तेजस्विता वेंगुर्लेकर यांना राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार प्रदान
जिल्हा परिषद दाणोली गावठणच्या शिक्षिका सावंतवाडी – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाणोली गावठणच्या शिक्षिका तेजस्विता देवदास वेंगुर्लेकर यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार ,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे ,सचिन वायकुळे, प्रमोद तमन्नावर ,जब्बार शिकलगार ,श्री. शेख ,सौ.खंकाळ , सौ.सोनकवडे यांच्या [...]
‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!
रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे. अमेय विनोद […]
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. केवळ 15 वर्षांच्या या खेळाडूने मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याचे भरभरून कौतुक केले. स्टेनच्या मते, वैभवने आपल्या आक्रमक शैलीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली असून, डेल स्टेन म्हणाला, “त्याने गोलंदाजांवर […]
सावंतवाडी मच्छी मार्केटात सांडपाणी गटारावरील फरश्या तुटलेल्या स्थितीत
पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ग्राहक पडले घसरून सावंतवाडी – शहरातील मच्छी मार्केट मधील सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या गटारावरील मजबूत जाळ्यांच्या फरश्या अनेक ठिकाणी तुटलेल्या व उघड्या स्थितीत असल्याने अनेक ग्राहक पाय घसरून पडल्याच्या घटना मंगळवारी घडल्या. यामध्ये वृद्धांसह महिला व लहान मुले यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप [...]
कदमवाडीत सुहासिनी जेवणानंतर 24 जणांना विषबाधा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती सुहासिनी जेवण कार्यक्रमानंतर तब्बल 24 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कदमवाडी गावात एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी सुहासिनी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सुमारे 3 वाजता पारंपरिक जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. यात खीर, बेसनवडी, वरण-भात, भाकरी या पदार्थांचा समावेश होता. जेवणानंतर काही तासांतच अनेक महिलांना उलटी,मळमळ,चक्कर, जुलाब, अशी लक्षणे दिसू लागली. पहाटेपर्यंत अनेकांना समान त्रास सुरू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 23 रुग्ण सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1 वृद्ध महिला (साखराबाई लबडे, वय 80) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेत महिलांसह काही लहान मुले व वृद्धांचाही समावेश असून गावातील अनेक कुटुंबांवर याचा परिणाम झाला आहे. विषबाधा नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामूहिक जेवणांमध्ये अन्न सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वच्छता, साठवण आणि अन्न बनवण्याच्या पद्धतींवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
येरमाळा येथील येडेश्वरी देवी यात्रेदरम्यान गोंधळ; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
येरमाळा (प्रतिनिधी)- येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवी यात्रेदरम्यान पालखी डोंगराकडे जात असताना झालेल्या गोंधळाच्या प्रकारात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येरमाळा येथील येडेश्वरी देवी ही तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळे दरवर्षी यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त पालखी गावातून डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असताना 7 एप्रिल रोजी सायंकाळी संबंधित प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आज 8 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अमोल ताकभाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपणे व पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि मूलभूत हक्कांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ.आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळी व सत्याग्रहांची माहिती देत सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले. या सामाजिक समता सप्ताहामध्ये ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.तसेच स्वच्छता अभियान राबवून समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.यासोबतच रक्तदान शिबिर,जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाद्वारे प्रबोधन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनीही सामाजिक समता सप्ताहानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आकांक्षा कोकाटे,दीक्षा भालशंकर,मोनिका गवळी व वैष्णवी माने या विद्यार्थिनींना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शंकर काशिनाथ खुने, विजयकुमार गायकवाड,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुधाकर सगट,कैलास पवार आणि संत रोहीदास चर्मकार समाज भुषण पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे यांचा संविधानाची फ्रेम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. व्याख्याते व साहित्यिक भैरवनाथ कानडे आणि महेंद्र चंदनशिवे यांनी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत” या विषयावर व्याख्यान दिले.या कार्यक्रमास विद्यार्थी,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिव्यक्त होणारे माध्यमे सशक्त होणे महत्वाचे- शरद गोरे
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजात जे काही घडते त्याचे चित्र साहित्यामध्ये येते. त्यामुळे अभिव्यक्त होणारे माध्यमे सशक्त होणे आवश्यक आहे असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. धाराशिव येथे 29 व 30 मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन होणार असल्याचेही डॉ. गोरे यांनी सांगितले. बुधवार दि. 8 एप्रिल रोजी दुपारी घेण्यात आलेंल्या या पत्रकार परिषदेस ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. धाराशिव येथे होणारे साहित्य संमेलन हे 32 व्या असून, या पूर्वी 18 वर्षापूर्वी धाराशिव शहरात साहित्य संमेलन घेतले होते. अशी आठवण डॉ. गोरे यांनी सांगितली. ग्रामीण भागातील नवीन साहित्यिकांना वाव देण्यासाठी व ग्रामीण साहित्य साहित्यामध्ये येणाऱ्यासाठी आपले प्रयत्न असून, राज्यातील 55 बोली भाषेची जपणूक होणे आवश्यक आहे असेही डॉ. गोरे यांनी सांगितले. काही साहित्य संमेलनामध्ये ठरावी लोकांची मक्तेदारी असते. त्यामुळेच आपल्या या साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण भागातील साहित्यिकांसह सर्वांना संधी देण्यात येईल असे सांगितले. साहित्य संमेलन नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार असून, या परिसराला अजित पवार नगरी असे नाव देणार असल्याचे सांगितले.
देशभरातील CBSE शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरातील आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता, आता सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता आणि स्वतंत्र स्वच्छता केंद्र (Sanitation Centres) उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे वृत्त ‘दैनिक जागरण’ने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने २० जानेवारी रोजी दिलेल्या […]
जग पुन्हा वसाहतवादाकडे जात आहे! उदय कोटक यांचे मोठे विधान
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आखातातील संघर्ष थंडावला आहे. आता या युद्धात अमेरिकेचा विजय झाला की इराणने वर्चस्व सिद्ध केले, याबाबतच्या चर्चा होत आहे. मात्र, या चर्चेपेक्षा एका वेगळ्या मुद्द्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. आता आपण पुन्हा वसाहतवादाकडे जात आहोत, असे विधान करत त्यांनी […]
पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे एक भीषण दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या अश्विनी संदीप नप्ते (वय 37) या महिला पर्यटकाचा वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने अपघात झाला, ज्यात त्यांच्या पाठीचे मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले असून, सध्या […]
तळवडेत ९ एप्रिलला ‘बाल आनंद मेळावा ‘
त.भा.वार्ताहर ——————- न्हावेली : श्री म्हाळाई देवी कला क्रिडा मित्र मंडळ,तळवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी ‘ बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत असून तळवडे केंद्रातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.हा मेळावा गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता तळवडे नं.१ येथे आयोजित करण्यात आला आहे. या [...]
जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा सत्कार
परंडा (प्रतिनिधी)- श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी लि.भोंजा हवेली तालुका परंडा येथील संचालक मंडळ व लघुउद्योग सल्लागार शिष्टमंडळानी नुतन जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील या परंडा दौऱ्यावर आले असता त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी थोडक्यात महत्वपूर्ण तालुक्यातील समस्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शक सांख्यिकी अधिकारी उदयसिंह चौरे, डायरेक्टर गणेश नेटके,लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.
केशव पाटील यांना डॉ.सी.व्ही.रमण जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान
धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विज्ञान अध्यापन करणारे सहशिक्षक केशव काशिनाथराव पाटील (बणजगोळे) बावची विद्यालय परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ यांच्या वतीने डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार - 2026 पुरस्काराने जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव डॉ. दयानंद जटनुरे यांचे हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी माळी, अविज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या पुरस्कारा बद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे,उपमुख्याध्यापक प्रमोद कदम विज्ञान विभाग प्रमुख संतोष देशमुख पर्यवेक्षक यशवंत इंगळे,बी.बी. गुंड, सुनिल कोरडे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे तसेच सहकारी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर वृंद, मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मंजूर
परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषद सभागृहात आज दि.8 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण सभेत शिवप्रेमी नागरिकांची जन भावना लक्षात घेता जनशक्ती नगरविकास आघाडीच्या 13 सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नाहारकत प्रमाणपत्र देण्यासाठी बहुमताने सर्व संमतीने ठराव मंजुर करण्यात आला. या ठरावास समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांनी सुचवले तर अब्बास उमर मुजावर यांनी अनुमोदन दिले.
कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
विद्यार्थ्यांच्या ‘ओंजळ’ या हस्तलिखिताचे प्रकाशन ओटवणे प्रतिनिधी कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सभापती सुष्मिता जाधव, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, गटशिक्षणाधिकारी सविता परब, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष सूर्यकांत सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस [...]
लोकशाहीत वेडा राजा निवडून देण्याआधीच…अभिनेते अतुल कुलकर्णी यांची पोस्ट व्हायरल
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देशातील आणि जगातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी एक मराठी व एक इंग्रजीत अशा दोन पोस्ट शेअर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत वेडा राजा वेळीच, म्हणजे निवडून देण्या आधीच, ओळखणाऱ्या जनतेला शहाणी जनता म्हणतात.#globalphenomenon — atul kulkarni (@atul_kulkarni) April 8, 2026 ”लोकशाहीत […]
ST Bus Price Hike –उन्हाळी सुट्टीचा बेत आखताय? एसटी महामंडळाचं भाडेवाढीचं सरप्राईज
एप्रिल आण मे महिन्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. सर्वसामान्यांसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस हाच सर्वात मोठा आधार असतो. गावी जाण्यासाठी असो अथवा फिरायला जाण्यासाठी ‘लालपरी’ला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मात्र, आता लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. 15 एप्रिलपासून एसटीने महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच […]
देशात कोळशाचा तुटवडा नाही, वीज निर्मिती सुरळीत सुरू; कोळसा मंत्रालयाची माहिती
देशाच्या कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कस्सी यांनी बुधवारी देशात कोळशाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत वीज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत असल्याचे म्हटले आहे. ANI च्या वृत्तानुसार, “देशात खाणी, वीज प्रकल्प, बंदरे आणि वाहतूक केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जो ग्राहकांना अगदी कमी वेळेत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.” कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव […]
Share Market News –शेअर बाजाराची जबरदस्त उसळी; गुंतवणूकदारांची चांदी झाली
शेअर बाजारासाठी बुधवार मंगलकारक ठरला आहे. अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू झाल्यानंतर शेअर बाजारात निफ्टीमध्ये सुमारे 12 टक्क्यांची म्हणजे 3500 अंकांची घसरण झाली होती. बाजार सवारण्याचा प्रयत्न करत अशला तरी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत नसल्याने बाजारात अपेक्षित तेजी येत नव्हती. मात्र, दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा झाली अन् बाजाराला सकारात्मक संकेत मिळताच शेअर बाजाराने तेजीत […]
ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून अर्ज केला दाखल; तृणमूलच्या विजयाचा केला दावा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या वर्षातील ३६५ दिवस याच ठिकाणी राहतात आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांनी भवानीपूरच्या जनतेला […]
मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, मोबाईलवर स्टेट्स ठेवत…
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे एका 24 वर्षीय तरुणाने मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचे पाऊल उचलले. आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला डावलण्यात आल्याने […]
Jammu Kashmir –शोपियानमध्ये आयईडी स्फोटक सापडले, बॉम्बशोधक पथकाने निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली
जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी रस्त्यावर पेरलेले एक शक्तिशाली आयईडी स्फोटक सुरक्षा दलांनी निकामी केले. हे आयईडी सुरक्षा दलांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र वेळी ते निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. दक्षिण कश्मीर जिल्ह्यातील झैनापोरा-चितारगाम रोडवर बुधवारी पहाटे नियमित तपासणी मोहिमेदरम्यान हे आयईडी आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने […]
वेताळबांबर्डे गावच्या सौंदर्यात सेल्फी पॉईंटची भर
गावच्या स्वागत नाक्यावर सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी कुडाळ – वेताळबांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व श्री देवी पावणाई टेंब राधानृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.या गावच्या सौंदर्यात हा सेल्फी पॉईंट अधिक भर घालत आहे,तर गावच्या स्वागत नाक्यावरचा हा सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरत आहे. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण सोहळा [...]
बोलेरो पिकअप व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
कुडाळ येथील घटना ;अचानक पिकअप थांबविल्याने दुचाकीची धडक कुडाळ – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते काळपनाका रस्त्यावर कृष्णाई सुपर मार्केट समोर भरधाव वेगातील बोलेरो पिकअप अचानक मधोमध थांबविल्याने मागून जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलची बोलेरो पिकअपला जोराची धडक बसली.यात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार पुंडलिक नारायण नाईक ( 68, रा.आंबलपाड- नाईकवाडी ) यांचे कुडाळ ग्रामीण रुग्णालयात काही [...]
Mumbai News –कुरारमध्ये दहशतवादविरोधी शाखेची छापेमारी; फंडिंग टेररप्रकरणी तपास सुरू
मुंबईतील कुरार भागात दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एटीएसने 12.5 लाख रुपयांची रोकड, अनेक बनावट पासपोर्ट, 9 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. एटीएस टेरर फंडिंगच्या अनुषंगाने देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही मान्यता न घेता परस्पर निधी वितरण
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 व 2025-26 अंतर्गत सन 2025-26 मध्ये विविध कामांसाठी देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आमदार कैलास बाळासाहेब पाटील यांनी करत राज्याच्या नियोजन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारीनुसार, जिल्हा नियोजन समिती धाराशिव अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. शासन नियमांनुसार उपलब्ध असलेल्या मर्यादेच्या पुढे जाऊन निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे आर्थिक शिस्तीचा भंग झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती रोपमळे या घटकासाठी सामाजिक वनीकरण विभागाला 100 लक्ष रुपयांची तरतूद असताना तब्बल 634.55 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तसेच 636.47 लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे निधी मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटन विकासासाठी निधी वितरण करताना देखील नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. जिल्हा नियोजन समितीची पूर्वमान्यता आवश्यक असतानाही ती न घेता एका विशिष्ट स्थळासाठी निधी मंजूर करून वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतर आवश्यक पर्यटन प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, पुनर्विनियोजनासाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही ती न घेता परस्पर निधी वळवून कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्राधान्य देणे अपेक्षित असतानाही त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत नियोजन विभागाने जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती धाराशिव यांना सविस्तर चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अनियमिततेमागील वस्तुस्थिती काय आहे, हे चौकशीतून स्पष्ट होणार असून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक
धाराशिव (प्रतिनिधी)- ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी धाराशिव शहरातील एका डॉक्टरची तब्बल 63 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशिलकुमार शिवाजीराव सर्डे (वय 45, रा. समर्थ नगर, धाराशिव) यांना दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.44 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधिताने ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमी रकमेवर चांगला परतावा मिळाल्याचा भास निर्माण करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या कालावधीत दिनांक 20 जानेवारी ते 9 मार्च 2026 दरम्यान विविध टप्प्यांमध्ये फिर्यादीकडून एकूण 63 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले. नंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि संपर्क कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्डे यांनी सोमवारी (दि.6) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम 2000 मधील कलम 66 (सी) आणि 66 (डी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही अनोळखी लिंक, मेसेज किंवा सोशल मीडियावरील गुंतवणूक योजना तपासल्याशिवाय स्वीकारू नये, असेही सांगण्यात आले आहे.
श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा 36 लाख 26 हजार रुपयाचा नफा
मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म. मुरुम येथील बसव सहकार भवन या इमारतीत सोमवारी (ता. 6) दुपारी 4 वाजता पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. 31 मार्च 2026 च्या तेरीज पत्रक नफातोटा, ताळेबंध या आर्थिक पत्रकावर चर्चा करण्यात आली. पतसंस्थेचे यंदाचे 16 वे वर्ष असून यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेस 36 लाख 26 हजार 806 रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा 15 कोटी 93 लाख 65 हजार 647 रुपयाच्या ठेवी आहेत. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात 12 कोटी 83 लाख 61 हजार 955 रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची इतर बँकेत गुंतवणूक 6 कोटी 22 लाख 61 हजार 808 रुपये. या पतसंस्थेचे सदरील वर्षात खेळते भागभांडवल 21 कोटी 33 लाख 4 हजार 757 रुपये आहे. या पतसंस्थेचे मार्च अखेर 4294 सभासद आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनच ऑडीट वर्ग अ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत आहे. सध्या पतसंस्थेची वाटचाल शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहाराकडे चालू आहे. सात वर्षापासून आरटीजीएस / एनएफटी ची सुविधा चालू असून मोबाईल बॅकिंगचा सभासद लाभ घेत आहेत. व्यवहार करताक्षणी एसएमएस सभासदाना प्राप्त होतो. ठेवीच्या अनेक योजना असून यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षण ठेव योजना, सीता स्वयंवर ठेव योजना, महात्मा बसवेश्वर लखपती ठेव योजना आदी चालू आहेत. महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, 11 टक्के सोने तारण कर्ज तर 11.50 टक्के वेअर हाऊस तारण, 13 टक्के गहाण कर्ज, 14 टक्के सामान्य कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायद्यासाटी संस्थेकडून पुरविल्या जातात. संस्थेकडे स्वत:ची स्वतंत्र लॉकर उपलब्ध करुन दिले आहे. टाटा कं. चे सोलार कार्यान्वित केले आहे. या बैठकीत पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, अमृत वरनाळे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, बाबासाहेब पाटील, मनोज बोंदर, इंद्रजित लोखंडे, सौ. संगीता जाधव, सौ. वंदना सोनवणे, शिवराज समन, अनंत हिरमुखे, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, सौ. नेहा शेवाळकर, पिग्मी एजन्ट संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, राजेंद्र मुदकण्णा, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यंदा ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असून यंदाचा वर्धापन दिन 12 मे रोजी होणार असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.
रामकथा सप्ताहात जाधव परिवारावतीने कन्यांचा सन्मान; चिमुकल्यांना ड्रेस वाटप
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील आयोध्या नगर येथे आयोजित श्रीराम कथा सप्ताह सोहळ्यात कन्यांचा सन्मान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना नेते विकास जाधव व उद्योजिका निताताई विकास जाधव पाटील यांच्या वतीने कन्हैया वारकरी संस्थेच्या 21 चिमुकल्या मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले रामकथा सप्ताहाच्या पवित्र वातावरणात आयोजित या उपक्रमात लहान मुलींना सन्मानित करण्यात आले. ड्रेस वाटपामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. या प्रसंगी सेवानिवृत्त पेशकार पोपटराव जाधव, उद्योजिका निताताई विकास जाधव पाटील, मरळ सर, बळी काका माने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकथा सप्ताहासारख्या धार्मिक सोहळ्यात कन्यांचा सन्मान करून समाजात स्त्री सन्मानाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या धार्मिक सोहळ्यातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
सोशल मीडियाचा मर्यादित वापर केल्याशिवाय प्रगती नाही- चित्रकार शिवाजी हांडे
धाराशिव (प्रतिनिधी)- सोशल मीडियाचा आपण सर्वांनी मर्यादित वापर केला पाहिजे, आवश्यकता पडल्यास मोबाईलचा उपवास देखील करावा असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांनी केले. संस्कार भारती देवगिरी प्रांताने निर्माण केलेल्या 2026 - 2027 दैनंदिनीचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख, उपाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, संगीत तज्ञ पंडित संजय जोशी, लातूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगर अध्यक्ष शरद पाडे, प्रांत उपाध्यक्ष डॉ.देवेंद्र कुलकर्णी, सह महामंत्री डॉ.सतीश महामुनी, दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, प्रांतमंत्री धनंजय देशपांडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी, उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे, जिल्हा सचिव प्रवीण गोरे, शहर सचिव गणेश कसपटे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगराध्यक्ष शरद पाढे, डॉ मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. जयंती आंबेगावकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. दैनंदिनीचा वापर, अत्याधुनिकता, मोबाईलचा वापर, मोबाईल उपवास या विषयावर प्रांताचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी प्रास्ताविकात केले. याप्रसंगी देवगिरी प्रांत दैनंदिनीचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समन्वयक संतोष बिडकर व धन्वंतर देशपांडे यांच्या सात संघतीसह ध्येय गीताचे गायन , दीप प्रज्वलन झाले. या निमित्ताने बोलताना प्रमुख अतिथी कलाध्यापक चित्रकार शिवाजी हांडे यांनी कलावंत बोलतो कमी आणि आपल्या कलाविष्कारातून जास्त व्यक्त होतो असे सांगून आजच्या धावपळीच्या जगामध्ये प्रगती होण्यासाठी मोबाईलचा कमीत कमी व आवश्यक वापर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, जनजागृती करावी, विद्यार्थी संवाद व पालक संवाद घडवून आणावा असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रांत अध्यक्ष प्रा स्नेहलताई पाठक यांनी संस्कार भारती ललित कलांच्या माध्यमातून कलावंताची संघटन करीत असताना कलेच्या प्रांतात राष्ट्रीय विचार देण्याचे काम करते. कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन घडवून आणते. कलावंतांना जोडते तसे माणसाला माणूस जोडण्याचे काम करते, कलावंत आपल्या कलाकृती मधून सर्व काही सांगून जातो योग्य संदेश व विचार देतो असे सांगितले. डॉ.हरिभाऊ वाकणकर व पद्मश्री योगेंद्रजी यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन तळीखेडे व आभार प्रदर्शन रघुनाथ पाटील यांनी केले. सौ.शुभांगी कुलकर्णी यांनी पसायदान गायन केले. सौ रुपाली नाईक, सौ.रूपा देसाई यांनी भूअलंकरण केले. सौ नीलिमा कुलकर्णी, धनंजय पटवारी, सो मंजुषा देशमुख, हनुमंत पांचाळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चैत्र पौर्णिमेनंतर मंगळवारी तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती ज्या भाविकांना मैत्री पौर्णिमे देणे देवीची वारी पूर्ण करता आली नाही अशा भाविकांनी आज रोजी मंगळवारी येऊन देवीजींचा पूजाअर्चा करून वारी सेवा अर्पण केली आज दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी तीर्थक्षेत्र तुळजापुरात झाली होती भाविकांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे एक वाजता धर्मदर्शनात खुले करण्यात आले होते दिविजेस भाविकांच्या अभिषेक पूजा सकाळी सहा वाजता प्रारंभ झाल्या त्या दहा वाजता संपल्यानंतर देवीचे वस्त्र अलंकार घालून नित्योपचार पूजा करण्यात आली. आज श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडप भाविकांनी भरून गेला होता तसेच अभिषेक सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या रात्री मंदिरात छबिना काढण्यात आला या सोहळ्यात हजारो भाविक मनोभावे सहभागी झाले होते श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात अतिक्रमण आजही जैसे तेच होते याचा फटका भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला.
Gold Silver Rate –अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली; सोने-चांदीत जबरदस्त तेजी आली
गेल्या वर्षी सोन्याचांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यात मोठी घट झाली. त्यानंतर अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे सोनेचांदीच्या दरात मोठी चढउतार होत होती. आता अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाल्याने सोनेचांदीच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा […]
येडेश्वरी यात्रेनिमित्त होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग द्या- डॉ. प्रतापसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- येरमाळा येथील आई येडेश्वरी यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने धुळेसोलापूर महामार्गावर सुमारे 40 किलोमीटरपर्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना तब्बल चार ते आठ तास रस्त्यात अडकून राहावे लागले. यामध्ये रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांनाही मोठा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही गंभीर परिस्थिती योग्य नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भविष्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात पर्यायी मार्ग निश्चित करून त्याची पूर्वसूचना नागरिकांना देणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.
Us Israel Iran War –शस्त्रसंधीनंतर इराणच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट, कारण अद्याप अस्पष्ट
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात बुधवारी सकाळी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर दुपारी इराणमधील लावान बेटावरील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. शस्त्रसंधीनंतर इराणमधील हा पहिलाच स्फोट आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. इराणी वृत्तसंस्थेने या घटनेची माहिती दिली आहे. इराणचे लावान बेट हे पर्शियन आखातातील होर्मोझगान प्रांतात वसलेले सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे […]
जुन्या झाडांमुळे धोका; जीवित, वित्तहानीची भिती
उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रीय महामार्गां-लगतची जुनी झाडे धोकादायक झाली आहेत. जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने जुनाट झाडेही कोलमडून पडत आहेत. यामुळे मार्गावरील जुनी व धोकादायक असलेली झाडे हटवण्याची गरज आहे. शहराच्या मध्य भागातून गेलेल्या या सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सध्या अवकाळी जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडू लागली आहेत. केव्हा, कधी धोकादायक वृक्ष कधीही उखडून किंवा एखादी मोठी फांदी वाहनावर पडून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. अलीकडेच जोराच्या झालेल्या पावसामुळे परिसरातील अनेक झाडे व फांद्या उन्मळून पडत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक खोळबंली होती. गत वर्षी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ जुनाट व मोठे झाड पडले. रस्त्याच्या लगत असलेल्या जुनाट झाडे उन्मळून पडली तर फांद्या कोसळलेल्या आहेत. संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनाट,धोकादायक झाडे हटविण्याची व फांद्या छाटण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. चार-पाच दिवसापूर्वी रात्री तालुक्यातील कराळीतांडा येथे विज पडून भारतबाई चव्हाण यांची म्हैस दगावली. कराळी गावात बालाजी इंगळे व गोविंद मुगळे यांच्या घराच्या सामाईक भिंतीवर विज पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. शहरातील स्वप्नील बसवराज स्वामी यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर विज पडून टाकीसह पाईपलाईन जळाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पहाणी
उमरगा (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे उमरगा व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या सेवेची माहिती घेण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी व उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पहाणी केली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून रुग्णांची मनापासून सेवा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ते सदैव तत्पर आहेत. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होऊन, स्थानिक पातळीवरच तपासणीची सुविधा मिळणार आहे. शासनाच्या वतीने आरोग्यविषयक विविध योजना राबवल्या जात आहेत. क्रस्ना डायग्नोस्टिक सी.टी. स्कॅन सेंटर सुरु करण्यात आले आहे. याची पहाणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार प्रविण स्वामी, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचे विधानसभा सह अध्यक्ष शरण बसवराज पाटील, मुरलीधर मुगळीकर, डॉ. कपिल महाजन, डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. थिटे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. विकास जाधव, डॉ. सौ. कोमल जाधव, अजिंक्य पाटील, प्रकाश आष्टे, सुनिल कुलकर्णी, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, पंचायत समिती सदस्य दगडू मोरे, हरीभाऊ जाधव, यशपाल कांबळे, धिरज बेळंबकर, महेश माशाळकर, मल्लिनाथ स्वामी, राजेश सोनवणे, सदानंद पाटील आदीसह डॉक्टर संघटना, कर्मचारी वर्ग, ग्रामीण भागातील युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुपवाडमध्ये अलंकार कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये हत्या कुपवाड : कुपवाड शहरात कापसे प्लॉट येथे पत्र्याच्या शेडमध्ये झालेल्या दगडू सुखदेव केंगार (वय ५२) या सेंट्रिंग कामगाराचा खून कौटुंबिक कारणातून झाल्याचे कुपवाड पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.हा खून मयताची पत्नी व सराईत गुन्हेगार या दोघांनी केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयितांना सोमवारी [...]
निरोगी समाजासाठी प्रत्येक घटकाचे सामूहिक प्रयत्न आवश्यक- प्रियंवदा महाडदळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करता येतात. स्वच्छता,संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांनी केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे कार्यकारी समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटना च्या स्थापनेनिमित्त दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त यंदा “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी,विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे,नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार, प्रसाराचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्द्गार ओटवणे : प्रतिनिधी पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले योगप्रचार आणि प्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून पतंजली योग समितीच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. त्यावेळी [...]
सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार व प्रसाराचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्द्गार ओटवणे : प्रतिनिधी पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले योगप्रचार आणि प्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून पतंजली योग समितीच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. त्यावेळी [...]
बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राजकारण
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख आनंद पाटील यांनी लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शिवसेना पक्ष नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे आणि पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली “एकनाथ केसरी” बैलगाडा शर्यत यशस्वी पार पाडली. या माध्यमातून आनंद पाटील यांच्या मातोश्रींना जिल्हा परिषद सभापतीपदासाठी डावलणाऱ्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर देऊन विशेष म्हणजे भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यात महायुती मजबूत असल्याचे दाखवून देत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आनंद पाटलांच्या नावाची राजकीय पटलावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. निमित्त बैलगाडा शर्यतीचे असले तरी बैलगाडा आखाड्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने राजकीय वचपा काढण्याचा खरखुरा सत्तेच्या खुर्चीचा आखाडा पेटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान भातागळी येथील आनंद पाटलाच्या दमदार बैलाने पटकावला आहे. लोहारा तालुक्यातील भातागळी येथे श्री शंभो महादेव यात्रेनिमित्त शिवसेनेचे आनंद पाटील यांनी “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत“ दि.7 एप्रिल रोजी आयोजित केली होती. सभापतीपदाला डावलले नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी खुद्द शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रींना महिला व बाल कल्याण सभापती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्याचे आम्हीच नेते आहोत, आमच्या शिवाय पक्षाची गाडी हलवणार नाही अशा अविर्भावात असलेल्या गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रीला सभापती पदापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोन दिवसात कोल्ह उसात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून येताच सभापतीपद मागणे म्हणजे दोन दिवसात कोल्ह उसात या म्हणी प्रमाणे आहे. ज्या लोकांची उभी उभी हयात शिवसेनेत गेली आहे अशांना संधी देणे योग्य झाले असते. अशी प्रतिक्रिया माजी आमदार चौगुले यांच्या समर्थकांनी दिली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद कर्मचारी भारत दिगंबर साळुंखे वय 57 यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते नगर पालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कार्यरत होते.
तेज मळगावकरची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
न्हावेली /वार्ताहर मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव प्रशालेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कुमारी तेज दत्ताराम मळगावकर हिने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ९२.६२ टक्के गुण मिळवत प्रथम प्रयत्नात ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.तेज हिच्या या यशामागे तिची प्रबळ जिद्द,सातत्यपूर्ण [...]
महापौर निकम यांनी सुर्वेनगरमध्ये मांडला कामांचा धडाका कोल्हापूर – कोल्हापूर जनता दरबारमधीलअर्जाच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग २० मधील सुर्वेनगर, विद्या-वसंत पार्क (रि.स. नं. ८५३, प्लॉट नं. डी-५) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. युवराज पाटील यांनी त्यांच्या घराच्या परिसरात अनाधिकृतरीत्या सोडण्यात येणाऱ्या [...]
“मिरची कागदात जोखणार अन् गुळाला चांगला भाव मिळणार”; वाकरेच्या ज्योतिर्लिंग यात्रेत भविष्याचा वेध
बिरदेव भक्त रंगराव हराळे यांनी वर्तवली आगामी काळाची भाकिते माकरे: कलियुग जाणार बाळांनो, कलंकी येणार, मिरची र बाळांनो कागदात जोकणार, गुळाला धारण बाळानो ठेचला मरण, अशी भाकणूक बिरदेव भक्त रंगराव हराळे (खुपिरे) यांनी केली. वाकरे, ता. करवीर येथे जोतिलिंग चैत्र यात्रेनिमित आयोजित [...]
गुजरातमधील भावनगरच्या राजकारणात सोमवारी एक धक्कादायक प्रकरण घडले. भाजपच्या माजी नगरसेविका सेजलबेन गोहेल यांनी अवघ्या काही तासांत पक्ष बदलत पुन्हा मूळ पक्षात परत येत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. दुपारी 12:09 वाजता काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत सेजलबेन गोहेल यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत पक्षात महिलांना आणि संविधानाला सुरक्षितता नसल्याचा आरोप […]
Solapur |दोन चाकांवर ‘फोर व्हीलर’चा फील ; सोलापूरच्या तरुणाची भन्नाट आयडिया, दुचाकी केली ‘कव्हर’
सोलापूरच्या अवलीयाने दुचाकीलाच बनवलं ‘कार सोलापूर : सोलापूर शहरातील एका अवलीयाने उन, वारा आणि पावसापासून बचावासाठी आपल्या दुचाकीला चारी बाजूंनी बंदीस्त केले आहे. त्यामुळे दुचाकीवरून जाताना कारचा फील येतो. ऋषिकेश मगर यांनी बनविलेली त्यांची दुचाकी लक्षवेधक [...]
नावे वगळून आमचा पराभव करू शकत नाही! ममता बॅनर्जींनी ठणकावलं, पुन्हा कोर्टात जाणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्यात आल्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार यादीतून नाव वगळण्यास विरोध करण्यासाठी आपला पक्ष पुन्हा न्यायालयात जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतून सुमारे ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी […]
विजापूर-रायचूर पॅसेंजर सोलापूरला येणार नाही सोलापूर: सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेबलिंग सायडिंग क्रमांक १ व २ कार्यान्वित करण्यासाठी सिग्नल व दूरसंचार विभागामार्फत विशेष काम हाती घेण्यात आले असून, यासाठी गुरुवारी (दि.९) रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम [...]
मला गुजराती लोकांबद्दल आदर, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केली दिलगिरी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी गुजरातमधील लोकांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर (X) केलेल्या पोस्टमध्ये खर्गे म्हणाले की, केरळमधील निवडणूक सभेत केलेल्या काही वक्तव्यांचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात आहे. तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांबद्दल […]
Sindhudurg News –देवगडमधील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक
देवगड येथील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी देवगड पोलिसांसमोर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींविरोधात देवगड पोलीस स्थानकात बीएनएस कलम 305, 331 (3), 331 (4) हा अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत संचार निगम लिमिटेड देवगड येथे 25 सप्टेंबर 2025 रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी 28,800 रुपये किंमतीचे […]
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे (प्रभाग २) येथील पाणी समस्या गंभीर बनली असून वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत गाव तळीचे काम सुरू न झाल्यास ८ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. असुर्डे प्रभाग २ (मणवेवाडी […]
आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबारात एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; शिकारी दरम्यान घडली घटना
कणकवली तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक जण ठार झाला असून दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीसाठी गेले असता अचानक गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागली. जखमीला तातडीने कणकवली येथील एका खाजगी […]
फोंडा पोटनिवडणुकीबाबत आज निवाडा
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिकांवर आज बुधवारी दुपारी निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाने सुनावणी निश्चित केली आहे. या पोटनिवडणुकीचे मतदान उद्या गुऊवारी 9 एप्रिल रोजी होणार आहे.मतदान अवघ्या एक दिवसांवर ठेपले असताना ही पोटनिवडणूक घ्यावी की नाही? यावर उच्च न्यायालय आज निवाडा देणार आहे. या याचिकेची पहिली सुनावणी 24 मार्च रोजी झाली होती. [...]
विवाह नोंदणी ऑनलाईन होत नसल्याने नवविवाहितांसमोर मोठी अडचण; शासनाने त्वरित मार्ग काढण्याची मागणी
सध्या विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया होत नसल्याने नवविवाहीत जोडप्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये विवाहाची नोंद करण्यासाठी गेलेल्या नवविवाहितांना क्यूआर कोड असलेले ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने अनेक शासकीय कामे रखडत असल्याची माहिती चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली. ग्रामपंचायतींमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया करताना संगणक प्रणालीमध्ये क्यूआर कोड […]
कामगारांना कामावर घ्या, नंतर काम करा
सुर्ल सांखळी येथील सेसा कंपनीच्या गेटवर कुटुंबियांसह कामगारांचा ठिय्या, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लक्ष घालावे साखळी : डिंगणे सुर्ल सांखळी येथील सेसा रिसोर्सीस लि. या खाण कंपनीतील 84 कामगारांना गेल्या 26 जुलै रोजी अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे प्रकरण न्याप्रविष्ट बनले आहे. असे असताना डिंगणे खाणीवरील खनिज माल इतरत्र हलविण्यात येत असल्याची माहिती मिळताच तो अडविण्यासाठी [...]
फोंड्यातील मतदारांचा कौल भाजप-मगो युतीलाच
दामू नाईक व दीपक ढवळीकरांचा विश्वास : रितेश नाईक यांच्या विजयाची पूर्ण खात्री, अपप्रचारावर विश्वास नको फोंडा : भाजप-मगो युतीचे उमेदवार रितेश नाईक यांनी आजवरच्या प्रचारकार्यात सर्व 45 बुथवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या कोपरा बैठका तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेला लाभलेला उदंड प्रतिसाद हे पाहिल्यास विजय [...]
संगमेश्वर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज
संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या राजकारणात सध्या मोठी स्थित्यंतरं पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील एकूण १२९ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तिथे आता पूर्णपणे प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. दुसरीकडे, ४१ ग्रामपंचायतींमध्ये मात्र डिसेंबर २०२७ पर्यंत लोकनियुक्त सरपंचांचा कार्यकाळ शिल्लक असल्याने तिथे सध्या नियमित कारभार सुरू आहे. एकाच तालुक्यात दोन भिन्न प्रशासकीय व्यवस्था असल्याने गावगाड्याच्या नियोजनात […]
लुथरा बंधूंच्या जामीनअर्जावर आज निकालाची शक्यता
पणजी : म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी कथित दस्तावेज बनावट प्रकरणात सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या जामीनअर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. आज सदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबचे दिल्लीस्थित मालक असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना सदर क्लबच्या अग्निकांड प्रकरणातील 25 मृत्युपायी दोषी मानले जात असले [...]
फोंड्यातील काँग्रेसच्या विजयाने राज्यात परिवर्तन सुरू होणार
महिला काँग्रेसच्या अरोरा यांचा दावा, भाजप विरोधात प्रचंड संताप फोंडा : गोव्यात महिलांवर होणारे वाढते अत्याचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि अनियंत्रित महागाई यामुळे जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून हा रोष व्यक्त होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्या विजयातून राज्यात परिवर्तनाची सुरुवात होणार आहे, असा दावा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस [...]
गोवा भू‐संवर्धन विधेयक अधिवेशनात संमत करा
माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांची मागणी, पणजीत ‘इनफ इज इनफ’च्या कार्यालयाचे उद्घाटन, जमीन रुपांतरे रद्द करा पणजी : नगर नियोजन कायदा 39 ए अंतर्गत झालेली सर्व आणि प्रस्तावित जमीन रुपांतरे रद्द करुन फोंडा पोटनिवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा अधिवेशन बोलवावे तसेच 39 (ए) कलम रद्द करण्याची मागणी असणारे गोवा भू-संवर्धन विधेयक त्यात संमत करावे, असे माजी न्या. [...]
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध
सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन सहसचिव तथा सदस्य कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी तालुका पत्रकार संघाचा [...]
गोवा नाईट क्लब आग प्रकरण, सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना जामीन मंजूर
गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन या अग्नीतांडव झालेल्या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. यामुळे लुथरा बंधूंच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा आहे. डिसेंबर 2025 मध्ये या क्लबमध्ये आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. आगप्रकरणाशी संबंधित प्रकरणात लुथरा बंधूंना या आधीच जामीन मिळाला […]
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख निलंबित, विभागीय चौकशी होणार
नांदेड जिल्हा परिषदेत अनेक प्रकरणात थेट सीईओंना ओव्हरटेक करून कारभार करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यांच्या संदर्भाने आलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पाहता त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता […]
दत्तवाड रस्त्यावरील विजापूरे मळ्यात जुगाराचा डाव उधळला कुरुंदवाड : घोसरवाड ता. शिरोळयेथील जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत रोख रक्कम, दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य असा २ लाख ८४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस [...]
Kolhapur |कसबा बावड्यात धक्कादायक घटना; २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूची राहत्या घरी आत्महत्या
कसबा बावड्यातील तरुण खेळाडूच्या निधनाने परिसरात हळहळ कसबा बावडा – कसबा बावडा येथील रेणुका नगरमध्ये राहणाऱ्या शिवम कृष्णात पाटील (वय २३) याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार त्याच्या घरच्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. [...]
कोल्हापुरी हिसका! ६०० रुपये किलोने मटण मिळताच शिवाजी पेठेत उसळला जनसागर कोल्हापूर – कोल्हापूर म्हटलं की रांगडी माणसं आणि इथली अस्सल खाद्यसंस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. सध्या कोल्हापुरात ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सुंदर मेळ शिवाजी पेठेत पाहायला मिळत आहे. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवार किंवा बुधवारी [...]
कुरुंदवाड परिसरात जुना वटवृक्ष जमीनदोस्त कुरुंदवाड – मजरेवाडी–बस्तवाड–अकिवाट तिहेरी रस्त्यावर असलेल्या वादग्रस्त वडाच्या झाडाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, मजरेवाडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात अडथळा आणू नये असा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून झाड तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या कामानंतर [...]
Us Israel Iran War –अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा, कश्मीरमध्ये जल्लोष
महिनाभराहून अधिक काळ सुरु असलेल्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध अखेर दोन आठवड्यांसाठी थंडावले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करताच कश्मीरमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कश्मीरमधील नागरिक याला ‘इस्लामिक प्रजासत्ताकाचा विजय’ असे मानत आहेत. कश्मीरच्या विविध भागांत विशेषतः खोऱ्यातील शिया-बहुल भागांमधील नागरिक या शस्त्रसंधीचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर जमले आहेत. शहरातील सैदाकदल […]
इंधन टंचाईच्या काळात टेरवमध्ये अवैध कोळसा भट्ट्या पुन्हा धगधगल्या! बंदीला हरताळ
आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाईची चर्चा रंगली असतानाच चिपळूण तालुक्यातील टेरव गावात मात्र पुन्हा एकदा कोळसा भट्ट्या धगधगू लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसची टंचाई असल्याने अवैधरित्या कोळशाचा ‘धूर’ मात्र जोमात निघत आहे. यामुळे कोळसा अवैध भट्टीवाल्यांना सुगीचे दिवस आले असले पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्याप्रमाणात होत आहे. चिपळूण तालुक्यातील टेरव परिसरात कोळसा […]
फोर्ट रोडवर एकेरी वाहतुकीसाठी चर्चा
पोलीस आयुक्तांनी दिली भेट : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एकेरी मार्गाचा पर्याय अवलंबला जात आहे. जुना धारवाड रोड येथील जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंप व तेथून खिमजीभाई पेट्रोल पंपापर्यंत या दोन रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यासंदर्भात फोर्ट रोड येथील व्यापाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी सूचना [...]
अमली पदार्थांविरोधात रेल्वेची धडक कारवाई
66 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त : 11 जणांवर गुन्हे दाखल बेळगाव : रेल्वेमधून अमलीपदार्थ व मद्य वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या विरुद्ध रेल्वेच्या आरपीएफकडून धडक मोहीम राबविण्यात आली आहे. मार्च 2026 मध्ये 66.86 लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे रेल्वेतून अमलीपदार्थांच्या वाहतुकीवर निर्बंध बसणार आहे. [...]
गणतीसह उत्तरपत्रिका तपासणीची शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी
शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी बेळगाव : शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांवर एकाच दिवशी दहावीची पेपर तपासणी व गणतीसाठीचे ट्रेनिंग अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना एकतर गणतीचे ट्रेनिंग अथवा पेपर तपासणीला उपस्थित रहावे लागणार आहे. त्यातच पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा झाल्याने त्यांचीही पेपर तपासणी करावी लागत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत [...]
राकसकोप जलाशयाला महापालिका आयुक्तांची भेट
पाण्याचा जपून वापर करण्याचे नागरिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाला सोमवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी पाणीपुरवठा महामंडळ आणि केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट देऊन पाहणी करण्यासह आढावा घेतला. बेळगाव शहराला हिडकलसह राकसकोप जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा उष्णता अधिक असल्याने पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच [...]
Samrjit Ghatge |कागलच्या राजकारणात मोठी उलथापालथ! समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये
कागलचे नेते समरजीत घाटगे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, त्यांनी आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट [...]
परिवहन मंडळाचा प्रवास ‘रामभरोसे’
बेळगाव-हैदराबाद मार्गावर सोडली मोडकळीस आलेली बस : परिवहन मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर : लांबपल्याच्या मार्गांवर सुसज्ज बस सोडण्याची मागणी बेळगाव : परिवहन मंडळाचा सुरक्षित प्रवास मानला जातो. तिकिटांचा दर माफक असल्याने नागरिक परिवहन मंडळाच्या प्रवासाला पसंती देतात. मात्र बेळगाव ते हैदराबाद दरम्यान मोडकळीस आलेली एसी बस सोडण्यात आली. लांबपल्ल्याच्या मार्गावर सुसज्ज बसेस सोडण्याऐवजी बेळगाव मध्यवर्ती [...]
हे गणराया कर्नाटकाला सुबुद्धी दे!
डॉ. किरण ठाकुर यांची आर्त विनवणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रŽ न्याय मार्गाने सुटावा सांगली : सीमाभागातील मराठी जनतेवर अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायातून त्यांची सुटका व्हावी आणि त्या भागातील लोकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी ‘हे गणराया, कर्नाटकला सुबुद्धी दे!“ अशी आर्त विनवणी तरुण भारत समूहाचे सलागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण [...]
‘एनसीएमसी’आधारित तिकीट प्रणाली होणार लागू
महिलांना शक्ती कार्ड दिले जाणार : टप्प्याटप्प्याने राज्यभर सुरू करणार : प्रभावी देखरेख ठेवणे शक्य बेळगाव : महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘शक्ती’ योजना लागू होऊन जवळपास तीन वर्षे पूर्ण होत असताना राज्य सरकारने बससेवेत डिजिटल बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील चारही परिवहन महामंडळांमध्ये ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आधारित तिकीट प्रणाली [...]
शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल
कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेची शासकीय स्तरावर विविध ठिकाणी नोंद असते. सरकारी ओळखपत्रांवर जन्मतारखेचा उल्लेख असतो. मात्र त्यातील काही नोंदीच वयाचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातात. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत मोठा निकाल दिला आहे. शाळा सोडल्याचा दाखला हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा निर्वाळा न्यायमूर्ती आर. एम. जोशी […]
चव्हाट गल्लीत ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी संतप्त
शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : नळांना तब्बल आठ ते 15 दिवसांतून पाणीपुरवठा बेळगाव : चव्हाट गल्लीतील घरगुती नळांना गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे लहान मुलांना उलटी, जुलाब सुरू झाल्याने गल्लीतील रहिवासी व महिला आक्रमक बनल्या आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा निषेध करत मंगळवारी महिलांनी गल्लीत रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन [...]
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध शमल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडला असतनाच आता जगात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. आता उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने बुधवारी अचानक तातडीची सूचना जारी केली. या सूचनेत म्हटले आहे की उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. जपान सरकारने तात्काळ सतर्कतेची घोषणा केली आणि […]
अमेरिका- इस्रायल- इराण युद्धबंदीचे श्रेय पाकिस्तानला, ही मोदी काळामध्ये हिंदुस्थानला मारलेली ही सगळ्यात मोठी चपराक आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच सगळ्यात आधी कॅबिनेटमध्ये जयशंकर सारखे जे माकड आहेत त्यांना दूर केलं पाहिजे असा टोलाही संजय राऊत लगावला. संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा […]
अजित पवार हे काँग्रेसचेच प्रोडक्शन, काँग्रेसवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांनी सुनावले
अजित दादा यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्यात गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच अजित पवार हे काँग्रेसचेच प्रोडक्शन आहे, त्यामुळे काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका कोणी करावी याचे आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपूरत केलं पाहिजे अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले आहे. मुंबईत […]
साताऱ्याच्या तरुणीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी, मृत्यूनंतर अवयवदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण अपघातात जखमी झालेल्या साताऱ्याच्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. नीलम तानाजी शिंदे असे मयत तरुण नाव असून अपघातानंतर ती गेले 14 महिने कोमात होती. नीलमच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर तिचे अवयव दान करुन कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. नीलम शिंदे ही गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. 14 फेब्रुवारी […]
‘त्या’ नराधम बापाला कठोर शिक्षाच करण्याची मागणी
बेळगाव : मानवी संवेदनांना हादरा देणारी एक धक्कादायक घटना तालुक्यातील उक्कड येथे घडली. जन्मदात्या बापानेच अवघ्या 14 दिवसांच्या निष्पाप बालिकेची विष देऊन हत्या केली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. भीमराई भानप्पा चिप्पाडी (रा. भुतरामहट्टी) याने प्रियांका नामक बालिकेचा विष देऊन खून केला. या अमानुष घटनेमुळे बालिकेच्या पालकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत [...]
महापालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी
माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन बेळगाव : बेळगावातील माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी विद्यमान नगरसेवकांच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बेळगावच्या महापालिकेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नगरसेवकांनी जनहितासाठी काम केले पाहिजे. महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी आपले अधिकारी अधिकाऱ्यांना देऊ नये. सभागृह महापौरानीच चालविले पाहिजे. मात्र अधिकारीवर्ग महापालिका चालवत आहे. अजेंड्यावर घरपट्टी वाढीचा विषय [...]
Solapur |“हातातोंडाशी आलेला घास हिरावला”; पापरी, येवती परिसरात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
मोहोळ तालुक्यात गारपीटीचा पिकांना मोठा फटका पाटकुल (प्रतिनिधी) :मोहोळ तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीस आलेली पिके व फळबागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या “हातातोंडाशी आलेला घास हिरावला” [...]
तात्काळ इराणमधून बाहेर पडा! हिंदुस्थानी नागरिकांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी
इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने बुधवारी आपल्या नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली असून, युद्धग्रस्त देशातून ‘त्वरित बाहेर पडण्याचा’ (expeditiously exit) ‘महत्त्वाचा सल्ला’ दिला आहे. इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने ‘X’ वरील एका पोस्टद्वारे हिंदुस्थानी नागरिकांना सुचवलेल्या मार्गांचा वापर करून देश सोडण्यास सांगितले आहे. ⚠️ Advisory as on 08 April 2026. pic.twitter.com/pusFQIAKKI — India in Iran (@India_in_Iran) […]
हलशी-हलशीवाडी लक्ष्मी यात्रा आजपासून
आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : आज पहाटे अक्षतारोपण वार्ताहर/हलशी कदंबकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हलशी-हलशीवाडी परिसरात श्री महालक्ष्मी यात्रेचा भव्य सोहळा उद्या बुधवार दि. 8 पासून मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. बुधवार दि. 8 ते गुरुवार दि. 16 पर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार [...]

28 C