SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
...

‘भारत टॅक्सी’ मध्ये चालकाला भागीदारी घेता येणार

चालकाला 500 रुपयांमध्ये या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ सहकारी मॉडेल सुरू केले आहे, ज्या अंतर्गत चालक फक्त 500 रुपयांमध्ये भागीदार बनू शकतात आणि नफ्यात जवळपास 80 टक्यांचा वाटा मिळवू शकतात. या योजनेत मालकी, बोर्ड प्रतिनिधित्व आणि महिला ‘सारथी दीदी’ साठी प्राधान्य असे विशेष फायदे देखील समाविष्ट आहेत. [...]

तरुण भारत 27 Feb 2026 11:23 pm

भाजपवाल्यांनी सांगावं, ते मराठीसाठी किती वेळा रस्त्यावर उतरले? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

हिमालय मोठा चालू आहे, थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच भाजपवाल्यांनी सांगावं, ते मराठीसाठी किती वेळा रस्त्यावर उतरले? असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ‘मराठीचा जागर’ हा कायक्रम आयोजित करण्यात आला होता. […]

सामना 27 Feb 2026 10:09 pm

हिंदुस्थान क्रिकेटसाठी नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या मुंबईकरांचा सन्मान; वानखेडे स्टेडियमच्या स्टँडसह गेटला देण्यात येणार नावं

हिंदुस्थान आणि मुंबई क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या माजी खेळाडूंचा सन्मान म्हणून मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमच्या एका स्टँडला हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक, मुंबईचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच गेट नंबर तीन, पाच आणि सहाला सुद्धा मुंबईच्या माजी खेळाडूंची नावं देण्यात येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची नुकतीच एक महत्तवपूर्ण मीटिंग पार […]

सामना 27 Feb 2026 9:19 pm

Beed News –महादेव मुंडे हत्याकांडाचा पर्दाफाश होणार? नार्को टेस्टचा अहवाल आज उघड होणार

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी युद्ध पातळीवर तपास सुरू आहे. हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आले आहे. एसआयटीने नुकतीच यातील संशयितांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपींग करण्यात आली होती. या दोन्हीचाही अहवाल शुक्रवारी एसआयटीच्या हाती सोपवण्यात आला. शनिवारी न्यायालयासमोर हा अहवाल उघड केला जाणार आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट […]

सामना 27 Feb 2026 8:43 pm

Beed News –वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, सुशिल कराड काय बोलणार याकडे लक्ष

संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. जामीनसाठी वाल्मीक कराड याने अनेकदा अर्ज केले. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराड कुटुंब आक्रमक झाले. समाज माध्यमावर एक सूचक संदेश पाठवत आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार […]

सामना 27 Feb 2026 8:37 pm

किचकट व्हिसा नियम आणि जाचक अटीशर्तीमुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची अमेरिकेच्या विद्यापीठांकडे पाठ

ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅडमिशन कौन्सिल (GMAC) च्या नवीन श्वेतपत्रिकेनुसार, अमेरिकन विद्यापीठांमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत किमान 45 टक्के ची मोठी घट झाली आहे. ही घट प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमधील मोठी घट आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याच्या कारणांमागे, व्हिसा आणि नोकरीतील अनिश्चितता ही महत्त्वाचे कारणे असल्याचे मानले जात आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी का अमेरिकेच्या विद्यापीठांकडे पाठ वळवली यासंदर्भातील […]

सामना 27 Feb 2026 8:27 pm

अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाक सैन्यप्रमुख मुनीरचा सल्लागार ठार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानच्या विविध सैन्य तळांवर भीषण हवाई हल्ले केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या हल्ल्याला अफगाणिस्तानने प्रतिहल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे. अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमधील सैन्य तळांना लक्ष्य केले. यात पाकिस्तानची राजधानी […]

सामना 27 Feb 2026 8:01 pm

तमिळ सुपरस्टार, टीव्हीके प्रमुख विजयच्या पत्नीने दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज

तमिळ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख विजय यांची पत्नी संगीता यांनी २४ फेब्रुवारीला चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या याचिकेत विजयवर एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि प्रकरण कुटुंब कल्याण समितीकडे पाठवले. हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या लग्नाला २७ […]

सामना 27 Feb 2026 7:55 pm

उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं

उन्हाळ्यात अन्न आणि पेये खराब होण्याची शक्यता जास्त असते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ठेवलेले दूध देखील खराब होऊ शकते. उन्हाळ्यात तुमच्याही घरातील दूध खराब होत असेल तर, काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून, ते वारंवार गरम करा. दूध खराब होण्यापासून रोखण्यासाठी, दर तीन ते चार तासांनी ते पुन्हा गरम करा. गरम […]

सामना 27 Feb 2026 7:36 pm

ज्या सरकारने मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमी दालनाला स्थगिती दिली, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? आदित्य ठाकरे यांचा टोला

गोमांसाबाबत गोवा, ईशान्य भारत आणि इतर राज्यांत भाजपची भूमिका वेगळी का असते, हे स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच ज्या सरकारने मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमी दालनाला स्थगिती दिली, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. विधीमंडळ परिसरात माध्यमांशी […]

सामना 27 Feb 2026 7:09 pm

ही हिंदुस्थानसाठी घाबरण्याची वेळ नाही तर, स्वतःला अपग्रेड करण्याची वेळ आहे; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे AI वरील भाष्य

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणाऱ्या नोकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की सेवा क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या तरी नवीन मार्ग उघडत आहेत. जगभरात सध्याच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल चर्चा घडत आहे. या चर्चेअंतर्गत एआय नोकऱ्या हिरावून घेईल का? हिंदुस्थानचे आयटी क्षेत्र धोक्यात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरबीआयचे […]

सामना 27 Feb 2026 7:01 pm

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन

भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन घेण्यात आले ;या कवी संमेलनाचे प्रमुख अतिथी एस पी कॉलेज भूम येथील प्रा . डॉ . गोविंद गरड होते .यावेळी शाळेतील चौदा विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या . कवितेचे विषय हे आई -वडील ,शेतकरी , पाळीव प्राणी असे होते .कविता हृदयाला भिडणाऱ्या होत्या . या बालकवींनी कवितेतून शाळेतील संपूर्ण वातावरण शब्दबद्ध केले होते .तसेच शेतकऱ्याला किती कष्ट सोसावे लागते . याचेही वर्णन केलेले होते . प्रमुख अतिथी यांनी आपल्या कवितेतून मुलांच्या लग्नाचा विषय अतिशय समर्पकपणे उभा केला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे सांगून संपूर्ण इतिहास सांगितला . खर्च करणार आहे ही विद्रोही कविता सादर केली . कार्यक्रमाला काकासाहेब पवार ,दयानंद पाटील , उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी , राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ ,प्रतिभा मुकटे मॅडम , सुनील जाधवर ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे ,सागर आकोस्कर ,अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार राजेंद्र गाडे यांनी मानले .

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:57 pm

संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालयचा महेश वाघमारे तालुक्यात पहिला

कळंब (प्रतिनिधी)- संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालय, ता. कळंब जि. धाराशिव या विद्यालयाने 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल 29 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांची यश महेश वाघमारे , देवयानी दत्ता पवार , अक्षरा दत्ता इके ,आर्या दिपक धावरे ,पंकजा गजेंद्र जवंजाळ , श्रेया बालाजी गुंड,श्रीलेश मधुकर बाकले ,विराज विजयकुमार मस्के ,सुहान लतीफ शेख ,समर्थ विलास डिकले ,श्रद्धा सुदर्शन कोळपे ,यशवर्धन दत्ता शेवडे ,रूही बोद्धीसत्व वाघमारे ,गायत्री संतोष पुरी ,प्रांजली नामदेव झाडे ,मयंक संजीवन सरवदे ,देव उमेश शिंदे ,ऋतुराज ज्ञानेश्वर गायकवाड ,समृद्धी शंकर डोळे ,सार्थक कल्याण कांबळे ,सौरभ समाधान कोठावळे ,अश्विन अविनाश कांबळे ,अस्मिता सतीश काळे ,संस्कृती धर्मराज काळे ,अंकिता अरुण माळी ,रुद्रप्रताप सुरेश शिंदे ,सृष्टी दत्तात्रय तनपुरे , सुबोध अश्रूबा राऊत ,सोनाक्षी दीपक धावारे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्रमुख श्री. अंगदराव चव्हाण साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. चव्हाण सर, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:53 pm

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी 40 लाखांची तरतूद तर राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यासाठी काहीच तरतूद नाही

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेचा 2026-27 चा अर्थसंकल्प लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी मांडला. या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी यांना फिरण्यास वाहने खरेदी करण्यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागेचे भाडे वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठेकेदार नेमण्यापेक्षा न. प. कर्मचाऱ्यांकडून वसुली करावी असे शिवसेनेचे नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी मांडले होते. या आर्थिक वर्षाचा 5 लाख 81 हजार 513 रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाच्या निधीची तरतूदच केली नाही हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. धाराशिव नगर परिषदेच्या सभागृहात दि.27 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सर्व नगरसेवकाच्या उपस्थितीत 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 314 कोटी 21 लाख 54 हजार 875 रुपयांचा आहे. यामध्ये महसुली जमा 58 कोटी 84 लाख रुपये ग्राह्य धरला असून खर्च 58 कोटी 80 लाख रुपयांची अपेक्षा केली आहे. तसेच भांडवली जमा रक्कम 254 कोटी 63 लाख रुपये अपेक्षित असून, खर्च 254 कोटी 34 लाख रुपयांचा ग्राह्य धरला आहे. प्रारंभी शिल्लक रक्कम 74 लाख 6 हजार रुपये तर महसुली व भांडवली अशी एकूण जमा रक्कम 313 कोटी 47 लाख 48 हजार 773 होणार आहे. मात्र, जमा रकमेपैकी 314 कोटी 15 लाख 63 हजार 362 रुपये खर्च ग्राह्य धरण्यात आले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ पवार, नाना घाडगे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इस्माईल शेख यांनी अर्थसंकल्पासंदर्भात विविध प्रश्न विचारले. घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला आठ कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र या अर्थसंकल्पात फक्त दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून पुन्हा शहर कचरामुळे व दुर्गंधीयुक्त करणार का असा प्रश्न या तरतुदीमुळे निर्माण झाला आहे. तसेच नदी संवर्धन योजनेसाठी एक रुपयाची देखील तरतूद केलेली नाही. तर रस्ता फंडसाठी देखील कुठलीही तरतूद नाही. याबरोबरच जिल्ह्याचे मुख्यालय असताना देखील शहरात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सोईसाठी अत्यावश्यक असलेल्या स्वच्छतागृहासाठी देखील एक रुपयाची तरतूद केली नाही. 2026-27 चे उत्पन्नामध्ये जाहीरात बॅनर कर निरंक दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुसता आकड्याचा खेळ अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. राजाभाऊ पवार नगरसेवक ठाकरे शिवसेना

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:53 pm

मुंबई उपनगरातील 22 ते 25 शाळांना धमकीचा ई-मेल, परिसरात घबराट

मुंबई उपनगरातील 22 हून अधिक शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच घबराट उडाली आहे. दहिसर येथील जेबीएनसी आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटने धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. सदर परिस्थिती लक्षात घेता पोलिसांच्या माध्यमातून तातडीने शाळेच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील 22 ते 25 […]

सामना 27 Feb 2026 6:41 pm

1 मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा लेडीज क्लब येथे महामेळावा

धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 मार्च 2026 रोजी लेडीज क्लब,धाराशिव येथे सकाळी 10 वाजता भव्य विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे,उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती धाराशिव यांच्या हस्ते, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा होणार आहे. विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती वंचित, दुर्बल व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे व त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अंतर्गत विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,पशुसंवर्धन कार्यालय, आरोग्य विभाग,शिक्षण विभाग, कृषी विभाग,समाजकल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग,मत्स्यव्यवसाय विभाग, आदिवासी विकास विभाग,प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच इतर संबंधित विभागांमार्फत विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.या महामेळाव्यात विविध कायदेविषयक अधिकार व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरणही करण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती.अभिश्री देव व सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भाग्यश्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू व्यक्तींनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधीसेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:33 pm

अवैध प्रवासी वाहतूक रोखा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला निर्देश

मुंबई (प्रतिनिधी)-राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे.परवाना,फिटनेस प्रमाणपत्र,विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत.अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणावेत त्यासाठी 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले. ते या अनुषंगाने विधानभवनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे या प्रकारांमुळे अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता अधिक असते.अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळवणे कठीण होते.अनेक वेळा वाहनमालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात,ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो. तसेच अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठे नुकसान सहन करावे लागते. नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचे ओझे येते. दरकपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात. एसटी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासीसंख्या घटल्याने नियोजित मार्ग व वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही मुद्दा आहे.अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लुटमार किंवा इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकते.प्रवाशांची नोंद किंवा तपशील उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकार धोकादायक आहे.वेगमर्यादा भंग, बेदरकार वाहनचालकता आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघात, वाहतूक कोंडी व प्रदूषणात वाढ होते.या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागाने कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणे,तसेच प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणे,ही काळाची गरज आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई आणि जनसहभाग या दोनच मार्गांनी सुरक्षित,पारदर्शक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते,असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:33 pm

6 मार्च रोजी पंचायत समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित पंचायत समिती सभागृहात दिनांक 6 मार्च रोजी दुपारी 02.00 वाजता होणार आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे; दुपारी 2.00 वाजता सभेस सुरुवात करणे. सभा खालीलप्रमाणे पार पडणार आहे.दुपारी 2.00 ते 2.15 वाजेपर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी; दुपारी 2.15 वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; दुपारी 2.15 ते 2.30 वाजता उमेदवारी परत घेणे; दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे; दुपारी 2.40 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; तसेच दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास प्रथम पंचायत समिती सभापती पदासाठी व नंतर उपसभापती पदासाठी मतदान घेऊन निवडणुकीचा निकाल जाहीर करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार प्रथम पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असून,त्यानंतर लगेच त्याच पद्धतीचा अवलंब करून पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:32 pm

13 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2 वाजता सभेस सुरुवात करणे,ही सभा खालीलप्रमाणे पार पडेल, दुपारी 2 ते 2.15 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी,नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी 2.15 वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.15 ते 2.30 वाजता उमेदवारी परत घेणे,दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे, दुपारी 2.40 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. यानुसार प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 6:32 pm

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात प्रवीण भोसलेंचे पालकमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी संदर्भात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी मुंबई येथील शासकीय निवास्थान सुवर्णगढ येथे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने जमिनीचा प्रश्न निकाली काढा [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:24 pm

जि.प अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवड 16 मार्चला

तर पंचायत समिती सभापती ,उपसभापती निवड 9 रोजी सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जि.प. व [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:07 pm

गेली १६ वर्षे चाललेल्या पर्यावरण चळवळीचे हे मोठं यश

डॉ . जयेंद्र परुळेकर , संदीप सावंत यांची प्रतिक्रिया ; सावंतवाडी , दोडामार्गातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह यादीत सावंतवाडी । प्रतिनिधी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी , दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत.त्यामुळे गेली सोळा वर्षे चाललेल्या पर्यावरण चळवळीचे हे मोठं यश आहे. न्यायालयात लढा दिलेल्या वनशक्ती फाउंडेशन या संस्थेचे [...]

तरुण भारत 27 Feb 2026 5:36 pm

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर

मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी, ‘मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीतच बोलले पाहिजे, मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे.’ या कविवर्य अशोक नायगावकर यांच्या कळकळीच्या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दुजोरा दिला. […]

सामना 27 Feb 2026 5:15 pm

एनव्हीपी शुगरच्या व्दितीय गळीत हंगामाची सांगता; 1 लाख 18 हजार मे.टन यशस्वी गाळप

धाराशिव (प्रतिनिधी)- जागजी (ता.धाराशिव) शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या गुळ पावडर कारखान्याच्या व्दितीय गळीत हंगामाची शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सांगता झाली. या हंगामात अवघ्या 119 दिवसांत तब्बल 1 लाख 18 हजार मे.टन ऊस यशस्वीरीत्या गाळप केले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक श्री.आप्पासाहेब पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. सन 2025-26 च्या व्दितीय गळीत हंगामात एनव्हीपी शुगरला कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑक्टोंबर महिन्यात संत-महंतांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. तरीही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे अवघ्या 119 दिवसांत गळीत हंगामात 1 लाख 18 हजार मे.टन गाळप यशस्वीपणे पूर्ण करणे शक्य झाले. तसेच चाचणी हंगामापासून शेतकर्‍यांनी गाळपासाठी ऊस दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत म्हणजेच दर महिन्याच्या 1 व 16 तारीखेस संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे. याप्रसंगी जागजी येथील प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मिल फोरमन प्रवीण पाटील, विजय वाघे, अमर पुंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, परचेस अधिकारी रविकांत जोगदंड, इ.इंजिनिअर प्रविण यादव, अजय गाडे, लेबर ऑफिसर शुभम सावंत, हार्वेस्टर मालक हेमंत देशमुख, वाहतूक ठेकेदार पद्माकर शिंदे, किरण कुर्‍हाडे, नवनाथ तोंडे, रामभाऊ मिसाळ, शिवाजी सुरवसे, शेतकी विभागाचे राजाभाऊ केवळराम, संभाजी चोरमले, अक्षय माने, बालाजी गुळवे, तसेच सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सन्मान व्दितीय गळीत हंगामात ऊस तोडणी-वाहतूक केलल्या तोडणी वाहतूक ठेकेदारांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम श्री.रोहिदास अप्पाराव पवार, (2172 मे.टन), द्वितीय श्री.अविनाश मनोहर भोरे (1790 मे.टन), तृतीय श्री.भजनदास लाला जमाले (1766 मे टन), तसेच हार्वेस्टर मागील वाहनांमध्ये प्रथम श्री.शरद शहाजी काटे (1395 मे टन), द्वितीय श्री. ज्ञानेश्वर बालाजी नवले (1302 मे टन), तृतीय श्री.किरण राजेंद्र इंगळे (1183 मे टन) या सर्व वाहतूक ठेकेदारांचा सत्कार करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मानले आभार एनव्हीपी शुगरचा व्दितीय गळीत हंगाम यशस्वी करण्यात मोठा वाटा असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांबरोबरच उन्हात, पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीत कष्टकरी ऊसतोड कामगारांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हा हंगाम यशस्वी झाला. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्‍या प्रत्येक खातेप्रमुख, कर्मचारी, शेतकरी बांधवांचे त्यांनी गळीत हंगाम सांगताप्रसंगी कारखान्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:08 pm

राणी ताराराजा शाळेत व बसस्थानकात मराठी दीन साजरा

भूम (प्रतिनिधी)- शहरातील राणी ताराराजा शाळेत व बसस्थानकात मराठी दीन साजरा करण्यात आला. दरम्यान राणी ताराराजा शाळेत वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमांचे अध्यक्ष संतोष वीर,जीवनराव गोरे व शाळा वायवस्थापन समिती अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक उषाताई विरधे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक शीतल राऊत यांनी केले. व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात माझा मना मधी शिवबा च नाव र ,मराठी गौरव गीत याने करण्यात आली दरम्यान एकविरा आई तू डोंगरा वरी या गाण्यावर वैष्णी महामुनी,स्वरा गवळी,वैष्णवी माळी,ईश्वरी भोसले,प्रांजली शेटे, प्रांजल खेत्रे,अहिल्या गोरे,आरोही साठे व समीक्षा जाधव यांनी एकत्रित नृत्य सादर केले. या नृत्याने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदरील कार्यक्रमाचे आभार परमेश्वर धुमाळे यांनी मानले. यानंतर शहरातील बसस्थानकात ही मराठी दिना निमित्त स्थानकातील प्रवासी बांधवांना फुल व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी आगार प्रमुख उल्हास शिनगारे,वाहतूक , वाहतूक निरीक्षक नागेश गायकवाड, रोहित बागडे,मुकेश भगत यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:08 pm

 सावंतवाडी नगरपरिषदेचा १४९.९९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

८० कोटींच्या भुयारी गटर योजनेची घोषणा, सभागृहात खडाजंगी सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा बहुचर्चित अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात सादर करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्षअनिल निरवडेकरयांनी अर्थसंकल्प मांडताना “नागरिकांवर कोणताही नव्या करांचा बोजा न टाकता विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे ठामपणे सांगितले. तब्बल आठ वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत अर्थसंकल्प सादर झाल्याने या [...]

तरुण भारत 27 Feb 2026 5:06 pm

महावितरणाच्या स्मार्ट मीटरचा ‌‘शॉक‌’; बँकांसह शासकीय कार्यालये आणि परीक्षेच्या काळात कळंबमध्ये तब्बल 200 घरांची वीज खंडित!

कळंब (प्रतिनिधी)- दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचा ताण असतानाच कळंब शहरात महावितरणाच्या स्मार्ट मीटर प्रणालीने अक्षरशः ‌‘शॉक‌’ दिला आहे. शहरातील विविध भागांत मंगळवारपासून जवळपास 200 हून अधिक घरांचा वीजपुरवठा अचानक खंडित करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विशेष म्हणजे काही बँका व शासकीय कार्यालयांचाही वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. स्मार्ट मीटर प्रणालीमुळे थकबाकीदार ग्राहकांची वीज ऑनलाइन पद्धतीने तत्काळ खंडित केली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात बिल भरूनही वीज तोडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ‌‘स्मार्ट‌’ प्रणाली की ‌‘त्रासदायक‌’ प्रणाली? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. परीक्षेच्या ऐन काळात वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. “माझे दहावीचे पेपर सुरू आहेत. आधीच अभ्यासाचा ताण आहे. त्यात रात्री वीज नसल्याने अभ्यास कसा करायचा?” असा सवाल एका विद्यार्थ्याने केला. तर एका बारावीच्या विद्यार्थ्याने, “शेवटचे पेपर बाकी असताना घरची वीज तोडली. निकालावर परिणाम झाला तर जबाबदार कोण?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, थकीत बिलांमुळे ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात असल्याचे सांगण्यात आले. पूर्ण बिल भरल्यानंतर वीज तत्काळ सुरू केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र बिल भरल्यानंतरही दोन-दोन दिवस अंधारात राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. संतप्त ग्राहकाचा आरोप “मी 14 जानेवारीला महावितरणाकडे चेकद्वारे पैसे जमा केले होते. तरीही खात्याची पडताळणी न करता माझा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दोन दिवस कुटुंबासह अंधारात राहावे लागले. ही कोणती स्मार्ट व्यवस्था?” एक संतप्त ग्राहक दरम्यान, नागरिकांनी महावितरणने मानवी दृष्टीकोन ठेवून किमान परीक्षेच्या कालावधीत वीज खंडित करू नये, तसेच बिल भरल्यानंतर तात्काळ प्रणाली अपडेट होईल याची खात्री करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात येत आहे. स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे कळंबमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता महावितरण या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:06 pm

कळंब नगर परिषदेचा 72 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; विकासाच्या गप्पा की प्रत्यक्ष कामांचा आराखडा?

कळंब (प्रतिनिधी)- आगामी आर्थिक वर्ष 2026-2027 साठी सादर करण्यात आलेल्या 72 कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पास कळंब नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या बैठकीत कोणताही विरोध नोंदविला गेला नाही. मात्र शहरातील रखडलेली कामे, प्रलंबित प्रश्न आणि अपूर्ण सुविधा पाहता हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती प्रभावी ठरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर परिषद सभागृहात प्रशासनाकडून उत्पन्न-खर्चाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात पाणीपुरवठा, सांडपाणी व गटार व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छता व आरोग्य सेवा, विद्युत सुविधा, सार्वजनिक मालमत्तेची देखभाल तसेच विविध सामाजिक योजनांसाठी तरतुदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी किती कामे पूर्ण झाली, याचा स्पष्ट हिशोब सभागृहात मांडला गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष लखनजी गायकवाड, मुख्याधिकारी मंजुषा गुरमे, शिवसेना गटनेते अतुलजी कवडे, विरोधी पक्ष गटनेते संजयजी मुंदडा यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षा कापसे यांनी “72 कोटींचा अर्थसंकल्प शहराच्या विकासाचा दिशादर्शक ठरेल. नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत सर्व कामे पारदर्शक व वेळेत पूर्ण केली जातील,” अशी ग्वाही दिली. तर मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि आर्थिक नियमांचे पालन करून विकासकामांची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतेचे प्रश्न आणि अर्धवट प्रकल्प पाहता नागरिकांचा प्रश्न एकच “दरवर्षी कोट्यवधींचे अर्थसंकल्प मंजूर होतात; पण बदल नेमका कुठे दिसतो?” 72 कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी मिळाल्याने कागदोपत्री विकासाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी प्रत्यक्षात कामे वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली तरच या अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थाने यश मिळेल. अन्यथा हा केवळ आकड्यांचा खेळ ठरू नये, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:05 pm

कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, 45 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा

परंडा (प्रतिनिधी)- लोहारा जि.धाराशिव येथून अल्पवयीन मुलगी गेली 45 दिवसांपासून बेपत्ता आहे जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून तात्काळ मुलीचा शोध घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या ठिकाणी राहणारे गोसावी समाजाचे बाबू जाधव हे,उदरनिर्वाहासाठी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात होते,फिरस्ती विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आहे,लोहारा शहरात छोटीशी झोपडी घालून शहरांमध्ये फिरस्ती अत्तर विकून आपला उदरनिर्वाह करतात.आपल्या घरी दोन मुले आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे,ते भटक्या समाजाचे असून उदरनिर्वाहासाठी सगळीकडे फिरून अत्तर विकावे लागते दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठी मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर गेली.मात्र ती दिवसभर घरी परतली नाही.आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला,नातेवाईकांशी संपर्क साधला तरीही तिचा पत्ता लागला नाही.अखेर लोहारा पोलीस ठाण्यात आई वडीलांनी तक्रार दाखल केली.संबंधित किराणा दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार,मुलीने त्यांचा फोन वापरून एका मुलाशी संपर्क साधला आणि तो मुलगा तिला तेथून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सदर मुलगी 12वर्षे9महिने वयाची असून अल्पवयीन आहे.त्यामुळे संबंधित मुलाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी,अशी मागणी ॲड.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी च्या शिष्टमंडळाने केली.मुलीचा शोध लागला नाही तर धाराशिव येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राज्य प्रवक्ते ॲड.नगरसेवक अरुण जाधव यांनी दिला. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे,धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,युवकाध्यक्ष शितल चव्हाण,जिल्हा महासचिव नसीर शेख,जिल्हा उपाध्यक्ष महादेव एडके,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंदुरकर,विधी सल्लागार ॲड.के.टी. गायकवाड,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे,जिल्हा संघटक कश्यप बनसोडे,युवक सदस्य जीवन कदम,मिलिंद रोकडे, मच्छिंद्र जाधव,अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे,विद्यार्थी संघटना राज्यपूर्वक्ता रविराज पोटे,यशवंत इंगळे,हनुमंत जाधव तसेच धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:05 pm

विशेष ग्रंथ प्रदर्शन भरवून “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‌‘कुसुमाग्रज‌’ यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा ‌‘मराठी भाषा गौरव दिन‌’ म्हणून आज उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग,जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड यांच्या “मुलांना वाचतं लिहितं करताना” आणि कवयित्री भाग्यश्री देवकते यांच्या “शब्दप्रभा” या कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिसंवादाचेही आयोजन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे,सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे,युवराज नळे,जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड,कवयित्री सुनिता गुंजाळ, भाग्यश्री देवकते,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे,पत्रकार अनिल आगलावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा समिती सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:03 pm

प्रसिद्ध लेखक, चारोळीकार चंद्रशेखर गोखले व प्रसिद्ध अभिनेत्री ,गायिका उमा गोखले ही जोडी धाराशिवमध्ये

धाराशिव (प्रतिनिधी)- 1 मार्च 2026 रविवार रोजी धाराशिव येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळ जे सातत्याने साहित्य चळवळ चालवत आहे . या मंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा साहित्य संमेलन आयोजित केले जाते. वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळ महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीचे संमेलन देखील मोठ्या थाटात होणार आहे. यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक चारोळीकर चंद्रशेखर गोखले व त्यांच्या अभिनेत्री ,गायिका पत्नी उमा गोखले प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहेत. तसेच अपूर्वाई प्रकाशनचे प्रकाशक, जेष्ठ पत्रकार, लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर हे देखील उपस्थित असणार आहेत. शहरातील बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अक्षरवेलच्या 40 कवित्रींच्या फुलांची नावे असलेल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. धाराशिव मधील नागरिकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी चंगोच्या खुमासदार चारोळ्या आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे. अशी विनंती नगरवासीयांना अक्षरवेल महिला साहित्य मंडळांनी केली आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:02 pm

मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीस 4 वर्षे सक्त मजुरी

धाराशिव (प्रतिनिधी)- मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपी महेश महादेव कदम यास 4 वर्षे 1 महिना व 2 हजार 500 रूपये दंडाची शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावली आहे. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी सक्षमपणे बाजू मांडली. गुन्ह्याची थोडक्यात हकीगत अशी की, कळंब तालुक्यातील एका गावात दि. 25 एप्रिल 2023 रोजी शाळेला सुट्टी असल्याने पिडिता ही घरी होती. त्यादिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पिडितेच्या आईने प्रमोद पवार यांच्या किराणा दुकानातून साखर आणण्यासाठी पाठविल्याने पिडिता साखर घेवून घरी परत येत असताना लोमटे यांच्या घरासमोर त्यांच्या घरात राहणारा आरोपी महेश महादेव कदम याने पिडितीस रस्त्यामध्ये अडविले व पिडितेचा हात पकडून म्हणाला की, तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत बोल, तेव्हा पिडितेने त्यास विरोध करून तु मला बोलू नकोस, मी माझ्या आई-वडिलांना तुझे नाव सांगेन. तेव्हा आरोपी महेश ने पिडितेस धमकी दिली की तु कोणाला काही सांगितलेस तर तुला, तुझ्या आई-वडिलांना व भावाला मारेन. तेव्हा पिडिता घाबरून घरी निघून गेली. या घटनेपूर्वीही मागील एक महिन्यापासून आरोपी हा पिडिता शाळेमध्ये जाता-येताना पिडितेच्या पाठीमागे फिरत असे व पिडितेकडे पाहून तिला त्रास देत असे. हा सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना पिडितेने सांगितल्यानंतर आरोपीस जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना मारहाण केली. त्यावरून शिराढोण पोलिस स्टेशन येथे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास सपोनि नेहरकर व पुजारवाढ यांनी केला. व दोषारोपत्र कळंब जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडितेची साक्ष व इतर साक्षीदारांचे साक्षी पुरावे महत्वपूर्ण ठरले. या प्रकरणी कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपीस 4 वर्षे 1 महिना व 2 हजार 500 रूपये दंडाची शिक्षा 27 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:01 pm

डोकेवाडी गावातील सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप

भुम (प्रतिनिधी)- गावातील तरुण मंडळी एकत्र आल्यावर कोणतेही काम करु शकतात.शासनाच्या निधीतून अनेक काम होतात परंतु लोकसहभागातून हे सर्वात मोठं काम झाले आहे. यांच उदाहरण भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात पाहवयास मिळालं आहे. या गावातील मागील दोन वर्षापासून सुशिक्षित , असे पंधरा नवंयुवक मंडळ एकत्र आले त्यांनी एक कमिठी स्थापन केली. या कलयुगात देखील तरुणांनी भक्ती मार्ग स्वीकारत गावातील अखंड हरिनाम सप्ताह ची सर्व सूत्रे हाती घेतले. दोन वर्षात अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून सर्व गावकरी मंडळ नोकरदार ,व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांना विश्वासात घेऊन लोक सहभाग जमा केला. त्या जमा झालेल्या लोकसभागातून गावचा दोन वर्ष अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न झाला. मागील 55 वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. परंतु कोणत्याही प्रकारची नवीन घडामोड होत नव्हती म्हणून तरुण एकत्र आले व लोकसभागातून झाली नसल्याने तरुणांनी एकत्र येऊन गावांमध्ये खुले भव्य असे लोकसभागातून सभागृह उभारली आहे. या सभागृहामध्ये गावातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या धार्मिक कार्यासाठी विवाहासाठी उपयोगात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये एक उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. असे तरुण एकत्र आले तर नक्कीच गावच्या विकासामध्ये भर टाकू शकतात अशीही चर्चा सर्वत्र आहे.शिल्लक रक्कम जिल्हा परिषद शाळेतील बहुतेक सुविधा साठी खर्च करावा ही मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. डोकेवाडी च्या तरुणाचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घ्यावा गावाच्या विकास कार्यात सहभागी व्हावे सन - 2024-2025 देणगी जमा 1008606-/ खर्च 686784 शिल्लक 3,21,822-/, सन 2025-2026 देणगी जमा 99,6685-/ खर्च 11,35469-/ एकूण शिल्लक 190,000-/ पुढील विकास कामासाठी नुतन कमिठीकडे जमा करण्यात आली. “गावातील आम्ही सुशिक्षित तरुण मंडळी एकत्र येऊन गावचा सप्ताह हाती घेतला आणि दोन वर्षात लोक सहभागातून भव्य खुले सभामंडप उभारण्यात आले.यासाठी सर्व गावकऱ्यांचे नौकरदार, व्यापार, शेतकरी, शेतमजूर सर्वांचे सहकार्य लाभले आहे“. - महावीर जालन - (सप्ताह कमिठी सदस्य) “ लोकसभागातून उभारण्यात आलेल्या खुल्या सभामंडपामध्ये पहिला मान मला मिळाला असून माझ्या मुलीचा विवाह गुरुवारी (ता.26) रोजी संपन्न झाला. यामुळे माझा कलामंडपसाठी लागणारा खर्च वाचला असून माझा आर्थिक नुकसान टळले आहे.या तरुण सप्ताह कमिटीने अत्यंत चांगले काम केले आहे“ - नारायण आहेर ग्रामस्थ , डोकेवाडी.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:01 pm

स्कूल बसच्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू

भूम (प्रतिनिधी)- भूम ते परांडा रोडवर स्कुल बस व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका 13 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती कळताच भूम पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी ती स्कुल बस ताब्यात घेतली असून चालकालाही ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये राजू अनिल लोखंडे या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, भूम शहरातील बाणगंगा हायस्कुल येथील स्कुल बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी सोडण्यासाठी शहरातील परंडा रोडने निघाली होती. ही स्कूल बस शहरातील परंडा रोड लगत असणाऱ्या बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पेट्रोल पंपा नजीक आली होती. त्यावेळी त्या गाडीसमोर राजू अनिल लोखंडे व त्याचा मित्र ध्रुव भारत चाकवते हे एम एच 25 ए टी 0713 या क्रमांकाच्या दुचाकीवरून पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी जात होते. पेट्रोल पंपाकडे जाण्याच्या 50 फूट अलीकडे या स्कूल बसने या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी व त्यावरील दोन्ही मुले खाली पडली. यामध्ये राजू अनिल लोखंडे यांच्या डोक्यावरून गाडीचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला. तर ध्रुव भारत चाकवते हा किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर स्कूलबसचा चालक दत्ता जालिंदर देवकते यास भूम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवकते हा चालवत असलेली गाडी नवी कोरी आहे. त्या गाडीची अद्याप पर्यंत पासिंग देखील झालेली नाही.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:00 pm

मराठी भाषा केवळ भाषा नसून ती अस्मितेचे प्रतीक आहे- डॉ. शिवाजीराव देशमुख

तुळजापूर (प्रतिनिधी)- जगात विविध देश आहेत, विविध देशातील लोकांच्या वेगवेगळ्या मातृभाषा आहेत. पण आपली मातृभाषा कोणती, तिचे महत्त्व काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. हा दिवस कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आज मराठी भाषा मोठी आहे, ती केवळ एक भाषा नाही; ती आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन सोलापूर येथील ज्येष्ठ व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख पुढे म्हणाले की, साहित्य, नाटक, कादंबरी, कविता, लोकसाहित्य या सर्व क्षेत्रांत मराठीचे मोठे योगदान आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बापूराव पवार यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवहार विभुते तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी जगताप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे, डॉ. निपाणीकर, प्रा. वनिता बाबर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी इत्यादींची सहकार्य लाभले, या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. जीवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 5:00 pm

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आमदार प्रा. डॉ. सावंत यांच्या मागणीवरून 40 नव्या बसेस

परंडा (प्रतिनिधी)- भूम-परंडा-वाशी मतदार संघातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मतदार संघासाठी तब्बल 40 नव्या कोऱ्या एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांपासून शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत वाढती प्रवासी संख्या, जुन्या बसेसची समस्या आणि अपुरी फेऱ्या यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार सावंत यांनी राज्य परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने 40 नवीन बसेस मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बसेसमुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे. तसेच शाळामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत प्रवास करता येणार असून स्थानिक व्यापार व दळणवळणालाही चालना मिळेल. नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत. लवकरच या बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 4:59 pm

पारगाव येथे सात मार्चला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारगाव मंडळातील पारगाव, जानकापूर, हातोला, जेबा, पांगरी, ब्रह्मगाव, पिंपळगाव(क), लोणखस, दहिफळ, शेलगाव, लाखनगाव, विजोरा, घाटपिंपरी, जवळका, शेंडी या गावच्या सर्व नागरिकांना वाशी तहसीलदार यांचे वतीने आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे .महाराष्ट्र शासनाने याबाबत अभियानातील शासकीय सेवा व लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने पारगाव येथे शनिवार दिनांक सात मार्च 2026 रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे ,सातबारा वरील किरकोळ दुरुस्ती,सर्व प्रमाणपत्र वाटप,अकृषिक तरतुदी संबंधित मार्गदर्शन,सामाजिक सहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारणे व लाभ मंजूर करणे, ॲग्री स्टॅक नोंदणी ,प्रलंबित इकेवायसी पूर्ण करणे, पुरवठा विषयक सेवा शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे ,दुय्यम शिधापत्रिका नवीन शिधापत्रिका इत्यादी महसुली व पुरवठा विषयी मार्गदर्शन, जिवंत सातबारा मोहीम, मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद रस्त्याविषयी मार्गदर्शन याबाबत पारगाव मंडळातील सर्व गावातील नागरिकांनी सदरील शिबिरात सहभागी व्हावे व योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मंडळ अधिकारी पारगाव किंवा संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाशी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 4:59 pm

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

धाराशिव (प्रतिनिधी)- सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, प्रती गुंठा 7 ते 10 हजार रुपये मावेजा देण्याचे जाहीर केले आहे. हा मावेजा अतिशय तुटपुंजा व अत्यल्प असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. समृद्धी महामार्गासाठी जो दर दिला होता तोच दर या शेतकऱ्यांना देण्यात यावा. विशेष म्हणजे एका जिल्ह्यात अशा पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. विशेष म्हणजे बागायती जमिनी असताना त्या चक्क जिरायती दाखविलेल्या आहेत. तसेच फळे असलेल्या वृक्षाचे रूपांतर रोपांमध्ये दाखवून त्याची किंमत शून्य करण्याचा पराक्रम महसूल विभागाने केला आहे. त्यामुळे सुरत-चेन्नई ग्रान फिल्ड महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करून योग्य भूसंपादित होणाऱ्या जमिनीस योग्य दर देण्यासह शेतकऱ्यावरील अन्याय दूर करावा. अन्यथा हा मार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा परंडा तालुक्यातील शिरसाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच त्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नव्हे तर त्या सातबारा वरून शेतकरीच कोरा करण्याचे धोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ठिय्या देत धरणे आंदोलन केले. यावेळी तानाजी चोबे, विकास चोबे, ऍड. गोविंद कोठुळे, सोमनाथ कापसे, हरिश्चंद्र बारस्कर, दादा आवळे, ज्ञानेश्वर कोठुळे, हैदर शेख, विश्वास चोबे, अमन खान, नितीन नायकोडे, रणजीत लांडगे, विकास जगदाळे, शहाजी नायकोडे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 27 Feb 2026 4:58 pm

कोलगावात ”मराठी भाषा गौरव दिन”उत्साहात

कोकण मराठी साहित्य परिषद आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुलचे आयोजन सावंतवाडी : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल आयोजित ”मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात कोलगाव येथे संपन्न झाला. या निमित्ताने ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुकल्यांच्या वेशभूषा धारण करत महाराष्ट्रातील संत परंपरेचा जागर केला.कोमसापचे [...]

तरुण भारत 27 Feb 2026 4:49 pm

Solapur News |सोलापूरमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले

सोलापूर कृषी बाजार समितीत भाव खाली सोलापूर | बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. काद्याला शंभर ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीचा खर्चही निघेनासा [...]

तरुण भारत 27 Feb 2026 4:13 pm

वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

आचरा प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पुढीलप्रमाणे विषयवार घेण्यात येणार आहेत, स्पर्धा पुढील प्रमाणे गट क्रमांक १ इ. १ [...]

तरुण भारत 27 Feb 2026 4:13 pm

झारापला शिवरायांच्या पुतळ्या नजीकच नवीन पुतळा उभारला

अ. भा.मराठा महासंघाचे कार्यकर्ते, शिवप्रेमी आक्रमक; 2 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा. कुडाळ – मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराप – जांभळं येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या पुतळ्या नजीक शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अज्ञातांनी शिवाजी महाराजांचा बेकायदेशीर नवीन पुतळा उभारल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी आक्रमक झाले.त्यांनी यासंदर्भात बैठक घेत आपल्या संतप्त भावना आणि खेद [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:59 pm

Ajit Pawar |रोहित पवार यांचा बारामती ठाण्यावर मोर्चा;

बारामतीत रोहित व युगेंद्र पवारांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला पुणे -महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू प्रकरणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी बारामती शहर पोलीस ठाण्यात धडक देत, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. सुमारे [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:58 pm

वाढत्या महागाईचा पर्यटनाला फटका, हिंदुस्थानच्या पर्यटकांची परदेश दौऱ्याला पसंती

गेल्या काही वर्षांपासून परदेशी दौऱ्याचे प्रमाण वाढत आहे. हिंदुस्थानी पर्यटक परदेशात फिरण्याला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. आकडेवारीनुसार, 2025 च्या तुलनेत पर्यटनामध्ये 6.6 टक्क्यांनी वाढ होऊन 3.3 कोटी पर्यटकांनी परदेश दौरा केल्याची माहिती आहे. दरम्यान, सौदी अरेबिया, अमेरिका आणि कॅनडा या देशांत जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी कॅनडाला जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांची संख्याही […]

सामना 27 Feb 2026 3:37 pm

…तर भविष्यात मराठी भाषा गौरव दिन काय साजरा करणार…? सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या पाच विभागात मिळून तब्बल 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत, अशी कबुली खुद्द सरकारनेच लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली. शासनाने 2025मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून 70 गावांत ना शाळा, ना पेन्सिल अशी परिस्थिती आहे. आज जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा होत […]

सामना 27 Feb 2026 3:31 pm

पाळे-शिरदोण ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

भू- रुपांतरण प्रक्रिया निलंबित, सातव्या दिवशी आंदोलन मागे : आंदोलनात सहभागींचे विरेश बोरकर यांनी मानले आभार पणजी : सांतआंद्रे मतदारसंघात 39 (अ) अंतर्गत करण्यात आलेली भू-रुपांतरण प्रक्रिया निलंबित करण्यात आली असल्याचे कायदेशीर पत्र जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आंदोलकांना दिले आहे. या पत्रावर मुख्य नगरनियोजक वर्तिका डागूर यांची सही आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पाळे-शिरदोण ग्रामस्थांनी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:30 pm

आमदार विरेश बोरकर यांच्यासह आंदोलकांविरोधात गुन्हा नोंद

‘टीसीपी’ मधीलदहाफाईल्सगायबप्रकरण: कलम39 (अ) रद्दकरण्यासाठीकेलेल्याआंदोलनावरकारवाई पणजी : नगर नियोजन कार्यालयात घुसून कलम 39 (अ) रद्द करण्यासाठी आंदोलनकेल्याप्रकरणी तसेच कार्यालयातील महत्त्वाच्या दहा फाईल्स गहाळ झाल्याचा खळबळजनक आरोप करून टीसीपी विभाग पणजीचे विनोद कुमार चंद्रा यांनी आमरण उपोषणाला बसलेले सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांच्यासह पाळे-शिरदोणच्या स्थानिक आंदोलकांविऊद्ध तक्रार दाखल केली आहे. पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:26 pm

पिण्याचे पाणी पुरवठ्यास प्राध्यान्य द्या

जिल्हापंचायतसीईओराहुलशिंदे: जिल्हाजल-स्वच्छतामिशनसमितीचीबैठक बेळगाव : उन्हाळी हंगामात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सर्व गावांना समर्पक व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. ग्राम पंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निरीक्षण करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची नियुक्ती करावी. संबंधित अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक ग्राम पंचायत कार्यालयांच्या फलकांवर किंवा भिंतींवर स्पष्टपणे लिहिण्यात यावेत. अधिकारी व अभियंत्यांनी ग्रामीण [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:17 pm

हॉस्पिटल्स-हॉटेल्सकडून कचरा शुल्क, दंड वसूल

विजया-कसबेकरमेटगूडहॉस्पिटल, आदर्शपॅलेसहॉटेलवरकारवाई: विनापरवानाव्यवसायकरणाऱ्यांचेहीधाबेदणाणले बेळगाव : अयोध्यानगर येथील विजया हॉस्पिटल,शिवाजीनगर येथील कसबेकर मेटगूड या दवाखान्यांकडून घनकचरा व्यवस्थापन शुल्क आणि दंड असे एकूण प्रत्येकी 36 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. कॉलेज रोडवरील आदर्श पॅलेसकडून कचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून 27 हजार रुपये वसूल करण्यासह 2028 पर्यंत त्यांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच व्यापार परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:16 pm

बावळाट आणि सातुळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील एस. जी फाउंडेशनचा उपक्रम ओटवणे प्रतिनिधी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील एस जी फाउंडेशनच्यावतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील १०० हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एस जी फाउंडेशनचे आभार मानले.यावेळी एस जी फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर गावकर, फाउंडेशनचे संस्थापक संदेश [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:15 pm

दागिने लांबवणाऱ्या मन्नापूरच्या युवकाला अटक

गोकाकपोलिसांकडूनकारवाई: 1 लाख20 हजाररुपयांचेदागिनेजप्त बेळगाव : मोटारसायकलच्या टँककव्हरमध्ये ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून गोकाक शहर पोलिसांनी मन्नापूर, ता. मुडलगी येथील एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वेंकटराव मुराऱ्याप्पा देसाई (वय 35) राहणार मन्नापूर, [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:14 pm

अपघात रोखण्यासाठी उपक्रमांबाबत चर्चा

मंत्रीसतीशजारकीहोळीयांच्याउपस्थितीतवायव्यकर्नाटकरस्तेपरिवहनतर्फेबैठक बेळगाव : सार्वजनिक बांधकामंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 25 रोजी झालेल्या वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीला वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेचे उपाध्यक्ष सुनील हलुमण्णावर, व्यवस्थापकीय संचालक प्रियांका एम., मुख्य अभियंता शिवानंद नायक, तसेच संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रस्ते सुरक्षासंबंधी उपक्रम हाती घेण्यात [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:12 pm

बेळगाव जिल्ह्यात पहिल्या इलेक्ट्रिक व्हील लोडरचे वितरण

लिगाँग इंडिया प्रा. लि.कडून निर्मिती : गोकुळ पॉवर सर्व्हिसेस अधिकृत वितरक बेळगाव : लिगाँग इंडिया प्रा. लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अवजड यंत्रसामग्रीसाठी विश्वासार्ह ब्रँड आहे. लिगाँग कंपनीचे उत्तर कर्नाटकातील गोकुळ पॉवर सर्व्हिसेस हे अधिकृत डीलर आहेत. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासोबत इंधनाची बचत करणाऱ्या लिगाँग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इलेक्ट्रीक व्हील लोडर बनविला आहे. खडी मशीन, खाणकामासाठी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:08 pm

तरुणांचे मानसिक आरोग्य धोक्यात; जागतिक क्रमवारीत हिंदुस्थान 60व्या स्थानी

देशाकरता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘ग्लोबल माइंड हेल्थ 2025’ या आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, तरुणांमध्ये (18 ते 34 वयोगट) मानसिक आरोग्याबाबतीत हिंदुस्थान जगात 60 व्या क्रमांकावर पोहचला आहे. या अहवालात जगभरातील 84 देशांचा अभ्यास करण्यात आला असून, हिंदुस्थानातील तरुणांचा ‘माइंड हेल्थ कोशंट’ (MHQ) केवळ 33 इतका नोंदवण्यात आला आहे. या अभ्यासाअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट उघड […]

सामना 27 Feb 2026 3:07 pm

नशामुक्त, अवयवदान जागरुकतेसाठी उद्या वॉकेथॉन

डॉ. रविपाटील, लक्ष्मणअरनरीयांचीपत्रकारपरिषद: जिल्हाक्रीडांगण-सरदार्समैदानापर्यंतआयोजन बेळगाव : आजकाल व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुण पिढी व्यसनाला ग्रासली असून यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिक कृतीची गरज ओळखून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने नशामुक्त भारत अभियान सुरू केले आहे. त्यानुसार ‘स्वस्थ भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत नशामुक्त भारत व नशामुक्त कर्नाटक करण्याच्या उद्देशाने शनिवार दि. [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:05 pm

काँग्रेस रोड की कचरा डेपो?

बेळगाव : स्वच्छ व सुंदर बेळगाव बनविले जात आहे. अशी फुशारकी मारली जात असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याचे आजपर्यंत सर्वांनी ऐकले व पाहिले आहे. मात्र बुधवारी रात्री काँग्रेस रोडवर भलताच प्रकार उघडकीस आला आहे. चक्क रस्त्यावर कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनातील कचरा टाकण्यात आल्याने अक्षरश: गलिच्छ स्वरुप प्राप्त झाले. याबाबतचा [...]

तरुण भारत 27 Feb 2026 3:01 pm

व्यापाऱ्यांनी एपीएमसीची प्रतिष्ठा राखावी

पालकमंत्रीसतीशजारकीहोळी: जिल्हाधिकारीकार्यालयातबैठक: एकत्रितयेऊनतोडगाकाढा बेळगाव : सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून एपीएमसीची उभारणी केली आहे. बेळगाव एपीएमसीची देशात चांगली प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी एपीएमसी व जयकिसान व्यापाऱ्यांची आहे. एपीएमसी व जयकिसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन वाद सोडवावा. दोन्ही बाजूंकडून व्यापाऱ्यांनी निर्धारित केलेल्या ठिकाणीच व्यापार करावा. यासाठी व्यापाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:59 pm

सिटीज-2 चे प्रकल्प पीपीपी मॉडेलच्या धर्तीवर चालविण्यास देणार

महापालिकेतस्मार्टसिटीतर्फेकार्यशाळेचेआयोजन बेळगाव : सिटीज-2 योजनेमध्ये बेळगाव शहराची निवड झाली नसल्याने विविध प्रकल्पांसाठी 135 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य सभागृहात गुरुवारी राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रकल्प महापालिकेकडून चालविण्याऐवजी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना जागा देऊन पीपीपी मॉडेलवर त्यांना चालविण्यास देण्याचा [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:56 pm

महापालिकेचे कम्युनिटी मोबिलायझर तीन महिन्यांपासून वेतनाविना

बेळगाव : महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे. शहराच्या स्वच्छतेचा ठेका कामगार परवाना नसलेल्या बेंगळूर येथील गणेश शंकर कंपनीला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून 300 सफाई कामगारांची बेकायदा नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत कम्युनिटीमोबिलायझर म्हणून काम करणाऱ्या 33 कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार थकविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकारांची चौकशी करून [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:55 pm

एन्. एम्. एम. एस् परीक्षेत सांगेली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

ओटवणे : प्रतिनिधी सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या एन्. एम्. एम. एस् परीक्षेत सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रशालेतील एकूण आठ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. एन्. एम्. एम. एस् परीक्षेत कु. समृ‌द्धी संदिप रेमूळकर (127 गुण), कु. समृद्धी सुरेश मेस्त्री (106 गुण), कु. सोहम संजय परब (101 [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:54 pm

हिंदवाडीत ड्रेनेज कामासाठी खोदकाम; वाहनधारकांना समस्या

लवकरातलवकरकामसंपवूनमार्गवाहतुकीसाठीपूर्ववतकरा बेळगाव : हिंदवाडी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईनच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने कॉक्रीट फोडण्यात येत असून त्याठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात येणार आहे. यामुळे एकेरी वाहतूक करण्यात येत असून याचा काहीसा परिणाम वाहनधारकांवर होत आहे. यासाठी लवकरात लवकर काम संपवून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची मागणी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:53 pm

Photo –चौकार-षटकारांची आतिषबाजी; टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचे ‘टॉप 5’हाय-स्कोअर!

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सुपर-8 लढतीमध्ये हिंदुस्थानने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि 20 षटकात 256 धावांचा डोंगर उभारला. टी-20 वर्ल्डकप इतिहासातील हा हिंदुस्थानचा सर्वोच्च स्कोअर ठरला. त्यानंतर झिम्बाब्वेला 184 धावांमध्ये रोखत 72 धावांनी विजयही मिळवला. चेपॉकवर झालेला सामना खऱ्या अर्थाने फलंदाजांनी गाजवला. याच निमित्ताने टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये नोंदवलेले 5 सर्वोच्च स्कोअर कोणते ते पाहूया. 1. […]

सामना 27 Feb 2026 2:48 pm

राज्य सरकार एका FIR ला का घाबरत आहे? रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोहित पवारांनी अपघात प्रकरणातील सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगितल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले होते तेच त्यांनी प्रत्यक्ष भेटीतही सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवारांनी तीन ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिन्ही ठिकाणी तो स्वीकारण्यात आला नाही. संबंधित पोलीस ठाण्यांना एफआयआर घेऊ नये, असे […]

सामना 27 Feb 2026 2:44 pm

बँकर लोकोमोटिव्हच्या ब्रेकमध्ये बिघाड, पळसदरीजवळ मालगाडीने वेगमर्यादा ओलांडली

लोणावळा घाटातून उतरत असताना ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने पळसदरीजवळ मालगाडी अनियंत्रित झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने मालगाडी ताशी 33 किमीऐवजी 100 किमी वेगाने धावू लागली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कर्जत-भिवपुरी दरम्यान वेग नियंत्रणात आणून गाडी थांबवली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही. मध्य रेल्वेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू […]

सामना 27 Feb 2026 2:43 pm

Aus w vs Ind w –ताळमेळ सुटला अन् विकेट गेली! प्रतिका बेभान धावली, पण हरमनप्रीत जागची नाही हलली

होबार्टच्या बेलेराइव्ह ओव्हल मैदानावर हिंदुस्थानच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाशी सामना रंगत आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धेत पायाला झालेल्या दुखापतीतून सावरलेली प्रतिका रावल हिने जबरदस्त कमबॅक करत अर्धशतक ठोकले. मात्र अर्धशतकानंतर हरमनप्रीतसोबत ताळमेळावा अभाव झाल्याने ती धावबाद झाली. बाद होण्यापूर्वी प्रतिकाने 52 धावा केल्या. दुखापतीतून कमबॅक करणारी प्रतिका रावल ही पहिल्या लढतीत शून्यावर बाद झाली होती. […]

सामना 27 Feb 2026 2:20 pm

Pandharpur News |विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी स्वयंवर चित्रे गायब

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कल्याण शेटे यांची दुर्मिळ चित्रे गायब पंढरपूर -काही दिवसांपूर्वी बसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवांचा विवाह सोहळा झाला. मात्र, पुराणकाळात श्री रुक्मिणी मंडपात थोर व महान चित्रकार राजा रविवर्मा यांच्या शैलीत सांगली येथील सुप्रसिद्ध चित्रकार कल्याण शेटे यांनी बारदाना पोत्यावर रेखाटलेली चित्रे रुक्मिणी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 2:07 pm

…तर तुमच्या जमिनीवर बोजा घेण्यात येईल; चूक प्रशासनाची, सरकारचे शेतकऱ्यांना ‘तुघलकी फर्मान’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील कार्यालयाकडून काही शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुबार अनुदान आल्याचे सांगत सरकारने या नोटीसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांनी दुबार अनुदान सरकारच्या खात्यात परत टाकावे अन्यथा त्यांच्या जमिनीवर बोजा घेण्यात येईल असे या नोटीसीत म्हटले आहे. शेतकऱ्यांना पिळण्यात या महायुती सरकारचा हात देशात कोणी धरू शकत नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे […]

सामना 27 Feb 2026 2:03 pm

Solapur Crime |सोलापुरात कारची काच फोडल्याच्या रागातून एकाचा खून

वाळूज नदीपात्रात मृतदेह आढळला; दोघांविरुद्ध खून गुन्हा नोंद सोलापूर -चारचाकीची काच फोडल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी मिळून एकास गंभीर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह वाळूज येथे सीना नदीपात्रात आढळला. या प्रकरणी दोघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:51 pm

Satara News |वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त तरुण भारत खजानातील ३९ हस्ताक्षरे प्रदर्शनात

उंब्रज महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त हस्ताक्षर प्रदर्शन उंब्रज – उंब्रज ता. कराड येथील सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यलयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला. या दिनाचे औचित्य साधून हस्ताक्षर प्रदर्शन आयोजित [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:43 pm

Satara News |सह्याद्री सहकारी साखर कारखाना कडून ऊस बिलात बेकायदेशीर कपात; शेतकऱ्यांचा आरोप

सातारा कलेक्टर कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोठा ठिय्या आंदोलन सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून बेकायदेशीर कपात पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय काँग्रेस किसान सेलचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्शन ४८ (अ) नुसार ऊस [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:34 pm

Whatsapp Web Down –व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये तांत्रिक बिघाड, युजर्सला फटका

सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. शुक्रवार सकाळपासून व्हॉट्सअ‍ॅप सेवा विस्कळीत झाली असून कॉम्प्युटर, लॅपटॉपवर लॉग इन करताना युजर्सला अडचणी येत आहेत. आयफोन युजर्सला याचा मोठा फटका बसला आहे. आयफोन युजर्सनी एक्सवर ट्वीट करत याबाबत तक्रार करत संताप व्यक्त केला आहे. मात्र अद्याप मेटाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. सकाळी […]

सामना 27 Feb 2026 1:17 pm

ज्या नेत्यांना वाटतं की आपण सुनेत्रा पवारांना नियंत्रित करू त्यांनी भ्रमात राहू नये, रोहित पवार यांचे सूचक विधान

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शब्दशः आणि कोणतीही गोष्ट न लपवता भूमिका मांडली. ते म्हणाले, दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला वेळ मिळाला. आज इथे आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली. ती माहिती समजून […]

सामना 27 Feb 2026 1:17 pm

Umbraj Fire Incident |उंब्रजला वीज मीटर मधील शाॅर्ट सर्कीटने भीषण आग ; लाखोंचे नुकसान

उंब्रजमध्ये एबीपी प्लाझा बिल्डिंगला आग उंब्रज – उंब्रज चाफळ रोडला पायनर मेडिकलच्या पाठीमागे असणाऱ्या एबीपी प्लाझा बिल्डिंग मधील विज मीटरला शॉक सर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी २७ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास घडली. मोठ्या प्रमाणावर ज्वाला व धूर बाहेर आल्याने हा प्रकार [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:15 pm

Satara News |रहिमतपूरमध्ये निकृष्ट रस्त्यांविरोधात रस्ता रोको आंदोलन

रहिमतपूर येथे रस्ता रोको आंदोलन घुणकी– प्रदूषणमुक्त अशी ओळख असलेली वारणा नदी आता मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी मिसळल्याने प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वारणा काठच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलचर [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:08 pm

Share Market Update –युद्धाची चाहूल अन् बाजारात विक्रीचा सपाटा, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण

जागतिक संकेत आणि इराण-अमेरिका, तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव याचा दबाव हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर दिसत आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-50मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 600 अंक, तर निफ्टी 200 हून अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शुक्रवारी बाजाराची सुरुवातच नकारात्मक झाली. विक्रीचा सपाटा […]

सामना 27 Feb 2026 1:03 pm

Jyotiba Temple |जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; नियोजन बैठकीत आढावा

जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रेची जय्यत तयारी जोतिबा डोंगर: महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा दि. १ एप्रिल रोजी होत असून यात्रा नियोजनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने जोतिबा डोंगर येथे आयोजित केलेल्या प्रांताधिकारी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 1:00 pm

Warna River Pollution |वारणा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चांदोली ते हरिपूर संगमदरम्यान वारणा प्रदूषित घुणकी– प्रदूषणमुक्त अशी ओळख असलेली वारणा नदी आता मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी मिसळल्याने प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वारणा काठच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलचर [...]

तरुण भारत 27 Feb 2026 12:49 pm

आता ‘स्मार्ट वर्क’ची गरज, AI वरून नारायण मूर्तींचा हिंदुस्थानच्या तरुणांना सावध इशारा

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्याच वर्षी त्यांनी हिंदुस्थानींनी आठवड्याला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यांच्या या मतावर त्यावेळी जोरदार टीका देखील झाली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानी तरूणांना मोलाचा सल्ला दिला आहे. दररोजच्या कामात अविभाज्य भाग बनलेल्या AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी […]

सामना 27 Feb 2026 12:45 pm

Kolhapur Crime |लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीस तीन वर्षांची सक्त मजुरी

कोल्हापुरात महिलेवर अत्याचार प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा निकाल कोल्हापूर -लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विकास शंकरराव चव्हाण (वय ५०, रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. व्ही आदने यांनी दोषी ठरवले. गुरुवारी त्याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 12:40 pm

“मोदींच्या संपूर्ण पक्षाने आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला…”मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातूीन राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे म्हणत कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर मनीष सिसोदिया यांनी एक्सवर सत्यमेव जयते! अशी पोस्ट केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही हल्ला चढवला. सत्यमेव जयते! आज पुन्हा […]

सामना 27 Feb 2026 12:19 pm

Kolhapur Crime |शाहूपुरीत दुकान फोडून ८ तोळे लंपास

कोल्हापुरात मध्यरात्री चोरी कोल्हापूर – शाहूपुरी येथील किराणा दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून साडे आठ तोळे सोने, रोख ५ हजार आणी १० साड्या असा सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहूपुरी ४ थी [...]

तरुण भारत 27 Feb 2026 12:17 pm

पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा; मालाडमधील झोपड्या हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश

मालाड येथील अनधिकृत झोपड्यांमुळे मागील अनेक वर्षांपासून खोळंबलेले पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचे काम अखेर मार्गी लागणार आहे. रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या झोपडीधारकांना 15 दिवसांच्या आत जागा रिकामी करुन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी रेल्वेची जमीन रिकामी करणे आवश्यकच आहे, असे निरिक्षण न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने […]

सामना 27 Feb 2026 12:01 pm

Panhala Truck Fire |पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाटात बर्निंग ट्रकचा थरार

पन्हाळ्यातील वाघबीळ घाटात शासकीय धान्याच्या ट्रकला आग पन्हाळा – पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाटात शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या मालवाहु ट्रकला शॉटसर्किटमुळे आग लागली. केवळ प्रंसगावधानामुळे ट्रकसह आगीपासुन बचाव करण्यात लोकांना यश आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली. कोल्हापुर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. तर [...]

तरुण भारत 27 Feb 2026 11:53 am

मी भ्रष्ट नाही…न्यायालयाने निर्दोष मुक्तता करताच केजरीवाल ढसाढसा रडले

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची कथित मद्य घोटाळा प्रकरणी राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे सांगितले. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाबाहेर येताच ढसाढसा रडले pic.twitter.com/OOLKvO4j8f — Saamana Online (@SaamanaOnline) February 27, […]

सामना 27 Feb 2026 11:49 am

जोपर्यंत मविआतील तीन पक्ष एकत्र बसत नाही तोपर्यंत राज्यसभेचा तिढा सुटणार नाही! –संजय राऊत

महाराष्ट्रातील सात जागांसह राज्यसभेच्या 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्याही नाव जाहीर झालेले नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून जोपर्यंत महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र बसत नाही. तोपर्यंत तिढा सुटणार नाही, असे […]

सामना 27 Feb 2026 11:46 am

मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील; मग शाळा बंद का पडल्या? संजय राऊत यांचा खणखणीत सवाल

महाराष्ट्रातील जवळपास 300 च्या आसपास मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री ओरडून ओरडून सांगताहेत की मुंबई, महाराष्ट्रात मराठी भाषेचीची सक्ती राहील. जर मराठी भाषेची सक्ती राहील असे तुम्ही म्हणताय, तर शाळा बंद का पडल्या? असा खणखणीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते. […]

सामना 27 Feb 2026 11:28 am

Nepal Earthquake –नेपाळमध्ये 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे नातावरण

नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचा तीव्र धक्के बसला. भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी होती. काठमांडूपासून 400 किमी अंतरावर असलेल्या संखुवासभा जिल्ह्यात पहाटे 3 वाजून 18 मिनिटांनी 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार संखुवासभा-ताप्लेजंग सीमा भागातील टोपके गोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भोजपुर, पंचथर आणि तेहरथुम […]

सामना 27 Feb 2026 11:27 am

Breaking –दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीतील राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी कोर्टाने आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे सांगितले. #UPDATE | The Rouse Avenue court discharged Arvind Kejriwal in the Delhi Excise policy case https://t.co/OrDihYrb02 — ANI (@ANI) February 27, […]

सामना 27 Feb 2026 11:11 am

Ajit Pawar Plane Crash रोहित पवार धक्कादायक पुरावे देणार, सोमवारी घेणार पत्रकार परिषद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 28 फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण होत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी तीन वेळा पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान रोहित पवार यांनी आता ते पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील धक्कादायक पुरावे सादर करणार असल्याचे […]

सामना 27 Feb 2026 11:01 am

देश विदेश –कमला हॅरिस यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियनमध्ये जे भाषण केले, त्यात ते खोटे बोलले आहेत, असे कमला हॅरिस म्हणाल्या. अमेरिकेतील अर्थव्यवस्था, मतदानाचा अधिकार आणि इराण मुद्दय़ावर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप हॅरिस यांनी केला. अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत […]

सामना 27 Feb 2026 10:27 am