जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी अन् थंडीची लाट
जम्मू-कश्मीरमधील अनेक भागांत मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी सुरूच आहे. यामुळे या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तापमान प्रचंड खाली घसरले आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि जवळपासच्या परिसरात बर्फ गोठले आहेत. कश्मीर खोऱयात धुके पडल्याचे दिसत आहे. शेजारील राज्य हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका व मध्यम पाऊस तसेच हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील […]
अमेरिकी वायुदलाचे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त
अमेरिकी वायुसेनेचे एफ-16 सी लढाऊ विमान दक्षिण कॅलिफोर्नियातील वाळंवटात दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलटला वेळीच बाहेर काढण्यात आल्याने तो बचावला. उपचारासाठी पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास प्रशिक्षण सुरू असताना या विमानाला अपघात झाला. या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. 2022 साली ट्रोना परिसरात एक लढाऊ […]
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या दोघांना अटक
पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या दोन संशयितांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक लष्कराचा माजी सुभेदार आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोघांवर गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. एके सिंह असे अटक करण्यात आलेल्या माजी शुभेदाराचे नाव आहे, तर रशमनी पाल असे महिलेचे नाव आहे. ही महिला दमनची रहिवासी आहे. हे दोघेही […]
दिल्लीत 5 स्टार हॉटेलचे भाडे लाखाच्या घरात
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या भाडय़ात विक्रमी वाढ झाली आहे. विकेंडला फाईव्ह स्टार हॉटेलचे भाडे 85 हजारांपासून 1.3 लाखांपर्यंत पोहोचले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हिंदुस्थान दौरा या आठवडय़ात दिल्लीतील भारत मंडपममध्ये टॅक्सेशन मीट, यशोभूमी येथे होत असलेले पेपर एक्स्पो कार्यक्रम, युनेस्कोची होत असलेली बैठक आणि दिल्लीत सुरू असलेले अधिवेश यामुळे दिल्लीतील […]
ब्राझीलमध्ये मजुराला सापडले 700 किलो सोने
ब्राझीलमध्ये खदानीत काम करणाऱया एका मजुराला 700 किलो सोने सापडले. चिको ओसोरियो असे या मजुराचे नाव आहे. जुन्या खदानीत खाणकाम करताना त्याला हे सोने सापडले. हे सोने 24 कॅरेटचे असून याची बाजारात किंमत तब्बल 914 कोटी रुपये इतकी आहे. ओसोरियाने एक हिस्सा बँकेत जमा केला आहे, तर दुसरा हिस्सा विकून जहाज खरेदी केले आहे. सरकारने […]
अध्यक्ष पुतीन यांचे भव्य स्वागत
पंतप्रधान मोदी स्वत: विमानतळावर उपस्थित : स्नेहभोजनासह द्विपक्षीय चर्चा वृत्तसंस्था/नवी दिल्ली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे भारतात भव्य स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर त्यांचे गुरुवारी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानळावर संध्याकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. पुतीन विमानामधून उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामोरे [...]
‘सर्वोच्च’आदेश, राज्यांना साहाय्य देण्याची सूचना वृत्तसंस्था/नवी दिल्ली केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘एसआयआर’चे काम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना करावेच लागणार आहे, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे काम करण्यात काही अडचणी असतील, तर त्या सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारांचे आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला अधिक कर्मचारी किंवा साहाय्यक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. मतदारकेंद्र निहाय कर्मचारी [...]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]
भारताच्या निर्णयावर अमेरिका समाधानी
सी-हॉक देखभाल व्यवस्थेची अमेरिकेकडून प्रशंसा वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारताच्या नौदलाने अमेरिकेच्या ‘एमएच-60आर सी-हॉक’ हेलिकॉप्टरांची देखभाल आणि इंधन पुरवठ्याच्या व्यवस्थापनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत अमेरिकेने केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येत असताना अमेरिकेकडूनही भारताला हे शुभसंकेत मिळाले आहेत. भारतीय नौदलाने घेतलेला हा निर्णय भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीला [...]
घर-पगार देण्यास तयार चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या वृद्ध महिलेची कहाणी सध्या चर्चेत आहे. 76 वर्षीय महिलेचे वय वाढत असून आता तिला मदतीची गरज आहे. परंतु तिच्या दोन्ही मुली तिला मदत करत नाहीत, तर एक मुलगी तिच्यासोबत संभाषण देखील करत नाही, तर दुसरी मुलगी मानसिकदृष्ट्या कमजोर आहे. देखभालीसाठी मुलीचा शोध महिला स्वत: अस्थमाने त्रस्त असून फारवेळ [...]
बाबरी मशीद उभारणार, नवा पक्षही स्थापणार
ममता बॅनर्जीच्या अॅक्शननंतर आमदार हुमायूं कबीर यांची घोषणा वृत्तसंस्था/कोलकाता पश्चिम बंगालमधील आमदार हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद उभारण्याची शपथ घेतली आहे. आमदाराच्या या निर्णयामुळे नाराज तृणमूल काँग्रेसने गुरुवारी त्यांना पक्षातून निलंबित केले. पक्षाच्या या कारवाईनंतर हुमायूं यांनी 22 डिसेंबर रोजी नव्या पक्षाची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. हुमायूं यांनी 6 डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद [...]
नातवंडांच्या देखभालीसाठी आजी आकारते शुल्क
1 तासाकरता द्यावे लागतात 1 हजार रुपये स्वत:च्या लहान नातवंडांना पाहून आजीआजोबांना होणारा आनंद काही औरच असतो. नातवंडांसाठी आजीआजोबा न झेपणारी दगदगही सहन करत असतात. स्वयंपाकापासून नातवंडांना स्नान घालण्यापर्यंत आजीआजोबा सर्वकाही करत असतात. परंतु सद्यकाळातील आजी अत्यंत वेगळ्या झाल्या आहेत. ब्रिटनमधील एक आजी स्वत:च्या नातवंडांची देखभाल करते आणि त्याच्या बदल्यात स्वत:च्या अपत्यांकडून पैसे घेते. ही [...]
राजदसोबत पुन्हा जाणार नाही : नितीश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले कौतुक पाटणा : बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सभागृहात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजददरम्यान तीव्र वाक्युद्ध दिसून आले. मी दोनवेळा राजदसोबत गेलो होतो, परंतु राजदच्या नेत्यांनी गडबड केल्याने त्यांची साथ सोडावी लागली. आता पुन्हा राजदसोबत कधीच जाणार नसल्याचे नितीश कुमार यांनी राजद आमदार भाई वीरेंद्र यांना उद्देशून म्हटले [...]
पतधोरण बैठकीचा आज अहवाल होणार सादर
आरबीयाअ गव्हर्नर संजय मल्होत्रा पत्रकार परिषदेतून मांडणार बैठकीचा अहवाल वृत्तसंस्था/मुंबई भारतीय रिझर्व्ह ब्ँाक (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समितीची बैठक आज 5 डिसेंबर रोजी संपणार आहे. आरबीआय रेपो दरात कपात करणार का रेपोदर जैसे थे राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. रेपो दराचा थेट परिणाम बँक कर्जांच्या व्याजदरांवर होतो. अशा परिस्थितीत, जर रेपो दरात कपात [...]
जिहादी कोर्समध्ये 5 हजार महिलांची भरती
महिलांना आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण : दहशतवादी अझहरचा दावा वृत्तसंस्था/रावलकोट मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास सर्वस्व गमाविणारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याने आता जैशच्या महिला शाखेवरून अनेक दावे केले आहेत. या महिला शाखेत आतापर्यंत 5 हजार महिलांची भरती झाली असून या महिलांना आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा मसूद अझहरने केला आहे. यापूर्वी अझहरने ऑक्टोबर [...]
‘इंडिगो’चे विमान तातडीने उतरविले
बाँबच्या धमकीचा संदेश पाठविणाऱ्याला अटक वृत्तसंस्था/नवी दिल्ली ‘इंडिगो’ या प्रवासी विमान कंपनीचे एक विमान अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले आहे. हे विमान सौदी अरेबियातील मदीना येथून हैद्राबाद येथे निघाले होते. मात्र, या विमानात बाँब पेरण्यात आला आहे, अशी धमकी ईमेल वरुन देण्यात आल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून ते अहमदाबादच्या विमानतळावर गुरुवारी दुपारी उतरविण्यात आले, अशी [...]
लालू कुटुंबियांना तूर्तास दिलासा
लँड फॉर जॉब प्रकरणात आरोप निश्चिती निर्णय लांबणीवर वृत्तसंस्था/नवी दिल्ली लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालय गुरुवारी निकाल देणार होते. मात्र, न्यायालयाने सध्या निर्णय पुढे ढकलला आहे. आता पुढील सुनावणी आता 8 डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाला [...]
पेन्शन असलेल्या आईचा उपचार खर्च मिळावा हायकोर्टाचे जिल्हा न्यायालय प्रशासनाला आदेश
नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक पेंशन असलेल्या आईचा उपचार खर्च सोलापूर जिल्हा न्यायालय प्रशासनाने तिच्या कर्मचारी मुलाला द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परशुराम मोतीवाले यांनी ही याचिका केली होती. ते सोलापूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आई एका रुग्णालयात कामाला होती. तिला तेरा हजार रुपये पेंशन आहे. आईच्या हार्टच्या […]
गुन्हे वृत्त –विमानतळावर कारवाईचा धडाका सुरूच
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या आठ दिवसांत विमानतळावर कारवाई करून ड्रग, सोने आणि चलन जप्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशातून हायड्रोपॉनिक गांजा तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गांजा तस्करी होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नुकतेच विमानतळावर आलेल्या 5 प्रवाशांकडून एपूण 16,796 किलो हायड्रोपॉनिक […]
‘नवोदित मुंबई श्री’वर साजिद मलिकचे नाव
‘नवोदित मुंबई श्री’च्या निमित्ताने शास्त्राrनगर मैदान शरीरसौष्ठवपटू आणि क्रीडाप्रेमींच्या गर्दीने अक्षरशा ओसंडून वाहात होतं. स्पर्धा नवोदितांची असली तरी स्पर्धेला लाभलेला अभूतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद बृहनमुंबई शरीरसौष्ठव संघटनेची वाढलेली खरी ताकद दाखवून गेला. अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘नवोदित मुंबई श्री’चा मान विराज फिटनेसच्या साजिद मलिकने मिळवला. 235 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात इतकी चुरस […]
बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणाऱ्या आमदाराची हकालपट्टी,तृणमूल काँग्रेसने केली कारवाई
पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणाऱया हुमांयू कबीर या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. त्याच्या घोषणेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाल्याचे बोलले जात होते. कबीर याने मुर्शिदाबाद येथील बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती. त्याने 6 डिसेंबर रोजी मशिदीचा पायाभरणी समारोह होणार असल्याचे पोस्टर्स मुर्शिदाबाद जिह्यात अनेक ठिकाणी […]
ऑस्ट्रेलियन भूमीवरही रुट ‘शतकवीर’ 12 वर्षांनंतर शतकाचा दुष्काळ संपला; स्टार्कची विक्रमी कामगिरी
तब्बल 12 वर्षे आणि 29 डावांचा संयमाचा कस लागल्यानंतर अखेर जो रुटने ऑस्ट्रेलियन भूमीवर आपले पहिले वहिले शतक ठोकले आणि ‘अॅशेस’मधील आपल्या शतकांचा ओघ कायम ठेवला. रुटच्या चाळिसाव्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 9 बाद 325 अशी मजल मारली असली तरी मिचेल स्टार्कच्या झंझावाती सहा विकेटमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची पहिल्या दिवशी चांगलीच परीक्षा घेतली. […]
ही मोदींची पॉलिसी…मला विदेशी नेत्यांना भेटू देत नाहीत! राहुल गांधी यांची टीका
‘विदेशी नेते किंवा प्रतिनिधी हिंदुस्थानात आले की विरोधी पक्ष नेत्यांनाही त्यांची भेट दिली जाते. सरकार स्वतः त्यासाठी पुढाकार घेते. अशी प्रथा आणि परंपरा आहे. मात्र, मोदी सरकार या प्रथा-परंपरा पाळत नाही. ही त्यांची पॉलिसीच आहे,’ अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राहुल बोलत होते. […]
कोहली-रोहितवर हात टाकू नका! शास्त्रींचा इशारा
हिंदुस्थानी क्रिकेट विश्वात सध्या नवनव्या अफवांचा धूर उठतोय. 2027 च्या वन डे विश्वचषकाच्या वाटचालीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जागांवर प्रश्नचिन्ह लावण्याचा सुळसुळाट काही मंडळींनी सुरू केला आहे. आणि नेमक्याच वेळी माजी कसोटीपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री बॅट, बॉल आणि माईक घेऊन मैदानात उतरले आणि त्यांनी कोहली-रोहितवर हात टाकू नका, असा इशारा त्यांच्या […]
पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत? तपोवन वादावर नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
नाशिकमध्ये होणाऱया कुंभमेळय़ासाठी तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज वादग्रस्त विधान केले. वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरी कापायला का विरोध करत नाहीत, असे नितेश राणे बरळले. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणाऱया सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी देशभरातील साधुसंत येणार […]
विराट, पांढरी जर्सी पुन्हा वाट पाहतेय…
> विराट, रांची पाहिलं, रायपूर पाहिलं आणि मग आम्ही आमच्याच हृदयाचं ऐकलं. ते एकच म्हणत होतं, हा माणूस कसोटीचा आहे! तुझा प्रत्येक फटका सीमारेषा ओलांडतो, पण आमच्या आठवणी थेट लॉर्ड्सपर्यंत पोहोचताहेत. तुझ्या बॅटनं चेंडू उडतो, पण आमच्या मनात पुन्हा अॅडलेड उजाडतंय. आज तू निळ्या जर्सीत खेळतोयस, पण आम्हाला प्रत्येक वेळी दिसते तीच पांढरी जर्सी. […]
आधी हिंदुस्थानात या, मग तुमचे म्हणणे मांडा; हायकोर्टाने विजय मल्ल्याला सुनावले
देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावले. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे. मात्र त्याच्या अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर आधी हिंदुस्थानात या मग तुमचे म्हणणे मांडा, अशा शब्दांत न्यायालयाने मल्ल्याला सुनावले. एफईओ कायद्याचे कलम 12 (8) घटनाबाह्य […]
अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचेच प्रोत्साहन, हायकोर्टाकडून ठाणे पालिकेसह सरकारची पुन्हा कानउघाडणी
ठाण्यात दिवसागणिक बेकायदा बांधकामे फोफावत असून अनधिकृत बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह ठाणे महापालिकेची आज पुन्हा झाडाझडती घेतली. प्रशासकीय अधिकारीच अनधिपृत बांधकामांना पाठीशी घालतात, प्रोत्साहन देतात. त्यामुळेच अशा बांधकामांना पाणी व विजेचे कनेक्शन मिळते असे सुनावत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने उपस्थित अधिकाऱयांना जाब विचारला. इतकेच नव्हे तर या बांधकामांना दोषी असलेल्या अधिकाऱयांची नावे […]
सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड पालिका लिलावात काढणार, गिरणी कामगारांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा
मुंबई महापालिकेने वरळी येथील सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा गिरणी कामगार पृती समितीने दिला आहे. सेंच्युरी मिलचा भूखंड मुंबई महापालिकेने 45 ते 50 वर्षे भाडय़ाने दिला होता. नुकताच त्याचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. तो भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला आहे. नव्या […]
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. शिवाजी पार्प येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, धूळ प्रतिबंधक आच्छादन आणि मंडप आदी सुविधा सज्ज […]
विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम हायकोर्टात जानेवारीत सुनावणीची शक्यता
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच अद्याप कायम आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे असून त्यावर हायकोर्टाच्या मुंबई खंडपीठासमोर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिकेची कागदपत्रे दोन आठवडय़ांत मुंबई खंडपीठाकडे पाठवण्याचे निर्देश रजिस्ट्रीला दिले. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी नावांची शिफारस केली होती. मात्र […]
भारतीय महिलांचा जर्मनीकडून पराभव
वृत्तसंस्था/सॅँटियागो येथे सुरू असलेल्या एफआयएच ज्युनियर महिला विश्वचषक मोहीमेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाला जर्मनीकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. जर्मनीकडून लीना फ्रेरिच (5), अन्निका शॉनहॉफ (52) आणि मार्टिन रीझेनेगर (59) यांनी गोल केले. दोन्ही संघ सुरूवातीलाच आपले वर्चस्व गाजवण्यास उत्सुक होते. जर्मानीने सुरूवातीच्या काही मिनिटांतच भारताला बॅकफूटवर ढकलले आणि पाचव्या मिनिटाला पेनल्टी [...]
600 विकेट घेणारा सुनील नरेन पहिला गोलंदाज
वृत्तसंस्था/अबू धाबी वेस्ट इंडीजचा गूढ स्पिनर सुनील नरेन त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुनील नरेनने स्पर्धात्मक टी-20 क्रिकेटमध्ये 600 बळी टिपणारा पहिला गोलंदाज बनून ऐतिहासिक यश मिळविले. त्याचे प्रँचायझी अबू धाबी नाईट रायडर्सकडून शारजाह वॉरियर्सविरुद्ध झालेल्या वर्ल्ड आयएल टी-20 सामन्यात खेळताना त्याने हा टप्पा गाठला. सामन्यांतर, अबू धाबी नाईट रायडर्सने नरेनला त्याच्या अभूतपूर्व कामगिरीचे स्मृतिचिन्ह [...]
कसोटी व टी-20 तून निवृत्ती घेतलेले रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीवरही पडदा पडायला आलाय अन् खुद्द निवड समिती नि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही तेच हवंय असं चित्र उभं राहिलं होतं…त्या दोन्ही खेळाडूंना जरी 2027 मधील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे वेध लागलेले असले, तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने ही त्यांना शेवटची संधी असल्याचं मानलं [...]
केरळचा गतविजेत्या मुंबईला धक्का, आसिफचे 5 बळी
वृत्तसंस्था/लखनौ स्थानिक हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज के.एम.आसिफने पाच विकेट घेतल्यामुळे गुरूवारी येथे सय्यद मुश्ताक अली चषक ग्रुप अ सामन्यात केरळने गतविजेत्या मुंबईला 15 धावांनी पराभवाचा धक्का दिला. टी-20 स्पर्धेत पाच सामन्यांत पहिला पराभव स्वीकारणाऱ्या मुंबईने 16 गुणांसह गटात आघाडी कायम ठेवली आहे. तर पाच संघांच्या गटात तिसऱ्या विजयानंतर केरळ 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर [...]
समरदीप सिंग गिलला गोळाफेकचे सुवर्ण
वृत्तसंस्था/जयपूर समरदीप सिंग गिलने गुरूवारी येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पुरूषांच्या गोळाफेकमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या (एआययू) स्वताचाच विक्रम मागे टाकला तर ईशा चंदर प्रकाश (महिला हेप्टाथ्लॉन) आणि पुरूषांच्या 4100 मी. रिले संघाने नवे स्पर्धाविक्रम नोंदवले. यावर्षी दोनवेळचा आशियाई गेम्स चॅम्पियन तजिंदरपाल सिंग तूरला तीनदा हरवणाऱ्या समरदीपने सुवर्णपदक जिंकण्याच्या दुसऱ्या प्रयत्नात 19.42 मी. अंतरापर्यंत शॉटपुट [...]
आनंदला धक्का देत जेरुसलेम मास्टर्समध्ये एरिगेसी विजेता
वृत्तसंस्था/जेरुसलेम ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने पाच वेळचा विश्वविजेता असलेल्या विश्वनाथन आनंदला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का देत जेरुसलेम मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. या दोघांनी सुरुवातीच्या रॅपिड गेममध्ये बरोबरी साधल्यानंतर, एरिगेसीने पहिल्या ब्लिट्झ टायब्रेक सामन्यात पांढऱ्या मोहरांनी खेळताना विजय मिळवत निर्णायक आघाडी घेतली. 22 वर्षीय खेळाडूने दुसऱ्या ब्लिट्झ सामन्यातही विजयी स्थिती राखली आणि नंतर बरोबरी साधली, जी त्याला 2.5-1.5 [...]
ऑफ-बिट…मॅक्सवेलच्या ‘आयपीएल’ कारकिर्दीवर पडदा…
ग्लेन मॅक्सवेल म्हणजे विलक्षण आक्रमक नि फॉर्मात आल्यावर कुठल्याही माऱ्यावर प्रचंड वर्चस्व गाजवण्याची ताकद बाळगणारा खेळाडू…त्याची बॅट तळपू लागली की, गोलंदाजांची धुलाई ही ठरलेली…2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्यानं एकहाती बाहेर काढताना फटकावलेलं नाबाद द्विशतक ही एकच खेळी त्याच्या स्फोटक कौशल्याची जाणीव करून देण्यास पुरेशी…पण ‘टी-20’ क्रिकेटला साजेसा हा खेळाडू ‘आयपीएल’मध्ये अलीकडे [...]
रचिन रवींद्र, टॉम लॅथम यांची शतकांसह द्विशतकी भागीदारी
विंडीजविरुद्ध पहिली कसोटी, तिसरा दिवस : 481 धावांची आघाडी घेत न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड वृत्तसंस्था/ख्राईस्टचर्च रचिन रवींद्र व कर्णधार टॉम लॅथम यांनी झळकवलेल्या शानदार शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले. रवींद्रने 176 तर लॅथमने 145 धावा जमविल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर 4 बाद 417 धावा जमवित विंडीजवर एकूण 481 [...]
गोव्याची आघाडीची मल्लखांबपटू : प्राजक्ता गावडे
नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा शरीराला ताकद, लवचिकता व बौद्धिक उर्जा देणाऱ्या मल्लखांब या भारतातील प्राचीन खेळात आज युवा खेळाडू आकर्षित होताना दिसत आहे. प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालय हे मल्लखांबपटू घडविणारे गोव्याचे एक प्रमुख केंद्र आहे. या केंद्रात अनेक मल्लखांबपटू तयार झाले आहेत. याच केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आपेव्हाळ-प्रियोळ येथील प्राजक्ता वसंत गावडे या युवा खेळाडूने राज्य व [...]
फक्त सामंजस्य करारांवर आणि मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर कोटय़वधींची उधळपट्टी केल्यानंतर ‘निकाल’ मात्र शून्यच असल्याचा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर केला. आपल्या देशात रोजगार देऊ शकत नाहीत आणि दुसऱ्या देशात रोजगार देण्याची आश्वासने सरकार देत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’वर सरकारची अकार्यक्षम धोरणे आणि भ्रष्टाचारावर सरकारवर जोरदार […]
सरकारला एक वर्ष झाले, महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा 9 लाख कोटींवर, राज्याची तिजोरी रिकामी
राज्यातील महायुती सरकारच्या स्थापनेची उद्या (शुक्रवारी) वर्षपूर्ती होत आहे. पण सरकारच्या पहिल्या वाढदिवसावर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यामुळे वर्षपूर्तीचा कोणताही मोठा गाजावाजा सरकारने केलेला नाही. मागील एका वर्षात सरकारी तिजोरीला गळती लागल्याने एकामागोमाग एक लोकप्रिय योजना बंद करण्याची नामुष्की या सरकारवर आलेली आहे. परिणामी लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा वर्षभरात प्रत्यक्षात येऊ […]
ऐनवेळी काही नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुका पुढे ढकलणे निवडणूक आयोगाला चांगलेच भोवले आहे. नागपूर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आयोगाच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तातडीने निवडणुकीची नियोजित तारीख बदलावी लागेल अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढावली नव्हती. हा निर्णय चुकीचाच होता, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाचे कान उपटले. न्या. विभा पंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांच्या […]
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामधील आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या उद्यानातच जन्मलेल्या या तीन वर्षीय वाघाचे नाव ‘रुद्र’ असे होते. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी या ठिकाणच्या ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ही माहिती पालिकेने दहा दिवस लपवली होती. यावेळी तर ‘रुद्र’ वाघाच्या मृत्यूची […]
मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान, आज तातडीची सुनावणी
काही नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वच 288 परिषदा आणि पंचायतींची एकत्र मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालाला आज राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तत्काळ मतमोजणीची त्यांची मागणी आहे. या याचिकेवर […]
व्लादिमीर पुतीन यांना रेड कार्पेट, मोदींनी घेतली गळाभेट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे गुरुवारी नवी दिल्लीत आगमन झाले. जवळपास आठ दशकांपासून मित्र राष्ट्र असलेल्या रशियाच्या अध्यक्षांसाठी हिंदुस्थानने ‘रेड कार्पेट’ अंथरले. नवी दिल्लीतील पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत पुतीन यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून रवाना झाले. महाराष्ट्र पासिंगच्या कारमधून प्रवास महाराष्ट्र पासिंगच्या MH01 EN5795 या कारमधून त्यांनी […]
शिक्षक ‘सुट्टी’वर, आज शाळा बंद! ‘टीईटी’ सक्ती रद्द करा, अशैक्षणिक कामे लादू नका
‘टीईटी’ सक्ती, संचमान्यता रद्द करा, शिक्षकांच्या नियुक्तीचे कंत्राटीकरण थांबवा, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादू नका आणि रिक्त पदे तत्काळ भरा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेसह राज्यातील शिक्षक संघटनांनी उद्या 5 डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’चा नारा दिला आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नसल्याने मुंबईसह राज्यभरातील सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळादेखील उद्या बंदच […]
डिजिटल सातबाराला मान्यता, अवघ्या 15 रुपयांत डाऊनलोड
तलाठय़ांच्या खाबूगिरीला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे ऑनलाइन काढण्यात येणाऱया सातबारावर तलाठय़ाच्या सही शिक्क्याची गरज नसेल. फक्त पंधरा रुपयांमध्ये सातबारा डाऊनलोड करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाने यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले. असा काढता येईल सातबारा महाभूमी पोर्टलवर digitalsatbara.mahabhumi.gov.in यावर आता नागरिकांना डिजिटल पेमेंटच्या मदतीने सातबारा डाऊनलोड […]
सामना अग्रलेख – शेतकरी नुकसानभरपाई दाखवायचे दात
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी प्रकाशमान करणार असे म्हणणारे सरकार ना स्वतःची मदत पूर्ण देऊ शकले आहे, ना केंद्राच्या अतिरिक्त सहाय्यासाठीचा प्रस्ताव वेळेत पाठवू शकले आहे. एरवी शेतकरी कल्याणाच्या मोठमोठ्या बाता मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही ‘उप’ करीत असतात. प्रत्यक्षात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत केलेल्या गौप्यस्फोटाने या सरकारचे दाखवायचे दात दिसले आहेत! नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या […]
महाराष्ट्र राजभवन झाले ‘लोकभवन’
भाजप सरकारचा नावे बदलण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ करण्यात आले. पेंद्रीय सचिवालयाचे ‘कर्तव्य भवन’ असे नामांतर करण्यात आले. त्याचवेळी राज्यपाल, नायब राज्यपाल यांचे निवासस्थान ‘लोक निवास’ म्हणून ओळखले जाईल, तर त्यांच्या कार्यालयांचे नाव ‘लोक भवन’ राहणार, असे नमूद करण्यात आले होते. तशा मार्गदर्शक सूचनाही पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांसाठी जारी […]
शिवसेना संसदेत आक्रमक…सरकारचा नवा वायदा, नवी तारीख; एप्रिलपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग!
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आता नवी तारीख दिली. एप्रिल 2026 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ‘मुंबई-गोवा हायवेला चांद्रयान मोहिमेपक्षाही जास्त खर्च आला आहे. तरीही रस्ता पूर्ण झालेला […]
दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घेऊन यादी जाहीर करा, आयुक्तांचे महापालिकांना आदेश
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ शिवसेना आणि मनसेसह विरोधी पक्षांनी सातत्याने चव्हाटय़ावर आणला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला जाग आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करा तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे […]
लेख –अमेरिकेतील ‘हायर अॅक्ट’ आणि आऊटसोर्सिंगचे भवितव्य
>> महेश कोळी अमेरिकेतील नव्या ‘हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अॅक्ट, 2025’ या प्रस्तावित विधेयकाने भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण केली आहे. हा कायदा लागू झाला तर अमेरिकन कंपन्यांनी परदेशी संस्थांना अमेरिकन ग्राहकांच्या फायद्यासाठी दिलेल्या सेवांच्या बदल्यात केलेल्या देयकांवर तब्बल 25 टक्के उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे ऑफशोर आयटी सेवा आणि बिझनेस […]
कोर्टाने बजावले; कोणतीही तडजोड नको; एसआरए बिल्डिंगचे काम दर्जेदारच हवे!
एसआरए इमारतींचे बांधकाम दर्जेदारच व्हायला हवे. इमारतीची सुरक्षा व स्थिरतेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, असे उच्च न्यायालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला बजावले आहे. खार येथील एका एसआरए इमारतीचे बांधकाम अपूर्ण असताना काही रहिवाशी तेथे जाऊन राहत आहेत. याची न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. या इमारतीला ओसी मिळालेली नाही. […]
आचारसंहिता 20 किंवा 22 डिसेंबरला, चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करण्याआधीच राज्याचे उच्च व तंत्रिशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका निवडणुकांची घोषणा करून टाकली. राज्यात 20 किंवा 22 डिसेंबरला पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, दिवाळीनंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका होतील असे विधान या आधी चंद्रकांतदादांनी केले होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी […]
मोहरीची भाजी खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वाचा
हिवाळा येताच मोहरीच्या भाजी बाजारामध्ये दिसू लागते. पंजाबपासून ते उत्तर भारतातील प्रत्येक घरात मोहरीची भाजी म्हणजेच सरसो का साग हे तयार होते. सरसो का साग आणि मक्के की रोटी हे काॅम्बिनेशन खूप उत्तम काॅम्बिनेशन मानले जाते. खासकरुन हिवाळ्यात मोहरीची भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे खूप आहेत. हंगामी असणारी ही भाजी म्हणूनच त्या दिवसात खाणे हे खूप […]
15 दिवस दररोज मेथी दाण्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
आयुर्वेदामध्ये मेथीचे वर्णन अमृतसारखी वनस्पती म्हणून केले जाते. मेथीदाणे हे मेथीच्या भाजीइतकेच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. मेथीच्या बियांमधील सॅपोनिन्स आणि फिनोलिक संयुगे जळजळ कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. झोपताना आपले शरीर योग्य स्थितीत म्हणजे कसे असायला […]
जालन्यातील कौचलवाडी गांजाच्या शेतीवर पोलीसांचा छापा, एक कोटीचा मुद्देमाल जप्त
जालन्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी गावभागातील शेतात गांजाच्या शेतीवर अंबड पोलीस व एटीएस पथकाने कारवाई करुन तब्बल एक कोटीचा गांजाचे झाडे पकडली आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज ४ डिसेंबर रोजी उशीरा करण्यात आली. एटीएस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे […]
जालन्यातील रुई येथील शेतात बिबट्याने पाडला गाईचा फडशा, २० दिवसांत दुसरी घटना; परिसरात भीतीचे वातावरण
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्याचे वाढते आतंकामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करुन तिचा फडशा पडल्याची घटना आज ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान ऊस तोंडीमुळे ऊसात लंपलेले बिबटे व इतर प्राणी ऊस बाहेर पडत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. रुई येथील शेतकरी पंढरीनाथ प्रभाकर राजगुरू […]
झोपण्याआधी वेलची का खायला हवी, जाणून घ्या
पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, मानसिक शांती मिळविण्यासाठी आणि श्वासाला तजेला येण्यासाठी वेलची खाणे हे फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने झोप चांगली लागते आणि ताण कमी होतो. वेलची दिसायला लहान असली तरी त्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत. वेलची खाणे आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने अविश्वसनीय फायदे मिळतात. दूध आणि जिलेबी एकत्र खाण्याचे […]
Pranit More आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत होता प्रणित मोरे, बिग बॉसमधून देशभरात मिळाली ओळख
बिग बॉस हिंदीचा 19 वा सिझनचा फिनाले विक सध्या सुरू आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्रीय भाऊ उर्फ प्रणित मोरे, अभिनेता गौरव मोरे, संगीतकार अमाल मलिक, इन्फ्लुएन्सर तान्या मलिक, अभिनेत्री फरहाना भट आणि क्रिकेटपटू दीपक चहरची बहिण मालती चहर हे सहा जण सध्या फिनालेमध्ये आहेत. रविवारी या पैकीच एक जण बिग बॉस 19 चा विजेता ठरणार […]
मराठी चित्रपटसृष्टीत 20 वर्षांहून अधिक काळ मालिका व चित्रपटांमधून घराघरात पोहचलेली प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही अवघ्या काही तासात नॅशनल क्रश बनली होती. गिरीजाचा निळ्या साडीतील एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात गिरीजा ही नॅशनल क्रश बनली होती.
Latur News क्रेटा कारची ट्रकला पाठीमागून धडक, भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू
अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई क्रेटाने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा कार अक्षरशः ट्रकच्या मागील भागात घुसली, यात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारमधील चालक रविकुमार तुकाराम दराडे (वय 20 […]
हिवाळ्यात गाजर सूप पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
हिवाळ्यात गरम सूप आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये गाजर ही मुबलक प्रमाणात उपल्बध असतात. गाजरापासून आपण विविध प्रकारच्या रेसिपी करु शकतो. यातील सर्वात महत्त्वाची रेसिपी म्हणजे गाजराचे सूप. गाजराचे सूप हे हिवाळ्यात पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. म्हणूनच गाजर सूप पिल्याने शरीराला अनेक […]
व्लादिमीर पुतिन यांचं हिंदुस्थानात आगमन, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर केलं स्वागत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं पालम विमानतळावर स्वागत केलं. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानात पंतप्रधान मोदी आज रात्री एका खाजगी मेजवानीचं आयोजन करणार आहे. पुतिन सुमारे ३० तास हिंदुस्थानात राहणार आहेत. त्यांच्या हिंदुस्थानात […]
एसआयआरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुर्शिदाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या आहेत की, “पश्चिम बंगाल निवडणुकीच्या फक्त तीन महिन्याआधी जाणीवपूर्वक एसआयआर का लागू करण्यात आला?” त्या म्हणाल्या की, फक्त विरोधी पक्षशासित राज्यांना लक्ष्य केले जात आहे, तर आसाम आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये ते लागू […]
दूध आणि जिलेबी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
हिवाळा येताच बहुतेक लोकांना सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात शरीराला अधिक ऊर्जा, उष्णता आणि हाडांची ताकद आवश्यक असते. दुधासोबत जिलेबी खाण्याचे खूप आश्चर्यकारक फायदे आहेत ते आजही कित्येकांना माहीत नाही. झोपताना आपले शरीर योग्य स्थितीत म्हणजे कसे असायला हवे? वाचा दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने काय होते? हिवाळ्यात आठवड्यातून किमान २-३ वेळा दूध […]
रत्नागिरीतील दोन हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरवणाऱ्या संचमान्यतेला विरोध, 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन
शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षकांच्या संचमान्यतेचा शासन निर्णय काढला होता.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक अतिरिक्त होऊन खेड्यापाड्यातील अनेक शाळा बंद पडणार आहेत.त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे संचमान्यतेचा हा जाचक निर्णय रद्द करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने उद्या दि.५ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन पुकारले […]
Solapur News : टेंभुर्णीत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
करमाळा चौकात सिमेंट मिक्सरचा कहर; दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी अंत टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात रस्त्यावरील अतिक्रमणे व बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्व सामान्यांना सतत बसत आहे. याचा नुकताच प्रत्यय आला आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करमाळा चौकात भरदिवसा भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या [...]
कर्मचाऱ्यांच्या संपाचा Indigo एअलाईन्सला मोठा फटका, तब्बल 7160 कोटींचे नुकसान
इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने आज अचानक संप पुकारल्याने बुधवारी त्यांची संपूर्ण सेवा कोलमडली होती. संपामुळे 200 हून अधिक विमाने रद्द झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. तसेच याचा मोठा फटका एअरलाईन्सला देखील बसला आहे. संपाचा फटका एअरलाईन्सच्या वाहतूकीला तर बसला सोबत इंडिगोचे शेअर्सही पडले. त्यामुळे दोन्ही मिळून विमान कंपनीला एकाच दिवसात […]
Solapur News : सोलापुरात महिला रुग्णाशी गैरवर्तन प्रकरण : क्ष-किरण तंत्रज्ञ इनामदार निलंबित
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले कारवाईचे आदेश सोलापूर : आरोग्य महापालिका विभागातील क्ष-किरण तंत्रज्ञ (एक्स-रे टेक्निशियन) गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत. महापालिकेच्या रामबाडी यु.पी. एस.सी. केंद्रामध्ये उपचारासाठी येण्प्रया रुग्णांचे क्ष-किरणयंत्राद्वारे तपासणी [...]
महायुतीत साठमारी! फाटाफूट झाली तर निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील; संजय शिरसाटांचा इशारा
महायुतीतील मित्रपक्ष शिंदे गट आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याचं कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण यांनी वसई-विरार पालिकेवरून केलेलं वक्तव्य आहे. वसई-विरार पालिका दत्तक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना द्या, असं चव्हाण म्हणाले आहेत. यावरूनच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिला आहे. महायुतीत फाटाफूट झाली तर निवडणुका स्वतंत्रपणे […]
Satara News : मरळी विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरली कलाकारांची अप्रतिम रांगोळी
मरळी प्रदर्शनात बारकाईने रेखाटलेल्या रांगोळ्यांनी पाहुण्यांचे लक्ष वेधले नवारस्ता : पाटण तालुक्यातील मरळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरले जात असताना प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच रेखाटलेली अप्रतिम रांगोळी सध्या विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरली आहे. पाटण तालुक्यातील कै. बत्सलादेवी देसाई हायस्कूल, मरळी येथे ५३ वे तालुकास्तरीय तीन [...]
Karad News : मसूर पोलिस स्टेशनचे बांधकाम प्रस्ताव फाईलमध्येच; नागरिकांमध्ये नाराजी
मसूर पोलीस स्टेशनला इमारतीची प्रतीक्षा मसूर : कराड तालुक्यातील मसूर हे गाव वाढती लोकसंख्या, व्यापारी वसाहतीचा झपाट्याने होत असलेला विरतार आणि दोन राज्य महामार्गाशी जोडलेले असल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग जवळ वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण बनले आहे.परिसरातील सुमारे [...]
पुरुष नसबंदी पंधरवाडा : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना
धाराशिव (प्रतिनिधी)- कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण असून,त्याची जबाबदारी बहुधा महिलांवरच पडते. समाजात असलेल्या गैरसमज आणि भीतीमुळे पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पुढे येत नाहीत.या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या सहभागात वाढ व्हावी,पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया आणि निरोध वापराला चालना मिळावी,यासाठी २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा केला जात आहे. या विशेष पंधरवाड्याचे उद्दिष्ट पुरुष नसबंदीविषयी जागरूकता वाढविणे, पुरुषांसोबत समुपदेशन करून कुटुंब नियोजनातील त्यांची समान जबाबदारी पटवून देणे,तसेच समाजातील गैरसमज दूर करणे हे आहे.“स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार” हे यावर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे. पंधरवाडा दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा (२१ ते २७ नोव्हेंबर) संपर्क आठवडा.यामध्ये आशा व आरोग्य सेविका यांनी सर्वेक्षण करून योग्य जोडप्यांच्या याद्या तयार केल्या असून पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त केले जात आहे. दुसरा टप्पा (२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर) सेवाकालावधी.या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पुरुष नसबंदीची गुणवत्ता पूर्ण व खात्रीशीर सेवा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये स्त्री व पुरुष दोन्ही शस्त्रक्रिया उपलब्ध असून,याआधी नसबंदी केलेल्या लाभार्थ्यांमार्फतही जनजागृती आणि मोहिमेचा प्रसार करण्यात येणार आहे.यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट ६१४० असून एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या काळात एकूण ३२२९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.त्यापैकी ३२०२ महिला आणि फक्त ०९ पुरुष नसबंदी झाल्याने पुरुष सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित होते. या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून,हा पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगामार्फत वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यानुसार सन २०२६ मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग,विविध विद्यापीठे तसेच इतर परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेण्यात आले आहे.यामुळे कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही,याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे.प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत सर्व संबंधित संस्थांना पाठविण्यात आली असून आवश्यक ती दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे. उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे वेळापत्रक व कार्यक्रम सर्व कार्यालयांनी आपल्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावेत,असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अवर सचिवांनी केले आहे.
Satara News : चोरे भागात पुन्हा वाढला बिबट्याचा वावर!
साखरवाडी, मस्कर वाडी, भांबे गावात डोंगराळ भागात बिबट्या सक्रिय चोरे : मध्यंतरी थांबलेली बिबटयाच्या बावराची चर्चा पुन्हा सुरू झाली असून साखरवाडी, मस्करवाडी, भांबे, चोरे, चोरजवाडी या डोंगरालगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेली डोंगर पायथ्याशी बागायती शेती, [...]
अमेरिकेत लढाऊ विमान कोसळले, एकाच वर्षात आठव्यांदा F-16 चा अपघात
अमेरिकेत गुरुवारी अमेरिकन हवाई दलाचे एफ-१६ लढाऊ विमान कोसळले. अपघाताच्या काही सेकंद आधी पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि त्याचा जीव वाचला. दक्षिण कॅलिफोर्नियातील ट्रोना जवळील एका वाळवंट भागात हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री १२:३० वाजता हा अपघात झाला. ट्रोना विमानतळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे. जो सध्या सोशल […]
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या Ashes 2025 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जो रूटला सुर गवसला आहे. पर्थ कसोटीमध्ये दोन्ही डाव मिळूनही त्याला दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. मात्र, आज सुरू झालेल्या ब्रिस्बेन कसोटीमध्ये त्याने धावांची भूक भागवली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतल 40 व शतक साजरं केलं आहे. विशेष म्हणजे जो रूटचं हे ऑस्ट्रेलियामधलं पहिलच […]
मृत व्यक्तीला जिवंत दाखवून भाजपच्या माजी नगरसेवकाने कामोठे येथील एक हजार १०० चौरस मीटरचा भूखंड हडप केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिडको व्यवस्थापनाने पनवेलमधील माजी नगरसेवक सुनील बहिरा आणि त्यांच्या कुटुंबीयांसह १२ जणांविरोधात पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी बहिरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. […]
Sangli Special Story : चोरटे विमानाने पळाले…पण शेवटी जाळ्यात सापडले !
गांधीधाम–बेंगळुरू एक्सप्रेसमधील २३ तोळ्यांची सोन्याची चोरी; सांगली : गांधीधाम-बेंगळुरू एक्सप्रेसमधील सोन्या चोरीच्या प्रकरणाने सांगली-मिरज परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. २३ तोळ्यांचे दागिने चोरल्यानंतर ही टोळी सलग ३ शहरांतून फिरते… आणि अखेर गोव्याहून विमानाने थेट दिल्लीला उड्डाण करते. निवडणूक [...]
दुचाकी-इनोवाचा अपघात; आई चा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील लातूर - उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटी जवळ दुचाकी - इनोवाचा अपघात होऊन सावळसूर येथील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 3 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लातुर - उमरगा रोड वरुन सावळसूर येथून नारंगवाडीच्या दिशेने दिनांक 3 डिसेंबर रोजी जाणा- या दुचाकी क्रं. एमएच 25 जे 5220 ला पाठीमागून येणाऱ्या इनोवा कार क्रमांक एमएच 12 एक्सएक्स 3713 ने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरुन प्रवास करणाऱ्या आई भिमाबाई गणपती बिराजदार वय 62 व प्रेमानाथ गणपती बिराजदार वय 45 राहणार सावळसुर हे गंभीर जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रस्ताच्या मदतीला जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केले असता भिमाबाई गणपती बिराजदार यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांचा मुलगा प्रेमनाथ यास पुढील उपचाराकरीता दाखल करुन घेण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.
खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी- खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- एका बाजूला राज्य सरकार म्हणतंय आम्ही मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे जबाबदार मंत्री राज्या कडून असा प्रस्ताव आला नसल्याच सांगत आहेत. मग लोकप्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांना खोटी उत्तर देत असतील तर यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी अशीच मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे. खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मदत मिळण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधून समोर आल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले. एका बाजूला राज्य सरकारने अकाड्याचा खेळ केला शेतकऱ्यांना पदरात काहीच पडलं नाही. राज्य सरकार वरील विश्वास उडाल्याने आता केंद्राची अपेक्षा होती.शेतकरी अडचणीत असताना मदतीची अपेक्षा केंद्र सरकारकडून होती. मात्र आश्वासने देऊन त्यांनी तर वेळकाढूपणाची पद्धत सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या संकटाची त्यांनी थट्टा केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील, विशेषतः धाराशिवमधील अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि केंद्रीय मदतीबाबत लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी धक्कादायक माहिती दिली. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 75.42 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे, तर 224 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मदतीचे निवेदन नाही केंद्राने नुकसानीची पाहणी करण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 या काळात केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाठवले होते. मात्र, पाहणी होऊन महिना उलटला तरीही, “महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला मदतीसाठी कोणतेही औपचारिक निवेदन प्राप्त झालेले नाही,“ असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी लेखी उत्तरात केला आहे. सरकारने तात्काळ निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी मदत दिली पाहिजे,अशी अपेक्षा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
निरवडे देव भूतनाथच्या जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी
न्हावेली /वार्ताहर निरवडे येथील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरुवारी हजारो भाविक भूतनाथ चरणी नतमस्तक झाले.श्री देव भूतनाथच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती.यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमानंतर भूतनाथ पंचायतनातील देवतांना भरजरी वस्रांसह सुवर्णालंकारानी सजविण्यात आले.देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून देवाची मानाची ओटी भरण्यात आली.त्यानंतर देवाच्या दर्शनास प्रारंभ झाला.यानंतर [...]
Kolhapur News : माजगाव शेतकऱ्यावर हल्ला; वनविभागाची तातडीची कारवाई
जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत मिळणार चाफळ : माजगाव (ता. पाटण) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकऱ्यारी जखमी झाल्याची आणि बिबट्याने दहा कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेतली असून, दौलतनगर येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत [...]
इन्सुलीच्या माऊली देवस्थानचा जत्रोत्सव ६ डिसेंबरला
प्रतिनिधी बांदा इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०६डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने सकाळी श्री देवी माऊलीची पूजा, अर्चा त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर नवस बोलणे नवस फेडणे. तसेच दुपारी मान्यवरांच्या हस्ते श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून रात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा [...]
शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये कुमारी समृद्धी संतोष राऊत व श्लोक संदीप शिंदे हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. याप्रसंगी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांचा लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भूम या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे मोटे तसेच सचि सतीश देशमुख, प्रशालेचे मा.मुख्याध्यापक माधव भोसले व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदन केले.
तुळजापूरमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती निवडणूक झाली- काँग्रेस जिल्हाध्यक्ष
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारीत सोशल इंजिनियरिंगचे तत्त्व वापरले. विकासाची भक्कम बाजू मांडली; तर प्रतिस्पर्ध्यांनी पैसा, कुटुंबवाद आणि गटबाजीवर भर दिल्याने मतदार आमच्या बाजूने आले. त्यामुळे निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती झाली आहे असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांनी पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीचे अमोल कुतवळ, सुधीर कदम, उत्तम अमृतराव, तोफिक शेख, श्याम पवार, आनंद जगताप, नागनाथ भांजी यांच्यासह उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी संवादात पाटील आणि मगर यांनी जोरदार हल्लाबोल करताना सांगितले“ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झाली आहे.”महायुतीने सहा कुटुंबांत 14 उमेदवार दिल्याने इतर समाज नाराज; ही नाराजी थेट आमच्या गळ्यात पडली.15 वर्षांच्या सत्तेच्या ठप्प, निरुपयोगी, अनियोजित कारभारामुळे सुज्ञ मतदारांना परिवर्तन हवे होते. “मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांनी तयार केलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणातून प्रमुख विकासकामे घडली. पण महायुतीच्या सत्ताकाळात तीर्थक्षेत्र तुळजापूरसाठी नक्की काय झाले?”असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
लोहाऱ्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक व एपीआय दोषी; दोघांना 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा पोलीस ठाण्यातील 2016 मधील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के. एम. एफ. खान (उमरगा) यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला असून, तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव गायकवाड (वय 43) व तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज महादेव भीमाळे (वय 52) यांना 3 वर्षे सक्तमजुरी व 5,000 रुपयांचा द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दिनांक 3 डिसेंबर रोजी कोर्टाने ही शिक्षा सुनावली. 2016 मध्ये हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7, 12, 13(1)(ड), 13(2) अंतर्गत नोंद असून, तक्रारदार सुरेश गुंडेराव वाघ, रा. लोहारा यांनी शिक्षण संस्थेच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून देण्यासाठी आरोपींकडून 50,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक 1 संतोष गायकवाड यांनी पन्नास हजारांची मागणी केली, तर आरोपी क्रमांक 2 शाहूराज भीमाळे यांनी ती रक्कम स्वीकारली. तसेच आरोपी गायकवाड यांनी या व्यवहारास प्रोत्साहन दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व तत्कालीन पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी केला. सरकारी पक्षाकडून सरकारी अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी प्रभावीपणे पक्ष मांडला,न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी व पंचनामा यांच्या आधारे दोन्ही आरोपी दोषी ठरवले. त्यानुसार आरोपी क्रमांक 1 संतोष बाबुराव गायकवाड यांना 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंड तसेच आरोपी क्रमांक 2 शाहूराज महादेव भीमाळे यांनाही 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यामध्ये ट्रायल ऑफिसर म्हणून योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव यांना काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून विजय वगरे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव, पोह. ए. एन. माने, पो. कॉ. पी. पी. भोसले यांनी काम पाहिले.
आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अटक कारवाईबाबत अधिकारी सामुहिक रजेवर
धाराशिव (प्रतिनिधी)- आर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या डिजिटल सिंगनिचर सटिफकेंटचा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्यावतीने 4 व 5 डिसेंबर रोजी सामुहिक रजेवर जावून अधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तुकाराम भालके यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सीईओ घोष यांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीमधील महिला गट विकास अधिकारी यांना अटक करताना आवश्यक असलेल्या कायदेशीर व प्रक्रियात्मक परवानगी घेतल्याचे दिसत नाही. पुढील दिवशी न्यायालयाने त्यांना 4 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली. ही संपूर्ण कारवाई “ वापर म्हणजेच गुन्ह्यात सहभाग“ या एकतर्फी आणि तांत्रिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण विषयावर आधारित असल्याने ती अत्यंत चिंताजनक आहे. आर्वी घटनेच्या पार्श्वभूमीवर व एकंदरीतच मनरेगा व घरकुल मधील काम करत असताना सध्याची असुरक्षितता लक्षात घेता राज्यातील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी गुरूवार दिनांक 04 डिसेंबर, 2025 आणि शुक्रवार दिनांक 05 डिसेंबर, 2025 रोजी सामुहिक रजेवर जात असलेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विकास सेवा संघटना, धाराशिव जिल्हा पदाधिकारी प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तुकाराम भालके सह इतर अधिकारी उपस्थित होते.

25 C