Jalna News –सावरकर चौकात कचऱ्यात आढळली आधार व मतदान ओळखपत्रे; आचारसंहिता कक्षाकडून गुन्हा दाखल
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सावरकर चौक, सिंधी बाजार भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रे बेवारस अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने गंभीर दखल घेत संबधितांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा […]
Solapur : सोलापूरमध्ये सोन्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक
सोलापूरमध्ये ५० लाखांचा फसवणूक प्रकार! सोलापूर : सोने मिळवून देतो, कमी दरात सोन्याचे कॉईन व बिस्किटे देतो असे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल ५० लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा [...]
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संगमेश्वर चौकात पुकारण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात एका मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह थेट रस्त्यावर उतरून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईहून आलेली मीना ही महिला आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कोणतीही भीती, कोणतीही तक्रार न करता आंदोलनस्थळी ठाण मांडून बसली होती. सकाळच्या थंड वातावरणापासून दुपारच्या प्रखर […]
Solapur News : स्वतःच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना जपले; आता प्रतिष्ठेसाठी वाऱ्यावर सोडले
सोलापूर महापालिका निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सोलापूर : पक्षाचे आदेश, एकत्रित होणाऱ्या आघाडी युतीसह विविध निवडणुका अशावेळी कार्यकर्ते हेच आपले बळ आहे, असे म्हणून कार्यकर्त्यांना जपण्यात आले. मात्र, आता कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची वेळ आली की. उमेदवारी नकारघंटा देण्यासाठी दर्शविताना कारणांचा पाढा [...]
असे नमुने फक्त आणि फक्त भाजपात मिळतील, अण्णामलाई यांचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा टोला
भाजपचे तामिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अण्णामलाई यांच्या एका आंदोलनाचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यात ते स्वत:ला कोडे मारून घेताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा […]
Solapur : अंत्रोळी स्मशानभूमीत दिवाबत्ती नसल्याने अंधारात अंत्यसंस्कार
अंत्रोळी स्मशानभूमीची अवस्था दयनीय अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना अनेक [...]
Solapur : सोलापूरात भाजप एबी फॉर्म प्रकरण तापले; विरोधकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
सोलापूर महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म वाद अधिक तापला सोलापूर : भाजपचे एबी फॉर्म प्रकरण अधिक तापले असून शिवसेना शिंदे गट. काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, माकप यांच्यासह विरोधकांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी दोन आणि चार मधील सर्व [...]
युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन- डॉ.जयसिंगराव देशमुख
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत असताना केवळ एक दिवस जयंती साजरी करून चालणार नाही तर युवकांच्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर पडावेत. त्यांच्या मध्ये असलेल्या गुणांना सादर करण्याची संधी मिळावी. यासाठी 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा विवेकानंद सप्ताह साजरा केला जातो. असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सहविभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी विवेकानंद सप्ताह उद्घाटन प्रसंगी केले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून मराठवाडा सह विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख हे लाभले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे होते. डॉ. संदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे यांनी केले. तर आभार डॉ.बालाजी गुंड यांनी मानले.
सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त उत्सवमूर्ती व पादुकांचे रविवारी सिद्धेश्वर मंदिरातून विधिवत पूजन करून उत्तर कसबा येथील थोबडे वाड्यात आणण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती. सोमवार, १२ जानेवारी रोजी सिध्देश्वर [...]
6000 कोटींचा खर्च, तरीही शहराची बकाल अवस्था; या खर्चाचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा –बबनराव थोरात
नांदेड शहराची झालेली बकाल अवस्था, वाहतुकीची प्रचंड कोंडी, पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाणी,रस्त्यावर पडलेले खड्डे, खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची दुरावस्था, आरोग्य सेवेचे तीनतेरा, गेल्या वीस वर्षात सहा हजार कोटी खर्च होवूनही नांदेडची झालेली दुरावस्था हे पाहता या विकास कामाचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा आहे. या सर्व कामांची युध्दपातळीवर चौकशी करणे गरजेचे असून महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बळासाहेब ठाकरे) […]
उड्डाण घेताच पक्षी धडकला, इंडिगोच्या विमानाचे वाराणसीत आपत्कालीन लँडिंग
बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे वाराणसीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बंगळुरुसाठी उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटांनी विमानाला पक्षी धडकला. पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. विमानात एकूण 216 प्रवासी होते. आपत्कालीन लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इंडिगोचे 6E-437 विमानाने गोरखपूर विमानतळावरून नियमित वेळेत बंगळुरूसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी विमानाच्या पुढच्या […]
शासकीय रेखाकला परीक्षेत रविंद्र हायस्कूल, भूमचा ऐतिहासिक निकाल
भूम (प्रतिनिधी)- नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत प्रशालेच्या 52 विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविला. त्यात एलिमेंट्री परीक्षेत डोके अनुष्का, सुळ आरोही,बोराडे कार्तिकी, मुंजाळ मयुरी, माने प्रणिती, गायकवाड श्रीजा, गोरे स्वरांजली या सात विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविला. तर इंटरमिजिएट परीक्षेत बोराडे आदर्श, घुटे पाटील आदिराज, गोयकर अमोल, कांबळे अनुजा, गोपने अपेक्षा, रेपाळ अपूर्वा, गायकवाड अर्जुन, बांगर चिराग, चौधरी दिव्या, काळे दिव्यानी, खुळे ज्ञानेश्वरी, शिंदे हिमांशू, शेंडगे किमया, आकरे कृष्णाली, सय्यद महेक,तांबोळकर मिथिलेश, चौधरी नूतन, शेंडगे ओजस, बोराडे पार्थ, बोराडे पार्थ, बाबर प्रगती, शेटे प्रणव, गायकवाड प्रेरणा, जाधव राजनंदनी, गलांडे राजशेखर, सुळ रिशिका, शेंडगे सई, रेवडकर समर्थ, कलमे सान्वी,दुरुंदे संस्कृती, शेंडगे सान्वी, धारकर सौरभ, उंबरे शिवम, कोकणे श्रवण, कुलकर्णी श्रावणी, काटे श्रावणी सोनवणे श्रेयस, चौरे स्नेहा, डोके सृष्टी, अवताडे सुदर्शन, कांबळे उत्कर्ष, क्षीरसागर उत्कर्ष, कवडे वेदांत या विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविल्याबद्दल त्यांचा व मार्गदर्शक शिक्षक भागवत लोकरे सर, किरण आयतलवाड सर, अक्षय कांबळे सर, चंद्रकला गायकवाड मॅडम, दिपाली ढेकळे मॅडम यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर तसेच धनंजय पवार सर, भागवत लोकरे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
अनुष्का हत्येप्रकरणी न्यायासाठी संपूर्ण भूम शहर बंद
भूम (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे दि. 4 जानेवारी 2026 रोजी इयत्ता सहावीत शिकणारी कु. अनुष्का पाटोळे हिचा छळ करून तिची थंड डोक्याने हत्या करण्यात आली असून, ही हत्या आत्महत्येचा बनाव करून झाकण्यात आली आहे, असा गंभीर आरोप करत भूम तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण भूम शहर बंद ठेवून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात अत्यंत चतुराईने पुरावे नष्ट करून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, तसेच लातूर जिल्हाधिकाऱ्यांना सहआरोपी करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांमुळेच या चिमुकलीला खरा न्याय मिळेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने तत्काळ कारवाई न केल्याने दि. 12 जानेवारी 2026 रोजी भूम तालुक्यातील सकल मातंग समाज रस्त्यावर उतरला. गोलाई चौकात रास्ता रोको आंदोलन, निषेध मोर्चा आणि चक्काजाम करण्यात आला. हा मोर्चा अण्णाभाऊ साठेनगर, गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक, गोलाई चौक या मार्गाने काढण्यात आला व नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूम येथे धडक देण्यात आली. चारही बाजूंचे रस्ते बंद करून चक्काजाम करण्यात आला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्रालय यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूम यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदनावर नगरसेविका लक्ष्मी साठे, नगरसेविका विजया साठे, नगरसेविका जया साठे, लता साठे, सुहासिनी साठे, संगीता साठे, सुमन साठे, दत्ता साठे, अण्णा साठे, बबन साठे, नारायण साठे, प्रदीप साठे, किरण साठे, सचिन साठे, गणेश साठे, शैलेश साठे, अमोल साठे ,नितीन साठे, अमोल साठे, रविंद्र साठे, प्रविण साठे, विनोद साठे, सुजित साठे, मनोज क्षीरसागर, गणेश साठे , हनुमंत साठे, संतोष साठे, कुणाल आडागळे, आकाश साठे, राम साठे, दिनेश दुबळे, जितेंद्र साठे, प्रमोद आडागळे, लखन साठे, विनोद थोरात, योगिराज साठे, कांता साठे, सुभाष साठे, तसेच महिला, लहान बालके यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
धनंजय सोनटक्के यांची वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड.
परंडा (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी पक्षा ची धाराशिव जिल्हा नूतन कार्यकारिणी प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली यामध्ये परंडा येथील धनंजय सोनटक्के यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी ते क्रियाशील कार्यकर्ता आहेत गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे त्यामुळे त्यांना पक्षाने यापुर्वी जिल्हा महासचिव म्हणून काम करण्याची संधी वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी देण्यात आली होती.यांच्या याच कार्य काळामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर ,प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पक्षाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका प्रा. अंजलीताई आंबेडकर पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे . प्रदेश महासचिव प्रा.किसन चव्हाण यांनी सत्तावीस पदाधिकाऱ्यांची जम्बो धाराशिव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये परंडा येथील मोहनदादा बनसोडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर कृष्णा जाधव यांची जिल्हा संघटक पदी वर्णी लागली आहे.भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या कार्यकाळात पक्षामध्ये प्रथमच परंडा तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाली आहे परंडा तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सक्रिय असून विविध आंदोलने पक्षाचे कार्यक्रम सक्रियपणे राबवून पक्षाची आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. उत्तम संघटन कौशल्य शांत संयमी नेतृत्व विविध विषयांवरचा असणारा अभ्यास वक्तृत्व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी या सर्व काम करण्याच्या कार्यशैलीमुळे धनंजय सोनटक्के यांच्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ते वंचित बहुजन आघाडी पक्षा चा विचार संकल्पना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायम तत्पर असतात काम करणारा ॲड.बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा निस्वार्थ कार्यकर्ता हीच त्यांची ओळख आहे वंचित बहुजन आघाडी महिला,युवक,कामगार,भटके विमुक्त सर्व घटकांना घेऊन ते काम करतील त्यांच्या निवडीमुळे वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल ,राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धाराशिव जिल्हा प्रभारी अविनाश भोसीकर ,मराठवाडा महासचिव तथा जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड ,प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी राज्याचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद ,प्रदेश प्रवक्ते ॲड.अरुण जाधव ,फुले आंबेडकर विद्वतसभेचे मार्गदर्शक प्रा.भास्कर भोजने ,फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे ,धाराशिव मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,मारुती बनसोडे ,सुभाष वाघमारे सर ,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण ,वंचित बहुजन जनरल कामगार युनियन आघाडी जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे त्याचबरोबर सर्व मित्र परिवार यांनी धनंजय सोनटक्के यांची धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने अभिनंदन करत पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत धनंजय सोनटक्के यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या अनुषंगाने सर्व स्तरातून स्वागत होत आहे. वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन संघटनात्मक बांधणी मजबुत करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाची विचारधारा तळाकळापर्यंत पोहोचविणे संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये लढणार . - धनंजय सोनटक्के
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजप उमेदवाराने पैशांची ऑफर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. महेश इंगळे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पत्नी सीमा […]
आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची नसेल तर जागे व्हा! –आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आंबोली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना घरोघरी भेट देत भाजपचा खोटेपणाचा, भ्रष्टाचाराचा बुरखा फाडत मतदारांना जागे करण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात जाऊ द्यायची नसेल तर मशालीला ताकद द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनिकांनी जास्तीतजास्त घरांना भेट देत आपण केलेली […]
ऊस वाहतूक वाहनांवर रोटरी लोगोचे 100 रिफ्लेक्टर बसवले
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत धाराशिव रोटरी क्लब तर्फे निमजाई न्यूएरा प्रा. लि. येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रोटरी लोगो असलेले 100 रिफ्लेक्टर बसवण्यात आले. रात्रीच्या वेळी व कमी प्रकाशात ऊस ट्रॉली स्पष्टपणे न दिसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. अनेक ट्रॉलींवर रिफ्लेक्टर किंवा दिव्यांचा अभाव, तसेच अतिवेग व निष्काळजी वाहनचालक ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रात ऊस ट्रॉलींना मागून धडक बसून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या उपक्रमामुळे एक जरी जीव वाचू शकला, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही, असे मत रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजित रणदिवे यांनी व्यक्त केले. या वेळी रोटरी अध्यक्ष रणजित रणदिवे, सचिव प्रदीप खामकर, रोटरीयन चित्रसेन राजेनिंबाळकर व रोटरीयन सुरज कदम उपस्थित होते.
तुळजाभवानी महाविद्यालयात जागर :आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा या उपक्रमाचे उद्घाटन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनामध्ये जागर :आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 20 : संधी आणि आव्हाने* विषयावर व्याख्याते :डॉ . रमेश चौगुले संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव तर प्रमुख पाहुणे : मा.आप्पासाहेब पाटील( महाविद्यालय विकास समित सदस्य) हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रो. डॉ. जीवन पवार प्राचार्य तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर . प्रास्ताविक डॉ. मंत्री आडे यांनी केले यामध्ये कार्यक्रमाची माहिती दिली व विविध स्पर्धांमधून विद्यार्थी घडण्यात कशी मदत होते हे सांगितले .विवेकानंद सप्ताहाचे औचिते का, कसे गरजेचे आहे हे विशद केले विद्यार्थ्यांना मंच प्रदान करणे हे गरजेचे आहे . आपल्या मनोगतात प्रो. डॉ.रमेश चौगुले यांनी भारताला महासत्ता बनवायचे असेल तर ज्ञानाचे महासत्ता अगोदर बनले पाहिजे हे सांगितले . नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वीची शैक्षणिक पद्धती व आताचे नवीन शैक्षणिक धोरण यामधील फरक सांगितला. शैक्षणिक क्षेत्रातील लवचिकता कशी आहे व शिक्षणात आधुनिक बदल व कौशल्यावर असल्याचे सांगितले .आहेत हे सांगितले . शैक्षणिक धोरणामध्ये भाषांतराच्या संधी देखील आहेत .भारताला महासत्ता बनवण्यासाठी उच्च शिक्षण आमुलाग्र बदल केलेला आहे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असा फरक न करता कोणताही विद्यार्थी विविध शाखेचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे .नवीन शैक्षणिक धोरणात जागतिक शिक्षण घेण्यासाठी मदत नवीन तंत्रज्ञानामुळे होते. नियम तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळे एखाद्या विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षण देखील घेऊ शकतो आणि शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांची सर्व समावेशक प्रगती होते म्हणून शैक्षणिक धोरण 2020 चा स्वीकार केला आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणात प्रथम वाचून संशोधनाची पद्धती देण्यात आली आहे पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण देखील नवीन शैक्षणिक धरणात आहे .वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी निधी दिला जातो त्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन निर्माण केली आहे आत्ताच्या शिक्षण पद्धती शिक्षक केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित आहे . नवीन शैक्षणिक धोरण असणाऱ्या त्रुटी सांगताना शिक्षणात पैशाची तरतूद कमी असल्याचे सांगितले नवीन तंत्रज्ञान वापर करण्याची कौशल्य शिक्षणात नसल्याचे सांगितले म्हणून सर्वांनी नवीन तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची कमतरता आहे नवीन शिक्षणात संधी आहेत पण आव्हाने देखील आहेत असे सांगितले .अध्यक्ष मनोगतात प्रोफेसर डॉ. जीवन पवार यांनी विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली तसेच सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उद्याच्या भारताचे भविष्य हे सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आहे असे सांगितले नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा डॉ.कस्तुरी रंजन इस्रो माजी अध्यक्ष यांनी सादर केला असल्याचे सांगितले भारताला महासत्ता बनवण्याचे सूत्र हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे .असे प्रतिपादन केले .आपल्या भारताचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 खेळाची अंमलबजावणी केली आहे आपल्या परकीय आक्रमणामुळे आपल्या गत वैभव रास पावले होते म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी गरजेचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन : प्रा . कोरे मॅडम तर प्रा. तांबोळी मॅडम यांनी आभार मानले . सदर कार्यक्रमास डॉ.प्रा.बापू पवार डॉ.नेताजी काळे प्रा. बालाजी कऱ्हाडे प्रा.स्वाती बैनवाड तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर रोड चौकास “राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ चौक” असे नामकरण करण्यात यावे
तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने तुळजापूर शहरातील लातूर रोड चौकास “राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ चौक” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समिती, तुळजापूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संबंधित चौकात जिजाऊ मातांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी जिजाऊंच्या विचारांना व कार्याला उजाळा देत चौक नामकरणाची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर रोड चौकाला जिजामाता चौक असे नामकरण करून आज पाच वर्ष होत आले तरी आज पाच वर्षे झाले अधिकृत नामाकरण करण्यात आलेले नाही. सदर चौकाचे अद्याप अधिकृत नामकरण झालेले नसून, शहरातील एक महत्त्वाचा व वर्दळीचा चौक असल्याने राजमाता जिजाऊंच्या नावाने नामकरण झाल्यास पुढील पिढीला प्रेरणा मिळेल तसेच इतिहासाचे स्मरण कायम राहील. या उपक्रमावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौक नामकरणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता मॉ जिजाऊ साहेब यांची जयंती नियोजित राजमाता जिजाऊ चौक येथे तुळजापूर शहरवासियांच्या वतीने जिजाऊंना वंदन करून, पेढे भरवून साजरी करण्यात आली. तसेच गेली पाच वर्षापासून राजमाता जिजाऊ चौक यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि यासंदर्भात लवकरात लवकर नगरपरिषदेच्या वतीने अधिकृत राजमाता जिजाऊ चौक होण्याकरिता मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे महेश गवळी अजय साळुंखे धैर्यशील कापसे,अर्जुन साळुंके कुमार टोले, अण्णा क्षीरसागर, जीवन राजे इंगळे,प्रशांत इंगळे, दत्ता सोमाजी, विशाल साळुंके, अक्षय साळवे, परीक्षित साळुंके, संतोष भोरे, बबन गावडे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
जिजाऊ महोत्सवामध्ये संघर्षशील मातृत्वाचा सन्मान
वाशी (प्रतिनिधी)- 12 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे सावित्रीबाई फुले, मा साहेब जिजाऊ आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भावनिक वातावरणात जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जीवनातील कठीण संघर्षांना न जुमानता आपल्या मुलांचे भविष्य घडवणाऱ्या मातृत्वाच्या शक्तीचा यावेळी सन्मान करण्यात आला. बस स्टँड चौकात कार्यक्रमाची सुरुवात झाली, जिथे शालेय विद्यार्थी, गावातील महिला, पुरुष आणि तरुणांच्या उपस्थितीत महिलांनी मा साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, नारळ फोडून आणि ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. “जय जिजाऊ, जय शिवराय!“ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शलन बिरू पवार, ज्यांनी कठीण परिस्थितीतून संघर्ष करून आपल्या मुलाला डॉक्टर बनवले आणि मुलीला पोलिस अधिकारी बनवले, त्यांना सवी जिजाऊ पुरस्कार प्रदान करून स्त्री सन्मान (महिला सन्मान) प्रदान करण्यात आला. पतीच्या मृत्यूनंतर, शलन पवार तिच्या कठोर परिश्रमात, चिकाटीने आणि आत्मविश्वासाने दृढ राहिली, तिच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. उपाशी झोपणे, तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिच्या इच्छांचा त्याग करणे आणि सामाजिक आव्हानांवर मात करणे हा तिचा प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. पुरस्कार स्वीकारताना, शलन पवारच्या संघर्षाच्या आठवणी समोर येताच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. हे अश्रू केवळ वेदनाच नव्हे तर दृढनिश्चयाच्या विजयाचे प्रतीक होते. हा क्षण उपस्थित सर्वांना भावला. कार्यक्रमस्थळ टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. सुजाता चव्हाण यांनी सावी जिजाऊंना लिहिलेल्या पत्राचे वाचन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती देशपांडे यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धाराशिव जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) वनिता डोंगरे यांनी महिलांना संघर्षातून यशाकडे नेण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी मातांचा सन्मान केल्याने समाजाची मुळे मजबूत होतात यावर भर दिला. सरपंच महेश कोळी, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक एकनाथ मोटे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका ठावरे, महात्मा फुले शाळेचे सिद्धेश्वर शहाणे, सलीम शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भाषणांनी आणि गाण्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. शालन पवार यांनी सावित्रीबाई फुले, माँ साहेब जिजाऊ आणि फातिमा शेख यांनी आपल्या जीवनकार्यातून दिलेला शिक्षण, स्वाभिमान आणि संघर्षाचा वारसा मूर्त रूप दिला आहे. म्हणूनच, हा सन्मान केवळ एका व्यक्तीबद्दल नाही तर संघर्ष करणाऱ्या स्त्रीत्व आणि मातृत्वाच्या अजिंक्य शक्तीबद्दल आहे. कार्यक्रमाचे संचालन शारदा वाघचौरे यांनी केले, प्रास्ताविक उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण यांनी केले आणि आभार प्रदर्शन वीर मॅडम यांनी केले. अनेक महिलांनी गाणी सादर केली आणि चंद्रहंस माने आणि धोंडिराम बटुले यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय आणि सौ-जिजाऊ फाउंडेशन, पारगाव यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उपस्थित असलेल्या सर्वांवर कायमचा प्रभाव पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून जिजाऊंच्या संस्कारक्षम मातृत्वाचे, शिवरायांना घडविण्यातील त्यांच्या भूमिकेचे तसेच समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाचे महत्त्व विशद केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करताना, “जिजाऊंसारखी संस्कार देणारी, मूल्यांची शिकवण देणारी आई आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांनी साकारलेली राजमाता जिजाऊंची वेशभूषा. या वेशभूषेमुळे संपूर्ण कार्यक्रमात ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. तसेच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आळणी येथील छावा प्रतिष्ठान यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली वीर, अजय देशमुख, अजित वीर, शुभम गाडे, संकेत वीर, विष्णू लावंड, अजय निंबाळकर, बालाजी वीर, अविनाश कदम, निलेश कदम, निखिल वीर, निलेश वीर, निलेश नांदे, निलेश वीर, प्रतीक कदम, स्वप्नील वीर, रोहित तौर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिनेश पेठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याससाठी शाळेतील जया नवले, सुमन इंगळे,सखुबाई कदम,स्वाती मुपडे, महादेवी सावळकर, नेहा भंडारे, राजेंद्र दीक्षित, अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले.
व्ही पी शैक्षणिक संकुलात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
धाराशिव(प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड,धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकला. व्ही पी शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयामध्ये जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्ही पी शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी व एसबीएनएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, आर.पी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख, एस. पी. पॉलीटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, वेलनेस फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पूजा आचार्य, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, डेअरी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी वाघमारे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. दत्तात्रय घावटे, लेखापाल योगेश मंडलिक तसेच संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रा.गे.शिंदे महाविद्यालयास विद्यापीठाचा शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण 2025 चा अ प्लस दर्जा प्राप्त
परंडा (प्रतिनिधी)- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयास नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (AAA ) 2025 मध्ये महाविद्यालयास अ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या विविध कामकाजाचे ऑडिट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने केले होते. महाविद्यालयातील अस्तित्वात असलेल्या सर्व विभागाच्या माहितीचे अंकेक्षण करण्यात आले होते. या समितीमध्ये महाविद्यालयातील समितीचे चेअरमन म्हणून डॉ. विद्याधर नलवडे तसेच या समितीचे सदस्य म्हणून डॉ.संतोष काळे, डॉ.अरुण खर्डे आणि डॉ. अमर गोरे पाटील यांनी काम पाहिले होते. महाविद्यालयास मिळालेल्या या मानांकनसाठी महाविद्यालयात समितीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी समितीचे चेअरमन डॉ.विद्याधर नलावडे समितीचे सदस्य डॉ.अरुण खर्डे, डॉ.संतोष काळे आणि डॉ.अमर गोरे पाटील यांचा शाल बुके देऊन सत्कार केला. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपले महाविद्यालय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे आपले योगदान द्यावे. महाविद्यालयाचे नाव नावलौकिक करावे महाविद्यालयाच्या विकासासाठी संस्था कोठेच कमी पडणार नाही. तेव्हा सर्वांनीच प्रामाणिकपणे काम करून महाविद्यालयाचे नाव विद्यापीठाच्या यादीमध्ये सर्वप्रथम आणावे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. प्रास्ताविक डॉ महेशकुमार माने यांनी केले. डॉ.विद्याधर नलवडे यांनी महाविद्यालयास AAA चा अ प्लस दर्जा कसा प्राप्त झाला त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागली या संदर्भात सविस्तर वृत्तांत सांगितला. शेवटी प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विजय राठोड व विवेक यादव यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पुरातत्व वास्तुचे जतन व्हावे या उद्देशाने विजय राठोड व विवेक यादव यांनी धाराशिव लेणीच्या भिंतीवरील कोरलेली नावे पुसुन भिंती व परिसर स्वच्छ केला,छत्रपती शाहु महाराज स्मारक परिसर,जिजामाता उद्यानितील देखील परिसर स्वच्छ करुन तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला,याबाबत शिव फुले शाहू आंबेडकरी विचार धारेतुन जिजाऊंच्या लेकी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दोघांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देऊन करण्यात आला. राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत लहान मुलींनी सहभाग घेतला होता, सत्कार करताना जिजाऊंच्या लेकी आशा कांबळे,अर्चना अंबुरे,अनुजा पानसरे,मिरा मोटे,संस्कृती,पर्यटन जनजागृती संस्थेचे सहसचिव अब्दुल लतीफ, पर्यटन जनजागृती संस्था व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे, रौफ शेख,दिलीप देशमुख,मुकेश मोटे,श्रीकांत मटकिवाले,स्वराज जानराव सह इतर उपस्थित होते.
Budget 2026 –केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला रविवारीच सादर होणार; ओम बिर्ला यांनी केली पुष्टी
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. दरवर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवाराला सादर करण्यात येतो. मात्र, यावर्षी 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने यंदा अर्थसंकल्प 1 तारखेला सादर होणार किंवा त्याची तारीख बदलणार, याबाबत चर्चा होत होती. तसेच रविवारीच अर्थसंकल्प सादर होणार असल्यास त्या दिवशी शेअर बाजार सुरू राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. आता या सर्व चर्चांना लोकसभा […]
Satara : खंडोबा यात्रेच्या कुस्ती मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विजेता
पुणे, हरियाणा व कर्नाटक केसरींची कुस्ती मैदानात जोरदार लढत वडूज : खटाव तालुक्यातील मोराळे येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पुणे येथील सेना दलाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला डंकी लावत हरियाणा केसरी निशांत लाडपुरने विजेतेपद पटकावले. त्यास ४ लाख [...]
माडबन समुद्रकिनारा सध्या निसर्गप्रेमींसाठी नव्हे, तर वाळू माफियांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार ते पाच बोटींमधून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिक धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार उघड होऊनही प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर आले आहे. […]
हिवाळ्यात दही लावताना काय काळजी घ्यायला हवी?
दही लावण्यासाठी उन्हाचा कालावधी हा खूप चांगला मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही लावण्यासाठी कुठलीही मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु हिवाळ्यात मात्र दही लावताना फार डोकेदुखी होते. हिवाळ्याच्या सीझनमध्ये दही नीट लागत नसल्यामुळे, ते पाण्यासारखे वाहते. पाणीदार दही खायलाही मजा येत नाही. म्हणूनच पावसाळ्यात दही लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर दही सर्वात उत्तम लागु […]
हाॅटेलसारखे पराठे घरी होत नाहीत, चला तर मग फाॅलो करा या टिप्स
पराठे म्हणजे पोटभरीचा नाष्टा. परंतु हाॅटेलसारखे मस्त पराठे मात्र घरी काही केल्या होत नाहीत. बरेचदा घरी करण्यात येणारे पराठे फसतात. यावरही काही साध्या सोप्या टिप्स आपण वापरुन हाॅटेलसारखे पराठे अगदी घरच्या घरी सहज बनवु शकतो. स्वादिष्ट आणि मऊ पराठे बनवण्यासाठी पीठ योग्य प्रकारे तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरता आपण पाहणार आहोत पराठे करण्यासाठीच्या योग्य […]
अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतवस्तीवर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व मोटरसायकल चोरी असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून सुमारे २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबधी सविस्तर माहिती अशी की, ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री कविता ज्ञानदेव कसबे (रा. उपळा शिवार) यांच्या शेतवस्तीवरील राहत्या घरात अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना मारहाण केली व सोन्याचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मोहा, ता. कळंब येथील पारधी पिढीवर छापा टाकून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उपळा शिवार येथील दरोड्याची कबुली दिली. तसेच दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव येथील विमानतळ परिसरात दरोडा टाकल्याचे, तसेच गोळेगाव (ता. वाशी) आणि अंतरवली (ता. भूम) येथे चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले. पोलिसांनी आरोपींकडून सदर गुन्ह्यातील १६.२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, चोरीस वापरलेल्या व चोरीच्या ४ मोटरसायकली (शिर्डी व जामखेड येथील) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईतून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीचे एकूण ८ गुन्हे उघड केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे, छगन श्रीपती काळे, बिभीषण उर्फ बबड्या दिलीप काळे, विजय उर्फ तुंबड्या आप्पा पवार (सर्व रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी आहेत. नमूद आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांतील दरोडा व जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, तसेच पो.ह. शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, मपो.ह. शोभा बांगर, चा.पो.ह. रत्नदीप डोंगरे, चा.पो.ह. नवनाथ गुरव यांनी सहभाग घेतला
सोन्या-चांदीच्या दराची घोडदौड सुरूच; सोने 1,41,000 तर चांदी 2,65,000 वर पोहचली
वाढती जागतिक अशांतता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड ताब्यात घेण्याची आणि टॅरिफ वाढवण्याची धमकी यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या आठड्यातही सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ झाली होती. मात्र, शुक्रवारी बाजार बंद होताना दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून आली होती. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ […]
धाराशिव येथे जिल्हास्तर सब - ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 08,10,12,14 वर्षाखालील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व जागर फाउंडेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे दि. 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये 08 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 50 मी ,100 मी धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप , 10 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा 50 मी ,100मी धावणे , स्टँडिंग ब्रॉड जंप , गोळा फेक, 12 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 60मी , 300मी धावणे , स्टँडिंग ब्रॉड जंप , गोळा फेक व 14 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 80 मी 300 मी धावणे,लांब उडी,गोळा फेक या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला (नगरपालिका/ग्रामपंचायत) सोबत आणावे. या लिंक वर https://forms.gle/AQSmn78xBaZo9nvf8 नोंदणी करावी. 08 वर्ष - 09/02/2018 ते 08/02/2020, 10 वर्ष- 09/02/2016 ते 08/02/2018,12 वर्ष-09/02/2014 ते 08/02/2016, 14 वर्ष - 09/02/2012 ते 08/02/2014 दरम्यान जन्मदिनांक असणारे सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17/01/2026 पर्यंत आहे. यासाठी राजेंद्र सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,राजेश बिलकुले, ज्ञानेश्वर भुतेकर ,सचिन पाटील, रोहित सुरवसे, ऋषिकेश काळे, छाया घोडके, योगिनी साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी माऊली भुतेकर (9404193674), रोहित सुरवसे (7796756866), शितल देशमुख सर (8788416603) यांच्याशी संपर्क साधावा.
कळंब येथे नगराध्यक्षा सुनंदा कापसे व सर्व नगरसेवकांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. सुनंदा शिवाजी कापसे व शहरातील सर्व नगरसेवकांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने शिक्षक भवन कळंब येथे भव्य सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यास नूतन नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्यासह नगरसेवक भूषण करंजकर,शितल चोंदे, हर्षद अंबुरे, रोहन पारख, अतुल कवडे, सागर मुंडे, अमर चाऊस, आशा भवर, अर्चना मोरे, योजना वाघमारे, ज्योती हरकर,जमील कुरेशी इंदुमती हौसमल, लखन गायकवाड, सफुरा काझी, पूजा धोकटे, वनमाला वाघमारे,मोहसीन मिर्झा, रुकसाना बागवान, शीला पवार, या नवनियुक्त नगरसेवकांचा फेटा,शाल, पुष्पगुच्छ, श्यामची आई पुस्तक, संस्थेची स्मरणिका, दिनदर्शिका देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आपल्या मनोगतातून शहर व तालुक्यातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच पूर्वीप्रमाणे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कळंब शहराचा लौकिक वाढावा. नगरपालिकेच्या शाळा सुसज्ज करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी सत्काराला उत्तर देताना कळंब शहरांमध्ये स्वच्छता, आरोग्य,शांतता व सुव्यवस्था करण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगती व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करून नगरपालिकेच्या शाळा सुसज्ज करून नवा कळंब पॅटर्न केला तयार जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी नगरसेवक हर्षद अंबुरे, अमर चाऊस, आशा भवर व रुकसाना बागवान या सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी नगराध्यक्षांना वेळोवेळी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी राज्यसंघाचे चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने , शिक्षक पतसंस्थेचे जेष्ठ संचालक दत्तात्रय पवार तालुका अध्यक्ष प्रशांत घुटे, पतसंस्थेचे संचालक भूषण नानजकर,अशोक डिकले, गणेश कोठावळे, दीपक चाळक, महादेव मेनकुदळे, प्रशांत निन्हाळ,अविनाश खरडकर, संतोष लिमकर, सचिन पवार, संदीप मगर, अशोक बिक्कड, सुबराव कांबळे,डी. ओ. पवार, बजरंग गिरी, राजाभाऊ शिंदे श्रीअंश पांगळ, संतोष ठोंबरे जनार्धन धुमाळे, सचिन तामाने, पांडुरंग टेळे, राजेश जाधव, संतोष मोहिते, नवनाथ तुंदारे,मुकुंद नांगरे संजय तांबारे, उत्तरेश्वर शिंदे , दत्तात्रय वायकर, विश्वनाथ सावंत, युसुफ पठाण, हरिभाऊ मोरे, बालाजी पवार, संतोष पवळ, किशोर गायकवाड, अशोक पांचाळ शिवाजी शिंदे, अण्णासाहेब जगदाळे, प्रशांत पोते,राहुल तामाने, कृष्णा जाधव, महिला आघाडीचे अध्यक्ष वैशाली शिरसागर, ज्योती ढेपे, प्रतिभा पवार, अर्चना घुटे, सिंधू तांबारे, कोंडाबाई भंडारे, सुषमा हंडीबाग, प्रतिभा बिडवे, सविता मेटे, सोनाली पाटील, सुवर्णा डिकले, पुष्पा बुरकुले, महादेवी झाडे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल शिंदे व महादेव खराटे यांचाही गौरव क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कळंब तालुका पत्रकार संघा हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल श्री अनिल शिंदे व संजीवनी फाउंडेशन नाशिकचा महाराष्ट्र गौरव शिवछत्रपती पुरस्कार महादेव खराटे यांना जाहीर झाल्याबद्दल दोघांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती ज्योती ढेपे सूत्रसंचालन शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष प्रशांत निन्हाळ तर आभार तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे यांनी मानले.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख अनिल दाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अभय डोणे, युवानेते रोहित निकम आणि राजसिंह गावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे बेंबळी परिसरात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. हा प्रवेश कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे नेते व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. या राजकीय घडामोडींमुळे बेंबळी परिसरातील संघटनात्मक समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख कार्यकर्ते : कैलास लोकरे, नितीन होळकर, अमोल माने, अतुल तानवडे, विजय तूपसुंदरे, अण्णासाहेब मोरे, सुदर्शन कांबळे, अंकुश डावखरे, दीपक दाणे, दीपक सोनटक्के, चेतन डावखरे, ओंकार डावखरे, आर्यन राऊत, श्रीकांत माळी, अभिषेक हिंडोळे, आकाश वाघे, संदेश मोटे, हर्षल मोटे, अमर मोटे, कमलाकर गावडे, रोहित पटाडे, ओंकार ढबाले, सागर शिंदे, कुणाल मनाळे, सागर कुंभार, विलास डावखरे, श्रीराम वाळके, श्रीराम दाणे, शुभम दाणे, सुनील दाणे, दादासाहेब दाणे, उमेश सोनटक्के, शंकर दूधभाते, किशोर माने, अविनाश सोनटक्के आदी. या प्रवेशावेळी उपस्थित मान्यवर नितीन काळे, मधुकर तावडे, उद्धव पाटील, धनंजय पाटील, खंडेराव चौरे, बालाजी गावडे, नाना कदम, राजाभाऊ सोनटक्के, प्रशांत रणदिवे, मोहन खापरे, हाश्मुद्दीन शेरीकर, प्रकाश शेळके, युवराज नळे, प्रसाद इंगळे, सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, पद्माकर निकम, गोविंद शिडुळे, विद्या माने, नवनाथ कांबळे, हनुमंत खापरे, राजाभाऊ रसाळ, नेहरू भोरे, संताजी व्हनसनाळे युवा नेते अजित खापरे आदी उपस्थित होते.
इजमा संघटनेची बैठक धाराशिव येथे संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गुळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांची मासिक बैठक धाराशिव येथील अँपल हॉटेल येथे यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत चालू ऊस गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांच्या गाळपाची सद्यस्थिती, उपलब्ध ऊस, उत्पादन खर्च तसेच बाजारातील मागणी-पुरवठा यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच येत्या काळातील ऊस गाळपाचे नियोजन, गुळ पावडर विक्रीसाठी किमान व योग्य दर, आर्थिक शिस्त, बाजारातील स्पर्धा, वाहतूक व साठवणूक व्यवस्थापन, कामगार सुरक्षितता आदी विषयांवर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस इजमाचे कार्यकारी अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील, श्री सिद्धीविनायक समूहाचे संस्थापक तथा सचिव दत्ता कुलकर्णी,उपाध्यक्ष तथा डी.डी.एन. समुहाचे चेअरमन विजय नाडे, कोषाध्यक्ष तथा एस.एम.डी. समूहाचे चेअरमन हणुमंत मडके, तज्ज्ञ संचालक प्रविण प्रजापती, कुलस्वामिनीचे संस्थापक मधुकर तावडे, चेअरमन आकाश तावडे, तुळजाभवानी शुगरचे चेअरमन अनिल काळे, हणुमान खांडसरीचे चेअरमन रामनिवास अग्रवाल, रुपामाता पॉवरचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, दत्तकृपा चे चेअरमन शरद पाटील, निमजाई चे चेअरमन मकरंदराजे राजेनिंबाळकर, साईप्रसाद शुगरचे चेअरमन बबनराव गवते, गुलमेश्वर शुगरचे व्हाईस-चेअरमन सिद्धेश्वर वायकर, बळीराजा ॲग्रोचे चेअरमन एकनाथ चाळक, शिवाजीराव ॲग्रोचे चेअरमन रविंद्र काळे, आशापुरक ॲग्रोचे संचालक वरद चरखा, गोपाळबुवा शुगरचे संचालक राजेश कराड, युके फार्म्सचे चेअरमन ओंकार खुर्पे, सोनाई अँग्रोचे चेअरमन प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी चालू ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी परस्पर सहकार्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
संजीवनी विद्यालयाचे शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेड परीक्षेत यश
धाराशिव (प्रतिनिधी)- चिलवडी येथील संजीवनी विद्यालय माहे - सप्टेंबर - 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. इलेमेंटरी ग्रेड परीक्षेत एकूण 18 विद्यार्थी विदयालयातून प्रविष्ट झाले. यांपैकी अ ग्रेड मध्ये 12, ब ग्रेड मध्ये 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के लागला असून, इंटरमिडीएट ग्रेड परीक्षेत एकूण 34 विद्यार्थी विद्यालयातून प्रविष्ट झाले यांपैकी अ ग्रेड मध्ये 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सदर परीक्षेकरीता कलाध्यापक नानासाहेब बोराडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा शिंदे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सदर यशाबद्दल सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
तुळजाभवानी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन
तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 ते सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 या कालावधीत स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन / व्याख्याते प्रो. डॉ. रमेश चौगुले संचालक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव यांचे विषय : “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : संधी आणि आव्हाणे “ वर व्याख्यान आयोजित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष : प्र. प्राचार्य, डॉ. जीवन पवार तसेच प्रमुख उपस्थिती : मा. श्री आप्पासाहेब पाटील - सदस्य, महाविद्यालय विकास समिती यांच्या उपस्थितीमध्ये 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात येणार असून, या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व विचारांवर आधारित “जागर : आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा“ व्याख्यानमाला वर्ष पहिले या व्याख्यानमाला, निबंध वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पधा, टॅलेंट सर्च| सुगम गायन | कराओके| समूह गीत, गोळा फेक, थाळी फेक,कब्बडी स्पर्धा, खो-खो लांब उड्डी स्पर्धा ,रक्तदान शिबीर/ रक्तगट तपासणी, ज्ञानशिदोरी: मोफत पुस्तक वाटप, तसेच युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. सप्ताहाचा समारोप 19 जानेवारी 2026 रोजी समारोप समारंभ करण्यात येणार आहे. या विवेकानंद जयंती सप्ताहात महाविद्यालयातील प्रा. डॉ. मंत्री आर. आडे - स्पर्धा समन्वयक, डॉ. बापूराव बी. पवार , डॉ. नेताजी काळे,,प्रा. बालाजी एच. कऱ्हाडे, प्रा .स्वाती बैनवाड , प्रा. बालाजी जे. कुकडे प्रा. सुदर्शन गुरव , प्रा. आर. एस. कोरे, प्रा. एफ. एम. तांबोळी, प्रा. डॉ. एस. एस. निपानीकर, प्रा. शिवाजी जगताप,प्रा. के. एस. कदम,. अनिल एम. नवात्रे,प्रा. जे. बी. क्षिरसागर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या सप्ताहात अंतर्गत “जागर : आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा“ या व्याख्यानमालेचा सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुरुदेव कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
निवडणूक जवळ येताच ड्रग्सचा मुद्दा तापला; तुळजापूर तालुक्यात राजकीय रणधुमाळी”
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात ड्रग्स आणि निवडणूक हे समीकरण गेल्या काही निवडणुकांपासून सातत्याने चर्चेत आहे. प्रत्येक निवडणूक जवळ आली की विरोधकांसह सत्ताधारी पक्षांचे मित्र पक्षही ड्रग्सचा मुद्दा प्रचारात आणत असल्याने हा विषय आता तालुक्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात व तालुक्यातील ग्रामीण भागात ‘पिंट्या’ नावाच्या व्यक्तीमार्फत ड्रग्स आणल्याची चर्चा सध्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. राज्यातील व देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या पवित्र भूमीशी ड्रग्ससारख्या गंभीर विषयाचा संबंध जोडून निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित बहुतांशी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आल्या असल्या तरी, ड्रग्सचा विषय स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये सातत्याने चर्चेचा मुद्दा बनत आहे. यात भर घालत भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) चे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी “ड्रग्स आणि देवीचा प्रसाद” या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय अधिकच पेटला आहे. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेवर प्रति-आरोप करत भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा दावा केला आहे. परिणामी, दोन्ही बाजूंनी आई तुळजाभवानी मातेच्या श्रद्धेचा राजकीय वापर होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यात युद्धसदृश वातावरणात लढवल्या जातील, अशी चिन्हे दिसत असून ड्रग्सचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. […]
मासिक पाळीतील वेदनांवर हा चहा आहे सर्वात उत्तम, वाचा
प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अनेकदा मात्र मासिक पाळी ही खूप जणींसाठी त्रासदायक ठरते. काहीजणींना तर मासिक पाळीमध्ये खूप तीव्र वेदनांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळी सुखकर जाण्यासाठी चहा कसा कराल? चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच हवेत, जाणून घ्या धणे घालून चहा करणे हा मासिक पाळीवरील सर्वात उत्तम […]
Satara : साताऱ्यात हुतात्मा स्मारक परिसरावर चायनिज हातगाड्यांचा विळखा
ऐतिहासिक साताऱ्यात अतिक्रमणाविरोधी प्रश्न उभा सातारा : सातारा ही ऐतिहासिक अशी भूमी आहे. परंतु याच ऐतिहासिक भूमीत हुतात्मा स्मारकांना चायनिज हातगाड्यांचा विळखा पडलेला आहे. अगदी नव्याने साकारण्यात आलेल्या स्मृती उद्यानाच्या बाजूला सुद्धा हातगाडी फुटपाथवर लागलेले आहेत. त्यावर कारवाई करून मोकळा श्वास डा परिसर [...]
हिवाळ्यात दुधासोबत काय खायला हवे?
हिवाळा येताच आपल्या आहारात अनेक बदल होतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी या काळात दूध अत्यंत फायदेशीर मानले जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो: दुधात गुळ की साखर घालणे चांगले का? दोन्हींचा वापर हा गोडासाठी केला जातो. परंतु साखर की गूळ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या गूळ आणि साखरेमधील […]
Karad : कराडात भोगी –मकर संक्रांत सणासाठी भाजी मंडईत प्रचंड गर्दी
कराड बाजारातील भाजी खरेदीमुळे वाहतूक विस्कळीत कराड : मकर संक्रांत आणि भोगीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथील भाजी मंडईतील आठवडा बाजारात भाज्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. भोगीचा सण मंगळवारी असल्याने आजच आठवडा बाजारात नागरिक व महिलांनी भाजांची खरेदी केली. भोगीच्या सणासाठी विविध भाज्या एकत्र करून [...]
प्लॅटफॉर्म तिकिटधारक व्यक्तीलाही भरपाईचा हक्क, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्या व्यक्तीलाही नुकसानभरपाईचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका अपघात प्रकरणात दिला. प्लॅटफॉर्म तिकीटधारक प्रवाशाला भरपाई मंजूर करण्याच्या रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात केंद्र सरकारने अपिल दाखल केले होते. ते अपिल उच्च न्यायालयाने फेटाळले. 16 ऑगस्ट 2013 रोजी वडोदरा एक्सप्रेसने सुरतला चाललेल्या मामे भावाला भेटण्यासाठी अनिल कालीवाडा हा प्रवासी रेल्वे […]
Sangli News : सांगलीत फेरीवाल्यांचे पुनर्वसन वाद; नागरिकांचा विरोध
सांगली महापालिकेने घेतली सावध भूमिका सांगली : येथील बापट मळा, महावीर उद्यानासमोरील रिकाम्या जागेत बीसपेक्षा जास्त फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याच्या विषयावरून शुक्रवारी वादंग निर्माण झाले. येथील माजी नगरसेवक आणि नागरिकांनी पुनर्वसनास विरोध केला. तर, फेरीवाला समितीचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी येथेच [...]
दिल्लीहून विजयवाडा जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरला ईमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून विजयवाडा चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाचे सोमवारी जयपूरला ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे विजयवाडाला जाणारे विमान जयपूरला वळवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान AI 2517 दिल्ली विमानतळावरून जयपूरकडे रवाना झाले. मात्र एक वृद्ध प्रवासी आजारी पडल्याने विमान जयपूरकडे वळवण्यात आले. विमान जयपूर विमानतळावर उतरताच आजारी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]
Sangli : भाटवडे गावात बिबट्याचा पुन्हा वावर; परिसरात भीतीचे वातावरण
भाटवडे गावातील बिबट्याची सुरक्षा समस्या गंभीर कासेगाव : वाळवा तालुक्यातील भाटवडे गावात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा दिसून आला आहे. डंगारणे मळा परिसरात बिबट्याने एका मेंढीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे, जवळच ऊसतोड सुरू असतानाही [...]
Sangli News : मिरजेची दूरवस्था सहन करणाऱ्या जनतेचे आश्चर्य : आ विनय कोरे
मिरज महापालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचा उत्स्फूर्त प्रचार मिरज : मिरज शहरातील विविध प्रभागात १५ ते २० वर्षे काम होत नाहीत. तरीही निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी उभे राहतात. मिरजेची जनता शहराची दूरवस्था कशी सहन करत आली, याचे आश्चर्य वाटते, असे परखड [...]
Sangli Politics : सांगली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा मास्टर प्लान जोरात
महाविकास आघाडीत एकता; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सांगली : महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली महाविकास आघाडी एक मास्टर प्लान घेऊन आपली बिजयी घौडदौड करत आहे [...]
वॉलमार्ट सीईओंचे मानधन ऐकून थक्क व्हाल! दर ३० मिनिटाला कमावतात १.४ लाख रुपये
दोन व्यक्ती भेटल्यावर अनेकदा चर्चा होते ती पगाराची. सध्या चर्चा सुरू आहे ती ‘वॉलमार्ट’च्या सीईओंची. जगातील सर्वात मोठी किरकोळ विक्री साखळी असलेल्या ‘वॉलमार्ट’चे (Walmart) सीईओ डग मॅकमिलन हे या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या निवृत्तीपेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती त्यांच्या भल्यामोठ्या पगाराची. मॅकमिलन हे दर ३० मिनिटाला साधारणपणे १.४ लाख रुपये कमावतात. […]
Sangli : मिरजजवळ भीषण अपघात; ट्रक-दुचाकी धडकेत 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
कृष्णाघाट स्मशानभूमी परिसरात भीषण अपघात; मिरज : कृष्णाघाट येथे स्मशानभूमीजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अर्जुनवाड (ता. शिरोळ) येचील वेदांत मल्हारी कुडचे (वय १८) हा तरुण जागीच ठार झाला. घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत गांधी चौकी पोलिसात [...]
हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
हिवाळा सुरु झाल्यावर बाजारात विविध पालेभाज्या दिसू लागतात. यामध्ये पांढराचुटूक मुळा आपले लक्ष वेधून घेतो. हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मुळा खाण्याचे खूप फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये घरामध्ये मुळ्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये मुळ्याचा पराठा, कोशिंबीर किंवा मुळ्याची भाजी असे विविध प्रकारचे पदार्थ घरी होतात. मुळा केवळ आपल्या जिभेची चव वाढवतोच असे नाही तर, मुळ्यामध्ये मुबलक प्रमाणात […]
Kolhapur Crime : कोल्हापुरात तरुणावर फिल्मी स्टाईलने लोखंडी चेनने हल्ला
ताराबाई पार्क परिसरात गुन्हेगारी कृत्याने खळबळ कोल्हापूर : किरकोळ कारणातून तरुणावर फिल्मी स्टाईलने लोखंडी चेनने हल्ला करण्यात आला. यामध्ये यश श्रीचंद्र मेघाणी (वय २९ रा. महाराणी लॉन, ताराबाई पार्क) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज वासवाणी, सुशिल दामुगडे [...]
केसांमध्ये अधिक प्रमाणात कोंड्याची समस्या ही हिवाळ्यात दिसून येते. काहीजणांच्या डोक्यात तर बारमाही कोंडा दिसून येतो. कोंड्यामुळे अनेकदा चारचौघांमध्ये आपल्याला ओशाळल्यासारखे होते. कोंडा आपल्या कपड्यांवर पडल्यावर आपले हसे होते. परंतु आता मात्र काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करुन कोंड्यावरही मात करता येईल. चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा आजकाल डोक्यातील कोंडा ही […]
Kagal News : कागलमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाकरी बनवण्याचा अनोखा संस्कार उपक्रम
कागलमधील शाळेत चूल मांडून परंपरेची जपणूक कागल : विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरा, श्रमप्रतिष्ठा व कौटुंबिक संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, प्रकल्पग्रस्त वसाहत, कागल येथे भाकरी बनवणे व संस्कारांची शिदोरी जपणे हा उपक्रम अत्यंत उत्साहात व प्रभावीपणे राबविण्यात आला. [...]
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
पणजी : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज दि. 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे अभिभाषण होणार असून अधिवेशन शुक्रवार दि. 16 पर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी केवळ राज्यपालांचे अभिभाषण एवढेच कामकाज असेल. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत कामकाज सल्लागार समितीचे अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. दरम्यान संपलेल्या वर्षात राज्याच्या इतिहासातील [...]
मराठीचे बीज गोव्यातून इतरत्र गेले!
केंद्रीयऊर्जाराज्यमंत्रीश्रीपादनाईकयांचेप्रतिपादन:जागतिकमराठीसंमेलनाचासमारोप पणजी : मराठी मनाचा शोध घेणारे हे जागतिक मराठी संमेलन जागतिक स्तरावर मराठी भाषेला अधिक प्रगल्भ बनवणार, अशी खात्री केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. गोव्यात मराठीचे बीज पोर्तुगीजांपूर्वीपासून रोवलेले असून नंतर ते महाराष्ट्रासह इतरत्र फोफावले. मराठी भाषा, माणूस, संस्कृती ही त्रिसुत्री आता जगातील सर्व देशात पसरली असल्याचे त्यांनी नमूद केले. पणजीतील [...]
Kolhapur : रविवारी अंबाबाई मंदिरात भाविकांचा महापूर; दर्शन मंडप हाऊसफुल्ल
अंबाबाईच्या चरणी ८० हजारांवर भाविक कोल्हापूर : गेल्या सात दिवसांच्या तुलनेत रविवारी दिवसभर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.दिवसभरात तब्बल ८० हजारावर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापूर, इचलकंरजीसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे वातावरण [...]
टी-२० विश्वचषक सुरू होण्यास तीन आठवडे शिल्लक असताना बांगलादेशचा संघ त्यांचे सामने कुठे खेळेल याबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. सुरक्षा आणि राजकीय कारणांमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्यांचे सर्व सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली आहे. आयसीसी शेवटच्या क्षणी सामन्यांचे ठिकाण बदलण्याच्या बाजूने नाही. आता आयसीसी बांगलादेशच्या सामन्यांसाठी हिंदुस्थानातच सामन्यासाठी ठिकाण शोधण्याचा पर्याय दिला आहे. […]
कांगडा जिल्ह्यातील २६ वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकारी रिक्षीत चौहान यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिक्षीत काम करत असलेला रशियन तेलवाहू टँकर अमेरिकन सैन्याने उत्तर अटलांटिक महासागरात ताब्यात घेतला असून, गेल्या आठवड्यापासून रिक्षीत अटकेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुलाच्या […]
Kolhapur : कोल्हापूरच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण
हिरियूर तालुक्यात कार-कँटर अपघात कोल्हापूर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात चार तरुणांसह सहा जण जागीच ठार झाले. तमटकल्लू गावच्या ब्रिजजवळ कारने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर कार आणि कैंटरमध्ये झालेल्या अपघातात [...]
गॅस ग्राहकाची पंधरा लाखांची लूट
मेघागॅसच्यानावेबिल: एपीकेफाईलमुळेबँकअकौंटवरडल्ला बेळगाव : मेघा गॅसच्या नावे ग्राहकांना फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत. गॅस बिल म्हणून व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल पाठवून एका ग्राहकाच्या खात्यातून 15 लाख रुपयांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी उचलली आहे. गेल्या वर्षभरापासून मेघा गॅसच्या नावे फसवणूक सुरूच असून ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. बॉक्साईट रोड, बसव कॉलनी येथील अर्जुन (वय 58) नामक ग्राहकाने सायबर क्राईम [...]
मजगावातील रहिवाशाकडून गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
उद्यमबागपोलिसांचीखादरवाडीक्रॉसवरकारवाई बेळगाव : खादरवाडी क्रॉसजवळ बेकायदा दारू विकणाऱ्या ब्रह्मनगर, मजगाव येथील एका रहिवाशाला उद्यमबाग पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून 16.5 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. परमेश्वर देवाप्पा नायक (वय 50) राहणार ब्रह्मनगर, मजगाव (मूळचा राहणार वाघवडे) असे त्याचे नाव आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. [...]
औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या चोऱ्यांबाबत उद्योजकांची नाराजी
पोलीसआयुक्तांनादिलेनिवेदन: गस्तघालण्याचीमागणी बेळगाव : नॉर्थ बेळगाव इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध समस्यांसाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वाढत्या घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने उद्योजकांना आर्थिक फटका बसत आहे. नुकतेच काकती येथील कारखान्यातील तांब्यांच्या तारांची चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजसह सर्व माहिती देऊन देखील तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने उद्योजकांनी पोलीस आयुक्तांसमोर [...]
कृष्णा नदीकाठावरील चार तालुक्यात दर रविवारी वीज खंडित करणार
पंपसेटनालगामलावण्यासाठीजिल्हाधिकाऱ्यांचाआदेश बेळगाव : कृष्णा नदीकाठावरील चार तालुक्यात कृष्णा नदीतून पंपसेटच्या माध्यमातून पाणी उपसा करण्यात येत आहे. यासाठी दर रविवारी नदीकाठावर वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे. यासंबंधी शनिवारी एक आदेश जारी करण्यात आला आहे. हिप्परगी धरणाचे 22 वे गेट तुटले आहे. या धरणात एकूण 6 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यापैकी 2 [...]
कडोलीत दोन घरांचे कुलूप तोडून 3 लाखाचा ऐवज लंपास
वार्ताहर/कडोली कडोली येथे दोन घरांचे कुलूप तोडून सुमारे 3 लाख रु. किमतीच्या सोन्यासह 15 हजार रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील शिवाजी गल्लीत अमिता शिवाजी बाळेकुंद्री, रामचंद्र वैजू बाळेकुंद्री, पुंडलिक यलुप्पा पाटील यांच्या घरात कोणी नसल्याची शहानिशा करून चोरट्यांनी चोरीचा डाव आखला. मध्यरात्रीच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून [...]
खासबाग आठवडी बाजाराला अखेर शिस्त
नगरसेवकरवीसाळुंखेयांच्याप्रयत्नानायश बेळगाव : खासबाग येथील आठवडी बाजाराला अखेर शिस्त लागली असून, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता झाल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नातून रविवारी महानगरपालिकेच्या वतीने भाजी विक्रेत्यांसाठी आरेखन करून देण्यात आले. त्या ठिकाणी बसून भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय केल्याने आठवडी बाजाराला शिस्त लागल्याचे दिसून आले. खासबागच्या आठवडी [...]
तुम्हीही चेहऱ्यावर लिंबू लावताना या चुका करताय का?
आपल्या त्वचेसाठी विविध प्रकारची पाणीदार फळे ही फार महत्त्वाची मानली जातात. यामध्ये लिंबू देखील आहे. लिंबू त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड त्वचा स्वच्छ, चमकदार आणि डागमुक्त ठेवण्यास मदत करते. परंतु चेहऱ्यावर लिंबू लावताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच […]
पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय सज्ज; याच महिन्यात रायसीना हिल्सवरून होणार कामकाजाचा श्रीगणेशा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता पूर्णपणे तयार झाले असून, या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान तेथे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या नव्या संकुलाला ‘सेवा तीर्थ’ असे नाव देण्यात आले आहे. ‘सेवा तीर्थ’ संकुलाची वैशिष्ट्ये अशी आहे की, या संकुलात एकूण तीन मुख्य इमारती आहेत. सेवा तीर्थ […]
सीमाभागच नव्हे तर कुठेही मराठीची पीछेहाट होणार नाही!
संमेलनाध्यक्षप्राचार्यडॉ. महेंद्रकदमयांचेप्रतिपादन: 41 वेकडोलीमराठीसाहित्यसंमेलनउत्साहात बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृती संपुष्टात येत आहे, असे वारंवार म्हटले जाते. तसे प्रयत्नही केले जात आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी उदयास आलेल्या मराठी भाषेमध्ये आजतागायत अनेक बदल झाले. परंतु, भाषा मात्र लयाला गेली नाही. त्यामुळे केवळ बेळगावसह सीमाभागच नव्हे तर कुठेही मराठीची पीछेहाट होणार नाही, असा ठाम विश्वास सोलापूर येथील [...]
इस्रोच्या या वर्षातील पहिल्याच अवकाश मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. इस्रोचे PSLV-C62 हे या वर्षातील पहिलेच मिशन अयशस्वी झाले आहे. रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. मात्र, तिसऱ्या टप्प्यानंतर डेटा पोहचण्यास उशीर होत होता. चौथा टप्पा सुरू झाला, परंतु त्यानंतर कोणतेही अपडेट मिळाले नाहीत. त्यामुळे मिशन नियंत्रण केंद्रावर शांतता पसरली. इस्रो प्रमुखांनी स्पष्ट केले की तिसऱ्या टप्प्यात […]
शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ठाकरेंचा महाराष्ट्राला संदेश! –संजय राऊत
कालची शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, परिवर्तन करणारी सभा आहे. शिवतीर्थ ओसंडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण, त्यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही तर, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे-जिथे मराठी बांधव आहेत ते त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते. भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा संदेश […]
अन्नोत्सवात रविवारी गर्दीचा उच्चांक
साप्ताहिकसुटीमुळेतुफानप्रतिसाद बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाला रविवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. साप्ताहिक सुटीमुळे सायंकाळपासूनच गर्दीने सर्व स्टॉल पुरेपूर भरले होते. शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. तुफान प्रतिसाद मिळाल्याने स्टॉलधारकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. एकाहून एक सरस बॉलिवूड गाण्यांवर तरुणाईला थिरकायला लावले. संगीताच्या तालावर गुलाबी थंडीत खवय्यांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला. [...]
हिवाळ्यात चेहऱ्याला फेशियल किंवा क्लीनअप यापैकी काय करणे श्रेयस्कर आहे? जाणून घ्या
ऋतू बदलानुसार आपल्याला चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी ही फार मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पार्लरमध्ये जातानाही काही गोष्टी लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाला ग्लोईंग त्वचा हवी असते. पण त्यासाठी मात्र नेमकं काय करायचं हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आपण आहार आणि त्वचेची काळजी या दोन्ही गोष्टींकडे […]
मनरेगा दुरुस्ती मसुदा रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार
गोपीनाथपळनियप्पन; काँग्रेसकार्यालयआवारातउपोषण: निषेधपत्रकांचेवितरण, दुरुस्तीविधेयकमागेघेण्याचीमागणी बेळगाव : आम्ही शांती, सद्भावनेने पुढे जात आहोत. केंद्र सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हे नाव बदलून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. योजनेच्या नावात बदल करून महात्मा गांधींची दुसऱ्यांदा हत्त्या केली आहे. नवा मसुदा रद्द होईतोवर आमचा लढा सुऊच राहील. हा लढा देशात चळवळ म्हणून उभा राहिला पाहिजे, [...]
नगर अर्बन बँकेतील थकबाकीदार कर्जदाराला नियमबाह्य सूट देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय जिल्हा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. जिल्हा न्यायाधीश एम. एच. शेख यांनी दिलेल्या या निकालामुळे बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सूट मंजूर करणाऱया संचालकांवर कारवाईची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजावर या निकालाने शिक्कामोर्तब झाल्याचा दावा नगर अर्बन […]
पंतप्रधानांविरुद्ध शिवराळ भाषा
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध शिवराळ भाषेचा वापर करीत त्यांना शिवीगाळ करणाऱ्या अथणी येथील व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांनी केली आहे. यासंबंधी रविवारी अथणी येथे जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांना एक निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख रविवारी अथणी दौऱ्यावर होते. त्यावेळी अथणी येथील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन [...]
उचगाव मळेकरणी देवस्थानच्या आमराईत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात
वार्ताहर/उचगाव हिंदू म्हणून जन्माला आलात, हिंदू म्हणून ताठ मानेने जगा. हिंदू कधीही डरपोक नसावा धर्माची व्याख्या आम्हा हिंदूना समजते. जो जो आमच्या धर्माच्या आडवा येतो त्याला आम्ही आडवे करतो. हे आमचा हिंदू धर्म सांगतो, असे परखड विचार सांगली येथील अनिल महाराज देवलेकर यांनी व्यक्त केले. उचगाव येथील मळेकरणी देवस्थानच्या आमराईमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा 29 वा मेळाव्याचे [...]
बेळगुंदी रस्त्यावरील ‘त्या’ धोकादायक झाडांच्या फांद्या हटवा
स्थानिक नागरिकांची मागणी : वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी वार्ताहर/किणये बेळगुंदी येथील मुख्य रस्त्यावर तसेच शिवाजीनगर येथील रस्त्याच्या बाजूला धोकादायक झाडाच्या फांद्या आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूने झाडे-झुडपे वाढलेली आहेत. या धोकादायक फांद्यांची व वाढलेल्या झाडे-झुडपांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून त्वरित योग्य तो तोडगा [...]
खादरवाडीच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
नाल्यानजीकदुर्गंधीयुक्तकचऱ्यामुळेआरोग्यधोक्यात, नागरिकांतूनसंताप वार्ताहर/मजगाव उपनगरांतही कचऱ्याची समस्या भेडसावताना दिसत आहे. खादरवाडी येथील मुख्य रस्त्यानजीक असलेल्या नाल्याजवळ दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, त्याच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला हात लावूनच वाहतूक करावी लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. खारदवाडी गाव हे पिरनवाडी नगरपंचायतीच्या हद्दीत येते. [...]
डोनाल्ड ट्रम्प यांची मनमानी; स्वतःलाच व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्रपती केले घोषित
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. व्हेनेझुएलावर हल्ले केल्यानंतर तसेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या संकेतांमुळे आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्रपती घोषित केले आहे. त्यामुळे जागतिक चिंतेत आणि तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प […]
हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ‘पीएसएलव्ही’ (PSLV) या भरवशाच्या रॉकेटने आज पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. मागील वर्षी आलेले अपयश मागे टाकत, PSLV-C62 मोहिमेद्वारे हिंदुस्थानचा ‘अन्वेषा’ हा अत्यंत महत्त्वाचा गुप्तचर उपग्रह आणि इतर १४ उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. संरक्षण क्षेत्रासाठी ‘अन्वेषा’चे महत्त्व या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने […]
महांतेश कवटगीमठ चषक क्रिकेट स्पर्धा : निलबॉईज हिंडलगा, अक्षित स्पोर्ट्स विजयी
बेळगाव : महांतेशकवटगीमठस्पोर्ट्सफौंडेशनआयोजितमहांतेशकवटगीमठचषकनिमंत्रितांच्याअखिलभारतीयटेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरहानने केआर शेट्टीचा, अक्षित स्पोर्ट्सने शिवनेरी स्पोर्ट्चा, निलबॉईज हिंडलगाने व्हीसीसी टिळकवाडी व आरहान स्पोर्ट्सचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. दीपक, शुभम, प्रज्वल व भावेश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के आर शेट्टी किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात [...]
जिथे लोकांचा विचार करणे बंद होते, तिथून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते. हे लोक त्यांचे पैसे खूप विचारपूर्वक खर्च करतात. विश्वासघात वगळता काहीही सहन करू शकतात. बहुतेक लोकांना वाचन आणि लेखनाची आवड असते. इतरांवर जास्त विश्वास ठेवतात, ज्यामुळे फसवणूक होऊ शकते. लहानसहान गोष्टींवरून दु:खी होणे, मनाची चंचलता, भावनिकता असे गुण असतात. विचार न [...]
कुंभ राशीचे लोक बुद्धिमान, स्वतंत्र विचारसरणीचे असून त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन असतो. ते बहुतेकदा सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि सर्जनशील असतात. कुंभ राशीवर शनिचे राज्य असते आणि ही राशी वायु घटकाशी संबंधित असते, ज्यामुळे ते उत्सुक आणि प्रगतीशील बनतात. बुद्धिमान आणि त्यांच्या विचारांमध्ये दृढ असतात. नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यास आणि जाणून घेण्यास उत्सुक असतात. ते मानवतेसाठी काहीतरी करण्यावर [...]
मकर राशीचे व्यक्तिमत्व मजबूत आणि आक्रमक असते. त्यांना बंधनात राहणे आवडत नाही. ते तर्कहीन गोष्टी स्वीकारत नाहीत. शिस्तबद्ध राहणे आवडते. ते खूप सभ्य,मोकळ्या मनाचे आणि सहनशील असतात.मकर राशीचे लोक जबाबदारीने प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात. एकावेळी अनेक कामे करू शकतात कारण त्यांच्याकडे स्मरणशक्ती विपुल असते. प्रगतीसाठी कठोर परिश्रम करतात. शॉर्टकटचा अजिबात आधार घेत नाहीत. त्यांना [...]
अहिल्यानगरात 345 केंद्रांवर होणार मतदान
महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 17 प्रभागांमध्ये 345 मतदान केंद्रांवर सुविधा असणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या 6 नंबरच्या गोडाऊनमध्ये केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता 7 नंबर गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार असून, त्याची तयारीही प्रशासनाकडून पूर्ण […]
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने ‘निश्चयनामा 2026’ जाहीर करण्यात आला. यामध्ये शहरातील लाडक्या बहिणींच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेवर 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरिकांना सन्मानाने वागवतील, त्यांची कामे करतील, असे वचन देण्यात आले आहे. दरम्यान, अहिल्यानगरकरांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मान्य आहे. मात्र, गुजरातचे […]
कोल्हापूर मनपाच्या बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून विद्युतनिर्मिती प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि खर्च बचत, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कोल्हापूर शहरातून दररोज सरासरी 280 ते 300 टन कचरा संकलित केला जातो. यामधील सुमारे 100 ते 120 टन ओला कचरा भाजीमंडई, हॉटेल वेस्ट तसेच घरगुती […]
मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या
आपण शारीरिक दृष्ट्या फीट आहोत की, नाही हे आपण विविध टेस्ट करुन जाणून घेऊ शकतो. परंतु जितके आपण आपल्या शारीरिक आरोग्याबाबत जागरूक असतो, तितकेच आपल्या मानसिक आरोग्याला मात्र आपण प्राधान्य देत नाही. मेंटली फीट राहण्यासाठी आपल्याला फार काही करण्याची गरज नसते. तर मेंटली फीट राहण्यासाठी काही ठराविक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करणे खूप गरजेचे असते. आपल्या […]

29 C