8 वर्षीय गुरनूर कौर जेकेमधील सर्वात तरुण तायक्वाँदो ब्लॅक ब्लेटधारक
वृत्तसंस्था, पूंछ आठ वर्षांच्या गुरनूर कौरने संपूर्ण जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील सर्वात तरुण तायक्वाँदो ब्लॅक बेल्टधारक बनल्यानंतर आनंद व्यक्त केला. तिच्या क्रीडा प्रवासातील हा एक उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. या यशाबद्दल आपला आनंद व्यक्त करताना गुरनूर म्हणाली की, या सन्मानामुळे तिला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि समर्पणाला [...]
भाजपची खर्गे यांच्याविरोधात तक्रार
पंतप्रधान मोदी यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, ही टिप्पणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. ही टिप्पणी त्यांनी म्ंगळवारी विधानभा निवडणूक प्रचाराच्या संबंधात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली होती. या टिप्पणीवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आता या पक्षाने केंद्रीय [...]
तामिळनाडूत बस अन् टँकरची टक्कर, 20 जखमी
कोइम्बतूर : तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टीनजकी राष्ट्रीय महामार्गावर बस दुर्घटना घडली आहे. कोइम्बतूर येथून नागरकोइलच्या दिशेने जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेट मिक्सर टँकरला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसचा पुढील हिस्सा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. बसचालकासमवेत सुमारे 20 जण यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
खड्ड्यात रोप, कॅमेर्यात चेहरा; बीडच्या वृक्षलागवड मोहिमेचा पर्दाफाश
पावसाळा सुरू झाला की, जनतेच्या पैशावर बीड जिल्ह्यात ग्रीन ड्रामा रंगत असतो. लाखो झाडे लावल्याचे दावे वृक्ष लागवडीच्या मोहिमा, मग वृक्ष लागवड करतानाचे फोटो सेशन हा तमाशा महिनाभर सुरू असतो. एकदा काय उन्हाळा सुरू झाला की खड्डे रिकामे, रिपोर्ट फुल, मृत झाडांची रांग, अखेर काय तर खड्ड्यात रोप आणि कॅमेर्यात चेहरा ही स्टंटबाजी आणि फोटोबाजीचा […]
उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेने २ कारला आग लागून ११ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ड्रमंडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडका घुमान वळणाजवळ एका भरधाव ट्रकने दोन कारना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारनी पेट घेतला आणि त्यामधील ९ प्रवासी जिवंत जळाले. या भीषण दुर्घटनेत ट्रक चालक आणि क्लिनरसह एकूण ११ जणांचा […]
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण, आरोपी विष्णू चाटेचा पॉवर ऑफ अॅटर्नीसाठी अर्ज
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे याने आर्थिक व इतर व्यवहारासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी कोणाला तरी देण्यात यावी असा अर्ज न्यायालयामध्ये सादर केला. या अर्जावर पुढच्या सुनावणीत सरकारी वकील आक्षेप मांडणार आहेत. स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. विशेष मकोका न्यायालयामध्ये […]
उच्च न्यायालयाचा के. चंद्रशेखर राव यांना दिलासा
वृत्तसंस्था/ हैदराबाद तेलंगणा उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि माजी मंत्री टी. हरिश राव यांना मोठा दिलासा दिला आहे. कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या अहवालाच्या आधारावर केसीआर आणि टी. हरिश राव तसेच दोन अन्य याचिकाकर्त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यापासून राज्य सरकारला रोखले आहे. संबंधित आयोगाने अधिनियमाच्या अंतर्गत [...]
पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण
मुस्लीम युवकाशी बळजबरीने करविला विवाह वृत्तसंस्था/ कराची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि विवाहाचे प्रकरण उघडकीस आले आहे. अल्पसंख्याक अधिकार संघटना व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीने या प्रकरणाची निंदा केली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरून गंभीर चिंता व्यक्त करत संघटनेने हिंदू मुलींसोबत सातत्याने अशाप्रकारच्या घटना होत असल्याचा आरोप केला आहे. इयत्ता 9 [...]
शाळेत स्मार्टफोन नेण्यावर आता बंदी! ‘या’देशातील सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर
इंग्लंडमधील शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापराबाबत सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत केवळ सूचना म्हणून लागू असलेले नियम आता कायद्याच्या स्वरूपात आणले जाणार आहेत. मुलांचे हित आणि शिक्षणाचे वातावरण अधिक चांगले करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या प्रस्तावानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवणे […]
लोटे औद्योगिक वसाहतीत पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांना विषबाधा
खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ही घटना काल बुधवारी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेला सुप्रिया लाईफ सायन्सेसचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत असून या रासायनिक पाण्यामुळे लोटे परिसरातील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे आढळून येत असल्याने […]
IPL 2026 –वानखेडेवर ‘थाला’चा कडक सराव! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत कमबॅक करण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन कट्टर संघात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला मुकलेला चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याने वानखेडे मैदानावर जोरदार सराव सुरू केला आहे. त्यामुळे तो मुंबईविरुद्ध खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धोनीचा ‘विंटेज’ अवतार 44 वर्षांचा […]
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘गोरी’ (Gori) नावाच्या सौंदर्य प्रसाधनावर बंदी घालत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिसरातून या क्रीमचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, क्रीमच्या बॉक्सवर Made in Pakistan” असा उल्लेख आढळला आहे. तपासणीत या क्रीममध्ये पाऱ्याचे (Mercury) प्रमाण अत्याधिक असल्याचे समोर आले आहे. त्वचेद्वारे पारा शरीरात गेल्यास […]
अमित शहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री आणि महिलांचा अपमान केला, अभिषेक बॅनर्जी यांचा आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपमान केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी बुधवारी केला आहे. शहा यांचे हे वागणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘पीटीआय’ने (PTI) याबाबतचे वृत्त दिले आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील जयनगर येथे एका निवडणूक सभेला […]
वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उलटली; अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
लग्नाला चाललेल्या वऱ्हाड्याची पिकअप व्हॅन उलटल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गिरनारा गावातील रहिवासी असलेले 30 जण बुधवारी सायंकाळी लग्न समारंभासाठी पिकअप व्हॅनने जात होते. पिकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते. […]
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी या राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेट वस्तू, अमली पदार्थ, मद्याचा साठा आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १००० कोटींहून अधिक किमतीच्या वस्तू आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. ‘पीटीआय’ने […]
हिंदुस्थानला येणारे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ने पुन्हा इराणला नेले
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुझमध्ये बुधवारी दोन जहाजांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही जहाजे जप्त करून इराणमध्ये नेण्यात आली. हल्ला केलेल्या जहाजांपैकी एक जहाज हिंदुस्थानात येत होते. इराणच्या सरकारी मीडियानुसार, एमएससी फ्रान्सिस्का आणि एपामिनोड्स अशी जहाजांची ओळख पटली आहे. एमएससी फ्रान्सिस्कावर पनामाचा ध्वज आहे, तर एपामिनोड्सवर लायबेरियाचा ध्वज आहे. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, एपामिनोड्स हे जहाज दुबईहून […]
गुजरातमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेची नोंद
गुजरातच्या काही भागांमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ नोंदवली गेली. सायंकाळी ४:३५ च्या सुमारास आलेल्या या भूकंपामुळे आनंद आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आनंदच्या ईशान्येस सुमारे ३६ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मध्य गुजरातमध्ये झालेल्या सौम्य भूकंपामुळे लोकांमध्ये […]
मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप
उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर न्हावेली /वार्ताहर कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.वेळेचा प्रचंड अपव्यय रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर [...]
मुरुम (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायत्ता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी संशोधन नियोजन समितीच्या धाराशिव जिल्हा समन्वयक व छत्रपती संभाजीनगर विभागाचा विभागीय प्रतिनिधी म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा प्रसाद मम्माळे या विद्यार्थ्यांची निवड करिअर कट्ट्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील करियर कट्टा नियोजन समिती च्या मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी यशस्वीरित्या राबवला जातो. या करीअर कट्ट्यांतर्गत कु.आणिशा सुरवसे हीची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली होती तर गणेश मोरे हा सध्या टेक्निकल इंटर प्रमुख म्हणून राज्य पातळीवर काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील शैक्षणिक वर्षासाठी श्री. प्रसाद मम्माळे याची निवड करण्यात आलेली आहे. तो यावर्षी बी.ए.द्वितीय वर्षात शिकत असून करिअर कट्ट्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी सत्कार करून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन करिअर कट्टा हा उपक्रम इतर महाविद्यालयांमध्येही प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. चंद्रसेन करे, प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले व करिअर कट्ट्यातील विद्यार्थी कु.दिशा सुरवसे, कु.योगेश्वरी मारकड,इनामदार सैफ, सुशील सूर्यवंशी, गणेश मोरे, कु.पूजा हांडे आणि प्रियंका इंगळे उपस्थित होते.
रस्त्याच्या दूरवस्थेवरून मतदारराजाची बॅनरमधून खरमरीत टीका
तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे रस्त्यावरून सावनधानतेचा इशारा वार्ताहर/कुडाळ कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस-आंदूर्ले पंचक्रोशीतील गावांना जोडणारा तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच वाहनधारकांना सावधतेचा इशारा करण्यासाठी रस्त्याच्या नजीक अज्ञातांकडून “सावधान” असा बॅनर लावण्यात आला. बॅनरवरमधील मजकुराने प्रशासन व लोकप्रतिनिधींवर असलेल्या नाराजीवर स्पष्ट प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून [...]
आमदार पाटील यांनी ॲड.अनिल काळे यांची भेट घेत केले सांत्वन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या मातोश्री कै. सुभद्राबाई काळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद बातमीने काळे परिवारावर शोककळा पसरली असून, या कठीण काळात तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केमवाडी येथे काळे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. दिनांक 13 मार्च 2026 रोजी कै. सुभद्राबाई काळे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या भेटीदरम्यान काळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “सुभद्राबाईंचे जाणे हे कुटुंबासाठी न भरून येणारे नुकसान आहे,“ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सांत्वन भेटीच्या प्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत सभापती विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, बाबासाहेब काशिद, अरुण खोत, बालाजी काळे, रवि काळे, श्रीकांत धावणे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच काळे परिवारावर ओढवलेल्या या संकटात सहभागी होत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार वैद्य परिवार, पु.वि. लोकराज्य व दैनिक भास्कर यांनी पण काळे यांच्या दुखात सहभागी होवून सांत्वन केले.
मोबाईलशिवाय वाचन लिखान संस्कृती विकसित करण्याचा भोसले हायस्कूलमध्ये शिवाई प्रतिष्ठानाचा अनोखा उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शिवाई प्रतिष्ठान यांच्यावतीने श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.स्क्रीनकडून वाचन लिखान संस्कृतीकडे. या उपक्रमांतर्गत शिवाई प्रतिष्ठान धाराशिवच्या महिलांनी एकत्रित येऊन श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील 120 विद्यार्थ्यांनां छोट्या वह्ंयाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना सुट्टी मध्ये वाचण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप केले. श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या ग्रंथालयातून करण्यात आले. इ 5 वी ते पुढील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोष्टींची व अभ्यासात्मक पुस्तके वाचतील आणि आपण काय वाचलं कोणतं पुस्तक वाचले या संदर्भामध्ये त्या त्या वेळी वही मध्ये थोडक्यामध्ये नोंद करून ठेवतील. हा उपक्रम एकाच वेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याचे समाधान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका माजी प्राचार्या डॉ. सुलभा देशमुख , अध्यक्षा शोभा घोडके, सचिव डॉ.विद्या देशमुख, उपाध्यक्षा डॉ. स्मिता कोल्हे, सहसचिव अस्मिता देशमुख, माधुरी कोकाटे, आशा पाटील, जयश्री भोसले आदि मान्यगण सदस्या उपस्थित होते. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर डॉ. सुलभा देशमुख यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपण जर वाचनाची सवय ठेवली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आपण अनेकांचे जीवन समजून घेऊ शकतो. सुसंस्कृत जीवन घडवण्यासाठी वाचनाचा नक्कीच फायदा होतो असे सांगितले. विविध माध्यमांच्या आपल्या वरती होत असलेल्या आक्रमणामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे . त्या दृष्टीने हा अनोखा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे सर्व शिक्षकांनी बोलून दाखवले. शालेय विद्यार्थ्यांनी पण खूप आवडीने वाचनासाठी पुस्तक घेतली. आणि भरपूर पुस्तकं सुट्टी मध्ये वाचणार आणि बक्षी से मिळवणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. या उपक्रमा प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम 8 वी पर्यवेक्षक कुमार निकम शिक्षकशिक्षिका वृंद उपस्थित होते.
गणेश नगर येथे सीएनजी पंपाचे भूमिपूजन बापूराव पाटील यांच्या हस्ते...
मुरूम (प्रतिनिधी)- पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि वाहनधारकांची सोय करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्त आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेश नगर, ता. उमरगा येथे रविवारी (ता. १९) रोजी नूतन सीएनजी पंपाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सीएनजी पंपाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि कुदळ मारून करण्यात आले. यावेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक गणेश अंबर, अमर भोसले, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी, धनराज मंगरुळे, रशीद शेख, गोविंद पाटील, बसवराज पाटील, उल्हास घुरघुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. हा पंप केवळ एक व्यवसाय नसून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. पर्यावरणापूरक पाऊल, वाहनधारकांना दिलासा, सीएनजीमुळे प्रदूषणात घट, नागरिकांना स्वस्त इंधन उपलब्ध होईल. या पंपाच्या सुविधेमुळे आता स्थानिक वाहनधारकांना इंधनासाठी लांबवर जाण्याची गरज भासणार नाही. या परिसरातील नागरिकांनी या नवीन सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मुरूम, (प्रतिनिधी)- फार्मसी हे क्षेत्र आरोग्याशी संबंधित असून अत्यंत जबाबदारीचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून न थांबता, सतत नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडून राहावे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा ही मूल्ये जपल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सांस्कृतिक सभागृहात आकर्षक सजावट आणि फलक लावून शनिवारी (ता. १८) रोजी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे होते. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलाकर मोटे, प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. वैष्णवी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील शिक्षक, शिस्त आणि मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच उत्तम माणूस व्हा, असा संदेश दिला. कठोर परिश्रमच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. रवींद्र आळंगे यांनी व्यक्त केले. अध्यक्ष समारोपप्रसंगी डॉ. होगाडे म्हणाले की, उद्या तुम्ही मोठे संशोधक व्हाल, यशस्वी उद्योजक व्हाल किंवा नावाजलेले फार्मसिस्ट व्हाल, तेव्हा तुमच्या यशात या महाविद्यालयाचा सहभाग असेल याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. महाविद्यालय तुमच्याकरिता नेहमी उघडे असेल. शेवटी इतकेच म्हणेन की, तुमची जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही यशाचे शिखर गाठावे. तुमच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. प्रा. हर्षद बदोले, डॉ. राजकुमार देवशेट्टे, मल्लिकार्जुन स्वामी, किशोर कारभारी, बालाजी शेळके, प्रतिभा शेळके आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियंका काजळे यांनी केले. सूत्रसंचालन हुमा लोणी तर आभार प्रा. विनंती बसवंतबागडे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
दोडामार्गात २४ पासून मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे आयोजन सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर येत्या 24 ते 28 एप्रिलला दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सकाळी ७.३० ते १० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात परंपरा, धैर्य ,संस्कार याविषयी मार्गदर्शन होणार [...]
पुढील काळात भारत हा रोटरीचे आशास्थान- सुधीर लातुरे
धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब धाराशिव येथे जिल्हा राज्यपाल सुधीर लातूरे यांचा अधिकृत दौरा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान शिक्षण, सार्वजनिक प्रतिमा, समाजसेवा व रोटरीच्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला. दौऱ्याची सुरुवात धाराशिव येथील ए. पी. प्राथमिक शाळा येथे भेट देऊन करण्यात आली. सदर शाळा रोटरी क्लब धाराशिवने Happy School म्हणून दत्तक घेतली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणी, शैक्षणिक साहित्य वितरण, स्वच्छता व गुणवत्तावृद्धी अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा राज्यपालांनी शाळेतील सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व क्लबच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यानंतर धुळेसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोटरी क्लब धाराशिवतर्फे उभारण्यात आलेल्या रोटरी ब्रँडिंग बोर्डाचे उद्घाटन जिल्हा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे रोटरीच्या सेवाभावी कार्याची व्यापक ओळख समाजापर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे वसुदेव वस्ती, उंबरे कोठा (धाराशिव) येथील पलावरची शाळा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना व्यवसाय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती, पत्रकार बंधू-भगिनी तसेच नव्याने रोटरी परिवारात सहभागी झालेल्या सदस्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुधीर लातूरे यांनी रोटरीचा मूलमंत्र “Service Above Self” अधोरेखित करत, निःस्वार्थ सेवाभावातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. त्यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत आगामी काळात अधिक व्यापक व परिणामकारक प्रकल्प राबवण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये डिस्ट्रिक्ट तर्फे दिला जाणारा आत्मनिर्भर पुरस्कार युवा उद्योजक अनिल सावंत व डिस्ट्रिक्ट तर्फे रोटरी सुरक्षा पुरस्कार हा अपंगत्व असलेल्या योगदानाबद्दल मयूर काकडे यांना देण्यात आला. तसेच समाजातील विविध लोकांना वोकेशनल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले या मध्ये पांडुरंग घोडके, पोपट कसबे आशा कार्यकर्त्या सिमा थोरात,बेलुरे, यांचा समावेश होतो. कार्यक्रमादरम्यान क्लब अध्यक्ष रोटे. रणजीत रांदिवे यांनी अध्यक्षीय भाषणातून क्लबच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मांडला, तर सचिव रोटे. प्रदीप खमकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमास फर्स्ट लेडी रोटे. संगीता सुधीर लातुरे मॅडम, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटे. टापडिया, असिस्टंट गव्हर्नर डॉ. गिरीश कुलकर्णी व सौ. कुलकर्णी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्लबचे सर्व संचालक मंडळ, सदस्य व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दौरा रोटरी क्लब धाराशिवसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे रोटरीची सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बॅंकांच्या कर्ज व्यवहारांत केल्या जाणाऱ्या ‘वन टाईम सेटलमेंट’बाबत (ओटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ओटीएस प्रस्ताव स्वीकारण्यासाठी किंवा नवीन प्रस्ताव देण्यासाठी कोणत्याही बँकेवर सक्ती केली जाऊ शकत नाही. एकदा बँकेने कायदेशीररित्या मालमत्तेचा लिलाव करून आपली थकबाकी वसूल केली आणि खाते ‘पूर्ण फिट’ झाले तर, त्यानंतर जुन्या ओटीएस प्रस्तावावर चर्चा करणे कायदेशीररित्या चुकीचे आहे, […]
भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे. यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी आणि मगच महिला आक्षणावर बोलावे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून […]
Satara News |सातारा आरटीओचा महसूल वसुलीत धडाका; एका वर्षात तब्बल २०८ कोटींचा टप्पा पार!
सातारा RTOचा महसूल वसुलीत मोठा विक्रम गोडोली -सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच कराड, फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी विविध योजनांच्या माध्यमातून उत्पन्न बाढीचा धडाका सुरु ठेवला असून महसूल बाढीत अब्बल कामगिरी केली आहे. नवीन वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक, परवाना शुल्क, दंडात्मक कारवाई आदी [...]
2023 ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधायक लागू करा- खासदार डॉ. काळगे
धाराशिव (प्रतिनिधी)- 2023 ला लोकसभेत व राज्यसभेत बहुमताने 33 टक्के महिला आरक्षण विधायक मंजूर झाले आहे. त्याप्रमाणे 33 टक्के आरक्षण भाजप सरकारने लागू न करता स्वतःची सत्ता परत येण्यासाठी नारी शक्ती वंदनीय विधायकच्या आतून मतदार संघ पुर्नरचना कार्यक्रम राबविण्याचा डावा भाजप सरकारचा होता. त्यामुळे इंडिया आघाडीने नारी शक्ती वंदनीय विधायकाच्या विरोधात मतदान केले. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बुधवार दि. 22 एप्रिल रोजी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. स्मिता शहापूरकर, राजाभाऊ शेरखाने, उमेश राजेनिंबाळकर, महेबुब पटेल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार डॉ. काळगे यांनी काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला आरक्षणाच्याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे देश स्वतंत्र पुर्व काळात काँग्रेसचे अध्यक्ष महिला होती. देश स्वातंत्र्यानंतरही महिला विषयी सन्मानाची भूमिका काँग्रेसची होती. या उलट भाजपचे धोरण आहे. लोकसभेमध्ये सध्या काँग्रेसच्या महिला खासदार 14 टक्के आहेत. तर भाजपाच्या 13 टक्के महिला खासदार आहेत. दक्षिण भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. तर उत्तर भारतात लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. लोकसंख्येवर आधारीत उत्तर भारतात जास्त लोकसभा मतदारसंघ तयार होतात. तर दक्षिण भारतात मात्र कमी लोकसभा मतदारसंघ तयार होतात. आगामी 2029 लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने या नारी शक्ती वंदनीय विधायकाच्या माध्यमातून करण्याचे ठरविले होते. त्यामुळेच त्यांना अपयश आले आहे. 1990 लाख पी. व्ही. नरसिंगराव पंतप्रधान असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिले होते. परंतु त्यावेळेस भाजपने त्या विरोध केला. त्यानंतर घटना दुरूस्ती करून तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंह राव यांनी महिलांना आरक्षण दिले होते. त्यामुळे भाजपने नारी शक्तीच्या नावाने चालू केलेले रडगाणे बंद करावे. असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. यावेळी डॉ. स्मिता शहापूरकर यांनी भाजप व आरएसएस यांच्यावर कडाडून टिका केली.
विधान परिषदेवर ॲड. व्यंकटराव गुंड यांना संधी द्यावी- जनतेची अपेक्षा
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि. 12 मे) धाराशिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे. पाडोळी (आ.) या गावातून उभा राहिलेला गुंड परिवार गेल्या चार दशकांपासून सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले ॲड. गुंड यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांसारख्या संघटनांमध्येही सक्रिय काम केले आहे. ते प्रथम व द्वितीय वर्ग शिक्षित स्वयंसेवक असून, 1977 साली पुणे येथे प्रथम वर्ग तर 1984 साली नाशिक येथील केटिएचएम महाविद्यालयात द्वितीय वर्ग स्वयंसेवक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गुंड कुटुंबाची राजकीय परंपरा देखील उल्लेखनीय आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी अनेक वर्षे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनीही सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व सहकारी संस्थांमध्ये विविध पदांवर काम करत विकासकामांना चालना दिली आहे. स्वतः ॲड. व्यंकटराव गुंड यांनीही सरपंच तसेच गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशक पदावर कार्य करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे. औद्योगिक क्षेत्रात त्यांनी उभारलेला रूपामाता उद्योग समूह आज परिसरातील शेतकरी, कामगार व बेरोजगारांसाठी आधारवड ठरत आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे मानले जाते.धाराशिव लोकसभा मतदारसंघात ॲड. गुंड यांचा मोठा जनसंपर्क असून, स्थानिक पातळीवर त्यांची मजबूत पकड आहे. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि दीर्घ अनुभव लक्षात घेता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात यावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त “ग्रंथालय व व्यवस्थापन” पुस्तकाचे प्रकाशन
भुम (प्रतिनिधी)- 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हारी महामुनी लिखित “ग्रंथालय व व्यवस्थापन” या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे सहसचिव तथा शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. रामेश्वर सौंळके, मराठी विभाग प्रमुख गंगाधर काळे, शारीरिक शिक्षक महेश सूर्यवंशी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल रणजीत बोराडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रंथालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील या पुस्तकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. हारी महामुनी यांच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Bengal SIR –२७ लाख अपीलांपैकी ५०० मंजूर, केवळ १३७ जणांनाच मिळणार मतदानाचा अधिकार
पश्चिम बंगालमधील एसआयआर संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रिब्युनलकडे आलेल्या तब्बल २७ लाख अपीलांपैकी केवळ ५०० अपीलांना मंजुरी देण्यात आली आहे. टीव्ही९ भारतवर्षने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, या ५०० प्रकरणांच्या सुनावणीनंतर पुरवणी मतदार यादीत केवळ १३७ नवीन मतदारांची नावे जोडली गेली असून, आता फक्त हेच १३७ मतदार […]
इंजिनिअरिंग कॉलेजसमोर अज्ञात मृतदेह सापडला; तुळजापूरात खळबळ
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील शहरात मंगळवारी (दि. 21) धक्कादायक घटना समोर आली. शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील हनुमान नगर परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मृतदेह 20 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्यांचा शर्ट असून तो अंडरपॅन्टवरच असल्याचे दिसून आले. मात्र, मृतदेहाजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे किंवा वस्तू आढळून आलेली नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे की घातपातातून झाला आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मेन रोडवरील उमाकांत जगधने यांच्या मालकीच्या ‘श्रद्धा बॅग’ दुकानावर 21 तारखेच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत शटर फोडून सुमारे 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील इतर अनेक दुकानांच्या शटरचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याचा अंदाज येत असून व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, हाणामाऱ्या, व्यसनाधीनता व छेडछाडीच्या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “रात्रगस्त अपुरी आहे, पोलिसांचा धाक उरलेला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, कळंब पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुन्हे नियंत्रणावर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे. रिक्त पदे तातडीने भरून पोलीस यंत्रणा सक्षम करावी, तसेच शहरात रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. मात्र, वाढत्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
पशु प्रदर्शनात पशुधनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, धाराशिव, पंचायत समिती, धाराशिव,तेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पशुप्रदर्शन व संकरीत वासरांचा मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पशुसंवर्धन प्रदर्शनात संकरीत वासरे गटात प्रथम गुंडा थोडसरे (तेर), देशी बैल गटात प्रथम गुंडा थोडसरे (तेर), संकरित गाय गटात प्रथम विजय बारकुल (येरमाळा), देशी गाय गटात प्रथम अजय शिंदे (किणी), देशी कालवड गटात प्रथम शिवाजी पडूळकर (तेर), म्हैस रेडी गटात प्रथम बालाजी मस्के (तेर), गु-हा म्हैस गटात प्रथम संकेत झिंजे (तेर), म्हैस गटात प्रथम मच्छिंद्र कोकरे (तेर) विजेते ठरले. पशुप्रदर्शाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम, पंचायत समिती सदस्या जया नाईकवाडी, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनाथ नाईकवाडी, युवराज शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय पांडे यांनी केले. तर आभार पी.जे.नाथबुवे यांनी मानले.
समुपदेशन केंद्रांचा आधार : एका वर्षात 428 महिलांना दिलासा
धाराशिव (प्रतिनिधी)- मानसिक तणाव, कौटुंबिक वाद आणि सामाजिक अडचणींमुळे अनेकदा व्यक्ती एकटेपणात अडकून पडते.अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाला,तर आयुष्याला नव्याने दिशा मिळू शकते.याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात कार्यरत असलेली समुपदेशन केंद्रे अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. धाराशिव जिल्ह्यात सध्या 04 पोलीस समुपदेशन केंद्रे पोलीस स्टेशनच्या आवारात कार्यरत आहेत. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत या केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. धाराशिव समुपदेशन केंद्राने 209 प्रकरणांतील महिलांचे समुपदेशन केले,वाशी केंद्राने 24,कळंब केंद्राने 38 तर उमरगा केंद्राने 157 प्रकरणांतील महिलांना मार्गदर्शन केले.अशा प्रकारे एकूण 428 महिलांना या केंद्रांद्वारे आधार देण्यात आला. समुपदेशन केंद्र म्हणजे व्यक्तींना त्यांच्या मानसिक,भावनिक, सामाजिक किंवा कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन व मदत मिळवण्यासाठी असलेले सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण.येथे मानसिक तणाव,नैराश्य,चिंता यावर मार्गदर्शन केले जाते,तसेच कौटुंबिक व वैवाहिक समुपदेशन दिले जाते. मुलांचे व किशोरवयीन समुपदेशन, तसेच महिलांसाठी कौटुंबिक हिंसा किंवा छळ यांसारख्या संवेदनशील विषयांवर विशेष समुपदेशनही येथे उपलब्ध आहे. या केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे अडचणीत सापडलेल्या महिलांना आणि कुटुंबांना योग्य सल्ला, मानसिक आधार आणि समस्यांवर सकारात्मक तोडगा देणे.अनेक वेळा छोट्या गैरसमजांमुळे वाढलेले वाद समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवले जातात आणि कुटुंब पुन्हा एकत्र येते.त्यामुळे केवळ समस्या सोडवणेच नव्हे,तर नातेसंबंध जपणे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हेही या केंद्रांचे ध्येय आहे.महिला व बालक,कुटुंबातील सदस्य तसेच मानसिक तणाव किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करणारी कोणतीही व्यक्ती या केंद्रांचा लाभ घेऊ शकते. एकूणच,गेल्या एका वर्षात समुपदेशन केंद्रांनी केवळ आकडेवारीत यश मिळवले नाही,तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.कोणाच्यातरी डोळ्यातील अश्रू पुसत,तुटलेली नाती पुन्हा जोडत आणि नव्या आशेचा किरण देत ही केंद्रे समाजात माणुसकीची उब जपत आहेत.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली 21 एप्रिल सर्व विभाग प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी उपजिल्हाधिकारी शेंडे यांनी लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागाने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला. या बैठकीचा मुख्य उद्देश RTS Performance Dashboard तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) अंतर्गत सेवांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेणे हा होता. बैठकीत RTS Performance Dashboard संदर्भात सर्व संबंधित विभागांचा सखोल आढावा घेण्यात आला. सेवा वितरणाची गुणवत्ता आणि गती यावर विशेष भर देत प्रलंबित अर्जांची स्थिती तपासण्यात आली.नागरिकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी कार्यक्षमतेत वाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रलंबित प्रकरणांबाबत गांभीर्याने विचार करून ती लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या तसेच 28 एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवस’ साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. RTS अपील प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करत पारदर्शकता आणि वेळेत निपटारा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. सर्व विभागांनी प्रलंबित अर्जांची यादी तयार करून तातडीने निकाली काढावी. सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात यावी.महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अपील प्रक्रियेत पारदर्शकता व वेळेत निपटारा सुनिश्चित करावा.असे श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यास अधिक गती मिळणार आहे.
कोल वॉशरीच्या प्रदूषणाने पांढरा कापूस झाला काळा; प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार
एखाद्या प्रकल्पाच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांची काय दुर्दशा होऊ शकते, याचा प्रत्यय चंद्रपुरात येत आहे. प्रदूषणाच्या जीवघेण्या समस्येमुळे या शेतकऱ्यांनी थेट प्रदुषण नियंत्रण अधिकाऱ्याचीच पोलिसात तक्रार केली. चंद्रपूरलगतच्या साखरवाही औद्योगिक वसाहत परिसरात महामाया इन्फ्रा डेवलपर्स नावाची कंपनी आहे. ही कंपनी कोळसा धुवून तो वीज प्रकल्पाला पाठवते. हजारो टन कोळसा खाणीतून इथे येतो रोज येतो आणि धुतला जातो. […]
Hybrid Jowar |हायब्रीड ज्वारीला सोन्याचा भाव! बदलत्या जीवनशैलीमुळे गव्हापेक्षा भाकरीलाच पसंती
आरोग्याबाबतच्या जागरूकतेमुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ चोरे– अलिकडच्या काळात बदलेल्या जीवनशैलीमुळे, वाढती बैठी कामे, कमी हालचाल यामुळे वेगवेगळ्या आजरांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोळी चपाती पेक्षा भाकरी खाण्याकडे लोकांचा कल दिसत आहे परिणामी कमी उत्पादन वाढलेली मागणी यामुळे हायब्रीड ज्वारीला सोन्याचा भाव आला आहे. पूर्वी हलक्या [...]
Satara News |पाटणमध्ये बेशिस्त पार्किंगचाळ सुळसुळाट; राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
पाटण शहरात बेशिस्त पार्किंगचा कहर पाटण : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीयमहामार्गावर दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी, बाहनांचे बेशिस्त पार्किंग वाढत चालले आहे. हातगाड्यांचे अतिक्रमण देखील वाढत आहे. विशेष म्हणजे हे चित्र दिसत असतानाही वाहतूक पोलीस याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. उलट त्यांच्या समोरच कधी कधी गाड्यांचे पार्किंग [...]
मध्यस्थता करताना पाकिस्तान अमेरिकेची बाजू घेत पक्षपातीपणा करत आहे; इराणच्या मीडियाचा आरोप
आखाती देशातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी पाकिस्तान आणि त्यांचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना थेट लक्ष्य केले आहे. इराणचा आरोप आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करणारा पाकिस्तान आता निष्पक्ष दिसत नाही. इराणला वाटते की, या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तान उघडपणे अमेरिकेच्या बाजूने पक्षपात आहे. त्यामुळे […]
साताऱ्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ सातारा : शहरातील अनधिकृतबांधकामाविरोधात तसेच साई अमृत हॉस्पिटलच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने रमेश उबाळे यांनी उपोषण सुरू केल्याने सातारानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करतो, अतिक्रमणांविरोधात मोहीम आखतो, अशी आश्वासने देत तब्बल दोन तास चर्चा आंदोलनस्थळी करण्यात आली. दरम्यान, साई [...]
राज्य कर्मचारी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसऱ्या दिवशी कर्मचारी मागण्यांवर ठाम
महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित बेमुदत संपाला बुधवारी दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीच्या परिसरात संपकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला कर्मचारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते सुधाकर सावंत, मध्यवर्ती संघटनेचे कोकण विभाग संघटक रुपेंद्र शिवलकर, समन्वय […]
RBI कडून ऑटो-डेबिट पेमेंटच्या नियमांत बदल; आता 15 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी…
जर तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला ओटीटी सबस्क्रिप्शन, विम्याचा हप्ता आणि म्युच्युअल फंड एसआयपीचे पैसे आपोआप कट होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑटो-डेबिट पेमेंटच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमांनुसार जर तुमचा कोणताही ऑटो-डेबिट व्यवहार 15 हजार रुपयांपेक्षा […]
Satara News |यवतेश्वर घाटात वणव्यामुळे दगडांचा वर्षाव, साताऱ्यात भीती
यवतेश्वर घाटात काळजाचा थरकाप! सातारा : सातारा शहरातून कासच्या दिशेने जाणाऱ्या यवतेश्वर घाटात मंगळवारी दुपारच्या सुमारास भीतीदायक प्रकार घडला. सांबरवाडी डोंगर परिसरात लागलेल्या वणव्यामुळे अचानक डोंगरकड्यावरून दगड-धोंड्यांचा वर्षाव सुरू झाला. या घटनेमुळे घाट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये काही काळ घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ [...]
मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीवरील व लगतच्या जिल्ह्यांमध्ये 23 आणि 24 एप्रिल रोजी दुपारी उष्णता, आर्द्रता आणि संध्याकाळी मात्र मेघगर्जनेसह पाऊस असे असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तशी शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 23 एप्रिल रोजी ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उन्हाचा कडाका राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलका किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. […]
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तीन आठवड्यांत नेपाळच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी राजीनामा दिला आहे. गुरुंग यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता तसेच मनी लाँड्रिंगपर्यंत अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर, एका वादग्रस्त उद्योगपतीशी संबंधित कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. गुरुंग यांनी पंतप्रधान बालेन […]
सत्ताधारी नेत्यांच्या एजन्सीकडून मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुलीच्या अनुषंगाने सर्वेक्षण –वैभव नाईक
नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर केंद्रीय नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात आले होते. मात्र त्यांचा सिंधुदुर्ग दौरा हा ओसरगाव टोल नाका सुरू करण्यासाठीच होता अशी चर्चा सध्या कोकणात सुरू आहे. गडकरी यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर टोल सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान सत्ताधारी नेत्यांच्या एजन्सीकडून टोल वसुलीच्या अनुषंगाने सर्वेक्षण देखील गेले काही दिवस सुरू असल्याचा आरोप माजी […]
सोलापुरात अल्पवयीन माताप्रकरणी मोठी कारवाई सोलापूर -अल्पवयीन मुलींचे बळजबरीने संसार बाटून त्यांना अकाली मातृत्व लादणाऱ्यांवर सलगर वरती पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मागील दोन दिवसांत अल्पवयीन माताप्रकरणी तीन तक्रारी दाखल झाल्या असून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८ जणांविरुध्द गुन्हे [...]
पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेस, भाजप व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रचारात त्यांची संपूर्ण ताकद लावली आहे. अशातच कोलकातामध्ये 23 तारखेला आयोजित राहुल गांधी यांच्या रॅलीला केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे. त्यावरून काँग्रेसने तृणमूल काँग्रेस व भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे शुभांकर सरकार […]
Photo –बिग बॉसवर गंभीर आरोप करणाऱ्या मॉडेलचे सुंदर फोटोशूट
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातल्या अस्वच्छतेवरून प्रोडक्शन टीमवर जोरदार टीका करणारी मॉडेल सोनाली राऊत हिने एक तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली राऊत हिने बिग बॉसच्या घरात मोठ मोठे उंदीर यायचे, घरातही भरपूर अस्वच्छता होती असा आरोप केला होता.
Solapur weather |सोलापूरला गारांनी झोडपले! ४३ अंशांच्या पाऱ्यात अवकाळी पावसाचा सुखद गारवा
उकाड्याने हैराण सोलापूरकरांना दिलासा सोलापूर -सोलापूर शहराचा पारा गेल्या काही दिवसापासून ४३ अंशावर पोहोचला होता. अशातच गेल्या चार दिवसापासून सोलापुरात अवकाळी पाऊस सुरु आला आहे. मंगळवारी ऊन कमी असले तरी प्रचंड उकाड्याने दिवसभर सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. सायंकाळी मात्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. [...]
इराणची राजधानी तेहरानमध्ये २१ एप्रिलच्या रात्री उशिरा हजारो नागरिक देशाचे झेंडे आणि खांद्यावर एके ४७ रायफली घेऊन रस्त्यांवर प्रमुख चौकात जमा झाले होते. हे दृश्य एखाद्या लष्कराच्या संचलनासारखे होते. यात सर्वात आधी जेव्हा एका मोबाईल लाँचरवर ठेवलेले क्षेपणास्त्र राजधानीच्या रस्त्यांवर सामान्य लोकांमध्ये आणण्यात आले. यावेळी या शक्तिप्रदर्शनात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे (IRGC) कमांडरदेखील क्षेपणास्त्र लाँचर घेऊन […]
पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच निवडणूक आयोगाने या दोन दिवसांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात विसंगती आहे. या नियमावलीमुळे जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे, असा आरोप केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या विसंगतीवर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी संताप […]
Miraj News |मिरज रेल्वे जंक्शनच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मिरज जंक्शनच्या जीर्ण इमारतीची पडझड सुरू मिरजः येथील मिरज रेल्वे जंक्शन प्रमुख प्रवेशद्वार पोर्चचा स्लॅब कोसळला आहे. त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीची पडझड सुरू झाली असून, रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांधारीच्या भुमिकेत आहेत. मिरज जंक्शनच्या विकासासाठी नागरिकांनी [...]
महिला आरक्षणाला विरोध केल्याने सोलापुरात भाजपचा संताप सोलापुर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भारतीय जनता युवा मोर्चाने बुधवारी निषेध केला. चार हुतात्मा पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले. महिलांचा अपमान करणाऱ्या [...]
Tasgaon News |तासगाव परिसरात मोगऱ्याचा सुगंध दरवळला; उन्हाळी हंगामात उत्पादनात मोठी वाढ
तासगावात मोगऱ्याचा सुगंध दरवळला तासगाव : उन्हाळ्याच्या दिवसांतबातावरणात दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध सध्या सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. गावोगावी मोगऱ्याची फुले बहरली असून बाजारपेठेतही त्याची मोठी मागणी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर पारंपरिकरित्या पूजा, सण समारंभ आणि महिलांच्या गजऱ्यासाठी मोगऱ्याचा [...]
RSSB Lab Assistant Exam Date 2026 Announced, Admit Card Soon
RSSB has officially announced the Lab Assistant Exam Date 2026. The written test will be held on May 9 and 10 across Rajasthan. Admit cards are expected soon. Check the full schedule, exam pattern, and the latest updates here. The post RSSB Lab Assistant Exam Date 2026 Announced, Admit Card Soon appeared first on MPC News .
Bunchyappa Paradi Sohala |धनगरी ढोलांचा कडकडाट आणि भंडाऱ्याची उधळण; बुर्लीचा बनात भक्तिरसात न्हाला
बुर्लीत बंच्याप्पा परडी सोहळा भिलवडी : महाराष्ट्रासह कर्नाटकच्याभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील श्री बंच्याप्पा बनात, धनगरी ढोलांच्या कडकडाटात आणि ‘बंच्याप्पा-मायाप्पा-बिरोबाच्या’ जयघोषात ऐतिहासिक परडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ८५ एकर गायरान आणि पश्नांच्या किलबिलाटाने नटलेल्या या निसर्गरम्य परिसरात दरवर्षी चैत्र पाडव्यानिमित्त [...]
शेवटच्या चढाईपर्यंत श्वास राखायला लावणार्या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊविरुद्ध संघर्ष ३२-३० असा जिंकला आणि महिला कबड्डीत आपणच शक्तिशाली असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र आजचा दिवस गाजवला तो निकिता पडवळच्या वेगवान-कल्पक चढायांनी. ती राजमाता जिजाऊच्या गळ्यात जेतेपदाची माळ घालण्यात […]
अमेरिका- इराणमध्ये हिंदुस्थान मध्यस्थी करणार का? राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया
आखाती देशातील युद्धाबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची मुदत वाढवली असली तरी ये युद्ध थांबणार का आणि आखाती देशात कायमस्वरुपी शांतता निर्माण होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची शक्यता आहे. या दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करत […]
बालगाव पुलावर भीषण अपघात उमदी : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बालगाव पुलावर आज दोन मोठ्या वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. नागालैंड पासिंगचा कंटेनर आणि सिमेंट मिक्सर ग्राइंडर यांच्यात झालेल्या या धडकेत दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी झाले असून, एका चालकाच्या हातापायाचा अक्षरशः चक्काचूर [...]
कोलगाव सातेरी पंचायतनचा त्रैवार्षिक पडली उत्सव
७ मे पासून विविध धार्मिक कार्यक्रम सावंतवाडी : कोलगावचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव गुरुवार ७ ते ११ मे दरम्यान होत आहे. त्यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त गुरुवार ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत श्री देवी सातेरी मंदिर येथे [...]
Sangli News |तांदुळवाडीत बिबट्याचा हैदोस; मेंढीनंतर आता मोराची शिकार केल्याने खळबळ
तांदुळवाडीत पुन्हा एकदा दहशतीचा थरार आष्टा : वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. या बिबट्याने मेंढी नंतर आता मोराची शिकार केली आहे. लागोपाठ होत असलेल्या शिकारींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी [...]
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये शाब्दिक चकमकी होत असतानाच आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला. लोकशाही वाचवण्यासाठीच्या अत्यंत कठीण लढाईमध्ये आम्ही ममता दीदींसोबत असल्याचे केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले. […]
सामाजिक कार्यकर्ते उल्हास देसाई यांचे निधन
सावंतवाडी । प्रतिनिधी डेगवे( आंबेखणवाडी) गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यात आयुष्य वेचलेले आणि डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सचिव तसेच सेल्स टॅक्स विभागातील निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. उल्हास बाबाजी देसाई वय 70 यांचे रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता डोंबिवली येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबईतील कोकणवासीयांमध्ये शोककळा [...]
जर्मन एअरलाइन लुफ्थान्साकडून २० हजार हवाई उड्डाणे रद्द
जर्मन एअरलाइन लुफ्थान्साकडून तब्बल २० हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लुफ्थान्सा ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, रद्द झालेल्या या उड्डाणासंदर्भातील माहिती आता प्रवाशांना देण्यात आलेली आहे.उड्डाणे रद्द करण्यामागील प्रमुख कारण हे जेट इंधनाच्या वाढत्या किमती असल्याचे म्हटले आहे. एअरलाइनने यासंदर्भात एक निवेदन जारी करुन, अमेरिका इराण युद्धाच्या उद्रेकानंतर जेट इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हा […]
घायल हूँ इसिलिये घातक हूँ, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर रोहित पवार यांचा इशारा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची न्यायालयाने सुटका केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘घायल हूँ इसिलिये घातक हूँ’ असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी याबाबत न्यायायलयाचे […]
अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात 30 गावांतील पाणी दूषित
अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च महिन्याचा पाणी शुद्धीकरण, सनियंत्रण व टीसीएल गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यात मार्चमध्ये जिल्ह्यातील 5 गावांच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नमुन्यांत 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळून आले, तर 30 गावांचे 89 पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवून […]
कर्नाटकात अमेरिकन महिला पर्यटकावर बलात्कार, होमस्टे मालकासह कर्मचाऱ्याला अटक
कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यात फिरायला आलेल्या एका अमेरिकेन महिला पर्यटकावर होमस्टेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पोलिसांत तक्रार करेल या भितीने होमस्टेच्या मालकाने त्या महिलेला तीन दिवस रुममध्ये बंद करून ठेवले व तिचा फोनही हिसकावून घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी होमस्टेचा मालक व पीडितेवर बलात्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे. पीडित महिलेने गेल्या […]
Kolhapur News |शासकीय कार्यालयांत शुकशुकाट; कर्मचारी संपावर गेल्याने कामकाजाचा बोजवारा
कोल्हापुरात शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कोल्हापूर – सुधारीत निवृत्ती योजना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमन यासह १७ मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी कामाला सुट्टी वेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महाबीर उद्यानात प्रचंड घोषणाबाजी करत ठिय्या आंबोलन केले. प्रलंबित मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी [...]
दुर्घटनेनंतर आजरा नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे आजरा – आजरा शहरातील वाणी गल्लीतील जुने घर पाडताना झालेल्या दुर्घटनेत एका प्राध्यापिकेसह शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. तर एक महिला कायमची जायबंदी झाली आहे. या घटनेमुळे शहरातील थोकादायक घरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. धोकादायक घरांच्या मालकांना आजरा नगरपंचायत प्रशासनाने [...]
Kolhapur Crime |शिरोली एमआयडीसीत वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश, बिबट्याच्या कातड्यांसह ११ जण ताब्यात
कोल्हापुरात वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश पुलाची शिरोली – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एमआयडीसी परिसरात कस्टम विभाग आणि वनविभागाने संयुक्त कारवाई करत वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला. बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या टोळीचा छडा लावत अधिकाऱ्यांनी दोन कातडी, दोन चारचाकी वाहने आणि तस्करीसाठी वापरले जाणारे [...]
Gadhinglaj News |गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात; अपघातात चौघे जखमी
गडहिंग्लजमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक गडहिंग्लज -गडहिंग्लज संकेश्वर मार्गावरील निलजी-नूल रोडवर सोमवारी रात्री समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीसात झाली आहे. अधिक माहिती अशी की, बाबू कंम्पान्नपा हानमाज (वय ५० रा. दुंडगे ता. गडहिंग्लज) हे आपल्या [...]
लईराईच्या जयघोषाने भारले शिरगाव
अखंड भक्तीभावासह उत्साहात जत्रोत्सवाला प्रारंभ : देवीची उत्सवमूर्ती मूळ आदिस्थानाकडे रवाना डिचोली : पारंपरिक प्रथा व प्रशासकीय पातळीवरील कडक सुरक्षा व्यवस्था अशा स्वरूपात यावेळी साजऱ्या होणाऱ्या शिरगावातील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. सकाळी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. देवीच्या कळसातील तीर्थ गावातील प्रत्येक घरामध्ये वितरित करून गाव सुचिर्भूत करण्यात आले. तीर्थातील [...]
Kolhapur Crime |गडमुडशिंगीत व्याजाच्या नावाखाली महिलेवर शारीरिक अत्याचार; खासगी सावकार अटकेत
कोल्हापुरात सावकाराचे क्रूर कृत्य गडमुडशिंगी – व्याजाच्या वसुलीसाठी महिलेवर शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी खासगी सावकार अमित कृष्णात सावंत (वय ३५ वर्षे, रा. रोहिदास चौक, गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याविरोधात गांधीनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयिताला गजाआड असून न्यायालयाने त्याला [...]
पदवी अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी आज
पणजी : उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रशासकीय अखत्यारितील सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी आज दि. 22 एप्रिल रोजी संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. संचालनालयाने जारी केलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या महाविद्यालयांना भेट द्यावी लागणार आहे. समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होईल. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत अर्ज [...]
महिला आरक्षण हा भाजपचा मतदारसंघ ‘सेटिंग’ चा डाव
काँग्रेस प्रभारी अंजली निंबाळकर यांचा दावा पणजी : येत्या 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणूनच सरकारला आता महिला आरक्षणाचा पुळका आला असून हा सर्वकाही मतदारसंघ ‘सेटिंग’ चा डाव आहे. फेररचनेच्या नावाखाली स्वमर्जीनुसार सीमा आरेखन करायचे आहे, असा दावा काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर यांनी केला आहे. मंगळवारी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या [...]
भाजप महिला आरक्षणाचा ‘सिरियल किलर’, विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
भाजप सरकारचे महिला आरक्षणाचे विधेयक म्हणजे केवळ जुमलेबाजी असून, प्रत्यक्षात भाजपच महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वरळीतील ‘महिला आक्रोश’ आंदोलनाचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, 20-30 महिलांना एकत्र करून केलेले आंदोलन म्हणजे जनतेचा आवाज नव्हे. काल एका […]
जागतिक अशांततेमुळे शेअर बाजार दिशाहीन; सोने-चांदीचे दर झपाट्याने वाढले
जागतिक अशांतता आणि युद्धाबाबतची अनिश्चितता यामुळे शेअर बाजार दिशाहीन झाल्याचे दिसत आहे. शेअर बाजारात मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निरिदेशांक निफ्टी 50 सुमारे 200 अंकांनी वाढला होता. मात्र, बुधवारी बाजार सुरू होताच त्यात मोठी घसरण दिसून आली आहे. बाजारात घसरण होत असतानाच सोने-चांदीचे दर झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी शेअर बाजारात मोठी […]
Kolhapur Crime |कोल्हापूर हादरले: बापानेच संपवलं पोराला; कोल्हापुरात मद्यपी मुलाचा पित्याकडून खून
कोल्हापुरात मद्यपी मुलाचा पित्याकडून खून कोल्हापूर -दारुच्या नशेत कानाखाली मारल्याच्या रागातून बापाने चिडून मुलग्याचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विक्रमनगर येथील स्वामी समर्थ कॉलनी परिसरात ही घटना घडली. जुनैद गफूर पठाण (वय २१) असे मृताचे नांव आहे. [...]
Ahmedabad Plane Crash –अपघातात पत्नी आणि मुलगी गमावली; हिंदुस्थानी व्यक्तीवर ब्रिटन सोडण्याची पाळी
अहमदाबाद अपघातामध्ये पत्नी आणि मुलगी गमावलेल्या, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद शेखवाला यांच्यावर आता देश सोडण्याचे संकट उभारले आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद शेखवाला यांना ब्रिटनच्या गृह मंत्रालयाकडून देश सोडण्याची मुदत (२२ एप्रिल) पर्यंतची देण्यात आलेली आहे. २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मरण पावलेल्या त्यांच्या पत्नीच्या स्टुडंट व्हिसावर डिपेंडंट म्हणून ब्रिटनमध्ये राहात होते. अहमदाबाद […]
नेत्रदीपक चित्ररथ देखावे : ढोलताशांचा गजर आणि मर्दानी खेळांनी मिरवणूक ठरली लक्षवेधी बेळगाव : ज्यांच्या पराक्रमाची कीर्ती दिगंतात पसरली, ज्यांनी शिस्तबद्ध लष्कर व संघटित प्रशासनाचा आदर्श घालून देत एक सामर्थ्यशाली साम्राज्य उभे केले, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्ररथ मिरवणुकीने व देखाव्यांनी जनतेची प्रशंसनीय वाहवा मिळवली. छत्रपती शिवराय म्हणजे शौर्य, साहस आणि पराक्रम. [...]
साईल तळकटकर यांना दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार जाहीर
न्हावेली /वार्ताहर वेंगुर्ला-आवेरे येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळातील युवा दशावतारी कलाकार ,दशावतार क्षेत्रामध्ये अल्पावधीतच ज्यांनी उंच भरारी घेतली, असे मळगाव गावचे सुपुत्र कु. साईल आपा तळकटकर यांना ‘दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.साईल तळकटकर यांच्या सामाजिक आणि कला क्षेत्रातील निस्वार्थ सेवेची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवार १६ [...]
मालवणात १ रोजी प्रचिती सौदागर यांचे ‘नृत्यशंभो’भरतनाट्यम
मालवण : प्रतिनिधी मालवण शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे, संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश असणार आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती [...]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली. ही घोषणा करून काही तास उलटत नाही तोच होर्मुझची सामुद्रधुनी गोळीबाराने दणाणली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका मालवाहू जहाजावर गोळीबार केला. ब्रिटिश लष्कराने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे आखातातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून शांतता चर्चेवरही याचे पडसाद उमटण्याची […]
बर्डफ्लूची धास्ती नको; सीमेवर तपासणी नाके
पशूसंगोपन खात्याकडून खबरदारी : बाहेरून येणाऱ्या कोंबड्यांची तपासणी बेळगाव : बेंगळूर येथील हेसरगट्टातील राज्य सरकारच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्डफ्मलूची लागण झाल्याने पशूसंगोपन खाते अलर्ट झाले आहे. विशेषकरून उन्हाळ्यात कोंबड्यांना बर्डफ्लूची लागण होते. त्यामुळेच बेळगाव जिल्हा पशूसंगोपन खात्याकडूनदेखील खबरदारी घेतली जात आहे. बाहेरून बेळगाव जिल्ह्यात आयात केल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके दोन महिन्यांपूर्वीच सुरू [...]
हलग्याजवळील अपघातात दोघे जागीच ठार
कोंबडीवाहू वाहनाची अवजड वाहनाला धडक, चालकही जखमी, सर्व शिमोग्याचे रहिवासी बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता महामार्गाशेजारी उभ्या करण्यात आलेल्या एका अवजड वाहनाला कोंबडीवाहू अशोक लेलँड गुड्स वाहनाची धडक बसून शिमोगा जिल्ह्यातील दोघे जण जागीच ठार झाले. तर चालक जखमी झाला. या अपघातात 300 हून अधिक कोंबड्याही दगावल्या आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ मंगळवारी पहाटे [...]
तीनऐवजी चार,चारऐवजी पाच : पाचऐवजी सहा दिवसांनी पुरवठा बेळगाव : एप्रिल ते जूनपर्यंत उन्हाळा असणार असून शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेत काही बदल करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. 24 तास पाणीपुरवठा होणारे भाग वगळून इतर भागामध्ये सध्या तीन दिवसांनी करण्यात येणारा पाणीपुरवठा चार दिवसांनी करण्यात येईल. चार [...]

29 C