विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री; ६० टक्के ‘फ्री सीट’चा नियम केंद्र सरकारकडून स्थगित
विमानाने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) विमान कंपन्यांना ६० टक्के जागा विनामूल्य (Free Seats) देण्याचा सक्तीचा नियम तात्पुरता स्थगित केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खासगी विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता प्रवाशांना आपल्या आवडीची जागा निवडण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे […]
जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz). या सागरी मार्गावरील सुरक्षेसाठी आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी इराण आणि ओमान या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोन्ही देशांनी देखरेख प्रोटोकॉलचा एक मसुदा तयार केला असून, यामुळे या भागातील सागरी हालचालींवर आता अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. […]
इराणसाठी करार करण्याची हीच वेळ, खूप उशीर होण्यापूर्वी निर्णय घ्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा देत, नवीन अणुकरारासाठी हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. “खूप उशीर होण्यापूर्वी इराणने निर्णय घ्यावा,” असे विधान करत ट्रम्प यांनी इराणवरील दबाव वाढवला आहे. इराणने आपली अण्वस्त्रे विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा सोडून दिली पाहिजे आणि अमेरिकेसोबत वाटाघाटीसाठी पुढे आले पाहिजे, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. डोनाल्ड […]
एपस्टीन फाईल्स वादादरम्यान ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल, ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांना पदावरून हटवलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक अत्यंत मोठा निर्णय घेत अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांची त्यांच्या पदावरून हटवलं. गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाईल्स हाताळणीवरून पाम बाँडी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अखेर ट्रम्प यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पाम बाँडी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत विश्वासू आणि दीर्घकाळापासूनच्या सहकारी […]
अमेरिका-इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, आखाती देशांतील सर्वात उंच ‘बी-१’पूल उद्ध्वस्त
मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई दलाने इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा आघात केला आहे. गुरुवारी झालेल्या एका हवाई हल्ल्यात आखाती देशांतील सर्वात उंच मानला जाणारा इराणचा बी-१ (B-1 Bridge) पूल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इराणची राजधानी तेहरानचा संपर्क तुटला असून संपूर्ण देशात वीज संकट गडद झाले […]
आश्चर्यच! कांगारू तब्बल 12 वर्षांनी ‘या’देशाविरुद्ध वनडे मालिका खेळणार
आगामी वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी एका महत्त्वाच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. यानुसार, ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबर 2026 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. विशेष म्हणजे, 2014 नंतर म्हणजेच तब्बल 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वेमध्ये वनडे मालिका खेळणार आहे. हे तिन्ही सामने हरारे […]
राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपये प्रमाणे जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी आहे. या मदतीतून शेतकरी सावरणार नसल्याने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक दाखविण्यासाठी एकदिलाने व्यापक लढा उभारण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला. एका बाजूला औषध फवारणी, […]
IPL 2026 –मला जाऊद्या ना! NOC चा वाद, RCB कडून खेळण्यासाठी पठ्ठ्याची थेट न्यायालयात धाव
IPL 2026 च्या 19 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. RCB ने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धुळ चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आता आरसीबीचा पुढील सामना 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. या दरम्यान, आरसीबीचा खेळाडू नुवान तुषारा आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची माहिती समोर आली आहे.यंदाच्या हंगामात गतविजेत्या […]
मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेता, इराणने आपल्या लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हातामी यांनी अमेरिकेसह इस्रायलला कडक शब्दांत इशारा दिला असून, कोणत्याही संभाव्य हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या सैन्याला पूर्णपणे तयार आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. इराणच्या लष्करी तळांना भेट देताना जनरल अमीर हातामी म्हणाले की, “इराणच्या सार्वभौमत्वाला धक्का […]
IPL 2026 –ऋषभ पंत खरोखरच सलामीवीर आहे का? इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने उपस्थित केला मोठा प्रश्न
IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार ऋषभ पंतने स्वतःला फलंदाजीच्या क्रमवारीत वर बढती दिली, मात्र या निर्णयावर इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने साशंकता व्यक्त केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंत केवळ 7 धावा काढून धावबाद झाला. “पंतने फलंदाजीच्या क्रमवारीत स्वतःला खूप पुढे ढकलले आहे का?” असा प्रश्न विचारत, या निर्णयामुळे […]
दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करा, अरविंद सावंतांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून वारंवार होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांबाबत कोकणवासीयांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत दादर-रत्नागिरी ट्रेन […]
IPL 2026 चा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘क्रिकबझ’ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पाटीदारला आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधाराबद्दल विचारण्यात आले असता, त्याने आपला सहकारी विराट कोहली याचे नाव न घेता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याची निवड केली. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली […]
होर्मुझ संकटावर ब्रिटनने बोलावली ३५ देशांची आपत्कालीन बैठक, हिंदुस्थानही होणार सहभागी
आखाती देशांमधील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बिघडलेली परिस्थिती पाहता, ब्रिटनने ३५ देशांची एक महत्त्वाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या आपत्कालीन बैठकीत हिंदुस्थानलाही आमंत्रित करण्यात आले असून, जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हिंदुस्थानची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने केलेले नियंत्रण आणि त्यातून निर्माण झालेला अडथळा यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. […]
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत यश
सावंतवाडी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील कु.यश सावंत , इयत्ता आठवीतील कु. करिष्मा मांजरेकर व कु. कनिष्का मकदम या विद्यार्थीनी प्रज्ञा परीक्षेस पात्र ठरल्या आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक [...]
Karad Breaking |चरेगाव येथे देवतांच्या मुर्तीची अज्ञाताकडून तोडफोड ; गावात तणावाचे वातावरण
कराड तालुक्यात मंदिरातील मूर्तींची तोडफोड; संतापाची लाट कराड – कराड तालुक्यातील चरेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चरेगावमधील श्रीराम मंदिरातील देवांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे. राम लक्ष्मण व सिता यांच्या मुर्तीची तोडफोड करण्यात [...]
हिमांता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, आसाममधील सभेत राहुल गांधींचा घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “हिमांता बिस्वा सरमा हे केवळ आसामचेच नव्हे, तर संपूर्ण देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत,” असा गंभीर आरोप करत राहुल गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. आसाममधील जमीन घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह […]
कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी आणि आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय..विजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाचा पालेभाज्या आणि फळभाज्या शेतीला मोठा फटका बसलायं..वडणगे इथल्या शिवाजी पवार या शेतकऱ्यांच सुमारे एक एकर क्षेत्रातील कलिंगड पीक चिखलात रुतून नुकसान झालंय.. एप्रिल [...]
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू
नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंचे आश्वासन ; वैद्यकीय अधीक्षकांनी वेधले रिक्तपदांविषयी लक्ष सावंतवाडी । प्रतिनिधी आधुनिक यंत्रणा आहे. परंतु फक्त भुलतज्ञ फिजिशियन नसल्यामुळे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना तातडीची सेवा देणे गैरसोयीचे होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करा, अशी मागणी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत आपण प्रस्ताव [...]
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून बनला रिक्षाचालक; जाणून घ्या कारण..
अॅपल (Apple) सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत काम करणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील गलेलठ्ठ पगार मिळवणे, हे आजच्या अनेक तरुणांचे स्वप्न असते. बेंगळुरूचे राकेश बी. पाल यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात जगले होते. मात्र, कॉर्पोरेट जगातील अंतर्गत राजकारण, कामाचा वाढता ताण आणि इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःचे अस्तित्व हरवत असल्याचे त्यांना जाणवू लागले. शेवटी, मनाच्या शांततेसाठी त्यांनी या […]
प्रियदर्शनी अर्बन बँकेची आर्थिक घोडदौड; एनपीए शून्यावर, आर्थिक स्थिती अधिक भक्कम
कळंब (प्रतिनिधी)- येथील प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि . ने 31 मार्च 2026 अखेर आर्थिक प्रगतीचा नवा टप्पा गाठत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आणि समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने आर्थिक स्थैर्यासोबतच विश्वासार्हतेतही उल्लेखनीय वाढ नोंदवली असून व्यवस्थापनाची दूरदृष्टी, काटेकोर नियोजन, पारदर्शक कारभार आणि सर्व घटकांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश साध्य झाल्याचे बँक प्रशासनाने सांगितले. यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे बँकेने थकबाकी कर्ज अर्थात एन.पी.ए. पूर्णपणे शून्य टक्क्यांवर राखण्यात यश मिळवले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एनपीए शून्यावर ठेवणे ही अत्यंत कठीण बाब मानली जाते; मात्र प्रभावी कर्जवाटप धोरण, वेळोवेळी राबवलेल्या वसुली मोहिमा आणि कर्जदारांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे बँकेने हे यश संपादन केले. बँकेच्या आर्थिक पत्रकानुसार ठेवी, कर्जवाटप, नफा आणि कार्यकारी भांडवल या सर्वच घटकांत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे बँकेची विश्वासार्हता अधिक बळकट झाली असून ग्राहकांचा प्रतिसादही वाढला आहे. बँकेने आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही प्रभावीपणे जपली आहे. शेतकरी, लघुउद्योग, गरजू घटक यांना आर्थिक सहाय्य देतानाच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत “आर्थिक हितासोबत सामाजिक हित जपणारी बँक” अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या यशामागे ठेवीदार, सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि कर्जदार यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याचे चेअरमन श्रीधर भवर यांनी नमूद केले. प्रत्येक घटकाने बँकेला स्वतःची संस्था मानून दिलेल्या विश्वासामुळेच बँक अधिक सक्षम बनली असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही बँक अधिक आधुनिक सेवा, नव्या संधी आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून प्रगतीचा वेग कायम ठेवणार असल्याचा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
थेट आमच्याशी व्यवहार करा, ‘होर्मुझ’मधून तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेची गरज नाही; इराणची ऑफर
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण नियंत्रण असून जगातील ज्या देशांना या मार्गावरून तेल आणि गॅसचा पुरवठा हवा आहे, त्यांनी अमेरिकेची मध्यस्थी न घेता थेट इराणशी करार करावा, अशी खुली ऑफर इराणने दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ संकटातून अमेरिकेला बाजूला काढण्याचे संकेत दिल्यानंतर इराणने जागतिक स्तरावर ही मोठी खेळी खेळली आहे. इराणच्या माहिती परिषदेचे […]
चैत्री पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा सोहळा बुधवार दिनांक एक रोजी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला असला तरी भाविकांनी गुरुवारी चैत्री पौर्णिमा समजून लाखोच्या संख्येने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ गर्दी केली होती. गुरुवारी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आकर्षक असा फुलांचा आरास करण्यात आला होता. चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक असे फुलांची आरास उद्योजक संजय कुमार मचे परिवार घोडेगाव, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी चैत्री पौर्णिमा निमित्त यांच्यावतीने आई तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा व मंदिर परिसर विविध प्रकारचे फुलांनी सजावट करण्यात आली होती. चैत्र पौर्णिमेचे मुख्य धार्मिक विधी बुधवारी दि.1 एप्रिल रोजी संपन्न झाले. बुधवारी रात्री सिंह वाहनावर छबिना काढण्यात आला. त्यानंतर प्रक्षाळ पूजा होऊन महंत वाकोजी बुवा यांनी आपल्या उपरण्यात जोगवा मागितला. या जोगवा विधीने चैत्री पौर्णिमेच्या धार्मिक विधीचा सांगता झाला. गुरुवारी पहाटे 1 वा. चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास आरंभ झाला. पहाटे एक वाजल्यापासून तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वा. देवीची भाविकांचे अभिषेक करण्यात आले ते 10 वाजता संपल्यानंतर देवीला वस्त्रालंकार घालुन, नित्योपचार पूजा केली गेली. सायंकाळी पुन्हा देवीजीस अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री 10 वा. मंदिर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. बुधवारच्या रात्री ते गुरुवारच्या पहाटे तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. या पावसात भाविकांचे मोठे हाल झाले. तसेच गुरुवारी रात्री देवी मंदिरात छबिना काढण्यात आला. त्यानंतर पक्षाळ पूजा करण्यात आली. शुक्रवार पेठ भागात भाविक मोठ्या संख्येने चैत्र पौर्णिमेनिमित्त येतात. मात्र याच भागात यात्रा नियोजनाबाबत कुठलाही नियोजन केल्याचे दिसून आले नाही. तसेच आज विजेचा लपंडाव ही सुरूच होता. आज लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन चैत्री पौर्णिमेची वारी अर्पण केली.
महामार्गावरुन चालत्यावाहनातुन सामानाची चोरी करणारी टोळी 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी धाराशिव शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे संतोष राजेंद्र शिंदे, रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा यांने त्याचे साथीदारासह रात्री इंदापुर ते वाशी जाणारे रोडवरुन चालते पिकअपमधून तेलाचे डब्बे काढले आहेत. ते डब्बे संतोष राजेंद्र शिंदे याचे घरी लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा येथे आहेत असे सागिंतले. पथकाने नमुद आरोपीचा शोध घेत असताना तो येरमाळा येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे नमुद घटनेबाबत चौकशी केली असता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वास घेवून चौकशी केली असता त्यांने सागिंतले की, रात्री मी व पापा शंकर पवार, रा.लक्ष्मी पारधी पिडी तेरखेडा, आकाश देवीदास शिंदे, रा. पारा असे तिघांनी मिळून इंदापुर गावाचे पुढे रोडवरुन जाणारे चालत्या पिकअपमध्ये चढुन त्यामधुन 04 तेलाचे डब्बे काढले आहेत व ते माझे घरी आहेत असे सागिंतले. पथकाने 04 तेलाचे डब्बे एकुण 8 हजार 960 किंमतीचे, मोटरसायकल एकुण 63 हजार 960 रेडीऑन कंपनीची जिचा चेसी नं 62562701176 माल जप्त करुन नमुद तीन आरोपी पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी यांच्या ताब्यात दिलेले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अमंलदार रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.
परंड्यात अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला
परंडा (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. बुधवार दि.1 एप्रिल 2026 पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास येथील कोर्टासमोर अश्वारूढ पुतळा शिवरायांच्या मावळ्यांनी उभारण्यात आला. नंतर त्याच दिवशी सर्वपक्षीय नेत्याने पुतळा बसवणाऱ्या शिव प्रेमीवरती गुन्हे दाखल करू नये, असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी काही नियम अटी घालून प्रतिसाद दिला. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने सकाळी शिवरायांवर पुष्प उधळून फटाके फोडून अतिषबाजी करून उत्साह साजरा केला. यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, उबाठाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य भाऊसाहेब खरसडे, माजी सभापती मेघराज पाटील, रिपाईचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, देवानंद टकले, उद्योजक रामभाऊ पवार.पैलवान नवनाथ जगताप, माऊली गोडगे,आदिसह शिवप्रेमी मोठ्या संख्येन उपास्थित होते. विनापरवाना शिवरायांचा विना परवाना पुतळा बसवल्या मुळे परवानगी मिळवण्या बाबत काल बुधवार दि.1 एप्रिल रोजी दिवसभर शिवप्रेमींच्या हालचाली सुरू होत्या. तसेच नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकऱ्यांना परवाना मिळवण्यासाठी तात्काळ नगर परिषदची बैठक बोलवावी असे निवदेन दिले. निवेदन देताच नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येक वार्डात शाहू, फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महामानवांचे पुतळे उभे करणार असून, आश्वसनाची पुर्तता करण्यात येईल. असे नगराध्यक्षांनी कर्त्यांना आश्वासन दिले.
Umerga Hanuman Jayanti |‘शरण शरण जी हनुमंता’च्या जयघोषाने उमरगा नगरी दुमदुमली;
उमरग्यात हनुमान जयंतीनिमित्त काळ्या मारुतीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी अंत्रोळी – अंत्रोळी (ता. द. सोलापूर) : अंत्रोळी येथील ग्रामदैवत स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात हनुमानाच्या जन्मकथेचे भावपूर्ण वर्णन [...]
तळवडेत ५ एप्रिलपासून दशावतारी नाट्य महोत्सव
न्हावेली /वार्ताहर स्व.प्रकाश परब फाऊंडेशन,देवस्थान व्यवस्थापन समिती समस्त गांवकर व तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री देवी सातेरी मंदिरा तळवडे भव्य पटंगणावर ५ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत संध्याकाळी ६ वाजल्यापासून मूळ पारंपारिक दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार ५ रोजी बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार लोककला नाट्य मंडळ,कवठी यांचा ‘ घटस्थापना ‘ नाट्यप्रयोग सोमवार ६ रोजी [...]
अंत्रोळीत सूर्योदयाला हनुमान जन्म सोहळा संपन्न अंत्रोळी – अंत्रोळी (ता. द. सोलापूर) : अंत्रोळी येथील ग्रामदैवत स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात हनुमानाच्या जन्मकथेचे भावपूर्ण [...]
ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थिनीने संपवले जीवन; काय आहे कारण?
विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतीगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सानिका खांडरे असे मृत तरुणीचे नाव असून ती हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथील रहिवासी होती. सानिका ही ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक एन्ड टेलीकम्युनिकेश शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत […]
सावंतवाडी वनविभाग कार्यालय परिसरातील वृक्षतोडीवर डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल सावंतवाडी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक (डीएफओ/डीसीएफ) कार्यालय परिसरात झालेली वृक्षतोड सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. असे पर्यावरण प्रेमी डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले [...]
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या अटकेच्या सत्रावर तीव्र आक्षेप नोंदवला असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. गेल्या तीन महिन्यांत पक्षाच्या १६० हून अधिक कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. […]
Satara District Hospital |वाई पोलिसांची मोठी कारवाई; केबल चोरी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या!
आसरे परिसरातून केबल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस स्टेशन हद्दीत केबल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यातील आसरे परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी प्रकरणात पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे २ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, तसेच जवळपास ९५० मीटर केबल [...]
साताऱ्यात महिनाभरात दोनदा मृतदेह बदलले सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांच्या अदलाबदलीच्या गंभीर प्रकारामुळे शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पहिली बातमी दैनिक तरुण भारत यांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्य [...]
एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- एमबीए / एमएमएस सीईटी २०२६ ही परीक्षा रविवार दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून,या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी,शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. हे आदेश दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत सादर करण्यात आलेल्या 1 महिन्याच्या अहवालानुसार, राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास आले.अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याची नोंद करण्यात आली असून,त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे स्थानिक स्तरावर आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, तसेच एसटी व आर.टी.ओ. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः,एसटीकडून कारवाईसाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले.काही ठिकाणी या वाहनांचा वैयक्तिक वापर केल्याच्या तक्रारीही समोर आल्या.याशिवाय, राज्यातील 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी केवळ 20 कार्यालयांना एसटीकडून आवश्यक वाहन व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे आढळून आले.दर 10 दिवसांनी कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. काही भागांत केवळ दिखाऊ कारवाई होत असल्याची नोंद करण्यात आली असून, आर. टी. ओ.अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की,अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे.एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा आणि त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही.तसेच, आर. टी. ओ. च्या सर्व 59 कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून,निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. याशिवाय,एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून आर.टी.ओ. विभागास देणे,संगनमत व गैरप्रकारांविरोधात स्वतंत्र चौकशी समिती नेमणे,तसेच जीपीएस व फोटो रिपोर्टिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई अधिक पारदर्शक करण्याचे निर्देशही देण्यात आले. ही बैठक राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.
महसूल वसुलीमध्ये धाराशिव तालुका जिल्ह्यामध्ये अव्वल
धाराशिव (प्रतिनिधी)- गौण खनिज व जमीन महसूल वसुलीमध्ये धाराशिव तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जमीन महसुलमध्ये तर तब्बल 143 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात तालुक्याला यश आले आहे. दोन्ही करांची वसुली जिल्ह्यात 74 कोटी 78 लाख रूपये झाली आहे. यामध्ये एकट्या धाराशिव तालुक्याचा वाटा 21 कोटी 33 लाख रूपयांचा आहे. आर्थिक वर्ष संपत येत असताना महसूल विभागाच्या वतीने गौण खनिज व जमीन महसूल वसूल करण्यावर अधिक भर देण्यात येत असतो. या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांच्या मार्फत जोमाने वसुली करण्यात आली. यामध्ये धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांनी विविध नियोजन करून वसुली मोहीम राबवली. यामुळे त्यांना यश आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात गौण खनेािची वसुली 53 कोटी 43 लाख 76 हजार झाली आहे. यामध्ये धाराशिव तालुक्याचा वाटा तब्बल 12 कोटी 69 लाख 52 हजार रूपये आहे. तसेच जिल्ह्यात जमीन महसूल 21 कोटी 34 लाख 38 हजार रूपये वसूल झाला आहे. यामध्ये धाराशिव तालुक्याचा वाटा 8 कोटी 43 लाख 85 हजार रूपये आहे. यामध्ये लोहारा, परंडा, भूम, वाशी तालुक्यातील वसुली नगण्य असून, उमरगा, कळंब व तुळजापूर तालुक्याची वसुली 50 ते 60 टक्क्यांच्या जवळपास आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता, धाराशिव तालुक्यानेच सर्वाधिक वसुली केली आहे.
नुकसानग्रस्त शेतीचा तातडीने पंचनामे करा- पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (प्रतिनिधी)- अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे.तीन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरायच्या आतच काल झालेल्या पावसाने तुळजापूर, लोहारा यासह अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, द्राक्ष आणि आंब्याच्या मोहोराचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.काही ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आहेत.यामुळे शेतकरी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे व प्रशासनासमोर मांडल्या आहेत. दरम्यान,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धास्ती आणखी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याशी सलग तीन दिवस संपर्क ठेवला आहे. आजही पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोकणात ज्या पद्धतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच धर्तीवर पारदर्शक आणि अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी पुजार यांना दिले आहेत.
मुरूम (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रमामध्ये संशोधन प्रकल्प, फिल्ड प्रोजेक्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप याचा समावेश केला आहे. पदवी आणि पदवीधर वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा योग्य वापर करता यावा. आणि त्या नुसार त्यांना उद्योग व्यवसाय किंवा करिअरची संधी मिळावी.तसेच संशोधनामध्ये गोडी निर्माण व्हावी चांगले संशोधक निर्माण व्हावी व्हावे म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्ष, वाणिज्य संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा आणि पुणे येथील इएनएसआयएन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने AI in Research Design, Creativity, Innovation and Entrepreneur: NEP 2020 activities Research Project, Field Project, OJT/Internship या विषयावर एक दिवस राष्ट्रीय कार्यशाळा शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आयडिया थोन या संकल्पनेवर आधारित क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन स्टार्टअप टू इंटर या अंतर्गत युवकांच्या , विद्यार्थ्यांच्या नवनवीन आयडिया चे पोस्टर/ डेमो/ मॉडेल /पोस्ट सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांच्या हस्ते आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अमोल शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे एखादी शेळीसाठी प्रमुख उपस्थिती मा आश्लेष भैय्या मोरे, उपाध्यक्ष मा जनार्दन साठे सरचिटणीस मा पद्माकरराव हराळकर, सचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे, सहसचिव यांची उपस्थिती आहे. कार्यशाळेसाठी पुणे येथील पुष्कराज कंपनीचे ग्रुप ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शैलेंद्र गोस्वामी यांचे संशोधन आणि संशोधन आराखडा यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर ब्रिज भाषण होणार आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरण आणि जागतिक युद्धाच्या संकटात उद्योजकाचे उद्योजकतेला संधी या विषयावर प्रोफेसर डॉक्टर सय्यद अझरुद्दीन प्रोफेसर कॉमर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांची दोन सेशन होणार आहेत तसेच डॉक्टर शैलेश वादेर डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड लिंकेजेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी तसेच प्रोफेसर शिवकुमार दिनी दिने सेंट्रल युनिव्हर्सिटी कर्नाटक यांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेत पोस्टर्स स्पर्धेसाठी युवक, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड तर संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च स्कॉलर इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेसाठी रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस प्राध्यापक, पदवी आणि पदव्युत्तर आजी आणि माजी विद्यार्थी तसेच संशोधन केंद्रातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले आणि संयोजन समितीने केले आहे.
कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा- माजी मंत्री बसवराज पाटील
मुरूम (प्रतिनिधी)- राजकारणात कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य कणा असतो आणि याच कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या व कष्टाच्या आधारावर आज भारतीय जनता पक्षाने राज्यात व देशात सत्ता मिळवली आहे. भाजप आज जगातील सर्वाधिक बलाढ्य पक्ष म्हणून नावारूपास आला आहे, त्याचे सर्व श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांना जाते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. बुधवारी (ता. 2) रोजी मुरूम येथील विठ्ठल मंदिरात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक व बूथ कमिटी चर्चासत्र उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी प्रत्येक गावातील वॉर्डनिहाय बूथ कमिटी प्रमुखांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे, अशा सूचनाही दिल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीला मंचावर मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते समितीचे सह अध्यक्ष शरण बसवराज पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, मदन पाटील, योगेश राठोड, भरत मारेकर, प्रा. शौकत पटेल, उमेश बारकुले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उमरगा पंचायत समितीचे सदस्य अमर वाले संजय मुळे लोहारा पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय वाघमारे,नागनाथ पाटील, व स्वप्नील कारभारी यांच्यासह कारखान्याचे संचालक शिवालिंग माळी लोहारा भाजप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रब्बानी नबेगावे, सतिश पवार आणि आलूरचे सरपंच राम जेऊरे, राजू मुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य उल्हास घुरघुरे तर आभार गटनेते गणेश अंबर यांनी मानले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाबाबत दिल्लीत खलबते
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं.प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला. याबाबत अधिक माहिती देताना योगेश केदार म्हणाले, यावेळी जिल्ह्यातील साध्यस्थीतील राजकीय परिस्थिती संपर्क प्रमुखांनी विचारून घेतली. मागील जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याने मी त्यांना सर्व ती वस्तुस्थिती समजाऊन सांगितली. तिकीट वाटपावेळी झालेले वाद विवाद ते निवडणूक निकालानंतर पक्षात फूट पाडण्यासाठी झालेले प्रयत्न या सर्वांच्या बाबत त्यांना अवगत केले. तानाजीराव सावंत यांचे जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढीसाठी मोठे महत्व आहे. त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. परत ते पक्ष वाढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या सक्रियतेमुळे शिवसैनिक आशावादी झाले आहेत. उमरगा लोहारा मतदारसंघात रवी सर तसेच ज्ञानराज चौगुले यांनी देखील त्यांचे गड मेहनतीने राखण्यासाठी प्रयत्न केले. कळंब धाराशिव मतदार संघात शिवसेना जनमानसात रुजलेली आहे. तिथे पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असले तरी ते सोडवता येण्यासारखे आहेत. ते झाल्यास हा मतदारसंघ ओके मधी शिवसेना राखेल. राहीला प्रश्न तुळजापूर शिवसेनेचा. तिथे मात्र विशेष लक्ष देऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षाची बांधणी आवश्यक आहे. या तालुक्यात सुद्धा मोठा स्कोप आहे. आम्ही या तालुक्यात प्रयत्न करत आहोत असे त्यांना सांगितले. बार्शी आणि औसा या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या दोन ठिकांची त्रोटक माहिती दिली. शिवसेना पक्षात एकी व्हावी यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मीडियातून देखील दिसले आहेत. सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद ओळखून तुम्ही प्रसंगी आक्रमक भूमिका देखील घेतली. आपण आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात फिरू न अधिकची माहिती घेऊ. तसेच तेथील सर्व शिवसैनिकांना राजकीय ताकद देऊ असे त्यांनी सांगितले. आधी सुरुवातीला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे धाराशिवला जाऊ असे त्यांनी सांगितले.
माडज येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमीपूजन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न
उमरगा (प्रतिनिधी)- माडज ता.उमरगा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी 2024 साली तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना व मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे 2515 या योजनेअंतर्गत 40 लक्ष रुपये निधी मंजूर झालेला होता. या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.02 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, रामकृष्ण बिराजदार, माडज पंचायत समिती सदस्य मन्मथ स्वामी, सरपंच सौ.सारिका संतोष पाटील, उपसरपंच बलभीम काळे, दिलीपसिंह गौतम, चेअरमन राजेंद्र माने, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, माजी चेअरमन रमेश माने, राम पाटील, अप्पाराव गायकवाड, राम माने, मधुकर माने, शरद माने, संतोष पाटील, काका गायकवाड, रवी पाटील, अज्ञान पाटील आदींसह माडज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती कोकणे यांनी माजी आमदार ठाकूर यांची घेतली भेट
परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषदचे समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांनी सभापती श्री. कोकणे यांचा फेटा बांधून व शाल व पुष्पहार देऊन सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, शिवाजीराव पाटील, सोशल मिडिया तालुका संयोजक तुषार नेटके, सनी अहिरे, नागेश मिसाळ तसेच खामसवाडी येथील भाजपा नेते अनिल शेळके, सादिक सय्यद,राजेश गरड आदी उपस्थित होते. कसलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पक्षाने उमेदवारी आणि सभापतीपदाची मोठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार व्यक्त केले. विश्वास कोकणे यांचा असलेला जनसंपर्क, कार्य आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे ते जिल्हा परिषदेत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आणि लोकाभिमुक पारदर्शी कारभार करून समाजकल्याण विभागाच्या असलेल्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास व्यक्त केला. कोकणे यांनीही ठाकूर यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जनता सहकारी बँक लि., धाराशिव बँकेच्या 4 नविन शाखांचा विस्तार
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील धाराशिव, लातुर, सोलापुर, बीड आणि अहिल्यानगर व कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली मराठवाडयातील एकमेव बहुराज्यीय नागरी सहकारी बैंक जनता सहकारी बैंक लिमिटेड, धाराशिव साल सन 1933 पासुन ग्राहकाच्या सेवेत कार्यरत असुन बँकेस 93 वर्षाची परंपरा आहे. बँकेच्या यापुर्वी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 30 शाखा कार्यरत होत्या, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार बँकेने दिनांक 27.03.2026 रोजी खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर व वलांडी, ता. देवणी, जि. लातुर शाखेचा व दिनांक 30.03.2026 रोजी शाखा कमलनगर, ता. कमलनगर, जि. बिदर (कर्नाटक) व लोहारा, ता. लोहारा, जि. धाराशिव या नविन 4 शाखेच्या विस्तारासह बँकेच्या दिनांक 31.03.2026 अखेर महाराष्ट्र राज्यामध्ये धाराशिव, लातुर, सोलापुर, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये 31 शाखा व कर्नाटक राज्यामध्ये बिदर या जिल्ह्यामध्ये 3 शाखा अशा एकुण 34 शाखेसह बँक व्यवसाय करत आहे. बँकेचा शाखा विस्तार संचालक मंडळाच्या विस्तारवादी धोरणानुसार बँकेच्या सध्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये शाखा विस्तार बऱ्याच वर्षानंतर झालेला असुन या पुढे 7 वर्षानंतर बँकेला 100 वर्षे पुर्ण होत असुन बँक शतक पुर्ती पर्यंत 100 शाखा विस्तार करण्याचा मनोदय मा. अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे यांनी व्यक्त केला. ही बाब बँकेच्या वैभवात भर टाकणारी आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे, उपाध्यक्ष वैजिनाथ ग्यानदेवराव शिंदे, सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय श्रीरंगराव घोडके व बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातुन बँकेचे सभासद, खातेदार व हितचींतकाकडून अभिनंदन केले जात आहे.
प्राईड मध्ये युकेजी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा
भूम (प्रतिनिधी)- येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. व्यंकटेश बागडे हा मुख्याध्यापक तर मीनाक्षी चौहान हिने उपमुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले. प्राईड इंग्लिश स्कूलच्या युकेजी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्यावतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. प्राचार्य, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थी ही आठवण आयुष्यभर जपतो. यावेळी अर्णव शिर्के हा पर्यवेक्षक बनला होता. तर इतर विद्याथ्यांनी शिक्षक म्हणून कार्य पार पाडले.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, मोनिका बोराडे यांच्यासह आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.
पाणीपुरवठ्यावर समाविष्ट गावांतील सोसायट्यांचे सर्व्हेक्षण करणार
समाविष्ट 32 गावांतील पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पुणे महापालिकेने जबाबदारी थेट विकसकांवर ढकलल्याचे चित्र समोर आले आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी समाविष्ट गावांतील सर्व सोसायट्यांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या सोसायट्यांना महापालिकेकडून पाणी द्यायचे आणि कोणत्या ठिकाणी विकसकाची जबाबदारी आहे, याची स्वतंत्र यादी तयार करून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. उन्हाचा […]
पहिल्याच दिवशी दोन ट्रक केबल जप्त, ओव्हरहेड विरोधात पालिकेची कारवाई
पुणे शहरातील अनधिकृत ऑप्टिकल फायबर केबल्सच्या जंजाळावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महापालिकेने अखेर धडक कारवाई सुरू केली असून गुरुवारी सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केबल्स हटविण्यात आल्या. या कारवाईत तब्बल दोन ट्रकभर केबल जप्त करण्यात आल्या. महापालिकेच्या विद्युत, अतिक्रमण व अग्निशमन विभागाच्या संयुक्त पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. आदिनाथ सोसायटी परिसरापासून सुरू झालेली कारवाई पुष्प मंगल […]
आखाती देशातील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. गेल्य़ा महिन्याभरापासून सुरू झालेले युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका जागतिक तेल पुरवठ्याला बसला आहे. इराणचे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वर असलेले वर्चस्व आणि या समुद्री मार्गावर होणारे ड्रोन-मिसाइल हल्ले यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आता सौदी अरेबिया आणि यूएई […]
लोकशाही जुलूमशाहीने चालवली तर देश आणि संसद ते सहन करणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाईल की एका निश्चित विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होईल, याबाबतची परिस्थिती आता स्पष्ट झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले की, दोन ते तीन आठवड्यांनंतर बैठक पुन्हा बोलावण्यात येईल. महिला आरक्षण विधेयकाचा संदर्भ देत ते म्हणाले, आम्ही एका विशिष्ट उद्देशासाठी पुन्हा बैठक बोलावू, ज्याबद्दल विरोधी पक्षांनाही […]
राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’चित्राचा नवा जागतिक विक्रम; 167 कोटी रुपयांना विक्री
हिंदुस्थानी चित्रकलेच्या इतिहासात बुधवारी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या अजरामर तैलचित्राने लिलावात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबईत पार पडलेल्या सॅफ्रनआर्टच्या ‘स्प्रिंग लाइव्ह’ लिलावात या चित्राची 167.20 कोटी रुपयांना विक्री झाली. हिंदुस्थानी कलेतील आतापर्यंतची सर्वात महागडी कलाकृती ठरली आहे. हिंदुस्थानी चित्रकलेचे जनक मानले […]
दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रासी व्हॅन डर ड्युसेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय ड्युसेनने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली असून, दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे त्याने म्हटले आहे. “प्रोटियाज जर्सी घालण्यासाठी लागणारा संयम आणि समर्पण अफाट असते आणि या प्रवासाने मला भरभरून दिले आहे,” अशा […]
रजोनिवृत्ती आणि वजन यांची सांगड कशी घालायला हवी, जाणून घ्या
आपल्या जीवनशैलीमुळे सध्याच्या घडीला दहापैकी आठ जणांना वजनवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आजकाल लठ्ठपणा आणि जास्त वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. परंतु रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आणखी गंभीर बनते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. रजोनिवृत्तीनंतर, महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. जेव्हा अंडाशय हार्मोन तयार करणे थांबवतात तेव्हा […]
IPL 2026 –पहिल्या षटकाचा नवा बादशहा, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्याने विक्रम प्रस्थापित
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने IPL 2026 मध्ये एक ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट घेण्याचा विक्रम आता शमीच्या नावावर झाला आहे. या विक्रमासह शमी लीगच्या इतिहासातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून समोर आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. शमीने आतापर्यंत […]
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हे आगीशी खेळत असल्याचे म्हणत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला खडे बोल सुनावले आहेत. मालदा घटना ही एका घाणेरड्या कटाचा परिणाम आहे. त्या म्हणाल्या की, संपूर्ण बंगालची प्रतिमा डागाळण्यासाठी एका वेगळ्या घटनेचा वापर केला जात आहे. ममता […]
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हे आगीशी खेळत असल्याचे म्हणत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला खडे बोल सुनावले आहेत. मालदा घटना ही एका घाणेरड्या कटाचा परिणाम आहे. त्या म्हणाल्या की, संपूर्ण बंगालची प्रतिमा डागाळण्यासाठी एका वेगळ्या घटनेचा वापर केला जात आहे. ममता […]
क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करत अंगणात पुरले; पश्चात्ताप होताच गाठले पोलीस ठाणे
छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एका विचित्र घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंबिकापूरच्या भगवानपूर परिसरात एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आणि त्याचा मृतदेह स्वतःच्या घरात पुरला. मात्र, या हत्येनंतर तब्बल सात दिवसांनी आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यामागील कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 आणि […]
Iran Israel War –तातडीने बगदाद सोडा, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना निर्देश
बगदादमध्ये येत्या काही तासांत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. बगदादमधील अमेरिकी दूतावासाने गुरुवारी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी केली असून,इराणशी संबंधित इराकी दहशतवादी गट मध्य बगदादला लक्ष्य करू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आपल्या नागरिकांना तातडीने इराक सोडण्याचे आदेश दिले आहेत. […]
फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणी
पणजी : येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीला विरोध करणाऱ्या तीन याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल बुधवारी दुसऱ्या दिवशीही अपूर्ण राहिली. दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज गुऊवारी एकेरी खंडपीठाचा दिवस असून खास द्विसदस्यीय खंडपीठ दुपारी 2.30 वाजता महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेचा उर्वरित कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी [...]
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालेले आहे. त्यांचे पार्थिव मूळ गावी बीड येथे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी त्यांच्यावर (३ एप्रिल) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या तुकाराम मुढे हे पश्चिम बंगालमध्ये असून, […]
सोहमला सहा दिवसांची पोलिस कोठडी; कार जप्त
पणजी : कुडचडे येथील वासनाकांडप्रकरणी दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या संदर्भात आरोपी सोहम सुशांत नाईक (वय 20) याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सोहम नाईकविऊद्ध आतापर्यंत पाच एफआयआर दाखल झाले असून त्याची गुह्यासाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. सोहम नाईक याच्यावर तीन वर्षांहून अधिक काळ अल्पवयीन मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार [...]
RBI ने घेतला मोठा निर्णय; रुपयाच्या घसरणीला ब्रेक
केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रुपयाबाबत काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागला असून त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चलनातील अस्थिरता कमी करण्यासाठी आरबीआयने अतिरिक्त उपाययोजना जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही वाढ झाली आहे. रुपयाने डॉलरच्या तुलनेत १२ वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठी वाढ 2 एप्रिल रोजी नोंदवली. तसेच बँकांनी त्यांच्या ऑफशोअर लाँग […]
उच्चशिक्षित बेरोजगार मुलांमुळे पालकांमध्ये नैराश्य वाढले; अहवालातून धक्कादायक खुलासा
हिंदुस्थानात आजही एकत्र कुटुंब पद्धती ही प्रामुख्याने पाहायला मिळते. आपल्याकडे प्रामुख्याने एकत्र कुटुंबात राहण्याचा कल पाहायला मिळते. परंतु अलीकडेच एका सर्वेक्षणातून धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अंतर्गत जर शिकूनही मुले बेरोजगार असतील तर, पालकांमध्ये नैराश्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. ही महत्त्वाची माहिती ‘लॉन्जिट्युडिनल एजिंग सर्व्हे ऑफ इंडिया’च्या आकडेवारीतून मिळाली आहे. हे […]
रियलमीचा सेल्फी मिरर फीचर असलेला हिंदुस्थानातील पहिला फोन लॉन्च, वाचा सविस्तर
स्मार्टफोन जगतात आपली पकड मजबूत करत रियलमीने आपला नवीन ‘रियलमी 16 5जी’ हा हँडसेट हिंदुस्थानी बाजारपेठेत लॉन्च केला आहे. अत्यंत आकर्षक फीचर्स आणि नाविन्यपूर्ण डिझाइन असलेल्या या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे यातील 7000 mAh ची अवाढव्य बॅटरी आणि मागील कॅमेऱ्याजवळ दिलेला खास ‘सेल्फी मिरर’. हा फोन एअर ब्लॅक आणि एअर व्हाईट अशा दोन आकर्षक रंगांमध्ये […]
IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानने धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात चेन्नईची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र, चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा कणा आणि माजी कर्णधार एमएस धोनी दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. महेंद्र सिंग धोनी स्नायूंच्या दुखापतीमुळे […]
आठ महिन्यांत फोंड्याच्या समस्या सोडवू !
फोंडा जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांचे आवाहन: भाजपा, काँग्रेसकडून जनतेचा भ्रमनिरास फोंडा : फोंड्यातील पोटनिवडणुकीतून आम आदमी पक्षाला केवळ आठ महिन्यांसाठी संधी द्या, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या सर्व समस्या सोडवू, असे आवाहन आपचे केंद्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी फोंडा येथील जाहीर सभेत केले. आपचे उमेदवार गितेश नाईक यांच्या प्रचारार्थ येथील जुन्या बसस्थानकावर काल बुधवारी सायंकाळी [...]
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांवर आपत्ती
चहा, नाश्ता, जेवणाची दरवाढ होण्याची चिन्हे पणजी : व्यावसायिक गॅस सिलिंडर रु. 218 अशा भरमसाठ किंमतीने वाढल्यामुळे त्याचा फटका गोव्यातील पर्यटनासह व इतर सर्व क्षेत्रांना बसत आहे. हॉटेल्स आणि बाकीची उद्योग-आस्थापने रेस्टॉरन्टमध्ये मोठी दरवाढ होण्याची चिन्हे असून त्याचे विपरित परिणाम ग्राहकांवरती देखील होणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुभारंभालाच हा दरवाढीचा [...]
”शक्तिपीठच्या ”नव्या आराखड्यात सावंतवाडीतील ४ गावांचा समावेश
तीव्र विरोधानंतर सरकारचा निर्णय ; १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांमधून जाणार महामार्ग ; दोडामार्गातील ५ गावे समाविष्ट सावंतवाडी । प्रतिनिधी राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात मोठे बदल करत सरकारने सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास केलेल्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या आराखड्यात सावंतवाडी [...]
पाईपलाईनच्या कामामुळे आजही पाणीपुरवठ्यात व्यत्यय
शहर-उपनगरात दोन दिवस पाणी नाही बेळगाव : पाईपलाईनच्या कामामुळे शहर व उपनगरात दोन दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. कर्नाटक शहर पायाभूत सुविधा विकास व आर्थिक संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बुधवार दि. 1 व गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी 24 तास पाणीपुरवठा सुरू असलेल्या विभागांसह संपूर्ण शहर व उपनगरांतील पाणीपुरवठ्यात व्यत्यय [...]
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून ती 23 एप्रिलला होणार आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाके) नेते, खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालये ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची गुलाम झाली आहेत, असे म्हणत त्यांनी लोकशाहीतील सर्वोच्च संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह […]
काँग्रेस रोडवर तुंबले गुडघाभर पाणी : नालेसफाईअभावी महापालिकेचे पितळ उघडे बेळगाव : विजांच्या कडकडाटासह बुधवारी बेळगाव शहरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. तासभर पडलेल्या पावसाने मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्ये पाणीच पाणी केले. विशेषत: टिळकवाडी परिसरात महानगरपालिकेकडून नालेसफाई झाली नसल्याने काँग्रेस रोडवर बऱ्याच वर्षांनी गुडघाभर पाणी साचले होते. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी [...]
जयपूरमध्ये हत्तीला गुलाबी रंगाने रंगवल्याचा वाद, ‘चंचल’ने जगाचा निरोप घेतला; नेमक कारण काय?
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका रशियन छायाचित्रकाराने फोटोशूटसाठी एका वृद्ध हत्तीला भडक गुलाबी रंगाने रंगवल्याचा प्रकार समोर आल्याने वाद निर्माण झाला होता. डिसेंबर 2025 मध्ये जूलिया बुरुलेवा या रशियन आर्टिस्टने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये ‘चंचल’ नावाच्या 65 वर्षीय हत्तीणीला एका बाजूने गुलाबी रंगाने माखलेले […]
इंग्रजीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न
राज्य सरकारने द्विभाषा सूत्र मागे घेण्याची मागणी : मराठी, ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे होणार नुकसान बेळगाव : राज्य सरकारकडून शाळांसाठी द्विभाषा सूत्र अवलंबिले जात असल्याने यामध्ये मराठी व ऊर्दू माध्यमाचे विद्यार्थी भरडले जाणार आहेत. इंग्रजीचे महत्त्व कमी करून कन्नड भाषेचे महत्त्व वाढविण्याचा हा एक प्रकार आहे. तृतीय भाषेसाठी केवळ ग्रेड देणे सुरू राहिल्यास विद्यार्थी इंग्रजी विषयाकडे [...]
शहरातील नाले सफाईच्या कामाला सुरुवात
नागरिकांतून समाधान : ठिकठिकाणी नाले तुंबून पावसाच्या पाण्यासह सांडपाणी शिरतेय घरामध्ये बेळगाव : महानगरपालिकेकडून अखेर पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील नाले सफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कारण अलिकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे नाले व गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहन्यासह काही ठिकाणी घरे व दुकानांमध्येही शिरले. खबरदारी म्हणून गोवावेस ते साई मंदिर टिळकवाडी येथील नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात [...]
देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात सध्या अत्यंत गंभीर विषय प्रलंबित असताना पंतप्रधान केवळ निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. सर्वपक्षीय बैठक स्वतःहून बोलवायची आणि तिथे स्वतःच […]
नव्या स्वरुपातील ‘तरुण भारत’चे मान्यवरांकडून स्वागत!
नव्या स्वरुपात सादर झालेल्या ‘दै.तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव : परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे वाचकांचे मत : वाचकांकडून उत्स्फूर्त स्वागत बेळगाव : 107 वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राने बुधवार दि. 1 एप्रिल 2026 पासून ‘तरुण भारत“चे रूप पालटले. नव्या स्वरुपात प्रसिद्ध झालेल्या ‘तरुण भारत’च्या या पहिल्या अंकाचे प्रकाशन बुधवारी पहाटे सर्व वितरकांच्या [...]
संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनीही संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी अनेक विषयांवर चर्चा केली. या भेटीबाबत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. […]
‘चला जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना’वर येळ्ळूर येथे 5 रोजी व्याख्यान
व्याख्याते वसंत हंकारे यांचे बदलत्या समाजव्यवस्थेवर प्रबोधन येळ्ळूर : आजच्या आधुनिक संस्कृतीत वावरताना आई-बाबा व मुलांच्या नात्यातील वाढत चाललेला दुरावा आणि बिघडत चाललेली समाजव्यवस्था सर्वत्र दिसून येत आहे. यावर समाजात प्रबोधन व्हावे आणि कुटुंबामधील एकोपा कायम टिकून राहावा यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूर यांच्यावतीने 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र [...]
हुबळी−पुणे वंदे भारतची रेकॉर्डब्रेक कमाई
अकरा महिन्यात 7 कोटींचा दिला महसूल : बेळगावमधून सर्वाधिक बुकिंग : दैनंदिन सुरू करण्याची प्रवासीवर्गाची मागणी बेळगाव : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरासोबत बेळगावकरांचे ऋणानुबंध आहेत. यामुळेच दररोज शेकडो प्रवासी बेळगाव-पुणे या मार्गावर प्रवास करत असतात. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. या एक्स्प्रेसला 87.09 टक्के बुकिंगसह रेल्वेला [...]
नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल
अशोकनगर बेळगाव वन कार्यालयाला मनपा महसूल उपायुक्तांची भेट : संबंधित प्रमुखाला लवकरच बोलावणार बेळगाव : अशोकनगर येथील बेळगाव वन कार्यालयाबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिकेचे महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी बुधवारी अचानक कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. कार्यालय प्रमुख उपलब्ध न झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध [...]
केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्याविरोधात निदर्शने
सीआयटीयूतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिले निवेदन बेळगाव : पूर्वीच्या कामगार कायद्यामध्ये नव्याने चार बदल करून केंद्र सरकार देशातील कामगारांचे खच्चीकरण करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लागू केलेला नवा कामगार कायदा रद्द करून जुना कामगार कायदा कायम ठेवावा, या मागणीसाठी सीआयटीयूतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. नवीन कामगार कायदा म्हणजे भांडवलदारांचे खिसे [...]
शिवबसवनगर येथे जोतिबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
बेळगाव : चैत्र पौर्णिमेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे जोतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. बेळगावहून लाखो भाविकांनी पौर्णिमेला डोंगरावर हजेरी लावून दर्शन घेतले. परंतु ज्या भाविकांना यात्रेला हजर होता आले नाही त्यांनी शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दर्शन घेतले. शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात बुधवार दि. 1 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरात गर्दी [...]
गणतीसाठी आवश्यकता भासल्यास अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांची मदत घेणार
बेळगाव जिह्यात पहिल्या टप्प्याची व्यापकपणे तयारी बेळगाव : पुढील वर्षी होणाऱ्या जनगणतीचा पहिला टप्पा देशात बुधवार दि. 1 एप्रिलपासून सुरू झाला आहे. बेळगाव जिह्यातही याची व्यापकपणे तयारी करण्यात आली आहे. ‘आमची गणती, आमचा विकास’ या घोषवाक्यावरून 2027 मध्ये जनगणती होणार असून जिह्यात जनगणतीसाठी ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. 180 ते 200 घरांसाठी एक ब्लॉक निश्चित [...]
दहा रुपयाचे नाणे टाका…अन् कापडी पिशवी मिळवा
मनपाच्यावतीने आज क्लॉथ बॅग वेंडींग मशीनचे लोकार्पण : जागतिक जलदिन-प्लास्टिकमुक्त दिनानिमित्त उपक्रम बेळगाव : जागतिक जल दिन आणि प्लास्टिकमुक्त दिनानिमित्त महानगरपालिकेकडून गुरुवार दि. 2 रोजी नरगुंदकर भावे चौकात क्लॉथ बॅग वेंडींग मशीनचे लोकार्पण केले जाणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हुबळी येथून 90 हजार [...]
प्रमोद पालेकर, के.आर शेट्टी संघ विजयी
एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा: प्रणय शेट्टी, भूषण सी यांची आक्रमक फलंदाजी बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 निमंत्रितांच्या थर्ड व फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून प्रमोद असलकर क्रिकेट अकादमीने बेळगाव लायन्स संघाचा 18 धावांनी तर के.आर शेट्टी संघाने गोल्डन स्टार संघाचा 77 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 [...]
आरपीडीचा विनीत हणमशेट मि.बेननस्मिथ किताबाचा मानकरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व बेननस्मिथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या बेननस्मिथ टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत आरपीडीच्या विनीत हणमशेटने मि. बेननस्मिथ हा मानाचा किताब पटकाविला. बेनस्मिथच्या सभागृहात आयोजित केलेल्या टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 50 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. निकाल पुढील प्रमाणे 1) विनीत हणमशेट-आरपीडी 2)श्रीशिव मोदगेकर-डीएमएस मंडळ, 3) भवन खर्डे-बेननस्मिथ, 4) हर्षद [...]
राष्ट्रीय बधीर जलतरण स्पर्धेत उमेश खाडेचे यश
बेळगाव : गुजरात अहमदाबाद येथे 27 व्या राष्ट्रीय बधीर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियर्स क्लबचा खेळाडू उमेश खाडेने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. गुजरात विद्यापीठाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या 27 व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या उमेश खाडेने भाग घेतला होता. या स्पर्धेत 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण [...]
Share Market News –ट्रम्प यांच्या संबोधनानंतर शेअर बाजार भूईसपाट; सेन्सेक्स, निफ्टी डेंजर झोनमध्ये
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध शमणार असल्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता ट्रम्प यांच्या सोंबधनानंतर जगाची चिंता वाढली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून त्यांनी 105 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच यामुळे जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानी शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या भाषणानंतर गुरुवारी […]
शत-प्रतिशत भाजपा! मिंधे आणि अजित पवार गटाचे 25-30 आमदार भाजपात जाणार, संजय राऊत यांचा दावा
अजित पवार आणि मिंधे यांचा एक गट भविष्यात भारतीय जनता पक्षात विलीन होतील, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणतील सद्यपरिस्थितीवर भाष्य केले. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार त्या गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजित पवारांचे सहकारी होते. […]
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका १३ वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ताजी […]
हनुमान जयंतीच्या दिवशी प्रेक्षकांना होणार रामाचे दर्शन, रामायणच्या टीझरचा सोशल मीडियावर शंखनाद
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण: भाग 1’ या पौराणिक चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो लीक झाल्यानंतर चाहते रणबीर कपूरच्या अधिकृत लूकची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवली असून, रणबीर कपूरचा ‘श्रीराम’ लूक आणि चित्रपटाचा भव्य टीझर अधिकृतपणे प्रदर्शित […]
‘धुरंधर’हा एक अद्भुत अनुभव आहे, असे प्रियांका चोप्रा का म्हणाली
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी “धुरंधर: द रिव्हेंज” या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. तिने आदित्य धर याचेही यावेळी कौतुक केले आहे. आदित्य धर बद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, एका ध्येयाने प्रेरित झालेला माणूस असून धुरंधर हा सर्वार्थाने एक अद्भुत अनुभव आहे. प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि “दिल धडकने दो”, “गुंडे” व “बाजीराव मस्तानी” […]
‘रामायण’च्या टीझरमध्ये यशचा बोलबाला…तीन सेकंदाच्या दृश्यात रावणाने भाव खाल्ला
बहुचर्चित रामायण या चित्रपटाचा टीझर अखेर सर्वांसमोर आला आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भक्तिपूर्ण आणि भावनिक रामायणाच्या पहिल्या झलकने लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. २ मिनिटे ३८ सेकंदांच्या या टीझरमध्ये रणबीर कपूरच्या अलौकिक रामाची झलक पाहायला मिळते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामायणाची इतकी भव्य झलक पाहून लोक आनंदित झाले आहेत. टीझरमध्ये रणबीर […]

27 C