रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाण पत्र वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले,या शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा सन्मान रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसेन्ना ग्रुपचे अध्यक्ष संदिप बनसोडे व त्यांचे सहकारी गेली सतरा वर्षे पासून रक्तदान शिबीर घेऊन रुग्ण कल्याणासाठी योगदान देत आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव समोर ज्ञानसुर्य बी.आर.आंबेडकर बहु.सामाजिक संस्था, बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठान व सम्राट अशोक धम्मचक्र बहु. प्रतिष्ठान, भक्ती एजन्सी तर्फे आयोजित शिबिरात 23 जणांनी रक्तदान या वेळी प्रशांत बनसोडे, रोहित शिंगाडे, रावसाहेब मस्के, रोहन शिंगाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रक्तपेढी तंत्रज्ञ इरशाद शेख, निलाक्षी जानराव हे देखील रक्तदान शिबिरात सहभागी झाले. तांबरी विभागातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथे साहस सोशल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या संयुक्त विद्यमाने घेतले. सध्या शासकीय रुग्णालयातील रक्तसाठा कमी असुन रक्ताची कमतरता भासत आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. परमपुज्य बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन विविध सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांना रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समिती सदस्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य एम डी देशमुख, अब्दुल लतीफ, गणेश वाघमारे, बाळासाहेब जावळे तर प्रभारी अधिष्ठाता डॉ.उज्वला गवळी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.विवेक कोळगे, पर्यवेक्षक विठ्ठल कांबळे, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंखे, तिरुपती केंद्रे, संजय गजधने, बलभीम कांबळे, बाबासाहेब गुळीग, अमर आगळे, सचिन चौधरी, महादेव माळी, श्रीकांत मटकिवाले, अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, सुमेध क्षिरसागर सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट सुरक्षा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर शहरात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वनियोजित 3 डिसेंबर रोजीची मतमोजणी आता 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडल्याने आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या दिवशी कोणाचा गुलाल उधळला जाणार याकडे लागले आहे. नगरपरिषदेतील 38 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झाले असून तीन सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या तीन जागांसाठी मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. 2 डिसेंबर रोजी वापरलेली सर्व ईव्हीएम मशीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँग रूमला पोलिसांचा अतिशय कडेकोट पहारा असून कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. स्ट्राँग रूमच्या चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या 24 तास पहारा देत आहेत. यामध्ये 17 कर्मचारी व तीन अधिकारी तैनात असून परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अखंडित देखरेख केली जात आहे. स्ट्राँग रूमला अधिकाऱ्यांच्या भेटी संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे हे दिवसभरातून तीन ते चार वेळा स्ट्राँग रूमला भेट देत असून सुरक्षा उपायांची तपासणी करत आहेत. मतदान झाल्यानंतर काही पक्षांच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली.
घरकुल व मनरेगा जबाबदारी निश्चितीबाबत राजपत्रित अधिकारी संघटनेचे आंदोलन
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने 4 व 5 डिसेंबर रोजी सामुहिक रजा घेवून आर्वी येथील गटविकास अधिकारी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतरही घरकुल व मनरेगा योजनेबाबत जबाबदारी निर्धारणाबाबत कोणताही निर्णय न झाल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांनी 8 डिसेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकारी वर्गाने धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या डिजिटल सिंगनिचर सटिफकेंटचा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्य सरकारने घरकूल व मनरेगा योजनेबाबत जबाबदारी निश्चिती संदर्भातील निर्णय घ्यावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात संघटनेच्यावतीने आंदोलन चालू आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह धाराशिव जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले आहे. सामुहिक रजा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झालेल्यामध्ये जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, अनुप शेंगुलवार, निलेश काळे, अनंत कुंभार, संतोष नलावडे, अमोल ताकभाते, हेमंत भिंगारदेवे, सिमा गवळी, पद्मा मांजरे आदींचा समावेश आहे.
जितके वर्ष मोदी पंतप्रधान आहेत, तितके वर्ष नेहरू तुरुंगात होते –प्रियंका गांधी
“नरेंद्र मोदी हे गेली १२ वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. जवळजवळ तेवढीच वर्षे पंडित नेहरूंनी तुरुंगात घालवली”, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याला आठवडल्याला सुरुवात झाली असून आज ‘वंदे मातरम्’वर चर्चा होत आहे. याचवेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी ही टीका केली आहे. लोकसभेत […]
प्रदूषण म्हणजे तापमानचं असतं असं विधान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुप्ता यांच्या विधानाचा समाचार घेतला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “सभेत दिलेली विधाने पाहून दिल्लीच्या नेतृत्वाची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते.” परिषदेत मुख्यमंत्री बोलताना “AQI हा एक […]
प्रदूषण म्हणजे तापमानचं असतं असं विधान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा शर्मा यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शर्मा यांच्या विधानाचा समाचार घेतला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “सभेत दिलेली विधाने पाहून दिल्लीच्या नेतृत्वाची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते.” परिषदेत मुख्यमंत्री बोलताना “AQI हा एक […]
Satara News : फलटणमध्ये शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू
शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू लोणंद : पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती (ता. फलटण) येथे शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादांमुळे मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत काशिनाथ साधू ताम्हाणे (वय ६०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर [...]
संगमेश्वर तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) येथील दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध नागरिकांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाबाबत संगमेश्वर पोलिसांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे ९० वर्षे) या वृद्धावस्थेमुळे तसेच आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे की, रुक्मिणी आमकर यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणारे त्यांचा मुलगा महादेव विठोबा […]
राज्य बार कौन्सिलमध्ये 30 टक्के महिला आरक्षण; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
न्यायालयीन व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक राज्यात सक्रिय असणाऱ्या बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ज्या राज्य बार कौन्सिलच्या निवडणुका अद्याप अधिसूचित झालेल्या नाहीत, अशा बार कौन्सिलमध्ये 30 टक्के जागांवर महिला वकिलांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सध्या […]
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 10 डिसेंबर रोजी योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, विभागाच्या योजना,कार्यक्रम, धोरणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे, नियम,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्त कार्यालये यांची रचना,स्वरूप, भूमिका,जबाबदाऱ्या व कार्ये इत्यादीबाबत दिव्यांगामध्ये जागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे केले आहे. या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क,स्पेशल कोर्ट,दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 80 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे अधिकार,शिक्षण,पुनर्वसन याबाबत विविध विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहे.
आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम
धाराशिव (प्रतिनिधी)- एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आयुष्मान भारतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात सध्या 15.23 लक्ष लाभार्थी असून त्यापैकी 6.80 लक्ष लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी झालेले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी 20 रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये,असे एकूण 30 रुपये मानधन स्वरूपात देण्याबाबत शासन निर्णय पारित झाला आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा 1356 आजारांवर उपलब्ध आहे.हा लाभ धाराशिव जिल्ह्यातील 27 खाजगी व 13 शासकीय अशा एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच 70 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आयुष्मान वय वंदना कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.
कर्मचारी संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने संघटनेचे अशोक बनसोडे, प्रभाकर बनसोडे, दिलीप वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदिप शिंदे, रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, श्रीकांत चिलवंत, रवि कांबळे, यु.व्ही. माने, विजय गायकवाड, वाहूळकर, राजन माने, बलभीम कांबळे, अविनाश गायकवाड, सुनिल बनसोडे, बाळासाहेब माने, राजेंद्र धावारे इत्यादी उपस्थित होते.
संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळीतील गायक अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे परंपरागत रीतीरिवाजांनुसार मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी देवीची ओटी भरून कुलाचार पार पाडले आणि आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांनी अजय गोगावले यांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना अजय गोगावले म्हणाले,“महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी दारी गायनरूपी सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. शाकांबरी नवरात्र महोत्सवात माझ्या तारखा उपलब्ध असतील, तर त्यातील एक दिवस मी नक्कीच कार्यक्रमासाठी देण्याचा प्रयत्न करीन.”त्यांच्या या आश्वासनामुळे भक्त आणि संगीतप्रेमींमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, रामेश्वर वाले, दिनेश निकवाडे, नवनाथ खिंडकर पुजारी सचिन अमृतराव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खेर्डीचे आकाश लकेश्री हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये चमकले, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश […]
MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आयोगाकडून नव्या तारखा जाहीर
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने परीक्षेच्या नवीन तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 रोजी ही एमपीएससी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत […]
Karad News : कर्नल संभाजी पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते ऐतिहासिक तैलचित्र सन्मान
कलात्मक सन्मान, कर्नल संभाजी पाटील यांचा गौरव कराड : जामनगर (राजस्थान) येथे १९८८ साली महामहीम राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या स्वागतावेळी स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या कर्नल संभाजी पाटील यांच्या ऐतिहासिक क्षणाचे ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांनी साकारलेले तैलचित्र खासदार शरद पवार यांच्या हस्ते संभाजी पाटील यांना प्रदान [...]
Satara News : बेळगावच्या युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या
वाघोली जवळ रेल्वे अपघात, IT कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू सातारा : तडवळे सङ वाघोली (ता. कोरेगाव) येथे रविवारी, ७ रोजी पहाटे रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, वाठार-सालपे रेल्वे अप लाईनवरील तडवळे हद्दीत रात्री २ वाजण्याच्या [...]
अबब! पाटणाच्या पुस्तक मेळाव्यात 15 कोटींचे पुस्तक, पुस्तकाच्या फक्त तीन प्रती प्रकाशित
आतापर्यंत आपण दोनशे चारशे जास्तीत जास्त हजार रुपयांपर्यंत पुस्तकं वाचली असतील. पण पाटणाच्या पुस्तक मेळाव्याततील एका पुस्तकाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, या मेळाव्यातील एका पुस्तकाची किंमत ऐकून सर्वच अवाक झाले आहेत. तब्बल 15 कोटी रुपये त्या पुस्तकाची किंमक असून हे पुस्तक जगातील सर्वात महागडे पुस्तक आहे. शिवाय या पुस्तकाच्या आशयाबाबत आणि लेखनाबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली […]
तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या
काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. हिवाळ्यात गाजर सूप पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅन्टीवायरल असल्याने […]
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला पूर्ण कला. टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळ केला आणि 9 विकेटने सामना एकहाती जिंकला. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या तिघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं. सामन्यासह मालिका टीम इंडिया जिंकली मात्र, एका चुकीमुळे ICC […]
बडीशेप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून व्हाल थक्क
आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाची चव तसेच खाल्लेले अन्न पचनासाठी सुद्धा बडीशेप गरजेची आहे. इतकेच नव्हे तर, बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात. नवमातांसाठी दूध येण्यासाठी बडीशेप खाणे खूपच गरजेचे आहे. […]
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून रस्ते कंत्राटदाराची हत्या, परिसरात शोध मोहिम सुरू
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी रस्ते कंत्राटाराचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इम्पियाज अली असे हत्या झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. पामेड पोलीस ठाण्याजवळ सुरक्षा छावणीजवळ कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्पियाज अली याला रस्ते बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी मेटागुडा सुरक्षा […]
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा
शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच उत्तम आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते.आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते. दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात […]
Sangli News : आटपाडी-करगणी मार्गावर भीषण कार अपघात, 1 ठार 4 जखमी
भरधाव कार मेटकरवाडी येथे पलटी आटपाडी : आटपाडी तालुक्यातील भिवघाट ते करगणी या मार्गावर आलिशान गाडीच्या झालेल्या अपघातात रिहान जमीर मुल्ला (बय १६ रा. करगणी ता. आटपाडी) हा ठार झाला. या भीषण अपघातात चारजण जखमी झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रिहान [...]
‘तुमची पत्नी हिंदुस्थानी नाही का?’जेडी वान्स यांच्या स्थलांतर-विरोधी वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स (JD Vance) यांनी ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर म्हणजे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे’, असे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. वान्स यांनी ‘X’ वर लिहिले की, ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर हे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे. हे नेहमीच असे राहिले आहे’. लुईझियाना येथील एका बांधकाम कंपनीच्या मालकाच्या व्हिडिओला प्रतिसाद […]
श्रीगोंदाचा वीर पुत्र हवालदार गोकुळ वाळके शहीद; चांभुर्डी गावावर शोककळा
श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी गावचे भूमिपुत्र आणि मराठा लाईट इन्फंट्री युनिट-५ मध्ये कार्यरत असलेले हवालदार गोकुळ नागेश वाळके (वय ३५) हे अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी दुःखदरीत्या शहीद झाले. त्यांच्या अचानक निधनाने चांबुर्डीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना भुरळ येऊन पडून डोक्याला […]
Sangli News : दिघंचीत आगीमध्ये सुमारे 30 एकर ऊस खाक
दिघंचीत आगीत 13 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जळून खाक दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील तरटी मळा येथे अचानक लागगेल्या आगीने १३ शेतकऱ्यांचा एकूण अंदाजे ३० एकर ऊस जळून खाक झाला. हि घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने बघता [...]
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अज्ञातांकडून प्रवाशांवर हल्ला, एका आरोपीला अटक; तिघे फरार
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर तीन आरोपींनी प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल 3 वर सकाळी 8.11 वाजता ही घटना घडली. संशयित आरोपींनी प्रवाशांवर मिरची पावडरचा स्प्रे मारला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले […]
Kolhapur News : इचलकरंजीत ढोल ताशांच्या निनादात शंभूराजेंना मानवंदना !
शंभू तीर्थाचे भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात इचलकरंजी : श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त रविवारी इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला. विविध ढोल पथक, ताशा पथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल-ताशांच्या निनादात हजारों शंभू भक्तांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांना [...]
बेळगांव, बिदर, भालकीसह सीमाभागावर हक्क सांगण्यासाठी बेळगांवमध्ये हिवाळी अधिवेशनाचा घाट घालणाऱ्या कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर म्हणून, महामेळावा घेणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने अत्याचाराचे टोक गाठले आहे. रात्री उशिरा तोंडी परवानगी दिल्यानंतर सकाळी महामेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांनी जबरदस्तीने बळाचा वापर करून ताब्यात घेतले. त्यामुळे मराठी भाषिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. […]
फुगा फुगवताना फुटला अन् श्वसननलिकेत अडकला, 13 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
वाढदिवसाच्या डेकोरशनसाठी फुगा फुगवत असताना फुटला आणि श्वसननलिकेत अडकल्याने 13 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या वाढदिवशीच बहिणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांना फुगे फुगवायला देताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील दिघी गावात ही घटना घडली. अशोक कुमार यांच्या तीन […]
Ratnagiri News –रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत सांबराची पाहणी करून पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (07 डिसेंबर 2025) रात्री 12.30 च्या सुमारास ही रत्नागिरी महामार्गावर करंजरी येते अज्ञात वाहनाने सांबराला जोराची धडक दिली. गाडी वेगात असल्यामुळे […]
चंद्रपूरातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे आदिवासी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी- बांबेझरी येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद पाडले. हे प्रकल्पग्रस्त शेतकरी 15 महिन्यांपासून स्वतःच्या शेतजमिनीसाठी मोबदला किंवा नोकरी मागत ऊन -वारा- पावसा- पाण्यात संघर्ष करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण निकाली काढण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे. 2003 -2004 मध्ये माणिकगड […]
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमाभाग सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. आता याच भागात सुरक्षा दलांनी ऐतिहासिक यश संपादित केले आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळवला आहे. एक कोटींच बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर रामधेर मज्जी याने आपल्या 12 साथीदारांसह छत्तीसगडच्या बकरकट्टा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. […]
Sangli News : चांदोली परिसरात वाघीणीचा उद्रेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन्य प्राणी उद्रेकामुळे सोशल मीडियावर चर्चा वारणावती : सध्या ताडोबातील वाघीणीनेचांदोली परिसरातील बफर झोन ठाण मांडले असतानाच शनिवारी टी १ वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्र मोबाईल वरून प्रसारित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण तर काही अधिकारी निर्मित [...]
Sangli News : चांदोली परिसरात वाघीणी उद्रेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन्य प्राणी उद्रेकामुळे सोशल मीडियावर चर्चा वारणावती : सध्या ताडोबातील वाघीणीनेचांदोली परिसरातील बफर झोन ठाण मांडले असतानाच शनिवारी टी १ वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्र मोबाईल वरून प्रसारित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण तर काही अधिकारी निर्मित [...]
Smriti Mandhana: संगीतकार पलाश मुच्छल सोबत स्मृती मानधनाचे लग्न रद्द, सोशल मीडियावर व्हायरल
स्मृती डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत दिसणार सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज, सांगलीची सुकन्या स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. पोस्ट करत ‘लग्नाचा निर्णय मागे घेतला असून दोन्ही कुटुंबांच्या खासगी आयुष्याचा आदर [...]
Kolhapur News : चंदगड तालुक्यात शेतकरी चिंतेत; वन्य प्राण्यांचा वाढता वावर
गवी-रेड्यांचे कळप गावाजवळील शेतात चंदगड : चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात येत असून, शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गवी-रेड्यांचे कळप गावाजवळील शेतशिवारात मुक्तपणे वावरताना दिसत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रविवारी [...]
Kolhapur News : सादळे घाटात भीषण अपघात; निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू
सादळे घाटातील अपघाताने परिसरात हळहळ सादळे : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सदाशिव खोत हे [...]
नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले बहुमताचे सरकार नेमके कशाला घाबरत आहेत? विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी त्यांना कशाची भीती वाटते, असा सवाल त्यांनी केला. तसेच वृक्षतोड, इंडिगोचा गोंधळ यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज सकाळपासून विरोधी पक्षनेत्याबाबत […]
कुणालाही सोडणार नाही, तुरुंगात टाकणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अग्नितांडवप्रकरणी कठोर भूमिका : बेकायदेशीरपणाला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार पणजी : हडफडे येथील ‘बर्च’ क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांचा होरपळून तर अन्य सर्वजण गुदमरून मृत्युमुखी पडल्याचे निदान वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचाही गय करणार नाही, तो [...]
Kolhapur News : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या अठरा बैलांची सुटका ; गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई
उजळाईवाडीजवळ बैलांची तस्करी रोखली कोल्हापूर : कत्तलीसाठी कर्नाटक मध्ये खिलारी जातीचे 18 बैल घेवून जाणारा ट्रक गोकुळ शिरगाव पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोर रविवार दि.७ रोजी दुपारी पकडला.कत्तलीसाठी नेणाऱ्या आरोपींच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत [...]
गोव्यातून जात होती कर्नाटकात : गुन्हाशाखेनेकेलीकारवाई पणजी : गुन्हा शाखेने केलेल्या कारवाईत एक कोटीची बनावट दारू जप्त केली आहे. बनावट दारू घेऊन गोव्यातून कर्नाटकात जाणारा ट्रक मेरशी बायपास येथे अडवून तपास केला असता बनावट दारूच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125, 274, [...]
फोंड्यातील मुख्य नाल्याला घातक प्रदूषणाचा विळखा
नाल्यात रासायनिक पाण्याचे विसर्जन : तक्रारीकऊनहीकारवाईनाहीच फोंडा : बेतोडा भागातून उगम पावणारा आणि कुर्टी पंचायत तसेच फोंडा शहरातून कवळे व बांदोड्यापर्यंत जाऊन जुवारी नदीला मिळणारा मुख्य नाला घातक रसायने व अन्य प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. नाल्यावर होणाऱ्या या प्रदूषणाच्या माऱ्यामुळे बेतोड्यासह कुर्टी व अन्य भागातील शेती बागायती तसेच त्यावर अवंबून असलेल्या जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू [...]
गोवा मुक्तीदिनी आमदारांना काळे झेंडे दाखवणार
म्हापसा येथील व्यापारी संघटनेचा सरकारला इशारा : अनेकवर्षांपासूनप्रलंबितप्रश्नसोडविण्याचीमागणी म्हापसा : म्हापसा येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा आणि पालिकेने लक्ष घालून येत्या 15 डिसेंबरपर्यंत त्या सोडवाव्यात, अन्यथा गोवा मुक्तीदिनी 19 डिसेंबर रोजी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू, असा निर्वाणीचा इशारा म्हापसा व्यापारी संघटनेने दिला आहे. म्हापसा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर म्हापसा व्यापारी [...]
Kolhapur News : आरे धनगरवाडीत शोककळा; ऊस भरताना शेतकऱ्याचा मृत्यू
आरे येथील शेतकऱ्याचा ऊस भरताना फळीवरून पाय घसरून मृत्यू सडोली खालसा : आरे (ता. करवीर) येथील धनगरवाडीतील तरुण शेतकरी मानसिंग नारायण देवकर (वय 46) यांचा ऊस ट्रॉलीत भरत असताना पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तरुण शेतकऱ्या च्या झालेल्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना [...]
अधिवेशनालाप्रत्युत्तर: मोठ्यासंख्येनेउपस्थितराहण्याचेम. ए. समितीचेआवाहन बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवार दि. 8 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. सकाळी 11 वाजता टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहून कर्नाटक सरकारला एकी दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मागील काही [...]
Kolhapur News : सादळे घाटातील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
सादळे घाटातील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू पुलाची शिरोली : नारायण खोत हे पेठ बडगाव येथील मार्केटमध्ये हमालीचे काम करत होते. रविवारी सकाळी ते कामासाठी गेले होते. दिवसभर काम करून सायंकाळी पाचच्या सुमारास ते कासारवाडी मार्गे निकमवाडी येथे परतत होते. सादळे घाटातील जुन्या जेनिसिस कॉलेजच्या [...]
अधिकारी-पोलीसच गळाला, खात्याची इभ्रत पणाला!
महासंचालकांची ‘खा की’ला पुन्हा एकदा समज : गुन्ह्यात सहभागी असल्यास कठोर कारवाईचा इशारा, पोलीस दलाची अब्रू वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, वाटमारी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. निपाणीत तर दरोडेखोरांनी एका पोलिसाला पिटाळल्याचे फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सोमवार दि. 8 डिसेंबरपासून बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत [...]
अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस खाते सज्ज
सहाहजारांहूनअधिकअधिकारी-पोलीसतैनात: शहरालापोलीसछावणीचेस्वरुप; आंदोलनकर्त्यांसाठीहीनियमावली बेळगाव : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहा हजारहून अधिक अधिकारी व पोलिसांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावला छावणीचे स्वरुप आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सुवर्ण विधानसौध परिसरात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना आंदोलने करणार आहेत. बंदोबस्तासाठी 3,820 हून अधिक पोलीस, 146 अधिकारी यांच्याबरोबर 8 क्युआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम), राज्य [...]
महामेळाव्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ
मराठीभाषिकांचीघेतलीधास्ती बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 8 रोजी व्हॅक्सिनडेपो परिसरात महामेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळनंतर टिळकवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी काढलेल्या काळ्या दिनाच्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून पोलिसांनी धास्ती घेत पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी शहरातील चार ठिकाणांची यादी पोलीस प्रशासनाकडे दिली [...]
शहरात 27 अग्निशमन वाहनांसह 250 जवानांची नियुक्ती
अधिवेशनाच्यापार्श्वभूमीवरअग्निशमनदलाकडूनविशेषखबरदारी: परजिल्ह्यातूनमागविलेबंब बेळगाव : दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर बेळगावातही हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली असून, यावेळी अग्निशमन दलाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. यंदा सुवर्णसौधसह शहरात तब्बल 27 अग्निशमन दलाची वाहने तैनात करण्यात आली असून, 250 कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली [...]
शहरात टीईटी परीक्षा सुरळीत; 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांची हजेरी
बेळगाव : कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी बेळगावसह राज्यभरात घेण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. यावर्षी सेवेत असलेल्या शिक्षकांनीही टीईटी दिल्यामुळे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात होता. टीईटीचे दोन पेपर सकाळी व संध्याकाळी [...]
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये माजी सैनिकांचा मेळावा
बाराशेहूनअधिकमाजीसैनिकांचीउपस्थिती: पेन्शन, वैद्यकीयसेवांच्यातक्रारींचेकेलेनिवारण बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रविवारी दक्षिण विभागीय माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाराशेहून अधिक माजी सैनिक, वीर नारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. माजी सैनिकांची पेन्शन, वैद्यकीय उपचार, बँकिंग यासह इतर तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या. या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. [...]
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केले आहे. शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? खरंतर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये, अशीच सरकारची इच्छा […]
पंचमसाली समाजाचा बुधवारी मूकमोर्चा
बसवजयमृत्युंजयमहास्वामीयांचीमाहिती: मोठ्यासंख्येनेसहभागीहोण्याचेआवाहन बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागील हिवाळी अधिवेशनावेळी आरक्षणासाठी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अमानुषपणे समाज बांधवांवर लाठीमार करण्यात आला होता. यंदा याला वर्षपूर्ती होणार असून या अत्याचाराची आठवण म्हणून बुधवार दि. 10 रोजी गांधी भवनपासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नियमानुसार [...]
छत्रपती शिवाजी उद्यानातील क्रीडा साहित्याची दुरवस्था
महानगरपालिकेचेदुर्लक्ष: नागरिकांकडूनदुरुस्तीचीमागणी बेळगाव : छत्रपती शिवाजी उद्यानातील लहान मुलांच्या क्रीडा साहित्याची दुरवस्था झाली आहे. झोपाळे तसेच सीसॉ तसेच इतर क्रीडा साहित्य मोडून पडले आहे. त्यामुळे उद्यानामध्ये खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या क्रीडा साहित्याची दुरुस्ती अथवा नवीन साहित्य बसवावे, अशी मागणी केली जात आहे. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात दररोज [...]
ग्राहक वाद निवारण आयोग खंडपीठावर पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी
बेळगाव : राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगाव येथे स्थापन करण्यात आले आहे. मात्र अद्याप अध्यक्ष, सदस्यांसह पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात न आल्याने वेळेवर निकाल मिळत नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पक्षकारांसह वकिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लवकरात लवकर पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बार असोसिएशनच्या [...]
मंत्री हो…पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सना भेट द्या
बॅरिकेड्सहटविण्यासंदर्भातपत्रव्यवहार बेळगाव : पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथील हटविण्यात यावे, यासाठी गेल्या साडेअकरा वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. मात्र, बॅरिकेड्स काही केल्या हटले नाहीत. त्यातच सोमवारपासून बेळगावात सरकारच्या विधीमंडळाचे अधिवेशन भरणार आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी स्वत: पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सची पाहणी करून समस्या मार्गी लावावी, यासाठी रविवारी सकाळी पुन्हा आंदोलन करण्यात आले. पहिले रेल्वेगेटवर [...]
भातपिकांचेप्रचंडनुकसानसुरुच: अर्धपक्वभातकापणीचीशेतकऱ्यांवरवेळ वार्ताहर/गुंजी गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या भागात फिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्याचे सत्र हत्तींकडून अद्याप सुरूच असून, गेल्या चार दिवसापासून हत्तींनी आपले ठाण गुंजीजवळ असलेल्या मेतीतळा शिवाराजवळ मांडले आहे. त्यामुळे या भागातील बिंबेगाळी आणि मेतीतळा शिवारातील भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील शेतकरी कृष्णा खेमांना बिरजे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकात हत्ती शिरून, खाऊन तुडवून [...]
नंदगड संगोळ्ळी रायण्णा यात्रोत्सव उत्साहात
धनगरीढोलच्यानिनादातमिरवणूक, धार्मिक-सांस्कृतिककार्यक्रम वार्ताहर/नंदगड कुरबर संघाच्यावतीने नंदगड येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यात्रा महोत्सव दोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कुरबर समाज बांधवांच्या बरोबरच अनेकांनी यात्रोत्सवात सहभाग दर्शवला. त्यामुळे नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाजवळ दोन दिवस लोकांची गर्दी झाली होती. शनिवार दि. 6 रोजी सकाळी क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा समाधीस्थळी पूजा व धार्मिक विधी पार [...]
म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
आजच्यामेळाव्यातउपस्थितराहण्याचेकार्यकर्त्यांनाआवाहन वार्ताहर/कणकुंबी कणकुंबी-जांबोटी भागातील गावांमध्ये 8 डिसेंबरच्या मेळाव्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कणकुंबी भागातील नागरिकांना पत्रके वाटप करून जागृती करण्यात आली. 2004 साली महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत [...]
ढगाळ वातावरणामुळे धामणे भागात पुन्हा चिंता
धामणे : दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरणामुळे धामणे, मासगौंडहट्टी, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे (ये.) या भागातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त अवस्थेत दिसत आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे भात पिकाच्या कापणीला उशीर झाला असून, पाऊस जास्त झाल्यामुळे शिवारातील जमिनीत ओलावा जास्त असल्याने भात पिकाच्या कापणीला उशीर झाला. त्याचप्रमाणे भातपीक कापणी संपल्यानंतरसुद्धा शेतजमिनीत ओलावा जास्त [...]
अलतगा फाटा ते अगसगा रस्ता बनला धोकादायक
डांबरीकरणाचीखडीसांडल्यानेवाहनचालकांचेअपघात बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाची खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील खडी या रस्त्यावर पडत असल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकीचे अनेक अपघात होत आहेत. एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्यावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. अलतगा परिसरात अनेक क्वारी आहेत. या ठिकाणाहून डांबरीकरणासाठी लागणारी [...]
बस्तवाड मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : बस्तवाड परिसरासह ग्रामीण भागासाठी अपुऱ्या बेससेवा पुरविण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी सायंकाळी तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच एकाचवेळी 2-3 बसेस एकाच मार्गावर सोडण्यात येत असल्याने याचा फटका बसत असल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे. बस्तवाड, हलगा, कोंडुसकोप्पसह ग्रामीण भागातून [...]
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा; भास्कर जाधव, नाना पटोले यांची मागणी
अधिवेशन नागपूरमध्ये म्हणजे विदर्भात होत असल्याने विदर्भ करारानुसार अधिवेशन घेण्यात यावे, ही मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तीच आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावा, ही आमची मागणी आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव म्हणाले. विदर्भासाठी या अधिवेशाचा कालावधी वाढवावा अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली. […]
बेळगाव : सार्वजनिकशिक्षणखात्यातर्फेघेण्यातआलेल्याजिल्हास्तरीयअॅथलेटिक्स स्पर्धेत केएलएस स्कूलचा विद्यार्थी नैतिक देसाई याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नैतिक देसाईने 4400 अडथळा शर्यतीत सुवर्णपदक तर तिहेरी उडीत रौप्यपदक पटकाविले. त्याची बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली असून तो बेंगळूरला रवाना झाला आहे. त्याला पी.जी.बडकुंद्री, मुख्याध्यापिका लक्ष्मी देशपांडे, ए. बी. [...]
हैदराबादमधील तीन विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी, विमानतळावर हायअलर्ट
इंडिगो एअरलाइन्समुळे देशभरात परिस्थिती गंभीर होत चालली असताना, आता एक नवीन बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावरील तीन विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. सोमवारी (८ ऑक्टोबर) ईमेलद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विमानांचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि […]
सतीश शुगर्स शरीरसौष्ठव स्पर्धा जानेवारीत
बेळगाव : सतीश जारकीहोळी फाऊंडेशन आयोजित 12 वी सतीश शुगर्स क्लासिक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा सोमवार दि. 19 जानेवारी 2026 रोजी गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पत्रकांचे अनावरण यमकनमर्डी येथे करण्यात आले.यमकनमर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पत्रकांचे अनावरण करण्यात आले. जिल्हा आणि राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्धेचा [...]
ड्रग्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
गृहमंत्रीडॉ. जी. परमेश्वरयांचेप्रतिपादन: गेल्यावर्षभरापासूनराज्याततब्बल300 कोटींहूनअधिककिमतीचेड्रग्जजप्त बेंगळूर : राज्याला ड्रग्जमुक्त करण्यासाठी सरकारने ड्रग्ज विव्रेते आणि वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. कर्नाटकाला ड्रग्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले. बेंगळूर शहर पोलीस आणि फेडरेशन ऑफ हिस्टोरिक व्हेईकल्स ऑफ इंडिया (एफएचव्हीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पॉल जॉन रिसॉर्ट्स अँड हॉटेल्समध्ये आयोजित ड्रग्जमुक्त [...]
ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न; परप्पन कारागृहातील वॉर्डनला अटक
बेंगळूर : कैद्यांना सिगारेट आणि बंदी घातलेल्या ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहाच्या जेल वॉर्डनला अटक करण्यात आली आहे. राहुल पाटील असे अटक केलेल्या जेल वॉर्डनचे नाव आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये त्याची बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून बेंगळुरातील परप्पन अग्रहार कारागृहात बदली करण्यात आल्याचे समजते. शुक्रवारी संध्याकाळी केएसईएसएफचे कर्मचारी परप्पन अग्रहार कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ [...]
बेंगळुरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तज्ञ समिती स्थापन
बेंगळूर : बेंगळूरमधील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पावले उचलली आहेत. यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दिनेश गुळीगौडा यांनी दिली. सिलिकॉन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळूरमधील वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत वाढत असल्याबद्दल दिनेश गुळीगौडा यांनी खंत व्यक्त केली होती. याला प्रतिसाद [...]
राज्यात प्रत्येक मृत्यूसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य
मृत्यूचेकारणजाणूनघेण्यासाठीपाऊल बेंगळूर : राज्यातील प्रत्येक मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करणारा आदेश आरोग्य खात्याने जारी केला आहे. राज्यात नोंदणीकृत मृत्यूंपैकी केवळ 26.7 टक्के मृत्यूंसाठी वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा वैद्यकीय संस्थांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी मृत्यू झाला तर वैद्यकीय प्रमाणपत्र [...]
वाढीव मुदत देऊनही योजनांची 607 कामे लटकली, रायगडमध्ये जलजीवन मिशनचे तीनतेरा
सरकारच्या जल जीवन मिशनचे रायगडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदारांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र वाढीव मुदत देऊनही 1 हजार 422 योजनांपैकी 607 कामे लटकली असल्याने ‘हर घर जल’ योजनेला ‘घर घर’ लागली आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक योजनांवर करोडो रुपयांचा निधी खर्च करूनदेखील जिल्ह्याची […]
आरोग्य विभाग करतो तरी काय? 61 बालके तीव्र, 393 बालके मध्यम, रायगड जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रायगड जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा पडत आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 454 कुपोषित बालके आढळून आली आहेत. यामध्ये 61 बालके तीव्र कुपोषित, 39 सौम्य कुपोषित असून 393 बालके सौम्य कुपोषित आढळल्यामुळे आरोग्य विभाग करतो तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला […]
कल्याणच्या आठ पोलीस ठाण्यांना मिळणार बळ, ‘फॉरेन्सिक व्हॅन’मुळे गुन्ह्यांचा तपास होणार अधिक फास्ट
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याण पोलीस आता सज्ज झाली आहे. गुन्ह्यांचा झटपट छडा लावण्यासाठी पोलिसांची फॉरेन्सिक व्हॅन आता ‘ऑन रोड’ उतरली आहे. त्यामुळे तपास फास्ट होणार असून तपासात वेग, अचूकता व वैज्ञानिक काटेकोरपणा वाढणार आहे. ही अत्याधुनिक सेवा 24 तास उपलब्ध राहणार असल्याने कल्याण परिमंडळ तीनमधील आठही पोलीस ठाण्यांना साठी नवे बळ मिळणार आहे. कल्याण परिमंडळ […]
जम्मू-कश्मीरच्या वनक्षेत्रात दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त; रायफल आणि २२ जिवंत काडतूसे जप्त
जम्मू आणि कश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने डोडा येथे रविवारी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला. पोलीस स्टेशन थाथरीच्या अखत्यारीतील भालाडा वनक्षेत्रात (Bhalara Forest Area) तपास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवत ही शोध मोहीम राबवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार डोडा जिल्ह्यातील थाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील भालाडा वनक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. या शोध नेतृत्व एस.एस.पी. […]
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या प्रबोधन कौशल्य निकेतनमुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संस्थेमुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी येथे केले आहे. माणगाव येथील प्रबोधन कौशल्य निकेतनचा दीक्षांत समारंभात ते बोलत होते. हिंदुस्थानमध्ये भरपूर मनुष्यबळ आहे. सुशिक्षित युवकदेखील […]
दांडगुरी-बोर्लीपंचतन रस्त्याचे रुंदीकरण, कार्पेट, सिलकोटचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून प्रवास ‘खड्डे’तर झाला आहे. खराब रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दांडगुरी-बोलींपंचतन मार्ग दिवसेंदिवस अपघाताला आमंत्रण […]
एआय तिकिटांचा सुळसुळाट; रेल्वेने थोपटले दंड; विशेष पथके तैनात
उपनगरीय नेटवर्कवर बनावट आणि एडिटेड तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांविरुद्ध मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवासी एआयने एडिट केलेल्या, मॉर्फ केलेल्या किंवा फोटोकॉपी केलेल्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले आहेत. ही गंभीर फसवणूक आहे. याविरोधात रेल्वेने दंड थोपटले आहेत. रेल्वेने मोठय़ा प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली आहे. फसवणूक करणारे […]
चिपळुणातील कंपनी मालकाची 2 लाख 44 हजारांची ऑनलाईन फसवणूक
लोटे येथील एका कंपनी मालकाची 2 लाख 44 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद राजकुमार पुखराज जैन (वय 52, मूळ रहिवासी – कोल्हापूर, सध्या रा. राधाकृष्णनगर, चिपळूण) यांनी दिली आहे. […]
‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटींचा आकडा पार
‘धुरंधर’ हा स्पाय थ्रिलर सध्याच्या घडीला चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने अपेक्षापेक्षा जास्त कमाई केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. मुख्य म्हणजे या वर्षातील ‘सैयारा’ ला मागे टाकत वर्षातील तिसरा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट देखील बनला आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने आपली […]
हिमालयाच्या जंगलातील आगीमुळे पर्वतांवरील बर्फ गायब
डिसेंबरच्या थंडीत हिमालयातील जंगलात आग भडकली आहे. त्यामुळे उत्तरेकडे वायू प्रदूषणाचा धोका आणखी वाढला आहे. बागेश्वर, चमोली, गोपेश्वर आणि उत्तराखंडच्या आसपासच्या भागात आग सतत पसरत आहे. बागेश्वरच्या गढखेत रांगेतील रियुनी, लखमार आणि बगोटिया जंगलातही आग पसरली आहे. चमोलीतील पोखरी आणि अल्मोरा येथील रानीखेत भाग आगीने कवेत घेतला आहे. आग मोठय़ा प्रमाणात पसरली असून ती नियंत्रित […]
गोळी बंदुकीतून सुटून मित्राचा मृत्यू; आरोपीला तुरुंगवास
बेकायदा बंदुकीतून गोळी सुटून मित्राचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला न्यायालयाने साडेचार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू शिद असे या आरोपीचे नाव असून तो त्याचा मित्र गणपत शिद याच्यासोबत जंगलात शिकारीला गेला होता. दरम्यान, गोळी लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन गणपतचा मृत्यू झाला होता. रोह्यातील इंदरदेव आदिवासी वाडीत राहणारे राजू शिद व गणपत शिद हे कार्ली […]
ऑनलाइन मैत्री महागात पडली, लग्नाचे खोटे आमिष दाखवून 65 लाखांना गंडा
ऑनलाइन मैत्री करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. मीरा रोडमध्ये राहणाऱ्या या तरुणीला भामट्याने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 65 लाखांचा गंडा घातला आहे. चेतन शर्मा (25) असे भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी चेतन व त्याच्या आईवडिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पंजाबमधील पठाणकोट अब्रोलनगर परिसरात राहणाऱ्या चेतन शर्मा याने ऑक्टोबर 2023 मध्ये मीरा […]
अबब! IndiGo ने आतापर्यंत इतक्या रुपयांचे रिफंड दिले; जाणून घ्या विमानसेवेची स्थिती
इंडिगो (IndiGo)च्या गोंधळाने हवाई सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना गेला आठवडाभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. असंख्य विमानांची उड्डाणे रद्द झाली तर बरीच विमाने नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाली. अशातच IndiGo कंपनीने अनेक प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहेत. रविवारी संध्याकाळी दिलेल्या अहवालानुसार, शनिवारीच्या १५०० विमानांच्या तुलनेत आज १६५० हून अधिक उड्डाणे (Flights) चालवण्याच्या मार्गावर आहे. एअरलाइनने […]
सारंगखेड्यात व्हाईट कोब्रा, रुद्राणीचा जलवा
नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक सारंगखेडा यात्रा सुरू झाली आहे. चेतक महोत्सवासाठी देशभरातून विविध जातींचे आणि उमदे घोडे दाखल झाले आहेत. यंदा विशेष आकर्षण ठरलेली ‘रुद्राणी’ ही घोडी पाहण्यासाठी अश्वप्रेमींची तुफान गर्दी होत आहे. तिला तब्बल 1 कोटी 17 लाख रुपये इतकी बोली लागली आहे. अश्व स्पर्धांमध्ये तब्बल 15 वेळेस विजेता ठरलेल्या पंजाबचे जगतारा सिंग यांचा हा […]
आठव्या दिवशीही इंडिगोची अवस्था जैसे थे, प्रवासी संतप्त
देशभरातील अनेक विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणे पुन्हा पूर्ववत झाली नसल्याने, प्रवाशांचे अक्षरशः हाल सुरू आहेत. सोमवारी, दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली, ज्यामध्ये म्हटले आहे की एअरलाइनच्या उड्डाणांना अजूनही व्यत्यय येऊ शकतो. दिल्ली (IGI) आणि मुंबई या दोन्ही प्रमुख विमानतळांवर सोमवारी उड्डाण रद्द झाल्यामुळे इंडिगोचे प्रवासी संतप्त होते. अधिकाऱ्यांच्या मते, प्रभावित प्रवाशांना ६१० कोटींहून अधिक […]
मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार, 14 डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन
मुंबईसह राज्यात बंद पडणाऱया मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास पेंद्राने पुढाकार घेतला आहे. या ज्वलंत विषयावर विचारविनिमय करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिवाजी मंदिर दादर येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुंबईतील मराठी शाळांतील […]
मुलांच्या जीवावर पालकांची कमाई, चाईल्ड एन्फ्ल्युएन्सर्सना चाप लावण्याची सुधा मूर्ती यांची मागणी
इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात लहान मुलांचा थेट कण्टेंट म्हणून वापर केला जातो. लहान मुलांच्या निरागसतेचा, त्यांच्या गोंडस दिसण्याचा वापर करून सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि त्यातून पैसा मिळविण्याचा प्रकार काही जणांकडून होताना दिसतो. या ट्रेंडबद्दल आता थेट राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. खासदार सुधा मूर्ती यांनी राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित […]

32 C