न्यूझीलंड महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी
द. आफ्रिकेचा 6 गड्यांनी पराभव : जेस केर सामनावीर वृत्तसंस्था/ वेलिंग्टन 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली. या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या जेस केरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तिने आपल्या [...]
हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी, महेंद्र गायकवाडवर मात
पुण्यात पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने आपला दबदबा कायम राखत मानाची गदा पटकावली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-१ अशा गुणांनी पराभव केला. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला असून, कुस्ती क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुण्यातील या प्रतिष्ठेच्या […]
आयपीएलच्या गेल्या पाच हंगामात मुंबई इंडियन्सला एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मुंबईच्या नेतृत्वात बदलाचे संकेत दिले आहेत. श्रीकांत यांच्या मते, आता मुंबई इंडियन्सच्या कप्तानीची धुरा हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्याची वेळ आली आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना त्यांनी ही परिस्थिती ‘विचित्र’ असल्याचे सांगत, मुंबईच्या […]
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी कोषाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांचे निधन
नेसरी / वार्ताहर माजी विधानसभा अध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे कनिष्ठ बंधू व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी कोषाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी सायंकाळी निधन झाले. बाळासाहेब कुपेकर यांनी आज अखेर दौलत साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, राजा शिवछत्रपती महाविद्यालयाचे अध्यक्ष, सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष, कानडेवाडीतील विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून [...]
पॅन कार्डच्या नियमांत 1 एप्रिलपासून मोठे बदल; आता फक्त आधार कार्डने काम भागणार नाही
जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड अर्जाच्या नियमांत मोठे बदल होणार असून ही प्रक्रिया आता अधिक कडक आणि पारदर्शक केली जाणार आहे. ‘Income Tax Rules 2026’ अंतर्गत हे बदल लागू केले जात आहेत. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या आधारे […]
राज्यासह देशभरात सध्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण गाजत आहे. त्याचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा तोच महाराष्ट्र आहे काय? आता त्यांचे आक्रोश मोर्चे कुठे गेले? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू […]
IPL 2026 –काही गोष्टी कधीच संपत नाहीत; दिल्ली कॅपिटल्समध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक, म्हणाला…
पृथ्वी शॉ आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात म्हणजेच ‘दिल्ली कॅपिटल्स’मध्ये परतला आहे. आगामी आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत असून, पृथ्वी शॉ अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला आहे. मागील लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर, यंदा दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीवर विश्वास दाखवत त्याला ७५ लाख रुपयांच्या बोलीवर संघात स्थान दिले […]
सोन्याच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतीमा असणार; अमेरिकेत नव्या वादाला सुरुवात
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त जारी करण्यात येणाऱ्या विशेष सोन्याच्या नाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. प्रस्तावित नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो छापण्याच्या निर्णयामुळे कायदेशीर आणि राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प समर्थक याला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणत आहेत, तर विरोधक याला लोकशाही मूल्यांचे उल्लंघन म्हणत आहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त, विद्यमान राष्ट्राध्यक्ष […]
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीच्या प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. कंपनीचा घातक रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी (CETP) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा एक टँकर राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन […]
Ratnagiri News –कोमसापचा ३५ वा वर्धापनदिन २४ मार्च रोजी मालगुंडमध्ये
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापनदिन दि.२४ मार्च रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात साजरा होणार आहे. २४ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता वर्धापन दिनाच्या उद्घाटन सोहळा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी कोमसापच्या जेष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजवरचा प्रवास यासंदर्भात चर्चासत्र व […]
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आणि आखाती देशांमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऊर्जा, पेट्रोलियम, वीज आणि खत क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. देशात ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ७ लोक कल्याण मार्ग येथील शासकीय निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. […]
IPL 2026 मध्ये अनलोल्ड राहिलेल्या खेळाडूची तोडफोड फलंदाजी, अवघ्या पाच धावांनी द्विशतक हुकलं
IPL च्या १९व्या हंगामाची धामधूम सुरू असतानाच, एका युवा खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघात असलेल्या २० वर्षीय स्वास्तिक चिकाराला यावेळच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मात्र, स्वास्तिकने अयोध्या प्रीमियर लीग २०२६ मध्ये ‘गोमती थंडर’ कडून खेळताना हिंडन टायटन्स विरुद्ध एक अविश्वसनीय खेळी साकारली […]
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सपासून ते राजस्थान रॉयल्सपर्यंत अनेक दिग्गज संघांचे खेळाडू जायबंदी झाल्याने फ्रँचायझींसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सॅम करन, आकाश दीप आणि हर्षित राणा यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने संघांचे गणित बिघडले असून, आता त्यांच्या जागी पर्यायी खेळाडू शोधण्यासाठी व्यवस्थापनाची […]
Kokan News –आंबा, काजू बागायतदारांना नोटीस बजावत पोलीस त्यांचा आवाज दडपत आहेत; वैभव नाईक यांची टीका
आंबा काजू बागायतीच्या हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकारने नुकसान भरपाई जाहिर न केल्यामुळे 23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर या आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये माजी आमदार वैभव नाईक […]
आता श्रीलंकेच्या कर्णधारानेही PSL सोडलं; IPL 2026 मध्ये ‘या’संघाकडून फटकेबाजी करणार!
पाकिस्तान सुपर लीगला (PSL) मोठा धक्का बसला असून श्रीलंकेचा टी-२० कर्णधार दसून शनाकाने पीएसएल सोडून IPL मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शनाका पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा भाग होता, मात्र आता तो राजस्थान रॉयल्स संघात सामील होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सने दुखापतग्रस्त सॅम करनच्या जागी शनाकाशी संपर्क साधला असून, श्रीलंकेच्या या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलसाठी होकार दर्शवला […]
जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने माजी सैनिकाचा सन्मान
कलंबिस्त येथे जागवल्या त्यावेळच्या युद्धाच्या आठवणी सावंतवाडी प्रतिनिधी भारत- पाकिस्तान , भारत- चीन – इस्राईल युद्धात शत्रूशी दोन हात करून आपले ९० वर्षांचे आयुष्य उत्तमरित्या जगणारे सैनिकी मराठा इन्फंट्री बटालियनचे माजी सैनिक विठ्ठल बाबाजी सावंत यांचा सत्कार करताना एका देश सेवकाच्या सानिध्यात आपल्याला राहता आले हे भाग्य आहे. यांच्यामुळेच आम्ही आज सुखी समाधानी आहोत. या [...]
Satara Politics |लोकशाहीचा खून झालाय!”सातारा जिल्हा परिषद निवडीवर अंकुश बाबा कदमांचा संताप
दबावतंत्राचा वापर करून सत्ता मिळवल्याचा शिवसेनेचा आरोप सातारा – सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनांवर शिवसेना संपर्कप्रमुख नेते अंकुश बाबा कदम यांनी तीव्र टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. परवा झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या घटनांचा [...]
मुख्याधिकारी यांच्या आदेशानंतर काढले अनधिकृत होर्डिंग रस्त्याच्या पोलवर बॅनर न लावण्याचा ठराव
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या हद्दीत नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य भागात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर, होर्डिंगज विरोधात मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. शहरातील अनधिकृत बॅनरचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर ही कारवाई सुरु करण्यात आली. नगराध्यक्षा नेहा काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे या सत्ताधारीसह अन्य सहयोगी पक्षाचे नेते, कार्यकर्ते व विविध खासगी व्यक्तीनी लावलेले काही बॅनर काढण्यात आले. उर्वरीत बॅनर यथावकाश काढण्यात येणार असल्याचे कळते. धाराशिव नगर परिषदेच्या हद्दीतील अनाधिकृत बॅनर लावल्यास कारवाई करण्यात यावी असे आकाश मधुकर तावडे यांनी सर्वसाधारण सभेत सुचविले. शहरामध्ये 21 ठिकाणी अधिकृत बॅनरची जागा निश्चित केलेली आहे. अनाधिकृत ठिकाणी बॅनर लावण्यास हायकोर्टाची बंदी आहे असे नगरसेवक सचिन पवार यांनी सांगितले. महापुरूषांचे पुतळे आहेत त्यांच्या पासुन 100 फुट जागा सोडून बॅनर लावण्यात यावे असे अभिजीत काकडे यांनी सुचविले. नगर परिषदेच्या शहरातील जागेमधील दर्शनिय स्थळ शोधून काढून त्या ठिकाणी बॅनर लावण्याची जागा निश्चीत करण्यात यावी, जेणे करून नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल असे नगरसेवक अमित शिंदे यांनी सभागृहास सुचविले. बॅनरचा कालावधी निश्चीत करण्यात यावा असे प्रदिप मुंडे यांनी सांगितले. जो मनमानी करेल, नियमानुसार बॅनर लावणार नाही व बॅनर छपाई करणारे यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे अभिजीत काकडे यांनी सांगितले. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या करीता रस्त्याच्या मध्यवर्ती भागातील लाईटच्या पोलवरती बॅनर लावण्यात येऊ नये असे सर्वानुमते ठरले मात्र खुद्द नगराध्यक्षा यांनीच पोलवर मध्यभागी बॅनर लावुन ठरावाचे उल्लंघन व नियमभंग केला. नगर परिषदेने घेतलेल्या ठरावानुसार शहरातील सर्व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यावर फौजदारी व इतर कारवाई होणार का ? हे पाहावे लागेल. नगर परिषदेने वारंवार ठराव घेतले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव टाकला जातो. स्वच्छ व सुंदर धाराशिवसाठी नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. नगर परिषदेचा कारभार पाहण्याऱ्या व त्यावर नियंत्रण असलेल्या नेतृत्वाने नवनवीन घोषणा बरोबरच अंमलबजावणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आरळी बुद्रुकचे माजी सरपंच तानाजी पारवे यांचे निधन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी बुद्रुकचे माजी सरपंच तथा शेकापचे नेते तानाजी पंढरीनाथ पारवे 82 यांचे वृद्ध काळाने शनिवार दिनांक शनिवार दि 21 मार्च रोजी रात्री 07 वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आरळी बुद्रुक येथे अत्यसंस्कार करण्यात आले.
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध तीव्र झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतच आहेत आणि भारतीय रुपया घसरत आहे. या परिस्थितीत, परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून बाहेर पडत आहेत. त्यांनी मार्च महिन्यात आतापर्यंत ८८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसत आहे. आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जगभरातील अनेक […]
IPL 2026 –सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी आमचा संघ…, रोहित शर्माचा चाहत्यांना मोठा शब्द
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स २०२६ च्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळून मुंबई आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी संघाने ‘द मिक्स’ नावाचा एक खास बॉन्डिंग प्रोग्राम आयोजित केला होता. या कार्यक्रमात माजी कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंसोबत धम्माल मस्ती तर केलीच, पण चाहत्यांना […]
…तर राजस्थान रॉयल्सला कोणीही रोखू शकणार नाही, अश्विनचा विरोधी संघांना धडकी भरवणारा इशारा
इंडियन प्रीमियर लीगचा धुमधडाका 28 मार्चपासून सुरू होत आहे. वर्ल्डकपनंतर जगभरातील क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या या महाकुंभाकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडण्यासाठी आणि विकेटचा रतिब घालण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये सर्वांचे लक्ष 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्याकडे असणार आहे. गेल्या हंगामात त्याने आपल्या बॅटचा तडाखा विरोधी संघांना दिला होता आणि […]
प्राचार्य अभिमन्यू टकले यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांचा सत्कार बहुजनाचे नेते धनंजय शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार राजाभाऊ वैद्य, सुधीर पवार, हुंकार बनसोडे, रहीम शेख, गायकवाड, नंदकुमार शेटे, उज्वल माने आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. टकले यांनी प्रत्येक समाजाचे साहित्य संमेलन सुरू झाले आहे. त्यामुळे आदिवासी धनगर समाजाचेही साहित्य संमेलन असावे, या दृष्टीकोनातून प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होळकर वाड्यात होणारे साहित्य संमेलन हे सहावे असून, दोन दिवसाचे आहे. यांची माहिती डॉ. टकले यांनी दिली.
विद्यार्थी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे विद्यार्थी स्वयंशासन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. शाळेतील त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संपूर्ण कामकाज एक दिवसासाठी हाती घेतले. ‘स्कूल डे’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शिक्षकांची भूमिका पार पाडत शाळेचे व्यवस्थापन कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या दिवशी कुमारी राजनंदिनी सुनील माळी हिने मुख्याध्यापक म्हणून तर आदित्य बाबासाहेब पौळ याने उपमुख्याध्यापक म्हणून जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सर्व विद्यार्थ्यांनी तासिका निहाय वेळापत्रक तयार करून प्रत्येक वर्गात नियोजनबद्ध अध्यापन केले. त्यामुळे संपूर्ण दिवस शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडला. या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री पेठे, श्री दीक्षित व श्रीमती नवले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व वैयक्तिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौं संजीवनी पौळ उपाध्यक्ष सौं अफसाना शेख उपस्थित होते हा स्वयंशासन दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या नेतृत्वगुणांना व जबाबदारीची जाणीव वाढविणारा अनुभव ठरला. शेवटी सातवीच्या सर्व विद्यार्त्यांनी आपले अनुभव कथन करून त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.
श्री भैरवनाथ-जोगेश्वरी मंदिराचा कळसारोहण भक्तीमय वातावरणात संपन्न;
काटी (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा ऐतिहासिक आणि मंगलमय कळसारोहण सोहळा 19 आणि 20 मार्च 2026 या दोन दिवस चाललेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक, माहेरवाशिणी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अत्यंत शाही थाटात संपन्न. या सोहळ्या दरम्यान संपूर्ण काटी गावातील वातावरण धार्मिक बनले होते. सोहळ्याची सुरुवात गुरुवार, 19 मार्च रोजी चिरंजीव सार्थक बावीकर आणि टीम यांचा सायंकाळी 7 वाजताभक्तीरंग हा सुरेल गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चिरंजीव सार्थक बावीकर व त्यांच्या टिमने सादर केलेल्या सुमधुर भजनांच्या स्वरांनी भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. शुक्रवारी दि.20 मार्च रोजी पहाटे 6 वाजल्यापासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यामध्ये देवांना रुद्राभिषेक आणि वेदमंत्रोच्चारात कळस पूजन करण्यात आले. भव्य कलश व दिंडी मिरवणूक: सकाळी 9 ते 11 या वेळेत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण भजन गायन व टाळ मृदंगाच्या गजरात माहेरवाशिणी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सकाळी 11 वाजता ह.भ.प. सुनिल महाराज ढगे यांचे कीर्तन सोहळा संपन्न झाला. हभप सुनिल ढगे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील कलशारोहण महत्त्व सांगताना सांगितले की, कुठल्याही मंदीराला कळस असल्याशिवाय मंदीर परिपूर्ण होत नाही. आजचा सर्वांच्या उपस्थितीत होणारा हा कलशारोहणाचा सोहळा हा ऐतिहासिक क्षण असून या भैरवनाथ जोगेश्वरी मंदीराच्या जिर्णोद्धाराचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून प्रशांत कुलकर्णी काटीकर यांच्या मुख्य संकल्पनेतून येथील रहिवासी असलेले परंतु नौकरी निमित्त पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी विविध ठिकाणी स्थलांतरित झालेले कुलकर्णी परिवारातील सदस्यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सामुहिक रित्या एकत्रितपणे येऊन स्वइच्छने सामुहिक वर्गणी गोळा करून काटी नगरीत भव्य अशा भैरवनाथ मंदीराची उभारणी केली. हे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या बहारदार शैलीत किर्तनातून सांगितले. त्यांनी आपल्या किर्तनातून कलशारोहण रोहनाचे चार प्रकार सांगितले. दुपारी 12 वाजता प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचेश्री स्वप्निलजी चामणीकर यांचे विशेष प्रबोधनपर संशोधनातून हिंदू धर्माविषयी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारी 12:30 वाजता प्रमुख अतिथी प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचे स्वप्निलजी चामणीकर यांच्या हस्ते हस्ते मुख्य महाआरती होऊन कळसारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. माहेरवाशिणीं व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आगळावेगळा सन्मान काटी गावच्या लेकी-सुनांसाठी हा सोहळा जिव्हाळ्याचा विषय ठरला होता. मंदिर समितीने लग्नानंतर सासरी गेलेल्या माहेरवाशिणींना खास निमंत्रित केले. या सर्व महिलांना श्री भैरवनाथ जोगेश्वरीची प्रतिमा आणि साडी-चोळीचा आहेर देऊन सन्मानित करण्यात आले. तर याच कार्यक्रमात भैरवनाथ जोगेश्वरी मंदीर ट्रस्टच्या वतीने प्रमुख अतिथी प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचे स्वप्निलजी चामणीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे प्रचारक श्री मंगेशजी बडवे, नवनिर्वाचित तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, नवनिर्वाचित काटी जिल्हा परिषद गटातील सदस्या सौ. आशाताई ब्रम्हदेव (बाळासाहेब) भाले, सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, हभप सुनिल ढगे महाराज,माजी जिल्हा संघचालक, धाराशिव ॲड. रविंद्र कदम,सुहास पुरुषोत्तम कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्काराने सन्मानित करण्यात आले.
एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेचे बापुराव पाटील यांच्या शुभहस्ते उदघाट्न
मुरुम (प्रतिनिधी)- मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात दि. 20 मार्च रोजी लसीकरण मोहिमेचे मुरूम नगरीचे नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धनवंत्री पूजन व द्विप्रज्वलनाने उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण,पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे,नगरसेवक गणेश अंबर,नगरसेवक अजित चौधरी,वैधकीय अधीक्षक डॉ. महेश अर्धाले,डॉ. शिवराज कारडामे, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश जिरोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी माहिती देताना डॉ. अर्धाले म्हणाले लस सण 2010 पासुनच वापरात असून त्या लसीपासून कोणतेही धोका नसून त्याबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरविण्यात येत आहेत. गर्भशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगाला थांबविण्यासाठी या लसीचे मदत होते. ही मानवी पॅपिलोमाव्हायरस संसर्गापासुन संरक्षण करणारी एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी लस आहे, जी प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी ही लस सर्वोत्तम मानली जाते. ही लस लैंगिक क्रिया सुरु होण्यापूर्वी घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी हा एक अत्यंत महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे माहिती लसी संदर्भात मनामध्ये कसलीही शंका न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष बापुराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील डायलसिस सेंटर, रुग्णालयाची पाहणी केली.मुरूम शहरातील डॉक्टर असोसिएशन, पत्रकार बांधव, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव तर आभार विजय भोसले यांनी मानले.
Iran US Israel War –इराणचा अमेरिकेवर पलटवार; एफ-15 लढाऊ विमान हार्मुझजवळ पाडलं, पाहा व्हिडीओ
इराण, इस्रायल आणि अमेरिकेत गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता धोकादायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हार्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर आखातातील तणाव आणखी वाढला आहे. ट्रम्प यांच्या या अल्टिमेटमनंतर इराणने अमेरिकन लष्कराचे एफ-15 हे लढाऊ विमान हार्मुझजवळ पाडले. इराणच्या माध्यमांनी हा दावा केला असून याचा व्हिडीओही […]
मुरुम रोटरीकडून बाजार रस्त्यावर खास शुद्ध व थंडगार पाण्याची सोय
मुरुम (प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून सध्या मोठ्या प्रमाणात हवेतील तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य रस्त्यावर खास रविवारी (ता. 22) रोजी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय करण्यात आली. या परिसरातील विविध गावातून बाजाराकरिता येणाऱ्या वाड्या-वस्तीवरील बाळ-गोपाळ, अबालवृद्ध व नागरिकांना तात्काळ पाणी मिळावे या हेतूने या सामाजिक उपक्रमाचा तथा पाणपोईचा शुभारंभ महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे संचालक अमृत वरनाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, उपप्राचार्य कल्लय्या स्वामी, रोटरीचे सचिव कल्लाप्पा पाटील, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संतोष कांबळे, खुणे गुरुजी आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना रोटरी सदस्यांकडून पाणी वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाची सोय मार्च-मे या तीन महिन्याच्या आठवडी बाजारादिवशी करण्यात येणार असल्याचे रोटरीचे सदस्य प्रकाश रोडगे यांनी यावेळी सांगितले. रोटरीकडून पाणपोई या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.
यात्रा मैदान चौकशी अहवाल बाहेर कधी येणार
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात आरक्षित जागा आहे. पार्श्वभूमीवर येथील बहुचर्चित यात्रा मैदान घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, “वाचवतंय कोण?” हा सवाल आता जनतेतून जोर धरू लागला आहे. चौकशी समितीने तपास पूर्ण केल्याची माहिती समोर येत असली तरी अहवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने तक्रारीतील काही मुद्द्यांना ‘क्लीन चिट’ दिली असली तरी बनावट रेखाकन नकाशे, बोगस कागदपत्रे व दस्त नोंदणी या गंभीर मुद्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या टेबलवर जाणार असून, त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर नगरपरिषदेने सर्वे नं. 138 मधील 2 हेक्टर 63 आर जमीन यात्रा मैदानासाठी संपादीत केली होती. मात्र हीच जमीन हडप करून विक्री केल्याची गंभीर तक्रार संभाजी नेपते व किरण यादव यांनी केली होती. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या अध्यक्षतेखालील प्राथमिक समितीने काही मुद्यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीनेच आता बनावट नकाशे, अकृषी परवाने, बांधकाम मंजुरी आणि खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठे गैरप्रकार झाल्याचे निष्कर्ष काढल्याची चर्चा आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि आमदार सुरेश धस यांनी लक्ष घातल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली होती. मात्र अजूनही फाईल हालचाल संथच असल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनीही कारवाईसाठी आवाज उठवत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
व्हीआयपी पास वाटपावर प्रश्नचिन्ह; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या व्हीआयपी पास वाटपाच्या कथित गैरप्रकारांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने शासन व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, मंदिरात व्हीआयपी पास देताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही व्हीआयपी नसलेल्या विशिष्ट व्यक्तींनाच प्राधान्य देत व्हीआयपी पास वाटप केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हीआयपी पास वाटपात बाह्य व्यक्तींचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंदिर संस्थानने शासनाने ठरवलेल्या नियमांनुसारच व्हीआयपी पास वाटप करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हीआयपी पाससंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मंदिरातील काही अधिकाऱ्यांकडून व्हीआयपी पास वाटपात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, आतापर्यंत झालेल्या व्हीआयपी पास वाटपाची सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जर 15 दिवसांच्या आत या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर संबंधित संघटनेच्या वतीने मंदिर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आता या प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच मंदिर संस्थान प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन भाविकांना न्याय मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्यावतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिवच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये येत्या 26 तारखेला प्रभू श्रीरामांची जयंती जिल्ह्यामध्ये सर्वत्र भव्य शोभायात्रा आयोजित करून साजरी केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन या पत्राद्वारे करण्यात येत आहे. प्रभू श्रीराम नवमी निमित्त धाराशिव शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक व धार्मिक संस्था, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय तसेच डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था व विविध अध्यात्मिक संघटना यांनाही या पत्राद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सदर शोभायात्रा सकाळी 10 वाजता त्या त्या शहरातील प्रमुख चौकातून निघून त्या भागातील प्रभू श्रीराम मंदिरात किंवा तेथील प्रमुख मंदिरामध्ये विसर्जित होईल. या शोभायात्रेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथेला भाविक भक्तीरसात चिंब
धाराशिव (प्रतिनिधी)- सकल संत सेवा धाराशिव आयोजित बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय चालू असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्र कथेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून ,वैराग्य महामेरू संत गोरोबाकाका यांचे चरित्र लेखक कथाकार हभप दीपक महाराज खरात (श्रीक्षेत्र तेर) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथेत रंगदेवता अवतरलेली आहे. प्रथमत: ग्रंथ पूजन, दीपप्रज्वलन ,व ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच कथेचे मुख्य प्रेरणास्थान कै. हभप श्यामराव दहिटणकर (काका) यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रस्तावनेत स्व. दहिटणकर यांच्या आठवणींना अभिजीत कदम यांनी उजाळा देत कथेसंदर्भात माहिती दिली. काकांची ऑडिओ क्लिप साऊंड सिस्टिमद्वारे उपस्थिताना ऐकवण्यात आली. याप्रसंगी सर्वांचे डोळे पाणावलेले होते. नंतर काकांच्या आठवणींना खरात महाराजांनी अश्रू नयनांनी उल्लेख केला. महाराज म्हणाले की, दहिटणकर काका असल्या वेळेचेसचे चित्र व त्यांच्या नसल्या वेळेसचे चित्र खूपच वेगळे असून, याप्रसंगी त्यांची उणीव निश्चितच जाणवते. त्यांच्या पश्चात हा कार्यक्रम जिव्हाळ्याने होत आहे. त्यांच्या स्मृती सांगणं हाही एक कथेचा भाग आहे .काकांनी अकरा वर्षापूर्वी धाराशिव येथील कृष्ण मंदिरात प्रवचनासाठी मला बोलावले होते. धाराशिव मधल्या वातावरणात संत चरित्राची पेरणी झाली पाहिजे ही त्यांची तळमळ होती. धाराशिव शहराच्या इतिहासात सकल संत सेवा समिती मार्फत संत गोरोबाकाका, संत तुकाराम महाराज, व यावर्षी चालू असलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची चरित्र कथा मेहनतीने, भक्तीने ,आणि नियोजनपूर्वक यशस्वी करत आहेत. श्रोत्यांना ज्ञानगंगेत स्नान करविताना महाराज पुढे उपदेश करतात की, जीवन ग्रंथ हा सर्वांच्या जन्मासोबत मिळालेला असून, पहिल्या पानावर जन्म दिनांक आहे. तर शेवटच्या पानावर मृत्यू दिनांक आहे. तर मधली पाने कोरी असून, त्यावर आपल्या कार्याचा उल्लेख करावयाचा आहे. असे सांगत गोदावरीच्या काठावरून ज्ञानोबाची कथा सुरू होते. आपेगाव हे अत्यंत पुरातन भूमी आहे. भगवान शिवजीची व ऋषीमुनींची ती साधना भूमी आहे. हरिहर पंत कुलकर्णी यांना तीन अपत्ये होते. रामचंद्रपंथ ,केशव पंथ, मोहनाबाई. त्रिंबकपंत हे ज्ञानेश्वर माऊलीचे पंजोबा होते. त्रिंबकपंत यांचे चिरंजीव गोविंद पंत हे होते .त्यांना अपत्ये नव्हते. याची त्यांना उणीव होती. परंतु तेजपुंज असे नाथपंथीय साधू त्यांच्या दारी आले. ते गहिनीनाथ होते. त्यांनी आशीर्वाद दिला की, योग्य वेळी योग्य फळ मिळणार आहे.! गर्भसंस्काराला परंपरेने महत्त्व दिलेले आहे. म्हणून गर्भवती मातेने संत चरित्र वाचावे पण आज सिरीयल आणि चित्रपट पाहिले जातात ही शोकांतिका आहे. संतांचे विचार व राष्ट्रपुरुषांचे आचार आपल्या जीवनात उतरणे गरजेचे आहे. आषाढ शुद्ध एकादशीला गोविंद पंतांच्या पोटी अपत्य झाले म्हणून त्यांचे नामकरण करताना विठ्ठल या नावाने नाम संस्कार केले. अशा प्रकारे संगीत टीमची मंजुळ साथ घेत महाराजांनी उपस्थित भाविकांना भक्तीरसात चिंब केले. तदनंतर अन्नदाते यांच्या हस्ते आरती करून, त्यांचा सन्मान करण्यात आला व पसायदानाने कथेची सांगता करण्यात आली. कथा श्रवणासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी सर्वांनी सात्विक महाप्रसादाचा शिस्तबद्ध लाभ घेतला.
आवडती भाजी केली नाही म्हणून गर्भवती पत्नीला संपवलं, आरोपी पतीला अटक
आवडती भाजी करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सुनील असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला पालकची भाजी बनवायला सांगितले. मात्र आधीच जेवण तयार असल्याने पत्नीने पालकची भाजी बनवण्यास नकार […]
तक्रार नोंदवायची असेल तर शैय्यासोबत करावी लागेल, पोलिसाची बलात्कार पीडितेकडे धक्कादायक मागणी
उत्तर प्रदेशमधील अलिगढ एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. त्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी तिच्याकडे तेथील पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. ”तक्रार नोंदवायची असेल तर शैय्यासोबत करावी लागेल’, असे त्या पोलिसाने तरुणीला सांगितले. या प्रकरणी तरुणीने वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या पोलिसाला निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल […]
मुदत संपली तरी वराड रस्त्याचे काम अपूर्णच
बिलाची रक्कम मात्र ठेकेदाराला अदा ; प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर काम कट्टा / वार्ताहर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सावरवाड तिठा ते वराड या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. मात्र दोन वर्षे उलटली तरीही रस्त्याचे निम्मे कामही पूर्ण झालेले नाही. याउलट जेवढे काही काम झाले आहे ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यात झालेल्या त्या [...]
बांगलादेशात कुमिल्ला येथे रेल्वे-बसचा भीषण अपघात; 12 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी
बांगलादेशातील व्यस्त अशा ढाका-चट्टोग्राम महामार्गावरील पाडुआ बाजार क्रॉसिंगवर एक भीषण अपघात घडला आहे. ढाक्याच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान रेल्वेने रेल्वे रुळावर आलेल्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाडुआ बाजार येथील रेल्वे क्रॉसिंगवर बस अचानक रुळावर आली असता हा अपघात […]
उन्हाचा तडाखा, विठूरायाचा विसावा! भाविकांसाठी थंड पाणी, लिंबू सरबत आणि कुलरची व्यवस्था
पंढरपूर मंदिर समितीचा मोठा निर्णय: चैत्री यात्रेदरम्यान ‘व्हीआयपी’ दर्शनावर निर्बंध पंढरपूर -चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीनिमित्त दरवर्षी भरत असलेली चैत्री यात्रा यावर्षी रविवार, २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून यात्रेचा कालावधी २३ मार्च ते २ एप्रिल असा राहणार आहे. यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी व्यापक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून [...]
“रामलल्लाचं दर्शन मस्त झालं, पण…”, जर्मनीहून आलेल्या चिमुकल्या भक्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी हिंदुस्थानसह जगभरातील भक्त अयोध्या नगरीमध्ये दाखल होत आहेत. नुकताच जर्मनीचा एक चिमुकला भक्त अंजनेय हा देखील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये आला होता. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्याने आपला अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येत दाखल होत असतानाच अंजनेयने जर्मनीहून खास रामलल्लाच्या दर्शनासाठी हजेरी […]
Kuduwadi |कुर्डूवाडी हादरले! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
नराधमासह साथीदाराला कुर्डूवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या कुर्डूवाडी – फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राच्या मदतीने मुलगी अल्पवयीन असताना लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर वारंवार दुष्कर्म केले. आरोपी व त्याला मदत करणाऱ्या दोघांना कुडुवाडी पोलिसांनी अटक करून बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर उभे केले असता न्यायाधीश [...]
कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला माथेफिरु, रेल्वे वाहतूक विस्कळीत
कल्याण रेल्वे स्थानकावर आज एका माथेफिरुने ओव्हरहेड इक्विपमेंट खांबावर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 1A आणि 2 ला वीजपुरवठा करणाऱ्या खांबावर हा माथेफिरु चढल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ठाकुर्ली आणि आंबिवली दरम्यानची ‘डाऊन लोकल’ लाईन तात्काळ बंद करण्यात आली. […]
‘ऑपरेशन सर्चलाईट’ला नरसंहार घोषित करण्याची मागणी, अमेरिकन संसदेत मांडला प्रस्ताव
अमेरिकेन खासदार ग्रेगरी जॉन लँड्समॅन यांनी एका सभेत बंगाली हिंदूंसदर्भाात प्रतिनिधीगृहात महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. 1971 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सर्चलाईट’ अंतर्गत बंगाली हिंदू आणि अल्पसंख्यांकांवर झालेल्या अत्याचारांना आता जागतिक स्तरावर ‘नरसंहार’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ओहायो डेमोक्रॅट पार्टीचे असलेले लँड्समॅन यांनी शुक्रवारी हा ठराव […]
पंढरपूर कॉरिडॉरचा पेच वाढला! पंढरपूर -येथील अत्यंत वादग्रस्त कॉरिडॉर प्रकल्प हा विषय मागील दोन दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. जुलै महिन्यात प्रत्यक्ष भूसंपादन करण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब खुद्द जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच सांगितल्याने मंदिर परिसरातील लोकांचे टेन्शन वाढले आहे. नुकताच मंदिर [...]
क्युबामध्ये पुन्हा एकदा ‘ब्लॅकआउट’; सलग तिसऱ्यांदा संपूर्ण देशाचा वीजपुरवठा खंडित
क्युबातील वीज संकट अधिक गडद झाले असून शनिवारी संपूर्ण देशाची वीज प्रणाली पुन्हा एकदा कोलमडली. या भीषण संकटामुळे देशातील अंदाजे 11 दशलक्ष नागरिक अंधारात बुडाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मार्च महिन्यात संपूर्ण देश वीजविना राहण्याची ही तिसरी वेळ असून, क्युबन इलेक्ट्रिक युनियनने (UNE) या देशव्यापी ‘ब्लॅकआउट’ची अधिकृत घोषणा केली आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा […]
गवळी तिठ्यावर छ.शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घोषणा सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील राजा शिवाजी चौक गवळी तिठा येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य – दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याची घोषणा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. गुढीपाडव्या निमित्त सालाबादप्रमाणे महापूजेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. साळगावकर म्हणाले [...]
Israel Iran War –हार्मुझच्या सामुद्रधुनीतील भूसुरुंग आम्ही हटवू, पण…! जपानने ठेवली महत्त्वाची अट
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध तीव्र होत असल्याने आखाती देशातील तणाव वाढत आहे. त्यातच आता जपानने हार्मुझ सामुद्रधनी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. पण त्यासाठी त्यांनी महत्त्वाची अटही ठेवली आहे. त्यामुळे आता युद्धामुळे झालेली तेलकोंडी सुटण्याचा अपेक्षा व्यक्त होत आहे. आखाती देशातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानने रविवारी जाहीर केले की, व्यापारी जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग सुकर […]
Solapur |सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा! गळती दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पुन्हा एक दिवस पुढे
सोलापूर पाणीपुरवठा थांबणार, गळती दुरुस्ती कारण सोलापूर – एकीकडे शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती कामासाठी परवानगी दिल्यानंतर गळती लागलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात येत असल्याने पाण्याचा पुरवठा रोखण्यात येणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एका रोटेशनसाठी एक दिवसाने [...]
इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामाला सुरुवात होण्यास सहा दिवसांचा अवधी बाकी आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात 27 मार्चला सलामीचा सामना खेळला जाणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आरसीबीचा स्टार बॅटर विराट कोहली याच्याबाबत एक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाली. आयपीएल दरम्यान विराट कोहली याने लंडनला ये-जा करण्यासाठी खास चार्टर्ड […]
Karad |शेतकऱ्यांनो, गव्हाचे काड जाळू नका! पाणी बचत आणि खत निर्मितीसाठी मल्चिंगचा अवलंब करा
उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार; सातारा -शेतीमधील ज्याला आपण कचरा समजून जाळून टाकतो, असे गव्हाचे काड माती स्थिरीकरणासाठी महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर अन्य विविध पर्यायांनीही त्यांचा फायदेशीर वापर होऊ शकतो. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही त्यांचा वापर होऊ शकतो म्हणूनच गव्हाचे काह जाळू नका, असे आवाहन [...]
दर्शनाहून परतत असताना रोपवेची ट्रॉली कोसळली, अपघातात महिलेचा मृत्यू; 7 भाविक जखमी
देवीचं दर्शन घेऊन परतत असताना रोपवेची ट्रॉली कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य भाविक जखमी झाले. झारखंडच्या महासमुंद जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आयुषी सत्कर असे मयत महिलेचे नाव आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवरात्रीनिमित्त बागबाहरा भागातील खलारी गावातील टेकडीवर वसलेल्या ‘खलारी माता मंदिरा’त दर्शनासाठी […]
आगाशिवनगरच्या रस्त्यांना अखेर अच्छे दिन, नागरिकांना दिलासा कराड – मलकापूर नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी सध्या निधी उपलब्ध होत असताना शहरातील आगाशिवनगर परिसरातील खराब रस्त्यांचा प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. खड्डेमय आणि जीर्ण झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या समस्येला दिलासा मिळत असून [...]
शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे दिपाली भालेकर यांचा सत्कार
सावंतवाडी – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे (गवळी तिठा )सावंतवाडी येथे सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ.दिपाली दिलीप भालेकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर ,प्रभारी नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे ,नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे ,यशवंत देसाई ,माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव ,संजय पेडणेकर ,सुरेश भोगटे, [...]
एकनाथ शिंदे यांना गुवाहटीचा रस्ता अशोक खरातनेच दाखवला –विनायक राऊत
”एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दिपक केसरकरांनी दाखवला व अशोक खरातांनी शिंदेना गुवाहटीचा रस्ता दाखवला”, अशी सणसणीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक खरात प्रकरणात जे जे मंत्री सामील आहेत त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी देखील केली आहे. ”कॅप्टन खरात याचे […]
Israel Iran War –युद्ध लांबल्यास जगभरात लॉक डाऊनची परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक पूर्णपणे थांबली आहे. जगातील बहुतांश तेल याच मार्गातून जाते. तेलाच्या किमती आता प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्या आहेत. अमेरिकेत गॅसची किंमत प्रति गॅलन ५ डॉलरपर्यंत घसरली आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सर्व काही महाग होत आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. या सर्व परिस्थितीत कोरोनानंतरचा सर्वात मोठा लॉकडाउनचा गंभीर धोक्याचा […]
बामणोलीतील रस्त्याचे काम दोन वर्षे अपूर्ण, ग्रामस्थ नाराज कुपवाड -बामणोली येथे कोंडके मळ्यातील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले प्रभाग क्रमांक तीनमधील रस्त्याचे काम दोन वर्षे उलटले तरी अपूर्ण अवस्थेतच आहे. केवळ सहा महिन्यांची मुदत असताना काम पूर्ण न झाल्याने जबाबदार असणारे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम [...]
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’डिजिटल चित्ररथ जनजागृती
मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते शुभारंभ ; महिला व बालविकास विभागाचा उपक्रम मालवण | प्रतिनिधी महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मालवण तालुक्यातील डिजिटल चित्ररथ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात बालिका/महिलांविषयक योजना प्रचार प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने ‘बेटी [...]
Ratnagiri News –कर थकविणाऱ्या 71 मालमत्ता सील, रत्नागिरी नगरपरिषदेची कारवाई
रत्नागिरी नगर परिषदेने करवसुलीची मोहीम सुरू केली आहे.कर थकविणाऱ्यांच्या 73 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.कर थकविल्यामुळे 61 जणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कर वसुली मोहीम सुरू आहे.रत्नागिरी नगर परिषदेचे लक्ष्य 15 कोटी 87 लाख 50 हजार 648 रुपये आहे.त्यापैकी 10 कोटी 31 लाख 13 हजार 61 […]
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा दारूण पराभव करत हिंदुस्थानने आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने हा वर्ल्डकप जिंकला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानच्या विश्वविजयामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानेही मोलाचा वाटा उचलला. वर्ल्डकप संपल्यानंतर आता वरुणला आयपीएलचे वेध लागले असून तो कोलकाता नाईट रायडर्स […]
नियतीचे खेळ खरोखरच अजब असतात, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात आली आहे. ज्या माऊलीला कुटुंबियांनी मृत मानून तिचे अकरा वर्षे श्राद्ध घातले, तीच आई अचानक जिवंतपणे घरासमोर उभी ठाकली, तर काय होईल? हा केवळ एखाद्या चित्रपटाचा भाग नसून बागपतच्या एका कुटुंबात घडलेला अद्भूत चमत्कार आहे. 11 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या वृद्ध मातेच्या पुनरागमनाने संपूर्ण […]
कतारमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 6 जणांचा मृत्यू; एक बेपत्ता
नियमित मोहिमेदरम्यान कतारचे एक लष्करी हेलिकॉप्टर देशाच्या सागरी हद्दीत कोसळले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने अपघाताची पुष्टी केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत अपघाताची माहिती दिली. नियमित कर्तव्यावर असताना हेलिकॉप्टरमध्ये […]
आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 16 जणांचा मृत्यू; एथिलीन ग्लायकॉलच्या अंशामुळे किडनी निकामी
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दुध प्यायल्याने मोठी जीवितहानी झाली असून, मृतांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात लालचेरुवू परिसरातून पुरवण्यात आलेले भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक नागरिकांना गंभीर आजार जडले होते. सध्या राजामहेंद्रवरम येथील रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेतील पीडितांना सुरुवातीला उलट्या होणे, […]
सावंतवाडी – शहरातील खासकिलवाडा येथील रहिवासी व सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्या पत्नी सौ .गीता जगदीश मांजरेकर( 63 ) यांचे रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्या शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. शनिवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने प्राथमिक उपचार करून अधिक [...]
अभंग गायन स्पर्धेत दक्षता घोगळे,श्रुती सावंत प्रथम
आरोस येथील गिरोबा युवक नाट्य मंडळाचे आयोजन न्हावेली /वार्ताहर श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ,आरोस आयोजित अभंग गायन स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाली. सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील गिरोबा रंगमंचावर गुढीपाढवा व रामनवमी महोत्सव २०२६ निमित्त या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत बालगटात कु.दक्षता बाबुराव घोगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर [...]
वायंगणीत भूमिगत विद्युत वाहिनीच्या निकृष्ट कामाला ग्रामस्थांचा आक्षेप
वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोर केली बोगस कामाची पोलखोल आचरा प्रतिनिधी वायंगणी गावामध्ये सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पेटी बसवण्याचे बसवलेले बॉक्स निखळून पडत असल्याचे सरपंच रुपेश पाटकर व ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना जागेवर आणून दाखवत झालेल्या बोगस कामाची पोलखोल केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, [...]
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील शाळा बनत आहेत दहशतवादाचे अड्डे; जैश आणि लष्करचा नवा कट उघड
पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवला आहे. धार्मिक मेळावे, रॅली आणि दहशतवादी शिबिरांनंतर या संघटनांनी आता थेट शिक्षण क्षेत्राचा वापर करून दहशतवाद्यांची नवी फौज तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इस्लाम आणि काश्मीरमधील जिहादच्या नावाखाली विद्यार्थ्यांची भरती केली जात असून, यासाठी पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये आणि पाकव्याप्त […]
गर्भवती कर्मचाऱ्याला ‘वर्क ऑफ होम’ नाकारून कार्यालयात बोलावणे एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. कामावर असताना महिलेची प्रसूती झाली आणि अवघ्या दीड तासांमध्ये तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित कंपनीला 22.5 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 189 कोटी रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. अमेरिकेतली ओहायो येथील ही घटना आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, […]
Indian Navy |भारतीय नौदलाची ताकद वाढणार! ३ एप्रिलला ‘तारागिरी’स्टेल्थ युद्धनौका होणार दाखल
भारतीय नौदलात नवीनतम स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ ३ एप्रिलला दाखल नवी दिल्ली -भारतीय नौदल आपली नवीनतम स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ (एफ४१) ३ एप्रिल २०२६ रोजी नौदलात दाखल करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या सागरी सार्वभौमत्वासाठी हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या या सोहळ्याचेअध्यक्षस्थान माननीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भूषवतील. पूर्णपणे आत्मनिर्भर नौदल शक्ती [...]
Maharashtra Weather |पुढील दोन दिवस पावसाचे! पुणे, सातारा, सांगलीसह दक्षिण महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’
महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट पुणे : कोकणात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामान, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा व दक्षिण विदर्भात पुढील दोन दिवसांत मध्यम स्वरुपाच्या वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कर्नाटक, राजस्थान, पूर्व राजस्थानवर असलेली हवेची [...]
कोल्हापूर पोलिसांची कारवाई; ५२ हजारांची लूट उघड कोल्हापूर -नांदुरादेवी (जि. हिंगोली) येथे दुचाकीस्वारा समोर आडवी मोटार थांबवून त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल लंपास करून पसार झालेल्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. या पाचही जणांना हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी रात्री आदमापूर ते कागल रोडवर पिंपळगाव [...]
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बिलाल सराफीची पाकिस्तानात हत्या
पाकिस्तानमधील मुरिके येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बिलाल आरिफ सराफी याची त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी निर्घृण हत्या केली. ही घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात घडली असून, या हत्येमुळे दहशतवादी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बिलाल सराफीवर त्याच्या कुटुंबातील लोकांनी आधी चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात बिलालचा जागीच मृत्यू झाला. […]
हिंदुकुश हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट; 2 अब्ज लोकांचा जीव धोक्यात
उत्तर आणि दक्षिण ध्रुवानंतर जगातील सर्वाधिक बर्फाचा साठा असलेल्या हिंदूकुश हिमालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पृथ्वीचा तिसरा ध्रुव मानल्या जाणाऱ्या हिंदुकुश हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पटीने वाढला आहे. यामुळे मोठा हाहाकार उडून तब्बल 2 अब्ज लोकांचा जीव धोक्यात असल्याची धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या महासंकटाचे संकेत मिळत आहेत. 21 व्या शतकात हिमनद्या […]
Israel Iran War –आता ट्रम्प घाबरले…अल्टिमेटमनंतर इराणचा आक्रमक पलटवार; तेलकोंडीसह पाणीकोंडी करणार
अमेरिका, इस्रायल इराण युद्धात आता होर्मुझची सामुद्रधुनी संवेदनशील मुद्दा ठरत आहे. ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर इराणने आखाती देशांच्या क्षारविरहितीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी देत प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रकल्प आखाती देशांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य पुरवठा स्रोत आहेत.या प्रकल्पावर हल्ला झाला, तर सर्व आखाती देशात गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते. […]
पोहताना लष्करी अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, बेळगावच्या कमांडो विंगमधील घटना
प्रशिक्षणादरम्यान पोहताना हृदयिकाराचा झटका आल्याने लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग येथे ही घटना घडली. लेफ्टनंट अमित सिंग असे मृत्यू झालेल्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट अमित सिंग हे मूळचे हरियाणाचे रहिवासी असून बेळगावातील विंग कमांडो येथे […]
जोतिबा डोंगरावर नवीन उंटाचे आगमन, भक्तांमध्ये उत्साह जोतिबा डोंगर – जोतिबा डोंगर महाराष्ट्राचे कुलदैवत व आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात सेवेसाठी नवीन उंट दाखल झाला आहे, नवीन उंट आठ वर्षांचा असून तो राजस्थानच्या सिरोहीमधून आणला आहे. जोतिबा मंदिरात नवीन उंटाचे औक्षण करून वाजत-गाजत स्वागत करण्यात [...]
निळे गावाचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग-विठ्ठलाई यात्रा उत्सवाचा जल्लोष; २५० वर्षांची परंपरा कायम
शाहूवाडीच्या निळे गावात भक्तीचा जागर! शाहूवाडी – सालाबादप्रमाणे निळे (ता. शाहूवाडी) गावचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग – विठ्ठलाई अभिषेक व यात्रा उत्सव रविवार दिनांक २२ मार्च ते २४ मार्च असा तीन दिवस होत आहे त्या निमित्ताने.. श्रीकृष्ण भोसले आंबा शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या निळे येथील ग्रामदैवत [...]
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवरही होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते. सोने-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सराफा बाजारातही शुकशुकाट दिसत होता. मात्र गेल्या 20 दिवसात सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने स्वस्तात दागिने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या […]
Iran Israel conflict |इराण-इस्रायल युद्ध आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इराण-इस्रायल युद्धाचा इतिहास; मैत्रीतून वैरापर्यंतचा प्रवास कोल्हापुर ( ऋषिकेश पाटील ) – आज आपणाला मध्यपूर्व आशियात युद्धामुळे पडलेल्या इमारती आणि धुराचे दाटलेले ढग दिसून येत आहेत. कारण इराण आणि इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, तर अमेरिकाही इस्रायल सोबत या युद्धात सहभागी झाला आहे.पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 1970 [...]
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धात आता आणखी काही देशांनी उडी घेतल्याने जागतिक युद्धाचे चित्र आता अधिक भयावह होत आहे. सुरुवातील क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यानंतर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. आता हे युद्ध एकमेकांचे आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहचले असल्याने किरणोत्सर्गाचा धोका वाढत आहे. त्याचप्रमाणे या युद्धाचे अतिभीषण परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात […]
Assam Assembly Election –निवडणुकीपूर्वी संशयित दहशतवाद्यांकडून पोलीस छावणीवर हल्ला, चार कमांडो जखमी
आसाममध्ये येत्या 9 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला धोबीपछाड करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात निवडणुकीची तयार सुरू असतानाच रविवारी तिनसुकिया जिल्ह्यातील जगुन येथील आसाम पोलीस कमांडो छावणीवर संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम पोलिसांचे चार कमांडो जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री 2 वाजता आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेजवळ […]
Satara News |कास-धावलीत अस्वलाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
साताऱ्यात भीतीचे सावट – अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला कास -धावली ता . सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी अस्वलाच्या हल्लात शेतकरी लक्ष्मण रामचंद्र जाधव हे जखमी झाले असुन त्यांच्यावर पुढील उपचार सातारा जिल्हा रुग्णालयात सुरु आहेतउन्हाळ्याची तिव्रता वाढु लागल्याने अन्न पाण्याच्या शोधात परळी खोऱ्याच्या डोंगररांगामध्ये लगतच्या [...]
विमानात अचानक महिलेचा मृत्यू; मृतदेहासोबत प्रवाशांचा 13 तास प्रवास
ब्रिटीश एअरवेजच्या हाँगकाँगवरून लंडनला निघालेल्या एका विमानाने उड्डाण केल्यानंतर तासाभरातच विमानातील एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान विमानातील क्रू मेंबर्सने विमान माघारी न नेता प्रवास सुरूच ठेवला त्यामुळे विमानातील प्रवाशांना मृतदेहासोबत तब्बल 13 तास प्रवास करावा लागला. दरम्यान कर्मचाऱ्यांनी अशा ठिकाणी तो मृतदेह ठेवला की जिथलं तापमान खूप जास्त होतं त्यामुळे काही वेळातच विमानात दुर्गंधी पसरू […]
इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केले. 28 फेब्रुवारीपासून युद्धाचा भडका उडाला आणि बघता बघता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसू लागला. अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगभरात इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटण्यास सुरुवात झाली असून […]
Mumbai News –स्कूटर पार्किंगवरून धारावीत रक्तरंजित थरार, मित्राकडून मित्राची क्रूर हत्या
स्कूटर पार्किंगच्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली. याप्रकरणी धारावी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आशिक खान असे अटक केलेल्या आरोपीचे तर अश्विन नादर असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटर पार्किंगवरून आशिक आणि अश्विन या […]
जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानी चलनाला मोठा फटका बसला असून रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94 इतक्या सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला आहे. तेलाचे वाढते आयात बिल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून हिंदुस्थानी बाजारातून सतत पैसे काढल्यामुळे रुपयात ही घसरण झाली. रुपयाची वाटचाल शंभरीकडून सुरू असून या घसरणीवरून शिवसेना (उद्धव […]
अमेरिका, इस्त्रायल- इराण युद्धामुळे जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. परिणाम एलपीजी, सीएनजी, पीएनजी यांच्या किमतीवर दिसत असून देशात सिलिंडरची कमतरता जाणवत आहे. नागरिंकांना सिलेंडरसाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या अडचणीतून तोडगा काढण्यासाठी ‘झेरोधा’चे (Zerodha) सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी उपाय सुचवला आहे. […]
Unlikely Paradise! संजय राऊत यांच्या पुस्तकाची देशभरात जोरदार चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या ‘अन्लाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी आणि ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीत 23 मार्च रोजी होणार आहे. या पुस्तकाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकाची इंग्रजी व हिंदी आवृत्ती येणार हे जाहीर होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. […]
‘एसबीआय’ला 6 हजार 338 कोटींची टॅक्स नोटीस
स्टेट बँक ऑफ इंडियाला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 6 हजार 338 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. एसबीआयने ही माहिती दिली आहे. आयकर विभागाने ही नोटीस एसबीआयला आर्थिक वर्ष 2023-24 साठी दिली आहे. एसबीआयला दिलेल्या या नोटिसीमध्ये व्याजही जोडलेले आहे. एसबीआयला इन्कम टॅक्स अॅक्ट सेक्शन 143(3), 144 सी (3), आणि 144 (बी) अंतर्गत ही नोटीस देण्यात […]
मार्चमध्ये सोन्याची झळाळी उतरली, चांदीही स्वस्त
मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2 मार्चला 24 पॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 67 हजार 471 रुपये तोळा होता. अवघ्या 15 दिवसांत सोन्याचा दर 1 लाख 47 हजार 218 रुपयांपर्यंत खाली आला आहे. याचाच अर्थ सोने 20 हजारांहून स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली आहे. 2 मार्चला चांदी […]
Photo –वयाच्या पन्नाशीतही तरुणींनाही लाजवेल अशी फिगर, पाहा शिल्पाचे ग्लॅमरस फोटो
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या अभिनयासोबतच फिटनेस आणि फॅशनच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 90 च्या दशकापासून आजपर्यंत तिचा ग्लॅमरस प्रवास कायम आहे. ‘योग क्वीन’ शिल्पा शेट्टीने आपल्या हटके फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फ्युजन आऊटफिटमध्ये ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत असून, तिचा हा लूक सध्या सोशल […]
देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. रविवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. अशोक खरात प्रकरणाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या आधीपासून महाराष्ट्राची भूमिका पुरोगामी, सुधारणावादी आणि विज्ञानवादी राहिली आहे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. अशावेळेला ज महाराष्ट्रात […]
धक्कादायक! घरी मांजर पाळण्यास कुटुंबीयांचा विरोध, महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल
कुटुंबीयांनी घरी मांजर पाळण्यास विरोध केल्याच्या रागातूीन 23 वर्षीय महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील अलवाल परिसरात ही घटना घडली. टी. प्रिन्सी उर्फ श्रेष्ठा असे मयत डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी […]

28 C