उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरण 108 टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 1 लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने त्यातून 17 हजार क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. या दोन्ही विसर्ग संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे […]
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवले. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होत. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची उत्तम समज आणि सखोल संविधानिक ज्ञान असलेले सिद्धार्थ […]
Ratnagiri News –अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला पहिल्या लेखापरिक्षणात ‘ड’ वर्ग मिळाला होता. तसेच रत्नागिरी शाखेत अनेकांनी आपण कर्ज घेतलेले नसताना नोटीसा आल्याचा आरोप केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. याचा फटका राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची मुख्य शाखा असलेल्या राजापूरला बसला. राजापूर शाखेतून सुमारे 100 कोटी रूपये पर्यंतच्या ठेवी काढून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेने यंदाच्या […]
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक देत 10 ते 15 जणांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एअरपोर्ट रोडवर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. अतिवेगामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण […]
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला आहे. कस्टम विभागाने केलेल्या विविध कारवाईत 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि जिवंत वन्यजीव हस्तगत केले आहेत. याप्रकरणी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान मुंबई कस्टम्स, झोन-III च्या अधिकाऱ्यांनी ही […]
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, तीन लाख हेक्टर खरीप पाण्यात; २०० गावांची वाहतूक ठप्प
बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला. प्रचंड विध्वंस पाहण्यास मिळाला. १६ मध्यम, १२७ लघू प्रकल्प ओसंडून वाहू लागले. सर्वच नद्या, नाल्यांना महापूर आला. बंधारे फुटले, नदीचे पाणी शेतात घुसले, शेकडो गावांची वाहतूक ठप्प झाली. पावसाच्या रौद्ररूपाने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तब्बल तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यात बुडाला. काढणीला आलेले सोयाबीन उद्धवस्त झाले. हातातोंडाशी आलेला […]
एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही –सुप्रिया सुळे
एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज नाशिकला आपण […]
एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले […]
Asia Cup 2025 – UAE च्या फलंदाजांचा तोडफोड अंदाज, ‘करो या मरो’च्या लढाईत Oman ला दिलं तगड आव्हान
Asia Cup 2025 मध्ये साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावलेल्या UAE आणि Oman यांच्यामध्ये शेख झायद स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ओमानने UAE ला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. याचा UAE ने चांगलाच फायदा घेतला आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना ओमानची गाडी रुळावरून घसरली आहे. प्रथम […]
कतरिनाने देणार गोड बातमी, विकी कौशल बाबा होणार
परिणीती चोप्रानंतर अभिनेत्री कतरिना कैफने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आई होणार आहे. याआधी अनेकदा कतरिना गरोदर असल्याचा अफवा पसरल्या होत्या. एनडीटीव्हीच्या सूत्रांनी कतरिना गर्भवती असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या चार वर्षांनंतर पालक होणार […]
Ratnagiri News –ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये, रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाची निदर्शने
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात सोमवारी (15 ऑगस्ट 2025) रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाने तीव्र निदर्शने केली. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी-कुणबी बांधव, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जयस्तंभ येथून सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शांततापूर्ण मोर्चाने रत्नागिरी तहसीलदार कार्यालयापर्यंत […]
विद्यार्थी व्हिसावर रशियात गेला, युद्धात अडकला; पंजाबच्या तरुणाला बळजबरीने सैन्यात केले सामील
रशियात एका हिंदुस्थानी तरुणाला बळजबरीने सैन्यात भरतीकरून त्याला युक्रेन युद्धाच्या रणांगणात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील हा तरुण असून त्याचे नाव बुटा सिंग आहे. तो गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये विद्यार्थी व्हिसावर मॉस्कोला गेला होता. ज्याला बळजबरीने रशियन सैन्यात भरती करत त्याला युद्धाच्या रणांगणात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुटा सिंग […]
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवलं; पती, सासू सासऱ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात घडली. प्रगती अविनाश पवार असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 22 जुलै 2018 रोजी प्रगतीचा अविनाश उत्तम पवार याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या चार-पाच महिन्यांनंतरच पती आणि सासू-सासरे पैशासाठी […]
टॅरिफ व ट्रेड संदर्भात अमेरिकन प्रतिनिधीचा मोठा दावा, हिंदुस्थान चर्चेसाठी तयार!
हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापारी संबंधावरुन तणावाचे वातावरण असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार, व्यापार तज्ज्ञ पीटर नवारो यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान वाटाघाटीच्या टेबलावर येत आहे, असे दावा नवारो यांनी केला आहे. रॉयटर्सने नवारो यांच्या एका मुलाखतीचा हवाला देत ही माहिती दिली आहे. येत्या मंगळवारी नवी दिल्लीमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापारविषयक चर्चा […]
दिलीप कांबळे यांची मराठवाडा प्रदेश सह सचिवपदी निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेत धाराशिवचे साहित्यिक दिलीप परशुराम कांबळे यांची मराठवाडा प्रदेश सह सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत राहणार आहे. शुभांगीताई काळभोर (राष्ट्रीय उपाध्यक्ष) व डॉ. शरद गोरे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वतीने कांबळे यांच्याकडून समाजातील सर्व घटकांपर्यंत साहित्य चळवळ पोहचवण्याची व समानतेचा संदेश रुजवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दिलीप कांबळे यांनी 1977 पासून लेखनास सुरुवात केली असून विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच अनेक प्रतिष्ठित दिवाळी अंकांमध्ये त्यांचे साहित्य झळकले आहे विशेषतः ग्रामीण कथालेखनात त्यांचा हातखंडा आहे. या निवडीमुळे मराठवाड्यातील साहित्यिक व सामाजिक वर्तुळात आनंद व्यक्त केला जात असून, कांबळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तुळजाई नगरी सांस्कृतिक महोत्सवाने भक्ती रसात न्हावुन निघणार
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव 2025 अंतर्गत “नऊ दिवस, नऊ रूप, नऊ अनुभव” या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक, भक्तीमय व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 22 सप्टेंबर रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा, मंगळवार 23 सप्टेंबर पं. जयतीर्थ मेवुंडी विशेष दर्शन व शास्त्रीय संगीत संध्या, बुधवार 24 सप्टेंबर अभिजीत जाधव लोकसंगीत मैफील, गुरुवार 25 सप्टेंबर फोक लोक स्टुडिओ लोकसंगीत मैफील, शुक्रवार 26 सप्टेंबर शाहीर रामानंद उगले लोकगीते मैफील, शनिवार 27 सप्टेंबर रसिकपर्ण डान्स अकॅडमी लोकनृत्य सादरीकरण, रविवार 28 सप्टेंबर राणा जोगदंड लोकसंगीत मैफील, सोमवार 29 सप्टेंबर ड्रोन् शो 300 ड्रोनद्वारे नवरात्र थीमवरील भव्य लाईट शो, मंगळवार 30 सप्टेंबर फोक आख्यान भव्य लोकसंगीत मैफील. या नवरात्र महोत्सवात भाविकांना भक्ती, संगीत, कला आणि संस्कृती यांचा अद्वितीय अनुभव लाभणार असून तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागामध्ये 'अभियंता दिन'तांत्रिकतेचे प्रदर्शन करून उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन विभागामध्ये 'अभियंता दिन'तांत्रिकतेचे प्रदर्शन करून उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षी 15 सप्टेंबर हा दिवस श्री.एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिवशी साजरा करण्यात येतो. यावेळी ई टी सी विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट प्रदर्शन आणि पोस्टर प्रेजेंटेशन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून विविध प्रोजेक्ट्स आणि पोस्टर्स बनवले आणि सर्वांची वाहवा मिळवली. या स्पर्धांचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होते. प्रदर्शनात मांडलेल्या प्रोजेक्ट्सचे आणि पोस्टर्सचे डॉ.माने यांनी खूप कौतुक केले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की अश्या स्पर्धा यापुढेही होत राहतील यातील काही निवडक विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट स्मार्ट इंडिया हेकाथॉन,अविष्कार, जागतिक कौशल्य स्पर्धा, डिफेक्ट, महाराष्ट्रीयन चॅलेंज यामध्ये प्रदर्शित करण्यासाठी सर्वतोपरी कॉलेज मदत करेल त्यामुळे सर्वांनी यात भाग घेऊन आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा. ई टी सी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे यांनी भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.भविष्यात असेच आणि याहूनही सरस असे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी करावेत असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रोजेक्ट्स आणि पोस्टर्स मधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.यावेळी माननीय प्राचार्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा दिन साजरा करण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.श्रीकांत अघोर आणि प्रा.वर्षा बोन्दर यांनी काम पाहिले.विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी परिश्रम घेतले.यावेळी माननीय प्राचार्यांच्या हस्ते प्रा.श्रीकांत अघोर आणि प्रा.वर्षा बोन्दर यांचा सत्कार करण्यात आला.
इतिहास हा जीवनाचा नंदादीप आहे - रामदास कोळगे
धाराशिव (प्रतिनिधी)- भविष्यात जीवन प्रकाशमान करण्यासाठी इतिहास महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. पाठीमागील काळात आपल्यातील देश भक्तांनी प्राण्याची आहुती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. घराची काळजी न करता आपल्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या परिश्रमाचे फळ आपल्याला मिळाले तो इतिहास आपण आठवला पाहिजे. कारण त्याच इतिहासातून आपल्या जीवनात नंदादीप लावत असतो असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले. रुईभर ता.धाराशिव येथील जयप्रकाश विद्यालयाच्या प्रागंणात आज सोमवारी दि 15 रोजी स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ कोळगे सोसायटी रुईभर संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कोळगे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर बालविकास संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाराशिव जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे आहे हैदराबाद संस्थानातील अन्याय , अत्याचाराच्या जुलमी राजवटीला बऱ्याच ठिकाणी विरोध होत होता. त्यात प्राणाची आहुती देत जे हुतात्मा झाले त्यांना आठवणीत ठेवून आपण आपले भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्य सेनानी कै विश्वनाथ आबा कोळगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये धाराशिव जिल्हयाचे योगदान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या सर्व विजयी स्पर्धकांना 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याबद्दल स्पर्धकांनी त्यांच्या कार्याचा आढावा देत त्यांचे धाडस, अन्याय विरुद्ध लढण्याचा भाव सांगितला प्रत्येकानी जुलमी राजवटीला थारा न देता त्याचा विरोध करून जुलमी राजवटी विरोधी लढणारे लढवले खरोखरच समाजाला आदर्श बनले असे मत स्पर्धकांनी प्रकट केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी गुरव वसुंधरा संजय (समता कन्या प्रशाला धाराशिव), हिने पटकाविला द्वितीय क्रमांक कुमारी गिल्डा संजीवनी कांतीलाल, (धाराशिव )तर तृतीय क्रमांक जाधव अनुजा भगवान (श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल धाराशिव) हिने पटकावला तर चतुर्थ क्रमांक कुमारी ढोले श्रावणी बाबासाहेब (जयप्रकाश विद्यालय रुईभर) हिने मिळवला तसेच जयप्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ बक्षिस म्हणून प्रत्येकी 500/- रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये .प्रथम यादव विद्या विक्रम, द्वितीय गायकवाड वैभवी पांडुरंग, तृतीय सुतार श्रद्धा ज्ञानेश्वर, तर उत्तेजनार्थ ढवळे वैष्णवी पद्माकर यांना 17 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे परिक्षक म्हणून विकास क्षिरसागर सचिन कांबळे, अभिजित घोळवे यांनी काम पाहिले याप्रसंगी माजी ग्रा.पं. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , कौशल्य विकास सहाय्यक , धाराशिव येथील संजय गुरव ,प्रशासकीय अधिकारी सौ.शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनय सारंग यांनी केले.
अयोध्या नगर येथे श्रीराम मंदिर सभागृहाचे भूमिपूजन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तुळजापूर शहराचे युवा नेते विनोद गंगणे व सचिन रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. 2 मधील अयोध्या नगर येथे जनतेच्या मागणीनुसार श्रीराम मंदिरासाठी वैशिष्ट्यपूर्ण सभागृहाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक औदुंबर कदम, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, तसेच दिनेश क्षिरसागर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विकासकामांना सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नंदकुमार हाजगुडे, बापूसाहेब अमृतराव, राहुल कणे, शंकर जाधव, तुकाराम मुळे, बळीराम माने, नारायण मरळ सर, सुधीर रोचकरी, विजय नवले सर, ज्ञानेश्वर डांगे, सागर सूर्यवंशी, रघु गौड, विकास जाधव, गणेश चादरे, बंडू मुळे, प्रसाद डांगे, विकास भिरगें, दळवी काका, विकास डांगे, बालाजी पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान, प्रभागातील हे आठवड्यातील दुसरे सभागृह भूमिपूजन असून, या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या चार शाखांचे एकाच दिवशी उदघाटने
तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तालुक्यातील गावागावात शाखा विस्तार सुरू करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील दीपकनगर तांडा, कुणसावळी,बोळेगाव व यमगरवाडी येथे एकाच दिवशी चार गावांमध्ये भव्य दिव्य पद्धतीने शाखा उद्घाटन सोहळे पार पडले. हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या वेळी धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश जगताप,तसेच तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात संबंधित गावांतील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.गावातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावात संघटना विस्तार करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.या माध्यमातून पक्षाची संघटना आणखी सक्षम व परिणामकारक होईल,असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात तुळजापूर शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख गणेश नेपते,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,भुजंग मुकेरकर,संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संजय लोंढे,नितीन मस्के,रितेश जवळेकर,गणेश पाटील,विकास जाधव यांसह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरूम (प्रतिनिधी)- मुरूम ते अक्कलकोट जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548ब ची दयनीय अवस्था झाली आहे, 2023 मध्ये या रस्त्याचे काम एका बड्या गुत्तेदारानी केले होते, आज रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, या मार्गावरील आलूर ते बोळेगाव या रस्त्यावरील 1 किलो मिटर रस्ता काम शेतकऱ्यांनी मावेजा साठी अडवला होता, मात्र त्यासंदर्भात निकाल लागून 6 महिने झाले अद्याप रस्ता काम झाला नाही, दि. 15 वार सोमवार रोजी बसव प्रतिष्ठान अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. रामलिंग पुराणे यांनी रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करून संबंधित गुत्तेदार व प्रशासनाला एक महिन्यात रस्त्या बाबतच्या समस्या सोडवावे अन्यथा बसव प्रतिष्ठान च्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मुरूम ते अक्कलकोट रस्त्यावर खड्डे व पाणी साचल्याने रहदारीस अडथळा. आलूर ते बोळेगाव रस्ता 2023 मध्ये शेतकऱ्यांनी मावेजा न मिळाल्याने आडवल्यामुळे अर्धवट सोडण्यात आले होते. दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. उमरगा अक्कलकोट रस्ता भाविक व प्रवाशांना सोयीचा होता पण शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे परिसरातील नागरिकांनी याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार ग्रामपंचायत व बोळेगाव येथिल नागरीकांनी पाठपुरावा करून देखील याची दखल घेतली नाही. कोर्टातसुद्धा याचा निकाल लागला असुन अजुनपर्यंत याकडे दुर्लक्ष केले जात आहे.यावर्षी आलुर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या रस्त्याची पार वाट लागली आहे,या रस्त्यावरील पुल फुटुन गेल्यामुळे रस्त्यावरुन पाणी वहात आहे,रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गाड्यांचे अपघात होत आहेत,तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.लवकरात लवकर या रस्त्याची शासनदरबारी दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे. गुत्तेदार आणि प्रशासनानी जनाची नाहीतर नाही मनाची तरी लाज बाळगून रकडलेला रस्ता काम व ठीक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा त्याच ठिकाणी शड्डू ठोकून आंदोलने छेडण्यात येईल. डॉ. रामलिंग पुराणे, अध्यक्ष, बसव प्रतिष्ठान
Mohammed Siraj –ओव्हलचं मैदान गाजवलं आणि मियां भाईने पटकावला ICC चा विशेष पुरस्कार
Asia Cup 2025 ला टीम इंडियाने शाही थाटात सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात दुबळ्या UAE चा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात पाकड्यांची नांगी ठेचलीत. आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची ICC ने ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरूष खेळाडू म्हणून निवड केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल […]
उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, आरोपींनी CCTV फुटेजचे DVR ही पळवले
उत्तर प्रदेशात भाजप नेते आणि माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली. बुलंदशहरातील खुर्जा कोतवाली परिसरातील राहत्या घरात चौधरी यांची हत्या करण्यात आली. चौधरी यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र चौधरी यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी […]
भाजप जेव्हा सत्तेपासून दूर होईल, तेव्हाच महागाई नियंत्रणात येणार –अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष्य अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत भाजप सत्तेतून हटत नाही, तोपर्यंत देशात महागाईवर नियंत्रण येणार नाही. रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत आणि कायदा व सुव्यवस्थाही लागू होणार नाही.” माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. बिहारमधील एसआयआरवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, निवडणूक आयोगाला […]
पाटकुल येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
पाटकुल (प्रतिनिधी) – सुहास परदेशी मोहोळ कडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकी नवीन चेहरा आहे .भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून मिळवा निधी उपलब्ध होईल त्यामुळे कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही . सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, मोहोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत [...]
झारखंडच्या बोकारोमधील नक्षलवादाचा समूळ नायनाट! अमित शहा यांचा मोठा दावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी झारखंडच्या बोकारोमधून नक्षलवाद पूर्णपणे संपल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर केली. या कारवाईत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले, ज्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अमित शहा यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, […]
वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा
लातूर (प्रतिनिधी)- महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांमधील रिक्त असलेली अतांत्रिक अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरावीत, अशी मागणी एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनने तिन्ही कंपन्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. प्रदीर्घ काळापासून महावितरण कंपनीत वेतनगट 1 व 2 मधील विधी, सुरक्षा व अंमलबजावणी, माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, जनसंपर्क या संवर्गातील सरळसेवा/अंतर्गत प्रक्रियेद्वारे भरण्यात येणारी पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याबाबत महावितरणचे संचालक (मासं) राजेंद्र पवार यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी (दि.11 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अतांत्रिक संवर्गाची पदे जवळपास मागील 10 वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत, ही बाब असोसिएशनचे सरचिटणीस संजय खाडे यांनी संचालक (मासं) राजेंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रकरणी लवकरच योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. यासह सांघिक कार्यालय स्तरावरील अतांत्रिक संवर्गातील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेले पदोन्नती पॅनल लवकरात लवकर घेण्याची तसेच प्रतीक्षा यादीत असलेल्या अधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबरपूर्वी पदोन्नती आदेश निर्गमित करण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय पुणे येथील वाढती वीजग्राहक संख्या लक्षात घेता माहिती तंत्रज्ञान विभागाकरिता नव्याने रास्ता पेठ, पुणे येथे सॉफ्टवेअर सेलची निर्मिती करण्याची विनंती करण्यात आली. यासह अनेक प्रलंबित प्रश्नांचे निवेदन संघटनेच्या वतीने संचालक (मासं) यांना देण्यात आले. याच धर्तीवर महापारेषण व महानिर्मिती कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाट, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड व केंद्रीय सल्लागार गुलाबराव मानेकर उपस्थित होते.
गौतम अदानींना १०५० एकर जमीन प्रतिवर्ष १ रुपये दराने देण्यात आली, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
“बिहार सरकारने भगलपूर जिल्ह्यातील पिरपैंती येथे १०५० एकर जमीन आणि १० लाख झाडे गौतम अदानी यांच्या कंपनीला वीज प्रकल्पासाठी ३३ वर्षांसाठी वर्षाला केवळ १ रुपयाच्या भाड्याने दिली आहेत”, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार दौऱ्यावर आहेत. याआधीच काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी […]
बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेवरील लोकलसेवा ठप्प
बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत निघाले. सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. मालागडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने एकाच जागी थांबली. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि कल्याणहून […]
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातील मंमादेवी मंदिर चौक ते अंबड चौफुली दरम्यान काढण्यात आला. मंमादेवी मंदिर चौक येथून मोर्चा सुरू झाला आणि पुढे मस्तगड, […]
पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ
धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या हत्याप्रकरणी आरोपी पतीस सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील रांजणी येथील आरोपीचे शेत गट क्रमांक 140 मध्ये त्यांच्या राहत्या पत्राच्या शेडमध्ये 1 मार्च 2022 रोजी ही हत्याची घटना घडली आहे. यातील आरोपी नामे विठ्ठल आप्पा संगापुरे (वय 57 वर्षे, रा. रांजणी, तालुका कळंब) हा व त्यांची पत्नी त्यांच्या रांजणी शिवारातील पत्राच्या शेडमध्ये राहण्यास होते. मागील 15 दिवसापासून तो त्यांची पत्नी नामे मंगल विठ्ठल संगापुरे हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिला शेडच्या बाहेर जावू देत नव्हता. तसेच तिला कोणाशी बोलू देत नव्हता. तसेच तो तिला तुला जिवे ठार मारतो अशी धमक्या देत असल्याने आरोपीचा मोठा मुलगा नामे बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हा तेथे झोपण्याकरिता जात होता. परंतु दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या रात्री तेथे झोपण्यासाठी गेला नसल्याने यातील आरोपी विठ्ठल आप्पा संगापुरे याने पत्नी मंगल विठ्ठल संगापुरे हिच्यावर असलेल्या चारित्र्यावरील संशयावरून रागाच्या भरामध्ये कोयत्याने पत्नी मंगल झोपेत असताना तिच्या हातावर, गळ्यावर मारून तीस गंभीर जखमी केले व तिला जीवे ठार मारले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 58/22 शिराढोण पोलिस स्टशेनमध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी एपीआय नेटके व उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सदरील प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे व बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हे फितुर झाले होते. सदरील प्रकरणामध्ये शकेला दगडू शेख व हाजू इस्माईल शेख यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजण पुरावे व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पाणीपत रणांगणावर पितृपक्षात मराठा वीरांना तुळजापूरकरांची विधीपूर्वक आदरांजली
तुळजापूर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील पानीपत येथे कृषीउत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय सर गंगणे मिञ मंडळाने जावुन रविवार दि14रोजी शहीद मराठा वीरांना तुळजापूरच्या परंपरेनुसार पिंडदान व महाळ विधी विजय गंगणे यांनी करून आदरांजली अर्पण करण्यात आली. पितृपक्ष म्हणजे आप्तस्वकीयांचे स्मरण, पण यंदा पाणीपतच्या रणांगणावर शौर्य आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. इतिहासात प्रथमच, पाणीपत येथे शहीद मराठा वीरांना तुळजापूरच्या परंपरेनुसार पिंडदान व महाळ विधी करून आदरांजली अर्पण करण्यात आली. रविवार सकाळी 10:30 वा. विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने, मंत्रोच्चारात आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मराठा तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रोड मराठा व फक्त मराठा मंडळ अध्यक्ष रामचरण सिंग व स्मारक ट्रस्ट मंडळ संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी पाटील रामनारायण राममेहर मराठा नीरज मराठा सतीश मराठा सुनिल मराठा राजेश मराठा जोंगिदर मराठा सतिश कदम करनाल सुनील मास्टर कुरुक्षेञ उपस्थितीत होते. यावेळी सिंग पाटील म्हणाले कि, “इतिहासात कधीच न घडलेला विधी तुळजापूरकरांनी पाणीपत रणांगणावर केला. हे बलिदानाचे स्मरण होईल. यावेळी शौर्य प्रतिमा भेट देण्यात आल्या. तर विजय गंगणे, जयकुमार पांढरे, शशी आप्पा जोत, संतोष इंगळे आदींनी या उपक्रमात मोलाचा वाटा उचलला.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 'कॅम्पस टू कॉर्पोरेट 'या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये येत्या ऑक्टोम्बर महिन्यापासून 'कॅम्पस टू कॉर्पोरेट 'या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या संदर्भात दिनांक 11 सप्टेंबर 2025 कॉलेज मध्ये सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कॅम्पस टू कॉर्पोरेट'या संस्थेचे प्रमुख तथा बी आर फिल्मचे संचालक श्री. धीरज धवन आणि प्रशिक्षक श्री. अमोल धुरी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सदरील प्रोग्रॅम हा विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त असून जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व भरघोस पॅकेजवर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्पोरेट अपेक्षांनुसार कौशल्य विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अधिक अधिक प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होणार आहेत. असे प्रतिपादन संस्थेचे हेड धीरज धवन यांनी केले. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कॉर्पोरेट संस्कृतीत चमकण्यासाठी आवश्यक असलेली टेक्निकल स्किल, सॉफ्ट स्किल्स आणि सामाजिक कौशल्ये वाढीची अत्यंत गरज आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने असे म्हणाले कि “सदरील नाविन्यपूर्ण उपक्रम हा पहिल्या वर्षा च्या विद्यार्थ्यांपासून ते शेवटच्या वर्षाच्या मुलांसाठी राबविण्यात येणार आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस कौशल्य वाढ झाल्याचे बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरणारा आहे. या कार्यक्रमामुळे विद्याथ्यांचे टेक्निकल स्किल, सॉफ्टस्किल,सामाजिक कौशल्ये विकसित होणार आहेत. या कॅम्पस टू कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या अखेरीस, विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य, टीमवर्क आणि नेतृत्व यांचा एक मजबूत पाया मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची पातळी उंचावून पहिल्या दिवसापासून ते कॉर्पोरेट जगामध्ये प्रभावीपणे काम करू शकतील. सदरील एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख आणि ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे सर्व समन्वयक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
भुम (प्रतिनिधी)- तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा (मुले) मध्ये शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत अनिकेत भारती,सुहास बाबर,साहिल जरडकर,हर्षद बाबर,अथर्व वसकर,जगदीश काळे,शंकर मस्कर,तुषार सुरवसे,ऋतिक बनसोडे,संजय काळे, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. एस. एस. शिंदे सर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ. तानाजी बोराडे सर, यांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रा. सूर्यवंशी सर, प्रा. जगदाळे सर, प्रा. राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मराठवाड्यातील पावसाचे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकात जाणारे पाणी मराठवाड्यात रोखले
तुळजापूर (प्रतिनिधी)- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे आणण्यासाठी सुरू असलेल्या कामांमुळे सिंदफळ तलाव ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकात जाणारे पाणी आता थेट रामदरा तलावात वळविण्यात आले आहे. गुरुवारी सलग 24 तास पंपद्वारे सिंदफळ तलावातून पाणी उपसा करून रामदरा तलावात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे पाणी उन्हाळ्यात सिंदफळ व परिसरातील तलावात सोडण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. रामदरा तलावात आधीच 78 एमएमक्युबिक पाणी असून, अजून 1516 एमएमक्युबिक साठवता येणार आहे. उन्हाळ्यात गेट उघडून हे पाणी पुन्हा सिंदफळ व खालील तलावांत सोडले जाईल. यामुळे पूर्वी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जाणारे पाणी आता मराठवाड्यातच थांबून शेतकऱ्यांच्या पिकांना उपयोगी पडणार आहे. सिंदफळ तलाव ओव्हरलोनंतर खाली वाहुन जाणारे रेपाणी उपसा करुन रामदरा तलावात घेतले जात असुन है पाणी उन्हाळ्यात गेट उघडुन परत सिंदफळ तलाव व त्या खालील तलावात शेतीसाठी सोडले जाणार आहे यामुळे कडक उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी मिळुन याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याने याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे कृष्णेचे पाणी येवू तेव्हा येवु पण मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्रात जाणारे पाणी माञ मराठवाड्यात थांबुन याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार आहे हा लाभ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आणण्यासाठी केलेल्या कामांन मुळे सिंदफळ तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेथुन तलावातुन बार्शी मार्ग सिना नदीतुन कर्नाटकात जाणारे पाणी सिंदफळ तलावातुन पंपध्दारे थेट रामदरा तलावात आणण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरु करण्यात आली सलग चोवीस तास पाणी उपसा करण्यात आला हे रामदरा तलावातील शिल्लक पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंदफळ सह त्या परिसरात असणाऱ्या तलावात सोडले जाणार आहे यामुळे मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्र मार्ग कर्नाटाकात जाणारे पाणी मराठवाड्यातील सिंदफळ तलावातुन रामदरा तलावात येवुन तेथुन ते उन्हाळ्यात सिंदफळ शिवारात कडक उन्हाळ्यात शेतीला मिळणार आहे रामदरा तलावात 25ते26 एमएमक्युबिक पाणीसाठा होता सध्या 7ते8 एमएमक्युबिक पाणीसाठा असुन अजुन 15ते16 एमएमक्युबिक करता येतो सिंदफळ तलावाचा कँचमेंट ऐररियातुन तलावात येणारे पाणी उपसा करुन रामदरा तलावात घेतले जात असुन है पाणी उन्हाळ्यात गेट उघडुन परत सिंदफळ तलाव व त्या खालील तलावात शेतीसाठी सोडले जाणार आहे यामुळे कडक उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी मिळुन याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याने याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे कृष्णेचे पाणी येवू तेव्हा येवु पण मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्रात जाणारे पाणी माञ मराठवाड्यात थांबुन याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार आहे हा लाभ शेतकऱ्यांन साठी महत्त्वाचा आहे
तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव पूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवार दि. 15 सप्टेंबर रात्री भाद्रपद वद्य अष्टमीस प्रारंभ झाला. देविची ही मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देविची मुख्य मुर्ती विश्रांतीकरिता निद्रीस्त करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यानुसार रविवारी रात्री साडेआठ वाजता हा सोहळा पार पडला. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेसाठीची पूर्व तयारी मंदिरात रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. प्रथम शेकडो सुवासिनींनी देविच्या गादीचा कापूस वेचुन स्वछ करण्यासाठी गर्दी केली होती. यात आराधी सुवासनी महिला देविभक्त मंडळी मोठ्या संखेने उपस्थितीत होते. प्रथम गादीच्या कापसाची हळदी-कुंकूवाने पूजा केली व नंतर आराधनींनी एकमेकांना कुंकू लावून देविची गाणी म्हणत कापूस वेचुन स्वछ केला. हे काम पुर्ण होताच मंदीर संस्थानने या सुवासिनींची खणाने ओटी भरली. त्यानंतर मुस्लिम धर्मिय असलेल्या पिंजारी समाजातील शेख यांनी देविच्या गादीचा कापूस पिंजून दिल्यानंतर नकाते कुटुंबियांनी गाद्यामध्ये कापूस भरुन गादी मंचकी निद्रेसाठी तयार केली. त्यानंतर पलंगे कुटुंबियांनी चांदीच्या पलंगावर सुताच्या दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या तयार केल्या. त्याखाली पलंगाला घट्ट बांधून बंदीस्त केल्या, त्यानंतर त्यावर तीन गाद्या अंथरण्यात आल्या व मंचकी निद्रेसाठी शयनगृह सज्ज करण्यात आला. सायंकाळी देविजीस भाविकांचे पंचामृत अभिषेक पूजा झाल्यानंतर मुर्ती स्वच्छ करुन ती अलगद उचलत शेजघराण्यातील चांदीच्या पलंगावर निद्रीस्त करण्यात आली. त्यानंतर देविला चंदनाचा मळवट भरण्यात आला. यावेळी देविजीस सोन्याचे नेत्र व नाकात नथ एवढेच सुवर्णालंकार घातले जातात. त्यानंतर मुर्तीवर साड्या टाकून त्यावर मखमली रझई टाकण्यात आली. यावेळी पाळीचे भोपे पुजारी, महंत, मंदीर समितीचे ट्रस्टी व धार्मिक तसेच प्रशासकीय व्यवस्थापकासह देविचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर नैवेद्य दाखवून आरती व प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. ही देविजींची मुळ मुर्ती अश्विन शुद्ध प्रतिपदेस म्हणजे सोमवार (दि.22) रोजी पहाटे सिंहासनाधिष्ठ केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात ईशान्य दिशेला घटस्थापना करण्यात येवून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.
तुळजापूरात मंगळवारी बंजारा समाजाचा शक्ती प्रदर्शन मेळावा
तुळजापूर (प्रतिनिधी)- बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्याधाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी तुळजापूर येथे भव्य शक्ती प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून, या प्रसंगी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत. “ऊठ बंजारा जागा हो, आरक्षण लढ्याचा धागा हो“ अशा घोषणांनी हा मेळावा उत्साहात रंगणार असून, बंजारा समाजाच्या एकतेचे व अस्तित्वाचे दर्शन घडविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात्मक मेळाव्यात समाजातील प्रतिष्ठित नायक, कारभारी, हासाबी-नसाबी यांच्यासह युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. निमंत्रक म्हणून सकल गोर बंजारा समाज, धाराशिव यांनी आवाहन केले असून, आरक्षणाच्या लढ्यात एकजूट दाखविण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान, तेर येथे पावसाचे घरांमध्ये शिरले पाणी
तेर (प्रतिनिधी-) धाराशिव तालुक्यातील तेर व परीसरात 13 सप्टेंबरला सायंकाळी 200 मिलीमिटर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले तर पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. धाराशिव तालुक्यातील तेर व परीसरात 13 सप्टेंबरला सायंकाळी सहा पासून रात्रभर 200 मिलीमीटर पाऊस पडल्याने तेरणा नदीचे पात्र भरभरून वाहत असून खरीप हंगामातील पिके मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले असून प्रपंच कसा भागवावा या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत.मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याने नागरीकांचे अतोनात हाल झाले.
विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होईल - पोलीस अधीक्षक आमना
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तायकांदो स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्येही तायक्वांदो स्पर्धेतील खेळाडूंना चांगला लाभ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत तायक्वांदो खेळाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी केले. धाराशिव येथे जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर घेण्यात आल्या. पोलीस अधीक्षक आमना यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमना यांनी, आजच्या युगातील विद्यार्थी हे टीव्ही, सोशल मीडिया, मोबाईल यांचा जास्त वापर करीत असल्याने त्यांना मैदानावर आणण्यासाठी पालकांना अधिक परिश्रम करावे लागत आहेत. याप्रसंगी धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, सहसचिव सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, अक्षय बिराजदार उपस्थित होते. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच म्हणून राम दराडे, शरीफ शेख, स्मिता गायकवाड, प्रज्ञा पाटील, माधव महाजन, चेतन तेरकर, सुमेध चिलवंत यांनी काम केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश महाजन, अनिल बळवंत, सूर्यकांत वाघमारे, विक्रम सांडसे यांनी प्रयत्न केले. या खेळाडूंनी मिळविले यश जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत (14,17,19 वर्ष वयोगट) यश मिळविलेल्या खेळाडूंमध्ये रोहित गोरे, समर्थ कदम, अर्णव ढेकणे, कुलजित इंगळे, प्रणित बनसोडे, जटनुरे कार्तिक, अंश गायकवाड, अनुराग पाटील, यशराज आवटे, संघर्ष कांबळे, अथर्व गरड, राजेश ढेकणे, पृथ्वीराज डाके, विनीत कुमार रंगदळ, स्वराज नलावडे, ऋत्विक ठाकर, हर्षवर्धन शिंदे, किरण हिंगमिरे, वैभवी सगट, रेणुका सरवदे, सृष्टी जगदाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, प्रांजल भुतेकर, क्षितिजा निंबाळकर, संस्कृती कपाळे, संस्कृती नलावडे, श्रेयशी सरपाळे, स्वरा कांबळे, स्वरा फडकुले, मृणाल हजारे, तेजस्विनी बांगर, मधुरा महाजन, स्वराली पडवळ, सफल केसकर, वैष्णवी साळुंखे, प्रतीक्षा चौधरी, सोनाली गटकुळ, वैष्णवी जगताप, श्रद्धा कदम यांचा समावेश आहे. सर्व विजेते खेळाडू लातूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
Shivaji University News: शिवाजी विद्यापीठाच्या पोर्चमध्ये ‘झुणका भाकर’आंदोलन
तीन महिन्यांपासून मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण – विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी बेट खेळ कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे, आळ्या आढळणे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी बेट खेळ करणारा हा प्रकार असूनही [...]
नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी संकटात असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा समाना त्यांना करावा लागत आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर […]
Kolhapur News: पुलाची शिरोलीतील पंचगंगेवरील मध्यभागचा पूल राहणार बंद
एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे धोकादायक कोल्हापूर : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ब्रिटिश कालीन पूल काढून टाकला आहे. तिथे नवीन पुलाचे कामास सुरुवात होणार आहे. शिवाय पूर्वेकडील पूल २००४ साली महामार्गाच्या चौपदरीकरणात पूर्ण झाला आहे. त्यामुळे मध्यभागी असलेला पूल [...]
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या अंत्ययात्रेचा खर्च उचलण्यास भाजपने नकार दिला आहे. रुपाणी यांच्या अंत्यसंस्कारात 20-25 लाख रुपये खर्च झाले होते. हा खर्च त्यांच्या कुटुंबीयांकडून घ्या असे पक्षाने सांगितले आहे. दिव्य भास्करने याबाबात वृत्त दिले आहे. रुपाणी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान फुलं, मंडप आणि इतर व्यवस्था करणारे व्यापारी जुलै महिन्यात रूपाणी यांच्या घरी गेले आणि कुटुंबाकडे […]
दातांचा पिवळेपणा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग, या टिप्स फॉलो करा
पांढरे आणि चमकणारे दात आपला आत्मविश्वास वाढवतात. परंतु खाण्याच्या सवयी, चहा-कॉफीचे जास्त सेवन, धूम्रपान आणि योग्य काळजीचा अभाव यामुळे दात पिवळे होतात. काही घरगुती उपायांद्वारे ते कमी करू शकता. दातांवरील पिवळेपणामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. शिवाय ते दिसायलाही अजिबात चांगलं दिसत नाही. म्हणूनच पिवळ्या दातांवर आपण काही महत्त्वाचे उपाय करुन त्यावरील पिवळेपणा दूर करु शकतो. […]
बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले की, निवडणूक आयोग (ECI) ही एक घटनात्मक संस्था असल्यामुळे त्यांनी कायद्याचे आणि नियमांचे पालन केले असेल, […]
Cooking Tips –कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या
अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारण ती कडू असते. विशेषतः लहान मुले फक्त त्याच्या नावानेच त्यापासून दूर पळतात. कारल्याची भाजी बनवली जाते आणि बरेच लोक त्याचे लोणचे देखील बनवतात. कारले हे विविध आयुर्वेदीक उपचारांसाठी वापरले जाते. कडू कारल्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम, जस्त, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. म्हणून कारल्याचा […]
नवीन कायदा म्हणजे ट्रोजनचा घोडा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची टीका
सरकार जो नवीन कायदा आणत आहेत तो म्हणजे ट्रोजन घोडा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच आपल्या संविधानिक संस्थांना संघ-भाजपच्या जाळ्यातून वाचवण्याचा निर्धार पुन्हा दृढ करूया असेही खरगे म्हणाले. एक्सवर पोस्ट करून खरगे म्हणाले की, गेल्या 11 वर्षांपासून संघ-भाजपकडून भारताची जपलेली आणि कष्टाने उभारलेली लोकशाही आतून पोकळ करण्याचा एक कटकारस्थानपूर्ण […]
पस्तीशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? जाणून घ्या यामागची महत्त्वाची कारणे
वयाच्या पस्तीशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. ही प्रक्रिया नैसर्गिक असून, वय वाढल्याने, हार्मोनल बदल आणि जीवनशैलीतील घटक हाडांच्या ताकदीवर परिणाम करतात. वेळीच खबरदारी घेतली नाही तर गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. अनेक महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात. ‘ही’ डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर हाडे का कमकुवत होतात? सर्वात मोठे […]
शनिवारी ऐरोली येथे झालेल्या अपघातानंतर कथितरीत्या पळवून नेण्यात आलेल्या 22 वर्षीय ट्रक मदतनीसाची पोलिसांनी सुटका केली. अपहरण झालेला हा हेल्पर माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या घरी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी पीडित प्रल्हाद कुमार, मिक्सर ट्रकच्या चालकासोबत होता. या ट्रकची मुलुंड-ऐरोली रस्त्यावरच्या ऐरोली सिग्नलजवळ एका कारला हलकीच धडक लागली. पोलिसांच्या मते, त्या कारमधील दोन व्यक्तींनी ट्रकचालक […]
बायडेन सरकारमुळेच अमेरिकेत गुन्हेगारी वाढली; नागमल्लैया यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. चंद्रमौली नागमल्लैया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे आहे. दरम्यान USA पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझने त्याचा गुन्हा देखील कबूल केला आहे. या घटनेवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. I am aware of the terrible […]
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अलीकडेच आई झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर आता ती तिच्या दुसऱ्या निर्णयामुळे चर्चेत आहे आणि तिचे सर्व स्तरातून खूप कौतुक केले जात आहे. आई झाल्यानंतर तिने एका सरकारी रुग्णालयात तिचे ब्रेस्टमिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. ती दररोज रुग्णालयात जाऊन तिचे ब्रेस्टमिल्क दान करत होती आणि अशा प्रकारे तिने ३० लिटर आईचे […]
‘ही’डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर
अलिकडे बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे, शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता सामान्य होत चालली आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी १२, हा एक घटक आहे जो आपले डीएनए बनवण्यास आणि आपल्या पेशींसाठी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि अशक्तपणा येतो. ही कमतरता विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये अधिक दिसून येते. व्हिटॅमिन बी १२ […]
देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 44 प्रकरणे निकाली; 14 लाख 15 हजार 840 रुपयांची वसुली
मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ११०८ पैकी एकूण ४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. […]
‘देवा’जरा इकडे बघ! मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी इथे लक्ष घालावे, शेतकऱ्यांच्या खात्यात एक दमडाही आला नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. एक्सवर दोन व्हिडीओ पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, ‘देवा’ जरा इकडे बघ! ‘देवा’ने हे दिले.. ‘देवा’ […]
आगरी मीठ, लामणदिवा, ‘जीआय’ साठी सज्ज!
पणजी : राज्यातील विविध वैशिष्ट्यापूर्ण आणि अद्वितीय अशा वस्तुंना आतापर्यंत जीआय मानांकन प्राप्त झाले असून त्या मालिकेत आता आणखीही काही वस्तुंना स्थान मिळणार आहे. त्यात पारंपारिक मिठागरांमधून काढण्यात येणारे अर्थात ‘आगराचें मिठ’, देवघरातील अखंड तेवणारा तसेच विवाह, उत्सवांमध्ये वापरला जाणारा तांबे आणि पितळीपासून हस्तनिर्मित लोंबता दिवा अर्थात ‘लामणदिवा’, आणि विवाह सोहळ्यावेळी नववधू स्वहस्ते विणलेल्या विविध [...]
लोहखनिज शुल्क वाढीची ‘जीएमओईए’ला चिंता
गोवाखनिजधातूनिर्यातदारसंघटनेचेकेंद्रालापत्राद्वारेसाकडे पणजी : गोव्याच्या खाण क्षेत्रातील प्रमुख भागधारकांचे 60 वर्षांहून अधिक काळ प्रतिनिधीत्व करणाऱ्या गोवा खनिज धातू निर्यातदार संघटनेने (जीएमओईए) कमी दर्जाच्या लोहखनिजावर (58 टक्के एफई पेक्षा कमी) निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त करीत संघटनेने केंद्र सरकारला याबाबत पत्र पाठवून शुल्क वाढ करू नये, याबाबत साकडे घातले आहे. केंद्र सरकारने कमी दर्जाच्या लोहखनिजावर शुल्क [...]
पंतप्रधान मोदींची पाठ फिरताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलीस ठाण्यात जमावाचा घुसण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे हिंसाचार उसळला. मोदींच्या स्वागताच्या सजावटींची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन जणांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली होती. त्या निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागले. रविवारी दुपारी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी कुकि-झो या आदिवासी समाज बहुल असलेल्या चुराचांदपूर शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि त्या दोघांच्या […]
संकेश्वरातील राजा निलगारचे आज विसर्जन
संकेश्वर : संकेश्वर येथील हेद्दुरशट्टी घराण्यातील नवसाचा राजा निलगारचे सोमवार दि. 15 रोजी रात्री येथील हिरण्यकेशी नदीत 20 व्या दिवशी विसर्जन होणार आहे. गत 20 दिवसांपासून सुमारे 5 लाख भाविकांनी निलगार गणेशच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामुळे संकेश्वर शहराला 20 दिवस यात्रेचे स्वरुप आले आहे. 20 दिवसांच्या काळात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून व्यापारी वर्गात [...]
बेसावध गुंतवणूक म्हणजे शंभर टक्के फसवणूक!
डिजिटलअरेस्ट, ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सीद्वारेसायबरगुन्हेगारांचेकारनामेसुरूच: भरभक्कमपरताव्याच्याआमिषानेलुबाडणूक बेळगाव : ककमरी, ता. अथणी येथील एका तरुणाच्या व्हाट्सअॅपवर एक मेसेज येतो. ‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, दामदुप्पट नफा मिळवा’ असा तो मेसेज असतो. या मेसेजवर विश्वास ठेवून या तरुणाने तब्बल 9 लाख रुपये गुंतविले. परतावा एक रुपयाही मिळाला नाही. मंडोळी रोड, टिळकवाडी येथील एका निवृत्त कर्मचाऱ्याचीही अशाच पद्धतीने व्हाट्सअॅपवर मेसेज करून ‘ट्रेडिंगमध्ये [...]
तिऱ्हाईत टोळक्याकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
गांधीनगरजवळट्रक-कारअपघातानंतरचीदादागिरी: माळमारुतीपोलिसांतगुन्हादाखल बेळगाव : भरधाव ट्रकने कारला ठोकरल्यानंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळ शनिवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नसली तरी अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या एका टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. गांधीनगरजवळील हरिकाका कंपाऊंडनजीक शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली असून चौघा जणांच्या एका [...]
बेळगावमध्ये ईद ए मिलाद मिरवणूक उत्साहात
शहरासहउपनगरांमध्येमिरवणुकीचेस्वागत: मुस्लीमसंघटनांचेपदाधिकारी-लोकप्रतिनिधीसहभागी बेळगाव : बेळगाव शहर तसेच उपनगरांमध्ये मुस्लीम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची 1500 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने फोर्ट रोड ते कॅम्प या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. फोर्ट रोड येथे [...]
ठिकठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्समुळे शहरात वाहतूक कोंडी
बेळगाव : ईद ए मिलाद मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत रविवारी बदल करण्यात आला. मिरवणूक मार्गावर वाहनांचे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले. परंतु, यामुळे शहराच्या अंतर्गत भागात प्रचंड वाहतूक केंडी झाल्याचे दिसून आले. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. फोर्ट रोडपासून राणी चन्नम्मा चौक मार्गे कॅम्पपर्यंत [...]
रेल्वेमंत्री बेळगावकरांच्या समस्येकडे लक्ष देणार का?
तिसरेउड्डाणपूल, फूटओव्हरब्रिजचेकामअर्धवटस्थितीत बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट व खानापूर येथील रोड अंडरब्रिजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवार दि. 15 रोजी बेळगावमध्ये येत आहेत. रेल्वेमंत्री चौथे रेल्वेगेटचे भूमिपूजन करणार असले तरी त्यापूर्वी अर्धवट स्थितीत असलेल्या तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे तसेच त्यावरील खड्ड्यांची पाहणी करणार काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. टिळकवाडी येथील दुसरे [...]
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
कणकुंबीभागातीलसहामहिन्यातीलचौथीघटना वार्ताहर/कणकुंबी तालुक्यातील पश्चिम भागातील हुळंद येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे (वय 60) यांच्यावर रविवारी सायंकाळी अस्वलाने अचानक हल्ला केल्याने या हल्ल्यात गावडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगावातील बिम्स येथे दाखल करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील सहा महिन्यातील अस्वल हल्ल्याची ही चौथी घटना [...]
Income Tax Return भरण्याची मुदत पुन्हा वाढली? आयकर विभागाकडून अधिसूचना जारी
आयकर विभागाकडून कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे, असा मॅसेज सध्या फॉरव्हर्ड होतोय. जर हा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान. कारण आयकर विभागाकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. ग्राहकांनी या फसव्या अफवेला बळी पडू नये, यासाठी आयकर विभागाने निवेदन जारी केले आहे. आर्थिक वर्ष […]
फार्मासिस्ट हे एकप्रकारे डॉक्टरच
डॉ. प्रभाकरकोरेयांचेमत: जिल्हारिटेलफार्मसीअसोसिएशनच्यावतीनेस्नेहमिलन बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रात भारताने जगभरात आघाडी घेतली आहे. आपल्या देशात तयार होणारी अनेक औषधे निर्यात होत असून, देशाची वैद्यकीय ताकद वाढत असल्याचे यातून दिसून येते. फार्मसीमध्ये स्पर्धा वाढली असून, फार्मासिस्ट हे एकप्रकारे डॉक्टरच आहेत, असे प्रतिपादन डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्यावतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. [...]
समाजकल्याण खात्याच्यावतीने सायकल रॅली
बेळगाव : जागतिक लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमिवर समाजकल्याण खात्याच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आमदार असिफ सेठ व महापौर मंगेश पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला चालना दिली. या रॅलीची सांगता टिळकवाडीमार्गे प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. लोकशाही दिनाचे औचित्य साधून समाजकल्याण खात्याच्यावतीने राज्यभर रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली राज्यभर [...]
वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती
वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश दिला असून काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. वक्फ (सुधारणा) कायद्यातील प्रमुख तरतुदी स्थगित करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की त्यापैकी काही अधिकारांचा मनमानी वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, संपूर्ण कायद्याला स्थगिती […]
घटस्थापना, ललितापंचमी, दुर्गाष्टमी, महानवमीमुख्यदिवस बेळगाव : येत्या शनिवारी (दि. 20) रात्री 12.16 नंतर अमावास्या सुरू होत असून रविवारी (दि. 21) उत्तररात्री 1.23 पर्यंत अमावास्या आहे. भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावास्या असे म्हटले आहे. आपले पूर्वज, दिवंगत झालेल्या घरातील वडीलधारी मंडळींचे स्मरण करण्याच्या काळातील (पितृपंधरवडा) अखेरचा दिवस हा सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखला जातो. सोमवारी (दि. 22) [...]
गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा
प्रत्येकाला आपली त्वचा स्वच्छ, चमकदार आणि सुंदर दिसावी असे वाटते. परंतु शरीराचे काही भाग जसे की गुडघे, कोपर आणि मान अनेकदा काळी पडते आणि त्यांचा रंग इतर त्वचेसारखा नसतो. विशेषतः गुडघ्यांचा काळेपणा चांगला दिसत नाही तर त्यामुळे आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. यामुळे बरेच लोक लहान कपडे घालणे टाळतात किंवा नेहमीच गुडघे लपवून ठेवतात. झोपेच्या कमतरतेमुळे […]
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
३३ वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये राहत असलेल्या ७३ वर्षीय शीख महिला हरजीत कौर यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शीख समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हरजीतच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी निदर्शने केली आहेत. शुक्रवारी हरजीतचे कुटुंब, इंडिव्हिजिबल वेस्ट कॉन्ट्रा कोस्टा काउंटी आणि शीख सेंटर यांनी निदर्शने केली. या निदर्शनात अमेरिकन काँग्रेस सदस्य जॉन गॅरामेंडी, स्थानिक […]
UPI Rule Change – UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी नवा नियम, 15 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी
आपल्या दैनंदिन जीवनात रोज ऑनलाईन UPI ने पेमेंट करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्तवाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अनेक UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. याची अमंलबजावणी आजपासून म्हणजे 15 सप्टेंबर पासू्न केली जाणार आहे. NPCI ने व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. डिजिटल व्यवहार सोपे करण्याच्या दिशेने एक […]
सोने स्वस्त होणार? US Fed च्या बैठकीकडे जगाचे लक्ष, सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या वर्षात सोन्याच्या दरात तुफानी वाढ झाली आहे. आता सोने प्रती 10 ग्रॅमसाठी 1,10,000 रुपयांवर पोहचले आहे. वायदे बाजारासह सराफा बाजारातही सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, आता सोन्याच्या तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याचे दर US Fed च्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांवर अवलंबून राहणार असून या बैठकीनंतर […]
हिरेकोडीत विषबाधा विद्यार्थी संख्या 120 वर
12 विद्यार्थ्यांचीअधिकउपचारासाठीबेळगावलारवानगी: उपचारानंतरअनेकविद्यार्थ्यांनापाठविलेघरी चिकोडी : येथून जवळच असलेल्या हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत अन्नातून अथवा पाण्यातून बाधा होऊन अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्यांच्या रुग्णसंख्येत वाढच होत आहे. शुक्रवारी 85 असलेली रुग्णसंख्या शनिवारी दुपारपर्यंत 120 पर्यंत पोहचली होती. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. तर 20 विद्यार्थ्यांची तब्येत सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज दिल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. [...]
रामदेव गल्लीत नवीन गटार कामासाठी खोदकाम सुरू
बेळगाव : शहर व उपनगरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे रामदेव गल्लीत नवीन गटार बांधकामासाठी खोदकाम केले जात आहे. लवकरच त्या ठिकाणी काँक्रिटच्या गटारी बांधल्या जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. याचा नाहक त्रास शहरवासियांना सहन करावा [...]
कौलापूरवाडाचे नवीन महसूल गाव म्हणून नोंद होणार
तीर्थकुंडयेतहोतेसमाविष्ट: कौलापूरवाडावासियांचीमागणीपूर्ण: ग्रामस्थांतूनसमाधान खानापूर : तालुक्यातील बैलूर ग्राम पंचायत क्षेत्रातील कौलापूरवाडा हे गाव तीर्थकुंडये गावात गेल्या अनेक वर्षापासून समाविष्ट होते. ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून कौलापूरवाडा गाव वेगळे गाव म्हणून नोंद करून महसूल खात्याच्या सर्व कागदपत्रात बदल करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आले असून प्रांताधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली असून याबाबतचा [...]
कारवार जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण
जुन्याइमारतीतीलरुग्णांचे-वैद्यकीयसुविधांचेटप्प्याटप्प्यानेस्थलांतर: थर्डपार्टीअहवालसरकारलासादर कारवार : येथील कारवार वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (केआयएमएस) आवारात उभारण्यात आलेल्या 450 बेड्सच्या नवीन रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. जुन्या जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने जुन्या इमारतीतील रुग्णांचे आणि वैद्यकीय सुविधांचे स्थलांतर नवीन इमारतीत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. पौर्णिमा यांनी दिली आहे. सप्टेंबर 8 रोजी [...]
कालची मॅच फिक्स होती आणि जुगारातले 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले –संजय राऊत
कालच्या सामन्यावर दीड लाख कोटींचा सट्टा खेळला गेला असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच यापैकी 25 हजार कोटी रुपये पाकिस्तानला गेले असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कालच्या सामन्यावर दीड लाख कोटींचा सट्टा खेळला गेला. कालच्या सामन्यातून एक हजार कोटी रुपये पाकिस्तान […]
साहित्य संघ, पत्रकार संघाच्या मोक्याच्या जागांवर अमराठी बिल्डरांचा डोळा; संजय राऊत यांचा घणाघात
मंगलप्रभात लोढा यांचा आणि साहित्याचा संबंध काय? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी अमराठी बिल्डरांचा डोळा आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, लोढा साहित्य संघामध्ये जाऊन मतदान करतात. त्यांचा […]
पुन्हा उत्खनन करण्याबाबत गंभीर चर्चा?
धर्मस्थळ प्रकरण : एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांची तपास पथकासमवेत महत्त्वाची बैठक, विठ्ठल गौडांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची शक्यता बेंगळूर : धर्मस्थळ प्रकरणामुळे आणखी उत्सुकता निर्माण झाली असून एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांनी रविवारी सुटीचा दिवस असला तरी तपास पथकासोबत महत्त्वाची बैठक घेतली. सामान्यपणे रविवारी तपास आणि चौकशीसाठी एसआयटी पथक विश्र्रांती घेत असे. परंतु सौजन्य यांचे [...]
प्रमोदा देवी वडेयर यांना म्हैसूर दसऱ्याचे अधिकृत निमंत्रण
बेंगळूर : म्हैसूरचे जिल्हा पालकमंत्री एच. सी. महादेवप्पा यांनी यदुवंशाच्या प्रमोदा देवी वडेयर यांना जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. राजघराण्यातील प्रमोदा देवी वडेयर यांना मानधन देऊन 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जगप्रसिद्ध दसऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की, यदुवंशाकडून दसऱ्याला कधीही कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. यदुवंश नेहमीच प्रत्येक दसऱ्याला [...]
Nanded: डॉ. बंसल यांच्या घरातील चोरीचा छडा लागला; तीन आरोपींना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड शहरातील पद्मजा सिटी येथील रहिवासी डॉ. बंसल यांच्या घरात जुलै महिन्यात झालेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डॉ. बंसल हे 10 ते 14 जुलैदरम्यान आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली होती. 14 जुलै […]
अनगोळ रोडवरील ब्लॅकस्पॉट महापालिकेने हटविला
कचऱ्याचीउचलकरूनकेलीफुलांचीसजावट बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आला असला तरीही शहरातील कचऱ्याची समस्या मात्र दूर होताना दिसत नाही. त्यामुळे जिकडे तिकडे निर्माण झालेले ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. रविवारी अनगोळ मुख्य रस्त्यावरील हरि मंदिरजवळ असलेला ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला असून त्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर बेळगाव [...]
मंत्री हेब्बाळकर यांची कुमारस्वामी लेआऊटला भेट
परिसराच्यासमस्यांचीसोडवणूककरण्याचेआश्वासन बेळगाव : महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच कुमारस्वामी लेआऊट परिसराला भेट देऊन पाहणी केली. मुख्य रस्त्यांचा विकास, वीज, पाणी, उद्यानांचा विकास, स्वच्छता, पथदीप आदींची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक क्षेमाभिवृद्धी संघटनेच्यावतीने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा गौरव करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष व्ही. जी निरलगीमठ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. नगरसेवक संदीप जिरग्याळ, [...]
स्मार्टफोनची बॅटरी फुगल्यावर काय करावे? वाचा या टिप्स
सध्याच्या घडीला स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा गरजेचा भाग झालेला आहे. परंतु अनेकदा आपल्याला स्मार्टफोनची बॅटरी फुगलेली दिसते. ही अशी बॅटरी खूप धोकादायक ठरू शकते. बॅटरी फुगल्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची भीती असते. म्हणून तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर ती बदलणे आवश्यक आहे. फोनची बॅटरी का फुगते आणि असे झाल्यास काय करावे ते जाणून घेऊया. बॅटरी का […]
1. तुमचा क्रेडिट स्कोर खराब झाला असेल तर त्याचा परिणाम सिबिल स्कोरवर होतो. कोणतेही कर्ज हवे असेल तर हा सिबिल स्कोर चांगला हवा असतो. 2. सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी काही फंडे वापरता येतात. तुमचे व्रेडिट कार्ड बिल, लोन आणि इतर हप्ते वेळेवर भरा. त्यात उशीर केला तर व्रेडिट स्कोरवर परिणाम होतो. 3 नवीन कर्जासाठी […]
हे करून पहा –फ्रीजमध्ये बर्फाचा डोंगर होतोय
घरातील रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये बऱयाच वेळा बर्फाचा डोंगर साचतो. असे होऊ नये म्हणून काय करावे? फ्रीजचे तापमान योग्य सेट करा. फ्रीजच्या मागील बाजूस एक पाइप आहे जो पाण्याचा निचरा करण्याचे काम करतो. जर ते थांबले तर बर्फ अधिक गोठण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता करत राहा. फ्रीज वारंवार उघडल्याने आत उबदार हवा […]
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 10,611 क्युसेक पाणी सोडले जात होते, ते आता सकाळी 10 वाजल्यापासून वाढवून 14,547 क्युसेक करण्यात आले आहे. धरणाच्या पाणीपातळीनुसार आणि पर्जन्यमानानुसार हा विसर्ग आणखी वाढवला […]
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
अनेक जण कर्ज काढून म्हणजेच ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. मोबाईल खरेदी केल्यानंतर काही जण कर्जाचे हप्ते भरत नाहीत. याला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक ड्राफ्ट नियम जारी केला आहे. त्यानुसार एखादा ग्राहक ईएमआय थकवला तर बँक किंवा एनबीएफसी त्याचा मोबाईल लॉक करू शकतात. ही यंत्रणा डिजिटल लोन अॅप म्हणजेच पेटीएम, फोन पे आणि इतर फिनटेक […]
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
लखनौ विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो विमान रनवेवर धावत असताना अचानक थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या क्षणी इर्मजन्सी ब्रेक लावले. विमानाच्या इंजिनला टेक ऑफसाठी दबाव मिळत नसल्याने पायलटने विमान थांबवण्याचा निर्णय घेतला, असे समजतंय. इंडिगोच्या 6-ई-2111 विमानात 151 प्रवासी होते. यामध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या खासदार पत्नी डिंपल यादव यांचा समावेश होता. विमान अचानक थांबल्याने […]