SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

Raju Shetty |बारामती-दौडमधील भेसळयुक्त गुळावर राजू शेट्टींचा निशाणा, म्हणाले…

कोल्हापुरात भेसळयुक्त गुळावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया कोल्हापूर – गेल्या बऱ्याच दिवसापासुन कोल्हापुरात भेसळ युक्त गुळाची चर्चा सुरु आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये आढळलेल्या भेसळयुक्त [...]

तरुण भारत 11 Apr 2026 7:11 pm

साडेतीन दशकांचा थरार! दरोड्यासाठी घरमालकिणीचा खून करणाऱ्या आरोपीला ३५ वर्षांनंतर अटक

दिल्ली पोलिसांनी १९९१ मधील हत्येचे एक गुंतागुंतीचे प्रकरण उलगडण्यात यश मिळवले आहे. आपल्या घरमालकिणीची हत्या करून आणि तिच्या मुलाला जखमी करून गेल्या ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली. पीटीआय (PTI) ने दिलेल्या वृत्तानुसार, छवी लाल वर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९९१ […]

सामना 11 Apr 2026 7:09 pm

अवैध भंगार व्यवसायावर तात्काळ कारवाई करा; हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी

चिपळूण शहर आणि ग्रामीण भागांत सध्या अवैध भंगार व्यवसायांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. खाजगी जागा विकत अथवा भाडे तत्त्वावर घेऊन हे व्यावसायिक लोकवस्तीत आणि चिपळूण-गोवा आणि चिपळूण-कराड महामार्गालगत उघडपणे कारभार करत आहेत. कारवाईसाठी प्रांताधिकारी अशोक लिगाडे यांनी १५ दिवसांची मुदत मागितली असली, तरी आम्ही त्यांना २० दिवसांची मुदत देत आहोत, जर २७ एप्रिल २०२६ पर्यंत […]

सामना 11 Apr 2026 6:58 pm

महिला आरक्षणावरून भाजप राजकारण करत आहे, अरविंद सावंत यांची टीका

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप या विषयावर केवळ राजकारण करत असून पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा कायदा घाईघाईने संमत करण्यात आला, अशी टीका त्यांनी केली आहे. एएनआयशी (ANI) संवाद साधताना अरविंद सावंत म्हणाले की, “जेव्हा तुम्ही महिला आरक्षणाबद्दल बोलता, तेव्हा […]

सामना 11 Apr 2026 6:54 pm

TMC जिंकल्यास मतदार यादीतून वगळलेली सर्व नावे पुन्हा जोडणार –अभिषेक बॅनर्जी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. मतदार यादीतून लाखो नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत, तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास ही सर्व नावे पुन्हा जोडली जातील, असे आश्वासन बॅनर्जी यांनी दिले आहे. माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी […]

सामना 11 Apr 2026 6:29 pm

खा. राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत विविध स्पर्धा

शिवसेना महिला आघाडीचे आयोजन ; पत्रकार , कीर्तनकार आदींचा सन्मान सावंतवाडी : प्रतिनिधी खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच झटत आले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे . त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी महिला शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले. [...]

तरुण भारत 11 Apr 2026 6:10 pm

अमेरिकेवर आमचा विश्वास नाही; शांतता चर्चा सुरू असताना इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विधान चर्चेत

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ नेते पाकिस्तानात दाखल झाले आहेत. याचवेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चर्चेपूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. त्यांचे हे विधान चर्चेत असून अमेरिका इराणमधील शांततेसाठीची चर्चा यशस्वी होईल का, […]

सामना 11 Apr 2026 5:44 pm

ओडिशामध्ये भीषण अपघात, बस ४० फूट खोल दरीत कोसळली

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात शनिवारी पहाटे एका सरकारी बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, ओडिसा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची (OSRTC) बस भवानीपटना येथून विशाखापट्टणमच्या दिशेने जात असताना पहाटे २ च्या […]

सामना 11 Apr 2026 5:40 pm

Miraj News |खासगी शाळांना आता महापालिका देणार टक्कर! मिरजेतील मनपा शाळा लवकरच होणार ‘डिजीटल’.

मिरजेतील मनपा शाळांचा दर्जा सुधारणार मिरज: खासगी शाळांच्या तोडीस तोड महापालिकेच्या शाळा बनविण्याचा निर्धार केला आहे. सामान्यांसह सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मनपा शाळांकडून जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी आणि अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळा लवकरच डिजीटल करणार असल्याचे आश्वासन महापौर [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:39 pm

आंबोलीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे उद्घाटन

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे आयोजन आंबोली प्रतिनिधी आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना घडविण्यासाठी लहानपणापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे . शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेतून भविष्यातील मोठ्या केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे बीजारोपण होईल. या परीक्षेतुनच पुढे जावून ग्रामीण भागातील अधिकाधिक मुले अधिकारी होतील, असा विश्वास अखिल प्राथमिक शिक्षक [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:31 pm

सांगली जिल्ह्याची पशुगणना पूर्ण, पण आकडेवारी गुलदस्त्यात! अहवाल सादर होऊनही शासनस्तरावर टाळाटाळ

सांगली जिल्ह्यातील पशुधनाची अधिकृत संख्या अद्याप जाहीर नाही सांगली: जिल्ह्यात पहिल्यांदाच गेल्यावर्षी ऑनलाईन २१ वी पशुगणना करण्यात आली. याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. मात्र अद्यापही आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दर ५ [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:30 pm

संगीत शाळेला अखेरचा निरोप! उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर घुमली अखेरची धून; नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

युद्ध आणि संघर्षाच्या सावटाखाली जेव्हा माणुसकी होरपळून निघते, तेव्हा कलाच मनातल्या वेदनांना वाट करून देते. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने जगभरातील नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या आपल्या संगीत शाळेला एका संगीतकाराने दिलेला शेवटचा निरोप काळजाला भिडणारा आहे. इराणमधील ‘hamidrezaafarideh’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या […]

सामना 11 Apr 2026 5:28 pm

संतापजनक! ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून पोत्यात भरून फेकले

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला पोत्यात कोंडून विहिरीजवळ फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी उताई पोलीस स्टेशनच्या हद्दीत […]

सामना 11 Apr 2026 5:20 pm

Sangli News |वाकुर्डेच्या सरपंच शीतल पाटील यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार! लाचखोरी प्रकरणी जिल्हा परिषदेची मोठी कारवाई

वाकुर्डे सरपंच अपात्रतेसाठी हालचाली वेगवान सांगली : शिराळा तालुक्यातीलवाकुर्डे येथील सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी जिल्हा परिषदेने प्रक्रिया सुरु केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ही प्रक्रिया सुरु करण्यात [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:20 pm

मिरजेत एसटीचा थरार! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट ‘कृपामायी मेंटल हॉस्पिटल’च्या भिंतीला धडकली

कृपामायी हॉस्पिटलजवळ भीषण अपघात मिरज: सांगली-मिरज रस्त्यावरभरधाव एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कृपामायी मेंटल हॉस्पिटलच्या दिशेने बस गाडी घुसून कंपाऊंड भिंतीला धडकली. यामुळे भितीची पडझड झाली. तसेच एसटीच्या पुढील बाजूचा चक्काचूर होऊन सुमारे दोन [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:14 pm

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन उपक्रमाचे आयोजन

डॉ .ज्योती तोरसकर यांचे प्रतिपादन मालवण -वार्ताहर विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर येथे वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रतिपादन डॉ. सौ ज्योती पुरस्कार यांनी बॅ. नाथ पै सेवांगण येथे बोलताना केले. सामाजिक न्याय [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:13 pm

Kupwad ATM theft attempt |चोरट्यांचा भरबाजारात धुमाकूळ! एसबीआय आणि हिताचीचे एटीएम टार्गेट; कुपवाडमध्ये खळबळ

कुपवाडमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनवर घातला घाला कुपवाड : कुपवाडमधील मंगळवारबाजार पेठेतील आर. पी. पाटील चौकात गुरुवारी मध्यरात्री एसबीआय व हिताची या दोन्ही बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. [...]

तरुण भारत 11 Apr 2026 5:03 pm

संविधान बदलू पाहतेय BJP, तेजस्वी यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

“आरएसएस आणि भारतीय जनता पक्ष देशाचे संविधान बदलू इच्छितात, मात्र अल्पसंख्याक समाजाने आता सावध होण्याची गरज आहे,” असा हल्लाबोल बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. शनिवारी पाटण्यातील श्री कृष्ण मेमोरियल हॉलमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) अल्पसंख्याक सेलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत. आपल्या भाषणात तेजस्वी यादव म्हणाले की, भाजपला देशाच्या […]

सामना 11 Apr 2026 5:00 pm

Kolhapur News |निसर्गाचा अद्भूत चमत्कार! शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये ‘सुरणा’ला आला दुर्मिळ फुलोरा

शिवाजी विद्यापीठात दुर्मिळ सुरण फुलले कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये सुरण या दुर्मिळ माणल्या जाणाऱ्या वनस्पतीला फुलोरा आला आहे. निसर्गप्रमी आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी चालून आली आहे. ‘एलीफंट [...]

तरुण भारत 11 Apr 2026 4:53 pm

शिवकालीन गढी कामाचा मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा

नांदोस महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल : मंत्री आशिष शेलार कट्टा / वार्ताहर मालवण तालुक्यातील नांदोस गावातील शिवकालीन गढीचे पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन केले जात आहे. या उत्खननात नवनवीन माहिती समोर येत असून त्यातून वेगवेगळे पुरातकालीन अवशेष सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी या कामाचा शुभारंभ सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आमदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला [...]

तरुण भारत 11 Apr 2026 4:50 pm

नितीश कुमार यांचे निवासस्थान बदलले; मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप सस्पेन्स

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकीय निवासस्थान आता नवी दिल्ली असेल. नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथही घेतली आहे. मात्र, अद्याप त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याने त्याबाबत सस्पेन्स कायम आहे. नितीश कुमार यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थान […]

सामना 11 Apr 2026 4:49 pm

नागभीड तालुक्यात वाघाचा धुमाकूळ; गोठ्यात शिरून 4 शेळ्यांचा पाडला फडशा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावात मध्यरात्री वाघाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून शेळ्यांवर ताव मारल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात 3 शेतकऱ्यांच्या एकूण 4 शेळ्या ठार झाल्या असून एका शेळीला वाघाने तोंडात धरून नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या […]

सामना 11 Apr 2026 4:42 pm

सिनेमाघरात दिसणार VFX चा नाव अविष्कार; वाराणसी मध्ये राजमौली घडवणार तंत्रज्ञानाची कमाल

एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीची उंची वाढवणारे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली आता त्यांच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटामुळे जागतिक स्तरावर एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, केवळ भव्य स्टारकास्टच नाही, तर या चित्रपटासाठी राजामौली पडद्यामागे […]

सामना 11 Apr 2026 4:22 pm

अंबाजोगाई पुन्हा हादरले! अभ्यासाचा तणावामुळे बारावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौक परिसरात राहणार्‍या एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून आज शनिवार ( 11 एप्रिल) रोजी सकाळी उघडकीस आली. पूनम मेघराज दहिफळे वय 17 असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळ उमरेवाडी (ता.धारुर) येथील रहिवासी होती. शिक्षणासाठी ती अंबाजोगाई येथे भाड्याच्या घरात […]

सामना 11 Apr 2026 4:20 pm

नांदेड जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला, कुठलीही जिवितहानी नाही

नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत आज सकाळी 8.45 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. शनिवारी सकाळी नागरिक आपल्या नित्यकामात व्यस्त असताना अचानक जमीन हादरल्याने एकच गोंधळ उडाला. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, […]

सामना 11 Apr 2026 4:00 pm

युवकांच्या आत्महत्यांच्या प्रसिद्धी ऐवजी हवी योग्य समूपदेशकाची साथ

दयानंद कुबल यांचे भावनिक आवाहन सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात वाढत्या युवकांच्या आत्महत्यांच्या घटनांना प्रसारमाध्यमांनी कृपया अनावश्यक प्रसिद्धी देण्याऐवजी या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी आपण समुपदेशक म्हणून कशी जबाबदारी हाती घेऊ शकतो यावर विचार करावा, असे अत्यंत भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी केले आहे. अशा संवेदनशील घटनांची सतत व ठळक प्रसिद्धी केल्यामुळे काही युवकांमध्ये [...]

तरुण भारत 11 Apr 2026 4:00 pm

केदारनाथ धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग आजपासून सुरू, प्रशासनाकडून सविस्तर माहिती जारी

उत्तराखंडच्या प्रसिद्ध ‘चारधाम यात्रे’साठी बिगुल वाजला आहे. देशभरातील आणि परदेशातील यात्रेकरूंची आणि स्थानिक व्यावसायिकांची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे, कारण ही पवित्र यात्रा १९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १९ एप्रिल रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे उघडून यात्रेला सुरुवात होईल. यानंतर, २२ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे यात्रेकरूंसाठी उघडले जातील आणि २३ एप्रिल रोजी बद्रीनाथ […]

सामना 11 Apr 2026 3:58 pm

आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष मध्यरात्री लोकल, BESTच्या अतिरिक्त बस सेवाही सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मध्य रेल्वेकडून मुख्य आणि हार्बर मार्गावर विशेष मध्यरात्रीच्या लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, सीएसएमटी–कल्याण आणि सीएसएमटी–पनवेल या मार्गांवर विशेष […]

सामना 11 Apr 2026 3:56 pm

आ .केसरकरांच्या कार्यालयात महात्मा फुलेंची जयंती

सावंतवाडी : प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार आमदार दीपक केसरकर यांनी अर्पण केला. श्री केसरकर यांच्या निवासस्थानी शनिवारी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार केसरकर म्हणाले ,महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणले तरच खरी जयंती साजरी केल्यासारखे होईल. यावेळी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन [...]

तरुण भारत 11 Apr 2026 3:51 pm

पुरंदरमध्ये हेलिकॉप्टरचं लँडिंग चुकलं, मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर शनिवारी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात चुकीच्या ठिकाणी उतरल्याची घटना घडली. नियोजित हेलिपॅडऐवजी हेलिकॉप्टर जवळच्याच पार्किंग परिसरात उतरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मंत्री तसेच वैमानिक सुरक्षित आहेत. ही घटना ते खानवडी गावात एका स्थानिक कार्यक्रमासाठी जात असताना घडली. लँडिंगदरम्यान वैमानिकाला […]

सामना 11 Apr 2026 3:45 pm

झोपण्याआधी काळी मिरी आणि गूळ मिसळलेले दूध पिण्यामुळे होतील अगणित फायदे

दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दूधातील पोषक तत्वांमुळे हाडे मजबूत होण्यापासून ते विविध आरोग्य समस्या कमी होण्यापर्यंत अनेक आरोग्य फायदे मिळतात. दूध काही विशिष्ट घटकांसोबत मिसळून प्याल, तर ते आणखी फायदेशीर ठरते. तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी काळी मिरी आणि गूळ दुधासोबत खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि […]

सामना 11 Apr 2026 3:40 pm

कतारसह इतर परदेशी बँकांमधील इराणची मालमत्ता अमेरिका मुक्त करणार? शांतता चर्चेतील महत्त्वाची माहिती

अमेरिका-इस्रायल इराण युद्धात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाली असून आता कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका-इराणमध्ये चर्चा होत आहे. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. आखातातील तणाव कमी होईल की नाही, हे या बैठकीवर अवलंबून असेल. आता कतारसह इतर परदेशी बँकांमधील इराणची संपत्ती मुक्त करण्यास अमेरिका तयार झाल्याची माहिती मिळत आहे. ‘आज तक’ने याबाबतचे […]

सामना 11 Apr 2026 3:37 pm

रोजचा ताणतणाव कमी करण्यासाठी डार्क चाॅकलेट आहे उत्तम पर्याय, जाणून घ्या

प्रसंग कोणताही असो, चॉकलेट हा एक गोड पदार्थ म्हणून नेहमीच योग्य ठरतो. असे म्हटले जाते की चॉकलेटचे अतिसेवन आरोग्यासाठी चांगले नाही, परंतु योग्य प्रमाणात सेवन केल्यास डार्क चॉकलेट अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि मॅंगनीज असते. त्यात पोटॅशियम, सेलेनियम आणि फॉस्फरस देखील असतात. या लेखात, डार्क चॉकलेट कसे खावे […]

सामना 11 Apr 2026 3:31 pm

चेहऱ्यावर व्रण, शरीरावर गंभीर जखमा! कशी मोज्तबा खामेनी यांची प्रकृती?

गेल्या 40 दिवसांपासून आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाच्या सुरूवातीला झालेल्या एअरस्ट्रॉकमध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी […]

सामना 11 Apr 2026 3:21 pm

नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंनी घेतला मासळी मार्केट समस्यांचा आढावा

सावंतवाडी : प्रतिनिधी मच्छी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्षांनी आज मार्केटला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला मासळी विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी, पावसाळ्यात होणारा त्रास आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर चर्चा केली. ​मार्केटमधील अपुऱ्या सुविधा आणि सांडपाण्याची समस्या विक्रेत्यांनी त्यांच्यासमोर मांडली. यावर बोलताना नगराध्यक्षांनी सांगितले की, “विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे.नवीन कचराकुंडी, [...]

तरुण भारत 11 Apr 2026 3:19 pm

तरीही मोदी बंगालमध्ये हरेल तर? आप नेते अरविंद केजरीवाल यांचा टोला

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उपरोधिक टिप्पणी केली आहे. केजरीवाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “सर्व संस्था आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आणि लाखो मतदारांची नावे कमी केल्यानंतरही मोदी पश्चिम बंगाल […]

सामना 11 Apr 2026 3:16 pm

मुद्दाम आम्हाला इराणच्या तोंडी दिले…; कुवेत हल्ल्यातून बचावलेल्या अमेरिकी सैनिकांनी दिली मोठी माहिती

अमेरिका, इस्रायल- इराण युद्धादरम्यान कुवेतमधील एका अमेरिकी लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, एका ‘स्कर्टर’ ड्रोनने कुवेत येथील एका तटबंदीयुक्त तळाची सुरक्षा भेदली होती. तथापि, या हल्ल्यातून बचावलेल्या सैनिकांनी हा दावा सपशेल खोटा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्करी तळावरील हा हल्ला २०२१ नंतर […]

सामना 11 Apr 2026 3:00 pm

निवडणूक आयोग आणि भाजप मिळून माझी उमेदवारी रद्द करण्याचा कट, ममता बॅनर्जी यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी रद्द करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशियारी येथे आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून उमेदवारी रद्द करण्याचा प्रयत्न केला. […]

सामना 11 Apr 2026 3:00 pm

उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, दिवसाढवळ्या वकीलाची गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे भरदिवसा एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आरोपी पळताना त्यांची मोटारसायकल बंद पडल्याचेही दिसून आले आहे. ही घटना कटवारू का पुरा परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख अ‍ॅडव्होकेट राजीव सिंग अशी झाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजीव सिंग हे नेहमीप्रमाणे सकाळी […]

सामना 11 Apr 2026 2:42 pm

Badminton Asia Championship –आयुष शेट्टीने इतिहास रचला, वर्ल्ड नंबर वन खेळाडूला नमवत गाठली अंतिम फेरी

निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत आयुषने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कुनलावुत विटिडसार्न याचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. आयुषने हा सामना 10-21, 21-19, 21-17 अशा फरकाने जिंकत जागतिक बॅडमिंटन […]

सामना 11 Apr 2026 2:42 pm

वीज सेवेची माहिती मिळणार “एसएमएस” सेवेद्वारे

लातूर (प्रतिनिधी) - गाहकाभिमूख सेवा देण्यासाठी महावितरण सातत्याने विविध प्रयत्न करत असते. त्याच सुविधेचा भाग म्हणून वीजग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास महावितरणने सुरुवात केलेली आहे. सर्व प्रकारच्या वीजसेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. वीजबिल तसेच वीजपुरवठा बंदचा कालावधी व इतर माहिती मिळवण्यासाठी लातूर परिमंडलातील १२ लाख ९८ हजार ४० वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. लातूर, बीड व धाराशिव या तीन जिल्हयांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडलातील कृषीपंप ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील एकूण १५ लाख २ हजार ९६२ वीजग्राहकांपैकी १२ लाख ९८ हजार ४० वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील १० लाख ६ हजार ३९३ ग्राहकांपैकी ९ लाख ३४ हजार ९८ ग्राहकांचा अर्थात ९२.८१ टक्के ग्राहकांचा समावेश आहे. तर कृषिपंप वर्गवारीतील ४ लाख ९६ हजार ५६९ ग्राहकांपैकी ३ लाख ६३ हजार ९४२ ग्राहकांचा अर्थात ७३.२९ टक्के ग्राहकांचा समावेश आहे. लातूर मंडलात सर्व वर्गवारीतील ५ लाख ९६ हजार २१८ वीजग्राहकांपैकी ५ लाख ३५ हजार ३८० ग्राहकांनी, बीड मंडलात ४ लाख ७६ हजार ५७३ वीजग्राहकांपैकी ४ लाख ९ हजार ९ ग्राहकांनी, तर धाराशिव मंडलात ४ लाख ३० हजार १७१ वीजग्राहकांपैकी ३ लाख ५३ हजार ६५१ वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वीजवाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, बिल प्राप्त झाल्याचा संदेश यासह विविध वीजसेवांची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवण्यात येते. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील ८६.३७ टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक नोंदवायचा आहे अथवा बदलायचा आहे, त्यांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर किंवा महावितरणच्या https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 2:26 pm

IPL 2026 –हा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता! रोहित शर्माने मानले मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्यांचे आभार

टीम इंडियाचा कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससोबत आपली यशस्वी 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना रोहित भावूक झाला. “हा केवळ माझा एकट्याचा प्रवास नसून, यात तुम्हा सर्वांचा मोलाचा वाटा आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. रोहितने आपल्या भाषणात पोलार्ड, हार्दिक, सूर्या, शार्दुल, मलिंगा आणि […]

सामना 11 Apr 2026 2:25 pm

जनतेचे प्रश्न घेवून कॉग्रेस सघर्ष करीत आहे - राजेश तिवारी

धाराशिव (प्रतिनिधी) - काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ स्तरावर जाणार असून जनतेच्या समस्या काय आहेत ? ते समजून घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक वाडी वस्ती आणि गाव तांडा या ठिकाणी पोचणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करतील. काँग्रेसचे जाळे सर्व स्तरावर मजबूत आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेवून कॉग्रेस सघर्ष करीत आहेत असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेश प्रभारी तथा धाराशिव प्रभारी राजेश तिवारी यांनी व्यक्त केले. धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे संघटन सृजन अभियान संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश तिवारी बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, भाजपने ईडी, सीबीआय व एसआयआर आदींची भीती दाखवण्यासह लालच दाखवून तसेच जाती धर्माच्या नावावर भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करत आहे. मात्र जनता काँग्रेस सोबत असून आगामी काळात जनताच केंद्रातील मोदी सरकारला मुळासकट उखडून फेकणार असल्याचे सांगून भाजपवर हल्लाबोल केला. पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभर केली. ही यात्रा 6 हजार किलो मीटरपेक्षा जास्त करण्यात आली असून या माध्यमातून खासदार गांधी यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव निरिक्षक हेमंत ओगले, प्रदेश महासचिव तथा धाराशिव निरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड, प्रदेश सचिव उदयसिंग पाटील, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, विनोद वीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. जनतेशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष ठरवणार ज्या जिल्हाध्यक्षांचे काम जनतेशी जोडलेले असेल आणि जनतेने त्यांच्या कामावर पसंती दिली तर त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू असून या बांधणीमध्ये अशा अनुभवी जिल्हाध्यक्षाचा पक्षाच्या वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, 19 एप्रिला यासंदर्भात थेट जनसेशी संवाद करून निर्णय घेतला जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 2:25 pm

भांडुपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

भांडुप (पश्चिम) परिसरात शनिवारी सकाळी निवासी इमारतीचा काही भाग कोसळून 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास तुळशीपाडा, पाटकर कंपाउंड येथे घडली. ग्राउंड प्लस वन (G+1) रचनेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीच्या […]

सामना 11 Apr 2026 2:21 pm

पाकिस्तानला मध्यस्थाची भूमिका कशी मिळाली? काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इस्लामाबादमध्ये सुरू होणाऱ्या या चर्चेमध्ये पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत असल्याबद्दल त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा ही दीर्घकालीन शांततेची सुरुवात ठरावी, अशी सर्वांची अपेक्षा […]

सामना 11 Apr 2026 2:08 pm

जि.प. शाळा आळणीच्या गुणवत्तेचे सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांच्याकडून कौतुक

धाराशिव (प्रतिनिधी)- PAT (Periodic Assessment Test) परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद धाराशिवच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रियंवदा महाडदळकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेटिव्ह अँड सायन्स सेंटर, ॲस्ट्रॉनॉमी लॅब व आयडियल कॉम्प्युटर सेंटर यांना भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून मॅडमशी आत्मविश्वासाने संवाद साधत आपली बौद्धिक क्षमता दर्शविली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी तत्परतेने व प्रभावीपणे दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली. तसेच परीक्षेबाबत येणाऱ्या अडचणींबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. शाळेच्या भौतिक सुविधांची पाहणी करून त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. “शाळेची गुणवत्ता अत्यंत उत्कृष्ट असून येथील सर्व विद्यार्थी हुशार आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेस पहिल्यांदा भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी व सरपंच प्रमोद काका वीर यांनी त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार केला शाळेची गुणवत्ता पाहून मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक करून शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी वयक्तिक लक्ष देईन असे अभिवचन दिले यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी सौ. रंजना मैंदर्गी यांनीही प्रत्यक्ष वर्गात जाऊन पट पडताळणी केली व शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:48 pm

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राजीनामा; नव्या सभापतीपदासाठी रंगली चर्चा

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. आशिष सोनटक्के यांनी 7 एप्रिल 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. भाजपने प्रथमच स्वबळावर तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतल्यानंतर: प्रथम सभापतीपद सचिन पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर ॲड. आशिष सोनटक्के यांची नियुक्ती झाली. या दोघांचा मिळून जवळपास 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून अजून 2 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. सभापती पदासाठी सध्या अनेक नावे चर्चेत असली तरी माजी सभापती विजय गंगणे यांचे नाव आघाडीवर आहे. कारण बाजार समिती भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसकडून भाजपकडे सत्ता? पूर्वी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र राज्य व केंद्रातील सत्तांतरानंतर भाजपने ही संस्था एकहाती ताब्यात घेतली. सध्या बाजार समिती सुरळीत सुरू असल्याने सभापतीपदासाठी मोठी चुरस आहे. निवड बिनविरोध की संघर्ष? आता सर्वांचे लक्ष निवड बिनविरोध की संघर्ष? याकडे लागले आहे. सभापती निवड बिनविरोध होणार? की पंचायत समितीप्रमाणे राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? या प्रश्नांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने विरोधक भाजपमधील निवडीच्या अंतर्गत हालचाली कडे लक्ष ठेवून आहे. सर्व पक्षांकडून हालचाली सुरू एकूणच, पुढील सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, येणारे काही दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:46 pm

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी; महसूल वसुलीत 114.57 टक्के उद्दिष्टपूर्ती

धाराशिव (प्रतिनिधी)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी आर्थिक वर्ष सन 2025-26 मध्ये शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार 114.57 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल वसुली करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी तब्बल 126 कोटी 30 लाख रुपयांचा महसूल शासनास मिळवून दिला आहे.मागील वर्षीच्या 97 कोटी 62 लाख महसूल वसुलीच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष मेहनतीमुळे हे उद्दिष्ट साध्य झाले असून,शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 114.57 टक्के महसूल वसुली करण्यात यश आले आहे. महसूल प्राप्तीमध्ये वाहन नोंदणीचा मोठा वाटा असून वर्षभरात एकूण 38 हजार 624 वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये 26 हजार 708 दुचाकी,3 हजार 627 चारचाकी,515 ऑटोरिक्षा,1 हजार 548 मालवाहू वाहने, 279 प्रवासी वाहने तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.तसेच आकर्षक पसंती क्रमांक शुल्काद्वारे 2 हजार 553 वाहनधारकांकडून 3 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. कार्यालयातील वायुवेग पथकानेही प्रभावी कामगिरी करत 19 हजार 475 दोषी वाहनांवर कारवाई केली असून 4 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2026 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत शहर व जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. पादचाऱ्यांमध्ये अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने उजवीकडून चला या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच झेब्रा क्रॉसिंग, आणि दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:46 pm

महात्मा फुले व डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

धाराशिव (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती व रमाई फाउंडेशन धाराशिव तसेच शिवसेना डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि.12 एप्रिल रोजी करण्यात आले असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरीब व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्फत मोफत करण्यात येईल. तसेच ॲंजिओग्राफी 50 टक्के दरात तर सोनाग्राफी व पायातील नसांची तपासणी 50 टक्के दरात करण्यात येणार आहे. त्याबरोबरच अपंगासाठी अत्यावश्यक असणारे साहित्य मिळवून देण्यात येईल. तसेच सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात येणार आहेत. या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ धनंजय पडवळ, जनरल फिजिशियन डॉ. पंकज शिनगारे, बालरोग तज्ञ डॉ स्वप्निल भोसले, डॉ अजित डिकले, डॉ स्वप्निल शिंदे, नेत्ररोग तज्ञ डॉ महेश पाटील, जनरल फिजिशियन डॉ शकील खान, दंत रोग तज्ञ डॉ अविनाश तांबारे, नाक कान घसा तज्ञ डॉ व्यंकटेश पोलावार, त्वचा रोग तज्ञ डॉ धवलकुमार बनसोडे, स्त्री रोग तज्ञ डॉ अश्विनी पडवळ - मुंडे, अस्थिरोग तज्ञ डॉ कृष्णा स्वामी, कन्सल्टंट फिजिशियन डॉ सागर सुर्यवंशी व डॉ प्रियंका मुंडे-डिकले या तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्याची तपासणी करणार आहे. हे शिबिर धाराशिव शहरातील बौद्ध नगर येथील संविधान चौकातील जम्बुद्वीप विहारात करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समिती अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:46 pm

क्रिमिलेअरची अट नोकरीच्या आरक्षणाला असेल तर ती राजकीय आरक्षणाला देखील लावावी - ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे

धाराशिव (प्रतिनिधी)- क्रिमिलेअरची अट नोकरीच्या आरक्षणाला असेल तर ती राजकीय आरक्षणाला देखील लावावी. दोन वेळा खासदार किंवा आमदार झाल्यानंतर त्याला पुन्हा निवडणुकीस बंदी घालावी. तसेच पक्षांतर केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करीत पक्षांतर बंदीचा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी केली. धाराशिव शहरातील गोरे कॉम्प्लेक्स येथील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुले-आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि ती फोडण्याचा मार्ग या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा रवी सुरवसे, सचिव नागनाथ गोरसे, मारोती पवार, प्रा.अंबादास कळासरे, अमोल गडबडे, प्राचार्य डॉ रमेश दापके आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना जेष्ठ पत्रकार कांबळे म्हणाले की, जातीयवादी व्यवस्थेने सत्ता व ज्ञान यापासून वंचित ठेवल्यामुळे फुले आंबेडकरांनी बंड केल्याचे सांगत ते म्हणाले की, 2020 पासून शस्त्र व शास्त्र मिळवून देण्याची लढाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जातगणनेच्या माध्यमातून संपत्तीचे समान वाटप करणार आहेत का ? असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी अरविंद गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा रवी सुरवसे यांनी केले. तर सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी केले. तर आभार मनिषा ताकपीरे यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:45 pm

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू

धाराशिव (प्रतिनिधी)- एमएचटी-सीईटी 2026 ही परीक्षा दि.11 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अभियांत्रिकी महाविद्यालय,सोलापूर रोड, धाराशिव या परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. ही परीक्षा दररोज सकाळी 7.30 ते दुपारी 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार,परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, इंटरनेट कॅफे, कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, मोबाईल फोन, सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. हे आदेश दि.11 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:44 pm

हँड्स ऑन ट्रेनिंग‌’मुळे खरीपासाठी कृषी यंत्रणा सज्ज

धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.आज,10 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव आणि कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष खरीप कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यशाळेत बीजप्रक्रिया,बियाणे उगवण क्षमता तपासणी, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेती या विषयांवर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी प्रास्ताविक करत खरीप हंगामाचे नियोजन आणि कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.‌‘हँड्स ऑन ट्रेनिंग‌’ वर विशेष भर देताना त्यांनी सांगितले की,केवळ तात्विक माहिती न घेता प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण घेतल्यास अधिकारी ते ज्ञान अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ कसबे आणि झगडे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये बीजप्रक्रिया,बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी याबाबत माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवत उत्पादकता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नैसर्गिक शेती तज्ञ श्री.विकास गोडसे यांनी उपस्थितांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.त्यांनी बिजामृत, जीवामृत,घन जीवामृत तसेच कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निमार्क, अग्न्यास्त्र, ब्रम्हास्त्र आणि निमास्त्र तयार करण्याच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन केले.विशेषतः त्यांनी मांडलेली ‌‘दहा ड्रम थेअरी‌’ ही उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या कार्यशाळेस उपविभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये आबासाहेब देशमुख (तालुका कृषी अधिकारी), ज्ञानेश्वर रितापुरे, महेश देवकते, राहुल दिवाने यांच्यासह सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यशाळेमुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असून,नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

लोकराज्य जिवंत 11 Apr 2026 1:44 pm

Eknath Shine |मी कोणतीही कामं लपून-छपून करत नाही! ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चोख प्रत्युत्तर

साताऱ्याच्या भूमीतून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना आणि माध्यमांना इशारा सातारा: गेल्या काही तासांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि उबाठा गटाच्या खासदारांसोबतच्या कथित गुप्त बैठकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी कोणतीही कामं लपून-छपून [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:43 pm

संसद‑विधानसभांना ‘डिजिटली’जाेडणार

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती: राष्ट्रकुल संसदीय परिषदेची सांगता पणजी : संसद आणि राज्य विधानसभा यांचे सहकार्य व समन्वय वाढवण्यासाठी त्यांना अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणण्यात येणार असून त्यासाठी गोव्यातील ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नमूद केले. ओम बिर्ला यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन दिवस [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:22 pm

सोहम सुशांत नाईकला तिसऱ्या गुह्यामध्ये अटक

प्रकरणाचा पाच अधिकाऱ्यांकडून तपास पणजी : कुडचडे येथील वासनाकांड प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक याला गुन्हा शाखेने तिसऱ्या गुह्यात अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झाले आहेत. या पाचही गुन्हांचा कसून तपास केला जात आहे. पाच तपास अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत असून प्रत्येक तपास अधिकाऱ्याकडे एक तक्रार सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:18 pm

पणजी मनपा निवडणुकीच्या सर्व नोंदी जतन कराव्यात

प्रधान जिल्हा-सत्र न्यायालयात याचिका दाखल : आता पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार पणजी : पणजी महानगरपालिकेच्या (मनपा ) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीशी संबंधित सर्व नोंदी 60 दिवसांसाठी जतन करण्याची मागणी न्यायालयात याचिकाकर्त्यांनी केली. उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आणि प्रतिवादींना त्यांचे उत्तर पुढची सुनावणी 4 मे पर्यंत दाखल [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:17 pm

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांकडून ओडीशातील तरुणाला अटक

एका दहशतवादी संघटनेशी संशयित संबंध असल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी भुवनेश्वर येथील एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, असे एका अधिकृत निवेदनात शनिवारी सांगण्यात आले. गंगा नगर परिसरातील ‘युनिट-६’ भागाचा रहिवासी असलेल्या आणि शेख इम्रान अशी ओळख पटलेल्या या आरोपीला, देशविरोधी कारवायांशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून, ओडिशा आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी अटक केली, […]

सामना 11 Apr 2026 1:16 pm

Iran US Israel War – इराणची सहमती असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच! ट्रम्प यांचा कठोर इशारा

आखाती देशातील तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इराणची मान्यता असो वा नसो, अमेरिका ही सामुद्रधुनी खुली करणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. हे काम सोपे नाही, परंतु अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रे यासाठी एकत्र […]

सामना 11 Apr 2026 1:14 pm

नियम म्हणजे नियम…म्हणून रिप्लाय दिला नाही, कर्मचाऱ्याने दिले सडेतोड उत्तर

जनरेशन झेड (Gen Z) च्या कार्यशैलीची सध्या कॉर्पोरेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईतील एका कंपनीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेने कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमांबद्दल आणि व्यवस्थापनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) च्या कडक बंदीचाच आधार घेत एका तरुण कर्मचाऱ्याने ऑफिसच्या वेळेनंतर आलेल्या क्लायंटच्या मेसेजकडे चक्क दुर्लक्ष केले. त्याने मॅनेजरला […]

सामना 11 Apr 2026 1:14 pm

‘गोवा’ ब्रँडखाली बनावट काजू विकाल तर खबरदार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : गोवा काजू महोत्सवाचे शानदार उद्घाटन, कांपाल बांदोडकर मैदानावर पणजी : काजू ही गोव्याची ओळख आहे. राज्याला स्वयंपूर्ण करण्यात काजूचा मोठा सहभाग आणि योगदान आहे. अशावेळी ‘गोवा’ ब्रँडच्या नावाखाली आफ्रिकन किंवा अन्य राज्यांमधील बनावट काजू विकाल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:11 pm

भ्रष्टाचाराची कमाल…अभियंता मालामाल

लोकायुक्तच्या छाप्यात 14 कोटी रुपयांचे घबाड हस्तगत : अधिकाऱ्यांकडून माहिती बेळगाव : बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षचे साहाय्यक कार्यकारी अभियंते अजयसिंग बापूसिंग रजपूत यांच्या घरांवर चार दिवसांपूर्वी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. या कारवाईत 14 कोटी रुपयांचे घबाड उघडकीस आले आहे. शुक्रवारी लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी [...]

तरुण भारत 11 Apr 2026 1:04 pm

स्वतःचेच भूसुरुंग शोधण्यात इराण असमर्थ; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेचा नवा दावा

इराणने पेरलेले स्वतःचेच सागरी सुरुंग त्यांना शोधता येत नसल्यामुळे ते होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करू शकत नाही, असा नवा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प प्रशासनाच्या मागण्या इराण त्वरीत पूर्ण करू शकत नाही, याचे हेच मुख्य कारण आहे. या महत्त्वपूर्ण जलमार्गातून इराणने जहाजांची वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी अमेरिकेची प्रमुख मागणी आहे. ही […]

सामना 11 Apr 2026 1:03 pm

कचरा डेपोविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एल्गार

तुरमुरीत श्वास घेणं झालंय कठीण : तात्काळ बंद करा, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : ‘स्वच्छ हवा, आमचा अधिकार’, ‘तुरमुरी कचरा डेपो हटवा, मगच निवडणूक घ्या’, ‘आमचा हक्क आमचा अधिकार’, ‘तुरमुरी कचरा डेपो हटवा, नको नव्या नव्या रोगांचा झटका’, ‘तुरमुरीत श्वास घेणं कठीण झालंय’, ‘तुरमुरीला न्याय द्या’ आदी घोषणा देत तुरमुरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:55 pm

ब्लॅक बॉक्सचं काय झालं? अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सुप्रिया सुळे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य वेळी एफआयआर नोंदवला गेला नाही, तसेच चौकशी प्रक्रियेत विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. […]

सामना 11 Apr 2026 12:52 pm

शिस्तबद्ध मिरवणुकीतून शिवभक्ती दाखवा

पोलीस आयुक्त : शिवजयंती उत्सव मंडळांसोबत बैठक बेळगाव : शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात मंडळ व पोलिसांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. चित्ररथ मिरवणुकीला कोणत्याही कृतीने गालबोट लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी. मंडळांना ज्या समस्या आहेत, त्या त्वरित दूर केल्या जातील, असे आश्वासन पोलीस [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:49 pm

साऊंड सिस्टीमची ध्वनीमर्यादा ९० डेसिबलपर्यंत वाढवा

बेळगाव साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशनची मागणी बेळगाव : बेळगाव शहर साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन, जनरेटर ओनर्स असोसिएशनची बैठक शुक्रवारी साई भवन येथे पार पडली. या बैठकीत लग्न समारंभ, उत्सव आणि तत्सम कार्यक्रमावेळी लावण्यात येणाऱ्या साऊंड सिस्टीमच्या ध्वनीमर्यादेबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासनाने ध्वनीमर्यादा 70 ऐवजी 90 डेसिबल करावी, अशी मुख्य मागणी या बैठकीत करण्यात आली. प्रशासनाने [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:46 pm

पक्षाची ताकद सिद्ध करण्याची संधी

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सूतोवाच : काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद बेळगाव : बागलकोट पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी नक्कीच विजयी होतील. ही जागा पुन्हा मिळविणे काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बागलकोट व दावणगेरे हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. या दोनपैकी एक जरी मतदारसंघ गमावला असता तर भाजप आम्हाला दोन वर्षे शांत बसू दिली नसती. यासाठी [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:45 pm

हिंडलगा न.पं. कार्यश्रेत्रात कचरा टाकल्यास दंड

स्वच्छता राखण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार, नगरपंचायत विकास अधिकाऱ्यांचे आवाहन वार्ताहर/हिंडलगा येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लोकसंख्या व उपनगरांची संख्या वाढल्याने शासनाने ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला असून, या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपंचायतचा अधिकार घेवून हजर झालेले विकास अधिकारी शांताप्पा हादिमनी यांनी गावच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले आहे. कार्यालयातील सर्व सफाई कामगार व कचरा गाडीतील [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:40 pm

बिद्रोळी खून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप

कारवार : हल्याळ तालुक्यातील बिद्रोळी येथील खून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा शिरसी येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र (कारवार आणि यल्लापूर पीठ) न्यायालयाचे न्यायाधीश किरण किणी यांनी ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय उर्फ आकाश कित्तुरकर, पांडूरंग कित्तुरकर आणि लता उर्फ तुसाई कित्तुरकर अशी आहे. या [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:37 pm

Satara Breaking |पाचगणी हादरलं! जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा; मुख्य सूत्रधार भरत घरत फरार

पाचगणी-वाईमध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा उघड पाचगणी -वाई तालुक्यात स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून भरत अनंत घरत याचे नाव तक्रारीनुसार पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:35 pm

वसंत व्याख्यानमालेला उद्यापासून प्रारंभ

उद्घाटन साहित्यिक-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील करणार बेळगाव : महिलांनी एकत्र येऊन तब्बल 50 वर्षे यशस्वीपणे चालविलेल्या वसंत व्याख्यानमालेला दि. 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन साहित्यिक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत. हेरवाडकर शाळेच्या [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:30 pm

शिवजयंतीसंदर्भात बापट गल्ली मंडळाची बैठक

अंकुश केसरकर यांचा मंडळातर्फे केला सत्कार बेळगाव : बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाची शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनंजय कणबरकर होते. या बैठकीमध्ये मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या बापट गल्लीतील युवा कार्यकर्ते अंकुश केसरकर यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 19 एप्रिल रोजी शिवजयंती व 21 एप्रिल रोजी चित्ररथ [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:28 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवाची जल्लोषी सुरुवात

आंबेडकर उद्यानापर्यंत मिरवणुकीने ज्योतीचे आगमन होणार बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उत्सवाची औपचारिक सुरुवातही करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवाचे नोडल अधिकारी उदयकुमार तळवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:26 pm

चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरण; पुणे-मुंबईतून पाच जणांना अटक

पैशांच्या वादातून दोन तरूणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण व सावर्डे येथे घडला होता. यातील चिपळूण प्रकरणी पुण्यातून एका तरूणाला अटक केली आहे. मात्र, तिघेजण पसार झाले आहेत. तर सावर्डेतील अपहरण प्रकरणी चौघांना अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रतीक भोसले ( ३०, रा. येरवडा-पुणे) असे अटक केलेल्या […]

सामना 11 Apr 2026 12:25 pm

शालांत परीक्षांचा निकाल जाहीर विद्यार्थी-पालकांची शाळांमध्ये गर्दी

बेळगाव : प्राथमिक व माध्यमिक शाळांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सरकारी, अनुदानित तसेच खासगी शाळांचा निकाल जाहीर झाल्याने शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून आली. सरकारी शाळांमध्ये ‘समुदाय दत्त’ या उपक्रमांतर्गत पालकांना पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी पहिली ते नववीपर्यंतचा निकाल शाळांमध्ये जाहीर करण्यात आला. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:25 pm

Gold Silver Rate –सोने चांदीच्या दरात चढउतार कायम; सोने दीड लाख, तर चांदी अडीच लाखांवर स्थिर

आखाती देशातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचे दर वधारून 1,52,360 रुपये (प्रति 10 ग्रॅम) झाले आहेत, तर २२ कॅरेट सोन्यासाठी 1,39,660 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या दरातही 1000 रुपयांची वाढ झाली असून […]

सामना 11 Apr 2026 12:20 pm

पदपथांवरील व्यावसायिकांना मंगळवारपासून मनपाचा ‘जोर का झटका’

पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम : अन्यथा संबंधितांवर दाखल करणार एफआयआर बेळगाव : शहर व उपनगरातील पदपथावर अतिक्रमण करण्यासह व्यवसाय थाटलेल्या मनपाकडून जोर का झटका दिला जाणार आहे. मंगळवारपासून विशेष मोहीम राबविली जाणार असून पदपथ अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत. यासाठी अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर पुढाकार घेणार असून अतिक्रमण हटवूनही पुन्हा त्या ठिकाणी व्यवसाय थाटल्यास संबंधितांवर [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:18 pm

अखेर समादेवी मंदिर समोरील तो खड्डा बुजविला

बेळगाव : ‘खड्डेच खड्डे चोहीकडे एलअॅण्डटीचे लक्ष कोणीकडे’ या मथळ्याखाली शुक्रवार दि. 10 रोजीच्या अंकात ‘तरुण भारत“मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर समादेवी गल्लीतील खड्डा बुजवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करून दिला आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 24 तास पाणी योजनेसाठी एलअॅण्डटी कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून जिकडे [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:16 pm

बेळगाव बार असोसिएशनसाठी 2 मे रोजी मतदान

बेळगाव : जिल्ह्यातील सर्व वकिलांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. दि. 2 मे रोजी बार असोसिएशनसाठी मतदान होणार असल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर हे अध्यक्षपदावर असताना अनेक नाट्यामय घडामोडी घडल्या. बेळगाव न्यायालयात बोगस वकिलांवर कारवाईकडे करण्याकडे दुर्लक्ष [...]

तरुण भारत 11 Apr 2026 12:15 pm

बालाजी क्लब, बेळगाव लायन्स विजयी

एसआरएस हिंदुस्थान चषक बेळगाव : एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली क्रिकेट मैदानावर एसआरएस चषक टी-20 स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या विविध सामन्यात बालाजी स्पोर्ट्स व बेळगाव लायन्स क्रिकेट क्लब संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजय संपादन केला. मिलिंद चव्हाण, व युसुफ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना बालाजी क्रिकेट क्लबने 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या. [...]

तरुण भारत 11 Apr 2026 11:57 am

महिलांचा मतदानात विक्रम; आसाम, केरळ, पुदुच्चेरीत पुरुषांनाही मागे टाकले

आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे गुरुवारी झालेल्या मतदानात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक विक्रम केला. या तिन्ही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात महिलांचे मतदान प्रमाण केवळ उच्चांकीच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. पुदुच्चेरीमध्ये तब्बल 91.4 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, तर आसाममध्ये 86.5 टक्के आणि केरळमध्ये 81.2 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. याउलट पुरुषांचे मतदान […]

सामना 11 Apr 2026 11:53 am

खादरवाडी येथे उद्या कुस्ती मैदान

वार्ताहर/किणये खादरवाडी येथील हनुमान तालीम कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने रविवार दि. 12 रोजी दुपारी 3 वा. मंडोळी रोड, खादरवाडी येथे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील मल्लांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकची कुस्ती कर्नाटक केसरी तालीम, कंग्राळी येथील कामेश पाटील व महाराष्ट्र [...]

तरुण भारत 11 Apr 2026 11:52 am

14 महिन्यांत 149 बिबट्यांचा मृत्यू, माहिती अधिकारातून धक्कादायक आकडेवारी उघड

मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या जानेवारीपासून एप्रिल 2026 पर्यंत म्हणजेच एकूण 14 महिन्यांत 149 बिबटय़ांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय दुबे यांनी यासंबंधी माहिती अधिकारांतर्गत काही प्रश्न विचारले होते. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये हिंदुस्थानात बिबटय़ांची […]

सामना 11 Apr 2026 11:50 am

Kokan News –आंबा घाटात करवंदे, जांभूळ विकून शिक्षणाचा खर्च भागविणारा युवक बनला महाराष्ट्र पोलीस..!

आंबा घाटातील अतिदुर्गम अशा दख्खन धनगर वाडी पूर्व येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आणि शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आंबा घाटात करवंदे,जांभूळ विकणारा युवक अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट पोलिस बनला आहे.मंगेश सोमा फोंडे असे या तरुणाचे नाव असून एन टी सी मधून त्याने जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळविले आहेत. मंगेश ज्या वस्तीत जन्मला आजही त्या […]

सामना 11 Apr 2026 11:49 am

आश्वासनांच्या गर्तेत अडकला तेंडोली -गोवेरी रस्ता

जीवघेण्या खड्डयांमुळे नागरिक त्रस्त ; १५ वर्षांपूर्वी झाली होती रस्त्याची डागडुजी वार्ताहर/कुडाळ कुडाळ तालुक्यातील तेंडोली-भोमपूल ते गोवेरी-म्हारसेवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरणाचा थर नष्ट झाल्याने खडी उखडली आहे. त्यामुळे रस्ता शोधणेच कठीण झाले आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था [...]

तरुण भारत 11 Apr 2026 11:44 am

एसी लोकलमध्ये टीसी दिसताच प्रवासी काढतात तिकीट, RailOne अ‍ॅपच्या त्रुटीमुळे रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी

नव्याने सुरू करण्यात आलेल्या RailOne तिकीट अ‍ॅपमध्ये गंभीर त्रुटी उघडकीस आली असून, प्रवासी चालत्या लोकलमध्ये असतानाही अनारक्षित तिकीट बुक करू शकत असल्याचे समोर आले आहे. या geo-fencing प्रणालीतील बिघाडामुळे तिकीट न घेता प्रवास रोखण्यासाठी ठेवलेली महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे (CR) प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त […]

सामना 11 Apr 2026 11:18 am

होडावडे येथील २२ वर्षीय युवकाची गळफासाने आत्महत्या

वेंगुर्ले – वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे – सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी डिसोजा (22) या युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अँथोनी याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र , उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवडाभरात सावंतवाडी तालुक्यातील चार युवकांनी [...]

तरुण भारत 11 Apr 2026 11:10 am

‘जन नायकन’लीक झाल्यानंतर रजनीकांत, कमल हासन आणि सूर्या यांनी कठोर उपाययोजनांची केली मागणी

तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विजय याची मुख्य भूमिका असलेल्या आणि प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या ‘जन नायकन’ या राजकीय थरारपटाची (पॉलिटिकल थ्रिलर) ऑनलाइन लीक झाला. यावर आता सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन आणि अभिनेता सूर्या यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या तिन्ही कलाकारांनी या घटनेबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची आणि पायरेसी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची […]

सामना 11 Apr 2026 10:45 am

सीआरपीएफमध्ये 9175 जागांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये एपूण 9 हजार 175 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांमध्ये तांत्रिक, ट्रेड्समन आणि पायोनियरच्या 9175 जागा भरल्या जाणार असून अर्ज प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू होईल. या भरतीची सविस्तर माहिती rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सामना 11 Apr 2026 10:44 am

भोपाळ मेट्रोचा फुगा फुटला! दिवसाला खर्च 8 लाख, कमाई 20 हजार

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या भोपाळमधील मेट्रोचा फुगा फुटला आहे. मेट्रो चालवण्यासाठी दररोज 8 लाख रुपये खर्च येत आहे, तर कमाई केवळ 15 ते 20 हजार रुपये होत आहे. प्रवाशांनी मेट्रो प्रवासाकडे पाठ फिरवल्याने मेट्रोला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मेट्रोचा ट्रक केवळ 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. यात सात स्टेशनांचा […]

सामना 11 Apr 2026 10:42 am