Ratnagiri News –‘ऑपरेशन क्लीन-सी’चा धडाका; एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी आणखी एक नौका जप्त
रत्नागिरीच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने आपली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. बुधवारी (08 एप्रिल 2026) मध्यरात्री मिरकरवाडा बंदरात कारवाई करत, पथकाने एलईडी (LED) दिवे लावून मासेमारी करणाऱ्या ‘हलीमा मरीयम’ नावाच्या मच्छिमार नौकेला पकडले. मिरकरवाडा समुद्र क्षेत्रात काही नौका नियमांचे उल्लंघन करून एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी करत असल्याची […]
ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा जामीन अर्ज फेटाळला
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे.बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दि.7 एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. दि.26 मार्च रोजी थिटे याच्यावर परंडा पोलिस ठाण्यात ॲट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन आरोपी फरार आहे. या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे.त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेता शेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान केले. इतकेच नव्हे, तर “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर दि.26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी परंडा जिल्ह्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोगता ॲड.गाडे,ॲड.निकाळजे, ॲड.बी.बनसोडे यांनी यूक्तीवाद केला.
हिंदुस्थान क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आपल्या जीवनातील सर्वात भीषण संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराजला त्यावेळी आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहोत याची कल्पना होती, पण देशासाठी खेळण्याची जिद्द मोठी होती. विश्वचषकानंतर जेव्हा त्याची प्रकृती अधिक खालावली, तेव्हा डॉक्टरांनी दिलेला इशारा ऐकून तो […]
Ratnagiri News –देवरुख पोलिसांची धडक कामगिरी; आंबा घाटातील दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत अटक
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दख्खन ते आंबा घाट दरम्यान गाडी अडवून, चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना जेरबंद केले असून, फरार असलेल्या तीन जणांचा कसून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या बोलेरो […]
दुशेरेच्या इंद्रायणीचा दरवळ देशभर! दुशेरे ( विकास जाधव ): कराड तालुक्यातील दुशेरे गावाने पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत इंद्रायणी भाताच्या माध्यमातून नवे यश मिळवले आहे. कृष्णा नदीकाठच्या सुपीक भूमीत पिकवला जाणारा हा [...]
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून राडा; पोस्टर लागले, पोस्टर फाडले, वाचा सविस्तर…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असतानाच, पाटणा येथील भाजप कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, हे पोस्टर भाजप […]
डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा सत्कार
तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा उच्च शिक्षणासाठी पीजी साठी प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी , आशा पर्यवेक्षिका स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
मंथन परीक्षेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे यश
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आराध्या संतोष भातभागे,ञिशा सागर लाड,श्रृतीका सतीश रोहीदास,सानिका प्रदीप भोरे,श्रेया जयवंत वाघमारे,आरोही हनुमंत काळे,जन्नत अब्बास शेख, स्वरा विठ्ठल पवार या विद्यार्थिनींनी मंथन परीक्षेत यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थीनीना सुशिल क्षिरसागर, सुषमा माने यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात उद्देशिका देवून विजय गायकवाड सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळात आयोजन केले आहे. धाराशिव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 08 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समता सप्ताहाचे उद्दघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक इतिहासाचे अभ्यासक विजय गायकवाड यांचा संविधान उद्देशिका देवून जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जात पडताळणी सचिव बलभीम शिंदे, सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कर्मचारीवृंद उपस्थित होते. या सन्मानाबद्दल गायकवाड यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार
परंडा (प्रतिनिधी)- बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भाऊसाहेब खरसडे यांची धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी निवड झाल्याबद्दल परंडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील शासकीय विश्राम गृह येथे सत्कार करून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. संदीप खोसे पाटील,नगर परिषद सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती राहुल बनसोडे,शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष नसीर शहावर्फीवाले ,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष नंदू शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाशा भाई आदी उपस्थित होते.
सीईओ प्रियंवदा म्हाडदळकर यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने,धाराशिव जि. प. च्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना शिक्षकांच्या सामूहिक विविध प्रलंबित प्रश्नांबद्दल माहिती करुन देऊन त्यावर थोडक्यात चर्चा करण्यात आली. पदवीधर स्वेच्छेने पदावनत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी. पदोन्नती( प्रमोशन) करताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अगोदर संधी देऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नैसर्गिक न्यायाने प्रक्रिया राबवावी. अशा विविध मागण्या राज्यउपाध्यक्ष श्रलालासाहेब मगर व बशीर तांबोळी यांनी सविस्तर मांडल्या. यावर सगळ्या मागण्याचा लवकर विचार करून,यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. भेटीच्यावेळी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मा. शिक्षणाधिकारी खंदारे साहेब, मापारी साहेब, पिकवने साहेब यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.. आढावा बैठक संपल्यानंतर मा. शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पदावनत प्रकियेबाबत चर्चा करुन लगेच पत्र काढत असल्याचे सांगितले व तसे पत्र ही काल निगर्मित करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हा अध्यक्ष बशीर तांबोळी, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सरचिटणीस अविनाश मोकशे*श्री कैलास मोहिते ,राज्य कार्यकारिणी सदस्य सविताताई पांढरे,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी साखरे,नप जिल्हा अध्यक्ष पवार सर,महिला आघाडी प्रमुख,अनिषा ताई कदम,जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन भांडे सर,शाहू पतसंस्था चेअरमन सुरेश भालेराव,कळंब तालुका अध्यक्ष महेंद्र रणदिवे मिलिंद धावारे,केंद्रप्रमुख जगदीश जाकते, तानाजी व्हनकळस, , इस्माईल शेख, हाशम शेख,जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे,परंडा तालुकाध्यक्ष श्री प्रफुल्ल झाडबुके सर, जिल्हा उपाध्यक्ष बब्रुवाहन भोसले,श्रीमती तबसूम बागवान,भोसले सर,धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे वाशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने,भूम तालुकाध्यक्ष युवराज पिंगळे, लोहारा तालुकाध्यक्ष श्री घोडके, श्री चंदनशिवे दाजी,रणदिवे सर,दिपक ठोंबरे सर,मारुती काळे ,इलाही बागवान,मोहन नागटिळक,दिनेश पेठे,हनुमंत माने सर,लक्ष्मण घोडके,महेश अनपट,भालेराव सर, मोहन लष्करे,तुळजापूर तालुका अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शेखू जेटीथोर, दयानंद जेटीथोर,विठ्ठल जेटीथोर, बिलाल सौदागर, विठ्ठल भोसले, दत्तात्रय लोहार, गोविंद बाचेवाद , विनायक संकपाळ,ज्ञानेश्वर ढोले, श्री मलंग सर, लक्ष्मण घोडके, श्रीहरी बिडवे,शिवाजी निंबाळकर, सुधीर पवार आणि जिल्हाभरातून आलेले बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार, जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. जंगम, येडशी बीटचे विस्तार अधिकारी प्रकाश पारवे, विस्तार अधिकारी चौरे, सौ. उषाताई सर्जे, आळणी गावचे सरपंच प्रमोद काका वीर, उपसरपंच कृष्णा गाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी बाबासाहेब पौळ, उपाध्यक्षा सौ. अफसाना सलीम शेख, केंद्रप्रमुख महेश अनपट, पोलीस पाटील प्रमोद माळी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोकाशी, लिटल स्टार शाळेचे दिवाणे सर, तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इतबारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर एमबीबीएस डॉक्टर झाल्याबद्दल डॉ. दिव्या प्रशांत पापा वीर तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थिनी श्रद्धा गणेश निंबाळकर हिचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. अर्चनाताई पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सेमी इंग्रजी शिक्षण, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही बंद ठेवण्याची सवय, आरोग्य व शिक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. शिक्षणाधिकारी डॉ. खंदारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलनाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वागतगीत, गणेश वंदना, खंडोबा गीत, गोरोबा कुंभार जीवनचरित्र, कोळीगीत, विनोदी नृत्य, लावणी, भारूड, मंगळागौर, दांडिया, नारीशक्ती, मराठा सैन्य, शिवकन्या, तसेच विविध हिंदी व मराठी गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रम रंगतदार झाला. काठी न घोंगड, फुलवंती, नवराई माझी लाडाची, कृष्ण मुरारी, खानदेशी ठेका यांसारख्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. एकूणच, आळणी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण असे संस्मरणीय ठरले.
Satara political news |साताऱ्यात राजकीय खलबतं? मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजेंमध्ये अर्धा तास चर्चा
गिरीश महाजन यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट सातारा – राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन महाजन यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास [...]
खराब रस्त्यांमुळे पाचगणीत शुकशुकाट पाचगणी – थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉल धारक, घोडे चालक आणि स्थानिक [...]
संसार सांभाळत सुरैया देसाई राज्यात प्रथम बेनिक्रे (ता. कागल) – येथील सुरेया साहेबलाल देसाई यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने [...]
आखातात अमेरिका – इस्रायल, इराण संघर्षाच्या अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, हिंदुलस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने (IGoM) बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-२ येथे आपल्या तिसऱ्या बैठकीत हिंदुस्थानच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी आखातात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनीतून किती हिंदुस्थानी जहाजे पार झाली याची माहिती देखील देण्यात आली. यावेळी मंत्रिगटाला माहिती […]
कोल्हापूरात शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग जाहीर कोल्हापूर: विदर्भातून गोव्यालाजाणारा बहुचर्चित ‘शक्तीपीठ महामार्ग गेली काही वर्षे जमीनबाधित शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे रखडला आहे. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने या मार्गाचे रेखांकन बदलण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग होणारच, हे आता [...]
सावर्डे बाजारपेठेत अपघाताच्या कारणावरून एका 20 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाडीच्या नुकसानीची रक्कम मिळेपर्यंत तरुणाला सोडणार नाही, अशी धमकी देत संशयितांनी नातेवाईकांकडून आतापर्यंत हजारो रुपये उकळले असून आणखी सव्वा लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी मुंबईतील चौघांविरुद्ध विविध […]
ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात पोलीस गाडी जप्त करू शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा निर्णय
चालक केवळ मद्यधुंद अवस्थेत आहे या कारणावरून पोलीस गाडी ताब्यात घेऊ शकत किंवा जप्त करू शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ई.व्ही वेणुगोपाल यांनी एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तर त्याला गाडी चालवण्यापासून रोखू शकता, पण वाहन जप्त […]
Indian embassy Tehran alert |इराण सोडा! भारतीय दूतावासाचा नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचा इशारा
इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला भारताने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या स्वतःच्या नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची सूचना केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक दिशानिर्देश जारी केले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. क्षेत्रातील सुरक्षास्थितीची अनिश्चितता [...]
गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय- सचिव भाग्यश्री पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत शासकीय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिरे व विविध विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. 9 एप्रिल रोजी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील पायल अतुल नन्नावरे, आदित्य दीपक कदम, स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग, निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसेच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी 45 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांचेही मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, अतुल मुक्ते तसेच लिपिक संकेत जगताप व संकेत भोसले यांनी व परिश्रम घेतले.
शिक्षक संघटनेच्या बैठकीत प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे अध्यक्षा पाटील यांचे आश्वासन
धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शैक्षणिक गुणवत्तावाढ व प्रशासनिक बाबीं संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. इयत्ता 1 ली ते 5 वी साठी सेमी-इंग्रजी अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्ष जून 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकसमान रंगाचा गणवेश असणार असून, त्या गणवेशाचा रंग पुढील बैठकीत निश्चित करण्यात येईल. गणवेश खरेदीचा अधिकार शाळा व्यवस्थापन समिती यांना देण्यात आला आहे. शाळा एकत्रीकरण प्रक्रियेत मुलांची व मुलींची वेगवेगळी शाळा एकाच आवारात असल्यास त्यांचे एकत्रीकरण करण्यात येईल. तसेच एकाच आवारातील इतर शाळांबाबतचा अंतिम निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापन समिती घेणार आहे. सेमी इंग्रजी अंमलबजावणीसंदर्भात सर्व शाळांनी दोन दिवसांच्या आत ठराव सादर करावेत. या ठरावांना दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाणार आहे. सेमी-इंग्रजी अभ्यासक्रमासाठी सर्व शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 100 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे बाजू मांडली. या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसला धक्का, 2 नगरसेवकांचा भाजप पक्ष प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सिद्धार्थ अंगुल बनसोडे, नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी मुंबई येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दोन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे धाराशिव शहराध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक अमित शिंदे, न. प. उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक अभिजीत पतंगे, माजी नगरसेवक दत्ता पेठे उपस्थित होते. धाराशिव नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असुन 41 पैकी 22 नगरसेवक भाजपचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना उबाठा 7, काँग्रेस 3 व एमआयएम 1 असे संख्याबळ होते.
तुळजाभवानी मंदिरातील ‘भवानीशंकर सभा मंडप’ साठी लागणारे खांब निर्मिती अंतिम टप्प्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील ‘भवानीशंकर सभा मंडप’ साठी लागणाऱ्या दगडी खांब निर्माण करणे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या प्रगतीचा सविस्तर आढावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, अभियंता प्रवीण अमृतराव, सहसंबंधित कारागीर ठेकेदार उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील भवानी शंकर मंडप पाटील काही खांबांना चिरे गेल्याने तिथे नवीन तयार केलेले खांब तसेच दुरुस्ती केलेले काम उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या वैभवात भर घालणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारंपरिक शैलीत भव्य खांबांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 39 भव्य खांबांची निर्मिती सुरू असून, त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथून आणलेल्या जवळपास 1,600 घनफूट काळ्या पाषाणाचा वापर करण्यात येत आहे. मंदिराचे मूळ प्राचीन स्वरूप अबाधित राखत, पारंपरिक आणि ऐतिहासिक स्थापत्यशैलीतच या खांबांची कोरीव रचना केली जात आहे. या कामात पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड दिली जात आहे. या कामात प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा आणि आधुनिक तांत्रिक कौशल्य यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. खांबांवरील कोरीव नक्षीकाम मंदिराच्या सौंदर्यात नवी भर घालणारे ठरणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेशातून आणले कुशल कारागीर हे खांब निर्मितीसाठी निष्णात कारागिर अथक परिश्रम घेत आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील सुमारे 12 कुशल कारागीर दिवसरात्र मेहनत घेत असून प्रत्येक खांब बारकाईने साकारला जात आहे. सदरील खांब लवकरच बसवणीस सुरुवात होणार आहे. खांबांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे कोरीव खांब ‘भवानीशंकर सभा मंडप’मध्ये बसवण्याचे काम सुरू होणार आहे. भवानी शंकर मंडप भाविकांसाठी आकर्षणाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे. हे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार असून, भवानीशंकर सभा मंडप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
पारधी समाजातील कुटुंबाचे घर जळून खाक; मदतीचा हात पुढे
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सामनगाव येथे पारधी समाजातील एका कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले असून मीराबाई काळे यांचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील कपडे, धान्य, संसारोपयोगी साहित्य तसेच लहान मुलांची शालेय दप्तरदेखील जळून नष्ट झाली. घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मिळताच सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख धाराशिव अर्चनाताई दराडे यांनी व काही महिला कार्यकर्त्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पीडित कुटुंबाला किराणा साहित्य, धान्य, साड्या, मुलांसाठी दप्तर व खाऊ देत तातडीची मदत केली. दरम्यान, सहा महिन्यांच्या नातीला वाचवताना मीराबाई काळे या गंभीररीत्या भाजल्या असून त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. अर्चनाताई दराडे यांनी तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये फोन करून ॲम्बुलन्स बोलवण्यात आली व त्यांना तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पत्र्याच्या शेडसाठी आर्थिक मदत मिळवून देत उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.12) संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. धाराशिव शहरातील नगर परिषदनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी स. 11 वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्युिशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम, रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाला सुरुवात : आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावा,यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” हाती घेण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल ते 25 या कालावधीत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.खुल्या प्रवर्गातील ज्या समाजघटकांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती,पटेल,राजपूत, राजपुरोहित,हिंदू नेपाळी,बनिया, कम्मा,कायस्थ,अय्यंगार,नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी समाजघटकांचा समावेश आहे.या घटकांतील विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक व शेतकरी यांच्यासाठी संस्थेमार्फत विविध विकासाभिमुख योजना उपलब्ध आहेत. सर्वेक्षणाच्या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित कुटुंबांशी थेट संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था,संघटना व मंडळांकडूनही आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित घटकांतील व्यक्ती,संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची माहिती नोंदवावी आणि उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी : चिन्मय कुलकर्णी,जिल्हा व्यवस्थापक, अमृत,धाराशिव मो. 7391065469 यांचेशी संपर्क साधावा.
घरगुती गॅसची 98 टक्के बुकिंग, कुठलीही टंचाई नसल्याची केंद्र सरकारची माहिती
पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील एलपीजी पुरवठ्याबाबत दिलासादायक माहिती दिली असून, कोणत्याही ठिकाणी गॅस टंचाई (ड्राय आऊट) झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी पुरवठा स्थिर असून मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कालच देशभरात 51 लाखांहून अधिक एलपीजी रिफिल्स वितरित करण्यात आल्या. ऑनलाइन बुकिंगचा दर 98 टक्क्यांपर्यंत […]
Iran internet blackout |इराण-अमेरिका युद्धविराम ; पण इराणमधील इंटरनेट बंदी हटणार का?
इराणमध्ये 912 तासांपासून इंटरनेट बंद; इराण आणि अमेरिका पुढील २ आठवड्यांसाठी युद्धविरामावर सहमत झाले आहेत. परंतु याचा फायदा सर्वसामान्य इराणी जनतेला मिळणार का?, इराणमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू [...]
कोटार्ची चपराक, फोडा पोटिनवडणूक रद्द
निवडणूक यंत्रणा पूर्णत : सज्ज असतानाच निवाडा : कर्मचारी, अधिकाऱ्यांत दिवसभर अनिश्चितता पणजी : गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला न्यायालयाने हस्तक्षेप करून पूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा धक्कादायक निकाल बुधवारी जाहीर झाला. लोकप्रतिनिधित्व अधिनियम-1951 च्या कायद्यानुसार आवश्यक असलेला एक वर्षाचा किमान कार्यकाळ निवडून आलेला आमदार पूर्ण करणार नाही, या याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी मुंबई [...]
गोवा, देवगड येथील एलईडी नौकांवर मालवण समुद्रात कारवाई
मालवण | प्रतिनिधी मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मालवण समुद्रात संयुक्त गस्तीत LED मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्यामुळे अवैध LED मासेमारीविरुद्ध मस्त्य विभागाची [...]
Assam Poll एका निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू
आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरुवारी आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात एका निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देबेन होरो (४५) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते नदुआर विधानसभा मतदारसंघात दुसरे मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘होरो यांची नियुक्ती डोलापाणी एल.पी. स्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक २३० वर करण्यात आली होती. आज सकाळी ते […]
अंबाबाई मंदिर परिसरात आईला मारहाण कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईलाच मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी घडली. मारहाणीत पद्मी शरद नरवडे (वय ५०, रा. पाटील [...]
वाहतूक नियम पाळणे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच; हायकोर्टाने नुकसानभरपाईत केली वाढ
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांनाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावरील रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट मत व्यक्त न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने एका रस्ते अपघात प्रकरणातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी नुकसानभरपाईत वाढ केली. परदेशात नियम पाळणारे हिंदुस्थानी नागरिक मायदेशात नियम का पाळत नाहीत? रस्ता […]
चिपळूणमध्ये पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण, सातारा जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल
चिपळूण शहरातील काविळतळी परिसरातील राहुल गार्डन येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका 29 वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुभम प्रकाश पवार असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात सातारा जिल्ह्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मार्तंडराव पवार (वय […]
“सोळावं वरीस धोक्याचं”, गोंधळलेल्या स्थितीत स्वभान हवे
अवंतिका ठाकरे यांचा खास लेख – सावंतवाडी “सोळावं वरीस धोक्याचं”, हे ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातील जगदीश खेबुडकर लिखित वसंत पवार यांचे सुमधुर संगीत व सुलोचनाताई चव्हाण यांनी गायलेलं गीत ऐकण्याची संधी मिळाली, त्याच वेळी मला आजच्या आमच्या पिढीच्या वेगळ्या तळमळीची तसेच तगमगीची जाणीव झाली.मी २२ वर्षांची. २२ व्या वर्षीचं आयुष्य म्हणजे एक गोंधळलेलं परंतु [...]
धाराशिवमध्ये गॅस वितरकाकडून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात निघाला भलताच ट्विस्ट
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एका गॅस वितरकाने एचपी कंपनीच्या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनंतर मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काटी सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी एचपी कंपनीच्या आढावा बैठकीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
IPL 2026 मध्ये बुधवारी (08 एप्रिल 2026) दिल्लीकरांना थरारक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने (41*) धाव घेण्यास नकार दिला आणि स्वतः सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. डेव्हिड मिलर चौकार किंवा षटकार ठोकणार, अशी चाहत्यांसह संघाला अपेक्षा होती. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला स्लो बाऊन्सर मिलरला खेळता आला नाही आणि […]
अत्यंत निराशाजनक, AI व्हिडीओवरून काँग्रेस खासदार शशी थरुर यांची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या डीपफेक व्हिडिओंबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, त्यांच्या अनेक डीपफेक व्हिडिओंचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. थरूर यांनी स्पष्ट केले की, या व्हिडिओंमध्ये त्यांच्या जुन्या मुलाखतींच्या खऱ्या फुटेजचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) […]
इराण मोहिमेवरून ‘नाटो’मध्ये फूट, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, “आम्हाला गरज होती तेव्हा…”
गेल्या 40 दिवसांपासून आखातात सुरू असलेल्या युद्ध अखेर काही काळासाठी थांबले. बुधवारी इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. युद्धविराम झाल्यानंतरही अंतिम करार होईपर्यंत अमेरिकेचे सैन्य इंचभरही मागे हटणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान त्यांनी ‘नाटो’ देशांवरही निशाणा साधत या संघटनेतून बाहेर पडण्याचे आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेतही दिले. जगातील सर्वात मोठी […]
Hupri |हुपरीत चांदी व्यापाऱ्याचा अकस्मिक मृत्यू; परिसरात खळबळ
हुपरीत चांदी देवाण-घेवाणीनंतर व्यापाऱ्याचा मृत्यू हुपरी – व्यापाऱ्याला मागविलेली चांदी देण्यासाठी सेतम येथून आलेल्या एका तरुण चांदी व्यापाऱ्याचा अकस्मिक मृत्यू झाला. – शिवम निवास जाधव (वय २५, रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव [...]
सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बाल तस्करीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करण्यास सांगितले. या समस्येतून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून राज्यस्तरावर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. बुधवार ८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या बाल तस्करीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या […]
व्यावसायिकाची हत्या करून फरार झालेल्या गुंडाला दुबईत अटक, लवकरच हिंदुस्थानात प्रत्यार्पण करणार
हरियाणातील व्यावसायिकाची हत्या करून दुबईत पळून गेलेल्या हिंदुस्थानातील कुख्यात गुंडाला दुबईत अटक करण्यात आली आहे. राव इंद्रजीत यादव असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. यादव याचे इन्स्टाग्रामवर 15 लाख फॉलोअर्स असून तो दुबईत आलिशान जीवनशैली जगत होता. दुबईतील अधिकाऱ्यांनी यादवशी संबंधित कागदपत्रे मागितली असून, लवकरच त्या हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यादव […]
लेबनानची राजधानी बेरूतमध्ये इस्त्रायली सैन्याने बुधवारी रात्री केलेल्या भीषण हल्ल्यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नईम कासिम याला मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यात कासिमचा सख्खा पुतण्या आणि खासगी सचिव अली युसूफ हर्शी मारला गेल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इस्त्रायली सैन्याने अधिकृत निवेदन जारी करून या कारवाईची पुष्टी केली आहे. युसूफ हर्शी हा केवळ नईम […]
जयपूरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेसोबत छेडछाड, आरोपींचा शोध सुरू
जयपूरमध्ये परदेशी महिला पर्यटकासोबत छेडछाडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आमेर परिसरातील जयगड किल्ल्याजवळ रविवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. जपानमधून आलेली ही महिला दोन-तीन दिवसांपूर्वी राजस्थान पर्यटनासाठी आली होती. ती जयगड किल्ल्याजवळील गणेश मंदिराकडे जात असताना सुनसान भागाचा फायदा घेत पाच तरुणांनी तिला अडवले आणि तिच्यासोबत छेडछाड केली. या वेळी महिलेने धैर्य […]
संगमेश्वरमधील सोनवी नदी प्रदूषणाच्या विळख्यात, दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त
संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाशी खोऱ्यातून वाहणारी ही नदी बुरंबी, सोनवडे, लोवले आदी गावांसाठी जीवनदायिनी मानली जात होती. मात्र सध्या तिची अवस्था चिंताजनक बनली आहे. नदीकाठावर वाढलेली झाडाझुडपे, पाण्यात वाढलेले शेवाळ आणि साचलेला कचरा […]
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले
कणकवली/ वार्ताहर: दर्शन सावंत कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये -सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून, त्या क्लिनिकमधील काम संपवून घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ‘काळे सर कुठे [...]
मी सामना संपवू शकत नाही…विराट कोहलीशी तुलना करताच बाबर आझम संतापला; रिपोर्टरला फटकारले
पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) हैदराबाद किंग्जमनविरुद्धच्या सामन्यात पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने 43 धावांची खेळी केली, मात्र सामना शेवटपर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. झल्मीने 146 धावांचे लक्ष्य अगदी शेवटच्या चेंडूवर गाठले. बाबरने 37 चेंडूत 43 धावा करून चांगली सुरुवात केली होती, परंतु डावाच्या मध्यात तो बाद झाल्याने पुन्हा एकदा त्याच्या ‘फिनिशिंग’ क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले […]
पत्नीला स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखणे हा मानसिक छळच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
घरातील रोजच्या कामांसाठीही परवानगी मागावी लागणे आणि स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखणे हा मानसिक छळच आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. हा केवळ कौटुंबिक वाद नसून पत्नीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत पतीविरोधातील फौजदारी आरोप रद्द करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी हा निर्णय दिला. अकोला येथील तरुणीचा […]
धावत्या जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसला आग, मथुरा स्थानकाजवळ घडली घटना
उत्तर प्रदेशातील मथुरा स्थानकाजवळ धावत्या जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसच्या बी-1 आणि बी-4 या डब्यांना आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मथुरा जंक्शनमध्ये ही एक्सप्रेसजवळ थांबवण्यात आली. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनच्या चाकाखालून धूर निघाताना प्रवाशांना पाहिले आणि एकच खळबळ उडाली. ही ट्रेन दिल्लीहून हैदराबादला जात […]
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक“ खटल्यांतील सर्वांची निर्दोष मुक्तता
कर्नाटकी पोलिसांना सणसणीत चपराक : 7 पैकी उर्वरित 2 खटल्यांचा निकाल : 56 जणांना दिलासा बेळगाव : सत्याला त्रास आहे, पण जय निश्चित आहे! हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याच्या निकालाच्या माध्यमातून आधोरेखित झाले आहे. न्यायालयातील 7 पैकी 5 खटल्यांमधील यापूर्वीच सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर उर्वरित 2 खटल्यांतील 56 जणांचीदेखील न्यायालयाने [...]
बेळगाव : बारावीचा निकाल गुरुवार दि. 9 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केला जाणार आहे. सकाळच्या सत्रात पदवीपूर्व शिक्षण विभाग व मंत्री मधु बंगारप्पा यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. http://www.karresults.nic.inया संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून पीयुसी द्वितीय वर्षाचा निकाल केव्हा लागणार, याबाबत प्रतीक्षा होती. [...]
हैदराबादमधून दोन तरुणांना घेतले ताब्यात
टिळकवाडीतील डिजिटल अरेस्ट प्रकरण : दोघांच्या बँक खात्यांवर 2 कोटींचा व्यवहार बेळगाव : आगरकर रोड, टिळकवाडी येथील एका वृद्ध उद्योजकाला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या खात्यातून 15 कोटी 45 लाख रुपये हडप केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या बँक खात्यांवर 2 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले [...]
Tehsildar Rakesh Gidde |केज तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू
रेणापूर फाट्याजवळ भीषण अपघात खंडेराजुरी – केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना [...]
फलकाबद्दल मनामनांमध्ये असणारा आदर अन् महाराष्ट्रात जाण्याची इच्छा याला सरकार प्रतिबंध कसा करणार? घटनाक्रम 24 जुलै 2014 फलक काढण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी बैठक बोलवली फलक काढू नये अशी तत्कालीन आमदार संभाजी पाटील व येळ्ळूरमधील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली विनंती 25 जुलै -सकाळी प्रशासनाचे अधिकारी येळ्ळूरमध्ये दाखल सकाळी 11 .30 वा. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलकावर [...]
अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात
महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून शहर परिसरात कारवाई बेळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून शहरातील जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी पथकाकडून शहर व परिसरातील जाहिरात फलक हटविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील जाहिरात फलकांचा प्रश्न सातत्याने महापालिकेच्या बैठकांमध्ये चर्चेत येत आहे. त्यामुळे याची दखल घेत अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली [...]
उत्तर प्रदेशमध्ये आढळले 25 गिधाडांचे मृतदेह, वनविभागाकडून चौकशी सुरू
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 25 गिधाडांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेची (IVRI) मदत घेतली आहे. वन विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. मंगळवारी भिरा रेंज अंतर्गत सेमरई गावाजवळील शेतात या गिधाडांचे मृतदेह आढळून आले. ही गिधाडे ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ अंतर्गत […]
IPL 2026 –गुजरातने अवघ्या एक धावेने सामना जिंकला, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड; नेमकं कारण काय?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शुभमन गिलच्या नतेृत्वाखालील गुजरात टायन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने अखेर बाजी मारली आणि हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. एकीकडे पहिल्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाचा कर्णधार शुभमन गिलला मोठा झटका बसला आहे. BCCI ने गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुजरातच्या […]
बेळगाव : बेकायदा दारू विकणाऱ्या गँगवाडी येथील एका अड्ड्यावर छापा टाकून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. माळमारुती पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. डॉन मेताजी चौगुले, राहणार गँगवाडी हा पोलिसांनी छापा टाकताच फरारी झाला आहे. माळमारुतीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. यु. हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या अड्ड्यावरून 4790 रुपयांचा दारूसाठा व 5 हजार रुपयांचा एक [...]
वाघवडे सराफी दुकान फोडीचा तपास यशस्वी
बेंगळूरच्या युवकाला अटक : 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई बेळगाव : मच्छे येथील वाघवडे क्रॉसजवळ असलेल्या सराफी दुकान फोडल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेंगळूर येथील एका युवकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळून 21 लाख 57 हजार 250 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. श्रीनिवास एन. ऊर्फ सिना ऊर्फ सिनू नरसय्या (वय 37) [...]
कोकण रेल्वेच्या विकासात सिंधुदुर्ग पोरका !
गोवा, कर्नाटकला झुकते माप ; रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकरांची टीका त.भा.वार्ताहर न्हावेली कोकण रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचा सर्वाधिक फायदा गोवा,कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी उचलला आहे.मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही मूलभूत रेल्वे सुविधांपासून वंचित राहिला असल्याचा गंभीर आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे.तळवडेकर म्हणाले की,शेजारील राज्यांना [...]
जनगणनेसाठी २.५ लाख कर्मचार्यांची नियुक्ती
16 एप्रिलपासून घरगणना प्रक्रिया : शासकीय सेवा पुरविताना येताहेत अडचणी बेळगाव : राज्यात होणाऱ्या महत्त्वाकांक्षी जनगणना मोहिमेसाठी सुमारे 2.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विविध विभागांतील दैनंदिन सार्वजनिक सेवांवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 16 एप्रिलपासून घरगणना प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार असली तरी सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण टप्प्यातच अनेक [...]
सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी जोतिबा देवाला साकडे
सीमासमन्वय मंत्र्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाला गती मिळावी व मराठी भाषिकांवरील अन्याय कमी व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सीमासमन्वय मंत्रिपदी दुसऱ्यांदा चंद्रकांतदादा पाटील यांना संधी दिली. परंतु एकदाही त्यांनी बेळगावला भेट देऊन मराठी भाषिकांच्या वेदना जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना सद्बुद्धी येवो आणि सीमावासियांना न्याय मिळो, असे साकडे सीमावासीयांनी दख्खनचा [...]
सफाई कर्मचाऱ्यांना ‘नमस्ते’ योजनेंतर्गत प्रशिक्षण
बेळगाव : महानगरपालिकेच्या ड्रेनेज आणि गटारी स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. पाच दिवसांचे प्रशिक्षण संपल्यानंतर संबंधितांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सध्या महानगरपालिकेत ड्रेनेज आणि गटारी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरीत्या प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. एखाद्या ठिकाणी ड्रेनेज [...]
लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर
बेळगाव : लोककल्प फाउंडेशन व नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्यावतीने हब्बनहट्टी व माण या गावांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. नेत्रदर्शनच्या डॉ. सीमा एस. एम. व साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार, पवित्रा दानवडे यांच्या सहकार्याने गरजू रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. याबद्दल रुग्णांनी व ग्रामस्थांनी फाउंडेशन व नेत्रदर्शनला धन्यवाद दिले. लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले.
श्रद्धा जरूर असावी परंतु ,अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडू नका
मेधा सामंत- पुरव यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. त्या सक्षम बनल्या आहेत अशा परिस्थितीतही काही महिला अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबांच्या आहारी जाताना दिसत आहे. नाशिकमध्ये घडलेले प्रकरण याचे उदाहरण आहे. अंधश्रद्धे विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे काम करत आहे [...]
इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल असे वाटत होते. मात्र इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत इराणला इशारा दिला. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या सीमेवरून एक […]
पती-पत्नीतील वैवाहिक वाद जणू काही महाभारतातील युद्ध; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
संसारात पती-पत्नीमध्ये दररोज या-ना-त्या किरकोळ कारणांवरुन वाद होत असतात. काही वाद घटस्फोटाच्या टोकापर्यंत पोहोचतात. अशाच्या वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नीतील वादाचा थेट महाभारताशी संबंध जोडला. पती आणि पत्नीतील वैवाहिक वाद जणू काही महाभारतातील युद्धच असल्यासारखे वाटते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. पेशाने वकील असलेल्या पतीच्या वर्तणुकीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचवेळी दाम्पत्यातील वादाला […]
इराण अमेरिका शस्त्रसंधीनंतर हिंदुस्थानला दिलासा, 15 हजार टन LPG घेऊन ‘ग्रीन आशा’देशात दाखल
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असताना हिंदुस्थानासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर 15,400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (LPG) घेऊन ‘ग्रीन आशा’ हे हिंदुस्थानचा ध्वज असलेले जहाज सुरक्षितपणे नवी मुंबईत दाखल झाले आहे. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुज सामुद्रधुनीतून मार्ग काढत हे जहाज हिंदुस्थानात पोहोचल्याने ऊर्जा सुरक्षेच्या […]
नाल्याच्या अपूर्ण कामामुळे आनंदनगरमधील रहिवासी हैराण
दुर्गंधीसह विहिरींचे पाणीही झाले दूषित : समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतप्त बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा फटका येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, आजूबाजूच्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तरीदेखील [...]
चिकोडी बसवेश्वर संस्थेने ठेवीदारांची रक्कम परत द्यावी
कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी बेळगाव : चिकोडी येथील बसवेश्वर सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठेवीदारांची 100 कोटी ऊपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून न्यायालयात हजर करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. या प्रकरणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संबंधितांनी मोठ्या प्रमाणात [...]
बाजारपेठेत रात्रीही कचरावाहू वाहनांची व्यवस्था
ओला कचरा थेट वाहनात जमा करण्यासाठी प्रयत्न : भाजीविक्रेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा बेळगाव : बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करणे सोपे व्हावे यासाठी महानगरपालिकेकडून नरगुंदकर भावे चौक आणि कडोलकर गल्लीत रात्रीच्या वेळीही कचरावाहू वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी ओला कचरा कोठेही न टाकता थेट कचरावाहू वाहनात टाकावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण काही भाजीविक्रेत्यांकडून [...]
हलशी-हलशीवाडी महालक्ष्मी यात्रेचा भव्य शुभारंभ
अक्षतारोपण समारंभ भक्तीभावात साजरा : सोहळ्यासाठी भाविकांचा लोटला जनसागर वार्ताहर/हलशी हलशी-हलशीवाडी (ता. खानापूर) येथे कदंबकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री ग्रामदेवता महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाचा बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आनंदमय वातावरणात शुभारंभ झाला. पहाटे 6.23 वाजता सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी असलेला अक्षतारोपण सोहळा विधीवत पार पडला. वेदमंत्रांच्या निनादात आणि [...]
यंदा काजूच्या उतार्यात होणार घट
अवकाळी पाऊस, हवामानातील बदलामुळे उत्पादन कमी : बागायतदार शेतकरी अडचणीत वार्ताहर/किणये अवकाळी पाऊस, धुके व हवामानातील बदलामुळे काजूच्या झाडांना आलेला मोहोर खराब झाला आहे. त्यामुळे यंदा काजूच्या उताऱ्यात घट होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी काजुबाग आहे. मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे काजू उत्पादनात घट झाली आहे. यामुळे बागायतदार शेतकरी [...]
सूर्यघर योजना लाभदायक पण जागृतीचा अभाव
शहरात केवळ 400 ग्राहकांनी घेतला फायदा : भविष्यात सोलारचे वाढणार महत्त्व बेळगाव : प्रत्येक घराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर योजना मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आली. ही योजना उत्तम असली तरी जागृतीच्या अभावाने बेळगावमध्ये तितकासा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. शहरात केवळ आजतागायत 400 नागरिकांनी आपल्या घरावर सूर्यघर योजनेंतर्गत सोलार रुफटॉप पॅनेल बसवून घेतले [...]
बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही मोफत बसप्रवास?
बेळगाव : राज्यात बालस्नेही वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची सुविधा देण्याची योजना आखली आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार ही योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार प्रस्तावाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याची सूचना परिवहन मंडळांना दिली आहे. टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. या [...]
शिक्षकांच्या बदल्या-जनगणनेतून निघाला तोडगा
जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : शिक्षक संघटनांचे समाधान बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या-पदोन्नती आणि जनगणनेच्या कामावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सुटला आहे. गणतीमुळे बदलीच्या जागी रुजू होण्यासाठी थांबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक तोडगा काढला आहे. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ, माध्यमिक शाळा शिक्षक संघ यांच्या संयुक्त [...]
हायटेक बसस्थानकातच कचऱ्याच्या पेट्या
बसस्थानकात अस्वच्छता : प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर बेळगाव : शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी ऊपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक शहर बसस्थानक उभारण्यात आले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे बसस्थानक उभारण्यात आले असले तरी सध्या ते अस्वच्छतेच्या गर्तेत सापडल्याचे चित्र दिसत आहे. कचरा संकलन [...]
लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करा
शहापूर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांची हेस्कॉमकडे मागणी बेळगाव : वडगाव, शहापूर, येळ्ळूर शिवारांतील लेंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप आरआर क्रमांक दिलेला नाही त्यांना तो दिला जावा, अशी मागणी शहापूर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमकडे केली. लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. पावसाळ्यात वीज [...]
अखेर नागरिकांनीच खड्ड्यांमध्ये टाकला भराव
भातकांडे स्कूलसमोरील रस्त्याची दुर्दशा बेळगाव : एसपीएम रोडपासून भातकांडे स्कूलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रहिवाशांसोबत वाहनचालकही वैतागले आहेत. प्रशासनाकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण थांबविण्यात आल्याने ये-जा करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अखेर नागरिकांनीच या रस्त्यांमध्ये भराव टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून भातकांडे स्कूलसमोरील रस्त्याचे काम [...]
पाणी पुरवठ्यासंदर्भातील कामे तातडीने पूर्ण करा
खासदार जगदीश शेट्टर यांची मनपा आयुक्तांना सूचना बेळगाव : बेळगाव शहरात पाणी पुरवठ्यावरून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी एलअँडटी कडून सुरू असलेली कामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने याबाबतची विकासकामे तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना केली आहे. मंगळवारी काडा कार्यालयात [...]
भुयारी मागर् असून अडचण नसून खोळंबा
मध्यवर्ती-शहर बसस्थानकाला जाण्यासाठीचा मार्ग समस्यांच्या गर्तेत : सुविधा पुरविण्याची मागणी बेळगाव : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक व शहर बसस्थानक यांना जोडण्यासाठी निर्माण करण्यात आलेला भुयारी मार्ग विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. मार्गावर अस्वच्छता व अपुऱ्या प्रकाशामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे 200 मीटर लांबीचा हा भूमिगत मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र संबंधित [...]
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा आमचा निर्णय झाला आहे. आमचा निर्णय आम्ही हायकमांडला कळवणार आहोत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळीच रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही […]
India’s Got Latent चा दुसरा सीझन येणार, कॉमेडियन समय रैनाकडून घोषणा
कॉमेडियन समय रैना याने आपल्या लोकप्रिय यूट्यूब शो India’s Got Latent च्या दुसऱ्या सिझनची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या खास शैलीत—हास्य, मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा यांचा मिलाफ करत—त्याने ही घोषणा आपल्या नवीन स्टँड-अप स्पेशलमधून केली. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या स्टँड-अपमध्ये समयने शोच्या पुनरागमनाबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला उत्तर दिले. “India’s Got Latent परत येणार का, असा प्रश्न […]
पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यांमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागत आहे त्याच्यामुळे लोकशाहीवर हल्ला होत असून निवडणूक आयोग लोकशाहीची विटंबना करत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने आपल्या कार्यलयावर भाजपचा झेंडा फडकवावा, असा टोलाही राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला. मतदार फेरतपासणी प्रक्रियेतील घोळाची व निवडणूक अधिकाऱ्यांच्या […]
अजित पवार यांच्या अपघाती निधानानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला साद घातली आहे. अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी बारमतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
दादा शेळकेने रशियाच्या जुबेरला घुटण्यावर‘अस्मान’
ब्रम्हदेव कुस्ती संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान : फ्रान्सच्या विलियम्सचा प्रेक्षणीय विजय,मजगावच्या मल्लांनी दाखविला डंका, कार्तिक काटेची विजयाची घोडदौड कायम, बेळगाव : श्री ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना मजगाव, हनुमान जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानात नवव्या मिनिटाला भारताच्या (महाराष्ट्र)च्या दादा शेळकेने रशियाच्या जुबेरला घुटणा डावावरती चीत करुन तर फ्रान्सच्या विलियम्सने भारताच्या (सांगली) सुबोध पाटीलला खालुन सवारी घालून [...]
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून प्रमोद पालेकर संघाने बेळगाव रॉयल सीसी संघाचा 6 गड्यांनी तर युनायटेड सीसी संघाचा बीसीसी मच्छे संघाचा 3 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. वासीम मतवाले व अक्रम पिरजादे यांना सामनावीर तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मेहेर व कल्पेश संभाजी [...]
केरळमध्ये भाजपसंबंधित महिलेने मतदाराला पैसे वाटले ? पोलिसांकडून गुन्हा दाखल
केरळमधील पालक्काड मतदारसंघात मतदानाच्या आधी मतदारांना लाच दिल्याच्या आरोपावरून भाजप-नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या प्रतिनिधींविरोधात बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एफआयआरनुसार, 8 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजता एनडीएशी संबंधित काही प्रतिनिधींनी पालक्काड परिसरात घराघरांत जाऊन मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत मतांवर प्रभाव टाकण्यासाठी हा […]
मोबाईल पासवर्डवरून झालेला वाद विकोपाला गेला, मुलीसमोरच पतीने पत्नीला चाकूने भोसकले
मोबाईल पासवर्डवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिखा मिश्रा असे पीडित पत्नीचे तर दीपक मिश्रा असे आरोपी पतीचे नाव आहे. लाईव्ह हिंदुस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात राहणाऱ्या मिश्रा […]

29 C