काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, जनता भाजपसोबत नसून द्रमुक (DMK) आणि काँग्रेसच्या बाजूने आहे. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुकची युती विजय मिळवून आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. “पंतप्रधान […]
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या पहिल्या टप्प्यासाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) शनिवारी आपल्या स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सुब्रत बक्षी, चंद्रिमा भट्टाचार्य, फिरहाद हकीम, अरुप विश्वास, कल्याण बॅनर्जी, डॉ. मानस रंजन भुनिया, डॉ. […]
४८ तासांत डील करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा; ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कडक इशारा दिला असून डील करण्यासाठी आता केवळ ४८ तासांचा वेळ उरला असल्याचे म्हटले आहे. या वेळेत जर कोणताही करार झाला नाही, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते, असा स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिला आहे. इराणने एकतर करार करावा किंवा हॉर्मुझची सामुद्रधुनी (Hormuz Strait) खुली करावी, यासाठी […]
जैन मुनींना फटके खायचे आहेत का? मनोज जरांगेंचा थेट इशारा
जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानांनंतर नवा वाद निर्माण झाला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जैन मुनींवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “जैन मुनींना फटके खायचे आहेत का?” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हे मुनी म्हणजे […]
कमतरता नाही तर, लोक गॅस सिलिंडरसाठी रांगा का लावत आहेत? आपचा केंद्र सरकारला सवाल
देशभरात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईवरून आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र आणि दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीसह संपूर्ण देशात जर एलपीजीची कमतरता नाही, तर मग गॅस एजन्सींसमोर सिलिंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा का लागत आहेत, असा सवाल आपने उपस्थित केला आहे. आम आदमी पार्टीने याप्रकरणी मोदी सरकारला समोर येऊन जनतेला खरे काय […]
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज यांनी वयाच्या 95 व्या वर्षी इहलोक सोडून वैकुंठवासी झाले. त्यांच्या इहलोकी जाण्याने असंख्य भक्तगन शोकसागरात बुडाले आहेत. स्वर्गीय महंत प. पू. अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाल्यानंतर प. पू.मधुसूदनजी भारती महाराज हे सन 1978 साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर […]
जगबुडी पुलावर भीषण अपघात! इथेनॉल टँकर पलटी होऊन केमिकल थेट नदीत
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचा इथेनॉल केमिकल भरलेला टॅंकर जगबुडी नदीच्या पुलावर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज दुपारी दीड वाजता झाला. टॅंकर पलटी झाल्यामुळे टँकरमधील इथेनॉल केमिकल गळती होऊन ते थेट जगबुडी नदीत मिसळल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे खेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड शहर व आजूबाजूच्या गावातील पाणी […]
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका जनसभेत बोलताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला. “जो कोणी भाजप-आरएसएसवर प्रश्न उपस्थित करतो, त्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. केरळममधील एर्नाकुलम बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपच्या विरोधात बोलल्यामुळे माझ्यावर […]
कोकणातील पारंपरिक नमन लोककलेला सध्या नवचैतन्य लाभले असून गावोगावी विविध कार्यक्रमांत या कलेची जोरदार मागणी वाढताना दिसत आहे. सार्वजनिक महापूजा, सत्यनारायण पूजन, लग्न समारंभ तसेच ग्रामदैवतांच्या जत्रांमध्ये नमन सादरीकरणाला प्राधान्य दिले जात असून रसिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नमन कलेची ‘मनोरंजन एक्सप्रेस’ सध्या अक्षरशः सुसाट धावत असल्याचे चित्र आहे. पूर्वापार चालत आलेली ही लोककला […]
Toll Plaza New Rule –१० एप्रिलपासून टोलचे नियम बदलणार; नवीन नियमांमुळे खर्च वाढेल, वाचा सविस्तर
जर तुम्ही हायवे किंवा एक्सप्रेसवेवरून वारंवार प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेत १० एप्रिलपासून टोल प्लाझावरील रोख व्यवहार (Cash Payment) पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. या नवीन नियमांमुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर भार पडणार असून प्रवासाची पद्धतही बदलणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयानुसार, आता […]
अंतराळातून दिसले पृथ्वीचे मोहक रूप, नासाच्या Artemis II मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपले खास फोटो
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने (NASA) आपल्या ऐतिहासिक आर्टेमिस-२ (Artemis II) मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी टिपलेली पृथ्वीचे खास फोटो प्रसिद्ध केले आहेत. मिशन कमांडर रीड वाइसमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवरून ही प्रकाशचित्रे काढली असून, यामध्ये आपली पृथ्वी अत्यंत विलोभनीय रूपात पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या फोटोत सूर्य पृथ्वीच्या मागे लपताना दिसत आहे. या खास क्षणी पृथ्वीच्या […]
ओवळीये खून प्रकरणातील संशयितांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून 71 वर्षीय सौ.सरस्वती धोंडी सावंत या वृद्ध महिलेच्या डोक्यावर मानेवर व पाठीवर कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले त्याच गावातील व वाडीतील संशयित विजय कृष्णा सावंत व रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्रांना न्यायालयाने पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना रविवारी घडली होती. या घटनेबाबत मृत [...]
शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा आहेर तुळजाभवानीला अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी)- खंडाळा (तुळजापूर) येथिल 350 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ऐतिहासिक परंपरा असलेल्या मानाच्या कावडींचे शिखर शिंगणापुर येथुन श्री शंभु महादेवाचे दर्शन करुन परतीच्या मार्गावर श्रीतुळजाभवानी मंदिरामध्ये आगमन झाले. यावेळी छञपती शिवाजी महाराजांच्या वंशज श्रीमंत कल्पणाराजे भोसले यांच्या वतिने शंभुमहादेव देवस्थानकडुन पाठविण्यात आलेल्या मानाच्या (साडीचोळी-महावस्त्र, विभुती, दवणागोळी) असा आहेर आई तुळजाभवानीला अर्पण करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतिने देवीजींचे मुख्य मंहत श्री वाकोजी बुवा, मुख्य पुजारी धनंजय कदम-पाटिल यांनी हा आहेर स्विकारला. शिखर शिंगणापुरला जाताना सदर कावडी श्री तुळजाभवानी मंदिराच्या वतिने शंभु महादेवाकरीता मानाचा फेटा, धोतर, शाल, कुंकु असा आहेर नेत असतात. मानाच्या कावडी मंदिरात येताच हालगी झांझेच्या निनादाने मंदिर परीसर दणानुन गेला.. कावडींच्या दर्शना करीता भाविकांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थित मंदिर संस्थानचे प्रतिनिधी व कावडीच्या वतिने सुधाकर पवार, अशोक पवार, महादेव कुंभार, पियुष पवार, संतोष काकडे, दत्ता पवार,माणिकदादा पवार, स्वराज लोखंडे, नाना पवार, ज्ञानेश्वर मोरे, कोकाटे, रावण कोकाटे, संजय जाधव, श्रीमंत पवार, मनमथ धुमाळ, आदी उपस्थित होते.
हनुमान जन्मोत्सव व क्रीडा भारती दिनानिमित्त 203 खेळाडूंनी दंड-बैठका
धाराशिव (प्रतिनिधी)- हनुमान जन्मोत्सव आणि क्रीडा भारती दिनाचे औचित्य साधत शहरात एक अनोखा फिटनेस उपक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने तब्बल 203 खेळाडूंनी एकत्रितपणे दंड-बैठका करत शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश दिला. क्रीडा भारतीच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमाची सुरवात क्रीडा भारती चे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष रामकृष्ण खडके यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रांत क्रीडा केंद्र प्रमुख प्रवीण गडदे, जिल्हा मंत्री ज्ञानेश्वर भुतेकर, सह मंत्री अभय वाघोलीकर व योगेश थोरबोले, माजी नगरसेवक प्रल्हाद धतुरे, सदस्य राजेश महाजन, मनोज पतंगे, यशोदीप कदम, मनोज जाधवर आदीसह खेळाडू, पालक, क्रीडा प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपास्तिथी होती. क्रीडा संकुलातील प्रसन्ना वातावरणामध्ये पार पडलेल्या या उपक्रमात विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हनुमानाच्या पराक्रम, शक्ती आणि शिस्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत खेळाडूंनी एकजुटीचे दर्शन घडवले. कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. “निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे गरजेचे आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये व्यायामाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
पंडित दिनदयाळ उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियान उत्साहात
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची निर्मिती व्हावी या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 चे आयोजन संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडत आहेत. धाराशिव जिल्यातील संघटनात्मक 19 मंडळा पैकी 12 मंडळांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले .या प्रशिक्षण वर्गास 12 मंडळातून सुमारे 1680 हून अधिक जेष्ठ, युवा, महिला भगिनी प्रशिक्षित झाल्या आहेत. या वर्गांमध्ये वैचारिक अधिष्ठान, भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि विस्तार, पक्ष संघटन विस्ताराची दृष्टी, पक्षाची कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी, सोशल मीडिया आणि AI तसेच नमो ॲप आणि सरल ॲप, बूथ व्यवस्थापन, मन की बात या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण महा अभियाना मध्ये 19 मंडळापैकी 12 मंडळामध्ये शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून, उर्वरित मंडलांमधील वर्गांचे पण लवकरच पूर्ण होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.
जोतिबा यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी
भुम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्या मधील जोतिबाचीवाडी येथील जोतिबा याञा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावच्या पंचक्रोशीतील तसेच बीड, सोलापूर ,अहिल्यानगर, भाविकांनी याञेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात्रेच्या निमित्ताने जोतिबा देवस्थान परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. जोतिबाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या जोतिबा यात्रेच्या निमित्ताने याही वर्षी सासन काठ्या,गुलाल खोबऱ्याची उधळण करत शिस्तबद्ध पद्धतीने नयनरम्य जोतिबा पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी वाद्यांच्या गजरात निघालेली यात्रा पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याञेतील धार्मिक उत्सवामुळे गावात एकात्मता, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम अनुभवायला मिळाला. आंबिल,शेरण्या वाटप, सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर, भव्य कुस्ती स्पर्धा, यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. जोतिबा यात्रेमुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरच्या श्री जोतिबाचे अधिष्ठान म्हणून जोतिबाचीवाडी येथील जोतिबा देवस्थानची विशेष ओळख आहे. चैञ पौर्णिमेच्या निमित्ताने जोतिबा याञा उत्सव सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. यात्रेच्या निमित्ताने हजारो भावी एकत्रित येत जोतिबाच्या भक्तीमय गुलालात रंगून जातात. भक्ती आणि संस्कृतीचा संगम यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी कायमच जोपासली आहे. याञेच्या निमित्ताने व्यावसायिक व नोकरीच्या निमित्ताने असलेले सर्वजण गावकरी एकत्रित येतात हा सर्वांसाठी आनंदही सोहळाच असतो. - लक्ष्मण जाधव जोतिबाचीवाडी ग्रामस्थ
चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश संकटात, गॅस टंचाईला सरकारच जबाबदार –मल्लिकार्जुन खरगे
देशात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आज देशाला या संकटाचा सामना करावा लागत असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बेंगळुरू येथे ‘एएनआय’शी (ANI) संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “देशात गॅसची मोठी समस्या निर्माण […]
Satara News : काळ्या कोळशाला आले सोनेरी दिवस!
गॅस टंचाईमुळे घराघरांत, हॉटेलांत पेटल्या कोळशाच्या शेगड्या सातारा : होर्मुज जलडमरूमधील वाहतूक बंदीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. ऑईल टँकर जहाजे अडकून पडल्याने अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही व्यावसायिक गॅस पुरवठा मर्यादित करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीत [...]
पुढची ५ वर्षे शांततेत जगायचे असेल, तर भाजपला रोखण्यासाठी एकत्र या; ममता बॅनर्जींचे जनतेला आवाहन
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “जर तुम्हाला पुढची पाच वर्षे शांततेत जगायचे असेल, तर भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी मालदा येथील माणिकचक येथील जाहीर सभेत केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे. ते […]
इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये आज (शनिवार) अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळत नसून त्याच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानला टी 20 वर्ल्डकप जिंकून देणारा सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादवने हार्दिकच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. हार्दिकची प्रकृती […]
अमेरिकन पायलटला पकडल्यास मिळणार ५५ लाख… F-15 पाडल्यानंतर इराणची मोठी घोषणा
इराणने शुक्रवारी अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. या घटनेनंतर एक अमेरिकन पायलट इराणच्या हद्दीत बेपत्ता झाला असून, त्याला पकडण्यासाठी इराणने आता बक्षीस जाहीर केले आहे. वैमानिकाची शोधमोहीम आणि बक्षीस ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या बेपत्ता पायलटला शोध घेत […]
इमारतीवरून पडून गंभीर जखमी महिलेचा मृत्यू
सावंतवाडी सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब द्वारका नगरी परिसरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या रुबी खातून मुन्ना खान (20) मूळ रा. बिहार , सध्या रा. द्वारकानगरी सावंतवाडी यांचे काल शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उपचारासाठी मोटरसायकलने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले [...]
ज्ञानदेव आबासाहेब देशमुख गुरुजी यांचे निधन
परंडा (प्रतिनिधी)- माजी जिल्हा परिषद शिक्षक ज्ञानदेव आबासाहेब देशमुख यांचे 3 एप्रिल रोजी सकाळी 10:40 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे. राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांचे ते आजोबा होते. त्यांच्यावर खासापुरी या मूळगावी शुक्रवार 3 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
छत्रपती शिवरायांची तुलना एखाद्या पामराशी करणे हा घोर अपराध- ॲड. संजय भोरे
धाराशिव (प्रतिनिधी)- मंत्री नितेश राणे यांची उंची शिवरायांएवढी असे वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र याने केले आहे. असे वक्तव्य करताना मुनीच्या जिभेला आणि त्याच्या टिल्लू एवढ्या बुद्धीला कदाचित हे भान नसेल की यामुळे मराठ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. नितेश राणे ची काय दलाली करायची असेल ते मुनीने खुशाल करावी; पण टिल्लू एवढ्या नितेशची चक्क छत्रपती शिवरायांशी तुलना करून मुनी निलेशचंद्र याने तमाम मराठ्यांची व शिवप्रेमींची मने दुखावली आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही याचं भान त्याने ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक जैन धर्म हा अहिंसा परमो धर्म: या तत्त्वावर चालतो. पण निलेशचंद्र याने धर्माचा वापर शांततेसाठी करण्याऐवजी समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला आहे, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला घातक आहे.“ काही दिवसांपूर्वी मुनी नयन पद्मसागर याने देखील महाराणी ताराराणी या जैन होत्या असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे अशी वादग्रस्त वक्तव्ये जाणून बुजून होत असतील व दोन समाजात असणारा सलोखा नाहक जर कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे बरोबर नाही.यातून त्यांना काय साध्य करायचे आहे या दोघांनी उघड उघड सांगावे. मराठे त्यांचा चांगला समाचार घेतील. मराठ्यांनी नेहमी शिवछत्रपतींचा घालून दिलेला समतेचा आदर्श जोपासला आहे पण याचा अर्थ असा होत नाही की मराठ्यांचं रक्त थंडावलेलं आहे. मुंबईतील दादर येथील कबुतरखाना आरोग्याच्या कारणास्तव (श्वसनाचे आजार) महानगरपालिकेने बंद केला होता. याला विरोध करताना निलेशचंद्र मुनी याने जैन समाज शांतताप्रिय आहे, पण धर्मासाठी गरज पडली तर आम्ही शस्त्रही उचलू,“ असे विधान केले होते. तसेच त्यावेळी त्याने कोर्टाच्या आदेशांचे पालन करणार नसल्याचे म्हटले होते, ज्यामुळे सामाजिक शांततेवर परिणाम झाला होता. एवढा माज आणि मस्ती चांगली नसते.त्याच मुनी निलेशचंद्र याने हे कायम लक्षात ठेवावे मराठ्यांनी भल्या भल्यांचा माज उतरवलेला आहे. असा इशारा ॲड संजय भोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
Satara News : कराड येथील ओंड परिसरात अवकाळीचा पावसाचा तडाखा!
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड कराड : कराड दक्षिणमधील ओंड परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात घरांची व गोठ्यांची पडझड तसेच शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. ताबडतोब पंचनामे करून, बाधितांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना [...]
भूममध्ये प्रा. धनंजय जोशींच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध
भूम (प्रतिनिधी)- कसबा येथील श्रीराम मंदिरात राम नवमी व हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीत मैफिलीत नांदेडचे किराणा घरणा प्रसिद्ध गायक प्रा. धनंजय जोशी यांनी आपल्या सुमधुर गायकीने भूमकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “बाजे रे मुरलीया बाजे“ या गवळणीने मैफिलीत रंगत आणली, तर त्यांच्या आवाजात श्रोत्यांना साक्षात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांचा प्रत्यय आला. स्वरांची जुगलबंदी आणि भक्तिरसाची उधळण 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता या मैफिलीचा प्रारंभ पखवाज आसाराम साबळे आणि तबल्याच्या हनुमंत फडतरे बहारदार जुगलबंदीने झाला. तालवाद्यांच्या या वादनाने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर प्रा. धनंजय जोशी यांनी “तुझी मूर्ती सुंदर देवा“ या अभंगाने आपल्या गायनाचा श्रीगणेशा केला. त्यांनी आपल्या खड्या आवाजात “पद्मनाभ नारायणा“ आणि “आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी“ हे अभंग सादर केले. या भक्तीगीतांनी उपस्थित प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले. केवळ शास्त्रीय आणि भक्ती संगीतच नव्हे, तर “हे सुरांनो चंद्र व्हा“ हे भावगीतही त्यांनी अत्यंत नजाकतीने सादर करून रसिकांची मने जिंकली. पंडित भीमसेन जोशींच्या स्मृतींना उजाळा प्रा. धनंजय जोशी यांच्या गायनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज आणि गायकीची ढब. त्यांच्या आवाजात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची हुबेहूब झलक पाहायला मिळाली. जणू स्वरभास्करच प्रत्यक्ष समोर गात आहेत, असा भास श्रोत्यांना होत होता. “तो नर धन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी“ ही भैरवी सादर केली. या मैफिलीला साजेसी साथसंगत पेटी सुरेश फडतरे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. देशपांडे यांनी केले.
चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी लाखो भाविकांनी देवीच्या चरणी टेकला माथा
कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा राज्यातील मोठया प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून यशस्वी यात्रा ठरली आहे.यंदा श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असुन देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज शुक्रवार (दि. 3) रोजी मोठया उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील पंधरा लाख्याचा वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते.येडेश्वरी देवीची पालखी मंदिरावरुन चुन्याच्या रानात येताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचुन पालखीवर टाकत आई राधा उदे उदेचा एकच जय घोष केला भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता. आज सकाळी 8 वा.येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन पाच दिवस चालणाऱ्या आमराई मंदिराकडे हालगी,जहांज,संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली.मुख्य चुन्याच्या रानात पालखी 10 वा.येताच भाविकांनी आई राधा उदे उदे,येडुसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला.श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रे नंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्या नंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे.त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर,शेतमजूर,बिगारी,चाकरमाने कर्मचारी,लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी,भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात.काळानुरुप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच गेल्याने आता ती लाखोंच्या संख्येवर पोहचली आणि श्री येडेश्वरी देवीची यात्रेला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा असा मान प्रशासन स्तरावर आल्याने यात्रा पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे. श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला वेगळे महत्व असुन यात्रेत या दिवशी येणाऱ्या पालखीवर चुन्याच्या रानात पालखी येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्यासाठी लाखों भाविकांची झुंबड उडते त्यामुळे भाविकांची आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी स्पर्धाच लागली आहे की काय असे चित्र दिसत होते.यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावुन भाजला जातो यात्रेनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहचल्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते त्यामुळे यात्रेत चुना वेचण्याचा प्रथा रुढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे.ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली असुन चुन्याच्या रानात पालखी येताच चुनखडीचे कडे आपोआप रानात येतात असे लोक सांगतात पूर्वीच्या तुलनेत चुन्याच्या रानात लोकवस्ती वाढली असली तरी दरवर्षी भाविकांच्या हाती चुनखडी कशी येते ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आज पर्यंत ही प्रक्रिया लुप्त का झाली नाही खुन्याचे खडे आपोआप वर येतात यावर देवी येडेश्वरी जागृत देवी असण्याचा भाविकांना विश्वास येतो त्यामुळेच भाविकांची तोबा गर्दी होते.यात्रेचे स्वरुपही यामुळेच वाढले आहे. चुन्याच्या रानातून देवीची पालखी 11 वा.आमराई मंदिरातील पालखी मंदिरात पोचली येथेही पालखी दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त केला होता.आज पालखी मुख्यमंदिरातुन पोलिस प्रशासनाच्या कमांडो,दंगल नियंत्रण पथक,देवस्थान सयंसेवक,स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात निघाल्याने सुरक्षित पणे पालखी मिरवत आली.यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी,देवस्थानचे पुजारी,मानकरी,पालखी सोबत होते. राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठीक ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. देवीच्या पालखीचे आज चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदिराकडे आगमन होणार असल्याने स्थानिक भविकात मोठा उत्साह होता.पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक,वाणीगल्ली,रोकडेश्वर मारुती मंदिर चौक,छत्रपती मार्केट,संभाजी नगर रस्त्यावर मोठं मोठया रांगोळी,फुलांच्या रांगोळीची सजावट केली होती. गुरुवार पहिल्या पोर्णिमेपासूनच भाविक लाखोंच्या संख्येने येरमाळ्यात दाखल होत होते.भाविकांची विक्रमी संख्या दाखल झाल्याने प्रत्येकाच्या हाती असलेले प्रत्येक कंपनीचे स्मार्ट फोन कव्हरेज मिळतं नसल्याने शोभेची वस्तु ठरले.यामुळे 2 तारखेचा दुपार पासून ऑनलाइन खरेदी,विक्री व्यवहार सर्व्हर डाऊन असल्याने बंद राहिले.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही वृत्तसंकलन करताना मोठी अडचणी येत होत्या यात्रा परिसर सोडून दहा किमी बाहेर गेल्यावर वृत्तकामी सर्वर उपलब्ध झाले. यंदाची यात्रा म्हणजे भाविकांच्या जमलेल्या अलोट गर्दीने आज पर्यंतचे विक्रम मोडीत काढणारी यात्रा ठरली चुना वेचाण्याच्या कार्यक्रमानंतर परत फिरलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते बीड ,येरमाळा ते कळंब येरमाळा ते बार्शी येरमाळा ते येडशीया चारी दिशेलाही सायंकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने प्रभावित सेवा झालीहोती . रस्त्यावरील भरधाव वाहतूक संथगतीने चालू होती.
शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण
धाराशिव (प्रतिनिधी)- माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून शाळेत काठीने अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला 18 ते 20 वेळा काठीने संपूर्ण अंगावर बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी मारहाण करणारे शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, धाराशिव शहरातील जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत साईरामनगर, धाराशिव येथील गोपाळ नारायण कोळी (वय 40, व्यवसाय) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा 13 वर्षीय मुलगा मनीषराज गोपाळ कोळी याला शाळेची वर्गाची वही का आणली नाही, या कारणावरून शिक्षक प्रफुल जाधव यांनी काठीने मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर व डाव्या पिंडरीवर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला असून पालकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1) आणि बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा 2015 मधील कलम 75 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाण करणारे शिक्षकाने यापूर्वीही या विद्यार्थ्याला दोन वेळेला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचे विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले. तसेच किरकोळ कारणावरून वारंवार शाळेमध्ये विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.
मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
धाराशिव (प्रतिनिधी)- येडेश्वरी यात्रेदरम्यान महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या या टोळीला पोलिसांनी तत्परतेने जेरबंद केले. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव) यांच्या आदेशानुसार यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी चोरीसारखे गुन्हे घडू नयेत यासाठी पथकाकडून पायी गस्त घालण्यात येत होती. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पदरीत्या फिरत असून ते चोरीच्या उद्देशाने गर्दीत वावरत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयितांवर पाळत ठेवली. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर ते गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत येरमाळा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, ता. पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली. त्यांच्या वर्तनावर संशय आल्याने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अनिल शिंदे याच्या पँटच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी कबुली दिली की, सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान येरमाळा-बीड महामार्गावरील पुलाजवळ भाविकांसाठी करण्यात आलेल्या अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून ते अनिल शिंदे याच्याकडे जमा केले जात होते. सदर कारवाईत एकूण 1 लाख 31 हजार रुपयांच्या किंमतीचे चार सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस शोभा बांगर, महेबूब अरब, रोहित दंडनाईक या पथकाने पार पाडले.
पौर्णिमेच्या दोन घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात चैत्री पौर्णिमा दिनी गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी घडलेल्या दोन घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाविकांची प्रचंड गर्दी असताना या घटना घडल्याने गर्दीच्या दिवशी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पहिली घटना धाराशिव रोडवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि भाविक यांच्यात घडली. याप्रकरणी भाजपाचे काक्रंबा जिल्हा परिषद गटातील सदस्य दयानंद शिंदे हे याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भेटावयास गेले असता त्यांनी हाकलून लावल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जोपर्यंत आम्ही दिलेली फिर्याद दाखल होत नाही, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचे यावेळी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी शिंदे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना जि. प. सदस्य शिंदे म्हणाले की, मी सत्ताधारी भाजपचा जिल्हा परिषद सदस्य आहे व पक्षाचा पदाधिकारी आहे. मला जर पोलीस ठाण्यात अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग आहे असा सवाल केला. पुण्यातील दोन गटात हाणामारी तर दुसरी घटना श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील शिलंगण पारा समोर घडली. या दोन्ही घटनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, चैत्री पौर्णिमेच्या रात्री छबीना सोहळ्यापूर्वी दोन देवीभक्तांच्या गटात शाब्दिक वाद होऊन तो हमरी-तुमरीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांवर नारळ फेकाफेकी करून मारहाण व शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोन्ही गटांनी आपण प्रथम हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे. पुण्यात एका देवीभक्ताने बिबेवाडी येथील दुसऱ्या गटावर नारळ व भोपळे फेकून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मात्र संबंधित गटाने हे आरोप फेटाळत, “आम्ही कोणताही हल्ला केला नाही, सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य समोर आणावे,” अशी मागणी केली आहे.
सरस्वती विद्यालय, शिंगोलीचा ‘आय एम विनर’ स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान निकाल
धाराशिव (प्रतिनिधी)- शिंगोली येथील सरस्वती विद्यालयाने 2026 सालच्या ‘आय एम विनर’ स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी केंद्र तसेच तालुका स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पहिलीतील दुर्वा शितोळे हिने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तर उजेर पठाण द्वितीय, समृद्धी पवार तृतीय आणि ऋषिकेश घोंगडे चौथ्या क्रमांकावर राहिला. इयत्ता दुसरीमध्ये आराध्या भोसले प्रथम, अर्णव पवार व ओम पवार द्वितीय, तसेच तृप्ती लामकाने चौथ्या क्रमांकावर झळकली. याच गटातील शौर्य पडवळ पाचवा, अविराज खांडवे सहावा आणि शर्वरी मुळे सहाव्या क्रमांकावर सिफा मुजावर पाचव्या क्रमांकावर यशस्वी ठरले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करताना जगजीत निंबाळकर तिसरा, विश्वजीत निंबाळकर प्रथम, शिवेंद्र पडवळ व प्रथमेश घोगरे चौथ्या, रुद्र घोंगडे पाचवा, वेदांत घोगरे सातवा तसेच श्रुती निंबाळकर पाचव्या क्रमांकावर हर्षद घोगरे सहाव्या क्रमांकावर यश मिळवले. इयत्ता चौथीमध्ये प्रत्युष रणखांब प्रथम, सुबोध शिंगारे द्वितीय, अनुराग वीर चौथा, अथर्व जंगम सहावा आणि स्वरा निंबाळकर सातवा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाले. इयत्ता पाचवीमध्ये श्रुती शिंदे प्रथम, ओम पोळ द्वितीय, प्रणित जगताप तृतीय, श्रेया खुणे चौथी आणि राहुल पडवळ पाचवा क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली. या सर्व विद्यार्थ्यांना सारिका गाढवे, अश्विनी लबडे, मनीषा शिंगारे, सुलताना पठाण व कोंढारे मॅडम यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक व संस्थापक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची भाजपा कार्यालयास भेट
परंडा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, धाराशिव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ठाकूर यांनी अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक अविनाश विधाते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, विकास कुलकर्णी, किरण देशमुख, शहाजीआप्पा पाटील, हनुमंत पाटील, शिवाजीराव पाटील, बाबासाहेब जाधव, श्रीराम देवकर, भागवत खोत, निशिकांत क्षिरसागर, तुषार नेटके, प्रमोद लिमकर, हरीदास शिंदे, ब्रम्हदेव उपासे, एकनाथ वायसे, अरुण करळे, इसुब पठाण, रणजित मिस्कीन, अभिषेक चोबे, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, रामकृष्ण घोडके, सुरज काळे, समाधान कोळेकर, मिलिंद शिंदे महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रियांका क्षीरसागर, नुतनताई खोसरे, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही यात्रा अनुदान मिळवून देणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- अमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा आई राजा उदे उदे... येडासरीचा उदे उदेच्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मागील 10 वर्षांपासून अविरत सुरू असलेली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. या अनुपम सोहळ्यासोबतच, लाखो भाविकांच्या सोयीसाठी येरमाळा देवस्थानला पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर विशेष यात्रा अनुदान मिळवून देण्याचा संकल्प आमदार पाटील यांनी केला आहे. मागील दशकापासून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा जो उपक्रम सुरू केला. तो आता या यात्रेची एक नवी ओळख बनला आहे. पालखी मार्गस्थ होत असताना आकाशातून होणारा फुलांचा वर्षाव पाहून उपस्थित 10 ते 15 लाख भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. केवळ उपस्थित राहणेच नव्हे, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुनखडी वेचण्याच्या विधीमध्ये स्वतः सहभागी होऊन आई येडेश्वरीचे मनोभावे दर्शन घेतले. येरमाळा येथील चैत्र यात्रेला दरवर्षी 10 ते 15 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. सध्या या भव्य यात्रेच्या नियोजनाचा आर्थिक भार ग्रामपंचायतीवर पडतो. भाविकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळा यात्रेला विशेष यात्रा अनुदान मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. येरमाळ्याचा तीर्थक्षेत्र विकास आरखडा तयार करून कायापालट करण्याचे प्रयत्न आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होणे हे माझ्यासाठी केवळ कर्तव्य नसून ती एक आत्मिक शक्ती आहे. या परिसराचा विकास आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. येरमाळ्याला तुळजापूर प्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आरखडा करून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ग्रामपंचायतीला असलेली उत्पन्नाचे अत्यल्प साधने पाहता यात्रा अनुदान मिळावे, यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे
निरवडे महोत्सवाचा विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ
न्हावेली /वार्ताहर निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ, माळकरवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य “निरवडे महोत्सव २०२६” ची जल्लोषात सुरुवात झाली. आकर्षक फूड फेस्टिवल आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीमुळे हा महोत्सव निरवडेवासीयांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांच्या हस्ते झाले.यावेळी सावंतवाडी [...]
आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारामध्ये फळांच्या राजाचे धुमधडाक्यात आगमनही होत असून एका-एका पेटीसाठी हजारोंची बोलीही लागत आहे. मात्र यंदा खराब हवामान आणि लहरी पाऊस यामुळे आंब्याचे मोठे नुकसानही झाल्याचे दिसले. त्यामुळे ठिकठिकाणी लागणाऱ्या आंब्याच्या आढ्याही अद्याप लागल्याचे दिसत नाही. आंब्याची आवक कमी असल्याचा फायदा घेऊन काही नफेखोर व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळ करत असून रसायनांचा […]
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली गेल्या वर्षभरापासून आपल्या कुटुंबीयांसोबत परदेशात स्थायिक झाला आहे. आपल्या संघाचे सामने खेळण्यासाठी तो हिंदुस्थानात येतो आणि पुन्हा लंडनला रवाना होतो. यामुळे सोशल मीडियावर किंग कोहलीची चर्चा असते. दोन महिन्यांपूर्वीच जानेवारीत शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर तो पुन्हा लंडनला निघून गेला. दरम्यान आता सुरू असलेल्या IPL च्या सामन्यांसाठी तो पुन्हा हिंदुस्थानात […]
Satara News : भोळेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यु
शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला उंब्रज : भोळेवाडी तालुका कराड येथे शेतात काम करणाऱ्या ५१ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले आहेत तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. सदरची घटना शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेने भोळेवाडी सह परिसरात शोककळा पसरली आहे. सतीश नाथा सूर्यवंशी वय [...]
अवैध एलईडी मासेमारी साहित्य असलेली नौका ताब्यात
पहाटे निवती समुद्रात कारवाई मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समोरील समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली आहे. नौकेवर नौका तांडेलसह 20 खलाशी असून सदर नौका जप्त करून पुढील कारवाईसाठी सर्जेकोट बंदरात आणली आहे.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय एलईडी पर्ससीन नौकेवर [...]
प्रख्यात अभिनेते आणि लेखक पीयूष मिश्रा हे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले आहेत. सातवीमध्ये असताना आपण शाळेतीलच एका शिक्षिकेच्या प्रेमात पडलो होतो आणि एकांतात आम्ही एकमेकांचे चुंबनही घेतले होते. मात्र ही घटना उघड झाल्यानंतर वडिलांनी बेदम मारहाण करत मला […]
Satara News : सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीत तणाव; सदस्यांची घोषणाबाजी!
जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात सातारा : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांची नावे आणि ओळखपत्रांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता. या कडक तपासणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी [...]
रोकड, सोन्याच्या अंगठीसह मौल्यवान वस्तू लंपास म्हापसा : म्हापसा येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अज्ञात चोरांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सुमारे 1 लाख रुपयांची रोकड, 1 सोन्याची अंगठी तसेच मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या असून या चोऱ्यांमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाही दुकानांची कुलुपे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश [...]
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला 8 रोजी गोव्यात
पणजी : पश्चिम क्षेत्रीय विधानसभा सभापतींची बैठक येत्या दि. 9 आणि 10 एप्रिल रोजी मिरामार येथे होत असून या परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी गोव्यात येत आहे. गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर, गोवा विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची [...]
Satara News : साताऱ्यात जिल्हा परिषद सभापती निवडीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त
जिल्हा परिषदेला पोलिस छावणीचे स्वरूप सातारा : जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून जिल्हा परिषद परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद परिसराच्या १०० मीटर परिघात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. [...]
आखातामध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास इटावातील सैफई भागात येणाऱ्या नंदपूर गावातील एका गव्हाच्या शेतामध्ये आकाशातून एक वस्तू पडली. ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या दिसणाऱ्या या वस्तूमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. नागरी उड्डाण विभागाच्या परवानगीने सुरू असलेल्या चाचणी उड्डाणादरम्यान […]
कोणी पायलटला शोधून काढेल का? प्लीज…, अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यानंतर इराणने उडवली खिल्ली
इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून आखाती देशांत हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. अशातच इराणने अमेरिकेचे ‘एफ-15 ई स्ट्राईक ईगल’ हे शक्तीशाली विमान पाडले होते. या घटनेनंतर इराणचे संसदचे सभापती मोहम्मद बगेर गालिबफ यांनी सोशल मीडियावर अमेरिकेची खिल्ली उडवली. ‘कोणी पायलटला शोधून काढेल का? प्लीज… सलग 37 इराण वेळा […]
बारामती पोटनिवडणुकीबाबात सुनेत्रा पवारांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे, उद्धव ठाकरे यावर लवकर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच बाह्य शक्तींकडून गोपनीय माहिती माध्यमांना दिली जाते त्याचा अर्थ सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले. मुंबईत पत्रकारांशी […]
क्रिकेट बेटिंगमध्ये हुबळी-धारवाड आघाडीवर; राज्यात 37 गुन्हे दाखल बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात मटका, जुगाराचा विळखा वाढतो आहे. मटका प्रकरणात बेळगाव संपूर्ण राज्यात आघाडीवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गृहखात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून बेळगावात मोठ्या प्रमाणात मटका सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. क्रिकेट बेटिंगमध्ये हुबळी-धारवाड ही जुळी शहरे पुढे आहेत. मटका, जुगारात उत्तर कर्नाटकातील [...]
लाभ घेण्यात शेतकरी उदासीन : ग्रामीण भागात व्यापक मोहीम राबविण्याची गरज बेळगाव : राज्यात शेतीची कामे करताना होणाऱ्या अपघातांमुळे अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘शेतकरी संजीवनी योजना’ प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. अतिवृष्टी, वीजपुरवठा खंडित होणे, वन्य प्राण्यांचे हल्ले तसेच मजुरांची कमतरता या विविध कारणांमुळे शेती अधिकच जोखमीची [...]
कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांनी ऑनलाईन स्वयंगणती करावी
सीईओ सुदाम मंचलवार यांचे स्थानिकांना आवाहन बेळगाव : गोवावेस येथे पदपथावरील चेंबरचे झाकण पडल्याने पदपथ धोकादायक ठरत आहे. ये-जा करताना चेंबरवरील झाकण नसल्याचे निदर्शनास न आल्याने अनेक अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी परगावचे नागरिक या ठिकाणी पडून जायबंदी होत आहेत. तरीदेखील महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रेल्वे ओव्हरब्रिजपासून गोवावेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर [...]
गोवावेस येथील पदपथ बनले धोकादायक
चेंबरचे झाकण पडूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष बेळगाव : गोवावेस येथे पदपथावरील चेंबरचे झाकण पडल्याने पदपथ धोकादायक ठरत आहे. ये-जा करताना चेंबरवरील झाकण नसल्याचे निदर्शनास न आल्याने अनेक अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी परगावचे नागरिक या ठिकाणी पडून जायबंदी होत आहेत. तरीदेखील महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रेल्वे ओव्हरब्रिजपासून गोवावेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीएनजी [...]
निर्बंध घालताच दुसऱ्या बाजूला टाकला कचरा
धारवाड रोड येथील प्रकाराने मनपा कर्मचारी हतबल : कचराकुंडीतच कचरा टाकणे गरजेचे बेळगाव : शहरातील कचऱ्याच्या समस्येने बेळगाव महानगरपालिकाही हतबल झाली आहे. जुना धारवाड रोड येथे रस्त्याच्या एका बाजूला कचरा टाकण्यास मनाई करण्यात आल्याने आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या अद्याप मिटलेली नाही. त्यामुळे नागरिकांनीही कचराकुंडीतच कचरा टाकणे गरजेचे आहे. [...]
मध्यवर्ती बसस्थानकात दुचाकीस्वारांची घुसखोरी
प्रवाशांच्या सुरक्षेला धोका : प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकात पार्सलच्या नावाखाली दुचाकीस्वारांचा सर्रासपणे वावर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बसस्थानकातून दररोज शेकडो बसेस लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी जात असतात. यामुळे प्रवाशांची संख्याही मोठी असते. मात्र पार्सल घेऊन जाण्याच्या नावाखाली दुचाकीस्वार मनमानीपणे बसस्थानकात वावरत आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारची घटना घडू [...]
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अशोक खरात याच्या संपर्कात राज्यातील कोणते नेते होते आणि त्यांच्यात किती वेळा संभाषण झाले याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा आरोप केला आहे. अशोक खरात याचे धागेदोरे […]
डॉ. किरण ठाकुर अमृतमहोत्सव पदार्पण सोहळा सांगलीत
सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच डॉ. ठाकुर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन : उद्यापासून तीन दिवस सायंकाळी 5 वाजल्यापासून कार्यक्रम सांगली : दै. तरुण भारतचे समूहप्रमुख, सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त दि.5, 6 व 7 एप्रिल रोजी सांस्कृतिक [...]
शहर परिसरात गुड फ्रायडे गांभीर्याने
बेळगाव : शहर परिसरात येशू ख्रिस्त यांच्या क्रूसावरील बलिदानाच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे अत्यंत गंभीर, शांत व भक्तिमय वातावरणात पाळण्यात आला. यानिमित्ताने सर्व चर्चमध्ये दिवसभर विशेष प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसाची सुऊवात ‘वे ऑफ द क्रॉस“ (क्रूसमार्ग) या धार्मिक विधीने झाली. यावेळी ख्रिश्चन बांधवांनी क्रूस खांद्यावर घेत येशू ख्रिस्तांच्या दु:खद प्रवासाचे स्मरण करत प्रार्थना केली. [...]
CBSE च्या नव्या अभ्यासक्रमावर एम. के. स्टॅलिन यांची टीका, ‘हिंदी लादण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी Central Board of Secondary Education (CBSE) च्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यावर कठोर टीका करत तो “हिंदी लादण्याचा योजनाबद्ध प्रयत्न” असल्याचा आरोप केला आहे. या धोरणामुळे संघराज्य व्यवस्थेला धक्का बसत असून बिगर-हिंदी राज्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. CBSE कडून 2026-27 शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने तीन-भाषा धोरण लागू करण्याची तयारी सुरू आहे. इयत्ता […]
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय – 28, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह कारने (एमएच 15 जेएच 0516) गणपतीपुळे येथे […]
हर हर महादेव…चा जयघोष; अवघी मुचंडी दुमदुमली
इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात : मुचंडी येथील सिद्धेश्वर यात्रेला भाविकांची अलोट गर्दी वार्ताहर/किणये सायंकाळची गडद पिवळी सूर्यकिरणे, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हर हर महादेव…च्या जयघोषात मुचंडी येथील इंगळ्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शुक्रवारी पार पडला. सर्वत्र हर हर महादेव, जय सिद्धेश्वर.. असा जयघोष आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे अवघी मुचंडी नगरी दुमदुमली होती. मुचंडी येथील [...]
अनगोळ येथे गाडे यात्रा-रथोत्सव उत्साहात
चित्ररथ, हलगी स्पर्धा : आकर्षक गाडे मिरवणूक : बैलजोडीत राजू भेंडिगेरी प्रथम बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जन्मोत्सवनिमित्त गाडेयात्रा व रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी रात्री आकर्षक शोभेचे गाडे काढण्यात आले. यात्रेनिमित्त श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रात्री रघुनाथ पेठ राजहंस गल्ली, हणमण्णावर गल्ल।r, भांदूर [...]
भाषा शिकण्याचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार काय?
चिदानंद पाटील यांचा सरकारला सवाल : द्विभाषा सूत्राला केला विरोध बेळगाव : कर्नाटकात शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक सरकारकडून नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) राज्यांना त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचे सांगण्यात आले होते. परंतु कर्नाटकात मात्र हिंदीमध्ये दहावीत नापास होणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगून द्विभाषा सूत्र स्वीकारण्यात आले. यामुळे मराठीसह उर्दू, हिंदी, तुळू, कोकणी, संस्कृत, [...]
कंग्राळीच्या प्रवेशद्वारावरच कचर्याचे ढीग
दुर्गंधीमुळे प्रवाशांतून तीव्र संताप : ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 28 एप्रिल 2026 ते 6 मे पर्यंत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यात्रेच्यानिमित्ताने गावच्या विकासासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने 10 कोटीच्या निधीतून विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू असतानाच ग्रामस्थांतूनही नवीन घर बांधणे, घरांची दुरूस्ती, रंगरंगोटी करण्याबरोबर इतर कामेही जोमात [...]
अवकाळी पावसामुळे बापट गल्ली रस्त्यावर पाणी
बेळगाव : बापट गल्ली ही मोबाईल स्पेअर पार्ट्स, इलेक्ट्रिक व साऊंड सिस्टम विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे दररोज खरेदीदारांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचा फटका बापट गल्लीला बसला असून गल्लीत पाणी वाहत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. गल्लीत सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने पाण्याचा योग्यरित्या निचरा होत [...]
सांगली जिल्ह्यात दर दोन व्यक्तींमागे एक वाहन; जिल्ह्यात मार्चअखेर वाहनांची संख्या पोहोचली 14 लाखांवर
>> प्रकाश कांबळे गेल्या 10 वर्षांत वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येची तुलना करता दर दोन व्यक्तींमागे एक वाहन असे चित्र दिसून येते. दररोज शेकडो गाडय़ा नव्याने रस्त्यावर धावताना दिसतात. जिल्ह्यातील वाहनांची संख्या मार्च 2026 अखेर 14 लाख 62 हजार 345 इतकी आहे. प्रत्येकाला आपल्या दारात गाडी असावी असे वाटत असते. नोकरीच्या किंवा कामाच्या […]
Satara news –रुग्णालय एक कोटींचं; रुग्ण मात्र बाहेरच! कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड
सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना, आता जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे. एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे अजूनही 40 टक्के काम अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराने संपूर्ण बिल काढल्याची धक्कादायक बाब […]
ड्रायव्हरलेस टॅक्सींना ‘ब्रेक’; वुहानमध्ये शंभरहून अधिक गाड्यांमुळे चक्काजाम
चीनमधील वुहान शहरात रोबोटॅक्सीच्या यंत्रणेत झालेल्या मोठ्या बिघाडामुळे एकच गोंधळ उडाला. मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याने 100 हून अधिक ड्रायव्हरलेस टॅक्सी रस्त्याच्या मध्यभागी अचानक थांबल्या. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून, सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे जगभरातील स्वयंचलित गाड्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक […]
क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी यांचे निधन
सावंतवाडी: प्रतिनिधी सावंतवाडी येथील प्रसिद्ध लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक यासीन मुलाणी (60) रा. कारिवडे -साईलनगर यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले आणि त्याचवेळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली दहा वर्षे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. त्यांचा स्वभाव [...]
गेल्या पाच आठवड्यांपासून इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेले हे युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले असून इराण अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमानं पाडली आहेत. या विमानांमधील एका पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात अमेरिकेला यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अमेरिकेने बेपत्ता पायलटचा शोध […]
तालुक्याच्या पूर्व भागाला अवकाळी पावसाने झोडपले
वादळी वाऱ्याचाही तडाखा : सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, सुळेभावी, मुचंडी शिवारात पाणी वार्ताहर/सांबरा तालुक्याच्या पूर्व भागातील बाळेकुंद्री खुर्द परिसराला शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी तुंबले होते. पूर्व भागातील सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मावीनकट्टी, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, कलखांब, मुचंडी आदी गावांना मुसळधार पावसाने झोडपून [...]
कणकवलीत एकाच रात्री 7 दुकाने फोडली
कणकवलीत पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान वार्ताहर/कणकवली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आचरा रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात बसवलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. मात्र एका दुकानाच्या खाजगी कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे.शनिवारी पहाटे सना कॉम्प्लेक्समधील 4 आणि राज मेडिकलसह अन्य तीन दुकानांची शटर उचकटून ही चोरी [...]
खानापूर स्वामी समर्थ केंद्राजवळील ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत
ट्रान्स्फॉर्मरभोवती संरक्षण कुंपण उभारण्याची मागणी खानापूर : शहरातील घोडे गल्ली येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूस असलेला ट्रान्स्फॉर्मर हा रस्त्याला लागूनच आहे. ट्रान्स्फॉर्मरवरील सर्व यंत्रणाही जमिनीपासून थोड्या वर आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा ट्रान्स्फॉर्मर धोकादायक बनला आहे. या ट्रान्स्फॉर्मरच्या सभोवताली संरक्षण कुंपण उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. घोडे गल्ली येथील श्री [...]
तृतीय भाषेच्या मुवर आता राज्यपालांचा हस्तक्षेप
राज्य सरकार विरुद्ध लोकभवन संघर्षाची शक्यता : निर्णयाचा फेरविचार करण्याचा राज्यपाल गेहलोत यांचा सल्ला बेंगळूर : राज्यात दहावी परीक्षेत हिंदीसह तृतीय भाषा विषयांसाठी गुणांऐवजी ग्रेड (श्रेणी) देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, असा सल्ला देत त्यांनी सरकारला पत्र लिहिले आहे. तृतीय भाषा अनिवार्य नाही [...]
कार्तिकेश्वर रवीकुमार ’चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स‘
कर्नाटकाचा मंजुनाथ एस. उपविजेता : महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद बेळगाव : मध्यप्रदेश इंदोर येथे इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन आयोजित 17 व्या वरिष्ठ बॉडीबिल्डींग स्पर्धेत आयबीबीएफचा कार्तिकेश्वर रवीकुमारने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला तर कर्नाटकच्या मंजुनाथ एस.ला पहिल्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला विभागात प्रतिभा थापियाळ हिने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत [...]
केएससीए क्रिकेट निवड चाचणीला प्रारंभ
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे 14 वर्षाखालील मुला-मुलींची क्रिकेट निवड चाचणी घेण्यात आली. ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर या निवड चाचणीच्या प्रसंगी दयानंद शेट्टी, जयराम नुली, राकेश भद्रापूरकर, श्रेयश मुर्डेश्वरकर यांचे मार्गदर्शन तर निरीक्षक म्हणून शिवाजी वड्डर यांनी काम पाहिले. 206 मुलांनी या निवड चाचणीत [...]
मराठा इलेव्हन,वनश्री गोकाक विजयी
एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा : सुशांत इम्पॅक्ट खेळाडू बेळगाव : एसआरएस हिंदुस्थान अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा इलेव्हन संघाने ईडीफा इलेव्हनचा 87 धावांनी तसेच वनश्री गोकाक संघाने बीसीसी मच्छे संघाचा 5 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. ज्ञानेश होनगेकर, शुभम बिशनकोप यांना सामनावीर तर सुशांत गुंजीकर, [...]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्पर्धा 16 रोजी
आमदार असिफ सेठ यांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 14 रोजी ट्रॉफीचे अनावरण होणार आहे. बुधवार दि. 15 रोजी अधिकारी व माध्यमांच्या संघामध्ये मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. गुरुवार दि. 16 रोजी स्पर्धेचा मुख्य दिवस असणार असल्याची माहिती आमदार [...]
मुंबई हाय येथील ONGC प्लॅटफॉर्मवर आग; 10 कर्मचारी जखमी, परिस्थिती नियंत्रणात
Oil and Natural Gas Corporation (ONGC) च्या मुंबई हाय क्षेत्रातील SHP प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीमुळे एकूण 10 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे 5:45 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच ONGC च्या […]
इटलीतील मिटेनी कंपनी आणि लोटेतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी यांचा काहीही संबंध नसून दोन्ही भिन्न कंपन्या आहेत. इटलीतील मिटेनी कंपनी कर्जबाजारी झाल्यानंतर लिलावात त्या कंपनीची यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान आम्ही घेतले आहे. लोटे येथे पीफासचे उत्पादन करताना आम्ही सुरक्षेचे काटेकोर नियमन करत आहोत असे लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. […]
एअरलाइन कंपन्यांनी इंधन दरवाढीच्या नावाखाली आधीच विमान प्रवास महाग केलेला असताना आता विमान कंपन्यांना विमानातील सीटच्या जागेनुसार, पैसे आकारण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने एअर लाइन्सला विमानातील 60 टक्के जागा अतिरिक्त शुल्क न घेता निवडण्याची परवानगी देणारा निर्णय तूर्तास थांबवला आहे. हा नियम 20 एप्रिलपासून लागू केला जाणार होता. परंतु, एअर लाइन […]
ताडोबा सफारीत भाजप आमदाराकडून नियमांचे उल्लंघन; मोबाईल बंदी असतानाही शूट केली ‘रील’
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाचे भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ताडोबाच्या ‘कोअर’ आणि ‘बफर’ क्षेत्रात सफारी करताना मोबाईल सोबत बाळगणे नियमबाह्य आहे; तसेच नियम मोडल्यास 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. असे असतानाही, आमदार देवतळे यांनी चक्क ‘रील्स’ तयार करून सोशल मीडियावर शेअर केली. […]
सीमा हैदरने मुलाचे नाव ठेवले ‘भारत’
पाकिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या सीमा हैदरने आपल्या मुलाचे नाव भारत ठेवले आहे. हिंदू धर्मात जेव्हा घरात मुलगा होतो तेव्हा नामकरण सोहळा केला जातो. हिंदुस्थानात खूप छान वाटत आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मला परत पाकिस्तानला जायचे नाही, असे सीमा हैदर म्हणाली. सीमाला तिच्या पाकिस्तानातील तिच्या आधीच्या पतीपासून चार मुले आहेत, तर पती सचिन मीनापासून तिला […]
हनी सिंग, बादशाहला कोर्टाने फटकारले
दिल्ली उच्च न्यायालयाने गायक हनी सिंग आणि बादशाहला अश्लील गाण्यावरून चांगलेच फटकारले आहे. गाण्याचे शीर्षक आणि बोल इतके आक्षेपार्ह आहेत की, ते अधिकृत आदेशात लिहिणेदेखील शक्य नाही. गुगल, यूटय़ूब आणि स्पॉटिफायसारख्या सर्व संगीत आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून या गाण्याची मूळ आवृत्ती, रीमिक्स आणि यूआरएल तत्काळ ब्लॉक केले जावे, असे निर्देश हायकोर्टाने दिले.
LPG गॅस घेऊन हिंदुस्थानचे सातवे जहाज होर्मुझमधून निघाले, आणखी 17 जहाज वाटेवर
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असताना, हिंदुस्थानसाठी महत्त्वाची दिलासादायक घडामोड समोर आली आहे. हिंदुस्थानचा ध्वज असलेले ‘ग्रीन सान्वी’ हे सातवे LPG टँकर शुक्रवारी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पुढे सरकले. यापूर्वी सहा LPG वाहतूक करणारी जहाजे ही सामुद्रधुनी पार करून सुरक्षितपणे हिंदुस्थानी बंदरांवर पोहोचली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. […]
पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 5जी सेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, टेलिकॉम कंपनी ‘वी’ने आणखी आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये 5जी सेवा सुरू केली आहे. यामध्ये कोल्हापूर, वसई, नांदेड, जळगाव, सातारा, मालेगाव, शिर्डी आणि धुळे यांचा समावेश आहे. मे 2026 पर्यंत ‘वी’ आपली 5जी सेवा लातूर आणि गोवा यांसह आणखी दहा शहरांमध्ये सुरू करणार […]
केरळममध्ये धार्मिक मिरवणुकीमुळे पाच तास विमानतळ बंद
केरळमच्या तिरुवनंतपूरममध्ये एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली. धार्मिक मिरवणुकीमुळे येथील विमानतळ जवळपास 5 तास बंद ठेवण्यात आले होते. पद्मनाभस्वामी मंदिराच्या पैनकुनी अरट्टू उत्सवामुळे हे करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी 4.45 ते रात्री 9 वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण रोखण्यात आले होते. यावेळी मंदिराची मिरवणूक विमानतळाच्या रनवेहून शंखुमुगमपर्यंत गेली. या परंपरेचे पालन अनेक वर्षांपासून केले जात आहे. या मिरवणुकीत […]
अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी तरुणांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली. फेब्रुवारी 2026 पर्यंत अमेरिकेत 3.5 लाखांहून अधिक हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 6.9 टक्के कमी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा आकडा 3 लाख 78 हजार 787 होता. तो […]
नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची धारधार शस्त्राने वार करून, तर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]
नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची धारधार शस्त्राने वार करून, तर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]
तरुणाची प्रेरणादायी कथा, यूपीएससीची सात वर्षे तयारी; सहा वेळा अपयश
यूपीएससी उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची युवकांची कहाणी प्रेरणादायी असते, मात्र असे उमेदवार असतात, जे ध्येयाच्या अगदी जवळ जाऊन अपयशी होतात, त्यांची मात्र चर्चा होताना दिसत नाही. यूपीएससीची तयारी करणारा निर्मल पवार हा त्यापैकीच एक. निर्मलने यूपीएससीची तयारी केली. तो मुलाखतीपर्यंत पोचला. पण 21 मार्कांमुळे मागे राहिला. त्याची निवड झाली नाही. त्याने सात वर्षे यूपीएससीची तयारी केली. […]
मस्तच! आता जीमेल अॅड्रेस बदलता येणार, 22 वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली
गुगलने आपल्या जीमेल यूजर्सला एक मोठी भेट दिली आहे. गेल्या 22 वर्षांपासून प्रतीक्षा असलेले अपडेट अखेर गुगलने आणले आहे. या नव्या अपडेटमुळे आता यूजर्सला साइन आधी आपल्या जीमेलचा यूजरनेम बदलता येईल. 1 एप्रिल 2004 पासून गुगलने जीमेल सर्विस सुरू केली होती. सर्विस सुरू झाल्यानंतर दोन दशकाहून अधिक काळानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलने जीमेलमध्ये […]
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आखाती देशांना बसू लागला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर आणि अमेरिकन कंपन्यांच्या इमारतींवर हल्ले चढवत आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने आता आपल्या आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला फटका पाकिस्तानला बसला असून […]

28 C