ICC T20 World Cup सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने ने झिम्बाब्वेवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 254 धावांचा डोंगर उभारला. हा टी-20 विश्वचषक इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च संघस्कोर ठरला. आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची घसरगूंडी झाली […]
20 वर्षांत 200 वाघांची अवैध शिकार
आरटीआयमधून खुलासा : मध्यप्रदेशात सर्वाधिक प्रमाण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टायगर स्टेट म्हणून मध्यप्रदेशला ओळखले जाते, भारतात सर्वाधिक वाघ याच राज्यात आढळून येतात, परंतु 20 वर्षांमध्ये याच राज्यात वाघांची सर्वाधिक अवैध शिकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून झाला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोकडून प्राप्त [...]
जवस खाण्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात
जवस हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाते. लहान जवसाच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि ते अनेक आरोग्य फायदे देतात. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराला असंख्य फायदे देतात. आहारात जवसाचे सेवन केल्याने कोणते रोग कमी होऊ शकतात आणि त्यात कोणते पोषक घटक आहेत हे जाणून घेऊया. जवस […]
केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नवीन व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसने आता थेट रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे. या कराराचा निषेध करण्यासाठी उद्या, मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसतर्फे भव्य ‘किसान महाचौपाल’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करणार असून, या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात जोरदार […]
एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत नाव जोडले जाणे लाजिरवाणे, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत नाव जोडले जाणे, हे लाजिरवाणे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार, अदानी प्रकरण आणि एपस्टीन फाइल् करत राहुल गांधी म्हणाले की, “मोदीजी, तुम्ही लाजेबद्दल बोलत आहात? मी तुम्हाला […]
त्रिफळा चूर्ण आपल्या आरोग्यासाठी का महत्त्वाचे मानले जाते
त्रिफळा पावडर ही आयुर्वेदात सर्वात जास्त वापरली जाणारी हर्बल औषध आहे. ती प्रामुख्याने तीन प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केली जाते. ती अनेक रोग बरे करते आणि शरीराला निरोगी बनवते, म्हणूनच आयुर्वेदात त्रिफळा पावडरचा वापर सर्वात जास्त केला जातो. त्रिफळा पावडर, ज्याला पॉलिहर्बल उत्पादन म्हणूनही ओळखले जाते, त्यात आवळा, बहेडा आणि हद्रा (हरिताकी) यांचा […]
इंडिया–अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे. “पंजाबमध्ये शेतकरी परिषद बोलवा, तेथील शेतकरी संघटनांशी चर्चा करा आणि हा करार शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही, हे त्यांच्याकडून विचारा,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेत सोमवारी काँग्रेसच्या आमदारांनी इंडिया–अमेरिका व्यापार कराराविरोधात निदर्शने केली. या कराराला त्यांनी […]
“मुख्य प्रवाहात येणं हाच योग्य मार्ग”, गडचिरोलीत माजी नक्षल कमांडरची कबुली
माजी नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांनी सशस्त्र चळवळीबाबत आत्मपरीक्षण करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. लोकांचा पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांच्या प्रश्नांसोबत त्यांच्या मध्ये जावं लागलं असतं; मात्र आम्ही लोकांमध्ये न मिसळता केवळ शस्त्रांवर भर दिला, अशी कबुली त्यांनी दिली. ते म्हणाले, “भारतामध्ये कायमस्वरूपी क्रांतिकारी तळ उभारण्याची कल्पना अवास्तव ठरली. एकेकाळी अनेक राज्यांमध्ये […]
रताळे रोज खाल्ल्यास आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतील
रताळे हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी कंदमूळ आहे. रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते. त्याचबरोबर रताळे खाल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढण्यास मदत मिळते. रताळे हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे मानले जाते. रताळ्यात कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, पोटॅशियम आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि एकूण पोषण सुधारते. रताळ्यात बीटा-कॅरोटीन मुबलक असते, […]
लातूरमध्ये 30 ते 32 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच ठिकाणी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरलेवाडी येथील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात तब्बल 30 ते 32 विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 […]
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत दापोली विधानसभा क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी खेड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील माँसाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाजवळील खेड नगर वाचनालय येथे दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत माजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी […]
रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला, ऊर्जा प्रकल्पाला केले लक्ष्य
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक हिंसक होत असून, रशियाने रविवारी युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा वर्षाव केला. या भीषण हल्ल्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. रशियाने प्रामुख्याने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. युक्रेनच्या […]
दोन्ही देशांमधील संघर्ष जगासाठी हानिकारक; चीनचा अमेरिला इशारा
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ बेकायदा ठरवत ते रद्द केले. या निर्णयाने ट्रम्प यांनी मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांनी जगवार 10 टक्के आणि त्यानंतर 15 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणाबाबत चीनने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांतील संघर्ष हा जगासाठी हानिकारक ठरेल, असा इशारा चीनने दिला […]
Latur News –अश्रू आवरत लेकीने दिला बारावीचा पेपर, वडिलांच्या भडाग्नीनंतर गाठले परीक्षा केंद्र
जीवन जगताना काही संकटे अशी येतात की, त्यातून बाहेर कसे पडावे? असा प्रश्न पडतो. परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करता येतो पण जीवनातील संकटांना उत्तरच नसते, असाच काहीसा प्रकार शिवानी माधव देवकते या विद्यार्थ्यानीचा बाबतीत घडला आहे. वडिलांचे निधन झाले त्यातच बारावीचा पेपर त्यामुळे अश्रूंना आवर घालत तिने बारावीचा पेपर दिला. आंत्यविधि आटपून शनिवारी सकाळी अकरा […]
अजित दादा म्हणजे महाराष्ट्राचा आधारवड. पक्ष, जात, धर्म, पंथ न पाहता मदत करणारा नेता होता अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच तो जग सोडून गेला असला, तरी आपल्या हृदयातून कधी जाणार नाही असेही भास्कर जाधव म्हणाले. विधीमंडळात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, या सभागृहाचे […]
आवळ्याला आयुर्वेदात सुपरफूड असे का म्हटले आहे
आवळा हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच त्याला सुपरफूड म्हटले जाते. हिवाळा सुरु होताच बाजारात आवळे दिसू लागतात. आवळा हा आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे फार मुबलक असते. म्हणूनच आवळा हा आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतो. आवळ्यात संत्र्यापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन C असते. हे […]
ICC T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाच्या विजयी रथाला सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात ब्रेक लागला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव करत संघाला जबर धक्का दिला. या पराभवामुळे संघ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. चाहत्यांमध्ये रोष असून माजी खेळाडूंनीही आता आपापली मत मांडत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 संदर्भात भाष्य केलं आहे. रविचंद्रन अश्वननेही […]
लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी अवकाळी पावसासह काही ठिकाणी चांगलीच गारपीट झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे नुकसान होत आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाप येथे गारांसह २० मिनिटे पाऊस झाला. अहमदपुर शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरात रविवारी रात्री हलक्या सरी […]
रत्नागिरी शहरात रहाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर कराचा बोजा वाढणार आहे. 32 पैकी महायुतीचे 29 नगरसेवक निवडून देणाऱ्या रत्नागिरीकरांना सत्ताधाऱ्यांनी करवाढीचं रिटर्न गिफ्ट दिले आहे. सोमवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा करवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांवर दिवाबत्ती कर आणि अग्निशमन कराचा भार वाढणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी या जाचक करवाढीला विरोध केला आहे. […]
Solapur Market |सोलापूर बाजारात भेंडी, गवार आणि मिरचींच्या किमतीत वाढ
सोलापूर कृषी बाजार समितीकडून भावांची माहिती जाहीर सोलापूर -उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात भाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. भाज्यांची आवकही मंदावली असल्याने सध्या भेंडी, गवार तसेच हिरवी मिरची, ढोबळी मिरची या भाज्याचे दर बधारले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो, कोथिंबीरचे दर मात्र उतरले आहेत. तसेच पालेभाज्यांचे [...]
Solapur News : हायवे कामासंदर्भात लवकरच मंत्री गडकरींना भेटणार ; माजी आमदार राजेद्र राऊत
बार्शी शहरातील पाणीपुरवठा आणि फोर लेन हायवे प्रकल्पांचे आढावा बार्शी -नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत बार्शी शहर समांतर पाणीपुरवठा आणि टेंभुर्णी ते लातूर नूतन फोर लेन हायवे संदर्भात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आमचे पूर्तता करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी [...]
डीसीसी बँकेची तिजोरी चोरट्यांनी फोडली
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वालवड येथील डीसीसी बँकेच्या शाखेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरीची घटना घडली आहे. ही घटना रविवार दिनांक 22 रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये चोरट्यांनी तिजोरीतील वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या चोरीच्या घटनेतील रक्कम जरी कमी असली तरी या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची वालवड येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये शाखा आहे. शनिवारी कार्यालयातील कर्मचारी बँकेचे कामकाज संपल्यानंतर बँकेस कुलूप लावून गेले होते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय वालवडचे कर्मचारी रवी चव्हाण हे कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना कार्यालयाच्या पाठीमागील खिडकी कट केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी सरपंच व उपसरपंचांना तसेच पोलीस पाटलांना दिली. या सर्वांनी तातडीने परिसराची पाहणी केली असता त्यांना बँकेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने भूम पोलीस ठाण्यास देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले व पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील पाण्याची समस्या दूर मंगळवेढा -ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी हैराण झालेल्या डोंगरगाव व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून लिंगिरा ओढ्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लिंगिरा ओढ्यावरील सिमेंट बंधारे भरले असून, पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी तसेच [...]
जानेवारी महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता सोने-चांदी वधारत आहे. गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीत चढउतार होत आहेत. सोमवारी सोने आणि चांदीचे दर झपाट्याने वाढले आहेत. सोमवारी चांदीच्या किमती 15,000 रुपयांपेक्षा जास्त तर सोने 3000 रुपयांनी वाढले आहे. सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहेत. RBI बोर्डासोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी […]
Solapur News : टेंभुर्णीत ट्रकचा भीषण धक्का; चालक पसार, दुचाकीस्वार ठार
ट्रक चालक पसार; टेंभुर्णीत दुचाकीस्वारांचा मृत्यू टेंभुर्णी – टेंभुर्णी ते कुडूवाडी रस्त्यावर विठ्ठलराव शिंदे साखर कारखाण्याजवळ गंगामाई हॉस्पिटलसमोर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. 22/02/2026 सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मृताचे नाव प्रभाकर रतन गाढवे (वय 59, रा. अंजनगाव [...]
संरक्षित कुळ हक्कांवर गदा? बोरीतील शेतकऱ्याची बेकायदेशीर खरेदी व जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार
धाराशिव (प्रतिनिधी) - बोरी येथे जमिनीच्या वादाने गंभीर वळण घेतले असून संरक्षित कुळ हक्क डावलल्याचा आरोप करत सुरवसे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. बोरी गावातील गहिनिनाथ श्रीपती सुरवसे व विश्वभर श्रीपती सुरवसे यांनी त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीबाबत सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संरक्षित कुळ म्हणून 7/12 उताऱ्यावर नावे नोंदविण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, वाशी येथे अर्ज सादर केला होता. मात्र संबंधित कागदपत्रांचा पुरेसा विचार न करता तहसीलदारांनी “कुळ नाहीत” असा निर्णय दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात अप्पर जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपील दाखल असून प्रकरण सध्या प्रलंबित आहे. दरम्यान, अपील प्रलंबित असतानाच दादा दत्तु जाधव व प्रिया दादा जाधव यांनी सुरेश वसंत कुलकर्णी व रमेश वसंत कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून संबंधित जमिनीची 9 डिसेंबर 2025 रोजी खरेदी केल्याचा आरोप सुरवसे कुटुंबीयांनी केला आहे. खरेदीनंतर लगेचच जमिनीत येऊ नये, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संरक्षित कुळ म्हणून न्याय द्यावा, तसेच बेकायदेशीर खरेदी व धमकीप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे.
कडुलिंबाचा सौंदर्यासाठी कसा उपयोग करता येईल
कडुलिंब हे भारतीय घराघरात आढळणारे औषधी झाड आहे. कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तो सौंदर्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. कडुलिंबाचं पूर्ण झाडाचा काही ना काही उपयोग हा होतोच. खासकरून याच्या लहान काड्या या दातुन म्हणजेच दात घासण्यासाठी देखील वापरल्या जातात. सौंदर्याच्या दृष्टीने कडुलिंब हा फारच महत्त्वाचा मानला जातो कडुलिंबाची पाने वाटून त्याचा लेप […]
परंडा (प्रतिनिधी)-रोजी संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.असे प्रतिपादन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या संत गाडगेबाबा जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने यांचे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बलभीम महाविद्यालय बीड येथील डॉ. योगेश भराटे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.विद्याधर नलवडे, डॉ.अक्षय घुमरे, डॉ. अमर गोरे पाटील, डॉ.प्रशांत गायकवाड, डॉ संभाजी गाते, डॉ.सचिन चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक तोडकरी, प्रा.जगन्नाथ माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्वच्छता, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणप्रसार या कार्यांची महती विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. चंदनशिवे यांनी सांगितले की, संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.त्यांनी शिक्षण आणि नैतिक मूल्ये यांना सर्वोच्च स्थान दिले.आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाज परिवर्तनात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.व स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक तोडकरी यांनी केले सूत्रसंचालन डॉ.सचिन चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.जगन्नाथ माळी यांनी मानले. संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते आधुनिक हात-पायांचे वितरण
धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरीच्या 121 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब धाराशिव व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधुनिक हात-पाय मोजणी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना कृत्रिम हात व पायांचे वितरण जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते व उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या सर्व लाभार्थ्यांना नियोजित कालावधीत आधुनिक जयपूर फूट व कृत्रिम हातांचे यशस्वी वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे 100% यश साध्य करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रणजित रणदिवे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार तसेच आरडीसी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी अशा सेवाभावी उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवजीवनाची संधी मिळते व समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे प्रतिपादन केले. या प्रसंगी रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव रो. पी. आर. काळे, रो. बाळासाहेब देशमुख, रो. प्रदीप मुंडे, रो. संजय देशमाने, रो. डॉ. श्रीराम जिंतूरकर, रो. सुनिल गर्जे, रो. सुरज कदम, रो. चंद्रसेन देशमुख तसेच इतर मान्यवर व रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवसंजीवनी मिळाली असून समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा रोटरी क्लब धाराशिवचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. उपस्थित लाभार्थ्यांनी व नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.
शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर, तातडीच्या चौकशीची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत येणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. संबंधित प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सादर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून काही शिक्षकांच्या निष्क्रीय आणि हलगर्जी कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही शिक्षक प्रामाणिकपणे ज्ञानदान करण्याचे काम करत आहेत. मात्र काही शिक्षक वर्गावर न जाता तासंतास कार्यालयात बसून मोबाईल वापरणे, शाळेच्या आवारात विनाकारण वेळ घालवणे, कोणालाही न सांगता शाळेला दांडी मारणे तसेच परस्पर रजा ॲडजस्ट करणे असे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत ग्राउंडवर बसवून विविध कार्यक्रमांच्या नावाखाली वेळ वाया घालवला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या प्रकारांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने पालकांकडे तक्रार केल्यास त्या एकट्या विध्यार्थ्याला अपमानास्पद बोलणे किंवा टॉर्चर करत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. यापूर्वी संबंधित शिक्षकांना कार्यपद्धती सुधारण्याबाबत अनेकदा विनंती करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यात कोणताही सकारात्मक बदल झालेला नसल्याने आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील शालेय व्यवस्थापन समितीने व पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर शिक्षण विभाग काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Hasan Mushrif |अजितदादा पवार मला म्हणायचे…..;अन् मंत्री हसन मुश्रीफ लागले सभागृहात ढसाढसा रडायला
अजितदादांच्या आठवणीने मंत्री हसन मुश्रीफ सभागृहात धाय मोकलून रडले कोल्हापुर– विधानसभा सभागृहात मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक शपथविधीला स्वर्गीय कै. अजितदादा पवार मला म्हणायचे, “मुश्रीफसाहेब…. माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच……!” सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या श्रद्धांजलीपर [...]
Satara News : बागणी शाळेच्या विद्यार्थिनींचा शिवजयंतीनिमित्त नृत्यसौंदर्य प्रदर्शन
नागनाथ मंदिरात शिवकन्यांनी बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली बागणी– बागणी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळा नंबर दोनच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित किल्ला भाग येथील नागनाथ मंदिरात शिवकन्यांनी बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीस तहसीलदार राजशेखर [...]
पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, इस्रायली विरोधी पक्षनेत्याचा भाषणावर बहिष्काराचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित इस्रायल दौऱ्यापूर्वीच तिथे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. इस्रायलमधील विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘नेसेट’मधील (इस्रायलची संसद) भाषणावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. इस्रायलच्या अंतर्गत राजकारणामुळे मोदींच्या या दौऱ्याला विरोधाचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात इस्रायली संसदेला संबोधित करणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते […]
बारा दिवसाच्या तुरूंगवासानंतर राजपाल यादव पुन्हा सेटवर
राजपाल यादव सुमारे १२ दिवस तिहार तुरुंगात होते. ५ फेब्रुवारीला त्यांनी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याला न्यायालयाने १.५ कोटी रुपयांचा जामीन मंजूर केला. १७ फेब्रुवारीला त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, त्यानंतर ते थेट त्याच्या गावी शाहजहांपूरला गेले. तिथे त्यांच्या भाचीचे लग्न होणार होते. तिथे राजपाल यांनी कुटुंबासोबत बराच वेळ घालवला होता. आता राजपाल देखील परत कामावर परतले […]
ICC T-20 WC 2026 च्या सुपर 8 सामन्यात हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १९ व्या षटकात १११ धावांवर गारद झाला. टीम इंडियाची फलंदाजी यशस्वी झाली नाही, तर गोलंदाजीत फक्त जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग चमकू शकले. संघाच्या या कामगिरीवर माजी […]
मुंबईच्या लाटांवर ‘संक रॉक’चा महासंग्राम! पुण्याच्या चैतन्य आणि दीक्षाचे वर्चस्व!!
मुंबईत आयोजित ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) तर्फे आयोजित या स्पर्धेत ६ राज्यांतील ३३७ जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता, ज्यापैकी ३३० जणांनी विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. प्रमुख विजेते आणि कामगिरी – पुरुष गट (५ किमी): पुण्याचा चैतन्य शिंदे (३९:१५ मि.) याने सुवर्णपदक […]
धाराशिवमध्ये अवकाळी; द्राक्ष, आंबाचे झाले नुकसान
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये सोमवारी (दि. 23) पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या पावसाने विशेषतः गहू आणि हरभरा पिकांवर या पावसाचा परिणाम झाला आहे. पिके वाढीच्या टप्प्यात असल्याने पुढील काही दिवसांत रोगराईचा धोका वाढू शकतो. तर काढणीला आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. द्राक्ष, आंबा आणि पपई या फळ पिकांनाही पावसाचा फटका बसल्याची माहिती आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणातील उकाडा काहीसा कमी झाला आहे. आगामी काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे साधन बनु शकते- कौस्तुभ गावडे
धाराशिव (प्रतिनिधी)- कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे साधन बनु शकते असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चॅट जीपीटीच्या सहाय्याने शिक्षक व व्यावसायिकांचे सक्षमीकरण : प्रात्यक्षिक व सहभागात्मक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावडे म्हणाले की, एआयच्या सहाय्याने मानवी क्षमता व उत्पादकता अनेक पटींनी वाढविण्यासाठी मदत होऊ शकते. पण तरीही मनुष्य बळाची गुणवत्ता विकसित देशांतील मानवी बळापेक्षा वेगळी असेल. नविन प्रणालीमुळे आयुष्यभर शिक्षण घेत रहाण्याची नविन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती म्हणाल्या की, एआयचा वापर सर्वांनी सुरक्षित पद्धतीने तसेच त्याच्या माध्यमातून जी माहिती मिळते ती काळजीपूर्वक पाहून बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. यावेळी प्राचार्य डॉ.रत्नदीप देशमुख, प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, चेतन टाकसाळे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. सुभाष चव्हाण यांचेही मार्गदर्शन झाले.या कार्यशाळेची समन्वयक म्हणून ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांनी काम पाहिले.
Rahimatpur crime news |रहिमतपूर पोलीस पथकाने आठ तासांत उघड केली जबरी चोरी; आरोपीला अटक
रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेतला रहिमतपूर– रहिमतपूर पोलीस ठाणे पथकाने जबरी चोरीचा गंभीर गुन्हा अवघ्या आठ तासांत उघड करत संशयित राहुल सर्जेराव कदम रा.साप यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २ लाख ६९ हजार १३२ रुपये किंमतीची १६.९ ग्रॅम [...]
अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे –हर्षवर्धन सपकाळ
आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, […]
वेंगुर्ल्यात सातवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ओरोस : एका सातवर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली विष्णू प्रसाद डील्ली कृष्ण न्यौपाने (६१, रा. नेपाळ) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष [...]
वेंगुर्ल्यात सातवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ओरोस : एका सातवर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली विष्णू प्रसाद डील्ली कृष्ण न्यौपाने (६१, रा. नेपाळ) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष [...]
मुक्तांगण इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल धाराशिव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या सुशीला देवी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.सौ. सुलभाताई देशमुख, अक्षरवेलच्या संस्थापक अध्यक्ष सौ. डॉ.रेखा ढगे, संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे, सदस्य सौ मंजुषा नलावडे, तसेच मुख्याध्यापिका सौ. अर्चनाताई शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्तांगणच्या मुलांनी देशभक्तीपर गीते, कोळी गीते, देवीची गीते यांचे सादरीकरण केले. नर्सरी, जूनियर, सीनियर के.जी च्या विद्यार्थ्यांनी बालगीताचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
वरुडा, होटगी, सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघांने विविध क्रीडा प्रकारात केली बक्षिसांची लयलूट
धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूर अंतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत वरुडा, होटगी, सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने विविध क्रीडाप्रकारात विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातही आश्रमशाळांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवत बक्षिसांची लयलूट केली. तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघानेही अनेक क्रीडा प्रकारात बक्षिसे पटकावली. धाराशिव येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा रविवारी (दि.22) समारोप झाला. या सोहळ्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देवून गौरविण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील काळे व इतर मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेत वरुडा येथील आश्रमशाळेच्या संघाने विजेतेपद तर सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. वरुडा आश्रशाळेच्या संघाचे श्रीराम कोकाटे हे सामनावीर ठरले. तर सवतगव्हाण संघाचे कप्तान सरतापे हे मालिकावीर ठरले. कबड्डी स्पर्धेत होटगी विजेता तर सवतगव्हाण संघ उपविजेता ठरला. होटगी संघाचे कप्तान के.एस. सूर्यवंशी व सवतगव्हाण संघाचे पवार यांनी बक्षिस स्वीकारले. हॅन्डबॉल स्पर्धेत सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने विजेतेपद तर प्रकल्प कार्यालय सोलापूर संघाने उपविजेतेपद पटकावले. हॉलीबॉल स्पर्धेतही होटगी आश्रमशाळेच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद तर वरुडा आश्रमशाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. भालाफेक स्पर्धेत पुरूष गटात धावारे, वाघमारे, थोरात यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर महिला गटात पूनम कांबळे यांनी प्रथम व अर्चना आबटवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. गोळाफेक स्पर्धेत पुुरुष गटात कदम यांनी प्रथम, महिला गटात अर्चना आबटवार व पूनम कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात टी.एस. सूर्यवंशी, गणेश दळवी, शरद वाघ तर महिला गटात अर्चना आबटवार, सुप्रिया गवळी, शीतल पिंपरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात कोठावळे, भांगरे, मोहोळकर यांनी बक्षिसे पटकावली. बॅडमिंटन स्पर्धेत वैयक्तिक गटात सी.एम. वाघमारे प्रथम, डी.पी. सूर्यवंशी द्वितीय तर महिला गटात तेजस्विनी माने, सुप्रिया गवळी यांनी शानदार खेळा प्रदर्शन करीत बक्षिसे पटकावली. कॅरम स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरुडा संघाने प्रथम तर होटगी संघाने द्वितीय बक्षिस पटकावले. तर महिला गटात तेजस्विनी माने व अर्चना आबटवार प्रथम, ऐश्वर्या देशमुख व सुप्रिया गवळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात श्री.थोरात, किसन सूर्यवंशी तर महिला गटात पूजा गाढवे व पूनम कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय बक्षिस पटकावले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी अध्यक्षीय समारोप केला. क्रीडा ध्वज उतरवून वंदे मातरम गीताने क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली. यावेळी खेळाडू अधिकारी-कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तामिळनाडूत SIR मध्ये ९७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, अंतिम मतदार यादी जाहीर
तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. राज्याच्या अंतिम मतदार यादीतून तब्बल ९७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे आणि कायमस्वरूपी […]
मंगरूळ येथे नव्याने भरणाऱ्या आठवडी बाजारास प्रतिपाद
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तीर्थक्षेत्र येथे मंगळवारी भरणारा आठवडा बाजार रद्द करून तो बुधवारी भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे मंगळवार दि. 17 फेब्रुवारीपासून नवीन आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. सध्या या आठवडी बाजारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नव्या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मंगळवारीच खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे बाजारासाठी येणाऱ्या सर्व व्यापारी बांधवांना गावातील ग्रामस्थांकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंगरूळ ग्रामस्थांनी दिली आहे. गावातील शेतकरी, भाजीपाला विक्रेते, किरकोळ व्यापारी तसेच विविध वस्तूंचे विक्रेते यांना या बाजारामुळे मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी खरेदीसाठी आता मंगरूळ हाच नवा पर्याय ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षकाला पाच लाखाचा ऑनलाईन गंडा
भुम (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका शिक्षकाला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला असून सायबर चोरट्यांनी तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप जगदाळे या शिक्षकांच्या मोबाईलवर स्टेट बँके ऑफ इंडियाच्या योनो बँकिंग सुविधेसंदर्भात आधार अपडेट करण्याबाबतचा मेसेज आला. संबंधित मोबाईल त्या वेळी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या हातात होता. मेसेजमध्ये बँक खाते बंद होण्याची भीती दाखवत तत्काळ आधार अपडेट करण्यास सांगण्यात आले होते.मेसेजनंतर काही वेळातच ओटीपी क्रमांक मागण्यात आला. घरातच उपस्थित असलेल्या जगदाळे यांना मोबाईलवर मेसेज अलर्टचा आवाज आल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ मोबाईल आपल्या ताब्यात घेतला असता त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 60 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. जगदाळे यांनी तात्काळ भूम येथील बँक शाखेत धाव घेतली. शाखा व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के यांना सांगताच जगदाळे यांचे बँक खाते होल्ड केले आहे. तसेच त्यांची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. यावेळी गुजरात राज्यातील सुरत येथे एटीएममधून 20 हजार रुपये काढण्यात आल्याचेही समोर आले आहे. बनावट लिंकच्या आधारे या शिक्षकास 4 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक व ओटीपीच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित शिक्षकांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधून खाते गोठविण्याची (फ्रीझ) केली असून सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बँकेचे आवाहन बँक अधिकारी वारंवार स्पष्ट करतात की बँक कधीही ग्राहकांकडून ओटीपी, पिन किंवा पासवर्ड विचारत नाही.सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्राहकांना योनो बँकिंग सुविधा हवी असल्यास त्यांनी परांडा रोडवरील भूम शाखेत संपर्क साधावा. तसेच बँकेच्या नावाने आलेल्या कोणत्याही एपिके लिंकवर जाऊ नये.असे आवाहन शाखा व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के यांनी केले आहे.
Satara News |उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी! सोने व्यापाऱ्यांची बॅंग लंपास
श्री वागदेवी ज्वेलर्सचा ऐवज लंपास; व्यापारी वर्गात खळबळ उंब्रज – उंब्रज ता. कराड येथील चोरे रोड परिसरात सोमवारी (दि. 23) सकाळी दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अज्ञात [...]
राष्ट्रीय सोलापूर धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवविवाहित वधूवरचा जागीच मृत्यू
भुम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नवीन नियोजित वरवधूचा सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मूलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता.15) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. मयत नववधू अक्षया हिची आज लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्र. एम एच 25 बी एफ 5064 गाडीतून जात असताना हा अपघात झाला. रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली.धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय.23) आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे याचा (वय. 25) अपघातात जागीच मृत्यू झाला.तर चालक अक्षय यादव सिरसट (वय. 22)जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमी चालकाला 108 ला कॉल करुन उपचारासाठी पाठवले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला. चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Satara News : महाबळेश्वर तालुक्यात उंबरी परिसरात अनाधिकृत उत्खनन आणि वृक्षतोड; नागरिक संतप्त
प्रशासन निष्क्रीय? महाबळेश्वर तालुक्यात उच्चस्तरीय चौकशीची मागणी कुडाळ -महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या उंबरी परिसरात अनाधिकृत उत्खनन व मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात [...]
Bank Fraud Case –अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दणका; चार आठवड्यांची मुदतवाढ नाकारली
उद्योगपती अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. बँकांच्या फसवणूक कारवाईला स्थगिती देणारा एकल-खंडपीठाचा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे. मुख्य न्यायाधीश श्रीय चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अखांड यांच्या खंडपीठाने सोमवारी याबाबतच्या अपीलांना परवानगी आहे. तसेच आव्हान दिलेल्या आदेशात गंभीर त्रुटी आहेत. न्यायालयाने सिंगल बेंचचा निर्णय चुकीचा असून त्यात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले […]
Jammu Kashmir –अखनूरमध्ये सीमेपलीकडून आलेल्या फुग्यांमध्ये परदेशी चलनी नोटा; सुरक्षा दल सतर्क
जम्मू आणि कश्मीरमधील अखनूरमध्ये ‘बलून टेरर’ची एक नवीन घटना समोर आली आहे. अखनूर भागातील खौर पोलीस स्टेशन हद्दीतील नीली नाला येथील गुनारा गावात पोलिसांना दोन संशयास्पद फुगे सापडले. प्राथमिक माहितीनुसार या फुग्यांचं पाकिस्तान कनेक्शन उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुग्यांवर एक पाकिस्तानी मोबाईल नंबर छापलेला होता, तसेच स्कॅनर कोडसारखी छापलेली प्रतिमा होती. घटनास्थळावरून काही पाकिस्तानी […]
एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात विवाहितेवर गोळीबार; घटना CCTV मध्ये कैद
पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पट्टी परिसरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेच्या डोक्यात भररस्त्यात गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रुबी हिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आरोपी करण हा लग्नापूर्वीपासूनच रुबीला त्रास देत […]
Sangli News : सांगलीत “संगीत कट्यार काळजात घुसली” सादरीकरण; रसिकांची मनं जिंकली
सांगलीतील नाट्यप्रेमींना मिळाली अविस्मरणीय संगीतमय अनुभव सांगली -महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेत अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती, सांगली या संस्थेने बुधवारी अजरामर संगीत नाटक ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ सादर करत रसिकांची मनं जिंकली. संगीत कट्यार काळजात घुसली ही कलाकृती [...]
Jammu Kashmir –लष्कराने 326 दिवस मोहिम राबवत सात दहशतवाद्यांच्या टोळीचा केला खात्मा
लष्कराची जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू आहे. किश्तवार जिल्ह्यातील चतरू भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या 326 दिवसांपासून जम्मू-कश्मीरमधील दुर्गम प्रदेशात सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत जैश कमांडर सैफुल्लासह सात दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सोमवारी याची पुष्टी केली. किश्तवारमधील कडक थंडी, पाऊस आणि बर्फाळ वातावरणातही लष्कराने हार […]
Sangli News |आष्टा-वडगाव रोडवर एसटीच्या चुकीच्या ओव्हरटेकमुळे तिहेरी अपघात
आष्ट्यात दुपारी तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली आष्टा -आष्टा ते वडगाव रोडवरील सार्थक लॉजसमोर शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एस. टी. बसने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तिन्ही वाहनांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले [...]
Sangli SSC exam |सांगलीत दहावी परीक्षा जिल्हापरिषदेच्या निगराणीखाली; कॉपीमुक्त मोहिमेला वेग
सांगलीत जिल्हा परिषदेची डिजिटल नजर सांगली – दहावीच्या परिक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जिल्हाभरात १०५ परीक्षा केंद्रावर ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्हा परिषदेने दहावीच्या विद्यार्थ्यावर मोबाईल कॅमेऱ्यांव्दारे लक्ष ठेवले आहे. सिसीटीव्ही [...]
पती-पत्नीमधील वादाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निरीक्षण नोंदवले आहे. “घरातील काम करणारी पत्नी बेरोजगार असली तरी ती निकामी नसते. तिच्या घरकामातील मेहनतीला आणि कुटुंबासाठीच्या योगदानाला शून्य समजणे चुकीचे आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एका दाम्पत्याच्या पोटगीशी संबंधित आहे. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी […]
Sangli Crime |आटपाडीत मारहाण; दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास
झरे गावात तरुणावर हल्ला आटपाडी -झरे येथील अशोक शामराव भानुसे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन तोडून नेल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ नवनाथ आप्पा पाटील, प्रशांत उत्तम गलांडे (रा. झरे) यांच्यासह अन्य तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल आहे. २० [...]
US Tariff –न्यायालयाने शुक्रवारी ट्रम्प यांना दिला मोठा धक्का; मंगळवारपासून टॅरिफ वसुली थांबवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह अनेक देशांवर लावलेले टॅरिफ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवत ते रद्द केले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, अमेरिका मंगळवारपासून या रद्द करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्कांची वसुली पूर्णपणे थांबवणार आहे. अमेरिकन प्रशासनाने […]
Sangli News |आटपाडीत रस्त्याच्या रुंदीवरून राजकीय संघर्ष पेटला
आटपाडी शहरात रस्ता प्रश्नावर राजकीय तापमान वाढले आटपाडी -आटपाडी शहरातील साई मंदिर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या रस्त्याच्या रुंदी कमी-जादा करण्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. पूर्वी प्रस्तावित रस्ता१४ मीटर रुंदीने करावा, अशी भूमिका शिवसेना-राष्ट्रवादीने घेतली. तर स्टैंड परिसरात रस्त्याची रुंदी वाढविण्यास [...]
पसमंडा मुस्लिमांना ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आरक्षण यादीत नवीन जात किंवा समुदाय समाविष्ट करणे ही सरकार आणि संसदेची जबाबदारी आहे. हे न्यायालयाचे काम नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले की, ओबीसी दर्जा केवळ जातीने नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक […]
खलिस्तान्यांकडून लाल किल्ला आणि दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. खलिस्तानी गटाच्या नावाने दिल्ली पोलिसांना सोमवारी सकाळी ई-मेलद्वारे ही कथित धमकी देण्यात आली. मेल प्राप्त झाल्यानंतर बॉम्ब पथक आणि सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ला परिसराची कसून तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या […]
Kagal News |सेनापती कापशी सीमेवरील धोकादायक वळण; अपघातांची मालिका सुरूच
कागल–आजरा सीमेवरील मृत्यूचा सापळा ठरलेले वळण सेनापती कापशी – कागल आणि आजरा तालुक्याच्या सीमेवरील माद्याळ हुडाकडे जाणाऱ्या वळणावर अपघातांची मालिका सुरू आहे. येथे सातत्याने अपघात होत आहेत. अनेक चार चाकी वाहने या वळणावर पलटी झाली आहेत. तर अनेक [...]
अजित दादांसारखा एक विश्वासू, दिलदार सहकारी आणि मित्र गमावला, उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
अजित पवार यांच्या निधनाने आनंदाने भरलेली बारामती पूर्णपणे पोरकी झालेली पाहिली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात अजित पवार यांना जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहिली. तसेच अजित दादांसारखा एक विश्वासू, दिलदार सहकारी आणि मित्र गमावला असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, विधिमंडळाचं या वर्षीचं हे पहिलं अधिवेशन आहे […]
leopard News |कागल तालुक्यात बिबट्या कॅमेऱ्यात कैद; ग्रामस्थांत भीती
बोळावीतील स्मशान रोडवर बिबट्याचे थरारक दर्शन मुरगूड – बोळावी ता. कागल या गावात स्मशान रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांत व अंधाऱ्या भागात बिबट्याने रात्री प्रत्यक्ष दर्शन दिले. एका धाडसी ग्रामस्थांने अंधारातच या बिबट्याला कॅमेऱ्यात बंदिस्त केल्यामुळे वनविभागाला याबाबत गांभिर्याने [...]
Ramling |रामलिंग डोंगरावर भीषण आग; हजारो झाडे जळून खाक
प्रसिद्ध रामलिंग मंदिर परिसरात वणवा हातकणंगले – हातकणंगले तालुक्यातील आळते-माणगाव हद्दीतील रामलिंग डोंगराला रविवारी सायंकाळच्या सुमारास दक्षिण बाजूने भीषण आग लागली. ही आग अज्ञात व्यक्तींनी लावल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आगीचा [...]
Sharad Pawar |तब्येत बिघडल्याने शरद पवार यांना पुन्हा रुबी रुग्णालयामध्ये दाखल
तब्येत बिघडल्याने शरद पवार यांना पुण्यात दाखल पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रसचे संस्थापक शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांना थकवा [...]
Hupuri crime news –हुपरीत अल्पवयीन मुलीकडे अश्लील हावभाव; आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
हुपरीत तरुणाची घृणास्पद कृत्ये; हुपरी– अल्पयीन मुलीकडे पाहत अश्लील हावभाव करत मुलीच्या मनाला लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात राहुल तुकाराम शिंदे ( वय २५ ) याच्या विरोधात पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. हुपरी पोलिसांनी पॉक्सो [...]
राजस्थानमधील सीकरी येथून अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. येथील ‘मिलन बँक्वेट हॉल’मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावती यांच्या प्रतिमा चक्क बाथरुमच्या भिंतीवर लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. या निंदनीय प्रकारामुळे केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण देशभरातील शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक्वेट […]
कलम 39अ रद्द करा, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी : आमदार विरेश बोरकर यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरुच पणजी : पाळे – शिरदोण ग्रामस्थांचे आंदोलन आता उग्रऊप धारण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंदोलकांनी समस्त गोमंतकीयांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून आज सोमवारी संध्याकाळी 4 वा. आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. आमदार विरेश [...]
येत्या नवीन शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीपर्यंत ‘एनईपी’
एससीईआरटीतर्फे परिपत्रक जारी पणजी : आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) सर्व पहिली ते दहावी इयत्तांना लागू करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून एनईपीची गोव्यात पूर्णपणे कार्यवाही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये इयत्ता तिसरी ते सहावी, नववी ते दहावी याकरीता एनईपी राबवण्यात [...]
पाणीगळतीरोखण्यासाठीप्रयोजन पणजी : डिजिटल स्मार्ट वीज मीटरबाबत आणि त्यातून मिळालेल्या वाढीव वीज बिलामुळे जनतेत संतापाची लाट असताना आता सरकारने तशाच प्रकारे डिजिटल स्मार्ट पाणी मीटर लागू करण्याचा प्रस्ताव आखला आहे. सध्याचे पाणी मीटर बदलून नवीन मीटर बसवण्याचे प्रयोजन सरकारने आखले आहे.नव्या पाणी मीटरमुळे सरकारच्या महसूलात रु. 70 कोटीपर्यंत वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच त्या [...]
खुशखबर! EPFO ने पुन्हा सुरू केली एक सुविधा; खातेधारकांना होणार मोठा फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांना खूशखबर दिली आहे. ईपीएफओने पेन्शनशी संबंधित तरतूद केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्त्यावर (DA) आधारित त्यांच्या पेन्शनमध्ये योगदान देण्याची परवानगी होती, ती सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा पुन्हा सुरू झाल्यामुळे, कर्मचारी पुन्हा एकदा त्यांच्या वास्तविक मूळ पगाराच्या आधारे उच्च पेन्शन योगदान […]
सायबर गुन्हेगारांचा शिक्षिकेला दणका
एपीकेफाईलच्यामाध्यमातूनदीडलाखरुपयेहडपले बेळगाव : एपीके फाईलच्या माध्यमातून संकेश्वर, ता.हुक्केरी येथील एका शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिच्या बँक खात्यातील दीड लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी हडपले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जिल्हा सायबर क्राईम विभागात या घटनेची नोंद झाली आहे. सायबर गुन्हेगारांचे उपद्रव थांबता थांबेनात. कधी शेतकरी, कधी डॉक्टर, कधी अभियंता तर कधी शिक्षक यांना लक्ष्य [...]
सामान्यांची ढाल…ज्यावर करोडोंची उलाढाल
सायबरगुन्हेगारांकडूनगरिबांनाआमिष: बनावटबँकखातेउघडूनफसवणुकीच्यारकमेचावापर, तपासयंत्रणेचीडोकेदुखी बेळगाव : सायबर गुन्हेगारांनी गावागावात, गल्लोगल्लीत फसवणुकीचे जाळे विणले आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील शेकडो तरुण या गुन्हेगारांच्या गळाला लागले असून केवळ तीन ते पाच हजार रुपये मिळविण्याच्या नादात सायबर गुन्हेगारांना आपल्या व इतरांच्या नावे बँक खाते उघडून दिले आहेत. आता ही बोगस बँक खाती तपास यंत्रणांसाठी डोकेदुखीची ठरू लागली आहेत. गेल्या [...]
येळ्ळूर, वडगाव शिवारातील बेकायदा लेआऊट्सकडे बुडाचे दुर्लक्ष
बेळगाव : बुडाकडून नुकतेच शिंदोळी येथील दोन बेकायदा लेआऊट्स उद्ध्वस्त करण्यात आले असल्याने भूमाफियांना हादरा बसला आहे. मात्र दुसरीकडे शहापूर, अनगोळ, वडगाव, येळ्ळूर शिवारात मोठ्या प्रमाणात बेकायदा लेआऊट्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका पावसाळ्यात तेथील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे बुडाने याकडे लक्ष घालून सदर बेकायदा लेआऊट्सवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात [...]
रविवार पेठ-खंजर गल्लीतील मटका अड्ड्यांवर छापे
चौघांनाअटक: रोकडसहचिठ्ठ्याजप्त बेळगाव : रविवार पेठ व खंजर गल्ली येथील दोन मटका अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना अटक करण्यात आली आहे.सीसीबी व मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. रविवार पेठ, कांदा मार्केटजवळ मुंबई मटका सुरू असल्याची माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व [...]
पिरनवाडी येथे अश्वारुढ शिवमूर्तीचा आगमन सोहळा जल्लोषात
मिरवणूकठरलीलक्षवेधी: ढोलताशा, टाळ-मृदंग, पारंपरिकवाद्यांचामिरवणुकीतगजर: शिवप्रेमींचाउत्साहद्विगुणीत: हजारोशिवभक्तांच्याउपस्थितीतमूर्तीआगमनसोहळाउत्साहात वार्ताहर/किणये टाळ-मृदंग, ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या जयघोषात, भगवेमय वातावरणात आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचा आगमन सोहळा रविवारी जल्लोषात झाला. फटाक्यांची आतषबाजी, सर्वत्र उत्साही वातावरण यामुळे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा आगमन सोहळ्याची मिरवणूक लक्षवेधी [...]
अजितदादांच्या अपघाताबाबत किंवा घातपाताबद्दल योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसेल, त्याच्यामध्ये काळेबेरे झाले तर सरकारला महागात पडू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले, यावेळी विधिमंडळाच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट […]
जंबगी सुपरस्पेशालिटी आय इन्स्टिट्यूटचे थाटात उद्घाटन
जागतिकदर्जाच्यानेत्रचिकित्साआताबेळगावमध्ये: मंत्रीलक्ष्मीहेब्बाळकरयांच्याकडूनकौतुक बेळगाव : बेळगावच्या कोल्हापूर सर्कल, नेहरूनगर येथील जंबगी सुपरस्पेशालिटी आय इन्स्टिट्यूटचे उद्घाटन रविवारी थाटात झाले. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व केएलईचे मानद कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सुपरस्पेशालिटी इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले. उत्तर कर्नाटकात पहिल्यांदाच डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर अत्याधुनिक उपचार करता येणार असल्याने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. हारुगेरी, ता. रायबाग येथे [...]
अंकोला येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
आगामी अर्थसंकल्पात सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी तरतूद : कर्करोग युनिट सुरू करणार कारवार : राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते रविवारी अंकोला तालुक्यातील गंगावळी नदीवरील मंजुगुणी पुलाचे आणि येथील किम्सच्या आवारातील 450 बेड्सची क्षमता असलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. अंकोला आणि कुमठा तालुक्यांना जोडणाऱ्या मंजुगुणी पुलावर सुमारे 35 कोटी रुपये [...]
फूल मार्केटच्या तोडग्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा
जागाअपुरीपडतअसल्यानेएपीएमसीतजागाउपलब्धकरूनदेण्याचीमागणी बेळगाव : बेळगावच्या होलसेल फूल मार्केट वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शनिवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अशोकनगर येथील फूल मार्केट संदर्भात चर्चा झाली. काही व्यापाऱ्यांनी जागा अपुरी पडत असल्याने एपीएमसी येथे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याने याबाबतप्रशासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. पंधरा दिवसांपूर्वी काही फूल व्यापाऱ्यांनी [...]
स्मार्ट विद्युत मीटरच्या तक्रारींमध्ये वाढ
तक्रारनिवारणबैठकीतसमस्यांचापाढा बेळगाव : मोठा गाजावाजा करत हेस्कॉमकडून नवीन विद्युत ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले. परंतु यामध्ये अनेक तांत्रिक दोष दिसून येत आहेत. ग्राहकांचे रिचार्ज संपल्यानंतर वीजपुरवठा बंद होणे गरजेचे असते. परंतु तसे होत नसल्याने वीजबिल वाढत जात असल्याची तक्रार ग्राहकांनी शनिवारी आयोजित हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत केली. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमकडून तक्रार निवारण बैठकीचे [...]
काँग्रेसकडून केवळ तुष्टीकरणाचे राजकारण
खासदारजगदीशशेट्टरयांचाआरोप बेळगाव : काँग्रेस सत्तेत आल्यापासून त्यांच्याकडून केवळ तुष्टीकरण केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवजयंती मिरवणुकीवेळी बागलकोट येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाईची गरज आहे. काँग्रेसकडून विकासाला बगल देत केवळ वाद निर्माण करत दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बेळगावच्या [...]
अखेर टिळकवाडी परिसरात चरी बुजविण्याच्या कामाला सुरुवात
बेळगाव : एलअॅण्डटीकडून 24 तास पाणी योजनेसाठी टिळकवाडी, आनंदवाडी, हिंदवाडी,इंद्रप्रस्थनगर आणि आरपीडी रोडवर खोदकाम करून जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतर चरी व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. त्यामुळे ते तातडीने हटवावेत, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली रहिवाशांनी केयुआयडीएफसी आणि एलअॅण्डटीला दिले होते. सदर निवेदनाची दखल घेत [...]
तेजस विमान अपघातानंतर IAF ची मोठी कारवाई, 30 लढाऊ विमानांची उड्डाणे रोखली
स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमान अपघातानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने मोठा निर्णय घेतला आहे. हवाई दलाने 30 तेजस विमानांची उड्डाणे रोखली आहेत. सध्या तेजस अपघाताची चौकशी सुरू आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमानांची व्यापक तांत्रिक तपासणी करण्यासाठी हवाई दलाने 30 सिंगल सीटर तेजस विमानांच्या ताफ्याला तात्पुरते ग्राऊंड केले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षण उड्डाणानंतर तळावर परतत असताना ब्रेक […]
विरोधी पक्षनेता नेमला तर सरकारची लक्तरं काढली जातील म्हणून सरकार घाबरतंय; संजय राऊत यांची टीका
विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून यंदाही सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवणं ही लोकशाहीची विटंबना आहे. विरोधी पक्षनेता नेमला तर तो संपूर्ण महाराष्ट्रासमोर सरकारची लक्तरं काढेल म्हणून सरकार घाबरतंय”, अशी […]
कुरापती पाकिस्तान आणि विस्तारवादी चीन हे दोन देश शेजारी असल्याने हिंदुस्थानला अखंड सावध आणि शस्त्रसज्य रहावे लागते. गेल्यावर्षी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी चीनने पडद्याआडून पाकिस्तानला मदत केली होती. आता या आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी हिंदुस्थानने आता मोठे पाऊल उचलत इस्रायलसमोर संरक्षण करार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. हिंदुस्थान इस्रायलकडून […]
सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी फडणवीसांच्या हातात आहे –संजय राऊत
तुम्ही भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात असेल, अशी फडणवीसांची भूमिका आहे. मंत्रालयात पोलीस मंत्र्याच्या कार्यालयात घुसतात व त्या मंत्र्यावर काहीही कारवाई होत नाही. यावरून स्पष्ट होते की फडणवीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या […]

27 C