४९ वर्षांनंतर चनीशेटी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा इस्पूर्ली वार्ताहर :निगवे खालसा(ता करवीर)येथील चनीशेटी विद्यालयाच्या १९७७ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल ४९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचा आणि भावनिक क्षणांचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मधल्या काळात दिवंगत [...]
Sangola news |पैसे तिप्पट करण्याचे आमिष पडले महागात; सांगोल्यात शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक
गायगव्हाणमध्ये ६ भामट्यांनी शेतकऱ्याला घातला गंडा सांगोला – सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे एका शेतकऱ्याची ९ लाख रुपयांचे तिप्पट पैसे करून देतो म्हणून फसवणूक केली. ६ जणांनी त्या शेतकऱ्याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्याच्याकडील ९ लाख रुपये हातचलाखी करून लंपास केले. शांतीलाल हणुमंत साळुंखे (वय ४८, व्यवसाय [...]
तांत्रिक निकषाच्या ऐवजी पीक कापणी प्रयोग अधारे विमा द्या- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा पीक कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादन असे निकष लावले आहेत. तांत्रिक निकषाचा आधार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात देण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की,2025-26 खरीप हंगामा मध्ये धाराशिव जिल्हयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील चार लाख,96 हजार 19 शेतकऱ्यांनी तीन लाख 96 हजार 435 हेक्टर क्षेत्रावरील उडीद, कापूस, पिके आय. सी. आय.सी. आय. लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली होती. जिल्हयातील सर्वच महसुल मंडळात 220 वेळा अतिवृष्टी झाली असून त्यापैकी 159 वेळा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाली आहे. या कालावधीत सरासरीच्या 159.70 टक्के एवढे पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये म्हणजे ऐन सोयाबीन पिक फुलोरा व पक्वतेच्या अवस्थेत असतानाच अतिवृष्टी झाल्याने, सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे, पिकातील धान्य कुजणे, मूळ कुज होणे, मान कुज होणे, धान्याला मोड येणे, धान्य काळे पडणे, धान्याची प्रत खराब होणे, नद्या, नाले ओसंडून वाहिल्यामुळे पिके वाहून जाणे इत्यादी बाबींमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जुन ते ऑक्टोबर 2025 दरम्यान अतिवृष्टी,सततच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत बाधित पिकांचे,क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून जिरायत, बागायत व फळपिकांच्या एकून सहा लाख 69 हजार 172 क्षेत्रापैकी पाच लाख 77 हजार 544.62 हेक्टर क्षेत्र (86%) बाधित झाले आहे. जिल्ह्यात एकूण 2190 पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. पैकी मुख्य पिक असलेल्या सोयाबिन पिकाचे 504 पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 368 पिक कापणी प्रयोगावर कंपनीने आक्षेप घेतले होते. त्यात सरासरी उत्पादकता हेक्टरी तीन ते चार क्विंटल आली आहे. परंतु केंद्र सरकारच्या पिक विमा योजनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार 50 टक्के पिक कापणी प्रयोग आणि 50 टक्के तांत्रिक उत्पादन सरासरीच्या आधारे नुकसान भरपाई करण्याचे ठरविले आहे. एका बाजूला पिक कापणी प्रयोगाचे सरासरी उत्पादन 3 ते 4 क्विंटल आले असून तांत्रिक उत्पादन हेक्टरी 10 ते 12 क्विंटलवर गेले आहे. पीक कापणी प्रयोगावर कंपनीने घेतलेल्या आक्षेपावर जिल्हास्तरीय, जिल्हास्तरीय आढावा समितीसमोर तसेच राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर सुनावणी होऊन समितीकडून सदरील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. तांत्रिक उत्पादनाचा विचार केल्यास अधिक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होण्याचा धोका आहे.तांत्रिक उत्पादन व पीक कापणी प्रयोगाच्या 50:50 टक्के या अन्यायी अटीमुळे जवळपास 13 ते 14 महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची भरपाई मिळणार नसल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. तसेच ज्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे ती अतिशय कमी मिळणारं आहे. पिकांच्या नुकसानभरपाई साठी तांत्रिक उत्पादनाचा विचार न करता झालेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे समप्रमाणात व अधिकच्या रकमेने म्हणजे नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना दिलेल्या हेक्टरी 37 हजार रुपये प्रमाणे नुकसानभरपाई निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत कृषी विभाग व विमा कंपनीला आदेशित करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्याचे हित कशात? विमा कंपनीला फायदा होईल अशा प्रकारचे धोरण सरकारने राबवले आहे. त्याचा तोटा आता शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे यामध्ये सुधारणा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल असे धोरण सरकार राबवण्याचे धाडस दाखवेल का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आणि टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. गुरुवारी (16 एप्रिल 2026) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने 41 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. विशेष म्हणजे, या हंगामातील हा त्याचा सलग पाचवा सामना होता ज्यात […]
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; 42 लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव(प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पवनचक्कीतील तांब्याच्या तारा आणि साहित्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दरोडा आणि चोरीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात एक गंभीर घटना घडली होती. पवनचक्कीवर कर्तव्यावर असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून व त्यांना बेदम मारहाण करून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात अशाच प्रकारे पवनचक्कीचे साहित्य चोरी जाण्याच्या अनेक घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) कासार आणि त्यांच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून पोलिसांनी 5 संशयित आरोपींना 3 वाहने आणि चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर फरार साथीदारांच्या मदतीने मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी आणि वाशी शिवारात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी करताना दहशत निर्माण करण्यासाठी आपण तेथील सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचेही त्यांनी मान्य केले. या टोळीकडून पोलिसांनी रोख रक्कम, तांब्याच्या तारा, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 1 बोलेरो जीप असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या या कबुलीवरून दरोडा आणि चोरीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. या धडक कारवाईत सुनील कालिदास शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरुडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला बेंबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, बेंबळी पोलीस ठाण्याचे गणेश पाटील, पोउपनि शिवाजी भुतेकर, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.
Video –योग्य पदावर योग्य व्यक्ती, संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांचे केले अभिनंदन
राज्यसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचे कौतुक करत त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी केली. योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे सांगत हरिवंश यांच्या कार्यपद्धतीचे आणि पत्रकारितेतील योगदानाचेही विशेष उल्लेख केला.
सोलापुरात पतीकडून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न सोलापूर -सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेली एक थरारक घटना परिसराला हादरवून गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस [...]
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘स्वच्छता लीग’क्रीडा स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.१८ व १९ एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण (कॅम्प) येथे करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या १५० [...]
सोलापुरात उष्माघात रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू सोलापूर -सोलापूर जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघारग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. बुधवारी तब्बल ४३ अंशांची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांच्या [...]
Solapur news |सोलापूरच्या भारत नगरमध्ये जुन्या वादाचा भडका; माय-लेकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
सोलापुरात जुन्या वादातून दोघांना बेदम मारहाण सोलापूर -शहरातील भारत नगर भागातजुन्या वादाचा राग मनात धरून दोन जणांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणकेल्याची घटना घडली आहे. यात यलब्वा अरूण घोडके (वय ५५ वर्षे) आणि बालाजीअरूण घोडके(रा. भारतनगर, टीव्हीकेंद्र सोलापूर) हे जखमी झाले आहेत. १६एप्रिल [...]
सावंतवाडीत भूमी अभिलेख कर्मचारी लाच घेताना सापडला
गुन्हा दाखल सावंतवाडी : प्रतिनिधी सामायिक जमिनीतील पोटहिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपये लाच घेताना सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (३३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दोन महिन्यापूर्वी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. सदर काम करून देण्यासाठी आपटे याने तक्रादाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीच्या [...]
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके याचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. यात शेळकेची पत्नी आणि मुलगा जखमी गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरहून शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावाजवळ शेळकेच्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) […]
Solapur news |पाणीटंचाई आणि जलजीवन मिशन रडारवर! सोलापूरचे नवे CEO कुशल जैन ॲक्शन मोडमध्ये
सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या पर्वाचा प्रारंभ सोलापूर -सध्या उन्हाळा सुरु असल्याने प्रथमतः जिल्ह्यातील पाणीटंचाई या विषयावर लक्ष देणार आहे. त्यासोबतच लवकरच आढावा घेऊन जलजीवन मिशनच्या कामावर लक्ष देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी सीईओ [...]
महिला आरक्षण विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. या विषयावर सभागृहामध्ये बोलताना, सरकारला आपली सत्ता गमावण्याची भीती वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना जादूगार संबोधताच, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले. त्यामुळे काही […]
माणकेश्वर येथील मंदिराला पुरातत्व विभागाची भेट
भूम (प्रतिनिधी)- माणकेश्वर येथील सटवाई देवीचीच्या मूर्तीचा शेंदूर काढण्यासाठी आलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यासोबत मंदिराच्या सभा मंडपामध्ये ट्रस्ट व गावकरी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्ट व गावकऱ्यासमोर बोलताना सांगितले की, देवीची मूर्ती वर्षानुवर्षे टिकवायची असेल तर मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे आहे. असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन पत्र व्यवहार करावा असे सांगितले. त्यामध्ये बैठकीदरम्यान गावकरी व ट्रस्टने पुरातत्त्व विभागात विभागाकडे ट्रस्टचा आक्षेप व म्हणणे पत्रव्यवहार करावा असे या बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरले .या बैठकीला तक्रारदार, ट्रस्टचे माजी-आजी अध्यक्ष,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणकेश्वर येथील सटवाई देवीची पाहणी करण्यासाठी आज आलो होतो. तक्रारदार, ग्रामस्थ व ट्रस्ट यांचे म्हणणे ऐकून घेतले. मूर्तीचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे .त्यामुळे मूर्ती पुढील दीडशे ते दोनशे वर्षे टिकू शकते. आज मूर्तीवर आभूषण असल्यामुळे पूर्ण बघितली नाही .परंतु मूर्ती पूर्ण बघितल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासन पुरातत्व विभाग यांच्याकडे सादर करणार आहोत. सागर मुंडे पुरातत्त्व विभाग माणकेश्वर येथील सटवाई देवीच्या शेंदूर काढण्यासाठी आमचा विरोध आहे. शेदुर काढल्यामुळे भाविक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात .सदरील देवस्थान यादवकालीन असून हे देवस्थान पुरातन विभागाच्या आखतऱ्यामध्ये येत नाही. राज्य संरक्षित स्मारक म्हणून सटवाई मंदिर घोषित केलेले नाही. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन दाद मागणार आहोत. बाबासाहेब अंधारे अध्यक्ष सटवाई देवस्थान
खासदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून लातूर-पुणे गाडी हडपसरपर्यतच
पुणे (प्रतिनिधी)- Hadapsar Railway Station येथे मराठवाडा व लातूर विभागातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या टर्मिनेट केल्या जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. Pune Railway Station येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था तात्पुरती असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात याचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. हडपसर येथे उतरल्यावर प्रवाशांना पुणे शहरात पोहोचण्यासाठी अतिरिक्त 15 ते 25 किमी अंतर कापावे लागत असून, दररोज 100 ते 300 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च व 1 ते 2 तासांचा वेळ खर्च होतो. कामगार, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, उत्तर भारत व गुजरातकडून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र थेट पुणे स्टेशनपर्यंत नियमितपणे चालवल्या जात आहेत. त्यामुळे “वेगळे नियम वेगळे न्याय” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाडा व लातूर प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील खासदारांनी यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे किमान पुणे स्टेशनपर्यंत गाड्या चालविण्याची मागणी अधिकृतरित्या मांडलेली आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप ठोसपणे लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, Khadki Railway Station किंवा Pimpri-Chinchwad पर्यंत गाड्या वाढविणे हे व्यवहार्य व तातडीचे समाधान ठरू शकते. योग्य नियोजन, स्वतंत्र वेळापत्रक ( Dedicated Slots) आणि “Through Running”धोरण राबविल्यास गाड्या सहज पुढे वाढविता येऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून प्राधान्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या ठोस मागण्या मराठवाडा व लातूरकडील सर्व गाड्या तात्काळ पुणे स्टेशन तसेच पुढे खडकी किंवा पिंपरी-चिंचवडपर्यंत वाढवाव्यात. सर्व गाड्यांसाठी समान व पारदर्शक धोरण लागू करावे. पुणेखडकीपिंपरी मार्गावर मराठवाडा गाड्यांसाठी स्वतंत्र स्लॉट निश्चित करावेत. पिंपरी-चिंचवड येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म व देखभाल सुविधा विकसित कराव्यात. तात्पुरत्या उपाययोजनेसह दीर्घकालीन आराखडा जाहीर करावा. या मागण्यांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सह्या मोहीम सुरू केली असून, 1000 पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह रेल्वे प्रशासन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की, या प्रश्नावर तात्काळ निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.“खासदारांनी पुण्यापर्यंत गाड्यांची मागणी करूनही ती पूर्ण होत नसेल, तर सामान्य प्रवाशांनी न्याय कुठे मागायचा?” असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महाडच्या सत्याग्रहाने रचला भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया- प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा (प्रतिनिधी)- महाडचा चवदार तळे सत्याग्रह ही केवळ पाणी पिण्यासाठी केलेली कृती नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध पुकारलेले बंड आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा होता. या सत्याग्रहाने भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया रचला असून, व्यक्तीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. 14) सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यंदा महाड सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि मानवी हक्कांची सनद या विषयावर हे व्याख्यान पार पडले. मानवी प्रतिष्ठेचे धर्मयुद्ध आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. मोटे पुढे म्हणाले की, 20 मार्च 1927 रोजी घडलेला हा लढा अस्तित्व आणि आत्मसन्मानाचा होता. सार्वजनिक मालमत्तेवर सर्वांचा समान अधिकार असतो, हे बाबासाहेबांनी कृतीतून सिद्ध केले. हा सत्याग्रह म्हणजे विषमतेच्या अंधाराविरुद्ध पुकारलेले अहिंसक धर्मयुद्ध होते. आज आपण जे मूलभूत अधिकार उपभोगत आहोत, त्यांची बीजे महाडच्या चिखलात पेरली गेली होती. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या महामंत्राची ठिणगी महाडमधूनच पडल्याचे नमूद करत, “ माणूस आहोत आम्ही, माणूस म्हणून जगूयात,“ असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी सांगितले की, महाडच्या सत्याग्रहाचा खरा इतिहास प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे असून, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राम माळगे, डॉ. बालाजी मोरे, डॉ. धनंजय मेनकुदळे, डॉ. सर्जेराव माळी,डॉ. आप्पाराव गायकवाड, योगेश पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. बालाजी मोरे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी पिडगे तर आभार प्रा. डॉ. फुलचंद पवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमेश केशरे, प्रा. दत्ता सुर्यवंशी, डॉ. शिरीष रेड्डी, डॉ. अनिता सरपे, डॉ. संजय साळुंके आणि इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या व्याख्यानास विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
22 एप्रिलपासून सुरतगाव येथे रंगणार ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा थरार
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगणार असुन, यामध्ये विजेत्या उपविजेत्या संघासह इतरही संघावर बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. यामुळे सुरतगाव येथे होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धांसाठी जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक तथा युवा नेते दादासाहेब घोडके यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य अशा ग्रामीण फुल पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शरण बसवराज पाटील (शरणभैय्या युथ फाऊंडेशन धाराशिव) यांच्या तर्फे 55,555, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अँड. अरविंद अप्पाराव बेडगे (सभापती नळदुर्ग) यांच्या तर्फे 33,333, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राजभाई शहाजी सुरते (ग्रा.प सदस्य, सुरतगाव) 15,555 तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत देवकर (यश कंट्रक्शन) यांच्या तर्फे 7,777 अशा भव्य बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. याच बरोबर इतरही बक्षीसांचा वर्षाव क्रिकेट संघावर होणार आहे. युवा पीढींचे सशक्तीकरण करावे व युवा पिढींनी मैदानी खेळांचे महत्त्व अंगीकृत करुण तंदुरुस्त जीवन जगावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा,असे आवाहन घोडके यांनी केले आहे.
मंगरुळ खून प्रकरणी पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथील युवकाच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेत 36 वर्षीय कृष्णाथ आनंद साठे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय 28) आणि तिचा प्रियकर शुभम घाटूळे (वय 20) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याने गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले आहे. तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतरच हा साधा गुन्हा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय होता. आरोपींनी डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली दिली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाजवळ टाकल्याचेही उघड झाले आहे. मृतदेह काही अंतर फरपटत नेण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय घोटे, बीट अंमलदार महादेव राऊत, पोलीस कॉन्स्टेबल वाघोलीकर, संतोष करवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई वेगाने पूर्ण केली. तपास बहुआयामी पद्धतीने पुढे नेला जात आहे.
शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘शाश्वत विकास ध्येय-जिल्हा निर्देशक आराखडा, धाराशिव जिल्हा’ या सन 2023-24 व सन 2024-25 या दोन पुस्तकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई यांच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई येथील अतिरिक्त आयुक्त भांगे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपआयुक्त सु.न.जाधव तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोलापूर श्रीकांत कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय,धाराशिव येथील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासाच्या विविध निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आलेला हा आराखडा जिल्ह्याच्या नियोजन प्रक्रियेस दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
135 व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकांच्या कलिंग युद्ध देखावा
धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कलिंग युद्धाचा भव्य देखावा सादर करण्यात आला.या देखाव्याला जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,आरडीसी विद्याचरण कडवडकर,तहसिलदार मृणाल जाधव,नायाब तहसिलदार महादेव शिंदे,समाज कल्याण सहआयुक्त सचिन कवले,मुख्याधिकारी निता अंधारे,यांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर भारताचा बादशहा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कलिंग युद्धावर आधारित सादर केलेल्या देखाव्याची पाहणी करण्यात आली. रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांचा सन्मान जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तसेच पर्यटन विकास समितीचे मार्गदर्शक डॉ.अभय शहापुरकर,अध्यक्ष युवराज नळे, सहसचिव अब्दुल लतीफ,राजाभाऊ कारंडे,ॲड.व्यकंट गुंड,भाजपा युवा नेते मल्हार पाटील,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,नगराध्यक्ष नेहाताई काकडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,विद्या माने,नगर सेवक अमित शिंदे,राहुल काकडे,सिध्दार्थ बनसोडे,दत्ता पेठे सह इतर नगरसेवक,राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील,नगर सेवक खलिफा कुरेशी,डॉ.आविनाश तांबारे,श्री साई श्रद्धा एज्युकेशन सोसायटीचे सोमनाथ लांडगे,अंकुर शिशुगृह तथा अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला,गजानन पाटील,अनंत जगताप,जयंत देशमुख,बाळासाहेब सुभेदार,पत्रकार बांधव यांच्या सह इतर मान्यवरांनी महामानवाला अभिवादन करून देखाव्याची पाहणी केली. सादर करण्यात आलेल्या या देखाव्यात सम्राट अशोक यांच्या जीवनातील कलिंग युद्धाचे जिवंत चित्रण करण्यात आले. युद्धानंतर झालेला त्यांच्या मनोवृत्तीतील बदल आणि बौद्ध धर्माचा स्वीकार याचे प्रभावी सादरीकरण उपस्थितांना भावले.तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आलेल्या भीम अनुयायासाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती,राजगीर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी मान्यवरांना देखाव्याबाबत सविस्तर माहिती देत उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. समाजामध्ये इतिहासाची जाणीव,सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व उपक्रमांसाठी नगर परिषदे सह मोलाचे सहकार्य लाभले. मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले, समिती अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सचिव प्रवीण जगताप उपाध्यक्ष संजय गजधने, सहसचिव संग्राम बनसोडे,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे, धनंजय वाघमारे, संपतराव शिंदे,बाबासाहेब देविदास बनसोडे,किसन घरबुडवे,रमेश कांबळे,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,बाबासाहेब गुळीग,अतुल लष्करे,विवेक यादव,विजय राठोड, सरफराज पटेल,महादेव एडके,बाळु कांबळे,युसुफ सय्यद,गोविंद वारे,गरड,देखावा बनविणारे शशी माने विशाल सरवदे शिवलिंग लोंढे अजय चिलवंत सह इतर तर समितीच्या वतीने दरवर्षी स्थानिक पातळीवर कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी स्वच्छता अभियान,नारी सन्मान,भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती व्याख्याते,शासकीय सेवेत रुजू झालेले विद्यार्थी व इतर गुणवंतांचा सत्कार,शासकीय योजनांचा माहिती मेळावा,दिव्यांग बांधवासाठी मेळावा व आरोग्य शिबिर,शासकीय योजनांचा माहिती मेळाव्यात विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आले होते. दिव्याग बांधवांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला,भोजन दान, रक्तदान शिबीर,आकर्षक अशा देखाव्याचे सादरीकरण सह ऐनवेळी सुचविलेले सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.समितीचे पदाधिकारी यासाठी अहोरात्र कष्ट करतात अशी माहिती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी दिली व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
अक्षय तृतीयाच्या मुर्हूतावर बालविवाहास ठाम नकार; ‘गुन्हा नोंद करा
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण,आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बालविवाहास आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना थेट आणि ठाम आवाहन करत,19 एप्रिल 2026 रोजीच्या अक्षय तृतीया मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू असून, त्यासोबत महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम 2022 देखील अंमलात आहेत. केंद्र शासनाच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.या कायद्यानुसार ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि शहरी भागात पर्यवेक्षिका यांची सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या कायद्याअंतर्गत बालविवाह करणे किंवा आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक तसेच वैयक्तिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र,याच दिवशी बालविवाह होण्याची शक्यता जास्त असल्याचे लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दि.19 एप्रिल रोजी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभाग,बाल संरक्षण समिती तसेच इतर यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे,व्यापक जनजागृती करणे आणि ‘1098’ चाइल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच कोणत्याही सजग नागरिकांनी बालविवाहाची घटना आढळल्यास तात्काळ हस्तक्षेप करून ती थांबवावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांच्याकडे सादर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा टास्क फोर्स (बालविवाह प्रतिबंध) अध्यक्ष कीर्ती किरण पूजार यांनी स्पष्ट केले आहे की,अक्षय तृतीया या मुहूर्तावर बालविवाह झाल्याचे आढळल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 अंतर्गत पालक,आचारी,मंडप मालक, पुजारी/काझी,वाजंत्री,हॉल चालक, स्वयंपाकी,उपस्थित नातेवाईक, विवाह आयोजक आणि संबंधित सर्व नागरिकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल,अशी हमी प्रशासनाने दिली आहे. समाजाच्या भविष्यासाठी प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बालविवाहास ठाम नकार देत,कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे भावनिक आणि कडक आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले आहे.
महावितरण कार्यालयास विधी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील प्रथम व तृतीय वर्षाच्या विधी विद्यार्थ्यांनी महावितरणच्या संरक्षण व सुरक्षा मंडळ कार्यालय, धाराशिव येथील वीज तक्रार निवारण मंच (सीजीआरएफ) विभागास शैक्षणिक भेट दिली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता व वीज तक्रार निवारण मंचाच्या सचिव नीलांबरी कुलकर्णी तसेच स्वतंत्र सदस्य मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नीलांबरी कुलकर्णी यांनी वीज कायद्यातील बदल, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी तसेच वीज चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तर मेधा कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करताना ग्राहकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच वीज तक्रार निवारण मंचाचे कार्य स्पष्ट केले. या मंचाद्वारे ग्राहकांना तक्रार नोंदवून त्याचे निवारण कसे केले जाते, याची प्रात्यक्षिक उदाहरणांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्मार्ट मीटर व वीज चोरीसंदर्भात विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. ही भेट प्रा. डॉ. पूनम दागडिया/तापडिया यांच्या समन्वयातून पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य कायला कृष्णमूर्ती यांनी मार्गदर्शन केले. या भेटीस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार मनोज घोरपडे यांनी धनगरी गजी नृत्यात धरला ठेका मसूर – गळ्यात धनगरी ढोल, हातात गजी रुमाल घेत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी कराड तालुक्यातील हेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात पारंपरिक धनगरी गजी ढोल नृत्यात सहभाग घेत ठेका धरला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ढोल [...]
रोज तुळशीची पाने खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
आपल्या हिंदुस्थानात तुळशीचे रोप हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे रोप केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही. तर तुळशीच्या झाडामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म दडलेले असतात. म्हणूनच पूर्वापारपासुन दारात किंवा अंगणात तुळस लावण्याची प्रथा रूढ झालेली आहे. तुळशीची पाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची […]
Satara news |सातारा पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त? कल्याणी विद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
साताऱ्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला सातारा – सातारा शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. परंतु नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या गोडोली येथील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण [...]
Satara News |यात्रेत भाविकांची गर्दी, पण गॅसचा तुटवडा; पार्वतीपुर परिसरात नागरिक हैराण
महाबळेश्वर तालुक्यातील गॅस वितरणाचे धिंडवडे प्रतापगड :महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पार्वतीपुर येथे सुरू असलेल्या श्री रामवरदायिनी माता यात्रेमुळे गावात सध्या उत्साहाचे वातावरण असले, तरी घरगुती गॅस पुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिनांक १४ पासून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर [...]
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात मागील आठवड्यात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात महिलांचे […]
तोवर गॅस पाईपलाईनचे पुढील काम करू देणार नाही
नगरसेवक देव्या सूर्याजींचा एम .एन. जी .एल अधिकाऱ्यांना इशारा सावंतवाडी : प्रतिनिधी जोपर्यंत मागच काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढे काम करू देणार नाही असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला देत मोती तलाव भागात सुरू असणारे काम बंद करण्यास भाग पाडले. सालईवाडा भागातील ३ महिन्यांपासून खणून ठेवलेले रस्ते आधी सुस्थितीत आणा, [...]
Satara news |महापुरुषांबाबत आक्षेपार्ह कमेंट; साताऱ्यात तणाव, युवकावर गुन्हा दाखल
साताऱ्यात आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणावरून तणाव सातारा – उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे गुरुवारी सकाळी सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटताच संतप्त समाजबांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर [...]
ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दूर लोटलं आणि पाकिस्तानला जवळ केलं; अमेरिकेच्या माजी राजदूताचं मोठं विधान
अमेरिकेचे माजी राजदूत रहम इम्यॅन्युएल यांनी हिंदुस्थान-अमेरिका संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः हिंदुस्थान-पाकिस्तान संदर्भात ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या तीन दशकांत निर्माण झालेली द्विपक्षीय मैत्री कमकुवत झाल्याचे त्यांनी म्हटले. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. एका मुलाखतीत इमॅन्युएल म्हणाले की, हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी सलग चार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दीर्घकाळ प्रयत्न केले होते. […]
Jat news |इकडे का आलात?’विचारत कोळगिरीत दाम्पत्याला दगडाने मारहाण; एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा
कोळगिरीत पती-पत्नीवर दगडफेक जत : तालुक्यातील कोळगिरी येथे शिवीगाळ, दगडाने मारहाण केरून जखमी केल्याप्रकरणी पाच जणांबर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजाराम शंकर चमकेरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकप्पा शंकर चमकेरी, राकेश मलकप्पा चमकेरी, महादेवी मलकप्पा चमकेरी, रेश्मा मलकप्पा चमकेरी, आकाश मलकप्पाचमकेरी (रा. कोळगिरी) [...]
Karnataka Accident –यादगिरीमध्ये कार आणि बसची समोरासमोर धडक; अपघातात 6 जणांचा होरपळून मृत्यू
खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात […]
तर मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की आली नसती
नगरसेवक महेश कांदळगावकर यांचा वैभव नाईकांना टोला मालवण । प्रतिनिधी मत्स्यालय निधी परत का गेला हा प्रश्न खरतर माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वतःला विचारावा असा टोला माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी लगावला आहे . नगर परिषद मत्स्यालय माजी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यालय निधी परत जाण्यास जबाबदार कोण हा प्रश्न खरतर स्वतःला [...]
चहा करण्याच्या वादातून बहिणीवर वरवंट्याने हल्ला मिरज : चहा करुन देण्यासाठी हट्ट धरुन लहान बहिणीने शिक्षक असलेल्या मोठ्या बहिणीच्या डोक्यात वरवंटा घालून जखमी केल्याची घटना तालुक्यातील एरंडोली येथे घडली. या मारहाणीत कल्याणी सुरगोंडा पाटील (वय ३४) या जखमी झाल्या असून, त्यांनी लहान बहिण [...]
नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा!
मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार : डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत गौरव‘ प्रदान पणजी : विश्वाच्या नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा म्हणजे महान शास्त्रज्ञ प्रा. डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत, याचा माझ्यासह सर्व गोमंतकीयांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम, राष्ट्रनिर्मिती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्यसाधारण योगदान देणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत [...]
पणजी शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे काय?
मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल : वाहतूक कोंडीवर नाराजी व्यक्त पणजी : पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावर संध्याकाळनंतर कॅसिनोंमुळे रोज होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उघड नाराजी व्यक्त करुन गोवा उच्च न्यायालयाने शहरात पार्किंगसाठी जागाच नसल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे, तर शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे का? असा सवालही केला आहे. पणजीत वाहतुकीसाठी आणखी शिस्त लागण्याची गरज [...]
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापूर -राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते मंगळवार (२१) ते गुरुवार (२३ एप्रिल) दरम्यान दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान पोलीस मुख्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे तसेच गडहिंग्लज पोलीस उपअधिक्षक कार्यालयाचीही तपासणी करण्यात येणार आहे. याचसोबत क्राईम आढावा बैठक, विविध [...]
सीबी टू परीक्षेमध्ये केवळ 650 शिक्षक झाले उत्तीर्ण
उर्वरित 950 शिक्षकांसमोर यक्षप्रश्न : ‘टीईटी’साठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी पणजी : शिक्षण खात्याने नव्याने शिक्षण भरतीसाठी घेतलेल्या सीबी 2 परीक्षेमध्ये चौदाशेपैकी केवळ 650 जण उत्तीर्ण ठरले असून उर्वरित 950 जणांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) परीक्षेला बसण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत द्यावी, अशी मागणी शिक्षकवर्गाने सरकारकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने [...]
श्री देवी लईराईचे सोवळे व्रत सुरु
अमावस्येपासून सोवळे व्रत पाळणारे धोंडगण सहभागी : रविवारपासून तीन दिवशीय सोवळे व्रत डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असतानाच या जत्रेत अनन्यभावनेने सेवा बजावणाऱ्या व्रतस्थ धोंडगणांच्या पाच दिवसीय सोवळे व्रताला आज शुक्रवार दि. 17 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवसीय व्रत रविवार 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या व्रताच्या [...]
राज्यात वाढत्या उष्णतेमुळे लाहीलाही होत असताना अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची असाधारण स्थिती दिसून येण्याची […]
जालन्यात महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी साहील शहनवाज अन्सारी (रा. मिल्लतनगर, जालना) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत […]
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमासाठी लाख मोलाची मदत
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मदतीचा हात ओटवणे : प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची समाजातील सर्व घटकांकडून दखल घेतली जात असून त्यांच्या विविध समाजपयोगी उपक्रमासाठी उत्स्फूर्तपणे सर्व घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करीत त्यांच्या विविध उपक्रमांसाठी एक [...]
महिला आरक्षणाची ढाल करून उत्तरेचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. तसेच मतदारसंघ पुनर्रचनेचे हे विधेयक जर मंजूर झाले तर हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल असा इशाराही त्यांनी दिला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून राज ठाकरे म्हणाले की, सध्या केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना […]
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरू असलेल्या नालेसफाईची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज झाडाझडती घेतली. गेल्या वर्षी पाऊस पंधरा दिवस लवकर सुरू झाला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच कामे पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मेऐवजी १५ मे ही ठेवण्यात यावी आणि याच मुदतीत कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी यावेळी प्रशासनाला […]
इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत असून, कर्णधार हार्दिक पांड्या आता क्रिकेट तज्ज्ञांच्या निशाण्यावर आला आहे. हंगामातील पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने मुंबईचा सहज पराभव केला. मुंबईला या हंगामात आतापर्यंत […]
Kurundwad news |खिद्रापूर हादरले! एकाच रात्रीत लाखो रुपयांची जनावरे लंपास
खिद्रापूर परिसरात बोकड-शेळी चोरीचा धुमाकूळ कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ)व परिसरात बोकड-शेळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, सबळ पुरावे नसल्याचे कारण देत त्याला सोडण्यात आले. [...]
महाद्वार रोडवर पालिकेचा ‘अॅक्शन मोड’ कोल्हापूर -महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून गुरुवारी तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ३ लोखंडी टेबल, ११ पाकिंग जाळ्या, ४ स्टैंड बोर्ड, [...]
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात द्रमुकच्या (DMK) आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या कामाला ‘दृष्ट’ लागू नये म्हणून लावलेला ‘काला टीका’ (काळा टिळा) अशी टिप्पणी केली होती. त्याला द्रमुक नेत्या कनिमोळी यांनी शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. काळा हा देवी कालीचा रंग असून, या मुद्द्यावर तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेला डीएमके शेवटपर्यंत आंदोलन करत राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. […]
शिवाजी विद्यापीठात सुरक्षारक्षकांना दमदाटी कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर वारंवार वाहन आडवे उभे केल्याचा जाब विचारणाऱ्या सुरक्षारक्षकांना दमदाटीचा प्रकार घडला. याप्रकरणी शाहूसेना संघटनेचा प्रमुख शुभम शिरहट्टी व सहकाऱ्यांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत वसंत ज्ञानू एकले (वय ५६, रा. [...]
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन धनाला ग्रहण
हजारो अर्जदार पैशांच्या प्रतीक्षेत : सरकारकडे अनुदानाची कमतरता बेळगाव : जातीय व्यवस्थेच्या भिंती तोडून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सरकारने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन धन योजना आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. आदर्श विवाह आणि सुंदर आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या हजारो नवविवाहित जोडप्यांना सरकारकडून आर्थिक मदतीसाठी महिनो न् महिने वाट पहावी लागली आहे. गेल्या काही वर्षांत प्रोत्साहन [...]
शेतकऱ्यांना बाजूला ठेवून डीसीसीकडून कारखान्यांना कर्ज
राज्य रयत संघटनेचे शशिकांत गुरुजी यांचा पत्रकार परिषदेत आरोप बेळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या डीसीसी बँकेच्या अलीकडील कर्जवाटप निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून राजकीय पाठबळ असलेल्या साखर कारखान्यांना शेकडो कोटी ऊपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीसीसी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झाली होती. मात्र [...]
कुपवाड पोलिसांची अवघ्या काही तासांत मोठी कारवाई कुपवाड़ -मानमोडी येथे माणुसकीता काळिमा फाराणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरुन तसेच घरगुती मांडणातून रागाच्या भरात एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा गळा दाबून खून केला. ही बरारक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. कुपवाड [...]
शिरोड्यात 7 कोटीचे अंबरग्रीस जप्त ; चार संशयित ताब्यात
वन विभागाची बनावट ग्राहक बनून मोठी कारवाई : ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस ताब्यात वेंगुर्ले / प्रतिनिधी शिरोडा परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाने ही मोठी कारवाई १६ एप्रिल रोजी सायंकाळी करून रात्री उशिरा गुन्हा [...]
हे म्हणजे महिलांना ओलीस ठेवण्यासारखे आहे, काँग्रेस खासदार शशी थरूर यांची लोकसभेत टीका
महिला आरक्षण विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) जोडण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत टीका केली. त्यांनी सांगितले की, महिलांच्या समान प्रतिनिधित्वाच्या आकांक्षा या इतक्या गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त प्रशासकीय प्रक्रियेशी जोडणे म्हणजे त्यांना “ओलीस ठेवण्यासारखे” आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर बोलताना थरूर म्हणाले की, देशात आज महिलांच्या आरक्षणाबाबत जवळपास सर्व पक्षांमध्ये अभूतपूर्व एकमत […]
दुबईची शान आलिशान जुमेराह ‘बुर्ज अल अरब’हाॅटेल राहणार १८ महिन्यांसाठी बंद
जगातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक मानले जाणारे जुमेराह बुर्ज अल अरब आता काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दुबईची ओळख बनलेले हे प्रतिष्ठित हॉटेल, त्याच्या अद्वितीय डिझाइन आणि आलिशान सुविधांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे हाॅटेल जगातील एकमेव ७ स्टार हाॅटेल आहे. परंतु आता नूतनीकरणासाठी हे हाॅटेल २०२७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या […]
वडगाव विभाग शिवजयंती मिरवणूक सोमवारी
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी पारंपरिक मिरवणुकीसंदर्भात केली चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने सोमवार दि. 20 एप्रिल रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत एकूण 7 जिवंत चित्ररथ (लाईव्ह देखावे) सादर करण्यात येणार असून, मिरवणूक रात्री 8 नंतर सुरू होऊन वडगावमधील सर्व गल्ली-बोळांमधून फिरणार आहे. या संदर्भात मंडळाच्या [...]
Shiv Jayanti |राजारामपुरीत शिवरायांच्या आगमन मिरवणुकीचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणला!
राजारामपुरीत शिवजयंती मिरवणुकीचा भव्य जल्लोष कोल्हापूर – गुरुवारी सायंकाळी राजारामपुरी येथील जनता बाजार चौकातून संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आकर्षकसजावटीत साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. महाराजांच्या पुतळ्यासमोर पारंपारिक ढोल-ताशा पथकाने बाताबरण दणाणून सोडले होते. [...]
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी जांबोटी-कणकुंबीत शिवणयंत्र वाटप
बेळगाव : महिला सक्षमीकरण व महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने लोककल्पतर्फे खानापूर तालुक्यातील जांबोटी व कणकुंबी गावांतील महिलांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला. यामुळे त्यांना शिवणकामाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. याबद्दल लाभार्थी महिलांनी लोककल्पचे आभार मानले. यावेळी लोककल्पचे संतोष कदम, किशोर नाईक, संदीप पाटील, हर्षद जगताप [...]
उत्पादनात घट होण्याची शक्यता : काळजी घेण्याचे पशुपालकांना खात्याचे आवाहन बेळगाव : उष्माघाताचा धोका केवळ मनुष्यालाच नव्हे तर जनावरांनाही होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक बनले आहे. उष्णतेमुळे जनावरांना आरोग्याची समस्या व दूध उत्पादनात घट होते. पशुसंगोपन खात्याच्या म्हणण्यानुसार गाभण, दुभत्या आणि आजारी जनावरांना ही समस्या येण्याची जास्त शक्यता आहे. जनावरांमध्ये अशक्तपणा, जलद [...]
कम्युनिटी मोबिलायझर, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या
सफाई कर्मचारी हितरक्षण समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी : मनपा आयुक्तांची चर्चा करण्याचे आश्वासन बेळगाव : महानगरपालिकेकडून कम्युनिटी मोबिलायझर आणि सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याने सदर बाब सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री जारकीहोळी याबाबत मनपा आयुक्तांची चर्चा करू, असे आश्वासन दिले. कम्युनिटी मोबिलायझरना गेल्या चार महिन्यापासून वेतन [...]
प्रशासन उपायुक्त तळवार यांना पदावर कायम ठेवा
तीन महिन्यांचे वेतन तातडीने द्या : सफाई कर्मचारी हितरक्षण समितीचे विविध मागण्यांचे मनपाला निवेदन बेळगाव : महापालिकेचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांची नुकतीच बदली झाली आहे. मात्र, त्यांची बदली रोखून त्याच पदावर कायम ठेवावे. कम्युनिटी मोबिलायझर्सना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. ते तातडीने देण्यात यावे. सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अल्पोपहाराचा दर्जा खालावला असून [...]
रणकुंडये-चोर्ला रस्ता डांबरीकरण अंतिम टप्प्यात
पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता-रस्त्याच्या बाजूने मातीचा भराव टाकणे अत्यंत गरजेचे वार्ताहर/कणकुंबी बेळगाव, चोर्ला, गोवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, बैलूर क्रॉस ते रणकुंडयेपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाला गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी सुरुवात केले आहे. गेल्या एप्रिल-मे महिन्यात चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी बैलूर क्रॉस ते रणकुंडयेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट राहिले होते. [...]
व्हर्जिनियाचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर जस्टिन फेअरफॅक्स यांनी त्यांच्या विभक्त पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधील ॲनांडेल येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. फेअरफॅक्स काउंटीचे पोलीस प्रमुख केविन डेव्हिस यांनी या घटनेची पुष्टी केली असून, 47 वर्षीय जस्टिन फेअरफॅक्स आणि त्यांच्या 49 वर्षीय पत्नी डॉ. […]
गावाला स्वतंत्र एकही बस फेरी नाही : विद्यार्थी-प्रवाशांची गैरसोय वार्ताहर/किणये तालुक्यातील सुवर्ण विधानसौध जवळ असलेले हलगा गाव बस सेवेपासून वंचित आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला दिवसातून केवळ एक बस फेरी सकाळी सुरू होती. मात्र गेल्या दोन महिन्यापासून ती बसफेरीही बंद झाली आहे. दिवसभर बस नशल्याने याचा त्रास गावातील शालेय विद्यार्थी व प्रवासी [...]
पंडित ओगले यांच्यावरील आरोप निराधार
हिंदू संघटनांचे तहसीलदारांना निवेदन खानापूर : पंडित ओगले हे रौडी शिटर असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे नेंद आहेत. असे असताना शांतता कमिटी अथवा पोलीस ठाण्यात इतर कामासाठी उठ-बस असते. तसेच शांतता कमिटीत भाषण करण्यास मुभा देण्यात येते. यावर काँग्रेस पक्षाने आक्षेत घेत तहसीलदारांना निवेदन दिले होते. या विरोधात तालुक्यातील हिंदू संघटना आणि नागरिकांनी गुरुवार दि. 16 [...]
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर केला विनोद, स्टँड-अप कॉमेडियनवर पोलिसांकडून कारवाई
आंध्र प्रदेशात उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांच्यावरील विनोदांमुळे आणखी एका स्टँड-अप कॉमेडियनवर पोलिसांची कारवाई झाली आहे. विशाखापट्टणमचा रहिवासी रफीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याआधी हैदराबादमधील कॉमेडियन अनुदीप कतिकाला यालाही अशाच कारणावरून अटक करण्यात आली होती. The News Minute या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. रफीकविरोधात कारवाई होण्यापूर्वी त्याची लोकेशन आणि संपर्क […]
बसव जयंतीनिमित्त रविवारी समानता बाईक रॅली
बसवराज रोट्टी यांची माहिती बेळगाव : कर्नाटक सांस्कृतिक नेते महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बसव जयंती महामहोत्सव समिती व विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 19 रोजी ‘समानता बाईक रॅली’ काढण्यात येणार आहे. यामध्ये 5 हजारहून अधिक समाज बांधव सहभागी होतील. बाईक रॅलीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्यात येणार असून एकसंघ राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, [...]
डॉ. प्रभाकर कोरे यांनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट
दोन राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी दिले निवेदन बेळगाव : केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्नाटकातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत केएलई संस्थेचे संचालक विजय मेटगुड उपस्थित होते. सौंदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एनएच-748-ए महामार्गावर सुरक्षिततेची उपाययोजना करावी व [...]
हनुमान मंदिरातील (मठ) श्रीमूर्ती प्रतिष्ठापना रविवारपासून
अनगोळमध्ये 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन : सहभागी होण्याचे विश्वस्त मंडळाचे आवाहन बेळगाव : अनगोळ येथे श्री हनुमानाची दोन मंदिरे आहेत. पहिले मंदिर मारुती मंदिर. हे मारुती गल्लीतच स्थित असून दुसरे मंदिर हे मंदिर नसून मठ आहे. याला इतिहास आहे. अनगोळ गाव कुरुंदवाडच्या पटवर्धन सरकारच्या अखत्यारित येत असे. दर चार वर्षांनी नाशिकच्या कुंभमेळ्यानंतर साधू मंडळी [...]
विराट कोहलीच्या लाईकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कुणाच्या फोटोवर केले लाईक?
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीच्या प्रत्येक पोस्ट आणि लाईकची चर्चा होत असते. गेल्या वर्षी विराटने टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो लाईक केला होता. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु या फोटोच्या लाईकवर स्पष्टीकरण देताना, विराटने अल्गोरिदमचे कारण दिले होते. त्याने म्हटले होते की, अल्गोरिदमच्या समस्येमुळे तो लाईक गेला होता. परंतु आता मात्र विराट […]
संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांच्या वक्तव्यामुळे तेलंगणात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सुर्या यांनी आंध्र प्रदेशाचे विभाजन आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीची तुलना हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीशी केल्याने काँग्रेस आणि बीआरएसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या तुलनेवर असंवेदनशील आणि ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची असल्याची टीका होत आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीला भावनिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याने या […]
Delimitation –कितीही तोडफोड केली तरी हे विधेयक पडणार! –संजय राऊत
संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना असे दोन विधेयक सादर करण्यात आली आहेत. त्यावर गुरुवारपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी ही विधेयके मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधकांचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळेच ‘हे विधेयक मंजूर होत नाही. हे विधेयक पडणार आहे’, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार […]
जुबिन नौटियाल अडकला विवाहबंधनात, बालपणीची मैत्रिण बनली जन्माची साथीदार
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. जुबिनने नुकतेच गुपचूप लग्न केल्याची बातमी आता समोर आलेली आहे. सध्याच्या घडीला बाॅलिवडूमधील लग्नसोहळे चर्चेचा विषय असताना, जुबिनने गुपचूप पद्धतीने उरकलेले लग्न आता चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु जुबिनने आपला खास दिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न उत्तराखंडमध्ये पार पडले असून, या […]
मुंबईत स्टुडियोला भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
मुंबईतील मालाड पश्चिम भागातील एका लोकप्रिय आउटडोअर शूटिंग लोकेशनवर शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. माध-मरवे रोडवरील योगा आश्रमाजवळ असलेल्या ‘दाना पाणी भुल्लर गार्डन स्टुडिओ’मध्ये ही आग लागली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सकाळी 6:13 […]
मिर्झा इराणच्या घुटण्यावर साहील कोली पराभूत
येळ्ळूर कुस्ती मैदान : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील यांचे प्रेक्षणीय विजय; प्रमुख लढती निकाली झाल्याने शौकीन समाधानी बेळगाव : येळ्ळूर येथे कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवानिमित्त व लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य केसरी किताबच्या प्रमुख कुस्तीत इराणच्या मिर्झाने साहील कोलीला घुटणा डावावरती नवव्या मिनिटाला तर डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने [...]
पाण्यासाठी खबरदारी उपाययोजना करा!
सिद्धरामय्या यांचे जिल्हा प्रशासनांना निर्देश : पेयजलाच्या समस्येबाबत घेतला आढावा बेंगळूर : राज्यातील पाच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत पावसाची कमतरता दिसून येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, यासाठी खबरदारी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. [...]
चिप्सच्या पाकिटात आढळले किडे, बाजारातील पॅकेट खाद्यपदार्थांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक अशी घटना उघडकीस आली आहे, यामुळे पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नादौनमधील गौना गावातील ही घटना असन, चिप्सच्या सीलबंद पाकिटात जिवंत किडे असल्याचे निदर्शनास आले. हे पॅकेट दोन वर्षांच्या मुलासाठी खरेदी करण्यात आले होते. पॅकेट उघडल्यावर कुटुंबाला धक्का बसला. टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, गौना गावातील […]
विनय कुलकर्णींसह 17 दोषींना आज शिक्षा सुनावणार
योगीश गौडा हत्या प्रकरण : बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष केंद्रित बेंगळूर : धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा हत्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णींसह 17 आरोपींना न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले होते. गुरुवारी शिक्षेच्या प्रमाणाविषयी युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार 17 रोजी शिक्षा सुनावण्यात येईल, असे सांगून सुनावणी पुढे ढकलली. गुरुवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात [...]
मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक अपडेटसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
बेंगळूर : राज्यातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या वयोगटातील सर्व मुलांच्या आधार क्रमांकांचे बायोमेट्रिक अपडेटसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व आधार सेवा केंद्रांवर पूर्णपणे मोफत दिली जात आहे. बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांनी [...]
वायू प्रदूषण आमच्या आठवणी हिरावतोय
ज्या हवेला आम्ही जीवन समजून स्वत:च्या शरीरात घेत आहोत, तिच आमच्या स्मरणशक्तीवर हल्ला करत आहेत. आमच्या जीवनभराच्या आठवणी नष्ट करत आहे. नव्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाने वायू प्रदूषण आता केवळ फुफ्फुसे आणि हृदयाच्या आजारापुरती मर्यादित नसून हे थेट मेंदूला नुकसान पोहोचवत असल्याचे स्पष्ट केले. हवेत प्रत्येक 10 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पीएम2.5 च्या वाढीमुळे डिमेंशियाचा धोका सुमारे 40 [...]
वेबसीरिजमध्ये झळकणार खुशाली कुमार
‘घुडचडी’ चित्रपटात रविना टंडन आणि संजय दत्तसोबत अभिनय केलेली खुशाली कुमार आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. एका वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती काम करत आहे. फॅशन आणि म्युझिक व्हिडिओद्वारे कारकीर्द सुरू करणारी खुशाली आता चित्रपट अन् वेबसीरिजवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. खुशाली ही ‘सपने व्हर्सेस एवरीवन’च्या सीझन 2 मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये खुशाली [...]
‘सुंदर पूनम’ मध्ये सान्या मल्होत्रा
ओटीटीवर येणार चित्रपट ‘सुंदर पूनम’ चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये सान्या मल्होत्रा ही नववधूच्या वेशात दिसून आली आहे. ती काही सामान्य वधू नसून तिच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर असल्याचे पोस्टर पाहून वाटू लागते. सुंदर पूनम चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना चकित करणारी असेल असे फर्स्ट लुकमुळे वाटते. या चित्रपटात थ्रिलर, सस्पेन्सचा डोस मिळणार आहे. सुंदर पूनमच्या फर्स्ट लुकमध्ये सान्या ही [...]
केवळ मेणबत्तीद्वारे कमाविले ६३ कोटी
चीनमध्ये महिलेचा जादूटोण्याचा धंदा चीनच्या एका इन्फ्लुएंसरला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. कारण तिने डेकोरेटेड मेणबत्तींना ‘विश कँडल्स’ ठरवत विकले आणि सुमारे 63 कोटी रुपये कमाविले आहेत. चीनचे तणावग्रस्त युवा ऑनलाइन अजब उत्पादने खरेदी करत ‘भावनात्मक आणि अध्यात्मिक दिलासा’ शोधत आहेत. अशास्थितीत तेथील युवा अशाप्रकारच्या फसवणुकींना सहजपणे बळी [...]
नेटफ्लिक्सचे सह- संस्थापक रीड हेस्टिंग्ज यांची राजीनाम्याची घोषणा, कंपनीकडून माहिती जाहीर
ओव्हर-द-टॉप (OTT)उद्योगातील अग्रगण्य प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सचे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्ज यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. सह-संस्थापक म्हणून त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत असून, त्यानंतर ते कंपनीच्या संचालक मंडळाचाही राजीनामा देणार आहेत. अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे. सह-संस्थापक राजीनाम्यानंतर लोककल्याणासाठी कार्यरत राहणार असल्याचे समजते. परंतु याबाबत अधिक कुठलीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. हेस्टिंग्ज […]
निवडणुकीआधीच TMC आमदाराच्या घरावर आयकर छापे; समर्थकांची घराबाहेर गर्दी, पोलीस तैनात
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी छडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी सभांचा धडका लावला आहे. अशातच आयकर विभागाने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार देबाशिष कुमार यांच्याशी संबंधित दोन ठिकाणांवर छापे टाकले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ च्या सुमारास देबाशिष कुमार यांचे मनोहरपुकर रोडवरील निवासस्थान आणि त्यांचे निवडणूक कार्यालय […]
दिल्ली विमानतळावर दोन विमाने धडकली, अकासाचे विमान उड्डाणासाठी सज्ज होत असताना दुर्घटना
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सिंग करत असताना स्पाईस जेटच्या विमानाची अकासा एअरच्या विमानाशी टक्कर झाली. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू मेंबरला इजा झाली नाही. अकासा एअरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून हैदराबादकडे जाणारे त्यांचे विमान क्यूपी 1406 हे उड्डाणासाठी तयार असताना बे क्षेत्रात परत आणावे लागले. विमान पार्किंगमध्ये स्थिरावलेले […]
पाकिस्तानने केली अँटी शिप मिसाईलची चाचणी
पाकिस्तानने जहाजातून लॉन्च होणाऱ्या अँटी शिप मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. पाकिस्तानी नौदलाने ज्या अँटी शिप मिसाईलची चाचणी केली ती स्वदेशी बनावटीची आहे. या मिसाईलच्या यशस्वी चाचणीने देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी झेप घेतल्याचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि नौदलप्रमुख अॅडमिरल नवीद अश्रफ यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराने […]
वेदांत प्रकल्प स्फोटप्रकरणी अनिल अग्रवालांसह 10 जणांवर गुन्हा दाखल, चौकशी सुरू
छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील वेदांताच्या वीज प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. डभरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 289 (यंत्रसामग्री संदर्भातील निष्काळजी वर्तन) आणि 3(5) (सामान्य […]
अमेरिकेत पाच संशोधक बेपत्ता, …तर पाच जणांचा रहस्यमय मृत्यू
अमेरिकेत अणू आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणांवरून आता व्हाईट हाऊस प्रश्नांची सरबत्ती होत आहे. 2023 पासून अशा दहा घटना घडल्या आहेत. यामध्ये शास्त्रज्ञ किंवा अधिकारी बेपत्ता झाले किंवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावले. व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये बुधवारी पहिल्यांदाच प्रेस सचिव पॅरोलिन लेविट यांना या घटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना […]

31 C