Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य – मनोबल उंचावणार आहे आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात आजचा […]
रोमांचक सामन्यात द.आफ्रिकेचा विजय
दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 4 गड्यांनी पराभव : मालिकेत बरोबरी :विराट-ऋतुराजची शतके वाया वृत्तसंस्था/ रायपूर एडन मार्करमच्या दमदार शतकानंतर ब्रेव्हिसच्या बॅटमधून आलेले झंझावाती अर्धशतक आणि मॅथ्यू ब्रीत्झकेच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने 350 पार धावांची लढाई जिंकत भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. रायपूरचे मैदान मारत आफ्रिकेने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली [...]
मल्लिकार्जुननगरातील घरफोडीचा तपास
तिघा चोरटे गजाआड, आणखी एका प्रकरणात महिलेला अटक, साडेसात लाखांचा ऐवज जप्त प्रतिनिधी/ बेळगाव बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने पळविणाऱ्या एका त्रिकुटाबरोबरच बसमधील प्रवासी महिलेच्या बॅगमधील दागिने पळविणाऱ्या महिलेलाही मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 7 लाख 53 हजार 500 रुपये किमतीचे 68.05 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले [...]
12 नक्षलींचा खात्मा; तीन जवानही हुतात्मा
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये चकमक : सर्व मृतदेह हाती वृत्तसंस्था/ रायपूर भारताला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू असतानाच छत्तीसगडमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. विजापूर जिह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याचदरम्यान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. बुधवारी सकाळपासून सुरू झालेली ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. [...]
रशियन राष्ट्राध्यक्षांचे आज भारतात आगमन
दोन दिवसांचा दौरा : संरक्षण करारांना मिळणार बळ : दिल्लीत बहुस्तरीय सुरक्षा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवार, 4 डिसेंबर रोजी भारतात आगमन होत आहे. ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. यादरम्यान मोठ्या संरक्षण करारांना मूर्त स्वरुप मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. [...]
सलग तिसऱ्या सत्रात शेअरबाजार घसरणीत
सेन्सेक्स 31 अंकांनी नुकसानीत : मिडकॅप निर्देशांक सर्वाधिक घसरला मुंबई : भारतीय शेअरबाजार बुधवारीही घसरणीसोबत बंद होताना दिसला आहे. सेन्सेक्स 31 अंकांनी घसरणीसह बंद झाला. मिडकॅप समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली. हा निर्देशांक जवळपास 1 टक्का नुकसानीसह बंद झाला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 31 अंकांनी घसरत 85106 च्या स्तरावर बंद झाला [...]
नवीन आधार अॅपमध्ये पत्ता, नाव बदलाचीही सोय
मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा सुरू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आता देशातील कोणताही आधार कार्डधारक आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर घरबसल्या बदलू शकतो. सरकारने नवीन आधार अॅपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच आता पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. अॅपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. कोणतेही कागदपत्रे किंवा [...]
न्यूझीलंडला 96 धावांची आघाडी, डफीचे 5 बळी
वृत्तसंस्था/ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज 96 धावांनी पिछाडीवर पडला आहे. शाई होपने बुधवारी डोळ्यांच्या संसर्गामुळे चष्मा घालून फलंदाजी करताना पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 167 धावांवर संपला आणि न्यूझीलंडने खेळ थांबवण्यापूर्वी सात षटकांत बिनबाद 32 धावा केल्या होत्या. निराशाजनक परिस्थितीत होपने हेल्मेटखाली मोठा परावर्तक चष्मा घातलेला पाहणे [...]
वृत्तसंस्था/ मुंबई भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान बीसीसीआयने घरच्या मैदानातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या 15 सदस्यीय संघात हार्दिक पंड्यासह शुभमन गिलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघात पाच सामन्यांची टी 20 मालिका 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध [...]
भारतीय महिला क्रिकेट सपोर्ट स्टाफला 11 लाखाचे बक्षीस
वृत्तसंस्था/ मुंबई महाराष्ट्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी एक सरकारी ठराव जारी केला आहे, ज्यामध्ये अलीकडेच पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या 11 सपोर्ट स्टाफ सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवीसह सपोर्ट स्टाफला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला [...]
आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानी
वृत्तसंस्था / दुबई भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात मॅचविनिंग शतक झळकावून आयसीसी रॅकिंगमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला. कोहलीने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 52 वे शतक केले. 120 चेंडूत 135 धावा केल्याने भारताने द. आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळविला. 37 वर्षीय फलंदाजाचे आता 751 रँकिंग गुण आहेत आणि तो भारताचा माजी कर्णधार रोहीत [...]
राजद खासदार अभय सिन्हांना लोकसभा अध्यक्षांची फटकार
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे बुधवारी एका प्रकारामुळे संतप्त झाल्याचे दिसून आले. सभागृहात छायाचित्रे काढणारे राजद खासदार अभय सिन्हा यांच्यावर ओम बिर्ला नाराज झाले. आज तुम्ही छायाचित्रे काढली आहेत, परंतु यापुढे छायाचित्रे काढली तर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा अशा शब्दांत बिर्ला [...]
कंपनीने केली प्रवाशांची क्षमायाचना ► वृत्तसंस्था/नवी दिल्ली इंडिगो या प्रसिद्ध प्रवासी विमान कंपनीची 85 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. बुधवारी काही तांत्रिक बिघाडामुळे कंपनीला अनेक विमाने रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्याने देशातील अनेक विमानळांवर प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनच्या या गैरसोयीमुळे कंपनीने प्रवाशांची [...]
पंचमसाली लाठीहल्ल्याचा अहवाल गृहमंत्र्यांकडे सुपूर्द
10 डिसेंबर रोजी काळ्या फिती बांधून निषेध प्रतिनिधी/ बेळगाव आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन छेडणाऱ्या पंचमसाली समाजबांधवांवर 10 डिसेंबर 2024 रोजी लाठीहल्ला केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या आयोगाने चौकशी पूर्ण केली असून गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना चौकशी अहवाल सुपूर्द केला आहे. 10 डिसेंबर हा दिवस लिंगायतांवरील अत्याचार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय समाजाने [...]
पानमसाला पॅकवर रिटेल किंमत सक्तीची
वृत्तसंस्था / नवी दिल्ली पान मसाला पॅकवर रिटेल किंमत प्रसिद्ध करण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. हा नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पानमसाला पॅकचा आकार किंवा वजन कितीही असले तरी हा नियम पाळावाच लागणार आहे. अन्यथा नियम न [...]
पंतप्रधान मोदी यांची सूचना, भाजप नेत्यांना संदेश वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ (एसआयआर) ही आवश्यक प्रक्रिया आहे. मात्र, ती पारदर्शक आणि सोपी असण्याची आवश्यकता आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही सूचना त्यांनी पुढच्या वर्षीच्या एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना अनुलक्षून केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी [...]
अभय-नेहाच्या आयुष्याचा गोड-तिखट प्रवास झी5 या अॅपवर 5 डिसेंबर रोजी मराठी वेबसीरिज प्रदर्शित होणार असून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बे दुणे तीन’ ही सीरिज आधुनिक नातेसंबंधातील आनंद, गोंधळ आणि जीवनातील छोटे छोटे अनुभव दाखविणारी आहे. यात दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोट, क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवानी रांगोळे हे प्रमुख भूमिका साकारत [...]
औषधकरोधक बॅक्टेरिया 91 टक्क्यांनी वाढले
सुपरबगच्या नव्या प्रजातीही आढळून आल्या आजारांच्या जोखिमीपासून वाचण्यासाठी अँटीबायोटिक औषधांचे वारेमाप सेवन रुग्णांसाठी जीवघेणे ठरत आहे. या औषधांच्या प्रतिरोधामुळे उपचारावर प्रभाव कमी होत असल्याची स्थिती आहे. तसेच नवे आणि घातक बॅक्टेरियाही वाढत असून त्यावर उपचार शक्य नाही. नवी दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एएमआर सर्व्हिलान्स रिपोर्ट जारी केला असून यानुसार भारताच्या रुग्णालयांमध्ये ओपीडीपासून वॉर्ड [...]
संरक्षण कराराला रशियन संसदेची मान्यता
युद्धकाळात दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करू शकणार वृत्तसंस्था/ मॉस्को रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह स्टेट ड्यूमाने मंगळवारी भारत आणि रशियामधील ‘रेलोस’ लष्करी कराराला मान्यता दिली. या करारामुळे दोन्ही देशांमधील लष्करी भागीदारी मजबूत होईल आणि गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करणे सोपे होईल, असेही रशियन सरकारने म्हटले आहे. राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत भेटीच्या एक दिवस आधी [...]
मानवी मेंदू 4 वेळा करतो मोठा बदल
जाणून घ्या कुठल्या वयात येतो गोल्डन पीरियड कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 0-90 वयोगटातील 3800 लोकांच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅनचे अध्ययन केले आहे. यातून मानवी मेंदू आयुष्यात केवळ 4 वेळा अचानक अत्यंत मोठा बदल करत असल्याचे कळले आहे. उर्वरित काळात हा मेंदू अचानक बदलत राहतो. 9 वर्षे, 32 वर्षे, 66 वर्षे आणि 83 व्या वर्षी हा बदल होत [...]
‘स्वच्छ हवा’ पॅनेलच्या अध्यक्षपदी रेखा गुप्ता
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीला गंभीर हवा प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी दिल्ली सरकारने एका विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत प्रदूषण तज्ञ आणि संशोधकांचाही समावेश करण्यात येणार असून ज्यांच्यामुळे दिल्लीचे वातावरण प्रदूषित होत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची योजनाही सज्ज [...]
10 वर्षांनी रहस्य दूर करण्याच्या प्रयत्नात मलेशिया
पुन्हा सुरू होणार बेपत्ता विमानाची शोधमोहीम वृत्तसंस्था/ क्वालांलपूर मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता विमान एमएच370 च्या अवशेषांचा शोध 30 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा मलेशियाने केली आहे. 239 प्रवाशांसह हे विमान एक दशकापूर्वी गायब झाले होते. तर नवा शोध 55 दिवसांपर्यंत चालणार असून याचा उद्देश प्रभावित परिवारांना एक सांत्वना देणे आहे. मलेशियन एअरलाइन्सचे दीर्घकाळापासून बेपत्ता विमान [...]
मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवानी हिला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज दुपारी ही कारवाई केली. तेजवानी यांची अटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. तेजवानी हिने मुंढव्यातील 40 एकर महार वतनी जमीन बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे. […]
आयोग है तो मुमकीन है!आष्टात मतदानानंतर दोन हजार मतं वाढली, स्ट्राँग रूमवर कार्यकर्त्यांची धडक
आयोग है तो मुमकीन है… सांगलीतील आष्टा नगर परिषदेसाठी झालेले मतदान आणि प्रशासनाने जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याचे आढळून आले. यामुळे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. आष्टा नगर परिषदेत 2049 मतदार कसे वाढले, असा सवाल आष्टा शहर विकास आघाडीने केला आहे. ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयंत […]
महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या भयंकर संकटाबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळच नसल्याचे आज समोर आले. महाराष्ट्राने अतिवृष्टीचा अहवाल केंद्राला पाठवलाच नाही, असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत सांगितले. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरताच चौहान यांनी आपल्या उत्तरात दुरुस्ती करत अहवाल आला आहे, असे सांगितले. नाही, नाही… आला, आला… या गोंधळात अहवालाचे नेमके झाले काय असा प्रश्न आता […]
भाजप करतोय जनतेची हेरगिरी! उद्धव ठाकरे यांचा ‘संचार साथी’वरून हल्ला
केंद्र सरकारने हेरगिरीसाठी वापरण्यात येणाऱया पेगासस तंत्रज्ञानाचे नाव ‘संचार साथी’ असे ठेवले असून त्याद्वारे भारतीय जनता पक्ष देशातील जनतेची हेरगिरी करतोय, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱया लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱया दहशतवाद्यांवर पाळत ठेवावी, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. ‘मातोश्री’ निवासस्थानी नवी […]
देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचा दावा मोदी सरकार करत असताना आज रुपयाने पुन्हा धक्का दिला. डॉलरच्या तुलनेत आणखी महाग होत रुपया शतकाकडे झेपावला. आज 25 पैशांनी कमकुवत होऊन रुपया 90.21 वर पोहोचला. ही घसरण अशीच सुरू राहिल्यास लवकरच एका डॉलरसाठी 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एकूणच अर्थव्यवस्थेला बसणार आहे. दरम्यान, उद्या रिझर्व्ह […]
सामना अग्रलेख – भाजपचा ‘बाबर’ मार्ग! नकली हिंदुत्वाचे ठेकेदार
‘वंदे मातरम्’ नाकारणारे एकीकडे अयोध्येत धर्मध्वजा फडकवतात व दुसरीकडे हिंदू धर्माची मंदिरे पाडतात. धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढले आहे. एकीकडे धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढायचे आणि दुसरीकडे धर्माचेच कारण सांगत नाशकातील सिंहस्थात हजारो वृक्षांची कत्तल करायची. भाजप हा दांभिकपणा सर्वत्र करत आहे. मोगलाईत मंदिरे तोडली म्हणून छाती पिटणारा भाजप बाबराच्याच मार्गाने निघाला आहे. संघ परिवार, भाजप मंदिरे […]
आज पुतीन हिंदुस्थानात,संरक्षण करार होणार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्यापासून हिंदुस्थानच्या दौऱयावर येत आहेत. ते उद्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. शुक्रवारी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल. या दौऱयात रशिया व हिंदुस्थानमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार होणार आहे.
डॉ. सदानंद दाते होणार नवे पोलीस महासंचालक
राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला दोन वर्षांचा वाढीव मुदतीचा काळ संपत असल्याने रिक्त होणाऱया राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे 1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. राज्यात सदानंद दाते हे […]
>> अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर महाराष्ट्राच्या समाजवादी परंपरेतील एक तेजस्वी दीप आज मावळला. ज्येष्ठ समाजवादी नेते, निर्भय विचारवंत आणि लोकहितवादी राजकारणी पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तत्त्वनिष्ठ सार्वजनिक जीवनाच्या एका कालखंडाचा अंत झाल्याची जाणीव महाराष्ट्राला झाली आहे. त्यांना लोकहितवादी राजकारणी म्हणणे आजच्या तरुण पिढीला […]
सावधान! आजपासून समुद्राला उधाण, 5 मीटरच्या लाटा उसळणार
मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस मोठे उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.03 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि पालिका-पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मोठय़ा भरतीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक […]
‘लग्नपंचमी’ लवकरच येतेय!मधुगंधा –निपुणची जोडी प्रथमच रंगभूमीवर
मराठी रंगभूमी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक भन्नाट मेजवानी देणार आहे. मराठीतील दोन नावाजलेले, बहुमुखी आणि निखळ संवेदनशील कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत आहेत. त्यांचं नवीन नाटक ‘लग्नपंचमी’ रंगभूमीवर येण्यापूर्वीच चर्चेत आलं आहे. मधुगंधा कुलकर्णी यांचं लेखन आणि नाटय़निर्मिती तर निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन या दोघांच्या योगदानामुळे नाटक तर टवटवीत होणारच, पण […]
विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय टळणार , बेस्ट बस सी-10 जुन्या मार्गावरून धावणार; शिवसेनेच्या मागणीला यश
बेस्ट बस सी-10ची मार्गिका बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, ही शिवसेनेची मागणी अखेर बेस्ट प्रशासनाने मान्य केली आहे. ही बस पूर्वीच्या मार्गावरून धावणार असल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह रुग्णांना दिलासा मिळाला आहे. बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंतच्या क्षेत्रात रफी अहमद किडवाई मार्गावर वडाळा स्टेशनपासून माटुंगा व […]
पडद्याआडून –संगीत संन्यस्त खड्ग –विचारांना ठसका देणारी रंगकृती
>> पराग खोत काही नाटके काळाच्या कोलांटउड्या पार करूनही मनाला चटके देतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे त्यातलंच एक. हे नाटक म्हणजे केवळ काल्पनिक कथानक नाही तर राजकारण, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक भान यांची तडफदार सांगड. द्रष्टय़ा सावरकरांच्या लेखणीने या नाटकाला जे परिमाण दिलं आहे, त्याला सर नाही. गौतम बुद्धांच्या शांततेच्या विचारांचा प्रभाव […]
हिंदुस्थानचे तुकडे झाल्यावरच बांगलादेशात शांतता येईल, बांगलादेशी निवृत्त जनरलने गरळ ओकली
बांगलादेशचा माजी लष्करप्रमुख अब्दुल्लाहिल अमान आझमी याने हिंदुस्थान विरोधात अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. आझमी म्हणाला आहे की, बांगलादेशात तोपर्यंत शांतता येणार नाही, जोपर्यंत हिंदुस्थानचे तुकडे होत नाही. ढाका येथील राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तो असा म्हणाला आहे. हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकत अब्दुल्लाहिल अमान आझमी म्हणाला की, बांगलादेशात जी काही अशांतता आहे, त्याला हिंदुस्थान जबाबदार […]
निवडणुकीत वाद होतातच, म्हणून काय गुन्हा दाखल करणार का? असा उफराटा सवाल करीत गद्दार आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदाराला पळवल्याचे समर्थनच केले. त्या तरुणाने विनंती केली म्हणून आपल्या मुलाने त्या तरुणाला वाचवल्याचा दावाही आमदार गायकवाड यांनी केला. नगर परिषद निवडणुकीसाठी बोगस मतदान करताना काही जागरूक नागरिकांनी एका तरुणाला पकडले. बेदम मारहाण करून त्या तरुणाला […]
त्यांच्या नावाने आधीच कुणीतरी केलं मतदान! नगरपरिषद निवडणुकीतील बोगस मतदान उघड
चंद्रपूरात नगरपरिषदेचा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरलं होतं आहे. काल पार पडलेल्या गडचांदूर नगरपरिषदेचा निवडणुकीसाठी मतदार भीमराव गोविंदा डोंगरे आणि त्यांचा पत्नी गंगासागर हे मतदान केंद्रावर गेले होते. मात्र भीमराव डोंगरे व त्यांच्या पत्नी गंगासागर या दोघांच्याही नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याचे […]
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण –शीतल तेजवानीला अटक
मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली आहे. #WATCH | Pune, Maharashtra: DCP Pune, Vivek Masal, says, “Today, on 3 December 2025… the accused, Sheetal Tejwani, has been arrested, and further investigation is going on. She has been given complete information about the ground arrest. She has illegally […]
राज्यसभेने अधिवेशनापूर्वी जारी वकेलेल्या बुलेटिनमधून सभागृहात भाषणानंतर वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणा न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या या आदेशावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. MPs of @ShivSenaUBT_ , @priyankac19 ji and @AGSawant ji met the Vice […]
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ७ नक्षलवादी ठार; २ जवानही शहीद
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यात सात नक्षलवादीही ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरू आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, तर दोन जवानही शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजापूरच्या गंगलूर भागात ही चकमक […]
अतिवृष्टीचे 1278 कोटी अनुदान वितरीत- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी 1278 कोटी दिवाळीपासून आजवर शेतकर्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकर्याींना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपातील पिकांना बसलेल्या फटक्यामुळे पीकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणीही आता दूर झाल्या आहेत. पीक कापणी प्रयोगातील काही बाबींवर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे. पीकविमाही लवकरच शेतकऱ् यांच्या थेट खात्यात जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल, याची खात्री असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांरना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अनुदान आणि मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्यांना नुकसानीच्या दुःखातून बाहेर काढून त्यांना नव्या उमेदीने उभे करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने अभुतपूर्व मदतीचा हातभार दिला आहे. एकंदरीत अडचणीच्या काळात अत्यंत संवेदनशीलपणे आपल्या महायुती सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. खंबीरपणे अडचणीच्या काळात अभुतपूर्व मदत दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारचे धन्यवाद मानले आहेत. जिल्ह्यात सन 2025 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतीपीक व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण 9,76,825 खात्यांवर तब्बल 1278.6897 कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. या आर्थिक सहाय्यामध्ये पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, रब्बी पेरणी व इतर आनुषंगिक बाबींसाठीच्या मदतीचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निकषांनुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच सामाईक क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी अनुदान ज्यांच्या नावावर घ्यावयाचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचे संमतीपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कागदपत्रांची पूर्तता व ई-केवायसी पूर्ण झालेल्या खात्यांवर अनुदान वितरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांना दिलेला शब्द आपल्या महायुती सरकारने पाळला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी धाराशिव जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. कठीण काळात शेतकऱ्यांना मिळणारे हे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही समाधानकारक बाब आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत. पीक विमाही लवकरच मिळणार पीक विमा खरीप 2025 संबंधित प्रक्रिया सुरू असून पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. शासन व प्रशासनासोबत शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन स्थगित जागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 2 डिसेंबर रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे तीन जागांवर (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) निवडणुका स्थगित झाल्या होत्या. या तिन्ही प्रभागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून 4 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. शहरातील 38 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आता धाराशिवकरांचे लक्ष स्थगित झालेल्या या तीन जागांकडे लागले आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम (धाराशिव – 3 जागा) निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : 4 डिसेंबर 2025, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत), निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : 11 डिसेंबर 2025, आवश्यक असल्यास मतदानाचा दिवस : 20 डिसेंबर 2025 (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30), मतमोजणी व निकाल : 21 डिसेंबर 2025 (सकाळी 10.00 पासून), शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख : 23 डिसेंबर 2025 नवीन उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळणार का? 2 डिसेंबरला 38 जागांसाठी झालेल्या मतदानासोबतच 20 डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र केली जाणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या तीन प्रभागांच्या निवडणुकीतील उमेदवारी प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसारनवीन कार्यक्रमात नवीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. जुन्या उमेदवारांचे वैध अर्जच कायम राहणार असून तेच उमेदवार निवडणूक प्रक्रियेत राहतील. मात्र ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी धाराशिव नगरपालिकेत केवळ 61% मतदान झाले असून, ही टक्केवारी जिल्ह्यातील इतर सात नगरपालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी लागणारा अंतिम निकाल कोणत्या दिशेने झुकणार? याकडे नागरिकांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. धाराशिवप्रमाणेच उमरगा नगरपालिकेतील 3 जागांसाठीदेखील 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.
मोदी सरकार जातनिहाय जनगणना ही बहुजनांचा विश्वासघात आहे, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जातनिहाय जनगणनेबाबत संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरानंतर त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी जातनिहाय जनगणनेला विश्वासघात म्हटले. ते म्हणाले आहेत की, सरकारची जातनिहाय जनगणना देशातील बहुजनांचा विश्वासघात आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या उत्तराची परत X वर शेअर करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “मी संसदेत जातनिहाय […]
१५ डिसेंबरला परंडा येथे आरटीओ शिबीर
धाराशिव (प्रतिनिधी) नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवमार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.डिसेंबर २०२५ मध्ये परंडा येथे होणारे वाढीव शिबीर कार्यालय १५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. परंडा येथे हे शिबीर नियोजित ठिकाणी १५ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.
एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.चे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.3) कारखानास्थळी विविध उपक्रमाने अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. चेअरमन पाटील यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्मचार्यांना थंडीपासून सुरक्षेसाठी ट्रायसूट, ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर, कपडा तसेच सुशोभिकरणासाठी कारखान्याच्या विविध विभागास वृक्षाच्या कुंड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशी, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, सिव्हिल इंजिनिअर विश्वास पाटील, फोरमन विजय वाघे, प्रवीण पाटील, बॉयलर विभाग अजय गाडे, सुधाकर खोत, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, दत्तात्रय टेकाळे, गोडाऊन किपर सुरेंद्र गिरी, राजाभाऊ केवळराम, अक्षय माने, प्रज्योत माने, बालाजी गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
Solapur News : करमाळ्याच्या मौलाली नगरात दोन गटात तुंबळ हाणामारी
मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान दोन गटांमध्ये वाद करमाळा : शहरातील मौलाली नगर येथे मतदानादरम्यान प्रभागात फिरण्यावरून तसेच प्रचार करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोन गटात परस्पर गुन्हा दाखल [...]
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५ साठी २६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी जिल्ह्यातून पुढीलप्रमाणे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत १) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (०१), २) गुणवंत खेळाडू – (महिला ०१, पुरुष ०१ व दिव्यांग खेळाडू ०१).या पुरस्काराचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी दिनांक ०१ जुलै ते ३० जून या कालावधीतील मागील पाच वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात किमान १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शकाने सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शन केलेले असावे आणि त्यांचे वय ३५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारातील अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. क्रीडा मार्गदर्शकांसाठी गेल्या दहा वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते,तसेच कनिष्ठ,शालेय, ग्रामीण आणि महिला (खेलो इंडिया) राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू घडविलेले असणे आवश्यक आहे.सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील नॅशनल गेम्स,वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेला खेळाडू किंवा राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणारे किमान तीन खेळाडू तयार केलेल्या मार्गदर्शकांकडून विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरीत्या नियत मुदतीत सादर करण्याची आवश्यकता आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्तावासह अर्ज २६ डिसेंबर २०२५ पर्यंत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
Pandharpur News : पंढरपूर पोलिसांची देशी दारू कारवाई, सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर पोलिसांचे निवडणूक पार्श्वभूमीवर सक्रिय पथक पंढरपूर : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन रस्ता, पंढरपूर येथे नाकाबंदी करीत चारचाकीतून देशी दारूचे बॉक्स वाहणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला [...]
Solapur : चिंचोली येथील सीएनजी पंप अचानक बंद
सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप बंद, सोलापूर : एमआयडीसी चिंचोली परिसरात आयएनसी लिमिटेडतर्फे चालवला जाणारा सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप मंगळवारपासून अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.कंपनीने सोमवारीच पंप परिसरात नोटीस फलक लावून २ डिसेंबरपासून पंप [...]
समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात,'सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहीले. नळदुर्ग येथील 'आपलं घर'बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण - राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारण क्षेत्राची हानी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आपण या सर्वांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले आहे.
शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जुना समाजवादी पक्ष,जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. 'चले जाव'आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक,राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या 'आपलं घर'मधून अनेक मुला- मुलींची आयुष्य घडली आहेत. पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Solapur News : सोलापूर मनपा प्रशासनात ‘खांदेपालट’झाले, कारभार कधी पालटणार ?
सोलापूर महापालिकेत प्रशासनात खांदेपालट सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासनात खदिपालट केली असून उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे तब्बल १३ विभागांची जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे आठ विभाग सोपवले असून दुसरे अतिरिक्त आयुक्त [...]
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची होणार नियुक्ती
एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दाते हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पोलीस महासंचालक पदाची कारकीर्द डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, एसपी नवी मुंबई आदी पदावर काम केले […]
महिलांवर अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कालचा दिवस हा महाराष्ट्रातला काळा दिवस –सुप्रिया सुळे
महाराष्टात परिस्थिती खराब होत आहे. देवेंद्रजी काही तरी करा हो राजकारण होत राहील. महाराष्ट्रामध्ये 50-60 वर्षामधील काळा दिवस कोणता आहे. तर महिलांवर अत्याचाराचा, शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आणि कालचा दिवस हा काळा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या […]
धाराशिव जिल्ह्यात मतदानामध्ये तुळजापूर अव्वल
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आठ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्याची एकूण मतदानाची सरासरी 68.97 टक्के इतकी असली तरी जिल्ह्यात तुळजापूर शहरवासिय मतदान प्रक्रियेमध्ये अव्वल राहिले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच धाराशिव शहरात मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु मतदान केंद्रामध्ये धिम्या गतीने मतदान सुरू होते. दोन मशीनवरील तिघांना मतदान देणे आवश्यक असल्यामुळे तिन्ही मतदान केल्यानंतरच मशीनचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मतदारांना वरचे नाव त्याच मशीनवरील खालील उमेदवाराचे नाव व दुसऱ्या मशीनवरील तिसऱ्या उमेदवाराचे नाव पाहण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे धाराशिव शहरात धिम्या गतीने मतदान चालू होते. परंतु जिल्ह्यात तुळजापूर, भूम, परंडा, नळदुर्ग, कळंब या ठिकाणी मतदान गतीने झाल्यामुळे मतदानांची टक्केवारी वाढली आहे. धाराशिव शहरातील खॉजानगर येथील जिल्हा होमगार्ड मतदान केंद्रावर रात्री साडेसात पर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. मतदानाची सरासरी 68.97 टक्के धाराशिव जिल्ह्याची मतदानांची सरासरी 68.97 टक्के आहे. जिल्ह्यातील आठ ही नगरपालिकेत एकूण 2 लाख 43 हजार 672 मतदारांपैकी 1 लाख 68 हजार 56 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूष 87 हजार 735 तर महिला 80 हजार 302 एवढ्या मतदारांचा समावेश होता. नगर परिषद निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी पाहिल्यास तुळजापूर 80.28 टक्के, भूम 79.21 टक्के, परंडा 78.13 टक्के, नळदुर्ग 73.17 टक्के, कळंब 72.69 टक्के, मुरूम 67.41 टक्के, उमरगा 66.81 टक्के आणि धाराशिव 61.14 टक्के या प्रमाणे टक्केवारी आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले धाराशिव शहरात जिल्ह्यात सगळ्यात कमी मतदान झाले आहे. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होत आहे.
कृषीपंपांना कॅपॅसिटर बसवा, रोहीत्रे व वीजयंत्रणेची हानी टाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- रब्बीचा हंगाम सुरू झाला की कृषीपंपाचा वापर वाढत जातो. अनेकदा रोहीत्रांसोबतच पाण्याची मोटर जळाल्याच्या तक्रारी वाढत जातात. विजेचा भार नियंत्रीत करणारे कॅपॅसीटरचा वापर फार कमी शेतकरी करतात त्याचबरोबर ॲटोस्विचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परिणामी अचानक विजेचा भार वाढल्याने वीज यंत्रणे सोबतच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाचा वापर योग्य ते कॅपॅसीटर लावूनच करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने बहूतांश शेतकरी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होणे तसेच पाण्याची मोटर जळन्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान होवू नये तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत. कॅपॅसिटरची गरज का? प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे योग्य दाबाचा वीजपुरवठा होतो, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. त्यामुळे ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार 30 टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळतो. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कॅपॅसिटर'चा वापर नचुकता करावा. ऑटोस्विचचा वापर टाळावा राज्यात 45 लाखांहून अधिक कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच'लावले असल्याचे दिसून येते. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच'लावू नये तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास त्वरीत काढून टाकावेत असे आवाहन महावितरणने केले आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिव्यांगांचा गौरव
मुरुम (प्रतिनिधी)- तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांगांना सर्वांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, दिव्यांग मध्ये अधिकाऱ्यांबाबत जागृती व्हावी, दिव्यांगांबाबत शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त महाविद्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात दिव्यांग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे सायली बिराजदार (बी.ए. द्वितीय वर्ष), अक्षय विजयापुरे (बी.ए. द्वितीय वर्ष), तर नीट परीक्षेची तयारी करणारी राजश्री भोसले (इयत्ता बारावी) या विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त ग्रंथालय परिचर भगवान औरादे यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय असेल म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे यावेळी त्यांनी कौतुक केले. या सन्मानामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, उपप्राचार्य गुंडाजी मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ. ज्ञानोबा ढोबळे, डॉ. भरत शेळके, प्रा. मुरली जाधव तसेच रजिस्टर राजकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. ढोबळे यांनी केले तर डॉ. भरत शेळके यांनी आभार मानले.
तीर्थक्षेत्र तुळजापूरात मतदानादिनी भाविकांची गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यभर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू असतानाही मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. थंडीचा जोर असतानाही सकाळपासूनच भाविक श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत होते. सलग सुट्यांचा योग आल्यानंतर शनिवारपासूनच तुळजापूरात भाविकांची सततची राळ सुरू झाली होती. शनिवार, रविवार, मंगळवारच्या सुट्ट्या आणि त्यात सोमवारी घेतलेल्या रजेमुळे चार दिवसांचा ब्रेक मिळाल्याने शहरी भागातून मोठा ओघ दिसून आला. आज तर परिस्थिती वेगळीच होती. अनेक शहरी भाविकांनी मतदान केंद्रावर जाण्याऐवजी थेट तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही तुळजापूरात भाविकांची असामान्य गर्दी झाली.
भूममध्ये मतदानासाठी उत्तम प्रतिसाद
भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 2 डिंसेबर रोजी सकाळी 7 :30 वाजल्यापासून मतदानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. युवक, युवती,महिला जेष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी भूम शहरातील 21 मतदान केंद्रावर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मतदान केले. आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने सर्व बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. दोन्ही आघाडीकडून इतर गावांना असणाऱ्या मतदारांना साद घातल्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. दोन्ही आघाडीकडून प्रचार जोराचा करण्यात आला होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची निवडणूक चुरशीची झाली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दोन्ही आघाड्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यामध्ये पडते. येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी दिसून येणार आहे. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लाभल्यामुळे कार्यकर्ते ,नेतेमंडळी यांची मात्र पूर्णपणे निराशात झाली असल्याचे पहावयास मिळाले. बाहेर जाऊन आलेले काही कार्यकर्ते मतदार निकालासाठी गावांमध्येच थांबणार होते. मात्र निकाल पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आली.
जेष्ठ समाजवादी विचारवंद पन्नाला सुराणा यांचे निधन
नळदुर्ग (प्रतिनिधी)- राष्ट्रसेवादलाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ समाजवादी विचारवंत व नळदुर्ग येथील “आपलं घर“ प्रकल्पाचे जनक पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दि.2 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वा. नळदुर्ग येथील आपलं घर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नळदुर्ग शहर व परीसरासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात्य मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परीवार आहे. साथी पन्नालाल सुराणा हे मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. त्यांनी शालेय जीवनातच राष्ट्रसेवादलात दाखल होऊन सेवादलाचे काम सुरु केले होते. पुढे त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहुन भुदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणुन व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणुनही त्यांनी काम पाहिले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणुन काम केले आहे. ते मराठवाडा दैनिकाचे संपादक होते. पन्नालाल सुराणा यांनी मोठ्या प्रमाणात लिखाणही केले आहे. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवर 40 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. शेतकरी -शेतमजुर यांच्या हक्कासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. भुमीमुक्ती चळवळीत त्यांना चारवेळेस तुरुंगावास झाला होता. 1993 साली लातुर जिल्ह्यात झालेल्या विनाषकारी भुकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी नळदुर्ग येथे “आपलं घर“ हा प्रकल्प सुरु केला. पर्यावरण तसेच जलसंधारण क्षेत्रातही पन्नालाल सुराणा यांनी काम केले आहे.राजकारणात असतांना त्यांनी बार्शी येथील विधानसभा निवडणुक व सोलापुरची लोकसभा निवडणुकही त्यांनी लढविली होती. पन्नालाल सुराणा यांचे दि. 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30 वाजता नळदुर्ग येथील आपलं घर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी देहादान केला असल्याने रात्री 11.30 वाजता त्यांचा मृतदेह सोलापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात देहदानासाठी नेण्यात आला.दि. 3 डिसेंबर रोजी सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांचे देहादान करण्यात आले. पन्नालाल सुराणा यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन ज्ञानदीप कलोपासक व धरीत्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
82 जणांचे भवितव्य मशीनमध्ये बंद ; 3 जागेसाठीचे 12 जणांची निवडणूक स्थगित
उमरगा (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीत शहरातील 37 मतदान केंद्रावर उमरगा नगरपालिका निवडणुकीत 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 4 तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी तीन जागेवरील 12 उमेदवारांच्या निवडणुकीला आयोगाने स्थगिती दिली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांच्या अतितटीच्या तिरंगी निवडणुकीत 82 जणांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. उमरगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी प्रभाग 4 (ब), 7 (अ) व 11 (अ) या तीन प्रभागातील 12 उमेदवारांचे निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. मंगळवारी (दि.2) शहरातील 31 हजार 791 मतदानापैकी 37 मतदान केंद्रावर 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे. प्रचाराच्या काळात शिवसेनेने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची शिवसेना (ठाकरे) कडून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभातून निवडणूकीत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना आत्मविश्वास आसल्याने स्वतःच्या बळावर कॉर्नर बैठका व गाठीभेटी वर भर देत शेवटच्या दिवशी माजी मंत्री बसवराज पाटील व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सभेतून निवडणूक प्रचारात रान पेटवले. मंगळवारी सकाळी 7.30 पासुन मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी वयस्क, अपंग, आजारी मतदारांना घरी जाऊन गाडीत घेऊन येत होते.
अवैध मद्यावर जिल्ह्यात धडक मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदांसाठीआचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकउून धडक मोहिम राबवली जात आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून 222 गुन्हे दाखल केले आहेत. 223 आरोपींना अटकही केली. शिवाय कारवाईत 57 लाख 36 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेच्या वेळीही हॉटेल्स आणि धाब्यांवरही सर्रास मद्यविक्री सुरू होती. पथकाने तपासणी मोहिमेत 46 गुन्हे नोंदवून 56 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एका वाहनासह 9 लाख 04 हजार 855 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने कारवाई करून 10 गुन्हे नोंदवले आहेत. 8 आरोपींना अटक करून 3 लाख 71 हजार 300 रूपये किंमतीची 8 हजार 340 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपआयुक्त व धाराशिव उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून 10 गुन्हे दाखल करून 10 आरोपीस अटक केली आहे. 34 हजार 25 रूपयांची अवैध दारू पकडली आहे.
Satara News : पाटण तहसील परिसरात आता ‘नो पार्किंग’फलक
पाटण तहसील कार्यालयात पार्किंगची नवीन व्यवस्था नवारस्ता : पाटण तहसील कार्यालय परिसरात वाहनांच्या पार्किंग असुविधेबाबत माध्यमांनी उठविलेल्या आवाजाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने आवारातील अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पट्टे मारून एका रेषेत पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाटण तहसील [...]
विरोधकांच्या जोरदार मागणीनंतर अखेर सरकारची माघार! ‘संचार साथी’ॲप प्री-इंस्टॉलेशनचा निर्णय घेतला मागे
देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) या सायबर सुरक्षा ॲपच्या प्री-इंस्टॉलेशनचा अनिवार्य करणारा आदेश केंद्र सरकारने बुधवारी दुपारी मागे घेतला आहे. सरकारकडून हेरगिरीचा कट रचला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर अखेर सरकारने माघार घेतली आहे. विरोधकांनी ‘संचार साथी’च्या वरून आवाज उठवल्यानंतर सरकारची चांगलीच अडचण झाली. अखेर त्यांनी सारवासारव […]
देशात आणिबाणीचे वातावरण’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची केंद्रावर जोरदार टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा जिल्ह्यातील गाझोल येथे झालेल्या एसआयआर विरोधी मेळाव्यात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला मिळायला हवा असलेला निधी केंद्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जीएसटीनंतर आता सिगारेटवरील करही केंद्राकडे ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सध्याची परिस्थिती ‘आणिबाणीतल्या काळासारखी’ असल्याचे म्हटले. गाझोलमधील सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, येथे रेल्वेची लाईन […]
राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. संजय राऊत हे आजारपणामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत […]
Satara News : आधुनिक यंत्र वापरून मसूर कापणीस सुरुवात ; शेतकऱ्यांना दिलासा
कोपर्डे हवेलीमध्ये इंद्रायणी भाताची कापणी जोमात मसूर : कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध भात उत्पादक पट्टा मानला जातो. सध्या परिसरात भातकापणी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक मजुरांऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राने कापणी सुरू केली आहे. भागात [...]
Karad News : उंब्रजला सेवारस्त्यावर भला मोठा खड्डा ; अपघाताचा वाढला धोका
उंब्रज येथील खड्डा दिवसेंदिवस वाढतोय उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील सेवारस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखभाल विभागाने या गंभीर समस्येकडे [...]
Photo –नवी मुंबईत मिंध्यांना धक्का! सहसंपर्कप्रमुखासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबईत मिंध्यांना धक्का बसला आहे. सहसंपर्कप्रमुख शिरीष काशिनाथ पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर आणि संदिप साळवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते राजन विचारे, विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि इतर पदाधिकारी व […]
सिस्टीममध्ये बिघाड: देशभरातील विमानसेवा विस्कळीत, चेक-इनवर परिणाम; हैदराबाद विमानतळावर गोंधळ
देशातील अनेक विमानतळांवर बुधवारी सकाळी सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे चेक-इन प्रणाली विस्कळीत झाली, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या तांत्रिक अडचणींमुळे काही विमानांना विलंब झाला आहे, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले. वाराणसी विमानतळावर एका सूचना फलकाद्वारे प्रवाशांना कळवण्यात आले की, ‘जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुख सेवा खंडित झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळांवरील आयटी सेवा/चेक-इन यंत्रणेवर परिणाम झाला आहे’. […]
Sangli News :कवठेमहांकाळमध्ये दुचाकी-टेम्पो अपघात, दोघेजण गंभीर जखमी
कवठेमहांकाळमध्ये दुचाकी अपघात, कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी दुचाकीची पिकअप टेम्पोला पाठीमागून झालेल्या धडकेत दोघे युवक गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल श्रीमंत तुपे व सुमित संतोष येवले (दोघेही रा. [...]
भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला
गडचांदूर शहरात भाजप उमेदवार सुरज पांडे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला विट फेकून मारल्याची धक्कादायक घटना मतदानानंतर घडली आहे. या हल्ल्यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झालेयत. या घटनेमुळे गडचांदूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे प्रभाग नऊचे उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या […]
सायन फ्लायओव्हरचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करणार, मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सायन फ्लायओव्हरच्या पुनर्निर्माण कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले असून, हे संपूर्ण काम पुढील वर्षी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या आढाव्यात त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देत विलंब टाळण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, सध्या कामाला अपेक्षित गती मिळत असून, रोजच्या प्रगतीवर स्वतः लक्ष ठेवले […]
आम्ही युरोपशी युद्धासाठी तयार, त्यांचा पराभव निश्चित आहे; पुतिन यांचा इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी युरोपीय देशांना कडक इशारा दिला की, “जर युरोपने रशियाविरुद्ध युद्ध सुरू केले तर रशिया सर्व प्रकारे प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.” ते म्हणाले आहेत की, “रशियाला युरोपसोबत युद्ध नको आहे, पण जर युरोपने युद्ध सुरू केले तर प्रकरण इतक्या लवकर संपेल की शांतता कराराच्या चर्चेसाठीही कोणीही उरणार नाही.” व्लादिमीर पुतिन […]
येत्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते जाहीर केलेच पाहिजेत, भास्कर जाधव यांची मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत गंभीर आक्षेप घेतले. पत्रकारांशी संवाद साधताना जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेता हे पद संविधानिक असून लोकशाहीच्या परंपरा, प्रथा आणि घटनात्मक नियमांनुसार ते अस्तित्वात असणे अत्यावश्यक आहे. “उपमुख्यमंत्री पद हे कुठेही संविधानात नाही, ही केवळ राजकीय सोय आहे. मात्र विरोधी पक्षनेता हा घटना, […]
Miraj News : मिरज तालुक्यात शेतजमीनीच्या वादातून जोरदार राडा; 4 जखमी
जमिनीच्या वादातून दोन्ही गटांमध्ये तुफान मारहाण मिरज : मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे शेतजमीनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. एकमेकांच्या अंगावर चटणी पूड फेकून कोयता व कुऱ्हाडीने मारामारी झाली. या मारहाणीत चौघेजण जखमी झाले आहेत. याबाबत संभाजी खुशाबा जाधव (वय ४२) [...]
Sangli News : सांगलीत पोलिस कॅन्टीन घोटाळा: व्यवस्थापकाला पाच दिवसांची कोठडी
‘संस्कृती सबसिडी कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार उघड सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीजर कॅन्टीन’ मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भुपेश भीमराव चांदणे (वय ४२, रा. [...]
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर राहाणार अत्याधुनिक कॅमेऱ्यांची नजर; प्राण्यांच्या हालचाली टिपणार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पावर ड्रोनद्वारे डिजिटल नजर ठेवली जाणार आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाचव्या वाघाला शोधणे सोपे होणार आहे. वन्यजीव संघर्ष वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन आणि आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवासंदर्भातील सामंजस्य करार झाला […]
गद्दारांचा बुडबुडा फुटलेला असून मिंधे गटात अक्षरशः मारामारी, उद्धव ठाकरे यांची टीका
ठाण्यातील शिवसेनेतून बाहेर पडून मिंधे गटात सामील झालेले अनेक कार्यकर्ते आता परत येत आहेत येत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. “आजही काही जण तिकडे गेले होते, पण तेही परत आलेले आहेत. थोडक्यात, गद्दारांचा बुडबुडा फुटलेला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मिंधे गटामध्ये अक्षरशः मारामारी, बाचाबाची सुरू झाली […]
Sangli News : कवठेमहांकाळ येथे उद्या श्री विरभद्र यात्रा
श्री विरभद्र देवस्थानी उद्या महापूजा कवठेमहांकाळ : सालाबादप्रमाणे कवठेमहांकाळ येथील लिंगायत, कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री. विरभद्र देवस्थानची यात्रा उद्या संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त सकाळी ५.३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा व श्रींच्या मूर्तीस भाविकांकडून अभिषेक होणार आहे. दुपारी श्रींची आरती होणार असून [...]
Sangli News : उदगिरी परिसरात वाघाचे दर्शन; स्थानिकांमध्ये भीती, पर्यटकांत उत्साह
उदगिरी वाघदर्शनाने भीतीचे वातावरण; वारणावती: दोन तीन दिवस उदगिरीजवळ वाघाचेदर्शन झाल्याचे उदगिरी परिसरातील व्हिडीओ व्हायलर होत आहे तर उखळू अंबाई वाडा येथे काही नागरिकांना तसेच पर्यटकांनी वाघ दिसल्याचे सांगत आहेत तर काही ठिकाणी वाघाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे [...]
Hupari Election |हुपरी नगरपरिषदेसाठी निवडणुकीत वादावादीमुळे गालबोट; लाठीमार
विक्रमी ८०.५५ टक्के मतदान; २१ डिसेंबर रोजी मतमोजणी हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नगरपरिषदेसाठी निवडणुकीत सर्व प्रभागात सरासरी ८०.५५ टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण नगरपरिषेदेत २०,०५३ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही प्रभागात शांततापूर्ण मतदान झाले तर प्रभाग क्र. ३, ४, ५, ७, ९ [...]
चॉकलेटचे आमिष दाखवून गैरवर्तन करणारा ६० वर्षीय नराधम अटकेत इचलकरंजी : इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या एका गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीला चॉकलेट बिस्किट गोळ्याचे आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्या वृद्धास महिलांनी बेदम चोप देऊन शहापूर पोलिसांच्या हवाली केले. दशरथ भाऊ सोनटक्के (वय ६० रा. [...]
Kolhapur News : ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिरात आज रात्री पालखी सोहळा
रेणुकादेवी मंदिरात पौर्णिमेनिमित्त धार्मिक सोहळ्यांची रेलचेल कोल्हापूर : पौर्णिमेनिमित्त बुधवार ३ रोजी यल्लामाच्या ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यानिमित्त मंदिराच्या वतीने रात्री ८ वाजता पारंपरिक पद्धतीने रेणुकादेवीचा पालखी सोहळा साजरा केला जाईल. तसेच नऊच्या सुमारास कंकण विमोचन सोहळा [...]
विवादित जागेत महिलेचा संशयास्पद मृत्यू
कारापूर-डिचोली येथील घटनेने खळबळ : नातेवाईकांसह अनेकांना घातपाताचा संशय,10 डिसेंबरला होती न्यायालयात सुनावणी डिचोली : कोळशाकातर कारापूर डिचोली एका विवादित व न्यायप्रविष्ट असलेल्या मालमत्तेत लहानशा घरात राहणाऱ्या वासंती सालेलकर या अविवाहित महिलेचा त्याच घरात विजेच्या झटक्मयाने मृत्यू होण्याची घटना काल मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. वासंतीची बहीण घरात आल्यावर हा प्रकार उघडकीस [...]
Kolhapur Crime : सिद्धूचा खून पैशांसाठी, खिशातील रक्कम, दुचाकी गायब
कोल्हापुरात सिद्धू बनवीचा गळा आवळून खून कोल्हापूर : हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी समोर सिद्धू शंकर बनवी (वय २०) याचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मनिष राउत याला अटक केले [...]
जुने गोवेत आज सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त
तिसवाडी : संत फ्रान्सिस झेवियर यांचे वार्षिक फेस्त बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी साजरे होणार आहे. दरवषीप्रमाणे यंदाही देश-विदेशातील लाखो भाविक बाँ जिझस बासिलिका चर्चमध्ये हजेरी लावणार आहेत.बासिलिका ऑफ बाँ जिझस येथे पहाटे 3.45 वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील. सायंकाळी 6.15 पर्यंत विविध भाषांमध्ये प्रार्थना चालू राहतील. मुख्य प्रार्थना सकाळी 10:30 वाजता होईल. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद [...]
तपासातसापडलेनाहीतकोणतेहीपुरावेपोलिसअधीक्षकराहूलगुप्तायांचीमाहिती राहूलगुप्ताम्हणाले… मंत्री, अधिकाऱ्यांविरुद्धनाहीपुरावा पूजानाईकवरतीनआरोपपत्रदाखल ‘ती’ डायरीअन्तन्वीचाहीनाहीपत्ता ‘त्या’ फ्लॅटमध्येराहतातविद्यार्थी मगोसंदर्भातीलदाव्यालाहीनाहीपुरावा पुजाच्याफोनमध्येमुलींचाअभ्यासक्रम परतकेलेलाफोनविकलाउत्तरप्रदेशात पूजाच्याखात्यात8 कोटींचाव्यवहार तीनमहिनेहोती‘फाईवस्टार’मध्ये फसलेल्यांनीपोलिसांशीसंपर्कसाधावा पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने सरकारी अधिकारी आणि एका मंत्र्यावर केलेले आरोप तथ्यहिन असून तिने पेलेल्या आरोपासंदर्भात गुन्हा शाखेने सखोल तपासणी केली असता कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तपासाअंती पूजाने केलेले आरोप खोटे [...]
Kolhapur News : कोल्हापुरात सोलर पॅनेल बसवताना विद्युत धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू
कोल्हापूरात सोलर बसविताना भीषण अपघात कोल्हापूर : सोलर पॅनेलचे साहित्य टेरेसवर नेत असताना मुख्य विद्युत वाहिनीस पाईपचा स्पर्श होवून विजेचा शॉ क लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. [...]

25 C