SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

परीक्षण –आंधी बोलीला बळ 

>> शंकर बळी क्रांतिकारक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी (15 नोव्हेंबर) प्रा. डॉ. सखाराम डाखोरे यांचा ‘हूलबिगूल’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाच्या शीर्षकानेच वाचकांचे लक्ष वेधले. यातील पहिला शब्द ‘हूल’ आणि दुसरा ‘बिगूल.’ ‘हूल’ हा शब्द संथाळी भाषेतील आहे, तर ‘बिगूल’ हा शब्द मूळचा इंग्रजी भाषेतील आहे. इंग्रजी राजवटीत आदिवासींवरील अन्याय-अत्याचार वाढले होते. तेव्हा […]

सामना 11 Jan 2026 12:00 am

राष्ट्रप्रथम असलेला भाजप मेला; आता भ्रष्टाचारी, बलात्कारी, दरोडेखोर प्रथम हे आता भाजपचं घोषवाक्य झालंय! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

”भाजपच्या निष्ठावंतांची हालत खराब झाली आहे. माखलेल्या बरबटलेल्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना धुवून पुसून खांद्यावर नाचवायचं हेच काम निष्ठावंतांना राहिलं आहे. राष्ट्रप्रथम असलेला भाजप मेला; आता भ्रष्टाचारी, बलात्कारी, दरोडेखोर प्रथम हे आता भाजपचं घोषवाक्य झालंय”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेत केला. छत्रपती संभाजीनगरमधील […]

सामना 10 Jan 2026 10:02 pm

तुम्ही स्वप्नं बघा, छत्रपती संभाजीनगरचा महापौर या भगव्याचाच होणार लक्षात ठेवा; भाजपला टोला लगावत अंबादास दानवे यांनी व्यक्त केला विश्वास

चार-पाच दिवसांपूर्वी भाजपचं डोंबिवलीचं घुबड आलं होतं. ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं आणि पहिला महापौर आमचा होणार. तुम्ही स्वप्नं बघा, तुमचा महापौर होणार नाही. महापौर या भगव्याचाच होणार एवढं लक्षात ठेवा, असा ठाम विश्वास व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. खरं […]

सामना 10 Jan 2026 9:01 pm

सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही, अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा; पुण्यात संजय राऊत यांचं रोखठोक भाषण

सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही, अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुणे येथील कोंढवा येथे प्रचार सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “माझी प्रकृती गेले काही महिने ठीक नाही आहे, दीड महिने मी […]

सामना 10 Jan 2026 9:00 pm

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहंचला, शिवसेनेच्या प्रत्यक्ष मतदार भेटी व रॅलीने शहर दुमदुमले

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच प्रभागात व वार्डात उमेदवारांनी पायी प्रचार रॅली तसेच भोंगे लावून आपापल्या पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेने देखील ३१ वार्डात आपले उमेदवार उभे केले असून, त्याठिकाणी दणदणीत प्रचार पक्षाने सुरू आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा पहिला महापौर सुधाकर पांढरे यांच्या […]

सामना 10 Jan 2026 8:21 pm

वर्षभरात विकासाची कामे व आवश्यक प्रश्न न सोडल्यास राजीनामा देईल, बॉण्ड पेपरवर लिहून घरोघरी प्रचार; शिवसेनेच्या निता जैन यांचा अनोखा प्रचार

>> विजय जोशी गौतम जैन हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कट्टर कार्यकर्ता. त्यांची पत्नी निता गौतम जैन या प्रभाग क्र.१६ ब-मधून शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या निवडणुकीत त्यांनी घरोघरी बॉण्डवर लिहून देवून तुमच्या भागातील मुलभूत समस्या सोडविण्यात अपयशी ठरले तर आपण राजीनामा देऊ, असे बॉण्डवर लिहून प्रचार करत असून या आगळ्यावेगळ्या प्रचाराची […]

सामना 10 Jan 2026 8:12 pm

खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची रूपेरी सांगता, दिक्षा यादवला रौप्‍यपदक

खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने समारोपाच्या दिवशी रूपेरी सांगता केली. सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक पटकावले. दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्‍या सत्रात 5 कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट् व कर्नाटकात चुरस रंगली. महाराष्ट्राची दिक्षा यादव 4 किमी पर्यंत आघाडीवर होती. निर्णायक टप्पात कर्नाटकच्‍या अश्मिता चंद्राने दीक्षासोबत बरोबरी केली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात 1.35.11 […]

सामना 10 Jan 2026 7:38 pm

सरकारविरोधात लिखाण केल्याने घेतलं ताब्यात; कायदेशीर लढा देईन; अनेक तासांच्या पोलीस चौकशीनंतर डॉ. पाटील यांची प्रतिक्रिया

लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता सोडण्यात आलं आहे. सरकारविरोधात लिखाण केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. याच प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितलं की, “मी फेसबुकवर सरकारविरोधात लिखाण करतो. सरकारच्या […]

सामना 10 Jan 2026 7:15 pm

Ratnagiri News –सानवी भिंगार्डेची वीरगाथा ५:० मध्ये राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड, सुपर १०० यादीत स्थान

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वीरगाथा ५:० ’ राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी सानवी शशांक भिंगार्डे हिची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कविता लेखन गट (इयत्ता ३ री ते ५ वी) मध्ये तिचा समावेश संपूर्ण देशातील ‘राष्ट्रीय सुपर १०० […]

सामना 10 Jan 2026 7:03 pm

मिऱ्या येथे दुचाकींचा भीषण अपघात; एक ठार, तिघे गंभीर

मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. दोन दुचाकींपैकी एक दुचाकी रत्नागिरी […]

सामना 10 Jan 2026 7:03 pm

भूम पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी संपन्न

भूम (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी संपन्न झाली. धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी ही वार्षिक तपासणी संपन्न केली. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी मानवंदना देऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे स्वागत केले. या वार्षिक तपासणी वेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधीकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरव केला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आर मेघना,उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल चोरमले हे हजर होते. वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस ठाण्याच्या वार्षिक कामकाजाची सविस्तर तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांनी काही सूचना केल्या व समाधान व्यक्त केले. यावेळी या वर्षांमध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी सपोनि संजय झराड, पोना संदेश क्षिरसागर, महिला पोह शबाना मुल्ला व रतन घोगरे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी स्टार ऑफ द मंथ हा उपक्रम चालू केला आहे. त्यावरही पोलीस अधीक्षकांनी तपासणी केली. तसेच ज्या ज्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी कोणत्या गुन्ह्याची सोडवणूक केली आहे. याचीही माहिती घेतली. वार्षिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मुक्त संवाद साधला. यावेळी भूम पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी ,कर्मचारी हजर होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 7:01 pm

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी न्याय देण्याची मागणी

भूम (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी इयत्ता 6 वी वर्गात शिकत असलेली कु अनुष्का पाटोळे या मुलीचा छळ करुण तिने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात अंत्यत चालाखीने, हुषारीने हत्येचा पुरावा नष्ट करून करून ही आत्महत्या आहे असे भासवण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी व त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी यांना देखील सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने तत्काळ कारवाई न केल्यास सकल भूम तालुक्याच्या वतीने मांतग समाजाने सोमवार दिनांक 12 रोजी भूम शहरातील गोलाई चौकात रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्रालय यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर दत्ता साठे, अण्णा साठे, बबन साठे , नारायण साठे, प्रदीप साठे, किरण साठे, सचिन साठे, गणेश साठे, शैलेश साठे,रोहीत गायकवाड, नितीन साठे, अमोल साठे, रविंद्र साठे, प्रविण साठे,सचिन साठे, सोहन साठे,सुजित साठे, मनोज क्षीरसागर, दत्ता पाटुळे, ओंम साठे संतोष साठे, किरण साठे,कुणाल आडागळे, आकाश साठे, राम साठे, दिनेश दुबळे,जितेंद्र साठे, गणेश साठे, प्रमोद आडागळे,लखन साठे यांच्या सह्या आहेत.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 7:00 pm

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेंचा नगरसेवक पदाचा राजीनामा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना शुक्रवारी भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. न्यायालयीन जामिनावर असलेल्या आपटे यांना भाजपने पायघडया अंथरुन नगरसेवकपद दिल्याने भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर तुषार आपटे यांनी वरिष्ठांकडे आपला राजीनामा दिल्याचे समजते. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. बदलापूरच्या नामांकित शाळेत […]

सामना 10 Jan 2026 5:43 pm

मराठा उद्योजकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे - बी. बी. ठोंबरे

धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजात मोठ्या संख्येने उद्योजक आहेत. पण ते विखुरलेले आहेत. या उद्योजकांना एकत्रित करून प्रोत्साहन देण्याचे कार्य एमईए (मराठा उद्योजक संघटना) करत आहे. या संघटनेत मराठा उद्योजकांनी जास्तीत जास्त योगदान देऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन नॅचरल शुगर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले. धाराशिव येथे मराठा उद्योजकांचा भव्य मेळावा शनिवार, 10 जानेवारी रोजी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर उद्योजक हनुमंत मडके, विक्रम गायकवाड, पी. के. मुंडे, चित्राव गोरे, विजय बारकुल, सतीश देशमुख, उमेश सोकांडे, विक्रम नरसाळे, बालाजी येरुळे, आश्रम काळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना श्री. ठोंबरे म्हणाले, मराठा समाजातले तरुण आज रोजगार निर्मितीत उतरले पाहिजेत. कारण सर्वांना नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून मराठा उद्योजकांनी जास्तीत जास्त उद्योग निर्मितीत उतरले पाहिजे. ग्रामीण भागात उद्योगाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये शेतीमाल प्रक्रिया, पशुपालन व इतर क्षेत्रात काम करून उद्योग निर्मिती करता येते. यातून मराठा तरुणांनी एकत्र येऊन उद्योग उभारणी करावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक तथा एमईएचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश विषद केला. ते म्हणाले, मराठा उद्योजकांना एकत्र करून मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्याचा आमचा उद्देश आहे. मराठा समाजातील उद्योजकांनी आपला उद्योग फेल होईल याची भीती बाळगू नये. उद्योजकांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यावेळी उद्योजक हनुमंत मडके, पी. के. मुंडे, चित्राव गोरे, विजय बारकुल, सतीश देशमुख, उमेश सोकांडे, विक्रम नरसाळे, यांनीही मराठा समाजातील उद्योजकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. मेळाव्यात धारशिव शहर व जिल्ह्यातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्याचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. मेळाव्यामध्ये अनेक उद्योजकांनी आपल्या मान्य शंकांचे निरसन केले. मेळाव्याला मराठा समाजातील तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:42 pm

नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुनंदाताई कापसे यांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा; नागरिक सेवा व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य

कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषद कळंबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आढावा बैठकीत नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट आणि ठोस दिशा दिली आहे. नागरिक सेवा, शहर स्वच्छता आणि वेळेत कामे या बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. शहराच्या स्वच्छतेमध्ये आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत, सर्व प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता, नाल्यांची वेळेवर साफसफाई आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे स्पष्ट आदेश अध्यक्षा कापसे यांनी दिले. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रभागातून वेळेत कचरा संकलन करावे, नागरिकांना स्वच्छतेबाबत कोणतीही अडचण येऊ देऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. “नगर परिषद म्हणजे नागरिकांसाठी सेवा केंद्र आहे. नागरिकांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा दुर्लक्ष याला यापुढे थारा दिला जाणार नाही,” असा ठाम सूर अध्यक्षा कापसे यांनी व्यक्त केला. मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे यांनीही सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांना नागरिकांना वेळेत, पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आवाहन करण्यात आले की, घरगुती व व्यावसायिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून दारात येणाऱ्या घंटागाडीतच कचरा टाकावा, जेणेकरून शहर स्वच्छ व सुंदर राहील. या बैठकीस कार्यालयीन अधीक्षक श्री. एल. एस. वाघमारे, आरोग्य विभाग प्रमुख श्री. संजय हजगुडे, आस्थापना, बांधकाम, पाणीपुरवठा, भांडार, वसुली, नगर रचना, विद्युत तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:39 pm

जीवनदान महाकुंभ अंतर्गत कळंब येथे रक्तदान शिबिर; ८३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ, नाणीज धाम, महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या जीवनदान महाकुंभ (रक्तदान) २०२६ उपक्रमांतर्गत कळंब येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. दिनांक ४ते १८ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या या महाअभियानाचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांसाठी विनामूल्य, सुरक्षित व पुरेसे रक्त उपलब्ध करून देणे हा आहे. उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे ७ जानेवारी रोजी आयोजित या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवले. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा संदेश या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र दिसून आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमर चाऊस, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, विकास कदम, सतीश आडसूळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. रक्तसंकलनाचे कार्य धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले. डॉ. दीपमाला करंडे (रक्तसंक्रमण अधिकारी), लक्ष्मीकांत मुंडे (रक्तपेढी तंत्रज्ञ) यांच्यासह ब्लड बँक व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी शिस्तबद्ध, सुरक्षित व नियमानुसार रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली. रक्तदान करणाऱ्या दात्यांना रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, प्राचार्य जगदीश गवळी, माधवसिंग राजपूत, जयनारायण दरक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे शिष्यगण, सेवाभावी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गरजवंत भक्तांना ब्लँकेट वाटप, तसेच रक्तदात्यांना बिस्किटांचे वितरण जयनारायण दरक यांच्या वतीने करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ 2026 उपक्रमाला समाजातील विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून आरोग्य सेवेस मोठा हातभार लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे शिष्यगण विठ्ठल काटे, कल्याण बोराडे, जीवन चव्हाण, राजेंद्र मुळीक, दत्तात्रय इंगोले, स्वप्नील खिंडकर, रमेश शिंदे, प्रदीप जाधव, प्रमोद कुलकर्णी, अशोक त्रिमुखे, अनिता चव्हाण, अनिता विभुते, सुहासिनी काळे, कोमल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:39 pm

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

भूम (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कानगुडे म्हणाले की, पत्रकार बांधव हे समाज मनाचा आरसा असतात. प्रशासनातील आम्हा अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शक ठरतात. आमच्या काही चुका झाल्या तर त्या देखील ते आपल्या बातमीच्या माध्यमातून सांगतात तसेच आमचे चांगले काम देखील ते तेवढ्यात समाजासमोर आणण्याचे काम करतात. प्रशासन आणि जनतेचे समन्वयक म्हणून त्यांची भूमिका समाजामध्ये खूप महत्त्वाची व मोठी आहे. भूम पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी असल्याने आम्ही या सत्कार समारंभाचे आयोजन उशिरा केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद सरोदे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी व पत्रकार बांधव हजर होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:38 pm

राष्ट्रीय सेवा योजना युवा शिबिराचे उद्घाटन उत्साहात

भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास या विषयावर आयोजित युवा शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शिबिराचा उद्देश युवकांच्या सहभागातून ग्रामीण विकास व समाजप्रबोधन साध्य करणे हा होता. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून गावचे सरपंच पांडुरंग देवळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते तसेच कृषी सहाय्यक आण्णासाहेब खटाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे हे होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. धनश्री पिंपरे यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका मांडणारे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर सोळंके यांनी शिबिराचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. समारोपप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. गंगाधर काळे यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी व प्राध्यापकांचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या युवा शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून जलसंधारण व ग्रामविकासाच्या कार्याला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:35 pm

अनेक वर्षांच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची अखेर व्हील्हेवाट

कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाची बनली होती. शहरातील विविध भागांमध्ये नियमित स्वच्छतेअभावी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि शहराची एकूण प्रतिमा धोक्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी परिस्थितीची दखल घेत थेट कृतीचा मार्ग स्वीकारला आहे. नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे या केवळ कार्यालयात बसून आदेश देणाऱ्या नगराध्यक्षा न राहता, सोबत स्वतः रस्त्यावर उतरून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची साफसफाई सुरू केली. विशेषतः प्रभाग क्रमांक 07 मधील अनेक ठिकाणी साचलेला जुना कचरा हटवण्याचे काम प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सुरू करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “अखेर आमच्या भागातही स्वच्छतेला सुरुवात झाली” अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या भागांना नवसंजीवनी मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. या स्वच्छता अभियानाच्या वेळी प्रभाग क्रमांक 07 चे नगरसेवक अमर चाऊस, नगरसेविका पूजा धोकटे तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून कळंब शहर स्वच्छतेकडे एक ठोस पाऊल टाकत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे यांच्या या कार्यतत्पर आणि ठाम भूमिकेमुळे कळंब शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असून, “स्वच्छ शहर सुंदर शहर” ही संकल्पना केवळ घोषणे पुरती न राहता प्रत्यक्षात उतरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 5:34 pm

लंडनहून मुंबईत परतातच डॉक्टर संग्राम पाटील यांना विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात, सरोदेंनी व्यक्त केला संताप

लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोविड काळात महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्याने वैद्यकीय मार्गदर्शन करत होते. यातूनच ते चर्चेत आले होते. पोलिसांनी त्यांना नेमकं का ताब्यात घेतलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली […]

सामना 10 Jan 2026 5:29 pm

अण्णामलाई जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार, महाराष्ट्र एकिकरण समितीचा इशारा

तामीळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईत प्रचारादरम्यान ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या दरम्यान महाराष्ट्र एकिकरण समितीने अन्नामलाई यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला आहे. समितीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. ”भाजपचे अण्णामलाई जिथे दिसतील तिथे […]

सामना 10 Jan 2026 5:28 pm

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्रीचा डंका कायम

दिल्लीत झालेल्या स्पर्धेत प्रथम येत पटकावले सुवर्णपदक ओटवणे| प्रतिनिधी दिल्ली फरीदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग बॅच प्रेस स्पर्धेत चराठा सावंतवाडी तालुक्यातील चराठा गावची कन्या तथा माजगाव हायस्कुलची विद्यार्थिनी कु हेमांगी गजानन मेस्त्री प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकाविले. या सुवर्णपदकामुळे हेमांगी हिने चराठा गावासह या प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल हेमांगी मेस्त्री हिच्यावर विविध [...]

तरुण भारत 10 Jan 2026 4:40 pm

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

धाराशिव (प्रतिनिधी) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-GRAM-G अधिनियम अमलात आणण्याच्या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस पार्टीच्यावतीने लाक्षणिक धरणे आंदोलन दि.९ जानेवारी रोजी करण्यात आले. केंद्राने घेतलेला तो निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन चिडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही सन २००५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने लागू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायदेशीर हमी देणे हा होता. तसेच रोजगाराची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनावर निश्चित करण्यात आली होती. या योजनेमुळे देशभरातील सुमारे ५ ते ६ कोटी ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी रोजगार मिळत होता. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होऊन स्थलांतराला आळा बसला. तसेच गोरगरीब, शेतमजूर, महिला व मागासवर्गीय घटकांना आर्थिक आधार मिळाला. मात्र, नवीन VB-GRAM-G अधिनियम अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या नव्या कायद्यामुळे ग्रामीण व गोरगरीब जनतेच्या रोजगाराच्या हमीवर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच या अधिनियमामुळे राज्य शासनाचे अधिकार कमी करून बहुतांश अधिकार केंद्र शासनाकडे केंद्रीत करण्यात येत असल्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संघराज्य व्यवस्थेच्या तत्वालाही बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. मनरेगा योजना ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेचा कणा आहे. ती रद्द केल्यास कोट्यावधी कुटुंबे उपजिवीकेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे आपण आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मनरेगा योजना रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत केंद्र सरकारला निर्देश द्यावेत व ग्रामीण जनतेच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. जर या मागणीचा विचार नाही केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र सहप्रभारी रेहना चिस्ती, जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, मी काय खाली आहे प्रदेश सरचिटणीस डॉ स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, बेंबळीचे सरपंच सत्तार शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक महबूब पाशा पटेल, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, नगरसेवक अक्षय जोगदंड, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, तनुजा हड्डा, सुरेखा जगदाळे, सरफराज काझी, वाशी तालुकाध्यक्ष गपाट, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, कपिल सय्यद, संजय गजधने, सचिन धाकतोडे, सुनील बडूरकर, जुबेर शेख, मलंग शेख, गोविंद हरकर, बापू खटके, प्रभाकर डोंबाळे, प्रेमानंद सपकाळ, माजी नगरसेवक मुहीब शेख, विलास शाळू, सलमान शेख, गौरीशंकर मुळे, संकेत पडवळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 4:40 pm

महिला सुरक्षा व टवाळखोरांवर लगाम घालण्यासाठी कळंब शहरात महत्त्वपूर्ण बैठक

कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसह सुरक्षित, सुसंस्कृत आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या पुढाकारातून नगरपरिषद कार्यालयात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली. शहरातील वाढत्या छेडछाडीच्या घटना, टवाळखोरांचा त्रास, शाळा–महाविद्यालय परिसरातील असुरक्षितता या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली. या बैठकीस पोलीस प्रशासन, बस स्थानक प्रतिनिधी, शाळा–महाविद्यालये व कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी, पत्रकार, पालक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान अनेक विद्यार्थिनींनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात व प्रवासादरम्यान होणाऱ्या छेडछाडीच्या घटना भावनिक शब्दांत मांडल्या. या गंभीर तक्रारींवर उपस्थित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेत तात्काळ उपाययोजनांचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर व पिंक पथक प्रमुख जाधव मॅडम यांनी प्राप्त तक्रारींची नोंद घेतली असून त्यावर त्वरित अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशयित टवाळखोरांवर नजर ठेवणे, शाळा व कॉलेज परिसरात पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही व पिंक पथकाची सक्रियता वाढवणे यावर भर देण्यात आला. शहरात गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न, अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणे, शाळा परिसरात बिनधास्त फिरणारे टवाळखोर यांना चाप बसवण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी “Safe City, Safe Girl” हा विशेष उपक्रम राबविण्याची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत महिला सुरक्षेसाठी समन्वयित कृती आराखडा, जनजागृती, पालक-शिक्षक सहभाग, तसेच पोलीस व नगरपरिषदेची संयुक्त यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. शहरात सुरू असलेल्या या सकारात्मक बदलांमुळे उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले. या बैठकीस नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती गुर्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्यासह नगरसेवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. “कळंब शहरातील प्रत्येक मुलगी, महिला आणि विद्यार्थी सुरक्षित असल्याची भावना मनात बाळगेल, हेच माझे ध्येय आहे. छेडछाड, टवाळखोरी आणि असभ्य वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. ‘Safe City, Safe Girl’ उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस, पालक, शाळा व नगरपरिषद एकत्र येऊन ठोस आणि कडक कारवाई करू. सुरक्षित शहर हे केवळ घोषणा नाही, तर आमची जबाबदारी आहे.” नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 4:39 pm

रा. से. यो. शिबिराअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न

मुरूम ( प्रतिनिधी)- कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम यांच्या वतीने मौजे गणेशनगर येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, मुरूम व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित स्वयंसेवक व गावातील नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५७ नागरिकांची रक्तगट तपासणी, सीबीसी, एच.बी.एस.ए.जी., एच.आय.व्ही., रक्तदाब (बी.पी.) व साखर (शुगर) यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद इंगोले, ग्रामीण रुग्णालय, मुरूम येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरदाळे, डॉ. कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले, समुपदेशक सुजित जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन उपासे, प्रा. प्रसाद इंगोले, प्रा. बालाजी इंगोले, प्रा. रोहन हराळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 4:38 pm

आज सरमळे नांगरतासच्या रामरक्षक देवस्थानचा जत्रोत्सव

ओटवणे:प्रतिनिधी जिल्ह्यात एकमेव असलेल्या सरमळे नांगरतास येथील श्री रामरक्षक देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी १० जानेवारीला होत आहे. यानिमित्त हजारो भाविक रामरक्षाचे दर्शन घेऊन त्याचा कृपाशीर्वाद घेतात. यादिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त मध्यरात्री १ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त ‘व्यंकट रमणा जय गोविंदा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी [...]

तरुण भारत 10 Jan 2026 4:31 pm

अन्यथा उद्भवणाऱ्या जनक्षोभाला पालिका प्रशासन जबाबदार राहील : प्रा. सिद्धेश नेरुरकर

गॅस , पाणी पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामाचा सर्वोदयनगर कॉलनीला फटका सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी सर्वोदयनगर कॉलनीत गेल्या महिनाभरापासून नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन तसेच पाणीपुरवठा लाईन टाकण्याच्या कामाबाबत तेथील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर गॅस पाईपलाईन आणि पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीमुळे परिसरात प्रचंड धूळ ,घाण आणि अस्वच्छता पसरलेली आहे. सदर काम सुरु [...]

तरुण भारत 10 Jan 2026 4:19 pm

नवनिर्वाचित नगरसेवकांचा भाजपा कार्यालयात सत्कार

परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेतील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मा.आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हामुख रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, माजी नगरसेवक शब्बीरखॅां पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भाजपा नेते अजिमभाई हन्नूरे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, गौरव पाटील, सुरज काळे तसेच प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:48 pm

उद्योगासाठी आवश्यक असणारे मुळ कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज - संजय गुरव

धाराशिव (प्रतिनिधी)- उद्योगासाठी आवश्यक असणारे मुळ कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहायक आयुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव संजय गुरव यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे काजळा येथे सुरू आहे. त्याप्रसंगी गुरव बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की, एन एस एस चे शिबिर हे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्याचे धडे देत असते. कारण इथे असंख्य विद्यार्थी जीवनाची कार्यशाळा म्हणून सहभागी होतात. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ मोहन राठोड, डॉ अवधूत नवले, सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम बंडगर, प्रास्ताविक ब्रम्हा गुरव आणि आभार सागर शिंदे या विद्यार्थ्यांनी केले

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:47 pm

मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेविकांचा सत्कार

धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव यांच्या वतीने जिजाऊ जयंतीचा 429 वा वर्षोत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने धाराशिव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेविकांचा सत्कार कोट गल्ली येथील जंगम मठ येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा जगदाळे, सुरेखा जाधव, डॉ. वैशाली बलवंडे, ॲड. स्मिता कोल्हे, ॲड. अमिता देशमुख, सुनीता साळुंके उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्षा नेहा काकडे, नगरसेविका कुरेशी मसूद, अलका पारवे, राणी पवार, उबरे सोनाली, गायत्री दंडनाईक, आकांक्षा वाघमारे, आंबेकर रूपाली, राजकन्या पवार, दिपाली पाटील, संगीता अकोसकर, वैशालीताई मुंडे, केशवबाई करवर, देवकते शकुंतला, सोनाली वाघमारे, ज्ञानेश्वरी निकम, पवार वंदना यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे म्हणल्या की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या अपेक्षां नुसार विकासकामे प्राधान्याने राबविण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना समिती अध्यक्षा प्रणिता पंकज पाटील म्हणाल्या की, पुढील जिजाऊ जयंती जिजामाता उद्यानात भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी उद्यानाचा कायापालट करण्यात यावा. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊंच्या लेकींनी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष कमलताई नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात स्त्रीच्या भूमिकेवर मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक घरात स्त्रीने स्वतःला केवळ मम्मी न म्हणता आई म्हणून घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नसतात, तर त्यांना घडवावे लागते. जिजाऊं प्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कारक्षम, धैर्यवान व समाजासाठी आदर्श ठरेल असा घडवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आभार प्रदर्शन अस्मिता बुरगुटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी पाटील यांनी केले. तसेच जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:46 pm

महास्ट्राईड अंतर्गत तुळजाभवानी मंदिर परिसराच्या जतन-संवर्धन व विकासकामांचा सखोल आढावा

तुळजापूर (प्रतिनिधी)- महास्टराईड अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन, संवर्धन व विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी तुळजापूर येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत पाचुंदा तलाव व रामदरा तलाव परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या व प्रस्तावित असलेल्या विकासकामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. जलसौंदर्यीकरण, सुरक्षितता, पर्यटकांसाठी सुविधा, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कामांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याच बैठकीत तुळजापूर येथे साकारण्यात येणाऱ्या आई तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करतानाचा भव्य व ऐतिहासिक पुतळा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतही सखोल चर्चा झाली. हा पुतळा तुळजापूरच्या ऐतिहासिक परंपरेचे आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक ठरणार असून भाविक व पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. येत्या काळात अंतर्गत होणाऱ्या या सर्व विकासकामांमुळे तुळजापूरच्या धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन महत्त्वाला नवे बळ मिळणार आहे. भाविक व पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज व आकर्षक सुविधा उपलब्ध होणार असून तुळजापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. या आढावा बैठकीस आमदार राणा जगजीतसिंह पाटील जिल्हाधिकारी श्री. किर्ती किरण पुजार, तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विनोद गंगणे, पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती जया वहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. नरसिंग मंडे, उपविभागीय अधिकारी श्री. ओंकार देशमुख, तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, तहसीलदार श्रीमती माया माने यांच्यासह आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञांची टीम तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:45 pm

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नगराध्यक्षासह पत्रकारांचा सत्कार

भूम (प्रतिनिधी)- भूम शहराचे नूतन नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे आणि त्यांचे नगरसेवक यांचा सत्कार आणि दर्पण दिननिमित्त भूम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती भूमच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुढील काळात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातही शिवसेना शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र येत निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी कार्यक्रम वेरी बोलताना सांगितले .तसेच माजी सभापती अण्णासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याकडे सर्वांनी मिळून पाठपुरावा करून पुढील काळात बाजार समिती चांगल्या नावारूपास आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे . नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यावेळी बोलताना म्हणाल्या की भूम शहराच्या विकासासाठी आलम प्रभू शहर विकास आघाडी आणि आम्ही कटिबद्ध आहोत. नगराध्यक्षपदाचा अधिकार पूर्णपणे वापरून भूम शहरातील विकास कामे अधिक गतीने करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील होतो आणि पुढील काळातही राहू असे यावेळी नूतन नगराध्यक्ष गाढवे म्हणाल्या. कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, अण्णासाहेब देशमुख, माजी सभापती शेळवणे, संचालक तथा सरपंच विशाल बापू ढगे, विशाल अंधारे, सहदेव गोपने, सातव समाधान, वैजीन नाथ म्हमाने, बालाजी काका तांबे, माजी पंचायत समिती उपसभापती रामकिसन गव्हाणे, दत्तात्रय गायकवाड, उद्योजक संजय साबळे, बाळासाहेब सुर्वे, रईस काजी, नगरसेवक सुरज गाढवे, अभिजीत शेटे, मंगल नाईकवाडी, राधा शिंदे, शितल शिंदे, मुशीर शेख, बापू बाराते, महिला जिल्हाप्रमुख अर्चना दराडे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:44 pm

मल्हार पाटील यांनी घेतली सुजितसिंह ठाकूर यांची भेट

परंडा (प्रतिनिधी)- भूम, परंड्याचे आमदार तानाजीराव सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर घणाघाती टिका केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मल्हार पाटील फिल्डींग लावत असल्याचे दिसत आहे. भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा मल्हार पाटील यांनी सत्कार केला. तर याप्रसंगी मल्हार पाटील यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, भाजपा नेते सुखदेव टोंपे, डोमगावचे माजी सरपंच मनोहर मिस्कीन, भाजपा युवा मोर्चा परंडा शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते, नगरसेवक . समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अकिब पठाण, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते. मल्हार पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक आणि विविध विकास कामाबद्दल चर्चा केली.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:43 pm

​मतांसाठी ‘गोमाता’आणि खासगीत ‘कापाकापी’? याला म्हणतात हिंदुत्वाचा ‘बळी’! रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओवर अंबादास दानवेंची टीका

भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्येला परवानगी दिल्याची जाहिर कबुली एका कार्यक्रमात दिली आहे. या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘राज्यमाता’ म्हणायचं आणि ‘खाटीकखाना’ उघडायचा? याला म्हणतात हिंदुत्वाचा ‘बळी’! ​ज्या सरकारने गाईला ‘राज्यमाता’ घोषित करून गाजावाजा केला, त्याच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे “खुशाल गाई कापा” […]

सामना 10 Jan 2026 3:43 pm

सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी ‌‘अरुणोदय‌’ मोहीम; एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहणार नाही

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये ‌‘अरुणोदय : विशेष सिकलसेल तपासणी पंधरवडा‌’ ही मोहीम दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये,असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना (साकोरे) बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले आहे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये,अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत. राज्यात 1 कोटी 5 लाखांहून अधिक तपासण्या; 12,420 रुग्ण, 1,24,275 वाहक सन 2019 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यात एकूण 1 कोटी 05 लाख 86 हजार 733 सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 12,420 सिकलसेल रुग्ण आणि 1,24,275 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन 2008 पासून आदिवासी व दुर्गम भागांत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.ठाणे, नाशिक,नंदुरबार,अमरावती,गोंदिया, गडचिरोली,पालघर,नागपूर,वर्धा,चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ,धुळे,जळगाव,बुलढाणा, नांदेड,वाशिम,अकोला,छत्रपती संभाजीनगर,रायगड व हिंगोली या 21 जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत जनजागृती,मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एचपीएलसी तपासणी,मोफत औषधे, समुपदेशन,नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा देण्यात येतात. सिकलसेल आजार म्हणजे काय सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून आई-वडिलांकडून अपत्यांना होतो.हा लाल रक्तपेशींशी संबंधित आजार आहे.सामान्य रक्तपेशी वर्तुळाकार व लवचिक असतात,तर सिकलसेल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात.त्या रक्तवाहिन्यांना चिकटून राहतात, त्यामुळे रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच सिकलसेल क्रायसिस म्हणतात. त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि वारंवार इजा झाल्याने अवयव निकामी होऊ शकतात.प्लीहा सुजते,रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग वाढतो.हाडे,फुफ्फुसे, यकृत,प्लीहा,मेंदू तसेच डोळे,स्वादुपिंड, त्वचा यांवर परिणाम होऊ शकतो. प्रतिबंधासाठी काय करावे विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करावी. लाल () व पिवळे () गुणधर्म असलेल्यांनी परस्पर विवाह टाळावा. सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्यांच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी. सिकलसेलची लक्षणे : हिमोग्लोबिन कमी होणे,हातपाय सूजणे,भूक मंदावणे,सांधे दुखणे,तीव्र वेदना,लवकर थकवा,चेहरा निस्तेज दिसणे. उपचार काय सिकलसेलचा पूर्ण उपचार नाही; मात्र योग्य औषधोपचार,नियमित तपासणी,फॉलिक ॲसिड व इतर औषधे,भरपूर पाणी, वेदनाशामक औषधे,समतोल आहार,गरज असल्यास रक्त संक्रमण,तसेच काही प्रकरणांत बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशनद्वारे पूर्ण बरे होण्याची शक्यता असते.अर्थसहाय्य व सवलती सिकलसेलग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते.10 वी व 12 वीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रत्येक तासाला 20 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जातो.बस प्रवासात सवलत मिळते. राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:43 pm

अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी विनामूल्य शासकीय जागा- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशान्वये नगरपालिकेचे 2 कोटी वाचणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारणीच्या अनुषंगाने सोमवारी दि. 12 जानेवारी रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यांनी दिली आहे. धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण 1.50 कोटी निधी मंजूर करवून घेतला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे 2 कोटी 8 लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. मात्र शासनाने विशेष बाब म्हणून सदर रक्कम माफ करावी यासाठी आपले प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले असून त्यावर आपल्या महायुती सरकारने मागील पंधरवड्याखाली शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार राज्य सरकारने तसा आदेश जारी केला आहे. शहरातील हे स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारण्याचा.मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी सोमवारी शासकीय विश्राम गृह येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:42 pm

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पालकमंत्र्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण पाऊल- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला यावे यासाठी घेतलेले परिश्रम आता वास्तवात येत आहेत. आपल्या महायुती सरकारने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आरखड्यासाठी 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 555 कोटी 80 लाख रुपयांच्या प्रमुख चार पहिल्या कामांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेले हा निर्णय म्हणजे आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले महत्वपूर्ण पाऊल असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. चौडी येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीत 1300 कोटींचा आराखडा तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. अंतिम अहवालात हा आराखडा 1865 कोटी इतका मंजूर करण्यात आला. त्याअंतर्गत 555 कोटी 80 लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली असून या कामांची निविदा प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. मान्यता देण्यात आलेल्या कामात प्राधान्याने घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र आणि बहुउद्देशीय वाहनतळ उभारणी यासाठी 77.02 कोटी रुपये, हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह तसेच वाहनतळ उभारण्यासाठी 376.33 कोटी रुपये, आराधवाडी पार्किंग याठिकाणी सुविधा केंद्रासाठी 45.43 कोटी रुपये आणि शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी 57.23 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 108 फुट उंचीची शिवभवानी शिल्प उभारणार यापूर्वीच हडको भागातील शासकीय भूसंपादन करण्यासाठी 28 कोटी 88 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असतानाच्या भव्य अशा 108 फूट उंचीच्या शिवभवानी शिल्पाचा समावेश असणार आहे. तसेच रामदरा तलावाच्या परिसरात भव्य उद्यानासह, साऊंड अँड लाईट शो तसेच मोठ्या प्रमाणात तलावलगत वॉटरफ्रंटची कामे साकारली जाणार आहेत. दर 15 दिवसांनी विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. मार्च 2028 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेवूनच संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रचलित दराच्या कैकपटीने मावेजा देवून विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:42 pm

नारायणी महिला जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पावधीतच विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नावारूपास आलेल्या नारायणी महिला जिल्हा सहकारी पतसंस्था मर्या., धाराशिव यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरुवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात, काळा मारुती चौक, मारवाडी गल्ली, धाराशिव येथे पार पडले. हा कार्यक्रम नामांकित मॉडेला टेलर्सचे मालक, संस्थेचे मार्गदर्शक तथा शांत संयमी व्यक्तिमत्त्व सय्यद सरशाद अब्दुल हलिम रझवी यांच्या शुभहस्ते छोटेखानी स्वरूपात पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण पवार, जयपाल शेरखाने, संस्थेच्या उपाध्यक्ष कु. मोनाली जयपाल शेरखाने, धाराशिव शाखा व्यवस्थापक शिवप्रसाद काजळे, तुळजापूर शाखा व्यवस्थापक गजानन वैद्य, तसेच संस्थेचे कर्मचारी अमृता सोनटक्के, आकाश पवार, बापू पवार उपस्थित होते. याशिवाय दोन्ही शाखांचे फर्निचर काम करणारे उत्तर प्रदेशातील कारागीर फक्रुद्दीन अन्सारी यांचीही उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:41 pm

धाराशिव येथे जनजागृती कार्यक्रमात कायदा,पर्यावरण व शिक्षणावर भर

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘बालविवाह मुक्त भारत आपला संकल्प अभियान‌’,पर्यावरण आणि सामुदायिक संरक्षण उपक्रमाविषयी जनजागृती कार्यक्रम छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून पुढे जावे,विजयाने उथळ वागू नये आणि पराभवामुळे खचून जाऊ नये.आदर्श नागरिक बनावे.कायदा मला माहित नाही,असे न म्हणता कायद्याचे ज्ञान घ्यावे व ते व्यावहारिक जीवनात पाळावे.मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये आणि बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प करावा.तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्नशील राहावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख,मुख्य न्यायरक्षक ॲड. अमोल गुंड,उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रेय जंगम, विस्तार अधिकारी भारत देवगुडे, प्राचार्य विक्रमसिंह देशमुख आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक आनंद वीर यांनी तर फलप्राप्तीचे महत्त्व सांगून आभार प्राचार्य विक्रमसिंह देशमुख यांनी मानले.कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:40 pm

555.80 कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता- पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य विकास आराखड्याला शासनस्तरावर वेग मिळाला असून,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पातील कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या विकास आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांची ऑनलाईन तर सभागृहात अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कळवकर,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने, नगर परिषद तुळजापूर मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी, अधिक्षक अभियंता महावितरण संजय आडे,छत्रपती संभाजीनगरचे राज्य पुरातत्व विभागाचे वैभव वानखेडे,तुळजापूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रज्वलित मंगरुळे,तुळजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.वाय.आवाळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यास 1865 कोटी रुपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे.शासनाने मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात एकूण 555.80 कोटीं रुपयांच्या चार प्रमुख कामांचा समावेश असून त्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र व बहुउद्देशीय वाहनतळ उभारणीसाठी 77.02 कोटी रुपये,हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र,व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह व वाहनतळासाठी 376.33 कोटी रुपये,आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्रासाठी 45.43 कोटी रुपये तसेच जुने एस.टी.स्टँड परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी 57.23 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या विकास आराखड्यातील 457.80 कोटी रुपयांच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.तसेच सन 2025-26 साठी 54.28 कोटी रुपयांची तरतूद आणि सन 2026-27 साठी 500 कोटी रुपयांच्या अंदाजित तरतुदीचे नियोजन करण्यात आले आहे.भूमी संपादनासाठी यापूर्वीच 28.88 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांच्यामार्फत संपादन प्रक्रिया सुरू आहे.तसेच सल्लागार शुल्कापोटी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसराचा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा या हेतूने हा प्रकल्प मार्गी लावला आहे.भाविकांना सुरक्षित,सोयीस्कर आणि सुव्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी हा आराखडा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विकास आराखड्यातील मंजूर कामे अनुभवी कंत्राटदारांकडून वेळेत करुन घ्यावेत,या कामास गती द्यावी, कंत्राटदारांकडून योग्य अंदाजपत्रक मिळाले नसल्यास निधी मंजूरीस अडचण निर्माण होते,त्यामुळे योग्य अंदाजपत्रक मागवून घ्यावे,विकास आराखड्यातील सर्व कामे जानेवारी 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या. प्रिबीडमधील सूचनांचा स्विकार करण्याचे पूर्ण अधिकार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. पूजार यांना असतील असे पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी सांगितले.श्री तुळजाभवानी मंदिराच्या अवतीभवतीच्या महसूली जमीनी मंदिर संस्थानला वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.मंदिर परिसरामध्ये पोलीस चौकी बांधण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले. आमदार राणाजगजितसिंह यांनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याशी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित पाहणी करुन वेगवेगळे अहवाल तयार करून स्वतंत्र प्रस्ताव मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना या प्रकल्पामुळे भाविकांच्या सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असून तुळजापूर शहराच्या पर्यटन,रोजगार व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:39 pm

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना अधिकारी -कर्मचाऱ्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न

धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणी,आंतर मशागती,कापणी,मळणीच्या कामासाठी तसेच शेतातील उत्पादीत माल घरापर्यंत, बाजारपेठेत पोहचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक असून यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामासाठी यंत्रसामग्रीचा वाढत असल्यामुळे शेत/पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या योजनेची माहिती व कार्यपद्धती संबंधित अधिकारी - कर्मचारी यांना व्हावी यासाठी 8 जानेवारी 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे रोजगार हमी योजना विभागाकडून एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख जोगदंड,जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वारंजे,कळंब उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे व सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विश्वास करे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. धरमकर यांनी या योजनेसाठी ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,बांधकाम विभाग,प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व वन विभाग ह्या कार्यान्विन यंत्रणा असल्याचे सांगितले.तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार,निविदा पद्धती,देयके अदा करण्याचे अधिकार,निधीची उपलब्धता यामध्ये अर्थसंकल्प तरतूद, सामाजिक दायित्व निधी,विविध योजनाच्या अभिसरणातून प्राप्त होणारा निधी याबाबतची माहिती त्यांनी दिली. तसेच गावनकाशावर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीस तहसीलदार यांनी अतिक्रमण 7 दिवसात काढण्याची नोटीस द्यावी.अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासनाकडून तहसीलदार यांनी काढावे.या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी पाणंद रस्त्यांच्या परिसरातील शासकीय तलावातील गाळ,माती व मुरूम,नदी नाले खोलीकरण करून उपलब्ध होणारा गाळ,माती, मुरूम तसेच परिघातील खाणीतील मुरूम,दगड वापरण्यात यावा याबाबतची माहिती त्यांनी दिली. या योजनेत ग्रामपंचायतची जबाबदारी,महसूल यंत्रणेची जबाबदारी,पोलीस यंत्रणेची, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची कार्यकक्षा, विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती याबाबतची तसेच योजनेची तांत्रिक कार्यपद्धती याबाबतची माहिती श्री.धरमकर यांनी दिली दिली. जोगदंड यांनी गावनकाशावर उपलब्ध असलेले रस्त्यांचे प्रकार यामध्ये ग्रामीण रस्ते, हद्द रस्ते,गाडीचे रस्ते व पाय रस्ते, डबल डॉटेड, सिंगल डॉटेड व पुनर्विलोकन गाव नकाशा याबाबत माहिती दिली. रोजगार हमी योजना कार्यालयातील एम.आय.एस. मिश्री जमादार यांनी विकसित भारत -रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात व्हि.बी- जी राम जी अधिनियम -2025 बाबत माहिती दिली. कार्यशाळेला सर्व तहसीलदार,गट विकास अधिकारी,वन परिक्षेत्र अधिकारी,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:38 pm

रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‌‘वॉक ऑन राईट‌’चे मार्गदर्शन

धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक 01/01/2026 ते 08/01/2026 या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मांजरा साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली. वायुवेग पथक क्र.2 मधील मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केंबळे व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर टेप लावून त्याचे फायदे चालकांना समजावून सांगितले. तसेच वायुवेग पथक क्र.4 मधील मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी वहीर यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावून नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत सूचना व मार्गदर्शन केले.वायुवेग पथक क्र. 1 व क्र.3 मधील श्री.सुशांत धुमाळे व सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री. सिद्धेश्वर मस्के यांनीही ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावून चालकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. धाराशिव शहरातील वरुडा रोड येथे पादचाऱ्यांना ‌‘वॉक ऑन राईट‌’ संकल्पनेबाबत मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे,सहायक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे व कार्यालयीन अधीक्षक नरसिंह कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पादचाऱ्यांना माहितीपत्रके व बॅजचे वाटप करण्यात आले. तामलवाडी टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे व सहायक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे यांनी टोल नाका कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.यावेळी बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरित करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा,दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे,चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरावा,मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच अपघातग्रस्तांना मदत करावी, याबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:38 pm

बीआयटीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्वल निकालाची परंपरा कायम*

भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या 2025 च्या हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज ) मधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा यावर्षीही देखील कायम राखली असून तीनही अभ्यासक्रमाचा तिसऱ्या वर्षाचा निकाल 100% लागला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये - प्रथम वर्ष -प्रथम क्रमांक - श्रीहर्ष कवडे 83.18%,द्वितीय क्रमांक - अजय खुले -83.06% ,तृतीय क्रमांक - धीरज थोरात - 80.35% द्वितीय वर्ष - प्रथम क्रमांक -अनुष्का काळे -82.94%, द्वितीय क्रमांक - अंजली फडकरी 77.29% तृतीय क्रमांक - प्रतिज्ञा कवडे -75.18% तृतीय वर्ष- प्रथम क्रमांक -श्रुती सातपुते -87.11% ,द्वितीय क्रमांक - वैभवी कांबळे -83.11%, तृतीय क्रमांक - वैष्णवी पाटील -82.11% इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा मध्ये प्रथम वर्ष - प्रथम क्रमांक - रिवा गाढवे -85.41%,द्वितीय क्रमांक - अमृता घोगरे -84.00%, तृतीय क्रमांक - सानिया फकीर व अनुष्का हागवणे - 82.59% द्वितीय वर्ष - प्रथम क्रमांक - अंकिता कांबळे -89.67%, द्वितीय क्रमांक -वैष्णवी धारूरकर -85.67%,तृतीय क्रमांक - प्रशांत जगदाळे - 85.33% तृतीय वर्ष - प्रथम क्रमांक - श्रुष्टि व्हळे -91.88%,द्वितीय क्रमांक - पृथ्वीराज बोबडे -90.00%,तृतीय क्रमांक - रोहन सलगर व प्रदीप मोरे - 88.59% मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये -प्रथम वर्ष- प्रथम क्रमांक ऋतुराज अरगडे 78.35% ,द्वितीय क्रमांक आरती गव्हाणे 76.47% तृतीय क्रमांक भारत येमाडे 76.12% द्वितीय वर्षात - प्रथम क्रमांक -यश नेमाने याने 87.78% द्वितीय क्रमांक साहिल जाधव 83.11% तृतीय क्रमांक शिवम अरगडे याने 78.44% . तृतीय वर्षात - प्रथम क्रमांक अभिजित सोनावणे 92.71% द्वितीय क्रमांक -नवनाथ भिल 90% तृतीय क्रमांक -अंकिता पवार 89.77% सर्व यशस्वी विद्यार्थ्याना संकुल संचालक ऋतुराज सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.एच.व्ही. शेटे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जेएसपीएम ग्रुपचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव सावंत सर , महाविद्यालयाचे सचिव पृथ्वीराज सावंत ,संकुल संचालक ऋतुराज सावंत , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.व्ही.शेटे सर ,यांच्यासह सर्व विभागप्रमुख ,प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:37 pm

शिक्षक व शिक्षणविरोधी धोरणा विरोधात देशव्यापी आंदोलन

धाराशिव(प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षक व शिक्षणविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील सात प्रमुख शिक्षक संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती समिती (AIJACTO)ची स्थापना केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी संसद भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली. शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात असून सरकारकडून या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. AIJACTOच्या वतीने RTE कायद्यापूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट, जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करणे, NEP 2020 मधील शिक्षणविरोधी तरतुदी मागे घेणे, शाळांचे विलीनीकरण थांबवणे व रिक्त पदे तात्काळ भरणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, कराराधीन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, समान कामासाठी समान वेतन आणि ८व्या केंद्रीय वेतन आयोगाची वेळेत अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. ५ फेब्रुवारीच्या संसद मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, व्ही. जी. पवार, अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, केंद्र कार्यकारिणी सदस्य एफ. जी. जमादार, सुशीलकुमार तीर्थकर, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष दयानंद भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष डी. एम. बनसोडे, जिल्हा सहसचिव गीते, धाराशिव शहराध्यक्ष व्यंकटेश पाटील व धाराशिव तालुकाध्यक्ष एस. के. दराडे यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अण्णासाहेब कुरुलकर यांनी दिली.

लोकराज्य जिवंत 10 Jan 2026 3:37 pm

घंटा फरक पडतो! मुंबईच्या विकासावरून आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबईतील निवडणुकीस अवघे पाच दिवस उरले असतानाही भाजपकडे मुंबईसाठी कोणताही ठोस अजेंडा, विकासाची दृष्टी किंवा जाहीरनामा नसल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप मुंबईसंबंधी ठोस मुद्द्यांवर बोलण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारला सीमापार घुसखोरी रोखण्यात आलेल्या अपयशासारख्या अमूर्त विषयांवर बोलत आहे, मात्र शहराच्या मूलभूत […]

सामना 10 Jan 2026 3:30 pm

सावंतवाडीत २० जानेवारीला मोफत आरोग्य शिबिर

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या [...]

तरुण भारत 10 Jan 2026 3:18 pm

गुळदुवे -शेटकरवाडी रस्ता दुरुस्तीअभावी अद्यापही खचलेला

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ; ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी न्हावेली /वार्ताहर मळेवाड- आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे शेटकरवाडी येथील रस्ता मागील अनेक महिन्यांपासून खचला असून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याच्या तळी व बागायतीला धोका निर्माण झाला असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मागील [...]

तरुण भारत 10 Jan 2026 2:48 pm

ओडिशात चार्टर्ड विमान कोसळले, सहा प्रवासी जखमी

ओडीशातील राउरकेला येथे एक चार्टर्ड विमान कोसळले असून या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. विमानात पायलटसह नऊ प्रवासी होते. हे विमान इंडिया वन एअर कंपनीचे होते. हे विमान भुवनेश्वरवरून राऊरकेला येथे जात होते. विमानाने दहा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विमानात काहीतरी बिघाड असल्याचे कॅप्टनव नवीन काडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तर यांना जाणवले. त्यांनी विमानाचे […]

सामना 10 Jan 2026 2:39 pm

प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा

सोनुर्ली – निगुडे मार्गावरील पुलाबाबत दिले बांधकाम उपअभियत्यांना निवेदन न्हावेली /वार्ताहर सोनुर्ली निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेला ओहळावरील पूल पूर्णत : कमकुवत झाले असून येत्या आठ दिवसात यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालसमोर २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावंकर यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता [...]

तरुण भारत 10 Jan 2026 2:38 pm

आधी रस्त्याची दुरुस्ती करा ,मगच जि. प. कडे हस्तांतरण करा

न्हावेली उपसरपंचांचा कडक पवित्रा न्हावेली /वार्ताहर न्हावेली मुख्य रस्ता ते माऊली मंदिर या जोड रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर जोपर्यंत रस्त्याची सर्व कामे आणि दुरुस्ती पूर्ण होत नाही,तोपर्यंत हा रस्ता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करु नये,अशी ठाम भूमिका न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी घेतली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत [...]

तरुण भारत 10 Jan 2026 2:27 pm

बालिका अपहरणप्रकरणी देवगड पोलिसांना हायकोर्टाची नोटीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिली ‘हेबियस कॉर्पस’ याचिका : कोल्हापूर खंडपीठांसमोर 19 रोजी सुनावणी प्रतिनिधी देवगड तालुक्यातील दहिबाव – तांबळवाडी येथून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षीय बालिकेचा 18 दिवस उलटूनही कोणताही शोध न लागल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने देवगड पोलिसांना नोटीस बजावून अहवाल मागविला आहे. या अपहरण प्रकरणातील गुन्ह्यात न्याय मिळण्यासाठी अपहृत बालिकेच्या आईने देवगड येथील [...]

तरुण भारत 10 Jan 2026 2:14 pm

गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

बदलापूर येथील चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपने थेट स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’कडून आरोपीला थेट राजकीय पद देण्यात आले असून, त्यामुळेच घटनेनंतर तब्बल 44 दिवसांनी त्याला अटक […]

सामना 10 Jan 2026 1:06 pm

कोल्हापूर मनपा निवडणुकीत 85 उमेदवार कोटय़धीश; 29 उमेदवार रेकॉर्डवरील गुन्हेगार

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून उमेदवारांची मालमत्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे. 81 जागांसाठी तब्बल 325 उमेदवार रिंगणात असून, यात 71 उमेदवार अपक्ष आहेत. यांतील 1 ते 10 कोटींपर्यंत संपत्ती असलेले तब्बल 85, तर 20 कोटींहून अधिक संपत्ती असलेले सहा ‘कोटय़धीश’ उमेदवार आहेत. बहुतांशी उमेदवार हे ‘लखपती’ आहेत. प्रभाग क्र. 17-‘ड’मधील काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक […]

सामना 10 Jan 2026 12:53 pm

छत्रपती संभाजीनगर टोलनाक्यावर 98 लाखांची रोकड जप्त, आचारसंहिता कक्षाची मोठी कारवाई

जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगर चौफुली टोलनाका येथे तैनात असलेल्या स्थितिक सर्वेक्षण पथकाने (SST) शुक्रवारी दुपारी मोठी कारवाई करत एका वाहनातून तब्बल 98 लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली. शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी […]

सामना 10 Jan 2026 12:47 pm

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला रवींद्र चव्हाण घोड्यावर बसवून घेऊन चालले, हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? संजय राऊत यांचा परखड सवाल

बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून घेऊन चालले आहेत. हे काय चालले आहे महाराष्ट्रामध्ये? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच जर न्यायालयात खटला चालवून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असते, तर कदाचित आम्ही यावर बोललो नसतो. पण अजून खटला पेंडिंग आहे असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेना […]

सामना 10 Jan 2026 11:47 am

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपा!

पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचा संदेश : 21 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन पणजी : जगातील सर्व देशात विविध क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा चालू असून त्यात मराठी माणसाचा, मराठी भाषेचा समृद्ध वारसा, संस्कृती जपण्याचे काम जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसांनी करावे, असा संदेश आणि कानमंत्र 21 व्या जागतिक मराठी संमेलनातून अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:59 am

शेतजमिनीत कोणत्या कायद्याने बांधकामे करता?

निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान पणजी : आज गोव्यात विकासाच्या नावावर उभेच्या उभे डोंगर कापले जात आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेली तसेच गावातील शेती बिनदिक्कतपणे बांधकामांच्या नावाखाली गिळंकृत केली जात आहे. खारफुटी वनस्पती नष्ट केली जात आहे. शेतजमीन कोणत्या कायद्याखाली तुम्ही इतर कारणांसाठी वापरात आणत आहात, याचे उत्तर गोमंतकीय जनतेला द्यावे, असे आव्हान [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:57 am

गोव्याबाहेरील लोकांमुळे समस्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा विधिकार दिन सोहळा उत्साहात पणजी : राज्यात 2000 सालानंतर परराज्यातील लोक वाढल्यामुळे त्याचा परिणाम काही प्रमाणात झालेला आहे, हे मी मान्य करतो. परंतु विकासासाठी सरकारने घेतलेले निर्णय हे कायद्याला धरून आणि चौकटीत बसणारे आहेत. गोव्याबाहेरील लोकांमुळे आज समस्या निर्माण होत आहेत, त्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जमीन [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:55 am

लाखाचा पगार…प्रत्यक्षात लुटण्याचा रोजगार

बेळगावातील तरुणांना कंबोडियात आला धक्कादायक अनुभव : कसेबसे गाठले बेळगाव बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच आहेत. बेळगाव शहर-जिल्ह्यासह राज्यातील वेगवेगळ्या शहरातील सावजांना सहजपणे लाखो रुपयांना गंडविण्यात येत आहे. सध्या कंबोडियामधील जकार्ता हे सायबर गुन्हेगारांची राजधानी असून पाच हजारहून अधिक भारतीय तरुण तेथील कॉल सेंटरमध्ये काम करीत आहेत. आपल्याच देशातील नागरिकांना ते ठकवत आहेत. या [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:53 am

होनिहाळमध्ये चार घरे फोडली

18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. होनिहाळ येथे चार घरे फोडण्यात आली असून चोरट्यांनी सुमारे 17 लाख 89 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. होनिहाळ येथील गुंडू शामू तळवार यांनी मारिहाळ [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:51 am

माहेरी जाण्याच्या वादावादीनंतर पतीकडून पत्नीचा कुऱ्हाडीने खून

खुनानंतर पतीनेही गळफासाने संपविले जीवन बेळगाव : पत्नीचा खून करून पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील तुरकर शिगीहळ्ळी येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे. कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. यल्लव्वा शिवाप्पा कंबळी (वय 46) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पत्नीच्या खुनानंतर पती शिवाप्पा सन्नबसाप्पा कंबळी (वय 50) याने गळफास [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:49 am

कानडी कार्यक्रमांसाठी कन्नडिगांचा मनपा आयुक्तांवर दबाव

50 लाखांचे अनुदान खर्च करण्याची मागणी : शुक्रवारी घेतली आयुक्तांची भेट, ‘अन्नोत्सव‘च्या मराठी-इंग्रजी भाषेतील फलकांवरही वक्रदृष्टी बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे सदर अनुदान कन्नड सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावातील विविध कन्नड संघटनांनी शुक्रवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन दबाव घालण्याचा प्रयत्न [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:47 am

भवानीनगरात पाच लाखांची घरफोडी

चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळविली बेळगाव : मंडोळी रोड, भवानीनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. रियल इस्टेट व्यावसायिक राजेश जाधव यांच्या घरी हा प्रकार घडला असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजेश जाधव यांचा [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:44 am

गणेशोत्सवातील थकीत वीजबिल पदाधिकाऱ्यांच्या घरगुती मीटरवर वर्ग

हेस्कॉमकडून वीजबिल दिल्याने कार्यकर्ते संतापले बेळगाव : गणेशोत्सवामध्ये वापरलेल्या विजेचे बिल आता मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या नावे दिले जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरगुती मीटरवर वीजबिल वर्ग करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वकल्पना न देता थेट घरगुती मीटरवर वाढीव वीजबिल देण्यात आले आहे. त्यामुळे किमान एकदा तरी कल्पना देणे गरजेचे होते. गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस वीज वापरली जाते. [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:42 am

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; अजित पवार गटाला लागली सत्तेची लॉटरी, अंबरनाथमध्ये शिंदे गटाची भाजपला धोबीपछाड घड्याळाच्या मदतीने सत्ता स्थापन करणार

अंबरनाथ, बदलापुरात भाजप आणि शिंदे गटाच्या वादात अवघे दोनचार नगरसेवक निवडून आलेल्या अजित पवार गटाला सत्तेची लॉटरी लागली आहे. नुकत्याच झालेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर भाजपने शिंदे गटाला सायडिंगला टाकत काँग्रेसचे १२ नगरसेवक पळवून सत्तेचा दावा केला होता. मात्र सत्तेचा हा सारीपाट आता उलटा-पुलटा झाला आहे. ‘ऑपरेशन लोट्स’ राबवणाऱ्या भाजपला शिंदे गटाने धोबीपछाड दिली असून […]

सामना 10 Jan 2026 10:40 am

वसईत ईव्हीएमचा असाही झोल; कमळ, धनुष्यबाण ठळक इतर पक्षांची चिन्हे फिकट? शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने उठवला आवाज

ईव्हीएम मशीनवरून संपूर्ण देशात विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच आता वसईतही यावरून वादाचा धुरळा उडाला आहे. वसई, विरारमधील ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची नावे,, चिन्हे दर्शवणाऱ्या पॅनलवर कमळ आणि धनुष्यबाण ही चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. मात्र अन्य पक्षांची चिन्हे फिकट दिसत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. ईव्हीएमच्या या झोलझपाट्याविरोधात शिवसेना व […]

सामना 10 Jan 2026 10:30 am

लोककल्पतर्फे ग्रामीण महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पाऊल; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील पारवड, तळवडे, हुळंद, गोल्याळी, बैलूर, चिखले, चिगुळे, चोर्ला आणि कणकुंबी गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगार मिळावा, त्यांना नियमित उत्पन्न मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. लोककल्प फौंडेशनचे संचालक किरण गावडे [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:29 am

कार पार्किंग शुल्क वसुलीत मनपाचे लाखोंचे नुकसान

अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत आरोप : तातडीने निविदा काढण्याची सूचना बेळगाव : बापट गल्ली आणि क्लब रोडवरील पार्किंग शुल्क वसूल करण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल महापालिकेला सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याला महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत शुक्रवारच्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:28 am

खासबाग आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांसाठी आरेखान करणार

मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना : नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश बेळगाव : खासबाग येथील आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी पोलीस खात्याबरोबरच आता महानगरपालिकेदेखील पुढे सरसावली आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत दर रविवारी भरणाऱ्या खासबाग आठवडी बाजाराचा फेरफटका मारून पहाणी केली. तसेच भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी आरेखन करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली. [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:25 am

शिष्यवृत्ती लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचे भांडे फुटणार; ४८ हजार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार

नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शिष्यवृत्तीसाठी सुमारे ४८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने शाळा आणि कॉलेजांना पत्र पाठवले आहे. शाळा आणि कॉलेजांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे अधिकृत असल्याचे जाहीर केल्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवणार आहे. आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात […]

सामना 10 Jan 2026 10:25 am

आझाद गल्ली येथील रस्ता दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात

‘तरुण भारत’ वृत्ताची दखल, नागरिकांमधून समाधान बेळगाव : आझाद गल्ली येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महानगरपालिकेला जाग आली. वर्षभरापासून रस्त्याची खोदाई करून काम अर्धवट टाकण्यात आल्याने नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने ‘तरुण भारत’चे आभार मानण्यात आले. आझाद गल्ली परिसरात जलवाहिनी [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:22 am

ड्रेनेज गळतीमुळे अनगोळमधील विहिरींचे पाणी दूषित

मनपाची तात्पुरती मलमपट्टी : नवीन वाहिनी घालण्याची नागरिकांची मागणी बेळगाव : झेरे गल्ली, अनगोळ परिसरात ड्रेनेजला गळती लागल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. परंतु, पुन्हा महिनाभरानंतर ड्रेनेजला गळती लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:19 am

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याचा 4 फेब्रुवारीला निकाल

बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक 794 ची सुनावणी शुक्रवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात झाली. यावेळी संशयितांचे जबाब नोंदवून घेण्यात आल्याने 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी निकाल दिला जाणार आहे.खटला क्रमांक 794/15 मध्ये बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेत न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. कुमार परशराम मासेकर, केदारी राघोजी पाटील, [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:17 am

वर्षभरात २३ लाख प्रवाशांचा प्रवास; उरण-नेरुळ-बेलापूर रेल्वे मार्गावर चार लाख प्रवासी वाढले

अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग या ठिकाणी स्थायिक झाला असल्याने उरण – नेरुळ – बेलापूर या रेल्वे मार्गावर चार लाख प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात या रेल्वे मार्गावरून २३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून २०२४ मध्ये ही संख्या […]

सामना 10 Jan 2026 10:15 am

माणुसकी जपणारी शहापूरची हट्टीहोळी गल्ली

जात-धर्माच्या भिंती ओलांडणारी गल्ली : आकाराने लहान असली तरी विचारांनी मोठी अमित कोळेकर, बेळगाव बेळगाव शहराच्या दक्षिण भागात वसलेला शहापूर परिसर हा केवळ भौगोलिक रचनेमुळेच नव्हे, तर त्याने जपलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांमुळेही विशेष ओळख निर्माण करणारा भाग आहे. पाणथळ भूभागामुळे मुबलक पाणीसंपदा लाभलेल्या या परिसरात सांगली संस्थानाच्या काळापासून नागरी वसती विकसित होत गेली. काळाच्या [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:15 am

पुण्यात 15 ठिकाणी मतमोजणी होणार

पुणे महापालिका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पंबर कसली आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप प्रचंड वाढले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून मतदानाची तयारी केली जात आहे. पुण्यात एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी असणार आहेत. यामध्ये 13 हजार 882 मतदान यंत्रांद्वारे एकूण 15 […]

सामना 10 Jan 2026 10:14 am

संगोळ्ळी रायण्णा संग्रहालयाचे नंदगडला 19 रोजी उद्घाटन

कन्नड संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी, जि. पं. सभागृहात पूर्वतयारी बैठक बेळगाव : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांना समर्पित असलेले संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. संग्रहालयाची काही कामे बाकी असून, याची कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. या संग्रहालयाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सोमवार दि. 19 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:11 am

बडोदा एक्स्प्रेस वे एप्रिलपर्यंत होणार खुला; वाहतूककोंडी फुटणार, हजारो वाहनचालकांना दिलासा

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या बडोदा एक्स्प्रेस वेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा एक्स्प्रेस वे एप्रिलपर्यंत खुला होणार असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार असून हजारो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. बडोदा – मुंबई एक्स्प्रेस वे एकूण ३७९ किलोमीटर लांबीचा […]

सामना 10 Jan 2026 10:10 am

हलकर्णी ग्रा.पं.पीडीओ विरोधात तक्रार

जमाबंदी कार्यक्रमात नागरिकांकडून पीडीओ धारेवर, बदलीची मागणी खानापूर : शहराला लागूनच असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतचा भ्रष्टाचार तसेच अकार्यक्षम आणि कार्यालयात उपस्थित रहात नसलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या पीडीआ रेश्मा पाणीवाले यांच्याविरोधात शुक्रवारी झालेल्या जमाबंदी कार्यक्रमावेळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी अधिकाऱ्यांसमोरच पाणीवाले यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. आणि पुराव्यासहित पाणीवाले यांच्याविरोधात [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:08 am

अव्वल, डिंगडाँग, शिवाजी तरुण मंडळ विजयी

महांतेश कवटगीमठ क्रिकेट स्पर्धा बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित महांतेश कवटगीमठ दुसऱ्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अव्वल संघाने वेव वॉरियर्सचा, शिवाजी तरुण मंडळाने ए.के.स्टार व हनुमान स्पोर्ट्स-खडीमशिन यांचा तर डिंगडाँगने साईराज वॉरियर्सचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. सामनावीर म्हणून समर्थ, समीर, परसु, शोहेब कुरेशी यांना गौरविण्यात आले. सरदार्स मैदानावरती खेळविण्यात [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:06 am

लिटल स्कॉलर, हेरवाडकर स्कूल विजयी

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लिटल स्कॉलर स्कूलने ज्युनेदीया स्कूल कुडचीचा 38 धावानी तर एम. व्ही. हेरवाडकरने केएलएसचा 14 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राज पवार, अवनिश मालदकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेईच्या प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लिटल स्कॉलरने [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:04 am

पी. यू. कॉलेज नंदगडच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा

हलशी : द. म. शिक्षण मंडळ संचलित डी.एम.एस. पी. यू. कॉलेज नंदगड येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा उपक्रम महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.क्रीडा महोत्सवाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने क्रीडा ज्योतीच्या पूजनाने करण्यात आली. क्रीडा ज्योतीचे पूजन एस. व्ही. बेंचेकर यांनी, क्रीडा मैदानाचे पूजन प्राचार्या प्रा. दीपा [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:03 am

ज्युडोपटू कावेरी सूर्यवंशीला कांस्य

बेळगाव : लुधियाना, पंजाब येथे सुरू असलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय खेळांमध्ये बेळगावीतील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलची विद्यार्थिनी 12 वषीय कावेरी सूर्यवंशी हिने 32 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कावेरीने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात इप्पॉनकडून फातिमा (तेलंगणा) विऊद्ध पहिली लढत जिंकली. दुसऱ्या सामन्यात तिने जम्मू आणि काश्मीरच्या मान्याचा पराभव केला, पुन्हा एकदा उत्कृष्ट तंत्र आणि आत्मविश्वास [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:02 am

निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही

महापालिकेसाठी पुढच्या आठवडय़ात मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र कोल्हापुरातील महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाच्या 14 उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखे शपथपत्र ठेवून महानगरपालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही. पक्ष सोडणार नाही, असे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी उमेदवारांनी लिहिलेल्या या प्रतिज्ञापत्राची सध्या […]

सामना 10 Jan 2026 10:02 am

मराठा युवक संघाची शरीरसौष्ठव स्पर्धा

बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध 7 वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धा मंगळवार दि.27 जानेवारीला होईल. जिह्यातील सर्व शरिरसौष्ठवपटूंसाठी स्पर्धा खुली असणार आहे. तसेच राज्यस्तरीय कर्नाटक मिस्टर हरक्मर्युलस राज्यस्तरीय टॉप टेन ही [...]

तरुण भारत 10 Jan 2026 10:00 am

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा न आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच प्रशिक्षण वर्गाला नियुक्त काही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या तब्बल 60 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा महापालिका आयुक्त […]

सामना 10 Jan 2026 9:47 am

गोरेगावमध्ये एका घराला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू

गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरातील एका घरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 2 पुरुष आणि 1 महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागली त्या वेळी तिघेही जण एकाच घरात झोपलेले होते. आगीदरम्यान निर्माण झालेल्या धुरामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू […]

सामना 10 Jan 2026 9:46 am

गॅस शेगडीचा बर्नर काळाकुट्ट झाला, हे करून पहा

स्वयंपाकघरात गॅस बर्नरवर तेलाचे डाग, अन्नपदार्थ आणि धुराची काजळी बसते. अशावेळी घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून बर्नर चकचकीत करता येतो. गरम पाण्यात 2 लिंबांचा रस आणि लिंबाची टरफले टाका. यात बर्नर 2 तास भिजवून ठेवा. त्यानंतर डिशवॉश जेलने थोडे घासा. बर्नरवरील काजळी काढण्यासाठी ‘इनो’ अत्यंत उपयुक्त ठरतो. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हा उपाय सर्वात परिणामकारक […]

सामना 10 Jan 2026 9:26 am

असं झालं तर, रेशन कार्डची ईकेवायसी करायची आहे…

नियमानुसार दर पाच वर्षांनी रेशनकार्ड ईकेवायसी करावी लागते. त्यासाठी रेशनिंग ऑफिसमध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरूनही ईकेवायसी करू शकता. त्यासाठी मेरा रेशन किंवा आधार फेस आरडी अ‍ॅप इन्स्टॉल करा. अ‍ॅप ओपन करून तुमचे लोकेशन टाका. आधार नंबर, मोबाईलवरील ओटीपी टाका. स्क्रीनवर आधार डिटेल्स दिसल्यानंतर फेस-ईकेवायसी हा पर्याय निवडा. पॅमेरा आपोआप ऑन होईल. फोटो […]

सामना 10 Jan 2026 9:23 am

प्रचारासाठी पुण्यातून रोज 12 हेलिकॉप्टरचे उड्डाण

राज्यात सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. 15 जानेवारीला महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. पुण्यात दररोज 12 हेलिकॉप्टरचे उड्डाण होत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सर्वात जास्त या हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, […]

सामना 10 Jan 2026 9:21 am