SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, तब्बल 11 लाख दुबार मतदार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र या यादीत अनेक घोळ असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने समोर आणलं आहे. यासाठी शिवसेना, मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रार ही दाखल केली आहे. नवीन प्रारुप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिका […]

सामना 25 Nov 2025 8:52 pm

ICC Men’s T20 WC Schedule – 20 संघ, 55 सामने; टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, रोहित शर्मा ब्रँड ॲम्बेसेडर

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्खेच 2026 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. या चार संघाची चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँडमध्ये सकाळी 11 वाजता […]

सामना 25 Nov 2025 8:11 pm

रत्नागिरीला स्मार्ट,आरोग्यदायी आणि सक्षम बनवणार! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी जाहीर केला वचननामा

रत्नागिरीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज 25 नोव्हेंबर रोजी आपला वचननामा पत्रकार परिषदेत जाहीर केला.रत्नागिरीत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारून आरोग्य विषयक सुविधा निर्माण करणार,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सहाय्यता योजना राबवणार, नगरपरिषद मालकीच्या इमारतीत सौर ऊर्जेचा वापर करणार,नगरपरिषदेची स्मार्ट शाळा उभारणार,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना,माहितीच्या अधिकारासाठी ऑनलाइन प्रणाली,नागरिकांच्या तक्रारींचे 72 तासात निवारण करणार,युवकांसाठी रोजगार अशा विविध संकल्पना महाविकास आघाडीच्या […]

सामना 25 Nov 2025 8:07 pm

पंडित-क्षीरसागरांत वादाची ठिणगी, पवारांच्या भेटीने घड्याची टिकटिक मंदावली

बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराणे आणि पंडित घराण्याचा राजकीय वाद सर्वश्रूत आहे. त्यातच पंडितांनी बीडच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केल्याने राजकीय समिकरणे बदलली. आणि त्याचा वचपा काढण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांनी गेवराईत पंडितांच्या विरोधात आपले फासे फेकायचे सुरूवात केली. कालच त्यांनी भाजपाच्या बाळराजे पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या नव्या राजकीय समिकरणामुळे गेवराईत अजित पवार गटाला मोठा […]

सामना 25 Nov 2025 8:05 pm

गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी दिले संकेत

सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्या किंवा घर, वाहन खरेदी करणाऱ्या किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते (EMI) सुरू असलेल्या सामान्य नागरिकांचे ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक (RBI) या वर्षाच्या अखेरीस रेपो रेटमध्ये आणखी एक कपात करण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी रेपो रेटबाबत संकेत दिले आहेत. पुढील […]

सामना 25 Nov 2025 7:59 pm

अजित पवार म्हणाले रामकृष्ण हरी, लोक म्हणाले वाजवा तुतारी…लक्षात आल्यावर दादांकडून सारवासारव

आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अजित पवारांचे आणखी एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत सारवासारव केल्याचे दिसून आले. नगरपरिषद निवडणुकांसाठी सोमवारी सभांचा धडाका लावलेला दिसून आला. आधी अंबाजोगाई आणि त्यानंतर बीडमध्ये सभा घेतली मात्र या सभेत बोलतांना ‘राम कृष्ण हरी’ असे म्हटल्याने समोरून वाजवा तुतारी असा प्रतिसाद मिळाला. मात्र ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित […]

सामना 25 Nov 2025 7:12 pm

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व - सोमनाथ गुरव

धाराशिव (प्रतिनिधी)- भुलथापा मारणे, हवेतल्या गप्पा करून जनतेला फसवणे एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व असल्याच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यांचा 'विकास'हा फक्त कागदावरचा असून प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे ही राणा पाटील यांची ओळख आहे. यावेळी गुरव म्हणाले की, राणा पाटील यांनी त्यांच्या भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले. यामध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सोडला पण ते कस देणार हे आपण सांगणार नसल्याच ते म्हणाले. म्हणजे पहिलाच मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला. दुसरा मुद्दा रस्त्याच्या जवळपास दीडशे कोटीच्या निधी बाबत व अन्य निधी आणण्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गुरव म्हणाले मर्जीतल्या गुत्तेदारास रस्त्याचं काम मिळावं यासाठी वीस महिने प्रक्रिया याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही.त्यामुळं शहरवासियांना झालेल्या त्रासाला फक्त तुम्ही जबाबदार आहात. निवडणुकीच्या तोंडावर अजून निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. शिवाय जे 140 कोटी निधी आणला म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहेत आतापर्यंत हे रस्ते फक्त तुमच्या कमिशन साठी थांबवले असा याचा अर्थ निघतो. ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते तिथं रस्त्यासाठी 500 कोटींचा निधी मिळत असतो. मात्र यांच्याकडून फक्त 140 कोटी एवढाच निधी शहरास मिळाला. म्हणजे शहराच्या हक्काच्या 360 कोटींचा निधी यांना आणता आला नाही हे यांचं कर्तृत्व असल्याच गुरव म्हणाले. तिसरा मुद्दा त्यांनी सफाई व कचरा डेपो च्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं. त्यावर गुरव यांनी राणा पाटील यांना प्रतिप्रश्न केला 4 वर्ष प्रशासकाचा काळ असो की 2019 पर्यंत तुम्हीच इथं आमदार असो त्या अगोदरही सत्ता तुमचीच होती. मग तेवढ्या काळात तुम्हाला हा प्रश्न का सोडवता आला नाही शिवाय तुमचेच बगलबच्चे यांच्याकडे या कामाचं टेंडर होते. तुम्ही पुन्हा तेच करण्यासाठी सत्ता मागत आहात का? असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटलांना विचारला. चौथा मुद्दा त्यांनी उद्यान निर्मितीसाठी पाच वर्षात 25 कोटींचा निधी आणतो म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्यामुळे यांनी तीन बगीचासाठी सात कोटी व आठवडी बाजारासाठी दहा कोटी असा बारा कोटीचा निधी मंजूर केला होता. महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाना स्थगिती दिली. 2022 पासून आतापर्यंत तुम्हाला ही काम करणं का झालं नाही याचेही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं असं आव्हान गुरव यांनी दिले आहे. पाचवा मुद्दा पारदर्शक प्रशासन आणणार ते जनतेनं जिल्हा परिषद व 2016 पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला त्यामुळं त्यावर तर आपण न बोललं बरं होईल असाही टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. डिसेंबर 2021 पासून पालिकेवर प्रशासक आहेत. महाविकास आघाडी सरकार जुलै 2022 पर्यंत होत. त्यानंतर पुन्हा राणा पाटील यांचीच सत्ता आहे. 2014- 2019 तेच धाराशिवचे आमदार होते. डिसेंबर 2016 ला पालिका निवडणूक झाली तेव्हापासून ऑक्टोबर 2019 पर्यंत तुम्हीच आमदार होतात. मग त्याकाळात आपण काय केलं? निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारायच्या व हवेत बोलायचं एवढंच तुमच कर्तृत्व असून विकासाची तुम्हाला किती तळमळ आहे हे जनतेला चांगल माहिती आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 6:18 pm

सुजात आंबेडकर यांची धाराशिव येथे प्रचार सभा

धाराशिव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवानेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारां करिता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रचार सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांती चौक भीम नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे. धाराशिव नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेखा नामदेव वाघमारे , प्रभाग क्रमांक 6 मधून नामदेव बाबुराव वाघमारे , प्रभाग 8 मधून जयदीप जीवनराव दळवे, सोनल हुंकार बनसोडे, प्रभाग 14 मधून विजयाबाई प्रल्हाद नागटिळे, शितल दादाराव चव्हाण, प्रभाग 15 मधून महादेव एडके , क्षमा सिरसाठ निवडणुकीसाठी उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात आंबेडकर हे धाराशिव येथे येणार आहेत. ही सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता क्रांती चौक भिम नगर येथे होणार आहे.या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 6:17 pm

यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा- प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे

धाराशिव (प्रतिनिधी)- यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते एक स्वतंत्र्यसैनिक, राजकारणी, लेखक आणि उत्तम वक्ते होते. आपणाला यशवंतराव चव्हाण हे समजून घ्यावयाचे असतील तर त्यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र अभ्यासणे गरजेचे आहे.यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ हे त्यांनी 1913 ते 1946 या कालावधीतील त्यांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेले आहे.या ग्रंथाची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रकाशित झालेली आहे. हे आत्मचरित्र वाचून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असे प्रतिपादन रामकृष्ण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी धाराशिव येथे बिल गेट्स महाविद्यालयात केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव यांच्यावतीने धाराशिव येथील बिल गेट्स महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव चे सचिव डॉ . रमेश दाबके हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना. यशवंतराव चव्हाण यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांच्यावर आईने केलेल्या संस्काराचा प्रभाव होता आणि म्हणून ते उत्तम राजकारणी होऊ शकले असे प्रतिपादन डॉ.रमेश दापके यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शाखा धाराशिव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, सुरेखा जगदाळे , डॉ. तबसूब ॲड. विश्वजीत शिंदे, डॉ.तांबारे ,आदित्य गोरे आदीसह बिल गेट्स महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बिल गेट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरशद रझवी यांनी केले. तर आभार प्रा.ज्ञानेश्वर गिरी यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 6:15 pm

Dharmendra Deol : कोल्हापूरशी धर्मेंद्र यांचे जिव्हाळ्याचे नाते; लोणावळा अन् तांबडा-पांढरा रस्स्याच्या गोड आठवणी

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या आठवणी उजाळ्यात by विद्याधर पिंपळे कोल्हापूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देश भावूक झाला आहे. त्यांच्या कोल्हापूरशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आता [...]

तरुण भारत 25 Nov 2025 6:14 pm

Dharmendra Deol : धर्मेंद्र यांची स्वामी समर्थ दर्शनाची इच्छा अधुरी; अक्कलकोट यात्रा स्वप्न राहिले अपूर्ण

धर्मेंद्र यांना अक्कलकोटला येण्याची होती इच्छा सोलापूर : बॉलीवूडचे प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र हे अक्कलकोट येथे स्वामीसमर्थांच्या दर्शनासाठी येणार होते, मात्र सोमवारी त्यांच्या निधनाने त्यांच्या श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाची इच्छा अधुरी राहिली आहे. एकेकाळी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी [...]

तरुण भारत 25 Nov 2025 6:00 pm

आईने दिली किडनी, किचकट शस्त्रक्रियेतून सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलाला दिले जीवदान

दिल्लीतील वीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयाने किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी येथे 11 वर्षीय मुलाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. सफदरजंग रुग्णालयातील हे पहिले बालवैद्यकीय किडनी प्रत्यारोपण असून, देशातील कोणत्याही केंद्रीय सरकारी रुग्णालयात झालेला हा पहिलाच पेडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट मानला जात आहे. या मुलाला बायलेटरल हायपो-डिस्प्लास्टिक किडनी नावाचा दुर्मीळ […]

सामना 25 Nov 2025 5:53 pm

धाराशिव शहराला 24 तास पाणी पुरवठा करणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये पाण्याचे नैर्सिगक आवर्षण आहे. त्यामुळे उजनी धरणावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. मात्र ते पाणी शहरवासियांना आवश्यकता असेल त्यावेळी मिळत नाही. ती समस्या दूर करण्यासाठी यापुढे 24 तास पाणी पुरवठा सुरू करणार असल्याचे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 25 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिले. धाराशिव शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार नेहा काकडे, मधुकर तावडे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव शहरातील प्रत्येक घरामध्ये पोहचण्याच्या कार्यक्रम भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आला. त्यामुळे त्यांच्या अडचणी काय आहेत? त्यांना काय पाहिजे? यांच्या सुचना त्यांनी दिल्या. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व सुचना व समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात शहरवासियांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याची आमचे उद्दिष्ट आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात 150 कोटी रूपयांची नाली व रस्ता आदी कामे करण्यात येणार असून, पुढील पाच वर्षामध्ये त्यासाठी 500 कोटी रूपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहरात सोलर सह इतर प्रकाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल. तसेच शहरवासियांना भेडसावत असलेला कचऱ्याचा व कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी अद्यावत साधन सामुग्री आणून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात 4-4 कोटींचे दोन नवे नमो बगीचे व वृक्ष लागवड करून नगर परिषदेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 5:46 pm

Solapur News : सोलापूरच्या विमानसेवेला पक्ष्यांचा अडथळा!

सोलापूर विमानतळाजवळील पक्षी धोक्यामुळे विमानसेवेवर सावट सोलापूर : येबील होटगी रोडवरील विमानतळावरुन सोलापूर ते मुंबई, बेंगलोर, गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र सोलापूर विमानतळ परिसरात असलेल्या पक्षांच्या अस्तित्यामुळे सोलापूरची विमानसेवा घिरट्या वाढत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील [...]

तरुण भारत 25 Nov 2025 5:45 pm

मी लढतीत नाही- महंत इच्छागिरी महाराज

तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत मठाधिपती सोमवार गिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे की, “मी या लढतीचा भाग नसणार आहे.” असे निवेदन देऊन जाहीर केले. श्री क्षेत्र तुळजापूर हे शक्तीपीठ, धर्म, परंपरा आणि अध्यात्म यांचे केंद्रस्थान असल्याचे सांगत ते म्हणाले की, समाजात अराजकता वाढू लागली की धर्मसत्तेने मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते. याच भावनेतून महंत योगी मावजीनाथ महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांच्या सहकार्याने त्यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नागरिक भेटू लागल्याने मोठा लोकाग्रह निर्माण झाला. शहरातील ज्येष्ठ मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व पक्षांचे नेतेपदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नगराध्यक्ष पद बिनविरोध करण्याचे प्रस्तावही पुढे आले, मात्र काही कारणांमुळे तो प्रयत्न सफल झाला नाही. महंत इच्छागिरी महाराज यांनी भाजपाच्या नावे एक अर्ज व एक अपक्ष असा दोन उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा अर्ज बाद झाला; परंतु अपक्ष अर्ज कायम राहिला. अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी या लढतीत नाही”तुळजापूरकरांना संदेश निवडणूक प्रक्रियेतील इतर उमेदवारांपैकी योग्य व्यक्तीची निवड करावी, असे आवाहन करत त्यांनी म्हटले“ आपण फक्त एक बटण दाबत नाही; आपण पाच वर्षांचे भविष्य ठरवत आहोत. 100% मतदान करा.”या सर्व प्रक्रियेत सहकार्य केलेल्या तुळजापूरच्या ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.या निवेदनावर महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज यांची स्वाक्षरी आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 5:44 pm

मराठाकालीन शस्त्रे पहाण्यासाठी गर्दी

तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने आयोजित मराठाकालीन शस्त्र प्रदर्शन पहाण्यासाठी नागरीकानी गर्दी केली होती. बार्शी येथील माधवराव देशमुख यांच्या खाजगी संग्रहालयातील मराठकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.मराठाकालिन शस्त्राचे प्रदर्शन पहाण्यासाठी तेर येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तेरच्या सरपंच दिदी काळे या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी गोरख माळी,नवनाथ पांचाळ,शरद सोनवणे, निकीता थोरात, दिपाली नाईकवाडी,अविनाश राठोड, भाग्यश्री बिराजदार, अमोल सावंत, अजित कदम, किशोर काळे, गिरीश चवरे, सविता बागडी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 5:44 pm

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची महाराष्ट्राला गरज- माजी प्रबंधक नेताजी साठे

धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची आज देखील महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्राचा विकास होत असला तरी देखील महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते व ज्यांना उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची आज देखील गरज असल्याचे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्रबंधक नेताजी साठे यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव येथील आयोजित कार्यक्रमात केले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सह विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण साहेब हे उत्कृष्ट संसदपटू उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ते रसिक व साहित्यिक होते त्यांनी युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ ऋणानुबंध या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वाचन होणे आज काळाची गरज आहे. सदर कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक प्रा. विवेकानंद चव्हाण, केंद्र सहाय्यक ज्ञानेश्वर बारवकर, प्रा. सुदर्शन गुरव, प्रसिद्धीप्रमुख प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे आदीसह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 5:43 pm

धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची जाहीर सभा

धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे बुधवारी दि. 26 नोव्हेंबर धाराशिवमध्ये भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिंदे यांचे धाराशिव शहरात आगमन सायं. 6 वाजता येणार असून, ते आझाद चौकातील जाहीर सभेला संबोधित करतील. ही सभा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांच्या प्रचारार्थ तसेच पक्षाचे 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिवकरांना आवाहन केले आहे की,26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या उमेदवारांना बळ द्यावे. धाराशिवमध्ये होणारी ही सभा आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या पहिल्या सभेमुळे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 5:42 pm

Solapur : तिरुपतीच्या पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवमध्ये सोलापूरची वारकरी दिंडी!

तिरुचनूर पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवात सोलापुरी वारकऱ्यांची दिंडी दिमाखात सोलापूर : तिरुपतीमधील तिरुचनूर येथे असलेल्या श्री पद्मावतीदेवी देवस्थानच्या ब्रह्मोत्सवमध्ये सोलापूरच्या वारकरी दिंडीने सहभाग नोंदविला. ब्रह्मोत्सवमध्ये प्रथमच सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ यांचा [...]

तरुण भारत 25 Nov 2025 5:34 pm

मी दलित समाजातील असल्यामुळे मला राम मंदिर ध्वजारोहण कार्यक्रमात बोलावलं नाही, अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांचा आरोप

राम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना समारंभाला आमंत्रित न केल्याबद्दल अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “रामललांच्या दरबारातील धर्मध्वज स्थापना कार्यक्रमात मला बोलावले नाही, याचे कारण मी दलित समाजातून येतो हे आहे. ही रामाची मर्यादा नाही, तर दुसऱ्याच्या संकुचित विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. राम सर्वांचेच आहेत. माझी लढाई कोणत्या पदाची किंवा […]

सामना 25 Nov 2025 5:29 pm

Solapur Crime : सोलापुरात दागिने चोरल्याच्या संशयावरून मावशीविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम पाच्छा पेठेत मावशीवर दागिने चोरीचा गुन्हा दाखल सोलापूर : मावशीने घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामुद्दीन इब्राहिम बिजापुरे [...]

तरुण भारत 25 Nov 2025 5:22 pm

अजित पवारांचा कोरडा दम! कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांच्या अनुदानात ५० कोटीचा हात मारल्याचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते बीडमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज अधिकार्‍यांना सोडणार नाही, असा देऊन जातात. त्यांचा दम हा कोरडाच निघत आहे. अधिकारी भेईनात, बीड जिल्ह्यात एकामागोमाग एक अधिकार्‍यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना मंजूर झालेल्या अनुदानामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि अधिकार्‍यांनी शेती […]

सामना 25 Nov 2025 5:13 pm

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकेवर कठोर कारवाई, कर्नाटकची मलपी नौका जप्त

महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभाग सतत सजग आहे. तसेच परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. याच धोरणांतर्गत मंगळवारी पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजताच्या […]

सामना 25 Nov 2025 5:07 pm

मराठी मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे, अंबादास दानवे यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले. दानवे म्हणाले की, भौगोलिक रचनानुसार याद्या करण्याऐवजी अनेक प्रभागांमध्ये बाहेरील लोकांना समाविष्ट करण्यात आले आणि स्थानिक मतदार याद्यांमधून बाहेर फेकण्यात आले. […]

सामना 25 Nov 2025 4:56 pm

हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडी वाढली की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधेदुखी वाढते आणि विविध प्रकारच्या लहान-मोठ्या समस्या सुरू होतात. म्हणूनच थंडीच्या काळात उबदार आणि ऊर्जा देणारे पदार्थ खाणे उचित आहे. यापैकी एक पदार्थ म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे हिवाळ्यातील सुपरफूड मानले जातात. उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी […]

सामना 25 Nov 2025 4:55 pm

बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, संपूर्ण देशात भाजपला हादरवून टाकेन –ममता बॅनर्जी

“भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन’, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या असं म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे […]

सामना 25 Nov 2025 4:55 pm

Satara News : विविध मागण्यांसाठी ‘पेन्शनर’चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा

अत्यल्प पेन्शनमुळे ८१ लाख EPS-95 निवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा सातारा : ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पेन्शनरांनी सातारा शहरात मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. शिवतीर्थ येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. व्यथा बैठकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. देशभरातील तब्बल ८१ लाख ईपीएस-९५ निवृत्त [...]

तरुण भारत 25 Nov 2025 4:50 pm

हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे भरमसाठ फायदे, वाचा

हिवाळा येताच बाजारात हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढते. यामध्ये पालक, शेपू, मेथी या भाज्या प्रामुख्याने दिसू लागतात. हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे असंख्य फायदे आहेत. मेथी ही आपल्या आरोग्यासाठी फार हितावह मानली जाते. मेथीच्या भाजीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. म्हणूनच मेथीच्या भाजीला हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते. हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला […]

सामना 25 Nov 2025 4:40 pm

Karad News : लम्पी आजारामुळे कराड तालुक्यातील गायींच्या आरोग्याची चिंता

सदाशिवगडावर चरावयास सोडलेल्या 20 गायींना लम्पी आजाराची लागण कराड : कराड तालुक्यातील सदाशिवगडावर चरावयास सोडलेल्या जवळपास २० गायींना लम्पी सदृश्य आजाराची लागण झाली असून त्यांच्या आंगावर मोठ्या प्रमाणात फोड आले आहेत. अद्याप गायींच्या मालकांना याचा थांगपत्ता नसल्याने गायी उपचारापासून दूर आहेत. गडावर एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास खड्डा [...]

तरुण भारत 25 Nov 2025 4:37 pm

हिवाळ्यात दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे काय होतील फायदे, वाचा

हिवाळा हा ऋतू आल्यावर खाण्यापिण्याची खूप चंगळ असते. पण हा ऋतू सोबतीला आजार देखील घेऊन येतो. कडाक्याच्या थंडीत शरीर उबदार ठेवायचे असेल तर स्वयंपाकघरातील भाजलेले चणे हे सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. महागडे बदाम आणि अक्रोड खाण्याऐवजी दररोज फक्त मुठभर भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे मिळतील. हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, या टिप्स लक्षात ठेवा […]

सामना 25 Nov 2025 4:33 pm

बीटाच्या रसामध्ये आले घालून पिण्याचे हे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहीत आहेत का, वाचा

बीटरूट हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ञ विशेषतः हिवाळ्याच्या काळात बीटरूट खाण्याची किंवा त्याचा रस पिण्याचे आपल्याला सांगतात. बीटाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. खासकरुन रिकाम्या पोटी आल्यासोबत बीटाचा रस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते. आल्यासोबत बीटरूटचा रस मिसळून पिल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित […]

सामना 25 Nov 2025 4:30 pm

Karad Municipal: निवडणुकीच्या निमित्ताने कराड पालिका मालामाल!

निवडणूक काळात कराड पालिकेत सव्वा कोटींचा कर जमा कराड : निवडणूक लढवण्यासाठी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या मिळकतीचा कर पालिकेत भरावा लागतो. त्यानुसार नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांनी सुमारे सव्वा कोटी रूपयांचा कर [...]

तरुण भारत 25 Nov 2025 4:22 pm

भाजलेल्या चण्यात विषारी ऑरामाइन रसायनचा वापर, शिवसेना खासदाराचे केंद्र सरकारला पत्र

भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी विषारी रसायनाचा वापर करण्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले आहे. चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्र लिहून यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एका अहवालाचा दाखला […]

सामना 25 Nov 2025 4:21 pm

सावंतवाडी टर्मिनससाठी ”डिजिटल एल्गार “

टर्मिनसचा लढा आता अटकेपार न्हावेली /वार्ताहर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता कोकणातील जनतेने डिजिटल एल्गार पुकारला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत : व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपच्या साहाय्याने कमीत कमी ५० हजार कोकणी जनतेपर्यंत पोहोचण्याचा महत्वाकांक्षी मानस ठेवण्यात आला आहे. टर्मिनस हेच एक उद्दिष्ट…. या कम्युनिटी ग्रुपचे एकच आणि [...]

तरुण भारत 25 Nov 2025 4:16 pm

धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी, काँग्रेस आमदाराचा आरोप

धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “संपूर्ण धारावीमध्ये प्रत्येक प्रभागात ६,००० ते १०,००० मतदारांना त्यांच्या मूळ वॉर्डमधून दुसऱ्याच वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. उदाहरण द्यायचे तर, सोशल नगरसारखे संपूर्ण परिसर, तेथील मतदारांना काहीही संबंध नसलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात […]

सामना 25 Nov 2025 4:10 pm

फेक अकाऊंटवाल्यांचा पर्दाफाश होणार! X ने लॉन्च केले नवे फिचर, Internet Activity मुळे समजणार देशाचे नाव

उद्योजक एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून ट्विटर (X) आणि एलॉन मस्क कायम चर्चेत आहेत. एलॉन मस्क नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतात. हल्लीच त्यांनी एक नवे फिचर लॉन्च केले आहे. Pandora’s box असे याचे नाव आहे. यामध्ये X युजर्स कोणत्या देशाचे आहेत? याबाबत माहिती मिळणार आहे. मागील आठवड्यात सुरू झालेल्या About this account या […]

सामना 25 Nov 2025 4:10 pm

IND vs SA –दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद, हिंदुस्थानवर पराभवाचे संकट; आफ्रिकेची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 549 धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानची अवस्था 2 बाद 27 अशी झाली होती. साई सुदर्शन 2, तर नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव 4 धावांवर खेळत होता. आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल (13 धावा) […]

सामना 25 Nov 2025 4:06 pm

Karad News : कराडचे शिक्षण क्षेत्र हादरले!

टीईटी परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाने कराडमध्ये खळबळ सातारा : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू असताना कोल्हापूरमध्ये उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेत पुन्हा एकदा तीव्र धक्का दिला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट कराड तालुक्यातील मसूरलगतच्या बेलवाडी गावापर्यंत पोहोचल्याने कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. [...]

तरुण भारत 25 Nov 2025 4:05 pm

झोळंबे पांडुरंग मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ

ओटवणे । प्रतिनिधी झोळंबे येथील पांडुरंग मंदिरात मंगळवार पासून सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून मंगळवारी २ डिसेंबरला या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. यानिमित्त किर्तन, प्रवचन, भजन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह भ प सद्गगुरू वासुदेव महाराज वझे यांचे परमभक्त असलेला श्री संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय व अनुयायी [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:51 pm

एशियन पेंट्स आणि बीसीसीआयमध्ये 3 वर्षांचा करार!

देशातील आघाडीची पेंट्स आणि डेकोर ब्रँड एशियन पेंट्स बीसीसीआयचा ‘ऑफिशियल कलर पार्टनर’ बनला आहे. एशियन पेंट्स आणि बीसीसीआयमध्ये पुढील तीन वर्षांसाठी करार झाला आहे. हिंदुस्थानात आगामी तीन वर्षात होणाऱ्या पुरुष, महिला आणि देशांतर्गत क्रिकेटच्या 110 हून अधिक लढतींचा या करारात समावेश आहे. यावेळी एशियन पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अमित सिघल, बीसीसीआयचे प्रवक्ते […]

सामना 25 Nov 2025 3:43 pm

Satara Crime : 73 वर्षीय वृद्धेच्या बोरमाळ हिसकावणाऱ्या चोरट्याला 12 तासांत केले जेरबंद

औंध पोलीस ठाण्याने अवघ्या १२ तासांत अट्टल चोर केला जेरबंद औंध : कळंबी (ता. खटाव) येथील वृद्धेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणाऱ्या अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले. कळंबी ते औंध रस्त्यावरून शेतातून घरी जाताना काळया दुचाकीवरून [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:41 pm

पदवी प्रमाणपत्राच्या विलंब शुल्कात माफी

धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र विनाविलंब शुल्क काढता येणार आहे. या संदर्भात विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत पदवी प्रमाणपत्रांना विलंब शुल्क लागणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र विना विलंब शुल्क काढण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे काढून मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करावी,असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 3:35 pm

होमगार्ड अंकुश थोरात यांचा एस.पी.कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार

भुम (प्रतिनिधी)- एस.पी.कनिष्ठ महाविद्यालय येथे भूम पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष होमगार्ड अंकुश थोरात यांचा विद्यार्थिनी व प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंकुश थोरात हे भूम येथील बस स्टँड परिसरात अहोरात्र कर्तव्यावर असतात. एस पी कॉलेजला बाहेर गावाहून बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. त्यामुळे बस स्टँड परिसरात विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी थोरात अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कानगुडे श्रीगणेश उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी काटे एम.बी. व डी.डी. बोराडे, वरीष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनुराधा जगदाळे,सर्व स्टाफ उपस्थित होता. पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ शिंदे यांनी थोरात यांचे कौतुक केले आणि बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 3:35 pm

सत्ताधाऱ्यांची ‘ही’वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी, विजय वडेट्टीवार यांची टीका

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मत दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची […]

सामना 25 Nov 2025 3:34 pm

तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे विजेचा लपंडाव सुरुच

तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच तुळजापूर शहरात विजेचा लपंडाव पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दररोजची अनियमित वीजपुरवठ्याची समस्या शहरवासीयांसह तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठ्या अडचणीत टाकत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरात येणाऱ्या भाविकांसाठी वीजपुरवठा खंडित होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मंदिर परिसर, निवासस्थाने, रस्ते आणि बाजारपेठेत अचानक जाणारी वीज व पर्यायाने बंद पडणारे दिवे, पंपिंग, सीसीटीव्ही यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. भाविकांचे म्हणणे आहे कि“देवीच्या दर्शनासाठी आलो विद्युत पुरवठा बंद होत असल्याने सुविधा बंद पडतात. सुविधा बंद पडतात यामुळे आमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. याला जबाबदार कोण असा सवाल करीत आहेत. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून असा आरोप होत आहे की, मुख्य वीज अधिकाऱ्यांची उपस्थिती शहरात नसल्यामुळे समस्येकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. अधिकारी सतत अप-डाउन करत असल्यामुळे स्थानिक समस्या प्रत्यक्ष पाहण्याकडे दुर्लक्ष होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळेच “सदर अधिकाऱ्यांनी काही काळ तुळजापूरमध्येच निवास अनिवार्य करावा” अशी मागणीही जोर धरू लागली आहे. तुळजापूरमधील विद्युत यंत्रणा अनेक वर्षांपासून निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप शहरवासीयांकडून वारंवार केले जात आहेत. चौकशीची मागणी शहरवासीय व स्थानिक सामाजिक संघटनांकडून मागणी केली जात आहे की, तुळजापूरच्या संपूर्ण वीज व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करावी. दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. तत्काळ दर्जेदार विद्युत यंत्रणा उभी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनांकडून होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या बनण्याची शक्यता निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांचे एकच म्हणणे“निवडणुकी आधी वीजपुरवठा सुरळीत करा अशी मागणी होते आहे.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 3:34 pm

धाराशिव क्रीडा संकुलात अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात

धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धा 24 नोव्हेंबर 2025 रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 14 व 16 वर्षांखालील मुलींच्या या दोन वयोगटातील स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील 262 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन निकिता पवार तालुका प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी व राजेश भवाळ, महेश पाटील ॲथलेटिक्स राज्य क्रीडा मार्गदर्शक व संजय कोथळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी,धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव योगेश थोरबोले, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे,विश्वास खंदारे, क्रीडा प्रशिक्षक राजेश बिलकुले,सुरेंद्र वाले, राहुल जाधव, कुलदीप सावंत आदी उपस्थित होते. भारतातील 300 जिल्ह्यांमधून ही अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून गुणवंत खेळाडूंची निवड करणे हा प्रमुख उद्देश आहे. या गुणवत्ता शोध अस्मिता ॲथलेटिक्स स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील मुलींना एक माध्यम तयार होईल, असे महेश पाटील यांनी सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून आलेले तज्ञ मार्गदर्शक वैभव पायगुडे, ज्ञानेश्वर धमकुंडलवाड यांनी या स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांची पुढील स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देताना, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी स्पर्धेदरम्यान नोंदवली. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार असून यातून गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून ज्ञानेश्वर भुतेकर, रोहित सुरवसे, ऋषिकेश काळे, योगिनी साळुंखे, प्रणिता जाधवर, संतोष चव्हाण, कृष्णा राठोड, सुरेश कोकाटे, ओमप्रकाश ढगे, विभुते काम पाहिले. स्पर्धेचा अंतिम निकाल 14 वर्षाखालील मुली- (अनुक्रमे प्रथम 3 क्रमांक) ट्रायथलॉन अ आरती धनंजय मोरे (इंदापूर), आर्या महेश वाकुरे (धाराशिव), अमृता औदुंबर तोर (आळनी), ट्रायथलॉन बी पलक अस्लम मेंडके (धाराशिव), समृद्धी अमर नन्नवरे(तुळजापूर),श्रद्धा राठोड (जळकोट), ट्रायथलॉन सी वैष्णवी विजय वावरे, राधा महेश रणदिवे (धाराशिव), उपासना जयप्रकाश चौधरी (तुळजापूर). 16 वर्षाखालील मुली- 60 मी धावणे आकांक्षा लहू गपाट (इंदापूर), श्रीदेवी परशुराम राठोड(जळकोट),ऋतुजा प्रकाश मांडवे (उमरगा), 600 मीटर धावणे अनुजा बाळासाहेब गोरे, आकांक्षा लहू गपाट,ऋतुजा प्रकाश मांडवे, लांब उडी शेख गुलनूर कबीर,उर्मिला संजय चव्हाण, उंच उडी सई निलेश महामुनी, अल्फिया हसन मुल्ला, गोळा फेक दीक्षा बोने,गायत्री लोंढे, प्राची भारत गवळी, थाळी फेक ऐश्वर्या नागेश पवार,प्राची भारत गवळी,अक्षरा उमेश घोगरे, भालाफेक भूमिका परमेश्वर मेनसे, सई निलेश महामुनी.

लोकराज्य जिवंत 25 Nov 2025 3:33 pm

Sangali News : सांगली आयुक्तांचे ‘टार्गेट’आता झुलेलाल चौक!

सांगली महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई सांगली : महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. झुलेलाल चौक ते शंभरफुटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ४० व्यावसायिकांना नगररचना विभागाने नोटीस दिली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण तसेच फ्रंट मार्जिनमध्ये केलेली [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:31 pm

निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे! प्रारुप मतदार याद्यांमधील घोळावर आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच पूर्वीप्रमाणे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची तटस्थता उरलेली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमितता आणि मतदार फसवणुकीचे पुरावे समोर येऊनही निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही, अशी टीका शिवसेना नेते आदित्य […]

सामना 25 Nov 2025 3:24 pm

सात दुकानांवर महापालिकेची कडक कारवाई; एकल प्लास्टिक वापरासाठी 28 हजार रुपये ठोकला दंड

मिरजमध्ये ७ दुकानांवर महापालिकेची कडक कारवाई मिरज : प्रतिबंध असलेले एकल प्लास्टीक वापरणाऱ्या शहरातील सात करुन दुकानांवर कारवाई महापालिकेने २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छा सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:15 pm

व्याघ्र क्षेत्र दोन टप्प्यात करा

केंद्रीय उच्चाधिकार समितीची शिफारस : सर्वोच्या न्यायालयात सादर केला अहवाल,पुढीलसुनावणी15 डिसेंबरलाहोणार पणजी : गेली काही वर्षे गाजत असलेल्या व्याघ्र राखीव क्षेत्र प्रकरणी केंद्रीय उच्चाधिकार समितीने अखेर आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला असून गोव्यात व्याघ्र क्षेत्र दोन टप्प्यात जाहीर करण्यास अनुमती दिली आहे. पहिल्या टप्प्यात नेत्रावळी अभयारण्य आणि खोतीगाव अभयारण्याचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:05 pm

अमरावतीच्या नांदगाव पेठ रोडवर पेट्रोलच्या टॅंकरला भीषण अपघात

अमरावती पेट्रोलच्या टॅंकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नांदगाव पेठ रोडवर पेट्रोलच्या टॅंकरला आग लागली. खड्ड्यात टॅंकर पलटी झाल्याने ही आग लागल्याची समजते. अमरावतीचे मोरशी येथून पेट्रोलचे तीन टॅंकर हे एकामागोमाग जात होते आणि रस्त्याच्या बाजूला पाईपलाईनचे आणि रस्त्याचे कामही सुरु होते. दरम्यान नियंत्रण न झाल्याने खड्ड्यात टॅंकर पलटी होऊन ही आग लागल्याची समजते. […]

सामना 25 Nov 2025 3:04 pm

कोंकणी साहित्यिकांच्या कोत्या बुद्धिची की करावी तेवढी थोडीच!

मराठीनिर्धारसमितीचेगो. रा. ढवळीकरयांचेटीकास्त्र पणजी : अर्नाकुलम येथे नुकत्याच पार पडलेल्या कोकणी साहित्य संमेलनातील मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा देण्यास विरोध करणारा ठराव अत्यंत निंदाजनक आहे, असे निवेदन करून मराठी राज्यभाषा समितीचे प्रमुख गो. रा. ढवळीकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या भाषेच्या वृद्धीसाठी, साहित्याच्या विकासासाठी सरकारची मदत मागणारे ठराव साहित्य संमेलनातून घेतले जातात. परंतु अशा [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:02 pm

Sangli Crime : ईश्वरपूर पेठेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचा 5 लाख 78 हजारांचा ऐवज केला लंपास

ईश्वरपूरच्या घरात भर दुपारी चोरट्यांचा डल्ला ईश्वपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथील गणेश सुभाष कोळेकर (४१) यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप फोडून चोरट्यांनी सुमारे पावणे सहा लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना भर दुपारी पावणे बारा [...]

तरुण भारत 25 Nov 2025 3:00 pm

जि. पं. निवडणुकांबाबत आज निर्णयाची शक्यता

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतीच्या 50 जागांसाठी निवडणुका घेण्याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. साऱ्यांचे लक्ष तारखांच्या घोषणांकडे लागले असून अनेकांनी आचारसंहितेची धास्ती घेतली आहे. कोणतेही अधिकार नसलेल्या जिल्हा पंचायतीच्या नव्या सदस्य निवडीसाठी निवडणुका घेण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय गोवा सरकार आज उच्च न्यायालयात जाहीर करणार आहे. या अगोदर 13 डिसेंबर रोजी निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते. [...]

तरुण भारत 25 Nov 2025 2:58 pm

हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर भाषा युद्ध निश्चित! उदयनिधी स्टॅलिन यांचा केंद्र सरकारला इशारा

चेन्नईत सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यापैकी एक महत्त्वाचा भाषा सक्तीच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर सरकार त्याचा तीव्र विरोध करेल, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला सुनावले. चेन्नईतील या कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, जर आमच्यावर हिंदी भाषा […]

सामना 25 Nov 2025 2:57 pm

काँग्रेसला भाजपची धास्ती

भाजपच्यानंतरचजाहीरकरणारउमेदवार पणजी : पक्षातून फुटलेल्या आमदारांना, उमेदवारांना पक्षात फेरप्रवेश नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली असून त्यात कोणताही बदल होणार नाही, असे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. जि. पं. साठी आधी उमेदवार जाहीर केल्यास त्यांना [...]

तरुण भारत 25 Nov 2025 2:57 pm

‘अप्रेंटिस’ना वेतन देण्यास निधी नाही?

पणजी : सरकारच्या विविध खात्यात शिकाऊ कामगार अप्रेंटिस म्हणून घेतलेल्या नवोदित हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. शिक्षण खात्यामध्ये घेण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंतचे मानधन देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे मानधन निधी अभावी देण्यात आले नाही. आता नोव्हेंबर संपुष्टात येताना तरी या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळणार की [...]

तरुण भारत 25 Nov 2025 2:54 pm

तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण मालक आमच्याकडे! चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून सत्ताधाऱ्यांमध्येच निधीवरून वाकयुद्ध रंगले आहे. तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला होता. यावर आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्यात तरी मालक आमच्याकडे, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी […]

सामना 25 Nov 2025 2:52 pm

स्टंटबाजी करणं दोन मुलांच्या जीवावर बेतले, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दोन तरुणांना स्टटंबाजी करणे जीवावर बेतले आहे. सोशल मीडिया साईट्सवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकं वाटेल ते करायला तयार होतात. दोन मित्र असेच स्टंटबाजी करत असताना त्यांना जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना मुलांच्या हेल्मेटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रविवारी सकाळी 10.20च्या सुमारास हा अपघात झाला आणि घटनास्थळीच […]

सामना 25 Nov 2025 2:41 pm

Ayodhya: राम मंदिरावर फडकला ‘भगवा ध्वज’; पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अयोध्येतील राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवला आणि मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पूर्ण झाल्याची घोषणा केली. हा ‘युगप्रवर्तक’ क्षण असून शतकानुशतके झालेल्या ‘जखमा आणि वेदना’ बऱ्या करणारा आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘संपूर्ण देश आणि जग राममय झाले असताना अयोध्या आणखी एका ऐतिहासिक टप्प्याची साक्षीदार होत आहे’.

सामना 25 Nov 2025 2:32 pm

मिस युनिव्हर्स 2025 वादाच्या भोवऱ्यात, ऑलिव्हिया यासेने किताब केला परत, चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

मिस युनिव्हर्स २०२५ चा अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये पार पडला. मेक्सिकोच्या फातिमा बॉशने किताब जिंकला. परंतु सुरुवातीपासूनच ही स्पर्धा वादांमुळे गाजली होती. त्यामुळे अंतिम फेरीनंतरही हा वाद कायम तसाच राहिला. अंतिम फेरीच्या काही दिवसांनंतर, कोट डी’आयव्होअरच्या ओलिव्हिया यासेने घोषणा केली की, ती मिस युनिव्हर्स आफ्रिका आणि ओशनिया २०२५ चा किताब परत करणार आहे. […]

सामना 25 Nov 2025 2:25 pm

हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, या टिप्स लक्षात ठेवा

जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अलीकडील WHO अहवालानुसार, १९९० ते २०२२ दरम्यान मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या काळात, त्याचा प्रसार जवळजवळ दुप्पट होऊन सुमारे १४% झाला आहे. हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित करणे विशेषतः कठीण असू शकते कारण सर्दी आणि संसर्ग शरीरात ताण वाढवतात, ज्यामुळे इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो आणि रक्तातील ग्लुकोजची […]

सामना 25 Nov 2025 2:20 pm

Sangli Politics : महायुतीला बहुमताने विजयी करा ; ना. उदय सामंत यांचे आवाहन

ईश्वरपूर महायुतीची तयारी जोरात ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने व्रजमुठ केली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या [...]

तरुण भारत 25 Nov 2025 2:16 pm

Sangli : कुपवाड–मिरज रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

विमल पाईप कंपनीसमोर भीषण अपघात कुपवाड : कुपवाड ते मिरज रस्त्यावर विमल पाईप कंपनीसमोर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाले. तर एका दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची कुपवाड पोलीस [...]

तरुण भारत 25 Nov 2025 2:03 pm

वऱ्हाड्यांनी केलेल्या गोळीबारात तरुणी ठार, वाचा नेमकं काय घडलं?

बाल्कनीतून लग्नाची वरात पाहत असताना वऱ्हाड्यांनी केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. श्यामनगरहून हापूर रोडवरून लग्नाची वरात चालली होती. यादरम्यान […]

सामना 25 Nov 2025 2:02 pm

“कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून…”, रोहित पवारांची गिरीश महाजन यांच्यावर टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याआधीच भाजपने दंडेलशाहीच्या जोरावर बिनविरोध नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा नवीन फॉर्म्यूला केला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनगर नगरपरिषदेमध्येही हाच फॉर्म्यूला वापरण्यात आला. तिथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका उमेदवाराची भाजप कार्यकर्त्यांनी कॉलर पकडली होती. यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली […]

सामना 25 Nov 2025 1:58 pm

kolhapur News : बालिंग्यात अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर धाड; सोनोग्राफी मशीनसह मोठा जप्त मुद्देमाल

सरस्वती महिपती पार्कमधील गर्भपात रॅकेट उघडकीस कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बालिंगा (ता.करवीर) येथील सरस्वती महिपती पार्कमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर पोलीस आणि आरोग्य विभागाने धाड टाकली.सोमवारी दुपारी टाकलेल्या या धाडीत एक गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, ९८ गर्भपात [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:55 pm

सेलिना जेटलीने पतीवर दाखल केला घरगुती हिंसाचाराचा खटला

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिचा पती पीटर हॉग याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. तिने घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि हेराफेरी या आरोपांखाली घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत (Domestic Violence Act) मुंबई न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानंतर न्यायालयाने ऑस्ट्रियन उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक असलेल्या हॉगला नोटीस बजावली आहे. सेलिना जेटली आणि पीटर हॉग यांचा […]

सामना 25 Nov 2025 1:41 pm

फेरसर्व्हे नको, बायपासच रद्द करा

हलगा-मच्छेबायपास: जिल्हाधिकाऱ्यांच्यापाहणीदौऱ्यावेळीशेतकऱ्यांचीमागणी बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे वडगाव, येळ्ळूर दरम्यानच्या शिवारात पाणी साचून राहत असल्याने त्याचे निवारण करू, शेतकऱ्यांनी रस्त्याची वर्कऑर्डर आणि कागदपत्रांची मागणी केल्याने ती देखील देऊ. नोटिफिकेशन वेगळे असून रस्ताकाम भलतीकडेच सुरू आहे, असा आरोप केला जात आहे. ज्या ठिकाणी जमिनीसंदर्भात वाद आहे त्या ठिकाणी फेरसर्वेक्षण करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:30 pm

कॉल सेंटर तपास आता सीआयडीकडे

राज्यपोलीसमहासंचालकांचाआदेश: स्थानिकपोलिसांच्यातपासावरप्रश्नचिन्ह बेळगाव : अमेरिकन नागरिकांना ठकविण्यासाठी बेळगावात थाटण्यात आलेल्या कॉल सेंटर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी यासंबंधी सोमवारी एक आदेश जारी केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी करणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचदिवशी आझमनगर येथील कुमार [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:27 pm

रस्त्याच्या कडेला कचरा टाकताय सावधान!

कचरा टाकताना आढळल्यास होणार एक हजाराचा दंड : शहर स्वच्छतेवर अधिक भर, जास्त दंड वसूल करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाचा होणार सन्मान बेळगाव : सुवर्णसौधमध्ये 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात मंत्री, महोदय व अधिकारी बेळगावात वास्तव्यास असणार आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचऱ्याची उचल करावी. उघड्यावर [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:23 pm

सह्याद्रीनगर येथील चोरी प्रकरणी फोंड्यातून वृद्ध ताब्यात

बेळगाव : सह्याद्रीनगर येथील एका घरफोडीप्रकरणी तिस्क-उसगाव, ता. फोंडा, गोवा येथील एका वृद्धाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून पावणे चार लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गवीसिद्धाप्पा ऊर्फ शिवाप्पा ऊर्फ मंजुनाथ लक्ष्मणाप्पा हुलसेर ऊर्फ कणकेरी (वय 72) मूळचा राहणार [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:21 pm

प्रदूषणामुळे सतत खोकला येतोय का? या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेले आहे. प्रदूषणामुळे आपल्याला सर्दी खोकला यासारखा त्रास सुरु होतो. अशावेळी घरच्या घरी काही रामबाण उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. प्रदूषित हवेत असलेले सूक्ष्म कण घशाच्या आणि फुफ्फुसांच्या पडद्यांना संक्रमित करतात, ज्यामुळे श्लेष्मा आणि कोरड्या खोकल्याची समस्या वाढते. हा परिणाम विशेषतः मुले, वृद्ध आणि […]

सामना 25 Nov 2025 1:20 pm

शनिवार खुटावर पार्किंगवरून हाणामारी

बेळगाव : शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच वाहन लावण्यावरून होणारी वादावादी शहरवासियांना आता काय नवीन राहिलेली नाही. सोमवारी शनिवार खूट येथे चारचाकी पार्किंग करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. त्यामुळे दुपारपर्यंत दोन्ही बाजूच्या तरुणांची गर्दी होती. शहरात पे अँड पार्किंगची व्यवस्था असतानाही जागा मिळेल तेथे दुकानांसमोर तसेच रस्त्याशेजारी वाहने पार्किंग केली जात [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:19 pm

कोनेवाडी भगवा ध्वज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याची साक्ष

बेळगाव : कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्र अशी घोषणा देण्यासह सोशल मीडियावर सदर पोस्ट अपलोड करून भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी सोमवारी चौथे जेएमएफसी न्यायालयात झाली. या खटल्यातील फिर्यादी काकतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राघवेंद्र [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:17 pm

बेळगाव-बैलहोंगल परिसरात चोरीच्या घटनात वाढ

चोरट्यांचीछबीसीसीटीव्हीतकैद बेळगाव : उपनगरात पुन्हा चोरट्यांचा वावर वाढला आहे. बाजार गल्ली, वडगाव येथे रविवारी रात्री दोन महिलांनी एका घराच्या पाठीमागे ठेवलेले पितळी साहित्य चोरल्याची घटना घडली. सदर महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बैलहोंगलमध्येही एका चड्डी गँगने घरफोडीचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. बाजार गल्ली, वडगाव परिसरात एका घराच्या बोळात ठेवलेली भांडी दोन महिलांनी [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:14 pm

धर्मवीर संभाजी चौक येथे खोदकाम केल्याने शंभूप्रेमींचा आक्षेप

बेळगाव : धर्मवीर संभाजी चौक येथे फलक बसविण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक परिसरात कोणत्याही प्रकारचे फलक लावून अडथळे निर्माण करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील फलक उभारल्यास आंदोलन छेडले जाईल, असे शिवप्रेमींनी म्हटले आहे. शंभू स्मारकाशेजारील जागेमध्ये काही दिवसांपूर्वी बसण्यासाठी सिमेंटचे बाक घालण्यात आले आहेत. त्याच्या [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:12 pm

Kolhapur Crime : खोट्या मोबाईल चोरीच्या आरोपातून तरुणाची आत्महत्या; सुपरवायझरवर गुन्हा दाखल

सुपरवायझरच्या अपमानामुळे २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू सांगरुळ : सांगरुळ करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील तरुणावर सुपरवायझरने मोबाईल चोरीचा खोटा आरोप करून त्याचा अपमान केल्याने मानसिक तणावाखाली त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. रोहित उर्फ कुमार आनंदा कांबळे (वय [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:12 pm

OBC Reservation –स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील टांगती तलवार कायम, शुक्रवारी होणार सुनावणी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रकरणी आणखी वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार खंडपीठाने ती विनंती मान्य करत पुढील सुनावणी शुक्रवारी, दुपारी 12 वाजता ठेवली. त्यामुळे सुनावणी पुढे […]

सामना 25 Nov 2025 1:10 pm

आरटीओ कार्यालयाला एजंटराजचे ग्रहण

नव्याइमारतीतहीशिरकाव: आमदारांच्याआदेशालाहरताळ बेळगाव : बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. कार्यालयाला नवीन सुसज्ज इमारत मिळाली, परंतु येथील एजंटराज मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांना एखाद्या कागदपत्रासाठी खस्ता खाव्या लागत असताना तेच काम एजंटामार्फत चुटकीसरशी होत असल्याने याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथे सहा [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:10 pm

शिवकुमारांच्या हस्तक्षेपामुळेच मागील युती सरकार पाडले

रमेशजारकीहोळीयांचेस्पष्टीकरण: देवेगौडामोठेनेते बेळगाव : डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्यात केलेल्या हस्तक्षेपामुळेच युती सरकार पाडण्यासाठी आपणच पुढाकार घेतला होता, अशी माहिती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी दिली. पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांचे नेतृत्व आपण कधीच मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस-निजद युती सरकारच्या पतनाला सिद्धरामय्या [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:04 pm

अनगोळ रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्यास अपघात ठरलेलाच बेळगाव : बडमंजीनगर, बाबले गल्ली क्रॉस (अनगोळ) येथून रेल्वे उड्डाण पुलालगत नाल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व गटार करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीवस्ती निर्माण झाली आहे. तसेच हा रस्ता अनगोळ येथील शिवारातही जातो. त्यामुळे या रस्त्यावरून शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर रस्त्यावरून [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:03 pm

‘त्या’ कुटुंबीयांना कर्जफेडीसाठी मुदत देण्याची सूचना

काहीमहिन्यांतसंपूर्णकर्जफेडकरण्याचेआश्वासन बेळगाव : तालुक्यातील कडोली येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी संस्थेकडून कर्जफेडीचा तगादा लावल्याने आत्महत्या केली. सातेरी रुटकुटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मृताचे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावर आले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे संस्थेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सदर मृत कुटुंबीयांना काही महिन्यांची मुदत [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:01 pm

Kolhapur Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

तरुणावर गुन्हा वाखल, संशयित पसार कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने करवीर पोलीस ठाण्यात दिली. जानेवारी २०२३ ते [...]

तरुण भारत 25 Nov 2025 1:00 pm

कुरुब समाजाचे 15 रोजी आंदोलन

बेळगाव : कुरुब समाजाला एसटी आरक्षण देण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करत आहे. त्यामुळे आरक्षणाविना समाजबांधवांना समस्या निर्माण होत आहे. आरक्षणासाठी अनेकवेळा आंदोलन करून निवेदने दिली. तरी, राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बेळगाव येथील आगामी सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्य कुरुब संघातर्फे केली. याबाबतचे निवेदन [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:59 pm

स्टेशन रोडवरील एका बाकाची चोरी

बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटवून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना बसण्यासाठी बाक तसेच शोभेची झाडे लावत आहेत. मात्र महागडे बाक चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. टेंगिनकेरा गल्ली पाठोपाठ स्टेशन रोडवरील एका बाकाची चोरी झाली आहे. त्यामुळे याबाबत खडेबाजार पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:58 pm

कडोली येथे इंद्रायणी भाताला 3000 रु. दर जाहीर

वार्ताहर/कडोली इंद्रायणी भाताला किमान 3000 रुपये दर मिळावा, यासाठी येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. येथील एका भात व्यापाऱ्यातर्फे3000 रुपये दर देवून भात खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. भात सुगी आणि मळणीच्या कामांना जोरात सुरू होताच अवघ्या आठच दिवसांत इंद्रायणी भाताचा दर 800 रुपयांनी कमी केल्यानंतर येथील स्वाभीमानी [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:56 pm

भारतीय किसान संघाचे 10 रोजी आंदोलन

बेळगाव : शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर त्वरित तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आगामी हिवाळी अधिवेशनावेळी बुधवार दि. 10 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असून सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा. तसेच त्वरित पीक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी भारतीय किसान संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सर्व पिकांसाठी आधारभूत किंमत खरेदी केंद्र [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:54 pm

कडसगट्टी येथील शेतकऱ्यांना जमीन खाली करण्याची नोटीस

बैलहोंगलतालुक्यातीलशेतकऱ्यांचेनिवेदन बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी येथील शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाकडून आपण कसत आलेली जमीन सरकारी असून ती ताबडतोब खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जमीन न सोडल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र शेतकरी सदर जमीन गेल्या 46 वर्षांपासून कसून उदरनिर्वाह करत आहेत. जर काढून घेतल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत. [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:52 pm

केंद्र सरकारचे ‘ते’ नवे कायदे रद्द करा

जुने कायदे कालबाह्य होणार : कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता बेळगाव : केंद्र सरकारकडून चार नव्या कामगार संहिता लागून करण्यात आल्या आहेत. कामगार वेतन संहिता. औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता व कामस्थान सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता हे चार नवे कायदे लागू करण्यात आले आहे. यामुळे जुने कायदे कालबाह्य होणार आहेत. मात्र या नव्या [...]

तरुण भारत 25 Nov 2025 12:51 pm