नेस्को पार्टी प्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक, प्रवेश देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप
नेस्को प्रदर्शन केंद्रातील पार्टी प्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांनी अटक केली. प्रदीप गुप्ता असे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने काहींना प्रवेशिका नसतानाही देखील पार्टीच्या ठिकाणी सोडल्याचा त्याच्यावर ठपका आहे. पार्टी प्रकरणातील ही दहावी अटक आहे. काही दिवसापूर्वी नेस्को प्रदर्शन केंद्रात पार्टी दरम्यान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या दोघांच्या मृत्यूनंतर वनराई पोलिसांनी गुन्हा […]
ईडीची भीती दाखवून बँक खात्यावर डल्ला
ईडीची भीती दाखवून ठगाने वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून 7 लाख 70 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक केल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना नवघर येथे घडली. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या मुलुंड येथे राहतात. […]
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावरून नरेंद्र मोदी सरकारची संसदेत नाचक्की झाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावरून भारतीय जनता पक्षावर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही आज निशाणा साधला. सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का, असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर सडपून टीका केली. देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा […]
पेनकिलर घेऊनही भोंदू खरातची डोकेदुखी थांबेना, 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
आपल्या भोंदूगिरीच्या कारनाम्यांनी अनेकांचे डोके सून्न करणाऱ्या अशोक खरातला सहज बरा न होणारा डोकेदुखीचा आजार जडल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. न्यूरोसर्जनकडून उपचार करण्याची मागणी न्यायालयात केली, यामुळे तो यापुढील चौकशीला प्रतिसाद देईल का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. महिलांना गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याच्या पाचव्या गुन्ह्यात रविवारी खरातला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. […]
कोस्टल रोडला मुंबईकरांची वाढती पसंती!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेगाने पुढे गेलेल्या कोस्टल रोडचा प्रकल्प वेगवान वाहतुकीच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. 2024 मध्ये खुला केलेल्या कोस्टल रोडवर दोन वर्षांत वाहनांच्या संख्येत तब्बल सातपटीने वाढ झाली आहे. सुरुवातीला या मार्गावर दररोज सरासरी 8,787 वाहने धावत होती. सध्या ती संख्या 63 हजारांच्या पुढे गेली आहे. मार्च 2024 मध्ये कोस्टल रोड […]
हाजी अली येथे कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत नियोजित असलेल्या भूमिगत चारस्तरीय पार्किंग तळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. जमिनीखाली 15,400 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या या पार्ंकग तळाच्या क्षेत्रात तब्बल 1069 कार पार्ंकग करता येणार आहेत. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पार्ंकग तळाचे काम पूर्ण करून वाहनधारकांसाठी सेवा खुली करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. कोस्टल रोडमुळे […]
मुलीकडे शरीरसुखाची मागणी करताना आम्ही ही गोष्ट कोणाला सांगणार नाही, हे सर्व आपल्यातच राहील, असे तिला सांगणे म्हणजे विनयभंग नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हे संभाषण एक मुलगी व दोन मुलांमधील आहे. एका मुलाने मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी दुसऱ्या मुलाने मुलीला सांगितले की, ही गोष्ट आपल्यातच राहील. आम्ही दुसऱ्या कोणाला सांगणार नाही. […]
एमएमआरडीएत टेंडर घोटाळा, कोटय़वधींची कामे लाडक्या कंत्राटदारांना द्यायचा घाट
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कामांसाठी काढलेल्या निविदांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज केला. एमएमआरडीएची कोटय़वधींची कामे लाडक्या पंत्राटदारांना देण्याचा घाट घातला गेला असून एमएमआरडीए आयुक्तांनी हे वेळीच रोखले नाही तर त्याविरोधात लोकायुक्त आणि केंद्रीय दक्षता आयोगासह विधीमंडळातही आवाज उठवणार असा इशारा त्यांनी दिला. […]
पुढच्या वर्षी नाशिक येथे सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परिक्रमेचा मार्ग बदलण्याची मागणी करत 50 हून अधिक शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने राज्य शासनासह नाशिक महापालिकेला नोटीस बजावली आहे. न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुढच्या वर्षी कुंभमेळा सुरू होत आहे. त्याची पहिली पूजा […]
पत्नी कमावती असली तरी मुलाचा देखभाल खर्च पतीलाच द्यावा लागेल, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
पत्नी कमावती असली तरी मुलाचा देखभाल खर्च पतीलाच द्यावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. काम सांभाळून मुलाचे संगोपन करणाऱ्या महिलेचे मातृत्व पैशात मोजता येणार नाही. अशा प्रकरणात पती स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही, असेही न्या. उर्मिला जोशी-फणसाळकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले. तसेच मुलाच्या देखभालीसाठी 15 हजारांऐवजी 30 हजार रुपये देण्याचे आदेश […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 20 एप्रिल 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य – मनोबल उंचावणार आहे आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात आजचा […]
रिंकू सिंगने लावला केकेआरच्या विजयाचा दिवा
सलग पराभवानंतर केकेआरचा पहिला विजय : राजस्थान रॉयल्स 4 गड्यांनी पराभूत : सामनावीर वरुण चक्रवर्तीचे 3 बळी वृत्तसंस्था/ कोलकाता यंदाच्या हंगामात सलग अपयशाचा सामना करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने अखेर विजयाचे खाते उघडले आहे. रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीने अशक्य वाटणारा विजय खेचून आणत राजस्थान रॉयल्सचा चार गडी राखून पराभव [...]
इराणचा अमेरिकेला कडक संदेश : अणुहक्कांवर तडजोड करण्यास पेझेश्कियान यांचा नकार वृत्तसंस्था/ तेहरान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तेहरानचा हेतू स्पष्ट केला. सध्या सुरू असलेला संघर्ष इराणला ‘सन्माना’ने संपवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परकीय शक्तीला किंवा देशाला इराणला त्याच्या कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अणुहक्कांपासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाही, [...]
भारत-रशिया यांच्यात संरक्षण करार
एकमेकांच्या भूभागावर 3,000 सैनिक तैनात करू शकणार : 5 युद्धनौका, 10 लष्करी विमाने तैनात करण्याचीही परवानगी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत आणि रशिया यांच्यातील ‘रेसिप्रोकल एक्स्चेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (आरईएलओएस) हा संरक्षण करार आता अंमलात आला आहे. या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांच्या भूभागावर 3,000 पर्यंत सैनिक तैनात करू शकतील. तसेच, पाच युद्धनौका आणि 10 लष्करी विमाने [...]
‘आय-पॅक’चे बंगालमधील कामकाज बंद?
कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविल्याचा दावा : तृणमूलची ‘भ्रामक कटा’ची टिप्पणी वृत्तसंस्था/कोलकाता बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक व्यूहनीतिकार संस्था ‘आय-पॅक’चे कामकाज अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आय-पॅकच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या एका ईमेलमध्ये ‘कायदेशीर बंधनां’चा दाखला देत 20 दिवसांच्या रजेवर जाण्याचा निर्देश देण्यात आला आहे. [...]
संघर्षरत मुंबई गुजरातचे आव्हान मोडीत काढू शकणार ?
गुजरात टायटन्स झेप घेण्यास आतुर, सलग चार पराभवांमुळे मुंबई अडचणीत वृत्तसंस्था अहमदाबाद : सोमवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात संघर्षरत मुंबई इंडियन्स आपला घसरता क्रम थांबवण्यासाठी आतुर असलेल्या आत्मविश्वासपूर्ण गुजरात टायटन्सशी भिडणार आहेत. गेल्या काही आठवड्यांत दोन्ही संघांची कामगिरी पूर्णपणे भिन्न राहिली आहे. टायटन्सने आपल्या मोहिमेची सुऊवात सलग दोन पराभवांनी केल्यानंतर सलग तीन [...]
गोळीबाराचे परिणाम भोगावे लागतील!
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दोन टँकरवरील हल्ल्यानंतर भारताचा इराणला इशारा वृत्तसंस्था नवी दिल्ली, तेहरान होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय तेल टँकरवरील हल्ल्याप्रकरणी भारताने इराणला कडक संदेश दिला आहे. इराणी नौदलाने ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ या दोन भारतीय इंधनवाहू जहाजांवर गोळीबार केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, एका जहाजाच्या केबिनची काच फुटली. अशा कृतींचे परिणाम इराणला भोगावे लागतील, [...]
दीपिका कुमारी, आरव यांना सुवर्ण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी आणि आरव यांनी सुवर्णपदके पटकाविली.वरिष्ठ महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात दीपिका कुमारीने अंकिता भक्तचा 7-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अंकिताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे वरिष्ठ पुरुषांच्या विभागात आरव पुनियाने वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविताना सुखचेन सिंगचा 7-3 असा [...]
इस्रायलच्या निर्णयामुळे भडकले मुस्लीम देश
सोमालीलँडमध्ये प्रतिनिधीची नियुक्ती : सार्वभौमत्वाचे ठरविले उल्लंघन वृत्तसंस्था/ दोहा कतार, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कियेसमवेत 16 अरब आणि इस्लामिक देशांच्या विदेश मंत्र्यांनी दोहा येथे एक संयुक्त वक्तव्य जारी करत सोमालीलँडमध्ये इस्रायलकडून राजनयिक प्रतिनिधीच्या नियुक्तीची कठोर निंदा केली आहे. इस्रायलचा हा निर्णय सोमालियाचे सार्वभौमत्व, एकता आणि क्षेत्रीय अखंडत्वाचे थेट उल्लंघन असल्याचे या देशांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय [...]
वृत्तसंस्था, मुंबई भारतीय क्रिकेट निवड समिती प्रमुख अजित आगरकरला बीसीसीआयने आणखी एका वर्षासाठी या पदाकरीता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ निवड समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अजित आगरकरच्या कारकिर्दीत भारताने आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे बीसीसीआयने अजित आगरकरच्या निवड समिती प्रमुख पदासाठीच्या कालावधीत जून 2027 पर्यंत वाढ (एक [...]
महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलेले 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर होणे हे नव्या संसद भवनातील एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या परिणामकारक घडामोड ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी गेल्या अनेक वर्षांत प्रथमच अशी वेळ आली आहे, जेव्हा त्यांनी मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मंजूर होऊ शकले नाही. याचाच अर्थ हा सरकारला मोठा [...]
अध्याय पाचवा ह्या अध्यायाचे नाव संन्यासयोग असे आहे. भगवंतांनी अर्जुनाला चौथ्या अध्यायात कर्मयोगाची महती सांगितल्यानंतर आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले. त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, आत्मज्ञान मिळव असेही सांगताय आणि कर्म कर असेही म्हणताय तेव्हा दोन्हीतलं माझ्यासाठी चांगलं काय आहे ते कृपया सांगा. त्यावर भगवंत म्हणाले, कर्मयोग आणि कर्मसंन्यास हे दोन्हीही मोक्ष मिळवून देतात पण कर्मयोग [...]
जर्मनी दौऱ्यावर जाणार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर होणार चर्चा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 21-23 एप्रिलपर्यंत जर्मनीच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत-जर्मनी संरक्षण सहकार्याला नवा आयाम मिळण्याची अपेक्षा आहे. राजनाथ सिंह हे जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. बैठकीत संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविणे, दोन्ही देशांच्या सैन्यसंबंधांना मजबूत [...]
वृत्तसंस्था, कोलकाता सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुरु होण्यापूर्वी इडन गार्डन्सच्या परिसरात असलेली ऐतिहासिक घंटा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने वाजविली. यावेळी बंगाल क्रिकेट संघटनेच्या या कार्यक्रमाला सीएबीचे अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरभ गांगुली त्याचप्रमाणे क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. इडन [...]
भारतीय महिला हॉकी संघाचा शेवटचा सामना अनिर्णित
वृत्तसंस्था, ब्युनोस आयरीस भारतीय महिला हाँकी संघाने अर्जेंटिना बरोबरचा शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखत आपल्या अर्जेंटिना दौऱ्याचा समारोप केला. या दौऱ्यात भारत आणि अर्जेंटिना महिला हॉकी संघात 4 सामने खेळविण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व नवनीत कौरकडे सोपविण्यात आले होते. या दौऱ्यातील झालेल्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिना महिला संघाने भारताचा 4-2 अशा गोल [...]
अहान पांडेसोबत दिसणार शर्वरी वाघ
अली अब्बास जफरचा नवा चित्रपट फिल्ममेकर अली अब्बास जफरने स्वत:च्या नव्या अॅक्शन-रोमान्स चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. त्याच्या या चित्रपटात अहान पांडे मुख्य भूमिकेत आहे. अहानचा मागील चित्रपट ‘सैयारा“ यशस्वी ठरला होता. तर अली अब्बास जफरच्या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत सुमारे एक महिन्याभर चालणार आहे. अली अब्बास जफरने अहानसोबतचे छायाचित्र शेअर करत चित्रिकरण सुरू झाल्याची घोषणा [...]
महिला आरक्षणाचा खेळखंडोबा, ये तो होना ही था!
सगळ्या जगावर युद्धाचे सावट असताना आणि भारताला त्याच्या झळा बसत असताना देशातील राजकारण रंगू लागले आहे. राजधानी दिल्ली जवळील नोएडा या भागात तुटपुंज्या पगारात गुजराण होत नाही म्हणून कामगार रस्त्यावर उतरले, गाड्यांची जाळपोळ झाली पण दिल्लीतील सत्ताधारी 2029 मध्ये आपण सत्तेत कसे राहू याचे डावपेच आखण्यात मशगूल आहेत. महिला आरक्षण नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक [...]
‘डिजिटल इंडिया’वाल्या मोदींनी केले कॅश पेमेंट, सोशल मीडियात चर्चा
‘डिजिटल इंडिया’चा पुरस्कार करणाऱ्या आणि लोकांना डिजिटल होण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी तेथील एका दुकानदाराला चक्क रोख पैसे दिले. सोशल मीडियात याची जोरदार चर्चा रंगली आहे. नरेंद्र मोदी हे रविवारी बंगालच्या झारग्राम जिह्यात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. प्रचारातून वेळ काढून त्यांनी तेथे एका […]
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिर परिसरातील वातावरण दुमदुमले वृत्तसंस्था/ रायपूर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी चारधाम यात्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि ‘जय माँ गंगा’ व ‘जय माँ यमुना’च्या जयघोषात गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी स्वत: या दिव्य क्षणाचे साक्षीदार झाले होते. गंगोत्रीचे दरवाजे उघडण्याच्या वेळी मंदिर परिसरात [...]
‘गिन्न्नी वेड्स सनी 2’चा ट्रेलर सादर
अविनाश तिवारी अन् मेधा शंकर मुख्य भूमिकेत यंदाच्या वर्षातील आणखी एक मनोरंजक चित्रपट ‘गिन्नी वेड्स सनी 2’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. हा एक कौटुंबिक नाट्या दर्शविणारा चित्रपट असून तो रोमांस, उलथापालथ आणि हास्याने युक्त आहे. एक प्रेमकहाणीची झलक सादर करत ट्रेलर गुंतागुंत, रुसवेफुगवे आणि अनेक ट्विस्टने युक्त प्रवास आहे. यात अविनाश तिवारी आणि मेधा [...]
चौकशीच्या समन्ससोबत तक्रारीची प्रत द्या, हायकोर्टाचे पोलिसांना महत्त्वपूर्ण आदेश
एखाद्याला चौकशीचे समन्स देताना त्यासोबत तक्रारीची प्रतही द्या, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तक्रार झाल्यावर अथवा गुन्हा दाखल करण्याआधी एखाद्याला चौकशीला बोलवायचे असल्यास पोलिसांनी त्याला त्या तक्रारीची प्रत आधी द्यायला हवी, जेणेकरून तक्रार असलेल्या व्यक्तीला त्याच्याविरोधात नेमके काय आरोप आहेत हे कळू शकेल. या प्रक्रियेचा अवलंब प्रत्येक पोलीस ठाण्याने करायलाच हवा. त्यासाठी […]
खाऱ्या सरोवराखाली गोड्या पाण्याचा भांडार
अमेरिकेच्या यूटाच्या ग्रेट सॉल्ट लेकखाली शोध ग्रेट सॉल्ट लेकचे नाव त्याच्या अत्यंत खाऱ्या पाण्यामुळे पडले नाही. हे सरोवर अमेरिकेच्या यूटा प्रांतात आहे. जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपेकी हे एक आहे. परंतु एका नव्या वैज्ञानिक अध्ययनात हैराण करणारा शोध लागला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ युटाच्या संशोधकांनी या खाऱ्या पाण्याच्या सरोवराखाली अत्यंत गोड पाण्याचा भांडार दडलेला असल्याचा [...]
गोव्याची साध्वी सैल ठरली ‘मिस इंडिया वर्ल्ड’
केआयआयटी भुवनेश्वरमध्ये पार पडली स्पर्धा : महाराष्ट्राची राजनंदिनी उपविजेती वृत्तसंस्था/ भुवनेश्वर केआयआयटी भुवनेश्वरमये 61 व्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले, या सौंदर्यस्पर्धेत गोव्याची साध्वी सैल हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा मान पटकाविला आहे. मिस इंडिया 2024 ची विजेती निकिता पोरवालने साध्वीला मुकूट परिधान केला आहे. तर या स्पर्धेत पहिली [...]
श्रीनगर विमानतळावर दोन अमेरिकन ताब्यात
उपग्रहीय फोन मिळाल्याने कारवाई : चौकशी सुरू वृत्तसंस्था/ श्रीनगर श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित तपासणीदरम्यान अमेरिकेच्या दोन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या विदेशी नागरिकांकडून एक उपग्रहीय फोन हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांची चौकशी केली आहे. यातील एकाचे नाव जेफ्री स्कॉट प्राथर असून तो अमेरिकेच्या मोंटाना प्रांताचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. विमानतळावर तपासणीला सामोरे [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 20 एप्रिल 2026
मेष: गोंधळलेल्या अवस्थेत वडीलधाऱ्यांची मते घ्या. वृषभ : कामाचे कौतुक, मौल्यवान वस्तू जपा. मिथुन : अतिरिक्त कामाचा बोजा, आरोग्य जपा. कर्क : मेहनतीचे सकारात्मक फळ, सकारात्मक ऊर्जेत वाढ. सिंह : अहंकारामुळे कुटुंबात तणाव, बागेत फिरा. कन्या : ताजेतवाने वाटेल. परिश्रमाचे फळ मिळेल. तूळ : अनपेक्षित आर्थिक लाभ, नोकरीनिमित्त प्रवास. वृश्चिक : पगारवाढ, इच्छित स्थळी बदली, [...]
इराण हटायला तयार नाही, दुसऱ्या फेरीच्या चर्चेला नकार
अमेरिकेसोबत इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या दुसऱया फेरीच्या चर्चेला इराणने आज स्पष्ट नकार दिला. अमेरिकेच्या अवाजवी आणि अवास्तव अपेक्षा, सतत बदलणारी भूमिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्परविरोधी वक्तव्याचा हवाला देत इराणने हा निर्णय घेतला. ‘अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझच्या मुद्दय़ावरून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. आमच्या अधिकारांवर मर्यादा घालणारे ट्रम्प कोण,’ असा खडा सवालही इराणने केला. इराण व […]
ही पाहा गुजरातची खरी ‘सुरत’! यूपी-बिहारच्या मजुरांवर मोदींच्या गुजरातेत पोलिसांचा बेछूट लाठीचार्ज
एलपीजीची सर्वाधिक टंचाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गुजरातमध्ये असून लोकांचे खायचे वांधे झाले आहेत. त्यामुळे यूपी-बिहारच्या मजुरांनी गावाकडे पलायन सुरू केले आहे. सुरतमधील उधना स्टेशनवर रविवारी गाडी पकडण्यासाठी हजारो मजुरांची तोबा गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक मजूर जखमी झाले. विकास मॉडेलचा गाजावाजा करणाऱया गुजरातची ‘खरी सुरत’ यानिमित्ताने समोर […]
मोदींनी आचारसंहितेचा भंग केला! डाव्या पक्षांची तक्रार
‘विधानसभा निवडणुकीच्या काळात देशाला संबोधित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे,’ अशी तक्रार डाव्या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संदोश कुमार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एमए बेबी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहिले असून, मोदींवर कारवाईची मागणी केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक […]
विरार-अलिबाग महामार्गावर 765 रुपयांचा टोल
मुंबईतील अवजड वाहतूक शहराबाहेरून थेट जेएनपीटी बंदराकडे नेण्यासाठी विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱया रस्त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडणार नाही. पण या मार्गावर प्रवासासाठी पुढील 40 वर्षे हलक्या वाहनांसाठी 765 रुपयांच्या टोलचा बोजा वाहनचालकांवर पडणार आहे. या रस्त्याच्या प्रत्येक किलोमीटरच्या उभारणीला तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. […]
वरळीतील जलतरण तलावाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार, शिवसेनेच्या प्रस्तावाला महानगरपालिकेची मंजुरी
वरळी येथील जलतरण तलावाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ असे करण्यास मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये हा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. वरळी जलाशय येथे लाल बहादूर शास्त्राr उद्यानाच्या बाजूला हा जलतरण तलाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वरळीतील युवासेना उपविभाग अधिकारी […]
सामना अग्रलेख –कपट तंत्राचा पराभव!
महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांवर महिलांना आरोग्य सुविधा नाहीत. झोळीतून गरोदर महिलांना न्यावे लागते व त्या झोळीतच बाळंत होतात. ही देशातील महिलांची स्थिती. महिला राष्ट्रपतींना अयोध्येत राममंदिराच्या प्रतिष्ठापनेला व नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलावले जात नाही हा त्यांचा महिलांप्रती आदर. आरक्षणाच्या नावावर बोंबा मारण्यापेक्षा 2023 साली संसदेत मंजूर केलेल्या महिला आरक्षणाची अंमलबजावणी करा. 33 टक्के आरक्षण आताच […]
दिल्ली डायरी –तामीळनाडूत सत्तेच्या चाव्या विजय यांच्याकडे!
>> नीलेश कुलकर्णी , nileshkumarkulkarni@gmail.com तामीळनाडूमध्ये दोनपैकी एका द्रमुक पक्षाला बहुमताने आलटून पालटून सत्तेत बसविण्याची परंपरा आहे. यावेळी काय होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल, मात्र यंदा ही परंपरा खंडित होते का, अशी शंका लोकप्रिय दक्षिणी अभिनेते विजय यांच्या ‘क्रेझ’मुळे व्यक्त होत आहे. कोणताही द्रमुक जिंकला तरी सत्तेच्या चाव्या विजय यांच्याकडे असतील, अशी चिन्हे सध्या तरी […]
विज्ञान रंजन –जगती हवा-पाण्याविना…!
>> विनायक माणसांच्या श्वासोच्छ्वासाचं गणित किंवा ‘एकेका सासाचं तंतर’ (तंत्र) किती अजब, गहन आणि तितकंच गमतीचं कसं आहे ते आपण वाचलंय. आपल्या श्वसनासाठी ऑक्सिजन किंवा प्राणवायूचे महत्त्व किती आहे ते सर्वच जाणतात. प्राणायाम करतानासुद्धा सराव असल्याविना फार काळ श्वास रोखून धरता येत नाही. पोहतानाही पाण्याखाली जाताना श्वास रोखण्याची तयारी करावी लागते. प्राणवायूशिवाय माणूस किंवा त्यावरच […]
मुंबई ः महाराष्ट्रावर दुहेरी संकट कोसळणार आहे. आधीच पारा 40 अंशांच्या वर गेल्याने उन्हाच्या तडाख्याने राज्यातील अनेक जिह्यांना होरपळून काढले असताना आता अवकाळीचाही इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडय़ातील काही जिह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अजित पवार विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे
मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहून तपास बारामती पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
अक्षय्य तृतीयेला देवदर्शनासाठी गर्दी, मुंबादेवीला 1100 डझन आंब्यांची आरास
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त रविवारी श्री मुंबादेवीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती. देवीचा गाभारा 1100 डझन आंब्यांनी सजवण्यात आला होता. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला मुंबादेवी मंदिरात असा आंबा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या गाभाऱयाबरोबरच मंदिरामध्येही आंब्याची सजावट करण्यात आली होती.
तन्वी कोलते बनली बिग बॉस मराठीची विजेती
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी कोलते ने जिंकला आहे. तन्वीने दीपाली सय्यद, विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने यांना मागे टाकत बिग बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली. घरात पहिल्या दिवसापासून अक्टिव राहिलेली तन्वी ही बिग बॉस च्या यंदाच्या सीझन च्या विजेतेपदाची तगडी दावेदार मानली जात होती.
सोने-चांदीची झळाळी कायम; दर गगनाला भिडले असले तरीही अक्षय तृतीयेला मागणी वाढली
सोन्या-चांदीच्या किमतीनी गेल्या वर्षी मोठी झेप उच्चांक गाठला. आता त्या त्यांच्या उच्चांकावरून घसरल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही सोन्याचांदीची झळाळी कायम असून अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची मागणी मजबूत आहे. या दिवशी २०,००० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा आहे. सोन्याचा भाव अजूनही प्रति १० ग्रॅम १.५० लाखांपेक्षा जास्त आहे, तर चांदीचा भावही प्रति […]
Photo –आणखी एका मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात केले लग्न
प्रसिद्ध अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या पाठोपाठ मराठीतील आणखी एका अभिनेत्रीने या जगप्रसिद्ध मंदिरात लग्न केले. अभिनेत्री नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकर काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे जाहीर केले होते. रविवारी तिने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर करत तिने त्रियुगीनारायण मंदिरात लग्न […]
सांगली, मिरज येथे गारांचा पाऊस; द्राक्ष- आंब्यांच्या बागांना बसणार फटका
सांगली व मिरज शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. जवळपास अर्धा पाऊण तास झालेल्या या पावसाने संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रविवार सकाळपासून हवेत कमालीची उष्णता होती. सायंकाळनंतर हवेत अचानक बदल झाला आणि आकाशात ढगांनी गर्दी […]
…तर आम्ही सर्व पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू; ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका-इराणमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. या चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने प्रस्तावित करार नाकारला, तर अमेरिका त्यांच्या पुलांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करेल आणि ते उद्ध्वस्त करेल. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या […]
तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, 16 कामगारांचा मृत्यू
तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Tamil Nadu: A massive explosion occurred at a firecracker factory in Kattanarpatti near Virudhunagar. 16 people died and 6 injured: Fire and Rescue Department […]
Sangli Crime |कुपवाडमध्ये गुंडावर भरदिवसा दगडाने हल्ला; वाघमोडेनगर रस्त्यावर रक्ताचा सडा
कुपवाडमध्ये दगडाने हल्ला कुपवाड : कुपवाड शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर काहीजणांनी मिळून दगडाने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी वाघमोडेनगर रस्त्यावर घडली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा हल्ला जुन्या वादावरून झाल्याचे [...]
छत्तीसगड वेदांता पॉवर प्लांट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर
छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसात या दुर्घटनेत जखमी झालेल्या वीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 15 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास शक्ती जिल्ह्यातील सिंहितराई गावातील ‘वेदांता लिमिटेड’च्या पॉवर प्लांटमध्ये ब्लास्ट झाला. टर्बाइनकडे वाफ वाहून नेणाऱ्या बॉयलर ट्युबमध्ये हा भीषण स्फोट झाला. […]
उन्हाच्या झळा असह्य होणार; उत्तर हिंदुस्थानात हवामान खात्याचा उष्णतेच्या लाटेचा इशारा
एप्रिल महिन्यात आता देशभरात सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाळवत आहेत. अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर काही राज्यात मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. […]
उन्हाळ्यात स्वयंपाकघरातील दूध वारंवार खराब होत असेल तर, या सोप्या ट्रिक्स वापरून बघा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकघरात साठवलेले अन्न खराब होण्याचे प्रमाण वाढू लागते. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले दूध लवकर खराब होते. कधीकधी, फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते नासू लागते. उष्णतेमुळे जिवाणूंची वेगाने वाढ होते, त्यामुळे काही मिनिटांतच दूध खराब होते. काही सोप्या आणि पारंपरिक पद्धती आहेत, ज्या तीव्र उष्णतेतही दूध जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत करू शकतात. दूध उकळण्यापूर्वी, तुम्ही वापरत […]
सांगलीत मध्यरात्री गोळीबार सांगली : शहरातील राम मंदिरचौक परिसरातील पंचमुखी मारुती रस्ता शुक्रवारी मध्यरात्री अक्षरशः गोळीबाराने दणाणून गेला. साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल पोतदार याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात निलेश जाधव (२९) [...]
देशात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या काळात सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा यासाठी आयोगाने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून आतापर्यंत 11 हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स […]
Ratnagiri News –बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करा, अन्यथा उधळवून लावू; शिवसेनेचा इशारा
राजापूर तालुक्यात कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात होणाऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडाडून विरोध केला आहे. सोमवारी (दि.२० एप्रिल रोजी) होणारी बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. जर ही जनसुनावणी घेतली तर ती उधळवून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात १४४.९५ हेक्टर […]
तासगावात विवाहितेचा छळ तासगाव : मुळगांव ईश्वरपूर वसध्या रा. जुळेवाडी, ता. तासगांव येथील विवाहितेचा पैशाची मागणेचे कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक मानसिक छळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून घरातून बाहेर काढले आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून [...]
खरीप 2025 पीक विम्याचा पेच सुटणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर, आणि बीड जिल्ह्यातील खरीप 2025 च्या पीक विम्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि विमा कंपन्यांचे आक्षेप लवकरच मार्गी लागणार आहेत. या प्रक्रियेची सुनावणी झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा पेच सुटणार असून, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसोबत समाजमाध्यमावरून संवाद साधताना आमदार पाटील यांनी सांगितले की, विमा कंपन्यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवर आक्षेप घेतल्यामुळे पीक विम्याची प्रक्रिया रखडली होती. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे प्रकरण कृषी सचिवांच्या स्तरावर गेले. कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग हे निवडणूक कर्तव्यावर असतानाही, त्यांना आपण शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्तिशः केलेल्या विनंतीला मान देत त्यांनी मागील आठवड्यात या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी घेतली आहे. येत्या मंगळवार पर्यंत यावर अंतिम निकाल लागण्याची शक्यता असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. सन 2020 आणि 2021 सालच्या प्रलंबित पीक विम्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्र सरकारचे जेष्ठ विधीज्ञ ऍड बलबीर सिंग आणि आपले जेष्ठ विधिज्ञ ऍड सुधांशु चौधरी यांच्यासह याप्रकरणी काम करणारी लीगल टीम यांच्याशी चर्चा करून याबाबत रणनीती आखण्यात आली आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी गढूळ पाणी पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यत्क केली. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात उन्हाळी सुट्ट्यां पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने येत आहे. त्यातच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने भाविकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यापूर्वीही शहराला गढूळ पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर नगरपालिकेने उपयोजना केलाय आता पुनश्च गढूळ पाणीपुरवठा होऊ लागल्याने या पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन करून स्वच्छ पाणी कसे पुरवठा होईल, अशी उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. उन्हाळा सुट्टी असल्याने यापुढे भाविकांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. जर त्यांना असे गढूळ पाणी मिळाले तर देवी भक्तांना त्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या शहराला एक दिवसाआड दोन टप्प्यात पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाणीपुरवठा वितरणातील गोंधळ सुरू असल्याने उन्हाळ्या सुट्ट्या तरी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करणे गरजेचे बनले आहे. तुरटी सह पाणी स्वच्छ करणारी औषधे दर्जेदार वापरावेत अशी मागणी आता शहरवासीयातून होत आहेत. कारण यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यात धुतल्या होत्या. तरीही पुनश्च गढूळ पाणी येऊ लागल्याने याबाबत नगर परिषदेने कायम तातडीने योग्य ती उपयोजना करणे गरजेचे बनले आहे.
दिल्ली दरबारी लाचारीचा नवा अंक! अशोक चव्हाणांच्या तोंडी भाजपची भाषा; काँग्रेसने केला जबरदस्त पलटवार
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आयाराम गयाराम संस्कृती वाढत आहे. काहीजण स्वार्थासाठी किंवा ईडीपासून बचावासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत भाजपवासी झाले. आता त्यांच्या तोंडी भाजपचीच भाषा असून ते आधीच्या पक्षावर टीका करत आहे. अशा पक्ष बदलणाऱ्यांवर काँग्रसने जबरदस्त पलटवार केला आहे. काही वर्षांपुर्वी भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनी महिला आरक्षणावरून नांदेड येथे प्रतिक्रिया देताना […]
अंधश्रद्धा समाजाला त्रास देणारा रोग आहे- प्राचार्य डॉ संदीप देशमुख
धाराशिव (प्रतिनिधी)- अंधश्रद्धा समाजाला त्रास देणारा रोग आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य देशमुख म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जुनाट, बुरसटलेल्या परंपरा नष्ट करण्यासाठी काम केले. ते म्हणतात की समाजात सतत सकारात्मक बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाने कष्ट केले पाहिजेत. श्रीमंत लोकांनी धनाचा अहंकार न बाळगता गरीब लोकांना मदत केली पाहिजे. माणसात देव शोधा ही शिकवण त्यांनी दिली. समाजात शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करु नये. असे झाले तर सामाजिक स्वास्थ्य टिकणार नाही, संतानी दिलेले वचन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून देश व राष्ट्र हीत साधले जाईल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी डॉ बालाजी गुंड, प्रा माधव उगिले,प्रा विवेकानंद चव्हाण यांच्या सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नाईक नगर आश्रम शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
मुरुम( प्रतिनिधी)- नाईक नगर आश्रम शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भास्कर पवार सर यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर शिवकुमार मठपती सर यांनी विद्यार्थ्यांना बसवेश्वरांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी बसवेश्वरांनी दिलेला समानता, बंधुता, सत्य आणि समाजसुधारणेचा संदेश स्पष्ट करून सांगितला. त्यांच्या विचारांचा आजच्या काळातही किती मोठा महत्त्व आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले. या कार्यक्रमाला विठ्ठल ठाकरे सर, दत्ता राठोड सर, भूषण पाताळे सर तसेच मारुती येळणी मामा आणि निखिल राठोड यांचीही उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यात चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी बसवेश्वरांच्या आदर्शांचा अवलंब करून समाजात चांगले नागरिक बनण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
फास्टॅग Activate नाही? सोप्या पद्धतीने तपासा Status…
फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. त्यामुळे टोलवसुली सोपी आणि जलद झाली आहे. मात्र, अनेकदा टोलनाक्यावर गेल्यावर फास्टॅग काम करत नाही. त्यामुळे चालक आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापुर्वी फास्टॅग तपासणे गरजेचे आहे. काही सोप्या ट्रिक वापरून काही क्लिकने फस्टॅग स्टेटस तपासता येते. फास्टॅग कारयरत नसल्यास दुप्पट टोल आकारला जातो. आता […]
Solapur News |मजरेवाडी परिसरातून एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता; शहरात मोठी खळबळ
सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता सोलापूर -शहरातील मजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात राहणारी महिला, तिचे वडील आणि तिची दोन मुले असे चौघेजण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.शाहीस्ताबेगम अमीन सय्यद (वय २७, रा. भांडेगाव, ता. बार्शी), तिचे वडील सलीम अमीर सय्यद (वय [...]
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या पुलावर आज रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून थेट १५ फूट खाली विहिरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात ट्रक चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रक (एमएच ०६ बीडी २५५५) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून […]
वाराणसीमध्ये शिवाला घाटावर मोठी दुर्घटना टळली; आंध्र प्रदेशातील १५ भाविकांना वाचवण्यात यश
वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाला घाटावर स्नान करत असताना पंधरा भाविक अचानक खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ धाडस दाखवून सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न आणि बोटींचा वापर स्पष्टपणे दिसत आहे. NDTV INDIA ने दिलेल्या बातमीनुसार, आंध्रप्रदेशातील १५ भाविक हे गंगास्नानासाठी […]
Ajmer accident –प्रवाशांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 31 गंभीर जखमी
राजस्थानच्या अजमेर येथे भीषण अपघात झाला आहे. पुष्करकडे जाणारी बस खोल दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे. 33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुष्कर घाटामध्ये अनियंत्रित झाली आणि खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण हे देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या एका नेत्याचे होते. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले हे भाषण आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडणारे आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. भाजपने रचलेल्या राजकीय कट कारस्थानांचा समाचार घेताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला […]
सोलापुरात पोक्सो प्रकरणात न्यायालयाचा कडक निर्णय सोलापूर -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी २० वर्षे सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव [...]
‘बॉक्सवेल’कामामुळे इन्सुली परिसर बनला अपघातांचे केंद्र
कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी बांदा मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुरू असलेल्या ‘बॉक्सवेल’च्या कामामुळे हा परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महामार्ग विभाग अजून किती बळींची वाट पाहत [...]
पंढरपूर ड्रीम प्रोजेक्टबाबत प्रशासन ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत पंढरपूर -गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरातील स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याचाचत नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या सल्ल्यानुसारच कॉरिडॉर करू, अशी भूमिका घेतली आहे. [...]
तो अभिनेता म्हणून उत्तम, परंतु भूमिकेसाठी अयोग्य; ‘शक्तिमान’ने मारली रणवीर सिंगच्या नावावर फुली
नव्वदीच्या दशकात छोट्या पडद्यावरील शक्तिमान हा सुपरहिरो अनेकांच्या मनपसंतीस उतरला होता. एक काळ होता जिथे अनेकांचे बालपण शक्तिमानच्या कथा पाहण्यात गेले होते. याच सुपरहिरो शक्तिमानवर चित्रपट बनवण्यात येणार होता. गेल्या दोन वर्षांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. परंतु शक्तिमानच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड मात्र झाली नव्हती. आता मात्र यासंदर्भात एक रंजक माहिती समोर येत आहे. या […]
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झालेला सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या लढतीत हैदराबादचा नवखा गोलंदाज साकिब हुसैन याच्या गोलंदाजीवर शिवम दुबे बोल्ड झाला. दुबे बाद होण्यापूर्वी एका चाहत्याने मैदानावर लिंबू फिरवला होता असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी […]
‘नारीला फक्त नारा बनवण्याचा प्रयत्न’; महिला आरक्षण विधेयकावर अखिलेश यादवांचा भाजपवर हल्ला
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 वरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्षात समाजात फूट पाडण्याचा आणि महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लखनौ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना यादव म्हणाले की, “भाजप ‘नारी’ला फक्त ‘नारा’ बनवण्याचा प्रयत्न […]
सौर कृषीपंपाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणने सोमवार ( दि.20 एप्रिल ते 22 एप्रिल) पासून उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे. नवीन सौर कृषीपंपासाठी कसा अर्ज करायचा यासाठी तसेच सौर कृषीपंपाबाबत तक्रार असलेल्या लाभार्थ्यांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. धाराशिव शहर व ग्रामीण उप विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी तसेच कळंब उपविभागातील लाभार्थ्यांसाठी सोमवारी (दि.20 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. त्याचबरोबर तेर, वाशी, भूम व परंडा उप विभागातील लाभार्थ्यांसाठी मंगळवारी (दि.21 एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. तसेच तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या तूळजापूर, लोहारा, उमरगा व नळदुर्ग उपविभागातील लाभार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 22 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. दिनांक 20 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजीत तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद
तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
भूम शहरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
भूम (प्रतिनिधी)- भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला. समतानायक, क्रांतीसूर्य, विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसवेश्वरांच्या विचारांची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली. कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक महादेव मंनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांचे कार्य स्मरले. या प्रसंगी अशोक तोडकर, डॉ. शिवशंकर खोले, प्रभाकर शेटे, मधुकर शेटे, ओम स्वामी, महादेव मंनगिरे, सिद्धेश्वर मनगिरे, अमित होळकर, पत्रकार धनंजय शेटे, बाजीराव बळे, उमेश मनगिरे, पंकज उंबरे, दत्ता शेद्रे, ऋषिकेश गवळी, भैया चौरे, गणेश रेवडवर, संजय होळकर, विजयकुमार सोलापूरे, श्रीकांत नकाते, राजेंद्र गाढवे वाशीकर यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बसवेश्वरांच्या विचारांचा समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या शिकवणीचे आजही महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी बसवेश्वरांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प केला.
दिल्ली उच्च न्यायालयात आप नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी 10:30 वाजता पुन्हा हजर राहणार आहेत. ही सुनावणी सीबीआयच्या प्रतिज्ञापत्र आणि त्यावरील केजरीवाल यांच्या उत्तराशी संबंधित आहे. यापूर्वीच त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, त्यामध्ये न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्याशी संबंधित हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. केजरीवाल यांनी असा दावा केला आहे […]
156 कोटींच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट; ‘नगरोत्थान’ निधी खाजगी प्लॉटिंगकडे वळवला?
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीतील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 156 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे काम सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. शहरात वर्षभर कोट्यवधी भाविक येत असताना मंदिर परिसरातील रस्ते निकृष्ट व अतिक्रमणग्रस्त, दाट लोकवस्तीतील रस्ते दुरवस्थेत अशा स्थितीत खाजगी विकासकांच्या प्लॉटिंग भागात रस्ते कामे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “मंदिर परिसर जुने तुळजापूर भकास, बाहेरचे रस्ते झकास” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, नगरोत्थान निधीचा वापर लोकवस्तीऐवजी निर्जन भागात केला जात आहे. खाजगी प्लॉटिंगमध्ये रस्ते बांधणे हे नियमबाह्य आहे. विकासकांनी स्वतः करायची कामे शासकीय निधीतून केली जात आहेत. यामुळे शासकीय निधीचा गैरवात वापर होतो असा आरोप केला जात आहे. नियम काय सांगतो तर नगर विकास विभागाच्या नियमानुसार खाजगी प्लॉटिंगमधील रस्ते, पायाभूत सुविधा विकासकाने स्वतः करणे बंधनकारक शासकीय निधीचा वापर सार्वजनिक वस्ती आणि गरज असलेल्या भागात करणे अपेक्षित मात्र प्रत्यक्षात याच्या उलट कामे होत असल्याचा आरोप आहे. या विकासकामांमुळे खाजगी प्लॉटिंगला मोठा फायदा होत असुन 1 हजार रुपये दर हजारवर जावुन प्लॉटचे दर गगनाला भिडल्याची चर्चा आहे. यामुळे ही कामे भाविकांसाठी की विकासकांसाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी व्हावी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी. हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंभी येथील श्रीमती शिवगंगा कल्याणराव गटकळ वय 95 वर्ष यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे उपचारादरम्यान दि. 18 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या पुणे शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयातील सेवानिवृत्त अधीक्षक किसन गटकळ व बळीराम गटकळ यांच्या मातोश्री होत. त्यांचेवर त्यांचे मूळ गावी आंभी ता. भूम येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे.
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील शेतकरी अभिमान ढगे (वय 60) यांच्यावर गावातील तिघांनी मिळून भीषण खुनी हल्ला केल्याची घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शेतातून घरी परतत असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिमान ढगे हे शेतातून घरी येत असताना आरोपींनी त्यांना अडवून गज व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अभिमान ढगे यांना मुलगा नसल्याने त्यांनी तिंघा आरोपींना जमिन न विकल्याने ती जमिन भूम येथील एका व्यक्तिला विकल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हल्ल्यावेळी ढगे यांच्या पत्नी वृदावंनी ढगे यांनी प्रसंगावधान राखत पतीच्या अंगावर झेप घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात अभिमान ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. घटनेनंतर जखमी ढगे यांना प्रथम वालवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना दाखल करून घेण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु जबर मारहाणीमुळे बेशुद्ध असल्यामुळे त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
चिंचपूर (ढगे) येथे शेताजवळ इसमाचा मृतदेह आढळला; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर (ढगे) शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडबा सुभाष कसबे (वय 42, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजण्यापूर्वी वालवड रोडलगत सिताबाई गोविंद जाधव यांच्या शेतात घडली. संबंधित इसम शेताजवळ मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. याबाबत चत्रभूज पांडुरंग कसबे (वय 38, रा. चिंचपूर (ढगे), ता. भूम) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोस्टे भूम येथे आम्र ( Accidental Death Report ) क्रमांक 14/2026, कलम 194 BNSS 2023 अन्वये दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 11.17 वाजता करण्यात आली. सदर प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार पाटील यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल
धाराशिव (प्रतिनिधी)- नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि उबाठा गटाने महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे. संसदेत या ऐतिहासिक विधेयकाच्या विरोधात मतदान करून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील महिलांना राजकीय सशक्तीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा हा अपमान जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती कदम व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत 33 टक्के आरक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते. मात्र, काँग्रेस आणि उबाठा गटाने पुन्हा एकदा केवळ राजकारणाला प्राधान्य दिले. हे विधेयक केवळ कायदा नव्हता, तर खरी समानता प्रस्थापित करण्याचा एक क्रांतिकारी टप्पा होता. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर महिलांना मिळणारी नेतृत्वाची संधी हुकली असून, वर्षानुवर्षे चालत आलेली असमानता कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहात विधेयक मंजूर न झाल्याने विरोधकांनी जो जल्लोष केला, तो देशातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. शिवसेना पक्षाच्यावतीने निषेध धाराशिवमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भूमिकेतून अनेक योजना आणल्या आहेत. यावेळी तुळजापूर जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, जिल्हा समन्वयक संगीताताई काळे, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, रूपाली घाडगे, लता हरवलकर, विजया पवार, श्रावणी पवार, सुषमा शिंदे, सुवर्णा सलगर, ज्योती लोखंडे, पल्लवी माने सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक कायापालटासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवयुगीन उद्योजक घडवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या उपक्रमाला जिल्हभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धाराशिवच्या आर्थिक विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनाल प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांची नावनोंदणी केली आहे. या सर्व इच्छुकांकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात येणार असून यातून छाननी करून 108 निवडण्यात येणार असून 1 मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, या उद्देशाने ही अभिनव संकल्पना मांडत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. अजूनही नोंदणी सुरू आहे.या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात उद्योगांचे जाळे विणले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडक उमेदवारांना केवळ कागदोपत्री मार्गदर्शन न देता, प्रत्यक्षात उद्योग उभारणी पूर्ण होईपर्यंत सहकार्य केले जाणार आहे. यात प्रामुख्याने उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक प्रकल्प अहवाल () तयार करणे, बँकांकडून सुलभ कर्जपुरवठा आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अर्जांची छाननी करून उद्योगाची व्यवहार्यता तपासेल. पात्र उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेवर आधारित असेल. या मोहिमेत पारंपरिक उद्योगांऐवजी आधुनिक आणि मागणी असलेल्या व्यवसायांवर भर देण्यात आला आहे. हायड्रोपोनिक शेती,नारळ शेंड्याचे (कोयर) पावडर,प्लास्टिक कचऱ्यापासून ग्रॅन्युल्स निर्मिती,व्हॅनिला शेती,केशर शेती,शेवग्याची (मोरिंगा) पावडर,कांदा पावडर,सोलर ड्रायर (सौर वाळवणी),मोती निर्मिती,पेपर बॅग निर्मिती,सोया उत्पादने,पर्यावरणपूरक म्हणून प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास हरित इंधन, फुलांपासून अगरबत्ती. आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर आधारित म्हणून ई-वेस्ट, सोलर पॅनल स्क्रॅप आणि लिथियम बॅटरी रिसायकलिंग आदी उद्योगांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. महाराष्ट्रदिनी मेळाव्यातून होणार दिशा निश्चिती या मोहिमेचा पुढील टप्पा 1 मे रोजी पार पडणार आहे. धाराशिव येथे त्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पहिल्या टप्प्यात निवडक उमेदवारांना उद्योग उभारणीची पुढील दिशा आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या उपक्रमातून 108 सक्षम उद्योजक तयार होतील, ज्यातून हजारो कुटुंबांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव,स्पर्धा,सभा, बैठका तसेच धरणे- आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे. दि.12 ते 22 एप्रिल दरम्यान संत गोरोबा काका यात्रा (तेर) तसेच दि.14 ते 30 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दि.19 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पारंपारिक), महात्मा बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती असे विविध यात्रा व उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारणे तसेच बौद्ध समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याच्या कारणावरून दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयांसमोर धरणे,मोर्चे, आंदोलन,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये दि.16 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते दि.30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र,हा आदेश कामावर असलेल्या पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह समारंभ, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नसल्याचेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
धाराशिव (प्रतिनिधी)- जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत हर घर जल योजना,जल सेवा अभियान आणि जल जीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस.कटकधोंड,कनिष्ठ भूवैज्ञानिक एम.आर.डोंगरे आदी उपस्थित होते. बैठकीत जल जीवन मिशनअंतर्गत उद्भव विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,जलताराची कामे 25 एप्रिलपासून सुरू करून मान्सूनपूर्व सर्व जलतारे व शोषखड्डे तांत्रिक बाबींसह पूर्ण करणे, केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो अपलोड करणे,तसेच सर्व जल जीवन मिशन योजनेच्या उद्भवाशेजारी कामे करणे यावर भर देण्यात आला. तसेच,गावांतर्गत पाण्याची क्षमता जास्त असलेले हातपंप व विंधन विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता मोहीम राबविणे,जैविक व रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व करणे,गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे आणि रिचार्ज शाफ्ट केलेल्या कामांची स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. यावेळी उमरगा, धाराशिव,भूम, तुळजापूर,परंडा,वाशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व संबंधित कनिष्ठ अभियंते व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वाचन मंदिरेच सुजाण व सुसंस्कृत समाज घडवीत असतात
अभिनेते नंदकुमार पाटील यांचे प्रतिपादन ; श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन संपन्न सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर हे पावणे दोनशे वर्षे सातत्याने वाचकांची भूक भागविणारे आणि सुजाण नागरिक घडविणारे ज्ञान मंदिर आहे .ज्यांच्या नावानेच हे वाचन मंदिर संस्थान काळात सुरू झाले त्यांच्या वंशज या नगरीच्या नगराध्यक्ष झाल्याने वाचन मंदिरालाही उच्च दर्जा प्राप्त होईल [...]

28 C