छिंदवाडात भीषण अपघात, बस आणि पिकअपच्या धडकेत 10 ठार, 30 जखमी
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गुरुवारी रात्री भीषण अपघाताची बस घडली. सिमरिया हनुमान मंदिराजवळ प्रवासी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली. बस छिंदवाडाहून भंडारकुंड या मार्गावर प्रवास करत होती. […]
Parbhani News –कापूस जिनिंगला भीषण आग; शेकडो क्विंटल कापूस जळून खाक
परभणी मानवत शहराजवळील केशव जिनिंग प्रेसिंग उद्योगात आग लागून शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मानवत-मानवत रोडदरम्यान असलेल्या या जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न […]
Recruitment 2026 – EPFO मध्ये 153 पदांसाठी भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)ने नवीन भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 153 पदांवर नियुक्ती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार EPFOच्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जाऊन ऑनलाइन […]
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आज राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल सुरू करण्यास विरोध केला. गुरुवारी राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. राजापूर तालुक्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा […]
यूएईमध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष अंगावर कोसळल्याने एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू, दुसरा जखमी
आखाती देशांतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीत मोठी दुर्घटना घडली आहे. इराणकडून डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अमिरातीच्या हवाई संरक्षण दलाने हवेतच नष्ट केले. या क्षेपणास्त्राचे अवशेष अंगावर कोसळल्याने अबु धाबीमध्ये एका हिंदुस्थानी नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये देखील एका हिंदुस्थानी नागरिकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबु धाबी […]
Photo –मुंबईच्या नभांगणात अवतरली महाराष्ट्राची संस्कृती; 2000 ड्रोनचा नेत्रदीपक सोहळा
मुंबईतील आझाद मैदान येथे राम नवमीच्या दिवशी सायंकाळी भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेणारा 2000 ड्रोनचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. ड्रोनच्या मदतीने मुंबईकरांना आकाशात साकारलेल्या विविध कलात्मक आकृती पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक पैलूंचा तेजस्वी आणि देखणा आविष्कार मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. या सोहळ्याने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत […]
सोसायटीतील मोकळ्या जागेची सदनिका म्हणून विक्री करू शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
हाऊसिंग सोसायटीतील मोकळ्या जागेला सदनिका मानून विकासक अशा जागेची विक्री करु शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. भांडुप येथील ‘धिरज ड्रिम्स’ गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयामुळे विकासकाला झटका बसला असून गृहनिर्माण संस्थेला दिलासा मिळाला आहे. संकुलात निर्वासित क्षेत्र असलेल्या मोकळ्या जागांना सदनिका दाखवून त्यांचे सदस्यत्व मिळवण्याचा दोन व्यक्तींचा […]
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाचा जागतिक तेल बाजारावर होणारा परिणाम हा कोविड-19च्या महामारीपेक्षाही भीषण असू शकतो, असा गंभीर इशारा सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जादान यांनी दिला आहे. जर हा संघर्ष तातडीने थांबला नाही, तर जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये आखातात युद्ध […]
महावीर जयंतीमुळे दहावी परीक्षा वेळापत्रकात बदल
तृतीय भाषा विषयाचा पेपर 30 ऐवजी 31 मार्च रोजी होणार बेंगळूर : राज्यात 18 मार्चपासून दहावी परीक्षेला प्रारंभ झाला आहे. काही विषयांचे पेपर संपले आहेत. मात्र, 30 मार्च रोजी होणारे तृतीय भाषा इंग्रजी, कन्नड, हिंदी, उर्दु, अरेबिक, संस्कृत, कोकणी, मराठी, तुळू विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महावीर जयंतीनिमित्त सोमवार, 30 मार्चऐवजी मंगळवार, 31 मार्च [...]
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि भविष्यातील स्पर्धांसाठी महिला श्रेणीमध्ये ट्रान्सजेंडर महिला आणि ‘डिफरन्सेस इन सेक्स डेव्हलपमेंट’ म्हणजेच DSD असलेल्या खेळाडूंवर बंदी घातली आहे. IOC च्या अध्यक्षा क्रिस्टी कोव्हेंट्री यांनी स्पष्ट केले की, महिला क्रीडा प्रकारातील निष्पक्षता आणि सुरक्षितता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरुषांमधील शारीरिक वाढीमुळे मिळणारे नैसर्गिक फायदे महिला […]
कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणे अन्यायकारक; हायकोर्टाने बेस्ट प्रशासनाला सुनावले
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर न ठेवणाऱ्या बेस्ट उपक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. केवळ आरटीपीसीआर अहवाल नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सरकारी निर्णयानुसार मिळणारे लाभ नाकारणे चुकीचे आहे. महामारीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला असे वाऱ्यावर सोडणे अन्यायकारक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने बेस्ट प्रशासनाची […]
Pandharpur News –श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा
आज रामनवमी प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास सकाळी 11.00 महानैवेद्य नंतर पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून दुपारी 12.00 वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल […]
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी मोठे आणि सूचक विधान केले आहे. युद्धात पुढे काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. इराण युद्धाचे परिणाम कोविड-19 महामारीइतकेच गंभीर असू शकतात, असे पुतिन यांनी म्हटले आहे. मॉस्कोमधील एका व्यावसायिक कार्यक्रमात संबोधित करताना पुतिन यांनी इराण युद्धावर भाष्य केले. या युद्धामुळे लॉजिस्टिक्स, […]
Ratnagiri News –संगमेश्वरच्या पंचक्रोशीत अवकाळी पावसाचा तडाखा; आंबा-काजू बागायतदार संकटात
कोकणचा राजा मानला जाणारा आंबा आणि काजू या नगदी पिकांवर यंदा निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवळे, चाफवली, मेघी या पंचक्रोशीसह परिसरात आज (26 मार्च 2026) दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन आंबा हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या पावसामुळे बागायतदार आणि व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून, शेतकरी मोठ्या चिंतेत […]
IPL 2026 –अनुभवाच्या नव्हे गुणवत्तेच्या जोरावर ‘हे’ 10 खेळाडू मैदान गाजवणार! वाचा सविस्तर…
IPL 2026 च्या आगामी हंगामासाठी सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या ताफ्यात अशा काही युवा आणि अननुभवी खेळाडूंना स्थान दिले आहे, जे या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सज्ज आहेत. चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाचा वारसदार मानल्या जाणाऱ्या प्रशांत वीरवर 14.20 कोटींची मोठी बोली लावली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी आहे, तर गुजरात […]
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पेंटहाऊसच्या व्यावसायिक वापरावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने भरधाव कार रहिवाशांवर चढवली. यात शम्पा पाठक नावाच्या तरुण महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली असून याचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सागर टाऊनशिपमधील दोन पेंटहाऊसचा […]
बोलणं बंद केलं म्हणून 16 वर्षीय मुलीसह तिच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुलुंडमध्ये घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आशिष बनसोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी आहेत. […]
Jalna News –इंधन तुटवड्याचा गाजावाजा.! जालन्यातील भोकरदनमध्ये तपासणीत हजारो लिटर साठा उघड
जालना जिल्ह्यात व भोकरदन शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध पेट्रोल पंपांवर बुधवारी 25 मार्च रात्रीपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून आली. या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली असून वाहनधारकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही पंपांवर ‘साठा शिल्लक’ असल्याचे सांगत गुरुवारी सकाळी नावापुरती विक्री सुरू […]
बाटली, प्लॅस्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी पेट्रोल-डिझेल अनधिकृतरित्या साठवू नये.नियमभंग केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बाटली, प्लास्टिक कॅन,बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी घालण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढलेल्या आदेशाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
आजपासून गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिवच्या वतीने येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी शहरात 'गंगाधर करंडक', कलावंतांचा मेळावा आणि भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवार 27 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी केले आहे. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, मुख्याधिकारी निता अंधारे, नगराध्यक्ष नेहा काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) चे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, प्रमुख कार्यवाह धनंजय (नाना) शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य मुंबई यांच्या सह विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित गंगाधर करंडक स्पर्धा ही 27, 28 आणि 29 मार्च रोजी होणार असून यात नावलौकिक आणि प्रसिद्ध नाट्य संस्थांनी भाग घेतला आहे. 30 आणि 31 मार्च राज्य स्तरीय नृत्य स्पर्धा होणार असून यात राज्यातील नृत्य स्पर्धक सहभागी होणार आहेत.तसेच कलावंतांसाठी एक एप्रिल रोजी भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या सर्व कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे, राजेंद्र अत्रे, शेषनाथ वाघ, डॉ.गणेश शिंदे,डी. जी.कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, सुगत सोनवणे, ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , प्रसेनजीत शिंगाडे,यशवंत शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, सुमित शिंगाडे, शशिकांत माने,प्रदीप गायकवाड, भैरू कसबे, सुरेश देवकुळे,प्रमोद जोगदंड, अंबिका आगळे, निकिता साळुंके, दिशा सोनटकके, रिया राठोड, सुमेध चिलवंत, दिनेश दणाने, प्रवीण सोनवणे, प्रियांका पोतदार, रिया राठोड यांच्या सह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.
बळीराजाच्या अडचणीत वाढ; डिझेल-खतांपाठोपाठ आता 'पंप संच'ही महागणार
धाराशिव (प्रतिनिधी)- आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यासमोर आता नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कच्च्या मालाच्या, विशेषतः धातूंच्या किमतीत जागतिक स्तरावर होत असलेल्या सततच्या बदलांमुळे शेतीसाठी लागणाऱ्या 'पंप संचांच्या'किमतीत ७.५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बळीराजाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पीव्हीसी पाईपनंतर आता डिझेल-खतांपाठोपाठ 'पंप संच'ही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाचे वाढत्या खर्चाचे गणित कोलमडणार आहे. 'दक्षिण भारत इंजिनीअरिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून या दरवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात तांब्याच्या किंमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. प्रति किलो ९०० ते ९५० रुपये असलेले तांबे आता १२०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. पंप संचाच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये तांब्याचा वाटा २५ ते ३० टक्के असतो. याशिवाय ॲल्युमिनियम, पोलाद आणि कास्ट आर्यनच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने पंप उत्पादक कंपन्यांना ही दरवाढ करणे भाग पडत आहे. धाराशिवच्या शेतकऱ्यांवर दुहेरी ओझे पडण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात सिंचनासाठी विहिरी आणि कूपनलिकांवर अवलंबून असतो. जिल्ह्यात पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सबमर्सिबल आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर केला जातो. आता १० टक्क्यांची वाढ झाल्यास, एका सामान्य पंपासाठी शेतकऱ्याला ३ ते ५ हजार रुपये जास्तीचे मोजावे लागतील. त्यातच पाइप आणि वायरही महाग झाले आहे. केवळ पंपच नाही, तर त्यासोबत लागणारे पाइप आणि केबल्सच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पंप संचाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी पंप उत्पादक संघटनांनी केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. सध्या पंप संचांवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो, तो ५ टक्क्यांपर्यंत खाली आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर करात कपात झाली, तरच वाढत्या महागाईपासून सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळू शकेल. दरवाढ अटळ : संजय मंत्री कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्याने एमएसएमई (MSME) क्षेत्रातील छोटे पंप उत्पादक अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहेत. ही दरवाढ न केल्यास उत्पादन बंद पडण्याची भीती भारतीय पंप उत्पादक संघटनेचे अध्यक्ष के. व्ही. कार्तिक यांनी दिली असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांनी दिली आहे.
जमात-ए-इस्लामी हिंद’तर्फे आज ‘ ईद मिलन’ सोहळा
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानला जाणारा ‘ईद-मिलन’ कार्यक्रम यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. ‘जमात-ए-इस्लामी हिंद’, धाराशिव शाखेच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आज, शुक्रवार २७ मार्च रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जमात-ए-इस्लामी हिंद संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे. शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स मधील समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७:१५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र आणून परस्परांमधील बंधुभाव वृद्धिंगत करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अहमदनगर येथील प्रख्यात विचारवंत डॉ. इकराम खान काटेवाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि पाटोदा (जि. संभाजीनगर) येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष सजीयोद्दीन शेख भूषवणार आहेत.शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी, मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इराणने मला ‘सर्वोच्च नेता’बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
आखातामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने मला सर्वोच्च नेता बनण्याची ऑफर दिली होती. मात्र हा प्रस्ताव मी नाकारला, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सोशल मीडियावर या संबंधीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. इराणच्या नेतृत्वाने मला देशाचे सर्वोच्च पद स्वीकारण्याचा अनौपचारिक प्रस्ताव दिला होता, परंतु मी तो […]
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीकडून आईची हत्या, वर्षभर मृतदेह घरातच लपवला
हैदराबादमधील वनस्थलपुरममध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पकडले जाऊ नये म्हणून मृतदेह घरातच बेडरुममध्ये पुरला. आरोपी मुलगी एक वर्ष आईच्या मृतादेहासोबत घरी राहिली. अंजू दसारी रामय्या (40) यांचा आपल्या 16 वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. यात रागातून मे 2023 मध्ये […]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी टाटा इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. साखळी फेरीतील उर्वरित 50 सामने 13 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत देशातील 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होईल. नवीन वेळापत्रकानुसार 16 एफ्रिल […]
श्री राम जन्मोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी उत्सव साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री राम जन्मोत्सवानिमित्त धाराशिव शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील कसबा भागातील श्री राम मंदिर आणि समर्थ नगरमधील राम मंदिर येथे भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राम जन्मोत्सवानिमित्त धाराशिव शहरातील प्रमुख चौकात श्री राम जन्मोत्सव भाजपाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिर समर्थ नगर येथील राम मंदिरात घेण्यात आले. समर्थ नगर मधील राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. दुपारी 12 च्या दरम्यान महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धाराशिव तालुक्यातील तडवळा येथे श्री राम यांचे पुरात्न मंदिर असून, या ठिकाणीही भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भूममध्ये भव्य शोभायात्रा प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भूम शहरातील शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरातून प्रभू श्रीराम व बजरंगबली हनुमान यांच्या आरतीने भव्य शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. धार्मिक वातावरण, पालखी,भगव्या पताका, ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण भूम शहर भक्तिमय झाले होते. शिवाजीनगर येथून सुरू झालेली ही शोभायात्रा फ्लोरा चौक, ओंकार चौक, नागोबा चौक, गांधी चौक, जुनी वेस मार्गे कसबा येथील प्रभू श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी बाळासाहेब क्षिरसागर, ज्ञानेश्वर गिते, संतोष सुपेकर, बाबासाहेब वीर, आबासाहेब मस्कर, हेमंत देशमुख, अमर सुपेकर, निलेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व भूम शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या निमित्ताने शहरात भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडले असून प्रभू श्रीरामांच्या आदर्श विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ता वाजिद पठाण यांचे अपघाती निधन
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, बेंबळी जवळील शिवाजीनगर परिसरात बोलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धाराशिव शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले वाजिद पठाण वय 57 यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वाजिद पठाण लातूरहून मोटरसायकलवरून बेंबळी मार्गे धाराशिवकडे येत असताना समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाजिद पठाण यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघाताची तीव्रता लक्षात घेता त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप व 30 हजारांचा दंड
धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या निर्घृण खून प्रकरणात दोषी असलेल्या पतीला जन्मठेप व 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. धाराशिव ओके सर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 25 मार्च 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. याबाबत अधिक माहिती अशी की, अनदूर (ता. तुळजापूर) येथील फिर्यादी खलील शेख यांची बहिण सुलताना हिला तिचा पती वाहिद बिलाल कुरेशी याच्याकडून चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार छळ व मारहाण होत होती. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. यापूर्वीही वाद वाढल्याने सुलताना काही दिवसांसाठी हैदराबाद येथे नातेवाईकांकडे गेली होती. नंतर नातेवाईकांच्या समजुतीनंतर ती पुन्हा पतीसोबत राहू लागली होती. दरम्यान, 5 नोव्हेंबर 2024 रोजी नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यासमोरील चहाच्या टपरीवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद अचानक हिंसक वळण घेत आरोपी वाहिद कुरेशी याने हातातील चाकू व कात्रीच्या सहाय्याने सुलतानावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली व जागीच मृत्यूमुखी पडली. घटनेदरम्यान आरोपीने स्वतःच्या पोटावर व गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचवण्यात आला. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 351 (2), (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चाकू, कात्री तसेच रक्ताचे नमुने जप्त केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. पी. सोळुके यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले. यामध्ये बाल साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तो ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी आरोपी वाहिद कुरेशी (वय 38) यास दोषी ठरवत जन्मठेप व 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवीचे काम पोलीस अंमलदार संजय जटे यांनी पाहिले.
पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चावा घेऊन गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिस अधिकाऱ्याला चावा घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25 मार्च 2026) दुपारी परंडा पोलिस ठाण्यात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस ठाणे परंडा येथील फिर्यादी शिवाजी बबन राऊत (वय 39) हे आपल्या सहकाऱ्यांसह नियमित शासकीय कामकाज करत असताना आरोपी अभिमान दिगंबर काळे, फुलाबाई अभिमान काळे, अनिषा अभिमान काळे आणि दिलीप अभिमान काळे (सर्व रा. देवगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन शिवीगाळ करत गोंधळ घातला. यावेळी “तुझी वर्दी घालवितो” अशी धमकी देत मोठ्याने आरडा-ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. तसेच एका आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजी राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 296, 224, 221, 118(1), 3(5) तसेच 110, 112, 117 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या रविवारी पळसप येथे संपन्न होणार
धाराशिव (प्रतिनिधी)- स्वर्गीय अजितदादा पवार साहित्य नगरी पळसप तालुका धाराशिव येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने 29 मार्च रोजी 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली. शिक्षक आमदार वसंतराव काळे यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देता यावा, यासाठी त्यांच्या 20 व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सुप्रिसद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश सावंत (नांदेड) हे संमेलनाध्यक्ष आहेत. 29 मार्चला सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीचे उदघाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे कोषाध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. घ. ना. पांचाळ (मुंबई) यांच्या हस्ते तर सव्वा दहा वाजता सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे (धाराशिव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री संजय बनसोडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दीड वाजता बदलते ग्रामीण जीवन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. गंगाधरराव हिंगोले अध्यक्षस्थानी असतील. सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य राजकुमार मस्के (उदगीर), प्रा. डॉ. कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर) यांचा सहभाग असेल. दुपारी तीन वाजता कथाकथन होईल. सत्यशिला तौर (जालना) अध्यक्षस्थानी असतील. प्रा. सुरेश पाटील (अंबाजोगाई), स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांचा सहभाग असेल. दुपारी साडेचार वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रा. जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाचा समारोप सायंकाळी सहा वाजता होणार आहे. डॉ. सुरेश सावंत अध्यक्षस्थानी असती. यावेळी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी (मुंबई), मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य विलास सिंदगीकर (छत्रपती संभाजीनगर) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य मधुकरराव गायकवाड, प्राचार्य अनिल वसंतराव काळे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, बालाजी तांबे यांनी केले आहे. दरम्यान, 28 मार्चला सकाळी दहा वाजता स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता ह. भ. प. कु. ईश्वरी दिदी महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नळदुर्ग किल्ला संवर्धन आणि स्थळ व्यवस्थापन आराखडा या आराखड्यानंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल 7 कोटी 18 लाख 91 हजार 791 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. कामाची निविदा प्रक्रियाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप आता पालटणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे दुर्लक्षित राहिलेल्या नळदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव लाभणार आहे. नळदुर्ग किल्ल्याच्या या पहिल्या टप्प्यातील कामात अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने तटबंदीचे संवर्धन हाती घेण्यात येणार आहे. किल्ल्याची ऐतिहासिक तटबंदी अनेक ठिकाणी कमकुवत झाली आहे, त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे. किल्ल्यातील झुडपे आणि राडारोडाही हटविण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात आणि तटबंदीवर वाढलेली अनावश्यक झुडपे तसेच साचलेला राडारोडा पूर्णपणे साफ करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक आवर्जून या भुईकोट किल्ल्याला भेट देतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून शिर्डीला दर्शनासाठी जाणारे भाविक आणि पर्यटकही अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी आणि किल्ल्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्थळ व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न कामाचा दर्जा राखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आणि तज्ज्ञ वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पुढील दीड वर्षाच्या आत पर्यटकांना नळदर्ग किल्ल्याचे पालटलेले रूप पाहायला मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.या संवर्धन प्रकल्पामुळे नळदुर्ग किल्ला पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे येईल आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी आपण सुरू केलेल्या प्रयत्नांना या कामामुळे आणखी दिलासा मिळणार असल्याचा दावाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
थकबाकीदार वीजग्राहक रडारवर, 1 हजार 824 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांसह इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे फेब्रुवारी अखेर थकीत 139 कोटी 69 लाख व चालू महिन्याचे 29 कोटी 75 लाख अशा एकत्रीत 169 कोटी 44 लाख रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहीम मार्च अखेरीस अधिक आक्रमक केली आहे. थकबाकीदार वीजग्राहक रडारवर असून वारंवार सुचना देवूनही दाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट मीटर काढून खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज खंडित केल्यानंतर कुणी परस्पर जोडल्यास महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यातील लघूदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडील वीजबिल थकबाकी वसुलीसाठी संपूर्ण जिल्ह्यात महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी भर उन्हात दारोदार फीरत आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. मात्र जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्यात येत आहे. काल पर्यंत 1 हजार 824 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट होत आहे. नॉन स्मार्ट मीटर असेल, तर ते थेट काढून आणले जात आहे. थकबाकी भरल्यावरच नवीन स्मार्ट मीटरने वीजपुरवठा जोडण्यात येत आहे. गेल्या चोवीस दिवसात धाराशिव मंडळातील थकबाकीदार ग्राहकांनी 26 कोटी 76 लाख रूपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. हे प्रमाण चालू बिलाच्या केवळ 89 टक्केच असून मार्च महिन्यातील निर्धारीत लक्ष्य गाठण्यास अद्याप 2 कोटी 99 लाख रूपये येत्या सहा दिवसात वसुल करण्याची कसरत महावितरणला करावी लागणार आहे. या वसुलीत मागील थकबाकीला स्पर्शही झालेला नाही. सर्वाधिक थकबाकी कळंब उपविभागात धाराशिव विभागाची मागील थकबाकी 88 कोटी 24 लाख असून चालू महिन्याचे 19 कोटी 17 लाख वसुल करावयाचे आहेत. यापैकी कालपर्यंत केवळ 16 कोटी 69 लाख वसूल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक थकबाकी ही कळंब उपविभागातील आहे. 25 कोटी 47 लाख थकबाकी असून चालू महिन्याचे 4 कोटी 24 लाख वसुल करावयाचे आहेत. यापैकी काल पर्यंत 3 कोटी 85 लाख वसूल झालेले आहेत. तर परंडा उपविभागातील ग्राहकांकडे थकबाकीसह 17 कोटी 19 लाख थकबाकी असून 1 कोटी 64 लाख वसूल करण्यात आले आहेत. भूम उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 16 कोटी 17 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 2 कोटी 14 लाख वसूल झाले आहेत. धाराशिव शहर उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 10 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 4 कोटी 94 लाख वसूल झाले आहेत. धाराशिव ग्रामीण उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 7 कोटी 71 लाखांची आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख वसूल झाले आहेत. तेर उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 13 कोटी 51 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 2 कोटी 24 लाख वसूल झाले आहेत. वाशी उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 12 कोटी 92 लाखांची थकबाकी आहे. यापैकी केवळ 92 लाख वसूल झाले आहेत. तूळजापूर विभागातील लघूदाब वर्गवारीतील ग्राहकांकडे चालू महिन्याच्या बीलांसह 51 कोटी 44 लाख थकबाकी असून 10 कोटी 8 लाख काल पर्यंत वसूल करण्यात आले आहेत. लोहारा उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 5 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 1 कोटी 48 लाख वसूल झाले आहेत. नळदुर्ग उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 15 कोटी 11 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 1 कोटी 48 लाख वसूल झाले आहेत. उमरगा उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 18 कोटी 13 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 4 कोटी 27 लाख वसूल झाले आहेत. तर तूळजापूर उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 23 कोटी 57 लाखांची थकबाकी आहे. यापैकी कालपर्यंत 2 कोटी 84 लाख वसूल झाले आहेत. वीजबील वसुलीसाठी विभागीय कर्मचाऱ्यांसोबतच धाराशिव मंडळ तसेच लातूर परिमंडल कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही थकबाकीदारांचे दार ठोठावत आहेत. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले हे सातत्याने वसुलीवर लक्ष ठेवून आहेत. जास्त थकबाकी असलेल्या व वसुली कमी असलेल्या उपविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन वसुलीचा आढावा घेत आहेत. यावेळी अधीक्षक अभियंता संजय आडे हे सुध्दा वारंवार बैठका घेवून व प्रत्यक्ष उपविभागीय क्षेत्रात वसुलीसाठी फीरत आहेत. धाराशिव विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, तसेच तूळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे यांच्यासह तांत्रिक कर्मचारी, लेखा विभाग व मानव संसाधन विभागाचे अधिकारी कर्मचारी वसुलीसाठी फीरत आहेत. मार्च अखेरीस केवळ सहा दिवस राहिल्याने युद्धपातळीवर वसुलीचे काम करा, अशा सूचना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी दिल्या आहेत.
गुलबर्ग्यातील देवींचे भक्त श्रीकांत लाहोटी यांच्याकडून मंदिरास देणगी
तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी आणि श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त श्रीकांत लाहोटी यांनी आज देवीच्या चरणी 1 लाख 92 हजार 872 रुपयांची देणगी अर्पण केली. आपल्या अखंड श्रद्धा व भक्तिभावातून त्यांनी ही देणगी अर्पण करत श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीकांत लाहोटी हे गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला देणगी देत असून, ते दरवर्षी कधी वस्तू स्वरूपात तर कधी रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देऊन श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी आपली सेवा बजावत असतात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जयसिंग पाटील यांनी श्रीकांत लाहोटी यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महेंद्र आदमाने, तेजस कऱ्हाळे, विश्वास कदम तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
खराब हवामानामुळे तासभर हवेतच घिरट्या, अखेर ममता बॅनर्जींचे विमान कोलकात्यात सुरक्षित उतरले
खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विमान तासभर हवेतच घिरट्या घालत होते. अनेक प्रयत्नांनंतर अखेर तासाभरानंतर विमान कोलकाता विमानतळावर सुरक्षित उतरले. ममता बॅनर्जी यांची बीरभूममधील पांडवेश्वर येथे गुरुवारी दुपारी एक बैठक होती. त्यानंतर त्यांचे विमान आंदाल येथून निघाले होते. विमान दुपारी 4.10 वाजता विमानतळावर उतरणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान कोलकाता येथे उतरण्यापूर्वीच वादळी […]
तुळजापूर पं. स. सभापती विक्रम देशमुख यांचा भाजपच्या वतीने सत्कार
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विक्रम देशमुख यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले व आध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक विकास मलबा , ज्येष्ठ नेते गिरीश देवलाकर ,सागर पारडे ,प्रशांत लोमटे आदि उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल भारतीय शिक्षक संघाच्या वतीने,धाराशिव जि. प. च्या नूतन अध्यक्षा आदरणीय अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रमुख मागण्या सहशिक्षण च्या नावाखाली बंद करण्यात येत असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत. गणवेश आणि बूट सॉक्स चे पैसे शाळा सुरु होण्यापूर्वी देण्यात यावेत. पदवीधर स्वेच्छेने पदावनत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी. पदोन्नती( प्रमोशन) करताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अगोदर संधी द्यावी. विज्ञान पदवीधर शिक्षकापैकी पदवी प्राप्त नसलेले शिक्षक पदावनत करावेत. शाळेची वेळ सकाळी साडे सात ते साडे अकरा करावी,अशा विविध मागण्या अध्यक्ष बशीरभाई तांबोळी,यांनी सविस्तर मांडल्या. यावर सगळ्या मागण्याचा लवकर विचार करून,यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला दिले. विद्यार्थी हित लक्षात घेता अर्ध वेळ शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 11.45 करण्यास मान्यता देण्यात आली सदर पत्र उद्या निर्गमित होईल तसेच मा. शिक्षण अधिकारी डॉ. श्री. रवींद्र खंदारे याची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हा अध्यक्ष बशीर तांबोळी, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सरचिटणीस अविनाश मोकशे,राज्य कार्यकारिणी सद्स्य सविताताई पांढरे,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी साखरे,नप जिल्हा अध्यक्ष पवार सर,महिला आघाडी प्रमुख,अनिषा ताई कदम,जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन भांडे सर,शाहू पतसंस्था चेअरमन सुरेश भालेराव,कळंब तालुका अध्यक्ष महेंद्र रणदिवे मिलिंद धावारे,केंद्रप्रमुख जगदीश जाकते, तानाजी व्हनकळस, नप प्रमुख श्री पवार, इस्माईल शेख, हाशम शेख,जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील सर, जिल्हा उपाध्यक्ष बब्रुवाहन भोसले,श्रीमती तबसूम बागवान,भोसले सर,धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे वाशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने,भूम तालुकाध्यक्ष युवराज पिंगळे, लोहारा तालुकाध्यक्ष श्री घोडके, श्री चंदनशिवे दाजी,रणदिवे सर,दिपक ठोंबरे सर,मारुती काळे ,इलाही बागवान,मोहन नागटिळक,दिनेश पेठे,हनुमंत माने सर,लक्ष्मण घोडके,महेश अनपट,भालेराव सर, मोहन लष्करे,तुळजापूर तालुका अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शेखू जेटीथोर, दयानंद जेटीथोर,विठ्ठल जेटीथोर, बिलाल सौदागर, सुरेश चांदणे, गोरख खरताडे, यशवंत भांबुरे, बाळासाहेब घेवारे, विठ्ठल भोसले, दत्तात्रय लोहार, गोविंद बाचेवाद , शिवलिंग हंकारे, ज्ञानेश्वर ढोले, श्री मलंग सर, लक्ष्मण घोडके, श्रीहरी बिडवे,शिवाजी निंबाळकर, सुधीर पवार आणि जिल्हाभरातून आलेले शेकडो शिक्षक उपस्थित होते.
बाजारातील वस्तूंचे मूल्य नियंत्रित करण्यासाठी सहकार भारतीचे प्रयत्न - संजय पाचपोर
धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थांची स्थापना करून प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. ते धाराशिव येथे सहकार भारतीच्या वतीने आयोजित सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्याभारतीचे क्षेत्रिय मंत्री श्री शेषाद्री डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक एडवोकेट रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री पाचपोर पुढे म्हणाले की सहकार भारतीच्या वतीने रिझर्व बँकेला सहकारी बँकांच्या लेखापरीक्षण ,कर्ज वसुली रेशो तसेच बँकिंग व्यवस्थापनातील अनेक महत्त्वांच्या बदलांची शिफारस करण्यात आली आहे. सहकार भारतीच्या सूचनेवरून देशभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आता थेट रिझर्व बँकेचे नियंत्रणाखाली आलेल्या आहेत. छोट्या पतसंस्था, मल्टीस्टेट आणि दूध उत्पादक संस्था, मत्स्य, गृहनिर्माण यासारख्या सहकारी संस्थांसोबत आता सहकारी क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सहकार भारतीने अनेक नव्या सहकारी संस्था नोंदवण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवून सर्वसामान्य नागरिक, महिला आणि सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांचे जीवनमान उंचावत देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडया राज्यात सहकारातील अनेक संस्थांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करून महाराष्ट्रात सुरू झालेली सहकार चळवळ देशाला आर्थिक दिशा देत असल्याचे श्री पाचपोर यावेळी म्हणाले. सोलापूर जनता सहकारी बँक संचालक मंडळाने संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल विजयी संचालकांचे अभिनंदन करून श्री पाचपोर यांनी बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने बँकेच्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा,कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कार्यपद्धती विकसित करावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषाद्री डांगे यांनी केले त्यात त्यांनी धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जनता बँकेचे संचालक श्री हर्षल डंबळ हे बिनविरोध निवडून आणण्यासाठी जसे प्रयत्न झाले तसेच सोलापूर जिल्ह्यातूनही व्हायला हवे होते, बँकेच्या जुन्या सभासदांना मतदान प्रक्रियेत शेअर्स रक्कम वाढवून सहभागी करून घ्यायला हवे,धाराशिव जिल्ह्यात बँकेच्या शाखा वाढाव्यात अशा अपेक्षा नूतन संचालक मंडळाकडून व्यक्त केल्या. जिल्हा संघचालक एडवोकेट रवींद्र कदम यांनी नूतन संचालक मंडळात धाराशिवचे संचालक डॉक्टर हर्षल डंबळ यांच्यावर द्याल ती जबाबदारी धाराशिव जिल्ह्याचा सन्मान वाढवणारी असल्याचे सांगून जिल्ह्यात बँकेच्या माध्यमातून नव उद्योजक, नव ठेवीदार यांना जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली. यावेळी नूतन संचालक आणि विद्यमान अध्यक्ष श्री सुनील पेंडसे आणि सौ चंद्रिका चौहाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवीदास पाठक यांनी केले तर आभार श्री अविनाश लोमटे यांनी मानले.प्रारंभी सहकार भारतीचे संस्थापक स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बँकेचे सभासद ,जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
जल व भूमी व्यवस्थापन विभागाची महत्वाची भूमिका
धाराशिव(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जल व भूमी व्यवस्थापन विभागातर्फे विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. पानढवळे स्वप्नाली, एम. एस्सी. भाग 1 व भाग 2 चे विद्यार्थी व कर्मचारी यांनी विद्यापीठ- उद्योग शिखर संमेलन 2026 चे आयोजन ज्ञान प्रबोधिनी हराळी, या संस्थेचे संस्थापक श्री अभिजित कापरे, तसेच नेटाफेम इरिगेशन कंपनीचे श्री मनोज लोमटे, कोठारी इरिगेशन कंपनीचे श्री प्रदीप जाधव, प्रिमियर इरिगेशन कंपनीचे श्री अक्षय कुलकर्णी, ज्ञान प्रबोधिनी हराळीचे श्री सचिन सुर्यवंशी, प्राइड इंडिया (एनजिओ) चे श्री ओंकार भोरे, व कोठारी इरिगेशनचे श्री निखिल भालेराव यांनी आजच्या काळात जल स्त्रोतांचे संरक्षण, आणि जमिनीची योग्य वापर का महत्वाचा आहे? आणि आगामी काळात जल व भूमी व्यवस्थापन विभागाची भूमिका अधिक महत्वाची असणार आहे व हवामान बदलामुळे जल स्त्रोतांवर दबाव वाढत आहे. त्यामुळे विभाग संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे जलसंवर्धन व जमिनीच्या शाश्वत वापराबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी संमेलनामध्ये संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि जल व भूमी व्यवस्थापनातील नव्या तंत्रज्ञानाची चर्चा केली. या विभागाच्या सदर उपक्रमामुळे शेतकर्यांना तसेच येणाऱ्या तरुण पिढीला पाण्याचा कार्यक्षम वापर करुन जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या पद्धती, शिकायला मिळतील त्या अनुषंगाने जल व भूमी व्यवस्थापन या विभागाचे येणाऱ्या दशकात अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कै. माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी
मुरुम (प्रतिनिधी)- कै. माधवराव पाटील यांनी शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांनी विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. समाजकारणाबरोबरच राजकीय क्षेत्रात त्यांनी पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्व केले. ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरु मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची रामनवमी दिनी 100 वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.26) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशिद शेख, मदन पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सादिकमिया काझी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे, कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. राम सोलंकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य डॉ. सदक वली, मुख्याध्यापक उल्हास घुरेघुरे, राजशेखर कोरे, अनुराधा जोशी, व्यंकट घोडके, सैपन शेख, धनराज खोंडे, श्रीपाद कुलकर्णी, कमलाकर मोटे, सच्चिदानंद अंबर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना आदि ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.
खोंदला नगरी भक्तिरसात न्हाली; अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील खोंदला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात दि . 26 ते 2 एप्रिल रोजी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि धार्मिक उत्साहात सप्ताहाचा प्रारंभ झाला असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. समस्त गावकरी मंडळ, खोंदला यांच्या वतीने आयोजित या सप्ताहाच्या प्रारंभी कलश पूजन, ध्वज पूजन, टाळ, मृदुंग, वीणा आणि गाथा पूजन यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा आरती, तर सायंकाळी कीर्तन, प्रवचन आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून संत साहित्य, भागवत धर्म आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात आहे. या सप्ताहात ह.भ.प. बळीराम महाराज कवडे , ह.भ.प. प्रदीप महाराज यादव, ह.भ.प. श्री. संभाजी महाराज में हुणकर, ह.भ.प. गणेश महाराज जोगदंड, ह.भ.प. महंत श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. श्री. गोविंद महाराज पांगरकर , ह .भ .प दिपक महाराज मेटे आदी मान्यवर कीर्तनसेवा देणार आहेत. सप्ताहाचा समारोप गुरुवारी दि . 2 रोजी महाप्रसादाने होणार असून ह.भ.प. श्री. महंत भगवान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन विशेष आकर्षण ठरणार आहे. गावातील महिला मंडळ, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत नाशिकचा दबदबा; यजमान लातूर विभाग उपविजेता
कळंब (प्रतिनिधी)- तालुका क्रीडा संकुल, कळंब येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाने दमदार कामगिरी करत 17 व 19 वर्षे गटातील प्रमुख गटांत विजेतेपद पटकावले, तर यजमान लातूर विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चार दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये राज्यभरातील संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला असून अंतिम फेऱ्यांमध्ये प्रेक्षकांना रोमहर्षक सामने अनुभवायला मिळाले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ आणि धाराशिव जिल्हा हौशी आट्यापाट्या मंडळ यांच्या तांत्रिक सहकार्याने दि. 23 ते 26 मार्च 2026 दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभात तहसीलदार हेमंत ढोकले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शितल शिंदे, शिल्पा डोंगरे, प्राचार्य हेमंत भगवान, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देत, प्रत्येकाने किमान एक खेळ नियमित खेळण्याचा सल्ला दिला आणि विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अंतिम सामन्यांचे पंचकार्य धर्मेंद्र काळे, अजित भुरे, अनिकेत टकसाळ, दीपक शिंदे, सौरभ शिंदे, तुषार डोंगरे, भैरवनाथ राऊत आणि अक्षय बाकाले यांनी पाहिले, तर गुणलेखनाची जबाबदारी अक्षता मगर, वैष्णवी शिंदे, प्रिती शिंदे आणि गायत्री माळकर यांनी सांभाळली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, कैलास लटके, अक्षय बिरादार, किशोर भोकरे, निलेश माळी यांच्यासह जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अंतिम निकाल 14 वर्षे मुले अमरावती प्रथम, छत्रपती संभाजीनगर द्वितीय, लातूर तृतीय, 14 वर्षे मुली छत्रपती संभाजीनगर प्रथम, नागपूर द्वितीय, अमरावती तृतीय, 17 वर्षे मुले नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, मुंबई तृतीय, 17 वर्षे मुली नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, पुणे तृतीय, 19 वर्षे मुले नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, छत्रपती संभाजीनगर तृतीय, 19 वर्षे मुली अमरावती प्रथम, नाशिक द्वितीय, लातूर तृतीय, कळंबमध्ये झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे तालुक्यात क्रीडा वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी उत्पत्ती दिन गुरुवार दि. 26 मार्च रोजी तुळजापुरात साजरा करण्यात आला. आज श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन (प्रकट दिन) निमित देवीजीस अभिषेक व महाआरती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी जनकल्याणासाठी देवीसमोर प्रार्थना करण्यात आली. प्रकट दिनानिमित्त महाद्वारासमोर भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महंत वाकोजी बुवा, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, नागेश शितोळे, नागेश नाईक, किशोर गंगणे गोविंद खुरुद, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, आदींसह शहरातील नागरिक, व्यापारी, पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमंगल फाउंडेशनतर्फे 10 मे रोजी धाराशिव येथे सामुदायिक विवाह सोहळा
तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 47 वा सामुदायिक विवाह सोहळा 10 मे 2026 रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे. फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा 2006 मध्ये सुरू झाली. समाजात एक आदर्श उपक्रम म्हणून या सोहळ्याने वेगळी ओळख निर्माण केली असून यंदा या उपक्रमाला 21 वे वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 20 वर्षांत एकूण 46 सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीपणे पार पडले आहेत. या सर्व सोहळ्यांमधून आतापर्यंत 3203 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला असून सामुदायिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत आहे. तसेच साधेपणाने विवाह करण्याची प्रेरणा समाजाला मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या उपक्रमाला विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जपत विविध धर्मांच्या जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होत विवाह केला आहे. गेल्या 20 वर्षांत हिंदू धर्मातील 2490, बौद्ध समाजातील 681, मुस्लिम समाजातील 21, ख्रिश्चन धर्मातील 4 आणि जैन समाजातील 7 जोडपी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून विवाहबद्ध झाली आहेत. दरम्यान, 10 मे रोजी होणाऱ्या 47 व्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम नोंदणीची मुदत 30 एप्रिल 2026 आहे. इच्छुक वधू-वरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क रोहन देशमुख संपर्क कार्यालय, जुन्या बस स्टँडसमोर, आयसीआयसीआय बँकेखाली, हंगरगेकर कॉम्प्लेक्स, तुळजापूर. विनोद देवकर संपर्क : 9923800256 लोकमंगल मल्टीस्टेट, पोलिस लाईन समोर, तीर्थकर कॉम्प्लेक्स, आनंद नगर, धाराशिव.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाची सुरुवात आर्या रोचकरी या मुलीला लस देऊन करण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चोरमले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रोचकरी तसेच रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लसीकरणानंतर डॉ. चोरमले यांच्या हस्ते संबंधित मुलीचा सत्कार करण्यात आला. डॉ. चोरमले यांनी यावेळी सांगितले की, एचपीव्ही लस ही 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी दिली जाते. ही लस सुमारे 90% पर्यंत कॅन्सरचा धोका कमी करण्यात प्रभावी आहे. लसीचे दोन डोस दिले जातात. डॉ. चोरमले यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, वेळेवर एचपीव्ही लस दिल्यास शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे आपल्या मुलींच्या सुरक्षित भवितव्यासाठी ही लस नक्की द्यावी.” यावेळी एचपीव्ही लस बाबत आवाहन करताना स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रोचकरी म्हणाल्या की, तुळजापूर तालुक्यातील व शहरातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी ही लस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लस उपलब्ध आहे तुळजापूर तालुक्यात सुरू झालेला हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी मोठा टप्पा मानला जात असून, भविष्यात कॅन्सरमुक्त समाजाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
आई तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता दर्शणार्थ खुले होणार
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सवाचा सोहळा यंदा दि. 30 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्था सुलभ करण्यासाठी यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शन सुरू होणार असुन अभिषेक पुजा घार सकाळी 6 वाजता होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील महंत, पुजारी, सेवेधारी व भाविक भक्तांनी वरील वेळापत्रकाची नोंद घ्यावी, तसेच दर्शनासाठी येताना शिस्त पाळावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी माताच्या नगरीत आरोग्य सुविधांचा अभाव;
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता यांच्या पुण्यभूमीत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रात आजही अद्यावत व सुसज्ज रुग्णालय नसल्याची वस्तुस्थिती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तुळजापूर येथे 200 खाटांचे आधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पूर्वी लातूर रोडवर अडीच एकर जागेत असलेले उपजिल्हा रुग्णालय आता महामार्ग विस्तारामुळे केवळ दोन एकर जागेत उभे आहे. त्यातही इमारतीचे नियोजन व्यवस्थित नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुळजापूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो-लाखो भाविक येतात. मात्र गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना सोलापूरसह इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असून अनेकांचे प्राणही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात यंत्रसामुग्री आणि डॉक्टरांची यंत्रणा उपलब्ध असतानाही सुसज्ज इमारतीचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे. पूर्वी येथे सुमारे 400 ओपीडी होत असताना सध्या 800 पेक्षा जास्त रुग्णांची ओपीडी होत आहे. ऑपरेशनचे प्रमाणही वाढले आहे. मात्र जागा अपुरी असल्याने वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागत आहे... तीर्थक्षेत्र तुळजापूर विकासासाठी जवळपास दोन हजार कोटीचा विकास आराखडा मंजूर केला आहे मात्र यातही आरोग्याबाबत कुठलेही उपाययोजना नसल्याचे आरोप नागरिकातून होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करणे येथील रुग्णालयासाठी जवळपास अशक्य ठरू शकते. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे हे भाविकांच्या जीवाशी खेळ ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री च्या नावाने हॉस्पिटल उभारण्याची चर्चा होती मात्र ती चर्चा सध्या हवेतच विरली आहे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या मदतीने संस्था येथे हॉस्पिटल चालवण्याच्या तयारीत होती तीही चर्चा आता हवेतच विरली आहेत दरम्यान, देश-राज्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी येतात, मात्र येथील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेऊन तुळजापूर येथे जिल्हा दर्जाचे अत्याधुनिक रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
आमदार प्रवीण स्वामींच्या पाठपुराव्याला यश; उमरगा-लोहारा तालुक्याला लवकरच मिळणार नवीन एसटी बसेस
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांची एसटी बसची प्रतीक्षा आता संपणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केलेल्या आक्रमक मागणीची दखल घेत राज्य सरकारने तालुक्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांनी विधानभवनात यासंदर्भात अधिकृत ग्वाही दिली असून, यामुळे मतदारसंघातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मतदारसंघातील अनेक ग्रामीण मार्गांवर बसेसची संख्या कमी असल्याने शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रवीण स्वामी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. जुन्या झालेल्या बसेस आणि अपुऱ्या फेऱ्यांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन बसेसचा ताफा मिळावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश आले आहे. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी येणाऱ्या काही दिवसांतच उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी विशेष कोट्यातून नवीन बसेस दिल्या जातील, असे आश्वासित केले आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील एसटीचे जाळे अधिक सक्षम होणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. विकासगंगा मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर भर देत असल्याचे यावेळी आमदारांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि सर्वसामान्य जनतेला हक्काचे आणि सुरक्षित साधन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमरग्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
उमरगा (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र कुशल कामगारांची आवश्यकता असुन युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांच्या ज्ञानाचे रुपांतर रोजगारात करावे असे मत तहसिलदार गोविंद येरमे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्यावेळी तहसिलदार येरमे बोलत होते. राजेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अक्षय घोडके, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, आय. एम. सी. सदस्य संतोष वखारे, प्राचार्य संजय माळकुंजे, गटनिदेशक नागनाथ माकने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. गुरव यांनी प्रस्ताविक करताना उमेदवारांना उपलब्ध असलेल्या विविध करिअर विषयक संधी बाबत माहीती दिली. व शासनाच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा व मेळाव्यातील खाजगी आस्थापनेकडील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे उमेदवारांना आवाहन केले. या रोजगार मेळाव्यात 236 जणांनी नोंदणी केली.180 उमेदवारांनी आठ खाजगी आस्थापनाकडे मुलाखत दिली यापैकी 118 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 8 नामांकित खाजगी कंपन्या, आस्थापना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे, व धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता. घोडके उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडील रिक्त पदे वेतन व इतर सुविधा बाबत उमेदवारांना माहिती दिली. यावेळी रोजगार मेळाव्यासोबत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांचे स्टॉल लावून माहिती देण्यात आली. पवन नाईकवाडे यांनी सुत्रसंचलन केले तर गटनिदेशक नागनाथ माकणे यांनी आभार मानले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
IPL 2026 – RCB च्या अडचणीत वाढ; आणखी एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर! क्रिकेट बोर्डाची आडकाठी
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. वेगवान गोलंदाज यश दयाल बाहेर पडल्यानंतर आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या नवीन आणि कडक फिटनेस धोरणांतर्गत तुषाराला NOC देण्यास नकार दिला आहे. या नियमानुसार परदेशी लीगमध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूंना कठीण शारीरिक चाचण्या […]
पंचायत समितीच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- सभापती ॲड.आकांक्षा चौगुले
उमरगा (प्रतिनिधी)- मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज असल्याने काही प्रमाणात संबंधित शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू होते. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. याच अनुषंगाने उमरगा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षाताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड व सर्व पंचायत समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याप्रसंगी सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांच्या योजना व कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना यावेळी देण्यात आली. सदर बैठकीत सभापती यांनी प्रामुख्याने घरकुल लाभार्थ्यांचे होल्ड केलेले बँक खाते परत सुरू करणे, गोठा व विहिरीचे कुशल व अकुशलची थकीत असलेली सर्व बिले तत्काळ अदा करणे, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, लसीकरणाबाबत जनजागृती करणे, आदी सूचना प्रशासनास केल्या. मागील काळात पंचायत समितीमध्ये काही भ्रष्टाचाराच्या चर्चा होत होत्या. यापुढील काळात पंचायत समिती मधील कोणीही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांकडून लाच अथवा पैसे मागितल्यास त्यांच्यावर सज्जड कारवाईचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. सदर बैठकीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, गटशिक्षण अधिकारी अमोल राजपूत, उपअभियंता जि.प.बांधकाम दिलीप बिराजदार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रीतापुरे, यांच्यासह परिवहन, जलसंधारण, पाणीपुरवठा, घरकुल, रोजगार हमी योजना, आदी प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनगणना 2027 ची तयारी; 3731 कर्मचारी सज्ज
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या स्तरावर व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध प्रशासकीय घटकांमार्फत एकूण 2850 गणक आणि 471 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव कर्मचारी धरून ही संख्या अनुक्रमे 3198 व 526 पर्यंत पोहोचली आहे.एकूण 3731 कर्मचाऱ्यांचा सहभाग या प्रक्रियेत राहणार आहे. तहसील कार्यालयांच्या पातळीवर धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी आणि कळंब या आठही तालुक्यांमध्ये गणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव तहसील कार्यालयात सर्वाधिक 456 गणक व 76 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून,तुळजापूर,उमरगा आणि कळंब या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमण्यात आले आहेत.प्रत्येक तहसीलस्तरावर आवश्यक तेवढे राखीव कर्मचारी देखील ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी कार्यात खंड पडणार नाही.नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर देखील गणक व पर्यवेक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, कळंब, मुरूम, नळदुर्ग तसेच लोहारा व वाशी नगरपंचायतींमध्ये मिळून मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नगरपरिषद धाराशिव येथे 206 गणक व 42 पर्यवेक्षक,तर तुळजापूर व उमरगा येथे अनुक्रमे 64 व 70 गणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यात एकूण 18 चार्ज कार्यालये कार्यरत असून,प्रशिक्षणासाठी 80 बॅचेस आणि 18 प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.मास्टर ट्रेनर्स,फील्ड ट्रेनर्स यांचीही नियुक्ती करण्यात आली असून,सर्व संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर भर दिला जात आहे.प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन केले असून जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया अचूक व पारदर्शकपणे पार पडणार आहे.
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
धाराशिव (प्रतिनिधी)- डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत 31 मार्च 2026 पूर्वी ई-पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल क्रॉप सर्वे योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी नोंदणी सध्या सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत,कर्जसुविधा व विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. रब्बी हंगामाची सुरुवात 10 डिसेंबर 2025 पासून झाली असून,शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी 24 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आली होती.त्यानंतर सहाय्यक स्तरावरून 25 जानेवारी 2026 पासून ई-पीक पाहणी नोंदणी सुरू करण्यात आली.या नोंदणीसाठीची मुदत पूर्वी 10 मार्च 2026 पर्यंत होती.मात्र,जिल्ह्यातील एकूण अपेक्षित क्षेत्रापैकी केवळ 24.66 टक्के नोंदणी पूर्ण झाल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत.यामुळे कोणताही शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहू नये,यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत दि.31 मार्च 2026 पर्यंत वाढविली आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदीवरच पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,शेतकरी कर्ज व अनुदान व इतर कृषी योजनांचा लाभ निश्चित होतो.म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी अद्याप झालेली नाही,त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांच्या मदतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पूर्वी अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे.शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून, भविष्यातील सर्व शासकीय लाभ ई-पीक पाहणीच्या नोंदीवर आधारित राहणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सहाय्यकांच्या मदतीने आपली ई-पीक पाहणी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून दोन निष्पाप मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.बालविवाह आणि कौटुंबिक त्रासाच्या विळख्यात अडकलेल्या या मुलींना मुक्त करून त्यांना नव्या आयुष्याची दिशा देण्यात आली आहे.या मुलींची शक्ती सदन येथे रवानगी करण्यात आली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. धाराशिव तालुक्यातील एका गावातील शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलीने तिच्या आईने तिच्या व वडिलांच्या इच्छेविरुद्ध लावलेल्या बालविवाहाविरोधात धाडसाने आवाज उठवला.शिक्षण बंद करून मारहाण केली जात असल्याची वेदनादायक कहाणी तिने 13 मार्च 2026 रोजी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्जाद्वारे मांडली. हा अर्ज मिळताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भाग्यश्री पाटील यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली. या प्रकरणासाठी बालस्नेही संघातील उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दोन्ही मुलींची व्यथा समजून घेतली. चौकशीदरम्यान पीडित मुलीने लग्नातील फोटो आणि मारहाणीचे व्हिडिओ सादर केले.मात्र,तिची परीक्षा 18 मार्च रोजी संपत असल्याने पेपर संपल्यावर मी येते, असे तिने सांगितले.शिक्षणाविषयीची तिची जिद्द यामधून स्पष्ट झाली. 18 मार्च 2026 रोजी पीडिता तिच्या लहान बहिणी व वडिलांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आली. त्या वेळी दोन्ही बहिणी भीती आणि तणावाखाली होत्या.त्यांनी घरी परतण्यास नकार दिल्यानंतर तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्यात आला.त्यानंतर जिल्हा महिला बालविकास चाइल्ड लाईनचे अमर भोसले,पुनम पाटील, श्री.चव्हाण तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी प्रियंका जाधव व एक महिला प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पीडित मुलींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना बालकल्याण समिती सदस्य ॲड.दिपाली जहागिरदार यांच्या समोर हजर करण्यात आले.तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समितीने दोन्ही मुलींना शक्ती सदन,बालाजी नगर,शेकापूर रोड,धाराशिव येथे पाठविण्याचा आदेश दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या संवेदनशील आणि तत्पर हस्तक्षेपामुळे दोन अज्ञान मुलींना त्रासातून मुक्तता मिळाली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आणि अज्ञान बालकांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय,धाराशिव यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
धाराशिव नगरपरिषदेसाठी 5 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारणार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेला पाणीपुरवठ्यासाठी दरमहा येणाऱ्या भरमसाठ वीज बिलाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत. उजनी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरावी लागत असल्याने नगरपरिषदेला लाखो रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वीज तोडणीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव शहराजवळ असलेल्या वरवंटी शिवारात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या सुमारे 15 एकर जमिनीवर 5 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही जमीन नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून सोलार प्रकल्प उभारणीसाठी ती उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, नगरसेवक पंकज भोसले, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, वरवंटी गावचे तलाठी तसेच वारी सोलार प्रकल्प भगवान शेजुळ यांच्या सह इतर कंपनीचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. हा सोलार प्रकल्प कार्यान्वित झाल्यास धाराशिव नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
माजी सैनिक नामदेव सावंत यांचे आकस्मिक निधन
ओटवणे प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार तथा जिल्हा समायोजन कार्यालयातील मुख्य लिपिक नामदेव रामचंद्र सावंत (५३) यांचे गुरुवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचा सावंत कुटुंबीयांसह आजी – माजी सैनिक परिवार व सर्वांनाच धक्का बसला. मूळचे दाणोली गावठण येथील नामदेव सावंत यांनी भारतीय सैन्य दलात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर ते ओरोस येथे जिल्हा [...]
सावंतवाडीत विजेचा खेळ खंडोबा ; नागरिक हैराण
दिवसातून 24 ते 25 वेळा जाते लाईट सावंतवाडी । प्रतिनिधी अमेरिका , इस्राईल- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात गॅस सोबतच पेट्रोल, डिझेलचाही तुटवडा भासू लागला आहे. त्याबरोबरच सावंतवाडीकर सध्या विजेच्या खेळाने त्रस्त झाले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १२ तासांमधून 24 ते 25 वेळा वीज येत -जात असल्याने नागरिक हैराण [...]
IPL 2026 –आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; BCCI ची मोठी घोषणा, कारण काय?
BCCI ने आयपीएल २०२६ चा पारंपारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी (28 एप्रिल 2026) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना रंगणार आहे, मात्र त्यापूर्वी कोणताही सोहळा होणार नाही. गेल्या वर्षी 4 जून 2025 रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. […]
मध्य पूर्वेतील युद्धाला महिना पूर्ण होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांमध्ये तंबी दिली आहे. इराणने लवकरात लवकर चर्चेबाबत गंभीर व्हावे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्याचे परिणाम भीषण असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा अल्टिमेटम दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया […]
नवे आर्थिक वर्ष सुरू होणार; नवीन आयकर कायदा लागू होणार, काय होणार बदल…जाणून घ्या…
१ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. तसेच नव्या आर्थिक वर्षात अनेक बदलही केले जातात. यंदा नव्या आर्थिक वर्षात नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. त्यामुळे अनेक बदल होणार आहेत. ITR आणि PAN मधील हे बदल माहित असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे आयकर श्रेणीत कोणताही बदल होणार नाही. तर उत्पन्न, वजावटी, पगार, भांडवली नफा आणि […]
आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा हिंदुस्थानला बसत आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने हिंदुस्थानमध्ये इंधन टंचाई आणि एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजीच्या बुकिंगबाबतही सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेतील संबोधनादरम्यान ‘कठोर परिस्थिताला सामोरे जाण्यास तयार रहा’, असे म्हटले होते. यानंतर लॉकडाऊनच्या अफवांचा बाजार उठला आणि पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. […]
दोन दिवसांनी पेट्रोलपंपांवरील गर्दी ओसरली
अफवांमुळे नागरिकांची ससेहोलपट : तासन्तास लावाव्या लागल्या रांगा बेळगाव : इंधन टंचाईची अफवा पसरल्यामुळे मागील दोन दिवसांत पेट्रोलपंपांवर प्रचंड गर्दी झाली होती. अखेर ही अफवा असल्याचे समजल्याने बुधवारी सकाळपासून परिस्थिती पूर्वपदावर आली. गर्दी ओसरू लागल्याने मुबलक पेट्रोल असतानाही पेट्रोलपंपांवर शुकशुकाट दिसून आला. रविवारी रात्रीपासून काही व्यक्तींनी सोशल मीडिया व रिल्सच्या माध्यमातून बेळगावमध्ये पेट्रोलचा तुटवडा असे [...]
अट्टल घरफोड्यांना उद्यमबाग पोलिसांकडून अटक
साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत बेळगाव : दोघा अट्टल घरफोड्यांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे दागिने व वाहने जप्त करण्यात आली आहेत. उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रामचंद्र फकिराप्पा तळवार (वय 21) राहणार मोहरे, ता. बैलहोंगल, सुरेश लक्काप्पा पाटील (वय 33) राहणार राजनकट्टी, सध्या राहणार रंगदोळी-वाघवडे रोड अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून [...]
ओडिसातील सुप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिराच्या ‘रत्नभांडारा’तील अमूल्य दागिन्यांची आणि खजिन्याची मोजणी प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. तब्बल 46 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हे रत्न भांडार उघडण्यात आले. या खजिन्यात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवींचे सोन्या-चांदीचे अलंकार, मौल्यवान रत्ने आणि पुरातन नाणी यांचा समावेश आहे. 12 व्या शतकातील या मंदिराला ‘धरतीवरील वैकुंठ’ मानले जाते. बुधवारी दुपारी […]
चिअर्सSsss…आता पेट्रोल पंपावर दारूही मिळणार; नवीन अबकारी धोरणाला शासनाची मंजुरी
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. एकीकडे काही भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळायचे वांदे झालेले असताना दुसरीकडे चंदीगड प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चंदीगड प्रशासनाने नवीन अबकारी घोरणाला मंजुरी दिली असून आता दारूच्या दुकानांमध्येच नाही तर पेट्रोल पंप, शॉपिंग […]
सावंतवाडीत “ज्ञानियांचा राजा -मोगरा फुलला” उत्साहात
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्रचे आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक-संगीत कार्यक्रम बुधवार 25 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बॅरिस्टर नाथ पै बहुउद्देशीय सभागृह , सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमातील [...]
व्हँकुव्हरला चुकीचे विमान पाठवले, डीजीसीएचा एअर इंडियाला दणका; एक अधिकारी निलंबित
व्हँकुव्हरला चुकीचे विमान पाठवल्याने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) निष्काळजीपणाबाबत एअर इंडियाला फटकारले आहे. या मार्गासाठी केवळ बोईंग 777-300ER विमानालाच मंजुरी असताना एअर इंडियाने चुकून व्हँकुव्हरच्या उड्डाणासाठी बोईंग 777-200LR विमान पाठवले. परिणामी, सुमारे सात तासांच्या प्रवासानंतर विमान दिल्लीला परतले. या घटनेनंतर डीजीसीएने तात्काळ एअर इंडियाला सुधारणात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निष्काळजीपणाबद्दल एअरलाइनच्या एका अधिकाऱ्यावर […]
LPG Crisis –देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाने जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिल वायूची कमतरता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानवरही याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? याची महिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा नियंत्रणात आहे. देशात सध्या ६० दिवसांचा साठा उपलब्ध आहे. सरकारने […]
ब्लूटूथ इयरफोन्समुळे खरोखरच कॅन्सर होतो का? अमेरिकन न्युरोसर्जननी मांडले सत्य!
ब्लूटूथ इयरफोन्स हा आपल्या जच्या धावपळीच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रवासात असो वा कार्यालयात, हे उपकरण सतत आपल्या कानाशी जोडलेले असते. मात्र, याच वाढत्या वापरासोबत रेडिएशन आणि मेंदूच्या कर्करोगाच्या (ट्यूमर) जोखमीबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. या विषयातील सखोल सत्य जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. रूपा जुथानी यांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे काही [...]
मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने हिंदुस्थानसह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणी सरकारी टीव्हीशी बोलताना याबाबत माहिती दिली. ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे. पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी दावा केल्याप्रमाणे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत अब्बास अराघची म्हणाले […]
Health Update : उरलेला भात पुन्हा गरम करून खाताय? सावधान! शरीरासाठी ठरू शकते ‘स्लो पॉयझन’.
अनेकदा घरामध्ये भात उरला की, आपण तो जपून ठेवतो आणि पुढच्या वेळेस पुन्हा गरम करून खातो. भाताच्या बाबतीत ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. जर उरलेला भात योग्य पद्धतीने साठवला नाही किंवा तो वारंवार गरम केला, तर त्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, जे [...]
मधुमेह नियंत्रणात केवळ आहार-औषधे पुरेशी नाहीत; ‘या’सवयीची जोड रक्तातील साखरेसाठी ठरेल रामबाण!
मधुमेहींसाठी खास ‘वॉकिंग’ तंत्र मधुमेहाच्या व्यवस्थापनात केवळ आहार आणि औषधे पुरेशी नसतात. योग्य व्यायाम आणि जीवनशैलीची जोड नसल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. अनेकदा उत्तम आहार घेऊन आणि वेळेवर औषधे घेऊनही साखर वाढत असल्याचे दिसते. यामागे मानसिक ताण, अपुरी झोप [...]
मनपाच्या अशोकनगर कार्यालयात ठिय्या : केआयएडीबी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक-रहिवासी आक्रमक, झोनल आयुक्तांच्या कामकाजाबाबत नाराजी बेळगाव : केआयएडीबी औद्योगिक वसाहतीतील मिळकतीना ई-आस्थी देण्यासाठी महापालिकेच्या अशोकनगर कार्यालयातील अधिकारी टोलवा टोलवी करत आहेत. त्यामुळे कर्ज, मिळकती घेणे व विक्री करणे कठीण झाले आहे. महापालिकेत ई-आस्थी व पीआयडी देण्याबाबत ठराव होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. झोनल आयुक्त अनिल बोरगावी [...]
जलवाहिनीसाठी चन्नम्मा चौकातून होणार खोदकाम
मनपा-एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : एप्रिलपासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पाण्याच्या टाकीतून शहरातील प्रमुख गल्ल्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे चन्नम्मा चौकातून खोदकाम करावे लागणार असल्याने कशा पद्धतीने जलवाहिनी घालण्याचे काम हाती घ्यावे, तत्पूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, चन्नम्मा सर्कल शहरातील प्रमुख रहदारीचे ठिकाण असल्यामुळे नियोजनबद्ध काम केले पाहिजे. यासाठी [...]
अधिवेशन संपताच सीमाप्रश्नी तज्ञ-उच्चाधिकार समितीची बैठक घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन,जयंत पाटील यांनी घेतली भेट बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या खटल्याला गती मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सीमा प्रश्नी तज्ञ कमिटी व उच्चाधिकार समितीची बैठक महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संपताच बोलविली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार [...]
भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, […]
पिंपळवाडीत घराच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी सातारा -पिंपळवाडी धावडशी येथे जुन्या गावठाणच्या जागेवर घराच्या बांधकामाच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद निर्माण होऊन एकमेकांना मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग बाबुराब फाळके यांनीप्रवीण परशुराम फाळके (वय ३४,रा. पिंपळवाडी, [...]
तळमावलेत इंधन तुटवड्याची अफवा! पेट्रोल पंपांवर जत्रेसारखी गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
इंधन साठवण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर झुंबड तळमावले – युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सध्या सर्वत्र डिझेल-पेट्रोलच्या तुटवड्याबाबत अफवा पसरल्याने नागरिकांनी रात्रीपासून पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. डिझेल-पेट्रोल मिळणार नाही ही अफवा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्याचा परिणाम म्हणून येथील पेट्रोल पंपावर जत्रेसारखी गर्दी उसळली आहे. एका [...]
शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांसह कुटुंबीयांना रेल्वेच्या एसी डब्यांमधून आजीवन मोफत प्रवास
देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा सन्मान करत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पुरस्कार विजेत्यांना आता एसी डब्यांमध्ये आजीवन मोफत प्रवास मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. हा निर्णय म्हणजे शूर सैनिकांना दिलेली ही एक आदरांजली आहे. ही सुविधा केवळ सेनिकांपुरतीच मर्यादित नाही. […]
कॅन्टोन्मेंटला राज्य सरकारकडून निधी
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी 40 लाख खर्च करणार बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ते आता चकाचक होणार आहेत. राज्य सरकारकडून 6 कोटी 40 लाख रुपयांचा निधी कॅन्टोन्मेंटला देण्यात आला आहे. या निधीतून खराब झालेले रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. त्यामुळे कॅम्प तसेच किल्ला येथील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मिळत नसल्याने [...]
बेळगावहून मुंबईसाठी पुन्हा घेता येणार भरारी
29 मार्चपासून दोन विमानफेऱ्या होणार सुरू : प्रवाशांतून समाधान बेळगाव : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराला रविवार दि. 29 पासून बेळगावमधून विमानफेरी सुरू होत आहे. मुंबई व नवी मुंबई या दोन्ही विमानतळांसाठी बेळगावमधून सेवा सुरू होत असल्याने बेळगावमधील उद्योगजगतातून समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांना सकाळी मुंबईला पोहोचून रात्री पुन्हा बेळगावला परतण्याची संधी यामुळे मिळणार आहे. [...]
कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णेत कोयत्याचा थरार! एकंबे – कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे श्री नवलाईदेवी यात्रेवेळी मंदिराजवळ झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च [...]
छत्रपतींच्या लेकीचे सासर असलेल्या जाधवराव वाड्यात रामनवमीचा उत्साह सातारा– सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गाव… आणि त्या गावातील ऐतिहासिक जाधवराव वाडा… जिथे तब्बल चारशे वर्षांची रामनवमी परंपरा आजही भक्तिभावात जपली जात आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीमुळे या वाड्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे [...]
लोककल्प फौंडेशनतर्फे देवाचीहट्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या साहाय्याने देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथे मंगळवार दि. 24 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 40 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करून आवश्यक नागरिकांना आरोग्यासंबंधी सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या [...]
Israel Iran War – इराणचा अमेरिकन तळांवर हल्ला; 6 सैनिकांचा मृत्यू, कुवैतमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त
आखाती देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून इराणने अमेरिकेच्या विविध लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी कुवैत, कतार आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. या भीषण संघर्षात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक महत्त्वाच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुवैत येथील ‘शुएबा’ बंदरावर […]
क्लब रोडवरील धोकादायक झाडे हटविण्याकडे कॅन्टोन्मेंटचा कानाडोळा
बेळगाव : क्लब रोडवरील अनेक वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. परंतु, ते हटवण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक पावसात क्लब रोड, हिंडलगा रोड, गणेशपूर रोड या परिसरात झाडे कोसळत आहेत. त्यामुळे निष्पापांचा बळी जाण्यापूर्वी या रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे अरगन तलावानजीक झाड कोसळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीस अडथळा [...]
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी लॉकडॉऊनची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे भाषण केल्याने गेल्या दोन दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात अफवा पसरल्या आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी लोकांनी रांगाच रांगा लावल्या. काही पेट्रोलपंप रात्रीच बंद पडले. प्रशासनाची व पुरवठा विभागाची कचुराई व सतर्कता न बाळगळल्याने नांदेडकर मात्र त्रस्त […]
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी लॉकडॉऊनची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे भाषण केल्याने गेल्या दोन दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात अफवा पसरल्या आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी लोकांनी रांगाच रांगा लावल्या. काही पेट्रोलपंप रात्रीच बंद पडले. प्रशासनाची व पुरवठा विभागाची कचुराई व सतर्कता न बाळगळल्याने नांदेडकर मात्र त्रस्त […]
विश्वविक्रमातून सोमय्या ग्रुप देणार जगाला शांती संदेश, सोमय्या ग्रुप संस्थेचा दुसरा विक्रम ठरणार
जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, महागाई आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सने शांततेचा जागतिक संदेश देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘युद्ध नव्हे, तर शांती हवी’ हा ठाम संदेश देत ही संस्था 28 मार्च ला सकाळी 9 वाजता नवा विश्वविक्रम नोंदविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना सांगीतली. चंद्रपूर शहरातील वडगाव […]
नोकर भरती विरोधात दलित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अनुसूचित जातीसाठी अंतर्गत आरक्षणाशिवाय भरतीच्या निर्णयाला विरोध बेळगाव : नोकरी शोधणाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून मंत्रिमंडळाने 53432 जागांवर भरती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आपला विरोध नाही. मात्र नोकर भरतीमध्ये अनुसूचित जातीसाठी अंतर्गत आरक्षणाशिवाय भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपला विरोध आहे, असे निवेदन कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आले. मादिग, संबंधित समुदाय गेल्या [...]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी 2026-27 हंगामातील हिंदुस्थानच्या पुरुष संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. एकूण 5 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे सामने देशातील 17 विविध शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, […]

29 C