SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
...

T20 WC 2026 –थरारक सामन्यात इंग्लंडला नमवत हिंदुस्थानची फायनलमध्ये धडक, बेथेलची शतकी खेळी व्यर्थ

वानखेडे मैदानावर शेवटच्या षटकापर्यंत झालेल्या थरारक लढतीत टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. जेकब बेथेल याच्या झुंझार शतकी खेळीनंतरही टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड संघाशी 8 मार्च रोजी होईल.

सामना 5 Mar 2026 10:56 pm

Big Thank you! सुप्रिया सुळे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्यासाठी मानले आभार

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल झाला. शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. आदरणीय पवार साहेबांनी […]

सामना 5 Mar 2026 9:42 pm

मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी; वर्षभरात 16 लाख प्रवाशांकडून 1.31 कोटींचा दंड वसूल

लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात तिकिट तपासणी मोहिम राबवत 2025-2026 या आर्थिक वर्षात 16.16 लाख फुकट्या प्रवाशांकडून 1.31 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या 1.10 लाख प्रवाशांकडून 3.51 कोटी रुपये इतका दंड वसूल केला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 15.90 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली […]

सामना 5 Mar 2026 9:21 pm

आर्थिक सर्वेक्षण अहवाल –महाराष्ट्रावर बोजा वाढला! कर्जाचे प्रमाण 18.3 टक्क्यांनी वाढले

एकीकडे महायुती सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीच्या बाता मारत असताना दुसरीकडे राज्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत चालला असल्याचे समोर आले आहे. सध्या महाराष्ट्रावरील कर्जाचा आकडा हा 9 लाख कोटींवर पोहोचला असून हे प्रमाण यंदाच्या आर्थिक वर्षात 18.3 टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत हा आर्थिक पाहणी अहवाल ठेवला. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली […]

सामना 5 Mar 2026 9:19 pm

विभक्त पत्नीच्या पोटगीसाठी थेट पतीच्या पगाराला कात्री; सुप्रीम कोर्टाने कंपनी मालकाला दिले आदेश

घटस्फोटांच्या प्रकरणातील पोटगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेत थेट पतीच्या पगाराला कात्री लावली आहे. यासंदर्भात न्यायालयाने पतीच्या कंपनी मालकाला आदेश दिले आहेत. पतीच्या पगाराचा हिशोब करताना विभक्त पत्नीच्या पोटगीची रक्कम आधीच कपात करा आणि ती रक्कम थेट विभक्त महिलेच्या खात्यात जमा करा, दर महिन्याच्या पगाराच्या तारखेला विभक्त महिलेच्या खात्यात रक्कम जमा करण्याची खबरदारी घ्या, असे […]

सामना 5 Mar 2026 9:08 pm

माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी जनतेचा व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी, शरद पवार यांचे भावनिक पत्र

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी प्रत्यक्ष जाऊन उमेदवारी अर्ज भरला नाही. त्या ऐवजी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केली प्रक्रिया पूर्ण केली. शरद पवार यांनी निवडणूकीचा अर्ज भरल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून […]

सामना 5 Mar 2026 8:57 pm

Central Railway Block –मध्य रेल्वेवर ठाकुर्ली आणि कल्याण विशेष रात्रीकालीन ब्लॉक, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान कल्याण येथे तिसऱ्या पत्रीपुल आरओबीच्या बांधकामासाठी शुक्रवार आणि रविवारी मध्यरात्री विशेष रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. डोंबिवली आणि कल्याण दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील. शुक्रवारी 6 मार्च रोजी रात्री 11 वाजल्यापासून शनिवारी पहाटे 3 […]

सामना 5 Mar 2026 8:53 pm

जोपर्यंत मुंबईचा वाळवंट होत नाही तोपर्यंत हे सरकार थांबणार नाही, झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

मुंबईत बुधवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. मुंबईचे कमाल तापमान हे 39 अंशावर पोहोचले आहे. तापमानाचा पार 40 अंश पार करू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. एकीकडे मुंबईचे तापमान वाढत असताना सरकारकडून मात्र वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला […]

सामना 5 Mar 2026 8:38 pm

रत्नागिरीच्या सुरेश भातडे याची ‘महाराष्ट्र श्री’स्पर्धेत रौप्य पदकावर मोहोर, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र श्री २०२६’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरेश सत्यवान भातडे याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ६५ किलो वजनी गटात त्याने रौप्य पदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ​तरुण भारत मंडळ, सांगली यांच्या वतीने २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

सामना 5 Mar 2026 8:37 pm

पुणे बाजार समितीत तोलाईमध्ये लाखोंचा झोल, तोलाईची सर्व माहिती गायब; बाजार समितीला पाच टक्के कमिशन

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात तोलाई वसुलीत लाखोंची सेटिंग होत असल्याचे समोर आले आहे. दोन लाखांपासून ते अठरा वीस लाखांपर्यंत थकबाकी असलेली तोलाईमध्ये सेटलमेंट करत त्यापैकी अर्धीच किंवा कमीत कमी रक्कम भरून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एका प्रकरणात वीस लाख रूपयांच्या ठिकाणी साडेअकरा लाख भरून घेतल्याचे समोर आले आहे. तोलाई सेटलमेंटची चर्चा बाजारात होताच […]

सामना 5 Mar 2026 8:36 pm

Ratnagiri News –आयना का बायना घेतल्याशिवाय जाईना! बालगोपाळ मोबाईलची चौकट तोडून जपताहेत परंपरा

उन्हातान्हात गावभर हिंडत राहाणं, गावाच्या उत्सवात सहभाग घेणं या गोष्टी हरवून आता मुलांचे बालपण मोबाईल स्किनच्या चौकटीत अडकून पडलेले असताना रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे बनवाडी येथील बालगोपाळांनी त्यांच्या आज्या-पंज्यानी सुरू केलेली, आई-वडिलांनी अनुभवलेली शिमग्याची परंपरा जपली आहे. ही आजच्या पिढीतील मुलं ढोल वाजवत संकासूर नाचवत शिमगा साजरा करत आहेत. ”आयना का बायना घेतल्याशिवाय जाईंना” म्हणत बालगोपाळांचा […]

सामना 5 Mar 2026 8:24 pm

Sindhudurg News –मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची M2M रो-रो बोटीला धडक; सेवा विस्कळीत

विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवेवर अचानक अडथळा निर्माण झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची एम-टू-एम रो-रो बोटीला धडक लागल्याने बोटीला चार ठिकाणी होल पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज (5 मार्च 2026) मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असलेली ही प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी […]

सामना 5 Mar 2026 8:18 pm

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राज्याचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काही काळ आधीच राज्यपालांनी पद सोडल्याने बंगालच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी […]

सामना 5 Mar 2026 8:12 pm

राज्यात पेट्रोल 500 रुपये लिटर होणार? जाणून घ्या काय आहे सत्य

अमेरिका-इस्रायल व इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल तब्बल 500 रुपये प्रति लिटर होणार असल्याची अफवा गेल्या दोन दिवसांपासून पसरली आहे. त्यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली होती. काहींनी तर पेट्रोल व डिझेल संपत आले असून लवकरच पेट्रोल पंप बंद होतील अशीही अफवा पसरवली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने […]

सामना 5 Mar 2026 8:10 pm

7/11 बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटला, मात्र ‘सिमी’कनेक्शनमुळे शिक्षा कायम; सिद्दीकीला न्यायालयाचा दणका

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष सुटलेल्या एहतशाम सिद्दीकीला न्यायालयाने दणका दिला आहे. बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटला तरी प्रतिबंधित संघटना ‘सिमी’शी संबंधित असल्याच्या आरोपाखाली माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने सिद्दीकीला सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटल्यात सिमीचा सदस्य असल्याच्या आरोपावरुन माझगाव येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 21 ऑक्टोबर 2016 रोजी सिद्दीकीला दोषी ठरवले होते. […]

सामना 5 Mar 2026 7:42 pm

लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, मुलांसमोरच केला आईवर सामूहिक बलात्कार

रात्रीच्या वेळी वाहन मिळत नसल्याने आपल्या सोबत असलेल्या मुलांच्या सुरक्षेसाठी एका महिलेने एका गाडीवाल्याकडून लिफ्ट घेतली. मात्र ही लिफ्ट घेणे तिला खूपच महागात पडले. या महिलेवर सदर कारचालकाने तिच्या मुलांसमोरच त्याच्या मित्राच्या मदतीने बलात्कार केला. ही घटना ओडीशातील केंझार जिल्ह्यातील भागलपूर गावात 20 फेब्रुवारी रोजी घडली. 20 फेब्रुवारीला सदर महिला आपल्या मुलांना घेऊन एका कार्यक्रमासाठी […]

सामना 5 Mar 2026 7:38 pm

Khamenei Death –अखेर ५ दिवसांनी हिंदुस्थानकडून खामेनींच्या निधनावर शोक व्यक्त, परराष्ट्र सचिव इराणच्या दूतावासात; पंतप्रधान मोदींचे अद्यापही मौन

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर हिंदुस्थानच्या भेटीवरून रवाना होणारी इराणची युद्धनौका अमेरिकेच्या पाणबुडीने हिंदी महासागरात उडवून दिली. या घटनेवरही केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. यामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या […]

सामना 5 Mar 2026 7:23 pm

USA-Israel Iran War –मध्य पूर्वेत युद्धाचा भडका अन् क्रिकेटला फटका; वर्ल्ड कपचे 6 सामने रद्द

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. फुटबॉलसह क्रिकेट जगतालाही त्याचा जोरदार फटका बसला आहे. या युद्धामुळे नेपाळमध्ये खेळण्यात येणाऱ्या ICC Men’s Cricket World Cup League 2 चे एकूण सहा सामने थेट रद्द करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ICC Men’s Cricket World Cup League […]

सामना 5 Mar 2026 7:08 pm

पुणे बाजार समितीत माणुसकीचा बळी! रक्त येईपर्यंत मारहाण; 12 तास गुन्हा नाही

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माणुसकीचाच बळी घेतला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राजस्थानातील जोधपूर येथून गाजर विक्रीसाठी आलेल्या वाहनचालकाला रात्री दोनच्या सुमारास बाजारात रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याने सुरक्षा रक्षकांकडे मदतीची याचना केली; मात्र आम्ही काही करू शकत नाही, असे सांगत त्याला वाऱ्यावर सोडण्यात आले. तब्बल 12 तासांनंतर गुन्हा दाखल […]

सामना 5 Mar 2026 7:03 pm

Us Israel Iran War –हार्मुझ सामुद्रधुनी बंद, हिंदुस्थानात 50 दिवसांचा तेल आणि वायूसाठा

आखाती देशांमधील संघर्षामुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या देशात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही. देशात अंदाजे 50 दिवसांचा तेल आणि वायूचा साठा आहे, त्यामुळे जनतेला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. पेट्रोलियम मंत्रालय रशियासह जगातील […]

सामना 5 Mar 2026 6:49 pm

IND Vs ENG –इंग्लंडने नाणेफीकाचा कौल जिंकला, सूर्याची सेना प्रथम फलंदाजी करणार

मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ICC T20 World Cup 2026 ची दुसरी सेमी फायनल खेळली जात आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार असून संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हिंदुस्थान आणि इंग्लंड तिसऱ्यांना सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. यापूर्वी […]

सामना 5 Mar 2026 6:42 pm

…हे तर आर्थिक अपहरण आहे, खंडणी म्हणून भाजपने पूर्ण बिहारच मागितलाय; अखिलेश यादव यांचा टोला

संयुक्त जनता दल पक्षाचे प्रमुख आणि तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी अर्ज भरला. जदयूमधील नेत्यांना व कार्यकर्त्यांना देखील नितीश कुमार यांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. त्यांच्या निर्णयावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोला लगावला आहे. बिहार के इतिहास का सबसे बड़ा अपहरण! […]

सामना 5 Mar 2026 6:33 pm

Photo –शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकर अडकला लग्नबंधनात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सानिया चंडोकसोबत विवाह बंधनात अडकला आहे. हा शाही विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येथे पार पडला

सामना 5 Mar 2026 5:54 pm

अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा; सुप्रिया सुळे यांची मागणी

अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे. या अपघातामागे नेमकी काय कारणे आहेत, याची चर्चा होत आहेत. तसेच या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. या अपघाताच्या चौकशी आणि तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले. अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांच्या अपघाताची […]

सामना 5 Mar 2026 5:36 pm

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव (प्रतिनिधी)- दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल जप्त न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तुळजापूर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. श्रीनिवास रामदास आरदवाड (वय 48) असे या लाचखोर पोलिसाचे नाव असून बुधवारी (दि. 4) तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली. तक्रारदारावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी एएसआय आरदवाड यांनी यापूर्वीच 10 हजार रुपये घेतले होते. मात्र, तरीही त्यांनी गुन्ह्यामध्ये अतिरिक्त कलमे न वाढवण्यासाठी आणि गाडी जप्त न करण्यासाठी तक्रारदाराकडे नव्याने 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. 4 मार्च) पडताळणी केली. यावेळी आरदवाड यांनी तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेचच तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेताना एएसआय आरदवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये 5,300 रुपये रोख, एक विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस आयडी कार्ड आणि इतर साहित्य मिळून आले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या घराची झडती आली आहे. ही यशस्वी कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि धाराशिवचे पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी काम पाहिले, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करत आहेत. या पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी आणि चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 5:34 pm

सर्वानुमते ठराव मंजूर प्रकरणी शहरातील नागरिकांनी संभ्रम निर्माण करून घेवू नये - नगराध्यक्षा संयोगिता गाढवे

भूम (प्रतिनिधी)- दिनांक 2 मार्च रोजी नगर परिषद सभागृह मध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असता या सभेच्या सुरुवातीला नगराध्यक्ष या नात्याने अभय योजने च्या माध्यमातून नळ पट्टी, घरपट्टी कर याच्यावर लावण्यात आलेले कर माफी चा लाभ तुरळक लोकांनीच घेतला असल्याने उर्वरित बहुतांश लोक या लाभापासून वंचीत राहिले आहेत. अश्या नागरिकांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी सर्वानुमते सभागृहात सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परंतु हा प्रस्ताव पाठण्याच्या सूचना देण्यात आले असून याला महाराष्ट्र भागातील नगरपालिकेचा समावेश होतो. या मूळे प्रस्ताव मंजुरी मिळे पर्यंत नागरिकांनी घाई न करता कोणाच्या सोशल मीडियाच्या अथवा आयक्यू बातम्या वर विश्वास न ठेवता नगर परिषद मध्ये चौकशी करून आपला संभ्रम दूर करावा. भूम शहरातील नागरिकांना अभय योजनेचा लाभ मिळावा यासाठीच सर्व नगरसेवकांच्या सर्वानुमते मंजूर झालेले ठरावाला शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या असल्या तरी मी माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनिताताई पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करणार असे पत्रकारांशी संवाद सांगताना गाढवे बोलत होत्या.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 5:33 pm

पेट्रोल @ 3 रुपये प्रतिलिटर! या देशांमध्ये पाण्यापेक्षाही स्वस्त मिळते इंधन

हिंदुस्थानात इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. आपल्या देशात एक लिटर पेट्रोलसाठी 104 रुपये मोजावे लागत असताना आखाती देशांमध्ये मात्र पाण्यापेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल उपलब्ध आहे. हिंदुस्थानात एक लिटर पाण्यासाठी देखील 20 रुपये मोजावे लागतात. मात्र आखाती देशांमध्ये एक लिटर पेट्रोल केवळ 3 रुपयांमध्ये मिळते. इंधनाच्या किमती कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम […]

सामना 5 Mar 2026 5:29 pm

T20 World Cup –ज्या हॉटेलमध्ये राहिले तिथल्याच महिला स्टाफसोबत पाकिस्तानी खेळाडूचे गैरवर्तन, संघाची नाचक्की

ICC T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानचा खेळ निरशाजनक राहिला. हिंदुस्थानविरुद्द खेळण्यावरूच वर्ल्ड कपपूर्वी PCB ने बराच हंगामा केला. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर बरीच टीका झाली. सुपर 8 मध्ये पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. टी20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात आला आहे. याच दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूने हॉटेलमधील […]

सामना 5 Mar 2026 5:27 pm

Photo –ई-चलान प्रणालीचा चुकीचा वापर, मुंबईत आझाद मैदानावर वाहतुकदारांचे आंदोलन

वाहन चालकांना चुकीच्या पद्धतीचे ई-चलान आकारले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने राज्यव्यापी आंदोलन. (सर्व फोटो – रुपेश जाधव) ई-चलान प्रणालीद्वारे वाहनधारकांची नियमबाह्य पद्धतीने लूट सुरू आहे. ई-चलान प्रणालीतील त्रुटी दूर करणे, एकाच गुन्ह्यासाठी वारंवार दंड आकारणे बंद करणे. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवणे. या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत […]

सामना 5 Mar 2026 5:27 pm

कोयत्याने वार करून पत्नीचा खून, पतीला जन्मठेप, २५ हजार दंड

धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दरम्यान,या खटल्यात प्रत्यक्षदर्शी आरोपींच्या मुलींची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय भारत माळी व मयत गोजर यांना तीन मुली होत्या. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी पत्नीला नेहमी मारहाण व त्रास देत होता. चौथे अपत्य नको, असे गोजर हिने सांगितल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. १९ डिसेंबर २०२४ रोजी मयत गोजर हिने बहिणीस सांगितले होते की, घरातील वाद टाळण्यासाठी मी चौथे अपत्य होऊ देण्यास तयार आहे. त्यानंतर ती घरी परतली. त्याच दिवशी दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे भाऊ साक्षीदार शिवराम राम माळी घराजवळून जात असताना मयताच्या मुलींनी त्यांना सांगितले की, “पप्पांनी आईचा गळा दाबून कोयत्याने वार केले.” शिवराम राम माळी यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिले असता गोजर हिच्या गळ्यावर मोठी जखम होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलींनी दिलेल्या साक्षीत सांगितले की, वडिलांनी आधी आईचा गळा दाबला व नंतर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला हलविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाला. प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ४८३/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. गिते यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. मयत महिला व आरोपी यांच्या अल्पवयीन मुली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने व वैद्यकीय अहवाल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यात आले. सर्व पुरावे व अ‍ॅड. महेंद्र बी. देशमुख, जिल्हा सरकारी वकील धाराशिव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी धनंजय भारत माळी याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 5:11 pm

सतर्क आणि शांत राहा, सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा; अबू धाबीतील हिंदुस्थानी दूतावासाच्या मार्गदर्शक सूचना

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी अबू धाबीतील हिंदुस्थानी दूतावासाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि प्रदेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या युएईमध्ये असलेल्या सर्व हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क आणि शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच युएईतील अधिकाऱ्यांच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा आणि वेळोवेळी जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला […]

सामना 5 Mar 2026 5:01 pm

Pandharpur : रंगपंचमीसाठी पंढरपूर बाजारात फॅन्सी पिचकाऱ्यांची रेलचेल

पंढरपुरात रंगपंचमीची धूम पंढरपूर – रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात गारगार पाण्याने रंगपंचमी खेळण्याचा आनंद काही औरच असतो. हा एकमेव सण असा आहे, जो बाल गोपाळांपासून मोठ्यांसह सर्वांना आवडतो. बाल गोपाळांचे आकर्षण म्हणजे पिचकारी. बदलत्या काळानुसार [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:57 pm

शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकर अडकला लग्नबंधनात; सानिया चंडोकसोबत विवाहबद्ध

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सानिया चंडोकसोबत विवाह बंधनात अडकला आहे. . हा शाही विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येथे पार पडला. या लग्नसोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नसोहळ्याला सानियाने लाल रंगाची साडी नेसली होती तर अर्जुनने लाल रंगाची शेरवानी घातली होती. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीत हा विवाहसोहळा पार पडला. […]

सामना 5 Mar 2026 4:52 pm

Solapur Crime : सोलापुरात थट्टा-मस्करीच्या वादातून तरुणाला मारहाण

सोलापुरात लाथाबुक्क्यांनी मारहाण सोलापूर : हुमा मेडिकलसमोरथट्टा-मस्करीच्या वादातून चौघांनी मारहाण केल्याची घटना ३ मार्च रोजी घडली. आसिफ रफिक शेख (रा. दक्षिण सदर बझार) याने सदर बझार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यावरून आरिफ रशीद पठाण, मजहर रशीद पठाण, अतिक रशीद पठाण व [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:49 pm

एसटीत मद्यपानास ‘ शून्य सहनशीलता- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. २५ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली.यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून,असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.सदर चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे.तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे.चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही,यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक,सहाय्यक वाहतूक अधीक्षक,वाहतूक निरीक्षक,सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे.ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक,वाहक आणि विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान,या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.मार्गतपासणी पथक,वाहतूक निरीक्षक,प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.तसेच आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक,चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अतिथ्यगृह परिसरातील स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल,असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:46 pm

भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. रामेश्वर शिवारात बिबट्यासदृश प्राण्याने शेळीला पकडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर आता वारेवडगाव येथे गाईवर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती. ही घटना शेतकरी बाळासाहेब नलवडे यांच्या शेतात घडली असून हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 3 मार्च) सायंकाळी 7 वाजून 10 सेकंदांनी वनविभागाच्या व शेतकऱ्याच्या वतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. भूम शहरा पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वारेवडगाव शिवारात बिबटयाने काल केलेली शिकार परत खायला आला वनविभाग शेतकऱ्यांनी वतीने लावण्यात आलेल्या कमेऱ्यात कैद केला.बाळासाहेब नलवडे यांच्या गाईला लक्ष्य करताना बिबट्या कॅमेऱ्यात दिसून आला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाला तत्काळ कळविण्यात आले. वन अधिकारी कुटे, वनपाल जाधवर व जगताप देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाची टीम कार्यरत झाली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:45 pm

छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिराचा लाभ घ्यावा - देशमुख

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 चे आयोजन करण्यात आले आहे. हे एक दिवशीय अभियान दि.7 मार्च ते 11 मे दरम्यान राबविण्यात येत असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी दि.5 मार्च रोजी केले. धाराशिव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार विशाखा बलकवडे व महादेव शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, या अभियानाअंतर्गत एक दिवशीय सेवेद्वारे जिवंत 7/12 अंतर्गत 7/12 वाचन, सामाजिक अर्थसाह्य योजनांसाठी पात्र लाभार्थ्याची अर्ज स्वीकारणे, मंजूर फेरफार प्रकरणातील 7/12, फेरफार उतारा व खाते उतारा वाटप, डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे, भोगवटदार वर्ग 2 जमिनी भोगवटदार 1 मध्ये परावर्तित करणे, तुकडे बंदी कायदा विरुद्ध दि.15/11/1965 ते 15/11/2014 पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार नियमानुकूल करणे, आकर्षक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. या तारखेला मंडळनिहाय होणार शिबीर केशेगांव 7 मार्च, बेंबळी 11 मार्च, तेर 14 मार्च, करजखेडा 17 मार्च, ढोकी 18 मार्च, येडशी 25 मार्च, अंबेजवळगा 8 एप्रिल, जागजी 10 एप्रिल, पाडोळी 17 एप्रिल धाराशिव ग्रामीण 8 मे आणि धाराशिव शहर 15 मे रोजी शिबिराचे आयोजन होणार आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:43 pm

Solapur News |दुबईत अडकलेल्या सोलापूरकरांसाठी जिल्हा प्रशासनाची संवेदना हरपली

युद्धस्थितीत सोलापूरचे विमा प्रतिनिधी दुबईत अडकले सोलापूर -इराण-इराक युध्दाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक नागरिक आखाती देशात अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाची संवेदना बोथट दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दुबईत सोलापूरातील दहा व्यक्ती सुरक्षित असल्याची माहिती सुरुवातीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडूनदेण्यात आली. [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:42 pm

सर्व धर्म समभाव‌’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

धाराशिव (प्रतिनिधी)- एस एम ग्रुप आयोजित विश्वभूषण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न झाली. मार्गदर्शक शंकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी निखिल मंजुळे, उपाध्यक्षपदी सुमित साबळे तर सचिवपदी खंडू आपुणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीस रोहित जाधव, समीर अरब, गौतम बनसोडे सर, कृष्णा भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. एस एम ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजू महिलांना साडी वाटप, अन्नधान्य वितरण अशा अनेक उपक्रमांचा समावेश असतो. त्याच अनुषंगाने यावर्षी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपचे संस्थापक मार्गदर्शक शंकर माने यांनी बैठकीत दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीदिनी भव्य अन्नदान कार्यक्रम आयोजित केला जाणार असून इंदिरानगर येथून जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच जयंती मिरवणुकीच्या आयोजनासाठी एस एम ग्रुपची कार्यकारिणीही निवडण्यात आली. एस एम ग्रुपची जयंती “सर्व धर्म समभाव” या घोषवाक्याखाली साजरी केली जाते. विशेष म्हणजे दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील युवकांना अध्यक्षपदाची संधी दिली जाते. त्यामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे धाराशिवमधील हे एकमेव मंडळ म्हणून एस एम ग्रुपकडे पाहिले जाते. यंदाही त्याच परंपरेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:39 pm

लक्की जाधव यांच्या विरोधात बंजारा समाजाच्यावतीने निवेदन

धाराशिव (प्रतिनिधी)- बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून लक्की जाधव यांच्या विरोधात बंजारा समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला. यासंदर्भात समाजाच्या वतीने निवेदन देऊन संबंधित वक्तव्याचा निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, लक्की जाधव यांनी अलीकडेच एका व्हिडिओच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती देत हा समाज ‌‘अफगाणिस्तानातून आला‌’ असा बिनबुडाचा दावा केला आहे. हा दावा केवळ तथ्यहीन नसून संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले. बंजारा समाज हा भारतातील अत्यंत प्राचीन, लढाऊ व समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारा समाज असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच व्यापार व सांस्कृतिक विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे समाजाला परकीय ठरवण्याचा प्रयत्न हा समाजाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आणि अपमानास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये ‌‘घुसखोरी‌’ सारखे शब्द वापरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये द्वेष पसरू शकतो, त्यामुळे संबंधितांनी अशा विधानांपासून दूर राहावे, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सचिन राठोड (संजय भाऊ राठोड समर्थक), सरपंच लमान राठोड, ॲड. राज राठोड, विशाल जाधव, डॉ. सुरज चव्हाण, शहाजी चव्हाण, अरुण जाधव, अनिल चव्हाण, राजाराम पवार, अरविंद राठोड, आकाश जाधव, रमेश राठोड यांच्यासह बंजारा समाजातील बांधव उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:38 pm

9 मार्च रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी व आयुष्मान-आभा नोंदणी विशेष शिबिर

धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद,धाराशिवमार्फत जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर,आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिर तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहितीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुदृढ पत्रकारितेला बळ देण्याच्या उद्देशाने हा संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. दि.9 मार्च 2026 रोजी कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे हा कार्यक्रम होणार असून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. समाजाच्या जडणघडणीत आणि शासन-जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पत्रकार नाव नोंदणी सकाळी 10 ते सकाळी 10.30 यादरम्यान करण्यात येईल.शिबिर व कार्यशाळेचे प्रास्ताविक सकाळी 10.30 ते 11 यावेळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष हे करतील. पत्रकारांची आरोग्य तपासणी आयोजित शिबिरात डॉ.विक्रांत राठोड,डॉ.त्वरिता कावळे व रवी चव्हाण हे करतील. आयुष्मान भारत (आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढणे) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजतापर्यंत काढण्यात येईल.पत्रकारांचे हे कार्ड काढण्याची जबाबदारी डॉ.संतोष आहेर व सुजित पडवळ हे पार पाडतील. जिल्हा परिषद,धाराशिवमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम तसेच शासकीय योजना याबाबत माहिती दुपारी 1.00 ते 2 या वेळेत विभाग प्रमुख,जिल्हा परिषद धाराशिव हे देतील.अल्पोहार व समारोप दुपारी 2 ते 2.30 यावेळेत होईल. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात येणार आहे.आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी अद्यावत शिधापत्रिका ऑनलाईन नोंद असणे तसेच आधार कार्ड आवश्यक आहे,असेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहिल्यास ऑन-द-स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पत्रकार सतत धावपळ करत असतात. अनियमित दिनक्रम,प्रवास आणि ताणतणावामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणीसोबतच आरोग्यविमा योजनांची माहिती व नोंदणी सुविधा उपलब्ध करून देणे हा जिल्हा परिषद प्रशासनाचा संवेदनशील आणि दूरदृष्टीचा उपक्रम आहे. या कार्यक्रमामुळे पत्रकारांना केवळ आरोग्य लाभच मिळणार नाही,तर शासकीय योजनांची अचूक व अधिकृत माहिती मिळणार आहे.परिणामी,ती माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होऊन सुदृढ पत्रकार आणि सक्षम समाज या संकल्पनेला या उपक्रमातून निश्चितच बळ मिळणार आहे. तरी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:38 pm

पदवीने मिळणाऱ्या पंखातून तुमचे आकाश निवडा- प्रा.डॉ.व्हि.एम.गुरमे

वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे विज्ञान मंडळाचे बुधवारी दिनांक 4 मार्च रोजी उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ गुरमे व्हि.एम. हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम होते. विज्ञान मंडळाचे संयोजक प्रा.राजाभाऊ बनसोडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये प्रश्न मंजुषा व पोस्टर प्रदर्शन हे उपक्रम राबवण्यात आले. प्रा.डॉ गुरमे व्हि.एम. यांनी बोलतांना सांगितले की, पदवीधर झाल्यामुळे तुम्हाला पंख मिळतात. नंतर तुम्ही तुमचे आकाश निवडा असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थांना दिला. आजच्या युगातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले.आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.तंत्रज्ञान,वैद्यकीय सेवा,शेती,अंतराळ,संवाद व्यवस्था,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगतीची नवी क्षितिजे खुली केली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, कुतूहल आणि शोधक वृत्ती विकसित व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा या उद्देशाने विज्ञान मंडळाचे उदघाटन करण्यात आले आहे.असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की, या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती देणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.ज्यात प्रदर्शने आणि मार्गदर्शनाचा समावेश आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विश्वास चौधरी,सुत्रसंचलन प्रा.डॉ पार्थराज क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रा.डॉ नेताजी देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येनेउपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:37 pm

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक ;नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद

धाराशिव (प्रतिनिधी)- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम,2013 लागू करण्यात आला आहे.या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शासकीय तसेच खाजगी कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी/कर्मचारी कार्यरत असतील, अशा प्रत्येक आस्थापना किंवा कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे.तसेच ज्या कार्यालयांमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील,त्या ठिकाणच्या महिलांना स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अधिनियमाच्या कलम 4(1) नुसार प्रत्येक शासकीय,निमशासकीय कार्यालये, संघटना,महामंडळे,आस्थापना,संस्था, शाखा,शासनाने स्थापन केलेल्या किंवा पूर्ण अथवा अंशतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निधी शासन,स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनीमार्फत प्राप्त करणाऱ्या संस्था,तसेच खाजगी उपक्रम/संस्था, इंटरप्रायजेस,अशासकीय संघटना, सोसायटी,ट्रस्ट,उत्पादक,पुरवठा व विक्री यांसह वाणिज्य,व्यावसायिक,शैक्षणिक, करमणूक,औद्योगिक,आरोग्य तसेच वित्तीय कामकाज पार पाडणाऱ्या सर्व युनिट्समध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य आहे.या कायद्याचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर रुपये 50,000 रुपये इतक्या दंडाची तरतूद अधिनियमात करण्यात आली आहे. तरी सर्व कार्यालये व आस्थापनांनी महिला व बाल विकास विभागाच्या दि.19 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून विहीत नमुन्यातील माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कक्ष क्र.27,तळ मजला,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,धाराशिव येथे सादर करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार व प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:37 pm

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सैनिक स्कूल परीक्षेत यश

वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी येथील दोन विद्यार्थी सैनिक स्कूल परीक्षेत पात्र ठरले आहेत. कुमार सत्यजित सुधीर उंदरे 232 गुण व कुमारी समाधान गवारे 227 गुण घेऊन दोन्ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचे रजिस्टर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सविता भारत मोळवणे व सुनिता रमेश वाकडे,सविता श्रीधर महामुनी,ज्ञानेश्वर नारायण जानगेवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार ही केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज कवडे व उपाध्यक्ष विकास क्षीरसागर यांनीही दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:37 pm

अमेरिकेकडून व्हेनेझुएलाची लूट? 1000 किलो सोने अमेरिकेला पाठवणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर काही आठवड्यांनंतर दोन्ही देशांमध्ये १००० किलो सोन्याचा एक मोठा करार झाला आहे. कथित ड्रग्ज प्रकरणात निकोलस मादुरोच्या अटकेनंतर व्हेनेझुएलातील सत्तेत मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर थेट नियंत्रण मिळवता आले. आता एक मोठा सोने निर्यात करार झाला आहे. अ‍ॅक्सिओसच्या […]

सामना 5 Mar 2026 4:36 pm

सॉफ्टवेअरच्या मुलभूत प्रशिक्षणामुळे माझी निवड- ढोणे

धाराशिव (प्रतिनिधी)- मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वेळीच महत्त्व ओळखून मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊन पदवी मिळविली, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाने दिलेल्या सॉलिडवर्क्स, कॅटिया, सीरिओ यांसारख्या सॉफ्टवेअरच्या मूलभूत प्रशिक्षणामुळे कंपनीत माझी त्वरित निवड झाली आणि आज मी 23 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत आहे. याबद्दल महाविद्यालयाचा मी ऋणी आहे. असे गौरवोद्गार ढोणे यांनी काढले. पुढे बोलताना ढोणे म्हणाले की, सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्लास्टिक मोल्डिंगसारख्या क्षेत्रात डिझाईन सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पदवीबरोबरच कौशल्यावर आधारित सहा ते नऊ महिन्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार महाविद्यालयात इनपुट कोर्सेस व मोफत प्लेसमेंट प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजसह देश-विदेशात संधी उपलब्ध होत आहेत. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते यांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या उज्ज्वल यशाबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, कर्मचारी व आजी माझी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:36 pm

आलियाबाद येथे बंजारा समाजातील पारंपारिक होळी पद्धतीने होळी संपन्न

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजातील पारंपारिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. होळी सण म्हणटले की बंजारा समाजाची एक पारंपारिक पद्धतीने आगळी वेगळी प्रथा आहे. होळी आली की बंजारा बांधव वीस ते पंधरा दिवसांपासून एकत्रित येऊन मंदिरा समोर नाचत,गाणे म्हणत, लेंगी म्हणतात आणि ज्यांच्या घरी लहान मुल जन्माला येते त्याच्या घरी धुंड (बारसा) आयोजित केला जातो. आलियाबाद येथे संदीप धनाजी राठोड यांच्या मुलाचे धुंड (बारसा) करण्यात आला. येथील पाच बंजारा महिला व भाजपचे प्रदेश सदस्य नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, श्रीनिवास पाटील, यांच्या हस्ते हंड्याचे पुजन करण्यात आले. यावेळी बंजारा होळी व धुंड विषयी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी माहिती दिली.यानतंर नाच, गाण्यात मदमस्त होऊन महिला, पुरुषानी लेंगी गीते सादर केले. यावेळी पुरुष मंडळींनी तेथील हंडा काढण्याचा प्रयत्न करतात पण महिलांनी पुरूषांना खुप लाकडाने मारहाण करतात. अशी वेगळी होळी व धुंड बंजारा समाजाची संस्कृती परंपरा आजही चालू आहे. या कार्यक्रमासाठी उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, शिवाजी राठोड, विनायक चव्हाण, पांडुरंग चव्हाण ,नेमिनाथ चव्हाण,डॉ गणेश राठोड, विलास राठोड शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, लक्ष्मण राठोड, दामाजी राठोड,बाबु नाईक,माणिक राठोड, गणेश चव्हाण,सिद्राम पवार, सुभाष चव्हाण, व्यंकट राठोड, हरीदास राठोड, यशवंत राठोड, गणपती राठोड,बाबु जाधव, हरिदास चव्हाण, मोतीराम राठोड,अरूण चव्हाण, बाबुराव चव्हाण, गुरूदेव राठोड ,हरी राठोड यांच्या सह आलियाबाद रामतीर्थ, येथील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:35 pm

चेन्नई-सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी न्याय्य मोबदला द्यावा- डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- चेन्नई-सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. मात्र या जमिनींसाठी जाहीर करण्यात आलेला मोबदला अत्यल्प व अन्यायकारक असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत प्रशासनाने निश्चित केलेले दर समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे. डॉ. पाटील यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामासाठी संपादित होणाऱ्या अनेक जमिनी बागायती स्वरूपाच्या असून त्या ठिकाणी ऊस, फळबागा तसेच इतर कायमस्वरूपी पिके आहेत. मात्र जमिनीचा दर्जा, पिकांची किंमत आणि भविष्यातील उत्पादनक्षमतेचा योग्य विचार न करता मोबदला निश्चित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या खरी किंमतीपेक्षा कमी मोबदला मिळत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच महामार्गामुळे अनेक शेतजमिनी दोन्ही बाजूंनी विभागल्या जाणार असून, त्यामुळे शेती करणे अधिक कठीण होणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सोयींची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य दरासह वाढीव मोबदला देणे, तसेच पुनर्वसन व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. या संदर्भात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदला मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:35 pm

भूम तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास सुरुवात

भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 अंतर्गत भूम तालुक्यात दि. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत विविध मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी दिली. शासनाच्या “जनतेच्या दारी प्रशासन” या संकल्पनेनुसार नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक माणकेश्वर मंडळ 7 मार्च, पाथरूड मंडळ 14 मार्च, वालवड मंडळ 10 एप्रिल, आंबी मंडळ 17 एप्रिल, ईट मंडळ 24 एप्रिल, भूम मंडळ 8 मे, आष्टा मंडळ 15 मे या शिबिरांमध्ये महसूल विभागासह कृषी व इतर संबंधित शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिरात महसूल, कृषी, विविध योजना आदीबाबतच्या समस्येचे समाधान केले जाणार आहे. पत्रकार परिषदेस तहसीलदार जयवंत पाटील यांनी नागरिकांनी आपल्या मंडळासाठी निश्चित केलेल्या तारखेला आयोजित समाधान शिबिरात उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हे अभियान ग्रामीण नागरिकांसाठी प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची व प्रलंबित कामे जलद मार्गी लावण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:34 pm

मुलींच्या आत्मनिर्भरतेसाठी कराटे प्रशिक्षण

भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलींना जिल्हा परिषद धाराशिव मार्फत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत 80 तासांचे कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याची सुरुवात आजपासून करण्यात आली. 7 ब्लॅक बेल्ट करणसिंग कालिदास कंचे हे प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 5 Mar 2026 4:34 pm

Solapur News |उमरगा तालुक्यात जलजीवन मिशनला निधीअभावी अडथळा

उमरग्यात नळ पाणी योजनांची कामे रखडली धाराशिव उमरगा – देशातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत उमरगा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांना सध्या निधीअभावी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळणे हा [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:33 pm

ओमानमध्ये अडकलेल्या ब्रिटीश नागरिकांच्या सुटकेचा प्रयत्न फसला, सरकारने पाठवलेल्या विमानात तांत्रिक बिघाड

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक ब्रिटिश नागरिक ओमानमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने विमान पाठवले. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि वैमानिकांच्या विश्रांतीच्या नियमांमुळे ते रद्द करण्यात आले. ओमानमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या सुटकेचा हा प्रयत्न फसल्याने मस्कत विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. मस्कतमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेण्यासाठी चार्टर्ड विमान आले होते. […]

सामना 5 Mar 2026 4:33 pm

Kupwad News |कुपवाड आंबेवाडी कुष्ठवसाहतीचा अखेर पाणीप्रश्न सुटला

आंबेवाडी कुष्ठवसाहतीतील पाणी संकट संपले कुपवाड – वसाहत आंबेवाडी कुष्ठरोग मिरज येथे हिंदू धर्मशाळा आणि सॅनेटिरियम ट्रस्ट यांनी कुष्ठरुग्ण व कुष्ठपीडित हालाखीच्या परिस्थितीत असणाऱ्यांसाठी पुनर्वसन केले आहे. परंतु, काही समाजकंटकांनी या वसाहतीत पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे तेथील रहिवाशी कुष्ठपिडीतांचे पाण्याविना [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:20 pm

Sangli Crime : लिंकवर क्लिक करताच काही सेकंदात बँक खाते रिकामे

आष्ट्यात माजी नगरसेवक वीर कुदळे यांना ऑनलाइन फसवणूक आष्टा -आष्टा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांना ऑनलाईन अज्ञात भामट्याने तब्बल २ लाख ६७ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. केवळ ८९७ रुपयांच्या व्यवहाराच्या बहाण्याने कुवळे यांचा मोबाईल हॅक करून डी लूट करण्यात आली [...]

तरुण भारत 5 Mar 2026 4:10 pm

सायबर गुन्हेगारांकडून भाजप आमदारालाच गंडा, एटीएस अधिकारी असल्याचे भासवत दीड तासासाठी ‘डिजिटल अटक’

फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या करत आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. लोकप्रतिनिधींही सायबर गुन्हेगारांपासून वाचले नाहीत. अलिकडेच, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये, सायबर गुन्हेगारांनी भाजप आमदार शैलेंद्र प्रताप सिंह यांना ‘डिजिटल अटक’च्या बहाण्याने अडकवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने एटीएस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला आणि एमएलसींना सुमारे दीड तास […]

सामना 5 Mar 2026 3:58 pm

Israel Iran War –हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत इराणची युद्धनौका बुडवली जाते आणि तरीही पंतप्रधान गप्प आहेत, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता हिंदुस्थानच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. श्रीलंका किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने हल्ला करत इराणची युद्धनौका बुडवली. या घटनेनंतर देशात राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाने या घटनेला हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर तीव्र सवाल उपस्थित केले आहेत. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून अवघ्या ४० […]

सामना 5 Mar 2026 3:55 pm

Sangli News |सांगलीत भरधाव रिक्षाची वृद्धाला धडक; गंभीर जखमी

विश्रामबाग बसथांबा परिसरात अपघात सांगली -भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दास धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृध्द गंभीर जखमी झाला. हा अपघात ११ रोजी दुपारी १२ च्या सुमारास सांगली-मिरज रस्त्यावरील विश्रामबाग बसथांबा परिसरात घडली. यामध्ये शंकर कृष्णा हेगडे (रा. न्यू रेल्वे स्टेशन नजीक, [...]

तरुण भारत 5 Mar 2026 3:54 pm

Israel Iran War – पुतिन यांच्याकडून युरोपच्या वर्मावर बोट; एका निर्णयाने जगभरात महागाईचा आगडोंब उसळणार

अमेरिका, इस्रायल- इराण युद्धाने जगभरात तणवाचे वातावरण आहे. तसेच या युद्धाचा परिणाम म्हणून जगावर गंभीर ऊर्जा संकटाचे सावट आहे. या जागतिक तणावादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केल्याने युरोपीय देशांची चिंता वाढली आहे. रशिया लवकरच युरोपला होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवू शकतो, असे पुतिन यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे. त्यांच्या केवळ विधानामुळे […]

सामना 5 Mar 2026 3:48 pm

हे देशी ‘मादुरो मॉडेल’! नितीश कुमार यांच्या निर्णयावर आरजेडीचा टोला

बिहारच्या राजकारणातील मोठी घडामोड देशासमोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी पुष्टी केली की, ते आगामी निवडणुकीत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २०२५ च्या निवडणुकीत पाचवा विजय आणि १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर […]

सामना 5 Mar 2026 3:42 pm

दुबईमध्ये मुलीसोबत अडकली अभिनेत्री लारा दत्ता; भावुक होत म्हणाली, आम्ही खूप घाबरलोय, स्फोटांचा आवाज ऐकू येतोय

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे दुबईला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक कलाकार दुबईत अडकले आहेत. अभिनेत्री लारा दत्ताही मुलीसोबत दुबईत आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप भावुक झाली आहे. लाराने व्हिडिओमध्ये सांगितले की, मुलगी सायरासोबत ती दुबईमध्ये आहे. दुबईत गेल्या 3 वर्षांपासून माझे घर आहे. मी माझा […]

सामना 5 Mar 2026 3:42 pm

Satara News |पैसे देवून कामगारांना गुन्हे अंगावर घ्यायला लावले ; बाजार समितीच्या तीन संचालकांचा आरोप

आटपाडीच्या दिघंची पेट्रोलपंप प्रकरण आटपाडी -आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची पेट्रोलपंप अपहार प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांनी पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले असुन आत्ता नव्याने तीन संचालकांनी केलेल्या आरोपाने चर्चेला उधाण आले पेट्रोलपंप अपहारप्रकरणी कामगारांना पैसे देवून गुन्हे अंगावर घ्यायला लावल्याचा दावा, तीन संचालकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. [...]

तरुण भारत 5 Mar 2026 3:29 pm

Satara News |पाटण तालुक्यातील पाणी प्रकल्पातील अपूर्ण काम; सामाजिक कार्यकर्त्यांचा तीव्र आरोप

पाटणमध्ये पाणी प्रकल्पावर आंदोलन पाटण : जलजीवन मिशन अंतर्गत पाटण तालुक्यात झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या सौ. सलमा शौकत मुल्ला यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी [...]

तरुण भारत 5 Mar 2026 3:17 pm

Satara News |स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा हक्क मिळावा; सातारा नगरपरिषदेतून ठराव करण्याची मागणी

स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार द्या; साताऱ्यात मागणी सातारा : स्वीकृत नगरसेवकांना नगरपालिकेच्या सभेतील कामकाजात मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी सातारा शहर नगरपरिषदेत ठराव करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भात स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात [...]

तरुण भारत 5 Mar 2026 3:08 pm

Amazon च्या रोबोटिक्स विभागातूनही आता होणार कर्मचारी कपात! दोन वर्षात ५७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

आखाती देशात युद्ध पेटले आहे, त्यामुळे जगभरात महागाई वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत जात आहे. अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे. Amazon सारख्या अग्रगण्य कंपनीत गेल्या दोन वर्षात मोठी कर्मचारी कपात सुरू होती. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून आता रोबोटिक्स विभागातून होणार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याची शक्यता आहे. रोबोटिक्स […]

सामना 5 Mar 2026 3:04 pm

Satara News |पाटण पुरवठा विभागाविरोधात महेंद्र चव्हाण यांच आमरण उपोषण

पुरवठा विभागातील त्रुटींविरोधात महेंद्र चव्हाण मैदानात पाटण: पाटण पुरवठा विभागातील कामकाजात पारदर्शकता आणावी व काही प्रशासकीय त्रुटी दूर कराव्यात या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून आंदोलनकर्त्यांनी आपल्या चार प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार, पुरवठा शाखेतील माहिती [...]

तरुण भारत 5 Mar 2026 2:57 pm

Chandrapur News –चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड; वडेट्टीवारांचा धानोरकरांना धक्का

चंद्रपूरमध्ये संधी असतानाही आपापसातील मतभेदांमुळे सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी महासभा बोलावण्यात आली. त्यात एकूण सोळापैकी काँग्रेसच्या वाट्याला सात जागा आल्या असल्या तरी, या सर्व सातही जागांवर विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नेमल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक नाराज झाले आणि महासभेवर […]

सामना 5 Mar 2026 2:52 pm

इचलकरंजीत थरारक घटना |पोलिसांसमोरच सराईत गुन्हेगारावर गोळीबार

सांगली रोडवर भररस्त्यात गोळीबार इचलकरंजी – इचलकरंजी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलिसासोबत निघालेल्या एका सराईत गुन्हेगारावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास घडली. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) हा [...]

तरुण भारत 5 Mar 2026 2:48 pm

BSNL Recruitment 2026 –बीएसएनएलमध्ये 120 वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये 120 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी (एसईटी) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 120 पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी 95 पदे टेलिकॉम स्ट्रीम, तर 25 फायनान्स स्ट्रीममध्ये आहेत. अभियांत्रिकी आणि वित्त […]

सामना 5 Mar 2026 2:41 pm

ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका! टॅरिफचे 16 लाख कोटी परत करण्याचे आदेश

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफबाबत मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. अमेरिकन सरकारला स्वतःच्या धोरणांमुळे अब्जावधी डॉलर्स परतफेड करावे लागू शकतात. याचा थेट परिणाम अमेरिकेचा व्यापार करार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. न्यू यॉर्कमधील संघीय न्यायाधीश रिचर्ड ईटन यांनी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट केले की सरकारने लादलेल्या […]

सामना 5 Mar 2026 2:37 pm

यंदा मुंबई तुंबई होण्याची दाट शक्यता, मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामात 40 टक्क्यांनी कपात

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) पूरप्रवण मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात जवळपास 40 टक्क्यांची कपात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शहरात मोठा पूर टाळण्यासाठी यापेक्षा कमी कामही पुरेसे ठरू शकते, असा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधातील चौकशीदरम्यान कामांच्या अंदाजपत्रकात फुगवटा असल्याच्या आरोपांची तपासणी झाल्यानंतर हा आढावा समोर […]

सामना 5 Mar 2026 2:31 pm

9 तासांची शिफ्ट संपल्याने लोको पायलटने गाडी थांबवली; तब्बल तीन तास प्रवासी ताटकळले

बिहारमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या नियमांनुसार 9 तासांची ड्युटी संपल्याने लोको पायलटने रेल्वेस्थानकातच गाडी थांबवून ठेवली. यामुळे मालडा ते सिलीगुडी जाणारी डेमू ट्रेन तब्बल 3 तास ठाकूरगंज स्थानकावर उभी होती. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मालडा ते सिलीगुडी डेमू ट्रेन बुधवारी दुपारी 2.52 वाजता किशनगंज जिल्ह्यातील ठाकूरगंज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 […]

सामना 5 Mar 2026 2:21 pm

Iran Israel US war –इराणने 24 तासात घेतला बदला; पर्शियन आखातात अमेरिकन टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला

हिंद महासागरातून परतणाऱ्या इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीतून पाणतीर डागले आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली. यामुळे तआखातात युद्धाचा भडका उडाला आहे. या हल्ल्याचा इराणने अवघ्या 24 तासांमध्ये बदला घेतला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) पर्शियन आखातात अमेरिकन टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकन टँकरला भीषण आग लागली आहे. […]

सामना 5 Mar 2026 2:17 pm

Israel Iran War –युद्धामुळे दुबईच्या रिअल इस्टेट सेक्टरवर मंदीचे सावट! अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक धोक्यात

दुबई म्हणजे स्वप्नांचे शहर, जिथे समुद्राच्या लाटांवर आकाशाला भिडणाऱ्या काचेच्या इमारती आणि आलिशान व्हिला सर्वांना आकर्षित करतात. हे सामान्य माणसासाठी एक स्वप्न आहे. तर अतिश्रीमंत आणि बॉलिवूड स्टार्ससाठी दुसरे घर आहे. मात्र, युद्धाच्या सावटाखाली दुबईची चमक कमी होत आहे. अमेरिका, इस्रायल- इराण युद्धामुळे दुबईच्या रिअल इस्टेट बाजाराला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक […]

सामना 5 Mar 2026 2:14 pm

Kolhapur News |ई-चलनचा जाच थांबवा; कोल्हापुरात वाहतूकदारांचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

ई-चलन कराविरोधात कोल्हापुरात वाहतूकदारांचा मोर्चा कोल्हापुर – ई-चलन कर आकारणीच्या विरोधात कोल्हापुरातील वाहतूक संघटनांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या वाहनांच्या रॅलीसह आरटीओ कार्यालयावर धडक देण्यात आली. या भव्य मोर्चामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूकदारांच्या मते, ई-चलनद्वारे होणारी कर आकारणी अन्यायकारक असून [...]

तरुण भारत 5 Mar 2026 1:36 pm

Kasarwadi tradition |कासारवाडीत धुलिवंदन निमित्त रंगला पारंपरिक अस्वलाचा खेळ

कासारवाडीत धुलिवंदनाला पारंपरिक ‘आस्वलाचा खेळ’ उत्साहात टोप /नंदकुमार साळोखे – पूर्वीपासून चालत आलेल्या गावगाडय़ातील परंपरा जपणार गाव म्हणुनकासारवाडीकडे पाहिले जाते.या गावात काेणताहि सण उत्सव असुदे गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन साजरा करतात. त्यापैकिच एक सण म्हणजे हाेळीचा दुसरा दिवस धुलिवंदनअसताे संपूर्णकासारवाडीगावामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत पारंपरिक आस्वलाचा खेळ माेठ्या उत्साहात साजरा [...]

तरुण भारत 5 Mar 2026 1:27 pm

हिंदुस्थानात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झाले दुप्पट, लॅन्सेटची धक्कादायक आकडेवारी

हिंदुस्थानमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) रुग्णसंख्येत गेल्या काही दशकांत मोठी वाढ झाली असून 1990 ते 2023 या कालावधीत ही संख्या दुप्पटपेक्षा अधिक झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. 204 देशांतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला आहे. ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’ (The Lancet Oncology) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन […]

सामना 5 Mar 2026 1:23 pm

Shahuwadi farmer success |कलम केलेल्या वांगी रोपाची लागवड करून केली आधुनिक शेतीकडे वाटचाल 

शाहूवाडीत प्रयोगशील शेतीचा आदर्श शाहूवाडी ( संतोष कुंभार) -जिद्द, चिकाटी, प्रयोगशील वृत्ती आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करून शेतीमध्ये यशस्वी वांगी लागवडीचा प्रयोग केला आहे. येलूर पैकी महाजनवाडी येथील संजय महाजन यांनी आपल्या पाच गुंठे क्षेत्रात कलम केलेल्या वांगी रोपाची लागवड करून शेतकरी [...]

तरुण भारत 5 Mar 2026 1:21 pm

मोठी बातमी- इस्रायलमधील अणू प्रकल्प उद्ध्वस्त करणार! इराणच्या धमकीने सर्वांना धडकी

US Israel Iran War आता अधिक चिघळत चालले आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनी घायाळ झालेला आणि बिथरलेला इराण आता भयंकर धमक्या देऊ लागला आहे. इस्रायल मधील ‘डिमोना’ अणू प्रकल्प उद्ध्वस्त करणार अशी धमकी दिली आहे. इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इस्रायलच्या ‘डिमोना’ (Dimona) या अणू ऊर्जा केंद्राला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर अमेरिका आणि […]

सामना 5 Mar 2026 1:13 pm

Share Market News –युद्धाच्या सावटात बाजाराला दिलासादायक सुरुवात; दुसऱ्या सत्रात दिसली घसरगुंडी

शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी चांगली वाढ दिसून आली आहे. अमेरिका, इस्रायल इराण युद्धाच्या सावटात बाजाराची सकारात्मक सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुसरे सत्र सुरू होताच परत बाजारात घसरगुंडीला सुरुवात झाली. युद्धाची तीव्रता, तेल पुरवठा, सोन्या-चांदीतील चढउतार यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण असून बाजारात गुरुवारी मोठे चढ उतार […]

सामना 5 Mar 2026 12:15 pm

Shahuwadi forest case |शाहुवाडीमध्ये रानडुक्कर शिकारीचा पर्दाफाश; सात जणांना अटक

होळीच्या रात्री वनविभागाची कारवाई शाहुवाडी- मलकापुर वनपरिक्षेत्रामध्ये होळीनिम्मित्त वनविभाचे अधिकारी व वन कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना पेरीड येथील आंबे तळे शेत या ठिकाणी रानडुक्करांची शिकार करुन त्याला नेत अलताना कडवी नदीशेजारी घोटमळा येथे पाठलाग करुन सात संशयिताना मुद्देमालासह पकडण्यात आले. बुधवारी त्यांना शाहुवाडीचे प्रथमवर्ग [...]

तरुण भारत 5 Mar 2026 12:10 pm

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची दंतकथा होती आणि ती आता संपली, संजय राऊत यांचे विधान

ऊद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शरद पवारांचे जे राजकारणातील आणि समाजकारणातील स्थान आहे, त्याच्यामुळे राज्यसभेची जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीरकणाची दंतकथा होती आणि ती आता संपली आहे असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईत […]

सामना 5 Mar 2026 11:54 am

Iran Israel US war – 10 पैकी 15 गुण…आम्ही अत्यंत मजबूत स्थितीत; अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले कौतुक

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या सहा दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने क्षेपणास्त्र, ड्रोनच्या मदतीने हल्ले केले आहेत. अशातच आता अमेरिकेचे नौदलही सक्रिय झाले असून इराणच्या नौदलावर प्रचंड प्रहार करत आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक करत 10 पैकी 15 गुण दिले आहेत. ते बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये […]

सामना 5 Mar 2026 11:47 am

जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे धावू नये, संजय राऊत यांचा सल्ला

नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवावं आणि बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे धावू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना […]

सामना 5 Mar 2026 11:43 am

बांद्यात भाजपच्या वतीने अंगणवाड्यांची पाहणी

प्रतिनिधी बांदा बांदा परिसरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाड्यांची पाहणी करण्यात आली. आळवाडा, पानवळ तसेच जुनी ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाड्यांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी अंगणवाडी सेविका व पालकांशी संवाद साधत आवश्यक सुविधा, साहित्याची कमतरता आणि मुलांच्या [...]

तरुण भारत 5 Mar 2026 11:33 am

बिहारमधील नितीशराज संपुष्टात…‘ती’इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याचा निर्णय

जनता दल (यु) पक्षाचे प्रमुख आणि तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्यास सज्ज झाले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन आपण राज्यसभेची जागा लढवणार असल्याचे नितीश कुमार यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवर जाण्यामागे आपली एक इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाणार […]

सामना 5 Mar 2026 11:23 am

महिला दिनानिमित्त बांद्यात उखाणा स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी बांदा महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक सकाळ व बांदा महिला मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहर मर्यादित खुली उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी – बांदा येथे पार पडणार आहे.महिला दिनानिमित्त मराठी संस्कृतीची परंपरा जपण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना [...]

तरुण भारत 5 Mar 2026 11:13 am

Israel Iran War – हिंदुस्थानातून 180 हवाई उड्डाणे रद्द; मार्गदर्शक सूचना जारी

अमेरिका, इस्रायल इराणमधील युद्धामुळे सुरक्षेसाठी आखाती देशासह अनेक देशांनी आपल्या हवाई सीमा उड्डाणांसाठी बंद केल्या आहेत. आखाती देशांनी हवाई सीमा बंद केल्याचा परिणाम सर्वच देशांवर झाला आहे. अनेक देशातील हवाई प्रवास रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. हिंदुस्थानातूनही १८० हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली असून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अनेक […]

सामना 5 Mar 2026 11:09 am

इन्सुलीत साटम महाराज पुण्यतिथी निमित्त आज विविध कार्यक्रम

प्रतिनिधी बांदा दाणोलीचे योगी परमपूज्य सद्गुरु श्री समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा गुरुवार, दिनांक ०५ मार्च रोजी इन्सुली येथील श्री साटम महाराज मठ, कै. रमेश नाटेकर यांच्या घराजवळ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.​पुण्यतिथी [...]

तरुण भारत 5 Mar 2026 11:05 am

एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना झटका, 1 एप्रिलपासून एटीएममधून कॅश काढल्यावर द्यावा लागणार चार्ज

खासगी सरकारी बँक एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एटीएममधून यूपीआयचा वापर करून पैसे काढल्यास आता ग्राहकांना चार्ज द्यावा लागणार आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार आहे. बँकेने म्हटले की, जर कोणताही ग्राहक एटीएममधून यूपीआयचा वापर करून कॅश काढत असेल तर बँकेच्या मंथली फ्री एटीएम देवाण-घेवाणीमध्ये हा व्यवहार मोजला जाईल. फ्री […]

सामना 5 Mar 2026 11:00 am

दुसरा कोणताही पर्याय नव्हता…ट्रम्प-बायडेन यांच्या हत्येसाठी इराणी गुप्तहेरांनी सुपारी दिल्याचा माजी बँक अधिकाऱ्याचा दावा

मध्यपूर्वेमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणचा नायनाट करण्याचा विडा उचलला असून तुफान बॉम्ब हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावू लागले आहे. अशातच अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी आली आहे. अमेरिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. यासाठी इराणी गुप्तहेरांनी पाकिस्तानी नागरिकाला सुपारी दिल्याचे […]

सामना 5 Mar 2026 10:57 am