारी 2026 मध्ये बेरोजगारीचा दर हा 14.7% इतका होता. तर हा दर फेब्रुवारीमध्ये वाढून, 14.8% इतका झाला. याआधी ऑक्टोबर–डिसेंबर 2025 […]
Gadhinglaj News |गडहिंग्लज शहरात गव्याचे दर्शन; दुंडगे मार्ग परिसरात नागरिकांमध्ये घबराट!
गडहिंग्लजमध्ये गव्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये खळबळ गडहिंग्लज – शहरातील दुंडगे मार्गावरील अशोक यमगेकर यांच्या घराशेजारील शेतात सोमवारी सकाळी गवी रेड्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. हा गवा ऊस, मका पिकातून वाट काढत खाली नागाचा डोह रस्त्यालगत हिरण्यकेशी नदीकाठाकडे रेडा गेल्याच्या पाऊल खुणा दिस ल्याचे वनविभागाकडून [...]
पिता-पुत्राच्या मृत्यूने डिचोलीत खळबळ
एकाचखोलीतआढळलेदोघांचेहीमृतदेह: वडिलांचीआत्महत्या, मुलाच्यामृत्यूचेगूढ,घरातसापडलीवडिलांची12 पानीचिठ्ठी डिचोली : नाईकनगर बोर्डे, डिचोली येथे एका घरात वडील व पुत्राचा मृतदेह आढळून आल्याने डिचोलीत खळबळ माजली आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात वडिलांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध होत असून मुलाच्या मृत्यूबाबत मात्र गूढ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच खोलीत दोन्हीही मृतदेह आढळून आले असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. मयत [...]
रखडलेल्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा, ठाणे महापालिकेत १७०० जागांसाठी ७५ हजार अर्ज
महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे पालिकेतील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. १ हजार ७७३ पदांच्या जागांसाठी तब्बल ७५ हजार अर्ज आले असून या भरती प्रक्रियेला पुढच्या महिन्यापासून पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून परीक्षेसाठी केंद्रांचा शोध सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १ हजार ७७३ पदांसाठी ऑगस्ट […]
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या कामगिरीबाबत विविध मुद्दे समोर आले आहेत. या कालावधीत त्यांची एकूण उपस्थिती 53 टक्के इतकी राहिली, तर सर्व सदस्यांची सरासरी उपस्थिती सुमारे 80 टक्के आहे. संसदीय नोंदींनुसार, गोगोई यांनी कार्यकाळात एकही प्रश्न विचारला नाही, तसेच कोणतेही खासगी विधेयक मांडले नाही. त्यांनी केवळ एका […]
Jyotiba Temple |दख्खनचा राजा चैत्र यात्रेसाठी सज्ज! जोतिबा मंदिरात उत्साहात पार पडली ‘पाकाळणी
चैत्र यात्रेपूर्वी जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला; जोतिबा डोंगर – महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात पाकाळणी विधी करून मंदिर स्वच्छ करण्यात आले. यावेळी मंदिराची शिखरे, दीपमाळ, ओवऱ्या, दागदागिने, शस्त्र अस्त्र, पालखीचे साहित्य, [...]
धावत्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून व्हिडीओ बनवला, कल्याणमध्ये हुल्लडबाज तरुणाला अटक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून साईनगर शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर एका हुल्लडबाजाने दगडफेक केल्याची घटना कल्याण पत्रीपुलाजवळ घडली. दगडफेक करणारा तरुण व्हिडीओ बनवत होता. यामध्ये एक्स्प्रेसच्या चार डब्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला अटक केली. सनी कांबळे असे अटक आरोपीचे नाव आहे. साईनगर शिर्डी […]
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने अण्वस्त्रे मिळवली तर, ते केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य पूर्वेसाठी विनाशकारी ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तेहराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, असा ठाम निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी इराणविरुद्ध करण्यात आलेल्या […]
नाटकादरम्यान फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर आस्ताद काळे भडकला; भर प्रयोगात झापलं!
नाटकाच्या वेळी आपले फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवा असे सुरुवातीलाच सांगितले जाते. मात्र तरिही काही प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात व त्यांचा फोन वाजल्यामुळे कलाकारांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. असाच प्रकार अभिनेता आस्ताद काळेसोबत घडला आहे. नाटक सुरू असताना फोनवर गप्पा मारणाऱ्या प्रेक्षकांवर अभिनेता आस्ताद काळे भडकला; भर प्रयोगात झापलं! pic.twitter.com/Zo1Do13VMe — Saamana Online (@SaamanaOnline) […]
महाराष्ट्रातील टोळीचा गोकाकमध्ये ‘गेम’
नोटाचौपटकरण्याचेआमिष: दोनपोलीसहवालदार, तीनमहिलांचाटोळीतसमावेश बेळगाव : नोटा चौपट करून देण्याचे सांगून सावजाला ठकविणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सात जणांना गोकाक शहर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मुंबई येथील दोन पोलीस हवालदारांचाही समावेश आहे. आठ जणांच्या या टोळीतील बहुतेक जण महाराष्ट्रातील आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक व [...]
बनावट नोटा खपविताना गोव्यातील चौकडीला अटक
अडीचलाखांच्यापाचशेच्याबनावटनोटाजप्त बेळगाव : बनावट नोटा खपविण्यासाठी गोव्याहून बेळगावात आलेल्या एका चौकडीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी जुन्या भाजी मार्केटजवळील कार पार्किंगनजीक ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून पाचशेच्या 495 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे [...]
पाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकेतही इंधनाचा तुटवडा, सरकारी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भीषण ऊर्जा संकटाने श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेलाही इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय. देशातील इंधन वाचवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, 16 मार्च रोजी प्रशासनाने देशात ‘फोर-डे वर्किंग वीक’ लागू करण्याची घोषणा केली. या नवीन नियमानुसार, दर बुधवारी सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी […]
बुकिंग एकाच्या नावाने आणि गॅसची डिलिव्हरी परस्पर दुसऱ्यालाच, मनसे नेत्याने प्रकार आणला उघडकीस
चंद्रपूर शहरातील गॅस वितरण प्रणालीमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुकिंग एका ग्राहकाच्या नावाने असताना प्रत्यक्षात सिलेंडरची डिलिव्हरी दुसऱ्यालाच दिली जात असल्याचा प्रकार मनसे नेते सचिन भोयर यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, MEL प्रभागातील ‘सुविधा गॅस एजन्सी’ मध्ये हा प्रकार […]
कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या परभणी-जालन्याच्या टोळीला अटक
26 तोळेसोने, 1 किलोचांदी, कारसह36 लाखांचाऐवजजप्त बेळगाव : आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक करून हारुगेरी पोलिसांनी 36 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. हे गुन्हेगार महाराष्ट्रातील परभणी व जालना जिल्ह्यातील राहणारे असून बेळगाव, बागलकोट, विजापूरसहअनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी चोऱ्या, घरफोड्या केल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. हारुगेरी, ता. रायबाग येथील चोरी [...]
Maharashtra Weather |सावधान! राज्यात पुढील ४८ तास वादळी पावसाचे; बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’.
विदर्भात गारपिटीचा धोका; राज्यभर पावसाचा यलो अलर्ट पुणे -राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर मध्यम स्वरुपाच्या वादळी पावसाची शक्यता असून, बहुतांश जिल्ह्यांत वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू किनारपट्टी, आसाम, लक्षद्वीप आणि लगतच्या भागावर असलेली हवेची द्रोणीय स्थिती, उत्तर कर्नाटक [...]
डिप्लोमसी गेली खड्ड्यात, आता फक्त ॲक्शन! पाकच्या एअरस्ट्राइकवर अफगाण संतापले; सूड घेण्याचा थेट इशारा
पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात सोमवारी भीषण वळण आले. पाकिस्तानने ‘ऑपरेशन गजब लिल हक” अंतर्गत अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले. यात 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 250 जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याचे व्हिडीओ जारी करत ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवर […]
शहरातील हॉटेल्समधून 12 घरगुती सिलिंडर जप्त
अन्न-नागरीपुरवठाखात्याचीकारवाई: हेल्पलाईनव्यवस्थासुरू: शहरातीलविविधहॉटेल्सनाभेटीदेऊनतपासणी बेळगाव : अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू असल्याने एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार आहार व नागरी पुरवठा खात्याकडून हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केल्याप्रकरणी शनिवारी शहरातील 12 हॉटेल्समधून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. युद्धाला 15 दिवस [...]
महापौर, उपमहापौर निवडणूक उद्या
महापालिकेकडूननिवडणुकीचीतयारीपूर्ण बेळगाव : महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांचा कार्यकाळ शनिवार दि. 14 मार्च रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नूतन महापौर व उपमहापौर पदासाठी बुधवार दि. 18 रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी कौन्सिल विभागाकडून करण्यात आली असून प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडणार आहे. सदर निवडणुकीत 58 लोकनियुक्त [...]
आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा!
जि. पं. सीईओराहुलशिंदेयांच्याकडूनदहावीच्याविद्यार्थ्यांनाशुभेच्छा बेळगाव : दहावी वार्षिक परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन उत्तम गुण मिळवावेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण किंवा भीती न बाळगता शांतपणे आणि सकारात्मक विचारांनी परीक्षा द्यावी. मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, अशा शुभेच्छा जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिल्या आहेत. दहावी परीक्षेसाठी विद्यार्थी [...]
गोकाक तालुक्यातील चोरट्यांकडून चोरीच्या 13 मोटारसायकली जप्त
बेळगाव, चिकोडीसहसाताऱ्यातूनहीचोरल्यादुचाकी बेळगाव : चिकोडी, बेळगावसह साताऱ्यात मोटारसायकली चोरणाऱ्या एका जोडगोळीला चिकोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून साडेसात लाख रुपये किमतीच्या 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अस्लम अब्बास मुलतानी (वय 32), अबुबकर बादशाह मुलतानी (वय 23) दोघेही राहणार कौजलगी, ता. गोकाक अशी त्यांची [...]
बाळेकुंद्री खुर्द महालक्ष्मी मंदिराचे लोकार्पण
हजारो भाविकांची कार्यक्रमाला उपस्थिती : मंदिर परिसर विद्युत दिव्यांनी सुशोभीत : तीन दिवस लोकार्पण सोहळा उत्साहात वार्ताहर/बाळेकुंद्री ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करत ‘लक्ष्मीमाता की जय’चा जयघोष करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळेकुंद्री खुर्द नूतन महालक्ष्मी मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने सोहळ्याचे आयोजन केले होते. [...]
धर्मवीर बलिदान मासची उद्या सांगता
शिवाजीउद्यानयेथूनकाढलीजाणारमूकपदयात्रा बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दि. 18 फेब्रुवारीपासून मागील संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे. या धर्मवीर बलिदान मासची सांगता बुधवार दि. 18 मार्च रोजी होणार आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मूक पदयात्रा काढून सांगता होणार आहे. छत्रपती शिवाजी उद्यान ते शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक या मार्गावर मूक पदयात्रा काढली जाणार [...]
डॉ.बाबू जगजीवनराम जयंतीची सर्व तयारी करा
जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांचेआदेश: जि. पं. सभागृहातपूर्वतयारीबैठक बेळगाव : हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. हा कार्यक्रम 5 एप्रिल रोजी संगमेश्वरनगर येथील डॉ. बाबू जगजीवनराम पार्क येथे होणार असून संबंधित विभागांनी आवश्यक सर्व तयारी करावी, जयंती कार्यक्रमात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, महाविद्यालये, बँका आणि संस्थांमध्ये [...]
इराण – इस्रायल संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत असून, चालू आर्थिक वर्ष 2027 मध्ये तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे 80 डॉलरवर स्थिरावतील, असा अंदाज ICICI बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार, मध्यपूर्वेतील तणाव वाढणे आणि महत्त्वाच्या व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण होणे यामुळे जागतिक तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर […]
Satara News |साताऱ्याला १५ व्या वित्त आयोगाचा ७१ कोटींचा निधी; विकासकामांना मिळणार चालना
साताऱ्यात विकासकामांचा मार्ग मोकळा गोडोली – जिल्हा परिषद , पंचायत समित्यांवर प्रशासक राजवट लागू झाल्यामुळे रोखून ठेवण्यात आलेला सन २०२२-२३ पासूनचा केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा १५ व्या वित्त आयोगाचा अबंधित निधी अखेर वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने वितरित केला आहे. तर [...]
जिल्ह्यातील मागास 500 ग्रा. पं.चा होणार विकास
‘कायकग्राम’ योजनेंतर्गतपुरविणारमूलभूतसुविधा: जिल्हास्तरीयअधिकारीघेणारदत्तक बेळगाव : जिल्ह्यातील मागासलेल्या ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात एकूण 500 ग्रामपंचायती असून त्यापैकी मागास म्हणून ओळखल्या गेलेल्या ग्रामपंचायतींची निवड करून त्यांच्या विकासाची जबाबदारी विविध अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या उपक्रमातून गावांमध्ये मूलभूत सुविधा सुधारण्यासोबतच प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘कायक ग्राम’ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, [...]
हलगा-मच्छे बायपासबाबत शेतकरी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याची वर्क ऑर्डर देण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. तरीदेखील जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केवळ आश्वासने देऊन तोडवातोडवी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. सुपीक जमिनीतून बायपास रस्ता करण्यात येऊ नये. रस्ता झाल्यास अल्पभूधारक शेतकरी [...]
…अन्यथा 23 मार्चपासून बेमुदत आंदोलन
अंगणवाडीकर्मचारीसंघटेचाइशारा: मंत्रीलक्ष्मीहेब्बाळकरयांनानिवेदन बेळगाव : राज्यातील अंगणवाडी केंद्रे कमकुवत करण्यासाठी शिक्षण विभागाने 10 हजार शाळांमध्ये एलकेजी व युकेजी शाळा सुरू करण्यास प्रयत्नशिल आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये हे वर्ग सुरू न करता पूर्व प्राथमिक केंद्रांमध्ये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे अंगणवाडी कमकुवत होणार आहे. सरकारी पातळीवरील सर्व कामे अंगणवाडीसेविका करत असतात. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतन देण्यात [...]
जुन्या वाहनांसाठीच्या फिटनेस शुल्कात कपात करा
बेळगाव : केंद्र सरकारने पंधरा वर्षांवरील जुन्या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट (एफसी) मिळवण्यासाठी तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सप्टेंबर 2025 मध्ये घेतला होता. परंतु, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जात असून व्यावसायिक वाहनचालकांकडून हजारो रुपयांचा कर वसूल केला जात आहे. त्यामुळे ट्रकचालकांची होणारी ही आर्थिक पिळवणूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी [...]
कंग्राळी बुद्रुक मार्कंडेय नदीकाठावरील मोटारींची केबल चोरीस
चोरीचेसत्रसुरूच: एकारात्रीतसातमोटारींच्याकेबललंपास वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक कंग्राळी बुद्रुक गावच्या पच्छिमेकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीकाठावरील विहिरीतील व नदीपात्रातील विद्युत पंपसेट मोटारीच्या केबल चोरण्याचे सत्र चोरट्यांकडून सुरूच असून रविवारी रात्री परत सात शेतकऱ्यांच्या पंपसेठ विद्युत मोटारींच्या केबल चोरुन चोरट्यांनी मार्कंडेय नदीकाठ परिसरात हाहाकार माजविला आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे 10 हजार रुपये किंमती प्रमाणे 70 हजार रुपयांची केबल चोरी चोरट्यांनी केले असून [...]
Palghar News –बोईसर तारापूर एमआयडीसीत फार्मा कंपनीत अग्नीतांडव, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. सेक्टर J-62 मधील एका कंपनीत मंगळवारी LDO (लाईट डिझेल ऑइल)मुळे सकाळी ही आग लागली. ज्वलनशील इंधनामुळे आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या […]
दिल्लीत गॅस सिलेंडर साठेबाजी आणि अवैध रिफिलिंगवर मोठी कारवाई, 610 सिलेंडर जप्त; अनेक आरोपी अटकेत
राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि अवैध रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासांत विविध भागांत छापेमारी करून मोठ्या प्रमाणात सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. मुंडका परिसरात गुन्हे शाखेने एका गोदामावर छापा टाकून तब्बल 610 गॅस सिलेंडर जप्त केले. यामध्ये 197 भरलेले आणि 392 रिकामे सिलेंडर होते. तसेच […]
इरानणे इराकच्या विविध भागांमध्ये ड्रोन आणि रॉकेट हल्ले चढवले. या भागांमधील अमेरिकन दूतावास, ‘ग्रीन झोन’मधील एक आलिशान हॉटेल आणि दक्षिण इराकमधील तेल क्षेत्राला लक्ष्य करण्यात आले आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ‘ग्रीन झोन’मधील दूतावासावर अनेक ड्रोन आणि रॉकेट डागण्यात आले. एअर डिफेन्स सिस्टमने काही ड्रोन हवेतच नष्ट केले, मात्र तरीही दूतावास परिसरातून काळ्या धुराचे लोट […]
साताऱ्यात “तुमच्या दारी” डिजिटल हेल्थ चेकअप; रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम सातारा – छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट चौदावे वंशज खा.उदयनराजे यांचे चिरंजीव छ. विरप्रतापसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत डिजिटल आरोग्य तपासणीची सुविधा [...]
Satara News |साताऱ्यात धडक कारवाई; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर छापे
कोरेगाव-फलटणमध्ये छापे; अनेक LPG सिलेंडर जप्त सातारा : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने धडक कारवाई सुरू केली असून दोन दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकून अनेक घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील रुचीसागर हॉटेलवर दिनांक १५ मार्च [...]
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेला कोणत्याही देशाच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकन मित्रराष्ट्रांनी या मोहिमेत सामील होण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला […]
देशभरात एलपीजी पुरवठा सुरळीत; घाबरून सिलिंडर बुक करू नका, इंडियन ऑइलचे आवाहन
देशभरात एलपीजी (गॅस) पुरवठा सुरक्षित आणि सुरळीत असल्याची खात्री इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IndianOil)ने दिली आहे. काही ग्राहकांकडून वेळेपूर्वी गॅस बुकिंग केल्यामुळे तात्पुरती मागणी वाढत असून वितरणावर परिणाम होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर इंडियन ऑइलने म्हटले आहे की, “एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि अखंड सुरू आहे. मात्र काही ग्राहक गरजेपूर्वीच […]
सरकारचे अनैतिक, असमतोल पद्धतीने निधीवाटप म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठी घातक पायंडा –संजय राऊत
सध्याचे सरकार हे अत्यंत अनैतिक, असमतोल पद्धतीने निधीवाटप करतंय, हे लोकशाही आणि संविधानासाठी घातक पायंडा असल्याची जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ”हे राज्य सर्वांचे आहे, राज्याचा विकास हा समतोल पद्धतीने व्हायला हवा मात्र सरकारकडून तसे होत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या […]
Mumbai News –मध्य रेल्वेचा प्रवास आणखी सुखद होणार; एसी लोकलच्या फेऱ्या शंभरी पार करणार!
उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत एसी लोकलच्या दैनंदिन फेऱ्या शंभरी पार करणार आहेत. यामुळे प्रवाशांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळणार असून लोकल प्रवास सुखद होणार आहे. सध्या मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 94 फेऱ्या चालवल्या जात आहेत. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी […]
Satara Municipal Council |साताऱ्यात थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई; ३ गाळे सील
सातारा नगरपालिकेची धडक मोहीम सातारा – सातारा नगरपरिषदेकडून थकबाकीदारांविरोधात वसुली मोहीम सुरू असून गुरुवारी (दि.१२) मंगळवार पेठ परिसरात थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी विनोद जळक तसेच कर अधिकारी उमेश महादर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी थकीत पाणीपट्टी न भरलेल्या [...]
चोरी, फसवणूक प्रकरणात 36 आरोपींना अटक
1.27 कोटीरुपयांचेदागिनेजप्त: विजापूरपोलिसांचीकारवाई वार्ताहर/विजापूर विजापूर जिह्यातील विविध मालमत्ता चोरी प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 वेगवेगळ्या प्रकरणांतील 36 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रु 1.27 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, 2 कार आणि 17 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, [...]
शांतता बैठकीत रमजान शांततेत साजरा करण्याचे आवाहन
बेळगाव : आगामी रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सोमवारी शहरातील मुस्लिम नेते आणि बांधवांची शांतता बैठक घेतली. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे होते. शांतता भंग न करता आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेऊन रमजान वेळेत साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. बैठकीस पोलीस उपायुक्त एन. [...]
ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशन्ट डेड अशी परिस्थिती, LPG तुटवड्या संदर्भात संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
इराण-इस्रायल युद्धाच्या सावटाखाली सध्या संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. एकीकडे गॅससाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना, दुसरीकडे केंद्र सरकार मात्र पुरवठा मुबलक असल्याच्या दावा करत आहे. सरकारच्या या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल […]
बारावीच्या परीक्षा अखेर संपल्या
परीक्षाकेंद्रांबाहेरविद्यार्थ्यांचाजल्लोष: प्रवेशपरीक्षांच्यातयारीलासुरुवात बेळगाव : बारावीच्या विद्यार्थ्यांचा महिन्याभरापासून परीक्षांसाठीचा असलेला तणाव अखेर सोमवारी संपला. शेवटचा पेपर सोपा गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत रंगांची उधळण करत जल्लोष साजरा केला. वर्गमित्रांबरोबर सेल्फी घेऊन त्यांनी हा आनंद द्विगुणित केला. 28 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा निश्चित करण्यात आली होती. [...]
लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत मधुमेह-रक्तदाब तपासणी शिबिर
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गंत लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत मधुमेह-रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन महाद्वार रोड येथे करण्यात आले. महाद्वार रोड येथील लोकमान्य सोसायटी आणि सेंट्रा केअर हॉस्पिटल यांचे साहाय्य लाभले. सुमारे 80 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या डॉ. लक्ष्मी कुलकर्णी, परिचारिका गिरिजा बाळेकट्टी, प्रज्योत हिरेमठ,पीआरओ विनायक ताम्हणकर यांनी [...]
जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची व्यवस्था
बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हीच गरज ओळखून उचगाव बसस्टँड परिसरात जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या सहकार्याने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बसची वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे कौतुक केले जात आहे. [...]

30 C