फळाची अपेक्षा सोडून कर्मे करावीत
अध्याय तिसरा भगवंत म्हणले, जगात थोर लोक जे कर्म करतात, ते धर्माला धरूनच असल्याची खात्री असल्याने सामान्य लोक त्यालाच धर्माचरण समजून त्याप्रमाणे वागतात. येथे जन्माला आलेल्याला कर्म हे करावेच लागते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. वास्तविक पाहता, मी काही केलेच पाहिजे असे नाही किंवा माझ्याजवळ नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, तरीपण मी कर्म करतो. पूर्णतेच्या [...]
आरे कॉलनीत बेस्टची बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबईतील आरे कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. बेस्ट बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात सकाळी सुमारे 6.20 वाजता आरे कॉलनी गेट क्रमांक 5 जवळ आरे रोडवर एका बेकरीसमोर झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बेस्टची बस विक्रोळी डेपोतून बोरीवली पूर्वेकडे जात होती, तर ट्रक विरुद्ध दिशेने […]
Ahilyanagar News –साईबाबांच्या चरणी 655 ग्रॅम वजनाचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती व प्रतिमा मोहंती यांनी श्री साईबाबांच्या चरणी ६५५ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. साईबाबांच्या चरणी 655 ग्रॅम वजनाचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण pic.twitter.com/Zkxr6hQ81W […]
पाकिस्तानात शिक्षा पूर्ण केल्यानंतरही परतीची वाट पाहत आहेत १६७ हिंदुस्थानी कैदी, सरकारने दिली माहिती
हिंदुस्थान आणि पाकिस्तानने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकमेकांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैद्यांच्या आणि मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण करण्यात आली आहे. वर्ष २००८ च्या कॉन्सुलर अॅक्सेसवरील द्विपक्षीय कराराच्या तरतुदींनुसार या यादीची देवाणघेवाण करण्यात आली. केंद्र सरकारने ही माहिती जाहीर केली आहे. या यादीत पाकिस्तानने ५८ नागरी कैदी आणि १९९ मच्छिमार हिंदुस्थानी असल्याचे नमूद केले आहे. यापैकी १६७ हिंदुस्थानी […]
IND Vs PAK –नवीन वर्षात दोन वेळा हिंदुस्थान-पाकिस्तान आमने-सामने; तारखा लक्षात ठेवाच
हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की सर्व कामे बाजूला ठेवून सामना पाहण्यासाठी वेळ दिला जातो. मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावापूर्ण आहेत. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामने ICC स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांव्यतिरिक्त खेळले जात नाहीत. यंदाच्या वर्षी फक्त दोन वेळा दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनामध्ये T-20 World Cup 2026 खेळला जाणार आहे. […]
शबरीमाला सोनं चोरी घोटाळ्यात नवा खुलासा; इतर सात पॅनेलवरूनही सोने गायब असल्याचा SITचा दावा
शबरीमाला मंदिरातील सोन्या चोरी प्रकरणाबाबत विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. मंदिरातील केवळ दोन कलाकृतींवरचे सोने गायब नसून इतर शिल्पांवरीलही सोन्याचा थर गायब असल्याचे समोर आले आहे. केरळ हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासात, द्वारपाल मूर्ती आणि गर्भगृहाच्या दरवाज्यावरील सोने गायब प्रकरणी दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते. मात्र कोल्लम येथील विजिलन्स कोर्टात सादर […]
स्वीत्झर्लंडच्या बारमध्ये भीषण आग; ४० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
स्वीट्जरर्लंडच्या प्रसिद्ध क्रॅन्स-मोंटाना येथे नववर्षाच्या जल्लोषादरम्यान एका नाइटक्लबमध्ये भीषण स्फोट झाला. या सफोटोनंतर लागलेल्या आगीत सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १:३० वाजता घडली. येथे ‘ले कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये २०० हून अधिक लोक नववर्ष साजरे करत होते. याचवेळी ही घटना घडली. स्फोटानंतर […]
एअर मार्शल नागेश कपूर यांनी वायुसेना उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला
हिंदुस्थानी वायुसेनेच्या उपप्रमुखपदी (व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ) एअर मार्शल नागेश कपूर यांनी आज कार्यभार स्वीकारला. ते निवृत्त होणाऱ्या एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची जागा घेत आहेत. एअर मार्शल नागेश कपूर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) पदवीधर आहेत. डिसेंबर १९८५ मध्ये एनडीए प्रशिक्षण पूर्ण करून ६ डिसेंबर १९८६ रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन्ड झाले. […]
FASTag युजर्सला मोठा दिलासा, कारसाठी KYV प्रक्रिया रद्द; जाणून घ्या नवे नियम
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग युजर्ससाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. विशेषतः कार, जीप आणि व्हॅन मालकांसाठी ‘नो युवर व्हेइकल’ (KYV) प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे टोल प्लाझावर होणारी अनावश्यक त्रास आणि दस्तऐवज दाखवण्याच्या त्रासापासून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत फास्टॅग सक्रिय झाल्यानंतर KYV प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होती. यात वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्र […]
Ratnagiri News –लोवले येथील कृषी पदवीधर तरुण शुभम दोरकडेने एक एकरवर फुलवली झेंडूची शेती
झेंडूची फुलं म्हटली की, दसऱ्याचा सण डोळ्यांसमोर उभा राहतो. या काळात झेंडूला मोठी मागणी असली तरी अनेकदा शेतकऱ्यांना मातीमोल भावातच फुलांची विक्री करावी लागते. मात्र झेंडूची शेती केवळ दसऱ्यापूर्ती मर्यादित नसून वर्षभर योग्य नियोजन केल्यास ती लाखोंचे उत्पन्न देणारी ठरू शकते, हे संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचा कृषी पदवीधर तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून […]
संभाजीनगरात शिवसेना उमेदवारांना माघार घेण्यास धमकी, हिशेब ठेवला जाईल; अंबादास दानवे यांनी दिला इशारा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमकावण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. दानवे यांनी म्हटले आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मंत्री हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी दबाव टाकत […]
वीज कनेक्शन हमखास वेळेत मिळण्यासाठी महावितरणची नवी व्यवस्था
धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात, शहरांमध्ये सात दिवसात आणि ग्रामीण भागात 15 दिवसात नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीज पुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत दाखलेही जोडता येतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते. ग्राहकाने पैसे भरले की, नवा मीटर जोडून ग्राहकाला वीज कनेक्शन दिले जाते. सध्याची ही पद्धती अर्ज केल्यापासून नवे कनेक्शन दिल्याची यंत्रणेत नोंद होण्यापर्यंत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना हमखास आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नवी जोडणी मिळण्याचा विश्वास महावितरणच्या प्रशासनाला वाटतो. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महानगरांसाठी तीन दिवस, शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात 15 दिवसात कनेक्शन देण्याची तरतूद केली असली तरी ती जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यासाठी ही कालमर्यादा आहे. विजेचे खांब उभारून व तारा जोडून वीज पुरवठा उपलब्ध करण्यासारखी पायाभूत सुविधांची कामे गरजेची असतील तर तेथे 90 दिवसात वीज जोडणी देण्याची कालमर्यादा आयोगाने निश्चित केली आहे. नव्या वर्षात सुरुवात महावितरणच्या प्रशासनाने केलेल्या सुधारणेमुळे नवीन वीज कनेक्शन देण्याच्या कामात गतीमानता येईल आणि अधिक पारदर्शकता येईल, असाही विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवे वीज कनेक्शन देण्याच्या बाबतीत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोठे दिरंगाई होत असेल तर माहिती तंत्रज्ञानामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यावर विलंब झाला हे समजेल. परिणामी एकूण प्रक्रियेची गती वाढविणे शक्य झाले आहे. महावितरणची ही व्यवस्था 1 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे.
सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांचे नाते आपुलकी आणि स्नेहाचे राहणार- बसवराज पाटील
मुरुम (प्रतिनिधी) - कै. माधवराव (काका) पाटील ज्या उद्देशाने शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. त्यांचे स्वप्न होते की, संस्थेत चांगली माणसे आली पाहिजेत. त्यामुळे नगर शिक्षण विकास मंडळ या संस्थेत जे कर्मचारी नियुक्त केले गेले ते गुणवत्ताधारक होते आणि आहेत. चांगली माणसे निर्माण होणे ही संस्थेची परंपरा असून ज्या कर्मचाऱ्यांनी संस्थेत राहून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळेच संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात नाव होत आहे. संस्था म्हणजे एक परिवार असून प्रत्येक कर्मचारी हा संस्था व पाटील परिवाराशी एकरुप असून आमचे नाते अतूट बनले आहे. सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांचे नाते आपुलकी आणि स्नेहाचे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजप लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील यांनी प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे व प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांचा गुरुवारी (ता. 1) रोजी नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम च्या वतीने माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संस्थेच्या वतीने सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बसवराज पाटील व बापूराव पाटील यांच्या हस्ते सपाटे व बनसोडे यांचा संपूर्ण आहेर उपचार करून सपत्नीक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, संस्थेचे संचालक राजू भोसगे, प्राचार्य डॉ. सादक वली, प्राचार्य उल्हास घुरघुरे, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर, दत्तप्रसाद शेळके, कांत हुलसुरे, काशिनाथ मिरगाळे, बाबुराव जाधव, देवेंद्र कंटेकुरे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, सौ. उषा सपाटे, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, सौ. वैशाली बनसोडे, मुख्याध्यापक इरफान मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, या संस्थेत प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केल्यानेच आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये नावारुपाला येत आहेत. सत्काराला उत्तर देताना सपाटे म्हणाले की, जे अनुभव मला या संस्थेत काम करताना आले त्यांचा लेखाजोखा मांडून सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. डॉ. बनसोडे म्हणाले की, संस्थेच्या प्रती आम्ही कायम ऋणात राहून पुढच्या काळात देखील संस्थेशी एकरूप राहू. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. विविध शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, सहकारी मित्र, नातेवाईक, मुरूम शहरातील पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु - वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा - विश्वास शिंदे
धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पूरग्रस्त कुटुंबातील पालकांनी आपल्या वधु - वरांची नोंदणी करून या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे मार्गदर्शक विश्वास शिंदे यांनी केले आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची नुकतीच निवड झाली आहे. समितीचे हे 36 वे वर्ष असून जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीमुळे उपवर मुला - मुलींचे विवाह कसे पार पाडायचे? असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी प्रथमच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.25 वाजता हा सोहळा होणार असून इच्छुक वधु-वराच्या पालकांनी 15 जानेवारी 2026 पर्यंत नावनोंदणी करावी. आणि जास्तीत जास्त गरजू कुटुंबांनी आपल्या उपवर वधु - वरांची नोंदणी करून विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहन समितीचे मार्गदर्शक विश्वासअप्पा शिंदे यांनी केले आहे. विवाह सोहळ्यात मिळणार या सुविधा सामुदायिक विवाह सोहळ्यात वधु-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधु-वरांचे वस्त्र, रूकवत देण्यात येणार असून वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तुळजापूर शहरातील नाले, गटारी व सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने स्वच्छ करण्याची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील सर्व नाले, गटारी व परिसरात साचलेला कचरा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था लक्षात घेता, शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी व कचरा संकलन व घंटागाडीची व्यवस्था नियमित करावी, अशी मागणी नगरसेवकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दि. 1 जानेवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर शहरातील अनेक ठिकाणी नाले व गटारी तुंबलेले असून, त्यामधून घाणेरडे पाणी वाहत आहे. त्यामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातील काही भागांमध्ये गटारींची चेंबर उघडी असल्याने अपघात होण्याची शक्यता असून, त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ न ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, शहरात सर्वत्र कचरा पसरलेला दिसून येत असून, कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा घंटागाडीची वेळ निश्चित करून ती दररोज सर्व भागांत फिरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुंतक, अक्षय धनंजय कदम, रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नामासाहेब जगताप व प्रांती गोपाळ लोखंडे यांनी दिले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळी देणे गुरुवार दिनांक एक रोजी देवीच्या सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. आज नवे वर्षाचा प्रथम दिन असल्याने भाविकांनी देवी दर्शनाला मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आपल्या नव्या वर्षाच्या कामकाजाचा आरंभ केला. श्री तुळजाभवानी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर अभिषेक पूजा झाल्यानंतर भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली होती. या पूजेबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते. आज दिवसभर सर्वच रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
स्वर्गीय हिराबेन यांच्या त्यागामुळे व कष्टामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घडले - विजयाताई रहाटकर
धाराशिव (प्रतिनिधी) - दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटर नॅशनल सेंटर, जनपथ, नवी दिल्ली येथे रूपामाता फाउंडेशन, धाराशिव व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.), लक्ष्मीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वंदे मातृशक्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वर्गीय हिराबेन यांच्या त्यागामुळे व कष्टामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घडले आहेत असे सांगितले. वंदे मातृशक्ती माता पूजन हा मातृभूमीप्रेम, मातृसंस्कार व मातृत्वाच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करणारा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम ठरला. मातृत्वाच्या तेजस्वी मूल्यांचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी देशभरातील महान मातांना एका मंचावर आमंत्रित करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन रूपामाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लड्डा यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार बांसुरी स्वराज, न्या. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी, पोलीस कमिशनर अजय चौधरी, कालीपुत्र कालीचरण महाराज, भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, हभप प्रकाश महाराज बोधले, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप सोपान महाराज सानप शास्त्री, धाराशिव जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, यशस्वी उद्योजक व्ही. पी. पाटील, हभप पांडुरंग लोमटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, व्यंकट मरगणे तसेच रूपामाता परिवाराचे कार्यकारी संचालक अजित गुंड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी सादर केलेले शिव तांडव व ‘वंदे मातरम’ हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या भजनसंध्येत उपस्थित मान्यवर व रसिकांनी या सादरीकरणाचा भावपूर्ण आनंद घेतला. हभप पुरुषोत्तम पाटील यांनी गायलेल्या आई माझी या कवितेमुळे सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रुधारा आल्या. मात्र त्यानंतर झालेल्या हभप विशाल खोले महाराजांच्या पिंगळा या विशेष किर्तन प्रकारामुळे सभागृहात ऊर्जा निर्माण झाली. हभप सोपान सानप शास्त्री महाराजांच्या संबोधनातून ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्राचे दर्शन दिल्लीकरांना झाले. यावेळी डॉ. किरण झरकर लिखित वंदे मातृशक्ती या सांस्कृतिक पुस्तकाचे प्रकाशन सर्व साधुसंतांच्या व मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी आचार्य लोकेश मुनी यांच्या मातोश्री मैना देवी, माजी जनरल रविंद्र सिंह यांच्या मातोश्री चंद्रावती रुढ, क्रिकेटपटू राजवर्धन सुहास हंगरगेकर यांच्या मातोश्री अनिता हंगरगेकर, कु. कृष्णा बंग यांच्या मातोश्री मीरा कमलकिशोर बंग, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भुतेकर, हभप सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या मातोश्री प्रयागबाई सानप, तसेच हभप विशाल खोले महाराज यांच्या मातोश्री बेबीआई खोले या सर्वांचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक रूपामाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड पाटील व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.), लक्ष्मीनगरचे संस्थापक अध्यक्ष महेन्द्र लड्डा यांनी खासदार बांसुरी स्वराज यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर म्हणाल्या की, राजमाता जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या. देशभरामध्ये अनेक राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्वांच्या मातांनीच त्यांना घडवले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माता हिराबेन यांची पुण्यतिथी आहे. हिराबाचे जीवन अत्यंत सामान्य आणि कष्टप्रद होते. मात्र त्यांनी नरेंद्र मोदी सारख्या अत्यंत कर्तबगार राष्ट्रभक्त जागतिक नेत्याला घडवले. हिराबांच्या असीम त्यागामुळे आणि कठीण परिश्रमामुळे नरेंद्र मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाला तेजस्वी आकार मिळाला. हिराबा यांच्या व्यक्तिमत्त्वावर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिराबा यांच्या माता पुत्राच्या असीम प्रेमाचे व मायेचे साक्षात रूपच सभागृहात उभे राहिले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रमाता अहिल्यादेवींचा आवर्जून उल्लेख करत असताना सांगितले की या महान मातेने अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. प्रत्येकाने आपल्या आईवर नितांत प्रेम केले पाहिजे असे प्रतिपादन करत असताना त्यांनी हे सांगितले की पुढच्या वर्षी देशात सगळीकडे हा दिवस वंदे मातृशक्ती माता पूजन दिवस म्हणुन देशभरात झाला पाहिजे. यावेळी बांसुरी स्वराज यांनी देशभरातील मातांच्या सन्मानार्थ अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. महिलांचे सशक्तीकरण व मातांच्या सन्मानाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून, असे कार्यक्रम त्या दृष्टीला प्रत्यक्षात उतरवतात, असे त्यांनी नमूद केले. महेन्द्र लड्डा यांनी सांगितले की, माता ही संस्कारांची मूळाधार, कुटुंबाचे हृदय व समाजाचा नैतिक केंद्रबिंदू आहे हा संदेश देशभर दृढ करणे हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ॲड. व्यंकट गुंड पाटील यांनी स्पष्ट केले की, ‘वंदे मातृशक्ती माता पूजन दिन’ हा केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम नसून, भारतीय समाजव्यवस्थेत मातृत्वाचे स्थान, महत्त्व व गौरव यांची पुनर्स्थापना करणारा मूल्यनिष्ठ राष्ट्रीय अभियान आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत शेकडो लोकांचे आगमन झाले होते. दिल्लीतील अनेक मान्यवर निमंत्रित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रूपामाता परिवाराच्या वतीने अनेकांना नववर्षी निमित्ताने दिल्ली दर्शन, उज्जैन महाकाल दर्शन, वृंदावन, मथुरा इथे आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले. समाजातील अनेक मान्यवरांनी या वंदे मातृशक्ती माता पूजन दिन या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजात माणुसकी, आपुलकी आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम धाराशिव तालुक्यातील आळणी येथे पार पडला. स्वाधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प, आळणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला “आमचा वाढदिवस” हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या, निरागस व विशेष काळजीची गरज असलेल्या मतिमंद मुलींचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करण्याची ही संकल्पना केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, त्या मुलींच्या आयुष्यात आनंदाचा, आपलेपणाचा आणि विश्वासाचा क्षण निर्माण करणारी ठरली. केक कापण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हेच या उपक्रमाचे खरे यश होते. या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संयोजनी राजेनिंबाळकर यांच्या सह उपस्थित होते. त्यांनी तेथील कर्मचारी, शिक्षक वृंद, आणि विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होताना अनुभवलेल्या भावना शब्दात मांडणे कठीण असल्याचे सांगितले. “या मुलींच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास आणि निरागस आनंद हा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. या सामाजिक कार्यामागील प्रेरणास्थान असलेल्या श्री. शहाजी चव्हाण सर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. मतिमंद मुलींसाठी स्वाधारसारखे निवासी बालगृह उभारणे ही केवळ संस्था सुरू करण्याची बाब नसून, समाजाने दुर्लक्षित केलेल्या आयुष्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याची धाडसी जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वातून उभे राहिलेले हे बालगृह अनेक मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘घर’ ठरले आहे. कार्यक्रमास श्रीमती भाग्यश्री पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, धाराशिव), तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव, नायब तहसीलदार श्रीमती विशाखा बलकवडे, श्री.दौलत निपाणीकर, सौ.पल्लवी निपाणीकर यांच्यासह स्वाधार प्रकल्पातील विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात अशा मानवतावादी उपक्रमाने होणे ही समाजासाठी आशा, सकारात्मकता आणि प्रेरणेची नवी पहाट असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. “आमचा वाढदिवस” हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजाच्या जाणीवेत कायम राहावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे - चेअरमन नानासाहेब पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एन.व्ही.पी.शुगर परिवाराने सुरू केली आहे. यंदाच्या गळीत हंगामात देखील गाळपास आलेल्या 63,090 मे.टन ऊसाचे बिल अवघ्या पंधरा दिवसात पहिला हप्ता प्रतिटन 2500/- रूपये प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी दिली आहे. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2026 रोजी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी आणि जनता सहकारी बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे.गळीत हंगाम संपल्यावर कारखान्याचा मागील दोन वर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्याना योग्य असा ऊस भाव देण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवार कायम ठेवणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब पाटील यांनी केले आहे.
Solapur : वळसंगमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून
दक्षिण सोलापूरच्या वळसंगमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून दक्षिण सोलापूर : पुटगे (वय ३५) यांनी दगडाने व धारदार शस्त्राने वाघमारे याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. घटना कशामुळे घडली याबद्दल अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांची चौकशी चालू दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे आहे. चौकशीनंतर मृतदेह तरुणाचा [...]
बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तलावात उडी मारून वाचवले स्वतःचे प्राण
बांगलादेशमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका हिंदू व्यवसायावर झालेल्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला आहे. गेल्या दोन आठवड्यांत अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या अशा प्रकारातील ही चौथी घटना आहे. खोकन चंद्र असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला मारहाण, चाकूने वार केल्यानंतर जिवंत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोकन याने जवळच्या तळ्यात उडी मारून जीव वाचवला. असे असले तरी खोकन यात गंभीररित्या […]
Solapur : बार्शी-कुहूवाडी रोडवर भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी
बार्शी-कुहूवाडी रोडवर गाडीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बार्शी : बार्शी-कुहूवाडी रोडवरील खांडवीनजीक बार्शीहून मित्रांना सोडण्यासाठी पुण्याकडे निघालेल्या एरटिंगा (एमएच १३-डीइ ९३१२) कारची रस्त्यावर सळईने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसल्याने नामदेव पालखे (वय ४३. रा. पिंपळगाव), निलेश केकाण (वय ४५, रा. शेळगाव) हे [...]
Satara : साताऱ्यात भाजी मंडईवर बंदी, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
सातारा बाजार समितीच्या निर्णयामुळे शेतकरी रस्त्यावर सातारा : सातारा बाजार समिती, नगरपालिका व प्रशासन यांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठीत लाथ मारल्याचा आरोप करत आज साताऱ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या नावाखाली सातारा बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेत भरवली जाणारी भाजी मंडई अचानक [...]
Ratnagiri News –शाळा बंद आंदोलन; नाटेतील तांदूळ चोरी प्रकरणी शिक्षकांचे निलंबन रखडल्याने पालक आक्रमक
राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला–वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरण उघडकीस आलं होतं. यामुळे मुख्याध्यापक व उपशिक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालक व ग्रामस्थांनी बुधवारपासून शाळा बंद आंदोलन […]
साताऱ्यात घसरून दरीत कोसळलेल्या युवकाचा धाडसी बचाव सातारा : महादरे ते येवतेश्वर घाट परिसरातील घनदाट जंगलात कड्यावरून घसरून दरीत कोसळलेल्या युवकाला श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी व शिस्तबद्ध बचाव कार्य करत जीवदान दिले. या थरारक घटनेत युवक गंभीर [...]
Satara : साताऱ्यात 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू
शाहू स्टेडियममध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन सातारा : ऐतिहासिक शाहू स्टेडियम येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिमाखात सुरू झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या [...]
साताऱ्यात संभाजी ब्रिगेडची पुस्तक जप्तीची मागणी सातारा : ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘संभाजी’ कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप करत ही कादंबरी शासनाने तात्काळ जप्त करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा नव्याने इतिहास मांडावा अशी [...]
आमदारला शिवीगाळ, मिंधे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांना अटक
मिंधे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख तरोडेकर यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवीगाळ केली. यानंतर आज नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कवित्व संपत नाही. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना डावलल्याचा प्रकार घडल्यानंतर मिंधे गटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. दहा वर्ष […]
केंद्र सरकारकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, LPG सिलेंडर 111 रुपयांना महागला
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला असून 1 जानेवारी 2026 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वाढविण्यात आले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 111 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही […]
आज होणार सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचा निवारण मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणच्या वतीने आज शुक्रवारी दि.2 जानेवारी रोजी उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारी असलेल्या सौरकृषीपंपधारक वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. धाराशिव विभागांतर्गत येणाऱ्या धाराशिव विभागातील तेर, परंडा या उपविभागात शुक्रवारी दि.2 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या लोहारा, उमरगा, नळदुर्ग व तूळजापूर या उपविभागांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. या तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 7 विद्यार्थी उद्योजक स्पर्धेत झळकले
धाराशिव (प्रतिनिधी)- इंडसइंड बँकेसोबत एक व्यवसाय कल्पना स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. जिथे जिल्हाभरातील 19 संस्थांकडून 164 कल्पना सादर झाल्या. स्पर्धेत एकूण 9 विजेते दिनांक 31 डिसेंबर,2025 रोजी जाहीर झाले. त्यापैकी 7 विद्यार्थी तेरणा महाविद्यालयाचे होते. पहिले, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे शेख समीर, निखिल मैदाड आणि शेख नयूम व गायत्री मोरे यांना मिळाले. तर हर्षराज पाटील, अमोल काळदाते आणि अंकिता शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचाही सर्व स्तरावर गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांची रूपांतर प्रोटोटाइप मध्ये फोटो प्रोटोटाइचे रूपांतर बिझनेस मॉडेलमध्ये करण्यासाठी सर्वतोपरी भारतीय युवाशक्ती ट्रस्ट व तेरणा पब्लिक ट्रस्ट संचालित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मेंटॉर देउन मदत करून उद्योजक करणार आहे. या कार्यक्रमास उद्योजक हनुमंत मडके, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र साळुंके, प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, उद्योजक संजय देशमाने, तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, टीपीओ अशोक जगताप, डॉ. सुशील होळबे तसेच इंडसइंड बँकेचे अधिकारी हजर होते. प्राचार्य डॉ. माने यांनी स्पष्ट केले की, “तेरणा महाविद्यालय स्टार्टअप संस्कृतीसाठी नेहमीच प्रयत्नरत असून भविष्यात आमचे अनेक विद्यार्थी या क्षेत्रात यशगाथा लिहितील. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनीही या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन
कळंब (प्रतिनिधी)- शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सवामध्ये 3 जानेवारी रोजी शहराच्या मुख्य रस्त्यावरून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भव्य मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी नृत्य, वारकरी, विविध समाजसुधारकांच्या नेत्यांच्या वेशभूषा, घोडे, रथ यांचा समावेश मिरवणुकीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर विद्यालयातील तसेच परिसरातील उच्च पदस्थ महिलांचा सन्मान सोहळा विद्यालयात होणार आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थिनी ज्यांनी यश संपादन करून शासकीय सेवेमध्ये लागलेले आहेत त्यांचादेखील सन्मान विद्यालयात होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी या जयंती महोत्सवाचा आनंद घ्यावा व जयंती महोत्सवामध्ये सामील व्हावे असे आव्हान विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे, उपप्राचार्य डॉ मीनाक्षी शिंदे भवर यांनी केले आहे.
उद्योजकता कौशल्य विकास“ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, येरमाळा येथे हॉर्टिकल्चर आणि अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता कौशल्य विकास“ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. कमलताई कुंभार (रा. हिंगळजवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) या यशस्वी उद्योजिकेने विद्यार्थ्यांना “यशस्वी उद्योजक कसे बनावे“ याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकामध्ये दडलेल्या कौशल्यांची उकल करून आत्मनिर्भर होण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. “जिद्द, मेहनत, चिकाटी आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करणे हे यशाचे गमक आहे,“ असे त्या म्हणाल्या. कमलताई कुंभार या भारतीय सामाजिक उद्योजक असून ‘कमल पोल्ट्री’ आणि ‘एकता प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेस चालना देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन 2021 मध्ये सीसीआय फाउंडेशनचा सर्वोच्च नागरी ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. प्रा.बुधवंत सर यांनीही विद्यार्थ्यांना फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व सांगितले व आधुनिक शेती ला प्राधान्य द्यावे हे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब (जि. धाराशिव) येथील डॉ. अनंत नरवडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या कौशल्यांचे व तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय कांबळे (सदस्य, अधिसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, उपप्राचार्य भोसले हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन हॉर्टिकल्चर विभागप्रमुख डॉ. हेमंत चांदोरे व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी जाधव यांनी केले. सह-संयोजक म्हणून राम दळवी, डॉ. लक्ष्मण सुरुनर यांचेही योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दादाराव गुंडरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. देवकते, प्रा. पाटील, प्रा. गपाट, प्रा. टिंपरसे, प्रा. कदम, डॉ. सरवदे, डॉ. लोहकरे, प्रा. काकडे, डॉ. पंडित, प्रा. खोशे, प्रा. घाटपारडे, प्रा. बोंदर, प्रा. आडसुळ, प्रा. खंडागळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. साकोले, डॉ. साठे, डॉ. अदाटे, डॉ. चिंते, डॉ. ढोले,प्रा. मुखेडकर,डॉ. वाकडे, डॉ. मानेकर, डॉ. वाघमारे, प्रा. शिंपले, प्रा. पालखे, प्रा. शेख, प्रा. गाझी व डॉ. सूर्यवंशी, यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये निबंधक श्री. हनुमंत जाधव, बंडगर , संतोष मोरे,उमेश साळु़ंखे, अर्जुन वाघमारे यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळंबची मॅरेथॉन स्पर्धेद्वारे मिळतो शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश - हेमंत ढोकले
कळंब (प्रतिनिधी)- स्व.गणपतराव कथले युवक आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून एक जानेवारी म्हणजेच नववर्षाला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते. हा उपक्रम स्तुत्य तर आहेच शिवाय याद्वारे शारीरिक तंदुरुस्तीचा महत्वाचा संदेश कळंबकरांना मिळतो हे विशेष असे प्रतिपादन हेमंत ढोकले (तहसिलदार, कळंब) यांनी कळंब मॅरेथॉन बक्षीस वितरण प्रसंगी केले. यावेळी ह.भ.महादेव महाराज आडसुळ, प्रा.विठ्ठल माने, प्रा.सतीश मातणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर सतपाल बनसोडे, प्रताप मोरे, गणेश करंजकर, मनोज चोंदे, स्वराज करंजकर, बापू भंडारे, अशोक चोंदे, शहाजी चव्हाण, अशोक शिंपले, मुकुंद नागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना हेमंत ढोकले म्हणाले की, व्यायाम ही काळाची गरज असून क्रीडांगणाशी मुलांचे व तरुणांचे नाते तुटत चालले आहे. नवीन वर्षात व्यायाम करण्याचे संकल्प अनेक जण करतात, मात्र त्याला मूर्त रूप देण्याचे काम स्व. गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कथले, सूत्रसंचालन राजेंद्र बिक्कड व आभार यश सुराणा यांनी मानले. ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कथले आघाडीचे बाळासाहेब कथले, राजेंद्र बिक्कड, शाम जाधवर, बाळासाहेब जाधवर, भाऊसाहेब शिंदे, पंकज कोटेचा, यश सुराणा, ओंकार कुलकर्णी, प्रवीण तांबडे, अशोक फल्ले, वैभव कोळपे, नवनाथ पुरी, धर्मराज पुरी, बंटी फल्ले यांनी परिश्रम घेतले. चौकट - हे ठरले कळंब मॅरेथॉनचे विजेते - 6 ते 15 वयोगट मुली- जान्हवी राऊत (प्रथम), प्रगती गायकवाड (व्दितीय), शिवक्रांती गायकवाड (तृतीय), 6 ते 15 वयोगट मुले- सोहम काळे (प्रथम), विवेक शिंदे (व्दितीय), प्रथमेश सुरवसे (तृतीय), खुला गट महिला-योगिनी साळुंके (प्रथम), परिमला बाबर (द्वितीय), संध्या डोंगरे (तृतीय), खुला गट पुरुष- विराज जाधवर (प्रथम), प्रसाद सुरवसे (द्वितीय), समीर शेख (तृतीय), जेष्ठ नागरिक गट - सुरेश काकडे (प्रथम), राजाभाऊ शिंदे (द्वितीय), प्रिया पवार (तृतीय).
सत्यवती रेंगे-डोके यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्षा यांच्या हस्ते सत्कार
भूम (प्रतिनिधी)- शहरातील शेषेराव रेंगे यांची कन्या आणि ॲड. किशोर डोके यांच्या धर्मपत्नी सत्यवती किशोर रेंगे-डोके यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या निवडीनंतर त्यांनी शहराचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या सार्थक निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा संयोगिताताई संजय गाढवे आणि संजय गाढवे यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश सत्यवती रेंगे-डोके यांचा तुळजाभवानी देवीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुवर्य शेषेराव रेंगे यांचा देखील नानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गुरुवर्य श्री रेंगे, किशोर डोके व न्यायाधीश सत्यवती रेंगे - डोके यांच्या हस्ते संयोगिता गाढवे यांची नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.आपल्या शहराच्या लेकीने न्यायदानाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारल्याबद्दल गाढवे परिवाराकडून त्यांचे कौतुक करत पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ॲड.पोपटराव गाढवे,ॲड.अमरसिंह ढगे,ॲड.पंडित ढगे,ॲड.अमित जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपा 2026 दिनदर्शिकेचे प्रकाशन
परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, परंडा तालुकाच्या वतीने नुतन 2026 भाजपा दिनदर्शिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालय, परंडा येथे करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंहभैय्या ठाकूर, श्री. सुखदेव टोंपे, शिवाजीराव पाटील, नागेश शिंदे व्यंकटेश दिक्षित, दिनदर्शिकेचे प्रकाशक बाबासाहेब जाधव तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी तात्काळ निकाली काढा- निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सेवा ठराविक कालमर्यादेत मिळाव्यात यासाठी करण्यात आला आहे.या सेवा वेळेत,पारदर्शक व उत्तरदायी पद्धतीने मिळाव्यात तसेच विलंब व दिरंगाईला आळा घालणे,हा या कायद्याचा उद्देश आहे.या अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने आपले सरकार पोर्टलवर प्राप्त तक्रारी विभागांनी तात्काळ निकाली काढून नागरिकांना वेळेत सेवा द्याव्यात.असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम2015 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टलअंतर्गत अपील मोड्यूलच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कडवकर बोलत होते. यावेळी तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रथम/द्वितीय अपील प्राधिकारी उपस्थित होते. कडवकर म्हणाले की,नागरिकांना सेवा देताना प्रत्येक विभागाच्या सेवांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना या कायद्याबाबत सखोल माहिती असली पाहिजे.नागरिकांना सेवा विहित मुदतीत मिळाल्या पाहिजे.अपील झाले तर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन सुनावणी ताबडतोब केली पाहिजे.त्यामुळे प्रश्न निकाली काढता येतील.घरबसल्या नागरिकांना ऑनलाइन सेवा मिळाल्या पाहिजे.विभागांनी विहित वेळेत सेवा देण्याची जबाबदारी या कायद्याअंतर्गत पार पाडली पाहिजे,असे ते म्हणाले. यावेळी महाआयटीचे जिल्हा समन्वयक पृथ्वीराज बिराजदार व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक तानाजी हंगरेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टलबाबत विस्तृत माहिती ऑनलाईन प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित प्रथम/द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांना दिली व त्यांच्या शंकांचे समाधान केले.
उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस चालू झाला असून दर्शनासाठी भक्त महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भक्त येतात. त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, त्यांना निवासाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे त्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यासह भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सना महेमूद मुजावर यांनी एका निवेदनाद्वारे नूतन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस सुरू असून भाविकांना राहण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तेथे निवास कामे अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तर यावर्षी भक्तांची संख्या देखील अधिक असणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी. तसेच सर्व सामान्य भक्तांना भक्त निवास पूर्ण करून द्यावे. या यात्रेच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी घ्यावी अशी मागणी मुजावर यांनी केली आहे.
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा सभासद नोंदणी उपक्रम संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती धाराशिव शाखेत दि. 30/12/2025 रोजी धाराशिव येथे व्यसनमुक्ती अंधश्रध्दा निर्मुलन व सभासद नोंदणी उपक्रम घेण्यात आला. यावेळी अनिसाचे राज्य सरचिटणीस उत्रेश्वर बिराजदार म्हणाले की, अनिस हे महाराष्ट्रात पंचसुत्रीनुसार कार्य करते. शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रध्दांना विरोध. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे. धर्माची विधायक, कृतीशिल आणि कालसुसंगत चिकित्सा करणे, संत व समाजसुधारकांचे विचार आणि संविधानाचा मुल्य असे कृतीशिल करणे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे. तेव्हा समाजातील युवक-युवती, स्त्री-पुरुष यांनी अनिसचे सभासद होवून डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करुया. अनिसचे सभासद होवून चळवळीचे भागीदार होवू असे आवाहन त्यांनी केले. यावेळीच संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते ॲड. अजय वाघाळे यांनी केले. याप्रसंगी लोखंडाच्या साखळीतून गोल कडी बाजूस करणे. एका प्रश्नचिन्हासारख्या हुकामध्ये बेल्ट करंगळीवर तोलून धरणे असे विविध प्रयोग करुन समाजात सामान्यांची कशी फसवणूक होते हे सप्रमाण दाखवून दिले. यावेळी ॲड. अरुणा गवई यांनी समाजात अंधश्रध्दांना बळी पडण्याचे प्रमाण स्त्रीयामध्ये जास्त आहे. तेंव्हा स्त्रीयांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन जीवनात कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटनेचे विजय गायकवाड यांनी संघटनेची भूमिका विशद करुन अनिसमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटनेचे सिध्देश्वर बेलुरे, अब्दूल लतीफ, गणेश वाघमारे, वामन पंडागळे, प्रशांत मते इत्यादींची उपस्थित होती.
Blast in Solan –नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल प्रदेशात स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या
कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा देव दर्शनाने नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी एकीकडे नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यामध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नालागड पोलीस ठाण्याच्या बाजूला जोरदार स्फोट झाला. या स्फोटाची तिव्रता इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या परिसरातील अनेक किलोमीटर अंतरावरील इमारतींच्या काचा फुटल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सैनिक भवन, पोलीस […]
शेकडो महिला भगिनींच्या सहभागाने तुळजापुरात भव्य जलयात्रा उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्रोत्सव 28 डिसेंबरपासून अत्यंत भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या पवित्र उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेली भव्य जलयात्रा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. शेकडो महिला भगिनींच्या सहभागाने निघालेल्या या जलयात्रेमुळे संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीचा ‘शाकंभरी’ अवतार पौष शुक्ल अष्टमीच्या दिवशी साकार झाला. अन्नधान्य, वनस्पती आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून शाकंभरी देवींची पूजा केली जाते. या श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दरवर्षी पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या जलयात्रेला पापनाश तीर्थ कुंडातून प्रारंभ झाला. पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला भगिनींनी या जलयात्रेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला. संबळाच्या कडकडाटात, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात आणि आई राजा उदो उदो च्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचली. गाभाऱ्यात विधिवत जलअर्पण करण्यात आले. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवींच्या प्रतिमेची विशेष आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध प्रकारचा भाजीपाला (शाक) आणि फळांचा वापर करून केलेली ही सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. अन्नधान्य व समृद्धीचे प्रतीक असलेल्या देवी शाकंभरींच्या या स्वरूपाने भाविकांमध्ये श्रद्धा, कृतज्ञता आणि भक्तिभाव अधिक दृढ झाला. या भव्य जलयात्रेत महिला भगिनींसोबतच गोंधळी, आराधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात संपूर्ण मिरवणूक अत्यंत आनंदी व भक्तिमय वातावरणात पार पडली. मिरवणुकीत सहभागी झालेले घोडे आणि सजवलेल्या बैलगाड्या या देखील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.या पवित्र सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, उपाध्ये बंडू पाठक, शाकंभरी नवरात्र उत्सवातील यंदाचे यजमान उल्हास कागदे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, जयसिंग पाटील, महेंद्र आदमाने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानला रोटरी क्लब धाराशिवकडून 40 हजाराचा मदतीचा हात
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव रोटरी क्लबच्या माध्यमातून वंचित समाज घटकांच्या परिवर्तनाची चळवळ गेली तब्बल 33 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या सामाजिक बांधिलकीच्या वाटचालीत रोटरी क्लब धाराशिवने भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेला 40 हजाराचा धनादेश प्रदान करून समाजोपयोगी कार्याला बळ दिले. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानतर्फे यमगरवाडी सेवा प्रकल्प, पालावरच्या अभ्यासिका-शाळा तसेच भटके-विमुक्त विकास परिषद अशा उपक्रमांद्वारे दुर्लक्षित घटकांसाठी मोलाचे कार्य केले जाते. सध्या महाराष्ट्रभरात 54 वस्त्यांवर पालावरच्या शाळा चालविल्या जात असून, या शाळांमधून मुलांना संस्कार, शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जात आहेत. धाराशिव शहर व परिसरातील वासुदेव वस्ती, वडार वस्ती, बंजारा वस्ती, राजगोंड वस्ती तसेच येडशी परिसरात एकूण 160 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळतो. या मुलांसाठी दरमहा खाऊ वाटपासाठी सुमारे 14 हजार रूपये खर्च येतो. पालावरच्या या शाळा वर्षातून एकूण दहा महिने नियमितपणे सुरू असतात. या उपक्रमासाठी आर्थिक हातभार म्हणून रोटरी क्लब धाराशिवने 40 हजाराचा धनादेश आज प्रदान केला. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रंजीत रणदिवे, सचिव प्रदीप खामकर तसेच शहापूरकर सर उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व संस्कार पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब धाराशिवचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
पंचायत समिती सभापतीपदासाठी महायुतीत स्पर्धा
उमरगा (प्रतिनिधी)- पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी राखीव झाले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक दंड थोपटून तयार आहेत. भाजपाचे कैलास शिंदे यांनी भुसणी गणातुन तर शिवसेनेच्या (शिंदे) कु. आकांक्षा चौगुले यांनी कवठा गणातुन चाचपणी सुरू केली आहे. यामुळे सभापती पदासाठी महायुतीच्या दोन पक्षात चुरस असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. उमरगा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 तर पंचायत समितीच्या 18 जागा आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर राहून पक्ष, संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकारण व समाजकारण करण्याची संधी असते. गावागावांमध्ये आपले व्यवसाय, शेती सांभाळत असे कार्यकर्ते पक्षांचे काम करत असतात. ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रुपाने जिल्ह्याची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषदेत उमरगा तालुक्यातून कॉग्रेसचे 5 सदस्य होते. यापैकी चौघांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच भाजपाचे 2 सदस्य होते. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य होते. उमरगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. तालुक्यातील अनुसुचित जातीसाठी भुसणी तर अनुसूचित जाती महिलांसाठी केसरजवळगा व कवठा हे गण राखीव आहेत. यापैकी निवडुन येणाऱ्या सदस्याला सभापती पदाचा मान मिळणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांचा डोळा या तीनच मतदारसंघावर आहे. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या, ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा कु. आकांक्षा चौगुले यांना शिवसेनेकडून कवठा गणातुन उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. भारतीय जनता पक्षात नेत्यांची मोठी टीम व मोठा जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी समाजाचा चेहरा म्हणून कैलास शिंदे यांनी भुसणी पंचायत समिती मतदारसंघातुन निवडणुक लढवणेस इच्छुक असल्याचे समजते. भाजपाकडून सभापती पदाचे कैलास शिंदे हेच प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना (ठाकरे) व काँग्रेसकडून कोण तुल्यबळ उमेदवार नजरेस येत नसले तरी ऐनवेळी शिवसेना (ठाकरे) विधानसभेचा पॅटर्न राबवणार का ? कॉग्रेसच्या अनेकांनी विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली होती. मात्र शिवसेना (ठाकरे) ला जागा सुटल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आता सभापती पद अनुसुचित जातीसाठी सुटल्याने मिनी आमदार म्हणून तालुक्याचे सभापतीपद बुजवण्यासाठी कोण इच्छुक आहे हे अद्याप स्पष्ट नाही. राष्ट्रवादी (अप) नेतृत्व भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्यासाठी इच्छुक आसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ची कोणासोबत समेट होणार, मनसे व वंचित बहुजण आघाडी कोणती भूमिका घेणार हे त्या त्या वेळी स्पष्ट होणार आहे.
उमरगा येथे डॉ. संतुजी लाड सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील चिंचोले प्लॉट येथील हिंदू खाटीक समाजभूषण डॉ. संतुजी रामजी लाड सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा मंगळवार दि 30 डिसेंबर रोजी पार पडला. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव लोकसभेचे माजी खासदार रविंद्र गायकवाड , उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, उमरगा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड, नगरसेवक धनंजय मुसांडे, पंढरीनाथ कोणे,शरद पवार व सदानंद शिवदे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा ज्योतीबा फुले यांचे सहकारी व हिंदू खाटीक समाजाचे प्रेरणास्थान डॉ संतूजी लाड यांचे नावे राज्यातील पहिले सभागृह भूमिपुजन सोहळा उमरगा येथे पार पडला आहे यांचे राज्यातील या कार्यक्रमासाठी हिंदू खाटीक समाज जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष गणेश घोडके, सल्लागार राजेंद्र कांबळे, प्रभाकर पिस्के, साईनाथ पिस्के, युवराज घोडके, महेश घोडके, अँड.अजय कांबळे, ॲड.परीक्षित कोथिंबरे, दिलीप डोंगरे, आदर्श कोथिंबरे, सतीश कांबळे, किशन कांबळे, योगेश बेंद्रे, देविदास बुये, नागेश घोलप, मारुती थोरात यासोबतच महिला तालुका अध्यक्षा विमल डोंगरे, उपाध्यक्षा अंजली कांबळे, सचिव मीना बुये, दिक्षा कांबळे, रेश्मा कोथिंबरे, राधा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने सुरू केली फिल्डींग
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यातील सास्तूर, जेवळी, कानेगाव व माकणी या जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सखोल आढावा बैठका संपन्न झाल्या. या सर्व बैठका खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान संबंधित गटांतील आजवर झालेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या स्थानिक विकासकामांचे नियोजन, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरावर कार्यकर्त्यांची प्रभावी नियुक्ती, मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून जनतेच्या विश्वासाची आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा प्रतिनिधी असून जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहणे, विकासाची स्पष्ट व ठोस भूमिका मांडणे आणि पक्षाची धोरणे घराघरात पोहोचवणे हीच यशस्वी निवडणुकीची खरी गुरुकिल्ली आहे. संघटनेत कोणताही मतभेद न ठेवता सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीने व शिस्तबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर, जनतेच्या विश्वासावर आणि संघटनाच्या बळावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश निश्चित असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून शेतकरी, युवक, महिला, कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आघाडी सातत्याने लढत राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले या बैठकीस सास्तूर, जेवळी, कानेगाव व माकणी जिल्हा परिषद गटांतील पदाधिकारी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satara : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रागतिक साहित्य पंचायतचे गंभीर आक्षेप
साहित्य संमेलनाची राजकीय प्रभावाखालील भूमिका उघडकीस सातारा :प्रागतिक साहित्य पंचायत, महाराष्ट्र यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. संयोजक मा. पार्थ पोळके (शिवाजी नगर, शाहूपुरी, सातारा) यांनी जाहीर निवेदनाद्वारे संमेलनाने मराठी [...]
धाराशिव विमानतळावर मेंटेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल प्रकल्प होणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव विमानतळ आता केवळ फ्लाइंग ट्रेनिंगपुरते मर्यादित न राहता मेंटेनन्स-रिपेअर-ओव्हरहॉल प्रकल्प ,पार्किंग सुविधा व प्रवासी सेवे बरोबर कृषी निर्यात कार्गो टर्मिनलसह बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठी औद्योगिक गुंतवणूक, कृषी मालाची थेट हवाई निर्यात, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला भरीव चालना मिळणार आहे. भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव विमानतळावर आले असता, त्यांच्याकडे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची अत्यंत ठोस आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली होती. या मागणीचे महत्त्व ओळखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विलंब न करता त्याच क्षणी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांना दूरध्वनीवरून सविस्तर, तांत्रिक आणि व्यवहार्य प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक देखील घेतली होती. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयक्षम आणि तत्पर नेतृत्वामुळेच आपल्या मागणीला मंजुरी मिळून प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. धावपट्टीचा विस्तार होणार धाराशिव विमानतळ धावपट्टी विस्तार केल्याने 1,218 मीटर लांबीची धावपट्टी वाढवून आता 3500 मीटर होत आहे. त्यासाठी केलेला पाठपुरावा कामी आला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आपले विमानतळ हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे भविष्यातील प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून आपल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव विमानतळाच्या धावपट्टीची रुंदीही 30 मीटरवरून 45 मीटर होणार आहे. धावपट्टीची मजबुती 10 वरून 60 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे बोईंग 737, बोईंग 777, एअरबस 320 व 321 सारखी मोठी व्यावसायिक विमाने धाराशिव येथे उतरण्यास सक्षम होतील. आपल्या विमानतळाचे क्षेत्रफळही आता वाढविले जाणार आहे.
सेंद्रिय शेती हा शेतकऱ्याच्या शाश्वत समृद्धीचा मार्ग - कृषीशास्त्रज्ञ डॉ. आरबाड
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मसला खुर्द येथे सुरू आहे. या शिबिरात आज सर्व स्वयंसेवकांनी सकाळी प्रभात फेरीने सुरुवात केली प्रभात फेरीमध्ये स्वच्छतेविषयी घोषणा देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे बॅनर हातात धरले होते. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले श्रमदान करत असताना गावातील मुख्य रस्ता, अंगणवाडी परिसर ,अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ,मंदिर परिसर ,स्वच्छ करून घेतले व ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर झालेल्या उद्भोधन व्याख्यानात सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे या विषयावर कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरबाड यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, महत्व सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात होणारी वाढ रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम ,गांडूळ खत निर्मिती शेतीसाठी कशा पद्धतीने सुपीक व महत्त्वाची आहे व रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचे होणारे नापीकीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतीश वागतकर तर आभारप्रदर्शन प्रा कुकडे बी जे यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिगंबर खराडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गोकुळ बाविस्कर, कार्यक्रमाधिकारी प्रा बैलवाड स्वाती, बाळासाहेब राऊत , प्रा निलेश एकदंते ,प्रा सतीश वागदकर तसेच कदम आणि गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेक. प्रथम वर्षाचा दुसरा पालक मेळावा उत्साहात संपन्न.
धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने बी. टेक. प्रथम वर्षाचा दुसरा पालक मेळावा दूरस्थ प्रणालीद्वारे उत्साहात संपन्न झाला. या पालक मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व महाविद्यालय यांच्यातील संवाद वाढविणे हा होता. पालक, सर्व विषय शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्यात संवाद साधण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विषयांवरील कामगिरी, वर्गातील शिस्त आणि त्यांच्या उपस्थितीची टक्केवारी यावरही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सर्व विषयांमधील त्यांच्या Continuous Assessment -I आणि Mid Semester exam या गुणांवर पालकांशी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने व परिचयाने झाली. त्यामध्ये प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्याचबरोबर पालकांना संबोधित करताना म्हणाले की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अद्ययावत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. यामध्ये शिक्षकांइतकाच पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच महाविद्यालयातील अध्यापक कक्ष अद्ययावत आहेत. गतवर्षी आमच्या महाविद्यालयाचा निकाल विद्यापीठात अमूल्य आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही राहील .याची खात्री आहे. असे प्रतिपादन तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांनी केले. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. तसेच महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बी. टेक. विभागाच्या विभागप्रमुख डॉ. यु. के. वडणे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीझ विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यावेळी डॉ. उषा वडणे यांनी विभागात आयोजित विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमाची सविस्तर माहिती पालकांना पीपीटीच्या माध्यमातून दिली. तसेच त्याचबरोबर महाविद्यालयात झालेल्या Continuous Assessment -I आणि Mid Semester exam च्या विद्यार्थ्यांच्या गुणांची आकडेवारी सांगितली. व त्याचबरोबर सध्या महाविद्यालयात चालू असलेल्या सराव परिक्षेबाबतही सांगितले. सराव परिक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरील परीक्षेचे स्वरूप हे लक्षात येते.तसेच वेळेचे नियोजन करता येते. व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील असलेली परीक्षे संदर्भातील भीती ही नाहिशी होते. अशा प्रकारे डॉ. वडणे मॅडम यांनी सराव परिक्षा घेण्याबाबतचा उद्देश स्पष्ट केला. व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थितीही दर्शवली. तसेच विद्यार्थ्यांच्या मुलभूत शैक्षणिक पायाभरणीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचीही माहिती सांगितली. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात देत आहेत.या घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात मोठ्या संख्येने सर्व पालक हे आपापल्या पाल्याबरोबर उपस्थित होते. कॉलेजच्या प्लेसमेंट सेल मार्फत येणाऱ्या विविध कंपन्या आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या रोजगाराची संधीची माहिती पालकांना देण्यात आली. त्यामध्ये अनेक पालकांनी कॉलेजमधील असलेल्या सोयी -सुविधांबद्दल आपले समाधान व्यक्त केले. या पालक मेळाव्यामध्ये आनंद सुरवसे सर, काटमोरे सर , वाघमारे सर, घोडके सर, सरवदे सर, कवठेकर मॅडम , लक्ष्मण गव्हाणे सर , मोडिवले सर या पालकांनी आपली मते मांडली. तसेच पालकांनी महाविद्यालयाची कार्यप्रणाली व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी श्रद्धा कानडे, यशोदा गव्हाणे या विद्यार्थ्यांनी आपापली मते व्यक्त केली. तर काहींनी आपल्या इच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी महाविद्यालयाकडून त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात आले. पालक मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. बी. एस. चव्हाण, प्रा. एम. व्ही. जोशी, प्रा. दयानंद मुंढे, प्रा. वर्षा पाटील, डॉ. आर. एस. यादव, प्रा. ए. डी. बोरकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. एस. एस. इंगळे, प्रा. सी. जी. न्हावकर, नेपते, वाघमोडे, दिगंबर जाधव तसेच वसतिगृहातील पाटील मॅडम यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. व्ही. जोशी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. व्ही. डी. पाटील यांनी मानले.
भूम (प्रतिनिधी)- येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित फनफेअर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या या फनफेअरला पालक, नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फनफेअरमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, व मनोरंजनाचे खेळ याची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. पालकांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपादार्थाची विक्री करत व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भारतीय खवय्येगिरीचा अनुभव घेताना उत्तर भारतीय पाणीपुरी, रगडा, पॅटिस, बिर्याणी तर दक्षिण भारतीय वडा सांबर, इडली, व केक पासून इतर सर्व पदार्थ बनवले होते. या संपूर्ण उपक्रमातून सुमारे अर्ध्या लाखांची उलाढाल झाली. तत्पूर्वी विद्या विकास मंडळ पाथरूड चे कोषाध्यक्ष तथा एसपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रचार्य संतोष शिंदे यांच्या हस्ते व शाळेचे संचालक ॲड. सिराज मोगल, प्रगतशील शेतकरी रणजित मस्कर यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मेघा सुपेकर, दिपीका टकले व मोनिका बोराडे यांच्या सह आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे व अमित सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. फनफेअरमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना व उद्योजकतेची भावना वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
नवीन वर्षात विकासाचा वृक्ष बहरणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव बदलत आहे. सरलेले 2025 हे वर्ष धाराशिवसाठी विकासाच्या अनेक योजना घेऊन आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या आशा-अपेक्षांना पालवी फुटली. नवीन वर्षात हा वृक्ष बहरत असल्याचे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्स्फॉर्मेशनचे अर्थात मित्रचे उपाध्यक्ष. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची पावले झपाझप पडत आहेत. सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे तुळजापूरसह जिल्ह्याचे रूप पालटणार आहे. ही महत्त्वाची दोन्ही कामे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीतून सुरू आहेत. गवगवा नाही, की स्टंटबाजी नाही... शांतपणे विकासाचा अजेंडा राबवणे, विरोधकांच्या बिनबुडाच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, ही आमदार पाटील यांच्या कामाची पद्धत. त्यामुळेच विकासाच्या विविध योजना महायुती सरकारकडून मंजूर करवून घेणे त्यांना शक्य झाले. रेल्वे, तुळजापूर तीर्थक्षेत्र आराखडा, शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 टक्क्यांनी वाढवणारा तारा प्रकल्प, नळदुर्ग, वाशी, भूम, परंडा, तामलवाडी, कौडगाव (टप्पा 3) वडगाव सिद्धेश्वर येथे एमआयडीसी प्रस्तावित आहेत. येडशी येथील रामलिंग अभयारण्य विकसित करणे, तुळजापूर येथे प्राणिसंग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. तेरला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. तेर येथील राज्यातील सर्वाच जुन्या त्रिविक्रम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या मंदिरातही विविध विकासकामे सुरू आहेत. तारा प्रकल्पाअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे एक हजार एकरांवर शेतीवर आधारित विविध प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जिल्ह्यातच अधिक दर मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्याचा विकास झाला नाही, अशी चर्चा नेहमी केली जाते. अशा चर्चा करताना जिल्ह्यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही, हे बहुतांश वेळा लक्षात घेतले जात नाही. पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही म्हणून विकास थांबला का?, तर अजिबात नाही. जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात काम करण्यासाठी वाव आहे, याची जाणीव माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना होती. त्यातूनच त्यांनी सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. सिंचनाखाली आलेल्या क्षेत्राची टक्केवारी 4 वरून 21 इतकी झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल झाला. त्यांच्या हातात पैसे खेळू लागले ते उसासारख्या नगदी पिकामुळे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या वाढली. वर्षाकाठी उसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा अधिक कोटींचे उत्पन्न मिळू लागले. हा बदल लोकांना जाणवला नसेल का? याचे उत्तर होय असे आहे, पण राजकारणासाठी या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक पद्धतीने दिले जाऊ लागले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. धाराशिवसाठी उजनी धरणातून पाणी आणण्यात आले आहे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी साठवण्यासाठी तुळजापूर येथील रामदरा तलाव सज्ज झाले आहे. सांगली-कोल्हापुरातील वाहून जाणारे पुराचे पाणी मराठव़ाड्याकडे वळवून दुष्काळ दूर करण्याची योजना आमदार पाटील यांनी सादर केली असून, त्याला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आमदार पाटील हे उपाध्यक्ष असलेल्या मित्रच्या माध्यमातून ही क्रांतिकारी योजना राबवण्यात येणार आहे. रेल्वेचे काम ठळकपणे दिसू लागले आहे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही लवकरच मिळणार आहे, तुळजापूर विकास आराखड्याची कामेही लवकरच सुरू होणार आहेत. तेरमधील कामांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धाराशिवच्या विकासाबाबत जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या नकारात्मक चर्चेला यामुळे ब्रेक लागला आहे. सरत्या वर्षात फुटलेली विकासाची पालवी नवीन वर्षात बहरणार आहे.
मधुशाली महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’वर प्रभावी कार्यशाळा संपन्न
तुळजापूर (प्रतिनिधी)- “देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात आलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत क्रांतीकारक ठरणार आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध मार्गदर्शक प्रा. डॉ. के. जी. घोलप यांनी मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मधुशाली कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सलगरा दिवटी येथे मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP -2020)’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. विनिल जांभळे हे होते. प्रा. डॉ. घोलप (इतिहास विभाग प्रमुख, शरदचंद्र महाविद्यालय, शिराढोण) यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून नवीन शैक्षणिक धोरणातील बारकावे, रोजगाराभिमुख शिक्षणाची संकल्पना, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन यावर सविस्तर प्रकाश टाकला. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी -2020 ची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्राचार्य प्रा. संतोष केसकर, डॉ. प्रशांत माने, हिंदी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी मनशेट्टी,तसेच प्रा. खंडेराव सूरवसे, प्रा. जयवंत काशिद, प्रा. लक्ष्मण घोडके, प्रा. सिकंदर लाटे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गिरी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kagal : कागल भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरी रंगेहात पकडला
कागल तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यावर लाचलुचपत कारवाई कागल : कागल फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिवराम कृष्णा कोरवी ( वय ५३, रा. हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या दप्तरीचे नाव [...]
Kolhapur News : सविता माने यांच्या नेतृत्वाखाली कागल नगरपालिकेत नवीन कार्यकारभाराची सुरुवात
नूतन नगराध्यक्षा सविता माने यांचा पदग्रहण सोहळा कागल : कागल नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सविता प्रताप माने यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी गुरुवारी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी एकत्र येत निवडणूक लढवली [...]
Kolhapur : गांधीनगर युवक मृतावस्थेत सापडला; अपघात की घातपात?
शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या तपासात घटना नोंद पुलाची शिरोली: गांधीनगर मधील युवक मृतावस्थेत आढळला. मादळे (ता. करवीर) येथे थर्डी फर्स्ट ची पार्टी करण्यासाठी आलेल्या गांधीनगर येथील तरूणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात? की घातपात? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.तसेच या बाबत उलट सुलट [...]
सरस प्रदर्शनमधून 63 लाख 51 हजार 973रुपयांची विक्री, महिला बचत गटाच्या उत्पादनाना पसंती
गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 मधून 63 लाख 51 हजार 973 रुपयांची विक्री झाली. 50 लाख 40 हजार 68 रुपये किंमतीची उत्पादन विक्री तर 13 लाख 11 हजार 905 रुपयांची खाद्य विक्री स्टॉलवरुन विक्री झाली आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत […]
एआयचा वापर करुन व्हिडीओ बनवले, इंडियन युट्युब चॅनलला वर्षभरात कमावले 38 लाख
केवळ एआयचा वापर करुन कंटेटच्या मदतीने एका इंडियन युट्युब चॅनलने वर्षभरात 38 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. एआय वापरुन कंटेट टाकणाऱ्या या इंडियन युट्युब चॅनलवर ‘बंदर अपना दोस्त’ जगभरात जास्त पाहिला जातो. व्हिडीओ एडिटींग प्लॅटफॉर्म कॅपविंगने आपल्या अभ्यासात एआयने बनवलेला व्हिडीओचा स्केल आणि छाप पाहण्यालाठी 15 हजारहून अधिक चॅनलचा अभ्यास केला. ज्यानंतर ‘बंदर अपना […]
Sangli Crime : आटपाडीत उसनवार मारहाण ; आठजणांवर गुन्हा
महालक्ष्मी ऑटोपार्टस समोरील रस्त्यावरही मारहाण जाटपाडी : विवाह आणि आजारपणातील उपचारासाठी उसनवार दिलेली रक्कम परत मागितल्याने जमाव जमवुन काठी, लोखंडी रॉडने मारहाण प्रकरणी आटपाडीतील ४ ज्ञात व ४ अज्ञात अशा आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. आटपाडी पाटीलमळा येथील सुरेश [...]
Sangli News : ‘तो’बेदाणा चीनमधील नव्हे अफगाणिस्तानातील ; बाफना बंधूचा खुलासा
अफगाणिस्तान बेदाण्याच्या आयातीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट सांगली : चीन मधील बेदाणा बेकायदेशीर मार्गाने भारतात आणला आहे, ही माहिती संपूर्णपणे खोटी, निराधार, व दिशाभूल करणारी आहे असे स्पष्ट करून आयात करण्यात आलेला बेदाणा हा अफगाणिस्तान येथील असून यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर कागदपत्रे आहेत, असे मत तासगांवातील [...]
हेअर कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, वाचा
केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. केसांचा रंग हा आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि स्टाइलवरही परिणाम करतो. म्हणूनच योग्य केसांचा रंग निवडणे महत्वाचे आहे. परिपूर्ण लूक मिळविण्यासाठी विचारात घेण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. बरेचदा लोक विचार न करता त्यांचे केस रंगवतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक खराब होतो. केसांना कलर केल्यानंतर मात्र त्यांच्या चुकीबद्दल पश्चात्ताप […]
कुडाळ –माड्याचीवाडीत काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात
वार्ताहर/ कुडाळ – कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रॉली येथे कॉलवेलगत खाली पलटी झाली . या अपघातात वाहनाच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. स्थानिक [...]
तरुण वयात केस पांढरे होण्याचे नेमके कारण काय, जाणून घ्या
आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते केस अकाली पांढरे होण्यामागे केवळ बाह्य कारणे नसून, शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण आहे. केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. शरीरात व्हिटॅमिन बी12चे प्रमाण कमी झाल्यास मेलॅनिनचे उत्पादन घटते आणि त्यामुळे केस काळ्याऐवजी हळूहळू पांढरे होऊ […]
Sangli Politics : सांगलीत भाजप नाराजांच्या घरी मनधरणीसाठी नेत्यांच्या बरोबरच उमेदवारही जाणार
सांगलीत भाजपसमोर नाराजीचे आव्हान सांगली : भाजपसमोर नाराजीचे मोठे आव्हान उभे असून नेत्यांकडून नाराजांना रोखण्यासाठी बुधवारपासून प्रयत्न सुरु आहेत. पक्षाच्या दोन आमदारांसह कोअर कमिटीचे पदाधिकारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा पुड्या भाग म्हणून आता नेत्यांच्या बरोबर त्याच्या भागातील [...]
तिकीट नाकारल्यानं झोल केला अन् डुप्लिकेट एबी फॉर्म भरला; भाजप नेत्याची चोरी पकडली गेली
राज्यात 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र महायुतीमध्ये एबी फॉर्मवरून चांगलाच गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी नाराजांचा उद्रेक झाला. मात्र मुंबईत एका इच्छुक उमेदवाराने चक्क डुब्लिकेट एबी फॉर्म दाखल केला. अखेर त्याची चोरी […]
Kolhapur : कोल्हापुरी संस्कृतीतील जनावरांवरील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित
पाळीव म्हशीच्या जाण्याने राबाडे कुटुंब पोरके कोल्हापूर : जिल्हा दूधदुभत्या जनावरांसाठी प्रसिद्ध असून इथे शेतकरी त्यांच्या दुभत्या पशूंवर पोटच्या पोरासारखे प्रेम करतात. उत्तरेश्वर पेठ भागात गेल्या काही दिवसांपूर्वी राबाडे कुटुंबाच्या पाळीव म्हशीचा अचानक मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब पोरके झाले आहे. [...]
मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ‘नाराजी’नामा सत्र, आणखी पदाधिकारी राम राम करण्याच्या तयारीत
नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 16 (ड) मधील भाजपचे 80 हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनाला यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे. पक्षातील असंतोषामुळे शहरातील इतर भागांतूनही आणखी राजीनामे येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंडियन […]
डॉ. दिनेश नागवेकर यांना राजदूत पुरस्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडीतील राणी पार्वती देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ . दिनेश नागवेकर यांना दिल्ली येथील न्यु थिंक फाऊंडेशनने राष्ट्रीय पातळीवरील राजदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले.यावेळी भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २० व्यक्तींना आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य संचालक डॉ. दिनेश उपाध्याय आणि उत्तराखंड राज्याचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री श्री. कमल सिंग नेगी यांच्या [...]
Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी
कोल्हापूरमध्ये निवडणूक प्रक्रियेवर मुख्य निरीक्षकांचे बारकाईने लक्ष कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले आणि सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनी रमणमळा येथील स्ट्राँगरुम [...]
Kolhapur : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाने नववर्षाचे भक्तिमय स्वागत कोल्हापूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात हजारो भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. अनेक भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात देवी अंबाबाईच्या दर्शनाने केली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच [...]
Kagal : फाळणी नकाशाच्या नक्कलीसाठी लाच; कागल भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरी रंगेहात
कागलमध्ये वर्षाअखेरीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई कागल : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिवराम कृष्णा कोरवी ( वय ५३, रा. हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या दप्तरीचे नाव आहे. फाळणी [...]
‘कुशावती’ जिल्हा विकासपर्व प्रारंभ
मुख्यमंत्र्यांकडून कुशावती जिल्हा निर्मितीची घोषणा : कुशावती नदीचे नाव सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प, लवकरच निर्माण होणार कुशावती जिल्हा पंचायत,प्रशासन पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती, पोलिस अधिकाऱ्यांसह वन अधिकारीही तैनात पणजी : पवित्र गोमंतभूमीच्या कुशीत वसलेल्या आणि सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचे युगानुयुगे उदर भरणपोषण करणाऱ्या कुशावती नदीचे स्मरण ठेवत सरकारने [...]
नववर्ष 2026 चे जल्लोषात स्वागत
समुद्रकिनारे गजबजले पर्यटकांच्या गर्दीने : गोमंतकीयांसाठीठरणारनिवडणुकांचेवर्ष पणजी : गोव्यात सर्वत्र नववर्षाचे थाटात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात प्रचंड प्रमाणात देशी विदेशी पर्यटक आले असून अनेक पर्यटकांना हॉटेल्स फुल्ल असल्यामुळे आसरा मिळू शकला नाही. त्यामुळे अनेकाने मिरामार समुद्रकिन्रायाचा उपयोग केला. रात्री उशिरापर्यंत सर्वत्र कार्यक्रमांची धमाल चालू होती. अकरा वाजून 59 मिनिटांनी आयोजकांनी अंधार केला [...]
आगामी अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ
खर्चातकपातकरण्यासाठीविविधसूचना पणजी : आगामी अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून वित्त खात्याने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशानुसार नव्याने कर्मचारी भरती व बढती तसेच नव्याने कोणत्याही खर्चाला मान्यता देऊ नये. त्याचबरोबर खर्चात कपात करावी, अशा अनेक सूचना सर्व खात्यांना जारी केल्या आहेत. वित्त खात्याचे अवर सचिव नरेश गावडे यांनी वर्षाअखेरीस हा आदेश जारी केला आणि त्यामधून [...]
हडफडे सरपंच रोशन रेडकरची हकालपट्टी
पंच, सरपंच म्हणून ठरला अपात्र : ‘बर्च’लापरवानेदेणेअखेरभोवले पणजी : बर्च नाईट क्लब जळीत हत्याकांडप्रकरणी कोणत्याही कायदेशीर बाबी झालेल्या नसताना देखील हडफडे ग्रामपंचायतीने क्लबला जे परवाने दिले दिले त्याप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने सरपंच रोशन रेडकर याच्या एकंदरीत कारभारावर ठपका ठेवला असून त्यामुळे सायंकाळी उशिरा राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार सरपंच रोशन याला अपात्र ठरविले [...]
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी निलंबित
‘बर्चनाईटक्लब’चीपाहणीनकरताप्रमाणपत्रेदिल्याचाठपका पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या आग घटनेप्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. बर्च नाईट क्लबची पाहणी न करताच प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चैतन्य साळगावकर व कनिष्ठ अभियंता विजय कानसेकर यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लेव्हीन्सन [...]
मनीषा सुभेदार/बेळगाव कालचक्रातील आणखी एका वर्षाने आपला निरोप घेतला आणि आपण नव्या वर्षात पदार्पण केले. हे कोठे आपले नववर्ष? वैगेरे ज्यांना म्हणायचे आहे ते म्हणोत बापडे. पण अर्धेअधिक जग नववर्षाचे स्वागत करेल असेल तर आपण त्या आनंदापासून पारखे का रहावे? आम्ही नववर्षही साजरे करू आणि गुढीपाडवासुद्धा. कारण या दोन्हींच्या साजऱ्या करण्यामध्ये आनंदच तर आहे आणि [...]
राष्ट्रीय स्तरावरील अवैध किडनी तस्करी रॅकेटचा पूर्व महाराष्ट्रात पर्दाफाश झाला असून या टोळीचे संबंध कंबोडिया आणि चीनपर्यंत असल्याचे उघड झाले आहे. या बेकायदेशीर बाजारात एका किडनी प्रत्यारोपणासाठी 50 लाख ते 80 लाख रुपये आकारले जात होते, तर अत्यंत गरजू दात्यांना फक्त सुमारे 5 लाख रुपये देण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने नियुक्त […]
कडाक्याच्या थंडीतही नववर्षाचा जल्लोष
आकर्षकरोषणाई, फटाक्यांचीआतषबाजी: खवय्यांनीमारलाविविधपदार्थांवरताव बेळगाव : कटू आठवणींना मागे सारत नवीन संकल्प, नवीन स्वप्ने उराशी बाळगून तरुणाईने नूतन वर्षाचे स्वागत केले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहर, तसेच परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. मध्यरात्री 12 च्या ठोक्याला आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ओल्डमॅनचे दहन करण्यासाठी बालचमूंसह तरुणाईची धडपड रात्री [...]
बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुखपदी के. रामराजन यांची नियुक्ती
विद्यमानपोलीसप्रमुखडॉ. गुळेदयांचीबढतीवरबदली बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची बढतीवर बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोडगूचे जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी राज्य सरकारने 23 एसपींना डीआयजी पदावर तर 2 डीआयजींना आयजीपी पदावर बढती दिली आहे. 3 एएसपींना एसपी पदावर बढती मिळाली आहे. तर राज्यातील 20 जिल्हा पोलीसप्रमुखांच्या [...]
चौकुळच्या सड्यावर दुर्मिळ ‘कोच ‘वनस्पतीचा शोध
डॉ. ऋतुजा कोलते- प्रभूखानोलकर यांच्यासह सहकाऱ्यांचे संशोधन सावंतवाडी -प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ हे निसर्गसंपन्न गाव असून चौकुळ पठार नैसर्गिक खजिन्याने संपन्न आहे. चौकुळ येथील सड्यावर जात डॉ. ऋतुजा कोलते- प्रभुखानोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोच नावाच्या वनस्पतीचा शोध लावला आहे. त्यामुळे चौकुळच्या सड्यावर निसर्गाचे दुर्मिळ असे रहस्य उलगडले आहे. डॉ. ऋतुजा कोलते- प्रभूखानोलकर, आणि त्यांचे सहकारी [...]
‘स्मार्ट सिटी नव्हे…स्मार्ट खेड्या’साठी सक्रिय लोककल्प फाऊंडेशन
आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना ज्यांच्या मनात असते; ते समाजासाठी काम करण्यास पुढे येतात. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी याच भावनेने खानापूर तालुक्यातील 32 गावांना दत्तक घेऊन तेथे समाजाभिमुख असे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम सुरू केले आहेत. लोकमान्य सोसायटी या नामवंत सोसायटीची स्थापना 1994 साली झाली. या सोसायटीच्या सीएसआर [...]
स्वित्झर्लंच्या एका बारमध्ये भीषण आग, अनेक लोकं होरपळ्याची शक्यता
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वित्झर्लंड च्या प्रसिद्ध क्रांस मोंटाना शहरामध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सुरु असताना ले कॉन्स्टेलेशन बारमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक लोकांचा होरपळल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. वॉलेस कॅंटन पोलीसांच्या माहितीनुसार, […]
नववर्षाच्यापार्श्वभूमीवरपोलिसांचाकडकबंदोबस्त: नशेतवाहनेचालविणाऱ्यांवरकारवाईचासपाटा बेळगाव : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहर व उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्वानपथकाच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येत होती. पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून नशेत वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा पोलिसांनी सुरू केला होता. कारवाईसाठी बार, ढाब्याजवळ पोलीस ठाण मांडून होते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत एकूण 176 [...]
Kolhapur : 31 डिसेंबरला पार्टी नाही, सेवा! नदीबेसचा राजा मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
गडहिंग्लजमध्ये सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारा उपक्रम गडहिंग्लज : वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर रोजी अनेकजण नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीत दंग असतात. मात्र शहरातील नदीबेस भागातील ‘नदीबेसचा राजा” मित्र मंडळाचे कार्यकर्ते मात्र वेगळ्याच नियोजनात मग्न असतात. यानिमित्ताने वर्षाअखेरीस परिसरातील हिंदू स्मशानभूमी स्वच्छतेची मोहीम राबवून कार्यकर्त्यांनी [...]
नवीन रेशनकार्ड वितरणास सुरुवात
जिल्ह्यातअडीचहजारबीपीएलकार्डेवितरीत बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित ठेवण्यात आलेल्या नवीन रेशनकार्डांचे वितरण अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून सुरू झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजार पात्र लाभार्थ्यांना नवीन बीपीएल कार्डे वितरीत करण्यात आली आहेत. यापूर्वी करण्यात आलेले 39 हजार अर्ज निकाली काढले जाणार आहेत. त्यामुळे सध्या नवीन अर्ज स्वीकारणे बंद ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात [...]
बसापूरमध्ये सख्ख्या भावाचा खून
उंचावरूनपडूनमृत्यूझाल्याचीखोटीफिर्याद बेळगाव : मिळकतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या एका युवकाला यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी बसापूर, ता. हुक्केरी येथील बसलिंग विठ्ठल रामापुरे (वय 38) याचा खून करण्यात आला होता. खून लपविण्यासाठी उंचावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद खून झालेल्या [...]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थलांतरित आणि परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबाबत घेतलेल्या कठोर निर्णयांचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प प्रशासनाने जगातील 39 देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यास पूर्ण किंवा आंशिक बंदी घातली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आता आफ्रिकन देश सरसावले असून बुर्किना फासो आणि माली या दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर […]
विमान उडवण्याआधी एअर इंडियाच्या पायलटने केले मद्यप्राशन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर मद्यधुंद अवस्थेत एअर इंडियाच्या वैमानिकाला ताब्यात घेण्यात आले. २३ डिसेंबर २०२५ रोजी व्हँकुव्हर आणि दिल्ली (व्हिएन्ना मार्गे) दरम्यान उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटने मद्यप्राशन केले होते. मद्याचा वास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. वृत्तानुसार, व्हँकूवरमधील ड्युटी-फ्री स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याने पायलटला दारू पिताना पाहिले. कर्मचाऱ्याने ताबडतोब कॅनेडियन अधिकाऱ्यांना पायलटची तक्रार केली. उड्डाणापूर्वी, कॅनेडियन […]
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटीतर्फे‘आरंभ’ नूतन मुदतठेव योजना जाहीर
बेळगाव : सहकारक्षेत्रातीलअग्रगण्यसंस्थाम्हणूनओळखल्याजाणाऱ्यालोकमान्यमल्टीपर्पजको-ऑप. सोसायटीने आपल्या 30 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त गुंतवणूकदारांसाठी ‘आरंभ’नावाची विशेष मुदत ठेव योजना कार्यान्वित केली आहे. ‘सुरक्षित बचत, नव्या सुरुवातीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आलेल्या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि ठेवीदारांना आपल्या बचतीवर निश्चित आणि सुरक्षित परतावा मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सर्व स्तरातील गुंतवणूकदारांना व्हावा, या [...]
सिद्धरामेश्वर ट्रस्ट…आशीर्वाद स्वामींचा..विकास मुलांचा!
सिद्धराममहास्वामींकडूनट्रस्टअंतर्गतविद्यार्थीनिलयचीस्थापना: विनामूल्यशिक्षणाबरोबरचनिवास, भोजनयांचीहीसोय बेळगाव : शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, हे लक्षात घेऊन एक दोन नव्हे तर दरवर्षी 50 मुलांना इयत्ता आठवी ते पीयूसीपर्यंत पूर्णत: विनामूल्य शिक्षण, निवास आणि भोजनाची सोय करून देणाऱ्या मठाचे कार्य खरोखरच स्पृहणीय आहे. लिंगायत समाजाच्या स्वामींनी ट्रस्ट स्थापन करून अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यापैकी एक म्हणजे श्री सिद्धरामेश्वर एज्युकेशन [...]

25 C