महाराष्ट्रात सर्पाकार परिस्थिती असून तीन साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात धरून एकमेकांना गिळायला बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीवर केला. अशी गिळागिळी सुरू झाली तर जनतेकडे कोण बघणार, असा सवालही त्यांनी केला. एकनाथ शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांनी आपले शेकडो कार्यकर्ते आणि अनेक सरपंचांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे […]
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत दुसरा मोठा हल्ला […]
भूतानमधून मोदींचा इशारा, स्फोटाचे कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही
स्फोटाचे कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये बोलताना दिला. ‘दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने मन व्यथित झाले आहे. संपूर्ण देश पीडितांच्या पाठीशी आहे. काल रात्रभर मी विविध तपास यंत्रणांचे अधिकारी व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे मोदी […]
स्थानिकच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची राज्यस्तरीय समन्वय समिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत समन्वय रहावा यासाठी महाविकास आघाडीने राज्यस्तरीय समन्वय समिती नेमण्याचा निर्णय आज घेतला. या समितीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद […]
मुद्दा –वाढती सायबर फसवणूक; एक चिंतेचा विषय
>> मच्छिंद्र ऐनापुरे भारत डिजिटल युगात झपाटय़ाने पुढे जात असताना, सायबर फसवणुकीच्या घटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 2024 मध्ये भारतात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 206 टक्क्यांनी वाढ होऊन एकूण 22,845 कोटींचं नुकसान झालं आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही वाढ अत्यंत धोकादायक असून डिजिटल सुरक्षा यंत्रणेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. 2023 मध्ये सायबर गुह्यांमुळे देशात अंदाजे 7465 […]
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आजपासून अंतिम सुनावणी
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या अंतिम सुनावणी सुरू करणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे कार्यतालिकेतील 19 व्या क्रमांकावर ही सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह […]
लेख –उन्हाच्या तासांमध्ये होणारी घट
>> प्रा. विजया पंडित तापमानवाढीमुळे अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असतानाच आता एका नव्या अभ्यासानुसार भारतासह काही देशांमध्ये उन्हाचे तास कमी होत असल्याचे समोर आले आहे. वातावरणात एरोसोलचे प्रमाण वाढल्याने ढगांची भाऊगर्दी होते आणि ते दीर्घकाळापर्यंत आकाशात राहतात. त्यामुळे सूर्यप्रकाश रोखला जातो आणि पुरेसे ऊन जमिनीवर पडत नाही. त्यास ‘अल्ब्रेट’ प्रभाव असे म्हणतात. धूलिकण […]
पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील गायब झालेली आरोपी शीतल तेजवानी अखेर प्रकट झाली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीने हायकोर्टात धाव घेतली असून चुकीच्या पद्धतीने यात नाव गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. हायकोर्टाने मात्र तेजवानीला दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर आज तत्काळ सुनावणी घेण्याची तिची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे तेजवानीच्या अडचणी वाढल्या असून तिला कोणत्याही क्षणी […]
गृहनिर्माण सोसायटीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकाचा कालावधी एक वर्षांचाच असेल. प्रशासकाने कारभार हाती घेतल्यानंतर तीन महिन्यांत निवडणूक घ्यावी, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने निबंधकांना दिले आहेत. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने हे आदेश दिले. सोसायटीचा कारभार हा निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीच चालवायला हवा. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास निबंधकावर न्यायालयाच्या अवनानतेची कारवाई करण्यात येईल. सोसायटीचे […]
सामना अग्रलेख –दिल्ली हादरली; गृहमंत्र्यांचे अपयश
स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी–शहांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी […]
राज्यातील न्यायालये आणि न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. न्यायालये आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8 हजार 282 सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास या बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएससी) हे सुरक्षारक्षक उपलब्ध […]
अजित पवारांना मोदी-शहादेखील आता वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण पुणे कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातून फडणवीसच, नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहादेखील आता वाचवू शकत नाहीत. मी त्यांना एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात […]
महायुतीला मतभेदांचा निवडणुकीत फटका बसण्याची भीती, तोडग्यासाठी तीन मंत्र्यांची समन्वय समिती
भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार असून महायुतीमधील मतभेदांचा फटका बसू नये म्हणून भाजप शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय आज भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत […]
स्वयंपुनर्विकास शहरांचा चेहरामोहरा बदलेल ः पवार
स्वयंपुनर्विकासातून सर्वसामान्य माणसाला मोठी जागा मिळेलच, पण मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या संकल्पनेत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतली आणि स्वयंपुनर्विकास संकल्पनेची माहिती दिली. पवार यांनी या योजनेतील सर्व बारकावे जाणून […]
एमईआरसीच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरता येणार नाही
महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) झालेल्या कामकाजाचे ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येणार नाही तसेच याचिका प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दाखल करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने सदर याचिका फेटाळून लावली. वीज नियामक आयोगासमोरील कामकाजाचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य […]
माता रमाबाई आंबेडकर, कामराज नगरमधील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर द्या!
घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील रहिवाशांना पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत 500 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्ष संघटक विलास रुपवते यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि एसआरए संयुक्तरीत्या करणार आहेत. या ठिकाणी मध्यमवर्गीय, कामगार वर्ग तसेच हातावर पोट भरणारे […]
डॉ. सुभाष जोशी यांना धन्वंतरी जीवनगौरव; डॉ. आल्हाद परांजपे, डॉ. विनोद मेहता यांनाही पुरस्कार
मुंबई वैद्य सभा आयुर्वेदिक नामांकित चिकित्सकांना सन्मानित करण्यासाठी धन्वंतरी पुरस्कार प्रदान करते. यंदाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. आल्हाद परांजपे आणि डॉ. विनोद मेहता यांना तर जीवनगौरव डॉ. सुभाष जोशी यांना प्रदान करण्यात आला. विलेपार्ले येथे पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. ओमप्रकाश दुबे आणि धूतपापेश्वर लिमिटेडचे एमडी रणजीत पुराणिक […]
कुरिअर ट्रक करण्याच्या नावाखाली ठगाने हिंदुस्थानी नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पवईत राहणाऱ्या निवृत्त नौदलातील अधिकारी यांनी एका कुरिअर कंपनीच्या नंबरवर त्याने फोन केला. त्यावेळी ठगाने त्यांना व्हॉट्सअॅपवर एक फाईल पाठवून एक अॅप्स इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्या अॅप्समध्ये ज्याना कुरिअर पाठवायचे […]
गुटखा विकणाऱ्या दोघांना बेड्या
वडाळा पूर्वेकडील आदर्श नगरात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांना वडाळा टीटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. वडाळा-चेंबूर मार्गावरील आदर्शनगर बस स्टॉपजवळ काही व्यक्ती बंदी असतानाही बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नवले यांनी त्याठिकाणी धडक […]
छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवादी ठार, बिजापूरच्या जंगलात सुरक्षा दलांची कारवाई
छत्तीसगडच्या बीजापूर जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईत मोठ्या प्रमातात शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, बीजापूर जिह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात ही चकमक उडाली. एका ठिकाणी नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अनेक तास दोन्ही […]
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल उठलेल्या अफवांचे त्यांच्या कुटुंबीयांनी खंडन केले. काही न्यूज चॅनेलवर सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त प्रसारित केले गेले. त्यानंतर ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘मीडिया अतिरेक करत असल्याचे दिसतेय. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची […]
ड्रग्ज माफिया ‘पगली’ कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, अमली पदार्थविरोधी कक्षाची धडक कारवाई
समाजामध्ये ड्रग्जची पाळेमुळे पसरविणाऱ्या व पेडलर्सद्वारे तरुण-तरुणींना ड्रग्जचे व्यसन लावणाऱ्या एका ड्रग्ज माफिया महिलेला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मजबूत दणका दिला. या पथकाने रोमा आरिफ शेख ऊर्फ पगली (37) हिला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. रोमा आरिफ शेख ऊर्फ पगली ही ड्रग्ज माफिया आहे. तिच्या विरोधात एनडीपीएसचे आठ गुन्हे दाखल आहेत. तिच्या […]
अडीच वर्षे पगारच मिळाला नाही! पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आर्थिक टंचाईला तोंड देणाऱ्या पाकिस्तानमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तब्बल 28 महिने पगारच न मिळाल्याने सिंध प्रांतात शिक्षण विभागाचे कर्मचारी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 14 दिवसांपासून हे कर्मचारी हैदराबाद प्रेस क्लबच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी आता उपोषण सुरू केले आहे. […]
अकोला दंगल प्रकरण, एसआयटी स्थापनेच्या आदेशाला स्थगिती
2023 मध्ये अकोला येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या स्वतःच्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. दंगलीसंबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले होते. त्या आदेशाला तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या […]
असं झालं तर…घर खरेदीची कागदपत्रे हरवल्यास
खरेदीची कागदपत्रे हरवली गेली तर जास्त घाबरून जाऊ नका. सर्वात आधी मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवली आहेत, चोरीला गेली आहेत, असे नमूद करून गुन्हा दाखल करा. पोलीस तक्रारीच्या आधारे, नुकसान झालेल्या कागदपत्रांची माहिती देणारी सूचना वर्तमानपत्रात प्रकाशित करा. हे तुमच्या मालमत्तेवर कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी महत्त्वाचे आहे. हरवलेल्या कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळविण्यासाठी संबंधित उपनिबंधक कार्यालयाशी […]
अगरबत्तीचा सुगंध पसरत नसेल तर…हे करून पहा
घरात अगरबत्तीचा सुगंध येत नसेल तर काय कराल. काही अगरबत्त्या कमी प्रतीच्या तेलांपासून बनवलेल्या असल्यामुळे त्यांचा सुगंध चांगला येत नाही. चांगल्या प्रतीची आणि नैसर्गिक तेलांपासून बनवलेली अगरबत्ती वापरा. कधी कधी जास्त वेळ अगरबत्ती जळल्याने तिचा सुगंध कमी होऊ शकतो. जर अगरबत्ती दमट असेल तर तिची सुगंधित तेले खराब होतात आणि सुगंध कमी होतो. अगरबत्ती पूर्णपणे […]
ट्रेंड – 10 वाला बिस्कीट कितने का…
सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदुस्थानी इन्फ्लुएन्सर शादाब हसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हे एका लिफ्टमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्यात एक छोटासा, पण भन्नाट संवाद होतो. लिफ्टमध्ये शादाब हसनने ब्रेट लीकडे बघत हिंदीत विचारले, ‘10 वाला बिस्कीट कितने का है जी?’ हे ऐकताच लिफ्टमधले सगळे लोक हसू लागले. […]
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक; चार घरांवर छापेमारी
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. दहशतवादी कनेक्शन असलेल्या काही आरोपींना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांची चाैकशीतून मुंब्रा येथील शिक्षकाचे नाव समोर आले होते. त्या शिक्षकाला एटीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यानंतर चार घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. ताब्यात […]
दापोलीत धनशक्तीचा जनशक्ती पराभव करणार; भास्कर जाधव यांचा विश्वास
आपण गेली ४३ वर्षं झाली राजकारणात आहोत. अगदी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा, विधान परिषद , लोकसभा , राज्यसभा, सहकार आदी क्षेत्रातील दिडशेच्या वर निवडणुकांना आपण सामोरे गेलो आहोत. आपण आपल्या सहकाऱ्यांनाही निवडून आणले. माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एक सुध्दा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आपल्याला निवडणुकीत कधीच पैशाचा वाटप करावा […]
Mumbai News –एक्स बॉयफ्रेडच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, घाटकोपरमधील धक्कादायक घटना
एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून घाटकोपरमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घाटकोपरमधील इंदिरानगरमध्ये राहणारी 22 वर्षीय पीडिता आणि आरोपी अली शेख एकाच कंपनीत काम करत होते. तेथेच त्यांचे प्रेमसंबंध […]
तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान जॉर्जियामध्ये कोसळले, बचाव कार्य सुरू
तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान जॉर्जियामध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. या विमानात 20 सैनिक असल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. तुर्की लष्कराच्या C-130 विमानाने मंगळवारी अझरबैजानहून उड्डाण केले. ते तुर्कीला परत जात असतानाच जॉर्जियन सीमेजवळ लष्करी मालवाहू विमान […]
बिहार विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या व अंतिम टप्प्याचे मतदान आज पार पडले. राज्यातील 20 जिह्यांतील 122 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बिहारच्या जनतेने विक्रमी मतदान केले. संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी ६७.१४ टक्के इतके मतदान झाले होते. तर पहिल्या टप्प्यासाठी ६५.८ टक्के मतदान झाले आहे. बिहार निवडणुकीसाठी मतमोजणी म्हणजे निकाल शुक्रवारी लागणार आहे. […]
Chhatrapti Sambhaji Nagar News –वडोद बाजार पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन
छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी शेतकऱ्याची मदत करून माणुसकीचे दर्शन दिले आहे. ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडलेला मका गोळा करून पुन्हा ट्रॅक्टरमध्ये भरण्यास वडोद बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी शेतकऱ्याला मदत केली. पोलिसांच्या या कार्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर पाथरी गावाजवळ एक शेतकरी ट्रॅक्टरमधून शेतातील मका घेऊन जात होता. रस्त्यावर […]
Delhi Car Blast –कोलकाता हाय अलर्टवर; हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका सामना होणार का नाही? वाचा…
दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात सोमवारी (10-11-2025) कारचा स्फोट झाला. या स्फोटामद्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरे हाय अलर्टवर असून प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशातच 14 नोव्हेंबरला कोलकाताच्या इडन गार्डन्सवर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार […]
…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू! SIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत, निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडून (EC) उत्तर मागवले आहे. याबाबतच्या याचिका द्रमुक, सीपीआय(एम), काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्यांनी दाखल केल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राजकीय पक्षांनी या प्रक्रियेला घाबरू नये. जर आम्हाला काही […]
फरिदाबादमध्ये अटक केलेल्या डॉ. शाहीनबद्दल धक्कादायक माहिती उघड, जैश-ए-मोहम्मदच्या होती संपर्कात
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे समोर येत आहे. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन शहीदबाबत सुरक्षा यंत्रणांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. डॉ. शाहीन यांना भारतात जैश-ए-मोहम्मदची महिला संघटना “जमात-उल-मोमिनीन” च्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. हिंदुस्थानात महिलांची भरती करणे, ब्रेनवॉश करणे आणि त्यांचे ऑपरेशनल नेटवर्क स्थापित करणे […]
Solapur Crime : सांगोला भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई
पंढरपूर पोलिसांचा छापा; 45 जुगारपट्ट्यांविरुद्ध गुन्हा दाखल पंढरपूर : ऐन नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक कोटी १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. [...]
Delhi Blast –दिल्ली स्फोटाचा तपास NIAकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA), 1967 च्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये आढळलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) […]
Solapur : पहिल्या दिवशी अर्जदारांची अनुपस्थिती; मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक चर्चेत
मंगळवेढा निवडणूक अर्ज प्रक्रियेत उशीर मंगळवेढा : नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मंगळवेढा नगरपरिषदेसाठी उमेदवाराकडून एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. त्यामुळे [...]
धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी 280 इच्छुक उमेदवारांनी न. प. निवडणुकीसाठी बेबाकी प्रमाणपत्र घेतले आहे. परंतु आज दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 10 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. असे असतानाही इच्छुक उमेदवार मात्र नगर परिषदेने उमेदवारी अर्जासोबत जे 26 कागदपत्र लागतात ते कागदपत्र जमविण्यात व्यस्त असल्याचे समजते. यावर्षीपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरणे सुरू असल्यामुळे व उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळाचा विषय झाला आहे. धाराशिव शहरात 41 नगरसेवकांसह 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. शहरात 94 हजार 14 इतकी मतदार संख्या आहे. 20 प्रभागापैकी 19 प्रभागामध्ये तीन सदस्यांना निवडून द्यायचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; प्रस्थापितांना धक्का!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आता उमेदवारीसाठी इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. जाहीर झालेली आरक्षण सोडत प्रभाग क्रमांक: १ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २ अ) […]
Solapur : अकलूजमध्ये सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांची कारवाई
सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न अकलुज : अकलूज पोलीस ठाण्यात १० खासगी सावकारांविरुद्ध सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुनावर गुलमहंमद खान (वय ४८, रा. जुना बाजारतळ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अनिल मदने (रा. महादेवनगर, अकलूज), [...]
एनसीसी विभागा तर्फे वंदे मातरम गीताचा सार्ध शती महोत्सव
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे 'वंदे मातरम 'आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे वंदे मातरम गीत गाऊन देशभक्ती, देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात सर्वप्रथम वंदे मातरम गीत गाण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले सर यांनी कॅडेट्सना या दिवसाचे ऐतिहासिक व वंदे मातरम गिताचा संपूर्ण अर्थ महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले. सरांनी आपल्या भाषणात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या गीताने सर्व देश भक्तांना एक सूत्र ते मध्ये बांधण्याचे काम केले . तसेच हजारो, लाखो भारतीयांनी वंदे मातरम म्हणत ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर घेतल्या देशासाठी प्राण दिला पण वंदे मातरम म्हणतच. ऐवढे सामर्थ्य , देशप्रेम , शक्ति या गिता मध्ये होते असे सांगितले . आज सुद्धा हे गित कालजयी आहे त्यासाठी संपूर्ण भारतीयांनी भारत मातेला वंदे मातरम म्हणजेच मातृभूमिला वंदन करणे होय व आजच्या काळात सर्वांमध्ये देशप्रेम , देशभक्ति जागृत होणे महत्वाचे आहे असे सरांनी सांगितले . नंतर दिडशे वर्ष पूर्ण झाल्या बदल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती चित्रकलेचा विषय होता 2047 मध्ये भारत कसा असेल? या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक पंकज जमादार, द्वितीय किरण सास्तुरे , तृतीय साक्षी राजपुत , सुलोचना सुर्यवंशी . या वेळी मंचावर उपप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले होते सुत्रसंचलन ,प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व आभार कॅडेट सुशांत जाधव यांनी मानले . यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी , कॅडेटस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तलाठ्यांच्या 'अप-डाऊन'मुळे नागरिकांची कामे खोळंबलीः महसुल विभागात पदेही रिक्त...!
उमरगा (प्रतिनिधी)- तलाठी हे गावाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र जिल्ह्यातील दूरदूरच्या गावांमध्ये तलाठ्यांचे नियमितपणे न येणे ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक तलाठी शहरातून अप-डाऊन करतात, तर काही ठिकाणी पदभरती रखडल्यामुळे तलाठी कार्यालये ओस पडलेली आहेत. या परिस्थितीमुळे शासकीय योजना, विविध प्रकारचे दाखले, अनुदान मिळवणे अशा अत्यावश्यक कामांसाठी ग्रामस्थांना वारंवार खर्च करूनही निराश होण्याची वेळ येते. कार्यालय गावात असतानाही तलाठी शहरात वास्तव्यास असल्यामुळे, ते प्रत्यक्ष गावात दिसतच नाहीत. त्यामुळे काम कुणाकडून करून घ्यायचं आणि तलाठी सापडायचा तरी कुठे..? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महसूल विभागातच कर्मचाऱ्यांची टंचाई आहे. काही ठिकाणी तर तहसीलदारांनी एका तलाठ्याला दोन गावे देऊन प्रभारी वर कामचलाऊपणा सुरू केल्याचे दिसत आहे. तलाठी कार्यालय गावात आहे पण साहेब शहराच्या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे समजते. त्यामुळे गावगाडा रखडला असल्याचे दिसत आहे..! उमरगा तालुक्यात 80 ग्रामपंचायत असून 96 गावे आहेत. तलाठ्यांची संख्या मात्र केवळ 35 असल्यामुळे अनेक गावांमध्ये तलाठीच नेमले गेलेले नाहीत. जेथे तलाठी कार्यरत आहेत, तेथे ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नाहीत. शासनदरबारी एकुण 41 तलाठ्यांचे पदे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ 35 तलाठ्यांवर भार घालून कामे केली जात आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामविकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तलाठ्यांची पदे सज्जे 41 मंजूर आहेत. पण सुंदरवाडी, कोराळी, समुद्राळ, केसरजवळगा, तुरोरी आणि सावळसुर या सहा तलाठी सज्जाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे 35 जणांवर तालुक्यातील गावगाड्याचा भार वाहीला जात आहे. तलाठी साहेब आज कुठे...? जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील तलाठी गावात वास्तव्यास न राहता शहरातून अप-डाऊन करतात. आज तलाठी साहेब गावात येणार की नाही, सध्या ते कुठे आहेत. याची ना ग्रामस्थांना कल्पना असते, ना कुठे कोणतीही अधिकृत सूचना दिसते. त्यामुळे शासकीय कामांसाठी आलेल्या ग्रामस्थांना तलाठ्यांचा शोध घेत गावागावात भटकावे लागते. नागरिकांची वणवण...! कोणत्याही योजनेची माहिती किंवा अर्ज भरताना, विविध योजनेचे अनुदान आले किंवा नाही यासह विविध कागदपत्रे हवे असल्यास ग्रामस्थांना तलाठ्यांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे एका एका तलाठ्याला दोन गावे दिलेली आहेत. त्यामुळे साहेब कुण्या गावात आहेत की आज आलेच नाहीत याचा शोधच लागत नाहीत. उमरगा येथे मुख्य कार्यालय असले तरीही ते वास्तव्यास मात्र बहुतांश तलाठी लातूरला, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर येथे राहतात. त्यामुळे ते जरी नाही आले व त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते उमरग्याला मीटिंग असल्यामुळे आलोच नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. उमरगा शहरातून अप-डाऊन; 4 वाजता तलाठी गायब...! उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक गावांमधील तलाठी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. चार-साडेचार वाजले की तलाठी गायब होतात. नंतर ते चार-आठ दिवसानंतरच येत असल्याने तसेच काही तलाठी नेमून दिलेल्या दिवशीच गावकऱ्यांना दर्शन देत असल्याने गावागावांतील नागरिकांचे कामे प्रभावित होत आहेत. काही तलाठ्यांचे नियमित गावांना भेटी...! काही तलाठी 'अप-डाऊन'करीत असले तरी काही तलाठी नियमित गावांत भेट देऊन नागरिकांची कामेही करताना दिसून येत आहेत. गावात 'डमी'तलाठी.... काही गावात तलाठी वेळेवर पोहोचत नसल्याने तलाठ्यांनी गावात एक खाजगी व्यक्ती ठेवला आहे. तलाठ्याचे कामे बहुतांश या डमी तलाठ्याकडून होत आहेत. याबाबत नायब तहसीलदार महसूल डॉ. अमित भारती व जी. एस. पारीसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, काही दिवसातच प्रत्येक तलाठी सज्जाला तलाठी भवनाचे बांधकाम दुरूस्ती सुरू आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास रितसर पाठवले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व कामकाज सुरळीत चालू होईल असे सांगून वेळ मारून नेले.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प सुविधा उभारण्यात याव्यात,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा व्यवस्थापन मंडळ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच मतिमंद व बहुविकलांग राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा स्थानिकस्तर समितीच्या आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री.बांगर,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी मयूर काकडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता व्ही.आर.सुर्यवंशी आदी उपस्थित होते. दिव्यांग हक्क अधिनियम-2016 च्या अंमलबजावणीअंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा,पुढील तीन महिन्यांच्या कामकाजाचे नियोजन,दिव्यांगांचे सर्वेक्षण,तसेच दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्जमंजुरी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँकांमार्फत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजना व इतर योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाच टक्के दिव्यांग निधीचा खर्च,संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित दिव्यांग प्रस्ताव,दिव्यांगांना स्वतंत्र घरकूल योजनेचा तात्काळ लाभ मिळवून देणे,200 स्क्वेअर फुट जागा शासन निर्णयानुसार उपलब्ध करणे,अंत्योदय रेशन कार्ड वाटप,आणि दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देणे या बाबीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी सर्व संबंधित विभागांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी तत्परतेने काम करून योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा,तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांगांचा सहभाग वाढावा,यावर विशेष भर दिला.
दक्षिण मुंबईतील ओपेरा हाऊस येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरकमा करणाऱ्या महिलेवर त्याच घरातील चालकाने बलात्कार केला. यानंतर महिलेचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला ओपेरा हाऊस परिसरात एका घरात घरकाम करते. ती ज्या घरामध्ये काम […]
लातूर - पुणे महामार्गावर ढोकी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करा
धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर - बार्शी - पुणे महामार्गावरील ढोकी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक ॲड. तुकाराम शिंदे यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन देऊन मागणीकडे लक्ष वेधले. दोन्ही मंत्री महोदयांनी ट्रॉमा केअर युनिटबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती ॲड. तुकाराम शिंदे यांनी दिली. मुंबई येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन ॲड. तुकाराम शिंदे यांनी मंगळवारी (दि.11) सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, लातूर - बार्शी - पुणे ते मुंबई महामार्गावरील 15 ते 16 गावाचा संपर्क असणारे आणि हायवेलगत असलेले ढोकी गाव साखर कारखाना व गाव ही महत्त्वाची वर्दळीची ठिकाणे आहेत. दररोज हजारो लोक या मार्गावरून विविध वाहनांतून ये-जा करतात. दिवसेंदिवस वाहनांची व प्रवाशांची संख्या वाढत असल्याने अपघातांची व त्यातील जखमी रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व जखमी रूग्णांना तात्काळ योग्य ते उपचार वेळेवर मिळण्यासाठी ढोकी येथे अस्थिरोगतज्ञासह ट्रॉमा केअर युनिटची म्हणजेच अपघात विशेषोपचार केंद्राची नितांत आवश्यकता आहे. सध्या विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. आता ढोकी पीएचसीच्या जागी विशेष बाब म्हणून तात्काळ ट्रॉमा केअर युनिट मंजूर करण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
उमरगा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करायच्या दुसऱ्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा नगर परिषद 2025 निवडणूकीत मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे वतीने दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रभाग क्रमांक 11 ब मधून फरहीन खाजा मुजावर व प्रभाग क्रमांक 11 अ मधून सचिन सूतके यांनी प्रभाग अकरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, शहराध्यक्ष विजयजी दळगडे, जिल्हा सचिव विजय वाघमारे, अभिमन्यू भोसले, बाबा मस्के, आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
लातूर रोडवरील एका लॉजवर छापा; तेवीस वर्षाच्या तरूणीची सुटका
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता ते लातूर जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला असून एका तेवीस वर्षाच्या तरूणीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगाल येथील एका तरूण महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. प्रीतीश दिलीप सगर (वय 26, रा. गुंजोटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल सागर बार अँड लॉजचा चालक आणि व्यवस्थापक (मॅनेजर) प्रीतीश दिलीप सगर (वय 26, रा. गुंजोटी, ता. उमरगा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजच्या वरच्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पांडुरंग कन्हेरे, रामहरी चाटे, पोहेका. अतुल जाधव, अनुरूद्र कावळे, पोलीस नाईक नवनाथ भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक यासाठी स्थापन करण्यात आले.रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच, पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला. छाप्यात आरोपी प्रीतीश सगर हा पैशाचे आमिष दाखवून एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका 23 वर्षीय महिलेची सुटका केली आहे.
समितीच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या दृष्टीने समितीचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक धाराशिव शहरातील श्री गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आली. उमरगा शहराध्यक्ष-किशोर माडजे आणि उमरगा तालुकाध्यक्ष- महेश फंड, लोहारा शहराध्यक्ष-श्री मंगेश गोरे आणि लोहारा तालुका अध्यक्ष श्री हरिदास रवळे तुळजापूर शहराध्यक्ष- श्री प्रतीक अंभोरे आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष- अतिश मिसाळ, कळंब शहराध्यक्ष- श्री ऋषिकेश काळे आणि कळंब तालुकाध्यक्ष- श्री ॲड. रणधीर देशमुख, वाशी शहराध्यक्ष- श्री विशाल कवडे आणि वाशी तालुकाध्यक्ष- श्री अंकुश मोरे, भूम शहराध्यक्ष- श्री अर्जुन जाधव आणि भूम तालुका अध्यक्ष- श्री प्रशांत शेळके, परंडा शहराध्यक्ष- श्री राहुल आगरकर आणि परंडा तालुकाध्यक्ष- श्री सुरेश घाडगे, धाराशिव शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे आणि धाराशिव तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे यांची शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये एकमताने .निवडी करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे, गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, ॲड. संजय शिंदे, अमोल पवार, हरिचंद्र आगळे, सुनील मिसाळ, दत्ता साळुंके, हनुमंत तांबे, धनंजय साळुंके, अच्युत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्ती देण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने बनवलेल्या 270 कृत्रिम घरट्यांचे विद्यार्थ्यांना वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (12 नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली (5 नोव्हेंबर) यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या वतीने पक्ष्यांसाठी 270 कृत्रिम घरटी बनवण्यात आली होती. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ही पक्ष्यांची घरटी मोफत वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, लोकसहभाग वाढवणे या हेतूने हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य प्रा. संतोष घार्गे, प्रा.डॉ.बालाजी कामठाणे, प्रा.डॉ. अजित मसलेकर, प्रा.डॉ. गोरख देशमाने, कला व वाणिज्य प्रमुख प्रा.कैलास कोरके, मनोज राजे निंबाळकर, श्रीकांत देशमुख, पर्यवेक्षिका सौ.भारती गुंड व ज्यांच्या संकल्पनेतून ही घरटी बनवली गेली ते मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.मनोज डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी पक्षी सप्ताहाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कृत्रिम घरट्यांविषयीची माहिती सांगितली. आदित्य पाटील यांनी पक्ष्यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून पक्षीसंवर्धन काळाची गरज असल्याचे सांगितले. तुम्हीही वापरात नसलेली खोकी, बाटल्या यांपासून घरटी बनवून या मुक्या जीवांच्या संवर्धनात मोलाचे योगदान देवू शकता, असे प्रतिपादन केले. तसेच प्रत्येक वाढदिवसाला दरवर्षी याच पध्दतीने किमान 500 घरटी मोफत वाटण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण कसे करायचे? छंद कसा जोपासायचा? पक्षीनिरीक्षणातून आनंद कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष सुधीर आण्णा पाटील यांनी पक्षी हे पर्यावरणासाठी, शेतीसाठी कसे आणि किती उपयुक्त आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत पक्षीसंवर्धनासाठी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहनही केले. या अभिनव उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शितलकुमार ऐवळे, प्रा.राज भोसले, प्रा.यशवंत कोकाटे, प्रा.सिध्देश्वर जाधव, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.डी.वाय.घोडके, प्रा.शंकर गोरे, प्रा.लक्ष्मण शिंदे,प्रा.राजहंस कांबळे, प्रा.अमित काकडे, प्रा.सविता जाधव, प्रा.सुवर्णा शेळके व शिक्षकेतर कर्मचारी पद्माकर ढेकणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सूर्यकांत कापसे तर आभार उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे यांनी मानले.
फरीदाबादमध्ये दहशतवादाची फॅक्टरी, दिल्ली स्फोटाबाबत महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जण जखमी झाले. या कटाचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद देखील स्फोटात ठार झाला. मोहम्मद हा डॉ. मुझम्मिल शकीलचा मित्र होता आणि फरीदाबादमधील एका रुग्णालयात काम करत होता. पोलिसांनी उमरच्या पालकांना आणि दोन भावांना ताब्यात घेतले आहे. […]
Pandharpur : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत 5 कोटी 18 लाखाचे उत्पन्न
वारकरी भाविकांचे कार्तिकी यात्रेत मोठे देणगी योगदान पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ [...]
गायिका पलक मुच्छल आपल्या गायकीबरोबरच सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. पलकची आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समने नोंद घेतली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पलकची दखल तिच्या गायकीसाठी नव्हे तर, समाजसेवेसाठी घेतली आहे. गायिका पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून 3800 हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केली आहे. लहानपणी पलक एका […]
Karad : कराडमधील पोलीस कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू
कराड पोलिस प्रवीण काटवटे यांचे आकस्मिक निधन कराड: शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. दक्षिण तांबवे, ता. कराड) या पोलीस कर्मचाऱ्याचा रविवारी दुपारी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी आकस्मिक मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची [...]
Nanded Election –नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोडतीत २० प्रभागातील 41 जागा महिलांसाठी राखीव
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. २० प्रभागातील ८१ वार्डापैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम व उपायुक्त अजितपालसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रभागाचे प्रभारी अधिकारी नितीन गाढवे यांनी आरक्षणाचा सर्व मसुदा उपस्थितांसमोर ठेवला. २०११ […]
Satara : लिंब ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लिंब ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप सातारा : लिंब ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यात कामे नसतानाही परस्पर बिले काढली आहेत. ग्रामनिधी परस्पर रोखीने खर्च केला आहे, असा आरोप करत लिंब येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या [...]
भूतानचे चौथे राजे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
मरो त्याचे दुश्मन…, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा संतापले
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर धर्मेंद्रचे जवळचे मित्र अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले आहेत. ते म्हणाले विश्वासू पोर्टल्सवर बातम्या पाहून त्यांनाही निधनाची बातमी खरी वाटली. मात्र, नंतर त्यांना निधनाची बातमी खोटी असल्याचे कळले. बॉलीवूड हंगामाशी बातचीत […]
Karad News : कराड तालुक्यात ऊसदर घोषणेची शेतकऱ्यांची मागणी तीव्र; कारखान्यांना निवेदन
कराडमध्ये ऊस उत्पादकांचा कारखान्यांविरोधात हल्लाबोल कराड : कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सह्याद्रि, अथणी रयत, जयवंत शुगर, कृष्णा व डायमंड शुगर या कारखान्यांच्या गट ऑफिसवर जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून ऊसतोड करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. [...]
राज्यात आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. त्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी मंगळवारी शहरातील प्रियदर्शनी सभागृहात आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे […]
Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पळसावडेतील भूमिपुत्रांचा टाटा पॉवरविरोधात हल्लाबोल सातारा : माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. स्थानिकांचा पगार वाढवला जात नाही. दिलेले आश्वासन कागदावरच ठेवली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरच घोंगडी आंदोलन करून त्यांना भंडारा भेट देणार होतो, [...]
उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
हरिनाम सप्ताह १५ नोव्हेंबर रोजी ओटवणे | प्रतिनिधी देवसू गावचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शेंडोबा माऊली देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. या दिवशी तीन [...]
Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
साताऱ्यात लल्लन जाधव आणि साथीदारांची दहशत सातारा : ‘मी फरारी आहे. मला खर्चाला ५० हजार रुपये दे, असे म्हणत कुख्यात गुन्हेगार लल्लन जाधव याने त्याच्या सात साथीदारांसोबत प्रतापसिंहनगरात राडा घातला. बंदुकीसारखे शस्त्र डोक्याला लावत एकाला मारहाण करुन लुटमार केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. लल्लन [...]
Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
मिरजमध्ये आर्थिक फसवणूक उघडकीस मिरज : येथील शिक्षण संस्था चालकाला संस्थात्मक कामासाठी सहा टक्के व्याजदराने दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे अमिष दाखवून आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिवानंद आप्पाराया तेलसंग (वय ५४, [...]
आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
गिरीजानाथाच्या दर्शनासाठी भाविकांची होणार अलोट गर्दी ओटवणे प्रतिनिधी सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतरगिरीजानाथाला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले असून गिरीजानाथाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक [...]
Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी
कवठेमहांकाळमध्ये राजकीय तापमान चढले! निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असून आचारसंहितेच्या घोषणेकडे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या बैठका नुकत्याच मुंबईमध्ये पार पडल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी, ढालगाव, कुची आणि देशिंग डे चार [...]
जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी आज पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क, सामाजिक कार्यातली निष्ठा आणि विकासासाठीची प्रामाणिक धडपड लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला ग्रामीण पातळीवर निश्चितच नवं बळ प्राप्त होणार आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या प्रवेशप्रसंगी युवासेना धाराशिव लखन गायकवाड, अक्षय गरड, तसेच ॲड. तुकाराम शिंदे (राज्य आंदोलन समन्वयक व शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष) उपस्थित होते. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर इरशाद शेख यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे मनःपूर्वक स्वागत करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहा आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सक्रिय भूमिका निभवा,” असे आवाहन केले. इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे जुनोनी परिसरात तसेच संपूर्ण धाराशिव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
दिल्लीत झालेल्या घटनेसाठी जबाबदार कोण? काँग्रेसचा सरकारला सवाल
दिल्लीतील स्फोटानंतर केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांकडून उत्तराची मागणी केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की अमित शाह हे अयशस्वी गृह मंत्री आहेत. सात महिन्यांत 41 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये जे घडले त्यासाठी जबाबदार कोण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. […]
विद्यापीठ उप-परिसर येथे रक्तदान शिबीर संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरील शिबीराचे आयोजन विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. पी. पी. दीक्षित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सदरील शिबिराच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये चोवीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील दीपमाला करंडे (रक्त संक्रमण अधिकारी), निलाक्षी जानराव (रक्तपेढी तंत्रज्ञ), विनय कुंभार (रक्तपेढी तंत्रज्ञ), गणेश साळुंके (वैद्यकीय समाजसेवक), जयदेव सुरवसे (रुग्णवाहीका चालक), रविराज गंभीरे (रक्तपेढी परिचारक) यांनी रक्त संकलणाचे कार्य पार पाडले. सदरील रक्तदान शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच धाराशिव येथील प्रदीप खामकर, अमोल माने, रविंद्र बेदमूथा व महेश भोंग या नियमित रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. एम. खोब्रागडे, डॉ. जे. एस. शिंदे, तसेच रासेयो स्वयंसेवकानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
धाराशिव (प्रतिनिधी)- इस्रो सारख्या संस्थेत आमचे विद्यार्थी आता काम करतात हा आमच्या महाविद्यालयाचा गौरव आहे. असे प्रशंसनीय उद्गगार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी काढले. नुकताच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी आदेश भोरे याची इस्त्रोमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 2022 चा विद्यार्थी आदेश भोरे हा इस्त्रोमध्ये सध्या कार्यरत आहे. पदवीनंतर एवढ्या अल्पावधीत निवड झाल्याबद्दल मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने त्याचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, एम जी चौधरी, डी.डी.लिंगे, रामेश्वर मुंडे, किरण बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्काराला उत्तर देताना आदेश भोरे म्हणाले की, धाराशिव सारख्या भागात असून सुद्धा महाविद्यालयाने शहरी भागात मिळणाऱ्या सर्व सुविधा आम्हा विद्यार्थ्यांना पुरविल्या. अगदी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून नियोजित अभ्यासक्रमाबरोबरच तांत्रिक कौशल्यावर भर देऊन महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले. मी पहिल्या वर्षापासून सातत्यपूर्ण प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रियपणे भाग घेऊन अभ्यास पूर्ण केला. त्यामुळे पदवी मिळाल्याबरोबर माझी इस्रो सारख्या संस्थेत निवड झाली याचा मला स्वतःलाही आनंद आणि अभिमान वाटतो. यापुढेही असे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून घडतील अशा शुभेच्छा आदेश भोरे यांनी याप्रसंगी दिल्या. आदेश भोरे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही आदेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आणि महाविद्यालयाने सत्कार करून शुभेच्छा दिल्याबद्दल आदेश भोरे यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. गंगाधर काळे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “ग्लोबल एज्युकेशन स्टार अवॉर्ड 2025” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान “नॅशनल विदर्भ आर्ट्स, सोशल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड सेरेमनी”, नागपूर येथे युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस् आणि समृद्धी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात आला. या समारंभाला देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि समाजसेवक उपस्थित होते. प्रा. काळे यांच्या या यशाबद्दल शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. गंगाधर काळे यांच्या या कामगिरीबद्दल भूम परिसरातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
भूम येथे माजी विद्यार्थ्यांची बैठक
भूम (प्रतिनिधी)- भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक 9 नोव्हेंबर रोजी गुरुदेव दत्त हायस्कूल येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी मुख्याध्यापक कल्याणराव मोटे, अरुण गायकवाड, लगाडे, गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव दत्त हायस्कूल भूम माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेतील मुलासाठी आरो फिल्टर बसवणे, शाळेत सोलर सिस्टिम बसवणे, आधुनिक पद्धतीचे स्मार्ट डिजिटल बोर्ड, अद्यावत सुसज्ज स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारणे, सर्व वर्गात सीसीटीव्ही बसवणे, शाळेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा मिळवावे म्हणून पारितोषिके ठेवणे अशा विषयावर चर्चा होऊन प्रधान्य क्रमांकाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले. या बैठकीमध्ये प्रथम प्रधान्य विद्यार्थ्यांसाठी आरो फिल्टर बसवण्यासाठी देण्यात आले तसेच सोलर सिस्टिम बसवणे यासाठीही सहकार्य करणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गुरुदेव दत्त माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संदीप बागडे,सचिव पदी उमेश ढगे ,कोषाध्यक्ष निशिकांत गाढवे,उपाध्यक्ष गणेश तांबे,नवनाथ रोकडे,गणेश पवार,सुधीर बागडे,तानाजी वडेकर, सिराज मोगल,अजित मस्कर ,हरिभाऊ महामुनी उपस्थित होते.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भूमचा रोहित माने ठरला तृतीय
भूम (प्रतिनिधी)- खोपोली (जि. रायगड) येथे झालेले असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रविंद्र हायस्कूल, भूम येथील विद्यार्थी रोहित माने याने 17 वर्षे वयोगट व 60 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत भूम तालुक्याचा मान उंचावला आहे. रोहित माने हा सलग चार वर्षे विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारा खेळाडू असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली. या उल्लेखनीय यशाबद्दल रोहित माने याचा व त्याचे मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (कबड्डी कोच) यांचा शाळेतर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी. सुळ, कोषाध्यक्ष डॉ. विजयकुमार सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर, तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहितच्या या कामगिरीमुळे भूम तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आणखी एक अभिमानाची नोंद झाली आहे.
शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांचा काँग्रेस प्रवेश
नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहरात कमकुवत झाला असून, आता शहरात काँग्रेसला नवा उत्साह प्राप्त झाला आहे. दरम्यान येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक जगदाळे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अशोक जगदाळे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशोक जगदाळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेचे उमेदवारी घेऊन जवळपास पहिल्याच टप्प्यात 35 हजार मतदान घेऊन सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. दरम्यान 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी त्यांची बहीण रेखाताई जगदाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणून एकहाती सत्ता नगरपालिकेत काबीज केली होती. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, माजी नगरसेवक अमृत पदाले, ताजुद्दीन सावकार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय बेडगे, नवल जाधव, माजी नगरसेविका सुमन जाधव, मास्टर टेलर, अमोल सुरवसे, दत्ता राठोड, अलीम शेख यांच्या सह अनेकांचा काँग्रेस प्रवेश झाला आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांची नगरपालीकेच्या निवडणूकीत विरोधकावर जोरदार चढवीला हल्ला
परंडा (प्रतिनिधी)- माजी मंत्री भूम-परांडा-वाशी मतदार संघाचे आमदार डॉ.प्रा.तानाजी सावंत हे शुक्रवार दि.7 रोजी पासून परंडा - भूम - वाशी मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असून परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी उपस्थितीत राहून पदाधिकारी,कार्यकर्तेसह उपस्थित हजारो मतदारास मार्गदर्शन करित विरोधकावर जोरदार हल्ला चढविला विरोधक एकत्र आले तरी आपणास काही फरक पडणार नाही असे म्हणत त्यांनी मी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका साम दाम दंड वापरून विरोधकांचे आमानत रक्कम जप्त करून वीस नगसेवक सह जाकीर भाई तुम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बहूमताने निवडून येणार मला पूर्ण खात्री आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी विरोधकावर जोरदार प्रहार करित माझ्या विरोधात शहरातील विरोधक सर्व पक्ष एकत्र आले असून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लडवून दाखवावी असे खुले आव्हान केले.तसेच शहशतील वीस नगरसेवकासह व मी स्वःता नगराध्यक्षपद निवडूण आणून दाखवून विरोकांचे अनामत रक्कम जप्त केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या पाठीशी परंड्यातील जनता व आमदार सावंत आहेत. त्यामुळे विकास कामाला गती मिळणार आहे. परंडा शहरात आमादर सावंत यांनी कोट्यवधी रुपयांची निधी आणून विकासकामे केली आहेत आणि या विकासकामांच्या बळावर जनता नक्कीच निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गटाला ) बहुमताने विजयी करेल असे मत सौदागर यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख,परंडा शहर प्रमुख यांच्यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते मतदार आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
366 वा शिवप्रताप दिन व समिती स्थापना दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सरदार अफजलखान यास ठार मारून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 366 वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. 366 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी बादशाहीचे अफजलखान रुपी आलेले संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारून ऐतिहासिक विजय संपादन केला होता. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या ऐतिहासिक दिनाची स्मृती जागृत व जतन करण्यासाठी हा दिवस शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2003 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सतत शिवकार्य करणारी समिती संपूर्ण जिल्हाभर कार्यरत आहे. 366 वा शिवप्रताप दिन व शिवराज्याभिषेक सोहळा समिती स्थापना दिन या दोन्हींच्या निमित्ताने धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक व महाभिषेक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत खुणे, गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, अमोल पवार, अच्युत थोरात मेजर, धनंजय साळुंके, एडवोकेट संजय शिंदे, हरिश्चंद्र आगळे, हनुमंत तांबे, दत्ता साळुंके यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवरायांचा पुतळा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच वाद्यांच्या दणदणाटात व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच समितीच्या मावळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच धाराशिव शहर, तालुका परिसरातील आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते मावळे उपस्थित होते.
काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभय मालवणकर
सावंतवाडी । प्रतिनिधी नगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य यावे यासाठी पक्षात आता फेरबदल करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी महेंद्र सांगेलकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अभय मालवणकर यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ [...]
Chhatrapati Sambhaji Nagar –महापालिकेच्या निवडणुकीसाठी 115 जागांचे आरक्षण जाहीर
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर येथील 29 प्रभागातील 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. यामध्ये 58 जागा या महिलांसाठी असणार आहे. तर 57 जागा या खुल्या असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण 30 महिला, सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 असून, ओबीसी पुरुष 15 आहेत. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये 11 पुरुष आणि 11 महिला नगरसेवकांसाठी आरक्षण […]
हिवाळ्यात दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या
हिवाळ्यात आपण खूप कमी प्रमाणात पाणी पितो. परंतु यामुळे आपल्या आरोग्याशाठी धोका निर्माण होऊ शकतो. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात देखील. हिवाळा आल्यावर तब्येतीच्या असंख्य तक्रारी सुरु होतात. म्हणूनच हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी हे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी हळदीसोबत हे पदार्थ खायलाच हवेत […]
आयपीएल २०२६ रिटेन्शनपूर्वी ५ अफवा, जाणून घ्या
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटाने हादरली, हायकोर्टाबाहेर कारमधील स्फोटात 12 जणांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्यावेळी कोर्ट परिसराच्या पार्किंगमध्ये कार उभी होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी असताना हा स्फोट झाला. स्फोटात अनेक वकील आणि सामान्य नागरीक […]
दिल्लीतील स्फोटावर पंतप्रधान मोदी भूतानमध्ये बोलले, षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही
मंगळवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर इशारा दिला आहे. भूतानच्या थिम्फूमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, या घटनेमागील कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सर्व जबाबदारांना कोर्टात उभे केले जाईल.” पंतप्रधान मोदी हे भूतानचे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेजारील देशात […]
हे निर्लज्ज लोक फक्त तुमचा वापर करतील…, सुनील गावसकरांनी टीम इंडियांच्या रणरागिंणींना केलं सावध
टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर महिला संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचे सगळीकडून कौतुक होत आहे. सरकारपासून ते अगदी मोठ मोठ्या ब्रँडपर्यंत सर्वांनी या रणरागिणींचे कौतुक केले आहे. दरम्यान, हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हरमनप्रीत कौर आणि संपूर्ण टीमला सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर काही […]
चेहरा सुंदर ठेवण्यासाठी घरातील हा पदार्थ वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
तुम्ही फेशियलसाठी वारंवार पार्लरमध्ये जाऊन कंटाळला असाल किंवा रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेवर प्रतिक्रिया येत असेल, तर आता काहीतरी नैसर्गिक अवलंब करण्याची वेळ आली आहे. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या दूध आणि मध सारख्या साध्या पण प्रभावी गोष्टींनी तुम्ही घरी चमकदार त्वचा मिळवू शकता. हे दोन्ही त्वचेला हायड्रेटिंग, क्लीन्झिंग आणि पोषण देण्यासाठी खूप प्रभावी आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्यासोबत […]
तब्बल तीन तासाच्या थरारानंतर कोल्हापुरात बिबट्या जेरबंद, उच्चभ्रू वसाहतीत एका हाॅटेलमधुन शिरला
कोल्हापूरातील नागाळापार्क या उच्चभ्रू वस्तीतील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यावयाशेजारी रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली.काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. हॉटेलमधून बिबट्याने पलिकडे बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर […]
नावे यापूर्वीच दिलीय, कारवाई का नाही?
पूजा नाईकच्या दाव्यानेपोलिसांच्या निक्रीयतेवर प्रश्नचिन्ह : विद्यमान मंत्रिमंडळातील तो मंत्री कोण? घोटाळ्याचे गूढ वाढले,अनेकखात्यांतीलनोकऱ्यांसाठी17 कोटी68 लाखांचाव्यवहार पणजी : राज्यभर गाजत असलेल्या कथित नोकऱ्यांसाठी रोकड घोटाळ्यातील सूत्रधार पूजा नाईक हिने पुन्हा एकदा एक घणाघाती दावा करीत नोकऱ्या घोटाळ्यातील संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची नावे यापूर्वीच पोलिसांना दिली होती, असे सांगितले आहे. त्यामुळे जर नोकऱ्यांसाठी पैसे घेणाऱ्यांची [...]
PMC Election 2025 –आरक्षण सोडत जाहीर, 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी
आगामी महापालिका निवडणुकांसाठीची पुणे महापालिकेच्या आगामी आरक्षणाची सोडत मंगळवारी (11 नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडली. यावेळी महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहे. यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये तब्बल […]
Kolhapur Leopard News : कोल्हापुरातील बिबट्या अखेर जेरबंद….!
कोल्हापुरात बिबट्याचा थरार, नागरिकांमध्ये भीती कोल्हापूर : मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती मात्र वनविभागाकडून शोध मोहीम सुरू होती वनविभागाला बिबट्या चकवा देत होता आज दुपारी विवेकानंद महाविद्यालयासमोर घरकाम करताना महिलांना बिबट्याचा दर्शन झालं यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले [...]
पूजा नाईकची डिचोलीत अर्धा तास चौकशी
डिचोली : नोकरभरतीत लोकांकडून पैसे उकळल्या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिला चौकशीसाठी काल सोमवारी 10 नोव्हें. रोजी सकाळी डिचोली पोलिसस्थानकात बोलावण्यात आले होते. त्यानुसार सकाळी 11.30 वा. च्या सुमारास ती डिचोली पोलिस्थानकावर दखल झाली. सुमारे अर्धा तास चौकशीनंतर ती पोलिसस्थानकाच्या मागील दाराने बाहेर पडली. कॅश फॉर जॉब प्रकरणात प्रमुख संशयित असलेली पूजा नाईक डिचोली पोलिसस्थानकावर [...]

24 C