भाजपसाठी विकास म्हणजे बिल्डर-कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल, आदित्य ठाकरे यांची टीका
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही नाशिक शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून नाशिकची जनता रस्त्यावर उतरली आहे. या वृक्षतोडीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला. ”गेल्या […]
धक्कादायक! हिंदुस्थानी लष्कराच्या मार्गांचा मागोवा घेण्यासाठी CCTV चा वापर, ११ जण अटकेत
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानमधील हँडलर्स आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) यांच्या पाठिंब्यावर चालणारे एक दहशतवादी, शस्त्रास्त्रे आणि हेरगिरीचे मॉड्यूल उद्ध्वस्त केले असल्याची माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली. सीमेपलीकडे बसलेले हँडलर्स हिंदुस्थानाच्या उत्तरेतील संवेदनशील ठिकाणांवर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे गुप्त जाळे बसवून हिंदुस्थानी लष्करी जवानांच्या रिअल-टाइम हालचालींवर कशा प्रकारे लक्ष ठेवून होते, याचा […]
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; चांदी विक्रमी उच्चांकावरून २ लाखांनी स्वस्त
सोन्या-चांदीच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असून आज कमोडिटी मार्केटमध्ये दर चांगलेच कोसळलेले पाहायला मिळाले. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू होणाऱ्या शांतता चर्चेमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही घट झाली आहे. एमसीएक्स (MCX) मार्केटमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव १,७०० रुपयांनी कमी होऊन तो १,५१,७०० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त होऊन […]
दत्त चौक ते स्मृतीसदन परिसर होणार अतिक्रमणमुक्त कराड-गेली पाच वर्षे रखडलेल्या शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येथील नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. हातगाहाधारकांबरोबर झालेल्या दोन बैठकांनंतर गुरुवारी रात्री बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष राजेंद्रसिंड यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, बांधकाम [...]
Patan |पाटणमध्ये प्रशासनाचा ‘बुलडोझर’! बसस्थानकासमोरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त
पाटणमधील अतिक्रमणाचा वाद मिटला कराड– चिपळूण रस्त्याच्या कामासाठी पाटण शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेले अनेक विबसापासून चर्चेत होता. त्यातल्या त्यात बरारथानकासमोरील अतिक्रमण काढण्याबाबत अनेक तर्क बितर्क लावले जात होते.बसस्थानकासमोरील टपरीधारकांनी [...]
यमुना नदीत भाविकांची बोट पलटली; 10 जणांचा मृत्यू
मथुरेतील वृंदावन येथे शुक्रवारी यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक नाव उलटल्याने 10 भाविकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर नाव पुलाला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. या बोटीत 20 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तत्काळ धाव घेत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, मात्र 10 जणांना वाचवण्यात अपयश आले. अद्याप […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर पाचगणी ( इम्तियाज मुजावर )-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपणे खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात असले [...]
बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा १० वा वर्धापन १४ एप्रिलला
१५ एप्रिलला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाट्यप्रयोग त.भा. वृत्तसेवा बांदा: श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर कलशारोहणाचा १० वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. १४ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्त सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक [...]
सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत ११ एप्रिल रोजी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित-दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच समाजात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी,या उद्देशाने दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संस्थांचा सत्कार व गौरवही करण्यात येणार आहे.
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू जाधववाडी – जाधववाडी (ता. माढा) येथील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.करण दिगंबर कांबळे (वय २०, मूळ [...]
बिहार विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाटण्यात खळबळ, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
बिहार विधानसभेच्या परिसरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी पाटण्यात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, विधानसभेला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धमकी मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. खबरदारीचा […]
प.पू. सद्गुरू आबा महाराज यांचा २८ वा पुण्यतिथी सोहळा उद्या
त.भा. वृत्तसेवा बांदा इन्सुली-बिलेवाडी येथील प.पू. सद्गुरू आबा महाराज यांचा २८ वा पुण्यतिथी सोहळा शनिवार, दि. ११ रोजी उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा होणार आहे. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याची सुरुवात सकाळी १०:०० वाजता ‘पादुका पूजन’ आणि ‘अभिषेक’ विधीने होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता ‘सत्यनारायण महापूजा’ व [...]
महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज- जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,आज १० एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथील सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, धाराशिव नगर परिषद नगराध्यक्षा श्रीमती. नेहा काकडे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलकर,जिल्हा कोषागार अधिकारी .अर्चना नरवाडे,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे, व्याख्याते महेंद्र चंदनशिवे,प्रा.राजा जगताप,श्रीमती वनिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला मेळाव्यात जिल्हाभरातील महिला व बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की,भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला असून आर्थिक अडचणींना खचून न जाता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे,असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे ही आजची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,भारतीय संविधानातून मिळालेल्या लोकशाही,समता व समानतेच्या हक्कांमुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यातून नारीशक्ती अधिक सक्षम होत आहे.शिक्षणामुळे महिलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत असून त्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.असे त्या म्हणाल्या. महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुखदेव चिंचोळकर यांनी सांगितले की,माविमच्या माध्यमातून २००७ पासून महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहे.बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.सेंद्रीय शेती,महिला आरोग्य, स्त्री-पुरुष समानता आणि जीवामृत या विषयांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्र (उमरगा),समता लोकसंचलित साधन केंद्र (परंडा) आणि नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र (कळंब) या कार्यालयांना ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.या पारितोषिकांचे धनादेश अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.याच कार्यक्रमात २०२५-२६ या वर्षात महिला व आर्थिक विकास महामंडळ,धाराशिव यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्याख्याते महेंद्र चंदनशिवे, प्रा.राजा जगताप,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे, नगराध्यक्षा श्रीमती.नेहा काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे तसेच श्रीमती वनिता डोंगरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बचत गटांच्या महिला, नागरिक,विद्यार्थी,पत्रकार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले.
Solapur Crime News |दुकान बंद करतानाच घात झाला! सोलापुरात चोरट्याने वृद्धेला पांढऱ्या ओढणीने दाबले
. साफसफाई करणाऱ्या ७२ वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला सोलापूर : दुकानाच्या आवारातसाफसफाई करणाऱ्या वृध्द महिलेचे तोंड दाबून चाकूने मारण्याची भिती दाखवून तिच्या गळयातील ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिवगंगा नगर भाग ४ [...]
वारकरी संप्रदाय आणि स्थानिक एकवटले! पंढरपुरातील ‘त्या’पडीक जागांवरून प्रशासनाला घेरले
रॅलीद्वारे पंढरपूरकरांनी दाखवले शक्तीप्रदर्शन सोलापूर -एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आसीफ मलंग मुजावर (रा. [...]
इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू, हिंदुस्थानने व्यक्त केली चिंता
लेबनॉनमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल हिंदुस्थानने शुक्रवारी चिंता व्यक्त केली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घडामोडींवर भाष्य केले. रणधीर जयस्वाल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लेबनॉनमधील सध्याची परिस्थिती अत्यंत त्रासदायक”आहे. विशेषतः नागरी मृत्यूंच्या वाढत्या संख्येचा […]
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक
धाराशिव (प्रतिनिधी)- मार्च महिना संपल्यानंतर दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग येतो. विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होऊन पुढील तीन महिने सुरू राहते. मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशभरातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले असून, देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे ‘जनगणना 2027’ची मोठी पार्श्वभूमी असून, सध्या देशभरात जनगणनेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. नागरिकांना ‘स्वयं-गणना’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी व घरांची गणना केली जाणार असून, एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान राज्य सरकार निश्चित करणाऱ्या 30 दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. स्पष्ट आदेश केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात येऊ नये. राज्यांच्या मुख्य सचिवांनीही आपल्या स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबणार असल्याचे स्पष्ट झाले असून, संपूर्ण यंत्रणा जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहे.
गॅस तुटवड्याचा फटका ग्रामीण भागाला
भुम (प्रतिनिधी)- एलपीजी गॅस सिलिंडर तुटवड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. बुकिंग प्रक्रियेत अडथळे, डीएससी क्रमांकासंबंधित समस्या आणि अपुरा पुरवठा यामुळे गॅस वितरणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये सध्या गॅसचे वाटप ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात गॅस वितरण करताना एजन्सी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत एका गावात एजन्सी कर्मचाऱ्यांना अडवून बुकिंग नसतानाही सिलिंडर घेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा अपुरा असल्याने समस्या अधिकच गंभीर बनत आहे. सध्या 8 मार्चपर्यंत बुकिंग सिलिंडरची संख्या 4,194 इतकी असून, कंपनीकडून केवळ 450 सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दरम्यान, भूम येथील एजन्सीसमोर नागरिकांना उन्हात तासन् तास रांगेत थांबावे लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरीवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वृद्ध महिला स्वतः सिलिंडर वाहून नेतानाचे चित्रही दिसून येत आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वितरणासाठी पोलिस संरक्षणाची मागणी गॅस सिलिंडर टंचाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून 26 मार्चला पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप संरक्षण उपलब्ध न झाल्याचे एजन्सीचे सुशील धावारे यांनी सांगितले.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान नसून लोकचळवळ- मंत्री प्रकाश आबिटकर
धाराशिव (प्रतिनिधी)- “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक आरोग्य चळवळ आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होतील. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. गावागावांत जनजागृती करून तपासण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह, एम.आय.टी.इंजिनीअरिंग कॉलेज येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांच्यासह सरपंच,पंचायत समिती सभापती व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर,जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वरिष्ठ अधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. जिल्हा प्रथम येणार- अर्चनाताई पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्हा पूर्णपणे ‘आरोग्य संपन्न’ करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असे अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ३ महिने कारावास सोलापूर -एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.आसीफ मलंग [...]
संजू परब यांनी खा.नारायण राणेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सावंतवाडी : प्रतिनिधी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी कणकवली येथे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. खासदार नारायण राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन त्यांनी सन 1999 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून [...]
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धलियारा येथील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘खूनी मोर’ जवळ भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 503 वर राधा स्वामी सत्संग गृहाजवळ भाविकांनी भरलेली एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन सुमारे 90 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 27 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच […]
पुणे शहरातील मध्यवर्ती रेड लाईट भागातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करणार्या महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ काढून स्टींग ऑपरेशनचे गोंडस नाव देणार्या तथाकथित पत्रकार रोहन कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच हे स्टींग ऑपरेशन घडवून आणण्यासाठी नामांकित ३ पत्रकारांनी एका राजकीय महिला पदाधिकार्याकडून तब्बल २५ लाख रूपयांची सुपारी घेतली. दरम्यान, भोंदू खरातला आम्ही उघडे पाडल्यानंतर आमच्यासोबत बदला घेण्यासाठी […]
खेराडकर गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची दगडफेक सांगली : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा मुबलक असल्याचा दावा करत ग्राहकांना सबुरीचा सल्ला देणाऱ्या प्रशासनाचे दावे फोल ठरत आहेत. नोंदणी करूनही वेळेत गॅस सिलिंडर मिळत नसल्याने एजन्सीसमोर ग्राहकांच्या पहाटेपासूनच रांगा [...]
सांगली जिल्हा पुन्हा हादरला! अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काढला काटा
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले कवठेमहांकाळ : अनैतिक संबंधास अडसर ठरत असणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून व काठीने मारहाण करून खून केल्याची घटना करोली (टी) येथे घडली असून आईच्या या दुष्कर्मास दोन मुलांनीही मदत [...]
उत्तर प्रदेशात SIR ची अंतिम मतदार यादी जाहीर; जानेवारीच्या तुलनेत ८४ लाखांहून अधिक मतदारांची वाढ
एसआयआर (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी लखनौमध्ये माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. नव्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील एकूण मतदारांची संख्या आता १३ कोटी ३९ लाख ८४ हजार ७९२ वर पोहोचली आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा […]
Islampur News |पेठ-शिराळा मार्गावर भीषण अपघात; भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाचा करुण अंत
रेठरे धरणजवळ कोल्हापूरच्या अधिकाऱ्याचा मृत्यू ईश्वरपूर : पेठ-शिराळा मार्गावररेठरेधरण येथील लोहारवस्ती जवळ कारने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रदीप खंडेराव कांबळे (५०, मूळ रा. सुभेदार रामजी आंबेडकर [...]
विकी कौशलच्या ‘महावतार’मध्ये दीपिकाला डच्चू
विकी कौशलचे नाव सध्या बॉलिवूडमध्ये खूप गाजत आहे. त्याच्या आगामी पौराणिक चित्रपटाची चर्चा सध्या खूप जोरदार सुरू आहे. ‘महावतार’ या चित्रपटासाठी सध्या विकी त्याच्या लूकवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात व्यस्त आहे. परशुरामांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकीसोबत दीपिका पादुकोण झळकणार होती. परंतु आता काही कारणास्तव दीपिकाला डच्चू मिळाला असून, त्याजागी आता श्रद्धा कपूरची वर्णी […]
Ambabai Temple |अंबाबाई मंदिरात व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून फसवणूक; फुलेवाडीतील महिला गजाआड
अंबाबाई मंदिरात तोतया महिला सुरक्षा रक्षक अटकेत कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांकडूनदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असेकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्रकारदर्शनासाठी पैसे उकळणाऱ्या तोतया सुरक्षा रक्षक महिलेस जुना राजवाडा [...]
पश्चिम रेल्वेवर रविवार १२ एप्रिलला सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ‘जम्बो ब्लॉक’
पश्चिम रेल्वेवर रविवार १२ एप्रिलला, सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लाॅक घेण्यात येईल. यावेळी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी १०:०० ते दुपारी १५:०० वाजेपर्यंत, अशा पाच तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने […]
भाईजान ठरला शब्दाचा पक्का, सलमानच्या आगामी सिनेमात झळकणार राजपाल यादव
बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या बिग बजेट अॅक्शन चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. मुख्य बाब म्हणजे आता या चित्रपटात त्याच्यासोबत राजपाल यादव देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी राजपाल यादवची एका बक्षिस समारंभात मस्करी करण्यात आली होती. त्याच्यावर असलेले लोन त्याला चुकवावे लागणार असे म्हणत राजपालची सर्वांसमोर मस्करी करण्यात आली होती. त्यावेळी एकटा सलमान खान हा […]
नितीश कुमार यांना भाजपने धोका दिला, अखिलेश यादव यांची टीका
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. “मी अशी इच्छा व्यक्त केली होती की नितीश कुमार यांनी पंतप्रधान म्हणून निवृत्त व्हावे. आमच्या ‘इंडिया’ आघाडीतील अनेक सहकाऱ्यांचीही हीच इच्छा होती,” असे यादव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या घडामोडींवरून मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे. […]
उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?
धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे थंड पाण्याची गरज वाढली असून शहरात आणि ग्रामीण भागात जारच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, केवळ थंड पाणी मिळते म्हणून जारचे पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते. पाण्याची गुणवत्ता तपासणे आता अत्यावश्यक बनले आहे.अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया (RO/UV) योग्य पद्धतीने केली जाते का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. काही विक्रेते केवळ साधे फिल्टर करून किंवा जुन्या जारमध्ये पाणी भरून विक्री करत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे हे पाणी शंभर टक्के सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा अपूर्णपणे फिल्टर केलेले पाणी पिण्यामुळे पोटाचे विकार, जुलाब, टायफॉइड, पिवळ्या काविळीसारखे आजार होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात अशा आजारांचा धोका अधिक वाढतो. नागरिकांनी घ्यावयाची काळजी फक्त नोंदणीकृत व विश्वासार्ह पुरवठादारांकडूनच जार पाणी घ्यावे, जारवरील सील, उत्पादन तारीख आणि ब्रँड तपासावा जार स्वच्छ आहे का, आत घाण किंवा कण दिसत नाहीत ना याची खात्री करावी पाण्याची चव, वास वेगळा वाटल्यास त्वरित वापर थांबवावा. दरम्यान, प्रशासनानेही जार पाणी विक्रेत्यांवर नियमित तपासणी मोहीम राबवून निकृष्ट दर्जाचे पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात शरीराला पाणी आवश्यक असले तरी ते सुरक्षित आणि शुद्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे थंड आहे” एवढ्यावर न थांबता शुद्ध आहे का? हे तपासणे आता काळाची गरज बनली आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र
धाराशिव (प्रतिनिधी)- एखादा योद्धा कसाही करुन पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची प्रतिमेबाबत लोकामध्ये सभ्रम तयार केला जातो असाच काहीसा प्रकार सद्या खासदार ओमराजे निंबाळकर दादा यांच्या बाबतीत अगदी नियोजनबद्ध केला जात आहे. पक्ष बदलाची चर्चा म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी जाधवर म्हणाले की, ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जनतेचा विश्वास हीच त्यांची शिदोरी असुन त्याच बळावर ते आतापर्यंत राजकारण करत आहेत. त्यांना पक्ष बदलण्याची आवश्यकता का असेल? स्वार्थ साधण्यासाठी अनेक जण पक्ष बदल केला पण एकनिष्ठ राहिले म्हणूनच जनतेनी त्यांना भरभरून मतरूपी आर्शिवाद मिळाला आहे. आता ही चर्चा घडवून विरोधी गटाला काय अपेक्षीत आहे याचा अंदाज सहज येऊ शकतो. 24 तारखेला पक्ष व चिन्ह याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अशी अफवा पसरवून लोकांच्या मनात एकप्रकारे संभ्रम निर्माण करायचा आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा घडवून आणली जाते. पुढे आपोआप त्या बंद होतात. खासदार म्हणून ते आजही सक्षमपणे काम करत आहेतच पण त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात तीन आमदार निवडून आले आहेत असे तानाजी जाधवर यांनी सांगितले.
51.840 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र श्री तुळजाभवानी देवीला अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील गणेश नगर, सोरपटवाडी येथील मनिषा अंकुश धामे यांनी आज श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 51.840 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले. मनिषा धामे या सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींला मंगळसूत्र अर्पण केले. यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
नशामुक्त भारत संकल्प, संस्कारमय पिढी घडवणार - डॉ. कृष्णगोपाल
धाराशिव (प्रतिनिधी)- कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण व राष्ट्रभक्ती यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असुन या पंचसूत्रीतुन समाज परिवर्तन करण्यावर भर आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक भाव वाढणे गरजेचे आहे. नशामुक्त भारत संकल्प असुन संस्कारमय पिढी घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी “प्रमुख नागरिक संगोष्ठी“ (परिसंवाद) कार्यक्रम संपन्न झाला, यात डॉ कृष्णगोपालजी यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा संघचालक ऍड रवींद्र हरिदास कदम, लातुर संघचालक संजय अग्रवाल उपस्थितीत होते. संघाच्या 90 हजार शाखा रोज होत असुन 40 हजार साप्ताहिक व मासिक शाखा अश्या 1 लाख 30 हजार ठिकाणी संघ स्वयंसेवक एकत्र येतात व मातृभूमीची प्रार्थना करतात. संघांचे कार्य गेली 100 वर्षापासुन निरंतर चालत असुन ते दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू समाजाने संघ कार्य समजुन घेतले पाहिजे, हे कार्य सर्वांचे आहे. हेडगेवार यांनी लढा दिला त्यांनी सुरु केलेले कार्य देशव्यापी बनले आहे. 3 हजार वर्षापुर्वी भारत जागतिक मोठे आर्थिक केंद्र होते, इथून अनेक वस्तु निर्यात केल्या जायच्या. तक्षशिला, नालंदा यासह अनेक ठिकाणी विश्वविद्यालय चालवले जायचे, तिथे 10 हजार विद्यार्थी एका वेळेस शिक्षण घ्यायचे. अनेक महान राजे जग जिंकणारे इथे होते. अंकगणित, बीज गणित यासह नक्षत्र व अंतराळ, वैदिक, व्याकरण भाषा, कपडे, परिमाण व्यवस्था, कृषी व तंत्रज्ञान हे भारताने जगाला दिले असल्याचे डॉ. कृष्णगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह अजय जानराव यांनी केले. ऍड सचिन सुर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यशवंत सुर्यवंशी यांनी व्यक्तीक गीत सादर केले. सुत्रसंचलन विश्वास कांबळे यांनी केले. राजे एकत्र आले नाहीत काही परकीय लोक आले व त्यांनी देशात जझिया कर आकारला, धर्मातर केले, अनेक अत्याचार 1 हजार वर्ष केले. भारताने कधी कुणाला लुटले नाही, महिलावर अत्याचार केला नाही. अध्यात्मत श्रेष्ट असताना भारतात अत्याचार झाले. देशात जातीय, आर्थिक, भाषा, वर्ण विभाजन झाल्याने परकीय आक्रमण झाले. भारतातील सगळे राजे एकत्र आले नाहीत. गझनी, गौरी, अबद्दली, बाबर, इस्ट इंडिया कंपनी, इंग्रज यांच्या विरोधात एकत्र आले नाहीत हे लोक एक एकाला हरवत आले आणि जिंकले. ते एकत्र कधी आले नाही. हिंदू समाज माझा आहे असा भाव निर्माण झाला पाहिजे. यातूनच डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हजारो वर्ष जुना हिंदू समाज देशाची दुर्दैशेला परकीय, इंग्रज जबाबदार नसुन भारतीय आहेत. कर्मकांड व रूढीमध्ये आपण अडकुन राहिलो. हेडगेवार यांनी देशात शाखा सुरु केल्या, मणिपूर, आसाम, लेह लड्डाख, जैसलमेर, अंदमान निकोबार अश्या अनेक ठिकाणी आता शाखा सुरु आहेत. इस्लाम व इसाई पेक्षा हजारो वर्ष जुना हिंदू समाज असुन इतिहास, कर्मकांड, अध्यात्म, विविधता आहे. सन्मान, धोका न देणे ह्या भावांना मानणारा हिंदू आहे. हिंदुत्व मर्यादित नसुन त्यात अनेक ग्रंथ, पुस्तके, रूढी परंपरा आहेत. जो सगळ्यांची चिंता करतो, काळजी घेतो,जीवन जगण्याची पद्धती देतो, संस्कार शिकवतो, समाजात राहायला शिकवतो तो हिंदू आहे, आता हे जगाला कळत आहे. अमेरीका, रुस व इतर देशातील लोक आता भारतात हिंदू समजण्यासाठी येत आहेत.
“असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली..“ वडगाव (सि.) येथे रंगला गझल मुशायरा
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार तर्फे आयोजित कवयित्री बी. के. सुरभी यांच्या मोरपिस व अवघा रंग या पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त सिद्धेश्वर वडगाव येथे आयोजित गझल मुशायऱ्यात अनेक दर्जेदार गझलांचे सादरीकरण झाले. या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील गझलकार सुनिता गुंजाळ कवडे या होत्या. तर ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे, साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मुशायऱ्याच्या सुरुवातीला धाराशिव येथील गझलकार मीना महामुनी यांनी ओढ नाही राहिलेली माणसाची माणसाला, दुःख सारे सांग आता अंतरीचे विठ्ठलाला, शेण मातीच्या घरातच लेकरे घडली सुसंस्कृत, वाढल्या क्राँक्रीट भिंती कोण नाही आस-याला ही गझल सादर करून मुशायऱ्याची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर बीड येथून आलेले बापू धनवे यांनी ऋतूप्रमाणे आयुष्याला बदलत गेलो, भिजलो ना गारठलो नुसता करपत गेलो, अथांग सागर व्हावे इच्छा मनात होती, झरा जाहलो आनंदाने झिरपत गेलो, ही गझल सादर करून सभागृहाची वाहवा मिळवली. धाराशिव येथील गझलकार कृष्णा साळुंके यांनी यह क्या खुलूस हो, यह कैसा खुमार हो, बड़े गुम रहते हो, ऐसा भी क्या गुबार हो, औ जो भटकते हो युं अकेले बेमतलब, कौन खुशी के तुम कहना शहरयार हो, ही हिंदी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वैराग येथील गझलकार जीवन धेंडे यांनी एक टेबल,चहा ती तिचा चेहरा... काय नाही पुढे आठवत आणखी... रात्र आहे किती दरवळत आणखी...कोण आहे सुगंधी जळत आणखी... ही गझल सादर करून मुशायऱ्यात बहार आणली. गंगाखेड येथून आलेले यशवंत मस्के यांनी थोडी थोडी म्हणता म्हणता बक्कळ वाया गेली, असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली, कळला नाही तिच्या मनाला भाव मनाचा माझ्या, तिच्याच साठी यशवंताची अक्कल वाया गेली, या गझलेतून सभागृहाला हसायला भाग पाडले. स्नेहलता झरकर अंदुरे यांनी वादळ येते तसेच फिरते.. विशेष काही नाही, फक्त इकडचे तिकडे करते.. विशेष काही नाही, कर्तव्याच्या तळपायांची चाळण होते दिवसा,फुंकर मारत रात्र सरकते.. विशेष काही नाही, या गजलेतून विचार करायला भाग पाडले. करमाळा येथील गझलकार नवनाथ खरात यांच्या एक झलक तुझी मला रात्र जागवायची, सोड ना सखे तुझी सवय वळुन बघायची, द्यायचे न घ्यायचे आपल्या मधे नको, मी कितीक घ्यायचो तू कितीक दयायची या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली. गंगाखेड येथील गझलकार डॉ. अविनाश कासांडे यांनी जीवनी जसजसा ढासळत राहिलो, मी स्वत:ला तसा आढळत राहिलो, शब्द होते कुठे बोलण्यासारखे ? ती मला मी तिला न्याहळत राहिलो, ही तरन्नूम गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ऋचा पत्की यांनी सादर केलेल्या आईवरील गझलेने सभागृहाला भावुक केले. डॉ. रेखा ढगे यांनी सादर केलेली, कशाला उगा केस मी डाय केले, असे रंगले अन मला बाय केले, कसा रंग माझा होता कळेना, बघातोंड वांगे जसे फ्राय केले ही गझल भाव खाऊन गेली. गझलकार युवराज नळे यांनी सादर केलेल्या चेहऱ्यावर भाळणे नाही बरे, विस्तवाशी खेळणे नाही बरे..भिड जरासा संकटाला मैतरा,कासरा कवटाळणे नाही बरे.. या गझलेला रसिकांनी डोक्यावर घेतले. राणी सावरगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांची अंधश्रद्धा मला सत्य वाटायची, माय जेंव्हा कधी दृष्ट काढायची, काजळा सारखा रंग माझा तरी माय माझी मला तीट लावायची, ही गझल रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. लातूरच्या गझलकार जना घुले यांनी काय करावे नव्हते उमजत हरकत नाही, माझेच मला होते फसवत हरकत नाही, या गझलेतून रसिकांची दाद मिळवली. प्रा.विद्या देशमुख यांच्या रंग ,झेंडे,चिन्ह, नेते फक्त होते, एक सारे लाल जेव्हा रक्त होते, तुमची असेल मोठी गगनात झेप तुमच्या, नाही कधीच दुबळी मीही नभात माझ्या, ही गझल अतिशय लक्षवेधी ठरली. गझलकार बाळ पाटील यांनी नेमके जे न्यायचे ठेवून गेली, विश्वशांती माणसे ठेवून गेली, हे किती बुजगावणे ते छान केले, पाखरे अंगावरी खेळून गेली, ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. खात्रीने जर वसंत येतो बहरायाला खंत उगा मी पानगळीची करू कशाला, प्राजक्ताची क्षणभंगुरता मी अनुभवली, अन जगण्याचा अर्थ नव्याने मला समजला, तुळजापूर येथील गझलकार कांचनगंगा मोरे यांनी या गझलेतून आशावाद मांडला. डॉ . सुलभा देशमुख यांनी बाप म्हणतो लेक मोठी फार नाही मांडला मी पण तिचा बाजार नाही, मान्य आहे की मुलींची वाण आहे, अन् उडत दारात आता बार नाही, या गझलेतून मुलीच्या भावना व्यक्त केल्या. जीवनाच्या राहिलो कर्जात आपण, आणि मरणाच्या किती धाकात आपण, जर रिकामे शेवटी जाणार होतो, एवढे का वागलो ताठ्यात आपण लातूर येथील गझलकार वंदना केंद्रे -बांगर यांच्या या गझलेने सभागृहाला विचार करायला भाग पाडले. गझलकार बी. सुरभी यांनी अत्तराचा बोलबाला फार होतो. पण फुलांचा केवढा बाजार होतो, का तिला हो अस्त्र केले पागलांनी, चीरहरणाने तिच्या बेजार जो तो, ही गझल सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे यांनी मांडलेला डाव हा मी टाकुनी जाणार नाही, हार होवो जीत होवो यापुढे माघार नाही, सूर्य केव्हा मागतो का भीक अंधारासमोरी, जे कधी होणार नाही ते कधी होणार नाही, ही गझल सादर करून मुशायऱ्यात रंगत आणली. पालम येथील गझलकार आत्तम गेंदे यांनी, आता केवळ तेच आपला पूर्ण अध्याय करू शकते.. मला कृष्ण अन तुला राधिका फक्त करू शकते.. शाळेइतकी सोपी नसते शाळेबाहेरची शाळा, ही दुनिया केव्हाही ध चा म, एक्स चा वाय करू शकते. ही गझल सादर करून मुशायऱ्याला उंचीवर नेले. मुशायऱ्याचे सुत्रसंचालक गझलकार शेखर गिरी यांनी घेऊन जवळ प्रेमाने कुरवाळू शकलो नाही, मी सुखास माझ्या क्षणभर सांभाळू शकलो नाही, मित्राने वार किती तो प्रेमाने केला होता, मी वार म्हणूनच त्याचा मग टाळू शकलो नाही, ही गझल सादर केली. शेवटी मुशायऱ्याच्या अध्यक्ष सुनिता गुंजाळ कवडे यांनी तुला कळेना काय नेमके गमवलेस तू, चवळी सोडुन भोपळ्यास का निवडलेस तू, सगळ्या नजरा खिळल्या होत्या माझ्यावरती, उखाण्यामधे थेट नाव तर घेतलेस तू, सरडा सुद्धा किती लाजला पाहून तुला, आभार किती मानू इतके शिकवलेस तू, या गझलेने मुशायऱ्याचा समारोप केला. शेवटी बी. के. सुरभी यांनी उपस्थितांचे आभार मानले. गझल मुशायऱ्याला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बुद्रुक येथे शेतात अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सिंचन साहित्य जळून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना सोमवार (दि. 6 एप्रिल) रोजी दुपारी घडली. शेतकरी संपत अंबादासराव जळके यांच्या गट नं. 297 येथील शेतात अचानक आग लागली. या आगीत स्प्रिंकलर सेटचे सुमारे 35 पाईप व टी-एल्बो साहित्य, ठिबक सिंचनाचे 40 बंडल पूर्णपणे जळून खाक झाले. दुपारी सुमारे 1.40 वाजता शेतकऱ्यांना फोनवरून माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता, शेतातील सोयाबीन व हरभऱ्याचे भरडलेले काड (भुसकट) पेट घेतल्याचे दिसून आले. अब्याच्या झाडाखाली ठेवलेले सिंचन साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आगीची तीव्रता एवढी होती की, सुमारे 50 फूट अंतरावरही झळ जाणवत होती, त्यामुळे आग विझविणे अत्यंत कठीण झाले होते. या आगीत परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, मोरे यांचेही पाईप जळाल्याचे समोर आले आहे. अनेक शेतांच्या बांधांवरही आग पसरली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित डी.पी. मागील महिन्यापासून बंद असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “डी.पी. सुरू असता तर पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणता आली असती.” या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अवकाळी संकटे, वाढती उष्णता आणि आता आगया तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बुकिंग प्रक्रियेतील अडचणी दूर!
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात 172 चालक व 193 वाहक कार्यरत असले आहेत. मात्र, त्यापैकी 20 ते 22 चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी 12 वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रणदीप हुड्डाने शेअर केला मुलीचा पहिला फोटो; मुलीच्या नावाचा अर्थ काय हेही सांगितले
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम यांच्या घरी एका महिन्याआधी १० मार्च रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे हुडा परिवारात आनंदाचे वातावरण आहे. रणदीपने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. आता रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या लहान मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. रणदीपच्या […]
‘नितीश युगाचा अंत’, नितीश कुमारांनी राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर काँग्रेसची टीका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया देताना “हा बिहारमधील ‘नितीश युगाचा’ अंत आहे,” अशी टीका केली आहे. शुक्ला यांनी सांगितले की, नितीश कुमार यांची राज्यसभेत जाण्याची प्रक्रिया ही भाजपची पूर्वनियोजित रणनीती होती. “2025 च्या बिहार […]
महाकुंभची ‘व्हायरल गर्ल’मोनालिसाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात
महाकुंभ मेळ्यादरम्यान आपल्या विवाहामुळे चर्चेत आलेली मध्य प्रदेशची ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशी अहवालात मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले असून, याप्रकरणी तिचा पती फरमान खान याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यामुळे आता फरमानवर अटकेची टांगती तलवार निर्माण […]
ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेल्या श्रीनंदाचा मृतदेह सापडला, तीन दिवसांपासून होती बेपत्ता
ट्रेकिंगदरम्यान कर्नाटकातील चिक्कमगलूरू जिल्ह्यातील चंद्रद्रोणा पर्वतरांगेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय श्रीनंदाचा माणिक्यधारा धबधब्याजवळ मृतदेह सापडला. श्रीनंदा गेल्या दिवसांपासून बेपत्ता होती. पोलीस आणि बचाव पथके तिचा शोध होते. शोध मोहिमेदरम्यान, दोन हजार फूट खोल दरीत धबधब्याजवळ तिचा मृतदेह सापडला. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनंदा केरळमधील 40 पर्यटकांच्या ग्रुपसोबत चंद्रद्रोणा पर्वतरांगेत चिक्कमगलूरू येथे ट्रेकिंगसाठी आली होती. […]
Ratnagiri News |रत्नागिरीतील अंबुवाडी समुद्रकिनारी कासवांच्या पिल्लांना मिळाले जीवदान
कासव संवर्धनासाठी नांदिवडे गाव सरसावले रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावातील अंबुवाडी (आंबू) समुद्रकिनारा हा त्याच्या शांततेसाठी आणि सुरक्षित सपाटीकरणामुळे प्रसिद्ध आहे. यामुळे वर्षानुवर्षे समुद्री कासवांचे आवडते प्रजनन स्थळ ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही [...]
पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांची माफी मागायला हवी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधानांवर महिलांच्या मुद्द्यावर दिशाभूल करणारी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान आता माध्यमांमध्ये लेख लिहून स्वतःला 2029 पासून लोकसभा […]
Ratnagiri News –रत्नागिरीत उद्या रंगणार आयपीएल फॅनपार्क
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दि.11 व 12 एप्रिल रोजी स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयपीएल फॅन पार्क आयोजित करण्यात आले आहे.या फॅन पार्क मोठ्या स्क्रीनवर चार क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्याची संधी रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींना लाभणार असल्याची माहिती आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी अनिल दातार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या 11 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज […]
‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी व्यापारी दांपत्याला तब्बल 10 तास व्हिडिओ कॉलवर ठेवून फसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बरेली येथील प्रेम नगर परिसरात उघडकीस आली आहे. मात्र, 8वीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी स्थानिक व्यापारी संजय सक्सेना आणि त्यांच्या पत्नीला अज्ञात क्रमांकावरून फोन केला. स्वतःला तपास […]
Kolhapuri Gul |कोल्हापुरी गुळाला भेसळीचा ठपका; सोमवारपासून गुजरातमधील बाजारपेठा बेमुदत बंद!
कोल्हापुरी गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धोक्यात कोल्हापूर – अहमदाबाद गुजरातमध्ये कोल्हापूर, सांगलीच्या गुळाला मोठी बाजारपेठ आहे. मात्र, अलिकडे या गुळामध्ये रंग व साखरेचे प्रमाण आढळून आल्याने हा गुळ आरोग्यास हानीकारक असल्याचे सांगत गुजरातमधील गुळ व्यापाऱ्यांनी कोल्हापूर, सांगलीच्या गुळ खरेदीला नकार दिला आहे. यासाठी सोमवार दि. [...]
‘थप्पड गँग’चा हैदोस; रात्रीच्या अंधारात नागरिकांवर हल्ले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
गेल्या काही काळापासून देशाभरात कोयता गॅंग, बनियान गॅंग अशा अनेक टोळ्यांनी हैदोस घातला आहे. या बाबत अनेक बातम्या आल्या असताना आता आणखी एक गॅंग चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जनपदमध्ये एका ‘थप्पड गँग’ने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या टोळीचा कोणताही ठोस उद्देश नसून केवळ दहशत निर्माण करण्यासाठी ते अशा प्रकारच्या […]
कॅटालिना बेटावर प्रवासी विमान कोसळले, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू
लॉस एंजेलिसमधील कॅटालिना बेटावर छोटे प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. टाईम्स नाऊ ने न्यू यॉर्क पोस्टच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान कॅटालिना बेटाच्या दक्षिण बाजूला अॅव्हलॉन शहरापासून काही अंतरावर कोसळले. विमानात दोन जण होते. दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विमान अपघाताबाबत […]
“सापावर विश्वास ठेवू शकतो, पण भाजपवर नाही”; ममता बॅनर्जींचा जोरदार हल्लाबोल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र टीका करत बंगाली जनतेला तृणमूल काँग्रेसला (TMC) मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत “सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही,” असे वक्तव्य केले. “राज्य सुरक्षित ठेवायचे असेल तर टीएमसीला मतदान करा. संपूर्ण राज्यात टीएमसीची […]
19 वर्षीय तरुणीला BMW मध्ये नोकरी? LinkedIn पोस्ट व्हायरल; ‘पर्सनल ब्रँडिंग’वर नवा वाद
एका 19 वर्षीय युवतीच्या LinkedIn पोस्टने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. गौरी एम नावाच्या या तरुणीने कोणतीही औपचारिक पदवी नसतानाही BMW सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत थेट मार्केटिंग विभागात नोकरी मिळाल्याचा दावा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, तिने ही नोकरी मिळवण्यासाठी कोणताही अर्ज केला नसल्याचेही सांगितले आहे. “मी कुणालाही पिच केले नाही, […]
ऑपरेशन रोअरिंग लायन! इराणवर 18 हजार बॉम्बचा वर्षाव, इस्त्रायलने दिला 40 दिवसांच्या युद्धाचा हिशोब
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्याच्या युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र तरी देखील इस्त्रायलने आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान इस्त्रायने संरक्षण दलाने (IDF) ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ ही मोहिम राबवली असून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या 40 दिवसांच्या युद्धात इस्त्रायलने इराणच्या हद्दीत शिरून तब्बल 18 हजार बॉम्ब फेकल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला […]
आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करा!
ओम बिर्ला यांचे आवाहन : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या परिषदेचे उद्घाटन पणजी : राज्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करावे, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. गुरुवारी पणजी येथे राष्ट्रकुल संसदीय भारत क्षेत्र, विभाग सातच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, गोव्याचे सभापती गणेश गांवकर, उपसभापती [...]
प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; अलवरमधील धक्कादायक घटना, आरोपींना अटक
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर येथे उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एनईबी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, मुख्य आरोपी अर्चना हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर तिचा प्रियकर ऋषभ […]
खरे तर भाजपला रितेशला उमेदवारी द्यायचीच नव्हती!
आप प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांचा दावा पणजी : फोंडा मतदारसंघाची निवडणूक रद्द होणे हे पद्धतशीर रचलेले षड्यंत्र असून मुळात मुख्यमंत्र्यांना रितेश नाईक यांना उमेदवारी द्यायचीच नव्हती, परंतु केवळ भंडारी समाज डिवचला जाऊ नये यासाठीच त्यांनी तो बनाव केला व ऐनवेळी निवडणूक रद्द करून इप्सित साध्य केले, असा दावा आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी [...]
अधिवेशन बोलावून प्रलंबित विधेयकांवर चर्चा करा
निवृत्त न्या. रिबेलो यांच्यासह युरी, विजय यांचीही मागणी : राज्यपालांना पाठविले पत्र पणजी : फोंडा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याचे कारण सांगत सरकारने विधानसभेचे अधिवेशन अर्ध्यावरच गुंडाळले होते. परंतु आता ती निवडणूक रद्द झालेली आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशन पुन्हा बोलावून प्रलंबित विधेयकांवर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी ‘इनफ इज इनफ“ चळवळीचे नेतृत्व करणारे निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन [...]
>> दुर्गेश आखाडे तीन वर्षापूर्वीची २० मे २०२३ ची गोष्ट आहे. मे महिन्यातील असह्य उकाडा सुरू होता.स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात “तू तू मी मी” चा प्रयोग सुरू होता.नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद आणि ध्वनी यंत्रणेच्या समस्येमुळे अभिनेते भरत जाधव यांनी प्रयोग मध्येच थांबवत प्रचंड संताप व्यक्त केला होता. भरत जाधव यांच्या नपिचक्यामुळे प्रशासनाला जागा आली […]
LDF संपणार, नवा काळ सुरु होणार; केरळमध्ये कमबॅक करण्याचा काँग्रेसचा विश्वास
केरळ विधानसभा निवडणुका पार पडताच काँग्रेसने सत्तांतराचा दावा करत मोठा विजय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी अलप्पुझा येथे बोलताना काँग्रेस-नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) राज्यात स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा दावा केला. ते म्हणाले, “या निवडणुकीत आम्हाला भव्य विजयाची अपेक्षा आहे. UDF ला बहुमत मिळेल आणि पुढील […]
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडक्या बहिणी आणि तरुण बेरोजगारांना दरमहा 3 हजार रुपये, सत्ता येताच 6 महिन्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 45 दिवसांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा भाजपने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित […]
Tehsildar Rakesh Gidde |अपघात की घातपात? तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या निधनाने महसूल विभागात खळबळ
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी गमावला जीव सांगली : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा संशयास्पद कार अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ सकाळी हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे [...]
तु काळा आहेस मला शोभत नाहीस, पत्नीने सुपारी देऊन केला पतीचा खून
सुरुवातीला साधा दरोडा आणि हत्या असा भासणारा प्रकार अखेर थरारक कटकारस्थान ठरला आहे. मसाल्याच्या व्यापाऱ्याच्या हत्येमागे त्याच्याच पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचलेला खूनाचा कट उघडकीस आला असून, विश्वासघात, अपमान आणि सूड यांची धक्कादायक कहाणी तपासातून समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये 7 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. 28 वर्षीय देवकृष्ण पुरोहित यांचा त्यांच्या घरात मृतदेह आढळून आला. […]
याचिकेत ‘उद्धटपणाची भाषा’! जातीनिहाय जनगणना रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
प्रस्तावित जातीनिहाय जनगणना रोखण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, एकच अपत्य असलेल्या कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन देणारी धोरणे तयार करावीत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने दाखल केलेली ही याचिका स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे याचिकाकर्ता स्वतः न्यायालयात हजर होते. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने […]
Shiroli MIDC |शिरोली एमआयडीसीचा श्वास मोकळा! अवैध व्यवसाय आणि वाहतूक कोंडीविरोधात कडक पाऊल
विद्रुपीकरण थांबवण्यासाठी एमआयडीसीची धडक कारवाई पुलाची शिरोली – शिरोली औद्योगिक वसाहतीत अनधिकृत खोक्यांच्या विरुद्ध एमआयडीसीची विशेष अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. यामध्ये सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी कारखानदार व कांही खोकी धारकांनी स्वताहून अतिक्रमणे काढण्यात पुढाकार घेतला. [...]
Panhala News |लग्नाचा बस्ता बांधला, वऱ्हाडही तयार होतं; पण ऐनवेळी मित्रांचा बनाव उघड, दोघांना कोठडी
पन्हाळ्याच्या दोन भामट्या मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या पन्हाळा – पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील फिर्यादी प्रवीण सर्जेराव अतिग्रे यांचे लग्न ठरत नव्हते याचा फायदा घेत त्यांच्या दोन मित्रांनी लग्नाचे आमिष दाखवून अतिग्रे यांची 1 लाख 82 हजार [...]
चारचाकीवरील ताबा सुटल्याने मळगाव येथे अपघात
चालकासह प्रवासी थोडक्यात बचावले न्हावेली /वार्ताहर कुडाळकरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने गाडीची धडक दुभाजकाला बसून गाडी पलिकडच्या मार्गावर येऊन कोसळली.या अपघातात चालकासह गाडीतील प्रवासी बालबाल बचावले.यात गाडीच्या दर्शनी भागासह डावीकडील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव जोशी मांजरेकरवाडी सर्कल लगत या चारचाकी गाडीचा अपघात [...]
Dharashiv News |मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाची धडपड; ४५ ठिकाणी पाण्याची सोय
मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाची धडपड धाराशिव उमरगा -उष्णतेच्या प्रमाणात कमालीचा बदल होत आहे. उन्हाचा चांगलाच पारा वाढत असल्याने पशु पक्षी यांच्यासह प्राण्यांची तहान भागवण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील फॉरेस्ट क्षेत्रावर वनविभाग अंतर्गत ४५ [...]
विजय थलापतीच्या निवडणूक रॅलीत अपघात, रोडशोदरम्यान दुचाकीला अपघात; दुचाकीस्वार जखमी
साऊथ सुपरस्टार आणि तमिळगा वेट्री कझगम (TVK) पक्षाचा सर्वेसर्वा विजय थलपतीच्या रोड शो दरम्यान अपघाताची घटना घडली. टीव्हीकेच्या रोड शो दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या घटनेमुळे राजकीय रॅलींमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी […]
बेळगाव जिल्ह्याचा निकाल ८०.३२ टक्के
गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी राज्यात दुसरी : बारावीच्या निकालात वाढ बेळगाव : बारावीचा परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर गुरुवारी दुपारी 3 वाजता परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या निकालामध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी बेळगावचा निकाल 80.32 टक्के लागला [...]
जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना ‘नाटो’ आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. इराणविरुद्धच्या कारवाईत नाटो देशांनी साथ न दिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी नाटोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा नाटो आमच्या पाठीशी नव्हते आणि भविष्यातही ते मदतीला नसतील, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली […]
नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी दिल्लीतील संसद भवनात राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीसोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांना ही शपथ दिली. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने आगामी काही दिवसात नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताच […]
वनखात्याला भाडेकरारावर वाहन द्या
महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत नगरसेवक रवी साळुंखे यांची सूचना : धोकादायक झाडे-फांद्या हटविणार बेळगाव : शहरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे व फांद्या आहेत. त्यामुळे वनखात्याकडून पावसाळ्यापूर्वी सर्व्हे करून कार्यवाही हाती घ्यावी, अशी सूचना महापालिकेत गुरुवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत नगरसेवकांनी केली. मात्र आपल्याकडे आवश्यक वाहन नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी चार महिन्यांसाठी वाहन भाडेकरारतत्त्वावर [...]
गुजरातमधील धोराजी परिसरात गुरुवारी स्थानिक राजकारणात मोठा नाट्यमय घडामोडींचा दिवस ठरला. पाटनवाव गावचे सरपंच कानभाई सावळिया यांनी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काही तासांतच पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) ‘घरवापसी’ केली. अवघ्या काही तासांत घडलेल्या या राजकीय ‘यू-टर्न’मुळे धोराजी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सकाळी सावळिया यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली होती. […]
दोन चित्ररथांमध्ये अंतर ठेवू नका
पोलीस आयुक्तांची शिवजयंती मंडळांना सूचना बेळगाव : बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होते. यावर्षी मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी चित्ररथ मिरवणूक होणार आहे. ही मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करावी, दोन चित्ररथांमध्ये अंतर असू नये, आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती [...]
अनगोळमधील थेरपिस्टच्या खून प्रकरणी पत्नीसह आणखी एकाला अटक
कट रचून करण्यात आला खून : न्यायालयाच्या आदेशानंतर हिंडलगा कारागृहात रवानगी बेळगाव : अनगोळ येथील व्यवसायाने आयुर्वेदिक थेरपिस्ट असणाऱ्या युवकाच्या खून प्रकरणी त्याच्या पत्नीसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 ते 6.15 यावेळेत आंबेडकरनगर, अनगोळ येथील अंकुश आयुर्वेदिक [...]
आचऱ्यात २५ एप्रिलला जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा
आचरा प्रतिनिधी रॉयल मालवणी सिंधुदुर्ग यांच्या वतीने आचरा येथे जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन (हॉटेल सिरॉक शेजारी), आचरा, ता. मालवण येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक [...]
खटला चालविण्याचे आमच्यासमोर होते आव्हान!
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक’ खटल्याचे श्रेय येळ्ळूरवासियांना द्यावे लागेल : ‘तरुण भारत’तर्फे वकिलांचा सत्कार बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक’ खटला चालविणे हे आमच्यासमोर आव्हान होते. एकूण 250 ग्रामस्थांवर खटले भरले गेले होते. 2014 सालापासून खटला सुरू होता. 12 वर्षे सतत पाठपुरावा करून आम्ही सर्वच्या सर्व 250 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात यशस्वी झालो. या खटल्याचे [...]
थलपती विजयचा ‘जन नायकन’चित्रपट एचडीमध्ये लीक; 500 कोटींचं बजेट, निर्मात्यांना 440 व्हॉल्टचा झटका
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. विजयचा चित्रपटसृष्टीतील शेवटचा चित्रपट मानला जाणारा ‘जन नायकन’ यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असतानाच हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाला आहे. पायरेडेट साईट्सवर या चित्रपटाचा काही भाग लीक झाल्याने चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी […]
५९५० ग्रा.पं.ची १९५ कोटी वीजबिले थकीत
राज्यातील स्थिती : प्रत्येक ग्रामपंचायतीची जवळपास सव्वा तीन लाखांवर बिले प्रलंबित बेळगाव : प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती देण्याचे स्वप्न असताना ग्रामपंचायती मात्र सध्या विविध वीज कंपन्यांच्या वाढत्या वीज बिलांच्या ओझ्याखाली दबल्या गेल्याचे चित्र समोर आले आहे. लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या या संस्थांना आर्थिक अडचणींमुळे मूलभूत सेवा पुरवितानाही संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील 5950 [...]
मरकट्टी येथील अवैध खाणकाम रोखा
वीरकेसरी आमटूर बाळप्पा फाऊंडेशनची मागणी बेळगाव : मरकट्टी (ता. बैलहोंगल) येथील ग्रामपंचायत क्षेत्रात रस्त्यांची दयनीय अवस्था आणि अवैध दगड खाणकामामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. परिसरातील सार्वजनिक रस्ते खराब झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात बेकायदेशीररित्या दगड उत्खनन केले जात असून समस्या निर्माण होत आहेत. यासाठी [...]
जुना पी.बी.रोडवरील कचऱ्याची समस्या नित्याचीच
समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्याची आवश्यकता बेळगाव : जुना पी. बी. रोड, फोर्ट रोड कॉर्नरनजीक रस्त्याकडेला कचरा टाकण्यात आल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. सदर कचऱ्याची समस्या नित्याचीच बनली असून वेळेवर उचल होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने परिसरातील व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असून [...]
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, रोख रकमेच्या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच निर्णय
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो त्यांनी राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. त्यांच्या निवासस्थानी रोख रक्कम आढळल्याच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीदरम्यानच त्यांनी हा निर्णय घेतल्याने या प्रकरणाला अधिक संवेदनशील वळण मिळाले आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधातील आरोपांबाबत न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत यंत्रणेद्वारे (in-house inquiry) चौकशी सुरू आहे. या चौकशीचा निकाल लागण्यापूर्वीच […]
टेंडर प्रक्रियेने दुकाने भाड्याने देण्यासाठी तालुका पंचायतीचा क्रम, गाळेधारकांत एकच खळबळ खानापूर : खानापूर शहरात तालुका पंचायतीच्या मालकीच्या असलेल्या 20 दुकान गाळ्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने नवीन भाडेकरुसाठी टेंडर प्रक्रिया राबवून दुकान गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी 20 दुकान गाळेधारकांना तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी 20 एप्रिलपर्यंत दुकान गाळे खाली करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे गाळेधारकात एकाच खळबळ माजली आहे. [...]
School Van Fire –धावत्या स्कूल व्हॅनला आग, चालकासह पाच विद्यार्थी भाजले
धावत्या स्कूल व्हॅनला आग लागल्याने चालकासह पाच विद्यार्थी भाजल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. पोलीस आणि कुटुंबीयांच्या मदतीने तात्काळ सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रशासनाने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. अपघातग्रस्त व्हॅन आशिष इंग्लिश अकादमी स्कूलच्या विद्यार्थ्यांना […]
येळ्ळूर कलमेश्वर-चांगळेश्वरी यात्रा डॉल्बीमुक्त करणार
सर्व गाडा कमिटी सदस्यांच्या बैठकीत डॉल्बीमुक्त यात्रेवर चर्चा : कर्कश आवाजाने त्रासाच्या वाढत्या तक्रारी वार्ताहर/येळ्ळूर चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे बोलावण्यात आलेल्या गावातील सर्व गाडा कमिटी सदस्यांच्या बैठकीत डॉल्बीमुक्त यात्रा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी नागनगौडा कट्टीमणीगौड यानी संपूर्ण जिह्यात डॉल्बीवर बंदी असल्याने कोणालाही डॉल्बीचा वापर करता येणार नाही. डॉल्बीचा कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने वयोवृद्ध व लहान [...]
पवन खेरा यांना दिलासा; उच्च न्यायालयाकडून एक आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्यावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात खेरा यांच्यावर आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती के. सुजाना यांच्या खंडपीठाने खेरा यांना संबंधित न्यायालयात […]
हवाईमधील किलाऊआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक; 200 मीटरपर्यंत लाव्हा उसळला
जगातील अत्यंत सक्रिय ज्वालामुखींपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हवाई बेटावरील ‘किलाऊआ’ ज्वालामुखी पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. गुरुवारी सकाळी अचानक झालेल्या या उद्रेकामुळे 200 मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत लाव्हाचे कारंजे हवेत उडाले. निसर्गाचे हे रौद्ररूप पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी तातडीने बंद करण्यात आले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, […]
भाजीपाल्यांचे दर गडगडल्याने शेतकरी संकटात
इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम असल्याची चर्चा : खर्च केलेली रक्कमही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कडोली : इराण-अमेरिका युद्ध थांबण्याच्या मार्गावर असल्याने आता तरी गॅस तुटवडा दूर होऊन बंद असलेल्या बहुसंख्य हॉटेल मालकांच्या शेगड्या लवकरच पेटतील काय? आणि शेती मालाची उचल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गॅस टंचाईमुळे बहुतांश [...]
परिस्थितीचे चटके सोसत यशाला गवसणी
महिला-बालकल्याण खात्याच्या विद्यार्थ्याचे बारावी परीक्षेत कौतुकास्पद यश बेळगाव : आई-वडिलांचे छत्र हरपलेले असताना परिस्थितीचे चटके सोसत महिला आणि बालकल्याण खात्याच्या केंद्रातील सुविधांच्या बळावर एका जिद्दी तरुणाने बारावीच्या परीक्षेत तब्बल 83.33 टक्के गुण मिळविले आहेत. कोणतीही खासगी शिकवणी नाही, ना नामांकित कॉलेज, सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन या विद्यार्थ्याने मिळविलेले यश हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. [...]
ओटवणे प्रतिनिधी मूळच्या चौकुळ पानयेलकरवाडी येथील आणि सध्या सांगेली देवकरवाडी येथील रहिवासी सौ. शोभा वामन गावडे (८३) यांचे मंगळवार ७ एप्रिल रोजी डोंबिवली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त कर्मचारी वामन गावडे यांच्या त्या पत्नी, मुंबईस्थित संजय गावडे, यशवंत (आबा) गावडे, भास्कर गावडे यांच्या त्या मातोश्री तर सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे [...]

29 C