SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

धर्मांधता मुळावर उठत आहे!

नाशिक आणि अमरावती येथे उघडकीस आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांनी या आठवड्यात उच्चपदस्थांची आणि उच्च शिक्षितांमधील धर्मांध वृत्ती आणि आंधळेपणा उघडा पडला. आपला हेतू साध्य करण्यासाठी ही मंडळी महाराष्ट्राच्याच गळ्याला नख लावण्यापूर्वी यांचा बिमोड केला गेला पाहिजे. नाशिकमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमधील प्रमुख उच्चशिक्षित मुस्लिम इंजिनियर धर्मांतरासाठी खेळ करत असल्याचे आणि त्यांना त्यांच्या कंपनीतून काही महिलाही साथ [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:30 am

यादगिरीजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा होरपळून मृत्यू

धडक बसल्यानंतर कार-खासगी बसला भीषण आग : मृत सिरवार तालुक्यातील त. भा. प्रतिनिधी बेंगळूर : कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात कार आणि खासगी बस यांची समोरासमोर धडक झालेल्या भीषण अपघातात सिरवार नगरपंचायतीच्या नगरसेवकासह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुरपूर तालुक्यातील देवापूर येथे शुक्रवारी ही घटना घडली. अपघातानंतर दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मृत सिरवार येथील [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:26 am

दुहेरी नागरिकत्व : राहुल गांधी अडचणीत

अन्वेषण करून एफआयआर सादरीकरणाचा आदेश वृत्तसंस्था / प्रयागराज राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा प्रकाशात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून त्यांच्या विरोधात एफआयआर सादर करा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला असून त्यामुळे गांधी यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि ब्रिटन या [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:26 am

नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत अमेरिका, उरुग्वे संघांचा समावेश

वृत्तसंस्था, लॉसेन (स्वीस) 2026 मध्ये पहिल्यांदाच होणारा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नेशन्स चषक पुरूष आणि महिलांच्या हॉकी स्पर्धेत उरुग्वेचा महिला हॉकी संघ तसेच अमेरिकेचा पुरूष संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहे. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी वेल्सचा पुरूष हॉकी संघ आणि स्कॉटलंडच्या महिला हॉकी संघाने माघार घेतल्याने त्यांच्या जागी उरुग्वे आणि अमेरिकन संघांना संधी देण्यात आली आहे. महिलांची [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:24 am

इस्रायलमध्ये मिळाली2100 वर्षे जुनी गोळी

शत्रूंसाठी गोळीवर लिहिलेला होता खास संदेश इस्रायलमध्ये 2100 वर्षे जुनी एका गुलेलची गोळी मिळाली आहे. त्या गोळीवर शत्रू सैन्यांना टार्गेट करत एक खास संदेश कोरण्यात आल्याचे पुरातत्व तज्ञांना आढळून आले आहे. वैज्ञानिकांना ही गोळी हिप्पोसच्या एका प्राचीन रस्त्याच्या कडेला असलेल्या दफनभूमी क्षेत्रात मिळाली. हे क्षेत्र बीजान्टिन युगादरम्यान एक प्रमुख बिशप केंद्र होते. हेलेनिस्टिक काळादरम्यान ख्रिस्तपूर्व [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:23 am

महिलांची टी-20 चॅलेंज चषक स्पर्धा रवांडात

वृत्तसंस्था, किगाली (रवांडा) आयसीसीची महिलांच्या पहिल्याच टी-20 चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद रवांडा भूषविणार आहे. सदर स्पर्धा आज 18 एप्रिलपासून रवांडामध्ये सुरू होत आहे. सदर स्पर्धेमध्ये पाच महिला संघांचा समावेश आहे. यजमान रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वानुआतू या देशांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान रवांडा आणि इटली यांच्यात सलामीचा सामना तर त्यानंतर नेपाळ [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:22 am

आयईडी स्फोटात सहा जवान जखमी

झारखंडमधील सारंडा जंगलातील घटना वृत्तसंस्था/ रांची झारखंडला नक्षलमुक्त करण्याच्या उद्देशाने पश्चिम सिंहभूम जिह्यातील चाईबासाच्या सारंडा जंगलात लपून बसलेल्या आणि 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या सीपीआय (माओवादी) पॉलिटब्युरो सदस्य मिसिर बेसराच्या शोधासाठी चालवलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाला दगाफटका सहन करावा लागला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे एकूण सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांमध्ये [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:22 am

बिहार मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्यास अटक

गुजरातमध्ये पोलिसांची संयुक्त कारवाई वृत्तसंस्था/ पाटणा बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना त्यांच्या शपथविधीच्या दिवशी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी आरोपी शेखर यादवला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी शेखर यादवला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी देण्यात आली. आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या दिवशी फोनवरून जीवे [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:22 am

कांबळीची प्रकृती गंभीर नसल्याचा पत्नीकडून खुलासा

वृत्तसंस्था, मुंबई भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांत त्याच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याची पत्नी अँड्रिया हेविटने त्याचे आरोग्य गंभीर स्थितीत असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. कांबळीच्या मेंदूत रक्ताची गुठळी निर्माण झाली असून त्याचा परिणाम त्याच्या स्मरणशक्तीवर होत असल्याचा दावा [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:22 am

न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघाची विजयी सलामी

यजमान बांगलादेशचा 26 धावांनी पराभव, डीन फॉक्सक्रॉफ्ट सामनावीर, निकोल्सचेही अर्धशतक वृत्तसंस्था, मिरपूर न्यूझीलंडचा पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या चौऱ्यावर असून उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 26 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. न्यूझीलंड संघातील डीन फॉक्सक्रॉफ्टला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:10 am

शेवटच्या दिवशी शेअरबाजारात परतली तेजी

सेन्सेक्स 504 अंकांनी तेजीत, स्मॉल कॅप- मिडकॅप समभागांची खरेदी, रुपया 27 पैशांनी वधारला त. भा. वृत्तसंस्था मुंबई : शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजार तेजीसोबत बंद होताना दिसला. मेटल, एफएमसीजी आणि ऑईल अँड गॅस यांच्या निर्देशांकाने मजबूत कामगिरी केली. स्मॉलकॅप व मिडकॅप समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी मजबूत होत [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:09 am

हरिवंश सिंह तिसऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती

पहिल्यांदाच नामनिर्देशित सदस्याला पद : पंतप्रधानांकडून अभिनंदन वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हरिवंश नारायण सिंह तिसऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती झाले आहेत. शुक्रवारी ते बिनविरोध निवडून आले. या पदासाठी विरोधी पक्षाने कोणतेही नामांकन सादर केले नाही. राज्यसभेच्या उपसभापतीपदी नामनिर्देशित सदस्याची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभा सचिवालयाला हरिवंश यांच्या समर्थनार्थ पाच प्रस्ताव प्राप्त झाले. सभागृह नेते जे. पी. [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:07 am

माद्रिद स्पर्धेतून जोकोविचची माघार

वृत्तसंस्था, माद्रीद येथे 6 ते 17 मे दरम्यान होणाऱ्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील माद्रीद खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या बीएनपी पेरीबस खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविचने आपला सहभाग दर्शविला होता. त्यानंतर त्याला उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:06 am

भारताच्या निर्यातीत घट : मार्चमध्ये जवळपास 7.44 टक्क्यांची घसरण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली पश्चिम आशियातील संकटामुळे, मागील महिन्यात वस्तूंच्या निर्यातीत 5 महिन्यांतील सर्वात मोठी घट दिसून आली आणि ती 7.44 टक्क्यांनी कमी होऊन 38.92 अब्ज डॉलर्सवर आली. या काळात, आयातीत 6 टक्क्यांहून अधिक घट झाली. ही माहिती अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. दरम्यान, कमी आयातीमुळे मार्चमध्ये व्यापार तूट कमी होऊन 20.67 अब्ज [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:04 am

पंजाबमधील मंत्र्यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा अडचणीत : ‘आप’कडून संताप वृत्तसंस्था/ लुधियाना पंजाबचे मंत्री संजीव अरोडा यांच्या निवासस्थानासमवेत विविध ठिकाणी शुक्रवारी ईडीच्या पथकांनी छापे टाकले आहेत. लुधियाना येथील निवासस्थानी ईडीने सुरक्षा दलांच्या देखरेखीत झडती घेतली आहे. ही पूर्ण कारवाई मनी लॉन्ड्रिंग आणि जमीन व्यवहारांशी निगडित कथित अनियमिततांच्या प्रकरणांवरून झाली आहे. ईडीचा तपास केवळ लुधियानापुरती मर्यादित राहिला नाही, [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:01 am

आजचे भविष्य शनिवार दि.18 एप्रिल 2026

मेष: आजारावर जास्त चर्चा कराल तितका तो वाढेल. वृषभ : मार्गदर्शकाची भेट आपल्याला उपयुक्त ठरेल मिथुन : देणेकऱ्याकडू पैसे आपोआप वसूल होतील. कर्क : स्वमालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी नको सिंह : सकारात्मक विचार फलदायी ठरेल. कन्या : प्रवासात नवी ओळख भविष्यात लाभदायी ठरेल. तूळ : कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत: गुंता. वृश्चिक : तणावामुळे चिडचिड व [...]

तरुण भारत 18 Apr 2026 6:01 am

अंदाधुंद मतदारसंघ फेररचनेचे विधेयक लोकसभेत कोसळले, महिला आरक्षणामागचे षड्यंत्र पराभूत

महिला आरक्षणाच्या षड्यंत्राआडून अंदाधुंद मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले आणि हे विधेयक लोकसभेत कोसळले. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमत गाठता न आल्याने महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. केंद्र सरकारने देशात 2029 पर्यंत महिला आरक्षण लागू करताना लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून वाढवून 850 […]

सामना 18 Apr 2026 5:30 am

राज्यघटनेवरील हल्ला आम्ही हाणून पाडला! –राहुल गांधी

आपल्या सोयीचे मतदारसंघ फेररचना करण्याचा मोदी सरकारचा घाट विधेयक फेटाळल्यानंतर उधळला गेला. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही राज्यघटनेवरील हा हल्ला यशस्वीपणे हाणून पाडला. हे केवळ महिला आरक्षणाचे विधेयक नव्हते, तर देशाची राजकीय रचना बदलण्याचा कट होता तो आम्ही रोखला.

सामना 18 Apr 2026 5:26 am

कच्च्या तेलाच्या जहाजांचा मार्ग मोकळा, होर्मुझ सामुद्रधुनी खुली

युद्धबंदीदरम्यान इराणने एक मोठी घोषणा केली आहे. कच्च्या तेलासह जागतिक व्यापारासाठी अतिशय महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्याचे इराणने जाहीर केले आहे. सर्व व्यापारी जहाजांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात येईल, मात्र युद्धबंदीच्या कालावधीपुरतीच ही परवानगी असेल, असे इराणने स्पष्ट केले. इराणच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री […]

सामना 18 Apr 2026 5:20 am

सामना अग्रलेख –मोदींचा भाव कोसळला!

मोदींच्या घरातल्या लोकप्रियतेला घसरण लागल्यामुळेच त्यांच्या जागतिक लोकप्रियतेला घरघर लागली आहे. मोदी यांची ध्येयधोरणे फसवी ठरली. शेजारी राष्ट्रांशी भारताचे संबंध साफ बिघडले आहेत. प्रत्येक गोष्टीत भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान करून लोकांना तणावात ठेवायचे. यामुळे जगात प्रतिष्ठा मिळते या भ्रमातून मोदींनी बाहेर पडायला हवे. देशातील तरुण नेतृत्व, विरोधी पक्षांना खतम करून स्वतःला मजबूत साबीत करण्याचा डाव त्यांच्यावर उलटला […]

सामना 18 Apr 2026 5:10 am

लेख –थोरियम ऊर्जेकडे भारताचे ऐतिहासिक पाऊल!

<<< ब्रिगेडियर हेमंत महाजन hemantmahajan12153@yahoo.co.in ऊर्जा हीच खऱ्या अर्थाने विकासाची गुरुकिल्ली आहे. शेती, उद्योग आणि सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शाश्वत वीजपुरवठा आवश्यक आहे. कल्पक्कम येथील 500 मेगावॅटची अणुभट्टी हे केवळ एक यंत्र नसून ते भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. सौर आणि पवन ऊर्जा महत्त्वाची असली तरी देशाला ‘बेस लोड’ (नेहमी उपलब्ध असणारी वीज) देण्यासाठी अणुऊर्जा […]

सामना 18 Apr 2026 5:05 am

प्रासंगिक –अक्षय्य तृतीया ः महत्त्व आणि पार्श्वभूमी

<< वृषाली पंढरी हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. 2026 मध्ये अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. ही तिथी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.49 मिनिटांनी सुरू होत असून तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी होईल. ही तिथी […]

सामना 18 Apr 2026 5:00 am

मुंबईच्या चौपाट्यांची सुरक्षा टाईट! सहा चौपाट्यांवर 106 लाईफ गार्ड

पावसाळा दोन महिन्यांवर आल्यामुळे पालिकेने पावसाळापूर्व तयारी जोरदार सुरू केली असून सहा चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाइफ गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाईफ गार्डना जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे चौपाट्यांवर मुंबईकर-पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे होणारे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे. अग्निशमन दलाच्या […]

सामना 18 Apr 2026 4:50 am

‘टीसीएस’वरील विश्वासाला तडा? नोकरकपात, नाशिक अत्याचार, न्यायालयीन प्रकरणांचा फटका

कॉम्प्युटर क्षेत्रातील बलाढय़ संस्था असलेल्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस (टीसीएस) मध्ये गेल्या काही महिन्यांत केलेली मोठी नोकरकपात, रखडलेले न्यायालयीन खटले आणि नाशिक अत्याचार प्रकरणामुळे टीसीएसवरच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे टीसीएसवरील विश्वासाला तडा जात असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणामुळे टीसीएस अडचणीत आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात […]

सामना 18 Apr 2026 4:42 am

राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचे खरात कनेक्शन; ईडी,आयकर तपासणीत धक्कादायक माहिती

भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांची व संपूर्ण आर्थिक व्यवहारांची ईडी आणि आयकर खात्याकडून सखोल चौकशी केली जात आहे. कागदपत्रांसह काही स्टॅम्पपेपरवरील व्यवहार आणि नोंदी मिळून आल्याने त्याच्याशी संबंधित राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधांचे ‘गूढ’ असण्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टजवळील खरातचा आलिशान फार्म हाऊस, नाशिकमधील निवासस्थान, शिर्डीतील समता पतसंस्था, […]

सामना 18 Apr 2026 4:36 am

भोंदू खरातचा निकटवर्तीय, शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके पत्नीसह अपघातात ठार; समृद्धी महामार्गावर कार कंटेनरखाली घुसली

महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि भीती घालून आर्थिक लूट करणारा भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय, शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके हा शुक्रवारी भीषण कार अपघातात ठार झाला. त्याची पत्नी अनुराधा हिचाही मृत्यू झाला, गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू आहेत. सिन्नरच्या मिरगाव येथे अशोक खरात हा संस्थापक अध्यक्ष असलेले शिवनिका ट्रस्ट आहे, त्याचा उपाध्यक्ष जितेंद्र गणपत […]

सामना 18 Apr 2026 4:30 am

निदाचा पती मोईन खान याला मुंब्य्रातून उचलले

नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाटय़मय वळण घेतले असून पोलीस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटनाक्रमाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केले आहे. दरम्यान, निदा खान हिच्या पतीला एसआयटीच्या पथकाने मुंब्य्रातून उचलले असून या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असलेल्या महिला […]

सामना 18 Apr 2026 4:28 am

आयटी कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक शोषण, धागेदोरे कुठपर्यंत ते तपासणार

नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. या नाशिक मॉडय़ूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी नाशिकच्या धर्मांतर घटनेसंदर्भात सरकारची भूमिका आणि कारवाई संदर्भात […]

सामना 18 Apr 2026 4:25 am

निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार निदा खान हिची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे. एका महिलेवरील लैंगिक अत्याचार व धर्मांतर, एका पुरुष कर्मचाऱ्याच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि अन्य महिलांचा विनयभंग याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका महिला अधिकाऱ्यासह आयटी कंपनीतील एपूण सात अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या […]

सामना 18 Apr 2026 4:23 am

स्टायलिश गॉगल खरेदी करण्यापूर्वी…हे करून पहा

उन्हाळय़ात गॉगल खरेदी करताना काळजी घ्या. नाहीतर डोळय़ांचे नुकसान होऊ शकते. उन्हाळय़ात जर खरोखर डोळय़ांचं संरक्षण करायचं असेल तर असे स्वस्तातले गॉगल टाळावे. दुकानात गॉगल घेताना त्या गॉगलची फक्त स्टाईल बघू नका. डोळय़ांना शांत वाटेल असे गॉगल्स खरेदी करा. उन्हाळय़ाच्या दिवसांत पिवळसर छटा असणारे गॉगल घेण्यापेक्षा काळपट, निळसर काचा असणारे गॉगल खरेदी करणं जास्त चांगलं. […]

सामना 18 Apr 2026 4:17 am

ट्रेंड –एकदम झक्कास लावणी.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहेत. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. मरीन ड्राइव्हवर फिरायला आलेली लोकही काwतुकाने त्यांना पाहत होती. या अप्रतिम सादरीकरणामुळे नेटकऱ्यांनी त्यांची भरभरून […]

सामना 18 Apr 2026 4:10 am

IPL 2026 –शुभमन गिलचा तडाखा अन् शाहरुख खानने कोलकाताचं स्वप्न धुळीस मिळवलं, गुजरातचा 5 विकेटने विजय

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अटीतटीचा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने 5 विकेटने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने गुजरातला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने कडवी झुंज दिली. कर्णधार शुभमन गिलने (50 चेंडू 86 धावा) एकट्याने खिंड लढवत […]

सामना 17 Apr 2026 11:28 pm

कोयंबतूरमध्ये टुरिस्ट व्हॅन दरीत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

तामिळनाडूच्या कोयंबतूर जिल्ह्यात पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. वलपराई टेकड्यांजवळ हा अपघात झाला. जखमींमध्ये व्हॅन चालकाचा समावेश आहे. एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन जाणारी टुरिस्ट व्हॅन वलपराई-पोल्लाची डोंगराळ रस्त्यावरून खाली उतरत असताना अनियंत्रित झाली. यानंतर व्हॅनने 13व्या […]

सामना 17 Apr 2026 10:56 pm

Megablock –रविवारी पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक तर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत जलद लाईनवरील सर्व उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव […]

सामना 17 Apr 2026 10:45 pm

एखादी महिला भाजपची अध्यक्ष, RSS ची सरसंघचालक होऊ शकते का? वर्षा गायकवाड यांचा सणसणीत सवाल

महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत खडाजंगी सुरू आहे. 2023 मध्येच मंजूर झालेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतल्याने विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली. एखादी महिला भाजपची अध्यक्ष आरएसएसची सरसंघचालक होऊ शकते का? असा सवाल करीत वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. याचवेळी त्यांनी काँग्रेसच्या महिला नेत्यांची यादी […]

सामना 17 Apr 2026 10:31 pm

मुंबईतील रेल्वे अपघातात रामेश्वरच्या तरुणाचा मृत्यू

ठाणे रेल्वे स्टेशन येथील घटना देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. काकांच्या दिवसकार्याला जाताना तेजसवर काळाने घाला घातला. रामेश्वर येथील जि.प.च्या माजी सदस्या वर्षा पवार [...]

तरुण भारत 17 Apr 2026 9:59 pm

राहुल गांधींनी 16 चा फास फेकलाय, मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात! –संजय राऊत

महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक राजकीय षडयंत्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या घसरणीची ही आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची हवी तशी मोडतोड करून सर्व निवडणुका जिंकण्याचे भाजपचे मनसुबे संसदेत कोलमडून पडले आहेत, अशी […]

सामना 17 Apr 2026 9:04 pm

होर्मुझ सामुद्रधुनी शस्त्रसंधीच्या काळात पूर्णपणे खुली! इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी घोषणा केली आहे की, शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ‘पूर्णपणे खुली’ राहील. ‘X’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, सर्व व्यापारी जहाजांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. अराघची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘लेबनॉनमधील शस्त्रसंधीला अनुसरून, होर्मुझ सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग, इराणच्या ‘पोर्ट्स अँड […]

सामना 17 Apr 2026 8:08 pm

झारखंडच्या छत्रामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 4 नक्षलींचा खात्मा

झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातील पिपरवार परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. ठार झालेल्यांमध्ये दीड लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव महातो याचाही समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी छत्रा-हजारीबाग सीमेवर शोधमोहीम सुरू केली होती. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, या चकमकीत झारखंड […]

सामना 17 Apr 2026 7:53 pm

अंदाधुंद मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत कोसळले, महिला आरक्षणामागचे षडयंत्र पराभूत!

महिला आरक्षणासाठी लोकसभेत आज मतदान पार पडले. आधी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि नंतर कागदावर मतदान घेण्यात आले. एकूण 489 खासदारांनी मतदान केले असून यापैकी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. संविधानाच्या नुसार विधेयक पारित होण्यासाठीचे बहुमत न मिळाल्याने यावर पुढील कारवाई करणे शक्य नाही, असे स्पष्ट करत महिला आरक्षण विधेयक […]

सामना 17 Apr 2026 7:42 pm

मोठी बातमी: महिला आरक्षण विधेयक नामंजूर; मोदी सरकारच्या पदरी निराशा, विरोधकांच्या एकजुटीचा विजय

लोकसभेत आधी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि नंतर कागदावर मतदान करण्यात आले असून यावेळी ४८९ खासदारांपैकी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या बाजूने २९८ तर विधेयकाच्या विरोधात २३० मतं पडली आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. संविधानाच्या नुसार विधेयक पारित होण्यासाठीचे बहुमत न मिळाल्याने यावर पुढील कारवाई करणे शक्य नाही, अशी स्पष्ट माहिती लोकसभा अध्यक्षांनी […]

सामना 17 Apr 2026 7:42 pm

Kokan News –कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाचे धडे; आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दिल्लीतील भारतीय हवाई दलातर्फे “इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे कामकाज व रोजगाराच्या उपलब्ध संधींची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्याचा व विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याच अनुषंगाने हवाई दलाच्या अधिका-यानी फ्लाईट सिमुलेटर […]

सामना 17 Apr 2026 7:38 pm

56 इंची छातीची भाषा करणाऱ्यांना महिलांच्या आड का लपावं लागतंय? शताब्दी रॉय यांची सरकारवर जोरदार टीका

संसदेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून केवळ निवडणूक जिंकण्याचा एक राजकीय फॉर्म्युला असल्याची तोफ त्यांनी डागली. शताब्दी रॉय यांनी आपल्या भाषणात या विधेयकासोबत जोडलेल्या डीलिमिटेशन आणि जनगणनेच्या अटींवरून गंभीर प्रश्न उपस्थित करत, 56 इंची छातीची भाषा करणाऱ्या […]

सामना 17 Apr 2026 6:53 pm

माहूर ​गडावर भाविकांचे हाल, मंत्र्यांचा मात्र अधिकाऱ्यांसोबत ‘आढावा’सोहळा

राज्यातील शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाचाही ‘ सोहळा’ मांडला जात आहे. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी माहूरला भेट देऊन विकासकामांची पाहणी केल्याचा बनाव केला खरा, पण प्रत्यक्षात गडावर येणाऱ्या भाविकांच्या पदरी मात्र पायपीट आणि गैरसोयींचेच ‘दान’ पडत असल्याचे चित्र आहे. ​​सुमारे ८२९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा गवगवा सरकारकडून केला जात आहे. पण प्रत्यक्षात माहूर […]

सामना 17 Apr 2026 6:45 pm

Video –एखादी महिला भाजपची अध्यक्ष, RSS ची सरसंघचालक होऊ शकते का?

एखादी महिला भाजपची अध्यक्ष, RSS ची सरसंघचालक होऊ शकते का? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सणसणीत सवाल.

सामना 17 Apr 2026 6:39 pm

यंदा फक्त आंब्याचे २० टक्केच उत्पादन, हा मेळावा म्हणजे शेतकऱ्यांच्या आक्रोश –माजी आमदार बाळ माने

बोगस किटकनाशक औषधे,निकृष्ट खते आणि हवामानातील बदलामुळे यंदा फक्त आंब्याचे वीस टक्के उत्पादन झाले आहे. त्यामुळे सरकारने आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी यामागणीसाठी आम्ही उद्या शनिवारी रत्नागिरीत आंबा बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा कोणतेही शक्तीप्रदर्शन नसून हा आंबा बागायतदारांचा आक्रोश आहे. त्यांच्या व्यथा मांडणारा हा मेळावा आहे असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे […]

सामना 17 Apr 2026 6:32 pm

विक्रोळीत चढाई-पकडींचा संग्राम आजपासून; सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरस्कारांचा वर्षाव

क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेवर छप्पर फाडके पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. राज्यातील तगड्या १६ व्यावसायिक पुरुष संघांचा आणि १५ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धांत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसांची उधळण केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ एप्रिलदरम्यान विक्रोळी पूर्वेला टागोर […]

सामना 17 Apr 2026 6:16 pm

माजगाव सरपंच पदासाठी दुरंगी लढत निश्चित

भाजपा पुरस्कृत विरुद्ध अपक्ष अशी थेट लढत ओटवणे : प्रतिनिधी माजगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी दुरंगी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी रंजना रवींद्र कानसे, जयश्री दिनेश सावंत, श्रद्धा मुकुंद सावंत, सपना सतीश गावडे असे चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी [...]

तरुण भारत 17 Apr 2026 6:11 pm

Chandrapur News – चंद्रपूरात लाही लाही, पाण्यासाठी हरणाच्या जोडीची रस्त्यावर भटकंती

चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने 42.6 अंशांचा उच्चांक गाठला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या कडक उन्हाचा परिणाम आता जंगलातील वन्यप्राण्यांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना चंद्रपूर शहराच्या सीमेवरील वनउपज नाका जवळ हरणांची एक जोडी पाण्यासाठी भटकंती करत थेट मुख्य रस्त्यावर (हायवे) आल्याचे दृश्य समोर आले आहे. हरणाला रस्त्यावर […]

सामना 17 Apr 2026 6:03 pm

सरकारी कामात अडथळा ; एकास २ वर्षे कारावास

ओरोस । प्रतिनिधी खारेपाटण बसस्थानकात अडथळा ठरणारे वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने एसटी वाहकास थप्पड लगावून शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी शरद शंकर गुरव (३५) रा . खारेपाटण ,संभाजीनगर ता. कणकवली याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग सूर्यकांत इंदलकर यांनी भारतीय दंड संहिता १८६०चे कलम ३५३, ३३२,५०४ अंतर्गत एकूण २ वर्षे कारावास आणि ९ [...]

तरुण भारत 17 Apr 2026 5:55 pm

Kolhapur News |तब्बल ४९ वर्षांनंतर मित्रांची गळाभेट! निगवे खालसा येथे १९७७ सालच्या दहावीच्या बॅचचा रंगला स्नेहमेळावा

४९ वर्षांनंतर चनीशेटी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा इस्पूर्ली वार्ताहर :निगवे खालसा(ता करवीर)येथील चनीशेटी विद्यालयाच्या १९७७ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल ४९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचा आणि भावनिक क्षणांचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मधल्या काळात दिवंगत [...]

तरुण भारत 17 Apr 2026 5:11 pm

Sangola news |पैसे तिप्पट करण्याचे आमिष पडले महागात; सांगोल्यात शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक

गायगव्हाणमध्ये ६ भामट्यांनी शेतकऱ्याला घातला गंडा सांगोला – सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे एका शेतकऱ्याची ९ लाख रुपयांचे तिप्पट पैसे करून देतो म्हणून फसवणूक केली. ६ जणांनी त्या शेतकऱ्याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्याच्याकडील ९ लाख रुपये हातचलाखी करून लंपास केले. शांतीलाल हणुमंत साळुंखे (वय ४८, व्यवसाय [...]

तरुण भारत 17 Apr 2026 5:07 pm

तांत्रिक निकषाच्या ऐवजी पीक कापणी प्रयोग अधारे विमा द्या- आमदार कैलास पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा पीक कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादन असे निकष लावले आहेत. तांत्रिक निकषाचा आधार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात देण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की,2025-26 खरीप हंगामा मध्ये धाराशिव जिल्हयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील चार लाख,96 हजार 19 शेतकऱ्यांनी तीन लाख 96 हजार 435 हेक्टर क्षेत्रावरील उडीद, कापूस, पिके आय. सी. आय.सी. आय. लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली होती. जिल्हयातील सर्वच महसुल मंडळात 220 वेळा अतिवृष्टी झाली असून त्यापैकी 159 वेळा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाली आहे. या कालावधीत सरासरीच्या 159.70 टक्के एवढे पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये म्हणजे ऐन सोयाबीन पिक फुलोरा व पक्वतेच्या अवस्थेत असतानाच अतिवृष्टी झाल्याने, सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे, पिकातील धान्य कुजणे, मूळ कुज होणे, मान कुज होणे, धान्याला मोड येणे, धान्य काळे पडणे, धान्याची प्रत खराब होणे, नद्या, नाले ओसंडून वाहिल्यामुळे पिके वाहून जाणे इत्यादी बाबींमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जुन ते ऑक्टोबर 2025 दरम्यान अतिवृष्टी,सततच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत बाधित पिकांचे,क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून जिरायत, बागायत व फळपिकांच्या एकून सहा लाख 69 हजार 172 क्षेत्रापैकी पाच लाख 77 हजार 544.62 हेक्टर क्षेत्र (86%) बाधित झाले आहे. जिल्ह्यात एकूण 2190 पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. पैकी मुख्य पिक असलेल्या सोयाबिन पिकाचे 504 पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 368 पिक कापणी प्रयोगावर कंपनीने आक्षेप घेतले होते. त्यात सरासरी उत्पादकता हेक्टरी तीन ते चार क्विंटल आली आहे. परंतु केंद्र सरकारच्या पिक विमा योजनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार 50 टक्के पिक कापणी प्रयोग आणि 50 टक्के तांत्रिक उत्पादन सरासरीच्या आधारे नुकसान भरपाई करण्याचे ठरविले आहे. एका बाजूला पिक कापणी प्रयोगाचे सरासरी उत्पादन 3 ते 4 क्विंटल आले असून तांत्रिक उत्पादन हेक्टरी 10 ते 12 क्विंटलवर गेले आहे. पीक कापणी प्रयोगावर कंपनीने घेतलेल्या आक्षेपावर जिल्हास्तरीय, जिल्हास्तरीय आढावा समितीसमोर तसेच राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर सुनावणी होऊन समितीकडून सदरील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. तांत्रिक उत्पादनाचा विचार केल्यास अधिक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होण्याचा धोका आहे.तांत्रिक उत्पादन व पीक कापणी प्रयोगाच्या 50:50 टक्के या अन्यायी अटीमुळे जवळपास 13 ते 14 महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची भरपाई मिळणार नसल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. तसेच ज्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे ती अतिशय कमी मिळणारं आहे. पिकांच्या नुकसानभरपाई साठी तांत्रिक उत्पादनाचा विचार न करता झालेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे समप्रमाणात व अधिकच्या रकमेने म्हणजे नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना दिलेल्या हेक्टरी 37 हजार रुपये प्रमाणे नुकसानभरपाई निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत कृषी विभाग व विमा कंपनीला आदेशित करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्याचे हित कशात? विमा कंपनीला फायदा होईल अशा प्रकारचे धोरण सरकारने राबवले आहे. त्याचा तोटा आता शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे यामध्ये सुधारणा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल असे धोरण सरकार राबवण्याचे धाडस दाखवेल का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 5:07 pm

IPL 2026 –टीम इंडियाच्या ब्रम्हास्त्राची पाटी अजूनही कोरीच, सलग 5 सामन्यांत एकही विकेट नाही; इरफान पठाणने सांगितलं कारण

IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आणि टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. गुरुवारी (16 एप्रिल 2026) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने 41 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. विशेष म्हणजे, या हंगामातील हा त्याचा सलग पाचवा सामना होता ज्यात […]

सामना 17 Apr 2026 5:06 pm

Video –योग्य पदावर योग्य व्यक्ती, संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांचे केले अभिनंदन

राज्यसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचे कौतुक करत त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी केली. योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे सांगत हरिवंश यांच्या कार्यपद्धतीचे आणि पत्रकारितेतील योगदानाचेही विशेष उल्लेख केला.

सामना 17 Apr 2026 5:04 pm

Video –जातीनिहाय जनगणना न करता ओबीसी समाजाचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न –राहुल गांधी

राहुल गांधी लोकसभेत म्हणाले,की हे महिला आरक्षण विधेयक महिलांना सशक्त करणार नाही. जुना कायदा आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. तसेच हा फक्त हिंदुस्थानच्या मतदारसंघांच्या नकाशात बदल करण्यासाठी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

सामना 17 Apr 2026 5:00 pm

Solapur crime |सोलापूर हादरले! तोंडी तलाकनंतर पुन्हा एकत्र राहण्याच्या वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले

सोलापुरात पतीकडून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न सोलापूर -सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेली एक थरारक घटना परिसराला हादरवून गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:57 pm

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘स्वच्छता लीग’क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्‍पर्धा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.१८ व १९ एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण (कॅम्प) येथे करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या १५० [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:51 pm

Solapur heatwave |सोलापूर ४३ अंशांवर! वाढत्या उष्णतेमुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘उष्माघात विशेष कक्षा’ची स्थापना

सोलापुरात उष्माघात रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू सोलापूर -सोलापूर जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघारग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. बुधवारी तब्बल ४३ अंशांची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांच्या [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:43 pm

Solapur news |सोलापूरच्या भारत नगरमध्ये जुन्या वादाचा भडका; माय-लेकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

सोलापुरात जुन्या वादातून दोघांना बेदम मारहाण सोलापूर -शहरातील भारत नगर भागातजुन्या वादाचा राग मनात धरून दोन जणांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणकेल्याची घटना घडली आहे. यात यलब्वा अरूण घोडके (वय ५५ वर्षे) आणि बालाजीअरूण घोडके(रा. भारतनगर, टीव्हीकेंद्र सोलापूर) हे जखमी झाले आहेत. १६एप्रिल [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:31 pm

सावंतवाडीत भूमी अभिलेख कर्मचारी लाच घेताना सापडला

गुन्हा दाखल सावंतवाडी : प्रतिनिधी सामायिक जमिनीतील पोटहिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपये लाच घेताना सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (३३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दोन महिन्यापूर्वी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. सदर काम करून देण्यासाठी आपटे याने तक्रादाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीच्या [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:30 pm

अशोक खरातचा निकटवर्तीय शेळकेचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू, रोहित पवारांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके याचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. यात शेळकेची पत्नी आणि मुलगा जखमी गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरहून शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावाजवळ शेळकेच्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) […]

सामना 17 Apr 2026 4:26 pm

या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी काही संबंध नाही, हा सत्ता बळकावण्याचा प्रयत्न आहे; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

महिला आरक्षण विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. या विषयावर सभागृहामध्ये बोलताना, सरकारला आपली सत्ता गमावण्याची भीती वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना जादूगार संबोधताच, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले. त्यामुळे काही […]

सामना 17 Apr 2026 4:20 pm

Karad News |ओगलेवाडीचा रेल्वे पूल बनला ‘डेथ ट्रॅप’; अरुंद पुलामुळे अपघातांची मालिका सुरूच!

ओगलेवाडीत अरुंद रेल्वे पूल, अपघातांचा धोका वाढला ओगलेवाडी : गुहागर-विजापूरराष्ट्रीय महामार्गावर ओगलेवाडी (ता.कराड) येथे रेल्वेचा पूल आहे. १९७२ च्या सुमारास बांधलेला हा पूल मुळातच अरूंद आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला चौपदरी महामार्ग असताना पूल मात्र केवळ दोन पदरी आहे. त्यामुळे [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:19 pm

माणकेश्वर येथील मंदिराला पुरातत्व विभागाची भेट

भूम (प्रतिनिधी)- माणकेश्वर येथील सटवाई देवीचीच्या मूर्तीचा शेंदूर काढण्यासाठी आलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यासोबत मंदिराच्या सभा मंडपामध्ये ट्रस्ट व गावकरी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्ट व गावकऱ्यासमोर बोलताना सांगितले की, देवीची मूर्ती वर्षानुवर्षे टिकवायची असेल तर मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे आहे. असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन पत्र व्यवहार करावा असे सांगितले. त्यामध्ये बैठकीदरम्यान गावकरी व ट्रस्टने पुरातत्त्व विभागात विभागाकडे ट्रस्टचा आक्षेप व म्हणणे पत्रव्यवहार करावा असे या बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरले .या बैठकीला तक्रारदार, ट्रस्टचे माजी-आजी अध्यक्ष,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणकेश्वर येथील सटवाई देवीची पाहणी करण्यासाठी आज आलो होतो. तक्रारदार, ग्रामस्थ व ट्रस्ट यांचे म्हणणे ऐकून घेतले. मूर्तीचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे .त्यामुळे मूर्ती पुढील दीडशे ते दोनशे वर्षे टिकू शकते. आज मूर्तीवर आभूषण असल्यामुळे पूर्ण बघितली नाही .परंतु मूर्ती पूर्ण बघितल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासन पुरातत्व विभाग यांच्याकडे सादर करणार आहोत. सागर मुंडे पुरातत्त्व विभाग माणकेश्वर येथील सटवाई देवीच्या शेंदूर काढण्यासाठी आमचा विरोध आहे. शेदुर काढल्यामुळे भाविक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात .सदरील देवस्थान यादवकालीन असून हे देवस्थान पुरातन विभागाच्या आखतऱ्यामध्ये येत नाही. राज्य संरक्षित स्मारक म्हणून सटवाई मंदिर घोषित केलेले नाही. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन दाद मागणार आहोत. बाबासाहेब अंधारे अध्यक्ष सटवाई देवस्थान

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:19 pm

खासदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून लातूर-पुणे गाडी हडपसरपर्यतच

पुणे (प्रतिनिधी)- Hadapsar Railway Station येथे मराठवाडा व लातूर विभागातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या टर्मिनेट केल्या जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. Pune Railway Station येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था तात्पुरती असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात याचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. हडपसर येथे उतरल्यावर प्रवाशांना पुणे शहरात पोहोचण्यासाठी अतिरिक्त 15 ते 25 किमी अंतर कापावे लागत असून, दररोज 100 ते 300 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च व 1 ते 2 तासांचा वेळ खर्च होतो. कामगार, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, उत्तर भारत व गुजरातकडून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र थेट पुणे स्टेशनपर्यंत नियमितपणे चालवल्या जात आहेत. त्यामुळे “वेगळे नियम वेगळे न्याय” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाडा व लातूर प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील खासदारांनी यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे किमान पुणे स्टेशनपर्यंत गाड्या चालविण्याची मागणी अधिकृतरित्या मांडलेली आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप ठोसपणे लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, Khadki Railway Station किंवा Pimpri-Chinchwad पर्यंत गाड्या वाढविणे हे व्यवहार्य व तातडीचे समाधान ठरू शकते. योग्य नियोजन, स्वतंत्र वेळापत्रक ( Dedicated Slots) आणि “Through Running”धोरण राबविल्यास गाड्या सहज पुढे वाढविता येऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून प्राधान्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या ठोस मागण्या मराठवाडा व लातूरकडील सर्व गाड्या तात्काळ पुणे स्टेशन तसेच पुढे खडकी किंवा पिंपरी-चिंचवडपर्यंत वाढवाव्यात. सर्व गाड्यांसाठी समान व पारदर्शक धोरण लागू करावे. पुणेखडकीपिंपरी मार्गावर मराठवाडा गाड्यांसाठी स्वतंत्र स्लॉट निश्चित करावेत. पिंपरी-चिंचवड येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म व देखभाल सुविधा विकसित कराव्यात. तात्पुरत्या उपाययोजनेसह दीर्घकालीन आराखडा जाहीर करावा. या मागण्यांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सह्या मोहीम सुरू केली असून, 1000 पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह रेल्वे प्रशासन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की, या प्रश्नावर तात्काळ निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.“खासदारांनी पुण्यापर्यंत गाड्यांची मागणी करूनही ती पूर्ण होत नसेल, तर सामान्य प्रवाशांनी न्याय कुठे मागायचा?” असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:18 pm

महाडच्या सत्याग्रहाने रचला भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया- प्रा. डॉ. महेश मोटे

उमरगा (प्रतिनिधी)- महाडचा चवदार तळे सत्याग्रह ही केवळ पाणी पिण्यासाठी केलेली कृती नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध पुकारलेले बंड आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा होता. या सत्याग्रहाने भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया रचला असून, व्यक्तीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. 14) सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यंदा महाड सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि मानवी हक्कांची सनद या विषयावर हे व्याख्यान पार पडले. मानवी प्रतिष्ठेचे धर्मयुद्ध आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. मोटे पुढे म्हणाले की, 20 मार्च 1927 रोजी घडलेला हा लढा अस्तित्व आणि आत्मसन्मानाचा होता. सार्वजनिक मालमत्तेवर सर्वांचा समान अधिकार असतो, हे बाबासाहेबांनी कृतीतून सिद्ध केले. हा सत्याग्रह म्हणजे विषमतेच्या अंधाराविरुद्ध पुकारलेले अहिंसक धर्मयुद्ध होते. आज आपण जे मूलभूत अधिकार उपभोगत आहोत, त्यांची बीजे महाडच्या चिखलात पेरली गेली होती. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या महामंत्राची ठिणगी महाडमधूनच पडल्याचे नमूद करत, “ माणूस आहोत आम्ही, माणूस म्हणून जगूयात,“ असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी सांगितले की, महाडच्या सत्याग्रहाचा खरा इतिहास प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे असून, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राम माळगे, डॉ. बालाजी मोरे, डॉ. धनंजय मेनकुदळे, डॉ. सर्जेराव माळी,डॉ. आप्पाराव गायकवाड, योगेश पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. बालाजी मोरे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी पिडगे तर आभार प्रा. डॉ. फुलचंद पवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमेश केशरे, प्रा. दत्ता सुर्यवंशी, डॉ. शिरीष रेड्डी, डॉ. अनिता सरपे, डॉ. संजय साळुंके आणि इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या व्याख्यानास विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:18 pm

22 एप्रिलपासून सुरतगाव येथे रंगणार ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा थरार

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगणार असुन, यामध्ये विजेत्या उपविजेत्या संघासह इतरही संघावर बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. यामुळे सुरतगाव येथे होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धांसाठी जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक तथा युवा नेते दादासाहेब घोडके यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य अशा ग्रामीण फुल पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शरण बसवराज पाटील (शरणभैय्या युथ फाऊंडेशन धाराशिव) यांच्या तर्फे 55,555, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अँड. अरविंद अप्पाराव बेडगे (सभापती नळदुर्ग) यांच्या तर्फे 33,333, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राजभाई शहाजी सुरते (ग्रा.प सदस्य, सुरतगाव) 15,555 तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत देवकर (यश कंट्रक्शन) यांच्या तर्फे 7,777 अशा भव्य बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. याच बरोबर इतरही बक्षीसांचा वर्षाव क्रिकेट संघावर होणार आहे. युवा पीढींचे सशक्तीकरण करावे व युवा पिढींनी मैदानी खेळांचे महत्त्व अंगीकृत करुण तंदुरुस्त जीवन जगावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा,असे आवाहन घोडके यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:17 pm

मंगरुळ खून प्रकरणी पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथील युवकाच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेत 36 वर्षीय कृष्णाथ आनंद साठे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय 28) आणि तिचा प्रियकर शुभम घाटूळे (वय 20) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याने गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले आहे. तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतरच हा साधा गुन्हा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय होता. आरोपींनी डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली दिली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाजवळ टाकल्याचेही उघड झाले आहे. मृतदेह काही अंतर फरपटत नेण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय घोटे, बीट अंमलदार महादेव राऊत, पोलीस कॉन्स्टेबल वाघोलीकर, संतोष करवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई वेगाने पूर्ण केली. तपास बहुआयामी पद्धतीने पुढे नेला जात आहे.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:17 pm

शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‌‘शाश्वत विकास ध्येय-जिल्हा निर्देशक आराखडा, धाराशिव जिल्हा‌’ या सन 2023-24 व सन 2024-25 या दोन पुस्तकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई यांच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई येथील अतिरिक्त आयुक्त भांगे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपआयुक्त सु.न.जाधव तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोलापूर श्रीकांत कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय,धाराशिव येथील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासाच्या विविध निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आलेला हा आराखडा जिल्ह्याच्या नियोजन प्रक्रियेस दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:16 pm

अक्षय तृतीयाच्या मुर्हूतावर बालविवाहास ठाम नकार; ‌‘गुन्हा नोंद करा

धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण,आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बालविवाहास आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना थेट आणि ठाम आवाहन करत,19 एप्रिल 2026 रोजीच्या अक्षय तृतीया मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू असून, त्यासोबत महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम 2022 देखील अंमलात आहेत. केंद्र शासनाच्या ‌‘बाल विवाह मुक्त भारत‌’ अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.या कायद्यानुसार ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि शहरी भागात पर्यवेक्षिका यांची सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या कायद्याअंतर्गत बालविवाह करणे किंवा आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक तसेच वैयक्तिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र,याच दिवशी बालविवाह होण्याची शक्यता जास्त असल्याचे लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दि.19 एप्रिल रोजी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभाग,बाल संरक्षण समिती तसेच इतर यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे,व्यापक जनजागृती करणे आणि ‌‘1098‌’ चाइल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच कोणत्याही सजग नागरिकांनी बालविवाहाची घटना आढळल्यास तात्काळ हस्तक्षेप करून ती थांबवावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांच्याकडे सादर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा टास्क फोर्स (बालविवाह प्रतिबंध) अध्यक्ष कीर्ती किरण पूजार यांनी स्पष्ट केले आहे की,अक्षय तृतीया या मुहूर्तावर बालविवाह झाल्याचे आढळल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 अंतर्गत पालक,आचारी,मंडप मालक, पुजारी/काझी,वाजंत्री,हॉल चालक, स्वयंपाकी,उपस्थित नातेवाईक, विवाह आयोजक आणि संबंधित सर्व नागरिकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल,अशी हमी प्रशासनाने दिली आहे. समाजाच्या भविष्यासाठी प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बालविवाहास ठाम नकार देत,कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे भावनिक आणि कडक आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:16 pm

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घेतला कामकाजाचा आढावा

धाराशिव (प्रतिनिधी)- विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. धाराशिव जिल्हयात दरोडा, घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल फोन चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्याबाबत मार्गदर्शन केले. धाराशिव जिल्ह्यातील उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस ठाणे येथे भेटी देवून मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत बैठका घेवून सुचन्या द्याव्यात. तसेच आगामी काळातील सण उत्सवा दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. सदर मिटींगला पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, परि. सपोअ मेघना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:15 pm

महावितरण कार्यालयास विधी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

धाराशिव (प्रतिनिधी)- येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील प्रथम व तृतीय वर्षाच्या विधी विद्यार्थ्यांनी महावितरणच्या संरक्षण व सुरक्षा मंडळ कार्यालय, धाराशिव येथील वीज तक्रार निवारण मंच (सीजीआरएफ) विभागास शैक्षणिक भेट दिली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता व वीज तक्रार निवारण मंचाच्या सचिव नीलांबरी कुलकर्णी तसेच स्वतंत्र सदस्य मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नीलांबरी कुलकर्णी यांनी वीज कायद्यातील बदल, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी तसेच वीज चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तर मेधा कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करताना ग्राहकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच वीज तक्रार निवारण मंचाचे कार्य स्पष्ट केले. या मंचाद्वारे ग्राहकांना तक्रार नोंदवून त्याचे निवारण कसे केले जाते, याची प्रात्यक्षिक उदाहरणांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्मार्ट मीटर व वीज चोरीसंदर्भात विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. ही भेट प्रा. डॉ. पूनम दागडिया/तापडिया यांच्या समन्वयातून पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य कायला कृष्णमूर्ती यांनी मार्गदर्शन केले. या भेटीस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 17 Apr 2026 4:15 pm

Manoj Ghorpade |गळ्यात ढोल आणि हातात रुमाल! आमदार मनोज घोरपडे यांनी हेळगावच्या यात्रेत धरला गजी नृत्याचा ठेका

आमदार मनोज घोरपडे यांनी धनगरी गजी नृत्यात धरला ठेका मसूर – गळ्यात धनगरी ढोल, हातात गजी रुमाल घेत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी कराड तालुक्यातील हेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात पारंपरिक धनगरी गजी ढोल नृत्यात सहभाग घेत ठेका धरला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ढोल [...]

तरुण भारत 17 Apr 2026 4:11 pm

रोज तुळशीची पाने खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आपल्या हिंदुस्थानात तुळशीचे रोप हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे रोप केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही. तर तुळशीच्या झाडामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म दडलेले असतात. म्हणूनच पूर्वापारपासुन दारात किंवा अंगणात तुळस लावण्याची प्रथा रूढ झालेली आहे. तुळशीची पाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची […]

सामना 17 Apr 2026 3:50 pm

Satara news |सातारा पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त? कल्याणी विद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

साताऱ्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला सातारा – सातारा शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. परंतु नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या गोडोली येथील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:46 pm

Satara News |यात्रेत भाविकांची गर्दी, पण गॅसचा तुटवडा; पार्वतीपुर परिसरात नागरिक हैराण

महाबळेश्वर तालुक्यातील गॅस वितरणाचे धिंडवडे प्रतापगड :महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पार्वतीपुर येथे सुरू असलेल्या श्री रामवरदायिनी माता यात्रेमुळे गावात सध्या उत्साहाचे वातावरण असले, तरी घरगुती गॅस पुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिनांक १४ पासून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:39 pm

Chandrapur News –अघोरी कृत्यांनी चंद्रपूर हादरले, कासव-घुबडासह मांत्रिकाचा विधी; विधवा-कुमारिकांचा वापर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात मागील आठवड्यात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात महिलांचे […]

सामना 17 Apr 2026 3:38 pm

Satara news |महापुरुषांबाबत आक्षेपार्ह कमेंट; साताऱ्यात तणाव, युवकावर गुन्हा दाखल

साताऱ्यात आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणावरून तणाव सातारा – उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे गुरुवारी सकाळी सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटताच संतप्त समाजबांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:31 pm

Ratnagiri News –जैतापूर खाडी पुलावर ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक; नागरिकांकडून तात्काळ कारवाईची मागणी

जैतापूर-धाउलवल्ली या गावांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील सुमारे ५०० मीटर लांबीच्या जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक ठरत असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणावर नागरिक सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी तसेच खाडीतील विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे उघड्यावरून टाकण्यात आलेली केबल भविष्यात […]

सामना 17 Apr 2026 3:29 pm

ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दूर लोटलं आणि पाकिस्तानला जवळ केलं; अमेरिकेच्या माजी राजदूताचं मोठं विधान

अमेरिकेचे माजी राजदूत रहम इम्यॅन्युएल यांनी हिंदुस्थान-अमेरिका संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः हिंदुस्थान-पाकिस्तान संदर्भात ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या तीन दशकांत निर्माण झालेली द्विपक्षीय मैत्री कमकुवत झाल्याचे त्यांनी म्हटले. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. एका मुलाखतीत इमॅन्युएल म्हणाले की, हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी सलग चार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दीर्घकाळ प्रयत्न केले होते. […]

सामना 17 Apr 2026 3:28 pm

Jat news |इकडे का आलात?’विचारत कोळगिरीत दाम्पत्याला दगडाने मारहाण; एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा

कोळगिरीत पती-पत्नीवर दगडफेक जत : तालुक्यातील कोळगिरी येथे शिवीगाळ, दगडाने मारहाण केरून जखमी केल्याप्रकरणी पाच जणांबर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजाराम शंकर चमकेरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकप्पा शंकर चमकेरी, राकेश मलकप्पा चमकेरी, महादेवी मलकप्पा चमकेरी, रेश्मा मलकप्पा चमकेरी, आकाश मलकप्पाचमकेरी (रा. कोळगिरी) [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:21 pm

Karnataka Accident –यादगिरीमध्ये कार आणि बसची समोरासमोर धडक; अपघातात 6 जणांचा होरपळून मृत्यू

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात […]

सामना 17 Apr 2026 3:20 pm

तर मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की आली नसती

नगरसेवक महेश कांदळगावकर यांचा वैभव नाईकांना टोला मालवण । प्रतिनिधी मत्स्यालय निधी परत का गेला हा प्रश्न खरतर माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वतःला विचारावा असा टोला माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी लगावला आहे . नगर परिषद मत्स्यालय माजी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यालय निधी परत जाण्यास जबाबदार कोण हा प्रश्न खरतर स्वतःला [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:17 pm

Miraj news |चहा बनवण्यावरून वाद विकोपाला; संतापलेल्या लहान बहिणीने मोठ्या बहिणीच्या डोक्यात घातला वरवंटा!

चहा करण्याच्या वादातून बहिणीवर वरवंट्याने हल्ला मिरज : चहा करुन देण्यासाठी हट्ट धरुन लहान बहिणीने शिक्षक असलेल्या मोठ्या बहिणीच्या डोक्यात वरवंटा घालून जखमी केल्याची घटना तालुक्यातील एरंडोली येथे घडली. या मारहाणीत कल्याणी सुरगोंडा पाटील (वय ३४) या जखमी झाल्या असून, त्यांनी लहान बहिण [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:14 pm

नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा!

मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार : डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत गौरव‘ प्रदान पणजी : विश्वाच्या नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा म्हणजे महान शास्त्रज्ञ प्रा. डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत, याचा माझ्यासह सर्व गोमंतकीयांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम, राष्ट्रनिर्मिती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्यसाधारण योगदान देणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत [...]

तरुण भारत 17 Apr 2026 3:02 pm

पणजी शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे काय?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल : वाहतूक कोंडीवर नाराजी व्यक्त पणजी : पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावर संध्याकाळनंतर कॅसिनोंमुळे रोज होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उघड नाराजी व्यक्त करुन गोवा उच्च न्यायालयाने शहरात पार्किंगसाठी जागाच नसल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे, तर शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे का? असा सवालही केला आहे. पणजीत वाहतुकीसाठी आणखी शिस्त लागण्याची गरज [...]

तरुण भारत 17 Apr 2026 2:59 pm

Sadanand Date |पोलीस महासंचालकांकडून कोल्हापूर पोलिसांची ‘शाळा’; पोलीस ठाण्यांसह मुख्यालयाची होणार कसून तपासणी

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापूर -राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते मंगळवार (२१) ते गुरुवार (२३ एप्रिल) दरम्यान दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान पोलीस मुख्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे तसेच गडहिंग्लज पोलीस उपअधिक्षक कार्यालयाचीही तपासणी करण्यात येणार आहे. याचसोबत क्राईम आढावा बैठक, विविध [...]

तरुण भारत 17 Apr 2026 2:58 pm

अभिषेकचे धोंडव्रताचे स्वप्न राहिले अपुरे

फीट येऊन नदीपात्रात पडल्याने मृत्यू : वाठादेव सर्वण येथील दुर्दैवी घटना डिचोली : मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने देवी श्री लईराईच्या जत्रोत्सवात धोंडगण म्हणून सहभागी होऊन सेवा बजावण्यासाठी आतुर असलेल्या दामोदर उर्फ अभिषेक दळपत नाईक (वय 23 वर्षे) या काजीवाडा, कारापूर-साखळी येथील युवकाचे स्वप्न अधुरे राहिले. सोवळे व्रतात सहभागी होण्यासाठी कपडे भिजवून आंघोळ करतानाच अभिषेक याच्यावर [...]

तरुण भारत 17 Apr 2026 2:57 pm

सीबी टू परीक्षेमध्ये केवळ 650 शिक्षक झाले उत्तीर्ण

उर्वरित 950 शिक्षकांसमोर यक्षप्रश्न : ‘टीईटी’साठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी पणजी : शिक्षण खात्याने नव्याने शिक्षण भरतीसाठी घेतलेल्या सीबी 2 परीक्षेमध्ये चौदाशेपैकी केवळ 650 जण उत्तीर्ण ठरले असून उर्वरित 950 जणांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) परीक्षेला बसण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत द्यावी, अशी मागणी शिक्षकवर्गाने सरकारकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने [...]

तरुण भारत 17 Apr 2026 2:54 pm