SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
...

तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, 16 कामगारांचा मृत्यू

तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Tamil Nadu: A massive explosion occurred at a firecracker factory in Kattanarpatti near Virudhunagar. 16 people died and 6 injured: Fire and Rescue Department […]

सामना 19 Apr 2026 5:42 pm

Sangli Crime |कुपवाडमध्ये गुंडावर भरदिवसा दगडाने हल्ला; वाघमोडेनगर रस्त्यावर रक्ताचा सडा

कुपवाडमध्ये दगडाने हल्ला कुपवाड : कुपवाड शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर काहीजणांनी मिळून दगडाने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी वाघमोडेनगर रस्त्यावर घडली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा हल्ला जुन्या वादावरून झाल्याचे [...]

तरुण भारत 19 Apr 2026 5:38 pm

छत्तीसगड वेदांता पॉवर प्लांट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसात या दुर्घटनेत जखमी झालेल्या वीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 15 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास शक्ती जिल्ह्यातील सिंहितराई गावातील ‘वेदांता लिमिटेड’च्या पॉवर प्लांटमध्ये ब्लास्ट झाला. टर्बाइनकडे वाफ वाहून नेणाऱ्या बॉयलर ट्युबमध्ये हा भीषण स्फोट झाला. […]

सामना 19 Apr 2026 5:36 pm

Sangli News |यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक; जनगणनेच्या कामामुळे राज्य शासनाचा मोठा निर्णय

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शासनाची स्थगिती सांगली :जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदा जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया राबवू नये असे आदेश राज्य शासनाने बजावले आहेत. देशभरात यंदा जनगणना राबबलीजाणार आहे. [...]

तरुण भारत 19 Apr 2026 5:26 pm

उन्हाच्या झळा असह्य होणार; उत्तर हिंदुस्थानात हवामान खात्याचा उष्णतेच्या लाटेचा इशारा

एप्रिल महिन्यात आता देशभरात सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाळवत आहेत. अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर काही राज्यात मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. […]

सामना 19 Apr 2026 5:25 pm

उन्हाळ्यात स्वयंपाकघरातील दूध वारंवार खराब होत असेल तर, या सोप्या ट्रिक्स वापरून बघा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकघरात साठवलेले अन्न खराब होण्याचे प्रमाण वाढू लागते. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले दूध लवकर खराब होते. कधीकधी, फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते नासू लागते. उष्णतेमुळे जिवाणूंची वेगाने वाढ होते, त्यामुळे काही मिनिटांतच दूध खराब होते. काही सोप्या आणि पारंपरिक पद्धती आहेत, ज्या तीव्र उष्णतेतही दूध जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत करू शकतात. दूध उकळण्यापूर्वी, तुम्ही वापरत […]

सामना 19 Apr 2026 5:15 pm

निवडणूक आयोगाचा सोशल मीडियावर ‘वॉच’, 11 हजार पोस्टवर कारवाई; आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी 3 तासांचा अल्टिमेटम

देशात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या काळात सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा यासाठी आयोगाने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून आतापर्यंत 11 हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स […]

सामना 19 Apr 2026 5:11 pm

Ratnagiri News –बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करा, अन्यथा उधळवून लावू; शिवसेनेचा इशारा

राजापूर तालुक्यात कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात होणाऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडाडून विरोध केला आहे. सोमवारी (दि.२० एप्रिल रोजी) होणारी बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. जर ही जनसुनावणी घेतली तर ती उधळवून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात १४४.९५ हेक्टर […]

सामना 19 Apr 2026 5:10 pm

Dowry Harassment Case |माहेरून सोन्याची अंगठी आणि पैशांची मागणी; जुळेवाडीतील विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ

तासगावात विवाहितेचा छळ तासगाव : मुळगांव ईश्वरपूर वसध्या रा. जुळेवाडी, ता. तासगांव येथील विवाहितेचा पैशाची मागणेचे कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक मानसिक छळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून घरातून बाहेर काढले आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून [...]

तरुण भारत 19 Apr 2026 5:02 pm

खरीप 2025 पीक विम्याचा पेच सुटणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर, आणि बीड जिल्ह्यातील खरीप 2025 च्या पीक विम्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि विमा कंपन्यांचे आक्षेप लवकरच मार्गी लागणार आहेत. या प्रक्रियेची सुनावणी झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा पेच सुटणार असून, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसोबत समाजमाध्यमावरून संवाद साधताना आमदार पाटील यांनी सांगितले की, विमा कंपन्यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवर आक्षेप घेतल्यामुळे पीक विम्याची प्रक्रिया रखडली होती. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे प्रकरण कृषी सचिवांच्या स्तरावर गेले. कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग हे निवडणूक कर्तव्यावर असतानाही, त्यांना आपण शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्तिशः केलेल्या विनंतीला मान देत त्यांनी मागील आठवड्यात या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी घेतली आहे. येत्या मंगळवार पर्यंत यावर अंतिम निकाल लागण्याची शक्यता असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. सन 2020 आणि 2021 सालच्या प्रलंबित पीक विम्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्र सरकारचे जेष्ठ विधीज्ञ ऍड बलबीर सिंग आणि आपले जेष्ठ विधिज्ञ ऍड सुधांशु चौधरी यांच्यासह याप्रकरणी काम करणारी लीगल टीम यांच्याशी चर्चा करून याबाबत रणनीती आखण्यात आली आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 4:58 pm

तुळजापुरला गढूळ पाणीपुरवठा

तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी गढूळ पाणी पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यत्क केली. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात उन्हाळी सुट्ट्यां पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने येत आहे. त्यातच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने भाविकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यापूर्वीही शहराला गढूळ पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर नगरपालिकेने उपयोजना केलाय आता पुनश्च गढूळ पाणीपुरवठा होऊ लागल्याने या पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन करून स्वच्छ पाणी कसे पुरवठा होईल, अशी उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. उन्हाळा सुट्टी असल्याने यापुढे भाविकांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. जर त्यांना असे गढूळ पाणी मिळाले तर देवी भक्तांना त्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या शहराला एक दिवसाआड दोन टप्प्यात पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाणीपुरवठा वितरणातील गोंधळ सुरू असल्याने उन्हाळ्या सुट्ट्या तरी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करणे गरजेचे बनले आहे. तुरटी सह पाणी स्वच्छ करणारी औषधे दर्जेदार वापरावेत अशी मागणी आता शहरवासीयातून होत आहेत. कारण यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यात धुतल्या होत्या. तरीही पुनश्च गढूळ पाणी येऊ लागल्याने याबाबत नगर परिषदेने कायम तातडीने योग्य ती उपयोजना करणे गरजेचे बनले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 4:57 pm

सांगली हादरली! शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती

कवठेमहांकाळच्या नराधमावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल सांगली : शिक्षणाच्या निमित्ताने पर जिल्ह्यातून सांगलीत येत असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रशांत रामचंद्र शिंगाडे (रा.चोरोची, [...]

तरुण भारत 19 Apr 2026 4:56 pm

दिल्ली दरबारी लाचारीचा नवा अंक! अशोक चव्हाणांच्या तोंडी भाजपची भाषा; काँग्रेसने केला जबरदस्त पलटवार

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आयाराम गयाराम संस्कृती वाढत आहे. काहीजण स्वार्थासाठी किंवा ईडीपासून बचावासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत भाजपवासी झाले. आता त्यांच्या तोंडी भाजपचीच भाषा असून ते आधीच्या पक्षावर टीका करत आहे. अशा पक्ष बदलणाऱ्यांवर काँग्रसने जबरदस्त पलटवार केला आहे. काही वर्षांपुर्वी भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनी महिला आरक्षणावरून नांदेड येथे प्रतिक्रिया देताना […]

सामना 19 Apr 2026 4:54 pm

अंधश्रद्धा समाजाला त्रास देणारा रोग आहे- प्राचार्य डॉ संदीप देशमुख

धाराशिव (प्रतिनिधी)- अंधश्रद्धा समाजाला त्रास देणारा रोग आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य देशमुख म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जुनाट, बुरसटलेल्या परंपरा नष्ट करण्यासाठी काम केले. ते म्हणतात की समाजात सतत सकारात्मक बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाने कष्ट केले पाहिजेत. श्रीमंत लोकांनी धनाचा अहंकार न बाळगता गरीब लोकांना मदत केली पाहिजे. माणसात देव शोधा ही शिकवण त्यांनी दिली. समाजात शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करु नये. असे झाले तर सामाजिक स्वास्थ्य टिकणार नाही, संतानी दिलेले वचन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून देश व राष्ट्र हीत साधले जाईल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी डॉ बालाजी गुंड, प्रा माधव उगिले,प्रा विवेकानंद चव्हाण यांच्या सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 4:52 pm

फास्टॅग Activate नाही? सोप्या पद्धतीने तपासा Status…

फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. त्यामुळे टोलवसुली सोपी आणि जलद झाली आहे. मात्र, अनेकदा टोलनाक्यावर गेल्यावर फास्टॅग काम करत नाही. त्यामुळे चालक आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापुर्वी फास्टॅग तपासणे गरजेचे आहे. काही सोप्या ट्रिक वापरून काही क्लिकने फस्टॅग स्टेटस तपासता येते. फास्टॅग कारयरत नसल्यास दुप्पट टोल आकारला जातो. आता […]

सामना 19 Apr 2026 4:44 pm

Solapur News |मजरेवाडी परिसरातून एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता; शहरात मोठी खळबळ

सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता सोलापूर -शहरातील मजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात राहणारी महिला, तिचे वडील आणि तिची दोन मुले असे चौघेजण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.शाहीस्ताबेगम अमीन सय्यद (वय २७, रा. भांडेगाव, ता. बार्शी), तिचे वडील सलीम अमीर सय्यद (वय [...]

तरुण भारत 19 Apr 2026 4:40 pm

Ratnagiri News –मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्यात भीषण अपघात, भरधाव ट्रक तीन वाहनांना धडकून विहिरीत कोसळला; तिघे गंभीर जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या पुलावर आज रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून थेट १५ फूट खाली विहिरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात ट्रक चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रक (एमएच ०६ बीडी २५५५) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून […]

सामना 19 Apr 2026 4:37 pm

वाराणसीमध्ये शिवाला घाटावर मोठी दुर्घटना टळली; आंध्र प्रदेशातील १५ भाविकांना वाचवण्यात यश

वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाला घाटावर स्नान करत असताना पंधरा भाविक अचानक खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ धाडस दाखवून सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न आणि बोटींचा वापर स्पष्टपणे दिसत आहे. NDTV INDIA ने दिलेल्या बातमीनुसार, आंध्रप्रदेशातील १५ भाविक हे गंगास्नानासाठी […]

सामना 19 Apr 2026 4:32 pm

Ajmer accident –प्रवाशांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 31 गंभीर जखमी

राजस्थानच्या अजमेर येथे भीषण अपघात झाला आहे. पुष्करकडे जाणारी बस खोल दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे. 33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुष्कर घाटामध्ये अनियंत्रित झाली आणि खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये […]

सामना 19 Apr 2026 4:32 pm

आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार

वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कारवाई सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे.सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा [...]

तरुण भारत 19 Apr 2026 4:30 pm

देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचे भाजपचे षडयंत्र विरोधकांनी हाणून पाडले, वडेट्टीवारांची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण हे देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या एका नेत्याचे होते. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले हे भाषण आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडणारे आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. भाजपने रचलेल्या राजकीय कट कारस्थानांचा समाचार घेताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला […]

सामना 19 Apr 2026 4:24 pm

Solapur Crime |अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्त कारावास; सोलापूर न्यायालयाचा मोठा निकाल

सोलापुरात पोक्सो प्रकरणात न्यायालयाचा कडक निर्णय सोलापूर -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी २० वर्षे सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव [...]

तरुण भारत 19 Apr 2026 4:21 pm

Pandharpur Corridor Project |पंढरपूर कॉरिडॉरबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सबुरीची भूमिका; जनतेच्या सल्ल्यानुसारच होणार निर्णय

पंढरपूर ड्रीम प्रोजेक्टबाबत प्रशासन ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत पंढरपूर -गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरातील स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याचाचत नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या सल्ल्यानुसारच कॉरिडॉर करू, अशी भूमिका घेतली आहे. [...]

तरुण भारत 19 Apr 2026 4:07 pm

तो अभिनेता म्हणून उत्तम, परंतु भूमिकेसाठी अयोग्य; ‘शक्तिमान’ने मारली रणवीर सिंगच्या नावावर फुली

नव्वदीच्या दशकात छोट्या पडद्यावरील शक्तिमान हा सुपरहिरो अनेकांच्या मनपसंतीस उतरला होता. एक काळ होता जिथे अनेकांचे बालपण शक्तिमानच्या कथा पाहण्यात गेले होते. याच सुपरहिरो शक्तिमानवर चित्रपट बनवण्यात येणार होता. गेल्या दोन वर्षांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. परंतु शक्तिमानच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड मात्र झाली नव्हती. आता मात्र यासंदर्भात एक रंजक माहिती समोर येत आहे. या […]

सामना 19 Apr 2026 4:04 pm

IPL 2026 –हैदराबादच्या चाहत्याने लिंबू फिरवला अन् दुबेची विकेट गेली; व्हिडीओ व्हायरल, CSK ची BCCI कडे तक्रार?

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झालेला सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या लढतीत हैदराबादचा नवखा गोलंदाज साकिब हुसैन याच्या गोलंदाजीवर शिवम दुबे बोल्ड झाला. दुबे बाद होण्यापूर्वी एका चाहत्याने मैदानावर लिंबू फिरवला होता असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी […]

सामना 19 Apr 2026 4:03 pm

‘नारीला फक्त नारा बनवण्याचा प्रयत्न’; महिला आरक्षण विधेयकावर अखिलेश यादवांचा भाजपवर हल्ला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 वरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्षात समाजात फूट पाडण्याचा आणि महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लखनौ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना यादव म्हणाले की, “भाजप ‘नारी’ला फक्त ‘नारा’ बनवण्याचा प्रयत्न […]

सामना 19 Apr 2026 3:55 pm

सौर कृषीपंपाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन

धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणने सोमवार ( दि.20 एप्रिल ते 22 एप्रिल) पासून उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे. नवीन सौर कृषीपंपासाठी कसा अर्ज करायचा यासाठी तसेच सौर कृषीपंपाबाबत तक्रार असलेल्या लाभार्थ्यांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. धाराशिव शहर व ग्रामीण उप विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी तसेच कळंब उपविभागातील लाभार्थ्यांसाठी सोमवारी (दि.20 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. त्याचबरोबर तेर, वाशी, भूम व परंडा उप विभागातील लाभार्थ्यांसाठी मंगळवारी (दि.21 एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. तसेच तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या तूळजापूर, लोहारा, उमरगा व नळदुर्ग उपविभागातील लाभार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 22 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. दिनांक 20 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजीत तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:46 pm

वीरशैव जंगम मठ ट्रस्ट अध्यक्षपदी गिरीश पाळणे तर उपाध्यक्षपदी शिवयोगी चपने

धाराशिव (प्रतिनिधी)- वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गिरीश पाळणे तर उपाध्यक्षपदी ॲड शिवयोगी चपने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मठाचे विद्यमान अध्यक्ष शिवानंद रामहरी कथले यांनी प्रकृती व वैयक्तिक कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी कार्यकारिणीने एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली. निवडीनंतर उपस्थित समाज बांधवांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष गिरीश पाळणे यांनी आपले धोरण स्पष्ट करताना सांगितले की, “मठाचे कार्य पूर्णपणे पारदर्शक, सर्वसमावेशक व समाजाभिमुख ठेवण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गटबाजी किंवा भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कार्य केले जाईल.” तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, “धाराशिव येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवले जातील. समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन समाजातील एकजूट अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला जाईल.” उपाध्यक्ष ॲड. शिवयोगी चपने यांनीही सर्वांच्या सहकार्याने मठाचे कार्य अधिक गतिमान, प्रभावी व सर्वसमावेशक करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर सचिव श्रीकांत गणपतप्पा साखरे, कोषाध्यक्ष वैजिनाथ शिवप्पा गुळवे, तसेच डॉ. अनंत राजमाने व इतर सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:45 pm

हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद

तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:45 pm

भूम शहरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

भूम (प्रतिनिधी)- भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला. समतानायक, क्रांतीसूर्य, विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसवेश्वरांच्या विचारांची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली. कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक महादेव मंनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांचे कार्य स्मरले. या प्रसंगी अशोक तोडकर, डॉ. शिवशंकर खोले, प्रभाकर शेटे, मधुकर शेटे, ओम स्वामी, महादेव मंनगिरे, सिद्धेश्वर मनगिरे, अमित होळकर, पत्रकार धनंजय शेटे, बाजीराव बळे, उमेश मनगिरे, पंकज उंबरे, दत्ता शेद्रे, ऋषिकेश गवळी, भैया चौरे, गणेश रेवडवर, संजय होळकर, विजयकुमार सोलापूरे, श्रीकांत नकाते, राजेंद्र गाढवे वाशीकर यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बसवेश्वरांच्या विचारांचा समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या शिकवणीचे आजही महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी बसवेश्वरांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प केला.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:45 pm

156 कोटींच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट; ‌‘नगरोत्थान‌’ निधी खाजगी प्लॉटिंगकडे वळवला?

तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीतील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 156 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे काम सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. शहरात वर्षभर कोट्यवधी भाविक येत असताना मंदिर परिसरातील रस्ते निकृष्ट व अतिक्रमणग्रस्त, दाट लोकवस्तीतील रस्ते दुरवस्थेत अशा स्थितीत खाजगी विकासकांच्या प्लॉटिंग भागात रस्ते कामे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “मंदिर परिसर जुने तुळजापूर भकास, बाहेरचे रस्ते झकास” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, नगरोत्थान निधीचा वापर लोकवस्तीऐवजी निर्जन भागात केला जात आहे. खाजगी प्लॉटिंगमध्ये रस्ते बांधणे हे नियमबाह्य आहे. विकासकांनी स्वतः करायची कामे शासकीय निधीतून केली जात आहेत. यामुळे शासकीय निधीचा गैरवात वापर होतो असा आरोप केला जात आहे. नियम काय सांगतो तर नगर विकास विभागाच्या नियमानुसार खाजगी प्लॉटिंगमधील रस्ते, पायाभूत सुविधा विकासकाने स्वतः करणे बंधनकारक शासकीय निधीचा वापर सार्वजनिक वस्ती आणि गरज असलेल्या भागात करणे अपेक्षित मात्र प्रत्यक्षात याच्या उलट कामे होत असल्याचा आरोप आहे. या विकासकामांमुळे खाजगी प्लॉटिंगला मोठा फायदा होत असुन 1 हजार रुपये दर हजारवर जावुन प्लॉटचे दर गगनाला भिडल्याची चर्चा आहे. यामुळे ही कामे भाविकांसाठी की विकासकांसाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी व्हावी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी. हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:44 pm

शिवगंगा गटकळ यांचे निधन

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंभी येथील श्रीमती शिवगंगा कल्याणराव गटकळ वय 95 वर्ष यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे उपचारादरम्यान दि. 18 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या पुणे शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयातील सेवानिवृत्त अधीक्षक किसन गटकळ व बळीराम गटकळ यांच्या मातोश्री होत. त्यांचेवर त्यांचे मूळ गावी आंभी ता. भूम येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:44 pm

शेतकऱ्यावर तिघांचा खून हल्ला

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील शेतकरी अभिमान ढगे (वय 60) यांच्यावर गावातील तिघांनी मिळून भीषण खुनी हल्ला केल्याची घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शेतातून घरी परतत असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिमान ढगे हे शेतातून घरी येत असताना आरोपींनी त्यांना अडवून गज व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अभिमान ढगे यांना मुलगा नसल्याने त्यांनी तिंघा आरोपींना जमिन न विकल्याने ती जमिन भूम येथील एका व्यक्तिला विकल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हल्ल्यावेळी ढगे यांच्या पत्नी वृदावंनी ढगे यांनी प्रसंगावधान राखत पतीच्या अंगावर झेप घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात अभिमान ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. घटनेनंतर जखमी ढगे यांना प्रथम वालवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना दाखल करून घेण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु जबर मारहाणीमुळे बेशुद्ध असल्यामुळे त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:43 pm

चिंचपूर (ढगे) येथे शेताजवळ इसमाचा मृतदेह आढळला; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर (ढगे) शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडबा सुभाष कसबे (वय 42, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजण्यापूर्वी वालवड रोडलगत सिताबाई गोविंद जाधव यांच्या शेतात घडली. संबंधित इसम शेताजवळ मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. याबाबत चत्रभूज पांडुरंग कसबे (वय 38, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोस्टे भूम येथे आम्र ( Accidental Death Report ) क्रमांक 14/2026, कलम 194 BNSS 2023 अन्वये दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 11.17 वाजता करण्यात आली. सदर प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार पाटील यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:43 pm

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल

धाराशिव (प्रतिनिधी)- नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि उबाठा गटाने महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे. संसदेत या ऐतिहासिक विधेयकाच्या विरोधात मतदान करून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील महिलांना राजकीय सशक्तीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा हा अपमान जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती कदम व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत 33 टक्के आरक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते. मात्र, काँग्रेस आणि उबाठा गटाने पुन्हा एकदा केवळ राजकारणाला प्राधान्य दिले. हे विधेयक केवळ कायदा नव्हता, तर खरी समानता प्रस्थापित करण्याचा एक क्रांतिकारी टप्पा होता. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर महिलांना मिळणारी नेतृत्वाची संधी हुकली असून, वर्षानुवर्षे चालत आलेली असमानता कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहात विधेयक मंजूर न झाल्याने विरोधकांनी जो जल्लोष केला, तो देशातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. शिवसेना पक्षाच्यावतीने निषेध धाराशिवमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भूमिकेतून अनेक योजना आणल्या आहेत. यावेळी तुळजापूर जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, जिल्हा समन्वयक संगीताताई काळे, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, रूपाली घाडगे, लता हरवलकर, विजया पवार, श्रावणी पवार, सुषमा शिंदे, सुवर्णा सलगर, ज्योती लोखंडे, पल्लवी माने सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:42 pm

महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक कायापालटासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवयुगीन उद्योजक घडवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या उपक्रमाला जिल्हभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धाराशिवच्या आर्थिक विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनाल प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांची नावनोंदणी केली आहे. या सर्व इच्छुकांकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात येणार असून यातून छाननी करून 108 निवडण्यात येणार असून 1 मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, या उद्देशाने ही अभिनव संकल्पना मांडत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. अजूनही नोंदणी सुरू आहे.या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात उद्योगांचे जाळे विणले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडक उमेदवारांना केवळ कागदोपत्री मार्गदर्शन न देता, प्रत्यक्षात उद्योग उभारणी पूर्ण होईपर्यंत सहकार्य केले जाणार आहे. यात प्रामुख्याने उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक प्रकल्प अहवाल () तयार करणे, बँकांकडून सुलभ कर्जपुरवठा आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अर्जांची छाननी करून उद्योगाची व्यवहार्यता तपासेल. पात्र उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेवर आधारित असेल. या मोहिमेत पारंपरिक उद्योगांऐवजी आधुनिक आणि मागणी असलेल्या व्यवसायांवर भर देण्यात आला आहे. हायड्रोपोनिक शेती,नारळ शेंड्याचे (कोयर) पावडर,प्लास्टिक कचऱ्यापासून ग्रॅन्युल्स निर्मिती,व्हॅनिला शेती,केशर शेती,शेवग्याची (मोरिंगा) पावडर,कांदा पावडर,सोलर ड्रायर (सौर वाळवणी),मोती निर्मिती,पेपर बॅग निर्मिती,सोया उत्पादने,पर्यावरणपूरक म्हणून प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास हरित इंधन, फुलांपासून अगरबत्ती. आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर आधारित म्हणून ई-वेस्ट, सोलर पॅनल स्क्रॅप आणि लिथियम बॅटरी रिसायकलिंग आदी उद्योगांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. महाराष्ट्रदिनी मेळाव्यातून होणार दिशा निश्चिती या मोहिमेचा पुढील टप्पा 1 मे रोजी पार पडणार आहे. धाराशिव येथे त्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पहिल्या टप्प्यात निवडक उमेदवारांना उद्योग उभारणीची पुढील दिशा आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या उपक्रमातून 108 सक्षम उद्योजक तयार होतील, ज्यातून हजारो कुटुंबांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:41 pm

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू

धाराशिव (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव,स्पर्धा,सभा, बैठका तसेच धरणे- आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे. दि.12 ते 22 एप्रिल दरम्यान संत गोरोबा काका यात्रा (तेर) तसेच दि.14 ते 30 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दि.19 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पारंपारिक), महात्मा बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती असे विविध यात्रा व उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारणे तसेच बौद्ध समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याच्या कारणावरून दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयांसमोर धरणे,मोर्चे, आंदोलन,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये दि.16 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते दि.30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र,हा आदेश कामावर असलेल्या पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह समारंभ, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नसल्याचेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:40 pm

मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

धाराशिव (प्रतिनिधी)- जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत हर घर जल योजना,जल सेवा अभियान आणि जल जीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस.कटकधोंड,कनिष्ठ भूवैज्ञानिक एम.आर.डोंगरे आदी उपस्थित होते. बैठकीत जल जीवन मिशनअंतर्गत उद्भव विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,जलताराची कामे 25 एप्रिलपासून सुरू करून मान्सूनपूर्व सर्व जलतारे व शोषखड्डे तांत्रिक बाबींसह पूर्ण करणे, केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो अपलोड करणे,तसेच सर्व जल जीवन मिशन योजनेच्या उद्भवाशेजारी कामे करणे यावर भर देण्यात आला. तसेच,गावांतर्गत पाण्याची क्षमता जास्त असलेले हातपंप व विंधन विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता मोहीम राबविणे,जैविक व रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व करणे,गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे आणि रिचार्ज शाफ्ट केलेल्या कामांची स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. यावेळी उमरगा, धाराशिव,भूम, तुळजापूर,परंडा,वाशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व संबंधित कनिष्ठ अभियंते व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 19 Apr 2026 3:40 pm

मला त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही; पोप लिओ यांचे ट्रम्प यांना सणसणीत प्रत्युत्तर

अमेरिका, इस्रायल -इराण युद्ध आणि जागतिक परिस्थितीवर केलेल्या वक्तव्यांवरून पोप लिओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सुरू असलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मला त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट करत पोप लिओ यांनी वादाला पूर्णविराम दिला आहे. आपल्याला ट्रम्प यांच्याशी कोणताही वादविवाद किंवा संघर्ष करायची नको आहे, असे ते म्हणाले. तसेच […]

सामना 19 Apr 2026 3:34 pm

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना विधेयक कळालं सुद्धा नाही, तेजस्वी यादव यांचा टोला

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावरून बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी भाजप महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्षात मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. रविवारी पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना या विधेयकाचा गाभा समजलेलाच […]

सामना 19 Apr 2026 3:34 pm

अभिनेत्री तब्बूने मुंबईत खरेदी केले १० कोटींचे आलिशान घर

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या अभिनेत्री तब्बूने, मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. तब्बूने तिच्या कारकिर्दीत अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही, ती आजही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच तब्बूने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या ‘भूत […]

सामना 19 Apr 2026 3:23 pm

LPG गॅसचे संकट, सूरतहून उत्तर प्रदेश, बिहारला जाण्यासाठी मजुरांची रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी

आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती आणि एलपीजी संकटाचा परिणाम हिंदुस्थानातील विविध भागांत जाणवू लागला असून, त्याचा मोठा फटका गुजरातमधील सूरत शहराला बसत आहे. उद्योगधंद्यांवर परिणाम होत असल्याने अनेक कंपन्या बंद पडू लागल्या आहेत, तर बाहेरील राज्यांतील कामगारांना आपल्या गावी परतण्याची वेळ आली आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. याच पार्श्वभूमीवर सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी […]

सामना 19 Apr 2026 3:22 pm

IPL 2026 –चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत हैदराबादने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेन याने मोठे विधान केले. चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय हैदारबादसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे स्टेन स्टार स्पोर्टवर बोलताना म्हणाला. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त […]

सामना 19 Apr 2026 3:14 pm

Assembly Election 2026 –एनडीएला मत म्हणजे तमिळनाडूच्या प्रगतीला खोडा, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे विधान

तिरुप्पूर येथे एका निवडणूक प्रचारसभेत संबोधित करताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध केले आहे. एनडीएच्या पारड्यात टाकलेले प्रत्येक मत राज्याच्या विकासकामांना आणि प्रगतीला खीळ घालणारे ठरेल, असे विधान स्टॅलिन यांनी मतदारांना उद्देशून केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक (डीएमके) सरकारवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, जेव्हा जेव्हा […]

सामना 19 Apr 2026 3:13 pm

IAS समीर बिश्नोई यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक गुन्हे शाखेकडून 4 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

छत्तीगडमधीलकोळसा घोटाळ्यातील आरोपी आणि निलंबित आयएएस अधिकारी समीर बिश्नोई यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बिश्नोई यांच्यावर कारवाई करत त्यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. समीर बिश्नोई यांच्यावरील आरोपांची गांभीर्याने दखल घेत रायपूरच्या विशेष न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जुलै […]

सामना 19 Apr 2026 3:06 pm

गुरुग्राममध्ये बनावट ‘मौंजारो’ इंजेक्शनचा भंडाफोड, 56 लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

हरियाणातील गुरुग्राममध्ये उशिरा रात्री अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत बनावट ‘मौंजारो क्विकपेन’ इंजेक्शनचे रॅकेट उघडकीस आणला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 56.15 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गुरुग्राम-1 चे औषध नियंत्रण अधिकारी अमनदीप चौहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुडा […]

सामना 19 Apr 2026 2:57 pm

भ्रष्टाचाराच्या ऑडिओ क्लिप चौकाचौकात लावल्या जातील

बाबी जोगींचा महेश कांदळगावकर यांना इशारा मालवण : प्रतिनिधी भ्रष्टाचार विरहित काम करण्याची भूमिका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली होती. परंतु काही कालावधीतच बालोद्यान मध्ये खेळाचे साहित्य बसविण्याच्या टेंडरच्या बिलात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आहे. त्याबाबत महेश कांदळगावकर यांच्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप देखील उपलब्ध आहेत. त्या ऑडिओ क्लिप कशा काय [...]

तरुण भारत 19 Apr 2026 2:49 pm

आखाती युद्धाची मोठी किंमत जगाने मोजली; 50 दिवसात 50 अब्ज डॉलर्सचे तेल झाले स्वाहा

इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्ध केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अंदाजे ५० दिवसांत ५० ​​अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे कच्चे तेल वाया गेले आहे. त्याचा परिणाम येत्या काही महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल, असे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विश्लेषकांच्या मते, फेब्रुवारीच्या अखेरीस संघर्ष सुरू झाल्यापासून अंदाजे ५० कोटी बॅरल […]

सामना 19 Apr 2026 2:37 pm

Pandharpur |पंढरपुरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांचा गोडवा; कोकणच्या हापूसला वाढती मागणी

पंढरपुरात अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा बाजार फुलला पंढरपूर -शहरात साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर कोकण तसेच इतर भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व इतर रसाचे आंबे दाखल झाले आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोकणात मोठ्या प्रमाणात मोहोर गळून गेला असल्याने हापूस आंब्याच्या [...]

तरुण भारत 19 Apr 2026 2:35 pm

पुढच्या वेळी संसदेत उभं राहून बोला, ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत विरोधी पक्षांवर टीका केली होती. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पुढच्या वेळी संसदेत उभं राहून बोला, जिथे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात असे आव्हान बॅनर्जी यांनी दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ममता बॅनर्जी […]

सामना 19 Apr 2026 2:22 pm

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प प्रशासनासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालाने खळबळ

इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. दोन्ही उभय देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने एक खळबळजनक अहवाल […]

सामना 19 Apr 2026 2:17 pm

Solapur Crime News |सोलापुरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’यशस्वी; सराईत दरोडेखोर ‘घुल्या’पवारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सोलापूर – सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात राबविलेल्या ऑपरेशन ऑ ल आऊटमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दरोड्यांसह सहा घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक केली. घुल्या ऊर्फ गुलाब ऊर्फ प्रितिज्ञान झिंगझिंग पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) असे अटक [...]

तरुण भारत 19 Apr 2026 2:16 pm

Satara Civil Hospital |साताऱ्यात ‘सिव्हिल’चा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर; ५० हजारांची लाच घेताना शिपाई रंगेहात अटकेत

सातारा सिव्हिल रुग्णालयात लाचखोरीचा पर्दाफाश सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने नव्याने वळण घेतले असून, शिपाई आनंदा बाळवेकर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर आरोग्य विभागातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचारात शे-पाचशेचे धनी असलेल्या वाळवेकरांची नोकरी अबधी दोन वर्षे राहिली [...]

तरुण भारत 19 Apr 2026 1:51 pm

Karad News |प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर कराड पोलीस ॲक्शन मोडमध्ये; शहरात डंपर आणि ट्रकना प्रवेशबंदी

कराडमध्ये जड वाहनांना चाप! कराड: काही दिवसांपूर्वी वर्दळीच्याठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कराड वाहतूक पोलीस प्रशासनाने गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रकांवर वर्दळीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी लागू [...]

तरुण भारत 19 Apr 2026 1:45 pm

Kolhapur News |गंगावेशात ‘रात्रीचा खेळ’रंगला! पैलवान आणि खाद्यविक्रेत्यात फ्री-स्टाईलने हाणामारी

कोल्हापुरात किरकोळ कारणावरून मारामारी कोल्हापूर -गंगावेश येथील रेगे तिकटी येथे शनिवारी रात्री खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ अचानक कुत्रे आल्याच्या कारणावरुन पैलवान आणि खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यात मारामारीचा प्रकार घडला. मारामारीच्या प्रकारात एका मोपेडचीमोडतोड करण्यात आली आहे. रेगे तिकटी येथे गाडीद्वारे एक विक्रेता खाद्यपदार्थांची विक्री करण्याचा व्यवसाय करतो [...]

तरुण भारत 19 Apr 2026 1:29 pm

Kurunwad News |बुलेटची मोटरसायकलला जोराची धडक; शिवनाकवाडीतील महिलेचा जागीच मृत्यू

शिवनाकवाडीत भीषण अपघात कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता.शिरोळ) येथे मोटरसायकललाबुलेटस्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरमागे बसलेल्या महिलेचारस्त्यावर रक्तबंबळ अवस्थेतस्वाती गावडे पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.मृत महिलेचे स्वाती कुमार गावडे (बय३६, शिवनाकवाडी) असे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वाती गावडे या आपले पती [...]

तरुण भारत 19 Apr 2026 1:16 pm

“ज्या भाजपने महाराष्ट्रात फक्त…”, महिला आरक्षणावरून डायलॉगबाजी करणाऱ्या फडणवीसांवर अंजली दमानियांची बोचरी टीका

महिला आरक्षणाच्या षड्यंत्राआडून अंदाधुंद मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले आणि हे विधेयक लोकसभेत कोसळले. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमत गाठता न आल्याने महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. यानंतर भाजपने विरोधकांना टार्गेट करणे सुरू केले. विरोधक महिला विरोधी असल्याची टिमकी सत्ताधारी वाजवू लागले. मुख्यमंत्री […]

सामना 19 Apr 2026 1:11 pm

Chandgad Crime News |चंदगड हादरले! तुर्केवाडीत महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडसदृश द्रव्याने जीवघेणा हल्ला

तुर्केवाडीत महिला डॉक्टरवर अॅसिडसदृश हल्ला चंदगड -तुर्केवाडी येथील एका महिला डॉक्टरवर अज्ञात दोघांनी असिडसदृश द्रव फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली कौशल बांदिवडेकर (वय २९, व्यवसाय डॉक्टर, रा. तिलारी [...]

तरुण भारत 19 Apr 2026 1:07 pm

नोएडा हिंसाचारातील मुख्य आरोपीला तामिळनाडूमध्ये अटक; गुन्ह्याची दिली कबुली

नोएडातील कामगार आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ज्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्या आदित्य आनंद उर्फ ​​रास्तीने पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने या कटातील आपली भूमिका मान्य केली आहे. त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून संपूर्ण नेटवर्क आणि कटाच्या इतर […]

सामना 19 Apr 2026 1:04 pm

नोएडा हिंसाचारातील मुख्य आरोपी आदित्यला तामिळनाडूमध्ये अटक; गुन्ह्याची दिली कबुली

नोएडातील कामगार आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ज्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्या आदित्य आनंद उर्फ ​​रास्तीने पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने या कटातील आपली भूमिका मान्य केली आहे. त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून संपूर्ण नेटवर्क आणि कटाच्या इतर […]

सामना 19 Apr 2026 1:04 pm

World Liver Day 2026 –लिव्हरचे आजार झपाट्याने का वाढत आहेत? जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे यकृताच्या आरोग्याविषयी आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. यकृत अन्न पचन करणे, विषारी द्रव्ये काढून टाकणे, ऊर्जा प्रदान करणे आणि शरीराची दुरुस्ती करणे यासह अनेक कार्ये करते. असे असूनही, यकृताशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षात येत […]

सामना 19 Apr 2026 1:04 pm

गुरुद्वारातून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून हत्या, इटलीतील संतापजनक घटना

इटलीतील बर्गामो प्रांतातील कोवो येथे एका गुरुद्वारात बैसाखीचा सण साजरा करून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे इटलीतील हिंदुस्थानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोवो येथील औद्योगिक भागात असलेल्या गुरुद्वारा माता साहिब कौर जी येथे बैसाखीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

सामना 19 Apr 2026 12:58 pm

Satara News |नेर धरणाचे पाणी तात्काळ सोडा, अन्यथा २२ एप्रिलला रस्त्यावर उतरू, खटावसह अनेक गावे आक्रमक

येरळा नदीकाठच्या गावांचा पाटबंधारे विभागाला इशारा सातारा – नेर धरणातील पाणी तात्काळ सोडा… अन्यथा २२ एप्रिलनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.खटावसह येरळा नदीकाठच्या गावांनी पाटबंधारे विभागाला थेट इशारा दिला असून, वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले [...]

तरुण भारत 19 Apr 2026 12:50 pm

मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; ठाणे–डोंबिवली दरम्यान लोकलचा खोळंबा, प्रवासी रेल्वे रुळांवरून चालत धोकादायक प्रवास

मुंबई उपनगरी रेल्वेतील मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. ठाणे ते डोंबिवली दरम्यान स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वाढीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याने, लोकल रेल्वेसेवेचा खोळंबा झाला आहे. या ब्लॉकदरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर गाड्या थांबत नसल्यामुळे, प्रवाशांना पर्याय नसल्याने थेट रेल्वे रुळांवरून चालत आपल्या गंतव्यस्थानी जाण्याचा धोका पत्करावा लागला. याचे काही व्हिडिओ आणि […]

सामना 19 Apr 2026 12:49 pm

एपस्टीन फाइल्सवरून लक्ष भरकटवण्यासाठी युद्धाचा घाट, अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात; कमला हॅरिस यांचा ट्रम्प प्रशासनावर हल्लाबोल

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला नको असलेल्या युद्धात ओढले आहे, असे हॅरिस म्हणाल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणविरुद्धच्या लष्करी संघर्षात ट्रम्प यांना जाणीवपूर्वक ओढले असून, यामुळे अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप हॅरिस यांनी […]

सामना 19 Apr 2026 12:42 pm

Gokul |गोकुळ’ची बदनामी थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; कर्मचारी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा

गोकुळ बचावासाठी कर्मचारी व शेतकरी एकवटले कोल्हापूर – सहकारामध्ये गेल्या सहा दशकापासून अधिक काळ नावाजलेल्या आणि अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पावक संघाची (गोकुळ) राजकीय बर्चस्वावरून सुरू असलेली बदनामी थांबवानी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असे [...]

तरुण भारत 19 Apr 2026 12:33 pm

रजनीकांतच्या ‘जेलर २’ने प्रदर्शनापूर्वीच केला विक्रम प्रस्थापित, कोट्यवधींच्या ओटीटी करारामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

रजनीकांतचा चित्रपट ‘जेलर २’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेला आहे. नुकतेच, या चित्रपटाने कोट्यवधींच्या ओटीटी करारासह एक मोठा टप्पा गाठला आहे. यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर, त्याच्या सिक्वेलकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, निर्माते २०२६ च्या उत्तरार्धात भव्य प्रदर्शनाची तयारी करत आहेत. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट […]

सामना 19 Apr 2026 12:24 pm

युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय, 12,980 कोटींचा सागरी विमा पूल मंजूर

युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक निर्बंध आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बाह्य व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 12,980 कोटींच्या सार्वभौम हमी (sovereign guarantee) असलेल्या सागरी विमा पूलला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. हा विमा पूल सुरुवातीला 10 वर्षांसाठी कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार आणखी 5 […]

सामना 19 Apr 2026 12:12 pm

मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय; 2023 ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्यांनी हत्या केली! –संजय राऊत

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता लाईव्ह येत विरोधकांवर आगपाखड केली. विरोधक कसे महिला विरोधी आहेत याची टीमकी त्यांनी वाजवली. याचा आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतला. मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडला आहे, अशी […]

सामना 19 Apr 2026 12:10 pm

ड्रायव्हर-क्लिनरचा ‘रिल्स’चा नाद चिमुकलीच्या जिवावर; समृद्धी महामार्गावर खासगी बस उलटून भीषण अपघात

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनचालकाच्या टोकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकलीला आपला प्राण गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर टोलनाक्याजवळ एका खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बसचा चालक आणि क्लिनर चालत्या बसमध्ये मोबाईलवर ‘रिल्स’ बनवण्यात मग्न असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा […]

सामना 19 Apr 2026 11:58 am

पंतप्रधान मोदींचे भाषण वादात; CPI खासदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारवाईची मागणी

दोन तृतीयांश बहुमताअभावी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. या पराभवामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता लाईव्ह येत विरोधकांवर आगपाखड केली. मोदींचे हेच भाषण आता वादात सापडले आहे. मोदींनी आपल्या भाषणातून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील राज्यसभा खासदार पी. संदोष […]

सामना 19 Apr 2026 11:45 am

मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, महिला मतदारांना भडकवले; काँग्रेस नेते अशोक गहलोत यांचा आरोप

माजी राजस्थान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी द्रविड मुनेत्र कळघम आणि तृणमूल काँग्रेसचा उल्लेख करून महिला मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असे गहलोत यांनी म्हटले. सध्या आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये […]

सामना 19 Apr 2026 11:41 am

दीपिका-रणवीर सिंग पुन्हा आई बाबा होणार, दुआसोबत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

रणवीर सिंग सध्या ‘धुरंधर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. असे असताना रणवीरने आणि दीपिकाने पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या दुसऱ्या बाळाची अपेक्षा करत आहेत. या जोडप्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची पहिली भेट २०१३ मध्ये ‘गोलियों […]

सामना 19 Apr 2026 11:30 am

Satara News |अजिंक्यतारा किल्ल्यावर ‘हेरिटेज वॉक’ला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐतिहासिक पाऊलखुणा शोधत सातारकर चढले अजिंक्यतारा सातारा– जागतिक वारसा दिनानिमित्त अजिंक्यतारा किल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉकला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. इतिहास संशोधन व वारसा संवर्धन संस्था आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा [...]

तरुण भारत 19 Apr 2026 11:26 am

देशात नरेंद्र मोदी फेल, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल ठरले आहेत. त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला. खरात फाईल्स, नराधम एरंडे, टीसीएसमधील छळवणूक प्रकरण याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संजय राऊत म्हणाले की, आपण धर्मांतर विरोधी […]

सामना 19 Apr 2026 11:20 am

Satara News |पसरणीच्या माळावर फुललं ‘मिनी काश्मीर’; बापू भिलारे यांच्या शेतात लालबुंद सफरचंदांची बाग!

पसरणी गावात उभं राहिलं ‘मिनी काश्मीर’ पाचगणी( इम्तियाज मुजावर ) – सफरचंद म्हटलं की सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते थंड हवामान असलेले हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ प्रदेश. मात्र आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावातही सफरचंदाची बाग फुलली असून, या भागातच ‘मिनी काश्मीर’ [...]

तरुण भारत 19 Apr 2026 11:17 am

कानपुर हादरलं…जुळ्या मुलींचे गळे चिरले आणि नंतर पोलिसांना बोलावले, जन्मदाता बाप मुलींच्या जीवावर उठला

कानपूरच्या नौबस्तामध्ये रविवारी पहाटे दोन जुळ्या मुलींचे गळे चिरून हत्या केली गेली. रविवारी पहाटे (19 एप्रिल) ही घटना घडली असून, ११ वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आलेली आहे. वडिलांनी त्यांच्या फ्लॅटमध्येच मुलींचे गळे चिरले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. आरोपी वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती देताना, डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी […]

सामना 19 Apr 2026 11:12 am

‘Idea of India’ वाचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पराभूत केले – राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत संसदेत मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. शनिवारी चेन्नई दौऱ्यावर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, “काल संसदेत भाजपने नवीन विधेयक आणले आणि ते महिला विधेयक असल्याचे सांगितले. पण महिला आरक्षणाचे […]

सामना 19 Apr 2026 11:08 am

लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच 18 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच जिल्ह्यामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने […]

सामना 19 Apr 2026 10:53 am

होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे आर्थिक दहशतवाद, हिंदुस्थानलाही झळा बसल्या; UAE च्या मंत्र्यांचा इराणवर तिखट हल्ला

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांत इराणने आपला निर्णय बदलल्याने आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आधी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली होती, मात्र अमेरिकेवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत त्यांनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आर्थिक दहशतवाद असून त्याच्या झळा हिंदुस्थानालाही बसला आहे. […]

सामना 19 Apr 2026 10:47 am

तेव्हा स्वत:ची पाठ थोपटून घेणार, आता गप्प का? अर्थव्यवस्थेच्या घसरणीवरून रोहित पवारांची केंद्र सरकारवर बोचरी टीका

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानची घसरण आता सहाव्या क्रमांकावर झाली असून युके आणि जपानने हिंदुस्थानला मागे टाकले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था वधारेल असा अंदाज येतो तेव्हा वाहवा करून घेणारे सरकार, आता घसरण झाल्यावर गप्प का? […]

सामना 19 Apr 2026 10:24 am

पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी मतदार यादीत ७ लाख नवीन मतदारांची भर, निवडणूक आयोगाने केले जाहीर

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती जाहीर केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मतदार यादीत जवळपास ७ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अद्याप या अतिरिक्त मतदारांचे वय किंवा लिंग याबद्दल माहिती दिलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक […]

सामना 19 Apr 2026 10:23 am

मध्य प्रदेशात बँक ऑफ महाराष्ट्रात 17 कोटी लुटले

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील बँक ऑफ महाराष्ट्रात दिवसाढवळय़ा बँकेत दरोडा टाकण्यात आला. दुपारच्या वेळी पाच सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले. या दरोडेखोरांनी गोळीबार करून 10 किलो सोने आणि 20 लाख रोख रक्कम असे जवळपास 17 कोटी रुपये लुटले आणि ते मोटरसायकलवरून पसार झाले. लुटलेले सोने ग्राहकांचे होते, जे बँकेने गहाण ठेवून कर्ज दिले होते. सोने […]

सामना 19 Apr 2026 10:22 am

मोदींनी आपल्या संबोधनात महिलांचा कमी पण काँग्रेसचा 59 वेळा उल्लेख केला, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करत ते पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप केला आहे. संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. मात्र, या भाषणात देशाच्या प्रश्नांऐवजी विरोधकांवर टीका आणि चिखलफेक करण्यात आली, असा दावा खरगे यांनी केला. खरगे यांनी ‘X’वर पोस्ट करत म्हटले […]

सामना 19 Apr 2026 10:14 am

मुंबईकरिता टेन्शन तलावात 46 टक्के पाणी उरले

राज्याच्या विविध भागात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये मिळून 46. 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये केवळ 39.32 टक्के इतक्या पाणीसाठा होता. राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठय़ासंदर्भातील आकडेवारी जाहीर […]

सामना 19 Apr 2026 10:05 am

‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा

इराण आणि अमेरिकेतील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार आहे. एकीकडे याची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराण सतर्क आहे. इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार असला तरी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहे, असे विधान करत इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. दीड महिन्यांच्या संघर्षानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. […]

सामना 19 Apr 2026 10:02 am

मेटा आठ हजार कर्मचार्‍यांना काढणार

जगप्रसिद्ध मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ही कर्मचारी कपात येत्या 20 मेपासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मेटा कंपनी जगभरातून कमीत कमी 20 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. त्यामुळे कंपनीतील आठ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, हे स्पष्ट झाले आहे. ही कर्मचारी कपात पहिल्या टप्प्यातील आहे. दुसऱ्या टप्प्यातही कर्मचारी कपात कंपनी करणार […]

सामना 19 Apr 2026 10:02 am

शेवटची ट्रिप मारून येतो ! तुटलेली काच मानेत घुसून रिक्षाचालक ठार

मित्रांनो शेवटची ट्रिप मारून येतो.. असे अन्य रिक्षाचालकांना सांगून गेलेला विकास पुन्हा आलाच नाही. ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रवाशाला सोडून घरी परतत असलेल्या विकास गाडे याच्या रिक्षाचा 90 फीट रोडवर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून जोरात धडक दिल्याने रिक्षाच्या फुटलेल्या काचा मानेत घुसल्याने रक्तस्त्राव होऊन विकासचा मृत्यू झाला. विकास […]

सामना 19 Apr 2026 10:00 am

IPL 2026 –हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात कमकुवत गोलंदाजीचे लेबल लागलेल्या सनरायझर्स हैदराबादने शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपली ताकद दाखवून दिली. घरच्या मैदानावर सीएसके… सीएसके…. अशा गगनभेदी गर्जना घुमत असतानाही हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी थरारक पराभव केला. हैदराबादने 195 धावांचा बचाव करताना चेन्नईला 184 धावांत रोखले आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या […]

सामना 19 Apr 2026 9:44 am

इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत, होर्मुझ सामुद्रधुनीत गोळीबारप्रकरणी इराणची प्रतिक्रिया

होर्मुझ सामुद्रधुनीत हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने रविवारी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दोन्ही देशांतील मजबूत संबंध अधोरेखित करत शांततेचे आवाहन केले. डॉ. इलाही म्हणाले की, “इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत. आपण उल्लेख केलेल्या घटनेबाबत मला ठोस […]

सामना 19 Apr 2026 9:42 am