झेडपी निकालांचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा ठाम विश्वास प्रतिनिधी/ पणजी जिल्हा पंचायत निवडणुकीत काही मंत्री व आमदारांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांना धक्का बसलेला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे.बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सरचिटणीस सर्वानंद भगत, ऊपेश [...]
पणजी, प्रतिनिधी : आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना अध्यक्षपदावरून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने हा निर्णय घेतला असून त्यासंबंधी आदेश बुधवारी जारी करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत श्रीकृष्ण परब यांना अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. परब हे सध्या राज्य आयोजन सरचिटणीस आहेत.
गृहनिर्माण प्रकल्पासाठी आमदाराने मागितले दहा लाख रूपये
सावियो रॉड्रिग्जचा पोस्ट व्हायरल प्रतिनिधी/ मडगाव गृहनिर्माण प्रकल्पासाठी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे दक्षिण गोव्यातून प्रथम निवडून आलेल्या एका आमदाराने 10 लाख ऊपयांची लाच मागितल्याची पोस्ट भाजपचे पूर्वीचे पदाधिकारी सावियो रॉड्रिग्ज यांनी सोशल मीडियावर टाकल्याने राज्यात खळबळ माजली आहे. यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना प्रदेश अध्यक्ष दामू म्हणाले की, सावियो रॉड्रिग्ज हे सध्या भाजपचे पदाधिकारी नाहीत. ते प्राथमिक [...]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे आर्थिक – शेअर बाजारातून धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक वातावरण – नातलग, मित्रपरिवाराच्या भेटीचे योग आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय […]
राज ठाकरे यांनी केली घोषणा : जागावाटप गुलदस्त्यात : महापालिका निवडणुकीत एकत्र काम करणार प्रतिनिधी/ मुंबई मराठी भाषेसाठी जुलै 2025 मध्ये काढण्यात आलेल्या मार्चात सहभागी झाल्यापासून युती होण्याची प्रतीक्षा असलेल्या उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या पक्षांची बुधवारी राजकीय युती जाहीर करण्यात आली. राज ठाकरे यांनीच ही घोषणा केली. मुंबई तसेच नाशिक महापालिकांसाठी ही युती आहे. [...]
आठ दिवसांत सहा मोबाईल आले कुठून?
हिंडलगा कारागृहातील गैरप्रकार उघडकीस प्रतिनिधी/ बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केवळ आठ दिवसांत सहा मोबाईल आढळून आले आहेत. कारागृहात आणखी मोठ्या प्रमाणात मोबाईल असल्याची माहिती मिळाली असून जामर असूनही कैद्यांचे मोबाईल कसे चालतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारागृहातील जामरचा हिंडलगा येथील नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. सोमवार दि. 22 डिसेंबर रोजी रात्री [...]
रोहित शर्माच्या शतकाने मुंबई विजयी
वृत्तसंस्था/ जयपूर येथे झालेल्या विजय हजारे करंडक गट क मधील सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने तडकावलेल्या शतकी खेळीचा जोरावर मुंबईने सिक्कीमचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करीत विजयी सलामी दिली. 94 चेंडूत 155 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला. सिक्किमने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मुंबईच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर त्यांना 50 षटकांत 7 बाद 236 धावा जमविता आल्या. [...]
इंडिगोच्या वर्चस्वाला आव्हान मिळणार
आणखी तीन विमान कंपन्या भारतात येण्यास सज्ज वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारताच्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक व्यवसायात सध्या ‘इंडिगो’ या कंपनीचे वर्चस्व आहे. या व्यवसायातला 60 टक्के वाटा इंडिगोचा आहे, अशी चर्चा आहे. तथापि, आता या वर्चस्वाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. तीन नव्या प्रवासी विमान वाहतूक कंपन्या भारतात येण्यास सज्ज असल्याचे वृत्त आहे. भारताच्या नागरी [...]
मटका बुकींविरुद्ध पुन्हा कारवाईला प्रारंभ
मार्केट-शहापूर पोलिसांकडून चौघांवर गुन्हा प्रतिनिधी/ बेळगाव विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्तानंतर पोलिसांनी मटका बुकींविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी मार्केट व शहापूर पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मार्केट पोलिसांनी जुन्या भाजी मार्केटजवळ मटका घेणाऱ्या तिघा जणांना अटक केली आहे. सादिक हाशीम हाजी, राहणार कसई [...]
अत्याचार प्रकरणात आरोपीला 10 वर्षांचा सश्रम कारावास
प्रतिनिधी/ बेळगाव प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 8 वे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नागराज धनपाल क्यामण्णावर असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश शिवपुत्र दिंडलकोप्प यांनी हा निकाल दिला आहे. आरोपी नागराज आणि पीडित तरुणीचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 8 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी ते एकमेकांना भेटले. [...]
सीमाप्रश्नाच्या सुनावणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा
मध्यवर्ती म. ए. समितीची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी प्रतिनिधी/ बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या खटल्याची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. या सुनावणीच्या तयारीसाठी वरिष्ठ वकिलांची बैठक, साक्षीदारांची शपथपत्रे याबाबतची रणनीती ठरवावी लागणार आहे. यासाठी तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. सीमाप्रश्नाचा खटला [...]
विधेयक संमत होताना राहुल गांधी कुठे होते?
माकप खासदाराने विचारला प्रश्न वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माकप खासदार जॉन ब्रिटास यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ‘चाय पे चर्चा’मध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा सामील झाल्याबद्दल त्यांनी टीका केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून आयोजित टी पार्टीत प्रियांका वड्रा सामील झाल्याने जनतेत [...]
नवीन वर्षापासून रेल्वे वेळापत्रकात होणार बदल
प्रतिनिधी/ बेळगाव नवीन वर्षापासून बेळगावमधून धावणाऱ्या काही लांबपल्ल्याच्या व पॅसेंजर रेल्वेंच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून हा बदल केला जाणार असून काही एक्स्प्रेसच्या वेगामध्ये वाढ केली जाणार असल्याने प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. बेळगाव-म्हैसूर विश्वमानव एक्स्प्रेस व बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेसच्या प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. बेळगाव-म्हैसूर रेल्वे फेब्रुवारीपासून सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. [...]
काँग्रेस समिती सफाई कर्मचारी विभाग जिल्हाध्यक्षपदी राजू साखे यांची निवड
प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस समितीच्या सफाई कर्मचारी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी राजू गंगण्णा साखे यांची निवड करण्यात आली आहे. यासंबंधी अध्यक्ष मुरळी अशोक सालप्पा यांनी पत्राद्वारे राजू यांना माहिती दिली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती व बेळगाव जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी काम करण्याबरोबरच पक्ष संघटनेवरही भर देण्याची सूचना [...]
गुरुवर्य पं.विकास कशाळकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त शनिवारी कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव गुरुवर्य पं. विकास कशाळकर यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने त्यांचे काही शिष्य पंडितजींनी रचलेल्या बंदिशांचे कार्यक्रम भारतातील विविध ठिकाणी सादर करताहेत. शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम आयएमईआरच्या सभागृहामध्ये बेळगावकरांसाठी आर्ट्स सर्कलतर्फे सादर होत आहे. सर्व रसिकांना कार्यक्रमास मोफत प्रवेश आहे. पं. डॉ. विकास कशाळकर हे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्राrय संगीत गायक [...]
यू-19 वर्ल्ड कपसाठी इंग्लंड संघ जाहीर
वृत्तसंस्था / लंडन इंग्लंडने आगामी आयसीसी 19 वर्षांखालील पुरूष क्रिकेट विश्वचषकासाटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये सॉमरसेटचा यष्टीरक्षक फलंदाज थॉमस रेव संघाचे नेतृत्व करणार आहे. तो अलिकडे इंग्लंड लायन्सच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात खेळला होता. फरहान अहमदने वेस्ट इंडिजविरूद्ध अलिकडील युवा एकदिवशीय मालिकेत रेवच्या अनुपस्थितीत 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते. तो उपकर्णधार असेल. डावखुरा फिरकी गोलंदाज [...]
‘आकाश नेक्स्ट जनरेशन’ची यशस्वी चाचणी
वृत्तसंस्था/ चांदिपूर भारतीय सैन्याने ओडिशातील चांदिपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे नुकतीच आकाश नेक्स्ट जनरेशन मिसाईल डिफेन्स सिस्टीमची (आकाश-एनजी) यशस्वी चाचणी केली. ही सिस्टीम आकाश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची प्रगत आवृत्ती आहे. देशाच्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जाते. आता भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्यात त्याचा समावेश करण्याची प्रक्रिया [...]
अमेरिकेला हवेत उच्चकुशल तंत्रज्ञ
ट्रम्प यांचे नवे व्हिसा धोरण, सामान्यांना नाही प्रवेश वृत्तसंस्था / वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या काम व्हिसा धोरणात व्यापक परिवर्तन करण्याची योजना सज्ज केली आहे. त्यानुसार अमेरिका आता केवळ उच्च दर्जाचे कौशल्य असणाऱ्या तंत्रज्ञांनाच अमेरिकेत कामासाठी व्हिसा देणार आहे. कमी वेतनाच्या आणि कमी कौशल्यपातळीच्या तंत्रज्ञांना यापुढे अमेरिकेत काम मिळणे कठीण होणार असल्याचे दिसून [...]
परंपरागत व्यवहारांपासून पर्यावरण शास्त्रापर्यंत सर्वत्र पाण्याला एक महत्त्वाचा स्त्राsत मानले जाते. पाण्याचा त्या दृष्टीने उपयोग व त्याचे महत्त्व समजून घेतानाच या क्षेत्रातील जाणकार व विषय तज्ञांनी देशांतर्गत लहान-मोठ्या आकाराच्या व मोठ्या संख्येत असणाऱ्या खाणींमध्ये उपलब्ध पाण्याचा उपयोग प्रसंगी पिण्याचे पाणी म्हणून सुद्धा होऊ शकतो असा अभ्यासपूर्ण पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्नांना सुरूवातदेखील झाली आहे. या [...]
वृत्तसंस्था / पामबीच (फ्लोरिडा) टेनिसची महान खेळाडू व्हीनस विल्यम्स आणि आंद्रेया प्रेटी विवाहबंधनात अडकले आहेत. याबाबत तिने सोशल मिडीयावर जाहीर केले आहे. विल्यम्स आणि प्रेटी यांनी फ्लोरिडा येथील पामबीच येथे आठवड्याच्या शेवटी पाच दिवसांच्या सोहळ्याचा भाग म्हणून पती-पत्नी म्हणून एकमेकांना स्वीकारले. जुलैमध्ये टूरस्तरीय एकेरी सामना जिंकणारी दुसरी सर्वात वयस्कार महिला ठरल्या. नंतर 45 वर्षीय व्हीनसने [...]
सहा महिन्यांत वैयक्तिक कर्जामध्ये 23 टक्के वाढ
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान देशात घर, कार आणि इतर ग्राहक गरजांसाठी कर्ज घेण्याच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल झाला आहे. जेएम फायनान्शियल्सच्या अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात मंदी आल्यानंतर उपभोग-आधारित बँक कर्जे वाढली आहेत. क्रेडिट कार्ड वगळता जवळजवळ सर्व विभागांमध्ये कर्जांची जास्त विक्री झाली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी हे सकारात्मक लक्षण आहे. [...]
शहरातील घरांमध्येही चालते नौका
600 वर्षे जुनी घरे- पूल योग्य स्थितीत माणसांनी नेहमीच पाण्याच्या आसपासच स्वत:ची घरे अन् वस्ती निर्माण केली आहे. परंतु काही ठिकाणी केवळ पाणी जीवनाचा आधार नव्हे तर संस्कृती आणि वास्तुकलेचा अविभाज्य अंग ठरते. इका शहरात घरामध्येही नौका चालविली जाते. 600 वर्षे जुने पूल अणि घरे आजही येथे उभी आहेत. चीनमधील सर्वात प्रसिद्ध जलनगरांपैकी एक झोउजुआंग [...]
अध्याय तिसरा ब्रह्मदेवानी लोकांना सांगितले की, स्वधर्माचे आचरण केल्याने देव तृप्त होतील आणि तुम्हाला प्रिय व हितकर अशा भोग वस्तू देतील. त्यांचा उपभोग घेण्याचा मोह तुम्हाला होईल परंतु त्यांचा उपभोग स्वत: घेण्यापूर्वी देवांचा वाटा त्यांना द्या. स्वधर्माचे पालन करून जे फळ मिळेल त्यांतून याचक, गरजू ह्यांना काही भाग देऊन उर्वरित भाग जे स्वत:च्या चरितार्थासाठी वापरतात [...]
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघात लेनॉक्सला संधी
वृत्तसंस्था / वेलिंग्टन डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज जेडेन लेनॉक्सला जानेवारीमध्ये भारताच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. काईल जेमिसन आणि मिचेल सँटनरचे संघात पुनरागमन झाले आहे. जेमिसन दोन्ही संघांमध्ये परतला आहे तर सँटेनरला केवळ टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. सँटनर मांडीच्या दुखापतीतून सावरत असल्याने त्याच्या रिटर्न टू प्ले योजनेचा हा एक भाग आहे. तो [...]
6.1 रिश्टर स्केलचा तैवानमध्ये भूकंप
चीन, फिलिपाईन्स, जपानपर्यंत जाणवले धक्के वृत्तसंस्था/ तैपेई तैवानमध्ये बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तैवानच्या हवामान खात्याने बुधवारी तैवानच्या आग्नेय किनारी काउंटी तैतुंग येथे 6.1 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त दिले. याचे धक्के चीन, फिलिपाईन्स आणि जपानपर्यंत जाणवले. मात्र, यात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती तातडीने देण्यात आली नाही. भूकंपामुळे राजधानी तैपेईमधील इमारती हादरल्या. अनेक लोक घर आणि [...]
चंदीगड महापौर निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का
दोन नगरसेविका भाजपमध्ये सामील वृत्तसंस्था/चंदीगड चंदीगड महापौर निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. आम आदमी पक्षाच्या नगरसेविका सुमन आणि पूनम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापौर हरप्रीत कौर बबला आणि वरिष्ठ नेते संजय टंडन यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेविकांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.महापौर निवडणुकीत विजयासाठी भाजपला 19 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते. वर्तमान काणत भाजपचे 16, आम [...]
विदेशी प्रवास, शिक्षण खर्चात झाली घट
आरबीआय आणि लिबरलाइज्ड रेमिटन्सअंतर्गत माहिती सादर : गुंतवणूक मात्र वाढल्याची नोंद नवी दिल्ली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत विदेशात जाणारे पैसे ऑक्टोबर 2025 मध्ये वार्षिक आधारावर 1.81 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. प्रवास आणि शिक्षण खर्चामुळे ते गेल्या वर्षीच्या 2.40 अब्ज डॉलर्सवरून 2.35 अब्ज डॉलर्सवर आले आहे. तथापि, परकीय [...]
आजचे भविष्य गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025
मेष: कामातील चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल. वृषभ: धनलाभ, स्वत:साठी वेळ काढा, मानसिक शांती मिळेल मिथुन: सकारात्मक विचारसरणी अंगी बाणा, कार्यालयीन काम फत्ते कर्क: अधिकाधिक ज्ञान व्यक्तिमत्वाला धार देईल सिंह: आशावादी राहा, कष्टाचे चीज होईल, आत्मविश्वास वाढेल, कन्या: आरोग्य तंदुरूस्त, गुंतवण्tक फायदेशीर ठरेल. तुळ: हरवलेला उत्साह परत मिळविण्यास फायदेशीर ठरेल वृश्चिक: आर्थिकस्थिती थोडी कमजोर होईल. [...]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत शिवसेना-मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा केली. वरळी येथील ‘ब्ल्यू सी’ या हॉटेलात भरगच्च पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी तर जल्लोष केलाच, परंतु दूरचित्रवाणी वाहिन्या आणि समाज माध्यमांवर हा क्षण पाहणाऱ्या […]
आता चुकू नका, फुटू नका नाहीतर संपून जाल! उद्धव ठाकरे यांचा मराठीजनांना इशारा
‘साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडण्याचे, मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती, त्यांचेच दिल्लीत बसलेले प्रतिनिधी यामागे आहेत. अशा वेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे लक्षात ठेवा. आता चुकाल आणि फुटाल तर संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका,’ असा सावधगिरीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]
गावकीला घाम फुटलाय, कारण…समाजमाध्यमांमध्ये शिवसेना-मनसे युतीचीच चर्चा
शिवसेना-मनसे युतीच्या ऐतिहासिक घोषणेच्या निमित्ताने अवघे वातावरण भारून गेले होते. समाजमाध्यमही यास अपवाद ठरले नाही. समाजमाध्यमात ठाकरेंच्या युतीचीच चर्चा होती. युतीची घोषणा होताच व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर मीम्सचा पूरचा आला. ठाकरे बंधूंना शुभेच्छा देतानाच नेटकऱयांनी विरोधकांची खिल्ली उडवली. ‘गावकीला घाम फुटलाय, कारण भावकी एकत्र आलीय,’ अशा प्रकारचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले. ही तर ‘शिवयुती’ समाजमाध्यमात अनेक […]
न्यायाची मागणी करणाऱया उन्नाव बलात्कार पीडितेसोबत पोलिसांनी आज केलेल्या गैरवर्तनावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘केवळ अर्थव्यवस्थाच मृत होतेय असे नाही तर समाजही मृतवत होत चालला आहे हेच दिसते,’ अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली. उन्नाव बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेला भाजप नेता कुलदीप सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर […]
…आणि पत्रकार परिषद ‘जनसभा’ ठरली! मुंबईत आवाज मराठीचा!
शिवसेना व मनसे युतीच्या घोषणेच्या निमित्ताने मुंबईत आज पुन्हा एकदा मराठीचा आणि ठाकरेंचा आवाज घुमला. युतीच्या घोषणेसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याने वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलबाहेर शिवसैनिक, मनसैनिक व मराठीप्रेमींची गर्दी उसळली होती. पत्रकार परिषदेचे सभागृह माध्यम प्रतिनिधी आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरले होते. आतमध्ये शिरायला जागा नव्हती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते बाहेरच उभे […]
ठाकरे ब्रॅण्ड! महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी वज्रमूठ, धूमधडाका जल्लोष आतषबाजी आनंदोत्सव
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला तो क्षण अखेर आला. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाली आणि राज्यभरात एकच जल्लोष झाला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. ढोलताशा वाजले, गुलाल उधळला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगरसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला. सकाळपासून दोन्ही पक्षांच्या शाखाशाखांमध्ये […]
आजपासून नवी मुंबईतून टेकऑफ! पहिल्या दिवशी 30 विमानांचे उड्डाण
नवी मुंबईतून हवाई प्रवासाचे स्वप्न उद्या तब्बल 18 वर्षांनी साकार होत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशी आणि कार्गो विमानसेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी 30 विमानांचे टेकऑफ या विमानतळावरून होणार असून सुमारे चार हजार प्रवाशी हवाई प्रवास करणार आहेत. या प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापाने जोरदार तयारी केली आहे. बंगलोर येथून […]
मुंबईत इच्छुकांची झुंबड! दोन दिवसांत 7 हजार अर्जांची विक्री
मुंबईत उमेदवारी अर्जांसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. पहिल्या दोन दिवसांत तब्बल 7009 अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच 4 हजार 165 अर्जांची विक्री झाली होती, तर आज दुसऱ्या दिवशी 2 हजार 844 अर्जांची विक्री पालिकेच्या निवडणूक कार्यालयांतून झाली. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत उमेदवारी अर्ज विक्री […]
नगराध्यक्षाला विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम – 1965मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षाला विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्यात […]
सामना अग्रलेख – महाराष्ट्र अखंड, मराठी एकत्र! लढू आणि जिंकू!!
सत्तेच्या जोरावर मराठी माणसाचे जास्तीत जास्त खच्चीकरण करण्याचे धोरण दिल्लीने स्वीकारले. भाजप व मिंध्यांचे लोक महाराष्ट्रावरील हे आक्रमण निमूटपणे सहन करीत आहेत. कारण त्यांची अवस्था दिल्लीच्या बुटचाट्यांसारखी झाली. या महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्यासाठी व मराठी जनांचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले हा महाराष्ट्रासाठी शुभशकून आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही, असे […]
शुद्ध हवा पुरवा, नाहीतर जीएसटी कमी करा! मोदी सरकारला हायकोर्टाने फटकारले
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली असताना एअर प्युरिफायरवर 18 टक्के जीएसटी लादणाऱ्या मोदी सरकारला बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले. प्रदूषणाची आपत्कालीन स्थिती असताना एअर प्युरिफायरवर जीएसटी का आकारताय? करात कपात का करू शकत नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने वेळीच द्यावे. जेव्हा हजारो लोक मरतील, तेव्हा जाग येणार का? लोकांना शुद्ध हवा पुरवा, नाहीतर जीएसटी […]
केंद्र सरकारची माघार,अरावली पर्वतरांगांत नवे खाणकाम बंद
अरावली पर्वतरांगांच्या क्षेत्रात नव्या खाणकामावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांच्या व राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधानंतर एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारने आज हा निर्णय घेतला. जगातील सर्वात प्राचीन असलेल्या अरावली पर्वतरांगा दिल्ली, हरयाणा, राजस्थान व गुजरातमधून जातात. या पर्वतीय प्रदेशात बेकायदा बांधकाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आधीपासूनच आहेत. त्यातच केंद्र सरकारने अलीकडे अरावली टेकडय़ा […]
लेख –नाताळ ही आमूलाग्र बदलाची सुरुवात
>> श्रीनिवास बेलसरे आज जगभर धार्मिक उन्माद, युद्धे, दुसऱयाचे हडपण्याची वृत्ती, निर्दय नरसंहार यांचा बोलबाला असताना येशूची शिकवण सगळ्या समस्यांवरचे औषध ठरू शकते, पण त्याच्या जन्माचा आनंद साजरा करताना किती जणांना तो या जगात का आला? त्याचा मुख्य संदेश काय होता? त्याचे शिष्य म्हणून मिरवण्यापूर्वी त्याच्या शिष्यत्वाचे कोणते निकष आपण पूर्ण करतो यावर कुणी विचार […]
आभाळमाया –‘कायपर’मध्ये दडलंय काय?
>> वैश्विक तसं पाहिलं तर आपला सूर्य हा विराट विश्वातल्या एका दीर्घिकेमधला सामान्य तारा. त्याच्या ‘परिवारा’तील आपल्या पृथ्वीसारखे ग्रह तर विश्वात नगण्य असेच. तरीसुद्धा या ‘सामान्य’ म्हटल्या जाणाऱया ताऱयाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची व्याप्ती जाणून घेतली तर तेही किती प्रचंड आहे हे समजेल… आणि असे अक्षरशः अब्जावधी किंवा त्याच्याही अनेक पटींनी ताऱयांनी खच्चून भरलेलं विश्वगण किती विराटाकार […]
तीन नव्या विमान कंपन्यांसाठी हिंदुस्थानचे आकाश खुले, इंडिगो-एअर इंडियाच्या मक्तेदारीला आव्हान
अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेस या दोन पंपन्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील ‘शंख एअर’ या कंपनीला यापूर्वीच एनओसी मिळाली असून ही कंपनी लवकरच सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे देशात नव्या वर्षात तीन नव्या कंपन्यांची सेवा सुरू होणार आहे. इंडिगो आणि एअर इंडिया दोन कंपन्यांकडेचं जवळपास 90 […]
‘इस्रो’च्या ‘बाहुबली’तून अमेरिकी उपग्रहाचे उड्डाण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा इतिहास रचला. इस्रोने आंध्रच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून अमेरिकेचा 6,100 किलो वजनाचा ‘ब्लूबर्ड ब्लॉक 2’ हा उपग्रह लाँच केला. एलव्हीएम-3 या बाहुबली रॉकेटने ही कामगिरी केली. प्रक्षेपणानंतर सुमारे 15 मिनिटांनी हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा झाला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 520 किमीवर लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थिरावला, अशी […]
विजय हजारे करंडकात शतकोत्सव, रोहित-विराटसह 22 फलंदाजांची शतके; समालची द्विशतकी खेळी वाया
हिंदुस्थानी संघातील दिग्गज खेळाडूंच्या सहभागामुळे कधी नव्हे इतके ग्लॅमर लाभलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच साखळी सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह 22 फलंदाजांनी शतके ठोकत शतकोत्सव साजरा केला. आज झालेल्या षटकार-चौकारांसह शतकांच्या वर्षावांनी हजारे करंडकाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज विजय हजारे करंडक स्पर्धेत […]
लोककलेचा जागर –सांस्कृतिक ओळखीचे जतन
महाराष्ट्रातील लोककला हा ग्रामीण जीवनाचा आत्मा मानला जातो आणि त्यांचे संवर्धन, जतन आणि पुनरुज्जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे. दशावतार, मेळे, नमन आणि भारूड या लोककलांनी समाजाला केवळ मनोरंजनच दिले नाही, तर संस्कार, श्रद्धा आणि सामाजिक संदेशही दिले आहेत. कोकणात प्रचलित असलेला दशावतार असो किंवा नमन ही देवतेच्या स्तुतीसाठी सादर केली जाणारी भक्तिनाटय़पर कला असो हे सगळे […]
गुडघेदुखीचा त्रास न होण्यासाठी…
आजकाल अनेकांना अगदी चाळिशीमध्ये गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र योग्य आहार आणि व्यायामाचा समावेश दिनचर्येत समावेश केल्यास त्रास कमी होऊ शकतो. तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेल्या काही टीप्स गुडघ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. गुडघा दुखत असल्यास विश्रांती घ्यायला हवी. धावणे, चालणे अशी कामे टाळावी. गुडघ्याभोवतीच्या स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करायला हवे. सायकल चालविणे, पोहणे आणि चालणे हे […]
‘खेलरत्न’साठी हार्दिक सिंगचे नामांकन! दिव्या, तेजस्विन, मेहुली अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत
हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड समितीने एकमेव नामांकन केले आहे. तसेच युवा स्टार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, ऐतिहासिक कामगिरी करणारा डेकॅथलिट तेजस्विन शंकर याच्यासह एकूण 24 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. योगासन खेळाडू आरती अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत 27 वर्षीय हार्दिक सिंग हा हिंदुस्थानी हॉकी संघाच्या मधल्या […]
हरमनप्रीत कौरने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 128 धावा केल्या. हिंदुस्थानकडून वैष्णवी शर्मा आणि नल्लपुरेड्डी चराणी यांनी प्रत्येकी 2-2 तर क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या […]
हिंदुस्थानी क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकत शिवाजी पार्क जिमखान्याने क्रीडा व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या यांच्याशी धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे. या भागीदारीतून सुरू होणारी ‘एसपीजी-रोझ मर्क क्रिकेट अकादमी’ ही उदयोन्मुख आणि गुणवान क्रिकेटपटूंना व्यासपीठ देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष तसेच एसपीजी रोझ मर्क क्रिकेट अकादमीचे समन्वयक […]
हिंदुस्थानी खेळाडूंची आयसीसी क्रमवारीत घोडदौड
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर जाहीर झालेल्या आयसीसी पुरुष खेळाडू क्रमवारीत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी लक्षणीय झेप घेतली आहे. ही मालिका हिंदुस्थानने 3-1 अशी जिंकत वर्चस्व सिद्ध केले. अहमदाबादमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत 231 धावांचा भक्कम डोंगर उभारला. या सामन्यात तिलक वर्माने 42 चेंडूंमध्ये 73 धावांची दमदार खेळी करत […]
बरगडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे (साईड स्ट्रेन) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ऑस्ट्रेलिया दौऱयातील ऍशेस मालिकेतील उर्वरित कसोटी सामन्यांतून बाहेर पडला आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी दिली. याचबरोबर ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचीही घोषणा करण्यात आली. आर्चरच्या जागी गस ऍटकिन्सनचा संघात समावेश करण्यात आला असून 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱया […]
शनिवारी जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘नवयुग श्री’ रंगणार
जे.जे. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी रुग्णसेवा करत असताना त्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्मचारी वसाहतीत कर्मचारी वर्गाला व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यायामशाळेमध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, सफाई कर्मचार्यांपासून सर्व कर्मचारी व त्यांची मुले व्यायाम करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. व्यायामशाळेच्या माध्यमातून दरवर्षी यंदाही नवयुग व्यायामशाळेच्या वतीने शनिवार, […]
प्रपोजल नाकारल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीचा केला विनयभंग, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
कर्नाटकातील बेंगळुरु येथील ज्ञानज्योती नगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने प्रपोजल नाकारल्याने भर रस्त्यात गाडी थांबून तरुणाने तिचा विनयभंग आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवीन कुमार एन असे […]
उन्नाव पीडितेने घेतली राहुल गांधींची भेट, केल्या तीन महत्त्वाच्या मागण्या
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार पीडितेने बुधवारी संध्याकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उन्नाव पीडितेने तिची आपबिती सांगितल्यानंतर राहुल गांधी व सोनिया गांधी हे भावूक झाले होते. या भेटीत पीडितेने राहुल गांधी यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. ”मला सर्वोच्च न्यायालयात माझी केस लढायला […]
” पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना मी मला भेटायचे आहे असे आवाहन केले होते. मात्र ते मला भेटले नाहीत”, अशी खंत उन्नाव बलात्कार पीडितेने व्यक्त केली आहे. पीडितेने राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ही खंत व्यक्त केली. मैंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह से मिलने की गुहार लगाई, […]
मॅरिज ब्युरोच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक
ग्वाल्हेरमध्ये दोन हाय प्रोफाईल फेक मॅरिज कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मायपार्टनर आणि यूनिक रिश्ते या दोन संकेतस्थळांवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळक्याचा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक केली आहे. ही टोळी mypartnerindia.com और uniquerishtey.co या नावाने संकेतस्थळ चालवत होती. ज्यावेळी कोणी इंटरनेट यूजर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचा, […]
इंडिगोच्या एकाधिकारशाहीला लागणार ब्रेक, दोन नवीन विमान कंपन्यांना केंद्राने दिली मंजुरी
अलीकडेच जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था कोलमडली, तेव्हा हजारो प्रवाशांना विमानतळांवर तासनतास वाट पाहावी लागली आणि अनेकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही. देशाच्या विमान वाहतूक क्षेत्र इंडिगोच्या एकाधिकारशाहीमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं बोललं जातं. यातच आता हिंदुस्थानी विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना मंजुरी दिली आहे. नागरी […]
दलित तरुणाशी लग्न केले, वडिलांनीच सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची केली हत्या
कर्नाटकातील हुबळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित मुलाशी लग्न केल्याने एका वडिलांनी आपल्या 20 वर्षांच्या गर्भवती मुलीची हत्या केली. लग्नापासून मुलगी तिच्या कुटुंबापासून वेगळी राहत होती. मात्र, सात महिन्यांनंतर ती तिच्या गावी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिची निर्घृण हत्या केली.या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी […]
निर्लज्जपणा! यूपीतील मंत्र्याने बलात्कार पीडितेची उडवली टिंगल
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या प्रकरणातील पीडिता दिल्लीतील इंडिया गेटजवळ आंदोलनाला बसली होती. तिला पोलिसांनी तेथून हटवले आहे. याबाबत पत्रकारांनी योगी सरकारचे मंत्री ओपी राजभर यांना विचारले असता त्यांनी हसत हसत पीडितेची टिंगल केली. या टिंगल टवाळीचा व्हिडीओ व्हायरल […]
बिबट्यांच्या हालचालींवर आता ‘एआय’ची नजर! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित
बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वनविभागातर्फे ‘एआय वाईल्ड नेत्र’ ही सौरउर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तात्काळ सावध करणे शक्य होणार आहे. वनपरिक्षेत्र […]
Vijay Hazare Trophy –बिहारची आग ओकणारी फलंदाजी! गोलंदाजांची रेकॉर्डब्रेक धुलाई करत इतिहास रचला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आजचा (24 डिसेंबर 2025) सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येणार आहे. एकीकडे विराट कोहली, रोहित शर्मा, इशान किशन या फलंदाजांनी धुवाँधार फटकेबाजी केली. तर दुसरीकडे बिहारच्या संघाने 50 षटकांमध्ये विश्व विक्रमी 574 धावा चोपून काढल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात बिहारचा संघ सर्वाधिक 574 धावा करणारा एकमेव संघ ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला […]
शुद्ध हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायर स्वस्त करा, दिल्लीतील प्रदूषणावरून हायकोर्टाने सुनावले
राजधानीतील प्रदूषण काहीही केल्या कमी होत नसून दिल्लीतील हवेने धोकादायक पातळी ओलांडली आहे. अशातच एकमात्र पर्याय असलेल्या एअर प्युरिफायरच्या किंमती आणि त्यावरील जीएसटी सामान्य माणसाला न परवडणाऱ्या आहेत. आता याप्रकरणी वकील कपिल मदन यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला एअर प्युरिफायरवर जीएसटीत सवलत देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्युरीफायरवरील […]
Solapur News : सोलापूर निवडणुकीत सोशल मीडियाचा जोरदार वापर!
सोलापूरमध्ये निवडणूकपूर्वी उमेदवारांचे डिजिटल युद्ध सोलापूर : सोलापूर भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार, त्यांचे नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. प्रभागात कोणताही उपक्रम केला की तो क्षणार्धात समाजमाध्यमांद्वारे सगळ्या फॉलोअर्सना पाठवला जात आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नव्हे तर त्या पक्षांचे [...]
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेटजवळ पाणी संघर्ष समितीचे आंदोलन
तिलाटी रेल्वे गेट परिसरात पाणी संघर्ष समितीचे आंदोलन सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेट क्रमांक ६१ परिसरात पाणी संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रशासन व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३५ वाजता पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष [...]
“तुमची ठेव,तुमचा अधिकार“ - जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणासाठी मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या 31 कोटी ठेवी 1 लाख 31 हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सोमवार दि.29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मेळावा आयोजित केला आहे.हा मेळावा केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या देशव्यापी “आपली पूँजी,आपला अधिकार Your Money, Your Right उपक्रमाचा एक भाग आहे. या मेळाव्यास मैनाक घोष,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव तसेच विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक व एलआयसी अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेचा उद्देश 10 वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झालेल्या बँक खाती,मुदत ठेवी आणि इतर आर्थिक मालमत्तांबद्दल (उदा.शेअर्स, विमा) लोकांना माहिती देणे आणि कायदेशीर वारसांना/दावेदारांना ती रक्कम परत मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा आहे. भारत सरकार व भारतीय रिझर्व बँक यांच्या माध्यमातून देशभरात एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कलावधीत मागील 10 वर्षांमध्ये ज्या खात्यांमध्ये व्यवहार झालेले नाहीत, आशा खात्यातील ठेवी भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांनुसार ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये (डीईएएफ) हस्तांतरित केल्या जातात.बरेच लोक माहितीच्या अभावी अथवा मृत असल्याने या ठेवी परत मिळवण्यासाठी पाठपुरवठा करत नाहीत.पर्यायाने या ठेवी डीईएएफमध्ये हस्तांतरित होतात. अशा सर्व ठेवी योग्य ती कागदपत्रे बँकेत जमा करून ठेवींची रक्कम खातेदाराला अथवा वारसदाराला मिळू शकते. बँक शाखांमध्ये ही विशेष मोहीम 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. दावा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नागरिकांनी आपली ओळखपत्रे (आधार/ पॅन), बँक खात्याचे तपशील,मुदत ठेव प्रमाणपत्रे (असल्यास),आणि वारस असल्यास मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र यासारखी संबंधित कागदपत्रे शिबिरांमध्ये सोबत आणावीत.पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली रक्कम परत मिळवावी,असे आवाहन श्री.कुमुद पंडा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,धाराशिव यांनी केले आहे.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!”
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी,या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या स्मारकासाठी मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. या निर्णयानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक 426 येथील आवश्यक 1 एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या स्वप्नाला अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे.जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने 2 कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला असून,या निधीतून स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर ते शोषित,वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते.त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभे राहत असून,ते सामाजिक न्याय,समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरेल.” धाराशिवच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे,परिवर्तनाची जाणीव करून देणारे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तेज सदैव उजळवत ठेवणारे ठरेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2 जानेवारी रोजी तुळजापूरमध्ये प्रथमच भव्य ड्रोन शोचे आयोजन; शाकंभरी नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला होता. या महोत्सवाच्या दरम्यान 29 सप्टेंबर रोजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या काळात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा ड्रोन शो स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ड्रोन शो आता 2 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य ड्रोन शो शुक्रवारी, 2 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. या ड्रोन शोमध्ये तब्बल 300 ड्रोनच्या सहाय्याने आकाशात तुळजाभवानी मंदिर, श्री तुळजाभवानी देवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार असून, त्यामध्ये श्री तुळजाभवानी देवींची भव्य प्रतिकृती हे मुख्य आकर्षण असणार आहे. यासोबतच धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्वरूपाच्या अन्य प्रतिकृतीही आकाशात झळकणार आहेत. अत्याधुनिक प्रकाशयोजना व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकार होणारा हा ड्रोन शो भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा ड्रोन शो धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे. देवीच्या दर्शनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. या भव्य ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी तसेच धाराशिव जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात हा ड्रोन शो भक्ती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरेल.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, नागेश शितोळे, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुजय मेश्राम, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार, ऋषभ रेहपांडे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन मंत्री पंकज भोयर यांचा सहकुटुंब यथोचित सन्मान केला. तत्पूर्वी विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, नागेश शितोळे, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुजय मेश्राम, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही बळकटीसाठी SIR विधेयक व निवडणूक सुधारणांवर सविस्तर बैठक
धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही अधिक मजबूत व पारदर्शक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून नवीन SIR (Special Intensive Revision) विधेयक व निवडणूक सुधारणा (Election Reforms) यासंदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत मतदारयादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट करणे, मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे वगळणे तसेच घुसखोर/अपात्र नागरिकांचे मतदान अधिकार रद्द करून त्यांची नावे मतदारयादीतून काढून टाकणे या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करताना मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची योग्य नोंदणी करणे आणि अपात्र मतदारांना यादीतून वगळणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची पडताळणी करण्यात येते. यासाठी नागरिकांना ऑनलाईन (ECINET App) तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क नाकारला जाऊ नये आणि मतदार यादीत कोणतीही अपात्र व्यक्ती राहू नये, याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, शहराध्यक्ष अमित शिंदे, नेताजी आबा पाटील, सुनील काकडे, राहुल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, दत्ता बंडगर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाकंभरी नवरात्र व नाताळ सुट्टीत तुळजाभवानी दर्शनासाठी विशेष व्यवस्था
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव तसेच नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी दर्शन व्यवस्थेत विशेष बदल जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे पहाटे 1 वाजता चरणतीर्थ, त्यानंतर दर्शन मंदिर संस्थानच्या निर्णयानुसार बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 ते शनिवार दि. 4 जानेवारी 2026 या कालावधीत रोज पहाटे 1.00 वाजता चरणतीर्थ होऊन लगेचच धर्मदर्शनास प्रारंभ केला जाणार आहे. भाविकांनी या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 28 डिसेंबर 2025 पासून श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या काळात दररोज हजारो भाविक तुळजापुरात दाखल होतात. यंदा नाताळ सुट्ट्यांची जोड लागल्याने गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दि. 24 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळच्या पूजांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. या काळात चरणतीर्थ पहाटे 1:00 वाजता, सकाळची अभिषेक पूजा (घाट) सकाळी 6:00 वाजता असे वेळापत्रक राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन माया माने, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे. शाकंभरी नवरात्र आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून दर्शन, रांग व्यवस्था, सुरक्षा आणि सुविधा याबाबत विशेष तयारी करण्यात येत असून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
मूकबधिरास पाच जणांची बेदम मारहाण
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील मलबा हॉस्पिटल समोरील जगदाळे पार्किंग येथे मूकबधिर तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पूर्ण ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला आहे सदरील घटना सोमवार दिनांक 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याबाबतीत कांताबाई अभिमान चौगुले वय 35 वर्षे व्यवसाय घरकाम रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला आत्याचा मुलगा विजय श्रीमंत पवार यांनी फोनवरून कळविले की, मी तुळजापूर च्या बाहेर असून माझा मोठा भाऊ राजेश यास जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर येथे काही लोक मारहान करीत आहेत. अशी माहिती मिळाली आहे. तरी तुम्ही तेथे तात्काळ जावा असे कळविल्याने मी माझे सोबत राजेशची पत्नी नंदिनी, आई काशीबाई, मावशी लक्ष्मी असे जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर तुळजापूर येथे गेलो असता माझ्या आत्याचा मुलगा राजेश श्रीमंत पवार यास तु आमच्या भागात का आलास म्हणून तेथील काही लोक मारहान करीत होते. राजेशचे दोन्ही हात बांधलेले होते. व त्यास डोक्याला, पाटीवर, तोंडावरे, बरगडीवर व गुप्त भागावर मारहान करीत असलेले दिसत होते. आम्ही त्यांना सोडवण्यास गेलो असता त्यांनी मला व माझ्या सोबत असलेल्या सर्वांना शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. व पुन्हा जर आमच्या भागात हा दिसला तर त्याला जिवेच मारू अशी धमकी दिली. माझा आत मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर यास मारहान करून, जखमी करणारे लोकांचे नावाची खात्री केली असता 1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे 2) प्रतिक जगदाळे 3) गणेश जगदाळे 4) राजाभाऊ देशमाने 5) शंतनू नरवडे व इतर सर्व राहणार तुळजापूर खुर्द असे असल्याचे खात्रीशिर समजले. त्यानंतर आम्ही आत्याचा मुलगा राजेश यास पाहिले असता त्याचे डोक्यात पाटीवर, तोंडावर, बरगडीवर, गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी काठीने मारहान झाल्यामुळे पुर्ण शरीरावर काळे निळे वळ दिसत होते. आम्ही त्यास घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आलो असता तेथे आत्याचा मुलगा राजेश यास जास्तच त्रास होवू लागल्याने पोलीसांनी उपचारासाठी मेडीकल यादी देवून उपचारासाठी सरकारी दवाखाना तुळजापूर येथे पाठविले असून सध्या त्याचेवर दवाखान्यात उपचार चालू आहेत. या हाणामारी प्रकरणी पाच जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापूरात पहाटेच्या शांततेत जशोदाबेन यांचे देवीदर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी मंगळवारी दि. 23 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास जशोदाबेन यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने सकाळपर्यंत याची कुणालाही चाहूल लागली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, जशोदाबेन मंगळवारी रात्री साधारण बारा वाजता थेट श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर मंदिर प्रशासनाच्या समन्वयाने त्यांना मंदिरात नेण्यात आले. पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर त्यांनी देवीची विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने हा धार्मिक सोहळा पार पडला. दर्शनानंतर त्या तात्काळ परतल्या, त्यामुळे भाविकांनाही त्यांच्या उपस्थितीची फारशी कल्पना आली नाही. महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी व सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाकडून पूर्ण गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे पहाटेच्या शांत वातावरणात घडलेल्या या दौऱ्याची चर्चा मात्र दिवसभर तुळजापूरात रंगली होती.
Solapur News : गोपाळपूर विष्णुपद येथे भाविकांची गर्दी; वनभोजनाचा लुटला आनंद
टेंभुर्णी परिसरातील भाविकांची गोपाळपूरला श्रद्धेची वाटचाल टेंभुर्णी : मार्गशीर्ष महिन्यात अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गोपाळपूर (पंढरपूर) येथील विष्णुपद अकोले-खुर्द येथील ५०० भाविकांची यात्रा घडविण्यात आली. यावेळी भाविकांनी विष्णुपद येथील भगवंताचे दर्शन घेऊन बन भोजनाचा आनंद लुटला. विठ्ठलराव शिंदे [...]
गुजरातमध्ये बंगालपेक्षा दुप्पट दुबार मतदार, SIR मध्ये कोणत्या राज्यात किती मतदारांना वगळण्यात आले?
निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याचे आकडे समोर आले आहेत. यातच सर्वाधिक नावे तामिळनाडूमध्ये कापली गेली आहेत. येथे ९७ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या आकडेवाडीनुसार, गुजरातमध्ये बंगालपेक्षा जास्त दुबार मतदार आढळले आहेत. गुजरातमध्ये ३.८१ लाख दुबार मतदार […]
Solapur Crime : सांगोल्यात मोबाईल शॉपीवर मोठी चोरी; ३.८८ लाखांचा मुद्देमाल गायब
सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकानात चोरीची घटना सांगोला : अज्ञात चोरट्यांने मोबाईल शॉपी दुकानचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील ३ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सांगोला शहरात उघडकीस [...]
Solapur News : पंतप्रधानांच्या पत्नीने घेतले भवानीचे दर्शन
तुळजाभवानी देवीसमोर मोदी कुटुंबीयांची कुलाचार महापूजा तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू यांनी मंगळवार, २३ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी देवीची कुलधर्म कुलाचार पूजाअर्चा करून दर्शन घेतले. सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत गुप्तता पाळण्यात आली [...]
Satara : रहिमतपूरमध्ये ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार’ उपक्रम उत्साहात
रहिमतपूरमध्ये चार शाळांचा संयुक्त ‘खाऊ गल्ली’ उपक्रम वाठार किरोली : रहिमतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रहिमतपूर क्रमांक १ यांच्या मैदानावर दि २० डिसेंबर रोजी ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. [...]
Vijay Hazare Trophy- किंग कोहली अन् हिटमॅनची दादा’गिरी’; दोघांनीही शतके ठोकून धुरळा उडवला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धुरळा उडवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मातब्बर गोलंदाजांना चोपून काढनाऱ्या या ‘धुरंधर’ खेळाडूंची बऱ्याच दिवसांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दादा’गिरी’ पाहायला मिळाली. रोहित शर्मा मुंबईकडून आणि विराट कोहली दिल्लीकडून मैदानात उतरले आणि दोघांनीही खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये धावांची लयलूट केली. मुंबईविरुद्ध सिक्कीम या सामन्यात रोहित शर्माची तळपती फलंदाजी उपस्थित चाहत्यांना […]
किल्लीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील एका गावात किचनचा धाक दाखवून 29 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने अखेर 23 डिसेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास एका गावातील तरुणाने तिला गाडीवर बसवून आडरानात नेले. तेथे आरोपीने मोटरसायकल गाडीच्या किचनचा धाक दाखवत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर भीती व मानसिक धक्क्यामुळे पीडिता काही दिवस शांत राहिली होती. त्यानंतर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रथम खबरी अहवाल दाखल केला. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील कलम 64(1), 351(2) व 351(3) अन्वये तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार असून, गाव खेड्यातील पुढाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 428 ग्रामपंचायतीसाठी जानेवारी 2021 मध्ये पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या होत्या. त्याची मुदत एक महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. परंतु नगरपालिकेची मतमोजणी लांबल्यामुळे तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुका घेण्यास सध्या पुरेसा वेळ नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार ते पाच महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या निवडणुका आता थेट एप्रिल मे 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीवर लक्ष ठेवून बसलेल्या गाव पुढाऱ्यांची निराशा झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका 2026 मध्ये पार पडणार असल्यामुळे प्रशासनाने चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यानंतर गाव पातळीवर गाव पुढाऱ्यांकडून निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात येईल या अपेक्षेने गाव पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, नगरपालिका निवडणुकांची लांबलेली मतमोजणी, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा हा कार्यक्रम आता जानेवारी ऐवजी थेट एप्रिल मे महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकराज येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी 2021 मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यांची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच कालावधीत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात आलेली नाही. पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढील दीड महिन्यात पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधान्याने घेतल्या जातील. सध्या संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याच्या कामात व्यस्त आहे. 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांमध्ये व्यस्त राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सध्या प्रशासनाकडे वेळ नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाला साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम तयार होऊ शकतो आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका होऊ शकतात. यावर्षी ऐन उन्हाळ्यातच गाव खेड्यातील राजकारण ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे तापणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमले जाणार आहेत. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या पूर्वीदेखील तीन ते चार महिने याच 428 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते. तालुकानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या तालुका ग्रामपंचायत संख्या धाराशिव 66 तुळजापुर 53 उमरगा 49 लोहारा 26 कळंब 59 वाशी 34 भूम 71 परंडा 70 एकूण 428
औद्योगिक विकासासोबत महिला, कृषी, सहकार क्षेत्रात भरवी योगदान देणार- ॲड. गुंड
धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूह, धाराशिव यांच्या नूतन वर्ष 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समूहाचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी औद्योगिक विकासासोबतच महिला सक्षमीकरण, कृषी व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा समूहाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात असून, बँकिंग क्षेत्राद्वारे महिला सक्षमीकरण तसेच सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. यासोबतच शिक्षण संस्थांसह शेतकऱ्यांसाठी अल्प दरात वेअरहाऊस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, रुपामाता डेअरीच्या माध्यमातून दुग्धव्यवसायास चालना देत जोडधंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या दिनदर्शिका प्रकाशन समारंभास रुपामाता समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड, श्री. अजय नाईक, चिफ अकाउंटंट विकास मंडाळे, नितीन मुदगल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याची आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्याची ही ओळख बदलण्यासाठी या भागाच्या आर्थिक विकासासाठी सेरेंटीका कंपनी काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. सेरेंटीका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील 40 दिव्यांगाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसीडेंट सुरजीत नारायण, कर्नल विक्रम अय्यंगार, अमित चक्रोबोर्ती आदीची उपस्थिती होती. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, सेरेंटीका कंपनी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींना व्हिलचेअरचे वाटप करत आहे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांगाना मदत करण्याची कंपनीची इच्छा आहे, ही मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यातील विविध घटकांसाठी सेरेंटीका कंपनी काम करत आहे. युवक - युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात येत असून हे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण झालेल्या काही युवकांना नौकरी देण्याचे कामही कंपनीने केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनीही रोजगारक्षम व्हावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण कंपनीच्या वतीने देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सेरेंटिका कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध समाजपयोगी कामाची दखल घेवून कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या या समाजपयोगी कामाचे कौतूकही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले. सेरेंटीका कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांचे पवनचक्की संबंधित समस्या सोडविण्यासाठी एक मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 1800 202 8735 हा कंपनीचा हेल्पलाईन नंबर असून याद्वारे शेतकऱ्यांना कंपनीच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधता येणार आहे.
'जागतिक ग्राहक दिनी'विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत 'जागतिक ग्राहक दिन'अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे आणि कोणत्याही फसवणुकीविरुद्ध आवाज उठवावा, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पूनम तापडिया जिल्हा संघटक, धाराशिव उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आजचा युवक हा उद्याचा जागरूक ग्राहक आहे. वस्तू खरेदी करताना पक्के बिल घेणे आणि गुणवत्तेची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.“ यावेळी श्री. शरद वाडगावकर जिल्हा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध कलमांची आणि तरतुदींची सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच श्री. रवी पीसे जिल्हा संघटक, धाराशिव यांनी ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डी. डी. मुंढे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, नेपते, वाघमोडे सर आणि दिगंबर जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जागरूक ग्राहक, सुरक्षित ग्राहक“ असा निर्धार करत कार्यक्रमाची सांगता झाली.
पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचा संकल्प
वाशी (प्रतिनिधी)- नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अंतर्गत शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, पारगाव यांच्या वतीने पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव (विक्रम) सावंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव सावंत यांनी भविष्यात गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन व हरभरा बियाणे मोफत वाटप करण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमास वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी नगरपंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी, बाजार समितीचे सचिव वाघ साहेब, पोलीस उपनिरीक्षक घोडके, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, नगरसेवक शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड यांच्यासह उद्धव साळवी, अशोक लाखे, विलास खवले, दिनकर शिंदे, राहुल आडुमटे, राजाभाऊ जोगदंड, सतीश गव्हाणे, तुकाराम गव्हाणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Satara News : पाचगणी–महाबळेश्वर मार्गावर नर्सरी अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
भिलारमध्ये रस्त्यावर कुंड्यांचा पसारा भिलार : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यालगत काही नर्सरी व्यावसायिकांनी झाडांच्या कुंड्या रस्त्यावरच मांडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुंड्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असून बांधकाम विभाग याकडे [...]
मिलिंद आळणे, प्रा. डॉ. श्रीराम मुळीक यांना 23 वा आदर्श समाजभूषण, शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान
कळंब (प्रतिनिधी)- कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था ट्रस्ट, बेळगाव महाराष्ट्र- कर्नाटक-गोवा यां तीन राज्याचा वतीने आयोजित राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025 हा भव्य आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी, शिक्षण व वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा . डॉ. अमर कांबळे (अध्यक्ष, नालंदा विद्यापीठ, कोल्हापूर) हे होते. तर दीपप्रज्वलन मिस इंडिया शुभांगी शित्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात मिलिंद आळणे, कळंब चे सुपुत्र प्रा.डॉ. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या समाजोपयोगी, प्रेरणादायी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन आदर्श समाजभूषण, शिक्षण गौरव पुरस्कार (राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025) प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून अनेक युवकांना प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजसेवेचे महत्त्व विशद केले. हा गौरव सोहळा कोल्हापूर येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूरमध्ये अपहरणाच्या धमकीने खळबळ!
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर शहरात गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपहरणाची धमकी देत वाईन शॉप चालकाकडून जबरदस्तीने माल उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमर श्रीराम नाईक (वय 52), रा. पंढरपूरकर गल्ली, तुळजापूर हे चेतन वाईन शॉप (जुने बसस्थानक परिसर) येथे असताना प्रशांत कांबळे, बालाजी जाधव व बाबा शेख (रा. तुळजापूर) या तिघांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. आरोपींनी नाईक व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत “तुझ्या मुलाला किडनॅप करू” अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी दुकानातून 3,100 रुपयांचा माल जबर नेला. तसेच दरमहा 10,000 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. या प्रकरणी अमर नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यशाळा संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णलाय कळंब येथे पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रति बंध कायदा1994 व सुधारित 2003) नुसार तालुका स्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. मुलगी वाचली तरच मानवता टिकते हा संदेश देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.या घोषवाक्याने कार्यशाळेस प्रारंभ झाला . कळंब च्या उपजिल्हा रुग्णालय येथे दि .23 रोजी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदशनाखाली पीसीपीएनडीटी तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदरील कार्यशाळेस कळंब तालुक्यातील सर्व पीसीपीएनडीटी सामूचीत प्राधिकारी /नोंदणीकृत सोनोग्राफी/एमटीपी/सामाजिक संघटना/आशा स्वयंसेविका/खाजगी डॉक्टर्स/ एआरटी सरोगसी केंद्र धारक/यांचे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. वैद्यकिय अधीक्षक डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करत असताना “एका बाजूस स्त्री विषयक सर्व सुधारणा व बदल घडत असताना दुस-या बाजूस मात्र समाजातील बुरसटलेल्या पुरूष सत्ताक मनोवृत्तीने विज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्त्रियांना संपविण्याचे कट कारस्थान सुरू केले आहे. हे थांबवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच खबरी योजना ही कायद्याअंतर्गत (गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान कायदा) बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी आहे, जिथे माहिती देणाऱ्याला एक लाख पर्यंत बक्षीस मिळू शकते, हेतू स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे आहे, ज्यात माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यशाळेस डॉ. सत्यप्रेम वारे यांनी गर्भलिंगनिदानाविरोधात लेक लाडकी अभियान विविध पातळीवर कार्यरत आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी अतिशय निकडीची आहे. कायद्याचा अर्थ आणि ताकद नीट समजून घेऊन समुचित प्राधिकारी व संबंधित यंत्रणेने त्याची चोख अंमलबजावणी केली तर गुन्हेगारांना पकडण्यात आणि लिंगनिदानाला प्रतिबंध करण्यात निश्चितच यश येऊ शकेल. याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मांडले. तसेच डॉ. मंजूराणी शेळके यांनी उपस्थित असलेल्या सर्व आशा, पी. एच. सी. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करता येईल याचे सकल असे विश्लेषण करून समजावून सांगितले. ॲड. रेणुका शेटे यांनी देखील कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या कार्यशाळेला जिल्हा समन्वयक कार्यक्रम श्रीमती सुनीता सांळुके, आय . एम. ए. डॉ. कुंकूलोळ, डॉ. सायस केंद्रे, डॉ. चंद्रकांत लामतुरे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. वाकुरे, व जिल्हा समन्वयक श्री. अमर सपकाळ, तसेच तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्र धारक व एमटीपी/ सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,ए.एन.एम,आशा स्वयंसेविका उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदेशक तानाजी कदम यांनी केले. तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. ही कार्यशाळा पार पाडण्यासाठी अधिपरिसेविका, अधिसेविका, दत्तप्रसाद हेड्डा, लक्ष्मीकांत मुंडे , मुंजाजी शिकारे, शिवशंकर वीर यांनी सहकार्य केले.

22 C