लेख –वाढते वजन : एक जागतिक समस्या
>> मच्छिंद्र ऐनापुरे लठ्ठपणाचा प्रश्न हा केवळ आरोग्याचा नसून सामाजिक, आर्थिक आणि भावी पिढीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. युनिसेफचा अहवाल हा फक्त इशारा नाही, तर पृतीसाठीचे आवाहन आहे. भारतासह संपूर्ण जगाने या दुहेरी समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. एका बाजूला उपासमार, तर दुसऱया बाजूला अतिरेकाचा आहार. लठ्ठपणा आणि वाढते वजन ही मोठी समस्या ठरत आहे. युनिसेफच्या […]
जाऊ शब्दांच्या गावा –गोष्ट नळाची
>> साधना गोरे शहरातच काय आता गावाकडेही घराघरांत पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठी विहीर, नदी यांचे पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरीसारखा पाण्याचा मूळ स्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे, पण आज आपण ज्या अर्थाने […]
कबड्डी वर्ल्ड कप की धरून पकडून कप
>> मंगेश वरवडेकर म्हणतात ना, प्रो कबड्डीमुळे कबड्डीची क्रांती झाली! हो रे! पण ती क्रांती कदाचित पुरुषांच्या अंगणातच झाली असावी, असं दिसतंय. महिलांच्या अंगणात मात्र अजूनही तोच संघर्ष भोगावा लागतोय. बरोबर आठवतंय, 13 वर्षांपूर्वी पहिला महिला वर्ल्ड कप हिंदुस्थानात झाला होता. बिहारच्या राजगीर शहरात खेळवला गेला. या वर्ल्ड कपमध्ये आपल्या मुलींनी इराणला पाडून ‘जगज्जेतेपद’ हा […]
गुवाहाटीतही गिलशिवाय, पंतकडे नेतृत्व
मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यात अपयश आल्याने हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी येथे शनिवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. कोलकाता कसोटीत पहिल्या डावातच गिलला मानेच्या दुखण्याने सतावले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले. त्यामुळे तो पुन्हा मैदानात दिसलाच नव्हता. त्याच्या मानेचे दुखणे […]
हिंदुस्थानकडून जर्मनीचा धुव्वा, महिला विश्वचषक कबड्डी
गतविजेत्या हिंदुस्थानने दुसऱया महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पहिल्या दोन्ही लढतींप्रमाणे तिसऱया लढतीतही प्रतिस्पर्धी जर्मनीचा 63-22 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश जवळजवळ निश्चित केला. आता शेवटची साखळी लढत युगांडाशी होणार असून यातही मोठा विजय अपेक्षित आहे. हिंदुस्थानप्रमाणे ‘ब’ गटातून इराणनेही विजयाची हॅटट्रिक साजरी करत आपलाही उपांत्य फेरीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. वर्ल्ड कप […]
आर.डी. ब्लास्टर्स सीसीचे सातत्य, सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय टी- ट्वेंटी क्रिकेट लीगमध्ये आर.डी. ब्लास्टर्स सीसीने सूर्यवंशी वॉरियर्स सीसीवर 9 विकेट राखून मात केली. मुंबई पोलीस जिमखाना येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत गुरुवारी आर.डी. ब्लास्टर्स सीसीने सांघिक कामगिरीमध्ये सातत्य राखले. त्यांनी सूर्यवंशी वॉरियर्स सीसीचे 118 धावांचे आव्हान केवळ 14 षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले. […]
सुर्वे स्मृती क्रिकेट उद्यापासून
ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेळवण्यात येणाऱ्या 16 वर्षे वयोगटातील चार संघांचा समावेश असलेल्या दुसऱया दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला 21 नोव्हेंबरपासून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेतील खेळाडूंची निवड चाचणी 15 नोव्हेंबर रोजी सेंट्रल मैदानावर पार पडली. ‘बाबा’ या टोपणनावाने मुंबई ठाण्यातील क्रिकेट […]
पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्षात प्रवेश का दिला? उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं
पालघरमध्ये काशीनाथ चौधरी यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यावेळेला साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून भाजपने बोंबाबोंब केली होती. साधू हत्याकांडात चौधरी सामील असतील तर, भाजपने प्रवेश का दिला? आणि सामील नसेल तर, प्रवेशाला स्थगिती का दिली? असं मनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ज्येष्ठ […]
पंजाबमध्ये पोलीसांच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, हातबॉम्ब आणि मोठा शस्त्रसाठा जप्त
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील लडोवाल परिसरात गुरुवार संध्याकाळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या चकमकीत पोलिसांनी दोन हातबॉम्ब, चार पिस्तूल आणि ५० पेक्षा जास्त काडतूड्या असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. लुधियाना पोलिसांच्या तत्परतेमुळे एका मोठ्या दहशतवादींना एक मोठ कट उधळा गेला, असे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना पोलिसांच्या पथकाने लडोवाल परिसरात […]
माहूरमध्ये दुहेरी हत्याकांड, गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून
माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांत अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) यांचा समावेश आहे. दोघीही आज दि.20 रोजी सकाळी आप […]
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर चुकीच्या पद्धतीने एसआयआर लागू करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. यातच बिहारमध्ये भाजपने निवडणूक आयोगाशी संगमात करून मोठ्या प्रमाणात मतचोरी करून विजय मिळवला, असा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून […]
टायर विहीरीच्या दिशेने जात असताना त्याला पकडण्यासाठी पळालेला चिमुकला भाचा टायरासहीत विहीरीत पडल्याचे कळताच त्याला वाचवण्यासाठी मामीने कसलाही विचार न करता थेट विहीरीत उडी घेतली. माञ पोहता येत नसल्याचे दोघांही मामी-भाच्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी जालन्यातील बदनापुर तालुक्यातील मालेवाडी गावात घडली. सध्या उसतोडीचा हंगाम सुरु असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी […]
महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग प्रकरणी आरोपीस 5 वर्षांची सक्तमजुरी व 21 हजार रूपये दंड
धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व वन विभागातील महिला वनसंरक्षक कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ता. धाराशिव) यास धाराशिव येथील न्यायालयाने 5 वर्षांची सक्तमजुरी व 21 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी सुनावली. 9 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्यादी वनरक्षक यांनी यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी व त्यांचे सहकारी शासकीय कामकाज करत असताना आरोपी तुपे यांनी त्यांना अडवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. चौकशीसाठी माहिती मागितल्यावर आरोपीने फिर्यादी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 228/2023, कलम 353, 354, 352, 506 भादंवि अन्वये दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. महेंद्र देशमुख यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टासमोर मांडला. साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरल्यावर न्यायालयाने 5 वर्षांची सक्तमजुरी आणि 21 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. अतिशय प्रभावी युक्तिवाद आणि समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश देव यांनी निकाल दिला.
तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला निवडून द्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तिरुपती चा विकास वीस वर्षात झाला तसा सर्व बाजूंनी सर्वांगीण विकास तीर्थक्षेत्र तुळजापुरात दहा वर्षात करावयाचा माझा संकल्प असल्याने विधानसभेपेक्षा दुप्पट मताने नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार विनोद गंगणे व त्यांच्या 22 नगरसेवकांना निवडून द्या विकासाची हमी मी घेतो. असे प्रतिपादन नगरपरिषद निवडणूक भाजपा उमेदवार प्रचाराचा शुभारंभ करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. भाजपा उमेदवार प्रचाराचा शुभारंभ पार्श्वभूमीवर गोलाई चौकातून रॅली रॅली काढण्यात आली. सदरील रॅली श्री तुळजाभवानी मंदिर महाडवार परिसरात आल्यानंतर येथे श्री तुळजाभवानी मातेची आरती करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे व बिनविरोध निवडून आलेल्या डॉक्टर अनुजा कदम सह 22 उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, महंत इच्छागिरी महाराज यांना बिनविरोध काढण्याची चर्चा झाली. या प्रकरणी खोटे नाते बोलू नका. याबाबतच म्हणतच बोलतील असे यावेळी म्हणाले. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गावर येण्यासाठी तीन हजार 295 कोटी रुपये देऊन दिला निधी दिला. सध्या काम प्रगतीपथावर आहे. मंदिर परिसर विकासासाठी 1865 कोटी रुपये निधी मंजूर केला असून भाविकांना चांगले दर्शन सुविधा मिळावी. शहरवासी चे उत्पन्नात दुप्पट वाढवावी. हे शहर विकासासाठी आमचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी म्हणाले. तीर्थक्षेत्र तुळजापूर विकासासाठी विरोधकांनी एक रुपया तरी दिला का असा सवाल करून जय भवानी जय शिवाजी कुठल्या तोंडाने म्हणतात अशी टीका केली. माझ्यावर वैयक्तिक खोटे नातेवाला तर सहन करणार नाही. सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मला बोलायला लावू नका, बोलायचं तर विकासावर बोला असे आव्हान यावेळी विरोधकांना दिले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात विकास कामे करताना स्थानिकांवर अन्याय होऊ न देणारा असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे म्हणाले की, तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकास आपल्याला आमदार राहणार माध्यमातून करावयाचा असल्याने नगरपरिषद निवडणुकीत आम्हाला विजयी करा. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर असाच राहू द्या. असे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कंदले यांनी केले. त्यानंतर सदरील रॅली शुक्रवार पेठ, पावणारा गणपती चौक, कमान वेस, आर्य चौक मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली. या रॅलीत महिला व लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड होती.
Solapur elections : सोलापूरमध्ये 2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुका; संवेदनशील केंद्रांवर कडक बंदोबस्त
संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक सुरु आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्राकडे प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असून याठिकाणी सीसी कॅमरे व पोलीस बंदोबस्त असणार असल्याची माहिती [...]
दिल्लीतील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी
लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटानंतर भीतीचे वातावरण असताना आता नवी दिल्लीत तीन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. ईमेलच्या माध्यमातून तीन शाळांना गुरुवारी सकाळी बॉम्बने उडविण्याचा धमकी देण्यात आली. यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने झडती घेतली असता काहीच संशयास्पदक आढळलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. […]
Solapur : जुनोनी येथे पायोनियरच्यावतीने पीक मळणी, शेती नियोजन शेतकरी मेळावा
जुनोनीत शेत नियोजन व मका लागवडीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथे पायोनियर सिड्स कंपनीच्या पी ३३०२ या मका पिकाचा माजी विस्तार अधिकारी सुखदेव सौदागर यांच्या शेतामध्ये पीक मळणी कार्यक्रम व शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना शेताचे व पिकाचे नियोजन [...]
मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला
मी भाजप पक्षाचा भाग नाही हे सांगायला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरीत यायची गरज नव्हती. मुंबईतून जरी सांगितले असते तर मी माझ्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असता, असे भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले. राजेश सावंत यांची सुकन्या शिवानी सावंत-माने या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
Satara News : दोष सिद्धीत उंब्रज पोलीस ठाणे जिल्ह्यात अब्बल
अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. उंब्रज : सातारा जिल्हा पोलीस दलात उंब्रज पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली छाप निर्माण केली आहे. ऑक्टोबर २०२५ या महिन्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कराड यांनी दिलेल्या निकालांमध्ये सर्वाधिक दोष सिद्धी मिळवत [...]
Satara : गिरवी येथे कार्तिक एकादशी निमित्त श्रीमद् भगवद्गीतेचे पूर्ण पठण
मनापासून केलेली उपासना साधकाला सात्विक बनवते : कल्याणी नामजोशी फलटण : कोणतीही उपासना, पारायण आपण मनापासून केल्यास ग्रंथपाठ जेव्हा मुखातून जातो, तो ग्रहण करताना शरीर, मन, बुद्धी, अहंकार यावर मात करुन आपण सात्विक बनतो, असे प्रतिपादन प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांनी केले. गिरवी, ता. फलटण येथील गोपालकृष्ण मंदिर [...]
बिहारच्या नवीन NDA सरकारमध्ये घराणेशाही, नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी
बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाली आहे. पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १४ आणि जेडीयू कोट्यातील ८ मंत्र्यांचा […]
sangli Crime : घाणंदमध्ये 27 वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण; सहा जणांवर गुन्हा दाखल
आटपाडी तालुक्यात भरदिवसा अपहरण आणि मारहाण आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) येथील २७वर्षीय शेतकरी सचिन मधुकर माने याचे फोनवरून झालेल्या वादातून अपहरण आणि मारहाणीची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी झरे, लेंगरे, जोंधळखिंडी येथील सहा लोकांवर गुन्हा दाखल केला. सचिन माने याच्या फिर्यादीवरून अक्षय [...]
परंड्यात दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. काही ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. नगर परिषद कार्यालयात नामनिर्देशन अर्जांच्या छाननीदरम्यान परांडा येथे गोंधळ उडाला होता. तसेच दगडफेक देखील झाली होती. त्यामुळे आता आदर्श आचारसंहितेचा भंग करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षासह तब्बल 26 जणांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 3 वाजता परंडा नगरपरिषद कार्यालयातील सभागृह व मुख्य प्रवेशद्वाराजवळ नामनिर्देशन छाननी सुरू असताना आरोपींनी एकत्र येऊन गोंधळ निर्माण केला. या गोंधळात नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य गेटवर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्यासोबतच स्वयं आरोपींचे तसेच इतरांच्या जिवीतासही धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनास्थळी कायदा-सुव्यवस्थेचे पालन न करता जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधे जाकीर इस्माईल सौदागर यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरपरिषद कार्यालयातील नगर अभियंता राहुल बंडू रणदिवे यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून निवडणूक काळातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त तेर येथे हेरिटेज वॉक संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताह निमित्त सहाय्यक संचालक (पुरातत्व), छञपती संभाजीनगर विभाग व पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव, संचलित पर्यटन विकास समिती धाराशिव आणि पुरातत्व विभाग, कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय महाराष्ट्र संत विद्यालय आणि तेरणा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तेर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन संपन्न झाले. तेर हे प्राचीन शहर असुन तेरला ऐतिहासिक असा पुरातत्व पर्यटनाचा वारसा लाभला असुन याची जनजागृती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत आमचे शहर प्राचीन तगर असा जयघोष करीत प्राचीन तेर याला दुजोरा देण्यात आला. त्रिविक्रम मंदिर,उतरेश्वर मंदिर सह इतर प्राचीन स्थळे व कै.लामतुरे प्राचीन वास्तु संग्रहालयाल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी मार्गदर्शन केले. तर नरहरी बडवे यांनी सुत्रसंचलन केले. आलेल्या मान्यवरांचे प्राचीन स्थळांविषयीचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन वास्तु संग्रहालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, मार्गदर्शक डॉ अभय शहापूरकर, मार्गदर्शक प्रा.अभिमान हंगरगेकर,उपाध्यक्ष गणेश वाघमारे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग, सदस्य राजाभाऊ कारंडे,पुरातत्त्वज्ञ रविंद्र शिंदे,सदस्य विजय गायकवाड,वैभव वाघचौरे,नरहरी बडवे सह पुरातत्व विभाग, पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.
नूतन उपविभागीय जलसंधारण अधिकारी टोंपे यांचा मराठा सेवा संघाने केला सत्कार
परंडा प्रतिनिधी - तालुक्यातील लोणी येथील श्रध्दा सौदागर टोंपे यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदी नवनियुक्ती झाल्याबद्दल मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने गुरुवार ( दि . 20 ) मराठा सेवा संघ कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव आशा मोरजकर, सेवानिवृत्त शाखा अभियंता सौदागर टोंपे, अभियंता राहूल रणदिवे, शशिकांत जाधव, देवानंद टकले, अंगद धुमाळ, संघाचे ता. अध्यक्ष गोरख मोरजकर, रविंद्र मोरे, आप्पा काशीद, मनोज कोळगे, समाधान खुळे, गुणेश राशनकर, राजकुमार देशमुख , ठोंगे , धर्मराज गटकुळ, खंडू मोरे, आदि उपस्थित होते. तसेच नितिन गाढवे व गणेश नेटके यांनीही सत्कार केला .महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलीमध्ये प्रथम क्रमांकाने टोंपे यांनी यश संपादन केले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-1) पदी निवड झाली आहे.
बनावट दस्त करून शौचालयाचे अनुदान लाटले, सात जणांवर गुन्हा
धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतःच्या फायद्यासाठी बनावट दस्त तयार करून शौचालयाचे अनुदान लाटल्याप्रकरणी आळणीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह सात जणांविरूध्द धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंद झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील आळणी येथील सरपंच महानंदा संतोष चौगुले, ग्रामसेवक सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड, बबन विठ्ठल माळी, गयाबाई बबन माळी, धनंजय बबन माळी, तानाजी विठ्ठल माळी, फुलचंद सदाशिव माळी यांनी 2016-2011 ते 29 ऑगस्ट 2024 रोजी आळणी येथे स्वतःच्या फायदा करून घेण्यासाठी संगणमत करून बनावट दस्त तयार करून शौचालयाचे अनुदान उचलले. तसेच जंगम मठाच्या जमिनीवर ही काही व्यक्तींनी कब्जा केला आहे. त्या जमिनीचे देखील बनावट दस्त तयार करून अनुदान उचलून शासकीय रक्कमेचा अपहार केला. अशी तक्रार अंबऋषी अर्जुन कोरे यांनी धाराशिव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
शाकंभरी नवरात्र महोत्सव तयारीची आढावा बैठक
तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र महोत्सव यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात उत्साहात पार पडणार आहे. याबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीस तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, आरोग्य विभागाचे अविनाश ढगे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर तसेच मंदिर संस्थानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आगामी महोत्सवाचे नियोजन, सुरक्षा, भक्त व्यवस्थापन आणि पूजाविधींचे आयोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सव काळात अपेक्षित असलेल्या भक्तवर्गाच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षा, स्वच्छता तसेच वाहतूक व्यवस्थापन याबाबत आवश्यक ती तयारी करण्यात येणार आहे. यावेळी सर्व विभागांना समन्वयातून नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी दिल्या. महोत्सवातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर -या कालावधीत श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा परंपरेनुसार सुरू राहणार आहे. 28 डिसेंबर रोजी पहाटे देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार असून दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. 29 डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, 30 डिसेंबर मुरली अलंकार महापूजा, 31 डिसेंबर रोजी सकाळी जलयात्रा तसेच शेषशायी अलंकार महापूजा, 1 जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 2 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा देवीची नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता पूर्णाहुती व घटोत्थापन, 4 जानेवारी रोजी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन.
उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्र माघारीसाठी 21 नोव्हेंबर शेवट दिवस
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी नगर परिषद धाराशिव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे स्वतः किंवा सूचकामार्फत उपस्थित राहून जोडपत्र5 भरून माघार प्रक्रिया पूर्ण करावी. नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्र (उमेदवारी) छाननी मध्ये वैध झालेल्या उमेदवार याचे माघार घेण्यासाठीदि.21 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजतापर्यंत वेळ असून निवडणुकीतून माघार घेण्यास इच्छुक उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद धाराशिव येथे स्वतः / सूचकामार्फत उपस्थितीत राहून (जोडपत्र 5) भरून द्यावे.असे निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद तथा उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.
उमरगा नगराध्यक्ष पदाचे 12 तर नगरसेवक पदाचे 127 अर्ज मंजूर
उमरगा (प्रतिनिधी)- नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 17 अर्जापैकी 5 अर्ज नामंजूर तर 12 अर्ज मंजूर करण्यात आले. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 255 अर्जापैकी 128 अर्ज नामंजूर तर 127 अर्ज मंजूर झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदावरुन एकमत न झाल्याने कालचे मित्र आज एकमेकांविरोधात शड्डु ठोकुन उभे आहेत. उमरगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 255 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.18) झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचे हर्षवर्धन चालुक्य (भाजपा), किरण गायकवाड (शिवसेना), अमोल मोरे (काँग्रेस), अब्दुलरजाक अत्तार (शिवसेना उबाठा), विक्रम बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस, शप), प्रभाकर मजगे (वंचित बहुजण आघाडी) तसेच शाहूराज माने, नितीन होळे, रफिक अत्तार, शिवशंकर दंडगुले, शांतप्पा वरकले यांचे अपक्ष असे एकुण 12 अर्ज मंजूर झाले आहेत. तर कॉग्रेसचे महादेवप्पा पाटील व इमामजाफर औटी, भाजपाचे साईराज टाचले, शिवसेना (उबाठा) चे विजयकुमार नागणे यांचे एबी फॉर्म नसल्याने तर विक्रम बिराजदार (डबल अर्ज) यांचे एकुण 5 अर्ज नामंजूर झाले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 255 अर्जापैकी 128 अर्ज नामंजूर तर 127 अर्ज मंजूर झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरु असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 21 नोव्हेंबर मुदत असल्याने तेंव्हाच चित्र स्पष्ट होणार आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असुन ते थेट जनतेतुन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे 11 प्रभागात नगराध्यक्षासह तीन तर 12 व्या प्रभागात नगराध्यक्षासह चार मते देता येणार आहेत. शहरातील 12 प्रभागातुन 25 नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत 31 हजार 791 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 16 हजार 231 तर महिला मतदारांची संख्या 15 हजार 555 तर इतर 5 मतदारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेना (शिंदे) चे किरण गायकवाड, कॉग्रेसचे अमोल मोरे, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे विक्रम बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस(शप) चे संजय पवार, वंचित बहुजण आघाडीचे प्रभाकर मजगे व अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 108 वी जयंती महाविद्यालयात साजरी
वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची 108 वी जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, प्रा.शाम डोके, व इतर प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये इंदिरा गांधी चे भारतासाठीचे योगदान नमूद केले यामध्ये प्रामुख्याने त्यांची निर्णय क्षमता किती कणखर होती हे त्यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन स्पष्ट केले.बांगलादेशाची निर्मिती असो कि पाकिस्तान विरुद्ध चे युद्ध असो ते कोणतेही निर्णय घेतला कि मागे घेत नसत. भारतीय राजकारणाची जाण असलेली, तळागाळातील लोकांच्या अडचणी जाणणाऱ्या व आपल्या पराभवातून सुद्धा पुन्हा जनमाणसामध्ये एक आढळ स्थान निर्माण करण्याऱ्या अश्या थोर इंदिरा गांधी होत्या लोक त्यांना याच निर्णय क्षमतेमुळे आयर्नलेडी असे संबोधत असत. असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.राहुल कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन प्रा.शाम डोके यांनी केले तर आभार प्रा.अजितकुमार तिकटे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
नेपाळमध्ये पुन्हा एकदा तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (CPN-UML) पक्षाच्या युवा जागरण मोहिमेला विरोध करत हे तरुण रस्त्यावर उतरले. यात यूएमएलच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती चिघळताच सिमरा आणि आसपासच्या भागात कर्फ्यू जाहीर करण्यात आला. या संघर्षात अनेक तरुण जखमी झाले असून, सोशल मीडियावर या घटनेचा […]
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्सव उत्साहात होणार साजरा सातारा : किल्ले प्रतापगड येथे 27 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवप्रताप दिन तयारीचा आढावा जिल्हाधिकारी पाटील यांनी घेतला. या बैठकीला [...]
पालघर जिल्ह्यात सहावीतल्या मुलीला 100 उठाबश्या काढायला लावल्याने तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. सात दिवसानंतर अखेर शिक्षिका ममता यादव विरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. वालिव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेच्या सातीवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत घडली. शाळा प्रशासनाने निलंबित केलेल्या शिक्षिकेला भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल […]
अनुष्का गावकर आणि संतोषी जंगम यांची कोकण विभागीय खो खो संघात निवड
ओटवणे |प्रतिनिधी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील कु अनुष्का आनंद गावकर आणि कु संतोषी भिवा जंगम या दोन्ही विद्यार्थिनींची कोकण विभागीय खो खो संघात निवड झाली आहे. याबद्दल या दोन्ही विद्यार्थिनींचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पाली येथे होणाऱ्या मुंबई युनिव्हर्सिटी खो-खो स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनी एसपिके कॉलेजमध्ये कला शाखेच्या [...]
Miraj Crime : मिरजेत महिलेला मारहाण करुन दागिने हिसकावले
मजूरीच्या पैशासाठी गेलेल्या महिलेवर मारहाण मिरज : कृष्णाघाट रस्त्यावर मजूरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करुन तिच्या गळ्यातील दीड तोळेचे गंठण हिसकावून घेण्यात आले. तशी तक्रार वैशाली सुनिल कांबळे (रा. बानलेसवाडी, रेणूका मंदिराजवळ, यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात [...]
ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
युकेमधील शस्त्र विक्रेता संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणावर न्यायालय ६ डिसेंबर रोजी सुनावणी करणार आहे. या वर्षी जुलैमध्ये, […]
Kolhapur Breaking : जयसिंगपूर-शिरोळमध्ये राजकीय भू-चाल ; काँग्रेस-भाजप युतीने दिला धक्का
जयसिंगपूरात राजकीय सत्तासंघर्षाची सुरुवात शिरोळ : जयसिंगपूर- शिरोळ आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पूर्वी कट्टर विरोधक मानले जाणारे नेते आता एकत्र येत असल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण खळबळले आहे. कागल तालुक्यातील समरजीत घाटगे ( राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट ) आणि [...]
‘350 टक्के टॅरिफची धमकी देऊन…’हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध विरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानला 350 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देऊन दोन्ही देशांमधील तणाव मिटवला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून ‘आम्ही युद्ध करणार नाही’, असे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. यावर्षी मे महिन्यात त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव ‘संपवण्यासाठी मदत केली’, असा दावा ट्रम्प […]
चिप्स खाल्यानंतर काही वेळात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं?
चिप्स खाल्यानंतर चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिप्सच्या पॅकेटमधील छोटे खेळणे चिप्ससोबत मुलाने गिळल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील मुसीमाहा गावात ही घटना घडली. चार वर्षाच्या चिमुकला नेहमीप्रमाणे अंगणवाडीतून घरी आल्यानंतर वडिलांनी त्याला चिप्स खायला दिले. चिप्सच्या […]
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध, नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर
रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष पदावर नमिता कीर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदावर डॉ. अलिमिया परकार यांची निवड करण्यात आली आहे. भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीकरिता नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत 2025 ते 2028 या तीन वर्षांकरिता नव्या कार्यकारी मंडळाची निवड […]
Video –महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा कार्यक्रम, उद्धव ठाकरे यांचे संबोधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमा साधला संवाद…
थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेशी संबंधित तीन न्यायाधीशांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच ही स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला इव्हिनिंग गाऊन सेगमेंट दरम्यान रॅम्पवॉक करताना मिस जमैका गॅब्रिएल हेन्री स्टेजवरून खाली पडली. या अपघातात गॅब्रिएल जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅब्रिएलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]
लढाऊ विमानांच्या संदर्भात रशियाचा हिंदुस्थानला नवा प्रस्ताव, अटीशर्तींचा देखील अडथळा नाही
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी, मॉस्कोने नवी दिल्लीला एक अत्यंत महत्त्वाचा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी हवाई सामर्थ्याला नवी दिशा मिळू शकते. हिंदुस्थानचे जुने मित्र राष्ट्र अशी रशियाची ओळख आहे. हिंदुस्थानच्या भविष्यातील गरजांसाठी Su-57 स्टील्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान कोणत्याही अटीशर्तीशिवाय उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली आहे. रशियाच्या रोस्टेक (Rostec) […]
वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष ,नगरसेवक उमेदवारांचा घरोघरी प्रचार
ग्रामदेवतांच्या चरणी उमेदवारांच्या विजयासाठी घातले साकडे वेंगुर्ले (भरत सातोस्कर)- वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना (शिंदेगट) पक्षातर्फे उमेदवारी भरलेल्या नगराध्यक्ष व १० प्रभागातील २० उमेदवारांच्या घरोघरी प्रचाराचा शुभांरभ जुना एस.टी. स्टॅण्ड येथील गणपती मंदिरातील गणपतीचे दर्शन व दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईचे दर्शन घेऊन प्रचार प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, [...]
‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री गप्प का? रोहित पवार यांचा सवाल
सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बुधवारी रात्री कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घालत हॉटेल चालकाला लुटल्याचा आणि धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. तसेच धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या […]
Miraj : मिरजेत रोप वायरचा गळफास लागून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
सायकल लॉकच्या वायरमुळे शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत मिरज : शहरातील बाळवे गल्ली, पाण्याच्या टाकीजवळ सायकलला लॉक करण्यासाठी असलेल्या कुलूपाच्या रोप बायरचा गळफास लागून अमोल संजय मळवाडे (वय १४) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील लोखंडी जिन्याला सदर बायर अडकवली होती. क्लास [...]
Miraj : मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘मिशन इंद्रधनुष्य’ सुरू; 7 दिवस 7 रंगांची बेडशीट
मिशन इंद्रधनुष्य’ राज्यातील पहिलाच प्रयोग सांगली : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून ‘मिशन इंद्रधनुष्य बेडशीट’ हा अनोखा आणि राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयातील स्वच्छता, शिस्त आणि रुग्णांना सकारात्मक वातावरण मिळावे, यासाठी आठवड्यातील प्रत्येक दिवशी नवीन [...]
Sangli : सांगलीत 4 वर्षीय अफानला ‘पुनर्जन्म’; उमर गवंडी व मेहता हॉस्पिटलचा अनमोल प्रयत्न
सांगलीत बालकाचा जीव वाचवणारा रात्रभर संघर्ष सांगली : 4 वर्षांचा लहान अफान मुल्ला या बालकाला मेहता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमर गवंडी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अक्षरशः पुनर्जन्म मिळाला आहे. अफान हा खेळत असताना एका अनोळखी दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाला होता. सुरुवातीला किरकोळ दुखापत [...]
मारकुट्या शिक्षकाच्या दहशतीला घाबरून विद्यार्थी जंगलात लपून बसले, जव्हारच्या शाळेतील धक्कादायक घटना
जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांवर निर्माण केलेल्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या छळाची ही कर्म कहाणी कळताच पालकांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली 14 नोव्हेंबर रोजी शिक्षक लोकनाथ जाधव यांनी विवेक बिपिन […]
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांसाठी किती घातक? लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र या खाद्यपदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होतात. द लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे काय धोका निर्माण होतो याचे धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक रोगांचा धोका वाढतो. प्रोसेस खाद्यपदार्थांबाबत सार्वजनिक मोहीम आवश्यक […]
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत डॉ .वसुधा मोरेंना सुवर्णपदक
क्रीडा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग महाराष्ट्र योगशिक्षक संघटना संचलित व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये 65 वर्षावरील वयोगटातून सिंधुदुर्गच्या योग अभ्यासिका डॉ. वसुधा मोरे यांनी सुवर्णपदक पटकावत योग क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर सिंधुदुर्गचा झेंडा फडकवला. मागील राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना रौप्यपदावर समाधान मानावे लागले होते. शेगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या योगशिक्षक संमेलनात महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स [...]
राज्य योगासन स्पर्धेत डॉ . वसुधा मोरेंना सुवर्णपदक
क्रीडा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग महाराष्ट्र योगशिक्षक संघटना संचलित व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्य योगासन स्पर्धेमध्ये 65 वयोगटातून सिंधुदुर्गच्या योग अभ्यासिका डॉ. वसुधा मोरे यांनी सुवर्णपदक पटकावत योग क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर सिंधुदुर्गचा झेंडा फडकवला. मागील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना रौप्यपदावर समाधान मानावे लागले होते. शेगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या योगशिक्षक संमेलनात महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे [...]
ढाबा स्टाईल मक्याची रोटी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, वाचा
आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनामुळे, पोटाची चरबी आणि अस्वास्थ जीवनशैलीमुळे चिंतेत आहेत. जिम, डाएट प्लॅन आणि सप्लिमेंट्सच्या गर्दीत, लोक अनेकदा या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक रोटी केवळ लठ्ठपणा कमी करण्यास मदत करत नाही तर शरीराला इतर अनेक प्रकारे फायदा देखील करते. तर, लठ्ठपणा टाळण्यासाठी तुम्ही दररोज कोणती भाकरी खावी आणि या भाकरीचे इतर कोणते […]
Photo –महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा संवाद
मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या स्थानिक विकासनिधीतून आज एम. आय. जी. क्लब, वांद्रे पूर्व येथे मुंबईतील विविध शाळांकरिता ‘डिजीटल स्मार्ट बोर्ड’ वितरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार […]
दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, चांगले शिक्षक मिळाले असते तर दिल्लीला जाऊन ‘बाबा, मला मारलं’ म्हणून लाचारी करावी लागली नसती, असा जोरदार टोला ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. […]
युती आघाडीतून वेळ मिळाल्यास इकडे ही बघा पालकमंत्री…, अंबादास दानवे यांनी केली टीका
मुंबईत वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत किल्ल्यावर बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. शिवसेना नेते, अंबादास दानवे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. रत्नागिरी सुवर्णदुर्गावरील कचऱ्याचा फोटो एक्सवर शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्री […]
प्रतिनिधी बांदा मूळ बांदा उभाबाजार येथील रहिवासी सध्या इन्सुली कोनवाडा येथे स्थायिक असलेले साईनाथ रामचंद्र करमळकर (वय-72 वर्षे) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी ,सून, जावई, नातवंडे, भाऊ ,वहिनी,विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते राज्य परिवहन (एसटी) चे [...]
केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
भीमसेनी कापूर केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतो. हा बहुतांशी सर्व घरांमध्ये वापरला जातो. भीमसेनी कापूर हा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. केसांसाठी आपण वरचेवर नानाविध उपाय करतो. हे प्रत्येक उपाय कामी येतातच असे नाही. केसांसाठी आपण भीमसेनी कापराचा वापर केल्यास केसगळती मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे केसांची उत्तम वाढ होण्यासही मदत मिळते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला […]
दररोज 40 मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
दररोज ४ किलोमीटर वेगाने चालणे हा व्यायाम सर्वात उत्कृष्ट मानला जातो. आपले हृदय मजबूत ठेवण्याचा आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जलद चालण्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबरीने आपले कोलेस्टेरॉल देखील चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते. चालण्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. दररोज जलद चालण्याचे फायदे केवळ आपल्या […]
हिंदीत बोलल्याने मराठी तरुणांनीच केली मराठी विद्यार्थ्याला मारहाण, मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल
कल्याणमधील तिसगाव नाका येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाला लोकल ट्रेनमध्ये हिंदीत बोलल्याने चार ते पाच मराठी तरुणांनी मारहाण केली होती. तेव्हापासून तो मानसिक तणावात होता. अर्णव खैरे असे त्या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका येथे राहायचा. अर्णव मुलुंड मधील एका कॉलेजमध्ये शिकत […]
Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका, तापमान 16 अंशाच्या खाली
कोल्हापुरात पहाटे गारठा वाढला कोल्हापूर : उत्तर भारतात तापमानात कमालीची घट होत असल्यामुळे राज्यात बंहीची लाट पसरत आहे. परिणामी, राज्यासह जिल्ल्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. कोल्हापुरात गुरुवारी किमान तापमान १६ अंशाच्या खाली आले होते. त्यामुळे बंडीची [...]
आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी सर्व काही आठवत असेल, असा टोला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मिंधे गटावर जोरदार निशाणा साधला. ”दिल्लीला जाऊन देशाच्या गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे एक […]
कसबा बावडा, दसरा चाक, पाचगावात विद्यार्थी वसतिगृह कोल्हापूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चार शासकीय वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी ६६ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मान्यतेमुळे कसबा बावडा येथे दोन, दसरा [...]
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की योग्य खाणे, नियमित व्यायाम करणे, तेलाचा सुज्ञपणे वापर करणे, ताण कमी करणे आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळणे याद्वारे कोलेस्ट्रॉल कमी करता येते. या सवयी हृदयाला सुरक्षित ठेवू शकतात आणि शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतात. […]
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री रुममध्ये कोळसा जाळणे चार तरुणांच्या जीवावर बेतले आहे. कोळसा जाळल्याने कार्बनडाय ऑक्साईडमुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पंकी पोलीस स्टेशन परिसरातील तेलबिया कंपनीच्या खोलीत चार कामगारांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एका भांड्यात […]
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर येत आहे. ‘सप्तलिंगी लाल भात’ या नावाने हा औषधी, चविष्ठ आणि पौष्टिक भात अधिकृतपणे ब्रँड केला जाणार असून, त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राला […]
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात एक कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतील काही प्रवाशांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे. एक थार गाडी ताम्हिणी घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू केली. घटनास्थळावरून पोलिसांना तीन मृतदेह […]
न्हावेली/वार्ताहर आजगाव येथील रहिवासी सौ.उमा गुरुनाथ बेहेरे वय (८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.दोन माणगाव येथील योगिराज पंचगव्यच्या सौ.शरयू उकिडवे यांच्या त्या आई आणि सिंधुकिरण दिनदर्शिकेचे संपादक श्री चंद्रहास उकिडवे यांच्या त्या सासू होत्या.तर श्री बेहेरे गुरुजी गुरुनाथ यशवंत बेहेरे यांच्या त्या पत्नी होत्या.
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण हा मानाचा पुरस्कार यंदा नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर झाला असून, मराठवाड्याच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अथक आणि अमूल्य कार्याचा हा सन्मान आहे. डॉ. देव यांनी मराठवाड्यातील दुर्गम भागात वर्षानुवर्षे भटकंती करून प्राचीन मंदिरांची वास्तुरचना, शिल्पकला, कोरीवकाम आणि सांस्कृतिक इतिहास […]
Kolhapur : वेताळ आणि वेताळाची पालखी ; काय आहे ही नेमकी परंपरा!
कोल्हापुरातील शिवाजी पेठेने जपलेली परंपरा कोल्हापूर : गंगावेश ,तटाकडील तालीम ,खरी कॉर्नर ,मिरजकर तिकटी, रविवार वेश,बिंदू चौक,खोलखंडोबा, शिवाजी पुतळा,या पलीकडे मूळ कोल्हापूर नव्हतेच हे आता कोणाला सांगूनही पटणार नाही . या पलीकडे जे होते ती माळरानेच होती. काही पाणवठे होते [...]
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त
केंद्रीय तपास संस्था ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नवीन तात्पुरत्या जप्तीच्या आदेशानुसार, अंदाजे 1,400 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यासह, ईडीने आतापर्यंत एडीएजी ग्रुपशी संबंधित एकूण 9,000 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्ता नवी मुंबई, चेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथे आहेत. […]
हिवाळ्यात दररोज तुळशीचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
तुळशीचा चहा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर ताण कमी करतो, पचन सुधारतो आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतो. याव्यतिरिक्त हा चहा त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे आणि कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. गरोदर महिलांसाठी किवी का सुपरफूड आहे जाणून घ्या तुळशीचा चहा […]
राजस्थानात मंत्र्याच्या घरात घुसला बिबट्या, वनविभागाकडून शोध सुरू
जयपूरच्या व्हीव्हीआयपी सिव्हिल लाइन्स परिसरात गुरुवारी मोठा सुरक्षा इशारा जारी करण्यात आला, कारण राजस्थानचे जलसंपदा मंत्री सुरेश सिंह रावत यांच्या अधिकृत बंगल्यात बिबट्या शिरल्याची माहिती मिळाली. घटना राज्याच्या राजधानीतील सर्वाधिक सुरक्षायुक्त भागात घडली, जिथे अनेक मान्यवर राहतात. त्यात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा क्रमांक 11 असलेला बंगला देखील आहे, जो रावत यांच्या निवासस्थानाच्या अगदी समोर […]
कोलगावचे माजी सरपंच बाबुराव राऊळ यांचे निधन
ओटवणे । प्रतिनिधी कोलगावचे माजी सरपंच तथा श्री देव कलेश्वर देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष बाबुराव उर्फ बाबा कृष्णा राऊळ (६८) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेले वर्षभर ते आजारी होते. घरीच त्याच्यावर उपचार सुरु होते. सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोलगावच्या विकासासह धार्मिक व सामाजिक [...]
जानेवारीत महापालिकेची रणधुमाळी कोल्हापूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्येच होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा स्पष्ट सूचना महायुतीच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी [...]
Beed News –पहाटेच्या थंडीत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका, माजलगावमध्ये डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू
पहाटेच्या थंडीत मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली. डॉ. चंद्रशेखर उजगरे (54) असे मयत डॉक्टरचे नाव आहे. डॉ.चंद्रशेखर उजगरे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून सध्या जिल्ह्यातील वडवणी येथे शासकीय पशुवैद्य दवाखान्यात ते कार्यरत होते. शालेय जीवनात फुटबॉल खेळाडू असलेले डॉ. चंद्रशेखर हे नियमित मॉर्निंग वॉकला जात असत. जवळपास […]
गरोदर महिलांसाठी किवी का सुपरफूड आहे जाणून घ्या
गर्भधारणा हा महिलांसाठी एक अतिशय खास आणि संवेदनशील काळ आहे. या काळात खाण्यात थोडीशीही निष्काळजीपणा देखील आई आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. अशा परिस्थितीत, डॉक्टर आणि तज्ञ तुमच्या आहारात अनेक फळांचा समावेश करण्याची शिफारस करतात, ज्यापैकी किवी फळाला विशेष महत्त्व आहे. गर्भवती महिलांसाठी किवी हे वरदान मानले जाते कारण ते पोषक तत्वांनी […]
कोकणात थंडीची चाहूल आणि अंगणात दरवळतोय पोपटीचा सुगंध
कोकणातली थंडी म्हणजे फक्त गारवा नाही, तर जिभेवर नाचणाऱ्या चवींचाही हंगाम. सणासुदीचा माहोल अजून ओसरलेलाच नसतो आणि घराघरांत गुलाबी थंडीची चाहूल लागताच एकच सवाल सुरू होतो “यंदाची पोपटी कधी करायची?” कारण कोकणाच्या मातीतला हा एक अनोखा, गावाकडचा पारंपरिक प्रकार… आणि ज्याची चव जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलात मिळत नाही. थंडीच्या दिवसांत वाल, पावटे यांचं भरघोस उत्पादन […]
कर्नाटकात मन्न सुन्न करणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी भरती करण्यास मनाई केल्याने रुग्णालयातील कॉरिडोरमध्ये चालता चालताच महिलेची प्रसुती झाली. प्रसुतीवेळी बाळ जमिनीवर पडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. रूपा करबन्नावर असे पीडित महिलेचे नाव आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पी.आर. हवनूर यांनी घटनेची पुष्टी करत प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. कर्नाटकातील हावेरी […]
‘भारत एक सूर’ भव्य परेडने उद्घाटन : ‘द ब्लू ट्रेल’ चित्रपटाने उघडणार पडदा,देशविदेशांतील सिने दिग्गजांची उपस्थिती,जगभरातील 270 हून अधिक चित्रपट पणजी : राज्यासाठी एक वार्षिक संस्मरणीय उत्सव ठरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) आज दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ होत आहे. दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशविदेशातील चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. तत्पूर्वी गोव्यासह [...]
कोलवडे येथे डम्पिंग ग्राऊंड नकोच, उपजिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव
ताराबाई परिसरात रोज निर्माण होणारा हजारो टन कचरा टाकण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कोलवडे गावाजवळ खासगी जागा विकत घेणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात जाऊन जागेची पाहणी केली. मात्र ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेताच हा प्रकल्प माथी मारला जात असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत डम्पिंग ग्राऊंडला विरोध केला. तारापूर औद्योगिक […]
भाजपातील काहींना आता पर्रीकरांची अॅलर्जी : उत्पल
पणजी महापालिका निवडणुकीत उतरवणार स्वतंत्र गट पणजी : मार्च 2026 मध्ये होणाऱ्या पणजी महापालिका निवडणुकीत आपला स्वतंत्र गट उतरविणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पक्षातील काही लोकांना आणखी पर्रीकर नको आहेत, असे एकंदरीत चित्र दिसून येते. याबाबत त्यांनी खंत व्यक्त करून अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. [...]
रात्रीची गस्त वाढवा, प्रसंगी नाकाबंदी करा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पोलिसांना निर्देश : पोलिस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक पणजी : राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आता कडक अमलबजावणी राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधी पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. गुन्हेगारी घटना घडू नयेत किंवा वाढू नयेत, यासाठी रात्रीची गस्त वाढवावी तसेच प्रसंगी नाकाबंदीही करावी, असे आदेश पोलिस [...]
पूजाची होऊ शकते नार्को तपासणी : श्रीपाद नाईक
पणजी : कॅश फॉर जॉब प्रकरणात पूजा नाईक हिने केलेले आरोप हे गंभीर स्वऊपाचे आहेत. अशा आरोप जाणून-बुजून केले आहेत का, हे तपासाअंती समोर येणार आहे. जर पूजा नाईक हिने सबळ पुरावे सादर केले नाहीत तर तिची नॉर्को तपासणी होऊ शकते, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नोकरी घोटाळा प्रकरणावरून पूजा नाईक हिच्या [...]
भंगार अड्ड्याला आग, सहा गोदामे खाक
झुवारीनगर झरीन येथील दुर्घटना वास्को : झुआरीनगर झरीन भागातील भल्या मोठ्या भंगार अड्ड्याला बुधवारी पहाटे आग लागण्याची घटना घडली. या आगीत त्या भंगार अड्ड्यातील सहा गोदाम खाक झाले. सकाळपर्यंत अग्निशामक बंबांनी ही आग विझविण्यासाठी कष्ट घेतले. परंतु संध्याकाळपर्यंत त्या परिसरात धूर पसरत होता. सदर भंगार अड्ड्यात शॉटसर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत [...]
मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तुला माझ्यासोबत राहावे लागेल नाहीतर कपडे फाडून तुझी धिंड काढेन, अशी धमकी नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी बॉबी शेख यांचा मुलगा यश शेख याने दिली. या 17 वर्षीय मुलीच्या बर्थडे पार्टीत यश शेख जबरदस्तीने घुसला आणि त्याने मुलीला धमकावले. मुलीच्या मित्रांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर हल्ला […]
नक्षत्र नायकला शौर्य पुरस्कार द्यावा
खासदार विरियातो यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मडगाव : मंगळवार दि. 18 रोजी पहाटे बायणा-वास्को येथील दरोड्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाला वाचविणाऱ्या नक्षत्र नायक हिची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करावी असे निवेदन दक्षिण गोव्याचे खा. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठविले आहे. या निवेदनात खा. विरियातो यांनी म्हटले आहे की, [...]
शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना : 50 जणांची चौकशी, मात्र सुगावा नाही वास्को : बायणा येथील ‘चामुंडी आर्केड’ मधील सहाव्या मजल्यावर घातलेल्या दरोडा प्रकरणाचा तपास जारी आहे. मात्र या तपासात विशेष प्रगती झालेली नाही. दरम्यान, या दरोड्यात एकूण 35 लाखांचा ऐवज दरोडेखोऱ्यांनी लुटल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांची विविध पथके दरोडेखोरांच्या मागावर आहेत. मंगळवारी पहाटे [...]
आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी बुधवारी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्यावर तीव्र टीका करत आरोप केला की 2026 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आसामबाहेरील मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करून मतदारांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहे. धुबरी येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना गोगोई म्हणाले की मुख्यमंत्री आता भाजपसाठी सर्वात मोठा भार ठरले असून त्यांनी उत्तर […]
विरारमध्ये पाण्यावरून वाद पेटला, महिलेने केली शेजाऱ्याची हत्या
पावसाळा संपून काही काळ उलटत नाही तोच वसई, विरारमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. पाणी भरण्यावरून रहिवाशांमध्ये रोज भांडणे होत आहेत. विरारच्या जे.पी. नगर परिसरात तर हा वाद एवढा पेटला की, संतापाच्या भरात महिलेने डासांचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. उमेश पवार (53) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी […]

23 C