वलसाड हापूस मानांकन मिळण्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा विरोध
कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावरून सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले असून, वलसाड हापूसला GI मानांकन मिळू नये म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी औपचारिक विरोध नोंदवला आहे. कोकणाला हापूस आंब्याच्या लागवडीचा सुमारे ३५० ते ४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. पोर्तुगीजांनी भारतात ही जात ‘अल्फान्सो’ या नावाने आणली असली तरी तिला ‘हापूस’ […]
ज्येष्ठ समाजसेवक आणि एक गाव एक पाणवठा चळवळीचे प्रणेते बाबा आढाव यांचे निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि असंघटित कामगारांचे आवाज मानले जाणारे बाबा आढाव यांचे पुण्यात निधन झाले. काही महिन्यांपासून प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, दलित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका महत्त्वाच्या नेतृत्वाचा अंत झाला आहे. बाबा आढाव […]
पंढरपूरमध्ये शेततळ्यात बुडून पती, पत्नीसह पाच वर्षीय मुलाचा मृत्यू
पंढरपूरमधील कोर्टी गावात शेतमजुरी करणाऱ्या पती, पत्नीसह त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवार दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विजय राजकुमार लोंढ(30), प्रियांका विजय लोंढे (28) आणि प्रज्वल विजय लोंढे अशी मयत कुटुंबाची नावे आहेत. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सखोल तपास […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिजिटल पद्धतीने वाढत चाललेल्या कामकाजामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष वेधत ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे खासगी विधेयक लोकसभेत पुन्हा सादर केले आहे. या विधेयकाद्वारे कामाच्या विहित वेळेनंतर कर्मचारी ई-मेल, कॉल्स किंवा मेसेजला प्रतिसाद देण्यास बाध्य राहणार नाहीत आणि त्यांना काम नाकारण्याचा कायदेशीर हक्क मिळेल, असे […]
Video –जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केले आहे.
Photo –आकाशात झेपावले हॅलिकॉप्टर्स, मुंबईत मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा
हिंदुस्थानी नौदलाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. नौदल दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. (सर्व फोटो – रुपेश जाधव)
Video –ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, अरविंद सावंत यांची टीका
ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, राष्ट्रगीत-राष्ट्रगान गायले नाही तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तसेच आज आपण वंदे मातरमच्या 125 वर्षांचा उत्सव करत असू तर थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे असेही अरविंद सावंत म्हणाले.
Video –हॅलिकॉप्टरमधून येणाऱ्या बॅगांमधून कोणता आनंदाचा शिदा वाटला जातो- आदित्य ठाकरे
उपमुख्यमंत्र्यांच्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत, पण दोन हेलिकॉप्टर जातात- आदित्य ठाकरे
Video –निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या सरकारला नेमकी कसली भीती वाटते?
निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या बहुमताच्या सरकारला नेमकी कसली भीती वाटते? आदित्य ठाकरे यांचा सवाल
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगोच्या मोठ्या प्रमाणातील उड्डाण रद्द आणि विलंबामुळे निर्माण झालेल्या गोंधळावरून केंद्र सरकार, नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि खासगी विमान कंपन्यांवर तीव्र टीका केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलताना त्यांनी हा संपूर्ण प्रकार “एकाधिकार, नियामक यंत्रणेचे अपयश आणि सरकार कंपन्यांतील संगनमत” याचा थेट परिणाम असल्याचा आरोप केला. […]
जानवली कृष्णनगरी येथील दत्त मंदिरातील चोरीच्या घटनेत हस्तगत झालेली श्री दत्ताची मूर्ती ही मंदिराच्या स्वयंभू दत्त मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी, असा महत्वपूर्ण निर्णय कणकवली न्यायालयाने दिला आहे. जमिनीतील खोदाईदरम्यान मिळालेल्या या मूर्तीवर शासनाचा अधिकार असल्याने ती मूर्ती शासनाच्या ताब्यात देण्यात यावी, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने कणकवली न्यायालयात करण्यात आला होता. मात्र, […]
Jalna News –जालन्यातील नळणीवाडीत ५ लाख रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची कारवाई; एक आरोपी ताब्यात
भोकरदन तालुक्यातील नळणीवाडी शिवारातील गट १७३ मधील कपाशीच्या शेतात पोलिसांनी छापा टाकून १९ किलो ८०० ग्राम असा एकून अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपयांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (8 डिसेंबर 2025) दुपारी 2 च्या दरम्यान पोलिसांनी […]
ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, राष्ट्रगीत-राष्ट्रगान गायले नाही तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तसेच आज आपण वंदे मातरमच्या 125 वर्षांचा उत्सव करत असू तर थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे असेही अरविंद सावंत म्हणाले. संसदेत आज वंदे मातरम वर चर्चा […]
नागपूर येथे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आदेशांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने हरताळ फासला आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात तरी या प्रकरणावर ठोस कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे बाजार समितीची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्याची घोषणा पणनमंत्री […]
Syed Mushtaq Ali Trophy मध्ये IPL 2026 ला डोळ्यासमोर ठेवत हिंदुस्थानी खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. लवकरच आयपीएल 2026 साठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयुष म्हात्रे, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, अमित पासी, देवदत्त पड्डीकल, सरफराज खान या खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये शतकीय खेळी करत धुरळा उडवून दिला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलेल्या […]
बंकिम दा नाही, बंकिम बाबू म्हणा…तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने संसदेत पंतप्रधान मोदींना टोकलं
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आज ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतावर विशेष चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला सुरुवात केली. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी वंदे मातरम् या गीताचे जनक आणि प्रसिद्ध बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा उल्लेख ‘बंकिम दा’ असा केला. यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी लगेचच आक्षेप घेतला. त्यांनी पंतप्रधान मोदी […]
Solapur News: मुंबई पाठोपाठ सोलापूरची विमानसेवाही विस्कळीत
सोलापूर ते गोवाही विमानसेवा रद्द सोलापूर: मुंबईत प्रवासी विमानसेवेत व्यत्यय आल्याने प्रवाशांतून एकीकडे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. अशातच आता सोलापूरची विमानसेवाही विस्कळीत झाली आहे. रविवारी गोव्यातून सोलापूरला येणाऱ्या विमानाचे टेकऑफ [...]
लग्न मोडलं आणि दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात, सरावाला केली सुरुवात
हिंदुस्थानी महिला संघाची स्टार फलंदाज, उपकर्णधार आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरलंय तिचं लग्न. 23 नोव्हंबरला वडिलांची तब्बेत बिघडल्यामुळे तिचं संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणारं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र, रविवारी (7 डिसेंबर 2012) तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली आणि लग्नासंदर्भातली सर्व चर्चांना […]
संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरानी यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले. संताजी महाराजांनी ‘तैलसिंधू’ व ‘शंकरदीपिका’ नावाचे ग्रंथ लिहिले. संताजी महाराजांनी ‘तैलसिंधु’ नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत ७५ वर्षेपर्यंत अविरत कार्य करणाऱ्या लढवय्या संताजींना तेली समाज म्हणूनच दैवत मानतो. तेली समाजात एवढा त्यागी, बहादूर, नि:स्वार्थी, जनतेवर नि:स्सीम प्रेम करणारा आणि तुकारामासारख्या द्रष्ट्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारे संताजी महाराज तेली समाजात जन्माला आले हे तेली समाजाचे भाग्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जनता सहकारी बॅकेचे माजी चेरमन विश्वास शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक संजय देशमुख, धनंजय शिंगाडे, जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, अभिजित काकडे, तुषार निंबाळकर ,लक्ष्मण माने,दाजीअप्पा पवार, तेली समाज संघटनेचे जिल्हा सचिव ॲड. विशाल साखरे, ॲड. मंजुषा साखरे,ॲड. खंडेराव चौरे, आबासाहेब खोत, इंजिनियर गवळी,पंकज पाटील, वैजिनाथ गुळवे, प्रमोद मेंगले, लक्ष्मण निर्मळे, शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत निर्मळे,पांडूरंग भोसले,विशाल मिश्रा, प्रशांत माळी, विष्णु इंगळे, राम माने यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यांत नगरपरिषद निवडणुकांसाठी तीन दिवस दारू दुकाने बंद
सोलापूरात १ ते ३ डिसेंबर पूर्ण दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, पंढरपूर, सांगोला रु या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी [...]
Solapur Politics : बार्शीच्या पाणीटंचाईवर उपाय केले; पण ‘पैसा आणणार कुठून?’ : पालकमंत्र्यांचा सवाल
बार्शी सभेत पालकमंत्री गोरे यांची टोलेबाजी बार्शी : बार्शीच्या पाणी टंचाईचा प्रश्न तर आम्ही जवळजवळ सोडविला आहेच. त्याशिवाय तीर्थक्षेत्र विकास बार्शी उपसा जलसिंचन सारख्या अनेक योजनांची परिपूर्ती करण्यासाठी मी स्वतः शासनाकडे सातत्याने वकिली करीत राहीन. पण देशात नरेंद्र भाऊचे, राज्यात देवाभाऊंचे, [...]
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा राज्यातील शेतकऱ्यांनाही फटका; स्ट्रॉबेरी, भाज्या आणि फुलांचे नुकसान
इंडिगोच्या सततच्या फ्लाइट रद्द आणि विलंबामुळे विमानवाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाचा मोठा फटका शेतीमाल आणि हवाई मालवाहतूक व्यवसायाला बसला आहे. महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी गोळा करून देशभरातील बाजारपेठांमध्ये पुरवठा करणारे अनिल येवले यांनी गेल्या पाच दिवसांत अनेक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार येवले रोज सुमारे 45 शेतकऱ्यांकडून अंदाजे 2.5 टन स्ट्रॉबेरी […]
Solapur Politics: सोलापूरची ‘गोल्डन नगरसेविका’ श्रीदेवी फुलारे भाजपमध्ये; काँग्रेसला मोठा धक्का
महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का सोलापूर : गोल्डन नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी रविवारी सकाळी सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुपारी सोलापुरातील विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लगेच भेट घेण्याची गोल्डन संधी फुलारे [...]
श्रेयवादाच्या लढाईत अडकलेली नांदेड ते मुंबई ही विमानसेवा अखेर 25 डिसेंबरपासून सुरु होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टार एअरने या विमानसेवेसाठी तिकीट विक्री सुरु केली आहे. दिवाळीत ही विमानसेवा सुरु होणार असे उर बडवून भाजपाचे नेते सांगत होते. मात्र विमानसेवेसाठी ज्या सुविधा, लँडींगची व्यवस्था, विमानाची उपलब्धी याबाबत […]
Solapur News : चैत्र चंपाषष्ठी यात्रेला हजारोंचा जल्लोष; ‘येळकोट’च्या जयघोषात उत्सव दणदणला
श्री खंडोबा चैत्र चंपाषष्ठी यात्रेला भाविकांची उसळलेली गर्दी सोलापूर : बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपरिक चैत्र चंपाषष्ठी यात्रा यंदा २६ नोव्हेंबरपासून उत्साहात सुरू झाली आहे. यंदाच्या यात्रा महोत्सवात चंपाषष्टीनंतरच्या पहिल्याच रविवारी सकाळपासूनच हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. [...]
रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाण पत्र वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले,या शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा सन्मान रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसेन्ना ग्रुपचे अध्यक्ष संदिप बनसोडे व त्यांचे सहकारी गेली सतरा वर्षे पासून रक्तदान शिबीर घेऊन रुग्ण कल्याणासाठी योगदान देत आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव समोर ज्ञानसुर्य बी.आर.आंबेडकर बहु.सामाजिक संस्था, बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठान व सम्राट अशोक धम्मचक्र बहु. प्रतिष्ठान, भक्ती एजन्सी तर्फे आयोजित शिबिरात 23 जणांनी रक्तदान या वेळी प्रशांत बनसोडे, रोहित शिंगाडे, रावसाहेब मस्के, रोहन शिंगाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रक्तपेढी तंत्रज्ञ इरशाद शेख, निलाक्षी जानराव हे देखील रक्तदान शिबिरात सहभागी झाले. तांबरी विभागातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथे साहस सोशल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या संयुक्त विद्यमाने घेतले. सध्या शासकीय रुग्णालयातील रक्तसाठा कमी असुन रक्ताची कमतरता भासत आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. परमपुज्य बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन विविध सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांना रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समिती सदस्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य एम डी देशमुख, अब्दुल लतीफ, गणेश वाघमारे, बाळासाहेब जावळे तर प्रभारी अधिष्ठाता डॉ.उज्वला गवळी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.विवेक कोळगे, पर्यवेक्षक विठ्ठल कांबळे, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंखे, तिरुपती केंद्रे, संजय गजधने, बलभीम कांबळे, बाबासाहेब गुळीग, अमर आगळे, सचिन चौधरी, महादेव माळी, श्रीकांत मटकिवाले, अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, सुमेध क्षिरसागर सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट सुरक्षा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर शहरात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वनियोजित 3 डिसेंबर रोजीची मतमोजणी आता 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडल्याने आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या दिवशी कोणाचा गुलाल उधळला जाणार याकडे लागले आहे. नगरपरिषदेतील 38 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झाले असून तीन सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या तीन जागांसाठी मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. 2 डिसेंबर रोजी वापरलेली सर्व ईव्हीएम मशीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँग रूमला पोलिसांचा अतिशय कडेकोट पहारा असून कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. स्ट्राँग रूमच्या चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या 24 तास पहारा देत आहेत. यामध्ये 17 कर्मचारी व तीन अधिकारी तैनात असून परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अखंडित देखरेख केली जात आहे. स्ट्राँग रूमला अधिकाऱ्यांच्या भेटी संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे हे दिवसभरातून तीन ते चार वेळा स्ट्राँग रूमला भेट देत असून सुरक्षा उपायांची तपासणी करत आहेत. मतदान झाल्यानंतर काही पक्षांच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली.
घरकुल व मनरेगा जबाबदारी निश्चितीबाबत राजपत्रित अधिकारी संघटनेचे आंदोलन
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने 4 व 5 डिसेंबर रोजी सामुहिक रजा घेवून आर्वी येथील गटविकास अधिकारी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतरही घरकुल व मनरेगा योजनेबाबत जबाबदारी निर्धारणाबाबत कोणताही निर्णय न झाल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांनी 8 डिसेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकारी वर्गाने धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या डिजिटल सिंगनिचर सटिफकेंटचा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्य सरकारने घरकूल व मनरेगा योजनेबाबत जबाबदारी निश्चिती संदर्भातील निर्णय घ्यावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात संघटनेच्यावतीने आंदोलन चालू आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह धाराशिव जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले आहे. सामुहिक रजा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झालेल्यामध्ये जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, अनुप शेंगुलवार, निलेश काळे, अनंत कुंभार, संतोष नलावडे, अमोल ताकभाते, हेमंत भिंगारदेवे, सिमा गवळी, पद्मा मांजरे आदींचा समावेश आहे.
जितके वर्ष मोदी पंतप्रधान आहेत, तितके वर्ष नेहरू तुरुंगात होते –प्रियंका गांधी
“नरेंद्र मोदी हे गेली १२ वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. जवळजवळ तेवढीच वर्षे पंडित नेहरूंनी तुरुंगात घालवली”, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याला आठवडल्याला सुरुवात झाली असून आज ‘वंदे मातरम्’वर चर्चा होत आहे. याचवेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी ही टीका केली आहे. लोकसभेत […]
प्रदूषण म्हणजे तापमानचं असतं असं विधान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुप्ता यांच्या विधानाचा समाचार घेतला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “सभेत दिलेली विधाने पाहून दिल्लीच्या नेतृत्वाची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते.” परिषदेत मुख्यमंत्री बोलताना “AQI हा एक […]
Syed Mushtaq Ali Trophy चा रणसंग्राम दिवसेंदिवस अधीक रोमांचकारी होत आहे. आयुष म्हात्रेसह अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या खेळाची झलक गेल्या काही दिवसांमध्ये दाखवून दिली आहे. यामध्ये आता अमित पासी या तरुण तडफदार फलंदाजाचा समावेश झाला आहे. अमित पासीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याने 55 चेंडूंमध्ये वादळी खेळी करत 114 धावांची सलामी दिली […]
Satara News : फलटणमध्ये शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू
शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू लोणंद : पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती (ता. फलटण) येथे शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादांमुळे मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत काशिनाथ साधू ताम्हाणे (वय ६०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर [...]
संगमेश्वर तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) येथील दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध नागरिकांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाबाबत संगमेश्वर पोलिसांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे ९० वर्षे) या वृद्धावस्थेमुळे तसेच आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे की, रुक्मिणी आमकर यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणारे त्यांचा मुलगा महादेव विठोबा […]
राज्य बार कौन्सिलमध्ये 30 टक्के महिला आरक्षण; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
न्यायालयीन व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक राज्यात सक्रिय असणाऱ्या बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ज्या राज्य बार कौन्सिलच्या निवडणुका अद्याप अधिसूचित झालेल्या नाहीत, अशा बार कौन्सिलमध्ये 30 टक्के जागांवर महिला वकिलांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सध्या […]
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 10 डिसेंबर रोजी योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, विभागाच्या योजना,कार्यक्रम, धोरणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे, नियम,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्त कार्यालये यांची रचना,स्वरूप, भूमिका,जबाबदाऱ्या व कार्ये इत्यादीबाबत दिव्यांगामध्ये जागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे केले आहे. या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क,स्पेशल कोर्ट,दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 80 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे अधिकार,शिक्षण,पुनर्वसन याबाबत विविध विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहे.
आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम
धाराशिव (प्रतिनिधी)- एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आयुष्मान भारतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात सध्या 15.23 लक्ष लाभार्थी असून त्यापैकी 6.80 लक्ष लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी झालेले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी 20 रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये,असे एकूण 30 रुपये मानधन स्वरूपात देण्याबाबत शासन निर्णय पारित झाला आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा 1356 आजारांवर उपलब्ध आहे.हा लाभ धाराशिव जिल्ह्यातील 27 खाजगी व 13 शासकीय अशा एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच 70 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आयुष्मान वय वंदना कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.
कर्मचारी संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने संघटनेचे अशोक बनसोडे, प्रभाकर बनसोडे, दिलीप वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदिप शिंदे, रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, श्रीकांत चिलवंत, रवि कांबळे, यु.व्ही. माने, विजय गायकवाड, वाहूळकर, राजन माने, बलभीम कांबळे, अविनाश गायकवाड, सुनिल बनसोडे, बाळासाहेब माने, राजेंद्र धावारे इत्यादी उपस्थित होते.
संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळीतील गायक अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे परंपरागत रीतीरिवाजांनुसार मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी देवीची ओटी भरून कुलाचार पार पाडले आणि आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांनी अजय गोगावले यांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना अजय गोगावले म्हणाले,“महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी दारी गायनरूपी सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. शाकांबरी नवरात्र महोत्सवात माझ्या तारखा उपलब्ध असतील, तर त्यातील एक दिवस मी नक्कीच कार्यक्रमासाठी देण्याचा प्रयत्न करीन.”त्यांच्या या आश्वासनामुळे भक्त आणि संगीतप्रेमींमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, रामेश्वर वाले, दिनेश निकवाडे, नवनाथ खिंडकर पुजारी सचिन अमृतराव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Satara News : चार्जिंग की पार्किंग पॉईंट, कधी कधी आंदोलनकर्त्यांचा पॉईंट
सातारा नगरपालिकेचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वयनात अपयशी सातारा : सौर उर्जा बळकटीकरणासाठी शासनाच्या अनुदानातून सातारा नगरपालिकेने दोन ठिकाणी चार्जिंग पॉईंट उभे केले होते. मात्र हे चार्जिंग पॉईंट नुसते नावाला असून त्या ठिकाणी पेट्रोलची दुचाकी बाहने उभी केली जात असल्याने तो पार्किंग पॉईंट बनला आहे. कधी कधी [...]
MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आयोगाकडून नव्या तारखा जाहीर
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने परीक्षेच्या नवीन तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 रोजी ही एमपीएससी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत […]
Karad News : कर्नल संभाजी पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते ऐतिहासिक तैलचित्र सन्मान
कलात्मक सन्मान, कर्नल संभाजी पाटील यांचा गौरव कराड : जामनगर (राजस्थान) येथे १९८८ साली महामहीम राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या स्वागतावेळी स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या कर्नल संभाजी पाटील यांच्या ऐतिहासिक क्षणाचे ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांनी साकारलेले तैलचित्र खासदार शरद पवार यांच्या हस्ते संभाजी पाटील यांना प्रदान [...]
Satara News : बेळगावच्या युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या
वाघोली जवळ रेल्वे अपघात, IT कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू सातारा : तडवळे सङ वाघोली (ता. कोरेगाव) येथे रविवारी, ७ रोजी पहाटे रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, वाठार-सालपे रेल्वे अप लाईनवरील तडवळे हद्दीत रात्री २ वाजण्याच्या [...]
अबब! पाटणाच्या पुस्तक मेळाव्यात 15 कोटींचे पुस्तक, पुस्तकाच्या फक्त तीन प्रती प्रकाशित
आतापर्यंत आपण दोनशे चारशे जास्तीत जास्त हजार रुपयांपर्यंत पुस्तकं वाचली असतील. पण पाटणाच्या पुस्तक मेळाव्याततील एका पुस्तकाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, या मेळाव्यातील एका पुस्तकाची किंमत ऐकून सर्वच अवाक झाले आहेत. तब्बल 15 कोटी रुपये त्या पुस्तकाची किंमक असून हे पुस्तक जगातील सर्वात महागडे पुस्तक आहे. शिवाय या पुस्तकाच्या आशयाबाबत आणि लेखनाबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली […]
तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या
काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. हिवाळ्यात गाजर सूप पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅन्टीवायरल असल्याने […]
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला पूर्ण कला. टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळ केला आणि 9 विकेटने सामना एकहाती जिंकला. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या तिघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं. सामन्यासह मालिका टीम इंडिया जिंकली मात्र, एका चुकीमुळे ICC […]
बडीशेप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून व्हाल थक्क
आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाची चव तसेच खाल्लेले अन्न पचनासाठी सुद्धा बडीशेप गरजेची आहे. इतकेच नव्हे तर, बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात. नवमातांसाठी दूध येण्यासाठी बडीशेप खाणे खूपच गरजेचे आहे. […]
म्हसवड येथे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाची भव्य सुरुवात
रुद्राभिषेक व नामस्मरणाने मंदिर परिसर भक्तिभावाने भारावला म्हसवड : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा ११२ व्यां पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने काल पहाटे श्री ब्रह्मचैतन्य महाराज देवस्थान च्या सर्व विश्वस्थांच्या हस्ते अक्षय बटव्याचे आणि कोठी पूजन मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून येत्या दहा दिवस चालणाऱ्या.या पुण्यतिथी [...]
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा
शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच उत्तम आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते.आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते. दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात […]
Sangli News : आटपाडी-करगणी मार्गावर भीषण कार अपघात, 1 ठार 4 जखमी
भरधाव कार मेटकरवाडी येथे पलटी आटपाडी : आटपाडी तालुक्यातील भिवघाट ते करगणी या मार्गावर आलिशान गाडीच्या झालेल्या अपघातात रिहान जमीर मुल्ला (बय १६ रा. करगणी ता. आटपाडी) हा ठार झाला. या भीषण अपघातात चारजण जखमी झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रिहान [...]
‘तुमची पत्नी हिंदुस्थानी नाही का?’जेडी वान्स यांच्या स्थलांतर-विरोधी वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स (JD Vance) यांनी ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर म्हणजे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे’, असे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. वान्स यांनी ‘X’ वर लिहिले की, ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर हे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे. हे नेहमीच असे राहिले आहे’. लुईझियाना येथील एका बांधकाम कंपनीच्या मालकाच्या व्हिडिओला प्रतिसाद […]
श्रीगोंदाचा वीर पुत्र हवालदार गोकुळ वाळके शहीद; चांभुर्डी गावावर शोककळा
श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी गावचे भूमिपुत्र आणि मराठा लाईट इन्फंट्री युनिट-५ मध्ये कार्यरत असलेले हवालदार गोकुळ नागेश वाळके (वय ३५) हे अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी दुःखदरीत्या शहीद झाले. त्यांच्या अचानक निधनाने चांबुर्डीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना भुरळ येऊन पडून डोक्याला […]
Sangli News : दिघंचीत आगीमध्ये सुमारे 30 एकर ऊस खाक
दिघंचीत आगीत 13 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जळून खाक दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील तरटी मळा येथे अचानक लागगेल्या आगीने १३ शेतकऱ्यांचा एकूण अंदाजे ३० एकर ऊस जळून खाक झाला. हि घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने बघता [...]
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अज्ञातांकडून प्रवाशांवर हल्ला, एका आरोपीला अटक; तिघे फरार
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर तीन आरोपींनी प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल 3 वर सकाळी 8.11 वाजता ही घटना घडली. संशयित आरोपींनी प्रवाशांवर मिरची पावडरचा स्प्रे मारला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले […]
Kolhapur News : इचलकरंजीत ढोल ताशांच्या निनादात शंभूराजेंना मानवंदना !
शंभू तीर्थाचे भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात इचलकरंजी : श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त रविवारी इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला. विविध ढोल पथक, ताशा पथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल-ताशांच्या निनादात हजारों शंभू भक्तांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांना [...]
हजारो प्रवासी त्रस्त आहे, केंद्र सरकार झोपले आहे का? ममता बॅनर्जी यांचा खरमरीत सवाल
देशभरात इंडिगो विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी याघडीला त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सामान्य जनतेच्या समस्यांबद्दल सरकार हे उदासीन आहे. सरकार हे फक्त निवडणूकांच्या रणनीतींमध्ये व्यस्त आहेत. संसदेत सुरू असलेल्या सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी […]
फुगा फुगवताना फुटला अन् श्वसननलिकेत अडकला, 13 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
वाढदिवसाच्या डेकोरशनसाठी फुगा फुगवत असताना फुटला आणि श्वसननलिकेत अडकल्याने 13 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या वाढदिवशीच बहिणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांना फुगे फुगवायला देताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील दिघी गावात ही घटना घडली. अशोक कुमार यांच्या तीन […]
Ratnagiri News –रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत सांबराची पाहणी करून पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (07 डिसेंबर 2025) रात्री 12.30 च्या सुमारास ही रत्नागिरी महामार्गावर करंजरी येते अज्ञात वाहनाने सांबराला जोराची धडक दिली. गाडी वेगात असल्यामुळे […]
चंद्रपूरातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे आदिवासी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी- बांबेझरी येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद पाडले. हे प्रकल्पग्रस्त शेतकरी 15 महिन्यांपासून स्वतःच्या शेतजमिनीसाठी मोबदला किंवा नोकरी मागत ऊन -वारा- पावसा- पाण्यात संघर्ष करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण निकाली काढण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे. 2003 -2004 मध्ये माणिकगड […]
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमाभाग सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. आता याच भागात सुरक्षा दलांनी ऐतिहासिक यश संपादित केले आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळवला आहे. एक कोटींच बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर रामधेर मज्जी याने आपल्या 12 साथीदारांसह छत्तीसगडच्या बकरकट्टा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. […]
Sangli News : चांदोली परिसरात वाघीणीचा उद्रेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन्य प्राणी उद्रेकामुळे सोशल मीडियावर चर्चा वारणावती : सध्या ताडोबातील वाघीणीनेचांदोली परिसरातील बफर झोन ठाण मांडले असतानाच शनिवारी टी १ वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्र मोबाईल वरून प्रसारित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण तर काही अधिकारी निर्मित [...]
Sangli News : चांदोली परिसरात वाघीणी उद्रेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन्य प्राणी उद्रेकामुळे सोशल मीडियावर चर्चा वारणावती : सध्या ताडोबातील वाघीणीनेचांदोली परिसरातील बफर झोन ठाण मांडले असतानाच शनिवारी टी १ वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्र मोबाईल वरून प्रसारित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण तर काही अधिकारी निर्मित [...]
Smriti Mandhana: संगीतकार पलाश मुच्छल सोबत स्मृती मानधनाचे लग्न रद्द, सोशल मीडियावर व्हायरल
स्मृती डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत दिसणार सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज, सांगलीची सुकन्या स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. पोस्ट करत ‘लग्नाचा निर्णय मागे घेतला असून दोन्ही कुटुंबांच्या खासगी आयुष्याचा आदर [...]
Kolhapur News : कागलमध्ये बकरी वाहून जाणारा ट्रक उलटला; 200बकऱ्यांचा मृत्यू
व्हन्नूर येथील अपघातात बकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान कागल : कागल ते निढोरी राज्य मार्गावरील व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याशेजारील धोकादायक वळणावर काल पहाटे बकरीवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २०० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान [...]
Kolhapur News : सादळे घाटात भीषण अपघात; निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू
सादळे घाटातील अपघाताने परिसरात हळहळ सादळे : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सदाशिव खोत हे [...]
नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले बहुमताचे सरकार नेमके कशाला घाबरत आहेत? विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी त्यांना कशाची भीती वाटते, असा सवाल त्यांनी केला. तसेच वृक्षतोड, इंडिगोचा गोंधळ यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज सकाळपासून विरोधी पक्षनेत्याबाबत […]
कुणालाही सोडणार नाही, तुरुंगात टाकणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अग्नितांडवप्रकरणी कठोर भूमिका : बेकायदेशीरपणाला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार पणजी : हडफडे येथील ‘बर्च’ क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांचा होरपळून तर अन्य सर्वजण गुदमरून मृत्युमुखी पडल्याचे निदान वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचाही गय करणार नाही, तो [...]
Kolhapur News : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या अठरा बैलांची सुटका ; गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई
उजळाईवाडीजवळ बैलांची तस्करी रोखली कोल्हापूर : कत्तलीसाठी कर्नाटक मध्ये खिलारी जातीचे 18 बैल घेवून जाणारा ट्रक गोकुळ शिरगाव पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोर रविवार दि.७ रोजी दुपारी पकडला.कत्तलीसाठी नेणाऱ्या आरोपींच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत [...]
गोव्यातून जात होती कर्नाटकात : गुन्हाशाखेनेकेलीकारवाई पणजी : गुन्हा शाखेने केलेल्या कारवाईत एक कोटीची बनावट दारू जप्त केली आहे. बनावट दारू घेऊन गोव्यातून कर्नाटकात जाणारा ट्रक मेरशी बायपास येथे अडवून तपास केला असता बनावट दारूच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125, 274, [...]
फोंड्यातील मुख्य नाल्याला घातक प्रदूषणाचा विळखा
नाल्यात रासायनिक पाण्याचे विसर्जन : तक्रारीकऊनहीकारवाईनाहीच फोंडा : बेतोडा भागातून उगम पावणारा आणि कुर्टी पंचायत तसेच फोंडा शहरातून कवळे व बांदोड्यापर्यंत जाऊन जुवारी नदीला मिळणारा मुख्य नाला घातक रसायने व अन्य प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. नाल्यावर होणाऱ्या या प्रदूषणाच्या माऱ्यामुळे बेतोड्यासह कुर्टी व अन्य भागातील शेती बागायती तसेच त्यावर अवंबून असलेल्या जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू [...]
गोवा मुक्तीदिनी आमदारांना काळे झेंडे दाखवणार
म्हापसा येथील व्यापारी संघटनेचा सरकारला इशारा : अनेकवर्षांपासूनप्रलंबितप्रश्नसोडविण्याचीमागणी म्हापसा : म्हापसा येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा आणि पालिकेने लक्ष घालून येत्या 15 डिसेंबरपर्यंत त्या सोडवाव्यात, अन्यथा गोवा मुक्तीदिनी 19 डिसेंबर रोजी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू, असा निर्वाणीचा इशारा म्हापसा व्यापारी संघटनेने दिला आहे. म्हापसा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर म्हापसा व्यापारी [...]
सत्ताधारी-विरोधी पक्षांनी बाह्या सरसावल्या
बेळगावात आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवशी मांडणार शोक प्रस्ताव : 25 विधेयके मांडण्याची सरकारची तयारी बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सरकारची कोंडी करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तयारी केली असून सत्ताधारी काँग्रेसनेही विरोधकांचे हल्ले समर्थपणे परतावण्यासाठी एकीचा मंत्र जपला आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात [...]
अधिवेशनालाप्रत्युत्तर: मोठ्यासंख्येनेउपस्थितराहण्याचेम. ए. समितीचेआवाहन बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवार दि. 8 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. सकाळी 11 वाजता टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहून कर्नाटक सरकारला एकी दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मागील काही [...]
Kolhapur News : सादळे घाटातील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
सादळे घाटातील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू पुलाची शिरोली : नारायण खोत हे पेठ बडगाव येथील मार्केटमध्ये हमालीचे काम करत होते. रविवारी सकाळी ते कामासाठी गेले होते. दिवसभर काम करून सायंकाळी पाचच्या सुमारास ते कासारवाडी मार्गे निकमवाडी येथे परतत होते. सादळे घाटातील जुन्या जेनिसिस कॉलेजच्या [...]
अधिकारी-पोलीसच गळाला, खात्याची इभ्रत पणाला!
महासंचालकांची ‘खा की’ला पुन्हा एकदा समज : गुन्ह्यात सहभागी असल्यास कठोर कारवाईचा इशारा, पोलीस दलाची अब्रू वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, वाटमारी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. निपाणीत तर दरोडेखोरांनी एका पोलिसाला पिटाळल्याचे फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सोमवार दि. 8 डिसेंबरपासून बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत [...]
अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस खाते सज्ज
सहाहजारांहूनअधिकअधिकारी-पोलीसतैनात: शहरालापोलीसछावणीचेस्वरुप; आंदोलनकर्त्यांसाठीहीनियमावली बेळगाव : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहा हजारहून अधिक अधिकारी व पोलिसांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावला छावणीचे स्वरुप आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सुवर्ण विधानसौध परिसरात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना आंदोलने करणार आहेत. बंदोबस्तासाठी 3,820 हून अधिक पोलीस, 146 अधिकारी यांच्याबरोबर 8 क्युआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम), राज्य [...]
महामेळाव्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ
मराठीभाषिकांचीघेतलीधास्ती बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 8 रोजी व्हॅक्सिनडेपो परिसरात महामेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळनंतर टिळकवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी काढलेल्या काळ्या दिनाच्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून पोलिसांनी धास्ती घेत पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी शहरातील चार ठिकाणांची यादी पोलीस प्रशासनाकडे दिली [...]
शहरात 27 अग्निशमन वाहनांसह 250 जवानांची नियुक्ती
अधिवेशनाच्यापार्श्वभूमीवरअग्निशमनदलाकडूनविशेषखबरदारी: परजिल्ह्यातूनमागविलेबंब बेळगाव : दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर बेळगावातही हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली असून, यावेळी अग्निशमन दलाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. यंदा सुवर्णसौधसह शहरात तब्बल 27 अग्निशमन दलाची वाहने तैनात करण्यात आली असून, 250 कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली [...]
शहरात टीईटी परीक्षा सुरळीत; 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांची हजेरी
बेळगाव : कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी बेळगावसह राज्यभरात घेण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. यावर्षी सेवेत असलेल्या शिक्षकांनीही टीईटी दिल्यामुळे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात होता. टीईटीचे दोन पेपर सकाळी व संध्याकाळी [...]
ट्रम्प यांचा युद्धविराम अपयशी; थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा युद्ध सुरू
थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युद्धबंदीनंतरही थायलंडने कंबोडियन सीमेवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले आहेत. थायलंडच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी सोमवारी सांगितले की थायलंडने कंबोडियासोबतच्या वादग्रस्त सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला […]
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केले आहे. शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? खरंतर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये, अशीच सरकारची इच्छा […]
पंचमसाली समाजाचा बुधवारी मूकमोर्चा
बसवजयमृत्युंजयमहास्वामीयांचीमाहिती: मोठ्यासंख्येनेसहभागीहोण्याचेआवाहन बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागील हिवाळी अधिवेशनावेळी आरक्षणासाठी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अमानुषपणे समाज बांधवांवर लाठीमार करण्यात आला होता. यंदा याला वर्षपूर्ती होणार असून या अत्याचाराची आठवण म्हणून बुधवार दि. 10 रोजी गांधी भवनपासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नियमानुसार [...]
छत्रपती शिवाजी उद्यानातील क्रीडा साहित्याची दुरवस्था
महानगरपालिकेचेदुर्लक्ष: नागरिकांकडूनदुरुस्तीचीमागणी बेळगाव : छत्रपती शिवाजी उद्यानातील लहान मुलांच्या क्रीडा साहित्याची दुरवस्था झाली आहे. झोपाळे तसेच सीसॉ तसेच इतर क्रीडा साहित्य मोडून पडले आहे. त्यामुळे उद्यानामध्ये खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या क्रीडा साहित्याची दुरुस्ती अथवा नवीन साहित्य बसवावे, अशी मागणी केली जात आहे. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात दररोज [...]
ग्राहक वाद निवारण आयोग खंडपीठावर पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी
बेळगाव : राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगाव येथे स्थापन करण्यात आले आहे. मात्र अद्याप अध्यक्ष, सदस्यांसह पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात न आल्याने वेळेवर निकाल मिळत नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पक्षकारांसह वकिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लवकरात लवकर पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बार असोसिएशनच्या [...]
मंत्री हो…पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सना भेट द्या
बॅरिकेड्सहटविण्यासंदर्भातपत्रव्यवहार बेळगाव : पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथील हटविण्यात यावे, यासाठी गेल्या साडेअकरा वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. मात्र, बॅरिकेड्स काही केल्या हटले नाहीत. त्यातच सोमवारपासून बेळगावात सरकारच्या विधीमंडळाचे अधिवेशन भरणार आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी स्वत: पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सची पाहणी करून समस्या मार्गी लावावी, यासाठी रविवारी सकाळी पुन्हा आंदोलन करण्यात आले. पहिले रेल्वेगेटवर [...]
भातपिकांचेप्रचंडनुकसानसुरुच: अर्धपक्वभातकापणीचीशेतकऱ्यांवरवेळ वार्ताहर/गुंजी गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या भागात फिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्याचे सत्र हत्तींकडून अद्याप सुरूच असून, गेल्या चार दिवसापासून हत्तींनी आपले ठाण गुंजीजवळ असलेल्या मेतीतळा शिवाराजवळ मांडले आहे. त्यामुळे या भागातील बिंबेगाळी आणि मेतीतळा शिवारातील भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील शेतकरी कृष्णा खेमांना बिरजे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकात हत्ती शिरून, खाऊन तुडवून [...]
नंदगड संगोळ्ळी रायण्णा यात्रोत्सव उत्साहात
धनगरीढोलच्यानिनादातमिरवणूक, धार्मिक-सांस्कृतिककार्यक्रम वार्ताहर/नंदगड कुरबर संघाच्यावतीने नंदगड येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यात्रा महोत्सव दोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कुरबर समाज बांधवांच्या बरोबरच अनेकांनी यात्रोत्सवात सहभाग दर्शवला. त्यामुळे नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाजवळ दोन दिवस लोकांची गर्दी झाली होती. शनिवार दि. 6 रोजी सकाळी क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा समाधीस्थळी पूजा व धार्मिक विधी पार [...]
म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
आजच्यामेळाव्यातउपस्थितराहण्याचेकार्यकर्त्यांनाआवाहन वार्ताहर/कणकुंबी कणकुंबी-जांबोटी भागातील गावांमध्ये 8 डिसेंबरच्या मेळाव्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कणकुंबी भागातील नागरिकांना पत्रके वाटप करून जागृती करण्यात आली. 2004 साली महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत [...]
हिवाळ्यात तुमच्याही पायांना भेगा पडल्यात का, करुन बघा हे उपाय
हिवाळा सुरू झाला आहे आणि थंडी सतत वाढत आहे. या ऋतूत बहुतेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर, हिवाळ्यातील थंड वारे त्वचेचा ओलावा काढून टाकतात आणि कोरडेपणा निर्माण करतात. यामुळे अनेकदा त्वचा भेगा पडते आणि निर्जीव दिसते. याव्यतिरिक्त, आजकाल भेगा पडलेल्या टाचांची समस्या अनेकांना त्रास देत आहे. यापासून मुक्त होण्यासाठी, बरेच लोक […]
ढगाळ वातावरणामुळे धामणे भागात पुन्हा चिंता
धामणे : दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरणामुळे धामणे, मासगौंडहट्टी, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे (ये.) या भागातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त अवस्थेत दिसत आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे भात पिकाच्या कापणीला उशीर झाला असून, पाऊस जास्त झाल्यामुळे शिवारातील जमिनीत ओलावा जास्त असल्याने भात पिकाच्या कापणीला उशीर झाला. त्याचप्रमाणे भातपीक कापणी संपल्यानंतरसुद्धा शेतजमिनीत ओलावा जास्त [...]
अलतगा फाटा ते अगसगा रस्ता बनला धोकादायक
डांबरीकरणाचीखडीसांडल्यानेवाहनचालकांचेअपघात बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाची खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील खडी या रस्त्यावर पडत असल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकीचे अनेक अपघात होत आहेत. एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्यावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. अलतगा परिसरात अनेक क्वारी आहेत. या ठिकाणाहून डांबरीकरणासाठी लागणारी [...]

27 C