IPL 2026 च्या हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) नवा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांची पाठराखण केली आहे. गोयंका यांच्या मैदानातील आक्रमक प्रतिक्रियेमुळे अनेकदा त्यांच्यावर टीका झाली असली तरी, शमीने त्यांचे समर्थन केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संघात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करते, तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणे सहाजिकच आहे, असे स्पष्ट मत […]
आखातातील युद्धाचा शेतीवर परिणाम होणार का? मंत्रालयाने काय दिले उत्तर
पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा हिंदुस्थानच्या कृषी क्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी म्हटले आहे. आगामी खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे आणि खतांचा साठा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्षाचा पुरवठा साखळीवर परिणाम होणार नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण […]
IPL 2026 – 11.75 कोटी रुपयांचा मिचेल स्टार्क DC Vs LSG या पहिल्याच सामन्यात बाहेर का?
IPL 2026 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या इकाना स्टेडियमवरील सामन्यात संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क खेळत नाहीये. तब्बल 11.75 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार्क संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने, त्याच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीच्या गोटात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिचेल स्टार्कने स्वतः आपल्या गैरहजेरीचे […]
आखाती देशांतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इराणने आता अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य केले आहे. इराणने बहरीनमधील अमेरिकन दिग्गज कंपनी अमेझॉनच्या मुख्यालयाला लक्ष्य करून एक मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात बेटेल्को या दूरसंचार कंपनीच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही कंपनी अमेझॉन वेब सर्विससाठी काम करते. बहरीन सरकारने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामुळे […]
२४ तासांत खून प्रकरणाचा छडा; चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद
चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास […]
जालन्यात समृद्धी महामार्गावर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालन्यातील कडवंची शिवारात एक अत्यंत भीषण अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याने ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने एक […]
विधवा महिलेलाही पोटगीचा हक्क; सासऱ्याकडूनही देखभालीचा खर्च मागता येणार
विधवा महिलेलाही पोटगीचा हक्क असून ती सासऱ्याकडून देखभालीचा खर्च मागू शकते, असा महत्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीचा मृत्यू झाला तरी पत्नीला पोटगी देण्याचे त्याचे कायदेशीर कर्तव्य संपत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पतीच्या मालमत्तेतून उदरनिर्वाह शक्य नसल्यास विधवा महिला सासऱ्याकडून देखभाल खर्च मागू शकते असे न्यायालयाने नमूद केले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अकुल […]
इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांनी केली युद्धविरामाची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील संघर्षाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेशी संपर्क साधून युद्धविराम (Ceasefire) करण्याची विनंती केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, इराणचे नवीन नेतृत्व त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांच्या तुलनेत कमी […]
न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अशक्य वाटणारा विजय मिळवत क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 348 धावांचे डोंगराएवढे आव्हान न्यूझीलंडने यशस्वीरित्या पार केले. या विजयासह न्यूझीलंडने 2025 च्या विश्वचषकात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 339 धावांच्या पाठलागाचा विक्रम मोडीत काढला असून, महिला एकदिवसीय क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा […]
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा –हर्षवर्धन सपकाळ
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]
भाजपला मदत करणाऱ्या ७ नगरसेवकांचे निलंबन, जालन्यात काँग्रेसची मोठी कारवाई
जालना महानगरपालिकेतील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वीकृत सदस्य निवडीवेळी पक्षशिस्तीचा भंग करून भारतीय जनता पक्षाला मदत केल्याच्या ठपक्यावरून काँग्रेसने आपल्या ७ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे. […]
Ratnagiri News –टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला! दापोलीतील कळंबट परिसरात नागरिक नेटवर्कअभावी हैराण
दापोली तालुक्यातील कळंबट गावात बीएसएनएल (BSNL) कंपनीने मोबाईल टॉवर उभा केला खरा, मात्र प्रत्यक्षात या टॉवरचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला…’ अशी अवस्था कळंबटसह परिसरातील गावांची झाली असून, मोबाईलधारक नेट कनेक्टिव्हिटीअभावी पूर्णपणे हैराण झाले आहेत. सध्याच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, ग्रामीण भागात […]
इराणमध्ये सत्तापालट; राष्ट्राध्यक्षांना बाजूला सारून सत्तेवर IRGC चा ताबा
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना सत्तेतून पूर्णपणे बाजूला सारून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) देशाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले आहे. ‘इराण इंटरनॅशनल’ने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आयआरजीसीने देशाचा कारभार चालवण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक […]
परंडा नगरपरिषद ची विशेष सभा घेण्याची मागणी
परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषद सर्व नगरसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, यासाठी आज मा. नगराध्यक्ष आणि मा. मुख्याधिकारी यांना लेखी पत्र दिले. परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आज जनशक्ती नगर विकास आघाडी च्या सर्व नगरसेवक यांनी पुतळा उभारण्याची मागणी करत तात्काळ नगरपरिषद ची विशेष सभा घ्यावी अशी मागणी केली. यावेळी जनशक्ती नगर विकास आघाडी उपनगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
रत्नागिरी नगरपरिषदेला आज (01 एप्रिल 2026) दीडशे वर्ष पूर्ण झाली. मात्र, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विसर पडला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या इमारतीवर साधी रोषणाईही करण्यात आली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 1 एप्रिल 1876 मध्ये ब्रिटिशांनी नगरपरिषदेची स्थापना केली. आज रत्नागिरी नगरपरिषदेला दीडशे वर्ष पूर्ण झाली. मात्र, सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांना शतकोत्तर सुवर्ण […]
महिला म्हणून मला जि. प. अध्यक्षपद सिध्द करावे लागते- अर्चनाताई पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांना झगडून न्याय मिळावा लागतो. काहीजण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या घरातच जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले असे आरोप केले. मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना रात्री 12 वाजेपर्यंत कामे केली. आता जिल्हा परिषद अध्यक्षपद मला मिळाले. हे अध्यक्षपद मी घेण्यास कशी पात्र आहे, हे मला सिध्द करावे लागते. अशी खंत धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. बुधवार दि. 1 एप्रिल रोजी जि. प. च्या सभागृहात दुपारी पत्रकार परिषदेत घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, शिक्षणाधिकारी खंदारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघद आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी जिल्हा परिषदच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व महिला व बालकल्याण सभापती महिला असल्यामुळे महिला राज बऱ्याच वर्षानंतर आले आहे. त्यामुळे महिलांसाठी काही विशेष योजना राबवणार का ? या संदर्भात विचारले असता त्यांनी जननी आरोग्य योजना, प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगून, आशा कार्यकर्त्यांना वाहन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी शालेय पोषण आहार वाटप, सेमी इंग्रजी, संत साहित्य यावर आधारित चल प्रदर्शन, समृध्द ग्रामपंचायत, मुला-मुलींची शाळा एकत्रीकरण आदी योजनेची माहिती दिली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन, दुहेरी पंप योजना कामासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना कार्यकारी अभियंता कटकधोंड यांना पुरेशी माहिती देता आली नाही. पदाधिकाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्व निवासस्थाने जिल्हा परिषदच्या आवारात होतील. त्याप्रमाणे धाराशिव पंचायत समिती इमारत, उमेद इमारत आदी इमारतींची कामे लवकरच सुरू होतील. जिल्हा परिषदेच्या जागेवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत ते अतिक्रमण काढण्यात येवून, जिल्हा परिषदच्या नावे 8 अ मालकी हक्क प्रमाणपत्र तयार करण्यात येईल. असेही अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
गेले अनेक वर्षे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या पनवेल कन्याकुमारी एनएच 66 या दुपदरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, अनेक ठिकाणी काँक्रिटमधल्या शिगा बाहेर आल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे. गतिमान विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या केंद्र सरकारचे या महामार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी, चिपळूणमध्ये […]
चैत्री पौर्णिमेचे धार्मिक विधी उत्साहात संपन्न
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा सोहळा बुधवार दिनांक एक रोजी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला चैत्री पौर्णिमे पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक असे फुलांची आरस करण्यात आला होता. चैत्र पौर्णिमेचे मुख्य धार्मिक विधी बुधवारी (दि.1) रोजी संपन्न झाले. चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहाटे 1 वा. चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास आरंभ झाला. पहाटे एक वाजल्यापासून तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वा. देवीची भाविकांचे अभिषेक करण्यात आले ते 10 वाजता संपल्यानंतर देवीला वस्त्रालंकार घालुन नित्योपचार पूजा केली गेली. सायंकाळी पुन्हा देवीजीस अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री 10 वा. मंदिर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांच्याकडून जोगवा होऊन चैत्र पौर्णिमा सोहळ्याची सांगता झाली.
बेंबळी येथे ५ एप्रिलला मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्व नागरिक, आर्थिकदृष्ट्या असक्षम, शेतकरी आणि कामगारांच्या कुटुंबियांसाठी बेंबळी (ता. धाराशिव) येथे ५ एप्रिलला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाॅयन्स क्लब ऑफ लातूर सिटी, बेंबळी ग्राम विकास ट्रस्ट आणि उदयगिरी लाॅयन्स आय नेत्रालयाच्या (उदगीर) यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेंबळी येथील हेड्डा आडत दुकानाच्या हॉलमध्ये शिबिर सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. शिबिराचे उद्घाटन अरविंदअप्पा गिरवलकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गोविंदलाल हेड्डा असतील. धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिबिरात उदयगिरी लाॅयन्स आय नेत्रालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे गरजू रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची निवड करून त्यांना उदगीर येथील नेत्रालयात नेले जाईल. विशेष म्हणजे, या रुग्णांना नेण्या-आणण्याची सेवा पूर्णपणे विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. जगदीश हनुमानदासजी हेड्डा यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी रुग्णांनी डॉ. श्रीनिवास पवार, डॉ. अविनाश गावडे, डॉ. सचिन ताडेकर गणेश हेड्डा, उपेंद्र कटके, राजन गिरवलकर, श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
बाळासाहेब क्षिरसागर यांचा पक्षाच्या बीएलए -1 विधानसभा अध्यक्ष पदी निवड
भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परांडा विधानसभा मतदारसंघाच्या (SIR) BLA-1 विधानसभा प्रमुखपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली . या निवडीचे मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन केले जात आहे . आगामी प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिये दरम्यान गैरप्रकार टाळला जावा, एकाच व्यक्तीचे अनेक ठिकाणी अनेक वेळेस मतदान होऊ नये यासाठी मतदार यादीची पूनरनिरीक्षण करण्याची पक्षाच्या माध्यमातून कार्यवाही चालू आहे . परंडा मतदार संघात ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पक्षातील ज्येष्ठ अनुभवी नेते बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडे पक्षश्रेष्ठी सोपवली आहे . बाळासाहेब क्षिरसागर यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते लालकृष्णजी अडवाणी, तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबत काम करत पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. या नियुक्तीमुळे परांडा विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे . दिनांक 29/3/ 2026 रोजी या निवडीचे तालुका भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियाना दरम्यान सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील , महादेव वडेकर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर महिला तालुका अध्यक्ष स्वाती तनपुरे , शहराध्यक्षा विद्या खामकर, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते, सिद्धार्थ जाधव , शुभम खामकर, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ, बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर, विकास जालन, पंचायत समिती माजी सदस्य सिताराम वनवे , सुरेश उपरे, सुबराव शिंदेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सत्कार
धाराशिव(प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बी.ए द्वितीय वर्षात शिकत असणारी निकिता बाळासाहेब शिंदे या विद्यार्थिनीची नुकतीच पोलीस भरतीमध्ये निवड झाली या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, यश प्राप्ती साठी प्रयत्नांमध्ये सातत्य असणे, नियोजन बद्ध पध्दतीने अभ्यास करणे व समर्पण भावनेने स्वतःला गुंतवून ठेवणे आवश्यक आहे तरच अपेक्षित यश प्राप्ती होते. भविष्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयात सुरू करण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सदर प्रसंगी डॉ सी आर दापके, डॉ केशव क्षीरसागर, डॉ बालाजी गुंड, डॉ निल नागभिडे, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे, प्रा माधव उगिले, प्रा विवेकानंद चव्हाण, प्रा. गेंजगे, डॉ दत्तात्रय साखरे, डॉ मारुती लोंढे यांची उपस्थिती होती.
महाअभिमानचा कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा
भूम (प्रतिनिधी)- संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग चालू आहेत. यापैकी भूम येथ झालेल्या कार्यशाळेचा पहिला अहवाल महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कौडगे यांच्याहस्ते धाराशिव येथे सादर व प्रकाशित केला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक मंडळात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान चालू आहे. या अभियाना दरम्यान सात ते आठ सत्रामध्ये विविध विषयावर विविध अभ्यासू वक्ते अनमोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करत आहेत. या अभियाना अंतर्गत भूम येथे झालेल्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा अहवाल कवी मनाचे पत्रकार तथा पक्षाचे भूम तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर यांनी संकल्पीत व लिखित केलेल्या अहवालाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कौडगे यांच्या हस्ते प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या दरम्यान मतदार यादी पुर्ननिरीक्षण परंडा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जेष्ठ नेते सहकारी अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य प्रदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, भूम तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, पत्रकार शंकर खामकर, चंद्रकांत गवळी, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.
धाराशिवात डीजेवर कडक बंदी पोलिसांचा मोठा निर्णय
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोणत्याही मंडळांनी डीजे बुकिंग करू नये, असा गर्भित इशारा धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक कुमार दराडे यांनी दिला आहे. शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये वेळोवेळी शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत असून त्यामध्ये प्रामुख्याने डीजे बंदी यावर चर्चा करण्यात येत आहे. सर्व उत्सव मंडळांना स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच ही कारवाई केली जात आहे. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली.
Chandrapur News –चंद्रपूर महापालिकेत भाजपमध्ये बंड, स्वतःच्या महापौरांविरोधात नगरसेवकांचा निषेध
चंद्रपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्येच अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सभागृह नेतेपदाच्या नियुक्तीवरून हा वाद चिघळला असून, तब्बल 27 नगरसेवकांनी एकमुखाने शेखर शेट्टी यांची सभागृह नेते म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी महापौरांकडे लेखी निवेदनही सादर केले होते. मात्र या मागणीला डावलून महापौरांनी स्वतःच्या मर्जीने दुसऱ्याच नगरसेवकाची सभागृह नेतेपदी नियुक्ती […]
कुडाळ शहरातील एक युवक ताब्यात कुडाळ – कुडाळ – एमआयडीसी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यात कुडाळ शहरातील एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 536 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. कुडाळ – एमआयडीसी येथे गांजा विक्री करण्यासाठी एक युवक गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती कुडाळ [...]
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आयपीएल IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 2021 पासून 2025 पर्यंत अर्जुन मुंबई इंडियन्सचा भाग होता, मात्र या पाच वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर आता अर्जुनने संघात मिळणाऱ्या मर्यादित संधींबाबत आपले मौन सोडले असून, […]
सावंतवाडीत वनविभागाकडूनच झाडांची कत्तल ?
उपवनसंरक्षक कार्यालय परिसरातील वृक्षतोडीने पर्यावरणीय प्रश्न ऐरणीवर सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात वनविभागाकडूनच मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करण्यात आल्याची घटना समोर आली असून यामुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ही झाडे त्या परिसरातील लहान मुलांसाठी असलेल्या गार्डनजवळ होती, जिथे घसरगुंड्या आणि इतर खेळणी बसविण्यात [...]
हनुमान जयंती उत्सवादरम्यान मंदिरातील मंडप कोसळला, दुर्घटनेत 10 भाविक जखमी
तेलंगणातील जगतियाल येथील एका मंदिरात उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. बुधवारी मंदिरातील तात्पुरता उभारण्यात आलेला मंडप कोसळल्याने 10 भाविक जखमी झाले आहेत. कोंडागट्टू श्री आंजनेय स्वामी मंदिराच्या आवारात ही घटना घडली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. श्री आंजनेय स्वामी मंदिरात तीन दिवसीय ‘हनुमान चिन्ना जयंती’ उत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने […]
भाजप हुकूमशाहीवर उतरली आहे; गुजरात ‘आप’अध्यक्षांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल यांची टीका
आम आदमी पक्षाचे (AAP) गुजरात प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला असून भाजप आता पूर्णपणे हुकूमशाहीवर उतरली असल्याचा आरोप केला आहे. नेमके काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी इसुदान […]
मांदिवली येथील बॉक्साईट उत्खनन विरोधात हरित लवादात याचिका; जून महिन्यात होणार सुनावणी
मांदिवली येथील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन विरोधात ग्रामस्थांनी अखेर न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारत पुणे येथील हरित लवादात याचिका दाखल केली आहे. गावकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही बॉक्साईट उत्खनन करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे आमचं कोण वाकडं करणार या आविर्भावात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. दापोली तालुक्यातील मांदिवली महसुली गावाच्या हद्दीत बॉक्साइट उत्खननाला अधिकृत पर्यावरणीय मंजुरी […]
भोंदू बाबा अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीचा तुळशीहार व वीणा देऊन सन्मान केल्याने सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याविषयी वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी साळुंखे यांनी प्रति विठ्ठल रखुमाई म्हणून भोंदू बाबाला दिलेले देवतांचे स्थान हे वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच पोहचविणारे आहे. या कृतीबद्दल माजी आमदार साळुंखे यांनी तमाम वारकरी संप्रदायाची जाहीर […]
राजाराम कोळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमधील सहशिक्षक राजाराम उत्तरेश्वर कोळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त आज शाळेत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोळी सरांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श. भोसले यांच्या हस्ते कोळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सतीश देशमुख, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माधव भोसले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना मुंडे यांच्यासह किरण जाधव, विठ्ठलराव दहिटणेकर, आबासाहेब ढगे, आप्पा मिसाळ, पोपट बांगर, लक्ष्मण घुले, आलम मुलाणी, चंद्रकांत तांबे, संतोष राऊत, सूर्यकांत वाळजे, महेश बोरकर, अंकुश परबळे, शेषेराव शेळके, शहाजी पाटील, संदीप बागडे, पल्लवी नवगिरे, पायल जिकरे, शिवानी गौड, रंधवे, भिमाबाई बांगर, कटारे, पूजा राठोड, यमुना क्षिरसागर, दीक्षा गाढवे, शामबाला बाराते, नायकिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कोळी यांच्या सेवाभावी वृत्तीचे, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे आणि शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले.
श्रीराम प्रतिष्ठानकडून वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्रीराम प्रतिष्ठानकडून इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. 31) रोजी करण्यात आले होते. इयत्ता 11 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचा विषय सोशल मीडिया समाजाला जोडते का तोडते हा होता. या स्पर्धेत एकूण 12 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विषयाच्या दोन्ही बाजूंनी प्रभावी मते मांडली. स्पर्धकांनी सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू स्पष्ट करून मुद्द्यांचे खंडन केले. इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचा विषय मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण असा होता. या स्पर्धेत 9 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे बालपणावर होणारे परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर प्रभावी भाषणे सादर केली. प्रारंभी श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली कलशेट्टी होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. उमाकांत महामुनी, केसरजवळगाचे शिक्षक भुरे यांनी केले. स्पर्धेचा निकाल वक्तृत्व स्पर्धा वर्षा अंबुसे (प्रथम), वैशाली नागने (द्वितीय), शहबाज नदाफ (तृतीय) तर वादविवाद स्पर्धा वैष्णवी रुपनूर व ज्ञानेश्वरी सुरवसे (प्रथम), सोनाली जाधव व साक्षी जाधव (द्वितीय), सीमा राठोड व तेजस्विनी खजुरे (तृतीय) या स्पर्धकांना महेश निंबरगे, विजयकुमार कलशेट्टी, योगेश कोलडंगरे, बाबुराव बेगमपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व विचारशक्तीला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. अध्यक्ष समारोपप्रसंगी या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथनाची सवय आणि व्यक्त होण्याची कला विकसित होण्यास मोठी मदत होते. आयोजक सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ, प्रशांत सोमवंशी, विकास शिंदे, रोहित स्वामी, शोभा बेगमपुरे, अनिल चव्हाण, मोहन करके, व्यंकटेश हंचाटे आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष येवले तर आभार प्रा. सतीश रामपुरे यांनी मानले.
भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण- हर्षवर्धन सपकाळ
धाराशिव(प्रतिनिधी)- शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, यात्रेचे समन्वयक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील, दादासाहेब मुंडे, अमर खानापुरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रशांत पाटील, अग्नीवेश शिंदे, उमेश राजे निंबाळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सकाळी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला. गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस ठेवलेले ट्रॅक्टर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, महागाई, बेरोजगारी वाढली आहे, सिलेंडर व पेट्रोल,डिझेल मिळत नाही पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून संविधानाची पायमल्ली करून गोलवळकरांच्या ‘बंट ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रधर्माची पायमल्ली करत आहेत. या महाराष्ट्रधर्म बुडव्यांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो व संविधानाला अभिप्रेत भारत घडू दे, असे साकडे घातल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अशोभनीय व किळसवाणे.. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यात प्रतिगामी विचार फोफावत असल्याने खरात सारख्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. अशोक खरात प्रकरणातून जे काही उघड होत आहे ते किळसवाणे असून महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकता येणार नाही, तर यामध्ये जे मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा छडा लावल्याच्या फुशारक्या मारू नयेत. 8-9 महिन्यांपासून त्यांच्याकडे याची माहिती होती, तर एवढा वेळ ते काय झोपा काढत होते काय? असा प्रश्न विचारून महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या यात्रेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा शेतकरी यात्रेचे समन्वयक डॉ.जितेंद्र देहाडे, अमर खानापुरे, सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे, जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, प्रदेश सचिव उदयसिंह पाटील, प्रदेश सचिव डॉ.स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेबूब पाशा पटेल, तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कळम तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शेळके, लोहारा तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, वाशीचे बाळासाहेब गपाट, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, अक्षय जोगदंड, तुळजापूर नगरपालिकेचे गटनेते अमोल कुतवळ, माजी नगरसेवक अमर मगर, उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सरचिटणीस अशोक बनसोडे, सरफराज काझी, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, परंड्याचे रमेशसिंह परदेशी, अजय खरसडे, भूषण देशमुख, धवलसिंह लावंड, संकेत पडवळ, उमरग्याचे गणेश पवार, अमित रेड्डी, महिला काँग्रेसच्या ज्योतीताई सपाटे, तनुजा हेड्डा उपस्थित होते.
दोषींवर 307 कलम लावा, तात्काळ अटक करा
तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव- तुळजापूर रोडवरील उड्डाणपुलावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी वातावरण तापले असून, पीडिताच्या पत्नी व मुलीने आरोपींवर कलम 307 (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. 20 मार्च 2026 रोजी सकाळी धाराशिव तुळजापूर बायपास उड्डाणपुलाजवळ काहीनी शिवाजी हावळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता यात पीडिताच्या पत्नी व मुलीने हा सरळ खूनाचा प्रयत्न आहे. आरोपींवर 307 कलम लावून त्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. अशी मागणी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूम (प्रतिनिधी)- येथील कसबा विभागातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून उद्या, गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कर्नाटक-हुबळी येथील किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कृष्णेंद्र वाडीकर आपली कला सादर करणार आहेत. रात्री 9:30 वाजता सुरावटींचा प्रारंभ श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी गायन क्षेत्रातील दिग्गज कलाकार कृष्णेंद्र वाडीकर यांच्या सुश्राव्य गायनाने ही मैफल सजणार आहे. गुरुवारी रात्री 9:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.दिग्गज कलाकारांची साथसंगत या संगीत मैफिलीला साथसंगत करण्यासाठी नावाजलेले वादक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तबला साथ हनुमंत फडतरे संवादिनी (पेटी) साथ: सुरेश फडतरे पखवाज साथ असाराम साबळे रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारे आणि किराणा घराण्याची गायकी प्रभावीपणे मांडणारे वाडीकर यांच्या गायनाचा आनंद घेता यावा, यासाठी भूम शहर व परिसरातील संगीत प्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समिती, श्रीराम मंदिर (कसबा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कळंब (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी कळंब आगारात उत्साहपूर्ण बैठक पार पडली असून, यंदाच्या जयंती उत्सवाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आल्याने आगारात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 30 मार्च 2026 रोजी दत्त मंदिर, रा. प. कळंब आगार येथे आयोजित बैठकीत आगारातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि विविध समित्यांची रचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना रविकांत शिंदे यांनी मांडली. त्यानंतर सर्वानुमते जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ. राजकन्या गवळी (निंबाळकर) यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्रीमती वंदना पालके, सचिवपदी सौ. संध्या सोनटक्के, कोषाध्यक्षपदी सौ. सरोजा औसेकर व सौ. निवेदिता रणदिवे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी सौ. प्रियंका शिंदे व सौ. अनुराधा भोसले यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांना नेतृत्वाची संधी देत जयंती उत्सवाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आल्याने आगारातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी भीमजयंती उत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा व्हावा, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रकाश पटेकर, नितीन गायकवाड, प्रशांत गायकवाड, अंकुश गायकवाड, संघरक्षित गायकवाड, बिभीषण क्षीरसागर, विलास थोरात, अशोक रणदिवे, विश्वनाथ गव्हाळे, आर. वाय. नकाते, एस. एस. कानडे, एस. आर. जाधव, सुनील जगताप, सुबोध रणदिवे, श्याम बनसोडे, एस. बी. पठाण, डी. सी. सरवदे आदी कर्मचारी उपस्थित होते. महिला नेतृत्वामुळे यंदाची भीमजयंती अधिक वेगळ्या स्वरूपात साजरी होणार असल्याची चर्चा आगार परिसरात रंगली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महामंत्री पदी विद्यमान विद्यापीठ प्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे दि.28 व 29 मार्च दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्रीय संघटनमंत्री महेंद्र कपूर, सहसंघटन मंत्री लक्ष्मण, प्रांताचे पालक प्रा.डॉ. शेखर चंद्रात्रे, क्षेत्र प्रमुख दिग्विजय, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यशाळेत प्रोफेसर दिलीप अर्जुने यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर राज्य महामंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी शैक्षणिक महासंघाचे विद्यापीठ महामंत्री डॉ. सत्यप्रेम घुमरे, महिला प्रमुख प्रा. डॉ. महानंदा दळवी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. संजय सांभाळकर, प्रसिद्धीप्रमुख प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे, जिल्हा महामंत्री डॉ. बालाजी माडजे, जालना जिल्हा महामंत्री डॉ. बाबू तोटरे , धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. नेताजी काळे, सचिव डॉ. निशांत निरमळे, बीड जिल्हाध्यक्ष रमेश लांडगे, यांच्यासह महाराष्ट्रातील शैक्षणिक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्ती बद्दल प्रोफेसर दिलीप अर्जुने यांचे अभिनंदन होत आहे.
हवामान अस्थिरतेचा केसर आंबा बागांना फटका- डॉ संजय पाटील
तेर (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील केसर आंबा बागांना हवामान अस्थिरतेचा मोठा फटका बसल्यामुळे यावर्षीआंबा उत्पादनात 40-50 टक्के घट येणार असल्याचे प्रतिपादन केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ संजय पाटील यांनी केले. कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील विजोरा (ता. वाशी), रत्नपुर, हासेगाव ( ता. कळंब), वाणेवाडी (ता. धाराशिव), वरवंटी, अपसिंग्गा (ता. तुळजापूर) आदी ठिकाणी आंबा बागांना भेटी देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम बरवे (वाशी), बी एच सरडे (कळंब),अण्णासाहेब देशमुख (तुळजापूर),ए एस दिवाने ( धाराशिव),वरिष्ठ संशोधक सहायक ओंकार पाटील,उपकृषी अधिकारी जाधव,तीर्थकार,वाडकर तर आंबा उत्पादक अच्युत जाधवर,अमर चोंदे,रवींद्र तोडकर,संजय भागवत,वैभव उंबरे,शंकर देशमुख,विलास म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.या पाहणीबाबत बोलताना डॉ पाटील म्हणाले,यावर्षी आंबा मोहर एक महिना उशिराने आला,मोहर येण्याच्या काळात कडाक्याची थंडी पडल्याने मोठ्या प्रमाणात आंबा झाडे सर्वत्र मोहराने लदगदुन गेली होती, परंतु ही थंडी दीर्घकाळ राहिल्याने फुलाचे रूपांतर फळात होण्याच्या स्थितीत तापमान कमीच राहिले, पर्यायाने फळधारणा कमीच झाली अन थंडीमुळे मोहराचे दांडे लांबलचक पडून यात नर फुलांचे प्रमाण अधिक राहिले. काही प्रमाणात फळधारणा झाली होती परंतु मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस ,वारा- वादळ, काही ठिकाणी गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा फळांची गळ झाली परिणामी फळाच्या राजास मोठा धोका बसला. आंबा पिकास नैसर्गिक धोके भरपूर असल्याने कोणतीही फळबाग लागवड करण्यापूर्वी बांधावर वारा रोधकाची लागवड करणे अनिवार्य वाटते. सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या फळांची गळ थांबविणेसाठी प्रयत्न करावा.
मुख्यमंत्री रोजगारमध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर सलग चौथ्या वर्षी 100 टक्क्यांहून अधिक कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयामुळे धाराशिवने हे यशशिखर गाठले आहे. चालू आर्थिक वर्षात धाराशिव जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल 1007 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याने 129 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकिंग क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यातील नवउद्योजकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या यशात जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, तेरणा जनसेवा केंद्राची टीम, प्रा. किरण आवटे आणि प्रमोद सुतार यांनी सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून मागील चार वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, 2025-26 या वर्षात 800 चे लक्ष्य निर्धारित असतानाही तब्बल 1007 प्रकरणे मंजूर करून घेण्यात केंद्राला यश आले आहे. ज्यांना स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा सामान्य नागरिकांसाठी तेरणा जनसेवा केंद्र एक भक्कम आधारवड ठरले आहे. या प्रयत्नांमुळेच चार वर्षात 3,100 उद्योजक स्वतःच्या कुटुंबाची गुजरान या उद्योगावर करीत आहेत. जिल्ह्याने सलग चार वर्षे ही सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक नकाशावर धाराशिवचे नाव आता ठळकपणे उमटले आहे. औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी कटिबद्ध धाराशिव जिल्ह्याचे हे यश देदीप्यमान आहे. प्रशासनातील सर्व विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण नवउद्योजकांना बळ देऊ शकलो. भविष्यातही जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन सोमवारी (दि. 30) करण्यात आले. प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. संजय आंबेकर व सहसमन्वयक प्रा. कैलास शिकारे यांनी स्पर्धेचे नियोजन केले. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. व्ही. जी. शिंदे होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. अभय शहापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभाला अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील उपस्थित होत्या. स्पर्धेत महाविद्यालयातील 16 संघांनी सहभाग नोंदवला. विविध अभिरूप न्यायालयांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कसुशांत मिंधे, मयुरी राजेनिंबाळकर व प्रतीक्षा शिराळ यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. तर ऋषिकेश जाधव, गणेशसिंग किल्लेदार व अभिषेक मोरे यांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. उत्कृष्ट युक्तिवादासाठी ऋषिकेश जाधव याला प्रथम क्रमांकाचा सन्मान देण्यात आला. स्पर्धेसाठी धाराशिव न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञांनी न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सार्थक सुरवसे व सुशांत मिंधे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सलगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रणिता भोसले यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
इस बार बडा खेला होगा, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर निशाणा
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीरभूम जिल्ह्यातील नानूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली. “इस बार बडा खेला होगा (यावेळी निवडणुकीत मोठा खेला होणार),” असा इशारा देत त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा […]
जटाशंकर यात्रेनिमित्त संगीत महोत्सवाला प्रारंभ
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील जटाशंकर देवस्थान यात्रेनिमित्त आज बुधवारी, दि 01 एप्रिल रोजी जटाशंकर संगीत महोत्सव तर उद्या सकाळी मानाची काठी व श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रा महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील मुळज येथे गावच्या पूर्वेला एक किमी अंतरावर उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले प्राचीन हेमाडपंती जटाशंकर मंदिर आहे. प्राचीन काळापासून दरवर्षी जटाशंकर देवस्थानची यात्रा गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत चालते. गुढी पाडव्याला सोयराप्पा घराण्याच्या काठी प्रतिष्ठापणेने यात्रेची सुरुवात होते. मंगळवारी, (दि 31) रात्री उशिरा ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिश बाजी श्री च्या पालखीचे देवस्थानकडे प्रस्थान झाले. आज बुधवारी संगीत महोत्सव, हरीजागर तर उद्या गुरुवारी, (दि 02) पहाटे छबिना मिरवणूक, सकाळी जटाशंकर देवस्थानची तीस ते चाळीस फुट उंच मानाची काठी व श्री च्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादरम्यान ठराविक ठिकाणी दहीहंडी काला, भारूड आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेनिमीत्त मंदिराच्या संपूर्ण गाभार्यात विविध फळे, देशी, विदेशी सुगंधी सुंदर फुलानी मनमोहक आरास करण्यात आली आहे. तर मंदिर व परिसर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि 03) सकाळी मोफत आरोग्य, रक्त तपासणी व रक्तदान शिबिर, दुपारी देवस्थान परिसरात जंगी कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या मल्लांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. शनिवारी पहाटे महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्वरयात्रा, एक सुरेल संगीत मैफील! जटाशंकर देवस्थान यात्रेनिमित्त आज बुधवारी, (दि 01) रात्री मंदिर परिसरात यावर्षीच्या जटाशंकर संगीत महोत्सवात आसावरी मुळे निर्मित पुणे येथील प्रसिद्ध गायक संगीतकार खंडेराव मुळे यांच्या स्वरयात्रा एक सुरेल संगीत मैफली चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
Israel Iran War –ब्रिटनचा अमेरिकेला दणका; युद्धात सहभागास नकार, होर्मुझबाबत 35 देशांची बैठक बोलावली
महिन्याभरापासून सुरू असलेले अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध संपण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत आहे. अमेरिका आपल्या अटींवर करार करण्याबद्दल बोलत आहे, तर इराणने त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही इराणविरोधातील युद्धात सामील होणार नाही, असे ब्रिटनने स्पष्टपणे सांगत अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी स्पष्ट केले आहे की, ब्रिटन इराणच्या युद्धात सामील होणार […]
नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंनी स्वीकारला नगरपालिकेचा कारभार
सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.श्रध्दाराजे भोसले यांनी तब्बल दोन महिन्यानंतर नगरपालिकेचा कारभार स्वीकारला. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी त्यांचे त्यांचे स्वागत केले.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर , पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सौ नीलम नाईक, सुनिता पेडणेकर , वैभव अंधारे, श्री गवंडे आधी उपस्थित [...]
IPL 2026 मध्ये एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा 22 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कूपर कोनोलीने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोनोलीने मॅच विनिंग खेळी करत पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध 3 गडी राखून विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा […]
वैवाहिक मतभेदातून पतीने आत्महत्या केली तरी महिलेला दोषी ठरवता येणार नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
वैवाहिक मतभेदातून पतीने आत्महत्या केली तरी पत्नीला दोषी ठरवता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पुरेसा पुरावा किंवा तसा हेतू नसल्याचे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने महिलेवर दाखल झालेला एफआयआर आणि कायदेशीर कारवाई रद्द केली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावती जिल्ह्यातील एका व्यक्तीने नोव्हेंबर 2019 मध्ये रेल्वेखाली उडी […]
नरेंद्र मोदी अमेरिकेचे गुलाम बनले आहेत, आसाममधील सभेत प्रियांका गांधींचा घणाघात
आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकार आणि आसाममधील राज्य सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे गुलाम बनले असून आसाममध्ये सध्या डबल इंजिनचे नव्हे, तर डबल गुलामीचे सरकार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की,”नरेंद्र मोदी इथे येऊन म्हणायचे […]
Pandharpur |पंढरपुरात चैत्री यात्रेच्या बंदोबस्तात मोठी कारवाई; ८० हजारांचा गांजा आणि कार जप्त
चैत्री यात्रेच्या तोंडावर अंमली पदार्थांची तस्करी पंढरपूर – शहरातील सरगम चौक येथे भरधाव वेगाने निघालेल्या कारमधून पोलिसांनी ८० हजार रुपयांचा चार किलो गांजा व गांजाची वाहतूक करणारी कार असा ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई दरम्यान गाजांची वाहतूक करणाऱ्या एकाला जेरबंद [...]
न्हावेली भजन स्पर्धेत सद्गगुरु भजन मंडळ प्रथम
न्हावेली /वार्ताहर न्हावेली – पार्सेकरवाडी येथील स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली कै.भूषण उदय पार्सेकर व कै.उदय शांताराम पार्सेकर स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत अणसूरचे सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.श्री नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव द्वितीय तर मातोंडच्या श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,तृतीय क्रमांक मिळविला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला [...]
Miraj |मिरजेत टोळीयुद्ध भडकले! सराईत गुन्हेगाराच्या भावाचा दोघा तरुणांवर खुनी हल्ला
मिरजेत दोन गटात तुंबळ हाणामारी; चाकू-कोयत्याने वार मिरज : पूर्वी झालेल्या भांडणाच्याकारणातून सहा जणांच्या टोळीने दोघा तरुणांना दुचाकीवरुन खाली पाहून खुनी हल्ला केला. डोक्यात बियरच्या बाटल्या फोडण्यासह चाकू व कोयत्याने जबर मारहाण करण्यात आल्याने सुजल दत्तात्रय भोसले (वय १७) व त्याचा मित्र समर्थ गायकवाड असे दोघे जखमी झाले [...]
अभिमानास्पद ! ‘मालवण ‘युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात
शिवरायांच्या आरमाराचा वारसा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्गात एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड, कोचीद्वारे बांधल्या जाणाऱ्या आठ ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ पैकी दुसरे जहाज ‘मालवण’, ३१ मार्च २०२६ रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. भारतीय नौदलाच्या विशिष्ट गरजांनुसार आणि ‘DNV’ च्या वर्गीकरण नियमांनुसार, CSL कोचीने या जहाजाची स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी [...]
घाटकोपरमध्ये 10 ऑटो रिक्षा जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट; सुदैवाने जीवितहानी नाही
घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरात बुधवारी दुपारी सुमारे 10 ऑटो रिक्षांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग घाटकोपर पूर्व येथील गगनगिरी इमारतीच्या मागील बाजूस, […]
पाकच्या कुरघोड्या सुरूच; जम्मूमध्ये हिंदुस्थानी ड्रोनवर गोळीबार
जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर कृत्य केले आहे. कनाचक सेक्टरमध्ये आपल्याच हद्दीत नियमित टेहळणी करत असलेल्या हिंदुस्थानी रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्टवर (RPA) पाकिस्तान्यांकडून गोळीबार केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हिंदुस्थानी ड्रोन सुरक्षितपणे आपल्या तळावर परतले आहे. या घटनेमुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री […]
अमेरिका-इराण युद्धाला एक महिना उलटला आहे आणि या युद्धाच्या तडाख्याने इतर देशांमधील रिअल इस्टेट क्षेत्रांनाही आपल्या विळख्यात घेतले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावामुळे केवळ राजनैतिक समीकरणेच बदलली नाहीत, तर जगभरातील रिअल इस्टेट क्षेत्रही अनिश्चिततेच्या गर्तेत लोटले गेले आहे. २०२६ च्या सुरुवातीला अमेरिकेतील गृहनिर्माण बाजारपेठ सुधारण्याच्या मार्गावर होती. मात्र, युद्धामुळे या गतीला खीळ […]
Mumbai News –इंडिगोच्या विमानात ‘डेंजर’चिठ्ठी सापडली; मुंबई विमानतळावर खळबळ
मुंबईहून अहमदाबादला जाण्याच्या तयारीत असतानाच इंडिगोच्या विमानात ‘डेंजर’ असं लिहिलेली चिठ्ठी सापडली. यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. चिठ्ठी सापडताच बॉम्बस्फोटाची भीती व्यक्त करत तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्नीशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान बुधवारी मुंबईहून अहमदाबादला […]
ऑटो चालकांचा 8 एप्रिलला RTO वर मोर्चा; कल्याण योजनेच्या 800 रुपये शुल्काविरोधात संताप
राज्यातील ऑटो रिक्षाचालकांच्या कल्याणकारी योजनेतील शुल्क संरचनेविरोधात महाराष्ट्रभर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर 8 एप्रिल रोजी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांवर (RTO) मोर्चा काढण्याचा निर्णय विविध ऑटो संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू मुंबईतील अंधेरी येथील RTO कार्यालय असेल, जिथे मोठ्या प्रमाणावर चालक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टाईम्स ऑफ […]
जागते रहो! शहराचा कायापालट होत आहे….
एप्रिल फूल (स्वप्ने पाहण्यास काय हरकत आहे?) मनीषा सुभेदार/बेळगाव आज 1 एप्रिल, एप्रिल फूल करण्याचा दिवस. याचा इतिहास काही असो, पण या दिवशी आपल्या जवळच्या माणसांचा एप्रिल फूल करण्याची गंमत अनेकजण घेतात. सामान्य जनतेचा हा एकच दिवस नव्हे तर अनेकवेळा ‘एप्रिल फूल’ होत असतो. तो कोण करते हे ज्याचे त्याने ठरवावे. त्याचेच हे प्रतिबिंब पहा… [...]
विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू, चार मिनिटांत वनविभागाची यशस्वी कारवाई
राजापूर तालुक्यातील मौजे जुवाठी-शिर्केवाडी येथे आज सकाळी रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत एक बिबट्या पडला होता. त्याबाबत सकाळी सुमारे 9 वाजता पोलीस पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. ही माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांनी तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, वनपाल व वनरक्षकांसह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पाहणीदरम्यान बिबट्या विहिरीतील दगडावर […]
अबब….. थोरांदळेत हनुमान जयंती निमित्त तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणीचा महाप्रसाद तयार…
अनेक वर्षाची परंपरा राखत थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे हनुमानजयंती निमित्त महाप्रसादासाठी तब्बल तीन लाख पुऱ्या पाच पिंप गुळवणी व 1 हजार किलो कांद्यांची चटणी असा महाप्रसाद तयार झाला आहे. गुरुवार (दि. 2) रोजी हनुमान जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. थोरांदळे येथील हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो. […]
राजापुरात विहिरीत पडलेल्या बिबट्याचा थरारक रेस्क्यू; वनविभागाची अवघ्या चार मिनिटांत यशस्वी मोहीम
राजापूर तालुक्यातील जुवाठी-शिर्केवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले. विशेष म्हणजे, अवघ्या चार मिनिटांच्या थरारक मोहिमेत या बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुवाठी-शिर्केवाडी येथील रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत बुधवारी सकाळी एक बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पोलीस पाटील […]
मुंबईसह ठाणे, रायगडला अवकाळी पावसाचा इशारा; इतर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’जारी
भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबईत पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून शहरात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड आणि इतर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले, तर IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने मंगळवारी २५.६ अंश सेल्सिअस […]
कृषी खात्यावर मावळत्या संचालकांनाच मुदतवाढ?
दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही : मावळत्या संचालकांना वर्षभराची मुदतवाढ? पणजी : नियमानुसार कृषी खात्याचे संचालक 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. तथापि सरकारने त्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसल्यामुळे पुन्हा एकदा मावळत्या संचालकांनाच मुदतवाढ देण्याची शक्यता दिसते. कृषी खात्यामध्ये संचालक आणि त्या मागोमाग येणारे अनुभवी अधिकारी यामध्ये थोडे अंतर असल्यामुळे कृषी उपसंचालिका रैना फर्नांडिस [...]
पतीकडून पत्नीवर अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना, याउलट एका प्रकरणात पतीनेच आपल्या पत्नीवर लैंगिक छळ, मानसिक अत्याचार आणि अप्राकृतिक कृत्यांसाठी भाग पाडल्याचे गंभीर आरोप केले आहेत. बेंगळुरूतील 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या 31 वर्षीय पत्नीविरुद्ध अमृतहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे. तक्रारीनुसार, संबंधित […]
अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नाशिक सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
बहुचर्चित भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या संदर्भात बुधवारी 1 एप्रिल रोजी नाशिक सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे बुधवारी त्याला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायमूर्ती बी. एन. ईचपुरानी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी […]
Ratnagiri News –कळंबस्ते येथे अज्ञाताने बागेला लावली आग; चंदनाची शेकडो झाडे जळून खाक, गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते भिमनगर येथे एका शेतकऱ्याच्या मेहनतीवर अज्ञाताने पाणी फेरले असून बागेला लावलेल्या आगीत चंदनासह शेकडो फळझाडे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी संकेत सिद्धार्थ मोहिते (वय ३९, सध्या रा. शिवडी, मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. २९ मार्च २०२६ रोजी दुपारी […]
सोहम नाईकची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी
पणजी : महिला आणि अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषणाशी संबंधित अनेक प्रकरणांच्या संदर्भात, आरोपी सोहम सुशांत नाईक याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने लैंगिक शोषणाच्या आणखी एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध पाचवा एफआयआर दाखल केला आहे. कुडचडे येथे लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी सोहम नाईक याला पणजी येथील बाल न्यायालयाकडून गेल्या [...]
आठव्या जनगणनेचा पहिला टप्पा : स्वेच्छा ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा पणजी : भारतीय 8 व्या जनगणनेचा गोव्यातील पहिला टप्पा आज बुधवार दि. 1 एप्रिलपासून सुरु होत असून त्यात गृहगणना करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत गणनेच्या पोर्टलवरुन स्वेच्छा ऑनलाईन गृहनोंदणी व इतर माहिती सादर करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यानंतर 16 [...]
भाजप आणि अकाली दलमुळे पंजाबमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट, आप नेते अरविंद केजरीवाल यांची टीका
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पंजाबमधील अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करत, “पंजाबच्या घराघरात नशा पोहोचविल्याबद्दल तुम्ही लोकांची माफी मागावी,” अशी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी भाजप आणि अकाली दल सरकारवर आरोप करत म्हटले की, पंजाबमध्ये अमली पदार्थांचा प्रसार हा त्यांच्या कारकिर्दीतच झाला आणि आता त्याच मुद्द्यावर […]
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांनी दारूच्या दुकानाचे अतिशय उत्कट वर्णन केले आहे. दारूच्या दुकानाला ते ‘मधुशाला’ म्हणतात. सुन कलकल, छलछल मधुघट से गिरती प्यालों में हाला सुन, रुनझुन रुनझुन चल वितरण करती मधु साकीबाला, बस आ पहुंचे, दूर नहीं कुछ, चार कदम अब चलना है चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले मधुशाला। मधुघटातून […]
शिरगावचा ३४ वर्षीय तरुण अपघातात दगावला शाहूवाडी : मलकापूर ते कोपार्डे मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. किरण भगवान पोतदार (वय ३४ शिरगाव ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची शाहूवाडी पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्यामाहितीनुसार किरण पोतदार हा आपल्या दुचाकीवरून शिरगावकडे जात [...]
आता बाहेर खाणं महागणार, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ
हिंदुस्थानात सुरू असलेल्या आखाती प्रदेशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या एका महिन्याच्या आत व्यावसायिक एलपीजी दरात ही दुसरी वाढ असून, यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि वसतिगृहांसारख्या व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे. विशेषतः मोठ्या […]
Sirsangi |गणेश’हत्तीचा वनविभागाला चकवा! सिरसंगी परिसरात पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थांमध्ये घबराट
सिरसंगी परिसरात ‘गणेश’ हत्तीचा पुन्हा धुमाकूळ किणे : सिरसंगी, यमेकोंड परिसरातगेल्या काही दिवसांपासून गणेश हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. शेत पिकांच्या नुकसानीसह रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचेही नुकसान केले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बनविभागाकडून हत्ती हटाव मोहिम राबविण्यात येत होती. पण बनविभागाला चकवा देत गणेश हत्ती पुन्हा [...]
मध्यवर्ती म. ए. समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे
सर्वानुमते झाली निवड : सीमाप्रश्नासंदर्भात तसूभरही माघार घेणार नसल्याची दिली ग्वाही बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीचे माजी अध्यक्ष कै. दीपक दळवी यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या अध्यक्षपदी मंगळवारी मध्यवर्ती म. ए. समिती सदस्यांच्या सर्वानुमते प्रकाश मरगाळे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी त्यांचे अभिनंदन करून [...]
कन्नडसक्ती विरोधात सडेतोड उत्तर देणार
मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : डांबर मोर्चासंदर्भात लवकरच बैठक बेळगाव : बेळगावमध्ये कन्नडसक्ती अधिकाधिक तीव्र केली जात आहे. याविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीकडून डांबर मोर्चा काढत सडेतोड उत्तर दिले जाणार आहे. डांबर मोर्चासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या येत्या बैठकीत सविस्तर चर्चा करून याबाबतची रणनीती ठरविली जाणार आहे. कन्नडसक्तीबद्दल नरमाईची भूमिका केव्हाही घेतली जाणार [...]
एप्रिलमध्ये चालू वर्षाची सर्व घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत
महापालिकेचे शहरातील मिळकतधारकांना आवाहन बेळगाव : महानगरपालिकेच्या अखत्यारित मिळकतधारकांनी 2026-27 सालातील आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात मिळकतीची सर्व घरपट्टी भरल्यास त्यावर 5 टक्के सवलत देण्यात येईल, असे महानगरपालिकेच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. मिळकतधारकांना आपल्या मिळकतीची घरपट्टी ऑनलाईन पद्धतीने भरता यावी यासाठी सोय करून देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट इंटिग्रेशन ऑफ प्रॉपर्टी टॅक्स हे सॉफ्टवेअर [...]
हनुमान जयंती शांततेत, उत्साहात साजरी करा
पोलीस खात्याकडून बैठक : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन बेळगाव : शहरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासह शोभायात्राही काढली जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. मंगळवारी खडेबाजार पोलीस स्थानकात शहरातील वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हनुमान जयंती शांततेत व उत्साहात साजरी करण्यात यावी, असे आवाहन कायदा व [...]
सोने किंचित स्वस्त, पण चांदी महागली! कोल्हापूरच्या सराफ बाजारात दरांची मोठी उलथापालथ
चांदीने ओलांडला २ लाख ४० हजारांचा टप्पा कोल्हापूर : सोने-चांदी दरामध्ये चढ-उतार सुरू आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी चांदी किलोमागे ९ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोने १० ग्रॅममागे फक्त ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी सोने १५१५०० तर चांदी २३३००० असा दर होता. तर मंगळवारी सोने [...]
सरकारनियुक्त सदस्य डॉ.नाशिपुडी यांचे महापालिकेत ठिय्या आंदोलन
अनधिकृतरित्या घरे बांधलेल्यांकडून सरकारी आदेशाप्रमाणे कर घ्या बेळगाव : अनधिकृत घरे बांधलेल्यांकडून पहिल्या वर्षी डबल टॅक्स व त्यानंतर दरवर्षी सिंगल टॅक्स घ्यावा, असा आदेश 2024 मध्ये राज्य सरकारने जारी केला आहे. मात्र या आदेशाची महापालिकेत अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे महापालिकेत सरकारच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सरकारनियुक्त सदस्य डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी मंगळवारी [...]
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओरॅकल’ने आपल्या जागतिक फेररचनेचा भाग म्हणून हिंदुस्थानातील सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जागतिक मंदीचे सावट आणि व्यवसायातील बदलांचे कारण देत कंपनीने जगभरातून आतापर्यंत एकूण 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या मोठ्या कर्मचारी कपातीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली […]
धोकादायक झाडांकडे मनपाचे दुर्लक्षच
पावसाच्या तडाख्याने नुकसानानंतरही उदासीनता; यंदा तरी धोकादायक झाडे हटविणार का? बेळगाव : गतवर्षी मनपाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात झाडे किंवा फांद्या हटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे यंदा तरी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे व फांद्या हटविल्या जाणार का? असा सवाल शहरवासियांतून विचारला जात आहे. विशेष म्हणजे बापट गल्ली कार पार्किंगच्या ठिकाणची झाडे [...]
उद्योगांचे स्थलांतर बेळगावकरांच्या मुळावर!
उद्यमबाग परिसरात असुविधांचा डोंगर, जागेअभावी करावा लागतोय समस्यांचा सामना, वाहतुकीच्या निर्बंधांमुळे संक्रांत, कारखानदार मेटाकुटीस सुशांत कुरंगी/बेळगाव बेळगाव जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या असुविधांमुळे मोठे कारखाने आता शहराबाहेर जाऊ लागले आहेत. विस्तारासाठी अपुरी जागा, वाहतुकीसाठीही निर्बंध, सरकारची उदासीनता यामुळेच मागील दोन वर्षात अनेक लहान-मोठे कारखाने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गासोबत कणगला औद्योगिक वसाहतीत सुरू [...]
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध संपण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांच्या संकेतांमुळे निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरच असल्याने शांततेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आता UAE युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातने (UAE) अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, याची चिंता वाढली आहे. […]
सहा हजार अल्पवयीन मुली गर्भवती
राज्यात बेंगळूर शहरासह रायचूर, विजापूर, तुमकूर बळ्ळारीमध्ये अधिक प्रकरणे बेळगाव : राज्यात 14 ते 18 वर्षांच्या आतील 5975 मुली गर्भवती असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अल्पवयीन मुली गर्भवती राहण्याचे प्रमाण बेंगळूर शहर प्रथम क्रमांकावर आहे तर रायचूर, विजापूर, तुमकूर, बळ्ळारी येथेही अशी प्रकरणे अधिक प्रमाणात दिसून आली आहेत. बालविवाह विरोधात कारवाईची कायद्यात तरतूद आहे. [...]
Chandoli Dam |वारणावती कॉलनीत अजगरांचा वाढता वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
चांदोली धरण परिसरात वन्यप्राण्यांची दहशत; शितुर बारुण – चांदोली धरण पायथ्याशी व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या वारणावती कॉलनी परिसरात सध्या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून या भागात अजगरांचे जणू साम्राज्यच निर्माण झाले असून, वारंवार घडणाऱ्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे सोमवारी सायंकाळी वारणावती [...]
अंगणवाडी केंद्रांना 30 दिवसांची उन्हाळी सुटी द्या
कर्मचारी संघटनेची मागणी : अधिकाऱ्यांना दिले निवेदन बेळगाव : मागील वर्षाप्रमाणे यंदाही अंगणवाडी केंद्रांना उन्हाळ्याची सुटी 30 दिवस द्यावी, अशी मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुका शाखेतर्फे करण्यात आली आहे. संघाच्या सदस्यांनी आपल्या मागणीचे निवेदन महिला-बालकल्याण खात्याच्या उपसंचालकांच्या नावे अधिकाऱ्यांकडे मंगळवारी सुपूर्द केले. 2025 मध्ये अंगणवाडी केंद्रांना 15 एप्रिल ते 14 मे अशी 30 [...]
बाजारपेठेतील गटारींची महापालिकेकडून स्वच्छता
शहरातील व्यापारीवर्गासह नागरिकांतून समाधान व्यक्त बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी दरवर्षी नगरसेवकांकडून महापालिकेकडे केली जाते. पण प्रत्यक्षात कार्यवाही करण्याकडे चालढकल केली जात असल्याने याचा फटका व्यापारी व रहिवाशांना सहन करावा लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेतील गणपत गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, मारुती गल्ली, कांदा मार्केट या ठिकाणी [...]
धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण
खा. नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर मुकुट मालवण | प्रतिनिधी मालवण शहर धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा 71 वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनः प्रतिष्ठापना 4 वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन सोहळा औचित्य साधून माजी मुख्यमंत्री [...]
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दूध उत्पादनात वाढ
अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांची माहिती : नवीन शंभर दूध संघांची केली स्थपना बेळगाव : बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षात शंभर नवीन दूध उत्पादक सहकारी संघ स्थापन करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकारी दूध संस्था सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच यावर्षी दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी [...]
जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त प्रशासनाचे कडक तपासणी मोहीम जोतिबा डोंगर : पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे जोतिबाच्याचैत्र यात्रेनिमित्त बाजारपेठेत प्रसाद म्हणून विक्रीला आलेल्या भेसळयुक्त आणि मुदतबाह्य सुमारे २६ हजार रुपये किंमतीचे पेढे आणि आईस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आईस्क्रीम नष्ट करून टाकले. श्री क्षेत्र जोतिबा [...]

28 C