IPL 2026: पंजाब किंग्सचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शेवटच्या चेंडूवर फिरवला सामना!
आज चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये झालेला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईवर ४ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५५ धावांची खेळी केली, तर शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबेने फटकेबाजी […]
तुरुंगातून सुटकेनंतर सोनम वांगचुक कारगिलमध्ये करणार पहिलीच जनसभा, लडाखच्या हक्कांसाठी देणार लढा
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ५ एप्रिल रोजी कारगिलमध्ये एका मोठ्या जनसभेला संबोधित करणार आहेत. जोधपूर तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कारगिल दौरा असून, या सभेकडे संपूर्ण लडाखचे लक्ष लागले आहे. कारगिलमधील बारू येथील गांधी पार्क येथे सकाळी ११ वाजता ही सभा पार पडणार असून, कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सने या सभेची जय्यत तयारी केली आहे, असे […]
IPL 2026 –महेंद्रसिंग धोनीविना चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव; पंजाब किंग्सचा ५ गडी राखून विजय
आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला (CSK) सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नईने विजयासाठी दिलेले २०९ धावांचे आव्हान पंजाबने १९ व्या षटकात पूर्ण करत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. आयुष म्हात्रे आणि शिवम दुबेची फटकेबाजी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या […]
North India Earthquake दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांना भूकंपाचे धक्के
दिल्लीसह हरयाणा, पंजाब, जम्मू कश्मीर अशा उत्तरेकडील राज्यांना शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. ५.९ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते. बातमी अपडेट होत आहे.
दहा रुपयाच्या पाण्याच्या बाटलीसाठी इस्रायलमध्ये हिंदुस्थानींना मोजावे लागतात एवढे पैसे
हिंदुस्थानच्या रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन सुरू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया थेट 94 वर पोहोचला आहे. लवकरच रुपया शंभरी गाठेल असे देखील बोलले जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे हे मूल्य असताना इस्रायली शेलेकचा भाव देखील हिंदुस्थानच्या रुपयापेक्षा जास्त आहे. इस्रायलचा एक शेलेक म्हणजे हिंदुस्थानचे तीस रुपये आहेत. इस्रायलमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 5 ते 10 शेलेकच्या […]
हडपसरचा पाणीप्रश्न मार्गी, शिवसेनेचे नगरसेवक नितीन गावडे यांचा पुढाकार
पुणे महापालिकेतील शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते नितीन गावडे यांनी महापालिकेत निवडून जाताच हडपसर प्रभागा क्रमांक १६ मधील पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. येत्या १५ दिवसांत काळेबोराटे नगर येथील गजानन महाराज मंदिराजवळील पाण्याच्या टाकीमधून आणि गाडीतळ पीएमपीएल येथील टाकीमधूनही पूर्णपणे नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असून प्रभाग क्रमांक १६ मधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. गावडे यांनी […]
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. #WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray, along […]
थोडा वेळ मिळाल्यास आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकतो, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हणाले की, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करू शकेल. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. “आम्ही खूप प्रगती करत आहोत. थोडा अधिक वेळ मिळाल्यास, आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकतो,” असे ट्रम्प […]
चीनमध्ये असंतोषाचा भडका; विविध प्रांतांत निदर्शने आणि पोलिसांशी संघर्ष, सुरक्षा व्यवस्था कडक
चीनमधील विविध भागांत सध्या पर्यावरण, जमिनीचे वाद आणि प्रशासकीय समस्यांविरुद्ध जनतेचा मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. ‘द इपॉक टाइम्स’च्या (TET) अहवालाचा हवाला देत एएनआयने (ANI) प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चीनच्या अनेक प्रांतांत नागरिक आणि पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था प्रचंड कडक केली आहे. वुहानमध्ये बॅटरी प्रकल्पाला विरोध मध्य चीनमधील […]
पुण्यात झालेल्या पावसाने प्रशासनाचे अपयश दिसून आले, आदित्य ठाकरे यांची टीका
बुधवारी अवघ्या दोन तासांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुणे शहर पाण्यात गेले. सिंहगड रस्त्यावर नवश्या मारुती मंदिराच्या शेजारी फुले विक्रसाठी बसलेल्या महिलेच्या अंगावर झोड कोसळल्याने मृत्यू झाला. शहरात 82 ठिकाणी झाडे पडली. रस्ते तुंबले, वाहतूक ठप्प झाली, वीज गायब झाली. मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. या अवकाळी पावसामुळे पुण्याच्या झालेल्या परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव […]
लोटे औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करताना एका महिलेची गरम मातीने साडी व हात भाजल्याची घटना काही दिवसांपूवी घडली होती. उपचारादरम्यान तिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या एच.आर.मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, मालक व व्यवस्थापक अशा चौघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला बबन सोनवणे (४८) […]
दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम ३’ प्रदर्शनापूर्वीच कायद्याच्या अडकला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांबाबत (Digital Rights) एक अधिकृत नोटीस (Public Notice) जारी केली आहे. यामध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की, जर निर्मात्यांनी इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मशी करार केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे […]
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये पुढील ३० दिवसांसाठी सर्व सार्वजनिक वाहतूक (पब्लिक ट्रान्सपोर्ट) मोफत करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानात […]
बीड तालुक्याला सुसाट वार्यासह अवकाळीचा तडाखा, 50 घरांचे पत्रे उडाले; भर उन्हाळ्यात नदीला पूर
बीड तालुक्यात आज अवकाळी पावसाने आज हाहाकार उडवून दिला. सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाचा अनेक गावांना तडाखा बसला. जोरदार वार्यामुळे काही समजायच्या आतच ४० ते ५० घरावरील पत्रे उडून गेले. घराच्या दगडी भिंती पत्त्यासारख्या कोसळल्या. झाडे कोलमडली, उभी पीकं आडवी झाली आहेत तर भर उन्हाळ्यात नदी दूधडी भरून वाहू लागली. बीड तालुक्यातील वलीपूर, घाटजवळा, जवळा तांडा […]
अबू धाबीत क्षेपणास्त्र हवेतच नष्ट, कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे ५ हिंदुस्थानींसह १२ जण जखमी
संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथील अजमान (Ajban) भागात शुक्रवारी हवाई संरक्षण यंत्रणेने एक क्षेपणास्त्र (Projectile) यशस्वीपणे हवेतच रोखले. मात्र हे क्षेपणास्त्र रोखल्यानंतर याचे अवशेष निवासी भागात कोसळल्याने १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५ हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ दिले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत जखमी झालेल्या पाचही हिंदुस्थानी […]
इराणने अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडले, पायलटला जिवंत पकडल्याचा केला दावा
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याचा मोठा दावा केला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या निमलष्करी दलाने अमेरिकन हवाई दलाचे F-15E स्ट्राइक ईगल विमान पाडले असून, त्यातील पायलटला जिवंत पकडल्याचे म्हटले आहे. इराणची वृत्तसंस्था ‘तस्नीम’च्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, इराणने सुरुवातीला हे विमान अत्याधुनिक F-35 असल्याचे म्हटले होते. […]
डिझेल दर नियंत्रणासाठी जिल्हा नियोजनमधून अनुदान जाहीर करा
गाबीत फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू मोंडकरांची पालकमंत्र्यांकडे मागणी मालवण । प्रतिनिधी मच्छिमार व्यवसाय वाढीव डिझेल दरवाढीवर राज्य सरकारकडून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन निधीमधून अनुदान जाहीर करावे अशी मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली आहे. ते म्हणाले , मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले मत्स्य व [...]
अतिप्राचीन व नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुकादेवीच्या वासंतिक नवरात्रोत्सव यात्रेची सांगता शुक्रवारी ३ मार्च रोजी सायंकाळी भव्य वहन मिरवणुकीने करण्यात आली. तब्बल २४ तास चाललेल्या या मिरवणुकीत विदर्भासह राज्यभरातून लाखो भाविकांनी सहभाग नोंदवत भक्तीभावाचा महासागर अनुभवायला मिळाला. यंदाच्या यात्रेमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. गुरुवारी २ मार्च रोजी […]
युवा संदेश प्रतिष्ठानच्या एसटीएस परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्या हस्ते प्रकटन कणकवली / प्रतिनिधी युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधू रत्न टॅलेंट सर्च एसटीएस परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. सिंधूरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ही यादी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष [...]
रशियाचे SU-30 लढाऊ विमान क्रिमियामध्ये कोसळले; सुदैवाने पायलट सुरक्षित
रशियन हवाई दलाचे SU-30 हे अत्याधुनिक लढाऊ विमान शुक्रवारी क्रिमिया द्वीपकल्पावर कोसळले. असे वृत्त पीटीआयने (PTI) रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने दिले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असून, सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने या अपघाताला अधिकृत दुजोरा दिला आहे. हे विमान नियमित प्रशिक्षणासाठी (Routine training flight) निघाले […]
वाफोली पंचायतन मंदिरात पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा
२१ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त. भा. वृत्तसेवा बांदा वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य ‘पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा’ मंगळवार, दिनांक २१ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल या कालावधीत अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक विधी, होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले [...]
गंजेवाडी येथे अकरा शेळ्यांचा मृत्यू
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या 17 पैकी 11 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दिनांक 3 एपिल रोजी सकाळी उघडकीस आली. सहा शेळ्या गंभीर जखमी झाले आहेत. गंजेवाडी येथील शेतकरी महावीर मारुती गंजे हे आपल्या शेतात शेळीपालन व्यवसाय करीत असुन शुक्रवार (दि. 3) रोजी सकाळी ते शेतात आले असता शेडमधील 11 शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या. तर 6 शेळ्या जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पशुपालक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून आपल्या पशुंबाबत त्यांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील शेळ्या या सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या असल्याचे समजते. याच शेतकऱ्याचे लाखो रुपये नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी होत आहे. सध्या तरी या या शेळ्यांचा कशामुळे मृत्यू झाला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदरील मयत शेळ्यांचे सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या शेळ्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.
मुंगाव येथे अखंड वैदिक नाम यज्ञ सोहळा उत्साहात संपन्न
परंडा (प्रतिनिधी)- अखंड वैदिक नाम यज्ञ सोहळा महादेव मंदिर,मुंगाव ता.परंडा जि.धाराशिव येथे भगवान महादेवांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध भागातून आलेल्या कीर्तनकार,प्रवचनकार व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.अखंड नामस्मरण, भजन,कीर्तन व धार्मिक विधींमुळे परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल कुर्डूवाडी चे माणिकराजे श्रीरामे पृथ्वीराज पाटील, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के भैय्यासाहेब जानकर गोरक्षनाथ खरड पप्पू चोरमले प्राणजीत गवंडी उपस्थीत होते. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेले नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचने भाविकांना मंत्रमुग्ध करून गेले.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी हभप बाळासाहेब महाराज देशमुख ईट हभप अनुसयाताई पुरी मुगाव ,किर्तनकार बालाजी महाराज बोराडे परंडा सर्वांच्या कीर्तनाने प्रबोधनाने पंचक्रोशीतील भाविकांचे प्रबोधन झाले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री तुळजाभवानी मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ,भजनी मंडळ युवा नेते संतोष हिवरे यांच्या सहकार्याने करण्यात आले.सर्वांच्या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला हा भक्तीमय किर्तनकारांच्या प्रवचणाचा हजारो भावीकांनी लाभ घेतला.
ओटवणेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य : संजू परब
ओटवणे गावठाणवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ ओटवणे : प्रतिनिधी ओटवणे गावाच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षात लाखो रुपयांचा निधी देण्यात आलेला असून यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून ओटवणे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ओटवणेवासियांना दिली.माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यामार्फत जिल्हा [...]
यशस्वी परदेश दौऱ्यानंतर गुरुवर्य डॉ.अशोक मोहेकर यांचा डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्याकडून सत्कार
परंडा(प्रतिनिधी)- गुरु-शिष्य परंपरेचे सुंदर उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जेव्हा शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले गुरुवर्य डॉ.अशोक मोहेकर यांच्या यशस्वी परदेश दौऱ्यानंतर त्यांचे शिष्य डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी त्यांचा मनापासून सत्कार केला. शिक्षण महर्षी गुरुवर्य ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंबचे माजी प्राचार्य तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेचे सचिव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिवचे माजी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. अशोक मोहेकर हे गेल्या काही महिन्यांपासून सपत्नीक परदेश दौऱ्यावर होते. या कालावधीत त्यांनी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा अभ्यास करून आपला दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. या यशस्वी परदेश दौऱ्यानंतर त्यांचे शिष्य व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी कळंब येथे जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी डॉ.अशोक दादा मोहेकर यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांनीही आपल्या शिष्याचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले व भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली. या सत्कार समारंभाला डॉ.विद्याधर नलवडे यांचीही उपस्थिती लाभली.सत्कार समारंभाचा कार्यक्रम अतिशय साध्या पण उत्साही वातावरणात पार पडला. गुरु-शिष्य नात्याची परंपरा जपणारा हा प्रसंग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.
Israel Iran War –अडकलेल्या फ्रेंच जहाजाचा होर्मुझमधून प्रवास; इराणची फ्रान्सला भेट, जाणून घ्या कारण…
अमेरिका, इस्रायल इराण युद्धाची तीव्रता आणि त्यातील संभ्रम अधिक वाढ आहे. त्यातच युरोपीय देशांनी अमेरिकेला सहकार्य करण्यास नकार दिल्याने अमेरिका आणि इस्रायल एकाकी पडले आहेत. फ्रान्सनेही या युद्धात अमेरिकेला सहकार्य करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. आता त्यांना त्याचे फळ मिळाले असून इराणने फ्रान्सला मोठी भेट दिली आहे. फ्रान्स नाटोचा एक जवळचा मित्र देश आहे, […]
रेडीरेकनर दराबाबत बांधकाम संघटनांकडून स्वागत
मालमत्तेच्या मूल्यांकन सुसूत्रेबाबत निर्णय न झाल्याने नाराजी ; ‘क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांचे मत सावंतवाडी । प्रतिनिधी राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या वर्षीचे चालू बाजारमूल्य दर (रेडीरेकनर) कायम ठेवले आहेत. या दरात वाढ न करण्याच्या निर्णयाचे बांधकाम संघटनांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, मालमत्तेच्या मूल्यांकनात अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याबाबत राज्य सरकारने काहीच [...]
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठीच केंद्र सरकारने महिला आरक्षण आणि सीमांकन (Delimitation) संबंधित विधेयके मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले असल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला आहे. हे पाऊल निवडणूक आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, “नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३ मंजूर […]
अजय देवगणने वाढदिवसानिमित्त स्वतःला दिली खास भेट; ताफ्यात दाखल झाली एवढ्या कोटींची आलिशान मर्सिडीज
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या शाही जीवनशैलीसाठीही ओळखले जातो. 3 एप्रिल रोजी अजय देवगण याने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी त्याने स्वतःला एक खास भेट दिली आहे. अजय देवगण याने आपल्या कार कलेक्शनमध्ये 1.40 कोटी रुपये किमतीची आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास’ समाविष्ट केली असून त्यांच्या कार संग्रहात […]
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध आता होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत पोहोचले आहे. या मार्गावर इराणचे प्राबल्य आहे आणि जहाजांकडून वसुलीसाठी त्यांनी टोलनाका उभारला आहे. आता अमेरिकेने वसुलीचे ठिकाण असलेल्या केशम बेटावर बॉम्बहल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणच्या केशम बेटावरील बंदराच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याची पुष्टी उपग्रह प्रतिमांनी केली आहे. रॉयटर्सने कोपर्निकस सेंटिनेल-२ प्रतिमांचा हवाला देत वृत्त […]
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी १२ एप्रिलला भव्य परिषद
“शेती वाचवा, शेतकरी वाचवा” परिषदेचे कोल्हापूर -शाहूवाडीत आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी दक्षिण महाराष्ट्र व कोकणातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” ही भव्य परिषद येत्या १२ एप्रिल रोजी शाहुवाडी, जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध या परिषदेत तीव्र एल्गार पुकारला जाणार आहे.अशी माहिती परिषद संघटक समितीचे प्रमुख कॉ. [...]
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : 130 टक्के उद्दिष्ट पूर्ण
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्राने सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्त्वाकांक्षी योजनेत 130 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रशासनातील समन्वय यामुळे संपूर्ण यंत्रणेला नवी दिशा मिळाली.विशेषतः प्रलंबित प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी बँक अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठका आणि दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर झाले.परिणामी,अनेक प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळून लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित नसून,ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी एक प्रभावी संधी आहे.या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला गती मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतिशील व संवेदनशील दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील शेकडो होतकरू युवक-युवतींच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, रोजगार निर्मिती क्षेत्रात जिल्ह्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
बातमी छापली म्हणून पत्रकारास जीवे मारण्याची धमकी संरक्षण देण्याची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- बोगस खतनिर्मिती कारखान्याची बातमी का लावतोस म्हणून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार सर्जेराव गायकवाड यांनी निवेदन देऊन केले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायजर व महीन्द्रा कार्प सायन्सेस या दोन नावाने एकच बोगस खतनिर्मिती व विक्रीचा कारखाना असुन आगस्ट,/ सप्टेंबर 2025 मध्ये मी पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवला व शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारा तो कारखाना बोगस खत असल्याचे निष्पन्न झाले व तो बंद करण्यात आला. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. परंतु अधुन मधुन रात्री अपरात्री व दिवसा कारखाना उघडला जात होता व माल लंपास केला जात असल्याचे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांना कळवलेही होते. दि.01 एप्रिल 2026 रोजी दु. 1 ते 2 वा. दरम्यान कारखान्याचे शटर उघडुन गाडी भरत असल्याचे निदर्शनास आले. मी व्हिडिओ चित्रीकरण केले व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना कल्पना देऊन माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध करताच संबंधितांनी दु 4.35 वा.फोन करुन बातमी का दिली म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
8 हजाराची लाच घेताना वेतन विभागाचे अधिक्षक अटक
धाराशिव (प्रतिनिधी)- वेतनाचा फरक काढून देण्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव येथील पठाण इम्रानखान अहमदपाशा यास 8 हजार रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीस वेतनमधील फरक काढून देण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच पठाण यांनी मागितली होती. त्यानंतर या संदर्भातील फिर्याद लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडे लेखी करण्यात आली. फिर्यादी यांची सन 2016 ते सन 2024 दरम्यानच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा वेतनाचा फरक 1 लाख 84 हजार 600 रूपये लवकर काढून देण्यासाठी पठाण याने पैशाची मागणी केली होती. त्यांच्यात तडजोड होवून 10 हजार रूपयांच्या ऐवजी 8 हजार रूपयांची मागणी पठाण यांनी केली. लाच लुचपत प्रतिबंधक पथक धाराशिव यांनी सापळा लावल्यानंतर सेट्रल बिल्डींगमधील अधीक्षक कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्या कॅबीनमध्ये पंचासमक्ष 8 हजार रूपये स्विकारताना पठाण यास पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस निरीक्षक विजय वगरे व त्यांच्या पथकात पाटील, जाधव, करडे, तावसकर, हजारे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे करीत आहेत.
भगवंताला आपलस करण्यासाठी परमभक्तीची गरज- ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर
कळंब (प्रतिनिधी)- भगवंताला आपलसं करण्यासाठी परमभक्ती करावी लागते यामुळे भगवंताशी एकरूप झाल्याने भक्त पूर्णपणे देवात विलीन होतो. हीच अद्वेत अनुभूती आहे या परमभक्तीमुळे अहंकार नष्ट होतो असे विचार ह. भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज हसेंगांवकर यांनी कळंब येथील कसबा पेठ भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी (2 एप्रिल) रोजी काल्याचे किर्तन सेवा प्रसंगी केले. किर्तन सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानेश्वरीतील संत ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग- गवळण, “आपुलेनि भारे श्रीरंग डोलत गेले“ “अवचिते पाचारिले पाठिमोरे“यावर स्पष्टीकरण करताना व्यक्त केले. भगवंताचे महत्त्व स्पष्ट केले. जगात सत्ता ,पैसा याने शासन, प्रशासन ,समाज सुधारू शकत नाही ही ताकत फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे वारकरी संप्रदाय विश्व संप्रदाय बनावा , बुवाबाजी, ढोंगीपणा यावर वारकरी सांप्रदायातील संतांनी कडवट टीका केली आहे, असे प्रतिपादन केले तसेच त्यांनी संतश्रेष्ठ गोरोबा काका समाधी सोहळ्यानिमित्त तेर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. दुपारी 10 ते 12 या वेळेत काल्याच्या किर्तनास भाविकांची मोठी उपस्थिती होती. कळंब येथे 26 मार्च ते 2 एप्रिल हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला 2एप्रिल रोजी सूर्योदय समयी हनुमान जन्मोत्सव मा ेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भक्तांनी लाडु,पेढे, प्रसाद वाटप केला यानंतर ह.भ.प. ज्ञान सिंधू संदीपान महाराज हासेगांवकर यांचेकाल्याचे किर्तन झाले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आचार्य विनोद शास्त्री महाराज वृंदावन निवासी यांनी शिवपुराण कथा, मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन सेवा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, आदी कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसाद पंगत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी आप्पा कापसे, नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांच्यावतीने देण्यात आली.
आंद्रूड येथे देवा थापाच्या कुस्तीचा थरार
भूम (प्रतिनिधी)- आंद्रूड येथील जगदंबा देवी यात्रा उत्सव निमित्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुस्त्याचा भव्य दिव्य फड भरवण्यात आला होता. परिसरातील नामांकित पैलवानासह सुप्रसिद्ध नेपाळ येथील देवा थापा सह कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. पैलवान देवा थापा याची चित्त थरारक कुस्ती पार पडली.सर्व प्रेक्षकांची मने थापा याने जिंकली. अतिशय उत्साहामध्ये हा यात्रा उत्सव पार पडला. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. धनंजय सावंत आवर्जून उपस्थित होते. तसेच याच गावचे मा.जिल्हा परिषद सदस्य प्रा.ज्ञानेश्वर गिते, उपसरपंच निवृत्ती तावरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाजीराव लिमकर, दादासाहेब फौजी लिमकर, सुनील लिमकर साहेब, संजय लिमकर, रामलिंग लिमकर, माऊली वालेकर, जीवन लिमकर, उद्धव लिमकर, परमेश्वर गीते, शिवाजी लिमकर, अभिमान लिमकर, सुग्रीव लिमकर, भास्कर लिमकर, पांडुरंग लिमकर आदी जेष्ठ गावकरी गावकरी मंडळी तसेच युवामंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- बैठकीत विविध योजनांची प्रगती, अंमलबजावणी आणि येणाऱ्या अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची स्थिती, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, तसेच विंधन विहिरी अधिग्रहण यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय इमारतींचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा तसेच इतर इमारतींचे निर्लेखन, दुरुस्ती व नव्या बांधकामासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची सद्यस्थिती, त्यामध्ये आशा कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, तसेच आयुष्यमान कार्ड वितरणाची प्रगती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव प्रियंवंदा महाडदळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, समाज कल्याण सभापती विश्वास कोकणे, पंचायत समिती सभापती गोकर्णाताई कदम, उपसभापती प्रमोद पाटील, तसेच तालुक्यातील सन्माननीय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अनंत कुंभार, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) कटकधोंड, शिक्षणाधिकारी (प्रा) खंदारे, गट विकास अधिकारी पं.स. धाराशिव संतोष नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व विभागांनी समन्वय साधून विकासकामांना गती देत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
नगराध्यक्षांनी मागितली शहरवासियांची माफी- संयोगिता गाढवे
भूम (प्रतिनिधी)- जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शहरातील नागरिकांचे पाण्या वाचून हाल होणार आहेत. उन्हाळ्यात त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. एकंदरीत एक एप्रिल पासून पाणीपुरवठा, विद्युत विभाग, उद्यान विभाग यावर कार्यरत असणारे रोजंदारी कर्मचारी कमी केल्याने शहरवासियांना जो त्रास होत आहे त्याबद्दल नगराध्यक्ष म्हणून मी शहरवासीयांची दिलगिरी व्यक्त करते असे म्हणून, यावेळी नगराध्यक्ष संयोगीता गाढवे यांनी शहरवासीयांची माफी मागून शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र बसून शहराचा विकास करावा असे आवाहन नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी पत्रकार परिषदेत केले. भूम नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे उपस्थित होते. भूम नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतरही नगरपालिकेचा कारभार अद्याप पर्यंत ही सुरळीत चालू झालेला नाही. नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी रोजंदारी वर काम करत होते. त्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र त्या ठिकाणचे कर्मचारी यांचे काम जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या आडमुट्या भूमिकेमुळे थांबवले आहे. शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत राहणे उन्हाळ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आम्ही जी कामे शासनाकडून मंजूर करून आणलेली आहेत ती कामे शहरांमध्ये करू द्यायची नाही. आणि नवीन कामे मंजूर करा असा तगादा सभागृहामध्ये लावायचा अशी भूमिका या नगरसेवकांची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भूम शहरातील सर्वच कामांची चौकशी शासनाने केली आहे. त्यामध्ये चुकीचे असे काहीही आढळलेले नाही. भूम शहराला अमृत 2 ही पाणीपुरवठा योजना मंजूर झालेले आहे. बहुतांश काम देखील या योजनेचे पूर्ण झालेले आहे. मात्र जनशक्तीचे नगरसेवक दुसऱ्या पाईपलाईनची मागणी सभागृहामध्ये करत आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना शासनाने दिल्यानंतर शासन दुसरी योजना देऊच शकत नाही.
भाविक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक; व्हिडिओ व्हायरल
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीने आता चिंताजनक रूप धारण केले आहे. चैत्री पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीत वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवार (दि. 2) रोजी सकाळी धाराशिव रोडवर वाहतूक नियंत्रणादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना रस्त्यात उभी असलेली बस दिसली. याबाबत त्यांनी चालकाला जाब विचारला असता बसमधील प्रवासी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत जाऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अखेरीस पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. बसमधील भाविकांनी “आम्ही भांडणासाठी नाही, देवदर्शनासाठी आलो आहोत; मात्र अधिकाऱ्यांनी आम्हाला धक्का बुकी केली,” असा आरोप केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक भाविकांनी तो पाहिला आहे. यामुळे वातावरणात तणावाची भावना निर्माण झाली आहे. चैत्री पौर्णिमेसारख्या मोठ्या यात्रेदरम्यान वाहतूक नियोजन अपुरे वाहनतळ व्यवस्थेचा अभाव, पोलिस-भाविक संवादातील ताण या समस्यांमुळे परिस्थिती अधिकच बिघडताना दिसत आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची भावना जपणे आवश्यक आहे. पोलिसांनी संयमाने वागणे गरजेचे आहे. थोडाही तणाव वाढल्यास मोठा अनुचित प्रसंग घडू शकतो. अशी चर्चा सध्या तुळजापूर शहरात जोर धरत आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार, तसेच वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चैत्री पौर्णिमेत तुळजापूरात भाविकांचे हाल; पाऊस, वीजखंडित व अतिक्रमणांचा फटका
तुळजापूर (प्रतिनिधी)- चैत्री पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यंदा अवकाळी पाऊस, खंडित वीजपुरवठा आणि अतिक्रमणांमुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. अवकाळी पावसात अनेक भाविकांना भिजतच दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले. मंदिर परिसरात नारळ फोडल्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. त्यामुळे चालणेही कठीण झाले. अवकाळी पावसाच्या काळात काही काळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने भाविकांचे हाल झाले. शुक्रवार पेठकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग, फूटपाथवर बसलेले विक्रेते यामुळे भाविकांना मंदिराकडे जाणे अत्यंत त्रासदायक ठरले. नगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आले की विक्रेते तात्पुरते हटत, मात्र पथक गेल्यानंतर पुन्हा त्याच जागी बसत असल्याचे चित्र दिसले. चैत्री पौर्णिमेसाठी येणारे अनेक भाविक शुक्रवार पेठ पाण्याची टाकी परिसर, साळुंखे गल्ली, भोसले गल्ली या भागात वास्तव्यास असतात. मात्र यात्रा नियोजनात या भागांचा समावेशच नसल्याने मूलभूत सुविधांचा अभाव जाणवला. यंदा नव्याने सुरू झालेल्या हडको वाहनतळावर हजारो वाहने उभी राहतात. येथून मंदिर फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असल्याने बहुसंख्य भाविक शुक्रवार पेठ मार्गेच मंदिरात जातात, तरीही या मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकंदरीत, चैत्री पौर्णिमा यात्रा उत्साहात पार पडली असली तरी नियोजनातील त्रुटी, अतिक्रमण, पावसाचा फटका यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.
हनुमंत पुरी यांनी कुस्ती स्पर्धेत मिळवला चांदी गदा
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथील श्री. खोपेश्वर यात्रेनिमित्त भव्य असा कुस्त्यांचा फड भरवण्यात आला होता. सदरील कुस्त्यामध्ये धाराशिव, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी सहभाग घेतला होता. येथील जिल्हा परिषदेचे शाळेच्या मैदानावर दुपारी पाच वाजता सुरू झालेला हा आखाडा रात्री साडेबारा वाजता संपला. पहिले बक्षीस 71000 व चांदीची गदा व खोपेश्वर केसरीचा पट्टा ठेवण्यात आले होते. हे बक्षीस परंडा तालुक्यातील कंडारी येथील हनुमंत पुरी याने पटकावले. हे बक्षीस जिल्हा परिषद सदस्य दत्ता भोरे यांच्याकडून देण्यात आले होते. स्पर्धेतील दुसरे बक्षीस 61000 व स्मृती चिन्ह हे युवा उद्योजक गणेश थोरात यांच्याकडून ठेवण्यात आले होते. हे बक्षीस आष्टी येथील मनोज पवार व कुर्डूवाडी येथील रवी खैरे यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेतील तिसरे बक्षीस 51000 व स्मृतीचिन्ह बाळू बहिरवाल (पाली जी.बीड) व संदीप लटके (जामखेड) या दोघांना विभागुण देण्यात आले. हे बक्षीस पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्याकडून ठेवण्यात आले होते. चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 41000 हे संभाजीनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर मनोज सासवडे यांच्याकडून देण्यात आले होते. सदरील बक्षीस पवन गाडे व पृथ्वीराज वनवे (जामखेड) यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेतील पाचवे बक्षीस उमेश शिंदे डिघोळ व विकास गटकळ पाटोदा यांना विभागून देण्यात आले. हे बक्षीस शासकीय ठेकेदार प्रताप भोईटे 31000 यांच्याकडून ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला पंच म्हणून वस्ताद बाळासाहेब आवारे, विठ्ठल वाघमोडे, विठ्ठल देवकते, वसंत रसाळ, मामू जमादार, बप्पासाहेब चव्हाण, बापू खांडेकर, रघुनाथ वाघमोडे तर समालोचक म्हणून राशीन येथील युवराज सोलंनकर यांनी काम पाहिले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुनील देशमुख, सयाजी हुंबे, युवराज हुंबे, अक्षय शिंदे, शंभूराजे देशमुख, नामदेव माळी, सुभाष हुंबे, परमेश्वर डोके, केशव चव्हाण, उद्योजक बालाजी हुंबे,यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
गॅस टंचाईच्या काळात पर्यायी उर्जेचा प्रभावी वापर
भूम (प्रतिनिधी)- सध्या जानवत असलेल्या गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठे संकट ओढवले असताना भूम येथील निर्मल खवा उद्योग यांनी पर्यायी ऊर्जेचा प्रभावी वापर करत विकसित केलेल्या इंडक्शन तंत्रज्ञानामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळत आहे. या उपक्रमामागे विनोद जोगदंड यांचा दूरदृष्टीपूर्ण पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. सध्या गॅस सिलिंडरचा अपुरा व अनियमित पुरवठा, सतत वाढणारे दर, अचानक संपणारा गॅस आणि वेळेवर उपलब्धता न होणे या कारणांमुळे हॉटेल चालकांना रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांची वाढती गर्दी असतानाही स्वयंपाक थांबवावा लागणे, ऑर्डर उशिरा पूर्ण होणे, अतिरिक्त खर्च वाढणे आणि ग्राहक नाराजी यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर विनोद जोगदंड यांनी लाईटवर चालणारी अत्याधुनिक इंडक्शन मशीन तयार करून हॉटेल उद्योगाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात चपाती, भाजी, वरण, भात तसेच चहा यांसारखे पदार्थ जलद आणि सातत्याने तयार करता येत आहेत. त्यामुळे गॅस व डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे गॅसच्या तुलनेत सुमारे 60 टक्के खर्चाची बचत होत असल्याचे समोर आले असून वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
सातारा येथील 44वी कलाशिक्षण परिषदेत बोराडे, वाघ सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)-: महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद मोठ्या उत्साहात स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न झाली. या परिषदेत राज्यातील विविध भागांतील सुमारे 600 हून अधिक कलाशिक्षकांनी सहभाग नोंदवला. दोन दिवसीय परिषदेमध्ये कलाशिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, अध्यापनातील नाविन्य, तसेच शिल्पकला, चित्रकला, नृत्यनाट्य, गायन-वादन, हस्तकला व चित्रप्रदर्शन या विविध कला प्रकारांवर सखोल चर्चा व प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडख राज्यध्यक्ष नरेंद्र बाराई, कलासंचालक मुंबई किशोर इंगळे, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा चंद्रकांत दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कौस्तुभ गावडे, राज्य सल्लागार पी. आर. पाटील, हिरामण पाटील मुबंई, राज्य उपाध्यक्ष बलराम सामंत, राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे, राज्य सहसरचिटणीस प्रकाश पाटील, सातारा जिल्हा कलाध्यापक संघ कार्याध्यक्ष किशोर कुदळे, जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हासचिव विकास शेवाळे, सहसचिव सुनिल देसाई, कोषाध्यक्ष सागर सुतार, सहकोषाध्यक्ष राजेंद्र कुंभार, उपाध्यक्ष बाळासाहेब कचरे, सुनिल फरांदे, विभागीय उपाध्यक्ष एकनाथ कुंभार, पुणे जिल्हाध्यक्षा सौ.अश्विनी कदम, सचिव सुनिल बोरले, दादा लाड कोल्हापूर, लातूर विभागीय सहकार्यवाह दिलीप लाड तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. या परिषदेमुळे कलाशिक्षण क्षेत्रात नवीन विचारांची देवाण-घेवाण होऊन अध्यापनात अधिक सुसंगती व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होत. असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब , जिल्हासचिव शेषनाथ वाघ यांना सुनिल शेडगे लिखित साताऱ्याच्या सहवासात पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या समयी जिल्हाकार्याध्यक्ष शिवाजी भोसले , जिल्हाकोषाध्यक्ष किरण वाघमारे, कलाध्यापक दत्तात्रय खंडागळे उपस्थित होते. 44वी कलाशिक्षण परिषद कार्यशाळा भव्यदिव्य अनेक उपक्रमांने संपन्न झाली.
संत गोरोबा काका यात्रेच्या नियोजनासाठी बैठक संपन्न
तेर (प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा वार्षीक सोहळ्यासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनेचा आढावा नायब तहसीलदार महादेव शिंदे यांनी घेतला. सहा एप्रिल पर्यंत पुर्ण तयारी झाली पाहिजे अशी सुचना शिंदे यांनी केली आहे. 30 मार्च रोजी तेर येथील संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात विविध शासकीय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संत गोरोबाकाका व शिवमंदिर समितीचे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार महादेव शिंदे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, पोलिस उपनिरीक्षक किशोर माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ गुरूबस शेटे, जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शाम पाटील, मंदिर समितीचे निरीक्षक अतुल नळणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याञेत गोरोबा काकांच्या समाधीचे दर्शन सुलभ होण्यासाठी मुख दर्शन,व,धर्म दर्शनासह भाविकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे मंदिर समितीच्या प्रशासक रूपाली कोरे यांनी सांगितले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व याञा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलिस विभागाने पोलिस उप विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक, छेडछाड विरोधी पथक, अवैध धंदे विरोधी पथक यासह पोलीस, होमगार्ड आदी 250 पोलीस कर्मचारी बंदोबस्तास ठेवण्यात आले असल्याचे माहिती ढोकीचे पोलिस उपनिरीक्षक किशोर माळी यांनी बैठकीत दिली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, महिला,पुरुष यांच्या साठी स्वतंत्र अंघोळीची सोय, याञेतील स्वच्छता, पाणी पुरवठा याचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब खोचरे व उपसरपंच श्रीमंत फंड यांनी ही उपाययोजनेची बैठकीत माहिती दिली. यावेळी महावितरण, परिवहन महामंडळ, महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्नीशामक विभाग कळंब, आरोग्य विभाग यांनी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी महसूल मंडळ अधिकारी शरद पवार, ग्राम अधिकारी प्रशांत देशमुख, तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रदीप मुरळीकर, पोलीस पाटील फातेमा मनियार, विलास माळी, वारकरी फडकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज तांबे, साहेबराव सौदागर, सुधाकर बुकन,संगिता डोलारे, अजित कदम, किशोर काळे, विवेकानंद नाईकवाडी, अमोल कसबे, गणेश फंड, धनंजय आंधळे, विजयकुमार खांडेकर, साहेबराव डक, अमोल सावंत, दैवशाला भोरे, राणी शिराळ, कविता आंधळे, मिरा गाढवे, अलका नाईकवाडी, सुषमा सरवदे, मुमताज तांबोळी आदी उपस्थिती होती. सुत्रसंचलन राजाभाऊ आंधळे यांनी केले.
सोमवल्ली प्रसादासाठी प्रचंड गर्दी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाच्या ठिकाणी 2 एप्रिलला सोमवल्ली प्रसाद घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती. सोमवल्ली म्हणजे पृथ्वीतलावरील अमृत आहे. ती दिव्य औषधी वनस्पती आहे. पूर्ण भारतामध्ये दुर्मिळ आहे. पण धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथे सोमवल्ली मिळते. त्या सोमवल्लीचे पूर्ण तीन दिवस देशातून आलेल्या विद्वान ब्राह्मणाकडून त्रुग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाने अभिमंत्रण करून 2 एप्रिलला त्या सोमवल्लीचे हवण करण्यात आले. निरोगी आयुष्यासाठी, असाध्य रोग निट होण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या सोमवल्लीचा प्रसाद सर्व उपस्थित भाविक भक्तांना वाटत करण्यात आला. सोमवल्ली वनस्पती डोंगराळ भागात व कमी पाण्यावर येते व ती पान विरहीत रहाते. या सोमवल्ली वनस्पतीला प्रतिपदा ते पौर्णिमा एक एक पान येत जाते. तसेच प्रतिपदा ते अमावास्या एक एक पाण गळत जातात.परत हीच प्रक्रियामध्ये ही सोमवल्ली वनस्पती वाढत जाते..देश व विदेशातून सोमवल्ली वनस्पतीची माहिती घेण्यासाठी विद्वान येतात. देशात कोठेही सोमयाग यज्ञ आयोजित केला की सोमवल्ली ही धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथून घेऊन जातात.
बी सुरभी यांच्या मोरपीस व अवघा रंग काव्यसंग्रहांचे थाटात प्रकाशन
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार यांच्यातर्फे वडगाव (सि.) येथे कवयित्री बी सुरभी यांच्या मोरपीस व अवघा रंग या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे होते तर जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील तर जेष्ठ साहित्यिक कमलताई नलावडे, अक्षरवेल अध्यक्षा सुलभाताई देशमुख, जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देविदास पाठक, साहित्य भारतीचे कार्यवाह रवींद्र शिंदे, भैरवनाथ कानडे, सुनिता गुंजाळ कवडे, कृष्णा साळुंके, बी के कृष्णा दिदी, बी के प्रीती दिदी, बी के मीरा दिदी, संतोष वाडकर, कमलाकर कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यावर निघालेल्या चित्रपटात गीतकार म्हणून योगदान देणाऱ्या बी सुरभी यांनी लिहिलेल्या कवितांना असलेला अध्यात्मिक स्पर्श, कवयित्रीची वैचारिक उंची दर्शवते असे प्रतिपादन उद्घाटक युवराज नळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षिय समारोप करताना जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे यांनी बी सुरभी यांच्या काव्य लेखनाचा यथार्थ आढावा घेतला. उपसभापती प्रमोद पाटील, सुलभाताई देशमुख यांनीही यथोचित शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ रुपेशकुमार जावळे यांनी केले. याप्रसंगी साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देऊळवाडा स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी बसवली
उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांचा पाठपुरावा मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण मार्गांवरील स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी नगरपरिषद माध्यमातून बसवण्यात आली आहे. त्याठिकाणी असलेली गरज लक्षात घेता उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांच्या पाठपुराव्यातून काम पुर्ण करण्यात आले आहे. यावेळी कमा गांवकर, महेश गांवकर, अर्जुन चव्हाण, जगदीश गांवकर, पांड्या फणसेकर, भाई [...]
युवा जादूगार वैभव कुमार यांना इंडिया एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
पुणे येथील आर्टबीट्स फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार ओटवणे प्रतिनिधी ओटवणे येथील प्रसिद्ध युवा जादूगार वैभव कुमार (वैभव रामदास पारकर) यांना पुणे येथील आर्टबीट्स फाउंडेशनच्या आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले आहे. या संस्थेच्यावतीने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून [...]
अमृतकाळ नाही हा तर संकट काळ; संविधान धोक्यात! –अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देशात अमृतकाळ सुरू नसून संकटाचा काळ असल्याचे विधान केले आहे. तसेच देशाचे संविधान धोक्यात असून संस्था कमकूवत केल्या जात असल्याचा आरोप देखील केला आहे. आपला पक्ष या विषयावर तळागाळात जनजागृती करेल असे देखील त्यांनी सांगितले आहे. समाजवादी पक्षाच्यावतीने शुक्रवारी लखनौ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना अखिलेश यादव […]
पनीर खाताना तुम्हीसुद्धा अशा चुका करताय का?
पनीरला शाकाहारी प्रथिनांचा एक मुख्य स्रोत म्हणून पाहिले जाते. पण बऱ्याच जणांना हे कळत नाही की, पनीर ज्या पद्धतीने तयार केले जाते किंवा शिजवले जाते याकडे लक्ष द्यायला हवे. पनीर नैसर्गिकरित्या प्रथिनांनी समृद्ध असले तरी, स्वयंपाकघरातील काही दैनंदिन सवयी त्याचे पौष्टिक मूल्य कमी करू शकतात किंवा त्याच्या योग्य वापरामध्ये अडथळा आणू शकतात. पनीर जास्त आचेवर […]
Sangali News : बांबवडेत नारळाच्या झाडावर कोसळली वीज
विजांच्या कडकडाटासह सांगलीत पावसाची हजेरी पलूस : पलूस तालुक्यातील बांबवडे येथे गुरुवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात विजांचा कडकडाटासह आणि पावसाने दमदार हजेरी लागली. या दरम्यान काळात येथील जयवंत पवार यांच्या बागेत असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. विजेच्या प्रहारामुळे सुमारे ५० फूट उंचीचे नारळाचे झाड मोडून पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी [...]
नेरूर-कलेश्वर मंदिर येथे आज वसंत पूजा
नॅशनल अवॉर्ड विजेते शास्त्रीय गायक श्री.महेश काळे यांचा ‘स्वरसंध्या’ हा विशेष कार्यक्रम जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींची राहणार उपस्थिती त. भा. प्रतिनिधी / डिगस कुडाळ तालुक्यातील श्री देव कलेश्वर मंदीर नेरुर येथील प्रथम मानकरी असलेल्या मतकरी कुटुंबियांची वसंत पूजा आज दि. ३ एप्रिल रोजी श्री देव कलेश्वर मंदीर नेरुर येथे मोठ्या भक्तीभावाने संपन्न होणार आहे. या निमित्त [...]
Karad |साताऱ्यात सापडला ५४ वर्षांपूर्वीचा ठेवा! सायकल चालवण्यासाठी कर भरल्याचा ‘तो’पुरावा चर्चेत
साताऱ्यात नगरपालिका काळातील दुर्मिळ टोकन जतन सातारा : एकेकाळीसायकल चालवण्यासाठी कर भरण्याची प्रथा असलेल्या काळाची साक्ष देणारा दुर्मिळ ‘सायकल टॅक्स टोकन” सध्या चर्चेत आला आहे. १९७० च्या दशकातील हा धातूचा बिल्ला आज ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा नमुना मानला जात असून, सैदापूर येथील वखार मालक सावरमल जहांगीड यांनी तो [...]
Israel Iran War –इराणचा ओरॅकलवर हल्ला; गूगल, मेटावर हल्ला झाल्यास जगाची चिंता वाढणार
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्धाची तीव्रता वाढत असून जगाची चिंता वाढवणारी माहिती मिळत आहे. इराणने अमेरिकन टेक कंपनी ओरॅकलच्या युएईमधील केंद्रावर हल्ला केला आहे. ओरॅकल सध्या कर्मचारी कपातीच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे. कंपनीने हिंदुस्थानातून १२,००० लोकांना कामावरून काढून टाकले आहे आणि जागतिक स्तरावर ३०,००० जणांना नारळ दिला आहे. मात्र, आता याच कंपनीच्या केंद्रावर हल्ला केल्याचा दावा केल्याने ओरॅकल […]
कराडच्या प्रमुख चौकांतील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा कराड: कराड नगरपरिषदेच्याबतीने सोमबार पासून सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरुच होती. गुरुवारी पुन्हा बसस्थानक व दत्त चौक परिसरातील हातगाडे ताब्यात घेण्यात आले. तर दत्त चौकातून मुख्य बाजारपेठेतील वाहतूकीला अडथळा ठरणारे फलक काढण्यातआले. तीन दिवसांत कृष्णा नाका, कॉटेज [...]
भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या एसआयटी कोठडीत असून त्याचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याचे याआधी समोर आले होते. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत खरातचे थेट कॉल रेकॉर्डस बाहेर काढले आहेत. अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा गेल्या वर्षभरातील सीडीआर हाती लागल्याचा दावा केला आहे. […]
मोदींविरोधात बोलायला घाबरतात, डरपोक नेते देश वाचवू शकत नाहीत, ‘आप’चा राघव चढ्ढांवर हल्लाबोल
आम आदमी पार्टीने राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून काढून टाकले आहे. यानंतर त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या या कारवाईनंतर चढ्ढा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. गप्प करण्यात आलंय, पण पराभूत नाही, असे म्हणत त्यांनी ‘आम आदमी’ला खास […]
सोनम कपूरने शेअर केला नवजात बाळाचा पहिला फोटो; टीमचेही मानले आभार
बॉलिवुडची ‘स्टाईल आयकॉन’ अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा 29 मार्च 2026 रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी सोनमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोनमने तिच्या नवजात मुलाचा पहिला फोटो सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दाखवला आहे. या पोस्टमध्ये, सोनम कपूरने तिच्या बाळाचा एक […]
सैयारा नंतर अहान पांडे पुन्हा एकदा दिसणार यशराज फिल्म्स सोबत
सध्या अनेक मोठे बॉलिवूड चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. काही या वर्षी प्रदर्शित होतील, तर काहींना पुढच्या वर्षापर्यंत थांबावे लागेल. या यादीत अहान पांडेचा समावेश आहे, ज्याने २०२५ मध्ये आपल्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली. कमी बजेटच्या ‘सैयारा’ या चित्रपटाने जगभरात ५७० कोटींची कमाई केली. अहान पांडे आपल्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनला. त्यानंतर लगेचच, अहान पांडे आणि […]
Nashik |‘मला काहीच सांगायचे नाही’; न्यायाधीशांसमोर हात जोडणारा भोंदू खरात आता एसआयटीच्या ताब्यात
नाशिक एसआयटीच्या कारवाईत अशोक खरात ताब्यात नाशिक – नाशिकचा भोंदू अशोक खरातला आणि गर्भपाताच्या बलात्कार दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सुनावणी वेळी न्यायालयाने खरातला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. यावेळी ‘मला काहीही सांगायचं नाही, असे म्हणत त्याने न्यायाधीशांसमोर [...]
हिमाचलमध्ये हवामान बिघडले, लाहौलमध्ये पुन्हा हिमवृष्टी सुरू; सफरचंद बागायतदार चिंतेत
हिमाचल प्रदेशातील हवामान पुन्हा बिघडले आहे. लाहौल-स्पितीमध्ये हिमवृष्टी आधीच सुरू झाली आहे. ३ आणि ४ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाल्यामुळे, हवामान विभागाने चंबा, कांग्रा, मंडी, कुल्लू आणि शिमला येथे मुसळधार गारपीट आणि ताशी ५०-६० किमी वेगाच्या वाऱ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. किन्नौर आणि लाहौल-स्पिती वगळता सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी […]
राधानगरीत तरुणाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू राधानगरीः राधानगरीतालुक्यातील काळमाबाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा दूधगंगा नदीतील ‘काळोखा’ डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिषेक बाबासो कांबळे (वय २१, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) असे – मृत तरुणाचे नाव आहे. [...]
गेल्या तीन वर्षांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिने काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना ३६ महिने झाले तरी काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी अर्धवट काम आहे, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक,रेडियम नाहीत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अर्धवट काम यामुळे तीन वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बीड रोडवरील […]
आखाती देशांमधील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणमधील सर्वात उंच पुलावर केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या तेहरानने आखाती देशांमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून इराणने कुवेतच्या ‘मीना अल-अहमदी’ या अत्यंत महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला […]
जोतिबाची राजेशाही रूपात सुवर्णालंकारीक खडी महापूजा जोतिबा डोंगर : दख्खनचा राजाश्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्री महायात्रेला दहा लाखांवर भाविकांनी हजेरी लावली, चैत्र बारीतील श्री जोतिबा देवाचे रूप डोळ्यात साठवत भक्तगण आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं…’ च्या गजरात, चैत्र लगतचा गुरुवारी असंख्य भाविकांनी श्रीच्या दरबारात हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. [...]
अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच, अमेरिकेच्या संरक्षण विभागात मोठी प्रशासकीय खळबळ उडाली आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवले आहे. पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जनरल जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41 वे लष्करप्रमुख म्हणून तात्काळ प्रभावाने सेवानिवृत्त होत असल्याचे जाहीर केले […]
साबणापासून ते तेलापर्यंत सर्व काही महाग होणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. यामुळे बाजारात महागाईचा परिणाम दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर साबण, सोडा आणि खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील काही दिवसांतच महाग होण्याची शक्यता आहे. जलद गतीने विकल्या जाणाऱ्या ग्राहक वस्तू (FMCG) कंपन्या 2027 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून पुन्हा भाववाढ करण्यच्या तयारीत […]
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना रंगला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या लढतीत हैदराबादने कोलकाताचा 65 धावांनी केला आणि यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र, या विजयानंतर हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा वादाच्या भोऱ्यात अडकला आहे. आयपीएल 2026 च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली […]
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून मालवाहू जहाजांना प्रवासास इराणकडून बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या. या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासंदर्भातील निर्बंध अमेरिकेने उठवले. त्यानंतर हिंदुस्थानला इराणकडून कच्चे तेल मिळणार असल्याचे बोलले जात होते. यामुळे हिंदुस्थानला तब्बल सात वर्षांनंतर इराणमधून कच्चे तेल मिळणार अशी […]
शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या रेखांकनाला मंजुरी कोल्हापूर : राज्य शासनाचामहत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, राज्यातील तीर्थक्षेत्रे जोडणार्या शक्तिपीठ महामार्गातून जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते तर हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार असून, त्यासह सुधारित नव्या रेखांकनाला राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली. या नव्या रेखांकनानुसार, शक्तिपीठ आता [...]
नितीश कुमार कधी राजीनामा देणार? भाजपचा नवा मुख्यमंत्री कोण? अद्याप सस्पेन्स कायम
बिहारमधील सत्ताबदलाबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. नितीश कुमार यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिल्याने, त्यांचा दिल्ली दौरा आता निश्चित झाला आहे. मात्र, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कधी देणार? बिहारमध्ये भाजपचा नव मुख्यमंत्री कोण होणार? असे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. नितीश कुमार राजीनामा देताच त्यांना ‘झेड-प्लस’ श्रेणीची सुरक्षाही मिळणार असून, त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये नवीन […]
लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान जखमी होऊन बाहेर पडाव्या लागलेल्या कॅडेट्सच्या भविष्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या तरुणांना माजी सैनिकाचा दर्जा देता येईल का ? जेणेकरून त्यांना नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळेल, असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने या तरुणांच्या भविष्याबाबत […]
चंद्रावर जाण्याच्या प्रवासात ख्रिस्तिना बनल्या ‘स्पेस प्लंबर’; अंतराळातही दाखवलं कौशल्य!
चंद्रावर पहिले पाऊल ठेवून 54 वर्षे उलटल्यानंतर मानव आता पुन्हा चंद्राकडे झेपावला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने (NASA) आर्टेमिस-२ ही मोहीम हाती घेतली असून, यामध्ये चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने रवाना झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. चंद्रावर जाणारी पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान मिळवणाऱ्या ख्रिस्तिना कोच यांचे जगभरातून कौतुक होत आहे. ख्रिस्तिना कोच […]
कुरुंदवाड बायपासवर भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची पाठीमागून धडक, दोघे गंभीर जखमी
कुरुंदवाडजवळ ट्रॅक्टर-दुचाकी भीषण अपघात कुरुंदवाड – कुरुंदवाड येथील बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. विजय गुंडाप्पा कोळी (वय ४७) व अनिल तातोबा मालगावे (वय ५२, दोघे रा. शेडशाळ, ता. शिरोळ)अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सायंकाळी [...]
‘अप्सरा’ म्हणून जाळ्यात ओढले; अन् औषध देवून गर्भपात केला, भोंदू खरातला पुन्हा एसआयटी कोठडी
भोंदू अशोक खरातचे धक्कादायक कारनामे उघड होत आहेत. ‘तू अप्सरा आहेस’, अशी भूरळ घालून महिलेवर अत्याचार केला, औषध देवून तिचा गर्भपात केल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारी पुन्हा ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर भोंदूबाबा अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केले आहेत. सुरुवातीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन […]
प्रतीक्षा संपणार! 19 दिवसांनी केदारनाथचे दरवाजे उघडणार
उत्तराखंडमधील चार पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या केदारनाथचे दरवाजे लवकरच उघडणार आहेत. केदारनाथ धामचे दरवाजे २२ एप्रिलला सकाळी ८ वाजता भाविकांसाठी उघडतील. ही घोषणा महाशिवरात्रीच्या दिवशी १५ फेब्रुवारीला करण्यात आली. त्यानंतर केदार यांच्या पालखीच्या पूजेने यात्रेला सुरुवात होईल. गेल्या वर्षी २०२५ मध्ये २ मे रोजी केदारनाथचे दरवाजे उघडले. सुमारे सहा महिन्यांच्या दर्शन आणि पूजेनंतर, २३ ऑक्टोबरला […]
Gadhinglaj |कडगावच्या जवानाचा दिल्ली येथे अपघातात मृत्यू
कडगावचा जवान अक्षय चौगुले यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू गडहिंग्लज – कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील जवान अक्षय विलास चौगुले (वय ३३) यांचा दिल्ली येथील मेरठ युनिटमध्ये कार्यरत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री घरातून युनिटमध्ये जात असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात [...]
Phulewadi |पहाटेच्या सुमारास फुलेवाडी हादरली; रिंगरोडवरील सुपर बझारला आग, मोठे आर्थिक नुकसान
फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग फुलेवाडी -चंद्राई कालनी-फुलेवाडी, रिंगरोड येथील मुख्य मार्गावरील सुपर बझार मार्केटला गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास आग लागली या आगीत सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दत्ताने दिली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे [...]
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. विजय राठोड कोल्हापूर -राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करत सरकारने एकाचवेळी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात कोल्हापुरातील प्रमुख तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकाचवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांची बदली झाली आहे. त्यांच्या [...]
चरेगाव येथील श्रीराम मंदिर मूर्ती विटंबना प्रकरण; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चरेगावच्या श्रीराम मंदिरातील मूर्तींची तोडफोड, एकाला अटक उंब्रज – कराड तालुक्यातील चरेगाव येथे गुरुवारी २ रोजी श्रीराम मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्या प्रकरणी उंब्रज पोलीसांनी एकास ताब्यात घेतले असून संशयित आरोपीचे नाव ओमकार विलास शिलेवंत वय २३ राहणार चरेगाव ता. कराड असे आहे. दरम्यान संशयित आरोपी हा [...]
Antroli |अंत्रोळी प्रीमियर लीगचा जल्लोष; टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंत्रोळीमध्ये क्रिकेटचा उत्सव अंत्रोळी (समीर शेख ) : जय हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त अंत्रोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज (दि. ३ एप्रिल) उत्साहात पार पडले. पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणारी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात रंगणार आहे. स्पर्धेसाठी [...]
हीच ती वेळ, खूप उशीर होण्यापूर्वी करार करा; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणसाठी हीच वेळ आहे की त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वी करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकते. पण काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यासोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकन सैन्याने […]
लष्करप्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांची म्यानमारच्या कार्यवाहू राष्ट्रपतीपदी नियुक्ती
म्यानमारमधील राजकीय पेचप्रसंग अधिक गडद झाला असून, देशाचे लष्करप्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांनी आता अधिकृतपणे ‘कार्यवाहू राष्ट्रपती’ म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेलेले मागील कार्यवाहू राष्ट्रपती म्यिंट स्वे यांच्याकडून ही जबाबदारी हलाईंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. म्यानमारच्या लष्करी परिषदेने जाहीर केले की, देशाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवण्यासाठी लष्करप्रमुखांकडे हे सर्वोच्च पद सोपवण्यात […]
कणकवलीत ५ एप्रिलपासून दशावतार नाट्य महोत्सव
खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य प्रतिनिधी / कणकवली माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोककला असून या कार्यक्रमामुळे कणकवली [...]
बाई काय हा प्रकार…तब्बल 50 हजारांचे बेबी डायपर; लक्झरी फॅशन ब्रॅण्डची सोशल मीडियावर चर्चा
सोशल मीडियावर रोज नवनवीन फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता सध्या एका बेबी डायपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या डायपरची किंमत 50 हजार रुपये आहे. हे डायपर (Gucci) या लक्झरी फॅशन ब्रँडचे आहे. ७ डायपरच्या एका पॅकची किंमत 500 डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार सुमारे 50 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे एका डायपरची […]
अमेरिका-चीन संघर्ष समुद्रापर्यंत पोहचला; जहाजांना रोखण्यावरून दोन्ही देश आमने-सामने
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध पेटले असून आखाती देशासह जगाला याचा मोठा फटका बसत आहे. या संघर्षात आणखी भर पडली आहे. जगातील दोन महाशक्ती समुद्रात आमने-सामने आल्या आहेत. पनामाचा ध्वज असलेली जहाजे चीनमध्ये रोखली जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे अमेरिका-चीन संघर्ष आता थेट समुद्रापर्यंत पोहचला आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या शक्ती, अमेरिका आणि चीन, समुद्रातही […]
10 एप्रिल पासून कुडाळात दशावतार नाट्य महोत्सव
खा .नारायणराणेंच्या वाढदिवसानिमित सांगिर्डेवाडी येथे आयोजन कुडाळ – भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित विनायक राणे मित्र मंडळ व सांगिर्डेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 16 एप्रिल या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कुडाळ – सांगिर्डेवाडी येथील श्री महापुरुष गणपती मंदिर येथे हा [...]
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका वाढत चालला आहे. अमेरिकेने आत्तापर्यत केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा केला आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणची सैन्यशक्ती खिळखिळी केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. एका गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांनंतरही इराणची ताकद पूर्णपणे संपलेली नाही. अमेरिकन प्रशासनाची […]
मुंबई महापालिका प्रशासनाने प्रशासकीय काळात काढण्यात आलेली 1 हजार कोटी रुपयांची टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय राजवटीत नगरविकास खात्याच्या अखत्यारीत मोठा भ्रष्टाचार झाला आणि मुंबई लुटली गेली, असे राऊत म्हणाले. ते जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधत होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक […]
Isreal Iran War –आखातात युद्ध पेटलं, दुबईतील पर्यटन घटलं
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा पर्यटकांच्या संख्येवर विनाशकारी परिणाम झाला असून, दुबईतील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला आहे. गेल्या वर्षी दुबईने १ कोटी ९५ लाख ९० हजार (१९.५९ दशलक्ष) आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत केले होते; यामुळे दुबई हे जागतिक स्तरावर सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक बनले होते. मात्र, युद्धामुळे दुबईतील पर्यटकांची संख्या रोडावले आहेत. दुबईतील रेस्टॉरंट्स […]

28 C