तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षासाठी २०० जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. शनिवारी डीएमके युथ विंगच्या परिषदेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना या ध्येयासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्व ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य […]
खेडमध्ये ईव्हीएम तांत्रिक बिघाड; मतदान प्रक्रियेत व्यत्यय
खेड तालुक्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खेड तालुक्यातील निगडे येथील आदर्श मतदान केंद्र क्रमांक 15/10 येथे सकाळी मतदान सुरू होताच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे तब्बल एक ते दीड तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांचा यामुळे मोठा […]
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५५ टक्के मतदान, आता मतमोजणीची प्रतीक्षा
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आणि ९ पंचायत समित्यांच्या १११ जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी १५० उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १११ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत.एक जागा बिनविरोध झाली आहे. निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६२१ पोलीस अधिकारी आणि अमंलदार, १८५३ होमगार्ड,एसआरपीएफच्या दोन […]
एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यावर देश विकला; संजय सिंह यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर पंतप्रधानांनी आपला बचाव करण्यासाठी देशाला विकले, असा दावा संजय सिंह यांनी शनिवारी केला. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असं म्हणाले आहेत. संजय सिंह यांनी असा दावा केला की, […]
राजापुरात मतदान प्रक्रिया सुरळीत; सरासरी 50% मतदान
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या निवडणुकीला सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तेरा आणि पंचायत समितीच्या ३२ अशा ४५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएम मशीन मध्ये बंदिस्त झाले. आता सोमवारी मतमोजणी होत असून त्यामध्ये कोण बाजी मारणार त्याची जोरदार उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे. राजापूर तालुक्यात शनिवारी सकाळी 7.30 […]
देवगड तालुक्यात 57.12 % मतदान! 30353 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
देवगड तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समिती गणातील मतदानाला शनिवारी सकाळी ७.३० वाजता शांततेत सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ५७.१२ % एवढे मतदान झाले .यात पुरुष मतदार १५६९७ व स्त्रिया मतदार १४६५५ व इतर १ एकूण ३०३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी ११.५३ %एवढी होती. त्यानंतरच्या पुढील […]
वयाची नव्वदी पार करूनही जिद्दीने केले मतदान! लक्ष्मण पंडू मुदगल यांचे कौतुक
संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावातील ९२ वर्षीय लक्ष्मण पंडू मुदगल यांचा चेहरा शांत, पण डोळ्यांत आत्मविश्वास भरलेला होता. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या जेष्ठ नागरिकांना चालण्यात गंभीर अडचणी आहेत; आधाराशिवाय उभे राहणेही कठीण. तरीही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दिवशी त्यांनी ठरवले की, आपला मतदान हक्क बजावणे सोडणार नाही. व्हीलचेअरवर बसून, नातेवाईक आणि मतदान केंद्रातील सहाय्यक […]
जालन्यात चौकात पुन्हा रक्तपात! धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून, मध्यरात्री शहर हादरले
जालना शहरात गुन्हेगारीने अक्षरशः हैदोस घातला असून, धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ६ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. या रक्तरंजित घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काल रात्री सुमारे दोनच्या सुमारास जालन्यातील मंगळ बाजार चौकात ही थरारक घटना घडली. शाहेद सगीर […]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर विरोधकांनी तीव्र हल्ला चढवला आहे. या कराराबाबत माहिती देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का? असा सवाल विचारल्यावर त्यांनी चेंडू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे टोलवला आहे. त्यावर एस. जयशंकर यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. […]
जिल्ह्यात 65 टक्के मतदान होण्याच्या प्राथमिक अंदाज
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मतदारांचा अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नाही. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाला वेग येवून 65 ते 70 टक्क्यापर्यंत मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुकानिहाय मतदानाची स्थिती पाहता, भूम तालुक्यात एकूण 55331 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 54.18 इतकी आहे. वाशी तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 34326 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.53 नोंदवली गेली आहे. कळंब तालुक्यात 82763 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 50.77 इतकी आहे. धाराशिव तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 118463 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मात्र, मतदारसंख्या मोठी असल्याने तेथील मतदानाची टक्केवारी 47.41 इतकीच राहिली आहे. परंडा तालुक्यात 56665 मतदान झाले असून टक्केवारी 52.83 इतकी नोंदवली गेली आहे. तुळजापूर तालुक्यात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. येथे एकूण 99863 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.24 इतकी आहे. लोहारा तालुक्यात 41753 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 46.71 आहे. उमरगा तालुक्यात 84563 इतके मतदान झाले असून तेथील टक्केवारी 48.97 इतकी नोंदवली गेली आहे. जिल्हा पातळीवर एकूण 5 लाख 73 हजार 727 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 2 लाख 96 हजार 84 पुरुष मतदारांचा तर 2 लाख 77 हजार 41 महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 50 टक्के इतकी आहे. दरम्यान, मतदानासाठी अखेरचे दोन तास शिल्लक असून या वेळेत मतदानाला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आता अंतिम दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिनांक 07.02.2026 रोजी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मेघना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांनी धाराशिव तालुक्यातील मौजे शेकापूर येथील हरीत धाराशिव, पिकं बुथ या संकल्पनेतून साकारलेल्या आदर्श मतदान केंद्रास व मौजे सांजा येथील महिला मतदान केंद्रास भेट देऊन निरीक्षण केले व मतदाराशी संवाद साधला.
खळबळजनक खुलासा; जेफ्री एपस्टीन होता इस्रायलचा गुप्तहेर? FBI च्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनबाबत (Jeffrey Epstein) पुन्हा एकदा जगभरात खळबळ माजली आहे. नुकत्याच सार्वजनिक झालेल्या २०२० च्या एका ‘एफबीआय’ (FBI) कागदपत्रातून असा दावा करण्यात आला आहे की, एपस्टीनचे इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’शी (Mossad) जवळचे संबंध होते आणि त्याला खास हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते. एफबीआयच्या अहवालानुसार, एका गुप्त स्रोताने माहिती दिली होती की, एपस्टीन […]
Mega Block News –मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकच्या काळात काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी योची दखल घेत प्रवासाचे नियोजन करावे, […]
ईव्हीएम मशीन फोडली, एकावर गुन्हा नोंद
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील विजोरा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी सुमारे 7:40 वाजता टेबलवरील मतदान मशीन खाली आपटून मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा आणून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुक्यातील विजोरा येथे एका जणांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावर दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान मशीनचे प्रात्यक्षिक ठरलेल्या वेळेप्रमाणे घेऊन सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावेळी विजोरा येथील महादेव कोंडीबा जाधव हे सकाळी 7:40 वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांनी मला मतदान मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवा माझा मतदान मशीनवर विश्वास नाही असे म्हणत प्रात्यक्षिक पुन्हा दाखवण्याची मागणी केली. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष नेताजी शिंदे यांनी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवता येणार नाही. तुम्ही मतदान करून जाऊ शकता असे सांगितले. यावेळी महादेव जाधव यांनी चिडून मतदान मशीन टेबलवरून खाली जोरात आपटली. यामुळे मतदान प्रक्रियेत बाधा येऊन शासकीय कामात अडथळा आणला असल्याची तक्रार मतदान केंद्राध्यक्ष नेताजी नेताजी शिंदे यांनी वाशी पोलिसांना दिल्यावरुन महादेव जाधव यांचे विरोधात मतदान प्रक्रियेत अडथळा आणणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोहेका बाळासाहेब औताडे हे पुढील तपास करत आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदारांनी मतदान केंद्रात मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. त्यानुसार आज वाशी पोलिसांच्या पथकाने 90 मोबाईल जप्त केलेले आहेत. सदरील मोबाईल हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत अशी माहिती वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदींनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले; हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेसची कडाडून टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले असून, हा करार म्हणजे हिंदुस्थानच्या आत्मसन्मानाशी केलेली तडजोड आहे,” अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत. पवन खेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था, शेती आणि आपले राष्ट्रीय हित एका ताटात वाढून […]
शून्य मोठा की १८? हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर अखिलेश यादवांची मोदी सरकारवर टीका
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या (Trade Deal) मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या करारावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हा करार पूर्णपणे एकतर्फी असून हिंदुस्थानने अमेरिकेसमोर आपल्या हितांची शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. विशेषतः आयात-निर्यात शुल्कामध्ये (टॅरिफ) असलेल्या तफावतीवरून त्यांनी भाजप […]
सलग दुसऱ्या आठवड्यात फटाका उद्योगात स्फोट
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव फटाका उद्योगासाठी गाजलेले असून या ठिकाणी तेरखेडा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये फटाके बनवण्याचे कारखाने उभारलेले असून सध्या ते जोमात सुरू असून या कारखान्यात अधून मधून स्पोट होत आहेत. या स्फोटामुळे अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहेत तर अनेकांना गंभीर जखमा होऊन अपंगत्व आलेले आहे असे असतानाही संबंधित फटाका बनवणाऱ्या कारखाना मालकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने सतत होणाऱ्या स्फोटातून दिसून येत आहे. दि. 31 जानेवारी रोजी तेरखेडा बावी रस्त्यावरील खामकरवाडी शिवारातील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्पोट झाला होता. त्याचा अहवाल अद्याप पर्यंत आलेला नसताच आज दि. 6 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोजवाडा शिवाराततील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे. यामध्ये फटाका कारखान्याचे शेड पूर्णपणे उध्वस्त झालेले असून यामध्ये कसलीही जीवित हानी झालेली नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील बोरी फाटा ते गोजवडा रोडवरील गोजवाडा शिवारातील गट क्रमांक 561 मध्ये सुरू असलेल्या बालाजी उकरंडे रा. तेरखेडा यांचे बालाजी फायर वर्क या कारखान्यात दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कच्चा माल ठेवलेल्या ठिकाणी स्फोट झाला. या ठिकाणी 40 किलोपेक्षा जास्त मिक्स केलेली स्फोटकाची दारू आढळून आलेली असून स्पोट झालेल्या कारखान्यात कोणीही जखमी अथवा मयत झाले नसल्याचा जबाब परवानाधारक यांच्या वडिलांनी दिला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप तरी समजू शकले नाही. तथापि उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी येत असून ते अधिक सविस्तर चौकशी करणार आहेत. दरम्यान 31 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसून धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी वाशीचे तहसीलदार यांना स्फोट नेमका कशामुळे झाला याची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना विचारणा केली असता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी जाऊन चौकशी करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास देणार असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील अहवाल जिल्हाधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले. सतत होत असलेल्या स्फोटामुळे फटाका कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे जीवितास धोका निर्माण होत असून फटाक्या कारखान्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे औद्योगिक सुरक्षा संचलनालयाकडून सदरील कारखान्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची गरज असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.
९० वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क
कोथळीतील 91 वर्षीय सुमनबाई आजीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील कोथळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीचा खरा उत्साह पाहायला मिळाला. वाढत्या वयाची तमा न बाळगता, कोथळी येथील ९१ वर्षीय आजी सुमनबाई नेमीनाथ गुरव [...]
104 वर्षीय सयदाबी बाबन पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क; उमरग्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरग्यात 104 वर्षांच्या सयदाबीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : नऊ वर्षांनंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असून, उमरगा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या दाबका मतदान केंद्रावर [...]
Satara News : आधी मतदान, मगच लग्न”; फलटणच्या सोनवडीतील नववधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
फलटणच्या सोनवडीतील मतदानातील नववधूचा आदर्श फलटण : आज ऋतुजा क्षीरसागर या नववधूचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच, लोकशाहीप्रती तिच्या कर्तव्यभावनेचे प्रेरणादायी दर्शन घडले. विवाह मंडपात जाण्यापूर्वी ऋतुजा हिने फलटण तालुक्यातील सोनवडी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून [...]
हिंदुस्थान- अमेरिका व्यापार करार नुकताच झाला. त्याचे हिंदुस्थानसह जगभरात परिणाम दिसून आले. तसेच शेअर बाजार आणि सोन्याचांदीच्या दरावरही त्याचे परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे हा करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या करारत नेमके काय आहे? देशाच्या कराराचा कसा आणि काय फायदा होणार आहे? याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या […]
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बजावला तेरमध्ये मतदानाचा हक्क
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2026 निमित्त तेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. यावेळी युवक नेते मल्हार पाटील, तेर गटातील उमेदवार व जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील उपस्थित होत्या. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गावाच्या विकासाचा भक्कम पाया. गावातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्याची ताकद याच निवडणुकांमधून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आपणही आवर्जून मतदान करा आणि आपल्या गावाच्या प्रगतीसाठी योगदान द्या असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
बार कौन्सिल महाराष्ट्र, गोवा निवडणुकीसाठी ॲड. अविनाश देशमुख
धाराशिव (प्रतिनिधी)- बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा च्या होऊ घातलेल्या 2026 च्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाला आज रोजी भेट दिली असता त्या ठिकाणच्या सर्व विधीज्ञानी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. वचने तसेच तेथील सर्व विधीज्ञानी एकमताने त्यांच्या बारचा ठराव घेऊन ॲड. अविनाशराव नरसिंगराव देशमुख काटीकर यांना पाठिंब्याचा ठराव देऊन पुढील वाटचालीसाठी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. त्याप्रसंगी मनोगत पर प्रास्ताविक व्यक्त करताना लोहारा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. रामदास जाधव त्यानंतर ॲड. राज कुलकर्णी, ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी यापूर्वी ॲड. राम गरड, ॲड. मिलिंद पाटील यांना धाराशिव जिल्ह्यातील विधिज्ञांच्या एकीमुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्याच धर्तीवर पुन्हा सर्वांनी एकजुटीने सहकार्य केले. तर आपल्या धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अविनाशराव दादाना प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले. तर त्यांच्या रूपाने हॅट्रिक पूर्ण नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला. आणि सर्वांनी येत्या 24 मार्चला प्रथम पसंतीचे मतदान ॲड. अविनाशराव दादा यांना करण्याचे आव्हान केले. त्यानंतर ॲड. अविनाशराव दादा यांनी या निवडणुकीमध्ये सर्व लहान थोर विधीज्ञ बंधू भगिनींना बरोबर घेऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर सर्व विधीज्ञाची मान उंचावेल अशा पद्धतीने काम करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले. याप्रसंगी धाराशिव विधीज्ञ मंडळाचेही सीनियर ज्युनिअर विधीज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहारा बारचा ठराव दिल्याबद्दल ॲड. अमोल वरुडकर अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव यांनी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाचे आभार मानले.
कळंब येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात दहावीचा स्कूल डे व निरोप समारंभ उत्साहात
कळंब (प्रतिनिधी)- रणसम्राट क्रीडा मंडळ, कळंब संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्कूल डे व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याने संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाबरोबरच आठवणींची उजळणी दिसून आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मुस्तान मिर्झा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांच्या मागे ते पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा. एक दिवस ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.” तसेच दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास आणि सातत्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. परीक्षेचा ताण न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेची भूमिका स्पष्ट करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी भवर, उपमुख्याध्यापक सावंत, फरिहा सय्यद यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाआधी विद्यालयात स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एक दिवसासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय पदांची जबाबदारी पार पाडली. यामध्ये विद्यार्थी प्रिया रत्नपारखी यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. अनुशिता हिरे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली, तर कृष्णा जाधव यांनी उपमुख्याध्यापक म्हणून भूमिका निभावली. सच्छिदानंद कुंभार यांनी शिक्षणाधिकारी म्हणून कार्य करत शालेय प्रशासनाची जबाबदारी पार पाडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी आणि प्रशासनाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. निरोप समारंभाच्या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहपाठी मित्रमैत्रिणींच्या साथीत घालवलेले क्षण सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी भावनिक शब्दांत शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनीने प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि भावनांच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
शरण पाटील यांनी भुसणीमध्ये मतदानाचा हक्क बजावला
मुरूम (प्रतिनिधी)- भुसणी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे गरजेचे आहे. आपले एक मत गावाचा आणि तालुक्याचा विकास ठरवू शकते. मतदान हा केवळ अधिकार नसून, ते प्रत्येक नागरिकाचे संविधानिक कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथील मतदान केंद्रावर सपत्नीक उपस्थित राहून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांनी रांगेत उभं राहून लोकशाही प्रक्रियेचे पालन केले. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणजे मतदान आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे, कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्ण जबाबदारीने मतदान करून आपली लोकशाही अधिक सुदृढ आणि मजबूत करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुज्ञ प्रतिनिधी निवडले जावेत असे आवाहन यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. आमदार कैलास पाटील यांचे सारोळ्यात मतदान शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील सारोळा येथे आपले मतदान कर्तव्य बजावले. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे त्यांनी सांगितले.
Satara News : सातारा तालुक्यातील खेडगटात समर्थकांमध्ये वाद; पोलीस परिस्थिती नियंत्रणात
निवडणूक काळात खेडगटमध्ये तणाव सातारा :सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान सातारा तालुक्यातील खेडगट परिसरात दोन गटांतील समर्थकांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. कोणताही [...]
शिरोडा-वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा उद्या २३ वा वर्धापन दिन
शिरोडा (प्रतिनिधी)- शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरांचा २३ वा वर्धापन दिन रविवार दि ८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार आहे. यासाठी श्रीदेवी लिंगेश्वर देवस्थान समिती विश्वस्त सल्लागार व उत्सव कमिटी यांनी भव्य दिव्य असे नियोजन केलेले आहे.शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापनदिन सोहळा रविवार दि. ८ फेब्रुवारी [...]
Satara News : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगाने घोड्यावरून नवरदेव मतदान केंद्रावर
नवरदेवने मतदानाला प्राधान्य दिले सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज तालुक्यातील मतदान केंद्रांवर दिवसभर उत्साहात मतदान सुरू आहे. कराड तालुक्यातील भैरवनाथनगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह पार पडत होता. विवाहाच्या गडबडीमध्येही लोकशाहीबद्दलच्या जबाबदारीला [...]
बॉलीवूड सिनेसृष्टीतील अभिनेते सुनील थापा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. नेपाळी, बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेपाळी प्रेक्षकांमध्ये ‘राते कैला’ या नावाने लोकप्रिय असलेल्या सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका अष्टपैलू कलाकाराचा प्रवास थांबला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत शोककळा […]
Zilla Parishad Election : उंब्रज –पाल जिल्हा परिषद गटात सकाळपासून उत्स्फूर्त मतदान
उंब्रज जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत उंब्रज : नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या दोन्ही गटांमध्ये [...]
लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. त्याऐवजी ई-केवायसीची माहिती ऑनलाइन पोर्टलवर पूर्ण करणे किंवा दुरुस्त करण्याची अंतिम मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला असून, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी […]
Kolhapur News : लिंगनूर दुमाला येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावला मतदानाचा हक्क
हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला केले मतदान सेनापती कापशी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथे आठ वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला. [...]
व्हीलचेअरवरून मतदान, 85 वयातही उत्साह; प्रत्येक मत मोलाचं सुमित्रा भिंगार्डे यांनी दिला संदेश
लोकशाही ही केवळ शासन आणि निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर अवलंबून नसून ती समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातूनच जिवंत राहते, याचे हृदयस्पर्शी चित्र आज संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान संगमेश्वर रामपेठ येथील रहिवासी असलेल्या 85 वर्षीय सुमित्रा पांडुरंग भिंगार्डे यांनी व्हीलचेअरच्या सहाय्याने मतदान करत आपला हक्क बजावला. या संपूर्ण […]
चिपळूण एस.टी. स्टँडवर प्रवाशाचा धिंगाणा; कंट्रोल रूमची काच फोडली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
एस.टी. स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (7 फेब्रुवारी) सकाळी घडली. या प्रकरणी एका प्रवाशावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? चिपळूण एस.टी. स्टँड येथे विनायक भास्कर कुसाळकर (55) हे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत […]
आयसीयू मधून थेट मतदान केंद्रावर
ज्येष्ठ मच्छीमार दादा सावजी यांचे प्रतिकूल परिस्थितीतही मतदान मालवण / प्रतिनिधी सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छीमार श्री.दादा सावजी यांनी थेट हॉस्पीटल आयसीयु मधून येऊन सर्जेकोट येथील मतदान केंद्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी मतदानाचा हक्क बजावला.श्री. दादा सावजी हे मालवण मधील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकार संदर्भात मागील तीन दिवसापासून आयसीयु मध्ये उपचार घेत आहेत.त्यांनी [...]
मराठी अस्मितेसाठीची लढाई कायम राहणार; सक्षम विरोधी गट म्हणून भूमिका पार पाडू – किशोरी पेडणेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना मराठी अस्मितेची लढाई कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. 2022 नंतर सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, संख्येचे गणित बदलले असले तरी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी लावलेले झाड आजही मुंबईत जिवंत आहे आणि मराठी माणूस […]
वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर यांचे निधन
वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा वेंगुर्ला बाजारपेठेमधील मे. रघवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर (63) यांचे आज (दि.7 फेब्रुवारी) शनिवारी पहाटेच्या सुमारास गोवा-मणिपाल येथील रूग्णालयात ह्रदय विकाराच्या आजारावर उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेंगुर्ले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापारी वर्गाने त्यांच्या निधनाचे [...]
येमेकोंड मतदान केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार आढळला किणे वार्ताहर : येमेकोंड मतदान केंद्रावर गेटसमोर लिंबू-मिरची आणि हिरव्या कपड्यात बांधलेला नारळ, हळदी-कुंकू लावलेला भानामतीचा प्रकार आढळून आला. ही घटना सकाळी प्राथमिक शाळेच्या गेटजवळ लक्षात आली, जिथे निवडणूक अधिकारी गोवेकर आणि कर्मचाऱ्यांनी [...]
राधानगरीतील नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क उत्साहाने बजावला राधानगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राधानगरी तालुक्यात सकाळपासून मतदान सुरू आहे.तालुक्यातील मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून सुरु असलेली गर्दी दुपारीही वाढत असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी रांगा [...]
Gadhhinglaj News |गडहिंग्लज तालुक्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज तालुक्यात सकाळी सक्रीय मतदान गडहिंग्लज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून गडहिंग्लज तालुक्यात मतदान सुरू झाले. सकाळी साडेतीन तासात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर सर्वत्र शांतता राहिली [...]
Shahuwadi News : लग्नाच्या गडबडीतही लोकशाहीला प्राधान्य; वराने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
लग्नाच्या धावपळीतही नवरदेवाने बजावला मतदानाचा अधिकार शाहूवाडी : मतदान हा प्रत्येक जागरूक नागरिकाचा पवित्र हक्क व कर्तव्य आहे, तर लग्नसोहळा हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. या दोन्ही जबाबदाऱ्या समतोलपणे पार पाडत शाहूवाडी तालुक्यातील परळे येथे लोकशाहीप्रती निष्ठा जपणारा एक [...]
Zilla Parishad Election |कागल तालुक्यात शांततेत मतदान सुरू, सकाळी साडेअकरापर्यंत 29.73 टक्के मतदान
हसन मुश्रीफ यांची विविध मतदान केंद्रांना भेट सेनापती कापशी : कागल तालुक्यामध्ये अतिशय शांततेने सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २९.७३ मतदान झाले आहे. काही केंद्रावर सकाळपासूनच रांगा आहेत. ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज लढत [...]
शिरोळ तालुक्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांचीही मोठी उपस्थिती शिरोळ : शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. सर्वत्र अत्यंत चुरशीचे वातावरण असून मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण 22.11 टक्के [...]
Ratnagiri News –कराड–चिपळूण रेल्वेमार्गाची आशा मावळली; अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याने नाराजी
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना लोहमार्गाद्वारे जोडण्यासाठी कोल्हापूर -वैभववाडी रेल्वेमार्गास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. केंद्राचा ३,४११ कोटी रुपयांचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पाला पुढील वर्षात सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गेल्या तीन दशकांपासून मागणी असलेल्या कराड–चिपळूण रेल्वेमार्गाला अर्थसंकल्पात स्थान न मिळाल्याने या भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत […]
अजितदादांच्या इच्छेनुसार पवार कुटुंब परिवार म्हणून एकत्रच राहणार; रोहित पवार यांचे महत्त्वाचे संकेत
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पिंपळी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र एक कुटुंब म्हणून मी सुनेत्रा काकींमध्येच अजितदादांना पाहतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. अजितदादांकडील उपमुख्यमंत्रीपद […]
Zilla Parishad Election : शाहूवाडी तालुक्यात मतदानाला संथ सुरुवात
दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळच्या सत्रात मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. काही मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती कमी दिसून आली. बाहेरील मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांकडून विशेष वाहनांची सोय करण्यात [...]
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक
रविवार, 08 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि पश्चिम मार्गावर विविध ठिकाणी देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या वळवण्यात येणार असून काही सेवा रद्दही राहणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार या अप आणि डाउन स्लो मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक […]
खाणसंचालकनारायणगाडयांचीमाहिती पणजी : राज्यातील खाण व्यवसाय मूळ पदावर येत असून, उत्तर गोवा जिह्यातील विविध ठिकाणचे पाच खाण पट्टे सुरू केल्यानंतर काल गुऊवारी 5 रोजी दक्षिण गोव्यातील काले मिनरल खाण पट्टा-4 सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाचे संचालक नारायण गाड यांनी दिली. गाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मुख्य [...]
‘आरव फार्मा’ विरोधात गुन्हा नोंद
बनावटसर्पदंशऔषधआरोग्यखात्यालाविकल्याचाआरोप: बनावटसर्पविषाचासाठाजप्त पणजी : बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवून आरोग्य खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी सांताक्रूझ येथील ‘आरव फार्मा’ औषध वितरण कंपनीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. औषध विभागाचे उपसंचालक डॉ. शाहीन सय्यद यांनी आरोग्य विभागाच्या वतीने या फार्मा कंपनीविरुद्ध बनावट लायोफिलाइज्ड (फ्रीझ-ड्राय) हे सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवल्याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. [...]
चेन्नई सिंगम्सने ‘मैदान मारले’! फायनलमध्ये टायगर्स ऑफ कोलकाताला नमवून पहिल्या जेतेपदाला गवसणी
चेन्नई सिंगम्सने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ (ISPL) सीजन 3 च्या किताबावर आपले नाव कोरले आहे. शुक्रवारी सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने टायगर्स ऑफ कोलकाताचा 29 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले. सर्वात आधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर […]
शहापुरात कारची काच फोडून 11 लाखाचे दागिने लंपास
अवघ्यासव्वातासात4 किलो72 ग्रॅमवजनाचेचांदीचेदागिनेपळविल्यानेसुवर्णकारांमध्येखळबळ: पोलिसांतफिर्याददाखल बेळगाव : कारची काच फोडून अवघ्या सव्वा तासात चोरट्यांनी सुमारे 10 लाख 91 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने पळविले आहेत. सदर घटना बुधवार दि. 4 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास तेली पाटील गल्ली, शहापूर येथील सरस्वती शाळेनजीक घडली आहे. याप्रकरणी नागराज वसंत टंकसाळी रा. बागलकोट यांनी गुरुवार दि. 5 रोजी शहापूर [...]
Kolhapur News: कळंब्यात ग्रामस्थांचा मतदानाला चांगला प्रतिसाद
साडेअकरापर्यंत ३२०० मतदारांनी बजावला हक्क कळंबा : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कळंबे [...]
बडाल अंकलगीतील झाडांच्या कत्तलविरोधात आंदोलन
विविधसंघटनांचावनविभागाच्याकार्यालयासमोरठिय्या: अधिकाऱ्यांनाधरलेधारेवर बेळगाव : बडाल अंकलगी येथील 50 एकर वन्यप्रदेशातील झाडांची कत्तल करण्यात आली असून याचा निसर्गावर विपरित परिणाम होणार आहे. काही राज्यकर्त्यांच्या दबावातून व सरकारी योजना राबविण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडे तोडण्यात आल्याने वन्यप्रदेशातील प्राणी-पक्षांवर परिणाम होणार असून त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे तोडून परस्पर लाटण्यात [...]
रुक्मिणीनगर येथील घरफोडीत एलअॅण्डटीचे 4 लाखांचे साहित्य चोरीस
सीसीटीव्हीकॅमेऱ्यातचोरटेकैद: टोळीतसहामहिलांचासमावेश? बेळगाव : घराचा कुलूप तोडून चेरट्यांनी एलअॅण्डटी कंपनीचे सुमारे 3 लाख 82 हजार किमतीचे साहित्य पळविले आहे. सदर घटना रविवार दि. 1 रोजी पहाटे 4.26 ते 5.36 च्या सुमारास रुक्मिणीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. शेजारच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पाहिले असता मालवाहू रिक्षातून आलेल्या 7 [...]
ओलमणीत काजू बागेला आग : लाखोंचे नुकसान
सुमारे800 झाडेआगीच्याभक्ष्यस्थानी: जांबोटीच्यातलाठीकडूनतातडीनेपाहणी वार्ताहर/जांबोटी ओलमणी ता.खानापूर येथे शुक्रवारी दुपारी गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या काजू बागेला अचानक आग लागून सुमारे 800 काजू झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ओलमणीपासून काही अंतरावर दारोळी गावाकडे जाणाऱ्या मधल्या स्त्यावरील माळरानावरील जमिनीमध्ये ओलमणी गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजूच्या झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये [...]
मनपा आयुक्तांसोबत एसकेकेएसची विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : सफाई कर्मचारी हित रक्षण कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त बी. एम. कार्तिक यांची भेट घेऊन सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीत आयुक्तांनी कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोणतेही कारण नसताना सफाई कामगार डेव्हिड बुडाला यांना कामावरून काढण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश [...]
कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट बनवून कोट्यवधींची कमाई केली जाते. पण इतर संवेदनशील विषयांवर चित्रपट का बनवले जात नाहीत? असा सवालशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच केरळ फाईल्स बनवणाऱ्यांनी एप्स्टिन्स फाईल्सवर चित्रपट काढावा, बॉक्स ऑफिसवर खूप चालेल असा टोलाही त्यांनी लगावला. पवार आणि ठाकरे कुटुंबांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “राजकीय […]
अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करणाऱ्यांना धमक्या देऊ नका – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे असून पवार कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे विलिनीकरण असो किंवा अजित पवारांच्या अपघाताबाबतचे प्रश्न असोत, […]
Zilla Parishad Election : राधानगरी तालुक्यात उत्साहात मतदान,सकाळी साडेदहा वाजेपर्यंत 15 टक्के मतदान
राधानगरीतील २२३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू राधानगरी ( महेश तिरवडे ) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील २२३ मतदान केंद्रांवर सकाळपासून शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू असून, सकाळी [...]
चंद्रावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहा !
अशोक चक्र पुरस्कार विजेते अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे प्रेरणादायी आवाहन : गोवा राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात साधला संवाद पणजी : विकसित भारताचे,अंतराळात जाण्याचे आणि चंद्रावर पाऊल टाकण्याचे स्वप्न पाहून तसे ध्येय ठेवा व प्रयत्न केल्यास ती स्वप्ने निश्चितच पूर्ण होतील, असा सल्ला अशोक चक्र पुरस्कार विजेते फायटर पायलट शुभांशू शुक्ला यांनी दिला. पालक – शिक्षकांनी शाळकरी [...]
रुग्णसेवेतील देवदूत : डॉ. एम. डी. दीक्षित
डॉ. एम. डी. दीक्षितयांचाआजवाढदिवस: त्यानिमित्तत्यांचापरिचय-कारकीर्द हृदय हा मानवी शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. रुग्णांसाठी डॉक्टर हा देवदूतच असतो. यातच हृदय रुग्ण म्हटले की, आपसुक नाव समोर येते ते म्हणजे प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. एम. डी. दीक्षित. एक प्रेमळ, ऊग्णांप्रति गंभीर आणि नि:स्वार्थ देवदूत समोर उभा आहे, असे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटते. हजारो रुग्णांना पुनर्जन्म देणाऱ्या [...]
हिंदू एकतेमुळेच नवा भारत बलशाली
चक्रवर्तीसुलीबेलेयांचेप्रतिपादन: हिंदूसंमेलनसमितीतर्फेविराटहिंदूमेळावा बेळगाव : आपण हिंदू असल्याचे छाती ठोकपणे सांगितले पाहिजे. मराठ्यांनी धैर्याने शत्रूंना सामोरे जावून इतिहास घडविला. आज हिंदूंच्या एकतेमुळे नवा भारत बलशाली आहे. भारताची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून, हे केवळ हिंदूंच्या एकतेमुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन युवा ब्रिगेडचे संस्थापक चक्रवर्ती सुलीबेले यांनी केले. हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी महांतेशनगर येथील हिंदू संमेलन समितीतर्फे [...]
धामणे येथील रस्त्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
बेळगाव : धामणे-येळ्ळूर येथील शेताकडे जाणारा रस्ता काहीजणांनी बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना रस्त्याअभावी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करून रस्ता खुला करून द्यावा, अशा मागणीचे पत्र धामणे येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठविले होते. याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून येत्या 7 दिवसात कार्यवाही केली जाईल, असे [...]
सुळगा (हिं.) येथे लक्ष्मीदेवीच्या जयघोषात भव्य मिरवणूक
लक्ष्मीमंदिरलोकार्पणसोहळ्यानिमित्तआजकळसारोहण: भजनीमंडळांचालक्षवेधीसहभाग: भाविकांचीअलोटगर्दी वार्ताहर/उचगाव भंडाऱ्याची उधळण, धनगरी वाद्यांचा गजर आणि लक्ष्मीदेवीच्या जयघोषाने सुळगा (हिं.) गाव भfिक्तमय वातावरणात नाहून निघाले. लक्ष्मी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावामध्ये काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सुळगा येथील लक्ष्मी मंदिराची वास्तुशांती, कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्याला सोमवार दि. 2 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. सोहळ्याच्या [...]
पंचहमी योजना कमिटीच्या बैठकीत योजनांचा आढावा
बैठकीतअधिकारीधारेवर: महिलांचेअनुदानबंदझाल्याससंपर्कसाधण्याचेआवाहन खानापूर : खानापूर तालुका पंचहमी योजना कमिटीची बैठक येथील तालुका पंचायत सभाभवनात गुरुवारी गँरटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपस्थितांचे स्वागत ता. पं. अधिकारी रमेश मेत्री यांनी करून महिन्याभरातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हेस्कॉमचे प्रवीण बरगले गृहज्योती योजनेविषयी माहिती देताना म्हणाले, तालुक्यात 63239 लाभार्थी असून डिसेंबर महिन्यात 1 कोटी 96 [...]
आगीत ऊस जळाल्यानंतर विमा संरक्षण कवच मिळावे
ऊसउत्पादकशेतकऱ्यांचीमागणी वार्ताहर/हलशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उसाच्या पिकाला लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच अचानक लागणाऱ्या आगीमुळे ऊस जळून खाक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेसह वाऱ्याचा वेग, विजेच्या तारांमधील ठिणग्या तसेच काही कारणांमुळे उसाच्या शेतात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विमा [...]
संकेत सुरतेकर विश्वकर्मा किताबाचा मानकरी
श्रीहरीबेळगावकरउत्कृष्टपोझर बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स आयोजित श्री विश्वकर्मा अनगोळ मर्यादित टॉप टेन शरीरसौष्ठव स्पर्धेत समर्थ जीमच्या संकेत सुरतेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर ‘श्री विश्वकर्मा’ हा मानाचा किताब पटकाविला. श्रीहरी बेळगावकर उत्कृष्ट पोझर ठरला. अनगोळयेथेआयोजितयास्पर्धेचेउद्घाटनमान्यवरांच्याहस्तेहनुमानवविश्वकर्माप्रतिमेचेपूजनकरूनकरण्यातआले. निकाल पुढीलप्रमाणे 1) संकेत सुरतेकर-समर्थ जीम 2) प्रभू चौगुले-बर्नआऊट 3) श्रीहर बेळगावकर- व्हीस्क्वेअर 4) मनिश सांबरेकर-हनुमान तालीम 5) निरंजन जाधव-हनुमान [...]
विनीत हणमशेटला ‘आरपीडी श्री किताब
बेळगाव : आरपीडी येथे 15 व्या आरपीडी शरीरसौष्ठव स्पर्धेत विनित हणमशेटने‘आरपीडी श्री किताब’ पटकाविला. किशोर पुजार उत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला. निकाल पुढील प्रमाणे 55 किलो गट 1) आकाश अगसा 2) आनंद टी., 60 किलो गट-1) श्रीनाथ पाटील 2) साहिल सावंत, 65 किलो गट -1) कार्तिक कांबळे 2) श्रीधर हांडे, 70 किलो गट-1) समर्थ मजुकर 2) [...]
क्रिप्टो करन्सीमध्ये मोठी उलथापालथ, गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले
क्रिप्टो बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि बाइनेन्स कॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये थेट 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अवघ्या 24 तासांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 18 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे जागतिक मार्पेट पॅप 2.24 ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली आला आहे. जोरदार घसरण झाल्यामुळे क्रिप्टो मार्पेटमध्ये भीती आणि अनिश्चितता पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून बिटका@इन […]
जबाबदार देशांच्या यादीत हिंदुस्थान 16वे; सिंगापूर पहिल्या, स्वित्झर्लंड दुसऱ्या स्थानी
वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनने ‘रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स, 2026’ची यादी जाहीर केली असून या यादीत हिंदुस्थानला ‘टॉप 10’मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. हिंदुस्थान या यादीत 16 व्या स्थानी आहे. या यादीत ‘टॉप-10’च्या यादीत पहिले स्थान हे सिंगापूरने पटकावले आहे. दुसऱया नंबरवर स्वित्झर्लंड, तिसऱया स्थानी डेन्मार्प, त्यानंतर सायप्रस, स्वीडन, चेकिया, बेल्जियम, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि जॉर्जियाला स्थान देण्यात […]
अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, दूतावासाकडून स्पष्ट सूचना; फोन चार्ज करण्याचेही आवाहन
इराणमध्ये राहणाऱया अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, अशा स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासांनी आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. शक्य तितक्या लवकर इराण सोडा. बाहेर पडण्याची योजना स्वतःच तयार करा आणि यात अमेरिकन सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, असेही अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे. इराणमध्ये देशव्यापी निदर्शने आणि अशांततेमुळे सुरक्षा व्यवस्था कडक झाली आहे. रस्ते बंद आहेत, सार्वजनिक वाहतूक […]
जपानमध्ये बर्फवृष्टीचा कहर, 35 जणांचा मृत्यू
जपानमध्ये 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला असून 358 लोक जखमी झाले आहेत. जपानमधील निगाता, अकिता, यामागाता, होक्काइडो आणि आओमोरी यांसह अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानच्या समुद्र किनारी असलेल्या निगाता या ठिकाणी सर्वात जास्त बर्फवृष्टीचा फटका बसला आहे. या ठिकाणी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा रस्त्यावर पडलेला आणि […]
पंतप्रधानांचे विदेश दौरे परराष्ट्र मंत्र्यांपेक्षा जास्त, मोदी आजपासून मलेशिया दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा थांबायचे नाव घेत नाही. पंतप्रधान झाल्यापासून ते दर महिन्याला परदेश दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी हे उद्या, 7 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा दोन दिवसांच्या मलेशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मोदींचा हा दौरा दोन दिवसांचा असून ते या दौऱ्यात मलेशियातील क्वालालंपूर येथे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम […]
सरकारी वकिलांच्या मानधनात वाढ, फेब्रुवारीपासून सुधारित फी लागू
केंद्र सरकारने सरकारी वकिलांना मानधन वाढीची भेट दिली आहे. सरकारी वकिलांच्या वेगवेगळ्या श्रेणीतील मानधनात वाढ करण्यात आली आहे. नव्या अधिसूचनेनुसार, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ट्रिब्युनल, आर्बिट्रेशनमध्ये वकिली करणाऱ्या वकिलांचे मानधन वाढवले आहे. सुधारित मानधन फेब्रुवारी 2026 पासून लागू झाले आहे. सरकारने स्पष्ट केलंय की, 1 फेब्रुवारी 2026 च्या आधी केलेल्या कामांसाठी किंवा खटल्यांसाठी वकिलांना पूर्वीच्याच दराने […]
व्यवसाय चांगला सुरू असताना त्याला कॅसिनो जुगाराची सवय लागली. त्यात तो पंगाल झाला. मग झटपट पैसा कमावण्यासाठी त्याने सोनसाखळी चोरण्यास सुरू केली. त्यात तो यशस्वी होऊ लागला. नवी मुंबई पोलीस, गोवंडी पोलीस, गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेऊ लागली. पण अचूक शोध घेत शीव पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. मोहन कोकाटे (48) असे त्या हायप्रोफाईल […]
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण –एकनाथ खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज झटका दिला. विशेष कोर्टाने एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याप्रकरणी कोर्टात आरोपनिश्चितीची प्रक्रिया होणार होती. मात्र खडसे दाम्पत्य कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे विशेष एमपीएमएलए कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. भाजप सरकारमध्ये मंत्री असताना […]
पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार, म्हाडा 15 फेब्रुवारीपासून रहिवाशांना भाडे देणार
अंधेरी पूनमनगर येथील धोकादायक पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. म्हाडामार्फत या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून आठवडय़ाभरात करारनामा करून 15 फेब्रुवारीपासून रहिवाशांना घरभाडे सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंधेरी पूनमनगर येथील पीएमजीपी वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती धोकादायक […]
प्रवाशावर दगड फेकणाऱ्या मजुराला अटक
लोकलमध्ये बसण्याच्या सीटच्या वादातून प्रवाशावर दगडफेक करणाऱयाला अखेर वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. योगेंद्र बोद्धा असे त्याचे नाव आहे. जखमी निशांत खात्री हे दादर येथे राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी अंधेरी येथून दादरला जाणारी जलद गतीची लोकल पकडली. तेव्हा लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जागेवरून वाद झाला. रात्री अकरा वाजता लोकल वांद्रे स्थानकात फलाट क्रमांक 5 वर […]
अण्वस्रांची संख्या कमी करण्याबाबत नवा करार करण्याची तत्काळ गरज असल्यावर अमेरिका आणि रशियाने संमती दिली असतानाच चीनने गुप्तपणे अण्वस्त्र चाचणी केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचवेळी चीनने अण्वस्त्रांची संख्या वाढवल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे. अमेरिकेकडून चीनवर भविष्यातील अण्वस्त्र करारामध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने दबाव वाढत आहे. मात्र, त्याचवेळी चीनने अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त […]
मागील पाच वर्षांत (2021-25) एपूण 1,68,665 हिंदुस्थानी नागरिकांची विविध देशांमधून हकालपट्टी करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेसह अन्य देशांतून हिंदुस्थानींना मोठय़ा संख्येने हद्दपार करण्यात आले आहे. कोणत्या देशाने किती हिंदुस्थानींना परत पाठवले, याबाबतची आकडेवारी सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली. गेल्या पाच वर्षांत अमेरिका आणि इतर देशांतून किती हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतर रोखण्यासाठी […]
दहावी-बारावी परीक्षार्थींच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा गाड्या धावणार
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्टच्या जादा गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. शाळा व पालकांच्या मागणीनुसार त्या त्या भागात विशेष गाडय़ांची व्यवस्था केली जाणार आहे. किंबहुना, वाहतूक कोंडीमध्ये बस अडकू नयेत, यासाठी बेस्टचे अधिकारी जागोजागी तैनात राहणार आहेत. बारावीची बोर्ड परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची बोर्ड परीक्षा 20 […]
हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! ‘सहयोग पोर्टल’विरोधात कुणाल कामरा हायकोर्टात
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सरकारच्या ‘सहयोग’ पोर्टलविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सहयोग पोर्टलसह सुधारित आयटी नियमांना कामराने आव्हान दिले असून हे सुधारित नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत असल्याचे कामराने म्हटले आहे. कुणाल कामरा याने याचिकेत म्हटले आहे की, सहयोग पोर्टल हे सेन्सॉरशिपचे साधन नाही, परंतु सोशल मीडिया मध्यस्थ आणि सरकारी एजन्सींमध्ये सहकार्य […]
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास नजीकच्या काळात सुकर होण्याची चिन्हे आहेत. जोगेश्वरी टर्मिनस, बोरिवली ते विरार आणि विरार ते डहाणूदरम्यान अतिरिक्त मार्गिका अशा विविध प्रकल्पांची कामे सध्या फास्ट ट्रकवर आहेत. ही कामे पूर्ण होऊन पुढील तीन वर्षांत चर्चगेट ते डहाणूपर्यंत लोकल ट्रेनच्या अतिरिक्त 165 फेऱयांची भर पडणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची प्रवासी क्षमता 5 लाखांनी […]
चर्चगेट ते मरीन ड्राईव्ह परिसरातील आरे स्टॉल हटविण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असून या कारवाईने मराठी स्टॉलधारकांच्या रोजीरोटीवर गदा येणार आहे. हे स्टॉल 50 वर्षांपासून उभे असतानाही या स्टॉल्सवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरू असून त्याविरोधात शिवसेनेच्या महाराष्ट्र दूध वितरक सेनेने आवाज उठवला आहे. बृहन्मुंबई दूध योजनेच्या स्थापनेपासून संपूर्ण मुंबईत 1811 आरे स्टॉलमार्फत रास्त दरात […]
कर्नाटकची सामन्यावर पकड, मुंबईचा 120 धावांत खुर्दा; कर्नाटक 2 बाद 110
रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने पहिल्याच दिवशी मुंबईला चांगलाच हादरा दिला. प्रसिध कृष्णा, विद्वथ कावेरप्पा आणि श्रेयस गोपाल यांच्या भेदक माऱयाने मुंबईचा डाव अक्षरशः 120 धावांत कोसळला, तर मयंक अगरवालच्या नाबाद अर्धशतकाने कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 110 अशी मजल मारत सामन्यावर आपली घट्ट पकड केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबईचा निर्णय पूर्णपणे फसला. […]
असं झालं तर…एसआयपी रद्द करावी लागली…
म्युच्युअल फंड एसआयपी थेट रद्द करता येते. त्यासाठी म्युच्युअल फंड वेबसाईटला भेट द्या. तुमच्या फोलिओ नंबर किंवा पॅनसह लॉग इन करा. तुमची एसआयपी निवडा. जर तुम्ही एजंटमार्फत गुंतवणूक केली असेल तर म्युच्युअल फंड कसा बंद करायचा आणि पुढील प्रक्रिया कशी करायची हे जाणून घेण्यासाठी एजंटशी संपर्क साधा. जर तुमचा एसआयपी बँक एसआय किंवा ऑटो-डेबिटद्वारे […]
वित्तीय संस्था व बँकांना लुबाडणारे गेल्या 20 ते 30 वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. त्यांच्या विरोधात जारी झालेल्या जामीन व अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी होत नाही. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत ठोस भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. जामीन, अजामीनपात्र वॉरंट जारी होऊनही आरोपी सापडत नसल्याने याचिका दाखल होतात. अशी अनेक प्रकरणे गेली 20 […]
मांडवी दररोज रखडट्टीची, वेळेवर चालणारी ट्रेन द्या प्रवाशांचा प्रचंड संताप
कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार मांडवी एक्प्रेस दररोज 3 ते 4 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे. हा त्रास आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आम्हाला फक्त वेळेवर चालणारी ट्रेन उपलब्ध करून द्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्सप्रेसचा […]
दुर्गेश आखाडे, रत्नागिरी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला येणाऱ्या चाकरमान्यांनो, मुंबई-गोवा महामार्ग अजूनही प्रगतीपथावरच आहे. आरवलीपासून वाकेडपर्यंत तुम्हाला खडतर प्रवास करावा लागणार आहे. मात्र वाकेडपासून आंगणेवाडीपर्यंत तुमची गाडी सुसाट जाऊ शकते. महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील पुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. 9 फेब्रुवारीपासून आंगणेवाडीतील भराडी देवीच्या […]
स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या वेळी तुम्ही 39-40 वर्षांचे असाल. तुम्ही आताच विकसित हिंदुस्थानला तुमचे स्वप्न बनवायला हवे, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशी वस्तू स्वीकारण्याचा सल्ला दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रात देशभरातील विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी 5 राज्यांमधील दिल्ली, कोईम्बतूर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), देव मोगरा […]

29 C