SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

सैन्याला ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सर्वाधिक गरज; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सैन्याला सर्वाधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या काळात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांची सैन्य दलाला अत्यंत गरज आहे. चीन आणि पाकिस्तानने स्वतःचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र दल स्थापन केले आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून आपल्या सैन्याकडेही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे असणे गरजेचे आहे, तसेच ड्रोन […]

सामना 13 Jan 2026 5:09 pm

Sangli : सांगलीत तरुणाचा रात्री खून, चौघे संशयित

शामरावनगरमध्ये खुनाची गंभीर घटना सांगली : शामरावनगर येथे गुंह चेतन आप्पासाहेब तांदळे (वय १८, रा. रामनगर, पहिली गल्ली) याचा खून केल्याप्रकरणी संशयित शुभम चंद्रकांत वाघमोडे (वय १८, रा. महादेव कॉलनी, शामरावनगर) याला सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे [...]

तरुण भारत 13 Jan 2026 5:07 pm

साप चावल्यानंतर चालकाने केले असे कृत्य, उडाला एकच गोंधळ; व्हिडीओ होतोय व्हायरल

मथुरा जनपदमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ईरिक्षा चालकाला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर या चालकाने चक्क तो साप उचलून जॅकेटमध्ये घालून जिल्हा रुग्णालयात पोहोचला. ज्यावेळी त्याने जॅकेट खोलले त्यावेळी एकच खळबळ उडाली आणि रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ईरिक्षा चालकाला सापाने दंश केला. […]

सामना 13 Jan 2026 4:57 pm

शेतकऱ्याच्या शेतातील पहिले द्राक्ष फळ श्री तुळजाभवानी चरणी

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मोर्डा येथील शेतकऱ्याने द्राक्ष मळ्यातील पहिला द्राक्ष घड देवीचरणी मंगळवार दिनांक 13 रोजी अर्पण केला. श्री तुळजाभवानी मातेच्या.भक्तात प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने असून शेतकरी आपल्या शेतातून आलेला पहिला शेतमाल धान्य, फळे, फुले प्रथम देवीच्या वाहुन मगच ते खाण्यास व विक्री करतात. या पार श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील शेतकरी गौतम आबा खताळ यांनी त्यांच्या शेतात आलेल्या द्राक्षबागेतील पहिल्या तोडणीतील द्राक्षे श्री तुळजाभवानी मंदिरात आणून देवीस वाहिले.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:56 pm

जुगार अड्ड्यावर छापा, बुकी मालक ताब्यात

धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढोकी पोलिसांना कसबे तडवळे येथील बस स्टॅडजवळील चिंचेच्या झाडाखाली काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी पोलिसांनी छापा टाकला असता फरीद तुरब खान (रा. कसबे तडवळे) हा कल्याण मटका जुगार चालवताना दिसून आला. यावेळी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच अधिक चौकशी केली असता बुक्की मालक महेश यादव मला कमिशन देतात, त्यामुळे मी येथे कल्याण मटका जुगार चालवत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. यानंतर ढोकी पोलिसांनी बुकी मालक महेश यादव व बुकी चालवणाऱ्या फरीद तुरब खानवर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांनी केली.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:55 pm

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षणक्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे- प्रो.डॉ. संदीप टेकाळे

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहामध्ये जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणातील नवीन प्रवाह” या विषयावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथील विभागाचे विभागप्रमुख प्रो.डॉ.संदीप टेकाळे यांचे एक दिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. संदीप टेकाळे (HOD, AIDS, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमाशी होणारा समन्वय, तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी क्षेत्रात कौशल्ये विकसित करून नव्या संधी कशा साधाव्यात? यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जीवन पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तंत्रज्ञानामुळे झपाट्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत नवकल्पना आवश्यक असल्याचे नमूद केले. कृत्रिम बुद्धिमात ही सर्व काही देत असेल तरी ती मानवास मूल्य देण्याइतके सक्षम नाही असे प्रतिपादन केले. ज्या ठिकाणी विकास झाला आहे त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने होतो. मूल्याची जोपासना करणे गरजेचे आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानास मूल्याची जोड द्यावी. असे आव्हान त्यांनी केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सज्जनराव साळुंखे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती पी. बैनवाड, विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांनी केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांची सखोल माहिती मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास डॉ.बापुराव पवार , डॉ. नेताजी काळे, संस्कृतिक विभागप्रमुख डॉ.मंत्री आडे, प्रा. बालाजी कऱ्हाडे , प्रा.सुदर्शन गुरव , डॉ. आबासाहेब गायकवाड, प्रा जे. बी. क्षीरसागर, प्रा सतीश वागतकर प्रा.राऊत सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश एकदंत यांनी केले सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:55 pm

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा महामार्ग

धाराशिव- महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतांश लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे.पेरणीपासून ते कापणी,मळणी आणि शेतीमाल बाजारात पोहोचविण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला सक्षम व सोयीस्कर पायाभूत सुविधांची गरज असते. यामध्ये शेतापर्यंत जाण्यासाठी असणारे शेत / पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आजही अनेक गावांमध्ये हे रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झालेले, निकृष्ट दर्जाचे किंवा पूर्णतः वापरण्यायोग्य नसल्याचे वास्तव आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला तरी योग्य रस्त्यांच्या अभावामुळे त्या यंत्रांचा प्रभावी वापर करणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेत / पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण,अतिक्रमणमुक्ती आणि दर्जेदार बांधकामासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र योजना जाहीर केली आहे,ती म्हणजे “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना”. योजनेची गरज आणि पार्श्वभूमी शेत / पाणंद रस्ते हे सहसा मुख्य रस्ते योजनांमध्ये समाविष्ट नसतात. त्यामुळे त्यांची दुरवस्था दीर्घकाळ दुर्लक्षित राहते. अनेक ठिकाणी या रस्त्यांवर अतिक्रमण झालेले असून पावसाळ्यात ते चिखलमय, तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य असते. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ,खर्च आणि श्रम वाढतात.ही समस्या लक्षात घेऊन दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ग्रामीण भागातील शेत / पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.या निर्णयातूनच “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना” अस्तित्वात आली. ही योजना केवळ रस्ते बांधण्यापुरती मर्यादित नसून,ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारी आहे.पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे सोपी,सुलभ आणि प्रभावी कार्यपद्धतीची आहे.अतिक्रमणमुक्त आणि बारमाही वापरण्यायोग्य रस्ते गुणवत्तेवर विशेष भर आणि दोष निवारण कालावधीची तरतूद आणि कार्यान्वयीन यंत्रणा या योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे विविध यंत्रणांमार्फत करता येणार आहेत.त्यामध्ये ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग,वन विभाग (ज्या ठिकाणी वनजमीन आहे तेथे) तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा समावेश आहे.त्यामुळे स्थानिक गरजेनुसार योग्य यंत्रणेमार्फत कामे करणे शक्य होणार आहे. शेत / पाणंद रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार अधिकार देण्यात आले आहेत.वनजमिनीच्या बाबतीत वन विभागामार्फत मान्यता देण्यात येणार आहे.प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य सचिव असलेल्या उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.यामुळे निर्णयप्रक्रिया वेगवान होणार आहे. निविदा प्रक्रिया व देयके 25 कि.मी. लांबीचा क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या कंत्राटदारांनाच निविदेत सहभागी होता येणार आहे.काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक यंत्रणेने प्रमाणित केलेली देयके उपविभागीय अधिकारी अदा करणार आहेत.निधीची उपलब्धता बहुआयामी स्रोत- या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडून शासनाकडून अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे.याशिवाय निधी,विविध योजना व अनुदाने यांचे अभिसरण करून निधी उभारण्याची मुभा देण्यात आली आहे.15 वा वित्त आयोग, खासदार/आमदार निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी,ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न, पेसा निधी,ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम,भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना अशा अनेक स्रोतांचा प्रभावी वापर करण्याची संधी या योजनेत उपलब्ध आहे. अतिक्रमणमुक्ती कठोर पण आवश्यक निर्णय गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेल्या शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी स्पष्ट व कठोर कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांनी 7 दिवसांची नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शासन स्तरावरून अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.या प्रक्रियेत पोलीस बंदोबस्तासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही,ही बाब विशेष महत्त्वाची आहे.गुणवत्ता,पर्यावरण आणि शाश्वतता या योजनेत रस्त्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात आला आहे.खडी,मुरूम यांची तपासणी, अनिवार्य करण्यात आले आहे.शेत / पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करणे बंधनकारक असून यामुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. ग्रामपंचायत,महसूल व पोलीस यंत्रणेची जबाबदारी योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,महसूल यंत्रणा आणि पोलीस विभाग यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी रस्त्यांचा आराखडा तयार करणे,महसूल यंत्रणेने अतिक्रमणमुक्ती व समन्वय साधणे,पोलीस विभागाने आवश्यक तेथे तात्काळ मदत उपलब्ध करून देणे या त्रिसूत्री समन्वयामुळे योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. समित्यांची भूमिका आणि नियोजन जिल्हास्तरीय व विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांमार्फत योजनेचा आढावा,निधी संकलन,अडचणींचे निराकरण आणि कामांच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यात येणार आहे.दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेणे बंधनकारक आहे. “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना”ही केवळ पायाभूत सुविधा विकासाची योजना नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक,सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरणाचा पाया आहे.शेतापर्यंत पोहोचणारे दर्जेदार,अतिक्रमणमुक्त आणि बारमाही रस्ते उपलब्ध झाल्यास शेतीचा खर्च कमी होईल,उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा बाजाराशी थेट संपर्क सुलभ होईल.ही योजना यशस्वीपणे राबविली गेल्यास ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि खऱ्या अर्थाने “बळीराजा” सशक्त होण्यास मदत होणार आहे. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:54 pm

प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवारी रा.गे.शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना नुकताच ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026 प्राप्त झाला. फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर महाराष्ट्र राज्य यांनी पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय परिसंवाद विकसित भारत पारंपारिक ज्ञान आणि शाश्वत विकास शिक्षकांची भूमिका हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चंदनशिवे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे गुरुवर्य प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे,मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथील सचिव सुनील चंदनशिवे, कृषिमंत्र्याचे आवर सचिव अंबादास चंदनशिवे, बीड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ शंकर अंभोरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सिनेट सदस्य प्रोफेसर प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे परंडा येथील महाविद्यालयातील कनिष्ठ कनिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मित्र परिवारांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:53 pm

डॉ. आंबेडकर विचारमंचचे राजमाता जिजाऊंना अभिवादन

धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने धाराशिव येथील जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र धावारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांचा विजय असो, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रा. रवि सुरवसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड, राजेंद्र धावारे, एम.जी. पवार, सी.के. मस्के, विकास काकडे, अमोल गडबडे, ॲड. अजित कांबळे, प्रा. अंबादास कलासरे इत्यादींची उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:53 pm

जाणीव संघटनेचा 19 जानेवारीला वाशी तहसीलवर भव्य मोर्चा

वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, गायरानधारक तसेच निराधार घटकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाणीव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी वाशी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये दिव्यांगांप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना, एकल महिला व निराधार लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वाशी तालुक्यात सन 1985 पासून दलित, भूमिहीन व आदिवासी समाजातील कुटुंबे पडीत गायरान जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे या कुटुंबांच्या नावे सातबारा नोंद करून पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणीही मोर्चामार्फत करण्यात येणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनांसाठी लागू असलेली 21 हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न अट रद्द करून ती 60 हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज, वीज बिल व शैक्षणिक फी माफ करावी, मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार प्रलंबित अनुदान वितरित करावे, घरकुल व घरपरजरीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, तसेच मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले असून, या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नागडे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:52 pm

ZP Election Maharashtra –जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला, 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल

महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आयोगाकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी म्हणजे निकाल लागणार आहे. यामुळे शहरांनंतर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये निवडणुकांचा […]

सामना 13 Jan 2026 4:52 pm

विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील राका गाव येथील व नवोदय जवाहर विद्यालय, लातूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेल्या दलित समाजातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानवी हक्क अभियानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर करून उच्चस्तरीय चौकशीची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर विद्यार्थिनीचा मृत्यू दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी झाल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थिनीचे पालक व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या असून सदर मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे. गळफास घेतल्याचे कारण पुढे करण्यात आले असले, तरी संबंधित कपड्याची लांबी व परिस्थिती पाहता या घटनेत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. जर या प्रकरणात शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही, तर मानवी हक्क अभियानच्या वतीने पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सल्लागार अरुण कुमार माने, जिल्हा सचिव मोहन ताटे, रज्जाक सय्यद, सुग्रीव कांबळे, यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:52 pm

कारखानदारांकडून 23 लाखांची ऊसतोड कामगार कुटुंबाला मदत

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मौ. डोंगरवाडी येथील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासन आणि साखर कारखान्यांकडून सुरुवातीला दुर्लक्ष होत असताना, मानवी हक्क अभियानाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनामुळेच अखेर या प्रकरणाला गती मिळाली. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित यश साखर कारखान्याकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला 23 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली असून हा संपूर्ण न्यायसंघर्षाचा विजय मानवी हक्क अभियानालाच श्रेयस्कर असल्याचे बोलले जात आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी व तीन लहान मुलांचे भवितव्य अंधारात गेले होते. शासन, प्रशासन आणि साखर कारखाने गप्प असताना मानवी हक्क अभियानाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. मृत कामगाराच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासन व कारखान्यांनी घ्यावी, तसेच किमान 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती. या निवेदनानंतरच संबंधित यश साखर कारखान्याला हालचाल करावी लागली. संघटनेच्या दबावामुळे 19 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तसेच ऊसतोड कामगार महेश याने घेतलेली 4 लाख रुपयांची उचल पूर्णतः माफ करण्यात आली. त्यामुळे एकूण 23 लाख रुपयांची मदत कुटुंबाला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवी हक्क अभियानाने ही मदत प्राथमिक असल्याचे सांगत मृत कामगाराच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. संघटना नसती तर हे प्रकरण दडपले गेले असते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या यशाचे सर्व श्रेय मानवी हक्क अभियानाच्या लढाऊ भूमिकेला व प्रशासनावर टाकलेल्या दबावालाच जाते, असे स्पष्ट मत व्यक्त होत आहे. या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सचिव माहन ताटे, समन्वयक अरुणकुमार माने, सय्यद रझाक, सुग्रीव कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:51 pm

राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबववून मोठ्या उत्साहात दि.12 जानेवारी रोजी साजरा करण्यात आली. सकाळपासूनच जिजाऊ चौकात जिजाऊ प्रेमींनी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. जिजाऊ उत्सव पारंपारिक पद्धतीने मात्र मोठ्या जल्लोषात साजरा केल्याने संपूर्ण परिसर जिजाऊंच्या जयघोष यांनी दणाणून गेला होता. धाराशिव येथील जिजाऊ चौकामध्ये मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रणिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष नेहा काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संस्थांनी भाग घेऊन जिजाऊंच्या विचारांना अभिवादन केले. या उत्सवांमध्ये जिजाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक उपक्रम राबवले गेले. यामध्ये रक्तदान आणि वृक्षारोपण याचा समावेश आहे. जिजाऊ चौकात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे आज जन्मलेल्या मुलींना कपडे व मातांना साडी चोळी आदींचे वाटप करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी वेशभूषा काढून शोभायात्रा व वाहन रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:51 pm

अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी व्यापक कृती समिती- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात साकारण्यात येणाऱ्या अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वप्रथम स्वतःचा एक लाख रुपयांचा सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिला आहे. धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशामुळे नगरपालिकेचे 2 कोटी वाचणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारणीच्या अनुषंगाने सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्मारक उभारणीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते स्मारकासाठी व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीची अधिकृत नोंदणी करून बँक खाते काढण्याचेही बैठकीत ठरले. सर्व आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता रहावी यासाठी लोकसहभागाची रक्कम केवळ धनादेशाच्या माध्यमातूनच स्वीकारण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केली. यावेळी दत्ता पेठे ,नगरसेवक विलास लोंढे, बापु पवार, कानिफनाथ देवकुळे, शिवाजी गायकवाड नळदुर्ग, युवराज शिंदे, सचिन लोंढे, दयानंद शिंदे, विजय क्षिरसागर तुळजापुर, विलास रसाळ तेर, विलास रसाळ ढोकीकर, अभिमान पेठे, यशवंत पेठे, रोहिदास झोबाडे, राजु रसाळ, सुमेध क्षिरसागर, किसन पेठे, काकासाहेब पेठे, सतोष पेठे, सतोष मोरे, शंकर मोरे,अंकुश पेठे, शिवाजी क्षिरसागर, दादा पेठे, खंडू चांदणे उपस्थित होते. सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि उद्यानही या स्मारकाच्या ठिकाणी सुसज्ज असे ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे. ज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र ग्रंथसंपदेसह इतरही मौलिक ग्रंथांचा समावेश असणार आहे. त्याबरोबरच एक अद्यावत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही याठिकाणी साकारले जाणार आहे. एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेचे पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यात कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र देखील असणार आहे. तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक सांस्कृतिक सभागृह देखील याठिकाणी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर आकर्षक असे भव्य उद्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा याठिकाणी साकारण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकराज्य जिवंत 13 Jan 2026 4:46 pm

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार करू शकणार प्रचार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून उमेदवार घरोघरी जाऊन सर्वप्रकारे प्रचार करत आहेत. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच आज 13 जानेवारीला प्रचाराचा कालावधी संपत असून गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराचा तोफा संध्याकाळी पाच नंतर थंडावणार आहेत. मात्र आज निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत उमेदवार प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही घरोघरी […]

सामना 13 Jan 2026 4:39 pm

सीमेपलीकडे 8 दहशतवादी तळ सक्रिय; कुरापत केल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ, लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचा पाकला इशारा

हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सीमेपलीकडील दहशतवादी हालचालींबाबत पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. सीमेपलीकडे अद्यापही दहशतवाद्यांचे आठ ट्रेनिंग कॅम्प सक्रिय असून हिंदुस्थानच्या सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तळांवरून कोणतीही कुरापत झाली, तर भारतीय लष्कर त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम जनरल द्विवेदी […]

सामना 13 Jan 2026 4:30 pm

भाजपचं सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्तान करतील, आदित्य ठाकरेंचा मतदारांना सावधगिरीचा इशारा

महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज (13 जानेवारी 2025) प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णामलाई यांच्यावर सडकून टीका केली. भाजपचं जर सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्थान करतील, अशी […]

सामना 13 Jan 2026 4:20 pm

10 मिनिटांत डिलिव्हरी देण्यावर केंद्र सरकारची बंदी; स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिटला मोठे निर्देश

डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. श्रम मंत्रालयाने अत्यंत कमी वेळेत म्हणजेच 10 मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या सुविधेवर आता बंदी घातली आहे. डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला असलेला धोका आणि रस्त्यावरील सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील महत्वाच्या ऑनलाईन […]

सामना 13 Jan 2026 4:08 pm

‘मोनोपॉली’देशाला वेठीस धरू शकते, इंडिगोचे उदाहरण देत राज ठाकरेंचे फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. सिंमेट, स्टील, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, वीजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्यावेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो. आणि ज्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार असतं आणि केंद्राकडून […]

सामना 13 Jan 2026 4:01 pm

Jammu Kashmir –कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन सदस्य […]

सामना 13 Jan 2026 3:55 pm

…तर तुम्हाला शहरात येताही येणार नाही; भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांच्या नेत्यांना भरसभेत सुनावले

छत्रपती संभाजीनगरातील मामा काणे चौकात झालेल्या सभेत भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालक असाल तर आम्ही मालक आहोत, तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत त्यांनी शिरसाट यांना सुनावले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत तुम्ही मुलगा, मुलगी आणि पीएलाच तिकिट देता, इतर कार्यकर्त्यांचा […]

सामना 13 Jan 2026 3:50 pm

भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विकासाचा आभास निर्माण करणार्‍यांना धडा शिकविण्याची वेळ –सुषमा अंधारे

गेल्या २५ वर्षात कोट्यवधीचा निधी आणून विकास केला असा भास निर्माण करुन नांदेडकरांची फसवणूक करणार्‍या व भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसा गोळा करुन जनतेची मते विकत घेण्याचे पाप करणार्‍या मंडळींना नांदेडकरांनी या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून अन्यायाविरुध्द भ्रष्टाचाराविरुध्द लढणार्‍या शिवसेना उमेदवारांची मशाल पेटवून १५ तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा […]

सामना 13 Jan 2026 3:33 pm

सावंतवाडी नगराध्यक्षांचा माजगावच्या सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्यावतीने सन्मान

ओटवणे ।प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांची सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांनी आपला सन्मान केल्याबद्दल सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ यांचे आभार मानले.सावंतवाडीत राजवाडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत [...]

तरुण भारत 13 Jan 2026 3:32 pm

शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत

हिंदुस्थानात मोठ्या संख्येने लोक शाकाहारी आहेत, परंतु यामुळे व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. हे जीवनसत्व लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी१२ हे सामान्यतः प्राण्यांपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये आढळते, परंतु काही शाकाहारी पदार्थ ही कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात. हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, […]

सामना 13 Jan 2026 3:30 pm

शिरोडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

वेंगुर्ले / प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा परबवाडा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हि चोरी १० जानेवारी २०२६ रोजी [...]

तरुण भारत 13 Jan 2026 3:20 pm

दोडामार्ग तालुका शासकीय भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

(साटेली भेडशी प्रतिनिधी) दोडामार्ग तालुका शासकीय भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मे. श्री.विजयादुर्गा ॲग्रो सर्विस साटेली भेडशी येथे सरपंच छाया धर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शासकीय भात खरेदी केंद्र केंद्रप्रमुख भिकाजी गणपत्ये,तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो, साटेली भेडशी माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र(संतोष) भिसे,ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी बोडदे माजी सरपंच तथा शेतकरी फटी नार्वेकर, शेतकरी शिवराम देसाई [...]

तरुण भारत 13 Jan 2026 3:12 pm

भटका कुत्रा चावल्यास भरपाई मिळणार; सुप्रीम कोर्ट सरकारला आदेश देणार

भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला भरपाईबाबत आदेश देण्याच्या तयारीत आहे. कुत्र्याने चावा घेतल्याच्या प्रत्येक घटनेत पीडित व्यक्तीला भरपाई देण्याबाबत सरकारला आदेश देणार आहोत, असे न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. जे लोक कुत्र्यांना खायला देतात, त्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही न्यायालयाने सुनावणीवेळी नमूद केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता […]

सामना 13 Jan 2026 3:06 pm

हिवाळ्यात नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का?

नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाणी महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते आणि मूत्रपिंड आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. परंतु प्रश्न असा उद्भवतो की, हिवाळ्यात नारळ पाणी पिणे आवश्यक आहे का. नारळ पाणी हे साधारणपणे उन्हाळी पेय मानले […]

सामना 13 Jan 2026 3:03 pm

सावंतवाडी उपनगराध्यक्ष ,स्वीकृत नगरसेवक निवड उद्या

सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे श्रद्धाराजे भोसले यांनी हाती घेतल्यानंतर आता उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्या बुधवारी निवड प्रक्रिया पार पडणार असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून ॲड. सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेकडून ॲड.नीता -सावंत कविटकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी [...]

तरुण भारत 13 Jan 2026 2:58 pm

आयब्रो विरळ असतील तर हे उपाय करुन बघा, वाचा

केस आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवतात, तसेच भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्वाची भूमिका बजावतात. जाड आणि सुंदर भुवया चेहरा आकर्षक बनवतात, परंतु कधीकधी, ताणतणाव, हार्मोनल बदल, वारंवार थ्रेडिंग किंवा पौष्टिक कमतरतांमुळे, भुवया विरळ होऊ लागतात. काही लोकांच्या लहानपणापासूनच भुवया विरळ असतात, ज्यामुळे त्या निस्तेज दिसतात. भुवया वाढीसाठी बाजारात अनेक उत्पादने आणि सीरम उपलब्ध आहेत, परंतु त्यातील रसायने […]

सामना 13 Jan 2026 2:50 pm

उत्तम आरोग्यासाठी जेवण्याच्या योग्य वेळा कोणत्या आहेत, जाणून घ्या

योग्य वेळी खाणे हे आरोग्यासाठी पोषणाइतकेच महत्त्वाचे आहे. दिवसा जड जेवण पचण्यास सोपे असते, तर रात्री उशिरा खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात. डॉक्टर लवकर जेवण करण्याची शिफारस करतात. पौष्टिक अन्न खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण चांगला आणि पौष्टिक आहार पोटाशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतो. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्या प्रकारचे अन्न खावे […]

सामना 13 Jan 2026 2:40 pm

रताळे की बटाटा आपल्या आतड्यांसाठी सर्वात उपयुक्त काय आहे?

आपल्या स्वयंपाकघरात बटाटे आणि रताळे दोन्ही असतात. परंतु यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. तर रताळे हे गोड चवीसाठी आणि त्यातील असलेल्या पोषक तत्वांसाठी ओळखले जातात. आपल्या आतड्यांचे आरोग्य केवळ पचनपुरते मर्यादित नाही. आतड्यांचे चांगले आरोग्य थेट रोगप्रतिकारक शक्ती, रक्तातील साखर नियंत्रण, वजन आणि […]

सामना 13 Jan 2026 2:25 pm

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, परवा मोठा ब्लॉक; तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल संपण्याचे नावच घेताना दिसत नाही. आणखी आठवडाभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने बुधवारी आणि गुरुवारी रात्री पुन्हा मोठा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकमुळे दोन दिवसांत तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच गुजरातहून येणाऱ्या काही एक्सप्रेस वसईपर्यंत चालवण्यात येणार […]

सामना 13 Jan 2026 2:18 pm

प्राचार्यांकडून सतत छळ, प्राध्यापिकेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने लिहिले पत्र; राष्ट्रपतींकडे थेट इच्छामरणाची मागणी

महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून सतत सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका महिला प्राध्यापिकेने थेट जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. तसेच, राष्ट्रपतींकडे कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगीही मागितली आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्राध्यापिकेने महाविद्यालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. मूळ […]

सामना 13 Jan 2026 2:03 pm

कॅनडातील सर्वात मोठ्या सोने चोरी प्रकरणी दुबईहून परतलेल्या आरोपीला अटक; 180 कोटींचे सोने चोरी

कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सोने चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पील प्रादेशिक पोलिसांनी ‘प्रोजेक्ट 24 के’ अंतर्गत एका मोठ्या आरोपीला अटक केली आहे. अरसलान चौधरी असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याला टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच ताब्यात घेण्यात आले. चौधरी हा दुबईहून विमानाने कॅनडात परतला होता. विशेष म्हणजे या आरोपीचा कोणताही निश्चित […]

सामना 13 Jan 2026 1:53 pm

Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करणार ; पेरणोली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय…

पेरणोलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धार पेरणोली-: पेरणोली-नव्याने अरेखीत केलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्णय आज पेरणोली येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे निवेदन तहसीलदार आजरा यांना देण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम बघून बाधित गावातील शेतकऱ्यांचा [...]

तरुण भारत 13 Jan 2026 1:32 pm

संकेश्वर येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यात क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

चिक्कोडी : साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यात घडली आहे. सदर कारखाना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात आहे. या अपघातात सच्चिन बसप्पा द्यामण्णी (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. मृत सच्चिन हा हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावाचा रहिवासी असून तो रोजंदारीवर काम करत होता. कारखान्यातील [...]

तरुण भारत 13 Jan 2026 1:31 pm

हिवाळ्यात जेवल्यानंतर तुम्हालाही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते का?

हिवाळ्यात आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतरही काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. हिवाळ्यात दिवस लहान होत असताना आणि तापमान कमी होत असताना, शरीर आपोआप अधिक ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांकडे वळते. यामध्ये गोड पदार्थांचा समावेश आहे. खरंतर, थंड हवामानात, शरीर स्वतःला उबदार आणि संतुलित ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा शोधते. म्हणूनच आपल्याला खाल्ल्यानंतरही अनेकदा गोड पदार्थ किंवा काहीतरी गोड पदार्थ हवे […]

सामना 13 Jan 2026 1:14 pm

माणुसकीने जिंकले मन! कचऱ्यात सापडलं 45 तोळे सोनं; महिला स्वच्छता कर्मचाऱ्याने जे केलं ते ऐकून सॅल्यूट ठोकाल

पैशांचा मोह कुणालाही आवरता येत नाही. माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यात पडलेली रोकड, सोने-नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडली तर तो पटकन खिशात टाकतो. पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. कचरा वेचणारी महिला पद्मा यांना तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने सापडले. बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे. […]

सामना 13 Jan 2026 1:12 pm

Kolhapur : दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमास 20 वर्षांची सक्तमजुरी

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची शिक्षा कोल्हापूर : दहा वर्षाच्या चिमुरडीला गाणी शिकविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास सोमवारी न्यायालयाने दोषी ठरविले. राजाराम अशोक सुतार (बय ५२, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने [...]

तरुण भारत 13 Jan 2026 1:08 pm

राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद; जिल्हा परिषद निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोग मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मुदतवाढ दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. […]

सामना 13 Jan 2026 1:08 pm

खरा विकास जनतेच्या कल्याणावर अवलंबून

राज्यपालपुसापतीअशोकगजपतीराजूयांचेप्रतिपादन: सावंतसरकारच्याकामाचाघेतलाआढावा पणजी : विविध क्षेत्रातील गोमंतकीय जनतेचा आनंदी निर्देशांक राज्य सरकार लवकरच तयार करणार आहे. खरा विकास हा केवळ आर्थिक उन्नती, साधनसुविधा यावरच अवलंबून नसतो, तर तो जनतेच्या कल्याणावरही अवलंबून असतो, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी विधानसभेतील अभिभाषणात नमूद केले. गोव्याचा आरोग्य, सामाजिक जीवन, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती या क्षेत्रातील निर्देशांक तयार होणार [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:46 pm

विरोधकांकडून राज्यपालांना ‘बर्च’ अग्नितांडवावर बोलण्याचा आग्रह

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घातला गोंधळ : ‘शेम शेम’च्या घोषणांनी सरकारचा केला निषेध,मार्शलांनी सातही विरोधी आमदारांना काढले बाहेर पणजी : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या काल सोमवारी विधानसभेतील अभिभाषणाच्या वेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी हडफडे येथे 25 जणांचे बळी गेलेल्या ‘बर्च’ अग्नितांडवाचा ज्वलंत विषय मांडला. त्यांच्यासह इतर विरोधी आमदारांनी हातात फलक घेऊन सभागृहात ‘शेम शेम’च्या [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:43 pm

‘बर्च’ अग्निकांडच्या मुळाशी जाणार

अवैधतेलासंरक्षणदेणारीसरकारी‘व्यवस्था’ मोडूनकाढू: उच्चन्यायालयानेस्पष्टकेलीभूमिका पणजी : आम्ही ही बाब हलक्यात घेणार नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अवैधतेला संरक्षण देणारी व्यवस्था आपल्याला मोडून काढावी लागेल. गोव्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच करू, अशी महत्त्वाची टिप्पणी उच्च न्यायालयाने हडफडे येथील ‘बर्च’ या नाईट क्लबमधील अग्निकांडावरील सुनावणीवेळी काल सोमवारी केली. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब’चे मूळ मालक [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:41 pm

…तर गंभीर संकट ओढवेल, अमेरिका रसातळाला जाईल; टॅरिफबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅरिफमुळे जगभराला धमकी देत आहेत. तसेच आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. ट्रम्प जगभराला धमकावत असले तरी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात टॅरिफच्या वैधतेबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे ट्रम्प धास्तावल्याचे दिसत आहे. आता त्यांनी या निकालापूर्वी संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ अवैध ठरवले तर गंभीर संकट ओढवेल, अमेरिका रसातळाला […]

सामना 13 Jan 2026 12:38 pm

आणखी तीन तरुणांची कंबोडियातून सुटका

बेळगावपोलीसआयुक्तांचापुढाकार, कालीमिर्चीयांचाहीपाठपुरावा: अद्यापशेकडोतऊणदुष्टचक्रातअडकून बेळगाव : परदेशातकॉम्प्युटरडाटाएंट्रीऑपरेटरची नोकरी देण्याचे सांगून कंबोडियात पाठविण्यात आलेल्या बेळगाव येथील तीन तरुणांना पोलिसांच्या मदतीने पुन्हा बेळगावला आणण्यात आले आहे. बेळगाव व खानापूर येथील दोन तरुणांनी स्वत:ची सुटका करून घेतल्याची घटना ताजी असतानाच कंबोडियात अडकलेल्या आणखी तिघा तरुणांचीही सुटका झाल्याचे सामोरे आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व पोलीस निरीक्षक जे. [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:35 pm

ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच

कडोलीतआठलाखाचीतरबेन्नाळीमध्ये5 लाखाचीधाडसीचोरी वार्ताहर/कडोली कडोली येथे चोरीच्या दोन घटनांनंतर आता तिसरी घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पाटील गल्ली येथील बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 8 लाख रुपयाचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याने गावात खळबळ माजली आहे. शिवाजी गल्ली कडोलीत शनिवारी रात्री दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 3 लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. परत जाताना [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:32 pm

बेन्नाळीमधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

बेळगाव : चव्हाट गल्ली, बेन्नाळी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने पळविल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विनायक कल्लाप्पा टक्केकर (वय 37) यांच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी 100 ग्रॅम चांदीचे दागिने, 126 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:31 pm

मरण उताऱ्यासाठीचा अर्ज मराठीतून उपलब्ध करून द्यावा

म. ए. समितीचेनगरसेवकरवीसाळुंखेयांच्यामागणीनंतरसभागृहातखडाजंगी: सध्याचाफॉर्मअत्यंतकिचकट बेळगाव : मरण उतारा मिळविण्यासाठी पूर्वी देण्यात येणारा अर्ज सरळ सोपा होता. मात्र सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला अर्ज अत्यंत किचकट आहे. तसेच केवळ कानडी भाषेत असलेला अर्ज इंग्रजीतही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक संतोष पेडणेकर, नितीन भातकांडे यांनी केली. त्यापाठोपाठ म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मराठी भाषेतही [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:27 pm

आचरा- पारवाडी दिंडीच्या कलाविष्काराने पंढरपूरनगरी दुमदुमली

आचरा|प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेल्या श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ आचरा पारवाडी या दिंडी भजन मंडळाने पंढरपुर येथे विठ्ठल मंदिर नामदेव पायरी समोर सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासोबत तुकोबा महाराजांचेही दर्शन आगळी अनुभूती देऊन गेले. आचरा पारवाडी येथील दिंडी भजन मंडळाने पंढरपुर वारीचे नियोजन करत अक्कलकोट स्वामी समर्थ, [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:26 pm

कच्च्या नाल्यांची वर्षातून दोनवेळा करणार सफाई

बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. 24 मध्ये येणाऱ्या मुचंडी माळ, हुलबत्ते कॉलनी आणि शास्त्रीनगरमधून जाणाऱ्या लेंडीनाल्याची सफाई केली जात नसल्याने परिसरातील 600 विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित बनले आहे. त्याचबरोबर दुर्गंधीमुळे लहानमुले व वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर नाल्याची वर्षातून किमान दोनवेळा स्वच्छता करावी, अशी मागणी नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी केली. या विषयावरून [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:25 pm

शिवभक्तांच्या रेट्यापुढे प्रशासनाचे नमते

धारवाडरोडउड्डाणपुलावरील‘छत्रपतीं’चाफलकपुन्हाबसविला: कारणमात्रगुलदस्त्यात, शहरभरजोरदारचर्चा बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे दैवत असूनही त्यांच्या नावाने बेळगावमध्ये राजकारण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. महानगरपालिकेत ठराव करून धारवाड रोड उड्डाणपुलाला नाव देण्यात आल्याने या ठिकाणी नवा फलक शनिवारी बसविण्यात आला. परंतु काहीवेळातच फलक पुन्हा हटविण्यात आला. तथापि शिवरायांच्या नावाने सुरू झालेले राजकारण परवडणारे नसल्याचे लक्षात येताच मनपाने दोन [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:24 pm

युवा समिती : 26 पासून ‘मराठी सन्मान यात्रा’

स्वराज्याचीराजधानीरायगडावरूनहोणारप्रारंभ: संविधानाच्यापायमल्लीचीसीमाभागातपरिसीमा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने मराठी भाषिकांसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व स्वराज्याची राजधानी रायगड येथून 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी या यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती सोमवारी मराठा मंदिर येथे आयोजित बैठकीत देण्यात आली. या बैठकीमध्ये 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:19 pm

अन्नोत्सवात चोखंदळ खवय्यांची रसनातृप्ती

सोमवारच्यादिवशीशाकाहारीपदार्थांकडेकल: महोत्सवातभारतातीलविविधखाद्यसंस्कृतीचीओळख बेळगाव : सावगावरोडयेथीलअंगडीकॉलेजच्या मैदानावर सुरू असलेला रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव’ खाद्यप्रेमींना आकर्षित करीत आहे. चौथ्या दिवशीही नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. सोमवार असल्यामुळे मांसाहारापेक्षा शाकाहारी पदार्थांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. मनोरंजनाच्या कार्यक्रमांतर्गत बुगीवूगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सर्व वयोगटातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आपापल्या स्पर्धकांना प्रोत्साहन [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:14 pm

पुन्हा बॅरिकेड्स लावून नागरिकांची गैरसोय

काँग्रेसरोडवरझालेल्याअपघातानंतरपोलीसप्रशासनानेरस्ताअडविला बेळगाव : काँग्रेस रोडवर झालेल्या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने यू-टर्न घेता येण्याच्या म्हणजेच दुभाजकाचा खुला भाग बॅरिकेड्स लावून रस्ता अडविला. त्यामुळे पुन्हा नागरिकांना लांब वळसा पडणार आहे, म्हणजे पुन्हा बॅरिकेड्स लावून नागरिकांची गैरसोयच झाली आहे. आधी पहिल्या रेल्वेगेटवर असलेल्या बॅरिकेड्सने लोकांना बराच ताप दिला आहे. आता त्या पुढे दुभाजकाच्या जागी बॅरिकेड्स लावल्याने विवेकानंदकॉलनी, महात्मा गांधी [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:13 pm

संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजारात चैतन्य

भोगीसाठीभाज्यांचीमोठीउलाढाल; दरातकिरकोळवाढ बेळगाव : हिरवागार मटार, वाटाणा, कांदा पात व बिनिस, लुसलुशीत गुलाबी गाजर, तुकतुकीत अशी वांगी, पांढरे सोले, लाल भाजी अशा विविध भाज्यांनी बाजार नटला असून भोगीच्या निमित्ताने भाजी खरेदीसाठी गर्दी तर झालीच, परंतु खरेदीबरोबरच भाजीबाजाराचा माहोल डोळ्यांना मोठा सुखद वाटला. संक्रांतीच्या आदलेदिवशी भोगीच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यामुळे रविवारी बाजारपेठेत गर्दी [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:11 pm

फुल मार्केटवरून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती

मनपासर्वसाधारणबैठकीतविविधविषयांवरचर्चा: लीजसंपलेल्यामालमत्तांचीमाहितीझोनलनुसारघेणार बेळगाव : महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या फुल मार्केटचा सर्वे करून त्याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. त्यावर कोणती कार्यवाही केली. मनपाची मालमत्ता असून दर महिना 5 लाख रुपये भाडे वसूल करून ते कोण घशात घालत आहे. अधिकारी बेजबाबदारपणे का वागत आहेत. सिमेंटचे रस्ते करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण अधिकाऱ्यांनी त्या [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:05 pm

अन्यथा 26 जानेवारीला महापालिकेला काळे झेंडे दाखविणार

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून किल्ला तलावमध्ये भगवान बुद्धांचा तर केएलई सर्कलमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुतळ्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तरीही याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. याबाबत त्वरित पावले न उचलल्यास 26 जानेवारीला महापालिकेला काळे झेंडे दाखविण्यात येतील. तसेच भविष्यात होणाऱ्या आपत्तीला [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:03 pm

तोडगा नाहीच…‘ते’ उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच

तुडयेग्रामस्थांनीदोनफेऱ्यासोडण्याचेआश्वासननाकारले: बेळगावजिल्हाधिकाऱ्यांशीचर्चेचीमागणी वार्ताहर/तुडये बेळगाव ते तुडये दरम्यान केएसआरटीसीने राकसकोपला असलेल्या बसफेऱ्या सुरू कराव्यात या मागणीसाठी तुडये येथील बस स्टॅन्डवर8 जानेवारीपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच होते. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व डेपो मॅनेजर सतीश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. तुडये ते बेळगाव दोन फेऱ्या सुरू करण्यात येतील असे सांगितले. मात्र, [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:02 pm

गौतम बुद्ध-छ. शाहू महाराज पुतळ्यासाठी दलित संघटनेचे मनपासमोर आंदोलन

बेळगाव : किल्ला तलावात गौतम बुद्ध तर केएलई सर्कल येथे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती (भीमवादी) बेळगाव तालुक्याच्यावतीने महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ व मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात [...]

तरुण भारत 13 Jan 2026 12:00 pm

खानापुरात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार

म. ए. समितीचानिर्णय: 17 जानेवारीरोजीसकाळी8.30 वाजतादिवंगतांनाअभिवादन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवस्मारक येथे सोमवारी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरवातीला दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजाराम देसाई यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे हे [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:56 am

संगमेश्वर तालुक्यात बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत; पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त

संगमेश्वर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वनविभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असून या भागात मोठी व दाट जंगले आहेत. ही जंगले वन्यप्राण्यांचे नैसर्गिक निवासस्थान मानली जातात. मात्र वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, ओसाड होत चाललेले डोंगर, बेकायदा उत्खनन, वाढती शिकार, जंगलातील पाणीस्रोतांचा ऱ्हास आणि मानवी वावरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही वर्षांत वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत येण्याच्या […]

सामना 13 Jan 2026 11:47 am

रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये किती अंतर असायला हवे?

आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते, चांगले पचन आणि चांगली झोप यासाठी, रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास ​​आधी खाल्ले पाहिजे. या वेळी अन्न योग्यरित्या पचते आणि आम्लता, गॅस किंवा छातीत जळजळ होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही रात्री १० वाजता झोपणार असाल तर, रात्री ७ ते ८ च्या दरम्यान रात्रीचे जेवण करावे. तुम्ही रात्री ११ […]

सामना 13 Jan 2026 11:42 am

भाग्यलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यात बेळगाव जिल्हा अव्वल

बेळगाव : बीपीएल कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या सर्वांगिण प्रगती, भविष्य आणि स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी 2006-2007 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भाग्यलक्ष्मी योजनेचे सर्वाधिक लाभार्थी बेळगाव जिल्ह्यात आहेत. भाग्यलक्ष्मी योजनेंतर्गत 1.83 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 2.36 लाख लाभार्थ्यांपैकी 1.58 लाख लाभार्थ्यांना मुदतपूर्व रक्कम मिळाली आहे. योजनेच्या सुरुवातीपासून 30 डिसेंबर 2025 पर्यंत 36,29,530 लाभार्थ्यांना बाँड /पासबुक [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:26 am

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडी नित्याचीच

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासह आवाराच्या विकासाला गती येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येतच आहे. शिवाय आवाराचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्याठिकाणी सुसज्ज इमारती बांधण्यात येणार आहेत. दरम्यान जुन्या इमारती पाडण्यात येत असल्याने साहित्य रस्त्यावरच कोसळत आहे. यामुळे रस्ता अरुंद बनला असून, यामध्ये वाहनांचीही भर पडत आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:24 am

अर्श इलेव्हन,कांतारा बॉईज विजयी

महांतेशकवटगीमठचषकक्रिकेटस्पर्धा बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बालाजी स्पोर्ट्सने अव्वल स्पोर्ट्सचा, अर्श इलेव्हनने अक्षित स्पोर्ट्स मजगावचा व बालाजी स्पोर्ट्सचा आणि कांतारा बॉईजने डेंजर स्पोर्ट्स होनग्याचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. किरण, शाहीद, सुनील, हितेंद्र जडेजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सरदार्समैदानावरतीखेळविण्यातआलेल्यापहिल्यासामन्यातअव्वलस्पोर्ट्सनेप्रथमफलंदाजीकरताना8 षटकात8 गडीबाद57 धावाकेल्या. [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:18 am

बनावट शिक्क्यांचा वापर करून वाटले बोगस जमीन पट्टे, भाजपच्या माजी शहराध्यक्षाविरुद्ध तक्रार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे देण्यात आल्याचा गंभीर आणि तेवढाच धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय. हा सर्व प्रकार भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केल्याचा थेट आरोप आणि तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना चंद्रपुरातील राजकीय वातावरण यामुळे चांगलेच तापले आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर […]

सामना 13 Jan 2026 11:16 am

अ‍ॅथलेटॉन संघाकडे राजू दोड्डण्णावर चषक

श्लोकचडीचालसामनावीर, श्रेयशपाटीलमालिकावीर बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णावर चषक निमंत्रितांच्या लिटल चॅम्पस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अ‍ॅथलेटॉन संघाने लेकव्ह्यू संघाचा 4 गड्यांनी पराभव करून राजू दोड्डण्णावर चषक पटकावला. श्लोक चडीचाल सामनावीर तर श्रेयश पाटील याला मालिकावीराने गौरविण्यात आले. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात लेकव्ह्यू टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:15 am

श्रीश चव्हाणचा सत्कार

बेळगाव : कंग्राळी खुर्दच्या साडेतीन वर्षांचा श्रीश चव्हाणचा सेंट पॉल्स स्कूलमध्ये बुधवारी विशेष सत्कार करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदांत त्याने 27 कार्टव्हील (हातावरील उलट्या उड्या) मारून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सेंट पॉल्सचे फादर अॅलेंड्रो डीकोस्टा यांनी श्रीशच्या कौशल्याचे कौतुक केले, तर वर्ग मुख्य शिक्षिका मेरी लोबो यांनीआई अंजना चव्हाण यांचे भावुक [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:12 am

किणयेत कबड्डी स्पर्धा उत्साहात

वार्ताहर/किणये नरवीर तानाजी युवक मंडळ किणये यांच्यावतीने महिला व पुरुष अशा दोन गटासाठी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती डुकरे हे होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष यशवंत गुरव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व समरसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे उद्घाटन अशोक घागवे यांच्या हस्ते करण्यात आले. हेमंत पाटील, श्रीधर गुरव, वर्षा डुकरे, चित्रा गडकरी, [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:09 am

हिवाळ्यात उकडलेल्या अंड्याला सूपरफूड का मानले जाते, जाणून घ्या

हिवाळा येताच, शरीर उबदार ठेवणे आणि चांगले आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे बनते. तर, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की या हंगामात कोणता अन्न सर्वात फायदेशीर आहे, तर उत्तर आहे उकडलेले अंडे. उकडलेले अंडे फक्त लवकर तयार होतात असे नाही तर त्यांचे पौष्टिक मूल्य सुपरफूडपेक्षा कमी नाही. ते प्रथिने, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात, जे […]

सामना 13 Jan 2026 11:08 am

नंदगड कन्या विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा

वार्ताहर/हलशी द. म. शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे मंगळवारी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीत व ईशस्तवन गीताने करण्यात आली. अध्यक्षस्थानी अरविंद काकतकर होते. क्रीडा ध्वजारोहण आदिनाथ पाथर्डे यांनी केले. क्रीडाज्योत प्रज्वलन शिवानंद तुरमरी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा साहित्य पूजन प्रदीप पवार यांनी केले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:07 am

कडोलीचा श्लोक पंजाबमध्ये चमकला

बेळगाव : शालेयराष्ट्रीयक्रीडास्पर्धेतडीवायईएसस्पोर्ट्सहॉस्टेलच्याश्लोककाटकरनेकांस्यपदकपटकाविले.कडोलीचा ज्युडोपटू आणि डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावचा खेळाडू श्लोक काटकरने 5 ते 10 जानेवारी दरम्यान पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 25 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्वल केले. कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 12 वषीय श्लोक काटकरला पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाल्यानंतर आत्मविश्वासाने आपल्या मोहिमेची सुऊवात केली. दुसऱ्या [...]

तरुण भारत 13 Jan 2026 11:05 am

Pune news –भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची काँग्रेस उमेदवाराला जाहीर सभेत शिवीगाळ!

पुणे महापालिका निवडणुकीचे राजकारण आता तापले असून सत्तेसाठी हपापलेले नेते प्रचाराच्या मैदानात उतरत असताना शब्दांची पातळी थेट शिवीगाळ करेपर्यंत घसरल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यावर जाहीर सभेत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत शिवराळ भाषा वापरल्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल […]

सामना 13 Jan 2026 11:02 am

पागडी मुक्तीची घोषणा फसवी, लाखो मराठी कुटुंबांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी

महायुती सरकारने केलेली पागडी मुक्तीची घोषणा फसवी ठरली आहे. प्रत्यक्षात मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवलीतील सुमारे 20 लाख रहिवाशी अद्यापही पागडीच्या विळख्यात आहेत. मालकांच्या बाजूचे कायदे, रखडलेला पुनर्विकास, मालकांची मनमानी आणि त्यामुळे पडणाऱ्या आर्थिक भुर्दंडामुळे हजारो मराठी कुटुंबे त्रस्त आहेत. हा अन्याय थांबवा, अशी मागणी भाडेकरूंनी केली आहे. बाजारभावाने घर खरेदी करूनही पागडी पद्धतीत राहणाऱया भाडेकरूंना […]

सामना 13 Jan 2026 10:48 am

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफची घोषणा, हिंदुस्थानवर काय होणार परिणाम?

व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेची नजर इराणवर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लष्करी कारवाई करू शकतो असे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत. एवढेच नाही तर अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश दिले. एवढेच नाही इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने इराणशी […]

सामना 13 Jan 2026 10:47 am

पश्चिम बंगालमध्ये निपाहचा धोका? दोन संशयित रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार सतर्क

पश्चिम बंगालमध्ये जीवघेण्या निपाह व्हायरसची दोन संशयित प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 2001 नंतर राज्यात प्रथमच निपाहचे संशयित रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय मल्टिडिसिप्लिनरी पथक बंगालमध्ये रवाना केले आहे. या पथकामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि पर्यावरण व वन […]

सामना 13 Jan 2026 10:45 am

ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे विधेयक अमेरिकन संसदेत सादर; जगभरातून विरोध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा त्यांचा हेतू अनेकदा उघडपणे व्यक्त केला आहे. आता ट्रम्प यांच्या पक्षाने आता हा हेतू साध्य करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे रँडी फाईन यांनी अमेरिकन संसदेत याबाबतचे एक विधेयक मांडले. या विधेयकाला “ग्रीनलँड अ‍ॅनेक्सेशन अँड स्टेटहूड अ‍ॅक्ट” असे म्हणतात. या विधेयकाला जगभरातून विरोध होत असून […]

सामना 13 Jan 2026 10:20 am

मसूर डाळ आणि भात खाणे हे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे, जाणून घ्या

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डाळ भात हा पदार्थ केला जातो. डाळ भात केवळ आपल्या जिभेचे चोचले पुरवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी देखील डाळ भात हा फार महत्त्वाचा मानला जातो. डाळ भात केवळ स्वादिष्टच नाही तर, पोषक तत्वांनी समृद्ध असतो. डाळ भाताचा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. डाळ आणि भात आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि आपल्याला […]

सामना 13 Jan 2026 9:50 am

भाजपकर पाईप चोरांचा प्रचार करण्याची केळ –एकनाथ खडसे

महापालिका निकडणुकीच्या पार्श्वभूमीकर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राष्ट्रकादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकर जोरदार टीका केली आहे. पाईप चोरीप्रकरणी ज्या पदाधिकाऱ्याच्या किरोधात भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांच्याच समर्थनार्थ आज महापालिका निकडणुकीत प्रचार करण्याची काईट केळ त्यांच्याकर आल्याचा टोला खडसे यांनी लगाकला आहे. ज्यांच्याकर पाईप […]

सामना 13 Jan 2026 9:42 am

तात्काळ इराण सोडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश, कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईची शक्यता

इराणमधील वाढता हिंसाचार आणि गृहयुद्धासारख्या परिस्थितीमुळे अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘वॉर मोड’मध्ये आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसने याबाबत संकेत दिल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. बातमी अपडेट […]

सामना 13 Jan 2026 9:25 am

मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का? काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचा सवाल, भाजपने मुंबईला धोका दिल्याचा आरोप

मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा भारतीय जनता पक्ष महायुती मोठय़ा प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहे. हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईशी धोका करणाऱ्या भ्रष्ट महायुतीला मुंबईकर निवडणुकीत धडा शिकवतील, असे काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा म्हणाले. मुंबईत आयोजित […]

सामना 13 Jan 2026 9:22 am

विकला जाणार नाही, फुटणार नाही! मनसे उमेदवाराच्या पतीला पैशांची ऑफर

भाजपचा निवडणुका बिनविरोध करण्याचा फंडा पुन्हा एकदा ठाण्यात समोर आला आहे. प्रभाग भाजपची क्रमांक ११ मधील मनसे उमेदवाराचे पती महेश इंगळे यांना भाजपने थेट पैशांची ऑफर करत तू व्यवस्थित सेटल होशील, खूश होशील, फक्त तुझ्या पत्नीची उमेदवारी मागे घे, असा तगादा लावला होता असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र या ऑफरला इंगळे बळी पडले नाही. […]

सामना 13 Jan 2026 9:11 am

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी; डोंबिवलीतील 80 कर्मचाऱ्यांवर गुन्हा, महापालिकेचा बडगा

सार्वत्रिक निवडणुकीचे काम पारदर्शक, सुरळीत व विहित वेळेत पार पडावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र या प्रशिक्षणादरम्यान डोंबिवलीच्या पवार पब्लिक स्कूलमधील ८० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. वारंवार सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत दांडी मारल्याचे लक्षात येताच महापालिकेने या कामचुकार ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेकडून शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, […]

सामना 13 Jan 2026 9:00 am

वाशीतील भाजपचा उमेदवार म्हणतो मच्छी मार्केटची दुर्गंधी येते

भाजपचे वाशीमधील उमेदवार अवधूत मोरे यांनी मच्छी मार्केटमुळे येथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा जोरदार फटका या निवडणुकीत भाजपला बसणार आहे. अवधूत मोरे यांनी वाशीमधील एका मार्केटमध्ये व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या मच्छी मार्केटमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा […]

सामना 13 Jan 2026 8:59 am

लहूशक्ती व शिवशक्ती महासंघाचा शिवसेनेला पाठिंबा

महापालिका निवडणुकीसाठी लहूशक्ती व शिवशक्ती महासंघाने शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. देशात सध्या दडपशाही सुरू आहे. लोकशाही देश हुकूमशाहीच्या दिशेने पावले टाकत आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली असून राज्यात महागाई आणि बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ही महागाई कमी करण्यात सरकारला […]

सामना 13 Jan 2026 8:48 am

गद्दार गद्दार! शिंदे गटासमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; चपला दाखवल्या, जोरदार राडा, अंबरनाथच्या उपनगराध्यक्ष निवडीत हायव्होल्टेज ड्रामा

अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महायुतीत आज ठिणगी पडली. उपनगराध्यक्ष निवडीच्या सभेत भाजप आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असला तरी शिंदे गटाने अजित पवार गटाला सोबत घेऊन उपनगराध्यक्ष निवडीत भाजपचा पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने भाजपने सभागृहातच शिंदे गटाच्या विरोधात गद्दार.. गद्दार अशा जोरदार घोषणा दिल्या. सभागृहाच्या […]

सामना 13 Jan 2026 8:38 am

महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! मंगळवार 13 जानेवारी सायंकाळी 5ः30 नंतर जाहीर प्रचार बंद

मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. शहरांमधले सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लोगल्लीत सकाळ-संध्याकाळ निघणाऱया उमेदवारांच्या प्रचार रॅली, तसेच छोटय़ा-मोठय़ा सभांमुळे सर्वत्र निवडणूकमय वातावरण झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यभरात सुरू असलेली ही रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी 5ः30 वाजता संपणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर राजकीय पक्षांच्या गुप्त […]

सामना 13 Jan 2026 8:20 am

प्रचार संपताच प्रचार साहित्य तत्काळ हटवा, पालिकेचे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता संपुष्टात येणार आहे. यानंतर सर्व राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी प्रचार साहित्य तत्काळ हटवावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर असणार आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी […]

सामना 13 Jan 2026 8:19 am