राजस्थानच्या श्रीगंगानगरमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, आयएसआयला पाठवत होता गोपनीय माहिती
राजस्थान सीआयडी इंटेलिजेंसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथील रहिवासी प्रकाश सिंग उर्फ बादल (३४) असे आरोपीचे नाव आहे. तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर्सशी संपर्क साधत होता आणि हिंदुस्थानी सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता, असा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस आयजी प्रफुल्ल कुमार […]
शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर या भांड्यात अन्न शिजवा, वाचा
लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी, लोखंडी कढईचा वापर करणे गरजेचे असते. लोखंडी कढईत अन्न शिजवतो तेव्हा त्यात, थोडेसे लोह मिसळते. हे लोह आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. लोखंडी कढईच्या वापरामुळे आपल्याला अनेक आरोग्यवर्धक फायदे मिळतात. गर्भधारणेदरम्यान आहारात काय समाविष्ट करायला हवे, जाणून घ्या. निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीरात सर्व […]
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा बसला असून आज मंगळवारी मतदान पार पडणार आहे. एकूण १७ प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी हे मतदान होणार असून नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १०७८९ इतके मतदार असून यामध्ये ५२०८ पुरूष तर ५५८१ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. […]
काम न करता बाटली बॉय कंपनीला दहा लाख, आणखी ३४ लाखांची मागणी; पुणे बाजार समितीचा भ्रष्ट कारभार उघड
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याच्या सुमारे २९९ कोटींच्या व्यवहारात कोणतीही स्पर्धा न करता थेट ‘सी.ए. बाटलीबॉय अँड पुरोहित’ या कंपनीची आर्थिक सल्लागार आणि कायदेशीर सेवांसाठी नेमणूक केली. मात्र, केलेल्या कामांचा एकही कागद समितीला सादर न करता समितीने या कंपनीला तब्बल दहा लाख रुपये अदा केले आहेत. इतकेच नव्हे […]
म्हणूनच विरोधकांना पैशांचा पाऊस पाडावा लागतोय
ठाकरे शिवसेनेची टीका सावंतवाडी : प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार हे सक्षम आणि जनतेचे हित पाहणारे आहेत. आमचे उमेदवार तगडे असल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत पैशाचा वापर करावा लागत आहे. मात्र, जनता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख [...]
मतदानाला १२-१४ तास शिल्लक असताना लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाहीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या नऊ ते दहा वर्षापासून झालेल्या नाहीत. राज्यातील सत्ताधारी मंडळींना प्रशासनाच्या […]
.. म्हणूनच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत करण्यात आले, हेमामालिनी यांनी सांगितलं यामागचं कारण
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी त्यांची अंत्ययात्रा न काढताच अगदी खासगीमध्ये विधी उरकले. त्यामुळे चाहते निराश झाले होते. परंतु यामागचे नेमके काय कारण आहे हे अखेर हेमामालिनी यांनी सांगितले आहे. धर्मेंद्र म्हणजेच बाॅलीवूडचे ही मॅन आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याचा परिणाम त्यांच्या चाहत्यांपासून ते जवळच्या लोकांपर्यंत सर्वांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अभिनेत्री हेमामालिनी यांनी […]
३० कोटी मागितल्याचे सिद्ध केल्यास उमेदवारी मागे घेतो!
संदेश पारकर यांचे प्रतिआव्हान : पराभवाची चाहूल लागल्यानेच खोटेनाटे आरोप! कणकवली/ प्रतिनिधी कणकवलीत शहर विकास आघाडीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नीतेश राणे यांना त्यांच्या उमेदवाराच्या पराभवाची चाहूल लागल्याने माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. नीतेश राणे यांनी मी ३० कोटी मागितल्याचे सिद्ध करावे. मी आज, आता कणकवलीतील मंदिरात जाऊन देवासमोरदेखील हे सांगू शकतो. मी ३० [...]
सावंतवाडी वार्ताहर सावंतवाडी, वेंगुर्ले ,मालवण या तिन्ही नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपला जनता साथ देईल. विकासासाठी भाजपच आवश्यक आहे हे आता जनतेला कळले आहे. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . राजघराण्याने जनतेची सेवा पूर्वीही केली आहे .आता यापुढेही राजघराणे जनतेची सेवा करण्यास सज्ज [...]
३० कोटी आणि नगराध्यक्षपदाची संदेश पारकर यांची होती मागणी
पालकमंत्री नीतेश राणे यांचा गौप्यस्फोट कणकवली : प्रतिनिधी ३० कोटी आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन मला भाजपमध्ये घ्या अशी मागणी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आमच्याकडे केली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझ्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यांना पैसे देऊन घेतले असते तर मी भ्रष्टाचारी झालो असतो का? त्यांची मागणी आम्ही धुडकावून लावत आमच्या [...]
पालकमंत्री नीतेश राणे यांचा सहभाग सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे सावंतवाडी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण शहरातून ही रॅली निघाली. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपची सत्ता आवश्यक आहे, असा विश्वास आता जनतेला वाटत आहे. त्यामुळे नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री [...]
मालवणात भाजपची भव्य प्रचार रॅली
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार रॅलीत सहभागी मालवण प्रतिनिधी मालवण शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपकडून शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप फोवकांडा-पिंपळ येथे जाहीर प्रचार सभेने करण्यात आला. सकाळी भरड दत्त मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली होती. यात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत व नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार तसा भाजप [...]
जनतेच्या आशीर्वादासाठी सावंतवाडीतून भाजपची भव्य प्रचार रॅली
सावंतवाडी / प्रतिनिधी फोटो : अनिल भिसे सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे सावंतवाडी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण शहरातून ही रॅली निघाली. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपची सत्ता आवश्यक आहे, असा विश्वास आता जनतेला वाटत आहे. त्यामुळे नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील,असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे [...]
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आज गदारोळाने झाली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एसआयआरच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. एसआयआरवर चर्चा व्हावी यामागणीसाठी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. याचदरम्यान गदारोळात राज्यसभेचे कामकाज सुरूच राहिले आणि दुपारी ४.४५ वाजता अध्यक्षांनी कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळानंतर मंगळवारी लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत […]
2006 ते 2011 पर्यंत न. प. मार्फत आम्ही कामे करून दाखविली- दत्ता बंडगर
धाराशिव (प्रतिनिधी)- 2006 ला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर धाराशिव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या स्वनिधीतून उभा केला. शहराच्या वैभवात भर टाकणारे नाट्यगृह उभा केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील त्यावेळी मंत्री मंडळात मंत्री होते. त्यामुळे मला मुंबईत बोलवून घेवून विकास कामे मार्गी लावली अशी माहिती माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे ॲड. नितीन भोसले, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, युवराज नळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दत्ता बंडगर यांनी सांगितले की, त्यावेळेस आमदार राणा पाटील यांनी पंचसुत्री कार्यक्रम राबविण्यात आला होता. धाराशिव शहराला 24 तास पाणी देण्याचे नियोजन तयार करण्यात आले होते. परंतु त्यानंतर झालेले काही बदल त्यामुळे ती योजना पूर्ण होवू शकली नाही. 2016 ते 2022 आम्ही शिवसेने सोबत धाराशिव नगर परिषदेमध्ये सत्तेत होतो असे सांगितले जात आहे. भाजप व शिंदे शिवसेना चुकीचे काम झाल्यामुळेच जिल्हाधिकारी यांच्याकडे धाराशिव नगर परिषदेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे असे बंडगर यांनी सांगितले. 4 कोटीची एफडी आमची सत्ता धाराशिव नगर परिषदेमध्ये असताना न. प.चा कारभार काटकसरीने करत 4 कोटी रूपयांची नगर परिषद धाराशिवची एफडी बँकेत केली होती. आज मात्र 128 कोटी रूपयांचे देने धाराशिव नगर परिषदेवर आहे. विरोधकांच्या काळात कागदपत्रे कामे करून बोगस बीले काढण्यात आली आहेत. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु भाजप नेते नितीन काळे यांच्याकडे 61 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आहेत. असा दावा करत दत्ता बंडगर यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना कोठेही यशस्वी झाली नाही. धाराशिव शहरात अंत्यत लहान पाईप अंडग्राऊंड ड्रेनेज योजनेसाठी वापरण्यात आले आहेत. केवळ भाषणावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी जनतेसमोर विकासाचे मॉडेल ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार राणा पाटील यांच्या ताब्यात धाराशिव नगर परिषद द्यावी अशी मागणी बंडगर यांनी पत्रकार परिषदेत केली.
शिंदे शिवसेनेचा आरोप भाजपने फेटाळला
उमरगा (प्रतिनिधी)- सध्या उमरगा नगर परिषदेची निवडणुकीत रंगत वाढली असून एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापुर्वी झालेल्या सभेत शिंदे गटाने युती न होण्यासाठी भाजपा कारणीभुत असल्याचे म्हंटले होते. त्यावर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालूक्य यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे सर्व आरोप खोडून काढले असुन निवडून आल्यानंतरचा अजेंडा जाहीर केला आहे. पत्रात म्हंटले आहे की, महायुतीबाबतचा शिवसेना (शिंदे गटाने) केलेला आरोप तथ्यहीन असून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अट्टाहासामुळे महायूती होऊ शकली नाही. यापूर्वी आमचे 1 नगराध्यक्ष व 15 नगरसेवक असल्यामुळे नगराध्यक्ष पदावरचा आमचा दावा ठाम होता. नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात विरोधकांनी विकासाच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचारामुळे आम्ही यूती केली नाही. विरोधकांनी पोसलेल्या गुंडागर्दी व दहशतीला आळा घालण्याची व शहरात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याची जबाबदारी यापुढे आमची राहील. उमरगा शहर हे राष्ट्रीय महामार्गावरील राज्याच्या शेजवटच्या टोकाला असुन तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात विविध कामानिमित्त हाजारों महिला, पुरुष येतात. येथे येणाऱ्या विशेषत: महिला व मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत. निवडणूकीनंतर प्राधान्याने याची उभारणी करण्यात येईल. नविन व्यापारी संकूल आणि भाजी मंडईसाठी प्रयत्न करणार. शहरातील विद्यार्थ्यांसाठी माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आय टेक्नॉलॉजी सुविधा सहीत इनोव्हेशन हॉल तयार करणार. सोलापूरकडून उमरगा शहरात प्रवेशद्वारवर बायपास रोडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा तसेच इंदिरा चौक- अहिल्या देवी होळकर, पतंगे रोड आण्णाभाऊ साठे व अंतुबळी सभागृहासमोर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणार. दर महिन्याला एका प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनसेवा कॅप भरविण्यात येईल. मुस्लीम समाजासाठी शहराच्या विस्तारानुसार दफनभूमी जागा उपलब्ध करुन देणार. शहरातील महिला व नागरीकांच्या सुरक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमॅरे बसविण्यात येतील. हुतात्मा स्मारकाजवळील नवीन पुल बांधण्यात येईल. यामुळे शहरात प्रवेश करताना रहदारीस अडथळा होणार नाही. शहरातील प्रत्येक वार्डात सुचना व तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात येईल. कर्नाटकातुन महाराष्ट्रात येताना शहराकडील पूर्वेस बायपास चौकात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येईल. चोवीस तास उपलब्ध अत्याधूनिक वाचनालयाची उभारणी करण्यात येईल.आण्णाभाऊ साठे चौक ते महात्मा बसवेश्वर शाळेपर्यात ड्रेनेजसह मोठा रस्ता तयार करण्यात येईल.अनु.जाती व जमाती व अल्पसंख्यांक लोकांना पक्के घरे बांधून देणार असल्याचे हर्षवर्धन चालूक्य यांनी जारी केलेल्या पत्रात म्हंटले आहे.
वडिलांच्या मदतीला लंडनहून धावला ‘पोरगा'; धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असताना प्रचाराला जोरदार उधाण आले आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाला बळ देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचे सुपुत्र करण प्रतापसिंह पाटील लंडनहून थेट धाराशिवात दाखल झाले आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी देत त्यांनी उमेदवारांशी संवाद साधला आणि मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. पक्षासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे यावर भर देताना त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. “उरलेले दोन दिवस तुम्ही डोळ्यात तेल घालून मेहनत घेतली, तर पुढील पाच वर्षे निश्चितपणे चांगले परिणाम दिसतील,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जित केले. करण पाटील यांनी विशेषतः प्रभाग क्रमांक 12 ब चे उमेदवार साईनाथ कुऱ्हाडे, प्रभाग क्रमांक 20 अ चे उमेदवार निलेश राम साळुंके यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी, “प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही,” असे आश्वासन देत पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
सायबर साक्षरता काळाची गरज- डॉ. भरत शेळके
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा जि. धाराशिव येथे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह दिना निमित राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. दि 30 नोव्हेंबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत असतो यावेळी एनसीसी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला. राष्ट्रीय सायबर सुरक्षा दिनाबद्दल संगणक शास्त्र विभागाचे डॉ भरत शेळके व्याख्याता म्हणून उपस्थित होते. सर्व कॅडेट व विद्यार्थ्यांना त्यांनी 'सायबर हाइजिन'या विषयावर मार्गदर्शन केले. शेळके यांनी आज अशा अनेक प्रमाणात वाढत चाललेल्या घटना घडत आहेत . अशा फसवणुकी संगणक व मोबाईल द्वारा जास्त होत आहेत . त्यामध्ये आर्थिक, वैयक्तिक ,खाजगी माहिती चोरी,फसवणुक केली जात आहे . यासाठी सर्वांनी या बनावट ॲप्स, लिंक, मॅसेज मोबाईल व संगणक द्वारे जास्त प्रमाणात हॅक केली जात आहे याबदल सर्वांनी सुरक्षित रहावे व सर्व मोबाईलच्या माध्यमातुन व्यक्तिची वैयक्तिक माहिती घेऊन हॅकर स्वतःचा ताबा घेतो त्यांच्या संबंधिताना तो फसवत असतो . याबद्दल सर्वांना संकणाकाची साक्षरता जाणुन घेणे गरजेचे आहे असे सरांनी सांगितले. तसेच आज प्रत्येकाने आपला मोबाईल वापरत असताना विविध फसव्या , बनावट जाहिराती, लिंक, मॅसेज पासून सावध रहावे जर फसवणूक झालीच तर वेळीच राष्ट्रीय, राज्य सायबर सुरक्षा, जवळच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला किंवा संबंधित यंत्रणेला भेट देऊन किंवा फोनदवारे आपली झालेली फसवणूक कळवून सुरक्षित रहावे असे आव्हान केले.राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. या महिन्यात देशभरात सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्याबद्दल माहिती दिली जाते.राष्ट्रीय सायबर सुरक्षा ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय अस्वले होते सूत्रसंचलन ,प्रास्तविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले आभार कॅडेट प्रमोद सुनगार यांनी केले या कार्यक्रमास डॉ विलास इंगळे, डॉ.पदमाकर पिटले डॉ प्रदीप पाटील,प्राध्यापक, कॅडेटस, विद्यार्थी उपस्थित होते.
देवराव मरबे याची सैन्यदलात निवड
मुरुम (प्रतिनिधी)- कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथील सन 2022-23 मधील विज्ञान शाखेचा माझी विद्यार्थी देवराव मरबे राहणार आलुर याची भारतीय सैन्यदलात ट्रेडमन म्हणून निवड झाल्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून सैन्यदलातील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना देवराव मरबे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्वकर्तुत्ववाने यशाचे शिखर गाठले आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व भारत देशाची सेवा करण्यासाठी आपणही प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील प्रा. राठोड एस. बी., प्रा. उपासे जी. डी., प्रा. इंगोले बी. आर., प्रा. हराळकर आर. व्ही., प्रा. चौगुले, प्रा. चौधरी, प्रा. कांबळे, प्रा. चिकुंद्रे, प्रा. चव्हाण, प्रा. इंगळे, प्रा. शिंदे, श्री गुरव, अनिकेत सगट हे उपस्थित होते.
सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे- अंबादास दानवे
उमरगा (प्रतिनिधी)- शिवसेना हिंदुत्ववादी तर आहेच पण इथल्या बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन,या अल्पसंख्याक समाजाचा सन्मान करते सर्व धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. कोणताही जातीभेद येथे केला जात नाही म्हणूनच येथील अध्यक्षपदासाठी मुस्लिम ओबीसी समाजातील निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली आहे. आजपर्यंत जगातील सर्व क्रांत्या सामान्य माणसांनी केल्या आहेत.भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना नगरपालिकेत स्थान देऊ नका असे आवाहन माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. शहरातील पतंगे रोडवरील अण्णाभाऊ साठे चौकातील सचिन कॉर्नर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अनंत पाताडे, आमदार प्रवीण स्वामीं, बाबा पाटील, रजाक अत्तार, शीतल चव्हाण, बसवराज वरनाळे, पोपट सोनकांबळे, अमोल बिराजदार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्याने सरकारने 31 हजार कोटी रुपयांचें पॅकेज जाहीर केले पण ते आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. आस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, तूर, ऊस या पिकांना भाव मिळत नाही. केवळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करणारे हे सरकार आहे. असे ते म्हणाले. यावेळी आमदार प्रवीण स्वामीं, सुधाकर पाटील,शीतल चव्हाण रजाक अत्तार आदींची भाषणे झाली.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामात तिसऱ्या पंधरवाड्यामध्ये 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे 2500 रूपयेप्रमाणे ऊसबिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 डिसेंबर रोजी जमा करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसांत जमा करण्यात येत आहे. ही परंपरा द्वितीय गळीत हंगामात देखील कारखान्याने जोपासली आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवाडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बील जमा करण्यात आले असून यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर जमा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सांगून तिसऱ्या पंधरवाड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाचे रूपये 2500 प्रमाणे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप खाते दिलेले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असेही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी कळविले आहे.
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी श्री संत गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयास भेट देऊन पुरातन वस्तूची पहाणी केली.यावेळी ग्राम मंडळ अधिकारी शरद पवार, तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकीस खोडा, मतदानाच्या काही तास अगोदर निवडणूक पुढे ढकलण्यात आली
लातूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेच्या आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. रेणापूर नगर पंचायत निवडणूक पुढे ढकलेली होती . आता निलंगा नगर परिषद निवडणूक उद्या होणार नाहीत. तसेच उदगीर नगर परिषदेच्या 3 प्रभागांची पण निवडणूक होणार नाही. या सावळ्या गोंधळामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश दि. 29/11/2025 नुसार निलंगा नगर […]
नव्याचे लग्न व्हावे असे मला वाटत नाही…जया बच्चन असं का म्हणाल्या
आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन यांनी एका इव्हेण्ट दरम्यान लग्न परंपरा आता आऊटडेटेड झाली असून मला नव्याचे लग्न व्हावे असे वाटत नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जया बच्चन असे का म्हणाल्या ते जाणून घेऊया. जया बच्चन यांनी ‘वी द […]
काही तरी बिनसलंय? विजयाचं सेलिब्रिशेन टाळून विराट कोहली एका बाजूने निघून गेला… Video आला समोर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत दारून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं तर रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. केएल राहुलच्या नेतृत्वात संघाने विजयी आघाडी घेतली. […]
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभसाठी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता. आता याच विषयावर लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांनीही सरकारविरोधात आवाज उठवला आहे. जगताप यांनी सरकारविरोधात मार्मिक पोस्ट करत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. अरविंद जगताप यांनी कायमच समाजातील महत्त्वाच्या विषयांवर ठामपणे मत व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीवर ते पोस्टच्या माध्यमातून त्यांनी परखड […]
ना वनावर प्रेम, ना धर्मावर; फक्त ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी हा सगळा खेळ रचला, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील झाडांची तोडणी करण्याच्या महापालिका निर्णयाविरोधात नाशिकमध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आणि शिवसैनिकांनी रविवारी आंदोलन केलं. याच मुद्द्यावरून आदित्य […]
शिवसेनेच्यावतीने आचार संहिता भंगची तक्रार
धाराशिव (प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर मतदानापूर्वीचा मतदारांचा कौल असे सांगत एका पक्षाला बहुमत दाखविण्यात आले आहे. हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोविंद कोलगे व राकेश हनुमंतराव सुर्यवंशी यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव नगर परिषदचे मतदान नियोजित आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू असतानाही, काही समाजमाध्यमांवरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. 'धाराशिव 2.0'या सोशल मिडीया पेजवर नियमबाह्य पद्धतीने ओपीनिंयन पोल प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये एका बनावट टीव्ही चॅनलचा रिपोर्ट वापरून खालील दावे करण्यात आले आहेत: भाजपच्या उमेदवार नेहा काकडे या विजयी होणार असल्याचे भासवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दाखवले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदानापूर्वी ओपिनिंयन पोल प्रसिद्ध करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य आणि जोशपूर्ण रॅली काढण्यात आली. भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग 2 चे उमेदवार अलका प्रकाश पारवे आणि आकाश मधुकरराव तावडे यांच्या प्रचारार्थ गांधीनगर आणि परिसरात काढण्यात आलेली रॅली अत्यंत उत्साहवर्धक ठरली. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, संघटनेचा उत्साह आणि नागरिकांचा जबरदस्त सहभाग पाहून संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला. नागरिकांच्या चेहऱ्यावर विकासाबद्दलची अपेक्षा आणि भाजपा नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट दिसत होता. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगत नागरिकांना मतदानाद्वारे विकासाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत मधुकर तावडे, नितीन तावडे, अमरसिंह देशमुख, दशरथ पाटील, सतीश घोडेराव, अमोल राजेनिंबाळकर, लक्ष्मण माने, पंकज जाधव,विजय राठोड, विनायक कुलकर्णी यांच्यासह प्रभागातील शेकडो नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय आणि प्रेरणादायी ठरला. आजचा प्रचंड प्रतिसाद हा जनतेचा स्पष्ट संदेश आहे की धाराशिव आता बदलत आहे आणि विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.
भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला- तानाजी जाधवर
धाराशिव (प्रतिनिधी)- अचानक उठायचं व अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं पण चार वर्ष भाजपचे नेते झोपले होते का? सत्तेत असलेला भाजप आज निवडणुकीत मतदारामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे. यावेळी जाधवर म्हणाले की, सत्तेत सोबत राहायचं आणि सत्ता जाऊन चार वर्षानंतर जाग यावी यातच यांचा प्रामाणिकपणा दिसतो. डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही भाजप सोबत सत्तेत होतो. त्या काळातील हे भ्रष्टाचार झाल्याचे सांगत असतील तर मग हे आमच्या बरोबर का राहिले. जर असा कारभार सुरु होता तर मग सत्तेतून स्वाभिमानाने बाहेर पडायला हवं होत. तेव्हाच तक्रारी करून चौकशीची मागणी का केली नाही? उपनगराध्यक्ष कोण होत हे काय शहराला माहिती नाही का? किती बुद्धीभेद करावा हे फक्त भाजपकडून शिकावं असा चिमटा तानाजी जाधवर यांनी काढला. लेखापरीक्षण अहवाल दाखवला पण त्यानंतर त्याला दिलेलं प्रशासकीय उत्तर तुम्ही द्यायला विसरलात. थोडा अभ्यास कमी पडला किंवा तुमच्या नेत्यांना जुन्या भाजप वाल्याना तोंडावर पाडण्यासाठी असे केले असावे. एवढा मोठा भ्रष्टाचार वास्तवात असता तर तुम्हाला राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली असती का? याचा विचार किमान भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी करायला हवा होता, असे तानाजी जाधवर यांनी म्हटले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचा दिलासा, मनरेगातून होणार मदत
धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या परिस्थितीची दखल घेऊन शासनाने मनरेगा विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) खालील लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहेत. खरडून गेलेल्या शेतीजमिनींचे पुनर्वसनासाठी प्रति हेक्टर 3 लाख रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीसाठी प्रति विहीर जास्तीत जास्त 30,000 रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना शेतीजमिनी व सिंचन साधनांची पूर्वस्थिती पुन्हा उभी करण्यास मदत होणार असून आगामी हंगामात शेती पुन्हा सक्षम होण्यास हातभार लागेल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की,आपल्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकारी,पंचायत समिती यांचेकडे सादर करावेत.तपासणी व मंजुरीनंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
धाराशिव (प्रतिनिधी)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुक - 2025 ची आदर्श आचारसंहितेचे आदेश 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्यामुळे आदर्श आचार संहिता 4 नोव्हेंबरपासुन ते 3 डिसेंबर 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 ची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत लागु राहणार राहणार आहे.त्याअनुषंगाने सर्व कार्यालय विभाग प्रमुख तसेच सर्व नागरिक यांना कळविण्यात येते की,ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही. त्यामुळे 1 डिसेंबर 2025 रोजीचा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
धाराशिवमध्ये कॅन्सर निदान शिबीर
धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब धाराशिव व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिवमध्ये दोन महत्त्वाची आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रोटरी क्लब धाराशिव, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन, रिसर्च सेंटर व विवेकानंद कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक शनिवार, 06 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 स्थळ फुलाई मल्टीस्टेट, डी.आय.सी. रोड, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, धाराशिव आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागात वाढत असलेल्या गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये तंबाखू सेवनामुळे होणारा मुखाचा कर्करोग लवकर ओळखणे हा आहे. कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास उपचार पूर्ण यशस्वी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः 30 वर्षांवरील महिलांनी तसेच तंबाखू सेवन करणाऱ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रंजीत रानदिवे (अध्यक्ष), प्रदीप खामकर (सचिव), रोटरी क्लब धाराशिव आणि प्रवीण काळे (सचिव, रोटरी सेवा ट्रस्ट) यांनी केले आहे. तसेच रोटरी क्लब धाराशिव आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हात-पाय कृत्रिम अवयव मोजणी शिबिर आयोजित केले आहे. दिनांक: 09 व 10 डिसेंबर 2025, स्थळ: जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय, रोड, फिल्टर टाकी मागे, धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अपघात, आजार किंवा इतर कारणांमुळे पाय गुडघ्याच्या खाली किंवा हात कोपऱ्याच्या खाली कापले गेलेले नागरिक पात्र ठरणार आहेत. या नागरिकांची मोजणी करण्यात येणार आहे. रंजीत रानदिवे (अध्यक्ष - रोटरी क्लब धाराशिव) 9404955959, मयूर काकडे (अध्यक्ष - प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव) 9673554491, प्रदीप खामकर (सचिव - रोटरी क्लब धाराशिव) 8888531285 यांच्याशी संपर्क साधावा. या दोन्ही उपक्रमांद्वारे नागरिकांना मोफत व महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मिळणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब धाराशिवतर्फे करण्यात आले आहे.
Photo –अनन्या पांडेच्या अदांनी चाहते घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या ग्रे आउटफीटमधल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनन्याने ग्रे आउटफीट वेअर केला आहे तसेच या ऑफशोल्डर टॉप वर साजेस ग्रे जॅकेट घेतले आहे या फोटोंमध्ये […]
SIR मुळे वाढला कामाचा ताण, बीएलओंनी व्यक्त केला संताप; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने
पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रियेत सहभागी असलेल्या बीएलओंनी सोमवारी कोलकाता येथे निदर्शने केली. यादरम्यान बीएलओंनी कोलकातामधील निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर बराच गोंधळ घातला. पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रियेत सहभागी असलेले बीएलओ गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने करत आहेत. गेल्या आठवड्यातही निषेधादरम्यान बीएलओंनी राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. निवडणूक आयोगाने कोलकाता पोलीस आयुक्तांना […]
ऑफिस नाही, कामाचा ताण नाही फक्त मौजमजा करायची…एलन मस्क यांचा एआयबाबत महत्वाचा दावा
तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे ते भविष्याचे वेगळेच रुप रंगवत आहे. आज आपण नोकऱ्या, कार्यालये आणि कामाला आवश्यक मानतो, भविष्यात वेगळी परिस्थिती असेल.येत्या काळात माणसांची भूमिका पूर्णपणे बदलेल. लोकांना आता काम करण्याची गरज राहणार नाही. कारण एआय आणि यंत्रे त्यांची जागा घेणार आहेत. त्यामुळे माणसांसाठी काम किंवा रोजगार गरज राहणार नसून एक छंद बनेल […]
गर्भधारणेदरम्यान आहारात काय समाविष्ट करायला हवे, जाणून घ्या.
गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यावेळी स्त्रीने खाण्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. चौकस आहारामुळे होणारे बाळही निरोगी जन्माला येते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान खाण्याची फार काळजी घेणे महत्त्वाचे असते. गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. स्त्रीला योग्य पोषणाची आवश्यकता असते. चांगले पोषण आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुनिश्चित करते. म्हणूनच, आपल्या […]
Crime News –मित्राने आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीवर सामुहिक अत्याचार केला, 12 दिवसांनी प्रकरण उघडकीस
देशाच्या कानाकोपऱ्याच दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. दोन आणि तीन वर्षांच्या मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांवर अत्याचार केला जात आहे. ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात केला जात असल्यांच अनेक प्रकरणांमध्ये सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार घडला असून मित्राने आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. जवळपास 13 दिवस तरुणीला […]
Video –स्थानिक निवडणुकांत पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता –संजय राऊत
स्थानिक निवडणुकांत पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढवल्या नाही असेही संजय राऊत म्हणाले.
संसदेत कुठले मुद्दे मांडावेत हे सरकारने ठरवू नये, काँग्रेस खासदार कार्ती चिंदबरम यांची टीका
काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका करताना स्पष्ट केले की संसदेचे कामकाज सुरळीत चालावे अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, आम्ही कोणते मुद्दे मांडावे हे सरकारने ठरवायचे नाही. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी बोलताना चिंदबरम म्हणाले की, “आम्हीच ठरवू कोणते मुद्दे उपस्थित करायचे. सरकारने फक्त त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ आणि जागा द्यावी.” मतदार […]
केंद्रापासून राज्यापर्यंत निवडणूक आयोग सत्तेप्रमाणे चालतोय, बाळासाहेब थोरात यांनी केला गंभीर आरोप
आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात निवडणूक आयोगाचा इतका गोंधळ प्रथम पाहत आहे. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांना असायचा, कोणाचा हस्तक्षेप नसायचा, सत्ताधारी देखील घाबरायचे. मात्र, आता केंद्रापासून राज्यापर्यंत आयोग सत्तेप्रमाणे चालत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. अवघ्या एका दिवसावर मतदान प्रक्रिया जवळ आलेली असताना निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुका पुढे […]
Kolhapur Crime News: अर्जुनवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला
तब्बल दहा दिवसांनी आढळला मृतदेह नेसरी: अर्जुनवाडी येथील सचिन सुरेश मंडलिक हा चाळीस वर्षीय तरुण तब्बल दहा दिवसापासून बेपत्ता होता. अखेर तब्बल दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अर्जुनवाडी गावच्या हद्दीतीलच आपटेवाडी नावच्या [...]
Video –डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईन –संजय राऊत
डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच बरा असतो तर नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी 100 टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो असेही संजय राऊत म्हणाले.
जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार का केले? हेमा मालिनी यांनी सांगितले कारण…
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एक आठवडा उलटला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठा पोकळी निर्माण झाली आहे. निधनानंतर धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार घाईघाईने करण्यात आले. तसेच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जास्त वेळ ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांना श्रद्धांजली वाहता आली नाही. याबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. धमेंद्र यांचे अंत्यसंस्कार […]
Samantha prabhu marriage –समांथा प्रभूने केले दुसरे लग्न, फोटो शेअर करत दिली माहिती
घटस्फोटाच्या चार वर्षानंतर साऊथची सुपरस्टार समांथा प्रभू पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अड़कली आहे. ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्याशी तिने लगीनगाठ बांधत सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता लग्नाचे फोटोही समांथाने सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री समांथा रूथ आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांचे लग्न झाले आहे. समांथा यांनी इंस्टाग्रामवर […]
Indian Word Ban- अमेरिकेत ‘इंडियन’शब्दावर बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान; नेमके प्रकरण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. अमेरिकेत आता ‘इंडियन’ या शब्दाचा वापर व्हायला नको, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. ट्रम्प यांचे हे विधान हिंदुस्थानी नागरिकांसाठी नसून तेथील नेटिव्ह अमेरिकन्ससाठी केले आहे. नेटिव्ह अमेरिकन्स म्हणजेच अमेरिकेतील मूळ रहिवाशांसाठी आहे. अमेरिकेचा खंडाचा शोध लावणारे ख्रिस्तोफर कोलंबस 1492 साली हिंदुस्थानकडे जाणारा नवीन […]
कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वन डे मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. रांचीमध्ये झालेल्या लढतीत हिंदुस्थानने 17 धावांनी विजय मिळवला. या लढतीमध्ये किंग विराट कोहली याने वन डे कारकिर्दीतील 52 वे शतक झळकावले, तर रोहित शर्मा अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्या नावे केला. या लढतीनंतर ड्रेसिंगरुममधील काही फोटो व्हायरल […]
Video –उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद –संजय राऊत
शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच शिवसेना आणि मनसेत जागावाटपावर चर्चा सुरु असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
लालपरीचा डीजिटल कारभार रामभरोसे; MSRTC वरून तिकीट बूक करताना समस्या, प्रवाशांचे हाल
एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी झाली आहे. आपल्याला गाव, खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. मात्र याच लालपरीचा डीजिटल कारभार रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. एमएसआरटीसी या अॅपवरून तिकीट बूक करताना तांत्रिक समस्या येत असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बातमी अपडेट होत आहे…
Digital Arrest Scam –देशभरातील डिजिटल अरेस्ट प्रकरणांची चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयाचे CBI ला आदेश
डिजिटल अरेस्ट प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने देशभरातील डिजिटल अरेस्ट प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. तसेच राज्य पोलिसांना सीबीआयला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी नोटीस बजावून आरबीआयला पक्षकार बनवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय दोन आठवड्यात या प्रकरणाची पुढील सुनावणी करेल. शिवाय आयटी मध्यस्थ नियम २०२१ अंतर्गत अधिकारी सीबीआयला पूर्ण सहकार्य […]
एल्फिन्स्टन पुलाचा वारसा जपणार, पुलासाठी वापरलेल्या बेसाल्ट दगडांचा वापर करून बनवणार छोटी प्रतिकृती
मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू असताना, तब्बल 113 वर्षे पुलाची कमान मजबुतीने धरणारे बेसॉल्ट दगड आता नव्या उपयोगात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या दगडांचे संकलन करून शहरातील एखाद्या मोकळ्या जागेत पुलाची छोटी प्रतिकृती उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वारसा विभागाकडून जतन केलेले दगड स्वच्छ करून, क्रमांक लावून, त्यांना नवी झळाली दिली […]
कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 थेट नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सोमवारी 1 डिसेंबर रोजी कणकवली तहसिलदार कार्यालय येथून ईव्हीएम मशीन अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कणकवली […]
रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्र. 10 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पैकी केवळ रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात प्रभाग क्रमांक 10 करिता दोन […]
रत्नागिरी शहरात 64 हजार 746 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदमध्ये १६ प्रभागात ६९ मतदान केंद्रावर ६४ हजार ७४६ मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ३१ हजार ३२४ पुरुष, ३३ हजार ४२१ महिला आणि इतर 1 आहेत. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतदान […]
ड्रामा कोण करतयं हे जगजाहीर आहे…, अखिलेश यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका
संसदेच्या हिवाळी अधिवेशाला आजपासून सुरूवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार यादी फेरतपासणीच्या विषयावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी BLO वर कामाचा ताण असल्याचा आणि SIR मुळे मतदान रद्द करण्याचा आरोप केला. एसआयआर लागू करण्याची इतकी घाई का आहे ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. देशातील लोकशाही तेव्हाच मजबूत होईल जेव्हा […]
सर्वोच्च न्यायालयातील एकमेव महिला न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना न्यायालयीन प्रक्रियांमध्ये सुरू असलेल्या राजकीय हस्तक्षेपावरून रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. न्यायव्यवस्थेला राजकारणापासून वेगळे ठेवणे हे निष्पक्ष न्यायव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याच त्या म्हणाल्या आहेत. तसेच न्यायालयात खडंपीठाने एखादा निकाल दिल्यानंतर, त्या खंडपीठातील एखादा न्यायमूर्ती बदलताच त्याचा निकाल बदलणे योग्य नसल्याच मत सुद्धा त्यांनी मांडल आहे. […]
संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यातच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. जयराम रमेश म्हणाले आहेत की, “पंतप्रधान मोदी कधीही संसदेत येत नाहीत आणि संसदेचे कामकाज कमकुवत करतात.” त्यांनी आरोप केला की, “पंतप्रधान विरोधकांशी संवाद साधत नाहीत आणि त्यांच्या धोरणांचा संसदेच्या कामकाजावर परिणाम होतो.” जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र […]
कोणत्याही आजारवर स्वतःहून औषधे घेणे ठरू शकते धोकादायक; डॉक्टरांचा इशारा
छोट्या छोट्या आजारपणात डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून औषधे घेणे धोकादायक ठरून शकते. अनेकजण छोट्या आजारपण जसे सर्दी,पात खोकला यावर जाहिरातीत दिसणारी किंवा स्वतःला माहिती असणारी औषधे घेतात. मात्र, त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, विशेषतः अँटीबायोटिक्स चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात घेतल्यास अँटीबायोटिक रेझिस्टन्ससारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. स्वतःहून औषध घेणे […]
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीने अनेकदा केला. दुबार नावे, चुकीचे पत्ते व फोटो तसेच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावेदेखील दिले. या घोळावरून विरोधकांनी रान उठवलेले असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश बालदी यांनी ‘अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा’, असे म्हटले आहे. याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित […]
Gold And Silver Update: सोने २२०० रुपये तर चांदी १३६०० ने महागली
सोने व चांदीच्या दरात वाढ सुरूचं कोल्हापूर : डिसेंबरमध्ये अवघे दोनच विवाह मुहूर्त असतानच, सोने व चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. गेल्या पाच दिवसामध्ये सोने १० ग्रॅममागे २४०० तर चांदी किलोमागे १३६०० रूपयांनी [...]
सोने-चांदीचे दरवाढीचे उच्चांक; चांदी 3500 तर सोने 1200 रुपयांनी वधारले
सोने आणि चांदीच्या किमती या वर्षात जबरदस्त वाढल्या आहेत. आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल 15 हजारांची वाढ झाली. शुक्रवारी चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. तसेच सोन्यानेही मोठी झेप घेतली […]
Jat News: मंगळवारी जतचा आठवडी बाजार व मार्केट कमेटी राहणार बंद
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार ठेवण्याचे आदेश जत: येत्या मंगळवारी जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी भरणारा जत येथील आठवडा बाजार तसेच मार्केट कमिटीच्यावतीने होणारे शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी काकडे यांनी दिलेल्या आदेशाने जतचा आठवडी बाजार व मार्केट कमेटीचे [...]
दुचाकी अपघातात सहाय्यक वाहतूक निरीक्षकाचा मृत्यू
प्रतिनिधी बांदा एसटीचे कुडाळ सहाय्यक वाहतूक निरीक्षक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८) यांचे काल रात्री कुडाळ एमआयडीसी येथे दुचाकी अपघातात निधन झाले. ते कुडाळ येथून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या सावंतवाडी येथील घरी येत होते. स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला.त्यांना तात्काळ कुडाळ येथील [...]
लँड माफियांच्या पैशाचे राजकारण सावंतवाडीकर खपवून घेणार नाही
शहराला माफियांच्या हाती जाऊ देणार नाही ;आमदार दीपक केसरकर यांचा कडाडून हल्ला सावंतवाडी : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गांधी चौकात आयोजित केलेल्या प्रचारसभेत लँड माफिया आणि त्यांच्या राजकीय समर्थकांविरुद्ध जोरदार तोफ डागली. गोरगरिबांच्या जमिनी लुटून आणि लाटून मिळालेल्या पैशाचा वापर हे लँडमाफिया निवडणुकीत करत [...]
Sangli News: खोतवाडीत हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पाणी फिल्टरेशन प्लान्टचे उद्घाटन
बुधगाव: खोतवाडी येथे ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाकी परिसरामध्ये पाणी फिल्टरेशन प्लान्टचे उद्घाटन वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहा कांबळे, उपसरपंच संदीप शिरतोडे, तंटामुक्तीचे विठ्ठल मुळीक, अजित कांबळे अर्जुन कदम, सुहास मुळीक, जगन्नाथ शिंदे, पंडीत पवार, राजाराम मंडले उपस्थित होते.
का रे दुरावाSSS का रे अबोलाSSS! फडणवीस आणि शिंदे एकाच हॉटेल मध्ये पण ना भेट ना बोलणे, महायुतीतील नाराजी, शिंदे गटाची हवा टाइट महायुतीतील खदखद ही आधीच चव्हाट्यावर आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र अमित शहा यांनी शिंदे यांचे काही एक ऐकून […]
Success Story –पत्र्याच्या झोपडीतून सीएपर्यंतचा प्रवास, भावेश पालेची प्रेरणादायी यशोगाथा
प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपले मूल उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, कुटुंबाचा आधार बनावे आणि समाजासाठी आदर्श ठरावे. अशीच प्रेरणादायी कथा आहे संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील भावेश पाले यांची. गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचा मान मिळवणाऱ्या हा तरुणाचे आयुष्य म्हणजे संघर्ष, स्वप्न, कष्ट आणि जिद्दीची विलक्षण सांगड आहे. अत्यंत गरीब घरातील परिस्थिती, […]
Kolhapur News: गारीवडेत गव्यांचा कळप
भरदिवसा गवे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गारीवडे: गगनबावडा तालुक्यातील गारीवडे परिसरात गव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालती आहे. जंगलातील वैरणीची कमतरता आणि अन्नधान्याच्या शोधात हे वन्यजीव आता थेट गावात प्रवेश करू लागले आहेत. परवा जर्गी गावात सकाळी [...]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गेल्या महिन्याभरापासून आजारपणामुळे सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नव्हते. मात्र उपचार सुरू असतानाही ते रुग्णालयातून सोशल मीडियावर सक्रिय होते. आता ते पहिल्यांदा माध्यमांसमोर आले असून सोमवारी सकाळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. वाचा त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – – तब्येतील थोडी सुधारणा होत आहे. उपचार फार कठोर असतात. आजारापेक्षा […]
Miraj Crime News: मिरजेत हत्यारे घेऊन फिरणारे इचलकरंजीचे तिघे गजाआड
एक दुचाकीसह दोन कोयता, दोन चाकू व एक सुरा आदी हत्यारे जप्त करण्यात आली मिरज: शहरातील शाखी चौक येथे दुचाकीवरुन धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या इचलकरंजीतील तिघा तरुणांना मिरज शहर पोलीस वण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकीसह दोन कोयता, दोन चाकू व एक सुरा आदी हत्यारे जप्त करण्यात आली आहे [...]
उत्तरगोव्यात13, दक्षिणेत6 नावांचीघोषणा पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायती मिळून एकूण 50 मतदारसंघ असून त्यासाठी पहिल्या यादीत भाजपने उत्तरेत 13 आणि दक्षिणेत 6 मिळून 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
संगमेश्वर ते साखरपा या राज्य मार्गाची पावसाळ्यात दुरावस्था झाली होती. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र लवकरच या मनस्तापातून प्रवाशांची सुटका होणार असून साखरपा ते देवरुख या मार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली असून देवरुख ते संगमेश्वर या मार्गाची दुरुस्ती येत्या आठवड्याभरात पूर्ण करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुखचे उपअभियंता […]
सुवर्ण विधानसौध परिसरात आजपासूनच जमावबंदी
तीनकिलोमीटरपरिघाचासमावेश: पाचहूनअधिकजणांच्याफिरण्यावरहीनिर्बंध बेळगाव : सुवर्ण विधानसौधमध्ये दि. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधच्या तीन किलोमीटर परिघामध्ये सोमवार दि. 1 डिसेंबरपासून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. दि. 1 डिसेंबरपासून 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता [...]
माझी पत्नी शिवोन जिलिस काही अंशी हिंदुस्थानी असून मुलाचे नावही नोबेल विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवल्याचे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क म्हणाले. जिरोधाचे संस्थापक निखिल कामत यांच्या ‘पीपलबाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. बातमी अपडेट होत आहे…
वाढती गुन्हेगारी त्यात ‘खाकी’चीही ‘कर्तबगारी!’
वर्दीच्याआडूनडल्लामारणाऱ्यांवरकारवाईहोणारका? मटका-जुगारीअड्ड्यांवरीलछापेकितीखरे? गृहमंत्र्यांच्याआदेशाचीअंमलबजावणीआवश्यक बेळगाव : बेळगावसह कर्नाटकात गुन्हेगारी प्रकरणात अधिकारी व पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळेच की काय, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी व पोलिसांची दलातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे. या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. कर्नाटकातील काही घटना लक्षात घेता [...]
आनंदनगर येथील रहिवाशाची आरोग्याच्या समस्यांमुळे आत्महत्या
बेळगाव : आनंदनगर-वडगाव येथील एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. संतोष परशुराम कट्टीमनी (वय 49) मूळचा राहणार हल्याळ, जि. कारवार, सध्या राहणार आनंदनगर-वडगाव असे त्याचे नाव आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष वाहन अपघातात जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत [...]
पंचहमी योजनांमुळे राज्य सरकार देशासाठी आदर्श
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : पंचहमी कार्यशाळा-प्रगती आढावा बैठक, गरिबांच्या कल्याणासाठी दरवषी अनेक योजना बेळगाव : राज्य सरकार हे गरिबांच्या हिताचे आहे. सुमारे 70 वर्षांपासून प्रत्येक सरकारच्या काळात जमीन मंजूर, शैक्षणिक प्रगती, वाहतूक व्यवस्थेसह अनेक योजना राबवल्या आहेत. सध्याच्या राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात पंचहमी योजना राबवून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे मत [...]
पॉवर टिलरमध्ये पाय अडकून काकतीतील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
वार्ताहर/काकती पेरणी करताना पॉवर टिलरमध्ये पाय अडकून एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी काकतीजवळील शिवारात ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सिदराई ओमाण्णा टुमरी (वय 64) राहणार होळी गल्ली, काकती असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या [...]
Sangli Crime: सांगलीत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
घटनास्थळी रक्त सांडल्याचे फोटो व्हायरल झाले होते सांगली: येथील मंगळवार बाजार परिसरात एका कॉम्प्लेक्ससमोर रविवारी सकाळी दोघांमध्ये झालेल्या चादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मांडीवर वार झाल्याने घटनास्थळी रक्त सांडले होते. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले होते. परंतु संजयनगर पोतिस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. या हल्ल्याबाबत पोलिसांनादेखीत काही माहिती नव्हती. शहरातील मंगळवार [...]
आज ना उद्या दंड भरावाच लागणार!
वाहनविक्रीकरतानायेणारअडचणी: कोट्यावधीरुपयांचादंडवाहनचालकांनीभरणेबाकी बेळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना टीएमसीद्वारे दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र, दंडाची रक्कम भरण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले असले तरी सदर वाहन विक्री किंवा रिपासिंग करायचे असल्यास वाहनावरील दंड भरणे गरजेचे आहे. दंड न भरल्यास संबंधित वाहनाची विक्री किंवा रिपासिंग करता येणार नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी गेल्या काही [...]
मुंबईचा युवा तडफदार आक्रमक फलंदाज आणि टीम इंडियाचा 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे Syed Mushtaq Ali Trophy मध्ये गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला आहे. पहिल्या सामन्यात धुवांधार फटकेबाजी केल्यानंतर रविवारी (30 डिसेंबर 2025) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही त्याने त्याच थाटात गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 59 चेंडूंमध्ये नाबाद 104 धावांची शतकीय खेळी करत संघाच्या विजयात मोलाची […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु झाले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राजस्थानच्या बिकानेर येथील 14 व्या लोकसभेचे सदस्य आणि दिवंगत अभिनेत धर्मेंद्र यांच्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली.
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना बंगळुरूमध्ये ट्रफिकचा फटका सहन करावा लागला होता. यानंतर आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यानांही ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या राय यांना रस्त्यावर एक तास अडकून पडावे लागले, ज्यामुळे त्यांचे दिल्लीला […]
लोककल्प-श्री महिला क्रेडिट सोसायटीतर्फे शाळांना कॉम्प्युटर, प्रिंटर भेट
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील शाळांना कॉम्प्युटर व प्रिंटर भेट स्वरुपात देण्यात आला. खानापूर तालुक्यातील कालमणी येथील सरकारी शाळेला चार कॉम्प्युटर व एक प्रिंटर तर कुसमळी येथील शाळेला एक प्रिंटर देण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांपर्यंत डिजिटल ज्ञान पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. [...]
हेस्कॉमच्या शहर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : नेहरुनगर येथील हेस्कॉमच्या नूतन अर्बन डिव्हिजन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. या कार्यालयामुळे शहर हेस्कॉम विभागाला सुसज्ज असे कार्यालय उपलब्ध झाले आहे. या कार्यालयामुळे नागरिकांना आपली कामे करून घेण्यास सोय होईल. तसेच अत्याधुनिक सेवा कार्यालयात दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, शहरामध्ये सर्व सोयींनीयुक्त [...]
मुंबईसह महाराष्ट्र गारठणार; हुडहुडी जाणवायला सुरुवात, तापमानात आणखी घट होणार
यंदा पावसाने नोव्हेंबरपर्यंत मुक्काम लांबवला होता. आता मुंबईत थंडीला सुरुवात झाली असून हुडहुडी जाणवायला लागली आहे. सध्या मुंबईकर सुखद गारवा अनुभवत आहेत. मुबईकरांनी गेल्या १३ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 15.7 सेल्सियस नोंदवले गेले. एकाच दिवसात 6.1 अशांची ची मोठी घसरण शनिवारी (२१.८C ) झाली. याआधी नोव्हेंबर 2012 किमान तापमान […]
खासबाग जुन्या कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर
बेळगाव : खासबाग येथील जुन्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी सदर काम सुरू करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे अडथळा निर्माण झाल्याने मध्यंतरी काम बंद ठेवण्यात आले होते. हे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले असून, मे 2026 पर्यंत खासबाग कचरा डेपो स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट महापालिकेकडून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी [...]
तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील उर्वरित डांबरीकरणाचे काम हाती
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे उर्वरित काम रविवारी सुरू केले. त्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. उड्डाणपूल बंद झाल्याने काँग्रेस रोडवर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साप्ताहिक सुटी असल्यामुळे गर्दी काहीशी कमी असली तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे नाकीनऊ झाले.उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे 7 नोव्हेंबरपासून रस्ता बंद करून कामाला सुरुवात झाली. मुरुम तसेच [...]
राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्ताकामाचा दर्जा राखा
अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा : रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांतून नाराजी : आराखड्यानुसार काम होत नसल्याची तक्रार खानापूर : एकात्मक विकास योजनेतून राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. रुमेवाडी ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे क्राँक्रीटीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिरपर्यंत तसेच करंबळ क्रॉस ते रुमेवाडी क्रॉसनजीकपर्यंतचा [...]
भीमगडमधील गावांच्या स्थलांतर विरोधात रहिवासी समितीचा उद्या हेम्माडगा येथे मेळावा
आमदारशांतारामसिद्धी, आधीवक्तापरिषदेचेपदाधिकारीमार्गदर्शनकरणार खानापूर : भीमगड अभयारण्य तसेच तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना कर्नाटक वन मंत्रालय आणि वनखाते यांच्याकडून पैशाचे आमिष दाखवून स्थलांतर करण्याचा घाट गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने 22 नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन तालुक्यातील नागरिकांनी अरण्य हितरक्षण समिती स्थापन करून स्थलांतराला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून [...]

27 C