नायजेरियातील शाळेतून ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण, चार दिवसात दुसरी घटना
नायजेरियाच्या नायजर राज्यातील सेंट मेरी स्कूलवर काही बंदूकधारींनी हल्ला करून ३०३ मुले आणि १२ शिक्षकांचे अपहरण केले, असे वृत्त ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने शनिवारी दिले. अद्याप कोणत्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. चार दिवसांपूर्वी केब्बी राज्यातील मागा शहरातही २५ शाळकरी मुलांचे असेच अपहरण करण्यात आले होते. नायजेरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नोआ रिबाडू अमेरिकेच्या दौऱ्यावर […]
ऐका, अजितदादांचा नवा इतिहास…यशवंतरावांनी हिंदवी स्वराज स्थापले! परतूरच्या जाहीर सभेत दादांची आदळआपट
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठ्यांचा इतिहासच बदलला! हिंदवी स्वराज्याची स्थापना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली, असा नवाच इतिहास त्यांनी सांगितला. आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच अजितदादांनी लगेच माफी मागून सारवासारवही केली. परतूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी आज जाहीर सभा घेतली. सभेसाठी व्यासपीठावर आल्यापासूनच अजितदादांचा नूर […]
SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला संताप
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याच्या (BLO) आत्महत्येने राजकीय वातावरण तापले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर शब्दांत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. नादियातील कृष्णनगर येथील शिक्षिका असलेल्या रिंकू तरफदार या बीएलओने गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येसाठी निवडणूक आयोगाला (ECI) जबाबदार धरले आहे. याचबद्दल X वर एक […]
धर्माबाद नगर परिषद निवडणुकीत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव वैभव कुलकर्णी हे सरकारी नोकरीत असतानाही आपल्या आईच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यांच्या आई अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. वैभव कुलकर्णी यांनी उमरी येथे अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. ते उघडपणे प्रचार करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्याला प्रचारासाठी परवानगी आवश्यक असते. […]
विकास आणि निष्ठा हे शब्द राजकारण्यांनी बदनाम केले –डॉ.राजन गवस
विकास, निष्ठा हे मराठी शब्द राजकारण्यांनी बदनाम करून टाकले आहेत. विकास आणि निष्ठा हे शब्द जेव्हा राजकारणी उच्चारतात तेव्हा अनेकांना हसू फुटतं. याचा परिणाम मराठी शाळेवर झाला आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. प्रयोगशील शिक्षक आहेत पण अधिकारी भ्रष्ट आहेत, अशा शब्दात रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आपल्या भावना व्यक्त […]
श्रीनगरमधील बटमालूमध्ये एसआयएचा छापा, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक
जम्मू आणि कश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्था (SIA) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तुफैल अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे, तो पुलवामा येथील इलेक्ट्रिशियन आहे. त्याला एका औद्योगिक क्षेत्रातून चौकशीसाठी नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे तुफैलचा कटात सहभाग असल्याचे […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धाराशिव विमानतळ येथे आगमन व स्वागत
धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी 1 वाजता धाराशिव येथील विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे आगमन प्रसंगी स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर व पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचेही आगमन झाले. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र चि. मल्हार व चि. सौ. का. साक्षी यांच्या विवाह प्रसंगी उभयतांना शुभेच्छा दिल्या. विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन.व्हि.भंडे,कार्यकारी अभियंता केत उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, भाजप आणि निवडणूक आयोग आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि समाजवादी पक्षाची मते कमी करण्यासाठी एकत्रितपणे रणनीती आखत आहेत. अखिलेश यादव म्हणाले आहेत की, त्यांच्या पक्षाला अशी माहिती मिळाली आहे की, २०२४ मध्ये […]
तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे (पश्चिम विभाग) खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्या. दिनेश कुमार सिंग यांनी आज सकाळी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरत कुलधर्म-कुलाचार पूर्ण केले. न्या. दिनेश कुमार सिंग हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून न्यायक्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी काही काळ प्रयागराज येथील औद्योगिक न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. न्यायव्यवस्थेतील दीर्घ सेवेनंतर विविध प्रशासकीय व न्यायिक जबाबदाऱ्या त्यांनी उल्लेखनीय रीतीने पार पाडल्या आहेत. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी त्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत सपत्नीक सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.
आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा
भूम (प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल, भूम येथे आजी-आजोबा दिन आनंदमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आजी-आजोबा हे नातवाचे पहिले मित्र असतात. आई-वडिलांसमोर न व्यक्त होणारे नातू आजी आजोबा जवळ मनमुराद मोकळे होतात. तत्पूर्वी आजी आजोबानी आपल्या जुन्या आठवणी जागवून सर्वंना भावनिक केलेफ यावेळी आजी आजोबा यांना विरंगुळा व्हावा व रोजच्या धकाधकीतून निवांत पणा मिळावा यासाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले यात आजी गटातून श्रीमती कमल देवरे तर आजोबा गटातुन बबन भोळे हे विजयी झाले. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमात मुलांनी आपल्या आजी-आजोबांसोबत वर्गात बसून रंग भरन केल. यावेळी उपस्थित आजी-आजोबांनी शाळेचे वातावरण, मुलांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या प्रेमळ सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा सुपेकर यांनी तर सूत्रसंचालन दिपीका टकले यांनी केले.शेवटी शाळेच्या वतीने भाग्यश्री डांगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.
दिल्लीतील धरणे आंदोलनासाठी अ. भा. प्रा. शिक्षक संघाचे प्रतिनिधी रवाना
टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी दिल्ली जंतर-मंतरवर आंदोलन ओटवणे| प्रतिनिधी टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन असुन यासाठी देशभरातून शिक्षक सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर २०२५ रोजी [...]
Photo –भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर व त्यांची पत्नी ट्विंकल भोईर यांनी आज शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची 'हेल्पलाइन 'सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिल्यानंतर तेथील उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थ्यांची संवाद साधताना बोलत होते. राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या पूरवित असते. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी 'मानव विकास बसेस ' उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या बसेस विशेषत: शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात . अशा सक्त सूचना देण्यात आलेले असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी याबाबत अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या . अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या . तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. तथापि, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. लवकरच विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू होणार शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल , तसेच 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतील जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते . विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल! तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.
धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस पार पडला असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 7 अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले. आता नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात उरले आहेत. नगरसेवक पदासाठीही माघारीची मोठी लाट पाहायला मिळाली. एकूण 55 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 201 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदाची लढत सरळ होत असून 6 उमेदवारांत मुकाबला होणार आहे. यामधे काकडे नेहा राहुल, पुरेशी परविन खलील, गुरव संगीता सोमनाथ, मंजुषा विशाल साखरे, मोमीन नाझिया इसुफ, वाघमारे सुरेखा नामदेव यांच्यात लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी 201 उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार आहेत. माघारीमुळे काही प्रभागांतील राजकीय गणिते बदलली असून प्रचाराची हवा आता अधिक जोर धरताना दिसत आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पहिल्या शहर व ग्रामीण शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या जिल्ह्यातील सर्व नूतन कार्यकारणीची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे.याच अनुषंगाने धाराशिव शहरात व धाराशिव तालुक्यात समितीच्या शाखा निर्माण करण्यासाठी जनसामांन्यातून मागणी येत होती. त्यानुसार धाराशिव शहरातील पहिली शाखा धारासुर मर्दिनी देवी मंदिर या भागात पहिल्या शाखेचे उद्घाटन समितीचे नूतन अध्यक्ष श्री अमोल सिरसट व शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.नूतन शाखेच्या शाखाध्यक्षपदी श्री पवन राऊत तर उपाध्यक्षपदी श्री मनोज घवांडे व श्री उत्तम जाधव तर सचिव श्री दीपक कदम कार्याध्यक्ष श्री गणेश सुरवसे कोषाध्यक्ष श्री आनंद देवकर प्रसिद्धीप्रमुख श्री एजाज शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. धारासुर मर्दिनी देवीला पुष्पांजली वाहून फटाक्यांच्या आतषबाजीत व घोषणांनी समितीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.ग्रामीण भागातील समितीची पहिली शाखा मौजे राघूचीवाडी येथे समितीचे अध्यक्ष श्री अमोल सिरसट व तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे व विभागप्रमुख श्री सुनीलराव मिसाळ यांचे हस्ते करण्यात आले. या शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून श्री संकेत नलावडे यांची तर उपाध्यक्ष श्री बबलू यमगर व श्री जितेंद्र नलावडे तर सचिव श्री बालाजी चौरे कार्याध्यक्ष श्री खंडू गायकवाड कोषाध्यक्ष श्री तात्यासाहेब करवर प्रसिद्धी प्रमुख श्री शंकर मोरे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हलग्यांच्या निनादात व प्रचंड घोषणाबाजी देत शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत समितीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री अमोल सिरसट उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव सचिव श्री आकाश भोसले कार्याध्यक्ष श्री मनोज मोरे तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे शहर उपाध्यक्ष श्री भैरवनाथ रणखांब रिक्षा समिती अध्यक्ष श्री तुशाल सूर्यवंशी श्री धर्मराज सूर्यवंशी श्री हनुमंत तांबे सर कुणाल जानराव अमीन दस्तगीर हमीद पटेल मयूर वाळवे दीपक कदम संदीप नलावडे श्रीराम पंडित कान्हा माळी शंकर विधाते अनिल कदम पिंटू सरडे गोकुळ पवार अमर मस्के गोविंद यादव गणेश कदम बाबा शेख नामदेव भुसनर अक्षय नलावडे बालाजी गायकवाड महमूद शेख दिलदार पठाण यासह शेकडो समितीचे मावळे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा युवा महोत्सव उत्साहात पार; कौशल्य,कला आणि नवोपक्रमाला मिळाला मंच
धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2025 _26 चा जिल्हा युवा महोत्सव पुष्पक मंगल कार्यालय,धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागांतर्गत समूह लोकगीत,समूह लोकनृत्य,चित्रकला,कथा लेखन, कविता लेखन,वक्तृत्व तसेच नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) अशा विविध कलेतील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून प्रा. मिलींद माने, प्रा.डॉ.उमेश सलगर, डॉ.उषा कांबळे, सतिश ओव्हाळ, शशिकांत माने, डॉ. विनोदकुमार वायचळ, प्रा. डॉ. वैभव आगळे, प्रा. सुर्यकांत कापसे, भोसले, गांगुर्डे, डॉ. होळंबे, डॉ. ननवरे, डी.जी.वाघमारे, समीर माने, डी.सी.पौळ, व्ही.पी. नागापूरे व श्री.एम.ए.चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा- प्रथम जान्हवी केव्हीजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर).द्वितीय आज्ञाशा पंडा.तृतीय समीर मजनू शेख (तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव). कथा लेखन- प्रथम कोळगे स्वरुपा अशोक (तेरणा अभियंत्रीकी महाविद्यालय).द्वितीय उंबरे किरण सूर्यकांत (श्रीपतराव भोसले मावउमावि,धाराशिव).तृतीय आदमिले वैष्णवी धर्मराज (व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय). कविता लेखन- प्रथम सूर्यवंशी वैभवी तानाजी (व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय),द्वितीय पडवळ वैष्णवी अमरसिंह (श्रीपतराव भोसले मावउमावि).तृतीय वाघमारे वैष्णवी युवराज (छ.संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय,बेंबळी). चित्रकला- प्रथम गुरु रवि देशमुख (शरद पवार हायस्कूल,धाराशिव). द्वितीय जगदीश बसवराज सुतार (तेरणा अभियंत्रिकी महाविद्यालय). तृतीय गौरी हनुमंत सुतार (तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय). समूह स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहे. समूह लोकनृत्य- प्रथम के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसी, धाराशिव,द्वितीय श्री तुळजाभवानी सैनिकी मावउमावि,तुळजापूर. समूह लोकगीत- प्रथम व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव.द्वितीय के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसी,तृतीय व्होकेशनल महाविद्यालय,धाराशिव. नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) प्रथम श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, द्वितीय शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालय,धाराशिव, तृतीय तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव,तृतीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालये,शाळा व युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. युवा कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि सर्जनशीलतेला चालना देणारा हा महोत्सव अतिशय यशस्वीपणे पार पडला.
धाराशिवमध्ये ‘एकता पदयात्रा'उत्साहात संपन्न : राष्ट्रपुरुष सरदार पटेलांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- सरदार 150 एकता अभियानाअंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा 21 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हिरवा झेंडा दाखवत पदयात्रेला सुरुवात केली. जिल्हा प्रशासन,मेरा युवा भारत कार्यालय उस्मानाबाद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदयात्रा सकाळी 10 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सुरू झाली.जिल्हाधिकारी कार्यालय,पोलिस अधीक्षक कार्यालय,कोहिनूर हॉटेल, समतानगर,सह्याद्री चौक,महात्मा फुले चौक मार्गाने जिल्हा स्टेडियम येथे सांगता झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार पटेलांच्या कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहिरी पथकाने सादर केलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाड्याने वातावरण भारावून गेले,तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,शिक्षणाधिकारी दत्तात्रय देवगुडे,शिक्षण विस्तार अधिकारी दतप्रसाद जंगम,तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी,क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते. या पदयात्रेत मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा प्रशासन,क्रीडा अधिकारी कार्यालय, विविधशाळामहाविद्यालये,स्थानिक युवा संघटना,एनएसएसएनसीसी स्वयंसेवक, भारत स्काऊट-गाईड तसेच पोलिस विभागाचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 हे वर्ष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे केले जात आहे.त्यानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये युनिटी पदयात्रा आयोजित करण्यात येत आहेत.त्याच अनुषंगाने ही पदयात्रा यशस्वीपणे पार पडली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी वैभव लांडगे,रवि सुरवसे,प्रशांत मते,किशोर भोकरे,सुरेश कळमकर आणि वेंकटेश दंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
धाराशिव (प्रतिनिधी)- दि.26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन मतदार जनजागरण समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. रॅलीत संविधान उद्देशिका शिल्प असलेले आकर्षक असा देखावा असुन शाळा नर्सिंग कॉलेज व वारकरी संप्रदाय शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग असुन, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीच्या मार्गावरील ठिकठिकाणी नागरिक,सामाजिक संस्था यांच्या कडुन संविधान रॅलीचे स्वागत केले जाणार आहे, बार्शी नाका माता जिजाऊ चौक येथुन रॅलीची सुरुवात असुन श्रीपतराव भोसले हायस्कूल,जॉन मलेलु मेमोरियल चर्च,आर्य समाज चौक,अंबाला हॉटेल मार्ग त्रिशरण चौक ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव समोरुन मारवाडी गल्ली,काळा मारुती मंदिर चौक, ताजमहाल टॉकीज रोड माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा,संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत रॅलीचा समारोप करण्यात येईल.या रॅलीच्या माध्यमातुन संविधान जनजागृती,मतदान जनजागृती,कायदेविषयक जनजागृतीचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे,मतदार जनजागरण समिती धाराशिव.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव.जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव.व जिल्हा प्रशासन विभाग धाराशिव सह इतरांचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय सण उत्सवातील संविधान जनजागृती रॅलीत सहभागी होऊन भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करावे असे आवाहन मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
चिडवल्याच्या कारणावरून एकाचा खून
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील वाघोली शिवारातील अजमेरा स्टोन क्रेशर येथे मजुरांच्या राहत्या शेडमध्ये झालेल्या हल्ल्यात एका मजुराचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामधे इतर दोघे जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग (रा. उपर हाटीया पिठ्याटोली, ता. जगन्नाथपुर, जि. रांची, झारखंड; ह.मु. अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली, जि. धाराशिव) यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता मजुरांच्या राहत्या पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली. लैंगिकतेवरून चिडविल्याच्या कारणावरून आरोपीने सुनिल गांगु कुजुर (वय 31 वर्षे) याच्या डोक्यात चौकोनी लोखंडी पाईपने वार करत त्याचा जागीच खून केला. तसेच धनेश खासा मुंडा याच्यावरही त्याने त्याच पाईपाने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी मागन करोम लोहरा (वय 67 वर्षे) हेसुद्धा जखमी झाले. घटनेनंतर फिर्यादी मागन लोहरा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 103(1), 109(1) व 118(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाघोलीतील मजुरांच्या वसाहतीत घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंड्यात नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत
परंडा (प्रतिनिधी)- दि.21 परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दि.21 रोजी एक नगराध्य पदासाठी 3 उमेदवार पैकी एकाने माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. तर 10 प्रभाग साठी 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी एकूण 43 उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे चित्र सपष्ट झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्य जाकिर सौदागर व जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने एक आजी व दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागरणार आहे. प्रभाग क्रमांक 1 अ मधून बनसोडे सुवर्णा तानाजी बनसोडे, मिनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे , रत्नमाला राहूल बनसोडे, आदिका सुभाष पालके.प्रभाग क्र.1 ब मधून विधाते श्रीकृष्ण कुमार व घाडगे संजय विजय. प्रभाग क्र. 2 अ मधून पठाण रुक्सानाबेगम रहिमतुल्ला, प्रभाग क्र.2 ब मधून कुरेशी इस्माईल अब्दूल सत्तार कुरेशी व सरफराज महमद शरीफ, प्रभाग क्र. 3 अ मधून बासले परवीन मन्नान व पठाण गुलजार शब्बीरखाँ , 3 ब मधून सद्दीवाल मदनसिंह व दिक्षित मदन मिलींद ,प्रभाग 4 अ मधून पठाण महिनाबी खाजा व पठाण जैतुनबी गौसखाँ ,4 ब मधून ठाकूर समरजितसिंह सुजितसिंह, कसबे नवनाथ एकनाथ व सौदागर अजीम महमद जाकेर, प्रभाग 5 अ मधून जाधव नंदा श्रीमंत व तांबोळी शमीम रशिद, 5 ब मधून मुजावर रईसोद्दीन व पठाण सत्तार गुलाबखाँ , प्रभाग 6 अ मधून शिंदे जयंत श्रीरंग व शिंदे अनिल महादेव, 6 ब मधून आलबत्ते वैशाली सोमनाथ व मेहेर मनिषा सोमनाथ, प्रभाग 7 अ मधून मुजावर अब्बास उमर व शेख इरफान जब्बार, 7 ब मधून दहेलूस रुखियाबी जकेरिया व जगताप कमल अरुण, प्रभाग 8 अ मधून चौधरी गुले इरम नुरोद्दीन एम.युनुस व सौदागर महमद साबेर महमद इस्माईल, 8 ब मधून जाधव शोभा नवनाथ व मुजावर अमिनाबी अब्रार , प्रभाग 9 अ मधून पठाण हसिना व जिनेरी मन्नाबी मतीन, 9 ब मधून गोरे जमाकांत शंकर व गायकवाड चंद्रकांत नाना , प्रभाग 10 अ मधून शिंदे वनमाला रामा व सोनटक्के ज्योती धनंजय, 10 ब मधून परदेशी रमेशसिंह गोकुळसिंह व सौदागर मोहसिन जाकिर उसे उमेदवार निवणूकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकणी तिरंगी अशी लढत होणार आहे.शिवसेना शिंदे गट विरुद्ध जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असून या निवडणूकीच्या रणधुमाळी मध्ये कोण बाजी मारणार याकडे परंडा शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.
उमरगा नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 90 उमेदवार रिंगणात
उमरगा (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व चार अपक्ष अशा आठ जणांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतल्याने भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेनेचे किरण गायकवाड, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार व वंचित बहुजण आघाडीचे प्रभाकर मजगे यांच्यात सामना रंगणार आहे. अध्यक्षपदावरुन आघाडी तोडणा-या कॉग्रेसने शिवसेना (शिंदे) ला अध्यक्षपद देत शर्यतीतून माघार घेतली आहे. नगरसेवक पदासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमरगा नगरपालिका निवडणुकीत पहिल्या दिवसापासून धाकधूक, शंका, गुप्त बैठका, राजकीय डावपेच टाकले जात होते. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवर 'सगळं आलबेल'नसल्याचे सुरुवातीपासून दिसत होतं. महाविकास आघाडीच्या एक दोन बैठकातच सुर जुळले नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी गुरुवारी रात्रीपर्यंत बैठकांचे सत्र सुरुच होते. परंतु नगराध्यक्ष पदावरुन घोडे आडल्याने गुरुवारी रात्री महायुती दुभंगली. अखेर शहरात नविन राजकीय समीकरणाने जुळले. यामध्ये भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली तर शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतले आहे. शिवसेना (ठाकरे) ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व वंचित बहुजण आघाडीने मोजक्या जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. गुरुवारी अपक्ष उमेदवार नितीन होळे यांनी तर शुक्रवारी अमोल मोरे (काँग्रेस), विक्रम बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस (अप), संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शाहुराज माने, शिवशंकर दंडगुले, रफिक अत्तार, शांतप्पा वरकले (सर्व अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेना (शिंदे)चे किरण गायकवाड, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार व प्रभाकर मजगे (वंचित बहुजण आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या 25 प्रभागात एकुण 127 अर्ज वैध ठरले होते यापैकी 37 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 12 प्रभागात एकुण 90 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोरे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु राजकीय तडजोडीत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा उमेदवार नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भाजपचे नेते माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष संभाजी सलगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. आपणास नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाही मिळाली. त्याप्रमाणे प्रभागामध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी मिळेल असे असताना निष्ठावंतांना ठावलून इतरांना उमेदवारी दिली. अशी टिका संभाजी सलगर यांनी भाजपवर केली. जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी संभाजी सलगर यांना पक्षात सन्मानाचे स्थान मिळेल असा विश्वास दिला. त्यांच्या राजकीय अनुभवाचा निश्चित आम्हाला फायदा होणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. सलगर यांच्या सोबत अजय नाईकवाडी, अविनाश शाबादे, महेश शिंदे, महाडिक, राहुल सलगर, देशमाने नंदकुमार, काकाजी अंकुश, राजेंद्र शिंदे, रामचंद्र कसबे, महेश नरवडे, विवेक मुळे, ऋषिकेश कपाळे, पोपट कासार, आर्यन सलगर, गौरव सलगर, भोलेनाथ मधुरकर, नागेश मधुरकर, नवनाथ शेरकर, लखन शेरकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवीण कोकाटे, सोमनाथ गुरव, संग्राम देशमुख, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, तानाजी जाधवर, पंकज पाटील, अभिजित देशमुख, हनुमंत देवकते, सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे, राज निकम, परवेज काझी, मनोज पडवळ, महेश लिमये, पंकज स्वामी, गफूर शेख आदी उपस्थित होते.
भूम नगर परिषद निवडणुकीत अर्ज परत घेण्याच्या दिवशी मोठी धावपळ
भूम (प्रतिनिधी)- नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम दिवस खऱ्या अर्थाने राजकीय नाट्यमयतेने भरलेला ठरला. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, कागदपत्र छाननी आणि अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतर एकूण 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एक अर्ज हा डमी असल्याने तोही बाद करण्यात आला. परिणामी, आता केवळ 3 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत अधिकृतपणे रिंगणात राहिले असून तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी मात्र खरी लढत ही आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या संयोगिता ताई गाढवे व जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सत्वशीला ताई थोरात यांच्यात होणार आहे. परंतु यात तिसरा अर्ज जो राहिला आहे तो प्रगती ताई गाढवे यांचा असल्याने ही एक राजकीय खेळी खेळण्यासाठी ठेवला असल्याचे राजकीय जानकर यांच्यातून बोलले जाऊ लागले आहे. परंतु याचा खरा फायदा होईल की नाही हे निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. नगरसेवक पदाच्या उमेदवारीत देखील मोठ्या चढउतारांनी वातावरण रंगतदार झाले. सुरुवातीला 20 प्रभागांसाठी तब्बल 84 अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या छाननीत 3 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आणि 81 अर्ज वैध ठरले. यात ही 3 अर्ज डबल उमेदवारांनी भरले होते म्हणून ते ही बाद झाल्याने ही 78 अर्ज राहिले होते. मात्र आज माघारीच्या अंतिम टप्प्यात 36 उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम आकडा 42 स्पर्धकांवर येऊन थांबला आहे. यात 20 उमेदवार हे आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी तर 20 उमेदवार ही जनशक्ती नगर विकास आघाडी नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात राहणार आहेत. तर 2 उमेदवार हे अपक्ष म्हणून नगर सेवक पदासाठी उभे राहणार आहेत. म्हणजेच, प्रभागनिहाय स्पर्धा आता अधिक तीव्र, सुस्पष्ट आणि थेट झाली आहे. या माघारीमुळे अनेक प्रभागांतील समीकरणे अक्षरशः एकाच दिवसात पालटली आहेत. काही प्रभागात सरळ सामना तर काही ठिकाणी तिरंगी- लढतीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अर्ज माघारी घेण्यासाठी लावलेल्या उमेदवारांची नाराजी हे ही या निवडणुकीत एक डोके दुखी होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे नेते मंडळी यांना आता पहिल्यांदा खुश करून पुढील रणनीती ठरवावी लागणार आहे. दरम्यान, आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवार यांनी अर्ज माघारीनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणांचे दोनही आघाडीच्या वतीने बारकाईने विश्लेषण सुरू केले असून, रणनीतीत त्वरित फेरबदल होताना दिसत आहेत.
Kolhapur News: कळंबा कात्यानीतील फार्महाउसला विकेंडसाठी पसंती
कोल्हापूरकरांना मिळतोय हाकेच्या अंतरावर निसर्गोत्सवाचा अनुभव: सेकंड होम डेस्टिनेशन सागर पाटील, कळंबा: कोल्हापूर शहराचा गजबजाट, वाहतूक आणि प्रदूषणापासून थोडी उसंत मिळवण्यासाठी आता कोल्हापूरकरांना लांबच्या पर्यटनस्थळी धावण्याची गरज उरलेली नाही. शहरालगत असलेल्या कळंबा–कात्यायनी परिसराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत मोठ्या वेगाने बदलला आहे. एकेकाळी शेतकऱ्यांच्या [...]
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
चीनमधील अनोख्या खाण्यापिण्याच्या सवयी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा चीन चर्चेत आले आहे ते अनोख्या कॉफीमुळे. बीजिंगच्या एका म्युझिअममध्ये झुरळ आणि मीलवर्म पावडरपासून बनलेली कॉकरोच कॉफी तरुणांना आकर्षित करत आहे. त्यामुळे चीनमधील ही अनोखी कॉफी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ही अनोखी कॉफी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही कॉफी झुरळ आणि सुख्या मीलवर्म […]
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही –संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. X वर एक पोस्ट करत संजय राऊत म्हणाले आहेत की, “दिल्लीतून आदेश आल्याशिवाय म न से ला […]
आचरा येथे 28 नोव्हेंबरला राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा
आदर्श आचरा व्यापारी संघटनेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन आचरा । प्रतिनिधी आचरा येथील आदर्श व्यापारी संघटना आचरातर्फे 28 नोव्हेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य खुली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार असून दुपारी १२ वाजता आरती, १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद. संध्याकाळी [...]
Ratnagiri News –सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर
यंदा अतिवृष्टीमुळे सुपारी पिकालाही मोठा फटका बसला आहे. फळ परिपक्व होण्याआधीच फळगळती सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र त्यात सुपारी पिकाचा समावेश नसल्याने सुपारी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धार्मिक विधींपासून ते माऊथ फ्रेशनर बनवण्यासाठी सुपारीचा वापर केला जातो. सुपारी फळाची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात आहे. अशा या […]
कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समितीकडून सर्वेक्षण
वार्ताहर/कुडाळ “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत “अ” वर्ग बसस्थानक यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. बसस्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी समितीमार्फत करण्यात आली. कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक यांनी समितीचे स्वागत केले.एसटी महामंडळाच्या प्रादेशिक नियंत्रण समिती क्र. 6 [...]
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेने वापरात नसलेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या भूखंडाचा लिलाव करून भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आता वरळीतील महापालिकेच्या क्रीडा भवनासाठीची जागाही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच असल्याचा जबरदस्त टोला आदित्य ठाकरे […]
लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणे बंधनकारक; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला असेल तरीही खरेदीदाराला सोसायटीची मागील थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही. SARFAESI कायद्यांतर्गत खरेदीदार अपवाद असू शकत नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. सोसायटीची कायदेशीर थकबाकी भरणे ही सदस्यत्व मागणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे, असा निर्णय देत न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल खंडपीठाने दहिसरमधील एका गृहनिर्माण सोसायटीला दिलासा दिला आहे. […]
अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल जागीच ठार
सातार्डा – सातार्डा – वेंगुर्ले सागरी मार्गांवर अज्ञात अवजड वाहनाने मोकाट फिरणाऱ्या बैलाला धडक दिल्याने बैल जागीच ठार झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सातार्डा शाखेसमोरच शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला.अवजड वाहनाने ठोकरल्याने बैलाचा चेंदामेंदा झाला होता.बैल रस्त्यावर मृत्यूमुखी पडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मध्यरात्री ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, दत्ताराम सातार्डेकर, गणेश सातार्डेकर, उल्हास कांबळी,पंकज मेस्त्री, [...]
वैभव नाईक यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता
राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर सा.बांधकाम कार्यालयातील तोडफोड प्रकरण कुडाळ – मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मेढा – मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयाचा दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून व अन्य साहित्याचे नुकसान केल्याच्या आरोपातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव विजय नाईक [...]
हिंदुस्थानातील 72 टक्के सहलींचे महिलांकडून ‘प्लॅनिंग’; राजस्थान, केरळ, गोव्याला जास्त पसंती
मुलांच्या शाळेच्या सुट्टीचे वेळापत्रक ठरले की लगेच सुट्टीत फिरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कुणी देशात फिरायचे नियोजन करतो, तर काहीजण थेट परदेशवारीचा बेत आखतात. अनेक कुटुंबियांची सुट्टीत सहल ठरलेली आहे. अशा सुट्टीतील सहलींचे प्लॅनिंग करण्यात महिला आघाडीवर असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. हिंदुस्थानातील तब्बल 72 टक्के सहलींचे नियोजन महिलांकडून केले जात असल्याचा निष्कर्ष […]
अजित पवारांनी पोलिसांना खुर्च्या उचलायला लावल्या, अंबादास दानवे यांनी फटकारले
जालना येथे एका प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दम देत त्यांच्या उमेदवारांसाठी खुर्च्या लावायला सांगितल्या. त्यांच्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. जनतेला गृहीत धरणारे अजित दादा आता पोलिसांनाही आपले कार्यकर्ते […]
जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
जालन्यातील भवानीनगरात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज 22 नोव्हेंबर रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सागर भगवान आगलावे (18) जय भवानीनगर,जुना जालना असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी […]
माजगावात गव्यांच्या कळपाची रिक्षाला धडक
सहा आसनी रिक्षाचे मोठे नुकसान ; सुदैवाने प्रवासी बचावले सावंतवाडी सावंतवाडी – शिरोडा राज्य मार्गावरील माजगाव दत्त मंदीर नजीक कै. भाईसाहेब सावंत समाधी स्थळ जवळ शनिवारी सकाळी दिवसाढवळ्या गवारेड्यांचा कळपाची तळवडे ते सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या सहा आसनी रिक्षाला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानाने रिक्षा रस्त्याच्या साईड पट्टीवर जाऊन कलंडून थांबल्याने अनर्थ घडला . [...]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात दुचाकीला धडक; चार जण गंभीर जखमी
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धूनकवड फाटा परिसरात अपघात झाला. ताफा मार्गक्रमण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने नवरा-बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा जबरदस्त होता की, दुचाकीचा चुराडा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोघांची […]
Mumbai News –धारावीत रेल्वे फाटकाजवळ भीषण आग, माहिम-वांद्रे दरम्यान लोकल विस्कळीत
धारावीतील 60 फूट रोडवरील सेनापती बापट रोडजवळील माहिम रेल्वे फाटकाजवळील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीमुळे माहिम आणि वांद्रे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. धारावीत रुळाजवळ आग लागल्याने गाड्या थांबवण्यात आल्या. यामुळे वांद्रे आणि माहिम दरम्यान लोकल विस्कळीत झाली आहे. […]
दिवाळखोरीद्वारे पोटगीची जबाबदारी टाळू शकत नाही, हायकोर्टाकडून विभक्त पत्नीला दिलासा
पत्नीचा सांभाळ करण्याची पतीची जबाबदारी वैवाहिक संबंध आणि कायद्याच्या धोरणातून येते. दिवाळीखोरीद्वारे पती पोटगीची जबाबदारी टाळू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने पत्नीची देखभालीची जबाबदारी झटकणाऱ्या पतीला दणका दिला आहे. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. पत्नीच्या देखभालीची रक्कम ही पतीच्या नैतिक आणि वैयक्तिक कर्तव्यातून येते. ती रक्कम दिवाळखोरी कायद्यानुसार रद्द करता येणारे […]
देवदर्शनासाठी जात असताना सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात, 5 भाविक जागीच ठार; 7 ते 8 जण जखमी
देवदर्शनासाठी जात असतानाच गाडीचा टायर फुटल्याने अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. अन्य 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर शनिवारी दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व भाविक सोलापूरमधील उळे […]
वेंगुर्लेत ठाकरे शिवसेनेची घरोघरी प्रचारात आघाडी
वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम व १७ नगरसेवक उमेदवार संपूर्ण शहरात प्रभागवार नियोजन पद्धतीने प्रचार मोहिम राबवित आहेत. या प्रचारात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभागातील स्थानिक मतदार नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रचाराचा धडाका पाहता ठाकरे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.ठाकरे शिवसेनेतर्फे प्रत्येक [...]
विठाबाईच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरने वाढवले 15 किलो वजन, लावणी करताना पाय झाला फ्रॅक्चर
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या पाय फ्रॅक्चर झाल्याने शूटींगमधून ब्रेक घेऊन घरी आराम करत आहे. विठा या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लावणी करत असताना तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. श्रद्धाच्या आरामासाठी 15 दिवस या चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारीत लक्ष्मण उतेकर यांच्या विठा या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य […]
दिल्ली पोलिसांनी पाकड्यांचा डाव उधळला; ड्रोनद्वारे पाठवलेल्या शस्त्रांचा साठा पकडला, चौघांना अटक
हिंदुस्थानमध्ये दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाळ केला असून ड्रोनद्वारे तस्करी करण्यात आलेल्या हत्यारांचा साठा जप्त केला आहे. या तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी अटकही केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे. ड्रोनचा वापर करून ही हत्यारे पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात […]
अचानक रस्ता बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा
उद्यमबागरोडवररात्रीउशिरापर्यंतप्रचंडवाहतूककोंडी: अधिकारी-कंत्राटदाराच्यामनमानीकारभाराविरोधातसंताप बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक शुक्रवारी सकाळपासून उद्यमबाग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खानापूर रस्त्यावर उद्यमबाग ओलांडण्यासाठी तब्बल तासभराचा कालावधी लागत होता. रात्री उशिरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी अधिकारी, तसेच कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. मागील 13 दिवसांपासून तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम [...]
सीमासत्याग्रही रामा शिंदोळकर यांचे निधन
बेळगाव : सीमासत्याग्रही व कोनवाळ गल्ली येथील पंच रामा हुवाप्पा शिंदोळकर (वय 86) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री 9 वा. निधन झाले. सीमाप्रश्नासाठीच्या लढ्यात ते नेहमी स्वत:ला झोकून द्यायचे. प्रत्येक लढ्यात सहभागी व्हायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, दोन कन्या, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. शनिवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी [...]
बेळगाव पोस्ट विभागाकडून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सोय
पेन्शनधारकांनाघरपोचसेवेचीसुविधा बेळगाव : पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयात दाखला द्यावा लागतो. परंतु, बऱ्याचशा पेन्शनधारकांचे वय अधिक असल्याने त्यांना हा दाखला मिळविण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी बेळगाव पोस्ट विभागाने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या सेवेचा अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांनी लाभ घेतला आहे. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान डिजिटल [...]
बिम्समध्येमहिलेनेचौकशीकेल्यानेखळबळ: यापूर्वीच्याचोरीप्रकरणांचाहीतपासनाहीच बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून यापूर्वी झालेल्या अर्भकांच्या चोरी प्रकरणांचा आजतागायत तपास लागला नाही. गुरुवारी याच विभागात एका महिलेने अर्भकांच्या विक्रीसंबंधी चौकशी केल्याने खळबळ माजली आहे. प्रसूती विभागात आलेल्या एका महिलेने ‘कोणी तरी अर्भक विक्री करणार का?’ अशी चौकशी केल्याची माहिती मिळाली असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. काही [...]
कोकटनूर यल्लम्मा यात्रेत स्वच्छतेचे गांभीर्याने पालन करा
जिल्हाधिकाऱ्यांचीआरोग्याधिकाऱ्यांनासूचना: संसर्गजन्यरोगांचाप्रतिबंधकरा,कायदा-सुव्यवस्था राखा बेळगाव : कोकटनूर, ता. अथणी येथील प्रसिद्ध श्री यल्लम्मा देवीची यात्रा 15 ते 21 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यात्रेच्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यासह विविध राज्यातील लाखो भाविक कोकटनूरला येतात. या काळात संसर्गजन्य रोगराईचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी यासंबंधी एक आदेश [...]
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा काल (21 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सत्ताधाऱ्यांनी दडपशाही करत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी […]
सरकारी शाळांनी समाजाभिमुख बनावे
शिक्षणविभागाचीसूचना: समाजमाध्यमांवरउपक्रमांचीमाहितीद्यावी बेळगाव : खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी सरकारी शाळांनीही आपले सोशल मीडिया अकाऊंट काढून शाळेमध्ये होणारे कार्यक्रम, उपक्रम यांची माहिती द्यावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 2026-27 या आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश वाढविण्यासाठी आतापासूनच शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगी शाळा अधिकाधिक जाहिरातबाजी करीत असतात. शाळेमध्ये होणारे उपक्रम, [...]
प्रत्येकानेअनधिकृतवेबसाईटपासूनदूरराहणेचयोग्य: पोलिसांकडूनसातत्यानेजागृती बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिन्यात डिजिटल अरेस्टच्या घटना वाढल्या होत्या. आता एपीके फाईलच्या माध्यमातून सावजांना ठकविण्यात येत आहे. पोलिसांनी सातत्याने जागृती करूनही फशी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बेळगाव शहराबरोबरच जिल्ह्यातील काही बँक खातेधारकांचीही एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. अँड्रॉईड अॅप्लिकेशन पॅकेजची फाईल [...]
ट्रेनमध्ये मॅगी शिजवणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल होताच मध्य रेल्वेकडून महिलेवर कारवाई
रेल्वेच्या एसी कोचमध्ये केटलमध्ये मॅगी बनवाऱ्या महिलेविरोधात मध्य रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. मध्य रेल्वेने सोशल मीडियावर पोस्ट करत व्हिडिओमधील महिलेविरुद्ध आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या चॅनेलविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगितले. अशा कृतींमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो आणि ट्रेनच्या एसी आणि इतर पोर्टचे नुकसान होऊ शकते, असे रेल्वेने नमूद केले. रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोबाईल चार्जिंग […]
मध्य रेल्वेवर सहा मेगा ब्लॉक; उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर होणार परिणाम, वाचा
मध्य रेल्वेकडून या आठवड्याच्या शेवटी आणि पुढील आठवड्यात मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर सहा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर याचा परिणाम होणार आहे. गर्डर लाँच करणे, ट्रॅक स्ट्रक्चर बदलणे आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम बसवणे आदी कामांसाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ठाणे ते कल्याण दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी […]
भीमगड अभयारण्यातील गावांचे स्थलांतर होणार
काही गावातील रहिवाशांनी वनखात्याकडे स्थलांतरासाठी आवश्यक कागदपत्रेही केली सुपूर्द : तालुक्यातील मराठी टक्का कमी होणार खानापूर : तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गम भागात असलेल्या गावांना कर्नाटक सरकारचा मूलभूत सुविधा पुरविण्याऐवजी या गावांचे स्थलांतर करण्याच्या डाव यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. भीमगड अभयारण्यातील काही गावातील रहिवाशांनी वनखात्याकडे स्थलांतरासाठी होकार दिला असून आवश्यक असणारी कागदपत्रेही वनखात्याकडे सुपूर्द [...]
अंगणवाडी, मध्यान्ह आहार योजना कर्मचाऱ्यांचे 1 डिसेंबरपासून आंदोलन
बेळगाव : गर्भवती व बाळंतिणींना सकस आणि मुबलक आहार मिळावा, मुलांचे कुपोषण होऊ नये, या उद्देशाने देशात 1975 पासून समग्र बालविकास योजना (आयसीडीएस) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतेही मूल शिक्षणापासूनवंचित राहु नये, शाळेची पटसंख्या वाढावी या उद्देशाने सरकारने सर्वशिक्षण अभियान, अक्षर दासोह योजना सुरू केली आहे. मागील 50 वर्षांपासून आयसीडीएसअंतर्गत अंगणवाडी कर्मचारी मानधनावर काम [...]
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 12 डिसेंबरला आंदोलन
राज्यरयतसंघ, हसिरूसेना, शेतकरीक्षेमाभिवृद्धीसंघातर्फेजिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन बेळगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून ते सर्वांचे अन्नदाते आहेत. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून राज्य सरकार त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकडे कानाडोळा करत आहे. दरम्यान, बेळगावमध्ये लवकरच राज्य सरकारचे अधिवेशन होणार असून या काळात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची एक संधी समोर आली आहे. राज्य सरकारशी थेट संपर्क साधता [...]
टेंगिनकेरा गल्लीत बाकड्याची चोरी
बेळगाव : खडेबाजार रोडवरील टेंगिनकेरा गल्ली क्रॉस येथील होळी कामाण्णा मंदिराच्या आजूबाजूला केरकेचरा टाकण्यासह हॉटेलमधील खरकटे टाकले जात होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याने काही महिन्यापूर्वी महापालिकेच्यावतीने त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून बाकडे ठेवण्यासह झाडांचे कुंडे ठेवले होते. पण तेथील एका बाकड्याची चोरी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. [...]
टीईटी विरोधात बेळगावचे शिक्षक दिल्लीत
जंतरमंतरयेथेहोणाऱ्याआंदोलनातघेणारसहभाग बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाने शाळा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे सक्तीचे केले होते. सरकारी शाळांमधील शिक्षकांना टीईटीची सक्ती नको, यासाठी दिल्ली येथे सोमवार दि. 24 रोजी देशव्यापी आंदोलन होणार असून यामध्ये भाग घेण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील 25 शिक्षक दिल्ली येथे पोहोचले आहेत. कोणत्याही परिस्थितीत टीईटीची सक्ती होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एका निकालादरम्यान [...]
कोतवाल गल्लीत भाजीविक्रेत्यांना स्थानिकांचा विरोध
बेळगाव : कोतवाल गल्लीत बसून भाजीविक्री व्यवसाय करणाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. अंत्यसंस्कार त्याचबरोबर इतर कामे करताना स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने गुरुवार दि. 20 रोजी भाजीविक्रेत्यांना रहिवाशांनी बसण्यास विरोध केला. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका व बैठे विक्रेते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोतवाल गल्लीतील भाजीविक्रेत्यांना त्या ठिकाणी बसू नये अशी सूचना केली. [...]
आचरा पिरावाडी वैकुंठभूमी स्मशानभूमी सौरदिव्यांनी उजळली
मुजफ्फर मुजावर यांनी लावले स्वखर्चाने सौरदीप आचरा | प्रतिनिधी असं म्हटलं जातं की ,पैसा खिश्यात असून उपयोग नाही तर तो देण्याची दानत असली पाहिजे हाच दातृत्वाचा गुण मुज्जफर(चावल) मुजावर यांनी जोपासला आहे. मुजफ्फर मुजावर यांनी पिरावाडी गावची गरज ओळखून स्मशानभूमीमध्ये आपल्या स्वखर्चाने पाच सौरदीप लावत आचरा पिरावाडी वैकुंठभूमी (स्मशानभूमी) उजळून टाकली आहे.पिरावाडी येथे रात्रीच्या वेळी [...]
हिंडलगा-बाची रस्ताकाम आठवड्यात पूर्ण करा
अन्यथा रास्ता रोकोचा इशारा : मार्गावर खडी पसरल्याने दुचाकींच्या अपघातांच्या घटना : काम संथगतीनेसुरू असल्याने वाहनधारकांतून संताप वार्ताहर/उचगाव हिंडलगा-बाची, कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामाचा वेग संथगतीने असल्याने आणि सध्या या संपूर्ण मार्गावर खडी पसरविलेली असल्याने दुचाकी वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. याबरोबरच धुळीचे लोट उठत असल्याने वाहनचालकांच्या [...]
अजित पवारांचा फोडाफोडी फॉर्म्युला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत फोडाफोडी आणि इतर पक्षातून खेचाखेची करावी लागत आहे. भोर, राजगुरुनगर, इंदापूर आणि जेजुरी या नगरपरिषदांमध्ये बाहेरच्या पक्षातील उमेदवारांना आयात करून उभे केले आहे. तर काही ठिकाणी भाजप आणि मिंधे गटाबरोबर तडजोड करावी लागली आहे. यामुळे त्यांच्या राजकीय मर्यादा समोर आल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने […]
मण्णूरला नियमित स्वतंत्र बस सोडण्याची मागणी
हिंदवीस्वराज्यसंघटनेकडूनआंदोलन: परिवहनविभागालानिवेदन वार्ताहर/हिंडलगा मण्णूर गावाला नियमित व वेळेवर बस व गावाकरिता स्वतंत्र बस सोडण्यासाठी मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या पुढाकारातून कर्नाटक राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळू आनंदाचे, सभासद व गावातील नागरिक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मण्णूर गाव हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असून कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. या शिवाय [...]
येळळूर शिवार रस्त्यावर दारूच्या बाटल्या, पाकिटांचे ढीग
सभोवतालचेशेतरस्तेबनलेततळीरामांच्यामैफलींचेअड्डे: शेतकऱ्यांनानाहकत्रास वार्ताहर/येळळूर येळळूर गावाच्या सभोवतालच्या शेत रस्ते म्हणजे तळीरामांच्या मैफलींचे अड्डे बनले असून गावाभोवतालच्या शेत रस्त्यांचे चित्र बघता प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि दारूची रिकामी पाकिटांचे ढीग जागोजागी पडलेले आहेत. काही ठिकाणी कचेच्या बाटल्या फोडून फेकलेल्या अवस्थेत असून येथील सर्वच शेतरस्त्यांचे हे चित्र आहे.रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना ही एक नेहमीचीच डोकेदुखी होऊन बसली [...]
देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवनगरी देवरुखात कृषी संस्कृतीचा जागर
देवनगरी देवरुखच्या भूमीत देवदिवाळीच्या पुण्यप्रसंगी इतिहासातील एक विलक्षण क्षण आकाराला आला. कोकणातील पारंपरिक, औषधी आणि सांस्कृतिक संपत्तीचे प्रतीक ठरणारा सप्तलिंगी लाल भात आता अधिकृतपणे कृषी क्रांतीच्या दिशेने पुढे सरकला आहे.या संपूर्ण उपक्रमाचे संकल्पक, सूत्रधार आणि मुख्य आयोजक म्हणून क्रांती व्यापारी संघटनेने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कृषी, उद्योग, व्यापार आणि बाजार व्यवस्थेच्या धाग्यांना एकत्र करणाऱ्या […]
माजी राष्ट्रपती जगदीप धनखड हे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आरएसएसचे संयुक्त महासचिव मनमोहन वैद्य यांनी लिहिलेल्या ‘हम और यह विश्व’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात धनखड सहभागी झाले आणि त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्यही केले. यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबतही सूचक विधान केले. मात्र […]
खासगी पशूसेवा देणाऱ्यांच्या नादी लागू नका
तालुकापशुवैद्याधिकारीडॉ. आनंदपाटीलयांचेस्पष्टीकरण: पाळीवप्राण्यांनालसटोचूनघेण्याचेआवाहन बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळविटांचा घटसर्पामुळे (एचएस) मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. काही प्रसारमाध्यमांकडून हेग्गेरी, दासरवाडी व आजूबाजूच्या गावातील पाळीव जनावरांचा घटसर्पामुळे मृत्यू झाल्याची बातमी प्रसारीत केली जात आहे. पशुसंगोपन खात्याकडून घटसर्प, लम्पी स्कीन आणि लाळ्याखुरकत रोगावर प्रतिबंधात्मक लस पाळीव जनावरांना टोचली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत एकाही पाळीव [...]
रत्नपूर न.प. निवडणूक रणधुमाळीत मिंधेसेना –भाजपमध्ये लटकली ! भाजपने विश्वासघात केला; मिंध्यांचा आरोप
रत्नपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिंदे सेनेमध्ये चांगलीच लटकली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेचा विश्वासघात केला असल्याने त्यांना चांगला धडा शिकवणार असल्याचा इशारा शिंदे सेनेचे नेते माजी सभापती किशोर कुकलारे यांनी येथे आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत दिला. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिंदे सेनेमध्ये युती असून या दोन्ही पक्षातील […]
जिल्ह्यातील 12 गोशाळांना अनुदान मंजूर
राज्यसरकारकडून10 लाख68 हजाराचानिधी बेळगाव : गोशाळा म्हणजे निराधार जनावरांसाठी असलेले निवारास्थान होय. येथे जनावरांना ठेवून त्यांची देखभाल करण्यात येते. तसेच पशुसंगोपन, पशुवैद्यकीय विभागासह जिल्हा प्राणी दया संघाच्या माध्यमातून जनावरांची सर्वप्रकारची व्यवस्था करण्यात येते. दरम्यान राज्य सरकारकडून जिल्ह्यात 12 गोशाळांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सरकारकडून 10 लाख 68 हजार 375 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले [...]
हिंदुशिवाय हे जग नष्ट होऊन जाईल, मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य
”हिंदू संस्कृती अमर आहे, जर हिंदू संस्कृती नष्ट झाली तर संपूर्ण जग नष्ट होईल, असे मोठे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे एका सभेत बोलताना केले आहे. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच सरसंघचालक मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. ”जगातील सर्व देशांनी सर्व प्रकारची परिस्थिती बघितली आहे. ग्रीसमध्ये युआन, इजिप्तची मिस्र, रोमची एक वेगळी संस्कृती होती. या संस्कृती […]
धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेच्या पाऊलखुणा
गोव्यातूनबेळगावात-समादेवीगल्लीच्याउगमाचीकहाणी: एकोप्यानेराहण्याचीपरंपरा अमितकोळेकर, बेळगाव कोणत्याही गावाची सीमा त्या गावाच्या हद्दीवरून निश्चित केली जाते. त्यानुसार, बेळगावची प्राचीन सीमा आताच्या समादेवी गल्लीपासूनच सुरू होत असे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेली ही गल्ली, खडेबाजार रस्त्याला जोडलेली आहे. पश्चिमेला कॉलेज रोडवरील यंदे खुटापासून सुरू होणारी ही गल्ली समादेवी मंदिरापर्यंत येऊन संपते. यंदे खुटाकडून गल्लीत प्रवेश करताच [...]
लोणावळा, वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी-भाजप लढत, काका-पुतण्या एकत्रः महायुतीला धक्का
लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष एकत्र आल्यामुळे मावळात महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे लोणावळा, वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने […]
भाजपने झिडकारले, मिंध्यांनी वाऱ्यावर सोडले, वसमतमध्ये क्यातमवारांच्या हाती धुपाटणे
नगराध्यक्षपदाच्या लालसेने तीन पक्षांचा प्रवास करणारे डॉ. मारोती क्यातमवार यांच्या हाती शेवटी धुपाटणेच आले! काँग्रेसचा हात सोडून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या लालसेपोटी मिंध्यांची सोबत केली. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मिंध्यांशी दगाबाजी करून ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. पण भाजपने ऐनवेळी सुषमा बोड्डेवार यांच्या नावाची घोषणा करून डॉ. क्यातमवारांना वाऱ्यावर सोडून दिले. बिच्चारे डॉ. क्यातमवार… आता अपक्ष लढणार […]
जिल्ह्यात बंडोबांमुळे महायुतीला भगदाड; मंचरमध्ये 15, सासवडमध्ये 26 तर भोरमध्ये 11 जणांची माघार
मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग १ मधून वंदना कैलास बाणखेले या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली असून, केवळ १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. नगराध्यक्षपदासाठी 6, तर 16 प्रभागांमध्ये ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुतीला भगदाड पडल्याची स्थिती आहे. प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग 1 मधून अपेक्षेप्रमाणे माजी […]
नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, कोचिंग क्लासेसच्या चार जणांवर गुन्हे दाखल
चंद्रपूर शहरातील जनता करियर लॉन्चर नामक खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. नीट परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्याने या निवासी संस्थेत प्रवेश घेतला होता.या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. चंद्रपूर शहरालगतच्या धानोरा या गावातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय मुलाने जनता करिअर लॉन्चरच्या वसतिगृहात खोलीतील […]
मोहन मोरे, सिनिअर 60 इलेव्हन संघ विजयी
साईराजचषकअखिलभारतीयटेनिसबॉलक्रिकेटस्पर्धा क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव साईराज स्पोर्टस क्लब आयोजित साईराज चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बालाजी स्पोर्टस हलगाने वामिका कॅम्प संघाचा, मोहन मोरे संघाने नानावाडी सुपरकिंग्जचा, सिनिअर 60 इलेव्हनने व्हीसीसीचा तर मोहन मोरेने बालाजी स्पोर्ट्स हलगा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. चंदन तलवार, रोहित यादव, लक्ष खतायत, ओम पांडे [...]
लव्हडेल सेंट्रल, भातकांडे उपांत्यफेरीत
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून लव्हडेल संघाने केएलएसचा 49 धावांनी तर गजाननराव भातकांडे संघाने केएलई इंटरनॅशनल अ चा 26 धावांनी पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. अजय लमाणी, सचिन तलवार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.प्लॅटिनम ज्युबली टर्फ मैदानावरती [...]
केएलएसचा अनुज हाणगोजीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते कर्नाटक सरकार व जिल्हा पंचायत हासन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत अनुज हाणगोजीने रौप्यपदक पटकाविल्याने त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. हासन येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील 600 मी. धावण्याच्या शर्यतीतकेएलएस इंग्रजी माध्यम शाळेच्या अनुजने उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले. त्यामुळे त्याची निवड आता मध्यप्रदेशमध्ये [...]
हिंडलगा संत मीराच्या वार्षिक क्रीडांना प्रारंभ
वार्ताहर/हिंडलगा लक्ष्मीनगर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ शाळेच्या भव्य पटांगणात झाला. अध्यक्षस्थानी डॉ. विजय गोवेकर, प्रमुख अतिथी पंकज रायमाने, क्रीडा शिक्षक अशोक शिंत्रे, भालचंद्र गाडगीळ, व्यवस्थापक समितीचे कार्यदर्शी देवीदास कुलकर्णी उपस्थित होते. प्रथम शालेय विद्यार्थिनीनी इशस्तवन सादर करुन स्वागत नृत्य सादर केले. ध्वजवंदन व आकर्षक पथसंचलनानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती [...]
माधुरी पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेंगळूर आणि हासन शिक्षण खाते यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत माधुरी पाटीलने 400 मी. धावणे क्रीडा प्रकारात रौप्य पदक तर 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक मिळविले. हासनमध्ये झालेल्या स्पर्धेत बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करताना तिने 200 मी 400 मी मध्ये धावण्याच्या शर्यतीत ही दोन पदके मिळविल्याने [...]
Ashes 2025 –खेळपट्टीवरून ‘डबल ढोलकी’वाजवणाऱ्यांना अश्विनने बदडून काढले, पर्थचा दिला दाखला
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात पर्थ येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तब्बल 19 विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने 172 धावांमध्ये गुंडाळले. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने सात विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर देत दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 123 अशी बिकट केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 5 […]
महाबळेश्वरात मिंधेंना धक्का, शिंदेंची मावस बहीण अजित पवार गटात
महायुतीतील तीन पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरूच असून, भाजपपाठोपाठ आता अजित पवार गटाने मिंधे गटाला धक्का दिला आहे. महाबळेश्वरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होऊन त्यांची चुलत मावस बहीण माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग क्र. 4 मधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सातारा येथील मेळाव्यात […]
US Firing –अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबार, चार जण जखमी
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. कॉनकॉर्डच्या वार्षिक ख्रिसमस ट्री लाइटिंग समारंभात गोळीबार झाला. या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कॉनकॉर्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोळीबार कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप समजू शकले नाही. कॅरोलिनातील कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर […]
न्यायालयातही भाजप उताणा, राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी कायम, फुलंब्रीत शिवसैनिकांचा जल्लोष
फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी आकाशपाताळ एक करणारा भाजप न्यायालयात उताणा पडला ! भाजप उमेदवार सुहास शिरसाठ यांनी ठोंबरे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळताच फुलंब्रीत शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. फुलंब्री नगर पंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजपने हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले. […]
सांगली जिल्ह्यात 316 शाळा एक शिक्षकी
>> प्रकाश कांबळे शिक्षणाची दारे खेड्यापाड्यांत, गावपातळीवरील घराघरांत पोहोचावीत, यासाठी राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असतानाही सांगली जिल्ह्यात आजही अनेक शाळा एका शिक्षकावर अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे. सन 2024-25च्या आकडेवारीनुसार 316 शाळा एकशिक्षकी असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात हीच एकशिक्षकी शाळांची संख्या सुमारे आठ हजार आहे. यंदाची संचमान्यता अद्याप अंतिम […]
दहा लाखांची रोकड कचरावेचक महिलेने प्रामाणिकपणे केली परत
सदाशिव पेठेतील सकाळ नेहमीप्रमाणेच सुरू झाली होती. पण २० नोव्हेंबरचा दिवस ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने यांच्या आयुष्यातील अजून एक सोन्याचा अध्याय ठरला. दैनंदिन कचरा संकलनाचे काम करताना त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली एक बॅग दिसली. सुरुवातीला ती एखाद्या औषधाच्या दुकानाची असेल, असा विचार. पण बॅग उघडताच डोळे विस्फारावेत, अशी दहा लाख रुपयांची रोख रक्कम समोर! […]
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…गुलाल-खोबऱ्यांच्या उधळणीत रथयात्रा संपन्न
‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आणि सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, खोक्यांची मुक्त उधळण करत रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरून वाजतगाजत रथामध्ये बसविण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती […]
भुमरे पिता-पुत्रांना मतदार धडा शिकवणार : चंद्रकांत खैरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमदारकी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना या चार अक्षरी मंत्रामुळे मंत्रीपद मिळाले. तरी पक्षफोडीच्या पापात सहभागी झाले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत पैठणकर भुमरे पिता-पुत्रांना चारी मुंड्या चित करून चांगलाच धडा शिकवणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. पैठण नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ […]
भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचारीकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये 842 पैकी 801 कर्मचारी उपस्थित होते. तर 41 कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाकण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे . प्रशिक्षण प्रथम प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत जिमखाना हॉल पी. ओ. […]

28 C