सूर्यकुमार टी-20 मानांकनात सातव्या स्थानी
वृत्तसंस्था / दुबई आयसीसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे स्थान पाच अंकांनी वधारले असून तो आता या यादीत सातव्या स्थानावर आहे. सध्या न्यूझीलंडबरोबर सुरू असलेल्या टी-20 मालिकेत कर्णधार यादवने तीन सामन्यांत अनुक्रमे 32, नाबाद 82 आणि नाबाद 57 धावा झळकविल्या. भारताने हे सलग तीन सामने जिंकून न्यूझीलंडवर [...]
टीव्हीएस मोटर्सला 940 कोटीचा नफा, नफा 49 टक्के वाढला
मुंबई : दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटर्सने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 940 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 841 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्या तुलनेत यंदाच्या नफ्यामध्ये एकूण 49 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. टीव्हीएस मोटरने या [...]
विविध कंपन्या देणार लाभांश, इंडिया मोटर पार्ट्स देणार 10 रुपये लाभांश
नवी दिल्ली : शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष हे नियमित उत्पन्नावर असते. यामध्ये कंपन्यांच्या लाभांशाचा विचारही प्रामुख्याने अनेक गुंतवणूकदार करत असतात. येणाऱ्या काळात अनेक कंपन्या आपल्या समभागधारकांना लाभांश देणार आहेत. लाभांशाचे वितरण करण्यासाठी समभागधारकांची पात्रता ठरवण्यासाठी कंपन्यांची 29 जानेवारी ही रेकॉर्ड डेट असणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना जर लाभांशाचा फायदा उठवायचा असेल तर 29 जानेवारी ही [...]
भोजनासाठी किंवा खाण्यासाठी हॉटेलात जाणे ही आता अतिशय सामान्य बाब झाली आहे. कित्येकदा लोक हॉटेलात बसतात खूप वेळ, पण खातात कमीच. खाण्यापेक्षा निवांत गप्पा मारणे हा त्यांचा उद्देश असतो. तथापि, बेंगळूरमधील एका हॉटेलात असा नियम आहे, की आपण तेथे एक तासाच्यापेक्षा अधिक काळ टेबल अडवून बसलात, तर आपल्याला प्रत्येक तासाला 1 हजार रुपये दंड केला [...]
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी अमेझॉन या ऑन लाईन व्यापार कंपनीने आपल्या जगभरातील 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात कंपनीने अधिक कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती. कारण त्या काळात ऑन लाईन अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तथापि, आता या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्यावाचून कंपनीसमोर गत्यंतर नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनी आता [...]
ऑस्टेलिया संघ पकिस्तानच्या दौराऱ्यावर
लाहोरमध्ये खेळावणार टी-20 समाने वृत्तसंस्था / लाहोर मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी सकाळी लाहोरमध्ये दाखल झाला,ज्यात शेवटचे दोन समाने 31 जानेवारी आणि 1 फेब्रवारी रोजी होणार आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील पुढील महिन्याच्या विश्वचषकातील सहभागबद्दल शंका असतानाही, पकिस्तान गुरुवारी लाहोरमध्ये सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मलिकेत ऑस्टेलियाशी भिडणार आहे.देशाचे क्रिकेट प्रमुख [...]
भारत युवा संघाचा झिम्बाब्वेवर दणदणीत
विजय यू-19 विश्वचषक : सामनावीर विहानचे नाबाद शतक, वैभवचे वेगवान अर्धशतक, म्हात्रे-उद्धव मोहनचे प्रत्येकी 3 बळी वृत्तसंस्था/ बुलावायो, झिम्बाब्वे मध्यफळीतील युवा फलंदाज व सामनावीर विहान मल्होत्राचे नाबाद शतक, अभिज्ञान कुंडू व वैभव सूर्यवंशी यांची अर्धशतके आणि उद्धव मोहन व आयुष म्हात्रे, अंबरीश यांच्या भेदक माऱ्यामुळे भारताच्या युवा संघाने यू-19 विश्वचषक स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीच्या पहिल्या [...]
श्रीलंका-वेस्ट इंडीज दौऱ्याची घोषणा
► वृत्तसंस्था / कोलंबो श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या सहा सामन्यांच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. ज्याचे सामने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहेत.दोन क्रिकेटमधील हे बलाढ्या महिला संघ 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळतील. त्यानंतर तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. ज्यातील पहिला सामना 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा दौरा 3 मार्च रोजी, तिसऱ्या [...]
जगातील आदिवासी जमातींमध्ये आजही अशा भयानक प्रथा पाळल्या जातात, की इतरांना त्यांसंबंधी चर्चा करणेही अवघड असते, ही वस्तुस्थिती आहे. पापुआ न्यू गिनी या देशात ‘फोर’ नावाची जमात आहे. या जमातीत काही वर्षांपूर्वीपर्यंत एक अशीच भीतीदायक प्रथा होती. या जमातीतील लोक आपल्या जमातीतील मृत लोकांचे मांस खात असत. त्यामुळे ही जमात नरमांसभक्षक म्हणून ओळखली जात असे. [...]
ड्रग्ज तस्कर भावांकडून 4 कोटींची मालमत्ता जप्त
उत्तर प्रदेशात ‘ऑपरेशन सवेरा’द्वारे कारवाई वृत्तसंस्था/ मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशात मीरापूर पोलीस ठाण्याने ड्रग्जच्या तस्करीत सहभागी असलेल्या दोन भावांची तब्बल 4 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करत मोठी कारवाई केली. मुझफ्फरनगरमधील पोलिसांनी ड्रम आणि घोषणांसह ‘ऑपरेशन सवेरा’ या मोहिमेंतर्गत कारवाई सुरू केल्यामुळे ड्रग्जच्या व्यापाराविरुद्ध कडक संदेश गेला आहे. बुढाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवारा गावातील रहिवासी लोकेंद्र [...]
अजितदादा विमान दुर्घटना घात की अपघात?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची ममता बॅनर्जींची मागणी वृत्तसंस्था/ कोलकाता विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू होण्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. विमानाला झालेला अपघात हा ‘घात की अपघात?’ असा प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या यंत्रणेद्वारे सत्य उघड होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या [...]
केएल राहुलचा कर्नाटक रणजी संघात समावेश
वृत्तसंस्था / बेंगळूर भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलचा 29 जानेवारीपासून मोहाली येथे पंजाबविरुद्ध सुरू होणाऱ्या 2025-26 रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी कर्नाटक संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलच्या समावेशाने कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे तर संघाचे नेतृत्व देवदत्त पडिक्कलकडे सोपविण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांचा वेगवान गोलंदाजीचा मारा [...]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा इराणला इशारा : अमेरिकेची युद्धनौका इराणच्या आखातात वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता चिघळला आहे. अमेरिकेने आपल्या नौदलातील युद्धनौका इराणच्या आखातात आणली असून अमेरिकेचा हल्ला या देशावर होऊ शकतो. इराणने चर्चेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. मात्र, इराणने चर्चा करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने [...]
अजितदादा पवार यांना लोकसभेत श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाला संबोधित करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे [...]
आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जानेवारी 2026
मेष: सर्व अडचणींवर हसतमुखाने मात करा, विचारापासून दूर राहा वृषभ: आरोग्य चांगले असले तरी प्रवास सांभाळून करावा मिथुन: अर्थपुरवठा होईल, मनात कामाच्या ताणाचे विचार नको कर्क: मुलांची काळजी घ्या, स्वास्थ्य सांभाळा अन्यथा खर्च सिंह: घरातील गरजेच्या वस्तुंची खरेदी कराल. आनंदाचा अनुभव कन्या: आनंदी वार्ता कानी पडेल, करमणुकीवर खर्च कराल तुळ: अध्यात्मिक मार्गाने मन:शांती मिळेल, आर्थिकदृष्ट्या [...]
पाच वर्षांपूर्वी याच दिवशी पालिकेच्या कार्यक्रमात केलं खुमासदार भाषण!
मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘पालिका मुख्यालय हेरिटेज टूर’च्या शुभारंभप्रसंगी 28 जानेवारी 2021 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुमासदार भाषण केले होते. उत्पृष्ट वास्तुकलेचा नमुना असणारे पालिका मुख्यालय ब्रिटिश संकल्पनेतील असले तरी इमारतीच्या बांधकामात मुख्य योगदान मराठी माणसाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. या कार्यक्रमात तत्कालीन पालिका आयुक्त […]
पिंकीला गरजू व गरीब तरुण-तरुणींना घडवायचे होते, स्वप्न पाहिले होते, पण…
आमची पिंकी प्रचंड कष्टाने शिकली होती. ती क्रू मेंबर म्हणून यशस्वीपणे कर्तव्य बजावत होती. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱया; परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्यांना समस्या येतात अशा होतकरू तरुण-तरुणींना मोफत मदतीचा हात द्यायचा. त्यांना आपल्या परीने शिकवायचे, ट्रेनिंग द्यायचे असे स्वप्न पिंकीचे होते. मंगळवारी रात्री आमचे शेवटचे बोलणे झाले तेव्हा तिने हे विचार माझ्याकडे मांडले, पण […]
पाच वर्षांत विमानांचे 53 अपघात, 320 मृत्यू; तांत्रिक बिघाडापासून खराब हवामानाचे भय
देशातील विमान प्रवास अलीकडच्या काळात प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करू लागला आहे. तांत्रिक बिघाड, खराब हवामानाची स्थिती, पक्ष्यांची धडक बसून इमर्जन्सी लॅण्डिंग अशा कारणांमुळे विमान प्रवासाबाबत भय वाढले आहे. देशात गेल्या पाच वर्षांत 53 हवाई अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात अहमदाबादमधील भीषण अपघाताचा समावेश आहे. या अपघातांमध्ये 320 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर 180 […]
कॅप्टन सुमीत आणि शांभवी दोघेही अनुभवी आणि सक्षम
बारामतीमध्ये अपघात झालेल्या विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर अत्यंत अनुभवी पायलट होते. टेकऑफ आणि लँडिंगच्या महत्त्वाच्या काळात ते फ्लाइटमधील सर्व कर्मचाऱयांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. यापूर्वी त्यांनी सहारा, जेटलाइन आणि जेट एअरवेजसारख्या मोठय़ा कंपन्यांसोबत काम केले होते. ते मूळचे दिल्लीचे होते. तर विमान अपघातात मृत्यू झालेली फर्स्ट ऑफिसर […]
महाराष्ट्रासाठी आजची सकाळ धक्कादायक ठरली. राज्यावर जबर आघात झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात निधन झाले. या बातमीने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. सर्वत्र शोकलहर निर्माण झाली…कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला. राज्याच्या राजकारणातील ‘दादा माणूस’ अशी ओळख असलेले तडफदार आणि झंझावाती नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले… दादापर्व संपले. ही केवळ एका पक्षाची वा […]
Ajit Pawar Death – खंबीर नेता हरपला, उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित […]
Ajit Pawar Death – अपघातावर संयशयाचे धुके! ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी केली चौकशीची मागणी
दाट धुके, कमी दृश्यमानता ही अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची प्राथमिक कारणे दिसत असली तरी या अपघातावर संशय व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, विकिपीडियावर 27 जानेवारीलाच अजित पवारांचे निधन झाल्याचे अपडेट पडले […]
हजरजबाबी, दिलखुलास अंदाज आणि मिश्किल दादा…
अजित पवार हे जितक्या कडक शिस्तीचे नेते होते, तितकेच ते मिश्किल आणि दिलखुलास होते. जाहीर सभांमध्ये किंवा वैयक्तिक भेटीत ते अनेकदा मनमोकळे बोलत. कठोर शब्दांत बोलून मग सांभाळूनही घेत. त्यांचा हा अंदाज राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत असे. z शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेल्यानंतर ते सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार […]
आभाळमाया –ग्रहांचे ‘हॅबिटेबल झोन’
>> वैश्विक एखादा ग्रह आपल्या पृथ्वीसारखा वसाहत योग्य कधी होतो? त्याचे बरेच निकष आहेत. वसाहत योग्य म्हटल्यावर स्वार्थी माणूस फक्त स्वतःचा ‘वसाहती’चा विचार करतो. त्यासाठी निसर्गाची हानी झाली तरी त्याला चालते. परंतु मुळात निसर्गाचा ऱ्हास करून माणसांना पृथ्वीवर राहताच येणार नाही. कारण आपणही त्या निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो. त्याची ‘भरपाई’ वगैरे […]
अजितदादांच्या आईला कळू नये म्हणून टीव्हीची केबल तोडली, लेकाला भेटायला चालतच निघाल्या
अजितदादांच्या निधनाचे बातमी त्यांच्या आईला कळू नये म्हणून दादांच्या फार्महाऊसवरील व्यवस्थापकाने टीव्हीची केबल तोडली. त्यानंतर दादांना भेटण्यासाठी त्या चालतच निघाल्याची माहिती फार्म हाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी दिली. संपत धायगुडे यांनी सांगितले की, सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई फार्महाऊसवरती टीव्ही पाहत होत्या. त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता अजितदादांच्या विमान […]
Ajit Pawar Death – संजय गांधी, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी आणि दादा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. याआधी अनेक बडय़ा नेत्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी एरोबॅटिक मॅन्युव्हर करत असताना या विमानाचे नियंत्रण सुटल्याने नवी दिल्लीच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये अपघात झाला. […]
लेख –भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी…
>> डॉ. प्रीतम भी. गेडाम भ्रष्टाचारात संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची ताकद असते. जर भ्रष्टाचाराला सत्तेची ताकद मिळाली तर अशा देशाला विनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही. भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वतः घेतली पाहिजे. देशासाठी आपल्याला काही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण भ्रष्टाचारमुक्त वातावरण आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करेल आणि भावी पिढय़ांना […]
अजित पवारांचा चार दशकांचा राजकीय झंझावात
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द अत्यंत वेगवान आणि झंझावाती होती. सुरुवातीच्या काळात त्यांना शरद पवारांमुळे सत्तेची पदे मिळाली. मात्र राजकारणात टिकायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही हे अजितदादांनी वेळीच ओळखले. पुढील काळात त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. चार दशकांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यातून बाहेर पडून ते पुढे जात राहिले. नुकत्याच झालेल्या महापालिका […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन!! हजारोंच्या संख्येने नागरिकांनी बारामतीत धाव
धक्कादायक, दुःखद ‘अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. वेदनादायी वृत्त महाराष्ट्राचे […]
Ajit Pawar Death – अन् ‘तो’ फोटो अखेरचा ठरला!
कळव्याजवळील विटाव्यात राहणारे विदीप जाधव म्हणजे अजितदादांची सावलीच. दादांचे पीएसओ असणारे विदीप जाधव गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. आज अजितदादांसोबत मुंबई ते बारामती विमान प्रवासात त्यांनी दादांसोबतचा एक फोटो त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि दुर्दैवाने तो फोटो अखेरचा ठरला. विदीप जाधव हे विटाव्यात राहतात. त्यांचे आई, वडील, पत्नी, 13 वर्षांची मुलगी आणि […]
पालक हरपला, बीड जिल्हा शोकसागरात
उपमुख्यमंत्री तथा बीड जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी येताच बीडवर शोककळा पसरली. दीड वर्षापासून अजित पवार हे बीड जिह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. अलीकडेच त्यांनी अनेक प्रकल्प राबवायला सुरुवात केली होती. बीड जिह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या जाण्याने बीड जिह्याची मोठी हानी झाली. संपूर्ण जिह्यामध्ये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात […]
कबड्डीची ‘दादागिरी’ संपली! अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्य क्रीडाक्षेत्रावर शोककळा
महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राच्या राजकारणात अजितदादांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यांची इतकी दहशत. इतका दरारा होता की, तो प्रत्येकाला हवाहवासा वाटायचा. कारण तो दरारा खेळाडूंना दाबणारा नव्हे तर व्यवस्थेला शिस्तीत आणणारा होता. आज कबड्डीची दादागिरी संपलीय. त्यांच्या निधनाने कबड्डीपटू, कबड्डी संघटक आणि कबड्डीप्रेमी आज अनाथ झालेत, अशा शब्दांत आज प्रत्येक कबड्डीवाल्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या निधनामुळे कबड्डी-खोखोच […]
नाटय़क्षेत्रातील मूक-नायक ‘बुकिंग क्लार्क’
मराठी रंगभूमी नव्या जोमाने बहरून आलीय. नवीजुनी नाटकं आणि नवनवे प्रयोग व यांच्या जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. काही नाटकं हाऊसफुल गर्दी खेचतायत. या सर्वात नाटय़गृहावरचा तो बुकिंग क्लार्क मात्र दुर्लक्षित आहे. नाटकांच्या नामावलीत त्याचे कुठेच नाव नसते. नाटकाच्या बुकिंग ओपनिंगपासून ते करंट बुकिंगपर्यंत सगळ्या तिकिटांचा चोख हिशोब ठेवून निर्मात्यांचा नफा होईल हे पाहणारा, पाहुणे […]
पडद्याआडून –भूमिका…एक संवेदनशील समतोल
>>पराग खोत आजचा काळ अतिसंवेदनशीलतेचा आहे. संयम कमी होत चाललाय, प्रतिक्रिया झटपट उमटतात आणि मतभेद सहज संघर्षात बदलतात. काही प्रश्न तर थेट अस्मितेच्या पातळीवर येऊन ठेपतात. अशा वातावरणात एखादा गंभीर विषय त्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊन मांडणं हे धाडसाचं काम असतं. ‘भूमिका’ हे नाटक हे धाडस समर्थपणे पेलतं आणि म्हणूनच ते आजच्या काळातलं समंजस व […]
Ajit Pawar Death – क्रीडाक्षेत्रातील ‘पॉवरहाऊस’
>> विठ्ठल देवकाते बुधवारी सकाळी महाराष्ट्रावरच नव्हे तर क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे आभाळ कोसळले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी समजताच संपूर्ण राज्य हादरले. ज्यांच्या नावाने निर्णय वेगाने होत असे, ज्यांच्या उपस्थितीने प्रशासन कार्यतत्पर होत असे आणि ज्यांच्या शब्दाला क्रीडा जगतात वजन होते, असे […]
जोकोविच हरता हरता नशिबाने जिंकला, आता उपांत्य फेरीत सिनरशी रंगणार द्वंद्व
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि सलग दोन वेळचा विजेता यानिक सिनरने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, विक्रमी दहा वेळचा विजेत्या नोव्हाक जोकोविचला नशिबाची साथ लाभली आणि तो हरता हरता भाग्याच्या जोरावर अंतिम चार खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. आता उपांत्य फेरीत त्याची गाठ सिनरशी पडेल. उपांत्यपूर्व फेरीत सिनरने अमेरिकेच्या […]
हिंदुस्थान इतिहास घडवू शकतो! टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याबाबत अनिल कुंबळेला विश्वास
आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपले विजेतेपद टिकवण्याची संपूर्ण क्षमता हिंदुस्थानी संघात आहे. तो सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास घडवू शकतो, असा विश्वास माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे. मात्र टी–20 सारख्या वेगवान प्रकारात सलग दोन वेळा विश्वविजेते होणे अवघड असते, हेही त्याने आवर्जून सांगितले. 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थानात सुरू होणाऱया या क्रिकेट युद्धात यजमान […]
हिंदुस्थानात सुरक्षेचे कारण पुढे करत आगामी टी20 विश्वकपमधून माघार घेणाऱया बांगलादेश सरकारचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. क्रिकेटसाठी हिंदुस्थान असुरक्षित ठरवणाऱया बांगलादेश सरकारने त्याच हिंदुस्थानात आशियाई रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेसाठी आपला संघ पाठवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे दुहेरी मापदंड स्पष्टपणे समोर आले आहेत. माध्यम अहवालांनुसार, बांगलादेश सरकारने पुढील महिन्यात नवी […]
ट्रेंड –मॅगी विकून हजारोंची कमाई
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण प्रेरितही होत आहेत. हा व्हिडीओ आहे कंटेंट क्रिएटर बादल ठाकूर यांचा. त्यांनी थेट पहाडांमध्ये एक साधा-सोपा मॅगीचा स्टॉल लावण्याचा प्रयोग केला. कोणतेही मोठे दुकान नाही, ना महागडे इन्फ्रास्ट्रक्चर.फक्त एक टेबल, एलपीजी सिलेंडर, काही भांडी आणि गरमागरम मॅगी बनवण्याची तयारी चालू आहे. […]
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांच्या यादीत परतला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसाच्या ताज्या टी-20 क्रमवारीत सूर्यकुमारने पाच स्थानांची झेप घेत सातवा क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थान सध्या 3-0 अशी आघाडीवर असून, या यशामागे सूर्यकुमारच्या दमदार फलंदाजीचा मोठा वाटा आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये […]
कपाटात ठेवलेल्या साडय़ा दीर्घकाळाने खराब होतात. रेशमी आणि जरीच्या साडय़ांना फटका बसतो. असे होऊ नये म्हणून साडय़ा 6 महिन्यांतून एकदा कपाटातून बाहेर काढून सावलीत सुकवाव्यात. साडय़ा प्लास्टिकमध्ये ठेवण्याऐवजी सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवाव्यात. साडय़ांच्या घडय़ा बदलत राहाव्यात. कपाटात ओलावा टाळण्यासाठी सिलिका जेलचे पाकीट किंवा वाळलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा. जरीच्या जड साडय़ा हँगरला लटकवून […]
फ्लेक्सो किंग-लेबल डिव्हिजन संघाने ड्रिम एकादश संघाचा 27 धावांनी पराभव करत नोबल प्रिंटिंग प्रेस आयोजित मर्यादित षटकांच्या आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ड्रिम एकादश संघाच्या गोलदाजांच्या भेदक माऱयासमोर फ्लेक्सो किंग संघाच्या फलंदाजाना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना निर्धारित षटकांमध्ये 5 फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त 68 धावा करता आल्या. त्यानंतर फ्लेक्सो किंगच्या गोलंदाजांनी फलंदाजांचे अपयश […]
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दादांसह पाच जणांचा होरपळून अंत झाला. संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करणारी अशी ही घटना. या एका घटनेने महाराष्ट्रातील एका उमद्या नेत्याला काळाच्या पडद्याआड नेलं आहे. आता उरल्या आहेत केवळ आठवणी. दादांच्या प्रामाणिकपणाचे, वक्तशीरपणाचे, वादग्रस्त बोलण्याचे किस्से. नावाप्रमाणेच हा माणूस अजित होता. 1980 च्या [...]
अणुकरार केला नाही तर पुढचा हल्ला अधिक विनाशकारी असेल; डोनाल्ड ट्रंप यांची इराणला धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर तातडीने अणुकरार करावा, अन्यथा अमेरिकेचा पुढचा हल्ला आणखी विनाशकारी असेल. ट्रम्प यांनी बुधवारी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणने असा करार करावा ज्यामध्ये अण्वस्त्रांचा विकास थांबविण्याची स्पष्टपणे तरतूद असेल. ट्रम्प म्हणाले की, वेळ संपत चालली आहे आणि […]
Ajit Pawar Death – अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे. यामुळे अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. ब्लॅक बाॅक्स सापडल्यानंतर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) इंजिनची कार्यक्षमता, नियंत्रण […]
बारामती विमान दुर्घटनेनंतर हवाई दलाची तातडीची मदत, लोहेगाव येथून हवाई वाहतूक नियंत्रण पथक तैनात
महाराष्ट्र सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर हिंदुस्थानी हवाई दलाने कारवाई करत लोहेगाव येथील हवाई दल तळ येथून हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांचे पथक तसेच आवश्यक तांत्रिक उपकरणे बारामती विमानतळावर पाठवली. आज बारामतीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हिंदुस्थानी हवाई दलाला ही विनंती केली होती. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पथकाने स्थानिक […]
Photo –अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाण्यासाठी निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं. या अपघातात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला. अजित पवार हे एका सभेसाठी बारामती येथे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. सकाळी पावणे नऊ ते […]
Ajit Pawar : वक्तशिर, रोखठोक, शब्दाला वजन , विकासावर भर देणारे ‘अजित दादा’
उपमुख्यमंत्री अजित पवार हे, वेळेला महत्व देणारे होते कोल्हापूर : आठ एप्रिल २०२२ स्थळ जिमखाना मैदान वेळ सायंकाळी सात वाजता पावसामुळे आपल्याला थोडा वेळ लागला अशी आल्या-आल्या दिलगिरी व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे, वेळेला महत्व देणारे होते. [...]
Ajit Pawar : विमान फिरुन आले आणि कोसळले ; प्रत्यक्षदर्शी महिलेने ‘तो’भीषण प्रसंग सांगितला
बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला मुंबई : बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट [...]
Ajit Pawar : दादा पर्व संपलं; राजकारणात न भरून येणारी पोकळी
दादा पर्वाचा दुर्दैवी अंत मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी बारामती [...]
हा निव्वळ एक अपघात, यात राजकारण आणू नका; अजित पवार यांच्या निधनावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
बारामतीत विमानाच्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. हा निव्वळ अपघात होता, यात राजकारण आणू नका असे आवाहन अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. […]
सांगलीत खळबळ: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला
मिरज–कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गंभीर जखमी सांगली : सांगली शहरात खळबळ उडवणारी घटना घडली असून मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा चाकूहल्ला केला आहे. हा हल्ला त्यांच्या कलानगर येथील घरासमोरच करण्यात आला असून चाकू फुफ्फुसात अडकल्याने [...]
पायलटने मेडे कॉल दिला नाही, अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी DGCA ची माहिती
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. उतरताना वैमानिकांना धावपट्टी दिसण्यात अडचण येत असल्याचे Directorate General of Civil Aviation (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) यांनी स्पष्ट केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. महासंचालनालयाच्या माहितीनुसार, पहिल्यांदा उतरण्याच्या प्रयत्नात धावपट्टी न दिसल्याने वैमानिकांनी पुन्हा वर जाण्याचा (गो-अराउंड) निर्णय […]
Ajit Pawar |उद्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचे अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार मुंबई : बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणिकॅप्टन [...]
Ajit Pawar Death – विचित्र योगागोग! अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर ६ अंकांची चर्चा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाण्यासाठी निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं. या अपघातात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाशी संबंधित एक विचित्र योगागोग समोर आला आहे. या घटनेचा ६ अंकाशी संबंध […]
काळ बनून आला ट्रक, दुचाकीला भीषण धडक; दोन युवकांचा मृत्यू
उमरगा तालुक्यातील जेकीकुर चौरस्ता येथे भीषण अपघात धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील जेकीकुर चौरस्ता येथे दुपारच्या सुमारास लातूरच्या दिशेने जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच बारा पी डब्ल्यू 93 82 वरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रक क्रमांक CG07 BA 4396 [...]
अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित [...]
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह अन्य चार जणांचा मृत्यू झाला. या चार जणांमध्ये वरळीतील रहिवाशी 29 वर्षीय पिंकी माळी यांचा सुद्धा समावेश होता. फ्लाईट अटेन्डेंट म्हणून त्या कार्यरत होत्या. भावाला पायलट करण्याच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, त्यांचं स्वप्न अधुरं […]
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे वाशी शहर कडकडीत बंद
वाशी (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याचे धक्कादायक, हृदयद्रावक वृत्त धडकताच वाशी शहर, तालुक्यावर धाराशिव जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी(दि.28) रोजी सकाळ पासूनच सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने कडकडीत दिवसभर बंद ठेवले होते. औषधांची दुकाने आणि दवाखाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता, हॉटेल, कपड्यांची आणि इतर सर्व दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे पूर्णपणे बंद होते. वाशी शहर बंद आसल्याची बातमी ग्रामीण भागात कळताच शहरातील छात्रपती शिवाजी महाराज चौक,पारा चौक,जुने तहसिल चौक व शिवाजी नगर बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
तुळजापूर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह नगरसेवक अमोल कुतवळ, रणजित इंगळे, आनंद जगताप, पंचायत समिती उमेदवार दत्ता शिंदे, सुजित हंगरगेकर, बाळासाहेब कदम, युसूफ शेख, नरेश पेंदे, सुदर्शन वाघमारे, विनोद सोंजी, दादा पाटील, पिंटू पंडागळे, शशिकांत पाटील तसेच असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत, जड अंतःकरणाने भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पंचायत समितीसाठी 41 तर जिल्हा परिषदेसाठी 25 उमेदवार रिंगणात
भूम (प्रतिनिधी)- भूम पंचायत समितीच्या दहा जागेसाठी 41 उमेदवार रिंगणात तर जिल्हा परिषद गटाच्या पाच जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात राहिले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत तर पंचायत समिती गणात काही ठिकाणी तिरंगी तर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे आज सकाळी उमेदवारी माघार घ्यावयाच्या अखेरच्या दिवशी अपक्षासह इतर उमेदवार यांची मोठी गर्दी दिसुन आली दरम्यान शिंन्दे सेनेकडून जिल्हा महिला कमेटी अध्यक्षा अर्चना दराडे यांनी वालवड तर रुपाली समाधान सातव यांनी सुकटा गटातुन अखेर पक्षाचा आदेश आसल्याचे सांगत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज मागे घेतला माजी मंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर विश्वासु आसलेले समाधान सातव यांच्या पत्नीस शिंन्दे शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता विधानसभा निवडणुकीत सातव यांच्या देवळाली गावातुन माजी मंत्री यांना 500 मताधिक्य मिळाले होते याच मताधिक्यमुळे सावंत हे कमी अधिक फरकाच्या मतांनी विजयी झाले होते त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी नक्की देईल असे चित्र सुकटा गटातील मतदारात होते मात्र पक्षान उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु शेवटी पक्षाचा आदेश मानत शक्तिप्रदर्शन करत अर्ज वापस घेतला आहे त्यामुळे आता शिंन्दे सेनेच्या विजयमाला भाऊसाहेब मारकड यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित झाली आहे तर शिवसेना महिला अघाडी अध्यक्षा अर्चना ताई दराडे यांनी पक्षाकडे वालवड गटासाठी मागणी केली होती त्यांनाही पक्षान उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानाही माजी मंत्री सावंत यांच्या आदेशान रिंगणातुन माघार घेतली आसल्याचे शक्तीप्रदर्शन करत सांगीतले गण आणी गटातील उमेदवार ईट गटातून वर्षा गिते(भाजप),स्नेहल सुनिल भोईटे(शिवसेना),शुभांगी सुनिल देशमुख (राष्ट्रवादी),सगुणा अशोक सोन्ने (शिवसेना ठाकरे),सुकटा गटातून विजयमाला भाऊसाहेब मारकड(शिवसेना), सुप्रिया संजीव पाटील(राष्ट्रवादी), लक्ष्मी बबन जानकर(शिवसेना ठाकरे), धनश्री रणजीत हापटे(भाजपा), श्वेता सुधाकर हाके(रासप), पाथरूड गटातून रामकिसन गव्हाणे(शिवसेना), अमोल(दत्ता) भोरे(राष्ट्रवादी काँग्रेस), शंकर नागरगोजे(शिवसेना ठाकरे),सिताराम वनवे(भाजपा),विठ्ठल सुरवसे(अपक्ष), वालवड गटातून उषा कांबळे (राष्ट्रवादी), जयश्री काळे (शिवसेना), लता गोरे (भाजपा), उर्मिला वनवे(शिवसेना ठाकरे), आष्टा गटातून साधना अंधारे (शिवसेना ), महादेव खैरे (राष्ट्रवादी), नितीन जाधव (भाजपा), झीनत सय्यद(शिवसेना ठाकरे),रवींद्र लोमटे (रा.स.द.आर) यांच्यात लढत होणार आहे. पखरुड गणातून प्रियंका रणबागुल(वंचित बहुजन आघाडी), राजकन्या लिमकर (शिवसेना), सागरबाई अनुभले (भाजपा), संगीता नलवडे (शिवसेना ठाकरे),ईट गणातून बाळासाहेब खरवडे (राष्ट्रवादी), प्रवीण देशमुख (शिवसेना), शरद चोरमले (भाजपा), श्रीमंत डोके (शिवसेना ठाकरे),शिवाजी चव्हाण (म न से), सुकटा गणातून सुरज नाना मदने (रा स प),भगवान बांगर (शिवसेना ठाकरे), दत्ता लवटे (राष्ट्रवादी), कृष्णा गोयकर (शिवसेना),सारिका मारकड(अपक्ष), आरसोली गणातून प्रशांत मुंडेकर (शिवसेना), कुमार (राहुल) तांबे- पाटील(राष्ट्रवादी), लिंबाबाई लोमटे (रा.स.द.आर), सुनंदा बनसोडे(अपक्ष),पाथरूड गणातून प्रदीप शेळके (राष्ट्रवादी अप),चेतन बोराडे (शिवसेना ठाकरे), समाधान भोरे (शिवसेना), विठ्ठल पन्हाळे (भाजपा), आंबी गणातून प्रियंका गटकळ (राष्ट्रवादी), सरिता नागरगोजे( शिवसेना ठाकरे),उर्मिला शिंदे (शिवसेना), रतन गायकवाड (भाजपा), वालवड गणातून वैशाली बारस्कर (राष्ट्रवादी), साधना सुबुगडे (शिवसेना), रुक्सना सय्यद (शिवसेना ठाकरे), स्वाती तनपुरे (भाजपा), चिंचोली गणातून अगरावती गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), श्रीलता लोखंडे (शिवसेना), ज्योती आडागळे (शिवसेना ठाकरे), स्नेह मिसाळ (भाजपा), आष्टा गनातून पूजा ढगे (शिवसेना),अश्विनी कदम (राष्ट्रवादी), लीलावती ढगे (शिवसेना ठाकरे), माणकेश्वर गणातून मनोज अंधारे (राष्ट्रवादी), बालाजी गुंजाळ (शिवसेना), सुदाम पाटील (भाजपा), बापू माळी (शिवसेना ठाकरे) यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी- डॉ. स्मिता शहापूरकर
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्याच्या राजकीय पटलावरून अचानक नाहीसे होणे ही सर्वांसाठीच अतिशय धक्कादायक बातमी आहे. गेल्या दहा वर्षांत ते विविध कारणांनी महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांची प्रशासनावरील पकड आणि कामकाजाची उत्तम समज नावाजली गेली. त्यांच्या कामाचा उरक आणि ऊर्जा दांडगी होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त राजकीय खेळ्या यांनी त्यांचे कर्तृत्व आणि कारकिर्द झाकोळली गेली. पवार कुटुंबातले ते महत्वाचे आधारस्तंभ होते. त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला, हे दुःखद आहे. राजकीय नेत्यांचा अपघाती मृत्यू हा लोकांच्या मनात कायम संशय निर्माण करतो. अजितदादा पवार यांच्या या अपघाती निधनाची चौकशी होऊन लोकांच्या शंकांचे निराकरण व्हायला हवे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव, डॉ. स्मिता शहापूरकर यांनी दिली.
Supriya Sule : बारामतीत विठ्ठलदादा मणियार दिसताच सुप्रिया सुळे गळ्यात पडून रडल्या अन्…
अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान [...]
प्रत्येक कार्यात आपला ठसा उमटवला- खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- माझे आत्तेमामा, महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय, कणखर नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा देणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. सहकार, जलसंपदा, वित्त आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी उभे राहिलेले जलसिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेली ठाम भूमिका, अर्थसंकल्प मांडताना दाखवलेली आर्थिक शिस्त आणि निर्णयक्षमतेचा वेग हे सगळे महाराष्ट्राने जवळून अनुभवले आहे. अशी प्रतिक्रिया धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. “काम बोला” ही त्यांची भूमिका केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून दाखवलेली कार्यसंस्कृती आहे. टीका, संघर्ष आणि राजकीय वादळांमध्येही त्यांनी कधी कामाची दिशा बदलू दिली नाही. राज्याच्या विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले, तरी मागे न हटता त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सामान्य कार्यकर्त्यापासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काम करून घेण्याची त्यांची शैली, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्पष्ट शब्दांत बोलण्याची सवय हीच त्यांची खरी ओळख. महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पष्ट, प्रभावी आणि अनुभवसंपन्न नेतृत्व म्हणून अजित पवारांचे योगदान कायम स्मरणात राहील असे राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अकाली असून, कार्यक्षम आणि काम करणाऱ्या नेत्याचा अशा प्रकारे अंत होणे हे सर्वांसाठी आघातकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर मोठे दु:ख कोसळले […]
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानाच्या लँडिंगदरम्यान अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झालेल्या वेळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जात होते. राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, उद्या (२९ […]
अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे महाराष्ट्रामध्ये धडाडीने काम करणारे सर्वांना सोबत घेऊन जाणारे पहाटेच उठून लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे गोरगरीब सर्वसामान्यांची छोटी मोठी कामे करणारे अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून सर्वांना न्याय मिळवून देणारे स्पष्टपणे बोलणारे आव्हान स्वीकारून काम करणारे जनतेचे आधारवड अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्रामध्ये त्यांनी विविध पदावर काम करून सरकारच्या व सहकाराच्या माध्यमातून शेतकरी तरुण महिला अशा अठरा पगड जातीतील लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विमान अपघाताने दादांना देवाज्ञा झाली दादांच्या जाण्याने आपल्या राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. रामदास कोळगे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव
Eknath Shinde : माझा मोठा भाऊ हरपला,अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे ; एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह [...]
अजितदादांच्या जाण्याने कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग यांची प्रतिक्रिया सावंतवाडी : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना मोठा आधार होता. ते कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत असत. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सावंतवाडी विधानसभा [...]
Ajit Pawar |उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा [...]
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख […]
दृश्यमानता आणि उंची, या दोन कारणांमुळे अजित पवारांच्या विमानाला अपघात; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध कारणांचा विचार केला जात असल्याचे विमानतज्ज्ञ दिप्तेश चौधरी यांनी सांगितले. गुजरातमधील अहमदाबाद येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अपघातामागील संभाव्य कारणांवर भाष्य केले. चौधरी यांनी सांगितले की, अपघातामागे अनेक कारणे असू शकतात. उपलब्ध माहितीनुसार त्या वेळी दृश्यमानता कमी होती. पुणे परिसरातील दृश्यमानता सुमारे 2500 मीटर होती, तर बारामती परिसरात […]
दमदार दिलदार मित्र सोडून गेला : CM देवेंद्र फडणवीस मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला [...]
अजितदादांच्या मृत्यूमुळे धाराशिव जिल्हा शोक सागरात
धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांची सासरवाडी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या मृत्यूचा सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असून धाराशिव जिल्ह्याच्या वातावरणात देखील दुःखाची छाया पसरली आहे. अजित दादांची सासुरवाडी असणाऱ्या तेर गावामध्ये सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले असून, आज दुकानेही बंद आहेत. तेरमधील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून, सामान्य नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादा पवार हे धाराशिव जिल्ह्यातील पाटील घराण्याचे जावई होते. आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विवाह सोहळ्याला अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी उपस्थिती लावत घरच्या सोहळ्याप्रमाणे ते या लग्नाच्या सोहळ्यात रमले होते. अजितदादा यांच्या दुर्दैव मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला असून , अर्चनाताई पाटील आणि चिरंजीव मल्हार पाटील व मेघ पाटील यांनी समाज माध्यमावर पूर्ण ब्लँक असणारे स्टेटस ठेवले असून भावना व्यक्त करण्यास शब्द नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अजित दादा पवार यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांची सासुरवाडी असणाऱ्या तेर या गावी गावकऱ्यांच्या वतीने जुन्या बसस्थानकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा पवार यांच्याशी अजित पवार यांचा विवाह झाला होता. आमदार राणा पाटील यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी वैयक्तिक पातळीवर पाटील परिवाराने आणि पवार परिवाराने एकमेकांशी कौटुंबिक स्नेह कायम ठेवला होता. आमदार राणा पाटील यांचे अजित दादांसोबत विशेष नाते होते. हाच स्नेह पुढील पिढीने देखील जपला असून, आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि मेघा पाटील यांनीही पुढे अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतचे कनिष्ठ कौटुंबिक संबंध जपले आहेत. अजितदादा यांच्या निधनाचे दुःख ज्याप्रमाणे पवार कुटुंबाला आहेत तसेच दुःख पाटील कुटुंबीयांना देखील झाले आहे. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनीही अजितदादा पवार यांच्या निधनावर समाज माध्यमातून दुःख व्यक्त केले असून आज महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून अजितदादा यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
पावसानंतर दिल्ली गारठली, मात्र प्रदूषणाचा विळखा कायम; हवेची गुणवत्ता अजूनही ‘खराब’श्रेणीतच
राजधानी दिल्लीत मंगळवारी बदललेल्या हवामानामुळे जोरदार वारे आणि पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे तापमानात मोठी घट होऊन दिल्लीकरांना हुडहुडी भरली आहे. पश्चिम विक्षोभामुळे झालेल्या या पावसामुळे दिल्ली-एनसीआरच्या तापमानात 6 ते 7 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी दिल्लीत 4.2 मिमी पावसाची नोंद झाली असून नोएडा आणि रेवाडी-नारनौल परिसरात गारपीटही झाली. मात्र, या पावसामुळे हवेत गारठा वाढला […]
मोठी दुर्घटना टळली! एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग अयशस्वी, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी विमान दुर्घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे विमानाचे लँडिंग अयशस्वी झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा हे थोडक्यात बचावले आहेत. हे विमान दिल्लीहून जयपूरला जात होते. एअर इंडियाचे विमान एआय-1719 ने […]
Ajit Pawar Plane Crash –अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीमध्ये पोहोचले […]
पुरोगामी भूमिका ठामपणे घेणारे दादांची ओळख होती- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालवणारे,पुरोगामी भूमिका ठामपणे घेणारे राज्याचे एक तडफदार व्यक्तीमत्व म्हणून अजित दादा यांची ओळख होती.प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने त्यांची प्रशासनावर मजबूत पकड असायची. सामान्य जनतेसाठी भल्या सकाळी उठून कामाला सुरवात करणार नेतृत्व आज तशाच सकाळी हरवलं हे मनाला चटका लावणार आहे. एक अनुभव संपन्न नेता राज्याने गमावल्याने मोठी हानी झाली आहे. धाराशिवचे जावाई असलेल्या नेत्यांस माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करतो.
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी दादा गेले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी)-जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते,माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे.मनाला चटका लावणारी आहे.मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे.माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे.हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला.त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.
अजित पवारांच्या विमाना अपघात, VSR Aviation कंपनीची चौकशी होण्याची शक्यता
दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या विमानात अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक कर्मचारी आणि दोन वैमानिक प्रवास करत होते. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. अपघातग्रस्त Learjet 45 हे मध्यम आकाराचे व्यावसायिक जेट विमान असून त्याची निर्मिती कॅनडास्थित Bombardier Aerospace कंपनीने केली आहे. 1995 ते 2012 […]
Ajit Pawar plane crash –विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा ‘हा’फोटो ठरला अखेरचा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांचा विमानातील अखेरचा फोटो समोर आला आहे. अजित पवार हे व्हीएसआर कंपनीच्या […]
उपोषणाच्या बाराव्या दिवशी बाळराजे आवारे यांची प्रकृती बिघडली
कळंब (प्रतिनिधी)- उपोषणाच्या बाराव्या दिवशी बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती खालावली असून राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न घेतली गेल्याने लोकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हे मौजे तांदूळवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे दिनांक 16 जानेवारी पासून ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव चा नारा घेऊन आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या उपोषणाच्या संदर्भाने अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही. बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या या उपोषणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास नजीकच्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव, मराठवाडा सचिव साई पाटील, परभणीचे जिल्हाध्यक्ष विशाल कुठे, धाराशिव चे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रणित डिकले, महिला प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील तसेच हिमानी मोहोळ, तांदुळवाडीचे उपसरपंच महावीर डिकले, पुष्पक देशमुख, अमोल रायगावकर, राम किर्दक, संभाजी आघाव आदींनी दिला आहे.
विश्वविक्रमाचा प्रयत्न: रानी लक्ष्मीबाई कार्यक्रमांतर्गत 15 लाख मुलींना आत्मरक्षण प्रशिक्षण
धाराशिव (प्रतिनिधी)- 2025/2026 इतिहास घडवणाऱ्या या क्रांतिकारी पावलात, महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ रानी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील सुमारे 15 लाख मुलींना प्रशिक्षण देऊन विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे राज्यभरातील मुलींच्या सशक्तीकरण आणि सुरक्षेत महत्त्वपूर्ण वाटचाल होणार आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले, आमच्या मुलींचे सशक्तीकरण आणि सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे. या उपक्रमातून महाराष्ट्र देशासमोर आदर्श ठेवणार आहे. हा कार्यक्रम राज्यात राबवलेला आत्मरक्षण प्रशिक्षणाचा सर्वात मोठा उपक्रम असून, युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व केल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे हार्दिक आभार मानते.
जिल्हा परिषदेसाठी 31 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 53 उमेदवार रिंगणात
उमरगा (प्रतिनिधी)- महायुती व महाविकास आघाडीतील बैठका नंतरही कांही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी 90 इच्छुकापैकी 59 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 31 उमेदवार राहिले आहेत. तर पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 जणापैकी 112 जणांनी माघार घेतल्याने 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी एकुण 90 इच्छुकानी अर्ज दाखल केले होते. यापैकी 59 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर निवडणूक रिंगणात 31 उमेदवार राहिले आहेत. पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 जणांचे अर्ज मंजूर झाले होते. यापैकी 112 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सिंग सुट्टया आणि अर्ज मागे घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची विनवण्या सुरू होत्या. सकाळपासून अर्ज मागे घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
आलुर, तुरोरी व गुंजोटी गटात महायुतीत बंडखोरी
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यात ऐनवेळी झालेल्या युती व आघाडीमुळे अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे. यातच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्याचे अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आलुर गट भाजपाच्या वाटणीला गेल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षात बंडखोरी झाली. तर तुरोरी गटात गेटकेन उमेदवार दिल्याने भाजपात बंडखोरी झाली आहे. गुंजोटीतही भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. तालुक्यातील आलुर गट हा सर्वसाधारण प्रवर्गातील सुटलेला आहे. या गटात आलुर, बेळंब, वरनाळवाडी, केसरजवळगा, कोथळी, कंटेकुर व आनंदनगर या गावांचा समावेश आहे. या गटात आलुर व केसरवळगा या गणांचा समावेश होतो. आलुर गण नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी तर केसरजवळगा गण मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय समाजासाठी राखीव असल्याने या गटातून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले या महायुतीच्या उमेदवार शिवसेनेकडून उभ्या आहेत. आलुर गटातून मागील निवडणुकीत शरण पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला व पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांना उमेदवारी दिली. दुसऱ्या बाजूला आप्पासाहेब पाटील हे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांनी जिल्हा परिषद लढवण्याची इच्छा व्यक्त करुन तयारीही केली. परंतु ऐनवेळी जागा भाजपाला सुटली आणि पंचाईत झाली. यामुळे आप्पासाहेब पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. दिवसभर राजकीय नेतेमंडळींनी आप्पासाहेब पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाच्या मदन पाटलाविरोधात त्यांचेच साडूभाऊ शिवसेनेचे आप्पासाहेब पाटील यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. तुरोरी गट हा इतर मागासवर्गीय महिलासाठी राखीव आहे. या गटात तुरोरी, मुळज, आष्टा ज., दाबका, एकोंडी ज., एकोंडीवाडी, चिंचोली ज., मळगी, मळगीवाडी आदी गावांचा समावेश आहे. येथील तुरोरी पंचायत समिती सर्वसाधारण तर मुळज पंचायत समिती सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. महायुतीत तुरोरी गट भारतीय जनता पक्षाला सुटला परंतु भाजपाने बाहेरील उमेदवार दिल्याने अर्चना युवराज जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. गुंजोटी गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. या गटात गुंजोटी, गुंजोटीवाडी, जकेकुर, जकेकुरवाडी, कोरेगाव, औराद, एकुरगा, एकुरगावाडी या गावांचा समावेश आहे. येथे गुंजोटी पंचायत समिती सर्वसाधारण महिला तर जकेकुर पंचायत समिती खुली आहे. गुंजोटी गटात भारतीय जनता पक्षाचे मल्लिकार्जुन साखरे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तळागाळाशी नाळ जोडलेला लोकनेता हरपला- डॉ. प्रतापसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनाला वेदना देणारी आणि काळजाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना असून, अजितदादा आपल्यातून इतक्या लवकर निघून जातील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रभावी नेतृत्व करत होते. परखड विचार, स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणे रोखठोक मत मांडण्याची त्यांची शैली सर्वश्रुत होती. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. मात्र या कठोर बाह्य रूपामागे अतिशय निर्मळ, संवेदनशील आणि माणुसकी जपणारे मन होते. याचा अनुभव मला स्वतःला अनेक वेळा आला आहे.तळागाळातील सामान्य माणसाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. शेतकरी, कामगार, युवक, महिला यांच्यासाठी ते नेहमीच धावून जाणारे नेतृत्व होते. विकासकामे, पाणीप्रश्न, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विषयांवर त्यांचा ठाम आग्रह होता.धाराशिव जिल्ह्यावर अजितदादांचे विशेष लक्ष आणि प्रेम होते. जिल्ह्यातील विकासकामांसाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याने एक दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला आहे.अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रती संवेदना व्यक्त करत, या महान लोकनेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
कठीण प्रसंगात उभे राहण्यास शिकवणारे दादा गेले
धाराशिव (प्रतिनिधी)- आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे. ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे. लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणे, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळे त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले. मन अक्षरशः सुन्न आहे. अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटले, ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही. या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. - राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
मेहुणे म्हणून परस्पर आदराचे नाते
धाराशिव (प्रतिनिधी)- आज मन अतिशय अस्वस्थ आहे. कै. अजित पवार यांच्या निधनाच्या दुर्दैवी बातमीने अंतर्मन व्यथित झालं आहे. मेहुणे म्हणून आमचं नातं केवळ कौटुंबिक नव्हतं, तर विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदराचे होते. मंत्रिमंडळात एकत्र काम करताना त्यांच्या कार्यक्षमतेचा, ठाम निर्णय क्षमतेचा आणि राज्यासाठीच्या तळमळीचा अनुभव मी स्वतः अनेकदा प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. ईश्वर सर्वांना हे दुःख सहन करण्याचं बळ देवो ही प्रार्थना. - डॉ. पद्मसिंह पाटील माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
जिल्हा परिषदेसाठी 15 तर पंचायत समितीसाठी 28 उमेदवार रिंगणात
वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत 69 जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले तर 43 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 102 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा 27 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी पारगांव, पारा व तेरखेडा या तिन्ही जिल्हा परिषद गटातून 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. या गटामधे एकूण 45 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या बरोबरच पारगांव, सरमकुंडी, पारा, बावी, तेरखेडा व इंदापूर या सहा गणात 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. या सहा गणात एकूण 67 उमेदवार होते.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दि.01 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.त्याच अनुषंगाने 27 जानेवारी 2026 रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालक व मालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, कार्यालयात आलेले शिकाऊ व पक्के लायसन उमेदवार तसेच सर्व नागरिकांसाठी अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी उपस्थित उमेदवार व नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.विक्रम राठोड, डॉ.शिवाजी फुलारे व डॉ.अर्चना गुट्टे यांनी अवयवदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनार, पूनम पोळ, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले, महेबूब मुसा सय्यद, वाघ, अधिक्षक डी.के.लोंढे, नरसिंह कुलकर्णी, ए.आर.राऊत, बालाजी वाघमारे, रमेश कऱ्हाळे, संध्या राणी गवाड, करिष्मा लोहार तसेच शिपाई दत्तू सरपे, एस.जी.काळे आदी उपस्थित होते.क ार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले यांनी आभार प्रदर्शन केले.

23 C