Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे आरोग्य – मनोबल उंचावणार आहे आर्थिक – आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]
आयला! पुन्हा तारीख पडली!! गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या याचिकेवरील फैसला आता नव्या वर्षात होणार आहे. या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर अंतिम सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आता 21 जानेवारी ही तारीख दिली आहे. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचीही सुनावणी होणार असून ती सलग दोन दिवस चालेल. त्यामुळे […]
2011 नंतरच्या झोपड्या हटवा! हायकोर्टाचे आदेश, एसआरएत बिल्डरची निवड लॉटरीनेच करा…मक्तेदारी मोडून टाका
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनायचे असेल तर आधी 2011 नंतरच्या झोपड्या हटवा तरच चांगली उद्याने व अन्य पायाभूत सुविधांचे जाळे तयार करता येईल. तसेच पुनर्वसनासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्या झोपडीधारकांवर गुन्हा दाखल करा व बिल्डरची नियुक्ती लॉटरीनेच करा, जेणेकरून कोणा एकाची मत्तेदारी राहणार नाही, अशा महत्त्वपूर्ण सूचना उच्च न्यायालयाने बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला केल्या. न्या. गिरीश कुलकर्णी […]
नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घाला! वनमंत्र्यांचे आदेश
नागरी वस्ती आणि शेतात होत असलेले बिबट्यांचे हल्ले हा गंभीर विषय आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे जर गावात संशयास्पद बिबट्या आढळला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा, असे आदेशच वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या रोहन बोंबे, शिवन्या […]
महायुती सरकारमुळे एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. पदोन्नती कोट्यातील जागा रिक्त नसतानाही सरकारने दीडशे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी नोकरीकडे आस लावून बसलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी गमवाव्या लागणार आहेत. राज्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या 600 जागा आहेत. नियमानुसार त्यातील निम्म्या म्हणजेच 300 जागा एमपीएससीच्या माध्यमातून भरायच्या तर उर्वरित निम्म्या 300 […]
एल्फिन्स्टन ब्रीजचा भुयारी मार्ग बंद, प्रभादेवी स्टेशनबाहेर प्रवाशांची कोंडी
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून प्रवाशांची गैरसोय झाली असतानाच बुधवारी सायंकाळी त्या गैरसोयींमध्ये मोठी भर पडली. पुलाखालील भुयारी मार्ग अचानक बंद करण्यात आला आणि पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून इच्छित ठिकाणी जावे लागले. प्रशासन कोणतीही आगाऊ सूचना न देता मार्गांमध्ये बदल करीत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी […]
पुण्यात ‘सर्च ऑपरेशन’, दिल्ली स्फोटानंतर संशयितांची झाडाझडती
दिल्लीतील स्फोट आणि फरिदाबाद, जम्मू-कश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर जप्त केल्याच्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा येथे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली. काही दिवसांपूर्वी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून कोंढव्यातून संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला एटीएसने अटक केली होती. दिल्लीतील एटीएसने बुधवारी कोंढवा भागातील संशयितांची चौकशी […]
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर राज्य सरकारच्यावतीने रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे आज सादरीकरण करण्यात आले. संगमेश्वरमध्ये पाच एकर जागेवर संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाने घेतली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावे, अशी सूचना करण्यात आली होती. […]
आभाळमाया –उपसूर्य आणि अपसूर्य!
>>वैश्विक, khagoldilip@gmail.com सूर्यमालेतला प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने कधी तो सूर्याजवळ येतो तर कधी सूर्यापासून दूर जातो. त्या ग्रहाची कक्षा स्वतःच्या अक्षाशी किती कलली आहे त्यावर आणि त्याच्या सूर्यापासूनच्या अंतरावर तिथे कधी उन्हाळा आणि थंडी असणार ते ठरते. पावसाळा हा आपल्याकडे उन्हाळ्यात उपऋतू आहे तो हिंदुस्थानातच 4 महिने ’वस्तीला’ राहात असल्याने एक संपूर्ण […]
>> सूर्यकांत पाठक राजस्थानातील जैसलमेर आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे घडलेल्या बस दुर्घटनांमध्ये एकूण जवळपास 46 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांनी देशातील परिवहन व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि प्रशासनातील पोकळपणा उघड केला आहे. या दोन्ही अपघातांत एकच गोष्ट समोर आली, ती म्हणजे बसचे आपत्कालीन दरवाजे उघडलेच नाहीत. ही केवळ योगायोगाची नव्हे, तर व्यवस्थेतील अक्षम्य बेजबाबदारपणाची […]
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज स्पष्टपणे फेटाळून लावले. ‘हे गोदी मीडियाचे पोल आहेत, त्यांना कुठलाही ठोस आधार नाही. हे तेच ‘एक्झिट पोल’वाले आहेत ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर इस्लामाबाद, लाहोर आणि कराची जिंकल्याचे दावे केले होते, अशा शब्दांत तेजस्वी यांनी खिल्ली उडवली. मतदानानंतर जाहीर करण्यात […]
सामना अग्रलेख –नवे टेरर मॉड्युल!
देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात व एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी यांनी तेच केले. पुन्हा या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. त्यांच्याच काळात गृहखात्याची यंत्रणा राजकारणग्रस्त झाली आहे. त्यामुळेच देशात दहशतवादी हल्ले होतच आहेत. तरीही मोदी म्हणतात, ‘‘सोडणार नाही.’’ साहेब, दिल्लीत दहशतवादाचे नवे […]
पुणे शहराचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी त्यांच्या नायब तहसीलदार ते तहसीलदार या कारकीर्दीमध्ये गडचिरोली, चंद्रपूरपासून पुण्यापर्यंत केलेले भ्रष्ट प्रवास समोर आले आहेत. 14 वर्षांच्या सेवेत सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. घोटाळे आणि प्रशासकीय अनियमितता असतानाही त्यांची तीन वेळा पुण्यातच बदली झाली आहे. येवले यांना विदर्भातून पुणे शहरात आणण्यापर्यंत वरदहस्त कोणी दिला याचीदेखील चर्चा […]
स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची केंद्र व राज्यातील मंत्र्यांची फौज
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. स्थानिक पातळीवरील या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने थेट केंद्र व राज्यातील मंत्र्यांना उतरवले आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष […]
काँग्रेस महायुतीतील पक्षांसोबत राज्यात कुठेही आघाडी करणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी महायुतीतील कोणत्याही पक्षाही युती केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केले. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या निवडणूक मंडळाच्या बैठकीनंतर […]
45 लाख रुपयांचे खंडणी प्रकरण, गुंड नीलेश घायवळविरुद्ध तिसरा मोक्का
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. महिला व्यावसायिकाला धमकावून त्याने 45 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या तीन गुह्यांत त्याच्यासह टोळीविरुद्ध मोक्का कारवाई […]
दोघा ड्रग्स तस्करांना 15 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
गांजाची तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कक्षाने रंगेहाथ पकडलेल्या दोघा आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. त्या दोघांविरोधात पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोघांनाही 15 वर्ष सक्त मजुरी व दीड लाख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. वर्ष 2011 मध्ये अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने घाटकोपर-अंधेरी लिंक रोड येथे इस्माईल शेख (21) आणि […]
शिवडीत ई-सिगारेटचा अड्डा उद्ध्वस्त
आरोग्यास हानिकारक असल्याने शासनाने बंदी घातलेली असतानाही ई-सिगारेटचा मोठ्या प्रमाणात साठा करणाऱ्याना शिवडी पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी फॉसबेरी मार्गावरील एक्सेल ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकून साठा केलेले तब्बल 30 लाख 50 हजार किंमतीचे ई-सिगारेटचे 305 बॉक्स जप्त केले. फॉसबेरी मार्गावरील महेंद्र पानवाल्याजवळ एक्सेल ट्रेडिंग कंपनी येथे ई-सिगारेटचा साठा करून ठेवला असल्याची खबर शिवडी पोलिसांना मिळाली […]
निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक; एकाला अटक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली निवृत्त बँक अधिकाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वसीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. गोरेगाव येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. ग्रुप अॅडमिनने त्यांना पह्न करून शेअरमध्ये […]
बेस्टमध्ये चोरी करणारा ताब्यात
गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुरेश पवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात दहाहून अधिक गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत.
सीओटू-टू-डीएमई तंत्रज्ञानाचे अनावरण
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने क्रांतिकारी प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीनहाऊस गॅसेसचे शाश्वत, हरित इंधनात रुपांतर होणार आहे. हे तंत्रज्ञान औद्योगिक सीओटू उत्सर्जनाचे थेट डिमथाईल इथर या कमी उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरणपूरक ऊर्जा वाहकात रूपांतर करते. डिमथाईल इथर हे हरित पद्धतीने जळणारे इंधन असून ते एलपीजी आणि डिझेल यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांची जागा घेऊ […]
>> गणेश पुराणिक, मुंबई मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदी अजिंक्य नाईक आणि टी20 गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजदीप गुप्ता यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर इतर पदांसाठी बुधवारी निवडणूक पार पडली. दुपारी 3 ते 6 या काळात MCA चे सदस्य, माजी खेळाडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 9 नंतर निकाल जाहीर झाला. उपाध्यक्षपदाच्या लढतीत […]
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 21 जानेवारी 2026 ला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू होते. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनावणीची […]
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकरने दिली माहिती
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले. ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हणत मंत्रिमंडळाने घटनेच्या जलद चौकशीचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळले. मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने लाल […]
दिल्ली बॉम्बस्फोटातील हल्लेखोराची लाल रंगाची इकोस्पोर्ट सापडली, पोलिसांच्या शोध मोहिमेला यश
दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित हल्लेखोर डॉ. उमर उन नबी याच्या दुसऱ्या कारचा अखेर शोध लागला आहे. उमरची रेड फोर्ड इकोस्पोर्ट ही गाडी बुधवारी हरियाणाच्या खंडावली गावाजवळ पार्क केलेली आढळली. ही गाडी डॉ उमरच्या मालकीच्या खंडावली येथील घराबाहेर पार्क केलेली आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारची तपासणी करून ती जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. दिल्ली […]
Photo –मैत्रिणीच्या लग्नात अनन्याचा जलवा
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या मेहंदी मधील फोटो सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या लहेंग्यातील फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. मात्र, या स्फोटाबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल […]
एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विमान हवेत असतानाच बॉम्बच्या मेल आला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर विमान ताबडतोब आयसोलेशन बेमध्ये नेण्यात […]
Nanded News –कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडमध्ये एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील जकात नाका येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता एका कारमध्ये २१ लाख ५० रुपयांची रक्कम एसएसटी पथकाने जप्त केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली आहे. सध्या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता […]
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत. देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3.30 वाजता मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात […]
मुंबई फिरायला आला अन् घात झाला, निर्माणाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकहून मुंबईत फिरायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील मरोळ परिसरात घडली. अमोल पगारे असे मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अमोल पगारे हा तरुण बुधवारी सकाळी नाशिकहून मुंबईत […]
Digital Gold खरेदी करताय? सेबीने दिला सतर्कतेचा इशारा
सध्या जगभरात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दरही गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या परताव्यामुळे अनेकजण सोने खरेदीकडे वळले आहेत. अनेकजण जिडीटल सोने खरेदी करत आहेत. देशातही डिजिटल सोन्यात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. बाजार नियामकाने (सेबीने) याबाबत एक मोठा इशारा दिला आहे. सेबीच्या मते डीजिटल सोन्यात गुंतवणूक धोक्याची ठरू शकते. काही डिजीटल सेवांवर […]
Mumbai News –साफसफाई करताना सेप्टीक टँकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
सेप्टीक टँकची साफसफाई करताना टाकीत पडून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयासमोरील राज ग्रँड दोई इमारतीजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. फुलचंद कुमार असे जखमी कामगाराचे नाव आहे. मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. […]
2 लाख रूपयाची लाच स्विकारल्या प्रकरणी पोलिस निरीक्षकांसह 4 कर्मचाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल
लोहारा (प्रतिनिधी)- लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. सहआरोपी न करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या या पोलिसांपैकी पोलिस नाईक अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक (प्रभारी) ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्ध बुधवारी दि. 12 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहारा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या मित्राविरुद्ध दाखल खुनाच्या गुन्ह्यात स्वतःला सहआरोपी न करण्यासाठी संबंधित पोलिसांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराकडे रक्कम नसल्याने त्याने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाकडून चार लाख रुपये स्वीकारले, तरीदेखील आणखी पाच लाख रुपयांची मागणी सुरूच ठेवली. एसीबीने केलेल्या पडताळणीत पोलिस भोसले व बोळके यांनी तक्रारदाराचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे उघड झाले. प्रभारी अधिकारी कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून तीन लाख रुपये घेतल्याचे आणि उर्वरित दोन लाख रुपये भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीने नियोजनपूर्वक मंगळवारी दि. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भातागळी (ता. लोहारा) येथील शेतामध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून तिघाडे याने दोन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपींच्या घरांची झडती घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7 (अ) आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले (सोलापूर) आणि पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पर्यवेक्षण उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या देखरेखीखाली पार पडली. ही कारवाई लोहारा पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचारावर मोठा धक्का ठरली असून स्थानिक पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
भूम (प्रतिनिधी)- येथील शशिकांत शाळू यांचे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी वयाच्या 71 व्या वर्षी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशान भूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुले,नातवंडे व पत्नी असा परिवार आहे. ते उद्योजक गणेश शाळू व मयूर शाळू यांचे वडील होत.
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढणार असल्याचे सूतोवाच नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेवून समविचारी पक्षाबरोबर युती-आघाडी किंवा स्वबळावर लढण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची तयारी सुरू केली असून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलने केली आहेत. मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. अशा स्थितीत सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. संभाजी ब्रिगेडने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी लक्षवेध आंदोलन केले. तरीही सरकार झोपेच सोंग करत असल्याचा आरोप ॲड. आखरे यांनी केला आहे. पुन्हा संभाजी ब्रिगेडने सत्ताधरी आमदार खासदार मंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. तरीही सरकारला जाग येत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगर परिषद निवडणुकीत निवडून आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आधीच महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने पीडलेला बळीराजा कर्जमाफीची वाट पाहत आहे. विधानसभा निवडणुकीत आजच्या सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा शब्द दिला होता मात्र आता योग्य वेळ शोधत आहेत. महाराष्ट्रात दर दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, सत्ताधारी व विरोधी पक्ष गुंडांचे पालन पोषण करण्यात दंग आहेत. आता राजकीय पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने फक्त संभाजी ब्रिगेडच जनतेचा आवाज होऊ शकते अशी परिस्थिती आहे. या वेळी महाराष्ट्रातील मतदार नक्कीच संभाजी ब्रिगेड ला पसंती देईल असा आम्हाल विश्वास आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती नुसार समविचारी पक्षां बरोबर युती - आघाडी करून या निवडणूका लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांनी सांगितले. धाराशिव, कळंब भूम, परंडा आणि वाशी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक लढण्यास तयार असलेल्या ईच्छुकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड आणि माजी जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील साखर व गुळ उत्पादक कारखानदारांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम द्यावी तसेच खरीप हंगामातील पीकविमा तत्काळ जमा करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्याची दखल न घेतल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे. आम्ही किती वफादार आहोत हे दाखवण्यासाठी साखर सम्राटांचे बगलबच्चे कारखानदारांच्या दारात शेपूट हलवत आहेत. त्यास प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत प्रतिटन 3500 रूपये विना कपात ऊसदर जाहीर करावा अन्यथा 17 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ऊसतोड बंद केली जाईल. ऊस दराबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर साखर कारखान्यातील वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावे, त्यावर शेतकरी प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजाभाऊ हाके, सचिन टाले, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, दुर्वास भोजने, तानाजी पाटील, विष्णू काळे, कमलाकर पवार, अभय साळुंके, चंद्रकांत समुद्रे आदी उपस्थित होते.
मानवी जीवनात कायद्याचे ज्ञान आवश्यक- माजी नगराध्यक्ष पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- मानवी जीवन हे समाजात घडते आणि समाजाला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी असते. कायदा म्हणजे शिक्षा देणारी गोष्ट नव्हे, तर तो अधिकार आणि जबाबदाऱ्याही सांगणारा मार्गदर्शक असतो. त्यामुळे मानवी जीवनात कायद्याने ज्ञान आवश्यक असल्याचे मत माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. धाराशिव शहरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी योगेश मोरे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परिक्षेतून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील आयएलएस लॉ कॉलेज येथे पाच दिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदविल्याबद्दल आंचल जानराव, किरण सुरवसे, ृती देवगिरे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात यावर्षी आयोजित केलेल्या दांडिया स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी प्रणिता भोसले व गौरी ढोबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. नितीन कुंभार, डॉ. इकबाल शहा, प्रा. व्ही. जी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. योगेश मोरे यांनी महाविद्यालयातील अनुभव आणि विधी क्षेत्रातील करिअर संधी याबद्दल मार्गदर्शन केले. धाराशिव पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे यांनी कायदा आणि तपास या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मूर्ती यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. जे. आंबेकर, प्रा. डॉ. एस. डी. कोल्हे, प्रा. के. पी. शिकारे, प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. अनुप कवठाळकर, प्रा. अजित शिंदे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी बागल, रोहित क्षीरसागर, आतार बशीर, राहुल ओव्हाळ, आकाश कवडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन ृती देवगिरे यांनी तर आभार प्रा. दीपिका स्वामी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे मार्गावर पेट्रोलची पाईपलाईन फुटली, उरण ते खारकोपर दरम्यान रेल्वे वाहतूक स्थगित
करंजाडे ते उरण दरम्यान रेल्वे मार्गावर पेट्रोलची पाईपलाईन फुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे सेवा स्थगित केल्याने उरण मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. या मार्गावरील सर्व रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. बुधवारी सकाळी 11.42 वाजता ही घटना घडली. […]
शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
गेल्या आठवड्याच दबावात असलेला शेअर बाजार या आठवड्यात मंगळवारपासून तेजीत आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बाजार तेजीत असला तरी ऐनवेळी होणाऱ्या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात सर्तकतेने व्यवहार करावेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. […]
कनिष्ठ प्रशासन अधिकारी निलंबित
धाराशिव (प्रतिनिधी)- बैठकीसही हजर राहिले नाहीत व कार्यालयातही अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए. पी. कुतवळ यांच्याविरूध्द मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. 11 नोव्हेंबर रोजी कुतवळ यांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र ते अनुपस्थित असल्याने त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांनी वारंवार फोन केला. तरीही ते बैठकीस हजर राहिले नाहीत. यानंतर शिक्षण विभागात पाहणी केली असता तिथेही अनुपस्थित होते. दरम्यान, महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित असल्याने आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेता आला नाही, असा आदेशाद्वारे ठपका ठेवत सीईओ डॉ. घोष यांनी मंगळवारी कुतवळ यांच्याविरूध्द निलंबनाची कारवाई केली.
पाणलोट विकास जाणीव जागृती प्रशिक्षण
भुम (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजना घटक 2.0 अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे, जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) संभाजीनगर, जलसंधारण विभाग धाराशिव, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ, भूम (PTO )यांच्या वतीने धाराशिव क्लस्टर क्र. 4 कारी येथे दि. 10/11/2025 रोजी पाणलोट जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम, सरपंच निलम कदम, जलसंधारण, कृषी विभाग लक्ष्मी कांत पवार, संकेत सर, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, पाणलोट समिती पदाधिकारी, प्रविण प्रशिक्षक, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ भूम चे सचिव प्रमोद शेळके हे हजर होते. या प्रशिक्षणात प्रधानमंत्री कृषी योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट विकासाचे महत्व, पाणलोट समितीची रचना, अध्यक्ष व सचिव यांची भूमिका, प्रकल्प आमंबजाववणी मध्ये, स्वयं सहायता गट, शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिका, पाणलोट विकासाच्या विविध उपचार प्रकार यावाबत सविस्तर माहिती प्रवीण प्रशिक्षक बाबासाहेब वडवे, शारदा गायकवाड, सुवर्णा पंढरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना दिली. बचत गट सदस्य,पाणलोट समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे प्रशिक्षण साठी हजर होते.
दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी फरिदाबादच्या कार डिलरला अटक
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फरिदाबादमधील कार डिलरला अटक केली आहे. अमित असे त्याचे नाव असून तो फरिदाबादमधील रॉयल कार प्लाझाचा मालक आहे. दिल्ली बॉम्बस्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 ही गाडी या डिलरने विकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी अमितच्या कार प्लाझावर धाड टाकली व त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. […]
वेट अँड वॉच, बिहार निवडणुकीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची सावध प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीत एक्झिट पोलचा काल हा एनडीएकडे वळताना दिसत आहे. पण हरयाणा निवडणुकीत वेगळेच चित्र होते असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले. तसेच निकाल लागायला वेळ आहे पाहू अशी सावध प्रतिक्रिया खरगे यांनी दिली आहे. खरगे म्हणाले की, सर्व एक्झिट पोल्स एनडीएला आघाडी दाखवत आहेत. ते दर्शवतात की महागठबंधनाला विशेष पाठिंबा मिळत नाही. […]
Delhi Bomb Blast –‘दावत के लिए बिर्याणी तैयार है’, स्फोट घडवण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत आता आणखी एक मोठी माहिती उघड झाली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी आपल्या चॅटबॉक्समध्ये कोडवर्ड्सची मदत घेतली आहे. हे कोड इतके साधे आहेत की, कोणालाच त्यावर संशय येणार नाही. पण त्या कोडवर्ड्समध्येच […]
अमरावती: लग्नात नवरदेवाला चाकूने भोसकले; कॅमेरामॅनच्या ड्रोनने हल्लेखोरांचा २ किमीपर्यंत केला पाठलाग
अमरावती शहरात सोमवारी एका लग्नसमारंभात नवरदेवाला स्टेजवर चाकूने भोसकल्यामुळे आनंदाचे वातावरण क्षणार्धात बदलले. यावेळी लग्नाचे चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्याने केवळ हा हल्ला चित्रित केला नाही, तर पळून जाणाऱ्या आरोपीचा आणि त्याच्या साथीदाराचा सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्यांचे चित्रण केले. बडनेरा रोडवरील एका लॉन मध्ये रात्री ९:३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय सुजल राम […]
मुरुम (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई-वठार येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी सृष्टी सुनील राठोड (इयत्ता 4 थी) हिने उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल (रौप्य पदक) पटकावले आहे. ‘परिश्रमाची पराकाष्ठा आणि आत्मविश्वासाची उंच झेप'या उक्तीला साजेसं प्रदर्शन करत सृष्टीने आपली चमकदार कामगिरी साकारली असून तिच्या या यशाने मुरुम आणि शाळेचा अभिमान द्विगुणित झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळांनी सृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजने आणि धनराज हळळे यांनी सृष्टीचा सन्मान करून अभिनंदन केले .या प्रसंगी शाळेत मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, पर्यवेक्षक वीरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे व प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका यांच्या हस्ते सृष्टीचे तीच्या पालका सहीत सत्कार केले . सृष्टीला या यशामागे प्रशिक्षक रफिक शेख यांचे मार्गदर्शन, तसेच वर्गशिक्षिका सोनाली कारभारी व श्रीदेवी मंडले यांचे सातत्याने प्रोत्साहन लाभले. सृष्टीची आता राष्ट्रीय (नॅशनल) पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व स्तरावरून तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका साक्षी देशमाने यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले.
लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस- न्यायमूर्ती व्यंकटेश गिरवलकर
मुरुम (प्रतिनिधी)- विधी व सेवा दिन हा केवळ औपचारिक दिवस नाही, तर लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस आहे. न्याय ही केवळ कागदावरची संकल्पना नाही ;तर ती प्रत्येक नागरिकाचा श्वास बनावी, तसेच विधी व सेवा दिनाचे उद्देश एनसीसी च्या विद्यार्थ्यांना न्यायमूर्ती व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले.श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात संपन्न झालेल्या 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरसिंग वाघमोडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नौगण , ॲडम ऑफिसर कर्नल वाय.बी. सिंह , राजस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण खरोसेकर,चीफ ऑफिसर महावीर काळे , सेकंड ऑफिसर नमनगे जगदीश, सचिन गिरवलकर, सुभेदार मेजर शंभू सिंग यांची उपस्थिती होती. न्यायव्यवस्थेला लोकपार्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी 9 नोव्हेंबरला विधी व सेवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग वाघमोडे यांनी 'भारतीय राज्यघटना आणि तिची निर्मिती प्रक्रिया 'या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, संविधानाची पायमल्ली म्हणजे आपल्या लोकशाहीवरचा घाला आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे डॉ. वाघमोडे म्हणाले. या कार्यक्रमास यशवंत विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय , ज्ञानेश्वर विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीच एम शिवशंकर निकम, हवालदार संभाजी शिंदे, हवालदार दीपक, हवालदार अमोल मोरे, हवालदार शामराव सोनटक्के यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चीफ ऑफिसर महावीर काळे यांनी केले तर आभार जगदीश नमनगे यांनी मानले.
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 11 नोव्हेंबर 25 रोजी करण्यात आले. विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे शाखेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष बोडके यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शितल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना “ बी आय एम सॉफ्टवेअर, ई- टेंडरिंग व बिल्डिंग परमिशन या स्थापत्य अभियांत्रिकी मधील प्रमुख विषयांवर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम क्षेत्रात होणारे बदल, डिजिटल साधनांचे महत्त्व आणि सॉफ्टवेअरच्या प्रत्यक्ष वापराबाबत सविस्तर सादरीकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्राचा मनःपूर्वक लाभ घेतला व त्यांच्या शंकांचे निरसनही केले. त्यामुळे या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना रुची निर्माण झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. या अंतर्गत सिव्हिल अभियांत्रिकी विषया अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागातील (बांधकाम व्यवसायातील) बारकावे माहिती जाणून घेतले. सोबतच विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांच्या मध्ये भविष्यातील नोकरी संदर्भ आणि ट्रेनिंग संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
थकीत भाडे मागितल्यावरून डोक्यात गोळी घालण्याची धमकी
वाशी (प्रतिनिधी)- टँकर वाहतुकीचे थकीत असलेले 43 लाख 41 हजार रूपये मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत अपहरण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील गिरवली पाटी येथे घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात श्रीरामपूर येथील एका आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर सोपान गिते (वय 44, रा. आंद्रुड, ता. भूम, जि. धाराशिव) यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामधील टँकर वाहतुकीचे 43 लाख 41 हजार 537 रूपये आरोपी यादवेंद्र दिलीप शर्मा (रा. मार्केट यार्ड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याकडे बाकी होते. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 9.35 च्या सुमारास गिते यांनी आरोपी शर्मा याला एनएच 52 रोडवर गिरवली पाटी येथे पैशाची मागणी केली. याचा राग मनात धरून आरोपी शर्माने फिर्यादी गिते यांना स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली. त्यानंतर तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत गिते यांना जबरदस्तीने गाडीत बसवून धोकादायकरित्या पळवून नेले. या घटने प्रकरणी ज्ञानेश्वर गिते यांनी 11 नोव्हेंबर रोजी वाशी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यादवेंद्र शर्मा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 140 (3) आणि 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.
विद्याचरण कडावकर यांची धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कडावकर यांची ही तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदावर झालेली पदोन्नती असून, त्यांची पहिलीच नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. विद्याचरण कडावकर यांनी यापूर्वी परभणी आणि जालना जिल्ह्यातील अंबड येथे तहसीलदार म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यानंतर त्यांची बदली तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झाली होती. तेथे त्यांनी काही काळ काम पाहिल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली असून, शासनाने त्यांना धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची अलीकडेच परभणी जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी शासनाने पूर्वी उदय किसवे यांची नियुक्ती केली होती. उदय किसवे हे वादग्रस्त अधिकारी असल्यामुळे त्या संदर्भात माध्यमाने आवाज उठवल्यानंतर त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नवीन शासननिर्णय काढत उदय किसवे यांच्या नियुक्तीच्या आदेशात अंशतः बदल करून विद्याचरण कडावकर यांची नियुक्ती केली. विद्याचरण कडावकर हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारतील असा अंदाज आहे.
रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थिनीला इस्रोला भेट देण्याची संधी
भूम (प्रतिनिधी)- मयुरी मनोज मुंजाळ या विद्यार्थिनीची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, मुलाखत दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत जानेवारी महिन्यात इस्रो, आयआयटी गांधीनगर, या वैज्ञानिक स्थळाला भेट देण्याची संधी तिला मिळाल्याबद्दल तसेच संजना अमोल बळे या विद्यार्थिनीची एलन करियर इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आलेल्या टॅलेंटेक्स परीक्षेत ऑल इंडिया रॅक 564 मिळवत स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल वरील दोन्ही विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हा बँकेला 74 कोटींचे शासकीय अर्थसहाय्य- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी देण्यासतठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हा बँकेला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या शेतजमीनी खरवडून गेल्या आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आहे. अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पतपुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. होमट्रेड रोखे घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली धाराशिव जिल्हा बँक प्रचंड अडचणीत सापडली आहे. 440 कोटी रुपयांच्या ठेवी देणारे तब्बल सहा लाख ठेवीदार आर्थिक अडचणीच्या कात्रीत अडकले आहेत. सन 2002 पासून म्हणजेच मागील तब्बल 23 वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा चक्क बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारीच्या जोखडातून जावे लागत आहे. कर्जाच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाचाही सध्या जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
सरन्यायाधीश गवईंवर बुट फेकल्याचे प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर चप्पल फेकण्याच्या घटनेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, ही घटना केवळ सुप्रीम कोर्ट किंवा वकील समाजालाच नाही, तर संपूर्ण समाजाला दुखावणारी आहे. मुख्य न्यायाधीश देवेन्द्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निरीक्षण केले की, काही घटनांची फक्त निषेध करणे पुरेसे नसते, […]
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा च्यवनप्राश, वाचा
च्यवनप्राश ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रभावी आयुर्वेदिक पाककृतींपैकी एक आहे, जी शरीराला आतून बळकट करते. हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शरीर उबदार ठेवते आणि थकवा, सर्दी आणि खोकला यासारख्या समस्या टाळते. बाजारात अनेक ब्रँडचे च्यवनप्राश उपलब्ध आहेत, परंतु घरगुती च्यवनप्राश हा सर्वात शुद्ध आणि पौष्टिक आहे. […]
40 वर्षीय व्यक्तीकडून लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल
चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध लोकलमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आणि तिचा व्हिडिओ परवानगीशिवाय चित्रीत केल्याचा आरोप असल्याने गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख हेमांशू गांधी (40) अशी झाली असून तो मालाड (पूर्व) येथील रहिवासी असून तो एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. पीडित महिला 30 वर्षांची वकिल असून ती मुंबई हायकोर्टात वकिली करते. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, […]
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खोटी सही दाखवून निवृत्त महिला कर्मचाऱ्याची 99 लाखांची फसवणूक
पुण्यात राहणाऱ्या महिलेची सायबर चोरट्याने चक्क अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खोटी सही दाखवून फसवणूक केली. संबंधित महिला ही एलआयसीच्या निवृत्त कर्मचारी आहेत. पुणे शहर सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये निवृत्त महिला कर्मचाऱ्याची फसवणूक झाली आहे. ही महिला कोथरुड येथे राहत होती. एका व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. जो स्वतःला डेटा प्रोटेक्शन एजन्सीचा अधिकारी असल्याचे सागंत होता. […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचाही समावेश होता, अशी […]
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठापुढे कार्यतालिकेतील 19 व्या क्रमांकावर ही सुनावणी होणार होती. दरम्यान शिवसेनेची बाजू मांडणारे विधिज्ञ असीम सरोदे यांनी ट्विटरवरून ही सुनावणी होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली होती. त्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत न्यायव्यवस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले. अश्या व्यंगचित्रांमधून लोकभावना […]
हिवाळ्यात मध खाणे का उपयोगी आहे, वाचा
हिवाळ्यात दररोज १ चमचा मध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदिक तज्ञांचा असा विश्वास आहे की, मध सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. हिवाळ्यात मध हृदय आणि पचन मजबूत करते. मध आपल्या शरीराची ऊर्जा वाढवते आणि रोगांपासून आपले संरक्षण करते. घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना […]
हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक असते. सिंघाडा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. म्हणूनच खासकरून हिवाळ्यात सिंघाडा हा खायलाच हवा. घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले सिंघाडा कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतो, त्यामुळे […]
निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारचे बिया अत्यंत फायदेशीर आहेत. त्यापैकी एक म्हणजे जवसाचे बियाणे. या बिया आकाराने लहान आहेत, परंतु त्यांचे गुणधर्म प्रचंड आहेत. असंख्य औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जवस बियांना सुपर सीड्स म्हटले जाते. इतर देशांमध्ये त्यांना “गोल्डन सुपर सीड्स” म्हटले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने ओमेगा-३, फायबर आणि लिग्निन असतात, जे हृदय, मेंदू, त्वचा, केस, पचनसंस्था […]
Video दिल्ली बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, भर ट्राफिकमध्ये…
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. VIDEO | CCTV footage captures the exact moment of […]
दिल्ली स्फोट प्रकरणात जैश मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी डॉक्टरांविरोधात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधून आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी डॉक्टरची ओळख कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी डॉ. तजामुल अशी झाली आहे. तो श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयात नोकरी करत होता. पोलिसांनी डॉक्टर तजामुलला करण सिंग नगर येथून […]
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकींवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने योगेश रामदास चव्हाण (वय 30 सातारा, सध्या राहणार वांद्री ), रोहित मोहन चव्हाण (वय […]
भोपळा हे नाव ऐकताच, तुम्हीपण नाक मुरडताय का? वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे
भोपळा म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु हाच भोपळा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे हे विसरुन चालणार नाही. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे अ, क, ई आणि बी-कॉम्प्लेक्स तसेच पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. भोपळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते, […]
हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या
हिवाळ्यात आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलतात. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ पसंत करतात, तर हिवाळ्यात गरम पदार्थ पसंत करतात. फळे अनेकदा थंड असतात, म्हणूनच लोक हिवाळ्यात फळांचे सेवन कमी करतात. हिवाळ्यात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, की त्यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढतो, असा प्रश्न अनेकांना पडतो, तर यामागील नेमकं तथ्य काय आहे हे जाणून घेऊया. […]
ड्रग्ज विकून बिघडवू देश, घशाशी आल्यावर भाजप प्रवेश…अंबादास दानवे यांचा जोरदार टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तुळजापूर ड्रग प्रकारणारील आरोपी संतोष परमेश्वर याने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत परमेश्वर याने भाजप मध्ये प्रवेश केला. यावरून शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ”तुळजापुरात ड्रग प्रकारणातील आरोपीला भाजप प्रवेश […]
नवऱ्याला दारु सोड म्हणणे पत्नीच्या जीवावर बेतले, संतप्त पतीने पेट्रोल टाकून जाळले
बेगुसरायमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नवऱ्याला दारु सोड असे सांगणे एका पप्नीच्या जीवावर बेतले आहे. संतापलेल्या नवऱ्याने बायकोला जीवंत जाळले आहे. ही घटना मंगळवारी सोनमा गावात रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. बेगुसराऊ येथील बखरी परिसरात ही घटना घडली आहे. रिडू कुमारी (25) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जितेन्द्र कुमार […]
ट्रम्प आले ताळ्यावर? ‘अमेरिकेकडे पुरेसे प्रतिभावान लोक नाही’ म्हणत H-1B व्हिसा योजनेचे केले समर्थन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन सुधारणांवरील भूमिकेत काहीशी नरमाई आणल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणाले की, अमेरिकेला विशिष्ट क्षेत्रांसाठी परदेशी प्रतिभेला (foreign talent) देशात आणण्याची गरज आहे. ट्रम्प यांनी हे मान्य केले की, दीर्घकाळ बेरोजगार असलेल्या अमेरिकन नागरिकांना संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये व्यापक प्रशिक्षणाशिवाय महत्त्वाच्या भूमिका सोपवता येणार नाहीत आणि अशा भूमिकांसाठी […]
दिल्लीत सोमवारी कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. देशाच्या तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असताना आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंण्ड मौलवी इरफान अहमद असल्याचे समोर आले आहे. तो जम्मू काश्मिरच्या सोफिया जिल्ह्यात राहणारा आहे. गुप्त यंत्रणांच्या माहितीनुसार,मौलवी इरफान याने फरीदाबादच्या मेडीकलचे विद्यार्थी आणि डॉक्टरांना कट्टरपंथी विचारांनी प्रभावित केले. याच कारणामुळे व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल बोलले […]
राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी
अर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक, नागपूर आणि धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (DCCB) भागभांडवल म्हणून एकूण 827 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने तोट्यात असलेल्या धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त करण्यास आणि प्रशासक नेमण्यासही मंजुरी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार या बँकेचे नियंत्रण अलीकडे काँग्रेस, […]
दिंडीत कंटेनर घुसला; महिला ठार, नऊ जखमी; संतप्त वारकऱ्यांचा रास्ता रोको
तुकारामाच्या गजरात आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये आज सकाळी कंटेनर घुसल्याने वारकरी महिला जागीच ठार झाली तर अन्य नऊ वारकरी जखमी झाले असून त्यांना कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान कंटेनरच्या मृत प्रियांका तांडेल घुसखोरीविरोधात संतप्त वारकऱ्यांनी कामशेतच्या महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे लोणावळ्यापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. उरणच्या करळ तसेच पनवेल परिसरातील असंख्य […]
चारकोपच्या मतदार यादीमधील मतदारांची नावे मराठीऐवजी अन्य भाषेत छापली असल्याची बाब उघडकीस येताच ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावेदेखील गुजराती, तामीळ, कानडी तसेच बंगाली भाषेत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्राचा कारभार मराठीमध्ये असतानाही मतदारांची नावे मात्र वेगवेगळ्या भाषेत छापल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या यादीतील नावांची त्वरित दुरुस्ती करावी व सर्व नावे मराठीतच छापावीत, अशी मागणी […]
घरातील फुलझाडांना घाला ‘या’पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले
आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही प्रकारची झाडे ही असतात. अर्थात ही झाडे फुलझाडे असतील तर त्यांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील फुलझाडांची योग्य निगा राखणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच घरातील झाडांना आपल्या किचनमधून खाऊ देऊ शकतो. यात महत्त्वाचे खत म्हणजे बटाटा. बटाटा आपल्या किचनमधील सर्वात आवडता प्रकार. अशावेळी याच बटाट्याची साले सुद्धा खूप उपयोगी […]
अलिबाग जिल्ह्यात ३८८ कुष्ठरुग्ण आढळले असून रायगडकरांची चिंता वाढली आहे. मात्र या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २३ लाख ३० हजार ८७१ जणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षणासाठी ३७५ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ९९५ […]
पोलीस डायरी –पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!
>> प्रभाकर पवार संगणक अभियंता असलेले दीपक डोळस हे पुण्याच्या कोथरूड येथील उच्चभ्रू वस्तीत राहत होते. ते इंग्लंडमध्ये आयटी इंजिनीअर म्हणून १० वर्षे नोकरीला होते. दीपक डोळस हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील! पैशांची त्यांना कधीच चणचण भासली नाही, परंतु त्यांच्या वयात आलेल्या दोन मुली मात्र कायम आजारी एक मुलगी तर मतिमंद आहे. त्यामुळे डोळस दांपत्य नेहमी […]
गुप्तधन शोधणारे सहाजण अटकेत, पडक्या घरात खोदाई; राजूर पोलिसांची कारवाई
एका जुन्या पडक्या घरामध्ये अघोरी प्रथा व जादूटोणा करून सोन्याची पेटीत असलेले गुप्तधन शोधून देण्याचे काम करीत असलेल्या चार पुरुषांसह एका महिलेला राजूर पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वंदना कलेक्शनसमोर गिरीश बोऱहाडेयांच्या पडक्या घरात काही लोक जादूटोणा करत […]
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली या मार्गावरील चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास वेगळेच वळण लागले. हातकणंगले येथील भूसंपादन कार्यालयासमोर अतिग्रे येथील विजय पाटोळे या बाधित शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी भूसंपादन कार्यालयाला टाळे ठोकले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकलीदरम्यान असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर […]
फातीमा देवीची मूर्ती देव्हाऱ्यातून बाजूला ठेवली
चिवला बीच परिसरातील घटनेने खळबळ ; पोलिसांकडून चौकशी सुरू मालवण/प्रतिनिधी मालवण शहरातील चिवला बीच येथील फातीमा देवीची मूर्ती अज्ञात व्यक्तीने देव्हाऱ्यातून काढून बाजूला ठेवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. धुरीवाडा, चिवला बीच येथील नागरिकांनी आणि खिस्ती बांधवांनी घटनेचा निषेध नोंदविला आहे. नागरिकांनी गर्दी करत सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान , पोलिस निरीक्षक मारुती जगताप [...]
कांद्याला क्विंटलला अवघा 180 रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये टाकून ते भरून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे काहीही घेणे-देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त […]
तीन तासांचा थरार; कोल्हापुरात बिबट्या जेरबंद
उच्चभ्रू वसाहतीत बिबटय़ा घुसल्याची आणि दोन ते तीन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात आल्याची पुनरावृत्ती कोल्हापूरकरांना आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. सकाळी नागाळा पार्क येथील वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल वुडलॅण्ड आणि महावितरण कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी पोलीस, वन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाला अडीच ते तीन तास लागले. तत्पूर्वी हॉटेलमधील कर्मचारी तुकाराम खोंदल आणि कृष्णात […]
शिर्डी नगरपरिषदेत भाजपविरोधात भाजपचे बंड, निवडणुकीत नवा ट्विस्ट
राज्याचे जलसंधारणमंत्री व अहिल्यानगर जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये भाजपने स्वतंत्र गट तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चिन्हे असतानाच भाजपमध्येच अंतर्गत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व 1980 साली शिर्डीत आरएसएसची पहिली […]
मी आता शांत बसणार! वॉरेन बफे यांचे सीईओ पद सोडण्याआधी पत्र
जगप्रसिद्ध गुंतवणुकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे या वर्षीच्या अखेरपर्यंत बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी शेअरधारकांसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले की, मी आता शांत राहणार आहे. कोणतेही मोठे पद स्वीकारणार नाही. बफे यांच्यानंतर ग्रेग एबेल हे पंपनीची सूत्रे स्वीकारणार आहेत. दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी आणि शेअरधारकांसाठी आभार मानणारे […]
धर्मेंद्र यांना बाॅलीवूडमधील हिमॅन असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून, चाहते धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत, ज्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६५ वर्षांहून अधिक काळ पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती जाणून तुम्हीही थक्क व्हाल. 1960 मध्ये “दिल भी है तेरा, हम भी हैं तेरे” या […]
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घराच्या दिशेने रवाना
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन गेले आहेत. 89 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना वयोमानानुसार प्रकृतीसंबंधी काही तक्रारी जाणवत असल्यामुळे त्यांना 31 ऑक्टोबरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी धर्मेंद्र […]
प्रदूषणामुळे दिल्ली-एनआरसीमध्ये ग्रॅप-3 लागू; पाचवीपर्यंतच्या शाळा आणि वर्क फ्रॉम होम बंद होणार
दिल्ली-एनआरसीमध्ये वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ग्रॅप-3 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पाचवीपर्यंतच्या शाळा बंद केल्या जाऊ शकतात. तसेच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सांगितले जाऊ शकते. दिल्लीच्या आनंद विहार, पालमपासून लाल किल्ला, चांदनी चौकपर्यंत एक्यूआय लेव्हल 400 च्या वर पोहोचली होती. त्यानंतर एअर क्वालिटी व्यवस्थापन आयोगाने ग्रॅप-3 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या डिझेल वाहनांनाही दिल्लीत […]
अनुसूचित जाती थेट आरक्षित जागा प्रभाग : 151, 186, 146, 152, 155, 147, 189, 93, 118, 183, 215, 141, 133, 26, 140. – अनुसूचित जातीसाठी आरक्षित 15 जागांमधून महिलांसाठी 8 जागा आरक्षित करण्यात आल्या. प्रभाग : 133, 183, 147, 186, 155, 118, 151, 189. – अनुसूचित जमातीसाठी थेट 2 जागा ः प्रभाग 53 आणि 121 […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवडय़ांपूर्वी एच-1 बी व्हिसा शुल्क अनेकपटीने वाढवले. त्यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची चिंता वाढली. यातून सगळे सावरत नाहीत तोच अमेरिकेचे सरकार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. या नव्या समस्येचे नाव ‘हायर अॅक्ट’ असे आहे. विदेशी कर्मचाऱ्यांना हायर करणाऱ्या अमेरिकेच्या पंपन्यांवर 25 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. यालाच हायर […]
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुमार यांनी महिनाभरापूर्वीच महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते भारतीय रेल्वे सेवा यांत्रिकी अभियंताच्या 1988 च्या तुकडीतील अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, […]

26 C