इस्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला; २५४ जणांचा मृत्यू
लेबनान आणि इस्रायलमधील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या जोरदार हल्ल्यात लेबनानमध्ये २५४ लोकांचा बळी गेला असून ७०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व रुग्णालये जखमींनी भरली असून आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत […]
आसाम, केरळ आणि पुडुचेरीमध्ये गुरुवारी मतदानाचा रणसंग्राम; १८९९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
देशातील दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरीमधील एकूण २९६ जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून, सुमारे ६ कोटी मतदार १८९९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. आसाम (१२६ जागा) आसाममध्ये गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता […]
बेंगळुरू विमानतळावर ५ कोटींचे सोने जप्त, शरीराच्या गुप्त भागात लपवून चालली होती तस्करी
बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी पाच तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांनी ज्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून सुरक्षा यंत्रणाही थक्क झाल्या आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले पाचही आरोपी बांगलादेशमार्गे हिंदुस्थानात आले होते. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर आता या आठवड्याच्या अखेरीत अमेरिका व इराणमध्ये शांतता चर्चा होणार आहे. ही चर्चा पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे होणार असून त्यासाठी. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या शनिवारी ११ एप्रिलला पाकिस्तानला जाणार आहे. #WATCH | White House Press Secretary Karoline Leavitt says, “I […]
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात गुजरात टायन्सने अवघ्या एक धावाने दिल्लीचा पराभव केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर गुजरातने बाजी मारली आणि हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिल्लीला 210 धावा करत 211 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने कडवी झुंज देत […]
२०२८ ची जागतिक हवामान परिषद हिंदुस्थानात होणार नाही; यजमानपदाचा दावा घेतला मागे
हिंदुस्थानने २०२८ मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान बदल परिषदेचे (COP33) यजमानपद भूषवण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, जागतिक हवामान मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हिंदुस्थानने स्वतः या आयोजनासाठी आपली दावेदारी मांडली होती, त्यामुळे या माघारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिळालेल्या […]
बीडीडी चाळवासियांना दरमहा 40 हजार घरभाडे द्या, आदित्य ठाकरे यांचे म्हाडाला पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीडीडी चाळवासियांना दरमहा 40 हजार घरभाडे द्या, अशी विनंती करणारे पत्र जयस्वाल यांना दिले. ना. म. जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकासांतर्गत स्थलांतरित रहिवाशांना सध्या मिळणारे रु. २५,००० घरभाडे वाढत्या […]
ताजे मासे कसे ओळखायचे, या तीन ट्रीक वापरा
बाजारात बऱ्याचदा ताजा माशांसोबत शिळे मासे देखील विकायला असतात. अनेकदा विक्रेते ताजा म्हणून आपल्याला शिळा माल खपवतात व आपली फसवणूक होते. दिवसेंदिवस मासळीचे दर वाढत चालले आहेत त्यात अशी फसवणूक झाली तर चांगलंच जीवाला लागतं. त्यामुळे मासे हे कायम व्यवस्थित स्वत: तपासूनच घ्यायचे. बाजारात गेल्यावर तुम्ही या तीन पद्धती वापरून मासे ताजे की शिळे ते […]
युद्धाच्या वाटाघाटींमध्ये हिंदुस्थान कुठेच दिसत नाही, जयराम रमेश यांचा मोदींना टोला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणला ‘संपूर्ण संस्कृती एका रात्री संपवू,’ अशी धमकी दिली होती. त्याआधी त्यांनी इराणला 48 तासांचा अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र इराणला धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे देखील म्हटले आहे. यात युद्धविरामाच्या चर्चेत हिंदुस्थानचा काहीच सहभाग […]
आता हे स्पष्ट झाले की…; अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
निवडणूक आयोगाच्या एका एक्सवरील पोस्टमुळे बुधवारी एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यावेळी पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती, हिंसाचार, धमक्या, प्रलोभने आणि धाडींपासून मुक्त असतील. ही पोस्ट करताना निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसला निवडणूक आयोगाचा स्पष्ट संदेश या निवेदनासह ही पोस्ट कली. त्यामुळे वाद उफाळून आला असून आपचे संयोजक अरविंद […]
आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेस नेते पवन खेरा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. बुधवारी पवन खेडा यांनी मुख्यमंत्री सरमा आणि त्यांच्या कुटुंबाच्या कथित विदेशी संबंधांवरून पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पवन खेडा यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये खेडा यांनी मुख्यमंत्री सरमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे […]
West Bengal –यंदाची निवडणूक भय –हिंसा रहित म्हणणाऱ्या आयोगाला संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली
निवडणूक आयोग व तृणमूल काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये आज दिल्लीत एक बैठक पार पडली. ही बैठक अवघ्या 7 मिनिटात आटोपली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एक ट्विट करत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग भय आणि हिंसा रहित होतील तसा स्पष्ट संदेश तृणमूल काँग्रेसला दिल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या ट्विटवर देशभरातून टीका होत असून विरोधकांनी देखील आयोगाला फैलावर घेतले […]
IPL 2026 –जोस बटलरचा नवा विक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये कॅरेबियन खेळाडूंच्या सिंहासनाला दिला धक्का
IPL 2026 मध्ये आज (8 एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात थरारक सामना पाहायला मिळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलरने झंझावाती फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बटलरने पॉवरप्लेच्या 6 षटकांतच अवघ्या 22 चेंडूत 47 धावा कुटल्या. यामध्ये त्याने 3 […]
बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकणार्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला असून संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल […]
भाजपने देशाचे परराष्ट्र धोरण रसातळाला नेले, अखिलेश यादव यांची टीका
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत देशाच्या परराष्ट्र धोरणावरून गंभीर टीका केली आहे. “भाजपने आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे रसातळाला नेले आहे,” असे त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत. अखिलेश यादव म्हणाले की, “एकेकाळी हिंदुस्थान विश्वगुरू होईल असे वाटत होते, मात्र […]
मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील गुंडेवाडी शिवारात अमोनियम नायट्रेटने भरलेला टँकर गळती झाल्याची थरारक घटना घडली. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा संभाव्य स्फोट आणि अनर्थ टळला आहे. गेल्या 24 तासांपासून या ठिकाणी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (06 एप्रिल 2026) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गुंडेवाडी शिवारात हा टँकर लीक होत असल्याचे लक्षात आले. अमोनियम नायट्रेट […]
प्राचीन व पवित्र पंढरीचा विध्वंस नको, काॅरिडॉर करायचा असेल तर तो शासकीय जागांवर करा अशी मागणी करीत आंदोलकांनी शासकीय जागांकडे लक्ष वेधण्यासाठी भव्य रॅली काढली. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने कॉरिडॉर विरोधात काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रँलीच्या माध्यमातून पंढरपूरातील अनेक सरकारी, निमसरकारी जागा वर्षानुवर्षे पडीक पडून आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत. त्याबाबत शोधयात्रा घेऊन त्या […]
शस्त्रसंधीनंतर होर्मुझमध्ये जहाजांचे ट्रॅफिक जाम; 3000 जहाजे अडकली, 14 दिवसात मार्ग मोकळा होणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर जहाज वाहतूक कंपन्यांना आशा आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेल टँकर वाहतूक पुन्हा सुरू होईल. अनेक आशियाई देशांमधील तेल शुद्धीकरण कंपन्यांनी कच्च्या तेलाची मागणी वाढवली आहे. मात्र, सध्या युद्धविराम केवळ १४ दिवसांसाठी आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांची संख्या पाहता इतक्या कमी वेळात होर्मुझमधून होणारी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. […]
अमरावतीच्या नावाखाली कमिशन आणि भ्रष्टाचार सुरू, जगन मोहन रेड्डींचा चंद्राबाबू नायडू सरकारवर हल्लाबोल
आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून अमरावतीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले असून, केवळ कमिशन आणि भ्रष्टाचारासाठी अमरावतीवर भर दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेश येथील ताडेपल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत. […]
अशोक खरात प्रकरण: अश्लील व्हिडीओची ऑनलाईन विक्री, 15 ते 20 रुपयांना विकले जातायत व्हिडीओ
भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून अनेक AI व्हिडीओ देखील तयार करून व्हायरल केले जात आहेत. यात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ १५ ते २० रुपयांना विकले जात आहेत. महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याला 17 मार्चला अटक […]
IPL 2026 –चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी खूशखबर; विस्फोटक फलंदाज दुखापतीनंतर मैदान गाजवण्यासाठी सज्ज
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 11 एप्रिल रोजी होणाऱ्या आयपीएल 2026 च्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या दुखापतीतून सावरून मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला सराव सत्रादरम्यान ब्रेव्हिसच्या बरगडीला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चेन्नईच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले. मात्र, […]
अमेरिकेच्या फक्त १० टक्के ताकदीपुढे इराण झुकले, मोजतबाही जखमी; पीट हेगसेथ यांचा दावा
अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने विजयाचा मोठा दावा केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले आहेत की, “ऑपरेशन एपिक फ्युरीत अमेरिकेला मोठे यश मिळाले असून इराणला युद्धविरामासाठी झुकावे लागले आहे.” वॉशिंग्टन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत. #WATCH | वाशिंगटन, DC | यूनाइटेड स्टेट्स सेक्रेटरी ऑफ़ वॉर, […]
IPL 2026 च्या 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला. गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे षटकांची संख्या कमी करून सामना 11-11 षटकांचा करण्यात आला होता. या विजयासह राजस्थान रॉयल्सने मोसमातील आपला तिसरा विजय नोंदवला असून, दोन महत्त्वाच्या गुणांसह संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. राजस्थानच्या या […]
नरेंद्र मोदींचा ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ, 12 वर्षापासून देशाची लूट सुरू –हर्षवर्धन सपकाळ
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत […]
बीड जिल्हा महाराष्ट्राचा रेशीम हब, कोयत्यांमुळे कणखर झालेले हात आता मुलायम रेशीम निर्माण करू लागले
>> उदय जोशी ऊसतोड कामगारांचा हा जिल्हा वर्षातील सात महिने हातात कोयता घेऊन देशावर जाणारा शेतमजूर कायम कष्टाने पिचला गेला. पिढ्यान् पिढ्या कोयत्याने कणखर झालेले हात आता परिवर्तनाची नांदी ठरत आहेत, त्याच कणखर हाताने आता मुलायम रेशीम निर्माण केले जात आहे. साडेसात हजार शेतकरी रेशीम कोष उबवत आहेत. बीडमध्ये निर्माण झालेली रेशीम बाजार पेठ चार […]
तेजस्विता वेंगुर्लेकर यांना राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार प्रदान
जिल्हा परिषद दाणोली गावठणच्या शिक्षिका सावंतवाडी – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाणोली गावठणच्या शिक्षिका तेजस्विता देवदास वेंगुर्लेकर यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार ,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे ,सचिन वायकुळे, प्रमोद तमन्नावर ,जब्बार शिकलगार ,श्री. शेख ,सौ.खंकाळ , सौ.सोनकवडे यांच्या [...]
‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!
रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे. अमेय विनोद […]
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. केवळ 15 वर्षांच्या या खेळाडूने मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याचे भरभरून कौतुक केले. स्टेनच्या मते, वैभवने आपल्या आक्रमक शैलीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली असून, डेल स्टेन म्हणाला, “त्याने गोलंदाजांवर […]
सावंतवाडी मच्छी मार्केटात सांडपाणी गटारावरील फरश्या तुटलेल्या स्थितीत
पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ग्राहक पडले घसरून सावंतवाडी – शहरातील मच्छी मार्केट मधील सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या गटारावरील मजबूत जाळ्यांच्या फरश्या अनेक ठिकाणी तुटलेल्या व उघड्या स्थितीत असल्याने अनेक ग्राहक पाय घसरून पडल्याच्या घटना मंगळवारी घडल्या. यामध्ये वृद्धांसह महिला व लहान मुले यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप [...]
कदमवाडीत सुहासिनी जेवणानंतर 24 जणांना विषबाधा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती सुहासिनी जेवण कार्यक्रमानंतर तब्बल 24 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कदमवाडी गावात एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी सुहासिनी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सुमारे 3 वाजता पारंपरिक जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. यात खीर, बेसनवडी, वरण-भात, भाकरी या पदार्थांचा समावेश होता. जेवणानंतर काही तासांतच अनेक महिलांना उलटी,मळमळ,चक्कर, जुलाब, अशी लक्षणे दिसू लागली. पहाटेपर्यंत अनेकांना समान त्रास सुरू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 23 रुग्ण सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1 वृद्ध महिला (साखराबाई लबडे, वय 80) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेत महिलांसह काही लहान मुले व वृद्धांचाही समावेश असून गावातील अनेक कुटुंबांवर याचा परिणाम झाला आहे. विषबाधा नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामूहिक जेवणांमध्ये अन्न सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वच्छता, साठवण आणि अन्न बनवण्याच्या पद्धतींवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा, गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांबाबत सातत्याने घडत असलेल्या अवमानकारक व बेकायदेशीर घटनांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, प्रशासनाची निष्क्रियता संशयास्पद असल्याचा थेट आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मागील काही दिवसांत येडशी, कळंब तालुक्यातील मस्सा व शिराढोण येथे मध्यरात्री विनापरवानगी पुतळे बसविण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वाशी येथील पारा चौकात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा हटवून दुसरा पुतळा बसविण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच भूम येथे आंबेडकर पुतळ्यासाठी आरक्षित जागेवर दुसरा पुतळा बसविण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.
महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आज 8 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अमोल ताकभाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपणे व पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि मूलभूत हक्कांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ.आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळी व सत्याग्रहांची माहिती देत सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले. या सामाजिक समता सप्ताहामध्ये ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.तसेच स्वच्छता अभियान राबवून समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.यासोबतच रक्तदान शिबिर,जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाद्वारे प्रबोधन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनीही सामाजिक समता सप्ताहानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आकांक्षा कोकाटे,दीक्षा भालशंकर,मोनिका गवळी व वैष्णवी माने या विद्यार्थिनींना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शंकर काशिनाथ खुने, विजयकुमार गायकवाड,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुधाकर सगट,कैलास पवार आणि संत रोहीदास चर्मकार समाज भुषण पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे यांचा संविधानाची फ्रेम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. व्याख्याते व साहित्यिक भैरवनाथ कानडे आणि महेंद्र चंदनशिवे यांनी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत” या विषयावर व्याख्यान दिले.या कार्यक्रमास विद्यार्थी,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिव्यक्त होणारे माध्यमे सशक्त होणे महत्वाचे- शरद गोरे
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजात जे काही घडते त्याचे चित्र साहित्यामध्ये येते. त्यामुळे अभिव्यक्त होणारे माध्यमे सशक्त होणे आवश्यक आहे असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. धाराशिव येथे 29 व 30 मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन होणार असल्याचेही डॉ. गोरे यांनी सांगितले. बुधवार दि. 8 एप्रिल रोजी दुपारी घेण्यात आलेंल्या या पत्रकार परिषदेस ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. धाराशिव येथे होणारे साहित्य संमेलन हे 32 व्या असून, या पूर्वी 18 वर्षापूर्वी धाराशिव शहरात साहित्य संमेलन घेतले होते. अशी आठवण डॉ. गोरे यांनी सांगितली. ग्रामीण भागातील नवीन साहित्यिकांना वाव देण्यासाठी व ग्रामीण साहित्य साहित्यामध्ये येणाऱ्यासाठी आपले प्रयत्न असून, राज्यातील 55 बोली भाषेची जपणूक होणे आवश्यक आहे असेही डॉ. गोरे यांनी सांगितले. काही साहित्य संमेलनामध्ये ठरावी लोकांची मक्तेदारी असते. त्यामुळेच आपल्या या साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण भागातील साहित्यिकांसह सर्वांना संधी देण्यात येईल असे सांगितले. साहित्य संमेलन नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार असून, या परिसराला अजित पवार नगरी असे नाव देणार असल्याचे सांगितले.
देशभरातील CBSE शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरातील आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता, आता सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता आणि स्वतंत्र स्वच्छता केंद्र (Sanitation Centres) उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे वृत्त ‘दैनिक जागरण’ने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने २० जानेवारी रोजी दिलेल्या […]
जग पुन्हा वसाहतवादाकडे जात आहे! उदय कोटक यांचे मोठे विधान
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आखातातील संघर्ष थंडावला आहे. आता या युद्धात अमेरिकेचा विजय झाला की इराणने वर्चस्व सिद्ध केले, याबाबतच्या चर्चा होत आहे. मात्र, या चर्चेपेक्षा एका वेगळ्या मुद्द्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. आता आपण पुन्हा वसाहतवादाकडे जात आहोत, असे विधान करत त्यांनी […]
पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे एक भीषण दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या अश्विनी संदीप नप्ते (वय 37) या महिला पर्यटकाचा वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने अपघात झाला, ज्यात त्यांच्या पाठीचे मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले असून, सध्या […]
तळवडेत ९ एप्रिलला ‘बाल आनंद मेळावा ‘
त.भा.वार्ताहर ——————- न्हावेली : श्री म्हाळाई देवी कला क्रिडा मित्र मंडळ,तळवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी ‘ बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत असून तळवडे केंद्रातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.हा मेळावा गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता तळवडे नं.१ येथे आयोजित करण्यात आला आहे. या [...]
जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा सत्कार
परंडा (प्रतिनिधी)- श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी लि.भोंजा हवेली तालुका परंडा येथील संचालक मंडळ व लघुउद्योग सल्लागार शिष्टमंडळानी नुतन जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील या परंडा दौऱ्यावर आले असता त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी थोडक्यात महत्वपूर्ण तालुक्यातील समस्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शक सांख्यिकी अधिकारी उदयसिंह चौरे, डायरेक्टर गणेश नेटके,लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.
परंडा (प्रतिनिधी)- संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र अक्षय सुरेश डोके यांनी मिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM) चे गणितीय मॉडेलिंग आणि प्रायोगिक तपासणी या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास चालना मिळणार आहे. ही संशोधन पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संलग्न राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील संशोधन केंद्रातून पूर्ण केली. त्यांच्या संशोधनासाठी डॉ. ए. एम. बडधे, डॉ. एन. एस. मुजुमदार आणि प्रदिप दिक्षीत (इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले. अक्षय डोके यांच्या संशोधनामध्ये इलेक्ट्रो केमिकल डिस्चार्ज मेकॅनिंग (ECDM) प्रक्रियेचे गणितीय मॉडेलिंग व प्रायोगिक विश्लेषण करण्यात आले असून, बोरोजिलिकेट ग्लासवर मिश्र इलेक्ट्रोलाइट्सच्या वापराचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग मायक्रो - इलेक्ट्रो - मेकॅनिकल सिस्टम उपकरणांमध्ये सूक्ष्म घटक विकसित करण्यासाठी होणार असून, यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाच्या प्रगतीस चालना मिळणार आहे. अक्षय हा शिवसेनेचे राहूल डोके याचा भाऊ तर मुंद्राक विक्रेता सुरेश दादा डोके याचा मुलगा आहे या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मंजूर
परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषद सभागृहात आज दि.8 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण सभेत शिवप्रेमी नागरिकांची जन भावना लक्षात घेता जनशक्ती नगरविकास आघाडीच्या 13 सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नाहारकत प्रमाणपत्र देण्यासाठी बहुमताने सर्व संमतीने ठराव मंजुर करण्यात आला. या ठरावास समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांनी सुचवले तर अब्बास उमर मुजावर यांनी अनुमोदन दिले.
कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
विद्यार्थ्यांच्या ‘ओंजळ’ या हस्तलिखिताचे प्रकाशन ओटवणे प्रतिनिधी कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सभापती सुष्मिता जाधव, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, गटशिक्षणाधिकारी सविता परब, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष सूर्यकांत सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस [...]
लोकशाहीत वेडा राजा निवडून देण्याआधीच…अभिनेते अतुल कुलकर्णी यांची पोस्ट व्हायरल
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देशातील आणि जगातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी एक मराठी व एक इंग्रजीत अशा दोन पोस्ट शेअर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत वेडा राजा वेळीच, म्हणजे निवडून देण्या आधीच, ओळखणाऱ्या जनतेला शहाणी जनता म्हणतात.#globalphenomenon — atul kulkarni (@atul_kulkarni) April 8, 2026 ”लोकशाहीत […]
ST Bus Price Hike –उन्हाळी सुट्टीचा बेत आखताय? एसटी महामंडळाचं भाडेवाढीचं सरप्राईज
एप्रिल आण मे महिन्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. सर्वसामान्यांसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस हाच सर्वात मोठा आधार असतो. गावी जाण्यासाठी असो अथवा फिरायला जाण्यासाठी ‘लालपरी’ला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मात्र, आता लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. 15 एप्रिलपासून एसटीने महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच […]
देशात कोळशाचा तुटवडा नाही, वीज निर्मिती सुरळीत सुरू; कोळसा मंत्रालयाची माहिती
देशाच्या कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कस्सी यांनी बुधवारी देशात कोळशाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत वीज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत असल्याचे म्हटले आहे. ANI च्या वृत्तानुसार, “देशात खाणी, वीज प्रकल्प, बंदरे आणि वाहतूक केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जो ग्राहकांना अगदी कमी वेळेत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.” कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव […]
Share Market News –शेअर बाजाराची जबरदस्त उसळी; गुंतवणूकदारांची चांदी झाली
शेअर बाजारासाठी बुधवार मंगलकारक ठरला आहे. अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू झाल्यानंतर शेअर बाजारात निफ्टीमध्ये सुमारे 12 टक्क्यांची म्हणजे 3500 अंकांची घसरण झाली होती. बाजार सवारण्याचा प्रयत्न करत अशला तरी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत नसल्याने बाजारात अपेक्षित तेजी येत नव्हती. मात्र, दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा झाली अन् बाजाराला सकारात्मक संकेत मिळताच शेअर बाजाराने तेजीत […]
ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून अर्ज केला दाखल; तृणमूलच्या विजयाचा केला दावा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या वर्षातील ३६५ दिवस याच ठिकाणी राहतात आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांनी भवानीपूरच्या जनतेला […]
कोकण रेल्वे मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये विसरलेले तब्बल ५३ लाख ६ हजार रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे. तसेच तब्बल तीस हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचवले आहे.ऑपरेशन नन्हे फरीश्ते अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिवसभरात 30 हून अधिक रेल्वेगाड्या धावतात. या गाड्यांमधील […]
Jammu Kashmir –शोपियानमध्ये आयईडी स्फोटक सापडले, बॉम्बशोधक पथकाने निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली
जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी रस्त्यावर पेरलेले एक शक्तिशाली आयईडी स्फोटक सुरक्षा दलांनी निकामी केले. हे आयईडी सुरक्षा दलांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र वेळी ते निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. दक्षिण कश्मीर जिल्ह्यातील झैनापोरा-चितारगाम रोडवर बुधवारी पहाटे नियमित तपासणी मोहिमेदरम्यान हे आयईडी आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने […]
वेताळबांबर्डे गावच्या सौंदर्यात सेल्फी पॉईंटची भर
गावच्या स्वागत नाक्यावर सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी कुडाळ – वेताळबांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व श्री देवी पावणाई टेंब राधानृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.या गावच्या सौंदर्यात हा सेल्फी पॉईंट अधिक भर घालत आहे,तर गावच्या स्वागत नाक्यावरचा हा सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरत आहे. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण सोहळा [...]
बोलेरो पिकअप व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
कुडाळ येथील घटना ;अचानक पिकअप थांबविल्याने दुचाकीची धडक कुडाळ – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते काळपनाका रस्त्यावर कृष्णाई सुपर मार्केट समोर भरधाव वेगातील बोलेरो पिकअप अचानक मधोमध थांबविल्याने मागून जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलची बोलेरो पिकअपला जोराची धडक बसली.यात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार पुंडलिक नारायण नाईक ( 68, रा.आंबलपाड- नाईकवाडी ) यांचे कुडाळ ग्रामीण रुग्णालयात काही [...]
Mumbai News –कुरारमध्ये दहशतवादविरोधी शाखेची छापेमारी; फंडिंग टेररप्रकरणी तपास सुरू
मुंबईतील कुरार भागात दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एटीएसने 12.5 लाख रुपयांची रोकड, अनेक बनावट पासपोर्ट, 9 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. एटीएस टेरर फंडिंगच्या अनुषंगाने देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही मान्यता न घेता परस्पर निधी वितरण
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 व 2025-26 अंतर्गत सन 2025-26 मध्ये विविध कामांसाठी देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आमदार कैलास बाळासाहेब पाटील यांनी करत राज्याच्या नियोजन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारीनुसार, जिल्हा नियोजन समिती धाराशिव अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. शासन नियमांनुसार उपलब्ध असलेल्या मर्यादेच्या पुढे जाऊन निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे आर्थिक शिस्तीचा भंग झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती रोपमळे या घटकासाठी सामाजिक वनीकरण विभागाला 100 लक्ष रुपयांची तरतूद असताना तब्बल 634.55 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तसेच 636.47 लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे निधी मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटन विकासासाठी निधी वितरण करताना देखील नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. जिल्हा नियोजन समितीची पूर्वमान्यता आवश्यक असतानाही ती न घेता एका विशिष्ट स्थळासाठी निधी मंजूर करून वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतर आवश्यक पर्यटन प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, पुनर्विनियोजनासाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही ती न घेता परस्पर निधी वळवून कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्राधान्य देणे अपेक्षित असतानाही त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत नियोजन विभागाने जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती धाराशिव यांना सविस्तर चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अनियमिततेमागील वस्तुस्थिती काय आहे, हे चौकशीतून स्पष्ट होणार असून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक
धाराशिव (प्रतिनिधी)- ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी धाराशिव शहरातील एका डॉक्टरची तब्बल 63 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशिलकुमार शिवाजीराव सर्डे (वय 45, रा. समर्थ नगर, धाराशिव) यांना दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.44 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधिताने ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमी रकमेवर चांगला परतावा मिळाल्याचा भास निर्माण करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या कालावधीत दिनांक 20 जानेवारी ते 9 मार्च 2026 दरम्यान विविध टप्प्यांमध्ये फिर्यादीकडून एकूण 63 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले. नंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि संपर्क कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्डे यांनी सोमवारी (दि.6) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम 2000 मधील कलम 66 (सी) आणि 66 (डी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही अनोळखी लिंक, मेसेज किंवा सोशल मीडियावरील गुंतवणूक योजना तपासल्याशिवाय स्वीकारू नये, असेही सांगण्यात आले आहे.
श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा 36 लाख 26 हजार रुपयाचा नफा
मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म. मुरुम येथील बसव सहकार भवन या इमारतीत सोमवारी (ता. 6) दुपारी 4 वाजता पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. 31 मार्च 2026 च्या तेरीज पत्रक नफातोटा, ताळेबंध या आर्थिक पत्रकावर चर्चा करण्यात आली. पतसंस्थेचे यंदाचे 16 वे वर्ष असून यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेस 36 लाख 26 हजार 806 रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा 15 कोटी 93 लाख 65 हजार 647 रुपयाच्या ठेवी आहेत. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात 12 कोटी 83 लाख 61 हजार 955 रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची इतर बँकेत गुंतवणूक 6 कोटी 22 लाख 61 हजार 808 रुपये. या पतसंस्थेचे सदरील वर्षात खेळते भागभांडवल 21 कोटी 33 लाख 4 हजार 757 रुपये आहे. या पतसंस्थेचे मार्च अखेर 4294 सभासद आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनच ऑडीट वर्ग अ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत आहे. सध्या पतसंस्थेची वाटचाल शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहाराकडे चालू आहे. सात वर्षापासून आरटीजीएस / एनएफटी ची सुविधा चालू असून मोबाईल बॅकिंगचा सभासद लाभ घेत आहेत. व्यवहार करताक्षणी एसएमएस सभासदाना प्राप्त होतो. ठेवीच्या अनेक योजना असून यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षण ठेव योजना, सीता स्वयंवर ठेव योजना, महात्मा बसवेश्वर लखपती ठेव योजना आदी चालू आहेत. महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, 11 टक्के सोने तारण कर्ज तर 11.50 टक्के वेअर हाऊस तारण, 13 टक्के गहाण कर्ज, 14 टक्के सामान्य कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायद्यासाटी संस्थेकडून पुरविल्या जातात. संस्थेकडे स्वत:ची स्वतंत्र लॉकर उपलब्ध करुन दिले आहे. टाटा कं. चे सोलार कार्यान्वित केले आहे. या बैठकीत पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, अमृत वरनाळे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, बाबासाहेब पाटील, मनोज बोंदर, इंद्रजित लोखंडे, सौ. संगीता जाधव, सौ. वंदना सोनवणे, शिवराज समन, अनंत हिरमुखे, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, सौ. नेहा शेवाळकर, पिग्मी एजन्ट संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, राजेंद्र मुदकण्णा, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यंदा ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असून यंदाचा वर्धापन दिन 12 मे रोजी होणार असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.
माहिती न मिळाल्याने ग्रामपंचायत सदस्य उपोषणाच्या पवित्र्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)- काटगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत वसंत कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळत नसल्याने दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. 16 एप्रिल 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार असल्याने गावात खळबळ उडाली आहे. कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन 2023 पासून आजतागायत ग्रामपंचायतीला विविध योजनांद्वारे मिळालेल्या निधीचा सविस्तर लेखाजोखा मागवण्यात आला होता. मात्र अनेक वेळा अर्ज करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आलेली नाही. कांबळे यांनी खालील बाबींची माहिती मागितली आहे : ग्रामनिधी जमा-खर्च व शिल्लक, जीओ-टॅग फोटो, 15 वा वित्त आयोग निधी, दलित वस्ती सुधार योजना निधी, तांडा सुधार योजना निधी, ग्रामस्वच्छता योजना निधी, अनुसूचित जाती व भटक्या-विमुक्त घटकांसाठी निधी, सन 2023 पासूनचा स्वनिधी जमा व खर्च, विविध विकासकामांचा सविस्तर तपशील मागीतला पण माहिती न दिल्यामुळे ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता कामे ठरवत आहेत. तसेच बैठकीचे ठराव (प्रोसिडिंग) वेळेवर नोंदवले जात नसून मागणी करूनही त्याच्या प्रती दिल्या जात नाहीत. कांबळे यांनी या संदर्भात राज्य माहिती आयोग, छत्रपती संभाजीनगर येथे अपील केले होते. आयोगाने माहिती देण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काटगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामपंचायत अधिकारी नसल्यामुळे प्रशासनात अडचणी येत असल्याचे सांगत, पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माहिती मिळत नसल्यामुळे अखेर कांबळे यांनी 16 एप्रिलपासून दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. “याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह !यापूर्वीही या ग्रामपंचायतचा कारभार जिल्हा बर गाजलेला असूनही या प्रकरणामुळे काटगाव ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियाचा मर्यादित वापर केल्याशिवाय प्रगती नाही- चित्रकार शिवाजी हांडे
धाराशिव (प्रतिनिधी)- सोशल मीडियाचा आपण सर्वांनी मर्यादित वापर केला पाहिजे, आवश्यकता पडल्यास मोबाईलचा उपवास देखील करावा असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांनी केले. संस्कार भारती देवगिरी प्रांताने निर्माण केलेल्या 2026 - 2027 दैनंदिनीचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख, उपाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, संगीत तज्ञ पंडित संजय जोशी, लातूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगर अध्यक्ष शरद पाडे, प्रांत उपाध्यक्ष डॉ.देवेंद्र कुलकर्णी, सह महामंत्री डॉ.सतीश महामुनी, दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, प्रांतमंत्री धनंजय देशपांडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी, उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे, जिल्हा सचिव प्रवीण गोरे, शहर सचिव गणेश कसपटे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगराध्यक्ष शरद पाढे, डॉ मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. जयंती आंबेगावकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. दैनंदिनीचा वापर, अत्याधुनिकता, मोबाईलचा वापर, मोबाईल उपवास या विषयावर प्रांताचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी प्रास्ताविकात केले. याप्रसंगी देवगिरी प्रांत दैनंदिनीचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समन्वयक संतोष बिडकर व धन्वंतर देशपांडे यांच्या सात संघतीसह ध्येय गीताचे गायन , दीप प्रज्वलन झाले. या निमित्ताने बोलताना प्रमुख अतिथी कलाध्यापक चित्रकार शिवाजी हांडे यांनी कलावंत बोलतो कमी आणि आपल्या कलाविष्कारातून जास्त व्यक्त होतो असे सांगून आजच्या धावपळीच्या जगामध्ये प्रगती होण्यासाठी मोबाईलचा कमीत कमी व आवश्यक वापर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, जनजागृती करावी, विद्यार्थी संवाद व पालक संवाद घडवून आणावा असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रांत अध्यक्ष प्रा स्नेहलताई पाठक यांनी संस्कार भारती ललित कलांच्या माध्यमातून कलावंताची संघटन करीत असताना कलेच्या प्रांतात राष्ट्रीय विचार देण्याचे काम करते. कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन घडवून आणते. कलावंतांना जोडते तसे माणसाला माणूस जोडण्याचे काम करते, कलावंत आपल्या कलाकृती मधून सर्व काही सांगून जातो योग्य संदेश व विचार देतो असे सांगितले. डॉ.हरिभाऊ वाकणकर व पद्मश्री योगेंद्रजी यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन तळीखेडे व आभार प्रदर्शन रघुनाथ पाटील यांनी केले. सौ.शुभांगी कुलकर्णी यांनी पसायदान गायन केले. सौ रुपाली नाईक, सौ.रूपा देसाई यांनी भूअलंकरण केले. सौ नीलिमा कुलकर्णी, धनंजय पटवारी, सो मंजुषा देशमुख, हनुमंत पांचाळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चैत्र पौर्णिमेनंतर मंगळवारी तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती ज्या भाविकांना मैत्री पौर्णिमे देणे देवीची वारी पूर्ण करता आली नाही अशा भाविकांनी आज रोजी मंगळवारी येऊन देवीजींचा पूजाअर्चा करून वारी सेवा अर्पण केली आज दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी तीर्थक्षेत्र तुळजापुरात झाली होती भाविकांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे एक वाजता धर्मदर्शनात खुले करण्यात आले होते दिविजेस भाविकांच्या अभिषेक पूजा सकाळी सहा वाजता प्रारंभ झाल्या त्या दहा वाजता संपल्यानंतर देवीचे वस्त्र अलंकार घालून नित्योपचार पूजा करण्यात आली. आज श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडप भाविकांनी भरून गेला होता तसेच अभिषेक सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या रात्री मंदिरात छबिना काढण्यात आला या सोहळ्यात हजारो भाविक मनोभावे सहभागी झाले होते श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात अतिक्रमण आजही जैसे तेच होते याचा फटका भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला.
Gold Silver Rate –अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली; सोने-चांदीत जबरदस्त तेजी आली
गेल्या वर्षी सोन्याचांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यात मोठी घट झाली. त्यानंतर अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे सोनेचांदीच्या दरात मोठी चढउतार होत होती. आता अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाल्याने सोनेचांदीच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा […]
येडेश्वरी यात्रेनिमित्त होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग द्या- डॉ. प्रतापसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- येरमाळा येथील आई येडेश्वरी यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने धुळेसोलापूर महामार्गावर सुमारे 40 किलोमीटरपर्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना तब्बल चार ते आठ तास रस्त्यात अडकून राहावे लागले. यामध्ये रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांनाही मोठा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही गंभीर परिस्थिती योग्य नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भविष्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात पर्यायी मार्ग निश्चित करून त्याची पूर्वसूचना नागरिकांना देणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.
Us Israel Iran War –शस्त्रसंधीनंतर इराणच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट, कारण अद्याप अस्पष्ट
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात बुधवारी सकाळी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर दुपारी इराणमधील लावान बेटावरील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. शस्त्रसंधीनंतर इराणमधील हा पहिलाच स्फोट आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. इराणी वृत्तसंस्थेने या घटनेची माहिती दिली आहे. इराणचे लावान बेट हे पर्शियन आखातातील होर्मोझगान प्रांतात वसलेले सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे […]
जुन्या झाडांमुळे धोका; जीवित, वित्तहानीची भिती
उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रीय महामार्गां-लगतची जुनी झाडे धोकादायक झाली आहेत. जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने जुनाट झाडेही कोलमडून पडत आहेत. यामुळे मार्गावरील जुनी व धोकादायक असलेली झाडे हटवण्याची गरज आहे. शहराच्या मध्य भागातून गेलेल्या या सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सध्या अवकाळी जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडू लागली आहेत. केव्हा, कधी धोकादायक वृक्ष कधीही उखडून किंवा एखादी मोठी फांदी वाहनावर पडून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. अलीकडेच जोराच्या झालेल्या पावसामुळे परिसरातील अनेक झाडे व फांद्या उन्मळून पडत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक खोळबंली होती. गत वर्षी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ जुनाट व मोठे झाड पडले. रस्त्याच्या लगत असलेल्या जुनाट झाडे उन्मळून पडली तर फांद्या कोसळलेल्या आहेत. संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनाट,धोकादायक झाडे हटविण्याची व फांद्या छाटण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. चार-पाच दिवसापूर्वी रात्री तालुक्यातील कराळीतांडा येथे विज पडून भारतबाई चव्हाण यांची म्हैस दगावली. कराळी गावात बालाजी इंगळे व गोविंद मुगळे यांच्या घराच्या सामाईक भिंतीवर विज पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. शहरातील स्वप्नील बसवराज स्वामी यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर विज पडून टाकीसह पाईपलाईन जळाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पहाणी
उमरगा (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे उमरगा व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या सेवेची माहिती घेण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी व उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पहाणी केली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून रुग्णांची मनापासून सेवा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ते सदैव तत्पर आहेत. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होऊन, स्थानिक पातळीवरच तपासणीची सुविधा मिळणार आहे. शासनाच्या वतीने आरोग्यविषयक विविध योजना राबवल्या जात आहेत. क्रस्ना डायग्नोस्टिक सी.टी. स्कॅन सेंटर सुरु करण्यात आले आहे. याची पहाणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार प्रविण स्वामी, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचे विधानसभा सह अध्यक्ष शरण बसवराज पाटील, मुरलीधर मुगळीकर, डॉ. कपिल महाजन, डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. थिटे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. विकास जाधव, डॉ. सौ. कोमल जाधव, अजिंक्य पाटील, प्रकाश आष्टे, सुनिल कुलकर्णी, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, पंचायत समिती सदस्य दगडू मोरे, हरीभाऊ जाधव, यशपाल कांबळे, धिरज बेळंबकर, महेश माशाळकर, मल्लिनाथ स्वामी, राजेश सोनवणे, सदानंद पाटील आदीसह डॉक्टर संघटना, कर्मचारी वर्ग, ग्रामीण भागातील युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालक, वाहक यांच्या ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून होत आहे. विभाग नियंत्रकांनी लेखी सूचना देऊन चौकशी व कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नसल्याचेही सांगितले जात आहे. परिवहन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमानुसार पुढील दिवसाचे ड्युटी बुकिंग आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र धाराशिव एसटी डेपोमध्ये हे बुकिंग नियमितपणे रात्री 9 नंतर उशिरा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालक व वाहकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच वैयक्तिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे आगारात पुरेशा प्रमाणात वाहतूक निरीक्षक व नियंत्रक उपलब्ध असतानाही ही परिस्थिती कायम असल्याने परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निरोगी समाजासाठी प्रत्येक घटकाचे सामूहिक प्रयत्न आवश्यक- प्रियंवदा महाडदळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करता येतात. स्वच्छता,संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांनी केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे कार्यकारी समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटना च्या स्थापनेनिमित्त दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त यंदा “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी,विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे,नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार, प्रसाराचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्द्गार ओटवणे : प्रतिनिधी पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले योगप्रचार आणि प्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून पतंजली योग समितीच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. त्यावेळी [...]
सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार व प्रसाराचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्द्गार ओटवणे : प्रतिनिधी पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले योगप्रचार आणि प्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून पतंजली योग समितीच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. त्यावेळी [...]
बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राजकारण
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख आनंद पाटील यांनी लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शिवसेना पक्ष नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे आणि पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली “एकनाथ केसरी” बैलगाडा शर्यत यशस्वी पार पाडली. या माध्यमातून आनंद पाटील यांच्या मातोश्रींना जिल्हा परिषद सभापतीपदासाठी डावलणाऱ्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर देऊन विशेष म्हणजे भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यात महायुती मजबूत असल्याचे दाखवून देत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आनंद पाटलांच्या नावाची राजकीय पटलावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. निमित्त बैलगाडा शर्यतीचे असले तरी बैलगाडा आखाड्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने राजकीय वचपा काढण्याचा खरखुरा सत्तेच्या खुर्चीचा आखाडा पेटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान भातागळी येथील आनंद पाटलाच्या दमदार बैलाने पटकावला आहे. लोहारा तालुक्यातील भातागळी येथे श्री शंभो महादेव यात्रेनिमित्त शिवसेनेचे आनंद पाटील यांनी “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत“ दि.7 एप्रिल रोजी आयोजित केली होती. सभापतीपदाला डावलले नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी खुद्द शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रींना महिला व बाल कल्याण सभापती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्याचे आम्हीच नेते आहोत, आमच्या शिवाय पक्षाची गाडी हलवणार नाही अशा अविर्भावात असलेल्या गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रीला सभापती पदापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोन दिवसात कोल्ह उसात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून येताच सभापतीपद मागणे म्हणजे दोन दिवसात कोल्ह उसात या म्हणी प्रमाणे आहे. ज्या लोकांची उभी उभी हयात शिवसेनेत गेली आहे अशांना संधी देणे योग्य झाले असते. अशी प्रतिक्रिया माजी आमदार चौगुले यांच्या समर्थकांनी दिली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद कर्मचारी भारत दिगंबर साळुंखे वय 57 यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते नगर पालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कार्यरत होते.
तेज मळगावकरची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
न्हावेली /वार्ताहर मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव प्रशालेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कुमारी तेज दत्ताराम मळगावकर हिने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ९२.६२ टक्के गुण मिळवत प्रथम प्रयत्नात ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.तेज हिच्या या यशामागे तिची प्रबळ जिद्द,सातत्यपूर्ण [...]
महापौर निकम यांनी सुर्वेनगरमध्ये मांडला कामांचा धडाका कोल्हापूर – कोल्हापूर जनता दरबारमधीलअर्जाच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग २० मधील सुर्वेनगर, विद्या-वसंत पार्क (रि.स. नं. ८५३, प्लॉट नं. डी-५) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. युवराज पाटील यांनी त्यांच्या घराच्या परिसरात अनाधिकृतरीत्या सोडण्यात येणाऱ्या [...]
समाजात बॅ .नाथ पै ,दंडवतेंच्या विचारांची माणसे असणे आवश्यक
मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला सावंतवाडी : प्रतिनिधी प्रत्येक घराघरात बॅ नाथ पै असायला हवेत अशी मानसिकता आजच्या काळात निर्माण होणे आवश्यक आहे. आज समाजामध्ये माणसं एकमेकांना मारताना दिसत आहे .कुठल्याही विद्यार्थ्यांला आपण भविष्यात सामाजिक योगदान द्यायचे आहे असे वाटत नाही. त्यामुळे आजच्या युगात बॅ नाथ पै [...]
गुजरातमधील भावनगरच्या राजकारणात सोमवारी एक धक्कादायक प्रकरण घडले. भाजपच्या माजी नगरसेविका सेजलबेन गोहेल यांनी अवघ्या काही तासांत पक्ष बदलत पुन्हा मूळ पक्षात परत येत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. दुपारी 12:09 वाजता काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत सेजलबेन गोहेल यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत पक्षात महिलांना आणि संविधानाला सुरक्षितता नसल्याचा आरोप […]
Solapur |दोन चाकांवर ‘फोर व्हीलर’चा फील ; सोलापूरच्या तरुणाची भन्नाट आयडिया, दुचाकी केली ‘कव्हर’
सोलापूरच्या अवलीयाने दुचाकीलाच बनवलं ‘कार सोलापूर : सोलापूर शहरातील एका अवलीयाने उन, वारा आणि पावसापासून बचावासाठी आपल्या दुचाकीला चारी बाजूंनी बंदीस्त केले आहे. त्यामुळे दुचाकीवरून जाताना कारचा फील येतो. ऋषिकेश मगर यांनी बनविलेली त्यांची दुचाकी लक्षवेधक [...]
नावे वगळून आमचा पराभव करू शकत नाही! ममता बॅनर्जींनी ठणकावलं, पुन्हा कोर्टात जाणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्यात आल्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार यादीतून नाव वगळण्यास विरोध करण्यासाठी आपला पक्ष पुन्हा न्यायालयात जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतून सुमारे ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी […]
विजापूर-रायचूर पॅसेंजर सोलापूरला येणार नाही सोलापूर: सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेबलिंग सायडिंग क्रमांक १ व २ कार्यान्वित करण्यासाठी सिग्नल व दूरसंचार विभागामार्फत विशेष काम हाती घेण्यात आले असून, यासाठी गुरुवारी (दि.९) रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम [...]
मला गुजराती लोकांबद्दल आदर, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केली दिलगिरी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी गुजरातमधील लोकांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर (X) केलेल्या पोस्टमध्ये खर्गे म्हणाले की, केरळमधील निवडणूक सभेत केलेल्या काही वक्तव्यांचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात आहे. तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांबद्दल […]
Sindhudurg News –देवगडमधील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक
देवगड येथील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी देवगड पोलिसांसमोर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींविरोधात देवगड पोलीस स्थानकात बीएनएस कलम 305, 331 (3), 331 (4) हा अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत संचार निगम लिमिटेड देवगड येथे 25 सप्टेंबर 2025 रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी 28,800 रुपये किंमतीचे […]
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे (प्रभाग २) येथील पाणी समस्या गंभीर बनली असून वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत गाव तळीचे काम सुरू न झाल्यास ८ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. असुर्डे प्रभाग २ (मणवेवाडी […]
‘आम्ही कश्मिरी क्रॉसफायरमध्येच मरतो’; ‘इंडियाज गॉट लॅटंट’वरील टीकेवर समय रैनाचे नवे विधान
‘इंडियाज गॉट लॅटंट’मध्ये सहभागी झालेला पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया याच्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन समय रैना आता आपल्या यूट्यूब शोच्या नवीन सीझनसह परत येणार आहे. मंगळवारी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या ‘स्टिल अलाईव्ह’ (Still Alive) या विशेष कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली. फेब्रुवारी २०२५ मध्ये, ‘इंडियाज गॉट लॅटंट’ या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाने […]
फोंडा पोटनिवडणुकीबाबत आज निवाडा
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिकांवर आज बुधवारी दुपारी निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाने सुनावणी निश्चित केली आहे. या पोटनिवडणुकीचे मतदान उद्या गुऊवारी 9 एप्रिल रोजी होणार आहे.मतदान अवघ्या एक दिवसांवर ठेपले असताना ही पोटनिवडणूक घ्यावी की नाही? यावर उच्च न्यायालय आज निवाडा देणार आहे. या याचिकेची पहिली सुनावणी 24 मार्च रोजी झाली होती. [...]
विवाह नोंदणी ऑनलाईन होत नसल्याने नवविवाहितांसमोर मोठी अडचण; शासनाने त्वरित मार्ग काढण्याची मागणी
सध्या विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया होत नसल्याने नवविवाहीत जोडप्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये विवाहाची नोंद करण्यासाठी गेलेल्या नवविवाहितांना क्यूआर कोड असलेले ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने अनेक शासकीय कामे रखडत असल्याची माहिती चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली. ग्रामपंचायतींमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया करताना संगणक प्रणालीमध्ये क्यूआर कोड […]
कामगारांना कामावर घ्या, नंतर काम करा
सुर्ल सांखळी येथील सेसा कंपनीच्या गेटवर कुटुंबियांसह कामगारांचा ठिय्या, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लक्ष घालावे साखळी : डिंगणे सुर्ल सांखळी येथील सेसा रिसोर्सीस लि. या खाण कंपनीतील 84 कामगारांना गेल्या 26 जुलै रोजी अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे प्रकरण न्याप्रविष्ट बनले आहे. असे असताना डिंगणे खाणीवरील खनिज माल इतरत्र हलविण्यात येत असल्याची माहिती मिळताच तो अडविण्यासाठी [...]
फोंड्यातील मतदारांचा कौल भाजप-मगो युतीलाच
दामू नाईक व दीपक ढवळीकरांचा विश्वास : रितेश नाईक यांच्या विजयाची पूर्ण खात्री, अपप्रचारावर विश्वास नको फोंडा : भाजप-मगो युतीचे उमेदवार रितेश नाईक यांनी आजवरच्या प्रचारकार्यात सर्व 45 बुथवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या कोपरा बैठका तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेला लाभलेला उदंड प्रतिसाद हे पाहिल्यास विजय [...]
संगमेश्वर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज
संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या राजकारणात सध्या मोठी स्थित्यंतरं पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील एकूण १२९ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तिथे आता पूर्णपणे प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. दुसरीकडे, ४१ ग्रामपंचायतींमध्ये मात्र डिसेंबर २०२७ पर्यंत लोकनियुक्त सरपंचांचा कार्यकाळ शिल्लक असल्याने तिथे सध्या नियमित कारभार सुरू आहे. एकाच तालुक्यात दोन भिन्न प्रशासकीय व्यवस्था असल्याने गावगाड्याच्या नियोजनात […]
लुथरा बंधूंच्या जामीनअर्जावर आज निकालाची शक्यता
पणजी : म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी कथित दस्तावेज बनावट प्रकरणात सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या जामीनअर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. आज सदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबचे दिल्लीस्थित मालक असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना सदर क्लबच्या अग्निकांड प्रकरणातील 25 मृत्युपायी दोषी मानले जात असले [...]
फोंड्यातील काँग्रेसच्या विजयाने राज्यात परिवर्तन सुरू होणार
महिला काँग्रेसच्या अरोरा यांचा दावा, भाजप विरोधात प्रचंड संताप फोंडा : गोव्यात महिलांवर होणारे वाढते अत्याचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि अनियंत्रित महागाई यामुळे जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून हा रोष व्यक्त होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्या विजयातून राज्यात परिवर्तनाची सुरुवात होणार आहे, असा दावा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस [...]
गोवा भू‐संवर्धन विधेयक अधिवेशनात संमत करा
माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांची मागणी, पणजीत ‘इनफ इज इनफ’च्या कार्यालयाचे उद्घाटन, जमीन रुपांतरे रद्द करा पणजी : नगर नियोजन कायदा 39 ए अंतर्गत झालेली सर्व आणि प्रस्तावित जमीन रुपांतरे रद्द करुन फोंडा पोटनिवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा अधिवेशन बोलवावे तसेच 39 (ए) कलम रद्द करण्याची मागणी असणारे गोवा भू-संवर्धन विधेयक त्यात संमत करावे, असे माजी न्या. [...]
Ratnagiri News –दाभोळ येथे एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी नौका पकडली
एलईडी दिवे लावून सुरू असलेल्या अवैध मासेमारी विरोधात मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त रत्नागिरीच्या पथकाने ऑपरेशन क्लीन-सी मोहिम राबवली आहे. मंगळवारी रात्री दाभोळ येथे एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी सफा मरवा-1 ही नौका मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने पकडली. गेल्या आठ दिवसांतील पकडलेली ही पाचवी मच्छिमार नौका आहे. दाभोळ बंदरात एलईडी दिवे लावून मासेमारी सुरू असल्याची […]
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध
सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन सहसचिव तथा सदस्य कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी तालुका पत्रकार संघाचा [...]
गोवा नाईट क्लब आग प्रकरण, सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना जामीन मंजूर
गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन या अग्नीतांडव झालेल्या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. यामुळे लुथरा बंधूंच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा आहे. डिसेंबर 2025 मध्ये या क्लबमध्ये आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. आगप्रकरणाशी संबंधित प्रकरणात लुथरा बंधूंना या आधीच जामीन मिळाला […]

27 C