Mumbai News –कोस्टल रोडवर अपघात, भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू
मुंबई कोस्टल रोडवर भयानक अपघाताची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भरधाव भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून ट्रॅफिक वार्डनचा मृत्यू झाला. रफिक वजीर शेख असे मयत ट्रॅफिक वार्डनचे नाव आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख हे शनिवारी मुंबई कोस्टल रोडवर कर्तव्यावर होते. सायंकाळी 5.21 […]
मला वाटलं माझा हातच तुटला.. विजयानंतर आवेश खानने का केलं नाही सेलिब्रेशन, काय घडलं पाहा...
Avesh Khan: आवेश शान हा लखनौसाठी मॅचविनर ठरला. पण आवेश खानला यावेळी विजयाचे सेलिब्रेशन करताच आले नाही. लखनौने विजय साकारल्यावर नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या..
शार्दुल ठाकूरच्या त्या एका कृतीने सामना लखनौच्या बाजूने फिरला, नेमकं घडलं तरी काय पाहा...
LSG vs RR: लखनौच्या संघाने अखेरच्या षटकात सामना जिंकला खरा, पण त्याचवेळी शार्दुल ठाकूरच्या एका गोष्टीमुळे सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात नेमकं काय घडलं, जाणून घ्या..
'मी नेता नाही तर सत्याचा शोधक,' राहुल गांधींचं स्पष्ट मत; गांधी-नेहरूंचा इतिहास गिरवत सांगितलं कारण
Rahul Gandhi Podcast : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी खासदार आणि काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. त्यांनी त्यांच्या अनेक राजकीय तत्वांवर प्रकाश टाकला आहे.
राहुल द्रविड सरांच्या लिटील चॅम्पचा मोठा धमाका, वैभव सूर्यवंशीने पहिल्याच षटकात रचला इतिहास
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वाधिक बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल केले, तेव्हा त्यांची मस्कर केली जात होता. पण राहुल द्रविड यांच्या शिष्याने तर पहिल्याच षटकात कोणता इतिहास रचला, जाणून घ्या..
Fact Check: अयोध्येत हनुमान जी आकाशात उडताना दिसले? व्हायरल VIDEO चं सत्य काय?
Fact Check News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हनुमानजी अयोध्येत उडताना दिसल्याचा दावा केला जात आहे. लोक हो व्हिडिओ खरा असल्याचं समजून शेअर करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केलेला असल्याचं समोर आलं आहे.
Eknath Shinde : राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, एकनाथ शिंदे पत्रकारावर भडकले
Eknath Shinde News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण दोन्ही बाजूंकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते पत्रकारावर चांगलेच संतापलेले बघायला मिळाले आहेत.
Nanded News : 'तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल,' असं म्हणत आश्रम शाळेतील एका ४० वर्षीय अधीक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अधीक्षकाविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारण आता एका नव्या वळणावर जाताना दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आता एकत्र येण्याच्या दिशेला वाटचाल करत आहेत. दोघांची युती झाली तर दोन्ही ठाकरेंना किती फायदा होणार? ते आपण सोप्या शब्दांत समजून घेऊयात.
राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं भुला कॅरेक्टर! शिंदेसेनेनं भलीमोठी यादी वाचली; पीठ, मीठ काढलं
विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत टाळीसाठी हात पुढे केला आहे.
भाजप कोणाचीही नाही, जैन मंदिरावरून आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबईतील विलेपार्ले येथील 35 वर्ष जुने मंदिर महापालिकेने एकाएकी पाडले. त्या विरोधात आज जैन समाजाने मोठ्या प्रमाणात एकत्र येत निदर्शने केली. या आंदोलनाला भाजपचे नेते व मुंबई चे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा देखील हजर होते. त्यावरून शिवसेना नेते आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारला फटकारले आहे. “दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर […]
सावंतवाडीच्या पत्रकारितेला निर्भिडतेचा इतिहास
मनिष दळवी यांचे प्रतिपादन; पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग [...]
CM Devendra Fadnavis on Raj-Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाशी हातमिळवणी करण्यासाठी पहिली साद घातली आहे. यावर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Fact Check: बाळाला चक्क नदीत फेकलं, महिलेचा धक्कादायक VIDEO व्हायरल, दावा किती खरा?
Fact Check News: सोशल मीडियावर महिला आणि मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिला मुलीला नदीत तरंगताना दिसत आहे. हा व्हिडिओ X, Instagram आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
गुजरात जिंकली पण जोस बटलरला बसला मोठा धक्का, विराट कोहलीचा मोठा विक्रम अबाधित राहीला
GT vs RR: गुजरातने सामना जिंकला, पण त्यांच्यासाठी जो मॅचविनर ठरला होता त्या जोस बटलरला मात्र धक्का बसला. सामना सुरु असताना अखेरच्या षटकात नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...
South Actor Unknown Facts : फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणारा हा अभिनेता दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा सुपरस्टार असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
प्रवाशांनी भरलेल्या बोटीला भीषण आग; १४८ जणांचा अंत, अनेकजण बेपत्ता; महिलेच्या एका चुकीनं घात
Congo Boat Accident: कांगो नदीत झालेल्या बोट दुर्घटनेनं जग हादरुन गेलं आहे. या अपघातात आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला असून कित्येक जण अद्याप बेपत्ता आहेत.
IPL 2025 –संजू सॅमसनच्या जागी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी, ठरला आयपीलमधील सर्वात तरुण खेळाडू
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे लखनौ सुपरजायंट्स विरोधातील सामना खेळू शकणार नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याची संघात वर्णी लागली आहे. अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वैभव हा आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 27 मार्च 2011 ला जन्मलेला वैभव हा डावखुरा फलंदाज आहे. अंडर 19 च्या ऑस्ट्रेलियाविरोधातील […]
Raj Thackeray and Uddhav Thackeray : आज दोघे भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं, आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबातील दोघे भाऊ एकत्र येत असतील मला असं वाटतं की, हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक राजकीय आणि कौटुंबिक सुवर्ण दिवस आमच्या सगळ्यांसाठी असेल, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
बिडवलकर हत्या प्रकरणात खरा आका निलेश राणेच, वैभव नाईक यांच्या आरोपाने खळबळ
बिडवलकर हत्या प्रकरणात माझ्यावर आरोप करण्यात आले. परंतु मी ज्याची विचारणा केली होती, त्यावर आमदार निलेश राणे काहीही बोलू शकले नाहीत. त्या हत्या प्रकरणात सिद्धेश शिरसाटला पकडल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निलेश राणेंनी पोलीस अधीक्षकांना दोन वर्षापूर्वीची प्रकरणे आता कशी काढता? अशी विचारणा केली. जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा, असे सांगत आक्रमक भूमिका […]
मित्रासोबत समुद्रात पोहायला गेले ते परतलेच नाहीत, दोन सख्ख्या भावांचा अंत; कुटुंबाचा एकच टाहो
Raigad Two Brothers Drown: मित्रासोबत वेळास समुद्रकिनारी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश होता.
Video –ठाकरे बंधुंच्या साद-प्रतिसाद भूमिकेचं महाराष्ट्रातून स्वागत!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत, त्यांच्यात कोणतेही वाद, मतभेद किंवा भांडणे नाहीत. महाराष्ट्राच्या शत्रूंना विरोध ही आमची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी साद घातली आहे. त्याला […]
हिंगोली जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी शनिवार व रविवारी दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणी जनतेने […]
Social Media Influencer Ex-Husband : लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पतीबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलीकडेच, कंटेंट क्रिएटरच्या पतीने सोशल मीडियाद्वारे त्याच्या आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितलं आहे.
Video –मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
मंत्री गोगावलेंसमोरच शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर, सोलापूरमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
सोलापूर दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समोरच दोन गट भिडले. यामुळे मोठा राडा झाला. गोगावले सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी स्थानिक कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाप्रमुख मनिष काळजे हे कार्यालयात गोगावले यांचा सत्कार करीत होते. त्यावेळी माजी शहर प्रमुख मनोज शेजवळ तिथे आले. गोगावले यांना मुद्दामहून बसवून घेत असल्याचा आरोप शेजवळ यांनी केला. […]
अशी अभद्र युती...; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाची भावना; चर्चा झडत असताना ईश्वर चरणी प्रार्थना
Uddhav Thackeray And Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत टाळीसाठी हात पुढे केला आहे.
विदर्भावर सूर्य कोपला! नागपूरच्या तापमानाची झेप पन्नाशीकडे; अकोला, चंद्रपूर, वर्धाही तळपलं
Vidarbh Weather Update : विदर्भाला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. उष्णता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल असे वाटत असतानाच आज तापमानाचा पारा पुन्हा चढला आहे.
Photo –मुंबईतील 90 वर्षे जुनं जैन मंदिर पाडल्याने समाज संतप्त
मुंबईतील विलेपार्ले येथील 90 वर्षे जुने दिगंबर जैन मंदिर पाडले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. या विरोधात जैन समाजातील हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शने केली. सर्व फोटो – रुपेश जाधव
DC vs GT: गुजरातसाठी जोस बटलर ठरला बॉस; दिल्लीविरुद्ध थोडक्यासाठी शतक हुकलं
DC vs GT IPL 2025: गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएलचा आजचा पहिला सामना रंगला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा केल्या याउलट गुजरातने सहज हे लक्ष्य पार केले.
Video –आम्ही प्रेमानं सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उखडून फेकू!
भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवर आपली भूमिका स्पष्ट केली.
जालन्यात लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरून भांडण, 16 वर्षाच्या मुलाने जीवन संपवले
जालन्यातील चंदनझिरा भागात लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. यानंतर एका सोळा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन राहुल साळवे (16)असे मयत मुलाचे नाव आहे. ही घटना जालना शहरातील चंदनझिरा येथे शुक्रवार 18 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चंदनझिरा भागात […]
'तर मराठी माणसासाठी हा सुवर्णक्षण, ठाकरे नाही, सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं', रोहित पवारांचं आवाहन
Rohit Pawar on Raj-Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी युतीसाठी काही अटी घातल्या आहेत, ज्यामुळे एकत्रीकरणाच्या शक्यता धूसर वाटत आहेत. रोहित पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रद्रोही शक्तींविरुद्ध ठाकरे कुटुंबांनी एकत्र येणे हा मराठी अस्मितेसाठी सुवर्णक्षण ठरू शकतो, असे म्हटले आहे.
विलेपार्लेतील जुने जैन मंदिर पाडलं, जैन समुदायाची पाडकामाविरोधात भव्य रॅली
विलेपार्लेतील कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुधवारी पाडले. या पाडकामाविरोधात शनिवारी जैन समाजाने एक भव्य अहिंसक रॅली विलेपार्ले येथे काढली. या रॅलीत हजारो जैन भाविक रस्त्यावर उतरले होते. विलेपार्लेतील कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुधवारी पाडले. या पाडकामाविरोधात शनिवारी जैन समाजाने एक भव्य रॅली काढली […]
गौरव मोरेची स्वप्नपूर्ती! अभिनेत्याने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क
Gaurav More : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने आलिशान गाडी खरेदी केली असून अभिनेत्याने व्हिडिओ शेअर केला आहे.
Sindhudurg News –उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राचा फायदा होईल –वैभव नाईक
महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असे मनसे नेते राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. […]
नागपुरात अग्नितांडव! डम्पिंग यार्डमध्ये भीषण आग, धुराचे लोट उसळले; अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
Nagpur Fire Broke out at Dumping Yard : शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये शनिवारी अग्नितांडव पाहायले मिळाले. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. यातच अग्निशमनची गाडी सुद्धा जळून खाक झाली आहे.
विराटला जे जमलं नाही ते रजत पाटीदारने करुन दाखवलं, सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
RCB vs PBKS: विराट कोहली सुरुवातीपासून आरसीबीच्या संघात आहे, पण जे विराटला जमले नाही ती गोष्ट रजत पाटीदारने करून दाखवल आहे. रजतने सचिनचा कोणता मोठा विक्रम मोडीत काढला आहे, जाणून घ्या..
Sai Tamhankar : सई ताम्हणकर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असून तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील देवमाणसाबद्दल सांगितलं आहे.
हाती बंदूक, १७ वर्षांच्या कुणालच्या हत्येचा आरोप... कोण आहे लेडी डॉन जिकरा?
Who Is Zikra The Lady Don: जिकरा या नावाने सध्या दिल्लीच्या सीलमपूर भागात दहशत माजली आहे. ही कोणती साधीसुधी मुलगी नसून एक लेडी डॉन आहे.
महाराष्ट्राच्या चर्चेत फक्त ‘ठाकरे’, मराठी मनं सुखावली; सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर
महाराष्ट्रातील राजकारणाचा तीन अक्षरी मंत्र म्हणजे – ‘ठाकरे’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजप सत्तते आल्यानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीही अनुभवलेले नव्हते असे प्रसंगही पाहिले. मात्र महाराष्ट्र कायमच देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राज्य ठरलं आहे. आताही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे […]
Raj Thackeray and Uddhav Thackeray News : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती न करण्याची अट घातली आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांनी सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा दुसरा अहवाल समोर; डॉ. घैसासांच्या अडचणीत वाढ
Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा दुसरा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. यानंतर अलंकार पोलीस ठाण्यात घैसास यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Photo –उद्धव ठाकरे यांचे भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन केले. आज भारतीय कामगार सेनेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पार पडली. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढत असताना, त्यांचं हित प्रथम ध्येय ठेवून इतकी वर्ष अविरत काम करणे कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. […]
अभिषेक नायरची IPL 2025 मध्ये एंट्री, BCCI ने केला गेम पण चॅम्पियन टीममध्ये मिळाली संधी
Abhishek Nayar: अभिषेक नायरला बीसीसीआयने भारतीय संघामधून बाहेर केले होते. पण आता त्याला आयपीएलने तारले आहे. अभिषेकची कोणत्या संघात एंट्री झाली आहे, जाणून घ्या...
Nagpur News –नागपूरमध्ये भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडला भीषण आग, अग्नीशमन दलाचा एक बंबही जळून खाक
नागपुरातील भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत अग्नीशमन दलाचा एक बंबही जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करीत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथन शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास […]
'महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं', उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू वैद्य यांचं आवाहन
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू वैद्य यांनी प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
'ससूनचा अहवाल जाळून टाका...' सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना थेट आदेश, वातावरण तापणार?
Supriya Sule on Sasoon Committee Report : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अपेक्षा होती की दोषींवर कठोर कारवाई होईल, मात्र ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीने संबंधित रुग्णालयाला ‘क्लीनचीट’ दिली आहे. 'ससूनचा हा अहवाल जाळून टाका,' अशी थेट सूचना खासदार सुळेंनी दिली आहे.
२१ पासून आरोंदा-परेल बसफेरी सुरु होणार ?
ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाच्या चर्चेत आगार व्यवस्थापकांचे आश्वासन वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ले आगारातून बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली आणि काही वर्षापासून बंद केलेली तसेच राजकिय पक्षांच्या मागणीनुसार केवळ उन्हाळी हंगामातील सिझनमध्ये चालू करण्यात येणारी आरोंदा-परेल हि बस केवळ हंगामासाठी नव्हे तर पुर्वी प्रमाणे ३६५ दिवस चालू करावी. शेवटच्या गावातून सुटणाऱ्या अन कायम मुंबईस जाण्यास भारमान असणाऱ्या आरोंदा-परेल बस [...]
राज ठाकरेंचा स्वभाव पाहता ते...; ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, उदय सामंतांनी 'अंदाज' वर्तवला
Uddhav Thackeray And Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर महायुती सत्तेत आली. त्यानंतर अलीकडे झालेल्या निवडणुकीतही महायुतीला एकहाती मोठे यश मिळालं. आता पुढील काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
मुलाच्या अस्थिविर्सजनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह चौघांचा जागीच मृत्यू
मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. मुलाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थिविसर्जनाला जात असताना आई-वडिलांसह चौघांवर काळाने घाला घातला. कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर धडकल्याने अपघात झाला. यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजकुमार शर्मा, कमलेश भार्गव, शुभम आणि पराग अशी […]
रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन
मुरूम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यशवंत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर शुक्रवारी (ता. 18) रोजी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद गुतेदार, महालिंग बाबशेट्टी, सतिश सावंत आदींची उपस्थिती होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हावळे, उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड, सचिव अमित देडे, सहसचिव डॉ. अजिंक्य मुरूमकर, जिल्हा कृषी पणन तज्ञ अमित भालेराव, प्राचार्य आकाश गवई, माजी नगरसेविका संध्या सावंत, माजी नगरसेविका मीरा सोमवंशी, मुख्याध्यापिका उर्मिला तुपेरे, अश्विनी कांबळे, तृप्ती गायकवाड, आनंद कांबळे, किरण गायकवाड, आशिष गवई, उत्कर्ष गायकवाड, वैभव कांबळे, प्रशांत कांबळे, सुरज कांबळे, शुभम सावंत, अमर भालेराव, प्रविण सुर्यवंशी, मलकेश वाघमारे, किशोर सुरवसे, समीर सोमवंशी, विवेक भालेराव, प्रसाद बनसोडे, संतोष कांबळे, अभिजीत कांबळे आदींनी पुढाकार घेतला. मातोश्री डी एम एल टी कॉलेजचे विद्यार्थी, श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ. सागर पतंगे, विजय केवडकर, योगेश सोनकांबळे, किशोर खरोसे ऋतिक मेत्रे, अजय रोडगे, राहुल कांबळे आदींनी रक्त संकलनाचे काम पाहिले. अशा समाज उपयोगी उपक्रमामुळे डॉ. आंबेडकर यांच्या समाजसेवेच्या विचारांना आणि मानवतेच्या मूल्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले. रक्तदानानंतर सहभागी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमाने सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दिल्याने परिसरातील नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.
IPL 2025 सुरु असताना सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का; एका फोटेमुळे कमिन्सने संघ सोडण्याची चर्चा
Pat Cummins SRH: आयपीएल २०२५ सनरायझर्स हैदराबादसाठी फारसे चांगले गेले नाही. संघ ४ गुणांसह ९ व्या क्रमांकावर आहे. या हंगामात हैदराबादला केवळ दोन सामने जिंकले आहेत. आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
कळंब (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त कळंब शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धे साठी दोन गट केले असून पहिला गट ते 5 वी आणि दुसरा गट 6 वी ते 10 वी असे आहेत. प्रत्येक गटातून प्रथम पारितोषिक 3000, द्वितीय 2000, त्रितीय 1000 व उत्तेजनार्थ तिघांना प्रत्येकी 200 असे ठेवण्यात आले आहे. निबंध स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. निबंधाचा विषय “ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य“ हा असुन पहिला गट 5 वी ते 7 वी आणि दुसरा गट 8 वी ते 10 वी असा आहे. पहिल्या गटासाठी शब्द मर्यादा 1000 व दुसऱ्या गटासाठी 1500 शब्द मर्यादा अशी आहे. प्रत्येक गटातून प्रथम पारितोषिक 3000, द्वितीय 2000, त्रतिय 1000आणि उत्तेजनार्थ म्हणून तीघांना प्रत्येकी 200 असे ठेवले आहेत. चित्रकलेसाठी चित्र रेखाटलेला आर्ट पेपर मोफत पुरविण्यात येणार असून पेन, पॅड, पेन्सिल, रंगाचे साहित्य स्पर्धकांनी सोबत आणायचे आहे. निबंध लिहिण्यासाठी पेपर स्पर्धकांनी सोबत घेऊन यायचा आहे व निबंध शाळेत ठरवुन दिलेल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. संयोजकांचा निर्णय अंतिम राहील. चित्रकला स्पर्धा मंगळवार दि 22 एप्रिल 2025 रोजी त्या त्या शाळेत सकाळच्या सत्रात घेतली जाणार आहे. निबंध स्पर्धा शाळेच्या सोयीनुसार 23 त 28 एप्रिल म्हणजेच शाळेला उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी घेण्यात येईल. या स्पर्धां एका विशिष्ट ठिकाणी न घेता वाढते तापमान व चालू असलेल्या शालेय अंतर्गत परिक्षा याचा विचार करून त्या त्या शाळेत आयोजित केलेल्या आहेत. संयोजकांनी या स्पर्धेविषयी माहिती सर्व शाळांना दिलेली आहेच परंतु नजर चुकीने एखाद्या शाळेला माहिती मिळाली नसेल तर पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा व स्पर्धेत विद्यार्थ्यांना सामिल करून घ्यावे हि विनंती. अप्पासाहेब कसपटे सर 9595180412, नानासाहेब कवडे सर 9404677147, अप्पासाहेब वाघमोडे सर, डॉ अशोक शिंपले सर, 7038289599, सचिन सलगर सर 9423736155, प्रा डॉ दादाराव गुंडरे सर 9470054913 आणि गाडेकर मॅडम 9405501045. असे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. बक्षीस वितरण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी म्हणजे शनिवार दि 31 मे 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते समारंभ पुर्वक करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कळंब (प्रतिनिधी)- विद्याभवन हायस्कूल, कळंब या प्रशालेत सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव, वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण कळंब आयोजित 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध लेखनाचा विषय 'वनाचे महत्व'या विषयावर प्रशालीतील विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. या स्पर्धेत एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय ,तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्ही के करे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण धाराशिव, बी एम तळेकर वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण कळंब ,एस आर कुलकर्णी वनपाल कळंब प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही जी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी ,मराठी विभाग प्रमुख सोपान पवार या मान्यवरांच्या हस्ते कु. मृणाल संतोष पवळ प्रथम क्रमांक, कु.रिया महेश आडणे द्वितीय क्रमांक, कु. वैष्णवी विष्णू तांबारे तृतीय क्रमांक व कु .प्रणिता गुणवंत जाधव उत्तेजनार्थ या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच एस आर कुलकर्णी वनपाल कळंब यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड कशी करावी,वनाचे महत्त्व व वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाप्रसंगी ज्योतीराम सोनके अप्पासाहेब वाघमोडे दीपक सौलाखे संजय कदम, चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांनी मानले.
भूम (प्रतिनिधी)- हौसेला मोल नाही म्हणतात ते खर करून दाखवलं आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका शेतकऱ्याने, आपल्या मुलाच्या लग्नात आणि विशेषतः होणाऱ्या लाडक्या सुनबाईसाठी माहेर वरुन लग्न मंडपात आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर ची सोय केली ज्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या आपल्या सुनेला लग्नात कोणताही कमीपणा भासू नये म्हणून, सासऱ्याने चक्क तिच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून तिला सासरी आणलं आणि त्याच हेलिकॉप्टरमधून वधू-वरांची गावात मिरवणूक काढली. भूम तालुक्यातील अंतरवली गावात ही आनंददायी आणि तितकीच चर्चेची घटना घडली आहे. येथील रहिवासी शेतकरी भास्कर शिकेतोड यांच्या लहान मुलाच आकाशचं लग्न सावरगाव येथील अस्मितासोबत त्यांनी ठरवलं होतं. अस्मिताने लहानपणीच आई-वडिलांना गमावलेलं असून तिचा सांभाळ तिच्या मामाने केला होता. लग्नासाठी अस्मिताला तिच्या माहेरहून, म्हणजे सावरगावहून सासरी आणायचं होतं. नवरी मुलीला माहेरहून आणण्यासाठी आणि तिला लग्नात कोणताही कमीपणा भासू नये, तिला राजेशाही थाटाचा अनुभव मिळावा या एकमेव इच्छेने भास्कर शिकेतोड यांनी थेट हेलिकॉप्टरच बुक केलं. ठरल्याप्रमाणे, अस्मिताला आणण्यासाठी हेलिकॉप्टर सावरगाव येथे पोहोचले. अस्मिताला हेलिकॉप्टरमधून अंतरवली येथे आणण्यात आले. यानंतर केवळ मुलीला आणण्यासाठीच नाही, तर त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसवून नववधू अस्मिता आणि वर आकाश यांची गावामध्ये शाही मिरवणूक काढण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आई-वडिलांच्या आठवणीने कदाचित हळवी होणाऱ्या सुनेच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सासऱ्याने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद होतं असं बोललं जात आहे. शेतकऱ्याची हेलिकॉप्टरची हौस जुनी शेतकरी भास्कर शिकेतोड यांची ही हेलिकॉप्टरची हौस तशी जुनीच आहे. त्यांनी यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नातही हेलिकॉप्टरमधून मिरवणूक काढली होती. विशेष म्हणजे, भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नाची मिरवणूक साध्या मोटरसायकलवरून झाली होती. त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नात तरी हेलिकॉप्टरचा थाट करायचा, असा निर्धार त्यांनी केला होता, असं ते सांगतात. आकाश आणि अस्मिता यांचा विवाह मोठ्या आनंदात पार पडला असला तरी, या लग्नापेक्षा सध्या सासऱ्याने आपल्या सुनेसाठी, विशेषतः आई-वडील नसलेल्या मुलीसाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टीची आणि मायेच्या 'थाटा'ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. या अनोख्या विवाहसोहळ्याबद्दल बोलताना वरबाप भास्कर शिकेतोड आणि नववधू अस्मिता शिकेतोड यांनी आपला आनंद व्यक्त केला.
Shaban Azmi On Smita Patil : स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांची जोडी कायम चर्चेत असायची. अशातच आता एका मुलाखतीदरम्यान शबाना यांना स्मिता यांच्याबद्दल वाईट बोलल्याबद्दल पश्चाताप होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा; उद्धवसेनेकडून दोन भावांचा खास फोटो पोस्ट, युती होणार?
Uddhav Thackeray And Raj Thackeray: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. महाराष्ट्रहितापुढे आमचे वाद क्षुल्लक असल्याचं विधान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलं.
Samantha Rejecst 15 brand endorsements:साऊथ स्टार सामंथा रुथ प्रभु सध्या चर्चेत आली आहे. आता पर्यंतच्या करिअरमध्ये असे काही निर्णय घेतले, त्याबद्दल आता खंत वाटते, असंही ती म्हणाली.
Nitesh Rane Reacted on Raj- Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पक्षाची मोठी गच्छंती झाल्यानंतर आता दोघांनीही हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत.
लग्नाहून घरी परतत असताना कार दरीत कोसळली, 5 जण जागीच ठार
लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना कार दरीत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. लगातार पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. कारमधील सर्व जण निजमुला येथून लग्न समारंभ आटोपून दशोली विकासखंड येथील घरी परतत होते. यादरम्यान चमोलीतील कोरेलधार येथे […]
अलिबागला फिरायला गेले अन् नको ते घडलं, पाच वर्षांच्या चिमुकलीचा आई-वडिलांसमोर अंत
Girl Child Drown In Hotel Swimming Pool: एक चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत अलिबाग येथे फिरायला गेली होती. मात्र, ती कोणालाही न सांगता आपल्य़ा बहिणीसोबत स्विमिंग पूलमध्ये गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने ही चिमुकली पाण्यात बुडाली.
Raj Thackeray And Uddhav Thackeray News : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याची तयारी दर्शवल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटासोबत संबंध न ठेवण्याची अट घातली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शंका व्यक्त करत, यापूर्वी शिवसेनेने दिलेल्या धोक्यांचा पाढा वाचला आणि विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल केला आहे.
सांगेली रवळनाथ मंदिराचा उदया संप्रोक्षण विधी सोहळा
विविध कार्यक्रमांचे आयोजन ओटवणे प्रतिनिधी सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथ देवस्थान पंचायतन मधील श्री देव रवळनाथ मंदिराचा संप्रोक्षण विधी रविवारी २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त रवळनाथ मंदिरात सकाळी ८ वाजता मानकऱ्यांकडून गणपतीपूजन संभारदान घेणे कार्यक्रम, सकाळी ८.१५ वाजल्यापासून पुण्याहवाचन, देवतास्थापन पूजन, अग्निस्थापन, हवन, बलिदान, पुर्णाहुती, वास्तू स्थापना आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता [...]
IPL 2025 संपल्यावर दुसऱ्या दिवशी सुरु होणार ही टी २० लीग, रोहित शर्मा आहे ब्रँड अॅम्बेसेडर
Rohit Sharma: रोहित शर्मा आता एका खास लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. आयपीएलची फायनल संपली की लगेच दुसऱ्या दुवशी आता कोणती लीग सुरु होणार आहे, जाणून घ्या..
Esha Dey : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रम असून एका मुलाखतीदरम्यान ईशा डेने हास्यजत्रेच्या चाहत्याचा किस्सा सांगितला आहे.
डाएटच्या प्राचार्यांची माडखोल केंद्र शाळेला सरप्राईज भेट
शाळेच्या कामकाजासह शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक ओटवणे प्रतिनिधी सिंधुदुर्ग जि.प.च्या प्रमुख शिक्षण, प्रशिक्षण संस्था अर्थात डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी माडखोल केंद्र शाळा नं १ ला अचानक भेट देत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह दर्जा सोयीसुविधा व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच विशेषतः शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या टीम वर्कचे कौतुक केले.यावेळी प्राचार्य राजेंद्र कांबळे [...]
इतका अहंकार की... अभिनेत्यानं नाकारलेला रंग दे बसंती चित्रपट, आता होतोय पश्चाताप
Movies Rejected by Randeep Hooda:बॉलिवूड अभिनेत्री रणदीप हुड्डा सध्या जाट चित्रपटामुळं चर्चेत आहे. त्यानं नुकताच्या दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला.
क्वांटम कम्प्युटर भविष्यातील गेम चेंजर?
देशातील पहिला वहिला सहा क्युबिट्सचा क्वाण्टम संगणक निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. By : चिन्मय गवाणकर, शलाका वर्मा, सहलेखक आपण शाळेमध्ये भौतिकशास्त्रात शिकलो होतो, की पदार्थाच्या साधारण तीन प्रकारच्या स्थिती असू शकतात : घन, द्रव आणि वायू! परंतु 19 फेब्रुवारी 2025 रोजी मायक्रोसॉफ्टने चक्क पदार्थाची नवीन स्थिती शोधल्याचे जाहीर केले. ज्याला त्यांनी टोपोलॉ जिकल सेमीकण्डक्टर (अर्धवाहक) [...]
तेंडोली रवळनाथ पंचायतनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
वार्ताहर/कुडाळ तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा 21 ते 25 एप्रिल याकालावधीत साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.21 रोजी दुपारी ३ वाजता ग्राम देवतेस श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालणे, तरंग स्वरूप देव नेसवणे, पाषाणे सजविणे, तरंगाना वस्त्रालंकार, सायंकाळी ७ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ (झाराप) यांचे नाटक, रात्री १० [...]
महाराष्ट्र, मराठी माणसासाठी मतभेद विसरत एकत्र येणे ही काळाची गरज; संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत, त्यांच्यात कोणतेही वाद, मतभेद किंवा भांडणे नाहीत. महाराष्ट्राच्या शत्रूंना विरोध ही आमची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी साद घातली आहे. त्याला […]
मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन केले. हिंदी सक्ती करत असाल तर होऊ देणार […]
Mumbai 6 Biggest landlords: मुंबईत आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी सर्वसामान्यांना कर्ज काढावं लागत आहे तर काही लोकांना अगदी गावाकडची जमीनही विकण्यास भाग आहे. अशा स्थितीत, फक्त सहा लोकांकडे आपल्या स्वप्ननगरीत 20 टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचा वाटा आहे. विशेष म्हणजे हा वाटा या लोकांना वारसा हक्काने मिळाला आहे.
भावांना पाझर फुटला असेल तर...; ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर शिंदेसेनेची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray And Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसेची धूळधाण उडाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले.
ब्राह्मणांविषयक वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; मुंबईत तक्रार दाखल
Complaint filed against Anurag Kashyap : बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यप अनेकदा वादग्रस्त वक्तामुळं अडचणींत सापडला आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढल्या आहेत..
बोत्रे कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा स्पर्धा परीक्षेत यशाचा झेंडा
भूम (प्रतिनिधी)- भूम कोष्टी समाजातील बोत्रे परिवारातील दोन सख्ख्या बहिणींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत यशस्वी प्रवेश केला असून, त्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. समाजाचे मार्गदर्शक आणि माजी उपनगराध्यक्ष नारायणराव बोत्रे यांच्या पुतणी, तसेच हनुमंतराव बोत्रे यांच्या कन्या गीता सुरेखा हनुमंतराव बोत्रे व शिबीका सुरेखा हनुमंतराव बोत्रे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शुभांगी हनुमंतराव बोत्रे व गीता हनुमंतराव बोत्रे यांच्या महसूल सहाय्यक (मंत्रालय क्लार्क) पदावर निवडी झाली आहे. भूम शहरातील कपड्यांचे व्यापारी हनुमंत विठ्ठलराव बोत्रे हे शिक्षणापासून दूर असले तरी त्यांच्या तीन मुलींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सरकारी सेवेत प्रवेश केला आहे. त्यांची एक मुलगी राणी श्रीकांत खामकर या जिल्हा न्यायालय, भूम येथे लघुलेखक (वर्ग-2) पदावर कार्यरत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न
परंडा (प्रतिनिधी) - येथील धम्मराजिका महाविहार येथे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न झाले परिवर्तन मिशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर भगत सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आजच्या तरुण पिढी या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी शिक्षण घेऊन कशाप्रकारे आंबेडकरवाद कसा पुढे घेऊन जाऊ शकतो यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच देश-विदेशात शैक्षणिक संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन करून आजच्या तरुण पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. येणाऱ्या काळात बहुजनांची मुलं शैक्षणिक पात्रात देश-विदेशात मोठी संधी असून त्यांना कशाप्रकारे विदेशी शिष्यवृत्ती मिळवून त्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. या कामी मी केव्हाही आपल्या सेवेत आहे असेही जाहीर केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकाळजे, दीपक पवार, महेश कसबे, जिनेरी, सीमा निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी बनसोडे, प्रदीप परिहार, जीवन दीपक पवार, कुणाल बनसोडे इत्यादी ने परिश्रम घेतले. वरिल व्याख्यानास पंचक्रोशीतील तरुण, तरुणी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक वारसा दिनानिमित्त प्रेक्षकांना मोफत प्रवेश
तेर (प्रतिनिधी)- जागतिक वारसा दिनानिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात प्रेक्षकांना संग्रहालय पहाण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमीत्ताने राज्य सरकारच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालयाचे तेर येथे असलेले कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहालयातील पुरातन वस्तू पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला.
एन.एम.एम.एस परीक्षेत मळगावच्या चैताली जाधवचे यश
न्हावेली / वार्ताहर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस (आर्थिक दुर्बल घटक) शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची विद्यार्थ्यांनी कुमारी चैताली दिपक जाधव इयत्ता 8 वी हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात sc प्रवर्गातून 8 वा क्रमांक प्राप्त केला.या तिच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले ,पर्यवेक्षक सुनील कदम, मळगांव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर,सचिव [...]
ॲडिशनल जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी घेतले देवीचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- ॲडिशनल जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार (सिडको) यांनी दि.18 एप्रिल रोजी विधिवत पूजा करून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी तालुका पञकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, तलाठी गोरोबा तोडकरी यांनी देवीची प्रतिमा, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी देविचे पुजारी विकी वाघमारे उपस्थित होते. सिडको (मुंबई) येथील अडचण जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सहकुटूंब सह परिवार देविचे दर्शन घेतले.
भूम (प्रतिनिधी)- भूम कुंथलगिरी रोडवर दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या दरम्यान शुकूर बागवान यांच्या शेतातील गोडाऊनला अचानक आग लागल्याने गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले. भूम नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर आग विजवण्यात आली. महावितरणचे अधिकारी व स्टाफ येऊन घटनास्थळाकडील सप्लाय बंद करण्यात आला. परंतु आग कशामुळे लागली हे अद्याप सष्ट होऊ शकले नाही. अधिक माहिती अशी की बागवान यांचे कुंथलगिरी रोडला साहित्याचे गोडाऊन होते. त्या गोडाऊन मधील फ्रुट साठी वापरण्यात येणारे कॅरेट, ट्रॅक्टरचे टायर्स व इतर साहित्य असे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बागवान यांनी सांगितले. आग इतरत्र पसरू नये म्हणून नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने आजूबाजूला शेताच्या बांधावर पसरलेली आग विझवण्यात आली. या अचानक लागलेल्या आगीमुळे मात्र व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या गोडाऊनच्या जवळच सोपान वरवडे यांचा गाय म्हशींचा गोठा आहे. तेथील जनावरे काही धाडसी युवकांनी आगीची पर्वा न करता सुरक्षित ठिकाणी हलवली. त्यामुळे जनावरांना देखील कोणतेही क्षती पोहोचली नाही.
शेतकऱ्याने केली देवि चरणी सफरचंद अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील हंगरगा येथील शेतकरी श्रीकांत हेमंतराव हंगरगेकर यांनी आपल्या शेतातील एक एकर मध्ये लावलेल्या सफरचंदाच्या लागलेला पहिला सफरचंद फळे शुक्रवारी तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केले आहे. यानंतर आता ते सफरचंद माल विक्रीस नेणार आहेत. शेतकरी वर्ग श्रीतुळजाभवानी मातेचा निस्साम भक्त आहे. आपल्या शेतातील पहिला आलेले फळे फुले प्रथम देविचरणी अर्पण करुन मगच विकण्यास आरंभ करतो.
पाण्याची नासाडी होत असताना ग्रामपंचायत बेफिकर !
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घट्टेवाडी येथे पाणी टाकी, पाईप लाईन उपलब्ध असताना ग्रामपंचायत दुर्लक्षीत पणामुळे पाणी असलेल्या बोअर मधुन पाणी नेण्यासाठी ग्रामस्थांना उन्हात पायपीठ करावी लागत आहे. याला ग्रामपंचायत कारभारी, ग्रामसेवक कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधुन केला जात आहे. तरी पाणीटंचाई काळात कर्तव्यात कसुर करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या बाबतीत अधिक माहीती अशी कि, काटगाव घट्टेवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. घट्टेवाडीची लोकसंख्या पाचशे आहे. गावात पिण्याचा पाण्यासाठी टाकी बांधली असुन अंतर्गत पाईपलाईन टाकली आहे. पन्नास टक्के घरांना नळकनेक्शन दिले आहे. उर्वरीत ग्रामस्थांना नळसाठी पाईप लाईन साहित्य आणुन घरात ठेवले आहे. पण नळ कनेक्शन दिले जात नाही. विशेष म्हणजे पाणी टाकी ते पाणीपुरवठा बोअर अंतर अवघे तीस फुट असुन बोअरचे पाणी टाकीत टाकुन तेथुन पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना तशी सोय करणे आवश्यक असताना ती न केल्यांना ग्रामस्थांना बोअरवर पाणी नेण्यासाठी यावे लागत आहे. यामुळे पाणी वाटोळ होवुन सदरील पाण्याचा डोह वड्यात तयार झाला आहे.या बाबतीत सरपंच, ग्रामसेवक यांना सांगुन ही उपाययोजना केली जात नाही. यात शासनाने ग्रामस्थांना सोयीसुविधा देण्यासाठी दिलेल्या निधीचा उपयोग ग्रामपंचायत दुर्लक्ष मुळे होत नाही.
आलियाबाद मध्ये मतदार नसलेल्या जातीसाठी आरक्षण
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील विविध राज्यपातळीवरील पुरस्कार प्राप्त आलियाबाद ग्रामपंचायतचे चुकीचे आरक्षण पडल्याने ते बदलुन देण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे निवेदन देवुन केली. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आलीयाबाद ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसुचित जातीसाठी पडले आहे. मात्र हद्दीत गावात एकही अनुसुचित जातीचा मतदार राहत नसुन घर ही नाही. येथील सर्व मतदार घरे हे बंजारा समाजाची आहेत. तरी 2025-2030 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेले अनुसुचित जाती आरक्षण रद्द करावे. असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे आरक्षण प्रक्रिया बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृदी लाभू दे त्यांना निरामय आयुष्य दे- तटकरे
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृदी लाभू दे त्यांना निरामय आयुष्य दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले देविदर्शन घेतना अलौकीक क्षण अनुभवास मिळतो,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात सहकुंटुब श्रीतुळजाभवानी मातेची कुलधर्म कुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी संवाद साधताना म्हणाले, मागील पंचेचाळीस वर्षापासून नित्यनियमाने सहकुंटुंब देवीदर्शनार्थ येतो. येथे आलो कि माझासाठी काहि मागत नाही. पण महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी साकडे घालतो. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृदी लाभू दे त्यांना निरामय आयुष्य दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले. देविदर्शन घेतना अलौकीक क्षण अनुभवास मिळतो. यावेळी राजकिय प्रश्न विचारला असता त्यावर भाष्य करणार नसल्याचे म्हणाले. यावेळी आपणास कँबिनेट व दादांना मुख्यमंत्री मिळण्या बाबतीत साकडे घातले का असा प्रश्न विचारला असता आम्हाला आपोआप मिळते. आम्ही जनतेत काम करणारी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेवर चालणारी मंडळी आहोत असे स्पष्ट केले. यावेळी महेंद्र धुरगुडे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, गोकुळ शिंदे, महेश चोपदार उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. मंत्री जाधव यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात यावेळी माहिती घेतली. श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना जाधव दांपत्यांनी व्यक्त केल्या. मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर संस्थानचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्हावेलीत दशावतार नाट्य महोत्सवाचे उद्घाटन
न्हावेली / वार्ताहर न्हावेली येथील उत्कर्ष कला क्रिडा सेवा मंडळ,न्हावेली कट्टा कॅार्नर व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या चार दिवस चालणाऱ्या नाट्यमहोत्सवाला उंदड प्रतिसाद मिळाला.या नाट्यमहोत्सावाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत धाऊसकर,उपाध्यक्ष लक्ष्मण परब हरि वारंग,शिवसेना शिंदे गट मळगाव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर,माजी सरपंच शरद [...]
Fact Check: आसाममध्ये रोहिंग्यांनी पोलिसांवर हल्ला केला? व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?
Fact Check News- आसाममध्ये रोहिंग्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सजगच्या टीमने या व्हिडिओचा तपास केला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
MNS - Shiv Sena UBT Alliance News : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी, ठाकरे बंधू एक होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा मार्ग नेहमीच महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाला सोबत न घेण्याची अट त्यांनी घातली आहे. या भूमिकेचं राज ठाकरेंनी समर्थन केल्यास पुढील चर्चा होऊ शकते, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
गरीबांच्या ‘थोरल्या’दवाखान्याला लुटण्याचे पाप, दोषींवर कारवाईची मागणी
सीपीआरच्या काही ओपीडीमधील ठराविक डॉक्टर रूग्ण तपासणीसाठी वेळेत हजर राहत नसल्याच्या कायम तक्रारी केल्या जातात. By : इम्रान गवंडी कोल्हापूर :गरीब व गरजूंना अधारवड असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) गैरकारभार चव्हाट्यावर आले. कधी औषध घोटाळा, कधी सर्जिकल साहित्य फसवणूक, कधी खासगी लॅब प्रपिनिधींचा शिरकाव, कधी बनावट सही शिक्क्याने कर्मचारी भरती, डॉक्टरांवरील हल्ले, रूग्णांच्या तक्रारी [...]