IPL 2026 –पाऊसही राजस्थानच्या सुसाट गाडीला ब्रेक मारू शकला नाही! मुंबईचा 27 धावांनी पराभव
पावसाने व्यत्यय आणलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात राजस्थान रॉयस्लने आपली विजयी धमाका सुरू ठेवला आहे. पावसाने धुमशान घातल्यामुळे 11-11 षटकांचा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 3 गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या मुंबईला जिंकण्यासाठी 151 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईचा सुरुवात खराब झाली. 50 धावांच्या आत मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतला होता. रायन […]
पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच रहा! इराणमधील हिंदुस्थानींना दूतावासाकडून निर्देश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर हिंदुस्थानी दूतावासाकडून इराणमधील हिंदुस्थानींसाठी काही निर्देश काढण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या दूतावासाने इराणमधील हिंदुस्थानींना पुढचे 48 तास कुठेही न जाता जिथे आहात तिथेच थांबा असे निर्देश दिले आहेत. ”सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी पुढील 48 तास जिथे आहात तिथेच थांबा. नागरिकांनी […]
कोदवली सायबाच्या धरणातील पाणी साठा घटला, राजापूर शहरात पाणी टंचाईचे संकेत
राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे तसेच वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे राजापूर शहरातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काटकसरीने वापर करावा असे आवाहन राजापूर नगरपरिषदेने केले आहे.यापुढे दर शनिवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी राजापूर शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे राजापूर नगरपरिषदेने सांगितले . महावितरण कडून होत असलेल्या भारनियमनामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे […]
Photo –ये तेरी चाँदबालियाँ…मेहेंदी, हिरव्या बांगड्यांमध्ये खुलले हिनाचे रूप
अभिनेत्री हिना खानने मंगळवारी तिचे एक सुंदर फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले. या फोटोत हिनाने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. हिनाच्या हातावर सुंदर मेहेंदी काढलेली असून हिरव्या बांगड्या, मोठे कानातले, हलका मेकअप असा सुंदर लूक तिने केला आहे. झ
नागपुरमधील आरएसएस मुख्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स) सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”नागपुरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या ठोसर वैश्य चौक, सेंट्रल ॲव्हेन्यु (CA) रोड भागात १५ जिलेटीन च्या कांड्या व ५० […]
तीन दिवस महिलांना अस्पृश्य मानणे अयोग्य; शबरीमला प्रवेश प्रकरणी न्यायमूर्ती नागरत्ना यांचे स्पष्ट मत
सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशासी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी मंगळवारी एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली. “एखाद्या महिलेला महिन्यातले तीन दिवस ‘अस्पृश्य’ मानले जावे आणि चौथ्या दिवशी तिची ही अस्पृश्यता अचानक संपावी, असे असू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपले मत मांडले. शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 2018 साली […]
Ratnagiri News –राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर
वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील 101 पैकी 51 ग्रामपंचायतींची प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यातून, ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे वातावरण आतापासून तापू लागले आहे. वर्षभरामध्ये मुदती संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपचायतींच्या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून, निवडणूक आयोगाच्या […]
गेल्या सहा आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, त्याची मुदत आता संपणार आहे. त्याआधीच, ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच एक मोठी धमकी दिली आहे. आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल, जी पुन्हा कधीही पूर्ववत करता येणार नाही. मला हे […]
‘कासवांचे गाव’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनाऱ्यावर यावर्षीचा कासव महोत्सव एप्रिल महिन्यात दिमाखात सुरू झाला आहे. कांदळवन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेला मोठे यश आले असून, आतापर्यंत अंड्यातून बाहेर पडलेली 231 पिल्ले सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा विणीचा हंगाम काहीसा लांबला असला, तरी […]
IPL 2026 –चाहत्यांचा हिरमोड; पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील टॉसला उशीर
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. पावसामुळे नियोजित वेळेत नाणेफेक होऊ शकली नाही. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होणार होती, मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या पाऊस थांबला असून खेळपट्टीवरील काही कव्हर्स हटवण्यात आले आहेत, परंतु मुख्य कव्हर अजूनही जागेवरच आहे. मैदान सुकवण्यासाठी ग्राऊंडस्टाफ शर्थीचे प्रयत्न करत […]
तपास आणि चौकशी अशा शाब्दिक खेळात अजितदादांच्या मृत्यूचा तपास अडकता कामा नये –रोहित पवार
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युचा तपासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात पोलीस महासंचालकांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली. याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित दादांच्या मृत्यूचा तपास […]
वन जमिनीचा वापर करणाऱ्यांवर वनविभाग कारवाई करेल, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचना
लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वन जमिनींवर जर कोणी काम करत असेल तर वन विभागाने सतर्क राहून अशांवर तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, […]
भिमाशंकर मंदिर आणखी दीड महिना बंद राहणार, नित्यदर्शनासाठी भाविकांना 1 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेऊन मंदिर व परिसराचे काम वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल पासून पुढे ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. सन […]
IPL 2026 –एक-दोन नव्हे 6 यॉर्कर्सचा भेदक मारा, नेट प्रॅक्टिसमध्ये अर्जुन तेंडुलकरचा जलवा; पाहा Video
IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स सोडून लखनौ सुपर जायंट्समध्ये (LSG) सामील झालेला अर्जुन तेंडुलकर सध्या आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अद्याप अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नसले तरी, नेट प्रॅक्टिसमधील त्याच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन अत्यंत अचूकतेने ‘यॉर्कर्स’ टाकताना दिसत असून, त्याने लखनौचा कर्णधार रिषभ पंत […]
दोनवेळा रद्द झालेल्या अंदाज समितीचा 8 एप्रिलपासून नांदेड दौरा; जिल्हाधिकार्यांनी घेतली आढावा बैठक
धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या स्वीय सहाय्यकाजवळ एक कोटीपेक्षा अधिक रक्कम सापडल्यानंतर वादाच्या भोवर्यात सापडलेल्या व दोनवेळा रद्द झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा जाहीर झाला असून ८ एप्रिलपासून ते १० एप्रिलपर्यंत हि समिती नांदेड जिल्ह्यात असणार आहे. धुळे जिल्ह्यात २२ मे २०२५ रोजी अंदाज समितीच्या दौर्यात समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय […]
मराठी अभिनेता शेखर फडके याला पितृशोक, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तू ही रे माझा मितवा’ फेम शेखर फडके याच्या वडिलांचे, विजयकुमार फडके यांचे दुःखद निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. विजयकुमार फडके यांचे निधन 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे 2 वाजता झाले. योगायोगाने याच दिवशी […]
धर्माबादमध्ये सट्टेबाजीतील म्होरक्या मनोज मानधनीला अटक; नांदेड व तेलंगणा पोलिसांची कारवाई
आयपीएल व अन्य क्रिकेटच्या सामन्यावर सट्टेबाजी करणारे रॅकेट धर्माबाद शहरात असल्याची माहिती नांदेड पोलीस व तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. यातील एका आरोपीला तीन दिवसापूर्वी अटक करण्यात आली. मंगळवारी दुसरा आरोपी मनोज मानधनी याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालतात. तसेच मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या सामन्यावर सट्टेबाजीही होते. यात […]
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी सामना झाला. सामना संपल्यानंतर उप्पल भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका तब्बल 90 मिनिटे अडकून पडली. यामुळे रुग्णवाहिकेतील 26 दिवसांच्या बाळाच्या मातेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बिष्णू असे मृत महिलेचे नाव असून, ती आणि तिचे पती सुरेश हे मूळचे […]
Israel Iran War – आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल…; ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
गेल्या सहा आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, त्याची मुदत आता संपणार आहे. त्याआधीच, ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच एक मोठी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे की, आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल, जी पुन्हा […]
200 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरला जामीन मंजूर
दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर याला जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ काळ तुरुंगात असलेल्या सुकेशला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असला, तरी न्यायालयाने त्याच्यावर कडक अटी लादल्या आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, खटल्याच्या निकालाविना वाजवी कालावधीपेक्षा जास्त काळ कोठडीत ठेवणे हे व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्याचे […]
शमिता शेट्टीच्या विलोभनीय सौंदर्याचे ‘हे’आहे गुपित; वयाच्या पन्नाशीतही दिसते तरुण!
शमिता शेट्टीने सांगितले आपल्या नितळ त्वचेचे रहस्य अभिनेत्री शमिता शेट्टीच्या तजेलदार आणि नितळ अत्री श त्वचेचे रहस्य तिच्या साध्या पण प्रभावी स्किन केअर रुटीनमध्ये दडलेले आहे. वयाची पन्नाशी गाठत आली तरी शमिता ालीची तरुण दिसते आणि याचे कम मुख्य [...]
सावंतवाडीतील 41 व्यावसायिकांना देणार नॅचरल गॅसचे कनेक्शन
पालिकेतील बैठकीत कंपनीकडून ग्वाही सावंतवाडी प्रतिनिधी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हॉटेल व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना लवकरात लवकर नॅचरल गॅस उपलब्ध व्हावा यासाठी पालिका प्रशानाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल 41 हॉटेल व्यावसायिकांना येत्या दिड महिन्यात पीएनजी गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.दरम्यान कनेक्शनसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करा आणि [...]
अशोक खरात पीडितांना मृत्यूची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करायचा, SIT ने दिली महत्त्वाची माहिती
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ”अशोक खरात हा पीडितांना मृत्यूची भीती दाखवायचा. त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू होईल असे सांगून तो त्यांच्यावर लैंगिक शोषण करायचा व पैसेही उकळायचा”, असे तेजस्विनी सातपुते यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. अशोक खरात विरोधात अहिल्यानगर व नाशिकमध्ये ११ गुन्हे दाखल […]
आखातातील संघर्षाचा जबर फटका; हिंदुस्थानात आतापर्यंत १० हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
आखातात संघर्ष सुरू झाल्यापासून विमान कंपन्यांना मोठा फटका बसला. अनेक विमाने रद्द करावी लागली तर काही बऱ्याच विमानांना गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी मार्ग बदल करावा लागला. हिंदुस्थानात देखील विमान कंपन्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. हिंदुस्थानच्या विमान कंपन्यांनी १०,००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. वाढता तणाव आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत अडथळे निर्माण झाले […]
IPL 2026 –धोनीच्या नसण्याने ‘CSK’ला फारसा फरक पडणार नाही; हैदराबादच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य
सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने IPL 2026 च्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सबाबत (CSK) एक महत्त्वाचे विधान केले आहे. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीने संघाला फारसा फरक पडणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले आहे. क्लासेनच्या मते, चेन्नईचा संघ एका खेळाडूवर अवलंबून नसून त्यांची ताकद त्यांच्या सांघिक कामगिरीमध्ये आहे. जरी धोनी मैदानात नसला तरी […]
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह : विविध उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 एप्रिल रोजी सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन व तयारी करण्यात येणार असून,8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.या वेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. 09 एप्रिल रोजी आर.पी. महाविद्यालय,धाराशिव येथे ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.10 एप्रिल रोजी महिला मेळाव्याचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून, महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाईल. 12 एप्रिल रोजी निवासी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, समाजातील स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. 13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचे प्रबोधन तसेच विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. संपूर्ण सप्ताहात जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून,सामाजिक समता व बंधुता यांचा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात येणार आहे.
आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याअनुषंगानें तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने याचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, आंब्याच्या मोहोराची मोठी गळ झाल्याने त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून पंचनामे केले जात आहेत व त्याचप्रमाणें लवकरच 33% नुकसान झालेल्या इतर फळपिकांचेही स्वतंत्र पंचनामे केले जातील. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नुकसानीबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी तातडीने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या गारपिटीनंतर तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम सुरू देखील झले आहे व प्राथमिक अहवालही सादर झाले आहेत. मात्र, आंबा पिकाच्या बाबतीत केवळ बाह्य नुकसान न पाहता, मोठ्या प्रमाणात झालेली मोहोराची गळ विचारात घेणे आवश्यक होते. ही बाब गांभीर्याने घेत छत्रपती संभाजीनगर येथील फळरोपवाटिका संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह धाराशिव, तुळजापूर, कळंब आणि वाशी या तालुक्यांतील बागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे. या शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार आता आंबा पिकाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश आपण प्रशासनाला दिले आहेत. आंब्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर फळपिकांचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना उर्वरित फळबागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
. कल्याणसागर धरणात पाणी असूनही परंडा तहानलेले परंडा -शहरातील नागरिकांना उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंडा शहराजवळ धारशिव जिल्ह्यातील कल्याणसागर हे मोठे धरण परंडा शहराजवळ आहे. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असताना देखील शहरास तीन [...]
नेपाळने हिंदुस्थानसह सहा देशांमधील राजदूतांना माघारी बोलावले
नेपाळने हिंदुस्थानसह सहा देशांतील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले असून, या सर्वांची नियुक्ती मागील के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली होती. मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील राजदूतांना माघारी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी दिली. माघारी बोलावण्यात आलेल्यांमध्ये शंकर प्रसाद […]
स्वस्त, परवडणाऱ्या घरांची मागणी 23 टक्क्यांनी घटली, 50 कोटींवरील आलिशान फ्लॅट्सची विक्री जोरात
हिंदुस्थानातील स्थावर मालमत्ता बाजारातील अलीकडील तेजी काही प्रमाणात मंदावत असल्याचे दिसते. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत ४% घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ८८,३६१ घरांच्या तुलनेत, या कालावधीत एकूण ८४,८२७ घरांची विक्री झाली. बाजार तज्ज्ञांच्या मते ही घट म्हणजे दीर्घकाळच्या वेगवान वाढीनंतर बाजारपेठ […]
न्यूझीलंडमध्ये टाउपॉ सरोवरात बुडून हिंदुस्थानी तरुणाचा मृत्यू; पवईतील श्रीराम कुटुंबावर शोककळा
न्यूझीलंडमधील टाउपॉ सरोवरात एका 21 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य श्रीराम असे या मृत मुलाचे नाव असून, तो न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. 5 एप्रिल रोजी इस्टरच्या सुट्टीत मित्रांसोबत फिरण्यासाठी अॅकेशिया बे येथील व्हाकामोएंगा पॉईंटवर गेला असता ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. […]
HelwakVillage |कष्टाची गिरण अन यशाचा ‘खाकी’गंध! हेळवाकच्या शिंदे कुटुंबातील ४ मुले पोलीस दलात दाखल
हेळवाकच्या शिंदे दाम्पत्याचा आदर्श कोयनानगर( विलास कदम )– ग्रामीण भागात असलेल्या हेळवाक (ता. पाटण) येथे पिठाची गिरणी चालवून सीमा शिंदे व भीमराव शिंदे या दाम्पत्याने आपल्या तीन मुली व एका मुलाला पोलीस खात्यात भरती करून लोकसेवक बनवत एक आदर्श [...]
डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये अटक; क्रीडा विश्वात खळबळ, PSL दरम्यान नेमकं काय घडलं?
पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराच किंग्सचा संघ सध्या तीन सामन्यांच्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र, संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कौटुंबिक भेटीसाठी रजेवर गेला होता. याच दरम्यान सिडनीमधील मारूब्रा येथे मंगळवारी मद्यपान करून गाडी चालवल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी […]
पोलीस बंदोबस्तामध्ये भूसंपदानामधील अडथळे दूर करून कामे सुरू
धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्र. 2 द्वारे तुळजापूर लोहारा व उमरगा तालुक्यातील 10862 हेक्टर सिंचनासाठी 2.24 अ. घ. फु. पाणी वापर होणार असून सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून 6 टप्प्याद्वारे पाणी उपसा करून बांधकाम पूर्ण झालेल्या पाटबंधारे प्रकल्पामध्ये सदरचे पाणी सिंचनासाठी व पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,लोहारा व उमरगा या तालुक्यासाठी नियोजित उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील टप्पा क्रमांक 1 ते 5 ची कामे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून पावसाळ्यामध्ये दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर योजनेद्वारे सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून टप्पा निहाय पाणी उपसा करून तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावामध्ये पाणीसाठा करण्यात येणार आहे. थेट खरेदीद्वारे भूसंपादनास असलेला तीव्र विरोध त्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका भूसंपादन मोबदला मान्य नसल्याने संपादन प्रक्रिया पूर्ण करून ही शेतकऱ्यांचा काम करण्यास असलेला विरोध ज्या गटामधून खोदकाम करावयाचे आहे. त्या गटामधील शेतकऱ्यांचा आप आपसामधील भांडणे इत्यादी कारणामुळे योजनेची कामे वेळेमध्ये पूर्ण करण्यास अडथळे येत आहेत. टप्पा क्र. 1 ते 5 च्या बांधकाम सध्यस्थितीबाबत कृष्णा मराठवाडा योजनेमधील उपसा सिंचन योजना क्र.2 मधील टप्पा क्र. 1 ते 5 मधील टप्पा क्र. 2 (पडसाळी), टप्पा क्र. 3 (सावरगाव), टप्पा क्र. 5 (सिंदफळ) इत्यादी ठिकाणची स्थापत्य विद्युत व यांत्रिकी कामे 100 टक्के पूर्ण झालेले असून, टप्पा क्र. 4 (पांगरदरवाडी) या ठिकाणचे काम 90 टक्के पूर्ण झालेले आहे. सन 2025 मधील माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे योजनेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा क्र.1 भोयरे येथील पंपग्रहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला होता. त्यामुळे सदर ठिकाणी संत गतीने काम करावे लागले परंतु सध्यस्थितीचा भोयरे पंपग्रहाचे काम 75 टक्के पूर्ण झालेले असून पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. कालव्याच्या एकूण 40.96 की मी लांबी मधील फक्त 550 मीटर लांबीचे काम बाकी असून, उर्ध्वगामी नलिकेच्या एकूण 15.30 की मी लांबी मधील फक्त 700 मी. लांबीचे काम बाकी आहे.
बेरडवाडी येथे पत्नी व अवघ्या 8 वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून
मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नी व अवघ्या 8 वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली असून आरोपी स्वतःहून मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुरूम पोलिसात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार, अजित अणप्पा वासुदेव हा मंगळवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांच्यासह मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे व पोलिस कर्मचारी दाखल झाले व घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत मुरूम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील मयत लिंबाबाई अजित वासुदेव तसेच 8 वर्षीय चिमुकली मानसी असे मयतांचे नावे आहेत. दरम्यान दुपारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी मुरूम पोलिसात दाखल झाल्या आहेत.
‘या’अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंग? फोटो केले शेअर
टीम इंडियाचा क्रिकेटपटू अर्शदीप सिंग याने सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून सध्या अर्शदीप कुणासोबत रिलेशनशिपमध्ये असेल याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. अशात पंजाबी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीसोबत अर्शदीपचे नाव जोडले जात आहे. समीरन कौर असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. नुकताच अर्शदीपने आपल्या स्नॅपचॅटवर काही स्टोरी शेअर केल्या होत्या. त्यात […]
शिवेंद्रसिंहराजेंनी टोचले भाजप नगरसेवकांचे कान सातारा : आपल्या प्रभागातले एखादे काम अडत असेल आणि चुकीचं होत असेल ते वारंवार सांगून प्रशासन ऐकत नसेल तर तुम्हाला सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. योग्य असेल ते बोलले पाहिजे परंतु कोणाची मने [...]
ऋषिकेशमध्ये गंगा नदीवर सीप्लेनची चाचणी यशस्वी; पर्यटनाला मिळणार चालना
उत्तराखंडमधील पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ऋषिकेशमधील पशुलोक बॅरेज येथे सोमवारी सीप्लेनची (वॉटरप्लेन) यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान विमानाने पाण्यावर यशस्वीपणे लँडिंग आणि टेक-ऑफ केले. राज्यात सीप्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ही चाचणी स्कायहॉप एव्हिएशन कंपनीने घेतली होती. १९ आसनी सीप्लेन गंगा नदीवरील पशुलोक […]
Nira River |नीरा नदीत मृत्यूचे तांडव! केमिकलयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत; फलटण तालुक्यात खळबळ
. नीरा नदीकाठचे जनजीवन धोक्यात! फलटण : गेल्या अनेक वर्षापासून नीरा नदीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नुकतेच फलटण तालुक्यात नीरा नदीच्या पात्रात मृत मासे मोठ्या प्रमाणात तरंगताना आढळून आले [...]
Mumbai News –कांदिवलीत डंपरखाली चिरडून 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, संतप्त स्थानिकांचा रास्ता रोको
रस्ता ओलांडणाऱ्या सहा वर्षाच्या शाळकरी मुलीला डंपरने चिरडल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी रास्ता रोको केला. यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना शांत करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमच्या […]
IPL 2026 –फिट नसाल तर खेळू नका; सुनील गावसकर भडकले, विदेशी खेळाडूंवर साधला निशाणा
हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी IPL 2026 मध्ये खेळाडूंच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याने केवळ फलंदाजी करणे आणि गोलंदाजी टाळणे यावर गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका सामन्यात गोलंदाजाला फक्त चार षटके टाकायची असतात, मग ते करण्यापासून त्यांना नक्की काय रोखत आहे?” असा बोचरा […]
पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; २०,००० महिला कमांडो, २.४ लाख निमलष्करी दलाचे जवान तैनात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष विजयाचा दावा करत आहे. दरम्यान, निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. या निवडणुकीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच सुमारे २०,००० महिला कमांडो मोठ्या संख्येने तैनात केल्या जात आहेत. २०,००० महिला कमांडो, २.४ लाख निमलष्करी दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. […]
उमरगा उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळल्या देशी दारूच्या बाटल्या धाराशिव उमरगा – उमरगा उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळल्या देशी दारूच्या बाटल्या,तर रुग्णालय परिसरात अस्वच्छता आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले सिटी स्कैन मशीन उद्घाटन साठी आमदार प्रवीण स्वामी उपजिल्हा रुग्णालात गेले होते दरम्यान त्यांनी रुग्णालय परिसराची [...]
खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम; हवामान विभागाचा पावसाचा इशारा
दिल्लीतील खराब हवामानामुळे मंगळवारी इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात खराब हवामानामुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. एअरलाइन्सने एक्स वर पोस्ट करत, दिल्लीवरील खराब हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी […]
Umarga News |वरनाळवाडीत भीषण आग; जनावरांच्या गोठ्यासह शेती साहित्य जळून खाक, ३ लाखांचे नुकसान!
वरनाळवाडीत आगीचे तांडव; गीर गाय, बैलगाडीसह धान्याची पोती भस्मसात उमरगा – वरनाळवाडी येथे अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यामध्ये गीर गाय, बैलगाडी , १५ पोते तूर, १५ पोते हरभरा, ज्वारी, ३ विदयुत मोटार, मोटारीचे केबल, कडबा, डिझेल इंजिन, ताडपत्री, [...]
दिल्ली विधानसभा घुसखोरी प्रकरण: एसयूव्ही चालकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी
दिल्ली विधानसभा परिसराच्या सुरक्षिततेचे उल्लंघन करून आपली एसयूव्ही गाडी आत घुसवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चालकाला दिल्ली न्यायालयाने मंगळवारी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे विधानसभा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सरबजीत सिंग याला मंगळवारी न्यायिक दंडाधिकारी कार्तिक तापारिया यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. तपासासाठी पोलिसांनी सुरुवातीला 10 दिवसांच्या कोठडीची मागणी […]
मुंबइ (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-2026’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. 4) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-2026’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा क्षेत्रात राज्याने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शाश्वत व स्वस्त विजेसाठी ऊर्जा परिवर्तनाचा रिसोर्स ॲडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठी गती दिली आहे. सौर ऊर्जेच्या योजनांद्वारे सद्यस्थितीत 20 लाख 66 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. तर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आतापर्यंत 5 लाखांवर घरगुती ग्राहकांनी लाभ घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्र नाईक यांनी प्रदर्शनीतील महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध योजना, उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. त्यांचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी स्वागत केले व माहिती दिली. यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री. सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष श्री. देवांग ठाकूर, सरचिटणीस श्री. अमरनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. या तीन दिवसीय प्रदर्शनीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा मोहिमेचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी सोमवारी (दि. 6) विशेष सत्रात विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन केले. महावितरणच्या अभियानामध्ये सहभागी होत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमच्या वतीने देण्यात आली. महावितरण प्रदर्शनीद्वारे अधीक्षक अभियंता श्री. संजय खंदारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठौर यांच्यासह अभियंता, अधिकाऱ्यांनी महावितरणच्या विविध योजना व विद्युत सुरक्षेसंदर्भात नागरिकांना माहिती दिली.
आष्टा शाळेचा प्रधानमंत्री परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
भुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव आयोजित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय बक्षीस केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा शाळेने पटकावले. जिल्हास्तरीय पथकाने उपशिक्षणाधिकारी कथले यांच्या नेतृत्वाखाली शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. विद्यार्थ्यांना पोषण आहारात दररोज योग्य तितका प्रथिनयुक्त आहार मिळावा व आहारात स्थानिक पातळीवर भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेचे तात्कालिक मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी शाळास्तरावर परसबाग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार आष्टा शाळेतील परसबागेस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे व जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. परसबाग तयार करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, कार्यालयीन विस्ताराधिकारी साळुंखे, आष्टा बीटचे विस्तारअधिकारी टकले, केंद्रप्रमुख मुळे, शाळेचे माजी मुख्याध्यापक भोसले, माजी शिक्षक तांबे, नलावडे, नाईकवाडे, भैरु गोरे, उपळकर, जगताप, डांगे, नलवडे, स्वयंपाकी इंदुबाई दिवाने व मदतनीस मनीषा शिंदे यांचे सहकार्य लाभले.
रस्ता रोको आंदोलन यशस्वी, लेखी पत्र नंतर मागे
भुम (प्रतिनिधी)- सोलापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गिरवली पाटी येथे डोकेवाडी येथील पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे व ईट यथीतील सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन महावितरणाच्या विरोधात व विविध मागण्यास साठी केलेल्या रस्ता रोको आज यशस्वी झाला महावितरणचे कार्यकारी अभियंता एन बी रडे यांच्या लेखी आश्वासनानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. गिरवली येथे चार वर्षांपूर्वी 33/11 के व्ही केंद्र मंजूर करण्यात आले होते. परंतु जागेचे पाहणी व नवीन निविदा प्रक्रिया अनेक दिवसापासून प्रलंबित होती सदरील केद्र चालू झाल्यानंतर डोकेवाडी गिरवली सोनेवाडी सह अनेक गावना योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा होणार होता. तसेच ईट येथील मुख्य 133 केवी वरील भार कमी होऊन ईट परिसरातील दहा गाावची ही समस्या सुटणार होती, परंतु महावितरणच्या भोंगळ कारभार व राजकीय ताळमेळ जुळून न आल्यामुळे ही समस्या अनेक वर्षापासून पुढे ढकली जात होती. आज अखेर महामार्ग अडवल्यानंतर महावितरणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरील रस्ता रोको मागे घेण्यात आला. सदरील रस्ता रोको यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे, सुनील देशमुख, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राजाभाऊ हुंबे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी झुंबे आदी उपस्थित होते.
मंदिर परिसरात अवैध धंद्याला विरोध म्हणून उपोषण
भुम (प्रतिनिधी)- माणकेश्वर येथील गट क्रमांक 318 मधील सरकारी जमिनीवर असलेल्या श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रशासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मंदिर परिसरात अवैध पद्धतीने मटण शिजवणे, मटणाचा नैवेद्य आणणे यावर प्रशासनाने बंदी घातली होती, मात्र आता पुन्हा हे प्रकार सुरू झाल्याने ह.भ.प. गणेश महाराज अंधारे यांनी दिनांक 06 एप्रिल 2026 पासून पुन्हा एकदा अन्नत्याग करून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने मंदिर परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी मांसाहार आणि अवैध कृत्यांवर बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे संपूर्ण हिंदू धर्मीय भाविक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले होते. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाला काही लोकांकडून हरताळ फासला जात असून, पुन्हा अवैध पद्धतीने मटणाचा नैवेद्य दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून महाराजांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उपोषणातील प्रमुख मागण्या मंदिर परिसरात मटणाचा नैवेद्य आणणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. राज्य संरक्षित स्मारक स्थळांवरील नियमांनुसार मंदिर परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. मंदिरात मांसाहार न करणाऱ्या सात्त्विक पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. श्री सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढून मूर्ती शास्त्रानुसार मूळ स्वरूपात दर्शन खुले करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच धाराशिवच्यावतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षीप्रमाणे धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे ठाणे हे फुले आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि तो फोडण्याचा मार्ग या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरविंद गोरे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव हे भूषवणार आहेत. दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी योगीराज बागुल ज्येष्ठ विचारवंत मुंबई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी या विषयावर विचार व्यक्त करून व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. प्रदीप रोडे नालंदा फाउंडेशन बीड हे भूषवणार आहेत. जगाने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखणाऱ्या व पुस्तकासाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती वैचारिक प्रबोधनात्मक रितीने साजरी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच धाराशिव यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला नालंदा फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्प्लेक्स विसर्जन विहिरीजवळ धाराशिव येथे सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे. धाराशिवकरांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे यांनी केले आहे.
मोरे यांनी उपनगराध्यक्ष वाघमारे यांची भेट
उमरगा (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांनी उपनगराध्यक्ष विजय वाघामारे यांची नगरपालिका कार्यालयात भेट घेतली. यावेळी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, नविन पाणीपुरवठा योजना व बंदिस्त गटारीचे कामाची माहिती घेण्यात आली. शहराच्या विविध विकास कामाबाबत चर्चा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे, नगरसेवक अभिजित मोरे, नरसेवक बाबा मस्के, नगरसेवक सचिन जाधव, विक्रम बापू बिराजदार, दत्ता चिंचोळे, प्रफुल्ल गायकवाड, बालाजी मिसाले, इम्रान शेख, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
आमदार स्वामी यांनी घेतली उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक
उमरगा (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोवण्याची सुचना आमदार स्व्ाामी यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आमदार प्रवीण स्वामी यांनी सोमवारी (दि.6) कामकाजाचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयातील कारभारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदारांनी प्रशासनाला दिले. शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचला पाहिजे. रुग्णालयातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील राहावे, जेणेकरून उमरगा तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयातील स्वच्छता राखणे व रुग्णांना औषध उपलब्ध करणेबाबत सुचेना दिल्या. रुग्णालयातील सेवा-सुविधांचा दर्जा सुधारून सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळावेत, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामध्ये आयसीयू विभाग तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. या संदर्भात बोलताना आमदार स्वामी म्हणाले की, आयसीयू विभाग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित अनुभवी स्टाफ आणि किमान दोन तज्ज्ञ फिजिशियन डॉक्टरांची तातडीने गरज आहे. या पदांच्या भरतीसाठी वरिष्ठ स्तरावर आणि शासन दरबारी पाठपुरावा करून या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील, पंचायत समिती सदस्य हरी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल जाधव, महावीर कोराळे, जगदीश सुरवसे, दत्ता शिंदे आदीची उपस्तीथी होती.
आष्टा (जहागीर) येथे हनुमान जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टा(जहागीर) येथे संतयोगी दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता किर्तनसेवा व दहिहंडी ने करुन हनुमान जयंती भक्ती मय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सायंकाळी 4 ते5 दरम्यान हणुमान मंदिर येथे 1008महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन ठेवण्यात आले होते 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांनी काल्याच्या किर्तनासाठी “उपजोनिया पुढती येवु/काला खावु दहीभात“ या काल्याच्या प्रसंगातील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग घेऊन उपस्थित भाविक भक्तांना संबोधुन अभंगाचे निरुपण करण्यात आले. तदनंतर 5:30वाजता दहिहंडी काल्याने हणुमान जयंतीचे सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच सतिष जमादार, उपसरपंच बापुराव गायकवाड, माजी उपसरपंच राधाताई गायकवाड,पोलीस पाटिल महेश जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद सुयर्यवंशी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैष्णवी जाधव, माजी सैनिक र्वषीकेत जाधव,माजी शालेय समीतीचे सभापती अशोकराव गायकवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रविकुमार मुळे,माधव पाटील श्रीराम कुलकर्णी,,ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा.मोहनराव गायकवाड, भजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड,जेष्ठ नागरिक अंबादास पाटील, हर्मोनियम वादक हिरानाथ गायकवाड, पखवाज वादक जयवंत (सोनाजी) जाधव,विणेकरी रमेश गायकवाड, पांडुरंग गायकवाड,गायनाचार्य उमेश जाधव, विश्वंभर जाधव,आशोक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, भगवान माने, नंदकुमार जाधव,युवानेते संभाजी गायकवाड, अनिल गायकवाड, शिवाजी गायकवाड, सचिन गायकवाड, विष्णू पाटील, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,किशोर जाधव,अदिसह भाविक भक्त गण समस्त ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना भोजन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गोव्यात भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुणीचा मृत्यू
गोव्याची राजधानी पणजी येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. डोना पॉला परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दीक्षा परवाडकर असे मयत तरुणीचे नाव आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीक्षा एका पंचातारांकीत हॉटेलमध्ये कामाला होती. रविवारी रात्री आपली ड्युटी संपवून दीक्षा तिचे […]
९ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’वर बंदी: निवडणूक आयोग
या महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’ आयोजित करण्यास किंवा त्यांचे निकाल प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. आयोगाने असा इशाराही दिला आहे की, या कालावधीत एक्झिट पोल घेणे किंवा त्यांचे प्रक्षेपण करणे हे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६(अ) […]
Ratnagiri News –उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मिळवला १२८ कोटी ५४ लक्ष महसूल
रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२८ कोटी ५४ लक्ष इतका महसूल शासनास मिळवून दिला आहे. शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार १०० टक्के पेक्षा जास्त महसूल वसुली केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उच्च्यांकी १२८ कोटी ५४ लक्ष इतका महसूल […]
इचलकरंजीत मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; इचलकरंजी : शहरातील आवळे मैदान परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यरात्री छापा टाकत ३४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ लाख ९८ हजार ६१० रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल हॅण्डसेट व [...]
JotibaYatra |जोतिबा चैत्र यात्रेत चोरट्यांचा हैदोस; गर्दीचा फायदा घेत २२ तोळे सोन्यावर मारला डल्ला!
जोतिबा चैत्र यात्रा मध्ये २२ तोळे सोन्याची चोरी वारणानगर – वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील जोतिबा चैत्र यात्रेमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी २२ तोळे सोन्यावर डल्ला मारला. यात विविध प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे [...]
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली. पाकिस्तानने 55 वर्षांपूर्वी, 1971 मध्ये एक चूक केली होती आणि त्याची किंमत दोन तुकड्यांमध्ये विभागले जाऊन चुकवावी […]
इस्तंबूलमधील इस्रायली दूतावासाजवळ गोळीबारात 3 जणांचा मृत्यू; दोन पोलीस जखमी
तुर्कीमधील इस्तंबूल येथील बेसिक्तास भागात इस्रायली दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याचे वृत्त आहे. दूतावासाला लक्ष्य करण्यात आले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दूतावास गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. या घटनेत तीन जण ठार झाले असून दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, […]
आरोग्याच्या दृष्टीने रोज कच्चा लसूण का खायला हवा, जाणून घ्या
आपल्याकडे आहारात लसूण हा हमखास वापरला जातो. लसूण हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या आहारात लसणाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. अर्ध्या पाकळीने सुरुवात करा आणि हळूहळू अख्ख्या पाकळीपर्यंत प्रमाण वाढवा. लसणाचा वास आणि चव तीव्र असल्यामुळे, तुम्ही त्याचे लहान तुकडे करूनही खाऊ शकता, ज्यामुळे ते खाण्यास सोपे जाते. तुम्ही ते मधात बुडवून […]
Chandgad |साऊंड सिस्टीमवरून अडकूरमध्ये राडा; पिता-पुत्राला काठीने मारहाण
सिस्टीम बंद करण्याच्या वादातून हाणामारी; अडकूरमध्ये पिता-पुत्र जखमी चंदगड – साऊंड सिस्टीम वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना अडकूर येथे घडली. या घटनेत फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली असून दोघे जखमी झाले आहेत. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [...]
कळतंय पण वळत नाही! ५७.८ टक्के हिंदुस्थानींनी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे केलं मान्य –सर्वेक्षण
धावपळीच्या युगात आरोग्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. जीवनशैलीतील बदलामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आता व्यस्त जीवनशैलीच्या काळात तब्बल ‘४२.५ टक्के’ हिंदुस्थानी आपल्या आरोग्याला दुय्यम स्थान देतात अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात ‘५७.८ टक्के’ लोकांनी मान्य केले की त्यांना त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे समजते, परंतु प्रत्यक्ष […]
नागपुरमधील आरएसएस मुख्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स) सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथके सखोल तपास करत आहेत. हा एक संवेदनशील परिसर असल्याने सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. नागपुरातील आरएसएस मुख्यालय परिसरात एक बॅग सापडली असून, त्यामधून १५ जिलेटीन स्टिक्स, ५० डेटोनेटर्स आणि ८ […]
स्त्री-पुरुष समानतेसाठी अनेक कायदे झाले, ऐतिहासिक निकालही आले, तरीही समाजात पुरुषप्रधान संस्कृतीचे मूळ आजही खोलवर रुजलेले आहे. अनेक कायदे करूनही महिलांच्या जीवनावर पुरुषप्रधान संस्कृतीचे नियंत्रण कसे? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने राजस्थानमधील एका प्रकरणावर निकाल देताना ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. राजस्थानमधील 2011 मध्ये […]
Sangameshwar |संगमेश्वरमध्ये कोल्हापुरातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
कोल्हापूरच्या राजारामपुरीतील तरुणाचा कोकणात दुर्दैवी अंत संगमेश्वर -कोल्हापूरहून कोकण पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा तालुक्यातील सोनवी संगमेश्वर नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजय शंकर बोरगे (वय ३७ रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय [...]
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी फिजीशीयन रूजू
विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला यश सावंतवाडी : प्रतिनिधी गेली ५ वर्ष सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजीशीयन मिळावा म्हणून सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन मिळाला आहे. यासाठी रूग्णकल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक [...]
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांनी छापा टाकला आहे. पवन खेरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. रिनिकी भुईया सरमा यांच्याकडे तिहेरी पासपोर्ट असून विदेशात त्यांची मालमत्ता असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता. यानंतर रिनिकी भुईया सरमा यांनी पवन खेरा यांच्याविरुद्ध […]
Israel Iran War –हिंदुस्थानला मोठा दिलासा; रशियानंतर व्हेनेझुएलाहून येणार कच्चे तेल
आखाती युद्धामुळे जगभरात तेलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जवळपास ११२ डॉलरपर्यंत पोहोचली आहे. देशात इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी हिंदुस्थानने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी विविध पर्यायांवर विचार करत आहे. इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करत असतानाच आता हिंदुस्थानला व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळण्याची […]
तुम्हालाही वारंवार चक्कर येते का? मग या गोष्टी तुम्ही करायलाच हव्यात
अनेकांना नेहमी चक्कर येण्याचा त्रास होतो. मात्र आपण या समस्येला दुर्लक्ष करतो. आपण घरगुती उपायांमुळे चक्कर येण्यापासून आराम मिळू शकतो का? चक्कर येणे ही कानाच्या आतील एक आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये सतत चक्कर येणे. बसताना किंवा झोपताना चक्कर येणे. यामध्ये सरळ उभे राहणे कठीण होते. चक्कर येण्याचे असे अनेक प्रकार आहेत. खरं तर, आजकाल मोबाईल […]
युद्धाच्या फटक्यामुळे एअर इंडियाने तिकीट दरात केली वाढ, 8 एप्रिलपासून नवे दर लागू
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. देशातील अग्रगण्य विमान कंपनी एअर इंडियाने वाढत्या खर्चाच्या दबावाला प्रतिसाद म्हणून आपल्या इंधन अधिभारात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीच्या या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. […]
मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. मंगळवारी पहाटे बिष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर मणिपूरमधील तणाव वाढला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने 5 जिल्ह्यात पुढील दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच बिष्णुपूर जिल्ह्यात तातडीने संचारबंदी लागू केली आहे. […]
माता न तू वैरिणी! दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या 11 महिन्यांच्या मुलाची हत्या, निर्दयी आईला अटक
पुण्यातील रांजणगावमध्ये मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नेहमी किरकिर करायचा आणि दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने आईने पोटच्या 11 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. पूजा रविंद्र पवार असे आरोपी महिलेचे नाव […]
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. गंगापूर रस्त्यावरील दीडशे वर्षांहून अधिक जुन्या दोन वटवृक्षांवर कुर्हाड चालवली जात आहे, याविरोधात आज संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले. त्यांना न जुमानता प्रशासनाने ही वृक्षतोड सुरूच ठेवली, तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरणारी […]
Gold Silver Rate –सोनेचांदीच्या दरात अस्थिरता कायम; जागतिक घडामोडींमुळे दरात घसरण
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक अशांतता वाढत आहे. आतापर्यंत युद्धाच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनेचांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र, हे युद्ध याला अपवाद ठरले आहे. या युद्धाच्या काळात सोने-चांदीचे दर वाढण्याऐवजी त्यात घसरण होत आहे. त्यांच्या उच्चांकापासून त्यात प्रंचड घसरण झाली आहे. तसेच जागतिक परिस्थितीचा परिणाम या दरांवर होत असल्याने त्यात चढउतार होत आहेत. मंगळवारी पुन्हा […]
रवींना स्मरून रितेशना विजयी करा!
फोंड्यातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : गोव्यात 2027 मध्येही डबल इंजिन सरकार येणार फोंडा : गोव्यातील बहुजनांचे लोकनेते, कुळ मुंडकारांचे कैवारी आणि फोंड्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार रवी नाईक यांच्या अकाली जाण्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. सामूहिक भावनेची किनार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गोव्यातील विरोधी पक्षांना राजकीय संस्कृतीचे उत्कृष्ट [...]
रवींना स्मऊन रितेशना विजयी करा!
फोंड्यातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : गोव्यात 2027 मध्येही डबल इंजिन सरकार येणार फोंडा : गोव्यातील बहुजनांचे लोकनेते, कुळ मुंडकारांचे कैवारी आणि फोंड्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार रवी नाईक यांच्या अकाली जाण्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. सामूहिक भावनेची किनार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गोव्यातील विरोधी पक्षांना राजकीय संस्कृतीचे उत्कृष्ट [...]
राजपाल यादवच्या समर्थनार्थ उतरला बाॅलीवूडचा भाईजान.. वाचा नेमकं काय घडलं?
राजपाल यादव अलीकडेच ₹९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अडकला होता. यावेळी त्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. मात्र अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात राजपालची खिल्ली उडवण्यात आली. एका ज्येष्ठ पत्रकाराने राजपालला म्हटले की, डॉलरचा दर कितीही कमी-जास्त झाला तरी त्याला संपूर्ण कर्ज फेडावेच लागेल. राजपालने हा टोमणा विनोदाने घेतला. परंतु या टोमण्यावर भाईजान सलमान खान मात्र चांगलाच […]
अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारे हिंदुस्थानी वंशाचे डॉक्टर आणि त्यांच्या ‘ॲडवान्स युरोलॉजी’ (Advanced Urology) या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जितेश पटेल असे या डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर अनावश्यक वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया करून सरकारी तिजोरीची लूट केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर $14 दशलक्ष (सुमारे 116 कोटी रुपये) दंड आकारण्यात आला […]
१६ वर्षांपासून फरार असलेल्या दहशतवाद्यासह पाच जणांना अटक; जम्मू-कश्मीर पोलिसांची मोठी कारवाई
जम्मू-कश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) एका दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये गेल्या १६ वर्षांपासून फरार असलेल्या आणि केंद्रशासित प्रदेशाबाहेर स्वतःचे तळ निर्माण करणाऱ्या अब्दुल्ला ऊर्फ अबू हुरैरा या दहशतवाद्याचाही समावेश आहे, अशी माहिती मंगळवारी अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत अब्दुल्लासोबतच उस्मान ऊर्फ खुबैब या अन्य एका […]
चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मधमाशांच्या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या आत असलेल्या मैदानावर ही घटना घडली. मधुकर रंगारी (65) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते सिन्हाळा या गावातील रहिवासी आहे. डीजेच्या आवाजाने मधमाशांचे मोहोळ उठले आणि हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते. […]
सीमावासियांना महाराष्ट्राच्या सवलती
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा सांगली : मागील चाळीस-पंचेचाळीस वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना सीमाप्रश्न का सुटला नाही? याबाबत राजकारण करण्याचा माझा पिंड नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे, हा विषय सुप्रिम कोर्टात आहे. प्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला ज्या सवलती मिळतात, त्यात मेडिकलच्या जागांसह सर्व सवलती सीमाभागातील सर्व 865 गावांना मिळत राहतील, अशी घोषणा सांगलीचे [...]
डॉ. किरण ठाकुर यांचा आज सांगलीत नागरी सत्कार
डॉ. किरण ठाकुर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांच्यावतीने मंगळवारी 7 एप्रिलला कार्यक्रमस्थळी भव्य नागरी सत्कार होणार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी सभापती अतुल माने, सभागृहनेते संदीप आवटी, मनपा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते युवराज गायकवाड, युवराज बावडेकर, मैनुद्दीन बागवान, तसेच शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. [...]
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकमध्ये प्रस्तावित केलेल्या बदलांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या बदलांमुळे प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्क्यांनी वाढ होणार असून तो ११,३३२.८२ कोटी रुपयांवरून १८,१२०.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. तसेच, यापूर्वी निश्चित केलेल्या १,५८५ खारफुटींच्या (मॅन्ग्रोव्ह्ज) झाडांऐवजी आता १,७९९ झाडे हटवावी लागतील, अशी माहिती मिळत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी […]
प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांची सूचना : सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बेळगाव : उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्मयता असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन बेळगाव विभागातील समस्याग्रस्त गावांची ओळख पटवावी. स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी टँकर व जवळील खासगी कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा [...]
विनापरवाना डीजे लावणाऱ्या तिघांविरुद्ध मारिहाळ पोलिसात एफआयआर
सुळेभावीमध्ये लग्न समारंभात वाजविला डीजे बेळगाव : कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लग्न समारंभासाठी डीजे लावणाऱ्या तिघा जणांविरुद्ध मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साऊंड सिस्टीमही जप्त केली आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री मारिहाळ पोलीस स्थानकातील आय. एम. शिलवंतर यांनी फिर्याद दिली आहे. सुरेश रामाप्पा बंगन्नावर, राहणार सुळेभावी, वीरभद्र नागाप्पा यरगुद्दी, [...]
न्यायालयासमोर करण्यात आले हजर : इतर चौघांवरही गुन्हा दाखल बेळगाव : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवून नंतर तिला धोका दिल्याच्या आरोपावरून शहापूर पोलीस स्थानकात अखेर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईश्वरसिंग प्रेमसिंग बडगुज्जर (वय 32) याला पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले आहे. ईश्वरसिंग, त्याचा भाऊ गुरुचरण प्रेमसिंग [...]
कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा मनपाकडून शोध सुरू
दोन ठिकाणी पाहणी : मात्र जागांची निश्चिती नाही बेळगाव : तुरमुरी येथील कचरा डेपोला परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र विरोध केला जात आहे. कचरा डेपोमुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित बनण्यासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा डेपो बंद करून दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच 2029 मध्ये तुरमुरी कचरा डेपोचा करार [...]
बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार देणे गैर नाही. सशक्त लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या चौकटीत काम करायचे झाले तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याच अधिकार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार आणि भाचा पार्थ पवार यांचेही काँग्रेस पक्षावर केलेल्या […]

27 C