SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी अटकेत

हुपरी पोलीसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला हुपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस बिबाहित तरुणाने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी हुपरी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याखाली तरुणास अटक केली आहे. सनी साताप्पा कांबळे (वय २८, रा. कारदगा, ता. निपाणी, [...]

तरुण भारत 4 Feb 2026 5:30 pm

Kolhapur News : महापालिकेत तयारी युद्धपातळीवर; महापौर दालनासह सभागृह सज्ज

महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण कोल्हापूर : महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होताच महापालिकेत महापौर दालनासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी ६ रोजी महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी सभागृहाच्या नूतनीकरणाचे कामही युद्धपातळीवर [...]

तरुण भारत 4 Feb 2026 5:22 pm

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या बेल्टची किंमत 82 हजार रुपये? नेटकरीही चक्रावले

भाजप नेते व खासदार अनुराग ठाकूर यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा लोकसभेतील एका चर्चेदरम्यानचा आहे. या व्हिडीओत ठाकूर यांनी घातलेल्या कंबरेच्या बेल्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभेत अमित शहा बोलत असताना विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर अनुराग ठाकूर शहांच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्याच काही सेकंदांचा त्यांचा […]

सामना 4 Feb 2026 5:20 pm

कर्मवीर मामासाहेबांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवा सुरू केली

वाशी:(प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती येथील कर्मवीर महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे,श्रीकांत थोबडे (माजी जनरल मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई),महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे, भाई भगवानराव उंदरे(माजी सरपंच वाशी),प्राचार्य डॉ.अशोक कदम,पत्रकार प्रा.शहाजी चेडे,प्रा.श्रीराम ढेपे व प्रा.विश्वास चौधरी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते मामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना भाई भगवानराव उंदरे म्हणाले कि, वाशी सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर डॉ.जगदाळे मामांनी हायस्कूल आणि महाविद्यालय काढल्यामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहेत. मच्छिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, हे महाविद्यालय सुरु करत असताना खूप अडचणी आल्या पण गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय सुरु केले गेले व आज ते नावारूपाला आले आहे असे त्यांनी सांगितले. ओश्रीकांत थोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,मामांच्या संस्थेतील विद्यार्थांना शिक्षण आणि उच्च संस्कार मिळाले त्या आधारे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे ते म्हणाले. पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे म्हणाले की,या संस्थेने विविध शाखा चालवत असताना पैशाचा विचार न करता विद्यार्थांना शिक्षण दिले तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांच्या आरोग्याविषयी अडचणी सोडवल्या असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याविषयी आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रा.अजित तिकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 5:15 pm

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; नगरसेवक सहलीवर रवाना

कोल्हापुरात महायुतीचे नगरसेवक निघाले सहलीला कोल्हापुर : कोल्हापुर महापालिका निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉग्रसला ३५ जागा मिळाल्या आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असुन महापौर,उपमहापौर पदाचे उमेदवार महायुतीने जाहीर केले असुन ६ फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदाची निवडणुक होणार आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीच्या [...]

तरुण भारत 4 Feb 2026 5:06 pm

सरमळेतील शतायुषी सावित्री डोईफोडे यांचे निधन

ओटवणे : प्रतिनिधी कष्टकरी जीवनाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या सरमळे येथील शतायुषी सावित्री भैरू डोईफोडे (१०५) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या आजी चार पिढ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत डोईफोडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कष्टकरी आणि संघर्षाच्या [...]

तरुण भारत 4 Feb 2026 5:00 pm

Mumbai Pune Expressway Traffic Jam –पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय

मुंबई-पुणे महामार्ग गेल्या 22 तासांहून अधिक वेळ बंद आहे. ओडोशी बोगद्यावर प्रोपेलिस गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. काल रात्रीपासून वाहने घाटामध्ये अडकून आहेत. अजून वाहतूककोंडी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला […]

सामना 4 Feb 2026 4:41 pm

निवडणूक आली की चर्चमध्ये जाणारे मोदी अल्पसंख्यांकावरील हल्ल्याबाबत मौन राहतात, ‘सिलेक्टीव्ह टार्गेटिंग’व ‘बुलडोझर पॉलिटिक्स’लोकशाहीसाठी धोक्याची घंटा! –खरगे

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत केलेल्या विधानाचा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करून विधान केले आहे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्री नेहमीच ध्रुवीकरणाच्या गोष्टी करतात आणि मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, अशी टीका खरगे यांनी बुधवारी राज्यसभेत केली. ते […]

सामना 4 Feb 2026 4:37 pm

Eknath Shinde : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उमरगा–लोहारा तालुक्यातील सभेत एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका उमरगा : उमरगा–लोहारा तालुक्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जेवळी येथे आयोजित सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली. “रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणे हीच माझी भूमिका आहे” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री [...]

तरुण भारत 4 Feb 2026 4:36 pm

प्रसन्न जीवन जगण्यास योग, ध्यान व प्राणायाम अवलंब करणे आवश्यक- स्वामी ब्रह्मचैतन्य

धाराशिव (प्रतिनिधी)- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग व्याख्याते स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यया विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले. मत्सर सोडा, प्रगती साधा स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात मानवी स्वभावावर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की, आज काही माणसांना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळे आणण्याची वृत्ती ही विघातक आहे. प्रसन्न जीवन जगण्यासाठी आपल्या भावना शुद्ध असणे आवश्यक आहे. आपण जितके विचार उच्च ठेवू, तेवढीच आपली प्रगती होण्याची दाट शक्यता असते. बुद्धी विशाल आहे, तिचा वापर सकारात्मकतेसाठी करा. यशाचा राजमार्ग यशस्वी लोकांच्या जीवनशैलीचा दाखला देत स्वामी ब्रह्मचैतन्य म्हणाले की, जगातील सर्व यशस्वी लोक प्राणायाम आणि ध्यानाचा आधार घेतात. सुदर्शन क्रियेमुळे आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. प्राणायामामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ध्यानामुळे मन स्थिर होते आणि माणसाला एकांतातही आनंदी राहण्याची कला अवगत होते. कष्ट आणि सुखाची व्याख्या कष्ट शरीराला होतात आणि दुःख आत्म्याला. जीवनात जेवढे जास्त कष्ट उपसाल, तेवढ्याच उंचावर तुम्ही जाल. याउलट, जीवनात जेव्हा प्रमाणाबाहेर सुख येते, तेव्हा माणूस 'बेहोशी'मध्ये जातो. अशा वेळी साधनाच माणसाला खरा जीवनमार्ग दाखवते. तप केल्याने व्यक्तित्व निखरते,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी गौतम बुद्धांची एक प्रेरणादायी कथा सांगितली. राजवाड्यातील सुखसंपन्न जीवन जगत असताना माणूस म्हातारा होतो, आजारी पडतो आणि मृत्यू अटळ आहे, याची जाणीव बुद्धांना नव्हती. परंतु जेव्हा त्यांनी वृद्ध, आजारी व मृत व्यक्ती पाहिल्या, तेव्हा जीवनाचे खरे सत्य त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच ध्यान, साधना व आत्मज्ञानाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. माणसाने सतत सकारात्मक विचार करत राहिले पाहिजे, कारण सकारात्मकतेमुळे नकारात्मकता आपल्या जवळ येत नाही. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक व शारीरिक विकास होण्यास मोठी मदत होते. अशा साधनेमुळे मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक संतुलित व आनंदी बनते, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की या जगात कोणीही कोणावाचून राहत नाही, माणूस गेल्यानंतर काही दिवसांत सर्व काही पूर्ववत होते, त्यामुळे जीवनात अनावश्यक ताण घेऊ नये. नियमित व्यायाम, योग व प्राणायाम केल्यास माणूस अधिक काळ निरोगी व सुदृढ राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या तणाव, अभ्यासातील एकाग्रता, भीती व संभ्रम यावर उपाय सांगताना त्यांनी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. व्याख्यानानंतर स्वामीजींनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष 'भस्त्रीका व ध्यान सत्र'घेण्यात आला तसेच सुमारे १८ मिनिटांचे ध्यान सत्र घेण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना मानसिक शांतता, आत्मविश्वास व ऊर्जाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय समारोप केला व तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास हजर होते.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 4:24 pm

समता वारी ही समाजपरिवर्तनाची चळवळ - सचिन पाटील

तेर (प्रतिनिधी)- “समता वारी हा केवळ धार्मिक प्रवास नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. हा विचार दूरगामी समाजहिताचा असून तरुणांनी या वारीत सहभागी होत समतादूत बनावे,” असे प्रतिपादन समता वारीचे निमंत्रक, संत चोखामेळा चरित्र अभ्यासक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक सचिन पाटील यांनी केले. तेर येथे चोखोबा वाणी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना त्संयांनी ही माहिती दिली. चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा शुभारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे, संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित अभिवादन सभेतून झाला. या सभेत सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत विचारांचा जागर करण्यात आला. भागवत धर्म व वारकरी परंपरेतील संतांनी सांगितलेल्या समता, मानवता व बंधुभाव या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. यंदा या वारीचे आठवे वर्ष असून, ही वारी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतून सुमारे १७५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ही वारी मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा, तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम–पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, देऊळगाव राजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे व आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे समाप्त होणार आहे. वारीदरम्यान संतांनी मांडलेल्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार असून, संत चोखामेळा महाराजांची उत्सवमूर्ती विशेष सजविलेल्या रथात विराजमान असणार आहे. शाळा, महाविद्यालये, वाड्या-वस्त्या, गावे व शहरे येथे जाऊन समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. आज समाजात वाढत चाललेली जातीय व धार्मिक दरी कमी व्हावी, माणसा-माणसातील नाते दृढ व्हावे आणि ‘जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय आहोत’ हा विचार रुजावा, या उद्देशाने समता वारीचे आयोजन करण्यात येते. एकसंघ समाज हेच राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे, असा संदेश ही वारी देत आहे. यावेळी सचिन पाटील यांच्यासह अविनाश अभंगराव, महादेव ढेंबरे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे, तात्यासाहेब येरमाळकर ,आशिष यादव, ॲड. रोहित मुंडे, कालिदास सदगर आदी समता वारी प्रतिनिधी उपस्थित होते. चोखोबावाणी दिनदर्शिकाचे तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात प्रकाशन करण्यात आले . यावेळी तेर येथील राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 4:24 pm

Ratnagiri News –पाली-दळवटणे रामवाडी परिसरात भीषण वणवा, फळबागा आगीच्या भक्षस्थानी

चिपळूण तालुक्यातील पालीकडून दळवटणे येथील रामवाडी परिसरात आज (04 फेब्रुवारी 2026) दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले होते. या वणव्यामुळे परिसरातील आंबा कलमे तसेच इतर फळबागा आगीच्या भक्षस्थानी सापडल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. […]

सामना 4 Feb 2026 4:08 pm

Solapur News : सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूरमध्ये भव्य रथ मिरवणूक

सोलापूरमध्ये सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची रथ यात्रा सोलापूर :‘सद् गुरू नाथांचा जयजयकार जयजयकार….’, ‘जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रम्ह सद् गुरू’ च्या अखंड जयघोषात हजारो भाविकांनी रथ ओढत भक्तिमय वातावरणात उत्साहात रथ मिरवणूक काढली. निमित्त होते श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या [...]

तरुण भारत 4 Feb 2026 4:05 pm

अमेरिकेची कृषी क्षेत्रातील एन्ट्री हिंदुस्थानी शेतकऱ्यांसाठी काळजी करणारी गोष्ट, शरद पवार यांचा इशारा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. अमेरिकेने हिंदुस्थानकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला एक ते दोन गोष्टींची चिंता वाटते. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे चित्र आणखी एक दोन दिवसांत स्पष्ट होईल. यानंतर सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल, असे […]

सामना 4 Feb 2026 4:02 pm

लोकसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ, विरोधी आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार भिडले; प्रियंका गांधींचा संताप

विरोधी पक्षनेते आणि राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात गोंधळ घालत त्यांना प्रश्न विचारला. या प्रकरणी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला. “जेव्हा जेव्हा सरकारला संसदेत गोंधळ घालायचा असतो, तेव्हा ते निशिकांत दुबे यांना पुढे करते,” असा थेट आरोप त्यांनी केला. […]

सामना 4 Feb 2026 3:48 pm

धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आज बुधवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी ठीक 9.26 वाजता आणि त्यानंतर 9.36 वाजता कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये भूगर्भातून आलेल्या गूढ व जोरदार आवाजांचे धक्के नागरिकांना जाणवले. या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की, अनेक घरांच्या भिंती जोरात हलल्या, तर खिडक्या व दारे थरथरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर आले. काही वेळासाठी गावोगावी आणि शहरातील वसाहतींमध्ये लोक एकमेकांकडे धाव घेत चौकशी करू लागले. काही नागरिकांनी हा अनुभव भूकंपासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी जमिनीखालून मोठा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज ऐकू आल्याचे नमूद केले. काही सेकंदांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या आवाजांमागे भूगर्भातील हालचाल, नैसर्गिक दाबातील अचानक बदल, किंवा इतर तांत्रिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांवरून या घटनेचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.सोशल मीडियावर मात्र या घटनेनंतर भूकंप झाल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अधिकृत यंत्रणांकडून अद्याप भूकंपाबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.10 ते 10.00 मिनिट या सुमारास कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गुढ आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असता त्यांचेकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार,या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की,नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. जिल्हाधिकारी धाराशिव.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:34 pm

मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांचे पाचवे पुण्यस्मरण

मुरुम (प्रतिनिधी)- येथील स्व. गंगादेवी माधवराव पाटील यांची बुधवारी ( ता. 4 ) रोजी पाचवे पुण्यस्मरण श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे साजरे करण्यात आले. स्व. मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. अविनाश मुळे, डॉ. महेश मोटे, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुजित मठकरी, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. शीला स्वामी आदींची उपस्थिती होती. प्रा. पायल आगरकर, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. विनंती बसवंतबागडे, प्रा. प्रियंका काजळे, राजू ढगे, दत्तू गडवे आदींनी पुढाकार घेतला. प्रतिभा निकेतन विद्यालयात मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, प्रा. उमाकांत महामुनी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सच्चिदानंद अंबर, जगदीश सुरवसे, भुसणीचे मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे तर नूतन विद्यालयात मुख्याध्यापक राजशेखर कोरे, बळीराम गंगणे, युवराज खताळ, कविता कदम आदींच्या हस्ते मातोश्री गंगादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुम आदी विद्यालयातही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांनी प्रतिकूल काळात स्वर्गीय माधवराव (काका) पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे राज्याचे सक्षम नेतृत्व करत सामाजिक-राजकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. तर दुसरे चिरंजीव धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे सहकार क्षेत्रातून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. कृषी व शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे नातू शरण पाटील राज्यभर युवकांची बांधणी करून युवकांचे संघटन वाढवीत आहेत. उमरगा जनता बँकेच्या माध्यमातून तरुणांना अधिक व्यवसायभिमुख बनवून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. या सर्वांना सुसंस्कारित विचार देण्यामध्ये मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला, असल्याचे उल्हास घुरघुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:33 pm

क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी; पोलीस हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

धाराशिव (प्रतिनिधी)- क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश महादेवराव शेळके हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदारास शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्लब सुरू करायचा असून त्यासाठी पोलीस हवालदार शेळके यांनी स्वतःसाठी व इतर लोकसेवकांसाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 8 डिसेंबर 25 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान पोलीस स्टेशन शिराढोण येथे झालेल्या भेटीत शेळके यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पहिला हप्ता म्हणून 5 हजार रुपये ‌‘साहेबांना विचारून सांगतो‌’ असे म्हणत स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत उघड झाले. एसीबीने 15 व 19 डिसेंबर 25 रोजी सापळा कारवाईचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित पोलीस हवालदार रजेवर असल्याने तसेच मोबाईल स्विच ऑफ असल्याने सापळा यशस्वी होऊ शकला नाही. तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने पुढील संपर्क टाळला जात असल्याचे तक्रारदाराने एसीबीला कळवले. या पार्श्वभूमीवर 3 फेब्रुवारी 26 रोजी पोलीस हवालदार राजेश शेळके यांच्याविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 व 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपीच्या अंगझडतीत काहीही आढळले नसून घरझडतीची कारवाई सुरू आहे. अटक अद्याप झालेली नाही. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश भालचंद्र वेळापुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांनी केले.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:33 pm

तब्बल पंधरा वर्षानंतर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या लिपिक व भांडारपालाची लाचलुचपत प्रकरणातून निर्दोष मुक्तता

सोलापूर (प्रतिनिधी)- यातील हकिकत - यातील आरोपी प्रल्हाद विठ्ठल मोरे (कनिष्ठ सहाय्यक वर्ग -1) व मारुती बापू ठोकळे (कनिष्ठ सहाय्यक व भांडारपाल वर्ग -3) उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंढरपूर या कार्यालयात कार्यरत होते. मूळ तक्रारदार उत्तमराव जोंधळे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन, रजा रोखीकरणातील फरकाची रक्कम, वेतनातील फरकाची रक्कम तसेच सुधारित निवृत्तीवेतनाप्रमाणे वेतन विक्रीचा फरक अशी बिले मिळालेली नव्हती, म्हणून ती बिले मिळण्यासाठी तक्रारदार जोंधळे यांनी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर या कार्यालयात दि.11/09/2009 रोजी विनंती अर्ज दिला होता. सदर अर्जानुसार वेतननिश्चिती आदेश प्राप्त झाल्यानंतर देयके अदा केली जातील, असे त्यांना लेखी कळविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी सदर कार्यालयातील प्रल्हाद मोरे, कनिष्ठ सहाय्यक यांची भेट घेऊन वरील नमूद बिले मंजुरीस पाठवण्यास सांगितले असता, त्यांनी सदर बिलाचे काम करण्यासाठी रक्कम रु. 5,000/- च्या लाचेची मागणी केली. त्यानंतर दि. 20/11/2009 रोजी तक्रारदार जोंधळे यांनी एमबी रजिस्टर व वाहनगणती मस्टर व रोजगार हमी योजना मस्टर तात्काळ जमा करावे व कार्यालयाकडून येणे- देणे नसल्याबाबतचा दाखला आणल्याशिवाय वेतन निश्चिती केली जाणार नाही, असे पत्राव्दारे कळविण्यात आले होते. त्यावेळी मारुती ठोकळे, भांडारपाल यांनी रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी जोंधळे यांच्याकडे रक्कम रु. 2,500/- ची मागणी केली. सदर लाच मागणीसंदर्भात जोंधळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे आरोपी प्रल्हाद मोरे व आरोपी मारुती ठोकळे यांच्या विरोधात दि. 17/08/2010 रोजी तक्रार दिलेली होती. सदर लाच मागणीबाबतची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात येऊन आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुढील सापळा रचण्यात आला, सदर सापळा कारवाईत आरोपी मारुती ठोकळे यांना स्वतःसाठी म्हणून लाच रक्कम रु. 2,500/- व आरोपी प्रल्हाद मोरे यांच्यासाठीची म्हणून लाच रक्कम रु. 5,000/- असे एकूण रक्कम रु. 7,500/- तक्रारदार जोंधळेकडून स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून दोन्ही आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलमान्वये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पंढरपूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भातील कोणताही ठोस व सबळ पुरावा आलेला नसून साक्षीदारांच्या जवाब अनेक महत्त्वपूर्ण विसंगती व त्रुटी असल्याचे, तसेच आरोपीस तक्रारदाराचे कोणतेही काम आरोपींकडे प्रलंबित नसताना केवळ कार्यालयामार्फत जोंधळे यांच्याविरुद्ध केले जाणाऱ्या कारवाईस बगल देणेसाठी तक्रारदाराने दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांना खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदर प्रकरणात दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही लोकसेवक आरोपींची लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे कलम 7, 12, 13(1)(ड), सह 13(2) मधून पंढरपूर येथील मे. श्री. एस. जी. नंदीमठ, विशेष न्यायाधीश, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. तत्कालीन सक्षम प्राधिकारी श्री. वीरेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर यांनी प्रस्तुत प्रकरणात मंजुरी देताना कार्यालयीन कागदपत्राची शहानिशा न करता सारासार विवेक बुद्धीचा वापर केला नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले आहे. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी (भारत सरकार नोटरी), ॲड. प्रभाकर गायकवाड व ॲड. कुमार बाबर, पंढरपूर व ॲड. राणी गाजूल यांनी काम पाहिले.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:32 pm

प्रा. श्रीराम मुळीक यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील सुपुत्र प्रा. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत चित्रपट युनियनतर्फे प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या भव्य समारंभात प्रसिद्ध फाईट मास्टर श्री. जावेद हैदर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. श्रीराम मुळीक यांनी आजवर अनेक गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली आहे. शिक्षणापुरतेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तीन अनाथ मुलींच्या विवाहासाठी आर्थिक व मानसिक आधार दिला. तसेच दोन भिकाऱ्यांना व्यवसाय उभा करून देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे ते सन्मानाने उदरनिर्वाह करत आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले, अजित मामुनकर यांच्यासह मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. या सन्मानामुळे कळंब व वाशी तालुक्याचा नावलौकिक राज्यपातळीवर उंचावला असून, प्रा. श्रीराम मुळीक यांच्यावर मित्रपरिवार, विद्यार्थी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:32 pm

ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांशी होणारा अन्यायकारक फरक दूर केला जाईल

धाराशिव (प्रतिनिधी)- शेती, शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठोस विकासाचा आराखडा हाच आमचा अजेंडा असून, केवळ घोषणा नव्हे तर परिणामकारक अंमलबजावणी हेच आमचे धोरण आहे. शेतीसाठी सिंचन व पाणलोट विकासाच्या कामांना गती देत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे, दुष्काळ व अवकाळी संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि शेतमालाला योग्य व हमीभाव मिळवून देणे हा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार, आधुनिक व सुविधा-संपन्न करणे हे आमचे प्राधान्य असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळा, डिजिटल शिक्षण, क्रीडा व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांशी होणारा अन्यायकारक फरक दूर केला जाईल. अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते. आरोग्याच्या बाबतीत गावपातळीवर वेळेवर, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली जातील. असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:31 pm

कळंब शहर व्यसनाच्या विळख्यात; 12 ते 30 वयोगटातील तरुण सुलोचनच्या आहारी

कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहर सध्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले असून, विशेषतः 12 ते 30 वयोगटातील तरुण पिढी सुलोचन ओढण्याच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम व्यसन सुरू असताना कळंब पोलीस प्रशासनाचे संशयास्पद दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. व्यसनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरात हाणामाऱ्या, वादविवाद, दहशतीचे प्रकार आणि किरकोळ गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शांत शहराची ओळख पुसली जात असून, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. जर वेळीच ठोस कारवाई झाली नाही, तर ही व्यसनाची लाट तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करेल, असा गंभीर इशारा जाणकार व्यक्त करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून शहरात विशेष मोहीम राबवावी, व्यसन विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि तरुण पिढीला या दलदलीतून बाहेर काढावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:26 pm

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना 7 फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक

धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही व्यवस्थेत 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाचा मतदान करणे हा मूलभूत हक्क आहे.लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी सर्वसामान्य मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी रजा देणे किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देणे आवश्यक आहे. मात्र,काही निवडणुकांमध्ये काही संस्था व आस्थापना त्यांच्या कामगारांना अशी रजा किंवा सवलत देत नसल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुक होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी रजा देण्यात यावी.तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने,दुकाने व इतर आस्थापना (खाजगी कंपन्यांमधील आस्थापना,सर्व दुकाने,निवासी व अनिवासी हॉटेल्स,खाद्यगृहे,नाट्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या,शॉपिंग सेंटर्स,मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) यांना हे आदेश बंधनकारक राहतील. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असलेल्या धोरणात्मक किंवा लोकोपयोगी सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या संदर्भात,संबंधित अधिकारी,कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवसाची रजा देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.ही सवलत देण्याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे बंधनकारक आहे. उद्योग,ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने व दुकाने यांचे मालक व व्यवस्थापन यांनी वरील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे शासनाने निर्देश दिले आहे. मतदारांकडून मतदानासाठी आवश्यक रजा किंवा सवलत न मिळाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही शासनाने दिला आहे.या आदेशामुळे येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला निर्भयपणे व निर्बंधांशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असून लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:26 pm

पदापेक्षा माणुसकी मोठी असते... जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श

धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 2 फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. सेवेची तब्बल 35 वर्षे पूर्ण करून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कुलकर्णी 2 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे,निष्ठेने व समर्पित भावनेने आपली जबाबदारी पार पाडली.अशा निष्ठावान कर्मचाऱ्याचा सन्मान हा केवळ औपचारिक न राहता,मनापासूनचा असावा,याचे जिवंत उदाहरण 2 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाले.सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी पुजार यांनी एक अत्यंत भावस्पर्शी निर्णय घेतला. स्वतःच्या शासकीय वाहनात कुलकर्णी यांना स्वतःच्या जागेवर बसवून, स्वतः मात्र समोर सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना घरी सुखरूप पोहोचवले आणि त्यानंतरच आपल्या शासकीय निवासस्थानी परतले. हा केवळ एक प्रसंग नव्हता,तर अधिकारी, कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिकपणाला मिळालेली माणुसकीची पावती आणि नेतृत्व म्हणजे काय याचा आदर्श ठरलेला क्षण होता. अधिकारी असूनही कर्मचाऱ्यांवर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करणारे, त्यांच्या कार्याचा आदर करणारे आणि माणुसकी जपणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार अनेकांच्या मनात आदराने घर करून गेले. अशा संवेदनशील, माणुसकीने भरलेल्या नेतृत्वाला मनापासून वंदन.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:25 pm

विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावरच निवडणूक लढवणार; खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ठाम निर्धार

धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर सांजा, आंबेजवळगे, कसबे तडवळे व येडशी (ता. धाराशिव) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाल्या. या सभांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना खासदार निंबाळकर यांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसह शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविल्याचा ठोस लेखाजोखा मांडला. “आम्ही केवळ आश्वासनांचे राजकारण करत नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामांच्या जोरावरच जनतेसमोर जात आहोत. विकास आणि जनतेच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. या सभांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांनीही पारदर्शक कारभार, प्रामाणिक सेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांचे उज्ज्वल भवितव्य हेच आघाडीचे मुख्य ध्येय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या जाहीर सभांना शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार सभांमुळे धाराशिव तालुक्यात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून महाविकास आघाडीला मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकराज्य जिवंत 4 Feb 2026 3:24 pm

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या टेरेसवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण आयआयटी परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमन अग्रवाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता. […]

सामना 4 Feb 2026 3:22 pm

20 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या रांगा असतानाही टोल वसूली

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे तसेच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. खालापूर टोल नाक्यापासूनच वाहतूक संथ गतीने सुरू असून खोपोली ते लोणावळा घाट सड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटल्याने या वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. […]

सामना 4 Feb 2026 3:18 pm

गोवेरी-म्हारसेवाडीत गव्यांचा उच्छाद

वार्ताहर/कुडाळ कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सात-आठ गव्यांचा कळप निदर्शनास आला.त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या या भागात गवारेड्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची, शेंगदाणा, कुळीथ, भाजीपाला लागवड केली आहे. त्यामुळे [...]

तरुण भारत 4 Feb 2026 2:55 pm

Photo –आदित्य ठाकरेंनी माळी कुटुंबीयांना दिला धीर

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू पावलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शिवसेना तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी माळी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित होते.

सामना 4 Feb 2026 2:53 pm

‘बंद दाराआड न्याय रडतोय!’; SIR वरून ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक

‘आज न्याय बंद दाराआड रडत आहे’, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) कडाडून हल्ला चढवला. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आज थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कक्षात प्रवेश केला आणि आपली बाजू मांडली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सुधारण्यासाठी (SIR) जी […]

सामना 4 Feb 2026 2:48 pm

बिलासपूरमध्ये प्रेयसीकडून प्रियकराची चाकू भोसकून हत्या, कारण जाणून धक्का बसेल

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियकराने आपला मोबाईल नंबर आणि मेसेज ब्लॉक केल्यामुळे संतप्त झालेल्या एका 22 वर्षीय तरुणीने प्रियकराची चाकू भोसकून हत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिलासपूर येथील गौरी गणेश कॉलनीमध्ये घडली. रोशनी सूर्यवंशी […]

सामना 4 Feb 2026 2:38 pm

Ratnagiri News –देवरुख बावनदीवर उभारण्यात येणाऱ्या धरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप, 6 कोटींचा निधी मंजूर

देवरुख शहराला २४ तास व सातही दिवस अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बावनदी पात्रात उभारण्यात येत असलेल्या धरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांची ही योजना असून काम पूर्ण होईपर्यंत खर्च […]

सामना 4 Feb 2026 2:34 pm

माजगावात स्व.भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती

आ . केसरकरांसह विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सावंतवाडी । प्रतिनिधी माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती येथील माजगाव समाधीस्थळी बुधवारी साजरी करण्यात आली. आमदार दिपक केसरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. लोकनेते व महाराष्ट्र [...]

तरुण भारत 4 Feb 2026 2:29 pm

Ratnagiri News : जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित ; दिनेश जैतापकर जैतापकर यांंचा विश्वास

जुवाठी गटातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार राजापूर : गेली अनेक वर्षे राजकारणात कार्यरत असतानाही मी निव्वळ समाजोपयोगी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजसेवा हा छंद समजून मी आजवर कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात शक्य तेवढे योगदान [...]

तरुण भारत 4 Feb 2026 2:01 pm

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महिला उमेदवारांची जोरदार रस्सीखेच

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? कोल्हापुर : निम्मापेक्षा अधिक जागेवर जिल्हा परिषद मतदार संघातुन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद यावेळी महिलांसाठीच आहे . त्यामुळे या पदावर कोणत्याही जातीतील उमेदवार दावेदार होऊ शकतात. त्यामुळे [...]

तरुण भारत 4 Feb 2026 1:54 pm

पंतप्रधान मोदींची संसदेत येण्याची हिंम्मत नाही, नरवणे यांच्या पुस्तकावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका

संसदेत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुस्तकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “लोकसभा अध्यक्ष म्हणतात की हे पुस्तक अस्तित्वात नाही. सरकार म्हणते ते अस्तित्वात नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही हे पुस्तक नाही असे सांगतात. पण देशातील प्रत्येक तरुणाला माहीत आहे की हे पुस्तक अस्तित्वात आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींची संसदेत […]

सामना 4 Feb 2026 1:38 pm

Ratnagiri News : धोपेश्वर गणातील जनता माझ्या कामाची पोचपावती देईल! ; अभिजीत गुरव यांचा विश्वास

पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात अभिजित गुरव राजापूर : मी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिलेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव ठेऊन माझ्या धोपेश्वर गणातील जनता मला [...]

तरुण भारत 4 Feb 2026 1:36 pm

स्वतःला मृत्यूच्या खाईत लोटलं, पण 20 चिमुकल्यांना वाचवलं; मधमाशांच्या हल्ल्यात अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धाडसी घटना समोर आली आहे. मडवडा पंचायतीतील एका अंगणवाडी केंद्रात मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यापासून 20 मुलांचे प्राण वाचवताना एका अंगणवाडी सेविकेने आपल्या प्राणांची आहुती दिली. कांचनबाई मेघवाल, असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी केंद्राच्या आवारात मुले नेहमीप्रमाणे खेळत होती. अचानक मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने […]

सामना 4 Feb 2026 1:30 pm

बिग बॉस मराठी सिझन 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता भिडले!

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश आणि रुचिता यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसत आहे. या भांडणामुळे घराचे वातावरण पूर्णपणे तापले असून, इतर स्पर्धकांनाही मध्यस्थी करणे कठीण झाले आहे. नेमकं काय घडलं? प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, एका टास्कदरम्यान किंवा चर्चेदरम्यान राकेश आणि रुचिता यांच्यात शाब्दिक चकमक सुरू […]

सामना 4 Feb 2026 12:46 pm

मांडवीकिनारी आजपासून ज्ञानसागर!

गोवा पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन : पाच दिवस गोवा होऊन जाणार पुस्तकमय पणजी : देशभरातीलवाचक, लेखक, प्रकाशकआणिविचारवंतांनाएकत्रआणणारा, ‘अॅनओशनऑफ स्टोरीज‘ या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव आजपासून पणजीत प्रारंभ होत असून पुढील पाच दिवस गोवा पुस्तकमय होणार आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आज दि. 4 [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:41 pm

पुस्तकाचा संदर्भ दिला तर अडचण काय? संसदेतील गदारोळावरून खासदार प्रियंका गांधी यांचा सवाल

संसदेत विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “यात नवीन काहीच नाही. प्रत्येक अधिवेशनात असेच घडते. आता तर हे आणखी वाढले आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रियंका गांधी म्हणाल्या की, हा विषय केवळ लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांना बोलू न दिल्यापुरता मर्यादित नाही, तर तो […]

सामना 4 Feb 2026 12:39 pm

अर्थसंकल्पाचा अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी

कॉंग्रेसच्याटीकेवरदामूनाईकयांचेप्रत्युत्तर पणजी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात गोव्याला काय काय दिले आहे, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांचा अभ्यास करावा व त्यानंतरच बोलावे. उगीच ‘उचलली जीभ …’ करू नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेसचे आरोप आणि टीकेला उत्तर दिले आहे. मंगळवारी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:38 pm

तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट सोसायटीची परवानगी रद्द

आर्थिकव्यवहारकरतानाखबरदारीघेण्याचासल्ला पणजी : सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने तिऊमल्ला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला 31 जुलै 2014 आणि 28 जून 2018 च्या पत्रांद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि गोवा राज्यात 13 शाखा उघडण्यासाठी दिलेली परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) गोवा सरकारने तात्काळ रद्द केले असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी 24 मे 2013 [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:35 pm

कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे हुतात्मा

पंजाबमधील भटिंडा येथे देशसेवा बजावताना वीरमरण : गावासह परिसरावर शोककळा,कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीमध्ये आज होणार अंत्यसंस्कार वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक कंग्राळी खुर्द येथील ज्योतीनगरमधील नागनाथ गल्लीतील रहिवासी जगदीश मनोहर शिंदे (वय 41) हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांना पंजाब भटिंडा येथे सोमवार दि. 2 रोजी वीरमरण प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:27 pm

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे ठार

अथणी-गोकाकरोडवरीलरेहमानधाब्यानजीकघटना बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तीन तरुण ठार झाल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी रात्री 9.50 च्या दरम्यान अथणी-गोकाक रोडवरील रेहमान धाब्यानजीक घडली आहे. गजानन महादेव वडेयर (वय 22) रा. मोरब, ता. रायबाग, महादेव मल्लाप्पा गोलभावी (वय 22), माळाप्पा मल्लाप्पा गोलभावी (वय 26) दोघेही राहणार मुगळखोड. ता. रायबाग अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:26 pm

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा चाकूने हल्ला करून खून

सौंदत्ती-रामदुर्गरस्त्यावरीलघटना: आरोपीहीझटापटीतजखमी बेळगाव : आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाने एकाचा चाकूने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी होलकट्टी गावातील सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावर घडली आहे. बसवराज पराप्पा होसमनी (वय 49) रा. बसीडोणी असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी इरय्या संगय्या मठपती (वय 32) रा. बसीडोणी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:24 pm

अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅम्प येथे पुन्हा लोखंडी कमान

बेळगाव : शहरातील कॅम्प येथील अवजड वाहतूक रोखण्यासाठी हिंडलगा रोड येथील गांधी स्मारकाजवळ पुन्हा नव्याने कमान उभारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातामुळे या कमानीचे नुकसान झाले होते. कमान नसल्यामुळे या मार्गावरून पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे नव्याने कमान उभारण्यात येत आहे. ग्लोब थिएटरपासूनच्या इंडिपेंडंट रोडवर अनेक शाळा आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी कॅम्प [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:15 pm

जिल्ह्यातील सर्व यात्रांमध्ये शुद्ध भंडारा वापरा

जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांच्याकडूनआदेशजारी: उल्लंघनकरणाऱ्यांवरकारवाई बेळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी यात्रा-जत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेषत: सौंदत्ती यल्लम्मा देवी, चिंचली मायाक्का देवी, कक्केरी बिष्टम्मा देवी, कोकटनूर यल्लम्मा देवीच्या यात्रेसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा-जत्रा होतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यानुसार भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रांमध्ये भेसळ भंडारा न वापरता शुद्ध भंडाऱ्याचा वापर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:13 pm

उजळणी परीक्षेत काही शाळांचा शून्य टक्के निकाल

शहरांसहग्रामीणभागातीलअवस्था: जिल्ह्यातील23 शाळांनाकारणेदाखवानोटीस बेळगाव : उजळणी परीक्षेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील काही शाळांचा धक्कादायक निकाल लागला आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील काही शाळांचे सर्वच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण खात्यानेही आता शाळांसमोर हात टेकले असून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दहावीच्या निकाल वाढीसाठी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्या प्रयत्नातून अनेक [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:12 pm

बडाल अंकलगीजवळील हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल?

वन अधिकाऱ्यांकडे तक्रार : दोषींवर कारवाईची मागणी बेळगाव : बडाल अंकलगीजवळील (ता. बेळगाव) कौरीगुडा रेणुकादेवी देवस्थान परिसरातील झाडांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थानी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. सोलार प्रकल्पाच्या नाव़ाखाली बडाल अंकलगी नजिकच्या कौरीगुडा रेणुका देवस्थानपरिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याची माहिती भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:10 pm

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 18 तासांपासून बंद; वाहनांच्या 12 किलोमीटरपर्यंत रांगा, पोलिसांनी दिली मोठी माहिती

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या 18 तासांपासून एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा […]

सामना 4 Feb 2026 12:09 pm

हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन मंजूर

बेळगाव : मच्छे येथे आयोजित हिंदू सभेवेळी पिरनवाडी दर्ग्याजवळ बाण सोडल्याचा हावभाव केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील हर्षिता ठाकुर, सुर्पित शिंपी, श्रीकांत कांबळे, बिटाप्पा तारिहाळ, गंगाराम तारिहाळ यांना मंगळवार दि. 3 रोजी जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:09 pm

वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर मात शक्य

बेळगाव : कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना हादरा बसत असे. ज्याला कर्करोग झाला आहे, त्याच्यापासून हे सत्य लपवून ठेवण्याकडेच कल असायचा. मात्र, हळुहळु परिस्थिती बदलत आहे. वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर उपचार करून मात करता येते. अशी अनेक उदाहरणे समोर आल्याने आता कर्करोगाची भीती कमी झाली आहे. कर्करोगाविषयीची भीती कमी करणे, प्रतिबंधात्मक [...]

तरुण भारत 4 Feb 2026 12:02 pm

बेलकॉन 2026 गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून

अभिनेत्रीसोनालीकुलकर्णीयांचीउपस्थिती बेळगाव : क्रिडाई बेळगावच्या बेलकॉन 2026 या भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 5 रोजी होणार आहे. सायंकाळी 4 वा. क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बेंगळूरनंतर बेळगावमध्ये असे भव्य प्रदर्शन वातानुकूलित शामियान्यामध्ये होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कर्नाटक क्रिडाईचे [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:59 am

भावेश्वरी यात्रेत ‘चांगभलं’चा गजर

मोदगेयेथेभक्तिमयवातावरण: लाखोभाविकांनीघेतलेदर्शन वार्ताहर/दड्डी ‘चांगभलं’च्या गजरात भावकाई देवीच्या यात्रा महोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 6 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. सोमवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सुमारे 2 लाख भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. बेळगाव, कोकण महाराष्ट्र व गोवा, येथून भाविक मोदगा गावात दाखल होत आहेत. गावानजीकची [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:56 am

राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय…रोहित पवारांचा पोस्टमधील वाक्याने उडवली खळबळ, रोख कुणाकडे?

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपघाताच्या घटनेवरून काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबीय राजकीय क्षेत्रात लगेचच सक्रीय झाले असले तरी मनातील जखमा कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे रोज X वर पोस्ट […]

सामना 4 Feb 2026 11:48 am

बेळगाव तालुक्यातील 54 ग्रा. पं.वर प्रशासकराज

जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांचाआदेश: निवडणूकहोईपर्यंतप्रशासकांचीनियुक्ती: लवकरचपदभारस्वीकारणार बेळगाव : ग्रामविकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. बेळगाव तालुक्मयातील एकूण 54 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायदा, 1993 मधील कलम 8(ग्ग्ग्) चा वापर करून आदेश देण्यात आला आहे. संविधानाच्या कलम 243-ई उपनियम तसेच [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:21 am

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांचे विधान

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी आपल्याला सांगितलं असतं असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले […]

सामना 4 Feb 2026 11:21 am

चिंचली मायाक्का यात्रेत मद्य विक्रीवर बंदी घाला

प्रादेशिकआयुक्तांकडेनिवेदनाद्वारेमागणी बेळगाव : चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्कादेवी यात्रेच्या निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रयत संघ-हरित सेनेने केली आहे. सदस्यांनी मंगळवार दि. 3 रोजी प्रादेशिक आयुक्त यांच्या कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. चिंचली येथे मायाक्कादेवी यात्रेला रविवार दि. 1 पासून सुऊवात झाली असून ही यात्रा 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या भागातील ही प्रसिद्ध [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:18 am

12 फेब्रुवारीच्या संपाला विविध संघटनांचा पाठिंबा

सीआयटीयूचेजी. एम. जैनेखानयांचीमाहिती: जिल्ह्यातीलकामगारहोणारसहभागी बेळगाव : केंद्रातील भाजप सरकार गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असले तरी 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. आजही देशातील कष्टकरी कामगारांना निर्धारित किमान वेतन दिले जात नसून कामगारविरोधी नवे कायदे जारी करण्यात आले आहेत. हे कायदे मागे घेण्यासह आपल्या मागण्यांसाठी विविध संघटनांनी गुरुवार दि. 12 फेब्रुवारी संप [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:17 am

आदर्शनगर महालक्ष्मी कॉलनीतील जलवाहिनीला गळती

मनपासहएलअॅण्डटीकंपनीचेदुर्लक्ष बेळगाव : आदर्शनगर येथील महालक्ष्मी कॉलनी सहावा क्रॉस येथे गेल्या 15 दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असले तरीही लिकेज काढण्याकडे महापालिका व एलअॅण्डटीने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या शहर व उपनगरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याचे दिसून येत आहे. मात्र लिकेज काढण्याकडे [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:13 am

Pune –भाजपच्या प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले; ‘हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला’असल्याचा खळबळजनक आरोप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला पुण्यामध्ये एका भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या आई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत हा अपघात नसून त्यांच्या आईला जाणीवपूर्वक कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. […]

सामना 4 Feb 2026 11:12 am

गणेशपूर रोड येथील स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला करा

कॅन्टोन्मेंटरहिवासीवेल्फेअरअसोसिएशनचीसीईओंकडेमागणी बेळगाव : गणेशपूर रोड, लक्ष्मीटेकडी ते हिंडलगा रोड येथील गांधी पुतळा रस्त्याला जोडणारा स्मार्ट रोड मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गणेशपूरहून हिंडलगा अथवा शहरामध्ये जाताना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेंन्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:08 am

‘द ग्रेट अमेरिका’बनवण्यासाठी ‘द ग्रेट इंडिया’ला खड्ड्यात घातलं; मोदींनी कोणते रहस्य उघड होण्याच्या भीतीपोटी हा करार केला? संजय राऊत यांचा सवाल

हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये ऐतिहासिक व्यापार करार झाला. यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत आणला. परंतु या करारानंतर हिंदुस्थानातील कृषी क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही हा करार करून मोदींनी देश खड्ड्यात घातला अशी टीका केली आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत माध्यमांशी संवाद […]

सामना 4 Feb 2026 11:06 am

मनपाच्या दुर्लक्षामुळे सीटीस 2.0 योजनेचा निधी परत जाण्याचा धोका

राजूटोपण्णावर, सुजितमुळगुंदयांचाआरोप: कन्नडसाहित्यभवनमध्येपत्रकारपरिषद बेळगाव : महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. केंद्र सरकारने राज्यातील सहा स्मार्टसिटीपैकी केवळ बेळगाव शहराची सीटीस 2.0 योजनेंतर्गत निवड करण्यात असून केंद्र सरकारने निधीचीही तरतूद केली आहे. ही बाब आनंदाची असली तरी या योजनेतील निधीचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. मार्चअखेर या योजनेतील निधी खर्च न केल्यास तो परत केंद्र [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:06 am

केस चमकदार- सिल्की होण्यासाठी

 थंडीत केस कोरडे होतात. केसांना चमक येण्यासाठी किंवा ते सिल्की होण्यासाठी दूध आणि मध हा हेअरमास्क ट्राय करता येईल. मिश्रण केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत सगळ्या केसांना लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.  आठवडय़ातून एकदा हा उपाय करा. केसांचा कोरडेपणा खूप वाढला तर दूध आणि केळीचा हेअरमास्क करू शकता. पिकलेले केळे मॅश करून त्यात […]

सामना 4 Feb 2026 11:00 am

भंडाऱ्याच्या उधळणीत किणये येथे रेणुकादेवी यात्रा

परडीभरण्याच्याकार्यक्रमालाभाविकांचीअलोटगर्दी: भंडाऱ्याचीउधळण, उदंगंआईउदं…चाजयघोष वार्ताहर/किणये भंडाऱ्याची उधळण, उदं गं आई उदं…चा जयघोष करत किणये येथे मंगळवारी रेणुकादेवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी परड्या भरण्याच्या कार्यक्रमाला भक्तांची अलोट गर्दी झाली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी किणये गावातील भाविक यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले होते. यावेळी गावातील सुमारे 25 [...]

तरुण भारत 4 Feb 2026 11:00 am

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे दोन्ही पाय भाजपात; ईडी, सीबीआयच्या भीतीने धिप्पाड पुरूष गर्भगळीत झाले, संजय राऊत यांची टीका

ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना संपवण्यासाठी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी अनेकदा केला. याला घाबरूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण होणार ही चर्चा सुरू असतानाही हा मुद्दा गाजतो आहे. कारण एकेकाळी भाजपने इक्लाब मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप केलेले प्रफुल्ल […]

सामना 4 Feb 2026 10:59 am

उभादांडा गणपतीचा जत्रोत्सव उद्या

वेंगुर्ले (वार्ताहर)- उभादांडा वाघेश्वरवाडी येथील दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी पूजनास विराजमान करण्यात आलेल्या आणि होळी पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस विसर्जन होणाऱ्या अशा सुप्रसिद्ध व जागृत अशा गणपती मंदिरातील गणपतीचा प्रतिवर्षी प्रमाणे वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. ५ फेब्रुवारी होणाऱ्या संकष्ट चतुर्थी दिवशी साजरा होणार आहे.नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशा या उभादांडा गणपती मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे माघ [...]

तरुण भारत 4 Feb 2026 10:58 am

हिंडलगा श्री मसणाईदेवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

दर्शनासाठी भाविकांची अमाप गर्दी : यात्रेत खेळण्यांचे विविध स्टॉल्स वार्ताहर/हिंडलगा येथील श्री मसणाई देवीची यात्रा प्रतिवर्षी माघ पौर्णिमेनंतर होते. यावर्षी कृष्ण पक्ष द्वितीया मंगळवार दि. 3 रोजी पहाटे मोठ्या भक्तिभावाने यात्रेला प्रारंभ झाला. देवस्थान कमिटी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मूर्तीला अभिषेक करून पूजा करण्यात आली. पुजारी कृष्णा सुणगार व पौरोहित्य दत्ता भटजी [...]

तरुण भारत 4 Feb 2026 10:58 am

केआर शेट्टी- टिळकवाडी अकादमी अंतिम फेरीत

बेळगाव : तनिष्क स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक वरिष्ठांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून ठळकवाडी क्रिकेट संघटनेने युनायटेड क्रिकेट क्लबचा 5 गड्यांनी तर केआर शेट्टी किंग्सने एसकेई क्रिकेट अकादमीचा 4 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित दोड्डवाड, संतांष सुळगे- पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटीनियम ज्युबिली मैदानवर खेळवण्यात [...]

तरुण भारत 4 Feb 2026 10:45 am

अजितदादांचा पक्ष पवारांचा; महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ‘पटेल’तेच करा, विलीनीकरणाच्या प्रश्नावर संजय राऊत स्पष्टच बोलले

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा पुढे आली. यावर दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळी विधाने करत आहेत. शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले, तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अशी चर्चाच झाली नसल्याचे म्हटले. अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष झाल्याचे […]

सामना 4 Feb 2026 10:44 am

घराचा ताबा मिळाला, पण रजिस्ट्रेशन रखडले

1 घर किंवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करणे खूप महत्त्वाचे असते. मालमत्तेची नोंदणी कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यामुळे नोंदणी वेळेवर करावी. 2 बिल्डरने ताबा दिला, पण रजिस्ट्री केली नाही तर तुम्ही त्याबद्दल रेराकडे तक्रार करू शकता. नोंदणीसाठी ग्राहक न्यायालयातही खटला दाखल करू शकता. 3 वकिलामार्फत बिल्डर किंवा विकासकाला कायदेशीर नोटीस पाठवून नोंदणी करण्यास सांगा. त्याही […]

सामना 4 Feb 2026 10:42 am

अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेवर इराणचा हल्ल्याचा प्रयत्न, फायटर जेटने ड्रोन पाडला खाली

मध्य पूर्वेतील समुद्रात अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या एका विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने येणारा इराणचा एक ड्रोन अमेरिकन लढाऊ विमानाने पाडला आहे. दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र कराराबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ही घटना घडल्याने चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी दिलेल्या […]

सामना 4 Feb 2026 10:23 am

ऑनलाईन गेमचे व्यसन; ३ सख्ख्या बहिणींनी ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनावरून पालकांनी रागावल्यामुळे तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ‘भारत सिटी’ या निवासी टाऊनशिपमध्ये बुधवारी पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) अशी मृत मुलींची नावे आहेत. […]

सामना 4 Feb 2026 10:02 am

अहिल्यानगरमध्ये उद्यापासून ‘कृषीपर्व’ महोत्सव, धान्य, खाद्यपदार्थ तज्ञांच्या मार्गदर्शनाची पर्वणी

महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, आत्मा (ATMA), जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ‘कृषिपर्व’ हा भव्य जिल्हा कृषी महोत्सव आणि कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे हा महोत्सव रंगणार असून, यात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम […]

सामना 4 Feb 2026 9:41 am

टेंभुर्णी पोलीस पथकावर आरोपींचा हल्ला

टेंभुर्णी ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच आरोपींनी हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील चौभे-पिंपरी येथे आज (दि. 3) घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेविषयी व कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी अक्षय भगवान जाधव, अमर भगवान जाधव व सागर भगवान जाधव (रा. जाधव वस्ती, चौभे-पिंपरी, ता. माढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात […]

सामना 4 Feb 2026 9:37 am

पोषण आहाराच्या गोडाऊनवर हल्ला; गाडय़ांची तोडफोड

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका माजी सुपर वायझरने पाच ते सहा साथीदारांसह शालेय पोषण आहार पुरवणाऱया वितरकाच्या गोडाऊनवर हल्ला केला. वितरकाला खंडणीची मागणी करत गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या 6 गाडय़ांच्या काचा फोडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना 1 फेब्रुवारीला रात्री जुन्या बोल्हेगाव रोडवरील गोडाऊनमध्ये घडली. याप्रकरणी दत्ता गोरख सोनवणे […]

सामना 4 Feb 2026 9:34 am

आठ दिवसांत पीएफ मिळणार! ईपीएफओ झाले अधिक डिजिटल आणि स्मार्ट

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओची यंत्रणा बऱयाच अंशी डिजिटल आणि अधिक स्मार्ट झाली आहे. ईपीएफओ 3.0 अंतर्गत झालेल्या बदलामुळे पीएफचे पैसे काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत याबाबतची माहिती देताना सांगितले की, आता ऑनलाईन ईपीएफ क्लेमचा निपटारा अवघ्या आठ दिवसांत होत आहे. म्हणजे तुमची माहिती योग्य असेल आणि […]

सामना 4 Feb 2026 9:00 am

खूशखबर! रेल्वेत 22 हजार पदांची ‘मेगाभरती! उमेदवाराला 2 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22 हजार 195 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या हजारो पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. आरआरबीअंतर्गत ग्रुप डीअंतर्गत असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रकमन आणि ट्रकमेंटेनर अशी एकूण 22 हजार 195 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख […]

सामना 4 Feb 2026 8:55 am

भारतीय कामगार सेनेमुळे विमानतळावरील कर्मचाऱ्याच्या पत्नीला दोन लाखांची मदत

मुंबई विमानतळावरील ओमेगा एंटरप्रायझेस (पार्किंग विभाग) कंपनीतील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेने यशस्वी पाठपुरावा केला. मियाल व्यवस्थापनासोबत भारतीय कामगार सेनेने निर्णायक चर्चा केली आणि मृत कर्मचारी गोविंद बागवे यांच्या पत्नीला कंपनीकडून 2 लाखांची मदत मिळवून दिली. ओमेगा एंटरप्रायझेस कंपनीकडून मिळवून दिलेले 2 लाख रुपये आणि कंपनीतील […]

सामना 4 Feb 2026 8:52 am

अहिल्यानगर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा; यश पाहायला ना ‘दादा’ राहिले, ना ‘कर्डिले’! राज्यात राष्ट्रवादीचा एकमेव महापौर

>> मिलिंद देखणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱयात दौरे केले. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते निवडणुकांच्या मैदानात झुंजत राहिले. त्यांच्या याच कष्टाचे फलित म्हणून अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. मात्र, राज्यात मिळालेले हे एकमेव ‘महापौरपद’ पाहण्यासाठी आज ना […]

सामना 4 Feb 2026 8:51 am

देशात 10 वर्षांत 93 हजार शाळा बंद, देशात 10 वर्षांत 93 हजार शाळा बंद

देशातील शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मागील दहा वर्षांत देशभरातील 93 हजारांहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. राजस्थानमधील सीकरचे सीपीआय (एम) खासदार अमराराम यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. सरकारी डेटानुसार, 2014-15 ते 2019-20 या सहा वर्षांत देशभरात तब्बल 70 हजारांहून अधिक […]

सामना 4 Feb 2026 8:50 am

अजितदादांच्या अंत्यविधीदिनी सब जेलरचे कार्यालयातच बर्थ-डे सेलिब्रेशन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला, मात्र दादांवर अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी बार्शीतील उपकारागृह प्रमुखांच्या वाढदिवसाचे कार्यालयातच जंगी सेलिब्रेशन करण्यात आल्याचे समोर आले आहे. बार्शी तहसील कार्यालय येथे हा प्रकार घडला.या प्रकरणी नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार असल्याचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी स्पष्ट केले आहे. उपकारागृह प्रमुख […]

सामना 4 Feb 2026 8:49 am

Ajit Pawar Plane Crash –अपघातापूर्वी 8 मिनिटं आधी अजितदादांनी केलेला शेवटचा कॉल, ऑडिओ क्लिप आली समोर

बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. अशात विमान अपघातापूर्वी अजित पवार यांनी कार्यकर्त्याला शेवटचा फोन कॉल केल्याचे समोर आले आहे. अजितदादांनी 8 वाजून 37 मिनिटांनी कार्यकर्त्याला कॉल केला होता. याची ऑडिओ क्लिप […]

सामना 4 Feb 2026 8:47 am

पोलीस निरीक्षकांची बदली करा; आमदार शिंदे यांचा ठिय्या, कोरेगाव पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप

कोरेगाव पोलिसांचा मनमानी कारभार सुरू असून, नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ हे राजकीय दबावातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असून, तपासातही पक्षपातीपणा करत असल्याने बल्लाळ यांना निलंबित करावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्र्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे […]

सामना 4 Feb 2026 8:46 am

चीनने दाखवली नव्या फायटर जेटची झलक, चीनने दाखवली नव्या फायटर जेटची झलक

चीनने जगातील पहिले सहावे जनरेशनच्या फायटर जेटचा फोटो सार्वजनिक केला आहे. हे जेट खूपच आधुनिक, मोठे आणि पॉवरफुल मानले जात आहे. या जेटला चीनची कंपनी चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन बनवत आहे. चीनने जारी केलेल्या फोटोमध्ये हे जेट टेकऑफ आधी रनवेवर उभे दिसत आहे. हे जेट अमेरिकेच्या एफ-35 हून अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या विमानाचे […]

सामना 4 Feb 2026 8:45 am

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘पाकिस्तानचं यान’ सर्वोत्कृष्ट

सुप्रिया प्रॉडक्शन आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा 2026’ची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, माटुंगा येथे जल्लोषात रंगली. स्पर्धेत ‘नाटय़ांकुर, मुंबई’च्या ‘पाकिस्तानचं यान’ या ‘घाटी’ बोलीतील एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा ‘नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार’ पुरस्कार पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार ‘नाटय़ारंभ, एन.के.टी.टी. ठाणे’च्या ‘सत्य’ या ‘मालवणी’ बोलीतील एकांकिकेने आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ‘नक्षत्र कलामंच, मुंबई’च्या ‘पाकळ्या’ या खान्देशी बोलीतील एकांकिकेने […]

सामना 4 Feb 2026 8:43 am

चंद्रपूरचा वाद काँग्रेस श्रेष्ठीकडे, 18 नगरसेवकांना घेऊन वडेट्टीवार दिल्लीत

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चंद्रपुरात सुरू असलेला वाद अखेर दिल्लीत पोहचला आहे. वडेट्टीवार 18 नगरसेवकांना घेऊन दिल्लीत दाखल झाले असून ते नगरसेवकांसह काँग्रेस सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील 18 नगरसेवक वडेट्टीवार समर्थक आहेत तर 9 नगरसेवक धानोरकर […]

सामना 4 Feb 2026 8:30 am

तीन अपत्य, खोटे शपथपत्र, अनधिकृत बांधकामे…एमआयएमचे नगरसेवक अडचणीत; मनपा प्रशासनाकडे 18 तक्रारी प्राप्त

महापालिका निवडणुकीत ११५ नगरसेवक निवडून आले. नवनिर्वाचित नगरसेवक अजूनही हारतुरे, सत्कार स्वीकारण्यातच मग्न असताना १८ नगरसेवकांच्या तक्रारी विरोधकांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एमआयएम नगरसेवकांच्या विरोधात आहेत. तीन अपत्य, खोटे शपथपत्र, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्याच्या, खोटे जात प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासन या तक्रारींची शहानिशा करीत आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकावर […]

सामना 4 Feb 2026 8:29 am