फ्रेन्च अभिनेत्री ब्रिगिट बार्डोट यांचे निधन, 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. 60च्या दशकातील हॉलिवूड आणि फ्रेंच सुपरस्टार ब्रिजिट बार्डोट यांचे निधन झाले आहे.वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बार्डोट यांना अभिनयाबरोबरच एक गायिका आणि प्राणी हक्क कार्यकर्ती अशी त्यांची ओळख होती. ब्रिजिट बार्डोट फाउंडेशनचे प्रतिनिधी ब्रुनो जॅकेलिन यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. मीडिया वृत्तानुसार,गेल्या महिन्यात त्यांना आरोग्याच्या समस्यांमुळे […]
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर–मनमाड राज्य महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात घडली. नदीम आदम शेख (वय १९) व उमर अब्बास शेख (दोघे रा. डिग्रस, ता. राहुरी) हे […]
लिव्ह-इन पार्टनरचे लैंगीक शोषण करणाऱ्या विवाहीत प्रियकराला अटक, 20 लाख रूपये-सोनं लुटल्याचा आरोप
बंगळुरुच्या बागलकुंटे येथे लिव्ह-इन रिलेशनशिपच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने 20 लाख रुपये आणि जवळपास 200 ग्रॅम सोने लुटल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय प्रियकराला फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुलार, शुभम शुक्ला असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि तिच्यावर लैंगिक […]
हिंदु तरुणीच्या वाढदिवसाला आलेल्या मुस्लीम तरुणांना बजरंग दल कार्यकर्त्यांची मारहाण
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका कॅफेमध्ये घुसून मुस्लीम तरुणंना मारहाण केली आहे. या कॅफेमध्ये एका हिंदू तरुणीचा वाढदिवस साजरा होत होता. त्या वाढदिवसासाठी हे तरुण आले होते. सदर तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थीनी असून शनिवारी तिच्या वाढदिवसानिमित्त तिने एका कॅफेमध्ये पार्टी ठेवली होती. त्या पार्टीसाठी तिने तिच्या नऊ मित्र मैत्रीणींना बोलावले होते. त्यातील […]
जगातील मातब्बर गोलंदाजांच्या यादीत मानाचे स्थान पटकावणाऱ्या ब्रेट लीचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा सन्मान केला आहे. ब्रेट लीने आपली कारकिर्द गाजवली आणि अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात खारीचा वाटा उचलला. त्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठीचे अमुल्य योगदान लक्षात घेऊन ब्रेट लीची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने Hall Of Fame साठी निवड केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एक दादा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या […]
घाटिवळे येथील रेल्वे ट्रॅकजवळ नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळला
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या लगत असणाऱ्या गटारात एका अनोळखी सुमारे पंचवीस नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजता उघडकीस आली. याबाबतची खबर पोलीस पाटील दिपक लक्ष्मण कांबळे यांनी साखरपा पोलिसांना दिली […]
PHOTO –राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी रचला इतिहास, INS वाघशीरमधून केला प्रवास
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला आहे. असं करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला होता.
उत्तराखंडमध्ये ढगफुटीत बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला
उत्तराखंडमधील हर्षिल गावात झालेल्या ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या अग्नीवीर जवानाचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला आहे. सचिन पोनिया (२३) असे त्या जवानाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हाथरसचा होता. उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली येथे ऑगस्ट महिन्यात ढगफुटीझाली होती. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. 10 जवानांसह 50 हून अधिक बेपत्ता […]
सावधान ! ईसिगारेटने महिलेची गेली दृष्टी, डॉक्टरांनी दिला इशारा
अलिकडे आपल्या दैनंदिन जीवनात ईसिगारेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अनेकांच्या मते ईसिगारेट धु्म्रपानापेक्षा कमी धोकादायक आणि शरीरावा कमी नुकसान पोहोचवणारी आहे. त्याचा शरिरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. मात्र तसे तुम्हालाही वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका महिलेने ईसिगारेटचा अतिवापर केल्याने तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. नेत्रतज्ज्ञ मेघा कर्णवत यांनी इंस्टाग्रामवर […]
पोलार्ड तात्याची धडकी भरवणारी फलंदाजी, एकाच षटकात 30 धावा चोपून काढल्या; केली षटकारांची बरसात
मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का म्हणून कायरॉन पोलार्डने आपली कारकिर्द गाजवली. त्याच्या आक्रमक फलंदाजीपुढे विरोधी संघातल्या गोलंदाजांची नेहमीच तारांबळ उडायची. आता पुन्हा एकदा त्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपल्या तडाखेबंद फलंदाजीची झलक दाखवून दिली आहे. ILT20 2025 मध्ये MI एमिरेट्स संघाकडून खेळताना त्याने गोलंदाजांना चोपून काढलं आहे. पोलार्डच्या झुंजार खेळीमुळे MI एमिरेट्सने दुबई कॅपिटल्सचा 8 विकेटने […]
एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अशोक चव्हाणांवर टीका
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना काँग्रेसची साथ सोडून दहा माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर टिका करत ही अशोकरावांची चाल असून अशोकरावांना आता भाजप हिरवा करायचा आहे, या शब्दात त्यांच्यावर प्रखर टिका केली आहे. 2012 मध्ये एमआयएम पक्षाने 11 उमेदवार निवडून आणले होते. […]
बालाजी अमाईन्सकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंच भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंचांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार असून त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करणारा आहे. तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर श्री. शास्त्री व ऑफिस इन्चार्ज श्री. मारुती सावंत यांच्या हस्ते प्रश्नसंच वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी सराव परीक्षांमध्ये या प्रश्नसंचाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असे मार्गदर्शन केले व कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमात पुढील ६ शाळांना अपेक्षित प्रश्नसंच भेट देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरळी बु. महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी श्रीराम विद्यालय, धोत्री नरेन्द्र बोरगावकर विद्यालय, देवकरळी छत्रपती शिवाजी हायस्कूल, पिंपळा खुर्द कार्यक्रमास संस्थेचे संचालक बाळासाहेब जगताप, पत्रकार संतोष मगर, विठ्ठल नरवडे सर, बोबडे सर, डोंगेरे सर, स्वामी सर, शिणगारे सर, गुड्ड सर तसेच बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालाजी अमाईन्सची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली आणि सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी आणि भक्तीभावाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सवाचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात ‘धाकटा दसरा’ असेही म्हटले जाते. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे. या नवरात्र काळात श्री तुळजाभवानी देवींची 29 डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, 30 डिसेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, 31 डिसेंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तसेच, सकाळी 7 वाजता जलयात्रा, 1 जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व 2 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न होणार आहे. तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना निघणार आहे. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज रविवार, पौष शुक्ल अष्टमीला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
युवकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 28 डिसेंबर 2025 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवक शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबाद यांच्या वतीने वकार-ए-अमल विभाग (श्रमाची प्रतिष्ठा) अंतर्गत शहरातील खिरणी मळारासोलपुरा परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला. मोहम्मदिया मशिद ते अहमदिया मशिद रस्त्यादरम्यान असलेली जुनी नाली पूर्णतः खराब झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अस्वच्छता व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन अहमदिया मुस्लिम युवक संघाच्या युवकांनी पुढाकार घेत जुनी नाली साफ करण्यासोबतच नवीन नाली खोदण्याचे कामही केले, ज्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. या श्रमप्रतिष्ठा उपक्रमात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थी, अभियंते, शिक्षक, फार्मासिस्ट तसेच इतर विविध पेशांतील नागरिकांनी कोणताही संकोच न ठेवता स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर नागरिकांची स्वतःचीही जबाबदारी आहे, असा महत्त्वाचा संदेश उपस्थित नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अहमदिया मुस्लिम जमाअत अध्यक्ष अब्दुस समद, चिटणीस (वक़ार-ए-अमल) आदिल अहमद तसेच अब्दुल अलीम,अब्दुल नईम, मामून अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद व इतर सदस्य सहभागी झाले होते.
आदर्श विद्यालयाच्या गणित साहित्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा (प्रतिनिधी)- येथील आदर्श विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्य सादर केली. या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, धाराशिव येथील डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जेटनुरे,डॉ. बिराप्पा शिंदे, प्राचार्य धनराज खोंडे, मुख्याध्यापक व्यकंट घोडके, माजी मुख्याध्यापक कमलाकर भोसले, मुख्याध्यापक सुदेश माने, प्राचार्य शैफन शेख, प्राचार्य भीमाशंकर सारणे, वाघमारे, पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी, सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती. या गणित साहित्य प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्याचे सादरीकरण केले. या वेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले कि- दर्जेदार व गुणक्तेचे शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळवी यासाठी शालेय स्तरावर विविध प्रदर्शने भरविणे गरजेचे आहे. शैक्षणिक ज्ञानाचे कार्य सर्व सामान्या पर्यंत पोंहचविण्यासाठी कवठा येथील साईग्राम येथे गुरुकूल ते गुगल हा शिक्षकांचा कुंभमेळा भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गणित हा विषय अभ्यासाचा नव्हे तर जगण्याचा आहे असे सांगताना अधिव्याख्याते डॉ. बिराप्पा शिंदे म्हणाले कि, जीवनाच्या प्रत्येक वाटेत गणित आपल्या सोबत असते. गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणिता मुळे समाज घडविण्याचे अप्रतिम कार्य केले जाते. आदर्श विद्यालयाने गुणक्तेचा मानबिंदू अखंडीत ठेवल्याचा आपल्याला मना पासून आनंद असल्याचे समाधान डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी व्यक्त केले. सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, गणित शिक्षिका पौर्णिमा दाहोत्रे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य शैफन शेख यांनी केले. सुत्रसंचालन कला शिक्षक तात्याराव फडताळे यांनी केले. आभार प्रशांत सोमवंशी यांनी मानले. या प्रदर्शना साठी पालकांची मोठया संख्येनि उपस्थिती होती. गणित विभागातील पुजा राठोड, दयानंद उमाटे, ज्ञानेश्वर माणिकवार, विकास कांबळे सह आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ईस्माईल मुल्ला व वेदांत गुरव या विद्यार्थ्यानी सादर केलेले गणितीय पोष्टर लक्षवेधी ठरले. सफीया शेख, राजश्री शिंदे, सुभान पठाण, श्वेता दळवे, प्रजोत सगर, वर्षा शिंगारे, धनश्री स्वामी, श्रावणी स्वामी, राधा गवळी, हर्षदा कुलकर्णी, जोरावीन सास्तूरे प्रांजली स्वामी, सोविया शेख, उजेर शेख, महिरा काजी, प्रतिक शिंदे, अबुतली सय्यद, शाहिस्ता सय्यद, आदित्य चव्हाण, मयुरी झाकडे, श्रेयश ग्राम,अमित सुरवसे या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणित साहित्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
उमरगा (प्रतिनिधी)- मानव जन्माला येतो तो कर्मभोगासाठी, संसार हा क्षणिक असून त्यात अडकून पडण्याऐवजी ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. देह हा काळाच्या अधीन आहे, तर धनसंपत्ती ही कुबेराची आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर मनुष्याचा कायमस्वरूपी अधिकार नाही. अशा परिस्थितीत केवळ देवाकडील शरणागतीच मानवाला तारू शकते, असे मत हभप गुरूराज महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिरात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या निमित्त शुक्रवारी, दि 26 डिसेंबर रोजी आयोजित किर्तन सेवेत गुरूराज महाराज देगलूरकर बोलत होते. यावेळी वेदमुर्ती अशोक जोशी, महेश इनामदार, माजी व्हाइस चेअरमन सतिश जाधव, भारत शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर बिराजदार, रघुनाथ मुळजे, उध्दव चव्हाण, विजय चव्हाण, माधव औरादे, देवीदास चव्हाण, संजय घोटणे आदी उपस्थित होते. “आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे,” संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा आशय उलगडताना देगलूरकर म्हणाले की, मानवाला पंचमहाभूतापासून उसना देह मिळालेला आहे, त्याला परत करावा लागणारा आहे. मानव जन्म अनमोल असून देह काळाच्या अधीन आहे, तर संपत्ती क्षणभंगुर आहे, अशा परिस्थितीत मनुष्याने गर्व कशाचा करावा?” असा थेट सवाल करत त्यांनी देव सोडून ईतराला शरण जावू नका पांडुरंगाच्या शरणागतीतच जीवनाचे कल्याण आहे, असे सांगत त्यांनी भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. किर्तनात विविध उदाहरणे, अभंगांच्या ओळी आणि संतवचनांच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शेवटी किर्तनात संसारातील मोह, माया, लोभ आणि अहंकार यापासून दूर राहून नामस्मरण, सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. यांवेळी गाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतवाणीचे मर्म उलगडले! हभप देगलूरकर महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून तपाने देवाचं दर्शन होत नाही तर भजनाने दर्शन होते. नामस्मरणाला काळ, स्थळ, वेळेची मर्यादा नसतात, देवाचा धावा केला तर उशीर होईल पण संत आणि भक्तांचा धावा केला तर देव लवकर येतो, संतानी आत्मचिंतन, नामस्मरण आणि सदाचार याचा मार्ग दाखविला. असे सांगत त्यांनी संतवाणीचे मर्म सोप्या उदाहरणांतून उलगडले.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी झेलम शिंपले
धाराशिव (प्रतिनिधी)-ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ,दिल्ली या संघटनेच्या वतीने झेलम शिंपले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून झेलम नारायण शिंपले यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंह होळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. पंकज भिवंटे, रामकिसन रौंदळे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या पत्राद्वारे मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख अनिल गोयकर यांच्या उपस्थित धाराशिव जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व मराठवाडा व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्य वतीने झेलम शिंपले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जनकल्याण द्रुतगती मार्ग कळंब-पारा- ईट मार्गे नेण्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी)- नियोजित लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग अधिक फायदेशीर आणि सोयीचा व्हावा, यासाठी या महामार्गाची आखणी लातूर, कळंब-पारा-ईट, खर्डा,जामखेड, अहिल्यानगर, कल्याण अशा सुधारित मार्गाने करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदारांनी सविस्तर निवेदन देऊन या बदलामुळे होणाऱ्या फायद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गडकरी यांच्याकडे मागणी करताना या मार्गाने लातूर-कल्याण मार्ग नेल्यास सध्याच्या प्रस्तावित मार्गापेक्षा कळंब-ईट-खर्डा हा सुधारित मार्ग अवलंबल्यास प्रवासाचे एकूण अंतर अंदाजे 60 ते 70 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाची मोठी बचत होईल. धाराशिव जिल्हा हा केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्हा योजनेत आहे. जिल्ह्यात मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने बेरोजगारी मोठी आहे. हा महामार्ग जिल्ह्याच्या या भागातून गेल्यास दळणवळण सुधारेल आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल. हा मार्ग जिल्ह्याच्या कृषी पट्ट्यातून जात असल्याने कळंब आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल मुंबई, ठाणे आणि कल्याण सारख्या बाजारपेठांमध्ये जलदगतीने पाठवणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण होणे ही काळाची गरज आहे. या द्रुतगती मार्गाच्या रचनेत बदल केल्यास जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असा विश्वास खा. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
भुजंगराव नलावडे म्हणजे कौतुक सप्तर्षी- प्रा. ए. डी. जाधव
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा आज ज्याठिकाणी आहे, तिथवर तो आणण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. त्यात छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते भुजंगराव नलावडे यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. शिक्षण, क्रीडा, साहित्य आणि समाजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी असाच होता. जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना ते कधीच थकत नसत खऱ्या अर्थाने भुजंगराव नलावडे म्हणजे कौतुकसप्तर्षीच होते अशा शब्दात प्रा. ए. डी. जाधव यांनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. धाराशिव येथील आई लॉन्स याठिकाणी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषद आणि बी. आर. नलावडे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने ठेवा आठवणींचा या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील तर शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, ग्रंथाच्या संपादिका कमलताई नलावडे, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव शहरातील पालिकांच्या शाळेची गुणवत्ता आणि दर्जा राज्यपातळीवर दखल घेण्याइतपत सिद्ध करण्याचे काम नलावडे यांनी केले असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगीतले. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदांच्या शाळा नगरपालिकेकडे वर्ग करून घेण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले याचा वृतांत सर्वांसमोर विषद केला. एम. डी. देशमुख आणि आमदार विक्रम काळे यांनी समोयोचीत मनोगत व्यक्त करीत आठवणींचा ठेवा पुढील पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेतील मुलांनी प्रार्थना, विजयश्री अत्रे यांनी सुंदर गीत सादर केले. प्रास्ताविक मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले. तर सूत्रसंचलन रविंद्र केसकर यांनी केले. तर आभार अर्चना शितोळे यांनी मानले. अनुष्का नलावडे यांचे मनोगत सर्वांना भावूक करून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजित नलावडे, संतोष नलावडे, संजय शितोळे, मसापचे माधव इंगळे, बालाजी तांबे, विजय गायकवाड, बाळ पाटील, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, श्याम नवले, संजय धोंगडे, मधुकर हुजरे, राजेंद्र अत्रे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
Pune News –डाळिंबाला उच्चांकी भाव; किलोस तब्बल ६०० रुपये, आवक रोडवल्यामुळे दरवाढ
डाळींबाची आवक कमी झाल्यामुळे डाळिंबाच्या भावात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकर्याच्या डाळिंबाला बाजारात विक्रमी भाव मिळत आहे. गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात किलोस तब्बल ६०० रुपये भाव मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा येथून आलेल्या ३६ किलो डाळिंबाला किलोस ६०० रुपये, तर ७८ किलो डाळिंबाला किलोस ४०० रुपये असा भाव मिळाला. पुणे बाजार समितीच्या […]
स्वतः कष्ट करून स्वावलंबी बनावे व उद्योजक बनावे- दिपक जोशी
तेर (प्रतिनिधी)- स्वत: कष्ट करून स्वावलंबी बनावे व उद्योजक बनावे असे आवाहन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत)पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी मोफत रेडिमेड गारमेंट्स अँड फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी दिपक जोशी बोलत होते.यावेळी बोलताना उद्योजिका भाग्यश्री निंबाळकर म्हणाल्या की, मला कांहींतरी बनायचय हे ध्येय महीलांच्या अंगी असले पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी ॲड.शिरीष देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांनी केले तर सुत्रसंचलन यश देशपांडे यांनी केले. तर अभार ॲड.अश्विनी देशपांडे यांनी मानले. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी, जिल्हा उप व्यवस्थापक अजय कुलकर्णी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नरेश अमृतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. तेर जिल्हा परिषद गट व तेर व आळणी पंचायत समिती गणात निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावे निरीक्षक म्हणून आलेले नरेश अमृतराव यांनी घेतली.यावेळी हनुमंत कोळपे यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी ॲड.दत्ता देवळकर, शिवाजीराव नाईकवाडी,पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, देवकन्या गाडे, प्रविण साळुंके,नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,मंगेश फंड, सतिष कदम,विठ्ठल लामतुरे, गोरख माळी, हनुमंत कोळपे, भारत नाईकवाडी,नवनाथ पसारे, कांचन इंगळे, नारायण साळुंके, शिवाजी चौगले,विलास रसाळ, अजित कदम,बिभीषण लोमटे,प्रभाकर शिंपले,प्रजोत रसाळ, बाळासाहेब सौदागर, बालाजी मुळे,रामा कोळी, संजय लोमटे,विजय हाजगुडे व मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उतार-चढाव हेच खरे जीवन; सरळ रेषा मृत्यूचे प्रतीक- राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी
वाशी (प्रतिनिधी)- भगवद्गीता हा जीवनाचा खरा आधार असून तो माणसाला प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवते. आजच्या धावपळीच्या व धक्काधक्कीच्या जीवनात येणारे उतार-चढाव हेच जीवन जिवंत असल्याचे प्रतीक आहेत. “जीवन का आधार गीता का सार” या विषयावर मार्गदर्शन करताना राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी जीवनातील वास्तव स्पष्ट केले. उषा दिदी पुढे म्हणाल्या की, जसे ईसीजी मशीनवर दिसणारी रेषा वर-खाली होत असते, तेव्हाच माणूस जिवंत असल्याचे स्पष्ट होते. मात्र ती रेषा सरळ झाली, तर तो मृत्यूचा संकेत असतो. त्याचप्रमाणे जीवनात अडचणी, संकटे, संघर्ष आले म्हणजे घाबरून न जाता त्यांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. समस्यांपासून पळ काढण्याऐवजी त्यांच्याशी सकारात्मक दृष्टीकोनातून सामना करणे हाच खरा जीवनमंत्र आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुरेश कवडे, निचित चेडे, ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. शांता देशमुख, डॉ. दयानंद कवडे, डॉ. दत्तात्रय कवडे, डॉ. उमादेवी बाराते, बर्वे (कृषी अधिकारी), भारत मोळवणे, छगन नाना मोळवणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप राजयोगिनी ब्रह्मकुमारी सोमप्रभा बहनजी यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणातून आध्यात्मिक जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी अनिता करवा यांनी प्रभावीपणे केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सर्व परिवाराच्या वतीने तसेच ब्रह्मकुमारी डॉ. शारदा मोळवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Sangli News : बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण
पशुधन हानीमुळे शेतकरी हवालदिल शिराळा: शिराळा उत्तर भागात बिबट्याने पुन्हा पशुधनावर हल्ले सुरू केले असून शेतकरी पशुपालक मेटाकुटीला आला आहे. शुक्रवारी रात्री औंढी येथील बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या आणि एक बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. पंधरा दिवसांपूर्वी शिवरवाडी येथे मादी [...]
Sangli : कवठेमहांकाळ येथे भरधाव कारची विजेच्या पोलला धडक; एक गंभीर जखमी
रत्नागिरी–नागपूर महामार्गावर भीषण अपघात कवठेमहांकाळ : रत्नागिरी नागपूर महामार्ग क्र १६६ वर महामार्ग पोलिस केंद्राचे दक्षिणेस सोलापूर ते मिरज जाणाऱ्या रोडवर शनिवारी ८.३० वाजता भरधाव वेगात असलेल्या कारची महामार्गालगत विजेच्या पोलला जोरदार धडक होऊन एक गंभीर जखमी झाला असून अन्य दोघे किरकोळ [...]
उस्मान हादी यांचा खून करणारे हिंदुस्थानात पळून गेले, ढाका पोलिसांचा दावा
बांगलादेशातील राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या खुनप्रकरणातील दोन प्रमुख संशयित खुनानंतर मेघालय सीमेवरून हिंदुस्थानात पळून गेले असा दावा ढाका पोलिसांनी केला आहे. द डेली स्टारच्या वृत्तानुसार ढाका महानगर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त एस. एन. नजरुल इस्लाम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख अशी संशयितांची नावे असून स्थानिक मदतनीसांच्या मदतीने मयमनसिंह […]
आधी बलात्कार मग धमकी, मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नगरसेविकेच्या नवऱ्याचा प्रताप; व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात भाजप नगरसेविकेच्या पतीला एका महिलेचा छळ केल्याबद्दल आणि धमक्या दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये आरोपी महिलााशी वाद घालताना आणि प्रभाव दाखवत असल्याचे दिसत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी महिलेने सतना […]
Sangli News : भाजप अंतर्गत तिकीट संघर्षाचा उद्रेक; दीपक माने पत्नीसह आमदार कार्यालयात ठिय्या
सांगली महापालि का निवडणुकीत भाजपात उमेदवारीवरून तीव्र संघर्ष सांगली : सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता अधिक उग्र वळण मिळालं आहे. तिकीट वाटपावरून भाजपात प्रचंड रस्सीखेच सुरू असून उमेदवार ठरवताना नेत्यांच्या नाकी नऊ आले आहेत. प्रभाग क्रमांक 11 या ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव जागेवर [...]
मागील काही महिन्यांमध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळ सुरू असताना खेळाडूंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली असून बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सहकाऱ्यांनी त्यांना CPR देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला परंतू रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ICC Under 19 World […]
Weather News : पुढील 24 तासांत राज्यात हुडहुडी वाढणार ; हवामान खात्याचा अंदाज
कोल्हापूरसह राज्यात थंडीचा कडाका कायम कोल्हापूर : राज्यात पुढील २४ तासांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका अद्याप कायम आहे. दिवसभर काही प्रमाणात ऊन जाणवत असले तरी [...]
अंधेरीतील चाळीत लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
अंधेरी (पूर्व) येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील चाळीतील खोलीत लागलेल्या आगीत गंभीर भाजलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. वीणा प्रदीप भोईटे अशी मृत महिलेची ओळख असून त्यांच्या संपूर्ण शरीरावर 95 ते 98 टक्के भाजल्या होत्या. त्यांचा 24 डिसेंबर रोजी रात्री 10.03 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आगीत जखमी झालेले इतर दोघे अद्यापही गंभीर अवस्थेत […]
बांगलादेशातील हिंसेचे पडसाद थेट लंडनमध्ये, खालिस्तानी गट आणि आंदोलक आमनेसामने
विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले. दीपू चंद्र दास असे त्याचे नाव असून त्याची हत्या आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्याकांडाच्या निषेधार्थ लंडनमधील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू समुदायाने मोठे आंदोलन केले. बांगलादेशात हिंदूवर होणारे हल्ले थांबवावेत आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. मात्र, […]
Kolhapur News : डिजिटल फलक हटवल्याने कुंभोजात तणावाचे वातावरण
फलक हटवल्याच्या निषेधार्थ कुंभोज गाव बंद हातकणंगले : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक १८३१ क्षेत्रातील ३ ते ४ गुंठे जमीन नियोजित शिवतीर्थ आरक्षित जागेवर लावलेल्या छत्रापती शिवाजी महाराजांचे डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने हटवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.कुंभोज गावातील [...]
Kolhapur News : कोल्हापूर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरतोय रंकाळा तलाव
पर्यटकांनी बहरला रंकाळा तलाव..! कोल्हापूर : ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर जोडून आलेल्या शनिवार-रविवारमुळे कोल्हापूर शहर पर्यटकांनी फुलून गेले आहे. विशेषतः शहराचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर पर्यटकांच्या गर्दीने गजबजला आहे. रंकाळा टॉवरपासून ते रंकाळा चौपाटीपर्यंतचा संपूर्ण [...]
Kolhapur Breaking : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कृष्णराज महाडिकांची माघार
इच्छुकांना संधी मिळावी म्हणून महाडिकांचा निर्णय कोल्हापूर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी महापालिका निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता, महाडिकांची तिसरी पिढी देखील राजकारणात [...]
ICC Under 19 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या 15 शिल्लेदारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना घायाळ करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सुद्धा संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याची हीच तोडफोड आणि तडाखेबंद फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत. 15 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडिया […]
महारेराचा संथ कारभार, 791 कोटींपैकी फक्त 262 कोटींचीच वसुली; पैसे न मिळाल्याने ग्राहकांचे हाल
महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महारेरा) यांनी जारी केलेल्या वसुलीच्या आदेशांची अंमलबजावणी राज्यात अत्यंत संथ गतीने सुरू असून, घरखरेदीदारांना देय असलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल दोनतृतीयांश रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. मागील आठवड्यापर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार 1,287 तक्रारींमधून वसुलीकरिता निश्चित केलेल्या 791.55 कोटी रुपयांपैकी केवळ 262.68 कोटी रुपये म्हणजे सुमारे 33 टक्के रक्कमच प्रत्यक्ष वसूल झाल्याचे दिसून […]
Kolhapur News : जागा वाटपाचा तिढा सुटला ; काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना एकत्र कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला. त्यांच्यामधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुट ला आहे. वरिष्ठांच्या बैठकीत ठाकरे गटाला सात जागा देण्यावर एकमत झाले. ठाकरे गटाने ५ व [...]
स्त्रीमुक्ती म्हणजे समारंभ नव्हे, संघर्ष आहे! धाराशिवमध्ये स्त्रीमुक्ती दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- स्त्री मुक्ती दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सामाजिक, राजकीय आणि मानसिक गुलामगिरीविरोधातील संघर्षाचा दिवस आहे, असे ठाम प्रतिपादन करत वंचित बहुजन महिला आघाडी, धाराशिव यांच्या वतीने स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कुटुंबाचा गाडा हाकत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या महिलांचा डॉ. यशवंत मनोहर लिखित “डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली” हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानातून महिलांच्या कार्याचा गौरव तर करण्यात आलाच, शिवाय आजही समाजात रुजलेल्या मनुवादी मानसिकतेवर थेट प्रहार करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आयु. शिलाताई चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे, उषाताई पवार, विजयश्री कुंडगीर यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधाताई लोखंडे यांनी केले. तर जिल्हा महासचिव रुक्मिणी बनसोडे, लक्ष्मीताई गायकवाड, सुरेखाताई गंगावणे, लोचनाताई भालेराव, सुजाताताई बनसोडे, खुणेताई आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, पण तिची मानसिकता अजूनही समाज, प्रशासन आणि राजकारणात जिवंत आहे. स्त्रीमुक्ती फक्त भाषणांपुरती न राहता निर्णय प्रक्रियेत महिलांना समान अधिकार दिले गेले पाहिजेत.” याप्रसंगी फुलेआंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, उपाध्यक्ष भाऊसाहेब अणदुरकर, धाराशिव शहराध्यक्ष नामदेव वाघमारे, शेखर बनसोडे, आकाश भालेराव, महादेव एडके, अंबूरे सर यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री सन्मानापुरता नव्हे तर स्त्री सक्षमीकरणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
उपनगराध्यक्ष, स्वीकृती सदस्य पदांची निवडीची उसुकता
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे ते स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे. नगरपंचायत अधिनियमानुसार सदस्य संख्याबळानुसार दोन स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार असून, या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदाची या निवडीबाबत मोठी उत्सुकता लागली आहे नगरपंचायतीत एकूण 23 नगरसेवकांची निवड झाली असून, त्यामध्ये भाजपचे 18 तर काँग्रेसचे 5 नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता भाजपकडूनच दोन्ही स्वीकृत सदस्य निवडले जाण्याची शक्यता प्रबळ आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासह सर्व नगरसेवक सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. त्यानंतर लगेचच स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये हालचाल वाढली असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गटनेतेपदासाठीही उत्सुकता स्वीकृत सदस्यांबरोबरच आता सभागृहातील गटनेतेपदाच्या निवडीकडेही लक्ष लागले आहे. भाजपकडून अनुभवी नगरसेवक पंडित जगदाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून अमोल यांना गटनेतेपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ता भाजपकडे जबाबदारीही मोठी नगरपंचायतीची सत्ता भाजपच्या ताब्यात आल्याने उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीची जबाबदारीही भाजपवर आहे. या निवडीदरम्यान पक्षनेते कोणाला प्राधान्य देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील तसेच नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शहरात राजकीय चर्चांना उधाण स्वीकृत सदस्य पदासाठी कोणाची निवड होणार, कोणाची संधी हुकणार आणि गटनेतेपदावर कोण विराजमान होणार, याबाबत तुळजापूरमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली असून, येत्या काही दिवसांत या साऱ्या घडामोडींवर शिक्कामोर्तब होणार आहे.
श्री तुळजाईच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास रविवारी आरंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवास रविवारी दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी प्रतिमेसमोर घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. हा महोत्सव जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या नवरात्रोत्सवास तुळजापूरकर छोटा दसरा म्हणून साजरा करतात. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मार्गशिर्ष अमावस्या दिनी शनिवारी (दि. 20) निद्रीस्त करण्यात आलेली श्री तुळजाभवानी मातेची मुळमुर्ती पौष शुध्द दुर्गाष्टमी दिनी रविवारी (दि. 28) पहाटे मुख्य गर्भगृहातील सिंहासनावर अधिष्ठीत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाची सांगता 3 जानेवारी 2026 रोजी शाकंभरी पोर्णिमा दिनी घटोत्थापनेने (घट उठवणे) होणार आहे. हा शाकंभरी नवरात्र महोत्सव पौष महिन्यात असल्याने या महिन्यात भाविकांची संख्या रोडावलेली असते. त्यामुळे या कालावधीत स्थानिक पुजारीवृंद देविजीस सिंहासन महाअभिषेक पुजा, कुलधर्मकुलाचार करतात. तसेच शारदीय नवरात्रोत्सव प्रमाणेच या कालावधीत नऊ दिवस उपवास करतात. या शाकंभरी नवरात्रोत्सव श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी प्रतिमेसमोर काळात सर्व धार्मिक विधी महापुजा शारदीय विधीवत घटस्थापना करण्यात आल्यानंतर या नवरात्रोत्सवाप्रमाणेच असतात. या यात्रेतील प्रमुख जल यात्रेचा धार्मिक सोहळा 31 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या समोर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून लख्ख प्रकाशासाठी मर्क्युरी लाईट फोकस बसवला आहे. मात्र, या फोकससमोरच डिजिटल होल्डिंग उभारण्यात येत असल्याने महाराजांचा पुतळा रात्री अंधारात जात असून, विविध राज्यांतून दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. होल्डिंग बसविणाऱ्या संबंधित एजन्सींना वारंवार तोंडी तसेच नगरपालिकेमार्फत लेखी सूचना देऊनही जाणूनबुजून फोकससमोरच राजकीय डिजिटल होल्डिंग उभे केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण तणाव निर्माण होत असल्याचेही सांगण्यात आले. हीच परिस्थिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळही असून, संरक्षण भिंतीसमोर गेटलगत उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंगमुळे आतला पुतळा दिसेनासा झाला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातही अशाच प्रकारचे होल्डिंग लावले जात असल्याचा आरोप आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या आजूबाजूला 50 मीटर अंतरात कोणतेही होल्डिंग लावण्यास मनाई असतानाही संबंधित डिजिटल फ्लेक्स एजन्सी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. हे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान असून, शहराचे विद्रूपीकरण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिजिटल होल्डिंगला विरोध नाही; मात्र ते लावताना भान ठेवून व नियमांचे पालन करूनच लावावेत, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून नूतन नगराध्यक्ष विनोद (पिटू) भैया गंगणे व नूतन नगरसेवकांना आवाहन करत, संबंधित एजन्सींवर प्रतिबंध घालून शिवाजी महाराज चौकातील फोकससमोरील होल्डिंग तात्काळ हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरपालिका व पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की, बेकायदेशीर व विनापरवाना होल्डिंग लावणाऱ्या एजन्सींवर कायदेशीर कारवाई करावी, होल्डिंग जप्त करावीत व गुन्हे दाखल करावेत. योग्य कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नगरपालिकेने यापूर्वी लेखी पत्र देऊन या ठिकाणी डिजिटल फ्लेक्सला परवानगी दिली जाणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतले होते. मात्र, पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याने तातडीने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अप)चे सोशल मीडिया प्रमुख बबनराव गावडे यांनी दिली आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे केशेगाव शिवारात बोअरची मोटार काढत असताना विद्युत तारेस स्पर्श झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू.ही घटना शनिवार दि.27 डिसेंबर 2025 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान केशेगाव शिवारात घडली. अधिक माहिती अशी की, मौजे केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअर मधील मोटार कप्पीच्या सहाय्याने काम सुरू होते त्यावेळी कप्पीचा स्पर्श महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस झाला आणि यावेळी काम करणारे काशिम कोंडीबा फुलारी वय 54 वर्ष, रतन काशिम फुलारी 16 वर्ष, रामलिंग नागनाथ साखरे वय 31 वर्ष व नागनाथ काशिनाथ साखरे वय 55 वर्ष सर्व राहणार केशेगाव ता.तुळजापुर यांचा तीव्र विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला.मृतामधील रतन फुलारी हा इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असून वेळ प्रसंगी वडिल कासीम फुलारी यांना मदत करीत होता. पण विद्युत तारेच्या धक्क्याने या पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतामधील काशिम व रतन हे पिता पुत्र असून, नागनाथ व रामलिंग हे ही पितापुत्र विजेच्या या तीव्र धक्क्याने चौघांचा ही जागीच मृत्यू झाला असल्याने केशेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी गाव परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. अधिक तपास नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत इटकळ औट पोस्टचे पोलीस करीत आहेत.
सर्वागिण विकास करण्यासाठी कटिबध्द- संयोगिता गाढवे
भूम (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीत आमच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन अहोरात्र प्रयत्न केले. तरीही जनतेने आम्हाला 51 टक्के कौल देऊन विरोधकांना चपराक लगावली आहे. सात हजारांहून अधिक मते मिळवून नगराध्यक्षपद आणि सहा नगरसेवक निवडून दिल्याबद्दल आम्ही मतदारांचे ऋणी आहोत. जरी आमच्या 14 जागांवर पराभव झाला असला, तरी त्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करून नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,“ असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व नूतन नगराध्यक्ष संयोगीता गाढवे यांनी केले. आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय गाढवे पुढे म्हणाले की, “निवडणुकीत मिळालेला 51 टक्के मतांचा कौल हा आमच्या कामावर जनतेने टाकलेला विश्वास आहे. ज्या जागांवर आमचा पराभव झाला, तिथे नक्की काय कमी पडले, याचे आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू. पराभवाने खचून न जाता, जनतेने दिलेल्या या कौलाचा आदर करून आम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांच्या सहकार्यातून शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे हीच आमची प्राथमिकता असेल.यावेळी संजय गाढवे व संयोगीता गाढवे, प्रविण रणबागुल, संजय साबळे, अर्चना दराडे, भागवत शिंदे आणि आलमप्रभु शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Photo –आदित्य ठाकरेंचा नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरण प्रेमी, स्थानिकांशी संवाद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी 27 सप्टेंबर रोजी नाशिकमधील तपोवन येथे भेट देऊन पर्यावरण प्रेमी, स्थानिकांशी संवाद साधला. तसेच ‘जागरूक नाशिककर नागरिक’ व इतर पर्यावरणप्रेमी संघटना, स्थानिकांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पावनभूमी तपोवन नष्ट करून ते विकासकांच्या घशात घालण्याचे महायुतीचे मनसुबे आपल्याला उधळून टाकावेच लागतील. त्यासाठी आता एकजुटीने लढूया, […]
Ratnagiri News –राजापुरात पत्रकार सिद्धेश मराठेवर हल्ला
राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. सिद्धेश मराठे हे सायंकाळच्या वेळेस शिवणे खुर्द गावात गेले होते. ते आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत […]
CWC Meet –‘मनरेगा बचाओ’… 5 जानेवारीपासून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ‘मनरेगा बचाओ’चा नारा काँग्रेसने दिला आहे. येत्या 5 जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ’ ही देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) चे कुठल्याही स्थितीत रक्षण करणार, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने ‘मनरेगा’ रद्द करून ‘विकसित भारत जी राम […]
मनरेगा योजना बंद केल्यामुळे देशातील दोन तीन अब्जाधीशांना फायदा, राहुल गांधी यांची टीका
मनरेगा बंद करणे म्हणजे कोट्यवधी जनतेवर अन्याय आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच यामुळे देशातील दोन तीन अब्जाधीशांना होईल अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी म्हटले की मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय कॅबिनेट आणि राज्य सरकारांना विचार न करता थेट घेण्यात […]
Gold Silver Rate Today –सोन्याची दीड लाख, तर चांदीची अडीच लाखांकडे वाटचाल; जाणून घ्या आजचा दर
सोने, चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. सोन्याची वाटचाल दीड लाखांकडे सुरू आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 42 हजार 545 वर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 29 हजार 450 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीतही […]
नाशिकवर प्रेम करणारा महापौर हवा, दिल्लीसमोर नतमस्तक होणारा नको –आदित्य ठाकरे
नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, दुपारची वेळ झाली आहे, सगळ्यांना भूक लागली असेल; परंतु आपल्यापेक्षा जास्त भूक ही भाजपला लागलेली आहे. त्यांना अशी भूक लागलेली आहे की आपण महाराष्ट्र कधी […]
गुहागर समुद्रामध्ये तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू
जीवरक्षकांच्या प्रयत्नांमुळे दोघांचा जीव वाचला गुहागर: ख्रिसमस सुट्टी निमित्त व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटनाकरिता गुहागर शहरांमध्ये दाखल झालेल्या पर्यटक कुटुंब समुद्रामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने खोल पाण्यात गेल्याने तिघेही बुडाले या तिघांपैकी [...]
फोडलेली माणसं परत द्या, तुमची ताकद फक्त सहा जागांवर; भाईंदरमध्ये युतीच्या चर्चेत शिंदेंची कोंडी
मीरा-भाईंदरमध्ये युतीच्या चर्चेवरून भाजपने शिंदे गटाची चांगलीच कोंडी केली आहे. चर्चेच्या फेऱ्या करण्यासाठी ठरवलेल्या त्रिसदस्यीय समितीची बैठक होण्यापूर्वीच शुक्रवारी या समितीचे सदस्य आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या ताकदीची चिरफाड केली. शिंदे गटाची ताकद केवळ सहा जागांवर आहे असे सांगून युतीसाठी जाहीरपणे दोन अटी घातल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाने भाजपची फोडलेली […]
भाजपने स्वबळावर लढावे ही नवी मुंबईकरांची इच्छा; संजीव नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही भाजपने स्वबळावर लढवावी अशी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाही तर सर्वसामान्य जनतेचीही इच्छा आहे. शिंदे गटाबरोबर युती नको, असा आग्रह सर्वच स्तरातून होत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नवी मुंबई महापालि का निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. पालिका निवडणूक महायुतीत लढवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या दोन बैठका झाल्या असतानाच […]
भाजपचा शिंदे गटाला ‘दम मारो दम’, ठाण्यात सोबत येता की जाता? केळकर यांचा सूचक इशारा
ठाणे पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी भाजप व शिंदे गटात अजून युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असून आजही चर्चेचा सूर टिपेला पोहोचला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर आज ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाला ‘येता की जाता?’ असा थेट अल्टिमेटम दिला आहे. चर्चेचे काथ्याकूट अजूनही […]
सुशिक्षित मातेने केली सहा वर्षाच्या मुलीची हत्या, हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा रचलेला बनाव उघड
अडखळत बोलते आणि बोलताना जास्त हिंदी शब्दांचा उपयोग करते म्हणून एका निर्दयी सुशिक्षित मातेने आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केल्याचा प्रकार कळंबोली येथील सेक्टर १ मधील गुरू संकल्प सोसायटीत घडला आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तिने आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याचे उघड झाले असून तिला […]
इंग्लंडने ऑस्ट्रेलियातील कसोटी विजयाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 5468 दिवसानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी विजय मिळवला आहे. एशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात दिली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या हा सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये संपला. A drought of 5468 days is over as England win their first Test in Australia since January 2011 […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलकांनाची भेट घेतली. आंदोलकांशी संवाद साधत पर्यावरणविषयक मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की,“गेल्या दहा वर्षांत 12 लाख हिंदुस्थानी देश सोडून गेले आहेत. काहीजण मुलांच्या भविष्यासाठी जातात; परंतु हे सगळे प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? […]
कल्याणमधील एका नामांकित शाळेत प्रशासकीय अधिकारी असलेल्या विवेक माने यांच्या मृत्यूचे गूढ तब्बल दीड वर्षांनंतर उकलले आहे. माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी पोलिसांनी नोंद केली होती. मात्र माने यांच्या वडिलांनी दिलेल्या एका माहितीवरून पोलिसांनी तपास केला आणि खुनी चक्क माने यांच्या घरातच सापडला. माने यांच्या आत्महत्येला त्यांची शिक्षिका पत्नीच जबाबदार असल्याचे उघड झाले […]
खोपोलीतील शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची गुरुवारी सकाळी निर्घृण हत्या झाली होती. मुलीला शाळेत सोडायला गेलेले मंगेश काळोखे यांना मारेकऱ्यांनी भररस्त्यात घेऊन त्यांच्यावर चॉपर आणि तलवारीचे वार केले. यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नागोठणे येथून रवींद्र देवकर […]
बांगलादेशात हिंसाचार सुरुच; सुप्रसिद्ध रॉकस्टार ‘जेम्स’च्या कॉन्सर्टमध्ये राडा, दगडफेकीत 25 जखमी
बांगलादेशमध्ये कट्टरपंथियांचा उन्माद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. एका तरुणाला तर जमावाने मरेपर्यंत मारहाण करत झाडाला लटकवून पेटवून दिले होते. अशातच कट्टरपंथी जमावाने सुप्रसिद्ध रॉकस्टार जेम्स यांच्या संगीत कार्यक्रमावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत आणि हाणामारीत 25 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमधील बहुतांश […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. युतीमुळे मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये शिवसेना-मनसेची ताकद वाढली असून आम्ही 115 जागा जिंकत आहोत, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शनिवारी […]
सौदी अरेबियातून सर्वाधिक हिंदुस्थानींना मायदेशी पाठवले, इंग्लंडमधून विद्यार्थ्यांची संख्या जास्त
परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये 81 देशांतून तब्बल 24,600 हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना परत पाठवण्यात (डिपोर्ट) आले असून, यामध्ये सर्वाधिक म्हणजे 11,000 हून अधिक हिंदुस्थानींना सौदी अरेबियातून परत पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकेतून 3,800 हिंदुस्थानींना देशाबाहेर पाठवण्यात आले असून, गेल्या पाच वर्षांतील हा […]
मुंबईत आढळली 1.68 लाख दुबार मतदार, मतदानासाठी 10 हजार 300 केंद्रे
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मुंबईत एकूण 10,300 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत 10,111 मतदान केंद्रे होती. यंदा त्यात 189 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीप्रमाणे शहरात एकूण 10.34 लाख मतदार आहेत. हे मतदार 227 प्रभागांत विभागलेले आहेत. […]
अमेरिकेला ‘डेविन’ हिम वादळाचा तडाखा बसला आहे. नाताळच्या सुट्ट्या सुरू असतानाच अमेरिकेच्या ईशान आणि मध्य-पश्चिम भागात हिम वादळाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे कॅलिफोर्नियामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हिम वादळामुळे आतापर्यंत 1800 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून 22 हजारांहून अधिक विमानांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात […]
सात दिवसांचे नवजात बाळ पावणेसहा लाखाला विकले; बदलापुरात पाच दलालांना अटक
पैशांसाठी एका निर्दयी मातेने तिच्या सात दिवसांच्या बाळाला विकल्याची धवःकादायक घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदलापुरात उघडकीस आली आहे. हे बाळ विकत घेण्यासाठी पोलिसांनीच बनावट ग्राहक पाठवले. ५ लाख ८० हजारांच्या बदल्यात दलालांनी हे बाळ ग्राहकांकडे सुपूर्द करताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे यांच्या तक्रारीवरून बदलापूर पोलि सांनी […]
Photo –हाती घेऊ मशाल रे…पाप जाळू खुशाल रे..! संभाजीनगरात प्रचाराचा श्रीगणेशा
शिवसेनेच्या मशाल रॅलीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर उजळून निघाले. क्रांतीचौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकातून निघालेल्या या रॅलीचे गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर झाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून […]
पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई, मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट झाला असून मतदानादरम्यान पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गैरव्यवहारांना आळा घालणे हा उद्देशदेखील या निर्णयामागे असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यात मुंबई महानगरपालिकेसह 29 पालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार […]
मुंबई महानगरपालिकेवर तीन वर्षे नऊ महिने प्रशासकाचे राज्य होते. लोकप्रतिनिधी नव्हते. या प्रशासकाच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने मुंबईकरांना लुटले आहे. मुंबईकरांना आज मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. केवळ कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांना मुंबई विकण्याचे काम केले आहे. महायुती सरकारच्या या महाभ्रष्ट कारनाम्याचे आरोपपत्र मुंबई काँग्रेसने प्रकाशित केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱयांच्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे […]
प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाबरोबर हातमिळवणी करण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावरून दोन दिवसांपूर्वी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर जगताप यांनी आज मुंबईत येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. […]
निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येईल. सूर्य उगवतो आणि मावळतोही. कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरूपी सत्ता नाही. सत्तेचा मुकुट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार […]
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, तपोवनाला देणार भेट; देवळालीत शिवसेना पदाधिकारी मेळावा
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उद्या शनिवारी, 27 डिसेंबर रोजी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडून त्या जागी माईस हब उभारण्याचा घाट महापालिकेने घातला, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी आवाज उठवला. शिवसेनेनेही या वृक्षतोडीला कडाडून विरोध करीत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे […]
बदल घडवायचा असेल तर महायुतीचे भूत गाडावेच लागेल! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यातील 29 महापालिकांवर सध्या सत्ताधाऱयांचे राज्य आहे. हे राज्य आहे की बजबजपुरी? रस्ते नाहीत, पाणी नाही, ड्रेनेज तुंबलेले! किती जणांना नोकऱ्या मिळाल्यात? शेतकरी कर्जमुक्त झाला का? किती दिवस या नरकयातना भोगत राहणार? बदल घडवायचा असेल तर मानगुटीवर बसलेले महायुतीचे भूत गाडावेच लागेल, असा घणाघात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या […]
माझ्यामुळे जर भाजपचा पराभव झाला तर ती आनंदाचीच बाब – एकनाथ खडसे
नगर परिषद निवडणुकीत जळगावमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवानंतर जिह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अपशकुनी म्हणत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळमधील पराभवाचे खापर खडसे यांच्यावर फोडले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पराभवाची जबाबदारी झटकू नका, असे म्हणत महाजन यांना खडे बोल सुनावले. मी आता भाजपचा विरोधक आहे. त्यामुळे माझ्यामुळे जर भाजपचा पराभव झाला असेल […]
मतदार यादी प्रसिद्धीसाठी 3 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना दिलेल्या सुचनेनूसार, दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी 27 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. तर […]
कोविडनंतर हिंदुस्थानात प्रदूषणाचे सर्वात मोठे आरोग्य संकट; डॉक्टरांचा दावा, हृदयरोगाची प्रकरणे वाढली
पाच वर्षांपूर्वी कोविड महामारीचे जगासमोर सर्वात मोठे आरोग्य संकट होते. आता कोविडची साथ नसली तरी हिंदुस्थानात हवा प्रदूषण हे कोविड महामारीनंतर सर्वात मोठे आरोग्य संकट बनले आहे. ब्रिटनमध्ये काम करणाऱया हिंदुस्थानातील अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी हा दावा केला आहे. जर तातडीने आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर ही समस्या दरवर्षी अधिक गंभीर होत जाईल, असा इशारा […]
ड्रग्जच्या परिणामाला आम्ही सर्वच संयुक्तपणे जबाबदार
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन पणजी/ खास प्रतिनिधी अमलीपदार्थांचा गैरवापर रोखण्याचे कुणा एका संस्था अथवा खात्याचे काम नाही. हे पोलिस, न्यायालय अथवा कुटुंबापुरतेही सीमित नसून आम्ही सर्वजण याच्या परिणामाला संयुक्तपणे जबाबदार आहोत. या समस्येला गोव्याने खूप आधीपासून धाडसाने आणि खुल्या छातीने झेलले आणि यशस्वीपणे परतूनही लावले असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.गोवा [...]
रशियाच्या रिफायनरीवर युक्रेन हल्ला, ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचा केला वापर
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. रशियाच्या एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सैन्यानुसार, हा हल्ला रशियाच्या रोस्तोव भागात असलेल्या नोवोशाख्तिंस्क तेल शुद्धीकरण प्रकल्पावर करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया या दोघांनीही एकमेकांच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले वाढवले आहेत. ऑगस्टपासून युक्रेनने रशियाच्या […]
डिलिव्हरी बॉईजचा ‘काम बंद’चा इशारा
ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’नी आता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी ‘गिग वर्कर्स’नी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीवर होईल. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने या संपाची हाक […]
सीरियात नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट; 8 ठार, 18 जण जखमी
सीरियातील होम्स शहरात एका मशिदीत नमाज पठणावेळीच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असून यात 8 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियात अल्पसंख्याक मानल्या जाणाऱ्या अलावी या समुदायाची ही मशीद असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
लुथरा बंधूंच्या कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ
सह-आरोपीला सशर्त जामीन मंजूर :हडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडवहडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडव खास प्रतिनिधी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बर्च नाईट आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. तर,सह-आरोपी असलेल्या भरतसिंग कोहलीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.हणजूण पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी संपल्यानंतर संशयित लुथरा बंधूंना काल शुक्रवारी म्हापसा न्यायालयात [...]
अर्थवृत्त –गुंतवणूकदारांची चांदी, 150 टक्के परतावा!
सोने आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी कायम असून सलग चौथ्या दिवशी किमतींनी नवा उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अॅण्ड ज्चेलरी असोसिएशनच्या (आयबीजेए) माहितीनुसार चांदीचा भाव एकाच दिवसात 13,117 रुपयांनी वाढला. त्यामुळे चांदी 2.32 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली. याशिवाय 24 पॅरेट सोन्याचा दर 1,287 रुपयांनी वधारून 1,37,914 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. या वर्षी चांदीने तब्बल 150 […]
नायजेरियात ‘आयएस’च्या ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला
ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या होत असल्याचा आरोप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात ‘आयएस’ या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.त्यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांना नाताळच्या शुभेच्छा, असे ट्रम्प म्हणाले. नायजेरियामध्ये या वर्षी धार्मिक हिंसा वाढली असून 10 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधीत सात हजारांपेक्षा जास्त […]
अंतराळात इस्रोची वाढती ताकद, एलन मस्कच्या स्पेसएक्सला तगडी टक्कर
नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. इस्रोने श्रीहरिकोटावरून ‘बाहुबली’ रॉकेट ‘एलव्हीएम3’चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि अमेरिकन कंपनीचा 6100 किलो वजनाचा ‘ब्लू बर्ड’ उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवला. ‘एलव्हीएम3’च्या यशानंतर इस्त्रोने आता थेट एलन मस्क यांच्या स्पेस एक्सला टक्कर दिली आहे. अंतराळ मार्वैटमध्ये सगळ्यात स्वस्त कोण रॉकेट प्रक्षेपण करते याची चर्चा रंगली आहे. […]
चीनने सेल्फड्रायव्हिंग कारची विक्री थांबवली, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूनंतर निर्णय
चीनने स्वयंचलित कार (सेल्फ-ड्रायव्हिंग) कार विक्रीची योजना सध्या थांबवली आहे. एका अपघातानंतर चीनने हा निर्णय घेतला. या वर्षी 29 मार्च रोजी सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कारमध्ये प्रवास करणाऱया 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी कारचा वेग 116 किमी प्रति तास होता. सध्या चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केवळ दोन कंपन्यांना बीजिंग ऑटोमोटिव्ह ग्रुप […]
फातोर्डा दुहेरी खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप
प्रतिनिधी/ मडगाव चंद्रावाडा – फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅथरिना पिंटो यांच्या खून प्रकरणासंबंधी मडगावच्या सत्र न्यायालयाने काल शुक्रवार 26 रोजी या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.या दुहेरी खून प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा हात होता. त्याच्याविरुद्ध ‘ज्युवेनाईल बोड’&मध्ये खटला चालू आहे. सरकार पक्षानुसार 8 मार्च 2021 रोजी सकाळी सुमारे 7.15 वाजता आरोपींनी [...]
लोटे एमआयडीसीतील विनाशकारी प्रकल्प बंद न केल्यास आंदोलन उभारू! शिवसेनेचा इशारा
लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून ‘तो जीवघेणा प्रकल्प तत्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन उभे करू’ असा इशारा आज जिल्हाधिकाऱ्यांना दिला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी जिल्हावासीयांचे मनोगत मांडले. इटलीतील नागरिकांसाठी जीवघेणी ठरलेली मिटेनी पीएफएएस उत्पादन रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी […]
कारागृहात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या पैद्यांना आता लवकर न्याय मिळण्याची शक्यता आहे. कारण आरोपींना न्यायालयीन तारखेला प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर न केल्यामुळे खटल्यांना होत असलेल्या विलंबाची गंभीर दखल सर्किट बेंचने घेतली आहे. आरोपींना ठरलेल्या तारखेला हजर करा. सुनावणी लांबवू नका, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी दिले. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृह प्रशासन […]
इन्फोहसिसचा धमाका! फ्रेशर्सना मिळणार थेट 21 लाखांपर्यंतचे पॅकेज
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोहसिसने फ्रेशर्सचे सुरुवातीचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेष तंत्रज्ञान पदावर रुजू होणाऱ्यांना वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात येणार आहे. देशातील आयटी सेक्टरमध्ये फ्रेशर्ससाठी ही खूप मोठी रक्कम मानली जाते. एआय क्षेत्रात प्रतिभावंत कर्मचारी आकर्षित व्हावेत, यासाठी इन्फोहसिस भरती प्रक्रिया वाढवत आहे. इन्फोहसिस 2025 च्या अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान […]
आमदार गोविंद गावडे यांच्याशी राजकीय संबंध? शक्यच नाही!
मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळली शक्यता प्रतिनिधी/ पणजी मगो पक्षाचे चिन्ह सिंहाविऊद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या आणि पक्ष नेत्यांच्या पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे आमदार गोविंद गावडे यांच्याशी भविष्यात कोणतेही राजकीय संबंध ठेवण्याची शक्यता मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळून लावली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील उमेदवाराला पाठिंबा देणे किंवा न देणे [...]
वीर बाल दिनानिमित्त 20 मुलांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमेवर जवानांना चहा आणि नाश्ता देणाऱया फिरोजपूर येथील श्रवण सिंग याच्यासह 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, 7 वर्षांची ग्रँडमास्टर लक्ष्मी प्रज्ञिका यांचा त्यात समावेश आहे. शीख बांधवांचे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या चार मुलांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून […]

25 C