मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच आज, शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. उद्या, शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक […]
वायुतळावर धावपट्टीचे केले उद्घाटन वृत्तसंस्था/ निकोबार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटसमुहात भारतीय वायुदलाच्या कार निकोबार वायुतळावर अपग्रेड करण्यात आलेल्या धावपट्टीचा शुभारंभ केला आहे. सीडीएस चौहान हे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता निकोबार बेटावर पोहोचले, जेथे अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल अजय कोचर आणि अन्य वरिष्ठ [...]
केंद्र सरकारने ‘X’ला बजावली नोटीस, Grok AI मधून अश्लील कंटेंट काढून टाकण्यास सांगितले
केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ ला नोटीस बजावली आहे. प्लॅटफॉर्मवरील Grok AI चॅटबॉटचा दुरुपयोग करून अश्लील कंटेंट तयार केले जात असल्याच्या वाढत्या घटनांवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ही कारवाई केली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, Grok AI चा वापर करून युजर्स महिलांच्या आणि मुलांच्या फोटोंमध्ये बदल करून अश्लील, नग्न […]
मुंबईतील महायुती आघाडीच्या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार अरविंद सावंत यांनी आरोप केला की विरोधकांकडून दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा भाऊ निवडणूक लढवत असून तो अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या निवडणूक लढवणारा हा उमेदवार गेल्या तीन दिवसांपासून विधानसभाध्यक्षांच्या भीतीमुळे बेपत्ता असून तो स्वतःच्या घरीही गेलेला […]
भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, पिंपरीत अजित पवार यांचा थेट हल्ला
भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पिंपरीत पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, “भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली. शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय.” अजित पवार म्हणाले की, ” फेब्रुवारी 2025 मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती. पुणे शहर बदलत गेलं, […]
कुलाबा येथील तीन वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. याच एक व्हिडीओही समोर आला आहे. यावरूनच आता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. X वर एक व्हिडीओ शेअर करत अंजली […]
Photo –उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले. मुंबईतला मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, सामान्य मुंबईकर आणि मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलो असून आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का कराल असा विश्वास उद्धव ठाकरे […]
Pandharpur : पंढरपुरात नववर्षानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास
नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले पंढरपूर : नववर्षाच्या प्रारंभानिमित्त गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती. या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या [...]
लोकशाहीच्या नावाने झुंडशाही सुरू, उमेदवारी अर्ज माघारीवरून संजय राऊत यांची टीका
सरकारी यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही सुरू आहे, उमेदवारी अर्ज माघारीवरून अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजया राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले आहेत की, “रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या […]
मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलोय असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का करा असा विश्वासही व्यक्त केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची […]
Satara : वडगाव हवेलीच्या खंडोबाची आज यात्रा
यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम दुशरे : परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव हवेली (ता.कराड) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा पौष शुक्ल १४ म्हणजे शुक्रवार दिनांक २ रोजी जानेवारी रोजी होत आहे. यात्रेची मुख्य सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा यादिवशी मृग [...]
Photo –आदित्य आणि अमित ठाकरे यांचं मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज शिवसेना भवन येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी युतीच्या वतीने मुंबई, मुंबईकर आणि मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांसमोर सादर केलं. मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द […]
भर बैठकीत ह्रदयविकाराचा झटका, भाजप आमदाराचे निधन
उत्तर प्रदेश येथील बरेली येथे बैठक सुरु असताना भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. श्याम बिहारी लाल यांनी एक दिवस आधी त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे वृत्त आहे. ते फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले […]
ड्रिंक अँड ड्राइव्हवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1.31 कोटींचा दंड, 13,752 ई-चलान जारी
मुंबई पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 हजार हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारला आहे. गुरुवार, 01 जानेवारी 2026 च्या सकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. या कालावधीत एकूण 211 वाहनचालकांवर मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. ही संख्या 2023 आणि 2024 च्या अखेरच्या दिवशी […]
Satara : बहुजमध्ये जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
बहुज येथील मोक्याची जागा नगरपंचायतीला देण्याचा निर्णय वादात बहुज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाची जागा नगरपंचायतीला भाड्याने देण्याचा निर्णयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याऱ्यांनी फेरविचार कराबा या मागणीचे निवेदन देऊन दहा दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीयनि घेतले नाही. याच्या निषेधार्थ बहुजला [...]
Miraj |मिरज महापालिका निवडणूक: मुख्य निरीक्षकांकडून ईव्हीएम व स्ट्राँग रूमची पाहणी
मिरज महापालिका निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात मिरज : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म नियोजन राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकयन एस. यांनी शहरातील सेंट्रल वेअरहाऊस येथील ईव्हीएम यंत्रांची साठवणूक, स्ट्रॉग [...]
SIR मध्ये मृत घोषित केलेल्या व्यक्तींना TMC ने आणलं मंचावर, निवडणूक आयोगावर केला हल्लाबोल
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरवरून सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मसुदा मतदार यादी प्रकाशित केली आहे, परंतु मसुदा मतदार यादीत अनियमिततेच्या तक्रारी सुरूच आहेत. एसआयआर मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत आहे. यातच शुक्रवारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपूर […]
Sangli Politics : सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भाजपकडून तयारी
सांगली महापालिकेसाठी भाजप सज्ज सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराची गती वाढवली असून, येत्या शनिवार ३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन सांगलीतील स्टेशन चौकात करण्यात आले आहे. या [...]
हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचा भाजपला सवाल
टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दक्षिण 24 परगणा (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या सभेत भाजप आणि राज्यातील विरोधकांवर जोरदार टीका केली. सुवेंदु अधिकारी यांनी बांगलादेशातील युनुस सरकार बंगाल सरकारपेक्षा चांगले प्रशासन चालवत असल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, दिपू दास यांची बांगलादेशात हत्या झाली असूनही भाजप नेते तेथील […]
बीड नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली. केवळ बीड शहरात दोन सभा आणि दोन बैठका त्यांना घ्याव्या लागल्या. नगर पालिका ताब्यात आली. नगराध्यक्षपद अजितदादांच्या गटाने राखले मात्र अजितदादा बीडमधून निघून जाताच दुसर्याच दिवशी नगराध्यक्षांच्या पदभार कार्यक्रमात ड्राम दिसला. उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकांच्या आत्मिक इच्छा समोर आल्या. रूसवा फुगवी आणि मतभेदही उघड […]
Sangli Politics : उमेदवारी नाही, तरी निष्ठा कायम; विश्वजीत पाटील यांची स्पष्ट भूमिका
पदापेक्षा विश्वास मोठा; विश्वजीत पाटील यांचे सूचक विधान सांगली : महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खंत असली तरी पक्ष आणि नेतृत्वावरील निष्ठा कायम ठेवून पुढेही काम करत राहणार असल्याचे भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील यांनी सांगितले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याशी असलेले [...]
कळंब नगर परिषद नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी सूत्रे स्वीकारले
कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषद सर्वाधिक निवडणूक 2025 साठी कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे या 2254 मताधिक्याने विजय झाल्या आहेत .त्यांनी मंगळवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी कळंब नगर परिषद कार्यालय येथे आयोजित भव्य समारंभात नगराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली हलगीच्या कडकडात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे व निर्वाचित नगरसेवक यांनी रॅली द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला , हि रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोहोचली , यानंतर नगरपरिषद कार्यालय येथील मीटिंग हॉलमध्ये पदग्रहण समारंभ संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, कळंब नगर परिषद निवडणूक प्रमुख माजी जीप बांधकाम सभापती दत्तात्रेय देऊळकर, शिवसेना नेते अजित पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी आप्पा कापसे , नगरपरिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात आर.पी. आय आठवले पक्षाचे बंडूभाऊ बनसोडे, मुकुंद मामा साखरे तसेच निवडणूक व्यवस्थापक योगेश अंधारे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्कार केला तर प्रमुख पाहुणे यांनी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार केला तसेच कळंब नगर परिषद कार्यालयाच्या वतीने मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी नूतन नगराध्यक्षाचा फेटा, शाल, बुके देऊन सत्कार केला, यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने नूतन नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला ,शिवसेना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख आनंत वाघमारे तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मकरंद पाटील, तालुकाप्रमुख दत्ता साळुंखे, अरुण चौधरी, नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य, शितल चोंदे, रोहन पारख, लखन गायकवाड, हर्षद अंबुरे, अमर चाऊस, अतुल कवडे, भूषण करंजकर, योजना वाघमारे, पूजा धोकटे, शाला पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची व नागरिकांची उपस्थिती होती. निर्वाचित नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांनी शहराचा विकास योजना राबविण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले तर दत्ताभाऊ कुलकर्णी, अजित पिंगळे, नितीन काळे यांनी विकास योजना पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पूर्ण सहकार्य राहणार आहे असे सांगितले व शंभर दिवसाचा विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर यांनी केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेत स्थलांतर करणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हे अनेक स्थलांतरितांचे स्वप्न असते. मात्र आता अमेरिकन नागरिकाशी विवाह करून हे ग्रीन कार्ड मिळवता येणार नाहीए. अमेरिकेचे इमिग्रेशन तज्ज्ञ ब्रॅड बेर्नस्टेन यांनी याबाबत कठोर इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यानुसार जोडीदाराला ‘इमिजिएट रिलेटिव्ह’ (जवळचे नातेवाईक) मानले जात […]
Sangli Politics : भाजपच्या आक्षेपाला “नकार; मैनुद्दीन बागवान उमेदवारी अर्ज वैध ठरला
भाजपच्या आक्षेपाला “नकार”; बागवान अर्ज पूर्ण वैध ठरला सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज महत्त्वाचा निर्णय समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे अधिकृत उमेदवार अल्लाभक्ष [...]
अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्या नंतर उपाध्यक्ष पदग्रहण सोहळ्याची तयारी
कळंब (प्रतिनिधी)- नववर्षाचे मुहूर्त साधत महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी भाजपा,शिवसेना,रिपाइं,ओबीसी अश्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.यादरम्यान अनेक वरीष्ठ पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले,मात्र ज्या कळंब भाजपा ने मागील वर्षभरापासून शहरात रामनवमी,राम मंदीर उत्सव,जनता दरबार,बुथ बांधणी,मन कि बात कार्येक्रम,विवीध योजनां,सरकार आपल्या दारी,मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार,लाडकी बहीण योजना,अशा अनेक कार्येक्रमांच्या माध्यमातून मकरंद पाटील यांनी संघटनेसोबत वाढवलेले जनसंपर्क व समाजाच्या शेवटच्या घटकाचा जनाधार मिळवला होता. जे घटक भाजप वर्ज्य समजत होते त्यांनी पण मतदान केले यासाठी मकरंद पाटील यांना श्रेय द्यावेच लागेल. या निवडणुकीत भाजपाने शहराध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुक्ष्मपणे आपली निवडणूक रणनीती आखत सर्वस्व पणाला लावून महायुतीच्या नगराध्यक्षांस प्रचंड बहूमत मिळवून दिले,कांहीं नगरसेवकांचा निसटता विजय झाला,तर कांहीं उमेदवारांना सर्वशक्तीनीशी लढूनही पराभव स्विकारावा लागला. निवडून आलेल्या भाजपा व शिवसेना उमेदवारांची संख्यात्मक मर्यादा जनतेने देत काठावर बहूमत दिले आहे,महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेले बहूमत पाहता महायुतीचे किमान तेरा ते चौदा उमेदवार निवडून यायला हवे होते,असे राजकिय जाणकारांचे मत आहे.मग माशी कुठे शिंकली ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्हीही शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र अद्याप हाती कांहीच लागले नसले तरी,यास कुठेतरी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांतील अंतर्गत धुसफुस कारणीभूत असावी असे जनतेत बोलले जाते. यातच आता नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी कळंब शहर भाजपाचे अध्यक्ष मकरंद पाटील,निवडणूक प्रसंगी विवीध माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवणारे विवीध सामाजिक नेते,भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकांचे सत्कार याप्रसंगी झाले नाहीत,याबाबत अनेक नेते व कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत,आता उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळाही लवकरच होण्याकरीता,उपनगराध्यक्ष,विवीध विषय समित्या,स्विकृत सदस्य,याकरीता भाजपा आता ॲक्शन मोडवर असल्याचे बोलले जाते.
वैष्णवी बाबर यांचा कबड्डी संघ देशात दुसरा
भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शालेय 69 व्या अजिंक्य कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ देशात दुसरा ठरला आहे. या स्पर्धेत चमकदार खेळी करणाऱ्या स्वराज क्रीडा मंडळाची खेळाडू वैष्णवी बाबर हिचे भूम शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तिचे गोलाई चौकात फटाक्यांच्या अतिषबाजीत व फुलाची उधळण करीत गोलाई चौकापासून गांधी चौकापर्यंत वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. ही राष्ट्रीय अजिंक्य कबड्डी स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात कोकमठाण येथे संपन्न झाल्या. या संघात भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाच्या वैष्णवी बाबर हिने जोरदार कामगिरी करत आपल्या संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला होता. या प्रसंगी स्वराज क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू स्वराज मुळे, यशोदीप कांबळे, सुहास बाबर, साहिल जरडकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी तिचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. सिराज मोगल, गोपाळ येळमकर, भरात साठे, महादेव कुटे, समाधान मिसाळ, निलेश व्हरे,अक्षय बाराते,स्वप्नील सुपेकर, अक्षय तिकटे, साक्षी मिसाळ, राजनंदिनी मिसाळ, राधिका जाधव, कुणाल भारती, अमित सुपेकर, संजय साठे, अभिजित देवरे, कैफ मोगल, आदित्य जगदाळे ,मयूर साठे, श्रेयश शिंदे, पार्थ साठे ,साहिल सुरवसे, विनायक आहेर, पृथ्वीराज हसवले, समाधान भोसले, अमित राऊत यांच्यासह स्वराज क्रीडा मंडळाचे खेळाडू मोठया संख्येने हजर होते. तिला एनआयएस प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक अमर सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
3 व 4 जानेवारीला विशेष मोहीम; धाराशिव तालुक्यात 117 जमीन मोजणी प्रकरणांचा दोन दिवसांत होणार निपटारा
धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने प्रलंबित राहिलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी धाराशिव तालुक्यात 3 व 4 जानेवारी 2026 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत दोन दिवसांत 117 प्रकरणांचा निपटारा केला जाणार असून,यासाठी इतर तालुक्यांतून 55 सर्वेअर सहभागी होणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात माहे जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत सतत पाऊस व शेतजमिनीत चिखल असल्यामुळे मोजणीची कामे होऊ शकली नाहीत. परिणामी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय,धाराशिव येथे एकूण 710 मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली असून त्यापैकी 510 प्रकरणे मुदतबाह्य आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख,छत्रपती संभाजीनगर विभागाचे किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 3 व 4 जानेवारी रोजी 117 प्रकरणांची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे.संबंधित जमीनधारकांना नोटिसा पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या असून ई-चावडीवरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.संबंधित अर्जदार व हितसंबंधितांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या जमिनीची मोजणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संग्राम जोगदंड यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात निपटारा होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कळंब येथे दिनेश मंडलिक यांचा सत्कार
कळंब (प्रतिनिधी)- येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक अधिकारी दिनेश गोरख मांडलिक यांचा वाढदिवसानिमित्त कळंब येथील उपविभागीय कार्यालयात सेतू सुविधा केंद्र संचालक व मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,सेतु सुविधा केंद्र संचालक नटराज गायकवाड, सुनील पाटोळे, दीपक दळवी, बाबासाहेब टोपे, कर्मचारी धनराज पिसुरे, बबन जाधवर यांच्या सह नागरीक उपस्थित होते.
मुला मुलींचा लिंग गुणोत्तर दर हा समतोल राहणे समाजाच्या दृष्टीने महत्वाचे- न्यायाधीश भगवान पंडित
भूम (प्रतिनिधी)- मुला मुलींचा लिंग गुणोत्तर दर हा समतोल राहणे समाजाच्या दृष्टीने महत्वाचे आह़े असे मत भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर भगवान पंडित यांनी पीसीपीएनडीटी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले. धाराशिवचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्हा रुग्णालय धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक व ग्रामीण रुग्णालय भूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशिकांत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी, जनजागृती, लिंग गुणोत्तर,बेटी बचाव बेटी पढाव, गर्भधारणापुर्व व प्रसूतीपुर्व लिंगनिदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा1994 सुधारीत 2003 कार्यशाळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भूम तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रधारक, गर्भपात केंद्रधारक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शासकीय व खासगी वैद्यकीय व्यावसायिक,आय एम ए.,फॉग्सी, निमा, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी, ए.एन.एम कर्मचारी, आशा कार्यकर्ती, व ग्रामीण रुग्णालय भूमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.शशिकांत खराडे यांनी कार्यक्रामाचे प्रास्तावीक केले. यावेळी पोलीस निरीक्षक कानगुडे, गट विकास आधिकारी वाझे, वैद्यकीय आधिकारी डॉ.सुळ, ॲड.रेणूका शेटे यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी एक मुलगी आणि दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या तीन महिलांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून मानसन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन समुपदेशक एस.डी. तटाळे यांनी केले. तर समुपदेशक मनोज सरवदे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राम खैरे, विनोद काटे, लक्ष्मण काळे, धनंजय कुलकर्णी, सुग्रीव राख, टी. एस. काळे, मुंढे मुकुंद, ठवरे यांनी परिश्रम घेतले.
Solapur : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नायगांव स्मारक भूमिपूजन
सोलापूर जिल्ह्यातून हजारो लोक नायगांव भूमिपूजनासाठी निघणार पाटकुल (सुहास परदेशी) :क्रांति ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त नायगांव येथील कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मधुन हजारो लोक जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे. स्त्री शिक्षणाच्या जनक प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले [...]
काँग्रेसडून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन व सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना लोकशाहीवादी, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरण असणे […]
Dapoli News –बुरोंडी बंदरात जेटी अभावी मासेमार बांधवांचे होतायेत हाल
दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर म्हणून ओळख असलेल्या या बुरोंडी बंदराचा विकास आजही खितपत पडला असून त्याची झळ येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना बसत आहे. ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बुरोंडी बंदरावर होड्या लावण्यासाठी जेटीचे बांधकाम केले नसल्याने मासेमार बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. मलपी परप्रांतीय फास्टर बोटींनी हैदोस घातल्याने तसेच एलईडी लाईटव्दारे केल्या जाणाऱ्या मासेमारींने येथील […]
कुंभार्ली घाटात अवघड वळणावर मालवाहक ट्रक उलटला, आठ तास वाहतूक ठप्प
चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्प झाली होती. यादरम्यान छोटी चार चाकी वाहने जातील एवढाच मार्ग शिल्लक होता. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हा अपघात कुंभार्ली घाटात असणाऱ्या मंदिराजवळ रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळेच घडल्याचे […]
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ नैराश्यात असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी ही हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील गव्हर्मेंट डिग्री कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील विक्रम कुमार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. […]
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भागीरथपुरामध्ये दुषितपाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. तर 338 नवे रुग्ण सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण राजकारण तापले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. इंदूरच्या लोकांना पाणी नाही तर, विष पाजलं गेलं आणि प्रशासन मात्र कुंभकरणाची झोप घेत असल्याचा संताप […]
कारिवडे उपसरपंच महेश गावकर यांचे युवानेते विशाल परब यांच्याकडून अभिनंदन
गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही ओटवणे|प्रतिनिधी कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या महेश गावकर यांचे भाजपाचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारिवडे येथे जात महेश गावकर यांचे अभिनंदन केले. तसेच गावच्या विकासासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्याची ग्वाही महेश गावकर यांना दिली.यावेळी विशाल परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांचा [...]
संघाच्या मुखपत्रात मुस्लीम लीगचा लेख, चूक कळताच संघाकडून सारवासारव
केरळमध्ये संघाच्या मुखपत्रात मुस्लीम लीगचे लेख छापून आल्याने एकच गोंधळ उडाला होता. पण ही तांत्रिक चूक असल्याची सारवासारव संघाला करावी लागली. केरळात नववर्षाच्या दिवशी घडलेल्या एका अनोख्या गोंधळाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जन्मभूमी’ या दैनिकाच्या कण्णूर–कासरगोड आवृत्तीमध्ये १ जानेवारीला मुस्लिम लीगच्या ‘चांद्रिका’ या वृत्तपत्राचे संपादकीय पान छापले गेले. […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तरित्या शिवसेना भवनात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मुंबईतील उमेदवारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण करत उमेदवारांना प्रचारासाठी एक दिशा दिली. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह आणि जोश निर्माण झाला. ही आमच्या मनातली इच्छा आहे, […]
भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात मैदानी स्पर्धांचे आयोजन
भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी गॅदरिंग निमित्त शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, डॉ. तानाजी बोराडे, समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे व डॉ. अशोक दुनघव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये 100 मीटर मुले या स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश मुंडेकर, द्वितीय क्रमांक, विशाल जाधव, तृतीय क्रमांक अभिषेक कांबळे या विद्यार्थ्यांनी मिळवला. तसेच गोळाफेक मुली स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती कराळे, द्वितीय क्रमांक कोमल बोराडे, तृतीय क्रमांक महादेवी जाधव या विद्यार्थ्यांनी मिळवला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रा. महेश सूर्यवंशी, प्रा. राहुल राठोड, प्रा. नंदू जगदाळे, प्रा. मंगेश खराटे, प्रा. अमोल कुटे, प्रा. हरी महामुनी, प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे, प्रा. रमेश गायकवाड, प्रा. नवनाथ भोंग, डॉ. शामसुंदर आगे, डॉ.शिवशंकर माळी, प्रा.जयेश मसराम प्रा.लक्ष्मण पवार, डॉ.शितल अलगुंडे, डॉ.राजश्री तावरे, प्रा. पूनम सुतार, प्रा. दिप्ती गिरी तसेच इतर प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करा - महाविकास आघाडी
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरामधील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करणे व कचरा घंटा गाडीची दररोज वेळेवर व्यवस्था करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. निवेदनात, तुळजापुर शहरामध्ये ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात घाणिचे साम्राज्य स्थापीत झाले असुन तुळजापुर येथील प्रत्येक नगरामध्ये सर्व गटारी, नाल्या, हे सर्व गहाण जावुन तुंबलेल्या असुन गटारीचे वाहणारे गहान पाणी हे सर्व रस्त्यावर वाहत आहे. तरी त्यापासुन मच्छरांची उत्पत्ती होऊन संबंधीत ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच सदरील घाणिचे साम्राज्य पाहुन येणारे भाविक भक्तांच्या दृष्टीकोनातुन तुळजापुर शहर हे अस्वच्छतेची छबी दिसत आहे. तसेच कांही ठिकाणी गटारीच्या चेंबर वरील झाकणे ही दुरावस्थेत असुन त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच तुळजापुर शहरातील सर्व परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे येथे स्वच्छता नसल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरत आहे. तसेच मंजुर ठिकाणी करचरा कुंडीची स्वच्छता करणे व दररोज वेळच्या वेळी कचरा घंटा गाडी ही सर्व शहरामध्ये फिरणे यावी. तरी मे. साहेबांना विनंती आहे की, कृपया आपण तुळजापुर शहरातील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे हे लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावे. तसेच कचरा कुंडीची ही व्यवस्था लवकरात लवकर करावी हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे यांनी दिले.
यात्रा मैदानावर चर्चा? आमदार सुरेश अण्णा धस यांची शिवसेना नेत्यांची सदिच्छा भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व नगरसेवक किरण (टिनु) कदम यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांची आष्टी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार धस यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवळ्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला. या भेटीत तुळजापूर शहरातील ऐतिहासिक यात्रा मैदानाच्या जमीन हडप प्रकरणासह विविध स्थानिक व नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात्रा मैदान प्रकरणाच्या चौकशी अहवालास होत असलेल्या विलंबाबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार धस यांच्याकडे व्यक्त केली. नागरिकांच्या अडचणी व विकासात्मक मुद्द्यांवर संवाद यावेळी यात्रा मैदानाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, तुळजापूर शहरातील विकासात्मक प्रश्न तसेच इतर स्थानिक समस्यांवर सकारात्मक व सखोल चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. तुळजापूरच्या सर्वांगीण हितासाठी संबंधित सर्व विषयांवर समन्वयाने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आल्याचेही समजते. या भेटीनंतर तुळजापूरच्या यात्रा मैदान प्रकरणासह इतर महत्त्वाच्या विषयांना गती मिळणार का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भूसंपादन मालमत्ताधारकांना अधिकाधिक मोबदला देणार- ओंकार देशमुख
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथील विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये बाधित मालमत्ताधारकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन ऑर्डर पद्धतीने अधिकाधिक मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिली. भूसंपादनाबाबत बुधवारी आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने, अभियंता राजकुमार भोसले, मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच बाधित मालमत्ताधारक उपस्थित होते. यावेळी मालमत्ताधारकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, भूसंपादनाबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशासनाने आम्हाला योग्य व सविस्तर माहिती द्यावी. तसेच या प्रक्रियेत आमचे सर्वस्व जाणार असल्याने समाधानकारक मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी रेल्वे रस्ता मावेजासारखी प्रकरणे रखडली होती, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख म्हणाले की, भूसंपादन प्रक्रिया सर्वांना विश्वासात घेऊनच केली जाईल. प्रत्यक्ष जागेवर किती क्षेत्र आहे व कागदोपत्री किती क्षेत्र आहे, याची सखोल तपासणी करून मोजणी केली जाईल. ही मोजणी येत्या सोमवार किंवा रविवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बस चालक यांनी बसमध्ये आपला परिवार प्रवास करत आहे असे समजून वाहन चालवावे -पोनि अजित चिंतले
कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या धावपळीच्या युगात बस चालकाने बस मध्ये आपला परिवार आहे असे समजून नशा पाणी न करता वाहन व्यवस्थित चालवावे व शिस्तीचे पालन करावे असे मत कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी कळंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. 1 ते 31 जानेवारी या मासिका च्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन गुरुवार दि ,1 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता कळंब आगारात धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले व कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे प्रभारी आगार प्रमुख बालाजी भारती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोहन जाधव,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, स्थानक प्रमुख जानराव हे होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रभाकर झांबरे , वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप , सुशिल हुंबे , प्रशांत नानजकर,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जाधव , सुरेंद्र पायाळ, शिंदे मॅडम, श्रीमती शेख मॅडम चालक वाहक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश गोरे यांनी केले . कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सोनारी ग्रामस्थ आक्रमक; 6 जानेवारीपासून बेमुदत ‘रस्ता रोको’चा इशारा
परंडा (प्रतिनिधी)- परंडा-पाथरूड राज्य महामार्ग क्रमांक 210 ची अत्यंत दुरवस्था झाली असून, वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या उदासीनतेच्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सोनारी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 6 जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बेमुदत ‘रस्ता रोको’ करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाने येत्या 5 दिवसांत (6 जानेवारीपर्यंत) या निवेदनाची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा, समस्त सोनारी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान होणाऱ्या परिणामांना पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना रवी मांडवे, सचिन पवार, अविनाश हांगे, गणेश फले हे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, तहसीलदार परंडा आणि आंबी पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. मौजे सोनारी येथील शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक झाली आहे. सोनारी हे ठिकाण श्री काळ भैरवनाथ तीर्थक्षेत्र असल्याने येथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित विभागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने साखर कारखान्यांची अवजड वाहने याच मार्गावरून धावतात. हा मार्ग अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख दुवा असूनही प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग परंडा येथे 1 जानेवारी 2026 रोजी हे निवेदन देण्यात आले. “जर या धोकादायक रस्त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात झाला, तर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,“ असा आक्रमक पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व भीमा कोरेगाव शौर्य विजयी दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती व राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने धाराशिव शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा म्हणजेच नगराध्यक्ष नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत करण्यात आला, कार्यक्रमापुर्वी तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली,शाल, सन्मान पत्र, भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला, प्रस्तावनेत अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच जागेच्या हस्तांतरण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहाविषयी माहिती दिली,नगर सेवक राहुल काकडे यांनी म्हण्टले की,या जागेसाठी व जागेतील नियोजित बाबी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करुन हा विषय मार्गी लावु,नगर सेवक अमित भैया शिंदे म्हणाले की, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागे संदर्भात आमदार राणा दादा पाटील प्रयत्नशील असुन काही दिवसांपूर्वी आम्ही घेतलेल्या बैठकीत समितीचा विषय घेतला असुन आम्ही या जागेसाठी सर्व नगरसेवक पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावु,आपण आम्हाला बोलावुन आमचा सत्कार केला याबद्दल ही त्यांनी आभार मानले,.नाना घाडगे यासह इतर ही मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,बलभीम कांबळे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,राणा बनसोडे,सचिन चौधरी,बाबासाहेब गुळीग,लक्ष्मण माने,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,श्रीकांत मटकिवाले,अतुल लष्करे, गुणवंत सोनवणे,राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे,ॲड.अनुरथ नागटिळक बापु कुचेकर,नवनाथ वाघमारे,मेजर सिद्राम वाघमारे, राजेंद्र धावारे,अशोक बनसोडे,पांडुरंग आल्टे,सुनिल वाघमारे,नरेन वाघमारे, मुकेश मोटे,योध्दा सामाजिक संस्थेचे सरफराज पटेल,बाबा कांबळे तर विजयी उमेदवार सह इतर मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम कांबळे, बाबासाहेब गुळीग,प्रस्तावना गणेश वाघमारे यांनी केले तर आभार संजय गजधने यांनी मानले.
जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वाशीच्या पूनम चेडे यांचा प्रथम क्रमांक
वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एस.सी.ई.आर.टी.) पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 डिसेंबर 2025 रोजी लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वाशी येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या शिक्षिका पूनम गौतम चेडे यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. धाराशिव जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या विविध नवोपक्रमांपैकी चेडे यांच्या उपक्रमाची गुणवत्ता, उपयुक्तता व सादरीकरण सर्वोत्तम ठरले. या घवघवीत यशामुळे त्यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, येत्या जानेवारी 2026 मध्ये एस.सी.ई.आर.टी. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्या धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अरविंद सावंत ,भास्कर जाधवांसह १५ जणांची निर्दोष मुक्तता
मनाई आदेशांचे उल्लंघन करून कुडाळ एसीबी कार्यालयावर काढला होता मोर्चा ; ॲड. सुधीर राऊळ यांचा युक्तिवाद कुडाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चा काढून आणि सभा घेऊन जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून शिवसेना नेते व खासदार [...]
कारिवडे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा! ओटवणे|प्रतिनिधी कारिवडे गावच्या उपसरपंचपदी महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत महेश गावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.कारिवडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात ठरल्याप्रमाणे तुकाराम बाबाजी आमुणेकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी कारिवडे [...]
मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला
बिबट्याने केला युवकाचा पाठलाग न्हावेली /वार्ताहर मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याचीवाडी खुळादेववाडी येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या त्याच्या नजरेत पडला.मात्र कुत्रा असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केला.परंतु मागे वळून पाहिले [...]
सावंतवाडी बाजारपेठेलगत कचऱ्याचे साम्राज्य
नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वेधले पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचे लक्ष सावंतवाडी ; प्रतिनिधी सावंतवाडी शहराच्या बाजारपेठेलगत सालईवाडा येथीव वर्दम, नेवगी, भांबुरे घरामागील असणाऱ्या ओहोळावरील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील रहिवाशांच्या खाजगी जागेत देखील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मिनी कचरा डेपो तयार झाला असून प्लास्टिक व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य प्रशासनाने [...]
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला बाहेरून उमेदवार आणण्याची वेळ, अंबादास दानवे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, उमेदवारीबाबत असंतोषाचे प्रमाण अतिशय कमी असून कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्याने पक्षाला फारसा फटका बसणार नाही. अनेक ठिकाणी चार-पाच इच्छुक असताना एका व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात येते, त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होतात, परंतु ही भूमिका समजावून सांगितल्यास ते समजून […]
राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप होत आहे. कुलाबा येथील 3 वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील 3 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ […]
लग्नाला नकार दिला म्हणून तरुणी संतापली, प्रियकराचे गुप्तांग छाटले; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व भागातील कलिना परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणीने लग्नाला वारंवार नकार देणाऱ्या आपल्या 42 वर्षीय प्रियकरावर जीवघेणा हल्ला करत त्याचे गुप्तांग कापले. नवीन वर्षाच्या पार्टीच्या बहाण्याने तरुणीने त्याला आपल्या घरी बोलावले होते आणि रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. […]
दुचाकींवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती
वाहतूकमंत्रीमाविनगुदिन्होयांचीमाहिती: 1 एप्रिलपासूनअंमलबजावणी: सर्वोच्चन्यायालयाच्याआदेशानुसारनिर्णय येत्या15 पासूनरस्तासुरक्षासप्ताहातजागृती सरकारनेअपघातांचीघेतलीगंभीरदखल प्रत्येकमतदारसंघातदेणारमोफतहेल्मेट राज्यातील91 ठिकाणीकॅमेराबसविणार झेब्राक्रॉसिंगसहअन्यसुविधांचीहीतपासणी पदपथांवरीलवाहनांवरहोणारकारवाई पणजी : राज्यसरकारनेवाढत्याअपघातांचीगंभीरदखलघेतलीअसूनतेटाळण्यासाठी6 महिन्यात61 ठिकाणीकॅमेरा बसवून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शिवाय येत्या 1 एप्रिलपासून दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहात हेल्मेटबाबत जागृती केली जाणार आहे. तसेच हेल्मेट मोफत देण्याची योजनाही सरकार [...]
इंदूर दूषित पाणीप्रकरण –सरकारने या पापाचे प्रायश्चित्त घ्यायला हवे, उमा भारती यांचा भाजपला घरचा आहेर
इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने अनेकांवर मृत्यू ओढावल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आपल्याच सरकारवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला आहे. ही घटना लज्जास्पद असून यासाठी सरकारने माफी मागायला हवी. मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये नुकसान भरपाई ही त्यांच्या आयुष्याची किंमत असू […]
कोल्हापूरात मुख्यमंत्री फडणवीसांचा मिसळ कट्ट्यावर थेट संवाद कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीने हटके नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १२ जानेवारी रोजी मिसळ कट्ट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नितळचा आस्वाद घेत मुख्यमंत्री तासमर कोल्हापूर वासियांसोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती खात्तदार [...]
Kolhapur : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम तपासणी पूर्ण!
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी नियोजन अंतिम टप्प्यात कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी निवडणुक विभागाकडे प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशिनची तपासणी पूर्ण झाली आहे. प्रशासनाकडून मतदान आणि मतमोजणी प्रक्रीयेची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. मतमोजणी ही चार ठिकाणी घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांनी दिली. कोल्हापूर महापालिका [...]
Inchalkranji Crime : इचलकरंजीत दिवसाढवळ्या घरफोडी
इचलकरंजीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह इचलकरंजी : शहरातील विक्रमनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरात शिरून तिजोरीतील लॉकर उचकटत सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचे २७.२६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजी गणपती भोसले (वय ६२. [...]
Kolhapur : नूतन वर्षारंभ व गुरुवार योगाने नृसिंहवाडीत भाविकांची लाखोंची गर्दी
नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला कोल्हापूर : नूतन वर्षारंभ व गुरुवार असा अनोखा योग साधत नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लाखावर भाविकांनी आज दत्त दर्शनाचा लाभ घेतला. थंडीची तमा न बाळगता पहाटेच्या काकड आरतीपासून [...]
ताळगाव वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट, काजू बोंडे, मुसराद आंब्याला ‘जीआय टॅग’
पणजी : राज्यातील विविध वैशिष्ट्यापूर्ण आणि पारंपरिक उत्पादनांना यापूर्वी भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्रदान करण्यात आले असून त्या यादीत आता आणखी पाच उत्पादनांची भर पडली आहे. ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट तांदूळ, काजू बोंडे आणि मुसराद आंबा यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. जीआय निबंधकांकडून या उत्पादनांना ‘जीआय’ दर्जा देण्यात आला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना [...]
देव श्री बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून
8 जानेवारीपर्यंतविविधधार्मिक, सांस्कृतिककार्यक्रमांचेआयोजन म्हापसा : म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा देव श्री बोडगेश्वरचा 91 वा महान जत्रोत्सवतसेच देवस्थानाचा 33 वा वर्धापनदिन आज शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 8 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज शुक्रवार दि. 2 रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराच्या [...]
सांबरा येथे पाणी भरताना विजेचा धक्का; सातवीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : सांबरा (ता. बेळगाव) येथे आज शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाणी भरताना विजेचा धक्का लागून सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. परिणीती चंद्रकांत पालकर (वय १२, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे [...]
गोळीबारातकार्यकर्त्याचामृत्यू: बॅनरलावण्यावरूनवाद बेंगळूर : गंगावतीचे आमदार गाली जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानासमोर बॅनर लावण्यावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. दोन गटात दगडफेक, हवेत गोळीबाराची घटना घडली. यावेळी बंदुकीतून झाडलेली गोळी लागून एका कार्यकर्त्याचा बळी गेला. या घटनेनंतर प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेमुळे बळ्ळारी शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, [...]
भिंतीवरून मारा…गुन्हेगारांना चारा?
हिंडलगामध्यवर्तीकारागृहातवस्तूफेकतानाचेसीसीटीव्हीफुटेजव्हायरल, अधिकाऱ्यांचेधाबेदणाणले बेळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बेंगळूर येथील परप्पन अग्रहार व गुलबर्गा मध्यवर्ती कारागृहानंतर हिंडलगा मध्यवर्ती कारागृह ठळक चर्चेत आले आहे. कैद्यांना अमलीपदार्थ व मोबाईल पोहोचविण्यासाठी गवताचे चेंडू बनवून कारागृहाच्या भिंतीवरून हे चेंडू टाकून दिल्याचे फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने याची दखल घेतली आहे. पोलीस आयुक्त [...]
फेक AI व्हिडीओवरून जावेद अख्तर संतापले, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा
DeepFake AI जनरेटेड व्हिडीओ बनवून कलाकारांची बदनामी केली जात आहे. याचा फटका सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा देखील बसला आहे. त्यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून जावेद अख्तर संतापले आहेत. A fake video is in circulation showing my fake computer generated picture with a topi on my head claiming […]
जिल्ह्यातील 60 हयातांना ठरविले मयत
आधारकार्डे निष्क्रिय करण्यात आल्याने नागरिकांना नरकयातना भोगण्याची वेळ : गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी बेळगाव : मयत झाल्याचे गृहित धरून हयात असलेल्या जिल्ह्यातील सुमारे 60 हून अधिक जणांची आधारकार्डे निष्क्रिय करण्यात आली आहेत. त्यामुळे आधारकार्डविना संबंधितांना जिवंतपणीच नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील आधारकार्ड केंद्रात नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र [...]
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंधांविरोधात योग्य कार्यवाही व्हावी
लोकसभाअध्यक्षांनामहाराष्ट्रएकीकरणयुवासमितीसीमाभागचेपत्र बेळगाव : बेळगावसह सीमाभाग व परिसरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर भाषिक अत्याचार करणाऱ्या एका अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिह्यातील प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांविरोधात योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने अध्यक्ष शुभम शेळके यांनी लोकसभा अध्यक्ष [...]
Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
मतदान – मतमोजणी प्रक्रियेत चूक होऊ नये यासाठी कडक तयारी कोल्हापूर : निवडणुका निर्भय, पारदर्शक आणि बिनचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी अशा सूचना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी केल्या. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या [...]
हाजगोळी-धामणे फाटा दरम्यानच्या रस्त्यावर ब्लॅक पँथरचे दर्शन
तुडये : तुडये-तुर्केवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील हाजगोळी हद्दीतील मडवळ कोंड नावाच्या परिसरात ब्लॅक पँथर दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विनायक बिर्जे हे आपल्या कारमधून तुडयेहून चंदगडकडे जात असताना त्यांच्या गाडीसमोर ब्लॅक पँथर आला. त्यांनी गाडी थांबवून तो रस्त्यावरून बाजूला जावा म्हणून हॉर्न वाजवताच उडी मारत जंगलात निघून [...]
पश्चिम पदवीधर मतदारसंघाची तात्पुरती यादी प्रसिद्ध
उर्वरितपदवीधरमतदारांचीनोंदणीकरण्यासमुभा बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 1 नोव्हेंबर 2025 अनुसरून कर्नाटक विधानपरिषद पश्चिम पदवीधर मतदारसंघाची मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी तात्पुरती मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे कर्नाटक पश्चिम मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी व बेळगाव विभाग प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी कळविले आहे. 25 नोव्हेंबर 2025 ते [...]
भीमा-कोरेगाव विजयोत्सवाच्या माध्यमातून समता, स्वाभिमान-सामाजिक न्यायाचा संदेश
डॉ. बाबासाहेबआंबेडकरउद्यानात208 वाविजयोत्सव बेळगाव : बेळगावमध्ये गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारा 208 वा भीमा-कोरेगाव विजयोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये पार पडला. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर भीमवंदना सादर झाली. या विजयोत्सवात विविध सामाजिक संघटना, दलित चळवळींचे कार्यकर्ते, विचारवंत, प्रगतिशील नागरिक व बाबासाहेबांचे अनुयायी बहुसंख्येने सहभागी झाले होते. [...]
एकीकडे संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे, तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये एका जागरूक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचे सांगत या नागरिकाने पुकारलेल्या ‘सविनय असहकार’ आंदोलनाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. देशभरात सध्या ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरून मोठे […]
अजित पवारांसोबत बजरंग सोनवणेंची हवाई सफर; एकत्र येण्याचे संकेत की, मुंडेंना इशारा
विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी बीडमध्ये दाखल झालेले अजित पवार परतीच्या प्रवासाला हेलिकॉप्टरने जात असताना बीड ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते पुणे प्रवासासाठी त्यांनी बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंना सोबत घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बजरंग सोनवणे यांच्या एकत्र प्रवासाची चर्चा दिवसभर सुरू होती. यातून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत की […]
लोककल्प फौंडेशनतर्पे चिगुळे येथील रुग्णाची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या साहाय्याने चिगुळे (ता. खानापूर) येथील रुग्णाची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांना नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदय कुमार यांचे सहकार्य लाभले. तसेच [...]
चापगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांवरील अविश्वास ठराव चौथ्यांदा बारगळला
गावातफटाक्यांचीआतषबाजीकरतआनंदोत्सव खानापूर : चापगाव ग्रा. पं. अध्यक्षा गंगा सिद्धप्पा कुरबर व उपाध्यक्षा मालुबाई अशोक पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव चौथ्यांदा बारगळला. उच्च न्यायालयाचा मनाई आदेश आल्याने अविश्वास ठरावावर मतदान घेता येणार नसल्याचे निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात असलेले प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांना चौथ्यांदा नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. अविश्वास [...]
खादरवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
बेळगाव : खादरवाडी गावातील रस्ता करण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने ग्रामस्थांकडून पाठपुरावा केला जात आहे. तरीदेखील अद्यापही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ, शेतकरी संघटना आणि श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गुरुवारी क्लब रोडवरील कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास खात्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास खात्याकडून खादरवाडी गावात रस्ता मंजूर झाला [...]
युवानेते विशाल परब यांच्या हस्ते आदिनारायण दिनदर्शिकेचे प्रकाशन
परुळे/प्रतिनिधी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते कोकण दिप प्रकाशन परूळेच्या आदिनारायण दिनदर्शिका २०२६चे दिमाखात प्रकाशन करण्यात आले . कोकणची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आता घराघरांत पोहोचणार आहे. .आदिनारायण दिनदर्शिका ही केवळ तारखांचे साधन नसून ती कोकणच्या लोककला, सण-उत्सव आणि धार्मिक विधींची माहिती देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानले जाते. कोकणातील प्रत्येक घरातील भिंतीवर या [...]
कोणत्याही शिफारशीशिवाय थेट भेटा!
नूतनजिल्हापोलीसप्रमुखांचेआवाहन: पदभारस्वीकारला बेळगाव : जनमानसातील पोलिसांची भीती गेली पाहिजे. कोणाला पोलिसांची भीती वाटू नये. कायद्याची भीती वाटावी, यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते कोणाच्याही शिफारशीशिवाय थेट आपली भेट घेऊ शकतात, अशी माहिती नूतन जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी दिली. गुरुवारी रात्री रामराजन यांनी पोलीसप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा [...]
नानावाडी-सावगाव रोडवरील खुले ड्रेनेज तातडीने बंद करण्याची मागणी
बेळगाव : नानावाडी-सावगाव रस्त्याच्या बाजूला असलेले ड्रेनेज खुले आहे.ड्रेनेज खुले असल्याने घाण पाणी व कचरा रस्त्यावर येऊन परिसरात अस्वच्छता पसरण्याचा धोका निर्माण होईल. यामुळे रोगराई पसरण्याच्या भीतीने तेथील रहिवाशांनी खुला असलेले ड्रेनेज झाडे-झुडपे टाकून बंद केला आहे. याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असून यामुळे रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे खुले असलेले ड्रेनेज [...]
दुसऱ्या रेल्वेगेटवरून विरुद्ध दिशेने प्रवास
बेळगाव : रेल्वे दुसऱ्या गेटसमोरील खानापूर-बेळगाव मुख्य रस्त्यावर गर्दी होऊ नये व वाहनधारकांना वाहतूक केंडीविना प्रवास करता यावा यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने प्रवास करून दुसऱ्या बाजूला जात आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकाराता येत नाही. यापूर्वी विरुद्ध दिशेने अपघाताच्या घटना घडल्या असून मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. यामुळे अपघाताची पुनरावृत्ती [...]
हलशी-हलशीवाडी येथील रस्त्याची दुर्दशा
रस्त्यावरुनवाहतूककरणेबनलेधोकादायक: 28 वर्षानंतरहोणाऱ्यामहालक्ष्मीयात्रेपूर्वीरस्ताकरण्याचीमागणी वार्ताहर/हलशी कर्नाटकातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हलशी हे गाव कदंब राजवटीची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील प्राचीन व सुप्रसिद्ध मंदिरे संपूर्ण राज्यात श्रद्धेचे केंद्र असून, दररोज हजारो भाविक व पर्यटक या मंदिरांना भेट देत असतात. तसेच इतिहास अभ्यासासाठी शाळा, महाविद्यालयांच्या सहली मोठ्या प्रमाणावर हलशी येथे येत असतात. अशा धार्मिक, ऐतिहासिक व [...]
दोडामार्गात ४ जानेवारीला आजी –माजी सैनिकांचा स्नेहमेळावा
दोडामार्ग – वार्ताहर आजी व माजी सैनिकांचा स्नेहमेळावा रविवार, दि. ४ रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आजी- माजी सैनिकांनी केले [...]
वैद्यकीय महाविद्यालय आंदोलनात धक्काबुक्की
विजापूरयेथीलप्रकार: पालकमंत्र्यांच्याघरासमोरआंदोलन वार्ताहर/विजापूर विजापूर येथे खासगी भागीदारीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात यावे यासाठी 106 दिवस सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करताना आंदोलनकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. तसेच स्वामीजींनी एका पोलिसाला कपाळमोक्ष केल्याची घटनादेखील घडली. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते. गेल्या अधिवेशनात विजापूर जिह्यात खासगी-सरकारी भागीदारीत (पीपीपी) वैद्यकीय [...]
शिवसेना-मनसेच्या संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन शिवसेना भवनात होणार, संजय राऊत यांनी दिली माहिती
शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. ठाकरे बंधूंच्या या जाहीर सभा संपूर्ण चित्र पालटणाऱ्या ठरणार असल्याने युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तत्पूर्वी, रविवार, 4 जानेवारी रोजी […]
कर्नाटकातील मतदारांचा ईव्हीएमवर (EVM) किती विश्वास आहे, याबाबत केंद्र सरकारच्या एका विभागाने केलेल्या सर्वेक्षणावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या सर्वेक्षणात मतदारांनी ईव्हीएमवर विश्वास दर्शवला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे, मात्र कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांनी या सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘कर्नाटक मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑथॉरिटी’ने ५,१०० मतदारांचे सर्वेक्षण […]
तरुण भारत निर्भीड पत्रकारितेचा वारसा
व्ही. एस. मांजरेकर, सतीशकुलकर्णीयांचेमत: तरुणभारतचिकोडीकार्यालयावरशुभेच्छांचावर्षाव चिकोडी : शतकोत्तर वर्षांपासून निर्भीड पत्रकारितेचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या तरुण भारतने आजच्या बदलत्या युगातही आपल्या कार्यातील सातत्त्यता कायम ठेवली असून ही पत्रकारिता यशस्वी होवो तसेच भविष्य उज्ज्वल लाभो अशा शुभेच्छा चिकोडी येथील तरुण भारत कार्यालयाच्या वर्धापनदिनी उपस्थित असलेल्या सीटीई संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. एस. मांजरेकर, संचालक सतीष कुलकर्णी व संचालकांनीदिल्या. [...]
किल्ला तलाव परिसरातील नाल्याच्या कामाची आमदार सेठ यांच्याकडून पाहणी
नाल्याच्याविकासासाठी8 कोटीरुपयांचानिधीमंजूर: नाल्याचेकामवेळेत, दर्जेदारकरण्याचीअधिकाऱ्यांनाकेलीसूचना बेळगाव : किल्ला तलाव येथे सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची पाहणी गुरुवारी आमदार आसिफ सेठ यांनी केली. ड्रेनेज त्याचबरोबर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवेळी त्या ठिकाणी समस्या निर्माण होते. त्यामुळे नाल्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार आसिफ सेठ यांनी गत महिन्यात नाल्याच्या विकासासाठी 8 कोटी रुपयांचा निधी [...]
उन्हाळा, पावसाळ्याबरोबर हिवाळाही ठरला असह्य
बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्ष 2026 चे स्वागत जल्लोषात झाले. मागील वर्ष 2025 हे कसे गेले यावर विचार करताना काही गोड आणि कटु आठवणी प्रत्येकाच्या मनात निश्चितच जाग्या झाल्या असतील. मागील वर्षात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीनही ऋतू असह्य ठरल्याचे प्रकर्षाने जाणवले. 2025 मध्ये फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाचे चटके बसत होते. मार्च, [...]
पेंडूरचे सुपुत्र नितीन पवार यांना भारत सरकारचे दक्षता पदक
केंद्रीय तपास संस्थेत केले उल्लेखनीय कार्य ; नवी दिल्ली येथे गृहमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान कट्टा / वार्ताहर केंद्र सरकार यांच्या अधिपथ्याखालील महत्वाची मानली जाणारी भारत देशाची “केंद्रीय तपास यंत्रणा” या संस्थेमध्ये विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील पेंडूर- सोनारवाडी गावचे सुपुत्र नितीन वसंत पवार यांना भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांच्या [...]
बैज्या जोडीने मारले निपाणीचे मैदान
निपाणीतशर्यतीनाअलोटगर्दी: जनरलघोडा-बैलशर्यतीतआडीचीगाडीप्रथम: मान्यवरांच्याहस्तेबक्षीसवितरण निपाणी : सीमाभागात चर्चेत आलेल्या निपाणीतील बैलगाडी शर्यतीत महेश मेजर-कांचनपूर यांच्या एमटी बैज्या आणि आरएक्स बैज्या जोडीने प्रथम क्रमांकाची युनिकॉर्न दुचाकी जिंकली. कडलगा येथील राहुल देसाई यांच्या हरण्या-सुंद्रया स्प्लेंडर तर राजू उमराणी यांच्या शिल्या-बैज्या जोडीने एचएफ डीलक्स दुचाकीवर नाव कोरले. अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या शर्यतीनी हजारो शर्यत शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. [...]

24 C