नागावरून उडी मारत आईने पोटच्या गोळ्याचे प्राण वाचवले
जिंतूर येथील येलदरी वसाहतीमध्ये ‘आईचं काळीज ते आईचंच!’ याची प्रचिती देणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने येणारा काळ पाहून, एका माऊलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता थेट फणा काढलेल्या नागाच्या अंगावरून उडी मारली आणि आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. येलदरी वसाहतीमधील रहिवासी मोनाली रवि जाधव या […]
कर्नाटकात खासगी बस पुलावरून कोसळली, 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी
कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी भद्रावती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भद्रावती तालुक्यात असलेल्या वीरपुरा गावातील कागेहल्ला येथे हा अपघात घडला. अपघातग्रस्त बस दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी येथून भद्रावतीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये […]
Chandrapur News मजुराने धावत येऊन स्वत:ला ट्रकखाली झोकून दिले, घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद
मजुराने धावत येऊन ट्रकच्या चाकाखाली स्वत:ला झोकून देत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे. भैरव खेदू ठाकूर (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बल्लारपूरात सुरू असलेल्या sndt महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. तो तिथे मृतक […]
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान शेकडो चाहत्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे रंगतदार सामना सुरू होता. मात्र, दुसरीकडे स्टेडियममधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनवर डल्ला मारला आहे. विशेषतः दुसऱ्या डावात प्रेक्षकांची हालचाल वाढत असताना आणि लोक पाणी किंवा नाश्त्यासाठी बाहेर येत असताना […]
Photo –शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक; संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी केले मार्गदर्शन
शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आणि मुंबई नगरसेवकांची बैठक आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संघटना बांधणीच्या दृष्टीने यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल […]
डिजिटल माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांवरही कर भरावा लागणार; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
हिंदुस्थानात राहून विविध ग्राहक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या कर आकारणीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हिंदुस्थान आणि चीनमधील द्विपक्षीय कर करारानुसार जर एखादी चिनी कंपनी हिंदुस्थानी उपकंपनीला तांत्रिक सेवा पुरवत असेल, तर त्यावर हिंदुस्थानात कर आकारला जाऊ शकतो, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. चीनमधील ‘बेंटेलर ऑटोमोटिव्ह इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ या […]
अभंगवाणी कार्यक्रमात संगीत रसिक मंत्रमुग्ध
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील ग्रामदैवत श्री.हनुमान जयंतीच्या अनुषंगाने येथील हनुमान मंदिरात दि.26 मार्च पासून प्रारंभ झाला. सप्ताहात वासुदेव शास्त्री महाराज,मंगेश महाराज देशमुख प्रसाद महाराज कुलकर्णी उमेश सुतार महाराज श्री कबिर महाराज अशा नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा , दैनंदिन हरिपाठ,श्री हनुमान चालीसा पठण नामवंत कलाकारांची भजन सेवा हरि जागर, अन्नदान महाप्रसाद अशी आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल होत असून 2 एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. भागवत महाराज कबिर पंढरपूर,संत कबीर महाराजांचे 17 वे वंशज यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे. 27 मार्च रोजी भूम येथीलअंबादास देशपांडे, संगीत विशारद, सेवानिवृत्त स्टेट बँक अधिकारी यांचा सुश्राव्य असा *अभंगवाणीचा कार्यक्रम* झाला. कार्यक्रमाची सुरुवात “जय रामकृष्ण हरी “ बिहाग रागात पारंपारिक भजनाने झाली.पंचपदीनंतर किरवाणी रागात “संतसंगतीचे काय सांगु सुख “ हा संत नामदेव महाराजांच्या अभंगाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. “ ज्ञानाचा सागर “ हा संत जनाबाईचा अभंग “घेई घेई माझे वाचे“ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तसेच भक्तीगीत नाट्यगीतांने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.शेवटी “ शेवटची विनवणी “ या संत तुकाराम महाराजांचा अभंग भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. गायनाची साथ श्री.दत्ता गोळे ,ह.भ.प.श्री.विलास महाराज ,ह.भ.प.उमेश महाराज यांनी तर तबला साथ बाळासाहेब चव्हाण, उल्हास जवाहिरे,बापू पौळ, बप्पा जोशी यांनी केली. सप्ताहाचे यशस्वीतेसाठी सर्व हनुमान सेवेधारी परिश्रम घेत आहेत.
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पूर्वसूचना न देताच वीज कनेक्शन कट करणे चालू
कळंब (प्रतिनिधी)- येथे सध्या मार्च अखेर च्या नावाखाली एमएसईबी कंपणी ग्राहकांना विनाकारण त्रास देणे सुरू आहे कुठलीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट लाईट कनेक्शन कट केले जात आहे त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कळंब शहरात तथा आजूबाजूतील अनेक गावांमध्ये सध्या महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असलेला दिसून येत आहे. कलम 56 क्र नुसार कोणत्याही वीज ग्राहकाचे लाईट कनेक्शन कट करण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर मोबाईल एसएमएस द्वारे किंवा लेखी नोटीसद्वारे वीज खंडित करण्यात येईल असा संदेश ग्राहकापर्यंत पोहोचवणे अनिवार्य असताना देखील कळंब महावितरण कंपनी कुठल्याही ग्राहकांना पूर्व सूचना न देता सध्या लाईट कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू आहे तसेच ज्या ग्राहकांना मोबाईल कळत नाही त्यांनी काय करावे व ते खूप लांबून महावितरण कंपनीच्या दारात बिल भरण्यासाठी जात असताना महावितरण कंपनीचे बिल भरणा केंद्र बंद असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महागाई ने सर्वसामान्य माणूस घोरपडत आहे. शेतातील उत्पन्नाला भाव येत नाही नैसर्गिक आपत्तींना संकटाच्या पाठीमागून संकट येत आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखाचे कर्ज माफी केली आणि एकीकडे अशा खाजगी महावितरण कंपन्या सर्वसामान्य माणसांच्या वसुलीच्या तगादा लावत डायरेक्ट लाईट कनेक्शन कट करत आहेत. आता ऑनलाईन मीटर आलेले आहेत त्यांची वसुली ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल पण ज्या गोरगरीब मुजरानकडे स्मार्ट फोनच नाही त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त महावितरण कंपणी च्या चकरा मारायच्या बास झाले आता महावितरण कंपनी जाहीर निषेध करत किती उलट सुलट महावितरण कंपनीच्या संदर्भात चर्चा सुरू असलेली दिसून येत आहे. तसेच ठिकठिकाणी गल्ली बोळामध्ये चौरस्ता मध्ये लाईटच्या तारा ही खाली आल्या मुळे वाहनांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि याचा धोका निर्माण होऊ शकतो हे काम सुद्धा वारंवार तक्रार देऊनही महावितरण कंपनी पूर्ण करत नाही त्याबद्दल देखील चर्चा गुलदस्ता मध्ये आहे. तसेच कळम शहरातील नगरपालिका याचा वीज भरणा किती थकीत आहे आणि सर्वसामान्याला पाणीपुरवठा बंद झालेला दिसून येत आहे वीज खंडित केल्यामुळे सहाय्यक अभियंता यांना वीज ग्राहक कळंब शहरांमध्ये किती आहेत ते विचारणा केली असता त्यांना माहीत नाही. तसेच स्मार्ट का मीटर तुम्ही शहरांमध्ये किती ठिकाणी बसवलेले आहेत ते सुद्धा त्यांना आकडेवारी माहित नाही त्यांनी सांगितले. विज ग्राहक सध्या स्मार्ट मीटर बसवणे चालू आहे त्याच अनुषंगाने बत्ती गुल फिल्म प्रमाणे शासनाने महावितरण कंपनीला निर्णय जारी करावा युनिट प्रमाणे बिल आकारण्यात यावे इतर चार्जेस त्या बिलामध्ये देऊ नये कारण ज्याप्रमाणे स्मार्टफोन किंवा टीव्ही रिचार्ज आपण करतात त्याचप्रमाणे महावितरण कंपनी आता बिल आकारणी करत आहे म्हणून इतर चार्जेस बिलामध्ये लावु नये.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीने पशु पक्षांना पाण्याची व धान्याची केली व्यवस्था
भूम (प्रतिनिधी)- यावर्षी पर्जन्यमान जास्त झाल्याने सर्वत्र डोंगर दर्याने झाडे झुडपे अधिक प्रमाणात वाढले असल्याने रस्त्यालगत गवत जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यामध्ये असल्या उन्हाच्या धगधगते मध्ये चिमणी पाखरू पक्षी यांचा जीव घरटे जळून खाक झालेली दिसून आली येताच मौजे हाडोंग्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी नालंदा रवींद्र लोमटे इयत्ता 2 री या विद्यार्थिनीने उन्हामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते उन्हामध्ये माणसांचा देखील जीव लाईलाई होत आहे ही गोष्ट लक्षात घेता या पशु पक्षांना उष्माघाताचा त्रास होऊ नाही म्हणून विद्यार्थिनीने घराशेजारी असलेल्या छोट्याशा झाडाला एका बिसलरी बॉटलमध्ये पाणी भरून ते झाडाला बांधून ठेवली आहे आणि सोबत जवारीच्या धान्याचे कणीश या झाडाला बांधल्याचे दिसत आहे या माझ्या पशु पक्षांना तहान व भूक लागल्यास त आपल्याला मागू शकत नाही म्हणून उष्णतेमुळे पशु पक्षांचा अन्नधान्य धान्य पाण्यावाचून मृत्यू होऊ शकतो. पशु पक्षांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर पाण्याची व्यवस्था केली पाहिजे .पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय पशु पक्षी मानव प्राणी जगू शकत नाही.2 री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था करून . पशु पक्षांना अन्नधान्याची व पाण्याची गरज असल्याचे एक प्रकारचा इथल्या मानव समूहाला संदेश दिल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमामुळे तिचे कौतुक होत आहे.
परंडा (प्रतिनिधी)- आज सोमवार दि.30 रोजी, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली, परंड्याचे नगराध्यक्ष जाकीरभाईं सौदागर यांना परंडा शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा परंडा शहरात शिवाजी महाराज चौकामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्या बाबतचे निवेदन दिले,परंडा शहरात दि.15 सप्टेंबर2024 रोजी महीला मेळाव्याचे निमित्ताने आले असता तत्कालीन मुख्यमंत्री, व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन आरोग्य मंत्री व परंडाचे विद्यमान आमदार डॉ.प्रा.तानाजीराव सावंतसर यांचे शिफारशीसह, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, त्याच वेळेस मा. उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी परंडा शहरात दोन्ही महा मानवांचे पुतळे बसवण्याची जाहीर घोषणा केलेली आहे, त्याच घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करून परंडा शहरात,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चौदा एप्रिल चे मुहूर्तावर पुतळे बसवण्याबाबतचे निवेदन दिले, सोबत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सरोदे माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, रिपाई नेते अमोल चौतमहाल, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, जयपाल बनसोडे अक्षय कांबळे ,विजय बनसोडे सिद्धार्थ बनसोडे, विश्वास बनसोडे ,वामन शिंदे आकाश लोखंडे व आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केले नुसार पुतळा बसविण्याची सकारात्मक कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष जाकीरभाईं सौदागर यांनी यावेळी दिले.
IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे आरसीबीने विक्रमी विजय नोंदवला असला, तरी सध्या सर्वत्र चर्चा होत आहे ती हैदराबादच्या अनिकेत वर्माची. झाशीच्या या 24 वर्षीय युवा खेळाडूने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ 18 चेंडूंमध्ये 43 […]
अंकुर शिशुगृहातून दहा बालके मोठ्या घरात अदत्तक- डॉ. दिग्गज दापके
धाराशिव (प्रतिनिधी)- नकोशी असलेली, कुमारी माता, घटस्फोट व इतर कारणामुळे जन्मताच बाळांना रस्त्यावर फेकून देणे किंवा कचराकुंडीमध्ये टाकून जाणे यामुळे बालकांचे जीवन धोक्यात येते. मात्र, अशाच बालकांना धाराशिव येथील अंकुर शिशुगृहामध्ये आणून त्याचे जीवन फुलविले जाते. या शिशुगृहामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये 21 बालके असून, त्यापैकी 10 बालकांना भुवनेश्वर (ओडिशा), नंदियाल (आंध्र प्रदेश), पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, अहमदाबाद (गुजरात) आदी शहरातील मोठ्या उद्योगपतींच्या घरात हे बालके दत्तक विधान् कायद्यानुसार पुनर्वसित झाले आहेत. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल व अंकुर शिशुगृहाचे प्रमुख डॉ. दिग्गज दापके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धाराशिव शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अंजुमन सोसायटी व सह्याद्री हॉस्पिटलच्यावतीने आयोजित ईद-ए-मिलाद व पत्रकार परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे फेरोज पल्ला उपस्थित होते. एक बालक अमेरिकेत या शिशुगृहातील एक बालक अमेरिकेत जाण्याची शक्यता असल्याचे डॉ. दिग्गज दापके यांनी सागून, त्यानुसार केंद्र सरकारकडून प्रोसेस चालू असल्याचे सांगितले. दत्तक विधान कायद्यानुसार त्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली असणे आवश्यक आहे. दत्तक घेणाऱ्या पती-पत्नीची संमती असण्याबरोबरच त्या दांपत्यांना कुठलाही जीवघेणा आजार आहे का ? त्यांचे वय तसेच त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? याची तपासणी केली जाते. विशेष म्हणजे दत्तक घेण्यासाठी 30 हजार दामप्त्य वेटींगवर असल्याचे डॉ. दापके यांनी सांगितले. दानशूरांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे करावा हा प्रकल्प लोकसहभाग व संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे अशा पालकांचे व्यवस्थित पालन पोषण व त्यांची जपणूक व्हावी यासाठी जास्तीत जास्त दानशुरांनी आर्थिक मदत करावी. असे आवाहन डॉ. दिग्गज दापके यांनी केले.
अजय घारगेचा अमरावती येथे पोलीसमध्ये भरती झाल्याबदल सत्कार
मुरुम (प्रतिनिधी)- दि .30 मार्च 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अजय परमेश्वर घारगे राहणार कोंडजीगड ता. लोहारा येथील रहिवासी हा भाग भूकंपग्रस्त परिसरात असल्यामुळे अनेक कठिण समस्याला सामोरे जाऊन वडिलांने कुटुंब सांभाळले. उदरनिर्वाह हा केवळ शेतीच असल्यामुळे वडिलांनी अजयला शिक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे बीए प्रथम वर्षात तसेच एनसीसी मध्ये प्रवेश घेण्यास सांगितला. घरची हालाकिची परिस्थिती असल्यामुळे मुलाला पोलीस करण्याचे स्वप्न मनात होते. ते वडिलाचे स्वप्न अजयनी पूर्ण करून दाखवले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी त्याचा सत्कार करून पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारप्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना इतर कॅडेटसनी पण यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावे असे आव्हान केले. या सत्कार समयी डॉ पद्माकर पिटले, कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ सुभाष इंगळे, डॉ सन्मुख मुच्छटे, डॉ खंडु मुरळीकर, राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ (विनोबा ॲप) माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना दरमहा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जिल्हा स्तरीय स्कॉलरशिप सराव परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या शाळांचा सन्मान गट शिक्षण कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आला. यामध्ये जी प. शाळा अळणी जि.प. कोडगाव आंबेजवळगा, जि.प. ताकविकी व जि.प. राजुरी या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार सय्यद ए. जी. (गट शिक्षण अधिकारी, धाराशिव) व हाके डी. आर.(विस्तार अधिकारी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गट शिक्षण कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’चे प्रकल्प अधिकारी मनोज बिरादार उपस्थित होते.कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले. तसेच सय्यद ए. जी. यांनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक केले. जि.प. आळणी येथील मुख्यध्यापक बशीर तांबोळी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर विनोबा ॲप व स्कॉलरशिप सराव परीक्षेमुळे त्यांच्या शाळेला मोठा फायदा झाल्याचे सांगितले. त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत धारक ठरले असून त्यांनी विनोबा ॲपचे आभार व्यक्त केले.
तीन गाईचा मृत्यू, दोन गाई अत्यावस्थे
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील होंनाळा येथील शेतकरी विजय गिरजाप्पा शेलार यांच्या गोठ्यात सोमवारी दि. 30 मार्च रोजी पशुखाद्य खाल्ल्यानंतर 3 गाईंचा जागीच मृत्यू झाला. तर 2 गाई अत्यावस्थेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेलार यांच्याकडे एकूण 18 जनावरे आहेत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे गायींची धार काढल्यानंतर त्यांनी पशुखाद्य तयार करून जनावरांना देण्यास सुरुवात केली. पहिल्या पाच गाईंना खाद्य दिल्यानंतर काही क्षणांतच त्यापैकी तीन गाई अचानक कोसळून मृत्युमुखी पडल्या, तर दोन गाईंची प्रकृती गंभीर झाली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या गाईचा हत्यारा कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरात भव्य मिरवणूक
भूम (प्रतिनिधी)- महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा कसबा जैन मंदिर येथे संपन्न करण्यात आली. या मिरवणुकीत पुरुष, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. भगवान महावीरांच्या उपदेशांप्रमाणे मिरवणूक अत्यंत साधी, शांत व शिस्तबद्ध होती. मिरवणुकीमध्ये जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शितल शहा, अभय गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीप आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजय सुरपुरिया, प्रीतम आहेरकर, धर्मचंद पोकर्णा डॉ.शुभम पोकर्णा, सूरज शहा, धवल गांधी, सुनील जोशी सुरेश लोखंडे, यांच्यासह अनेक जैन बांधव उपस्थित होते. मिरवणुकीनंतर भगवान महावीरांची आरती करण्यात आली. या उपक्रमातून शांती, करुणा व अहिंसेचा संदेश देण्यात आला.
त्यागातूनच राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आहे- दत्ता कुलकर्णी
भूम (प्रतिनिधी)- प्रत्येक क्षेत्रात त्याग केल्या शिवाय फळ मिळत नाही, जनसंघाच्या माध्यमातून अनेकांनी त्याग केला. त्यांच्या विचारधारेवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र, राज्यात आणि जिल्ह्यात सरकार आहे. प्रगत राष्ट्रासाठी ही बाब समाधानकारक असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. शनिवार दि. 28 व रविवार दि 29 मार्च या दोन दिवसाच्या कालावधीचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम शहर व ग्रामीण मंडल स्तरीय प्रशिक्षण वर्ग श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृहात माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राज्य परिषद सदस्य तथा मतदार यादी पुनरनिरीक्षण विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सात सत्रामध्ये विविध विषयावर वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. नितीन काळे, सचिन घोडके, रामदास कोळगे, देविदास पाठक, अस्मिता कांबळे, शिवाजी गिट्टे, बाळासाहेब क्षिरसागर सखोल मार्गदर्शन केले. दोन दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात तालुक्यातून 163 बूथ प्रतिनिधी निवासी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थींची भोजन निवास व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीची केली होती. यात महिलांची सुद्धा उपस्थिती चांगली होती. संपूर्ण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे प्रभारी दत्ताभाऊ राजमाने, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, शहराध्यक्षा विद्या खामकर, मन की बात व्यवस्थापन करणारे सिद्धार्थ जाधव, शुभम खामकर तसेच नगरसेवक तथा प्रभारी आबासाहेब मस्कर, शांतीराज बोराडे, बापू बगाडे, संदीप खामकर, शरद चोरमले, रघूनाथ वाघमोडेसह अनेकांनी परिश्रम घेतले. प्रत्येक सत्रामध्ये गीत गायन महादेव वडेकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात योग प्राणायाम सत्र उत्साहात संपन्न
परंडा (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तसेच शिबिराची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून करण्यात आली. या प्रशिक्षण महाअभियानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्कार शिबिर तसेच आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता दर्शविली. याप्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, बौद्धिक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सूर्यवंशी, भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे व शहर प्रमुख उमाकांत गोरे , तानाजी पाटील, जयदेव गोफणे, गौतम लटके सर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योग सत्रामध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे (एम.डी. आयुर्वेद मेडिसिन) योगशिक्षक यांनी प्रात्यक्षिकासह केले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक ताण कमी होतो व कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन केले. तसेच निरोगी कार्यकर्ता हा सशक्त संघटनेचा पाया असून आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी असून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. या प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजसेवा व राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अधिक बळ मिळेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
केरळमध्ये दोन प्रमुख आघाड्या सत्ताधारी LDF आणि मुख्य विरोधी गट UDFएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केरळच्या या राजकारणात भाजपची बी-टीम हा मुद्दा गाजत आहे. या आघाड्या राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपशी एकमेकांची तुलना करत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करतात, ते भाजपची बी टीम आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी पिनराई विजयन […]
..तेव्हाच खरातच्या पापाचा घडा फुटला असता; पतसंस्था, ट्रस्टमधील ‘राजीनामा नाट्य’
>> बाबासाहेब गायकवाड भोंदू अशोक खरातच्या पापाची कुणकुण त्याच्या जवळच्या सहकार्याला वर्ष-दीड वर्षापूर्वीच लागली असावी, या पापाचे साक्षीदार व्हायला नको म्हणून त्याने खरातच्या शिवनिका ट्रस्ट विश्वस्तपदाचा त्याग केला. आपल्याही पापाचा घडा भरण्याआधीच फुटायला नको यासाठी खरातनेही ‘त्या’ पतसंस्थेच्या कारभारातून मुक्त होण्याचा शहाणपणा केला. त्याच्या कार्यकाळात ठेवींमध्ये झालेली वाढ ही काळा पैसा पांढरा करण्याची युक्ती होती. […]
Earthquake –दक्षिण पॅसिफिक बेटसमूहावर 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
दक्षिण पॅसिफिक बेटसमूहातील वानुआतूच्या किनाऱ्याजवळ 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची अद्याप नोंद झालेली नाही. स्थानिक प्रशासन खबरदारीचे उपाय योजत असून परिस्थतीवर लक्ष ठेवून आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप सोमवारी, 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.44 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली […]
धाराशिव (प्रतिनिधी)- हास्याचे फवारे उडविणारी मिश्किल शैली तर कधी काळजाला भिडणाऱ्या, क्षणभर स्तब्ध करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करीत मराठवाड्यातील कविंनी कविसंमेलनाचा मंच गाजवला. कविसंमेलनास साहित्यिरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी प्रा.जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. प्रा. जिजा शिंदे यांनी किती लगडलेली असते माती युगानयुगे किती अनुपम सोहळा अनुभवला असतो गाव शिवारातील मातीने ही मातीचे महत्व सांगणारी कविता सादर केली. दिलीप चौधरी यांनी हसण्यानं आयुष्य वाढत असतं पण काही लोकांना कळत नसतं तनवणे काही होत नसतं मग खाल्लेलं पचत नसतं ही विनोदी शैलीतील कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. प्रज्वल भालेराव यांनी साहेब एसी मध्ये बसणारी पोरं दंगली मध्ये आत जात नाहीत जातात तुमची आमची अशी चल दंगल समजून घेऊ ही समाजभान देणारी कविता सादर केली. प्रा. सुलक्षणा सोनवणे यांनी सोसून ताप सारा जगतात बायका सुर्यासमान तळपत असतात बायका ही महिलांच्या व्यथा मांडणारी गझल सादर केली. भावना चौधरी यांनी बाप ही कविता सादर करून वडिलांचे महत्त्व विशद केले. कविसंमेलनात भावना चौधरी, मनीषा पोतदार, युसुफ सय्यद, दिलीप चौधरी, प्रज्वल भालेराव (धाराशिव), अनुपमा भंडारी, सुलक्षणा सोनवणे, सुनिता मोरे, दयानंद बिराजदार (लातूर), साईनाथ रहाटकर (लोहा), शिवराज लोखंडे (बिलोली), रघुवीर पतंगे, विजया पतंगे, गोडाती काळे (हिंगोली), आत्माराम जाधव (गंगाखेड), राजकुमार यल्लावाड, गोविंद पाठक (परळी), अंजली यादव-चाळक (केज), वासुदेव उगले, वैशाली फोके (जालना), दीपक नागरे (गंगापूर), अकिल पठाण (छत्रपती संभाजीनगर) बी. सुरभी आदींनी सहभाग नोंदवून कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार नारायण खैरे यांनी मानले.
सोलापूर जिल्ह्यात गॅसचा प्रचंड तुटवडा सोलापूर -आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सोलापूर जिल्ह्यालाही बसू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रती रेशनकार्डधारकांना तीन लीटर केरोसीन देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या [...]
मुंबई इंडियन्स संघाने गेल्या 13 वर्षांपासून पहिला सामना गमावण्याची परंपरा यंदा मोडीत काढली आणि रविवारी वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दारूण पराभव केला. या लढतीमध्ये शार्दुल ठाकूर याने मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या लढतीतच त्याने आपली छाप सोडली आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीचे हिंदुस्थानचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी भरभरून […]
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढलेला असतानाच सोमवारी निसर्गाचा वेगळाच लहरीपणा पाहायला मिळाला. दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणेकरांची दाणादाण उडवली. बाणेर, बालेवाडी, धायरी आणि वाघोली परिसरात तर जोरदार गारपीट झाल्याने उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव आला. सोमवार सकाळपासूनच पुण्याच्या आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती. दुपारी दोनच्या सुमारास हलक्या सरींना सुरुवात झाली, […]
Sir Please No Flash Light…, अगस्त्यसाठी पपाराझींवर भडकली माहिका शर्मा, व्हिडीओ व्हायरल
आयपीएल 2026 च्या हंगामात वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. या लढतीत मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल माहिका शर्मा, हार्दिकचा मुलगा अगस्त्य त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. यावेळी मैदानातील खेळाप्रमाणेच मैदानाबाहेर घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून […]
त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज, नवीन पटनाईक यांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका करत त्यांना “मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे” असे म्हटले आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. 27 मार्च रोजी निशिकांत दुबे यांनी दावा केला होता की, 1960 च्या दशकात चीनविरुद्धच्या […]
कोकणातील शेतकऱ्यांनो आंबा-काजू नको; बांबू-साग लावा; पेम संस्थेचे आवाहन
बदलत्या हवामानामुळे कोकणात आंबा व काजूच्या उत्पादनाचा भरवसा राहिलेला नाही. हवामान बदल आणि किडींच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे त्रस्त झालेले शेतकरी या फळझाडांवर फवारण्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च करतात. या व्यतिरिक्त बाग साफ करण्यापासून तयार झालेला आंबा बाजारात पाठवण्यापर्यंत विविध टप्प्यांवरही बराच खर्च करावा लागतो आणि इतकं करूनही पदरात काय पडेल, याची शाश्वती नसते. एखाद्या दिवसाचं मळभ किंवा […]
दीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा पालिकेची घंटा वाजणार सातारा -सातारा नगरपालिकेच्या तत्कालिन नगराध्यक्ष माधवी कदम यांनी कोरोना काळात शेवटची मासिक सभा घेतली होती. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला होता. आता तब्बल चार वर्षाच्या काळानंतर निवडणुका होवून नव्याने भाजपाची सत्ता स्थापन झाली असून पहिलीच सर्वसाधारण सभा दि. ७ एप्रिल रोजी होत आहे. या सभेत अजेंड्यावर [...]
घोडेगावमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. गिरवली (ता. आंबेगाव) येथील कृष्णवाडी येथे कोयता घेऊन दोन अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि दागिने लंपास केले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. ही वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील घटना ताजी असतानाच पुन्हा गिरवली कृष्णवाडी […]
तू तुझ्या भूमिकेबद्दल काहीच बोलू नकोस…असं मोना सिंग ‘धुरंधर-2’मधील गौरव गेराला का म्हणाली
‘धुरंधर’ या चित्रपटामध्ये अभिनेता गौरव गेरा याची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. गौरव गेरा हा पहिल्या भागामध्ये तर ओळखताही आला नव्हता. इतका कमाल अभिनय त्याने केला होता. ‘धुरंधर २’ मधील लक्षवेधी कलाकारांपैकी एक म्हणून गौरव गेरा नावारूपाला आला आहे. NDTV ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, या अभिनेत्याने अमृतसरमध्ये ‘धुरंधर’ आणि ‘कोहरा २’ या चित्रपटांचे शूटिंग […]
कणकवलीत बर्निंग कारचा थरार; CNG कारने अचानक घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली
कणकवली नरडवे रोडवरील कनकनगर येथे उभी असलेली सीएनजी कारने सोमवारी अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीएनजीवर चालणाऱ्या कारचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईहून दारिस्ते येथे जाणारे कुटुंब या कारमधून प्रवास करत होते. कारमध्ये बिघाड झाल्याने कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात […]
साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीत केमिकल फॅक्ट्रीत भीषण स्फोटानंतर आग, सुदैवाने जीवितहानी नाही
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यात सोमवारी सकाळी जोरदार स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या आत झालेल्या स्फोटानंतर आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी […]
इराण युद्धाचा परिणाम, रॉकेल पुरवठ्यासाठी केंद्र सरकारकडून नियम शिथिल; 21 राज्यांमध्ये तात्पुरती सवलत
इराणमधील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती रॉकेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलियम सुरक्षा आणि परवाना नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता जाहीर केली आहे. सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वयंपाक आणि प्रकाशासाठी रॉकेलचा तात्पुरता पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना पेट्रोल […]
इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगला. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या लढतीत केकेआरने 220 धावांचा डोंगर उभारला होता, मात्र रोहित शर्मा आणि रिकल्टन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. मात्र या लढतीनंतर हिंदुस्थानच्या माजी खेळाडूवर मुंबईच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले. मुंबई […]
दुपारी वामकुक्षी घेण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या
सकाळची कामे आवरल्यानंतर गृहिणींना दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेतात. पण आता प्रश्न असा आहे की, दुपारी डुलकी घ्यावी की नाही? खरं तर, तुम्ही किती वेळ आणि केव्हा झोपता यावर अवलंबून, दुपारची छोटी डुलकी फायदेशीर आणि हानिकारक दोन्ही असू शकते. तुम्ही डुलकी घ्यावी की नाही? दिवसा घेतलेली छोटी डुलकी शरीराला ताजेतवाने करते. जर तुम्हाला सकाळी थकवा […]
आता हे युद्ध लवकर संपणार नाही, त्यामुळे…; रॉबर्ट कियोसाकी यांचा महत्त्वाचा इशारा
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध महिनाभर सुरू आहे. तसेच या युद्धाची तीव्रता वाढत आहे. आता अमेरिका इराकमध्ये सैन्य उतरवण्याच्या तयारीत आहे. या जागतिक अनिश्चिततेच्या काळात “रिच डॅड, पुअर डॅड” चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गंभीर इशारा देत लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हे युद्ध लवकर संपणार नाही, त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करा आणि हाच निश्चिंत […]
देशातील महिला, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांचे अपहरण, अत्याचाराच्या रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. यापूर्वी दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. याच घटनेची पुनरावृत्ती विशाखापट्टणमध्ये घडली. येथील गाजुवाका परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने एका 29 वर्षीय महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. […]
मोस्ट वाँटेड नक्षलवादी कमांडर चेलुरी नारायण राव 8 सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण
गेल्या 36 वर्षांपासून भूमिगत असलेला मोस्ट वाँटेड नक्षलवादी कमांडर चेलुरी नारायण राव उर्फ सुरेश अखेर पोलिसांना शरण आला आहे. राव याने आपल्या आठ सहकाऱ्यांसह आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांच्यासमोर शरणागती पत्करली. राव हा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. माजी आमदार किदरी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार […]
Gas Shortage |आखातातील युद्धामुळे गॅस टंचाईचा चटका; मिरजेतील गृहिणी पुन्हा वळल्या मातीच्या चुलीकडे
गॅस टंचाईमुळे मिरजेत मातीच्या चुलींना वाढली मागणी मिरज -आखातील देशातील युध्दामुळे सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाल्याने गृहीणी आता पारंपारीक मातींच्या चुलीकडे वळल्या आहेत. वखारभागात वाळलेले जळण खरेदी करण्याकडे कल वाढला असून, बाजारात गृहिणींसाठी वेगवेगळ्या आकारातील मातीच्या चुलीही उपलब्ध झाल्या आहेत. या चुली खरेदीसाठी महिलांकडून चांगलीच पसंती मिळत असून, गॅस सिलेंडरचा पुरवठा [...]
तुमच्याही मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय का? जाणून घ्या यावरील साधे सोपे उपाय
मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये शौचास कमी वेळा होते किंवा शौच कडक आणि कोरडे होते. चुकीच्या आहार सवयी, डिहायड्रेशन (शरीरातील पाण्याची कमतरता) किंवा शौच रोखून धरण्याची सवय ही सहसा याची कारणे असतात. मुलांमधील बद्धकोष्ठता सहसा तात्पुरती असली तरी, ती अनेकदा वेदनादायक आणि त्रासदायक असू शकते. याच्या व्यवस्थापनामध्ये सामान्यतः आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे, […]
Jotiba Donger |दख्खननगरी भाविकांनी फुलली! बेळगावच्या मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीत लाखो भाविकांची हजेरी जोतिबा डोंगर -महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र बाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील जोतिबाची यात्रा बुधवार १ एप्रिल रोजी होत आहे. रविवारी कामदा एकादशी पासुन चैत्र यात्रेस प्रारंभझाला. बेळगाव, लातूर, बार्शी, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बिड, सातारा, पुणे परिसरातील काही सासनकाठ्या [...]
मार्च संपत आला तरीही उत्तरेत उन्हाळा नाही; हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा परिणाम हिंदुस्थानवरही होत आहे. त्यामुळे देशातील ऋतुचक्र बदलत आहे. दरवर्षी देशभरात 15 मार्चपासून उकाडा जाणवायला सुरुवात होतो. मात्र, यंदा मार्च संपत आला तरीही उत्तरेत अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. त्यातच आता उत्तरेत हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदलाचे वारे […]
Maharashtra Weather |राज्यात पुढील दोन दिवस अवकाळीचा तडाखा; पुणे, सातारा आणि सांगलीला ‘ऑरेंज अलर्ट’
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा पुणे -राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची तीव्रता वाढणार असून, यामध्ये पुढील दोन दिवसांत काही जिल्ह्यांना गारपिटीसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात मंगळवारी पुणे, सातारा,मंगळवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापुरला तीव्रता अधिकसांगली, सोलापूर जिल्ड्यांचा समावेश आहे. राजस्थान, आसाम, [...]
दोघांनाही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी लांबणीवर
वाहतूकमंत्री गुदिन्हो यांची माहिती : हेल्मेटसाठी जनजागृतीचे काम सुरूच पणजी : येत्या एक एप्रिलपासून स्कूटरवर बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय आता आणि तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार नाही. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. त्यांनी सांगितले की [...]
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याचे अनेक आमदार, खासदार, मंत्री, बडे अधिकारी यांच्याशी लागेबांधे असल्याचेही उघड झाले. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरात हा बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना एकमेकांसोबत शेअर करायला लावत होता,” असा आरोप वडेट्टीवार यांनी […]
सांकवाळ अपघातात ‘बिटस् पिलानी’चा विद्यार्थी ठार
वास्को : सांकवाळ-झुआरीनगर येथील महामार्गावर झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हे दोघेही युवक बिटस् पिलानीचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या दुचाकीची धडक टँकरला बसली. मयत युवकाचे नाव करण एन. नृसिंहमूर्ती (25 वर्षे) असे असून तो म्हैसूर कर्नाटकचा आहे. जखमी युवकाचे नाव सोहन अधिकारी (26 वर्षे) असे आहे.वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा [...]
वाळवा-कामेरी रस्त्यावर रविवारी पहाटे घडला थरार वाळवा -बाळबा येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून झाला. दि. २९ मार्च रोजी पहाटे वाळवा कामेरी रस्ता येथे ही घटना घडली आहे. संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. माळभाग वाळवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आष्टा [...]
इतर आंदोलकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन कुडचडे : मीराबाग-सावर्डे येथील प्रस्तावित बंधाऱ्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला काल रविवारी 48 दिवस पूर्ण झाले. या आंदोलनाचा आजचा 49 वा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून आज सोमवारी आंदोलक आपली कैफियत मांडण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानाला धडक देणार आहेत. या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असून समर्थकांनी कंबर कसली आहे. [...]
दुचाकींना एकाच नंबरप्लेटची क्रेझ
‘कॅमेऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक’ करण्याची स्मार्ट क्लुप्ती पणजी : राज्यात एका बाजूने सरकार आणि न्यायव्यवस्थासुद्धा वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविण्यासंबंधी कठोर नियम बनवतात तर त्याच नियमांना वाकुल्या दाखवत खास करून तरुणांमध्ये दुचाकींसाठी एकाच क्रमांक पट्टीची क्रेझ निर्माण झाली आहे. हे सर्व प्रकार पोलिस आणि वाहतूक अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत चालले असतानाही कुणीही त्यांच्यावर कारवाई करण्यास धजत नाहीत. आश्चर्यकारक [...]
इराणशी पंगा घेतला, आता ट्रम्प यांची टरकली; व्हाईट हाऊसखाली बंकर बनवण्यास सुरुवात
मध्य पूर्वेतील युद्धाला सुरवात झाल्यानंतर, इराणचे पूर्वीश्रमीचे नेते बंकरमध्ये लपले होते. त्यांच्या बंकरवर हल्ला करत अमेरिकेने त्यांना संपवले. परंतु आता खुद्द अमेरिकेलाच बंकर बांधण्याची वेळ आलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आता ट्रम्प स्वतःसाठी बंकर बांधत आहे. त्यामुळेच या गोष्टीची चर्चा आता सर्वदूर होऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या त्या भागाचा फोटो दाखवला आहे, ज्याखाली […]
शरद पवार पुन्हा कामाला लागणार, लवकरच करणार राज्याचा दौरा
आरोग्याच्या कारणामुळे जवळपास तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार पुढील दोन आठवड्यांत राज्यव्यापी संपर्क अभियान सुरू करण्याची तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुन्हा उभारणी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका […]
एप्रिलमध्ये बँका 14 दिवस बंद राहणार; जाणून घ्या सुट्ट्यांची माहिती…
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेनुसार एप्रिल महिन्यात बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राज्या-विशिष्ट सुट्ट्या, महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच सर्व रविवार यांचा समावेश आहे. महिन्याची पहिली सुट्टी 3 एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’च्या निमित्ताने येत आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाविषुव संक्रांती, बोहाग बिहू आणि बैसाखी […]
दिल्ली उच्च न्यायालयाने इंटास फार्मास्युटिकल्सला त्यांच्या कर्करोगावरील औषधासाठी बेवाटास (BEVATAS) हा ट्रेडमार्क वापरण्यापासून कायमस्वरूपी रोखले आहे. याअंतर्गत सन फार्माच्या बेवेटेक्स (BEVETEX) या नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी म्हटले आहे की, सन फार्मा ही १९८३ पासून बेवेटेक्स (BEVETEX) या ट्रेडमार्कची नोंदणीकृत मालक आणि पूर्व-वापरकर्ता आहे, आणि २०१५ मध्ये […]
कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी, वेदिका सासणे पराभूत सोलापूर -रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची [...]
Kolhapur Wildlife |कोल्हापुरात आढळली दुर्मिळ पांढरी खारुताई; आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची दखल
कोल्हापूरमध्ये दुर्मिळ ल्यूसीस्टिक खारुताईंचे निरीक्षण कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ खारुताईंच्या निरीक्षणाने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पक्षीनिरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची एक खारुताई दिसली. सुरुवातीला एकच खारुताई असल्याचा समज होता, [...]
Kolhapur Water Supply |कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद; महावितरणच्या दुरुस्ती कामाचा फटका
कोल्हापूर शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद कोल्हापूर : महावितरण कंपनीकडून सोमवारी, ३३ के. व्ही. बीजबाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी बीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी आणि ई बॉर्ड तसेच त्यास [...]
मंत्रीच गॅस सिलिंडरसाठी पत्र पाठवत आहेत, सरकारने वास्तव सांगावं! –सुप्रिया सुळे
मंत्रिमंडळामधील मंत्री एकमेकांना गॅस सिलिंडरसाठी पत्र लिहित असतील तर संकट गंभीर आहे. केंद्र सरकारने लोकांना वास्तव सांगावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर द्या, अशी मागणी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा […]
72 म्यूल खाती : 13 कोटींचा व्यवहार
मुंबईच्या भामट्यासह बेळगावच्या महिलेला अटक : सायबर गुन्हेगारांच्या स्थानिक कनेक्शनचा पर्दाफाश बेळगाव : वर्क फ्रॉम होमसाठी कामे देण्याबरोबरच सरकारकडून कर्ज मिळवून देण्याचे सांगून उघडलेली बँक खाती सायबर गुन्हेगारांना देणाऱ्या मुंबई व बेळगाव येथील दोघा जणांना शहर सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बेळगाव येथील दोघा जणांच्या नावे उघडलेल्या 72 पैकी 47 बँक खात्यात 12 [...]
बिनखांबी गणेश मंदिर परिसरात दोन एजंटांमध्ये वाद कोल्हापूर – कोल्हापूर लॉजसाठी ग्राहकांची पळवापळवी दोन करण्याच्या वादातून एजटांनी तलवार नाचवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी दि.२९ रोजी भरदुपारी बिनखांबी गणेश मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. रोहित सतीश गोसावी (वय २७, रा. [...]
सुळगा येथे शेड अंगावर पडून पाटील गल्लीच्या युवकाचा मृत्यू
काकती पोलिसांत एफआयआर दाखल बेळगाव : निर्मिती केंद्राच्यावतीने सरकारी शेड उभारण्याचे काम सुरू असताना शेड अंगावर पडून पाटील गल्ली येथील एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सुळगा-हिंडलगा येथे ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ शुभम मोहन सावंत (वय 32) राहणार पाटील गल्ली, शनिमंदिरजवळ असे त्या दुर्दैवी [...]
Kolhapur News |कोल्हापूर-नवी मुंबई हवाई मार्गावर आता इंडिगोची विमानसेवा; दिवसातून होणार दोनदा उड्डाण
कोल्हापूर-नवी मुंबई हवाई सेवा सुरू कोल्हापूर – कोल्हापूरच्या विमानसेवेच्या आधुनिकीकरण, विस्तारीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यातूनच हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये रविवारी आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गावर दिवसातून दोन वेळा इंडिगो [...]
अधिवेशनातील चर्चेनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीची रजा; सातारा – सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या राड्यावरुन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आता साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशना दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये पोलिस अधीक्षक तुषार दोषी [...]
भारत-इंग्लंड सेमी फायनलच्या तिकिटांची काळाबाजार, मुंबईतील माजी क्रिकेटपटूला अटक
टी-20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडिययममध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्याच्या तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. या प्रकरणात मुंबई अंडर-19 संघासाठी खेळलेला बलवंत सिंह उर्फ स्वरूप सिंह सोढा (वय 26) याला सातवा आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोढा याचा मोबाईल फोन जप्त […]
मार्च एंडींगमुळे रविवारीही कर्मचारी कामावर
बँकांसह काही सरकारी कार्यालये सुरू : टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग बेळगाव : चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा (मार्च एंडींग) सुरू असल्याने प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी बँकांसह काही सरकारी कार्यालये रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सुरू होती. बेळगाव शहरातील अनेक बँकांचे व्यवहार बंद असले तरी शटर बंद ठेवत मार्च एंडींगचे काम सुरू ठेवण्यात आले होते. यामुळे [...]
हिडकल धरणातून घटप्रभेला आजपासून पाणी
पाण्याचा सदुपयोग करण्याचे पालकमंत्री जारकीहोळी यांचे आवाहन बेळगाव : हिडकल धरणातून घटप्रभा नदीला पाणी सोडण्यात येत असून नागरिक व शेतकऱ्यांनी पाण्याचा सदुपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. सोमवार दि. 30 मार्चपासून पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. उन्हाळ्यात दरवर्षी हिडकल धरणातून घटप्रभा नदीला पिण्यासाठी पाणी सोडले [...]
दिल्लीत लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अटकेत, बांगलादेश कनेक्शनचा मोठा पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन ऊर्फ राजा याला दिल्लीतून अटक केली आहे. शब्बीर हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बांगलादेशमध्ये बसून हिंदुस्थानच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दहशतवादी शब्बीरसंदर्भात […]
हनुमान जयंतीनिमित्त अनगोळला विविध कार्यक्रम
भव्य शोभायात्रा काढण्यात येणार : विविध स्पर्धांनी रंगणार उत्सव : शुक्रवारी रथ ओढणे कार्यक्रम बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी यंदाही गाड्यांची भव्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार [...]
रामलिंगखिंड गल्लीत दिवसाही पथदीप सुरूच
बेळगाव : रामलिंगखिंड गल्ली येथील पथदीप मागील तीन दिवसांपासून सतत सुरू आहेत. यामुळे विजेचा अपव्यय होत असून नागरिकांनी कळवूनदेखील पथदीप बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येणारे वीजबिल नागरिकांच्या खिशातूनच कापले जाणार असल्याने हे पथदीप त्वरित बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे. किर्लोस्कर रोड ते टिळक चौक या दरम्यानचे पथदीप मागील तीन दिवसांपासून सुरू आहेत. [...]
Khandoba Yatra |यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात मंगसुळी येथील खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न
मंगसुळीत खंडोबा यात्रेचा उत्साह, यळकोट जय मल्हारच्या गजरात सांगता मंगसुळी -मंगसुळी येथील कुलस्वामी खंडोबाची यात्रा यळकोट यळकोट जय मल्हारच्या गवरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लंगर फिली वेळात तुटते, या पावेतील सर्वात महत्वाचा क्षग असतो यावेळी लंगर एकविसाव्या पेटपाला पाचध्या कडीतून तुटली. त्याच क्षणी माविकांनी सदानंदाचा यहकोट चा एकच गजर केला. यावेळी प्रत्येक भक्तगण [...]
गोव्यातील कचरा बेळगाव-खानापूर महामार्गावर
महामार्गाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कचरा उचलण्याची वेळ : परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध बेळगाव : अनमोडमार्गे बेळगावकडे येणाऱ्या कचरावाहू वाहनातील कचरा बेळगाव-खानापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज मोठ्याप्रमाणात पडत आहे. त्यामुळे पडलेल्या कचरा दररोज स्वच्छ करण्याची वेळ महामार्गाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. गोवा राज्यातील प्लास्टिकचा कचरा बागलकोट येथील सिमेंट कंपनीकडे नेण्यात येत असताना हा प्रकार घडत असल्याची [...]
Gold Silver Rate –सोने-चांदीच्या दरात अस्थिरता; घसरणीनंतर वाढले भाव
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह सोनेचांदीच्या दरातही चढउतार होत आहेत. फेबुरवारी आणि मार्च महिन्यात सोनेचांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. सोनेचांदी त्यांच्या उच्च्यांकापेक्षा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे खेरदीदारांसाठी हा मोठा दिलासा आहे. तर सोनेचांदीतील या चढउतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. सोने आणि चांदीच्या दरांमधील घसरण थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेल्या जागतिक तणावाच्या […]
द लॅन्सेट ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकोलॉजी अँड विमेन्स हेल्थ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासानुसार, हिंदुस्थान अजूनही जगातील सर्वाधिक माता मृत्यू असलेल्या देशांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांत लक्षणीय घट झाली असली तरी 2015 नंतर या प्रगतीचा वेग मंदावल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अभ्यासानुसार, 2023 मध्ये जगभरात गर्भधारणा आणि प्रसूतीशी संबंधित कारणांमुळे सुमारे 2.4 लाख […]
रविवार पेठ येथील गटारीमधील कचरा काढण्यास टाळाटाळ
गटारी तुंबल्यामुळेच कांदा मार्केटमध्ये पावसाचे पाणी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून रविवार पेठ परिसरात पाण्याचा निचरा होण्याचे चुकीचे नियोजन करण्यात आल्याने त्याचा फटका आजूबाजूच्या नागरिकांना बसू लागला आहे. वेळच्यावेळी गटारींमधील कचरा काढण्यात न आल्याने चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसात कांदा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रविवार पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या पाठीमागील गटारीची स्वच्छता होत नसल्यानेच पाणी [...]
तेरवाड बंधाऱ्याजवळ नदीची भीषण अवस्था, कुरुंदवाड -तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्याची भीषण अवस्था झाली असून काळपट, फेसाळ व तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी बाहत आहे. आता हेच प्रदूषित पाणी थेट शेती पंप व चेंबरमध्ये येऊ लागल्याने शेतकरी वर्गात भीतीचे व संतापाचे बातावरण निर्माण झाले आहे. बंधाऱ्याच्या एका बाजूला [...]
केपीएस मॅग्नेट स्कूलविरोधात बेंगळूर येथे होणार आंदोलन
बेंगळूरच्या फ्रिडम पार्क येथे 10 एप्रिलपासून राज्यस्तरीय आंदोलन बेळगाव : केपीएस मॅग्नेट स्कूलच्या विरोधात मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अधिक बळ देऊन राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी बेंगळूरच्या फ्रिडम पार्क येथे 10 एप्रिलपासून राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे. या सभेच्या जागृतीसंदर्भात रविवारी बेळगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये एआयडीएसओ व सेव्ह पब्लिक एज्युकेशन कमिटीतर्फे [...]
शांतीनगर परिसराला कचऱ्याचा विळखा
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर : वेळेवर कचरा उचल करण्याची मागणी बेळगाव : शहरातील शांतीनगरमधील पापा मळा, शिवाजी कॉलनी परिसरात रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने या भागात अस्वच्छतेचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली [...]
गांधीनगर प्रुट मार्केट रस्त्याकडेला फळांचा कचरा
परिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन : आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता बेळगाव : गांधीनगर प्रुट मार्केमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आपले उत्पादन घेऊन येतात. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी-विक्री होत असते. काहीवेळा खराब झालेली फळेही मार्केटमध्ये येत असतात किंवा साठा केल्यामुळे काही फळे खराब होतात. ही खराब व नासधूस झालेली फळे व्यापारी व शेतकरी रस्त्याच्या बाजूला [...]
उत्पन्नवाढीसाठी झेडपीच्या मालमत्ता भाड्याने देणार; ठाणे जिल्हा परिषदेचा 116 कोटींचा अर्थसंकल्प सादर
ठाणे जिल्हा परिषदेचा ११६ कोटी ९९ लाखांचा मूळ अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. यंदा जिल्हा परिषदेस मोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले असल्यामुळे उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे असा निर्णय झाल्यास भविष्यात जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस, अनेक मैदाने तसेच शासकीय इमारतीतील तळमजल्यावरील जागा आदी स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग […]
…तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील!
रोहयो कामगारांना शासन अन् शेतकऱ्यांनी फिप्टी-फिप्टी मजुरी देऊन काम करून घेतल्यास सोयीस्कर वार्ताहर/उचगाव रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो महिला आज कामासाठी घराबाहेर पडतानाचे चित्र दिसत आहे. मात्र तेच शेतावर काम करण्यासाठी किती महिला घराबाहेर जात आहेत. हे सर्व पाहण्यासारखे आहे. शासनानेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून दीडशे व शासनाकडून दीडशे रुपये देऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या [...]
बेळवट्टीत डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे आगमन जल्लोषात
कर्नाटक दलित संघर्ष समिती शाखा बेळवट्टीतर्फे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वार्ताहर/किणये सनई, हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा जयघोषात, बेळवट्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा रविवारी मोठ्या जल्लोषात झाला. कर्नाटक दलित संघर्ष समिती शाखा बेळवट्टी यांच्यावतीने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. अनगोळ [...]
गुंजी परिसराची पाठ हत्ती सोडता सोडेनात!
हत्तींच्या पुन्हा आगमनामुळे शेतकऱ्यांत घबराट : सुगी हंगामातही महिनाभर होता धुमाकूळ वार्ताहर/गुंजी गेल्या चार दिवसापासून गुंजी परिसरात पुन्हा हत्तींचे आगमन झाले असून शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुगी हंगामातही जवळजवळ महिना दीड महिना हत्तीनी ठाण मांडून या परिसरातील भात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर आता पुन्हा हत्तींनी ठाण मांडले आहे. सध्या या भागात [...]
पुजाऱ्यांविरोधात ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा भोगावती – पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी दि. ३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा हा निश्चित निघणार आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. यामध्ये व्यापारी संघटना व पीडित भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिते (ता. करवीर) गावचे सरपंच [...]
कारची कंटेनरला धडक;आई-मुलगी जागीच ठार
उडुपी जिल्ह्यातील मावूंद येथील घटना कारवार : जिल्ह्यातील मुर्डेश्वर-गोकर्ण येथे देवदर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या कारने रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याने आई-मुलगी जागीच ठार तर अन्य चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री कारवार आणि उडुपी जिल्ह्यांच्या सीमेवरील मावूंद (ता. बेंदूर) राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडली. अपघातात ठार झालेल्या आई व मुलीचे नाव [...]
धरण उशाला, कोरड घशाला; शहापूरमध्ये 51 गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण
भातसा, तानसा आणि मोडकसागर ही तीन मोठी धरणे शहापूर तालुक्यात असतानाही स्थानिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच अवस्था तालुक्याची आहे. शहापूर तालुक्याच्या दुर्गम व टंचाईग्रस्त भागातून जानेवारीपासूनच टँकरची मागणी सुरू झाली असून आजमितीस ५१ गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्याला गेल्या पाच वर्षांत […]
नकली सोन्याची नाणी देऊन दहा लाखांचा गंडा घातलेल्या आरोपीला अटक
कारवार : खरे सोने भासवून नकली एक किलो सोन्याची नाणी देऊन दहा लाख रुपयांचा गंडा घातलेल्या आंतरजिल्हा भामट्याला ताब्यात घेण्यात सिद्धापूर पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या भामट्याचे नाव गजेंद्र हालेशप्पा कोरचर (वय 34, रा. मुद्देशनहळ्ळी, ता. शिकारीपूर, जिल्हा शिमोगा) असे आहे. आरोपीकडून दहा लाख रुपये रोख रक्कम, बजाज डिस्कव्हरी मोटारसायकल आणि एक किपॅड [...]
तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणाचे पट्टे संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले; उरणच्या खोपटा गावात अनोखे आंदोलन
राज्य सरकारने केएससी नवनगरच्या (कर्नाळा-साई-चिरनेर) नावाने तिसऱ्या मुंबईची घोषणा केल्यानंतर उरण, पनवेल व पेण तालुक्यातील १२४ महसुली गावांमध्ये भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणासाठी पट्टेही आखण्यात आले असून उरणच्या खोपटा गावात ग्रामस्थांनी हे पट्टे पेटवून अनोखे आंदोल न छेडले. दरम्यान सर्वेक्षणाकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांनाही गावकऱ्यांनी हुसकावून लावले असून तिसऱ्या मुंबईविरोधात आंदोलन […]
अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर पक्षाचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या फोटोंना कुठेही स्थान देण्यात आले नाही. हा कार्यक्रम तालुक्यातील इंदापूरमध्ये पार पडला. अजित दादा आणि सुनेत्रा पवार बॅनरवरून गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले […]
पोळ्या नाही पुऱ्या खा, अळूची भाजी ही ताटातून गायब! पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची सद्य स्थिती
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीने संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामामुळे इंधनाची मोठी टंचाई निर्माण झाली असून, याचा मोठा फटका पुण्याच्या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीला बसला आहे. शहरातील अनेक नामांकित हॉटेल्स आणि खानावळींमध्ये गॅसअभावी मोठे बदल करण्यात आले असून, काही ठिकाणी तर चक्क टाळे लावण्याची वेळ आली आहे. […]
…तर दुबई उद्ध्वस्त होऊ शकते, अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचा गंभीर इशारा
प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी संयुक्त अरब अमिरातीला सुरू असलेल्या युद्धापासून लांब राहण्याचा कडक इशारा दिला आहे. यूएई जर या संघर्षात सामील झाले, तर दुबई आणि अबू धाबी सारख्या शहरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. दुबई आणि अबू धाबी ही पर्यटनासाठी आणि श्रीमंतांसाठी बनवलेली […]

32 C