सीरियात नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट; 8 ठार, 18 जण जखमी
सीरियातील होम्स शहरात एका मशिदीत नमाज पठणावेळीच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असून यात 8 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियात अल्पसंख्याक मानल्या जाणाऱ्या अलावी या समुदायाची ही मशीद असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
लुथरा बंधूंच्या कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ
सह-आरोपीला सशर्त जामीन मंजूर :हडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडवहडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडव खास प्रतिनिधी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बर्च नाईट आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. तर,सह-आरोपी असलेल्या भरतसिंग कोहलीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.हणजूण पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी संपल्यानंतर संशयित लुथरा बंधूंना काल शुक्रवारी म्हापसा न्यायालयात [...]
अर्थवृत्त –गुंतवणूकदारांची चांदी, 150 टक्के परतावा!
सोने आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी कायम असून सलग चौथ्या दिवशी किमतींनी नवा उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अॅण्ड ज्चेलरी असोसिएशनच्या (आयबीजेए) माहितीनुसार चांदीचा भाव एकाच दिवसात 13,117 रुपयांनी वाढला. त्यामुळे चांदी 2.32 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली. याशिवाय 24 पॅरेट सोन्याचा दर 1,287 रुपयांनी वधारून 1,37,914 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. या वर्षी चांदीने तब्बल 150 […]
नायजेरियात ‘आयएस’च्या ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला
ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या होत असल्याचा आरोप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात ‘आयएस’ या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.त्यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांना नाताळच्या शुभेच्छा, असे ट्रम्प म्हणाले. नायजेरियामध्ये या वर्षी धार्मिक हिंसा वाढली असून 10 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधीत सात हजारांपेक्षा जास्त […]
अंतराळात इस्रोची वाढती ताकद, एलन मस्कच्या स्पेसएक्सला तगडी टक्कर
नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. इस्रोने श्रीहरिकोटावरून ‘बाहुबली’ रॉकेट ‘एलव्हीएम3’चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि अमेरिकन कंपनीचा 6100 किलो वजनाचा ‘ब्लू बर्ड’ उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवला. ‘एलव्हीएम3’च्या यशानंतर इस्त्रोने आता थेट एलन मस्क यांच्या स्पेस एक्सला टक्कर दिली आहे. अंतराळ मार्वैटमध्ये सगळ्यात स्वस्त कोण रॉकेट प्रक्षेपण करते याची चर्चा रंगली आहे. […]
चीनने सेल्फड्रायव्हिंग कारची विक्री थांबवली, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूनंतर निर्णय
चीनने स्वयंचलित कार (सेल्फ-ड्रायव्हिंग) कार विक्रीची योजना सध्या थांबवली आहे. एका अपघातानंतर चीनने हा निर्णय घेतला. या वर्षी 29 मार्च रोजी सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कारमध्ये प्रवास करणाऱया 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी कारचा वेग 116 किमी प्रति तास होता. सध्या चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केवळ दोन कंपन्यांना बीजिंग ऑटोमोटिव्ह ग्रुप […]
लोटे एमआयडीसीतील विनाशकारी प्रकल्प बंद न केल्यास आंदोलन उभारू! शिवसेनेचा इशारा
लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून ‘तो जीवघेणा प्रकल्प तत्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन उभे करू’ असा इशारा आज जिल्हाधिकाऱ्यांना दिला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी जिल्हावासीयांचे मनोगत मांडले. इटलीतील नागरिकांसाठी जीवघेणी ठरलेली मिटेनी पीएफएएस उत्पादन रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी […]
कारागृहात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या पैद्यांना आता लवकर न्याय मिळण्याची शक्यता आहे. कारण आरोपींना न्यायालयीन तारखेला प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर न केल्यामुळे खटल्यांना होत असलेल्या विलंबाची गंभीर दखल सर्किट बेंचने घेतली आहे. आरोपींना ठरलेल्या तारखेला हजर करा. सुनावणी लांबवू नका, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी दिले. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृह प्रशासन […]
इन्फोहसिसचा धमाका! फ्रेशर्सना मिळणार थेट 21 लाखांपर्यंतचे पॅकेज
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोहसिसने फ्रेशर्सचे सुरुवातीचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेष तंत्रज्ञान पदावर रुजू होणाऱ्यांना वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात येणार आहे. देशातील आयटी सेक्टरमध्ये फ्रेशर्ससाठी ही खूप मोठी रक्कम मानली जाते. एआय क्षेत्रात प्रतिभावंत कर्मचारी आकर्षित व्हावेत, यासाठी इन्फोहसिस भरती प्रक्रिया वाढवत आहे. इन्फोहसिस 2025 च्या अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान […]
आमदार गोविंद गावडे यांच्याशी राजकीय संबंध? शक्यच नाही!
मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळली शक्यता प्रतिनिधी/ पणजी मगो पक्षाचे चिन्ह सिंहाविऊद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या आणि पक्ष नेत्यांच्या पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे आमदार गोविंद गावडे यांच्याशी भविष्यात कोणतेही राजकीय संबंध ठेवण्याची शक्यता मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळून लावली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील उमेदवाराला पाठिंबा देणे किंवा न देणे [...]
वीर बाल दिनानिमित्त 20 मुलांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमेवर जवानांना चहा आणि नाश्ता देणाऱया फिरोजपूर येथील श्रवण सिंग याच्यासह 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, 7 वर्षांची ग्रँडमास्टर लक्ष्मी प्रज्ञिका यांचा त्यात समावेश आहे. शीख बांधवांचे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या चार मुलांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून […]
इंडिगोच्या गोंधळाला दोषी कोण? डीजीसीएच्या समितीचा अहवाल सादर
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाईन्सच्या भोंगळ कारभारामुळे हजारो उड्डाणे रद्द झाली होती. परिणामी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक वेठीस धरली गेली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आज नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए) अहवाल सादर केला आहे. डीजीसीएने विमान सुरक्षेसंदर्भात नवी नियमावली लागू केली आहे. मात्र योग्य नियोजन न केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ टंचाई […]
हिंदुस्थानात मिळतेय बनावट रेबीज लस, वर्षभरात 20 हजार लोकांचा मृत्यू; ऑस्ट्रेलियाचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हिंदुस्थानात दरवर्षी 20 हजार लोक रेबीजने दगावतात. हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या रेबीजच्या लस बनावट असून या लस रेबीज रोगासाठी फायदेशीर नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणारी सरकारी संस्था, ऑस्ट्रेलियन टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने याबाबत इशारा दिला आहे. नोव्हेंबर 2023 पासून ही बनावट लस पुरवली जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. […]
‘धुरंधर’ने गाठला एक हजार कोटींचा पल्ला
‘धुरंधर’ चित्रपटाने आपली बॉक्स ऑफिसवरील जादू कायम ठेवत आता एक हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून हा चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन विक्रम मोडत आहे. अवघ्या 21 दिवसांत सिनेमाने हा टप्पा गाठला आहे. सिनेमाने जागतिक स्तरावर 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाने हिंदुस्थानात 668.80 कोटी रुपये कमावले […]
असं झालं तर…–प्राप्तिकर परतावा थांबविल्याचा मेसेज आल्यास…
आयकर खात्याने अनेक करदात्यांना त्यांचा आयकर परतावा थांबविण्याचा मेसेज आणि ई-मेल पाठविला तर घाबरू नका. काही प्रक्रिया केल्यास परतावा मिळतो. विवरण आणि टीडीएस या तपशिलात काहीतरी जुळत नाही. त्यामुळे सिस्टममध्ये परतावा थांबवला जातो. करदात्याकडून झालेली चूक सुधारण्याची ही संधी असते. सर्वप्रथम आपले प्राप्तिकर विवरण तपासून घ्या. फॉर्म 26 एएस, एआयएस किंवा टीआयएस यामधील माहिती विवरणासोबत […]
मराठी अस्मिता जपणार…शब्दांतील चुकांना माफी नाही! बेस्टचा खासगी कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
बेस्ट बससेवेमध्ये मायमराठीची अस्मिता जपण्यासाठी बेस्ट उपक्रम सजग झाला आहे. बससेवेमध्ये मराठी भाषेचा अचूक पद्धतीने वापर झाला पाहिजे. बेस्टच्या ताफ्यातील बस चालवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून मराठीचा कुठल्याही प्रकारे अवमान होता कामा नये यादृष्टीने बेस्ट प्रशासनाने पाऊल उचलले आहे. त्यानुसार जर मराठी भाषेतील सूचनांच्या शब्दांमध्ये चुका आढळल्या तर खासगी कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एकीकडे बेस्टच्या […]
हिंदुस्थानातील नोकरदार आदेशाचे गुलाम; त्यांना अपयशाच्या भीतीने पछाडलंय
जगातील पहिली वेबमेल सर्विस सुरू करणाऱया ‘हॉटमेल’चे सहसंस्थापक सबीर भाटिया यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये हिंदुस्थानातील शिक्षण प्रणालीबाबत महत्त्वाचे विधान केले. भाटिया म्हणाले की, आपण दुसऱ्याच्या विचाराने जगणाऱया समाजात राहतो. लोकांना अनेकदा सांगितले जाते की, दुसऱयांचे ऐका, ते सांगतील तेच करा. पण आधीच कोणीतरी गेलेल्या वाटेवर का चालावे? आपली शिक्षण प्रणाली ही व्यवस्थेला आव्हान देणारे द्रष्टे […]
पुण्यात देशातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी, ‘एआयसीटीएस’च्या डॉक्टरांमुळे नवजात बालकाला जीवदान
लष्करी सेवेतील एका जवानाच्या बाळाला जन्मतःच हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे निदान झाले. कोलकाता येथील लष्करी रुग्णालयात जन्मलेल्या या नवजात बालकाला पुढील उपचारासाठी तातडीने पुण्यातील आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओ-थोरेंसिक सायन्सेस (एआयसीटीएस) या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांच्या टीमने या बालकावर ‘एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन’ (ईसीएमओ) ही देशातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करत या बालकाला […]
जनावरांसारखे वागू नका, गायक कैलास खेर संतापले
प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी मोठा गदारोळ घातला. ग्वाल्हेरमधील कार्यक्रमात गर्दी अचानक अनियंत्रित झाली. लोक बॅरिकेड्स तोडून थेट स्टेजच्या दिशेने धावले, ज्यामुळे परिस्थिती बिघडली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, कैलास खेर यांना शो मधेच थांबवावा लागला. ते संतापून म्हणाले, ‘तुम्ही जनावरांसारखे वागत आहात, कृपया असे करू नका.’ मात्र तरीही प्रेक्षकांनी ऐकले नाही. अखेर […]
हेरॉईन ड्रग्जची खरेदी- विक्री करणारी ड्रग्ज तस्करांची टोळी पायधुनी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. सहा पुरुष व तिघा महिला ड्रग्ज तस्करांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 36 कोटी 55 लाख 25 हजार रुपये किमतीचे हेरॉईन, आठ लाख 26 हजार रुपयांची रोकड आणि 10 लाख किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 36 कोटी 72 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत […]
उद्या ’मरे’च्या जलद लोकल धिम्या ट्रॅकवर, माटुंगा ते मुलुंडदरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक
नाताळच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत फिरायला जाणाऱ्या नागरिकांची रविवारी लोकल प्रवासात गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामांसाठी माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात सर्व जलद लोकल धिम्या मार्गावरुन धावणार असल्याने लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. रविवारी सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहे आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहे आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत कौटुंबिक वातावरण -कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]
संरक्षण करारांची मंजुरी वेटिंगवर
संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक लांबणीवर : आता नववर्षात 15 जानेवारीचा मुहूर्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली शस्त्रास्त्र खरेदीसाठी जबाबदार असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या सर्वोच्च संस्थेने म्हणचेच संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी अनेक प्रमुख स्वदेशी संरक्षण प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, शुक्रवारी झालेल्या डीएसीच्या [...]
बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांची हवा
अॅशेस मालिका : ऑस्ट्रेलिया 152 तर इंग्लंड 110 धावांत ऑलआऊट :पहिल्याच दिवशी पडल्या 20 विकेट्स वृत्तसंस्था/ मेलबर्न अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. मालिकेत 3-0 अशा आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव इंग्लंडने 152 धावांवर गुंडाळून चांगले पुनरागमन केले. पण, ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांना सडेतोड उत्तर मिळाले. इंग्लिश संघाला 110 धावांत ऑलआऊट करत त्यांनी [...]
कंपन्यांनी आयपीओमधून 2 लाख कोटी उभारले
2025 मधील कंपन्यांची आयपीओमधील कामगिरीची आकडेवारी वृत्तसंस्था/ मुंबई वर्ष 2025 मध्ये, कंपन्यांनी 365 हून अधिक प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे 1.95 लाख कोटी रुपये उभारले. मेनबोर्डच्या 106 आयपीओद्वारे 1.83 लाख कोटी रुपये उभारले गेले, जे एकूण रकमेच्या 94 टक्के आहे. सदरची माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. मागचे वर्ष म्हणजेच 2024 [...]
कन्नड संघटनांना आता ‘रक्ताची कावीळ’
रक्तदानासारख्या पवित्र कार्याच्या जागृतीचे फलक फाडले प्रतिनिधी/ बेळगाव भाषिक द्वेषाने पछाडलेल्या काही कानडी संघटनांच्या प्रतिनिधींकडून आता रक्तदानासारख्या पवित्र कार्यक्रमाचे फलक फाडण्याचे धाडस केले जात आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने व्यापक विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची जागृती करण्यासाठी लावण्यात आलेले फलक शुक्रवारी काही मराठीद्वेषी कन्नड संघटनांकडून फाडण्यात आल्याने पुन्हा एकदा भाषिक तेढ [...]
भारतीय महिला संघाची विजयी आघाडी
सामनावीर रेणुका सिंगचे 4, दीप्तीचे 3 बळी, शेफाली वर्माचे नाबाद अर्धशतक वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम रेणुकासिंग ठाकुरची भेदक गोलंदाजी तसेच शेफाली वर्माच्या दमदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात यजमान भारताने लंकेचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली. या सलग तिसऱ्या विजयाने भारताने मालिकेवर आपले वर्चस्व [...]
जमावाकडून दगडफेक : 6 पोलीस जखमी वृत्तसंस्था/ जयपूर राजस्थानची राजधानी जयपूरच्या चौमू येथे अचानक हिंसा भडकली आहे. येथे मशिदीनजीक पडलेले दगड उचलण्यावरून दोन समुदायांदरम्यान वाद होत स्थिती बिघडली. येथे कलंदरी मशीद असून तेथील अतिक्रमणावरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. एका गटाने स्वेच्छेने अतिक्रमण हटविले, परंतु काही लोकांनी लोखंडी सामग्री लावून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी [...]
क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आपल्या धाडसी फटकेबाजीने क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि सात वर्षीय बुद्धिबळपटू वाका लक्ष्मी प्रग्निका यांचा समावेश असलेल्या अनेक मुलांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलतरणपटू धिनिधी देसिंगू ही देखील क्रीडा, शौर्य, समाजसेवा आणि पर्यावरण या क्षेत्रांतील अपवादात्मक [...]
भाजप 140 तर शिवसेना 87 जागांचा फॉर्म्युला :मुंबईमधील प्रमुख जागांवर चर्चा मुंबई, नागपूर : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत (शिंदेगट) यांच्या जागावाटपासाठी चर्चेच्या फ्रेया सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकासाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. [...]
आयुष्य नेमके जगायचे कसे-‘फास्ट’ की ‘स्लो’?
जगण्याच्या बाबतीत माणूस इतका संभ्रमात कधीच नव्हता. नवतंत्रज्ञानामुळे आपले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा त्याचा समज होता. पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या वेगाने वाढते आहे त्यामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य अक्षरश: पिंजून गेले आहे. जगण्याचा वेग अपरिहार्यपणे खूपच वाढला आहे. अल्प काळात अचानक वाढलेल्या वेगाने माणसाच्या जगण्याचे गणित मात्र पार अवघड करून टाकले आहे. वेळेची प्रचंड [...]
82 वर्षांपूर्वी रिकामी करविलेले गाव
येथे दिसते भूतकाळाची झलक इंग्लंडमध्ये एक असे स्थळ आहे, जेथे गेल्यावर काळ जणू थबकलाय असे वाटू लागते. येथील घरे, गल्ल्या, चौक, लॅम्पपोस्ट सर्वकाही 20 व्या शतकाच्या प्रारंभाच्या काळाप्रमाणे आहेत. या गावात गेल्यावर आपण जणू एक शतक मागे गेलो आहोत असे वाटते. डॉर्सेट येथील टाइनहॅम गाव हे ब्रिटनमधील अन्य कुठल्याही गावाप्रमाणे नाही. हा भूतकाळाचा एक असा [...]
पाकिस्तानची अण्वस्त्र जगासाठी धोका
पुतीननी 24 वर्षांपूर्वीच अमेरिकेला केले होते सतर्क : दस्तऐवजांमधून खुलासा वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी 2001 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासोबतच्या स्वत:च्या पहिल्या भेटीदरम्यान पाकिस्तानवरून चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तान प्रत्यक्षात एक सैन्यराजवट म्हणजे जुंटा असून त्याच्याकडे अण्वस्त्रs आहेत, तो काही लोकशाहीवादी देश नाही, तरीही पाश्चिमात्य देश पाकिस्तानवर टीका करत [...]
मशिदीतील स्फोटात सीरियामध्ये 8 ठार
वृत्तसंस्था/ दमास्कस सीरियातील होम्स शहरात शुक्रवारच्या नमाजावेळी एका मशिदीत भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले. इमाम अली बिन अबी तालिब मशिदीच्या एका कोपऱ्यात प्री-प्लांट केलेल्या स्फोटक यंत्रात हा स्फोट झाला. त्यावेळी मशिदीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्फोट होताच लोकांची प्रचंड धावपळ उडाली. या दुर्घटनेत अनेकजण [...]
अंधाऱ्या वाटेने…शहेनशाह ठाकरे बंधू एकत्र!
ठाकरे बंधूंच्या युतीची शहेनशहा चित्रपटाशी तुलना जरा जास्तच फिल्मी वाटेल पण ठाकरे बंधू एका अंधाऱ्या राजकीय वाटेवरून शहेनशहाच्या थाटात हातात दांडके घेऊन चालले आहेत… 1988 साली अमिताभ असाच डबल रोल करत चालला होता. संवाद, स्टाइल, हातात दंडुका, आणि थीम सॉंग यामुळे चित्रपट कल्ट क्लासिक मानला जातो. त्यातून अमिताभ बच्चन यांच्या करिअरला पुन्हा उभारी मिळाली. राजकीय [...]
मक्केच्या मशिदीत आत्महत्येचा प्रयत्न
सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे व्यक्तीचा बचाव वृत्तसंस्था / मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीमांचे पवित्र शहर मक्का येथील मस्जीद अल- हरमच्या वरच्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा एका व्यक्तीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनाने असफल ठरला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून सौदी प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही चित्रीत झालेली असून सोशल मिडियावर प्रसारित [...]
सिलिगुडीच्या हॉटेल्समध्ये बांगलादेशींना नो एंट्री
हिंदूंच्या मॉब लिंचिंगवरून संताप व्यक्त वृत्तसंस्था/ सिलिगुडी सिलिगुडीचे कुठलेही हॉटेल कोणत्याही बांगलादेशी पर्यटकाला वास्तव्य करू देणार नसल्याची घोषणा ग्रेटर सिलिगुडी हॉटेलियर्स वेलफेयर असोसिएशनने केली आहे. याचबरोबर वैद्यकीय व्हिसावर येणाऱ्या बांगलादेशींनाही देखील वास्तव्य करू दिले जाणार नाही. मागील वर्षापासून बांगलादेशात उद्भवलेली स्थिती पाहता आम्ही सिलिगुडीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये कोणत्याही बांगलादेशी पर्यटकाला वास्तव्याची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला [...]
भारत-न्यूझीलंड व्यापार करार जगास दिशादर्शक ठरणारा
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशानेऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, रशिया व आफ्रिकन आणि अरब देशांशी अलीकडच्या काळात केलेले दीर्घकालीन व्यापार करार काळाची गरज अधोरेखित करतात. चारच दिवसांपूर्वी भारताच्या व्यापार भागीदारांच्या यादीत आणखी एका प्रगत देशाची भर पडली. भारताने न्यूझीलंडशी मुक्त व्यापार कराराचा मार्ग मोकळा केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणानंतर [...]
मेहनती कर्मचाऱ्याला कंपनीकडून घर गिफ्ट
घराची किंमत 1.5 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना दीर्घकाळापर्यंत स्वत:सोबत ठेवण्यासाठी चीनच्या एका कंपनीने अनोखी पद्धत अवलंबिली आहे. कंपन्या सर्वसाधारणपणे वेतन किंवा बोनस देतात, परंतु या कंपनीने स्वत:च्या मेहनती आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना घर गिफ्टमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या झेजियांग गुओशेंग ऑटोमोबाइल कंपनी लिमिटेड ही ऑटोमोबाइल पार्ट्स तयार करते. या कंपनीने 5 वर्षांपर्यंत सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना [...]
बेळगाव, पुणे, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई आरओ, मडगाव, म्हापसा, कार्पोरेट संघ विजयी
लोकमान्य प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा ► क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव लोकमान्य को-ऑप. सोसायटी आयोजित 13 व्या लोकमान्य प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव आरओ, मडगाव गोवा, कार्पोरेट, पुणे आरओ, म्हापसा गोवा, कोल्हापूर आरओ, सावंतवाडी आरओ, मुंबई आरओ संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. एसकेई प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या [...]
पी. व्ही. सिंधूची बीडब्ल्यूएफ अॅथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधूची 2026-2029 या कार्यकाळासाठी बीडब्ल्यूएफ अॅथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या भूमिकेत सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेची सदस्य म्हणूनही काम करेल, ज्यामुळे खेळाडूंना संघटनेच्या जागतिक प्रशासनामध्ये थेट आपला आवाज मांडण्याची संधी मिळेल. पी. व्ही. सिंधूने ही जबाबदारी सोपवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली [...]
मुलांसमोर पतीने पत्नीला पेट्रोल ओतून जिवंत जाळले
मुलीलाही आगीत ढकलण्याचे कृत्य वृत्तसंस्था/ तेलंगणा हैदराबादमध्ये एका पतीने स्वत:च्या मुलांसमोरच पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले आहे. यादरम्यान मुलगी आईला वाचविण्यासाठी धावली असता तिलाही त्याने आगीत लोटून दिले. या घटनेत पत्नीचा होरपळून मृत्यू झाला, तर मुलगी सुदैवाने बचावली आहे. ही धक्कादायक घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा भागात घडली आहे. वेंटकेशला स्वत:च्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय हाहेता, यामुळे [...]
‘झेप्टो’कडून आयपीओसाठी कागदपत्रांचे सादरीकरण
मुंबई : क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने आयपीओसाठी त्यांचा डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) गोपनीय पद्धतीने दाखल केला असल्याची माहिती आहे. एका वृत्तवाहीनीच्या सूत्रांनी या संदर्भात ही माहिती दिली आहे. कंपनी नवीन वर्षात (2026) शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची योजना आखत आहे. झेप्टोच्या या हालचालीमुळे क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. ब्लिंकिट (इटरनल) [...]
जपानमध्ये कारखान्यातील कामगारांवर चाकूहल्ला
► वृत्तसंस्था/ टोकियो जपानच्या शिझुओका प्रांतातील एका कारखान्यातील कामगारांवर शुक्रवारी चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनुसार, ही घटना मिशिमा शहरातील योकोहामा रबर मिशिमा प्लांटमध्ये सायंकाळी 4:30 वाजता घडली. हल्लेखोराने पाच ते सहा जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करतानाच कारखान्याच्या परिसरात घातक द्रव [...]
कॅनडात भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थीची हत्या
टोरंटोत विद्यापीठ परिसरात अंदाधुंद गोळीबार वृत्तसंसथा/ टोरंटो कॅनडात शिकत असलेला भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. टोरंटोमध्ये विद्यापीठाच्या परिसरात भरदिवसा त्याची हत्या करण्यात आली आहे. भारतीय महावाणिज्य दूतावासाने टोरंटो स्कारबोरो युनिव्हर्सिटी परिसरानजीक झालेल्या गोळीबारात 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थीचा मृत्यू झाल्याची माहिती देत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. याप्रकरणी [...]
आजचे भविष्य शनिवार दि. 27 डिसेंबर 2025
मेष: तणावरहित होण्यासाठी संगीताचा आस्वाद घ्या. वृषभ: प्रवासाची मजा लुटाल, आत्मविश्वास ठेवा मिथुन: अत्यंत व्यस्त दिवस, महत्वाच्या वस्तुंची काळजी घ्या कर्क: तणावापासून थोडे दूर राहाल, साहित्याकडे लक्ष असावे सिंह: इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे काही करावे लागणार नाही कन्या: अध्यात्मिक लाभासाठी ध्यानधारणा, मन:शांतीची प्राप्ती तुळ: वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांना सल्ला द्याल. वृश्चिक: धनसंचय करा, अन्यथा [...]
ठिकठिकाणी गाड्यांच्या रांगा, शेकडो वाहने कोंडीत अडकली; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिकचा खेळखंडोबा
थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन सुरू होताच आवडते डेस्टेनशन गाठण्यासाठी ठाणे, मुंबईतील हवशे-नवशे-गवशे आपल्या कुटुंबकबिल्यासह मिळेल त्या वाहनाने निघाले खरे… पण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाताना त्यांना वाहतूककोंडीने गाठले. खंडाळा, लोणावळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिकचा ‘ना’-ताळ होता ना मेळ. वाहतूककोंडीत अडकल्याने दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागला. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या नशिबी […]
महानगरपालिका निवडणुका राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महायुती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस राहिले तरी कोण कुठे लढणार याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. मुंबई, ठाण्यात दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असला तरी काही जागांवरून पेच अद्याप कायम आहे. पुण्यात भाजपविरोधात शिंदे गटात खदखद […]
11 लाख नव्हे फक्त 1 लाख 68 हजार 350 दुबार मतदार, पालिकेचा दावा
मुंबईत आढळलेल्या 11 लाख 1 हजार 507 दुबार नावांच्या छाननीनंतर अखेर 1 लाख 68 हजार 350 दुबार मतदार आढळले आहेत. पालिकेने तंत्रज्ञानाचा वापर करून ही दुबार नावे वेगळी केली आहेत. मुंबईत आढळलेल्या दुबार मतदारांमुळे जोरदार टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने 11 लाखांवर नावांची छाननी मॅन्युअली न करता माहिती तंत्रज्ञान विभाग आणि एफ/उत्तर व एन […]
एअर प्युरिफायरवरील जीएसटी कमी करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या सूचनेला केंद्रातील मोदी सरकारने शुक्रवारी विरोध केला. जीएसटी कपातीसंदर्भातील न्यायालयाचे निर्देश संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देणारे आहेत. न्यायालयाचे कोणतेही निर्देश कायदे करण्याच्या आमच्या अधिकारांचे उल्लंघन करतील, असा दावा मोदी सरकारने केला. याचवेळी एअर प्युरिफायरला ‘वैद्यकीय उपकरण’ म्हणून घोषित करण्याच्या विनंतीवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारने न्यायालयाकडे वेळ मागितला. […]
Maharashtra Civic Polls –बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची घोषणा लांबली
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका होत असल्याने यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा लांबवली जात असून शेवटच्या क्षणी ही नावे उघड केली जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज […]
धर्मातील संतुलन बिघडले तर विनाश अटळ –मोहन भागवत
धर्म आणि विज्ञान यांच्यात कोणताही संघर्ष नाही. दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने एकाच सत्याचा शोध घेतात हे सांगतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मातील संतुलन बिघडले तर विनाशाचे कारण ठरते असे वक्तव्य केले. तिरुपती येथे आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात सरसंघचालक भागवत बोलत होते. धर्माकडे अनेक वेळा गैरसमजातून ‘रिलिजन’ म्हणून बघितले जाते. परंतु धर्म म्हणजे एखादा […]
मुलांना सोशल मीडिया बंदीचा विचार करा, मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
16 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना नजीकच्या काळात सोशल मीडियाचा वापर करता येणार नसल्याची चिन्हे आहेत. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करा, त्यासाठी देशात ऑस्ट्रेलियातील कायद्याच्या धर्तीवर कायदा लागू करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला केली. इंटरनेटचा लहान मुलांच्या सुरक्षेला धोका आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास […]
सेंगरच्या जामिनाविरोधात दिल्ली हायकोर्टाबाहेर निदर्शने, पीडितेच्या कुटुंबासह महिलांचा संताप
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगरला दिल्ली उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. त्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आज पीडितेच्या कुटुंबीयांसह महिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर उग्र निदर्शने केली. कुलदीप सेंगरच्या जामिनावरून वादळ उठले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कालच अंजली पटेल आणि पूजा शिल्पकार या दोन महिला वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात […]
सामना अग्रलेख –मोदी ‘येशू’चरणी, बाहेर खिश्चनांवर हल्ले!
गेल्या दहा वर्षांपासून भारतातील सर्वच धर्मांत भयाचे वातावरण आहे. बाहेर ख्रिस्ती बांधवांवर हल्ले व नाताळचा सण उद्ध्वस्त केला जात असताना पंतप्रधान मोदी चर्चमध्ये घुसून बिशपबरोबर प्रार्थना करतात. प्रेम, शांतता, करुणेसाठी येशूकडे प्रार्थना करतात. याला ढोंग नाही, तर काय म्हणायचे? मोदी यांच्या भक्तांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण ख्रिश्चन, मुसलमानांत भय निर्माण करून, त्यांच्यावर हल्ले […]
लेख –ईशान्य भारताचे रक्षक- लचित बरफुकन
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन , hemantmahajan12153@yahoo.co.in लचित बरफुकन यांची युद्धनीती ही केवळ शौर्यावर आधारित नव्हती, तर ती अत्यंत प्रगत मानसशास्त्र, भूगोल आणि गनिमी काव्याचा (Guerrilla Warfare) एक उत्तम नमुना होती. लचित बरफुकन यांनी सराईघाटच्या लढाईत मिळवलेला विजय हा केवळ आसामचा विजय नव्हता, तर तो संपूर्ण भारताच्या अस्मितेचा विजय होता. जर त्यांनी मोगलांना तिथे रोखले नसते तर […]
>> स्पायडरमॅन इंटरनेटच्या आगमनानंतर मानवी आयुष्यात फार मोठी उलथापालथ झाली. कोणाला आपले आयुष्य सुखद झाल्याचे तर कोणाला इंटरनेटच्या आगमनानंतर आपण आळशी बनल्याचे वाटते आहे, पण इंटरनेटमुळे काही प्रमाणात आपले कष्ट वाचत आहेत हे मात्र नक्की खरे आहे. पूर्वी प्रवासाला जायचे म्हणजे आठवडाभर आधीपासून तिकिटाच्या रांगेत उभे राहून तिकीट बुक करण्यासाठी धडपडावे लागायचे. आता मात्र तिकीट […]
>> अतुल जोशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे नाव गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर फारसे नव्हते, परंतु आधीची चार दशके काँग्रेस पक्षाच्या सत्तावर्तुळात सुरुपसिंग नाईक या नावाशिवाय सत्तेचा सारीपाट हलत नसे. सुरुपसिंग नाईक हे काँग्रेसच्या अत्यंत जुन्या पिढीतले कमालीचे निष्ठावंत. त्यातही इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याचे सच्चे पाईक ही त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख […]
रोहित बाद होताच सवाई मानसिंग स्टेडियम झाले रिकामे!
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यासाठी जमलेला क्रिकेटप्रेमींचा उत्साह एका क्षणात मावळला. मुंबईकडून खेळत असलेला रोहित शर्मा शून्यावर बाद होताच स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला आणि काही वेळातच प्रेक्षकांच्या रांगा बाहेरच्या दिशेने वळल्या. उत्तराखंडविरुद्धच्या या लढतीत रोहितला 25 वर्षीय वेगवान गोलंदाज देवेंद्र सिंग बोराने पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रोहितचा […]
कोहलीच्या धावा अन् क्रिकेटप्रेमींकडून गंभीरवर धावा!
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये सध्या दोन गोष्टी जोरात सुरू आहेत. एकीकडे विराट कोहलीच्या धावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर गौतम गंभीरवर धावा. कारण कोहलीने गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांत असा काही ‘रनपाऊस’ पाडलाय की, आकडे पाहूनच टीकाकारांची बॅट गळून पडते. कोहलीच्या मागील सहा डावांत 584 धावा, सरासरी 146 आणि स्ट्राईक रेट 116.56. म्हणजे संयम आणि आक्रमकतेचाही परफेक्ट डोस. त्यात […]
विश्वचषकावर नजर म्हणूनच विश्रांती, कमिन्सचा स्पष्ट इशारा
अॅशेस कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांतून बाहेर राहण्याचा निर्णय हा माघार नव्हे, तर मोठया ध्येयासाठी उचललेले पाऊल असल्याचे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हिंदुस्थान-श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर कमिन्सने पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात झालेल्या कंबरेच्या दुखापतीमुळे कमिन्सला अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन […]
मेलबर्नवर 20 फलंदाजांची विकेट, बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांचा कहर
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अर्थातच एमसीजीवर बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी कहर करत 20 फलंदाजांची विकेट काढण्याचा पराक्रम केला. एमसीजीच्या खेळपट्टीवर केवळ चार मिलीमीटर जास्त गवत होतं, पण त्याने खेळाचं अख्खं गणित बदलून टाकलं. 94,199 प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर बॅटला धडधडण्याची संधीच लाभली नाही, इथे फक्त चेंडू गोळीसारखे फलंदाजांवर बरसले आणि ऑस्ट्रेलियाचा 152 धावांत, तर इंग्लंडचा 110 धावांत […]
‘सिंदूर’ शक्यतेने पाकिस्तानची गाळण
सीमेनजीक हलविण्यात आली ड्रोनविरोधी यंत्रणा वृत्तसंस्था / इस्लामाबाद भारत लवकरच ‘सिंदूर अभियाना’चा दुसरा टप्पा हाती घेईल, या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाल्याचे वृत्त आहे. या भीतीपोटी पाकिस्तानने त्याची ड्रोनविरोधी यंत्रणा भारताच्या सीमेनजीक हलविली आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विषेशत: पाकव्याप्त काश्मीर भागात पाकिस्तानने आपली संरक्षण सिद्धता वाढविल्याचे दिसून येत आहे. भारताच्या गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार रावळकोट, [...]
सीरियात नमाज दरम्यान मशिदीत स्फोट; आठ जणांचा मृत्यू
सीरियामध्ये शुक्रवारी नमाज दरम्यान एका मशिदीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात अठरा जण जखमी झाले आहेत. ही मशीद अलावाइट भागात आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत हा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
जपानच्या बेडकामध्ये सापडला कर्करोग विरोधी जीवाणू, एक डोसही पुरेसा
जपानी शास्त्रज्ञांना एक अद्भुत शोध लागला आहे. जपानी ‘ट्री फ्रॉग’ नावाच्या बेडकाच्या आतड्यांमध्ये असलेला जीवाणू कर्करोगावर प्रभावी ठरला आहे. उंदरांवर केलेल्या परीक्षणात कोणतेही गंभीर दुष्परिणाम न होता एका डोसमध्ये त्यांचा ट्युमर नष्ट झाला आहे. हे संशोधन ‘Gut Microbes’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून ते संशोधन भविष्यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण असणार आहे. बेडूक, पाल, उभयचर […]
भाजपा राजवटीत भाजी-भाकरी नाही, फक्त धोखा मिळाला; अखिलेश यादव यांची टीका
भाजपा राजवटीत भाजी-भाकरी नाही, फक्त धोखा मिळाला, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, भाजपच्या राजवटीत सामान्य लोकांना विकास आणि आदर नाही तर फक्त विश्वासघात आणि फसवणूक मिळाली आहे. ते म्हणाले की, परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे आणि दुर्लक्ष […]
Latur News –गुढ आवाजाने कलांडी हादरली, ग्रामस्थांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कलांडी गाव शुक्रवारी पुन्हा एकदा गूढ आवाजांनी हादरले. दुपारी 12 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास जमिनीतून झालेल्या प्रचंड आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जीव वाचवण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांनी घराबाहेर रस्त्यावर धाव घेतली.दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी कलांडी आणि परिसरातील खडक उमरगा परिसरातही अशाच प्रकारचे दोन […]
ऊसतोडणी हार्वेस्टरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, उसाच्या फडात पोलीस आल्यानंतर झाला उलगडा
ऊसतोडणीवेळी बाजूला पडलेला ऊस हार्वेस्टरमध्ये टाकताना अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औसा तालुक्यातील आशिव येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर प्रभाकर सावंत (40) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. औसा तालुक्यातील आशीव येथील शंकर सावंत यांच्या शेतातील उसाला कारखान्याची तोड आली होती. त्यामुळे […]
लोटे एमआयडीसीतील तो जीवघेणा प्रकल्प बंद केला नाही तर जनआंदोलन उभारू, शिवसेनेचा आक्रमक इशारा
इटलीतील नागरिकांसाठी जीवघेणी ठरलेली मिटेनी पीएएफएस उत्पादन रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही कंपनी तात्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दत्ताजी […]
नगराध्यक्ष नेहाताई काकडे व नगरसेवकांचा परंडा येथे सत्कार
परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. नेहाताई राहुल काकडे या विक्रमी मताधिक्याने आणि त्यांचे पती व निर्वाचित नगरसेवक भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. राहुल काकडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसह परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, नगरसेवक श्री. रमेशसिंह परदेशी, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, साहेबराव पाडुळे, तानाजी घोडके, रामदास गुडे, डॉ. आनंद मोरे, धनंजय काळे, रामकृष्ण घोडके, गजानन तिवारी, पांडुरंग मुसळे, अमर ठाकूर, गौरव पाटील, संतोष गायकवाड, सिध्दीक हन्नूरे, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, तुषार कोळेकर, जयंत भातलवंडे, समाधान कोळेकर, तसेच इतर मान्यवर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्यामुळे समाजाबांधवामध्ये आनंद
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा साकारण्यात यावा यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वप्रथम नगरसेविका सिंधुताई पेठे यांनी 2011 ला नगर परिषदेमध्ये ठराव मांडून तो मंजूर करून घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक काम केले. 2011 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय दूध डेअरीच्या एक एकर जागेमध्ये उभारण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ती जागा विनामूल्य दिली असून यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 50 लाख रुपये व नगर विकास विभागाच्यावतीने सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आ. राणाजगजितसिह पाटील यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यासाठी दत्ता पेठे यानी सातत्याने व अखंडपणे प्रयत्न केले.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी कुटुंबीयांचे उपोषण
धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी पारधी समाजातील व्यक्तींना बेकायदेशीरपणे उचलून नेऊन तब्बल चार दिवस अटक न दाखवता ठेवले, अमानुष मारहाण केली, महिलांचा विनयभंग केला तसेच खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप अश्विनी केशव पवार (रा. खंडाळा, ता. तुळजापूर) यांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी कुटुंबातील 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे न घेतल्यामुळे गावपातळीवर बहिष्कार टाकण्याचा ठरावही करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो विषय तात्पुरता मिटला असला, तरी सूडबुद्धीने पुढील कारवाई करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दिनांक 2 डिसेंबर रोजी मध्यरात्री लातूर एलसीबीच्या पथकाने शेतात झोपलेल्या चार जणांना कोणतीही नोंद किंवा अटक पत्र न देता उचलून नेले. त्यानंतर तब्बल 48 तासांहून अधिक काळ कुटुंबीयांना अटकेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. चौकशीसाठी गेलेल्या महिलांना पोलीस कार्यालयातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून, न्याय न मिळाल्यास 10 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र विधान भवनासमोर कुटुंबीयांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अर्जदारांनी दिला आहे. आदिवासींचे नेते काय करतात नेत्यांकडून स्वतःकडून शब्बासकी मारून घेणारे व आर्थिक फायदा करून घेणारे आदिवासींचे काही नेते का लक्ष देत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी समाजातील लोकांनी नेत्यांविषयी टिका करून आदिवासी समाजाकडे लक्ष द्या अशी मागणी केली आहे.
पोलिस ठाण्याच्या भिंती झाल्या बोलक्या
भूम (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिक हा पोलीस स्टेशनकडे येण्यास कायम भितो. कारण पोलीस स्टेशन हे त्रासदायक असते. पोलीस निष्कारण त्रास देतात. हा समाजातील सर्वसामान्य घटकाचा गैरसमज आहे. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी मात्र जनसामान्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या भिंती बोलक्या केल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. भूम पोलीस ठाणे मध्ये या झालेल्या बदलामुळे तसेच पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या सूचनांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच खोटे नाटे गुन्हे देखील नोंद होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भूम पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सध्या बांधकाम प्रगतीपथावर आहे. नवीन पोलीस ठाण्याची इमारत होईपर्यंत पोलिसांचे निवासस्थान असणारे इमारतीमध्ये पोलीस ठाणे थाटले आहे. याच इमारतीला श्री कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच भिंती विविध सुविचाराने रंगविण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करतानाच डाव्या हाताला सर्वसामान्य नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांचा रंगरंगोटी केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच उजव्या हाताला स्मार्ट पोलीस कोणाला म्हणायचे याचा अर्थ लिहिलेला आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या संरक्षण कठड्यावर विविध प्रकारचे वाक्य रंगविले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्यामध्ये येणारे नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे संबंध दर्शविणारे अर्थबद्ध वाक्य या भिंतीवर लिहिलेले आहेत. तसेच या पोलीस ठाणे मध्ये जे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना देखील प्रत्येक महिन्याला पोलीस निरीक्षकांच्या वतीने पोलीस ठाणे पातळीवर पुरस्कार दिला जात आहे. गैरसमज दूर करण्यासाठीच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिमा कायम मारझोड करणारे किंवा शिवीगाळ करणारे अशा पद्धतीची समाजामध्ये रंगवली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात हे अधिकारी किंवा कर्मचारी तशा पद्धतीचे नसतात. समाजातील पोलीस दलाबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठीच हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. श्रीगणेश कानगुडे, पोलीस निरीक्षक भूम पोलीस ठाणे.
Solapur News : सोलापूरमध्ये एनटीपीसी सोलापूरच्या 13 मेगावॅट सौर प्रकल्पाचे वाणिज्यिक संचालन
एनटीपीसी सोलापूरने हरित ऊर्जेत नव्या टप्प्याची सुरुवात दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी परिसरातील एनटीपीसी सोलापूरच्या १३ मेगावॅट सौर प्रकल्पाचा वाणिज्यिक संचालन जाहीर करण्यात आला आहे.या प्रकल्पामुळे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करत एनटीपीसी सोलापूरने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला [...]
Tuljapur : तुळजापूरमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सवात भव्य ड्रोन शोचे आयोजन
तुळजापूरमध्ये प्रथमच भव्य ड्रोन शोचे आयोजन तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र उत्सव २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत साजरा केला जात आहे. या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ड्रोन शो आता २ [...]
मराठी शाळेत शिकून मोठे झालो तर ते फार अभिमानाचे !
मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत यांचे प्रतिपादन ; कुणकेरी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात सावंतवाडी । प्रतिनिधी आपण आपल्या गावच्या मराठी शाळेत शिकलो आणि मोठे झालो तर ते फार अभिमानाचे आहे. आज एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल आणि शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच [...]
तेलंगणामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना हैदराबादच्या नल्लकुंटा येथे घडली आहे. शिवाय आईला वाचवायला आलेल्या मुलीलाही त्याने आगीत ढकलले. त्यानंतर घरातून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. वेंकटेश असे आरोपीचे नाव आहे. वेंकटेश आणि त्रिवेणी यांचा प्रेमविवाह झाला […]
Solapur News : मोहोळजवळ भरधाव टेम्पोचा कहर; कॉलेजला निघालेल्या दोन तरुणींचा मृत्यू.
पाटकुल परिसरात दुचाकी-टेम्पो अपघात पाटकुल:- कॉलेजचे स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या दोन विद्यार्थिनींवर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी नजीक पिंपरी [...]
वाद सोडवण्याचा यशस्वी मार्ग म्हणजे मध्यस्थी – CJI सूर्य कांत
जर दोन पक्षांमध्ये वाद असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे मध्यस्थी. मध्यस्थी ही दोन्ही पक्षांसाठी एक यशस्वी आणि फायदेशीर प्रक्रिया मानली जाते, ज्यामुळे दोन्ही पक्षांना आनंददायी निकाल मिळतो, असं सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत म्हणाले आहेत. गोव्याच्या पणजी येथे आयोजित ‘मध्यस्थता जागरूकता’ कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्टेकहोल्डर्सना संदेश […]
Satara News : उंब्रजजवळ पिकअप टेम्पोवरील हटके संदेश ठरला चर्चेचा विषय
उंब्रज–कराड मार्गावर हटके विचारांची चर्चा उंब्रज : वाहनांच्या मागील बाजूस विविध संदेश लिहिण्याची अनेकांना आवड असते. काही संदेश वाहतूक सुरक्षेचा इशारा देणारे असतात. तर काही हटके व विनोदी शैलीतून समाजाला संदेश देतात. गुरुवारी महामार्गावरून धावणाऱ्या एका पिकअप टेम्पोच्या [...]
धावत्या कारमध्ये आयटी मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, उदयपूरमध्ये कंपनीच्या CEOसह तिघांना अटक
उदयपूरमध्ये आयटी कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीच्या सीईओसह तीन आरोपींना अटक केली आहे. पीडिता शुद्धीत आल्यानंतर तिचे कानातले, मोजे आणि अंतर्वस्त्रे गायब होती. त्यानंतर तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डॅशकॅम, मेडिकल रिपोर्ट आणि जबाबाच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न […]
Karad News : मसूरच्या पिरजादे बंगला वस्तीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये घबराट
मसूर परिसरात गेल्या पंधरवड्यात बिबट्याचा वारंवार वावर मसूर : मसूर (ता. कराड) येथील पिरजादे बंगला वस्तीमध्ये बुधवारी रात्री दहा वाजता नागरिकांना बिबट्याचा वावर दिसला. त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे, सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मसूरच्या उत्तर बाजूकडे पिरजादे [...]
भंडारी समाजाची दिनदर्शिका एकमेकांना ‘कनेक्ट’ठेवेल !
कणकवलीत भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे दिनदर्शिका प्रकाशन व गुणवंत सत्कारप्रसंगी मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी / कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. कणकवली तालुक्यात समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. समाजातील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप त्यांना पुढील करियरसाठी प्रोत्साहन देणारी ठरते. तर समाजाची दिनदर्शिका बाराही महिने समाज बंधू भगिनींना एकमेकांशी [...]
Satara News : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी
आंबेनळी घाटात भीषण अपघात महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी अमरावती येथून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेले पर्यटकांचे टाटा नेक्सन वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात दोघे गंभीर तर तीन जण [...]
SIR म्हणजे महाघोटाळा! चिदम्बरम यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा
काँग्रेस नेते खासदार आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी SIR वरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. SIR म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप चिदम्बरम यांनी केला आहे. पी. चिदम्बरम यांनी तामिळनाडूमधील पुडुकोट्टाई येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. SIR ला आमचा विरोध नाही. पण तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने SIR ची अंमलबजावणी […]
Satara News : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित
श्री सेवागिरी महाराज पुण्यस्मरणार्थ संगीतमय बँड महोत्सव संपन्न सोमवार : दिनांक 22 डिसेंबर रोजी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ देवस्थान ट्रस्ट पुसेगाव व ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने संपन्न झालेल्या यात्रेमध्ये विविध उपक्रम संपन्न होत असतात . येणेप्रमाणे यात्रा स्थळावरील कबड्डीच्या सुसज्ज [...]
प्रस्तावित लातूर-कल्याण महामार्ग कळंब मार्गेच- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर, कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. कळंब आणि परिसराच्या भौगोलिक आणि अभियांत्रिकी दृष्टीने सखोल विचार करता हा मार्ग अधिक व्यवहार्य, किफायतशीर ठरणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मदत होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच नेण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात यावा या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालकांची यांच्याशी संवाद साधला. यावेळी तांत्रिक बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता कळंब तालुका हा अन्य भूभागांच्या तुलनेने सपाट आहे. त्यामुळे कट-फिल कामाचे प्रमाण याठिकाणी कमी आहे. परिणामी मर्यादित भूसंपादन आणि मोठ्या तसेच उड्डाणपुलांची आवश्यकता कमी भासेल. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च नियंत्रणात राहून कामाची गती वाढण्यास मदत होईल.तज्ज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार कळंब तालुक्यातून मार्ग गेल्यास महामार्गाची एकूण लांबी सुमारे 15 ते 20 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी लातूर ते कल्याण प्रवासाचा कालावधीही अंदाजे 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार आहे. सरळ, वेगवान व सिग्नल-फ्री मार्गामुळे इंधन खर्चात देखील 8 ते 12 टक्क्यांपर्यंत बचत अपेक्षित आहे. अवजड वाहतूक, मालवाहतूक व लॉजिस्टिकसाठीही हा मार्ग अधिक किफायतशीर ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तपशीलवार सांगितले. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याला विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून गेल्यास लातूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईठाणेनवी मुंबई या आर्थिक केंद्रांशी थेट व जलद आणि थेट संपर्क निर्माण होईल. परिणामी शेतमालाला मोठ्या बाजारपेठेत जलद प्रवेश मिळणार आहे. उद्योग आणि वेअरहाऊसिंग तसेच सेवा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होईल जेणेकरून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी आपल्या गावाशेजारी उपलब्ध होतील. कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक घडामोडींना त्यामुळे मोठी चालना मिळेल. या महत्त्वाच्या मार्गबदलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सकारात्मक व निर्णायक पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच जावा, यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत आणि जिल्ह्याच्या हिताचा निर्णय निश्चितपणे होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
तब्बल 19 वर्षांनी आले एकत्र, जुन्या वर्गमित्रांची पुन्हा भरली शाळा ! जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- अरे कसा आहेस. अय्या ओळखलंच नाही. तब्येत काय म्हणतेय. अगं कुठे असतेस. मिस्टर काय करतात. मुले किती आहेत. दहावीनंतर पुढे काय केले. ती आली नाही का. तो कुठे असतो. ती सध्या काय करतेय. नोकरी काय म्हणतेय. भावोजी काय करतात. वहिनी कुठल्या आहेत आणि त्या काय करतात. तुझा व्यवसाय कसा चालला आहे. शेती काय म्हणतेय. गावाकडे आल्यावर कोणी भेटतं का. सध्या काय चाललंय. तुला तो आठवतो का. हा तोच तो. असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना विचारत आणि सुख-दुःखाचे प्रसंग सांगत तालुक्यातील मौजे.आपसिंगा येथील नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते शाळेच्या 2006 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. यावेळी सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांच्या वतीने सौर ऊर्जा कॅमेरा मोठ्या आनंदाने भेट देण्यात आला. स्थानिक माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या स्नेहमेळाव्याचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या व राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थिनी यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना संपर्क करून हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, हैद्राबाद व पुणे जिल्ह्याच्या परिसरातून सुमारे 50 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येथोच्छित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी शाळेसह जीवनातील अनुभव ते आजपर्यंतचा जीवन प्रवास शब्दात उलगडला. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकजण गहिवरले. अशी पाखरे येती... आणि स्मृती ठेवूनी जाती या काव्य पंक्तीप्रमाणे शालेय जीवनात अनेक बॅचनी पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. कोणी पुढील शिक्षणासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणी निघून गेले. तरीही शालेय जीवनातील मित्रांसोबतच्या आठवणी मात्र काढत राहिले. याच जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 19 वर्षांनी एकत्र येत हा आठवणीपर स्नेहमेळावा आयोजित केला. एक महिना अगोदर बॅचच्या व्हाटसअप ग्रुपवर तारीख ठरवून आपल्या नोकरी, व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कोणी धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून आतुरतेने शाळेत जुन्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी हजर राहिले. प्रारंभी सर्वांनी फेटे बांधून कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच पूर्ण दिवस आनंदात घालवला. यावेळी शालेय जीवनातील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध अधिक घट्ट केले. दरम्यान, या दहावीच्या बॅचने केलेल्या उत्कृष्ट स्नेहमेळावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे इतरही बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयराज सुर्यवंशी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी शिक्षक बाळकृष्ण गोरे, तुकाराम गोरे, सुमित्रा खंदारे, शरद गोरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, ज्ञानेश्वर हेडे, शंकर गिरी, सुनील क्षीरसागर, शक्ती पांडागळे, समाधान पारधी, चंद्रकांत सोनवणे, नाना गादे आणि राहुल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.
कळंबकरांच्या उपनगरध्यक्षपदाकडे नजरा; उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांची कळंबच्या जनतेतून मागणी
कळंब (प्रतिनिधी)- राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे. कळंब नगरपालिकेचे कारभारी सुनंदाताई शिवाजी कापसे ह्या निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासीयांचे नजरा लागल्या आहेत. उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची शहरवासीयामधून मागणी होत असुन चर्चेला उधाण आले आहे. येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ.सुनंदा ताई कापसे 2554 मताने विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर महायुतीचे दहा नगरसेवक ही निवडून आणण्यात यश आले आहे. तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ दहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. ही निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादीना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेना-भाजप महायुतीच्या सुनंदा ताई शिवाजी कापसे ह्या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत. तर उप नगराध्यक्ष पदासाठी शितल चोंदे यांच्या नावाला शहरात चांगलेच चर्चेला उधान आले आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लावून राहिले आहे.
वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मूलाधार- कॉ. अजित अभ्यंकर
उमरगा (प्रतिनिधी)- जागतिक, देशपातळीवरील अनेक उदाहरणे आकडेवारीसह दिली. युरोपातील प्रबोधनाची क्रांती व इतर राजकीय क्रांत्या या वाचन संस्कृतीतून व एका ठराविक विचाराने लोक जागृत झाल्याने घडल्या. वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मुलाधार असल्याचे प्रतिपादन केले. भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेतील राज्ये अधिक प्रगत आहेत, त्याचे कारण तिथे रुजलेली शैक्षणिक आणि वैचारिक बीजे आणि खोलवर रुजलेली वाचन संस्कृती आहे. असे मत लेखक, अर्थतज्ञ आणि डाव्या-पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. अजित अभ्यंकर व्यक्त केले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून केशव उर्फ बाबा पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, कैलास शिंदे, हरीश डावरे, हरी जाधव, कॉ. सुनिता रेणके, अमर देशटवार, विठ्ठल चिकुंद्रे, रविकिरण बनसोडे, अ. रजाक अत्तार, ऍड. दिलीप सगर, सुनंदा माने, रेखा पवार, राजू तोरकडे, रणधीर पवार, उद्धवराव गायकवाड, सुधाकर पाटील, अमोल बिराजदार, डॉ. उदय मोरे, विवेक हराळकर आदींची उपस्थिती होती. वाचनालयाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. हे पुरस्कार वितरणाचे 07 वे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात संपन्न झाला. डॉ. दामोदर पतंगे यांना जीवन गौरव, वसंतराव नागदे यांना सहकाररत्न, डॉ. दीपक पोफळे यांना समाजरत्न, अनिल जगताप यांना कृषीरत्न, सतीश पवार यांना उद्योगरत्न, बालाजी बिराजदार यांना पत्रकाररत्न, रामजी साळुंके यांना शिक्षकरत्न, भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा, विशाल काणेकर यांना कलारत्न, महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीतरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. शीतल चव्हाण यांनी केले. आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून प्रा. चव्हाण वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन देत पुरस्काराच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वसंतराव नागदे, डॉ. दीपक पोफळे यांची मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ऍड. एस. पी. इनामदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. ख्वाजा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताबाई चव्हाण, सत्यानारायण जाधव, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप मोरे, राजू भालेराव, करीम शेख, माधव चव्हाण, धानय्या स्वामी, किशोर बसगूंडे, राजू बटगिरे, अनुराधा पाटील, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, माधवराव गावकरे, विजय चितली, ज्योती माने, शबाना उडचणे, बबीता मदने, धनंजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.

22 C