बांगलादेशविरुद्ध आज भारताचे पारडे जड
वृत्तसंस्था/ बुलावायो स्पर्धेतील आपला आत्मविश्वासाने भरलेला विजयी सिलसिला कायम ठेवण्याच्या इराद्याने एक संतुलित भारतीय संघ आज शनिवारी येथे आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात उतरणार असून यावेळी बांगलादेशसारख्या आव्हानात्मक संघाविऊद्ध खेळताना प्रबळ दावेदार म्हणून तो सुऊवात करेल. पाच वेळा विश्वविजेत्या भारताने अपेक्षेप्रमाणे आपल्या मोहिमेची सुऊवात केली आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला केवळ 107 [...]
सावंतवाडीत दहावीतील विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी: प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील जुनाबाजार_कामतनगर येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.जतिन प्रशांत राऊळ (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास करीत आहेत. जतिन राऊळ हा उत्कृष्ट कबड्डीपटु होता. यंदा तो राज्यस्तरावर खेळला होता. त्याची [...]
जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता –संजय राऊत
जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निकालांवर X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. X वर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की, “जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर […]
BMC Election 2026 –पूजा महाडेश्वर यांचा दणदणीत विजय, भाजपच्या उमेदवाराला दाखवला घरचा रस्ता
वांद्रे पूर्वेत वॉर्ड क्र. 87 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार पूजा महाडेश्वर यांचा विजय झाला. भाजपच्या महेश पारकर यांचा पराभव करत पूजा महाडेश्वर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. पूजा महाडेश्वर या माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी आहेत. पूजा महाडेश्वर आणि महेश पारकर यांच्यातील लढत चुरशीची मानली जात होती. मात्र दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या महेश […]
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांची मतमोजणी सुरू आहे. मात्र या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सत्ताधाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांचं झुकतं माप असल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे मुंबईत वॉर्ड क्रमांक १९० मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वैशाली पाटणकर यांना विजय घोषित करण्यात आलं होतं. मात्र नंतर भाजप उमेदवार शीतल गंभीर यांना विजय घोषित करण्यात आलं. यानंतर शिवसेना (उद्धव […]
Video –शिवसेनेची शिवडी आणि शिवडीची शिवसेना अबाधित राहणार, सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया
मुंबई महापालिका निवडणुकीचा वॉर्ड क्र. 193 चा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार हेमांगी वरळीकर यांनी मिंधे गटाच्या प्रल्हाद वरळीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल नागवेकर यांचा दारुण पराभव केला. विजयी झाल्यानंतर हेमांगी वरळीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अपप्रचार करणाऱ्यांना पुरुन उरले. उद्धव साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, अशा भावना वरळीकर यांनी मीडियाशी […]
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. आता भाजप नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. त्यामुळे मिंधेंना डिवचण्यासाठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचा व्हिडीओ काही तासांपूर्वी व्हायरल झाला होता. आणि आता नेरूळमधील मिंधे गटाच्या कार्यलयाची भाजपकडून तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. […]
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीचे वर्चस्व, विजयाच्या जल्लोषात शहर दणाणले
महायुतीच्या विजयाने कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीने आपले अधिक जागा मिळवत वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे, विजयी उमेदवारांच्या घोषणांनी आणि समर्थकांच्या जल्लोषाने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोषी मिरवणुका [...]
Kolhapur News : कोल्हापुरात निकालानंतर गुलाल-भगव्या रंगाची उधळण, शहरात जल्लोष
कोल्हापुरात प्रभागांमध्ये दुचाकी रॅलीतून कार्यकर्त्यांचा जल्लोष कोल्हापूर : शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका निकाल जाहीर झाला. निकालानंतर शहरातील ररत्यावर, उमेदवारांच्या कार्यालयाराह प्रभागामध्ये गुलालाबरोबर भगव्या रंगाची उधळण दिवसभर गुरू होती. मिरवणुकीला बंदी असल्याने, प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी मात्र दुचाकी रॅली काढून जल्लोष सुरू होता. तर उबाठाच्या एकमेव विजयी उमेदवार प्रज्ञा उतुरे [...]
मुंबई वॉर्ड 192 : शिवसेना भवनाचा प्रभाग शिवशक्तीकडेच; मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी
मुंबईत मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत. ते मुंबईच्या वार्ड 192 मधून निवडणूक लढवत होते. ते शिवसेना भवनाच्या प्रभागातून निवडणूक लढवत होते, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानण्यात येत होती. या विजयाचे श्रेय त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. तसेच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या […]
Kolhapur News : कोल्हापुरात काँग्रेसचा विजय जल्लोष, अजिंक्यतारा चौक गुलालाने निघाला न्हाऊन
गुलालमय झाला ‘अजिंक्यतारा’ कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जस स्पष्ट होत गेला, तसे शहरातील राजकीय वातावरण उत्साहाने भरून गेले. निकालाचा प्राथमिक कल समजताच विविध प्रभागांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने अजिंक्यतारा परिसरात दाखल झाले. अजिंक्यतारा [...]
रत्नागिरी तालुक्यात 2 लाख 4 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क, 271 मतदान केंद्रावर होणार मतदान
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 10 गट आणि पंचायत समितीच्या 20 गणांमध्ये 5 फेब्रुवारी रोजी 271 मतदान केंद्रांवर एकूण 2 लाख 4 हजार 496 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 45 पुरुष मतदार, तर 1 लाख 4 हजार 441 महिला मतदार आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी व निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार […]
शिवसेनेचा डबल धमाका, सरवणकर यांच्या मुलापाठोपाठ मुलीचाही पराभव; विशाखा राऊत विजयी
मिंधे गटाचे सदा सरवणकर यांचे संपूर्ण प्रस्थ शिवसेनेने उद्ध्वस्त केले आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर आता त्यांची मुलगी प्रिया गुरव-सरवणकर हिचाही पराभव झाला आहे. वॉर्ड क्रमांक 191 मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला आहे.
BMC Election Result 2026 –बालेकिल्ल्यात आवाज निष्ठावंतांचाच, सचिन पडवळ यांचा दणदणीत विजय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वाॅर्ड क्रमांक २०६ मधून, शिवसेनेचे सचिन पडवळ यांना १२ हजार १८९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी मिंधे गटाच्या नाना आंबोले यांचा दारूण पराभव केला आहे. सचिन पडवळ यांनी या विजयाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांना दिले आहे. तसेच हा उद्धव, राज, आदित्य, अमित ठाकरें असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. लालबाग, परळ, नायगाव, […]
Video –हा विजय लालबाग परळकरांचा, विजयानंतर श्रद्धा पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया
वॉर्ड क्रमांक 203 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांचा विजय झाला. हा विजय लालबाग परळकरांचा आहे अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली.
सोलापूरात भाजपचा दबदबा सोलापुर : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक निकालांची घोषणा सुरू झाली. सोलापुरातही सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जसजसे मतमोजणीची आकडेवारी समोर येईल, तसतसे कुठे नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे तर गुलालाचा जयघोष सुरू आहे प्राथमिक [...]
महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी (16 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतमोजणी सुरु असताना प्रतिक्रीया देताना ते म्हणाले,अजूनही लढाई संपलेली नाही. पूर्ण निकाल अजूनही आलेले नसताना भाजप मुंबईत जल्लोष करत आहे. दुपारी तीन नंतर यायला […]
Navi Mumbai Result 2026 –भाजपने मिंधेंना डिवचलं; टांगा पलटी घोडे फरार, शहरात झळकले पोस्टर
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. एकूण १११ जागांच्या या निवडणुकीत भाजप ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर मिंधे गट ४२ जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित जागा इतर पक्ष आणि अपक्षांनी पटकावल्या आहेत. यातच आता नवी मुंबईत एकमेकांविरोधात लढणाऱ्या भाजपने शहरात एक पोस्ट लावत मिंधेंना डिवचलं आहे. नवी मुंबईत […]
निवडणूक काळात रस्ते व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर-बॅनर्सवर निर्बंध ; जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत आदेश
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी तसेच सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक सुरळीत राहावी,या दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर निवडणूक साहित्य लावण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांच्याकडून सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक रस्त्यांवर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स,बॅनर्स, पॅम्प्लेट्स,कटआऊट्स,होर्डिंग्ज, कमानी आदी साहित्य लावल्यास रहदारीस अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशा प्रकारच्या कृतींवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(डीबी) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार,निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत,कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल अशा पद्धतीने कोणतेही निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.हे आदेश दिनांक १३ जानेवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहतील.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले असून, त्या अनुषंगाने भाजप कार्यालयाकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. अवघ्या चारच दिवसात पंचायत समितीच्या 110 जागांसाठी सुमारे 392 इच्छुकांनी, तर जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तब्बल 320 असे एकूण 712 इच्छुकांनी इच्छुक अर्ज भाजपा कार्यालयात दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. दरम्यान पक्षाकडून वेळोवेळी कार्यकर्ता संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीची रणनिती आखली जात असून, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक असले तरी उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असा विश्वासही देण्यात आला आहे. आपण सर्वांनी एकसंघपणे लढा दिल्यामुळेच नगरपालिका निवडणुकांमध्ये ऐतिहासिक यश मिळाले. याच एकतेच्या जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही महायुतीचे सर्वच उमेदवार इतिहासात नोंद होईल असे यश संपादन करतील असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाचा माध्यमातून व्यक्त केला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा पराभव
धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 37 मधून शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या माजी मंत्री व आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार अरुण भगवान राजवाडे यांनी गिरीराज सावंत यांचा पराभव करत प्रभागावर भाजपाचा झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत गिरीराज सावंत हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सावंत कुटुंबाचे राजकीय वजन, शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता हा प्रभाग शिवसेनेकडेच जाईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्वच अंदाज फोल ठरवत सावंत कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे. गिरीराज सावंत यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सुरू केली होती. मात्र त्यांना पहिलाच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गिरीराज सावंत हे भाजपचे माजी आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे जावई आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लक्ष्मण जगताप यांचे बंधू आमदार शंकर जगताप यांनी स्वबळावर भाजपाचा झेंडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवला आहे. मात्र त्यांचे जावई गिरीराज सावंत हे पराभूत झाले आहेत. शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे.
निवडणूक कालावधीत जात,धर्म व भाषावार शिबिरे-मेळावे बंद; जिल्ह्यात 7 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केल्याने,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जात,धर्म किंवा भाषावार शिबिरे व मेळावे आयोजित केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 चा वापर करून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत,कुठेही कोणत्याही प्रकारचे जात,भाषा किंवा धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत.हे आदेश दिनांक 13 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.
राष्ट्रीय सेवा योजना युवा शिबिराचा समारोप उत्साहात
भूम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय, भूम यांच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना युवा शिबिराचा आज उत्साहात समारोप झाला. दिनांक 10 जानेवारी ते 17 जानेवारी 2026 या सात दिवसांच्या कालावधीत युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास या विषयावर आधारित विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ, पाथरूडचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. बोराडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे या होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे प्रा. डी. डी. बोराडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण व श्रमप्रतिष्ठा निर्माण होते, असे नमूद केले. जलसंधारण, स्वच्छता, वृक्षारोपण व ग्रामविकासाशी निगडित उपक्रमांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेला अनुभव त्यांच्या भावी जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नंदकुमार जगदाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दिप्ती गिरी यांनी मानले. कार्यक्रमास शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सातदिवसीय युवा शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून ग्रामविकास व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या घरासमोर भाजपची दणदणीत विजय सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडे अख्खा राज्याचे लक्ष लागून राहीले होत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या बाल्लेकिल्ल्यात काय चाललेय या कडे जिल्हासह राज्याच्या नजारा लागून होत्या अशातच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना मोठा धक्का लागल्याची माहिती समोर येत [...]
स्वाभिमानी लातूरकरांच्या अस्मितेसमोर भाजपचा सुपडा साफ, काॅंग्रेसचा एकहाती विजय
लातूरातून स्व.विलासराव देशमुखांची ओळख पुसून टाकण्यास निघालेल्या भाजपला लातूरकरांनी जोरदार हबाडा दिला.स्वाभिमानी लातूरकरांच्या अस्मितेसमोर भाजपचा सुपडा साफ झाला तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर स्थापन झाली. तब्बल ४३ जागा काॅंग्रेसने मिळवल्या तर युतीत ४ जागा वंचितनेही मिळवल्या. तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे. लातूर येथील शासकीय महिला […]
वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेनेचे किरण तावडे विजयी, अनिल कोकीळ यांचा पराभव
वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार किरण तावडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे अनिल कोकीळ यांचा पराभव केला. किरण तावडे यांना 14845 मते मिळाली आहेत. मुंबईचा राजा पावला… बाप्पाने आशीर्वाद दिला आहे.. लालबाग परळमध्ये गद्दारांना स्थान नाही हेच मतदारांनी दाखवून दिले. शिवसैनिकांनी आपला किल्ला राखला. सुधीर साळवी यांनी मला […]
सातारा जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांची मुलाखती 17-18 जानेवारीला सातारा : भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा उमेदवार असेल आणि त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते , पदाधिकारी आणि [...]
मतदारांनी शिवसेनेचा पारंपरिक गड राखला, श्रद्धा जाधव यांचा दणदणीत विजय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा जाधव या वाॅर्ड क्रमांक २०२ मधून विजयी झाल्या आहेत. या आधी श्रद्धा जाधव यांनी मुंबईच्या महापौर पदाची धुरा सांभाळली होती. स्थानिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची सलग सहा वेळा 1992 ते 2017 मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवड झाली होती. या निवडणुकीमध्ये श्रद्धा जाधव यांना ११ हजार १४३ […]
एकमेंकाच्या सहकार्याने भूम शहराचा विकास करू- संयोगिता गाढवे
भूम (प्रतिनिधी)- एकमेकांच्या सहकार्याने भूम शहराचा विकास करु,नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या जनतेने सभागृहात पाठवले आहे .सर्व नगरसेवक मिळून शहरातील विकास कामे करू, नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे, गटनेता निवड,उपनगराध्यक्ष निवड स्वीकृत सदस्य निवड प्रसंगी बोलत होत्या. पुढे बोलताना म्हणाले की सभागृहामध्ये येताना राजकीय जोडे तसेच राजकीय विषय सभागृहामध्ये जनतेच्या कामासाठी सर्व मिळून प्रयत्नशील राहू असे गाढवे बोलत होत्या .यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक सुरज गाढवे यांची निवड करण्यात आली तसेच स्वीकृत सदस्य पदी संजय गाढवे यांची निवड झाली . त्यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या नूतन नगरसेवक सुरज गाढवे ,अभिजीत शेटे ,मंगल नाईकवाडी ,भाग्यश्री माने , तौफीक कुरेशी , रिमा शिंदे यांचा नगराध्यक्षा सहयोगिता गाढवे यांनी सत्कार केला .तसेच गटनेते पदी सुरज गाढवे व स्वीकृत सदस्य पदी संजय गाढवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .यावेळी धनंजय मस्कर, प्रदिप चौधरी, कैलास पवार, समाधान पोतदार, आसिफ जमादार, बालाजी माळी, सुनील माळी, खंडेराव गोयकर, नितीन साठे, बाळासाहेब अंधारे, सागर टकले , बाळासाहेब अंधारे, नुतन सुर्वे, मयूर शेटे, मुशीर शेख, श्रीराम बोराडे, आकुबाई पवार, संजय शिंदे, अमोल शिंदे, अखतर जामदार, रईस काझी,प्रथम वराडे, पोपट धावारे,तानाजी शिंदे,धनाजी गाढवे,मंगल आकरे,शितल शिंदे, यांच्या सह पदाधिकारी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव ,नगरपरिषद चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पुढील सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा- डॉ. स्मिता शहापूरकर
धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर मार्कर पेनने लावली जाणारी शाई निघून जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले. परिणामी मतदानामध्ये होणारे गैरप्रकार आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे देशभरात पुढील होणाऱ्या लोकसभा ते ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेन ऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा, अशी मागणी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत मतदार यादी मध्ये नावाचा घोळ तसेच मतदान झाल्यानंतर मतदारांच्या बोटाला मार्कर पेनने लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार सर्वत्र घडला आहे. या प्रकारामुळे एकाच मतदाराने अनेक ठिकाणी मतदान केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कर पेनने बोटावर लावलेली शाही लवकर पुसल्याने याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाही झाला आहे. झालेल्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेवरील अविश्वासाची भावना तयार झाली आहे. भारतातील निवडणुकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून लोकसभा ते ग्रामपंच्यातच्या निवडणुकीमध्ये शाईचा वापर केला जातो. निवडणुकीमध्ये होणारी फसवणूक, गैरप्रकार टाळण्यासाठी ही शाई प्रभावी ठरली आहे. मागील निवडणुकांमध्ये वापरल्या गेलेल्या या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट हा मुख्य घटक असतो. तो त्वचेतील प्रथिनांशी प्रतिक्रिया देतो आणि त्यामुळे शाई सहज पुसली जात नाही.साधारणतः ही शाई 7 ते 14 दिवसांपर्यंत बोटावर स्पष्टपणे दिसते. शाई ही स्वस्त, सोपी व प्रभावी पद्धत आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांशिवाय काम करणारी प्रणाली आहे. एकदा मतदान केलेला मतदार पुन्हा मतदान करू शकत नाही. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता वाढवण्यास मदत झाली आहे. यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील जनतेची विश्वासाहर्ता वाढीस मदत होणार आहे. त्यामुळे देशभरात पुढील होणाऱ्या लोकसभा ते ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेन ऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा, अशी मागणी डॉ. स्मिता शहापूरकर यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.
परंडा (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” मोठ्या उत्साहात व प्रभावीपणे राबविण्यात आली. ही विशेष मोहिम दिनांक 01 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे पार पडली. सदर मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची सखोल माहिती देणे, तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, शंका व तांत्रिक समस्यांचे त्वरित निरसन करणे हा होता. अनेक वेळा माहितीअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या वतीने ही मोहिम आयोजित करण्यात आली. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती नोडल अधिकारी डॉ.प्रकाश सरवदे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी () पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा,अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती, पात्रता अटी काय आहेत. अर्जातील माहिती कशी तपासावी, तसेच अर्ज नाकारले जाण्याची कारणे व ती कशी टाळावीत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कालावधीत विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकूण 14 शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सहाय्य योजना, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पात्रतेनुसार शिष्यवृत्ती अर्ज भरावा, तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, असे आवाहन डॉ. प्रकाश सरवदे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे प्रेरणादायी आव्हानही उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. या विशेष मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या वैयक्तिक अडचणी, कागदपत्रांबाबतच्या समस्या, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, बँक खाते व आधार लिंकिंग, तसेच ऑनलाईन अर्जातील तांत्रिक अडचणी यांचे तत्काळ व प्रभावी निरसन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, अर्ज प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या मोहिमेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ माहेशकुमार माने डॉ रंदील जी एस.डॉ.खर्डे अरुण , डॉ .शहाजी चंदनशिवे,डॉ .बाळासाहेब राऊत डॉ. निलोफर चौधरी , प्रा.हुके हे विचार मंचावर उपस्थित होते त्याचबरोबर विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे राबविण्यात आलेली “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस आणि आर्थिक स्थैर्यास निश्चितच हातभार लावणारी ठरली आहे.
शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी, कलम 163 अन्वये आदेश
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून,भारत निवडणूक आयोगाच्या आदेश अन्वये दिलेल्या निर्देशांनुसार,कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक घोषित झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी कर्मचारी तसेच बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी/कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे. हे आदेश जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत,निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अंमलात राहतील.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम घोषित केला असून,कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीतील धार्मिक स्थळे,रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (07.02.2026 पर्यंत) निर्बंध घालण्यात येत आहेत. हे आदेश दि.13 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील.
कार्यालये / विश्रामगृहे परिसरात मिरवणूक,घोषणा,सभा इत्यादींवर निर्बंध
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सभा, मिरवणुका,निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणुकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय तसेच सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत खालील बाबी करण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे कोणत्याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे,आंदोलन करणे, निदर्शने करणे,उपोषण करणे. कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे इत्यादी.कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यास बंदी राहील.हा आदेश 13 जानेवारी ते 07 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत अंमलात राहील.
शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन.एस.एस.शिबिराचा समारोप
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम च्या एन.एस.एस.शिबिराचा समारोप वालवड या ठिकाणी संपन्न झाला.दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत मौजे वालवड ता.भूम येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .शिबिरा दरम्यान स्वच्छता, श्रमसंस्कार, आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, प्रबोधनपर व्याख्याने, वृक्ष लागवड,सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले गेले. शिबिरामध्ये 50 स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे जी.सी., प्रा.सूर्यवंशी महेश, प्रा.कु.पिपरे धनश्री, प्रा.टोंगारे शरद यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले. समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बोराडे डी.डी. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचर्या डॉ.जगदाळे अनुराधा, सरपंच देवळकर व उपसरपंच कृष्णा मोहिते, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार,स्वच्छता,व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण वाढीस लागतील अशी अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.प्रा काळे यांनी आभार मानले
धाराशिव (प्रतिनिधी)- स्वच्छ महाराष्ट्र मिशन व नगरपरिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे विद्यार्थ्यांसाठी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृष्णा भिसे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कचऱ्याचे विविध प्रकार, कचरा कमी करण्यासाठी अंगीकारावयाच्या चांगल्या सवयी, तसेच ‘पाच आर’ (Reduce, Reuse, Recycle, Refuse, Recover) संकल्पनेद्वारे कचरा कसा कमी करता येतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले असून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. वेगवेगळ्या कार्ड्स व दृश्य (व्हिज्युअल) माध्यमांच्या सहाय्याने माहिती आकर्षक व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले.
नूतन प्राथमिक विद्यामंदिरची शैक्षणिक सहल संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, येथील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणपतीपुळे, रत्नागिरी, डेरवण, प्रतापगड, महाबळेश्वर या ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आलेली आहे. या शैक्षणिक सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, त्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग व पर्यटनस्थळांची माहिती मिळावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, निरीक्षणशक्ती व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हा आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर, रत्नागिरी व डेरवण येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, प्रतापगड किल्ला तसेच महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसर यांची माहिती प्रत्यक्ष पाहून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांचा इतिहास व भूगोल विषयावरील अभ्यास अधिक सखोल झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, सहलीदरम्यान अनुभवी शिक्षकवर्ग, कर्मचारी व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. पालकांच्या सहकार्यामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ही सहल अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित व यशस्वी ठरली. या उपक्रमाबद्दल पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व स्थानिक स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच मदत होते, असे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी अमोल कोतवळ
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबाबतचे शिफारसपत्र काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या नगरपालिकेतील अधिकृत गटासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत अमोल कुतवळ यांची गटनेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या शिफारस अर्जावर नगरसेवक अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे व आनंद ननानासाहेब जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरसेवक अमोल कोतवळ हे काँग्रेस पक्षात लढवय्ये व सक्रिय नेते म्हणून परिचित आहेत. नगरसेवक नसतानाही त्यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर अनेक आंदोलने केली असून, त्यांच्या सामाजिक व राजकीय अनुभवाचा विचार करून काँग्रेस पक्षाने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे. गटनेते अमोल कुतवळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ यांचे चिरंजीव असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत विरोधी पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची आकडेवारी जारी करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत काही अडचणी येत आहेत. त्यामुळे अंतिम निकाल हाती येईपर्यंत आकडेवारी बदललेली असेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच आमच्या शिवशक्तीचे 90 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतदानाच्या आकडेवारीत मनसेच्या जागा […]
भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव (पाथरूड) येथील ग्रामीण, दुष्काळग्रस्त व वंचित पार्श्वभूमीतून आलेले बालाजी सोमनाथ शिंदे यांची इंग्लंडमधील University of Bristol (जगातील टॉप 100 विद्यापीठांपैकी एक) येथे MSc (Education) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. बालाजी शिंदे यांचे आई-वडील पूर्वी ऊसतोड कामगार व बांधकाम मजूर म्हणून अत्यंत कष्टकरी जीवन जगत होते. अशा कठीण सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग अविरतपणे चालत हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण या अभ्यासक्रमासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना National Overseas Scholarship (NOS) मंजूर झाली आहे. या शिष्यवृत्तीचा निकाल 9 जानेवारी रोजी जाहीर झाला असून, देशभरातून केवळ 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड बालाजी शिंदे यांची झाली आहे. शारीरिक दिव्यांग व्यक्ती म्हणून अनेक सामाजिक, आर्थिक व भौगोलिक अडचणींवर मात करत, शिक्षणावरील दृढ विश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील दिव्यांग तसेच सर्वसामान्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. बालाजी शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शासकीय आश्रमशाळेतून पूर्ण करत पुढे भारतातील नामांकित शैक्षणिक संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथून उच्च शिक्षण घेतले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते NGO आणि CSR क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, याआधी ते Rise Bionics, बेंगळुरू येथे Regional Lead (प्रादेशिक व्यवस्थापक) म्हणून कार्यरत होते. समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 2020 साली ‘दिव्यांगहिताय माहिती व मार्गदर्शन केंद्र (DIGCP)’ या व्हॉट्सॲप-आधारित सामुदायिक उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन तसेच स्वयंसेवी सेवांबाबत माहिती व सहाय्य दिले जाते. त्यांना प्रेरणास्थानांविषयी विचारले असता, बालाजी शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतील संघर्षपूर्ण भूतकाळालाच आपली खरी प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. तसेच या यशामध्ये आपले कुटुंबीय, एकलव्य इंडिया फाउंडेशनचे राजू केंद्रे आणि मित्र तुकाराम गायकवाड यांच्या मोलाच्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. बालाजी शिंदे यांच्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खवा कारखान्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी नुकतीच वालवड ता. भूम येथील खवा, पेठा कारखान्यास शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना दुग्धप्रक्रिया उद्योगाची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता. कारखान्यात विद्यार्थ्यांना खवा निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, दुधाची गुणवत्ता तपासणी, स्वच्छतेचे महत्त्व तसेच आधुनिक यंत्रसामग्रीची माहिती देण्यात आली. खवा कसा तयार केला जातो, त्याचे प्रकार व त्याचा मिठाई उद्योगात कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्याचे मालक श्री. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून दुग्धव्यवसायातील संधी व रोजगाराच्या शक्यतांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी या वेळी उत्सुकतेने प्रश्न विचारून आपले ज्ञान वाढवले. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या वेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. शामसुंदर आगे, डॉ. नितीन पडवळ, डॉ. राजश्री तावरे उपस्थित होते. शेवटी विभागाच्या वतीने कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.
श्रमसंस्कार शिबिरात आरोग्य तपासणी
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वालवड येथे केलेले आहे. शिबिराच्या सहाव्या दिवशी आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजन केले होते. यावेळी डॉ. आयशा खान वैद्यकीय अधिकारी भूम या व त्यांची टीम घेऊन त्या वालवड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात पोहोचल्या व तेथील संपूर्ण स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी केली. सोबतच नैसर्गिक धनसंपदा ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे त्यांनी आपल्या मौलिक अशा व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए.एस. जगदाळे मॅडम, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. नितीन पडवळ, प्रा. डी जी गिरी, प्रा एन आर जगदाळे उपस्थित होते. तसेच प्रा भोंग, प्रा, मसराम, डॉ खराटे, प्रा डोंगरदिवे, डॉ भांडवलकर, प्रा, गायकवाड डॉ. माळी, डॉ, मोरे मॅडम, प्रा, अलगुंडे मॅडम, डॉ.तावरे मॅडम, प्रा कुटे, डॉ आगे, उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यां व गावकरी यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक संदर्भात माहिती
भूम (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केले असल्याने धाराशिव जिल्हा परिषद आणि तालुका निहाय पंचायत समितीच्या निवडणूक प्रोग्राम लागला असल्याने भूमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रेवैया डोंगरे आणि भूमचे तहसीलदार सह निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील आणि सह निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण जाधव नायब तहसीलदार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम आणि त्या संदर्भातील माहिती सांगितली. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये भूम तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट असून दहा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये निवडणूक होणार असल्याने नामनिर्देशन पत्र घेण्याची तारीख 16 जानेवारी पासून ते 21 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तारीख 21 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरुवात राहणार आहे. तसेच नामनिर्देशन छाननी 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. वैध व अवैध यादी याच रोजी लावण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 23 जानेवारी ते 27 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ राहणार आहे आणि पात्र उमेदवार निवडणुकीत राहणारे यांना चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी तीन वाजून 30 मिनिटानंतर देण्यात येणार आहे. मतदानासाठी दिनांक 5 फेब्रुवारी आणि निकाल सात फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने जिल्हा परिषद गट मध्ये एकूण किती मतदान संख्या आहे अशी की, इट गटासाठी सर्वसाधारण महिला जागा असल्याने यासाठी एकूण मतदान 20563 मतदार आपले हक्क बजावणारा असून यामध्ये पुरुष दहा हजार 905 महिला 9658, गटासाठी नामाप्र महिला उमेदवार असल्याने या ठिकाणी 20899 इतके मतदान मतदार बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 11129 महिला 9770, पाथरूड गटासाठी नामा प्र साठी आरक्षित असल्याने या ठिकाणी 19849 मतदान मतदार करणार आहेत. यामध्ये पुरुष10,616 आणि महिला 9233, वालवड गटासाठी नामाप्र महिलांसाठी प्रवर्ग असल्याने 19942 मतदान असून यासाठी मतदार मतदान करणार आहे. यामध्ये पुरुष दहा हजार सहाशे दोन आणि महिला 9340, आष्टा गटासाठी सर्वसाधारण आरक्षित असल्याने या ठिकाणी 20877 मतदान असून यामध्ये 11017 पुरुष आणि 9860 महिला आपले मतदान हक्क बजावणार आहे. पंचायत समिती गणासाठी पाखरूड गन सर्वसाधारण महिलासाठी असून यामध्ये 9722 मतदार आपले मतदान हक्क बजावणार असून यामध्ये पुरुष 5175 महिला 4547, इट गणासाठी सर्वसाधारण असल्याने 10841 इतके मतदार आपले हक्क बजावणार असून 5730 पुरुष महिला 5111 मतदार आहेत. सुकटा गणासाठी नामा प्र आरक्षण असल्याने दहा हजार आठशे अकरा इतके मतदान होणार आहे. यामध्ये पाच हजार 737 पुरुष आणि पाच हजार 74 महिला, आरसोली गणासाठी सर्वसाधारण असल्याने 10088 इतके मतदान होणार असून पैकी पाच हजार 392 पुरुष आणि 4696 महिला, पाथरूड गणासाठी सर्वसाधारण असल्याने 5172 पुरुष आणि 4476 महिला, आंबिगन नामाप्र महिलांसठी असल्याने दहा हजार दोनशे एक मतदान आपले हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये पुरुष 5444 आणि महिला 4757, वालवड गणासाठी सर्वसाधारण महिला असल्याने या ठिकाणी 10264 मतदार आपले हक्क बजावणार असून, पुरुष 5440 आणि महिला 4824, चिंचोली गणासाठी अनुसूचित जाती महिला असल्याने 9678 एवढे मतदान होणार असून 5162 पुरुष आणि 4516 महिला मतदार आहेत. आष्टागनसाठी सर्वसाधारण महिला दहा हजार 908 इतके मतदान होणार असल्याने 5811 पुरुष आणि पाच हजार 97 महिला मतदार आहेत. माणकेश्वर गणामध्ये सर्वसाधारण जागा असल्याने 9959 एवढे मतदान असून पाच हजार दोनशे सहा पुरुष मतदान आणि 4763 महिला मतदान आहे. एकूण जि प आणि पसं साठी 102130 एवढे मतदान असून पुरुष 54269 तर महिला 4763 मतदान करणार आहेत. या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचा नियम सर्वांनी पाळावा असे सर्व राजकीय तसेच इतर लोकांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेवो या डोंगरे यांनी आव्हान केले आहे.
चिमुकल्यांसोबत मकर संक्रांतीचा गोडवा, बालपणीचा ठेवा !
भूम (प्रतिनिधी)- रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कुल, भूम येथे चिमुकल्यांसोबत भाऊंनी मकर संक्रांतीचा सण साजरा केला. शाळेतील लहान मुलांना तिळगुळ आणि चॉकलेटचा गोड स्वाद आणि आशीर्वाद दिले. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन गेला, मनाला सुखावून गेला. महाराष्ट्र राज्य जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांनी आज शहरातील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये छोट्या मुलांसोबत मकरसंक्रांत साजरी केली. मुले ही देवाघरची फुले असतात. निरागस, गोंडस आणि तितकीच गोड चिमुकली मुले पाहून भाऊंना त्यांच्या शाळेची आठवण झाली. भाऊंना त्यांच बालपण आठवलं. भाऊंची परिस्थिती जरी तेव्हा बेताची असली तरी बालपणाची श्रीमंती त्यांनी खूप अनुभवली आहे. आज चिमुकल्यांसोबत मकर संक्रांत साजरी करताना भाऊ पुन्हा शाळेत रमले आणि मनातून सहज पुटपुटले, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा“
BMC Election 2026 – मुंबईत वॉर्ड क्रमांक २०५ मधून शिवशक्तीच्या सुप्रिया दळवी विजयी
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०५ (नायर हॉस्पिटल – भायखळा फायर ब्रिगेड, F/South विभाग) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या शिवशक्ती युतीच्या उमेदवार सुप्रिया दिलीप दळवी यांनी विजय मिळवला आहे. हा प्रभाग परळ, भायखळा, कळाचौकी, अभ्युदयनगर, जिजामाता नगर, दाभोळकर अड्डा आदी भागांचा समावेश असलेला महत्त्वाचा भाग आहे. या […]
जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राखला गेला आहे. शिवसेना राष्ट्रवादी मनसे युतीच्या उमेदवार शिवानी शैलेश परब यांनी मिंधे गटाच्या प्रियांका आंबोळकर यांचा दारुण पराभव केला. शिवानी परब यांचा 15 हजार 421 मते मिळवून विजय झाला. शिवानी परब यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
उपनगराध्यक्षपदासाठी लढत; अक्षय ढोबळे यांचा 13 मतांनी विजय
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेच्या आज (दि.16) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी विजय मिळवला. नगरपालिकेतील संख्याबळ पाहता ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता होती; मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अक्षय ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून अक्षय जोगदंड यांनी अर्ज दाखल केला. दोन अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. झालेल्या मतदानात अक्षय ढोबळे यांनी अक्षय जोगदंड यांचा 13 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत अक्षय ढोबळे यांना भाजपच्या 22 नगरसेवकांची मते तसेच नगराध्यक्षांचे एक मत मिळून एकूण 23 मते मिळाली. तर अक्षय जोगदंड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ मिळाली असून काँग्रेस पक्षाची तीन मते त्यांच्या बाजूने पडली. त्यांना 10 मते मिळाली. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 22, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7, काँग्रेसचे 3 तर एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नगरपालिकेतील चारही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या कालच पूर्ण झाल्या. यामध्ये भाजपकडून अमोल राजे निंबाळकर आणि सुजित साळुंखे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पंकज भोसले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंकज जयंतराव पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदी भाजपकडून कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक संभाव्य नावातून अखेर अक्षय ढोबळे यांनी बाजी मारली. नगराध्यक्ष पदासाठी देखील अक्षय ढोबळे यांच्या पत्नी पूर्वा अक्षय ढोबळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष बनवले आहे. धाराशिव नगरपालिकेत मागील चार वर्षांपासून प्रशासक कारभार हाकत आहेत. चार वर्षानंतर आता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळाल्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
शिवभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कृत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन व विकासकामांना पायाने लाथा मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचा उघड अपमान केल्याचा गंभीर आरोप करत, लौकिक गोळे याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. याबाबत शिवप्रेमींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लौकिक गोळे याने रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धनात्मक व विकासात्मक कामांच्या ठिकाणी जाऊन चालू अवस्थेतील बांधकामांना पायाने लाथा मारल्या. एवढ्यावरच न थांबता, या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते जाणीवपूर्वक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. शिवप्रेमींनी हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित व हेतुपुरस्पर असल्याचा ठपका ठेवला आहे. या व्हिडिओंमुळे राज्यभरातील शिवभक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, यावर तात्काळ कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईची मागणी करणाऱ्यांमध्ये शिवप्रेमी जीवनराजे इंगळे, महेश गवळी, औदुंबर जमदाडे, सुदर्शन दळवे, प्रताप पठाडे, संतोष पठाडे, गणेश माळी, नागनाथ बचाटे यांचा समावेश आहे.
घासून नाही ठासून! वॉर्ड 208 मधून शिवसेनेचे रमाकांत रहाटे विजयी
मबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०८ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार रमाकांत सखाराम रहाटे यांनी विजय दणदणीत मिळवला आहे. रहाटे यांनी मिंधे गटाचे उमेदवार विजय लिपारे यांना तब्बल ४,१८८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. रमाकांत रहाटे यांना ११,६५३ मते मिळाली, तर विजय लिपारे यांना ७,४६५ मते पडली. इतर उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या […]
मकर संक्रांति पार्श्वभूमीवर गुरुवारी देवीजींच्या सिंहासनावर विशेष अलंकार महापूजा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात मक्रर संक्रांत सणाच्या दुसऱ्या दिवसानंतर आता सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाची धूम सुरू झाली असून, किंक्रांती दिनी श्री तुळजाभवानी मातेस विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली होती. गुरुवारी महिलांनी एकमेकांच्या घरी जाऊन हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला बुधवारी मकर संक्रांत निमित्त श्री तुळजाभवानी मातेस आज खास विशेष बनवण्यात आलेला हलव्यांच्या दागिन्याचा हार घालण्यात आला होता. आज मंदिर मुख्य गर्भ गृह फुलांनी सजवण्यात आले होते. अखंड सौभाग्यासाठी वाणवसा देण्याची ही अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आजही सुवासिनी महिला श्रद्धेने पाळत असल्याचे चित्र दिसून आले. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मराठवाड्यातील विविध भागातील सुवासिनी महिला मोठ्या संख्येने श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाल्या होत्या. अनेक महिलांनी प्रथम पंढरपूर येथे श्री रुक्मिणी मातेला वाणवसा अर्पण करून त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या चरणी वाणवसा अर्पण केला व नंतर आपल्या गावी परतल्या. या पावन सणाच्या पार्श्वभूमीवर आज श्री तुळजाभवानी मातेस हलव्याच्या दागिन्यांचा हार अर्पण करण्यात आला होता.
BMC Election 2026 –वॉर्ड क्र. 141 मधून विठ्ठल लोकरे यांचा सलग पाचव्यांदा विजय
मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्र. 141 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपच्या उमेदवार श्रुतिका मोरे यांचा पराभव करत 8483 मतांनी विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला. सलग पाचव्यांदा लोकरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले.
नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये गद्दार सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षातील एबी फॉर्म वादामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली असतानाही […]
कोल्हापुरात काँग्रेस मोठा भाऊ कोल्हापुर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या चुरशीची लढाईत अखेर महायुतीने बाजी मारली आहे.. महायुतीने बाजी जरी मारली [...]
आर्य चाणक्यच्या मॉडेलची राज्यस्तरावर निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाच्या वरून धर्म या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित कंपोस्ट खत निर्मिती मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्याचे 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 -26 तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापूर येथे दिनांक 12 व 13 जानेवारी 2026 आयोजित करण्यात आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनात आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील वरून समीर धर्म या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकवला असून त्याच्या स्मार्ट मल्टीटास्किंग डस्टबिन या मॉडेलची आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. ही डस्टबिन हवी त्या ठिकाणी आपोआप मुव्हेबल आहे. या मल्टी टास्किंग डस्टबिन मध्ये घरगुती कचऱ्याचे ओला व कोरडा कचरा विभाजन करून त्यात कचरा कमीत कमी वेळात कंपोस्ट मध्ये रूपांतर केला जातो. अशा या टाकाऊ कचरा व्यवस्थापन व पर्यावरण पूरक मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षिका शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वरून समीर धर्म याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मित्राच्या घरी चोरी करणाऱ्या मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड
धाराशिव (प्रतिनिधी)- मित्राच्या घरी चोरी करणाऱ्या मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून 79 हजार 780 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी धाराशिव शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 570/2025 कलम 331(4), 305(A) बीएनएस हा गुन्हा आरोपी नामे स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनिल चिलवंत, निखील किरण सोनवणे सर्व रा. धाराशिव यांनी केला आहे. अशी गुप्त माहिती मिळाल्याने पथकाने धाराशिव शहरात नमुद आरोपीचा शोध घेताला असता ते धाराशिव शहरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, सदर गुन्ह्यातील फिर्यादी शुध्दोधन गायकवाड यांने यातील आरोपींना उसने पैसे देवून त्याचे जास्त व्याज घेतले होते म्हणुन आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीचे घरी कुरणेनगर येथे चोरी केली असल्याचे कबुल केले. नमुद आरोपीचे ताब्यातुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 79 हजार 780 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हावलदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार महेबुब अरब, रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.
अनुजा पाटोळे मृत्यू प्रकरणी हत्येचा संशय; वाशी शहर कडकडीत बंद, एसआयटी व सीबीआय चौकशीची मागणी
वाशी (प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे टाकळा येथील मातंग समाजातील अनुजा किरण पाटोळे (वय 12) ही विद्यार्थिनी जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे सहावीमध्ये शिक्षण घेत होती. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी शाळेच्या परिसरातील शासकीय विश्रामगृहात तिचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनुजा ही अत्यंत हुशार, धाडसी व शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभागी असल्याचे सांगितले जाते. तिच्या स्वभावावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नसल्याचा दावा नातेवाईक व समाजबांधवांकडून करण्यात येत असून, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह आढळल्यानंतर शाळेतील महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना माहिती न देता अनुजाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविल्याचा आरोप आहे. तसेच प्राथमिक तपासणी न करता शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आल्याने संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरत आहे. शवविच्छेदन अहवालात आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला असला तरी घटनास्थळाची परिस्थिती पाहता ही आत्महत्या नसून जाणूनबुजून करण्यात आलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनद्वारे करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 15 जानेवारी रोजी वाशी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला. बंद दरम्यान विविध सामाजिक संघटना, मातंग समाजबांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी दोषींवर कठोर कारवाई, तसेच संपूर्ण प्रकरणाची एसआयटी व सीबीआयमार्फत चौकशी करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन वाशी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सांगळे यांनी स्वीकारले. आंदोलनावेळी अनेक मान्यवर, समाजबांधव व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत अनुजा पाटोळे हिला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अनुजा पाटोळे यांच्या निर्घृण मृत्यूमुळे मातंग समाजासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व दुःखाची भावना पसरली असून दोषींना शिक्षा व पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत उमरग्यात आढावा बैठक संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. गावागावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन करण्यात आले. “उमेदवार कोणताही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे,” असे सांगत प्रामाणिक कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे उमरगा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, सुलतान शेठ, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अजित चौधरी, रणधीर पवार, सुधाकर पाटील, गुलाब मोरे, विजयकुमार नागने, विजयकुमार तळभोगे, अजित पाटील, धिरज बेळंबकर, शेखर पाटील, सालिम शेख, वहाब अतार,समाने सावकार, विठ्ठल साठे उपस्थित होते.
BMC Results 2026 –मुंबईत आतापर्यंतचे शिवशक्तीचे विजयी उमेदवार, ही पाहा यादी
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांची यादी. मुंबईत वॉर्ड क्रमांक 182 मिलिंद वैद्य विजयी मुंबईत वॉर्ड क्र. 124 सकीना शेख विजयी मुंबईत वॉर्ड क्र. 32 मधून गीता भंडारी विजयी मुंबईत वॉर्ड क्र. 73 लोना रावत विजयी मुंबईत वॉर्ड क्र. 194 निशिकांत शिंदे विजयी मुंबईत […]
चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. तरी सुद्धा एकाबाजूने संपूर्ण बहुमत मिळाल्याचं चित्र भाजपकडून दाखवलं जात आहे. हे साफ खोटं आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. मुंबईत वॉर्ड क्रमांक ८९ मधून गितेश विनायक राऊत हे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर विनायक राऊत यांनी गितेश विनायक राऊत यांच्यासह […]
रवींद्र धंगेकरांना धक्का; पुण्यातील प्रभाग 23 मधून पत्नीचा पराभव
पुण्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला असून पुण्यातील प्रभाग 23 मधून धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. तर आंदेकर टोळीतील सोनाली आंदेकर यांचा विजय झाला आहे. सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती. कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची स्नुषा आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना […]
BMC Election 2026 –गोरेगाव वॉर्ड क्र. 54 मध्ये शिवसेनेचे अंकित प्रभू यांचा विजय
मुंबई महापालिका निवडणुकीचा वॉर्ड क्र. 54 चा निकाल जाहीर झाला असून शिवसेना ((उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंकित सुनील प्रभू यांचा भरघोस मतांनी विजय झाला. अंकित प्रभू यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अंकित प्रभू यांच्या प्रभाग क्रमांक 54 मधील मतदानाची गोरेगाव पश्चिमेकडील उन्नत नगर मुंबई पब्लिक स्कूल येथे मतमोजणी करण्यात आली. त्यांनी भाजप महायुतीच्या […]
शारंगधर देशमुखांची सरशी, राहुल माने पराभूत कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वात जास्त राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकापेक्षा एक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवार निवडून यावी यासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर असो अथवा [...]
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला चांगलाच दणका दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या मोफत योजनांना पुणेकरांनी सपशेल नाकारले आहे. पुण्यात भाजपचा विजयरथ सुसाट धावताना दिसत आहे. अजित पवारांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मोफत योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते, “घोषणा करायला तुमच्या […]
Video –शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक व मनसैनिकांचा जल्लोष
मुंबईत शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक व मनसैनिकांचा तुफान जल्लोष
BMC Election 2026 –गोरेगाव वॉर्ड क्र. 56 मध्ये शिवसेनेच्या लक्ष्मी भाटिया यांचा दणदणीत विजय
मुंबई महापालिका निवडणुकीचा गोरेगाव वॉर्ड क्र. 56 चा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी नितीन भाटिया यांनी भाजप उमेदवार राजूल समीर देसाई यांचा दारुण पराभव करत विजयाची माळ गळ्यात घातली. लक्ष्मी भाटिया यांचा 11455 मतांनी दणदणीत विजय झाला आहे. भाटिया यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
BMC Result 2026 – मुंबईत प्रभाग 203 मधून शिवसेनेच्या श्रद्धा पेडणेकर विजयी
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक २०३ (F/South विभाग) मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रद्धा श्रीधर पेडणेकर यांनी विजय मिळवला आहे. श्रद्धा पेडणेकर यांना ६ व्या आणि अंतिम फेरीनंतर एकूण १६,५४१ मते मिळाली आहेत. हा प्रभाग महिला आरक्षित असून त्यांनी येथे मिंधे गटाच्या समिधा संदीप भालेकर यांचा पराभव केला आहे. या प्रभागात एकूण ५ […]
Video –वॉर्ड क्र. 182 मधून मिलिंद वैद्य विजयी, शिवसेना भवनापर्यंत काढली मिरवणूक
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना उमेदवार मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. विजयानंतर मिलिंद वैद्य यांची शिवसेना भवनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Video –हेमांगी वरळीकर यांनी बालेकिल्ला राखला, शिवसैनिकांनी गुलाल उधळला
मुंबईती वॉर्ड क्र. 193 मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हेमांगी वरळीकर यांनी विजय मिळवत बालेकिल्ला राखला, शिवसैनिकांनी गुलाल उधळला
Kolhapur Municipal Corporation Election 2026 : हाय व्होल्टेज लढतीत ऋतुराज क्षीरसागरांचा दणदणीत विजय
अमेरिकेतून प्रचार, पण विजय क्षीरसागरांचाच कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये काही हाय व्होल्टेज लढतींकडे सर्वांचे लक्ष होते.त्यात प्रभाग क्रमांक ७ ड कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते. या प्रभागातून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे [...]
साटेली येथील विनापरवाना मायनिंग उत्खनन थांबवा : ॲड.आल्हाद नाईक
न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात बेकायदेशीर मायनिंग उत्खनन केले जात असून हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरी सदरचे उत्खनन थांबवावे अशी मागणी ॲड. आल्हाद नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.साटेली गाव हा इकोसेन्सिटिव्ह गावांच्या यादीत समाविष्ट असताना या गावात मायनिंग सारख्या प्रदूषणकारी प्रकल्पांच्या गोंडस नावाखाली बेकायदेशीर उत्खनन करून 50 ते 60 फुट [...]
BMC Result 2026 –मुंबईत भाजप उमेदवाराचा अवघ्या ७ मतांनी पराभव
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत एका प्रभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९० (कलिना – बांद्रा टर्मिनस – निर्मल नगर) मध्ये काँग्रेसच्या अॅड. तुलिप मिरांडा यांनी फक्त ७ मतांच्या अत्यंत चुरशीच्या फरकाने विजय मिळवला आहे. तुलिप मिरांडा या माजी नगरसेविका असून, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपच्या ज्योती उपाध्याय यांचा पराभव केला. या […]
“हा आमचा बालेकिल्ला होता. मिंधे गटाने केलेल्या गद्दारीनंतर जनतेने त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली. तसेच जनतेनेही ठामपणे ठरवले की सत्ता आणि पैशांचा माज असलेल्यांना पराभूत करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची,” असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील […]
Bmc Election Results 2026 –गोरेगाव पश्चिमेकडील केंद्रावरील मतमोजणी वादात; आकडेवारीबाबत संदिग्धता
> मंगेश मोरे निवडणूक आयोगाची कार्यपद्धती मतदानापाठोपाठ मतमोजणीच्या दिवशीही वादात सापडली आहे. मतमोजणीच्या आकडेवारीबाबत पारदर्शकता ठेवण्यात राज्य निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूल येथील मतमोजणी केंद्राबाहेरील मतमोजणी दर्शवणारी निवडणूक आयोगाची उपकरणे निष्क्रिय अवस्थेत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या पदरात पडलेल्या आकडेवारीबाबत साशंकता निर्माण करणारी परिस्थिती आहे. निवडणूक आयोग मतांच्या आकडेवारीचा […]
Nashik News –नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर यांना दणका, पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव
नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंड करत पक्षातून बाहेर पडलेल्या, गद्दार सुधाकर बडगुजर यांना मतदारांनी दुसरा दणका दिला आहे. पुत्र दीपक बडगुजर प्रभाग २९ मधून पराभूत झाले असून, भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी ठरले आहेत. दोन एबी फॉर्म दिल्यानं मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला होता. बडगुजर पिता पुत्रांनी ही […]
मुंबईतील वॉर्ड क्र. 182 मधून शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला. या विजयानंतर मिलिंद वैद्य यांनी प्रतिक्रीया देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माहिमकरांचे आभार मानले आहेत. ”मी बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेलो शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी माहिम मच्छिमार वसाहत, पोलीस वसाहत, दर्गास्ट्रीट इथली शिवसेनची शक्ती कायम आहे हे माझ्या […]
PMC Election Result 2026 –मतदानयंत्रे बदलल्याचा आरोप; रुपाली ठोंबरे यांचा मतमोजणीला आक्षेप
मशीन बदलल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावरील मतमोजणी थांबवली होती. मशीन बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला. त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. जवळपास १ तासांहून जास्त काळ मतमोजणी बंद होती. याबाबत रुपाली पाटील यांनी सांगितले की, प्रभाग 25 […]
आनंद देवळी यांना वेंगुर्ले नगर वाचनालयाचा पुरस्कार जाहीर
न्हावेली /वार्ताहर ग्रंथालय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा वेंगुर्ले नगर वाचनालयाचा स्व.श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार श्री.आनंद महादेव देवळी मळगाव ग्रंथपाल कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर झाला आहे.पुरस्काराचे स्वरुप शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व रोख रु.५,००० असे आहे.पुरस्काराचे वितरण रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रो.डॉ.धनराज बा.गोस्वामी प्राचार्य बॅ.बाबासाहेब खर्डेकर [...]
PHOTO BMC Election 2026 –मिलिंद वैद्य यांचा विजय, शिवशक्तीचा जल्लोष
मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महापालिका वॉर्ड क्र. 182 चा निकाल समोर आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. वॉर्ड क्र. 182 मधून मिलिंद वैद्य यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष व्यक्त केला. (फोटो – सचिन वैद्य)
Vidarbha Election Result 2026 –विदर्भात देवेंद्र फडणवीसांना धक्का, मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, आमरावती, अकोला येथे भाजप आघाडीवर आहे. मात्र, काही जागांवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे मामेभाऊ अमरावती येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे. विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीसांना 2 मोठे धक्के बसले आहेत. फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती अमरावतीतून पराभूत झाले आहेत. तसेच फडणवीस यांचे निवटवर्तीय मानले […]
> मंगेश मोरे मुंबईत पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात काहींनी शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र, त्याचा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर कोणताही परिणाम झाला नसून पालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या लोना रावत विजयी झाल्या. स्थानिक शिवसेना आमदार बाळा नर यांनी या विजयाबद्दल मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आहेत. खालील लिंकवर क्लिक करा […]
Pune News –पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा धुव्वा उडाला
पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आता २०२६ च्या निकालांमध्ये पुण्यात भाजप ४७ जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धुव्वा उडाला आहे. अजित पवार यांनी प्रचारादरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा मांडला होता.परंतु या मुद्दयावरही अजित पवार गटाला चांगले मताधिक्य मिळवण्यात यश मिळाले नाही. बातमी अपडेट होत आहे…
बिल्डर लॉबीच्या सरवणकरांना लोकांनी दाबून टाकलंय, महेश सावंत यांची प्रतिक्रीया
मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये निशिकांत शिंदे यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी याबाबत प्रतिक्रीया देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. “आज माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या दिवसाची मी वाट बघत होतो. माझी एकच शपथ […]
आंदोलक चिंबलकरांचा मेरशी जंक्शनवर ठिय्या
विधानसभेवर जाणारा मोर्चा पोलिसांनी अडविला : मोर्चात महिलांसह तरुण, वृद्धांचाही समावेश,रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी मेरशीतच तिसवाडी : चिंबलकरांनी युनिटी मॉल प्रकल्पाच्या विरोधात काल गुरुवारी महामोर्चा काढला. चिंबलकरांनी मेरशी जंक्शनवर मुख्य महामार्ग रोखून बसून धरणे आंदोलन केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गोविंद शिरोडकर, अजय खोलकर आणि संदेश चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा गोवा विधानसभेकडे जाण्याच्या [...]
मुख्यमंत्र्यांच्याखुलाशानंतरविरोधकांचानिषेधसंपुष्टात पणजी : पाणी टंचाईच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरु असताना आमदार वीरेश बोरकर यांनी युनिटी मॉलविरोधी मोर्चेकऱ्यांना काहीतरी ‘शब्द’ देण्याची मागणी केली तसेच त्यांना अटक झाल्याचे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमांवसह विरोधी आमदारांनी सभापतींच्या समोर येऊन निषेध, घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी विधानसभागृहात गोंधळ माजला. त्या गोंधळातच कामकाज सुरु ठेवण्यात आले. उपसभापती जोशुआ डिसोझा हे सभापती [...]
सोमवार किंवा मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेआश्वासन: केंद्रसरकारलापत्रलिहिणार; आश्वासनानंतरतूर्तासआंदोलनमागे तिसवाडी : गोव्यातील चिंबल येथील वादग्रस्त युनिटी मॉल प्रकल्पावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने राज्य सरकार एकटे निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिणार असल्याचे जाहीर केले. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत या प्रकल्पावर अंतिम [...]
सभापतींसमोरील हौदात विरोधकांचा ठिय्या
पणजी : चिंबल येथील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्प कायमचा रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंबल ग्रामस्थांनी आरंभलेल्या आंदोलनाचे पडसाद गुऊवारी विधानसभा कामकाजात उमटले आणि विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौदात उतरून ठिय्या दिला. हे आंदोलन सध्या निर्णायक वळणावर पोहोचले आहे. त्यातूनच गुऊवारी आंदोलकांनी विधानसभेवर मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी तो अडविल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मेरशी जंक्शनवरच ठाण मांडले. त्याचे पडसाद विधानसभेतही [...]
चिंबलमध्ये माझी जमीन असल्याचे सिद्ध करा : खंवटे
पणजी : चिंबलमध्ये माझी जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यातील 50 टक्के गोविंद शिरोडकर यांना भेट देतो, तसेच उर्वरित जमिनीमधील 5 ते 10 टक्के मीडिया बंधूंना देतो आणि बाकी शिल्लक चिंबल वाड्यास देऊन टाकतो, असे जाहीर वक्तव्य मंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. चिंबलमधील युनिटी मॉलच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांचे नेते गोविंद शिरोडकर यांनी खंवटे यांच्यावर [...]
पणजीमध्ये फेब्रुवारीत गोवा पुस्तक महोत्सव
पणजी : पणजीत 4 ते 8 फेब्रुवारी या दरम्यान गोवा पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा राष्ट्रीय महोत्सव नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्यातर्फे होणार असून, याला लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन आणि एनबीटी प्रकल्पाचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी दिली. पणजीत काल गुऊवारी घेण्यात आलेल्या पत्रकार [...]
हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
शहरमहाराष्ट्रएकीकरणसमितीचेआवाहन: उद्याफेरीहीनिघणारच बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षीप्रमाणे 17 जानेवारी रोजी हुतात्मा चौकात सकाळी 9.30 वा. शहर म. ए. समितीच्यावतीने आदरांजली वाहिली जाणार आहे. फेरीच्या परवानगीसाठी पोलीस खात्याकडे रितसर अर्ज करण्यात आला असून अद्याप परवानगीबाबत काही कळविण्यात आलेले नाही. यामुळे परवानगी मिळो अथवा न मिळो हुतात्मा दिनाच्या फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने [...]

24 C