Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 11 एप्रिल 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक – कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय […]
आरसीबीवर 6 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर वैभव सूर्यवंशीची तुफानी फटकेबाजी : ध्रुव जुरेलचीही नाबाद 81 वृत्तसंस्था/ गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने खेळलेली तुफानी खेळी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. सूर्यवंशीने (26 चेंडूत 78) तुफानी अर्धशतक झळकावताना आरसीबीच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुलाई केली. त्याच्या या वादळी खेळीमुळे राजस्थानने आव्हानाचा पाठलाग सहज पार [...]
वाहन, बँकिंग व रिलायन्सच्या कामगिरीमुळे बाजाराला चालना
सेन्सेक्स 918 अंकांनी मजबूत तर निफ्टी 24,050 वर बंद : आशियाई बाजारातही उत्साह वृत्तसंस्था, मुंबई चालू आठवड्यात अंतिम सत्रात शुक्रवारी आशियाई बाजारांमधील सकारात्मक ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजार शेवटच्या सत्रात सकारात्मकतेने बंद झाला. बँकिंग आणि निर्देशांकातील अव्वल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीसह वाहन समभागांमुळे बाजाराला आधार मिळाला. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव अजूनही जास्त असल्याने, [...]
आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेले मतदान विक्रमीच म्हटले पाहिजे. स्वाभाविकच येथील निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागतात की विरोधात जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांतील निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आसाममध्ये 85 टक्के, पुदुच्चेरीत 89.87 टक्के, तर केरळमध्ये 79 [...]
‘केकेआर’विरुद्धची लढत पावसात वाहून गेल्याने पंजाब पूर्ण गुण कमावण्यास सज्ज त. भा. प्रतिनिधी मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शनिवारी येथे होणाऱ्या सामन्यात जिद्दी पंजाब किंग्स संघ स्टार खेळाडूंनी भरलेल्या, पण सातत्य नसलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाविऊद्ध आत्मविश्वासाने खेळेल. हंगामाची सुऊवात ज्या प्रकारे झाली आहे ते पाहता पावसामुळे मागील सामन्यात केकेआरसोबत एक गुण विभागून घ्यावा लागल्याने [...]
त. भा. प्रतिनिधी चेन्नई : तीन वेगवेगळ्या मैदानांवर तीन पराभव पत्करावे लागल्यामुळे सीएसकेने या हंगामाची सुऊवात अत्यंत निराशाजनक पद्धतीने केली आहे. आज शनिवारी चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करताना ते आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असतील. संघाची कामगिरी सर्वच विभागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पडली आहे. प्रतिस्पर्धी संघांशी बरोबरीने स्पर्धा करायची असल्यास त्यांनी आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा करणे गरजेचे [...]
‘आर्टेमिस टू“ यशस्वी ‘चंद्र“ मोहीम : मानवतेसाठी मोठे उड्डाण
मानवानं शेवटचा चंद्रप्रवास 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेद्वारे केला. त्यानंतर जवळपास या पन्नास वर्षांत अंतराळ संशोधनात प्रचंड मोठी झेप घेतली आहे. पण चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याचा प्रयत्न झाला नाही. नासाने चंद्रावर पुन्हा मोहीम सुरु केली आहे. आता नासाची आर्टेमिस टू मोहीम पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. या मोहिमेत चार अंतराळवीरांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा [...]
लंकेचा हसरंगा आयपीएलमधून बाहेर
वृत्तसंस्था, कोलकाता सध्या सुरू असलेल्या 2026 च्या आयपीएल स्पर्धेत लंकेचा अष्टपैलु वनिंदु हसरंगा लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. पण आता त्याला ही प्रतिष्ठेची स्पर्धा हुकणार आहे. लवकरच हसरंगाच्या जागी दुसऱ्या बदली खेळाडूची निवड केली जाईल, असे लखनौ जायंट्सच्या फ्रांचायझीने सांगितले. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील गुरूवारचा सामना हिडन गार्डन्स मैदानावर [...]
400 वर्षांपासून पाऊस न अनुभवलेले ठिकाण
तरीही येथे नाही कोणी तहानलेला शेकडो वर्षांपर्यंत पाऊस न पडलेला ठिकाण असूनही तेथे कुणीच तहानेने मृत्युमखी न पडलेला नाही. असेच एक चमत्कारिक ठिकाण चिलीचे अटाकामा डेझर्ट असून हे जगातील सर्वात कोरडे बिगर-ध्रूवीय वाळवंट आहे, जेथे काही भागांमध्ये मागील 400 वर्षांपासून एक थेंबही पाऊस पडलेला नाही. काही हवामान स्थानकांवर तर कधीच पावसाची नोंद झालेली नाही. तरीही [...]
ख्रिस्टीला धक्का देत शेट्टी उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, निंगबो (चीन) विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशिया चषक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या 25 व्या मानांकीत आयुष शेट्टीने इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकीत जोनाथन ख्रिस्टीला पराभवाचा धक्का देत पुरूष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. शुक्रवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आयुष शेट्टीने जोनाथन ख्रिस्टीचा 23-21, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान [...]
प्रियदर्शिनीच्या मारेकऱ्याची मागणी फेटाळली
नवी दिल्ली 1996 मधील चर्चित प्रियदर्शिनी मट्टूच्या हत्या प्रकरणाचा दोषी संतोष कुमार सिंहला देण्यात आलेला पॅरोलचा कालावधी वाढविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाशी निगडित मुख्य मुद्दा मुक्तता यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. गुन्हा 23 जानेवारी 1996 रोजी घडला होता. याचिकाकर्ता सुमारे 31 वर्षांपासून [...]
कोलंबियावर 100 टक्के आयातशुल्क
क्विटो : कोलंबियातून आयात होणाऱ्या सामग्रीवर इक्वेडोरने 100 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे आयातशुल्क 1 मेपासून लागू होणार आहे. कोलंबिया अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी म्हटले. कोलंबिया हा देश जगातील सर्वात मोठ्या कोकेन उत्पादकांपैकी एक आहे. तेथूनच अमली पदार्थ इक्वेडोरामार्गे [...]
मंत्री जमीर अहमद यांच्यासह तिघांविरुद्ध हायकमांडकडे तक्रार
राज्य काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये दुफळी शक्य प्रतिनिधी/ बेंगळूर दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले असले तरी सत्ताधारी काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांमधील मतभेद उफाळून आले आहेत. दावणगेरे पोटनिवडणुकीत मंत्री जमीर अहमद खान, विधानपरिषद सदस्य नासीर अहमद, अब्दुल जब्बार यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी [...]
पाक मंत्र्याची टिप्पणी, इस्रायलकडून संताप व्यक्त
वृत्तसंस्था, इस्लामाबाद पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलमध्ये अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. याप्रकरणी इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली. इस्रायलचे विदेशमंत्री गिदोन सार यांनी प्रत्युत्तर देत पाकिस्तानला दहशतवादी देश संबोधिले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे इस्रायलला नष्ट करण्याचे आवाहन अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे वक्तव्य कुठल्याही प्रकारे सहन केले जाणार नाही असे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. इस्रायल हा [...]
इंडो-हॉलिवूड चित्रपटात दिसणार प्रियामणि
प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण पेले आहे. तसेच उर्वरित भारतीय कलाकारांसाठी मार्ग प्रशस्त केला आहे. प्रियांकाच्या मार्गावर चालत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणि आता एका इंडो-हॉलिवूड चित्रपटात काम करणार आहे. यात तिच्यासोबत एक भारतीय कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाची कहाणी हर्ष महादेश्वर यांनी लिहिली असून तेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले [...]
भारतीय महिला बास्केटबॉल संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र
वृत्तसंस्था, नवी दिल्ली स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे 23 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा 33 महिलांचा व्हिल चेअर बास्केटबॉल संघ पात्र ठरला आहे. स्कॉटलंडमधील होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या व्हिलचेअर बास्केटबॉल क्रीडा प्रकार 24 ते 29 जुलै दरम्यान खेळविला जाणार आहे. भारताचा 33 महिलांचा व्हिलचेअर बास्केटबॉल संघ आशियाई ओसेनिया स्पर्धेतून पात्र ठरला [...]
बाबर आझमकडून गेलचा विक्रम मोडीत
वृत्तसंस्था, कराची पाकचा अव्वल फलंदाज बाबर अझमने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात नवा विक्रम करताना यापूर्वी विंडीजच्या ख्रिस गेलने जलद 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. आता गेलचा हा विक्रम बाबर आझमने मोडीत काढला आहे. सध्या पाकमध्ये सुरू असलेल्या पाक सुपर लिग (पीएसएल) टी-20 स्पर्धेतील पेशावर झल्मी संघाकडून खेळताना बाबर आझमने क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारात 12 हजार [...]
भारत-जपान यांची मध्यपूर्वेवर चर्चा
जयशंकर यांनी केली मोटेगी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा ► वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती हा त्यांच्या चर्चेचा विषय होता. होमुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीच्या परिस्थितीवरही त्यांनी बोलणी केली. मध्यपूर्वेतील संघर्षात काही भारतीयांचाही बळी गेला आहे. मोटेगी यांनी यासंबंधी आपल्या [...]
अमेरिका-इराण चर्चेचा संभ्रम कायम
जेडी व्हान्स पाकिस्तानकडे, मात्र, अद्यापही शब्दयुद्ध वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती चर्चेसंबंधीचा संभ्रम अद्यापही कायाम असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स या चर्चेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानकडे निघाले आहेत. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत इराणच्या शिष्टमंडळाची हालचाल दिसत नसल्याने स्थिती दोलायमान होती. इस्रायल जोपर्यंत लेबेनॉनवील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चेत सहभागी [...]
फूड डिलिव्हरी कंपन्यांचे समभाग 37 टक्क्यांनी घसरणीत
सहा महिन्यांपासूनची स्थिती: जेएम फायनॅन्शियलने ध्येय कमी केले वृत्तसंस्था, नवी दिल्ली फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी स्विगी लिमिटेड चिंतेचा विषय बनली आहे, कारण देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनॅन्शियलने तिच्या शेअरचे रेटिंग ‘बाय’ वरून ‘रिड्यूस’ असे कमी केले आहे. यानंतर, गुरुवार, 9 एप्रिल रोजी, 1.5 टक्के पेक्षा जास्त घसरणीनंतर स्विगीचा शेअर 273 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. मागील [...]
एलआरएलएसीएम सुखोईतून डागण्याची तयारी
वृत्तसंस्था नवी दिल्ली ऑपरेशन सिंदूरदरम्यानच भारताला डीप स्ट्राइक क्षमतांचे महत्त्व उमगले होते. हेच पाहता आता आकाशातून मारा करू शकणाऱ्या लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाइलची (एलआरएलएसीएम) निर्मिती महत्त्वपूर्ण टप्प्यात पोहोचली आहे. आकाशातून मारा करू शकणारे एलआरएलएसीएम सर्वप्रथम सुखोई-3एमकेआय लढाऊ विमानावर तैनात केले जाणार आहे. हेच लढाऊ विमान या क्षेपणास्त्राच्या प्रारंभिक परीक्षणांसाठी प्लॅटफॉर्म ठरणार आहे. क्षेपणास्त्राच्या [...]
मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश अंतिम लढत
वृत्तसंस्था, राजोरी (बिहार) हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांनी उपांत्य फेरीचे सामने जिंकले. पहिल्या उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशने दादरा-नगर हावेली, दमन-दिव संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. मध्यप्रदेशतर्फे दीपक सिंग, करण गौतम, गाझी खान आणि सिद्धार्थ बेन [...]
भारतीय युवा टेटेपटू उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली सध्या सुरू असलेल्या आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी 15 आणि 19 वर्षांखालील वयोगटात आपले वर्चस्व राखताना एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारतीय युवा टेटे संघाला या स्पर्धेत विविध वयोगटात सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. भारताच्या टेबलटेनिसपटूंना या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली [...]
काँग्रेस नेते पवन खेडांना अंतरिम दिलासा
तेलंगणा उच्च न्यायालयाकडून 1 आठवड्याचा अंतरिम जामीन वृत्तसंस्था/ हैदराबाद आसाममध्ये नोंद एका गुन्ह्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने एक आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पवन खेडा यांना एक आठवड्याची मुदत संबंधित न्यायालयासमोर हजर राहत नियमित जामिनासाठी अर्ज करण्यासाठी दिली जात असल्याचे न्यायाधीश सुजाना कलासिकम यांनी सांगितले आहे. यादरम्यान पवन खेडा यांना [...]
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी टिम व्हाईट
वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाच्या टिम व्हाईट यांची नियुक्ती केल्याची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाचे हॉकी प्रशिक्षक टिम व्हाईट हॉकी इंडिया लीग स्पर्धेसाठी तामिळनाडू ड्रॅगन्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रामध्ये हॉकीची नवी पिढी तयार करण्यावर टीम व्हाईट यांचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी टिम व्हाईटने [...]
भारत-अमेरिका शस्त्रनिर्मिती करणार?
भारतीय अधिकाऱ्यांची पेंटागॉनमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी एकीकडे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अजूनही विरलेले नसताना, भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्तरित्या अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती करण्यासाठी चर्चा केली जात आहे. सध्या भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी यासंबंधी अनेक उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. या चर्चेची आणखी एक फेरी पेंटागॉन येथे नुकतीच [...]
आजचे भविष्य शनिवार दि.11 एप्रिल 2026
मेष: विनाविलंब चर्चा करून मार्ग काढा. वृषभ : मातुल घराण्याकडून धनप्राप्ती, निवांत वेळ असेल मिथुन : दैवी व अप्रश्नांकित प्रेम यात जादुई शक्ती असेल कर्क : पुरातन वस्तु व दागिने यातील गुंतवणूक फायद्याची. सिंह : नातेवाइकांकडून उधारी घेतल्यास परत करावी लागेल. कन्या : सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. तूळ : धनसंचय केलात तरच फायदा, मित्रांच्या [...]
म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13012 घरे उभारणार आहे. म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरे उभारण्यात येणार असून घरांच्या बांधकामासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात तब्बल 10 हजार 585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत येत्या आर्थिक वर्षात विविध […]
लेबनॉनमध्ये युद्धबंदी केली तरच वाटाघाटी! पाकिस्तानातील चर्चा अधांतरी, इराणने अमेरिकेला ठणकावले
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवडय़ांची युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा इस्रायलमुळे अधांतरी आहे. एकीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पाकिस्तानला रवाना झाले आहे, तर दुसरीकडे इराणचे शिष्टमंडळ अद्याप रवाना झालेले नाही. लेबनॉनसाठी इराण ठाम आहे. चर्चा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमध्ये युद्धविराम आणि इराणच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करणे या दोन अटी पूर्ण […]
न्या. यशवंत वर्मा यांचा राजीनामा, बंगल्यात सापडली होती नोटांची जळालेली बंडले
ज्यांच्या सरकारी निवासस्थानामध्ये लागलेल्या आगी- दरम्यान 500 रुपयांच्या नोटांची अनेक बंडले जळालेल्या अवस्थेत सापडली होती, ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. आपण तत्काळ पदमुक्त होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षी 14 मार्च रोजी न्या. यशवंत वर्मा यांच्या सरकारी […]
आम्ही विकले जाणारे नाही, शिवसेना खासदारांनी ठणकावले
शिवसेनेचे आठ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून बुधवारी रात्री ठाण्यात त्यांची गुप्त बैठक झाल्याचे खोडसाळ वृत्त एका दैनिकात छापून आले आहे. यामध्ये काही खासदारांची नावेही नमूद केल्याने आज राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, हे वृत्त शिवसेनेच्या खासदारांनी फेटाळून लावले. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदारांची भूमिका मांडली. ‘आम्ही […]
>> महेश उपदेव अद्भुत धैर्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अलीकडेच पाल्क सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली ईश्वरी पांडे ही कामगिरी करणारी जगातील पहिली जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते हिंदुस्थानातील धनुष्कोडी इथपर्यंत जलतरण करत हा विक्रम केला आहे. ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नारजवळील उर्मलाई पॉईंट येथून 6 […]
वेब न्यूज : आंटी म्हटले –कोर्टात खटला
> स्पायडरमॅन लंडनमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका सहकर्मचारी महिलेला आंटी म्हटल्यामुळे एका तरुणाला कोर्टाने दंड केला, अशी बातमी वेगाने व्हायरल झाली. मात्र या घटनेमागील वास्तव थोडे अधिक वेगळे आणि विचार करण्यास भाग पाडणारे आहे. घटना National Health Service (NHS) मध्ये घडली. एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेने आपल्या सहकाऱयाविरुद्ध तक्रार […]
लेख –भारत-कॅनडा सहकार्याची नवी सुरुवात
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, hemantmahajan12153@yahoo.co.in गेल्या सहा आठवड्यांपासून माध्यमांचे लक्ष इराण-अमेरिका युद्धाच्या घडामोडींवर आहे. याच काळात कॅनडा आता खलिस्तानी दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी पुढे येत आहे. अमेरिकेसोबत सध्या कॅनडाचे संबंध ताणलेले असल्यामुळे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताशी व्यापार आणि सहकार्य वाढवणे कॅनडाला आवश्यक वाटत आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीत काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱया […]
चारधाम यात्रेला जाणाऱया भाविकांची आता मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. केदारनाथमध्ये जवळपास 25 हजार भाविकांना पायवाटेपासून ते धामपर्यंत का@टेज आणि तंबूची व्यवस्था केली जात आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडले जाणार आहेत. त्याआधीच प्रशासनाकडून मुक्कामाला राहणाऱया भाविकांसाठी का@टेज व तंबूंची व्यवस्था केली जात आहे. भाविकांसाठी जंगलचट्टी, भीमबली, छोटी आणि मोठी लिनचोली यांसारख्या प्रमुख थांब्यांवर […]
इस्रोची दुसरी एअर ड्रॉप चाचणी यशस्वी, अंतराळातून पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याची गॅरंटी
अंतराळात पाऊल ठेवणे रोमांचक असते तर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतणे आव्हानात्मक असते. मानवी अंतराळात मोहिमेत खरी परीक्षा पृथ्वीवर सुखरूप परतण्याची असते. याच दृष्टिकोनात इस्रो गगनयान मिशनच्या प्रत्येक लहानमोठय़ा चाचण्यांवर गांभीर्याने काम करत आहे. अंतराळात गेलेल्या मानवाला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची दुसरी इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट आज यशस्वी झाली. गगनयान मोहिमेंतर्गत दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप […]
मोनालिसा अल्पवयीन, फरमान खानविरुद्ध गुन्हा
प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाने आंतरधर्मीय पद्धतीने फरमान खान याच्यासोबत लग्न केले, परंतु ती अल्पवयीन असल्यामुळे फरमान खानविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग (एनसीएसटी) च्या चौकशीत मोनालिसाची जन्मतारीख 30 डिसेंबर 2009 आहे. यामुळे तिच्यासोबत फरमान खानने अवघ्या 16 व्या वर्षी […]
समृद्धी महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात, दोन जण गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९३ (मुंबई कॉरिडॉर) येथे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला. या घटनेत २ जण गंभीर जखमी झाले असून ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मदतकार्यासाठी धावून आलेले ट्रक चालक आणि कर्तव्यावर असलेले एमएसएफ (MSF) जवानही या अपघाताच्या कचाट्यात सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी दुपारी ४:१८ […]
साहित्याचा उत्सव शांतीवनात, ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा रंगतदार शुभारंभ
बीड जिल्ह्यातील शांतीवन (ता.शिरूर कासार) येथे ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज (शुक्रवार) उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. साहित्य, समाजकार्य आणि संवेदनशील विचारांचा संगम साधणार्या या संमेलनाला राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत आणि रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. पुस्तके वाचणार्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. भावी पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे. त्यांना परत वाचनाकडे आकर्षित करायचे असेल तर लेखक […]
IPL 2026 लखनौ सुपर जाएंट्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली
इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सिझन रंगात आलेला असताना लखनौ सुपर जायंट्सला एक मोठा धक्का बसला आहे. LSG चा अष्टपैलू वानिंदु हसरंगा याने दुखापतीमुळे यंदाच्या सिझनमधून माघार घेतली आहे. आज अखेर लखनौच्या संघाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून हसरंगाच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेला जागा देण्यात आली आहे. Lucknow mein swagat hai, George […]
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने जीवन संपवले, फेसबुकवर पोस्ट करत उचलले टोकाचे पाऊल
पत्नीचा आणि तिच्या नातेवाईकांचा त्रास अनावर झाला आहे, या त्रासाला कंटाळूनच आपण आत्महत्या करत आहोत अशी फेसबुक पोस्ट व्हायरल करत युवकाने आपले जीवन संपवले. फेसबुक पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आधीच त्याने आपले टोकाचे पाऊल उचलले होते. बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन […]
नासाची ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’मोहीम फत्ते; उद्या पहाटे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार
मानवाच्या अंतराळ मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून नासाचे ‘आर्टेमिस २’ हे ऐतिहासिक यान उद्या ११ एप्रिल २०२६ रोजी पृथ्वीवर परतणार आहे. चंद्राभोवतीचा आपला १० दिवसांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून चार अंतराळवीर ओरियन कॅप्सूलसह पॅसिफिक महासागरात उतरणार आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’ने याबाबत वृत्त दिले आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच मानवाने चंद्राच्या इतक्या जवळून […]
भाजपसाठी विकास म्हणजे बिल्डर-कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल, आदित्य ठाकरे यांची टीका
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही नाशिक शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून नाशिकची जनता रस्त्यावर उतरली आहे. या वृक्षतोडीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला. ”गेल्या […]
धक्कादायक! हिंदुस्थानी लष्कराच्या मार्गांचा मागोवा घेण्यासाठी CCTV चा वापर, ११ जण अटकेत
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानमधील हँडलर्स आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) यांच्या पाठिंब्यावर चालणारे एक दहशतवादी, शस्त्रास्त्रे आणि हेरगिरीचे मॉड्यूल उद्ध्वस्त केले असल्याची माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली. सीमेपलीकडे बसलेले हँडलर्स हिंदुस्थानाच्या उत्तरेतील संवेदनशील ठिकाणांवर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे गुप्त जाळे बसवून हिंदुस्थानी लष्करी जवानांच्या रिअल-टाइम हालचालींवर कशा प्रकारे लक्ष ठेवून होते, याचा […]
उत्तर प्रदेशात घरात झोपलेल्या मायलेकीवर ॲसिड हल्ला; २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू, आईची प्रकृती चिंताजनक
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री एका घरात घुसून मायलेकीवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात २३ वर्षीय काजलचा मृत्यू झाला असून, तिची ५८ वर्षीय आई लीलावती देवी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, रामकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोरवन परिसरात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित […]
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; चांदी विक्रमी उच्चांकावरून २ लाखांनी स्वस्त
सोन्या-चांदीच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असून आज कमोडिटी मार्केटमध्ये दर चांगलेच कोसळलेले पाहायला मिळाले. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू होणाऱ्या शांतता चर्चेमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही घट झाली आहे. एमसीएक्स (MCX) मार्केटमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव १,७०० रुपयांनी कमी होऊन तो १,५१,७०० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त होऊन […]
Patan |पाटणमध्ये प्रशासनाचा ‘बुलडोझर’! बसस्थानकासमोरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त
पाटणमधील अतिक्रमणाचा वाद मिटला कराड– चिपळूण रस्त्याच्या कामासाठी पाटण शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेले अनेक विबसापासून चर्चेत होता. त्यातल्या त्यात बरारथानकासमोरील अतिक्रमण काढण्याबाबत अनेक तर्क बितर्क लावले जात होते.बसस्थानकासमोरील टपरीधारकांनी [...]
यमुना नदीत भाविकांची बोट पलटली; 10 जणांचा मृत्यू
मथुरेतील वृंदावन येथे शुक्रवारी यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक नाव उलटल्याने 10 भाविकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर नाव पुलाला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. या बोटीत 20 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तत्काळ धाव घेत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, मात्र 10 जणांना वाचवण्यात अपयश आले. अद्याप […]
Khandala News |खंडाळा शहरात रानगव्याचा थरार! मध्यरात्री नागरी वस्तीत वावर आढळल्याने खळबळ
खंडाळ्यात रानगव्याचे दर्शन खंडाळा : शहरात खंडाळा रानगाव्याचा बाबर दिसून आल्याची चर्चा रंगू लागली असून मध्यरात्री नागरी बस्तीत रानगाबा आल्याने शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.सध्या उन्हाळा सुरू [...]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर पाचगणी ( इम्तियाज मुजावर )-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपणे खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात असले [...]
बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा १० वा वर्धापन १४ एप्रिलला
१५ एप्रिलला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाट्यप्रयोग त.भा. वृत्तसेवा बांदा: श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर कलशारोहणाचा १० वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. १४ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्त सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक [...]
सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत ११ एप्रिल रोजी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित-दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच समाजात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी,या उद्देशाने दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संस्थांचा सत्कार व गौरवही करण्यात येणार आहे.
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू जाधववाडी – जाधववाडी (ता. माढा) येथील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.करण दिगंबर कांबळे (वय २०, मूळ [...]
बिहार विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाटण्यात खळबळ, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
बिहार विधानसभेच्या परिसरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी पाटण्यात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, विधानसभेला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धमकी मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. खबरदारीचा […]
महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज- जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,आज १० एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथील सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, धाराशिव नगर परिषद नगराध्यक्षा श्रीमती. नेहा काकडे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलकर,जिल्हा कोषागार अधिकारी .अर्चना नरवाडे,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे, व्याख्याते महेंद्र चंदनशिवे,प्रा.राजा जगताप,श्रीमती वनिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला मेळाव्यात जिल्हाभरातील महिला व बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की,भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला असून आर्थिक अडचणींना खचून न जाता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे,असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे ही आजची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,भारतीय संविधानातून मिळालेल्या लोकशाही,समता व समानतेच्या हक्कांमुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यातून नारीशक्ती अधिक सक्षम होत आहे.शिक्षणामुळे महिलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत असून त्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.असे त्या म्हणाल्या. महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुखदेव चिंचोळकर यांनी सांगितले की,माविमच्या माध्यमातून २००७ पासून महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहे.बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.सेंद्रीय शेती,महिला आरोग्य, स्त्री-पुरुष समानता आणि जीवामृत या विषयांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्र (उमरगा),समता लोकसंचलित साधन केंद्र (परंडा) आणि नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र (कळंब) या कार्यालयांना ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.या पारितोषिकांचे धनादेश अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.याच कार्यक्रमात २०२५-२६ या वर्षात महिला व आर्थिक विकास महामंडळ,धाराशिव यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्याख्याते महेंद्र चंदनशिवे, प्रा.राजा जगताप,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे, नगराध्यक्षा श्रीमती.नेहा काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे तसेच श्रीमती वनिता डोंगरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बचत गटांच्या महिला, नागरिक,विद्यार्थी,पत्रकार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले.
Solapur Crime News |दुकान बंद करतानाच घात झाला! सोलापुरात चोरट्याने वृद्धेला पांढऱ्या ओढणीने दाबले
. साफसफाई करणाऱ्या ७२ वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला सोलापूर : दुकानाच्या आवारातसाफसफाई करणाऱ्या वृध्द महिलेचे तोंड दाबून चाकूने मारण्याची भिती दाखवून तिच्या गळयातील ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिवगंगा नगर भाग ४ [...]
अमेरिकेचे २० कोटी डॉलर्सचे ‘MQ-4C ट्रायटन’ड्रोन होर्मुझच्या सामुद्रधुनीवर गायब
आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी अमेरिका ओळखली जाते. या शस्त्रास्त्रांची किंमतही भली मोठी असते. यापैकीच अमेरिकन नौदलाचे सर्वात महागड्या मानवरहित वाहनांपैकी एक ‘MQ-4C ट्रायटन’ हे पाळत ठेवणारे ड्रोन होर्मुझच्या सामुद्रधुनीवर बेपत्ता झाले आहे. उड्डाणादरम्यान हे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पोहोचल्यावर त्याने इमर्जन्सी अॅलर्ट दिला आणि काही वेळातच ड्रोन बेपत्ता झाले. इंग्रजी वृत्तानुसार, या ड्रोनने पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचे […]
वारकरी संप्रदाय आणि स्थानिक एकवटले! पंढरपुरातील ‘त्या’पडीक जागांवरून प्रशासनाला घेरले
रॅलीद्वारे पंढरपूरकरांनी दाखवले शक्तीप्रदर्शन सोलापूर -एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आसीफ मलंग मुजावर (रा. [...]
इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू, हिंदुस्थानने व्यक्त केली चिंता
लेबनॉनमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल हिंदुस्थानने शुक्रवारी चिंता व्यक्त केली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घडामोडींवर भाष्य केले. रणधीर जयस्वाल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लेबनॉनमधील सध्याची परिस्थिती अत्यंत त्रासदायक”आहे. विशेषतः नागरी मृत्यूंच्या वाढत्या संख्येचा […]
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक
धाराशिव (प्रतिनिधी)- मार्च महिना संपल्यानंतर दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग येतो. विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होऊन पुढील तीन महिने सुरू राहते. मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशभरातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले असून, देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे ‘जनगणना 2027’ची मोठी पार्श्वभूमी असून, सध्या देशभरात जनगणनेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. नागरिकांना ‘स्वयं-गणना’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी व घरांची गणना केली जाणार असून, एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान राज्य सरकार निश्चित करणाऱ्या 30 दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. स्पष्ट आदेश केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात येऊ नये. राज्यांच्या मुख्य सचिवांनीही आपल्या स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबणार असल्याचे स्पष्ट झाले असून, संपूर्ण यंत्रणा जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहे.
गॅस तुटवड्याचा फटका ग्रामीण भागाला
भुम (प्रतिनिधी)- एलपीजी गॅस सिलिंडर तुटवड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. बुकिंग प्रक्रियेत अडथळे, डीएससी क्रमांकासंबंधित समस्या आणि अपुरा पुरवठा यामुळे गॅस वितरणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये सध्या गॅसचे वाटप ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात गॅस वितरण करताना एजन्सी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत एका गावात एजन्सी कर्मचाऱ्यांना अडवून बुकिंग नसतानाही सिलिंडर घेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा अपुरा असल्याने समस्या अधिकच गंभीर बनत आहे. सध्या 8 मार्चपर्यंत बुकिंग सिलिंडरची संख्या 4,194 इतकी असून, कंपनीकडून केवळ 450 सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दरम्यान, भूम येथील एजन्सीसमोर नागरिकांना उन्हात तासन् तास रांगेत थांबावे लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरीवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वृद्ध महिला स्वतः सिलिंडर वाहून नेतानाचे चित्रही दिसून येत आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वितरणासाठी पोलिस संरक्षणाची मागणी गॅस सिलिंडर टंचाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून 26 मार्चला पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप संरक्षण उपलब्ध न झाल्याचे एजन्सीचे सुशील धावारे यांनी सांगितले.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान नसून लोकचळवळ- मंत्री प्रकाश आबिटकर
धाराशिव (प्रतिनिधी)- “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक आरोग्य चळवळ आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होतील. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. गावागावांत जनजागृती करून तपासण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह, एम.आय.टी.इंजिनीअरिंग कॉलेज येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांच्यासह सरपंच,पंचायत समिती सभापती व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर,जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वरिष्ठ अधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. जिल्हा प्रथम येणार- अर्चनाताई पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्हा पूर्णपणे ‘आरोग्य संपन्न’ करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असे अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
संजू परब यांनी खा.नारायण राणेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सावंतवाडी : प्रतिनिधी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी कणकवली येथे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. खासदार नारायण राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन त्यांनी सन 1999 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून [...]
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धलियारा येथील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘खूनी मोर’ जवळ भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 503 वर राधा स्वामी सत्संग गृहाजवळ भाविकांनी भरलेली एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन सुमारे 90 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 27 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच […]
डॉलरपुढे रुपयाची घसरण सुरुच, प्रती डॉलर पोहोचला ९२.६८ वर
जागतिक बाजारपेठेतील वाढता दबाव आणि अमेरिकन डॉलरच्या सातत्याने वाढणाऱ्या मजबूतीमुळे हिंदुस्थानी रुपयाला आज पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. डॉलरसमोर रुपयाच्या गटांगळ्या सुरूच आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी कमकुवत होत ९२.६८ प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावर डॉलर निर्देशांकात झालेली वाढ रुपयाच्या या घसरणीला कारणीभूत […]
पुणे शहरातील मध्यवर्ती रेड लाईट भागातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करणार्या महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ काढून स्टींग ऑपरेशनचे गोंडस नाव देणार्या तथाकथित पत्रकार रोहन कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच हे स्टींग ऑपरेशन घडवून आणण्यासाठी नामांकित ३ पत्रकारांनी एका राजकीय महिला पदाधिकार्याकडून तब्बल २५ लाख रूपयांची सुपारी घेतली. दरम्यान, भोंदू खरातला आम्ही उघडे पाडल्यानंतर आमच्यासोबत बदला घेण्यासाठी […]
खेराडकर गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची दगडफेक सांगली : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा मुबलक असल्याचा दावा करत ग्राहकांना सबुरीचा सल्ला देणाऱ्या प्रशासनाचे दावे फोल ठरत आहेत. नोंदणी करूनही वेळेत गॅस सिलिंडर मिळत नसल्याने एजन्सीसमोर ग्राहकांच्या पहाटेपासूनच रांगा [...]
सांगली जिल्हा पुन्हा हादरला! अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काढला काटा
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले कवठेमहांकाळ : अनैतिक संबंधास अडसर ठरत असणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून व काठीने मारहाण करून खून केल्याची घटना करोली (टी) येथे घडली असून आईच्या या दुष्कर्मास दोन मुलांनीही मदत [...]
उत्तर प्रदेशात SIR ची अंतिम मतदार यादी जाहीर; जानेवारीच्या तुलनेत ८४ लाखांहून अधिक मतदारांची वाढ
एसआयआर (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी लखनौमध्ये माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. नव्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील एकूण मतदारांची संख्या आता १३ कोटी ३९ लाख ८४ हजार ७९२ वर पोहोचली आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा […]
Islampur News |पेठ-शिराळा मार्गावर भीषण अपघात; भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाचा करुण अंत
रेठरे धरणजवळ कोल्हापूरच्या अधिकाऱ्याचा मृत्यू ईश्वरपूर : पेठ-शिराळा मार्गावररेठरेधरण येथील लोहारवस्ती जवळ कारने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रदीप खंडेराव कांबळे (५०, मूळ रा. सुभेदार रामजी आंबेडकर [...]
Ambabai Temple |अंबाबाई मंदिरात व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून फसवणूक; फुलेवाडीतील महिला गजाआड
अंबाबाई मंदिरात तोतया महिला सुरक्षा रक्षक अटकेत कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांकडूनदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असेकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्रकारदर्शनासाठी पैसे उकळणाऱ्या तोतया सुरक्षा रक्षक महिलेस जुना राजवाडा [...]
पश्चिम रेल्वेवर रविवार १२ एप्रिलला सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ‘जम्बो ब्लॉक’
पश्चिम रेल्वेवर रविवार १२ एप्रिलला, सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लाॅक घेण्यात येईल. यावेळी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी १०:०० ते दुपारी १५:०० वाजेपर्यंत, अशा पाच तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने […]
तोंडाची दुर्गंधी, वजन कमी करण्यासाठी महागडी औषधे टाळा…रोज सकाळी पेरूची पाने चावून खा
मौखिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेची असते. मौखिक स्वच्छता नसल्याने हिरड्यांना सूज येणे, दातदुखी किंवा तोंडाची दुर्गंधी यांसारख्या समस्यांमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर आत्मविश्वासही कमी होतो. सकाळी रिकाम्या पोटी पेरूची कोवळी पाने चावणे हा या समस्यांवर एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे. या पानांमधील दाहक-विरोधी आणि जीवाणू-विरोधी (antibacterial) गुणधर्म तोंडात वाढणाऱ्या जीवाणूंना नष्ट […]
भाईजान ठरला शब्दाचा पक्का, सलमानच्या आगामी सिनेमात झळकणार राजपाल यादव
बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या बिग बजेट अॅक्शन चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. मुख्य बाब म्हणजे आता या चित्रपटात त्याच्यासोबत राजपाल यादव देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी राजपाल यादवची एका बक्षिस समारंभात मस्करी करण्यात आली होती. त्याच्यावर असलेले लोन त्याला चुकवावे लागणार असे म्हणत राजपालची सर्वांसमोर मस्करी करण्यात आली होती. त्यावेळी एकटा सलमान खान हा […]
नितीश कुमार यांना भाजपने धोका दिला, अखिलेश यादव यांची टीका
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. “मी अशी इच्छा व्यक्त केली होती की नितीश कुमार यांनी पंतप्रधान म्हणून निवृत्त व्हावे. आमच्या ‘इंडिया’ आघाडीतील अनेक सहकाऱ्यांचीही हीच इच्छा होती,” असे यादव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या घडामोडींवरून मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे. […]
उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?
धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे थंड पाण्याची गरज वाढली असून शहरात आणि ग्रामीण भागात जारच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, केवळ थंड पाणी मिळते म्हणून जारचे पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते. पाण्याची गुणवत्ता तपासणे आता अत्यावश्यक बनले आहे.अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया (RO/UV) योग्य पद्धतीने केली जाते का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. काही विक्रेते केवळ साधे फिल्टर करून किंवा जुन्या जारमध्ये पाणी भरून विक्री करत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे हे पाणी शंभर टक्के सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा अपूर्णपणे फिल्टर केलेले पाणी पिण्यामुळे पोटाचे विकार, जुलाब, टायफॉइड, पिवळ्या काविळीसारखे आजार होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात अशा आजारांचा धोका अधिक वाढतो. नागरिकांनी घ्यावयाची काळजी फक्त नोंदणीकृत व विश्वासार्ह पुरवठादारांकडूनच जार पाणी घ्यावे, जारवरील सील, उत्पादन तारीख आणि ब्रँड तपासावा जार स्वच्छ आहे का, आत घाण किंवा कण दिसत नाहीत ना याची खात्री करावी पाण्याची चव, वास वेगळा वाटल्यास त्वरित वापर थांबवावा. दरम्यान, प्रशासनानेही जार पाणी विक्रेत्यांवर नियमित तपासणी मोहीम राबवून निकृष्ट दर्जाचे पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात शरीराला पाणी आवश्यक असले तरी ते सुरक्षित आणि शुद्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे थंड आहे” एवढ्यावर न थांबता शुद्ध आहे का? हे तपासणे आता काळाची गरज बनली आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र
धाराशिव (प्रतिनिधी)- एखादा योद्धा कसाही करुन पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची प्रतिमेबाबत लोकामध्ये सभ्रम तयार केला जातो असाच काहीसा प्रकार सद्या खासदार ओमराजे निंबाळकर दादा यांच्या बाबतीत अगदी नियोजनबद्ध केला जात आहे. पक्ष बदलाची चर्चा म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी जाधवर म्हणाले की, ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जनतेचा विश्वास हीच त्यांची शिदोरी असुन त्याच बळावर ते आतापर्यंत राजकारण करत आहेत. त्यांना पक्ष बदलण्याची आवश्यकता का असेल? स्वार्थ साधण्यासाठी अनेक जण पक्ष बदल केला पण एकनिष्ठ राहिले म्हणूनच जनतेनी त्यांना भरभरून मतरूपी आर्शिवाद मिळाला आहे. आता ही चर्चा घडवून विरोधी गटाला काय अपेक्षीत आहे याचा अंदाज सहज येऊ शकतो. 24 तारखेला पक्ष व चिन्ह याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अशी अफवा पसरवून लोकांच्या मनात एकप्रकारे संभ्रम निर्माण करायचा आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा घडवून आणली जाते. पुढे आपोआप त्या बंद होतात. खासदार म्हणून ते आजही सक्षमपणे काम करत आहेतच पण त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात तीन आमदार निवडून आले आहेत असे तानाजी जाधवर यांनी सांगितले.
51.840 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र श्री तुळजाभवानी देवीला अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील गणेश नगर, सोरपटवाडी येथील मनिषा अंकुश धामे यांनी आज श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 51.840 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले. मनिषा धामे या सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींला मंगळसूत्र अर्पण केले. यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
“असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली..“ वडगाव (सि.) येथे रंगला गझल मुशायरा
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार तर्फे आयोजित कवयित्री बी. के. सुरभी यांच्या मोरपिस व अवघा रंग या पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त सिद्धेश्वर वडगाव येथे आयोजित गझल मुशायऱ्यात अनेक दर्जेदार गझलांचे सादरीकरण झाले. या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील गझलकार सुनिता गुंजाळ कवडे या होत्या. तर ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे, साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मुशायऱ्याच्या सुरुवातीला धाराशिव येथील गझलकार मीना महामुनी यांनी ओढ नाही राहिलेली माणसाची माणसाला, दुःख सारे सांग आता अंतरीचे विठ्ठलाला, शेण मातीच्या घरातच लेकरे घडली सुसंस्कृत, वाढल्या क्राँक्रीट भिंती कोण नाही आस-याला ही गझल सादर करून मुशायऱ्याची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर बीड येथून आलेले बापू धनवे यांनी ऋतूप्रमाणे आयुष्याला बदलत गेलो, भिजलो ना गारठलो नुसता करपत गेलो, अथांग सागर व्हावे इच्छा मनात होती, झरा जाहलो आनंदाने झिरपत गेलो, ही गझल सादर करून सभागृहाची वाहवा मिळवली. धाराशिव येथील गझलकार कृष्णा साळुंके यांनी यह क्या खुलूस हो, यह कैसा खुमार हो, बड़े गुम रहते हो, ऐसा भी क्या गुबार हो, औ जो भटकते हो युं अकेले बेमतलब, कौन खुशी के तुम कहना शहरयार हो, ही हिंदी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वैराग येथील गझलकार जीवन धेंडे यांनी एक टेबल,चहा ती तिचा चेहरा... काय नाही पुढे आठवत आणखी... रात्र आहे किती दरवळत आणखी...कोण आहे सुगंधी जळत आणखी... ही गझल सादर करून मुशायऱ्यात बहार आणली. गंगाखेड येथून आलेले यशवंत मस्के यांनी थोडी थोडी म्हणता म्हणता बक्कळ वाया गेली, असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली, कळला नाही तिच्या मनाला भाव मनाचा माझ्या, तिच्याच साठी यशवंताची अक्कल वाया गेली, या गझलेतून सभागृहाला हसायला भाग पाडले. स्नेहलता झरकर अंदुरे यांनी वादळ येते तसेच फिरते.. विशेष काही नाही, फक्त इकडचे तिकडे करते.. विशेष काही नाही, कर्तव्याच्या तळपायांची चाळण होते दिवसा,फुंकर मारत रात्र सरकते.. विशेष काही नाही, या गजलेतून विचार करायला भाग पाडले. करमाळा येथील गझलकार नवनाथ खरात यांच्या एक झलक तुझी मला रात्र जागवायची, सोड ना सखे तुझी सवय वळुन बघायची, द्यायचे न घ्यायचे आपल्या मधे नको, मी कितीक घ्यायचो तू कितीक दयायची या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली. गंगाखेड येथील गझलकार डॉ. अविनाश कासांडे यांनी जीवनी जसजसा ढासळत राहिलो, मी स्वत:ला तसा आढळत राहिलो, शब्द होते कुठे बोलण्यासारखे ? ती मला मी तिला न्याहळत राहिलो, ही तरन्नूम गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ऋचा पत्की यांनी सादर केलेल्या आईवरील गझलेने सभागृहाला भावुक केले. डॉ. रेखा ढगे यांनी सादर केलेली, कशाला उगा केस मी डाय केले, असे रंगले अन मला बाय केले, कसा रंग माझा होता कळेना, बघातोंड वांगे जसे फ्राय केले ही गझल भाव खाऊन गेली. गझलकार युवराज नळे यांनी सादर केलेल्या चेहऱ्यावर भाळणे नाही बरे, विस्तवाशी खेळणे नाही बरे..भिड जरासा संकटाला मैतरा,कासरा कवटाळणे नाही बरे.. या गझलेला रसिकांनी डोक्यावर घेतले. राणी सावरगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांची अंधश्रद्धा मला सत्य वाटायची, माय जेंव्हा कधी दृष्ट काढायची, काजळा सारखा रंग माझा तरी माय माझी मला तीट लावायची, ही गझल रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. लातूरच्या गझलकार जना घुले यांनी काय करावे नव्हते उमजत हरकत नाही, माझेच मला होते फसवत हरकत नाही, या गझलेतून रसिकांची दाद मिळवली. प्रा.विद्या देशमुख यांच्या रंग ,झेंडे,चिन्ह, नेते फक्त होते, एक सारे लाल जेव्हा रक्त होते, तुमची असेल मोठी गगनात झेप तुमच्या, नाही कधीच दुबळी मीही नभात माझ्या, ही गझल अतिशय लक्षवेधी ठरली. गझलकार बाळ पाटील यांनी नेमके जे न्यायचे ठेवून गेली, विश्वशांती माणसे ठेवून गेली, हे किती बुजगावणे ते छान केले, पाखरे अंगावरी खेळून गेली, ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. खात्रीने जर वसंत येतो बहरायाला खंत उगा मी पानगळीची करू कशाला, प्राजक्ताची क्षणभंगुरता मी अनुभवली, अन जगण्याचा अर्थ नव्याने मला समजला, तुळजापूर येथील गझलकार कांचनगंगा मोरे यांनी या गझलेतून आशावाद मांडला. डॉ . सुलभा देशमुख यांनी बाप म्हणतो लेक मोठी फार नाही मांडला मी पण तिचा बाजार नाही, मान्य आहे की मुलींची वाण आहे, अन् उडत दारात आता बार नाही, या गझलेतून मुलीच्या भावना व्यक्त केल्या. जीवनाच्या राहिलो कर्जात आपण, आणि मरणाच्या किती धाकात आपण, जर रिकामे शेवटी जाणार होतो, एवढे का वागलो ताठ्यात आपण लातूर येथील गझलकार वंदना केंद्रे -बांगर यांच्या या गझलेने सभागृहाला विचार करायला भाग पाडले. गझलकार बी. सुरभी यांनी अत्तराचा बोलबाला फार होतो. पण फुलांचा केवढा बाजार होतो, का तिला हो अस्त्र केले पागलांनी, चीरहरणाने तिच्या बेजार जो तो, ही गझल सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे यांनी मांडलेला डाव हा मी टाकुनी जाणार नाही, हार होवो जीत होवो यापुढे माघार नाही, सूर्य केव्हा मागतो का भीक अंधारासमोरी, जे कधी होणार नाही ते कधी होणार नाही, ही गझल सादर करून मुशायऱ्यात रंगत आणली. पालम येथील गझलकार आत्तम गेंदे यांनी, आता केवळ तेच आपला पूर्ण अध्याय करू शकते.. मला कृष्ण अन तुला राधिका फक्त करू शकते.. शाळेइतकी सोपी नसते शाळेबाहेरची शाळा, ही दुनिया केव्हाही ध चा म, एक्स चा वाय करू शकते. ही गझल सादर करून मुशायऱ्याला उंचीवर नेले. मुशायऱ्याचे सुत्रसंचालक गझलकार शेखर गिरी यांनी घेऊन जवळ प्रेमाने कुरवाळू शकलो नाही, मी सुखास माझ्या क्षणभर सांभाळू शकलो नाही, मित्राने वार किती तो प्रेमाने केला होता, मी वार म्हणूनच त्याचा मग टाळू शकलो नाही, ही गझल सादर केली. शेवटी मुशायऱ्याच्या अध्यक्ष सुनिता गुंजाळ कवडे यांनी तुला कळेना काय नेमके गमवलेस तू, चवळी सोडुन भोपळ्यास का निवडलेस तू, सगळ्या नजरा खिळल्या होत्या माझ्यावरती, उखाण्यामधे थेट नाव तर घेतलेस तू, सरडा सुद्धा किती लाजला पाहून तुला, आभार किती मानू इतके शिकवलेस तू, या गझलेने मुशायऱ्याचा समारोप केला. शेवटी बी. के. सुरभी यांनी उपस्थितांचे आभार मानले. गझल मुशायऱ्याला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बुद्रुक येथे शेतात अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सिंचन साहित्य जळून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना सोमवार (दि. 6 एप्रिल) रोजी दुपारी घडली. शेतकरी संपत अंबादासराव जळके यांच्या गट नं. 297 येथील शेतात अचानक आग लागली. या आगीत स्प्रिंकलर सेटचे सुमारे 35 पाईप व टी-एल्बो साहित्य, ठिबक सिंचनाचे 40 बंडल पूर्णपणे जळून खाक झाले. दुपारी सुमारे 1.40 वाजता शेतकऱ्यांना फोनवरून माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता, शेतातील सोयाबीन व हरभऱ्याचे भरडलेले काड (भुसकट) पेट घेतल्याचे दिसून आले. अब्याच्या झाडाखाली ठेवलेले सिंचन साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आगीची तीव्रता एवढी होती की, सुमारे 50 फूट अंतरावरही झळ जाणवत होती, त्यामुळे आग विझविणे अत्यंत कठीण झाले होते. या आगीत परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, मोरे यांचेही पाईप जळाल्याचे समोर आले आहे. अनेक शेतांच्या बांधांवरही आग पसरली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित डी.पी. मागील महिन्यापासून बंद असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “डी.पी. सुरू असता तर पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणता आली असती.” या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अवकाळी संकटे, वाढती उष्णता आणि आता आगया तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रा.डॉ.मारुती लोंढे यांचा कनिष्ठ विभागाकडून सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाकडून डॉ. मारुती लोंढे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरची अर्थशास्त्र विषयातून पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुनील मोहिते, प्रा.सचिन चव्हाण,साहित्यिक डॉ.अरविंद हंगरगेकर आदींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कनिष्ठ विभागातील गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील मोहिते म्हणाले की, डॉ. मारुती लोंढे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे.शैक्षणिक क्षेत्रामध्ये खुप मोठी भरारी घेतलेली आहे. यापुढे देखील त्यांची अशीच प्रगती व्हावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुर्यवंशी यांनी देखील अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.मारुती लोंढे यांनी सत्काराबध्दल सर्वांचे आभार मानले.
बुकिंग प्रक्रियेतील अडचणी दूर!
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात 172 चालक व 193 वाहक कार्यरत असले आहेत. मात्र, त्यापैकी 20 ते 22 चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी 12 वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रणदीप हुड्डाने शेअर केला मुलीचा पहिला फोटो; मुलीच्या नावाचा अर्थ काय हेही सांगितले
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम यांच्या घरी एका महिन्याआधी १० मार्च रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे हुडा परिवारात आनंदाचे वातावरण आहे. रणदीपने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. आता रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या लहान मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. रणदीपच्या […]
‘नितीश युगाचा अंत’, नितीश कुमारांनी राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर काँग्रेसची टीका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया देताना “हा बिहारमधील ‘नितीश युगाचा’ अंत आहे,” अशी टीका केली आहे. शुक्ला यांनी सांगितले की, नितीश कुमार यांची राज्यसभेत जाण्याची प्रक्रिया ही भाजपची पूर्वनियोजित रणनीती होती. “2025 च्या बिहार […]
महाकुंभची ‘व्हायरल गर्ल’मोनालिसाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात
महाकुंभ मेळ्यादरम्यान आपल्या विवाहामुळे चर्चेत आलेली मध्य प्रदेशची ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशी अहवालात मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले असून, याप्रकरणी तिचा पती फरमान खान याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यामुळे आता फरमानवर अटकेची टांगती तलवार निर्माण […]
ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेल्या श्रीनंदाचा मृतदेह सापडला, तीन दिवसांपासून होती बेपत्ता
ट्रेकिंगदरम्यान कर्नाटकातील चिक्कमगलूरू जिल्ह्यातील चंद्रद्रोणा पर्वतरांगेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय श्रीनंदाचा माणिक्यधारा धबधब्याजवळ मृतदेह सापडला. श्रीनंदा गेल्या दिवसांपासून बेपत्ता होती. पोलीस आणि बचाव पथके तिचा शोध होते. शोध मोहिमेदरम्यान, दोन हजार फूट खोल दरीत धबधब्याजवळ तिचा मृतदेह सापडला. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनंदा केरळमधील 40 पर्यटकांच्या ग्रुपसोबत चंद्रद्रोणा पर्वतरांगेत चिक्कमगलूरू येथे ट्रेकिंगसाठी आली होती. […]
Ratnagiri News |रत्नागिरीतील अंबुवाडी समुद्रकिनारी कासवांच्या पिल्लांना मिळाले जीवदान
कासव संवर्धनासाठी नांदिवडे गाव सरसावले रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावातील अंबुवाडी (आंबू) समुद्रकिनारा हा त्याच्या शांततेसाठी आणि सुरक्षित सपाटीकरणामुळे प्रसिद्ध आहे. यामुळे वर्षानुवर्षे समुद्री कासवांचे आवडते प्रजनन स्थळ ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही [...]
पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांची माफी मागायला हवी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधानांवर महिलांच्या मुद्द्यावर दिशाभूल करणारी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान आता माध्यमांमध्ये लेख लिहून स्वतःला 2029 पासून लोकसभा […]
Ratnagiri News –रत्नागिरीत उद्या रंगणार आयपीएल फॅनपार्क
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दि.11 व 12 एप्रिल रोजी स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयपीएल फॅन पार्क आयोजित करण्यात आले आहे.या फॅन पार्क मोठ्या स्क्रीनवर चार क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्याची संधी रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींना लाभणार असल्याची माहिती आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी अनिल दातार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या 11 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज […]
कराड पोलिसांनी ३ वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या कराड – जास्त परताव्याच्या गोड बोलांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अखेर कराड शहर पोलीस व डीवायएसपी पथकाने मुंबईतून बेड्या ठोकल्या. तब्बल तीन वर्षे बनावट ओळखी आणि परदेशातील वास्तव्याच्या आड [...]

28 C