चेन्नईजवळ हिंदुस्थानी हवाई दलाचं विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झाला अपघात
हिंदुस्थानी हवाई दलाचं पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान शुक्रवारी चेन्नईतील तांबरमजवळ नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळलं. सुदैवाने वैमानिक वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती देत हवाई दलाने सांगितलं की, हे उड्डाण नियमित प्रशिक्षण मोहिमेचा भाग होतं. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (तपास समिती) स्थापन करण्यात आली आहे आणि ती […]
वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी फलंदाजी! 32 चेंडूत ठोकलं शतक, पाकिस्तानची धडधड वाढली
टीम इंडियाचा उगवता सितारा वैभव सूर्यवंशीने Asia Cup Rising Stars स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात तोडफोड फटकेबाजी केली आहे. UAE च्या गोलंदाजांना वैभवने अक्षरश: फोडून काढलं आहे. चौकार आणि षटकारांची चौफेर फटकेबाजी त्याने केली आणि फक्त 32 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. शतक ठोकल्यावरही त्याची बॅट शांत झाली नाही. टीम इंडिया A आणि UAE यांच्यामध्ये दोहा येथे सामना खेळला […]
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त […]
अमेरिकन खासदार ग्रीन एच-१बी व्हिसा रद्द करण्यासाठी प्रस्ताव मांडणार, काय आहे कारण?
अमेरिकन खासदार मार्जरी टेलर ग्रीन एच-१बी व्हिसा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यासाठी एक प्रस्ताव मांडणार आहे. या प्रस्तावाचा उद्देश केवळ हा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करणे नाही तर, नागरिकत्वाचा मार्ग देखील बंद करणे आहे. एखाद्याचा व्हिसा संपला की, लोकांना घरी परतण्यास भाग पाडले जाईल. हा व्हिसा हिंदुस्थानी व्यावसायिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याबाबत बोलताना खासदार म्हणाल्या आहेत की, […]
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा बुधवार २६ नोव्हेंबरला रवींद्र नाट्यमंदिर येथे सायं. ६.०० वा. संपन्न होणार […]
बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका - तानाजी जाधवर
धाराशिव (प्रतिनिधी)- विरोधकांना खोटं नाट म्हणताना अगोदर आपण स्वतः आरशात बघा मग समजेल खरं आणि खोटं कोण. बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल असं बोलून तुम्ही बिहार व धाराशिवची तुलना करून इथल्या जनतेचा अपमान करु नये, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपला केलं आहे. जाधवर म्हणाले की, शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामातील केलेली अडवणूक बाजूला पडेल असं राणा पाटील यांना वाटत असेल. 140 कोटीच्या रस्ते प्रकरणी भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखविले होते. दिखाऊ आंदोलन देखील स्वतःच्या सरकार विरोधात पक्षाने करून तुमच्यातील खरेपणा दाखवून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरला नाही. त्याच कारण पण अजूनपर्यंत खरेपणा मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी दिलेलं नाही. विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करतायेत हे देखील खरेपणाचा अजून एक पुरावाच म्हणावा लागेल. बिहार च्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की आपण धाराशिव मध्ये राहतोय याचा त्यांना विसर पडल्याच दिसत आहे. म्हणून बिहारची व धाराशिवची तुलना तुम्ही केली आहे. याचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे देईल असा टोला तानाजी जाधवर यांनी लगावला.
धाराशिव नगर परिषदेसाठी एकूण 23 अर्ज
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदे धाराशिवसाठी नगराध्यक्षपद व नगरसेवक पदासाठी एकूण 23 जणांनी आपले उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर रोजी दाखल केले आहे. धाराशिव नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा चौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगरसेवक पदासाठी शेख नेहा बेगम अलीमोद्दीन यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वनमाला देडे, किरदत्त किशोर, अंकुश चौगुले, नारायण तुरूप, मनिषा बनसोडे, संगिता पेठे, सिध्दार्थ बनसोडे, सुनिल पंगुडवाले, सना शेख, सचिन पवार, वंदना पवार, प्रविण बनसोडे, सरस्वती खोचरे, शिवानी दंडनाईक, विलास लोंढे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर संदीप इंगळे यांनी दोन तर भाग्यश्री खोचरे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रविवारी सुट्टी असून, शनिवारी मात्र उमेदवारी अर्ज भरणे चालू आहे.
Ratnagiri News –राज्य नाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोग ‘हाऊसफुल्ल’, प्रेक्षक नसतात ही ओरड पुसून टाकली
राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीतील खल्वायन रत्नागिरी या नाट्यसंस्थेने सादर केलेला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला. रसिक प्रेक्षकांनी बसायला खुर्ची नसल्यामुळे उभं राहून अडीच तास या नाट्यप्रयोगाचा अनुभव घेतला. राज्य नाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोग पहायला प्रेक्षक येत नाहीत. अनेकवेळा दहा-पंधरा प्रेक्षक आणि परीक्षक यांच्या समोर नाटक सादर करावं लागतं हा आरोप रत्नागिरीच्या नाट्यप्रेमींनी पुसून टाकताना राज्य […]
IND vs SA Kolkata Test – जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेची हवा काढली आणि इतिहास रचला!
टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र, वेगावर स्वार होऊन अचुक माऱ्यासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कहर बरसवणारी गोलंदाजी केली आहे. टेस्ट चॅम्पियन्स म्हणून कॉलर टाईट करण्याच्या तयारीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेची त्याने पहिल्याच दिवशी हवा काढून टाकली आणि अर्धा संघ तंबुत धाडला. कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर त्याच्या विकेटचा पंच पाहून चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. त्याने या धमाकेदार […]
बिहार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही –विजय वडेट्टीवार
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण मुळात निवडणुका प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “बिहार निवडणुकीआधी एसआयआर झाले, मतदार यादीत अनेक घोळ होते. बिहार मध्ये युतीचे सरकार […]
दांडेली येथील भजन स्पर्धेत दाडोबा भजन मंडळ प्रथम
गावमर्यादित स्पर्धा : राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ वरचावाडा द्वितीय न्हावेली / वार्ताहर दांडेली सरपंच नीलेश आरोलकर आयोजित जय हनुमान मित्रमंडळ,घोणसेवाडी ग्रामस्थ व दांडेली यांच्या सहकार्याने दांडेली आरोस गावमर्यादित भजन स्पर्धेत दाडोबा प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.वरचावाडा येथील श्री राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय घोणसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाने तृतीय तर फणसमाडे [...]
उद्या भाजप ,शिवसेनेचे उमेदवार दाखल करणार अर्ज
सावंतवाडी नगरपालिका निवडणूक सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना व भाजप असे दोन्ही पक्ष सावंतवाडीत उद्या शनिवार 15 नोव्हेंबरला दुपारी बारानंतर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहेत. सावंतवाडीत उद्या पालकमंत्री नितेश राणे एका कार्यक्रमा निमित्ताने उपस्थित राहणार आहेत तसेच शिंदे शिवसेनेच्या वतीने आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब आधी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत [...]
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा'तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा ‘वेग'आणि ‘नियमितता'या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज एसटी स्वतःला ‘चल संस्था'म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी 10 वाजता आगारात, 11 ला विभागात आणि 12 वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा मंत्र या बैठकींना दिला आहे. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे. चालकवाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे कार्यक्षमतेवर भर डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे (किलोमीटर प्रति 10 लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे. तिकीट विक्री ही महसुलाची जीवनवाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM (संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल. वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा'मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. 1 जानेवारीला बसस्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाईल. वक्तशीरपणा आणि नियमितता ही एसटीची नवी ओळख बनवण्याचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान 80% पेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक'तत्त्वावर बस फेऱ्या देणे अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात होत आहेत. यासोबतच ऑनलाइन व मोबाईल ॲपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस आहे. ‘प्रवासी देवो भव' सुविधांचा दर्जा उंचावणार स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत. एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मत यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.
मानवी हक्क संघटनेची धाराशिव तालुका कमिटी जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सुंभा येथे मानवी हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्या निवासस्थानी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणकुमार उर्फ बाबासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बैठकीस सुग्रीव कांबळे, राजाभाऊ राऊत, सागरबाई घोडेराव यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत मानवाधिकार रक्षण, सामाजिक न्याय, पीडितांना मदत, तसेच तालुका पातळीवर संघटनबांधणी मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर धाराशिव तालुका कमिटीची नव्याने एकमताने निवड करून जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली आले. नवीन पदाधिकारी- तालुकाध्यक्ष- जनार्दन वाळवे, तालुका उपाध्यक्ष-कैलास कांबळे, तालुका संघटक- भाऊसाहेब ननवरे, तालुका सचिव सय्यद लतिफ रजाक यांची निवड करण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मौजे सुंभा (ता. धाराशिव) येथे पार पडलेल्या या बैठकीमुळे तालुक्यातील मानवी हक्कांच्या कार्याला अधिक वेग, बळ व दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
महिलेवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
धाराशिव (प्रतिनिधी)- एका महिलेवर दुष्कर्म करून तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीस धाराशिवच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 17 हजार रूपये दंडाची शिक्षा आरोपी सुरज बाबू लातुरे पठाण यास सुनावली आहे. यावेळी सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद व सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. पीडीत महिलेने तुळजापूर पोलिस ठाण्यातया प्रकरणी फिर्याद दिली होती. दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी पीडितेच्या मैत्रिणीने तिला नवीन कामाच्या ठिकाणी नेण्याचे सांगून पाटोदा येथे नेले. तेथे त्यांनी मुदतशीर शेख नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होवू शकला नाही. सायंकाळी 7 वाजता संपर्क झाल्यानंतर मुदतशीर शेख आणि सुरज पाठण हे दोघे तिघे आले. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पीडिता आरोपी सुरज पठाणच्या दुचाकीवर तर तिची मैत्रीण मुदतशीर शेखच्या दुचाकीवर बसून तुळजापूरकडे निघाले. यावेळी सुरज पठाण याने वडगाव पाटीजवळील खडी मशीनजवळ थांबवून पीडितेला मारहाण करत अत्याचार केला. घटनेची कोठे वाच्यता केल्यास पीडितेस व तिच्या मुलाला ठार मागण्याची धमकी दिली. तसेच नातेवाईकांची बदनामी करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. यावरून तुळजापूर पोलिसात पठाण विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
महाविकास आघाडीशी आघाडी न झाल्यास स्वबळावर लढणार- एमआयएम जिल्हाअध्यक्ष गोलाभाई शेख
तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हयात नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महा-विकासआघाडी सोबत जाण्यास एमआयएम तयार, परंतु आघाडीकडून सन्मानाची वागणूक न मिळाली तर पक्ष स्वबळावरही लढण्यास सज्ज असल्याचे मत जिल्हा अध्यक्षा सिद्धीक उ़र्फ गोलाभाई शेख यांनी व्यक्त केले. तुळजापूरमध्ये पत्रकारांशी संवादात गोलाभाई शेख म्हणाले, “भाजपला सत्ता पासून रोखण्याकरिता आम्ही महाविकासआघाडी सोबत जाण्यास इच्छुक आहोत. परंतु, आमच्या पक्षाला योग्य स्थान व सन्मान मिळाला नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारीत आहोत.” गोलाभाई शेख पुढे म्हणाले कि “जिल्ह्यात आमच्या पक्षाकडे सर्वजाती, सर्वधर्मीय उमेदवारांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.”“नळदुर्ग, तुळजापूर या परिसंस्थांमध्ये महाविकासआघाडी सोबत राहण्याचे आमचे मन आहे; पण सन्मानाच्या बाबतीत जर समंजसपणा झाला नाही तर आम्ही स्वबळावर उतरण्यास तयार आहोत“एमआयएममध्ये येण्यासाठी अनेक मोठे नेते येण्यास इछुक असल्याचे यावेळी स्पष्ट केले. एमआयएम ची तालुक्यात नळदुर्ग येथे राजकिय ताकद आहे तसेच तुळजापूर तालुक्याचा निकालात ही एमआयएम ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
तुळजापूर प्रभाग क्रं 1 मध्ये भाजपा भाकरी फिरवणार का ?
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद चे बिगुल वाजला असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भावी नगरसेवकांची लगबग सुरु झाली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक तुळजापूर खुर्द मधील उमेदवारीकडे सगळयांच लक्ष लागलेलं असून सत्ताधारी भाजपा मधून इच्छुक असलेल्या कोणत्या भावी नगरसेवकाला पक्षकडून संधी मिळेल हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रभागाची भौगोलिक रचना ही सारा गौरव, गवते प्लॉटिंग, तुळजाई नगर, समर्थ नगर तुळजापूर खुर्द व शिवरत्न नगर व लातूर रोड कडील काही भाग असा असून एकूण मतदार संख्या ही 2188 यात पुरुष मतदार 1105 तर महिला मतदार 108: या निवडणुकीत आपल्या मतांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी तुळजापूर खुर्द मधील नगर पालिकेच्या शाळा क्रं 3 मध्ये स्वतंत्र 3 बूथ ची व्यवस्था निवडणूक विभागा मार्फत करण्यात आली आहे यामुळे सारा गौरव, गवते प्लॉटिंग समर्थ नगर या हद्दवाढ भागातील मतदारांची गैरसोय होणार असून मतदानाच्या टक्केवारी वर याचा परिणाम होणार आहे या मतदारांना मतदान केंद्र समर्थ नगर येथील पालिकेच्या अंगणवाडी येथे सोयीचे ठरले असते या भागापासून सध्याचे मतदान केंद्राचे अंतर हे जवळपास अर्धा ते एक किलोमीटर लांब आहे हद्दवाढ भागात मागील काळात कसल्याही प्रकारची विकास कामे केली गेली नसल्याने या भागातील मतदारांची तीव्र नाराजी विद्यमान नगरसेवका वर असल्यामुळे जाणून बुजून या पुढऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून मतदान केंद्र हे मतदारांच्या गैरसोयीचं करून ठेवल्याची चर्चा या मतदार संघात सुरु आहे यंदा इच्छुक असणारे नारायण नन्नवरे यांचा 2011 सालच्या निवडणुकीत एनवेळी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकाप पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवून याच पंडीत जगदाळे यांनी त्यांचा पत्ता कट करून नगरसेवक पद पटकावले होते याची मनात कोणतेही सल मनात न ठेवता व यावेळेस ही पक्षाने संधी न दिल्याने नाराज न होता नारायण नन्नवरे यांनी पक्षाचा आदेश मानून पंडीत जगदाळे व मंजुषा देशमाने यांच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती या प्रभागातील आरक्षण हे अ- सर्वसाधारण स्त्री व ब - सर्वसाधारण असे असून यामध्ये भाजपा कडून नारायण नन्नवरे, पंडीत जगदाळे, प्रसाद पानपुडे व मंजुषा देशमाने,ऍड अंजली साबळे हे इच्छुक असून पक्षातील त्यांचे जुने सहकारी नारायण नन्नवरे हे उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठी कडे जोर लावत आहेत तर त्यांना मानणारे कार्यकर्ते, मतदार हे त्यांनी कोणत्याही परिस्थिती मध्ये अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षा कडून ही निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरत आहे तसेच महाविकास आघाडी ही नारायण नन्नवरे यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्नशिल आहे. अशा परिस्थिती मध्ये भाजपा पक्षश्रेष्ठी प्रभाग क्रमांक एक मध्ये भाकरी फिरवते की असलेली भाकरी करपवते हे पाहण्याचे आत्सुक्याचे ठरेल.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि अशा अपघातातील पीडितांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.नगरपालिका, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करणे,खड्डे व उघड्या मानवनिर्मित गटारांमुळे मृत्यू किंवा अपघात झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देणे या उद्देशाने ही समिती कार्यरत राहणार आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या समस्येचे तत्काळ निराकरण होण्यास मदत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात खराब रस्ते व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली.या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे आदेश पारीत केले असून त्यानुसार जिल्ह्यात समितीची स्थापना करण्यात आली आहे. शहरात व ग्रामीण भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही समिती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार नगर परिषद हद्दीत मुख्याधिकारी,नगर परिषद व सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची समिती तयार करण्यात आली असून नगर परिषदेच्या कार्यक्षेत्राबाहेरील भागासाठी जिल्हाधिकारी व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करून संबंधितांना नुकसानभरपाई देणे या समित्यांची जबाबदारी असणार आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांतील मृतांच्या वारसांना 6 लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली असून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या स्थितीचा गंभीरपणे विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार,खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या अपघातांत मृत्यू झाल्यास मयतांच्या वारसांना 6 लाख रुपये,तर गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार ते 2.5 लाख रुपये इतकी भरपाई देण्यात येणार आहे. ही भरपाई संबंधित स्थानिक संस्था अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी लागणार असून पुढे ही रक्कम रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींसाठी जबाबदार ठरलेल्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांकडून वसूल केली जाईल. तसेच,खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी 48 तासांच्या आत समितीला कळविणे अनिवार्य असेल.नुकसानभरपाई प्रक्रियेत कोणतीही विलंब न करता त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजा डिसेंबर महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची डिसेंबर - 2025 मधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी. असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत श्रद्धेने केली जाणारी पूजा असून,नोंदणीसाठी http://shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर ‘सिंहासन पूजा पास बुकिंग'या मेन्यूवर क्लिक करून, https://shrituljabhavanimataseva.orgया लिंकवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. नोंदणी कालावधी : 20 नोव्हेंबर 2025 सकाळी 10 वाजता ते 25 नोव्हेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत. प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट : 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.भाविकांनी प्रथम फेरीचे ऑनलाईन पेमेंट 27 नोव्हेंबर सकाळी 11 ते 28 नोव्हेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एसएमएस पाठविण्यात येईल. व्दितीय फेरीचे ऑनलाईन पेमेंट 28 नोव्हेंबर सकाळी 11 ते 29 नोव्हेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत करता येईल. तृतीय सोडत व भाविकांना एसएमएस 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजतापर्यंत पाठविण्यात येईल.तृतीय फेरीचे ऑनलाईन पेमेंट 29 नोव्हेंबर सकाळी 11 ते 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करता येईल. डिसेंबर 2025 या महिन्यातील अंतीम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. वरीलप्रमाणे सर्व भाविक भक्त, महंत,पुजारी,सेवेकरी आणि नागरिकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पूजेच्या नोंदणीची माहिती लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी, दिनांक 21 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत श्री देवीजींची मंचकी निद्रा असल्याने तसेच 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्य यजमान,तिन्ही पुजारी मंडळ व महंत यांचेसाठी सिंहासन पूजा आरक्षित असल्याने या कालावधीत सिंहासन पूजा होणार नाही.याची भाविकांनी नोंद घ्यावी.असे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी कळविले आहे.
प्रभाग 20 मध्ये विलास लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन, भव्य रॅलीसह भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला वेग येत असताना आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपचे युवा नेते विलास बापू लोंढे यांनी शेकडो समर्थकांसह दिमाखात नगर परिषद कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भाजप कार्यालयापासून नगर परिषदेपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मोटारसायकल रॅली, फटाके, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आज प्रभाग 20 मध्ये निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. विलास लोंढे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून नगर परिषद कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीता अंधारे नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी प्रभागातील आणि शहरातील महत्त्वाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, धारासुर मर्दिनी देवी मंदिर, हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी (रहे.) दर्गाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच लहुजी वस्ताद साळवे चौक येथे जाऊन त्यांनी आशिर्वाद घेत निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. विलास लोंढे यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग 20 मधील राजकीय समीकरणात मोठी रंगत येणार असून, त्यांच्या भव्य शक्ती प्रदर्शनाची आज दिवसभर चर्चाच सुरू होती. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे प्रभाग 20 मधील ही उमेदवारी विशेष ठरली आहे.
विद्यापीठीय मैदानी स्पर्धेमध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूमच्या विध्यार्थ्यांचे यश
मुरुम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाराशिव झोनच्या मैदानी स्पर्धा दि. 11/12/2025 रोजी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे घेण्यात आल्या. या मैदानी स्पर्धेमध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूमच्या विध्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये राठोड अजित बाबू याने 400 मीटर धावणे प्रथम, राठोड कृष्णा संजय 5000 मीटर धावणे तृतीय आणि कुमारी हाक्के प्रतीक्षा विश्वभर 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, सदस्य शरण पाटील यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर प्राचार्य. डॉ अशोक सपाटे, उपप्राचार्य, डॉ. चंद्रकांत बिराजदार व सर्व प्राध्यापकांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. या विध्यार्थ्यांना प्रा. गणापुरे राजेंद्र यांनी मार्गदर्शन केले.
एकतर्फी निकाल लागेल वाटलं नव्हतं, बिहार निवडणूक निकालांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सशक्त लोकशाहीमध्ये हार आणि जीत होत असते मी नितेश कुमार यांना मिळालेल्या बहुमत बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, एकतर्फी निकाल लागेल वाटलं नव्हतं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “यावेळी आमच्यापेक्षा त्यांचा गटबंधनचा परफॉर्मन्स […]
उबाठाचे नरेश हुले, फारूक मुकादम शिंदे शिवसेनेत
आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख विश्वास [...]
Solapur : सोलापुरात मनपाचे 4 सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा सेवेत !
सोलापूर महापालिकेत सहा महिन्यांसाठी करार पद्धतीवर पुनर्नियुक्ती सोलापूर : महापालिकेत विविध विभागात सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे, सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तुपदोळकर, सेवानिवृत्त अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि सेवानिवृत्त सहाय्यक [...]
Solapur : सोलापूर महापालिकेची प्रारूप मतदारयादी ‘या’तारखेला होणार जाहीर
सोलापूर महापालिका निवडणूक तयारीला गती सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रारूप मतदारयादी १४ नोव्हेंबरऐवजी आता २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीवर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना [...]
बिहार निवडणुका हायजॅक, ज्ञानेश कुमार यांचे अभिनंदन –संजय सिंह
“मी तीन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, बिहार निवडणुका हायजॅक झाल्या आहेत. ८० लाख मते चोरल्याबद्दल अज्ञेनेश कुमार यांचे अभिनंदन”, अशी टीका आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर आपलॆ प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह म्हणाले आहेत की, “मी आधीच सांगितले होते की, ही […]
कोलकाताच्या ऐतिहासिर इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण संघ 159 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने लोटांगण घातलं आणि अवघ्या 55 षटकांमध्येच संपूर्ण संघ तंबूत परतला. दिवसा अखेर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली असून 20 षटकांमध्ये […]
Solapur : सोलापुरात रेल्वेच्या चाकांवर आता ‘सीसीटीव्हीची नजर’ !
सोलापूर रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित सोलापूर : सोलापूरमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीन सुरक्षित होणार आहे. स्थानकावरील आठ हटमध्ये प्रत्येकी दोन असे १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून रेल्वेच्या चाकांपासून ते ब्रेक सिस्टीमपर्यंत प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीमधून बारकाईने लक्ष असणार आहे. रेल्वे गाडी स्थानकात येताना किंवा बाहेर [...]
न्यायालयाच्या आवारातच वकीलाला पक्षकाराकडून धमकी
संबंधितावर अदखलपात्र गुन्हा ; कडक कारवाईची सावंतवाडी वकील संघटनेची मागणी सावंतवाडी प्रतिनिधी पक्षकाराकडून एका ज्येष्ठ वकीलाला न्यायालयाच्या आवारातच धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला असून याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार राज्यात रोज घडत आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन धमकी देणाऱ्या संबंधितांच्या [...]
Solapur : आळंदीत शनिवारी कार्तिकी एकादशी; लाखो भाविक अलंकापुरीत दाखल
संजीवन समाधी दिन सोहळा कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरा आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत शनिवारी श्रीचे ७३० व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा [...]
Solapur : सोलापूरकरांतर्फे पद्मावतीला माहेरची साडी अर्पण
आज पद्मावती देवीची लोटस मंगल कार्यालयात कुंकूमार्चना होणार सोलापूर : तिरुपती येथील पद्मावतीदेवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून ‘पुट्टींटी पट्टचिरा’ अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत. यानिमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार १४ रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकूमार्चना तर येथील व्यंकटेश्वर मंदिरात १५ ते १९ पर्यंत [...]
बिहार निवडणूकीच्या विजयानंतर कुडाळात भाजपचा जल्लोष
कुडाळ – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळवित ऐतिहासिक विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील भाजप पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथील भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष करीत आनंद व्यक्त केला फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली.या विधानसभा निवडणुकीत एनडीए व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. एनडीएमध्ये भाजप, जनता दल युनायटेड , लोकजनशक्ती पार्टी [...]
बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्ता कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाला (RJD), ज्याला २०१० नंतरचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी त्यांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे तो म्हणजे सर्वाधिक मतांचा वाटा. मतमोजणी सुरू होऊन सहा तास उलटल्यानंतर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला […]
Photo –शिवसेनेत जोरदार इनकमिंग, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत
अहिल्यानगरमधील अकोले येथील कुशाबा धांडे, सिंधुदुर्गातील राकाशेठ चव्हाण, रत्नागिरी खेडमधील शिंदेगटाचे संघटक रविंद्र झगडे, पनवेलमधील राजेश मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Karad News : मुंढे वीज वितरण कार्यालयात बिबट्याचा बाबर; दोन बछड्यांसह सीसीटीव्हीत कैद
मुंढे परिसरात बिबट्याचा वावर कराड: मुंढे (ता. कराड) येथील बीज वितरण कार्यालय आवारात दोन बछड्यांसह बिबट्याचा बाबर असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ३० व ३१ ऑक्टोबर रोजी बिबट्याचा बाबर सीसीटीव्हीत दिसत असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता विशाल ग्रामोपाध्याय यांनी दिली. कराड [...]
कामगारांची दिशाभूल करण्याचे भाजपचे मनसुबे उधळले, शिवसेनेचं ताज लँड्स समोर जोरदार आंदोलन
वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँड्स हॉटेलमधील कामगारांची दिशाभूल करून त्यांना भाजपच्या संघटनांमध्ये घेण्याचे भाजपचे मनसुबे शिवसेनेच्या शिलेदारांनी उधळून लावले आहेत. शिवसेनेकडून ताज लँड्स समोर जोरदार आंदोलन केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. मंगळवारी ताज लँड्स येथे भाजपने अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाची सुरुवात […]
Satara : तासवडे औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल कंपनीत आग
टेक्सटाईल कंपनीतील आग विझविण्याचे यशस्वी प्रयत्न उंब्रज : तासवडे औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल कंपनीत अचानक आग लागण्याची घटना गुरुवारी १३ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतेही हानी झाली नाही. मात्र काही काळ मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण [...]
माडखोल पावणाई रवळनाथ देवस्थानचा जत्रोत्सव उद्या
ओटवणे । प्रतिनिधी माडखोल गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारा रवळनाथ आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी पावणाई देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर पावणाई रवळनाथ काळकाई देवतांना भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या [...]
धाराशिव (प्रतिनिधी)- पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वासाहत विरोधी राष्ट्रवादी,धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, सामाजिक, लोकशाहीवादी आणि सुप्रसिद्ध लेखक होते. ते सोळा वर्ष भारताचे पंतप्रधान होते.त्यांनी संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडलेला आहे.असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पंडित नेहरू यांच्या जयंतीच्या वेळी उद्गार काढले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर बालाजी गुंड , श्री सचिन चव्हाण, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे आदींसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satara : पिपाणी चिन्ह कायमचे रद्द; शशिकांत शिंदे यांनी आयोगाचे मानले आभार
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे समाधान, चिन्ह रद्दीनंतर राजकारणात स्थिरता एकंबे : राज्यातील बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणी उर्फ ट्रम्पेट या चिन्हामुळे पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार [...]
बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड
तुळजापूर (प्रतिनिधी)- रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी CSR“रोटरी इंडिया नॅशनल अवॉर्ड 2025” जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर या कंपनीने मोठ्या उद्योगसमूह या गटात आरोग्य क्षेत्रातील बेस्ट प्रोजेक्ट हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. रोटरी इंटरनॅशनलचे संचालक श्री. के. पी. नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ माणेकशॉ सेंटर, दिल्ली येथे 13 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडला. या वेळी रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री. शरत जैन, सचिव मंजू फडके, तसेच रोटरी इंडिया नॅशनल अवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते. सोलापूर स्थित बालाजी अमाईन्स लिमिटेड ही अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, व्यावसायिक यशासोबतच आरोग्य क्षेत्रातही ती सातत्याने उल्लेखनीय सामाजिक कामगिरी बजावत आहे. कोविड काळापासून कंपनीने सोलापूर शहरातील तीन रुग्णालयांचे नूतनीकरण करून, अत्यल्प किंमतीत किंवा विनामूल्य आरोग्यसेवा देण्याची सुविधा निर्माण केली आहे. या रुग्णालयांमध्ये आज अत्याधुनिक वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत. या प्रसंगी बोलताना डी. राम रेड्डी म्हणाले, “ CSR ची कायदेशीर जबाबदारी लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने 1990 च्या दशकात ‘बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. आमचे चेअरमन श्री. ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात ‘ज्या समाजातून आपण कमावतो, त्यालाच काहीतरी परत द्यावे; हाच खरा CSR चा अर्थ आहे. ते पुढे म्हणाले, “हा राष्ट्रीय सन्मान आमच्या टीमच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. आम्ही आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रांमध्ये केलेले कार्य इतर उद्योगांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
तुकाराम गंगावणे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहिर
परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील जेष्ठ साहित्यिक धाराशिव जिल्हयाचा मानबिंदू गडंगणकार , समाजभूषण तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्य जिवण गौरव पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे.सदरील पुरस्कार पुणे येथील महात्मा फुले सभागृहात दि.23 नोहेंबर 2025 रोजी वितरीत करण्यात येणार आहे.गंगावणे यांच्या साहित्य व सामाजिक कार्याची दख्खल घेऊन हा सन्मान दिला आहे . तुकाराम गंगावणे यांना दि बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया हा अंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाला असून समाजभुषण, साहित्यरत्न, धाराशिव जिवणगौरव, तेरणा भूषण, राष्ट्र गौरव, मानवता गौरव, डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखण पुरस्कार, इंदिरा गांधी अवॉर्ड, अनमोल रत्न, प्रेरणा, संत तुकाराम महाराज पुरस्कार, समाज सुधारकरत्न, जनसेवा, असे अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . गंगावणे यांना महात्मा फूले साहित्य जिवण गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धनाचे धडे
धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 12 नोव्हेंबर हा पद्मविभूषण प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ.सलीम अली यांचा जन्मदिवस. पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कार्यामुळेच भारतात पक्षी निरीक्षणाची परंपरा सुरू झाली, ज्यामुळे त्यांना भारतातील पक्षी निरीक्षकांचा 'आद्यगुरू'मानतात. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना “बर्डमॅन ऑफ इंडिया“ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या जयंतीच्या व पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने धाराशिव येथील गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 'सुरेख हे पक्षी निसर्गरक्षी'या पक्षी संवर्धनावरील विषयाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मानद वन्यजीव रक्षक, पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्पत्तीपासून पक्ष्यांविषयी शास्त्रशुध्द माहिती देवून पक्षी संवर्धनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पक्षी हा मानव आणि पर्यावरणातील महत्वाचा घटक कसा आहे हे पटवून देताना विद्यार्थ्यांना स्थानिक व परदेशी पक्षांची माहिती पी.पी.टी. व दृकश्राव्य माध्यमातून दिली. यात त्यांनी पक्षांचा अधिवास, विणीचा हंगाम, स्थलांतरित, खाद्यजीवन, पक्षांतील बारकावे, निरीक्षणे, पक्ष्यांमधील गमतीजमती, आकार, रंग, अधिवास, घरट्यांचे वैविध्य विशद करताना पक्षांचा मानव जातीला आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने शेतीला असणारा उपयोग मुलांना पटवून दिला. यात त्यांनी प्रामुख्याने स्थानिक पक्षी सुगरण, कोतवाल, खाटिक, कीर पोपट, वेडा राघू, मोर, बगळे, चिमणी, कावळा, होला, धीवर, शिंपी, पाणकावळे, घार, सर्पगरुड प इ. तसेच स्थलांतरित विदेशी असे रोहित, चक्रवाक, पट्टकादंब, मराल, तलवार, जांभळी पाणकोंबडी, चित्रबलाक, मुग्धबलाक, धोबी, तुतवार पक्षी इ. अशा जवळपास 100 पक्षांविषयी माहिती सांगितली. मार्गदर्शनाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे, मनातील प्रश्नांचे निरसन करून येणाऱ्या उन्हाळ्यात पक्षांच्या अन्न पाण्याची सोय करा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सलीम अली यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशन प्रमुख प्रा.विनोद आंबेवाडीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला शिंदे तर आभार पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील सामाजिक संघटना शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सन 2025-26 या वर्षाकरिता धाराशिव जिल्हा व धाराशिव शहर कार्यकारिणींची निवड करण्यात आली.यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी अमोल सिरसट तर शहराध्यक्षपदी संतोष घोरपडे यांची एकमताने निवड करण्यात आली. काल झालेल्या समितीच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये सर्वानुमते या निवडीत जिल्हा उपाध्यक्षपदी हनुमंत यादव, सचिव श्रआकाश भोसले, कार्याध्यक्ष मनोज मोरे, सहकार्याध्यक्ष अमोल साळुंके, संघटक सतीश थोरात, सहसंघटक सचिन उमाप, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सहकोषाध्यक्ष राजेंद्र मोरे, प्रवक्ता राहुल घोडके, सहप्रवक्ता अविनाश अंधारे, प्रसिद्धी प्रमुख लहू शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख विशाल घोडके, सोशल मीडिया महेश कळमकर, विनोद कावळे तर कायदेशीर सल्लागार पदी अड. जयप्रकाश साळुंके यांची निवड करण्यात आली.तर धाराशिव शहर कार्यकारिणी मध्ये शहराध्यक्षपदी श्री संतोष घोरपडे, उपाध्यक्ष श्रभैरवनाथ रणखांब, सचिव ऋषिकेश काळे,कार्याध्यक्ष अविनाश रणखांब,सहकार्याध्यक्ष उदय गायकवाड, संघटक प्रथमेश जगदाळे, सह संघटक आदित्य मुंडे, कोषाध्यक्ष अनंत झाडके, सहकोषाध्यक्ष लखन क्षीरसागर, प्रवक्ता रामानंद माडेकर, सहप्रवक्ता केदार जाधव, प्रसिद्धीप्रमुख योगेश रायबान, सहप्रसिद्धीप्रमुख अनिल अंकुश, सोशल मीडिया सुजित मगर, प्रदीप लोमटे तर कायदेशीर सल्लागार पदी अड. महेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीच्या मोठ्या पराभवावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीचा पराभव एसआयआरमुळे झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. बिहारमध्ये एसआयआरने गेम केला आहे आणि आता हाच डाव पश्चिम बंगाल, यूपीसह इतर राज्यांमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही, असा इशारा अखिलेश यादव […]
जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025 अंतर्गत सोयाबीन,मूग व उडीद या पिकांसाठी अनुक्रमे 5328रुपये, 8768 रुपये आणि 7800 रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत घोषित केलेली आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील 31 खरेदी केंद्रांवर 15 नोव्हेंबर 2025 पासून प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित खरेदी केंद्रांवर सुरू झाली असून,नोंदणीसाठी आधारकार्ड, अद्यावत बँक पासबुक,तसेच खरीप 2025 चा ई-पीक पाहणी नोंद असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे घेऊन कार्यालयीन वेळेत पोर्टलवरील मशिनवर स्वतःची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना शेतमाल केंद्रावर आणण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक दिवस आधी पाठविण्यात येईल. हा प्राप्त झाल्यानंतर त्या दिवशी शेतमाल केंद्रावर आणणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील 31 खरेदी केंद्रांची यादी ही तालुका, खरेदी केंद्राचे नाव आणि सब एजंट संस्थेचे नाव धाराशिव तालुका- धाराशिव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ,धाराशिव,टाकळी (बें) - विकास कृषी पणन सहकारी संस्था,म.धाराशिव,चिखली - वसुंधरा जिल्हा कृषी पणन व प्रक्रिया सहकारी संस्था,कनगरा,ढोकी - पुण्यश्लोक राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.ढोकी,गोवर्धनवाडी - पवनराजे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,खामगाव - गणराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. तुळजापूर तालुका- तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी संघ, म.तुळजापूर,नळदुर्ग - श्री खंडोबा पणन सहकारी संस्था,म.अणदूर लोहारा तालुका- कानेगाव - जगदंबा सहकारी खरेदी विक्री संस्था,म.लोहारा,दस्तापुर - दस्तापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,म. दस्तापुर,बेंडकाळ - एन.एन.जी.ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. उमरगा तालुका- गुंजोटी - गुंजोटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,गुंजोटी,उमरगा - श्री स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था, म.गुंजोटी,नारंगवाडी पाटी - श्रीयोग फार्मर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि., कळंब तालुका- कळंब - एकता खरेदी विक्री संस्था, म. धाराशिव,शिराढोण - तालुका सहकारी खरेदी विक्री संघ,म.कळंब,चोराखळी - राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.चोराखळी,गौर - भैरवनाथ किसन कृषी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,हासेगाव (के) - ॲग्रोवेट ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. वाशी तालुका- वाशी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,म. वाशी, पारा, कळंब तालुका भाजीपाला फळबाग उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था,कवडेवाडी - अंजिक्य ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि., भूम तालुका- भूम तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,म.भूम,ईट - तनुजा महिला शेतीपुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.सोन्नेवाडी, सोन्नेवाडी - कै.उत्तमराव सौन्ने कृषिमाल पुरक सहकारी संस्था,म.सोन्नेवाडी,पाथ्रुड - कामधेनु कृषिमाल सेवा व विविध व्यवसायीक सहकारी संस्था,गिरवली फाटा - कृषीवाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यासह धाराशिव,तुळजापूर,उमरगा आणि कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हे खरेदी केंद्र सुरू आहेत. एफ ए क्यू दर्जा व अटी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केंद्रावर फक्त दर्जाचाच माल स्वीकारला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ, चाळणी करून आणावा. जिल्हास्तरीय दक्षता पथक: अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य,स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी (पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी) सदस्य,जिल्हा उपनिबंधक सदस्य सचिव आहे. तालुकास्तरीय दक्षता पथक: तहसिलदार अध्यक्ष,तालुका कृषी अधिकारी सदस्य,स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे प्रतिनिधी सदस्य, सहाय्यक निबंधक सदस्य सचिव हे आहेत. खरेदी प्रक्रियेशी संबंधित अडचणींसाठी केंद्र शासनाने हेल्पलाईन क्रमांक 1800-210-1222 उपलब्ध करून दिला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नोंदणी करून आपल्या शेतमालाची विक्री करावी,असे आवाहन जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या अध्यक्षा तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी केले आहे.
उमेदवारीसाठी भाजप शहराध्यक्षांकडे मागणी केल्याचे आहेत पुरावे मालवण / प्रतिनिधी नगराध्यक्ष पदासह नगरसेविका पदासाठी देखील मी इच्छुक म्हणून शहर भाजपाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शहरात झालेल्या बैठकीला आणि ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या मुलाखतीला आपल्याला भाजपाकडून बोलवलेच नाही, अशी भूमिका माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. ममता वराडकर या [...]
बिग बींनी सुनावले पापाराझींना खडे बोल.. नेमकं काय घडलं? वाचा
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी आले असून सध्या घरातच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात असल्यापासून त्यांच्यांबाबतचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांची प्रकृती बिघडल्यापासून त्यांच्या घराबाहेर, रुग्णालयाबाहेर पापाराझी ठाण मांडून बसले होते. मीडियाच्या या कृतींमुळे अनेक सेलिब्रिटी संतापले आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का! सनी […]
गूळ खरेदी करताना अस्सल गूळ कसा ओळखावा, जाणून घ्या
हिवाळ्यात गूळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे कारण त्याचा तापमानवाढीचा प्रभाव असतो. तो शरीराला आतून उबदार ठेवतो आणि खोकला आणि सर्दी टाळतो. हिवाळ्याच्या काळात खूप गुळ खात असाल आणि बाजारातून तो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरा आणि नकली गुळ ओळखण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. आपल्या किचनमध्ये दडलेत पित्तावरील रामबाण उपाय, जाणून घ्या गूळ […]
Karad News : कराडमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
शिक्षणाच्या ताणामुळे आत्महत्येची घटना कराड : येथील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आर्यन अधिकराव फडतरे (वय १७, रा. गोंदवले, ता. माण) असे त्याचे नाव असून, [...]
Kavthehankal Crime : पूर्व वैमनस्यातून खून करण्याचा प्रयत्न, फिर्यादी गंभीर जखमी
कवठेमहांकाळ पोलिसांची तत्पर कारवाई कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे मंगळवारी एकावर पूर्व वैमनस्यातून एकावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. कवठेमहांकाळ शहरातील उपकोषागार कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी मोहसीन दस्तगीर जमादार (वय ३७, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात [...]
Miss Universe 2025 –सावळ्या रंगांमुळे आपल्याच देशात ट्रोल होतेय मिस पाकिस्तान
थायलंडमध्ये सध्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा सुरू होत आहे. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवेगळे वाद समोर येत आहेत. जगभरातील सौंदर्यवती या स्पर्धेत त्यांच्या देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. पाकिस्तानमधील रोमा रियाझ ही सौदर्यवती देखील या स्पर्धेत सहभागी होत आहे. पण स्पर्धेत सहभागी होण्याआधीच तिचा ट्रोल केलं जातंय. रोमा रियाझ (27) ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरची […]
नितीश कुमार मुख्यमंत्री होते व राहणार…जदयूने आधी केले पोस्ट नंतर केले डिलीट
बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालात भाजप व जदयू सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर असून कधी भाजप पुढे जातेय तर कधी जदयू. सध्या भाजप 92 जागांवर तर जदयू 81 जागांवर आघाडीवर आहे. अद्याप पूर्ण निकाल हाती आलेला नसतानाच संयुक्त जनता दलाने नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेला 159 धावांमध्ये ढेर करत टीम इंडियाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर असल्याचे सिद्ध केले. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आफ्रिकन फलंदाजांना वेसन घालत विकेटचा पंच ठोकला. मोहम्मद सिराज, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. दक्षिण आफ्रिकेचा […]
पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन, वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. इंग्रजी संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या आणि बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३० जून १९११ रोजी तुमकूरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. ग्रामीण कर्नाटकात अनेक दशके केलेल्या […]
भाजपकडून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी १२ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला . नगरपालिकेच्या निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने नगरपालिकेत पहिली एंट्री [...]
Sangli : कवठेपिरान येथे अपघातात सांगलीच्या युवकाचा मृत्यू
कवठेपिरान- दुधगाव रस्त्यावर ट्रॅजिक अपघात; युवक ठार सांगली : रस्त्याकडेला लावलेल्या चारचाकी चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने मागून येणाऱ्या दुचाकीस धडक बसल्याने रस्त्यावर पडलेल्या युवकास समोरुन येणाऱ्या ट्रकने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील भिमराव [...]
एकाही व्यक्तीने भाजपला मत दिलं नाही तरी ते निवडणूका जिंकतील, अभिनेत्याचा जोरदार टोला
बिहारच्या विधानसभा निवडणूकीचा निकालात सध्या भाजप व जदयू आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर राजद व काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या जागांमध्ये तर मागच्या निवडणूकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या या निकालावरून देशभरातील विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. Today, BJP has won #Bihar as I said long ago. And I […]
हिवाळ्यात आहारामध्ये कोथिंबीर सर्वाधिक समाविष्ट करणे का गरजेचे आहे, जाणून घ्या
कोथिंबीर आपल्या किचनमधील महत्त्वाची भाजी.. कोथिंबीर अन्नाची चव तर वाढवतेच. त्याशिवाय, आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते. हिवाळ्यात लोकांना ते का आवडते आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. वारंवार पोटफुगीचा त्रास होत असल्यास करुन बघा हे घरगुती उपाय, वाचा हिवाळ्यात कोथिंबीराचा वापर कसा कराल? हिवाळ्यात ताज्या कोथिंबीरीपासून भाज्या, सॅलड, चटण्या आणि पराठ्यांमध्ये […]
बिहारमधील निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब; रोहित पवारांचा ECI, BJP वर निशाणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. दोन टप्प्यात झालेल्या बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी समोर आले. सुरुवातीला […]
आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम
सध्याच्या घडीला मखाना हा आरोग्यदायी पर्याय म्हणून अनेकांकडून सेवन केला जात आहे. मखाना हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता म्हणून ओळखला जातो. निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम नाश्ता आहे. मखानामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक […]
मधुमेहींसाठी संजीवनी आहेत हे सुपरफूड्स, जाणून घ्या
आपल्याकडे मधुमेहग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढू लागली आहे. या आजाराच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांच्या आहारानुसार साखरेची पातळी चढ-उतार होते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखर पचवू शकत नाही तेव्हा हा आजार अधिक बळावतो. यामुळे शरीराच्या नसा हळूहळू खराब होतात. हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा मधुमेह लवकर नियंत्रित […]
हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हिवाळा सुरू होताच, बथुआ बाजारात उपलब्ध होतो. म्हणून या पालेभाजीपासून चविष्ट असे पदार्थ करु शकतो. चाकवत हा केवळ जिभेच्या चोचल्यांसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठीही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. खासकरुन हिवाळ्यात चाकवत मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. चाकवतमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यास त्यावर कोणते […]
Miraj : मिरज खुनातील मुख्य संशयित कारागृहातून पळाला
सांगली कारागृहातून खुनाती ल मुख्य संशयिताचा पलायन सांगली : मिरजेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले (रा. मिरज) हा गुरुवारी सांगली कारागृहातून पळाला. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे तारांबळ उडाली. भोसलेच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. कुणालचा भाऊ वंश [...]
बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आलेल्या कलांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसते. दोन टप्प्यात पार पडलेल्या या निवडणुकीत एनडीएने 190 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे, तर महागठबंधनला 50 जागाही मिळालेल्या नाहीत. या निकालावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या विधानसभा […]
पूजा नाईकच्या आरोपात नाही तथ्य
राजकारण्याच्या नावाचा उल्लेख नाही : अधीक्षकराहूलगुप्तायांचीमाहिती पणजी : कथित नोकरी घोटाळ्यासंदर्भात संशयित पूजा नाईकने आतापर्यंत केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली असता, अनेक दावे चुकीचे असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती गुन्हा शाखेचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी काल गुरुवारी दिली. आरोप गंभीर असल्याने तपास सुरूच राहील. गुन्हा शाखा सध्या नोंदवलेल्या जबाबांचे विश्लेषण [...]
kolhapur News : किरणोत्सवाचा अखेरचा पाचव्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत!
पाच दिवसांच्या किरणोत्सवाची सांगता कोल्हापूर : किरणोत्सवाचा अखेरचा पाचव्या दिवशी (गुरुवारी) मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपासून खांद्यापर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली. ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्यकिरणांच्या आड ढगांची पुसटशी झालर आली. हवेतील बाष्पांचाही सूर्यकिरणांच्या प्रवासात व्यत्यय झाला होता. त्यामुळे सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहरा अथवा किरीटांपर्यंत [...]
हणजूण येथील जमीन हडपप्रकरणी सुहैलसह चौघांविरोधात आरोपपत्र
पणजी : हणजूण येथे जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, रॉयसन्स रॉड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात 569 पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 486/6 मधील जमीन हडप प्रकरणात [...]
सोमवारपर्यंत भाजपचे उमेदवार होणार जाहीर
गोवाप्रदेशाध्यक्षदामूनाईकयांचीमाहिती: प्रत्येकमतदारसंघातीलनेत्यांसोबतस्वतंत्रपणेचर्चा म्हापसा : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची एकमताने निवड केली जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघात भाजपातर्फे एकमेव उमेदवार असेल याकडे भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पंचायतीसाठी उत्तर गोव्यातील 25 जागांवर भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री [...]
पैसे घेणारे, देणारेही दोषी : सरदेसाई
मडगाव : नोकरीसाठी पैसे घेण्याच्या प्रकरणांचा आपल्याला मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबाबतीत अनुभव नाही. त्यामुळे आपण त्यावर बोलू शकत नाही. मात्र जे उमेदवार नोकऱ्यांसाठी पात्र होते आणि ज्यांना पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याने संधी डावलली गेली त्यांची आपल्याला काळजी आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. या प्रकरणात पैसे देणारे व घेणारे [...]
‘अ युजफूल घोस्ट’ ने होणार इफ्फीचा समारोप
पणजी : ‘अ युजफूल घोस्ट’ या चित्रपटाने 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप होणार आहे. थाई चित्रपट निर्माते रत्चापूम बूनबंचचोके यांनी या विनोदी भयपटाची निर्मिती केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून गोव्यात 56 व्या इफ्फीचे आयोजन होणार असून तो 28 पर्यंत चालणार आहे. ‘अ युजफूल घोस्ट’ हा विनोदी भयपट नॅट या महिलेच्या जीवनावर आधारित आहे. धूळ [...]
Kolhapur : कुरुंदवाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई; ८.८७ लाखांचा तंबाखू मुद्देमाल जप्त
शिरदवाड–इचलकरंजी मार्गावर कारवाई; लाखोंचा माल जप्त कुरुंदवाड : शिवनाकवाडी गावचे हद्दीत आयको मिलसमोरील रोडवर टेम्पोतून बेकायदा सुगंधी तंबाखू वेगवेगळ्या कंपन्यांचे सुगंधी मसाले सुपारी घेऊन जात असताना येथील पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ८७ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. [...]
दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांची लूट
अॅड. संतोष मळवीकर यांच्याकडून पर्दाफाश : अधीक्षकांकडूनतीनपोलिसांचीचौकशीसुरु पणजी : गोवा दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांची लूट करणाऱ्या पोलिसांना शेरास सव्वाशेर भेटला आणि चेक नाक्यावरील पोलिसांचा पर्दाफाश झाला. नंतर त्याने गुरुवारी रितसर तक्रार दाखल करून पणजीत पत्रकार परिषद घेतली आणि सारा प्रकार पत्रकारांना सांगितला. दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांकडून पावती न देता पैसे घेणाऱ्या तीन पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी [...]
उबाठाकडून आज पुन्हा शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल
नगराध्यक्ष पदाबाबत अद्याप सस्पेन्स कायम ; मंदार ओरसकर यांचेही शक्ती प्रदर्शन मालवण/प्रतिनिधी उबाठा शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र, मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अद्याप उबाठा कडून कोणाचेही अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता.उबाठाकडून मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, स्मिता सरमळकर, पूजा जोगी यांनी तर काँग्रेस कडून [...]
शेतकरी आंदोलनाला मुधोळ येथे गालबोट
उसानेभरलेल्याट्रॅक्टर-ट्रॉलीपेटविल्या: 50 ट्रॅक्टरसहअनेकदुचाकीभस्मसात वार्ताहर/जमखंडी मुधोळ येथे ऊस दराकरिता सुरू असलेले आंदोलन गुरुवारी सायंकाळी पेटले असून महालिंगपूर जवळील समीरवाडी (सैदापूर) येथील गोदावरी साखर कारखान्याच्या परिसरात उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटविण्यात आल्या. काही ट्रॉली उलटण्यात आल्या. यात 50 ट्रॅक्टर-ट्रॉलांसह अनेक दुचाकी भस्मसात झाल्याची दुर्घटना घडली. शेतकऱ्यांचा मोर्चा मुधोळहून समीरवाडी फॅक्टरीकडे जाताच पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान [...]
बेळगावातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक
आझमनगरमध्येबोगसकॉलसेंटरवरछापा, बेंगळूरपाठोपाठबेळगावातहीलोण, पाचतरुणींसह33 जणांनाअटक बेळगाव : बेंगळूरनंतर बेळगाव येथेही एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला असून बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांना गंडविण्यात येत होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आझमनगर परिसरातील मुख्य रस्त्याशेजारी कॉल सेंटर उघडून फसवणूक करणाऱ्या 33 जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच तरुणींचा समावेश आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. [...]
Panhala Nagar Parishad : पन्हाळ्यात गुरूवारी एकही अर्ज नाही
मोकाशी–भोसले युतीची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुका लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. गडावर बैठकांना जोर आला आहे. गुरूवारी चौथ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. पन्हाळा [...]
सव्वाकिलोसोने, साडेआठकिलोचांदीजप्त: अट्टलगुन्हेगारालाथारवाहनासहअटक बेळगाव : ऐन दिवाळीत यमकनमर्डी, ता. हुक्केरी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वाकिलो सोने व साडेआठ किलो चांदीचे दागिने पळवणाऱ्या अट्टल घरफोड्याला यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. पोलीस मुख्यालयात झालेल्या [...]
प्रसिद्ध वृत्तपत्रात बातमी ऐवजी छापला ‘Prompt’, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ChatGPT ला योग्य तो प्रॉम्प्ट देऊन आपल्याला हवी ती माहिती अगदी सविस्तर उपलब्ध होतेय. त्यामुळे कन्टेंन्ट राइटर्सही याचा पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. पाकिस्तानातही AI चा वापर वाढत चाललाय. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने देखील AIचा वापर केला आणि ते वृत्त देशभरात व्हायरल झाले. त्यामुळे आता पाकिस्तान आणि […]
केएलईच्या उभारणीत डॉ. प्रभाकर कोरे यांचे योगदान मोठे
डॉ. एम. आर. जयराम: केएलईसंस्थेच्या110 व्यास्थापनादिनामित्तकार्यक्रम बेळगाव : केएलई संस्थेचा समाज बदलणारा एक अद्भूत शैक्षणिक प्रवास आहे. डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षणाची असंख्य झाडे लावली आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज संस्थेने गरुडझेप घेतली आहे. यासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. केएलईच्या उभारणीत डॉ. प्रभाकर कोरे यांचे योगदान मोठे, असे गौरवोद्गार एम. एस. [...]
लोकमान्यची 100 वी शाखा पुणे येथे लोकमान्य टिळक यांच्या वाड्यात सुरू
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची गरुड भरारी सुरूच आहे. 30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सोसायटीची 100 वी शाखा पुणे येथे लोकमान्य टिळक यांच्या वाड्यात सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन गृहराज्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सोसायटीने आता 10 हजार कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे [...]
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुपारपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एनडीएची गाडी सुसाट असून भाजप 87, तर जेडीयू 75 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या आरजेडीची पिछेहाट झाली आहे. आरजेडी सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे. अर्थात असे असले तरी मतांच्या टक्केवारीत आरजेडी वर आहे. निवडणूक […]
बेळगाव-गोवा चेनस्नॅचिंग प्रकरणी हुबळीतील जोडगोळीला अटक
टिळकवाडीपोलिसांचीकामगिरी: 9 लाखांच्यादागिन्यांसहदोनमोटारसायकलीजप्त बेळगाव : बेळगाव व गोव्यात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणी हुबळी येथील एका जोडगोळीला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 9 लाख 15 हजार रुपये किमतीचे 80 ग्रॅम 36 मिलि सोन्याचे दागिने व चेनस्नॅचिंगसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकारांना सदर माहिती दिली. अमन [...]
थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी झटपट बनवा मुळ्याचा पराठा
थंडीच्या दिवसात मुळा खाणे हे खूप फायदेशीर मानले जाते. मुळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये थंडीत मुळ्याचे विविध प्रकार केले जातात. त्यातीलच सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुळ्याचा पराठा. मुळ्याचा पराठा हा नाश्त्याला खाल्ल्यामुळे पोटभरीसाठी उत्तम मानले जाते. एक मुळ्याचा पराठा खाल्ला तरी लवकर भूक लागत नाही. म्हणूनच नाश्त्यामध्ये मुळ्याचा पराठा हा केला […]
महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : लॅब चालकावर गुन्हा
हिंडलगाकारागृहातरवानगी, लॅबचापरवानारद्दकरण्याचीनागरिकांचीमागणी, तालुकावैद्याधिकाऱ्यांनानिवेदन खानापूर : खानापूर येथील वर्दे प्लॉट येथे असलेल्या सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरी चालक सुलतान अबालाल मोमीन (वय 48) याने आपल्या लॅबमधील कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खानापूर पोलिसात नेंद झाला आहे. खानापूर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक केली. रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली [...]
महांतेशनगरातून चोरलेली कार हैदराबादमधून घेतली ताब्यात
दोघाचोरट्यांपैकीएकाच्याआवळल्यामुसक्या बेळगाव : दहा दिवसांपूर्वी महांतेशनगर येथून एका क्रेटा कारची चोरी करण्यात आली होती. कारमधून आलेल्या दोघा जणांनी घरासमोर उभी केलेली कार चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. बेळगावातून चोरलेली कार हैदराबादमध्ये सापडली आहे. या प्रकरणी आंध्रप्रदेशमधील एकाला अटक करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबर रोजी महांतेशनगर येथून चोरण्यात आलेल्या क्रेटा कारचा शोध घेण्यात माळमारुती पोलिसांना [...]
Bihar Election Result 2025 –लालटेन शाम को जलता है…निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट
बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाला सुरुवात झाली असून निवडणूक आयोगानुसार सध्या राज्यात भाजप व जदयू आघाडीवर आहेत. NDA ला सध्या स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर राष्ट्रीय जनता दल 36 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजदचा सुपडा साफ झाला असे बोलले जात आहे. असे असताना राजचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी ट्विटवर एक सूचक पोस्ट शेअर करत […]
वाहतूकपोलिसांचीकारवाईसुरूचराहणार बेळगाव : कर्कश आवाजाच्या सायलेन्सरविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. एकूण 157 मोटारसायकलस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यापैकी 147 सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ती नष्ट केली आहेत. ही कारवाई सुरूच राहणार आहे. शहर [...]
Hupari Nagar Parishad : हुपरीत एकही अर्ज दाखल नाही
हुपरीत निवडणूक तापली; नागरिक मात्र उत्सुकतेत हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेत उमेदवारी ऊर्ज दाखल करण्याचा गुरुवारी चौथा दिवस असून एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुकांची नगर परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. पालिकेत कर विभाग कार्यालयात थकीत वसुली रक्कम भरण्याचे कार्य जोरदारपणे सुरू आहे. चार ते पाच [...]
Kolhapur News : कोल्हापूरच्या शेतकरी महिलांची सोशल मीडियावर धुमाकूळ
राजगोळीच्या महिलांची धमाल रील्स व्हायरल कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील राजगोळी या गावातील शेतकरी महिलांनी भातकापणी करताना तयार केलेल्या रील्सना सध्या सोशल मीडियावर मोठी दाद मिळत आहे. हातात विळा, डोक्यावर उन्हाचा तडाखा, अंगावर घामाच्या धारा अशा रणरणत्या वातावरणातही [...]

28 C