‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चा भव्य प्रारंभ
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोहळा, एक वर्ष उत्सव वृत्तसंस्था/नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या सोहळ्याचा भव्य आणि शानदार शुभारंभ करण्यात आला आहे. हे पर्व एक वर्षभर देशभरात साजरे करण्यात येणार आहे. परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुनर्स्थापित करण्यात आलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित हा सोहळा आहे. 75 [...]
भारतीयांच्या व्हिसा सेवांवर बांगलादेशकडून निर्बंध
तूर्तास व्यवसाय-रोजगार व्हिसा सुरू राहणार : द्विपक्षीय तणावादरम्यान भारतीयांना धक्का देण्याचा प्रयत्न वृत्तसंस्था/ढाका, नवी दिल्ली आयपीएलमधून एका खेळाडूला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाच्या निषेधार्थ बांगलादेशने भारताला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. सध्या विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरूच राहतील. बांगलादेश सरकारने दिल्ली, आगरतळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना सामान्य व्हिसा सेवा [...]
वांगचुक यांच्यासंबंधी 12 जानेवारीला सुनावणी
अटकेला आव्हान देणारी याचिका वृत्तसंस्था/नवी दिल्ली सध्या तुरुंगात असलेले लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या जामीन अर्जावर आता सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी सुनावणी होणार आहे. त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) पतीच्या अटकेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. गुरुवारी यासंबंधी एका खंडपीठासमोर [...]
वृत्तसंस्था/नवी दिल्ली दिल्लीतील एसआयआर प्रक्रियेपूर्वी आग्नेय जिल्हा पोलिसांनी 20 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 12 पुरुष, 8 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. सर्वांनी बनावट ओळखपत्रे बनवली होती. दिल्ली पोलीस आता ही बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. बांगलादेशी घुसखोरांबाबत पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त कारवाई करून त्यांना पकडले. आता सर्वांना [...]
तुर्कमान गेट प्रकरणी आणखी 6 अटकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली दिल्लीतील तुर्कमान गेट हिंसाचार प्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली महानगरपालिकेने या भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी हाती घेतलेल्या अभियानाच्या प्रसंगी हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दिल्लीचे 5 पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जखमी झाले होते. हिंसाचार करणाऱ्या आणखी 25 जणांची ओळख पटविण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हिंसाचारात साधारणत: 35 जणांचा [...]
मध्यस्थ तुर्कियेने प्रकियेतून घेतली माघार वृत्तसंस्था/अंकारा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध तणावपूर्ण असून दोन्ही देशांनी परस्परांवर बॉम्बफेकही केली आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यावर मध्यपूर्वेच्या अनेक देशांनी मध्यस्थीसाठी धाव घेतली, परंतु कुणालाच यश मिळू शकलेले नाही. दोन्ही देशांच्या बिघडत्या संबंधांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तुर्कियेने आता या प्रक्रियेतून पूर्णपणे माघार घेतली आहे. वारंवार प्रयत्न करूनही पाक आणि [...]
दिपू दास हत्या प्रकरणी सूत्रधाराला अटक
वृत्तसंस्था/ढाका बांगला देशमध्ये झालेल्या हिंदू युवकाच्या हत्येप्रकणी मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. 18 डिसेंबरला दास याची बांगला देशची राजधानी असणाऱ्या ढाका या शहराच्या नजीक निर्घृण हत्या करण्यात आली होती. तो एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याची हत्या धर्मांधांकडून करण्यात केली होती, अशी माहिती हत्या झाल्यानंतर देण्यात आली होती. 27 वर्षांच्या [...]
उत्तरप्रदेशातील सप आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन
दुद्धी मतदारसंघाचे होते आमदार सोनभद्र : उत्तरप्रदेशच्या दुद्धी मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे आदिवासी समुदायासह राजकीय आणि सामाजिक जगताला धक्का बसला आहे. दुद्धी मतदारसंघात सातत्याने सक्रीय राहिलेले सप आमदार गोंड यांना आदिवासी समुदायाचा सशक्त आवाज म्हणून ओळखले जात होते. साधेपणा आणि संघर्षशील प्रतिमेमुळे ते जनतेदरम्यान लोकप्रिय [...]
बीएनपी नेत्याची बांगलादेशात हत्या
निवडणूकपूर्व हिंसाचार सुरूच वृत्तसंस्था/ढाका युवा नेते उस्मान हादी यांच्या हत्येपासून बांगलादेशात निवडणूकपूर्व राजकीय हिंसाचार वाढतच आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) स्वयंसेवक शाखेचे नेते अझीझुर रहमान मुसब्बीर यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी ढाका येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुसब्बीर यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलीस आणि पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुसब्बीर आणि मसूद जवळच्या रस्त्यावरून [...]
बळ्ळारीची वाटचाल रायलसीमाच्या दिशेने?
जनार्दन रेड्डी कारागृहात गेल्यानंतर सूर्यनारायण रेड्डी यांचे चिरंजीव भरत रेड्डी बळ्ळारीचे आमदार झाले. विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रिपब्लिक बळ्ळारीतील जनार्दन रेड्डी यांचा दबदबा मोडून काढण्यासाठी शड्डू ठोकला होता. बेंगळूरहून बळ्ळारीपर्यंत पदयात्राही काढली होती. तेव्हा कोठे जनार्दन रेड्डीचा दबदबा थोडा कमी झाला होता. बळ्ळारीच्या राजकारणाला अशी पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बळ्ळारीतील प्रवेश बंदी उठवल्याने आता [...]
भारतात गेल्या पाव शतकापासून विविध विकास प्रकल्पांखातर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जंगले नष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे मानव व वन्यजीव यांच्यातला ताणतणाव टोकाला गेलेला पाहायला मिळत आहे. 2015 ते 2020 पर्यंत जागतिक पातळीवर ब्राझिल पाठोपाठ जंगलांचा ऱ्हास करण्याचे प्रमाण आपल्या देशात वाढलेले आहे. आसाम, मिझोराम, अऊणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या [...]
योगच्या प्रसारासाठी झटणारे : योगपटू विश्वदीप नाईक
योग अकादमीची स्थापना : योग शिक्षणात पदवी नरेश कृष्णा गावणेकर, फोंडा योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक व शारीरिक शास्त्र आहे. योग हे एक पूर्ण विज्ञान जीवनशैली, चिकित्सा व पूर्ण अध्यात्म विद्या आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषी-मुनीनी योग आविष्कृत केले होते. महर्षी पतंजलीने अष्टांग योगच्या रुपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादीत केले. [...]
‘आयएसएल’ परततेय…मात्र अस्थिरता कायम !
‘इंडियन सुपर लीग’च्या 2025-26 हंगामात आतापर्यंत ज्या प्रकारे घटना घडल्या अन् ज्या प्रकारे स्पर्धा ठप्प झाली ते पाहता भीती निर्माण झाली होती ती फुटबॉल रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या या लीगचं यंदा दर्शन न होण्याची, प्रथमच क्लब फुटबॉलचा संपूर्ण देशांतर्गत हंगाम वाया जाण्याची…पण बऱ्याच विलंबानंतर अन् खास करून क्रीडा मंत्रालयाच्या नाट्यामय हस्तक्षेपामुळं कोंडी सुटलीय…असं असलं, तरी अखिल [...]
>>संजयराऊत,महेशमांजरेकर ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात दाणादाण उडाली आहे. यापुढे ठाकरे विरुद्ध ठाकरे नसून ठाकरे औ ठाकरे अशीच बेरीज होईल. महाराष्ट्राचे भविष्य ठरवणाऱ्या या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाढलेल्या राजकीय विकृतीवर जोरदार हल्ला चढवला. ‘‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे […]
हिंदुस्थानवर अमेरिका 500 टक्के टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा जबर दणका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज हिंदुस्थानला दुहेरी दणका दिला. रशियाकडून तेल खरेदी करणाऱया देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्यास ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. तसेच हिंदुस्थानच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल सोलार अलायन्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे हिंदुस्थानच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत. युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियाने थांबवावे यासाठी ट्रम्प आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तेलसमृद्ध रशियाच्या […]
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी डॉ. गाडगीळ यांनी अतुलनीय योगदान दिले होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित […]
राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसी तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रतीक जैन यांच्या घरी धडकल्या. ईडीने हात लावण्याअगोदरच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच उमेदवारांची माहिती असलेल्या फायली ताब्यात घेतल्या. पक्षाशी संबंधित कागदपत्रे आणि उमेदवारांच्या याद्या […]
रस्त्यावरील सर्व कुत्र्यांना हटवण्याचे आदेश नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
रस्त्यांवरील प्रत्येक भटक्या कुत्र्याला हटवण्याचे निर्देश आम्ही दिलेले नाहीत. प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) नियमांनुसार, या कुत्र्यांचे प्रकरण हाताळा व आवश्यक ती कारवाई करा असे आमचे निर्देश होते,’ असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. त्यावरून देशभरात गदारोळ सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी […]
अजित पवारांचा उमेदवार हद्दपार; सांगली पोलिसांचा दणका
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आझम काझीसह जिह्यातील वेगवेगळय़ा ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. अजित पवार यांची शुक्रवारी सभा होण्यापूर्वीच ही कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपारीचे आदेश […]
सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार, पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का
महानगरपालिका निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर आले असताना अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये उभे केलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हे सचिन खरात यांच्या गटाचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता स्वतः खरात यांनी तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्यावरून अजित पवार […]
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांत भाजपने ‘एआयएमआयएम’ म्हणजे मियाँ ओवेसींची छुपी मदत वारंवार घेतली. मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात. आता झाडामागचा हा रोमान्स उघड्यावर आला. भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे. महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही. […]
लेख –सिम बाइंडिंग : सायबर सुरक्षेचे नवे अस्त्र
>> महेश कोळी देशात फेब्रुवारी 2026 पासून सिम बाइंडिंग हा नियम लागू होतोय. या नियमानुसार, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम इत्यादींसाठी मेसेजिंग अकाऊंट तयार करण्यासाठी वापरला जाणारा फोन नंबर फोनवरून काढून टाकला तर सर्व अकाऊंट आपोआप बंद होतील. टेलिकॉम कंपन्या याच्या बाजूने आहेत, तर ब्रॉडबँड इंडिया फोरमने याला अतिरेकी हस्तक्षेप म्हटले आहे. त्यांना या नियमाबद्दल अस्वस्थ वाटते. वास्तविक, […]
जाऊ शब्दांच्या गावा – कोलणे आणि कोलदांडा
>> साधना गोरे हल्ली तरुण, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील तरुण मुलं ‘मी त्याला कोलला’ किंवा ‘मी त्याला कोलतो’ यांसारखे वाक्प्रयोग सर्रास वापरताना दिसतात. संदर्भावरून आपल्याला या वाक्यांचा अर्थ लागतो खरा, पण त्याचं मूळ समजून घेणं तितकंच रोचक आहे. यातली गंमत अधिक रंगतदार व्हावी म्हणून ‘कोलदांडा’ या शब्दाची माहिती आधी घेऊया. कधी एकाच भाषेतील तर कधी दोन […]
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने जिंकलेला वन डे वर्ल्ड कप आज आठवणींत कोरला गेला असला तरी क्रिकेट कधीच थांबत नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगामानंतर आता सगळे लक्ष वळले आहे ते हिंदुस्थानातील महिलांच्या सर्वोच्च टी-20 स्पर्धा असलेल्या महिला प्रीमियर लीगकडे (डब्ल्यूपीएल). हिंदुस्थानी महिला खेळाडू आता नव्या रणांगणात उतरायला सज्ज झाल्या आहेत. विश्वविजयी कामगिरीनंतर प्रथमच होत असलेला डब्ल्यूपीएलचा नवा […]
टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर हिंदुस्थानी क्रिकेटला जबर धक्का बसला आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात विजेतेपदाची मोहोर उमटवणारा युवा फलंदाज तिलक वर्मा गंभीर दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरा गेला असून, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा टी-20 वर्ल्ड कपमधील सहभागाबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या […]
अॅशेस म्हणजे काही केवळ क्रिकेटची मालिका नाही; ती इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलियात आली की सुरू होणारी वार्षिक परीक्षा. यंदाही अॅशेस प्रश्नपत्रिकाच अवघड निघाली. अखेर पाचवी सिडनी कसोटीही 5 विकेट्सनी फत्ते करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या बॅझबॉलचा 4-1 असा धुव्वा उडवत अॅशेसची आणखी एक मालिका जिंकली आणि इंग्लंडला पुन्हा एकदा ‘होमवर्प अपुरा’ असा शेरा देऊन घरी पाठवले. बुधवारी जेकब बेथेलने […]
मुंबईचा अनपेक्षित पराभव 24 धावांत 6 फलंदाज गमावले
पंजाबचा डाव अवघ्या 216 धावांत गुंडाळल्यानंतर सरफराज खानच्या 20 चेंडूंतील 62 धावांच्या झंझावाताने मुंबईचा विजय सोप्पा केला होता. एकवेळ मुंबईला 31 षटकांत अवघ्या 26 धावांची गरज होती आणि सहा फलंदाजही शिल्लक होते. तरीही मुंबईने आपले सहाही फलंदाज 24 धावांत गमावले आणि पंजाबने एका धावेने विजय मिळवत गटात अव्वल स्थान संपादले. आजच्या पराभवामुळे विजय हजारे करंडकाच्या […]
मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा! सिंधू, सात्त्विक-चिराग जोडी उपांत्यपूर्व फेरीत
दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार पुरुष दुहेरी जोडीने शानदार कामगिरी करत मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, पुरुष एकेरीत हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले. दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या माजी जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूने आठव्या मानांकित जपानच्या टोमोका मियाझाकीला […]
मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘टाटा मुंबई मॅरेथॉन एक्स्पो 2026’ साठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सुमारे तीन एकर जागा तात्पुरत्या भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर मंजुरीसाठी येण्याआधीच संबंधित जागेवर प्रोकॅम इंटरनॅशनल कंपनीचे पूर्वतयारीचे साहित्य आणून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या कामकाजात थेट राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय बळावला […]
टी-20 वर्ल्ड कपसाठी विक्रम राठोड देणार श्रीलंकेला फलंदाजीचे धडे
आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला गती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विक्रम राठोडची फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. हिंदुस्थानचा माजी फलंदाजी प्रशिक्षक असलेला राठोड 18 जानेवारीपासून 10 मार्चपर्यंत सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. त्याच्या अनुभवाचा वर्ल्ड कप 2026 च्या तयारीत फायदा करून घेण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. याशिवाय दिग्गज लसिथ मलिंगाची 40 दिवसांसाठी वेगवान गोलंदाजी सल्लागार […]
देवगड तालुक्यातील मिठबांव आणि तांबळडेग सीमेवरील समुद्रकिनारी असलेल्या सुरुच्या बनाला भीषण आग लागली आहे. या आगीत निसर्गासह सरकारी मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या, मात्र अद्याप उद्घाटनही न झालेल्या बीच कॉटेजेसना आगीमुळे धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी तांबळडेग येथील केरकर यांच्या बागेत […]
खेलो इंडिया बीच स्पर्धेतील पुरूषांच्या बीच सॉकरमध्ये अंदमान आणि निकोबारला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी धडक मारली आहे. पेंचक सिलटमधील रेगु प्रकारात महाराष्ट्राने २ रौप्य पदकाची कमाई करीत दिवस गाजविला. दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्या मुलांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अंदमान आणि निकोबारवर संघावर १४-५ गोलने दणदणीत विजय संपादन पदकासह उपांत्य […]
वेदांता ग्रुप अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना पुत्रशोक
स्कीइंग करताना अग्निवेश झाले होते जखमी वृत्तसंस्था/न्यूयॉर्क वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. अमेरिकेत स्कीइंग करताना अग्निवेश जखमी झाले होता. त्यांना न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान 7 जानेवारी 2026 रोजी रुग्णालयात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. वडील [...]
Devendra Fadnavis : सोलापुरात भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्र्यांची होणार जाहीर सभा
मुख्यमंत्री फडणवीसांची सोलापुरात १० जानेवारीला जाहीर सभा सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीतही [...]
Pandharpur News : भाषेच्या सीमा ओलांडत दक्षिणात्य महिलांची पंढरपुरात अभंग सेवा
सावळ्या विठुरायासाठी दाक्षिणात्य महिलांचे सुरेल अभंग गायन पंढरपूर : मनात उत्कट भाव असतील तर भाषेचे बंधन कधीच आडवे येत नाही. सावळ्या विठुरायाच्या ओढीने चक्क दाक्षिणात्य महिला भाविकांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभंग गायन, भक्तिगीते सादर करून मंत्रमुग्ध केले.या महिलांना [...]
Solapur : सोलापुरात पर्जन्य जलवाहिनी कामाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी
सोलापूर शहरात पाणी साचू नये यासाठी नियोजनबद्ध कामावर भर सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील नाला क्र. २० (पोगुल विहीर ते हैदराबाद रोड) तसेच नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या पर्जन्य [...]
Satara : पिंगळी खांडसरी चौकात माण तालुक्यातील पहिला उड्डाणपुल साकारतोय
पिंगळी चौकातील बॉटलनेक दूर by विठ्ठल काटकर कुकुरुछवाड : पिंगळी (ता. माण) येथील अहिल्यानगर-सांगली मार्गावरील खांडसरी चौक एक बॉटलनेक चौक बनत असून या चौकात माण तालुक्यातील पहिला उड्डाणपुल साकारतोय. त्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान [...]
जैन कासार समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील- नगराध्यक्ष विनोद गंगणे
तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील शिवपार्वती मंगल कार्यालय सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक व पत्रकार यांचा सत्कार सोहळा जैन कासार समाज तुळजापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलचंद व्यवहारे यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री कंदले, नगरसेविका सौ मंजुषा देशमाने, निताताई दिनेश क्षीरसागर सौ प्रिया गंगणे सौ सरोजाताई अमृतराव डॉक्टर अमृता अजित परमेश्वर महंताताई किशोर साठे सौ दीपालीताई अरुण यादगिरे पंडितराव जगदाळे, अश्विनीताई विशाल रोचकरी, संस्कृती सचिन कपाळे सज्जनराव साळुंखे, अजित कदम, सुनिल रोचकरी माऊली भोसले लखन पेंदे सागर कदम ,विजय कंदले, नरेश अमृतराव पंडितराव जगदाळे अनंत सावंत अंब्रीश जाधव गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, यांच्यासह इतर नगरसेवक, पत्रकार उपस्थित होते. जयश्रीताई कंदले ()वैशाली व्यवहारे ,विशाल रोचकरी चंद्रवदन शेटे ,आनंद कंदले पत्रकार सतीश महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभिक समाजाच्या यांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा जैन कासार समाजाचे अध्यक्ष सुभाष शेटे, व्यापारी फुलचंद व्यवहारे, यांच्या वतीने शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विशाल रोचकरी, सौ जयश्री कंदले, आनंद कंदले, डॉ सतीश महामुनी, शेटे यांनी भाषणे केली. यावेळी संस्कृती सविता सचिन कपाळे (वाशी)धाराशिव हिने इटानगर अरुणाचल प्रदेश येथे 69 व्या राष्ट्रीय शालेय ताईकांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या 32 किलो खालील गटात कास्य पदक जिंकले आहे म्हणून तिचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला जैन कासार समाज अत्यंत कष्टाने तुळजापुरात व्यापार करतो समाजाची लहान मोठे प्रश्न आहेत याशिवाय जैन समाजाचे मंदिर विस्थापित होणार असल्यामुळे त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने नगरपरिषदेने महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी आपले प्रास्ताविकामध्ये सौ वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी प्रास्ताविकात केली. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी हा समाज तुळजापुरात संयमी शांत आणि व्यापार विषयक कामकाज करणारा समाज आहे निश्चितपणे नगरपरिषद आणि आपण व्यक्तिगत रित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक पद्माकर राव यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने जॉईन कसा समाजातील महिला आणि समाज बांधव उपस्थित होते. जैन कासार समाज अत्यंत कष्टाने तुळजापुरात व्यापार करतो समाजाची लहान मोठे प्रश्न आहेत याशिवाय जैन समाजाचे मंदिर विस्थापित होणार असल्यामुळे त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने नगरपरिषदेने महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी आपले प्रास्ताविकामध्ये सौ वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी प्रास्ताविकात केली. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी हा समाज तुळजापुरात संयमी शांत आणि व्यापार विषयक कामकाज करणारा समाज आहे निश्चितपणे नगरपरिषद आणि आपण व्यक्तिगत रित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक पद्माकर राव यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने सुधाकर शेटे ,संतोष शेटे ,चिंतामणी भांबरे , अनिल सोलापूर ,सुनील सोलापूरे ,प्रमोद शेटे ,बबलू रोकडे ,संदीप शेटे ,राहुल शेटे ,पद्माकर राव ,गाडे ,महावीर गडदे रवि दुरुगकर विलासराव रोकडे सचिन गडदे चैतन्य काटकर कसार समाजातील असंख्य महिला आणि समाज बांधव उपस्थित होते.
पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धाराशिव तालुक्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न
धाराशिव, (प्रतिनिधी)- पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारावे व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत आजपर्यंत सात तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडल्या असून आज धाराशिव तालुक्याची कार्यशाळा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा परिचारिका प्रशिक्षण सभागृहात उत्साहात संपन्न झाली. पीसीपीएनडीटी कायद्याचे महत्त्व, त्याची प्रभावी अंमलबजावणी, गर्भलिंग निदानास प्रतिबंध तसेच लिंग गुणोत्तर सुधारण्याच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत धाराशिव तालुक्यातील सर्व सोनोग्राफी व एमटीपी केंद्रधारक,स्त्रीरोग तज्ज्ञ, शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक,आयएमए व एफओजीएसआयचे पदाधिकारी, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी विविध उपयोजना राबविण्याचे आवाहन केले तसेच खबरी योजनेद्वारे कायद्याच्या उल्लंघनाची माहिती देण्याबाबत जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ.दत्तात्रय खुणे यांनी गावपातळीवर लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पीसीपीएनडीटीचे नोडल अधिकारी डॉ.अनिल चव्हाण यांनी आशा कार्यकर्त्यांकडून तालुकानिहाय लिंग गुणोत्तराचा आढावा घेतला.तर विधी सल्लागार ॲड.रेणुका शेटे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, एफओजीएसआयचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू,आयएमएचे अध्यक्ष डॉ.महेश कानडे,श्री.अमर सपकाळ यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन किंवा गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. यासाठी हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३-४४७५ / १०४ किंवा www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर अथवा नजीकच्या ग्रामीण,उपजिल्हा किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
कर्मवीर महाविद्यालयाच्या रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
वाशी (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे जगदाळे महाविद्यालय,वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ मौजे घाटपिंप्री ता.वाशी येथे गुरुवारी(दिनांक 08)रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचेप्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार बापू शितोळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मांगले, पोलिस पाटील शंकर आहिरे, माजी सरपंच चंद्रकांत सातपुते,मुख्याध्यापक महादेव भैरट,जयचंद सातपुते सर आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनंत पाटील,प्रा.डॉ दैवशाला रसाळ व प्रा.डॉ नेताजी देसाई उपस्थित होते. या वेळी बोलताना जयकुमार बापू शितोळे म्हणाले कि, विद्यार्थांमध्ये शिबिरांमधून आत्मसन्मान वाढतो व त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. समाजसेवक बाळासाहेब मांगले म्हणाले की, आमचे गाव समाजसेवक अण्णा हजारे व पन्न्नालाल सुराणा यांच्या विचाराने प्रेरित झाले असून शिक्षणाचे प्रमाण मोठे असून व्यसनाधीनता कमी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की, शिबिरांमधून स्वयंसेवकामध्ये एकीची भावना निर्माण होते व ग्रामीण जीवनाचा अनुभव येतो तसेच अशा शिबिरामधूनच समाजामध्ये आदर्श नागरिक तयार होत असतात. शिबिरातील आठ दिवसामध्ये शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, कृषि विषयक व्याख्यान,श्रमदान,व्यसनमुक्ती इत्यादि उपक्रामधून जनजागृती केली. या शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन,महिला मेळावा,आरोग्य शिबीर, कृषि विषयक इत्यादि उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ अनंत पाटील यांनी केले.शिबीर अहवाल वाचन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ अशोक हुंबे आणि आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ नेताजी देसाई यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.गोविंद चोरमले,प्रा.पांडुरंग आहेर,प्रा.डॉ.अश्विनी नवले, प्रा.डॉ चेतना जगताप, प्रा.प्रियांका गादेकर,प्रा.लोखंडे मॅडम, प्रा.प्रेरणा पाटील व प्रा.डॉ सुचित्रा जाधव,स्वप्निल शेलकांदे व चंद्रकांत घाडगे,सोहेल शेख यांनी परिश्रम घेतले.
भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त भूम नगरीतील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी भूम नगरीच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, युवा नेते साहिल गाढवे, डॉ. सई गाढवे तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू-भगिनींच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. साहिल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास नगरसेवक सुरज गाढवे, तोफिक कुरेशी, अभिजीत शेटे, तसेच मंगल नाईकवाडी, रिमा शिंदे, भाग्यश्री माने, मंगल आकरे, आक्कुबाई पवार, राणी वाडेकर, शितल शिंदे यांची उपस्थिती होती. यासह मुशीरभाई शेख, सुनील थोरात, बापू बाराते, योगेश आसलकर, काकासाहेब बोराडे, अतुल उपरे, किरण साठे, बाळासाहेब अंधारे, विष्णू शिंदे, बालाजी माळी, बंटी माळी, डॉ. आकाश भोसले, अमोल सरवसे, तानाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचा संशोधक विद्यार्थी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर या अभ्यासक्रमाबरोबरच अनेक विषयांची संशोधन केंद्र आहेत. हिंदी विभागातील संशोधन केंद्राचे विद्यार्थी डॉ. बनसिंग भोई यांनी विशेष सहकार्याबद्दल प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बनसिंग भोई हे हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ.केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पीएच.डी. करत आहेत. याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.माधव उगिले, प्रा.शरद लोंढे, दादा माळी उपस्थित होते.
ऊसतोड कामगाराची ऊसाच्या फडात धडपड
भूम (प्रतिनिधी)- ऊस तोड कामगारांचे जीवन अतिशय वाईट असते. ना कुटुंबाची सोय ,ना खाण्याची ना राहण्याची सोय असते. दिवस रात्र जीवाला धोका आहे असे समजून काम करावे लागते. तसेच या मध्ये सगळ्यात मोठा तोटा मुला बाळांच्या शिक्षणाचा होतो. एक कुटुंबाला जगण्यासाठी ज्या गरजा असतात त्या कधीच पूर्ण होत नसल्याने पिढ्यापिढ्या हजारो कुटुंब या उसतोडीच्या खाईत जीवन जगत आहेत. राज्यात बीड,धुळे,जालना,खानदेश या भागाची ऊसतोड कामगारांसाठी खास ओळख आहे. धाराशिव जिल्ह्यातूनही अनेक लोक ऊसतोडीसाठी जातात. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बावी गावातील एक बाप आपल्या कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र उसाच्या फडात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील बावी येथील सतीश भारत कांबळे हे आपल्या कटुंबाच्या अठरा विश्व दारिद्रयावर मात करण्यासाठी झटत आहेत. तालुक्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कांबळे कटुंबाच्या संसार वेलीवर काही फुले लागली तोच घरातील कर्त्या महिलेचे निधन झाले. कुटुंबामध्ये सहा मुली व दोन मुले जन्माला आली. मात्र आठवी अपत्य मुलगा झाला आणि त्यामध्येच कांबळे यांच्या कुटुंबाचा घात झाला. बाळंतपण झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी कांबळे यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या अचानक जाण्याने घरात पोकळी निर्माण झाली असून, घरात केवळ मुली असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी एकट्याच शेतकऱ्यावर येऊन पडली आहे. श्री कांबळे यांना अवघी दोन ते तीन एकर शेती आहे. पत्नीच्या निधनानंतर स्वतःला सावरत त्यांनी चार मुलींची लग्न केली. तर उर्वरित मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शेती हा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे . मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शेतीमध्ये जास्त काळ पावसाचे पाणी राहिल्याने त्यामध्ये पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला सोबत घेऊन ऊस तोडीसाठी कारखाना गाठला. तसेच शिक्षण घेणारी मुलीही सुट्टीच्या काळामध्ये येऊन त्यांना मदत करतात. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने तसेच कुटुंब गाडा चालवण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा फेडण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नव्हता. त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक असलेली बैलजोडी नसल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्याने कर्ज काढून दोन म्हशी विकत घेतल्या. दूध विक्रीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर संसाराचा गाडा कसाबसा ओढला जात आहे.मात्र वाढती महागाई, मुलींच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि शेतीवरील खर्च यामुळे ‘अठरा विश्व दारिद्य्र’ कायम आहे. परिस्थिती काहीशी सुधारावी, कुटुंबाच्या चुलीला धूर राहावा आणि मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे, या आशेने हा शेतकरी सध्या ऊस तोडीसाठी भूम तालुक्यातील बाणगंगा साखर कारखान्याच्या क्षेत्रात आपल्या मुलींना सोबत घेऊन बैलगाडीला म्हशी जुंपून धडपड करत आहे. दिवसा कडक उन्हात व रात्री थंडीची पर्वा न करता तो मजुरीचे कठोर काम करत आहे.एकीकडे पत्नीच्या आठवणी, तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी अशा अवस्थेत हा शेतकरी आयुष्याशी झुंज देत आहे. शासनाच्या योजना, समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिल्यास त्यांच्या जीवनात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दिवे घेवून 50 फुट उंचावरून धावण्याचा थरारक चिरागा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा उरूस उत्साहात सुरू आहे. उरूसातील मुख्य चिरागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांच्या दर्ग्यावरून दिवे घेवून 50 फुट उंचावरून धावण्याचा थरारक चिरागा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवारच्या पहाटे अजहर आशु नाईकवाडी व चॉद यासीन नाईकवाडी यांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मानकरी शैलेश कुलकर्णी यांनी दोघांचा मानाचा फेटा बांधून सत्कार केला. त्यावेळी सरफराज अब्दुल्लाह हुसेनी सज्जादे, शफीक रफिक हुसेनी सज्जादे, इकरामुल्ला हुसेनी सज्जादे, तेजस कुलकर्णी, विश्ववेश्वर कुलकर्णी, ईशान कुलकर्णी, जिल्हा वक्फ अधिकारी आमेर सय्यद, मोहसीन शेख, आदी उपस्थित होते. चिरागाला आहे 700 वर्षांची परंपरा 700 वर्षापासून परंपरा दर्गाहच्या भिंतीवर व घुमटाच्या खाली कंगोरे बांधलेले असतात. सुमारे 50 फुट यांची उंची आहे. या उंचावर हातात पेटते दिवे (चिरागा) घेवून धावतात. आतपर्यतच्या इतिहासात कधीही यामध्ये अपघात झालेला नाही. ही प्रथा दरवर्षी उत्साहात पार पडते. उंचावरून धावत असताना पहाण्यासाठी जवळपास 30 हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित असतात.
IND Vs NZ T20 –टीम इंडियाला मोठा हादरा, तिलक वर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून आऊट
न्यूझीलंडचा हिंदुस्थान दौरा 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. प्रथम वनडे मालिका आणि त्यानंतर टी-20 मालिकेचा धुमशान सुरू होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विस्फोटक डावखुरा फलंदाज आणि आशिया चषकाचा हिरो तिलक वर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आगामी टी-20 चषकाच्या दृष्टीने तिलक वर्माचं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून […]
Karad News : कराडजवळ उभ्या कंटेनरला स्विफ्टची जोरदार धडक; चार जखमी
पाचवड फाट्यावर पहाटे भीषण अपघात कराड : पाचवड फाटा (ता. कराड) कोल्हापूर-सातारा मार्गावर भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. या अपघातात स्विफ्टमधील चार जण किरकोळ जखमी [...]
Karad Crime : कराड एसटी स्टँड परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांचा हल्ला
कराड शहरात विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर कराड : शहरातील एसटी स्टँड परिसरात जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी विंग (ता. कराड) येथील १६ वर्षीय मुलाने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली [...]
उत्तर प्रदेशात SIR मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाली अन् भाजपचे टेन्शन वाढले…नेमके कारण काय…
उत्तर प्रदेशातील विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) ची मसुदा यादी प्रसिद्ध झाली आहे. या मसुदा यादीत तब्बल २.८९ कोटी नावे वगळण्यात आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाजपने आमदार आणि खासदारांना मतदार यादी दुरुस्तीकडे पूर्ण लक्ष देण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील SIR चा भाग म्हणून मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील […]
आधी अभद्र युती, आता थेट प्रवेश; अंबरनाथमधील काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपमध्ये सामील
आधी अभद्र युती केल्यानंतर आता काँग्रेसने निलंबित केलेले १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत एका कार्यक्रमात या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. १२ नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले असून संपूर्ण ब्लॉक कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाकडून प्रदीप पाटील […]
अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी शुक्ला कुमार यांचे निधन
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि कुमार गौरवची आई शुक्ला कुमार यांचे निधन झाले आहे. या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. शुक्ला कुमार यांना सिनेइंडस्ट्रीत त्यांचा साधेपणा आणि शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. पती राजेंद्र कुमार सिनेइंडस्ट्रीत असल्या तरी त्या मात्र लाइमलाइटपासून दूरच होत्या. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबच नव्हे तर, संपूर्ण सिनेसृष्टीवर […]
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असणाऱ्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांच्या दर्ग्यास 721 व्या उरूस निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, नूतन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे, सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली यावेळी हापिसाब कलीम शेख,पत्रकार निसार पटेल, इरशाद शेख, शाकेत काझी, शकील शेख, रणजीत माळाळे, एजाज सय्यद, अमीर मशायक, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे, शिक्षक नासीर मोमीन,रामराजे पाटील, कलाध्यापक शेषनाथ वाघ, तसेच सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील भैरवनाथ शुगर वर्क्स येथे पत्रकार दिनानिमित्त वाशी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार गौतम चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे, महंमद मुजावर, शिवाजी गवारे, शहाजी चेडे, सचिन कोरडे, शोएब काझी, नितीन सुकाळे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना पत्रकारांनीही समाजहितासाठी आपली लेखणी सदैव जागृत राहील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केशव सावंत म्हणाले, “पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करणे हे माझे कर्तव्य आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो सातत्याने समाजसेवेचे काम करतो. पुढील वर्षी पत्रकारांच्या सहकार्याने पत्रकार दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.” तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा, विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या कार्यासाठी भैरवनाथ शुगर वर्क्सकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाला युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, तालुका उपप्रमुख विकास तळेकर, अतुल चौधरी प्रकाश शेटे, राहुल आडमुटे, दिनकर शिंदे, माऊली देशमुख, गायकवाड यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार व सामाजिक संस्थांमधील सकारात्मक संवाद अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटक
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे दि. 06.01.2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम बसस्थानकातील प्रदीप हॉटेल जवळील गेट मध्ये काळ्या रंगाची मोटरसायकल घेवून थांबला असुन ती चोरीची मोटरसायकल आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळालेवरुन पथकाने लागलीच तेथे जाउन सूर्यकांत उर्फ सुरज उर्फ रावसाहेब मस्के वय35 वर्ष रा मारवडगली धाराशिव ता जि धाराशिव यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल क्र एमएच 14 एच.टी. 1240 चेसी नं- ME4JVC65DGKD061734 इंजिन नंबर JC65ED0132273 एकुण 40 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल हस्तगत केली आहे. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी धाराशिव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन पोलीस हावलदार बळीराम शिंदे, राहुल नाईकवाडी, चव्हाण, अशोक ढगारे, चालक पोअं दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे.
13 वर्षीय बालकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून
धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलाव परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून मृतदेह गवताखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी ओमकार देवीदास कांबळे यास तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी तामलवाडी साठवण तलावाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 04/2026 कलम 103(1) भा.न्या.सं. अन्वये दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर, धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारात कदम यांची शेती असून, ती दत्ता कोरे बटईने करत होता. याच ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार कांबळे हा आपल्या भावजयी ज्योती कांबळे हिच्यासह सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे हिचा 13 वर्षीय मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत असे. कृष्णा याला आपल्या आई व चुलत्यामधील अनैतिक संबंधाची माहिती होती व तो ही बाब वडिलांना सांगत असल्याने आरोपी ओमकार कांबळे याला राग आला. त्यामुळे कृष्णा हा त्यांच्या संबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून, आरोपीने दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता, तामलवाडी साठवण तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णा यास तलावाजवळ नेले. तेथे कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला व मृतदेह तलावाजवळील गवताखाली फेकून देऊन तो फरार झाला. या घटनेची नोंद प्रथम अकस्मात मृत्यू क्रमांक 02/2026 कलम 194 बी.एन.एस.एस. अन्वये करण्यात आली होती. मृताची ओळख पटताच पुढील तपासात गुन्हा उघडकीस आला. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी आरोपी ओमकार देवीदास कांबळे यास उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, पोलीस हवालदार जुबेर काझी, दिनकर तोगे, पोलीस अंमलदार सुरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, चालक पोलीस हवालदार तुराब शेख, हनमंत कोरे व नितीन भोसले यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
33 लाख 95 हजार रूपयांच्या अवैधरीत्या गुटखा व वाहन स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त
धाराशिव (प्रतिनिधी)- 18 लाख 95 हजार 880 रुपयांचा सागर 2000 पान मसाला व टाटा टेम्पो वाहन असा एकूण 33 लाख 95 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून जालना जिल्ह्यातील व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गस्त करीत असताना त्यांना धुळे-सोलापूर महामार्गावर एक टाटा टेम्पो वाहन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला घेऊन धाराशिवच्या दिशेने जात आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने तात्काळ महामार्गावर गस्त केली असता त्यांना तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, धाराशिव या ठिकाणी सदरचे वाहन दिसून आले. सदर वाहन चालकाला पोलिसांचा संशय आल्याने त्याने वाहन वेगाने चालवण्यास सुरुवात केली. सदर वाहन चालकास पकडण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकास सांगण्यात आल्यामुळे डी मार्ट धाराशिवच्या समोर सदर वाहन आढवून चौकशी केली असता दीपक दिगंबर पुरी, रा. शिरपूर, तालुका मंठा, जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. नमूद वाहनात सागर 2000 हा प्रतिबंधित पान मसाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून 18 लाख 95 हजार 880 रुपयांचा सागर 2000 पान मसाला व टाटा टेम्पो वाहन असा एकूण 33 लाख 95 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालकाविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई कामी सदरचा मुद्देमाल व आरोपी आनंद नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, स्थानिक गुन्हे शाखेचे,पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे आणि आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खांडेकर, सपोनी परमेश्वर सोगे व पथक यांनी केली आहे.
दर्पण दिनानिमित्त आणीबाणीचे ते दिवस पुस्तकाचे प्रकाशन
धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आणीबाणीचे ते दिवस या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. भास्कर ब्रम्हनाथकर लिखित आणीबाणीचे ते दिवस या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. आणीबाणीच्या कटू आठवणी सांगून श्री ब्रम्हनाथकर यांनी लोकशाहीच्या मजबुतीसाठी प्रत्येक नागरिकाने काम करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे आणि पत्रकार देविदास पाठक तसेच विश्व हिंदू परिषदेचे ॲड. गजानन चौगुले यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरएसएसचे जिल्हा कार्यवाह अजय जानराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
संशोधन प्रकल्प स्पर्धेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची ऐश्वर्या सक्राते प्रथम
धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय अविष्कार 2026 संशोधन प्रकल्प स्पर्धेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज धाराशिव येथील एम टेक (संगणक अभियांत्रिकी) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऐश्वर्या दत्तात्रय सक्राते हिने आपल्या उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. अविष्कार झोनल लेवल राऊंड झाला होता. त्यामध्ये तेरणा अभियांत्रिकीचे सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले होते. पदव्युत्तर गटातून सक्राते ऐश्वर्या, अंकिता शिंदे, अर्चना उडाणे, अनुराधा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. तर लेवल युजी मधून सायली साळुंखे हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक आशिष थोरात, दीक्षा मस्के यांनी मिळवले होते. हेच विद्यार्थी पुढे 6 जानेवारी 2026 रोजी यूनिवर्सिटी लेवल राऊंड साठी सादरीकरणासाठी गेले असून त्यामध्ये पदव्युत्तर गटातून ऐश्वर्या सक्राते हिने सुवर्ण पदक पटकावले. ऐश्वर्या हिच्या यशाने नक्कीच नवीन पिढीला संशोधनाच्या मार्गाला लागण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले. अविष्कार 2025-26 चे समन्वयक व डी.आर.एन डी. डॉ.सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा. रवींद्र गुरव, प्रा. यु. जे. जाधव, डॉ. राजश्री यादव, प्रा.डी.बी ठाकूर, प्रा.डी.बी भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे,, डॉ.आर.बी.ननवरे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माजी गृहमंत्री तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी ऐश्वर्या दत्तात्रय सक्राते हिचे अभिनंदन केले.
मंदिरकडे येणाऱ्या तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त सीसीटीव्हीच्या कक्षेत
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिरकडे येणाऱ्या तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्रात स्वच्छता व मंदिर परिसर विकसित करून स्वच्छ तुळजापूर, सुंदर तुळजापूर घडवण्याची आमची ठाम संकल्पना असल्याचे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संवाद साधताना नगराध्यक्ष गंगणे म्हणाले की, संवादातूनच समस्या सुटतात. सकारात्मक विचार ठेवून तीर्थक्षेत्राचा चेहरा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असून यासाठी पत्रकार व शहरवासीयांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना गंगणे यांनी सांगितले की, स्वच्छतेवर आमचा सर्वाधिक भर असून सध्या नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुढील काळात शहरातील स्वच्छतेबाबत नगरपरिषद जातीने लक्ष देणार आहे. या राबवणार योजना अतिक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले की, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी राहील. कोणालाही रस्त्याच्या मधोमध बसून व्यवसाय करू दिला जाणार नाही. स्वच्छ तुळजापूर सुंदर तुळजापूर, शहर व मंदिर परिसरात स्वच्छतेवर सर्वाधिक भर, रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणार; व्यापाऱ्यांसाठी लाईन पद्धत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एसपी दर्जाचा अधिकारी नेमण्याचे प्रयत्न, तुळजापूरमध्ये प्लास्टिक बंदी लागू करणार, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष नियोजन, आठवडा बाजारातच भाजी मंडई कार्यान्वित, जिल्हा परिषद जुनी कन्या शाळेत अंडरग्राउंड वाहनतळाचा प्रस्ताव वर उमेद हॉल, नगरपालिकेची प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्याची योजना आदीबाबत नगराध्यक्ष गंगणे यांनी माहिती दिली. तुळजापूरचा चेहरा बदलण्यासाठी शहरवासीयांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल रोचकरी यांनी केले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी चव्हाण, सुनील रोचकरी, अमर हंगरगेकर, अनुजा कदम, प्रा. संभाजीराव भोसले, आनंद कंदले, विजय कंदले, सागर कदम, शांताराम पेंदे, लखन पेंदे, नरेश अमृतराव तसेच नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
WTC 2025-27 –हिंदुस्थानची अटीतटीची लढाई, आणखी तीन मालिका बाकी; आता ‘या’देशांना भिडणार
ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाचा खेळ सुमार राहिला आहे. त्यामुळे गुणतालिकेत टीम इंडियाची घसरगुंडी झाली असून संघ सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे आगामी तीन मालिकांमध्ये टीम इंडियाला दणक्यात पुनरागमन करावं लागणार आहे, अन्यथा टीम इंडियाचा पत्ता जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या शर्यतीतून कट होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून […]
अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी भाजपाने […]
आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, राजकीय वादाला सुरुवात
उत्तर प्रदेशातील अमेठीत भाजप नेते आणि जगदीशपूरचे आमदार सुरेश पासी यांनी आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या २० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सुरेश पासी म्हणाले की, मी कधीही मशिदीत जात नाही, पूर्वी कधीच गेलो नाही आणि […]
सागर चव्हाण यांना जिल्हास्तरीय “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”प्रदान
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी “HELLO सिंधुदुर्ग” डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना [...]
देशातील विविध न्यायालयांना मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी
देशातील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. बॉम्बच्या धमकीने मोठ्या प्रमाणात घबराट पसरली असून न्यायालय परिसर रिकामे करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये उपस्थित न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. छत्तीसगडमधील बिलासपूर आणि राजनांदगाव जिल्हा न्यायालयांना आणि मध्य प्रदेशातील रेवा जिल्हा न्यायालयाला धमकीचा ईमेल […]
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच हवेत, जाणून घ्या
घरगुती उपचार त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. नैसर्गिक उपाय केवळ चेहऱ्यावर चमक आणत नाहीत तर त्वचेच्या समस्यांपासूनही आराम देतात. घरगुती उपचारांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्याचप्रमाणे, सफरचंद आणि कच्च्या दुधाची एक जुनी रेसिपी आहे. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जातात. म्हणून, जर फेस पॅक बनवून लावला तर त्वचेच्या अनेक समस्यांपासून […]
आपल्या आहारात बार्ली समाविष्ट करण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या
बार्लीला (सत्तुला) धान्यांचा राजा मानलेले आहे. बार्लीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्ससह कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन सारखे घटक देखील त्यात आढळतात. नियमित बार्लीचे (सत्तुचे) सेवन केल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. तथापि, आजही लोक त्यांच्या आहारात बार्ली कशी समाविष्ट करावी याबद्दल गोंधळलेले आहेत. आहारात सत्तुपासुन […]
चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगचा शुभारंभ
परूळे/ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे चिपी विमानतळावर बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता नाईट लँडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार रात्री विमानतळावर शासकीय आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झाला होता. मात्र, दौरा रद्द झाल्याने नाईट लँडिंगची चिपी विमानतळावरील संधी हुकली . चिपी विमानतळावर नाईट लँडिंगच्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून [...]
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राजकीय सल्लागार आणि रणनीती फर्म ‘आय-पॅक‘ (I-PAC) चे कार्यालयांवर आणि या फर्मचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. #WATCH | Kolkata | West Bengal CM Mamata Banerjee […]
सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरुच; चांदी 9000 तर सोने 1000 रुपयांनी घसरले
सोने-चांदीच्या दरात बुधवारी मोठी घसरण झाली होती. सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र गुरुवारीही सुरू असून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचे दर ९,००० रुपयांनी घसरले असून सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदी बुधवारी प्रति किलो ₹९,००० ने घसरून २.४२ लाखांवर पोहोचली. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावातही घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या भावात बुधवारी […]
चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण घरीसुद्धा अनेक प्रयोग करु शकतो. यातलाच एक प्रकार म्हणजे होममेड फेशियल.फेशियल केल्याने चेहऱ्यावरील घाण आणि मृत त्वचा निघून जाते आणि त्वचाही उजळते. तसेच, फेशियल केल्याने पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि त्वचेचा रंगही सुधारतो.मलई आपल्या त्वचेला बराच काळ मॉइश्चरायझ आणि हायड्रेट […]
केसगळती रोखण्यासाठी आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत?
केसगळती ही समस्या प्रामुख्याने सर्व वयोगटाला सध्याच्या घडीला भेडसावत आहे. केसगळतीमुळे आपल्या आत्मविश्वासावरही खूप परीणाम होतो. मुख्य म्हणजे सध्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. प्रदूषणामुळे केसगळती ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच केसांवर विविध रासायनिक शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर केल्यानेही केसगळती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आहे. […]
Sangli Politics : कोल्हापूरच्या निवडणुकीत वादग्रस्त बनले सांगलीतील भाजप आमदार पुत्राचे नाव
सांगलीत भाजप आमदार पुत्राविरुद्ध थेट पाईपलाईन भ्रष्टाचाराचा आरोप सांगली : कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा थेट संबंध सांगली जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदार पुत्राशी जोडला गेला आहे. या पुत्राला या थेट पाईपलाईनचे कोल्हापूर शहरात जाळे विस्तारण्याचे कंत्राट मिळाले मात्र त्याने ते काम वेळेत पूर्ण न [...]
युवा विकास प्रतिष्ठानचे रक्तदान चळवळीतील कार्य कौतुकास्पद
प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती सोहळ्यात २५० रक्तदात्यांचा सन्मान ओटवणे: प्रतिनिधी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असुन एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन जणांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे युवा विकास प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून पवित्र अशा रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय असल्याने सांगेली पंचक्रोशीसह परिसरातील अनेक गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करून त्यांना जीवदान देण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. त्यामुळे या सेवाभावी संस्थेचा [...]
Solapur : अटीतटीच्या लढतीत हरियाणाच्या विक्रांतवर मात; हिंदकेसरी सिकंदर शेख यांचा दणदणीत विजय
पीर बावासाहेब कादरी यात्रेत कुस्तीला नवचैतन्य दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं.) येथील ग्रामदैवत पीर बावासाहेब कादरी यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेने कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या लढतीत हिंदकेसरी सिकंदर शेख यांनी हरियाणाच्या [...]
भाजप उमेदवाराच्या होर्डिंगवर फेकले शेण, तर्क-वितर्कांना उधाण
चंद्रपूर शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. प्रभाग क्रमांक एकमधील रामकृष्ण सोसायटी परिसरात सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचे होर्डिंग आहेत. याच होर्डिंगवर शेण फेकल्याचे आज दिसून आले. यातील सुभाष कासनगोट्टूवार यांच्याच प्रतिमेवर हे शेण फेकले गेले, हे विशेष. भाजप प्रदेशाध्यक्षांनी […]
कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत हे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या
आपल्या निरोगी आरोग्यासाठी फळे ही खूप गरजेची असतात. परंतु ही फळं कशी साठवावी याचेही काही नियम आहेत. फळांच्या ताजेपणाचे रहस्य त्यांच्या योग्य काळजीमध्ये आहे! पपई आणि केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा त्यांची चव आणि पोत खराब होऊ शकते. काही फळे थंडीत सुकतात, तर काही त्यांचा गोडवा गमावतात. आजकाल फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी […]
केस घनदाट आणि लांबलचक होण्यासाठी काय लावायला हवे, जाणून घ्या
आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये कांदा हा असतोच. कांदा आपल्याला विविध पदार्थ करण्यासाठी लागत असल्याने, कांद्याचा मुबलक साठा आपल्या घरामध्ये आढळतो. कांद्याचा रस हा आपल्या केसांसाठी फार गुणकारी मानला जातो. कांद्याचा रस केसांना लावल्याने, केस लांबसडक होण्यास मदत होते. म्हणूनच कांद्याचा रस हा योग्य पद्धतीने कसा लावायला हवा यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण […]
Sangli : शिराळ्यात दुचाकींच्या भीषण अपघातात युवकाचा मृत्यू
पाडळी रोडवर दोन मोटारसायकलींची धडक; शिराळा : शिराळा येथील पाडळी रोडवर दोन मोटारसायकलींच्या अपघातामध्ये सुधिर जालिंदर कांबळे (वय ३६) रा. बाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) या युवकाचा मृत्यू झाला असून दोन्ही मोटरसायकलींचे नुकसान झाले आहे. सदर घटना बुधवार दिनांक ७ रोजी [...]
Miraj : मिरजेत प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीचा झंझावात; विकासाचे व्हिजन घेऊन उमेदवार घरोघरी
मिरज प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रचाराला जोर सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रचाराने जोर पकडला आहे. पक्षाने या प्रभागात उमेदवार युवा उद्योजक शिशिर अण्णा जाधव, मिरज विद्या समितीचे [...]
सोलापुरात धक्कादायक घटना : वृद्ध वडिलांच्या देखभालीस कंटाळून मुलाने केला जन्मदात्याचा खून
सोलापुरात कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना सोलापूर : वृद्ध वडिलांची देखभाल, खाणे-पिणे व दैनंदिन सेवेला कंटाळून मुलाने जन्मदात्याचा निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सोलापुरातील न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, जुना विडी घरकुल परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात [...]
Kolhapur : शिवस्पंदन महोत्सवात शाहिरी बाण्याने विद्यापीठ परिसर दुमदुमला
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने शिवस्पंदन महोत्सव गाजला कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवांतर्गत बुधवारी सादर केलेल्या शाहिरी बाण्याने शिवाजी विद्यापीठाचा परिसर दुमदुमला.मूकनाट्य, नकला, लघुनाटिका, पारंपरिक वाद्य वादनासह पोवाडा, भारूड, शिवगीते यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रमाचे [...]
Kolhapur : इचलकरंजीत मोठी घरफोडी उघडकीस; दोन अट्टल गुन्हेगार अटकेत
पितळी नळ चोरीप्रकरणी ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी : येथील पंचगंगा फॅक्टरी रोडवरील जलाराम ट्रेडर्स या दुकानात झालेल्या घरफोडीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. मुकेश गणपती जाधव (वय ३९) आणि उमेश गणपती गोसावी उर्फ [...]
खेळ विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. देशाचे राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षक अंकुश भारद्वाज यांच्यावर एका 17 वर्षीय अल्पवयीन नेमबाज मुलीने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारद्वाज यांच्याविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) […]
Kolhapur : कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार कोल्हापूर : अल्पवयीन मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून अत्याचार प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी आरोपी चेतन प्रदीप नरवाळे (वय ३५ रा. कामगार चाळ, संभाजीनगर) याला २० वर्षाच्यासक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. [...]
रस्ता सुरक्षा अभियान, पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाची रत्नागिरीत रॅली
नागरिकांनी रस्त्यावरुन चालताना व वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते मिरकरवाडा या मार्गावर आज रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन […]
एससी, ओबीसीतील पाचशेजणांना व्याजमाफी
मंत्रिमंडळाचानिर्णय: 30 वर्षांपूर्वीचेकर्ज, व्याजाचीरक्कम3.2 कोटी पणजी : राज्य मंत्रिमंडळाच्या काल बुधवारी झालेल्या बैठकीत आर्थिक मदत, शैक्षणिक विकास आणि सांस्कृतिक स्मरणार्थ कार्यक्रम यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी एका निर्णयात अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीय समाजातील लाभार्थ्यांनी एससी, ओबीसी महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. बैठकीनंतर आयोजित [...]
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेआश्वासन: रिबेलोंच्यासभेतीलमागण्यांचेनिवेदनमिळाले पणजी : निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पणजीत झालेल्या महासभेत करण्यात आलेल्या मागण्या सरकारकडे पोहोचल्या आहेत. हे सरकार जनतेच्या मागण्याप्रती संवेदनशील असून लोकमताचा आदर करणारे आहे. त्यामुळे संबंधित निवेदनावर सध्या अभ्यास करत आहे. सरकार लोकांना हवे तेच करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ [...]
Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक ‘स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स’ची सुरुवात
विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कोल्हापूर मॉडेल स्वच्छतागृह योजना कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ का म्प्लेक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी [...]
मठग्रामस्थ हिंदु सभेवर प्रशासक नियुक्तीसाठी अहवाल सादर करा
जिल्हानिबंधकआणिसंस्थामहानिरीक्षकांचाआदेश मडगाव : मडगावची प्रतिष्ठीत संस्था असलेल्या मठाग्रामस्थ हिंदु सभेने कलम 12-सी चे उल्लंघन केले आहे. व्यवस्थापन समिती गैरव्यवस्थापनासाठी दोषी आढळली आहे. संस्था नोंदणी अधिनियम, 1860 (गोवा दुऊस्ती कायदा, 2023)’ च्या कलम 20-एए अंतर्गत प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी तात्काळ सरकारला अहवाल सादर केला जावा, असा आदेश दक्षिण गोव्याचे जिल्हा निबंधक आणि संस्था महानिरीक्षक सूरज आर. वेर्णेकर [...]
ट्रम्प यांच्या 500 टक्के टॅरिफच्या धमकीनंतर शेअर बाजार गडगडला; IT सेक्टरची घसरगुंडी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५००% टॅरिफ लादण्याची धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानी शेअर बाजारात दबाव दिसून आला. ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात मोी घसरण झाली आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. सर्वाधिक 4 टक्क्यांची घसरण टीसीएसच्या शेअरमध्ये दिसून आली. रशियाकडून तेल खरेदीमुळे हिंदुस्थानवर 500 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड […]
वास्को येथे चौघा गुंडांकडून दोघांवर हल्ला
जखमीमध्येमामा-भाचा: हल्लेखोरांवरगुन्हानोंद वास्को : वास्को मांगोरहिल भागात चौघा गुंडांनी दोघांना कारची धडक देऊन खाली पाडले आणि नंतर त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढवला. दोघांपैकी एकटा गंभीर जखमी आहे. दोघांनाही गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.पूर्ववैमनस्यातून मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. सुहेल शेख व इरफान मकानदार अशी जखमींची नावे असून ते मामा-भाचे आहेत. या प्रकरणी [...]

22 C