इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीबही ठार?
इस्रायलचा दावा : हवाई हल्ले सुरूच वृत्तसंस्था/ तेल अवीव इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) केलेल्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री, इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी केला. खतीब रात्री झालेल्या हल्ल्यात मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तथापि, इराणकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. इराणचे शक्तिशाली राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि आयआरजीसीच्या बसिज [...]
जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’सेवा विस्कळीत; कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका
उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) बुधवारी रात्री अचानक डाऊन झाल्याने जगभरातील कोट्यवधी युजर्सना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. हिंदुस्थान, अमेरिका आणि युनायटेड किंगडमसह अनेक देशांतील युजर्सना त्यांचे फीड रिफ्रेश करण्यात आणि नवीन पोस्ट पाहण्यात अडथळे येत होते. रात्री साधारण ८:१५ वाजल्यापासून या तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. […]
लीलावती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘मोड्युलर आणि हायब्रिड’ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि रुग्णसेवेचा जागतिक दर्जा राखण्याच्या दिशेने लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने (LHRC) एक मोठे पाऊल उचलले आहे. रुग्णालयामध्ये अत्याधुनिक ‘मोड्युलर आणि हायब्रिड ऑपरेशन थिएटर’ (OT) संकुलाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या नवीन सुविधेमुळे शस्त्रक्रियेतील अचूकता, सुरक्षितता आणि संसर्ग नियंत्रण प्रणालीमध्ये क्रांती घडून येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जागतिक दर्जाची मानके नव्याने विकसित करण्यात […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस, जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, आता अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याने काही सखल भागांत पाणी साचले होते. हवामान विभागाने पुढील २४ तास […]
कोकणातील सुप्रसिद्ध ‘म्हानाड’सरता खेळ, भुईबावडा येथील शिमगोत्सवाची आज सांगता
सह्याद्रीच्या कुशीत आणि ऐतिहासिक किल्ले गगनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या भुईबावडा गावातील प्रसिद्ध शिमगोत्सवाची आज, बुधवारी मोठ्या उत्साहात सांगता होत आहे. पांडवकालीन पर्यटन स्थळे आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या गावात पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला पारंपरिक ‘म्हानाड’ म्हणजेच ‘सरता खेळ’ पाहण्यासाठी कोकणासह मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भुईबावडा येथील श्री […]
रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई नाही असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असले तरी आजही अनेक गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. बुकींग करूनही ग्राहकांना सिलेंडर मिळालेला नाही. हॉटेल व्यवसायिकांनी सिलेंडर मिळत नसल्याने चुली पेटवल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर भूमिका घेऊन तात्काळ गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा युवासेनेने (उद्धव […]
दही-भात पोटाच्या आजारावर आहे रामबाण उपाय, जाणून घ्या खाण्याचे अगणित फायदे
आपल्या प्रत्येकाच्या घराघरांत आवडीने खाल्ला जाणारा दही-भात हा केवळ चविष्ट पदार्थ नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः उन्हाळ्यात हा पदार्थ शरीराला थंडावा देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतो. दहीमध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते. दही-भात खाल्ल्याने शरीराला […]
पाकिस्तान हा अमेरिकेसाठी सर्वात मोठ्या आण्विक धोक्यांपैकी एक, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांचे वक्तव्य
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी पाकिस्तानबाबत अत्यंत खळबळजनक आणि गंभीर विधान केले आहे. पाकिस्तान हा अमेरिकेसाठी सर्वात मोठ्या आण्विक धोक्यांपैकी एक असल्याचे गबार्ड यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात, विशेषतः दक्षिण आशियाई क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत ही भीती व्यक्त […]
अभिनेता राजपाल यादवला न्यायालयाचा दिलासा, 1 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव हा एका चेक बाऊन्स प्रकरणात अडकला आहे. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत अडकलेल्या राजपाल यादवला 1 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने प्रकरणाचे गांभीर्य आणि आतापर्यंत जमा झालेली […]
मार्लेश्वर हे केवळ श्रद्धास्थान नसून निसर्ग पर्यटणाचे मोठे केंद्र आहे.येथील भक्त आणि पर्यटकांची संख्या पाहता त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात हाच आमचा मानस आहे .१० कोटींची कामे वेगाने सुरु असून ३० कोटींच्या दुसरया टप्प्यामुळे मार्लेश्वर पर्यटनाचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास आमदार श्री शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणारया श्री क्षेञ […]
सध्या आपण एका अशा जगात वावरतोय जिथे AI चा वापर प्रत्येक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तरीही अजूनही काही जणांना या नवीन बदलाबद्दल माहीती नसल्याकारणाने अधिक चिंता वाटू लागते. अशीच एक घटना घडलीय दिल्लीमध्ये. दिल्लीस्थित उद्योजक रोहन धवन हा एक २४ वर्षांचा डेव्हलपर आहे. रोहनची वार्षिक कमाई ही ४० लाख असून, तो दिवसाला […]
मुंबईकरांची गर्दीतून सुटका करा, लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार संजय दिना पाटील यांची संसदेत मागणी
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची जीवघेणी गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रखडलेल्या सवलतींचा प्रश्न आज संसदेत घुमला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभेत मुंबईकरांच्या व्यथा मांडत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. “मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, लोकलच्या फेऱ्या वाढवणे आता अनिवार्य झाले आहे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. […]
१९ दिवस, २००० हून अधिक हल्ले; अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचे धडकी भरवणारे आकडे समोर
अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या इराणच्या युद्धाला आज १९ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र हा संघर्ष थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन आठवड्यांत दोन्ही बाजूंकडून २,००० पेक्षा जास्त हल्ले नोंदवले गेले असून, यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘एसीलेड’ (ACLED) या जागतिक स्तरावर युद्धाचा डेटा गोळा करणाऱ्या संस्थेच्या […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या इंग्रजी (UNLIKELY PARADISE) आवृत्तीच्या प्रकाशनाची तारीख समोर आली आहे. येत्या २३ मार्च रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मावळणकर हाॅल, काॅन्सिटट्युशन क्लब ऑफ इंडिया, रफि मार्ग, संसद मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता […]
चीन वाढवत आहे इराणची लष्करी शक्ती, अमेरिकेच्या अहवालाने जगभरात खळबळ
जागतिक राजकारणात चीन आणि इराणमधील वाढती जवळीक आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर पोहोचली आहे. अमेरिकेच्या एका ताज्या संरक्षण अहवालातून चीन आणि इराणमधील गुप्त लष्करी युतीची माहिती समोर आली असून, चीन इराणला प्रगत ड्रोन, रॉकेट तंत्रज्ञान आणि उपग्रह मार्गदर्शनासाठी मोठी मदत करत असल्याचे समोर आले आहे. या खुलाशामुळे पाश्चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आशिया […]
स्वयंघोषित हवामान तज्ञ दिशाभूल करणारा अंदाज लावत असल्याने, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामागे व्यापाऱ्यांचे कटकारस्थान आहे का याचा शोध घेऊन बोगस हवामान तज्ञवर कडक कारवाई करावी व हवामान अंदाज सांगण्यास बंदी करावी, अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. पंढरपूर तहसील कार्यालयावर आज शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कारवाई बाबत तहसीलदारांना निवेदन दिले. […]
अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ल्याने अहिल्यानगर हादरले; आरोपी अद्याप फरार
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण ॲसिड हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, घटना घडूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासासाठी पाच विशेष पथके नियुक्त केली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केला आहे. काल दुपारच्या सुमारास […]
राज्य विधिमंडळात महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर करण्यात आले असून, यामुळे जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण कर (Green Tax) थेट दुप्पट करण्यात आला आहे. परिणामी आता जुनी वाहने बाळगणे आणि नवीन इंधन-आधारित गाड्या खरेदी करणे ग्राहकांसाठी महाग पडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणास कारणीभूत ठरणारी जुनी वाहने […]
कसबा संगमेश्वरच्या शिंपणे उत्सवात लाल रंगाची मनसोक्त उधळण!
कसबा संगमेश्वर येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सवाचा खेळ आज बुधवारी अपूर्व उत्साहात, लाल रंगाची मनसोक्त उधळण करीत व मटण भाकरीच्या प्रसादाचे आस्वाद घेत संपन्न झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपर्यातू हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली. आज दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा – संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल लाल होऊन गेले होते. उत्सवासाठी असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे […]
हिमाचलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर ‘ड्रेस कोड’चे बंधन; जीन्स-टीशर्टवर बंदी, वाचा सविस्तर
हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पेहरावाचे कडक नियम लागू करण्यात आले असून, कार्यालयांमध्ये जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर राज्य सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. सरकारी कार्यालयांमधील व्यावसायिक शिस्त आणि कार्यालयीन मर्यादा जपण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या […]
Dapoli News –ऐतिहासिक दाभोळ बंदराकडे तब्बल १३९८ कासवांची पिल्ले समुद्राकडे सुरक्षितपणे झेपावली
दाभोळ गावाच्या समुद्र किनाऱ्यावर कासवांच्या संवर्धनासाठी एकुण ८३ घरटी संरक्षित केलेली आहेत. या संरक्षित केलेल्या कासवांच्या घरटयात एकुण ८३७२ कासवांची अंडी संरक्षित केलेली आहेत. त्यातील १३९८ पिल्ले सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली. कासवांच्या एकूण 7 प्रजाती आहेत. त्यापैकी 5 प्रजाती या आपल्या देशातील सागराच्या किनाऱ्यावर विशेष करून आढळतात. पश्चिम किनारपट्टीचा विचार केल्यास गुजरात व महाराष्ट्र […]
दुबई नको आता दिमापूरला जाऊ! हिंदुस्थानींचा वाढता ओढा देशांतर्गत पर्यटनाकडे
सध्या जगभरात युद्धाचे वारे घोंगावत असल्याने, आता हिंदुस्थानी पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाकडे पसंती दिली आहे. मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर, सुट्टी पडल्यानंतर कुठे जायचे यासाठी आता घरोघरी बेत रंगू लागले आहेत. परंतु सध्याच्या घडीला मध्यपूर्वेकडील युद्धजन्य परिस्थिती पाहता आता हिंदुस्थानातील लोकांचा वाढता ओढा हा देशांतर्गत सहलींकडे वळलेला आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या बुकिंगच्या ट्रेंडवरून असे दिसून येते […]
राज्याच्या महसूल विभागात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समोर आला असून, शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल १ ते १.५ लाख शेतकऱ्यांचे ७/१२ उतारे परस्पर बदलण्यात आल्याची धक्कादायक कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात […]
जिल्हा परिषद विषय सभापती निवड 25 मार्चला
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
हरीश राणा हे उदाहरण संपूर्ण हिंदुस्थानसमोर ताजे असतानाच, अजून एक अशीच हृद्याला पीळ घालणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील आनंद दीक्षित असे या मुलाचे नाव आहे. गेले २७ महिने हा मुलगा कोमात असून, याचे ४ कोटींचे बिल भरण्यासाठी आई वडिलांनी सर्वस्व पणाला लावले आहे. एका भीषण अपघातानंतर आनंद कोमात गेला आणि आजही त्याच अवस्थेत आहे. […]
तानाजी सावंतचे पुतणे अखेर भाजपावाशी
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला. सावंत कुटुंबातील ज्योतीताई धनंजय सावंत, संजय सावंत, सोहम सावंत, अजिंक्य सावंत यांच्यासह गौतम लटके, दत्तात्रय मोहिते, श्रजयदेव गोफणे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत पक्ष संघटनेला नवी ऊर्जा दिली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी, धनंजय सावंत, अनिल काळे, संताजी चालुक्य तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बिबीशन खुणे यांची निवड
परंडा (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बिबीशन खुणे यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 15 रोजी एम ई टी कॉलेज बांद्रा मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, ओबीसी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष सुभाष राऊत, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत आदी उपस्थित होते. बिभिषण खुणे यांच्या निवडीबद्दल परंडा तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
मुख्यमंत्री म्हणतात मागणीपेक्षा जास्त वीजनिर्मिती मग राज्यात लोडशेडिंग का- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- मागणीपेक्षा अधिक वीज निर्मिती आहे असं सरकार सांगत आहे. मग ग्रामीण भागातील नागरिकांना लोड शेडिंचा त्रास का सहन करावा लागत आहे? असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपले राज्य हे एनर्जी सरप्लस म्हणजे मागणीपेक्षा वीजनिर्मिती जास्त असलेले राज्य आहे. मग असे असताना ग्रामीण भागामध्ये वाड्या, वस्त्यावर संध्याकाळी चार तास व सकाळी चार तास सिंगल फेजची विज कपात केली जात आहे. ज्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या काळात तब्बल आठ तास लोड शेडिंग चा त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळी सहा ते दहा तर सकाळी पाच ते नऊ या काळात लोडशेडिंग होत आहे.शिवाय शेतीपंपाची ही वेगळी परिस्थिती नाही 24 तासांपैकी फक्त तीन ते चार वीज असते त्यातही पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही. त्या चार तासांमध्येही अनेकदा वीज जात असल्याचं चित्र आहे. यावर सरकारने लक्ष द्यावे व ग्रामीण भागात लोड शेडिंगमुळे नागरिकांना विजेचा जो त्रास होत आहे तो थांबवावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली आहे. शेती पंपालाही पुरेशा दाबाने व नियमित वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
इराण –अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत सामूहिक प्रार्थना
आज सायंकाळी ७.०० वाजता सर्वोदयनगर गार्डनमध्ये आयोजन सावंतवाडी : प्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या इराण – अमेरिका युद्धाच्या भीषण परिणामांची झळ संपूर्ण जगाला बसत असून विशेषतः युद्धग्रस्त भागातील निरपराध लहान मुलांची मानसिक अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. या वेदनादायी परिस्थितीची जाणीव ठेवत सर्वोदय नगर रहिवाशांच्या वतीने विश्वशांतीसाठी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या [...]
आमदार राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे- सोमनाथ गुरव
धाराशिव (प्रतिनिधी)- राणा पाटील गेल्या दहा वर्षापासून तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत सत्तेत आहेत. तरीही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडलेले दिसत नाहीत. दुसरीकडे देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार ओमराजे निंबाळकर हे जनतेचे प्रश्न मांडत असून त्यावरही आता राणा पाटील यांच्या पोटात दुखत असल्याचे प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. यावेळी गुरव म्हणाले की, या जिल्ह्यामध्ये जे काही होईल ते फक्त राणा पाटलाच्या मर्जीनेच व्हायला हवे अन्यथा ते होणार नाही अशीच मानसिकता भारतीय जनता पार्टीची व राणा पाटील यांची आहे. याच विकृत मानसिकतेचे दर्शन पुन्हा एकदा भाजपने दाखवला आहे. लोकसभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे प्रश्न मांडून निधीची मागणी केली. त्यावर भाजपच्या वतीने व राणा पाटलाच्या सांगण्यावरून प्रतिक्रिया देण्यात आली. उलटपक्षी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरच खोडा घालण्याचा आरोप केला. खोडा घालण्याचा व स्थगिती देण्याचा व्यवसाय राणा पाटील यांचा आहे आणि ते सातत्याने करत असतात. जनतेच्या प्रति कोणत्याही प्रकारची बांधिलकी नसलेल्या राणा पाटील यांनी विकासावर बोलावं एवढी त्यांची नैतिकता नाही. तुमच्यावर लोकांचा एवढा विश्वास असता तर तुमच्या सौभाग्यवतींना तीन लाख 29 हजारने पराभवाचा सामना करावा लागला नसता. कशाच्याही कामाचे श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे हा अट्टाहास राणा पाटील करत आहेत. लोकप्रतिनिधीचे जे काम आहे ते प्रामाणिकपणे करण यामध्ये कोणी कितीही आडकाटी आणली तरी ओमराजे निंबाळकर हे जनतेच्या जीवावर राजकारण करतात. त्यांच्यासाठीच काम करतात त्यामुळे अशी कितीही कोल्हेकुही केली तरी त्याचा ओमराजेंवर कसलाही फरक पडणार नाही याची दक्षता राणा पाटील व त्यांच्या गड्यांनी घ्यावी असे आवाहन देखील सोमनाथ गुरव यांनी केले आहे. राहिला प्रश्न रेल्वेच्या कामासंदर्भात तर 2014 ते 19 या काळात तुमचं सरकार खासदार देखील सत्ता पक्षातला असतानाही त्या काळात किती रुपयांचं काम झालं याचंही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते व राज्यात मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीसच होते मग तेव्हा तुमचे हात कुणी बांधले होते का असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटील यांना विचारला आहे.2019 ला ओमराजे खासदार झाल्यानंतरच हा प्रश्न सातत्याने अधिवेशनात तसेच वेळोवेळी रेल्वेमंत्री यांना अवगत करून त्याचा पाठपुरावा केला म्हणूनच आत्तापर्यंतच काम दिसत आहे. आपल्याशिवाय जगात कुणाला काही कळत नाही हा जो अविर्भाव आहे तो राणा पाटलांनी त्यांच्याजवळ ठेवावा. खासदार म्हणून ओमराजे यांना जनतेने निवडून दिलेल आहे आणि जनतेसाठी ते काम करतच राहणार आहेत. तुमच्या कितीही पोटात दुखले तरी तो तुमचा प्रश्न असल्याचे गुरव यांनी सांगितले.
संविधान जनजागृती झालीच पाहिजे- अजिनाथ राऊत
भूम (प्रतिनिधी)- सन 2024 -25 हे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचे शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे. शासनाने यासंबंधी वर्षभराचा कृती आराखडा व वार्षिक वेळापत्रकानुसार संविधानाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याचे व त्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे सांगितले होते. परंतु या कार्यक्रमांची प्रत्येक ठिकाणी अंमलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये भरारी पथकाची निर्मिती केलेली आहे. सदर भरारी पथकाने भेट दिली व वर्षभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच पुढील कार्यक्रमाची दिशा सांगितली. कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी नाही झाली तर संबंधित शाळा प्रमुखांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत असे सांगितले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ राऊत तसेच तालुका अध्यक्ष श्याम पालके यांनी भेट देऊन संपूर्ण शासन निर्णयांची माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. यावेळी मान्यवरांचा बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन पायघन यू. पी. यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
ऑनलाईन गेलेली दीड लाख रूपयांची रक्कम परत मिळाली
धाराशिव (प्रतिनिधी)- सोयाबीन विकल्यानंतर व्यवहारादरम्यान चुकून भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले 1 लाख 54 हजार रुपये परत मिळवून देण्यात धाराशिवच्या सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि योग्य कायदेशीर पाठपुराव्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर ही रक्कम तक्रारदार महिलेला परत मिळाली आहे. त्याबद्दल सायबर विभागाच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. किणी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी पूनम दीपक दंडनाईक यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव येथील अडत बाजारात आपले सोयाबीन विकले होते. यावेळी पैशांचा ऑनलाइन व्यवहार करताना त्यांच्याकडून चुकून भलत्याच ‘स्कॅनर’वर 1 लाख 54 हजार रुपये पाठवले गेले. ही चूक लक्षात आल्यावर पूनम यांनी त्या अज्ञात नंबरवर संपर्क करून पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे बुडाल्याची भीती निर्माण झाल्याने पूनम यांनी तात्काळ तक्रार दाखल केली. या तक्रारीची धाराशिव सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तातडीने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून अज्ञात व्यक्तीच्या खात्याची माहिती मिळवली. तक्रार वेळेत प्राप्त झाल्याने पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत त्या अज्ञात खात्यावरील रक्कम तत्काळ ‘फ्रीझ केली. रक्कम फ्रीझ झाल्यानंतर ती पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात वळती करण्यासाठी बँकेने न्यायालयाच्या आदेशाची मागणी केली. यावर सायबर पोलिसांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाचा आदेश बँकेला सादर केला. या सर्व प्रक्रियेनंतर अखेर मंगळवारी (ता. 17 मार्च 2026) पूनम दंडनाईक यांना त्यांचे हक्काचे 1 लाख 54 हजार रुपये परत मिळाले. आपली कष्टाची रक्कम परत मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांचे विशेष आभार मानले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे पोलिस निरीक्षक शकील शेख, पोशि गाडे, पोशि सुर्यवंशी यांनी केला आहे.
पवनचक्कीच्या तार चोरणारी टोळी जेरबंद
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम ताराची चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 75 हजार किंमतीच्या 750 किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पवनचक्की तार चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक मंगळवारी (ता. 17 मार्च) गस्तीवर होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, बालाजी ऊर्फ आवड्या अजिनाथ शिंदे (वय 24) आणि शहाजी भीमराव शिंदे (वय 32, दोघे रा. मांडवा, जि. धाराशिव) यांच्याकडे पवनचक्कीतून चोरी केलेल्या ॲल्युमिनियमच्या तारा असून, तो मुद्देमाल त्यांनी लपवून ठेवला आहे. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही संशयितांना मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी तुळजापूर आणि वाशी तालुक्यातील नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी, जिन्नर आणि दहिफळ शिवारातील पवनचक्कीच्या खांबांवरून या तारा चोरल्याची कबुली दिली. धाराशिव जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे एकूण 8 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा तात्काळ पंचनामा करून त्यांच्याकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या दोन आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे आणि चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या सर्व आरोपींनी मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अटकेतील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, महिला पोलिस हवालदार शोभा बांगर, पोलिस नाईक अशोक ढगारे, पोलिस शिपाई योगेश कोळी, चालक नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.
महिलांचे खंबीर नेतृत्व ठरले प्रेरणास्थान
धाराशिव (प्रतिनिधी)- गावागावात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या अर्चनाताई पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शशिकल पाटील, अनिता तोडकर व किरण निंबाळकर यांनी अर्चनाताई पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्चनाताई पाटील यांच्या पुढील कार्यकाळात महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास व विविध सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्यातील महिलांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी 27 मार्चला विशेष बैठक
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 मधील कलम 83 तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष/उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती/उपसभापती) (आरक्षण व निवडणूक) नियम 1962 मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत घेणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीसाठी दि.27 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात,महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 मधील कलम 83 तसेच संबंधित नियमांनुसार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश जारी केला आहे.या आदेशान्वये विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी होणाऱ्या विशेष बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,धाराशिव श्री.ओंकार देशमुख यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न- ॲड भोसले
धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतःचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी रेल्वेमार्गाच्या कामात असंख्य अडथळे आणले, आणि आता काम प्रगतीपथावर असताना लोकसभेत मागणीचे नाटक करून त्याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा हा केविलवाणा स्टंट आहे. अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न अशा शब्दांत भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदारांच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा करीत सडकून टीका केली आहे. वरातीमागून घोडे दामटणाऱ्या खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. ॲड भोसले यांनी थेट वार करताना म्हटले की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 50 टक्के वाटा निश्चित झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या हिश्याची रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी खासदारांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे पाठपुरावा का केला नाही? असा खोचक सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे. ठाकरेंच्या या आडमुठ्या धोरणामुळेच प्रकल्पाची किंमत तब्बल दोन हजार कोटी रुपयांनी वाढली आणि कामाला विलंब झाला, असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रकल्प जाहीर केला. या रेल्वेमार्गासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिशाभूल करणारी माहिती दिल्यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला होता. राज्यात महायुतीचे सरकार येताच आमदार पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून राज्याच्या वाट्याची रक्कम मंजूर करून घेतली. आज धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच इंजिन ट्रायल होईल. आई तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस धावत येईल. ठाकरे सरकारच्या काळात राज्याचा वाटा मिळाला असता तर एव्हाना हा प्रकल्प पूर्णही झाला असता. महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच आज प्रकल्प प्रगतीपथावर आहे. स्वतःच्या सत्ताकाळात काहीच करता आले नाही. आता महायुती सरकारने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी खासदारांची स्टंटबाजी सुरू आहे. लोकसभेत या मार्गासाठी एक हजार कोटींची मागणी करणे ही केवळ नौटंकी आहे. जेव्हा स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना निधी रोखला गेला, तेव्हा खासदार मूग गिळून का.गप्प बसले होते ? आता काम पूर्णत्वाकडे जाताना श्रेयासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा टोलाही भोसले यांनी लगावला. ज्यांनी प्रकल्पाला खीळ घातली, तेच आता श्रेयाचा टाहो फोडत आहेत. धाराशिवची जनता सुज्ञ असून खासदारांचा हा वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार सगळ्यांना माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी
धाराशिव (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (आरपीआय-डे)च्या धाराशिव महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका राजेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रमुख राज धज यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि. 17 मार्च) आयोजित पक्षाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. निवडीनंतर बोलताना बालिका सूर्यवंशी यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून जिल्ह्यात महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख राज धज, दिनेश बाबुराव खळे, हनुमंत भीमराव सूर्यवंशी, सुभाष विठ्ठल देवकर, कुमार शिवाजी गायकवाड, अनिल वाघमारे, संतोष धावारे, हाफेज ढलूज, सत्यम गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांचा मृत्यू, इस्रायली संरक्षण दलाकडून मारले गेल्याचा दावा
मध्यपूर्वेतील युद्ध आता आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. इस्रायलने एक मोठा दावा करत जगाला हादरवून सोडलं आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इजराइल कार्टज् यांनी सांगितलं की, इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खतिब यांचा हवाई हल्ल्यात खात्मा करण्यात आला आहे. हा हल्ला रात्रीच्या अंधारात करण्यात आला होता. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी थेट इराणच्या सत्ताकेंद्रावर प्रहार केला. मात्र, इराणकडून […]
Solapur News |दुर्गंधीचा विळखा आणि कचऱ्याचे ढीग! सोलापूर शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर; नागरिक त्रस्त
सोलापूरचा श्वास गुदमरला! सोलापूर -शहरातील घनकचरा व्यवस्थापन कुचकामी ठरल्याने कचरा आणि दुर्गंधीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रोज सुमारे ४२० टन कचरा निर्मिती होत असताना, सुमारे २० टक्के कचरा (सुमारे ७०-८० टन) [...]
१५ एप्रिलपर्यंत पूर्णवेळ ग्रामसेवक न मिळाल्यास धरणे आंदोलन
इन्सुलीतील सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांचा इशारा प्रतिनिधी बांदा इन्सुल येथील ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे कोलमडला असून, प्रशासकीय कामांचा खोळंबा होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वागत रघुवीर नाटेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, १५ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्णवेळ ग्रामसेवक न मिळाल्यास पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा [...]
उन्हाळ्यात वाळ्याचा वापर करण्याचे आरोग्यवर्धक फायदे
वाळा हे एक सुगंधी गवत असून, त्याच्या वाळलेल्या मुळांचा वापर मुख्यत्वे उन्हाळ्यात नैसर्गिक थंडावा मिळवण्यासाठी केला जातो. हे सुगंधी, उष्णताश्मक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे. माठातील पाणी थंड करण्यासाठी तसेच सरबत बनवण्यासाठी, तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुगंधी तेल आणि अत्तर बनवण्यासाठी वाळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाळ्यामध्ये शीतलता असल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान तसेच शरीराला […]
आइसक्रीम की फ्रोजन डेजर्ट या उन्हाळ्यात नक्की काय खाताय? जाणुन घ्या
उन्हाळा सुरू होताच आपल्याला थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणुन उन्हळ्यात ज्यूस, आणि आइसक्रीमची मागणी वाढते. अनेकदा आपण आवडीने पॅकेज केलेले आइसक्रीम घरी मागवून खातो. पण तुम्हाला माहित आहे का, बहुतेक वेळा आपण आइसक्रीम एवजी फ्रोझन डेझर्ट्सच खात अहोत. खरे तर, आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समधील फरक फार कमी लोकांना समजतो. दुकानदार अनेकदा गिऱ्हाईकांना माहिती न […]
मालवण बाजारपेठ मार्गांवरून निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणचे आयोजन मालवण | प्रतिनिधी घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताशांच्या गजरात भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे [...]
इस्रायली हवाई हल्ल्यात इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख अली लारीजानी यांचा मृत्यू झाल्याने पश्चिम आशियात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर इराणने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, या संघर्षासाठी थेट अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, एखाद्या नेत्याच्या जाण्याने इराणची रणनीती बदलणार नाही आणि हा संघर्ष यापुढेही […]
Solapur |किल्लारीचे वैभव सरले! द्राक्ष बागा जमीनदोस्त, हजारो मजूर कामाच्या शोधात परजिल्ह्यात
किल्लारी परिसरात रोजगाराचे भीषण संकट किल्लारी – अनेक वर्षांपासून हाताला काम नसल्याने किल्लारी व परिसरातील हजारो तरुण कामाच्या शोधात पुणे, मुंबईकडे रवाना तर कांहीजण द्राक्ष छाटणी, पेष्ट, खरह छाटणी अशा विविध कामांसाठी तरुण व महिला वर्ग कामाच्या शोधात पंढरपूर, [...]
सोलापूर हादरले! कोंडीतील ‘कॅसिनो’ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २१ जणांवर गुन्हा
ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्याचा धिंगाणा; ११ महिलांसह ९ ग्राहक ताब्यात सोलापूर- सोलापूर पोलीस अधिकारी यांचे पथक व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील कॅसीनो ऑकस्ट्रा बारवर कारवाई करून २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कारवाईत पोलिसांनी पाच लाख १२ हजार [...]
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
विलवडेत तहसीलदारांच्या बंदीनंतरही सुरुंग स्फोटांचा थरकाप प्रतिनिधी बांदा सावंतवाडी तहसीलदारांनी दिलेले स्थगितीचे आदेश हवेत विरतात न विरतात, तोच विलवडे परिसरात पुन्हा एकदा सुरुंग स्फोटांचा धडाका सुरू झाला आहे. मंगळवारी तहसीलदारांनी सर्व खाणींचे काम बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले असतानाही, आज बुधवारी (१८ मार्च) सकाळपासून तब्बल ११ स्फोट घडवून आणल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.विलवडे [...]
नावातील किरकोळ चूक भरपाई नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नावात किरकोळ चूक असल्याच्या कारणावरून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तीला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रेल्वेला संबंधित कुटुंबाला व्याजासह भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एका जुन्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांनी भरपाईसाठी अर्ज केला […]
युद्धग्रस्त इराणला हिंदुस्थानचा मदतीचा हात, पाठवली मोठी वैद्यकीय मदत
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या इराणच्या मदतीसाठी हिंदुस्थान धावून आला आहे. हिंदुस्थनांने इराणला औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप पाठवली असून, ही मदत इराणी रेड क्रिसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या मदतीबद्दल इराणने हिंदुस्थानी नागरिकांचे जाहीर आभार मानले आहेत. इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय मदतीचा हा पहिला साठा यशस्वीरीत्या इराणमध्ये पोहोचला […]
दागिने चोरी प्रकरणातील संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मालवण । प्रतिनिधी मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्यामधील संशयित अमृता अमर म्हापणकर रा. कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत रा. सुकळवाड ता. मालवण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओरोस यांनी फेटाळला. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता संदीप राणे यांनी बाजू मांडली. मुळ फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण [...]
तोतया अधिकारी भासवून खऱ्या आयएएस अधिकाऱ्याला अटक, कागदपत्रे समोर आल्यानंतर पोलिसांचे मौन
तोतया अधिकाऱ्याच्या अटकेमुळे मेरठमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तोतया अधिकारी असल्याचे भासवून राहुल कौशिक यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर कौशिक यांनी कागदपत्रे सादर करत आपण खरे आयएएस अधिकारी असल्याचा दावा केला आहे. यामुळे हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र याबाबत मौन बाळगून आहेत. मेरठ पोलिसांनी 12 मार्च रोजी […]
Gudhi Padwa |गुढी उभारण्याची परंपरा; ब्रह्मध्वजाचे महत्त्व जाणून घ्या
१९ मार्चला ‘गुढीपाडवा’; यंदा ‘पराभव’ संवत्सराचा प्रारंभ सोलापूर – सोलापूर महाराष्ट्रासह देशभरात हिंदू नववर्षाचीसुरुवात मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा सण यंदा गुरुवारी १९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदा अमावस्या समाप्तीनंतर सकाळी ६:५४ पासून शालिवाहन शक १९४८ या नवीन संवत्सराची सुरुवात होणार असून या [...]
बरगाव ग्रामपंचायतीचे ‘लाचखोर’ अधिकारी पोलिसांच्या ताब्यात सोलापूर -पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांना तक्रारदाराकडून [...]
निरवडेत ३ , ४ एप्रिलला महोत्सवाचे आयोजन
गणेश मेस्त्रीं, नागेश आडगावकरांसह कलाकारांची उपस्थिती न्हावेली /वार्ताहर कोकणच्या मातीतील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा ‘निरवडे महोत्सव २०२६’ पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. निरवडे ग्रामस्थ व श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा दोन दिवसीय सांस्कृतिक महाकुंभ येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी निरवडे, माळकरवाडी येथे रंगणार असून, या महोत्सवासाठी [...]
सातार्यात रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडी सातारा – पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यान रस्त्याचे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असल्याने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी [...]
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच! महाविकास आघाडीत अध्यक्षपदासाठी ‘शितयुद्ध’सुरू.
सातारा झेडपीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? सातारा – सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागल्याने महाविकास आघाडीमध्येच अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन शितयुद्ध सुरु झालेले आहे. दोन दिवसांनी झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी की भाजपाचा झेडपी [...]
देशात एलपीजी-पीएनजी पुरवठा सुरळीत, नागरिकांना PNGकडे वळण्याचे सरकारचे आवाहन
देशातील ऊर्जा पुरवठा आणि स्वयंपाकाच्या गॅस वितरणाबाबत झालेल्या इंटर-मिनिस्ट्रियल ब्रीफिंगमध्ये केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण माहिती दिली. सरकारने स्पष्ट केले की घरगुती एलपीजी आणि पीएनजीचा पुरवठा कोणत्याही कपातीशिवाय सुरळीत सुरू आहे. मात्र, भविष्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत सर्व राज्यांना 10% अतिरिक्त कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जग लाडकी हे हिंदुस्थान-ध्वजांकित तेलवाहू जहाज बुधवारी मुंद्रा बंदर येथे सुरक्षितपणे दाखल झाले. या जहाजातून सुमारे 80,886 मेट्रिक टन ‘Murban crude’ तेल संयुक्त अरब अमिरात येथून आणण्यात आले. पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत असताना, विशेषतः अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर […]
इराण युद्धाचा परिणाम! ट्रम्पने अचानक चीन दौरा पुढे ढकलला, जागतिक राजकारणात खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा महत्त्वाचा बीजिंग दौरा अचानक पुढे ढकलला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर आले आहे. याआधी हा दौरा मार्चअखेरीस होणार होता. परंतु आता हा दौरा पुन्हा एक ते दीड महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांच्यासोबत व्यापार, तंत्रज्ञान आणि तैवानसारख्या […]
वाईची शान धोक्यात! पसरणी घाट वणव्याने होरपळला; वाई – समाज कंटकांनी लावलेल्या आगीत पसरणी घाटातील तब्बल तेरा किलोमटीर परिसरातील वन संपदा जळून खाक झाली आहे. नागेवाडी धरण परिसरासह संपूर्ण पसरणी घाटात पसरलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागासह [...]
कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत कोकणवासीयांनी आता थेट कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देण्याची तयारी केली आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरु करा, अन्यथा ‘महाराष्ट्र दिनी’ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवाशांतर्फे ‘जल फाऊंडेशन’ या संस्थेने दिला आहे. गेल्या 30 वर्षे कोकणवासीयांच्या […]
वर्सोवा-भाईंदर जोडरस्त्याच्या प्रकल्पावरून पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विधानसभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारची पोलखोल केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पासाठी सुमारे 45 हजार खारफुटी वनांची कत्तल होणार आहे. तसेच 13 लाख 70 हजार खारफुटी झाडांचे स्थानांतरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, […]
Nepal Helicopter Crash –नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान संतुलन बिघडले
लँडिंग करताना संतुलन बिघडल्याने हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना नेपाळमध्ये घडली. हे हेलिकॉप्टर काठमांडूहून खोतांग जिल्ह्यात आले होते. यात पायलटसह एकाच कुटुंबातील पाच जण होते. हे कुटुंबीय नातेवईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. अपघातात एका व्यक्तीला किरकोळ जखम झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पायलटसह सर्वजण सुखरुप आहेत. बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. […]
कवठेमहांकाळमध्ये जुन्या वादातून तुफानी हाणामारी कवठेमहांकाळ -घाटनांद्रे येथे जुन्यावादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये सोमवारी झालेल्या तुफानी हाणामारीत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात आरोप करत परस्परविरोधी कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत.सोमवारी हा प्रकार दोन टप्प्यांत घडला. पहिली घटना सायंकाळी घाटनांद्रेच्या वेशीजवळ, तर दुसरी घटना रात्री ८ ते [...]
Nanded News –देगलूर तालुक्याला पावसाने झोडपले, पिकांचे अतोनात नुकसान
देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्तासह पंचपुरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वार्याचा तडाखा बसल्याने रब्बी पिकासह फळबाग, आंबा, टरबूजचे मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वार्याचा नांदेड जिल्ह्यात इशारा दिला होता. १६ तारखेला दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता परिसराला गारपीटचा मोठा तडाखा बसला आहे. वादळी वार्यासह […]
आटपाडी हादरले! प्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा
आटपाडीतील ‘जवळे ज्वेलर्स’च्या मालकावर गुन्हा सांगली -व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी आटपाडीतील प्रसिध्द सराफ व्यवसायिकावर गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून प्रसाद भारत जवळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पिडीतच्या फिर्यादीनुसार ती आणि तिचे कुटुंबिय आटपाडी [...]
चैत्रातील उत्सवाच्या स्वागतासाठी जेजुरीत सुगंधी दवण्याची शेती बहरली
>> प्रकाश खाडे श्रीक्षेत्र जेजुरी परिसरातील देवमळा येथील शेतात सध्या सुगंधी दवणा पूर्णपणे फुलोऱ्यात आला आहे. वाऱ्यासोबत दरवळणारा हा मनमोहक सुगंध केवळ परिसरातच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रात चैत्रमासाच्या आगमनाची आणि हिंदू नववर्षाच्या उत्साहाची चाहूल देत आहे. जेजुरी परिसरातील दवणा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा भगवान शंकराचा अवतार मानला जातो ,या देवाला भंडार-खोबरे बेल याच्याबरोबरच […]
हिंदुस्थान सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत असून जागतिक ऊर्जा बाजारात मोठे बदल दिसत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील पुरवठ्यात अडथळे, तसेच अमेरिका-इराण युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे हिंदुस्थानने रशियन तेल खरेदी वाढवली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हिंदुस्थान इतक्या मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल खरेदी करत आहे की चीनकडे जाणारी काही तेलवाहू जहाजेही मार्ग बदलून हिंदुस्थानकडे […]
दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सोमवारी रात्री एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देण्यात आलेल्या जेवणात बुरशी आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांनी आक्षेप नोंदवला असता, विमानातील केबिन क्रूने त्यांच्याशी कथितरीत्या गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे लँडिंग […]
Iran War –अली लारीजानी यांच्यासह मुलाचाही मृत्यू, इराणकडून शवपेटीचा फोटो समोर
इराणमध्ये सध्या संतापाची लाट मोठ्या प्रमाणात उसळली आहे. अली लारीजानी आणि त्यांचा मुलगा मोर्तेझा लारीजानी यांच्या पार्थिवाचा पहिला फोटो समोर आला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या शवपेट्या एकत्र ठेवल्या असून, घडलेल्या या घटनेने इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अली लारीजानी हे सचिव होते. […]
अजित दादांच्या अपघाताला क्रिमिनल अँगल, नवीन पुराव्यांसह रोहित पवार पत्रकार परिषद घेणार
विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात क्रिमिनल अँगल असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “अनेक दिवसांपूर्वी अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी […]
सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा कहर; २५ नागरिकांचा घेतला चावा
नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून शासकीय विश्रामगृहाजवळील बांदेकर खानावळ परिसरात एका आक्रमक कुत्र्याने तब्बल वीस ते पंचवीस नागरिकांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली [...]
विलवडेतील क्रशर्सना परवानगी दिलीच कोणी ?
पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल सावंतवाडी । प्रतिनिधी वाफोली , विलवडे गावांमध्ये लघुपाटबंधारे धरणापासून नजीकच असलेल्या दगडखाणींमध्ये दिवसाच नव्हे तर रात्री -मध्यरात्री ब्लास्टिंग केले जात आहे. क्रशर्समधील मशिनरींच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप उडालेली आहे.अनेक वृद्ध ग्रामस्थांना, लहान मुलांना आणि महिलांना रक्तदाब,दमा असे आजार जडलेले आहेत. एखाद्या धरण प्रकल्पाच्या एवढ्या जवळ अशा पर्यावरण विघातक प्रकल्पांना मुळात [...]
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाने फक्त राजकारण ढवळून निघाले नाही. तर अनेकांच्या भावना देखील या युद्धासोबत जोडल्या गेल्या आहेत. ईदसारखा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. परंतु विमान तिकीटांचे वाढते दर, यामुळे आखाती देशांत काम करणारे अनेक हिंदुस्थानी घरी परतण्याऐवजी परदेशातच अडकून पडले आहेत. महिन्यांपूर्वीच ईदसाठी हिंदुस्थानात परतण्याची तयारी करणाऱ्या, सर्वांचेच नियोजन एका क्षणात […]
ट्रम्प यांची क्युबावर ‘वक्रदृष्टी’! कोणत्याही परिस्थितीत ताबा मिळवणार, ट्रम्प प्रशासनाचा इशारा
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा क्युबाकडे वळवला आहे. या कॅरेबियन देशावर नियंत्रण मिळवण्याचे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. सोमवारी ओवल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी क्युबाबाबत अत्यंत आक्रमक भाष्य केले. क्युबावर कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत ताबा मिळवणे हा आपल्यासाठी एक सन्मान असेल आणि आपण या देशाबाबत […]
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात सर्वप्रथम इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर लारीजानी यांनीच अमेरिका विरुद्धच्या युद्धाची सूत्रे हाती घेतली होती. पण मंगळवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्यासह 300 सैनिक मारले गेले. अली लारीजानी यांच्या निधनानंतर संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या पुढील भूमिकेकडे आहे. असे असताना […]
Sangli News |सांगली जिल्हा न्यायालय आवारात थरार! इलेक्ट्रिक दुचाकीचा भडका, दोन गाड्या खाक.
सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी वाहने पेटली सांगली – सलग दुसऱ्या दिवशी जिल्ख्यात वाहन पेटले. जिल्हा न्यायालयाच्या आवारात ही घटना घडली. जिल्हा न्यायालय आवारात इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला त्या दुचाकीची आग आटोक्यात येईपर्यंत त्याच्याजवळ असणारी दुसरी दुचाकी पेटली आणि दोन दुचाकी [...]
पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात, कंटेनर कारवर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी
पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात एक कंटेनर कारवर कोसळल्याने भीषण अपघात घडला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर नवीन बोगद्याजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या […]
सांगोल्यात दहावीच्या भूगोल पेपरची चोरी सांगोला – सांगोला येथील बिद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथील स्ट्रॉग रूमचे कुलूप कटरने तोडून अज्ञात चोरट्याने वहाबी भूगोलाच्या ५० पेपरचा गहा चोरून नेला. ही घटना मंगलबार, १७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. आज १८ मार्च [...]
विमान प्रवाशांना मोठा दिलासा, 60 टक्के सीट निवडताना कुठलेही शुल्क लागणार नाही
हिंदुस्थानातील विमान प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. सीट निवडीसाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कावर निर्बंध आणत केंद्र सरकारने विमान कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने हे निर्देश जारी केले असून, नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) मार्फत त्याची अंमलबजावणी होणार आहे. 60 टक्के सीट मोफत निवडीसाठी नवीन नियमांनुसार, प्रत्येक उड्डाणात किमान 60 टक्के सीट […]
धुवाधार पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले
सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटचा मारा : विद्युतखांब-झाडांची पडझड, मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची उडाली तारांबळ बेळगाव : सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि गारपिटीसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने मंगळवारी शहर परिसरासह ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे पडण्यासह फांद्या तुटून पडल्या. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची [...]
Iran War –लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणचा जोरदार पलटवार; इस्रायलवर केला क्षेपणास्त्रांचा वर्षाव
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता अधिक उग्र वळण घेतले असून, इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणने तीव्र प्रत्युत्तर देत इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले आहेत. लारिजानी यांच्या मृत्यूनंतर इराणने ‘बदला’ घेण्याची भूमिका स्पष्ट करत इस्रायलवर एकाच वेळी अनेक […]
झाड कोसळल्याने रेल्वेसेवा खोळंबली
पहिले रेल्वेगेटनजीकचा प्रकार बेळगाव : जोरदार पावसाचा परिणाम मंगळवारी रेल्वेसेवेवरही झाला. टिळकवाडी परिसरात एक वृक्ष वीजवाहिन्यांवर कोसळल्याने रेल्वेचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे तासभर बेळगाव रेल्वेस्थानकातील वाहतूक खोळंबली. राणी चन्नम्मा एक्स्प्रेस बेळगाव रेल्वे स्थानकात अर्धातास थांबून होती. रात्री उशिरापर्यंत रेल्वेकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्याने केवळ एकाच मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू होती. मंगळवारी दुपारनंतर बेळगाव शहरात सोसाट्याच्या [...]
विद्युतखांब-वीजवाहिन्यांचे प्रचंड नुकसान
शहरात 35 ते 40 विद्युतखांब कोसळले : मध्यरात्रीपर्यंत हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम बेळगाव : मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने हेस्कॉमला जोरदार दणका दिला. वाऱ्यामुळे झाडे-फांद्या कोसळून विद्युतवाहिन्या व खांबांचे नुकसान झाले. शहरात 35 ते 40 विद्युतखांब कोसळल्याने मध्यरात्रीपर्यंत हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. शहापूरमधील जोशी गल्ली परिसरात वीजखांबांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर किल्ला व हरीकाका कंपाऊंड [...]
प्रॉपर्टी परेडमध्ये साडेसहा कोटींचा मुद्देमाल मालकांना सुपूर्द
पोलीस आयुक्तालयातर्फे विविध प्रकरणांचा तपास बेळगाव : पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मंगळवार दि. 17 रोजी पोलीस परेड मैदानावर प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चोरी, चेनस्नॅचिंग, घरफोडी आणि वाहन चोरी प्रकरणांचा तपास करून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालकांकडे सुपूर्द करण्यात आला. सुमारे 6 कोटी 36 लाख 93 हजार 743 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून संबंधितांना परत [...]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राज्यातील विविध विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे आणि नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होत असल्याचा आरोप केला. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत एका पुलासाठी तब्बल 45,000 कांदळवनाची झाडं तोडली जात आहेत, तर गोल्फ कोर्ससाठीही खारफुटीची […]
कागल सीमा नाक्यावर तणाव कागल – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरअपघातांच्या मालिकेनंतर करण्यात आलेल्या वाहतूक बदलांच्या विरोधात काल कागल सीमा तपासणी नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मागील आंदोलनावेळी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सीमा तपासणी [...]
इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर पाकिस्तानला महाग पडेल, क्रिकेटपटूचा पाकड्यांना इशारा
पाकिस्ताने मंगळवारी पहाटे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर व 250 हूनअधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. या हल्ल्याचा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा क्रिकेटपटू अल्लाह गझनफर याने पाकिस्तानला फटकारले आहे. गझनफरने सोशल मीडियावरून एक पोस्ट […]
क्रिकेटचा खेळ ठरला जीवघेणा! शिरढोणमध्ये किरकोळ वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला
शिरढोणमध्ये क्रिकेटच्या वादातून भीषण हाणामारी कुरुंदवाड – कुरुंदवाडशिरढोण (ता. शिरोळ) येथे घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या शुल्लक वादावादीचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन शेतकऱ्याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला करून जखमी केले. याबाबत जखमी शेतकरी प्रकाश राऊ भंडारे (वय ४०, रा. शिरढोण) यांनी कुरुंदवाड पोलिसात [...]

26 C