शेवटच्या चेंडूवर लखनौ विजयी : केकेआरच्या पदरी पुन्हा पराभव : सामनावीर मुकुल चौधरीची तुफानी फटकेबाजी वृत्तसंस्था/कोलकाता लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल-2026 मध्ये आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौने कोलकाता नाईट रायडर्सला 3 गडी राखून पराभूत केले. लखनौ संघाला विजयासाठी शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज होती आणि 7 गडी बाद झाले होते. [...]
राजस्थान-आरसीबी सामना चुरसपूर्ण ठरण्याचीअपेक्षा
पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल, विराट कोहली-देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीवर लक्ष वृत्तसंस्था/गुवाहाटी आज शुक्रवारी गुवाहाटी येथे जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे दोन ‘फॉर्म’मध्ये असलेले संघ आमनेसामने येतील तेव्हा हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक सुऊवातीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स यावेळी आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न [...]
आजचे भविष्य शुक्रवार, १० एप्रिल २०२६
मेष : मन शांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवाल. वृषभ : रिकामा वेळ रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल मिथुन : जमेल तेवढ्याच कामाचे वचन द्या, ताण नको कर्क : कामाची पद्धत बदला, फावल्या वेळेत ध्यान करा सिंह : प्रवासाची संधी शोधाल, आर्थिक अडचणीवर मात. कन्या : आपल्या मुलांकडून गर्व करण्यासारखे काम तूळ : रागावर नियंत्रण ठेवा, मेहनत, [...]
ऑफ-बिट…‘आयपीएल’मधील अपेक्षाभंग…
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच आठवड्यात उत्कंठावर्धक सामने, काही अनपेक्षित निकाल आणि काही कमी धावसंख्येचे सामने असं सर्व काही पाहायला मिळालंय…आतापर्यंत विविध संघांमधील काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलेलं असलं, तरी मोठी प्रतिष्ठा आणि उत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या हंगामात उतरलेले काही क्रिकेटपटू मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरलेत…कामगिरीचं मूल्यमापन करण्याच्या दृष्टीनं हा काळ [...]
टी-20 प्रकारात कार्डोसोचा नवा विश्वविक्रम
ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोचे चार धावांत 9 बळी वृत्तसंस्था/गॅबोरोन ब्राझीलची महिला क्रिकेटपटू लॉरा कार्डोसोने टी-20 प्रकारात नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. येथील बोट्सवाना क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या बीसीए कलहारी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात वेगवान गोलंदाज कार्डोसोने आपल्या तीन षटकांमध्ये 4 धावांच्या मोबदल्यात 9 गडी बाद करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. टी-20 प्रकारातील पुरूष किंवा [...]
भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांना दहा पदके
वृत्तसंस्था/उलानबातार 2026 च्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना एकूण 10 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला संघातील प्रत्येक मुष्टीयोद्ध्याने किमान एक पदक मिळविले असल्याची माहिती संघाचे प्रमुख प्रशिक्षक सॅन्टीयागो निव्हा यांनी दिली. भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे [...]
नितेशला रौप्य, सचिन, प्रिन्स यांना कांस्यपदके
वृत्तसंस्था/नवी दिल्ली किर्जीस्थानमधील बिश्केक येथे सुरू असलेल्या 2026 च्या वरिष्ठांच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या नितेशने रौप्यपदक तर सचिन सेहरावत तसेच प्रिन्स यांनी प्रत्येकी 1 कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत बुधवारी भारताने तीन पदकांची कमाई केली असून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाअखेर पदकतक्त्यात भारताने दोन रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळविली आहेत. या स्पर्धेत भारताच्या दोन महिला मल्लांनी कांस्यपदक [...]
जलतरणातील नवीन आशा……. रुबन रोचा
जलतरण खेळात एक नवीन नाव उदयास येत आहे ते म्हणजे आके-बायश या गावातील एक प्रतिभावंत कुमार जलतरणपटू रुबन रोचा याचे. 11 वर्षीय रुबनने जलतरणात एवढं प्राविण्य मिळविले आहे, की हा जलतरणपटू भविष्यात एक ‘लंबी रेस का घोडा’ बनणार हे निश्चित आहे. हॅन्री रोशा आणि फिल्डा एँड्रो यांचा हा 11 वर्षीय पुत्र सध्या सां जुझे दी [...]
वैशालीकडून दिव्याचा पराभव, अव्वल स्थान राखले कायम
कँडिडेट् स्पर्धा जिंकण्याच्या मार्गावर असणारा उझबेकच्या जावोखिर सिंदारोव्हचे 7 तर दुसऱ्या स्थानावरील अनिश गिरीचे 5.5 गुण वृत्तसंस्था/पाफोस, सायप्रस महिलांच्या ’कँडिडेट्स’ स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत सुरू असून अजून पाच फेऱ्या बाकी असल्याने पुढील काळात आणखी रोमांचक घडामोडींची अपेक्षा आहे. सदर स्पर्धेच्या नवव्या फेरीत आपलीच सहकारी खेळाडू दिव्या देशमुखचा पराभव करत आर. वैशालीने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. [...]
पालिका प्रशासन निवृत्त कर्मचाऱयांच्या हक्काचे पैसे देत नसल्याचे निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेवर 40 हजार कोटींहून अधिक खर्च करतेय. आता ही योजनाच रोखली पाहिजे, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देत न्यायालयाने पालिकेचेही कान उपटले. तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेतील टेबल, खुर्च्या, एसी, फर्निचर… इतकेच नव्हे, तर […]
युद्धबंदीत इस्रायलचे बेफाम हल्ले,विश्वासघाताने इराण खवळला…आमचे बोट ट्रिगरवर!
इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम झाल्यानंतरही जगाचे टेन्शन कायम आहे. वादाचा केंद्रबिंदू आता होर्मुझवरून लेबनॉनकडे सरकला आहे. युद्धविरामाशी लेबनॉनचा संबंध नसल्याचे सांगत इस्रायलने तिथे बेफाम हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे इराण खवळला आहे. ‘‘हा विश्वासघात आहे. हे असेच सुरू राहिल्यास चर्चेला काडीचा अर्थ उरणार नाही. आमचेही बोट ट्रिगरवर आहे,’’ असा दम इराणने अमेरिका-इस्रायलला भरला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा […]
उत्पन्न वाढीसाठी महायुतीचा नवा फंडा, सरकारी भूखंड आता 49 वर्षे भाड्याने देणार
राज्यातील महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे विविध सरकारी विभागांची आर्थिक कुतरओढ सुरू झाली आहे. यावर उपाय म्हणून उत्पन्न वाढीसाठी सरकारी भूखंड आता 49 वर्षे भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भाडेपट्टय़ाने दिलेल्या सरकारी जमिनींचेही नूतनीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील सुधारित धोरण जाहीर केले आहे. शासकीय जमिनी भाडेपट्टय़ाने देण्याचा कालावधी 30 वर्षांवरून […]
सीबीएसई शाळांत सहावीपासून तिसरी भाषा सक्तीची
‘सीबीएसई’ शाळांमध्ये आता सहावीपासून तिसरी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ा अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027पासूनच या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि इंग्रजी व्यतिरिक्त आणखी एका भाषेत पारंगत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हिंदुस्थानच्या समृद्ध भाषा वारशाची माहिती व्हावी आणि […]
Baramati Bypoll Election आधी ताणले…अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, कॉँग्रेस ही निवडणूक लढणारच, अशी ठाम भूमिका कॉँग्रेसकडून घेण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून ते अर्ज माघारीच्या एक दिवस आधीपर्यंत बारामतीत लढणारच, अशी टोकाची भूमिका घेत कॉँग्रेसने ताणून धरले होते. मात्र गुरुवारी सकाळी मुंबई आणि दिल्लीतून झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या पह्नापह्नीनंतर अखेर बारामतीच्या निवडणूक रिंगणातून कॉँग्रेसने माघार […]
सामना अग्रलेख –तुमचाही ‘हिसाब’ होईल!
इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, या विवंचनेत भारतातील जनता आहे. या विवंचनेवर फुंकर घालण्याऐवजी पंतप्रधान मोदी प. बंगालमध्ये निवडणूक ‘पर्यटना’चा आनंद घेत आहेत. ‘नीरो’ बनून इशारे-नगारे वाजवीत आहेत. कालपर्यंत ते ‘सबका विकास’ अशी घोषणा करीत होते. प. बंगालमधील हल्दियामधून त्यांनी आता ‘सबका हिसाब होगा’ अशी गर्जना केली आहे. मोदीजी, ‘हिसाब’ तर […]
लेख –विद्युत वाहनांचे चार्जिंग –दुर्घटना आणि उपाय
>> महेश शिपेकर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटमध्ये झालेल्या स्पह्टामध्ये एका कुटुंबातील सात जण ठार झाल्याची दुर्घटना गेल्या महिन्यात घडली होती. या घटनेनंतर विद्युत वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. पर्यावरणपूरक आणि भविष्याचे साधन म्हणून या वाहनांकडे पाहिले जात असले तरी सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती घर करू लागली आहे. […]
जाऊ शब्दांच्या गावा –‘ ढ’ ढगाचा की गाढवाचा?
>> साधना गोरे, sadhanagore2018@gmail.com आपली शाळा आणि तिथले शिक्षक यांना आपल्या मनात एक अढळ स्थान असतं. शाळेत असताना काही शिक्षक आपल्याला आवडत नसले तरी मोठं झाल्यावर आपल्याला त्यांच्या वागण्याचं कारण कळतं आणि नाही कळलं तरी आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकीच वाटते. तर आपल्या शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांचं एक अक्षर फार लाडपं असतं ते म्हणजे ‘ढ’. हा ढगाचा ‘ढ’ […]
प्रत्येकाला सर्व मंदिर आणि मठांमध्ये दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणाला रोखल्यास हिंदुत्वावर त्याचा परिणाम होईल आणि परिणामी समाज विभागला जाईल. हे हिंदुत्वासाठी चांगले नाही, असे मत आज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याचवेळी, धार्मिक मुद्दय़ांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 एप्रिल रोजी होणार आहे. केरळममधील शबरीमाला मंदिरासह […]
पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी तहकूब, आज निर्णय होण्याची शक्यता
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. त्यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नीकडे 3 देशांचे पासपोर्ट असून अमेरिकेतील एका कंपनीत हिमंता सरमा यांनी 52 हजार कोटी रुपये गुंतविल्याचा गौप्यस्फोट खेरा यांना केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आसाम पोलिसांनी खेरा यांच्या […]
बांगलादेशमध्ये ‘जेन-झी’ने आंदोलन करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. तेव्हापासून गेले 18 महिने हिंदुस्थान आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. ते सुधारण्यासाठी हिंदुस्थान आणि बांगलादेशने सहमती दर्शवली. त्याच वेळी शेख हसीना यांच्या मुद्दय़ामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होणार नाही, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बांगलादेशचे […]
दिवसाढवळ्या बायकोचा गळा चिरला! छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर थरार
महिला संरक्षण, शक्ती कायदा वगैरे सगळे थोतांड असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. दोन वेळा पतीच्या विरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेतल्याने दोन निष्पाप मुले अनाथ झाली. अत्यंत थंड डोक्याने या पतीने भरदिवसा, पेट्रोल पंपावर आपल्या पत्नीचा गळा चिरला आणि पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कचनेरपर्यंत पाठलाग करून या नराधमाला अटक केली. चित्तेपिंपळगाव येथील […]
पोक्सोच्या गुह्यात अडकविण्याची भीती दाखवून उकळले 7 लाख रुपये
महाविद्यालयातील विद्यार्थिनीला धाक दाखवून प्राचार्यांविरुद्ध अपहरणाची तक्रार करायला सांगून शिवाजीनगर पोलिसांनी 7 लाखांची खंडणी उकळली आहे. प्राचार्याला पोक्सोच्या गुह्यात अडकवण्याची भीती दाखवून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे यांनी खंडणी उकळली असून, त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. उपनिरीक्षक बडे […]
लेबनॉनसोबत थेट चर्चेसाठी इस्रायल तयार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मोठा निर्णय
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लेबनॉनने केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत नेतन्याहू यांनी लेबनॉनसोबत थेट चर्चा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच, शेजारील देशाशी थेट संवाद साधण्याचा हा निर्णय शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या प्रस्तावित चर्चेचा […]
…आणि हा चेंडू थेट रवी शास्त्री स्टँडच्या छतावर! वानखेडेवर ‘रवी शास्त्री स्टँड’चे दिमाखदार अनावरण
– गणेश पुराणिक धोनी फिनिशेस ऑफ स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप आफ्टर 28 इयर्स… 2011 मध्ये वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने उत्तुंग षटकार ठोकला आणि क्रिकेट समालोचक रवी शास्त्री मोठ्या उत्साहात हे अजरामर वाक्य म्हणाले. आजही वानखेडे मैदानावर गेल्यावर क्रीडाप्रेमींच्या कानात हे वाक्य घुमत असणार… याच मैदानावर रवी शास्त्री यांनी बडोदा विरुद्ध […]
केरळम, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण; उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये कैद
देशातील राजकीय लक्ष लागून राहिलेल्या केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, तिन्ही ठिकाणी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून अनेक केंद्रांवर मतदानाचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. या सर्व जागांचे निकाल येत्या ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहेत. कुठे किती टक्के […]
बिहारमधील अररिया जिल्ह्यात फारबिसजंग येथे पार्किंगवरून झालेल्या वादावरून एका ज्यूस विक्रेत्याने एका कार चालकाची गळा चिरून मुंडके छाटले. त्याने भररस्त्यात कार चालकाचे मुंडके फेकले. त्यानंतर संतप्त जमावाने ज्यूस विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. फारबिसगंज येथील कृषि उत्पादन बाजार समितिच्या गेटवर राहुल चौहान याचा ज्यूसचा स्टॉल होता. त्या ठिकाणी […]
बेपत्ता तरुणाचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ला येथे आढळला
तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे समुद्र किनारी मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल किड्ये हा तीन दिवसांपासून […]
महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा ‘निवडणूक ड्रामा’; आप खासदार संजय सिंह यांचा हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा केवळ निवडणूक ड्रामा करत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला. ‘एएनआय’ने (ANI) ने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरेतील पदयात्रेदरम्यान त्यांनी हे विधान केले. संजय सिंह म्हणाले की, जेव्हा हे विधेयक यापूर्वी मांडण्यात आले होते, तेव्हा आम […]
Photo –शिवसेना भवनात शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांना आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पुरुष आणि महिला शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक उपस्थित होते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अनिल परब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (सर्व फोटो – रुपेश जाधव)
गोदावरीच्या मध्यभागी भक्तीचा सागर, आत्मतीर्थमध्ये दत्त अवतार दिन साजरा
गेवराई तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र पांचाळेश्वर आत्मतिर्थ येथे श्री दत्त अवतार दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. महानुभव पंथाचे उपकाशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्री हजारो भाविकांनी श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे मंगलस्नान, दत्त कवच पारायण, महाआरती आणि रात्री भव्य छबिना मिरवणुकीने संपूर्ण परिसर “श्री दत्त जय जय दत्त” […]
शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, चांदिवली मतदारसंघातील ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश
विधानसभा निवडणूकीत चांदिवली मतदारसंघातील ईव्हीएमची (EVM) तपासणी आणि छाननी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी देत शिंदे गटाला दणका दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात […]
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वनला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १-बी मध्ये गुरुवारी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग टर्मिनलच्या तळमजल्यावर असलेल्या केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी […]
IPL 2026 –एका सेल्फीने चाहत्याचा दिवस बनला; संजू सॅमसनने भेट दिला महागडा स्मार्टफोन; पण का? वाचा…
IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज संजू सॅमसन सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या संजूला IPL मध्ये अद्याप सुर गवसलेला नाही. मात्र, त्याने आपल्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. केरळमधील मुंदूर-थुथा रोडवर प्रवास करत असताना सॅमसनने एका क्रिकेटप्रेमी चाहत्याला तब्बल 40 हजार रुपये किमतीचा नवीन स्मार्टफोन भेट देऊन सर्वांना […]
Ratnagiri News –८० वर्षांपूर्वीचा जुना पूल तोडल्याने गावांचा संपर्क तुटला, पर्यायी पायवाट अडचणीची
खेड तालुक्यातील फुरूस पोयनार मार्गावरील सुमारे ८० वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्या दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कामामुळे फळसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. काही गावांचा संपर्क तुटल्याची ही गंभीर समस्या समोर […]
मोबाईलचा स्फोट अन् UPSC विद्यार्थ्याचे स्वप्न भंगले! ग्राहक आयोगाने Realme ला ठोठावला लाखांचा दंड
मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला दिल्ली जिल्हा ग्राहक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. या स्फोटामुळे विद्यार्थ्याला यूपीएससीची (UPSC) पूर्व परीक्षा देता आली नव्हती. याप्रकरणी आयोगाने ‘रियलमी’ (Realme) कंपनीला १.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘पीटीआय’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युपीएससीचा विद्यार्थी कोती साई पवन याने यासंदर्भात तक्रार दाखल […]
असंसदीय भाषेवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले आसामचे मुख्यमंत्री
आसाममध्ये आज विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे जलुकबारी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मतदानाच्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना हिमांता सरमा हे लल्लनटॉप चॅनेलच्या पत्रकारावर भडकले. या पत्रकाराने त्यांना असंसदीय भाषेवरून प्रश्न विचारला होता. तो प्रश्न ऐकताच सरमा हे चांगलेच संतापले व माझी भाषा लल्लनटॉपपेक्षा चांगली असते असे त्या पत्रकाराला […]
छत्रपती संभाजीनगर हादरले, भररस्त्यात माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर भरदिवसा माथेफिरू प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चिरून तिचा निघृण खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करमाड येथील गणपती मंदिराजवळ इंडियन ऑईलचा एक पेट्रोल पंप आहे. पूजा सुदाम गावंडे ही तरुणी या पेट्रोल पंपावर काम करते. गुरुवारी दुपारी साडे […]
बिहारमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि आर्थिक स्थितीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असून, लोकप्रतिनिधींनाही अद्याप पगार मिळालेला नाही, असा खळबळजनक दावा तेजस्वी यादव यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला. तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील संपूर्ण सरकारी यंत्रणा आता […]
IPL 2026 –डेव्हिड मिलरची एक चूक अन् 2 चेंडूत 2 धावा झाल्या नाहीत; कर्णधाराने सांगितलं कारण
IPL 2026 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. दोन चेंडूंमध्ये दोन धावांची गरज होती. स्ट्राईकला डेव्हिड मिलर होता. सामना दिल्ली जिंकणार हे चाहत्यांनी जवळपास निश्चित केलं होतं. मात्र, दोन धावा करण्यात मिलरला अपयश आलं आणि दिल्लीच्या हातातला सामना निसटून गुजरातच्या पारड्यात पडला. […]
11 दिवसात पैसे डबल होणार; ज्येष्ठ नागरिकाने गुंतवले 12 कोटी आणि पुढे
12 कोटीचे 11 दिवसात मिळणार 24 कोटी होणार असे सांगत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. पैसे डबल मिळण्याच्या हव्यासापोटी हडपसर भागातील एका 75 वर्षीय डॉक्टरने सायबर चोरट्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी १२ कोटी ३१ लाख रुपये दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली […]
आफ्रिकन टोळीचा पर्दाफाश, देशभरातील १२ सायबर गुन्ह्यांशी संबंधित दोन जणांना दिल्लीत अटक
देशभरातील विविध राज्यांमध्ये ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा छडा लावत दिल्ली पोलिसांनी दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. ‘PTI’ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिला असल्याचे भासवून हिंदुस्थानी नागरिकांशी मैत्री करत असत आणि भावनिक नाते निर्माण करत असत. त्यानंतर आपण हिंदुस्थानात येत […]
स्वच्छता कराच्या नावाखाली एसटी प्रवाशांकडून कोट्यवधींची वसुली; तरीही बसस्थानके अस्वच्छच !
कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटावर आकारलेला दोन रुपयांचा स्वच्छता कर हा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर टाकलेला अतिरिक्त आर्थिक भार असल्याची तीव्र नाराजी राज्यभरातून व्यक्त होत आहे. राज्यात दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये आकारल्यास महामंडळाच्या तिजोरीत दररोज १ कोटी १० लाख रुपये, महिन्याला ३३ कोटी रुपये, तर वर्षाला तब्बल ४०१ कोटी ५० लाख रुपये जमा होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असताना राज्यातील अनेक बसस्थानके आणि बसेस आजही स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. राज्यात सध्या २५१ आगार आणि ५९८ बसस्थानके असून या सर्व ठिकाणची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि बसची नियमित साफसफाई यासाठी हा निधी प्रभावीपणे वापरण्याची मागणी जोर धरत आहे. महामंडळाने अलीकडेच सहलीच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाख रुपये उत्पन्न मिळवले असून, त्यासाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्या करण्यात आल्या. गतवर्षीच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाख रुपयांची वाढ झालेली असतानाही प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, अनेक बस वाटेतच बंद पडतात, स्वच्छतेचा अभाव जाणवतो, तर बसस्थानकांवरील परिस्थितीही समाधानकारक नाही. त्यामुळे स्वच्छता करातून मिळणारा निधी नेमका कुठे खर्च होतो, याबाबत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान १५ एप्रिल ते १५ जून हा गर्दीचा उन्हाळी हंगाम सुरू होत असताना महामंडळाने १० टक्के उन्हाळी भाडेवाढ जाहीर करून प्रवाशांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एसटी प्रवासही महाग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. एकेकाळी “गोरगरिबांची लालपरी” म्हणून ओळखली जाणारी एसटी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक बस सेवांमध्ये वाढ झाली असली तरी त्याचे तिकीटदर अनेकांसाठी परवडणारे नसल्याने “लालपरी आता श्रीमंतांचीच होत चालली का?” असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसा शासन आदेशही जारी केला आहे. राज्यातील 405 शासकीय शाळांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा“ म्हणून विकसित करण्यास मान्यता मिळाली असून, यात आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांनी स्थान पटकावले असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. निवड झालेल्या या शाळांमध्ये विकसित महाराष्ट्र - 2047 चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रामुख्याने या सर्व शाळांमध्ये आता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना एकाच छताखाली सलग आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पिंक रूमची निर्मितीही या शाळांमधून केली जाणार आहे. प्रत्येक शाळेत / शुद्ध पिण्याचे पाणी आणि आधुनिक स्वच्छतागृहांची सुविधाही असणार आहे. जिल्ह्यातून एका शाळेची निवड क्रीडा प्रबोधिनी म्हणून करून तिथे खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या शाळांची झाली निवड धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि शिक्षकांच्या निष्ठेमुळे जिल्ह्यातील खालील शाळांची या निवड झाली आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशेगाव ता. धाराशिव, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, ता. वाशी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होर्टी, ता. तुळजापूर, जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला खामसवाडी, ता. कळंब, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला ईट, ता. भूम, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कसबे तडवळे, ता. धाराशिव, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला, शिराढोण, ता. कळंब
मे महिन्यात श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन- पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (ंप्रतिनिधी)- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात या संदर्भात आज आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील,छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाने सुमारे 1865 कोटी रुपयांच्या श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.त्यापैकी 421 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या 105 खाजगी मालमत्तांपैकी सुमारे 75 टक्के मालमत्ता धारकांशी शासनाने यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत.त्यामुळे उर्वरित विकास कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर,तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य व दिव्य स्वरूपात व्हावा,यासाठी वेळेचे काटेकोर पालन करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत रामदरा तलावाजवळ विकसित होणाऱ्या शिवसृष्टी उद्यानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच मंदिर परिसरातील आठ जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आठ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप यांसारख्या कामांबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने शहरासाठी स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून सुनियोजित विकास साधण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत समिती स्थापन करण्याचे निर्देशछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी समाजात नितांत आदर आहे.त्यांच्या प्रेरणादायी स्मारकांची उभारणी व्हावी,मात्र काही ठिकाणी शासनाचे निकष न पाळता अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असून त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर,अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करावी आणि इच्छुकांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पुतळे उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील आणि महापुरुषांचा सन्मानही राखला जाईल,असे त्यांनी सांगितले. बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा,मृद व जलसंधारण विभाग,नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या कामकाजाचा अद्ययावत आढावा सादर केला.तसेच बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.
मतदान झाले हाय-टेक; पुद्दुचेरीतील मतदान केंद्रावर ‘नीला’रोबोने केले मतदारांचे स्वागत
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना पुद्दुचेरीमध्ये तंत्रज्ञानाचा एक आगळावेगळा आविष्कार पाहायला मिळाला. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी नीला (Nila) नावाचा ह्युमनॉइड रोबो मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले होते. साडी परिधान केलेल्या या रोबोने मतदारांचे स्वागत केल्यामुळे मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष वेधले गेले. काय आहे नीला रोबोची वैशिष्ट्ये? पुद्दुचेरीतील व्ही.ओ.सी. सरकारी […]
Video – I Parth Ajit Pawar…पार्थ पवार यांनी इंग्रजीत घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पार्थ पवार यांनी ही शपथ इंग्रजीत भाषेत घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. View this post on Instagram A post shared by Saamana (@saamana_online) अजित […]
७ दिवसांत ‘तिसरी भाषा’शिकवण्यास सुरुवात करा, CBSE चे शाळांना आदेश
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशातील आपल्या सर्व संलग्न शाळांना पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतानाही येत्या सात दिवसांत तिसरी भाषा शिकवण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाने हा तातडीचा निर्णय घेतला असून, यामुळे शाळा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, इयत्ता सहावी ते […]
अंत्रोळी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण अंत्रोळी – (समीर शेख ) जय हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त येथील अंत्रोळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि. ८ एप्रिल) मोठ्या उत्साहात पार पडले. पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी [...]
Jalna News वडिलांना करायचे होते दुसरे लग्न, मुलाने रागच्या भरात कुऱ्हाडीने केले सपासप वार
पोटच्या मुलानेच बापाची कुर्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज ९ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (४५) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती […]
Ratnagiri News –‘ऑपरेशन क्लीन-सी’चा धडाका; एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी आणखी एक नौका जप्त
रत्नागिरीच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने आपली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. बुधवारी (08 एप्रिल 2026) मध्यरात्री मिरकरवाडा बंदरात कारवाई करत, पथकाने एलईडी (LED) दिवे लावून मासेमारी करणाऱ्या ‘हलीमा मरीयम’ नावाच्या मच्छिमार नौकेला पकडले. मिरकरवाडा समुद्र क्षेत्रात काही नौका नियमांचे उल्लंघन करून एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी करत असल्याची […]
ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा जामीन अर्ज फेटाळला
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे.बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दि.7 एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. दि.26 मार्च रोजी थिटे याच्यावर परंडा पोलिस ठाण्यात ॲट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन आरोपी फरार आहे. या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे.त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेता शेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान केले. इतकेच नव्हे, तर “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर दि.26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी परंडा जिल्ह्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोगता ॲड.गाडे,ॲड.निकाळजे, ॲड.बी.बनसोडे यांनी यूक्तीवाद केला.
हिंदुस्थान क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आपल्या जीवनातील सर्वात भीषण संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराजला त्यावेळी आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहोत याची कल्पना होती, पण देशासाठी खेळण्याची जिद्द मोठी होती. विश्वचषकानंतर जेव्हा त्याची प्रकृती अधिक खालावली, तेव्हा डॉक्टरांनी दिलेला इशारा ऐकून तो […]
Ratnagiri News –देवरुख पोलिसांची धडक कामगिरी; आंबा घाटातील दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत अटक
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दख्खन ते आंबा घाट दरम्यान गाडी अडवून, चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना जेरबंद केले असून, फरार असलेल्या तीन जणांचा कसून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या बोलेरो […]
दुशेरेच्या इंद्रायणीचा दरवळ देशभर! दुशेरे ( विकास जाधव ): कराड तालुक्यातील दुशेरे गावाने पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत इंद्रायणी भाताच्या माध्यमातून नवे यश मिळवले आहे. कृष्णा नदीकाठच्या सुपीक भूमीत पिकवला जाणारा हा [...]
महाबळेश्वर तालुक्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा थरार प्रतापगड ( जितेंद्र कारंडे ) -महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात दुपारच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय राघू जानू कदम यांच्या [...]
डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा सत्कार
तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा उच्च शिक्षणासाठी पीजी साठी प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी , आशा पर्यवेक्षिका स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
मंथन परीक्षेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे यश
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आराध्या संतोष भातभागे,ञिशा सागर लाड,श्रृतीका सतीश रोहीदास,सानिका प्रदीप भोरे,श्रेया जयवंत वाघमारे,आरोही हनुमंत काळे,जन्नत अब्बास शेख, स्वरा विठ्ठल पवार या विद्यार्थिनींनी मंथन परीक्षेत यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थीनीना सुशिल क्षिरसागर, सुषमा माने यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात उद्देशिका देवून विजय गायकवाड सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळात आयोजन केले आहे. धाराशिव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 08 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समता सप्ताहाचे उद्दघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक इतिहासाचे अभ्यासक विजय गायकवाड यांचा संविधान उद्देशिका देवून जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जात पडताळणी सचिव बलभीम शिंदे, सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कर्मचारीवृंद उपस्थित होते. या सन्मानाबद्दल गायकवाड यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार
परंडा (प्रतिनिधी)- बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भाऊसाहेब खरसडे यांची धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी निवड झाल्याबद्दल परंडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील शासकीय विश्राम गृह येथे सत्कार करून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. संदीप खोसे पाटील,नगर परिषद सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती राहुल बनसोडे,शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष नसीर शहावर्फीवाले ,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष नंदू शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाशा भाई आदी उपस्थित होते.
सीईओ प्रियंवदा म्हाडदळकर यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने,धाराशिव जि. प. च्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना शिक्षकांच्या सामूहिक विविध प्रलंबित प्रश्नांबद्दल माहिती करुन देऊन त्यावर थोडक्यात चर्चा करण्यात आली. पदवीधर स्वेच्छेने पदावनत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी. पदोन्नती( प्रमोशन) करताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अगोदर संधी देऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नैसर्गिक न्यायाने प्रक्रिया राबवावी. अशा विविध मागण्या राज्यउपाध्यक्ष श्रलालासाहेब मगर व बशीर तांबोळी यांनी सविस्तर मांडल्या. यावर सगळ्या मागण्याचा लवकर विचार करून,यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. भेटीच्यावेळी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मा. शिक्षणाधिकारी खंदारे साहेब, मापारी साहेब, पिकवने साहेब यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.. आढावा बैठक संपल्यानंतर मा. शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पदावनत प्रकियेबाबत चर्चा करुन लगेच पत्र काढत असल्याचे सांगितले व तसे पत्र ही काल निगर्मित करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हा अध्यक्ष बशीर तांबोळी, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सरचिटणीस अविनाश मोकशे*श्री कैलास मोहिते ,राज्य कार्यकारिणी सदस्य सविताताई पांढरे,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी साखरे,नप जिल्हा अध्यक्ष पवार सर,महिला आघाडी प्रमुख,अनिषा ताई कदम,जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन भांडे सर,शाहू पतसंस्था चेअरमन सुरेश भालेराव,कळंब तालुका अध्यक्ष महेंद्र रणदिवे मिलिंद धावारे,केंद्रप्रमुख जगदीश जाकते, तानाजी व्हनकळस, , इस्माईल शेख, हाशम शेख,जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे,परंडा तालुकाध्यक्ष श्री प्रफुल्ल झाडबुके सर, जिल्हा उपाध्यक्ष बब्रुवाहन भोसले,श्रीमती तबसूम बागवान,भोसले सर,धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे वाशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने,भूम तालुकाध्यक्ष युवराज पिंगळे, लोहारा तालुकाध्यक्ष श्री घोडके, श्री चंदनशिवे दाजी,रणदिवे सर,दिपक ठोंबरे सर,मारुती काळे ,इलाही बागवान,मोहन नागटिळक,दिनेश पेठे,हनुमंत माने सर,लक्ष्मण घोडके,महेश अनपट,भालेराव सर, मोहन लष्करे,तुळजापूर तालुका अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शेखू जेटीथोर, दयानंद जेटीथोर,विठ्ठल जेटीथोर, बिलाल सौदागर, विठ्ठल भोसले, दत्तात्रय लोहार, गोविंद बाचेवाद , विनायक संकपाळ,ज्ञानेश्वर ढोले, श्री मलंग सर, लक्ष्मण घोडके, श्रीहरी बिडवे,शिवाजी निंबाळकर, सुधीर पवार आणि जिल्हाभरातून आलेले बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार, जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. जंगम, येडशी बीटचे विस्तार अधिकारी प्रकाश पारवे, विस्तार अधिकारी चौरे, सौ. उषाताई सर्जे, आळणी गावचे सरपंच प्रमोद काका वीर, उपसरपंच कृष्णा गाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी बाबासाहेब पौळ, उपाध्यक्षा सौ. अफसाना सलीम शेख, केंद्रप्रमुख महेश अनपट, पोलीस पाटील प्रमोद माळी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोकाशी, लिटल स्टार शाळेचे दिवाणे सर, तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इतबारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर एमबीबीएस डॉक्टर झाल्याबद्दल डॉ. दिव्या प्रशांत पापा वीर तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थिनी श्रद्धा गणेश निंबाळकर हिचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. अर्चनाताई पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सेमी इंग्रजी शिक्षण, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही बंद ठेवण्याची सवय, आरोग्य व शिक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. शिक्षणाधिकारी डॉ. खंदारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलनाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वागतगीत, गणेश वंदना, खंडोबा गीत, गोरोबा कुंभार जीवनचरित्र, कोळीगीत, विनोदी नृत्य, लावणी, भारूड, मंगळागौर, दांडिया, नारीशक्ती, मराठा सैन्य, शिवकन्या, तसेच विविध हिंदी व मराठी गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रम रंगतदार झाला. काठी न घोंगड, फुलवंती, नवराई माझी लाडाची, कृष्ण मुरारी, खानदेशी ठेका यांसारख्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. एकूणच, आळणी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण असे संस्मरणीय ठरले.
Satara political news |साताऱ्यात राजकीय खलबतं? मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजेंमध्ये अर्धा तास चर्चा
गिरीश महाजन यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट सातारा – राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन महाजन यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास [...]
कोकणच्या प्रवाशांसाठी 4 एसी विशेष ट्रेन; मध्य रेल्वेकडून अतिरिक्त फेऱ्यांची घोषणा
उन्हाळी सुट्टीत चाकरमान्यांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वे कोकणासाठी 4 अतिरिक्त एसी विशेष ट्रेन सुरू करणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावतील. अतिरिक्त ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरम्यान्यांना दिलासा मिळणार आहे. सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी गाडी क्रमांक 01129 एसी विशेष 10 एप्रिल 2026 आणि 14 एप्रिल 2026 रोजी सीएसएमटी येथून 00.20 […]
संसार सांभाळत सुरैया देसाई राज्यात प्रथम बेनिक्रे (ता. कागल) – येथील सुरेया साहेबलाल देसाई यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने [...]
आखातात अमेरिका – इस्रायल, इराण संघर्षाच्या अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, हिंदुलस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने (IGoM) बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-२ येथे आपल्या तिसऱ्या बैठकीत हिंदुस्थानच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी आखातात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनीतून किती हिंदुस्थानी जहाजे पार झाली याची माहिती देखील देण्यात आली. यावेळी मंत्रिगटाला माहिती […]
कोल्हापूरात शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग जाहीर कोल्हापूर: विदर्भातून गोव्यालाजाणारा बहुचर्चित ‘शक्तीपीठ महामार्ग गेली काही वर्षे जमीनबाधित शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे रखडला आहे. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने या मार्गाचे रेखांकन बदलण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग होणारच, हे आता [...]
सावर्डे बाजारपेठेत अपघाताच्या कारणावरून एका 20 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाडीच्या नुकसानीची रक्कम मिळेपर्यंत तरुणाला सोडणार नाही, अशी धमकी देत संशयितांनी नातेवाईकांकडून आतापर्यंत हजारो रुपये उकळले असून आणखी सव्वा लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी मुंबईतील चौघांविरुद्ध विविध […]
ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात पोलीस गाडी जप्त करू शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा निर्णय
चालक केवळ मद्यधुंद अवस्थेत आहे या कारणावरून पोलीस गाडी ताब्यात घेऊ शकत किंवा जप्त करू शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ई.व्ही वेणुगोपाल यांनी एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तर त्याला गाडी चालवण्यापासून रोखू शकता, पण वाहन जप्त […]
Indian embassy Tehran alert |इराण सोडा! भारतीय दूतावासाचा नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचा इशारा
इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला भारताने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या स्वतःच्या नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची सूचना केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक दिशानिर्देश जारी केले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. क्षेत्रातील सुरक्षास्थितीची अनिश्चितता [...]
गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय- सचिव भाग्यश्री पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत शासकीय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिरे व विविध विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. 9 एप्रिल रोजी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील पायल अतुल नन्नावरे, आदित्य दीपक कदम, स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग, निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसेच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी 45 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांचेही मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, अतुल मुक्ते तसेच लिपिक संकेत जगताप व संकेत भोसले यांनी व परिश्रम घेतले.
ईटमध्ये रसिकांना मिळणार नृत्य अविष्काराची मेजवानी
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते आज आयोजित “भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या“ लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या भव्य स्पर्धेमुळे राज्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या नृत्य स्पर्धेचे स्वरूप अत्यंत व्यापक असून यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नामवंत स्पर्धक आपला कलाविष्कार सादर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांच्या वतीने अत्यंत आकर्षक आणि मोठ्या स्वरूपाची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुप्त गुणांना वाव देण्याचा संकल्प आयोजकांनी यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये विशेष करून ईटच्या मातीमधून उच्च पदावर कार्यरत असलेले 125 मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, लष्करी व निमलष्करी सेवा, विधी व न्याय, राजपत्रित अधिकारी, उच्च विद्या विभूषित, तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांना “ईट रत्न“ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बाल गट समूह नृत्य- प्रथम 31000, द्वितीय 21000, तृतीय 11000, उत्तेजनार्थ 7000, प्रौढ गट समूह नृत्य स्पर्धा- प्रथम 51000, द्वितीय 31000, तृतीय 21000, उत्तेजनार्थ 11000, बाल गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा- प्रथम 21000, द्वितीय 11000, तृतीय 7000, उत्तेजनार्थ 5000, प्रौढ गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा- प्रथम 25000, द्वितीय 21000, तृतीय 11000, उत्तेजनार्थ 7000 वरील प्रमाणे स्पर्धकांना बक्षीस हे मिळणार आहेत. ही स्पर्धा 11 एप्रिल 2026 व 12 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईट येथे भरणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, विशाल ढगे, सुनील भोईटे, युवराज हुंबे यांसह आयोजक प्रवीण देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसला धक्का, 2 नगरसेवकांचा भाजप पक्ष प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सिद्धार्थ अंगुल बनसोडे, नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी मुंबई येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दोन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे धाराशिव शहराध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक अमित शिंदे, न. प. उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक अभिजीत पतंगे, माजी नगरसेवक दत्ता पेठे उपस्थित होते. धाराशिव नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असुन 41 पैकी 22 नगरसेवक भाजपचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना उबाठा 7, काँग्रेस 3 व एमआयएम 1 असे संख्याबळ होते.
तुळजाभवानी मंदिरातील ‘भवानीशंकर सभा मंडप’ साठी लागणारे खांब निर्मिती अंतिम टप्प्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील ‘भवानीशंकर सभा मंडप’ साठी लागणाऱ्या दगडी खांब निर्माण करणे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या प्रगतीचा सविस्तर आढावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, अभियंता प्रवीण अमृतराव, सहसंबंधित कारागीर ठेकेदार उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील भवानी शंकर मंडप पाटील काही खांबांना चिरे गेल्याने तिथे नवीन तयार केलेले खांब तसेच दुरुस्ती केलेले काम उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या वैभवात भर घालणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारंपरिक शैलीत भव्य खांबांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 39 भव्य खांबांची निर्मिती सुरू असून, त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथून आणलेल्या जवळपास 1,600 घनफूट काळ्या पाषाणाचा वापर करण्यात येत आहे. मंदिराचे मूळ प्राचीन स्वरूप अबाधित राखत, पारंपरिक आणि ऐतिहासिक स्थापत्यशैलीतच या खांबांची कोरीव रचना केली जात आहे. या कामात पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड दिली जात आहे. या कामात प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा आणि आधुनिक तांत्रिक कौशल्य यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. खांबांवरील कोरीव नक्षीकाम मंदिराच्या सौंदर्यात नवी भर घालणारे ठरणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेशातून आणले कुशल कारागीर हे खांब निर्मितीसाठी निष्णात कारागिर अथक परिश्रम घेत आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील सुमारे 12 कुशल कारागीर दिवसरात्र मेहनत घेत असून प्रत्येक खांब बारकाईने साकारला जात आहे. सदरील खांब लवकरच बसवणीस सुरुवात होणार आहे. खांबांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे कोरीव खांब ‘भवानीशंकर सभा मंडप’मध्ये बसवण्याचे काम सुरू होणार आहे. भवानी शंकर मंडप भाविकांसाठी आकर्षणाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे. हे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार असून, भवानीशंकर सभा मंडप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
पारधी समाजातील कुटुंबाचे घर जळून खाक; मदतीचा हात पुढे
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सामनगाव येथे पारधी समाजातील एका कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले असून मीराबाई काळे यांचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील कपडे, धान्य, संसारोपयोगी साहित्य तसेच लहान मुलांची शालेय दप्तरदेखील जळून नष्ट झाली. घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मिळताच सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख धाराशिव अर्चनाताई दराडे यांनी व काही महिला कार्यकर्त्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पीडित कुटुंबाला किराणा साहित्य, धान्य, साड्या, मुलांसाठी दप्तर व खाऊ देत तातडीची मदत केली. दरम्यान, सहा महिन्यांच्या नातीला वाचवताना मीराबाई काळे या गंभीररीत्या भाजल्या असून त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. अर्चनाताई दराडे यांनी तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये फोन करून ॲम्बुलन्स बोलवण्यात आली व त्यांना तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पत्र्याच्या शेडसाठी आर्थिक मदत मिळवून देत उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.12) संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. धाराशिव शहरातील नगर परिषदनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी स. 11 वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्युिशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम, रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाला सुरुवात : आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावा,यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” हाती घेण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल ते 25 या कालावधीत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.खुल्या प्रवर्गातील ज्या समाजघटकांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती,पटेल,राजपूत, राजपुरोहित,हिंदू नेपाळी,बनिया, कम्मा,कायस्थ,अय्यंगार,नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी समाजघटकांचा समावेश आहे.या घटकांतील विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक व शेतकरी यांच्यासाठी संस्थेमार्फत विविध विकासाभिमुख योजना उपलब्ध आहेत. सर्वेक्षणाच्या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित कुटुंबांशी थेट संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था,संघटना व मंडळांकडूनही आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित घटकांतील व्यक्ती,संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची माहिती नोंदवावी आणि उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी : चिन्मय कुलकर्णी,जिल्हा व्यवस्थापक, अमृत,धाराशिव मो. 7391065469 यांचेशी संपर्क साधावा.
घरगुती गॅसची 98 टक्के बुकिंग, कुठलीही टंचाई नसल्याची केंद्र सरकारची माहिती
पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील एलपीजी पुरवठ्याबाबत दिलासादायक माहिती दिली असून, कोणत्याही ठिकाणी गॅस टंचाई (ड्राय आऊट) झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी पुरवठा स्थिर असून मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कालच देशभरात 51 लाखांहून अधिक एलपीजी रिफिल्स वितरित करण्यात आल्या. ऑनलाइन बुकिंगचा दर 98 टक्क्यांपर्यंत […]
Iran internet blackout |इराण-अमेरिका युद्धविराम ; पण इराणमधील इंटरनेट बंदी हटणार का?
इराणमध्ये 912 तासांपासून इंटरनेट बंद; इराण आणि अमेरिका पुढील २ आठवड्यांसाठी युद्धविरामावर सहमत झाले आहेत. परंतु याचा फायदा सर्वसामान्य इराणी जनतेला मिळणार का?, इराणमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू [...]
Tavandi Ghat accident |तवंदी घाटात थरार! कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; भीषण अपघातात दोघे गंभीर
तवंदी घाटात भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला जोरदार धडक कोल्हापूर : तबंदी तवंदी घाटात कंटेनरची मालवाहू ट्रकला धडक बसल्याने ट दोघेजण गंभीर झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या ने सुमारास घडली. या अपघातामध्ये का वाहनांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर दोन्हीही [...]
गोवा, देवगड येथील एलईडी नौकांवर मालवण समुद्रात कारवाई
मालवण | प्रतिनिधी मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मालवण समुद्रात संयुक्त गस्तीत LED मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्यामुळे अवैध LED मासेमारीविरुद्ध मस्त्य विभागाची [...]
Assam Poll एका निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू
आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरुवारी आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात एका निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देबेन होरो (४५) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते नदुआर विधानसभा मतदारसंघात दुसरे मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘होरो यांची नियुक्ती डोलापाणी एल.पी. स्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक २३० वर करण्यात आली होती. आज सकाळी ते […]
अंबाबाई मंदिर परिसरात आईला मारहाण कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईलाच मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी घडली. मारहाणीत पद्मी शरद नरवडे (वय ५०, रा. पाटील [...]
वाहतूक नियम पाळणे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच; हायकोर्टाने नुकसानभरपाईत केली वाढ
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांनाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावरील रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट मत व्यक्त न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने एका रस्ते अपघात प्रकरणातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी नुकसानभरपाईत वाढ केली. परदेशात नियम पाळणारे हिंदुस्थानी नागरिक मायदेशात नियम का पाळत नाहीत? रस्ता […]
चिपळूणमध्ये पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण, सातारा जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल
चिपळूण शहरातील काविळतळी परिसरातील राहुल गार्डन येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका 29 वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुभम प्रकाश पवार असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात सातारा जिल्ह्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मार्तंडराव पवार (वय […]
“सोळावं वरीस धोक्याचं”, गोंधळलेल्या स्थितीत स्वभान हवे
अवंतिका ठाकरे यांचा खास लेख – सावंतवाडी “सोळावं वरीस धोक्याचं”, हे ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातील जगदीश खेबुडकर लिखित वसंत पवार यांचे सुमधुर संगीत व सुलोचनाताई चव्हाण यांनी गायलेलं गीत ऐकण्याची संधी मिळाली, त्याच वेळी मला आजच्या आमच्या पिढीच्या वेगळ्या तळमळीची तसेच तगमगीची जाणीव झाली.मी २२ वर्षांची. २२ व्या वर्षीचं आयुष्य म्हणजे एक गोंधळलेलं परंतु [...]
धाराशिवमध्ये गॅस वितरकाकडून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात निघाला भलताच ट्विस्ट
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एका गॅस वितरकाने एचपी कंपनीच्या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनंतर मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काटी सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी एचपी कंपनीच्या आढावा बैठकीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
IPL 2026 मध्ये बुधवारी (08 एप्रिल 2026) दिल्लीकरांना थरारक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने (41*) धाव घेण्यास नकार दिला आणि स्वतः सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. डेव्हिड मिलर चौकार किंवा षटकार ठोकणार, अशी चाहत्यांसह संघाला अपेक्षा होती. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला स्लो बाऊन्सर मिलरला खेळता आला नाही आणि […]
यांत्रिक बिघाडामुळे ड्रोन शेजारील मालमत्तेत पडणे हा ‘फौजदारी गुन्हा’होत नाही- कर्नाटक उच्च न्यायालय
बेंगळुरूस्थित एका ड्रोन संशोधन कंपनीच्या चाचणी दरम्यान, ड्रोन कंपनीच्या आवाराबाहेर जाऊन खासगी मालमत्तेत शिरल्यामुळे दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच रद्द केला आहे. ‘मेसर्स न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ (M/s NewSpace Research and Technologies Private Limited) या कंपनीने भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२५ (इतरांच्या जीवनास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस […]
अत्यंत निराशाजनक, AI व्हिडीओवरून काँग्रेस खासदार शशी थरुर यांची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या डीपफेक व्हिडिओंबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, त्यांच्या अनेक डीपफेक व्हिडिओंचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. थरूर यांनी स्पष्ट केले की, या व्हिडिओंमध्ये त्यांच्या जुन्या मुलाखतींच्या खऱ्या फुटेजचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) […]
इराण मोहिमेवरून ‘नाटो’मध्ये फूट, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, “आम्हाला गरज होती तेव्हा…”
गेल्या 40 दिवसांपासून आखातात सुरू असलेल्या युद्ध अखेर काही काळासाठी थांबले. बुधवारी इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. युद्धविराम झाल्यानंतरही अंतिम करार होईपर्यंत अमेरिकेचे सैन्य इंचभरही मागे हटणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान त्यांनी ‘नाटो’ देशांवरही निशाणा साधत या संघटनेतून बाहेर पडण्याचे आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेतही दिले. जगातील सर्वात मोठी […]

28 C