जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला काळिमा फासणारा प्रकार संगमेश्वर तालुक्यात उघडकीस आला आहे. मतदान केंद्राच्या अवघ्या २०० मीटर परिसरात उघडपणे प्रचार केल्याचा गंभीर आरोप करत मूचरी (गट क्रमांक ४३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार प्रा. ललिता रोहित तांबे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी […]
रेल्वे प्रकल्प रखडले, जनतेत संताप! मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले…
तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “रेल्वे प्रकल्पांना होणाऱ्या विलंबामुळे जनतेमध्ये संतापाची लाट आहे,” असे स्टालिन यांनी या पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी पत्रात प्रामुख्याने तिंदिवनम-तिरुवन्नामलाई रेल्वे मार्ग आणि इतर प्रलंबित प्रकल्पांचा […]
सातारा पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, सातारा : सातारा पोलीस विभागात पाळत ठेवण्यासाठी (सर्व्हिलन्स) बापरण्यात येणाऱ्या दोन अत्याधुनिक गाडचा नुकत्याच दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. या [...]
कर्नाटकमध्ये खासगी विमान कोसळले; सुदैवाने जिवीतहानी टळली
कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलुरु गावात रविवारी दुपारी एका रेड बर्ड हे खासगी मिनी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेच सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. विमानातील पायलटसह दोन्ही प्रवासी बचावले आहेत. मिनी विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान अचानक मंगलुरु गावाजवळील एका मोकळ्या शेतात कोसळले. विमान कोसळल्याने समोरील भाग […]
Sangli News : माधवनगरात पाच दिवस पाणी बंद कार्यकर्त्यांची झाली ‘बिनपाण्याची’..!
बुधगाव माधवनगर पाणीबंदीमुळे मतदार संतप्त बुधगाव : सांगली शहरालगतच्या माधवनगर, मध्ये पाच दिवस पाणी बंद असल्याच संताप उफाळून आल्याने संतप्त मतदारांनी कार्यकर्त्यांवर राग काढला. दारात आलेल्या प्रत्येकाची ‘बिनपाण्याची… केली गेली. परिणामी गावात मतदानाची टक्केवारी चांगली घसरली. शेजारच्या बुधगाव, [...]
Sangli News : चिंचणी-वांगी पोलिसांची मतदारांना अरेरावी : ग्रामस्थ झाले आक्रमक
वांगी मतदान केंद्रावर वृद्ध व अपंगांना पोलिसांनी रोखले वांगी : वांगी येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान सुरू असताना आभाळ वृद्ध व अपंग व्यक्तींना चिंचणी बांगी पोलिसांनी अरेरावी करून मतदानापासून रोखले त्यामुळे बांगी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता परंतु [...]
ICC T20 World Cup 2026 ला शनिवारपासून सुरुवात झाली. यजमान हिंदुस्थानचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर अमेरिकेसोबत रंगला. या लढतीत अमेरिकेच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांना जखडून ठेवले होते. कर्णधार सूर्यकुमार यादव याने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर हिंदुस्थानने अमेरिकेसमोर 162 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर अमेरिकेला 8 बाद 132 धावांत रोखत 29 धावांनी विजय मिळवला. या लढतीत […]
Solapur Local Elections |सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; सरासरी ७०% मतदान
सोलापूर निवडणूक रंगतदार सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात आले. सर्वच तालुक्यात अत्यंत चुरशीने मतदान झाले. [...]
Kolhapur Local Elections |कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ७४.३५% मतदान;
ग्रामीण भागातील मतदारांनी रणरणत्या उन्हातही मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मोठ्या उत्साहात आणि इष्येने मतदान झाले. गावगाड्यात या निवडणुकीत प्रचंड उत्साह दिसून आला. २०१७ च्या निवडणुकीच्या ७६.८५ टक्के मतदान झाले होते. आताच्या निवडणुकीत त्यामध्ये घट होऊन ७४.३५ टक्के मतदान [...]
पात्रता परीक्षेत 4 लाख शिक्षक व भावी शिक्षक नापास !
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) निकाल जाहीर केला. त्यात चार लाख 46 हजार 730 पैकी अवघे 11.28 टक्केच (50 हजार 369) भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 4 लाख सध्याचे शिक्षक आणि भावी शिक्षक नापास झाले आहेत. राजकीय चर्चांमध्ये या महत्त्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले आहे. या परीक्षेला सध्या नोकरीत असलेले अनेक शिक्षक आणि ज्यांना शिक्षक व्हायचे आहे, असेही शिक्षक परीक्षेला बसले होते. यातून सध्याच्या व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिकून डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे. दर्जाहीन शिक्षणातून दर्जाहीन विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यातून पुन्हा उद्याचे दर्जा खालावलेले शिक्षक आणि त्यांच्या हातून दिले जाणारे पुन्हा तसे शिक्षण हे दृष्टचक्र या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे. मान्य आहे की नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेची सक्ती करावी का ? यावर वाद होऊ शकतो. ती सक्ती कोणत्या तारखेपासून करावी ? यावरही वाद होऊ शकतो. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असावा का ? यावरही नक्कीच चर्चा होऊ शकते. किंबहुना राज्यातील शिक्षकच काय सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ज्ञान अद्ययावत होणारी परीक्षा असली पाहिजे व त्या परीक्षेच्या आधारे चे वेतनवाढ दिली पाहिजे. यामुळे शिक्षकांसह घटक वाचन करतील,अभ्यास करतील पण तो विषय वेगळा आहे. नोकरीतील सुरक्षितता ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला काहीच केले नाही तरी चालेल असा संदेश देते आणि कधीतरी शिकलेल्या पुस्तकांच्या आधारे लहान मुलांना शिकवायला काय लागते ? अशी मानसिकता करून अनेक जण जगत असतात. या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांचा दर्जा हा या अर्थाने सन्माननीय अपवाद वगळता प्रातिनिधिक आहे.
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची मतमोजणी सोमवारी; 16 टेबलवर गणनिहाय प्रक्रिया
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील 9 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 18 गणांची मतमोजणी सोमवार दि. 9 फेब्रुवारी रोजी होणार असून, ही मतमोजणी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया गणनिहाय केली जाणार असून यासाठी एकूण 16 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व एक शिपाई नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली. मतमोजणीचे वेळापत्रक जाहीर मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9.30 वाजता उमेदवारांना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 10 वाजता टपाली मतदानाची मतमोजणी सुरू होईल. तर सकाळी 10.15 वाजता ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे. दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश गणांचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून, सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकरी आप्पा सोपान पवार (वय 50 वर्ष) यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.8 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अपसिंगा ते ढेकरी रोडलगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास साडीच्या पटकराने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. मृत शेतकऱ्यांकडे 4 एक्कर कांद्याचे पीक होते. मात्र सध्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने बँक व फायनान्सचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेत ते होते. त्यातच बँक व फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या तगाद्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. उत्पन्न हातात येत नसताना कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार चौधरी तसेच त्यांची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील वास्तव स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणी पंचनामा करून बँक व फायनान्स कोणते आहे कर्ज किती होते ते पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अपसिंगा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतमालाला योग्य भाव, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजना कधी होणार? असा संतप्त सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ‘डॉ. मोईन शाकिर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतीय समाज, राजकारण व विशेषतः भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक-शैक्षणिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रख्यात विचारवंत डॉ. मोईन शाकिर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जाणीव, सामाजिक समज आणि लोकशाही मूल्यांचे भान निर्माण करणे हा आहे. व्याख्यानमालेत समकालीन सामाजिक प्रश्न, अल्पसंख्याक समाजाच्या समस्या, शिक्षणाची भूमिका, अंधश्रद्धा व असुरक्षिततेमधून मुक्ती यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन सोमवार, दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असून, डॉ. रमेश चौगुले (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर, धाराशिव) हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) उपस्थित राहून “डॉ. मोईन शाकिर : व्यक्ती आणि कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख असतील. व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पात, प्रा. डॉ. महेशकुमार मोटे (समन्वयक, राज्यशास्त्र संशोधन केंद्र, श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम) हे “लोकशाही, धर्मनिरपेक्षता : डॉ. मोईन शाकिर यांचे वैचारिक योगदान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख (सह. मराठवाडा विभाग प्रमुख) राहणार असून, प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात, प्रा. डॉ. आनंद करडे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी) हे “भारतीय मुस्लिम समाज : मोईन शाकिर यांचा दृष्टिकोन” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे भूषवणार असून, प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता, सामाजिक भान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि चिकित्सक विचारशक्ती विकसित होईल, असा विश्वास महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
मार्ग तपासणी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार? बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास
कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बस तपासणीच्या नावाखाली गाड्या तासन्तास एकाच ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालू असताना तपासणी करणे शक्य असताना गाडी थांबवून दीर्घकाळ तपासणी केली जाते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. नियोजित कामांमध्ये उशीर होतो आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेतही अनावश्यक वेळ घेतला जात असल्याची चर्चा आहे. या तपासण्यांच्या नादात वाहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. “बस थांबवून नव्हे, तर चालत्या बसमध्येच तपासणी करावी,” अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एका आदेशानंतर सर्वत्र कडक तपासणी सुरू झाल्याने काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांचा वेळ आणि सोयीचा विचार करून तपासणी प्रक्रियेत सुसूत्रता आणावी. तसेच अनावश्यक विलंब टाळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या सूचना कराव्यात. जेणेकरून प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि बससेवा अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सूरजकुंड दुर्घटनाप्रकरणी झुलता पाळणाच्या कंपनीवर कारवाई; मालकासह दोघांना अटक
फरीदाबादमध्ये आयोजित सूरजकुंड येथील जत्रेत झुलता पाळणा दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक मोहम्मद शाकीर आणि नितेश यांना अटक केली आहे. झुलता पाळणा कोसळताना लोकांना वाचवताना एसआय जगदीश प्रसाद शहीद झाले. या दुर्घटनेप्रकरणी शाकीरला अटक करून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठीविशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी […]
Chandgad News : मलगड मतदान केंद्रावर ९० वर्षीय वृद्धेचा अचानक मृत्यू ; गावात शोककळा
चंदगड तालुक्यातील मलगड येथील घटना मलगड : मलगड (ता. चंदगड) येथे मतदान केंद्रावरच वृद्धेचा अचानक मृत्यू झाला. यशोदा दत्तू घोळसे (वय ९०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मतदान केंद्रावर शोककळा पसरली [...]
Sawantwadi : सावंतवाडीत बिबट्याचे सीसीटीव्हीत दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण
बेळगाव मुख्य मार्गाजवळील बिबट्याचे दर्शन सावंतवाडी : बेळगाव मुख्यमार्गालगत कारिवडे पेडवे माळकरवाडीतील भर वस्तीत बिबट्याच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील अनिल माळकर यांच्या घराचे सध्या बांधकाम सुरू असून त्याच ठिकाणी शनिवारी मध्ये रात्री १२ च्या सुमारास हा [...]
ICC T-20 World Cup 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करून स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यानंतर माजी हिंदुस्थानी खेळाडू आणि ‘सीएसके’चा माजी स्टार बॅटर सुब्रमण्यम बद्रीनाथ याने सिराजबाबत केलेल्या एका मजेशीर विधानाने सर्वांचे लक्ष वेधून […]
Jyotiba Temple |श्री जोतिबाचे खेटे आजपासून सुरु होणार!
जोतिबा डोंगरवर सुरू होणार खेट्याची भव्य यात्रा जोतिबा डोंगर : महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची खेट्याची यात्रा रविवार दि. ८ पासून प्रारंभहोणार आहे. यासाठी संपूर्ण डोंगर परिसर सज्ज झाला आहे. यावेळी उत्साहात व भक्तीमय वातावरणात ‘श्री’स महाअभिषेक, महापोषक, धार्मिक विधी, [...]
Kolhapur News : कोडोलीत संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव उत्साहात साजरा
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोडोलीत धार्मिक सोहळा वारणानगर : शेगाव येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आज रविवार दि.८ रोजी कोडोली ता. पन्हाळा येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकट दिना निमित्त श्री [...]
T-20 World Cup 2026 ची टीम इंडियाने अगदी दणक्यात सुरुवात केली. शनिवारी (7 फेब्रुवारी 2025) अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेचा विजयी श्री गणेशा केला. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. टीम इंडिया […]
Kolhapur News : दहा मिनिटांची वेळ चुकली अन् काळाचा घाला!
कोल्हापुरात भीषण अपघात; वडील–लेकीचा दुर्दैवी मृत्यू कोल्हापूर : कोटीतीर्थपासून दिलबहार जवळ घरी जाण्यास अवघा १० मिनिटांचा वेळ पुरेसा होता. मात्र इतक्यातच दिपक वंशे आणि त्यांची वकील मुलगी भाग्यश्री यांच्यावर काळाने घाला घातला. नियतीने वंशे कुटुंबियांवर गेल्या सहा महिन्यात तीन आघात केले. सहा [...]
गलवान संघर्षानंतर सात दिवसात चीनने केली अण्वस्त्रचाचणी; अमेरिकेच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
टॅरिफ आणि आखाती देशातील तणावामुळे सध्या अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आहेत. आता अमेरिकेने एक गौप्यस्फोट केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने दावा केला आहे की चीनने २०२० मध्ये गुप्त अणुचाचणी केली. ही कथित चाचणी अशा वेळी झाली जेव्हा हिंदुस्थान आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी सर्व जग कोरोनाशी सामना करत होते. […]
केंद्र सरकारकडून फक्त घोषणाच, योजनांसाठी दिलेला 60 टक्के निधी खर्चच नाही केला
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने आपल्या सर्वात मोठ्या योजनांवर 60 टक्के निधी खर्चच झालेला नाही. या योजना अशा आहेत ज्यांसाठी सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंतचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती आणि ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारांचा संयुक्त खर्च अपेक्षित आहे. या योजनांमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत पायाभूत सुविधा सुधारणा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, […]
Sawantwadi Election |सावंतवाडीत उद्या मतमोजणी; कसं असणार संपूर्ण नियोजन जाणून घ्या
सावंतवाडी जिमखाना मैदानात सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू सावंतवाडी (संतोष सावंत ) : सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आठ व पंचायत समिती 17 जागांसाठी एकूण 72 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे महिलांपेक्षा पुरुष मतदार ची संख्या 3000 आणि अधिक आहेत्यामुळे पुरुष मतदार [...]
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून परतताना 84 वर्षीय ज्येष्ठ मतदाराचा मतदान केंद्र परिसरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूरच्या निलंगा तालुक्यात घडली आहे. विश्वनाथ शरणप्पा तुपडे (वय 84, रा. औराद शहाजानी, ता. निलंगा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजता ते अत्यंत उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान […]
Mahashivratri 2026 –महाशिवरात्रीला शिवभक्तांना भीमाशंकराचे दर्शन होणार नाही; जाणून घ्या कारण…
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशी माहिती दिली असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. नाशिक येथे सिंहस्थ कुभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरला […]
मुंबईसह देशात तापमानात बदल; फेब्रुवारीपासूनच उकाडा जाणवायला सुरुवात
मुंबईसह आता देशातील तापमानात बदल होत आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट होती, तसेच पर्वतीय भागात हिमवृष्टीही झाली होती. आता तापमानात बदल होत असून राजधानी दिल्लीसह, मुंबई आणि मध्य हिंदुस्थानात फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी सरासरी तापमानात वाढ झाली आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतही तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवायला […]
कुठल्याही जातीची व्यक्ती सरसंघचालक होऊ शकते, मोहन भागवत यांचे विधान
‘मुंबई व्याख्यानमाला’च्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, संघात कोणत्याही जातीतला व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे ही अडचण नाही आणि ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या […]
ICC Under 19 Men’s World Cup हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने जिंकला आणि विजेतेपदाचा खणखणीत षटकारी ठोकला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या वादळाचा इंग्लंडला जबर तडाखा बसला. 80 चेंडूंमध्ये 175 धावांची तडाखेबंद खेळी त्याने केली. या तडाख्यात इंग्लंडचा पालापाचोळा झाला आणि टीम इंडियाने सहाव्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. वैभवसह कनिष्क चौहान आणि हेनिल पटे […]
नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि तडजोडीच्या भूमिकेत, काँग्रेस नेते पवन खेरा यांची टीका
प्रस्तावित व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारवर गंभीर आरोप केले. पवन खेरा म्हणाले की, “आमचा जो संशय होता, तो आता खरा ठरला आहे. नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि तडजोडीच्या भूमिकेत आहेत.” भाजपचे नेते ज्या कराराबद्दल बोलत आहेत, त्याचे परिणाम […]
पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर आता हिंदुस्थानने जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. NHPC ने सावळकोट जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानची ऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, मोदी सरकारने चिनाब नदीवरील एका मोठ्या पायाभूत सुविधा आणि […]
जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस आंबा’ आता नव्या संकटात सापडला आहे. यावर्षीच्या नव्या हंगामात पहिलाच मोहोर झाडावरच कोळश्यासारखा काळा पडल्याने बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. बदलत्या वातावरणात मोहोर चांगल्याप्रकारे टिकून चांगली फळे मिळण्यासाठी महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यानंतरही गुलाबी थंडीच्या धुक्यात साठलेल्या बुरशीने मोहोरावर आघात करून देवगड तालुक्यातील बागायतदारांच्या मेहनतीला निराशेचा सुरुंग लावला आहे. बुरशीजन्य रोगाची ही परिस्थिती तालुक्यात […]
Ratngiri News : रत्नागिरी जिल्ह्यात ५५.७९ टक्के मतदान ; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडानंतरही सर्वाधिक मतदान रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ५५.७९ टक्के ईतके मतदान झाले. एकूण ६ लाख ५४ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ लाख ३६ हजार २८५ महिला, ३ लाख १८ हजार ६६२ पुरुष [...]
Ratnagiri News : राजापूर तालुक्याची सून, मालवणची सुकन्या होणार मुंबईची महापौर
मुंबई महापौरपदी भाजपकडून रितू तावडे राजापूर : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्मा नावाची घोषणा झालेली आहे. तावडे या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत.रितू तावडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव [...]
Ratnagiri News : राजापूर तालुक्याची सून, मालवणची सुकन्या,मुंबईची होणार महापौर
मुंबई महापौरपदी भाजपकडून रितू तावडे राजापूर : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्मा नावाची घोषणा झालेली आहे. तावडे या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत.रितू तावडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव [...]
Radhanagari Election : राधानगरी तालुक्यात विक्रमी 79.37 टक्के मतदान, मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
राधानगरी तालुक्यात महिला मतदारांचा मोठा सहभाग राधानगरी (महेश तिरवडे ) : राधानगरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला असून 79.37 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. यामध्ये 73,032 पुरुष तर 65,304 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क [...]
आनंद, उत्साह आणि जल्लोष क्षणात मावळला! झुलता पाळणा कोसळून पोलीस अधिकाऱ्याचा मृ्त्यू; अनेक गंभीर जखमी
हरयाणाऱ्या फरीदाबादमध्ये सूरजकुंड यात्रेमध्ये एक विचित्र अपघात झाला असून एका पोलीस अधिकाऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. भर गर्दीमध्ये घडलेल्या या अपघातामुळे यात्रेमधलं आनंदी वातावरण एका क्षणात दु:खमय झालं. अधिक माहिती अशी की, मृत पोलीस अधिकारी जगदीश प्रसाद यांच्यासह 26 जण एका पाळण्यामध्ये बसले होते. पाळण्यात बसेपर्यंत […]
मुंबईच्या आगामी संभाव्य महापौर रितू तावडे यांनी मुंबई बांगलादेशीमुक्त करू असं विधान केलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर आणि अर्थसंकल्पातील घोषणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. हे अवैध बांगलादेशींना देशाबाहेर घालवायला निघाले आहेत, त्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा. हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या बांगलादेशला मोदी सरकारकडून कोट्यवधींची मदत केली आहे, असा […]
ओला उबर चालकांचा संप, प्रवाशांचे हाल; रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट
ॲप-आधारित कॅब आणि ऑटो-रिक्षा चालकांच्या देशव्यापी एकदिवसीय संपामुळे शनिवारी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लांब अंतराच्या प्रवासासाठी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहन मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट केली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. शहरात नियमित मीटर रिक्षा उपलब्ध असल्या तरी ॲप-आधारित सेवांची कमतरता […]
संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी झालेल्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संघावर हल्लाबोल केला. कालच्या संघाच्या कार्यक्रमात सलमानला दिलेलं आमंत्रण हे गर्दी जमवण्यासाठी होतं की यापुढे आता संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का?” असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांनी […]
पुरुषाने बुरखा घालून महिलांच्या डब्यातून केला प्रवास, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपी सध्या फरार आहे. शुक्रवारी दुपारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांना बुरखा घातलेल्या एका प्रवाशाबद्दल संशय आला. त्यांनी त्याला विचारपूस केली […]
दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेलसमोरील भागात कल्व्हर्टस् बनविण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने या कामाची पाहणी करण्यात आली तसेच पावसाळय़ापूर्वी कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळय़ात दिंडोशीतील रत्नागिरी हॉटेलसमोर पाणी साचल्यामुळे नागरी निवारा म्हाडा संकल्प येथील लोकांना त्रास होत होता. याबाबत विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 40 चे नगरसेवक तुळशीराम शिंदे व […]
कॉल सेंटरमधील 50 टक्के नोकऱ्या ‘एआय’ खाणार, आयबीएमच्या सीईओ यांनी व्यक्त केली भीती
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे नोकऱया धोक्यात आल्या आहेत, अशी भीती सर्वच क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अनेक सेक्टरमध्येही एआयने आपले वर्चस्व निर्माण केल्याचेही दिसत आहे. एआयमुळे अनेक कामे ऑटोमेटिक होत आहेत. हजारो कर्मचाऱयांना नोकरी गमवण्याची भीती असताना आयबीएम या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी एआयचा धोका सांगितला आहे. एआयमुळे कॉल सेंटरमधील 50 टक्के […]
रशियातील बश्कोर्तोस्तानची राजधानी उफा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधील स्पोर्ट्स हॉलमध्ये शनिवारी एका माथेफिरूने केलेल्या चाकू हल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक हॉस्टेलमध्ये घुसून तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, […]
शत्रूंचे लांब पल्ल्याचे टार्गेट हिंदुस्थानच्या आवाक्यात! ‘अग्नी-3’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
हिंदुस्थानने ‘अग्नी-3’ मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्र (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज), चांदीपूर येथे करण्यात आली. रणनीतिक दल कमांड (स्ट्रटेजिक फोर्सेस कमांड – एसएफसी) च्या जवानांनी मोबाईल लाँचरद्वारे हे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण नियमित प्रशिक्षण सरावाचा एक भाग होते. अग्नी-3 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात आल्याने आता शत्रूंचे लांब पल्ल्याचे […]
जगातील टॉप हॉस्पिटलच्या यादीत ‘एम्स’ सहाव्या स्थानी
जगातील टॉप हॉस्पिटलची यादी ब्रांड फायनान्सने जारी केली आहे. या यादीत एकूण 250 हॉस्पिटलचा समावेश असून यात हिंदुस्थानच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट आफ मेडिकल सायन्स (एम्स) ला सहावे स्थान मिळाले आहे. 2026 मधील या हॉस्पिटलमध्ये अव्वल स्थान हे जॉन्स हापकिन्स मेडिसिनला मिळाले आहे. दुसरे स्थान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट आणि तिसरे स्थान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी […]
चंद्रावर वाजणार आयफोनची रिंगटोन! फोन घेऊन जाण्यास ‘नासा’कडून परवानगी
जगातील कोणत्याही व्यक्तीने कधी विचारही केला नसेल की, चंद्रावर गेलेला अंतराळवीर आपल्या कुटुंबातील व्यक्तीला थेट व्हाट्सअॅप मेसेज करेल किंवा इन्स्टाग्राम रील शेअर करेल, परंतु आता हे चित्र लवकरच खरोखर दिसणार आहे. अमेरिकी अंतराळ एजन्सी ‘नासा’ने आपला दशकभरापूर्वीचा जुना नियम बदलला आहे. अंतराळात जाणाऱया अंतराळवीरांना सोबत आयफोन घेऊन जाण्यास नासाने अखेर परवानगी दिली आहे. नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर […]
स्वित्झर्लंड नव्हे, कश्मीर आहे!
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर ट्रफिक जाम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस बर्फातून वेगाने धावत आहे. रेल्वे स्टेशनपासून जवळपासच्या सर्व परिसरात जणू बर्फाची चादर अंथरली आहे. या पांढऱ्या शुभ्र बर्फातून ‘वंदे भारत’ सुस्साट वेगाने धावत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर हे स्वित्झर्लँड […]
स्टेटससाठी आता व्हाट्सअॅप आणणार नवे फिचर
व्हाट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी स्टेटस फिचरला आणखी स्मार्ट आणि पर्सनल बनवण्याची तयारी केली आहे. सध्या स्टेटस शेअर करण्यासाठी यूजर्सकडे तीन ऑप्शन आहेत. यातील पहिला पर्याय आहे माय कॉन्टॅक्ट्स, माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट आणि ओन्ली शेअर विथ असे हे तीन पर्याय दिसतात. परंतु व्हाट्सअॅप लवकरच नवीन अपडेटमध्ये कस्टम्स लिस्टचे फिचर आणणार आहे. या नव्या फिचरमुळे यूजर्सला प्रत्येक स्टेटससाठी […]
कोयना तिचे गाव…हिरकणी तिचे नाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली तिसरी वाघीण
जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणाऱया पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा नंतर आता तिसरी वाघीण दाखल झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडून आणलेल्या या वाघिणीस आज कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात मुक्त करण्यात आले. सह्याद्रुमीधील गाईड मंडळींनी या वाघिणीला ‘हिरकणी’ हे नाव दिले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून या […]
रितू तावडे मुळच्या काँग्रेसच्याच! दुसऱ्या टर्ममध्ये सर्वोच्च पदावर
पालिकेच्या 78 व्या महापौर ठरलेल्या रितू तावडे मूळच्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. 2012 पर्यंत त्या काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होत्या. मात्र 2012 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा नगसेविका म्हणून निवडून आल्या. पालिकेच्या शिक्षण समितीसह अनेक पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. महापौर रितू तावडे प्रभाग क्र. 127 मधून निवडणूक लढून त्या जिंकून आल्या आहे. त्यांनी मुंबई […]
हिजबुल्लाह संघटनेत फेरबदल, वफीकला हटवले
लेबनानची संघटना हिजबुल्लाहने संघटनेत फेरबदल केले असून वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वफीक सफाला पदावरून हटवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाने स्वतः पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर नेतृत्वाने सफाचा राजीनामा स्वीकारला. सफा हा अनेक दशकापासून संघटनेत संपर्क आणि समन्वयकचा प्रमुख होता. तसेच लेबनानच्या सुरक्षा एजन्सीसोबत काम पाहत होता. वफीक सफाच्या जागी आता हुसैन अब्दुल्लाहकडे […]
वेस्ट इंडिजचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय, हेटमायरचे अर्धशतक, शेफर्डचे हॅट्ट्रिकसह पाच बळी
शिमरोन हेटमायरच्या तुफानी फलंदाजीने आणि रोमारिओ शेफर्डच्या विध्वंसक गोलंदाजीने वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या ‘ग्रुप सी’ मधील सामन्यात स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत विजयी सलामी ठोकली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 182 धावांचा डोंगर उभारला. शिमरोन हेटमायरने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत स्कॉटलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 36 चेंडूंत दोन चौकार आणि […]
पाकिस्तानी कारागृहात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू
पाकिस्तानातील कराची कारागृहात बंद असलेल्या एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. भागाभाई बामनिया असे या मृत्यू झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे. ते गुजरातमधील गिर सोमनाथ जिह्यातील चिखली गावाचे रहिवासी होते. मच्छीमार भागा भाई बामनिया अचानक आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पाकिस्तानातील रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी कारागृह हिंदुस्थानी मच्छीमारांसाठी मृत्यूचा सापळा बनले […]
आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश
मुंबईजवळील समुद्रात भारतीयतटरक्षक दलाची कारवाई :तीन जहाजे ताब्यात प्रतिनिधी/ वास्को भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या पश्चिमेस सुमारे शंभर सागरी मैल अंतरावर केलेल्या धडक कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश केला. या तेल तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटस् गुंतलेले असल्याचे उघडकीस आले आहे. तटरक्षक दलाने या भर समुद्रातील कारवाईत तीन जहाजे ताब्यात घेतली आहेत. तटरक्षक दलाने गुरुवारी व शुक्रवारी असे [...]
बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून
21 हजार विद्यार्थी देणार परीक्षा प्रतिनिधी/ बेळगाव बारावीची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणी करण्याकडे भर देत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21 हजार 131 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी केली जात आहे.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील [...]
बांगलादेशात निपाह व्हायरसने महिलेचा मृत्यू
बांगलादेशात निपाह व्हायरसमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बांगलादेशातील या महिलेला 21 जानेवारीला निपाह व्हायरसची लक्षणे आढळली होती. ताप, डोकेदुखी, तोंडातून लाळ येणे अशी लक्षणे दिसत होती. आठवडाभराच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला अन्य कोणत्याही देशात गेली नव्हती. या घटनेमुळे आशियातील विमानतळावर स्क्रिनिंग वाढवण्यात आली आहे. दोन […]
नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाचा झटका
कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. कोर्टाने बँक ऑफ इंडिया संबंधित कर्जफेडीप्रकरणात करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. नीरव मोदीने प्रकृती ठीक नसणे, दृष्टी कमी होणे आणि जेलच्या परिस्थिती सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. परंतु, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. या […]
सौदी अरबमध्ये आता उंटाला मिळणार पासपोर्ट
सौदी अरब सरकारने सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला आहे. सौदीत आता उंटांना पासपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे उंटांची खरेदी-विक्री, ओळख आता आणखी सोपी होणार आहे. सौदीत उंटांचा वापर हा परिवहन, व्यापार आणि वाळवंटात सर्वात जास्त केला जातो. उंटाला पासपोर्ट दिल्याने सौदीत पर्यावरण, जल आणि कृषी मंत्रालय या सेक्टरचे महत्त्व वाढेल, असे सरकारला वाटते. […]
अभिनेता सलमान खान याने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. संघाच्या कार्यक्रमातील सलमानच्या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्याच्या ‘संघ दक्ष’ भूमिकेची सोशल मीडियात चर्चा रंगली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सलमान खानने हजेरी लावली.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एआयचा जोरदार बोलबाला सुरू आहे. इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून दोन महिने, चार महिने, सहा महिने, एका वर्षाच्या बाळाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एआयच्या मदतीने हे व्हिडीओ तयार केले जात आहे. छोटय़ा बाळाचा एखादा पह्टो घेऊन त्याला व्हिडीओमध्ये रूपांतरित केले जात आहे. या व्हिडीओत छोटय़ा बाळाच्या तोंडून ‘गोली मार देगा मेरे […]
शीव प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास चार धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱया काही इमारतींचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी संक्रमण सदनिकांची इमारत बांधण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. प्रतीक्षानगर येथील संक्रमण इमारत क्र. 36, 37, 53 व 54 […]
हिंडलगा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल-एक सीमकार्ड जप्त
अधिकाऱ्यांकडून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल प्रतिनिधी/ बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन बराकीमध्ये दोन मोबाईल आणि एक एअरटेल कंपनीचे सीम आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारागृह अधिकारी बसवराज वाय. बजंत्री यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. हिंडलगा कारागृह नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलिकडेच कारागृहात मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या [...]
साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 08 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 14 फेब्रुवारी 2026
>> नीलिमा प्रधान मेष – वर्चस्व सिद्ध कराल मेषेच्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. कोणताही किचकट प्रश्न सोडवू शकाल. तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. नोकरीधंद्यात वसुली होईल. नवे काम मिळेल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धेत यश मिळेल. शुभ दि. 8, 9 वृषभ – जिद्दीने यश मिळवाल वृषभेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. मानसिक […]
हनुमाननगरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ : एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद प्रतिनिधी/ बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 लाख रु. किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेऊन पलायन केले आहे. शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 4.35 च्या सुमारास हनुमाननगर सर्कल येथील ट्रयो कॅफेनजीक ही घटना घडली आहे. या प्रकरणी जयश्री [...]
यजमान भारताच्या मोहीमेला विजयाने प्रारंभ
अमेरिकेचा 29 धावांनी पराभव, सूर्यकुमार यादव ‘सामनावीर’ वृत्तसंस्था / मुंबई 2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेला यजमान भारताने विजयी सलामीने प्रारंभ केला. मात्र हा विजय मिळविताना नवोदित अमेरिका संघाने कडवा प्रतिकार दर्शविला. ‘सामनावीर’ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, [...]
मलेशियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान इब्राहिम यांच्यासोबत कारमधून प्रवास : भारतीय वंशाच्या लोकांना केले संबोधित वृत्तसंस्था/ क्वालांलपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर क्वालांलपूर येथे पोहोचले. या दौऱ्यादरम्यान मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी वैयक्तिक स्वरुपात विमानतळावर त्यांचे स्वागत केले, यातून दोन्ही नेत्यांदरम्यानचे दृढ वैयक्तिक संबंध दिसून येतात. विमानतळावर सांस्कृतिक स्वागतही करण्यात आले, ज्यात भारत आणि मलेशियाच्या संयुक्त [...]
भारतावर अठरा टक्के कराची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, वॉशिंग्टन डीसी अमेरिकेने भारतावरील व्यापार शुल्क 50 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवा 18 टक्के कर भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून लागू करण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांनी एक व्यापक व्यापारी करार करण्याचा निर्णय घेतला असून या करारासंबंधात दोन्ही देशांचे संयुक्त निवेदनही शनिवारी प्रसिद्ध करण्यात [...]
जुनैद खानसोबत जमणार जोडी आमिर खानचा पुत्र जुनैद खानचा नवा चित्रपट ‘एक दिन’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैदची झलक दिसून येत आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे. पोस्टरमध्ये जुनैद आणि साई हे हिमवृष्टीत कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीम [...]
‘धुरंधर’च्या यशानंतर सौम्याला मिळाली मोठी संधी
बॉलिवूड चित्रपटात झाली एंट्री सौम्या टंडन ही अभिनेत्री यापूर्वी ‘भाभी जी घर पर हैं’मुळे लोकप्रिय झाली होती. परंतु तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्याचे श्रेय धुरंधर या चित्रपटाचे आहे. या चित्रपटात तिची भूमिका छोटी परंतु दमदार होती. चित्रपटात रहमान डकैतला थप्पड लगावतानाच्या दृश्यामुळे सौम्या ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लोकांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले आणि [...]
तिसऱ्यांदा केरळ निवडणूक जिंकणार एलडीएफ
भाकप नेत्याचा दावा : निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळ सचिव बिनॉय विश्वम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एलडीएफ (डाव्यांची आघाडी) विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एलडीएफ तिसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन करणार असून निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल. या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये एलडीएफचे नेतृत्व डावी विचारसरणी करणार [...]
वृत्तसंस्था / तियानजीन (चीन) येथे सुरू असलेल्या 12 व्या आशियाइं इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा अॅथलिट आदर्श रामज्योती शंकरने पुरूषांच्या उंचउडी प्रकारात कांस्यपदक पटकाविले. पुरूषांच्या उंचउडी प्रकारात आदर्श शंकरने 2.19 मी.चे अंतर नोंदवित तिसऱ्या स्थानावर कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत भारताच्या प्रवीण चित्रावेलला तिहेरी उडी प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या तिहेरी उडीत तसेच महिलांच्या [...]
टी 20 वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक :रोमारियो शेफर्डचे हॅट्ट्रिकसह 5 बळी वृत्तसंस्था/ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला 35 धावांनी नमवत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 5 गडी गमावत 182 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव 147 धावांत आटोपला. विंडीजने हा सामना 35 धावांनी [...]
‘गृहलक्ष्मी’साठी जीवित प्रमाणपत्र सक्तीचे
कार्यवाहीबाबत पावले उचलण्याची मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिवांना सूचना प्रतिनिधी/ बेंगळूर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेतील अनुदानाचा गैरवापर रोखण्यासाठी नवी नियमावली लागू करण्याचा विचार चालविला आहे. मृत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ नयेत, यासाठी जीवित प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) सादर करणे अनिवार्य करण्याचा सरकारने गांभीर्याने विचार चालविला आहे. या संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी [...]
कैची धाम हे उत्तराखंडमधील ठिकाण असून ते भारतातील एक प्रमुख धार्मिकस्थळ आहे. हे स्थान हिमालयाच्या पर्वतरांगेत स्थित असून येथे अनेक तीर्थस्थळं आहेत. कैची धाममध्ये दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येत अध्यात्मिक पर्यटक दाखल होत असतात. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी येथे आश्रम स्थापन केला होता, जो आता लोकांसाठी शांतता अन् अध्यात्मिक केंद्र ठरला आहे. अंतर्गत शांततेसाठी [...]
सूडानमध्ये आरएसएफच्या हल्ल्यात 24 ठार
खार्तूम : सूडानमध्ये मागील 3 वर्षांपासून जारी गृहयुद्धामुळे देशात मानवीय संकट तीव्र होत चालले आहे. सैन्य आणि रॅपिड सपोर्ट फोर्सदरम्यान (आरएसएफ) जारी संघर्षाने देश घायाळ झाला आहे. याचदरम्यान आरसीएफने नॉर्थ कोर्डोफान प्रांतात शनिवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 24 जण मारले गेले असून यात 8 मुलांचा समावेश आहे. दुबेकिर भागातून विस्थापित झालेले लोक वाहनातून जात असताना हा [...]
कूनोमध्ये आशा चित्त्याने दिला 5 बछड्यांना जन्म
श्योपूर मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमध्ये नामीबियन चित्ता आशाने 5 बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे भारतात जन्मलेल्या जिवंत बछड्यांची संख्या वाढून 24 झाली आहे. याचबरोबर देशात चित्त्यांची एकूण संख्या आता 35 वर पोहोचली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी याची घोषणा करत याला प्रोजेक्ट चित्तासाठी अपार गर्व आणि आनंदाचा क्षण संबोधिले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही [...]
सूरजकुंड मेळ्यात झूला तुटल्याने अपघात
एका भाविकाचा मृत्यू, 7 जखमी, वेगाने बचावकार्य वृत्तसंस्था / नवी दिल्ली हरियाणातील सूरजकुंड येथे होत असलेल्या जगप्रसिद्ध मेळ्यातील एक झूला तुटल्याने मोठा अपघात झाला आहे. शनिवारी संध्याकाळी हा झूला तुटल्याने मेळ्याला उपस्थित त्यावरील काही खाली पाण्यात पडले. जखमी भाविकांची संख्या 7 ते 8 असल्याची माहिती देण्यात आली. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सेतू तुटला तेव्हा [...]
आसाममध्ये 14 कोटीचे अमली पदार्थ जप्त
आसाम आसामच्या कछार जिल्ह्यात पोलीस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त कारवाईत 14 कोटी मूल्याचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका इसमालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कछार जिल्ह्याच्या तोलेंग्राम क्षेत्रात करण्यात आली असून जप्त सामग्रीत 154 पाकिटांमध्ये भरलेले हेरॉइन आणि 10 हजार याबा टॅबलेट सामील असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी दिली [...]
अमेरिकेने दिला पाकिस्तानला झटका
संपूर्ण काश्मीर-अक्साई चीन भारताच्या नकाशात वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेने पाकिस्तानला चांगलाच झटका दिला आहे. भारत आणि अमेरिका यांनी शनिवारी दोन्ही देशांतील अतंरिम व्यापार करारासंबंधी रुपरेषा प्रसिद्ध करणारे संयुक्त निवेदन प्रसारित केले आहे. या रुपरेषेच्या कागदपत्रात अमेरिकेने पाकव्याप्त काश्मीसह पूर्ण काश्मीर आणि चीनने बळकाविलेला ‘अक्साई चीन’ हा प्रदेश भारताच्या नकाशात दाखविला आहे. अमेरिकेने अशी कृती [...]
केसांसाठी नवस केले जाणारे मंदिर
केस उगविण्यासाठी येतात लोक जपानच्या सांस्कृतिक वारशात अनेक अनोखी मंदिरे आहेत, परंतु कीओतोचे मिकामी श्राइन खरोखरच वेगळे आहे. हे मंदिर पूर्णपणे केसांना समर्पित आहे. या मंदिरात लोक केस उगविणे, केस गळण्यापासून वाचविणे, केसांच आरोग्य आणि हेयरड्रेसर्सची परीक्षा पास करविण्याची प्रार्थना घेऊन येतात. अराशियामाच्या प्रसिद्ध बांबू फॉरेस्टपासून केवळ काही अंतरावरील हे मंदिर सोशल मीडियावर व्हायरल होत [...]
अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी ठेवणारा ‘नियतीशी करार’ केला. मोदी यांनी हा करार मोडून भारताला अमेरिकेचे गुलाम केले! पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 आागस्ट 1947 ला भारताच्या संविधान सभेत स्वातंत्र्याच्या प्रसंगी ऐतिहासिक आणि भावनिक भाषण केले. […]
मुनीर यांनी दिला होता ‘गजवा-ए-हिंद’चा नारा
जैशच्या दहशतवाद्याकडून कबुली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाक सैन्यप्रमुखाचे कृत्य वृत्तसंस्था/ रावळकोट जैश-ए-मोहम्मदच्या एका म्होरक्याने ऑपरेशन सिंदूरवरून मोठी कबुली दिली आहे. पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसिम मुनीर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा संघर्ष म्हणजे गजवा-ए-हिंद असल्याचे दहशतवाद्यांना सांगितले होते, असा खुलासा दहशतवादी इलियास काश्मिरीने केला आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये जैशचा टॉप कमांडर इलियासने जैशच्या दहशतवाद्यांदरम्यान हा खुलासा केला आहे. [...]
विजेत्या भारतीय युवा संघाला 7.5 कोटींचे बक्षीस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील झिम्बाब्वेमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) 7.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित साकीया यांनी भारतीय युवा संघाचे खास अभिनंदन केले आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय युवा संघाने एकही सामना न गमविताना [...]
जय शहा यांच्या संघांना शुभेच्छा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. सदर स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त यजमानपदाने भरविली जात आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 55 सामने खेळविले जात असून 20 संघांचा यामध्ये समावेश आहे. हे संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. यजमान भारताचा पहिला सामना मुंबईत अमेरिकेबरोबर झाला आहे. या [...]
क्रेमेशन इंक टॅटू सध्या फॅशनमध्ये
शरीरावर मृताची राख गेंदवून घेण्याचा प्रकार फॅशन आणि आठवणींचा एक नवा परंतु हैराण करणारा ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. याला ‘क्रेमेशन इंक टॅटू’ नाव देण्यात आले आहे. लोक आता स्वत:च्या मृत स्वकीयांच्या क्रेमेटेड राखेला टॅटू इंकमध्ये बदलून शरीरावर स्थायी स्वरुपात गोंदवून घेत आहेत. एक चमचा राखेपासून सुरू होत ही प्रक्रिया हायटेक फिल्ट्रेशन आणि मिक्सिंगला सामोरी [...]
भारत कधीच मुस्लीमबहुल होणार नाही : ओवैसी
हिंदूंपेक्षा कधीच लोकसंख्या अधिक नसणार वृत्तसंस्था/ निजामाबाद भारतात मुस्लिमांची लोकसंख्या कधीच हिंदूंपेक्षा अधिक होणार नाही असे वक्तव्य एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणातील पालिका निवडणुकीपूर्वी निजामाबाद येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना केले आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या भाषणात पूर्ण जगाची लोकसंख्या वृद्ध होत असताना भारताची लोकसंख्या युवा असल्याचे म्हटले होते असा उल्लेख ओवैसी [...]
नागरिकत्वाबद्दल आरोप राजकीय कट
न्यायालयासमोर सोनिया गांधी यांच्या वतीने दावा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1983 साली भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याच्या तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव सामील करण्यात आल्याचा आरोप करणारी तक्रार राजकीय उद्देशाने करण्यात आली होती असा दावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या वकिलाने शनिवारी दिल्लीतील एका न्यायालयात केला आहे. हा जबाब विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांच्या समोर सादर करण्यात आला. [...]
आजचे भविष्य रविवार दि. 8 फेब्रुवारी 2026
मेष: मुलांच्या बक्षीस समारंभात आपलाही सहभाग वृषभ: लांबचा प्रवास टाळावा, आरोग्य कमकुवत बनवेल. मिथुन: अध्यात्मिक लाभासाठी ध्यान व योगाचा अवलंब कराल कर्क: निसर्गरम्य ठिकाणी काढलेली एखादी सहल आनंदमयी ठरेल. सिंह: प्रवासामुळे थकवा वाटेल, ताण येईल. कन्या: तब्येत ठणठणीत असेल, कुटुंबाला प्राधान्य द्या तुळ: मनावरील ताण दूर सारा, प्रगतीत अडथळा बनेल वृश्चिक: उच्च आत्माविश्वास चांगल्या कामासाठी [...]

33 C