SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

सीरियात नमाज दरम्यान मशिदीत स्फोट; आठ जणांचा मृत्यू

सीरियामध्ये शुक्रवारी नमाज दरम्यान एका मशिदीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात अठरा जण जखमी झाले आहेत. ही मशीद अलावाइट भागात आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत हा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

सामना 26 Dec 2025 7:29 pm

जपानच्या बेडकामध्ये सापडला कर्करोग विरोधी जीवाणू, एक डोसही पुरेसा

जपानी शास्त्रज्ञांना एक अद्भुत शोध लागला आहे. जपानी ‘ट्री फ्रॉग’ नावाच्या बेडकाच्या आतड्यांमध्ये असलेला जीवाणू कर्करोगावर प्रभावी ठरला आहे. उंदरांवर केलेल्या परीक्षणात कोणतेही गंभीर दुष्परिणाम न होता एका डोसमध्ये त्यांचा ट्युमर नष्ट झाला आहे. हे संशोधन ‘Gut Microbes’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून ते संशोधन भविष्यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण असणार आहे. बेडूक, पाल, उभयचर […]

सामना 26 Dec 2025 7:12 pm

भाजपा राजवटीत भाजी-भाकरी नाही, फक्त धोखा मिळाला; अखिलेश यादव यांची टीका

भाजपा राजवटीत भाजी-भाकरी नाही, फक्त धोखा मिळाला, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, भाजपच्या राजवटीत सामान्य लोकांना विकास आणि आदर नाही तर फक्त विश्वासघात आणि फसवणूक मिळाली आहे. ते म्हणाले की, परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे आणि दुर्लक्ष […]

सामना 26 Dec 2025 7:05 pm

Latur News –गुढ आवाजाने कलांडी हादरली, ग्रामस्थांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कलांडी गाव शुक्रवारी पुन्हा एकदा गूढ आवाजांनी हादरले. दुपारी 12 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास जमिनीतून झालेल्या प्रचंड आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जीव वाचवण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांनी घराबाहेर रस्त्यावर धाव घेतली.​दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी कलांडी आणि परिसरातील खडक उमरगा परिसरातही अशाच प्रकारचे दोन […]

सामना 26 Dec 2025 7:05 pm

ऊसतोडणी हार्वेस्टरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, उसाच्या फडात पोलीस आल्यानंतर झाला उलगडा

ऊसतोडणीवेळी बाजूला पडलेला ऊस हार्वेस्टरमध्ये टाकताना अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औसा तालुक्यातील आशिव येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर प्रभाकर सावंत (40) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. औसा तालुक्यातील आशीव येथील शंकर सावंत यांच्या शेतातील उसाला कारखान्याची तोड आली होती. त्यामुळे […]

सामना 26 Dec 2025 7:00 pm

लोटे एमआयडीसीतील तो जीवघेणा प्रकल्प बंद केला नाही तर जनआंदोलन उभारू, शिवसेनेचा आक्रमक इशारा

इटलीतील नागरिकांसाठी जीवघेणी ठरलेली मिटेनी पीएएफएस उत्पादन रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही कंपनी तात्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दत्ताजी […]

सामना 26 Dec 2025 6:25 pm

Solapur : सोलापुरात रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद सोलापूर : सिध्देश्वर साखर कारखान्याच्यापुलाजवळ भरधाव रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या दोन्ही पायांना व कमरेला [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:07 pm

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्यामुळे समाजाबांधवामध्ये आनंद

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा साकारण्यात यावा यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वप्रथम नगरसेविका सिंधुताई पेठे यांनी 2011 ला नगर परिषदेमध्ये ठराव मांडून तो मंजूर करून घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक काम केले. 2011 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय दूध डेअरीच्या एक एकर जागेमध्ये उभारण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ती जागा विनामूल्य दिली असून यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 50 लाख रुपये व नगर विकास विभागाच्यावतीने सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आ. राणाजगजितसिह पाटील यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यासाठी दत्ता पेठे यानी सातत्याने व अखंडपणे प्रयत्न केले.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 6:03 pm

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी कुटुंबीयांचे उपोषण

धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी पारधी समाजातील व्यक्तींना बेकायदेशीरपणे उचलून नेऊन तब्बल चार दिवस अटक न दाखवता ठेवले, अमानुष मारहाण केली, महिलांचा विनयभंग केला तसेच खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप अश्विनी केशव पवार (रा. खंडाळा, ता. तुळजापूर) यांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी कुटुंबातील 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे न घेतल्यामुळे गावपातळीवर बहिष्कार टाकण्याचा ठरावही करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो विषय तात्पुरता मिटला असला, तरी सूडबुद्धीने पुढील कारवाई करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दिनांक 2 डिसेंबर रोजी मध्यरात्री लातूर एलसीबीच्या पथकाने शेतात झोपलेल्या चार जणांना कोणतीही नोंद किंवा अटक पत्र न देता उचलून नेले. त्यानंतर तब्बल 48 तासांहून अधिक काळ कुटुंबीयांना अटकेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. चौकशीसाठी गेलेल्या महिलांना पोलीस कार्यालयातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून, न्याय न मिळाल्यास 10 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र विधान भवनासमोर कुटुंबीयांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अर्जदारांनी दिला आहे. आदिवासींचे नेते काय करतात नेत्यांकडून स्वतःकडून शब्बासकी मारून घेणारे व आर्थिक फायदा करून घेणारे आदिवासींचे काही नेते का लक्ष देत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी समाजातील लोकांनी नेत्यांविषयी टिका करून आदिवासी समाजाकडे लक्ष द्या अशी मागणी केली आहे.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 6:02 pm

पोलिस ठाण्याच्या भिंती झाल्या बोलक्या

भूम (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिक हा पोलीस स्टेशनकडे येण्यास कायम भितो. कारण पोलीस स्टेशन हे त्रासदायक असते. पोलीस निष्कारण त्रास देतात. हा समाजातील सर्वसामान्य घटकाचा गैरसमज आहे. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी मात्र जनसामान्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या भिंती बोलक्या केल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. भूम पोलीस ठाणे मध्ये या झालेल्या बदलामुळे तसेच पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या सूचनांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच खोटे नाटे गुन्हे देखील नोंद होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भूम पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सध्या बांधकाम प्रगतीपथावर आहे. नवीन पोलीस ठाण्याची इमारत होईपर्यंत पोलिसांचे निवासस्थान असणारे इमारतीमध्ये पोलीस ठाणे थाटले आहे. याच इमारतीला श्री कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच भिंती विविध सुविचाराने रंगविण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करतानाच डाव्या हाताला सर्वसामान्य नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांचा रंगरंगोटी केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच उजव्या हाताला स्मार्ट पोलीस कोणाला म्हणायचे याचा अर्थ लिहिलेला आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या संरक्षण कठड्यावर विविध प्रकारचे वाक्य रंगविले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्यामध्ये येणारे नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे संबंध दर्शविणारे अर्थबद्ध वाक्य या भिंतीवर लिहिलेले आहेत. तसेच या पोलीस ठाणे मध्ये जे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना देखील प्रत्येक महिन्याला पोलीस निरीक्षकांच्या वतीने पोलीस ठाणे पातळीवर पुरस्कार दिला जात आहे. गैरसमज दूर करण्यासाठीच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिमा कायम मारझोड करणारे किंवा शिवीगाळ करणारे अशा पद्धतीची समाजामध्ये रंगवली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात हे अधिकारी किंवा कर्मचारी तशा पद्धतीचे नसतात. समाजातील पोलीस दलाबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठीच हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. श्रीगणेश कानगुडे, पोलीस निरीक्षक भूम पोलीस ठाणे.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 6:02 pm

Solapur News : सोलापूरमध्ये एनटीपीसी सोलापूरच्या 13 मेगावॅट सौर प्रकल्पाचे वाणिज्यिक संचालन

एनटीपीसी सोलापूरने हरित ऊर्जेत नव्या टप्प्याची सुरुवात दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी परिसरातील एनटीपीसी सोलापूरच्या १३ मेगावॅट सौर प्रकल्पाचा वाणिज्यिक संचालन जाहीर करण्यात आला आहे.या प्रकल्पामुळे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करत एनटीपीसी सोलापूरने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:00 pm

Tuljapur : तुळजापूरमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सवात भव्य ड्रोन शोचे आयोजन

तुळजापूरमध्ये प्रथमच भव्य ड्रोन शोचे आयोजन तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र उत्सव २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत साजरा केला जात आहे. या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ड्रोन शो आता २ [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:54 pm

मराठी शाळेत शिकून मोठे झालो तर ते फार अभिमानाचे !

मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत यांचे प्रतिपादन ; कुणकेरी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात सावंतवाडी । प्रतिनिधी आपण आपल्या गावच्या मराठी शाळेत शिकलो आणि मोठे झालो तर ते फार अभिमानाचे आहे. आज एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल आणि शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:51 pm

Hyderabad Crime –पतीने अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला जीवंत जाळले, आईला वाचवायला आलेल्या मुलीलाही आगीत ढकलले

तेलंगणामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना हैदराबादच्या नल्लकुंटा येथे घडली आहे. शिवाय आईला वाचवायला आलेल्या मुलीलाही त्याने आगीत ढकलले. त्यानंतर घरातून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. वेंकटेश असे आरोपीचे नाव आहे. वेंकटेश आणि त्रिवेणी यांचा प्रेमविवाह झाला […]

सामना 26 Dec 2025 5:47 pm

Pratapgad : प्रतापगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा फटका

प्रतापगडकडे जाणारा मार्ग ठरला ‘ट्रॅफिक जाळं’ प्रतापगड : पर्यटन हंगाम सुरू असतानाच प्रतापगड रस्त्यावर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. शालेय सहलीच्या बस, खासगी वाहने आणि दुचाकी यांचा बेधुंद ओघ एकाच अरुंद रस्त्यावर सोडल्याने वाहनांच्या रांगा मैलोनमैल [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:30 pm

वाद सोडवण्याचा यशस्वी मार्ग म्हणजे मध्यस्थी – CJI सूर्य कांत

जर दोन पक्षांमध्ये वाद असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे मध्यस्थी. मध्यस्थी ही दोन्ही पक्षांसाठी एक यशस्वी आणि फायदेशीर प्रक्रिया मानली जाते, ज्यामुळे दोन्ही पक्षांना आनंददायी निकाल मिळतो, असं सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत म्हणाले आहेत. गोव्याच्या पणजी येथे आयोजित ‘मध्यस्थता जागरूकता’ कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्टेकहोल्डर्सना संदेश […]

सामना 26 Dec 2025 5:28 pm

Satara News : उंब्रजजवळ पिकअप टेम्पोवरील हटके संदेश ठरला चर्चेचा विषय

उंब्रज–कराड मार्गावर हटके विचारांची चर्चा उंब्रज : वाहनांच्या मागील बाजूस विविध संदेश लिहिण्याची अनेकांना आवड असते. काही संदेश वाहतूक सुरक्षेचा इशारा देणारे असतात. तर काही हटके व विनोदी शैलीतून समाजाला संदेश देतात. गुरुवारी महामार्गावरून धावणाऱ्या एका पिकअप टेम्पोच्या [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:24 pm

धावत्या कारमध्ये आयटी मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, उदयपूरमध्ये कंपनीच्या CEOसह तिघांना अटक

उदयपूरमध्ये आयटी कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीच्या सीईओसह तीन आरोपींना अटक केली आहे. पीडिता शुद्धीत आल्यानंतर तिचे कानातले, मोजे आणि अंतर्वस्त्रे गायब होती. त्यानंतर तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डॅशकॅम, मेडिकल रिपोर्ट आणि जबाबाच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न […]

सामना 26 Dec 2025 5:22 pm

Karad News : मसूरच्या पिरजादे बंगला वस्तीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये घबराट

मसूर परिसरात गेल्या पंधरवड्यात बिबट्याचा वारंवार वावर मसूर : मसूर (ता. कराड) येथील पिरजादे बंगला वस्तीमध्ये बुधवारी रात्री दहा वाजता नागरिकांना बिबट्याचा वावर दिसला. त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे, सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मसूरच्या उत्तर बाजूकडे पिरजादे [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:18 pm

भंडारी समाजाची दिनदर्शिका एकमेकांना ‘कनेक्ट’ठेवेल !

कणकवलीत भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे दिनदर्शिका प्रकाशन व गुणवंत सत्कारप्रसंगी मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी / कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. कणकवली तालुक्यात समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. समाजातील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप त्यांना पुढील करियरसाठी प्रोत्साहन देणारी ठरते. तर समाजाची दिनदर्शिका बाराही महिने समाज बंधू भगिनींना एकमेकांशी [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:14 pm

Satara News : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी

आंबेनळी घाटात भीषण अपघात महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी अमरावती येथून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेले पर्यटकांचे टाटा नेक्सन वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात दोघे गंभीर तर तीन जण [...]

तरुण भारत 26 Dec 2025 5:10 pm

SIR म्हणजे महाघोटाळा! चिदम्बरम यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा

काँग्रेस नेते खासदार आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी SIR वरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. SIR म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप चिदम्बरम यांनी केला आहे. पी. चिदम्बरम यांनी तामिळनाडूमधील पुडुकोट्टाई येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. SIR ला आमचा विरोध नाही. पण तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने SIR ची अंमलबजावणी […]

सामना 26 Dec 2025 5:10 pm

प्रस्तावित लातूर-कल्याण महामार्ग कळंब मार्गेच- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर, कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. कळंब आणि परिसराच्या भौगोलिक आणि अभियांत्रिकी दृष्टीने सखोल विचार करता हा मार्ग अधिक व्यवहार्य, किफायतशीर ठरणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मदत होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच नेण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात यावा या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालकांची यांच्याशी संवाद साधला. यावेळी तांत्रिक बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता कळंब तालुका हा अन्य भूभागांच्या तुलनेने सपाट आहे. त्यामुळे कट-फिल कामाचे प्रमाण याठिकाणी कमी आहे. परिणामी मर्यादित भूसंपादन आणि मोठ्या तसेच उड्डाणपुलांची आवश्यकता कमी भासेल. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च नियंत्रणात राहून कामाची गती वाढण्यास मदत होईल.तज्ज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार कळंब तालुक्यातून मार्ग गेल्यास महामार्गाची एकूण लांबी सुमारे 15 ते 20 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी लातूर ते कल्याण प्रवासाचा कालावधीही अंदाजे 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार आहे. सरळ, वेगवान व सिग्नल-फ्री मार्गामुळे इंधन खर्चात देखील 8 ते 12 टक्क्यांपर्यंत बचत अपेक्षित आहे. अवजड वाहतूक, मालवाहतूक व लॉजिस्टिकसाठीही हा मार्ग अधिक किफायतशीर ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तपशीलवार सांगितले. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याला विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून गेल्यास लातूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईठाणेनवी मुंबई या आर्थिक केंद्रांशी थेट व जलद आणि थेट संपर्क निर्माण होईल. परिणामी शेतमालाला मोठ्या बाजारपेठेत जलद प्रवेश मिळणार आहे. उद्योग आणि वेअरहाऊसिंग तसेच सेवा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होईल जेणेकरून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी आपल्या गावाशेजारी उपलब्ध होतील. कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक घडामोडींना त्यामुळे मोठी चालना मिळेल. या महत्त्वाच्या मार्गबदलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सकारात्मक व निर्णायक पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच जावा, यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत आणि जिल्ह्याच्या हिताचा निर्णय निश्चितपणे होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:47 pm

तब्बल 19 वर्षांनी आले एकत्र, जुन्या वर्गमित्रांची पुन्हा भरली शाळा ! जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

धाराशिव (प्रतिनिधी)- अरे कसा आहेस. अय्या ओळखलंच नाही. तब्येत काय म्हणतेय. अगं कुठे असतेस. मिस्टर काय करतात. मुले किती आहेत. दहावीनंतर पुढे काय केले. ती आली नाही का. तो कुठे असतो. ती सध्या काय करतेय. नोकरी काय म्हणतेय. भावोजी काय करतात. वहिनी कुठल्या आहेत आणि त्या काय करतात. तुझा व्यवसाय कसा चालला आहे. शेती काय म्हणतेय. गावाकडे आल्यावर कोणी भेटतं का. सध्या काय चाललंय. तुला तो आठवतो का. हा तोच तो. असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना विचारत आणि सुख-दुःखाचे प्रसंग सांगत तालुक्यातील मौजे.आपसिंगा येथील नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते शाळेच्या 2006 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. यावेळी सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांच्या वतीने सौर ऊर्जा कॅमेरा मोठ्या आनंदाने भेट देण्यात आला. स्थानिक माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या स्नेहमेळाव्याचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या व राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थिनी यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना संपर्क करून हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, हैद्राबाद व पुणे जिल्ह्याच्या परिसरातून सुमारे 50 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येथोच्छित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी शाळेसह जीवनातील अनुभव ते आजपर्यंतचा जीवन प्रवास शब्दात उलगडला. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकजण गहिवरले. अशी पाखरे येती... आणि स्मृती ठेवूनी जाती या काव्य पंक्तीप्रमाणे शालेय जीवनात अनेक बॅचनी पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. कोणी पुढील शिक्षणासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणी निघून गेले. तरीही शालेय जीवनातील मित्रांसोबतच्या आठवणी मात्र काढत राहिले. याच जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 19 वर्षांनी एकत्र येत हा आठवणीपर स्नेहमेळावा आयोजित केला. एक महिना अगोदर बॅचच्या व्हाटसअप ग्रुपवर तारीख ठरवून आपल्या नोकरी, व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कोणी धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून आतुरतेने शाळेत जुन्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी हजर राहिले. प्रारंभी सर्वांनी फेटे बांधून कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच पूर्ण दिवस आनंदात घालवला. यावेळी शालेय जीवनातील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध अधिक घट्ट केले. दरम्यान, या दहावीच्या बॅचने केलेल्या उत्कृष्ट स्नेहमेळावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे इतरही बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयराज सुर्यवंशी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी शिक्षक बाळकृष्ण गोरे, तुकाराम गोरे, सुमित्रा खंदारे, शरद गोरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, ज्ञानेश्वर हेडे, शंकर गिरी, सुनील क्षीरसागर, शक्ती पांडागळे, समाधान पारधी, चंद्रकांत सोनवणे, नाना गादे आणि राहुल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:47 pm

कळंबकरांच्या उपनगरध्यक्षपदाकडे नजरा; उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांची कळंबच्या जनतेतून मागणी

कळंब (प्रतिनिधी)- राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे. कळंब नगरपालिकेचे कारभारी सुनंदाताई शिवाजी कापसे ह्या निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासीयांचे नजरा लागल्या आहेत. उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची शहरवासीयामधून मागणी होत असुन चर्चेला उधाण आले आहे. येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ.सुनंदा ताई कापसे 2554 मताने विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर महायुतीचे दहा नगरसेवक ही निवडून आणण्यात यश आले आहे. तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ दहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. ही निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादीना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेना-भाजप महायुतीच्या सुनंदा ताई शिवाजी कापसे ह्या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत. तर उप नगराध्यक्ष पदासाठी शितल चोंदे यांच्या नावाला शहरात चांगलेच चर्चेला उधान आले आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लावून राहिले आहे.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:46 pm

वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मूलाधार- कॉ. अजित अभ्यंकर

उमरगा (प्रतिनिधी)- जागतिक, देशपातळीवरील अनेक उदाहरणे आकडेवारीसह दिली. युरोपातील प्रबोधनाची क्रांती व इतर राजकीय क्रांत्या या वाचन संस्कृतीतून व एका ठराविक विचाराने लोक जागृत झाल्याने घडल्या. वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मुलाधार असल्याचे प्रतिपादन केले. भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेतील राज्ये अधिक प्रगत आहेत, त्याचे कारण तिथे रुजलेली शैक्षणिक आणि वैचारिक बीजे आणि खोलवर रुजलेली वाचन संस्कृती आहे. असे मत लेखक, अर्थतज्ञ आणि डाव्या-पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. अजित अभ्यंकर व्यक्त केले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून केशव उर्फ बाबा पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, कैलास शिंदे, हरीश डावरे, हरी जाधव, कॉ. सुनिता रेणके, अमर देशटवार, विठ्ठल चिकुंद्रे, रविकिरण बनसोडे, अ. रजाक अत्तार, ऍड. दिलीप सगर, सुनंदा माने, रेखा पवार, राजू तोरकडे, रणधीर पवार, उद्धवराव गायकवाड, सुधाकर पाटील, अमोल बिराजदार, डॉ. उदय मोरे, विवेक हराळकर आदींची उपस्थिती होती. वाचनालयाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. हे पुरस्कार वितरणाचे 07 वे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात संपन्न झाला. डॉ. दामोदर पतंगे यांना जीवन गौरव, वसंतराव नागदे यांना सहकाररत्न, डॉ. दीपक पोफळे यांना समाजरत्न, अनिल जगताप यांना कृषीरत्न, सतीश पवार यांना उद्योगरत्न, बालाजी बिराजदार यांना पत्रकाररत्न, रामजी साळुंके यांना शिक्षकरत्न, भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा, विशाल काणेकर यांना कलारत्न, महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीतरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. शीतल चव्हाण यांनी केले. आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून प्रा. चव्हाण वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन देत पुरस्काराच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वसंतराव नागदे, डॉ. दीपक पोफळे यांची मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ऍड. एस. पी. इनामदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. ख्वाजा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताबाई चव्हाण, सत्यानारायण जाधव, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप मोरे, राजू भालेराव, करीम शेख, माधव चव्हाण, धानय्या स्वामी, किशोर बसगूंडे, राजू बटगिरे, अनुराधा पाटील, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, माधवराव गावकरे, विजय चितली, ज्योती माने, शबाना उडचणे, बबीता मदने, धनंजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:45 pm

जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी येथे ‌‘आनंद बाजार‌’ उपक्रम उत्साहात संपन्न

वाशी (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी येथे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ‌‘आनंद बाजार‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप, शिक्षणविस्ताराधिकारी सुधाकर कोल्हे, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती टेकाळे मॅडम, काझी मॅडम उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज कवडे, उपाध्यक्ष विकास क्षिरसागर, समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मोळवणे मॅडम व शिक्षकवृंद सुनिता वाकडे, ज्ञानेश्वर जानगेवाड, सविता महामुनी यांची उपस्थिती लाभली. या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी घरी तयार करून आणलेले खाद्यपदार्थ व इतर वस्तूंना पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. पालकांनी सर्व स्टॉलला भेट देत खरेदी केली व पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. या उपक्रमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22,950 रुपयांची आर्थिक उलाढाल केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर जानगेवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सविता महामुनी यांनी केले. आनंद बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:45 pm

तुळजापूरचा कौल भाजपाच्या पारड्यात: विकासाची कसोटी आता सुरू !

तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या मतदारांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला कौल दिल्याने आता शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी भाजपावर येऊन पडली आहे. विकासाच्या मुद्द्यावर नेहमी ठाम भूमिका घेणाऱ्या तुळजापूरकरांनी या निकालातून स्पष्ट संदेश दिला असून, “काम कराल तरच पाठिंबा” ही परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना सुमारे 6 हजार मतांचे मताधिक्य, तर विधानसभेत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 3,500 मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी तब्बल 1,680 मतांनी विजय मिळवला. या तिन्ही निकालांतून तुळजापूरचा मतदार विकासाच्या बाजूने उभा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विकासासोबत विस्थापन टाळण्याचे आव्हान तीर्थक्षेत्राचा विकास करताना स्थानिक नागरिक विस्थापित होणार नाहीत, याची काळजी घेणे हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. भाविकांची वाढती संख्या, सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सक्षमीकरण आणि सौंदर्यीकरण या मुद्द्यांवर समतोल विकास साधावा लागणार आहे. तुळजापुरात भाजपाला मिळालेला हा विजय म्हणजे संधी आणि जबाबदारी दोन्ही आहे. राज्यभरात भाजपावर “ड्रग्स, गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्थे”बाबत होणारी टीका दूर करण्याची संधी या निकालामुळे मिळाली आहे. यापुढे तुळजापुरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि पारदर्शक विकासकामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. येथील कामगिरीवरच भाजपाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष अमर मगर सह अन्य उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र खालची बाजू कमकुवत असल्याने याचा फटका महा विकास आघाडीला बसला. विशेष म्हणजे काही उमेदवार अत्यंत गरीब वर्गातून आले होते. त्यांनी मिळवलेली मते ही भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहेत. दुसरीकडे भाजपचे काही उमेदवार एक आणि दोन अंकी मतांवरच अडकले, ही बाब पक्षासाठी चिंतेची आहे. तरुण चेहऱ्यांचे आव्हान आणि अनुभवी विरोधक भाजपचे बहुतांश नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका या तरुण आणि प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यामुळे सभागृह चालवताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून अमोल कुतवळ, आनंद जगताप आणि अनुभवी नगरसेवक रणजित इंगळे यांसारखे दिग्गज सभागृहात असल्याने भाजपला प्रत्येक निर्णयात सावध पावले टाकावी लागणार आहेत. माजी नगराध्यक्षांचा पराभव: आत्ममंथनाची वेळ आहे या निवडणुकीत भाजपचे तीन माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, सचिन रोचकरी यांना पराभव स्वीकारावा लागला, तर भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या चुलती माजी नगराध्यक्षा जयश्रीताई कंदले यांचा अवघ्या काही मतांनी नवख्या उमेदवाराकडून विजय झाला. हे निकाल भाजपसाठी निश्चितच आत्ममंथन करायला लावणारे आहेत. मोठ्या निधीतून विकासाची संधी! तुळजापूरसाठी मोठ्या निधीची शक्यता असल्याने तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची सुवर्णसंधी सध्या उपलब्ध आहे. प्रशासक काळात विकास आराखडा तयार झाला असला, तरी आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. त्यामुळे विकास आराखड्याला लोकप्रतिनिधींचा चेहरा आणि दिशा मिळणार आहे. भविष्यासाठी दिशा ठरवणारा कौल एकंदरीत, तुळजापुरच्या मतदारांनी भाजपाला केवळ सत्ता नाही तर अपेक्षांचा मोठा भार दिला आहे. हा विजय भाजपासाठी संधीही आहे आणि कसोटीही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी एकत्र येऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक विकास केला तरच तुळजापूर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, अन्यथा हा कौलच भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

लोकराज्य जिवंत 26 Dec 2025 4:43 pm

दाणोलीत उद्या आणि रविवारी रेशन लाभार्थ्यांसाठी केवायसी कॅम्प

रेशन लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन ओटवणे प्रतिनिधी दाणोली येथील रास्त धान्य दुकानात रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठी शनिवार २७ व रविवार २८ डिसेंबर रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी न चुकता केवायसी पूर्ण करावी असे आवाहन दाणोली रास्त भाव धान्य दुकानच्यावतीने करण्यात आले आहे.शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्ड [...]

तरुण भारत 26 Dec 2025 4:27 pm

Sangli News : केंब्रिज इंटरनॅशनल स्कुल मिरजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य, नाटक, मल्लखांब मिरज : येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध नृत्याविष्कार व कलागुण सादर केले. प्रमुख पाहूणे [...]

तरुण भारत 26 Dec 2025 4:24 pm

साहित्य संमेलनात उद्या लोककलांचा आविष्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी लोककलांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या केशवसूत साहित्य नगरीत होणाऱ्या या संमेलनात शनिवार २७ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून लोककला सादरीकरण होणार आहे. यात आरपीडी हायस्कूलचा वारकरी जागर, आडवी गावच्या महिलांच्या पारंपरिक [...]

तरुण भारत 26 Dec 2025 4:11 pm

Kolhapur News : पेठवडगावात निवडणूक वादातून युवकावर एडक्याने हल्ला; दोघांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

पेठवडगाव बाजारपेठेत युवकावर एडक्याने हल्ला पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका युवकावर एडक्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात २५ वर्षीय रतन आप्पासो पाटोळे हा युवक गंभीर [...]

तरुण भारत 26 Dec 2025 4:08 pm

कंपनी विकल्यानंतर अमेरिकन सीईओने कर्मचाऱ्यांना वाटले 2 हजार कोटी रुपये, सोशल मीडियावर मालकावर कौतुकाचा वर्षाव

अमेरिकेत लुईझियाना येथील एका कंपनीचा मालक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला. त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी विकून त्यातील प्रत्येकाला लाखो डॉलर्सचे बोनस चेक दिले. ही रक्कम थोडी थोडकी नसून तब्बल 240 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. या मालकाने आपली कंपनी 1.7 अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर हा उदारपणा दाखवला. त्यामुळेच सध्याच्या घडीला सोशल मीडियावर या कंपनीच्या मालकाची वाहवा […]

सामना 26 Dec 2025 4:07 pm

Kolhapur News : पेठवडगाव स्मशानभूमी शेजारी भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस ; नागरिकांमध्ये भीती

पेठवडगावच्या तांबवे वसाहतीत अघोरी प्रकरणाचे रहस्य उघडकीस पेठवडगाव : पेठवडगाव इथल्या तांबवे वसाहत परिसरातील स्मशान भूमी शेजारी भानामतीचा प्रकार उजेडात आला आहे. एका बुट्टी मध्ये लिंबू दोरा,भात,तांदूळ, ब्लाउज पीस, काकण हळद कुंकू, मंगळसूत्र, काळ्या,भावल्या यासह जिवंत कोंबडा आढळला असून याबाबत परिसरातून भीती [...]

तरुण भारत 26 Dec 2025 4:00 pm

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान

हिंदुस्थानचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी प्रत्येक दिवसागणिक नवी यशस्वी पावले टाकत असून अवघ्या 14 व्या वर्षी त्याने विक्रमांची मालिका आपल्या नावे केली आहे. क्रिकेटमधील या चमकदार कामगिरीबद्दल हिंदुस्थान सरकारने त्याला सन्मानित केले असून वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान मानला जाणारा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील […]

सामना 26 Dec 2025 3:54 pm

Sangli News : तासगावात बागायती क्षेत्र वाढल्याने चराऊ कुरणे गायब

तासगावात बागायती वाढीमुळे चराऊ कुरणांची गंभीर हानी तासगाव : ग्रामीण भागातील विकासाच्या पटावर गेल्या काही वर्षांत बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उस, द्राक्षे, केळी, डाळिंब, भाजीपाला यांसारख्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने शेतीचे प्रमाण निश्चितच वाढले. पण याच वाढत्या बागायतीमुळे गावोगावी चराऊ [...]

तरुण भारत 26 Dec 2025 3:52 pm

कॅप्टन गावडे यांचे व्यक्तिमत्व आजही सर्वांसाठी प्रेरणादायी- दीपक भोगटे

कॅप्टन गावडे यांना १०० व्या वाढदिवसानिमित्त कट्टा येथे आदरांजली चौके/ प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे नांदोस चौके पंचक्रोशीतील समाजसेवक कॅप्टन रामकृष्ण गावडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कॅप्टन गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.दीपक भोगटे यांनी कॅप्टन गावडे यांच्या समग्र जीवनप्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले लहानपणापासून [...]

तरुण भारत 26 Dec 2025 3:49 pm

इन्सुली विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबरला

प्रतिनिधी बांदा विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता विद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक आप्पा सावंत हे असतील. फोंडा (गोवा) नगरपालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ​यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती [...]

तरुण भारत 26 Dec 2025 3:30 pm

भाजपच्या तिकिटावर लढलेल्या अभिनेत्रीचा पक्षाला रामराम, तृणमूल काँग्रेसमध्ये घेतला प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच पक्षांतराचे राजकारण वेग घेऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेली बंगाली अभिनेत्री पर्णो मित्रा यांनी पक्षाला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिकरित्या टीएमसीची सदस्यता स्वीकारली. टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पर्णो मित्रा यांनी भाजपात प्रवेश करण्याचा […]

सामना 26 Dec 2025 3:24 pm

मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या

डान्स करणंही एक कला आहे. परंतु याउपरही डान्स ही एक थेरपी आहे.तुम्हाला तणाव, चिंता किंवा दुःख वाटत असेल तर नाचणं हा एकबेस्ट पर्याय आहे. डान्समुळे आपण तणावापासूनही दूर राहतो हे आता संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. डान्स करण्यामुळेआपल्या शरीरामध्ये ‘सेरोटोनिन’ या फील गूड हार्मोन्सची पातळी वाढते. शरीरामध्ये फील गुड हार्मोन्सची वाढ झाल्यामुळे, आपण मानसिकताण तणावावर […]

सामना 26 Dec 2025 3:10 pm

उत्तर प्रदेशात भाजपच्या ब्राह्मण आमदारांची स्वतंत्र बैठक, राजकीय चर्चांना उधाण

उत्तर प्रदेशातील भाजपच्या ब्राह्मण आमदारांच्या बैठकीची पक्षाच्या उच्च नेतृत्वाने दखल घेऊन कठोर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी नेत्यांना फटकारत अशा प्रकारच्या हालचालींपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. नकारात्मक राजकारणापासून दूर रहा, अन्यथा कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अशा कृती भाजपच्या विचारसरणी आणि कार्यपद्धतीशी जुळत नाहीत आणि पक्ष कुटुंब, समाजघटक किंवा […]

सामना 26 Dec 2025 3:09 pm

Kolhapur News : भारतीय सैन्याबाबत वक्तव्य केल्याने गडहिंग्लजमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध

गडहिंग्लजला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचे दहन गडहिंग्लज : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्य दल आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल कमी केले असून या वक्तव्याच्या विरोधात गडहिंग्लजला माजी सेनिक संघटना आणि वीरपत्नी एकत्र येत प्रतिमेचे दहन केले. [...]

तरुण भारत 26 Dec 2025 3:05 pm

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, जाणून घ्या

केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे.केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलालाआयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामुध्ये व्हिटॅमिन सी,फ्लेव्होनोइड्स,एमिनोअॅसिड,म्यूसिलेज फायबर,आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर […]

सामना 26 Dec 2025 2:55 pm

सुरेश ठाकूर यांना केंद्रीय बालसेवा पुरस्कार’ जाहीर

बेळगाव येथे पुरस्कार वितरण सोहळा आचरा प्रतिनिधी आचरे (मालवण) येथील सानेगुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरूजी यांना अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ आजच जाहीर झाला. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या निवड मंडळाने एकमताने ठाकूर गुरूजी यांची निवड केली. मा. हसन देसाई – कोल्हापूर (अध्यक्ष), सुनिल पुजारी – सोलापूर (सचिव) अखिल भारतीय सानेगुरूजी [...]

तरुण भारत 26 Dec 2025 2:51 pm

रोजच्या आहारात एक वाटी हा पदार्थ खायलाच हवा, वाचा

दही रोजच्या आहारात असणे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. दही आपल्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळेच झोप न येण्याची तक्रारही दूर होते. दही आहारात आपण अनेक प्रकारे घेऊ शकतो. आपण नुसते दही खाऊ शकतो. किंवा दह्यापासून कढी, ताक असे विविध प्रकारही आपण करु शकतो. यामुळे दही आपल्या पोटात जाण्यासही मदत होते. दही […]

सामना 26 Dec 2025 2:40 pm

इन्सुलीत अवैध दारू वाहतुकीवर कारवाई ; एकास अटक

गोवा बनावटीच्या दारूसह ५० लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी बांदा गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने कारवाई केली. गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली तपासणी नाक्यासमोर करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू साठ्यासह ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित कंटेनरची झडती घेतली [...]

तरुण भारत 26 Dec 2025 2:38 pm

आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

थंडीचा सीझन सुरु झाल्यानंतर आपल्याला विविध आजारांची चाहूल लागते. ही चाहूल लागताच आपण त्यावर उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. थंडीच्या सीझनमध्ये मासे फार कमी प्रमाणात मिळतात. परंतु मासे हे आपल्या आरोग्यासाठी फार गुणवर्धक मानले जातात. आपल्या धावत्या जीवनशैलीत नानाविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. यातलीच एकआजार म्हणजे ब्रेन स्ट्रोक. अलीकडे ब्रेन स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू […]

सामना 26 Dec 2025 2:26 pm

Kolhapur : कोडोलीत शतकोत्तर नाताळ उत्सवास भक्तीमय वातावरणात शानदार प्रारंभ

कोडोली चर्च परिसरात जत्रेचे स्वरूप वारणानगर : सन १९१९ पासून सुरु झालेल्या व ख्रिश्चनांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडोली ता.पन्हाळा येथे शतकोत्तर नाताळ उत्सवास शानदार प्रारंभ झाला.मुख्य चर्चवर केलेली विद्युत रोषणाई,सकाळ पासून भक्तीगीते,प्रार्थना सभा, मान्यवरांच्या उपस्थितीत विविध भरगच्च कार्यक्रमास लोटलेली अलोट [...]

तरुण भारत 26 Dec 2025 2:16 pm

Kolhapur News : बेलववळे बुद्रुक येथे जिल्हा लोक कलाकार संघटनेचा मेळावा उत्साहात

बेलवळे बुद्रुक येथे लोककलेचा जागर कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघटनेच्यावतीने तेराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील लोक कलाकारांचा मेळावा संपन्न झाला. हा मेळावा बेलवळे बुद्रुक ता. कागल येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याला जिल्ह्यातील हजारोहून [...]

तरुण भारत 26 Dec 2025 1:58 pm

Latur News –सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वाहन चालकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं

औराद शहाजानी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि वाहनचालकाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडीयावर टाकून येथील एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दिनांक २५ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांसह हजारो नागरीकांनी पोलीस […]

सामना 26 Dec 2025 1:49 pm

Solapur News : ऊमेश पाटील यांनी शक्तिपीठ वाचवावा ! : प्रा.संग्राम चव्हाण

नवीन आरेखनामुळे शक्तिपीठ महामार्ग पुन्हा रखडण्याची शक्यता सोलापूर : अलीकडेच सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलणार असल्याचे विधान केले आहे. शक्तिपीठ महामार्गाला सांगली व कोल्हापूर या दोनच जिल्ह्यामध्ये विरोध होत आहे. अस्तित्वात असलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाला सदरचा महामार्ग समांतर धावतो [...]

तरुण भारत 26 Dec 2025 12:57 pm

विजय माल्ल्या आणि नीरव मोदीला परत आणणार, केंद्रीय मंत्री कीर्तिवर्धन सिंह यांचे विधान

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तसेच फरार उद्योगपती विजय माल्या यांना हिंदुस्थानात परत आणणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. बांग्लादेशात घडणाऱ्या घटनांकडे सरकार सतत लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. बांग्लादेशात हिंदूंवर वारंवार होणाऱ्या घटनांविषयी बोलताना कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की तेथील […]

सामना 26 Dec 2025 12:44 pm

Raigad News –खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका सीमा काळोखे यांच्या पतीची हत्या, घटनेने खळबळ

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना खोपोलीत मोठी घटना घडली आहे. खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका सीमा काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. मुलीला शाळेत सोडून परतत असताना खोपोलीतील जया बारजवळ तलवार आणि चॉपरने वार करून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात […]

सामना 26 Dec 2025 12:36 pm

Kolhapur News : सिद्धेश्वर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सादळे डोंगरात बिबट्याचा हल्ला टोप : सादळे डोंगरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिद्धेश्वर सुळकी परिसरातील कुरळुपकराच्या यांच्या शेतात गुरुवारी दुपारी शेळी चारण्यासाठी गेलेल्या हनुमंत पाटील यांची एक शेळी बिबट्याने फाडून खाल्याचे [...]

तरुण भारत 26 Dec 2025 12:07 pm

बुलेट ट्रेनच्या कामामुळे मुंबईत प्रदूषण, काम थांबवण्याची कंत्राटदाराला नोटीस

बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) येथे सुरू असलेले बुलेट ट्रेन टर्मिनसचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. बांधकामादरम्यान वायूप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन झाल्याने थांबवण्यात आले आहे. सध्या मुंबईत वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. पण ही कारवाई प्रतिक्रियेच्या स्वरूपातील असल्याची टीका होत आहे. कारण […]

सामना 26 Dec 2025 11:06 am

थायलंड-कंबोडिया सीमेवर भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना

थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर भगवान विष्णूची मूर्ती पाडण्यात आली. यामुळे जगभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेनंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत ‘असे अनादर करणारे हे कृत्य जगभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे आहे,’ असे म्हटले आहे. दोन देशांमध्ये दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या संघर्षानंतर थायलंडच्या लष्कराने ही मूर्ती पाडली असल्याचे सांगितले जात आहे. थायलंड-कंबोडिया […]

सामना 26 Dec 2025 11:00 am

‘व्हिटॅमीन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी

व्हिटॅमीन डीची कमतरता कमी करण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे. ते शक्य नसल्यास आहारातील अनेक घटक ही कमतरता दूर करू शकतात. ऑयस्टर मशरूम किंवा उन्हात वाळवलेले शीताके यात भरपूर व्हिटॅमीन डी असते. आहारात देशी तुपाचा समावेश करावा. तसेच कोवळ्या उन्हात बसण्यापूर्वी थंड प्रेस केलेले तिळाचे तेल लावावे. याशिवाय आहारात काही प्रमाणात फॅट असावे तसेच […]

सामना 26 Dec 2025 10:54 am

26 डिसेंबरपासून पंढरपूरच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी

पुढील वर्षीच्या पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या सर्व पूजांचे ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा, पाद्यपूजा आणि इतर प्रकारच्या पूजा मिळवण्यासाठी देशभरातली भाविक प्रयत्न करीत असतात. आता नवीन वर्षात 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठीच्या पूजांचे ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचे मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात भाविकांना […]

सामना 26 Dec 2025 10:36 am

पंतप्रधान मोदींचे ‘परीक्षा पे चर्चा’महाराष्ट्रात फ्लॉप, केंद्राची राज्यावर खप्पा मर्जी

दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. पण यंदा या कार्यक्रमाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारची राज्य सरकारवर खप्पा मर्जी झाली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने राज्य सरकारला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढवा अशी तंबी दिली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकारच्या ‘परिक्षा पे चर्चा’ या […]

सामना 26 Dec 2025 10:31 am

अमिता मसुरकर यांचे निधन

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी उभाबाजार येथील रहिवासी सौ. अमिता दत्तप्रसाद मसुरकर (५५) यांचे शुक्रवारी सकाळी ६ वाजता अल्प आजाराने बेळगाव केएलइ रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, दीर, चुलते, नणंद, भावजय, पुतणे असा परिवार आहे. उभा बाजार येथील सुवर्णकार दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या त्या पत्नी होत. वेदांत तसेच डॉ. दीक्षा मसुरकर यांच्या त्या आई [...]

तरुण भारत 26 Dec 2025 10:31 am

थर्टी फर्स्टला धिंगाणा घालाल तर ‘हॅपी न्यू इअर’कोठडीत; पालघर पोलिसांची करडी नजर

थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन आतापासूनच सुरू झाले आहे. समुद्रकिनारे, सोसायट्या, हॉल, बंगले, हॉटेल्स, रिसॉर्टस् येथे तरुण-तरुणींचे जथ्थेच्या जथ्थे येण्यास सुरुवात झाली आहे. नाताळची सुट्टी लागल्याने ‘फुल्ल टू धम्माल’चा माहोल सर्वत्र दिसून येत आहे. तुम्ही थर्टी फर्स्ट जरूर साजरा करा, पण धिंगाणा घालाल तर ‘हॅप्पी न्यू इअर’ कोठडीतच साजरी करावी लागेल. पालघर पोलिसांनी तसा कडक इशाराच दिला […]

सामना 26 Dec 2025 10:10 am

10 जानेवारीला खगोलप्रेमींना पर्वणी, गुरू ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार

आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा 10 जानेवारीला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. या दिवशी गुरू आणि सूर्य आमने-सामने राहतील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना, जिज्ञासूंना गुरूचे निरीक्षण व अभ्यास करण्याची ही चांगली संधी आहे. गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा […]

सामना 26 Dec 2025 10:10 am

रायगडातील पर्यटनस्थळे ओव्हरपॅक; मुंबई-ठाणेकर कुटुंबकबिल्यासह पोहोचले,अलिबाग, काशिद, मुरुड, श्रीवर्धन

नाताळची सुट्टी लागताच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई, ठाणेकर कुटुंबकबिल्यासह रायगडातील अलिबाग, काशिद, मुरुड, श्रीवर्धनमध्ये पोहोचले आहेत. फेसाळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत आणि माशांवर ताव मारून मनसोक्त मौजमजा करण्यास सुरुवात झाली आहे. रायगडातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीन ओव्हरपॅक झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्ते, चौक, […]

सामना 26 Dec 2025 10:05 am

पुण्यात पोलिसांची धडक कारवाई, एक कोटी पेक्षा अधिक रक्कम आणि लाखो रुपयांची दारू जप्त

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील काकडे वस्ती, गल्ली क्रमांक 2 येथे आज एपीआय अफरोज पठाण आणि गुन्हे शोध पथकाने केलेल्या दारूबंदी (प्रोहीबिशन) कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान 50 एमएलचे 80 पाउच, विविध ब्रँडची देशी व विदेशी दारू, व्हिस्कीचे मोठ्या प्रमाणावर नग, तसेच 70 लिटर दारूचे कॅन असा एकूण 2,05,900 रुपयांचा मुद्देमाल […]

सामना 26 Dec 2025 10:03 am

पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही! हायकोर्टाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला

कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात गुंतलेली पाहणे सहन होणार नाही. रागाच्या भरात पत्नीचा फोन फोडणे, तिचा प्रियकराशी असलेला संपर्क तोडणे हे स्वाभाविक आहे, असे निरीक्षण नोंदवत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पतीला कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला. संबंधित दाम्पत्याचा विवाह 2006 मध्ये झाला होता. पतीने पत्नीच्या अनैतिक संबंधांचे आरोप करत 17 नोव्हेंबर 2021 रोजी […]

सामना 26 Dec 2025 10:00 am

आपल्या घरावर बॉम्ब पडल्यासारखी अवस्था! ‘देवराई’ वणव्यामुळे सयाजी शिंदे भावुक

गवत जाळल्यामुळे पुन्हा नव्याने चांगले उगवते हा गैरसमज आहे. वणव्यात निसर्गाचे मोठे नुकसान होते. पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले, झाडे-रोपटी आगीत जळून खाक होतात. आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर जी अवस्था होते तशीच अवस्था प्राण्यांची होते, असे सयाजी शिंदे आज म्हणाले. ‘देवराई’ला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडे, गवत जळून खाक झाल्यामुळे भावुक झालेल्या शिंदे यांनी आज […]

सामना 26 Dec 2025 10:00 am

एआयने काही नोकऱ्या नष्ट केल्यावर उच्च पगाराची पदे निर्माण होतील, ओपन एआयच्या सॅम ऑल्टमन यांच्या वक्तव्याची चर्चा

2035 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी सध्याच्या पिढीप्रमाणे सामान्य नोकरी करणार नाही. त्याऐवजी तो एका अगदी नवीन, उच्च पगाराच्या अंतराळ क्षेत्रातील नोकरीत कार्यरत असेल, असा आशावाद ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी व्यक्त केला. करीअर सुरू करण्यासाठी येणारे दशक हा ‘इतिहासातील सर्वात रोमहर्षक काळ’ असू शकतो. एआयने काही नोकऱया पूर्णपणे नष्ट केल्यानंतर आणि आज अस्तित्वात […]

सामना 26 Dec 2025 9:51 am

महिला प्रवाशांसाठी ‘महिला चालक’ पर्याय; उबर, ओला, रॅपिडोसारख्या ऍग्रीगेटर्ससाठी नवे नियम

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन ऍग्रीगेटर्स मार्गदर्शक तत्त्वे, 2025 मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणामुळे उबर, ओला आणि रॅपिडोसारख्या ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्मला प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी प्रवाशांकडून टीप मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही ऐच्छिक टीप देण्याची सुविधा प्रवासाच्या पूर्ततेनंतरच प्रवाशांना दिसली पाहिजे आणि ती बुकिंगच्या वेळी उपलब्ध नसावी. राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना या […]

सामना 26 Dec 2025 9:47 am

कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यापाऱ्याला कोर्टाचा दणका, पाच हजारांचा दंड ठोठावला

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे खायला घालणाऱया दादरच्या व्यापाऱयाला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला. सरकारी आदेशाचे उल्लंघन तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने व्यापाऱयाला दोषी ठरवले आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ देण्यावर उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात बंदी घातली. त्या बंदीनंतर कबुतरांना दाणे खायला दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याची ही पहिली […]

सामना 26 Dec 2025 9:11 am

सावंतवाडीत टर्मिनस नाही तर मत नाही! चाकरमान्यांचा एल्गार; मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय कोंडी करणार

‘‘मुंबईच्या 10 बाय 10 च्या खोलीत राहून मुंबईला आर्थिक राजधानी बनवणारा कोकणी माणूस आता लाचारी सोसायला तयार नाही. सत्ताधाऱयांकडून वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या भूलथापा अन् रेल्वेच्या जनरल डब्यात जनावरांसारख्या प्रवासामुळे चाकरमान्यांचा संयम आता सुटला आहे. सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणाऱ्यालाच मुंबईवर राज्य करण्याचा अधिकार असेल’’, अशा शब्दांत कोकण रेल्वे प्रवाशांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी राजकीय पक्षांना ठणकावले […]

सामना 26 Dec 2025 8:26 am

मुंबईत काँग्रेसला हवीयं वंचितची साथ! सर्वच महापालिकांमध्ये आघाडीसाठी आटापिटा सुरू

मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱया काँग्रेसला आता मुंबईसह राज्यभरात वंचित बहुजन आघाडीची साथ हवी आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून आता आटापटा सुरू झाला आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची […]

सामना 26 Dec 2025 8:14 am

अटलजी हे जगाचे प्रेरणास्थान!

गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन :पणजीतील अटल सेतू परिसरात वाहिली आदरांजली प्रतिनिधी/ पणजी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या योगदानासाठी आणि देशसेवेसाठी जो आदर्श घालून दिला त्याला तोड नाही. त्यांनी सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाला वेगळी दिशा दिली. त्यांचे त्याग आणि आत्मसमर्पण हे फार मोठे आहे. त्यामुळे ते केवळ भारताचेच नव्हे, [...]

तरुण भारत 26 Dec 2025 8:08 am

पुण्यात अजितदादा गट काँग्रेसला नकोसा, समविचारी पक्षांशी जुळवाजुळव; महाविकास आघाडीत घेण्यास विरोध

पुण्यात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार गटाला बरोबर घेण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट वगळून समविचारी पक्षांना बरोबर घेत महाविकास आघाडी होण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. त्यामुळे आता अजित पवार गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अजित पवार गटाबरोबर युती तोडत मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती. त्यामुळे अजित […]

सामना 26 Dec 2025 7:58 am

तुमच्यासाठी उमेदवारी मागायला जनता यायला हवी, नगरसेवक बनायचे तर शिव्या खायची तयार ठेवा; काम करावे लागेल; भाजपमधील पालिका निवडणुकांसाठी इच्छुकांचे नितीन गडकरी यांनी टोचले कान

नगरसेवक बनायचे तर शिव्या खायची तयार ठेवा; काम करावे लागेल. एका घरातील चौघांनी उमेदवारी मागितली. कुणाचा मुलगा-मुलगी होणे गुन्हा नाही. मात्र, तुमच्यासाठी उमेदवारी मागायला जनता यायला हवी. तुमचे वडील आई उमेदवारी मागायला येत असेल तर याला अर्थ नाही. मी एकही उमेदवारी ठरवायला येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय नितीन गडकरी यांनी भाजपमधील पालिका निवडणुकांसाठी इच्छुकांचे कान […]

सामना 26 Dec 2025 7:53 am

मुंबई महापालिकेचा इशारा : निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास फौजदारी कारवाई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी सुमारे 58 हजार कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण 29 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीसंबंधित कामाच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबई महापालिकेची व्याप्ती मोठी असून एकूण 227 प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. […]

सामना 26 Dec 2025 7:49 am

महत्त्वाच्या बातम्या –के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य

के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य विशाखापट्टणम ः हिंदुस्थानने बंगालच्या उपसागरात आयएनएस अरिघात या आण्विक पाणबुडीतून के-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 3,500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रातून अण्वस्त्रांचाही मारा करता येतो. विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱयाजवळ ही चाचणी झाली. त्यामुळे आता समुद्राच्या आतमधून अण्वस्त्रांचा मारा करण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानला प्राप्त झाले आहे. या […]

सामना 26 Dec 2025 7:44 am

रस्ते अपघातांत 11 महिन्यांत 14 हजार जणांचा मृत्यू

राज्यात या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यात एकूण 33 हजार 2 अपघात झाले असून, त्यामध्ये 14 हजार 66 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 हजार 784 अपघातांमध्ये 14 हजार 185 मृत्यू झाले होते. परिणामी राज्यात अपघातांची संख्या 218 ने (0.66 टक्के) वाढली असल्याची अधिकृत आकडेवारी पुढे आली आहे. राज्यातील वाहनांची […]

सामना 26 Dec 2025 7:40 am

नवी मुंबई विमानतळावर आपले सहर्ष स्वागत, हजारो प्रवासी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; दिवसभरात 30 विमानांचे लॅण्डिंग टेकऑफ

गेल्या 18 वर्षांचे स्वप्न आज साकार झाले. देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले लॅण्डिंग आणि टेकऑफ झाले. बंगळुरू येथून आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी टेकऑफ झालेल्या इंडिगोच्या 6 ई-460 या विमानाचे दीड तासाच्या प्रवासानंतर 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर लॅण्डिंग होताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ऑस्ट्रेलियातून आणलेल्या वॉटर टँकरने […]

सामना 26 Dec 2025 7:36 am

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक वातावरण -कुटुंबियांसोबत छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]

सामना 26 Dec 2025 7:02 am

लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणास्थळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार कार्यक्रम वृत्तसंस्था / लखनौ (उत्तर प्रदेश) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘राष्ट्रीय प्रेरणास्थळ’ या भव्य स्मारक संकुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी लक्षावधी लोक आणि मान्यवरांचा उपस्थितीत, भारताचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या 102 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात आला आहे. [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:58 am

श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकण्याकडे आज भारताचे लक्ष

वृत्तसंस्था/ तिरुवनंतपूरम एकतर्फी वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ आज शुक्रवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आत्मविश्वास गमावलेल्या श्रीलंकेविरुद्ध आणखी एका प्रभावी कामगिरीसह पाच सामन्यांची मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यांमध्ये भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. विशाखापट्टणम येथे अनुक्रमे आठ गडी आणि सात गडी राखून दणदणीत विजय मिळवून भारताने [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:58 am

हिंडलगामध्ये भटक्या कुत्र्याकडून बालकासह पाच जणांवर हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी झाले आहे. गुरुवारी सायंकाळी हिंडलगा येथे ही घटना घडली असून कुत्र्याने चावा घेतल्याने या बालकाचा अंगठा पूर्णत: निकामी झाला आहे. याच कुत्र्याने पाहुण्यांच्या घरी आलेल्या एका तरुणावरही हल्ला केला आहे.शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हिंडलगा येथील अथर्व कुरंगी (वय 7) या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:58 am

खालिदा झिया यांचा मुलगा 17 वर्षांनी परतला मायदेशी

बांगलादेशात स्वागतासाठी लाखाहून अधिक कार्यकर्ते वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान 17 वर्षांनी देशात परतले आहेत. अटक टाळण्यासाठी ते 2008 मध्ये लंडनला पळून गेले. त्यावेळी हसीना सरकारच्या काळात त्यांच्याविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराचे खटले प्रलंबित होते. आता तारिक यांचे स्वागत करण्यासाठी ‘बीएनपी’चे 1,00,000 हून अधिक कार्यकर्ते जमले होते. याप्रसंगी त्यांनी 17 मिनिटांचे [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:57 am

एका फिंगरप्रिंटची कमाल…दोन खुनांची उकल!

सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात घटप्रभा पोलिसांना यश : धुपदाळसह हुबळीमधील खुनाचीही कबुली प्रतिनिधी / बेळगाव चोरी प्रकरणात घेतलेल्या एका फिंगरप्रिंटमुळे खून झालेल्या युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. खून करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करणाऱ्या युवकालाही पुणेजवळ अटक करण्यात आली आहे. एका खून प्रकरणाचा तपास करताना हुबळी येथे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या आणखी एका खुनाचाही [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:56 am

ऑस्ट्रेलिया –इंग्लंड चौथी कसोटी आजपासून

ऑस्ट्रेलिया संघात स्पिनरऐवजी जलद गोलंदाज :नामुष्की टाळण्याचे इंग्लंडसमोर आव्हान वृत्तसंस्था/ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया यजमान ऑस्ट्रेलिया व यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असून केवळ वेगवान गोलंदाजांचा भरणा असणाऱ्या संघासह ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे. फिरकी गोलंदाज नॅथन लायन जखमी असल्याने तो संघाबाहेर आहे. पण त्याच्या जागी दुसरा फिरकी गोलंदाज घेण्याचे त्यांनी टाळले आहे. [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:55 am

केंद्राचे नवे कायदे कामगार हिताचे

गोव्यात लागू करण्याची प्रक्रिया लवकरच :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी केंद्रातील भाजप सरकार हे देशातील कामगारांच्या पाठिशी आहे. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी चार प्रमुख श्रम संहिता (कामगार कायदे) लागू केलेल्या आहेत. हे कायदे गोव्यातही लागू होण्यासाठी प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:55 am

बांगलादेशातला आगडोंब

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी साडेपाच दशकांपूर्वी आपल्या सैनिकांनी त्यांचे रक्त सांडले आहे, तो बांगलादेश आज भारतावरच उलटला आहे. त्या देशात आज इस्लामी धार्मिक कट्टरतावादाचा आणि त्याला जोडून येणाऱ्या हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. त्या देशातील अल्पसंख्य समाजांचे, विशेषत: हिंदूंचे भवितव्य अस्थिर आणि असुरक्षित बनले आहे. नुकतीच तेथे दिपू चंद्र दास याची धर्मांध जमावाकडून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:52 am

मोटारसायकली चोरणाऱ्या वडगावच्या अट्टल चोराला अटक

सात लाखांच्या दहा मोटारसायकली हस्तगत प्रतिनिधी/ बेळगाव मोटारसायकली चोरणाऱ्या विष्णू गल्ली, वडगाव येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. काकती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.मुझिफ मंजूरअहमद शेख (वय 21) राहणार विष्णू गल्ली, वडगाव असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:51 am

बेळगावसह तालुक्यात थंडीचा कडाका कायम

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगावसह तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा पारा 10 ते 12 अंशापर्यंत खाली जात असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. तसेच नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करण्याला पसंती देत आहेत. थंडी वाढल्याने विविध आजार बळावत असून दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचेही पहावयास मिळत आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:50 am

स्वधर्माचे आचरण जो करत नाही तो पापांच्या राशी रचत असतो

अध्याय तिसरा ब्रह्मदेवानी अन्नसाखळी कशी काम करते ते सांगितले. ते म्हणाले, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे. कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्ठीत असतो. ब्रह्मदेवांच्या सांगण्यावर पुढे बोलताना भगवंत [...]

तरुण भारत 26 Dec 2025 6:48 am