एन. रघुरामन यांचा कॉलम:स्मरणशक्तीच्या समस्या आपल्या युवा कार्यबलाला प्रभावित करत आहेत का?
20 वर्षांपासून एकाच कुटुंबासोबत काम करणाऱ्या 39 वर्षीय ड्रायव्हरला तीन कामे सोपवण्यात आली होती. मित्राच्या घरून पार्सल घेणे, किराणा सामानातील तीन वस्तू खरेदी करणे आणि परतताना लॉन्ड्रीतून कपडे घेऊन येणे. तो कपडे न घेताच परत आला. विचारल्यावर उत्तर दिले की, ‘विसरलो, माफ करा.’ एकदाच नाही, तर अनेक प्रसंगी त्याने अशा चुका केल्या व त्याचे उत्तरही तसेच असायचे. तो ते रस्तेही विसरू लागला होता, ज्यावरून तो वर्षातून किमान 5 वेळा तरी गेला होता. नवीन बांधकामांमुळे गोंधळ उडतो, असे त्याचे म्हणणे होते. दुसऱ्या प्रकरणात, दोन महिन्यांपासून एका मोहिमेवर काम करणारी, मध्यमवयीन तरुण अधिकारी, जागतिक प्रमुखासोबतच्या आढावा बैठकीत अचानक सुन्न झाली. त्यांच्यासोबतची तिची पहिलीच बैठक होती. तिला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची होती. पण एका कठीण प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी ती म्हणाली, ‘माफ करा, माझी स्मरणशक्ती काम करत नाहीये.’ वरील उदाहरणांमध्ये, अशा स्मरणशक्तीच्या समस्यांसाठी त्या दोघांचेही वय खूप कमी होते. दोघेही एकाच कंपनीत कार्यरत असल्याने व त्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा असल्याने डॉक्टरांनी तपासणी केली त्यांना असे आढळले की, वेगवेगळ्या स्तरावरील दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या आहे. एक अभ्यास सांगतो की, 2013-2023 दरम्यान 40 वर्षांखालील अमेरिकन प्रौढांमध्ये स्वतःहून नोंदवलेली बोधनात्मक अक्षमता जवळपास दुप्पट झाली. हे केवळ वृद्ध लोकांपर्यंत मर्यादित नाही. तणावामुळे मेंदूवरील धुकं (ब्रेन फॉग) व स्मरणशक्तीचा ऱ्हास वाढत आहे. कामाची मुदत पाळता न येणे, एकाग्रता कमी होणे, छोट्या चुका वाढणे यामुळे कामाच्या ठिकाणी परिणाम होत आहे. स्मरणशक्तीची कमतरता असलेले लोक कार्यबलात वाढत आहे. याची खालील कारणे आहेत: मानसिक थकवा आणि बोधनात्मक दबाव: जास्त तणावामुळे संप्रेरक वाढते, जे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि मानसिक थकवा जाणवतो. अतिकामामुळे मेंदूमध्ये संरचनात्मक बदल शक्य आहेत आणि किमान यामुळे मानसिक थकवा तरी येतोच. घटती उत्पादकता: स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे माहिती मेंदूत साठवणे कठीण होते. यामुळे कामगिरी कमकुवत होते. कर्मचारी सूचना लक्षात ठेऊ शकत नाहीत, बैठका विसरतात आणि कामाचा मागोवा घेऊ शकत नाहीत. युवकांवरही परिणाम: स्मरणशक्तीच्या समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही, तर 18-39 वयोगटातील प्रौढांमध्येही वाढत आहेत. विशेषतः कमी उत्पन्न आणि कमी शिक्षण असलेल्या लोकांमध्ये. विशिष्ट कारणे: या समस्यांच्या कारणांमध्ये झोपेची कमतरता, अस्वस्थता, नैराश्य, जीवनसत्व बी-12 ची कमतरता आणि काही प्रकरणांमध्ये कोविडचा समावेश आहे. मग आपण काय करावे? जीवनशैलीत बदलाचे काही सुचवलेले उपाय येथे दिले आहेत: 1. झोपेला प्राधान्य द्या: रोज रात्री 7-10 तासांच्या झोपेचे लक्ष्य ठेवा, त्याने स्मरणशक्ती मजबूत होईल व माहिती टिकून राहील. ‘रवंथ’ करा, जशी गाय खाल्लेले अन्न पुन्हा चघळते, तसेच झोपण्यापूर्वी दिवसातील महत्त्वाच्या घटना डोळे मिटून दहा मिनिटे आठवा. यामुळे सुप्त मनामध्ये माहिती दीर्घकाळ टिकून राहील. सजग राहा, ध्यान करा, दीर्घ श्वासाचे व्यायाम करा आणि पोषक आहार घ्या. हे स्मृतीभ्रंशाचा परिणाम कमी करण्यास उपयुक्त ठरते.2. एकाच वेळी अनेक कामे करू नका, नियमित विश्रांती घ्या व प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा: एकाच वेळी अनेक कामे केल्याने मानसिक घर्षण वाढते. कामाचा दर्जा कमी होतो. हातातील काम पूर्ण करा. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याऐवजी कामे लिहून ठेवून मागोवा घ्या. दीर्घकाळ एकाग्र राहिल्याने मानसिक थकवा येतो, म्हणून विश्रांती घ्या. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करण्यासाठी प्रत्यक्ष व डिजिटल कामाची जागा व्यवस्थित ठेवा. स्मरणशक्तीवर परिणाम करू शकणाऱ्या रक्तदाब, मधुमेह, थायरॉइडसारख्या आजारांबाबत दरवर्षी आरोग्य व्यवस्थापन ठेवा.फंडा हा आहे की, मालकांना अधिक आश्वासक आणि मेंदूसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागेल, जेणेकरून अनुभवी आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांमधील बोधनात्मक घसरणीचा धोका कमी करता येईल. प्रत्येक कर्मचाऱ्याला अस्थिर करण्याऐवजी असे अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, जिथे कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करू शकेल.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:दु:खाची समज असणे म्हणजेच दु:ख नाहीसे होणे होय
जगात अनेक गोष्टी कमावण्याचा आपला उद्देश असतो. पैसा, पद,प्रतिष्ठा, कुटुंब... हे सर्व कमाईचे भाग आहेत. परंतु इतर दोन गोष्टीसुद्धाआपली कमाई बनतात- सुख आणि दु:ख. सुख कमावणेसमजण्यासारखे आहे, पण लोक दु:खही कमावतात. नको असूनहीकमावतात. जेव्हा दु:ख जीवनात येते, तेव्हा ते संपवण्यासाठी लोकवेडेपिसे होतात. दु:ख वाटता येते, दु:खाला वळवता येते, पण दु:खकायमचे मिटत नाही. एक तर ते नक्की येईल, आले की सहजासहजीमिटणार नाही. दु:खाची समज असणे म्हणजेच दु:ख नाहीसे होणे होय.दु:खाला समजून घ्या. अशी दोन पात्रे आहेत, ज्यांनी सुख-दु:खालास्वेच्छेने आपल्या जीवनात स्वीकारले. कैकयीने सुख मिळवण्यासाठीइतका मोठा कट रचला की, तेच तिच्यासाठी दु:ख बनले. याच्याकेंद्रस्थानी होती- मंथरा. दुसरीकडे कुंती आहे. कुंतीने भगवान कृष्णाकडेदु:खच मागितले होते, परंतु कृष्णाने तिला योग्य पुत्रांचे इतके मोठे सुखदिले. म्हणूनच, आपण जेव्हा कधी सुख-दु:खाच्या शोधात बाहेर पडू,तेव्हा हे नक्की लक्षात ठेवावे की आपल्या जीवनात मंथरेची भूमिकाआहे की कृष्णाची.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:आपल्यासाठी आपले हितच सर्वात महत्त्वाचे
‘सार्वभौमत्व’ हा या वर्षातील सर्वाधिक वापरला जाणाराशब्द ठरू शकतो. ट्रम्प यांनी याला चलनात आणले आहे.जागतिकीकरणावर गेल्या तीन दशकांपासून जे एकमत झालेहोते, ते त्यांनी मोडून काढले आहे. त्या सहमतीने मित्र-देशआणि सहकाऱ्यांसोबतच्या आघाडीत आपले सार्वभौमत्वसामायिक करण्याचे फायदे दाखवले होते. परंतु, ट्रम्प यांनीकॅनडापासून भारतापर्यंत प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचेमहत्त्व पुन्हा समजून घेण्यास भाग पाडले . याला तुम्ही आपल्या वसाहतवादी इतिहासाशी जोडूनपाहू शकता किंवा पाश्चात्त्य देशांच्या (अमेरिका)दबावाशीही जोडू शकता, कारण पाकिस्तान त्यांचासहकारी बनला होता. 1974 आणि 1998 मध्येपोखरणमधील अणुचाचण्यांनंतर आपल्यावर आर्थिकनिर्बंध लादले गेले आणि आपल्याला तंत्रज्ञानापासून वंचितठेवले गेले. आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर‘रोखा, मागे घ्या आणि संपवा’ या काळातील जो दबावपडला, तो अमेरिकेच्या बाजूनेच होता. सार्वभौमत्वाबाबतभारतात जो व्यापक विचार होता, त्याकडे अमेरिका-विरोधम्हणून पाहिले जाऊ लागले. या अनुभवाने अशाराष्ट्रवादाला जन्म दिला, जो मजबूतही होता आणिअमेरिकेबद्दल संशयाने भरलेलाही. ‘विदेशी हात’ यालानेहमीच अमेरिकेचा हात मानले गेले. त्याचे विरोधक,म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि त्यांचे सोबती, भारताचेनैसर्गिक मित्र मानले गेले. परंतु हे तोपर्यंतच राहिले, जोपर्यंत1990-91 मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आले नाही.तेव्हापासून भारत या नवीन, एकध्रुवीय जगात स्वतःसाठीजागा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम असाझाला की भारत हळूहळू पश्चिमेकडे झुकत गेला. भारताचाप्रत्येक नेता या विवंचनेचा सामना करत आला आहे की,शीतयुद्धानंतरच्या जगात कोणत्याही एका गटात न जातासंबंध कसे प्रस्थापित करावेत. भारताचा तणावपूर्ण शेजार त्याच्या धोरणात्मक पर्यायांना मर्यादित करतो. ही भारताची दुहेरी कोंडी आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध नेहमीच तणावाचे असतात आणि चीनकडून नेहमीच धोका असतो. अमेरिकेची इच्छा आहेकी भारताने एकाच वेळी अनेक आव्हाने पेलावीत. तथापि भारतासाठी चीन-पाकिस्तान युती हे अधिक मोठे आव्हान आहे. याला दुहेरी कोंडी यासाठी म्हटले जाते, कारण भारताला आपले सैन्य नेहमीच सज्ज ठेवावे लागते. बरेचसे लष्करी साहित्य रशियन बनावटीचे आहे आणि या अवलंबित्वेतून लगेच सुटका होऊ शकत नाही. याशिवाय भारताच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये, जसे की अणु पाणबुडी (एसएसएन), रशियाची मोठी भूमिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन आघाड्यांवरचा संघर्ष टाळण्यासाठीभारताला चीनसोबतही संबंध टिकवून ठेवावे लागतात, मग यासाठी व्यापारात काही तडजोडी का कराव्या लागेनात. संबंध टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की भारत युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध फार कठोर भूमिका घेऊ शकत नाही किंवा ट्रम्प यांच्या त्या दाव्याची उघडपणे पुष्टीकरू शकत नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणेबंद केले आहे. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण युक्रेन युद्धापूर्वी जेव्हा युरोप व अमेरिकेला वाटत होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, जेणेकरून जागतिक किंमत संतुलित राहील, तेव्हा भारत त्यातून खूप कमी तेल खरेदीकरत असे. त्या काळी रशियाचे तेल भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आवश्यक आहे, असेही म्हटले जात नसे. पणआता परिस्थिती उलट आहे. आज जनमताचा दबाव आहेकी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली जावी आणिसांगितले जावे की आम्ही एक सार्वभौम देश आहोत. भारताच्या मागील सरकारांनी अमेरिकन दबावाकडेदुर्लक्ष केले होते आणि इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणिहेन्री किसिंजर यांचा खंबीरपणे सामना केला होता, याचीआठवण काढली जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. दुसरे सत्य हेआहे की इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या, म्हणजेच सोव्हिएतयुनियनच्या जवळ गेल्या होत्या. आपले सरकारवाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हवा होता,म्हणून 1969 नंतर भारताचा कल सोव्हिएत युनियनकडेवाढला. 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत सोव्हिएत युनियनचासहकारी बनला. हा करार खूप मजबूत नव्हता, परंतु यातपरस्पर सुरक्षेची बाब समाविष्ट होती. याचा फायदा तेव्हाझाला जेव्हा अमेरिकेचा ‘सातवा ताफा’ भारतावर दबावटाकण्यासाठी आला होता. सोव्हिएत युनियनने संयुक्तराष्ट्रात ‘व्हेटो’ केला आणि भारताला लष्करी साहित्यलवकर उपलब्ध करून दिले, ज्यात पोलंडमधून आलेलेटी-55 टँकही समाविष्ट होते. त्याच वेळी, अमेरिकेचा नवीनसहकारी चीन पाकिस्तानला शस्त्रे पुरवत होता. 1971च्या विजयाने इंदिरा गांधी आणि भारत दोघांची प्रतिष्ठावाढवली आणि निक्सन सरकारला लाजवले, पण याचाअर्थ असा होता का की भारत पूर्णपणे सार्वभौम झालाहोता? नाही. भारताला अनेक प्रकरणांमध्ये सोव्हिएतयुनियनचे समर्थन करावे लागले, जसे की कंबोडिया आणिअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर. अफगाणिस्तानमुळेभारतासमोर नवीन धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या.यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत झाले, जिहादीसंस्कृती वाढली आणि पाकिस्तान अणुशक्ती बनला. 1969 ते 1989 दरम्यान भारताने आपल्या सार्वभौमत्वाशीतडजोड केली का? उत्तर आहे- नाही. सार्वभौमत्व हा काहीकायमस्वरूपी शिक्का नसतो. अमेरिका असो वा चीन,प्रत्येक देशासाठी सार्वभौमत्वाचा अर्थ आपले निर्णयघेण्याचे स्वातंत्र्य आहे. शीतयुद्धात भारताने सोव्हिएतयुनियनशी संबंध जपले. नंतर अमेरिकेसोबत संबंधसुधारले, रशियासोबतचे संबंध कायम ठेवले, चीनसोबतस्थिरतेचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानचा सामनाकरण्याची शक्ती वाढवली गेली. पाहिले तर कोणताही देशपूर्णपणे सार्वभौम नसतो. सर्वजण आपले निर्णय आणिकरार करतात. आज जग एकमेकांवर अवलंबून आहे, जिथेसार्वभौमत्वाकडे लवचिक पद्धतीने पाहावे लागते. सर्व देशनवीन आघाड्या बनवत आहेत आणि आपल्या हितानुसारनिर्णय घेत आहेत. एकदा मी माकप नेते हरकिशनसिंहसुरजित यांना विचारले की, तुम्ही त्या सरकारांना पाठिंबाका देता जे अमेरिकेशी संबंध सुधारतात? त्यांनी उत्तर दिले:भारताला तंत्रज्ञान हवे आहे. पूर्वी हे सोव्हिएत युनियनकडूनमिळायचे, आता मिळत नाही. म्हणून आता अमेरिकेचीगरज आहे. आपण आपल्या राष्ट्रीय हितानुसार काम केलेपाहिजे. सार्वभौमत्वावर हा एक महत्त्वाचा धडा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) विचारधारा आणि नैतिकतेचेमहत्त्व आता कमी झाले आहे.कोणताही देश पूर्णपणे सार्वभौम नसतो.सर्वजण आपले निर्णय आणि करारकरतात. आज जग एकमेकांवर अवलंबूनआहे. जगातील सर्वच देश आता नवीनआघाड्या बनवत आहेत आणि आपल्याहितानुसार निर्णय घेत आहेत. विचारधाराआणि नैतिकतेला आता पूर्वीसारखे महत्त्वउरलेले नाही.
नीरज कौशल यांचा कॉलम:कचरा व्यवस्थापनाचे धडे मुलांना शाळेपासूनच द्यावे लागतील
दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काहीसामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आताकचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चाललेआहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचेगंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तरजवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकरपरिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोहीगाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायूउत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातीलभूजल प्रदूषित झाले आहे. कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांचीखरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळेभारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेतकमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हेस्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचराविषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मितीहे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचेप्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मीअलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरासंकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचेपुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील वअविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणेशिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्यामाध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर तेघेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्कआला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथेउपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्येटाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीचव्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचेनिकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्याविल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही. टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लासफेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वीझाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एकागटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवलेगेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशावस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईलआणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवीसोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकषवेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडीशोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथेआपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळआणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपणत्या रिकाम्या करायला विसरतो. बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरीनिराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले कीबिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचराटाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्यानेशालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टनकचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिकस्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छराष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगरसपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनचमुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतआपला दृष्टिकोन बदलल्या शिवायआपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडेशिकवावे लागतील
प्रियदर्शन यांचा कॉलम:इंटरनेटने आपली स्मृती हिरावली होती, एआयने कल्पनाशक्ती हिरावू नये
एआयबाबतचा आपला उत्साह किती वैज्ञानिक आहेआणि किती उपभोक्तावादी? एआयमुळे निर्माण होणाऱ्यावास्तविक शक्यता किंवा आव्हानांबाबत आपण जागरूकआहोत का? की आपण त्याला फक्त वापरात येणारी अशीगोष्ट समजत आहोत, ज्यामुळे आपली बरीचशी कामेसोपी होतील? किंवा असा धोका ज्यामुळे अनेक नोकऱ्याजातील? किंवा ज्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील? दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय समिट’दरम्यान जी चर्चा झाली, त्यातून साधारणपणे याच सर्वगोष्टी समोर येत राहिल्या. एआय आपल्यासाठी शेती सोपीकरेल, व्यापार सोपा करेल, उपचार सोपे करेल, काहीनोकऱ्या संपवेल तर नवीन नोकऱ्या निर्माण करेल. याचर्चेत या उपभोक्तावादी समजुतीसोबतच ही घोषणाहीजोडलेली होती की, भारत येणाऱ्या वर्षांत एआय क्रांतीच्यामागे चालणार नाही, तर तिला आकार देईल. यात शंका नाही की, एआय हे एका अशा क्रांतीचेआगमन आहे, ज्याच्या वास्तविक परिणामांपासून आपणअद्याप अनभिज्ञ आहोत. जाणकार याला औद्योगिकक्रांतीपेक्षा मोठी क्रांती मानताहेत, ज्यानंतर जग बदलून गेलेहोते. युवल नोआ हरारी यांनी आपल्या “नेक्सस” यापुस्तकात याच्या धोक्यांपासून सावध केले आहे. त्यांच्यामते, एआय माहितीचा अणुबॉम्ब ठरेल. त्याहून मोठी चिंताही आहे की, मानवी संस्कृतीसमोर पहिल्यांदाच असे यंत्रआहे, जे स्वतः निर्णय घेऊ शकते. लष्करी उपक्रम किंवाअणु मोहिमांमध्ये याचा वापर धोकादायक ठरू शकतो.एआयमुळे माहिती ग्रहण करण्याची आपली क्षमता,संवेदना वाहून नेण्याचा आपला सराव यात बरेच काहीबदलू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठीकविता-कादंबरीही लिहून देईल आणि टीव्ही मालिकाहीबनवून देईल. या दृष्टीने या नवीन प्रयोगासमोर आपल्यालाकाही प्रमाणात सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.पण आपण वातावरण असे काही बनवून ठेवले आहे की,आपण ही एआय क्रांती प्रत्येक ठिकाणी अमलात आणू -मग ते शिक्षण, आरोग्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र.शाळा-कॉलेजांमध्ये शिकवण्यासाठी नवनवीन एआयमॉडेल्स सादर केली जात आहेत, पण एआय जर मुलांनाशिकवेल, तर त्यांचा नैसर्गिक विकास होऊ शकेल का? स्लेट किंवा वहीवर रेषा ओढणे, आकार बनवणे, अक्षरेशिकणे, वाक्ये तयार करणे इत्यादी जी प्रक्रिया असते,ज्यामध्ये बोटांत धरलेली पेन्सिल किंवा लेखणी सहायकअसते आणि ज्यामध्ये अनेकदा स्वतःचेलिहिलेले-रचलेले पुसण्याची किंवा काटण्याची गरजहीभासते, ते वास्तविक शिक्षण आहे. हे केवळ शब्दज्ञाननाही किंवा इतिहास-भूगोल, गणित-विज्ञानाचा असा धडानाही जो एआयने शिकवावा आणि तो घेऊन मुलांनीजीवनाच्या मैदानात उतरावे. वही-पेन्सिल-रबरनेघासून-घासून संयमाने सर्व काही शिकणारी मुलेचिकाटीने शिकतात, ती जीवनातील चढ-उतार आणिनवनिर्मिती सहजपणे हाताळू शकतात, पण एआयच्याकोरीव ज्ञानातून बाहेर पडलेली मुले तितकीच यांत्रिक असूशकतात, जितके कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल. नक्कीच, तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही - हेइतिहासाने सांगितले आहे. मात्र, माझ्यासारख्या लोकांचीकाळजी ही आहे की इंटरनेटने आपली स्मृती हिरावूनघेतली, आता एआय आपली कल्पनाशक्ती हिरावून ननेवो. आता आपण काहीही लक्षात ठेवत नाही, सर्व काहीनेटवर शोधतो - आप्तस्वकीयांची नावे-पत्ते-नंबर आणित्यांच्या घरापर्यंत नेणारे रस्ते सुद्धा. तंत्रज्ञानाचे पुढचेआक्रमण आपल्या कल्पनाशक्तीवर होणार आहे, कारणआपण सर्व चित्रे, सर्व नकाशे, सर्व कलात्मक वस्तूएआयकडून बनवून घेण्याची कल्पना करत आहोत.एआयचे आगमन हे एक वास्तव आहे. या जगात वैज्ञानिकपद्धतीने उतरलो, तरच खऱ्या अर्थाने एआय क्रांतीलाआकार देण्यात काही योगदान देऊ शकू, पण जर व्यापारीकिंवा सजावटीच्या-दिखाऊ पद्धतीने विचार केला, तरमात्र हसे करून घेऊ. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
जोसेफ स्टिगलिटज यांचा कॉलम:असमानतेची महामारी आपलीदेशांतर्गत आव्हाने वाढवतेय
रोगांशी लढण्याचे विज्ञान मानवजातीच्या इतिहासातकधीही इतके सशक्त नव्हते, जितके ते आज आहे.आपल्याकडे महामाऱ्यांचा तत्काळ शोध घेण्याची, काहीदिवसांतच रोगजंतूंची सिक्वेन्सिंग करण्याची आणि काहीमहिन्यांत नवीन लस विकसित करण्याची साधने आहेत.तरीही आपण कोविड-19 च्या शोकांतिकेचा सामनाकेला. या महामारीमुळे अंदाजे 1.82 कोटी लोकांचा मृत्यूझाला, तर कोट्यवधी लोकांना याचा आर्थिक फटकाबसला. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीचमहामारीचा इशारा दिला होता आणि बराक ओबामा यांनीराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत महामारी-सज्जता कार्यालयदेखील स्थापन केले होते. परंतु विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेबंद केले होते. पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य अधिकारी इशारा देत आहेत की, पुढच्या महामारीबाबतचा एकमेव प्रश्न हाआहे की ती ‘कधी’ पसरेल, ‘पसरेल की नाही’ हा नाही.पण जग याकडे डोळेझाक करत आहे. ‘ग्लोबल कौन्सिल ऑन इनइक्वालिटी, एड्स अँड पँडेमिक’ने नुकताच या धोक्यावर एक अहवाल आला आहे, जो जोहान्सबर्गमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या जी-20 बैठकीच्या वेळी जाहीर झा ला.कोविड-19, एड्स, इबोला आणि एमपॉक्सच्या पुराव्यांचावापर करून हा अहवाल सांगतो की, असमानता आणित्याशी संबंधित समस्या महामाऱ्यांची भीती अधिकवाढवतात आणि त्यांचे परिणाम अधिक गडद करतात.महामाऱ्यासुद्धा विषमतेमध्ये भर टाकतात. विशेषतः कमीउत्पन्न गटांवर विनाशकारी प्रभाव पाडतात. कोविडच्याबाबतीत, कमी वेतनात काम करणाऱ्या आघाडीच्याफळीतील कर्मचाऱ्यांनी अधिक हाल सोसले. त्यांच्यातआजारी पडण्याचे आणि रुग्णालयात भरती होण्याचेप्रमाण जास्त होते, जेव्हा ते आजारी पडले, तेव्हात्यांच्याकडे आपली बचत खर्च करण्याशिवाय दुसरा पर्यायनव्हता. महामाऱ्यांचा प्रश्न केवळ वैद्यकीय प्रतिक्रियांपुरतामर्यादित नसतो. आपल्याला त्यांच्या सामाजिक-आर्थिकघटकांवरही लक्ष द्यावे लागेल. दाटीवाटीची परिस्थिती,फ्रंटलाइन व्यवसाय आणि गरिबी महामारीच्या प्रसारातभर टाकतात. कुपोषण आणि मूलभूत आरोग्य स्थितीसुद्धाकारणीभूत ठरते. याच कारणामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवाप्रणाली असलेल्या देशांनी कोविड-19 संकटात त्यादेशांपेक्षा चांगली कामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा यंत्रणेच्या अभावामुळे आर्थिक विषमता हीआरोग्याच्या विषमतेत बदलते. कोविड-19 ने आपल्याला हेदेखील सांगितले होते की,जेव्हा जगातील कोणत्याही भागाला लस, उपचार आणिसंरक्षणात्मक उपकरणांची उपलब्धता मिळत नाही, तेव्हाआजार पसरतो आणि त्याचे स्वरूप बदलत (म्युटेट)राहते, ज्यामुळे सर्वांसाठी नवीन धोके निर्माण होतात.विकसित अर्थव्यवस्थांनी अवलंबलेले ‘मी-फर्स्ट’ हे तत्त्वकेवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नव्हते, तर ते व्यक्तिश:त्यांच्यासाठीही नुकसानकारक ठरले होते. महामारीच्याशिखरावर असताना आफ्रिकेत तयार झालेल्यालसीदेखील युरोप आणि अमेरिकेला पाठवण्यात आल्याहोत्या, तर स्वतः आफ्रिकन जनता त्यापासून वंचितराहिली होती. कोविड दरम्यान, श्रीमंत देशांनी संकटाचासामना करण्यासाठी त्यांच्या अवाढव्य जीडीपीच्या 8%खर्च केला होता, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांनीकेवळ 2%. आणि आता, विकसनशील देश 31 ट्रिलियनडॉलरच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, जेगेल्या दोन दशकांहून अधिक काळातील सर्वोच्च स्तरआहे. अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांकडेएड्ससारख्या वर्तमान महामाऱ्यांचा सामनाकरण्यासाठीदेखील संसाधने नाहीत, पुढच्या महामारीचीतयारी तर लांबची गोष्ट आहे. हे स्पष्ट करते की कशाप्रकारे महामाऱ्या देशांमधील असमानतादेखील वाढवूशकतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीअसलेल्या देशांनी कोविड-19 च्यासंकटात त्या देशांच्या तुलनेत चांगलीकामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा प्रणालींच्या अभावामुळेआर्थिक विषमता, आरोग्यविषयकविषमतेत रूपांतरित होते.
रुचिर शर्मा यांचा कॉलम:सोन्याचे दर वेगाने वाढले, याझळाळीमागचे रहस्य काय ?
वर्षानुवर्षे उसळी मारणाऱ्या सोन्याच्या किमती आताविशिष्ट क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. जणू ‘स्टोरीटेलिंग’ त्याची दिशा ठरवत आहे. सोन्याच्या किमती त्या मूलभूत शक्तींपासून मुक्त झाल्या आहेत. ते घटक पूर्वी चढ उतारांना दीर्घकाळ नियंत्रित करत होते.आता जागतिक जोखीम आणि अनिश्चिततेच्या‘कथां’वर त्या वाढत आहेत. विश्लेषकांना हा काळ1970 च्या दशकातील //सोन्याच्या गर्दी’ सारखाच वाटू लागला आहे. सोन्याकडे दीर्घकाळापासून सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. कारण त्याच्या किमती शतकानुशतके चलन वाढीशी सुसंगत राहिल्या आहेत. त्यात अधूनमधून चढ उतार देखील अनुभवले आहेत. वास्तविक व्याजदरात घट होत असताना तेजी सामान्यतः आली. बचत खात्यांमध्ये किंवा बाँडमध्ये ठेवलेल्या पैशांवरील परतावा कमी झाला तेव्हा लोकांनी त्यांची गुंतवणूक सोन्याकडे वळवली. 2023 मध्ये हा पॅटर्न बदलू लागला. व्याजदर पूर्वीपेक्षाजास्त होते आणि वाढत होते तरीही सोन्याच्या किमतीवाढू लागल्या. हे प्रामुख्याने मध्यवर्ती बँकांनी केलेल्यावाढत्या खरेदीमुळे झाले. त्यांना डॉलरमधून त्यांच्याहोल्डिंग्जचे अवमूल्यन करायचे होते. रशियाविरुद्धच्यानिर्बंधांमध्ये अमेरिकेने शस्त्र म्हणून वापरलेला हाचडॉलर आहे. तेव्हापासून सोन्याचे भाव गगनाला भिडलेआहेत. परंतु मी एकेकाळी परदेशी मध्यवर्ती बँकांच्यानेतृत्वाखालील डॉलरविरोधी क्रांती असे म्हटले होते तेआता हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसे नाही. गेल्या वर्षभरातमध्यवर्ती बँकांची खरेदी मंदावली आहे. उच्चकिमतींमुळे ग्राहकांच्या संकोचामुळे दागिन्यांच्यामागणीत घट झाली आहे. याउलट, भारतापासून चीनआणि अमेरिकेपासून युकेपर्यंत सर्व प्रमुखबाजारपेठांमध्ये गुंतवणूकदारांची मागणी वाढली आहे.गेल्या वर्षी, एकूण जागतिक सोन्याच्या खरेदीमध्येगुंतवणूकदारांचा वाटा दुप्पट होऊन 35% झाला आहे.बिस्किटे आणि नाण्यांपासून ते एक्सचेंज-ट्रेडेडफंडांपर्यंत - सर्व गुंतवणूक करण्यायोग्य सोन्याच्याप्रकारांमध्ये गुंतवणुकीत वाढ झाली आहे. विशेषतःभारतीयांना सोन्याबद्दल विशेष आकर्षण आहे.अंदाजानुसार भारतीय कुटुंबांकडे जगातील सर्वात मोठासोन्याचा साठा आहे : 28 हजार टन. तो जागतिक एकूणसोन्याच्या 14% आहे. गेल्या वर्षी भारतीयांनी सोन्याच्यादागिन्यांवर कमी आणि सोन्याशी संबंधित गुंतवणूकउत्पादनांवर जास्त खर्च केला. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचेम्हणणे आहे की भारतात सोन्याच्या ईटीएफमध्येझालेल्या असामान्य वाढीमुळे नवीन उत्पादनांच्याऑफरिंगची मालिका सुरू होत आहे. त्यामुळे या वर्षी हीगती टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. सोन्याच्याकिमती स्पष्ट करण्यासाठी वापरले जाणारे मॉडेल्स -त्यात वास्तविक बाँड उत्पन्न आणि चलनवाढीच्याअपेक्षांचा समावेश होता - आता कुचकामी ठरलेआहेत. सोन्याच्या जाणकारांनुसार सध्याचे चित्र- 2हजार आणि विशेषतः 1970 च्या दशकासारखे लांब,शक्तिशाली तेजीचा काळ. आजची महागाई जिमीकार्टरच्या काळातील दुहेरी-अंकी पातळीच्या जवळहीनाही. आणि असा युक्तिवाद करणे कठीण आहे कीट्रम्प, कर आणि युक्रेन सारख्या अनिश्चितता आजतेल निर्बंध, व्हिएतनाम युद्ध आणि इराण बंधकसंकटाइतकेच विघटनकारी आहेत. आणखी एकयुक्तिवाद असा आहे की डॉलरच्या अवमूल्यनाविरुद्धबचाव म्हणून सोने भरभराटीला येत आहे. पण तसेअसेल तर बिटकॉइन सारख्या इतर डॉलर-मूल्यांकितमालमत्ता का कमी होत आहेत तर अमेरिकन स्टॉकआणि बाँड्स सारख्या इतर डॉलर-मूल्यांकित मालमत्ताका टिकून आहेत? म्हणूनच सोन्याचे समर्थक म्हणतातकी पिवळ्या धातूला वाढण्यासाठी वाव आहे. कदाचितते बरोबर असतील. गेल्या दहा वर्षांत ते तिप्पटपेक्षा जास्तवाढले आहे. परंतु हे 1970 च्या दशकातील बारा पटवाढीच्या तुलनेत फारसे नाही. मी अनेक वर्षांपासून सोन्याबद्दल सकारात्मक आहे.परंतु आता मी अधिक तटस्थ आहे. अनियमितकथानकांनी प्रेरित बाजारपेठेत कोणते कथन खरे आहेआणि टिकेल हे जाणून घेणे कठीण आहे. तुम्हालाअधिक सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला फक्तविश्वास ठेवावा लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) सोन्याच्या समर्थकांनुसार पिवळ्याधातूमध्ये अजूनही तेजी येण्यासाठीभरपूर वाव आहे. गेल्या दहा वर्षांत तेतिप्पट वाढले आहे. परंतु 1970 च्यादशकातील बारापट वाढीच्या तुलनेत हेफारसे नाही.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या कामावर प्रेम केल्यास कामाचे ओझे वाटणार नाही
आजकाल हस्तांतरणीय कौशल्यांचे युग आहे. सोप्या भाषेत सांगायचेतर एका कामात दुसऱ्या कामातील कौशल्ये लागू करणे. उदाहरणार्थ-परस्पर संवाद, वेळ व्यवस्थापन आणि डेटा विश्लेषण. ही कौशल्ये एकाच कामात एकत्रित केली पाहिजेत. हे व्यवस्थापन तंत्र आहे. आत आपण अध्यात्माकडे वळलो तर ऋषींनी शास्त्रांमध्ये आणखी एककौशल्य वर्णन केले आहे ते म्हणजे प्रेम. ते सर्वत्र उपयुक्त ठरेल. काकभूशुंडीने गरुडाला कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा तुलसीदासांनी लिहिले, प्रथमहिं अति अनुराग भवानी, रामचरित सरकहेशी बखानी.’ भवानीने प्रथम मोठ्या प्रेमाने रामचरितमानस सरोवराचेरूपक समजावून सांगितले आणि नंतर कथा पुढे चालू ठेवली. शिवपार्वतीला हेच सांगत आहेत. कथेत बोलताना त्यांनी प्रेम व्यक्त केले.वाणीत प्रेम असेल तर वाणीतील गोडवा, जवळीक व प्रतिष्ठाआपोआप येते. तुम्ही कोणतेही काम कराल तर ते प्रेमाने करा. सर्वातमहत्त्वाचे म्हणजेतुम्हाला तुमचे काम आवडले तर तुमचे कर्म तुम्हालाओझे वाटणार नाही.
एन. रघुरामन यांचा कॉलम:मूल्य कधीही कमी होत नाही असे चलन म्हणजे प्रामाणिकपणा
जून 2019 मध्ये तो कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून रुजू झाला. कॉलेजमधून बाहेर पडताच तो थेट येथे जॉइन झाला. अनेक मुले असलेल्या कुटुंबांना माहीत असलेली ही कंपनी आहे. विक्रीचे काम सोपे होते. बॅकएंड टीम त्याला कुठे भेट द्यायची हे सांगत असे. कंपनीचे ॲप असलेले लोक किंवा कधीतरी ॲप वापरणाऱ्यांना कोर्स विकण्याचे त्याला काम होते. हे संभाषण आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल असल्याने पालक लक्षपूर्वक ऐकत असत. ते त्याला पाणी, ज्यूस आणि स्नॅक्स देखील देत असत. तो त्यांच्या घरी बसायचा. खात असे, पीत असे आणि मुलाला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी संपूर्ण कोर्स मटेरियलने भरलेला टॅब्लेट विकायचा. टॅब्लेट देण्यापूर्वी तो थोडे पैसे घेत असे आणि पालकांना एक करार करायला लावत असे. त्यात कर्ज देणाऱ्या कंपनीला मासिक हप्ते देण्यास पालक सहमत होत. दररोज सकाळी तो ‘टार्गेट्स’ आणि ‘रूपांतरण दर’ या भाषेत स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. ते खूप छान वाटले. कारण लोक त्याला सेल्समन म्हणून नव्हे तर “रक्षक’ म्हणून पाहत होते -आपल्या मुलांना गरिबीपासून वाचवण्याची गुरुकिल्ली हाती असलेला हा माणूस म्हणून पालक त्याच्याकडे पाहायचे. हे पालक कारखान्यांमध्ये आणि छोट्या दुकानांमध्ये ओव्हरटाइम काम करत होते. एके दिवशी तो एका वडिलांच्या डोळ्यात पाहत होता. तो 8,000 रुपयांचे “डाउन पेमेंट’ करण्यासाठी त्याला किती जेवण वगळावे लागेल याचा हिशेब करत होता. त्याला असे वाटले की तो एका असाहाय्य वडिलांकडे पाहत आहे. त्याला वेदना होत होत्या, परंतु तरीही त्याने त्याला त्या रकमेच्या दहापट कर्ज करार दिला. पहिल्यांदाच त्याला जाणवले की तो काहीही विकत नाही तर हळूहळू लूट करत आहे. त्याला वाटले की तो खोट्या आश्वासनांवर आधारित करिअर घडवत आहे. त्याच्या वरिष्ठांनी “क्रशिंग द नंबर्स’चा आनंद साजरा केला, परंतु प्रत्येक विक्री त्याच्या विवेकावर एक जखम करत होती. कुणाच्या तरी अपेक्षांना वस्तू बनवण्याच्या खेळात आपण ओढले जाऊ नये, असे त्याला वाटत होते. इतर तरुणांप्रमाणे तो लग्न आणि मुलांचे स्वप्न पाहत होता, पण त्याच्या स्वप्नात तो त्याचे मूल कंपनीसाठी फक्त एक लीड व वडील म्हणून तो स्वतः ला एक “पाकीट’ बनत असल्याचे पाहत होता. त्या दिवशी त्याला कळले की, त्याने काही हजार रुपये आणि बिझनेस कार्ड टायटलसाठी त्याच्या प्रामाणिकपणाची देवाणघेवाण केली आहे. सहा आठवड्यांनंतर जुलैच्या मध्यात त्याला जाणवले की, “उदरनिर्वाह करणे’ आणि “जीवन लुटणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या वडिलांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने ताबडतोब राजीनामा दिला. तो काम करू शकत नव्हता म्हणून नाही तर तो व्यक्ती बनत होता. त्याच्यासोबत राहू शकत नव्हता म्हणून. तो आजही सेल्समध्ये आहे आणि लोकांना प्रत्यक्षात गरजेच्या गोष्टी विकतो. म्हणून तो बरेच चांगले काम करतो. त्याने त्याच्या रिझ्युममधून तो अनुभवही काढून टाकला. त्या सहा आठवड्यांच्या कारकीर्दीबद्दल कोणालाही माहिती नाही. तो लोकांना सांगतो, “पदवीधर झाल्यानंतर मी तीन महिने बेरोजगार होतो. नंतर मला नोकरी मिळाली, पण ती त्याची सर्वात काळी बाजू होती, याची त्याला जाणीव होती. आज मी ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे कॅम्पस भरती मोठ्या प्रमाणात होत आहे. कंपन्या विद्यापीठांमधून उच्च प्रतिभेची भरती करत आहेत. उच्च पगाराची नोकरी शोधण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु मी तुम्हाला एक उत्कृष्ट कंपनी निवडण्याचा आग्रह करतो - नीतिमत्ता असलेली. जेणेकरून तुम्हाला या कर्मचाऱ्याने अनुभवलेल्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. फंडा असा की, कोणताही करिअर टप्पा अंतरात्म्याची बरोबरी करू शकत नाही. कोणताही पगार एखाद्याची स्वप्ने हिरावून घेण्याच्या अपराधीपणाची भरपाई करू शकत नाही. म्हणूनच या गोष्टीला कठीण होऊ देऊ नका.
माझ्या हिश्श्याचे किस्से:दिव्याला सगळ्यांपुढे जायचे होते ... मृत्यूच्याही
प रवा, २५ फेब्रुवारी दिव्या भारतीचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी “ओ रोमियो”च्या प्रीमियरला उपस्थित होतो तेव्हा मी दिव्याचा भाऊ कुणालला अनेक वर्षांनी भेटलो. कुणालला भेटून मी खूप भावनिक झालो. म्हणून मी माझ्या आजच्या किश्श्यात दिव्या भारतीबद्दल बोलणार आहे. ती एक उत्साही, आनंदी-भाग्यवान मुलगी होती. नेहमीच मजेदार मूडमध्ये असायची. मी तिला कधीही थकलेले, दुःखी, शांत किंवा गंभीर पाहिले नाही. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जगली. जणू तिला माहीत होते की तिच्याकडे मर्यादित वेळ आहे आणि म्हणूनच ती प्रत्येक क्षण जगू इच्छिते. मी आधीच नमूद केले आहे की तिच्या आत एक लहानसे मूल होते. ती परिणामांचा विचार न करता तिच्या मनात येईल ते करायची. उदाहरणार्थ, जुहूमधील तिच्या परिसरात एक खूप प्रसिद्ध आइस्क्रीम शॉप आहे. जिथे लोक दररोज रात्री आइस्क्रीम खाण्यासाठी येतात आणि तिथे नेहमीच गर्दी असते. दिव्या जेव्हा गाडीने घरी परत जात असायची. तेव्हा लोक तिच्या घराच्या दारासमोर त्यांच्या चारचाकी (कार) उभ्या करून आइस्क्रीम खात. यामुळे तिला खूप त्रास होत असे. तिला बराच वेळ हॉर्न वाजवावा लागत असे. मग कार हलायच्या आणि मग तिला घरात जाता येत असे. तिने लोकांना अनेकदा समजावून सांगितले होते की, दारासमोर कार उभी करून आइस्क्रीम खाऊ नका. एके दिवशी तिला तिथे केलेल्या गाड्या दिसल्या आणि ती रागावली. ती खाली उतरली आणि तिने लोखंडी रॉड उचलून कार फोडायला सुरुवात केली. तिने कारच्या पुढच्या काचा, मागच्या काचा, दिवे आणि दरवाजे तोडले. एक मुलगी रॉडने गाड्या फोडत आहे हे पाहून लोक नाराज झाले होते. त्यांना शांत होण्यास थोडा वेळ लागला. साजिद आणि मी घरी बसलो होतो तेव्हा आम्हाला फोन आला आणि आम्ही थेट जुहू पोलिस स्टेशनला धावलो. दिव्या तिथे उभी होती आणि बाहेर अनेक फोडलेल्या कार उभ्या होत्या. बरेच लोक बाहेर बोलत उभे होते. साजिद त्यांच्याशी बोलला आणि मग त्या घटनेवर तात्पुरता पडदा पडला. साजिदने काही दिवसांपूर्वी मला सांगितले की खटला अनेक वर्षे चालला होता. दिव्या अल्पवयीन होती आणि तिच्या वडिलांचे नाव कार फोडण्याच्या गुन्ह्यात टाकण्यात आले होते. कारण गाडी त्यांच्या नावावर होती. तो खटला काही वर्षांपूर्वीच संपला. बरं एका रात्री संपूर्ण मुंबईत लाइट बंद झाले आणि घरी खूप गरमी होत होती. म्हणून दिव्या म्हणाली, “चला, आपण कार काढून फिरूयात.’ मी, साजिद आणि दिव्याने कार काढली. आम्ही जुहूला आलो. तिने म्हटले, “जुहू येथे कार थांबवा.” आम्ही थांबलो. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तेथे दोन-तीन घोडेस्वार बोलत बसले होते. दिव्या म्हणाली, “मला घोडेस्वारी करायची आहे.’ पण घोडेस्वार म्हणाले, “नाही, नाही, ही वेळ नाही. आम्ही आणि घोडेही विश्रांती घेत आहेत.’ दिव्याने घोड्याला स्पर्श केला आणि घोडा उभा राहिला. दिव्या म्हणाली, “बघ, ते मला घेऊन जाण्यासाठी तयार आहे. तू आळशी आहेस, तुला मला घेऊन जायचे नाही.’ साजिद घोडेस्वाराला म्हणाला, “भाऊ, तू तिला ओळखत नाहीस. ती तिची जिद्द पूर्ण करेलच. तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारू शकता. पण तिला फक्त गाडी चालवू द्या.” ती घोड्यावर बसली आणि म्हणाली, “लगाम माझ्या हातात दे.’ घोडेस्वाराने दिव्याला लगाम दिला. दिव्याने लगेच त्याच्या हातातून त्याची काठी हिसकावून घेतली आणि घोड्याला मारले. आणि उधळून धावू लागला. आम्ही त्याच्या मागे धावलो. घोडेस्वारही धावला. त्या रात्री चंद्र नसल्याने अंधार होता. अंधारात आम्हाला काहीही दिसत नव्हते. म्हणून आम्ही विचार करत होतो की, घोडा दिव्याला कुठे घेऊन गेला आहे. घोडेस्वाराने उत्तर दिले, “काळजी करू नका. कारण या मार्गावर शेवटी परमेश्वर गोदरेजचा बंगला आहे. तेथून पुढे रस्ता नाही.’ आम्ही तिथे पोहोचलो. तेव्हा आम्हाला घोडा तिथे उभा असलेला दिसला आणि घाबरलेली दिव्या घोड्याची मान पकडून बसली होती. ती एक लहान मुलगी होती, जी तिच्या मनात येईल ते करत होती. कदाचित यासाठीच ख्वाजा मीर म्हणाले होते :सैर कर दुनिया की ग़ाफ़िल ज़िंदगानी फिर कहाँज़िंदगी गर कुछ रही तो ये जवानी फिर कहाँमी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. ऑक्टोबर १९९१ चा तो दिवस होता. माझ्या मोठ्या भावाचे भोपाळमध्ये लग्न होते. तिने लग्नाला जाण्याचा आग्रह धरला. मी तिला समजावून सांगितले की तिच्या जाण्याने संपूर्ण लग्नात गडबड होईल; सर्वजण नवरीला सोडून तुझ्याकडेच पाहतील. मी लग्नात माझ्या कुटुंबासोबत काम करू, समारंभ सुरळीत करू की तुझ्याकडे पाहू? तिने शेवटी होकार दिला आणि मी निघताना तिने माझ्यासाठी एक छान मेडिकल बॉक्स तयार केला. औषधांची नावे कागदावर लिहिलेली होती : “जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर ही गोळी घ्या, जर तुम्हाला पोटदुखी असेल तर ही गोळी घ्या. जर तुम्हाला संसर्ग असेल तर ही गोळी घ्या. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर ही गोळी घ्या आणि जर तुम्हाला दुखापत झाली तर ही बँड-एड लावा.’ अगदी डॉक्टरांसारखा तिने तो बाॅक्स बनवला होता. जो माझ्यासोबत अनेक वर्षे होता, पण घर बदलताना तो कसा हरवला हे मला माहीत नाही. मला त्याचा खूप पश्चात्ताप होतो. मग, नोव्हेंबरच्या शेवटी, माझा भाऊ आणि वहिनी भेटीसाठी मुंबईला आले. दिव्या उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होती. जेव्हा ते आले तेव्हा तिला त्यांच्यासोबत खूप मजा केली. तिने माझ्या वहिनीकडील वधूची लाल साडी परिधान केली आणि म्हणाली, “आपण गंमत करू आणि साजिद आल्यावर त्याला सांग की, आज दिव्याचे लग्न आहे. आपण साजिदला चिडवू.’ योगायोगाने त्या रात्री साजिद आला नाही. ती मजा करत राहिली. भाऊ आणि वहिनींमध्ये झोपली आणि म्हणाली, “मी तुमच्या दोघांमध्ये झोपेन.” असो. सकाळी ती चित्रीकरणासाठी निघून गेली. तिथे पोहोचताच तिने एक कार पाठवली आणि माझ्या भावाला आणि वहिनींना तिला घेऊन येण्यास सांगितले. ‘दिल ही तो है’ या सिनेमाचा सेट तयार झाला होता. असरानीजी दिग्दर्शक होते. मला तो प्रसंग चांगला आठवतो. नोव्हेंबर महिना होता. अचानक एक उघडी जीप आली आणि त्यात अजय देवगण बसला होता. सर्वांनी ज्या पद्धतीने त्यांचे स्वागत केले त्यावरून मला जाणवले की ‘फूल और कांटे’ हा सिनेमा खूप हिट झाला आहे आणि एक नवीन सुपरस्टार आला आहे. तिथेच मी अजय देवगणला भेटलो. त्यानंतर आम्ही निघालो. मी चालकाच्या शेजारी बसलो. भाऊ, वहिनी आणि दिव्या मागे होते. हायवेवर एका कारने आम्हाला ओव्हरटेक केले. दिव्या लगेच म्हणाली की, त्या कारचा पाठलाग करा आणि ओव्हरटेक करा. मी वेग वाढवण्याच्या विरोधात होते. मी चालकाला वेग वाढवू नये असा इशारा केला. दिव्या म्हणाली की, वेग वाढवा. पण चालकाने माझेच ऐकले. त्याने वेग वाढवला नाही आणि सिग्नलवर गाडी थांबवताच दिव्या खाली उतरली. चालकाचा दरवाजा उघडला. त्याला बाहेर काढले आणि स्वतः गाडी चालवू लागली. तिने ओव्हरटेक करणाऱ्या कारला मागे टाकल्यावरच आमची कार थांबवली. हा दिव्याचा स्वभाव होता; तिने जे करायचे ते केले. तिला प्रत्येक गोष्टीत सगळ्यांपेक्षा पुढे राहायचे होते. तिला सगळ्यांपेक्षा पुढे राहायचे होते. आणि जेव्हा हे जग सोडून जाण्याची वेळ आली तेव्हाही तिने आपल्या सर्वांना पुढे सोडून दिले आणि आपल्याला आधी सोडले. आज, दिव्याच्या आठवणीत, तिच्या ‘शोला और शबनम’ सिनेमातील हे गाणे ऐका. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.तू पागल प्रेमी आवारा, दिल तेरी मोहब्बत का मारा |
ऋ ग्वेदाचे अंतिम संकलन साधारणपणे १००० इसवी सनापूर्वी केले गेले असे मानले जाते. यामध्ये कुरुकुळातील सदस्यांसाठी ‘भरत’ शब्दाचा वापर केला गेला आहे. या कुळातील सदस्य सिंधू नदीच्या खोऱ्यापासून गंगेच्या पश्चिम तटापर्यंत पसरलेल्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवत असत. हा भूभाग आज पंजाब आणि हरियाणा म्हणून ओळखला जातो. या दृष्टीने भरत कुळातील राजांना हिंदुस्थानच्या सुरुवातीच्या राजांमध्ये गणले जाते. या राजांनी गंगेच्या मैदानी प्रदेशात वैदिक संस्कृतीची स्थापना आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. साधारण एक हजार वर्षांनंतर, म्हणजेच १०० इसवी सनापूर्वीच्या आसपास ओडिशामध्ये जैन राजा खारवेलच्या शिलालेखात गंगेच्या मैदानी क्षेत्राला ‘भारतवर्ष’ म्हटले गेले आहे. हा उल्लेख सांगतो की, तोपर्यंत हे नाव एक भौगोलिक-सांस्कृतिक ओळख म्हणून प्रस्थापित झाले होते. साधारण याच कालखंडात भरत राजांची कथा ऋषी व्यासांद्वारे संस्कृत महाकाव्याच्या रूपात संकलित केली गेली. सुरुवातीला हा ग्रंथ ‘जय’ आणि नंतर ‘महाभारत’ नावाने प्रसिद्ध झाला. महाभारतात ययाती, शंतनू, पुरू, कुरू आणि भरत यांसारख्या राजांच्या कथा वर्णिल्या आहेत. कारण या राजांचा उल्लेख आधी ऋग्वेदातही मिळतो, त्यामुळे असे मानणे स्वाभाविक वाटते की महाभारतात वैदिक विचारांचे विस्तृत रूप मांडले गेले असेल. परंतु वास्तव मध्ये परिस्थिती यापेक्षा वेगळी दिसून येते. या नव्या महाकाव्यात भरताला शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र सांगितले आहे. शकुंतला ही मेनका आणि विश्वामित्राची मुलगी आहे. येथे मेनका एक अप्सरा आहे आणि विश्वामित्र सूर्यवंशी मानले जातात. दुसरीकडे दुष्यंत चंद्रवंशी आहेत. अशा प्रकारे राजा भरतमध्ये हिंदूु्थानच्या दोन महान राजवंशांचा (सूर्यवंश आणि चंद्रवंश) संगम दाखवला गेला आहे. साधारण ५०० इसवीमध्ये रचित विष्णुपुराणात भरत नावाच्या एका अन्य व्यक्तीचा उल्लेख मिळतो, जो राजा ऋषभनाथाचा पुत्र होता. ऋषभनाथाने तपस्वी बनल्यानंतर भरताने राजपद सांभाळले होते. ऋषभनाथ जैन परंपरेत प्रथम तीर्थंकर मानले जातात. जैन धर्मात जीवनात संयम आणि तपस्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जैन विचारांचा प्रारंभ सुरुवातीपासूनच मौखिक स्वरूपात होत राहिला. जैन ग्रंथांनुसार भरत, ऋषभनाथांचे पुत्र आणि हिंदुस्थानचे पहिले चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी आपल्या ९९ भावांना पराजित करून मेरुपर्वतावर आपले नाव कोरले. परंतु त्यांचा अहंकार तेव्हा तुटला, जेव्हा त्यांना समजले की मेरुपर्वतावर त्यांच्याआधीही अनेक नावे कोरलेली होती. अशा वेळी प्रश्न पडतो की तो भरत कोण आहे, ज्याच्या नावावरून हिंदुस्थानला भारतवर्ष म्हटले जाते? ते वेदांत वर्णित राजे आहेत, महाभारताचे पात्र आहेत की जैन ग्रंथात उल्लेखित चक्रवर्ती सम्राट आहेत? या संदर्भात हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही राजाने कधीही संपूर्ण हिंदुस्थानवर प्रत्यक्ष रूपाने शासन केले नाही. साधारण २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने उत्तर भारतापासून दक्षिण केवळ तुंगभद्रा नदीपर्यंतच्या व्यापार मार्गांवरच नियंत्रण प्रस्थापित केले होते. अकबराचे शासनही प्रामुख्याने उत्तर भारतापर्यंत मर्यादित होते. इंग्रजांच्या शासनकाळातही अनेक संस्थाने स्वतंत्रपणे कार्यरत होती. हिमालयापासून महासागरापर्यंत पसरलेल्या एका अखंड भारताची धारणा मूलतः राजकीय नाही, तर सांस्कृतिक राहिली आहे. सर्वात प्रसिद्ध पूर-वृत्तांत बायबलच्या ‘ओल्ड टेस्टामेंट’मध्ये आढळतो. त्यानुसार, मानवतेच्या वाढत्या क्रूरतेमुळे क्षुब्ध होऊन सृष्टीकर्ता म्हणजेच एकमेव ईश्वर ‘जेहोवाह’ने पृथ्वी जलमय करण्याचा निर्णय घेतला. ‘नोआह’ हा एक सत्शील आणि नीतिमान माणूस असल्याने, जेहोवाहने त्याला आगामी विनाशाची सूचना देऊन सुरक्षित राहण्याचा मार्ग सांगितला. बायबलमधील हे आख्यान प्राचीन सुमेरच्या परंपरांमधून उगम पावलेले मानले जाते, जिथे आजचा इराक स्थित आहे. परंतु तिथे केवळ एक देव नाही, तर ‘अनुनकी’ नावाचा देवसमूह मनुष्यांच्या कोलाहलामुळे क्रोधित होऊन पृथ्वीवर जलप्रलय आणतो. ग्रीस कथाही देवांचा अधिपती ‘झ्यूस’ने महापूर पाठवून मानवतेचा विनाश केला. यात ‘प्रोमीथीअस’ नावाच्या देवाच्या हस्तक्षेपामुळे ‘डेडलस’ नामक व्यक्ती बचावली. ज्याने आपल्या खांद्यामागे दगड फेकले आणि त्यातून मनुष्यांची उत्पत्ती झाली, असे सांगते. या सर्व पाश्चात्त्य आख्यानांमध्ये जलप्रलय हा दैवी क्रोधाचा परिणाम आहे. मात्र, चीन आणि भारताच्या कथांमध्ये कोणत्याही क्रोधित देवतेचा उल्लेख आढळत नाही. चिनी आख्यानानुसार, सर्वोच्च देवी ‘नूवा’ हिने आपल्या मनोरंजनासाठी मनुष्यांची रचना केली होती. एके दिवशी देवांमध्ये झालेल्या युद्धामुळे ज्या स्तंभांवर स्वर्ग टिकला होता ते नष्ट झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे पृथ्वी जलमय झाली. तेव्हा नूवा देवीने एका विशाल कासवाच्या पायांच्या साहाय्याने स्वर्गाची भेग भरून काढली आणि पाऊस थांबला.
संबंध संपण्यापेक्षा संघर्ष बरा:संघर्षही एक प्रकारचा नात्याचाच एक भाग असतो- बलराज संघई
प्रत्येक व्यक्ती सतत मानसिक स्तरावर काहीतरी विचार करत असतो. व्यक्ती बोलत नाही म्हणजेच तो शांत आहे असे नसते. त्याच्या मनात अनेक विषयाचे विचारमंथन चालू असते. मनातील विचारात मतभेद असतील तर अंतर्द्वंद्व ही चालू असते. मानसिक पातळीवरही व्यक्ती सतत संघर्षरत असतो. संघर्ष ही परस्पर मानव संबंधांमध्ये सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. जेव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये सहकार्य आणि सहयोग नसतो अथवा जेव्हा ते एक दुसऱ्याच्या बाबतीत तटस्थही नसतात, अशावेळी त्यांच्यामध्ये परस्पर संघर्षाची स्थिती उत्पन्न होते. पदार्थ सीमित असतात. इच्छा, आकांक्षा व्यापक असतात. सीमित उद्देशांना ज्यावेळी अनेक व्यक्ती प्राप्त करू इच्छितात त्यावेळी त्यांच्यामध्ये संघर्ष हा स्वाभाविक होतो. वास्तविकतः संघर्ष हे परिवर्तनाचे एक साधन आहे. प्रगतीच्या मार्गामध्ये संघर्ष आवश्यक अशा स्वरूपात येतोच. परिवर्तन आणि उत्कर्ष यासाठी केला जाणारा संघर्ष स्वीकार करावाच लागतो. फक्त या संघर्षाचे स्वरूप हिंसक, स्वतःला अथवा दुसऱ्याला इजा पोहोचवणारे नसावे. सिमित वस्तूसाठी स्पर्धेमध्ये परस्पर संघर्ष आणि हिंसा होते. सामंजस्य आणि सहिष्णुता पूर्वक इतरांच्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा आणि विचार यांचा आदर केला तर हा संघर्ष टळू शकतो. संघर्षाचे बीजारोपण व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर येतो त्यावेळेस तो समाजामध्ये समाविष्ट होतो. समाजामध्ये परस्पर व्यवहार आणि भाषा या माध्यमातून व्यक्ती-व्यक्तींचा संपर्क येतो. हा संबंध होत असताना संबंधित व्यक्तींची मानसिक स्थिती सकारात्मक असेलच असे नव्हे. कोणत्याही दोन व्यक्तींची मानसिक स्थिती एकावेळी सारखी असू शकत नाही. मानसिक अशांतीमुळे परस्पर संघर्षाची बीजे रोवली जातात. मनात द्वंद्व चालू होते आणि अशांतीयुक्त अशा शीतयुद्धाचा आरंभ होतो. मैत्री अथवा प्रेम जेव्हां व्यवहाराशिवाय देखील दोन व्यक्तीचे परस्परात संबंध असतात तेव्हा ती मैत्री अथवा प्रेम असते. परस्पर नात्यातील गतिशीलता भावनिक आणि जैविक घटकावर अवलंबून असते. एखाद्याशी आपण सुरक्षितपणे जोडले गेलो आहोत असा विश्वास असल्यास परस्पर संबंधांमध्ये मधुरता आणि दृढता असते. परंतु परस्पर आवड-निवड, विषय भेद, मतभेद,अविश्वास, समज-गैरसमज, त्रयस्थ हस्तक्षेप यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोन व्यक्तींमध्ये परस्पर संबंध असतात तेव्हां त्याचा आधार व्यवहार, मित्रत्व, सहकार्य, प्रेम इत्यादी असतो. आपण स्वतःहून दुसऱ्याच्या विचार,उत्कर्ष,सुख,समाधान आणि उद्देशाला किती महत्त्व देतो यावर त्या बंधनाची मजबुती अवलंबून असते. मानसशास्त्रानुसार दोन व्यक्ती अति अधिक काळ सोबत किंवा एकत्र राहिल्याने सुद्धा त्यांच्यामध्ये परस्पर संबंधात कटूता निर्माण होते. अनेक वेळा हा थोडासा दुरावा देखील परत संबंध दृढ होण्याचे कारण बनत असतो. कटुता का निर्माण होते? परस्पर संबंधांमध्ये ज्यावेळी एक व्यक्ती दुसऱ्याची आवड किंवा उद्देशाच्या प्राप्तीस यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे संबंधित व्यक्तीचा, ज्याच्याशी मित्रत्व किंवा प्रेम आहे त्याचा जितका अधिक उत्कर्ष साधत असेल तितका अधिक परस्पर संबंध दृढ होत असतो. कारण त्यामध्ये एकाचे हित साधून तो दुसऱ्यास आभारयुक्त प्रेम परतावा देत असतो. परंतु याउलट काही वेळा मित्र किंवा संबंधित व्यक्ती आपल्या उद्देशाच्या साध्यामध्ये संपूर्णपणे प्रयत्नरत नाही असे वाटल्यास अथवा संशय आल्यास यासंबंधी कटूता निर्माण व्हायला सुरुवात होते. मित्रत्व किंवा प्रेम याचा आधार आणि उद्देश परस्पर संबंधातून सुख, समाधान आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्व हाच असतो. परंतु कालांतराने ज्यावेळी या संबंधांमध्ये एका व्यक्तीच्या मनात लोभ, मोह, राग, द्वेष इत्यादी कारणांनी कटुता निर्माण होते, त्यावेळी ती परस्पर संबंध व व्यवहारांमध्ये उतरते आणि दुरावा वाढत जातो. अशा परिस्थितीमध्ये परस्पर वाद-विवाद ही होतात, संबंधांमध्ये स्थगिती निर्माण होते. या स्थितीच्या स्वरूपाला मौन समजले जाते, परंतु ते मौन नसते तर अशांतिपूर्ण अंतर्द्वंद्व असते. त्याला कलह असेही म्हणतात. हा कलह काळ अधिक असेल तर त्यात अधिक प्रमाणामध्ये कटूता वाढत जाते. आणि याचाच परिणाम परस्पर संबंध संपुष्टात येण्यात होतो. वाद-विवाद हा संबंधच कलहपूर्ण मानसिक अशांतीच्या अवस्थेमध्ये प्रेम वास्तव्य करू शकत नाही. परंतु यापेक्षा जर वादविवाद होत असतील, ते अधिक काळ देखील घडत असतील तरी मात्र तो एक प्रकारचा संबंधच असतो. संबंध आहे, असावा. तो कसा आहे हा नंतरचा विषय. संबंध असल्यास त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. मानसिक परिवर्तन अथवा मध्यस्थतेने विवादयुक्त संबंधात सुधार विचार परिवर्तनाने होऊ शकतो. विरोध व्यक्तीचा नको एक प्रसिद्ध असे वक्तव्य आहे. पापाची घृणा करावी पापी व्यक्तीची नव्हे, अविचाराचा तिरस्कार करावा व्यक्तीचा नव्हे, हिंसेचा विरोध करावा हिंसा करणाऱ्या व्यक्तीचा नव्हे. याचा अर्थ विरोध, राग आणि द्वेष हा दुष्पवृत्तीचा करावा, व्यक्तीचा करू नये. हा विचार व्यापक झाला पाहिजे. परस्पर कटुता, विरोध, वाद-विवाद, संघर्ष युक्त स्थिती यामध्ये सूक्ष्म विचार केला तर एक साम्य असते आणि ते म्हणजे हा वाद विवाद, विरोध एकाच उद्देशासाठी असतो. समान उद्देशासाठी होत असलेला परस्पर विरोध संपू शकतो असा विश्वास परस्पर संबंध मधुर आणि दृढ होण्याचा प्रमुख आधार आहे. विवादाचा आधार समानता याचाच अर्थ असा होतो की कसल्याही प्रकारचे परस्पर संबंध नसल्यापेक्षा वाद-विवाद, घृणा, संघर्ष,राग आणि द्वेष स्थिती असलेली बरी, कारण त्या ठिकाणी विचार परिवर्तन आणि सुधारणेला वाव असतो. मानवी हृदय असे आहे की त्यामध्ये दया, करुणा, प्रेमाचे बीज रोवले जाऊ शकते. तुझ्यातला आणि माझ्यातला संघर्ष हेच दर्शवत असतो कोणती तरी एक गोष्ट आपल्यामध्ये समान आहे. फक्त ती कशी असावी यासाठी हे भांडण चालू आहे. मला वाटतं या समस्येशी लढले पाहिजे, न की एक दुसऱ्याशी. विवादामध्ये सुद्धा विवेक पूर्ण सावधानतेने परस्पर कुटुतेचा काळ कमी केला जाऊ शकतो. कटुतेचे प्रेमात रुपांतरण काळ परिवर्तनाला कारणीभूत असतो. मग ते परिवर्तन अजीव वस्तूमध्ये असो जीवांमध्ये. काळानुसार परिस्थिती बदलते. वस्तूची परिस्थिती बदलते तसे जीवाचे विचारही बदलतात. बदललेल्या विचारामुळे मानसिक स्थितीत परिवर्तन होते. कौटुंबिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, उद्देश आणि गरजांची अपूर्ती आणि वयोमानानुसार सहनशीलता कमी अधिक होत असते. म्हणूनच अशा मानसिक स्थितीत असलेल्या दोन्ही व्यक्तीच्या संबंधांमध्ये मधुरतेचा परिणाम स्वरूप अभाव निर्माण होऊ शकतो. या सूक्ष्म मानसिक स्थितीचा विचार केला आणि परस्परांमध्ये निर्माण झालेली नावड , कटुता, विवाद याचा मुख्य आधार आणि उद्देश दोघांपैकी एकाचे म्हणजेच परस्परांचे सुख समाधान याची प्राप्ती हाच आहे हे लक्षात आले तर या संघर्षाचे, विवादाचे आणि कटुतेचे पुन्हा मित्रत्व आणि प्रेमामध्ये रूपांतर व्हायला काहीच वेळ लागणार नाही असा मला विश्वास वाटतो. म्हणूनच संबंध नसल्यापेक्षा, पोकळी असल्यापेक्षा वाद-विवाद आणि संघर्षपूर्ण स्थिती कधीही प्रेमाला अंकुरित करू शकते. (बलराज संघई, 9420015108 / वाळूज औद्योगिक परिसर, छत्रपती संभाजीनगर)
‘डॉ. चॅटजीपीटी’कडून आरोग्यसल्ला असा घेता येऊ शकेल:एआय वापरून चांगली तयारी करू शकता
मी माझ्या रुग्णांना चॅटबॉट्सकडून सेकंडआेपिनियन घेण्याबाबत दक्षताबाळगण्याचा सल्ला देतो. ते रोग समजूनघेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतुउपचारांसाठी त्यांच्यावर पूर्णपणेअवलंबून राहू नये. एक डॉक्टर म्हणून मला माहित आहे की माझे रुग्णवैद्यकीय सल्ल्यासाठी एआयचा वापर करतात.कधीकधी लक्षणे सूक्ष्म असतात - उदाहरणार्थ तेसुचवलेल्या चाचण्या आणि संभाव्य उपचारांची एकलांब यादी घेऊन येतात. परंतु बहुतेकदा ते थेट नमूदकरतात की त्यांनी मला भेटण्यापूर्वी ‘डॉ. चॅटजीपीटी’चासल्ला घेतला. आकडेवारी दर्शवते की एक तृतीयांशपेक्षा जास्त अमेरिकन आरोग्य सल्ल्यासाठी लार्जलँग्वेजच्या मॉडेल्सचा वापर करतात. एआय संशोधक म्हणून मला वाटते की योग्यरित्या वापरकेला गेला तर इंटरनेटच्या शोधापासून रुग्णांना सक्षमकरण्यासाठी हे मोठे भाषा मॉडेल्स सर्वात प्रभावी साधनआहेत. परंतु ते काही नवीन वअद्याप पूर्णपणे नसमजलेले धोकेही घेऊन येतात -म्हणजे डॉक्टर-रुग्णनात्यात अंतर निर्माण करणे किंवा चॅटबॉट्सवर सततप्रश्न विचारल्याने लोक चिंतेच्या दुष्टचक्रात अडकतात. आरोग्यसेवेच्या या रोमांचक नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना मी रुग्णांसोबत त्यांच्या आरोग्यासाठीएआयच्या वापराबद्दल काही गोष्टी शेअर करू इच्छितो. रुग्ण डॉक्टरांच्या भेटीच्या दृष्टीने चांगल्या तयारीसाठी एआयचा वापर करू शकतात. सरासरी एका रुग्णाला दरवर्षी त्यांच्या डॉक्टरांशी फक्त १८ मिनिटे समोरासमोर संवाद साधता येतो. मेडिकेअर कायद्यानुसार रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय नोट्स उपलब्ध आहेत. याची खात्रीदिली जाते. परंतु बहुतेकांना त्या कधीच दिसत नाहीत.अनेकदा वैद्यकीय पारिभाषिक संज्ञा समजण्यास किंवाकाय महत्त्वाचे आहे हे ठरवण्यास अडचण येते त्यांनाहीते उपयुक्त आहे. एक गंभीर समस्या अशी आहे की चुकीचे निदान किंवानाकारलेल्या शंका यासारखी चुकीची माहितीनोट्समध्ये राहू शकते. एआय रुग्णांना या गुंतागुंतीतूनमार्ग काढण्यास मदत करू शकते. कल्पना करा कीसततच्या खोकल्यामुळे डॉक्टरकडे जात आहात.तुमच्या वैद्यकीय नोट्स उघडा. त्या एआय टूलमध्येकॉपी करा आणि तुमच्या सध्याच्या आरोग्याबद्दल आणितुमच्या खोकल्याशी संबंधित चिंतांबद्दल अपडेट्सजोडा. नंतर या सर्व माहितीचा संक्षिप्त सारांशदेण्यासाठी चॅटबॉटला सांगा. शेवटी त्याला विचारा,माझ्या आरोग्याच्या या पार्श्वभूमीमुळे माझ्या पुढच्याअपॉइंटमेंटमध्ये मी माझ्या डॉक्टरांना माझ्याखोकल्याबद्दल कोणते तीन प्रश्न विचारावे? एआय टूल्स तज्ञ-स्तरीय वैद्यकीय सल्ला देण्यास सक्षमआहेत. परंतु त्यांचे कार्यप्रदर्शन जवळपास पूर्णपणेतुमच्या आरोग्याचे संपूर्ण चित्र असण्यावर अवलंबूनअसते—म्हणजे तुमचे जुनाट आजार, तुम्ही घेतअसलेली औषधे आणि तुमची दिनचर्या. वैद्यकीयशाळेत डॉक्टरांना रुग्णांनी तक्रार केल्यावर कोणत्यालक्षणांवर आणि तपशीलांवर लक्ष केंद्रित करावे हेशिकायला मिळते. तुम्हाला तुमची लक्षणे अधिक प्रभावीपणे व्यक्तकरायची असतील तर तुम्ही चॅटबॉटला सांगू शकता:‘माझी मुलाखत घ्यावी जणू तू डॉक्टर आहेस.'' हीप्रश्नोत्तर प्रक्रिया केवळ तुमचे वर्णन अधिक स्पष्ट करूशकत नाही तर अनावश्यक चिंता निर्माण करूशकणाऱ्या इतर संभाव्य परिस्थितींना देखीलनाकारण्यास मदत करू शकते. वास्तविक आरोग्यासंबंधी प्रश्नांच्या बाबतीत लँग्वेजमॉडेल्सना त्यांच्या वापरकर्त्यांना समाधानी करण्याचीप्रवृत्ती चिंताजनक आहे. ‘सायबरकॉन्ड्रिया'' ही अशीस्थिती आहे त्यात एखादी व्यक्ती सामान्य लक्षणेइंटरनेटवर शोधत असताना अचानक भयावहशक्यतांच्या खाणीत प्रवेश करते. लार्ज लँग्वेज मॉडेलतुमच्या अवचेतन इच्छांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतअसल्याने ते ओळखू शकतात की कोणती माहितीतुमच्यावर सर्वात जास्त परिणाम करते. नकळतपणेत्याच दिशेने ते अधिक सामग्री देऊ शकते. उदाहरणार्थ-ते साध्या ताण-प्रेरित डोकेदुखीबद्दलच्या संभाषणालामेंदूच्या कर्करोगाबद्दल तपशीलवार चर्चेकडे वळवूशकतात! हे सोशल मीडिया अल्गोरिदम लोकांना सततभयावह सामग्री पाहण्याच्या सवयीमध्ये कसे ढकलतातयासारखेच आहे. (द न्यूयॉर्क टाईम्स)
आपण ‘ग्लोबल साऊथ’ ला ऊर्जेमध्ये देऊ शकतो दिशा:विकसनशील देशांनी आता एकत्र यायला हवे
भारत ग्लोबल साऊथसाठी एक मॉडेलसादर करतो. विकसनशील देश त्यांच्याबाजारपेठांच्या पायाभूत सुविधांबद्दलकसा विचार करतात त्यावरून ते थेटडिजिटल क्रांतीच्या पुढील टप्प्यात प्रवेशकरतील की नाही हे ठरेल. ग्लोबल साउथच्या एका मोठ्या भागासाठी ऊर्जासंक्रमण बहुतेकदा हवामान बदलाच्या संदर्भात मांडलेजाते. परंतु लाखो लोक ते प्रामुख्याने विस्तारित संधी,परवडणारी क्षमता आणि सेवा वितरणाच्या दृष्टिकोनातूनपाहतात. म्हणूनच स्वच्छ-ऊर्जा क्रांतीचा पुढचा टप्पाकेवळ अधिक सौर पॅनेल बसवत नाहीत तर त्यांचे ग्रिड,बाजारपेठ आणि संस्थात्मक संरचनांचे योग्यरित्याआधुनिकीकरण करणाऱ्या देशांद्वारे चालवला जाईल. जुने मॉडेल सोपे : वीज प्रकल्प वीज निर्माण करत.ग्रिडने ती थेट व्यवसाय आणि घरगुती ग्राहकांपर्यंतपोहोचवत. नवीन मॉडेल वेगळे आहे. घरे, शेती वखाजगी उद्योग छतावरील सौरऊर्जा, बॅटरी स्टोरेजसिस्टम आणि इलेक्ट्रिक उपकरणे स्वीकारत असल्याने वीज व्यवस्था विकेंद्रित होत आहे. नागरिक आता केवळ निष्क्रिय ग्राहक राहिलेले नाहीत; ते व्यावसायिक’ होत आहेत. हा शब्द उत्पादक’ आणि ग्राहक’ चे एक रूप आहे. याचा अर्थ असा की लोक आता वीज वापरतात व उत्पादनही करतात. विकेंद्रीकरण आणि अक्षय ऊर्जा गुंतागुंत आणतात. सातत्यपूर्ण आणि दर्जेदार सेवेच्याअपेक्षा कायम राहिल्यामुळे, सौर आणि पवन ऊर्जा परिवर्तनशील असतात आणि अशा ऊर्जा प्रणालींमधील मालमत्ता मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात. याआव्हानाला तोंड देण्यासाठी स्वच्छ ग्रिडसाठीइंटरनेटप्रमाणेच सामायिक डिजिटल पायाभूत सुविधाआवश्यक असतील जिथे मालमत्ता खुल्या चौकटीवरसंवाद साधू शकतात. वास्तविक रिअल-टाइम डेटाआणि क्षमतांवर आधारित आणि डिजिटल पायाभूतएआय-सक्षम ग्रिड, रस्ते आणि बंदरे यासारख्यापारंपारिक पायाभूत सुविधांइतकेच ग्लोबल साउथच्याविकासासाठी महत्त्वाचे असतील. ऊर्जा पुरवठ्यातएआय ॲप्लिकेशनचा वापर करणे हे स्वाभाविक आहे.मागणीचा अंदाज सुधारण्यासाठी आणि खरेदी आणिवितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान योग्यआहे. संभाव्य दोषांचा अंदाज घेऊन, वीज खंडितहोण्यापासून रोखून आणि बिलिंग आणि पुनर्प्राप्तीप्रक्रिया सुलभ करून ते आधीच देखभाल करण्यासमदत करत आहे. भारताच्या डिजिटल सार्वजनिकपायाभूत सुविधांचे उदाहरण विचारात घ्या. त्याचे उद्दिष्टनवीन स्पर्धात्मक परिसंस्था तयार करणे आहे. देशातीलसार्वजनिक प्लॅटफॉर्म स्टार्टअप्स आणि सेवा प्रदात्यांनासुरवातीपासून सुरुवात न करता नवकल्पना पुढे नेण्याचीपरवानगी देतात. ते मॉड्यूलर सोल्यूशन्स देखील प्रदानकरतात, त्यांना एकाच विक्रेत्यावर अवलंबून राहण्याच्यासापळ्यात अडकण्यापासून रोखतात. संपूर्ण संरचनेलाआमूलाग्र बदलून न घेता विद्यमान प्रणाली मजबूत करणेहे उद्दिष्ट आहे. वास्तविक भारत ग्लोबल साउथसाठीएक मॉडेल सादर करतो. विकसनशील देश त्यांच्याबाजारपेठेच्या पायाभूत सुविधांबद्दल कसा विचारकरतात हे ठरवेल की ते थेट डिजिटल क्रांतीच्या पुढीलटप्प्यात प्रवेश करू शकतात की इतरांवर डिजिटलरित्याअवलंबून राहू शकतात. निश्चितच कमी विकसितआणि लहान देशांना अनेक अडथळ्यांचा सामनाकरावा लागतो - विखुरलेल्या बाजारपेठा आणि नाजूकअर्थव्यवस्थांपासून ते मर्यादित बजेटपर्यंत. परंतुआंतरराष्ट्रीय सौर आघाडी या अडथळ्यांवर मातकरण्यास मदत करू शकते. सौर ऊर्जा विस्तारावरसहकार्य करण्यासाठी १२५ सदस्य देश वचनबद्धअसल्याने आघाडीकडे ऊर्जेसाठी एआयवरीलजागतिक मोहिमेद्वारे एआय-चालित व नागरिक-केंद्रितग्रिड परिवर्तनांचे जागतिक इंजिन बनण्याची क्षमता आहे.ग्लोबल साउथला यापूर्वीही या समस्येचा सामना करावालागला आहे. विशेषतः डिजिटल पायाभूत सुविधांच्याविस्तारादरम्यान. त्या अनुभवाने आपल्याला शिकवलेकी समन्वयाशिवाय आधुनिकीकरणामुळे कठोर प्रणालीनिर्माण होऊ शकतात. त्या अपग्रेड करणे महागडे आहे.म्हणूनच ऊर्जा क्षेत्रात एआयचा योग्य वापर केवळ एकतांत्रिक आव्हान नाही तर एक धोरणात्मक गरजही आहे. स्वच्छ-ऊर्जा संक्रमण आता त्याच्या प्लॅटफॉर्म युगातप्रवेश करत आहे. ग्लोबल साउथला जुन्या ग्रिडमॉडेलची प्रतिकृती बनवण्याची गरज नाही - श्रीमंत देशमोठा खर्च करून आधुनिकीकरण करत आहेत. एआयआणि डिजिटल पायाभूत सुविधांशी अक्षय ऊर्जेचेसंयोजन करून ते पुढील टप्प्यावर झेप घेऊ शकते. भारतयामध्ये आघाडीवर आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट. सह-लेखक: आशिषखन्ना, महासंचालक, इंटरनॅशनल सोलरअलायन्स. )
एआयच्या मदतीने खटल्यांचे ओझे कमी का करत नाही?:तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर आवश्यक
न्यायालयांमध्ये एआय वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर ‘तारीख पे तारीख’चा चक्रव्यूह कमी होऊ शकतो. मात्र, जनतेच्या हितासाठी एआयचा व्यावहारिक वापर न केला जाणे चिंताजनक आहे. देशात सध्या एआयची लाट आहे. हे संकट ठरेल की विकसित भारताचा शंखनाद, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी ४ मुद्द्यांच्या आधारे न्यायिक व्यवस्थेतील एआयशी संबंधित आव्हाने आणि विरोधाभासांचे मूल्यमापन केले जाऊ शकते:१. ई-कोर्ट््स प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात एआय आणि ब्लॉकचेनच्या वापरासाठी केवळ ५३.५७ कोटी रुपये दिले गेले. सर्वोच्च न्यायालयात संशोधन आणि अनुवादासाठी अनेक एआय साधने तयार केली गेली आहेत. परंतु ९९ टक्क्यांहून अधिक खटले उच्च व जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. तिथे एआयच्या माध्यमातून पोलिस, न्यायालय, तुरुंग, फिर्यादी आणि पक्षकार यांना जोडून जामिनाशी संबंधित लाखो प्रकरणांमध्ये लवकर निर्णय होऊ शकतो. एआयच्या वापरामुळे चेक बाउन्स आणि ट्रॅफिक चलान यांसारख्या कोट्यवधी खटल्यांचा जलद निपटारा होऊन न्यायालयांवरील खटल्यांचा बोजा कमी होऊ शकतो. न्यायालयांमध्ये एआय साधनांच्या वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर तारखांचा घोळ कमी होऊ शकतो. पण सामान्य जनतेसाठी जलद आणि योग्य न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्यात एआयचा व्यावहारिक वापर न होणे चिंताजनक आहे. २. विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी म्हटले की, निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत मदत आणि केस मॅनेजमेंटच्या माध्यमातून एआय न्यायाचा वेग वाढवू शकते, परंतु हे न्यायाधीशांचा विवेक आणि मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही. न्यूझीलंडमधे ख्राइस्टचर्च जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एआयद्वारे लिहिलेले माफीपत्र नाकारताना म्हटले की, त्यात संवेदना व मानवी भावांचा अभाव आहे.गतवर्षी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले होते की, चॅटजीपीटीच्या वापरामुळे घटनात्मक व्यवस्थेसमोर मोठी संकटे येत आहेत. गेल्या महिन्यात बॉम्बे हायकोर्टानेही एआयद्वारे तयार केलेल्या काल्पनिक खटल्याच्या उल्लेखावर ५० हजारांचा दंड ठोठावला होता. आता मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. वकिलांच्या ड्राफ्टिंगमध्ये व न्यायाधीशांच्या निर्णयात एआयच्या चुकीच्या वापराने खटले अधिक गुंतागुंतीचे बनवले जात आहेत. ३. लोकसभेत कायदामंत्र्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सांगितले होते की, न्यायपालिकेत एआयच्या वापरामुळे अल्गोरिदम (पूर्वग्रह), अनुवादाची समस्या आणि डेटा सुरक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर ई-कमिटी विचार करत आहे. त्यापूर्वी मार्च २०२५ मध्ये मंत्र्यांनी संसदेत सांगितले होते की, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून निर्णयांचे १८ भाषांमध्ये भाषांतर होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी म्हटले की, एआयच्या चुकीच्या वापरामुळे न्यायिक प्रशासनात अडथळा येऊ नये. तरीही सोनम वांगचुक यांची अटक वैध ठरवण्यासाठी पुरावा म्हणून सरकारने तीन मिनिटांच्या भाषणाचा आठ मिनिटांचा अनुवाद सादर केला. न्या.ती अरविंद कुमार व वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, एआयच्या युगात अनुवादाच्या प्रकरणांमध्ये किमान ९८ टक्के अचूकता आवश्यक आहे. न्यायाधीशांच्या मते, सरकार अशा गोष्टीवर विश्वास ठेवत आहे जी वास्तव नाही. ४. सुनावणी आणि प्रसारणात व्हॉट्सॲप आणि झूम सारख्या ॲप्सचा वापर होणे बेकायदेशीर असण्यासोबतच न्यायिक व्यवस्थेत विदेशी हस्तक्षेपदेखील आहे. गृह मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार, वर्गीकृत माहिती प्रसारमाध्यमांशी शेअर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गोपनीयता कायद्यांतर्गत कडक फौजदारी कारवाई केली जाईल, परंतु डिजिटल आणि एआय कंपन्यांसोबत जनता आणि सरकारचा डेटा बेकायदेशीर आणि संघटित पद्धतीने शेअर करण्याविरुद्ध कारवाई होत नाही. गोपनीयतेच्या अधिकारावरील सर्वोच्च न्यायालयाचा नऊ वर्षे जुना निर्णय लागू करण्याऐवजी, थंड बस्त्यात पडलेल्या डेटा सुरक्षा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयांत सुनावणी होणे हे एक वेगळेच प्रहसन आहे. एआयच्या माध्यमातून ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे लक्ष्य साध्य झाले तर उत्तम, परंतु एआय क्रांतीच्या नावाखाली परदेशी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण झाले, तर संविधानाचे सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भर भारतासमोर संकटाची त्सुनामी येऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) viraggupta@hotmail.com
६ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांचा मृत्यू आणि ८५ वर्षीय शरद पवार यांची घटती ताकद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील त्या पवार साम्राज्याच्या कमकुवत होण्याचा संकेत आहे का, ज्याने अर्ध्या शतकापर्यंत राजकारणावर प्रभाव टाकला. अजित पवार यांचा आकस्मिक मृत्यू आणि त्यानंतरच्या घडामोडींनी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे अशा प्रकारे बदलली आहेत, ज्याची अपेक्षा नव्हती. सध्या तरी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. यावर काम सुरू होते आणि १२ फेब्रुवारीला याची घोषणा होणार होती, असे म्हटले जाते. मात्र, या विलीनीकरणाच्या अटी काय असतील हे कुणीही जाहीर केले नव्हते. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत राहिली असती का? शरद पवार यांनी वारंवार सांगितले की ते भाजपसोबत जाणार नाहीत. तसेच अजित पवार किंवा त्यांचे पक्षातील जे लोक मुंबईत सरकारमध्ये आहेत, ज्यांच्यावर ईडी/सीबीआयची टांगती तलवार होती त्यांनी महायुतीपासून वेगळे होणे कठीण होते. हे शक्य होते की, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबतच राहिली असती, ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांना मोठी भूमिका दिली गेली असती आणि ज्येष्ठ पवार निवृत्त झाले असते. परंतु, अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते - प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे - जे सर्व बिगर-मराठा आहेत. त्यांनी बैठक आधीच पुढे ढकलली. अजित पवार गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून तातडीने शपथ देण्यासाठी ते तयार झाले होते. वास्तव हे आहे की, अजित पवारांचे जवळचे कुटुंब किंवा त्यांचे ज्येष्ठ सहकारी, पक्ष शरद पवारांच्या हवाली करू इच्छित नव्हते. त्यांना भीती होती की शरद पवार पुन्हा पक्षावर नियंत्रण मिळवू शकतात. अजितदादांच्या उपस्थितीशिवाय ते स्वतःला कमकुवत समजत होते. परंतु, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा झाला. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक ताकदवान सिद्ध झाली होती. यादरम्यान दुसरी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे भाजपने रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत महापौर म्हणून नियुक्ती केली. शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर बनले. एकनाथ शिंदे महापौरपदासाठी प्रयत्नशील होते, पण त्यांना येथेही दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या या मंथनाचा फायदा कुणाला होईल? राष्ट्रवादीतील फूट, अजित पवारांचा अकाली मृत्यू, शरद पवारांचे कमकुवत होणे आणि काँग्रेसची सततची घसरण यामुळे मराठा समाज स्वतःला एकाकी समजत आहे. मराठा मतांवर (३५%) ताबा मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशिवाय एकनाथ शिंदे - जे स्वतः मराठा आहेत आणि ज्यांना ठाण्यासारख्या शहरी भागातून मोठा पाठिंबा मिळतो - अजितदादांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या बाजूने नव्या पद्धतीने उभे राहू शकतात. अशा स्थितीत काँग्रेस पुन्हा स्वतःला मजबूत करू शकेल का? आतापर्यंत तरी परिस्थिती फडणवीस यांच्या हिताची राहिली आहे. संघ फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. फडणवीस यांनी वेळ न घालवता सुनेत्रा पवार यांना आपल्या सरकारमध्ये सामील करून घेतले आणि साहजिकच त्यांना यासाठी दिल्लीतूनही मंजुरी मिळाली होती. यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांचा दबाव कमी करण्यास मदत झाली. फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडेच ठेवले आहे, जे पूर्वी अजितदादांकडे होते. हा विभाग अशा कोणत्याही बड्या नेत्यासाठी राखीव ठेवला जाऊ शकतो, जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेऊ शकतो.ज्या कौशल्याने फडणवीस यांनी घडामोडी हाताळल्या, त्याने त्यांना मोदींनंतरच्या काळासाठी तयार होत असलेल्या नेत्यांच्या यादीत एक पायरी वर नेले आहे. अजितदादांचा मृत्यू आणि ८५ वर्षांच्या शरद पवार यांची घटती ताकद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील त्या पवार साम्राज्याच्या कमकुवत होण्याचा संकेत आहे का, ज्याने अर्ध्या शतकापर्यंत राज्यावर राज्य केले किंवा प्रभाव टाकला. पवार युग १९७७ मध्ये शरद पवारांच्या उदयाने सुरू झाले, जे तीन वेळा मुख्यमंत्री बनले आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री व कृषिमंत्री पदापर्यंत पोहोचले. ते सत्तेत असोत वा नसोत, त्यांना दुर्लक्षित करणे शक्य नव्हते. त्यांना आजही एक असे निष्णात राजकारणी मानले जाते, जे राज्याला उत्तम प्रकारे ओळखतात आणि प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते याचे सर्व बारकावे ओळखून आहेत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) neerja_chowdhury@yahoo.com
जीवनमार्ग:आपण मुलांना तेव्हाच वाचवू शकू जेव्हा स्वतः सावध असू
आज जगभरातील बाजारपेठा एआयमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. प्रत्येक गोष्टीचे निराकरण एआयमध्ये शोधले जात आहे. आपल्याकडे दोन स्तरांवर एआयशी जोडून काम व्हायला हवे- एक देश स्तरावर आणि दुसरे कुटुंबासाठी. एआयमुळे विकास तर व्हावा, पण या तंत्रज्ञानामुळे देशातील काम कमी होऊ नये, अन्यथा काम करणारे लोक अधिक बेरोजगार होतील. एआयवरून अमेरिका आणि चीनमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही देशांत कौटुंबिक रचना विखुरलेली आहे. एआयमुळे बाजारपेठेत आपला फायदा व्हावा असा विचार तर करायचा आहेच, पण कुटुंबाच्या सुरक्षिततेवरही चिंतन करायचे आहे. जगातील इतर देश कदाचित कुटुंब संस्थेबाबत इतके गंभीर नसतील, पण आपण हे लक्षात घ्यायला हवे की, एआयच्या विळख्यात आपला संसार येऊ नये आणि दांपत्य जीवन विखुरले जाऊ नये. आपण मुलांना एआयपासून तेव्हाच वाचवू शकू जेव्हा माता-पिता स्वतः सावध असतील. ठिणगी हाती धरून दारूच्या कोठाराचे रक्षण करता येणार नाही, हे लक्षात ठेवावे. Facebook:Pt. Vijayshankar Mehta
ब्रँड व्हायचंय? मग अनुकरण नको:स्वतःची ओळख निर्माण करा- बलराज संघई
सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव गुण देखील सारखे नसतात. या प्रकारच्या विषमता निसर्गकृत आहेत. आत्म्याच्या किंवा जीवाच्या चैतन्याच्या स्तरावर एकत्व म्हणजे सर्व जीव त्या स्तरावर समान आहेत, सर्वांचा आत्मा एकाच गुणवत्तेचा आहे असं वाचलं, ऐकलं, म्हटलं जातं आणि त्यावर श्रद्धा आहे. मात्र विषमता इतर बाबतीत संभवते. व्यावहारिक, भौतिक जगामध्ये आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने, तसेच उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्य हा दैनंदिन प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. मागचं वर्ष,मागचा महिना,कालचा दिवस गेला तसा आजचा जाऊ नये. त्यामध्ये आज काहीतरी बदल व्हावा आणि कुठेतरी जिथे अडले होते तो अडथळा दूर व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मनुष्य एक शोध करत असतो. माणसाच्या आयुष्यातील सारी धडपड ही सुखाच्या प्राप्तीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी आणि सर्वार्थाने प्रगतीसाठी असते असे मला वाटते. परंतु असे करत असताना काही मानसिक स्वभाव असतात, काही विकार असतात, काही प्रवृत्ती असतात यांच्या प्रभावाने मनुष्य कुठेतरी दुसऱ्याची बरोबरी करायला पाहतो. आपण आपला स्वतःचा उद्देश न ठेवता दुसऱ्याचे अनुकरण करायला पाहतो दुसऱ्याच्या मागे जायला पाहतो. दुसऱ्यासारखे होणं, तसा प्रयत्न करणं म्हणजेच आपलेपणा, आपला वेगळेपणा आणि आपले स्वत्व हरवणे असाच अर्थ आहे. जसे संविधानाने आपणास आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच निसर्गाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे, इतरांना त्रास न होईल असे पण स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. ( याचा निरंकूशता असा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये). म्हणून कमीत कमी आपण आपले स्वतःचे छंद, आवडीनिवडी आपल्या पातळीवर तरी जोपासले पाहिजेत ज्याने स्वतःला आनंद होईल. आपल्याकडे दिवस रात्रीचे मिळून चोवीस तास असतात. त्यामध्ये झोप वगळता उरलेले तास आपण कशासाठी खर्च केले आणि त्यामध्ये निव्वळ स्वतःसाठी आपल्या आवडीसाठी, आपल्या आवडीने आपल्या आवडीचे जीवन क्षण जगण्यासाठी किती वेळ खर्च केला, मी स्वतःला किती वेळ दिला हे मात्र तपासले पाहिजे. आपण आपल्या सारखं, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे याची दुसरी बाजू अशी स्पष्ट होते की आपण दुसऱ्या सारखं जगलं नाही पाहिजे. मी जर इतर कोणा सारखं जगत असेल तर याचा अर्थ मी स्वतःला त्याच्या सारखं बनवू इच्छितो आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानून जगत आहे. त्यावेळी मी स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला,आपल्या अस्तित्वाला उच्च श्रेष्ठ असल्यापासून नाकारत असतो. म्हणून अनुकरण नको हेच सांगणं आहे. जे दुसऱ्याचं अनुकरण करतात, दुसऱ्याच्या मागे चालतात, दुसऱ्यासारखं व्हायला पाहतात ते कधीच सर्वात पुढे नसतात कारण ते पुढे जाणाऱ्याला पाहत असतात. समोरचा कुठे चालला आहे, काय करतो आहे कसे करतो आहे हे पाहण्यातच अनुकरण करणाऱ्याचा भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे स्वतः काही होण्याचा,काही बनण्याचा काही होऊन दाखवण्याचा बराचसा वेळ तर आपण गमावलेला असतो आणि उरलेल्या वेळात मग त्याच्यासारखं होता येत नाही. लोकं करत आहेत तेच तुम्ही करत असाल तर लोका सारखेच व्हाल. पूर्ण पण नाही, अर्धवटच. तुम्ही स्वतंत्र विचार करा. आपला उद्देश आपण निश्चित करा. गर्दीच्या मागे जाण्यात अर्थ नसतो कारण गर्दी महान असत नाही. स्वतः स्वतंत्र विचार करुन धैर्य पूर्वक चालणारा माणूसच महान बनतो. अनुकरण करु नका. स्वतः जळणाराच दीपक बनतो व स्वयं प्रकाशमान होतो. गर्दीतून चालत असताना सुद्धा आपण वेगळं असलं पाहिजे, आपण आपला विचार घेऊन चाललं पाहिजे. सर्वात आधी आपण स्वतः आपल्यावर, आपली बुद्धी आणि विचार, क्षमता यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सतत असे चिंतन केले पाहिजे की जे कोणी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बनले आहेत ते एक निश्चित उद्देश घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करून ध्येय प्राप्तीला पोहोचले आहेत. आपणही आपल्या जीवनाचा उद्देश निश्चितच केला आणि स्व कष्टाने त्या ध्येयाकडे या प्रकारे वाटचाल केली तर आपणही निश्चितच सर्वोत्कृष्ट होणारच. उच्च व्यक्तिमत्त्वाचा आदर्श असावा, सन्मान करावा पण आपण मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. बाजारामध्ये एका वस्तूचे अनेक उत्पादन असतात, परंतु ब्रँड म्हणावली जाणारी अशी एकच वस्तू असते एखाद्या कंपनीची. गळ्यात हार असतो परंतु लक्ष हारातल्या मुख्यपदक किंवा त्यात जडलेल्या माणिक, मोती,हिऱ्याकडे असते. हेच असते विशेषत्व. असेच चिंतन-मनन करत ध्येय प्राप्तीकडे स्वतःला मूल्यांकन करत जात राहिल्याने एक दिवस नक्कीच आपणही सर्वोत्कृष्ट असू याबाबत शंका नसावी. बलराज संघई, लेखक कवी गितकार 9420015108 वाळूज औद्योगिक परिसर छत्रपती संभाजीनगर
एन. रघुरामन यांचा कॉलम:‘एफडीपी’ अवलंबल्याने मुलांचे यश निश्चित
परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्नेहभोजनात न येण्याचे आम्ही कोणतेही कारण देऊ शकत नव्हतो. हा नियम फक्त दोनच प्रसंगी मोडला जायचा - जेव्हा कुणाला खूप ताप असेल किंवा देश युद्ध लढत असेल. जसे १९७१ चे बांगलादेश युद्ध, जेव्हा रस्त्यांवरील दिवेही बंद केले जायचे आणि सायकलच्या डायनामोला अर्धा काळा रंग लावला जायचा. आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात बसत असू, जिथे ना डायनिंग टेबल होते, ना गॅस स्टोव्ह असलेला किचन ओटा. या सोयीसुविधा माझ्या बहिणीच्या जन्मानंतर घरात आल्या.डायनिंग टेबलवरही आम्ही दोन्ही मुले एका दिशेला तोंड करून बसत असू आणि उरलेल्या दोन दिशांना आई-वडील बसत. दक्षिण दिशा रिकामी राहायची. पालकांच्या एका समजुतीमुळे आमच्या घरात दक्षिणेकडे तोंड करून जेवणे टाळले जायचे. ही समजूत वास्तुशास्त्र आणि ऊर्जेशी संबंधित पारंपरिक धारणांचे एक मिश्र रूप होते. रात्रीच्या जेवणादरम्यान वास्तुकला, ऊर्जा आणि मान्यतांसारख्या विषयांवर आईकडून मिळालेला हा माझा पहिला वादातीत धडा होता. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. दिवसातील किमान एक जेवण तरी एकत्र बसून घ्या आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. काळाच्या ओघात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक दिसून येईल. जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा तुम्हाला केवळ भेटवस्तूच मिळत नाहीत, तर भरपूर सल्लाही मिळतो. पण माझा हा सल्ला तुमच्या मुलांना हमखास एक उत्तम माणूस बनवेल. अगदी माझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी जेव्हा माझी आई रुग्णालयात होती, तेव्हाही आम्ही पिता-पुत्र साध्याशा जेवणासाठी एकत्र बसलो होतो. आम्हा दोघांमधील चर्चा नेहमीच दीर्घ चालायची. १० मिनिटे असो किंवा अर्धा तास, सोबत जेवण्याचा नियम ‘तडजोड नसणारा’ होता. अर्थात, त्याचा फायदाही झाला. बालपणीच्या या गोष्टी मला तेव्हा आठवल्या, जेव्हा नुकतेच मी ‘फॅमिली डिनर प्रोजेक्ट’ (एफडीपी) च्या कार्यकारी संचालिका डॉ. एमी फिशेल यांच्याबद्दल वाचले. त्या म्हणतात की, नियमित एफडीपीचा संबंध नैराश्य, चिंता, नशा किंवा तंबाखूचे व्यसन, ईटिंग डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि सध्या विकसित देशांमध्ये आढळणाऱ्या किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण कमी करण्याशी आहे. यामुळे लवचिकता आणि आत्मसन्मान वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. प्री-स्कूलमधील मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि मोठ्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते. त्यांच्या सर्वेक्षणात एकत्र जेवणारी ८०% कुटुंबे ही परंपरा सुरू ठेवू इच्छितात, कारण किशोरवयीन मुलांना वाटते की त्या वेळी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. जेवणाचा टेबल हे शिष्टाचार, संयम शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल उपकरणांच्या व्यत्ययाशिवाय एकत्र बसण्याची दुर्मिळ संधी असते. घरच्यांना हळू जेवणाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि स्वयंपाक करणाऱ्या आईचे रोज आभार मानावे लागतात. मुले सहानुभूती शिकतात, चालू घडामोडींबद्दल जाणून घेतात आणि हळूहळू आपले मत मांडू लागतात. चित्रपट, पुस्तके, व्यवसाय आणि राजकारणावर चर्चा होते. मी सर्व तरुण पालकांना आग्रहाने सांगेन की त्यांनी अमांडा रिपली यांचे ‘द स्मार्टेस्ट किड्स इन द वर्ल्ड’ हे पुस्तक नक्की वाचावे. यात टेबलवर चर्चा सुरू करण्याचे उत्तम मार्ग सांगितले आहेत. फंडा असा की- कुटुंब म्हणून एकत्र जेवणे हे एखाद्या प्रकल्पापेक्षा कमी नाही. म्हणूनच याला ‘एफडीपी’ म्हटले गेले आहे. प्रत्येक जेवणाच्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपली आई जी मेहनत घेते, त्याचे खूप कौतुक झाले पाहिजे, कारण ती भावी पिढीला एक उत्तम माणूस बनवण्याचे काम करत असते.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्प यांची तीन वर्षे उलथापालथीची असतील
आजच्या भू-राजकारणात जो खेळ सुरू आहे, त्याला ताकद वाढवण्याचा आणि वेळ साध्य करण्याचा खेळ म्हणता येईल. ही केवळ एकाविरुद्ध दुसऱ्याची स्पर्धा नाही.यात एकाची ताकद वाढली की दुसऱ्याची कमी होते असे नाही, तर उलट एकाची ताकद वाढली की दुसरा त्यापेक्षाही जास्त ताकद वाढवतो. तुमच्याकडे जेवढी शक्ती आणि फायदा उठवण्याची क्षमता असेल, तेवढाच वेळ तुमच्या हातात असतो. आता भारत या समीकरणात कुठे आहे, हे पुढे समजेलच. जरा लेसोथो या देशाबद्दल विचार करा. केवळ २३ लाख लोकसंख्या असलेला हा डोंगराळ देश चहूबाजूंनी दक्षिण आफ्रिकेने वेढलेला आहे. गरिबीशी झुंजणाऱ्या या देशात एड्सग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि तिथले दरडोई उत्पन्न पाकिस्तानच्या तुलनेत निम्मे आहे. पण त्यांच्याकडे एक विशेष औद्योगिक ताकद आहे. या देशाला जगाचे ‘जीन्स केंद्र’ म्हटले जाते. येथील गारमेंट उद्योग ५०,००० लोकांना रोजगार देतो आणि सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो. त्यांच्या निर्यातीचे मूल्य त्यांच्या जीडीपीच्या १०% इतके आहे. ही ताकद त्यांना ‘आफ्रिकन ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी ॲक्ट’ (एजीओए) अंतर्गत अमेरिकेत विनाशुल्क व्यापार करण्याच्या सुविधेमुळे मिळाली होती, पण २०२५ मध्ये ट्रम्प आले, तेव्हा हा कायदा हटवण्यात आला. उलट लेसोथोवर ५०% चा ‘लिबरेशन डे’ टॅरिफ (शुल्क) लादण्यात आला, ज्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली. नंतर हे शुल्क १५% पर्यंत कमी केले असले,तरी आता लेसोथो भारत, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या उत्पादकांशी स्पर्धा करू शकत नाही.त्यांनी आता ‘आपत्ती काळ’ घोषित केला आहे. लेसोथो हे अशा देशांचे उदाहरण आहे ज्यांच्याकडे ना ताकद आहे ना वेळ. त्यांची अर्थव्यवस्था ट्रम्प पायउतार होण्याची तीन वर्षे वाट पाहू शकत नाही. याउलट चीनकडे सर्वाधिक ताकद आणि वेळ आहे. व्यापारात चीन विक्रेता (अत्यंत आवश्यक खनिजे आणि चुंबक) आणि खरेदीदार (सोयाबीन, मका) अशा दोन्ही रूपांत मजबूत आहे. लष्करी ताकदीत ते अमेरिकेच्या बरोबरीला पोहोचत आहे. अमेरिकेचे लक्ष इतरत्र असताना आणि रणनीतिक दबाव कमी असताना, चीन आपली ताकद एवढी वाढवू शकतो की, ट्रम्प यांच्यानंतर येणारा कोणताही नेता त्यांची बरोबरी करू शकणार नाही. जर या मोजमापात लेसोथो सर्वात खाली आणि चीनसर्वात वर असेल, तर बाकी देशांचे काय? युरोपचे संकट आणि लेसोथोचे संकट यांची तुलना करणे कदाचित विचित्र वाटेल, पण तसे नाही. युरोपला याची जाणीव म्युनिख सुरक्षा परिषदेत झाली, जेव्हा त्यांना समजले की त्यांची ताकद कमी आहे आणि ते सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. आता ते संरक्षणावरील खर्च वाढवतील, पण स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागतील. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे आणि १५५-मिमी तोफा तुम्ही सहज ऑर्डर करून मागवू शकत नाही. शिवाय लढण्यासाठी नागरिकही तयार करावे लागतात. जेव्हा पुतीन तुमच्या दारात उभे असतात, तेव्हा तुमच्याकडे वेळ उरत नाही. चीनच्या तुलनेत अमेरिकेची ताकद आजही जास्त आहे, पण त्यांच्याकडे वेळ फक्त ट्रम्प यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळापर्यंत आहे. अमेरिका ही जगातील निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांच्याकडे टॅरिफची शक्ती आहे. त्यांचे सैन्य सर्वात प्रबळ आहे आणि मित्रराष्ट्र ८० वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत. युरोप, ब्रिटन, जपान,दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि तैवान त्यांच्यावर अवलंबून आहेत. भारतासारख्या मित्रदेशांनाही चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेची गरज आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, एआयमधील आघाडी आणि जगाचे राखीव चलन असलेला डॉलर अमेरिकेकडे आहे,पण ट्रम्प यात गुंतवणूक करण्याऐवजी ही ताकद खर्च करत आहेत. यामुळे अमेरिकेची शक्ती घटत आहे आणि वेळ हाताबाहेर जात आहे. तीन वर्षांनंतर अमेरिका कदाचित एक वेगळीच महासत्ता असेल. तेव्हा ते चीनच्या मागेपडतील का? मित्रराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवतील का?‘ग्रीनलँड’ हे नाव लक्षात ठेवा. भविष्यात असाच एखादा अनपेक्षित नेता आला तर काय होईल, याची चिंता मित्रराष्ट्रांना असेलच. तसे पाहता अमेरिकेकडे वेळ फक्त तीन वर्षांचाच नाही,तर पुढच्या निवडणुकीपर्यंत किंवा फक्त १० महिन्यांचाही असू शकतो, जर मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प कमकुवत झाले तर हे एक महत्त्वाचे तथ्य दर्शवते—लोकशाही देशांकडे वेळेची मर्यादा असते. पुढच्या १ ते ५ वर्षांत या सर्वदेशांत निवडणुका होतील. इस्रायलकडे सध्या आघाडी आहे. आशिया आणि आफ्रिकेच्या सीमेवर असलेली ही एक पाश्चात्य लोकशाही असून अमेरिका, युरोप आणि भारताचा महत्त्वाचा मित्र आहे, पण निवडणूक किंवा न्यायालयाच्या निर्णयामुळे नेतन्याहू यांना पायउतार व्हावे लागू शकते. त्यांच्यानंतर एक वेगळाच इस्रायलसमोर येऊ शकतो. वेळेची मर्यादा हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, पण हे जिनपिंग, पुतीन किंवा मुनीर यांना लागू होत नाही. उत्तर कोरियासारखी हुकूमशाही असो किंवा पाकिस्तानसारखी मिश्र हुकूमशाही, तिथे वेळेचे बंधन नसते. मात्र, अशा देशांत अचानक मोठे बदल घडू शकतात. आता प्रत्येक देश हा खेळ शिकत आहे. काही देशनवीन मित्र शोधत आहेत, तर काही पूर्वी दुर्लक्षित असलेल्या देशांना महत्त्व देत आहेत. भारत आणि युरोप हे याचे मोठे उदाहरण आहेत. या बदलत्या जगाने भारताला अधिक खुल्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठेचे फायदे पाहण्यास भाग पाडले आहे. रशिया, इराण,तुर्की, सौदी अरेबिया आणि यूएई सारखे देशही स्वतःलाया स्पर्धेसाठी तयार करत आहेत. ताकद आणि वेळेच्या मोजमापात आपण कुठे आहोत? आपली ताकद सध्या मर्यादित आहे, ज्याचा प्रत्यय ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आला, जेव्हा आपले ३२ धोरणात्मक भागीदार असूनही फार कमी जण पाठीशी उभे राहिले. भारताची ताकद वाढवण्याचा मार्ग म्हणजे जीडीपी वाढवणे,आर्थिक सुधारणा करणे आणि बाजारपेठ खुली करणे हाच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आम्ही रणनीती बदलली;करारांची तयारी दर्शवलीट्रम्प यांचा कार्यकाळ आपल्या संयमाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारा असेल.भारताने आपली रणनीती बदलली आहे,व्यापार करार केले आहेत, आर्थिक सुधारणा केल्या आहेत आणि संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आहे. दीर्घकाळापासून रखडलेली खरेदीही सुरू झाली आहे. यालाच ताकद वाढवणे आणि वेळ मिळवणे असे म्हणतात.
शशी थरूर यांचा कॉलम:अंतराळ क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवलेले असावेत
अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने प्रस्थापित केला. हे सर्व इतक्या कमी बजेटमध्ये साध्य करण्यात आले, जेवढ्या खर्चात हॉलीवूडच्या एखाद्या अंतराळपटाच्या प्रसिद्धीचा खर्चही निघणे कठीण असते.मात्र, गेल्या एका वर्षात इस्रोच्या गौरवशाली कामगिरीवर तीन प्रमुख मोहिमांच्या अपयशाची सावली पडली आहे, ज्यामध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अयशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. ‘किफायती नवोन्मेष’ आणि ‘अढळ विश्वासार्हता’ या दोन स्तंभांवर उभ्या असलेल्या कार्यक्रमासाठी हा केवळ तांत्रिक धक्का नाही, तर तो प्रतिमेचाही प्रश्न आहे. पीएसएलव्ही गेल्या ३० वर्षांपासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा मुख्य आधार राहिले आहे. याच रॉकेटने भारताला चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचवले आणि जवळपास ४०० परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर भारताला एक ओळख मिळवून दिली. पण अलीकडेच पीएसएलव्ही-सी ६१ (मे २०२५) आणि पीएसएलव्ही-सी ६२ (जानेवारी२०२६) या मोहिमांदरम्यान तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वी निरीक्षण आणि सामरिक महत्त्वाच्या उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटना इस्रो आणि त्यांच्या मूळ उद्देशांमधील वाढते अंतर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात भारताचा अंतराळ कार्यक्रम जनतेच्या गरजांवर आधारित होता. उपग्रह तंत्रज्ञानाला विकासाचे साधन बनवले, तर ते लोकांचे जीवन बदलू शकते, अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते आणि जगात भारताची स्थिती नव्याने परिभाषित करू शकते, असात्यामागील विचार होता. इस्रोने हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी उपग्रहांची एक भक्कम यंत्रणा विकसित केली, जी लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी ठरली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आणि त्यानंतरच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट मालिकेमुळे दुर्गम गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचली. यामुळे वंचित लोकांसाठी टेलिमेडिसिन शक्य झाले आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जे एरवी मागे राहिले असते.पंजाब आणि तामिळनाडूच्या शेतात शेतकरी‘रिसोर्ससॅट’सारख्या उपग्रहांच्या माहितीचा वापरपिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जलव्यवस्थापनासाठी करतात. चक्रीवादळाच्या काळात इस्रोच्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांमुळे संवेदनशील भागातील लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचतात. मात्र, अलीकडील घटना असे संकेत देतात की, इस्रोची वाढती महत्त्वाकांक्षा आता गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठासाखळीवर ताण निर्माण करत आहे. समस्या संसाधनांचीही आहे. ज्या मर्यादित बजेटमध्ये भारताने आपली मागील यशाची शिखरे गाठली, तोच आता भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आज भारत अंतराळ क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २ अब्ज डॉलर्स खर्च करतो, तर चीनचा खर्च १६ अब्ज डॉलर्स आणि अमेरिकेचा खर्च २५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या भारत २१ सक्रिय निरीक्षण उपग्रह चालवत आहे, तर चीन १,००० हून अधिक उपग्रहांचे संचालन करत आहे, ज्यापैकी २५० उपग्रह केवळ संरक्षणासाठी समर्पित आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताचा अंतराळ कार्यक्रम ही चैनीची गोष्ट नाही तर ते आपल्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू, सुरक्षेचा स्तंभ आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आहे. सुदैवाने इस्रोनेयापूर्वीही अनेक आव्हानांवर मात केली आहे आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांबद्दल कोणतीही शंका नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) अंतराळ क्षेत्र केवळ वैज्ञानिक कुतूहलाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचे एक धोरणात्मक क्षेत्र बनत आहे. संसाधनांच्या टंचाईकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. यादिशेने आपल्याला धोरणात्मक पुनर्रचनाकरणे आवश्यक आहे.
पवन के. वर्मा यांचा कॉलम:एक देश म्हणून आपण आपले राष्ट्रीय हित जपायला हवे
१९ व्या शतकात वसाहतवादाने लष्करी शक्तीच्या जोरावर देशांना लुटले. त्यानंतर नव वसाहतवादाने लष्करी बळासोबतच आर्थिक ताकदीचा वापर करून देशांना गुलामगिरीत ढकलले. आज ट्रम्प यांचे ‘टॅरिफ साम्राज्यवाद’ आपल्यासमोर आहे. साहजिकच,भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये काही गोष्टींची देवाणघेवाण होणे अपेक्षितच होते, त्यामुळे घाईघाईने कोणताही उत्साह दाखवणे किंवा टीका करणे योग्य नाही.मात्र, या कराराचे जे तपशील समोर आले आहेत, त्यामध्ये एक चिंतेचा विषय आहे की, अमेरिका आपल्या तेल खरेदीवर नियंत्रण ठेवत आहे का? अमेरिकन सरकारने एका ‘मॉनिटरिंग कमिटी’च्या स्थापनेसाठी अध्यक्षीय आदेश ही जारी केला आहे. ही समिती भारत रशियाकडून ‘थेट किंवा अप्रत्यक्षपणे’ तेल खरेदी करणार नाही, यावर लक्ष ठेवेल. अशी कोणतीही व्यवस्था आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखीआहे. परराष्ट्रमंत्र्यांनी यावर इतकेच म्हटले आहे की,‘आमच्या पर्यायांमध्ये राष्ट्रीय हितच केंद्रस्थानी राहील, जे पुरेसा पुरवठा, रास्त दर आणि पुरवठ्याची विश्वासार्हतायावर अवलंबून असेल.’ भूतकाळातही भारताने नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताची व्याख्या ‘रणनीतिकस्वायत्ततेच्या’ संदर्भात केली आहे. याचा अर्थ जगापासून अलिप्त राहणे किंवा केवळ आदर्शवाद पाळणे असा नव्हता. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेल्या एका महान राष्ट्राला हा अधिकार असलाच पाहिजे की, त्याने कुणाशी व्यापार करावा, कुणाशी मैत्री ठेवावी आणि आपल्या लोकांच्या कल्याणाचे रक्षण कसे करावे. हा सिद्धांत भारताने कधीही सोडलेला नाही. प्रश्न असा आहे की, एखादा तिसरा देश एका सार्वभौमराष्ट्राला अशा सूचना देऊ शकतो का की त्याने काय खरेदीकरावे, कुणाकडून करावे, किती प्रमाणात करावे आणि कोणत्या दराने करावे? सवलतीच्या दरात तेल उपलब्ध असतानाही भारताने आपले ऊर्जा-पर्याय मर्यादित ठेवावेत असे सुचवणे, म्हणजे भारताने आपल्या सार्वभौम अधिकारांकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. जर सवलतीच्या दरात तेल मिळत असेल, तर ते खरेदी करण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असायला हवा. जेव्हा निर्बंध एकतर्फी लादले जातात आणि तेस्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्यावर लादले जातात, तेव्हा ते देशांच्या ‘समान सार्वभौमत्वाच्या’संकल्पनेला तडा देतात. अशा दबावापुढे झुकणे म्हणजे त्यासत्तेचा स्वीकार करणे होय, जिथे काही देश केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही कायदे बनवतात. जे या कराराचे समर्थन करत आहेत, त्यांचा असा युक्तिवाद आहे की अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण ती धोक्यात आणू शकत नाही. हे निःसंशयपणे खरे आहे, परंतु भागीदारी टिकवण्यासाठी परस्पर आदर असणे आवश्यक आहे. भारताने वारंवार दाखवून दिले आहे की,तो कुणाचेही अनुकरण न करताही मजबूत संबंध ठेवू शकतो. ही स्वायत्तताच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवते, केवळ आज्ञा पाळणारा भागीदार नाही. जर आज भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतचे निर्बंध स्वीकारले, तर उद्या संरक्षण खरेदी, तंत्रज्ञान भागीदारी किंवा अमेरिकेला न पटणाऱ्या देशांशी संबंध ठेवण्याबाबतही दबाव आणला जाऊ शकतो. एकदा का अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बाह्य ‘व्हेटो’चा सिद्धांत स्वीकारला, तर तो मार्ग अत्यंत धोकादायक ठरेल. हा युक्तिवाद अमेरिकेसोबतच्या भागीदारीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराचा बचाव करण्यासाठीही नाही. ही मूलभूत तत्त्वांची गोष्ट आहे.भारताचे राष्ट्रीय हित तेव्हाच सुरक्षित राहते जेव्हा पर्यायांची निवड नवी दिल्लीत होते. एका स्वतंत्र देशाला आपल्या इच्छेनुसार खरेदी करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने वारंवार हे सिद्ध केले आहे की,कुणाच्याही दबावाखाली न येता तो जगातील विविध महासत्तांशी भक्कम संबंध ठेवू शकतो. खरं तर, ही स्वायत्तता आणि स्वतंत्र बाणाच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवतो.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चारित्र्य मजबूत असेल तर ईश्वरीय शक्तीही सोबत असते
कोणावर तरी कलंक लावणे हे आजकाल एका व्यवसायासारखे झालेआहे. जेव्हा एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा त्यातील सत्य शोधणे मोठे कठीण असते. जगात जेवढी कामे सोपी आहेत, त्यामध्ये सर्वात सोपे काम म्हणजे कोणाचे तरी चारित्र्यहनन करणे. तुम्ही एखाद्याच्या चारित्रावर शिंतोडे उडवले तर तुमचे काहीच जाणार नाही, पण समोरच्याचे आयुष्य मात्र तो डाग धुता धुता निघून जाईल. दोन व्यक्तींवर कलंक लागला होता आणि त्यांनी त्याचे निवारणही अतिशय उत्तमरीत्या केले. श्रीकृष्णावर स्यमंतक मणीमुळे चोर आणि खुनी असल्याचा कलंक लागला होता. भरतावर सत्तेच्या षडयंत्राचा कलंक लागला होता. या दोघांनीही अत्यंत धैर्याने आणि विवेकाने तो कलंक पुसून टाकला. आज ज्या लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, जर त्यांचे चरित्र मजबूत असेल तर त्यांचा विजय नक्कीच होईल, कारण ईश्वरीय शक्ती त्यांच्या पाठीशी असते. म्हणूनच समाजात असे चित्र पाहायला मिळते की, जेव्हा उंच इमारत हलवणे कठीण असते, तेव्हा काही लोक फक्त तिच्या काचा फोडतात.
एन. रघुरामन यांचा कॉलम:डेटिंगची अर्थव्यवस्था ‘सोल्जर पेमेंट’पासून ‘ब्यूटी टॅक्स’पर्यंत पोहोचली
डेटिंगचे बिल कोणी भरावे, हा वाद स्वतः डेटिंगइतकाच जुना आहे. 1980 च्या दशकात जेव्हा मी अविवाहित तरुण होतो तेव्हा मित्रांमधील या वादाच्या केंद्रस्थानी मी असायचो. माझे सहकारी त्यांच्या रोमँटिक भेटींच्या खर्चासाठी माझ्याकडून पैसे उधार घ्यायचे. मी क्वचितच नकार द्यायचो, पण ‘सोल्जर पेमेंट’ची सूचना देण्याची संधीही सोडायचो नाही-म्हणजेच प्रत्येकाने स्वतःच्या खाण्याचा खर्च स्वतः देणे. माझ्या या सूचनेला लगेच विरोध व्हायचा. ‘अशा विचाराने तुझे कधीच लग्न होणार नाही’ असा इशारा ते मला द्यायचे. महिन्याच्या शेवटी आम्ही एका प्रिंटिंग प्रेसच्या तुटलेल्या बाकांवर बसून ‘कटिंग चहा’ प्यायचो. कारण आम्हाला तेव्हा तेवढेच परवडायचे. तेव्हा ते मला प्रेमसंबंधांचे ‘ज्ञान’ द्यायचे. त्यामागचे लॉजिक साधे असायचे. मुख्यतः पुरुषच कमावते असतात आणि भविष्यात घर चालवणारे असतात. डेटचे बिल भरून पुरुष आपली क्षमता सिद्ध करतो की तो आता लग्नासाठी तयार आहे, असा त्यांचा तर्क असे. आता 2026 मध्ये येऊ. परिस्थिती खूप बदलली आहे तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ अपेक्षा तिथेच अडकलेल्या आहेत. आज महिला अधिक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. अनेक महिला (सर्व नाही) पारंपरिक कौटुंबिक दबावातून मुक्त होऊन स्वतःच्या हिमतीवर काम करत आहेत. तरीही पहिल्या डेटचे बिल पुरुषानेच भरावे हा रिवाज कायम आहे. विशेष म्हणजे पुरुषाच्या ‘घर चालवणाऱ्या’ दर्जाची बरोबरी आता महिलांच्या ‘ब्यूटी टॅक्स’शी केली जाऊ लागली आहे. ‘ब्यूटी टॅक्स’ म्हणजे समाजाच्या आधुनिक सौंदर्य मानकांना पूर्ण करण्यासाठी महिला जो खर्च करतात तो वेगाने वाढत आहे. प्रोफेशनल मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरपासून नियमित वॅक्सिंग आणि हेअर स्टायलिंगपर्यंत स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी येणारा हा ‘रनिंग कॉस्ट’ हे एक कारण सांगितले जाते की, पुरुषाने बिल का भरावे? या दृष्टिकोनातून पाहिले तर महिला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा आर्थिक वाटा खर्च करून झालेला असतो. अलीकडील सर्वेक्षणांनुसार हा विचार आणि पारंपरिक पुरुषी शिष्टाचार मिळून हे ठरवतात की डेटिंग आजही बऱ्याच अंशी लिंग-आधारित पॅटर्नवरच चालते. यामागचे मानसशास्त्र मनोरंजक आहे. एका सर्वेक्षणानुसार, 30% महिला पुरुषांनी बिल भरण्याला ‘इन्टेंशनल डेटिंग’चा संकेत मानतात. त्यांच्यासाठी हे पैशाचे प्रदर्शन नसून पुरुषाने त्यांची निवड केली आहे आणि तो नात्यात गुंतवणूक करण्यास तयार आहे, असा संदेश असतो. दुसरीकडे, 17% महिलांचा असा तर्क आहे की जर नात्यात गांभीर्य असेल तर बिल वाटून घेणे हा उत्तम मार्ग आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे 67% पुरुष अजूनही असे मानतात की सामाजिक शिष्टाचारानुसार पहिल्या भेटीचा खर्च त्यांनीच केला पाहिजे, मग त्यांचे उत्पन्न समोरच्या महिलेपेक्षा कमी का असेना. यावरून मला माझ्या आयुष्यातील एक वैयक्तिक किस्सा आठवला. एका छोट्या काळात माझे उत्पन्न माझ्या पत्नीपेक्षा 250 रुपयांनी कमी होते. मला घरी जेवण करणे आणि काटकसर आवडायची, ज्याचा माझ्या कमाईशी काही संबंध नव्हता. पण पत्नीला महिन्यातून किमान एकदा बाहेर जाणे आवडायचे. सवयीनुसार त्या रात्री मी साधी खिचडी किंवा दही-भात ऑर्डर करायचो. सुरुवातीला तिला वाटले की माझे हे साधे जेवण म्हणजे बाहेर येण्याला माझा मूक विरोध आहे. मात्र, कालांतराने तिला समजले की ही सहजपणे माझी आवड आहे. तिने अशा जेवणाचे पैसे देण्यात कधीही खंत मानली नाही आणि मलाही कधी न्यूनगंड वाटला नाही. डेटिंगचा मूळ उद्देश हा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे जाणवून द्यावे की तुम्ही त्यांची ‘निवड’ केली आहे. तुम्ही त्यांच्या वेळेचा आणि उपस्थितीचा आदर करता. मग ते ‘सोल्जर पेमेंट’ असो किंवा पारंपरिक ट्रीट-त्यातून एकमेकांबद्दलची गुंतवणूक आणि आदर दिसला पाहिजे, तो वादाचा मुद्दा ठरू नये.
मुंबईतील पवई तलावाच्या काठावरच्या काही संध्याकाळी सहसा शांत असतात. पण त्या संध्याकाळी ती जागा निष्ठेच्या एका खोल उदाहरणाची साक्षीदार बनली. 70 ते 80 वयोगटातील काही निवृत्त व्यक्ती आपल्या रोजच्या गप्पांसाठी तिथे बसल्या होत्या. जसे घड्याळात पाच वाजले तसे त्यातील सर्वात टापटीप कपडे घातलेली एक व्यक्ती उठून उभी राहिली. “अरे मित्रा, थांब ना!’ एकाने आग्रह केला. “आइस्क्रीम पाच मिनिटांत येईल. थोडा वेळ बस, मग जा.’ त्यांनी नकार दिला आणि घरी जाण्यावर ठाम राहिले. पत्नीसोबत संध्याकाळचा चहा घेण्यासाठी. तेव्हाच एका तिसऱ्या मित्राने ज्याच्या आवाजात थोडी कडवट उदासी होती म्हटले, “एवढी घाई काय आहे? त्या तर आता स्मृतिभ्रंशाच्या (डिमेन्शिया) धुक्यात हरवल्या आहेत. त्यांना काहीच आठवत नाही. तू आला आहेस की नाही हे त्यांना कसं कळणार?’ त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. त्यांची नजर तीक्ष्ण होती आणि आवाजात संध्याकाळच्या हवेलाही थांबवणारी स्थिरता होती. ते म्हणाले, “त्यांना आठवत नाही, पण मला तर डिमेन्शिया झालेला नाही. मला आठवतंय त्या कोण आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासोबत तिथे असणं ही माझी जबाबदारी आहे.’ त्या शब्दांत इतका जडपणा होता की सर्वजण काही क्षणांसाठी शांत झाले. ही प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे. अशी बांधिलकी, जी समोरच्याला समजण्यापलीकडेही टिकून राहते. काही वर्षांपूर्वीच्या या अनुभवाची आठवण मला तेव्हा झाली, जेव्हा शुक्रवारी रात्री एका पार्टी अँकरने मला विचारले की, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही अशी कोणती गोष्ट आहे, जी रोमान्स जिवंत ठेवते? माझे उत्तर साधे होते : लहान, न दिसणारे प्रयत्न तिने मला उदाहरण मागितले. कदाचित तिला एखाद्या भव्य कथेची अपेक्षा होती. पण मी सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल बोललो. मी श्रोत्यांना सांगितले की, माझ्या पत्नीची स्वच्छतेबद्दलची संवेदनशीलता ओळखून मी सार्वजनिक ठिकाणी नेहमी लक्ष ठेवतो. जसे मी एखाद्या हाउसकीपिंग टीमला काम संपवताना पाहतो, मी तिला लगेच सांगतो वॉशरूम आता स्वच्छ आहे, तुला वापरायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. ती अँकर भावुक झाली. तिने पाहुण्यांना सांगितले की, “बघा, हे किती योग्य बोलत आहेत. रोमान्स म्हणजे जगाला दाखवण्यासाठी हार्ट डिझाइनचा चॉकलेट बॉक्स नाही, तर कोणासाठी तरी केलेलं एखादं विचारपूर्वक ‘अदृश्य’ काम आहे.”माझ्यासाठी खरे प्रेम म्हणजे कोणतेही प्रदर्शन नाही. ते तितकेच साधे असू शकते, जितके माझे वडील ऑफिसमधून परतताना एक आण्यात विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा आईसाठी आणायचे किंवा रोज ठरावीक वेळी न चुकता चहासाठी हजर राहण्याचा तो शांत निर्णय. कारण हृदय आपले कर्तव्य कधीच विसरत नाही. रोमान्स ही अशी गोष्ट नाही, जिला एखाद्या साच्यात बसवता येईल. मी अशा पतींना ओळखतो, जे स्वयंपाकघरात स्टूलवर बसून कोथिंबीर साफ करतात किंवा भाजी चिरून देतात, जेव्हा त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. ते भाजी चिरण्याला साधे घरगुती काम मानत नाहीत; त्या बहाण्याने ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात की आपल्या जोडीदाराला भावनिक आणि शारीरिक सुखासाठी काय हवे आहे. ते आयुष्य एकत्र अनुभवतात. दररोज पत्नीसाठी भाजी चिरणे हे खरं तर रोज एकमेकांना ‘डेट’ करण्यासारखेच आहे, जो रोमान्स जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. संयुक्त कुटुंबात जिथे आई-वडील किंवा ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी असते अशी जोडपी सकाळी लवकर उठतात आणि स्वयंपाकघरात थोडा वेळ एकत्र घालवतात. कारण नंतर दोघांनाही अनेक भूमिका पार पाडायच्या असतात. मला नाही वाटत की अशी जोडपी आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कधी महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करत असतील. ते सामाजिक दबाव, चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या काल्पनिक रोमान्सचे ओझेही वाहत नाहीत. एक गजरा कदाचित किरकोळ वाटू शकतो, पण विश्वास ठेवा, त्याचा प्रभाव खोल असतो. तो महाग नसतो, पण त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. ते एकमेकांना हे सांगण्याचे एक साधे माध्यम आहे की ‘मी तुझा विचार करतोय.’ प्रेम कदाचित ‘परफेक्ट’ नसेल, पण ते ‘सुंदर’ नक्कीच असू शकते. फंडा असा की - स्वतःला विचारा अशा कोणत्या लहान-लहान गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अशा प्रकारे करू शकता, ज्याची त्यांना खरोखर गरज होती.
अगदी लहानपणापासून काही मोजक्या जागा अशा आहेत, ज्या मला नेहमीच भारी वाटतात. तिथं जाणं येणं आनंदाचा भाग असतो. मग ते मामाच्या गावाला जायचो तिथलं महादेवाचं खूप जुनं मंदिर आणि तिथल्या चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका असो किंवा अगदी घराजवळची भाजी मंडई. घरापासून अगदी चालत चालत जावं इतक्या जवळ! अगदी सुरुवातीलाच भरपूर फळांचे गाडे, थोडं पुढे मोठं पिंपळाच झाड आणि त्याच्याभोवती पार. त्या पारावर छोटंसं हनुमानाचं मंदिर. तिथून थोडं पुढे विड्याची पानं, सुपारी, फुलं असं पूजेचं साहित्य घेऊन बसलेली मंडळी. तिथून पुढे कुठे फळभाज्यांचे गाडे लावत असलेले काका, कुठे ओट्यावर हिरव्यागार भाज्यांवर पाणी शिंपडणार्या आजी. कुणी वजनाकरता वाद करतंय, कुणी हिशेब करतंय, कुणी घासाघीस करतंय, असे कितीतरी वेगवेगळे संवाद एकाच वेळी सुरू असायचे. शिवाय ग्राहकांना बोलवण्यासाठी एक सारखा ऐकू येणारा तारसप्तकामधला आवाज. तिथं फिरताना जाणवत राहणारा, मातीत मिसळलेला पाण्याचा, भाज्यांचा तो एक वेगळाच गंध! आठवतं तेव्हापासून कधी आईसोबत, आजीसोबत तर कधी बाबांसोबत भाजी आणायला गेले आहे, पण प्रत्येकासोबतचा अनुभव मात्र वेगळा असायचा. आजीसोबत गेले की, मला तिची पैसे ठेवायची छोटी पर्स देऊन टाकायची. मग जिथे भाजी घ्यायचो, तिथे मी बरोबर मोजून नोटा द्यायचे. सॉलिड वाटायचं. शिवाय येताना हमखास समोरच्या विष्णू मंदिरात किंवा थोडं पुढे दत्त मंदिरात घेऊन जायचे. मला हे रुटीन मोडलेलं अजिबात आवडायचं नाही. आजीसोबतची मंडईची भटकंती, ही मंदिरात न जाता पूर्ण व्हायचीच नाही! आईसोबत भाजी आणायला गेले की आधी तिच्या ठरलेल्या एका भाजीवाल्या मावशींकडे जायचो. त्या छान ओळखीचं हसायच्या. भाज्यांचे दर आईला पक्के माहीत असायचे, त्यामुळे थोडीफार घासाघीस व्हायचीच. तरीही, आई दरवेळी त्याच मावशींकडे भाजी घ्यायची आणि त्याही दरवेळी तेवढं आणि तसंच हसायच्या, बोलायच्या. मला आपलं छोट्या पिशव्या घेऊन मागे फिरायचं, इतकंच काम! थोडी मोठी झाले तशी आई मला बाबांसोबत भाजी आणायला पाठवायला लागली, पिशवीत यादी देऊन. बाबांना सगळं मार्केट फिरून यायला आवडायचं त्यामुळे त्यांच्यासोबत पार दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर व्हायची. ते अगदी एखादा रुपयाही कमी न करता भाज्या घेऊन टाकायचे! संध्याकाळ होताना कधी गेलोच मार्केटला तर दिवसभर भाज्या न विकला गेलेला कुणी असेल तिथूनच भाजी घ्यायचे. माझं काम फक्त सगळी यादी घेतली आहे, हे पाहणे इतकंच असायचं. आता हे सगळं एकदम आठवलं, ते आज भाजी आणायला गेले तेव्हा. लग्नानंतर या भाजी मंडईत जाण्याच्या अनुभवात नवऱ्यासोबत भाजी घेण्याचा नवा अनुभव जोडला गेला. नजीकच्या दिवसातले काही विशेष प्रसंग, फ्रिजमधल्या उरलेल्या गोष्टी, खावेसे वाटणारे पदार्थ आणि दोघांच्या आवडीनिवडी या सगळ्याचा लसावी काढून मग भाजी घ्यायची! सुरुवातीला ही कसरत आम्ही ऑनलाइन करत असू, पण त्यामध्ये काही गंमतच नव्हती. अशातच आता घरापाशी शेतकऱ्यांकडूनच एक मंडई सुरू झाली असं कळलं आणि तिथे जाणं झालं. पालक, मुळा, लाल माठ, शेवगा, घेवडा किती नि काय काय! सगळी भाजी खरेदी करता करता उद्या काय करूया, ही भाजी लिंबू पिळून कशी लागते इथंपासून ते कवळी भेंडी कशी ओळखावी, किडका टोमॅटो, किडलेलं वांग कसं ओळखावं, अशा किती तरी गप्पा सुरू होत्या. त्या सगळ्यात भरलेल्या पिशव्या घेऊन आम्ही घराकडे निघालो. माझ्या मनात सोलापूरच्या मार्केटच्या या सगळ्या आठवणी भरून आलेल्या असतानाच हातातली भाजीची पिशवी स्वतःकडे घेत नवरा कानात कुजबुजला, काय छान वाटलं हे. असं तुझ्यासोबत भाजी खरेदी करायला मला फार आवडतंय! आणि एकदम हेही मार्केट मला तेवढंच आवडून गेलं!
एन. रघुरामन यांचा कॉलम:प्रेमाची अनेक रूपे अन् ते कोणत्याही प्रकारे व्यक्त करणे शक्य
गेल्या तीन दशकांपासून प्रत्येक शनिवारची सुरुवात अशीच झाली आहे. डिजिटल अलार्म वाजण्यापूर्वी मी जागा होतो. घर पहाटेच्या आगळ्या मखमली शांततेने वेढलेले असते. मी एक कप फिल्टर कॉफी बनवतो आणि एका शांत कोपऱ्यात बसतो. मंद प्रकाशात फोनद्वारे माझ्या 88 वर्षीय मामांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांची श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे आमचे गप्पा मारणारे फोन कॉल्स व्हॉट्सॲपच्या शांत, तेजस्वी जगात बदलले आहेत. स्क्रीनचा हलका निळा प्रकाश कुणालाही त्रास देत नाही. अगदी माझ्या पाळीव प्राण्याला नाही. कारण ते अगदी थोड्याशा हालचालीबद्दल संवेदनशील असतात. ते तसेच झोपून राहतात. त्यांच्या नजरेत आम्ही त्या क्षणी जणू ‘काहीही उपयुक्त’ करत नसतो. परंतु आम्ही आमच्या जीवनाला धरून आहोत. आम्हा दोघांनाही केवळ आमचे कुटुंब शारीरिक व भावनिकदृष्ट्या चांगले आहे ना, एवढीच ख्यालीखुशाली जाणून घ्यायची आहे. अनेकदा आम्ही काहीही बोलत नाही तरीही आम्ही सर्व गोष्टींबद्दल बोलतो. त्यांची मुले म्हणजे माझे चुलत भाऊ परदेशात राहतात. ते अनेकदा विनोदाने म्हणतात, त्यांचे वडील माझ्याशी त्यांच्यापेक्षा जास्त बोलतात. ते चिडवतात की मीच त्यांच्या कुटुंबात राहतो. मामा मला 1940 व 50 च्या दशकात घेऊन जातात. माझ्या आईच्या तरुणपणाच्या आठवणी सांगतात. ते तिच्या शाळेत जाण्याचे, स्वयंपाक व शिवणकाम शिकण्याचे, तिच्या करुणेचे वर्णन करतात. त्यांचे शब्द माझ्या आठवणीत कायमचे कोरले जातात. आपली बहीण भावांची कशा प्रकारे दिव्यतेने काळजी घेई हेही त्यांच्याकडून मी ऐकले. त्यांना चांगले जेवण आणि विश्रांती मिळतेय याची खात्री करत असे. भाऊ थकण्यापूर्वीच तिला ते जाणवत होते. मामा 1940 आणि 50 च्या दशकातील आठवणी सांगतात. अगदी मी माझ्या बालपणीच्या आठवणींपर्यंत पोहोचत नाही तोवर. जणू काही आठवणी ऑलिम्पिक टॉर्च रिलेसारख्या एकामागून दुसऱ्याकडे जात असाव्यात. मी अनेकदा शब्दांतून प्रतिसाद देत नाही. मला गरज भासत नाही. स्क्रीनवर ‘ब्ल्यू टिक’ पाहून त्यांना माहीत कळते की मी तिथे आहे. प्रत्येक शब्द आत उतरत आहे. अचानक स्क्रीनवर एक प्रश्न येतो : “तू रडत आहेस का?’ उत्तर देण्यासाठी मला काही सेकंद लागतात. त्यांनी मला रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या भावनिक नाळेमुळे ते अशा जाणिवांना स्पर्श करतात. कदाचित मी हे लपवत होतो. ते त्यांच्या आईच्या भावंडांबद्दलची करुणा आणि त्यागाच्या कथा सांगतात. त्याग आणि वृद्धत्वाच्या वेदना ते कबूल करतात. या भावना कदाचित फोनवर हाताळता येत नाहीत. कधीकधी ते सहा महिन्यांपूर्वी ऐकलेल्या त्याच कथेची पुनरावृत्ती करतात - पण मी त्यांना कधीच थांबवत नाही. ती गोष्ट पुन्हा सांगण्याचा आनंद मी कधीच हिरावून घेऊ इच्छित नाही. आता एक अज्ञात भीती मला घेरते. मी त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकतो तेव्हा मी सर्वकाही सोडून चेन्नईला प्रवास करतो. माझे चुलत भाऊ बरोबर होते. मी त्यांच्या घराचा एक भाग झालो आहे. पण आल्यावर त्यांना मिठी मारण्याचा आनंद अल्पकाळ टिकतो. कारण आता लवकरच निरोप घ्यावा लागेल, याचे ओझे त्या क्षणी भार टाकणारे ठरते. प्रेमाचा अर्थ नेहमीच जवळ असणे असा नाही; कधीकधी त्याचा अर्थ असा होतो की ते पुन्हा पुन्हा करावे. आम्हाला हे माहीत आहे की एके दिवशी हे सर्व संपेल. मी तयार आहे की नाही हे विचालेही नाही. सध्या तरी हे साधे संभाषण पुरेसे आहे. कधीकधी आमच्या गप्पा नात्यातील भावनेवर व कधी माझ्या आईच्या आठवणींवर आधारित असतात. त्या शांततेच्या विश्वात घेऊन जातात. व्हॅलेंटाइन डे हाच आहे का? मला माहीत नाही. फंडा असा की- प्रेमाची अनेक रूपे असतात. ते व्यक्त करण्यासाठी क्वचितच एखाद्या भव्य व्यासपीठाची गरज असते. ते विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट पद्धतीने व्यक्त करण्याची गरज नाही. ते कधीही दाखवता येते.
चेतन भगत यांचा कॉलम:कोणत्याही प्रकारच्या नशेपेक्षा आयुष्याचा आस्वाद चांगलाच!
एक सकारात्मक गोष्ट ऐका : जग पूर्वीपेक्षा कमी दारूपित आहे. दारू ही एक अशी गोष्ट आहे की त्यावरकडक निर्बंध, नियंत्रण आणि कर लावला नसता तरलोकांच्या त्यावर उड्या पडल्या असत्या. एवढे असूनहीजागतिक ट्रेंड स्पष्ट आहेत : विक्री कमी होत आहे. लोकआता दारू पिऊ इच्छित नाहीत. अमेरिकेतील गॅलपपोलमध्ये असे दिसून आले की 2025 मध्ये फक्त 54%अमेरिकन लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दारू पितहोते - ही 90 वर्षांतील सर्वात कमी पातळी. काही श्रेणीविशेषतः प्रभावित झाल्या आहेत. उदाहरणार्थ- वाइनचावापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे - सुमारे 20%किंवा त्याहून अधिक. बिअरप्रेमी युरोपमध्येही बाजार संशोधन असे दर्शविते की 71% ग्राहक आता एकतरकमी दारू पितात किंवा पूर्णपणे दारू सोडून देत आहेत. भारत या जागतिक ट्रेंडला अपवाद वाटू शकतो. येथेदारूची विक्री दरवर्षी सुमारे 7% दराने वाढत आहे. पण आजही अमेरिका आणि युरोपमध्ये दरवर्षी दारूचा वापर प्रती व्यक्ती 8-9 लिटर प्रतिवर्षी होत असला तरी भारताततो फक्त 3 लिटर प्रती व्यक्ती प्रतिवर्षी आहे. भविष्यातभारतात दारूची विक्री एका विशिष्ट पातळीपर्यंतपोहोचण्याची, स्थिर होण्याची आणि नंतर कमी होण्याचीशक्यता आहे. भारतातील काही शहरी भागातही बदलदिसतो. महानगरीय भागात असे गट उदयास येत आहेत.तेथे जेन-झी ग्राहकांमध्ये बिअर आणि पारंपारिक दारूचावापर स्थिर होत आहे किंवा कमी होत आहे. पण मूलभूतप्रश्न असा आहे की जग पूर्वीपेक्षा कमी का मद्यपान करतआहे? एक कारण म्हणजे लोक पूर्वीपेक्षा जास्तआरोग्याबाबत जागरूक आहेत. कमी सिगारेट, अधिकयोग, अधिक हिरवे रस आणि कमी अल्कोहोल हेआरोग्याचे लोकप्रिय शब्द बनत आहेत. लोक‘हँगओव्हर’पेक्षा निरोगीपणाला प्राधान्य देत आहेत. दुसरेम्हणजे सामाजिक देखरेखीमध्ये लक्षणीय वाढ झालीआहे. आज प्रत्येकजण व्हिडिओ कॅमेरा बाळगतो. तोकोणत्याही क्षणी तुमचा व्हिडिओ कॅप्चर आणि शेअरकरू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी सोशलमीडियावर तुम्ही आदल्या रात्री पबमध्ये काय करत होताते उघड करू शकतो. मारामारी, अनियमित गाण्यापासूनते उलट्या आणि बेशुद्धीपर्यंत - या सर्व अल्कोहोलशीसंबंधित घटना सार्वजनिक झाल्यास गंभीर सामाजिकलज्जा निर्माण करू शकतात. नोकरी गमावणे आणिसामाजिक बहिष्कार शक्य आहे. अलिकडच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की अल्कोहोलसर्व परिस्थितीत हानिकारक आहे - अगदी कमी प्रमाणातसेवन केले तरीही. आघाडीच्या आरोग्य संस्थांनी इशारादिला की कोणत्याही पातळीचे मद्यपान खरोखर सुरक्षितमानले जाऊ शकत नाही. अशाप्रकारे आरोग्य,मानसशास्त्र आणि सोयीचा एकत्रित परिणाम मद्यपानसंस्कृतीत बदल घडवून आणत आहे. आजार आणिअपघात कमी करून आणि अल्कोहोल नसलेले पेयेआणि शांत कार्यक्रमांसारख्या निरोगी पर्यायांना प्रोत्साहनदेऊन या बदलाचा समाजावर सकारात्मक परिणामहोईल. शिवाय लोक त्यांची घरे आणि कार्यालयाबाहेरऑफलाइन भेटत असलेल्या ठिकाणांची संख्या कमी होतचालली आहे. याचा सामाजिकीकरणावर परिणाम होईल.सरकारी महसूल देखील कमी होईल. याचा परिणाम बारआणि रेस्टॉरंट्सवर देखील होईल. त्यांच्यासाठीअल्कोहोल विक्री हा महसूलाचा महत्त्वाचा स्रोत आहे.आजचे सर्वात मोठे व्यसन अल्कोहोल नाही तर स्क्रीनटाइम आणि सोशल मीडियाचा डोपामाइन-हिट्सचेआहे. मानसशास्त्रज्ञ अतिरेकी फोन वापराची तुलनाअल्कोहोलसारख्या व्यसनाशी करतात. तुम्ही मद्यपान केले नाही, तर तुम्हाला कोणाच्याहीदबावाला बळी पडण्याची गरज नाही. दारूशिवायहीजीवन सामाजिक व उत्साही असू शकते. तुम्ही पीतअसाल तर कमी करण्याचा विचार करा. तुमचे यकृततुमचे आभार मानेल. तुमचे पाकीट अधिक आधार देईलआणि तुम्हाला दीर्घकाळात बरे वाटू लागेल. तसेचलक्षात ठेवा की इतर कोणत्याही व्यसनालाअल्कोहोलची जागा घेऊ देऊ नका. त्यावर नियंत्रणठेवले नाही तर फोन, अंतहीन स्क्रोलिंग आणि लाइक्सचा ध्यास तितकाच हानिकारक असू शकतो. सामाजिक जीवन, अर्थपूर्ण नातेसंबंध, सामायिक हास्य- या अशा गोष्टी आहेत. त्या जीवनाला सार्थकबनवतात. तर, चला अल्कोहोलपेक्षा जीवनाचा अधिक आस्वादघेऊया. चिअर्स! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आज लोक पूर्वीपेक्षा जास्त आरोग्याबाबत जागरूक आहेत. कमी सिगारेट, जास्तयोग, जास्त हिरवा रस आणि कमीअल्कोहोल हे आरोग्याचे मंत्र बनत आहेत.लोक आता ‘हँगओव्हर’पेक्षा आरोग्यालाप्राधान्य देत आहेत.
डॉ. सामी महरूम यांचा कॉलम:सरकारला जनतेचा विश्वास मिळवून देण्यास एआय सक्षम
लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढलाआहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आताएआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणितथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहेकी नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्यासंकटावर उपाय बनू शकतात! ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरीफक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वासठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेतप्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे 17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.चीनही या बाबतीत आघाडीवर आहे. तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देतअसताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेतकरणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभावआहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीयव्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वीउपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमतावाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्नकरतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळवअसते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणिजनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्नकरते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलदेशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमापकरण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवाप्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत. हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्धझाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीयराजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधनअनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानताकमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडूनआलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशाहालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांचीआवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमतसर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणेनिवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्येदोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठेभाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमताप्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्यामाझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणालीविशेषतः मी त्यास भावनिकदृष्ट्या जागरूक धोरणडिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिकसाधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हेदेखील आठवण करून देऊ शकतात की कंजेशनचार्ज’ या शब्दापेक्षा स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांनाचांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागूकेल्याने राजकीय धोका वाढू शकतो. येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटितआणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआयआपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्सवेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा तेजवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचेविश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठीडिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलातआणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगतनसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय-संचालित विश्लेषणातून बातम्यामाध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीयवादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशाप्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.राजकीय संधीची खिडकी कधी उघडीआहे किंवा कधी बंद आहे हे समजूशकते.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाला शोधा आणि जगाच्या वस्तूंना सापडून दाखवा
शोधणे आणि संशोधन या भिन्न गोष्टी आहेत. आधीच आपल्याकडेअसलेल्या गोष्टीचा विसर पडतो. तेव्हा आपण तिला शोधतो. मात्रअप्राप्त असलेल्या गोष्टीचा वेध घेणे हे संशोधनात मोडते. म्हणूनचएखाद्याने देवाला शोधले पाहिजे. जगाच्या वस्तूंना सापडून दाखवलेपाहिजे. कारण देवाची प्राप्ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या गोष्टींचीप्राप्ती तर सांसारिक वस्तू म्हणजे अप्राप्तीची प्राप्ती. आजकाल एआयद्वारे अप्राप्त मिळवणे सोपे झाले आहे. ते अलीकडेचे नाही. जवळपास७५ वर्षांपूर्वी अॅलन ट्युरिंगने बुद्धीचे एक यंत्र तयार केले होते. त्याद्वारेदुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव झाला. जगभरातील देशांना हेसमजले आहे की एआयचे फायदे अद्वितीय आहेत. परंतु तोटे मोठीआपत्ती असतील. आपण या भस्मासुराचा मर्यादा ठेवून सदुपयोगकरावा. लक्ष्मण रेषा असलीच पाहिजे. जेणेकरून रावण प्रवेश करूशकणार नाही. शांती, शक्ती किंवा भक्ती रुपी सीता बाहेर जाणारनाही.
कोणत्याही समाजाची शक्ती बहुतेकदा त्याच्या संस्थांच्या प्रामाणिकतेवर मोजली जाते - उदाहरणार्थ- शाळा. यातून आपल्या तरुणांची जडणघडण होते. दुसरे म्हणजे आपल्या परिसराचे रक्षण करणारे पोलिस. या आठवड्यात देशाच्या विविध भागातील तीन घटनांमुळे चिंताजनक स्थितीनिर्माण झाली आहे. जौनपूर आणि गोव्यात पोलिस कॉन्स्टेबलने उघडपणे चोरी केली. त्रिचीमध्ये एका पालक मुख्याध्यापकांना मारहाण करतात. हे चित्र आपण या टप्प्यावर कसे पोहोचलो असा विचार करायला लावणारे आहे. कारण कायद्याची अंमलबजावणी करणारे आणि भावी पिढीला घडवणारे दोघेही मूलभूत परीक्षेत अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कथा जाणून घेऊया.... उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये गुन्हेगारांना हातकडी घालणारे हात 1.6 लाख रुपये किमतीचा नवीन आयफोनच्या मोहात जुना आयफोन बदलून देताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. कॉन्स्टेबल मिथिलेश यादव आणि धनंजय बिंद यांनी त्यांचा गणवेश सन्मानाचे प्रतीक म्हणून नव्हे तर एका किरकोळ चोरीसाठी वापरला. त्याचप्रमाणे गोव्यात कॉन्स्टेबल साईश पार्सेकर यांनी अपघातानंतर एका मरणासन्न माणसाकडून 8 लाख किमतीचे सोने चोरल्याचा आरोप आहे. हे केवळ शोषण करणारे गुन्हे नाहीत तर नैतिकतेच्या तीव्र अभावाचे सूचक आहेत. कायदा अंमलबजावणी अधिकारी एखाद्या जीवघेण्या कार अपघाताला सेवेऐवजी दरोड्याची संधी मानतो तेव्हा सामाजिक करार मोडला जातो. हे अधिकारी सक्षम होते. परंतु नैतिकदृष्ट्या कमकुवत होते. मला आश्चर्य वाटते की असे लोक सार्वजनिक सेवेत का येतात? याचे उत्तर कदाचित तामिळनाडूतील त्रिची येथील एका घटनेत आहे. के. राजा नावाच्या एका पालकाने आपल्या मुलाला ग्रुमिंग कोडचे पालन करण्यास सांगितल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाला चापट मारली. पालक शिस्त पाळणाऱ्या शिक्षकावर हल्ला करतात तेव्हा यातून मुलाला एक धोकादायक संदेश मिळतो : नियम कमकुवत लोकांसाठी असतात. अधिकार हिंसाचाराने हाताळला पाहिजे. मुलाच्या केशरचनेवरील हा वाद प्रत्यक्षात एका मोठ्या समस्येचे छोटे स्वरूप आहे. पालक शिक्षक किंवा शिष्टाचाराचा अनादर करताना पाहून मोठे झाले तर जेव्हा ते पोलिस किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये सामील होतात तेव्हा त्यांना असे वाटेल की त्यांच्या वैयक्तिक इच्छा कायद्याच्या वर आहेत. जौनपूर आणि गोव्यातील हवालदार एका रात्रीत भ्रष्ट झाले नाहीत. कदाचित “कठीण आणि योग्य मार्गापेक्षा’ “नैतिक शॉर्टकट’ पसंत केल्या जाणाऱ्या वातावरणात ते वाढले असतील. यावरून मला महान भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या कथेची आठवण झाली. त्यांनी कौशल्यापेक्षा प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले. ही कहाणी आपल्याला आधुनिक व्यवस्थेत काय उणिवा आहेत हे समजून घेण्यास मदत करते. एकदा प्रयोगशाळेतील सहायक भरती प्रक्रियेदरम्यान रमण यांनी तांत्रिक कारणांमुळे एका उमेदवाराला नाकारले. काही तासांनंतर तो तरुण सात रुपये परत करण्यासाठी कार्यालयात परतला. त्याने स्पष्ट केले की विभागाने त्याला प्रवास भत्ता देण्यात चूक केली आहे आणि तो अतिरिक्त पैसे ठेवू शकत नाही. हे पाहून रमण यांनी लगेच त्याला नोकरी देऊ केली आणि म्हणाले, मी तुला भौतिकशास्त्र शिकवू शकतो, पण प्रामाणिकपणा नाही.’ रमण यांना एक मूलभूत सत्य माहीत होते. आपल्या आधुनिक भरती व्यवस्था आणि पालकत्वप्रणाली विसरली आहे. कार्यक्षमता हे एक कौशल्य आहे. परंतु प्रामाणिकपणा हा एक मूलभूत गुण आहे. तुम्ही एखाद्याला बंदूक चालवायला शिकवू शकता किंवा समीकरणे सोडवायला शिकवू शकता, परंतु एकदा का पायाच बिघडला तर एखाद्याला चारित्र्यवान कसे बनायचे हे शिकवता येत नाही. निलंबित हवालदार आणि आक्रमक वडील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पालक शिक्षकांच्या अधिकाराला कमी लेखत राहिले तर आपण पोलिस अधिकाऱ्यांसह व्यावसायिकांची एक पिढी निर्माण करत राहू. परंतु ते मात्र आपल्या पदांना सार्वजनिक सेवेऐवजी वैयक्तिक फायद्याचे साधन मानतात.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चारित्र्य अंतिम प्राधान्य बनल्याने लोक देहापुरते मर्यादित झाले
जगात केवळ तीनच समस्या आहेत. पहिली, पैसा असणे किंवा नसणे. दुसरी, पुरुषाच्या जीवनात स्त्री असणे किंवा नसणे आणि तिसरी, स्त्रीच्या जीवनात पुरुष असणे किंवा नसणे. उर्वरित सर्व समस्या याच तिन्हींचा विस्तार आहेत. आपल्याकडे जेव्हा अष्टलक्ष्मीचे पूजन केले जाते, तेव्हा त्यांचे एक रूप ‘गजलक्ष्मी’ देखील आहे. यात लक्ष्मी माता पांढऱ्या हत्तीवर विराजमान आहे. हा पांढरा हत्ती उडूही शकतो. याचा अर्थ असा की, पैसा काहीही करू शकतो. म्हणूनच तो समस्या आणि समाधान, दोन्ही बनतो. दुसऱ्या व तिसऱ्या समस्येत सर्व खेळ स्त्री-पुरुषाचा आहे. आजकाल चारित्र्य व नैतिकता या गोष्टी अंतिम प्राधान्य बनत आहेत, म्हणूनच लोक केवळ देहापुरते मर्यादित झाले आहेत. मध्यंतरी ऐकले की, एका पाच वर्षांच्या मुलीवर तिच्याच नात्यातील तेरा वर्षांच्या भावाने अत्याचार केला. ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना इतर बातम्यांसारखीच आली आणि गेली, परंतु ती ही चिंता सोडून गेली की, या तीन समस्यांपैकी उर्वरित दोन समस्या आता अधिक रौद्र रूप धारण करतील.
डेरेक ओ ब्रायन यांचा कॉलम:प्रदीर्घ मौनाविरुद्ध महिलांचा उठाव सदैव लक्षात ठेवावा
हा माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या कठीण स्तंभांपैकी एक आहे. यात सार्वजनिक धोरणांवर चर्चा केलेली नाही, कोणत्याही योजनेचे विश्लेषण नाही, किंवा कर, निवडणूक किंवा संसदेच्या सत्रावर भाष्यही नाही. हा स्तंभ ‘मौना’बद्दल आहे. असे मौन, जे दीर्घकाळ टिकून होते, जे कधीतरी धैर्याने तोडले गेले आणि जे आता पुन्हा हळूच परतताना दिसत आहे. आठ वर्षांपूर्वी भारतातील महिलांनी आवाज उठवला होता. त्यांनी दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि सामर्थ्यवानांसमोर उभे राहून सत्य सांगितले. हे सत्य केवळ भ्रम दूर करण्यासाठीच नाही, तर अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्या संरचना मोडीत काढण्याच्या आशेने बोलले गेले होते. ‘मी-टू’ आंदोलन ही केवळ एक क्षणिक घटना नव्हती, तो आत्मचिंतन आणि उत्तरदायित्वाचा एक निर्णायक क्षण होता. वरिष्ठ अधिवक्ता रेबेका जॉन यांनी ‘मी-टू’ची लढाई कायदेशीर आघाडीवर लढली होती. त्यांनी मला सांगितले की, मी-टू आंदोलन या आधारावर उभे होते की, पीडितांनी ते मौन संपवावे ज्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र सत्तेचा गैरवापर नियमितपणे सुरू होता. पण सत्य बोलण्यासाठी अनेक महिलांना गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांच्यावर खटले भरले गेले. ज्या प्रकरणांत पीडितांना कायदेशीर विजय मिळाला, तिथेही पुरुषांचे कोणतेही ठोस नुकसान झाले नाही. उलट, हे पुरुष त्यांच्या प्रभावक्षेत्रात पुन्हा प्रस्थापित झालेले आपण पाहिले आहेत. काही प्रकरणांत लैंगिक हिंसेच्या तक्रारी न्यायालयीन तपासाच्या निकषांवर टिकू शकल्या नाहीत—तपासातील त्रुटी किंवा अकार्यक्षमतेमुळे. तसेच, पीडितांना सतत सार्वजनिक बदनामीचा सामना करावा लागला. येथे पीडिता आणि आरोपी यांच्यातील सामाजिक प्रतिष्ठा आणि वर्गीय शक्ती यामध्ये मोठी दरी होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीकाकार अनेकदा असा बचाव करतात की, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक शोषणाची समस्या भारताने 2013 च्या ‘पॉश’ (पीओएसएच) कायद्याद्वारे आधीच सोडवली आहे. हा कायदा निश्चितच त्याच्या काळातील पुरोगामी होता. त्याने एक औपचारिक नियोक्ता व निश्चित कार्यस्थळाची कल्पना केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका महिला अधिवक्त्याने सांगितले, आम्ही सर्वांनी आमच्या व्यावसायिक जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या समस्येचा सामना केला आहे. कायद्याचे क्षेत्रही याला अपवाद नाही. आम्ही कुणाकडे तक्रार करायची? ‘शी-बॉक्स’चा कुठे पत्ता नाही. ‘पॉश’ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केले जाते, कारण असा समज पसरवला गेला आहे की, यामुळे महिला कायद्याचा ‘दुरुपयोग’ करायला शिकतील. भारतात सत्तासंबंधांच्या संदर्भात होणाऱ्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या सार्वजनिक खुलाशांवर कार्यवाही करण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. ‘मी-टू’च्या खुलाशानंतरही आपण नवीन कायदेशीर चौकट तयार केली नाही. त्याऐवजी विद्यमान कायदे, विशेषतः मानहानीच्या तरतुदी अशा प्रकरणांमधील पुढच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवतात. वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांनी सध्याच्या परिस्थितीवर म्हटले आहे की, जे पुरुष विद्यमान सत्ताव्यवस्थेशी जोडलेले आहेत आणि ज्यांनी या तंत्रात आपली जागा बनवली आहे, त्यांनी शांतपणे आपले जीवन पुन्हा प्रस्थापित केले आहे. परंतु ज्यांना व्यवस्थाविरोधी मानले गेले, त्यांना न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतरही परतण्याची संधी दिली गेली नाही. खोलवर रुजलेले पितृसत्ताक संस्कार हेच मी-टू आंदोलनातील आरोपींविरुद्ध समाजात वास्तविक रोषाचा अभाव असण्याचे कारण आहेत. प्रत्यक्षात वेदना किंवा संताप व्यक्त करण्याऐवजी, एक प्रकारची उपरोधिक संमती दिसते-डोळा मिचकावून दिलेली स्वीकृती किंवा हसण्यावारी नेण्याची प्रवृत्ती, जणू गैरवर्तणुकीच्या घटना म्हणजे केवळ ‘लॉकर रूम’मधील विनोद आहेत. जेव्हा सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती सार्वजनिकरीत्या महिला नेत्यांची थट्टा करते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा आपल्या नागरी समाजाचा विरोध आणि स्पष्ट निषेध कुठे असतो? जेव्हा महिलांचा छळ केल्याचे गंभीर आरोप असलेल्या लोकांना साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाने आमंत्रित केले जाते, तेव्हा आपल्याला या कठोर सत्याचा सामना करावाच लागेल की-स्त्रीद्वेष आज समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनला आहे! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. लेखाच्या सहायक संशोधिका चाहत मंगतानी आणि वर्णिका मिश्रा आहेत.) भारतात अशी कोणतेही कायदेशीर तरतूद नाही, जी सत्तासंबंधांच्या संदर्भात लैंगिक गैरवर्तणुकीच्या सार्वजनिक खुलाशावर कार्यवाही करतील. खरे तर ‘मी-टू’ आंदोलनानंतरही आपण कोणतीही नवीन कायदेशीर चौकट विकसित केलेली नाही.
रुचिर शर्मा यांचा कॉलम:ट्रम्प यांच्याबद्दल नाराजी असूनही अमेरिकेत प्रचंड पैसा येतोय
अमेरिकेच्या बाबतीत आज जगभरातील गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन असा आहे की, ‘दिवसभर टीका करा आणि रात्रभर खरेदी करा.’ अलीकडेच आशिया, युरोप आणि मध्य-पूर्वेच्या दौऱ्यात ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेबद्दल किती तक्रारी आहेत, हे मला जाणवले. मग तो टेरिफचा मुद्दा असो, ग्रीनलँडची गोष्ट असो किंवा जुन्या जागतिक व्यवस्थेबद्दलची उदासीनता असो. जगभरात अमेरिकेबद्दल नकारात्मक धारणा वाढत आहे. पण जेव्हा मी न्यूयॉर्कला परतलो आणि आकडेवारी पाहिली, तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. अमेरिकेबद्दलचे मत जरी नकारात्मक होत असले तरी पैसा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात अमेरिकेकडे वाहत आहे. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी अमेरिकन फायनान्शियल ॲसेट्समध्ये 1.6 ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक केली, ज्यापैकी सुमारे 700 अब्ज डॉलर केवळ शेअर बाजारात गुंतवले गेले. हे दोन्ही विक्रमी आकडे असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. अमेरिकन कॉर्पोरेट बाँड्सच्या बाबतीतही हाच कल दिसून आला, जिथे परदेशी खरेदीत लक्षणीय वाढ झाली. मग प्रश्न असा पडतो की, ज्या देशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे, तिथे इतकी गुंतवणूक का होत आहे? याचे एक कारण म्हणजे ‘इनर्शिया’ (जडत्व). 2008 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर आतापर्यंत अमेरिकेची कामगिरी जगातील बहुतांश देशांपेक्षा सरस राहिली आहे. गुंतवणूकदार नेहमी मागील कामगिरीचा मागोवा घेतात. प्रचंड आकारमान आणि लिक्विडिटीमुळे सध्या अमेरिकन बाजारपेठेला कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी गृहीत धरले आहे. जग अजूनही तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेच्या आघाडीने प्रभावित आहे. युरोपियन गुंतवणूकदार दीर्घकाळापासून अमेरिकन टेक शेअर्सचे उत्साही खरेदीदार राहिले आहेत, परंतु गेल्या वर्षी अमेरिकन शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत दक्षिण कोरिया होता. या देशात अमेरिका किंवा एआयशी संबंधित मालमत्तेबद्दल प्रचंड आकर्षण आहे. भारतातही हा कल दिसून येतो. 2025 मध्ये भारतीयांनी परदेशात प्रवास, शिक्षण, भेटवस्तू यांसारख्या सर्व श्रेणींवर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खर्च केला, परंतु पोर्टफोलिओ गुंतवणुकीत 60 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. सरकारने गुंतवणुकीच्या मर्यादा शिथिल केल्यामुळे भारतीयांसाठी परदेशी फायनान्शियल असेट्स खरेदी करणे सोपे झाले आहे आणि या गुंतवणुकीचा धक्कादायक 99 टक्के हिस्सा अमेरिकेकडे जात आहे. याचा मोठा भाग अमेरिकन एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये जातो, पण सर्वात मोठा वाटा थेट अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवला जातो.विशेषतः एआय क्रांतीच्या केंद्रस्थानी असलेल्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये. बाजारपेठेतील कल कायमस्वरूपी नसतात आणि ‘दिवसभर टीका, रात्रभर खरेदी’ करण्याची सवयही याला अपवाद नाही. अमेरिकेतील एआय शेअर्सबाबत जे वेड आहे, ते अस्तित्वाबद्दल प्रश्न उभे करत आहे. एआयच्या शर्यतीत कोणत्या कंपन्या विजयी होतील हे स्पष्ट नाही. त्या अमेरिकनच असतील याचीही खात्री नाही. चीनने आपण स्पर्धा करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांचे काही एआय मॉडेल्स अमेरिकन मॉडेल्ससारखीच कामगिरी कमी प्रशिक्षण खर्चात देत आहेत. दुसरीकडे, अमेरिकन बाजारपेठेचे वर्चस्व आणि त्यातील अनिश्चितता पाहता इतर सरकारेही जोखीम कमी करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहेत. ते व्यापार करार करत आहेत, नियमावली शिथिल करत आहेत आणि संरक्षण व स्थानिक तंत्रज्ञानातील गुंतवणूक वाढवत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत भांडवलाचा प्रचंड प्रवाह असूनही, जगातील इतर भागांतील बाजारपेठांनी कामगिरीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले. अमेरिकेबाहेर विकास दरात वाढ होत असल्याने हा कल अधिक मजबूत होत आहे. या वर्षी आणि पुढच्या वर्षी इतर अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत दीडपट वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. 2027 पर्यंत उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सरासरी कॉर्पोरेट नफा अमेरिकेच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढण्याचा अंदाज आहे, तर इतर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये हा वाढीचा दर सुमारे 50 टक्के अधिक राहण्याची शक्यता आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विदेशी गुंतवणूकदार अमेरिकेवर कितीही टीका करत असले तरी त्यांच्याकडे 70 ट्रिलियन डॉलरची मालमत्ता आहे.जी दशकाच्या तुलनेत दुप्पट आहे. जोवर हा ओघ सुरू राहील, तोवर अमेरिकन बाजारपेठेवर फारसा परिणाम होणार नाही.
एन. रघुरामन यांचा कॉलम:‘रॉ डेटा’च्या घुसळणीतून व्यवसायासाठी सुवर्णसंधी निर्माण कराव्या लागतील
मंगळवारी मी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पवई शाखेत उभा होतो. ऑपरेशन्स मॅनेजरसमोरील रांगेत दुसऱ्या क्रमांकावर उभे असताना मला एक लॉजिस्टिक अपयश पाहायला मिळाले. माझ्या पुढे उभी असलेली व्यक्ती तीस मिनिटे वाट पाहून थकली होती. तो एका विचित्र अडचणीत होता. पाच दिवसांपूर्वी त्याने शाखेच्या ऑटोमेटेड मशीनमध्ये चेक जमा केला होता. पुरावा म्हणून त्याच्याकडे फोटोग्राफिक पावतीही होती. तरीही, बँक ते फिजिकल डॉक्युमेंट (कागदपत्र) शोधू शकत नव्हती. मशीनने ते गिळले की काय? कुणालाच माहीत नाही. माझा स्वतःचा संयमही सुटू लागला होता, तेवढ्यात शाखा व्यवस्थापकाने येऊन मला मदत केली. प्रशासकीय बेजबाबदारपणामध्ये अडकलेली ती अस्वस्थ व्यक्ती तिथेच राहिली आणि मी बाहेर आलो. माझे पुढचे ठिकाण एक प्रमुख रुग्णालय होते, जिथून मला पंधरा दिवसांपासून भरती असलेल्या एका नातेवाइकाला डिस्चार्ज द्यायचा होता. गर्दीच्या या ठिकाणी एका बेडसाठीही अनेकदा मोठी शिफारस लावावी लागते. येथेही मला एक धक्कादायक पॅटर्न दिसला. असा एकही रुग्ण नव्हता ज्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. सर्वांच्या हातात एकाच रंगाचे फोल्डर्स होते, ज्यात हाताने लिहिलेल्या अपॉइंटमेंट्स आणि प्रिंट केलेले लॅब रिझल्ट्स भरले होते. कारण ‘प्रोव्हायडर्स’ अनेकदा डिजिटल फाइल्सचा मागोवा गमावतात, ज्यामुळे अनावश्यक वारंवार चाचण्या केल्या जातात. हे असेच आहे जणू काही ते त्या चाणाक्ष चिकुनगुनिया व्हायरसला शोधत आहेत, जो सुरुवातीच्या चाचणीत पकडला जात नाही. एआयच्या युगात जगूनही आपली आरोग्य सेवा व्यवस्था १९ व्या शतकातच अडकली आहे. हे एक विचित्र डिजिटल-अॅनालॉग हायब्रिड मॉडेल आहे, जिथे कॉरिडॉरमध्ये आजही फॅक्स मशीन चालतात आणि डॉक्टर व्हॉट्सॲपवर संवेदनशील वैद्यकीय डेटा शेअर करतात. रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर शेकडो संगणक आहेत. प्रत्येकात माहितीचा महासागर आहे. सर्वत्र डेटा आहे, तरीही डॉक्टर आणि रुग्ण कागदालाच चिकटून आहेत. मला खलाशांची एक जुनी ओळ आठवते- ‘Water, water everywhere, not any drop to drink’. या आधुनिक युगात आपणही रॉ डेटामध्ये बुडालो आहोत, परंतु वापरण्यायोग्य, व्यवस्थित माहितीसाठी तहानलेलेच आहोत. मुळात ही समस्या तंत्रज्ञानाची नसून संस्कृतीची हार आहे. व्यवस्थेचे हे अपंगत्व केवळ मुंबई किंवा भारतापुरते मर्यादित नाही, तर विकसित देशही याच्याशी झुंजत आहेत. सुरुवातीचा तांत्रिक अडथळा आहे, इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच वेगवेगळ्या सिस्टिम्सची एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे, जर खरोखरच उपाय शोधण्याची इच्छा असेल तर. मोठ्या डेटा सेटचा शोध घेऊन विश्लेषण करण्याच्या क्षमतेवर आधारित एआय जसे मुख्य प्रवाहात येत आहे, तसे आपण अश्मयुगासारख्या काळात अडकून राहू शकत नाही. डेटासाठी स्पष्ट आणि युनिव्हर्सल स्टँडर्ड्स (सार्वत्रिक मानके) तयार करणे आवश्यक आहे आणि हे केवळ बँक किंवा क्लिनिकमधील ग्राहक अनुभव सुधारण्यासाठीच नाही, तर संशोधन, नावीन्य आणि विविध उद्योगांमध्ये एआय च्या विस्तारासाठी मूलभूत अट आहे. केवळ खर्च कमी करण्यापलीकडे, हा वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय डेटा सार्वभौमत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात आरोग्य डेटा हा एक मौल्यवान सामग्री आहे, जी सांभाळावी लागेल आणि प्रभावीपणे वापरावी लागेल. सध्या, बहुतेक आरोग्य सेवा कर्मचारी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवतात, परंतु त्याचा एक छोटासा भागच रुग्णाला दिला जातो. पंधरा दिवसांनंतर रुग्णालयातून जाणाऱ्या व्यक्तीकडे उपचारांचा पूर्ण इतिहास नसतो, तर फक्त ‘डिस्चार्ज समरी’ असते. परिणामी, नवीन रुग्णालय किंवा शहरात नवीन डॉक्टरला पुन्हा नवीन चाचण्या कराव्या लागतात. केवळ खर्चच नाही, तर त्या रुग्णाचे दुःखही समजून घ्या, ज्याला पुन्हा अंगावर सुया टोचून घ्याव्या लागतील. फंडा असा की - डेटा ही प्रत्येक आधुनिक व्यवसायाची ‘क्रीम’ आहे. तथापि, समाज म्हणून आपण ती क्रीम घुसळून लोणी आणि आरोग्यदायी, चविष्ट तूप बनवण्यात अपयशी ठरलो आहोत. जे ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायदेशीर आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला हे अंतर भरून काढावे लागेल.
राजदीप सरदेसाईंचा यांचा कॉलम:आसामच्या राजकारणात चाललेय तरी काय?
सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानकेअसूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एकानवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअररायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्यानिशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला वदुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशीघुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूनेनिषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तरव्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणेद्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेनेनिवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावरबंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघनआहे. नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशाकोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असेस्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसामभाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळापाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून सरमा मियां या शब्दाचा वापरकरून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधीलबंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणाराअपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी मियां’ वर आर्थिकबहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग तेदुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजीसरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्यासांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षणकरण्यासाठी आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणेसरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //बाहेरील’ लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणेसोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषणमानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षणम्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजपनेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगतआहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीयवातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसूनयेतो. भाजप नेते घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाहीवारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीयसीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्याविजयी मोर्चासमोर स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखीलजवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरीलव्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचीमागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतुव्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेटसामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदूमतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एककाळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्यहिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मायांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केलीअसेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्णभाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेताभाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातीलसंधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला कीत्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगीबैठकीत त्यांचा //अपमान’ केला होता. राहुल गांधींनाआसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीवकुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचेवाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाकाँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठीएक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मायांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसरपडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागेघेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतीलआघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारीवाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीयशुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधीलहोते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसतनाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्यातीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचाप्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणिसमस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षाकरणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळेअस्वस्थ होतील. पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचानिर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षनेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की ते भविष्याचेनेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीवभासेल.’ एक दशकानंतर तो भविष्याचा चेहरा’ त्यांनाएका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.असाही एक काळ होता; परंतु आजभारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदूमतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचितयामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्तविधाने करू शकतात हे स्पष्ट होते.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:पालकांनी आपल्या मुलांची निर्णय क्षमता वाढवावी
आजकाल अति जागरूक पालक आपल्या मुलांच्या संगोपनात खूपजास्त सतर्क झाले आहेत. पालक मंडळी मुलांना जास्त प्रश्नविचारतात.सतत हस्तक्षेप करतात. या प्रक्रियेत ते विसरतात की याचात्यांच्या मानसशास्त्रावर विपरीत परिणाम होतो. काही पालकजेवणाच्या वेळी त्यांच्या मुलांना इतके पर्याय देतात की त्यांना निर्णयघेण्याची थकवा येतो - त्यांच्या निर्णय क्षमतेला धक्का बसतो किंवा तेचिडचिडे होतात. मुले एकतर सांगतात किंवा विचार करतात-आपणस्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही का? येथूनच पालकांचे आव्हान सुरूहोते. त्यांच्या इच्छांबद्दल जास्त चौकशी केल्याने किंवा त्यांच्यावरआपली इच्छा लादल्याने भविष्यातील चिंता निर्माण होईल.उदाहरणार्थ- तुम्ही मुलाला अनेक खेळणी दिली तर ते खेळत नाहीत.त्यात मग्न होतात. पण तुम्ही त्यांना फक्त एक खेळणी दिली तर तेउत्साहाने खेळतात. पालकांनी त्यांच्या मुलांची स्वतःचे निर्णयघेण्याची क्षमता वाढवली पाहिजे. त्यांचे अधिक ऐका. त्यांना कमीसांगा. तुम्हाला त्यांना सांगायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी किमानत्यांना प्रेरणादायी घटना आणि आदर्श पात्रांच्या कथा सांगा.
आरती जेरथ यांचा कॉलम:संसद सुरळीत चालावी याची जबाबदारी कुणाची आहे?
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सतत होणाऱ्यागदारोळात संसदेची गौरवशाली परंपरा खंडित होतअसल्याचे पाहणे लोकशाही व्यवस्थेवर विश्वासठेवणाऱ्यांसाठी खूप वेदनादायक आहे. राष्ट्रपतींच्याअभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर नरेंद्र मोदी यांनाबोलू दिले गेले नाही. परंतु असे पहिल्यांदाच घडलेलेनाही. २००४ मध्ये मनमोहन सिंग यांनाही ही संधीनाकारली गेली होती. परंतु यावेळी एक नवीन उदाहरणमांडण्यात आले. प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आलातेव्हा पंतप्रधान स्वतः लोकसभेत उपस्थित नव्हते. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आभारप्रस्तावावरील चर्चा रद्द झाली असेल तर अर्थसंकल्पीय चर्चाही गदारोळात वाहून गेली. संसदेच्या तीन वार्षिक अधिवेशनांपैकी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षित गांभीर्यआणण्याच्या तडजोडीत सत्ताधारी भाजप किंवाकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष रस दाखवतनाहीत. खरे तर सभागृहात व्यत्यय आणि वारंवारतहकुबी भाजपसाठी फायदेशीर आहे. कारण ते अस्वस्थ प्रश्न टाळण्याची सोयीस्कर संधी मिळते. दुसरीकडेविरोधी पक्षांनी - विशेषतः काँग्रेसने - संसदेत गंभीरआणि तर्कशुद्ध चर्चेपेक्षा त्यांचा गदारोळ वचिथावणीखोर घोषणाबाजी जनतेपर्यंत अधिकप्रभावीपणे पोहोचते, असा असा निष्कर्ष काढला आहे.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातअरुण जेटली राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हात्यांनी जाहीरपणे म्हटले होते की संसदेत व्यत्यय आणणेहे लोकशाहीचे उल्लंघन नाही. एका वर्षानंतरलोकसभेतील त्यांच्या समकक्ष सुषमा स्वराज यांनीहीहेच मत मांडले. 2012 मध्ये त्या म्हणाल्या, संसदेचेकामकाज होऊ न देणे हे देखील लोकशाहीचे एक रूपआहे. अलिकडच्या संसदीय इतिहासावरून असे दिसूनयेते की विरोधी पक्षातील राजकीय पक्षांमध्ये ही धारणारूढी झाली आहे. 1995 मध्ये भाजप विरोधी पक्षात होता.तेव्हा त्यांनी नरसिंह राव सरकारमधील दूरसंचार मंत्रीसुखराम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संपूर्णहिवाळी अधिवेशन थांबवले होते. 2001 मध्येवाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळातकाँग्रेसने तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचाबहिष्कार टाकला होता. तेहलका टेप्स घोटाळ्यातफर्नांडिस यांचे नाव समोर आले होते. फर्नांडिस यांनासंसदेत बोलण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस खासदारांनीगोंधळ घातला. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखालीलसंसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना उपस्थितराहण्यासही त्यांनी नकार दिला होता. 2010 मध्येमनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारलाहादरवून टाकणाऱ्या 2-जी घोटाळ्याची चौकशीसाठीजेपीसी स्थापन करण्याच्या भाजपच्या मागणीने तेहिवाळी अधिवेशन व्यर्थ गेले होते. अशा व्यत्ययांसाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरले जातअसले तरी संसदेचे कामकाज सुरळीत चालावे याचीजबाबदारी सरकारची आहे हे देखील खरे आहे-त्यासाठी विरोधकांशी तडजोड करण्यात एक पाऊलमागे घ्यावे लागले तरी सरकारने ते करावे. फर्नांडिसयांचा बहिष्कार दीड वर्ष चालला तेव्हा वाजपेयीसरकारने अखेर माघार घेऊन चर्चेसाठी सहमतीदर्शविली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष -राज्यसभेत भैरवसिंग शेखावत आणि लोकसभेत मनोहरजोशी - यांनी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांनावाटाघाटीच्या टेबलावर बोलावले आणि संवादाचे सूत्रतयार करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे 2-जीघोटाळ्याच्या जेपीसी चौकशीच्या भाजपच्या मागणीवरसंपूर्ण हिवाळी अधिवेशनात ठाम राहिल्यानंतर मनमोहनसिंग सरकारने शेवटी हार मानण्याचा निर्णय घेतलाहोता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळित चालावे अशीत्यांची इच्छा होती. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) तीव्र ध्रुवीकरणाच्या या युगात -राजकीय गटांमधील दरी अधिकचवाढली आहे - संसदेची प्रतिष्ठाजपण्यासाठी संयम, धैर्य आणितडजोडीसाठी एक पाऊल मागे घेण्याचीतयारी आता पूर्वीपेक्षा जास्त गरजेचीबनली आहे.
मेघना पंत यांचा कॉलम:जन्मदात्री महिलांकडे डोळेझाक न करता कसे बघायला हवे?
तू आई कधी होणार? तुला तुझ्या वयाचे तर भान आहेना? तुझे करिअर तर चांगले चालले आहे. मग कुटुंबबनवणार आहेस? तू खूप सडपातळ आहेस. तुला बाळकसे होईल?... समाजाला गर्भधारणा महत्त्वाची वाटते.कदाचित समाजाला गरोदरपणापेक्षा त्याची कल्पना जास्तआवडत असावी. - त्याचे अमूर्त स्वरूप, त्याची घोषणा,हृदयाच्या इमोजीसह व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवलेलाअल्ट्रासाऊंड फोटो इत्यादी. एखाद्या महिलेचे लग्नहोताच तिच्यावर दबाव वाढतो - आनंदाची बातमी कधीदेताय मग? डॉक्टर तिला वारंवार इशाऱ्यातून आठवणदेतात. नातेवाईक विचारपूस करतात. समाज डेडलाइनअसलेल्या सार्वजनिक प्रकल्पाप्रमाणे तिला लवकरगरोदर हो बाई, असे जणू सांगत असतो. आणि त्यानंतर गर्भधारणेची लक्षणे दिसतात - वास्तविकशारीरिकदृष्ट्या वाढत असताना - आपण अस्वस्थ होतो.दिल्लीतील सोनम कपूरच्या गर्भधारणेच्या ड्रेसिंगसंबंधीच्या वादामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.समोर एक गर्भवती महिला होती. ती कदाचित स्वत:लाआरामदायी वाटावे, आत्मविश्वास किंवा आनंदासाठीतिने विशिष्ट कपडे घातले असावेत. पण त्यावरूनअचानक समाजाचा सूर बदलला - शालीन वागावे.त्याला झाकून टाका, आई होणारी स्त्री अशी दिसू नये...त्यांच्याकडे आई होण्याची अपेक्षा असते. पण त्या आईहोताच समाज त्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याची मागणीकरतो. आपण मातृत्वाला आदर्श मानतो. पण खरे मातृत्वआकार घेऊ लागते तेव्हा आपण त्यावर सामाजिकनियमांचा पहारा लावतो. आपल्याला स्त्री नको तरगर्भाशय हवे आहे. आपल्याला त्याग हवा आहे. व्यक्तीनको. आपल्याला मूल हवे आहे. पण वेदना, विस्तारआणि जन्म देण्यासाठी बदल सहन केला. आपल्याशरीराची पर्वा केली नाही, अशी व्यक्ती मात्र नको.गर्भवती शरीराला त्याच्या स्वरूपाची लाज वाटत नसेलतर तीगोष्ट आपल्याला अस्वस्थ करते. ती विस्तारते,दृश्यमान होते.विश्रांती, अन्न आणि लक्ष देण्याची मागणीकरते. ती शांत राहू शकत नाही. म्हणूनच समाज त्यासशिस्त लावण्यासाठी घाई करतो.एखादी गर्भवती महिलास्वतःच्या आनंदासाठी कपडे घालते तेव्हा ते आपल्यालाआठवण करून देते की मातृत्व म्हणजे स्वतःच्या इच्छा,स्वाभिमान किंवा ओळखीचा त्याग करणे नाही. गर्भवतीमहिला ही पूर्णपणे चैतन्यशील तरीही थोडी गुंतागुंतीचीअसते. आपल्याला मातृत्वाची स्वच्छ, आदर्श प्रतिमाआवडते - शुद्ध, लैंगिक इच्छेपासून मुक्त आणि नेहमीचदातृत्व असलेली. परंतु एखादी स्त्री स्वतःकडे पाहतेआणि म्हणते, मला अजूनही माझ्यासारखे दिसायचेआहे. त्या क्षणी धोक्याची घंटा वाजते. खरे म्हणजे तू हेकसे एंजॉय करू शकते ? असे त्यांना सांगायचे असते. गरोदरपणामुळे महिला लहान होत नाहीत; ते त्यांनाअधिक दृश्यमान बनवते. हीच दृश्यमानता त्यांच्यासाठी धोका आहे. आपण त्यांनानियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो या आशेने की त्यास्वीकारार्ह अदृश्यतेकडे परत येतील. आपण खरोखरचहोणाऱ्या मातांचा आदर केला असता तर आपण त्यांचाअसा वावर सुकर होऊ दिला असता. समाजाला मुलेइतकीच हवी असतील तर समाजाने जन्मदात्रीविषयीकसा दृष्टिकोन ठेवावा, हे देखील शिकले पाहिजे. तेहीडोळेझाक न करता. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वास्तविकतेपासून दूर जाऊ नका,हे मुलांना समजावणे गरजेचे
जगातील सर्वच दिवे प्रकाश देण्यासोबतच धूरही सोडतात. प्रकाश हवाअसेल, तर धूर सहन करण्याची तयारीही ठेवा. केवळ सूर्यप्रकाश असाआहे ज्यात धूर नसतो. त्यातील उष्णताही आरोग्यासाठी आवश्यक ठरते.आज आपल्या हातात ‘सोशल मीडिया’ नावाचा एक दिवा आहे.दिवसाचे ९ ते १० तास स्क्रीनवर घालवणारी मुले या दिव्यापासून प्रकाशकमी घेतात व होरपळून जास्त निघत आहेत. मुलांच्या आयुष्यात दोनमोठे धोके निर्माण झाले आहेत. पहिला ती कुटुंबापासून दूर होत आहेतआणि दुसरे म्हणजे, ती खऱ्या जगापासून तुटत आहेत. आयुष्यात‘फँटसी’ काही काळासाठी आवश्यक असू शकते, परंतु वास्तवाचासामना करणे आणि वास्तवात जगणे हेच जीवनाचे खरे सत्य आहे. अशावेळी मुलांना हे कसे समजावून सांगायचे की वास्तव नाकारू नका?त्यांना एक गोष्ट नक्की सांगा की, सर्वात मोठे वास्तव म्हणजे ‘आत्मा’आणि त्याचे पुढचे पाऊल म्हणजे ‘परमात्मा’. सोशल मीडियासारख्याविध्वंसक शक्तीपासून मुलांनी स्वतःला कसे वाचवावे, यासाठी त्यांनाआत्म्याचा आस्वाद चाखायला शिकवले पाहिजे. आत्म्याचा हा आस्वाद‘ध्याना’तून मिळतो.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:आम्हाला बंगाली भाषिक पाकिस्तान नकोय...
या आठवडाअखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्यासुरुवातीला बांगलादेशात लोकनियुक्त सरकार सत्ता हातीघेऊ शकते. अवामी लीगला निवडणुकीत सहभागीहोण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेविश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. तरीहीलोकशाहीच्या निकषावर ही निवडणूक काही अंशी नि:पक्षम्हणता येईल, कारण पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सैन्यनिवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाही किंवा त्यांनीकोणत्याही उमेदवाराचे समर्थनही केलेले नाही. यूपीए-२ च्या काळात भारत आणि बांगलादेश यांनीसीमा प्रश्न, विशेषतः सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्यावस्त्यांचा मुद्दा सोडवण्यासाठी करार केला होता. तेव्हाभाजपमध्ये कोणीही या कराराला उघडपणे विरोध केलानव्हता. तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तर त्याचेसमर्थन केले होते. तरीही पक्षाने संसदेत त्यात अडथळेआणले होते. ते त्यावेळच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाचे फळहोते. तेव्हा बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी अहमदाबादलाजाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होतीआणि त्यांचे समर्थन मागितले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने, ६ जून२०१५ रोजी भारत-बांगलादेश भू-सीमा कराराला मंजुरीदेण्यात आली. याचसोबत दोन्ही देशांनी सागरी सीमाहीनिश्चित करून ती स्वीकारली. यासाठी ममता बॅनर्जीयांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळवावे लागले. आसामआणि त्रिपुरातील भावनाही शांत कराव्या लागल्या. अशाप्रकारे बांगलादेश हा एकमेव असा मोठा शेजारी देश बनला,ज्याच्याशी भारताने सर्व सीमा विवाद सोडवले आहेत.बांगलादेशसोबतचा सीमा करार हा मोदी सरकारच्या १२वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण हा करारअशा वेळी झाला जेव्हा शेजारील देशांशी संबंध तणावपूर्णहोते. अनेक अर्थांनीही मोदींच्या मोठ्या यशांपैकी एकयश मानले जाऊ शकते. असे असूनही विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे राजकारण दीर्घकाळापासून अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्रित राहिले आहे.प. बंगालच्या दोन विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता, आज आपण इतिहासाच्या अशाच एका वळणावर उभे आहोत. फरक इतकाच आहे की, २०१४ च्या तुलनेत आज धोरणात्मक प्रभाव आणि शक्यता खूप मोठ्या आहेत. बांगलादेशातील निवडणुका प. बंगाल आणि आसामच्या निवडणुकांच्या काही महिने आधी होत आहेत. ही एकप्रकारे चांगली संधी आहे. कारण सध्या ‘घुसखोर’ हीघोषणा खूप तीव्र झालेली नाही. मात्र, पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात त्याचा उल्लेख नक्कीच केला आहे.पण सोशल मीडिया आणि अनेक टीव्ही चॅनेलवर बांगलादेशबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत.बांगलादेशातील निवडणुका पश्चिम बंगाल आणिआसामच्या निवडणुकांनंतर होत नसल्यामुळे, सरकारकडेपरिस्थिती सामान्य करण्याची आणि संतुलनाकडेपरतण्याची संधी आहे. मात्र, शेख हसीना यांच्याकाळासारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होणे आता कठीणदिसते. ही वेळ ढाकामध्ये भारताच्या पसंतीच्या नेत्यालानाकारण्याची किंवा मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनेपरराष्ट्र धोरणात केलेल्या मोठ्या बदलांबद्दल नाराजी व्यक्तकरण्याची नाही. युनूस गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानलाखुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनीअनेक प्रक्षोभक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ,भारताला चिडवण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनाबोलावण्यात आले. त्यांच्या सरकारने मोठी शस्त्रे खरेदीकरण्याबाबत चर्चा केली आणि भारताच्या ईशान्येकडीलराज्यांबाबतही भडकाऊ विधाने केली गेली. त्यांनी शेखहसीना यांना भारतात आश्रय देणे हे ‘करार मोडणारे’ पाऊलअसल्याचे म्हटले. पण बांगलादेशच्या दृष्टीने हे दूरदृष्टीचाअभाव दर्शवणारे आणि भारताला उकसवणारे आहे. जमेचीबाजू ही की, युनूस यांना एका आठवड्याच्या आत निवडूनआलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी लागेल. खालिदाझिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरयांना पाठवून आम्ही एक व्यावहारिक पाऊल उचलले.त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे(बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांचीही भेट घेतली.आतापर्यंत रहमान एक समजूतदार नेते म्हणून समोर आले आहेत. वास्तव हे आहे की, निवडणूक कोण जिंकेल किंवा कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे कोणालाहीमाहीत नाही. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये तारिकरहमान आणि बीएनपीला आघाडी मिळताना दिसत आहे. ‘प्रोथोम आलो’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार, ८३टक्के बांगलादेशी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा मानतात,७७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की व्यवसायासाठीवातावरण चांगले नाही आणि ३५ टक्के लोक देशाच्याआर्थिक स्थितीबाबत निराश आहेत. इस्लामीकरण किंवा कट्टर राष्ट्रवाद म्हणजेचभारत-विरोधाकडे तेथील लोकांचा फारसा कल दिसतनाही. सामान्य जनतेचा कल भारताच्या विरोधात नक्कीचआहे, विशेषतः हसीना यांच्या मुद्द्यावरून, पण सर्वातमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ५४ टक्के लोकांना आशा आहे कीनवीन सरकार सामाजिक-धार्मिक सहिष्णुता पुन्हा प्रस्थापितकरेल. ‘पीपल्स इलेक्शन सर्व्हे’नुसार ४७ टक्के लोकतारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात, तरकेवळ २२.५ टक्के लोक जमात-ए-इस्लामीच्या शफीकुररहमान यांना पसंती देतात. यावरून जमातला मिळणाऱ्यासमर्थनाची पातळी स्पष्ट होते. युनूस यांच्यासह काहीशक्तींना त्रिशंकू संसद हवी असेल जेणेकरून जमातलासामील करून सरकार स्थापन करता येईल. या निवडणुकाआपल्याला बांगलादेशसोबतचे संबंध नव्याने सुरूकरण्याची संधी देत आहेत. बंगाल आणि आसामच्यानिवडणुका पाहता हे एक आव्हानही आहे. अशापरिस्थितीत आपण भारताच्या पूर्वेला धोरणात्मक स्थिरतापरत आणण्याचे प्रयत्न करणार का? याचा अर्थ असा होईलकी या राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यानबांगलादेशविरोधी भाषा मवाळ ठेवली जावी. अथवा मगआपण आपल्या पूर्वेला एक ‘बंगाली भाषिक पाकिस्तान’तयार होऊ देण्यास तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीत कट्टरपंथी आवाजांनाकमी महत्त्व मिळते...निवडणूक प्रचारात बीएनपी किंवा जमातयांपैकी कोणीही पाकिस्तानबद्दल भाष्यकेलेले नाही. जमात भारतासोबत मैत्रीपूर्णसंबंधांबद्दल बोलत आहे, तर बीएनपी सर्वांशीपरस्पर आदरावर आधारित संबंधांची अपेक्षाकरत आहे. हे सकारात्मक संकेत आहेत.कट्टरतावाद्यांची स्वीकारार्हता कमी होत आहे.
आना पलासियो यांचा कॉलम:देवघेवीच्या मुत्सद्देगिरीपलीकडे ट्रम्प विचार करू शकत नाहीत
जगातील रशियाच्या भूमिकेकडे अमेरिका कशाप्रकारे पाहते आणि दोन देशांमधील संबंधांची रूपरेषाकशी असू शकते यावर वॉशिंग्टनचा विचार आतास्पष्ट होऊ लागला आहे. ट्रम्प यांच्या बहुतांश परराष्ट्रधोरणांप्रमाणे ही दृष्टीदेखील प्रामुख्याने ‘व्यावसायिकहिशेबाने’ परिभाषित केलेली दिसते. पाकिस्तानपासूनआखाती देशांपर्यंत व्यापारी सौदे करण्याच्या इच्छेपोटीमानवाधिकार किंवा कायद्याचे राज्य यांसारख्यामुद्द्यांना बाजूला ठेवण्याची ट्रम्प यांची तत्परताभू-राजकीय डावपेच वाटू शकतात, परंतु त्यांच्या या‘देवाणघेवाण आधारित’ दृष्टिकोनाला ‘यथार्थवाद’समजण्याची चूक करू नये. याचे कारण असे की, जिथे यथार्थवादी परराष्ट्रधोरण आपल्या मर्यादा, शक्ती-संतुलन आणिदीर्घकालीन हितसंबंधांना लक्षात घेते, तिथे ‘देवाणघेवाणीचे राजकारण’ आंतरराष्ट्रीय संबंधांना संकुचित सौदेबाजीच्या कक्षेत ओढून आणते. जिथे यथार्थवादी धोरण निकष, युती आणि संस्थांचाजास्तीत जास्त उपयोग करते, तिथे ‘देवाणघेवाणवाद’ त्यांना टाळण्याकडे, कमकुवत करण्याकडे किंवा नष्टकरण्याकडे वाटचाल करतो. आज जेव्हा जागतिकव्यवस्था विखुरलेली दिसत आहे, तेव्हा यथार्थवादीसंकल्पना आदर्शवादी वाटू शकते आणि देवाणघेवाणआधारित दृष्टी व्यावहारिक. परंतु येणाऱ्या काळातयाचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता कमी आहे.रशियाबाबत अमेरिकेची जी रणनीती समोर येत आहे,त्याबाबत हे आकलन निश्चितपणे अचूक ठरते. ट्रम्पप्रशासन युक्रेनमधील युद्धाची समाप्ती हीक्रेमलिनसोबतच्या आर्थिक आणि भू-राजकीयसंबंधांना नवीन आकार देण्याची संधी म्हणून पाहतआहे. अमेरिकेची इच्छा आहे की, युद्ध संपल्यानंतरनिर्बंध, तांत्रिक निर्बंध आणि बाजारपेठेतील अडथळेहळूहळू हटवले जावेत, जेणेकरून अमेरिका आपल्याइच्छेनुसार निकालांवर प्रभाव टाकू शकेल. पण समस्याही आहे की, अमेरिकेला हे बदल मनमानी पद्धतीनेलागू करायचे आहेत आणि विविध पक्षांना वेगवेगळ्याकरारांवर चर्चेसाठी भाग पाडायचे आहे. अमेरिकेचा हा‘पे-टू-प्ले’ दृष्टिकोन आर्थिक मुत्सद्देगिरी म्हणतायेणार नाही आणि तो यशस्वी होण्याची शक्यताही कमीआहे. ट्रम्प यांच्यासाठी त्यांचे व्यावसायिकहितसंबंधच सर्वात महत्त्वाचे आहेत. पण ते चुकीनेअसे मानून चालतात की, पुतीन यांच्यासारख्यानेत्यांचीही विचारसरणी अशीच असेल. आपल्या याचसमजूतीवर आधारित ट्रम्प असे मानतात की, राजकीयतडजोडी तेव्हा अधिक टिकतात जेव्हा त्यांनाव्यावसायिक करारांमध्ये गुंफले जाते. ट्रम्प यांच्या याचविचारसरणीमुळे त्यांच्या प्रशासनाचा असा समजझाला आहे की, अमेरिका-रशिया संबंध थोडे जरीसामान्य झाले, तरी रशिया आणि चीनचे संबंधआपोआपच कमकुवत होतील. ट्रम्प यांच्या यातथाकथित ‘रिव्हर्स-निक्सन रणनीती’ मुळे मुख्य मुद्दावैचारिक फेरमांडणीचा नाही. रशियाला कोणत्या नाकोणत्या स्वरूपात पाश्चिमात्य पायाभूत सुविधांमध्येपरत ओढणे हेच चीनसोबतची त्यांची युती कमकुवतकरण्यासाठी पुरेसे ठरेल. युक्रेनसोबतच्या जवळपासचार वर्षांच्या युद्ध आणि कठोर निर्बंधांमुळे तसेचमालमत्तेच्या पुनर्वितरणामुळे रशियाची सत्ता अधिकसुदृढ झाली आहे, जी आधीच पूर्णपणे व्यक्तिकेंद्रितहोती. सत्तेचे असे वैयक्तिकीकरण तडजोडीचीराजकीय किंमत वाढवते आणि दीर्घकालीनसौदेबाजीची संधी मर्यादित करते. ट्रम्प यांना हे समजतनाही की, जे काही ‘बॅलन्स शीट’वर आकर्षक दिसते,ते क्रेमलिनमध्ये राजकीयदृष्ट्या अस्वीकार्य असूशकते.विशेषतः अशा लोकसंख्येचा सामना करताना,ज्याने युक्रेन युद्धात जवळपास दहा लाख जीवितहानीसहन केली आहे! (@प्रोजेक्ट सिंडिकेट) जिथे ट्रम्प त्वरित विजयाची घोषणाकरण्याची निमित्ते शोधतात, तिथे चीनदीर्घकाळाचा खेळ खेळत आहे. अमेरिकेननेतृत्वाच्या जागतिक व्यवस्थेच्याविघटनातून फायदा उठवण्याच्या स्थितीतचीन स्वतःला अधिक मजबूत करेल.
प्रियदर्शन यांचा कॉलम:एका युद्धातून बाहेर पडून दुसऱ्यायुद्धाकडे जाणारी मानवता
श्रीकांत वर्मा त्यांच्या ‘युद्ध नायक’ या कवितेतलिहितात. ‘अभी / कल ही की तो बात है / ढाका / एकमांस के लोथड़े की तरह / फेंक दिया गया था / युद्ध कबशुरू हुआ था हिन्द-चीन में? / हृदय में दो करोड़ साठलाख घाव लिए / वियतनाम / बीसवीं सदी के बीच सेगुजरता है / अभी / कल ही की तो बात है / यूरोप / एकयुद्ध से निकलकर / दूसरे युद्ध की ओर / इस तरह चलागया था / जैसे कोई नींद में चलता हुआ व्यक्ति।’ या कवितेचा कालखंड थोडा बदलला—ढाका ऐवजी‘गाझा’ वाचले, व्हिएतनाम ऐवजी ‘इराक’,‘अफगाणिस्तान’ किंवा येणारा ‘इराण’ वाचले व युरोपऐवजी ‘अमेरिका’—तर असे वाटेल की जग पुन्हा त्याच काळात आहे. अहंकार आणि प्रमादात लिप्त नेत्यांच्या संघर्षात जग तिसऱ्या महायुद्धाकडे सरकत आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास, भारत-पाकिस्तान, आर्मेनिया-अझरबैजान, अमेरिका-इराण—हे सर्वएकतर जवळच्या भूतकाळात लढले आहेत किंवा वर्तमानात लढत आहेत अथवा भविष्यात लढण्याचीतयारी करत आहेत. रशिया आणि अमेरिका यांच्यातील ‘स्टार्ट’ (स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी) हा करार 5फेब्रुवारी रोजी संपला असून तो पुढे नेण्यात दोन्हीबाजूंना रस दिसत नाही. अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये ज्याप्रकारे दादागिरी करत घुसखोरी केली, त्यानंतर चीनतैवानमध्ये घुसण्याची संधी शोधत असेल तर त्यातआश्चर्य नाही. पूर्वी म्हटले जायचे की पुढचे महायुद्धपेट्रोलसाठी होईल, नंतर म्हटले गेले पाण्यासाठी होईल,पण आता असे वाटते की पेट्रोल असो वा पाणी, हे सर्वकेवळ राजकीय वर्चस्वासाठीची साधने आणि कारणेम्हणून वापरली जातील. पण ही वेळ का येत आहे?दोन महायुद्धांचा हिशेब लावला तर त्यात सुमारे दहाकोटी लोक मारले गेले होते. आज जेव्हा काही देशांकडेपृथ्वीला अनेक वेळा नष्ट करू शकतील अशाअण्वस्त्रांचा साठा आहे, तेव्हा अशा युद्धातील विनाशकिती मोठा असेल,याची कल्पना कोणाला आहे का?आपण खरोखरच आइन्स्टाइनने सांगितलेला तो विनोदखरा करणार आहोत का की, तिसरे महायुद्ध कोणत्याहीशस्त्रांनी लढले जावो, चौथे मात्र दगडांनी लढलेजाईल? कारण मानवी सभ्यतेला पुन्हा शून्यातून सुरुवातकरावी लागेल. ती सुरुवात होऊ शकेल की नाही हेसांगणे कठीण आहे, कारण तेव्हा ही पृथ्वी अब्जावधीवर्षांपूर्वीसारखी जंगले आणि समुद्रांनी भरलेली नसेल,तर ती जळून खाक झालेल्या एखाद्या अग्निपिंडाचीसुकत चाललेली राख असेल. ही कल्पना भयानक वाटते. पण ही कल्पनादेखीलयामुळेच शक्य होत आहे कारण जगातील मोठ्या आणिबलाढ्य देशांच्या शिरस्थानी अनेक भीतिदायक आणिसंशयास्पद लोक बसले आहेत. हे लोकशाहीचे अपयशआहे की विचारसरणीचे? हे रुग्ण आणि वृद्धभांडवलशाहीसमोर व्यर्थ ठरवलेली नैतिकता आणिमूल्यांच्या ऱ्हासाचे प्रकरण आहे का? हा नफेखोर मुक्तबाजाराचा खेळ आहे का, ज्यात एका बाजूला ‘एपस्टीनफाइल्स’ बाहेर येतात आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवाद,जातीयवाद, साम्यवाद आणि सैन्यवाद यांचीहातमिळवणी दिसते? हे रुग्ण, नफेखोर आणि सत्ताप्रेमीलोक स्वतःला वाचवण्यासाठी ‘युद्धवादाचा’ आश्रय घेतआहेत का? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. चर्चिल यांनी त्यांच्या‘सेकंड वर्ल्ड वॉर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेआहे की, रुझवेल्ट यांनी त्यांना विचारले होते की यायुद्धाला काय नाव द्यावे. चर्चिल यांनी उत्तर दिले होते—हे ‘फ्युटाइल वॉर’ (Futile War) म्हणजेच ‘निरर्थकयुद्ध’ होते—आणि इतर युद्धांच्या तुलनेत हे थांबवणेअधिक सोपे होते. 21 व्या शतकाची 25 वर्षे उलटल्यानंतर पुन्हा एकदाआपण अशाच वळणावर उभे आहोत, जिथे अनेकनिरर्थक युद्धे आपली प्रतीक्षा करत आहेत. ही युद्धे सुरूकरणे जेवढे सोपे आहे, तेवढेच ती थांबवणेदेखील सोपेआहे—पण या दिशेने कुणी पुढाकार घेत आहे का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडे आंबट, थोडे खारटही चालेल, फक्त कटूपणापासून दूर राहा
आयआयएममध्ये माझ्यासोबत शिकलेली एक मैत्रीणअचानक सोडून गेली. 31 डिसेंबरला व्हॉट्सॲपवर निरोपहोता की, श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय, हॉस्पिटलमध्येभरती आहे. 17 जानेवारीला तिच्या निधनाची बातमीकळली. कोणाचाच विश्वास बसला नाही. याहसत्या-खेळत्या, सुदृढ व्यक्तीला आपण महिनाभरापूर्वीचभेटलो होतो. आता तिच्या फोटोवर हार चढवला आहे वआम्ही शोकसभेला बसलो आहोत. एवढीही काय घाईहोती, शारदा? 54 वर्षे हे काही जाण्याचे वय नसते. आम्ही दिवंगत आत्म्याच्या आठवणीत एकत्र आलोहोतो, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता— माझा नंबरकधी येईल? वीस वर्षांनंतर की उद्या सकाळी? याचे उत्तरकोणाकडेच नाही. जाणे सर्वांचे निश्चित आहे, पण आपणअशा प्रकारे जगतो जणू आपल्याकडे वेळेचा महासागरआहे. शारदाने तरुण वयातच टाटा ग्रुपमध्ये मोठी नोकरीमिळवली होती. पण शोकसभेत तिच्या करिअरचा फारसाउल्लेख झाला नाही. उल्लेख झाला तो तिच्या प्रेमाचा आणिआपुलकीचा. साध्या स्वभावाचा. सासूबाई म्हणाल्या, बाहेरती मोठी अधिकारी असेलही, पण घरात आम्हाला ते कधीचजाणवले नाही. ती सर्वांमध्ये मिळून-मिसळून राहायची. हीगोष्ट दखल घेण्यासारखी आहे, कारण आजकालच्यातरुण पिढीला त्यांच्या शिक्षणाचा, पदाचा आणि पगाराचाखूप अभिमान आहे. अशा परिस्थितीत सासू-सून सोडाच,पती-पत्नीचेही पटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणीहीमदत मागितली तर शारदा कधीच टाळत नसे. इतकेच नाहीतर तुम्ही मदत मागितली नाही तरी तिला जाणीव व्हायची कीया व्यक्तीला कदाचित माझी गरज आहे, तर मी स्वतःचविचारून घेऊ का? हा असा संस्कार आहे, जो कोणत्याहीशाळा-कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. तुम्ही टॉपर आहात आणि तुमच्याकडे कोणी नोट्समागितल्या तर तुम्ही द्याल का? आधी तर तुम्ही विचारकराल की समोरचा किती नालायक आहे, स्वतः क्लासलाका येत नाही? मग मनात विचार येईल की, जर माझ्या नोट्सवाचून त्याने माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर? खरं तरकॉलेज सोडल्यानंतर काही वर्षांनी तुमच्या मार्कशीटलाकाहीच अर्थ राहत नाही. कदाचित वर्गात जो टॉपर होता तोबाहेरच्या जगात संघर्ष करत असेल. एखादा दिवस असायेईल जेव्हा तुम्ही नोकरी शोधत असाल आणि तोचक्लासमेट, ज्याच्यासोबत तुम्ही नोट्स शेअर केल्या होत्या,एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असेल. कदाचित तुम्हीविसरला असाल, पण त्याला आजही ते आठवत असेल. तुम्ही म्हणाल ही तर ‘कॅल्क्युलेशन’ची गोष्ट झाली. मीकोणाला मदत केली तर कदाचित कधीतरी त्याचे फळमिळेल. हे फक्त एक उदाहरण होते, याची काही गॅरंटी नाही.मी तर फक्त एवढेच पाहिले आहे की, जो मनापासून जगतोतोच खऱ्या आनंदाचा धनी होतो. कर्माच्या देवाणघेवाणीततो नेहमीच फायद्यात राहतो. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. कदाचित माझे कर्माचेखाते अजून थोडे जड आहे, ते संतुलित करण्याचे कामसुरू आहे. ज्या दिवशी ते पूर्ण होईल, तेव्हा माझ्याशोकसभेतही कोणीतरी येईल. माझी अशी इच्छा आहे कीमलाही अशाच प्रकारे लक्षात ठेवले जावे, लोकांच्या मनातएक गोडवा राहावा. थोडे आंबट, थोडे खारटही चालेल,फक्त कटूपणापासून दूर राहा, जीवन समृद्ध होईल. दोन आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला ‘खुर्ची’वर एक कथालिहिण्याचे निमंत्रण दिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे,70-75 वाचकांनी मला ई-मेल केले. मला अनेक सुंदररचना वाचायला मिळाल्या. पण सर्वात प्रेरणादायी कथाराजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील बागरा येथील देवेंद्रसिंह सुथार यांनी पाठवली. बक्षीस म्हणून मी त्यांना माझेएक पुस्तक स्वाक्षरीसह पाठवणार आहे. तुमच्या सर्वांमध्येइतकी प्रतिभा आहे, म्हणून मी तुम्हाला कथा लिहिण्याचीआणखी एक संधी देत आहे. यावेळचे शीर्षक आहे—‘जीना इसी का नाम है’. कथेत पात्रे, संवाद, थोडा तणावआणि चढ-उतार असायला हवेत. निबंध लिहून पाठवू नका.मग सुरू करा कल्पनेचा बहार, मला तुमच्या कथांची प्रतीक्षाआहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
एन. रघुरामन यांचा कॉलम:विश्वासाची जादुई ताकद, एक ‘फायरफायटर’ आणि हिऱ्याची गोष्ट
विश्वास आणि सातत्य हे असे अदृश्य धागे आहेत, जे मानवी नात्यांना जोडून ठेवतात. जेव्हा तुम्ही स्वतः याचा अनुभव घेता, तेव्हा ते केवळ एक ‘कनेक्शन’ न राहता एक अतूट नाते बनून जाते. माझ्या कारकिर्दीत आणि व्यक्तिगत आयुष्यात मला असे जाणवले आहे की, विश्वास केवळ बोलण्याने निर्माण होत नाही, तर सातत्याच्या आगीत तावून सुलाखून निघाल्यावर तो अधिक मजबूत होतो. अनेक दशकांपूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये मला सांगण्यात आले की, मी स्वतःचे वर्णन दोन-तीन शब्दांत करावे. अजिबात वेळ न दवडता मी म्हणालो, ‘मी एक फायरफायटर आहे.’ माझी कल्पकता तपासण्यासाठी एचआर हेड अरूप गुप्ता कुत्सितपणे हसले आणि म्हणाले, ‘जर तुला या वाक्यात आणखी एक शब्द जोडायला सांगितला तर तो कोणता असेल?’ साहजिकच, त्यांना ‘डेकोरेटिव्ह’, ‘गुड’ किंवा ‘एफिशिएंट’ सारख्या एखाद्या सामान्य विशेषणाची अपेक्षा होती, परंतु मी त्यांना एक व्यावहारिक सत्य सांगून चकित केले की, ‘मी एक कन्सिस्टंट (सातत्यपूर्ण) फायरफायटर आहे.’ त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक स्पष्ट दिसत होती. जरी त्यांनी मजेशीरपणे असे म्हणत आपले भाव लपवण्याचा प्रयत्न केला की, मी सिटी फायर ब्रिगेडच्या कोणत्याही अनुभवाचा उल्लेख तर केलाच नाही, परंतु खोलीतील वातावरण स्पष्टपणे अनुभवता येत होते. ‘कन्सिस्टंट’— या एका शब्दाने त्यांचा विश्वास जिंकला. तेव्हापासून गेल्या ३५ वर्षांत आमच्यात तसाच विश्वास कायम आहे. एका व्यावसायिक मुलाखतीपासून सुरू झालेले हे नाते जन्मभराच्या मैत्रीत बदलले. हे सिद्ध करते की, सातत्य हाच तो पाया आहे ज्यावर कायमस्वरूपी निष्ठेची इमारत उभी असते. गेल्या शुक्रवारी, मुंबईच्या अंधेरी येथील २२,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या तनिष्क स्टोअरमध्ये उभे असताना मला ही जुनी गोष्ट आठवली. जेव्हा मी ते सजलेले शोरूम पाहत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात हिंदीतील एक प्रसिद्ध ओळ रुंजी घालत होती— ‘आईना आज फिर रिश्वत लेता पकड़ा गया। दिल में दर्द था और चेहरा हंसता हुआ पकड़ा गया।’ खरे तर मी सुद्धा एका खोटेपणात अडकलो होतो— अगदी तसाच, जसा दशकांपूर्वी अरूप यांनी मजेशीरपणे विषय टाळला होता. खट्याळ नजरेने तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग यांनी मला विचारले, ‘तुम्ही टेन्शनमध्ये आहात का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ पण आतून मी थोड्या गोंधळात होतो. माझी चिंता त्या वस्तूच्या किमतीबद्दल नव्हती, तर माझ्या भूतकाळातील सत्याबद्दल होती. जर निकाल नकारात्मक आला असता, तर याचा अर्थ असा झाला असता की, दशकानुदशके मी ज्या गोष्टीचा आनंद घेत होतो, ती प्रत्यक्षात एका बनावट वस्तूशिवाय काहीच नव्हती. पेल्की यांनी मला ओळखले. त्या हसल्या आणि मी नजर चोरत हसलो. तेव्हाच मी पाहिले की, लांब उभे असलेले तनिष्कचे सीईओ अरुण नारायण या सायकॉलॉजिकल गेमची मजा घेत होते. माझ्या टेन्शनचे कारण लग्नाची अंगठी होती, जी अनेक वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी भेट दिली होती. त्यात एक छोटासा हिरा होता, अगदी राईच्या दाण्याएवढा. तीस वर्षे मी माझ्या फॅमिली ज्वेलरच्या शब्दावर विश्वास ठेवला होता. आज तीच अंगठी अशा अत्याधुनिक मशीनमध्ये होती, जी नैसर्गिक, लॅबमध्ये बनवलेले आणि बनावट हिरे यांमधील फरक सांगण्यासाठी बनवली आहे. मला तीन मिनिटे वाट पाहावी लागली. ही प्रतीक्षा अंतहीन वाटत होती, जसे एखाद्या ‘सीझन फिनाले’ दरम्यान डिजिटल स्क्रीनची बफरिंग पाहणे असते. तिसऱ्या मिनिटाला मशीनचा निकाल आला— ‘नॅचरल’ (नैसर्गिक). मला दिलासा मिळाला. आरशातील माझे प्रतिबिंब बदलले होते. पेल्की माझा विजय ओळखून जवळ आल्या आणि जोरात म्हणाल्या— ‘दे ताली’. आम्ही ‘हाई-फाइव्ह’ केले. मनातल्या मनात माझ्या फॅमिली ज्वेलरचे आभार मानत मी अरुण यांच्याकडे गेलो आणि माझ्या विश्वासाला वैज्ञानिक आधार दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कदाचित याच कारणामुळे या ब्रँडने असा निर्णय घेतला असावा की, ते त्यांच्या आउटलेटवर येणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांना एक वास्तव अनुभव देतील. फंडा असा की - जेव्हा वचने अनुभवाद्वारे प्रमाणित केली जातात, तेव्हा नाते अतूट बनते— मग ते मित्रांमधील असो किंवा एखाद्या ब्रँड आणि ग्राहकामधील.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कथा ऐकल्याने आव्हानांवर मात करण्याची शक्ती मिळते
आजकाल कथांमध्ये गर्दी वाढत आहे. परंतु गरुड आणि काकभूशुंडीयांच्यातील संभाषणात तुलसीदासांनी कथांचा सर्वात मोठा प्रभाव स्पष्टकेला. पक्ष्यांचा राजा गरुड म्हणाला, आता, मला श्रीरामाची कथा सांगा.ती अत्यंत शुद्ध करणारी आहे. नेहमीच आनंद देते. सर्व दुःखांचा नाशकरते.’ पवित्रता, आनंद आणि दुःख हे सर्व कथेत गुंतलेले आहेत.कथेतील पात्रे आणि घटना आपल्याला जीवनात काहीतरी करण्याचीआणि काहीतरी घडू देण्याची प्रेरणा देतात. आपण आपल्या कर्मांच्यापरिणामाबद्दल विचार करतो तेव्हा समस्या सुरू होते. निसर्ग आपले कामकरत असतो. तुम्ही कल्पना केलेले अचूक फळ मिळेल, हे गरजेचे नाही.म्हणून कथा ऐकल्याने एक शक्ती मिळते. ती आपल्याला हसत-खेळतआव्हानांना तोंड देण्यास मदत करते.
लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडे ठोस कारणे नाहीत
अमेरिका इराणवर हल्ला करेल का? अनेकांचा असाविश्वास आहे की सध्याचा संघर्ष हा युद्ध वाढवण्याऐवजीदबावाची रणनीतिचा भाग दिसतो. निर्णायक कारवाईपेक्षासंकेत देण्याचा प्रयत्न वाटतो. हा विश्वास निराधार नाही.अमेरिका-इराण संघर्षावर अनिश्चितता वर्चस्व गाजवते.हे इराणची हट्टी भूमिका आणि अमेरिकेची संकोच दोन्हीस्पष्ट करते. निर्बंध, आर्थिक अडचणी आणि निषेधअसूनही इराण झुकण्यास नकार देतो. कारण इराणीसत्ताधारी वर्गाचे उद्दिष्ट त्याचे राज्य टिकवणे आहे.तेहरानमध्ये सत्ताधारी नेतृत्वाचा असा विश्वास आहे कीबाह्य दबावाला बळी पडणे हे अंतर्गत अडचणी सहनकरण्यापेक्षा अधिक धोकादायक असेल. तेथीलराजकीय रचनेत तडजोड ही पतनाची सुरुवात मानलीजाते. म्हणूनच इराण कितीही घेरलेला असला तरी तो टिकला पाहिजे, असे विधान ऐकायला मिळते.परकीय दबाव अनेकदा सरकारांना बाह्य कटांनाघरातील कथित मतभेद जबाबदार धरण्याची परवानगीदेतो. हे निमित्त दडपशाहीला समर्थन देते. असा समज निर्माण होतो की कितीही प्रयत्न करावे लागले तरीआपल्या लोकांवर कडक नियंत्रण ठेवणे हा परकीय दबावाला बळी पडण्यापेक्षा सुरक्षित पर्याय आहे.व्यापक निषेधांशिवाय इराणमध्ये सत्ता बदल शक्य आहेका असे ट्रम्प यांना वाटते का? इतिहासात किंवा सध्याया विश्वासाचे समर्थन करणारा ठोस आधार नाही. बाह्यशक्तींकडून कोणताही सत्ता बदल शांततेत झालेलानाही. वॉशिंग्टनमधील सध्याचा वाद या वास्तवाला थेटतोंड देण्याचे टाळत आहे. राजकीय निर्णयांमधीलअस्पष्टता ही इराणमधील सर्वात महत्त्वाची उणीव आहे.त्याशिवाय लष्करी धमक्या व्यावहारिक रणनीतीपेक्षासौदेबाजीचे साधन बनतात. या व्यवहारातील कूटनीतीलक्षात घेतली पाहिजे. केवळ वर्तनात अस्पष्टता दिसते. अशी अस्पष्टता आत्मविश्वास नाही तर संकोचदर्शवते. अशा वक्तव्यांच्या खोलात एक नैतिक आणिधोरणात्मक प्रश्न असतो. राजकीय आणि लष्करी उद्दिष्टेसाध्य करण्याची किंमत हजारो नागरिकांचे जीव गमावून मोजावी लागते. तेव्हा त्यास कायदेशीर मानले जाऊशकते का?आधुनिक युद्धाच्या अनुभवाने या प्रश्नाचे वारंवार नाही’ असे उत्तर दिले आहे. व्यापक मानवी दुर्घटनेतूनमिळवलेले विजय अनेकदा त्यांची स्वतःची वैधता नष्टकरतात. ते समाजांना कट्टरतावादी बनवतात. प्रदेशांनाअस्थिर करतात.भविष्यातील संघर्षाची बीजे पेरतात.इराक हे त्याचे एक प्रमुख उदाहरण आहे.तिथे जलद लष्करी यशानंतर दीर्घकाळ राजकीयअपयश, सांप्रदायिक हिंसाचार, प्रादेशिक अस्थिरताआली. अशा परिस्थितीत विजयाचा भ्रम केवळधोरणात्मक पराभव पुढे ढकलतो.असाही एक गैरसमजआहे की गंभीर धोका निर्माण करण्यासाठी इराणनेअमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याशी जुळवून घेतले पाहिजे.मात्र इराणची प्रतिबंधात्मक रणनीती जाणूनबुजूनराजकीय, आर्थिक आणि मानसिक नुकसानकरण्यासाठी तयार केली गेली आहे. होर्मुझच्यासामुद्रधुनीतील सागरी व्यापारात व्यत्यय आणण्याची,क्षेपणास्त्रे , ड्रोनने नौदल तळांना लक्ष्य करण्याची किंवामोठ्या जहाजाला नुकसान पोहोचवण्याची त्यांची क्षमताही अशा कृती तुलनेने लहान वाटली तरी तिचे परिणामअसामान्य रुप घेऊ शकतात. अमेरिकन विमानवाहू जहाजावर किंवा महत्त्वाच्यासागरी मार्गावर इराणचा एक हल्ला जागतिकबाजारपेठांना हादरवू शकतो. अमेरिकेची प्रतिष्ठागंभीरपणे कमी करू शकतो. सार्वजनिक दबावाखालीराजकीय आणि लष्करी चिथावणी देऊ शकतो आणिदोन्ही बाजूंच्या नियंत्रणाबाहेरील घटना घडवू शकतो.इराणला अमेरिकेला लष्करीदृष्ट्या पराभूत करण्याचीगरज नाही. त्याला फक्त कोणत्याही हस्तक्षेपाचीराजकीय किंमत असह्य होत असल्याचा कांगावाकरायचा आहे. ही गोष्ट अमेरिकेला अगदी चांगल्याप्रकारे समजते. म्हणूनच सध्या दोन्ही बाजू म्हणजेअमेरिका तसेच इराण देखील संघर्ष वाढवण्यास मुळीचतयार दिसून येत नाहीत.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) युद्धे मोठ्या आवाजांतील धमक्यांनी सुरूहोत नाहीत. दोन्हीपैकी एका बाजूचेउद्दिष्ट स्पष्ट होते तेव्हा ती सुरू होतात.सध्या इराणबाबत अमेरिकेचे तसे उद्दिष्टपूर्णपणे अस्पष्ट आहे. यात संभ्रम दिसतो.
एन. रघुरामन यांचा कॉलम:परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 1990 च्या दशकातील जीवनशैलीचा एक भाग दाखवा
“परीक्षा उद्यापासून आहे. आता कुठे जातोय?’ सोमवारी मुंबईतील समोरच्या गेटने बसमध्ये चढणाऱ्या एका विद्यार्थ्याला चालकाने विचारले. मी बस सुटण्याची वाट पाहत होतो, म्हणून मी संभाषण ऐकले. मुलाने स्पष्ट केले की त्याच्या हॉलतिकिटावरील छपाईतील चुकांमुळे तो परीक्षा केंद्राबद्दल गोंधळात पडला आहे. त्याला हा प्रश्न सोडवायचा होता, जेणेकरून तो महाराष्ट्रात १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा कोणत्याही तणावाशिवाय देऊ शकेल. त्याचप्रमाणे २० फेब्रुवारी रोजी त्याच्या दोन वर्षांनी लहान असलेले ३,४८,८९९ विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. मुंबईच्या नागरी वाहतुकीने या विद्यार्थ्यांसाठी केवळ अतिरिक्त बसेस चालवल्या नाहीत तर मागील गेटवरील गर्दी टाळण्यासाठी त्यांना पुढच्या गेटवरून चढण्यास सांगितले आहे. “काळजी करू नका, फक्त या,” चालक म्हणाला. मी तुम्हाला लवकर तिथे पोहोचवतो. “मला खात्री आहे की तुमची समस्या सुटेल.” या शब्दांनी मुलाला शांत केले. तो हसला आणि समोरच्या गेटमधून चढताना काही प्रवाशांच्या अस्वस्थ चेहऱ्यांकडे दुर्लक्ष केले. बस पुढे सरकली. मी रस्ता ओलांडताना विचार करत होतो की ही नवीन पिढी आपली पहिली किंवा दुसरी स्पर्धा परीक्षा देणार आहे. शेवटच्या क्षणी अशा चुका झाल्यावर ही पिढी काय विचार करत असावी. मी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला हीच परीक्षा दिली तेव्हा कुणीही आमच्यासोबत नव्हते. आम्ही शाळेत चालत जायचो. परीक्षा द्यायचो आणि पुढच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी परतायचो. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला माझ्या मुलीने तिची परीक्षा दिली तेव्हा एक पालक नेहमीच सोबत असायचा. जेणेकरून ती ट्रॅफिकमध्ये अडकू नये किंवा पुढील परीक्षेसाठी तिचा मूड खराब होऊ नये. आज आपण अशा युगात राहतो जिथे संगणकातील बिघाड, अचानक वीज खंडित होणे आणि वाहतूक बिघाड यासारख्या सामान्य समस्यांमुळे आपल्याला वेळेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. आपण १९९० चे दशकदेखील पाहिले आहे. तेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ होता. कारण तेव्हा जग इतके वेगवान नव्हते आणि आपल्या उर्वरित तीन सेकंदांचे लक्ष वेधण्यासाठीचे स्पॅनचे मूल्यांकन करण्यासाठी अल्गोरिदम नव्हते. त्या काळात गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीमधील सर्व मुलांना चॉकलेट बार पाठवत असत आणि त्यांना त्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत असत. सोसायटीतील काही श्रीमंत सदस्य चांगल्या शाईच्या पेनसह शुभेच्छा पाठवत असत. सोसायटीत मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये अशी सूचना जारी करत असत. क्लबहाऊस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले असायचे. मनोरंजनासाठी नाही. काही जण चहा आणि कॉफी पुरवत असत, जेणेकरून मुले अभ्यासासाठी जागृतही राहू शकतील. गाड्या असलेले लोक पालकांना संदेश देत असत की गरज पडल्यास ते त्यांच्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडतील. हा सामूहिक प्रयत्न केवळ मुलांच्या यशासाठी होता. आज आपली जीवनशैली खूप उंचावली आहे. प्रत्येक घर एकमेकांशी संपत्ती जमा करण्यासाठी स्पर्धा करत आहे. मदत मागण्यास आपण कचरतो. जग धावत आहे. कदाचित म्हणूनच आपल्याला अनेकदा बस स्टॉपवर बसची उत्सुकतेने वाट पाहणारा शेजाऱ्याचा मुलगा लक्षात येत नाही. फंडा असा की - देशभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने या मुलांना १९९० च्या दशकातील जीवनशैलीचा एक छोटासा भाग देऊया. तसे कदाचित यातून त्यांचा आणि आपलाही दिवस उजळू शकेल.
भारतीय शहरांसमोरील प्रमुख सार्वजनिक आरोग्य संकटांपैकी वायू प्रदूषण हे एक गंभीर आव्हान बनले आहे. लोकसंख्येची प्रचंड घनता आणि वाहनांचे उत्सर्जन, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे यांसारख्या प्रदूषण स्रोतांशी असलेली जवळीक यामुळे अनेक शहरी भाग कायमस्वरूपी प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत, ज्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. भारतामध्ये वायू गुणवत्तेबाबतची चर्चा आणि धोरणे प्रामुख्याने Continuous Ambient Air Quality Monitoring Stations (CAAQMS) कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित आहेत. मात्र, ही मॉनिटरिंग केंद्रे बहुतेक वेळा लोकांच्या वास्तव्यात, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासाच्या मार्गांपासून दूर असतात. विविध अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, दाट लोकवस्तीच्या भागांतील नागरिकांना तुलनेने अधिक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. विशेषतः मुले, गर्भवती महिला, श्वसन विकार असलेले लोक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यांच्यावर याचा परिणाम अधिक तीव्र असतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शहरी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल आवश्यक आहे. यासाठी एक आशादायक उपाय म्हणजे ‘हेल्दी एअर झोन्स’ (Healthy Air Zones – HAZs) स्वीकारणे.’ या संकल्पनेत संपूर्ण शहराच्या सरासरी प्रदूषण मापनाऐवजी विशिष्ट भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून वायू प्रदुषणाच्या स्रोतांवर भर दिला जातो. जागतिक स्तरावर ही संकल्पना ‘क्लीन एअर झोन्स’ किंवा ‘लो एमिशन झोन्स’ म्हणूनही राबवली जाते. मात्र, तिथे ही पद्धत प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रापुरती मर्यादित असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणि वाहतूक नियंत्रण यावर भर असतो. भारतीय शहरे मात्र या चौकटीपलीकडे जाऊन वाहनेच नव्हे, तर बांधकाम, रस्त्यावरील धूळ, कचरा जाळणे आणि उद्योग यांसारख्या इतर प्रदूषण स्रोतांवरही लक्ष केंद्रित करू शकतात. हेल्दी एअर झोन्स शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये किंवा जिथे लोकसंख्या आणि वावर अधिक आहे अशा ठिकाणी राबवता येऊ शकतात. यामध्ये वाहतूक केंद्रे, मध्यवर्ती व्यापारी भाग, बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि मोठी सार्वजनिक स्थळे यांचा समावेश होतो. शहर प्रशासन उच्च लोकघनता असलेले भाग, प्रदूषण स्रोत आणि जास्त प्रमाणात प्रदूषणाच्या संपर्कात असलेले नागरिक यांची ओळख करून घेऊ शकते. यामुळे स्थानिक पातळीवर विशिष्ट गरजांनुसार उपाययोजना करता येतील, ज्याचा उपयोग पुढे शहरव्यापी वायू प्रदूषण नियंत्रण योजनेत होऊ शकतो. वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, HAZ अंतर्गत स्वच्छ वाहतुकीकडे संक्रमणाला प्राधान्य देता येईल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन व अनुदान, सार्वजनिक वाहतुकीची वारंवारता आणि विश्वासार्हता वाढवणे, तसेच कमी अंतरासाठी चालणे आणि सायकलिंगला प्राधान्य देण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना करणे यांचा समावेश होतो. या झोन्समध्ये अतिप्रदूषणकारी मालवाहनांवर आणि जुन्या व्यावसायिक वाहनांवर कठोर निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतील. एज-टू-एज पेव्हिंग आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे यांसारख्या पायाभूत सुविधा उपायांमुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होतो; टेलपाइप उत्सर्जन कमी होते. यामुळे रस्त्यावरील धूळ पुन्हा हवेत उडण्याचे प्रमाणही कमी होते. कारण ही धूळ सूक्ष्म कणांच्या (Particulate Matter) प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या प्रकारच्या पायाभूत आणि नियामक उपायांमुळे प्रदूषण कमी होण्याचे फायदे थेट त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ मिळू शकतात. या झोन्समध्ये बांधकाम स्थळांवर कडक निरीक्षण आणि स्वच्छ बांधकाम पद्धतींची सक्ती करता येईल. पाडकामाच्या वेळी पाण्याची फवारणी, वाहनांच्या चाकांची स्वच्छता (wheel-washing), बांधकाम साहित्य आणि कचरा झाकून ठेवणे हे उपाय आजूबाजूच्या निवासी भागांना धूळ आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दाट औद्योगिक वसाहती किंवा लहान उद्योगांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये स्वच्छ इंधनाकडे वळल्यास प्रदूषण नियंत्रण अधिक मजबूत होऊ शकते. महापालिकेने कचरा खुले जाळणे हे स्थानिक पातळीवरील वायू प्रदूषणाचे एक महत्त्वाचे कारण आहे. HAZ पद्धतीद्वारे स्थानिक व्यवस्थापन योजना तयार करता येईल. समुदाय सहभागातून जनजागृती वाढवता येईल आणि विकेंद्रीत कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा उभारता येतील. विद्यमान CCTV नेटवर्कचा वापर करून कचरा जाळण्याचे हॉटस्पॉट ओळखता येतील आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी निर्माण करता येईल. औद्योगिक क्षेत्रे किंवा मुख्य रस्ते आणि निवासी इमारती यांच्या दरम्यान शहरी जंगलांची लागवड आणि हिरवे बफर झोन्स तयार केल्यास हे नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करून समुदायावर प्रदूषणाचा परिणाम कमी करतात. आजपर्यंत वायू गुणवत्ता व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रशासकीय प्रक्रियेचा आहे. HAZ पद्धतीमुळे स्थानिक नागरिकांना, समुदायांना, नगरसेवकांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना थेट सहभागी होण्याची संधी मिळते. यामुळे स्थानिक पातळीवर टिकाऊ आणि प्रभावी उपाय विकसित होऊ शकतात. हेल्दी एअर झोन्स हे ‘लिव्हिंग लॅबोरेटरी’ म्हणूनही काम करू शकतात, जिथे नवकल्पना तपासून पाहता येतात. लहान भौगोलिक क्षेत्रात उपायांची परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतर ते संपूर्ण शहरात राबवता येतात. फेब्रुवारीत पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन करण्यात आले आहे. या मंचावर शहर प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांना अनुभव शेअर करण्याची आणि प्रयोगाअंती सिद्ध झालेल्या उपायांसाठी अंमलबजावणीचा आराखडा आखण्याची संधी मिळणार आहे. ‘हेल्थी एअर झोन्स’सारखे प्रयोग ग्लोबल साउथमध्ये यशस्वी उदाहरणे आधीच पाहायला मिळतात. आग्रा येथे ताजमहाल परिसरात खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यात आल्याने ऐतिहासिक वारसा आणि आरोग्य दोन्हींचे संरक्षण कसे करता येते हे स्पष्ट झाले आहे. तसेच कोलंबियातील बोगोटा शहरातील क्लीन एअर झोन्समध्ये स्वच्छ वाहतूक आणि समुदायिक आरोग्य यांचा प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. सर्वाधिक प्रदूषित मार्गांवर लक्ष केंद्रित करून उत्सर्जनात लक्षणीय घट करण्यात यश आले आहे. आरोग्य विशेषतः कमकुवत समाज घटकांचा प्रदूषण संपर्क कमी करण्यावर भर देऊन HAZ संकल्पना आपल्या शहरांचे रूपांतर करण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे स्वच्छ हवा हे केवळ धोरणात्मक उद्दिष्ट नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:सोन्याच्या शर्यतीत अद्याप पैसे कमावता येतील का?
जर तुम्ही चार दिवस आधी, 4 फेब्रुवारीला सोने खरेदी केले असते तर तुम्ही 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी अंदाजे ₹1,60,356 दिले असते, जे 1 फेब्रुवारी 2026 पेक्षा ₹3,505 जास्त आहे. तुम्ही एक वर्षापूर्वी हीच खरेदी केली असती तर व्यवहाराची किंमत सुमारे ₹85,300 झाली असती. फेब्रुवारी 2024 च्या या स्तंभात पुढील 14 महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तेव्हा एवढे सोने तुम्हाला 62 हजार रुपयांत मिळाले असते. सोने विक्रमी उच्चांकावर असू शकते. जागतिक अनिश्चिततेच्या काळात ते आणखी वाढू शकते. कारण जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते पसंतीचा पर्याय आहे. परंतु ज्या गुंतवणुकींनी इतकी चांगली कामगिरी केली आहे त्यात अनेकदा अशा व्यवहारांचा समावेश असतो, ज्यात सुधारणा होऊ शकते. म्हणूनच जगभरातील मध्यवर्ती बँकांना जोडणाऱ्या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने इशारा जारी केला आहे. त्यानुसार सोने बबल झोनमध्ये असू शकते आणि त्यात लक्षणीय घटदेखील होऊ शकते. तथापि, अनेक गुंतवणूकदार आणि विश्लेषक अजूनही असे सुचवत आहेत की, ते आणखी वाढेल. यासाठी प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. पण जेव्हा आपण चांदीकडे पाहतो तेव्हा ती अत्यंत अस्थिर झाली आहे, त्यात लक्षणीय चढउतार येत आहेत. अनेक महिन्यांच्या वाढीनंतर अलीकडेच एका दिवसात ती 17% ने घसरली आहे. एका आठवड्यात ती सर्वोच्च शिखरावरून ती 36% ने घसरली आहे. उच्च परताव्याची आशा बाळगून गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती, सोन्याच्या तुलनेत तिचा आकार लहान असणे आणि औद्योगिक मागणी यामुळे चांदीच्या किमतीत एका वर्षात 250% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बहुतेक भारतीयांसाठी सोन्यातील गुंतवणूक हा एक भावनिक विषय आहे. दुसरीकडे, जगभरातील अनेक लोक याकडे एक ‘अंतिम सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून पाहतात. ते सोन्याकडे त्याच दृष्टीने बघतात, ज्याप्रमाणे मोठे गुंतवणूकदार शेअर आणि बाँड्सकडे पाहतात. परंतु जर तुम्ही नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर त्याची अस्थिरता आणि किमतीत घट यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. म्हणून गुंतवणूक करताना एक मर्यादा निश्चित करा : तुम्ही कोणत्या किमतीला नफा मिळवण्यासाठी पुरेशा उच्च किमतीला विक्री कराल किंवा कोणत्या किमतीला इतक्या कमी किमतीला विक्री कराल की तोटा सहन करता येईल. व्यवस्थापनाची टीप : खरेदीसाठी खूप उशीर झाला आहे आणि तुम्ही ते विकत घेतले तरी त्यासोबत कोणतीही भावना जोडू नका. तुम्ही स्वतः ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच त्याचा व्यापार (ट्रेडिंग) करा. तज्ज्ञांसह कोणाचेही अंदाज चुकू शकतात, हाच आमचा इशारा आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:आजी-पणजीकडून आपली एआय स्किल्स सुधारायला शिका!
ही 1968 ची एका रविवारची संध्याकाळ होती. त्यांनी गल्लीच्या कोपऱ्यातून त्यांना चालत येताना पाहिले. त्यांच्या डोळ्यांनी चटकन ओळखले की ते आपल्या नेहमीच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांच्या एआय म्हणजेच ‘ॲक्च्युअल इंटेलिजन्स’ने लगेचच ऑफिसमध्ये घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. त्या दिवशी त्यांच्या साहेबांना सुट्टी होती त्यामुळे प्रशासकीय वादाची शक्यता नव्हती. रविवारची संध्याकाळ असल्याने ट्रॅफिकही कमी होती. त्यामुळे घरी यायला उशीर होण्याचे कारण नव्हते. बाहेर हवामान थंड होते त्यामुळे उकाड्याने त्रस्त होण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्यांच्या या अशा वागण्याचे कारण काय असू शकते? त्यांच्या डोळ्यांनी स्वतःच्या अंतर्गत एआयचा वापर केला आणि आपल्या काळातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’प्रमाणे ‘डीप डाइव्ह’ केले. त्यांनी पाहिले की त्यांचा नवीन पांढरा शर्ट - जो नेहमी कडक आणि नीटनेटका असायचा - उजव्या बाजूने थोडा ढिला पडला होता. वरून दुसरे बटण गायब होते. याच कारणामुळे त्यांचा उजवा हात वारंवार छातीजवळची ती रिकामी जागा झाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या ‘मेमरी कार्ड’ने एका जुन्या घटनेची आठवण काढली, जेव्हा त्यांचा शर्ट टेबलच्या ड्रॉवरच्या खाली निघालेल्या एका खिळ्यात अडकून फाटला होता. त्यांचे डोळे चमकले. जसजसे ते घराच्या जवळ येत होते तशी त्यांनी समस्या ओळखली होती आणि त्याचे समाधानही त्यांच्याकडे आधीपासूनच तयार होते. हो, त्यांचे एक बटण तुटले होते. ते अस्वस्थ होते. कारण त्याच संध्याकाळी त्यांना तोच शर्ट घालून त्यांच्यासोबत बाहेर जायचे होते. ते घरी पोहोचताच त्यांनी त्यांच्या हातातील बॅग घेताना पहिले वाक्य हे उच्चारले की, ‘काळजी करू नका, तुम्ही कॉफी पिण्यापूर्वी मी बटण लावून देईन. नशीब शर्टला काही झाले नाही! काय, तीन आठवड्यांनंतरही शिपायाने तो खिळा नीट केला नाही का? उद्या जेव्हा तो तुमचा टिफीन घ्यायला येईल तेव्हा मी त्याला आठवण करून देईन.’ त्यांनी या सर्व गोष्टी कोणताही प्रश्न न विचारता सांगितल्या होत्या. त्यांचा मूड एका क्षणात बदलला. त्यांच्या एआयने काहीही न सांगता प्रत्येक समस्येवर तोडगा दिला होता. माझ्या आई-वडिलांमधील हे दृश्य मी कधीच विसरू शकलो नाही. पण आज जेव्हा मला त्या सर्वाचा अर्थ समजतो तेव्हा मला त्यात आपल्या आजच्या जगासाठी एक खोल साम्य आणि एक समाधान दिसते. तुम्हीही ‘एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) डिसरप्शन’मुळे दररोज करिअरचा पॅनिक बटण दाबत आहात का? तुम्ही एआय अपस्केलिंगच्या प्रक्रियेत आहात का? तर वरील गोष्टीवरून ही शिकवण घ्या - एआयचे ऑनलाइन कोर्सेस हे व्यायामाच्या नियमांसारखे असतात. चुकीचा कोर्स निवडला तर तो तुम्हाला तितकाच निराश करेल, जितका एखादा अयशस्वी ‘फिटनेस रिझोल्युशन’. तुम्हाला एआयबद्दल काय शिकण्याची गरज आहे हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे ‘ग्रँडमदर एआय’ला विचारणे. त्याच खऱ्या अर्थाने ‘मास्टरक्लास’ देतात. त्या आपल्या वागण्यातून दाखवून देतात की, एआयचे प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे कंपन्यांच्या नजरेत तुम्ही त्याचे तज्ज्ञ बनत नाही, ज्याप्रमाणे थोड्या वर्कआऊटने तुम्ही बॉक्सिंग चॅम्पियनसारखे दिसू शकत नाही. खुद्द रिक्रूटर्सनाही हे ठरवता येत नाही की ऑनलाइन कोर्सेसमधून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांना किती महत्त्व द्यावे. म्हणूनच हे आवश्यक आहे की तुम्ही तुमची मूल्ये स्पष्टपणे समोर ठेवावी, जशी आईने वडिलांसमोर ठेवली होती - या पुराव्यासह की तुमची एआय क्षमता तुमची कामगिरी कशी सुधारते. त्यांच्याकडे ‘ॲक्च्युअल इंटेलिजन्स’ने तयार केलेले ‘वर्क-पोर्टफोलिओ’ होते. एआयचे ट्रेनिंग आणि कोर्सेस ही काही 5-स्टार प्रमाणपत्रे नाहीत, जी तुम्हाला लगेच नवीन नोकरी मिळवून देतील किंवा पदोन्नती देतील. पण ती तुमच्या नॅरेटिव्हचा भाग नक्कीच बनू शकतात. तुमच्या चर्चा अशा प्रकारे मांडा की, तुम्ही सतत शिकणारे व्यक्ती आहात असे वाटेल, नवीन तंत्रज्ञानाला घाबरणारे नाही - ज्याला आपल्या आजी-पणजींची पिढी केवळ ‘उदयास येणाऱ्या समस्या’ म्हणायची.
एन. रघुरामन यांचा कॉलम:‘टूल-बेल्ट’ जनरेशनचे फॅशन स्टेटमेंट आमच्या पिढीच्या अगदी उलट आहे
नुकतेच अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीने मला २८ डॉलरची ‘काउबॉय हॅट’ भेट दिली. ही हॅट केवळ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहरा झाकून ठेवते म्हणूनच वेगळी नव्हती, तर ज्याप्रमाणे बुटांच्या छिद्रांमधून लेस ओवलेली असते तशीच त्या हॅटच्या चारी बाजूंनी फीत ओवलेली होती. त्या हॅटलाही चारही बाजूंनी छिद्रे होती. जशी तुम्ही फीत सोडता तशी हॅटच्या आतून एक मच्छरदाणी उघडते आणि चेहरा व मान झाकून टाकते, जी तुम्ही शर्टच्या कॉलरमध्ये खोचून बटण लावू शकता. बहिणीने माझा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये मी फिरत होतो आणि मच्छर मला चावत होते. त्यानंतर तिने ही हॅट खरेदी केली. तेव्हापासून रात्री बाहेर जाताना हा माझा आवडता पेहराव बनली आहे. कारण तेव्हा डास चावण्याची शक्यता असते. ती माझ्या टक्कल पडत असलेल्या डोक्याला झाकते, फॅशनेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डासांपासून बचाव करते. काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असले तरी मला फरक पडत नाही- कारण काही प्रमाणात ती मला संभाव्य आजारांपासून वाचवते. आतापर्यंत मला माहित नव्हते की ही हॅट घालून मी ‘टूल-बेल्ट जनरेशन फॅशन प्रमोटर’ बनलो आहे. आता हे काय आहे? तर ही अशा लोकांची फॅशन आहे, जे शारीरिक श्रम करतात आणि अशा आरामदायी कपड्यांवर व चांगल्या साधनांवर (टूल्स) खर्च करण्यास तयार असतात, जे सुरक्षा देतात. उदाहरणार्थ, सुरक्षा मानकांनुसार असलेले वर्क बूट्स. अनेक ‘जेन-झी’ तरुणांना आता हे उमजले आहे की, केवळ पदवीधर होण्यापेक्षा मेकॅनिक, प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन बनून जास्त कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत ते शारीरिक श्रमाच्या कार्यबलात सामील होत आहेत. म्हणूनच त्यांनी असे कपडे आणि फॅशन निवडली आहे, जी त्यांच्या कामाच्या प्राधान्यक्रमानुसार अधिक लवचिक (फ्लेक्सिबल) आहे. आणि जे लोक असे फंक्शनल फिट कपडे परिधान करतात, त्यांना ‘ट्रेड्सपीपल’ म्हटले जाते. आज ट्रेड्सपीपल म्हणजे फक्त तेच लोक नाहीत, जे निळा गणवेश घालून वर्कशॉपमध्ये असतात. गेल्या चार वर्षांत शॉप फ्लोअरचा मोठा कार्यबल बनलेले जेन-झी तरुण केवळ कामावर येता-जातानाच नाही, तर वर्कप्लेसवरही फॅशनेबल दिसू इच्छितात. यामुळे या कपड्यांची ओढ आता ‘ब्लू कॉलर’ संस्कृतीच्या पलीकडे गेली आहे. ब्रंट, लोव्हस यांसारखे मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड केवळ जगभरात स्टोअर्स उघडत नाहीत, तर ब्रँड-बिल्डिंग कंपन्यांच्या माध्यमातून ‘वर्कवेअरमधील वारसा’ (लेगेसी) देखील सांगत आहेत. परदेशात त्यांना कोणी केवळ कामगार म्हणू शकत नाही, तर तिथे त्यांना ‘स्ट्रीटवेअर कम्युनिटीज’ म्हटले जाते. हे वर्कवेअर अशा लोकांसाठी आहेत, जे त्यांचा वापर फॅशन प्रॉडक्ट म्हणून नाही, तर इक्विपमेंट्स (साधने) म्हणून करतात. वर्कवेअर हा आज अपेरल आणि फुटवेअर इंडस्ट्रीमधील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे, ज्याची किंमत लाखो डॉलर्स आहे. ‘बकेट टॉक’ नावाचा एक पॉडकास्ट आहे, जो वेल्डर्स, प्लंबर्स, शेतकरी आणि युटिलिटी लाइनमन यांसारख्या लोकांसाठी आहे. यात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे लोक हलक्या आणि अधिक आरामदायी कपड्यांकडे वळत आहेत. हे कपडे वेगवेगळ्या हवामानात आणि स्वच्छतेच्या परिस्थितीत काम करण्यास उपयुक्त ठरत आहेत. आठवा की कॉलेजच्या दिवसांत आपल्यापैकी अनेक जण बसमध्ये ॲप्रन घालून फिरत असत, जणू आपण मेडिकलचे शिक्षण घेत आहोत, जरी आपण बीएस्सी किंवा एमएस्सीचे विद्यार्थी असू. त्याचप्रमाणे आज ही टूल-बेल्ट जनरेशन आपले आधुनिक स्ट्रीटवेअर घालून आरामात बस स्टँड आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत आहे. इतरांना दाखवण्यासाठी आपण कपडे घालत होतो, ते दिवस आता गेले. टूल-बेल्ट जनरेशन मानते की ‘माय कम्फर्ट, कम्स फर्स्ट’ (माझा आराम आधी येतो). आणि यात काही चुकीचेही नाही. त्यांच्या नवीन कार्गो पँट्स आपल्या काळातील कडक कॅनव्हास पँट्सपेक्षा कितीतरी जास्त स्ट्रेचेबल आहेत. मी पाहतो की सोशल मीडियावरही हे तरुण आपल्या आरामाला प्राधान्य देत मेकॅनिक, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन्सचे जोडे आणि पेहराव घालत आहेत. फंडा असा आहे की, टूल-बेल्ट जनरेशनच्या पेहरावाच्या नवीन स्टाइलबाबत पूर्वग्रहदूषित (जजमेंटल) होऊ नका. कारण त्यांना इतरांच्या नजरेत चांगले दिसण्यापेक्षा स्वतःचा आराम जास्त महत्त्वाचा वाटतो.
विराग गुप्ता यांचा कॉलम:व्हॉट्सॲप डेटा चोरीवर आपणकधी कठोर भूमिका घेणार?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्हॉट्सॲपला फटकारतानाडेटा चोरीमुळे ग्राहकांना लक्ष्य करून जाहिरातीपाठवल्या जातात. तीन न्यायाधीशांचे खंडपीठ म्हणाले,लोकांच्या वैयक्तिक डेटाचा व्यावसायिक वापररोखण्यासाठी प्रतिज्ञापत्र प्राप्त होईपर्यंत व्हॉट्सॲपच्याअपीलावर सुनावणी केली जाणार नाही. व्हॉट्सॲपप्रकरणातील सुनावणी आणि निर्णय डिजिटल इंडियाचेभवितव्य आणि प्रतिमा दोन्ही बदलू शकतो. याच्याशीसंबंधित सहा पैलू समजून घेणे महत्त्वाचे आहे. १. भारतात मेटाच्या तीन कंपन्यांचे ५८ कोटी वापरकर्तेआहेत: फेसबुक, इंस्टाग्राम ४८ कोटी आणि व्हॉट्सॲपसुमारे ८५ कोटी ग्राहक आहेत. देशातील ९२% उद्योगआणि ८९% स्मार्टफोन वापरकर्ते व्हॉट्सॲप वापरतआहेत. २०१६ पासून तीन मेटा कंपन्या कोट्यवधीग्राहकांचा डेटा शेअर करत आहेत. व्यावसायिकवापरातून लक्षणीय नफा कमवत आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाने २०२१-२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात म्हटले होते की व्हॉट्सॲप प्रकरण स्पर्धा कायद्यानुसार सुनावणीत आहे. त्याचाकलम २१, गोपनीयतेशी संबंध नाही.२. सीसीआय आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की मोफत सेवा देणारे व्हॉट्सॲपजाहिरातींमधून महसूल मिळवते आणि वापरकर्ते त्याचेउत्पादन आहेत. अमेरिकेत दाखल क्लास ॲक्शनसूटनुसार व्हॉट्सॲपचे चॅट आणि डेटा असुरक्षितअसल्याने लक्ष्यित जाहिराती दिसतात. अनेक चिनीॲप्सवर भारतीय डेटा परदेशात हस्तांतरित करण्यासाठीबंदी घालण्यात आली होती. अमेरिकन टेक कंपन्याआमचा डेटा देशांतर्गत व परदेशात उघडपणे विकतआहेत. तरीही केंद्र सरकार २०२३ मध्ये संसदेने मंजूरकेलेल्या डेटा संरक्षण कायदे अंमलबजावणी करत नाही.३. मेटाने २०२५ मध्ये जागतिक स्तरावर २०० अब्जडॉलर्सचे उत्पन्न मिळवले होते. यापैकी अंदाजे १९६अब्ज डॉलर्सची कमाई केवळ जाहिरातींमधून होते.मेटाचा प्रति ग्राहक व सरासरी कमाई ५७ डॉलर्स आहे.वापरकर्त्यांच्या संख्येनुसार भारतातून व्हॉट्सॲपलाअंदाजे ४ लाख कोटी रुपयांची कमाई होते. परंतुजगातील सर्वात मोठी डिजिटल बाजारपेठ असलेल्याभारतात मेटा इंडियाने गेल्या वर्षी फक्त ३७९२ कोटींचीकमाई नोंदवली. भारतात अंदाजे ४४ लाख कोटी कररुपातून मिळतात. तो जीडीपीच्या ११.२% आहे. विकसितदेशांची संघटना असलेल्या ओइसीडीमध्ये जीडीपीच्या३४% कर उत्पन्नातून येतो. मेटाकडून डेटा वर जीएसटीवसुल केल्यास तूट कमी होईल. अर्थव्यवस्था वाढेल.४. विशाल डेटा बेसच्या जोरावर मेटा वाणिज्य,डिजिटल जाहिरात, यूपीआय, पेमेंट बँकिंग, एआय याक्षेत्रातही वर्चस्व प्रस्थापित करत आहे. व्हॉट्सॲपद्वारे६०% पेक्षा जास्त मोफत व्हॉइस कॉलमुळे टेलिकॉमकंपन्या आर्थिक अडचणीत आहेत. व्हॉट्सॲप कॉलवरकेवायसी नसल्याने सायबर गुन्हे वाढले. मोबाईलकंपन्यांच्या मागण्या व संसदीय समितीच्याअहवालानंतरही व्हॉट्सॲपला दूरध्वनी कायदा २०२३अंतर्गत आणले नाही.५. युरोपमध्ये कडक जीडीआर डेटा संरक्षण कायद्याचेउल्लंघन केल्याबद्दल मेटाच्या कंपन्यांना १२ हजार कोटीरुपये, डिजिटल मार्केटिंग कायद्याचे उल्लंघनकेल्याबद्दल २००० कोटी रुपये आणि अल्पवयीनमुलांवरील डेटाचा गैरवापर केल्याबद्दल ४ हजार कोटीरुपये दंड ठोठावण्यात आला. अमेरिकेत केंब्रिजप्रकरणात २०१९ मध्ये फेडरल ट्रेड कमिशनने मेटालासुमारे ५० हजार कोटी रुपये दंड ठोठावला. भारतीयकेंद्रीय आयोगाने मेटाला २१३ कोटी रुपयांचा छोटा दंडठोठावला. त्याची वसुली सध्या कोर्टात सुरू आहे.६. व्हॉट्सॲपने नियमांचे पालन केले नाही तरव्हॉट्सॲपने भारत सोडावा असा निर्णय न्यायाधीशांनीदिला आहे. मेक इन इंडिया’ आणि स्वावलंबनाचे दावेअसूनही जनता, उद्योग, न्यायालये आणि सरकारपूर्णपणे व्हॉट्सॲपवर अवलंबून आहेत. सर्वोच्चन्यायालयाने डेटा चोरी रोखण्यासाठी कठोर आदेशदिल्यास राज्यघटनेच्या राजवटीची प्रतिष्ठा वाढेल.शिवाय सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट होईल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) न्यायाधीशांनी असे म्हटले आहे कीव्हॉट्सॲपने नियमांचे पालन केले नाहीतर त्यांनी भारत सोडावा. परंतु मेक इनइंडिया आणि आत्मनिर्भरतेसारखे दावेअसूनही जनता, व्यापार, न्यायालयेसरकार व्हॉट्सॲपवर अवलंबून आहेत.
डेरॉन एस्मोग्लू यांचा कॉलम:अध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला नेमके कुठे नेऊन ठेवणार आहेत?
ट्रम्प यांच्या धोरणांमुळे हुकूमशाहीकडे वाटचालकरताना अमेरिकेत निर्णायक वळण कधी येईल हेसमजणे कठीण आहे. काही जण असा युक्तिवादकरतील की या रणनीतिचा उद्देश लोकांच्या हक्कांवर वसंस्थात्मक नियंत्रणावर हळूहळू अतिक्रमण करणे आहे.परंतु आपण मिनियापोलिसमध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्सएन्फोर्समेंट एजंट्सनी केलेल्या दोन अमेरिकननागरिकांची हत्या हा वळणबिंदू ठरू शकतो, असे आपणम्हणून शकतो. हुकूमशाही सरकारांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेत्यांच्या विरोधकांविरुद्ध अत्यधिक शक्ती वापरण्याचीत्यांची तयारी. जवळपास प्रत्येक सरकार पोलिसिंगद्वारेविशिष्ट प्रकारची दडपशाही वापरते. त्यालाही स्पष्टमर्यादा असतात. उदाहरणार्थ- ब्रिटिश सरकार काही भागातून निदर्शकांना हटवण्यासाठी मध्यम शक्तीचावापर करू शकते. परंतु ब्रिटनमधील पोलिस निदर्शकांना अमेरिकेप्रमाणे अंदाधुंदपणे मारतील, अशी कल्पनाकरणे अशक्य आहे. अरब स्प्रिंग दरम्यान निदर्शने सुरू झाली तेव्हा बशर अल-असाद यांच्या हिंसक प्रतिसादाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. बहुतेक लोकांनामाहित आहे व समजते की हुकूमशाही सरकारे विरोधीपक्ष, स्वतंत्र मीडिया व नागरी समाजाच्या इतरस्तंभांविरुद्ध समान शक्ती वापरतात. लोकशाही किंवाव्यापकपणे हुकूमशाही नसलेल्या समाजांमध्येकोणत्याही प्रतिकाराच्या अशा हिंसक दडपशाहीलाअनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. पहिलेसरकारच्या इतर शाखा आणि नागरी समाजाकडूनत्याला तीव्र विरोध होऊ शकतो. दुसरे म्हणजे सरकारखात्री देऊ शकत नाही की त्याचे सुरक्षा दल अशाआदेशांचे पालन करतील. उदाहरणार्थ, ट्रम्पच्या पहिल्याकार्यकाळात, अमेरिकन लष्करी नेतृत्वाने स्पष्ट केले कीते अशा आदेशांचे पालन करणार नाहीत. २०२५ दरम्यानआयसीईने आपली व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवलीआणिसर्व संकेत असे सूचित करतात की त्यांनी ट्रम्प यांच्याअजेंड्याशी सहानुभूती असलेल्या तरुण कर्मचाऱ्यांचीभरती केली आहे. त्यांना कोणत्याही केंद्रीय संस्थेसाठीपूर्वी अशक्य मानल्या जाणाऱ्या युक्त्या वापरण्याचीपरवानगी देण्यात आली आहे. न्याय विभागानेआयसीइच्या कृतींना अटळ पाठिंबा दर्शविला आहे.त्यांची चौकशी करण्यासही नकार दिला आहे.मिनेसोटातील घटनांचे प्रतीकात्मक महत्त्व निर्विवादआहे. आयसीइने आधीच दोन निष्पाप नागरिकांना ठारमारले आहे : रेनी गुड तीन मुलांची आई होती. तिलाशाळेत सोडल्यानंतर गोळी मारण्यात आली होती आणिअलेक्स प्रीटी एक अतिदक्षता परिचारिका होती. तीआयसीई छाप्याचे रेकॉर्डिंग करत होती. हे केंद्रीय एजंटत्यांच्या कामांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या निदर्शकांनावारंवार धमकावतात व हिंसकपणे वागवतात. सर्वातमहत्त्वाचे म्हणजे ट्रम्प प्रशासनाने आयसीई एजंट्सनात्यांच्या हिंसक युक्त्या तीव्र करण्यासाठी हिरवा कंदीलदिला आहे. त्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. याहिंसाचाराला आळा घातला नाही, तर तो खरोखरच एकटर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण यामुळे इतर सुरक्षादलांसाठी अगदी ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनाहीकोणत्याही प्रकारच्या निषेधाविरुद्ध बेलगाम बळाचावापर करण्याचे उदाहरण ठरेल. अशा परिस्थितीतहुकूमशाही राजवटीकडे होणारी वाटचाल उलथवणेकठीण होईल. कारण वाढत्या दडपशाहीमुळे नागरीसमाज निष्क्रिय होईल आणि लोकशाही नियम हळूहळूनष्ट होतील. आधीच सरकारच्या दोन शाखांनी राष्ट्राध्यक्षांच्या सत्तेवरनियंत्रण ठेवायला हवे होते. काँग्रेस आणि सर्वोच्चन्यायालय - ट्रम्प यांच्या अजेंड्याबद्दल अपवादात्मकपणेसहानुभूती दाखवत आहेत. तितकेच महत्त्वाचे म्हणजेसंस्थात्मक संतुलन देखील कमकुवत झाले आहे.विशेषतः राष्ट्राध्यक्षांना त्यांचे सहकारी आणिनिष्ठावंतांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्याचीमोकळीक देण्यात आली आहे. ट्रम्प यांचे उद्दिष्ट एकनिरंकुश, साम्राज्यवादी अध्यक्षपद निर्माण करणे आहे. तेनियंत्रणाबाहेर असावे. याच मार्गाने हुकूमशाहीलासंस्थात्मक रुप दिले जाते. हंगेरीपासून इक्वेडोर,मेक्सिको, निकारागुआ, तुर्कीये आणिव्हेनेझुएलापर्यंतची समकालीन उदाहरणे ही प्रक्रियास्पष्टपणे दर्शवतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) हुकूमशाही सरकारांचे एक प्रमुखवैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विरोधकांविरुद्धअत्यधिक बळाचा वापर करण्याचीत्यांची तयारी. विरोधी पक्ष, माध्यमे आणिनागरी समाजाच्या इतर स्तंभांवरदडपशाहीच्या तंत्राचा वापर केला जातो.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:घराप्रमाणेच ऑफिस, कॅम्पस आणि बाजारपेठेत खुली विचारसरणी ठेवा
राज्यव्यवस्थेला योग्य दिशा व गती देण्यासाठी वेगवेगळ्या राजांनी अनेक प्रयोग केले. आपण केवळ राम-कृष्णाबद्दल बोललो, तर अयोध्या व द्वारकेचे प्रयोग आपल्याला आजही प्रेरणा देतील. आपल्याला जगावर प्रभाव पाडायचा असेल, तर आपल्याला जातीयवादाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडावे लागेल. राजकारणाची तर सवयच आहे की, काही तरी छेडछाड करत मुद्दे उपस्थित करायचे, जेणेकरून मनुष्य त्यात अडकून पडेल आणि राजकारण सत्तेचा खेळ खेळत राहील. परंतु शास्त्रांनी आपल्याला शिकवले आहे की, आपण सर्वात आधी मनुष्य आहोत. भारतात घरांमध्ये हळूहळू पती-पत्नीच्या ‘जेंडर रोल’चे रूपांतर समानता व मैत्रीमध्ये होत आहे, तसेच ऑफिस, बाजार व कॅम्पसमध्येही खुली मानसिकता ठेवावी लागेल. याचा अर्थ स्वैराचार वा राजकारण नव्हे, तर सर्वांप्रति स्वीकारार्हता व सर्वसमावेश होय. कुणीही लहान-मोठे नसते, मोठी किंवा छोटी तर नियत असते. सर्व समान आहेत. योग्यतेला संधी देणे ही ईश्वराची कार्यशैली आहे. राजकारणाने किमान त्यात तरी ढवळाढवळ करू नये.
रुचिर शर्मा यांचा कॉलम:एआयमुळे जगात बेरोजगारी पसरण्याची भीती कमीच
प्रत्येक तांत्रिक क्रांती आपल्यासोबत या शंका घेऊन येते की नवोपक्रमाचा फटका नोकऱ्यांना बसेल. इतिहासात आतापर्यंत या शंका कधीही खऱ्या ठरल्या नाहीत, पण एआयची गोष्ट वेगळी आहे. यामध्ये खरोखरच इतकी क्षमता आहे की, ते अनेक कार्ये मनुष्यांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा कुठेही चांगल्या प्रकारे करू शकते, तर मग यावेळी मानवी श्रमासाठी असलेला धोका वास्तवात वेगळा आणि अधिक गंभीर आहे का? पण एआयबाबत आज दिसत असलेल्या वेडामध्ये एका तथ्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या चार दशकांमध्ये ज्या देशांमध्ये कामकरी वर्गाची लोकसंख्या घटत आहे, अशा देशांची संख्या शून्यावरून वाढून 55 झाली आहे. यामध्ये बहुतांश प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ही घट आता अधिक वेगवान होत आहे, कारण कुटुंबे अपेक्षेपेक्षा कमी मुले जन्माला घालत आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये जन्मलेल्या बालकांची संख्या 1949 मध्ये या पीपल्स रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. जपानमध्ये तर ही संख्या आता 1899 नंतर सर्वात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत जागतिक प्रजनन दर आता अंदाजापेक्षा 25 वर्षे आधीच लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खाली जाण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, जगातील कामकरी वयोगटातील लोकसंख्येचा उच्चांक देखील अंदाजापेक्षा 30 वर्षे आधी येऊ शकतो. असे संकेत मिळत आहेत की, एआय आधीच प्रति कामगार उत्पादन वाढवत आहे, ज्यामुळे मानवी श्रमाची एकूण मागणी घटू शकते. पण वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, एआय मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण करण्याऐवजी येणाऱ्या लेबर-शॉर्टेजच्या समस्येला कमी करण्यात अधिक मदतनीस ठरू शकतो. हे लक्षात ठेवा की, भूतकाळातील तांत्रिक क्रांतींनी नोकऱ्या नव्हे, तर उद्योग संपवले होते. 19 व्या शतकात मशीनच्या उदयाने श्रमिकांना शेतातून कारखान्यांकडे आणि नंतर कारखान्यांतून सेवा क्षेत्राकडे ढकलले होते. 1910 च्या दशकात जेव्हा कारने घोडागाड्यांची जागा घेतली, तेव्हा टांगा चालवणाऱ्यांच्या जागी ऑटो, ट्रकचालक आणि टॅक्सी ड्रायव्हर आले. 1970 च्या दशकात एटीएम मशीनने बँकांना आपला खर्च कमी करण्यास आणि अधिक शाखा उघडण्यास मदत केली. 1990 च्या दशकापासून आतापर्यंत इंटरनेटने जर अमेरिकेत सुमारे 35 लाख नोकऱ्या संपवल्या असतील, तर 1.9 कोटी नवीन नोकऱ्या देखील निर्माण केल्या होत्या. निश्चितपणे, एआय या सर्वांपेक्षा जास्त उलथापालथ करू शकते. एका अंदाजानुसार, एआय आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी- जसे की ह्युमनॉइड रोबोट्ससाठी जागतिक स्तरावर कमाल श्रम-बाजार सुमारे 400 कोटी नोकऱ्यांपर्यंतचा असू शकतो, पण सध्या तरी एआय तसे करू शकत नाही. जागतिक स्तरावर आणि अमेरिकेसारख्या एआय क्षेत्रात अग्रणी असलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचा दर अनेक दशकांच्या पातळीच्या आसपासच कायम आहे. जपानमध्येही रोबोट्सची संख्या वेगाने वाढूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचा दर घटत आहे आणि श्रम-बलातील सहभाग वाढत आहे. वास्तवत: आपण हे तर पाहू शकतो की, सध्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत, पण भविष्यात कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत, त्यांची कल्पना इतक्या सहजपणे करू शकत नाही. अमेरिकेत आज निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांपैकी सुमारे एक-तृतीयांश अशा श्रेणीतील आहेत, ज्या 25 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या. एआय कंटेंट क्रिएटर्स, प्रॉडक्ट मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि सिस्टम डिझाइनर्स यांसारखी नवीन जॉब टायटल्स वेगाने वाढत आहेत आणि ती पारंपरिक श्रेणींमध्ये झालेल्या नोकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मोठ्या सहजतेने करताना दिसत आहेत. एआयने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण केली तरीही माणसे शांत बसतील का? 2000 च्या दशकात ‘चायना-शॉक’ने अमेरिकेच्या जुन्या औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे 60 लाख फॅक्टरी कामगारांना विस्थापित केले होते आणि हे जनक्षोभ भडकवण्यासाठी पुरेसे ठरले होते. एआयमुळे जितक्या जास्त नोकऱ्या धोक्यात येतील, तितकी जास्त शक्यता मतदार सरकारांकडे त्याचा प्रसार धिमा करण्याची मागणी करतील. कोणतीही अर्थव्यवस्था श्रमशक्ती वाढवल्याशिवाय वेगाने पुढे जाऊ शकलेली नाही. एआय उलट लेबर-शॉर्टेजच्या कमतरतेशी झुंजणाऱ्या जगाला दिलासा देऊ शकते. यामुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमी आहे- किमान अनिर्बंधपणे तरी नाही. एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वाचा राहील. कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एआयमुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमीच आहे. किमान अनिर्बंधपणे तरी नाही. वास्तवत: एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वपूर्ण राहतील- कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही.
ज्यां द्रेज यांचा कॉलम:देशातील आरोग्यसेवा नफ्याच्या हेतूने प्रेरित असता कामा नये
‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातील एक दृश्य मला आठवते. संतप्त कामगारांना जमीनदाराला मारायचे असते, पण जेव्हा भीतीने जमीनदाराला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा ते त्याच्या मदतीसाठी धावून जातात. पण जर कामगारांना जमीनदाराला मारायचे होते, तर ते त्याचा जीव का वाचवताहेत? कदाचित त्यांना असे वाटते की आजारी पडल्यावर शत्रूलाही मदतीचा हक्क आहे. अनेक देशांनी आरोग्याचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. सोव्हिएत रशिया हा पहिला देश होता, ज्याने सर्वांना मोफत सार्वजनिक सुविधा म्हणून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. 30 च्या दशकात श्रीलंका आणि न्यूझीलंडने सार्वत्रिक आरोग्य सेवेची सुरुवात केली. 1948 मध्ये ब्रिटनने ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ची स्थापना केली, जी आजतागायत सर्व नागरिकांना विनामूल्य आरोग्य सेवा प्रदान करते. आज जगातील बहुतांश विकसित देश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहेत. याचा मुख्य अपवाद अमेरिका आहे. यापैकी अनेक देश सार्वत्रिक आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काही प्रमाणात आरोग्य विम्यावर अवलंबून असतात. मात्र हा व्यावसायिक विम्याऐवजी सामाजिक विम्याचा प्रकार असतो. याचे एक उदाहरण कॅनडा आहे. तिथे आरोग्य विमा अनिवार्य आणि सार्वत्रिक आहे. सर्व रहिवासी एकाच समान आरोग्य विमा योजनेत समाविष्ट असतात. तिथे सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही प्रकारची आरोग्य केंद्रे आहेत, परंतु बहुतेक खासगी आरोग्य केंद्रे नफा न कमवणारी आहेत. सामाजिक विमा असलेल्या इतर देशांमध्येही बहुतेक आरोग्य केंद्रे नफा न कमवणारीच असतात, मग ती सार्वजनिक असोत वा खासगी. नफा कमावणाऱ्या आरोग्य केंद्रांवर कडक नियंत्रण असते. भारतात सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात या सेवा अत्यंत मर्यादित आहेत आणि रुग्णांना अनेकदा औषधे किंवा तपासणीसाठी पैसे द्यावे लागतात. याशिवाय, सरकारी रुग्णालयांत खूप गर्दी असते. जेव्हा रुग्ण तेथे निराश होतात, तेव्हा ते खासगी रुग्णालये किंवा नर्सिंग होमकडे वळतात. ते भरमसाट शुल्क आकारतात, पण सेवा चांगल्या असतीलच याची खात्री नसते. अलीकडच्या काही वर्षांत सरकार पुरस्कृत आरोग्य विमा योजना वाढल्या आहेत. ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुमारे 60 कोटी लोकांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच प्रदान करते. राज्य सरकारांमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक आरोग्य विमा योजनाही आहेत. या योजनांमध्ये नोंदणी केलेले रुग्ण कोणत्याही आरोग्य केंद्रात जाऊ शकतात. त्यांना निर्धारित प्रोटोकॉलनुसार मोफत उपचार घेण्याचा अधिकार आहे. मात्र अनेक वेळा खासगी रुग्णालये रुग्णांकडून शुल्क वसूल करतात. या आरोग्य विमा योजना, सामाजिक विमा प्रणालींच्या उलट नफा कमावणाऱ्या सेवांना प्रोत्साहन देतात. उदाहरणार्थ, जनआरोग्य योजनेअंतर्गत पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांपैकी सुमारे अर्धी रुग्णालये नफा कमावणारी आहेत आणि सुमारे दोन-तृतीयांश निधी त्यांनाच दिला जातो. आरोग्य विमा हा भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीचे व्यावसायिक क्षेत्रावरील अवलंबित्व अधिक वाढवतो. नफा-प्रेरित आरोग्य सेवा ही न्यायसंगत नसते आणि कार्यक्षमही नसते. ती न्यायसंगत नाही कारण ती गरीब लोकांना आरोग्य सेवेतून बाहेर ठेवते. आणि ती कार्यक्षम नाही कारण बाजारपेठेची कार्यक्षमता ग्राहकाच्या उत्पादनाचे मूल्यमापन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जर तुम्हाला छत्री खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती आधी पाहू शकता आणि तिच्या डिझाइन, रंग, साहित्य, किंमत इत्यादींच्या आधारे ती तुम्हाला आवडली की नाही हे ठरवू शकता, पण जेव्हा तुम्ही आरोग्य सेवा खरेदी करता, तेव्हा तुम्ही ते ‘उत्पादन’ आधी पाहू शकत नाही, कोणत्याही स्थितीत त्याचे मूल्यमापन करण्यास सक्षम नसता. तुम्ही पूर्णपणे डॉक्टरांवर अवलंबून असता. यामुळेच खासगी आरोग्य सेवा क्षेत्रात इतके शोषण दिसून येते. भारताला आरोग्याचा अधिकार साकार करायचा असेल, तर सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल. उत्तम आरोग्याशिवाय विकसित भारताला काहीही अर्थ नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत) आरोग्यसेवा ही सार्वजनिक सेवा असायला हवी, नफाप्रेरित व्यवसाय नाही. जगभरातील सार्वत्रिक आरोग्यसेवेचा कणा नफा न कमवणाऱ्या आरोग्यसेवा आहेत. उत्तम आरोग्याशिवाय विकसित होण्याला काहीही अर्थ नाही.
एन. रघुरामन यांचा कॉलम:वयस्कर हाेणे म्हणजे अधिक पावित्र्य,शहाणपण, सौम्यपणाने भरलेले जीवन
रुग्णालयात दाखल केलेल्या माझ्या एका नातेवाइकाला कधी डिस्चार्ज मिळेल, असा प्रश्न मी बुधवारी डॉक्टरांना विचारला. डॉक्टर म्हणाले, एवढी घाई का? मी म्हणालो, घाई नाही, पण मला गुरुवार आणि शुक्रवारी माझ्या काकांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सुशिक्षित व्यक्ती एखाद्याच्या आजारापेक्षा उत्सवाला प्राधान्य देत आहे, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आपण 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे इतक्या थाटामाटात का साजरे करतो, हे त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आकडे आध्यात्मिक आहेत की केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर महाभारतातील राजा ययातीच्या कथेत आहे. ययातीने जीवन पूर्णत्वाने जगले - सत्ता, सुख, यश आणि सर्वकाही. पण अचानक वृद्धत्वाची सुरुवात झाल्याने त्याला धक्का बसला. खोलवर आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवले की “सुखाला मर्यादा असतात, पण इच्छा कधीच संपत नाहीत.’ ही गोष्ट उमगल्यानंतर ययातीचे जीवन बदलले. त्यांनी म्हातारपण स्वीकारले. स्पष्ट केले की जीवनात पाच अंतर्गत वळणे असतात - ती वयावर नव्हे तर शहाणपणावर आधारित असतात. ही वळणे 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे वयाच्या भारतीय परंपरांशी संबंधी आहेत. त्यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे- 60 व्या वर्षी षष्ट्यब्दीपूर्ती : 60 व्या वर्षी काहीतरी बदलते - शरीरात नाही तर प्राधान्यक्रमांमध्ये. “मी आणखी किती साध्य करू शकतो?’ हा प्रश्न नाहीसा होऊ लागतो. त्याच्या जागी प्रश्न येतो, “आता खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ तुमचे मन संचयातून समजून घेण्याकडे जाते. आत्ममंथन सुरू होते. आता आवाज, प्रशंसा किंवा बाह्य प्रमाणीकरणाची गरज नाही. शोध स्पष्टतेचा आहे. ही कमकुवतपणा नाही तर महत्त्वाकांक्षेसह येणारी परिपक्वता आहे. 70 व्या वर्षी भीमरथ शांती : स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते. तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. युक्तिवाद आकर्षक वाटत नाहीत. युक्तिवाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे बनते. असे दिसते की शांत राहणे बरोबर असण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 80 व्या वर्षी शताभिषेकम : तुमची केवळ उपस्थिती सांत्वन देते. 80 व्या वर्षी लोक सल्ला घेण्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोलवर शोधतात - जीवन जगता येते आणि समजून घेतले जाऊ शकते याची खात्री. या वयात तुमची उपस्थिती स्वतःच एक आशीर्वाद बनते. शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच सांगते की सर्वकाही ठीक आहे. म्हणूनच वयाचा ऐंशीचा टप्पा पवित्र मानला जातो. 90 व्या वर्षी नवती : येथे काहीतरी दुर्मिळ घडते. अहंकार नाहीसा होतो. तुम्हाला इतरांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतल्या जात नाहीत. तुम्ही सहज दुखावत नाही. हे कमकुवतपणामुळे नाही तर जीवनाने तुम्हाला खूप काही दाखवले आहे म्हणून होते. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवत नाही. एक शांत-स्थैर्य येते. ही नम्रताच खरे अध्यात्म आहे. 100 व्या वर्षी शतमानम : जीवन वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाते. वयाची शंभरी गाठणे ही केवळ वर्षांची संख्या नाही तर एक टप्पा आहे. तेथे व्यापक चित्र दृश्यमान होते. तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहून घेतलेल्या चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम खरोखर महत्त्वाचे होते. आयुष्य नेहमीच एका गूढ, करुणामय शक्तीने चालत आले आहे. 100 व्या वर्षी व्यक्ती कमी पण त्याची उपस्थिती जास्त जाणवू लागते. या पाच टप्प्यांचे सार आपल्या ऋषी आणि पूर्वजांच्या जीवनात दिसून येते. त्यांनी वय नाही तर वयानुसार येणारे बदल साजरे केले. 60 व्या वर्षी प्राधान्यक्रम बदलतात. 70 व्या वर्षी शांती शक्ती बनते. 80 व्या वर्षी उपस्थिती समाधान देते. 90 व्या वर्षी अहंकार नाहीसा होतो. 100 व्या वर्षी जीवन परिपूर्णतेला पोहोचते. म्हणूनच आपण या वयात वृद्धांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हालाही चांगल्या जीवनासाठी त्याच गुणांची गरज आहे. तुम्हाला असे वृद्ध लोक दिसले तर त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या.
शीला भट्ट यांचा कॉलम:दक्षिणेकडील राजकारणावरही लक्ष ठेवा!
तामिळनाडूमध्ये प्रादेशिक राजकारणाचा एक अध्यायसुरू होणार आहे. त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणामहोईल. तज्ञांनुसार दशकांनंतर तमिळनाडूत त्रिकोणीयस्पर्धा होऊ शकते. यावेळी त्रिशंकू विधानसभेची शक्यताआणखी आश्चर्यकारक आहे. दक्षिण भारतातील यामहत्त्वाच्या राज्यात राजकारणातील मूलभूत गोष्टी बदलतआहेत. यावेळी निवडणुका केवळ हिंदी विरुद्ध तमिळआणि उत्तर विरुद्ध दक्षिण या बद्दल नाहीत. या निवडणुकाकेवळ तमिळ संस्कृतीचे रक्षण करण्याबद्दल नसतील. त्यातमिळनाडूचे स्वरूप बदलण्याबद्दल देखील असतील. याखेळात पत्ते अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाहीत. परंतु हामुकाबला खूप मनोरंजक ठरला आहे. विधानसभेतील 234 जागांपैकी 133 जागा सत्ताधारीद्रमुककडे आहेत. इतर सर्व पक्ष द्रमुकचे मुख्यमंत्री एमकेस्टॅलिन यांच्याविरुद्ध युती करत आहेत. त्यामुळे यानिवडणुकीत द्रमुकचा पूर्णपणे पराभव करण्याचे आव्हानत्यांच्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुकविरुद्ध अण्णा द्रमुक उभे राहिले आहे आणि मुकाबलानेहमीच या दोन द्रविड पक्षांत राहिला आहे. व्यक्ती पूजेचेराजकारण हे तामिळनाडूचे वैशिष्ट्य राहिले आहे.अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, करुणानिधी आणिजयललिता यासारख्या महान व्यक्तींना तमिळ लोकांनीअवर्णनीय आदराने स्वीकारले होते. पण आजतामिळनाडूमध्ये त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याची कमतरताआहे. पक्षाच्या पलीकडे जाणारा आणि तमिळ संस्कृतीचाएक शक्तिशाली रक्षक असलेल्या नेत्याची कमतरताआहे. विशेषतः जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुककडे आता त्यांच्या दर्जाचा नेता राहिलेला नाही.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद वाढले आहेत. यामुळे ते द्रमुकविरोधी भावनांचा पूर्णपणे फायदा घेऊ शकत नाही. द्रविड भूमीत आपली मुळे रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपकडे ना करिष्माई नेता आहे ना द्रविड रणनीतीसमजून घेणारा तमिळ भाषिक तज्ञ. कदाचित भाजपलापक्ष व विचारसरणीपेक्षा मोठे स्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वाची गरज नसेल. भाजप ही निवडणूक एकाच उद्दिष्टाने लढत आहे : काहीही झाले तरी द्रमुकचा पराभव करणे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस पूर्णपणे द्रमुकच्यासावलीत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनाफक्त नऊ जागा मिळाल्या. द्रमुक तामिळनाडूमध्ये हरलातर केंद्रात काँग्रेसची स्थिती सध्याच्यापेक्षा अधिककमकुवत होईल. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत.ते प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारचा तीव्र विरोध करतात. आज देशात भाजपविरोधी दोन मजबूत बालेकिल्लेआहेत: बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये स्टालिन. तामिळनाडूमध्ये भाजप संघटनेत द्रमुकचीबरोबरी करणारा नेता नाही. हे देखील खरे आहे की 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखालील निवडणुका नाहीत. या निवडणुकीतअमित शाह हे मुख्य रणनीतीकार आहेत. त्यांनाद्रमुकविरुद्ध प्रभावी युती करण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. एप्रिल 2024 मध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकने तामिळनाडू निवडणूक लढवण्यासाठी युती केली.गेल्या तीन महिन्यांत अमित शाह आणि प्रभारी पियुषगोयल यांनी गौंडर आणि वाणीयार जातींना एनडीएमध्येसामील होण्यासाठी राजी केले आहे. दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून द्रमुकचा प्रचार प्रामुख्याने भाजपच्याविचारसरणीविरुद्ध आहे. भविष्य लक्षात घेऊन स्टॅलिनयांनी त्यांचा मुलगा उदयनिधी यांना प्रोत्साहन दिले आहे.आज उदयनिधी हे द्रमुकच्या भाजपविरोधी राजकारणाचेमुख्य प्रचारक आहेत. स्टॅलिन अनेक संकटांनी वेढलेलेआहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, त्यांचा मुलगाउदयनिधी यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्याचा त्यांचादृढनिश्चय व राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेचीपरिस्थिती यामुळे द्रमुकच्या विरोधाचे वातावरण निर्माणहोत आहे. बदलत्या जमिनीवरील वास्तवामुळे एकेकाळीद्रमुकचा सहकारी असलेला काँग्रेसही द्रमुकपासून वेगळेनिवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. परंतु तसेहोण्याची शक्यता कमी आहे. पण तामिळनाडूच्यानिवडणुका अभूतपूर्व होणार असतील तर त्या स्टॅलिनकिंवा विरोधी पक्षनेते पलानीस्वामी (ईपीएस) यांच्यामुळेनाहीत. खरे तर तमिळ सुपरस्टार विजय यांनी सर्वांनाचप्रभावित केले आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये सुमारे 25%मतदारांमध्ये विजयला पाठिंबा असल्याचे दिसून आलेआहे. हे लोक विजयच्या टीव्हीके (तामिळनाडू वेत्रीकझगम) पक्षाला मतदान करत असले तरीनिवडणुकीच्या निकालांचा अंदाज कोणीही लावू शकतनाही. विजय काँग्रेससोबत आल्यास द्रमुकला 20 जागाहीमिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाजबांधणारे लोकही काँग्रेसमध्ये आहेत. पण विजयलाकोणीही सहजासहजी घेणार नाही. त्याच्याकडे प्रचंडआत्मविश्वास आणि भरपूर पैसा आहे. तो आजचा सर्वातलोकप्रिय सुपरस्टार आहे. तो इतर पक्षाच्या नेत्यांना सहजभेटत नाही आणि घटनांवर तो लवकर प्रतिक्रिया देतनाही. संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्याच्याकडे उभे करण्यासाठीपुरेसे उमेदवार नाहीत. परंतु बिघडत्या परिस्थितीमुळे लोकइतके संतापले आहेत की ते विजयवर आशा ठेवत आहेत.विजयला दलित, महिला आणि तरुणांचा पाठिंबा आहे. खरे तर, लोक दोन्ही द्रविड पक्षांना इतके कंटाळले आहेतकी द्रमुकच्या विरोधात असणारी निवडणूक मतदानाच्यादिवशी विजयसाठी अनुकूल निवडणुकीत रूपांतरितझाली तर आश्चर्य वाटणार नाही. भाजपविरुद्ध कोणतेहीमहत्त्वाचे विधान न केल्याबद्दल द्रमुक नेते विजयवरजोरदार टीका करतात. सेन्सॉर बोर्डाने त्यांचा महागडाचित्रपट ब्लॉक केला आहे. तरीही, ते भाजपविरुद्ध बोलण्यात अपयशी ठरले. यामुळेभाजप द्रमुकविरुद्ध युक्ती खेळत असल्याच्या अफवांनाबळकटी मिळाली आहे. सध्या सुरू असलेले सर्वेक्षणसर्वांना गोंधळात टाकण्यासाठी पुरेसे आहेत. तज्ज्ञांनुसारविजय द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोघांचेही नुकसानहोईल. अशा परिस्थितीत द्रमुक निवडणूक जिंकण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. अगदी थोड्या फरकानेही. कारणविजयच्या प्रवेशामुळे द्रमुकविरोधी मते फुटण्याची शक्यताआहे. दरम्यान, भाजप तामिळनाडूमध्ये त्रिशंकूविधानसभा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यात तेएनडीएमध्ये सरकार स्थापन करण्यात किंवा चालवण्यातभूमिका बजावू शकेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) द्रविड राजकारणात एक नवीनत्रिकोणीय संघर्ष उदयासगेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुकआणि अण्णाद्रमुक मैदानात आहे. हामुकाबला सामान्यपणे दोन द्रविड पक्षांतअसतो. आज त्यांच्याकडे लोकप्रिय नेतानाही. विजय त्यांच्यासमोर कठीण आव्हानउभे करत आहेत. भाजप- काँग्रेस यासमीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:एकत्र जेवल्याने शांती, प्रेमाचे वातावरण निर्माण होते
जीवनात अशांतता येण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु शांतीचे मार्गमर्यादित आहेत. त्यापैकी एक म्हणजे अन्न. अन्न आपल्याला प्रचंडशांती देऊ शकते. अन्नामध्ये तीन पैलूंचा समावेश आहे : तयारी,वाढणे आणि खाणे. आणि हे योग्य झाल्यास ते पचण्यास सोपे ठरते.अन्नाच्या या तीन प्रक्रिया माणसाला शांत करू शकतात. आतामानसशास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे की एकत्र जेवणारी कुटुंबे शांतीआणि प्रेमाचे वातावरण निर्माण करतात. स्वयंपाकाद्वारेकल्याण’(वेल बीइंग थ्रू कुकिंग) असे त्यास म्हटले जाते. एक किंवादोन सदस्य जेवण तयार करत असतील तर आणखी दोन किंवा चारजणांनी त्यात सामील व्हावे. जेवण तयार करण्यास मदत करणारे हातजितके जास्त तेवढे भोजन आनंददायी होईल. आजकाल एकटेखाण्याची प्रवृत्ती वाढली. परंतु भविष्यात अशा लोकांना अस्वस्थ वाटूशकते. म्हणूनच सर्व धार्मिक विधींमध्ये अन्नाला खूप महत्त्व दिलेजाते. आजकाल विधींची रचना खूप क्लिष्ट आहे. कार्यक्रमांचीसजावट गुंतागुंतीची आहे. अशा परिस्थितीत किमान घरी तरी अन्नदेवतेचा आदर करावा .
मुकेश माथुर यांचा कॉलम:विकसित भारताच्या केंद्रस्थानीअर्थव्यवस्था की माणूस?
शून्य ते शिखरापर्यंत पोहोचणारी व्यक्ती आपली कोणतीगोष्ट म्हणजे विकास’ मानेल? पैसा, पद, प्रतिष्ठा किंवाजीवनाचा चांगला दर्जा, बौद्धिक विकास, मनःशांती कीआनंद? त्यापलीकडे आपल्या वर्तुळातील लोकांचेजीवनमान सुधारणे? कदाचित हे सर्व, परंतु मोठा बंगलाआणि मोठी गाडी विकास असू शकत नाही. 2047 मध्ये आपल्या देशाला विकसित देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ट्रम्प यांचे टेरिफ देखील नाही. आता आपल्याकडे मदर’ही आहे. मदर ऑफ ऑलडील्स! जीडीपी व्यतिरिक्त विकसित देशाचे प्राथमिकमाप दरडोई उत्पन्न मानले जाते. ते आपण 2047 मध्ये12 ते 18 लाख रुपये असे साध्य करू. प्रश्न असा आहेकी : विकसनशील देशाची हवा विषारी, पाणीप्राणघातक, अन्न कर्करोग निर्माण करणारे आणिऔषधी (बनावट) मृत्यूला कारणीभूत कशी ठरूशकतात? आपल्या विकास मॉडेलच्या केंद्रस्थानी अर्थव्यवस्था असेल, पण मानव नसेल? आपण कायसाध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत? जगालादाखवण्यासाठी की लोकांना पुढे नेण्यासाठी? जगालातर वेगाने विकसित होणारा भारत दिसत आहे. परंतुभारतात गुंतवणूक करायला गेल्यास व दिल्लीत श्वासघेण्यास त्रास होईल, हे देखील जगाने पाहिले. जागतिकबँकेच्या 2022 च्या अहवालात असे दिसून आले आहेकी प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 17 लाख लोक मरतात.कोणत्या प्रकारचा विकसित देश करु इच्छितो, हेसरकारने ठरवलेय का? अमेरिकेप्रमाणे मनुष्याला मागेसोडून अर्थव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवतो, तसा? तुम्ही तेआधीच स्वीकारले आहे का? जागतिक नियंत्रणासाठीनेहमीच एक शक्ती राहिलेल्या या देशात 2021 पासूनसामान्य माणसाचे राहणीमान आणि खरेदी शक्तीघसरली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांपैकी एक तृतीयांशकुटुंबे मूलभूत अन्न आणि आरोग्य गरजा पूर्ण करूशकत नाहीत. बेघर लोक राजधानीच्या रस्त्यांवर तंबूतराहत आहेत. दुसरीकडे, खूपच कमी जीडीपी असलेले विकसित देशविकासाची स्वतःची व्याख्या तयार केली आहे.स्कॅन्डिनेव्हियन देश- नॉर्वे, स्वीडन आणिफिनलँडसारखे एचडीआय (मानव विकास निर्देशांक)वर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यांचा मंत्रबालपणापासून वृद्धापकाळापर्यंत सुरक्षा हा आहे.फिनलँडमध्ये शिक्षण मोफत आहे. खाजगी शाळानसल्यात जमा आहे. नॉर्वे नागरिकांसाठी कल्याणकारीनिधी तयार करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापरकरते. आरोग्यसेवा मोफत आहे. जपानने दीर्घायुष्यआणि आरोग्यसेवा हे आपले प्राथमिक लक्ष्य बनवलेआहे. रस्ते सुरक्षित आहेत, आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्टआहे आणि गाड्या बारकाईने धावतात. प्रसिद्धकोलंबियन अर्थशास्त्रज्ञ गुस्तावो पेट्रो म्हणाले, विकसितदेश म्हणजे गरीबांकडे गाड्या असणे असे नव्हे तरश्रीमंत लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. आपल्या देशात 2047 पर्यंत निम्मी लोकसंख्या शहरांतराहणारी असेल. वाहतूक अनियंत्रित असलेल्या शहरांतहवा,पाणी विषारी आहे. 90 अंशांचे उड्डाणपूल बांधलेजात आहेत. कोसळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, संस्था बेजबाबदार आहेत. पायाभूत सुविधा ववाहतुकीत मंत्री,अधिकृत कमिशन आणि कंत्राटदारांचानफा वाढत आहे. विकसनशील देशाला अनेकसमस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण सरकारच्याप्राधान्यक्रमांची काय भूमिका आहे हे महत्त्वाचे आहे? तेधोरणांद्वारे कोणत्या प्रकारची संस्कृती निर्माण करतआहे? भावनिक मुद्द्यांवर निवडणूक जिंकतायेऊ शकते. परंतु विकासाच्याआराखड्यात तुम्हाला विजयी करणाऱ्यामतदारांचा विचार करा. जीडीपी वाढतअसेल पण लोकांचे आरोग्य आणिकल्याण नसेल, तर असा विकास एकप्रकारची फसवणूक ठरते.
नंदितेश निलय यांचा कॉलम:एका क्लिकवर सर्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व कसे उजळेल?
तुम्ही लक्षात घेतले का की संपूर्ण जग पूर्ण उर्जेनेस्क्रीनमध्ये बुडालेले असताना आपली तरुण पिढी एकाचवेळी कधीही न संपणारी आळसाने ग्रासलेली आहे.बेडशीट झटकणे, पाण्याचा ग्लास उचलण्यासाठी दोनपावले उचलणे, पुस्तके बाजूला ठेवणे, एखाद्याचीख्यालीखुशाली विचारणे, दुसऱ्या खोलीत जाणे ही सर्वत्यांच्यासाठी कठीण कामे बनतात. अंथरुणावर अभ्यासकरणे, त्याच ठिकाणी खाणे आणि सतत त्यांचे फोनतपासणे या गोष्टी त्यांना योग्य आणि उत्पादक वाटतात.स्क्रीन वेळेपलीकडची रसहीन वाटू लागतात. या पिढीकडे फोन तपासणे आणि फक्त एका क्लिकवरगोष्टी ऑर्डर करण्यासाठी असलेली ऊर्जा घराबाहेरफिरायला जाणे किंवा ग्रंथालयात जाण्यासाठी तितकी कादिसत नाही? //टेक-ब्रोस’ म्हणून ओळखली जाणारी हीपिढी हजारो मुद्द्यांवर पालकांशी असहमत आहे.त्यांच्यासाठी लगेच प्रतिक्रिया देणे सामान्य आहे. तेस्वतःच्या विचारसरणीबद्दल खूप पझेसिव्ह असतात.त्यांचा कम्फर्ट झोन तोडण्याचा प्रयत्न करणारे,शिकवण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. सिलिकॉन व्हॅलीमध्येलोकप्रिय वेगाने पुढे जा’ हा मंत्र अनेकदा या नवीनपिढीला नैतिक चुका , अनपेक्षित परिणामांकडे घेऊनजातो. या पिढीचे नाविन्यपूर्ण आणि दूरदृष्टीसाठी कौतुककेले जाते. परंतु जोखीम घेण्याच्या त्यांच्या बेपर्वावृत्तीमुळे समाजाचेही नुकसान होऊ शकते. डेटागोपनीयतेचे उल्लंघन, अल्गोरिथमिक पूर्वाग्रहाच्याप्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे. आपण या पिढीकडेत्यांच्या पालकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते त्यांनासतत गॅझेट्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचाआहे तर //टेक-ब्रोज’साठी, ध्येय तंत्रज्ञान, कार्यक्षमता,आराम आहे. कदाचित म्हणूनच ज्या गोष्टीशी ते बहुतेकअसहमत असतात किंवा तीव्र प्रतिक्रिया देतात ती म्हणजेकठोर परिश्रमाचे महत्त्व. त्यांच्या पालकांचा असाविश्वास आहे की जीवनात पुढे जाण्यासाठी प्रत्येकानेत्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे. पण टेक-ब्रोज’साठी संपूर्ण जग एका बटणाच्या क्लिकवर उपलब्ध आहे.मग कठोर परिश्रम का करावे? श्रम खालच्या वर्गातपडले आहेत. त्यांनी त्यांचे फोन सोडून कठोर परिश्रम काकरावेत? तंत्रज्ञानाच्या जगाने त्यांना एक स्वप्नवत जगदिले आहे. तेथे प्रत्येक //गैरसोय’ दूर झाली आहे.सर्वकाही त्वरित पोहोचवले जाते. आता विचार देखीलबुद्धिमान चॅटबॉट्सकडे आउटसोर्स केले गेले आहेत. पण यामुळे फ्रिक्शन-मॅक्सिंग’ ही नवीन संकल्पनाहीउदयास आली आहे. ती आपल्या दिनचर्येत गैरसोय’परत आणण्याचा पुरस्कार करते. ते शारीरिक हालचालीआणि प्रयत्नांचे महत्त्व मांडते. ते असा युक्तिवाद करतेकी घरी बसण्यापेक्षा घराबाहेर पडणे, रहदारीचा सामनाकरणे व ऑर्डर केल्यानंतर अन्नाची वाट पाहणे यामुळेसंयम, नियंत्रणाबाहेरील परिस्थितींना तोंड देण्याची क्षमताविकसित होते. कारण स्वतःला कठीण परिस्थितीतटाकल्याने आपले व्यक्तिमत्व वाढते. यातून मानसिकशक्ती,आत्मविश्वास मिळतो. आपल्याला शिकवते कीजीवन हे इंस्टाग्राम किंवा मेटा प्लॅटफॉर्म नाही; ते खोलवास्तव आहे. भौतिकशास्त्राच्या भाषेत फ्रिक्शन’आहे. तेएखाद्या व्यक्तीला पडण्यापासून रोखते. त्यांना नेहमीचसतर्क ठेवते! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
एन. रघुरामन यांचा कॉलम:लहानसहान सवयी वेळीच रोखल्या नाहीत, तर त्या मोठ्या समस्या बनू शकतात
माझ्याही काही लहानसहान सवयी आहेत. एक म्हणजे ‘रिटर स्पोर्ट हेझलनट चॉकलेट’. विश्वास ठेवा, 100 ग्रॅमचे हे पॅकेट मी लंच आणि डिनरनंतर चार भागांत विभागून अवघ्या दोन दिवसांत संपवत असे. प्रत्येक विदेशवारीवर मी हे भरपूर प्रमाणात विकत घेतो. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला माझी ही कमजोरी माहीत आहे, मला काही सांगण्याची गरज पडत नाही. पण ही छोटीशी सवय हळूहळू आरोग्याची समस्या बनली आणि मला डॉक्टरांकडे जावे लागले. आजही माझ्या फ्रिजमध्ये ‘रिटर स्पोर्ट’ आहेत, पण त्या संपत नाहीत. मी या सवयीतून मुक्त झालो आहे. नुकतेच मी कॅथरीन ग्रे यांचे ‘लिटल ॲडिक्शन्स : फ्रीडम फ्रॉम अवर टाइनी बट मायटी कंपल्शन्स’ हे पुस्तक वाचले. त्या म्हणतात की, बहुतेक लोक मानतात की स्मोकिंग, वेपिंग, सट्टेबाजी आणि पोर्न पाहणे हेच व्यसन आहे. पण काही कमी नुकसानकारक गोष्टीही आहेत, ज्या जीवनाची गुणवत्ता खराब करू शकतात. उदाहरणार्थ, टीव्ही पाहणे, बोअर झाल्यावर शॉपिंग करणे, जंक फूड खाणे आणि आइस्क्रीमची ओढ (जी मलाही आहे, पण मी दुसरी कोणतीही मिठाई खात नाही). या गोष्टी लाइफस्टाइलवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. त्या एका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसारखी या सवयी वाढण्याची प्रक्रिया सांगतात. 1. मजा, 2. मजा + समस्या, 3. समस्या + मजा, 4. समस्या. जेव्हा कोणतीही सवय ठरलेल्या वापरापेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा तिथेच त्याचे व्यसनात रूपांतर होते. त्यांनी अशा अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे, पण मी अशा तीन सवयींबद्दल सांगत आहे, ज्या बहुतेक लोकांमध्ये असतात. बिंज वॉचिंग : कॉर्नेल विद्यापीठाच्या एका अभ्यासात लोकांना ‘बॉटमलेस बाऊल’मध्ये सूप देण्यात आले. हा असा बाऊल होता, ज्यात सूप आपोआप भरले जायचे. तेव्हा लोकांनी सामान्यच्या तुलनेत 73% जास्त सूप प्यायले. याचप्रमाणे टीव्ही कंटेंट प्रोड्युसर सीझनचे पूर्ण एपिसोड एकदाच देतात व आपण एकाच रात्रीत हे बिंज वॉच करतो. हे कसे ठीक करायचे? हे ठरवा की आयुष्यातील किती वर्षे तुम्हाला टीव्ही पाहायचा आहे? 365 दिवस रोज 54 मिनिटे पाहणे म्हणजे 19,710 मिनिटे- म्हणजेच एका वर्षात 329 तास. खूप जास्त टीव्ही पाहण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही त्या लोकांपैकी आहात, ज्यांना तत्काळ समाधान हवे असते. त्याऐवजी धीमे डोपामाइन देणाऱ्या गोष्टी शोधा, जसे- वाचणे, स्वयंपाक करणे, लोकांना भेटणे किंवा व्यायाम.2. शॉपिंग : मी एम. वेंकटरमन यांना ओळखतो, जे डीएनए वृत्तपत्रात चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. ते अस्वस्थ झाले की शॉपिंगला निघून जात. तेव्हा मला माहीत नव्हते की हेदेखील व्यसन असू शकते. ग्रे सांगतात की लोक गरजेपेक्षा जास्त शॉपिंग का करतात? त्या म्हणतात की, एका अभ्यासानुसार याचे कारण यापैकी एक असते- सुखाचा शोध, वेदनेपासून वाचण्याचा प्रयत्न, सजावटीद्वारे प्रभाव दाखवणे, सौंदर्याद्वारे रोमँटिक स्वीकारार्हता मिळवणे व संसाधने जमा करणे. आता हे कसे थांबवायचे? मेंदूचा एक भाग ‘इन्सुला’ आपल्याला शॉपिंगपासून रोखतो. हा भाग नकारात्मक उत्तेजना, तिरस्कार व नुकसानीपासून वाचण्याची भावना निर्माण करतो. जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा हा भाग सक्रिय होत नाही. पण कॅश पेमेंट करताना ‘पेन ऑफ पेमेंट’ ॲक्टिव्हेट होते, जे आपल्याला कमी खरेदीसाठी प्रेरित करते.3. लोकांना खुश करणे : अनेक लोक दुसऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भारी वजन उचलण्यासारखे काम करतात. रविवारी मी व्यक्तिगतरीत्या हे अनुभवले, जेव्हा मी त्या रुग्णाला कुशीवर वळवले, ज्याला पाहण्यासाठी मी गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात जात होतो. माझ्या पाठीत तीव्र कळ आली. कोणताही संघर्ष टाळण्यासाठी दुसऱ्यांच्या मूडवर गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवणे याला इंग्रजीत ‘फॉन’ म्हणतात. हे त्या लोकांमध्ये जास्त दिसते, ज्यांचे बालपण संकटांत गेले आहे. हे ठीक करण्यासाठी सीमा ठरवा. जर कुणी रागात किंवा अस्वस्थ दिसत असेल तर विचार करा की ‘त्यांना तसेच राहू द्या’ आणि तिथून बाजूला व्हा. जेव्हा ‘हो’ म्हणायचे असेल, तेव्हा ‘नाही’ म्हणणे हादेखील एक मार्ग आहे.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जगावर विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा
सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, तो म्हणजे आपण जगावर विश्वास ठेवतो व देवावर विचार करतो. आज आपल्या सभोवताली जे काही घडत आहे, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण देव आहे की नाही, तो कृपा करतो की नाही, यावर आपण खूप विचार करतो. जगभरातील शास्त्रज्ञ स्वतःच त्यांच्या शोधांच्या धोक्यांबद्दल म्हणतात की, विज्ञान जबाबदार हातांमध्ये सुरक्षित राहील, अन्यथा ते नुकसान करेल. पण जबाबदार कोण आहे? जो तो विज्ञानाचा गैरवापर करण्यातच मग्न आहे. आजकाल तर कुटुंबाचा विचारही लोकांना त्यांच्या वैयक्तिक आनंदात अडथळा वाटतो. पूर्वी कुटुंबात राहण्याचा अर्थ कायमस्वरूपी नातेसंबंध व जबाबदारी असा होता; पण आता चहुबाजूला बेजबाबदारपणाचेच चित्र निर्माण झाले आहे. घराबाहेर सरकारने दान देऊन बेजबाबदारांची फौज उभी केली आहे आणि घरात संस्कारांच्या अभावामुळे सदस्य बेजबाबदार झाले आहेत. या दोन्ही स्थितींचा आनंद विज्ञान, तंत्रज्ञान घेत आहेत.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:युद्धात आपल्या उद्दिष्टांबद्दलची स्पष्टता जास्त महत्त्वाची असते
ऑपरेशन सिंदूरच्या 88 व्या तासाला भारताने युद्धविराम करण्याची पाकिस्तानची विनंती मान्य करण्यात घाई केली होती की शहाणपण दाखवले होते? भारताने लढाई सुरू ठेवायला हवी होती का आणि ती कधीपर्यंत? अशा प्रकारचे प्रश्न अलीकडेच तेव्हा उपस्थित झाले, जेव्हा या ऑपरेशनवर स्वित्झर्लंडच्या एका संस्थेच्या ‘सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्सपेक्टिव्ह स्टडीज’साठी एका उच्चाधिकार गटाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील निष्कर्षांचे भारतात स्वागत झाले आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या दाव्यांच्या तुलनेत भारताचे हवाई सुरक्षेमध्ये निम्मेच नुकसान झाले. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युद्धविराम होईपर्यंत भारतीय हवाई दलाने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान केले होते आणि या संघर्षाचा शेवट पाकिस्तानी हवाई दलाच्या मुख्य तळांवर सलग अनेक जबरदस्त हल्ले करून करण्यात आला. अशा प्रकारे, हवाई हल्ल्यात स्पष्ट सरशी मिळवून भारताने पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करण्यास भाग पाडले. अहवालात असेही म्हटले आहे की, 10 मे 2025 च्या सकाळपर्यंत भारतीय हवाई दल पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या मोठ्या भागावर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी झाले होते, असे दर्शवणारे पुरेसे पुरावे समोर आले आहेत. यामुळे भारताला शत्रूच्या पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्यावरून हल्ले करत राहण्याच्या स्थितीत आणले होते. या अहवालाचे निष्कर्ष पाश्चात्त्य ‘थिंक टँक’कडून आलेल्या अहवालांच्या तुलनेत अधिक निष्पक्ष आणि स्पष्ट वाटतात. यामध्ये असेही म्हटले आहे की, 6/7 मे च्या रात्री पीएएफ बहावलपूर किंवा मुरिदकेवरील भारताच्या हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्यात किंवा ते रोखण्यात यशस्वी ठरले नव्हते. अशा वेळी दोन प्रश्न लगेच समोर येतात. एक प्रश्न संशयवाद्यांकडून येतो, जे विचारतात की, आयएएफ आपल्याच क्षेत्रातून आतून हल्ले करत असताना त्यांनी हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळवले होते असे आपण म्हणू शकता का? परंतु वास्तव हे आहे की, आज बहुतेक युद्धे आणि विशेषतः हवाई युद्धे लांब पल्ल्यावरून लढली जात आहेत आणि तुम्हाला शत्रूच्या क्षेत्राच्या आतच काय, तर त्याच्या जवळ जाण्याचीही गरज नसते. दुसरा आणि मोठा प्रश्न तो आहे, जो आपण आधीच उपस्थित केला होता की, भारताने युद्धविराम खूप आधीच स्वीकारला का? अनेक गंभीर लोकही युद्धविरामाला घाईने घेतलेला निर्णय मानतात आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी संधी मिळाली होती, ती गमावली गेल्याबद्दल खेद व्यक्त करतात. याच्या उत्तरात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की, भारत आपला विजय कशा प्रकारे परिभाषित करणार होता आणि तो विजय कधी झाला असता? तो पीएएफच्या संपूर्ण विनाशाने झाला असता का? की 1971 मध्ये ढाक्यामध्ये जे झाले होते, तसे काही झाल्यावर तो विजय मानला गेला असता? 10 मेच्या संध्याकाळपासून भारत सांगत आला आहे की त्याची उद्दिष्टे पूर्ण झाली होती, युद्धात वर्चस्व त्याला मिळाले होते आणि युद्ध कधी थांबवायचे हे त्याच्या हातात होते. कोणत्याही युद्धाची व्याख्या प्रामुख्याने ते सुरू करणाऱ्या पक्षाच्या उद्दिष्टांवरूनच केली जावी. हा प्रश्न अटलबिहारी वाजपेयी यांनीही तेव्हा उपस्थित केला होता, जेव्हा जानेवारी 2002 मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत सीमांवर लष्कराची तैनाती उच्च पातळीवर होती. देशाचा मूड पूर्णपणे तापलेला होता आणि तो आरपारच्या लढाईची मागणी करत होता. युद्ध हा पूर्णपणे राजकीय विषय असतो. तो ना भावनिक असतो, ना पूर्णपणे लष्करी. उद्दिष्टांची स्पष्टता नसल्यामुळे भारत ऑपरेशन पराक्रममध्ये अडकून राहिला होता. लष्कर पूर्णपणे तैनात करण्यात आले होते आणि ते दहा महिने ठाम राहिले. अखेरीस, काहीही साध्य न होता, थकल्यामुळे ते छावण्यांमध्ये परतले. भारताने तेव्हा एक संधी गमावली होती का? 1999 आणि 1971 मध्ये आपण स्पष्ट उद्दिष्टे ठेवली होती - कारगिलमधील पाकिस्तानच्या ताब्यातील क्षेत्र मुक्त करणे आणि बांगलादेशला स्वतंत्र करणे. 1999 मध्ये लढाई एलओसीच्या पलीकडे नेण्यासाठी लष्कराकडून जो दबाव होता, त्यासमोर वाजपेयी झुकले नाहीत. 1971 मध्ये पाकने पूर्वेकडे आत्मसमर्पण केले, तेव्हा इंदिरा गांधींनी पश्चिम सेक्टरमध्ये तातडीने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. काही वर्तुळात हा शाश्वत वाद आणि खेद कायम आहे की इंदिराजींनी पश्चिम सेक्टरमध्ये ‘काम’ फत्ते केले नाही. परंतु त्यांच्यासमोर उद्दिष्टे स्पष्ट होती आणि त्यांनी 13 दिवसांच्या लढाईनंतर विजयाची घोषणा केली. युद्ध ही इतकी गंभीर बाब आहे की ती लष्करी जनरल्सवर सोडून चालत नाही. हा निर्णय राजकीय नेत्यांवर सोडला पाहिजे, जे परिस्थितीच्या व्यापक कॅनव्हासवर लक्ष ठेवून असतात.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) युद्ध कधी सुरू करायचे हे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा ते केव्हा, कधी व कसे संपवायचे हे समजणेही महत्वाचे आहे. युद्ध ही एक गंभीर बाब आहे जी केवळ सेनापतींच्या भरवशावर सोडता येत नाही.
अर्घ्य सेनगुप्ता, स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:76 वर्षांनंतरही इंग्रजीच प्रशासकीय भाषा का आहे?
जेव्हा संविधान सभेचे सदस्य संविधानाच्या अधिकृत इंग्रजी मजकुरावर स्वाक्षरी करत होते, तेव्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सभागृहासमोर त्याचे हिंदी भाषांतरही सादर केले आणि सदस्यांना त्यावरही स्वाक्षरी करण्याची विनंती केली. हे पाऊल संविधान सभेमध्ये उठलेल्या त्या प्रबळ मागणीने प्रेरित होते की, संविधान कोणत्याही वसाहतवादी भाषेत नसून जनतेच्या भाषेत असायला हवे. हा क्षण एका व्यापक घटनात्मक महत्त्वाकांक्षेला दर्शवत होता - जी भारताच्या अनेक प्रादेशिक भाषांचा सन्मान करत होती, विविधता स्वीकारत होती आणि इंग्रजीवरील वसाहतवादी भाषिक अवलंबित्व हळूहळू संपवण्याची संकल्पना मांडत होती. हिंदीला या दिशेने एक सुरुवात मानले गेले होते, या ध्येयाचे ते एकमेव रूप नव्हते. हिंदीची कल्पना राजभाषा म्हणून केली गेली होती, परंतु इतर भारतीय भाषांच्या निरंतर वापरासाठी आणि विकासासाठी स्पष्ट सुरक्षा उपायदेही करण्यात आले होते. आठव्या अनुसूचीने चौदा प्रादेशिक भाषांना घटनात्मक मान्यता दिली; अनुच्छेद 345 ने राज्यांना अधिकार दिला की त्यांनी त्यांच्या शासकीय कार्यासाठी राज्यात बोलल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक भाषांचा स्वीकार करावा; आणि अनुच्छेद 347 ने राष्ट्रपतींना अशी शक्ती दिली की ते राज्याच्या एका मोठ्या लोकसंख्येने बोलल्या जाणाऱ्या भाषेला अधिकृत मान्यता देऊ शकतील. राज्य विधानसभांचे कामकाज राज्याच्या राजभाषेत व्हायला हवे होते आणि संसदेतही सदस्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर, अनेक घटनात्मक कार्यांसाठी इंग्रजीला एक कार्यकारी भाषा म्हणून कायम ठेवले गेले. ती केंद्र सरकारची अधिकृत भाषा राहिली, हिंदीसोबत संसदेची एक ‘डिफॉल्ट’ भाषा राहिली आणि सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयांचे कामकाज, संसदेत सादर होणारी विधेयके आणि इतर वैधानिक दस्तऐवजांची भाषाही इंग्रजीच राहिली.प्रत्यक्ष संविधानदेखील शेवटी इंग्रजीमध्येच स्वीकारले गेले - असा निर्णय, ज्याबद्दल अनेक सदस्यांनी खेद व्यक्त केला. इंग्रजी केवळ 15 वर्षांच्या कालावधीसाठीच राहील आणि त्यानंतर ती राजभाषा राहणार नाही, या आश्वासनाने त्यांचे समाधान करण्यात आले होते. 76 वर्षांनंतरही हे घटनात्मक वचन केवळ अंशतःच पूर्ण होऊ शकले आहे. इंग्रजीच्या पलीकडे जाण्याचा प्रत्येक गंभीर प्रयत्न एक तर थांबला किंवा कमकुवत झाला किंवा लांबणीवर टाकला गेला. काळानुसार इंग्रजी केवळ एक कार्यकारी भाषाच राहिली नाही, तर ती घटनात्मक सत्तेची भाषा बनली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय प्रामुख्याने इंग्रजीमध्येच कामकाज चालवतात; विधेयके आणि कायदे बहुतांश इंग्रजीमध्येच तयार केले जातात; आणि उच्चस्तरीय अधिकृत कामकाज जवळजवळ पूर्णपणे त्याच भाषेत चालते. ही परिस्थिती कोणत्याही एका निर्णयाचा किंवा नियोजित योजनेचा परिणाम नव्हती. हे संस्थात्मक जडत्व आणि राजकीय सतर्कतेतून निर्माण झाले आहे. भाषिक बहुसंख्यावादाबाबतच्या खोल शंका - विशेषतः हिंदीच्या वर्चस्वाची भीती - सुधारणेच्या प्रयत्नांना रोखत राहिली. इंग्रजीकडे एक ‘तटस्थ तडजोडीची भाषा’ म्हणून पाहिले जाऊ लागले, जी कोणत्याही एका भारतीय भाषेला विशेष अधिकार देत नव्हती. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी इंग्रजीच्या जागी हिंदीला एकमेव राजभाषा बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विशेषतः मद्रासमध्ये मोठा विरोध झाला. दोन लोकांनी आत्मदहन केले, एकाने विषप्राशन केले आणि हिंदीच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. आज इंग्रजीने घटनात्मक सत्तेला भाषिक बहुसंख्याकांपासून वेगळे केले आहे आणि त्याच वेळी एका मर्यादित, शिक्षित उच्चभ्रू वर्गाची पकड मजबूत केली आहे. भाषाच ठरवते की कायदा कोण वाचू शकतो, कोण तो समजू शकतो आणि कोण घटनात्मक संस्थांशी अर्थपूर्णरीत्या जोडू शकतो. न्याय मिळणे हे केवळ न्यायालयांपर्यंत पोहोचण्याच्या अधिकारापुरते मर्यादित नाही; त्यामध्ये कामकाज, युक्तिवाद आणि निकाल समजून घेण्याच्या क्षमतेचाही समावेश आहे. असे संविधान, जे बहुतेक नागरिक वाचू शकत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत, ते सहभागाचे माध्यम बनण्याऐवजी केवळ एक दस्तऐवज बनून राहते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत.) जोपर्यंत घटनात्मक संस्था त्या भाषांमध्ये बोलणार नाहीत ज्यामध्ये नागरिक आपले जीवन जगतात, तोपर्यंत भाषिक लोकशाही हे एक अपूर्ण घटनात्मक वचनच राहील. न्यायालयांचे निकाल आजही प्रामुख्याने इंग्रजीतच दिले जातात.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आश्रम काही कार्यक्रमांपुरते नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे
मानवी जीवनात तीन ठिकाणी आपण नेहमी ये-जा करतो. घर,कार्यालय आणि बाजारपेठ. परंतु तुलसीदास चौथ्या स्थानाचा देखीलउल्लेख करतात. पक्षी राजा गरुड काकभूशुंडीकडे गेला आणिम्हणाला, मी येथे येताच माझी सर्व कामे पूर्ण झाली. ‘देखि परम पावनतव आश्रम, गयउ मोह संसय नाना भ्रम।’ म्हणजे सर्वात पवित्र आश्रमपाहून, माझी आसक्ती, शंका आणि विविध प्रकारचे भ्रम सर्व नाहीसे झाले. म्हणूनच चौथे स्थान आश्रम आहे. यात मंदिर अंतर्भूत असते.आसक्ती, शंका आणि संभ्रम सर्व नाहीसे झाले. घरात आसक्तीनिर्माण होते. कार्यालयात संशयाने वावरतो. आणि बाजारअपरिहार्यपणे संभ्रम निर्माण करतो. हे तिन्ही नष्ट करण्यासाठी आपणरोज आश्रम किंवा मंदिराला भेट द्यावी. ही काही कार्यक्रमांच्याआयोजनाचे नव्हे तर उर्जेची केंद्रे आहेत. ऋषी-मुनींची मौलिक क्रियाआहे. आजही त्याच्याशी जोडलेले राहिल्यास आपल्याला लाभमिळेल.
आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:केवळ ‘आत्मनिर्भरते’वरच अवलंबून राहता येणार नाही
भारताने बदलत्या जागतिक व्यवस्थेला कशा प्रकारेप्रतिसाद दिला पाहिजे? यासाठी सर्वप्रथम एका मोठ्याप्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. ते म्हणजे आजच्याजगात भू-राजकारण (Geo-politics) आणिअर्थव्यवस्था यांचा काय संबंध आहे?जागतिकीकरणाच्या अलीकडील काळात ज्याची सुरुवात 1980 च्या दशकात झाली आणि 1991 मध्ये सोव्हिएतयुनियनच्या विघटनानंतर ज्याला बळकटी मिळाली.सामान्यतः भू-राजकारण हे अर्थव्यवस्थेच्या मागे चालतअसे आणि अर्थव्यवस्था प्रामुख्याने बाजारपेठ-आधारितहोती. बहुतेक आंतरराष्ट्रीय संबंध आर्थिक हितांच्याभोवती विणलेले होते. जागतिक मंचावर चीनचा उदय हेयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 2002 मध्येपश्चिमेकडील देशांच्या पाठिंब्याने चीनला जोराजकीयदृष्ट्या कम्युनिस्ट होता, परंतु आर्थिकदृष्ट्या कम्युनिस्ट राहिला नव्हता जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यू) समाविष्ट करण्यात आले. हे लक्षात ठेवणेमहत्त्वाचे आहे की, 1972 मध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातील सुरुवातीचा मेळ हा पूर्णपणे धोरणात्मक होता, आर्थिक नव्हता. त्याकाळी चीन आर्थिकदृष्ट्यामागासलेला होता . त्याचे व्यापार/जीडीपी गुणोत्तर केवळ 5% होते. तसेच तो परकीय गुंतवणुकीचे स्वागतही करतनव्हता. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सोव्हिएतयुनियनला कमकुवत करण्यासाठी चीनकडे एक भागीदारम्हणून पाहिले होते. परंतु 1991 नंतरही अमेरिकेनेचीनपासून अंतर राखले नाही. मोठ्या आर्थिक संधींनीचीनचे अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांशी असलेलेसंबंध पुढे नेले. देश आणि कंपन्या वेगाने चीनकडेधावल्या. आज परिस्थिती अशी आहे की, अर्थव्यवस्था आताभू-राजकारणाच्या मागे चालू लागली आहे, जरी तीअजून पूर्णपणे त्याच्या अधीन झालेली नाही. जर चीनचाडब्ल्यूटीओमध्ये समावेश होणे हे या गोष्टीचे सर्वात मोठेसंकेत होते की, पूर्वी अर्थव्यवस्था भू-राजकारणावरवरचढ होती, तर आता ट्रम्प यांनी टेरिफचा (शुल्क)भू-राजकीय शस्त्र म्हणून केलेला वापर हा नव्या युगातीलसर्वात मोठा इशारा आहे. एकेकाळी टेरिफ हे एकआर्थिक साधन असायचे आणि जागतिकीकरणाच्याकाळात बहुतेक देशांना ते किमान पातळीपर्यंत कमीकरायचे होते, परंतु गेल्या वर्षभरात अमेरिकेने आपल्याजुन्या मित्रराष्ट्रांवरही टेरिफ लादले आहेत. कारण आताअमेरिका त्यांना फारसे उपयुक्त मानत नाही. ग्रीनलँडशीसंबंधित आपल्या योजनांसाठी ट्रम्प नाटो देशांना दंडितकरण्यासाठीदेखील टेरिफचा वापर करण्यास तयार होते.ज्यांनी त्यांना विरोध केला होता नंतर त्यांनी माघार घेतलीअसली तरी. 2028 ते 2030 दरम्यान भारत जर्मनीला मागेटाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनूशकतो, परंतु हा वेग पुढेही कायम राहू शकेल का? ट्रम्पयांनी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय निर्यातीवर उच्च टेरिफलावणे हा या समस्येचा मोठा भाग आहे. दुसरीकडे,अमेरिकेने पाकिस्तानला जवळ केले आहे आणि चीनवरतितके कडक टेरिफ लादलेले नाहीत, तर चीन हाभारताचा एक भू-राजकीय प्रतिस्पर्धी आहे. अशावातावरणात आत्मनिर्भरतेबद्दल बोलणे आकर्षक वाटते,परंतु हा व्यावहारिक विचार नाही. भारताचेव्यापार/जीडीपी गुणोत्तर आता खूप लहान नाही, जसे कीते 1970 च्या दशकापर्यंत होते. आता ते 40% पेक्षा जास्तआहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जगाशी खोलवरजोडलेली आहे. आज भारत अचानक स्वतःपुरतामर्यादित राहू शकत नाही. व्यापारावर अवलंबून असणारेदेश (उदा. दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर आणि 1980च्या दशकानंतरचा चीन) पुढे गेले. हे पाहताआत्मनिर्भरतेच्या दीर्घकालीन उपयुक्ततेवरही प्रश्नउपस्थित होतात. भारताची आर्थिक रणनीती दोन भागांची असायला हवी :बाह्य जगाशी संतुलन राखणे आणि अंतर्गत नियामकचौकट सोपी करणे. अमेरिकेने काहीसे अंतर राखलेअसले तरी भारताला त्यांच्याशी व्यापार करण्याचा मार्गशोधावा लागेल. ईयूसोबतचा व्यापार करार हे योग्य दिशेनेटाकलेले पाऊल आहे. धोरणात्मक गुंतागुंत असूनहीचीनला पूर्णपणे सोडले जाऊ शकत नाही. अंतर्गतनियामक चौकट सोपी करणे,करप्रणाली, जमीन- श्रमबाजारा बदल करावेत.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आत्मनिर्भरतेबद्दल बोलणे आकर्षकवाटते, परंतु ते व्यावहारिक नाही. भारताचेव्यापार/जीडीपी गुणोत्तर आता 1970 च्यादशकासारखे खूप लहान राहिलेले नाही.आज भारत अचानक स्वावलंबी होऊशकत नाही.
लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:पाकलाच दहशतवादाचे मूळ उद्ध्वस्त करण्यात रस नाही
पाकिस्तान पुन्हा एकदा अंतर्गत अशांततेच्या काळातप्रवेश करत असल्याचे दिसते. ही बाब भूतकाळातीलपरिचित नमुन्याची पुनरावृत्ती असली तरी यावेळी तेअधिक कठीण प्रादेशिक आणि आर्थिक परिस्थितीच्याकाळात घडत आहे. बलूच बंडखोर आणि इस्लामीअतिरेक्यांमधील संघर्षांमुळे अलीकडेच सुरक्षा दलांतमोठ्या प्रमाणात मृत्यू,जीवितहानी झाली. अशा घटनावेगवेगळ्या नाहीत. एकीकडे बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याशीथेट चकमकींद्वारे बलुचिस्तानमध्ये बंडखोरी मोहीम पुन्हासुरू केली. दुसरीकडे हरनाई आणि पंजगुरमध्येअलिकडचे लष्करी छापे तेहरिक-ए-तालिबानपाकिस्तान नेटवर्कविरुद्ध सक्रिय केल्याचे दिसतात. हे दुहेरी-आघाडीचे अंतर्गत आव्हान - फुटीरतावादीबंडखोरी आणि वैचारिक दहशतवाद - भूतकाळात पाकिस्तानला त्रास देणाऱ्या आव्हानासारखेच आहे.पाकिस्तान सैन्याची तैनाती अद्याप ऑपरेशन झर्ब-ए-अज्बच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. परंतु भूतकाळातील अनुभवानुसार दीर्घकाळाच्या संघर्षामुळे अनेकदा असा बदल होतो. मोठ्या प्रमाणात अंतर्गत सैन्य तैनात केल्याने नागरी क्षेत्रांचे लष्करीकरण, राजकीय अस्थिरताव बाह्य आघाड्यांवरून सैन्य मागे घेणे असेधोके निर्माण होतात. १६ डिसेंबर २०१४ रोजीपेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्याचीआठवण पाकिस्तानच्या धोरणात्मक जाणीवेत खोलवरकोरलेली आहे. परिस्थितीमुळे ती निर्माण झाली त्यापरिस्थितींकडे आजपर्यंत मूलभूतपणे लक्ष दिले गेलेनाही. येथूनच पाकिस्तानचा कायमचा विरोधाभास स्पष्टहोतो. इस्लामी दहशतवादाला अजूनही वैचारिक समस्याम्हणून नव्हे तर सुरक्षा समस्या म्हणून पाहिले जाते.कट्टरवादाचे जाळे तोडण्यासाठी, धार्मिक अर्थसुधारण्यासाठी किंवा समाजातील अतिरेकी कथनांनाआव्हान देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत.दरम्यान, बलूच बंडखोरीचा सामना जवळपास पूर्णपणेबळाच्या वापराद्वारे केला जात आहे. हे दोन पूर्णपणे भिन्नप्रकारचे संघर्ष आहेत. परंतु पाकिस्तान दोन्ही एकाचजुन्या पद्धतीने हाताळत आहे. प्रादेशिक परिमाण हीसमस्या आणखी गुंतागुंतीची करते. आजचाअफगाणिस्तान हा केवळ पाकिस्तानचा शेजारीच नाहीतर पाकिस्तानला कमकुवत करणाऱ्या कारवाया शक्यअसलेले क्षेत्र आहे. काबूलमधील पाकिस्तानचा प्रभावअपेक्षेपेक्षा कमकुवत असल्याचे सिद्ध झाले आहे.अमेरिका पुन्हा एकदा पाकिस्तानचा मित्र बनले आहे.अमेरिकेने कधीही दीर्घकालीन स्थिरतेत रस दाखवलानाही. सौदी अरेबिया, तुर्कीये आणि इतर प्रभावशालीइस्लामिक देशांनीही पाकिस्तानमधील अतिरेकीपणाचासामना करण्यासाठी धार्मिक किंवा वैचारिकपुढाकारांमध्ये फारसा रस दाखवला नाही. पाकिस्तानदहशतवादाचा बळी आहे कारण त्याच्याकडे लष्करीक्षमता नाही, तर हिंसाचाराला चालना देणाऱ्या वैचारिक,राजकीय आणि प्रादेशिक विरोधाभासांचे निराकरणत्याने कधीही केलेले नाही. परंतु आपल्यासारख्याशेजाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब असली पाहिजे. इतिहासदाखवतो की पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा चक्र हिंसकवळण घेते तेव्हा त्याचे परिणाम त्याच्या सीमांच्यापलीकडे पसरतात. तसे अनेकदा घडले आहे. पाकिस्तानया हिंसाचाराच्या लाटेला बाह्य कट रचण्याचा प्रयत्नकरेल. नेहमीप्रमाणे तो भारताकडे बोट दाखवेल. परंतुअसे आरोप सत्याला विचलित करू शकत नाहीत. जम्मूव काश्मीरमध्ये दहशतवादी गटांचा वापर करण्यासाठीदशके त्यांना पोसणे हे स्वतःच्या पायावर स्वत:च कुऱ्हाडमारण्यासारखे ठरू शकते. दहशतवादाशी संबंधित विविध गट त्यांच्या मर्यादेत राहतनाहीत. धोरणात्मक साधन म्हणून हिंसाचाराचेसामान्यीकरण समाजावर देखील परिणाम करते.धार्मिक, वांशिक किंवा राजकीय अशा सर्व प्रकारच्याकारणांसाठी बळाचा वापर न्याय्य मानला जाऊ लागतो.संघटित सामाजिक प्रतिकार होत नाही तोपर्यंत अर्थपूर्णबदल होण्याची शक्यता कमी आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पाकिस्तानकडे लष्करी क्षमता नाही म्हणूनहा देश दहशतवादाने पीडित आहे, असेनाही. वास्तविक पाकने हिंसाचारालाचालना देणाऱ्या वैचारिक, राजकीयआणि क्षेत्रीय विरोधाभासांचे निराकरणकेलेले नाही हे समस्येचे मूळ कारण आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:लवकरच आपण ‘टायपिंग’ऐवजी‘टॉकिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करू
आतापर्यंत आपण सर्वजण ही तक्रार करत होतो की, आपल्यापैकी बहुतेक लोक रस्ते, ट्रेन किंवा सार्वजनिक ठिकाणी मोबाइल स्क्रीनमध्ये मान घालून काही ना काही टाइप करत असतात, पण काळजी करू नका, एआयने (AI) तुमची ही तक्रार ऐकली आहे. लोक आता डोळ्यात डोळे घालून तुमच्याकडे पाहतील आणि बोलत राहतील. अहो, घाबरू नका! ते तुमच्याशी नाही, तर त्यांच्या फोनशीच ‘टॉकिंग’ करत असतील. आता लोक फोनवर दुसऱ्या कोणाशी बोलत नसून आपल्या मोबाइलला ‘डिक्टेशन’ देत आहेत—जो एखाद्या सेक्रेटरीप्रमाणे नोट्स घेत आहे आणि त्या हव्या त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आता कल्पना करा की, तुम्ही मुंबईच्या गच्च भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत आहात आणि प्रत्येक जण आपल्या मोबाइलशी बोलतोय. मोबाइल त्यांचा आवाज ओळखून त्याचे रूपांतर मेसेजमध्ये करत आहे. विचार करा, या गाड्या किती गोंगाटाच्या होतील? हो, जग हळूहळू सॅन फ्रान्सिस्कोमधील एका स्टार्टअपद्वारे तयार केलेल्या ‘विस्पर फ्लो’सारख्या एआय डिक्टेशन ॲप्सच्या आहारी जाईल. हे एआय तुमच्या विस्कळीत मजकुरात योग्य ठिकाणी विरामचिन्हे लावेल आणि त्याचे फॉरमॅटिंग करेल. याद्वारे तुम्ही सरासरी ११० ते १२५ शब्द प्रतिमिनिट बोलू शकता, जो वेग सरासरी टायपिंग स्पीडच्या किमान दुप्पट आणि कधी कधी तिप्पट असू शकतो. आजच्या काळात प्रत्येक काम टायपिंगने होऊ शकते, परंतु सॉफ्टवेअर एजन्सी ‘व्हाय नॉट अस’चे संस्थापक गेविन मॅकनमारा ७७ ॲप्स वापरत आहेत आणि गेल्या पाच महिन्यांत त्यांनी ३ लाख शब्द बोलले आहेत. हे तीन कादंबऱ्या लिहिण्यासारखे आहे. भविष्यातील जगात तुमचे स्वागत आहे. येथे टेक दिग्गज कंपन्यांची अशी इच्छा आहे की, आपण एआय आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या वापरामध्ये ‘टायपिंग’ऐवजी ‘टॉकिंग’द्वारे तंत्रज्ञानाशी संवाद साधावा. व्हॉइस-टू-टेक्स्ट डिक्टेशन ॲप्स हा एक नवीन ट्रेंड बनत आहे. कारण त्यांचा वापर टायपिंगपेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे. तंत्रज्ञान उद्योगातील नामवंत व्यक्ती देखील एआय वापरण्याच्या नवीन पद्धती विकसित करत आहेत. मेटाचे नवीन स्मार्ट ग्लासेस पूर्णपणे आवाजावर अवलंबून आहेत. ओपनएआय आणि मेटाने त्यांच्या बॉट्सशी व्हॉइस चॅट करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे (पर्सनॅलिटी) डिझाइन तयार केले आहे. ॲमेझॉनची अलेक्सा आणि ॲपलच्या सिरीजमध्येही एआय अपग्रेड्स होत आहेत. २०२६ च्या एमी अवॉर्ड््सची तयारी देखील अशाच तंत्रज्ञानाने करण्यात आली. हे सर्व बदल हे सुनिश्चित करतील की, या वर्षाच्या अखेरीस आपण बोटांच्या वापरापेक्षा तंत्रज्ञानाशी गप्पा मारताना जास्त दिसू. हे नवीन डिक्टेशन ॲप्स ‘विस्पर’ या एआय मॉडेलवर आधारित आहेत. चॅटजीपीटी बनवणाऱ्या कंपनीने २०२२ च्या शेवटी हे मूलभूत तंत्रज्ञान म्हणून लाँच केले आणि लाइव्ह डिक्टेशन सुविधा देण्यासाठी त्यावर काम केले. जरी याचे काही विनामूल्य पर्याय उपलब्ध असले, तरी भारतात याचे पेड सबस्क्रिप्शन दरमहा सुमारे ५०० रुपयांपर्यंत असू शकते. विकसित देशांमध्ये याची किंमत सुमारे १० डॉलर्स असू शकते. तुम्ही आजही पाहू शकता की, एका विशिष्ट वयोगटातील टेक युजर्स ई-मेल आणि एसएमएससाठी आपल्या कॉम्प्युटरशी ‘टॉकिंग’ करत आहेत. यामुळे काम वेगाने पूर्ण होते आणि म्हणूनच लोक पेड व्हर्जन घेण्यास तयार आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे कोडर्स देखील मोठ्या संख्येने या तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत, जेणेकरून कॉफी पिण्यासाठी थोडा वेळ वाचवता येईल. ते आधी आपले सर्व विचार बोलून मोकळे होतात, मग एआयला कोडिंग करू देतात आणि फायनल एडिटिंगसाठी स्वतः की-बोर्डचा वापर करतात. लवकरच तुम्हाला ऑफिसमध्ये असे बोलणे ऐकू येईल की, ‘हे बघा, तुमचा आवाज चांगला आहे, पण ऑफिससाठी नाही. कारमध्ये जा आणि मनसोक्त ओरडा.’ समजूतदार लोक हेडफोन वापरत आहेत, जेणेकरून लोकांना वाटावे की ते कॉलवर आहेत. थोडक्यात, ते सोशल हॅकिंग करत आहेत. फंडा हा आहे की, की-बोर्ड आता कालबाह्य होणार आहे आणि आपल्या आसपासच्या जगात पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त गोंगाट असेल. आपल्याला लवकरच ध्वनी प्रदूषणाविरुद्धच्या युद्धासाठी तयार राहावे लागेल.
मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...!
कविता वाचून संपत नाही. आवडलेली कविता वाचून झाल्यावरही मनात रुणझुणत राहते. मग ती कुठल्याही रूपात असो, त्याने फरक पडत नाही. दीर्घकविता असो, वा हायकू! तिला हवं तेवढं मनसोक्त बागडते कविता मनभर. अशाच वाचल्यानंतरही आठवत राहणाऱ्या हायकूंचा एक फार उत्तम संग्रह नुकताच वाचला. तो म्हणजे विजय पाडळकर लिखित हायकूऋतू! ३००हून अधिक हायकू आहेत आणि शिरिष घाटे यांच्या समर्पक रेखाचित्रांनी पुस्तकाला एक छान वेगळेपण आलंय. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक छोटा हायकू आहे. तो काहीसा प्रस्तावनेसारखा भासतो. चंद्र घेऊन आलाचकोरासाठी चांदणेमाझ्यासाठी हायकू मी वाचलेला हा पहिलाच संग्रह, याआधी हायकू वाचण्यात आले होते, पण एक सबंध संग्रह वाचण्याचा अनुभव वेगळा होता. एखादी दुखरी आठवण उलगडणारा, एखाद्या क्षणाला शब्दात बांधणारा, कुठल्याशा चिरंतन वेदनेचा उच्चार करणारा असे इतके वेगवेगळे भाव असलेले हायकू एकत्र वाचणं आनंददायी होतं. प्रत्येक हायकूचा काही एक ठरीव अर्थ असेल असं नाही. तो ज्याला त्याला वेगळ्या अर्थानं भावणंही शक्य आहे. काही फार आवडलेल्या हायकूंबद्दल सांगायचं तर ‘श्रावणहायकू’पैकी एकात कवी म्हणतात, माहेरनाते नभातल्या पाण्याचे सागरजळाशी किती छान कल्पना मांडलीये! समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि तिच्यामुळे पाऊस पडतो हे विज्ञानात शिकलेलं जलचक्र खरंतर, पण समुद्राच्या जळाला पावसाच्या पाण्याचं माहेर म्हणणं किती गोड आहे! पण ह्याच भागात आणखी एका हायकूमधे एका कदाचित दुखावलेल्या काहीशा कोरड्या मनाचं श्रावणाच्या लोभस असण्यापासूनचं राखलेलं अलिप्तपण येतं. कवी म्हणतात, चिंब बरसातीत कोरडे मन आला गेला श्रावण वाटेचे हायकूमधे ते म्हणतात, पाखराची वाट आकाशी लपून ज्याची त्याने शोधावी खूण केवढं तरी खरंय! ज्याला त्याला आपापल्या वाटा आणि गंतव्य शोधावं तर लागतच पण त्या वाटा जपणारी खूणही शोधावी लागते. पाखराला आकाशातून मनसोक्त विहरताना त्याची त्याची वाट जिथे आहे ती खूण गवसते तशी आपल्यालाही गवसेल फक्त शोधणं हवं! ‘प्रवासाचे हायकू’मधे असलेला एक हायकू मला फार भावला. अदृश्य झाले कॅमेरा शोधताना इंद्रधनुष्य आजकाल आहे तो क्षण अनुभवण्यापेक्षा पुन्हा पाहण्यासाठी कैद करण्याची घाई खूप करतो आपण, नाही का? समोरचं सुंदर इंद्रधनुष्य हे त्या क्षणी मनसोक्त आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी असतं, त्याचे नितांत सुंदर रंग मनात साठवण्यासाठी असतं हे कधी कसे विसरून गेलो आपण मोबाइलची मेमरी भरताना? आणि मग हे वाचून होतं न होतं तोच हा आहे तो क्षण एका क्षणापुरताच वर्तमान आहे हे पुन्हा सांगायला कवी विसरत नाहीत. ते ‘विखुरलेले हायकू’मधे म्हणतात, क्षण बनला एक आठवण क्षणार्धात या इतक्या सुंदर संग्रहाला तितकाच समर्पक समारोप देताना कवी एक छोटीशी प्रार्थना करतात. अंतिम क्षणी मनात उरावे थोडे रंग मागणे एवढेच हे इतकं तरल आणि नेमकं काही कवीच मागू शकतो. एकूणात अनेक छोट्या छोट्या अनुभवांना, भावनांना, दुःखांना, वेदनांना, इच्छांना अवघ्या तीन ओळींमधून आपल्या ओंजळीत ठेवत आपल्या मनात विचारांचे कितीतरी तरंग उठवणाऱ्या हायकूंचा हा एक वाचनीय संग्रह आहे.
त्याने त्याच्या फोन स्क्रीनच्या मंद प्रकाशात टाइप केले, “मलाही जगण्याचा कंटाळा आला आहे. तू मला तुझ्यासोबत घेऊन जाशील का? मला भीती वाटते.’ तो काही सेकंदांपूर्वी त्याला आलेल्या एका मेसेजला उत्तर देत होता. ज्यामध्ये लिहिले होते, “मी आधी जात आहे.’ त्याला सोबत घेऊन जाण्याची विनंती करत असताना, तो त्याला वारंवार त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी एक फोटो पाठवण्यास सांगत होता, जेणेकरून तो वेळेत त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल. आपल्यापैकी बहुतेकांना, हे आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या दोन किशोरांमधील संभाषणासारखे वाटेल. फार कमी लोकांना हे समजेल की या संभाषणात एक बाप आहे. ज्याने आपल्या मुलाला अशाच मूर्खपणाने गमावले आहे. आता तो त्याच्या मृत मुलाचा फोन वापरून इतर मुलांशी बोलून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखत आहे. लोकेशन पाठवताच, त्याने मित्रांना पोलिसांना कळवण्याची सूचना दिली. पोलिस अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत, वडील मुलाशी गप्पा मारत राहिले, जणू काही ते मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. हा एक ग्रुप चॅट आहे (एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून, आम्ही या साइटचे नाव उघड करत नाही). मे 2020 मध्ये चीनमधील हेनान प्रांतातील 45 वर्षीय रहिवासी शू यांचा 17 वर्षांच्या मुलाने त्याच्या राहत्या घराच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. आता शू यांनी शक्य तितक्या जास्त मुलांचे जीव वाचवण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर, शू यांनी त्यांच्या मुलाचा मोबाइल फोन पाहिला आणि किशोरवयीन मुलाच्या जीवनातील अनेक पैलू उघड केले. त्याने आवेगाने आत्महत्या केली नव्हती. शू यांना आढळले की, त्यांचा मुलगा बराच काळ नैराश्य आणि आत्मत्यागाच्या दुष्टचक्रात अडकला होता. त्याची मैत्रीण एक चांगली विद्यार्थिनी होती आणि तिने त्याच्यापेक्षा चांगले गुण मिळवले होते. मुलगा अनेक ऑनलाइन चॅट ग्रुप्सचा भाग होता, त्यापैकी एक “XXXX’ होता. जेथे किशोरवयीन मुले शिक्षक, पालक, शाळा आणि ग्रेड यावर चर्चा करत असत. हळूहळू, हे ग्रुप्स लहान गटांमध्ये विभागले गेले. एकमेकांबद्दल नकारात्मक भावना वाढत गेल्याने सकारात्मकता कमी झाली आणि तक्रारींनी त्याची जागा घेतली. अखेर, “आत्महत्या करार चॅट’ नावाचा एक अंतिम ग्रुप तयार झाला. किशोरवयीन मुलांसाठी आत्महत्या करणे किती सोपे झाले आहे हे पाहून शू थक्क झाले. शू हे घर नूतनीकरण करणारा कामगार आहेत आणि कधीकधी झेंगझोऊ रेड क्रॉस वॉटर रेस्क्यू टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात. पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवण्यात अनुभवी असलेल्या शू यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर मोबाइल चॅट ग्रुप्सच्या खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. या गटांमधील भाषा कोडसारखी होती. ‘कोळसा जाळणे’ याला “बार्बेक्यू’, नदीत उडी मारणे याला “डायव्हिंग’ आणि इमारतीवरून उडी मारणे याला कोडवर्डमध्ये ‘क्लबिंग’ असे ते म्हणत होते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ज्या रात्री शू या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला संदेश टाइप करत होते त्या रात्री पोलिसांनी 13 ते 14 वयोगटातील पाच मुलांचा जीव वाचवला. 10 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. या वर्षांमध्ये शरीरात, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये बदलांसह लक्षणीय बदल होतात. तणाव, गोंधळ, भीती आणि शंका या भावना किशोरांच्या समस्या सोडवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यांना यशस्वी होण्यासाठी दबावदेखील येतो. शू आपले सर्वोत्तम प्रयत्न करत असताना, आपण घरी असताना मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे, त्यांच्यात संबंधांची भावना निर्माण केली पाहिजे. मुलांना समस्यांना तोंड देण्याची आणि सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करा, ज्यामुळे भविष्यातील धोके टाळता येतील. फंडा हा आहे की, हे इतके सोपे आहे की, जर आपण आपल्या किशोरवयीन मुलांशी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन संवाद साधला तर जीवन सोपे आणि आनंदी होईल. जर ते ऑनलाइन बराच वेळ घालवतात. तर ते काय पाहत आहेत यावर लक्ष ठेवण्याऐवजी, ते कुणाला मेसेज करत आहेत आणि ते काय लिहीत आहेत यावर लक्ष ठेवा.
गॉर्डन ब्राउन यांचा कॉलम:जागतिक आव्हानांपासून वेगळे राहता येणार नाही
पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा ट्रम्प यांचा निर्णय आता औपचारिकपणे लागू झाला आहे. या महिन्यात त्यांनी अमेरिका 31 संयुक्त राष्ट्र संघटना आणि 35 गैर-संयुक्त राष्ट्र संघटनांसह इतर 66 आंतरराष्ट्रीय संघटनांपासून माघार घेत असल्याचे जाहीर केले. इतिहासात कधीही एखाद्या राष्ट्रीय नेत्याने केवळ एका महिन्यात इतक्या व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध तोडले नाहीत. तसेच कोणत्याही नेत्याने कधी इतके स्पष्टपणे म्हटले नाही की त्याला आता आंतरराष्ट्रीय कायद्याची गरज नाही. ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. अमेरिकेवर नियम व कायदे कधी लागू होतील हे आपण स्वत: ठरवू, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या कठोर धोरणांमुळे आधीच नुकसान होऊ लागले आहे. गेल्या वर्षभरात ट्रम्प प्रशासनाने जागतिक मानवतावादी मदत व आरोग्य कार्यक्रमांसाठी निधीतमोठी कपात केली आहे. त्यामुळे - सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटनुसार - दरवर्षी अंदाजे दहा लाख अतिरिक्त मृत्यू होण्याची अपेक्षा आहे. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि इतर संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अमेरिका आणि युरोपकडून मदत कपात केल्याने 2030 पर्यंत विकसनशील देशांत 2.26 कोटी अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात - त्यात पाच वर्षांखालील 54 लाख मुले समाविष्ट आहेत.अलिकडच्या घडामोडींवरून असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय मदतीमध्ये आणखी कपात केली जाईल. ट्रम्पबद्दल आम्हाला आधीच माहिती होते की त्यांचे प्रशासन युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्तराष्ट्र निर्वासित संस्था, संयुक्त राष्ट्रांची मदत आणि कार्यसंस्था जवळच्या पूर्वेतील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी आणि संयुक्त राष्ट्रांची लोकसंख्या निधी यासारख्या जागतिक संस्थांना लक्ष्य करेल. परंतु आता हेही स्पष्ट झाले की हवामान बदलावर करार करण्यासाठीच्या चौकटीचा त्याग करणारा अमेरिका पहिला देश बनेल. ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’ याच्या व्याप्तीचे देखील दूरगामी परिणाम होतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रयत्नांना पर्याय म्हणून ते ठेवण्याचा प्रयत्न हा एक मोठा बदल आहे. कायदा आयोग, युरोप परिषदेचा व्हेनिस आयोग, लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था आणि न्याय आणि कायद्याचे नियम यासारख्या आंतरराष्ट्रीय कायद्यांना वचनबद्ध असलेल्या संस्थांवर हल्ला करणे, भविष्यातील अमेरिकन कृतींच्या वैधतेसाठी वाईट संकेत देते. ट्रम्प प्रशासनाचा हा युक्तिवाद की ही पावले खर्च कमी करणे आणि जागृत अजेंडाचा प्रतिकार करणे हा आहे हे देखील निराधार दिसते. महिलांच्या समानतेचे आणि मुलींच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थांपासून माघार घेण्याचा अर्थ काय? यूएन वुमन सारख्या संस्थेने 80 हून अधिक देशांना जेंडर-संवेदनशील बजेट विकसित करण्यास मदत केली आहे. त्यास अनावश्यक आणि निरर्थक कसे मानले जाऊ शकते? त्याची भगिनी संस्था, यूएनएफपीएमातृ आरोग्यास समर्थन देते. एज्युकेशन कान्ट वेट(याचे अध्यक्ष पद मी सांभाळले) लाखो निर्वासित आणि विस्थापित मुलांना शिक्षणाची सुविधा प्रदान करते. अशा संस्थांना पुरेसा निधी मिळाला नाही तर जगातील सर्वात असुरक्षित महिला आणि मुलींना हिंसाचार आणि मातृ मृत्यूचा धोका जास्त असेल. ट्रम्प प्रशासनाचा गैरसमज आहे की अमेरिकन नागरिकदेखील आंतरराष्ट्रीय संस्थांना नष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणांना समर्थन देतात. उलटपक्षी वास्तव असे आहे की बहुसंख्य अमेरिकन लोकांना जगातील राष्ट्रांनी सामान्य समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करावे असे वाटते. 34 देशांतील एका सर्वेक्षणात 90 टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी म्हटले की जागतिक आरोग्य, मानवी हक्कांचे संरक्षण आणि संघर्ष रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. जागतिकस्तरावर 60 टक्के लोकांनी जागतिक आरोग्य संघटनेवर विश्वास व्यक्त केला. 58 टक्के लोकांनी संयुक्तराष्ट्रांवरही विश्वास व्यक्त केला. अमेरिका याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) ट्रम्प प्रशासनाचा गैरसमज आहे की अमेरिकन नागरिकदेखील आंतरराष्ट्रीय संघटना नष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणांना पाठिंबा देतात. परंतु बहुसंख्य अमेरिकन लोकांना जगातील राष्ट्रांनी एकत्र काम करावे असे वाटते.
पवन के. वर्मा यांचा कॉलम:अर्थसंकल्पात सुधारणेसाठी जोखीम घेतली जाईल का?
सलग आठ वर्षांपासून अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण कौतुकास पात्र आहेत.आपली वित्तीय तूट नियंत्रणात आहे आणि महागाई मोठ्या प्रमाणात नियंत्रित आहे. समृद्ध परकीय गंगाजळी आणि 6% पेक्षा जास्त आर्थिक विकास दरासह आपण जगातील सर्वात वेगाने वृद्धी होत असलेल्या अर्थव्यवस्थांत समाविष्ट आहोत. परंतु अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला एक प्रश्न आहे : या वातावरणात त्याभारताचा आर्थिक स्तर आणखी उंचावण्यासाठी जोखीम घेण्यास तयार आहेत का? अलीकडेच एका कॉर्पोरेट व्यक्तीने मला सांगितले कीसरकार उद्योजकांना जोखीम घेण्याची क्षमता वाढवण्यास सांगते. भारतीय जन्मतः उद्योजक असतात. जोखीम पत्करून भरभराटीला येतात. परंतु अपयशाला फसवणूक मानले जाते, अशा वातावरणात जोखीम पत्करावी का? सरकारी म्हणण्यानुसार चालले नाहीतर तो व्यक्ती तपास संस्थांची शिकार बनतो, अशी धारणा बनलेली आहे. निर्मलाजी, गुंतवणूकदारांच्या मनात अशा शंका निर्माण करणारी व्यवस्था बदलण्याचा धोका तुम्ही घेऊ शकता का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल? सरकारकडे दोन टर्मसाठी पूर्ण बहुमत राहिले. आजही स्थिर बहुमत आहे. जागतिक बँकेच्या यादीत आपण अजूनही 63 व्या क्रमांकावर असल्याने आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी आणि उद्योगांत सुलभतेने सुधारणा करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. काही सुधारणा निश्चितच केल्या गेल्या आहेत. परंतु अधिक अजूनही थंडीत आहेत. उदाहरणार्थ- जमीन आणि कामगार कायदे. अनेक असंबद्ध नियम भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात. सरकारला या सुधारणांना गती देणे परवडेल का? हो, भारतासारख्या देशात सामाजिक सुरक्षा काही प्रमाणात मानवतावादी आणि आर्थिकदृष्ट्या तर्कसंगत आहे. परंतु खरे आव्हान म्हणजे या मदतींचे अशा साधनांमध्ये रूपांतर करणे जे लोकांना सुरक्षित रोजगार किंवा उद्योजकतेकडे नेऊ शकतात. निर्मलाजी, सरकार अशा सुधारणांचा धोका पत्करण्यास तयार आहे का? पुन्हा एकदा कृपया आम्हाला सांगा, आज एआय आणि ऑटोमेशन केवळ नवीन संधी निर्माण करत नाहीत तर कामगारांना देखील विस्थापित करत आहेत. तेव्हा बेरोजगारी हाताळण्यासाठी तुमचा काय प्रस्ताव आहे? यंत्रे आता उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्रात दैनंदिन कामे करत आहेत. येथे खरा मुद्दा कौशल्य आणि संधींमधील असंतुलन आहे. केवळ भात पिकवण्याचा दशकांचा अनुभव असलेला शेतकरी पुन्हा कौशल्य निर्माण केल्याशिवाय एआय इकोसिस्टममध्ये अचानक रोजगारक्षम होऊ शकत नाही. शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची पुनर्रचना केली तरच भारताची तरुण लोकसंख्या लोकसंख्या शास्त्रीय लाभांश देऊ शकेल. भारताच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान दीर्घकाळापासून सुमारे 15-17% वर स्थिर आहे. हेलॉजिस्टिक्समधील अडथळे, अनुपालन खर्च आणि विसंगत धोरणे यासारख्या संरचनात्मक समस्यांमुळे आहे. निर्मलाजी, एआयच्या युगातही सरकार बेरोजगारी कमी करण्यासाठी कामगार-केंद्रित उद्योगांना आणि कौशल्य विकासाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊ शकेल का? भारतीय मध्यमवर्ग केवळ त्यांच्या उत्पन्नाबद्दलच नाही तर आरोग्य जोखीम, शिक्षण खर्च, निवृत्तीची असुरक्षितता, नोकरीची अनिश्चितता, गृहनिर्माण महागाई, बालसंगोपन आणि शैक्षणिक कर्ज सुधारणांबद्दल देखील चिंतित आहे. सरकार अल्प करसवलतीच्या वरवरच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मध्यमवर्गासाठी अधिक ठोस पावले उचलू शकेल का? कृषी क्षेत्र देशाच्या अर्ध्या कामगारांना रोजगार देते तरीही त्याचा जीडीपीमध्ये एक पंचमांशपेक्षा कमी वाटा आहे.या स्थिर कृषी उत्पादकतेवर मात करण्यासाठी नवोपक्रमाची एक नवीन लाट आवश्यक आहे. तुरळक घोषणांऐवजी दुसऱ्या हरित क्रांतीसाठी ठोस योजना आणणे बजेटला परवडेल का? भारतात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. परंतु आपल्याकडे अत्यंत गरीबलोक देखील आहेत. निर्मला सीतारमण, यावेळी तुमच्या अर्थसंकल्पीय दृष्टिकोनात केवळ आकडेवारी संतुलित करण्याऐवजी 1991 च्या ऐतिहासिक आर्थिक उदारीकरणासारखे मोठे धोरणात्मक बदल लागू करण्याचा धोका तुम्ही पत्करण्यास तयार असाल का?(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. परंतु आपल्याकडे अत्यंत गरीब लोकहीआहेत. या वेळी आकडेवारी संतुलितकरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण 1991 च्या आर्थिक उदारीकरणासारखे मोठे धोरणात्मक बदल आणण्याचाधोका पत्कराल का?
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नातेसंबंधांत स्थिरतेपेक्षा आत्मीयता बाळगावी
सार्वजनिक जीवनात मित्र शत्रू बनणे आणि शत्रू मित्र बनणे हेसामान्य आहे. जीवनात मोठी ध्येये साध्य करायची असल्यास स्थिरनातेसंबंधांचा काळ संपत आला आहे. आज तुमची असलेली व्यक्तीउद्या तुमच्या विरोधात असू शकते. तोच विरोधक कधीही पाठिंबा देऊशकतो. संतांनी म्हटले आहे- ‘समय फिरे रिपु होई पीरिते।’ म्हणजेकाळ बदलतो, शत्रूही तुमचा प्रिय बनतो. देवकीच्या लग्नात कंस खूपआनंदी होता. तो हुंड्याच्या वस्तू त्याच्या रथात भरत होता . त्याच्याबहिणीला व भावाला निरोप देत होता. तेवढ्यात आकाशवाणी झाली-मूर्ख कंस, बहिणीच्या लग्नाबद्दल तू इतका आनंदी आहेस. तिचाआठवा मुलगा तुझ्या मृत्यूचे कारण बनेल.’ कंस रथावरून उडीमारतो. त्याच्या बहिणीला खाली फेकतो मारण्याचा प्रयत्न करतो. हीघटना दर्शवते की लोक किती लवकर बदलतात. नातेसंबंधांत स्थैर्यराखू शकत नाही. परंतु आत्मीयता ठेवू शकता. अन्यथा तुम्ही दुःखीराहाल.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गांधी तसेच हनुमान दोघांकडेही श्रीराम नावाची शक्ती होती
आज पुन्हा गांधीजींचे स्मरण केले जाईल. त्यांचे टीकाकारही गांधी मानवतेचे शिक्षक होते यावर सहमत आहेत. भक्त म्हणतात की हनुमान मानवतेचे गुरू आहेत. गांधी म्हणायचे की सत्याचा शोध घेणारा हिंसक असू शकत नाही. आपण सुंदरकांडात हनुमानाचा लंकेचा प्रवास पाहतो तेव्हा हे सिद्ध होते. गांधीजींनी शिकवलेल्या गोष्टी आजही खऱ्या ठरतात : सत्य, साधेपणा, नैतिकता, स्वदेशी आणि स्वच्छता. गांधीजींशी जोडण्याच्या सर्व मार्गांचे राजकारणात बलिदान दिले गेले. परंतु हनुमानाशी जोडण्याचा एक मार्ग खूप सोपा आहे हनुमान चालिसा. एकत्रितपणे मंत्र पठण केले तर त्याची सकारात्मक ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरेल. म्हणूनच “महानिर्वाण’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तो आज संध्याकाळी ७ वाजता संस्कार टीव्हीवर पाहता येईल. हनुमान आणि गांधीजी दोघांनीही समाजाला सक्रिय भक्तीचे यप भेट दिले. दोघांमध्ये श्रीराम नामाची शक्ती होती. आपण हे स्वीकारू शकतो.
डेरेक ओ ब्रायन यांचा कॉलम:आपली व्यवस्था स्त्रियांची बाजू कमकुवत करतेय
या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची शिकार झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पीडितेच्या बहिणीचे शब्द कधीही विसरता येणार नाहीत-‘तिला कुणीही न्याय देऊ शकले नाही.’भारतामध्ये महिलांसाठी न्यायाचा नेमका अर्थ काय आहे? आपली कायदेशीर यंत्रणाच महिलांची बाजू कशी दुर्बल करते, हे पाहूया- 1. भारतीय दंड संहिता, 1860 मध्ये संहिताबद्ध आणि भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 63 मधील तरतुदीनुसार पतीने पत्नीच्या संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार मानले जात नाहीत. हा कायदा विवाहातील स्त्रीच्या संमतीच्या तत्त्वालाच नाकारतो आणि पत्नीच्या निर्णयाऐवजी पतीच्या लैंगिक अधिकारांना प्राधान्य देतो.महिलांना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा,2005 अंतर्गत नागरी उपाय उपलब्ध असले तरी वैवाहिक बलात्कारावर फौजदारी कारवाई नाकारणे म्हणजे स्त्रीचा शरीरावरचा अधिकार तिच्या वैवाहिक स्थितीपुढे नगण्य ठरतो, असे मानणाऱ्या व्यवस्थेला बळ देणे होय.1971 मध्ये 42 व्या विधी आयोगाने वैवाहिक अत्याचार गुन्हा ठरवण्याची शिफारस केली होती; मात्र ती आजवर अमलात आणलेली नाही.2. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 नुसार महिलांसाठी किमान विवाह वय 18 आणि पुरुषांसाठी 21 वर्षे आहे. या फरकाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. उद्देश बालविवाह रोखण्याचा असेल तर तो सर्व लिंगांसाठी समान असायला हवा. आणि महिलांचे संरक्षण हाच उद्देश असेल तर त्यांच्यासाठी कमी वय ठेवल्याने तो उद्देश कसा साध्य होतो? उलट स्त्री-पुरुष वयातील फरक आवश्यक आहे. हीच धारणा कायदेशीर ठरवली जाते. यामुळे स्त्रियांचे पुरुषांवर अवलंबित्व वाढते आणि शिक्षण मर्यादित होते. कायदा असमानतेला संस्थात्मक स्वरूप देतो, तो गौरवाचा दावा करू शकत नाही.3. दाम्पत्य सहवास पुनर्स्थापना (आरसीआर) ही तरतूद हिंदू विवाह अधिनियम कलम 9 आणि विशेष विवाह अधिनियम कलम 22 अंतर्गत आहे. यानुसार कोणताही जोडीदार योग्य कारणांशिवाय वेगळा राहत असल्यास त्याला पुन्हा सहवासासाठी बाध्य करता येते.हा कायदा विवाहाला संमतीवर आधारित नातेसंबंध न मानता कायदेशीर बंधन ठरवतो. याचा भार प्रामुख्याने महिलांवर पडतो. त्यांना मानसिक, भावनिक किंवा लैंगिक अत्याचार असूनही वेगळे राहण्याचे कारण सिद्ध करावे लागते. वैवाहिक बलात्कार गुन्हा नसल्यामुळे ही तरतूद महिलांना पुन्हा अपमानास्पद आणि असुरक्षित परिस्थितीत परत जाण्यास भाग पाडू शकते.4. पोक्सो कायदा 2012 अंतर्गत लैंगिक गुन्ह्यांमध्ये असहमतीचा पुरावा आवश्यक मानला जात नाही. म्हणजेच 18 वर्षांखालील दोन किशोरवयीन परस्पर संमतीने संबंधात असले तरी त्यांची संमती कायदेशीरदृष्ट्या अप्रासंगिक ठरते.पोक्सो अंतर्गत दाखल होणाऱ्या अनेक प्रकरणांचा संबंध सहमतीवर आधारित किशोरवयीन प्रेमसंबंधांशी असतो. विशेषतः आंतरजातीय, आंतरधार्मिक किंवा सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य संबंधांमध्ये पालकच अशा तक्रारी दाखल करतात.लैंगिक शोषण आणि संमतीने झालेले संबंध यामधील फरक न केल्यामुळे हा कायदा किशोरांची स्वायत्तता मर्यादित करतो. पण त्यांना प्रत्यक्ष संरक्षण देण्यात अपयशी ठरतो.5. भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 69 नुसार विवाहाच्या खोट्या आश्वासनावर आधारित लैंगिक संबंध गुन्हा ठरवण्यात आला आहे. ही तरतूद या गृहितकावर आधारित आहे की स्त्रीची लैंगिक संमती केवळ विवाहाच्या अपेक्षेशीच जोडलेली असते. नात्यांमध्ये इरादे बदलू शकतात; मात्र स्पष्ट कायदेशीर निकष नसल्यामुळे या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. कायद्यातील संमती सशर्त आहे, तोपर्यंत महिलांसाठी न्यायही सशर्तच राहील — राज्यघटनेतील सन्मान, समानता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूल्यांशी विसंगत आहे.( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. लेख संशोधन साहाय्य चाहत मंगतानी यांनी केले.) वैवाहिक अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास नकार देणारी व्यवस्था स्त्रीला आपल्या शरीरावरील अधिकाराला तिच्या वैवाहिक दर्जापेक्षा गौण ठरवते. मग वैवाहिक अत्याचार आजही गुन्हा का मानला जात नाही?
नीरज कौशल यांचा कॉलम:टेरिफ का असेना... आपण व्यापार करारांकडे वळलो
ट्रम्प भारताला ‘किंग ऑफ टेरिफ ’ म्हणतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अनेक गृहीतके आणि विधाने चुकीची असू शकतात. परंतु या एका मुद्द्यावर ते बरोबर आहेत. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतात सर्वाधिक टॅरिफ -भिंती आणि असंख्य नॉन-टॅरिफ अडथळे आहेत. भारताने टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे दोन्ही कमी करणे चांगले होईल. हे व्यापार अडथळे विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग अधिक कठीण करतात. आत्मनिर्भर भारताची कल्पना ही देशाच्या सध्याच्या व्यापार धोरणाचा सार आहे. परिणामी गेल्या 12 वर्षांत एनडीए सरकारने टेरिफ वाढवले आहेत. असंख्य नॉन-टेरिफ अडथळे उभे केले आहेत आणि व्यापार करार टाळले आहेत. दुर्दैवाने भारतीय माध्यमे ट्रम्पच्या टॅरिफवर तीव्र टीका करत असताना मोदी सरकारचे काँग्रेस काळातील संरक्षणवादी धोरणांकडे परतणे हे मूकपणे स्वीकारले जात आहे. हे भारताच्या हिताचे नाही. 1980 च्या दशकात भारताचा सरासरी टॅरिफ दर 125% च्या आसपास होता. अशा उच्च टॅरिफ दरांमुळे भारतीय अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होण्याऐवजी स्पर्धात्मक बनली. व्यापाराद्वारे आर्थिक समृद्धी मिळवणाऱ्या पूर्व आणि आग्नेय आशियाई देशांप्रमाणे या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मंद विकासाच्या मार्गावर गेली. त्यावेळी भारताला अनेकदा “बास्केट केस’ असे संबोधले जात असे - गंभीर आर्थिक अडचणींमध्ये असलेला व कर्ज फेडू शकत नव्हता असा देश. ही परिस्थिती 1990 मध्ये उद्भवली. भारताचा परकीय चलन साठा 1 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाला. तो तीन आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा नव्हता. बँक ऑफ इंग्लंडकडून कर्ज घेण्यासाठी आणि 2 अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन कर्जासाठी आयएमएफकडे जाण्यासाठी भारताला आपले सोने गहाण ठेवावे लागले, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याच्या अटी होत्या. पुढील दोन दशकांत, लागोपाठच्या सरकारांनी शुल्क कमी केले. 2013 पर्यंत प्रभावी शुल्क दर 13% पर्यंत घसरला. परंतु आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत एनडीए सरकारने उदारीकरण थांबवलेच नाही तर हळूहळू पुन्हा शुल्क वाढवले. 2021 पर्यंत प्रभावी शुल्क दर 18% पर्यंत वाढला होता. गुणवत्ता नियंत्रण आदेश किंवा क्यूसीओच्या स्वरूपात नॉन-टेरिफ अडथळ्यांचा अलीकडील इतिहासही तितकाच चिंताजनक आहे. 2014 मध्ये फक्त 14 क्यूसीओ अस्तित्वात होते. 2025 पर्यंत त्यांची संख्या 800 पेक्षा जास्त झाली होती. औपचारिकपणे हे ग्राहक संरक्षण उपाय आहेत. परंतु प्रत्यक्षात ते आयात प्रतिबंधित करणारे नॉन-टॅरिफ उपाय आहेत. ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्याऐवजी, हे भारताची स्पर्धात्मकता कमकुवत करत आहेत आणि परदेशी गुंतवणूकीला परावृत्त करत आहेत. चांगली बातमी अशी आहे की सरकार आता क्यूसीओ कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारने कापड क्षेत्रात वापरल्या जाणारी रसायने, पॉलिमर आणि फायबर मध्यस्थांशी संबंधित 14 क्यूसीओ काढून टाकले. ऑटोमोबाईल्ससह विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टीलशी संबंधित मध्यस्थांना लागू असलेले 55 इतर क्यूसीओ देखील काढून टाकले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच सांगितले की सीमाशुल्क हे त्यांचे पुढील मोठे स्वच्छता कार्य आहे. या स्वच्छतेमध्ये लक्षणीय शुल्क कपात आणि शक्य तितक्या जास्त क्यूसीओचे उच्चाटन किंवा कपात यांचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या शुल्क युद्धामुळे भारताला आत्मनिर्भरतेच्या कोशातून बाहेर पडण्यास आणि व्यापार करारांद्वारे नवीन बाजारपेठांचा शोध घेण्यास भाग पाडले आहे. गेल्या वर्षी भारताने ब्रिटन, ओमान, न्यूझीलंड आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या चार सदस्य देशांसोबत व्यापार करार केले आहेत. आता इयूसोबत व्यापार करार झाला आहे. असे दिसते की 2026 हे द्विपक्षीय व्यापार करारांचे वर्ष असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) ट्रम्प यांच्या टेरिफ युद्धामुळे भारताला त्याच्या आत्मनिर्भरतेमधून बाहेर पडून व्यापार करारांद्वारे नवीन बाजारपेठांचा शोध घेण्यास भाग पाडले आहे. असे दिसते की 2026 हे द्विपक्षीय व्यापार करारांचे वर्ष असेल.
पेनी गोल्डबर्ग यांचा कॉलम:एआयचे फायदे घेण्यासाठी शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करावे
गेल्या दोन वर्षांत लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (एलएलएम)वाढीमुळे अशी भीती निर्माण झाली की एआय लवकरचमहाविद्यालयीन शिक्षण, विशेषतः उदारमतवादी कलाअभ्यास यांना अप्रासंगिक बनवेल. अशा परिस्थितीततरुणांनी कॉलेज सोडून थेट कामावर जाणे चांगले होईल.मी पूर्णपणे असहमत आहे. व्यावहारिक अनुभवातूनशिकणे मौल्यवान आहे. परंतु भविष्यात कोणत्या नोकऱ्याआणि कौशल्यांची मागणी असेल याची लोकांना चांगलीसमज असेल तरच ते कार्य करते. हे खरे आहे कीरोजगाराचे भविष्य अनिश्चित आहे. परंतु तरुणांना शक्यतितक्या लवकर कॉलेज सोडून कामगार बाजारात प्रवेशकरण्याचा सल्ला देणे दिशाभूल करणारे आहे. आधुनिक एआयचे प्रणेते मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनीएकदा त्यांच्या क्षेत्रातील विकासाची तुलना धुक्यातूनमार्गक्रमण करण्याशी केली : तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो.पण त्यापलीकडे काय आहे ते दिसत नाही.शिक्षकांसमोरील आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना अशापरिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी तयार करणे.उपाय म्हणजे त्यांना लवकरच कालबाह्य होऊ शकणाऱ्याकामांसाठी प्रशिक्षित करणे नाही. तर त्यांना अधिकअनुकूल बनवणे. या दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका - आणि विशेषतःउच्च शिक्षणाची - पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची बनते.भविष्यात कोणत्या कौशल्यांची मागणी असेल हेआपल्याला माहित नसल्यामुळे मूलभूत गोष्टींकडे परतणेआवश्यक आहे. उदारमतवादी शिक्षण काय करावे यावरनव्हे तर कसे विचार करावे यावर भर देते. ते विद्यार्थ्यांनातर्क करायला, काळजीपूर्वक वाचायला, स्पष्टपणेलिहायला आणि पुराव्यांचे मूल्यांकन करायला शिकवते.ही कौशल्ये इतर तांत्रिक कौशल्यांपेक्षा काळाच्याकसोटीवर खूप चांगल्या प्रकारे उतरतात. याचा अर्थ असानाही की तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. उलटविद्यार्थ्यांनी एआयसोबत काम करायला शिकले पाहिजे.गणित, तर्कशास्त्र आणि तर्क शिकवणे; मूलभूतपाठ्यपुस्तकांमध्ये व्यस्त राहणे; आणि युक्तिवाद कसेतयार केले जातात आणि त्यांची चाचणी कशी केली जातेहे समजून घेणे - हे सर्व आजही आवश्यक आहे. हीअशी कौशल्ये आहेत जी आपल्याला तंत्रज्ञानाच्या पुढेराहण्यास सक्षम करतात. आपण काय शिकावे आणि तेकसे शिकवावे? पहिला प्रश्न कठीण आहे आणिस्वाभाविकपणे वादविवाद निर्माण करेल. मुख्यसंकल्पनांच्या महत्त्वावर व्यापक सहमती असू शकते,परंतु कालांतराने तपशील बदलतील. पूर्वीच्यातंत्रज्ञानाबाबतचा आपला अनुभव विचारात घ्या.कॅल्क्युलेटर आणि संगणकांनी अंकगणित शिकवण्याचीगरज दूर केली नाही. विद्यार्थी अजूनही गणना कशीकरतात हे शिकतात. त्याचप्रमाणे, स्पेलिंग आणिव्याकरण महत्वाचे आहे. एआयला अनेक क्षेत्रांमध्येसमान समायोजनांची आवश्यकता आहे. एलएलएमआता लेखाचा सारांश देणे किंवा त्याची मध्यवर्ती कल्पनाओळखणे अशी कामे करण्यास सक्षम आहेत. असा युक्तिवाद केला जातो की एआय औपचारिकशिक्षणाची आवश्यकता कमी करेल कारण ते मागणीनुसारमाहिती आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते. परंतु हीधारणा या गृहीतकावर आधारित आहे की वापरकर्त्यांनाकाय विचारायचे आहे आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांचाअर्थ कसा लावायचा हे माहित आहे. एआयपासूनसमाजाला फायदा करून द्यायचा असेल तर शिक्षणातकमी नाही तर अधिक गुंतवणूक गरजेची असेल.(@प्रोजेक्ट सिंडिकेट)
मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:बांगलादेशातील निवडणुका आपल्यासाठीही महत्त्वाच्या
बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्यानिवडणुकांमध्ये तीन शक्ती सहभागी होत आहेत.पहिली- मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार. त्यासपाकिस्तानशी संबंधित इस्लामी गटांचा पाठिंबा आहे.दुसरी- बीएनपी. त्याचे नेतृत्व गेल्या महिन्यात निधनझालेल्या खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान करतआहेत. तिसरी- बांगलादेशच्या अस्थिरतेत स्वतःचे हितसाधणाऱ्या परदेशी शक्ती. यामध्ये चीन आणिपाकिस्तान भारतविरोधी घटकांना पाठिंबा देतात. त्यानंतरअमेरिका आहे. ती हसिना सरकारच्या जागी स्वतःलाअनुकूल असलेले सरकार इच्छिते. वर्षानुवर्षे शेखहसिना सरकारने अमेरिकेला बंगालच्या उपसागरातीलसेंट मार्टिन बेटावर प्रवेश करण्यापासून रोखले. म्यानमारपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरअसलेल्या या बेटाचे भू-सामरिक महत्त्व आहे. गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या पलायनानंतर भारतानेयुनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारशी थेट संघर्ष करण्यापेक्षा शांत राजनैतिकतेला प्राधान्य दिले आहे.हसीना यांना आश्रय दिल्याने इस्लामी-नियंत्रित युनूस सरकार नाराज झाले. हसीनांचे १५ वर्षांचे शासन भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सर्वात उत्पादक आणिसौहार्दपूर्ण राहिले आहे. इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांनाजबरदस्तीने हटवणे हा भारतासाठी मोठा धक्का होता.ब्रह्मपुत्र आणि गंगा नद्यांवर नियंत्रण आणि बांगलादेशलावीज पुरवठा यावरुन भारत बांगलादेशवर दबावआणण्याच्या स्थितीत आहे. निवडणुका जवळ येतअसताना हसीना अधिक बोलू लागल्या आहेत. ढाकासोडल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांच्या पहिल्यासार्वजनिक भाषणात त्यांनी युनूस सरकार आणित्यांच्या कट्टर समर्थकांना उलथवून टाकण्याचे आवाहनबांगलादेशींना केले. भारत बीएनपीच्या विजयाची आशाकरत आहे. जनमत सर्वेक्षणात बीएनपीला ७०% पेक्षाजास्त पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले आहे.बीएनपी भूतकाळात भारतविरोधी होती. परंतु रहमानयांच्या नेतृत्वाखाली पक्षाने धर्मनिरपेक्ष, विविधता,आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणारे आणिभारताशी सहकार्य करणारे सरकार चालवण्याचीवचनबद्धता व्यक्त केली. बीएनपीचा मुख्य प्रतिस्पर्धीजमात-ए-इस्लामी आहे. बीएनपी आणि जमातच्याकार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष सुरू झाले आहेत. आतालीगला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलीआहे. बीएनपी मध्यम विचारसरणीकडे वळली आहे तरजमातने तीव्र अतिरेकी विचारसरणीकडे वाटचाल केलीआहे. टी-२० विश्वचषकात भारतात सामने नखेळवण्याच्या सरकारच्या निर्णयात जमातच्या संयोजकनाहिद इस्लाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.परिणामी, बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेशकरण्यात आला. वेगवान गोलंदाज मुस्तफिजूररहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतरबांगलादेशमधील भारतविरोधी भावना शिगेलापोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पर्धेच्या दुसऱ्याफेरीच्या पुढे न जाणाऱ्या संघांना देखील ३,८२,५००डॉलरची बक्षीस रक्कम देखील मिळते. ९ व्या ते १२ व्याक्रमांकावर असलेल्या संघांना २,४७,५०० डॉलरमिळतात. १३ व्या ते २० व्या क्रमांकावर असलेल्यासंघांना २,२५,०० डॉलर मिळतात. प्रत्येक संघालासामना जिंकल्याबद्दल अतिरिक्त ३१,१५४ डॉलरमिळतात. आयसीसी सहभागी संघांना ३ ते ५ लाखडॉलरची फी देखील देते. ती स्थानिक क्रिकेट बोर्डालाजाते. भारताने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीबांगलादेशसोबतचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केलाआहे. परंतु निवडणूक जिंकणारा आणि पंतप्रधानपदस्वीकारणाऱ्याविरुद्ध भारताला कठोर भूमिका घ्यावीलागेल. दावे जास्त आहेत. लाखो निर्वासित बांगलादेशीपश्चिम बंगाल ,आसाममध्ये राहतात. दरम्यानपाकिस्तान बांगलादेशात नवीन भारतविरोधी पूर्वपाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनबांगलादेशात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प तयारकरत आहे. अमेरिकेने बांगलादेशातही हालचालवाढवली आहे. रहमानची बीएनपी खरोखर समावेशक , सुधारणावादीसरकार स्थापन करू शकेल का? शेख हसीना अजूनहीखात्री बाळगू शकलेल्या नाहीत. परंतु भारताला आशाआहे की एक दशकाच्या खंडानंतर बीएनपीच्यारहमानची भूमिका नरमाईची झाली असावी.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताला बीएनपी विजयाची आशा आहे.हा पक्ष भूतकाळात भारतविरोधी होता.परंतु अलीकडेच त्याने धर्मनिरपेक्ष,विविधता, विकासाभिमुख आणिभारत-अनुकूल सरकार चालवण्याचीवचनबद्धता व्यक्त केली आहे.
राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सनसनाटीपेक्षा विश्वासार्हता यास महत्त्व देणारा पत्रकार
टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल फोन आपल्या जीवनावरअधिराज्य गाजवण्याच्या खूप आधी रेडिओचे जग होते.१९७० च्या दशकात भारतात वाढणाऱ्या आपल्यापैकीअनेकांसाठी रेडिओ हे व्यापक जगाचे द्वार होते. आणित्यापैकी बीबीसी रेडिओ सेवा होती. दररोज सकाळीमाझे दिवंगत आजोबा - एक पोलिस अधिकारी - एकतास योग आणि ध्यान केल्यानंतर त्याचे दैनिक बुलेटिनऐकत असत. ते मला म्हणायचे, तुम्हाला बातम्या हव्याअसतील तर बीबीसी ऐका. बातम्यांच्या जगात बुडलेल्याएका जिज्ञासू मुलाप्रमाणे बीबीसी माझा पहिला साथीदारबनला. आणि त्यासोबतच मिस्टर बीबीसी म्हणूनओळखले जाणारे एकमेव मार्क टली (नंतर सर मार्कटली) देखील आमच्या जीवनाचा अविभाज्य भागबनले. मला आठवतंय १९८४ मध्ये बीबीसीने इंदिरा गांधींच्याहत्येची घोषणा केली. तेव्हा मी एका सलुनमध्ये होतो.ऑल इंडिया रेडिओने शोकाकुल संगीत वाजवले. पणमार्क टलीच्या स्पष्ट आणि प्रभावी आवाजाने याभयानक बातमीची पुष्टी झाली. काही वर्षांनंतर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हा मी मुंबईतरिपोर्टर होतो. तरीही आम्ही सर्वात अचूक आणिघटनास्थळी रिपोर्टिंगसाठी बीबीसी आणि टलीकडेवळलो. कारसेवकांच्या जमावाने टलीचा पाठलाग केलाहोता आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतुया भयानक अनुभवाला न जुमानता त्यांनी शक्यतितक्या स्पष्टतेने घटना सादर केल्या. ते विश्वासार्हतेचा आवाज होते. कालांतराने आणि एकाविशाल देशात वर्षानुवर्षे कानाकोपऱ्याचा प्रवास करूनहे गुण विकसित झाले. बीबीसीचे भारतातील ब्युरो चीफम्हणून त्यांनी अनेक दशकांमध्ये घडणाऱ्या ऐतिहासिकआणि विनाशकारी घटना पाहिल्या. मला आठवतंय१९९० च्या दशकाच्या मध्यात माझ्या कॅमेरामनसोबतउत्तर प्रदेशला प्रवास करत होतो. आम्ही लखनौजवळीलएका गावात पोहोचलो. तेथे आंब्याच्या बागेच्यामालकाने आम्हाला चहासाठी त्यांच्या घरी आमंत्रितकेले. त्यांनी आम्हाला काही वर्षांपूर्वी काढलेलाटलीसोबतचा त्यांचा फोटो असलेला एक अल्बमदाखवला. त्यांनी उत्साहाने घोषित केले, हा माझाचाहता क्षण होता. टली साहेब हे त्या काळातील एकसेलिब्रिटी होते. ते स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीआवाज उंच करण्याची गरज नसते. शांत, संयमी आणिअधिकारपूर्ण स्वरात बोलणे पुरेसे असते. त्या महानपत्रकारासोबत माझाही चाहता क्षण होता. १९९४ मध्ये मीदिल्लीला आलो आणि राजधानीतील सत्तेचे कॉरिडॉरसमजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. राजकारण्यांपेक्षा मीमार्क टलीला भेटण्यास उत्सुक होतो. मी अपॉइंटमेंटघेण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांनी लगेच प्रतिसाद दिलाआणि सांगितले की त्यांना मला भेटून आनंद होईल.त्यांना सहकारी पत्रकारांचा सहवास आवडला.त्यांनीत्यांच्या कथा , विस्तृत अनुभव, काळजी होतीत्यांच्याशी शेअर केले. केवळ माहितीसाठी भारतीयपत्रकारांशी संपर्क साधणाऱ्या त्या परदेशी’पत्रकारांसारखे टली मुळीच नव्हते; आयुष्यभर मैत्रीजोपासत असत. कदाचित म्हणूनच त्यांना इंग्लंडपेक्षाभारतात जास्त घरासारखे वाटले. भारताबद्दलचे त्यांचेप्रेम आणि जिव्हाळा खरा होता. तो कल्पनारम्य नव्हता.टलीसाठी भारत हे ऑडिओव्हिज्युअल अनुभवांचा एकचैतन्यशील जग होते. त्याने काही टीव्ही माहितीपटबनवले - भारतीय रेल्वे प्रवासांवर एक संस्मरणीयचित्रपट देखील समाविष्ट होता - परंतु रेडिओ हा त्याचापहिला प्रेम होता. कदाचित माध्यमाचा साधेपणा त्यांनाआवडत होता. एकदा मी त्यांना टीव्ही चर्चेसाठी आमंत्रित केले. खूपसमजावल्यानंतर ते आले. पण त्यांना तो अनुभव विशेषआवडला नाही. ते म्हणाला, हे सर्व खूप गोंगाटाचे नाहीका?’ या अर्थाने ते सौम्य काळातील पत्रकार होते. तेसनसनाटी आणि गोंगाटापेक्षा विश्वासार्हता आणिसत्याला प्राधान्य देत. मला अजूनही इंडिया इंटरनॅशनलसेंटरमध्ये झालेला आमचा शेवटचा संवाद आठवतो. तेहसले आणि म्हणाले मला वाटते की आजच्या भारतातपत्रकार असणे सोपे नाही! मी त्यांच्याकडे पाहिले आणिमान हलवली. कधीकधी चेहऱ्यावरील हावभाव हजारशब्दांपेक्षा जास्त शब्द बोलतात. त्यांच्या पुस्तकाच्याशीर्षकात म्हटल्याप्रमाणे, भारतात कधीही पूर्णविरामनसतो. अलविदा सर मार्क, शुभ यात्रा.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आपल्याशेवटच्या संभाषणात ते म्हणाले, मलावाटते की आजच्या भारतात पत्रकारअसणे सोपे नाही! मी मान हलवली.अनेकदा चेहऱ्यावरील भाव हजारशब्दांपेक्षा जास्त बोलतात.
नवनीत गुर्जर यांचा कॉलम:यूजीसीच्या नवीन नियमांवरून गदारोळ का?
नवीन यूजीसी नियमांवर इतका गदारोळ का? खरे तरनवीन नियमांमुळे जातीआधारित टिप्पण्यांमध्ये समाविष्टअसलेल्या वर्गांची व्याप्ती वाढवली आहे. पूर्वी या कक्षेतकेवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचासमावेश होता. कारवाईतील कठोरताही कमी होती. हेदेखील खरे आहे - दलित वर्गावर वर्षानुवर्षे अन्यायहोत आहे हे कुणीही स्वीकारू शकते आणि त्यांच्यावरझालेल्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी या वर्गाचेउत्थान करणे योग्य ठरले असावे. पण आता ओबीसी(इतर मागासवर्गीय) आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय(ईबीसी) वर्गदेखील या कक्षेत जोडले गेले आहेत. याकक्षेतून फक्त सामान्य किंवा अनारक्षित वर्ग वगळण्यातआला आहे. नवीन नियमांमुळे सामान्य वर्गावर आपोआप आरोपहोतील. दुसऱ्या शब्दांत, त्यांना डिफॉल्ट गुन्हेगार घोषितकेले जाईल, असा विरोध करणाऱ्यांचा युक्तिवाद आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे सामान्य वर्गासाठी कोणताहीदिलासा नसला तरी असे म्हटले जात आहे की राखीववर्गाने खोटी तक्रार दाखल केली तरी शिक्षेची तरतूद नाही.हे निषेधाचे एक प्रमुख कारण आहे.असेही म्हटले जात आहे की सरकार मागासवर्गीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत राहते. मोठ्या प्रमाणात निषेध झाल्यानंतर हे नवीन नियम मागे घेतले जातीलकिंवा योग्य सुधारणा केल्या जातील. परंतु नियम मागे घेतल्यानंतरही त्या वर्गांची सरकारबद्दल सहानुभूती कायम राहील! विरोधी वर्गाचा असा युक्तिवाद आहे की सरकारहे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेही समग्रतेला नकार आणि फक्त तुकडे हेचवास्तविक आहे, असे दाखवण्याचे राजकारण स्वातंत्र्यापूर्वीही होते. आजही सुरू आहे. नेत्यांनी प्रथमलहान गटांना सतत अन्यायाला बळी पडलेल्यांना भडकावले, नंतर त्यांना पोकळ आश्वासनांची अफू दिली आणि शेवटी त्यांना अतिरेकीपणाच्या टप्प्यावर पोहोचूदिले. नंतर या काही गटांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यानाहीत. तेव्हा त्यांनी संपूर्ण शासनव्यवस्थेला आणि शेवटी संपूर्ण देशाला अन्याय्य म्हणण्यास सुरुवात केली होती.म्हणूनच तुकड्यांचे राजकारण उलटे झाले तेव्हा तेच राज्यकर्ते हेच तुकडे घेऊन विखुरलेल्या जातींना एकत्र करताना दिसून आले. हे करताना ही मंडळी आम्हीसमग्रतेला ओळख देणे आणि लहान वर्गांची एकजूटकरत आहोत, असे सांगत होती. कारण असे करणे एकूण सामाजिक विकासासाठी अपरिहार्य आणि अनिवार्यबनले होते. स्वातंत्र्यापूर्व काळात ब्रिटिशांनी असेच केलेहोते. त्यांनी प्रथम समाजातील लहान वर्गांना स्वतंत्रओळख देऊन फोडाफोडी केली. वर्षानुवर्षे ते यायुक्त्यांवर अवलंबून राहून राज्य करण्यात यशस्वी झाले.प्रत्यक्षात राजकारणाला आत्मा नसतो. राजकारणीलोकांकडे मते मागण्यासाठी जाणार नाही त्या दिवशीराजकारणाचा आत्मा जागृत होईल. हा आंतरिकआत्मविश्वास आणि बाह्य शक्तीमधील फरक आहे.भयमुक्त असणे आणि घाबरणे यात हाच फरक आहे.राजकारणाला आत्मा नसतो. त्यामुळे त्यात आंतरिकशक्तीचाही अभाव असतो. ...आणि म्हणूनचकाळाबरोबर प्रत्येक शक्ती स्वतःची जाणीव गमावते.आश्वासनांवर आधारित सिंहासन मिळवण्याची कल्पनातिच्या पायातील बेडी बनते. आपल्या प्राचीन इतिहासातएक नाव आहे : मीरदाद. काही लोक त्यांच्याकडे हा प्रश्नघेऊन गेले. आपण इतके दुःखी का आहोत? मीरदादम्हणाले, याचे उत्तर केवळ आपण श्वास घेत असलेल्याहवेतूनच मिळू शकते. ती हवा आपल्या स्वतःच्याविचारांच्या विषाने भरलेली आहे. हे विष आपलेघर-रस्त्यांवर आणि आपल्या दारांमध्ये कोरले गेले आहे.म्हणूनच आपण आता चेतनेचे किंवा महाचेतनेचेवारसदार नाही. ...आज आपण किंकाळ्या, जखमाआणि रस्त्यावर वाहणाऱ्या रक्ताचे वारसदार आहोत. अखरे तर सत्ता आणि सरकार, आसन आणि सिंहासनाचेलोकांना घाबरवण्याचे जणू कर्तव्य बनले आहे. ते केवळशारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही गुलामकरतात. म्हणूनच... दररोज आपल्या पोटी आनंदाचा सूर्यजन्मतोआणि हाच सूर्य अनाथ होत असतो. नवीन नियमांमुळे सामान्य वर्गआरोपांनी वेढला जाईल? नवीन नियमांमुळे सामान्य वर्ग आरोपांनीवेढला जाईल असे आंदोलकांचे म्हणणेआहे. त्यांना दोषी ठरवले जाईल. असेम्हटले जात आहे की राखीव वर्गाने खोटीतक्रार दाखल केली तरी त्यांच्यासाठीशिक्षेची तरतूद नाही.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मुलांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी ध्यानाशी जोडा
आज पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची खूपकाळजी वाटते. भारतीय तरुणांना जगातील सर्वात जास्तकरिअर-केंद्रित मानले जाते. भविष्याबद्दलची ही गांभीर्य तरुणपिढीमध्ये दिसून येते. पण हे बालपण प्रौढत्वात जाते तेव्हा कायहोईल? असे म्हटले जाते की इच्छेच्या प्रवासावर निघालेल्यालोकांची झोप उडते. इच्छा हा मानवी स्वभाव आहे. नंतर इच्छाउत्कटतेत बदलते. उत्कटतेचे वासनेत रूपांतर होते आणि वासनानंतर अडचणीचे कारण बनते. पूर्वी तरुण लोक लवकर प्रतिक्रियादेत असत. परंतु आता मुलेही तेच करू लागली आहेत. कृतीलाप्रतिक्रियेइतकी ऊर्जा लागत नाही. मानवी मनात एक चुंबक असतो.आपण परिस्थितीबद्दल विचार करतो त्या परिस्थितीला ते आकर्षितकरते. आज मुले विचार करत आहेत त्याची त्या वयात गरज नसते.आणि प्रौढत्वात पोहोचण्यापूर्वी काही गोष्टी त्यांच्या मनात रुजल्यातर त्यांच्या प्रतिक्रिया धोकादायक ठरू शकतात. मुलांचे मानसिकआरोग्य राखण्यासाठी, त्यांना लवकर ध्यानाशी जोडले पाहिजे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:सायबर सुरक्षा आता कचऱ्याच्या समस्येशीही दोन हात करत आहे!
मी त्यांना ‘लिटर वॉरियर्स’ म्हणतो, कारण यातील प्रत्येक जण मॉर्निंग वॉकदरम्यान जाणाऱ्या वाहनांतून फेकलेल्या फास्ट फूड कंटेनरचे १०० तुकडे उचलतो. त्यातील काही गोठलेल्या रस्त्यावरून एक-एक तुकडा काढतात, काही फोटो काढतात आणि एआय पॉवर्ड टूलमध्ये अपलोड करतात. हे टूल लोकेशन, कचऱ्याचा प्रकार आणि ज्या फास्ट फूड आउटलेटमधून ते आले आहे त्याचे नाव नोंदवते. इंग्लंडच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या या प्रयोगादरम्यान लिटर वॉरियर्सना आढळले की, बहुतेक कचरा मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीच्या अशा आउटलेट्समधून आला आहे, जे संरक्षित नॅशनल लँडस्केपपासून अनेक मैल दूर आहेत. कचऱ्याच्या पिशव्या भरताना ते न खाल्लेल्या बिग मॅक, चीज बर्गर, नगेट्स आणि फ्रेंच फ्राइजने भरलेली एक पिशवीही गोळा करतात. हे स्वयंसेवक ‘फास्ट लिटर’ नावाच्या अभियानासह या लढाईच्या आघाडीवर आहेत. हे एक अभियान आहे, ज्याचे नाव लोकांनी ग्रामीण भागात, विशेषतः चालत्या कारमधून खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे पॅकेजिंग फेकण्याच्या प्रवृत्तीवरून ठेवले आहे.ग्लूस्टरशायर विद्यापीठाचे सायबर तज्ज्ञ आणि स्ट्राउड डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या टीमने सामान्यतः दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येला ‘फास्ट लिटर’ नाव दिले आहे. आता ते पहिला डेटा सेट गोळा करत आहेत, जेणेकरून कचऱ्याची समस्या किती व्यापक झाली आहे हे समजेल. यामुळे हा कचरा निर्माण करणारे आणि तो फेकला जाणारे हॉटस्पॉट ओळखले जातील. यामुळे भविष्यात या वॉरियर्सना कारवाई करण्यास आणि टार्गेटेड अँटी-लिटर कँपेन राबवण्यास मदत मिळेल. पुढील महिन्यात येणारे एआय वॉवर्ड ॲप आता नव्याने समोर येणाऱ्या ग्राहक वर्तणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे, जे कारमध्ये बसून खाणे आणि कचरा कुठेही किंवा ग्रामीण भागात फेकण्याशी संबंधित आहे.या वॉरियर्सचे मानणे आहे की, एआयच्या मदतीने कचऱ्याची अशी मोजदाद मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीसारख्या कंपन्यांवर स्वच्छतेचा खर्च उचलण्यासाठी दबाव टाकण्यास मदत करेल. सायबर सुरक्षेचे सीनियर लेक्चरर आणि या प्रोजेक्टचे प्रमुख अन्वेषक रिचर्ड कुक यांनी गेल्या वर्षाच्या ताळेबंदाचा हवाला देत सांगितले की, फास्ट फूड हा सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय आहे आणि ब्रिटनमध्ये मॅकडोनाल्ड्सचा ऑपरेटिंग प्रॉफिट ११ दशलक्ष पौंडांवरून ७६ दशलक्ष पौंडांपर्यंत वाढला होता. एआयच्या मदतीने त्यांनी अशी बारीक माहितीही शोधली आहे, जी सहसा दुर्लक्षित केली जाते. उदाहरणार्थ, या रेस्टॉरंटच्या इन-स्टोअर डायनिंग सुविधेच्या तुलनेत त्यांच्या ड्राइव्ह-थ्रू आउटलेट्समुळे रस्त्यांवर कचरा कसा वाढत जातो. एकूण २,६८० ड्राइव्ह-थ्रू पैकी १,०८० एकट्या मॅकडोनाल्ड्सचे आहेत आणि कोस्टा कॉफी तसेच स्टारबक्सही हळूहळू वाढत आहेत. एआयमुळे उघड झाले आहे की, हा कचरा माती आणि संपूर्ण इकोसिस्टिममध्ये कसा मिसळत आहे. डेटा सेट वाढण्यासोबतच एआय टूल केवळ लिटर हॉटस्पॉट्सचा अंदाजच लावणार नाही, तर काही विशिष्ट भागात परवानगी देण्यापूर्वी नागरी संस्थांनाही विचार करण्यास मदत करेल. कुक यांच्या मते, जिथे कचऱ्याचा प्रश्न आहे, तिथे कुणीही याबद्दल अनेक लढाया लढू शकतो. त्यांना आशा आहे की, त्यांचा हा प्रोजेक्ट अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध नक्कीच यशस्वी होईल, ज्या स्वतः नफा कमवतात आणि स्वच्छतेची जबाबदारी नागरी संस्थांवर ढकलतात. हे लिटर वॉरियर्स मानतात की, फूड-ऑन-द-गो व्यवसायासाठी एक ‘व्हॉलंटरी कोड ऑफ प्रॅक्टिस’ लागू केली पाहिजे, ज्यामध्ये आउटलेट्सवर अँटी-लिटर साइनेज, परिसराच्या आसपास दररोज कचरा उचलण्याची सक्ती, जनजागृती आणि कठोर कारवाईच्या तरतुदी असल्या पाहिजेत. खरे तर, मी स्वतःही एक प्रोजेक्ट केला होता की मॅकडोनाल्ड्सने केवळ अमेरिकेतच नाही, तर मुंबईत १९९९-२००० मध्ये त्यांचे आउटलेट उघडल्यानंतर आसपासची सफाई कशी केली होती. जेव्हा मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री कव्हर करत होतो, तेव्हा ते सर्वात जबाबदार फास्ट फूड आउटलेट्सपैकी एक होते.
एन. रघुरामन यांचा कॉलम:यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक - हे सर्व एका टेलरकडून शिका!
वसंत पंचमीच्या दिवशी, जेव्हा मी माझ्या टेलरकडे जायला निघालो होतो तेव्हा माझी पत्नी नाराज झाली. ती म्हणाली, “मला समजत नाही की तुम्ही एकाच शर्टचे माप देण्यासाठी वारंवार टेलरकडे का जाता? किमान काही जोड कपडे तरी शिवून घेत जा, म्हणजे चकरा वाचतील.’ माझ्याकडे यावर कोणतेही ठोस उत्तर नव्हते. मात्र, गाडी चालवताना मी विचार करत होतो की, मला टेलरकडे जाणे इतके का आवडते? जेव्हा मी दुकानात पोहोचलो तेव्हा मालकाने माझे स्वागत केले आणि कुटुंबाची चौकशी केली. त्यांना उत्तर दिल्यानंतर मी पांढरा कपडा शर्ट शिवण्यासाठी दिला. मालक जेव्हा टेप काढत होते तेव्हा त्यांच्या सहायकाने तत्परतेने विचारले, “साहेबांचे माप गेल्या महिन्यातच घेतले होते, पुन्हा माप घ्यायचे का?’ मालकाने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर सहायकाकडे बिल-बुक आणि पेन घेऊन सूचना लिहिण्याशिवाय पर्याय उरला नाही. मला वाटले की, आता घरी गेल्यावर पत्नीला देण्यासाठी माझ्याकडे एक योग्य उत्तर आहे. परंतु, मी घरी जाऊन पत्नीला काय सांगितले हे सांगण्यापूर्वी हे सांगणे आवश्यक आहे की, टेलरकडे जाण्यापूर्वी हैदराबादच्या प्रभा एकंबरम यांनी ट्रेनर आणि मेंटरच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर (ज्याचा मी देखील भाग आहे) एक गोष्ट शेअर केली होती. त्यांनी या शुभ दिवशी महाराष्ट्रातील एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल वैद्यकीय विद्यार्थ्याला गोल्ड हार्ट फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला उत्तम प्लेसमेंट मिळवून देण्यात मदत केली. ज्ञान आणि स्वप्नांचे वास्तविक परिणामात रूपांतर करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. परतताना प्रभा यांच्याशी बोलत होतो की, त्या ही कामे कशी करतात. त्यांनी मला अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले की, त्या नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवे अतिशय बारकाईने जोडतात. एक मेंटर म्हणून त्या त्यांना करिअरसाठी तयारही करतात. त्या संभाषणाने मला एका बातमीची आठवण करून दिली. ज्यात म्हटले होते की, अमेरिकेसारख्या प्रगत देशातही बिझनेस स्कूल आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्या बातमीनुसार, २०२५-२०२६ दरम्यान हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधील प्लेसमेंटचे प्रमाण कोविडपूर्व स्तरापेक्षा कमीच आहे. या संस्थांनी संभाव्य नियोक्त्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार करिअर-रेडीनेसवर भर देणारा नवीन अभ्यासक्रम सुरू करूनही ही स्थिती आहे. यामुळे माझे मन प्रभा यांच्यासारख्या व्यक्तींचे प्रयत्न आणि ज्या संस्था आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी झगडत आहेत, यांच्यातील तुलनेकडे वळले आणि तेव्हाच मला त्या टेलरच्या कामाचा खरा अर्थ समजला. प्रत्येक लीडर, पालक, शिक्षक, कोच आणि मेंटरला पुढची पिढी यशस्वी होताना पाहायची असते. पण यश हे यावर अवलंबून असते की, ते या पिढीकडे त्या टेलरच्या दृष्टिकोनातून कसे पाहतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या टेलरला भेटता तेव्हा तो तुम्हाला नवीन नजरेने पाहतो आणि म्हणूनच तो प्रत्येक वेळी तुमचे नवीन माप घेतो. माप घेताना तो बाजारात येत असलेल्या नवीन फॅशनबद्दलही सविस्तर बोलतो. तो तुमच्या सहमतीची वाट पाहत नाही, तर फक्त सांगत जातो की बाजारात किंवा या हिवाळ्यासाठी काय नवीन ट्रेंड सुरू आहे. आता आपल्या सभोवतालचे जग पाहा. जग आपल्याला अनेकदा जुन्या नजरेने किंवा जुन्या चष्म्यातूनच पाहते. ते आपल्याला नवीन दृष्टिकोनातून पाहत नाही. एखाद्या क्रिकेटपटूने एका मॅचमध्ये शतक झळकावले तर जग त्याच्याकडून प्रत्येक मॅचमध्ये शतकाची अपेक्षा करू लागते. आणि जर आपल्यापैकी कोणी एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरले असेल तर दुर्दैवाने आयुष्यभर त्याच अपयशाच्या आधारावर आपले मूल्यमापन होत राहते. फंडा यह है कि आपण प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिस्थितीकडे प्रत्येक भेटीत नवीन नजरेने पाहण्यासाठी टेलरचा दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. कारण जेव्हा आपण त्यांच्याकडे नवीन नजरेने पाहतो तेव्हा एक नवीन गुण किंवा चांगली गोष्ट दिसून येते. पूर्वग्रह हा संयमाचा शत्रू आहे.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धर्माला योगाशी जोडावे लागेल,या युगात ते अत्यंत गरजेचे
एक खूप गहन बाब आहे की, पूजेच्या बाबतीत अत्युच्च समर्पण भावसमजू शकतो. परंतु कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्या गोष्टीचावेडेपणा निश्चितच चुकीचा होय.आपल्या संतांनी हीच बाब उत्तमरीत्यासमजून घेतली होती. भक्तिकाळात एक मोठे काम झाले. त्या काळीप्रचलित धर्म अनेक कारणांमुळे निष्प्राण होत होता. भरकटत होता. यासंतांनी त्यात प्राण फुंकले. सध्या शिक्षण तंत्रज्ञानाला कलेचाही थोडाआधार घ्यायला हवा, अन्यथा ते पूर्णपणे कोरडे होईल. धर्माच्याबाबतीतही हेच घडत आहे. काही लोक धर्माला राजकारणाच्याआश्रयाला घेऊन जात आहेत, तर काही निव्वळ कर्मकांडांकडे. खरंतर धर्माला योगाशी जोडावे लागेल. यंत्रयुगात हे अत्यंत गरजेचे आहे.विशाल धार्मिक परंपरा अशा ठिकाणी उभी राहिली आहे. जिथे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष असे मार्ग आहेत. ध्येय निश्चित केल्यानंतरचमार्गावरून चालावे.
मनोज जोशी यांचा कॉलम:एका ‘इस्लामिक नाटो''चाआपल्यासाठी अर्थ काय ?
आजकाल ‘इस्लामिक नाटो'' बद्दल बरीच चर्चा आहे.परंतु मध्य पूर्वेतील इस्लामिक युतीची कल्पना नवीननाही. १९५५ मध्ये सोव्हिएत युनियनचा सामनाकरण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालीबगदाद कराराची स्थापना झाली होती. त्यात इराक, तुर्की,पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश होता. त्याचवर्षीत्याचे केंद्रीय करार संघटनेत (सेंटो) रूपांतर झाले. हीव्यवस्था १९७९ मध्ये विघटित झाली. २०१५ मध्ये सौदीअरेबियाने इसिसविरुद्ध युद्ध पुढे नेण्यासाठी इस्लामिकमिलिटरी दहशतवाद प्रतिबंधक आघाडीची स्थापनाकेली होती. २०१७ मध्ये पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुखराहील शरीफ यांना त्यांचे पहिले लष्करी कमांडर म्हणूननियुक्त करण्यात आले होते. आता पाकिस्तान-सौदीसामरिक परस्पर संरक्षण करार अस्तित्वात आला आहे. त्यात नाटोप्रमाणेच संघटेतील कोणत्याही देशावर हल्ला करणे हा संपूर्ण संघटनेवर हल्ला मानला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल अशी तरतूद आहे. तुर्कीदेखील या गटात सामील होण्याचा विचार करत आहे.सध्या अशा //इस्लामिक नाटो’ सारखी कोणतीही औपचारिक संघटना अस्तित्वात नसली तरी त्याचीशक्यता गंभीर भू-राजकीय परिणाम करू शकते. सौदी-पाक करार इराणसोबत अमेरिका-इस्रायल युद्ध, इस्रायलने कतारवर बॉम्बहल्ला, येमेनवरील सौदी-युएईतणाव आणि भारताचे ऑपरेशन सिंदूर यासारख्याघटनांच्या पार्श्वभूमीवर आला आहे. या घटनांनंतर मध्यपूर्वेतील इस्रायलच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवरसौदी अरेबियाला एक विश्वासार्ह युतीची गरजअसल्याचे जाणवले. पाकिस्तानबद्दल सांगायचे तर सौदीअरेबिया त्याच्या डळमळीत अर्थव्यवस्थेला आर्थिकजीवनरेखा प्रदान करू शकते. १९६७ च्या सुरक्षाकरारानंतर - आणि पुन्हा एकदा काबातील अतिरेकीघुसखोरी आणि १९७९ मध्ये इराणी क्रांतीच्यापार्श्वभूमीवर - पाकिस्तानी सैन्याने सौदी अरेबियालासुरक्षा प्रदान केली हे आठवते. पाकिस्तानची अण्वस्त्रक्षमता देखील या गटासाठी एक मोठी वाढ आहे.इस्लामाबादने काश्मीरवर आंतरराष्ट्रीय पाठिंबा मागितलाआहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या इस्लामिक संदर्भात हावाद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शक्तिशालीइस्लामिक सुरक्षा गटातील सदस्यत्वामुळे पाकिस्तानचाराजनैतिक प्रभाव वाढू शकतो. इतर सदस्य देश काश्मीरमुद्द्याचे लष्करीकरण करण्यास नाखूष असले तरीही. याव्यवस्थेत तुर्कीयेचा रस मध्य पूर्वेतील घडामोडींशीजोडलेला आहे. तो एकेकाळी उस्मानी साम्राज्याचा भागहोता. नाटो सदस्य असूनही तुर्कीयेला अमेरिकेवरीलअवलंबित्व कमी करायचे आहे. खरंच त्याच्या मजबूतलष्करी क्षमतेमुळे तो स्वतःला इस्लामिक जगाचा नेताम्हणून पाहतो. शिवाय त्याच्याकडे एक मजबूत संरक्षणउद्योग आणि युद्धभूमीचा मोठा अनुभव आहे. ही नवीदिल्लीसाठी एक सामरिक चिंता असू शकते. पश्चिमआशिया, आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिणआशियामध्ये पसरलेला असा वैचारिकदृष्ट्या आधारितलष्करी गट प्रादेशिक संतुलनाची पुनर्परिभाषा करेल.त्याकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही. मध्य पूर्वेतील याघडामोडींचा एक तात्काळ परिणाम म्हणजे युएई आणिभारत यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध समोर आला आहे.अलिकडेच युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेदयांनी भारताचा अधिकृत दौरा केला. मध्य पूर्वेतीलवाढत्या तणावादरम्यान झालेल्या या भेटीने बरेच लक्षवेधले. अधिकाऱ्यांच्या मते दोन्ही नेत्यांनी भारत-युएईव्यापक धोरणात्मक भागीदारी आणि आर्थिक संबंध पुढेनेण्यावर चर्चा केली.सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजेधोरणात्मक संरक्षण भागीदारीवर करार करण्याच्याइराद्याची घोषणा. सौदीच्या नेतृत्वाखालील तथाकथित//इस्लामिक नाटो’ ला युएईचा प्रतिसाद असल्याचे दिसूनयेते. भारताचे परराष्ट्र धोरण पारंपारिकपणे बहुध्रुवीय जगातभरभराटीला आले आहे. त्यांनी व्यावहारिकराजनैतिकतेद्वारे मुस्लिम बहुसंख्य देशांशी आपले संबंधव्यवस्थापित केले आहेत. इस्लामिक नाटो’ याव्यावहारिकतेची जागा ओळख-आधारित आघाडी घेऊशकते. यामुळे भारताची कूटनीतिच्या पातळीवरीललवचिकता कमी होईल. विशेषतः पश्चिम आशियामध्ये.येथे नवी दिल्लीने सौदी अरेबिया, इराण, इस्रायल आणिआखाती देशांशी असलेले आपल्या संबंधात मोठेसंतुलन आणले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे .) ‘इस्लामिक नाटो''चा कणा बनू शकतातअशाच प्रदेशांमधून भारताच्या आर्थिकजीवनरेषा जातात. पर्शियन आखात,लाल समुद्र आणि हिंदी महासागर. परंतुमुस्लिम बहुल देशांचेही धोरणात्मकहितसंबंधांमध्ये खोलवर मतभेद आहेत.
कंवर रेखी यांचा कॉलम:तरुणांनी डॉक्टर, इंजिनिअर होण्यापलीकडे विचार करावा
माझे वडील सैन्यात होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धातभाग घेतला होता. फाळणीनंतर माझे वडील ‘दारजी''सध्याच्या पाकिस्तानातील रावळपिंडीतील त्यांच्यासुखो गावातून कानपूरला विविध पोस्टिंगमधून गेले.तेथेतच मी माझे बालपण घालवले. सैन्यात असल्याने‘दारजी'' सैन्याला यशाचे मानक मानत होते. पण मीशारीरिकदृष्ट्या कमकुवत होतो. खांदे वाकलेले,लाजाळू आणि बोलण्यात कमजोरी असलेले मूल होते.त्यांच्या डोळ्यात मी निराश होता. लहानपणी त्यांच्या नकाराने मला धक्का बसला होता.पण नंतर मी सकारात्मक बाजू पाहिली आणि त्यांचेदुर्लक्ष माझ्यासाठी चांगले आहे असे मला वाटूलागले. माझ्या दोन भावांप्रमाणे मला सैन्यात भरतीहोण्यासाठी दबाव आणला गेला नाही. त्यांच्यादुर्लक्षामुळे मला माझा मार्ग स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. माझ्या आईचा माझ्यावर आणिगणिताबद्दलच्या माझ्या आवडीवर निश्चितच विश्वास होता. माझे वडील पोस्टिंगवर असताना ती माझ्यावर घराचे बजेट सोपवत असे. वयाच्या १३ व्या वर्षी मी हिंदी-माध्यम शाळेत शिकलो आणि गणित आणि विज्ञानात प्रवीण झालो. माझ्या उत्सुकतेमुळे माझा आत्मविश्वास वाढला. चांगली गोष्ट अशी होती की त्यावेळी देशात ज्ञान अर्थव्यवस्था वाढत होती.आमच्या घराजवळ एक ग्रंथालय होते. तेथे मलाइतिहासाच्या पुस्तकांपासून ते अमेरिकन मासिकांपर्यंतसर्व काही वाचण्यासाठी जागा मिळाली. लाईफमासिकाचे नवीन अंक वाचल्याने मला माझ्यापरिस्थितीच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या एका नवीनजगात घेऊन जायचे - आलिशान कार, विमाने,आलिशान घरे आणि उत्साही अंतराळवीरांचे कारनामे.हे फोटो उद्यासाठी आशेच्या नवीन खिडक्या होत्या.जिथे मी माझे स्वप्न पाहू शकलो. शाळेनंतर माझीआयआयटी मुंबईसाठी निवड झाली. पण माझ्यावडिलांना वाटले की मी आणखी एक मूर्खपणाची चूककरत आहे. मग त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांनासांगितले की आयआयटीसाठी निवड होणे किती मोठीगोष्ट आहे. त्या दिवशी ते पहिल्यांदा घरी आल्यावरत्यांनी माझे कौतुक केले. मला खात्री पटली की सर्व नकारात्मक आव्हाने, सतत नकार आणि अशाअंधारात एक जादुई, उज्ज्वल स्वप्न लपलेले आहे. ते तुम्हाला स्वतःला शोधायचे आहे. आयआयटीमध्ये मी शिकलो ते आजही खरे आहे : प्रश्न विचारा. तुमचीमूलतत्त्वे मजबूत करा आणि उपाय शोधा. मूलभूततत्त्वांवर सतत प्रश्न विचारल्यामुळे मला फंडा सिंग हेटोपणनाव मिळाले होते. भारतीय मध्यमवर्गाचीविचारसरणी अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक घरात एकचआवाज घुमतो : डॉक्टर बना. अभियंता बना. पणकोणताही पालक कधीही म्हणत नाही, बेटा, उद्योजकबन.’ त्यानंतरचा सल्ला असा आहे की : चांगलीनोकरी मिळवा, लग्न करा आणि जबाबदार बना.म्हणजेच एका नियमाला चिकटून राहणे ही शिस्तमानली जाते. शिस्त म्हणजे समाज तुमच्याकडूनअपेक्षित आहे ते करणे. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीकरणे आणि तुमच्या कुटुंबाने निवडलेल्या महिलेशीलग्न करणे हे शहाणपण मानले जाते. हा सल्ला तुम्हालातुमच्या मनाचे ऐकण्यापासून रोखतो. उद्योजक बनणेम्हणजे या सर्व अपेक्षांना झुगारणे. हा मार्ग कठीण, एकाकीआहे आणि सहानुभूतीची अपेक्षा करू नका. लोकतुम्हाला वेडे म्हणतील आणि हसतील. उद्योजकालास्वतःला सिद्ध करावे लागते. तुम्हाला उद्योजक बनायचेअसेल तर तो समाजाच्या सांगण्यापेक्षा वेगळा मार्ग आहे.ते कठीण आहे. परंतु तुम्ही स्वतःचा आवाज ऐकता.तेव्हाच खरे समाधान मिळेल. शिस्त म्हणजे फक्तइतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे नव्हे तर तुमची स्वप्ने जगणे.कल्पना अशी असावी की प्रत्येकाला प्रश्न पडेल, हे मलाका सुचले नसेल? आयुष्याने मला एक गोष्ट शिकवलीआहे : दुसरे कोणीही करत नाही. ते मी केले पाहिजे. तेमाझ्या स्वतःच्या अटींवर, माझ्या पद्धतीने केले पाहिजे.आज भारतात पायाभूत सुविधा आणि आत्मविश्वासाच्याजलद विकासासह, तरुणांसाठी भरपूर संधी आहेत. मलाविश्वास आहे की उलट ब्रेन ड्रेनचा ट्रेंड भविष्यात वाढतचराहील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) ‘ हे माझ्या मनात का आले नाही?''असाविचार सुचला पाहिजे. जेणेकरून तो सर्वांना विचार करायला लावतो.आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे: दुसरे कोणीही करत नाही. ते मी केलेपाहिजे. तेही माझ्या अटींवर आणि माझ्यापद्धतीने केले पाहिजे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:‘एकदा विचारले असते तर बरे झाले असते’, असा पश्चात्ताप व्हायला नको
कॅन्सरग्रस्त एका तरुणाने घर आणि रुग्णालयात अनेक महिने घालवल्यानंतर एके दिवशी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो एका म्युझिक स्टोअरवर सीडी खरेदीसाठी थांबला आणि तेथील सेल्सगर्ल त्याला आवडली. त्याला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम जडले. तो काउंटरपर्यंत गेला तेव्हा सेल्सगर्लने हसून विचारले - ‘मी आपली काही मदत करू शकते का?’ बऱ्याच काळापासून गंभीर चेहरे पाहणाऱ्या त्या तरुणासाठी हे आतापर्यंतचे सर्वात सुंदर हास्य होते. तो म्हणाला - ‘अं... मला एक सीडी घ्यायची आहे.’ त्याला जी पहिली सीडी दिसली, ती त्याने उचलली आणि पैसे दिले. मुलगी हसून म्हणाली, ‘मी हे गिफ्ट रॅप करून देऊ का?’ मुलाने होकार दिला आणि ती ते रॅप करण्यासाठी मागच्या खोलीत गेली. मुलगा ती रॅप केलेली सीडी घेऊन घरी गेला. तेव्हापासून पुढील काही दिवस तो नियमितपणे त्याच म्युझिक स्टोअरवर जात असे आणि दररोज एक सीडी खरेदी करत असे. दररोज ती मुलगी त्या सीडी गिफ्ट रॅप करून देत असे आणि मुलगा त्या सीडी न उघडताच आपल्या कपाटात ठेवत असे. मुलगा अत्यंत लाजाळू होता. त्याने खूप प्रयत्न केले, पण मुलीला बाहेर फिरायला जाण्याबद्दल विचारण्याची हिंमत तो एकवटू शकला नाही. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला धीर दिला. दुसऱ्या दिवशी तो पक्का निश्चय करून स्टोअरवर पोहोचला. नेहमीप्रमाणे एक सीडी खरेदी केली आणि जेव्हा ती मुलगी दुसऱ्या ग्राहकाला अटेंड करत होती, तेव्हा तो आपला फोन नंबर तिथे सोडून निघून गेला. पुढील दोन दिवस तो स्टोअरवर गेला नाही, म्हणून मुलीने त्याला फोन केला. आईने फोन उचलला आणि विचार करू लागली की हे कोण असू शकते. ही तीच म्युझिक स्टोअरवाली मुलगी होती. तिने मुलाशी बोलणे करून देण्यास सांगितले तेव्हा आईला रडू कोसळले. मुलीने विचारले, काय झाले? आई म्हणाली, ‘तुला माहीत नाही? तो तर कालच वारला.’ फोनवर दीर्घ शांतता पसरली. त्याच दुपारी आईने त्याचे कपाट उघडले आणि तेथे गिफ्ट-पेपरमध्ये गुंडाळलेल्या खूप साऱ्या सीडी पाहून त्या थक्क झाल्या. तिथे खूप साऱ्या सीडी असल्याने आईला उत्सुकता वाटली व त्यांनी नुकतीच आणलेली एक सीडी उघडली. पाकीट फाडताच त्यांना एक चिट्ठी दिसली, ज्यावर लिहिले होते - ‘हाय, तू खूप क्यूट आहेस. मला तुला भेटायला आवडेल. कधीतरी बाहेर जाऊया? - सोफी.’ हे पाहून आईला अनावर रडू फुटले. गुरुवारी रात्री एक मोठी चूक केल्यानंतर मला ही गोष्ट आठवली. मी मुंबईला जाणाऱ्या ट्रेनऐवजी पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढलो होतो. दोन्ही गाड्या अमरावतीहूनच सुटतात. मी काही विचार करणार, त्याआधीच मी पाहिले की आणखी दोन लोकांनीही हीच चूक केली होती. आता ते कधी रेल्वे अनाउन्समेंट सिस्टिमला दोष देत होते, तर कधी साखळी ओढण्याची धमकी देत होते. जेव्हा ते टीसीसोबत भांडत होते, तेव्हा मुंबईला जाणारी ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरून आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली, कारण ती पुण्याच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगवान होती. मी हेड टीसीबद्दल माहिती घेण्यासाठी बेडरोल सुपरवायझरची मदत घेण्याचे ठरवले व माझ्या चुकीबद्दल त्यांची माफी मागितली. हेड टीसीसाठी मी त्या प्रवाशांपेक्षा चांगला होतो, जे कडवट आणि मोठ्या आवाजात तक्रार करत होते. त्यांनी तत्काळ मागून येणाऱ्या ट्रेनच्या प्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची व्यवस्था केली. आम्ही सर्व मनमाड स्टेशनवर उतरलो, पण सीट फक्त मला एकालाच मिळू शकली. ते दोघे पुन्हा तक्रार करू लागले की मला सीट का मिळाली व त्यांना का नाही. तेव्हा टीसी म्हणाले, ‘तुम्ही आधी विचारले असते तर मी तुम्हाला दिली असती...’ फंडा हा आहे की, आयुष्यात कोणतीही विचित्र परिस्थिती उद्भवली तर, ‘एकदा विचारले असते तर बरे झाले असते’, असा पश्चात्ताप करण्यापेक्षा तत्काळ विचारणे कधीही श्रेयस्कर.
एन. रघुरामन यांचा कॉलम:कामाचे ठिकाण बदलणार, मग स्वतःलाही बदला
“दिमाग का दही हो गया’ अशा शब्दांत एका मिडल लेव्हल व्यवस्थापकाने स्वतःशीच कुरकुर केली. कारण तेथे बोलण्यासाठी कुणीही नव्हते. मोठ्या दुकानाच्या मजल्यावर तो एकटाच होता. पण अचानक मागून आवाज आला, “हे दही काय आहे?’ त्याला माहीत होते की ते कोण आहे. त्याने मागे वळूनही पाहिले नाही आणि शांतपणे म्हणाला, “तू ते कुठे खातोस? तुला माहीत नाही.’ पण आवाज कायम राहिला, “म्हणूनच मी विचारत आहे.’ त्यावर त्याचा राग अनावर झाला आणि तो म्हणाला, “गप्प बस. तू काहीही बोलत राहा. आता माझे मन बिघडू देऊ नकोस.’ आता आवाज थोडा कठोर झाला आणि म्हणाला, “अबे...’ व्यवस्थापकाने मध्येच अडवले, “कोणतेही वाईट शब्द बोलू नकोस’. आवाज थोडा मंद झाला आणि म्हणाला, “मी तुझ्याकडूनच सर्व शिव्या शिकलो.’ चौकशी झाली तर मी तुम्हाला उघड करेन.’ व्यवस्थापक निघून गेला आणि ओरडला, ‘अरे देवा, मला कुणासोबत काम करावे लागत आहे ?’२०३५ किंवा २०४० च्या दुकानात आपले स्वागत आहे. एकही मध्यमस्तरीय व्यवस्थापक किंवा एकही कर्मचारी नसेल. सर्वत्र रोबोट असतील. सर्वत्र रोबोटच प्रॉडक्शन बेल्टवर काम करतील. मग, तुम्ही रोबोटला हे घे. माझ्या आईने बनवलेले... असे म्हणू शकणार नाही आणि तो तुमच्या अनुत्पादक वेळेकडे डोळेझाक करेल. तुम्ही शौचालयात जाणे, सिगारेट ओढणे किंवा ‘दही’ सारख्या निरुपयोगी गोष्टी करण्यात किती वेळ वाया घालवला आणि शिफ्टच्या शेवटी तुमचे योगदान काय होते हे ते अचूकपणे नोंदवेल. तुम्हाला एक तर इशारा देणारे पत्र मिळेल किंवा रोबोट्सशी संवाद साधण्याच्या कोर्ससाठी वर्गात पाठवले जाईल. हो, कंपन्या आता विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला वर्गखोल्यात पाठवतील. एआय कामाच्या ठिकाणी धोका बनत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर येथे एक अलीकडील उदाहरण आहे. अमेरिकेतील एका कुटुंबाने एआय चॅटबॉटचा वापर करून हॉस्पिटलच्या मोठ्या बिलाला आव्हान दिले. त्यामुळे ते जवळपास १.६ कोटी रुपयांवरून सुमारे २७ लाख रुपये झाले. हे कसे झाले याचे आश्चर्य वाटते? कुटुंबातील एका सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला फक्त चार तासांच्या उपचारांसाठी १.९५ लाख डॉलरचे बिल देण्यात आले. परंतु ते विम्याने भरलेले नव्हते. एका कुटुंबाने अँथ्रोपिकच्या एआय चॅटबॉट, क्लाऊडच्या मदतीने आयटमाइज्ड बिलाचे विश्लेषण केले आणि एआयला डुप्लिकेट बिलिंगसारख्या मोठ्या चुका आढळल्या. रुग्णालयाने मास्टर प्रक्रियेसाठी शुल्क आकारले आणि नंतर त्याच्या प्रत्येक उपप्रक्रियेचे स्वतंत्रपणे बिल केले. त्याला अनबंडलिंग म्हणतात. एआय तिथेच थांबले नाही. या चुकांचा उल्लेख करून एक शक्तिशाली कायदेशीर वाद पत्रदेखील तयार केले. यामुळे रुग्णालयाला त्याचे बिल ८०% पेक्षा जास्त कमी करावे लागले. एआयदेखील शिकारी किंमत ओळखण्यास सुरुवात करत आहे. २०२० पासून तुमच्या कामाच्या क्षेत्राबद्दल विचार करा. गेल्या पाच वर्षांत कामाच्या जगात प्रचंड बदल झाले आहेत. साथीच्या रोगाने दूरस्थ आणि हायब्रिड कामाच्या युगाची सुरुवात केली. मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आणि कामाच्या जीवनातील कमी होत जाणारे अंतर एकेकाळी कार्यालयात निषिद्ध मानले जात असे. आता नियोक्त्यांसाठी प्राधान्य बनले आहे. लोक निवृत्तीचे वय ६० पेक्षा जास्त करून काम करत आहेत. याचा अर्थ असा की आज कामाच्या ठिकाणी पाच पिढ्या एकत्र राहतात. प्रत्येकी वेगवेगळ्या कामाच्या आणि व्यवस्थापनाच्या शैली आहेत. पुढील दोन दशके आणखी बदल घडवून आणतील. हे बदल मुख्यत्वे एआय द्वारे चालवले जातील. काही वर्षांत मध्यमस्तरीय व्यवस्थापक इतिहास बनतील. एआय कामे हाती घेते. तेव्हा फार कमी लोक महत्त्वाचे आणि सर्जनशील निर्णय घेण्यास सक्षम महासत्ता बनू शकतील. परंतु त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पुरेसे पात्र असले पाहिजे. फंडा असा की : भविष्यातील लीडर्स मानव आणि बुद्धिमत्ता प्रणालींमधील समन्वय व्यवस्थापित करतील. परंतु भावनिक बुद्धिमत्ता असलेलेच वेगळे मानले जातील. त्यास सहानुभूती आणि तांत्रिक समजुतीची जोड हवी. असेच लोक भविष्यातील कार्यस्थळाची दिशा ठरवतील.

26 C