पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गाय आपल्या ग्रामीण आणि शहरी जीवनातील भक्कम दुवा
जुने लोक म्हणायचे की, आपले काम हीच विश्वासाची व सत्याचीपावती असावी. याचा अर्थ असा की, कोणतेही काम पूर्ण सचोटीनेकरा. येत्या २७ एप्रिल रोजी ''गो-सन्मान दिवस'' साजरा केला जाणारआहे. यानिमित्ताने लोक संकल्प पत्रे भरतील आणि गायीच्यारक्षणासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील. गाय आपल्या ग्रामीण आणिशहरी जीवनाला जोडणारा एक अत्यंत सशक्त दुवा आहे. आजग्रामीण भागात जीवन थोडेफार तग धरून असेल, तर त्यामागे गाय हेमुख्य कारण आहे. आपण गायीची सेवा, सुरक्षा आणि सन्मानासाठीसंकल्प केला, तर त्याचा थेट फायदा शहरी जीवनालाही मिळेल.आज शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनाच माहित आहे की जगणे कितीआव्हानात्मक झाले आहे. स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे,नोकरी आणि व्यवसायात प्रचंड ताण आहे, मालमत्तेचे वाद आहेत.गुन्हेगारी कधी आपल्या आयुष्यात शिरकाव करेल याचा नेम नाही.आपण जर गो-मातेचे रक्षण केले, तर शहरी जीवनातील या तणावातूनदिलासा मिळू शकेल.
एन. रघुरामन यांचा कॉलम:जेव्हा तुम्ही ‘अन-रिटायर्ड’ लोकांना भेटता तेव्हा दयाभाव दुप्पट वाढतो
अलीकडेच जेव्हा मी माझ्या इमारतीत लिफ्टची वाट पाहत होतो, तेव्हा मागून वॉचमन आला आणि म्हणाला की, ‘सर, लिफ्ट मेंटेनन्समध्ये आहे, काही काळासाठी वीज कपात आहे. वरच्या मजल्यावर काम सुरू आहे. हे दुरुस्त व्हायला 20 मिनिटे लागतील.’ मी त्याला धन्यवाद देऊन पायऱ्या चढणारच होतो की, लिफ्टच्या प्रतीक्षेत उभे असलेले एक वृद्ध म्हणाले, ‘सर, तुम्हाला अडचण नसेल तर तुम्ही हे सामान या फ्लॅट नंबरवर द्याल का? मला पायऱ्या चढायला त्रास होत आहे. मी फ्लॅट मालकाला फोन केला असता, पण माझा फोन दुकानात राहिला आहे आणि विजेविना इंटरकॉमही काम करत नाहीये.’ त्यांचा नम्र लहेजा, स्पष्ट भाषा आणि इंग्रजी शब्द ऐकून मला वळून त्यांचे लक्षपूर्वक ऐकावे लागले. तेवढ्यात वॉचमन मध्येच म्हणाला, ‘काका, तुम्ही थोडी वाट पहा, दुरुस्ती पूर्ण झाल्यावर मी मदत करेन.’ पण फ्लॅट नंबर पाहून मी पार्सल घेतले, कारण ते माझ्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीचेच होते. शिवाय मला वाटले की ते वृद्ध डिलिव्हरी मॅन खूप कमकुवत आहेत आणि पायऱ्या चढू शकणार नाहीत. तसेही मी संध्याकाळी त्या ओळखीच्या व्यक्तीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी जाणारच होतो. पार्सल घेताना मी त्यांना विचारले की, ‘काय तुम्ही मला ओळखता?’ वृद्धाने मान हलवून माझे नाव आणि फ्लॅट नंबर अचूक सांगितला. वास्तविक, ते माझ्या घरीही किराणा सामान पोहोचवत आले आहेत, कारण त्यांचे स्टोअर आमच्या इमारतीपासून काही अंतरावरच आहे. जेव्हा मी त्यांना विचारले की ते या वयात काम का करता, तेव्हा त्यांचे उत्तर ऐकून मला समाजात वाढणाऱ्या ‘अन-रिटायर्ड’ लोकांबद्दल विचार करावा लागला. जर तुम्ही आजूबाजूला पाहिले तर 70 पार केलेले अनेक लोक काही तासांसाठी गिग जॉब्स करत आहेत. कुणी आर्थिक कारणांमुळे, कुणी घरातील नकारात्मक वातावरणापासून वाचण्यासाठी, कुणी जवळच्या लोकांच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी, तर कुणी जोडीदाराच्या मृत्यूनंतर एकटेपणातून बाहेर येण्यासाठी. काहींसाठी निवृत्तीनंतरचे दिवस इतके मोठे आणि रिकामे झाले आहेत की ते नकोसे वाटतात. 78 वर्षीय हे वृद्ध अनेक दशकांपर्यंत वेडिंग फोटोग्राफर होते, पण हळूहळू हे काम शारीरिकदृष्ट्या कठीण होऊ लागले. म्हणूनच ते पार्सल डिलिव्हरी करू लागले. यासोबतच ते वाढदिवस किंवा हाउसिंग सोसायटींच्या छोट्या कार्यक्रमांच्या फोटोग्राफीसाठी आपले व्हिजिटिंग कार्ड देतात. त्यांनी सांगितले की, ‘माझे इंग्रजी चांगले असल्याने किराणा स्टोअरचे मालक मला ग्राहकांशी बोलू देतात. तिथे मी सांगतो की मी फोटोग्राफर आहे आणि त्यांच्या घरातील छोट्या कार्यक्रमांचे फोटो शूट करू शकतो.’ त्यांनी सांगितले की त्यांच्यासारखे अनेक लोक छोटे कुत्रे फिरवणे, कॉल टॅक्सी चालवणे यांसारखी कामे करतात, जेणेकरून रूट कॅनालसारखे महागडे उपचार घेऊ शकतील. त्यांना ही कामे गिग प्लॅटफॉर्म्सवरून मिळतात. अतिरिक्त कमाई त्यांना अचानक येणाऱ्या खर्चाचा सामना करण्यास मदत करते आणि व्यग्रही ठेवते. जर त्यांच्याप्रमाणे तुमचीही गिग प्लॅटफॉर्म्सवर काम करण्याची इच्छा असेल, कारण यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवू शकता, तर आधी थोडा रिसर्च नक्की करा की कंपनी तुमच्या कमाईचा किती वाटा घेईल. कारण कमाई याच प्लॅटफॉर्म्सच्या नियंत्रणात असते. ड्रायव्हिंग तुमच्या पाठीसाठी आणि पायांसाठी कठीण असू शकते आणि वाढत्या वयात चालताना रेस्ट रूम शोधणे कठीण जाते. हेही लक्षात ठेवा की अशा कामांमध्ये कार्यालयीन संरक्षण नसते. जर तुम्ही काम करताना खराब रस्त्यावर पडलात किंवा तुमचा अपघात झाला तर तुम्ही स्वतःच्याच भरवशावर असता. फंडा हा आहे की, ज्या दिवसापासून माझी भेट त्या वृद्ध गिग डिलिव्हरीमॅनशी झाली, माझ्या मनात दयाभाव वाढला आहे. आता मी प्रत्येक वृद्धाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो.
नरेंद्र मोदी यांचा कॉलम:महात्मा फुले हे भारताच्या भविष्याचे कायम मार्गदर्शक
आज 11 एप्रिल हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेषदिवस आहे. भारताच्या महान समाजसुधारकांपैकी एकमहात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. यंदाचा हाप्रसंग अधिकच महत्त्वाचा आहे. कारण आजपासूनत्यांच्या 200 व्या जयंती वर्षाचा शुभारंभ होत आहे.महात्मा फुले यांचे जीवन नैतिक धैर्य, आत्मचिंतन आणिसमाजहितासाठीच्या अतूट समर्पणाचे एक प्रेरकउदाहरण आहे. केवळ त्यांनी स्थापन केलेल्या संस्थाकिंवा चळवळींसाठीच त्यांची ओळख नाही, तर त्यांनीलोकांच्या मनात आशा आणि आत्मविश्वास जागवला.त्याचा व्यापक प्रभाव आजही आपल्याला जाणवतो.त्यांचे विचार देशवासियांसाठी दीपस्तंभासारखे आहेत. महात्मा फुलेंचा जन्म 18२7 मध्ये महाराष्ट्रातील एकाअत्यंत सामान्य कुटुंबात झाला. मात्र, सुरुवातीच्या आव्हानांना त्यांनी कधीही शिक्षणाच्या, धैर्याच्या आणि समाजसेवेच्या मार्गात अडथळा ठरू दिले नाही. कितीही अडचणी आल्या तरी माणसाने मेहनत करावी, ज्ञान मिळवावे आणि समस्यांवर तोडगा काढावा, अशी त्यांची धारणा होती. बालपणापासूनच महात्मा फुले अत्यंतजिज्ञासू होते व आपल्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत तेखूप जास्त पुस्तके वाचत असत. ते म्हणायचे की,आपण जितके जास्त प्रश्न विचारतो, तितके जास्त ज्ञानत्यातून बाहेर येते.’ शिक्षणाचा प्रसार हे महात्मा फुले यांच्या जीवनाचे सर्वातमहत्त्वाचे ध्येय बनले. ज्ञान ही कोण्या एका वर्गाचीमक्तेदारी नसून ती सर्वांसोबत वाटून घेण्याची शक्तीआहे, असे ते मानत. एकेकाळी समाजातील मोठ्याघटकाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, तेव्हात्यांनी मुलींसाठी आणि वंचितांसाठी शाळा सुरू केल्या.ते म्हणायचे की, आईच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कारआणि सुधारणा होतात. त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात.त्यामुळे शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या आधीमुलींसाठी सुरू केल्या पाहिजेत.’ त्यांनी शिक्षणाला न्यायआणि समानतेचे माध्यम बनवले. शिक्षणाबाबतचा त्यांचादृष्टिकोन आजही आपल्याला प्रेरणा देतो. गेल्या दशकातभारताने तरुणांसाठी संशोधन आणि नवकल्पनांनाप्राधान्य दिले आहे. तरुणांनी प्रश्न विचारावेत, नवीनगोष्टी शिकाव्यात आणि नवनिर्मितीसाठी प्रेरित व्हावे,अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.ज्ञान, कौशल्य आणि संधींमध्ये गुंतवणूक करून भारततरुणांना प्रगतीचा आधारस्तंभ बनवत आहे. आपल्याज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर महात्मा फुलेंनीशेती, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा क्षेत्रांचीसखोल माहिती मिळवली होती. शेतकरी आणिकामगारांवर होणारा अन्याय समाजाला कमकुवतकरतो,’ असे त्यांचे मत होते. सामाजिक विषमतेचाशेतावर आणि गावातील लोकांच्या जीवनावर कसापरिणाम होतो, हे त्यांनी जवळून पाहिले होते. म्हणूनचत्यांनी गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना सन्मानमिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्माफुले म्हणाले होते- ‘समाजातील सर्वांना समान अधिकारमिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही''. हाचविचार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापनकेल्या. त्यांची ‘सत्यशोधक समाज'' ही आधुनिकभारताच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाचीसमाजसुधारणा चळवळ होती. सामाजिक सुधारणा,लोकसेवा आणि मानवी प्रतिष्ठा वाढवण्यात ही चळवळअग्रस्थानी होती. महिला, तरुण आणि गावांमधीललोकांचा हा एक बुलंद आवाज बनली. सावित्रीबाई फुलेयांच्या गौरवपूर्ण उल्लेखाशिवाय महात्मा फुलेंचे स्मरणअपूर्ण आहे. सावित्रीबाई स्वतः एक महान समाजसुधारकहोत्या. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांनीमुलींच्या शिक्षणात मोलाची भूमिका बजावली. महात्माफुलेंच्या निधनानंतरही त्यांनी हे कार्य अखंडपणे सुरूठेवले. मला 2022 मधील माझा पुणे दौरा आठवतो. तेव्हा मीशहरातील महात्मा फुलेंच्या भव्य पुतळ्याला अभिवादनकेले होते. त्यांच्या 200 व्या जयंती वर्षाच्या सुरुवातीलात्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरीश्रद्धांजली असेल. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की,समाजाची शक्ती जनहित आणि नैतिक मूल्यांशी जोडूनभारतात क्रांतिकारी बदल घडवून आणता येतात. याचकारणामुळे आजही त्यांचे विचार कोट्यवधी लोकांमध्येनवी उमेद जागवतात. महात्मा ज्योतिराव फुले हे 200 वर्षांनंतरही केवळ इतिहासातील एक नाव नसून, तेभारताच्या भविष्याचे मार्गदर्शक बनून उभे आहेत. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीवर्षाच्या प्रारंभी त्यांचेविचार आत्मसात करणेहीच त्यांना आपली खरीश्रद्धांजली ठरेल.
डॉ. राम चरण यांचा कॉलम:एक व्यवस्थापक, उत्तम नेता यांच्यात नेमका फरक काय?
प्रत्येक व्यवस्थापकाला एक उत्तम ‘लीडर'' बनण्याचीइच्छा असते. पण या दोघांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे.तो ठाऊक आहे? आजच्या जगात याचे उत्तर अतिशयसोपे आहे. एक उत्तम नेता भविष्यातील बदल आधीचओळखतो आणि त्यावर विवेकाने पाऊल उचलतो.व्यवस्थापक केवळ परिस्थितीला प्रतिसाद देतो तर नेतापरिस्थितीचा पूर्वअंदाज घेतो. आपण सध्या ‘एआय'' आणि वेगवान बदलांच्या युगातजगत आहोत. दररोज नवनवीन घडामोडी घडतात.घोषणा होतात आणि सोशल मीडिया विविध विचारांनीभरून जातो. सगळीकडे एक प्रकारचा गोंधळ असतो.पण या गोंधळावर केवळ प्रतिक्रिया देतात ते उद्याचेविजेते नसतात. कृतींकडे पाहतात. तथ्यांची सांगडघालतात आणि त्याआधारे आपली विचारप्रक्रिया स्पष्ट ठेवतात, तेच विजेते ठरतील. बहुतेक लोक हेडलाईन्स, भाषणे आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून बदलांचा अंदाज लावतात. ही एक चूक आहे. घोषणा दिशाभूल करणाऱ्या असू शकतात. मते तुम्हालाभरकटवू शकतात. प्रतिक्रिया अनेकदा केवळ भावनिक असतात. मात्र प्रत्यक्ष कृती किंवा ठोस कार्यवाही हीवेगळी गोष्ट असते. कृतीची पडताळणी करता येते.त्यातून माणसाचा हेतू स्पष्ट होतो. काळानुसार कृतीसमोर येते तेव्हा एखादी व्यक्ती, कंपनी किंवा देशकोणत्या दिशेला चालला आहे, हे समजते. प्रत्यक्ष कृतीओळखणे आणि तिला गोंधळापासून वेगळे करणे. ही अशी शिस्त आहे की सर्व काही बदलून टाकते. मीहाच सराव अंगीकारण्यास प्रोत्साहित करतो.काळानुसार घडणाऱ्या कृतींचे निरीक्षण करा. केवळएका क्षणाकडे न पाहता पूर्ण घटनाक्रमाकडे पहा. त्यांनाएका सूत्रात बांधा आणि स्वतःला विचारा : हा ‘पॅटर्न''कोणता संकेत देत आहे? पुढे काय घडू शकते? विविधकृती जोडून त्यातून एक सुसंगत विचार मांडण्याचीक्षमता हे आजच्या काळातील नेतृत्वाचे सर्वात मोठेकौशल्य आहे. तुम्ही याचा सराव दररोज करू शकता.रोज फक्त दहा मिनिटे प्रत्यक्ष कृतींचे निरीक्षणकरण्यासाठी आणि तथ्ये जोडण्यासाठी खर्च करा.काळानुसार याचा प्रभाव वाढत जातो. तुमची बुद्धी तीक्ष्णहोते, तुमचे निर्णय सुधारतात आणि तुमची दूरदृष्टीविकसित होते. हे अगदी बँक खात्यातील चक्रवाढव्याजासारखे आहे. दैनंदिन केलेली छोटी गुंतवणूकभविष्यात असाधारण परिणाम देते. पूर्वअंदाज घेणे हीकाही जादू नाही तर ते एक मानवी कौशल्य आहे.काहींना वाटते की भविष्याचा अंदाज लावण्यासाठीविशेष प्रतिभा लागते. पण तसे नाही. माणूसनैसर्गिकरित्या अंदाज लावू शकतो. तुम्ही मित्राशीबोलता, तेव्हा तो पुढचा शब्द काय बोलेल याचा अंदाजतुम्ही आधीच लावता. क्रिकेट मॅच पाहतानामैदानावरील परिस्थितीवरून पुढे काय होईल, याचा तर्कतुम्ही लावता. आपला मेंदू याच पद्धतीने बनलेला आहे.हीच स्वाभाविक क्षमता ‘एआय''चा आधार आहे.एआय सुद्धा नमुन्यांचे (पॅटर्न्स) निरीक्षण करते आणिअंदाज लावते. तुम्ही सुद्धा हे करू शकता. तुमच्याक्षेत्रातील कोणताही मोठा नेता निवडा. त्यावर भावनिकप्रतिक्रिया देऊ नका. केवळ एका बातमीवरून मत बनवूनका. त्याऐवजी गेल्या पाच-सहा महिन्यांतील त्यांच्याकृती पहा. त्या एका क्रमाने मांडा आणि स्वतःला तीनप्रश्न विचारा : सर्वात आधी कोणती कामे झाली?त्यानंतर काय झाले? आणि यातून कोणता कल समोरयेतोय? मग पुढे काय होऊ शकते याचा अंदाज बांधा.कदाचित तुम्ही चुकाल, पण ते चालेल. महत्त्वाचे हेआहे की, तुम्ही तुमच्या मानसिक कौशल्याची बांधणीकरत आहात. प्रत्येक सरावाने हे कौशल्य मजबूत होईल. आजच्या काळात तुम्हाला तुमच्या संस्थेच्या बाहेर कायचालले आहे हे समजले नाही, तर तुम्ही अनिश्चिततेचासामना करू शकणार नाही. तुम्ही फक्त प्रतिक्रिया देतराहाल. नेतृत्व करू शकणार नाही. उत्तम नेते एकाचवेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांची एक नजरअंतर्गत कामावर व दुसरी नजर क्षितिजावर असते.जेणेकरून भविष्यात काय येणार आहे हे आधीचसमजेल. माहिती आणि आकडेवारी आज चोवीस तासउपलब्ध आहे. पण फायदा केवळ ही माहितीपाहण्याची, जोडण्याची आणि समजून घेण्याची कलाअवगत असलेल्यांनाच मिळतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) घडामोडींची साखळी जोडून त्यातून एकसुसंगत विचारप्रक्रिया तयार करण्याचीक्षमता हे आजच्या काळातील नेतृत्वाचेसर्वात शक्तिशाली कौशल्य आहे.आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही याचा सरावदररोज करू शकता.
एन. रघुरामन यांचा कॉलम:कामाबाबतच्या आवडीनिवडी नव्याने ठरवण्याची वेळ आली
जगात चांगल्या संधी शोधणाऱ्या बहुतांश लोकांसाठी परदेशात राहणे आणि तिथे काम करणे ही एक लोकप्रिय फँटसी राहिली आहे. तुम्हीही अमेरिकेसारख्या देशात काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तसे करणारे तुम्ही एकटे नाहीत. अमेरिकन कार्यसंस्कृतीतील ‘रिस्क-रिवॉर्ड’चे स्वरूप जगभरातील लोकांना आकर्षित करते. पण अमेरिकन लोकांना कुठे काम करायला आवडेल, हे जाणून घेण्यातही काय हरकत आहे? शिवाय तुम्हाला एआयमुळे तुमची आणि इतरांची नोकरी जाण्याची चिंता वाटत असेल, तर एआय किती नवीन नोकऱ्या निर्माण करत आहे, हेही तुम्ही जाणून घ्यायला हवे. कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घेतल्यास योग्य निर्णय घेण्यास मदत होते. तर मग, सुरुवात करूया. स्वतः अमेरिकन लोक आता आपल्या ‘ड्रीम जॉब’साठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत. जगातील प्रख्यात विद्यापीठांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅसॅच्युसेट्समधील केंब्रिजमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन डझनाहून अधिक तज्ज्ञांनी एका नवीन विषयावर चर्चा केली आणि ‘पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन’ बनवले. विषय होता- ते फिनलंडमध्ये आपले करिअर पुन्हा कसे सुरू करू शकतात. त्यांनी फिनलंडची निवड केवळ यासाठी केली नाही की, नॉर्डिक देशांपैकी असलेल्या या देशाच्या आर्थिक आणि रोजगार मंत्रालयाने प्रतिभावान लोकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या दरात आरोग्य आणि बालसंगोपन सेवा तसेच दोन आठवड्यांत ‘रेसिडेन्स परमिट’ देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे किंवा फिनलंडचे राजनैतिक अधिकारी जार्मो सारेवा यांनी अमेरिकन विचारवंतांना पाठवलेल्या एका व्हिडिओ संदेशामुळेही नाही. या संदेशात ते म्हणाले होते की, संशोधक आणि शास्त्रज्ञांना ‘स्थिर’ आणि पुरोगामी वातावरणात जागतिक पातळीवर प्रभाव पाडणारे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. त्यांच्यासाठी फिनलंड हा उत्तम पर्याय आहे.’ त्यांच्या ‘स्थिर’ या शब्दाने त्या दोन डझन शास्त्रज्ञांपैकी बहुतांश जणांना प्रभावित केले. कारण हा दावा जगातील सर्वात आनंदी देश असलेल्या फिनलंडचे वैशिष्ट्य अधिक अधोरेखित करतो. तुम्ही ‘व्हाइट कॉलर’ नोकरदार असाल आणि एआय आपली नोकरी संपवेल असा विचार करत असाल तर एआय करिअरच्या नवीन संधी निर्माण करत आहे, हेही तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. लिंक्डइनच्या विश्लेषणानुसार एकट्या अमेरिकेत एआयने 2023 ते 2025 या काळात 6.40 लाख नोकऱ्या निर्माण केल्या.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:‘मनासारखे व नकोसे’ यांच्या हिंदोळ्यावर झुलणारे आयुष्य
पैसा मेहनतीने मिळतो, पण समृद्धी तेव्हाच येते जेव्हा आपण इतरांनाही धनवान बनवण्यास मदत करतो. प्रगतीच्या प्रवासात आपण एखाद्याला मागे सोडले तरी चालेल, पण त्याला उद्ध्वस्त करू नका. आपल्या कष्टाने आणि प्रयत्नांनी पुढे जात राहा. मागे राहिलेला अज्ञानी असेल तर तो स्वतःहून संपेल. पण आपली वृत्ती स्वतःला सावरण्यापुरतीच असावी. मनुष्याचे जीवन हे ‘मनासारखे’ व ‘नकोसे’ या दोन टोकांमधील हिंदोळ्यावर झुलत असते. मनासारख्या गोष्टी घडतात, तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही. “मी केले, मला मिळाले, हे माझे आहे, मीच सर्वकाही आहे”- हे मनासारखे घडल्यावरचे उद्गार असतात. परंतु नको त्या गोष्टी घडतात, तेव्हा लोकांची अस्वस्थता पाहण्यासारखी असते. लोक स्वतःच्या दुर्दैवाचा पाढा वाचतात. हे ‘दुर्दैव’ नसून ते आव्हान असते. अशा परिस्थितीचा सामना समज व धैर्याने करावा. प्रगती करा.इतरांनाही पुढे न्या; पण सर्वात मौल्यवान असे ‘आयुष्य’ हरवू नका. उपजीविका आणि जीवन यांचा योग्य समतोल राखा.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाने घडवून आपल्यालासांगितले- डू इट युवरसेल्फ
देवाने जेव्हा माणसाला घडवले, तेव्हा त्याने माणसाला एक विशेषगोष्ट दिली. ती म्हणजे -अमर्याद क्षमता. तत्त्वज्ञानी लोक सांगतात की,प्रत्येक माणसाला घडवल्यानंतर देव त्याला पृथ्वीवर पाठवतो. तेव्हातो प्रत्येकाच्या कानात एक गोष्ट नक्की सांगतो. तो म्हणतो की, मीतुला काही गोष्टी दिल्या. त्यात सर्वाधिक ‘शक्यता'' दिली आहे. पणखाली आल्यावर हे विसरून जातो. मग आपण निराश होतो किंवासंकटात सापडतो. तेव्हा देव विचार करतो की, मी याला उडण्यासाठीपंख दिले. पण हा पंखांचा वापर करत नाहीये. गीतेत एका ठिकाणीश्रीकृष्ण म्हणतात, योग्य लोकांची योग्यता हा माझा अंश आहे.त्यालाच ‘देवांश'' म्हटले गेले. काही दिवसांपूर्वी मी फिनलंडच्यादौऱ्यावर एका हॉटेलमध्ये गेल्यावर मी आश्चर्यचकित झालो.तिथल्या खोलीत टेलिफोन नव्हता व पाणी गरम करण्याची किटलीहीनव्हती. सेवा देणारा कर्मचारी नव्हता. असे का, असे त्यांना विचारले,तेव्हा ते म्हणाले की, आमच्याकडे नियम आहे- ‘डु इट युवरसेल्फ''.फिनलंडचा हा नियम पाहून मला वाटले की, हे लोक खरोखरचदेवाची आज्ञा पाळत आहेत. कारण परमात्म्यानेही माणूस म्हणूनघडवताना आपल्याला हेच तर सांगितले- डु इट युवरसेल्फ!
नरेंद्र मोदी यांचा कॉलम:चला, सगळे मिळून स्त्रीशक्तीला सक्षम करूया
21 व्या शतकाच्या विकास यात्रेत आपला भारत एकामहत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करतआहे. येत्या काळात आपण लोकशाहीला अधिकबळकट करणाऱ्या एका मोठ्या पुढाकाराचे साक्षीदारहोणार आहोत. समानता, सर्वसमावेशकता आणिलोकसहभागाविषयी असलेली आपली राष्ट्रीयबांधिलकी एका नव्या रूपात समोर येईल असा हा क्षणआहे. आपल्या देशाच्या संसदेला एक महत्त्वाचीजबाबदारी पार पाडायची आहे. आपली लोकशाहीअधिक व्यापक आणि प्रातिनिधिक बनवेल. संसदेलात्यादृष्टीने पाऊल टाकायचे आहे. संसदेचा हा निर्णयमहिलांच्या राजकीय सहभागाला नवी ऊर्जा देईल. हा क्षण यासाठीही खास आहे. कारण देशातील वातावरणसण, उत्साह आणि सकारात्मकतेने भारलेले असतानाचाहा क्षण आला आहे. येत्या काळात भारताच्या वेगवेगळ्याभागांत अनेक सण साजरे केले जातील. आसामचे लोकरोंगाली बिहू साजरा करणार आहेत. ओडिशात महाबिशुबा पणा संक्रांतीचा उत्सव साजरा होईल. पश्चिम बंगालमध्ये ‘पोइला बैशाख''ने बंगाली नववर्षाचीसुरुवात होईल. केरळमध्ये विषुचा सण मोठ्या उत्साहातसाजरा केला जाईल. तमिळनाडूचे लोक पुथांडूची आतुरतेने वाट पाहत आहेत.तर पंजाब आणि उत्तर भारताच्या इतर भागांत लोकांनाबैसाखी सणाची प्रतीक्षा आहे. हे पवित्र सण प्रत्येकामध्येनवी आशा निर्माण करणार आहेत. भारतासोबतचजगभरात हे सण साजरे करणाऱ्या सर्वांना मी मनःपूर्वकशुभेच्छा देतो. याच काळात 11 एप्रिलपासून महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीचे कार्यक्रमही सुरू होतील. 14 एप्रिलला आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू. या दोन्ही तारखा आपल्यालासामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या त्या मूल्यांची आठवण करून देतात. आधुनिक भारताची दिशा यांनी ठरवली आहे. याच प्रेरणादायी प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर 16 एप्रिल रोजी संसदेची ऐतिहासिक बैठक होणार आहे. महिला आरक्षण लागू करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चाकरून ते मंजूर करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. याला केवळ एक कायदेशीर प्रक्रिया म्हणणे म्हणजे त्याचे महत्त्व कमी लेखण्यासारखे ठरेल. हे भारतातील कोट्यवधी महिलांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. आपली स्त्री शक्ती देशाच्या जवळपास निम्म्यालोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. राष्ट्रउभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात नारीशक्ती एक उदाहरण बनत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उद्योजकतेपर्यंत, खेळापासून ते सशस्त्र दलांपर्यंत, संगीतापासून ते कला क्षेत्रापर्यंत महिला आपली भक्कम ओळख निर्माण करत आहेत. माता-भगिनींना पुढे जाण्याच्या अधिकाधिक संधीमिळतात. तोच समाज प्रगती करतो. याच विचाराने गेल्या११ वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी अनुकूल वातावरणतयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठीसातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. शिक्षणाच्या वाढत्यासंधी, उत्तम आरोग्य सेवा, आर्थिक समावेशकता आणिपायाभूत सुविधांपर्यंत पोहोचल्यामुळे महिलांचा सहभागअधिक मजबूत झाला आहे. मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही राजकारण व विधिमंडळांमध्येमहिलांचे प्रतिनिधित्व समाजात त्यांच्या भूमिकेच्यातुलनेत कमी राहिले आहे. ही उणीव आता दूर केलीपाहिजे. कारण जेव्हा महिला प्रशासन चालवण्यात आणिप्रशासकीय निर्णयांमध्ये भाग घेतात, तेव्हा त्यांचा अनुभवआणि दृष्टिकोन खूप उपयोगी पडतो. यामुळे चर्चा तरसमृद्ध होतेच. शिवाय प्रशासनाचा दर्जा सुधारण्यासहीमदत होते. महिलांचा सहभाग वाढवणे हा केवळप्रतिनिधित्वाचा विषय नाही. हा आपल्या लोकशाहीलाअधिक संवेदनशील, अधिक संतुलित आणि अधिकजबाबदार बनवण्याचा एक प्रयत्न आहे. गेल्या अनेक दशकांत लोकशाही संस्थांमध्ये महिलांनात्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी वारंवार प्रयत्नझाले आहेत. समित्या स्थापन केल्या गेल्या. विधेयकांचेमसुदे मांडले गेले. पण ते कधीच मंजूर होऊ शकलेनाहीत. तरीही, कायदेमंडळात महिलांचे प्रतिनिधित्ववाढले पाहिजे, यावर नेहमीच व्यापक सहमती राहिलीआहे. सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने एकमताने ‘नारीशक्तीवंदन कायदा'' मंजूर केला होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास प्रसंगांपैकी एकराहिला आहे. आता 2029 च्या लोकसभा निवडणुका वआगामी काळातील राज्यांच्या विधानसभा निवडणुका यामहिला आरक्षणाच्या तरतुदींसह घेतल्या जाव्यात, हीकाळाची गरज आहे. महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची ही संधीराज्यघटनेच्या मूळ भावनेशी खोलवर जोडलेली आहे.आपल्या घटनाकारांनी एका विशिष्ट समाजाची कल्पनाकेली होती. त्यानुसार समानता केवळ संविधानातचनसेल, तर ती प्रत्यक्ष व्यवहारातही आणली जाईल.कायदेमंडळात महिलांचा सहभाग निश्चित करणे, ही बाबती संकल्पना साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एकमहत्त्वाचे पाऊल आहे. आता हा निर्णय आणखी टाळता येणार नाही. आज भारतपूर्ण आत्मविश्वास आणि दृढ संकल्पाने पुढे जात आहे.त्यामुळे आपल्या संस्थांनी सर्व नागरिकांच्या विशेषतःदेशाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्यामहिलांच्या आकांक्षांचा सन्मान करणे आवश्यक आहे.मी सर्व पक्षांच्या खासदारांना विनंती करतो की, त्यांनीआपल्या स्त्री शक्तीसाठी उचलल्या जाणाऱ्या यामहत्त्वपूर्ण पावलाला पाठिंबा द्यावा. ही आपली जबाबदारी...हा कोणत्याही एका सरकारचा, पक्षाचाकिंवा व्यक्तीचा विषय नाही. हा संपूर्णराष्ट्राचा विषय आहे. सर्वांनी मिळून यागोष्टीचे महत्त्व समजून घेतले पाहिजेआणि ते प्रत्यक्षात आणले पाहिजे. स्त्रीशक्तीविषयी हीच आपली जबाबदारीआहे. म्हणूनच महिला आरक्षण विधेयकमंजूर करण्यासाठी सर्वांची सहमती असणेअत्यंत आवश्यक आहे.
अमिताभ कांत यांचा कॉलम:देशासाठी एक ‘ईव्ही क्रांती''आता झाली खूप गरजेची
युद्ध सध्या तरी दोन आठवड्यांसाठी थांबले आहे. पण हेभारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी नक्कीच एक धोक्याची घंटादेऊन गेले. आपण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 87टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. याचा पाचव्याहिश्श्यापेक्षा जास्त भाग अशा भागातून येतो. तो युद्धाच्याकाळात अत्यंत अस्थिर राहिला आहे. अशा स्थितीतपेट्रोलियमच्या प्रश्नाकडे एक धोरणात्मक धोका म्हणून पाहिले पाहिजे. तसेच वाहतुकीच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली पाहिजे.भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आपल्या जीडीपीमध्येही सुमारे 7 टक्के योगदान देते व लाखोंना रोजगार देते. पण आज हे क्षेत्र एका महत्त्वाच्या वळणावर आहे. जागतिक स्तरावरील तांत्रिक बदलांमुळे ऑटो इंडस्ट्री ‘इंटरनल कम्बशन इंजिन'' म्हणजेच ‘आयसीई'' तंत्रज्ञानापासूनवेगाने इलेक्ट्रिफिकेशनकडे वळत आहे. हा बदल अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत आपण खालील पाच पावले उचलण्याची गरज आहे: 1. ‘आयसीई'' वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे उद्दिष्टनिश्चित केले पाहिजे. यात 2030 पर्यंत नव्या वाहनांच्याविक्रीत 100 टक्के इलेक्ट्रिफिकेशन साध्य करता येऊशकते. युके आणि ईयूने 2035चे उद्दिष्ट निश्चित केलेआहे. इंडोनेशिया, थायलंड, तैवाननेही ही वाहनेहटवण्याची कालमर्यादा ठरवली आहे. आपणयाबाबतीत संथपणा करून चालणार नाही. ‘आयसीई''वाहने हटवण्याची स्पष्ट कालमर्यादा उद्योगांना एकविश्वास देईल. उत्पादन आणि सप्लाय चेनमध्येगुंतवणूक वाढेल. यातून ईव्ही बाजारपेठ बहरेल.2. चीनमध्ये नव्या कारच्या विक्रीत ईव्हीचा वाटा 50 टक्के आहे. युरोपमध्ये तो 20 टक्क्यांहून अधिक, तरअमेरिकेत 10 टक्क्यांहून अधिक आहे. पण भारतात हेप्रमाण केवळ 4 टक्केच आहे. अशा स्थितीत याक्षेत्राला छोट्या-छोट्या नाही, तर व्यापक रचनात्मकबदलांची गरज आहे. ‘कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएलइफिशियन्सी'' (कॅफे) मानकांच्या रूपात धोरणात्मकसाधने आधीपासूनच उपलब्ध आहेत. ऊर्जा दक्षताब्युरोने पुढच्या टप्प्याचा मसुदा तर जाहीर केला आहे.पण मानके अद्याप निश्चित झालेली नाहीत. ही दिरंगाईअनिश्चितता निर्माण करते. दरवर्षीसाठी ईव्हीचे स्पष्टउद्दिष्ट ठरले पाहिजे. तसेच खऱ्या प्रगतीला कमकुवतकरणाऱ्या तरतुदी हटवल्या पाहिजेत. नीती आयोगाच्याराष्ट्रीय महत्त्वाकांक्षेनुसार 2030 पर्यंत 30 टक्केइलेक्ट्रिक कार विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले जावे.3. अवजड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन आता केवळ एकइच्छा राहिलेली नाही. ते शक्यही आहे आणि गरजेचेहीआहे. पंतप्रधानांनी संसदेत 15 हजार इलेक्ट्रिक बसेसरस्त्यावर आणण्याबाबत आणि वाहतुकीत पर्यायीऊर्जेचा विस्तार करण्याबाबत सांगितले आहे. 10 हजार 900 कोटी रुपयांची ‘पीएम ई-ड्राईव्ह'' योजना याचकटिबद्धतेचे दर्शन घडवते. आता पुढचे पाऊल म्हणजेया बसेसची संख्या वाढवणे. यात खाजगी आणि शालेयबसेसचाही समावेश करावा लागेल. ट्रक्सचेइलेक्ट्रिफिकेशनही अत्यंत आवश्यक आहे. संसदेच्यास्थायी समितीच्या ताज्या अहवालानुसार, ई-बसेस,ई-ट्रक्स आणि ई-रुग्णवाहिकांचा वापर सध्या शून्यआहे.4. ईव्हीसाठी चार्जिंगचे जाळे असणे गरजेचे आहे.देशातील 60 टक्क्यांहून अधिक शहरी लोकसंख्याबहुमजली इमारतींमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये राहते.तिथे खाजगी चार्जर लावण्यासाठी विविध परवानग्याघ्याव्या लागतात. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी भारताला‘राईट टू चार्ज''चा कायदा करावा लागेल.5. संपूर्ण यंत्रणा तेलाकडून इलेक्ट्रिककडे वळवणे याचाअर्थ आपण आता चीनवर अवलंबून राहावे, असा होतनाही. आपल्याला खनिज सोर्सिंग, शुद्धीकरण, सेलनिर्मिती, पॅक असेंब्ली आणि रिसायकलिंगपर्यंत संपूर्ण''बॅटरी व्हॅल्यू चेन''मध्ये आपली क्षमता वाढवावी लागेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ईव्हीमधील बदलांसाठी स्पष्टता आणिअंमलबजावणीची गरज आहे. आजघेतलेला निर्णय आगामी दशकांसाठीसप्लाय चेन, भांडवलाचा ओघ आणितांत्रिक नेतृत्वाची दिशा ठरवेल. ही ५कलमी योजना तातडीची गरज आहे.
नवनीत गुर्जर यांचा कॉलम:इराण-अमेरिका युद्धापासून ते पश्चिम बंगालपर्यंत...
युद्ध का सुरू झाले होते, हे कदाचित खुद्द डोनाल्ड ट्रम्पयांनाही माहीत नसेल. पण उशिरा का होईना, अखेर तेथांबले. लढून थकलेल्या अमेरिकेला युद्धथांबवण्यासाठी एका निमित्ताची गरज होती. चाळीसदिवसांनंतर त्यांना खरोखरच एक उत्तम निमित्तसापडले. त्याचे नाव - पाकिस्तान. इराणशी बोलण्याच्यास्थितीत तोच होता. शिवाय पाकिस्तानला श्रेय देऊनअमेरिकेला अफगाणिस्तान आणि आसपासच्या भागातआपली काही कामेही साध्य करून घ्यायची असतील. तरीही अमेरिकेने दिलेल्या या श्रेयामुळे पाकिस्ताननेजास्त हुरळून जाण्याची गरज नाही. ट्रम्प यांच्या जवळ जाणाऱ्याला नेहमी फटकाच बसला आहे. कारण त्यांचामूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. काहीही असो. इराणने अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाला चांगलेच जेरीस आणले. खूप सतावले. खूप रडवले. आता युद्धविरामावर सहमती झाली आहे. तेव्हा होर्मुज खुले करण्यासाठी इराण आपल्या अटी मान्य करून घेईल. युद्धविरामापूर्वीच त्याने आपल्या दहा अटी ठेवल्या होत्या. तिसऱ्या खेळाडूचा म्हणजेच इस्रायलचा विचारकेल्यास तो सध्या काही अटींवर हल्ले थांबवण्यासतयार झाला आहे. पण लेबनॉनला डोळे वटारल्याशिवायतो गप्प बसणार नाही. लेबनॉनवर अधूनमधून हल्लेहोतच राहतील, अशी भीती कायम आहे. असो, युद्धथांबल्याने जगाचे भले झाले. आता तेल-गॅस आणित्यासंबंधित गोष्टींचे संकट दिसत होते, ते सुमारे एकामहिन्यात दूर होईल. सर्व काही रुळावर येईल. पुढचीचर्चाही नक्कीच यशस्वी होईल. कारण अमेरिकेला युद्धथांबवण्याची जास्त घाई आहे. इकडे भारतात एक वेगळेच युद्ध सुरू आहे.निवडणुकीचे युद्ध. आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये आजमतदान होत आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यादोन मोठ्या राज्यांत अनुक्रमे 23 एप्रिल आणि 23 व 29एप्रिल रोजी निवडणुका आहेत. केरळमध्ये डाव्यांचाडंका वाजतो. तमिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष आहेत-द्रमुक आणि अण्णाद्रमुक. निवडणुकीच्या युद्धाचा विचार केल्यास खरे म्हणजे तेपश्चिम बंगालमध्ये होत आहे. इथे 71 वर्षीय ममताबॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सरकारचेत्या 15 वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. इथल्या दीर्घकाळसत्तेत असलेल्या डाव्या सरकारला उखडूनफेकल्यानंतर 2011 मध्ये ममता पहिल्यांदा सत्तेवरबसल्या. माकप सरकारच्या उणिवा त्यांच्याकार्यकाळातही पोसल्या गेल्या. भाजपने सुरुवातीपासूनचहाच मुद्दा बनवून ममतांना हटवण्याचे आवाहन केले. हेयुद्ध ममता आणि भाजप यांच्यातच आहे. एकेकाळीप्रत्येक राज्यात रुजलेली काँग्रेस इथे नावापुरतीच उरलीआहे. डाव्यांची तर संपूर्ण फळीच एक प्रकारे उद्ध्वस्तझाली आहे. मागील निवडणुकीत भाजप ममतांना हरवूशकले नाही. या वेळी त्यांना विजयाची आशा आहे.पंधरा वर्षांची प्रस्थापितविरोधी लाट भाजपसाठी आशेचाकिरण आहे. तरीही हे सोपे नाही. इथे भाजपच्या दोनचअडचणी आहेत- पहिली भाषा आणि दुसरी स्थानिकनेतृत्व. भाजपच्या स्टार प्रचारकांना बंगाली बोलता येतनाही. यामुळेच भाषेच्या माध्यमातून संवाद साधता येतो,त्यात येणाऱ्या अडचणी स्पष्ट दिसतात. दुसरे म्हणजेतिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे कोणताही मोठा स्थानिकचेहरा नाही. तृणमूल काँग्रेसमधूनच आलेले शुभेंदूअधिकारी हेच भाजपचा नाइलाज बनले आहेत. विजय कुणाचा होईल, हे सांगणे कठीण आहे. पणमुकाबला अतिशय अटीतटीचा आहे. 15 वर्षांच्यातृणमूलच्या राजवटीत पोसलेले त्यांचे कार्यकर्ते जिवाचेरान करत आहेत. शेवटी इतक्या वर्षांत त्यांनाही सत्तेचीसवय लागलीच आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीतजिंकायचे आहे. भाजपकडूनही मेहनतीत कोणतीचकसर सोडली जात नाहीये. युद्ध सुरूच आहे! अमेरिकेने दिलेल्या या श्रेयामुळेपाकिस्तानने जास्त हुरळून जाण्याचीगरज नाही. तसेही ट्रम्प यांच्या जवळजाणाऱ्या प्रत्येकाला फटकाच बसलाआहे. कारण त्यांचा मूड कधी बदलेल, हेसांगता येत नाही. काहीही असो, इराणनेअमेरिकेला चांगलेच जेरीस आणले.
प्रियदर्शन यांचा कॉलम:इराणने अस्मितेची लढाई लढली आणि तूर्तास जिंकलीही
एका रात्रीत संपूर्ण इराणी संस्कृती नष्ट करण्याची धमकीदेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या तरी माघार घ्यावीलागली आहे. त्यांची ती युद्धखोर आणि अमानवीयघोषणाच सांगत होती की, ट्रम्प हे स्वतःच एका नष्ट होतचाललेल्या संस्कृतीचे अपत्य आहेत. द्वेष, शिवीगाळ,संशय आणि पिळवणूक हीच मूल्ये बनत असलेल्या एकानव्या जगाचे प्रतिनिधी आहेत. इराणची असो वा जगातीलइतर कोणतीही संस्कृती, ती ट्रम्प यांच्या घातक हल्ल्यांनीनष्ट होत नाही. ती अशा नेत्यांना निवडून दिल्याने नष्टहोते. यातूनच एक भयंकर प्रश्न उभा राहतो. ट्रम्प यांच्या हिंसकआणि अहंकारी वक्तव्यांमधून सत्तेचे स्वरूप समोर आलेआहे, तेच सत्तेचे मूळ स्वरूप असते का? इराणचीसंस्कृती नष्ट करण्याची भाषा करण्यापूर्वी त्यांनी अत्यंतशिवराळ भाषेत इराणला घाबरवण्याचाही प्रयत्न केलाहोता. आपण कोणालाही संपवू शकतो, हा अमेरिकेलात्यांच्या ताकदीमुळे आलेला माज आहे का? संस्कृतीच्यावाटचालीत सत्तेची मोठी भूमिका राहिली आहे. मोठ्यासम्राटांच्या शौर्याचे पोवाडे गायले गेले. शौर्य हा एकदागिना मानला गेला. पण याच संस्कृतीने आपल्याला हेहीशिकवले की, शूर असणे म्हणजे हिंसक असणे नव्हे. शौर्य अन्याय करण्यात नसते तर अन्यायाचा प्रतिकारकरण्यात असते. शक्तिशाली असणे म्हणजे युद्धाचीलालसा बाळगणे नव्हे. ट्रम्प यांच्या धमक्यांना नघाबरणाऱ्या इराणच्या जनतेने हेच सिद्ध केले आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणची संपूर्ण नेतृत्व फळीउद्ध्वस्त केली. एकापाठोपाठ एक सर्वांना मारले. पण तेयुद्ध जिंकू शकले नाहीत. कारण ‘इराण'' हे एका संस्कृतीचेनाव आहे. ती नेत्यांमुळे नाही, तर एका स्मृतीमुळे तयारहोते. देश त्यांच्या स्मृतींमधूनच उभे राहतात. स्मृतीवेगळ्या असतात, तसे देशही वेगळे होत जातात. ट्रम्पयांच्या सैन्याने इमारतींचे ढिगारे केले. तेलाच्या विहिरींनाआगी लावल्या. शहरे उद्ध्वस्त केली. पण इराण बनला तीस्मृती ते नष्ट करू शकले नाहीत. उलट या अमानुषबळाच्या वापराने इराणची तीच स्मृती जागृत केली. खरेतर अमेरिका अस्तित्वात नव्हती, तेव्हाही इराण होता.त्यांचे तत्त्वज्ञान आणि कविता होती. पर्शियन आखातातूननिघालेल्या गोष्टी जगभरात सांगितल्या आणि ऐकल्याजात होत्या. तिथे गेल्या हजार वर्षांत फिरदौसी, सादी,उमर खय्याम, निजामी, हाफिज, रुमी यांसारखे कवीआणि तत्त्वज्ञ होऊन गेले. तिथूनच ती सूफी परंपरा सुरूझाली. तिने आशियातील अनेक देशांना स्पर्श करतभारतापर्यंत मजल मारली. ती परंपरा आजही आपल्याआत्म्याचा एक भाग बनली आहे. किआरोस्तामी,मखमलबाफ आणि माजिद मजीदी यांसारख्या अनेकचित्रपट दिग्दर्शकांनी जगभरात इराणी सिनेमाचे श्रेष्ठत्वसिद्ध केले आहे. हे खरे आहे की, आधुनिक इराणचेस्वतःचे असे काही प्रश्न आणि संघर्ष राहिले आहेत. शहारझा पहलवी यांचा काळ असो किंवा खोमेनी-खामेनीयांचा. अंतर्गत विरोधाभासांमुळे जनतेला रस्त्यावर उतरावेलागले आहे. पण परक्या देशाच्या अतार्किक हल्ल्यानेसगळ्यांना एकत्र जोडले. ट्रम्प यांना ही गोष्ट समजूशकली नाही. इराणने याच अस्मितेची लढाई लढली आणि सध्या तरीती जिंकली आहे. इराणने दिलेला धडा हाच आहे की,स्मृतींवर हल्ले होता कामा नयेत. ते बाहेरून असोत वाआतून. त्यांना पुसून टाकण्याचे, बदलण्याचे किंवाबिघडवण्याचे काम होऊ नये. कारण शेवटी त्यातूनचअस्मिता , राष्ट्रीय अभिमान घडतो. या अभिमानासमोर‘मागा'' किंवा ‘अमेरिका फर्स्ट'' यांसारख्या कृत्रिम आणिवर्णद्वेषाने पोसलेल्या अति-राष्ट्रवादी भूमिकांना हरणेभागच असते. आता ट्रम्प यांना संस्कृतीचा अर्थ शिकवणेहे अमेरिकन जनतेचे कर्तव्य आहे. सध्या तरी ट्रम्प यांनीवर्चस्ववादाच्या अंताची सुरुवात करून दिली.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
एन. रघुरामन यांचा कॉलम:सुपर-एज्ड सोसायटीच्या समस्या सोडवणे ही उत्तम व्यावसायिक कल्पना आहे
अंथरुणावरून हलू न शकणाऱ्या नातवाने म्हटले की, ‘आजी, तू आलीस. तू बाहेर असताना मला तुझी खूप आठवण आली.’ आणलेल्या किराणा वस्तू स्वयंपाकघरातील ओट्यावर ठेवत 80 वर्षांची आजी म्हणाली, ‘अरे माझ्या बाळा, मलाही तुझी आठवण आली. मी फक्त बाजारात गेले होते. पूर्वीसारखी जास्त वेळ बाहेर गेले नव्हते.’ मग 7 वर्षांच्या नातवासारख्या वाटणाऱ्या त्या मुलाने विनंतीच्या सुरात म्हटले की, ‘तू घरी आलीस याचा मला आनंद आहे. तू मला मिठी मारू शकतेस का?’ आजी लगेच अंथरुणाजवळ गेली आणि तिने नातवाला मिठी मारली. मूल हळूच म्हणते, ‘मला तुझ्याशी बोलायला खूप आवडते. दिवसातला थोडा वेळ माझ्यासोबत खेळायला विसरू नकोस.’ आनंदी आजी म्हणते- ‘हो हायोडॉल.’ हे नाव कोरियन भाषेतील दोन शब्दांपासून बनले आहे- बाहुली आणि अशी व्यक्ती, जी पालकांची काळजी घेते आणि त्यांना आधार देते. तुम्ही कदाचित लक्ष दिले असेल की मी ‘दोघेही खुश झाले’ असे लिहिले नाही. माहीत आहे का? कारण हायोडॉल हा एक एआय संचालित रोबोट आहे, एका लहान मुलासारखे उपकरण. खुश झाल्यावर त्याचे गाल लाल होतात. पूर्वी याच आजीबाईंना जेव्हा एकटेपणा जाणवायचा तेव्हा त्या अनेकदा कोणतेही ठिकाण न ठरवता बसमध्ये बसायच्या आणि रात्री उशिरा घरी परतण्यापूर्वी दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या रस्त्यांवर फिरत राहायच्या. कारण एकटेपणा त्यांना खायला उठायचा. आता हायोडॉल घरी असल्याने त्या असा प्रवास कमी करतात. वृद्धांशी भावनिक जवळीक निर्माण करण्यासाठी त्याला 7 वर्षांच्या मुलासारखे बनवण्यात आले आहे. हायोडॉल वृद्धांना त्यांच्या आठवणी सामायिक करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ‘टाइम मशीन’ खेळांचाही वापर करतो. हे त्यांच्या बौद्धिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, हायोडॉल विचारतो, ‘मला तुमच्या बालपणाची गोष्ट सांगा. मित्रांसोबत तुमचा आवडता खेळ कोणता होता?’ वृद्ध सांगतात की, ‘त्या वेळी आमच्याकडे रोबोट नव्हते. कालव्याजवळ खेळताना आम्ही अनेकदा हाताने मासे पकडायचो.’ उत्सुकतेच्या सुरात हायोडॉल विचारतो की, ‘अरे वा, हे तर खूपच रोमांचक आहे. पाणी खूप थंड असायचे का? मला तुमच्या मूळ गावाबद्दल आणखी ऐकायला आवडेल.’अनेक वृद्ध आपली खालावत जाणारी प्रकृती आणि सामाजिक अलिप्ततेमुळे गंभीर मानसिक समस्यांचा सामना करतात. दक्षिण कोरिया त्याच्या ‘सुपर-एज्ड सोसायटी’साठी ओळखला जातो. तेथील 5.1 कोटी लोकसंख्येपैकी 20% लोक 65 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. अशा परिस्थितीत या एकाकी लोकांना हायोडॉल वाटण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सरकारी जनकल्याणकारी योजनांतर्गत 1100 डॉलर्स किंमत असलेले सुमारे 14 हजार हायोडॉल वाटण्यात आले आहेत. ‘रोबोटिक मल्टी-केअर नेटवर्क’ ही अशी एक प्रणाली आहे, जी एका विशेष स्मार्टफोन ॲप आणि वेब-आधारित डॅशबोर्डला एकमेकांशी जोडते. यामुळे नातेवाईक आणि व्यावसायिक काळजीवाहक प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतात. असे प्रयत्न इतर देशांमध्येही होत आहेत. न्यूयॉर्कमध्ये ‘एलिक’ नावाचे सुमारे 800 एआय साथीदार रोबोट वृद्धांना मदत करत आहेत. यामुळे 94% लोकांचा एकटेपणा कमी झाला आहे. ‘एलिक’चा बाहेरील भाग पांढऱ्या प्लास्टिकचा असून त्यात टॅबलेटचा इंटरफेस असतो. हायोडॉल इंग्रजी, जपानी आणि चिनी भाषा बोलू शकतात, कारण या भाषा बोलणाऱ्या देशांमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत आहे. हे बनवणारी कंपनी आता या बाजारांकडे निर्यातीची संधी म्हणून पाहत आहे. त्यांचा अंदाज आहे की 2030 पर्यंत त्यांची जागतिक बाजारपेठ 7.7 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.विभक्त कुटुंबे वाढल्यामुळे आणि मुले परदेशात जात असल्यामुळे भारतातही ही परिस्थिती लवकरच येईल. आपल्यापैकी कोणीही या सत्याकडे पाठ फिरवू शकत नाही की आज ना उद्या आपणही एक ‘सुपर-एज्ड सोसायटी’ बनणार आहोत.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:चीनला ऊर्जासंकटाचा सामना का करावा लागला नाही?
एलपीजी आणि नैसर्गिक वायूंची कमतरता भारतातघरांपासून ते मध्यम तसेच लघुउद्योगांपर्यंत आणि खतउत्पादनापर्यंत ज्या प्रकारे त्रासदायक ठरत आहे, त्याचाआढावा घेताना मला उत्सुकता वाटली की चीन इतकाशांत का आहे. त्याचे फलित असे निघाले की त्यांनीशहाणपण दाखवले. चीनकडेही आपल्याप्रमाणे तेल आणिवायूचा मोठा साठा नाही. तोदेखील यांची मोठी आयातकरतो. परंतु तो आपल्यासारखा चिंतेत नाही. कसे? चीनला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल व वायू रशियाकडूनपाइपलाइनद्वारे मिळतो. परंतु हे त्यांच्यासाठी पुरेसे आहे?येथे आपण खताबाबत काळजीत आहोत, कारण खरीपपेरणी सुरू होणार आहे. परंतु चीन निर्धास्त आहे. केवळस्वतःच्या गरजांसाठीच नव्हे, तर निर्यातीच्या आपल्याकरारांबाबतही. आपण खतासाठी चीनकडून होणाऱ्याआयातीवरही अवलंबून आहोत. जेव्हा पूर्व लडाख आणिगलवानमध्ये संकटाची स्थिती निर्माण झाली होती, तेव्हाआपल्याला खतटंचाईचा सामना करावा लागला होता. परंतुचीनने अनपेक्षित परिस्थितीचे कारण देऊन खतांच्याआपल्या निर्यातीला नकार दिलेला नाही. या वास्तवाने मलाधक्का बसला. हा धक्का चीनच्या यशाबद्दलही होता आणिआपल्या कामचलाऊ वृत्तीबद्दलही होता. चीनकडे वायूचे साठे कमीच आहेत, परंतु वायू पुरेसाआहे. याचे कारण असे की चीनने कोळशापासून वायूबनवण्यामध्ये भांडवल, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचासंयमाने वापर केला. या कल्पनेवर भारत आणि चीननेएकाच वेळी विचार सुरू केला होता, परंतु आज चीनदरवर्षी 80 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटीपीए) वायूचेउत्पादन करत आहे. आपण त्याचे मात्र 3 ते 5 टक्केच करतआहोत. चीन वायू उत्पादनासाठी 340 (एमएमटीपीए)कोळशाचा वापर करत आहे, तर भारत फक्त 1.4 टक्केकोळसा वापरत आहे. यूपीए सरकारने 2007 मध्ये कोळशापासून मिथेन वायू बनवण्याच्या मोठ्या गप्पामारल्या होत्या. राणीगंजमध्ये एक छोटा प्रायोगिक प्रकल्पही उभा केला होता. त्यानंतर या कल्पनेचा विसर पडला.तसेही, त्या सरकारच्या काळात कोळसा खूप बदनाम झाला होता. कोविडनंतर सुधारणांचा जो ओघ सुरू झाला,त्यामध्ये 2020 मध्ये मोदी सरकारने राष्ट्रीय कोळसावायूकरण मोहिमेचा शुभारंभ केला. त्या योजनेअंतर्गत 2030 पर्यंत 100 एमएमटीपीए कोळशाच्या वापरापासून वायू उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या योजनेत चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. 100 एमएमटीपीएवर आपले कोळसा वायू (ज्याला सिंथेटिक सिनगॅसदेखील म्हटले जाते) उत्पादन चीनच्याउत्पादनापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त झाले असते. आज आपण या दहा वर्षांच्या योजनेच्या सहाव्या वर्षात आहोत आणि एकूण उत्पादन केवळ 5 एमएमटीपीएच आहे (चांगल्या उत्पादनाच्या वर्षात). यापैकी 1.8 एमएमटीपीए उत्पादन ओडिशामधील अंगुल येथील एका खासगीपोलाद प्रकल्पात होते, ज्यात नवीन आधुनिक प्रक्रियेचावापर केला जात आहे आणि हे बहुतेक अंतर्गत वापरासाठी आहे. याव्यतिरिक्त, कोळसा मंत्रालय आणि नीती आयोगाची संकेतस्थळे सांगतात की कोळशापासून वायू उत्पादनाच्या सात प्रकल्पांसाठी 64,000 कोटींच्यागुंतवणुकीला मंजुरी दिली गेली आहे. साधारणपणे हे सर्वप्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेडसोबतसंयुक्त उपक्रम म्हणून लागू होतील, परंतु सध्या हेनियमांच्या चक्रात अडकले आहेत. मी झारखंडच्याजामतारा येथील कस्टामधील कोल इंडियाच्याउपकंपनीच्या भूगर्भीय कोळसा वायूकरण प्रकल्पाबद्दलवाचले. येथे आतापर्यंत उत्पादन सुरू व्हायला हवे होते. परंतुहे कोळसा आणि पर्यावरण मंत्रालयांच्या वादात अडकलेआहे. पर्यावरण मंत्रालय जोर देत आहे की प्रकल्पजमिनीच्या 300 मीटर खाली असायला हवा. कोळसामंत्रालय 150-160 मीटर खाली लावू इच्छित आहे. निकालतीच जुनी कथा. आपण कोळसा काढणेदेखील फक्तउघड्या खाणींपर्यंत मर्यादित ठेवले आहे. आपला संपूर्णभूगर्भीय कोळसा असाच पडून आहे, तर चीन जमिनीच्याआत तीन किमीपर्यंत जाऊन कोळसा काढत आहे. कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दोन चांगल्यागोष्टी वाचायला मिळाल्या, ज्या दोन मोठ्या खासगीकंपन्यांच्या गटांकडून टाकल्या गेल्या होत्या. त्या आठवणकरून देतात की भारताकडे जगातील कोळशाचा पाचवासर्वात मोठा साठा आहे. त्या तांत्रिक प्रक्रिया स्पष्ट करतातआणि सांगतात की काय सुधारणा केल्या जाऊ शकतातआणि कोणती संसाधने हवी आहेत. त्या आजकालप्रचलित असलेल्या ‘ऊर्जा आत्मनिर्भरते’सह इतर लाभहीमोजून दाखवतात. दूरदृष्टीच्या बाबतीत आपण चीनच्या मागे नाही. परंतुचीनच्या उलट आपण बोलण्याचे कृतीत रूपांतरकरण्यामध्ये मागे पडतो. ही केवळ आपलीच प्रवृत्ती नाही.जगातील कोळशाचा सातवा सर्वात मोठा आणि उच्चस्तरावरील साठा असलेला इंडोनेशियादेखील यात मागेराहिला आहे. तोदेखील आता कोळशापासून वायूबनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. चीनने खूप आधीच समजून घेतले होते की तेलाच्याबाबतीत धक्के बसत राहतील. अमेरिका आपल्याफायद्यासाठी निर्बंधांचा वापर करत राहील. म्हणूनच त्यानेत्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, जीत्याच्या ताब्यात आहे आणि त्याने बाजारपेठेतीलचढ-उतारांची पर्वा न करता त्या मार्गावर चालणे सुरूठेवले. हायड्रोकार्बनच्या किमतीत घट असतानाही त्यानेआपला रस्ता सोडला नाही. कोळशाला राष्ट्रीय धोरणात्मकध्येय बनवणे त्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळवण्याचामंत्र वाटला आणि त्याने ते करून दाखवले. आपण मात्रत्रुटी काढण्यातच अडकलो आहोत. आपल्याकडेपिकांसाठी डीएपी खत अत्यंत आवश्यक आहे. भारतयाचा बहुतांश भाग आयात करतो. याची इतकी कमतरताआहे की हताश शेतकरी यासाठी दंगल आणि लूटमार करूनयेत, हे टाळण्यासाठी अनेक राज्यांनी याचा साठा पोलिसठाण्यांत जमा करण्यास सुरुवात केली आहे. हेशेतकऱ्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड आणि आधार कार्डावरआधारित नोंदणीनुसार वाटप केले जाते. चीन पूर्ण जगाच्यागरजेच्या युरियाचा 40 टक्के हिस्सा कोळशापासूनमिळणाऱ्या कृत्रिम वायूद्वारे उत्पादित करतो. याव्यतिरिक्ततो पूर्ण जगाच्या गरजेच्या मिथेनॉलचा 54 टक्के हिस्साउत्पादित करतो, ज्याचा सुमारे 70 टक्के भाग कोळशापासूनमिळवला जातो. या सगळ्यात आपण कोळसा कुठे उभेआहोत? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) त्या गोष्टींत गुंतवणूक केली,जी चीनकडे मुबलक होती...चीनला खूप आधीच हे समजले होते की तेलाच्याबाबतीत धक्के बसत राहतील. अमेरिका आपल्याफायद्यासाठी निर्बंधांचा वापर करत राहील.म्हणूनच त्यांनी त्या गोष्टीत गुंतवणूक करण्याचानिर्णय घेतला, जी त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहेआणि बाजारपेठेतील चढ-उतारांची अजिबातपर्वा केली नाही.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वृद्धापकाळात एवढे तरीकरा की मन हलके राहील
आजकालच्या पिढीच्या तोंडून ही गोष्ट ऐकायला मिळते की, मी गोष्टीमनावर घेत नाही. म्हणजेच हे लोक जबाबदाऱ्यादेखील खूप हलक्यातघेतात. असे म्हणतात की, गोष्टी मनावर घेणेदेखील फायदेशीर असते.कधीकधी वेदनादेखील जिद्द निर्माण करतात. आपण हीच गोष्ट जुन्यापिढीशी जोडून पाहूया. आजच्या वृद्धांनी जे आयुष्य व्यतीत केले आहे,त्यात त्यांना अनेक वेदना झाल्या असतील आणि माणूस स्वभावानुसार तोया वेदना साठवून ठेवतो. मात्र, म्हातारपणी ही अडगळ सर्वात आधीकाढून टाकावी. वृद्धांनी आपले जीवन असे व्यतीत करायला हवे, जसेरेल्वेत बसून जेव्हा आपण खिडकीतून बाहेरची दृश्ये पाहतो, तेव्हा ती दृश्येसतत मागे सरकत जातात आणि आपण फक्त बसल्या-बसल्या त्याचाआनंद घेतो. कुटुंबातील घडामोडींकडे असेच पाहावे. कुटुंबातीलबोलल्या-ऐकल्या गेलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा जास्त प्रयत्न करू नये.शेवटच्या काळात शरीर आजारांचे घर बनतेच. किमान मन तरी हलकेठेवा. मनावर एखादी गोष्ट घ्यायचीच असेल, तर मनाला फक्त एकाचगोष्टीची आठवण करून द्या की, आता जाण्याची वेळ आली आहे, इथूनचांगल्या रीतीने जाऊया.
शशी थरूर यांचा कॉलम:भारतात जगाच्या नवनिर्मितीची राजधानी बनण्याची क्षमता आहे
भारताला प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीयव्यवसायांसाठी केवळ कमी खर्चातील कार्यालयीनकामांचे केंद्र म्हणून सादर केले जात होते. आजच्यासंदर्भात हे चुकीचे ठरले आहे. भारत आता शोध,उत्पादन-विकास आणि तांत्रिक महत्त्वाकांक्षेच्या सर्वातमहत्त्वपूर्ण केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.जागतिक कंपन्या जिथे आपली उत्पादने विकसितकरतात, लवचिकता वाढवतात आणि आपल्यामहत्त्वपूर्ण प्रणालींचा विस्तार करतात, अशा ठिकाणाच्यारूपात भारताने एक मध्यवर्ती भूमिका प्राप्त केली आहे. या कथेची सुरुवात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स(जीसीसी) उदयापासून होते, ज्यांची स्थापना बहुराष्ट्रीयकंपन्यांनी दोन दशकांपूर्वी सुरू केली होती. त्यांची कारणे स्पष्ट होती - कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमीकरणे. आपल्या मोठ्या, सुशिक्षित आणि इंग्रजी भाषिक मनुष्यबळामुळे भारत जीसीसीचे एक नैसर्गिक केंद्रबनला. येथे भारतीय कर्मचारी जगभरातील कंपन्यांसाठी नियमित माहिती तंत्रज्ञान कामे आणि व्यावसायिकप्रक्रियांचे संचालन करत असत. परंतु भारतीय मनुष्यबळाची क्षमता याहून कितीतरी अधिक होती,त्यामुळे कंपन्यांनी अधिक गुंतागुंतीची कामे - जसे की विश्लेषण, समस्या-निराकरण, सामायिक सेवादेखील हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. हळूहळू जीसीसीकेवळ साहाय्यक घटक राहिले नाहीत, ते आता रणनीतीबनवत होते, प्रकल्पांची आखणी करत होते आणिबौद्धिक संपदेची निर्मिती करत होते. आज भारतावरआधारित जीसीसीची ओळख संपूर्ण मालकी हक्कानेहोते, जिथे भारतीय कल्पनेपासून निर्मिती, चाचणी वअंमलबजावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नेतृत्व करतात. भारतात आता 1800 हून अधिक जीसीसी आहेत,ज्यामध्ये अभियांत्रिकी, वित्त, कायदा, रचना आणिसंशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुमारे 20 लाखव्यावसायिक कार्यरत आहेत. हे जाळे एक शक्तिशालीनवनिर्मिती-चक्र तयार करते. आज अशी परिस्थितीनिर्माण झाली आहे की सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्याउत्पादनाची कल्पना केली गेली असेल, ते बंगळुरूमध्येविकसित केले गेले असेल, हैदराबादमध्ये त्याची चाचणीघेतली गेली असेल, पुण्यात ते सुरक्षित ठेवले गेले असेलआणि काही दिवसांतच ते जागतिक स्तरावर कार्यान्वितकेले जाऊ शकते. कमी खर्चाचा फायदा तर आजहीअस्तित्वात आहे, पण आता त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजेती या सर्वांच्या वेगामुळे मिळणारा फायदा. आणि हे सर्व गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करताहोत आहे. जगातील काही सर्वात प्रगत एआयप्रयोगशाळा आणि महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर डिझाइनटीम आज भारतात स्थित आहेत. भारतातील सुमारे६०% जीसीसी आज एजंटिक एआयमध्ये मोठीगुंतवणूक करत आहेत. या प्रमुख व्यावसायिक प्रणालीआहेत. गोल्डमन सॅक्स बेंगळुरूपासून ते वॉलमार्टग्लोबल टेक इंडियापर्यंत, अनेक कंपन्यांची भारतातीलपर्यायी मुख्यालये आज त्यांच्या अधिकृतमुख्यालयांपेक्षाही तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत. खऱ्या अर्थाने, भारतातील हा जीसीसीचा विस्तार 1991 मधील अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतरच्या सर्वातपरिवर्तनात्मक आर्थिक घडामोडींपैकी एक आहे. यानेव्यावसायिकांचा असा एक नवा वर्ग तयार केला आहे,ज्यांचे काम बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे, जेपारंपरिक सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या तुलनेत कितीतरीअधिक वेतन प्रदान करते आणि जागतिक नेतृत्वापर्यंतपोहोचण्याचे मार्ग मोकळे करते. याचा प्रभाव केवळ प्रथमश्रेणीतील शहरांपुरता मर्यादित नाही. द्वितीय श्रेणी आणितृतीय श्रेणीतील शहरे - जसे की कोइम्बतूर, इंदूर,कोची, जयपूर, भुवनेश्वर, त्रिवेंद्रम इ. देखील उच्च-दर्जाअसलेल्या कामाचे केंद्र म्हणून उदयास येत आहेत.यामुळे महानगरांवरील दबाव कमी होतो, तसेच स्थानिकस्थावर रिअल इस्टेट, किरकोळ अर्थव्यवस्था आणिपायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळते.परिणामी, भारताचा आर्थिक नकाशा अधिक संतुलितहोत आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) आज सिलिकॉन व्हॅलीत ज्या उत्पादनाचीकल्पना केली गेली असेल, ते बेंगळुरूमध्येविकसित केले गेले असेल, हैदराबादमध्येत्याची चाचणी घेतली गेली असेल,पुण्यात ते सुरक्षित ठेवले गेले असेल आणिकाही दिवसांतच ते जागतिक स्तरावरकार्यान्वित केले जाऊ शकते.
नंदितेश निलय यांचा कॉलम:एआयच्या वेगवान प्रवासाशी आपल्या कायद्यांचा ताळमेळ बसेना
अलीकडे अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यांनी यावादाला पुन्हा तोंड फोडले आहे की, निर्णय घेण्याच्याप्रक्रियेत नैतिकता आणि कायदा यांना स्वतंत्र ठेवता येईलकी ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत? एआय कंपनीअँथ्रोपिकच्या मॉडेल्सचा वापर शस्त्रास्त्रे स्वायत्तपणेडागण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, असे केले जाऊ नयेआणि युद्धातील याचा वापर टाळायला हवा, असे अँथ्रोपिकचे मत आहे. दुसरीकडे, ज्या पेंटागॉनने या एआयकंपनीला डेटावर काम करण्याचे कंत्राट दिले होते, त्यांचेमत असे आहे की, हे तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे आणि यामॉडेल्सचा उपयोग युद्धात व्हायला हवा. जेव्हा अँथ्रोपिकनेया निर्णयाला विरोध केला आणि ट्रम्प यांचे म्हणणे मानलेनाही, तेव्हा त्यांना बहिष्कृत करण्यात आले. इतकेच नाहीतर, चिनी टेक कंपनी हुवेईप्रमाणेच त्यांनाही राष्ट्रीयसुरक्षेसाठी धोका असलेल्या श्रेणीत टाकण्याची धमकीदेण्यात आली. नंतर ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की,अमेरिका युद्ध कसे लढेल हे कायदा ठरवेल, कोणत्याहीकंपनीची नैतिक तत्त्वे नव्हेत. म्हणजेच, कायदा आपल्यानिर्णय प्रक्रियेत व्यावसायिक नैतिकतेकडे सहज दुर्लक्ष करूशकतो. पण अखेर कायदादेखील समाजातील शेवटच्यानागरिकाच्या हिताचे रक्षणच करतो आणि त्याचे स्वरूपनैतिकतेशी बांधलेले असते. इकडे भारतात, उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयातम्हटले की, नैतिकता आणि कायदा यांना वेगळे ठेवावेलागेल. न्यायालयाने असे मानले की, जर कायद्यानुसारएखादा गुन्हा ठरत नसेल, तर नागरिकांच्याअधिकारांबाबतचे न्यायालयाचे निर्णय नैतिकता किंवासामाजिक सहमतीने प्रभावित होणार नाहीत. पण कोणताहीकायदा नैतिकतेपेक्षा वेगळा असतो का? जर कायदा हान्यायाची मूल्ये प्रस्थापित करण्याची प्रक्रिया असेल, तरनैतिकतेला त्यापासून कसे वेगळे ठेवता येईल? आज डेटाशी संबंधित नैतिक मुद्दे ही जगातील मोठीचिंतेची बाब बनली आहे. एआयच्या युगात निर्णय घेण्याचामुख्य स्रोत डेटा हाच आहे, परंतु त्याचा वापर अनेकदागोपनीयता, स्वायत्तता, निष्पक्षता आणि भेदभाव न करणेयांसारख्या मूलभूत अधिकारांशी धडकतो, ज्यामुळेनैतिकता आणि कायदा यांच्यातील फरकाचा प्रश्न अधिकगडद होतो. आज तुम्ही तुमच्या फोनच्या वेब ब्राऊझरमध्ये किंवाएखाद्या ॲपमध्ये काहीही टाइप करता, तेव्हा पुढच्याच क्षणीतो डेटा तुमच्या स्क्रीनवर माहितीची एक लांब साखळीतयार करतो. तुम्हाला वाटते की जे तुम्ही विचार करतआहात, तंत्रज्ञानही तेच शोधत आहे. परंतु कंपन्या अनेकदाकोणतीही सूचना किंवा संमती न घेता वैयक्तिक डेटा गोळाकरतात; ज्यामध्ये लोकेशन, ब्राऊझिंग हिस्ट्री, बायोमेट्रिक्स,आवाज, भावना, सामाजिक संबंध यांचा समावेश असतो.कायदा किंवा नैतिकतेच्या आधारे हे योग्य आहे का? अँथ्रोपिकच्या घटनेचा एक नैतिक पैलू हादेखील आहेकी, तंत्रज्ञानाचा विकास किंवा प्रसार किती आणि कसाहोईल हे कायदा बनवणारेच ठरवतात. पण असे वाटते कीकायदा अजूनही एआयच्या विकासाच्या वेगवान गतीपेक्षाबराच मागे आहे. म्हणूनच, कोणत्याही लोकशाहीत जोपर्यंतमतदार या विषयावर कोणताही निर्णय घेत नाहीत, तोपर्यंतनैतिकतेची जबाबदारी कायदा बनवणारे आणि त्यांचा वापरकरणारे या दोघांनाही मिळून उचलावी लागेल. अँथ्रोपिकचेप्रकरण असो किंवा डेटाशी संबंधित नैतिक मुद्दे,कायद्यासोबतच तो ‘मॉरल-कंपास’ त्या निर्णयांच्या गाभ्यातअसायला हवा, जे निर्णय संपूर्ण मानवी समाजावर परिणामकरतात. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
एन. रघुरामन यांचा कॉलम:एकाग्रतेवर लक्ष केंद्रितकरून वेतनवाढ मिळवा
चित्रपटांमधील तो नेहमीचा प्रसंग आठवा, जेव्हा रुग्णालयातील कर्मचारी एखाद्या रुग्णाला वेगाने शस्त्रक्रिया कक्षात घेऊन जातात. लगेच लाल दिवा लागतो आणि कॅमेरा त्या दिव्यावर, जवळील घड्याळावर आणि बाहेर उभ्या असलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर जातो. चेहऱ्यावर तणाव, अस्वस्थता आणि मानसिक थकवा दिसतो. संगीत दिग्दर्शकही तसेच काहीसे संगीत वाजवतो. जोपर्यंत लाल दिवा चालू असतो, तोपर्यंत कोणीही आत जाऊ शकत नाही. आत डॉक्टर शांतपणे काम करत असतात. ते हात पुढे करतात आणि परिचारिका त्यांना कात्री, कापूस, उपकरणे देते. ते शरीरातून गोळी काढतात. शेवटी पुन्हा कापूस, टाके घालण्याचे साधन आणि जखम बंद करण्यासाठी मलमपट्टी मागतात. या संपूर्ण वेळेत लाल दिवा चालूच राहतो आणि तिथे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वस्तू आणण्यासाठी ये-जा करणाऱ्या परिचारिकेव्यतिरिक्त दुसरे कोणीही आत येऊ शकत नाही. या लाल दिव्याचा अर्थ असतो, ‘डॉक्टरांना व्यत्यय आणू नका’. कारण त्यांना रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी एकाग्रतेची गरज असते. पुढच्या प्रसंगात घड्याळ काही तास पुढे गेलेले असते आणि डॉक्टर बाहेर येऊन नातेवाइकांशी बोलण्यासाठी मुखवटा काढतात. अगदी असाच एक प्रयोग ‘फोकस ऑन-ऑफ : फ्युएल युअर अटेन्शन, गेट मोअर डन’ या पुस्तकाच्या लेखकांनी केला. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर एक प्रयोग केला, ज्यामध्ये ते काम करत असताना लाल दिवा लावू शकत होते - ज्याचा अर्थ ‘व्यत्यय आणू नका’ असा होता. त्यांच्याकडे हिरवा दिवादेखील होता, जो इतरांना सांगायचा की आता ते त्यांच्याशी बोलू शकतात. जेव्हा प्रयोग संपला तेव्हा बहुतांश सहकाऱ्यांनी संपूर्ण दिवस लाल दिवा चालू ठेवल्याचे दिसले. यावरून लोक एकाग्रता मिळवण्यासाठी किती अस्वस्थ आहेत हे दिसून येते. लेखक ऑस्कर डे बॉस आणि मार्क टिगचेलार म्हणतात की, खुल्या कार्यालयाची संकल्पना ही मुळात लक्ष विचलित करणाऱ्या भूलभुलय्यासारखी आहे. आज बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांची एकाग्रता कशी वाढवता येईल याचाच विचार करत आहेत. हे दोन्ही लेखक प्राइस वॉटरहाऊस कूपर्स, लॉरिअल आणि अनेक मोठ्या बँका तसेच कायदा कंपन्यांसाठी सत्रे आयोजित करतात. असे यामुळे आहे. कारण पडद्यावर केवळ एका तासात आपले लक्ष आश्चर्यकारकपणे 77 वेळा बदलते. आपण एका पृष्ठावरून दुसऱ्या पृष्ठावर जात राहतो आणि दिवसभरात 74 वेळा आपला इनबॉक्स तपासतो. 2004 मध्ये पडद्यावरील एका कामात आपण 2.5 मिनिटांपर्यंत लक्ष केंद्रित करू शकत होतो, तर 2016 मध्ये आपण 47 सेकंदांपेक्षा जास्त काळही टिकू शकलो नाही. 2026 च्या एकाग्रतेचा कालावधी अद्याप उपलब्ध नाही, परंतु लेखकांना खात्री आहे की आपल्यापैकी बहुतांश लोक एखाद्या कामापेक्षा कंटाळा आल्यामुळे फोन जास्त हातात घेतात. तंत्रज्ञान, एकाग्रता आणि तणावावर अभ्यास करणाऱ्या संशोधक आणि लेखिका ग्लोरिया मार्क यांचे हे गंभीर निष्कर्ष आपल्या एकाग्रतेच्या कालावधीत येणारी घट दर्शवतात. जसजसे तंत्रज्ञान आपले लक्ष विचलित करत आहे, आपला वेळ खात आहे आणि अर्थपूर्ण अनुभव कमकुवत करत आहे, तसतसे मानसोपचारतज्ज्ञ खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लोकांची एकाग्रता परत आणण्याचे नवीन मार्ग आजमावत आहेत. सततच्या व्यत्ययामुळे चिडचिड, अस्वस्थता, थकवा, झोपेची समस्या आणि कमी बुद्ध्यांक यांसारख्या बौद्धिक क्षमतांमध्ये घट होण्यासारख्या समस्या समोर येत असल्याने पडद्यावर आपला वेळ कुठे उडून जातो याची आपल्याला चिंता वाटत आहे. यासाठी लोक उपचार घेत आहेत, कंपन्या कर्मचाऱ्यांना एकाग्रता वाढवण्यास सांगत आहेत. प्रत्येक जण लज्जित आहे की संगणकीय प्रणाली नेहमी जिंकत आहे आणि आपण एकाग्रतेने जीवनातील आवश्यक कामेदेखील करू शकत नाही फंडा असा आहे की, नियोक्ते त्याच कर्मचाऱ्याला पसंती देतील, जो लाल दिवा लावून किंवा इतर मार्गांनी कामावर एकाग्रता दाखवू शकेल. वेतनवाढीचे भविष्य एकाग्रतेवरच अवलंबून आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:मॉर्निंग वॉकला प्रेरणा मिळवण्याचे ठिकाण बनवा
जर तुम्ही हैदराबादच्या कोंडापूरमधील हायटेक सिटीजवळ गच्चीबावली रोडवर चालत असाल, तर उजव्या बाजूला तुम्हाला ‘कोटला विजय भास्कर रेड्डी बॉटनिकल गार्डन’ दिसेल. माझ्या आणि तुमच्यासारख्या बाहेरील व्यक्तींना हे आपल्या शहरातील एखाद्या सुंदर बागेसारखेच वाटते, जिथे लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात. परंतु, त्या इतर मॉर्निंग वॉक आणि येथील वीकेंड मॉर्निंग वॉक यामध्ये फरक आहे. येथे लोक प्रवेशद्वारावर लहान गटांमध्ये गोळा होतात. काही जण रनिंग शूजमध्ये तर काही बॅकपॅकसह येतात. इतर कोणत्याही ठिकाणाप्रमाणेच एकमेकांकडे बघून हसून किंवा हस्तांदोलन करून स्वागत केले जाते, पण येथे एक छोटासा फरक आहे. काही मिनिटांतच गर्दी वाढते आणि तिथे स्टार्टअप्सचे संस्थापक (फाउंडर्स), मार्केटिंग प्रोफेशनल्स, तंत्रज्ञानाची आवड असलेले लोक, उद्योजक आणि समाजाला काहीतरी परत देऊ इच्छिणारे मार्गदर्शक सहज पाहायला मिळतात. त्यानंतर वॉक सुरू होण्यापूर्वी काहीतरी वेगळे घडते. लोक एकमेकांचे वय किंवा दिसण्यावरून नव्हे, तर गरजेनुसार जोड्या बनवतात आणि पार्कच्या 3.5 किमी लांबीच्या वर्तुळाकार ट्रॅकवर वॉक सुरू करतात, जिथे फिटनेससोबतच उद्योजकतेवरही चर्चा रंगते. कुणी प्रॉडक्ट आयडियावर चर्चा करते, कुणी आपल्या स्टार्टअपचा टप्पा समजावून सांगते, तर अनेक जण मार्गदर्शन मागतात. संकल्पना अत्यंत सोपी आहे - सोबत चाला, कल्पनेवर चर्चा करा आणि सोबत पुढे जा. पहिली 45 मिनिटे चालता-चालता कल्पनांची देवाणघेवाण होते. ज्युनियर लोक प्रश्न विचारतात, वरिष्ठ उत्तरे देतात आणि ज्ञानाचे हस्तांतरण होते. अनेक लोक आपल्याला नक्की काय हवे आहे हे उघडपणे सांगतात. उदाहरणार्थ, गुंतवणूकदार, सह-संस्थापक, भागीदार किंवा सुरुवातीचे ग्राहक. काहींना आपल्या कल्पनेवर शिक्कामोर्तब (व्हॅलिडेशन) हवे असते, तर काहींना प्रामाणिक फीडबॅक हवा असतो. अनेकदा सोबत चालणारे लोक, मार्गदर्शक आणि आयोजक तात्काळ सूचनाही देतात. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत हैदराबादमधील अनेक तरुणांसाठी हे केवळ तंदुरुस्त राहण्याचे साधन नसून, व्यवसाय, उत्पादन आणि स्टार्टअपमधील आव्हानांवर चर्चा करण्याची एक संधी असते. हे केवळ याच पार्कमध्ये नाही, तर हैदराबादच्या अनेक ठिकाणी घडते. पार्कमध्ये 3500 पावले चालल्यानंतर आता अधिक नियोजित चर्चा सुरू होते. लोक प्रवेशद्वाराजवळील ‘ग्राउंड झीरो’वर परत येतात. संस्थापक गटासमोर आपली कल्पना मांडतात. कधी सुरुवातीची संकल्पना, तर कधी विकसित होत असलेल्या उत्पादनांबद्दल माहिती देतात. गुंतवणूकदार यामध्ये संधी शोधतात आणि कामकाजाच्या दिवशी भेटण्यास सांगतात. भेटीगाठी ठरतात आणि आराखडा तयार होतो. आयोजकांना माहीत आहे की कोणत्याही स्टार्टअपसाठी सुरुवात हा सर्वात कठीण टप्पा असतो. जर ही सुरुवात बागेसारख्या अनौपचारिक ठिकाणी झाली, तर कल्पना समोर येताच व्यवसाय पुढे नेणे सोपे होते. ‘फिटनेस आणि उद्योजकता एकत्र आणण्यासाठी पार्क ही सर्वात योग्य जागा आहे,’ असा आयोजकांचा दावा आहे. दर रविवारी येथे संस्थापक, गुंतवणूकदार किंवा उद्योग तज्ज्ञांपैकी कुणीतरी अतिथी वक्ता म्हणून येतो आणि उद्योजकता, नेतृत्व व विकासाबद्दल माहिती देतो. अनेक लोकांसाठी ही पूर्णपणे मूल्ये आणि ज्ञानाची देवाणघेवाण आहे. नियमितपणे लोकांना भेटत राहिल्यास एखाद्या दिवशी एखादा भागीदार किंवा ग्राहक मिळू शकतो, असे काहींना वाटते. विशेष म्हणजे, या भेटीसाठी आता इतर शहरांतील लोकही येऊ लागले आहेत. या उपक्रमामागील व्यक्ती चेनप्पा नायडू यांचे असे मानणे आहे की, उद्योगाशी संबंधित ज्ञान विनामूल्य आणि अधिक सुलभ करण्यासाठी हे त्यांचे योगदान आहे. कारण अनेक लोकांना काहीतरी सुरू करायचे असते, पण सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नसते. फंडा असा आहे की, लवकर उठा, संवादासाठी एकत्र या आणि कल्पना शेअर करा. कुणास ठाऊक, बागेतील वाटेवर चालता-चालता तुमची स्टार्टअप आयडिया बूटस्ट्रॅपमधून (बाहेरून निधी न घेता स्वतःच्या पैशाने सुरू केलेला उद्योग) बाहेर पडून भावी पिढीच्या टी-शर्टवरील स्लोगन बनेल.
एन. रघुरामन यांचा कॉलम:या ‘समर चॅलेंज’ला जिंकून बना विजेते
उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये फक्त तापमानच वाढत नाहीये, तर घराच्या खर्चातही मोठी वाढ होत आहे. ज्या लोकांनी नवीन एअर कंडिशनर्स किंवा स्टेबलायझर्सच्या ‘पॅनिक बायिंग’पासून स्वतःला वाचवले होते, त्यांना अचानक नवीन खर्चाने घेरले आहे. इंडक्शन चुली आणि त्याला पूरक असलेल्या भांड्यांची अचानक खरेदी वाढली आहे. गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे मजबुरीने लोकांना विजेवर स्वयंपाक करण्याचे पर्याय स्वीकारावे लागले आहेत. याने महिन्याचे बजेट सुरुवातीलाच बिघडवले आहे. यामुळे विजेचे बिल तर वाढतच आहे, पण खरा फटका त्या छोट्या दैनंदिन खर्चांमुळे बसतो ज्यांच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. या उष्णतेच्या दिवसात कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस व ग्लुकोजचा वापर घरांमध्ये वाढतो. दरम्यान, आंब्यासारख्या फळांचे चढे दरही बजेट बिघडवत आहेत. दुपारच्या उन्हापासून वाचण्यासाठी साध्या ऑटो-रिक्षाऐवजी एसी कॅबची निवडदेखील आपल्या खिशावरील ओझे वाढवत आहे. वाढत्या उन्हात सुती कपडे आता लक्झरी नाही, तर गरज बनले आहेत, जे बजेटचा एक मोठा हिस्सा मागतात. या वेळी हंगामी महागाईसोबतच आर्थिक वातावरणही आव्हानात्मक होत चालले आहे. खाण्याच्या वस्तू, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी गुड्सच्या वाढत्या किमती सामान्य माणसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘गरीब’ झाल्यासारखे वाटायला लावत आहेत. 5-7% चा अंदाजित महागाई दर बजेट बनवण्याच्या निर्णयांवर भारी पडेल. यामुळे आजचा खर्च आणि उद्याची बचत यामध्ये एक कठीण निवड करावी लागेल. त्यातच पश्चिम आशियातील वाढता तणाव आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. जर हा संघर्ष जास्त काळ खेचला गेला, तर इंधन आणि सप्लाय चेनवर पडणारा परिणाम प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचेल. मात्र मंदीचा तात्काळ धोका नाही, पण बाजारातील सुस्ती नाकारता येत नाही. उन्हापासून वाचण्यासाठी अनेक लोक विचार करतात की ते मॉलमध्ये जाऊन ‘मोफत’ एसीचा आनंद घेऊन वीज वाचवत आहेत. पण ही रणनीती अनेकदा उलट वार करते. जसे तुम्ही मॉलमध्ये शिरता, विचार न करता खरेदी करण्याचे मानसशास्त्र वरचढ होते. ‘एंड ऑफ सीझन सेल’ आणि महागड्या आइस्क्रीम संडेच्या नादात, तो ‘मोफत’ एसी घराच्या दिवसभराच्या वीज बिलापेक्षाही महाग पडतो. मॅनेजमेंट टिप: डगमगता बाजार आणि अनपेक्षित महागाईदरम्यान आपला खिसा रिकामा होणे निश्चित आहे. आता अशी वेळ आली आहे जेव्हा आपण ‘ताकही फुंकून’ प्यायला हवे. म्हणजेच प्रत्येक छोट्या खर्चाबाबत अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचा कॉलम:कैवल्याच्या चांदण्याचा चकोर- अशोकजी परांजपे
प्रसिद्ध कवी आणि लोककलेचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांचा 9 एप्रिल हा स्मृतीदिन. सांगली जिल्ह्यातील हरीपूर हे त्यांचे जन्मगाव. “आपल्या गावातून मी बाहेर पडलो म्हणून आज जे काही आहे ते आहे. नसता नुसते पारायण आणि जप करत बसलो असतो,” असे ते विनोदाने म्हणत. मुंबईत त्यांच्या कलासंपन्न व्यक्तिमत्त्वाला खरी ओळख मिळाली. त्यांची अनेक गाणी अशोक परांजपे यांच्या पत्नी यांनी संगीतबद्ध केली असून सुमन कल्याणपूर यांनी ती गायली आहेत. ही गाणी अतिशय मधुर असून खूप लोकप्रिय झाली. त्यात ‘नाव आहे आदीअंती’, ‘पाखरं जा दूर देशी’, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणू’, ‘एकदाच यावे सखया’, ‘कुणी विंचावे वा वंदावे’, ‘आला आला गं सुगंध मातीचा’, ‘नाविक रे वारा वाहे रे’, ‘केतकीच्या बबी तिथे’ ही गाणी विशेष गाजली. याशिवाय ‘अवघे गरजे पंढरपूर’ आणि ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ही गाणी त्यांच्या काव्यप्रतिभेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अशोकजी परांजपे यांची ओळख मला संभाजीनगरला (तेव्हाचे औरंगाबाद) आल्यानंतर, साधारण 1998 च्या सुमारास झाली. त्यावेळी माझा पहिला काव्यसंग्रह ‘चांदण चाफा’ प्रकाशित होण्यासाठी तयार होता. प्रकाशिका डॉ. शांता जोशी यांनी माझ्या मागे लागून तो संग्रह पूर्ण करून घेतला. “आणखी किती दिवस या चांगल्या कविता अशाच बसवून ठेवणार आहेस?” या त्यांच्या आग्रहामुळे मी संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्या पुस्तकाला फ. मुं. शिंदे सरांनी छान पाठराखण लिहून दिली. प्रकाशन समारंभ पैठण येथे करण्याचं ठरल्यानंतर अशोकजी शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते अगदी तत्परतेने तयार झाले. तसे ते आमच्या उषा मावशीचे यजमान म्हणजे नातेवाईकच असलेले, पण त्यांच्या भोवतीच्या वलयामुळे ते येतील किंवा नाही अशी धाकधूक वाटत होती. उषा मावशी म्हणजे डॉ. उषा भोरे या आम्हाला शरीरशास्त्र शिकवत असत. वैद्यकीय महा. औरंगाबादमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर बाबा शरीरशास्त्र विभागात त्यांना भेटायला घेऊन गेले होते. 'अरे मधु, तुझी मुलगी का ही?' अशी त्यांच्या उत्साही शैलीत त्यांनी विचारपूस केली होती. 'कधींही काही लागलं तर माझ्याकडे ये' असा दिलासाही त्यांनी दिला होता. कारण नांदेडहून एकदम या मोठ्या महाविद्यालयात आल्यावर रॅगिंग वगैरेचं दडपण होतंच. त्यांचं आणि अशोकजीचं नातं मात्र त्या पुढे मुंबईला बादलून गेल्यानंतरच जुळलं. पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस त्यांच्याशी भरपूर आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. तुम्ही अशोकजी असं नाव का लावता असं विचारल्यावर ते म्हणाले. “कुणीही ऐरागैरा माणूस आपल्या नावासमोर साहेब लावतो.' आपण कलावंत लोक त्यांच्या पुढे किरकोळ दिसायला नकोत, त्यामुळे जी लावले की आपोआप आदबशीर वाटतं.” सांगलीहून मुंबईला आल्यावर त्यांनी लोककला, संगीत, गीतलेखन या क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली. महा. राज्य लोककला संचालनालय, (आय. एन. टी.) मध्ये त्यांच्या प्रतिभेला वाव मिळाला. त्यांच्या कलासुक्त मनाला इथे आनंदायी काम मिळाले. संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी 1986 मध्ये आनंदवन येथे आदिवासी कला महोत्सवाचे आयोजन केले. त्यानंतर 1992 मध्ये पंढरपूर भक्ती महोत्सवाचे आयोजन केले, त्यात सुदूर भागातल्या लोककलावंतांना संधी दिली. या उत्सवांची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली आणि त्यांना ऑस्ट्रिया येथील Iov (Institute of Vidografhy) चे सभासदत्व दिले. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या लोककला वंतांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. या कलाकरांमध्ये सिल्लोडचे निरंजन भाकरे हेही होते. पुढे काही दिवसानंतर त्यांच्याबरोबरच्या गप्पामधून त्यांनी असं सुचवलं की, त्यांचा एखादा कार्यक्रम पैठणला ठेवावा. 'असे गीत जन्मा येते' हा मथळा त्यांनीच सुचवला आणि त्यांची गाणी व इतर अनुभवांवर आधारीत दीड तासांचा कार्यक्रम करायचा ठरला. आमच्या पैठण येथील घराच्या गच्चीवर आरामात शे दोनशे माणसं बसू शकतात. मग तिथेच एका संध्याकाळी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला. पैठणमधील सगळी रसिक मंडळी श्रोते म्हणून आली आणि दीड तास श्रोत्यांना अशोकजींनी मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या गाण्यांविषयी, सुमन कल्याणपूर यांच्या गायना विषयी, स्वतःच्या बालपणीचे आणि नंतरच्या तरुणपणीचे किस्से, अशोक पत्की यांच्या संगीता विषयी ते एकदम खुलून बोलले. या कार्यक्रमानंतर जेवणाच्या दरम्यान झालेल्या मोकळ्या गप्पामधून तर असा काही त्यांच्या सूर लागला की बस्स! कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा मुक्काम पैठणला होता. उत्तर जायकवाडीच्या नाथ सागराच्या जवळ असणाऱ्या विश्राम गृहात त्यांची सोय केलेली होती. त्या अवधीतही त्यांनी बाळासाहेब पाटलांच्या घरी काही लोककलावंतांना बोलावून घेतलं होतं. त्यांचं सादरीकरण त्यांनी पाहिलं. लोककला हा त्यांचा ध्यासाचा विषय असल्यामुळे ते तिथे जात तेथील चांगलं टिपून घेत. आपल्या लोककलांना जपलं पाहिजे त्यासाठी त्यांना लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्ही मिळायला हवा ही त्यांची धडपड होती. यथावकाश माझा दुसरा तिसरा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. औरंगाबादच्या एका कवीसंमेलनात मी 'खजुराहो' वरील कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला ते जातीने हजर होते. शेवटी म्हणाले, “मला माहीतच नव्हतं की तुझ्या कविता इतक्या सुंदर आहेत. आपल्याकडे कुणी असं दुसऱ्या विषयी चांगलं सांगतच नाही.” त्यांच्यासारख्या जाणकार रसिकाची दाद मला खूप सुखावून गेली. मी फक्त पन्नास कि.मी. अंतरावर पैठणला रहात होते, तरी आम्हाला हॉस्पिटल सोडून त्यांच्याकडे सारखं भेटायला जाता येत नसे. मग मी त्यांच्याशी पत्राद्वारे संवाद चालू ठेवला. त्यांचं उत्तर आंतरदेशीय पत्रावर येत असे. परंतु त्यातही सुरेख अक्षरातला मजकूर आणि एखादं रेखाचित्र असे. हो हे सांगायचं राहिलंच की चित्र कलेतही त्यांना उत्तम गती होती. त्यांची ही सुबक आणि जिव्हाळ्याने ओतपोत भरलेली पत्रे अजून माझ्या संग्रही आहेत. नंतर पत्रसंवादही विरळ होत गेला. आणि अचानक बातमी आली की त्यांनी आपलं जीवन संपवूनच टाकलंय! कलावंत असणारा माणूस कायम अस्वस्थ असतो. त्याच्यातल्या कलाकाराला नीट पैस मिळाला नाही, नवनिर्मितीची ऊर्जा मिळाली नाही तर तो विझत जातो. मुंबईतल्या सांस्कृतिक वातावरणात त्यांना जी ऊब मिळत होती ती इकडे कुठे… त्यामुळे कदाचित त्यांना उदासीने घेरलं आसावं. पण माणूस म्हणूनही उत्तम असलेल्या या चतुरस्त्र कलाकाराचा शेवट सर्वांनाच चटका लावून गेला. कैवल्याच्या चांदण्याची भूक असलेले ते कलावंत होते. स्वतःच चकोर होते. (डॉ. ऊर्मिला चाकूरकर, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ आणि साहित्यिक, पैठण)
एन. रघुरामन यांचा कॉलम:कधी-कधी शांत लोक सर्वात खोल प्रभाव सोडून जातात
ते 70 वर्षांचे असतील. त्या दिवशी ते एका साधारणशा कॅफेमध्ये आले. अनेक लोक त्या जागेला यासाठी पसंती द्यायचे कारण ती V आकारात स्थित होती, जिथून ग्राहक एकाच वेळी दोन रस्ते पाहू शकत होते. ते दुपारी 2:30 वाजता आले आणि 4:30 वाजेपर्यंत तिथेच बसून राहिले. मालकाने याची फारशी पर्वा केली नाही, कारण त्या वेळी कमीच ग्राहक यायचे. त्यांनी मेन्यूतील सर्वात स्वस्त पदार्थ- एक ब्लॅक कॉफी मागवली आणि दोन तास त्याच कॉफीसोबत बसून राहिले. मग ते रोज त्याच वेळी येऊ लागले, ते तीच ऑर्डर द्यायचे आणि रोज त्याच वेळी जायचे. ते ना फोन वापरायचे, ना पुस्तक वाचायचे, फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना पाहत बसायचे. ते बेघर वाटत नव्हते, त्यामुळे कॅफे मालकाने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना समजले की त्यांचे नाव वॉल्टर आहे आणि नुकतेच त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. एका महिन्याच्या नियमित भेटींनंतर एक दिवस मालकाने त्यांना केकचा एक तुकडा दिला. वॉल्टर म्हणाले, मी तर याची ऑर्डर दिली नव्हती. मालकाने उत्तर दिले, हे आमच्याकडून आहे. ते गप्प बसून राहिले आणि लोकांना जाताना पाहत राहिले. एक दिवस ते म्हणाले, मी इथे काही आवाजांसाठी येतो- थोड्या उबदारपणासाठी, एकटे नसल्याच्या जाणिवेसाठी. मालकाला त्यांची सवय झाली, कारण ते 6 महिन्यांपर्यंत नियमितपणे येत राहिले होते. आणि मग एक दिवस ते आले नाहीत. त्या दिवशी मालकाच्या लक्षात आले की 2:30 वाजता आपली नजर वारंवार दरवाजाकडे जात होती. दुसऱ्या दिवशीही ते आले नाहीत. मग एक आठवडा उलटला आणि वॉल्टरचा काहीच पत्ता नव्हता. एका महिन्यानंतर, एक प्रौढ महिला कॅफेमध्ये आली. ती इकडे-तिकडे अशी पाहत होती, जणू काहीतरी शोधत असावी. तिने काउंटरवर विचारले, तुम्हीच या कॅफेचे मालक आहात का? मालकाने होकार दिला. महिला म्हणाली, माझे वडील इथे यायचे- वॉल्टर. मालकाचे हृदय धस्स झाले. त्याने हळू आवाजात म्हटले, हो, ते काही काळापासून आले नाहीत. महिलेने हलक्या उदासीने सांगितले, गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले. हे शब्द कॅफे मालकाला खूप टोचले, पण त्याच्या तोंडातून एवढेच बाहेर पडले- हे ऐकून खूप दुःख झाले. तेव्हा महिलेने फिकट हास्य करत म्हटले, माझे वडील या जागेबद्दल नेहमी बोलायचे. ही त्यांची दुसरी लिव्हिंग-रूम होती. मग तिने आपल्या पर्समधून एक पाकीट काढले आणि म्हणाली, त्यांनी हे तुमच्यासाठी सोडले आहे. ते उघडताना मालकाचे हात थोडेसे थरथरले. पाकिटात एक हस्तलिखित पत्र होते. त्यात लिहिले होते : दयाळू कॅफे मालकास, कदाचित तुम्हाला याची जाणीव नसेल, पण तुम्ही मला कॉफीपेक्षा खूप काही जास्त दिले आहे. पत्नीच्या निधनानंतर माझे दिवस खूप मोठे झाले होते. मला माझ्या मुलीवर ओझे बनायचे नव्हते. तिने माझा एकटेपणा पाहावा असे मला वाटत नव्हते. तुमच्या कॅफेने मला माझे आयुष्य जगण्याचे एक कारण दिले. तो अतिरिक्त केक व तुमची ती अतिरिक्त नम्रता माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाची होती. धन्यवाद, की तुम्ही एका म्हाताऱ्या माणसाला त्या कोपऱ्यात बसू दिले. -वॉल्टर. पाकिटात धनादेशही होता. त्यात खूप मोठी रक्कम नव्हती, पण वॉल्टरने आतापर्यंत त्या कॅफेमध्ये जेवढी रक्कम खर्च केली होती, त्यापेक्षा ती जास्तच होती. त्यांची मुलगी म्हणाली, हे काइंडनेस-फंडसाठी आहे. त्यांची इच्छा होती की तुम्ही याचा वापर अशा व्यक्तीच्या मदतीसाठी करावा, ज्याला कदाचित बसण्यासाठी एखाद्या जागेची गरज असेल. तेव्हा कॅफे मालकाला अश्रू लपवण्यासाठी चेहरा दुसरीकडे वळवावा लागला. त्याने तिथे एक बोर्ड लावला : जर तुम्हाला बसण्यासाठी एक उबदार जागा हवी असेल, तर तुमचे इथे स्वागत आहे. त्या दिवसानंतर, कधी एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करायचा, कधी एखादी विधवा तिथे विणकाम करायची, किंवा एखादी व्यक्ती तिथे गप्प बसायची. प्रत्येक वेळी जेव्हा तो कुणाला कॉफी द्यायचा, तेव्हा सोबत वॉल्टरच्या नावाने एक केकही द्यायचा. फंडा हा आहे की, कुणालाही सर्वात मौल्यवान गोष्ट जी आपण देऊ शकतो, ती म्हणजे अतिरिक्त अन्न नाही, तर ते एकटे नाहीत हा दिलासा आहे.
मार्क फडौल यांचा कॉलम:तुमच्या चॅटबॉटच्या कानात कोण कुजबुज करतेय?
अल्गोरिदम कधीच तटस्थ नसतात. असे असूनही गेल्याएका दशकाहून अधिक काळ आपण ‘बिग टेक''कंपन्यांना आपल्या माहितीच्या ‘इको-सिस्टम''चेद्वारपाल बनण्याची परवानगी दिली आहे. तेहीत्यांच्याकडे कोणतीही पारदर्शकता किंवा जबाबदारीचीमागणी न करता. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावेलागले आहेत. यात ध्रुवीकरण आणि खळबळजनकआशयाचा प्रसार होणे, ‘पर्सनलाइज्ड'' जाहिराती आणिएकाधिकारशाहीला खतपाणी मिळणे यांचा समावेशआहे. तसेच, लोकशाहीतील विचारमंथनाला मारकठरतील, असे परिणामही सार्वजनिक चर्चांवर झालेआहेत. माहितीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणतीही देखरेख नसताना त्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातीसोपवल्यास काय होते, याचा धडा आपण भूतकाळात शिकलो आहोत. तरीही आपण“एआय'' चॅटबॉट्सच्या बाबतीत तीच चूक पुन्हा करत आहोत. हे चॅटबॉट्सकेवळ सध्याच्या माहितीचे संकलन करत नाहीत; तर ते स्वतः माहिती तयार करतात (जनरेट करतात) आणितिचे स्वरूपही ठरवतात. तुम्हाला कोणत्या बातम्याआणि कोणते लेख दाखवले जावेत, हे फेसबुक आणिगुगल ठरवत असत. पण आता चॅटजीपीटी, क्लॉडआणि जेमिनाय यांसारखी ''एआय टूल्स'' त्याचमाहितीचा सारांश तुमच्यासमोर असा मांडतात, जणूकाही ती एक अधिकृत माहितीच आहे! माहिती गोळाकरण्यापासून ते तिचे संपादन करण्यापर्यंतचा हा प्रवासखूप महत्त्वाचा आहे. आपण भविष्यातील माहितीच्यापायाभूत सुविधा खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवतआहोत. तेही कोणत्याही स्वतंत्र देखरेखीची मागणी नकरता. यात सर्वात मोठा धोका हा आहे की, स्वतःच्यास्वार्थाने चालणारे काही मोजकेच लोक एका मोठ्यालोकसंख्येसाठी माहितीचे रखवालदार बनत आहेत.सध्याचे चॅटबॉट्स हे केवळ ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स''(एलएलएम) नाहीत. ते अनेक अपारदर्शकअल्गोरिदमवरही आधारित असतात. या अल्गोरिदमचेकिमान पाच स्तर असतात. पहिला स्तर म्हणजे‘ट्रेनिंग-डेटा''चे संकलन. प्रशिक्षणादरम्यान कोणता डेटाघ्यायचा किंवा कोणता वगळायचा, यावर अपारदर्शकनिर्णय घेतले जातात. पण यातूनच मॉडेलचीविचारसरणी ठरत असते. उदाहरणार्थ, ऑक्टोबर 2025मध्ये इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘ग्रोक'' चॅटबॉटलाट्रेनिंग-डेटा उपलब्ध करून देण्यासाठी“ग्रोकिपीडिया''सुरू केले होते. कॉर्पोरेट नियंत्रण असलेला हाविश्वकोश विकिपीडियाला एक ‘अँटी-वोक'' पर्यायम्हणून समोर आणला गेला. दुसरा स्तर म्हणजे‘रिइन्फोर्समेंट लर्निंग''. मॉडेल विकसित करण्याच्या याप्रशिक्षणानंतरच्या टप्प्यात, मानवी परीक्षक उत्तरांचे(आउटपुटचे) मूल्यमापन करतात. पण आता त्यांचीजागा वेगाने ''एआय'' शिक्षक घेत आहेत. आधीचठरवलेल्या तत्त्वांनुसार मूळ मॉडेल तयार करणे, हात्यांचा उद्देश असतो. तिसरा स्तर म्हणजे ‘वेब-सर्च''.जेव्हा चॅटबॉट्स ऑनलाइन शोध घेतात किंवा डिजिटलडेटाबेसपर्यंत पोहोचतात, तेव्हा ‘रिट्रिव्हल-ऑगमेंटेड-जनरेशन'' प्रणाली मॉडेलच्या उत्तरात कोणती माहितीसमाविष्ट करायची हे ठरवते. पण चॅटबॉटच्या उत्तरातजाहिरातींचा समावेश केल्यास त्यांच्यानिःपक्षपातीपणावर आणखी प्रश्नचिन्हे निर्माण होतात.चॅटजीपीटीने 2026 साठी अशीच घोषणा केली आहे.चौथा स्तर ‘सिस्टीम प्रॉम्प्ट्स''चा आहे. एखादा चॅटबॉटउत्तर देत असतो, तेव्हा हे प्रॉम्प्ट्स सक्रिय होतात.त्यामुळे मॉडेलला पुन्हा प्रशिक्षण न देताच प्लॅटफॉर्म्सनाचॅटबॉटच्या वागणुकीत बदलाची मुभा मिळते.उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ‘ग्रोक''चा सिस्टीम प्रॉम्प्टसार्वजनिक करण्यात आला होता. त्यात‘राजकीयदृष्ट्या चुकीचे दावे करण्यास संकोच करूनका'' अशा सूचनांचा समावेश असल्याचे आपल्यालासमजले. शेवटचा स्तर ''सेफ्टी फिल्टर''चा (सुरक्षाफिल्टर) आहे. चॅटबॉटला विचारलेला प्रश्न (क्वेरी)मॉडेलपर्यंत पोहोचण्यापूर्वी ''इनपुट फिल्टर'' तोस्वीकारार्ह आहे की नाही हे ठरवतात. ट्रम्प यांच्याशपथविधीनंतर ॲपलने त्यांच्या ‘एआय'' प्रशिक्षणसूचनांमध्ये बदल केला होता. 2025 मध्ये ‘नेचर''मासिकात प्रसिद्ध अभ्यासात असे दिसून आले आहे की,एखाद्या उमेदवाराच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठीप्रशिक्षित केलेले चॅटबॉट्स मतदारांना सहजपणे प्रभावितकरू शकतात. (सौजन्य : प्रोजेक्ट सिंडिकेट) आपण सोशल मीडियाच्या बाबतीत एकचूक केली होती, तीच चूक आता ‘एआय''चॅटबॉट्ससोबत करत आहोत. हेचॅटबॉट्स आता केवळ उपलब्ध माहितीगोळा करत नाहीत; तर ते स्वतः माहितीतयार करतात. तिचे स्वरूपही ठरवतात.
रीटा कोठारी यांचा कॉलम:आपल्याकडील अनुभवांसाठी जवळ नेहमी शब्द असतात?
अनेक वर्षांपूर्वी मी माझ्या काकूंना एका प्रसिद्धहोमिओपॅथी डॉक्टरांकडे घेऊन गेले होते.होमिओपॅथीमध्ये नेहमी विचारतात तसे, डॉक्टरांनीकाकूंना अनेक प्रश्न विचारले. ‘तुम्ही कुठे राहता?'',‘घरात कोण-कोण असतं?'',‘तुम्हाला काळजीकरण्याची सवय आहे का?'', ‘तुम्हाला लगेच राग येतोका?'' असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. माझ्याकुटुंबातील ज्येष्ठ मंडळी फारशी शिकलेली नाहीत.माझ्या काकूंना जेमतेम स्वतःचे नाव लिहिता येते.वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले होते आणित्यांना अकरा मुले होती. डॉक्टरांनी त्यांना विचारले,‘तुमचा जन्म कुठे झाला? तुम्ही कुठे लहानाच्या मोठ्याझालात?'' काकू म्हणाल्या, ‘माझा जन्म सिंधमध्येझाला. त्यानंतर आमचे कुटुंब अजमेरला गेले. लग्नानंतरमी अहमदाबादला आले.'' ‘सिंधवरून अजमेरला येणंकसं झालं?'' असे विचारल्यावर काकू म्हणाल्या,‘जेव्हा हिंदुस्थान-पाकिस्तान झालं ना, तेव्हा!''गुजरातमध्ये राहणाऱ्या त्या डॉक्टरांना काही समजलेनाही. त्यांनी विचारले, ''कोणत्या वर्षी?'' काकूम्हणाल्या, ते मला माहीत नाही बाबा!'' फाळणी हेआमच्या घराचे वास्तव होते. पण हा शब्दचआमच्यासाठी अनोळखी होता. ‘हिंदुस्थान-पाकिस्तानझालं'' या वाक्याचे अनेक अर्थ काढता येऊ शकतात.हिंदुस्थान होता. तो पाकिस्तान बनला; किंवा दोनशब्दांमध्ये रेष ओढून सांगायचे तर, दोन देश बनले -हिंदुस्थान आणि पाकिस्तान. मी हा संवाद कधीचविसरू शकले नाही. सिंधी समाजात ‘विर्हांगो'' या शब्दाचाही वापर केलाजातो. पण हा शब्द सहसा साहित्यिक लोक वापरतात.माझ्या काकूंसारख्या लोकांना हा शब्दही माहीत नव्हताआणि 1947 हे वर्षही त्यांना ठाऊक नव्हते. कदाचितइतिहास आणि स्मृतीचं हेच नातं असतं. एक जणघटनांना नाव देतो. तर दुसरी निनावी घटनांचा खोलप्रभाव मागे सोडून जाते. पुढच्या काही वर्षांत मीफाळणीनंतर सिंधमधून स्थलांतर करणाऱ्या लोकांच्यामुलाखती घेण्यास सुरुवात केली. मला माझ्याकाकूंकडूनही त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे होते. त्यांनीमला सांगितले की, त्या कुटुंबासोबत हैदराबादला(सिंधमधील) गेल्या होत्या. तिथून त्यांनी ट्रेननेराजस्थानमधील पालीपर्यंतचा प्रवास केला. कोणीतिकीट तपासायला यायचे, तेव्हा त्यांना कुठेतरी लपवलेजायचे. कारण त्यांच्याकडे तिकीट नव्हते. त्या मलाआणखी काही सांगणार, तेवढ्यात त्यांचे पती म्हणजेचमाझे काका तिथे आले. त्यांनी काकूंना मध्येच थांबवलेमाणसांनी भरलेल्या त्या घरात काकूंना कधीच एकांतातबोलण्याची संधी मिळाली नाही. त्यांची गोष्ट कायमचीदबूनच राहिली. अनुभव असलेल्यांकडे अनेकदाइतिहासात वापरले जाणारे शब्द नसतात. ते आपलेअनुभव विशिष्ट शब्दांत किंवा अनेकदामोडक्यातोडक्या वाक्यांतून मांडतात. मानसिक आघातकिंवा धक्क्याचे अनुभव सांगण्यासाठी नेहमीच शब्दअसतात का? ते अनुभवाला न्याय देऊ शकतील? हीझाली माणसांची गोष्ट; पण प्राण्यांचे काय? सिंधी भाषेत‘बैल'' नावाची एक कथा आहे. मी त्या कथेचा अनुवादकेला आहे. फाळणीनंतर पंजाबमधून आलेले काहीशेतकरी सिंधमधील गावांमध्ये पोहोचतात. त्यापैकीशम्सुद्दीन नावाचा एक शेतकरी आपले बैल तिथल्याएका सिंधी शेतकऱ्याला देतो. त्या बदल्यात तोत्याच्याकडून दुसरे बैल आणि गाढवे घेतो. पण, दोन्हीशेतकरी आपल्या बैलांना सूचना देऊ लागतात, तेव्हात्यांना जाणवते की बैलांना त्यांची भाषाच समजतनाहीये. अखेर निराश होऊन दोघेही एकमेकांचे प्राणीपरत करतात. कथेच्या शेवटी तो सिंधचा शेतकरी विचारकरतो, ‘ बैलांची ही अवस्था आहे, तर इथून गेलेल्यासिंधी बांधवांची काय अवस्था झाली असेल?'' शब्द आणि अनुभव यांची एकमेकांशी सांगड बसतनाही. इतिहास हा सर्वांबद्दल असतो, असे मानले जाते.पण अनेकदा इतिहास फक्त व्यक्त करण्यासाठी शब्दअसलेल्यांचा असतो. ही एक मोठी शोकांतिकाच आहेकी, विभाजनाच्या विनाशकारी घटनेसाठीफाळणीसारखा असा शब्द वापरला जातो; त्याचा सरळअर्थ वाटून घेणे किंवा वाटणी करणे असा होतो. आम्हीया भयानक अनुभवासाठी अजिबात तयार नव्हतो.आमच्या भाषेत यासाठी कोणतीही सोय नव्हती. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) अनुभव असतात त्यांच्याकडे अनेकदाइतिहासात वापरले जाणारे शब्दनसतात. ते अनुभव मोडक्यातोडक्यावाक्यांतून मांडतात. ते ऐकण्यासाठीआपल्याकडे वेळ आणि संयम नसतो.
एन. रघुरामन यांचा कॉलम:हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये रस असेल तर डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित करा
तुम्ही कधी शनिवारी आरोग्य तपासणीसाठी गेला असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की, रुग्णालयांमध्ये हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो आणि रजिस्ट्रेशन काउंटरवरची लांब रांग पाहून तुम्ही निराश झाला असाल. याची दोन कारणे आहेत : 1. कोणत्याही रुग्णाला रविवारची सुट्टी अशा कामात घालवायची नसते.2. रजिस्ट्रेशन काउंटरवर केवळ रुग्णाचा टेलिफोन नंबर टाकून त्याचे जुने रेकॉर्ड काढणे सोपे नसते. त्यामुळे नाव, पत्ता आणि आजारासारख्या त्याच जुन्या नोंदी पुन्हा घ्याव्या लागतात. मला तर हे सांगण्याचा अधिकार नाही, पण वैद्यकीय क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती असे सांगते. अपोलो हॉस्पिटल, हैदराबादच्या व्यवस्थापकीय सहसंचालक डॉ. संगीता रेड्डी यांनी नुकतेच अधिकृतपणे सांगितले की, ‘डॉक्युमेंटेशन, वेगवेगळ्या प्रणालीमध्ये माहिती शोधणे, एकच नोंद वारंवार करणे आणि विस्कळीत वर्कफ्लोचे व्यवस्थापन करण्यात खूप वेळ खर्च होतो. हे ओझे कमी झाल्यावर क्लिनिशियन्स त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतील, जी इनोव्हेशन किंवा पैशाने विकत घेता येत नाही आणि ती म्हणजे- रुग्णांवर लक्ष देणे.’ केअर इंडस्ट्रीच्या या प्रख्यात प्रतिनिधीच्या विचारानुसार परिस्थिती खूप लवकर बदलणार आहे. कारण भारताचे हेल्थकेअर क्षेत्र रेकॉर्ड््स डिजिटाइज करण्यात मोठी प्रगती करत आहे. आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी जोडलेल्या खात्यांबद्दल बोलायचे झाले तर 2026 पर्यंत 80 कोटी आरोग्य नोंदी लिंक झाल्या आहेत. पुढचे पाऊल या डेटामध्ये केवळ आणखी आकडे जोडणे नसून अशी सिस्टिम बनवणे असेल, ज्यामध्ये डॉक्टरांना तत्काळ आणि कमी मेहनतीत रुग्णाचे जुने रेकॉर्ड मिळू शकतील आणि ते अधिक चांगले निर्णय घेऊ शकतील. असे तेव्हाच होईल, जेव्हा सर्व सिस्टिम्स बॅकग्राउंडमध्ये काम करत राहतील. केअर इंडस्ट्री आता अशा युनिफाइड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरकडे वाटचाल करत आहे, जे ऑपरेशनल गॅप्स भरणे सोपे करते. प्रत्येक रुग्णालय अशी आटोकाट धडपड करेल की, तंत्रज्ञानाने त्यांचे क्लिनिकल जजमेंट मजबूत व्हावे, डेटा सुरक्षा वाढावी, विभागांमध्ये समन्वय राहावा आणि प्रत्येक रुग्णाची काळजी वैयक्तिक आणि सन्मानजनक राखली जावी. या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी सेंट्रलाइज्ड आयडेंटिटी आणि अॅक्सेस मॅनेजमेंट सिस्टिमने हे सुनिश्चित केले पाहिजे की रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी फक्त त्याच डेटापर्यंत पोहोचतील, जो त्यांच्यासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एका युरोलॉजिस्टकडे केवळ लघवीच्या चाचणीचा अहवालच नाही, तर सोनोग्राफी रिपोर्टचा अॅक्सेसही असावा. एआय टूल्स सातत्याने देखरेख आणि नेटवर्क घडामोडींचे विश्लेषण करतील आणि सर्व अॅप्लिकेशन्स तसेच उपकरणांमधील असामान्य वर्तनाला रियल-टाइममध्ये अधोरेखित करतील. केअर इंडस्ट्रीचे भविष्य आता रिॲक्टिव्ह अॅप्रोचकडून भविष्यवेधी अंदाजाकडे जात आहे. म्हणजेच पुढील 5 ते 10 वर्षांत रुग्णासोबत काय होऊ शकते आणि तो आतापासूनच काय प्रिव्हेंटिव्ह केअर (प्रतिबंधात्मक काळजी) घेऊ शकतो. परदेशात रुग्णांना प्रोत्साहित केले जाते की त्यांनी हेल्थकेअरला अचानक आलेल्या आजाराच्या वेळचा मासिक किंवा अल्पकालीन खर्च मानू नये, तर आपली उत्पादकता आणि स्थिरता सुरक्षित ठेवणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणुकीसारखे पाहावे. ‘रिॲक्टिव्ह’कडून ‘प्रेडिक्टिव्ह’ केअरकडे येत असलेल्या या बदलाने तांत्रिक तज्ज्ञांची मोठी मागणी निर्माण केली आहे. यात एआय आणि मशीन लर्निंग इंजिनिअर्स, हेल्थ डेटा सायंटिस्ट्स, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म तज्ज्ञ आणि इंटरऑपरेबिलिटी आर्किटेक्ट्सचा समावेश आहे. डिजिटायझेशनचा अर्थ फक्त कोडिंग नाही. या प्रक्रियेत नवे डिजिटल वर्कफ्लो हाताळणारी माणसेही हवी आहेत. यामुळे नॉन-आयटी प्रोफेशनल्ससाठीही संधी निर्माण होत आहेत. यामध्ये क्लिनिकल इन्फॉर्मेटिक्स स्पेशालिस्ट, डिजिटल हेल्थ प्रॉडक्ट मॅनेजर्स, मेडिकल स्क्राइब्स, डॉक्युमेंट स्पेशालिस्ट, टेलिहेल्थ ऑपरेशन्स लीड्स आणि हेल्थ इन्शुरन्स व क्लेम्स अॅनालिस्ट येतात. या विकासात काही हायब्रिड भूमिकाही समोर येत आहेत, जसे की एआय सेफ्टी ऑडिटर, ईएचआर इम्प्लिमेंटेशन स्पेशालिस्ट्स आणि हेल्थ डेटा मॅनेजर.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:विपरीत परिस्थितीत केवळ अध्यात्मच देईल शांती
खोटे बोलणे हा एक पर्याय आहे, ज्याची निवड आपण स्वतः करतो. ज्याला खोटे बोलता येते, तो खरे तर बोलूच शकतो. परंतु जेव्हा निवडीची वेळ येते, तेव्हा आपण सत्याचा मार्ग कठीण आणि असत्याचा मार्ग सोपा मानतो. पूर्वी असे म्हटले जायचे की गावची माणसे सत्यवचनी असतात आणि शहरात गल्लोगल्ली खोटेपणा वसलेला असतो. मात्र आता बेइमानी, कामचुकारपणा आणि खोटेपणा सर्वत्र पसरला आहे. मग ते शहर असो वा गाव. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीने शहरी जीवन पूर्णपणे हादरवून सोडले आहे. गेल्या 20 वर्षांत मानवी शहरी जीवनात जे बदल आणि जी प्रगती झाली आहे, ती गेल्या 2 हजार वर्षांतही झाली नव्हती. डिजिटल मीडियाने तर लोकांवर आपला प्रभाव पाडून त्यांना स्वतःचे म्हणणे मानायला भाग पाडण्याचे जणू धोरणच स्वीकारले आहे. वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी आणि गुन्हेगारी हे आता शहराच्या विकासाचेच भाग बनले आहेत. अशा विपरीत वातावरणात राहताना माणसाला खरी शांतता केवळ आध्यात्मिक मार्गावरच मिळू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉलम:आपले शत्रू युद्ध हरत आहेत आणि अमेरिका जिंकत आहे
माझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो, अमेरिकन सैन्याने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू करून आज एक महिना पूर्ण झाला आहे. जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता इराणला धडा शिकवणे हे आमचे लक्ष्य आहे. गत 4 आठवड्यांत, आपल्या सशस्त्र दलांनी रणांगणावर वेगवान, निर्णायक विजय मिळवले आहेत. इराणचे नौदल आता संपले आहे. हवाई दलाची पडझड झाली आहे. त्यांचे बहुतेक नेते मारले गेले आहेत. ‘आयआरजीसी’वरील त्यांचे नियंत्रण आम्ही मोडीत काढले आहे. थोडक्यात, आपले शत्रू हरत आहेत आणि अमेरिका जिंकत आहे. तेल, वायूच्या बाबतीत आम्ही मध्य-पूर्वेवर अजिबात अवलंबून नाही. आम्हाला त्यांचे तेल नको आहे, पण आम्ही आमच्या मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी तिथे उभे आहोत. मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, अमेरिकेची सुरक्षा व स्वतंत्र जगाच्या रक्षणासाठी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ का आवश्यक आहे. 2015 मध्ये मी राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली, तेव्हाच मी वचन दिले होते की, मी इराणला कधीही अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. ही कट्टरपंथी राजवट गेल्या 47 वर्षांपासून ‘अमेरिका आणि इस्रायलचा नाश’ करण्याच्या धमक्या देत आहे. बैरुतमध्ये 241 अमेरिकन सैनिकांची हत्या आणि मरीन बॅरॅकवर झालेल्या बॉम्बस्फोटांमागे यांचेच हस्तक होते. रस्त्यालगत पेरलेल्या बॉम्बमुळे आमचे शेकडो सैनिक शहीद झाले. ‘यूएसएस कोल’वरील हल्ल्यात त्यांचा सहभाग होता. त्यांनी इस्रायलमधील 7 ऑक्टोबरच्या भीषण घटनेसह अनेक क्रूर कृत्ये केली. या राजवटीने इराणमध्ये आंदोलन करणाऱ्या स्वतःच्याच 45 हजार लोकांना ठार केले! अशा दहशतवाद्यांकडे जर अण्वस्त्रे असतील, तर तो जगासाठी एक सहन करण्यापलीकडचा धोका असेल. मी बराक ओबामा यांचा इराण अणुकरार रद्द केला. त्यांनी त्यांना 1 अब्ज 70 कोटी डॉलर्स रोख दिले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी आमच्या राष्ट्राध्यक्षांची थट्टा केली आणि अणुबॉम्ब बनवण्याचे आपले मिशन सुरूच ठेवले. मुत्सद्देगिरीला माझे नेहमीच प्राधान्य राहिले. परंतु, इराणने अण्वस्त्रे मिळवण्याचा हट्ट सोडला नाही आणि कराराचे सर्व प्रयत्न धुडकावले. म्हणूनच मी जूनमध्ये इराणच्या मुख्य अणुप्रकल्पांवर हल्ला करण्याचे आदेश दिले - ज्याचे नाव होते ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’. आम्ही ते अणुकेंद्र पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर इराणने दुसऱ्या ठिकाणी पुन्हा अणुकेंद्र उभारण्याचा प्रयत्न केला. यावरून हे स्पष्ट झाले की, अण्वस्त्रे सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. ते मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठाही तयार करत होते. ही क्षेपणास्त्रे अमेरिका, युरोप व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकली असती. आमची उद्दिष्टे अतिशय स्पष्ट आहेत. अमेरिकेला धमकावण्याची किंवा सीमेबाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची इराणची क्षमता आम्ही पद्धतशीरपणे संपवत आहोत. आमची मुख्य धोरणात्मक उद्दिष्टे आता पूर्ण होण्याच्या जवळ आहेत. आम्ही पृथ्वीवरील तेल आणि वायूचे प्रथम क्रमांकाचे उत्पादक आहोत. सौदी अरेबिया आणि रशिया एकत्र आले तरी आमच्या मागेच आहेत. आम्ही होर्मुज सामुद्रधुनीतून जवळजवळ काहीही तेल आयात करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. आम्हाला त्याची गरज नाही. जगातील जे देश होर्मुजमधून तेल घेतात, त्यांनी स्वतः तिथे जाऊन त्याचे रक्षण केले पाहिजे. ते हे सहज करू शकतात. आम्ही त्यांना सहकार्य करू, पण ज्या तेलावर ते अवलंबून आहेत, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे. ज्या देशांना इंधन मिळत नाहीये, त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे. आमच्याकडे त्याचा अफाट साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे धाडस दाखवा, होर्मुजच्या सामुद्रधुनीवर जा, त्यावर नियंत्रण मिळवा, त्याचे रक्षण करा आणि ते स्वतःसाठी वापरा. इराणचा पराभव झाला आहे. कठीण काम आम्ही पूर्ण केले आहे, त्यामुळे आता ही गोष्ट तुमच्यासाठी सोपी असायला हवी. (राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील संपादित अंश) ज्या देशांना इंधन मिळवण्यात अडचणी येताहेत, त्यांना सल्ला आहे: अमेरिकेकडून तेल खरेदी करा. आमच्याकडे मुबलक साठा आहे. दुसरे म्हणजे, धाडस दाखवा, होर्मुजच्या सामुद्रधुनीवर जा, तिथे ताबा मिळवा व ते स्वतःच्या वापरासाठी वापरा.
मसूद पेजेश्कियान यांचा कॉलम:या लढाईने अमेरिकन जनतेचे कोणते हित साध्य होत आहे?
इराण ही मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आम्ही कधीही आक्रमकता, विस्तारवाद, वसाहतवाद किंवा वर्चस्व गाजवण्याचा मार्ग निवडला नाही. अगदी जागतिक महासत्तांचे आक्रमण आणि सततचा दबाव सोसूनही, अनेक शेजारील देशांच्या तुलनेत लष्करी ताकद जास्त असूनही- इराणने कधीही युद्धाची सुरुवात केली नाही. म्हणूनच, इराणला जगासाठी ‘धोका’ म्हणून सादर करणे हे ना ऐतिहासिक वास्तवाशी सुसंगत आहे, ना आजच्या तथ्यांशी. अशी धारणा केवळ शक्तिशाली राष्ट्रांच्या राजकीय आणि आर्थिक मनमानीचा परिणाम आहे. स्वतःचा दबाव वाढवण्यासाठी, लष्करी वर्चस्व राखण्यासाठी, स्वतःचा शस्त्रास्त्र उद्योग टिकवण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना एक ‘शत्रू’ निर्माण करावा लागतो. अमेरिकेने इराणच्या चहूबाजूंनी आपले सैन्य, लष्करी तळ आणि युद्धसामग्रीचा मोठा साठा उभा केला आहे. अशा स्थितीचा सामना करणारा कोणताही देश स्वतःच्या संरक्षणाची क्षमता मजबूत करण्यापासून मागे हटणार नाही. इराणने आजवर जे काही केले आहे, ती केवळ स्वसंरक्षणासाठी संतुलित प्रतिक्रिया आहे. ती कोणत्याही प्रकारे युद्धाची किंवा आक्रमणाची सुरुवात नाही. इराण आणि अमेरिकेचे संबंध सुरुवातीपासून शत्रूचे नव्हते. पण अमेरिकेने जेव्हा इराणच्या स्वतःच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याच्या (राष्ट्रीयीकरण) प्रयत्नात हस्तक्षेप केला, तेव्हापासून यात निर्णायक वळण आले. अमेरिकेने इराणमधील लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणले, त्यामुळे इराणच्या जनतेत अमेरिकन धोरणांबद्दल अविश्वासाची खोल भावना निर्माण झाली. पुढे अमेरिकेने शाह यांच्या राजवटीला दिलेला पाठिंबा, 1980 च्या दशकात लादलेले युद्ध, आधुनिक इतिहासातील सर्वात प्रदीर्घ निर्बंध आणि शेवटी- जेव्हा चर्चेची प्रक्रिया सुरूच होती, तेव्हा इराणवर केलेले लष्करी हल्ले यांमुळे हा अविश्वास अधिकच गडद झाला. तरीही इराण डगमगला नाही. उलट, आम्ही अनेक क्षेत्रांत अधिक सशक्त झालो आहोत. इराणमधील साक्षरतेचे प्रमाण 30 टक्क्यांवरून (क्रांतीपूर्वी) आज 90 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. उच्च शिक्षणाचा व्यापक विस्तार झाला असून आधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा झाली आहे आणि पायाभूत सुविधांचा विकास पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वेगाने झाला आहे. निर्बंध आणि युद्धाचे इराणच्या जनतेवर झालेले परिणाम अत्यंत भीषण आणि अमानवीय आहेत, हे नाकारता येणार नाही. लष्करी आक्रमणे आणि अलीकडची बॉम्बफेक लोकांचे आयुष्य आणि विचारांवर खोलवर परिणाम करते. या युद्धामुळे अमेरिकन जनतेच्या कोणत्या हिताचे रक्षण होत आहे? अशा वागणुकीचे समर्थन करण्यासाठी इराणकडून खरोखरच काही धोका होता का? निष्पाप मुलांची हत्या करणे, कर्करोगाच्या औषधांचे कारखाने उद्ध्वस्त करणे किंवा एखाद्या देशाला ‘पाषाण युगात’ मागे पाठवण्याची फुशारकी मारणे- या सर्वांचा नेमका उद्देश काय? इराणने नेहमीच चर्चेचा मार्ग स्वीकारला, करारापर्यंत पोहोचला आणि सर्व अटींचे पालनही केले. पण करारातून बाहेर पडण्याचा आणि संघर्षाचा मार्ग निवडण्याचा निर्णय केवळ अमेरिकन सरकारने घेतला.इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणे म्हणजे थेट जनतेला लक्ष्य करणे होय. हा केवळ एक युद्धगुन्हाच नाही, तर याचे परिणाम इराणच्या सीमांच्या पलीकडेही पसरणारे आहेत. अमेरिका या युद्धात इस्रायलचा प्रतिनिधी म्हणून, त्याच्या प्रभावाखाली सामील झाली आहे, हे सत्य नाही का? आणि हेही तितकेच खरे नाही का की, इस्रायलला इराणच्या नावाचा बागुलबुवा उभा करून पॅलेस्टिनींवरील आपल्या अत्याचारांवरून जगाचे लक्ष वळवायचे आहे? आज जग एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. संघर्षाचा मार्ग निवडणे आता पूर्वीपेक्षा अधिक महागडे आणि निरर्थक ठरणार आहे. आपण संघर्ष निवडायचा की सहकार्य, या निर्णयावरच येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अवलंबून आहे.(डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर अमेरिकन जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्राचा संपादित अंश) अमेरिका या युद्धात इस्रायलचा प्रतिनिधी म्हणून सामील झाली आहे, हे सत्य नाही काय? इस्रायलला इराणचा बागुलबुवा उभा करून पॅलेस्टिनींवरील आपल्या कृत्यांवरून जगाचे लक्ष वळवायचे आहे, हेही तितकेच खरे नाही का?
एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्या आजूबाजूला काही नि:स्वार्थ आणि समजूतदार लोक असणे का गरजेचे आहे?
ली वेई यांनी आपल्या मुलांसाठी सर्वस्व दिले. त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, जेणेकरून मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये. मुलांचे आयुष्य चांगले व्हावे यासाठी त्यांनी स्वतःच्या आरामाचा त्याग केला. जेव्हा मुले मोठी झाली, त्यांचे स्वतःचे कुटुंब झाले आणि ती स्वतंत्र आयुष्य जगू लागली, तेव्हा ली यांना वाटले की शेवटी त्यांच्या आनंदाने जगण्याची वेळ आली आहे. ते आपले घर विकून मुलासोबत राहायला गेले. त्यांना वाटले की भरल्या कुटुंबात, नातवंडांमध्ये त्यांना उत्साह व जिव्हाळा मिळेल. पण तसा आनंद त्यांना कधीच मिळाला नाही. घर भरलेले होते, पण त्यांचे मन रिकामे होते. मुलांना त्यांचा सल्ला नकोसा वाटू लागला. त्यांची उपस्थिती व्यर्थ मानली जाऊ लागली. त्यांचे बोलणे अनिच्छेने ऐकले जायचे. ली जेवढे जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे, मुले तेवढीच दूर जायची. उत्तराच्या शोधात ली एका विद्वान संताकडे गेले आणि विचारले की असे का होते की संपूर्ण आयुष्य मुलांसाठी समर्पित करूनही आपण म्हातारपणात एकटेपणा अनुभवतो? त्या संत, कन्फ्युशियस (जन्म इसवी सन पूर्व 551 - मृत्यू 479 इसवी सन पूर्व) यांनी ली यांना सांत्वन देण्याऐवजी तीन सोप्या शिकवणी दिल्या. शिकवण 1 : संतांनी पाण्याने पूर्ण भरलेली एक फुलदाणी उचलून विचारले, सांग, जर यात आणखी पाणी ओतले तर काय होईल? ली म्हणाले, ते सांडून जाईल. कन्फ्युशियस म्हणाले, नातीही अशीच असतात. जेव्हा आपण स्वतःला आधीच भरलेल्या जागेत बळजबरीने सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा असंतुलन निर्माण होते. तू मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी घर बनवलेस, पण तुला पुन्हा त्याचे केंद्र व्हायचे आहे. तर त्यांच्या घराचे आधीपासूनच स्वतःचे केंद्र आहे. त्यांचे स्वतःचे आयुष्य, त्यांची स्वतःची मुले आहेत. तू स्वतःला अशा भांड्यात ओतत आहेस, ज्यामध्ये जागाच उरलेली नाही. शिकवण 2 : संतांनी एकमेकांच्या खूप जवळ वाढलेली दोन झाडे दाखवली. त्यांच्या फांद्या एकमेकांत गुंतलेल्या होत्या, कारण ती सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करत होती. त्यांनी विचारले की जेव्हा झाडे खूप जवळजवळ वाढतात तेव्हा काय होते? ली म्हणाले, ती एकमेकांत अडथळा आणतात, स्पर्धा करतात. कन्फ्युशियस म्हणाले, काय ती मजबूत होतात? नाही, तर ती कमकुवत होतात. जीवनही असेच आहे. आपल्याला वाटते की खूप जवळीक म्हणजेच एकता आहे. पण गरजेपेक्षा जास्त जवळीक तणाव निर्माण करते. विकासासाठी जागा असणे आवश्यक असते. शिकवण 3 : मुठीत घट्ट वाळू धरून कन्फ्युशियस यांनी विचारले की जर मी ही अशी पकडली तर काय होईल? ली म्हणाले, ती बोटांमधून निसटून जाईल. कन्फ्युशियस म्हणाले, मानवी नातीही अशीच असतात. प्रेम आणि आदर दबावाखाली फुलत नाहीत. यांना जितके घट्ट पकडाल, जितकी जवळीक मागाल, तितकीच ती हातातून निसटून जातील. स्वातंत्र्य द्याल तर जे खऱ्या अर्थाने तुमचे आहे, ते टिकून राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घे की जेव्हा तू एखादे झाड लावतोस, तेव्हा ते म्हातारपणात तुला सावली देईल अशी अपेक्षा करत नाहीस. मग मुलांकडून वेगळी अपेक्षा का? तू त्यांना स्वतःसाठी नाही, तर जगासाठी मोठे केले आहेस. जगाचा त्यांच्यावर तुझ्याइतकाच हक्क आहे. ली यांना ही गोष्ट समजली. ते आपल्या गावी परतले. शाळेजवळ एक छोटे घर भाड्याने घेतले आणि मुलांना मदत करू लागले. त्यांच्यासोबत आपले ज्ञान वाटून घेतले, त्यांना शिकवले, त्यांच्यासोबत झाडे लावली आणि गोष्टी सांगितल्या. लवकरच लोक त्यांना मास्टर म्हणू लागले. जेवढे त्यांनी स्वतःला कमी लादले, तेवढेच त्यांना कौतुक मिळाले. जेवढे त्यांनी कमी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, तेवढे ते जास्त मिळू लागले. एके दिवशी त्यांना मुलाचे पत्र मिळाले - बाबा, खूप काळ लोटला. आम्हाला तुमची आठवण येते. मुलेही तुमच्याबद्दल विचारतात. भेटायला या - राहायला नाही, फक्त सोबत वेळ घालवण्यासाठी. जेव्हा मास्टर तिथे पोहोचले तेव्हा त्यांचे प्रेमाने स्वागत झाले. अनेक वर्षांत पहिल्यांदाच त्यांना असे वाटले की ते ओझे नाहीत, तर हवेहवेसे वाटणारे पाहुणे आहेत. ली यांना समजले की प्रेमाची अपेक्षा सोडून द्या, ते परतून तुमच्याकडेच येईल. फंडा हा आहे की, नि:स्वार्थ लोक आयुष्यातील मोठमोठ्या अडचणी सहज सोडवतात. म्हणूनच या धड्याप्रमाणे त्यांची शिकवण 2500 वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही प्रासंगिक राहते.
एन. रघुरामन यांचा कॉलम:अशा ठिकाणी खोदण्याचा निर्णय घ्या, जिथे इतर कोणी विचारही करणार नाही
त्यांची कामगिरी कदाचित ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी इतकी मोठी नसेल, ज्यांच्याबद्दल अनेकांनी ऐकले आहे. पण त्यांचा जिद्द आणि निर्धार मात्र तोच होता. 2024 पर्यंत ओडिशामधील चंदका-डम्पडा अभयारण्यात राहणाऱ्या 35 वर्षीय शकुंतला चतर यांना जंगली प्राणी, विशेषतः हत्तींनी वेढलेल्या जंगलातून दररोज एक तास पायपीट करावी लागत असे. इतके कष्ट करूनही मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसे. अशीच परिस्थिती 2016 पर्यंत महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील काळमेश्वर गावचे मजूर बाबूराव ताजणे यांची होती. त्यांच्या खडकाळ भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आणि बोअरवेल्स कोरड्या पडल्या. जेव्हा त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी एका विहिरीवर गेली तेव्हा तिला पाणी भरण्यास मनाई करण्यात आली आणि तिचा अपमान करण्यात आला. त्यानंतर शकुंतला आणि बाबूराव यांनी असे काही केले, ज्याचे धाडस त्या भागात इतर कोणीही केले नव्हते. कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी स्वतः विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात कोणाचीही मदत मिळाली नाही. शकुंतला यांना कधीतरी त्यांचे पती लादूराम चतर आणि शेजारी जगन्नाथ तिंगुआ यांची मदत मिळत असे, पण बाबूराव पूर्णपणे एकाकी होते. बहुतेकांना वाटले की हे दोघेही वेडे झाले आहेत. बाबूराव पहाटे लवकर उठून चार तास खोदकाम करत आणि त्यानंतर मजुरीला जात. कामावरून परतल्यानंतर ते पुन्हा दोन तास विहीर खोदत. दुसरीकडे, सरकारी प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या शकुंतला यांनी रोज चार तास आपल्या जमिनीवर विहीर खोदण्यास सुरुवात केली. जेव्हा 10 फूट खोदल्यावरही पाणी लागले नाही तेव्हा लोकांनी त्यांना खड्ड्यात अडकलेले ‘वेडे’ म्हणून हिणवले. खोदकामाच्या 30 दिवसांनंतर शकुंतला 25 फुटांपर्यंत पोहोचल्या, तर बाबूराव 10 फुटांपर्यंत पोहोचले होते. कारण तिथली जमीन अत्यंत खडकाळ होती तरीही पाणी लागले नव्हते. हा त्यांच्या ‘खोदकामाचा अंध:कारमय काळ’ होता. ते थकून 25 किंवा 10 फुटांवर थांबले असते तर ते केवळ पाणी मिळवण्यातच अपयशी ठरले नसते तर त्यांची संपूर्ण मेहनत वाया गेली असती. जमीन कोरडी दिसत असली तरी खोल गेल्यावर पाणी नक्कीच लागेल या विश्वासाची तिथे गरज होती. हे दोघेही आणखी खोलवर गेले. अखेर शकुंतला यांना 40 फुटांवर पाणी लागले, तर बाबूराव यांना 15 फुटांवर पाणी मिळाले. शकुंतला यांना हे कार्य पूर्ण करायला 60 दिवस लागले, तर बाबूराव यांनी ते 40 दिवसांत करून दाखवले. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या विहिरींनी केवळ त्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला पाणी दिले. आज ते आपल्या भागातील खऱ्या अर्थाने ‘नायक’ ठरले आहेत. आपले करिअरदेखील बऱ्याचदा असेच असते. एकतर 1. तुम्ही ‘वरवरचे’ काम करता, म्हणजे जी नोकरी मिळाली ती केली आणि रस नसतानाही दुसऱ्या नोकरीकडे वळलात. किंवा 2. तुम्ही कोणत्याही तत्काळ फायद्याची (प्रसिद्धी, मोठा पगार किंवा पद) अपेक्षा न ठेवता वर्षानुवर्षे अभ्यास, सराव आणि कठोर परिश्रम करता. ‘खोल’ करिअरची सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट ‘तहानेला’ (एखाद्या उद्योगातील समस्या किंवा स्वतःमधील कौशल्याची उणीव) ओळखता आणि तिथे तज्ज्ञतेचा पाझर फुटेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहता. ‘वरवरचे’ करिअर हे केवळ पगार मिळवण्यासाठी आणि तग धरण्यासाठी असते. पण ‘खोल’ करिअर हे ‘योगदान’ देण्यापर्यंत पोहोचते. एकदा का तुम्ही एखाद्या विषयात प्रभुत्व मिळवले (म्हणजेच पाण्यापर्यंत पोहोचलात) की तुम्ही इतरांसाठी एक ‘स्रोत’ बनता. तुमची तज्ज्ञता एका अशा ‘विहिरी’सारखी होते, जिथे तुमचे सहकारी, कनिष्ठ आणि संपूर्ण उद्योग मदतीसाठी येतो. फंडा असा आहे की - कोणताही मोठा परिणाम किंवा प्रभाव पृष्ठभागावर दिसून येत नाही. तो सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर खोलवरच गवसतो. किमान पाणी आणि करिअरच्या बाबतीत तरी हेच सत्य आहे. म्हणूनच आपल्या कार्यक्षेत्रात ‘विहीर खोदणाऱ्या’ माणसाचा दृष्टिकोन अंगीकारा.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कोलाहल अन् शून्याचा समतोल ठेवावा असे हनुमंत सांगतात
आपण किती श्वास घेतो, कसा घेतो, याचा हिशेब ठेवणे खूप गरजेचेआहे. शांततेच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या श्वासावर काम करावेलागेल. कारण आयुष्यात विचारांतून नाही तर श्वासातून चिंता आतप्रवेश करते. हनुमान पवनपुत्र आहेत. आपण आपल्या प्राणांवर मंत्राचेप्रयोग करू, तितके आपण शांत होऊ. तसेच आपल्या शरीरातून बाहेरपडणाऱ्या लहरी सकारात्मक होतील. हनुमान चालीसा हा एक मंत्रआहे. आज संपूर्ण देशात हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे.यानिमित्त आणखी एक संकल्प करूया. तो म्हणजे आपण आपल्याश्वासांना हनुमान चालीसारूपी मंत्राशी जोडूया. कारण निम्म्यासुंदरकांडात हनुमंताचा पराक्रम, चरित्र आहे. उर्वरित सुंदरकांडहनुमंतांनी मौनात व्यतीत केले आणि त्यातूनच प्रभू रामचंद्रांची लीलाजगासमोर आली. म्हणूनच हनुमंत सांगतात की, जीवनात कोलाहल वशून्याचा समतोल असाावा. आज एक संकल्प करुया. जीवनात खूपकष्ट करू आणि पराक्रम गाजवू, पण वेळ आल्यावर अत्यंत शांतहीराहू. भक्ताने उत्तेजित नाही, तर कायम उत्साहित राहायला हवे.
रघुराम राजन यांचा कॉलम:एआयच्या क्षमतांबाबत फारनिराश होण्याचे कारण नाही
इक्विटी-रिसर्च फर्म सिट्रिनीने अलीकडेच आर्थिक बाजारात खळबळ उडवून दिली होती, जेव्हा तिने असे एक चित्र सादर केले, ज्यात 2028 पर्यंत एआय (AI) बहुतेक व्हाईट-कॉलर नोकऱ्या संपुष्टात आणेल. अर्थात, याचे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होतील. परंतु हे भाकीत काही बाबतीत अत्यंत निराशावादी आहे. सॉफ्टवेअरसारखे काही क्षेत्र वगळल्यास, एआय (AI) स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे निर्माण होणारी इनर्शिया (जडत्व) बदलांची गती कदाचित कमी करतील. इतिहासात नेहमीच असेच घडले आहे. उदाहरणार्थ, 1920 च्या दशकातच ऑटोमेटेड टेलिफोन एक्सचेंज शक्य झाले होते, परंतु यामुळे अमेरिकेतील टेलिफोन ऑपरेटरच्या नोकऱ्या 1980 च्या दशकापर्यंत गेल्या नव्हत्या. याव्यतिरिक्त, तंत्रज्ञान स्वतःमध्ये केवळ एक व्हेरिएबल (चल) असते. त्याच्याभोवती अशा प्रक्रिया आणि संरचना देखील असाव्यात, ज्या ग्राहकांना विश्वसनीय सेवेची हमी देतील. हेच ते क्षेत्र आहे, जिथे स्थापित कंपन्यांना नवीन प्रतिस्पर्धकांवर आघाडी मिळते, जरी त्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करत नसतील तरीही. आणि जर स्थापित कंपन्यांनी आपले स्थान गमावले, तरीही एआय-प्रेरित खर्च कपात आणि उत्पादकतेतील वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नवीन संधी केवळ एआयवरील अवलंबित्व मर्यादित राहणार नाहीत. त्या मानवी श्रमाचीही गरज निर्माण करू शकतात- जसे की इंटरनेट आणि इन्फ्लुएन्सर्सच्या उदयासोबत दिसून आले आहे. तरीही, अशा भविष्याची कल्पना करा, जिथे काही विशिष्ट प्लॅटफॉर्म (जसे की अँथ्रोपिक किंवा मेटा) एआयच्या अशा स्तरावर पोहोचतील, जे त्यांना स्पर्धेतून पुढे जाण्यास आणि वापरकर्ता-कंपन्यांकडून सातत्याने जास्त किमती वसूल करण्यास सक्षम करतील. हे प्लॅटफॉर्म तेव्हा प्रचंड नफा कमावतील, ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे (जे संख्येने कमी असतील, कारण एआयने कर्मचाऱ्यांची कपात केली असेल!) आणि त्यांच्या भागधारकांचे उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर, त्यांच्या सेवांवर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्याही पैसे देण्यास तयार असतील, कारण एआय त्यांची उत्पादकता वाढवेल आणि त्यांना अधिक व्हाईट-कॉलर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची परवानगी देईल. त्यानंतर, हे बेरोजगार झालेले कर्मचारी अशा आसपासच्या क्षेत्रांमध्ये काम शोधतील, जिथे एआयने अजून त्यांच्या कौशल्यांना अप्रस्तुत केले नाही. पण जर असे रोजगार मर्यादित झाले, तर ते माळी, वेटर आणि शॉप-असिस्टंट्ससारखी कामे करतील, ज्यामुळे या व्यवसायांमध्ये वेतन आणखी खाली जाईल. जर असे मानले की एआय प्रथम संज्ञानात्मक कार्ये संपवतो, कुशल शारीरिक कार्यांच्या तुलनेत - तर मशिनिस्ट, प्लंबर आणि गवंडी यांसारख्या व्यवसायांमध्ये काही काळ काम टिकून राहू शकते, जोपर्यंत रोबोट या कार्यांसाठी पुरेसे प्रगत होत नाहीत. किंवा आणखी एका अशा स्पर्धात्मक परिस्थितीचा विचार करा, ज्यात कोणताही प्लॅटफॉर्म विजेता ठरत नाही, कारण चॅटजीपीटी 33.2, जेमिनाई 25 आणि इतर सर्वांमध्ये खूप कमी फरक असतो. यात एआयच्या किमती कमी राहतील आणि उत्पादकतेचे फायदे संपूर्ण अर्थव्यवस्थेत पसरतील, तसेच त्यातून निर्माण होणारा नफाही. एआयवर जास्त खर्च टाळून, वापरकर्ता कंपन्या किमती कमी करू शकतात आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवू शकतात, ज्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये अधिक रोजगार निर्माण होऊ शकतात. यात पहिल्या परिस्थितीच्या तुलनेत अडचणी खूप कमी असतील, कारण स्वस्त वस्तू आणि सेवा आधीच असलेल्या कामगार बचतीला अधिक दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतील. केवळ सध्याचे कल हेच दर्शवत नाहीत की ही दुसरी परिस्थिती अधिक संभाव्य आहे, तर सरकारे हे सुनिश्चित करण्यासाठी पावले देखील उचलू शकतात की हेच परिदृश्य साकार व्हावे.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) बेरोजगारीच्या समस्येवर कोणतेही सोपे सार्वजनिक उपाय नसतात. यासाठी सामाजिक सुरक्षा यंत्रणा काही प्रमाणात मजबूत करावी लागेल. त्याचबरोबर, शक्य असेल तेथे, व्यवसायांनाही नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि कामगारांना पुन्हा कौशल्य शिकवण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल.
संजय अग्रवाल यांचा कॉलम:आपण अद्याप आपल्या पूर्णक्षमतेचा वापर केलेला नाही
भारताला विश्वासार्ह आणि ‘लो-कार्बन'' (कमीकार्बन उत्सर्जन करणारी) ऊर्जा सुरक्षा हवी आहे. याशोधात थोरियम हे एक धोरणात्मक साधन म्हणूनपुन्हा एकदा पुढे येत आहे. पण याला केवळ एकशक्यता म्हणून न पाहता वीज प्रकल्पांपर्यंतपोहोचवायचे असेल तर धोरणात्मक, तांत्रिक आणिसंस्थात्मक पातळीवरील त्रुटी दूर कराव्या लागतील. जागतिक पातळीवर युरेनियमच्या तुलनेत थोरियमकडेदीर्घकाळापासून एक जास्त सुरक्षित व मुबलक पर्यायम्हणून पाहिले जाते. 1950 ते 1970 च्या दशकातअमेरिका व युरोपात यावर प्रयोग झाले. मात्र ते व्यावसायिक पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.कारण स्वस्त युरेनियम ‘लाईट-वॉटर रिॲक्टर्स''चेवर्चस्व न शस्त्रास्त्रांशी जोडलेले ‘फ्यूल सायकल्स'' यामुळे गुंतवणूक दुसरीकडे वळली होती. या संदर्भात भारत एक उल्लेखनीय अपवाद राहिला आहे. कारणडॉ. होमी भाभा यांच्या तीन टप्प्यांतीलअणुकार्यक्रमाची संकल्पना आपल्या थोरियमच्याप्रचंड साठ्यावरच आधारित होती. पहिल्या टप्प्यात नैसर्गिक युरेनियम व‘ हेवी-वॉटर रिॲक्टर्स''चासमावेश होता. दुसऱ्या टप्प्यात ‘फास्ट ब्रीडररिॲक्टर्स'' आणि तिसऱ्या टप्प्यात थोरियमवरआधारित प्रणाली होत्या. तरीही मोठ्या प्रमाणावरथोरियमचा वापर अद्याप सुरू झालेला नाही. संसदेतदिलेल्या एका उत्तरात (2015) एक अंदाज वर्तवण्यातआला होता. त्यानुसार ‘फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर''(एफबीटीआर) 2040 च्या दशकात एका स्थिरपातळीवर पोहोचतील. त्यानंतर 3-4 दशकांनीव्यावसायिक पातळीवर थोरियम रिॲक्टर्स शक्यहोतील. म्हणजेच यासाठी 2070 ते 2080 सालापर्यंतवाट पाहावी लागेल. आज भाभा अणुसंशोधन केंद्राचा‘ॲडव्हान्स्ड हेवी-वॉटर रिॲक्टर'' आपल्या तांत्रिकसज्जतेचे प्रतीक आहे. हा रिॲक्टर आपली सुमारे 60टक्के ऊर्जा थोरियमपासून मिळवतो. भारताच्यादीर्घकालीन अणुयोजनेत ज्या त्रुटी आहेत. त्यासाठीआपला दृष्टिकोन कमी जबाबदार आहे. त्यापेक्षागोष्टींचा योग्य क्रम, संसाधन व्यवस्थापन व राजकीयअर्थव्यवस्था अधिक जबाबदार राहिली. तीनटप्प्यांतील या रणनीतीत काही गृहितके होती.‘हेवी-वॉटर रिॲक्टर्स''चा वेगाने विस्तार होईल.“फास्टब्रीडर रिॲक्टर्स'' वेळेवर उभे राहतील. तसेचगुंतागुंतीचे इंधन बनवण्यात सक्षम अशी एकऔद्योगिक परिसंस्था विकसित होईल, असे मानले गेलेहोते. पण निर्बंध आर्थिक मर्यादा आणि प्रकल्पांमधीलविलंब यामुळे या सर्व गृहितकांना वारंवार तडे गेले.1962 च्या अणुऊर्जा कायद्यांतर्गत सार्वजनिक क्षेत्राचेवर्चस्व होते. यातून एक बंदिस्त व अतिशय सावधअशी कार्यसंस्कृती निर्माण झाली. एका बाजूला‘प्रेशराइज्ड हेवी-वॉटर रिॲक्टर''ची (पहिला टप्पा)क्षमता वाढली. दुसऱ्या बाजूला“प्रोटोटाइप फास्ट ब्रीडररिॲक्टर'' व थोरियमवर आधारित टप्पे (दुसरा आणितिसरा टप्पा) खूप मागे राहिले. ‘शांती'' कायद्याने(भारतात बदलासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापरआणि विकास विधेयक, 2025') आता 1962 चाअणुऊर्जा कायदा आणि 2010 चा अणुहानीसाठीनागरी दायित्व कायदा यांची जागा घेतली आहे. हा नवाकायदा खासगी भारतीय कंपन्यांना रिॲक्टर्सचीउभारणी, मालकी आणि संचलन करण्याची परवानगीदेतो. तसेच इंधन निर्मितीमध्येही सहभागाची मुभा देतो.यामध्ये युरेनियम-235 चे रूपांतरण, शुद्धीकरण व एकामर्यादेपर्यंत संवर्धन यांचा समावेश आहे.अतिसंवेदनशील कामे मात्र सरकारसाठीच राखीवठेवण्यात आली आहेत. याहूनही महत्त्वाची बाबम्हणजे, ‘शांती'' कायदा अणुऊर्जेच्या शांततापूर्णवापरासाठी पेटंटचीही परवानगी देतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) डॉ. होमी भाभा यांच्या तीन टप्प्यांतीलअणू कार्यक्रमाची संकल्पना आपल्यादेशातील थोरियमच्या प्रचंड साठ्यावरचआधारित होती. यातील तिसऱ्या टप्प्यातथोरियमवर आधारित प्रणालींचासमावेश होता. असे असूनही थोरियमचाअजूनही मोठ्या प्रमाणावर वापर सुरूझालेला नाही.
प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:वाढता वापर, वाढते अवलंबित्व आणि वाढती असुरक्षितता !
आपले आधुनिक जीवन ऊर्जेवर चालते. ही ऊर्जाबहुतांश वेळा कार्बनवर आधारित असते. जगात वापरल्याजाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 80 टक्क्यांहून अधिक वाटाआजही जीवाश्म इंधनाचा आहे. यात कोळसा, तेलआणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. पण जगातकोळसा, तेल आणि वायू यांसारख्या कार्बन ऊर्जास्रोतांचे वरदान लाभले असे मोजकेच देश आहेत. उर्वरितदेशांना आयातीवरच अवलंबून राहावे लागते. परिणामी, हीऊर्जा हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्यावापराच्या ठिकाणी पोहोचते. अनेकदा ही वाहतूकसमुद्रातील अतिशय अरुंद मार्गांवरून होते. जास्त अंतरआणि जेवढा अरुंद मार्ग, तेवढाच धोका अधिक असतो.या मार्गांवर थोडासा अडथळा आला, तरी मोठे नुकसानहोऊ शकते. या अरुंद मार्गांमधील गडबडही मोठीअडचण निर्माण करते. म्हणूनच या मार्गांना ‘एनर्जीचोक-पॉइंट्स'' म्हटले जाते. अशा काही प्रमुख चोक-पॉइंट्समध्ये ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ''(ओमान आणि इराणच्या दरम्यान), ‘सुएझ कालवा''(इजिप्तमध्ये), ‘बाब-अल-मंदेब'' (येमेन आणिजिबूती-एरिट्रियाच्या दरम्यान), ‘मलक्का सामुद्रधुनी''(मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दरम्यान)आणि ‘पनामा कालवा'' (पनामामध्ये) यांचा समावेशहोतो. यापैकी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ'' सर्वाधिक चर्चेत आहे.हे सर्व चोक-पॉइंट्स म्हणजे केवळ भौगोलिक ठिकाणेनाहीत. ती जागतिक ऊर्जा व्यवस्थेची एक कमकुवत नसआहे. जगाचे या चोक-पॉइंट्सवर असणारे अवलंबित्वएक नाजूक संतुलन निर्माण करते. 2021-22 मध्ये सुएझकालवा बंद पडल्याच्या घटनेने दाखवून दिले होते की,जागतिक व्यापार किती संवेदनशील आहे. याचप्रमाणे‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ''मधील तणाव जागतिक स्तरावर तेलआणि वायूच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढवतो. यातून एकभीषण सत्य समोर येते. ते म्हणजे जगाची ऊर्जा व्यवस्थामुळीच मजबूत नाही. खरी समस्या या चोक-पॉइंट्सच्याभौगोलिक स्थितीत नाही. ती आपल्या ऊर्जा पुरवठ्याच्यारचनेत आहे. आपण आधुनिक मानवांनी अशी जागतिकऊर्जा प्रणाली तयार केली आहे. तिचे उत्पादन काहीविशिष्ट भागातच केंद्रित आहे. मात्र, तिचा वापर संपूर्णजगभरात पसरलेला आहे. हे असंतुलन ऊर्जेला मर्यादितमार्गांवरूनच प्रवास करण्यास भाग पाडते. यामुळे धोकाआणखी वाढतो. जेवढा वापर, तितके अवलंबित्व. आणिजेवढे अवलंबित्व, तितकीच असुरक्षितता. हीअसुरक्षितता आजही आहे, उद्याही राहील आणि अनेकदशकांनंतरही कायम राहील. हवा, पाणी आणि मातीचेप्रदूषण हे देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कार्बनऊर्जेचाच परिणाम आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानबदल यालाही तेल, वायू आणि कोळसाच कारणीभूतआहे. ऊर्जा आयातीवरील आपले अवलंबित्व आणिअस्थिरता पाहता आपण ऊर्जा पुरवठ्यासाठी पर्यायीव्यवस्था शोधणे अत्यंत गरजेचे आहे. या नव्या ऊर्जाव्यवस्थेअंतर्गत मी दोन महत्त्वाच्या गोष्टींवर भर देऊइच्छितो. पहिली म्हणजे या नव्या व्यवस्थेत व्यक्ती,संस्था आणि देशांनी आपल्या ऊर्जेचा वापर कमी करणेबंधनकारक असले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जेच्यासर्व गरजा शक्यतो स्थानिक पातळीवरच पूर्ण केल्याजाव्यात. यामुळे ही व्यवस्था अधिक मजबूत आणि न्याय्यबनेल. तसेच ती पृथ्वीच्या मर्यादेला अनुकूल अशीचअसेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
अरूंधती काटजू यांचा कॉलम:ट्रान्सजेंडर हक्कांच्या बाबतीत आपण पुन्हा मागे जात आहोत
दशकाहून अधिक काळ न्यायालये, केंद्र सरकार आणि राज्ये ट्रान्सजेंडर हक्कांचा विस्तार करण्यासाठी एकत्रकाम करत आहेत. पण आता केंद्र सरकार कायद्यातदुरुस्ती करून आम्हाला मागे नेऊ इच्छिते. 2014 मध्ये‘नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी विरुद्ध सरकारखटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींनासन्मानाने जगण्याचा हक्क असल्याचे मान्य केले होते.राज्यघटनेने स्व-निर्धारित लैंगिक ओळखीचे संरक्षण केलेआहे, असे सांगून न्यायालयाने सरकारला तृतीयपंथीयांनामान्यता देण्याचे निर्देश दिले होते. 2019 मध्ये केंद्र सरकारने ‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचेसंरक्षण) कायदा'' मंजूर केला. या कायद्याने ‘ट्रान्सजेंडरव्यक्ती''ची व्यापक व्याख्या केली. त्यात किन्नर, अरावनी,जोगता यांसारख्या पारंपरिक ओळखी आणिनॉन-बायनरी व्यक्ती, जेंडरक्विअर, तसेच ट्रान्सजेंडरपुरुष व महिला यांसारख्या अपारंपरिक ओळखींचासमावेश होता. कलम 4(2) ने स्वयं-निर्धारित लैंगिकओळखीचे संरक्षण केले. हे तर्कसंगत होते. आपणआपली लैंगिक ओळख स्वतःच ‘घोषित''करतो—आपली कागदपत्रे आपल्या पोशाखातून आणिवागणुकीतून ते दर्शवतो. आपण कोण आहोत हे घोषितकरण्यासाठी आपल्याला सरकारी मंजुरीची गरज नसते. 2019 च्या कायद्याने शस्त्रक्रिया अनिवार्य केली नाही. हेयोग्य होते. लिंगबदल शस्त्रक्रिया महाग आहे आणिभारतात सहज उपलब्ध नाही. ट्रान्सजेंडर व्यक्तीकोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय ‘ट्रान्सजेंडरओळख प्रमाणपत्र'' आणि शस्त्रक्रियेनंतर ‘लिंग बदल''प्रमाणपत्र मिळवू शकत होत्या. या कायद्याने ते सर्वसंरक्षण प्रदान केले. ते आपल्याला आपल्या ट्रान्सजेंडरप्रिय व्यक्तीसाठी हवे असते. सरकारने त्यांना समाजातसामावून घ्यावे आणि वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात;नोकरी देणारे आणि शैक्षणिक संस्था त्यांच्याशी भेदभावकरू शकत नाहीत. या कायद्याने ‘राष्ट्रीय ट्रान्सजेंडरव्यक्ती परिषद'' स्थापन केली. या कायद्याने तृतीयपंथीव्यक्तींना महाविद्यालये, कार्यालये आणि सरकारमध्येत्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी एक आराखडाहीतयार केला. अमेरिकेत तृतीयपंथींच्या हक्कांवर हल्ले होतअसताना भारत या मुद्द्यावर एक नेतृत्व म्हणून म्हणूनउदयास आला. गेल्या दशकात लक्षणीय बदल दिसून आले आहेत. उत्तरप्रदेशामध्ये तृतीयपंथी मुले आणि त्यांचे जोडीदारशेतजमिनीच्या वारसा हक्कासाठी पात्र ठरले. कर्नाटकनेतृतीयपंथी व्यक्तींना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले.ते सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणिमहाविद्यालयांचे प्राचार्य बनले. माझ्या स्वतःच्या वकिलीव्यवसायात, विधी महाविद्यालयांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थीआहेत आणि न्यायालये व विधी संस्थांमध्ये तृतीयपंथीवकील कार्यरत आहेत. हे हक्क वाढवण्याऐवजी केंद्र सरकार आता ते काढून घेतआहे. राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांशी सल्लामसलत नकरता मंजूर करण्यात आलेल्या दुरुस्ती कायद्यानुसारकेवळ हिजडा, किन्नर, जोगता आणि अरवणी यांनाचतृतीयपंथी मानले जाईल. या दुरुस्ती कायद्याने कलम 4(2) देखील काढून टाकलेआहे. तृतीयपंथीयांच्या स्व-ओळखीच्या हक्काचे संरक्षणकरत होते. हे बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाले आहेत.त्यामुळे त्यांनी 2019 च्या कायद्यानुसार ट्रान्सजेंडरप्रमाणपत्र मिळवले आहे. शस्त्रक्रियेशिवाय आधार व इतरकागदपत्रे बदलली आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्तींनी मुख्यप्रवाहात येण्यासाठी प्रचंड अडथळ्यांवर मात केली आहे.केंद्र सरकारने त्यांचे कौतुक करायला हवे. त्याऐवजी तेत्यांचे हक्क हिरावून घेत आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सद्गुणांना विजयी करायचे असल्यास मौन- ध्यान करा
आजकाल जगात जे देश युद्ध करताहेत, त्यांच्याबद्दल विश्लेषकांचेअसे म्हणणे आहे की, ज्यांचे हेरगिरीचे जाळे भक्कम असेल आणिजो कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करेल, तोच जिंकेल. जगाचे हे जेदृश्य आहे, त्यातून आपण काय शिकावे? विशेषतःआध्यात्मिकदृष्ट्या, कारण एक युद्ध आपण रोज आपल्या आतहीलढत असतो. दुर्गुण आणि सद्गुणांचे. या महाभारतापासून कोणताहीमाणूस वाचलेला नाही. हृदयाचे स्थान सद्गुणांकडे आहे. रजोगुणशरीरावर आहेत. मन दुर्गुणांना सुरक्षा देते. तीन गुणांनी बनलेली हीकाया आंतरिक युद्धाशी झुंजत असते. मौन व ध्यान - हे हेरगिरीचेजाळे आहे. त्याने दोन्ही साधले. पांडव जर सद्गुण असतील आणिकौरव दुर्गुण, पांडवांच्या विजयामागे श्रीकृष्णांचे गुप्तहेर जाळे होते.पांडवांचा धाकटा भाऊ सहदेव ज्योतिषी होता; त्याने दुर्योधनालाविजयासाठी पूजा सांगितली. तिची माहितीही श्रीकृष्णांकडे आली.त्यांनी तोडगा काढला. म्हणूनच आपल्या सद्गुणांना विजयी करायचेअसेल, मौन आणि ध्यान या दोन गोष्टी साध्य केल्या पाहिजेत.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:पुढे काय करायचे हे पाकिस्तानला ठाऊक नाही
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत पाकिस्तानचा सहभाग ही केवळ एकतात्पुरती घटना आहे, कोणतीही मोठीरणनीती नाही. त्यांना स्वतःलाच माहीतनाही की पुढे काय करायचे आहे. राष्ट्रीयताकदीशिवाय उचललेले कोणतेही पाऊल‘रणनीती'' बनू शकत नाही. तसेहीअमेरिकेची मैत्री धोकादायकच असते. सरकार खरी परिस्थिती उघडपणे का सांगू शकत नाही, हेसमजून घेणे सोपे आहे. सत्य हेच आहे की भारत याप्रकरणात पूर्णपणे तटस्थ नाही. भारत सध्या अरब देश,इस्रायल व अमेरिका यांच्या बाजूने आहे. मात्र,इराणसोबतही भारताचे महत्त्वाचे हितसंबंध आहेत.त्यामुळे भारत उघडपणे इराणच्या विरोधात जाऊ शकतनाही आणि उघडपणे त्यांच्या बाजूनेही उभा राहू शकतनाही. हा गुंता अत्यंत जटिल आहे. हे युद्ध थांबेल. तेव्हाहीभारताचे हितसंबंध जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या अशादोन्ही बाजूंशी जोडलेले असतील. याच कारणामुळे चीनने कधीही मध्यस्थीचा प्रयत्न केलानाही किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा उचललानाही. चीन समजूतदार आहे. त्याचे प्रतिस्पर्धी एकमेकांनाकसे कमकुवत करत आहेत. हे तो शांतपणे पाहत आहे.चीन जुन्या भावनांमध्ये अडकून पडलेला नाही तो फक्तस्वतःची शक्ती वाढवत आहे. ‘ग्लोबल साउथ'' मध्येचीनने आपल्या ‘बीआरआय'' (बेल्ट अँड रोडइनिशिएटिव्ह) द्वारे जवळपास 32 देशांना अवाढव्यव्याजाचे कर्ज देऊन आपल्या बाजूने वळवले आहे. चीनसध्या शांत आहे. भारताला मध्यस्थीसाठी बोलावले गेले किंवा भारताने केवळ निरोप पोहोचवण्याचे काम केलेम्हणजे सध्या पाकिस्तान करत आहे तसे. तरीही चीनला त्याचा हेवा वाटणार नाही. उलट त्याला हे सर्व एखाद्या विनोदासारखे वाटेल. कारण चीनला माहित आहे की भू-राजकारण हे भावनांचे नाही, तर संयम आणिदीर्घकालीन नियोजनाचा खेळ आहे. शक्ती निर्माणकरायला वेळ लागतो आणि पूर्ण लक्ष तिथेच द्यावे लागते. एकेकाळी पाकिस्तानने ‘रणनीतिक स्पष्टते'' मध्ये आघाडी घेतली होती. पण इतिहासाने दाखवून दिले की हे पाऊल त्यांच्यासाठी नेहमीच नुकसानकारक ठरले. पाकिस्तानने आपली संपूर्ण शक्ती फक्त एकाच लक्ष्यावर केंद्रित केली—भारत संपवता आला नाही तरी त्याला कमकुवत करणे.’ साम्यवादाशी लढण्यासाठी 1950 च्या दशकातच पाकिस्तान अमेरिकेच्या लष्करी गटात सामील झाला. पंडित नेहरूंनी ही बाब गांभीर्याने घेतली होती.त्यांना वाटले होते की भारत आणि पाकिस्तान एकत्रमिळून चीनच्या धोक्याचा सामना करतील. पणपाकिस्तानने भारताला सोडून चीनशी मैत्री केली आणि आपल्या ताब्यातील सीमा निश्चित करण्याचा मागेलागला. त्यात बहुतांश भाग काश्मीरमधील होता.परिणामी, 1960 पर्यंत पाकिस्तान अमेरिका व चीन यादोन्ही देशांच्या जवळ गेला. लष्करी ताकदीच्या जोरावर काश्मीर मिळवणे हेच त्यांचे स्वप्न होते. देशात असंतोष वाढला व अय्युब खान यांना सत्ता सोडावीलागली. त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्येमुजीबूर रहमान यांच्या आवामी लीगला बहुमत मिळाले,पण पश्चिम पाकिस्तानने निकाल मान्य करण्यास नकारदिला. तेव्हा पाकिस्तानने अमेरिका आणि चीनसोबतच्यासंबंधांचा वापर करून 1971 मध्ये हेन्री किसिंजर यांनागुप्तपणे चीनला नेले. यामुळे जगात खळबळ उडाली.त्यावेळी याह्या खान आणि भुट्टो यांना वाटले की आपणखूप यशस्वी झालो आहोत, पण पुढच्या पाच महिन्यांतचपाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशचीनिर्मिती झाली. 1979 मध्ये पाकिस्तानने पुन्हा तीच चूककेली. अफगाणिस्तानात सोव्हिएत संघाचा विरोधकरण्यासाठी तो अमेरिकेसोबत गेला. त्यातून त्यांना पैसामिळाला, पण सोबतच लाखो शरणार्थी आणि ‘जिहादी''संस्कृतीही आली. याच जिहादींनी पुढे अमेरिकेतील ट्विनटॉवर्सवर हल्ला केला. 2001 मध्ये पाकिस्तान पुन्हा अमेरिकेचा मजबूतभागीदार’ बनला आणि 10 वर्षांत 22 अब्ज डॉलर्सचीमदत घेतली. पण जेव्हा ओसामा बिन लादेनपाकिस्तानच्याच अबोटाबादमध्ये सापडला, तेव्हा ही मदतथांबली. आज पाकिस्तानकडे काय उरले आहे? जिहादीसंस्कृती. ती आता त्यांच्याच सत्तेसाठी धोका बनली आहे;हिंसक धार्मिक भेदभाव; आत्मघातकी हल्ले आणितालिबानशी सुरू असलेला संघर्ष. 1954 पासूनच्या 70 वर्षांत जागतिक लक्ष वेधून घेतलेल्याचार प्रमुख पावलांनी पाकिस्तानला कमकुवत आणि गरीबबनवले आहे; त्याची एकता कमकुवत झाली आहे; त्याचासर्वात लोकप्रिय नेता तुरुंगात आहे, आणि एककठपुतळीसारखा फील्ड मार्शल सत्तेवर आहे. त्यांना वाटत असेल की ते आणखी एक चमत्कार करतआहेत, तर त्यांचे अभिनंदन. अमेरिकेशी वैर धोकादायकठरू शकते, पण तिच्याशी मैत्री घातक आहे, हे किसिंजरयांचे प्रसिद्ध विधान पाकिस्तान सिद्ध करत असल्याचेदिसते. भारताने आपल्या सीमा मजबूत केल्या पाहिजेत आणिआपल्या शत्रूंमध्ये भीती निर्माण करण्याची शक्ती निर्माणकेली पाहिजे. यामुळे या प्रदेशात शांततेची हमी मिळूशकते. हे पाकिस्तानसाठीही फायदेशीर ठरेल, कारणकेवळ भीती निर्माण करणारी पारंपरिक शक्तीच त्यालास्वतःचे नुकसान करण्यापासून रोखू शकते. या संपूर्ण युक्तिवादाचे सार हे आहे की, अमेरिका आणिइराण यांच्यातील चर्चेत सामील होण्याचा पाकिस्तानचा‘करिश्मा'' हा सामरिक नसून अल्पकालीन आहे, आणिपुढे काय करावे हे त्यांना माहीत नाही. राष्ट्रीयसामर्थ्याशिवाय कोणतीही सामरिक चाल धोरणात्मक बनूशकत नाही. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे ) अमेरिका आणि इराणमधील चर्चेत पाकिस्तान सहभागीआहे आणि भारत नाही, यावरून सध्या खूप चर्चा सुरूआहे. आपले महत्त्व राहिले नाही का? आपण आपलीनैतिक शक्ती गमावली आहे का?’ असे प्रश्न विचारलेजात आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करणारचकारण ते त्यांचे काम आहे. सरकारही या प्रश्नांची उत्तरेशोधत आहे. पण आम्ही पाकिस्तानसारखे ‘दलाल''नाही, असे याचे उत्तर होऊ शकत नाही.
संजय कुमार यांचा कॉलम:दक्षिण भारतात कामगिरी सुधारण्याचे भाजपचे प्रयत्न
भाजप दक्षिण भारतात आपला पाठिंबा वाढवण्याचे ध्येयठेवत आहे. परिणामी केरळ, तामिळनाडू आणिपुदुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुका भाजपलाविविध स्तरांवर निवडणुकीत यश मिळवण्याची संधी देतआहेत. चला, दक्षिणेकडील या आघाड्यांवर भाजपचेप्रयत्न आणि शक्यता तपासूया. केरळमध्ये सातत्याने एलडीएफ आणि यूडीएफयांच्यातच लढत राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीनंतरया दोन आघाड्यांमध्ये सत्ता आलटून पालटून येतराहिली आहे. 2021 च्या निवडणुका याला अपवादठरल्या. त्यात एलडीएफ सलग दुसऱ्यांदा सत्तेवर परतली. भाजपने केरळमध्ये आपले अस्तित्व वाढवण्यासाठीअथक प्रयत्न केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश गोपी यांनी त्रिशूर जागाजिंकून पक्षाचे खाते उघडले. अलीकडेच 101 सदस्य असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने 50वार्ड जिंकले व बहुमतासाठी त्यांना केवळ एका जागेचीकमतरता भासली. 2019 आणि 2024 च्या लोकसभानिवडणुकांचे निकाल दर्शवतात की भाजप केरळमध्येआपली पकड विस्तारत आहे. 2021 ची विधानसभाआणि अलीकडील स्थानिक निवडणुका देखील हेचदर्शवतात. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीतभाजपवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल. पक्षाने राज्याचे नावकेरळ वरून केरळलम असे बदलून आपल्या बाजूनेसकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाआहे. तो तेथील लोकांसाठी एक भावनिक मुद्दा आहे.तामिळनाडूमध्ये पारंपरिकरित्या द्रमुक आणिएआयएडीएमके यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळते.आता थलपथी विजय यांचा पक्ष तामिळनाडू वेत्रीकळघम (टीव्हीके) निवडणूक रिंगणात उतरला आहे.आपल्या पहिल्या मोठ्या पक्ष अधिवेशनात विजय यांनी''धर्मनिरपेक्ष सामाजिक न्याय'' ही टीव्हीकेची विचारधाराअसल्याचे सांगितले. त्यांनी भाजपला वैचारिक शत्रूआणि द्रमुकला राजकीय प्रतिस्पर्धी घोषित केले.समानता, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणिजात जनगणनेवर आधारित धोरणांवर लक्ष केंद्रित करूनआपले राजकारण भ्रष्टाचारमुक्त असेल, असेआश्वासन त्यांनी दिले. येथेही निवडणुकीत प्रभावपाडण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला गती निर्माणकरण्यात यश आले असले तरी निकालांमध्ये लक्षणीयप्रभाव पाडण्यात तो अयशस्वी ठरला. मागील विधानसभानिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी खराब होती. परंतु यानिवडणुकांमध्ये त्यांना आशा आहे. 2021 च्यानिवडणुकीत भाजपने एआयएडीएमकेसोबत युती करून20 जागांवर निवडणूक लढवली आणि 2.6% मतेमिळवली. 2016, 2011 आणि 2006 च्या निवडणुकांमध्येपक्षाला 3% पेक्षा कमी मते मिळाली होती. भाजपनेतामिळनाडूमध्ये युती करून आणि स्वबळावरनिवडणूक लढवून आपला पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्नकेला आहे. परंतु त्यात त्यांना विशेष यश मिळालेलेनाही. आता पक्षाला तेथे आपला मतांचा वाटावाढवण्याची आशा आहे आणि त्यासाठी पक्ष जोरदारप्रचार करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आर. एन.जयप्रकाश यांनी असा आरोप केला की, द्रमुकने आपल्या2021 च्या निवडणूक जाहीरनाम्यात 505 आश्वासनेदिली होती. परंतु त्यापैकी केवळ 160 पूर्ण केली. यावरूनअसे दिसून येते की सरकार आपली आश्वासने पूर्णकरण्यात अपयशी ठरले आहे. या कथित अपयशालानिवडणुकीची संधी मानेल. पुदुचेरीत सरकार वाचवेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) 2019 आणि 2024 च्या लोकसभानिवडणुकांचे निकाल दर्शवतात कीभाजप केरळमध्ये आपली पोहोच वाढवतआहे. पक्षाला या वेळी तामिळनाडूमध्येहीआपला मतांचा वाटा वाढण्याची आशाआहे आणि म्हणूनच पक्ष तेथे जोरदारप्रचार करत आहे.
विराग गुप्ता यांचा कॉलम:सीसीटीव्हीद्वारे होणारी हेरगिरी राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका
दिल्लीसह देशातील अनेक शहरांत सीसीटीव्हीद्वारेहेरगिरी होत असल्याचे समोर येणे चिंताजनक आहे.काही वर्षांपूर्वी चिनी दूरसंचार उपकरणांवर निर्बंधघालण्यात आले असले तरी सीसीटीव्ही नेटवर्कवरअजूनही चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. चीनकडूनमिळणाऱ्या अनुदानामुळे हे कॅमेरे भारतात स्वस्त दरात निर्यात केले जातात. परिणामी भारतातील सामरिकक्षेत्रांवर नजर ठेवण्याची संधी चीनला मिळू शकते. इस्रायलने इराणच्या सीसीटीव्ही व मोबाईल नेटवर्कची माहिती मिळवूनच सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनीयांच्यावर लक्ष्यित हल्ला केल्याचा उल्लेख केला जातो. तसेच मणिबेन पटेल यांच्यावरील एका पुस्तकानुसारसरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक ठरू शकतो,असा इशाराही दिला होता. चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळेनिर्माण होणारे चार महत्त्वाचे धोके पुढीलप्रमाणेसांगितले जातात : 1. स्मार्ट सिटी प्रकल्प, सरकारी कार्यालये, औषधांचीदुकाने, रस्ते, महामार्ग, रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्या, बस,शाळा, विमानतळ, बंदरे, रुग्णालये आणि संरक्षणक्षेत्रांमध्ये सरकारी आदेशांमुळे कोट्यवधी सीसीटीव्हीबसवले गेले आहेत. आयातीवर निर्बंध घातल्यानंतरहीचिनी उपकरणे आयात करून भारतात कॅमेरे जोडण्याचेकाम सुरू आहे. इराण संकटानंतर सायबर सुरक्षेसाठीस्थापन झालेल्या केंद्रीय संस्था सीईआरटी आणिसंरक्षण मंत्रालयाने दूरसंचार नेटवर्कमधील धोके लक्षातघेऊन अनेक सूचना जारी केल्या आहेत. तरीही देशभरपसरलेल्या सीसीटीव्ही नेटवर्कच्या नियंत्रणाबाबत ठोसकारवाई झालेली दिसत नाही.2. दिल्लीमध्ये 2018 नंतर दोन टप्प्यांत सार्वजनिकबांधकाम विभागामार्फत सुमारे 652 कोटींत सुमारे 2.64लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पोलिस वएनडीएमसीव्यतिरिक्त नगरसेवक, आमदार व खासदारनिधीतूनही सोसायट्या व बाजारांत कॅमेऱ्यांचे जाळेवाढत आहे. मात्र यापैकी 32 हजारांहून अधिक कॅमेरेसध्या बंद असल्याचे समोर आले . विशेष म्हणजे यालाखो कॅमेऱ्यांच्या सुरक्षा तपासणीसाठी पीडब्ल्यूडीनेबाह्य सल्लागार कंपनी नेमली असून ती सुमारे साडेसहावर्षांनी अहवाल देणार आहे.3. विदेशातून उपकरणांची आयात, दूरसंचार साधनांचीसुरक्षा व सीसीटीव्ही डेटासंबंधी कायदे करण्याचीजबाबदारी केंद्र सरकारची आहे. माहिती तंत्रज्ञानमंत्रालयाच्या अखत्यारीतील एसटीक्यूसी संस्थाकॅमेऱ्यांचे सोर्स कोड, फर्मवेअर व हार्डवेअरची गुणवत्ताव सुरक्षा तपासते. बाजारात प्रमाणित नसलेले कॅमेरेमोठ्या प्रमाणात विकले जात आहेत आणि स्थानिकसंस्था व पोलिसांना नियमांची पुरेशी माहितीही नाही.4. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतरही अनेक पोलिसठाण्यांत आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही बसवलेगेलेले नाहीत. घरे व बाजारपेठांधील कॅमेऱ्यांमधूनमिळणाऱ्या डेटाच्या सुरक्षेसाठी असलेला डिजिटलवैयक्तिक डेटा संरक्षण कायदा प्रभावीपणे लागू झालेलानाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपने सुरक्षेच्याकारणास्तव चिनी कॅमेऱ्यांच्या आयातीवर बंदी घातलीआहे. मात्र भारतात 2017 मधील ‘मेक इन इंडिया’आदेश 2021 मधील नोंदणीचे नियम बीआयएसचेआयएस 16910 मानक आणि मार्च 2024 मधीलसरकारी खरेदी नियमांचे काटेकोर पालन होत नसल्यानेराष्ट्रीय सुरक्षेवरील धोका वाढल्याने चिंतेत भर पडली.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपमध्ये चिनीसीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घातली आहे.मात्र भारतात नागरिकांच्या सुरक्षेसाठी वगुन्हेगारी रोखण्यासाठी उभारलेल्यासीसीटीव्ही नेटवर्कवर चिनी कंपन्यांचेवर्चस्व असल्याने राष्ट्रीय सुरक्षेलाअसलेला धोका वाढला आहे.
भगवान महावीर जयंती विशेष:संग्रहाच्या आसक्तीतूनच वाढते हिंसा, अहिंसेचा मार्गच खरा उपाय- बलराज संघई
संग्रहात आसक्त असलेला मानवच हिंसा वाढवतो जैन धर्मामध्ये २४ तीर्थंकर परंपरा आहे. जैन धर्माचे संस्थापक प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव आदिनाथ हे आहेत. तर २४ वे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर हे होते. तीर्थंकर म्हणजेच संपूर्ण ज्ञानाच्या ( केवलज्ञान, कैवल्य, सर्वज्ञता) प्राप्ती नंतर जे श्रावक-श्राविका ( गृहस्थ ) साधू-साध्वी या रूप चतुर्विध धर्म संघाची स्थापना ( तीर्थ स्थापना ) करतात व संपूर्ण जीव जातीच्या कल्याणासाठी धर्मोपदेश करतात. भगवान महावीरांचा जन्म ई.स. पूर्व ५९९, चैत्र शु. त्रयोदशी या दिवशी क्षत्रिय, इक्ष्वाकु वंशीय राजा सिद्धार्थ,राणी त्रिशला देवी यांच्या पोटी वैशाली गणतंत्र राज्यात क्षत्रिय कुंडलपुर ( वर्तमान नालंदा जिल्हा, आजची बिहारची राजधानी पटना पासून उत्तरेस ६० किमी,बिहार ) या ठिकाणी झाला. वर्धमान महावीर हे वयाच्या तीस वर्षापर्यंत राजमहालात राहिले. त्या नंतर संन्यास्त होऊन साडेबारा वर्ष आत्मसाधने मध्ये एकाग्र होऊन केवलज्ञान म्हणजेच सर्वज्ञतेची प्राप्ती केली. पुढे तीस वर्ष भगवंतांनी समस्त जीव जातीच्या कल्याणासाठी धर्मोपदेश केला. भगवान महावीरांना वैशाख शुक्ल दशमी या दिवशी चौथ्या प्रहरामध्ये विजयी मुहूर्तात जांभीय ग्राम या ठिकाणी रुजू बालिका नदीच्या उत्तरी तीरावर विहार करत असताना शाल व्रक्षाच्या सानिध्यात गोदोहीका आसनामध्ये तप आचरणात असताना ज्ञानमुद्रेत केवलज्ञान अर्थात सर्वज्ञतेची प्राप्ती झाली. याच ठिकाणी भगवंतांनी गृहस्थ महिला आणि साधू साध्वींच्या समुदायास दिव्यवाणीने प्रथम उपदेश दिला. तीर्थंकरांच्या दिव्यवाणीचे वैशिष्ट्य असे असते की भगवंताचे ओठ न हलता दिव्य ध्वनी सर्व दिशेमध्ये सर्व प्राण्यांना समजेल अशा भाषेमध्ये प्रसारित होते. चारीही दिशेने भगवंताच्या मुखकमलाचे दर्शन होत असते. प्रथम प्रवचनात महावीरांनी आत्मसाक्षात्काराच्या चतुरंग मार्गाचे प्रतिपादन केले. १. सम्यक दर्शन : सत्यावर श्रद्धा ठेवणे. खरे गुरु, धर्म व शास्त्रावर श्रद्धा ठेवणे. २. सम्यक ज्ञान : वस्तुमात्राचे खरे स्वरूप जाणणे. ३. सम्यक चारित्र्य : संयमासह अचरण करणे. तपो ज्वाला द्वारा आत्मशुद्धी करणे. या जगाचे मुख्य तत्व दोन आहेत. आत्मा (जीव) आणि अनात्मा (अजीव). जीव आणि आत्म्याची शरीर मुक्त अवस्था म्हणजेच परमात्मा. आत्म्यापासून परमात्मा होण्याचे अहिंसा,सत्य, संयम धर्माचा अवलंब करणे हेच साधन आहे. सुखात आनंदी व दुःखात दयनीय होऊ नका .स्तुतीने फुलून जाऊ नका, निंदेने सुकून जाऊ नका,सन्मान प्रसिद्धीने गर्व आणि अपमानाने तुच्छता वाटून घेऊ नका. कोणासही हीन दिन असे समजू नका.जीवनातील सर्व द्वंद्वात तटस्थ रहावे आणि समतापूर्वक जीवन हीच अहिंसा आहे असा उपदेश भगवंतांनी केला. भगवान महावीरांनी सत्य धर्मासाठी विशेष प्रवचन केले. ते म्हणाले सत्य ईश्वर आहे, तेच सर्व सृष्टीमध्ये सार तत्व आहे त्याचा शोध घ्या. जीवनातील कोणत्याच व्यवहारात असत्याचा प्रयोग करू नका. सत्य हेच शाश्वत आहे, त्याच्या पालनासाठी त्यांनी काही नियम सांगितले. १. मानसिक सत्य २. वाचिक सत्य : ३. कायिक सत्य : अस्तेय किंवा अचौर्य बाबत एका विशेष प्रवचनात भगवान म्हणाले, इच्छे वर संयम असू द्या. आपल्या इच्छावर संयम असणारा इतरांच्या वस्तू अधिकार याचे हरण करत नाही. असंयमाने राग द्वेष वाढतात,नंतर मोह वाढतो.ज्याचा मोह वाढतो त्याचे दुःख वाढते. जर दुःखापासून सुटका हवी असेल तर इच्छावर संयम असू द्या. इच्छा संयम हा शाश्वत धर्म आहे त्याच्या पालनासाठी १. वस्तूंचा अनावश्यक वापर टाळा. २. आवश्यकता आणि अनावश्यकता याचा विवेक असू द्या. ३. वस्तूंच्या वापरासाठी आपल्या इच्छा मर्यादित करा. ४. अल्पशा सामूग्रीमध्ये जीवनात संतोष माना. ब्रह्मचर्य तत्वाचे प्रवर्तन करताना महावीर असे म्हणाले की, अब्रह्मचर्येच्या असक्ती ला जिंकल्यानंतर किंवा काम प्रवृत्तीवर विजय मिळवल्यानंतर उर्वरित आसक्तीतून निवृत्त होणे सुलभ होते. महासागरात पोहोचल्यानंतर दीत पोहणे कठीण असत नाही. ब्रह्मचर्य हा शाश्वत धर्म आहे व त्याच्या पालनासाठी १. वक्तव्यावर बोलण्यावर संयम ठेवा. २. शुद्ध सात्विक आहार ग्रहण करा. ३. दृष्टीचा संयम असू द्या, विकार सहित दृश्य पाहू नका. ४. स्मृतीचा संयम असू द्या. भूतकाळातील असंयमाच्या स्मृती चे आवर्तन करू नका. ५. पाचही इंद्रियावर, व त्यांच्या सर्व विषयांवर आपले नियंत्रण असू द्या. ६. गृहस्थांनी अधिक आसक्ती न ठेवता स्वदार संतोष व्रत धारण करावे. आत्म दर्शनाचा अभ्यास करा, स्वयंकेंद्रित व्हा,आत्मलीन व्हा,स्वतःमध्ये सतत रममाण होणे हेच ब्रह्मचर्य आहे. अपरिग्रहाच्या सिद्धांताचे भगवान महावीरांनी विस्तृत विवेचन केले. परिग्रहात आसक्त मानव वैर वाढवतो त्यासाठी पदार्थावर आसक्ती ठेवू नका अनासक्ती शाश्वत धर्म आहे. त्याच्या पालनासाठी शब्दावर आसक्ती ठेवू नका, रूपावर आसक्त होऊ नका, रस सौंदर्यावर आसक्ती ठेवू नका, स्पर्शाने आसक्त होऊ नका. आसक्ती आणि त्याच्या कारणांपासून दूर राहणे हाच अपरिग्रह आहे. परिग्रहाने हिंसा वाढते व अकारण संग्रह केल्याने जीवांमध्ये द्वेषभावना वैरभावना वाढतात. भगवान महावीरांनी मुनी धर्माच्या स्थापनेनंतर गृहस्थ धर्माची व्याख्या केली. भगवान म्हणाले, गृहस्थ हा परिवार समाज, राज्य, आदिं पासून मुक्त होऊ शकत नाही तरीही त्याने आंशिक प्रमाणात व्रतांचे पालन आवश्यक करावे. १. मोठ्या हिंसेचा त्याग करावा २. महान असत्याचा त्याग करावा. ३. चोरीचा प्रयत्न करू नये. ४. स्वदारसंतोष व्रत धारण करावे. ५. परिग्रह संग्रह सीमित असावेत. या प्रथांच्या पाठबळासाठी काही सहाय्यक व्रतांचा अभ्यासही भगवंतांनी सांगितला. १. सर्व दिशांना जाण्याची मर्यादा ठरवून त्या बाहेर जाऊन हिंसा आणि व्यवहाराचा त्याग करावा. २. सीमा बाह्य वस्तूंचा उपभोग टाळावा. ३. अनावश्यक वस्तूंचा उपभोग घेऊ नये. ४. समतेचा अभ्यास असावा. ५. दैनिक व्यवहाराची सीमा निर्धारित करावी. ६. आत्म उपासनेसाठी नित्य क्रमात वेळ द्यावा. ७. त्याग तपश्चर्या संयम पूर्वक उपासना व्रत अंगीकारावे. मिथ्यात्व,आसक्ती, आणि भोग लालसेने जखडलेल्या माणसांनी वाणी संयम,अनासक्ती, अपरिग्रहाचा पडताळा पाहिला, प्रकाश पाहिला आणि हजारो व्यक्ती भगवान महावीरांचा उपदेश शिरसावंद्य मानून शिरोधार्य मानण्यास प्रवृत्त झाले. भयानक परिस्थितीमुळे विचारांना एक नवी दिशा मिळाली आणि भौतिक गोष्टी असार मानून लोक प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून निवृत्तीच्या मार्गाकडे अहिंसेकडे वळले. मनुष्य स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता आहे. सुख दुःखास स्वतः कारणीभूत आहे. तो ईश्वरीय सत्तेने संचालित नाही. आत्मा हाच परमात्मा आहे. त्यात ईश्वर वेगळा नाही. आत्मसाधने द्वारा कर्ममुक्त होणारा ईश्वर बनतो. भगवंतांनी उपदेशातून व्यक्तीतल्या निद्रिस्त परमात्म्यास जागृत केले. कर्माने पीडित जनतेस भगवंतांनी प्रेरणा दिली. याबाबत भगवान महावीर म्हणाले की पुरुषा! तू स्वतः पराक्रम कर, जो मनुष्य आपल्या शक्तीचा उपयोग करत नाही, तो आपल्या दैवी प्राप्तीपासून वंचित राहतो. अवयव थकत नाहीत तोपर्यंत संयम साधना करा. भगवंतांनी दैववाद स्वीकृत केला नाही परंतु त्यांनी पुरुषार्था पासून दूर जाणाऱ्या जनतेस दैववादाच्या, भाग्यवादाच्या बेडी तून मुक्त केले. भगवंतांच्या वाणीतून समन्वयाची धारा प्रवाहीत झाली. त्यात दैवाला स्थान नाही, एकट्या पुरुषार्थासही स्थान नाही. तर भाग्य आणि पुरुषार्थ दोहोंची संगत हीच त्या धारेचा मुख्य प्रवाह आहे. या प्रवाहानेच भारतीय जनतेस चमत्कार व कर्मण्यता, अनिष्ठ रूढींपासून मुक्त पुरुष आणि जागृती वाढवली त्यातच भारतीय जनता भारतीय आत्मा प्रफुल्लित झाला. या प्रकारे भगवान महावीरांनी केवल ज्ञान किंवा कैवल्य अर्थातच सर्वज्ञतेच्या प्राप्तीनंतर तीस वर्षांपर्यंत हिंसा व कर्माने पीडित जनतेस सत्य मार्गाचा उपदेश केला. शाश्वत अशा सुख प्राप्ती करणाऱ्या धर्माची त्यांनी व्याख्या केली, याच क्रमात त्यांनी जनजनांचा उद्धार केला. जनतेच्या अनेक जिज्ञासांचे समाधानही केले. भगवान महावीरांनी प्रतिपादन केलेल्या सर्वच तत्वांचे दर्शना एका छोट्याशा लेखांमधून करणे अशक्य आहे. त्यासाठीच भगवंताच्या उपदेशाचा प्रमुख भाग या ठिकाणी नोंदीत केला आहे. भगवंताच्या उपदेशातून असंख्य असे प्रकांड पंडित,विद्वान शिष्य निर्माण झाले. त्यामध्ये प्रमुख गौतमस्वामी, सुधर्मा स्वामी इत्यादी अकरा असे मुनी समुदायाचे नायक म्हणजेच गणधर पंडित होते. या सर्व आचार्यांचे मिळून ४४०० शिष्य होते. या आचार्यांनी आणि शिष्यांनी त्यातील उपाध्याय मंडळींनी पुढे भगवान महावीराच्या उपदेशाचे शास्त्रांमध्ये मांडणी केले. तेच जैन आगम ग्रंथ म्हणून आज प्रकाशित आहेत. केवलज्ञान अर्थात सर्वज्ञता प्राप्तीनंतर भगवान महावीरांचे जीवन केवळ समस्त जीव जातीच्या आत्म ऊद्धारासाठी आणि कल्याणासाठी अहिंसा,सत्य,शांती,अपरिग्रह, ब्रह्मचर्य या तत्वांचा उपदेश करण्यातच सत्कारणी लागले. वयाच्या ७२ व्या वर्षी भगवंतांचे कार्तिक कृष्णा अमावस्ये च्या दिवशी पावापुरी ( आजचे नालंदा जिल्हा, बिहार ) येथे महानिर्वाण झाले. भगवान महावीरांची अहिंसा योध्याची अहिंसा आहे ज्याने भगवान महावीरांचे चरित्र पूर्ण जाणले तो अहिंसेस भ्याडपणा म्हणण्याचे धाडस करणार नाही. अभय आणि पराक्रम त्यांच्या अहिंसेस जोडलेला आहे. भगवान महावीरांची निवृत्ती अकर्मण्यता नाही ती कर्मावरील विजयाची अजिंक्य अशी शक्ती जागृत करणारी महान गाथा आहे. म्हणूनच भगवंताच्या वाणीमध्ये विश्वशांतीच्या पथ दर्शनाची क्षमता आहे. (बलराज संघई, (एम. ए. अहिंसा शांति शोध) | छत्रपती संभाजी नगर, 9420015108)
जीवनमार्ग:भगवंताची कृपा होते तेव्हा जीवनात संत येतात
संत आणि भगवंत यांच्यातील समन्वय अद्वितीय आहे. एक दुसऱ्याकडे घेऊन जातो आणि दुसरा पहिल्याकडे. भगवंताचा आशीर्वाद असतो तेव्हा संत आपल्या जीवनात येतात आणि ते आपल्याला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. रामायण ऐकून, पक्ष्यांचा राजा गरुड भावविवश झाला आणि म्हणाला, “संत बिसुध्द मिलहिं परि तेहि, चितवहिं राम कृपा करि जेही।’ खरे संत केवळ त्यांनाच आढळतात ज्यांच्यावर प्रभू राम कृपादृष्टी टाकतात.” म्हणून, आपल्या जीवनात संत आणि देव या दोघांचाही आदर राखा. आजकाल संत, महात्मा आणि बाबा यांच्यावर सतत मालिका बनवल्या जात आहेत. यापैकी काही मालिका पाहताना असे वाटते की त्यांना बदनाम करण्यासाठी मुद्दामहून कट रचला जात आहे. एका पिढीला असे वाटू शकते की भगवे वस्त्र परिधान केल्याने माणसाला काहीही करण्याची—विशेषतः वाईट गोष्टी करण्याची—परवानगी मिळते. परंतु आपण या पिढीला हे समजावून सांगितले पाहिजे की भगवंताचा आशीर्वाद असतो, तेव्हा संत आपल्या जीवनात येतात. काही महात्म्यांच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण संत परंपरेचा अपमान होऊ नये. Facebook:Pt. Vijayshankar Mehta
परराष्ट्र धोरण हे राष्ट्राच्या चारित्र्याची अभिव्यक्ती:आजही नैतिकता महत्त्वाची आहे
वाढत्या अनिश्चिततेच्या जगात भारताला संतुलन पुनर्स्थापित करण्यात भूमिका बजावण्याची संधी आहे आणि ब्रिक्सचे सध्याचे अध्यक्षपद भूषवत असल्यामुळे भारत इराण युद्ध संपवण्यातही भूमिका बजावू शकतो.परराष्ट्र धोरण काय असावे याबद्दल ‘नैतिकवादी’ आणि ‘वास्तववादी’ यांच्यात एक नवीन वादविवाद उदयास येत आहे. वास्तववाद्यांच्या मते जग नैतिक उपदेशांनी चालत नाही. हे एक अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्र आहे. येथे निकाल तत्त्वांनी नव्हे तर शक्तीच्या जोरावर ठरतात. अशा परिस्थितीत तात्काळ आर्थिक लाभ आणि सामरिक फायदा हे कोणत्याही अमूर्त आदर्शांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरतात. या दृष्टिकोनानुसार दुर्बळ देशांनी शांत राहावे, सौम्यपणे बोलावे, काळजीपूर्वक युती करावी व आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करावा. हा दृष्टिकोन आदर्शवादाला केवळ मूर्खपणाच नव्हे, तर एक ओझे मानतो. हा दृष्टिकोन व्यावहारिक वाटत असला तरी त्याची व्याप्ती मर्यादित आहे. तो राष्ट्रांना केवळ व्यवहार करणाऱ्या संस्थांपुरते मर्यादित करतो. त्यांना ओळख, स्मृती किंवा नैतिक कल्पनाशक्ती नसते. यात असे गृहीत धरले जाते की जागतिक सन्मानाचे एकमेव चलन म्हणजे सत्ता, तर इतिहास हे सिद्ध करतो की चिरस्थायी प्रभाव अनेकदा विश्वासार्हता, सातत्य आणि दृढनिश्चय यांच्या संयोगातूनच निर्माण होतात. उदाहरणार्थ २० व्या शतकातील वसाहतविरोधी संघर्ष केवळ लष्करी बळावर जिंकले गेले नाहीत; ते साम्राज्यवादी वर्चस्वाचा ढोंगीपणा उघड करणाऱ्या नैतिक युक्तिवादांनी प्रेरित होते. सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता व समानता यांसारख्या तत्त्वांची मांडणी, कालांतराने, स्वतःच सत्तेची साधने बनली आहेत. याचा अर्थ असा नाही की परराष्ट्र धोरण उपदेशात्मक पद्धतीने चालवले जावे. साहजिकच राष्ट्रांनी जगाच्या वास्तवाला प्रतिसाद दिलाच पाहिजे. पण याचा अर्थ शरणागती पत्करणे असा होत नाही. सामरिक लवचिकता व नैतिकतेचा त्याग करणे यात फरक आहे.एखादा देश थोड्याशी गैरसोय दिसताच आपली घोषित तत्त्वे सोडून देत असेल, तर तो केवळ जगात आपली विश्वासार्हताच कमी करत नाही तर देशांतर्गत आत्मसन्मानही धोक्यात आणत असतो. कमकुवत देश आपला आवाज उठवू शकत नाहीत हा दावा म्हणजे मूलतः पराभववाद आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील सामर्थ्य केवळ लष्करी किंवा आर्थिक मानकांवरून मोजले जात नाही. एखाद्या राष्ट्राची आपली भूमिका स्पष्टपणे आणि सातत्याने मांडण्याची क्षमता यातही दडलेली आहे. भारतासारखा देश ठामपणे आपले मत दृढतेने मांडतो. त्याचा परिणाम जागतिक राजकारण विकसित होणाऱ्या वातावरणावर होतो. त्याला आकार देण्यास हातभार लावतो. याउलट मौन हे अनेकदा शरणागती म्हणून समजले जाते. आदर्शवादावरील टीका ही राष्ट्रीय हिताच्या संकुचित समजावर आधारित असते. सत्य हे आहे की संधीसाधू समजल्या जाणाऱ्या देशांना अनेकदा एक तर गृहीत धरले जाते किंवा भू-राजकीय घडामोडींमधील महत्त्वपूर्ण भूमिकेतून वगळले जाते. याउलट देश अडचणी असूनही तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन दाखवतात. त्यांना अनेकदा एक नैतिक वलय प्राप्त होते. ते त्यांच्या भौतिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्यांचा प्रभाव वाढवते. भारताचे अमेरिका आणि इस्रायलसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण इराणसोबतही आपले कूटनीती आणि प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत. इराणच्या धोरणांबद्दल कुणाचे मत काहीही असले तरी इराणच्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्याची हत्या, या घटनांमुळे सार्वभौमत्व, अहस्तक्षेप व वादांचे शांततापूर्ण निराकरण याविषयी भारतासारख्या देशाकडून तात्काळ तीव्र चिंता व्यक्त होणे अपेक्षित होते. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील आदर हा धोका पत्करूनही आपली मते व्यक्त करण्याच्या आणि त्यांचे रक्षण करण्याच्या धैर्यातून येतो. या अर्थाने परराष्ट्र धोरण हे राष्ट्राच्या चारित्र्याची अभिव्यक्ती असते. वाढत्या अनिश्चिततेच्या जगात येथे नियमांची कसोटी लागते आणि त्यांची पुनर्व्याख्याही होत आहे. येते भारताला संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यात भूमिका बजावण्याची संधी आहे. ब्रिक्सचा विद्यमान अध्यक्ष या नात्याने हे युद्ध संपवण्यातही भारत भूमिका बजावू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे )
तामिळनाडूच्या लोकांनी जैनधर्म सहजभावातून स्वीकारला:विशेष धर्म, करुणा आणि शांतीचा मार्ग
आज तामिळनाडूमध्ये ४० हजारांहून अधिक तामिळ भाषिक जैन राहतात. ते या प्राचीन वारशाशी एक जिवंत नाते जपतात. प्राचीन तामिळ साहित्यात जैन विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तामिळनाडू ही फार पूर्वीपासून एक आध्यात्मिक भूमी आहे. प्राचीन सांस्कृतिक वारसा, सखोल सर्वसमावेशक वृत्ती व अद्वितीय बुद्धिमत्तेने समृद्ध असलेल्या आपल्या तामिळनाडूने देशभरातील धर्मांना खुल्या मनाने स्वीकारले आणि त्यांचे पोषण केले आहे. म्हणूनच तामिळनाडूच्या लोकांनी सध्याच्या बिहारमध्ये उगम पावलेल्या जैन धर्माचा सहजपणे स्वीकार केला. तमिळ लोकांनी नेहमीच धर्माला जीवनाचा मूलभूत पाया मानले आहे आणि यावर जोर देणाऱ्या धर्मांना स्वीकारून आपल्या जीवनात समाविष्ट केले आहे. जीवन हे ‘अरम’ (सदाचार), ‘पोरुल’ (संपत्ती) आणि ‘इनबम ‘ (सुख) यांच्या सुसंवादी शोधातून साकारले जाते तेव्हा संपत्ती आणि सुख केवळ धर्माच्या मार्गाचे अनुसरण करूनच प्राप्त केले पाहिजे. ‘अरथोडु नित्रल’—धर्माचे अविचल पालन—ही गोष्ट जीवनाचे मूलभूत व्याकरण निर्माण करत असते. तामिळनाडूच्या लोकांचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे सदाचाराशिवाय संपत्तीचा शोध घेणे व विना धर्मपरायण सुखांचा उपभोग घेणे अयोग्य आहे. समाजात अशा प्रथा अस्तित्वात असल्या तरी त्यांना कधीही परंपरेचा भाग मानले गेले नाही. आपल्या संस्कृतीने असे नियम प्रस्थापित केले की साहित्यसुद्धा अशा वर्तनाचे समर्थन करणार नाही—हे तत्त्व ‘तोलकाप्पियम’ या प्राचीन ग्रंथात प्रतिबिंबित होते. भगवान महावीरांनी शिकवले की ‘त्रिरत्न’—म्हणजेच सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण—हा जैन धर्माचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे अशा नैतिक आदर्शांना अत्यंत महत्त्व देणाऱ्या तामिळनाडूच्या लोकांनी या महान परंपरेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. म्हणूनच यात आश्चर्य नाही. भारतातील सर्वात प्राचीन आध्यात्मिक परंपरांपैकी एक म्हणून जैन धर्म अहिंसा, सत्य, तपश्चर्या आणि त्याग या नैतिक तत्त्वांवर आधारित आहे. भगवान महावीरांनी बारा वर्षांच्या तीव्र तपश्चर्येतून मिळवलेले ज्ञानधन मानवतेच्या उद्धारासाठी लोकांमध्ये वाटले. त्यांचा शाश्वत संदेश स्पष्ट आणि अविचल होता : मोक्ष केवळ धर्माच्या मार्गाचे दृढपणे अनुसरण करूनच मिळू शकतो. इतर कोणत्याही मार्गाने नाही. साहजिकच जैन धर्मात दानधर्मावर भर दिला जातो. हे तत्त्व तामिळ लोकांच्या स्वभावाला अनुसरून करुणामय वृत्तीशी एकरूप झाले आहे. तामिळनाडूमध्ये जैन धर्माच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची शिकवण लोकांपर्यंत तमिळ भाषेतून पोहोचवली गेली. जैन विद्वानांनी आपापल्या क्षेत्रातील स्थानिक मातृभाषांत धर्मग्रंथ रचले. अशा प्रकारे त्यांनी आपले तत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. तामिळ साहित्यातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. प्राचीन तामिळ साहित्यात जैन विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. संगम काळात, ‘पुरनानूरू’चे लेखक, कवी पक्कडुक्कई नंकानियार म्हणाले होते- “हे जग दुःख आणि सुखाचे एक अनपेक्षित मिश्रण आहे. तरीही त्याचे स्वरूप जाणणारे लोक त्यात अंतर्भूत माधुर्यही ओळखतात.’ यातून जैन दृष्टिकोन दिसून येतो की सुख आणि दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि हे वास्तव ओळखण्यातच खरे ज्ञान आहे. त्याचप्रमाणे कनियान पुंगुंद्रनार यांची प्रसिद्ध कविता, “याधुम ऊरे, यावरुम केलिर’ एक वैश्विक दृष्टिकोन व्यक्त करते—त्यानुसार सर्व ठिकाणे आपलीच आहेत आणि सर्व लोक आपले मित्र आणि नातेवाईक आहेत; शिवाय चांगले आणि वाईट हे इतर कुणामुळे होत नाही, तर ते आपल्या स्वतःच्या कर्मांनी ठरते. कर्माच्या तत्त्वावर आधारित हा गहन विचार जैन तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. म्हणूनच कनियान पुंगुंद्रनार यांना अनेकदा जैन कवी मानले जाते. ‘सिलप्पथिकारम’, ‘जीवका चिंतामणि’, ‘वलैयापति’ आणि ‘नालादियार’ यांसारख्या कालातीत रचना तामिळ साहित्यिक वारशाचे चिरस्थायी आधारस्तंभ आहेत. त्यावर जैन तत्त्वज्ञानाचा अमिट ठसा आहे. आज तामिळनाडूमध्ये ४० हजारांहून अधिक तामिळ भाषिक जैन राहतात. ते या प्राचीन वारशाशी एक जिवंत नाते जपतात. ‘दक्षिणेची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचीपुरमची अनेकदा तीन वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागणी केली जात असे : शिव कांची, विष्णू कांची आणि जैन कांची. या प्रदेशांपैकी शेवटचा प्रदेश म्हणजे तिरुपरुत्तिकुनरमचा भाग होय. येते भगवान महावीर आणि भगवान चंद्रप्रभ यांची मंदिरे आहेत. येथे जैन साधूंनी धर्म, शिक्षण आणि समाजाला अमूल्य सेवा दिली आहे. तिरुप्पूर जिल्ह्यात जन्म आणि वाढ झाल्यामुळे माझ्या प्रदेशाच्या जैन वारशाशी माझे एक खोल व वैयक्तिक स्नेहबंध आहेत. भगवान महावीरांच्या जन्माच्या या शुभप्रसंगी आपण धर्मपरायणता, करुणा आणि शांतीच्या मार्गावर चालण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया.
एन. रघुरामन यांचा कॉलम:मुले ‘टेक नेक’ वा ‘कॉस्मेटिकोरिक्सिया’च्या समस्येशी झुंजत तर नाहीत ना?
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या पत्नीने आमच्या मुलीला सहज म्हटले, ‘तू तुझ्या वयापेक्षा मोठी दिसतेस.’ हे ऐकताच घरात वादळच उठले. पत्नीने असे म्हटले. कारण मुलगी उशिरापर्यंत जागत होती. खूप जड व्यायाम करत होती आणि सतत थकलेली दिसत होती. पण तरुण पिढी पालकांच्या बोलण्याचा कसा अर्थ लावते हे आपल्याला माहितीच आहे. पुढील काही महिने ती वारंवार माझ्याकडे येऊन विचारत होती, ‘मी ठीक दिसते ना?’ तिच्या ड्रेसिंग टेबलवर अनेक नवीन कॉस्मेटिक उत्पादनेही दिसू लागली. घरात शांतता राहावी म्हणून मी काही न बोलता तिला पैसे देत राहिलो. त्या वेळी मला माहीत नव्हते की अशा प्रकारच्या वर्तनाला ‘कॉस्मेटिकोरिक्सिया’ असे म्हणतात. याचा अर्थ मला अलीकडे समजला. इटलीतील स्पर्धा आणि बाजार नियामक प्राधिकरणाने फ्रेंच लक्झरी समूह एलव्हीएमएचच्या मालकीच्या एका सौंदर्य उत्पादन विक्रेत्या आणि मेकअप ब्रँडच्या मार्केटिंगची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली. आरोप असा की सोशल मीडियावरील मोहिमांमुळे तरुणींमध्ये स्किन केअर उत्पादनांविषयी अतोनात आकर्षण निर्माण झाले आणि त्या नाइलाजाने ही उत्पादने खरेदी करू लागल्या. नियामक संस्थेच्या मते, कंपन्यांनी कथितपणे भ्रामक मार्केटिंग रणनीती वापरली. त्यात कमी वयाच्या सूक्ष्म प्रभावकांचा वापर करण्यात आला, जे विशेषतः संवेदनशील तरुणांना सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यास प्रवृत्त करू शकतात. तसेच ही उत्पादने ‘मुले आणि किशोरवयीन’ वापरकर्त्यांसाठी नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला गेला नाही, असा आरोप आहे. संबंधित कंपनीने मात्र तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले आहे. याच संदर्भात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या माझ्या एका नातेवाइकानेही एक अनुभव सांगितला. त्यांच्या पत्नीने 24 वर्षांच्या ब्यूटी इन्फ्लुएन्सर असलेल्या मुलीला सांगितले की, ‘तुझ्या मानेला माझ्यापेक्षा जास्त सुरकुत्या आहेत.’ मान ही वय दर्शवणारा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे त्यांच्या घरीही मोठा वाद झाला. नंतर सहा महिन्यांनी त्यांनी मुलीला समजावले की याचा तिच्या सौंदर्याशी संबंध नाही; त्यामागे खरा कारणीभूत घटक म्हणजे तंत्रज्ञानाचा अति वापर आहे. स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर करताना सतत खाली मान घालून पाहण्याची सवय लागते. त्यामुळे मानेला आडव्या रेषा अधिक ठळक दिसू लागतात. या स्थितीला ‘टेक नेक’ असे म्हणतात. वाढत्या वयानुसार मानेला काही रेषा पडणे नैसर्गिक असले तरी सतत मोबाइल वापरल्यामुळे या रेषा अधिक वाढतात, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. कॅलिफोर्नियातील कॉस्मेटिक त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तासन्तास फोनवर राहतात किंवा संगणकावर खाली पाहत काम करतात. त्यामुळे मानेवरील काही कायमस्वरूपी रेषा अधिक गडद होऊ शकतात. या संदर्भात मध्य प्रदेशातील हर्बल कॉस्मेटिक उत्पादने तयार करणाऱ्या ‘देविकाज’ या कंपनीच्या संचालक बिंदिया खेर्ब यांच्याशी झालेली चर्चा आठवते. त्यांनी सांगितले की त्यांच्या सोशल मीडिया पेजवरील जवळपास एक-तृतीयांश अनुयायी 23 वर्षांखालील तरुण आहेत. मात्र ते गंभीर ग्राहक नसल्याचे त्यांचे मत होते. परंतु एका वरिष्ठ प्राध्यापकांनी त्यांना वेगळाच अनुभव सांगितला. विशाखापट्टणममध्ये शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या 17 वर्षांच्या मुलाने नुकतेच त्या कंपनीचे उत्पादन खरेदी केले होते. त्यानंतरच त्यांना समजले की ही कंपनी भोपाळची आहे. फंडा हा आहे की, तुमची मुले खूप जास्त कॉस्मेटिक उत्पादने खरेदी करत असतील किंवा आरशासमोर खूप वेळ घालवत असतील तर ते ‘टेक नेक’ किंवा ‘कॉस्मेटिकोरिक्सिया’सारख्या नव्या समस्यांना सामोरी जात आहेत का, हे एकदा तपासणे गरजेचे आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:गुंतवणूकदारांसाठी युद्धातील महत्त्वाचे धडे
गुंतवणूकदाराचे जीवन कधीकधी आव्हानात्मक होते, जेव्हा दीर्घकाळात उत्तम परतावा देणारी इक्विटी मार्केट व सुरक्षित गुंतवणूक मानले जाणारे सोने हे एकाच वेळी संकटात येतात. अशा स्थितीत विक्री वा नवीन खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी, दोन मूलभूत वास्तव समजून घ्यावे लागतील. दशकांपर्यंत ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (एलएनजी) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाच्या वेळी एका सुरक्षा व्हॉल्व्हप्रमाणे काम करत असे, ज्यामुळे कारखान्यांना स्वस्त इंधन मिळत राहत असे. परंतु इराण युद्धाने संपूर्ण सप्लाय चेन उद्ध्वस्त केली आहे. गॅस उत्पादक कतारच्या ‘रास लफ्फान’ सुविधेचे झालेले नुकसान हा एक मोठा धक्का आहे. जागतिक उत्पादन क्षमतेत 17% कपात झाली आहे, जी पूर्ववत होण्यासाठी किमान 5 वर्षे लागू शकतात. कच्च्या तेलाच्या उलट, जगाकडे गॅसचा कोणताही ‘सामरिक साठा’ नाही. जर युद्ध आज संपले, ज्याची शक्यता कमीच आहे, तरीही गॅस बाजार सामान्य होण्यासाठी तेलाच्या तुलनेत खूप जास्त वेळ लागेल. गॅसची ही कमतरता केवळ श्रीमंत देशांमध्ये ऊर्जा आधारित महागाई वाढवणार नाही, तर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाचे रेशनिंग आणि कारखाने बंद होण्याची वेळ आणू शकते. खते, कच्चा माल आणि सेमीकंडक्टर उत्पादनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गॅसची कमतरता आर्थिक चक्रावर वाईट परिणाम करू शकते. अमेरिकन कन्सल्टिंग फर्म युरेशिया ग्रुपने म्हटल्याप्रमाणे, ‘जागतिक गॅस बाजार, जो अतिरिक्त आणि स्वस्त असेल अशी अपेक्षा होती, आता मोठी टंचाई आणि वाढत्या दरांच्या काळात प्रविष्ट झाला आहे.’ युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमतीत 16% पेक्षा जास्त घसरण झाली आहे, ज्याने या वर्षाची सुरुवातीची वाढ पूर्णपणे पुसून टाकली आहे. यामुळे सोन्याच्या त्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामध्ये त्याला ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानले जात असे. सामान्यतः भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या किमती वाढतात. युद्धाच्या सुरुवातीच्या 10 दिवसांपर्यंत सोन्याने मूल्य टिकवून ठेवले होते, तर शेअर बाजार कोसळत होता. परंतु त्यानंतर सोनेही विक्रीच्या तडाख्यात सापडले. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून होत असलेला नफा काढून घेत आहेत. या स्पर्धेने सोन्यालाही अस्थिर केले आहे. मॅनेजमेंट टिप: बाजार ‘शॉक व पॅनिक’ फेजमध्ये आहे. दोन्ही मालमत्ता (ॲसेट) परतीचा रस्ता शोधून घेतात.इक्विटीला सावरण्यासाठी वेळ लागू शकतो, जसे महामारीच्या काळात दिसले होते. सोन्यामध्ये मात्र 2008 च्या संकटानंतर दिसली होती तशी वेगवान रिकव्हरी दिसून येऊ शकते.
एन. रघुरामन यांचा कॉलम:आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना हलक्यात घेऊ नका
जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्यान ही बाराही महिने वाहणारी नदी असायची, पण आता ती कधी-कधी कोरडी पडते. मला वाटायचे की तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील माझ्या मूळ गावी ती कायम अशीच दुथडी भरून वाहत राहील. मला तो पोंगलही खूप आठवतो, जो मला दररोज सकाळी 6 वाजता कावेरीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिरात प्रसाद म्हणून मिळायचा. नदीत पोहून आल्यावर त्या गरम पोंगलची चव दोन कारणांमुळे नेहमीच अद्भुत लागायची- एक, पोहल्यामुळे भूक वाढते आणि दोन, देवाच्या आशीर्वादामुळे त्यांचा प्रसाद आणखी चविष्ट बनतो. मला तो वडा-सांबारही आठवतो, जो लहानपणी रविवारी माझे आजोबा मला खाऊ घालायचे. ‘वेंकटा लॉज' नावाच्या हॉटेलमध्ये तो एका आण्याला (सहा पैसे) मिळायचा. तिथे वेटर ॲल्युमिनियमची बादली घेऊन उभा असायचा आणि तो कंटाळा न करता हवा तेवढा सांबार वाढायचा. ही माझ्या आयुष्यातील छोटी-छोटी आश्चर्ये होती. मी नेहमीच त्यांना हलक्यात घेतले, पण आज जेव्हा मी जास्तीच्या सांबारच्या छोट्या वाटीसाठी 5 रुपये देतो तेव्हा मला ती बादली व त्या वेटरचा चेहरा आठवतो. त्या हॉटेलने आतापर्यंत आपल्या मूळ मालकांनंतर तीन नवे मालक पाहिले आहेत आणि नव्या मालकाची मुले याचे रूपांतर दुसऱ्या एखाद्या व्यवसायात करू शकतात. याहून मोठ्या पातळीवर मला अरबी समुद्र व किनाऱ्यांची उणीव भासते. समुद्र तिथेच आहे- पण माझे काम मला अनेकदा- अगदी रविवारीही- त्या किनाऱ्यालगतच्या मुंबईपासून दूर घेऊन जाते, जिथे मी राहणे पसंत केले आहे. लोक आयुष्यातील आश्चर्यांना हलक्यात घेतात. पण ती प्रत्येक रूपात व आकारात आपल्यासमोर येतात. मोठी आश्चर्ये थक्क करणारी असू शकतात, पण छोट्या आश्चर्यांनी आपले आयुष्य बनते. जीवनप्रवासाची दु:खद बाजू ही आहे की या छोट्या-छोट्या आश्चर्यांना हरवण्याची वाईट सवय असते. गावातील छोट्या-छोट्या झोपड्यांचे रस्त्याच्या कडेला प्रवेशद्वार असलेल्या दोन-तीन मजली सिमेंटच्या इमारतींमध्ये रूपांतर झाल्याने ग्रामीण सौंदर्याला आपल्यापासून दूर नेले आहे- नगरपालिकेची बस वेगात गेल्यावर उडणाऱ्या कोंबड्या, सकाळी ताज्या अन्नाच्या प्रतीक्षेत घराबाहेर बसलेली गाय, इकडे-तिकडे सुस्तावलेला अन् पाय ओढत चालणारा व कधी-कधी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी भुंकणारा एखादा कुत्रा, जाणाऱ्या सायकलींच्या घंटीचा आवाज व बाहेर उभ्या असलेल्या दशकं जुन्या झाडावर किलबिल करणारे पक्षी... नुकतीच जेव्हा माझी मुलगी आली तेव्हा मी तिला आवर्जून नागपुरातील माझ्या शाळेत घेऊन गेलो आणि तिला त्याच बाकावर बसवले, जिथे मी शिकायचो. मी तिला शाळेबाहेर टोपली घेऊन बसलेल्या वृद्ध महिलेकडून बोरे विकत घ्यायला लावली. एका छोट्याशा हनुमान मंदिरासमोर त्याचप्रमाणे उभे राहून प्रार्थना करायला लावली, जशी मी परीक्षा देण्यापूर्वी करायचो. तिला हे सर्व खूप आवडले. भूतकाळातील आठवणी जागवणाऱ्या ठिकाणांबद्दल भावुक होणे आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर जतन करून ठेवणे स्वाभाविक आहे. वयानुसार माझ्यामध्ये ही प्रवृत्ती आणखी गडद होत गेली आहे. त्यामुळेच आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना ओळखणे व शक्य होईल तितके त्यांना जपून ठेवणे गरजेचे आहे. उदासीन, निनावी जग व असे जग, ज्यामध्ये जीवन व नावीन्याची चमक असेल, जे जगण्याचा आनंद घेता येईल- या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी एकमेव गोष्ट ही की गावाकडच्या शाळांबाहेर बोरे विकणारी वृद्ध महिला केवळ रोख रक्कमच स्वीकारेल. कारण ती मर्यादित नफ्यावर काम करते व डिजिटल पेमेंट घेऊन कमिशन देऊ शकत नाही.
अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट! दरवर्षी एक तरी सहकुटुंब ट्रिप व्हायचीच, तशी त्याही वर्षी आमची ट्रिप माहूर, शेगाव अशी निघाली होती. घरी देवीची उपासना असल्यामुळं शक्य होईल तेव्हा जाणं, येणं होतंच. क्रुझर आणि जाता येता जवळपास 700 किलोमीटरची रोड ट्रिप त्यामुळे आम्ही भावंडं खुश होतो. नांदेडला चहा घेतला आणि वाटलं झालं, अंधाराच्या आत गडापाशी पोहोचू! गाडीत बसता बसता बहीण म्हणाली, तशी आजच मी एक स्टोरी वाचली फेसबुक वर. एक कुटुंब असंच कुठेसं प्रवासाला निघालं होतं. अंधार होता होता त्यांचा मॅप चुकला. तिथं भरपूर जंगल होतं. गुगल मॅप रस्ता दाखवत तर होतं, पण अंतर कमीच होत नव्हतं. त्यांना वाट मिळतही नव्हती आणि कुठे चाललोय ते कळतही नव्हतं. शेवटी कंटाळून मधेच गाडी उभी केली आणि बसून राहिले. पहाट होता होता लक्षात आलं फिरता फिरता पुन्हा सुरुवातीच्याच ठिकाणी पोहोचलेत. त्यांना चकवा लागला होता! तिने सहज सांगितलेली गोष्ट ऐकून काहीही, बापरे! केवढं थ्रिल! असे उद्गार करत आम्ही भावंडं गाडीत बसलो. आजी मात्र हे ऐकून म्हणाली, दादा, दिवसा उजेडीच पोहोचव रे! मजा, गप्पा, गाणी अशा सगळ्यात दोन एक तास गेले. आजीची चलबिचल सुरू होती. एव्हाना पोहोचायला हवं होतं. आणखी एक तास उलटला तरी रस्ता काही संपेचना! अंधार पडायला लागला. भाऊ मजेत म्हणाला, माई तू गोष्ट काय सांगितलीस, आपल्यालाच तर चकवा नाही लागला नं? आम्ही हसण्यावारी नेलं खरं, पण आमच्याही मनात ही शंकेची पाल चुकचुकली होतीच. अंधार गडद होत गेला. दुतर्फा भरपूर झाडी असलेल्या रस्त्यावर एव्हाना इतर वाहनंही दिसत नव्हती. कितीतरी वेळ आपली आमची एकच गाडी धावत होती. हळूहळू सगळ्यांनाच भीती वाटायला लागली. मोठ्यांना भीती वाटली तरी दाखवता थोडीच येते! आम्हा भावंडांच्या कल्पनाशक्तीला मात्र ऊत आला होता. पाहता पाहता जिथे दोन तासात पोहोचावं तिथे आम्ही चार तास होऊनही पोहोचलो नव्हतो. रेंजअभावी मॅप उपयोगीच पडत नव्हतं. शेवटी उगाच फिरत राहण्या अर्थ नाही म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि साधारण अर्ध्या तासात आम्हाला एका गाडीचा आवाज आला. एक स्विफ्ट डिझायर आमच्या शेजारून पुढे गेली. झालं, आम्ही क्षणाचाही उशीर न करता कसे कोण जाणे त्या गाडीच्या मागे निघालो. थोड्याच वेळात मॅपची रेंज आली आणि आमच्या जीवात जीव! एका वळणाशी मग ती स्विफ्ट वळली आणि दिसेनाशी झाली. आम्ही टर्न राईट आफ्टर 500 मीटर्स ही सूचना ऐकून पुढे आलो. एक तासाभरात माहूर मधे होतो! जे दोन तासात होईल असं वाटलं होतं तिथे पोहोचायला तब्बल सहा तास गेले! खाली उतरल्या उतरल्या आजी म्हणाली, देवीमाते, आणलंस बाई सुखरूप! आम्ही काही म्हटलं नाही, पण सगळ्यांच्या मनात अगदी हेच होतं! खरंतर आज इतक्या वर्षांनी हा प्रसंग आठवतो तेव्हा वाटतं, त्या काही तासात किती भीती होती मनात, केवढ्या शंका होत्या. आपल्याला चकवा लागल्याची जवळपास खात्री होती! गाडी बिघडणं, पेट्रोल संपणं, अशा किती शक्यता डोक्यात पिंगा घालत होत्या. पण कुठंतरी मन म्हणत होतं, काही ना काही मार्ग नक्की निघेल. ती स्विफ्ट पाहिल्यावर पहिला विचार होता, 'कोण माणूस धावून आला देवासारखा'. त्या अंधाराल्या रस्त्यांवर आमच्या पुढे धावणाऱ्या त्या गाडीचे लाईट किती आश्वासक वाटले होते! वाटतं आम्ही त्या चकव्यापासून वाचू शकलो. कारण कुठेतरी, सगळ्या भीतीपलीकडेही मनाला पक्कं ठाऊक होतं, 'देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपण इथून बाहेर पडू शकतो'. भवताल जेव्हा अस्वस्थ करणारं असतं, जागतिक स्तरावरच्या घडामोडींचे पडसाद आपल्या आसपास कुठे कुठे उमटताना दिसतात तेव्हा मग मनावर मळभ येणं साहजिकच आहे. उज्ज्वल भविष्याची आणि कधी कधी वर्तमानतल्या घटनांमुळे आजचीसुद्धा मनभर पसरत जाणारी काळजी असतेच, पण या सगळ्या चक्रव्यूहात अडकून, शंकांच्या जंजाळात आपल्याला चकवा लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हा छोटासा प्रसंग जेव्हा जेव्हा मला आठवतो तेव्हा वाटतं आपल्या स्वतःपुरत्या कितीतरी गोष्टी ह्या आपल्या मनातच सुरू होतात नि मनातच संपतात. एक दिवस सगळं पूर्ववत नि चांगलं होईल हा विश्वास जर आपण मनात बाळगून असलो तर सगळ्या जटिल शंका दूर होतील आणि आपणही आनंदी राहू शकू! यावरच चार ओळी लिहिल्या होत्या... काळोखभरली रात्र, सोसाट्याचं वादळ प्रत्येकात सुरू असतं कधी ना कधी.. पण मग प्रत्येकानं पाहावं एकदा दूरवर, दिसेल एकतरी मिणमिणणारी पणती. तिचं असणं जाणीव करून देत राहील, अंधारापुढल्या प्रकाशाच्या अटळ अस्तित्वाची! संबंधित कॉलमचे इतर भाग मुक्तछंद:जयश्री आलूरकरांच्या कथासंग्रहातले माणूसपणाचे झरे; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मुक्तछंद:मामाचा गाव, चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका अन् पिंपळाचा पार; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये धुंद नाती गंधावणारी! मुक्तछंद:सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर, पण पाहतो का आपण?; वाचा मानसी वैद्य यांचा हुरहुर लावणारा कॉलम! मुक्तछंद:कविता न सुचलेले दिवस, उजळण्यामागचं जळणं आणि दोन कोवळी पानं फुटावित असं दान मागणारं दासूंचं 'तथापि'...! मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मानसी वैद्य यांचा कॉलम:जग जरी इतकं मोठं, हसू त्यात मावणार नाही...'मुक्तछंद' हे नवंकोरं सदर, वाचायला विसरू नका!
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संतुलित, मधुर व अर्थपूर्ण शब्द बोलणे हीदेखील एक पूजाच
विवेकानंद म्हणायचे की तुमचे शब्द तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्वकरतात. आजकाल लोकांनी गोष्टी रचण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवलेआहे. बाहेरून गोड शब्द बोलत असले तरी आतून काहीतरी वेगळेचघडत असते. पण हे फार काळ टिकत नाही. अध्यात्म सांगते, तुम्हीबोलाल, ते हृदयापासून बोला. तुमचे हृदय शुद्ध असेल तर तुमचे शब्दहीशुद्ध असतील. शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. तुम्ही तुमच्याअंतरात्म्याचे प्रतिबिंब दाखवणारे शब्द बोललात तर तुमचाआत्मविश्वास वाढेल. तुम्हाला शांत वाटेल. हळूहळू नव्या पिढीचाशब्दसंग्रह गोंधळलेला होत चालला आहे. तो आधीच विकृतीकडेवाटचाल करत आहे. सोशल मीडियावर होणारे संदेश केवळडोळ्यांनीच वाचले जात नाहीत तर ते कानांतूनही आत शिरत आहेत.त्यात सत्याचा अभाव असल्याने दिशाभूल करण्याचे आकर्षण असते.म्हणून किमान आपल्या अंतर्मनातील शब्दांवर काम करा. केवळसंतुलित, मधुर आणि अर्थपूर्ण शब्दच बोला. ही सुद्धा एक प्रकारचीपूजा आणि ध्यान आहे.
बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टी-20 विश्वचषकापेक्षाही मोठा ब्रँड बनला आयपीएल
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगामआजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्याप्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलनेबीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझीमालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिलाआहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थानअधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिकवर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्यापहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिकलिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाअनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनीदेशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होताआणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतलेजातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीयअर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉललीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्याकंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधतहोत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिकलोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमापप्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्चकरूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेटचाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणिप्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणिप्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळेचाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभररुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचाअनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिलेआणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठेफलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठीलाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्यास्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणिमालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साहनिर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचेमालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणिमहिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितकेतणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्याननसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तानसामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनचआज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिकफायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता याअब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणिजिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठाब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एकजोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याचीहमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षायालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताचीकामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधीडॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आताआयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारतजागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे. इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझीआता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटचीवाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिकआक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएलएक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एकमंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमीअसते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा यालाअधिक पसंती देतात. कारणविश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्णस्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.
रश्मी बन्सल यांचा कॉलम :नारळपाणी विक्रेत्यांनो गर्व करू नका, चहाची मजाच काही न्यारी
माझ्या मुलीला चहा अजिबात आवडत नाही. ती फक्त कॉफी पिते. मला वाटलं होतं की ती मोठी झाल्यावर विचारेल, आई, मी एक कप चहा बनवू का? आपण एकत्र पिऊ.’ तो दिवस कधीच आला नाही. माझ्या डोळ्यासमोरच माझ्याच रक्ताने माझ्याविरुद्ध बंड केलं! आणि आता आमच्या घरात एक युद्ध पेटलं आहे: चहाचांगला की कॉफी? मी लहानपणी कधीच चहा प्यायलेनाही. पण हॉस्टेलला गेल्यावर मला त्याची सवय झाली.मग ऑफिसमध्ये मी सकाळी 11 आणि दुपारी 3 वाजताबालूची वाट बघायचे. तो टपरीवरून कधी येऊन मलाचहा देईल असे वाटायचे. मुंबईत याला ‘कटिंग''म्हणतात—चहाचा एक छोटा ग्लास. पण काय तोअनुभव! पहिला घोट म्हणजे अमृतासारखा असतो—गोड,कडक आणि आल्याचा स्वाद असलेला. एक घोट थकलेल्या मनाला आणि शरीराला जागृत करतो. बॉसचा संताप शांत करणारा असा घोट. एक घोट ..तो भुताखेतांनाही पळवून लावतो. हा तो चहा देशाचे अर्थचक्र फिरवतो. तो तरुण आणि वृद्ध दोघांनाही नाचायला लावतो. पण माझी मुलगी नाही.तिचा विश्वास आहे की दिवसाची सुरुवात फक्तकॉफीनेच होते. भलेही ती बनवायला अर्धा दिवसलागला तरी. आधी ती ग्राइंडरमध्ये कॉफी बीन्स दळते.मग फिल्टर पेपरमधून गाळते. या लांबलचक प्रक्रियेनंतरतिला ते काळे पाणी मिळते. त्याला जाणकार ‘फ्रेश ब्रू''म्हणतात. होय, अशाच आकर्षक शब्दांनी कॉफीनेआपल्या ‘जेन-झी''चे मन-मेंदू जिंकला आहे. एक तरकॉफी शॉप खू कूल-कूल आहे. चहाच्या टपरीवरच्यातुटलेल्या स्टूलची याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही.स्टारबक्समध्ये कॉफीचे अनेक प्रकार मिळतात. आतातर आत्या-मामासुद्धा तिथे कॅपुचिनोसाठी जातात. पणत्यांना ते खरंच त्याचा आनंद मिळतो का? सर्वात मोठीफसवणूक ही आहे : चहाच्या नावाखाली मिळणारा‘चाय-लाते ''. हे इतकं घाणेरडं पेय आहे की मी तेपहिल्यांदा अमेरिकेत प्यायले आणि लगेच फेकून दिलं.कदाचित लहानपणी परीक्षेपूर्वी दुधात नेस्कॅफे मिसळूनआम्ही कॉफीचा अपमान केला होता, त्याचा बदलाघेण्यासाठी गोऱ्या लोकांनी ‘चाय-लाते ''चा शोधलावला असेल. असो. परदेशात प्रवास केलेल्यांनाठाऊक असेल की, चहाच्या नावाखाली उर्वरित जगालानिरर्थक गोष्ट विकली जाते. तुम्ही रेस्तराँमध्ये चहामागवण्याचा मूर्खपणा केल्यास तुम्हाला गरम पाणीआणि एक टी-बॅग मिळेल. ती टी-बॅग म्हणजे एकनाजूक छोटा देवदूत असतो. तो तुमच्या चहाच्या कपातदहा मिनिटे नाचल्यानंतर पाण्याला किंचित तपकिरी रंगदेतो. बस्स एवढंच. याहूनही वाईट म्हणजे हर्बल टी.भावा, तो औषध म्हणून प्यायला पाहिजे; चहाचं नाव काखराब करायचं? तसंही, मी हर्बल कॉफीबद्दल कधीऐकलेलं नाही, मग चहाची अशी अवहेलना का? आणि‘ग्रीन टी''ने तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.आजकाल सरकारी कार्यालयांतही लोक तो पितात; तेम्हणतात की तो आरोग्यासाठी चांगला आहे. मी तुम्हालाखरी समस्या सांगते : चहा पिणाऱ्यांमध्ये आता एकजूटराहिलेली नाही! तुम्ही चार लोकांना विचारलं, तुम्हालाचहा हवा आहे का?’, तर तुम्हाला चार उत्तरं मिळतील.एक म्हणतो साखर नको, दुसरा म्हणतो दूध कमी.एकाला कडक मसाले हवे, तर दुसऱ्याला आलं नको,वेलची नको. चार कपांसाठी चार भांडी कोण बनवणार?बरे या चहा-कॉफीच्या वादात एक नवीन व्यक्ती पुढेआली आहे. ती म्हणते, नको धन्यवाद, दोन्ही विषआहेत. मी फक्त नारळ पाणी पितो.’ म्हणजे तो योगकिंवा आरोग्यवेडा, त्याने आम्हा चहा-कॉफी पिणाऱ्यांनावाईट वळणाचे ठरवले आहे. नारळ पाणी पिणाऱ्यांनो,गर्व बाळगू नका. चहा- कॉफीची स्वतःची एक वेगळीमजा आहे. सकाळ-संध्याकाळ मिळणारी ती शांती.यातून मन आतून फुलून येतं. तो आनंद तुम्हाला मिळतनाही. आम्हाला आमच्या सवयींचा पश्चात्ताप नाही.टपरीसमोर गप्पा होतात. कोलकात्याच्या कॉफीहाऊसमध्ये रात्री सरतात. नारळ पाण्यात ती शक्ती नसते. प्रेमींना दुःख नसतं.आयुष्य कदाचित काही गोष्टी थोड्या असतील. कंबरेचाघेर थोडा जास्त असेलही. या. मी तुमच्यासाठी एक कपचहा बनवते. मी तुमचा मूड चांगला करेन. साखर कमी घेतोस. काही हरकत नाही. मी त्यात प्रेमाचेदोन दाणे मिसळले आहेत. त्याचा गोडवा बघ तसाचआहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) चहाच्या टपरीसमोर गप्पा रंगतात.कोलकात्याच्या कॉफी हाऊसमध्ये रात्री सरतात. या, मी तुमच्यासाठी एक कप चहा बनवते, तुमचा मूड चांगला करेन.तुम्हाला साखर कमी लागते, काही हरकत नाही. मी त्यात प्रेमाचे दोन दाणे मिसळले आहेत, स्वाद घेऊन तर बघ.
एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय आजही कृत्रिमच आहे! म्हणूनच खऱ्या बुद्धिमत्तेची गरज
मी दोन अशा व्यक्तींना ओळखतो, एक -ज्यांनी या मार्चमध्ये एआयच्या मदतीने युरोप आणि अमेरिकेच्या संपूर्ण ट्रिपचे नियोजन केले. दुसरी -त्यांची मुलगी, जिने अलीकडेच 12 वीची परीक्षा दिली आणि एआयच्या मदतीनेच कॉलेज प्रवेशाची योजना आखली. साहजिकच वेगवेगळे पर्याय देण्याच्या बाबतीत हे तंत्रज्ञान कोणत्याही ट्रॅव्हल एजंट किंवा समुपदेशकापेक्षा अधिक वेगवान होते. इतक्या वेगाने व इतके जास्त पर्याय पाहून दोघेही इतके प्रभावित झाले की त्यांनी एआयच्या अंतिम सूचनांच्याच पालनाचा निर्णय घेतला. कोर्स आणि कॉलेजची निवड करून दोघेही ट्रिपवर निघाले आणि त्यांना पहिला धक्का तेव्हा बसला, जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनवर त्यांची ट्रेन चुकली. डब्ल्यूटीसी स्टेशन हे खरं तर एक ट्रान्सपोर्टेशन हब आहे, जिथून न्यूजर्सी आणि मॅसाच्युसेट्ससारख्या राज्यांसाठी थेट ट्रेन मिळतात. यांना पाथ ट्रेन म्हणतात. मुलीने तिची तिकिटे पुन्हा तपासली नसल्याने केवळ तिची ट्रेनच सुटली नाही तर तिचे कनेक्टिंग स्टेशनही वेगळे होते. एआय ट्रॅव्हल प्लॅनिंगबाबतच्या सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेदरम्यान तिची इच्छा होती की, आपल्या संपूर्ण ट्रिपसाठी एआयव्यतिरिक्त इतर कुठेही संशोधन करू नये. तिची सर्वात मोठी चूक ही होती की, तिने हा प्रयोग अशा ठिकाणासाठी केला, जिथे ती आधी कधीही गेली नव्हती. ट्रेन सुटल्यानंतर जेव्हा तिने मला स्टेशनवरून फोन केला तेव्हा माझ्या लक्षात आले की ती चुकीच्या ठिकाणी उभी होती. याआधी तिने हॉटेलवरही पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण एआयने सांगितले होते की टॅक्सी महाग पडेल आणि हॉटेल फक्त ६०० मीटर अंतरावर आहे. पण एआयला हे माहीत नव्हते की त्या दिवशी मुसळधार पाऊस पडेल आणि भारतीय लोक केवळ दोन सुटकेस नाही, तर हँडबॅग आणि लॅपटॉपही सोबत ठेवतात. मुसळधार पावसात सामान घेऊन चालताना दोघेही पूर्णपणे भिजले, ज्यामुळे पुढचे दोन दिवस त्यांना ताप आला आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वेळच मिळाला नाही. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, मुलीच्या एआय-आधारित कॉलेज ॲडमिशन कौन्सिलरचा सल्लाही अमेरिकेत कॉलेज निवडताना चुकीचा ठरू शकतो. त्यानंतर त्यांनी पैसे खर्च करून मानवी सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तेव्हाच चांगले मार्गदर्शन मिळते, जेव्हा त्यात माणसाचा सहभाग असतो. कारण समुपदेशक बॉट्सची माहिती फिल्टर करून विद्यार्थ्यांना सल्ला देतात. विशेषतः जेव्हा त्यांना अर्ज भरण्यासाठी स्पष्टतेची गरज असते. शाळांमध्ये एआयच्या वापराचे समर्थक राहिलेले मॅसाच्युसेट्स स्कूल कौन्सिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली रोबिडॉक्सही मानतात की, विद्यार्थ्यांवर समुपदेशकांचा जो प्रभाव असतो, तंत्रज्ञान त्याची बरोबरी करू शकत नाही. असे का, तर माणसाला माहीत असते की त्यांच्या खासगी आयुष्यातील बारकावे कसे समजून घ्यावेत. चॅटबॉट फक्त विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी पाहतो आणि त्यांना त्या देशातील अधिक स्पर्धात्मक कॉलेजांमध्ये अर्ज करण्यापासून परावृत्त करू शकतो. कुणाच्या घरी निधन झाले असल्यास चॅटबॉट्स अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आकलन करू शकत नाहीत. एका समुपदेशकानुसार, ‘एआय तुम्हाला ओळखत नसल्याने ते तुम्हाला फक्त तेच सांगतात, जे पब्लिक डोमेन उपलब्ध आहे.’ चॅटबॉट्स बनवणाऱ्या कंपन्याही याच्याशी सहमत आहेत की, पदवीसाठी योग्य कॉलेज निवडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्यांचा सल्ला आवश्यक असतो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी मदत करण्यासाठी एआयचा वापर करणाऱ्या ‘मेनस्टे’ प्लॅटफॉर्मचे संस्थापक अँड्य्रू मॅग्लियोज्जी म्हणतात की, ‘या प्रक्रियेत माणसांचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एआय अजूनही विकसित होत आहे.’ फंडा असा की, आपण वेग आणि विश्वासार्हता यामध्ये अडकून असा विचार करू लागतो की एआय आपल्यापेक्षा सरस आहे. सध्या एआय वापरण्याचा सर्वात योग्य मार्ग हाच की, त्याच्या वेगाचा फायदा घ्यावा आणि नंतर अनुभवी माणसांना सांगावे की त्यांनी या माहितीचे विश्लेषण आपल्या बुद्धीने करावे.
संघर्ष:उन्नती आणि परिवर्तनाचा खरा पाया- बलराज संघई
संघर्ष म्हटलं की आपल्याला साधारणपणे भांडण तंटा असंच वाटतं. वास्तविक विचार केला तर ते तसं नसतं. संघर्षाचा केवळ भांडण किंवा वाद आणि विवाद इतकाच संकुचित अर्थ नाही. संघर्ष एक व्यापक व्यक्तिगत आणि सामाजिक क्रिया आहे. संघर्ष कारण आणि निवारण याचा विस्तृतपणे विचार अनेक विचारवंतांनी केला. त्यात न्यायोचित संघर्ष हा विधायक स्वरूपाचा ही मानला गेला आहे. म्हणून संघर्ष हा सतत अनैतिक आणि विध्वंसत्मकच असतो असे नव्हे. संघर्ष ही मानवाच्या परस्पर संबंधांमध्ये सतत कार्यरत असणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये परस्परांमध्ये सहकार्य नसते किंवा ते तटस्थ ही नसतात त्या वेळेसच परस्पर संघर्षाची स्थिती उत्पन्न होत असते. ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार, दोन वर्ग किंवा समूहांच्या मध्ये सशस्त्र विरोध युद्ध लढाई किंवा विवाद यास संघर्ष म्हटले आहे . संघर्ष करत असताना व्यक्ती किंवा समूह स्वतःच्या उद्देशांना प्राप्त करण्यासाठी विरोधकाच्या संबंधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंसात्मक क्रिया प्रतिक्रियेचा प्रयोग करत असतो. वास्तविक पाहता संघर्ष हे परिवर्तनाचे एक प्रमुख साधन आहे. संघर्षाच्या सशक्त प्रक्रियेमध्ये उत्पन्न असंतोषाचे कारण आणि निमित्त समाप्त करून आवश्यक परिवर्तनाच्या दिशेने सामाजिक चेतना निर्माण करून उत्कृष्ट सिद्धांताचा परिचय दिला जातो. या प्रकारे क्रियांवीत संघर्षाची मात्र एक विशिष्ट छाप निर्माण होते. मानवाच्या इच्छेला टाळता येत नाही म्हणून संघर्ष आवश्यक होऊन जातो. आणि जगाच्या पाठीवर ही त्याच जीव जाती अस्तित्वात राहिल्या आहेत ज्या की संघर्ष प्रिय होत्या. घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे मूल्यवान तत्व म्हणजे शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच. म्हणून न्यायोचित मागण्या आणि जन्मसिद्ध अधिकार प्राप्त होत नसतील तर संघर्ष हेच एकमेव नैतिक शस्त्र उरते. ज्यावेळी संघर्ष विधायक स्वरूपात केला जातो त्यावेळी त्याचा उद्देश न्यायाची प्राप्ती आणि आपले हक्क मिळवणे व त्याचा प्रतिस्पर्ध्यांना आग्रह करणे यासाठी असतो. म्हणून न्यायोचित हक्कासाठी केलेला संघर्ष हा नक्कीच नैतिक, सकारात्मक आणि उन्नतीसाठीच असतो. संघर्ष एकाच प्रकारचा नसून अनेक प्रकारचा असतो. व्यक्तीच्या मनात द्विधा परिस्थितीमध्ये द्वंद्व निर्माण होते. अनेक वैयक्तिक इच्छा आकांक्षा दमित होतात. याचेच कुंठित होण्यामध्ये रूपांतर होते. आणि ही कुंठा सहनशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर याचेच संघर्षात आणि हिंसेत रूपांतर होते. मनुष्य आणि इतर जीवांमध्ये कधीकधी काही जाती प्रजाती दुसऱ्या जाती वरती शासन करण्याचा स्वतःला जन्मसिद्ध अधिकार समजतात. याच्याच परिणाम स्वरूप अन्य प्रजातींमध्ये यांच्याविरुद्ध संघर्ष भावना उत्पन्न होते. प्रजातीय संघर्षाचे प्रगती हे प्रमुख कारण आहे तर याशिवाय राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिक क्षेत्रांमध्ये जाती जातींमध्ये विषमता दिसून येते; त्याच्याही परिणाम स्वरूप परस्पर संघर्षाची बीजे रोवली जातात. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते, मानवी समाज सदैव दोन आर्थिक वर्गामध्ये विभागलेला असेल शोषक आणि शोषित. हे दोन्ही वर्ग सतत एकमेकांशी संघर्षरत असतील तोपर्यंत जोपर्यंत की वर्ग विहीन समाजाची स्थापना होणार नाही. प्राचीन काळापासूनच मानव जातीमध्ये वर्ग संघर्ष पाहायला मिळतो. मालक नोकर, भांडवलदार आणि कामगार, याप्रकारे अनेक वर्गांमध्ये सतत संघर्ष दिसून येतो जो की आजही विद्यमान आहे. व्यक्तिगत संघर्ष, प्रजातीय संघर्ष, वर्ग संघर्ष, जातीय संघर्ष आणि राजनैतिक संघर्ष यापेक्षाही संघर्ष उत्पन्न होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विषमता आणि अन्याय हेच आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक क्षेत्रांमध्ये सतत शक्तिशाली कडून शक्ती हीनांवरती होणारा अन्याय संघर्षाच्या प्रक्रियेला जन्म देत असतो. या अन्यायाचे सातत्यच प्रतिशोध व विवादांना जन्म देतात. यामुळेच व्यक्ती समाज व राष्ट्र सतत संघर्षरत होत असते. सामाजिक पातळीवर सुद्धा संघर्ष हा काही विशिष्ट परिणामांच्या प्राप्तीचे साधन आहे. संघर्ष विहीन समाजाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सामाजिक जीवनातून देखील आम्ही संघर्षाला वेगळं करू शकत नाहीत. नैतिक आणि विधायक संघर्षाच्या समाप्तीचा अंतिम परिणाम हा शांतीस्वरूपच असतो. संघर्षाचा मूळ आधार आणि कारण मात्र व्यक्तीच्या अनंत इच्छा लोभ या प्रवृत्तीच आहेत. इच्छेचा विस्तार हा अनेक प्रकारच्या हिंसेचे मूळ कारण असतो. इच्छापूर्तीसाठी दुसऱ्यांचे शोषण होते. उपार्जित पदार्थांच्या संरक्षणासाठी शस्त्रीकरण होते. या शस्त्रीकरणाचा अखेर युद्धाला जन्म देण्यात परिणाम होतो. म्हणून संघर्ष जसे उत्कर्षाचे उन्नतीचे परिवर्तनाचे साधन आहे तसेच अन्याय आधारित उद्देश असेल तर मात्र त्यासाठी केलेला संघर्ष हा हिंसेला जन्म देतो आणि त्यातून अशांतीच निर्माण होते. वर्णभेद, वर्गभेद, विषमता, उच्च नीच मानण्याची प्रवृत्ती, अतिलोभ, अधिकार व सत्तेचा विस्तार यासारख्या तत्त्वांमुळे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर संघर्ष निर्माण होतो आणि त्याचे मोठ्या प्रमाणात युद्ध आणि हिंसेमध्ये रूपांतर होते. वैयक्तिक किंवा दोन व्यक्ती मध्ये किंवा व्यक्ती व्यक्तींमध्ये मात्र राग, द्वेष, लोभ, आसक्ती, क्रोध, मान, माया, लोभ, वासना, विकार भाव, विकृती, लालसा, संग्रह वृत्ती... अशा अनेक प्रवृत्तींमुळे एक प्रकारची अशांतता निर्माण होऊन त्यांच्यात परस्पर संघर्ष निर्माण होतो. मात्र त्याचा परिणाम हिंसा आणि अशांती हाच असतो. म्हणूनच आज या ठिकाणी असे सांगावेसे वाटते की संघर्ष हा उन्नतीचे आणि परिवर्तनाचे मूळ कारण आहे परंतु तेव्हाच जेव्हा तो न्यायोचित मागणीसाठी आणि नैतिक आणि पवित्र उद्देशाच्या प्राप्तीसाठी नैतिक व अहिंसक मार्गाने केला जातो. हाच संघर्ष सकारात्मक असतो. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हनुमंत कुमती दूर करून मनुष्याला सुमती देतात
चांगल्या सवयींचे फळ वर्तमानात मिळते तर वाईट सवयींचे परिणाम भविष्यात दिसतात. हनुमान चालिसामधील तिसरी चौपाई आहे – ‘महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी.’ याचा अर्थ असा की हनुमान कुमती दूर करून माणसाला सुमती देतात.कुमती प्रामुख्याने कुसंगामुळे येते. आजच्या काळात नकळतपणे आपण कुसंगात अडकत आहोत. त्यापैकी एक म्हणजे सोशल मीडियाची संगती. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाची सुमती किती वाढेल हे भविष्यात कळेल; मात्र कुमतीची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत हनुमंत आणि हनुमान चालिसा हे या संघर्षातील एक प्रभावी शस्त्र ठरू शकतात. म्हणूनच राम नवमी निमित्त रायपूर येथे सायंकाळी 7 वाजता हनुमान चालिसाच्या महापाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्कार टीव्हीवर होणार आहे. या कार्यक्रमाशी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जोडले पाहिजे. आपण आजारी असलो तरी हनुमान चालिसा हे औषध आहे.
डेरेक ओ ब्रायन यांचा कॉलम:ट्रान्सजेंडर विधेयक एवढ्या घाईघाईने का मंजूर केले?
या आठवड्यात संसदेने ट्रान्सजेंडर विधेयक घाईघाईने मंजूर केले. ‘घाई’ यासाठी कारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत दहापैकी सहा विधेयके छाननीसाठी संसदीय समित्यांकडे पाठवली जात असत. आता दहापैकी फक्त दोनच विधेयके पाठवली जात आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही सभागृहांमधील भाजप नेत्यांनी त्यांना बोलण्यासाठी दिलेल्या वेळेपैकी केवळ दोन-तृतीयांश वेळेचाच वापर केला. त्यांच्याकडे पुरेसे वक्ते नव्हते का? की विधेयक लवकर मंजूर व्हावे यासाठी त्यांनी वक्त्यांना पुढे न आणण्याचा निर्णय घेतला? तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रत्येक मिनिटाचा वापर करून प्रभावी हस्तक्षेप केला. उदाहरणार्थ- काँग्रेस पक्षाच्या रेणुका चौधरी म्हणाल्या, आम्ही खासदार होतो. तेव्हा आम्हाला आमची लैंगिक ओळख जाहीर करावी लागते. आम्ही हे स्वतः करतो. त्याची पुष्टी वैद्यकीय मंडळाकडून केली जात नाही. द्रमुकचे तिरुची शिवा म्हणाले , ट्रान्सजेंडर लोकांचे सर्वत्र शोषण, छळ व अपमान होत आहे. आता सरकार त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूलचे साकेत गोखले म्हणाले, “ट्रान्स पुरुष हा पुरुषच आहे. ट्रान्स महिला ही महिलाच आहे. हे तिसरे लिंग नाही. सरकारला ही मूलभूत तथ्येच समजत नाहीत. तेव्हा आपण कोणत्या कायदेशीर हक्काबद्दल बोलत आहोत? याउलट भाजपच्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत काय म्हटले ते ऐका : “ते ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागताना आणि पैसे गोळा करताना आढळतात... आणि घरी पोहोचल्यावर ते पैसे मोजताना, दारू पिताना आणि सिगारेट ओढताना दिसतात!’ यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकामुळे 2019 च्या कायद्यात व्यापक बदल करण्यात आले आहेत. ही दुरुस्ती त्याचा उद्देश आणि परिणाम या दोन्ही दृष्टीने धोकादायक आहे. कारण ती ट्रान्सजेंडर व्यक्तीची व्याख्या आणखी संकुचित करते. आता एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय मंडळ किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असेल. स्व-ओळख यापुढे पुरेशी ठरणार नाही. यामुळे लैंगिक ओळख ही वैयक्तिक स्वायत्ततेची बाब न राहता शासनाच्या मान्यतेची बाब बनते. यामुळे असमान वागणूक निर्माण होते (कलम 14 चे उल्लंघन) आणि स्वायत्तता व प्रतिष्ठा मर्यादित होते (कलम 21 चे उल्लंघन). नवीन विधेयकानुसार रुग्णालयांना लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रियांची माहिती अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. ते वैद्यकीय गोपनीयतेचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती के. एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार या निकालात स्पष्ट केले आहे की गोपनीयतेमध्ये शारीरिक आणि निर्णयात्मक स्वायत्तता तसेच वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. एखाद्याच्या शरीरासंबंधीचे निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात. तृतीयपंथी लोकांना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांची ओळख उघड करण्यास भाग पाडणे धोकादायक ठरू शकते. यामुळे ते कुटुंब, कार्यस्थळ आणि सार्वजनिक जीवनात भेदभावाला अधिक बळी पडतात. तृतीयपंथी लोकांचे संरक्षण करण्याचा दावा करणारा कायदा, अशा संरक्षणाची गरज निर्माण करणाऱ्या परिस्थितीला अधिक मजबूत कसा करू शकतो? हे विधेयक अशा दंडात्मक तरतुदींचा लक्षणीय विस्तार करते. ते कागदोपत्री छळाला शिक्षा देण्यासाठी आहेत. मात्र प्रलोभन आणि अवाजवी प्रभाव यांसारख्या अस्पष्ट संज्ञांचा वापर, आणि अगदी संमतीने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांनाही गुन्हेगारी ठरवणे हे एक पूर्णपणे वेगळेच चित्र उभे करते. शिक्षेच्या भीतीमुळे लोक लिंग-पुष्टीकरण उपचार घेण्यास कचरतील. गुन्ह्यांच्या अस्पष्ट व्याख्येमुळे ते छळाचे साधन बनण्याचा धोका आहे. त्यामुळे मित्र, कुटुंब आणि अगदी वैद्यकीय व्यावसायिकांनाही शिक्षा होऊ शकते. हिंदी चित्रपटांमधील ट्रान्सजेंडर प्रतिनिधित्वाचा विचार करा. ऋषी कपूरच्या ‘रफू चक्कर’ किंवा अमिताभ बच्चनच्या ‘लावारिस’मध्ये ते प्रामुख्याने विनोदाचा स्रोत म्हणून सादर केले गेले. कुकू (‘सेक्रेड गेम्स’) किंवा शिल्पा (‘सुपर डिलक्स’) यांसारखी पात्रे अधिक सूक्ष्म चित्रण सुचवतात. पण इथेही ट्रान्स भूमिका अनेकदा सिस-जेंडर कलाकारांद्वारे साकारल्या जातात. 1930 च्या दशकात नाझी जर्मनीमध्ये “ट्रान्सव्हेस्टाईट प्रमाणपत्रे’ (त्या वेळी ट्रान्सजेंडर लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा) जारी केली जात होती. अशी प्रमाणपत्रे होती त्यांना छळछावण्यांमध्ये पाठवले जात होते. आपण कोणत्या दिशेने जात आहोत? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. आयुष्मान डे व चाहत मंगतानी यांनी सह-लेखन केले आहे.) आपल्या समाजात ट्रान्सजेंडर व्यक्तींना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांचे जेंडर स्पष्ट करण्यास भाग पाडणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सुधीर चौधरी यांचा कॉलम:संवादाची दारे उघडू शकतील अशा नेत्यांची जगाला गरज
भारत पाकिस्तानप्रमाणे ‘दलाली’ करत नाही—परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा थेट संदेश हे केवळ एक विधान नाही; तर ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्पष्ट संकेत आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानला संभाव्य मध्यस्थ म्हणून सादर करण्याचे प्रयत्न सुरू असताना हे विधान आले आहे. मग सत्य काय आहे? मध्यस्थी म्हणजे केवळ संदेश पोहोचवणे नव्हे. मध्यस्थी म्हणजे करार शक्य करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता असणे. इथेच पाकिस्तान कमी पडतो. त्याच्याकडे दोन्ही बाजूंवर प्रभाव टाकण्याची सामरिक ताकद नाही. तसेच कराराची अंमलबजावणी करण्यासाठी विश्वास ठेवण्यासारखी विश्वासार्हताही नाही. इराणच्या राष्ट्रपतींशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींना ब्रिक्स अध्यक्ष म्हणून आपल्या भूमिकेचा वापर करून हे युद्ध टाळण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही सामान्य कूटनीती नाही. हे या गोष्टीचे द्योतक आहे की, जग विभागलेले असते तेव्हा केवळ काही मोजकेच देश राहतात. सर्व बाजू त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असतात. आजची जागतिक परिस्थिती पाहता हे स्पष्ट आहे की कोणत्याही दोन नेत्यांमध्ये हा संघर्ष कमी करण्याची क्षमता असेल म्हणजे नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन आहेत. आणि हे केवळ कूटनीती नाही तर सामर्थ्यामुळेही आहे. भारत आणि रशिया हे छोटे देश नाहीत. एक जगातील सर्वात मोठी लोकशाही तर दुसरी एक महासत्ता आहे. दोघांकडेही मोठी सैन्यदले आहेत. दोघेही अणुशक्ती आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदी आणि पुतीन हे जगातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वाधिक काळ पदावर असलेल्या नेत्यांपैकी आहेत. त्यांच्याकडे अनुभव, स्थिरता आणि जागतिक समज यांचा संगम आहे. आज भारत एका अद्वितीय संतुलनाच्या वळणावर उभा आहे. अमेरिकेसोबत त्याची मजबूत सामरिक भागीदारी आहे. ट्रम्प मोदींचा आदर करतात. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री आहे तसेच संरक्षण आणि तांत्रिक क्षेत्रात त्यांचे सखोल सहकार्य असून इराणसोबत सतत संवाद सुरू आहे. गेल्या दशकात आखाती देशांसोबतचे भारताचे संबंधही नव्या उंचीवर पोहोचले आहेत. संयुक्त अरब अमिरातीपासून सौदी अरेबियापर्यंत ऊर्जा, गुंतवणूक, सुरक्षा आणि परदेशस्थ भारतीयांमुळे भारतावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आखाती देशांत जवळपास 1 कोटी भारतीय राहतात. या संख्येमुळे भारत केवळ एक मूकदर्शक न राहता एक थेट हितसंबंधी बनतो. मोदींच्या मुत्सद्देगिरीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शांतपणे पण प्रभावीपणे काम करण्याची त्यांची क्षमता. ते शांतपणे संवाद साधतात आणि सर्व पक्षांशी बोलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आता पुतीन यांच्याबद्दल बोलूया. त्यांच्याकडे दोन मोठे फायदे आहेत. पहिला ते इराणचे विश्वासू भागीदार आहेत. रशिया आणि इराण यांचे सखोल सामरिक संबंध आहेत. त्यामुळे पुतिन यांना तेहरानमध्ये थेट प्रवेश मिळतो. दुसरा- ट्रम्प यांच्याशीही त्यांचा थेट संवाद आहे. आणि हा संघर्ष टाळण्यात वॉशिंग्टनची भूमिका निर्णायक आहे. थोडक्यात सांगायचे तर पुतीन इराणशी प्रभावाने बोलू शकतात आणि अमेरिकेशी थेटपणे संवाद साधू शकतात. येथूनच चित्र स्पष्ट होते. पाकिस्तानला मध्यस्थ व्हायचे आहे पण त्यांच्याकडे ताकद आणि विश्वासाची कमतरता आहे. मोदींचा सर्व बाजूंनी विश्वास आहे. पुतीन यांचा सत्तेच्या केंद्रांमध्ये प्रभाव आहे. या दोन भिन्न शक्ती आहेत. पण त्यांच्यात एक समान क्षमता आहे : शांती. पण सर्वात मोठा प्रश्न असा की भारताने या भूमिकेत पुढे यावे का? कारण पश्चिम आशिया केवळ राजनैतिक मार्गाने चालत नाही. तो इतिहास, ओळख, सत्ता व अविश्वास यांचे एक गुंतागुंतीचे मिश्रण आहे. तरीही संकेत स्पष्ट आहेत. इराण भारताकडे पाहत आहे. आखाती देशांचा भारतावर विश्वास आहे. आणि जगाला अशा नेत्यांची गरज आहे. ते संवादाचे दरवाजे उघडू शकतील. या शोधात नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन हेच एकमेव पर्याय नाहीत. हे युद्ध टाळण्यात आणि जागतिक संकटास कारणीभूत ठरू शकणारी आर्थिक मंदी रोखण्यात निर्णायक भूमिका बजावू शकणारी कदाचित हीच ती जोडी आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) रशिया व भारतात नेतृत्व क्षमताभारत आणि रशिया हे छोटे देश नाहीत. दोघांकडेही मोठी सैन्यशक्ती आहे. दोन्ही अणुशक्ती आहेत. मोदी व पुतीन हे आज जगातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वाधिक काळ पदावर असलेल्या नेत्यांपैकी आहेत.
पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात 'खारगे समिती'चा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अहवालात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पार्थ पवार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पवार कुटुंबातील सदस्य पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारगे समितीने आपल्या निरीक्षणांमध्ये 'अमेडिया' कंपनी आणि त्यातील भागीदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंजली दमानिया यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधताना सांगितले की, अहवालात उल्लेख असलेल्या 'इतर भागीदार' या शब्दांत पार्थ पवार यांचा समावेश होतो. शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांना 'नोटराईज्ड पॉवर ऑफ ॲटर्नी' दिल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला होता. तात्काळ गुन्हा दाखल करा अंजली दमानिया म्हणाल्या की, हे संपूर्ण प्रकरण फौजदारी स्वरूपाचे असल्याचे समितीने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे. त्यामुळे खारगे समिती हा अहवाल आता पुढील कार्यवाहीसाठी गृह, उद्योग आणि महसूल विभागाकडे पाठवणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विभागाची जबाबदारी असल्याने, त्यांनी या अहवालातील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती दमानिया यांनी केली आहे. पार्थ पवारांना क्लीन चीट देऊ शकत नाही अंजली दमानिया म्हणाले की, मुंढवा जमीन प्रकरणी कोणीही पार्थ पवारांना क्लीन चीट देऊ शकत नाही. पार्थ पवार 99 टक्के भागीदार असलेल्या कंपनीचे 1 टक्के भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर पार्थ पवारही तितकेच दोषी आहेत. यामध्ये गंभीर अनियमितता झाल्या आहेत असे अहवालात म्हटले आहे. ती जागा शासकीय आहे तरीही दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने तो व्यवहार केले. ज्यांनी हा व्यवहार केला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारच्या जमीनी धशात घालणार का? अंजली दमानिया म्हणाले की, सर्व शासकीय जमीनीची चौकशी 6 महिन्यात करत त्याचा अहवाल महसूल विभागच्या पोर्टलवर टाकण्यात यावा, राजकीय दबाव, मुख्यमंत्र्यांचे वेगळे राजकारणाचे प्रेशर असताना सुद्धा आहे. राजकारणासाठी जर मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारच्या जमीनी या लोकांच्या धशात घालण्याचे ठरवणार असताल तर हे आम्ही खपवून घेणार नाही, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करू नका अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करू नये, आपला राग अशोक खरातवर आहे, पण त्या पीडित महिलांची ओळख पटेल असे काही वागू नका. खरात प्रकरणी जो तपास सुरू आहे ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्यांना आता फार त्रास होत आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अशोक खरातवर काही उद्योजकांनी फार पैसे खर्च केला आहे. त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आज तपासासाठी या लोकांना 8 ते 10 तास बसवून एसआयटीकडून बसवून ठेवण्यात येते, तसे करू नये ही विनंती आम्ही एसआयटीतील अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरातच्या अनेक गोष्टी यांच्याकडे होत्या पण ही लोकं घाबरले होते.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संकट आल्यावर त्याचा धैर्याने सामना करावा
व्यक्तीच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडते तेव्हा तो त्याचा सामनाकसा करतो? यावरून त्याच्या बुद्धिची परीक्षा होते. तुम्ही कितीहीसक्षम असलात तरी संकट तुमच्या नियंत्रणात नसते. होय, त्याचासामना करणे हातात आहे. संकटात काही लोक सोन्यासारखेचमकतात तर काही केवळ कोळसा होतात. रामायण याचे एक उत्तमउदाहरण देते. श्रीराम राजा होणार होते पण कैकयीने आपला निर्णय बदलला. त्यांना बोलावले. कैकयीच्या महालात श्रीरामांनी दशरथालाव्यथित पाहिले. कैकयी क्रोधित झाली. श्रीरामांनी असे दृश्यपहिल्यांदाच पाहिले होते. त्यांच्यासाठी एक ओळ आहे: प्रथम दिखदुखु सुना न काउ’ . अर्थात पहिल्यांदाच दुःख पाहिले. यापूर्वी तेऐकलेही नव्हते. पण श्रीराम मनात हसले. म्हणाले, काही घडते, तेचांगल्यासाठीच घडते.’ पुढे वनवासी श्रीराम इतके लोकप्रिय झाले कीअयोध्या सोडून गेल्यावर लोकांच्या हृदयात पोहोचले. म्हणूनचप्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा प्रभू श्रीरामांचे स्मरण करावे वपरिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करावा.
नवनीत गुर्जर यांचा कॉलम:तुम्ही तेलाचे व्यापारी, आम्ही घाण्याचे बैल!
तेलाचा घाणा. आता यासाठीही आधुनिक पद्धती आणियंत्रे उपलब्ध आहेत. पण पूर्वी तेल घाणा आणि तेलघाण्याचे बैल होते. होय, आपण सर्व तेलाच्या घाण्याचेबैल आहोत! घाणा चालू असायचा तेव्हा ‘चक चूं'' असाआवाज यायचा. बस बैल.तो आयुष्यभर चालत राहतो.वर्षे किंवा महिन्यांची पर्वा न करता. फक्त फिरत राहायचा.तो गोल गोल फिरायचा. त्याच्या गळ्यातील घंटा वाजतराहायची. त्यामुळे त्याला या गोल जगाच्या पलीकडेहीकाहीतरी आहे असे वाटू लागे. जणू घंटेचा आवाज किंवाइतर कशाचा तरी गोंगाट. याच सुरात, याच भ्रमात, तो घाणा ओढतच राहिला. सर्वबिया दळल्या जात होत्या. तेल गळत राहायचे. मागूनचाबकाचा फटका बसायचा तेव्हा कातडी फाटायची. तोहजारो मैल चालायचा तरीही तो तिथेच असायचा. त्याचजागी! मालक बाजारात तेल विकायचा. बैलाला काहीचवाटा नव्हता! हेच दुःखद आहे. तेल एका व्यक्तीचे.कातडी दुसऱ्याची. त्याच्या वाट्यात केवळ सुके गवत!जगाची तेल गिरणी अशीच चालते. माणसाला बैलबनवून! तिने त्याला जुंपले आहे. रात्री अधिकच लांबतआहेत. श्वास लहान होत आहेत. जणू कुणीतरी होळीवरअभ्रक शिंपडले आहे! अमेरिकन तेल गिरणीचा मालक डोनाल्ड ट्रम्प यानेआपल्या हट्टीपणामुळे जगाला एका विचित्र संकटातढकलले आहे. इराणसोबत युद्ध करण्याचे ठोस कारण नसतानाही त्याने विनाकारण हल्ला चढवला. ठीक आहे. तुम्ही शक्तिशाली आहात. तुम्ही काहीही करू शकता,पण भलतेच काहीतरी करू नका. यातून तुम्हाला काय मिळाले? होर्मुझमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यांची जहाजे निघू शकत नाहीत. त्यांच्या म्हशी आणि गायी खुंट्यांना बांधलेल्या आहेत. त्या हंबरू लागल्या आहेत. एलपीजी आणि कच्च्या तेलाने भरलेली शेकडो जहाजे अडकून पडली आहेत. त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा कोणताहीमार्ग नाही. कोणतीही जागा नाही. त्यांनी कुणाला सांगावे? त्यांनी कुणाचे ऐकावे? काही समजायला मार्ग नाही.जगाचे पोलिस बनण्याची किंवा राहण्याची इच्छा किंवा महत्त्वाकांक्षाच ट्रम्प यांना अस्वस्थ करणारी किंवा इस्रायलला चिथावणारी असावी. नाही तर या जगात तेलाशिवाय दुसरा कोणता लोभ उरला आहे? तसे, इस्रायलला आपला उद्देश चांगलाच ठाऊक आहे. आपल्या क्षेत्राच्या विस्तारासाठी ते कसर सोडत नाहीये. लेबनॉनवरील हल्ले व त्यांच्या भूमीवर केलेला कब्जा हे स्पष्ट करू शकते. पण या संपूर्ण पोलिस कारवाईतअमेरिकेला काय स्वारस्य ? असो. इराणमध्येअमेरिकेसाठी तेलाशिवाय दुसरे काय आहे? इस्रायलनेहमी युद्धात गुंतलेला आहे. त्याने युद्धाद्वारे भूभागबळकावला. पण अब्जावधींचे नुकसान सोसूनहीअमेरिका या युद्धात का सामील झाली आहे, हेसमजण्यापलीकडचे आहे. इथे भारतात सरकारसर्वतोपरी प्रयत्न करत असूनही तेल आणि स्वयंपाकाच्यागॅसची टंचाई आता जाणवू लागली आहे. इराणसोबतचेयुद्ध आणखी एक महिना चालू राहिले तर भारताला पुन्हाएकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागू शकतो! हवाईप्रवास थांबवला जाऊ शकतो! रस्त्यावरील वाहतुकीवरनिर्बंध येऊ शकतात. पण भारत हार मानणारा नाही. २००८च्या जागतिक मंदीच्या काळातही भारतावर परिणाम शून्यहोता. कोविडच्या काळातही आपण जगाला लसपुरवली. खरे तर भारताच्या परंपरा त्याला सर्वपरिस्थितीत जिवंत ठेवतात. यामुळेच जगातील संकटाचाआपल्यावरील परिणाम नगण्य असतो. पाहुण्याला किंवात्यांच्या मुलाला पैसे देण्याची प्रथा भारताशिवाय जगातकुठेही नाही! या अर्थव्यवस्थेला समानार्थी शब्द , पर्यायजगात आणखी कुठे आहे? आम्ही अमेरिकन नाही. तेपेन्शन कार्डवरूनही पैसे उधार घेतात. आम्ही बचतकरण्यात तज्ज्ञ आहोत. बचत करणे आमच्या रक्तातचआहे. स्वतःच्या खर्चाची पर्वा न करता पैसे वाचवतो.म्हणूनच भारताला महान म्हणतात. आपण महान आहोत. हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास इथे युद्धाचा तणावस्पष्ट दिसतोय. पण अवकाळी पावसामुळे सर्वकाही थोडेसोपे झाले आहे. त्याने वातावरण थंड केले आहे. हवामानउन्हाळ्यासारखे नसेलही, पण पावसाळी तर नक्कीचनाही. तरी मुसळधार पाऊस पडत आहे. गारवाउन्हाळ्याच्या उंबरठ्यावर आहे. रात्री झोपायला जातानापाऊस कधी पडला हे माहीत नसते. पण सकाळी रस्ताओला दिसतो. तेव्हा आदल्या रात्री पाऊस पडला होता कीरस्त्याला घाम फुटला आहे, हे सांगता येत नाही! या युद्धात अमेरिका का ?तेलाशिवाय इराणमध्ये अमेरिकेसाठी आहेतरी काय ? इस्रायल नेहमीच युद्धातगुंतलेला आहे आणि लढाईतूनच त्यानेभूभाग मिळवला आहे. पण अब्जावधींचेनुकसान सोसूनही अमेरिका युद्धात काआहे, हे आकलनापलीकडचे आहे.
नीरज कौशल यांचा कॉलम:आपल्याला एआय मोफत वाटते, पण सत्य वेगळेच
जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माणकरते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसाअसेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्षवेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळखव स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रणठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे कीएआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलतराहील. जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीचवर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याचीलक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपीवाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकासआणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सातवर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियनडॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फारमागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत तेनगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार हीगुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीनगुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताआहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकतावाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्यापलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिकपरिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेतव्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योगआणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारेशिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचावापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागाघेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोकएआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणूनपाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअरप्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणिलेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देतनाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याचीसदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की तेआपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्यआहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणालीप्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळातआपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमीकरणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषणआणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्यामते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारेरोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्टमानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळेपारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवीसर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माणहोतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्यासंशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्यावेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिकव्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्याअर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असायुक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलरकर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्यानेएआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तरएआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळेविकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माणहोऊ शकते. तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटतेतितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचेमार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवीसर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचेनकारात्मक परिणाम कमी करेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देतनाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की तेआपल्यासाठी व आपल्या समाजासाठीमोफत आहे. आपल्याला हे लक्षात येतनाही की ही एआय प्रणाली प्रचंडप्रमाणात विजेचा वापर करते.
मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:भारतीय फ्रँचायझींनी पाक खेळाडूंना का बरे घ्यावे ?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 28 मार्चपासून सुरूहोत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्येबंदी घालण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंतक्रीडा लीगपैकी असलेल्या आयपीएलचे सध्याचेबाजारमूल्य 18 अब्ज डॉलर्स आहे. त्या तुलनेत खूपजुन्या असलेल्या इंग्लिश प्रीमियर लीगचे (ईपीएल)मूल्य 30 अब्ज डॉलर्स आहे. आयपीएलच्या वर्षानुवर्षे मिळणाऱ्या यशामुळेऑस्ट्रेलिया, इंग्लंडपासून ते वेस्ट इंडिज, दक्षिणआफ्रिकेपर्यंत जगभरात टी-20 क्रिकेट लीग उदयासआल्या. या लीग्समधील अनेक फ्रँचायझी भारतीयांच्यामालकीच्या आहेत. त्यापैकी बरेच जण आयपीएलसंघांच्या मालकांशी संलग्न आहेत. या परदेशीलीग्समध्येही कोणत्याही भारतीय मालकीच्याफ्रँचायझीने पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी बोली लावलेली नाही. ही बंदी अधिकृत नसली तरी ती जगभर लागू आहे. पण इंग्लंडमधील ‘द हंड्रेड लीग''मध्ये पहिल्यांदाच या बंदीचे उल्लंघन झाले आहे. प्रत्येक डावात 100 चेंडू खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील बहुतेक फ्रँचायझी संघ भारतीयांच्या मालकीचे आहेत. यापैकी अनेकआयपीएल संघांचे मालकही आहेत. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक आणितामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नातेवाईक काव्या मारन यांनी ‘द हंड्रेड''मधील त्यांच्या सनरायझर्स लीड्स या फ्रँचायझीसाठी पहिल्यांदाच एका पाकिस्तानीक्रिकेटपटूची निवड केली आहे. त्यांनी पाकिस्तानीगोलंदाज अबरार अहमदला सुमारे 2.34 कोटी रुपयेदेऊन विकत घेतले. यावर तात्काळ तीव्र विरोध सुरूझाला. भारताचे माजी कसोटी कर्णधार सुनीलगावसकर यांनी यावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया दिली. एकालेखात गावसकर यांनी परखडपणे लिहिले की,पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे मानधन—त्यावर तेत्यांच्या सरकारचा आयकर भरतील आणि त्यांचेसरकार या पैशांतून शस्त्रे खरेदी करेल. ही बाबप्रत्यक्षपणे भारतीय सैनिक,नागरिकांच्या मृत्यूलाकारणीभूत ठरते. या जाणिवेतून भारतीय संघटनापाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना आमंत्रितकरण्यापासून दूरच राहतात . पैसे देणारी संस्था भारतीयअसो किंवा तिची परदेशात शाखा असो. पण तिचामालक भारतीय असेल तर संस्था भारतीयांच्या मृत्यूलाहातभार लावत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.गावसकर खूप स्पष्टवक्ते आहेत. पण त्यांनापाकिस्तानविरोधी मानले जात नाही. त्यांनी वसीमअक्रम यांच्यासोबत क्रिकेट समालोचन केले आहे.सध्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूइम्रान खान यांनाही पाठिंबा दिला आहे. पण गावस्करयांच्यासारख्या व्यक्तीने टीका केली. तेव्हा ही बातमीन्यूयॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रातही प्रसिद्ध झाली.वास्तविक या वृत्तपत्राला सहसा क्रिकेटमध्ये फारसा रसनसतो. वृत्तपत्राने गावस्कर यांचा मुख्य युक्तिवाद पुन्हामांडला की, भारतीय क्रिकेट फ्रँचायझीने पाकिस्तानीखेळाडूला दिलेले पैसे पाकिस्तानकडून अप्रत्यक्षपणेभारताच्या विरोधात वापरले जातील. न्यूयॉर्क टाइम्सनेलिहिले की, ''भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एकानेइंग्लिश संघाने पाकिस्तानी खेळाडूला करारबद्धकरण्यावर टीका केली. या पैशांतून अप्रत्यक्षपणेभारतीय सैनिक किंवा नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.''गावसकर यांनी यापूर्वी म्हटले की, अनेक पाकिस्तानीक्रिकेटपटू नेहमीच भारताच्या विरोधात राहिले . अबरारअहमदने भारतीय हवाई दलाची खिल्ली उडवली होती. ‘द हंड्रेड''मधील भारतीय फ्रँचायझी मालकांचाभारतविरोधी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचे शुल्क देऊनपुरस्कृत करण्याचा इरादा आहे का, असा प्रश्नगावसकर विचारतात. बीसीसीआयने या संपूर्णवादापासून स्वतःला दूर ठेवत म्हटले की, आम्हीआयपीएल चालवतो. परंतु परदेशी लीगमध्ये खाजगीकंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या फ्रँचायझींवरअधिकारक्षेत्र नाही. बीसीसीआयनुसारआयपीएलप्रमाणेच परदेशी लीगमध्ये सहभागी भारतीयफ्रँचायझी मालकांच्या विवेकबुद्धीवर त्यांचा विश्वासआहे. त्यानुसार ते पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्यासंघातून वगळू शकतात. मात्र काव्या मारनमध्ये याविवेकबुद्धीचा अभाव आहे. तिच्या फ्रँचायझीवरबहिष्कार टाकण्यापूर्वी तिने ही समज विकसित केलीपाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अबरार अहमदने भारतीय हवाई दलाचीखिल्ली उडवली होती. तथापि,आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादसंघाच्या मालकाने ‘द हंड्रेड'' मध्येआपल्या सनरायझर्स लीड्सफ्रँचायझीसाठी अबरारला 2.34 कोटीरुपयांना विकत घेतले.
सुधींद्र मोहन शर्मा यांचा कॉलम:मध्यपूर्वेतील संघर्षात पाणी आता शस्त्रही आणि लक्ष्यही
मध्यपूर्वेतील सध्याचा तणाव आता केवळ लष्करी तळकिंवा ऊर्जा साधनांपुरता मर्यादित नाही; पाणी एकअत्यावश्यक आणि जीवनदायी गरज असून तेही यासंघर्षाचा एक भाग बनत आहे. आखाती देशांच्याजलसुविधांना लक्ष्य करण्याच्या इराणच्या धमकीने हेस्पष्ट झाले आहे की, भविष्यात पाणी केवळ शस्त्रच नव्हे,तर लक्ष्यही बनू शकते. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन,कुवेत आणि ओमान यांसारखा आखाती क्षेत्रनैसर्गिकरित्या खूप शुष्क आहे. येथे पर्जन्यमान खूप कमीआहे आणि नद्या व तलाव जवळपास अस्तित्वातचनाहीत. डिसेलिनेशन प्लांट (खारपाणी शुद्धीकरण) यादेशांची सर्वात मोठी गरज पूर्ण करतात. असे प्रकल्पखारट पाण्यातून मीठ आणि इतर अशुद्धी काढून तेपिण्यायोग्य बनवण्याचे काम करतात. हे काम प्रामुख्यानेदोन प्रकारे केले जाते. पहिली पद्धत आहे रिव्हर्सऑस्मोसिस. त्यात समुद्राचे पाणी दाबाखाली एका विशेषपडद्यातून (मेम्ब्रेनमधून) जाते. तो क्षार अडवतो आणिस्वच्छ पाण्याला त्यातून जाऊ देतो. दुसरी पद्धत म्हणजेपाणी गरम करून वाफ तयार करणे आणि नंतर शुद्ध पाणीमिळवण्यासाठी ते थंड करणे. अशा प्रकारे हे प्रकल्पसमुद्राच्या पाण्याला गोड्या पाण्यात रूपांतरित करतात.आज आखाती देशांमधील पाण्याची परिस्थिती पूर्णपणेकृत्रिम स्रोतांवर अवलंबून झाली आहे. मध्य पूर्व प्रदेशातजगातील खारपाणी शुद्धीकरण क्षमतेपैकी अंदाजे45-50% क्षमता आहे . रोज समुद्रातून अंदाजे 60-70दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. आखाती देशांमधीलअंदाजे कोट्यवधी लोक थेट शुद्ध केलेल्या पाण्यावरअवलंबून आहेत. असे असूनही या प्रदेशात दरडोईनैसर्गिक पाण्याची उपलब्धता खूपच कमीआहे—जागतिक सरासरी 5,500 घनमीटरच्या तुलनेतयेथे दरवर्षी प्रति व्यक्ती सरासरी 480 घनमीटर पाणीउपलब्ध आहे. आखाती देशांमध्ये पाण्याचे साठे अत्यंतमर्यादित आहेत—बहुतेक देशांमध्ये फक्त एकाआठवड्यापुरते पाणी सुरक्षित असते. खारपाणीशुद्धीकरणापूर्वी हा प्रदेश जगातील सर्वाधिक पाणीटंचाईअसलेल्या भागांपैकी एक होता. येथील 15 हून अधिकदेश तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत (80% पेक्षाजास्त वापर). क्षारविरहितीकरण प्रकल्पांच्या उभारणीपूर्वीआखाती प्रदेशात दरडोई पाण्याची उपलब्धता अत्यंतकमी होती. जीवन प्रामुख्याने मर्यादित भूजल स्रोतांवरअवलंबून होते. अनेक भागांत पाण्याची इतकी कमतरताहोती की मोठ्या शहरांचा विकास अशक्य होता. याप्रदेशाच्या वसाहती आणि विकासात क्षारविरहितीकरणानेमहत्त्वपूर्ण भूमिका बजावली. क्षारविरहितीकरण प्रकल्पकिनारपट्टीवर आणि इराणच्या अगदी जवळ वसलेलेआहेत. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणे सोपे होते. याप्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात हल्ला झाला, तर संपूर्ण शहरीलोकसंख्येवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याचाप्रभाव केवळ एका शहरापुरता मर्यादित राहणार नाही.आखाती देशांमधील जवळपास संपूर्ण शहरीलोकसंख्या—अंदाजे 10 कोटी लोक—थेट प्रभावितहोतील. काही दिवसांतच पाण्याची टंचाई एकामानवतावादी संकटात बदलू शकते.पिण्याच्या पाण्याची टंचाई, उद्योग आणि कारखाने बंदपडणे, वीज निर्मितीवर परिणाम रुग्णालये वआरोग्यसेवांमध्ये व्यत्यय यामुळे लोकांवर थेट हल्ला नकरताही संपूर्ण समाज प्रभावित होऊ शकतो. . सौदी येत्याकाही वर्षांत 80 अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करत आहे.परंतु पाणीपुरवठा खंडित झाला तर अब्जावधी डॉलर्सचीगुंतवणूक आणि उत्पादन धोक्यात येईल.जगानेएकत्रितपणे पाण्याला संघर्षापासून दूर ठेवण्याचा निर्धारकेला पाहिजे—कारण पाण्याला धोका निर्माण झाल्यासजीवनदेखील धोक्यात येईल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
एन. रघुरामन यांचा कॉलम:विद्यार्थी शोधत आहेत करिअर एआय-प्रूफ करण्याचे मार्ग
विमा क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या एका 22 वर्षीय युवकाने, जिथे त्याने कधीतरी दोन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केले होते, अचानक आपला इरादा बदलला आहे. आता तो पूर्णवेळ वीजतंत्री बनण्याच्या विचारात असून या उन्हाळ्यात महानगरामध्ये स्थलांतरित होऊन नवीन कामात कौशल्य आजमावू इच्छितो. त्याच्या या निर्णयामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे, त्याला भीती आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्याच्या नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो, कारण विम्यातील बहुतांश काम माहिती नोंदवण्याचे आहे. दुसरे म्हणजे, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या स्वयंपाकी, दाई, घरकामगार, काळजीवाहक, चालक आणि सुरक्षा रक्षक यांशिवाय इतर कुशल कामगारांची मोठी कमतरता भासू शकते. भरती सेवा देणाऱ्या संस्थांच्या मते, आगामी विधानसभा निवडणुकांमुळे 10 पैकी 3 कामगार आपल्या घरी परतत असून महिनाभराची सुट्टी घेत आहेत. या संस्था अधिक पगार आणि प्रोत्साहन भत्ता देऊन ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आपल्या मित्रासोबत मोठ्या शहरात जाऊन नवीन करिअर कसे सुरू करता येईल, हे पाहू इच्छितो. कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यस्थळांवर कसा परिणाम करेल, हा विषय आतापर्यंत केवळ आर्थिक शोधनिबंधांपुरताच मर्यादित होता, त्याचे ठोस पुरावे कमी होते. मात्र, दीर्घकालीन करिअरची सुरुवात करणारे तरुण आता याचा विचार करून भविष्याची दिशा शोधू लागले आहेत. काही जण शारीरिक श्रमाच्या नोकऱ्यांकडे वळत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत, जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावापासून वाचता येईल. कामकाजी लोकसंख्येपेक्षा विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल अधिक विचार करत आहेत. त्यांना माहीत आहे की याचा परिणाम होईल. मात्र, हा परिणाम नेमका किती आणि कसा असेल, हे त्यांना स्पष्टपणे माहीत नाही. जगभरातील विद्यार्थी दिवसातून किमान एकदा तरी इंटरनेटवर शोधतात की त्यांच्या भावी करिअरवर याचा काय परिणाम होईल. अमेरिकेतील आकडेवारीनुसार, अलीकडच्या वर्षांत तिथे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओघ 2020 च्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढला आहे. ज्याप्रमाणे पूर्वी पालक मुलांना टायपिंग क्लासला पाठवत असत, तसेच आता मुलांना नळकाम आणि वीजतंत्री अशा अभ्यासक्रमांसाठी पाठवले जात आहे. अनेक व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी आयपीएलशी संबंधित व्यवसाय सुरू केले आहेत, कारण त्यांना वाटते की आगामी काळात या तात्पुरत्या कामांची मागणी 25 टक्क्यांनी वाढू शकते. केरळ, पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि पिकांच्या कापणीचा हंगाम एकाच वेळी आला आहे. यामुळे अनेक कामगार घरी परतत आहेत. तसेच आयपीएलमुळे मागणी वाढेल आणि कामगारांच्या कमतरतेमुळे त्यांना या व्यवसायात संधी मिळेल. त्यांना केवळ उत्पादन क्षेत्राची भीती वाटते. जर युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्च्या मालाची कमतरता निर्माण झाली आणि उत्पादन मंदावले, तर वितरण क्षेत्रात गरजेपेक्षा जास्त लोक येतील, असे त्यांना वाटते. काही पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे असे मत आहे की, शेती आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव कमी असेल. एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’ देखील हे मान्य करते, मात्र त्यांनी असा इशाराही दिला आहे की संगणक प्रोग्रामर आणि ग्राहक सेवा प्रतिनिधींच्या नोकऱ्या अधिक धोक्यात आहेत. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने केलेल्या विश्लेषणामध्येही असेच निष्कर्ष समोर आले होते. ओंटारिओच्या 21 वर्षीय वेदांत व्याससारख्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून रजा घेऊन एका एआय स्टार्टअपमध्ये पूर्णवेळ काम सुरू केले आहे. त्याच्या मते, कॉलेजचे अभ्यासक्रम आणि कार्यक्षेत्रातील नवीन वास्तव यांच्यातील संबंध आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. फंडा हा आहे की, जेव्हा घरात जेवणाच्या टेबलावर हा चिंतेचा विषय बनतो, तेव्हा आपण मुलांना दोन नौकांची सवारी करण्यास मदत करणे चांगले ठरेल- म्हणजे पारंपरिक कॉलेजचा कोर्स आणि जोडीला एखादा अर्धवेळ शारीरिक कौशल्याचा कोर्स.
एन. रघुरामन यांचा कॉलम:सोशलायजिंगचे साधन: ‘नाइट व्हाइब्ज’चीजागा आता ‘कॉफी रेव्ह्स’ने घेतली
14 मार्च 2026 रोजी एका व्हिडिओ कॉलवर माझ्या कुटुंबातील पुढची पिढी एका पार्टीमध्ये होती. ही पार्टी चीनमधील सेंट्रल शांघाय येथील हुआंगपू नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या 1.5 किमी लांब प्रसिद्ध ‘द बंड’ या वॉटरफ्रंट प्रोमेनेडवर आयोजित करण्यात आली होती. ही एक ओपन-एअर पार्टी होती, ज्याला चीनमध्ये ‘रेव.एएम.’ म्हणतात. दुबई आणि सिंगापूरमध्ये याला ‘माचा रेव्ह्स’ आणि सोल व टोरंटोमध्ये ‘कॉफी शॉप डान्स ऑफ्स’ म्हटले जाते. जगभरात या पार्ट्या ‘कॅफे रेव्ह्स’ सारख्या वेगवेगळ्या स्थानिक नावांनी वेगाने प्रसिद्ध होत आहेत. मात्र, आपल्याकडे अजून हे ट्रेंड इतके लोकप्रिय होताना दिसले नाहीत. जेव्हा चीनमधील मुले आपल्या पालकांना सांगतात की ते वीकेंडला अशा पार्टीत जात आहेत, तेव्हा मुले उशिरा येतील या विचाराने पालक अस्वस्थ होत नाहीत. मुले सकाळी 9 वाजता निघतात आणि दुपारी 3 च्या आधी घरी परततात. उलट, पालक तर त्यांना ‘जास्त पिण्यासाठी’ प्रोत्साहन देतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नक्की कशी पार्टी आहे? ही पार्टी शनिवार रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत चालत नाही. ही शनिवार किंवा रविवारी सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 12 वाजण्यापूर्वी संपते. अनेक लोक तिथे दुपारच्या जेवणापर्यंत मजा करतात आणि दुपारची झोप घेण्यासाठी 3 वाजेपूर्वी घरी परततात. येथे प्रखर दिव्यांचा झगमगाट नसतो, कारण लख्ख सूर्यप्रकाश असतो. जबरदस्त संगीत असते, पण दारू मात्र अजिबात नसते. होय, मद्यपान आणि लेट नाइट पार्टी सोडून आताची ‘जेन-झी’ पिढी सोशल नेटवर्किंगचे नवीन मार्ग शोधत आहे. पण ड्रिंक्सशिवाय ते सोशल कसं होतात? तर येथील मेनू पाहा. आपल्याकडील नाइट क्लबप्रमाणेच तिथेही सर्वजण एकमेकांसाठी अनोळखी असतात. जवळजवळ सर्वच स्पोर्ट्स शूजमध्ये येतात. योगाभ्यासाने सुरुवात होते. त्यानंतर रनिंग (धावणे) आणि काही लोक बॉक्सिंग करतात. काही आरोग्यसजग तरुण ‘एचआयआयटी’ निवडतात - ही एक वर्कआउट शैली आहे, ज्यामध्ये 80-95% हार्ट रेटसह जलद व्यायामाचे छोटे टप्पे आणि मध्ये छोटे विश्रांतीचे काळ असतात. ते येथे मोठ्या प्रमाणात कॅलरी जाळण्यासाठी आणि पुढील अनेक तास मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी येतात. यामुळे त्यांची कार्डिओव्हस्कुलर फिटनेस सुधारते आणि चरबी वेगाने कमी होते. ते एकमेकांशी गप्पा मारताना हातात ग्लासदेखील धरतात, पण त्यातील घटक ‘चीप’ नसून ‘हाय-एंड’ कॉफी असते. जुन्या पिढीचा असा विश्वास होता की नेटवर्किंग किंवा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र बसून मद्यपान करणे आवश्यक आहे, तर याउलट ‘जेन-झी’चे असे मानणे आहे की अल्कोहोलमुक्त सोशलायजिंग हा त्यांच्या पिढीतील लोकप्रिय पर्याय असेल आणि तरीही ते नेटवर्किंग करू शकतील. व्हिडिओ कॉलवरील संभाषणात एका तरुणीने सांगितले की, सुरुवातीला तिला ‘सोबर पार्टी’चा अर्थही माहीत नव्हता. नंतर तिला जाणवले की ‘कॉफी रेव्ह’ खरंच तिला जागरूक आणि जिवंत असल्याची जाणीव करून देते. रात्री झोपही चांगली लागते. विखुरलेल्या जगात जिथे अनेक लोक, विशेषतः ‘जेन-झी’ एकमेकांशी कनेक्ट होण्याचे मार्ग शोधत आहेत, तिथे अनेक सुपर क्लब्सद्वारे आयोजित हे कॉफी रेव्ह्स त्यांना संगीताच्या माध्यमातून मित्र बनवण्यास मदत करत आहेत. अनेक महिला सहभागीदेखील या जबरदस्त संगीताचा आनंद घेतात, पण दोन गोष्टींमुळे स्वतःला सुरक्षित समजतात- दिवसाचा प्रकाश आणि दारूचा अभाव. ड्रिंक्सशिवाय अनोळखी लोकांशी संवाद साधणे त्यांना अधिक सुरक्षित आणि चांगले वाटते. यामुळे पालकही तणावमुक्त राहतात. जगभरातील पारंपरिक नाइट क्लब अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत हे वास्तव आहे आणि कॉफी रेव्ह्सची वाढती क्रेझ याच्याशीच जोडलेली आहे. मेलबर्नपासून टोकियोपर्यंत आणि क्लबिंगसाठी सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या बर्लिनमध्येही रात्री 3 वाजेपर्यंत चालणाऱ्या क्लब्सची संख्या घटली आहे.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:युद्धाच्या काळात आपण पर्याय निवडतोय
कोणतेही युद्ध कुठेही वाईटच असते. विशेषतः आपल्याभूभागाच्या इतके जवळ घडणारे असते तेव्हा ते अधिकचमहत्त्वाचे ठरते. आपल्या ऊर्जा पुरवठ्यावर गदा आणते.ते अधिकच वाईट असते. सुमारे 1 कोटी भारतीयकामगार आखाती देशांत काम करतात. त्या देशांसोबतआपली मोठी परस्पर गुंतवणूक आहे. त्यांच्यासोबतआपली तीन दशकांपासून सामरिक भागीदारी आहे. परंतुयुद्धावरील सध्या सुरू असलेल्या चर्चा देशांतर्गत सुरूअसलेल्या वादाच्या दृष्टिकोनातूनही पाहता येतात. भाजप/केंद्र सरकारचे समर्थक आपल्याला हे पटवून देऊइच्छितात की, हे युद्ध दाखवते की भारत परिपक्व झालाआहे; सरकारने अत्यंत विवेकपूर्ण पावले उचललीआहेत. भारताने इराणसोबत संतुलन राखत अरब देशांशीआपली मैत्री अधिक घट्ट केली आहे आणि त्याच वेळीइराणसोबत युद्ध करणाऱ्या आपले सामरिक भागीदार,अमेरिका व इस्रायल, यांची गुपचूप प्रशंसाही केली आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारताचे आता मध्य-पूर्वेतसात औपचारिक सामरिक भागीदार आहेत: संयुक्त अरबअमिरात, सौदी अरेबिया, इजिप्त, कतार, ओमान, कुवेतआणि इस्रायल. टीकाकार असा युक्तिवाद करतील की,इराणच्या हल्ल्याचा नाही, तर किमान युद्धाचा निषेध नकेल्यामुळे आपण आपले सामरिक स्वातंत्र्य गमावले आहे; भारत अमेरिका आणि इस्रायलवर इतका अवलंबूनझाला आहे की त्याने आपली तटस्थता सोडून दिली आहे;भारत आपला ‘जुना आणि विश्वासू मित्र'' असलेल्याइराणबद्दल इतका असंवेदनशील कसा असू शकतो?ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांना आणिआयात करावरून झालेल्या अपमानाला भारतानेप्रत्युत्तरही दिले नाही. इस्रायलविषयी भारताच्या वाढत्या वचनबद्धतेसाठी भाजपच्या मुस्लिमविरोधी राजकारणाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, इस्रायलचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. सत्य हे आहे की बहुतेक मुस्लिम जग इराणविरोधी गटात आहे. मग आखाती अरब देशांचेकाय? गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या सदस्य राष्ट्रांवर झालेल्या इराणच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्यारियाधमध्ये जारी संयुक्त ठरावात तुर्कीये, अझरबैजान, पाकिस्तान यांचा समावेश होता. या देशांची एकत्रितमुस्लिम लोकसंख्या इराणच्या पाचपट आहे. सरकारचे समर्थक म्हणतील, बघा या गोंधळात भारत कितीमजबूत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान सौदी अरेबियाला दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनांमध्ये आणि इराणलापाठिंबा दर्शवण्यामध्ये अडकला आहे.’ हे समर्थकम्हणतील, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे जहाज, कोचीमध्ये सुरक्षितपणे इराणी नौदलाचे जहाज आले.मोदींनी केवळ आखाती नेत्यांशीच नव्हे तर इराणचेअध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी साधलेल्यासंवादाकडे पाहा. तसेच विचार करा की ट्रम्प यांनी महिनाभरात आमच्या विरोधात काहीही कठोर विधानकेलेले नाही. हे आपण इतर दोन दृष्टिकोनांतूनही समजू शकतो. एक पक्ष वरील गोष्टींकडे पाहून विचार करतो की भारत आपल्या क्षमतेच्या पलीकडे जात आहे. दुसरा पक्ष मानतो की गांधी आणि नेहरूंच्या मूल्यांमधून भारताला मिळालेली पारंपरिक ताकद कमजोर झाली आहे. . दोन्हीपक्ष चुकीचे आणि भ्रमात आहेत. स्वातंत्र्यानंतरच्याकाँग्रेसच्या काळात आणि आता मोदींच्या काळातभारताने आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केली आहे. परंतुभारताने आपल्या सामर्थ्याबद्दल आणि प्रभावाबद्दलनेहमीच एक मोठा भ्रम बाळगला आहे—प्रथम आपल्यानैतिक, तात्विक आणि वैचारिक सामर्थ्याबद्दल; आणिआता सामरिक, आर्थिक सामर्थ्याबद्दल जगाला उपदेशकरणे हा आपला राष्ट्रीय छंद बनला आहे. हा छंद अनेकवर्षांपासून अस्तित्वात आहे. आपले दरडोई उत्पन्न 92डॉलर (1962 मध्ये) होते तेव्हा आणि आता ते 3,000डॉलरच्या जवळ असतानाही हा छंद सुरू आहे.स्वप्रतिमा हा कोणत्याही देशाच्या सामर्थ्याचा एकमहत्त्वाचा घटक असतो. परंतु इतर अनेक पैलू देखीलमहत्त्वाचे आहेत. आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतो.लष्करी धोक्यांच्या दबावाखाली होतो. सामरिकदृष्ट्यासोव्हिएत संघाशी सोबत होतो. बऱ्याच काळासाठीआपल्याला अन्न मदतीची गरज होती. आपण 1956 मध्येहंगेरी, 1968 मध्ये झेकोस्लोव्हाकिया आणि 1978 मध्येकंबोडियावर झालेल्या सोव्हिएत आक्रमणांवर मौनबाळगले. यावरून आपल्याकडे किती सामरिक स्वातंत्र्यहोते हे स्पष्टपणे दिसून येते. तरीही आपण 1971 मध्येनिक्सन आणि किसिंजर यांच्या विरोधात ठामपणे उभेराहू शकलो. यावरून सोव्हिएत संघासोबतच्या करारामुळेव हरित क्रांतीमुळे सामरिक शक्ती मिळाली होती. आज3 हजार डॉलरच्या दरडोई जीडीपीसह चौथी सर्वात मोठीअर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर असताना आपणअमेरिकेसोबत एक मजबूत भागीदारी टिकवून ठेवूशकतो. त्याचवेळी रशियासोबतही चांगले संबंध राखूशकतो; चीन, युरोप, ब्रिटन , कॅनडासोबतच्या संबंधांतसंतुलन साधू शकतो; इस्रायल हा एक प्रमुख सामरिकभागीदार व अरब देश जवळचे मित्र आहेत. आपणइराणसोबत किमान नागरी संबंधही राखले आहेत. जगभरात अनेक देशांवर अवलंबून असलेल्या देशाच्याह्या मर्यादा आहेत. भारत संरक्षणासाठी अमेरिका, रशिया,इस्रायल व फ्रान्सवर, ऊर्जेसाठी रशियावर परवडणाऱ्याअभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी चीनवर आणिरोजगारासाठी आखाती देश व अमेरिकेवर अवलंबूनआहे. या अवलंबित्वांमुळे भारताने नव्या सामर्थ्याबद्दलफारसा उत्साह बाळगू नये. यामुळेच भारत युक्रेनच्यामुद्द्यावर रशियाला किंवा अमेरिका-इस्रायल युतीलाउघडपणे आव्हान देऊ शकत नाही. इराणला दहशतवादीगटांना का पाठिंबा देत असेही विचारू शकत नाही. याचकारणामुळे भारतालाही एलएसीवर चीनच्या कारवायासहन कराव्या लागतात. इतर सर्व देशांप्रमाणेच भारतहीआपल्या सामर्थ्यानुसार आणि उपलब्ध संधींनुसार निर्णयघेतो. याच चौकटीत राहून भारत आपल्या क्षमतेनुसारपर्याय निवडत आहे आणि प्रयत्न करत आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सर्वप्रथम आपल्या स्वतःच्याहितांना प्राधान्य द्यायला हवेइतर देशांवरील आपल्याअवलंबित्वामुळेच भारत युक्रेनच्यामुद्द्यावर रशियाविरुद्ध उघडपणे बोलूशकत नाही. इराणबाबतअमेरिका-इस्रायल युतीला टोकू शकतनाही आणि विविध देशांतील दहशतवादीगटांना पाठिंबा का दिला जातो ? हेइराणला विचारू शकत नाही.
अमिताभ कांत यांचा कॉलम:तेल-वायूवरील अवलंबित्वावर प्रश्न विचारला गेला पाहिजे
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने जगाला पुन्हाएकदा आठवण करून दिली आहे की, ऊर्जा सुरक्षा हीभूगोलाच्या अधीन आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्याहायड्रोकार्बन कॉरिडॉरपैकी एकाच्या भोवती केंद्रित एकचयुद्ध तेल आणि वायूच्या बाजारपेठांना हादरवूनटाकण्यासाठी पुरेसे ठरते . इराणच्या उत्तरेला आणिओमानच्या दक्षिणेकडील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारीजलवाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहेआणि जगातील प्रमुख शक्ती जागतिक ऊर्जा प्रवाहावर घोंघावणाऱ्या धोक्याला उघडपणे मान्य करत आहेत. जागतिक तेल व एलएनजीचा पाचवा भाग या अरुंद कॉरिडॉरमधून जातो. आधुनिक ऊर्जा इतिहासातील ही सर्वात गंभीर घटनाआहे. 1970 च्या दशकातील दोन तेल संकटांमुळेजागतिक पुरवठ्यात प्रत्येकी रोज सुमारे पाच दशलक्षबॅरलचे नुकसान झाले होते तर सध्याच्या संकटामुळे पुरवठ्यात आधीच रोज अंदाजे 11 दशलक्ष बॅरलचाव्यत्यय येत आहे. याचे परिणाम दुर्लक्ष करण्यासारखेनाहीत आणि त्याचे पडसाद संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेतउमटू लागले आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठ्याऊर्जा आयातदारांपैकी आहे. आकडेवारीनुसार आपणतेलाच्या गरजांपैकी 90% पेक्षा जास्त व गॅसच्यागरजांपैकी सुमारे निम्म्या गरजांसाठी आयातीवर अवलंबूनआहोत. गेल्या काही आठवड्यांत आखाती प्रदेशातीलव्यत्यय वाढल्यामुळे नवी दिल्लीला आपत्कालीन ऊर्जादेखरेख लागू करण्यास भाग पडले आहे. सरकारने हेहीमान्य केले की भारताच्या एलपीजी वापरापैकी सुमारे 60%गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यापैकी सुमारे 90%आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. भारताने आपल्याकच्च्या तेलाचे पर्याय लक्षणीयरीत्या वाढवले. परंतुफेब्रुवारी 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारताच्याआयातीपैकी 59% वाटा अजूनही मध्य-पूर्वेकडीलदेशांचा आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारताचे तेल आणिवायू आयातीचे बिल एका वर्षात सहजपणे 180 अब्जडॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. 2025-25 मध्ये एकट्याकतारने भारताच्या एलएनजी आयातीपैकी 11.2 दशलक्षटन पुरवठा केला. तो एकूण आयातीच्या 51% होता.भारताचे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व हा केवळहवामानाचा प्रश्न नाही तर एक सुरक्षा संकटही आहे.आयात हायड्रोकार्बन्स आपल्या अर्थव्यवस्थेला काहीप्रदेशांवर आणि सागरी मार्गांवर अवलंबून ठेवतात. त्यावरआपले नियंत्रण मर्यादित आहे. तेलाच्या किमतींमधीलअभूतपूर्व वाढ आणि वायू पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे,आपले आयातीचे बिल केवळ वाढतच जाईल. त्यामुळेउद्योग, कृषी, वाहतूक आणि घरगुती क्षेत्रांवर वाढतादबाव येईल. जीवाश्म-इंधन नसलेले पर्याय हे समीकरणबदलतात. एकदा सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प,जलविद्युत प्रकल्प किंवा अणुऊर्जा प्रकल्प उभारले आणिजोडले गेले की ते दीर्घकाळासाठी देशांतर्गत वीज निर्माणकरू शकतात आणि इतरत्र घडणाऱ्या भू-राजकीयघटनांमुळे ते खूप कमी असुरक्षित ठरतात. सौरफोटोव्होल्टेइक प्रणाली आता साधारणपणे 25 ते 35 वर्षेचालतात. याचा अर्थ असा की, एकदा स्थापित झाल्यावर,जीवाश्म-इंधन-विरहित ऊर्जा क्षमता युद्धे, जहाजवाहतुकीतील व्यत्यय आणि सागरी संघर्षांच्या काळातहीउत्पादन करत राहते. आधुनिक ऊर्जा इतिहासात ही पहिलीच वेळ आहे कीएवढ्या मोठ्या संकटामुळे जीवाश्म इंधन प्रणाली मजबूतहोत नसून त्यापासून दूर जाण्याच्या संक्रमणाला गतीमिळत आहे. 1973, 1979 आणि अगदी 2008 च्याधक्क्यांनी अखेरीस तेलाचे महत्त्व अधिकच अधोरेखितकेले होते. पण आज इतर पर्याय उपलब्ध आहेत. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताचे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्वहा केवळ हवामानाचा प्रश्न नाही तर एकसुरक्षा संकटही आहे. आयात केलेलेहायड्रोकार्बन्स आपल्या अर्थव्यवस्थेलाविशिष्ट प्रदेश आणि सागरी मार्गांवरअवलंबून ठेवतात. प्रत्यक्षात त्यावर आपलेकोणतेही नियंत्रण नाही.
प्रियदर्शन यांचा कॉलम:मिठाच्या सत्याग्रहाच्या आधी झाला होता जल सत्याग्रह
20 मार्च 1927 रोजी महाराष्ट्रातील (तत्कालीन बॉम्बेप्रेसिडेंसीचा भाग) एका तलावाला हजारो दलितहातांनी स्पर्श केला. त्यातील पाणी प्यायले आणि एकाजनआंदोलनाला सुरुवात केली. तो आजही सुरू आहे.महाडचा सत्याग्रह किंवा चवदार तळे सत्याग्रह म्हणूनओळखल्या जाणाऱ्या या चळवळीचे नेतृत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. महिला, मुले आणिवृद्धांसह अडीच हजार दलित नागरिकांनी चार-चारच्या गटाने महाडच्या चवदार तलावाकडे मोर्चा घेऊन गेले. तेथील पाणी प्यायले आणि त्यावर आपला कायदेशीरहक्क असल्याचे घोषित केले होते. यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांना मारहाण करण्यात आली. अनेकांनात्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले. तलावाचे //शुद्धिकरण ’ करण्यात आले. आंबेडकरांनी याचीतुलना 1789 मध्ये फ्रेंच क्रांतीपूर्वी झालेल्या व्हर्साययेथील सभेशी केली. महात्मा गांधींनीही या सत्याग्रहाची प्रशंसा केली होती. पण हा पाण्याचा संघर्ष अजून सुरूचहोता. उच्च जातीच्या लोकांनी न्यायालयात धाव घेतलीआणि दलितांना तलावापासून दूर ठेवण्याचा आदेशमागितला होता. हा लढा दहा वर्षे चालला—1937 मध्येमुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की तलावनगरपालिकेच्या मालकीचा आहे आणि त्याच्यापाण्यावर सर्वांचा हक्क आहे. हे सांगण्याची गरज नाही की या संघर्षानंतरही आणिभारतीय संविधानात अस्पृश्यतेला गुन्हेगारी ठरवूनहीसमाजातील बहुसंख्य लोक ते स्वीकारण्यास तयारनाहीत. हुंडा निर्मूलन किंवा महिलांच्या मालमत्तेच्याहक्कांप्रमाणेच अनेक दलितांना विहिरी आणितलावांमधून पाणी घेण्याचा हक्क नाही. 20 मार्च रोजीप्रसिद्ध वकील संजय हेगडे यांनी ‘द हिंदू''मधील एकाभाष्यात महाडच्या या जल सत्याग्रहाला दांडीतीलमिठाच्या सत्याग्रहाइतकेच महत्त्वाचे मानले. ते म्हणतातकी, 1930 चा मिठाचा सत्याग्रह जगातील सर्वात मोठ्यासाम्राज्याविरुद्धच्य ा संघर्षाचे आवाहन होते तर त्याच्यातीन वर्षे आधी 1927 मध्ये झालेला पाण्याचा सत्याग्रह हागुलामगिरीतून मुक्तीसाठीची देशातील सर्वात जुनीचळवळ होती. या सत्याग्रहाला इतिहासात त्याचे योग्यस्थान दिले पाहिजे. ते असा प्रस्ताव मांडतात की महाडसत्याग्रहाची शताब्दी सुरू होत असताना वर्षभर असेकार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. सामाजिकसमानतेसाठीच्या या हरवलेल्या संघर्षाला अधिक पुढेनेऊ शकतील. महाड सत्याग्रह हा केवळ दलितांच्यासंघर्षाचा इतिहास नाही तर समानता शोधणाऱ्या सर्वलोकांच्या संघर्षाचा इतिहास आहे. यात प्रत्येकाचासहभाग असला पाहिजे आणि तो सामाजिक स्तरावरचाअसला पाहिजे. सध्या मुख्य प्रवाहातील राजकारणअशा सर्व चळवळींना जातीय आधारावर मोडूनकाढण्यात आणि आपल्या सोयीनुसार बदलण्यात व्यस्तआहे. दलित, मागास किंवा सवर्ण अस्मितांनानिवडणुकीच्या पटावर प्याद्यांप्रमाणे वापरले जात आहे.आंबेडकरांची तत्त्वे, पेरियारांचे सिद्धांत आणिकांशीरामांच्या सूचना विसरल्या गेल्या आहेत—आताफक्त आघाडीचे राजकारण उरले आहे. त्यामुळेसमानतेचा लढा अविश्वसनीय बनला आहे. जातीयराजकारण याचा फायदा घेत आहे. या राजकीय चर्चेतूनअल्पसंख्याकांना बाजूला सारले गेले आहे. अशा परिस्थितीत महाडची आठवण समाजाच्यामुळापासून हा रोग कापून काढण्यासाठी आवश्यकअसलेल्या शस्त्रक्रियेच्या सुरीप्रमाणे काम करू शकते.अर्थात हे सोपे नाही. परंतु याकडे केवळ दलितांचा संघर्षम्हणून न पाहता भारतातील समानतेसाठी उरलेला लढापुनरुज्जीवित करण्याची मोहीम म्हणून पाहिले गेले तरत्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) 1930 चा मिठाचा सत्याग्रह जगातीलसर्वात मोठ्या साम्राज्याविरुद्ध संघर्षाचेआवाहन होता, पण त्याच्या तीन वर्षेआधी 1927 मध्ये झालेला जल सत्याग्रहहा देशातील सर्वात जुन्या गुलामगिरीतूनमुक्तीसाठीचा एक लढा होता.
मेघना पंत यांचा कॉलम:खरा घोटाळा म्हणजे एपस्टीन फाइल्स नव्हे, तर त्याभोवतीचे मौन
एपस्टाईन फाईल्समुळे मला धक्का बसला नाही, पणआतून नक्कीच पोकळी जाणवली. हे नवीन नाही; हेओळखीचे आहे. सत्ता लपते, संरक्षण करते आणि जेव्हागोंधळ सुरू होतो तेव्हा घाबरते. जेफ्री एपस्टीनकडे बघा. बातम्या त्याला एक राक्षस म्हणूनचित्रित करत आहेत. पण तो कधीच एकटा नव्हता.त्याच्यामागे एक संपूर्ण जाळे होते—आर्थिक, सामाजिक,राजकीय आणि जागतिक. आणि असे जाळे उघडकीसयेते तेव्हा कोणताही एक खलनायक समोर येत नाही.अनेक पदर उलगडले जातात. नावे समोर येतात.महत्त्वाच्या संस्था अशा प्रकारे वागू लागतात जणू काहीत्यांनी आपली स्मृती गमावली आहे. पण इथे एकअस्वस्थ करणारे वास्तव आहे. समाजाला सपाट कथाआवडतात. त्याला चित्रपटांतील खलनायकांसारखेभीतीदायक चेहरे हवे असतात. गुन्हेगार केवळ पाहूनचभीतीदायक वाटावेत असे आपल्याला वाटते. आणिपीडित व्यक्ती निरपराध, निर्दोष आणि सुरक्षित असते.पण दोन्हीही केवळ कल्पना आहेत. खरे गुन्हेगारआकर्षक वाटतात—मैत्रीपूर्ण, परोपकारी, एखाद्यापाहुण्यासारखे. आणि खरे बळी संतप्त, गोंधळलेले आणिदुखावलेले असतात. हे फक्त पाश्चात्य देशांमध्येच घडतेअसा खोटा दिलासा स्वतःला देऊ नका. गुन्हेगारी आणिसत्ता एकमेकांत गुंतलेली आहेत—मग ते लंडन असो,न्यूयॉर्क असो किंवा भारतातील एखादे छोटे शहर असो.पद्धत तीच आहे: पोहोच, जाळे आणि मौन. फक्तआपलीच उदाहरणे पाहा. 2012 च्या दिल्लीतील सामूहिकबलात्कारानंतर देशात खळबळ उडाली. कायदे बदललेगेले. बाल न्याय कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.जेणेकरून काही 16-18 वर्षांच्या मुलांवर घृणास्पदगुन्ह्यांसाठी प्रौढांप्रमाणे खटला चालवला जाऊ शकेल. हीसुधारणा संतापातून जन्माला आली आणि आवश्यकहीहोती. पण ती गुंतागुंतीची, राजकीयदृष्ट्या प्रभावित आणिअस्थिर आहे. हाय-प्रोफाईल हिट-अँड-रन प्रकरणांकडेपाहा. खटले आणि अपील वर्षानुवर्षे चालतात. तुम्हीनिकालाशी सहमत असाल किंवा नसाल, हे स्पष्ट आहेकी पैशाने वेळ विकत घेता येतो. सत्ता विलंबही लावते.आणि विलंबाचे निश्चितच काही फायदे आहेत. एपस्टीनप्रकरणात केवळ एका संबंधालाच सहभाग आणिजवळीकीचा पुरावा मानले जाते. हे धोकादायक आहे.एक स्त्रीवादी म्हणून दोषी सिद्ध होईल अशा कोणत्याहीपुरुषाच्या विरोधात मी उभी राहीन. पण मला पितृसत्तेचीजागा जमावाच्या न्यायाने घ्यावी असे वाटत नाही. पुरावेमहत्त्वाचे आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया अत्यावश्यकआहे. कारण तिचा त्याग केल्याने न्याय स्वस्त होईल. तोमजबूत होणार नाही. मी दिखावू रागाला कंटाळले आहे.मला ठोस संताप हवा आहे. मला पीडितांची प्रकरणेचांगल्या प्रकारे हाताळली जावीत. त्यांचे संरक्षण व्हावेआणि त्यांच्यावर विश्वास ठेवला जावा असे वाटते. असेइथे घडत नाही. हे ऐकून मी कंटाळले आहे. अरे, हे घडते,हे सगळीकडे घडते. आणखी नावे समोर येतील. अशीनेटवर्क्स हळूहळू उघड होतात. पत्रकार परिषदेतनाही—तर दस्तऐवज, निवेदने, विमान प्रवासाच्या नोंदीआणि दिवाणी खटल्यांमधून. पण खरा प्रश्न हा आहे :आपण काळजीपूर्वक तपास करणार आहोत की प्रत्येकनवीन मथळ्यावर केवळ भावनिक प्रतिक्रिया देऊन शांतहोणार आहोत? दस्तऐवजीकरण का सुरू करू नये?हॅशटॅगवाला राग नको. पक्षपाती घोषणाही नकोत.वास्तविक शास्त्रीय आधार असलेला व निर्भय न्यायहवा. खरा घोटाळा एपस्टीन फाईल्स नव्हता, तरत्याभोवतीचे मौन होते. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
नीरजा चौधरी यांचा कॉलम:राज्यसभा निवडणुकीमुळे भाजप राजकीयदृष्ट्या अधिक बळकट
या वर्षीच्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकानेहमीपेक्षा जास्त चर्चेत राहिल्या. 37 पैकी 26 उमेदवारबिनविरोध निवडून आल्याने वरवर पाहता या निवडणुकासाध्या वाटू शकल्या असत्या, परंतु प्रत्यक्षात हा‘भाजपचा शो’ ठरला. पक्षाला गरजेपेक्षा जास्त जागामिळाल्या. यात बिहार, ओडिशा आणि हरियाणामधीलक्रॉस व्होटिंगचा मोठा वाटा होता, ज्याचा थेट फटकाविरोधकांना बसला. या निवडणुकांनी हे देखील दाखवूनदिले की, भाजपच्या आक्रमक रणनीतीचा सामनाकरण्यास विरोधक असमर्थ आहेत. मात्र, यानिवडणुकांचे खरे महत्त्व नितीशकुमार यांचे अनपेक्षितनामांकन आणि शरद पवार यांचे पुन्हा राज्यसभेत जाणेयात दडलेले आहे. येथेच भाजपच्या यशाची खरी कथा आहे. नितीशकुमार आणि शरद पवार हे दोघेही भारतीय राजकारणातीलदिग्गज असून त्यांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्रीआणि केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे. आज दोघेही प्रकृतीच्या समस्यांशी झुंजत आहेत. भाजपचे डोळेगेल्या अनेक दिवसांपासून पाटलीपुत्रच्या (बिहार)गादीवर होते. 2025 ची बिहार निवडणूक नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यास भाजप सुरुवातीला कचरत होता, पण नंतर त्यांना ते मान्य करावे लागले. निवडणुकीत जदयूनेआपल्या जागा जवळपास दुप्पट केल्यामुळे भाजपने 89जागांसह मोठा पक्ष असूनही 85 जागा असलेल्या नितीशयांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवले. मात्र, संधी मिळताचभाजप पाटण्यात नेतृत्वबदल करून आपला मुख्यमंत्रीबसवेल हे सर्वांना ठाऊक होते. बिहार हे भाजपसाठी एक‘ड्रीम प्रोजेक्ट’ होते. तेथे त्यांना कधीही स्वबळावरसरकार बनवता आले नव्हते. पण हा बदल इतक्या लवकर होईल अशी कोणालाचअपेक्षा नव्हती. भाजपने या ठिकाणी घेतलेले निर्णयअनपेक्षित होते. आतापर्यंतच्या स्थानिक राजकारणाचाविचार केल्यास तसे वाटते. खरे तर राज्याची सूत्रे गेल्याकाही वर्षांपासून नितीश यांच्याकडे होती. त्यांचा समर्थकवर्गही खूप मोठा आहे. पक्षाचा पाठिंबा पाहता नक्कीचकाही प्रश्न समोर असतील. सर्वात कठीण प्रश्न हा होता की, नितीशकुमार यांना पदसोडण्यास कसे तयार करायचे? कारण याच खुर्चीसाठीत्यांनी अनेकदा युती बदलली होती. भाजपचे यश केवळ नितीश यांना मुख्यमंत्रिपदावरूनहटवण्यात नाही, तर ते त्यांनी स्वतःच्या संमतीने केले यातआहे. ‘आता मला राज्यसभेचा अनुभव घ्यायचा आहे,’असे नितीश यांनी स्वतःच जाहीर केले. मात्र, केवळत्यांचा मुलगा निशांत याला उपमुख्यमंत्रिपद देणे हेत्यांच्या राजीनाम्याचे एकमेव कारण असू शकत नाही.नितीश हे लोहिया आणि कर्पुरी ठाकूर यांचे अनुयायीअसून त्यांनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला आहे.त्यांना मुलाला राजकारणात आणायचे असते तर त्यांनीते कधीही केले असते. परंतु त्यांनी आजवर ते कटाक्षानेटाळले असावे. विशेष म्हणजे सध्या लोकसभेत भाजप240 जागांसह अल्पमतात असताना जदयूचे 12 खासदारत्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लोकसभेतील हेगणित सुरक्षित राहावे यासाठी भाजपने ही खेळी खेळलीअसावी. शरद पवार यांची बिनविरोध निवडदेखील याच संदर्भातमहत्त्वाची असे मला वाटते. भाजपने त्यांच्याविरुद्धउमेदवार उभा केला नाही. वास्तविक भाजपने बिहारकिंवा ओडिशात असे केले होते. पवार यांच्या बाबतीतत्यांनी अशा प्रकारची खेळी केली. पवार यांनामहाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती आणिभाजपने त्यांच्याविरोधात मवाळ भूमिका घेतली. संन्यासघेण्याच्या चर्चेनंतर पवार पुन्हा राज्यसभेत गेल्यानेशिवसेना चिंतेत आहे. कारण भविष्यात पवार एनडीएतील अजित पवार गटाच्याजवळ जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाचीचर्चाही सर्वश्रुत होती. एकूणच, नितीशकुमार यांचे राज्यसभेत जाणे त्यांनाआणि जदयूला कमकुवत करणारे ठरू शकते, तर शरदपवार यांचे पुन्हा राज्यसभेत जाणे त्यांना आणि त्यांच्यापक्षाला बळ देणारे आहे. हे दोन्ही परिणाम अंतिमतःभाजपलाच अधिक शक्तिशाली बनवणारे आहेत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) बिहार, ओडिशा आणि हरियाणामध्येझालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’ने विरोधीपक्षांचे मोठे नुकसान केले. आपल्याउमेदवारांना ताकद देण्याची आणिविरोधकांना कमकुवत करण्याचीभाजपची दुधारी रणनीती रोखण्यातविरोधक अपयशी ठरले.
एन. रघुरामन यांचा कॉलम:निश्चयी इराद्याचे बीज तुम्हाला त्यागाकडून यशाकडे नेते
यश त्यांनाच मिळते, जे समाजाचे टोमणे, शारीरिक मर्यादा किंवा अनोळखी गोष्टींच्या भीतीमुळे डगमगत नाहीत. येथे दोन उदाहरणे दिली आहेत: 1. ईश्वराने प्रत्येक प्रजातीच्या मातेला अशी शक्ती दिली आहे की, ती स्वतःची भूक मारून मुलांना भरवू शकते. यामध्ये मनुष्य जात सर्वात पुढे आहे. मग ती आई कितीही भुकेलेली असो किंवा आठवडाभर तिला चांगले अन्न मिळाले नसो, तरीही तिच्यात अशी ताकद असते की ती डोळ्यांत किंवा चेहऱ्यावर तसे भाव येऊ देत नाही. मुलांनी पोटभर खाल्ल्यावर चेहऱ्यावर आनंद कसा ठेवायचा, हे देवाने तिला शिकवले आहे. 19 वर्षीय रिया सोलंकीची आई, साक्षी सोलंकी यांच्याकडे ही शक्ती केवळ एक दिवस किंवा महिना नाही, तर गेल्या आठ वर्षांपासून होती. 2018 मध्ये जेव्हा त्यांच्या मुलीने ‘शॉट पुट’चे (गोळाफेक) प्रशिक्षण सुरू केले, तेव्हापासून साक्षी स्वतः उपाशी राहून तिला पौष्टिक अन्न भरवत आहेत. दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या साक्षी यांच्यासाठी ॲथलीट मुलीच्या पोषणाची व्यवस्था करणे हे जीवनातील सर्वात कठीण काम होते. गरिबीत जेमतेम संसार चालवणाऱ्या कुटुंबात, मोठ्यांच्या जेवणात कपात करून 11 वर्षांच्या मुलीला प्रोटीनयुक्त आहार देणे हे मोठे आव्हान होते. त्याव्यतिरिक्त, रियाला जन्मापासूनच कोपराखाली डावा हात नव्हता. उपाशी आई-वडिलांसमोर पौष्टिक अन्न खाताना त्या लहान मुलीलाही वाईट वाटायचे. जेव्हा ती आपल्या ताटातील घास त्यांना देण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा ते दोघे हसून सांगायचे की, “आमचे पोट भरले आहे,” प्रत्यक्षात मात्र ते दीर्घकाळ भुकेले असायचे. पण या आठवड्यातच या त्यागाचे फळ कुटुंबाला मिळाले. मेरठमधील एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीने भुवनेश्वर येथे आयोजित ‘नॅशनल पॅराॲथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये शॉट पुटमध्ये सुवर्णपदक जिंकले. एका ड्रायव्हर पित्याने आपले खेळाचे स्वप्न सोडले आणि आईने मुलीच्या पोषणासाठी जास्तीचे घरकाम केले, अशा एका कुटुंबाच्या आर्थिक संघर्षाचा हा गोड शेवट होता. आता तिचे लक्ष्य ‘एशियन गेम्स’ आहे. 2010 मध्ये साक्षी यांना दररोज 150 रुपये मजुरीवर घरकामाचे काम मिळाले होते. ही त्यांच्यासाठी मोठी रक्कम होती, कारण आधी त्यांना महिना 250 रुपये मिळायचे. तेव्हाच त्यांनी ठरवले की पती घरी मुलांची काळजी घेतील आणि त्या कामावर जातील. समाज त्यांच्या पतीला “बायकोच्या कमाईवर खातो” असे टोमणे मारायचा. पण हे कुटुंब डगमगले नाही आणि आज चित्र बदलले आहे. एका खोलीच्या भाड्याच्या घरात आज विजयाचा जल्लोष साजरा होत आहे. 2. गडचिरोलीतील स्ट्रॉबेरी क्रांती : आता महाराष्ट्रातील माओवाद प्रभावित गडचिरोलीचे दुसरे उदाहरण पाहा. चांगला पाऊस होऊनही तिथला कोणताही शेतकरी दरवर्षी प्रति एकर 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावू शकत नव्हता. त्यांना सांगण्यात आले की स्ट्रॉबेरी लावून ते लाखो रुपये कमावू शकतात. शेतकरी हसले, कारण त्यांना स्ट्रॉबेरी दिसते कशी हेदेखील माहीत नव्हते. शेतकरी पवीरा राव म्हणतात, “जेव्हा मी पहिल्यांदा अधिकाऱ्यांकडून स्ट्रॉबेरीबद्दल ऐकले, तेव्हा ती कशी दिसते हे इंटरनेटवर पाहिले. शेती करण्यापूर्वी आमच्यापैकी अनेकांनी या फळाचे नावही ऐकले नव्हते.” त्यांनी आपल्या 5 एकर जमिनीपैकी अर्ध्या एकरात स्ट्रॉबेरीची लागवड केली. आता मार्चच्या अखेरीस ते 400 रुपये किलो दराने पीक घेत आहेत. गडचिरोली हा प्रामुख्याने भातशेतीचा भाग आहे, परंतु कृषी विभाग पर्यायी पिकांना प्रोत्साहन देत आहे. स्ट्रॉबेरीचा हा प्रयोग 2019 मध्ये दोन-तीन शेतकऱ्यांपासून सुरू झाला, जो आता 50 शेतकरी आणि 12 एकर शेतीपर्यंत पोहोचला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुचेरा हा भाग आता ‘स्ट्रॉबेरी बेल्ट’ बनत आहे, कारण तिथे महाबळेश्वरसारखा डोंगरी भाग आहे. फंडा असा की - खरा बदल तेव्हाच सुरू होतो, जेव्हा आपण दीर्घकालीन ध्येयासाठी तात्कालिक आरामाचा त्याग करण्याचे धाडस दाखवतो. मग तो आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने मुकाट्याने सहन केलेली भूक असो किंवा नवीन पीक घेण्यासाठी शेतकऱ्याने उचललेले धाडसी पाऊल असो
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपली परंपरा संसाराच्या उन्हात सावली देणारी
निसर्गाने सुख आणि दुःखाचा समतोल साधला आहे. मनुष्य केवळसुख किंवा केवळ दुःख सहन करू शकत नाही. दोन्ही स्वीकारण्यातचशहाणपण आहे. ही कथा ऐकल्यानंतर गरुडजी काकभूषुंडीजींनाम्हणाले, ‘जो अति आतप ब्याकुल होई, तरु छाया सुख जानइ सोई।’अर्थात उकाड्याचा अत्यंत त्रास होतो, त्यांनाच झाडाच्या सावलीचाआनंद कळतो. आजच्या आपल्या तरुण पिढीची जीवनशैली भविष्यातत्यांच्यासाठी आणखी त्रासदायक ठरेल. हे केवळ भारतापुरते मर्यादितनाही. रशियाच्या सीमेवरील एस्टोनिया या देशाची राजधानी टॅलिनआहे. मी सुंदरकांडावर तेथे बोलत असताना एका रहिवाशाने मलासांगितले की तरुण पिढीत देशभक्ती व कौटुंबिक जबाबदारी कमीझाली आहे. मी विचारले, यावर उपाय काय?’ त्याच्याकडे उत्तरनव्हते. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे एक परंपरा, एकसंस्कृती आहे. मग आपल्या मुलांना धर्मग्रंथांशी का जोडू नये. ते त्यांनासांसारिक झळांमध्ये सावली देतील.
ब्रह्म चेलानी यांचा कॉलम:चीन अमेरिकेकडून शिकतोय की तैवानला कसे हडपायचे?
गेल्या वर्षी सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी कॅरिबियनक्षेत्रापासून पूर्व-प्रशांत आणि आफ्रिकेपासून मध्यपूर्वेपर्यंत लष्करी हल्ल्यांचे आदेश दिले आहेत. त्यांनीव्हेनेझुएलावर हल्ला करून तिथले नेते मादुरो यांचेअपहरण केले. आता इस्रायलसोबत मिळून इराणविरुद्धयुद्ध छेडले आहे. दरम्यान, अमेरिका क्युबाभोवतीही पाशआवळत आहे. यातून निर्माण होणाऱ्या मानवीशोकांतिकेला घाबरून क्युबा आपल्यासाठी दरवाजेउघडेल, अशी अमेरिकेला आशा आहे. जसे ट्रम्प आंतरराष्ट्रीय कायद्यांची बिनधास्तपणेपायमल्ली करत आहेत, त्यातून चीनही धडा घेत आहे.ट्रम्प यांचे ‘क्युबा-मॉडेल’ शी जिनपिंग यांच्यासमोरतैवानला हडपण्यासाठी एक उपयुक्त आराखडा सादर करते. महाशक्ती एखाद्या देशाला गुडघ्यावरआणण्यासाठी त्याचा गळा कसा घोटू शकतात, याचे हे उघड प्रदर्शन आहे. आधुनिक समाज अन्न, पाणी,वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींवर अवलंबून असतो, पण एक प्रणाली यासर्वांवर वरचढ आहे: ती म्हणजे ऊर्जा. विजेमुळेचपाण्याचे पंप, रेफ्रिजरेशन, आरोग्य सेवा, डिजिटलनेटवर्क आणि औद्योगिक-शेती उत्पादन चालते. जसेपॉवर ग्रीड निकामी होते, तशा इतर सर्व महत्त्वाच्यायंत्रणा कोलमडू लागतात आणि सामाजिक स्थिरतेसमोरधोके निर्माण होतात. याच कारणामुळे जे देश वीजनिर्मितीसाठी आयातीत इंधनावर जास्त अवलंबूनआहेत, ते मुळातच असुरक्षित असतात. क्युबादीर्घकाळापासून मुख्यतः व्हेनेझुएला आणिमेक्सिकोकडून खरेदी केलेल्या तेलावर अवलंबून आहे.ट्रम्प यांनी क्युबाच्या याच असुरक्षिततेचा फायदा घेतइंधन पुरवठ्यावर पूर्णपणे नाकेबंदी लागू केली आहे.लाखो लोक विजेपासून वंचित झाले आहेत. पाणीउपसणारे पंपिंग स्टेशन बंद झाले आहेत. ट्रॅक्टर आणिडिलिव्हरी ट्रक्स थांबले आहेत, ज्यामुळे अन्नाच्याकिमती गगनाला भिडल्या असून अन्नसंकट वाढतआहे. रुग्णालये अनियमित ब्लॅकआउटमध्ये कामकरण्यासाठी संघर्ष करत आहेत. शी जिनपिंग यातूनधडा घेऊन तैवानचीही अशाच प्रकारे दमनकारी कोंडीकरू शकतात. ते तैपेईवर क्षेपणास्त्रे डागण्याऐवजी किंवातैवानच्या समुद्रकिनाऱ्यावर हल्ला करण्याऐवजी त्याच्यासभोवताली ‘सागरी क्वारंटीन’ किंवा‘कस्टम-तपासणी’ व्यवस्था घोषित करू शकतात.यामध्ये चिनी तटरक्षक जहाजे तैवानच्या बंदरांकडेजाणाऱ्या इंधन टँकर्सना सुरक्षा तपासणी किंवा तस्करीविरोधी मोहिमेच्या नावाखाली रोखू शकतात. अशाप्रकारचे किरकोळ अडथळे देखील वेगाने पुरवठासाखळी खंडित करू शकतात. तैवान आपलेजवळजवळ सर्व इंधन (मुख्यतः एलएनजी) आयातकरतो आणि त्याच्याकडे जेमतेम दोन आठवड्यांचासाठा असतो. . क्युबाप्रमाणेच तैवानलाही ब्लॅकआउटचासामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तिथलापाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणा विस्कळीत होईल.जागतिक डिजिटल अर्थव्यवस्था चालवणारेसेमीकंडक्टर प्लांटसह सर्व औद्योगिक उत्पादन ठप्पहोईल. चीनचा उद्देश तैवानला तातडीने शरण आणणे हानसेल, तरीही या मार्गाने तो हळूहळू तैवानची मुळेकमकुवत करू शकतो. अशा परिस्थितीत, चीनतैवानमध्ये स्थिरता आणण्याचा किंवा तिथल्या लोकांचेरक्षण करण्याचा हवाला देऊन तो देश हडपू शकतो.तसेही ट्रम्प-युगात ‘फ्रेंडली-टेकओवर’ एखाद्या कॉर्पोरेटपुनर्रचनेसारखे बनले आहे. सूत्र साधे आहे: एखाद्यादेशात समस्या निर्माण करा आणि नंतर त्यावर तोडगादेण्याच्या नावाखाली त्या देशात लुडबूड करा. जर चीनने तैवानवर थेट हल्ला केला तर इतर देशांनाप्रतिक्रिया देणे भाग पडेल, पण जर जहाजांच्या ‘रुटिनतपासणी’चा हवाला देऊन तैवानचा पुरवठा खंडितकेला, तर त्याविरोधात मोठी लष्करी कारवाई करणेकोणालाही समर्थनीय ठरणार नाही. तसेही शी जिनपिंगअशा धोरणांचे माहीर आहेत, ज्याद्वारे त्यांनी दक्षिण चीनसमुद्र आणि इतर भौगोलिक क्षेत्रांत एकही गोळी नझाडता मोठे सामरिक लाभ मिळवले आहेत. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) महाशक्ती एकमेकांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतात. अशा वेळी एकासाठी जे तंत्र प्रभावी ठरते, ते दुसऱ्यासाठी आदर्श बनून जाते. आजअमेरिका जे काही करत आहे, तेचीनसाठी एका रंगीत तालमीसारखेआणि चाचणीसारखे आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय आजी-आजोबांसाठीही तितकेच गरजेचे आहे, जितके मुलांसाठी
‘खूप झाले राहुल, तंत्रज्ञानात लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देत नाहीयेस, बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत.’ राहुलने तर आपल्या आईच्या या कठोर इशाऱ्याकडे लक्षही दिले नव्हते, पण त्या आवाजातील तिरस्काराचा सूर इतका तीक्ष्ण होता की तो इतर कुणालाही दुखावू शकत होता. यामुळे त्या बेबी बूमरला (1964 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तीला) थोडी उदासीनता नक्कीच आली, जे बऱ्याच काळापासून टेक्नोफोबियाशी झुंजत होते. पण त्यांनी त्याकडे लगेच दुर्लक्ष केले आणि म्हणाले, जा, जा, नाही तर तुझी आई मला ओरडेल की मी तुला थांबवून ठेवले. तुझा अभ्यास पूर्ण कर, मग बघू. आजोबांनी त्याला खोलीबाहेर काढले. बाहेर जाताना राहुलने वचन दिले, काळजी करू नका, मी ही समस्या कायमची सोडवेन. ज्या पिढीला बेबी बूमर्सनी मार्गदर्शन केले होते, आता तीच पिढी स्मार्टफोनच्या माध्यमातून त्यांची मार्गदर्शक बनली होती. बहुतांश कुटुंबांमध्ये बऱ्याच काळापासून हीच गोष्ट पाहायला मिळत होती. पण अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. आज जर राहुलच्या घरात इंटरनेटची सुविधा नसेल तर तो संकटात सापडलेल्यांच्या श्रेणीत येतो. राहुलच्या अभ्यासादरम्यान इंटरनेटचा पुरवठा मर्यादित केला जात असे. पण जसजसा राहुल पदवी शिक्षणापर्यंत पोहोचला, तसतसे आजोबा पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचले! राहुलकडे त्यांच्यासाठी वेळ कमी होत गेला, त्याच्या आईचा सूर मवाळ झाला, तर घरात आजोबांचे महत्त्व वाढले. आता घरात आजोबाच सर्वात जास्त टेक-सॅव्ही झाले होते! विचार करत आहात कसे? तर ही आहे त्याची गोष्ट. त्या रात्री राहुलने त्यांना एआयचा वापर करायला शिकवले. तो गेल्यानंतर आजोबांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक त्यांच्या संगणकावरून मेनू बार गायब झाला. आजोबांनी शेजारच्या खोलीत बसलेल्या राहुलला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. राहुलने उत्तरात व्हॉइस मेसेज पाठवला- एआयला विचारा. एआयने शांतपणे त्यांना खात्री दिली की ॲपल कधीकधी हे लपवून ठेवते आणि ते कुठे शोधायचे हेही सांगितले. जेव्हा त्यांनी विचारले की मेमरी कॅशे म्हणजे काय असते, तेव्हा एआयने सर्वात आधी म्हटले- खूप छान प्रश्न. यापूर्वी कुणीही त्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नाला खूप छान म्हटले नव्हते, त्यामुळे आजोबांचे मन त्यात रमले. एआयने कधीही तक्रार केली नाही आणि ते त्यांची प्रत्येक समस्या सोडवत गेले. हळूहळू त्यांचे पासवर्ड सशांच्या वेगाने वाढू लागले. डिमेन्शियाची भीती त्यांना सतावत नव्हती, कारण एआय त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत होते आणि त्यांच्याकडे केवळ फिंगरप्रिंट्सची परवानगी मागत होते. एआयने घराचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले होते. आता राहुलची आई आपल्या सासऱ्यांचीच राहुलला समजावण्यासाठी मदत घेऊ लागली, कारण राहुल हळूहळू जणू अशी एक बायोमेकॅनिकल युनिट बनत चालला होता, जी सातत्याने शक्तिशाली होत चाललेल्या मशीन इंटेलिजन्समध्ये एकरूप होण्यासाठीच बनली होती. तो हे समजण्यात अपयशी ठरला होता की मानवी जीवन यापेक्षा खूप मोठे आहे आणि आपले जाणून घेण्याच्या, नाते जोडण्याच्या, समजून घेण्याच्या आणि काहीतरी बनण्याच्या अनुभवांमध्ये कितीतरी अधिक खोली आहे. आज राहुलचे आजोबा याच खोलीचा शोध घेण्यात त्याची मदत करतात. अनेक दिवस राहुल आणि आजोबा एकाच खोलीत तासन्तास एकत्र बसतात. ते मानवाच्या ज्ञानात्मक क्षमतांवर चर्चा करतात. म्हणजेच वरवरच्या अभ्यासाच्या पुढे जाऊन वास्तविकता, अस्तित्व आणि असण्याच्या मूळ तात्त्विक आधारांपर्यंत पोहोचणे आणि पारंपरिक सीमांच्या पलीकडे जाऊन ज्ञानाचा शोध घेणे - आपल्या किंडल आणि मॅकबुकसोबत. ते 1950 पासून ते 2026 आणि त्यापुढील ज्ञानाची मिळून रचना करतात. आज आई एक प्रेक्षक बनून बसते आणि दोघेही तासन्तास संयमाने आणि जिज्ञासेने चर्चा करतात. तेव्हा आईला आश्चर्य वाटू लागते की ज्या शालेय मुलाला ती आपल्या तंत्रज्ञानविरोधी सासऱ्यांपासून दूर ठेवू इच्छित होती, तोच आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली कसा एक चांगला माणूस बनत आहे. फंडा असा आहे - तुम्ही तुमच्या मुलांना आजी-आजोबांचे टेक्नॉलॉजिकल-मेंटॉर बनू दिले नाही, तर एआय त्यांना नक्कीच मदत करेल, पण मुले नक्कीच प्रथम श्रेणीचे माणूस बनण्याऐवजी द्वितीय श्रेणीचे रोबोट बनू शकतात.
तरुण राहण्यासाठी मानसिकता तरुण ठेवा:छंद जोपासणेही तितकेच महत्त्वाचे- बलराज संघई
काळ थांबत नाही. काळाचा नियम आहे. जीव-अजीव वस्तूंच्या परिवर्तनासाठी काळ हा कारणीभूत असतो. काळ थांबणार नाही, त्याला रोकता येणार नाही. काळाच्या गतीनेच दिवसेंदिवस वय वाढत जातं आणि आयुष्याचा अखेरचा टप्पा वार्धक्य म्हटलं जातं एक दिवस तो आपल्यासमोर येऊन ठेपतो. तर हे वार्धक्य,याला म्हातारपण समजलं तर माणूस मनानेही वयस्कर होऊन जातो. एक शारीरिक वय असतं आणि एक मानसिक वय असतं. शारीरिक वय वाढत जाणारच परंतु मानसिक वय वाढू नये. वयानुसार योग्य ती परिणाम बुद्धी आणि मानसिक समज यायलाच हवी. वयानुसार समजदारी यावी ही अपेक्षा असतेच. वय वाढत जातं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अवयव क्षीण होत जातात. म्हणजेच शारीरिक क्षमता कमी होत जाते. परंतु सुरुवाती पासूनच व्यायाम आणि खाण्या पिण्यावर नियंत्रण असेल तर हा त्रास कमी जाणवतो. या सोबतच मनाची प्रफुल्लता ही असायला हवी. आपलं वय असणं आणि आपण दिसणं हे आपल्यावर अवलंबून आहे. एखादा पन्नास पंचावन्न वर्षांचा व्यक्ती जेव्हा तरुण मुलांना शारीरिक चपळतेने, दिसण्याने अस्तित्वाने लाजवतो तेव्हा हे लक्षात येतं. वाढत्या वयानुसार आपण आपल्या दिसण्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं. त्यासाठी आवश्यक त्या आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करावा. शरीर चेहरा, त्वचा याकडे जरासं लक्ष दिलं तर जगण्यात ताजेपणा राहतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट मानसिकता ही आहे. आपण आयुष्यभरात कोणाशी कसे वागलो, कसे संबंध ठेवले यावर अवलंबून आहे की पुढे आपल्याशी कुटुंबातील समाजातील आणि सर्वच लोक कसे संबंध ठेवणार. आपण प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीला सकारात्मकपणे प्रतिसाद दिला तर सर्वांसोबत आपले दिवस हसून खेळून मजेत जातात. आणि मग वाढतं वय लक्षातही येत नाही. काळजी, जिम्मेदारी या गोष्टी सर्वांनाच असतात. आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये प्लॅनिंग ही खूप महत्त्वाचं असतं. दररोजच्या जीवनात आपण सर्वांना कुटुंबामध्ये समजून आणि सांभाळून घेतले असेल तर वाढत्या वयात आपल्याला तेही सांभाळून घेतीलच यात शंका नाही. यासह सहनशीलता आणि संयम ही असला पाहिजे. तसेच आपण आपले छंदही जोपासले पाहिजेत. प्रत्येकामध्ये कोणती न कोणती कला असते. आपली आवड आपण जाणून जोपासली पाहिजे. दररोजचे फिरणे, व्यायाम, आपल्या आवडीच्या गोष्टी अवश्य कराव्यात, जवळपास असलेल्या एखाद्या उद्यानामध्ये फेरफटका मारावा. निसर्ग, पाने-फुले, झाडं यांच्याकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पहावे, निसर्ग आणि ईश्वर द्वारा निर्मित कोणताही जीव-अजीव सुंदरच आहे, कदापि असुंदर, कुरूप नाही अशी मानसिक धारणा असावी. वाचन करावे, वर्तमानपत्र असो, आवडीची पुस्तक असोत, आपला वेळ घालवण्यासाठी वाचन आवश्यकच आणि त्याने ज्ञानही वाढत जाते. आपला मित्र परिवार सांभाळावा मित्र असावेत. मित्रांशी दररोज बोललं पाहिजे. आपल्या मध्ये काही कलागुण असतील तर तेही जोपासले पाहिजेत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपले कलागुण, आपल्या आवडी-निवडी आपली समजदारी आणि आपला स्वभाव हेच आपल्याला तारते. म्हणूनच एखादा वयस्कर ही तरुण असू शकतो आणि एखादा तरुणही वयस्कर वाटू लागतो. भलेही माणूस वयस्कर असो तो सर्वांना हवाहवासा वाटला पाहिजे. आपला कंटाळा येऊ नये असेच आपण सर्वांशी वागले पाहिजे. तरच आपलं वार्धक्यही आपल्याला जाणवत नाही आणि हाच काळ आणि वार्धक्य अवस्थेवर विजय प्राप्त झाला असे म्हणता येईल. शरीर भलेही क्षीण होवो , वय भले ही वाढत जावो, मानसिकता तरुण असावी. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
एन. रघुरामन यांचा कॉलम:परिपक्व संस्था नेहमी विचारतात की ‘काय होऊ शकते’, न की ‘काय झाले’
जो गुढीपाडवा उत्सवाचा दिवस असायला हवा होता, तो इंदूर शहरासाठी दुःखाचा दिवस ठरला. बुधवारी एका घराला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या सात लोकांच्या चिता जेव्हा एकाच वेळी जळाल्या तेव्हा त्याच्या वेदना संपूर्ण शहराने सामूहिकरीत्या अनुभवल्या. मृतांमध्ये एका निष्पाप बालकाचाही समावेश होता. या वेदनादायी अपघाताच्या दिवशी मध्य प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपम राजन म्हणाले की, ‘अशी शोकांतिका पुन्हा घडू नये. हे सुनिश्चित करणे हे राज्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आम्ही आयआयटी आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने सखोल न्यायवैद्यक चौकशी करू. चार्जिंगदरम्यान अशा घटना का घडत आहेत आणि यामागे कोणत्या तांत्रिक त्रुटी आहेत हे समजून घेण्यासाठी ईव्ही तज्ज्ञांची बैठकही बोलावली जाईल.’ अशी विधाने विचार करण्यास भाग पाडतात की बहुतांश संस्था ‘काय होऊ शकते’ यावर क्वचितच चर्चा का करतात आणि ‘काय आणि का घडले’ यावरच अधिक लक्ष का केंद्रित करतात. बहुतांश बैठकांच्या विषयपत्रिकेत महसुलाचा अंदाज आणि तो मिळवण्याचे मार्ग, ऑपरेशनल टार्गेट्स आणि ती वाढवण्याचे उपाय, विस्ताराच्या योजना आणि प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची रणनीती यांचाच समावेश असतो. आणि शेवटी सेल्स विभागाचे व्हेंडर नेगोशिएशन, जिथे त्यांना कमी मार्जिनवर कसे राजी करावे यावर चर्चा होते. बहुतांश बैठकांमध्ये एका मुद्द्यावर चर्चा राहून जाते, तो म्हणजे ‘धोका’. कटू सत्य हे आहे की बहुतांश संस्था धोक्याऐवजी नफ्यावर बारकाईने लक्ष ठेवतात व व्यवस्थापनाच्या भाषेत याला ‘धोकादायक असमतोल’ म्हटले जाते. एका बोर्डरूमची कल्पना करा, जिथे शीर्ष नेतृत्व बसले आहे आणि अचानक टीम मेंबर्सना विचारते की, ‘या तिमाहीचे लीडिंग सेफ्टी इंडिकेटर्स काय आहेत?’ विश्वास ठेवा, काही क्षणांसाठी खोलीत शांतता पसरेल. कारण उत्तर तर द्यायचेच असते, त्यामुळे कोणीतरी म्हणेल की ‘सर, आम्ही सेफ्टी कंप्लायंट आहोत’. दुसरे म्हणतील ‘सर, कोणताही मोठा अपघात झाला नाही.’ पण हा तर नेत्याचा प्रश्नच नव्हता. त्याने मागील घटनांबद्दल नाही, तर भविष्यातील धोक्यांबद्दल विचारले होते. चांगल्या संस्था सामान्यतः याचे आकलन करतात की काय होऊ शकते व ते कसे टाळता येईल. जसे, उन्हाळ्यात वीज मंडळाच्या बैठकांमध्ये शहरातील संभाव्य धोके, ते टाळण्याच्या उपायांवर चर्चा झाली पाहिजे. परंतु बऱ्याचदा वीज मंडळ आपत्ती आल्यानंतर त्यास तोंड देणाऱ्या अग्निशमन दलाची तयारी करते. सेफ्टी मॅट्रिक्स दोन प्रकारचे असतात. 1. लॅगिंग इंडिकेटर्स : यामध्ये घटनांची संख्या, मृत्यू व जखमींची संख्या आणि अंतिम नुकसानीचा समावेश असतो. 2. लीडिंग इंडिकेटर्स : हे धोक्यांची ओळख, समोर आलेल्या छोट्या चुका, सेफ्टी ऑडिट्सची संख्या, सेफ्टी ट्रेनिंगची वेळ आणि शेवटी ड्रिल परफॉर्मन्सच्या गुणांबद्दल बोलतात.बहुतांश परिपक्व संस्था केवळ अपघातांचे मोजमाप करत नाहीत. कारण तो तर अपयशांचा रेकॉर्ड व पोस्टमॉर्टेमसारखा आहे. त्या नेहमी त्यांच्या यंत्रणेची ताकद मोजतात. कारण यावरूनच प्रतिबंधात्मक क्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्या रिव्ह्यू मेकॅनिझम तयार करतात, कठीण प्रश्न विचारतात आणि त्या गोष्टी मोजतात, ज्या किंमत मोजण्यापूर्वी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असतात. नेतृत्वाने ‘सिस्टिम हेल्थ’चे नियमित पुनरावलोकन केले नाही तर धोका गुपचूप वाढत राहतो आणि शेवटी एक दिवस संपूर्ण सिस्टिम कोसळते. अशा घटना पूर्वसूचना देत नाहीत, तर थेट बातम्यांचे मथळे बनतात. लॅगिंग सेफ्टी मॅट्रिक्स आपल्याला केवळ नुकसान सांगतात, तर लीडिंग सेफ्टी मॅट्रिक्स सांगतात की काय करायला हवे. देशभरातील वाढती उष्णता पाहता हे अधिकच महत्त्वाचे ठरते. लक्षात ठेवा, रिस्क एक्सपोजर हा मोठा आर्थिक धोकादेखील आहे. अपघात रोखण्यासाठी सेफ्टी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन तितक्याच गांभीर्याने केले पाहिजे, जितक्या गांभीर्याने फायनान्शियल मॅट्रिक्सचे केले जाते. फंडा हा आहे की, सुरक्षा हा केवळ ऑपरेशनल विषय नसून रणनीतीदेखील आहे. त्यामुळे परिपक्व संस्थांचा नारा असायला हवा की, ‘सुरक्षा हा बोर्डरूममधील चर्चेचा विषय आहे.’ सुरक्षा ही केवळ एका विभागाची अपडेट नसून ती संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम:आजकाल मुले इकॉनॉमिक्सऐवजी‘ पर्सनल फायनान्स’ निवडत आहेत
शाळा आपल्या विद्यार्थ्यांना खऱ्या जगासाठी कसे तयार करू शकतात? येथे एक मार्ग आहे. अर्थात मी असे म्हणत नाही की हा एकमेव मार्ग आहे. चला तर मग, सुरुवात करूया. वर्गात बसलेल्या त्या मुलांकडे शाळा संपवून आपल्या ‘ड्रीम कॉलेज’मध्ये जाण्यासाठी फक्त दोन वर्षे शिल्लक आहेत. त्या सर्वांनी उत्साहाने आपले लॅपटॉप उघडले आहेत, कारण हा तास त्यांच्या भविष्याबद्दल आहे आणि ते स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार बनणार आहेत. होय, ते आपली सध्याची आर्थिक स्थिती आणि हे वास्तव जाणून घेणार आहेत की, आपल्या स्वप्नातील विद्यापीठात किंवा देशात पदवी शिक्षणासाठी नेमके किती पैसे लागतील. त्यांना शिक्षकांकडून आधीच एक सामायिक ‘स्प्रेडशीट’ मिळाली आहे, ज्यांच्या स्वतःच्या लॅपटॉपची स्क्रीन स्मार्ट क्लासरूमच्या मुख्य स्क्रीनवर दिसत आहे. विद्यार्थी आपल्या इनबॉक्समधून ती स्प्रेडशीट मुख्य स्क्रीनवर आणतात. त्यात अनेक रकाने आहेत आणि विद्यार्थ्यांना एक-एक करून प्रत्येक रकाना भरायचा आहे, जेणेकरून त्यांना प्रवेश, राहणे, खाणे, हॉस्टेल आणि इतर खर्चांचा वार्षिक खर्च समजू शकेल. जसा अंदाजित मासिक आणि वार्षिक खर्च लॅपटॉपवर दिसू लागतो, तसा वर्गात एकच गोंधळ उडतो. कारण ही रक्कम पाहून सर्व तरुण थक्क होतात. शिक्षक त्यांच्याकडे पाहून हसतात. खर्चाची बेरीज केल्यानंतर त्यांना विचारले जाते की, खर्च कमी करण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करायची आहे का? त्यासोबत एक ‘प्लॅन शीट’ जोडलेली असते, ज्याद्वारे ते स्कॉलरशिप परीक्षेत चांगले गुण कसे मिळवता येतील याचे नियोजन करू शकतात. यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढते. त्यानंतर एक ‘बजेट ट्रॅकर’ असतो, ज्यामध्ये दोन रकाने असतात. यामध्ये विद्यार्थी 6% व्याजदराने ‘एज्युकेशन लोन’ घेऊ शकतात आणि त्याची ईएमआय आपल्या भविष्यातील संभाव्य पगारातून कापून देऊ शकतात. आधी त्यांना आपले संभाव्य खर्चही लिहावे लागतात. शिक्षक त्यांना सांगतात की, पगारातील 12% रक्कम कामावर येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी वेगळी ठेवा. राज्य, शहर, ऑफिस, स्थानिक भाडे, सर्व काही यात समाविष्ट असते. हा क्लास काही महिने चालतो, जेणेकरून त्यांना त्या खऱ्या जगाचे चित्र दिसू शकेल ज्यात त्यांना जगायचे आहे. हळूहळू वर्गात त्यांना गुंतवणूक, टॅक्स, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही सांगितले जाते. जर तुम्ही विचार करत असाल की हे कुठे घडत आहे, तर सांगतो की अमेरिकेतील 22 राज्यांनी वर्गांमध्ये इकॉनॉमिक्सऐवजी ‘पर्सनल फायनान्स’च्या अभ्यासाची निवड केली आहे. मर्यादित संसाधने असलेल्या जगात बहुतेक शाळा तात्त्विक शिक्षणाऐवजी व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देऊ इच्छितात. ‘शॉप क्लासेस’मध्येही (कौशल्य आधारित वर्ग) या बदलावर भर दिला जात आहे, कारण आता ‘ब्लू कॉलर’ नोकऱ्या अधिक लोकप्रिय होत आहेत आणि ‘व्हाइट कॉलर’ कमी होत आहेत. आजकाल विद्यार्थ्यांना खऱ्या जगात पाऊल ठेवताच कठीण आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. अनेक तरुण, ज्यांना स्वतःचे काम सुरू करायचे आहे, त्यांना समजावून सांगितले जाते की कर्ज घेणे किती सोपे आहे पण ते फेडणे किती कठीण. महामारी किंवा सध्याच्या युद्धासारख्या संकटात, ज्यामध्ये राहणीमानाचा खर्च वाढतो, अशा वेळी ते लोक अधिक चांगले आर्थिक निर्णय घेतात ज्यांनी हायस्कूलमध्ये अनिवार्यपणे ‘फायनान्शियल एज्युकेशन’ घेतले आहे-त्यांच्या तुलनेत ज्यांनी हे शिक्षण घेतलेले नाही. जरी पर्सनल फायनान्स शिकण्याचे कोणतेही अनिवार्य प्रशिक्षण नसले, तरी अनेक लोक ते आवडीने शिकत आहेत. फंडा हा आहे की - शक्य असल्यास विद्यार्थ्यांना खऱ्या जगासाठी तयार करण्यासाठी इकॉनॉमिक्सऐवजी ‘पर्सनल फायनान्स’ हा विषय शिकवा. कारण जग अपेक्षेपेक्षा जास्त अनिश्चित होत आहे आणि मुलांसाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना किती पैशांची गरज लागेल. हेच त्यांना खरा आरसा दाखवेल.
एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
एआयच्या मदतीने काम पूर्ण करणाऱ्या लोकांना विचारा की, ते याद्वारे किती वेळ वाचवतात? 'एआयने आमचे काम सोपे नाही तर अधिक कठीण केले आहे,' असे म्हणून ते तुम्हाला चकित करू शकतात. केवळ कर्मचाऱ्यांचीच नाही, तर एआयच्या सर्वात मोठ्या समर्थकांचीही हीच अपेक्षा होती की, यामुळे कामाचा भार कमी होईल आणि लोकांना उच्चस्तरीय सर्जनशील कामांसाठी अधिक वेळ मिळेल. बिल गेट्स आणि जेपी मॉर्गन चेसचे जेमी डायमन यांसारख्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनीही म्हटले होते की, 'एआयमुळे अखेर लोकांना जास्त नाही तर कमी काम करावे लागेल आणि कामाचे दिवस कमी होऊ शकतात.' इलॉन मस्क यांनी तर म्हटले होते की, पुढील दोन दशकांत एआय आणि रोबोट्सच्या प्रगतीमुळे काम करणे हे ऐच्छिक ठरू शकते. परंतु, सध्या तरी सर्व काही याच्या उलट घडत असल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. असे का घडत आहे? असे नाही की एआय कार्यक्षमता वाढवत नाही. खरे तर एआय जी क्षमता किंवा वेळ वाचवते, त्याचा वापर लगेच दुसऱ्या कामात केला जातो. यामुळेच कामाचा ताण वाढू लागतो. उदाहरणार्थ, जर कुणी एआयच्या मदतीने एखादा प्रकल्प करत असेल, तर प्राथमिक अहवाल काही सेकंदांत तयार होतो. पण त्याचसोबत एआय असेही सुचवते की, 'मी या गोष्टीचाही विचार करू का?' किंवा 'तुमच्या कंपनीच्या गरजेनुसार मी अंमलबजावणीची योजना जोडू शकतो' किंवा 'तुमच्या ग्राहकांची यादी मला माहीत असल्याने मी त्यांच्या आवडीनुसार यात बदल करू शकतो.' अशा प्रकारे एआय एकावर एक 7-8 स्तरांपर्यंत नवीन गोष्टी जोडत जाते, ज्याचा कर्मचाऱ्याने विचारही केलेला नसतो किंवा ज्यांची गरजही नसते. एआयच्या याच सवयीमुळे वापरकर्ता एकाच कामाच्या खोलात शिरत जातो आणि थकून जातो. 'ॲक्टिव्हट्रॅक' या उत्पादकता ट्रॅकिंग सॉफ्टवेअर कंपनीने नुकताच कामाच्या सवयींवर होणाऱ्या एआयच्या परिणामाचा एक मोठा अभ्यास पूर्ण केला. यामध्ये 1,111 नियोक्त्यांच्या 1.64 लाख कर्मचाऱ्यांच्या 44 कोटी तासांहून अधिक डिजिटल क्रियाकलापांचा अभ्यास करून काही मनोरंजक तथ्ये समोर आणली आहेत. एआय टूल्स वापरण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या 180 दिवसांतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण केल्यावर असे आढळले की, जवळपास सर्वच क्षेत्रांत कामाचा वेग वाढला. ईमेल, मेसेजिंग आणि चॅट ॲप्सवर घालवला जाणारा वेळ दुपटीहून अधिक झाला. दुसरीकडे, एकाग्रतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय केल्या जाणाऱ्या कामाचा वेळ 9 टक्क्यांनी कमी झाला. हा तो वेळ असतो जो गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन कल्पना तयार करण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी आवश्यक असतो. प्रशासकीय कामे स्वयंचलित(ऑटोमेट) करण्यासाठी ज्या कंपन्यांनी एआय विकसित केले, त्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण स्वयंचलित कामच पूर्ण होत नाहीये. कर्मचारी तेच काम वारंवार करणे, त्यात सुधारणा करणे आणि पुन्हा एआयच्या सूचना जोडण्यात गुंतलेले असतात. यात जास्त वेळ खर्ची पडतो. लोक कमी नाहीतर जास्त काम करत आहेत. बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या हास स्कूल ऑफ बिझनेसमधील सहयोगी प्राध्यापिका अरुणा रंगनाथन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एआय आपल्याला अतिरिक्त कामात गुंतवून ठेवते. ते काम काही प्रमाणात सोपे करत असले तरी आपण त्यात अडकून पडतो, ज्यामुळे फक्त वेगाने काम केल्याची जाणीव होते.' एआय टूल्ससोबत काम करण्याचा सरासरी वेळ आठपटीने वाढला असल्याने, एआयचा वापर कसा करावा की ऊर्जा आणि उच्च उत्पादकता दोन्ही टिकून राहतील? तज्ज्ञांच्या मते, जे लोक आपल्या एकूण कामाच्या वेळेपैकी 7 ते 10 टक्के वेळ एआय टूल्सवर खर्च करतात, त्यांची उत्पादकता सर्वाधिक असते. फंडा हा आहे की, एआय ही दुधारी तलवार आहे. ते तुम्हाला वेगाने पुढे नेऊ शकते, पण अधिक खोलात जाण्यासाठी भुरळही घालू शकते. जर तुम्ही एकाच कामाच्या खोलात जात राहिलात, तर पुढचे काम करण्यासाठी तुम्ही पुन्हा मूळ पातळीवर येऊच शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी याचा वापर संयमाने करणेच हिताचे आहे.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
आपण काही गोष्टींना दैवी कृपा किंवा दैवी कोप मानणे थांबवलेपाहिजे. पूर येतो, आपले नुकसान होते किंवा आपले शरीर आजारीपडते तेव्हा आपण म्हणतो की ही देवाची इच्छा आहे किंवा त्याने दयादाखवली आहे, किंवा तो क्रोधित आहे. पण हे एक अपूर्ण सत्य आहे.निसर्ग हाहाकार माजवत असेल तर त्याचे श्रेय केवळ दैवी इच्छेलादेऊ नका; त्यात आपलीही भूमिका असते. आपणच निसर्गालाआपल्या मनाप्रमाणे वागवले आहे. यातून तो सूड घेत आहे. देवाने हेजग खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केले आहे. यात काहीही व्यर्थ जातनाही. संकटाचा सामना करतो, तेव्हा आपण प्रथम आपली भूमिकाकाय आहे याचा विचार केला पाहिजे. आजपासून रौद्र नावाचे संवत्सरसुरू होत आहे. ज्योतिषांच्या मते या वर्षी गुरु राजा आणि मंगळ मंत्रीअसेल. गुरुच्या प्रभावामुळे धार्मिक कार्यांमध्ये वाढ होईल. यातून हेवर्ष आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. यंदा तसा संकल्पकरा. मंगळ मंत्री असल्यामुळे अग्नी, हिंसाचारा अशा घटना घडतराहतील. परंतु हे हिंदू वर्ष आत्म्याशी जोडले जाण्याच्या अनेक संधीदेईल.
आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
इराणमध्ये सुरू असलेले युद्ध केव्हा आणि कसे संपेल, हेयुद्ध सुरू करणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलच्याउद्दिष्टांवर अवलंबून आहे. काही प्रमाणात इराणच्याप्रतिसादावर आणि त्याच्या लष्करी व राजकीयक्षमतांवरही अवलंबून आहे. इस्रायलची युद्धाची उद्दिष्ट्येस्पष्ट आणि सुसंगत असली तरी अमेरिकेची भूमिकाअनेक विविध घटकांमध्ये गुंतलेली आहे. इराणचे धार्मिक सरकार आपल्या नागरिकांविषयी अत्यंतदडपशाही करणारे व बाह्य पातळीवर विशेषतःइस्रायलविरुद्ध आक्रमक राहिले आहे. पहिला मुद्दाइस्रायलसाठी प्राथमिक चिंतेचा विषय नाही; दुसरा आहे.इराणची राजकीय व्यवस्था कोसळावी किंवा किमानत्याची लष्करी ताकद आणि त्याच्या मित्रगटांची—विशेषतः लेबॉनमधील हिजबुल्लाह आणिगाझामधील हमासची—शक्ती लक्षणीयरीत्या कमीव्हावी, असे इस्रायलला वाटते. 7 ऑक्टोबर 2023 नंतरदोन्ही गटांना मोठे नुकसान झाले होते आणि काहींना भीतीहोती की ते सावरू शकणार नाहीत. परंतु आता हे स्पष्टझाले आहे की लेबनॉनमधील हिजबुल्लाह कमकुवतझाला असला तरी पुन्हा सक्रिय झाला आहे. इराणबद्दलइस्रायलची भूमिका पॅलेस्टिनींबद्दलच्या भूमिकेसारखीनाही. केवळ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूआणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांसाठीच नव्हे तरइस्रायली समाजाच्या मोठ्या वर्गासाठीही 7 ऑक्टोबर2023 नंतर गाझामधील पॅलेस्टिनींना ‘माणसापेक्षा दुय्यम ''मानले गेले. म्हणूनच त्यांचा हिंसक विनाश न्याय्य ठरवलागेला. इतिहास आणि सिद्धांत दर्शवतात की अशाविचारसरणीमुळे सामूहिक हत्या आणि नरसंहार होऊ शकतो. इराणच्या बाबतीत इस्रायलविषयीच्या चर्चांमध्ये अनेकदा सरकार व समाज यांच्यात फरक केला जातो. इराणी सरकारला दुष्ट म्हणून चित्रित केले जाते . त्याच्या उच्चाटनाची मागणी केली जाते तर इराणी समाज—1979 च्या क्रांतीपूर्वी इस्रायलचा मित्र मानला जात होता—एका प्राचीन संस्कृतीचा भाग मानला जातो.त्यामुळे गाझामध्ये अवलंबलेली रणनीती इराणसाठी लागू केली जाऊ शकत नाही. इराणमधील इस्रायलचे प्राथमिक उद्दिष्ट सरकार बदलणे असेल. समाज नष्ट करणे नव्हे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी अनेक कारणेदिली आहेत. तशी अशी : राजकीय व्यवस्था बदलणे; इराणची लष्करी क्षमता, विशेषतः क्षेपणास्त्रे बनवण्याची आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता नष्ट करणे; आणि त्याचे युरेनियम संवर्धन रोखणे. इराणला अण्वस्त्रेमिळवण्यापासून रोखणे; अरब जगतातील इराणच्या मित्र राष्ट्रांना संपवणे; शोषित नागरिकांची सुटका करणे; आणि इराणने अमेरिकेवर किंवा तिच्या प्रादेशिक हितसंबंधांवर हल्ला करण्यापूर्वीच त्यावर जोरदार प्रहार करणे. याअसंख्य कारणांनंतरही, अनेकांचा असा युक्तिवाद आहेकी हे खरे तर इस्रायलचे युद्ध आहे आणि अमेरिका केवळ त्याचा भागीदार आहे. तरीही, इतकी वेगवेगळी कारणे असण्याची समस्या सैद्धांतिकदृष्ट्या सोडवली जाऊशकते. असे म्हणता येईल की सरकार बदलणे हेअमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. इतर उद्दिष्टे त्याच्याशीजोडलेली आहेत. प्राथमिक उद्दिष्ट साध्य झाले तर इतरउद्दिष्टे आपोआप पूर्ण होतील. दुसऱ्या शब्दांत सरकारबदलले तर अण्वस्त्रांच्या योजना सोडून दिल्या जातील.क्षेपणास्त्र उत्पादन कमी होईल. मित्र गट कमकुवत होतीलआणि नागरिकांवरील दडपशाही देखील कमी होईल. पणसमस्या ही आहे की सरकार बदलणे शक्य होणार नाहीकिंवा त्याला खूप वेळ लागू शकतो. नेत्यांची हत्या करणेम्हणजे राजकीय व्यवस्था बदलणे नव्हे विशेषतः मजबूतसंस्था असलेल्या देशात. 1979 च्या क्रांतीनंतर इराणनेसंविधानाद्वारे एक धर्मसत्ताक व्यवस्था स्थापित केली.त्यात धर्मगुरूंना देशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारआहे. निवडून आलेल्या सरकारपेक्षा त्यांच्याकडे अधिकसत्ता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, क्रांतीचे रक्षणकरण्यासाठी एक मोठी संघटना तयार करण्यात आलीहोती—इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स. बाह्यशक्तीद्वारे सध्याचे नेतृत्व हटवले गेले तरी स्थापितकार्यपद्धतींनुसार नवीन नेतृत्व उदयास येऊ शकते. किमाननजीकच्या भविष्यात बाह्य दबावामुळे संपूर्ण राजवटकोसळण्याची शक्यता कमी वाटते. शिवाय, इराणराजकीय व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांचा खर्च सहजपणेआणि लक्षणीयरीत्या वाढवू शकतो. क्षेपणास्त्रे रोखणाऱ्याहवाई संरक्षण प्रणाली खूप महाग असतात. जितकी जास्तक्षेपणास्त्रे डागली जातात तितका क्षेपणास्त्र संरक्षणाचाखर्च वाढतो व त्या कायमस्वरूपी टिकू शकत नाहीत. युद्धलांबले तर हा खर्च कमी नसेल. काही क्षेपणास्त्रे तर हवाईसंरक्षण भेदून लक्ष्यांपर्यंत पोहोचतील. इराण आखातीदेशांमध्ये आधीच असे करत आहे. यामुळे त्यांच्याअर्थव्यवस्थांचे नुकसान होत आहे. हे नुकसान आणखीमोठे असू शकते. दुसरे म्हणजे ड्रोनने युद्धांचे स्वरूपबदलले आहे. क्षेपणास्त्रांपेक्षा त्यांचे उत्पादन व प्रक्षेपणखूपच स्वस्त आहे. युक्रेनने दाखवून दिल्याप्रमाणे दोन्हीदेशांच्या लष्करी सामर्थ्यात मोठी तफावत असूनही ड्रोनदीर्घकाळ युद्ध चालू ठेवू शकतात. क्षेपणास्त्र प्रक्षेपकआणि उत्पादन सुविधांवर हल्ला झाला—जसे कीइस्रायली आणि अमेरिकन लष्करी कारवायांमध्ये दिसूनयेत आहे—तर संयुक्त अरब अमिराती आणिकतारसारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर ड्रोन हल्लेबचावासाठी वापरले जाऊ शकतात. ड्रोन उत्पादन क्षमतापूर्णपणे कशी नष्ट करायची हे कोणालाही माहीत नाही. तिसरे म्हणजे इराण जगातील केवळ 5% तेलाचे उत्पादनकरतो. परंतु जगातील 20% तेल आणि वायूचा पुरवठाहोर्मुझ खाडीद्वारे करतो. ऊर्जा तज्ज्ञ डॅनियल येरगिनयांच्या मते, जग इतिहासातील तेल उत्पादनातील सर्वातमोठ्या व्यत्ययाचा आणि जागतिक गॅस बाजारालाबसणाऱ्या मोठ्या धक्क्याचा सामना करत आहे. ड्रोनचावापर आणि होर्मुझवरील नियंत्रणाच्या माध्यमातून युद्धाचाखर्च वाढवणे हे इराणच्या हिताचे ठरेल, आणि तसेकरण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. व्हेनेझुएलासारखास्वस्त विजय येथे शक्य नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत) इराण या युद्धाची किंमतवाढवायला तयार ....ड्रोनचा वापर आणि होर्मुझ समुद्रावरीलनियंत्रणाच्या माध्यमातून युद्धाची किंमतवाढवत राहणे हे इराणच्या हिताचे ठरेल.तसे करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे.व्हेनेझुएलासारखा स्वस्त विजयइराणमध्ये शक्य नाही. इराणमध्ये सत्ताहवेतून बदलता येऊ शकत नाही.
आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
बंगाल आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त निवडणुकीच्यादिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ राज्यातीलतृणमूल विरुद्ध भाजप समीकरणाचीच परीक्षा नव्हे तरनिवडणूक आयोगाच्या क्षमतेचीही कसोटी लागणार आहे.मतदार यादी वादात अडकणे आणि तरीही निवडणुकीच्यातारखा जाहीर होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे—त्याचवेळी संबंधित मतदार आणि राजकीय पक्षांकडूननिवडणूक आयोगाच्या कार्यालय व न्यायालयांमध्येआक्षेपांचा पूर आला आहे. याशिवाय दुसरा कोणताहीपर्याय नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 मेरोजी संपत आहे. घटनेनुसार त्यापूर्वी निवडणूक प्रक्रियापूर्ण करून नवीन विधानसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेचे नियम सोपे आहेत व निवडणूक आयोगाने गेल्या सात दशकांत एकापाठोपाठ एक राज्यांत कोणत्याही मोठ्या वादंगाविना सुरळीत व शांततेत निवडणुका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळीबंगालमधील प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी गोष्टम्हणजे निवडणुकीच्या अवघ्या पाच महिने आधीआयोगाने विशेष मतदार यादी (एसआयआर) सुरूकरण्याचा घेतलेला निर्णय. घुसखोर आणि अवैधमतदारांना वगळणे हे अधिकृत कारण देण्यात आले. परंतुनंतर आयोग स्वतःच या कामामुळे हतबल झाल्याचेदिसून आले. मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यावरूनआयोगाचा राज्य सरकारशी संघर्षही झाला. सध्याची परिस्थिती पागचा मतदार यादीतून अंदाजे 63लाख नावे वगळली आहेत. या गोंधळात भर घालतआयोगाने बंगालसाठी ‘न्यायप्रक्रियेअंतर् गत'' नावाचीएक विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या यादीतअंदाजे 60 लाख मतदारांची नावे आहेत. त्याची स्थितीसंशयास्पद मानली जात आहे. स्पेलिंगमधील चुका किंवावयातील किरकोळ तफावत यांसारख्या कारणांसाठीत्यांची छाननी केली जात आहे. आयोगाला खात्री वाटतनाही की ते खरे मतदार आहेत तोपर्यंत ते मतदानासाठीअपात्र मानले जातील. एसआयआर इतका वादातअडकला आहे की सर्वोच्च न्यायालयालाही त्यातहस्तक्षेप करावा लागला आहे. अनेक तज्ञांच्या मतेसर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणापासून दूर राहायला हवेहोते. कारण एसआयआर हे मुळात एक कार्यपालिकेचेकार्य आहे. तरीही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल याची खात्रीकरण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरघेतली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष न्यायिकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि याविशेष न्यायिक अधिकाऱ्यांना नामनिर्देशनपत्र मागेघेण्याच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी सर्व विवादसोडवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की 1.23कोटी मतदारांचे भवितव्य आणि मतदार यादीला अंतिमस्वरूप देणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनिवार्यझाले आहे. परंतु सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे, कारणहे काम प्रचंड मोठे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतचआयोगाने मध्यरात्री मुख्य सचिवांसह पाच वरिष्ठअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांनीएसआयआर प्रक्रियेदरम्यान सहकार्य केले नव्हते, असेमानले गेले. दरम्यान, पोलीस आणि गृह विभागांसहपश्चिम बंगाल प्रशासनाच्या जवळपास सर्व प्रमुखशाखांच्या प्रमुखांना बदलण्यात आले आहे. आर. एन.निवडणुका जवळ आल्याने रवी पश्चिम बंगालचेराज्यपाल झाल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झालेआहे. रवी यांची ओळख एक हस्तक्षेपवादी घटनात्मकअधिकारी म्हणून आहे. विशेषतः तामिळनाडूत त्यांचेराज्य सरकारशी वारंवार मतभेद झाले. यामुळे मुख्यमंत्रीएम. के. स्टॅलिन नाराज झाले.(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मतदार यादी वादात अडकणे आणि तरीहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर होणे, हीतशी दुर्मिळ गोष्ट आहे. संबंधित चिंतितमतदार व राजकीय पक्षांकडून निवडणूकआयोगाच्या कार्यालयांत आणिन्यायालयांत आक्षेपांचा पूर आला आहे.
डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
आजकाल एक समस्या झपाट्याने वाढत आहे : झोपेतव्यत्यय येणे किंवा झोपेची कमतरता. अनेक लोक याकडेदुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की हे केवळ तणाव किंवाथकव्यामुळे होत आहे. मात्र झोपेशी संबंधित समस्या एकमोठे आरोग्य आव्हान बनत आहेत. याची कारणेओळखली नाहीत व त्यावर त्वरित उपचार केले नाही तरती गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. निद्रानाश ही एक समस्या आहे. परंतु झोपेत वारंवारव्यत्यय येणे हे त्याहूनही गंभीर असू शकते. अनेकलोकांना वाटते की त्यांच्या झोपेतील व्यत्यय तणाव किंवाचिंतेमुळे आहे. परंतु अनेकदा त्यामागे शारीरिक कारणेअसतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या नाकात कोणत्या नाकोणत्या प्रकारचा अडथळा जाणवतो. हा अडथळाॲलर्जी, सायनसच्या समस्या किंवा नाकाचे हाड वाकडेअसण्यामुळे होऊ शकतो. नाक पूर्णपणे उघडे नसते,तेव्हा श्वासोच्छ्वास सामान्य होत नाही. यातून झोपेवरपरिणाम होतो. यामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो.लोकांना अनेकदा ही समस्या समजत नाही आणि तेवारंवार नाकाचे थेंब किंवा स्प्रे वापरतात. यामुळे तात्पुरताआराम मिळू शकतो. परंतु मूळ कारणावर उपाय होतनाही. म्हणून जर नाक बराच काळ बंद राहत असेल किंवातुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर योग्य निदान करूनघेणे महत्त्वाचे आहे. स्लीप ॲप्निया हे देखील झोपेत व्यत्यय येण्याचे एककारण आहे. एका अभ्यासानुसार अंदाजे 32.5% लोकांनामध्यम ते तीव्र स्वरूपाचा स्लीप ॲप्निया असतो. यास्थितीत व्यक्तीचा श्वास प्रति तास 15 पेक्षा जास्त वेळाथांबू शकतो. याचा अर्थ असा की अंदाजे दर चारमिनिटांनी एकदा श्वास 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबतो.यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यादीर्घकाळ चालणाऱ्या प्रकारामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाबआणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो.स्लीप ॲप्निया आणि झोपेत व्यत्यय येण्याची अनेककारणे असू शकतात. यामध्ये वाढता लठ्ठपणा, खाण्याच्या सवयी, रात्रीउशिरापर्यंत जागे राहणे, कामाचा ताण आणि लांबचाप्रवास यांचा समावेश आहे. काही लोकांसाठी इतरआरोग्य समस्यांमुळे देखील झोपेत व्यत्यय येतो. अनेकपुरुष प्रोस्टेटच्या समस्या किंवा ॲसिडिटीमुळे रात्रीवारंवार जागे होतात. यातून त्यांच्या झोपेत व्यत्यय येतो.नाक आणि घशाच्या रचनेशी संबंधित समस्यांमुळेहीस्लीप ॲप्निया होऊ शकतो. नाकाचे हाड वाकडे असेलकिंवा अंतर्गत रचनेत काही समस्या असेल तर ते केवळऔषधोपचाराने बरे होऊ शकत नाही आणि बऱ्याचप्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.स्लीप ॲप्निया अत्यंत धोकादायक आहे – दिवसा जास्तझोप येण्यामुळे होणाऱ्या रस्ते अपघातांपासून ते घटस्फोटआणि गर्भधारणेतील गुंतागुंतीपर्यंत यामुळे अनेक समस्यानिर्माण होतात. त्यामुळे विम्यामध्ये स्लीप ॲप्नियाच्यासर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश असणे आवश्यकआहे. सुदैवाने आजकाल बहुतेक नाकाच्या आणिसायनसच्या शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक, कमीत कमीत्रासदायक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जातात,ज्यामुळे रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. झोपेच्या समस्या लवकर ओळखणे आणि त्यावर उपचारकरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा असे दिसून येते कीलोक या समस्येकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करतात व खूप वयझाल्यावरच उपचार घेतात. 60 किंवा 70 वर्षांनंतरअनेकदा इतर आजार उद्भवतात, यातून शस्त्रक्रिया किंवाउपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. सर्वात महत्त्वाचेम्हणजे आपण अन्न आणि कामाइतकेच झोपेलाहीप्राधान्य दिले पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मुलांना जाणीवपूर्वक चारित्र्याकडे वळवा
आपण दिशेषतः पालकांनी या गोष्टीवर भर दिला पाहिजे की,माणसाची सर्जनशीलता ही यंत्रांपेक्षा श्रेष्ठ राहिली पाहिजे. कारण ज्यावेगाने यंत्रे आपल्या जीवनात प्रवेश करत आहेत त्या वेळेस पालक म्हणूनआपले वय तर निघून जाईल, परंतु आपली मुले ना यंत्रवत राहू शकतील नापूर्णतः माणूस. त्यांचे द्विधा मनःस्थितीतील व्यक्तिमत्त्व आपल्यासमोरउभे राहील आणि आपण काहीही करू शकणार नाही. आजकाल पालकमुलांना ‘स्टेम’ (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स)शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतात. ज्याला पाहावे ते याच चार दिशांनीधावताहेत. मात्र, आता आणखी एक शिक्षण देण्याची गरज आहे आणि तेम्हणजे ‘चारित्र्य निर्मिती’चे. इथे चारित्र्याचा अर्थ आहे आपसातीलसंबंध, सामाजिकता, कुटुंब आणि परमात्मा. याचे शिक्षण पालकांनीमुलांना दिले तर मुले यंत्रांचा लाभ घेतीलच, पण त्यांच्या नुकसानापासूनवाचू शकतील. यासाठी शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठांकडूनअपेक्षा ठेवू नका. शिक्षण क्षेत्रातील या ‘स्टेम’मध्ये चारित्र्याचा ‘स्कॅम’(घोटाळा) झाला आहे. म्हणूनच आपण मुलांना चारित्र्याकडे वळवले पाहिजे.
शेखर गुप्ता यांचा कॉलम:पाकिस्तान वगळता शेजार देशांत लोकशाही परिपक्व
आपण कितीही प्रयत्न केला तरी संपूर्ण जगातआपल्याला असे दुसरे क्षेत्र सापडणार नाही, जिथे 2अब्ज लोक निवडणुकीत मतदान करतात आणिलोकशाहीला महत्त्व देतात. असे क्षेत्र ना अमेरिकनखंडात सापडेल, ना आफ्रिकन खंडात. युरोपचीलोकसंख्या इतकी मोठी नाही आणि पूर्व आशियाच्यालोकसंख्येवर 1.4 अब्ज चिनी लोकसंख्येचे वर्चस्वआहे. त्यामुळे भारतीय उपखंडाला काहीतरी खासबनवणारी हीच गोष्ट आहे. मालदीवपासून श्रीलंका,भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानपर्यंत – याउपखंडातील सर्व देशांमध्ये नियमित निवडणुकाहोतात. अर्थात, प्रत्येक देशाची लोकशाही वेगवेगळ्याप्रकारची आहे. उदाहरणार्थ, आपण पाकिस्तानच्यालोकशाहीला सर्वात खालच्या पायरीवर मानून वरभारतापर्यंत येऊ शकतो. याचा अर्थ असा नाही कीभारताची लोकशाही परिपूर्ण अथवा सर्वगुणसंपन्नआहे. लोकशाहीचे ‘रेटिंग’ करणे हे जोखमीचे कामआहे. मी फक्त एक साधी कसोटी लावतो-कोणत्यादेशात सर्वात शांततेने आणि सामान्य पद्धतीने राजकीयसत्तेचे सातत्यपूर्ण बदल होत राहिले आहेत. 19महिन्यांच्या आणीबाणीचा अपवाद वगळता भारत याकसोटीवर सर्वाधिक वेळा खरा उतरला आहे असेम्हणता येईल. पाकिस्तानला आपण या मापदंडावर सर्वात खालीठेवतो कारण त्यांना निवडणुका घेण्याची आठवणआपल्या निर्मितीनंतर 25 वर्षांनी झाली. याशिवाय,त्यांचा कोणताही निवडून आलेला पंतप्रधान आपलाकार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. त्यांनी सैन्यालानेहमीच सर्वोच्च मानले आणि स्वतःसाठी एक वेगळ्याप्रकारची ‘मिश्र व्यवस्था’ शोधून काढली. तिथे अनेकमोठे कालखंड असे आले जेव्हा पूर्णपणे लष्करी राजवट होती, जसे की 1999 ते 2008 या काळात जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या हाती सूत्रे होती. तरीही, तिथले लोकमतदान करत राहिले. दुसरीकडे पाहिले तर हिमालयीन देश भूतान आहे,जिथे राजेशाही अत्यंत मजबूत असूनही तिथले सम्राटइतके दूरदर्शी आहेत की ते नियमितपणे निवडणुकाघेतात आणि निवडून आलेल्या पंतप्रधानांना व त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्ता सोपवतात. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीवमध्येही निवडणुका होतराहिल्या आहेत आणि सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरणझाले आहे. तिथे कुठेही सैन्याची भीती राहिलेली नाही. गेल्या तीन दशकांपासून बांगलादेशातही ही भीतीराहिलेली नाही, जिथे कधीकाळी दोनदा लष्करीहुकूमशाही होती. याचा अर्थ असा की,भौगोलिकदृष्ट्या एका क्षेत्रात सामावलेल्या या उपखंडातील जगाची एक चतुर्थांश लोकसंख्या लोकशाहीशी घट्ट बांधील आहे. पाकिस्तान सोडून यासर्व देशांमध्ये सैन्य हे ‘चांगुलपणाची शक्ती’ ठरले आहे आणि निवडणुका व सत्ता हस्तांतरण मजबूतकरण्यासाठी साहाय्यक ठरले आहे. अगदी तेव्हाही,जेव्हा प्रस्थापित सरकारला तीव्र आंदोलनांनीनाट्यमयरीत्या सत्तेबाहेर केले होते. गेल्या चार वर्षांत आपण आपल्या तीन शेजारीदेशांमध्ये असे घडताना पाहिले. आधी श्रीलंकेत महिंदाराजपक्षे यांची सत्ता गेली, मग बांगलादेशातील शेखहसीना यांची सत्ता गेली आणि त्यानंतर नेपाळचेखडकप्रसाद शर्मा ओली गेले. ‘अरब स्प्रिंग’आंदोलनासारख्या निदर्शनांमुळे या तीन देशांतसत्तापालट तर झाला, पण ते देश अराजकतेत अडकलेनाहीत. ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले, शांततेतनिवडणुका घेतल्या आणि लोकप्रिय नेत्यांच्या हाती सत्तासोपवली. यापैकी श्रीलंका आणि नेपाळ या दोनदेशांनी तर या प्रक्रियेत नवीन राजकीय पक्षांचा शोधलावला. तिथल्या ‘यंत्रणे’विरुद्ध राग होता आणि त्याचेरूपांतर प्रस्थापित राजकीय पक्षांविरुद्धच्या उग्र विरोधातझाले. यावर उपाय म्हणून कोणतीही गैर-संवैधानिकशक्ती किंवा नवीन संविधान समोर आले नाही, तर एकनवीन राजकीय पक्ष उदयाला आला. सर्वात ताजे उदाहरण नेपाळचे आहे. 2025 च्या 8आणि 9 सप्टेंबर या दोन नाट्यमय दिवसांतच ओलीसरकार पडले. ‘आता तिथले सैन्य काय करेल’ अशाचर्चा सुरू झाल्या, पण सैन्याने काहीही केले नाही.त्यांनी फक्त शांतता राखली, जेणेकरून सन्माननीयमुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालीलअंतरिम सरकार सत्ता सांभाळू शकेल, ज्यांचा एकमेवअजेंडा लवकरात लवकर शांततापूर्ण आणि निष्पक्षनिवडणुका घेणे हा होता. कार्की यांनी सहा महिन्यांच्याआत सर्व पक्षांना स्वतंत्र निवडणूक लढण्याची संधीउपलब्ध करून दिली. निवडणूक निकालांनी त्यासर्वांना नाकारले, ज्यांनी 2008 मध्ये राजेशाहीऐवजीलोकशाही आणि गणराज्य संविधान लागू झाल्यापासूननेपाळला 14 पंतप्रधान दिले होते. यामुळे माओवादीसत्तेचाही अंत झाला. आता प्रत्यक्ष निवडून येणाऱ्या 165सदस्यांच्या सभागृहात ते 10 टक्क्यांहून कमी राहिलेआहेत. नवीन नेता कोण? अवघ्या 35 वर्षांचे बालेन शाह हेअशा पालकांचे अपत्य आहेत जे कधीही राजकारणातनव्हते. बेळगावच्या ‘विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकलयुनिव्हर्सिटी’मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेककेलेले बालेन शाह हे आधी एक रॅपर होते. भ्रष्टाचार,कुशासन आणि ढासळत्या जीवनमानाबद्दल लोकांच्यासंतापाला आपल्या गाण्यांतून आवाज दिल्याने ते अत्यंतलोकप्रिय झाले. ते ज्या ‘राष्ट्रीय स्वतंत्र पक्षा’त सामीलझाले, त्याची स्थापना पत्रकार रबी लमिछने यांनी 2022मध्ये केली होती. या पक्षाने दोन तृतीयांश बहुमतालाअवघी एक जागा कमी इतक्या जागा जिंकल्या आहेत.सध्या हा पक्ष ‘विचारधारामुक्त’ दिसत असला तरीस्वतःला मध्यमार्गी म्हणतो. या कथेचा सारांश असाआहे की, तिथल्या लोकांचा संविधान आणि लोकशाहीप्रक्रियेवर विश्वास दृढ आहे आणि सर्वोच्चन्यायालयापासून राष्ट्रपती, निवडणूक आयोग आणिसैन्यापर्यंत सर्व संस्थांनी आपली प्रतिष्ठा टिकवूनठेवली. प्रश्न असा पडतो की, या उपखंडातील सर्वदेशांमध्ये लोकशाही परिपक्व होत असताना पाकिस्तानका अडखळला? माझ्या मते, याचे उत्तर या देशांनी‘राष्ट्रवादाची’ काय कल्पना केली यात दडलेले आहे.पाकिस्तान अपवाद आहे कारण तो अजूनही द्विराष्ट्रसिद्धांताचे समर्थन करण्याच्या नादात गुंतलेला आहे.त्यांच्या याच वेडाने सैन्याव्यतिरिक्त इतर कोणत्याहीसंस्थेला आपली नैतिक उंची वाढवण्याची संधीचदिलेली नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) उपखंडातील सर्व देशांमध्ये केवळपाकिस्तानच अपवाद...या उपखंडातील सर्व देशांमध्ये लोकशाहीपरिपक्व आणि मजबूत झाली असताना,पाकिस्तान का अडखळला आहे? पाकिस्तानअपवाद ठरण्याचे कारण म्हणजे तो अजूनही‘द्विराष्ट्र सिद्धांत’ योग्य ठरवण्यासाठी व्यर्थधडपड करताना दिसत आहे.
राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:नितीश कुमार यांच्यानंतरचे बिहारमधील चित्र कसे असेल?
राजकारणात 13 वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो. याकालावधीत नितीश कुमार यांनीही मोठा प्रवास केलाआहे. बख्तियारपूरमधून आलेले एक मृदुभाषी इंजिनिअरते राजकारणी बनलेल्या नितीश यांनी 2005 च्याहिवाळ्यात बिहारची सूत्रे हाती घेतली होती. पुढील दोनदशकांत त्यांनी बिहारच्या राजकारणाला नवे रूप दिले.तसेच, सत्तेत टिकून राहण्यासाठी त्यांनी अनेकदा आपलीआघाडीही बदलली. समकालीन भारतात असे फार कमीनेते आहेत, ज्यांनी इतक्या वेळा राजकीय युती बदललीअसूनही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. तरीही,नितीश कुमार यांच्या कथेत आलेले हे नवीन वळणकदाचित त्यांच्या असाधारण राजकीय कौशल्याच्याअंताचे संकेत देत आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांना राज्यसभेच्या दिशेने ढकलण्यात आले व पाटण्याच्या सत्तेच्यागल्लीबोळांपासून दूर करण्यात आले, तो अशाव्यक्तीसाठी अत्यंत शांत निरोप मानला जात आहे, ज्यांनी20 वर्षे बिहारच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवले.भाजपसाठी बिहार हे दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेलेध्येय आहे. राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व असूनही, पक्ष कधीहीया राज्यावर स्वबळावर नियंत्रण प्रस्थापित करू शकलानाही. याचे मुख्य कारण असे होते की, ‘मंडलवादी’राजकीय वातावरणात पक्ष आपल्या ‘उच्चवर्णीय पक्ष’ याप्रतिमेतून पूर्णपणे मुक्त होऊ शकला नव्हता. अशापरिस्थितीत नितीश कुमार हे त्यांच्यासाठी एक उपयुक्तसाधनही होते आणि त्यांची मर्यादाही होते-एक विश्वासार्ह,प्रशासनावर लक्ष केंद्रित करणारे सहकारी, ज्यांनी युतीचासामाजिक आधार वाढवला, पण ते असे प्रादेशिक नेतेहीहोते ज्यांच्या उंचीमुळे भाजपला संपूर्ण राजकीयअवकाशावर कब्जा करण्यापासून रोखले जात होते.परंतु काळाबरोबर समीकरणे बदलली. प्रत्येकनिवडणुकीनंतर बिहारमधील भाजपची मतांची टक्केवारीवाढत गेली. जो पक्ष एकेकाळी नितीश यांच्या जदयूचाज्युनियर पार्टनर असायचा, तोच युतीमध्ये मोठी शक्तीम्हणून उदयास आला. 2020 ची निवडणूक हा निर्णायकटप्पा ठरला, ज्यामध्ये भाजपने जदयूपेक्षा कितीतरी अधिकजागा जिंकल्या, जरी मुख्यमंत्रिपदी नितीश कुमारचराहिले. त्याच क्षणापासून समीकरण बदलले होते. भाजप नेतृत्वासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट स्पष्ट होते,बिहारला असे राज्य बनवणे जिथे पक्ष अखेर स्वतःच्यापायावर उभा राहू शकेल. परंतु नितीश कुमार यांनाअचानक हटवणे राजकीयदृष्ट्या जोखमीचे होते. 2025मध्ये मोठा निवडणूक विजय मिळवण्यासाठी अतिमागासवर्गीय आणि महिलांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचाहोता. जेव्हा 2015 मध्ये नितीश यांनी आपले जुने सहकारीलालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केली होती,तेव्हा भाजप कोपऱ्यात ढकलला गेला होता. परंतु आता नितीश कुमार यांना हळूहळू राज्यसभेतीलएका सन्माननीय परंतु राज्याच्या राजकारणात तुलनेनेमर्यादित भूमिकेकडे नेऊन भाजपने एकाच वेळी दोनउद्दिष्टे साध्य केली आहेत. एकीकडे बिहारच्यासत्तारचनेत आपल्या वर्चस्वाचा मार्ग मोकळा केला आहे,तर दुसरीकडे गोंधळाचा किंवा संघर्षाचा प्रसंग टाळूनत्यांचा निरोप सुसह्य केला आहे. राजकारणात जे नेते आपली धोरणात्मक उपयुक्ततासंपवतात, त्यांना अशाच प्रकारे सन्मानपूर्वक निरोप दिलाजातो. परंतु बिहारचे हे प्रकरण अधिक महत्त्वाचे आहेकारण ते भाजपची कार्यशैली दर्शवते. प्रादेशिकसहकाऱ्यांचे स्वागत आहे, परंतु त्यांना सत्तेतकायमस्वरूपी भागीदार म्हणून क्वचितच पाहिले जाईल.आसाम गण परिषदेपासून ते शिवसेना आणि महाराष्ट्रवादीगोमांतक पक्षापर्यंत, भाजपने आपल्या विस्तारासाठीप्रादेशिक पक्षांचा असाच वापर केला आहे. परंतु याचासत्ताधारी युतीमधील इतर सहकाऱ्यांना काय संदेशजातो? कारण आज एनडीएमध्ये तेलगू देसम पक्ष आणिअण्णा द्रमुक यांच्यासह अनेक छोटे पणधोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे भागीदार सामील आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) नितीश कुमार यांना हळूहळू राज्यसभेतीलएका सन्माननीय परंतु राज्याच्याराजकारणात तुलनेने मर्यादित भूमिकेकडेनेऊन भाजपने एकाच वेळी दोन उद्दिष्टेसाध्य केली आहेत. बिहारमधील आपलेवर्चस्व आणि संघर्षाचा प्रसंग टाळणे.
अभय कुमार दुबे यांचा कॉलम:इराण आणि पाश्चात्त्य जगातील संघर्षाची कथा बरीच जुनी आहे
इराणवर इस्रायलच्या मदतीसाठी केलेल्या अमेरिकेच्या हल्ल्याचा संबंध हजारो वर्षे जुन्या सांस्कृतिक वैराशी देखील आहे हे अमेरिका कधीही मान्य करणार नाही. परंतु, इराण ज्या पर्शियन (इराणी)संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो आणि अमेरिका ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचा ध्वजवाहक आहे त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पाचशे वर्षांपूर्वी सुरू झालेली शत्रुत्वाची स्पर्धा आजही कायम आहे. या संघर्षाचे सांस्कृतिक पैलू आजही युरोपीय आणि अमेरिकन जनमानसाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये वारंवार व्यक्त होत आहेत. मग ती हॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट असोत किंवा ओटीटीवरील दीर्घ मालिका; 21 व्याशतकातही पाश्चिमात्य जगाकडून इराणचे कथित खलनायकत्व व पाश्चिमात्य जगाचे नायकत्व सांगणारीही संघर्षाची कथा वेगवेगळ्या प्रकारे मांडली जात आहे. ही त्या काळातील गोष्ट आहे, जेव्हा इस्लाम नव्हता आणि ख्रिश्चन धर्मही नव्हता. पश्चिम ज्या ग्रीको-रोमन संस्कृतीला आपला पाया मानते त्याचा पाळणा ग्रीसमध्ये होता. ग्रीक नगरराज्ये (अथेन्स, स्पार्टा, मॅसेडोन आणि थेब्स) आणि तत्कालीन पर्शियन सम्राट दारा वझर्कसीझ यांच्यातील युद्धांचा वृत्तांत ग्रीक इतिहासकार हेरोडोटसने आपल्या ‘द हिस्ट्रीज’ या पुस्तकातसविस्तरपणे नोंदवला आहे. त्या काळात इराणी संस्कृतीही तिच्या नागरी चारित्र्यासाठी आणि खानदानीपणासाठीओळखली जात असे. मात्र, हेरोडोटसने इराणी लोकांनारानटी ठरवले. त्याने लिहिले की, इराणी लोक अशीभाषा (पर्शियन) बोलतात जी ग्रीक भाषेच्या तुलनेतनिकृष्ट आहे. आजही पाश्चात्त्य जग असाच ‘नॅरेटिव्ह’चालवताना दिसते की इराण हा अधोगती, अंधश्रद्धाआणि हुकूमशाहीचा प्रतिनिधी आहे आणि पश्चिम हेलोकशाही व खुल्या समाजाचे प्रतिनिधित्व करते.हॉलीवूडने 2006 आणि 2014 मध्ये दोन सुपरहिटचित्रपट बनवले-‘300’ आणि ‘300 : राइज ऑफ एनएम्पायर’. यामध्ये इराणच्या अफाट सैन्याविरुद्ध लढतानाशहीद होणाऱ्या 300 स्पार्टन योद्ध्यांची कथा आहे. याचित्रपटांमध्ये गहूवर्ण आणि काळी त्वचा असलेल्याआशियाई इराणी लोकांना अंधकार, लोभ आणिअज्ञानाच्या विळख्यात दाखवण्यात आले आहे.त्यांच्याविरोधात लढणाऱ्या ग्रीकांना सोनेरी केसांच्यागोऱ्या युरोपियन लोकांप्रमाणे चित्रित केले गेले आहे.चित्रपटात हे ग्रीक लोक शिस्त, नियमबद्धता, मानवी प्रेमआणि त्यागाचे प्रतीक आहेत. खरी गोष्ट ही आहे की,प्रत्यक्ष जीवनात ग्रीक लोक आशियाई अधिक दिसतातआणि युरोपियन कमी. बहुतेक ग्रीक तत्त्वज्ञांचे शिक्षणहीतत्कालीन इजिप्तमध्येच झाले होते. ग्रीसमध्ये काहीही‘युरोपियन’ नव्हते. परंतु या चित्रपटांमध्ये ग्रीक लोकांचीवंशच बदलून टाकण्यात आला आहे. अशाच प्रकारे 2014 मध्ये ‘अरगो’ नावाचा आणखीएक चित्रपट आला, ज्याचा हीरो सीआयए एजंट आहेआणि जो 1979-1981 दरम्यान तेहरानमधील अमेरिकनदूतावासामध्ये अडकलेल्या ओलीस ठेवलेल्या लोकांचीसुटका करतो. 2020 पर्यंत इस्रायलीदेखील यानॅरेटिव्हमध्ये उतरले. त्यांनी ओटीटीवर ‘तेहरान’ नावाचीमालिका बनवली, जिचे तीन सीझन सुपरहिट झाले.यामध्ये मोसादचे एजंट संगणक हॅकरच्या मदतीनेइराणचा अणू कार्यक्रम नष्ट करण्याची मोहीम राबवतात. आजची भारतीय आधुनिकता स्वतःला अमेरिकाआणि युरोपशी जोडलेली अनुभवते. तिच्याकडेआशियातील दोन महान संस्कृतींच्या—भारतीय आणिइराणी-सांस्कृतिक एकतेची कोणतीही स्मृती उरलेलीनाही. आज भारतात इराणकडे केवळ मुस्लिमांचा देशम्हणूनच पाहिले जाते. सध्याचे युद्ध हे एका भारतीयहिंदूच्या नजरेत पश्चिमेची ‘खुल्या संस्कृती’ व इराणचे‘बंदिस्त इस्लामिक राज्य’ यांच्यातील लढतीशिवायकाहीही नाही. वास्तविक, आज इराण या युद्धात केवळक्षेपणास्त्रे आणि ड्रोनमुळे टिकून नाहीये, तर त्याच्याकडेइस्लामपूर्व पर्शियन (इराणी) सभ्यता आणि संस्कृतीचेबळ आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) इराण या युद्धात आपल्या क्षेपणास्त्रांमुळेआणि ड्रोनमुळेच टिकून नाही. त्याच्याकडेपर्शियन सभ्यता व संस्कृतीचे ते अदृश्यभासणारे बळदेखील आहे, जे त्यालाअमेरिकेच्या इतिहासहीनतेचा प्रतिवादकरण्यासाठी सक्षम करते.
डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आपली स्वयंपाकघरं आता विजेवर चालवण्याची वेळ आली आहे का?
भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटलेजाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेलेआहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषितठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातीलसंघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने जागतिकऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण कशाप्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारितबनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्यानेविचार करणे आवश्यक आहे. दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषणकोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावरचालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षितमर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीयघरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातीलहवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीनेखराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराबहवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाचीपद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूरयामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते. संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्याप्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्यातसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरातजास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदामातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटकाबसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावलेउचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्येलाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळेमहिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनचआहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिकपरिस्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एकअधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबेमोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणेतयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिकचर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलालाप्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो. विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिकऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भागथेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवनऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिरआणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणिपर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांतविजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्तकनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजहीआवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतरउपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळाठरू शकतो. भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणेआणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणारनाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वासनिर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठीस्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यितसवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांनामदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जायंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळदेऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
एन. रघुरामन यांचा कॉलम:बहुतांश कुटुंबांसाठी फोन बेबीसिटर बनले आहेत
तुम्ही ग्रामीण भारतात एखाद्या पॅसेंजर ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला असे काहीसे दृश्य दिसू शकते- चालत्या ट्रेनमध्येही किचनची जबाबदारी सांभाळणारी एक तरुण आई आपल्या हँडबॅगमध्ये हात घालते. तिचा एक वर्षाचा मुलगा राहुल (काल्पनिक नाव) अस्वस्थ आहे. त्याचे चिमुकले हात आईच्या मनगटावरील काचेच्या बांगड्यांपर्यंत पोहोचत आहेत. आई सवयीने आपला स्मार्टफोन अनलॉक करते, डान्सिंग फ्रुट्सचे हाय-कॉन्ट्रास्ट ॲनिमेशन उघडते आणि फोन मुलाला देते. ती हळूच म्हणते, ‘राहुल बसून राहा, मम्मीला जेवण बनवायचे आहे.’ ती लोअर बर्थच्या मधल्या छोट्याशा जागेत जाते, स्टेनलेस स्टीलचे डबे उघडते आणि स्नॅक्स बनवण्याचे मेहनतीचे काम सुरू करते. काही कुरमुरे मिक्स करते, कोथिंबिरीसोबत थोडे कांदे आणि हिरवी मिरची चिरते, लिंबू पिळते. यावर मीठ आणि लाल तिखट भुरभुरून गप्पांमध्ये रंगलेल्या आपल्या पतीला आणि तीन वृद्ध नातेवाइकांना वाढते. पुढचा एक तास वातावरण अविस्मरणीयरीत्या शांत राहते. ट्रेन धावत असते. ट्रॅक बदलताना धक्के बसतात. रेल्वे जॉइंट्सवर लयबद्ध पद्धतीने उसळते, ज्याचे कंपन फरशीवर जाणवते. काही मोठी मुले डब्याच्या खिडकीबाहेर गाईंना पाहत आहेत किंवा वरच्या बर्थवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राहुल ‘आज्ञाधारक’ मूर्ती बनून बसला आहे. तो निळ्या रंगाच्या फॉक्स-लेदर सीटवर मांडी घालून बसला आहे, पाठीचा कणा प्रश्नचिन्हासारखा वाकलेला आहे. त्याची मान खाली आहे आणि हनुवटी जवळपास छातीला चिकटली आहे. खिडकीबाहेर मोहरीची हिरवी शेते, डोलणारी पामची झाडे, स्टेशनवरील विक्रेत्यांचे ‘चाय-गरम’चे आवाज यांसारख्या भारतीय परिदृश्यातील विविध रंगांना आणि गोंधळाला तो पाहूही शकत नाही. त्याचे डोळे खिळलेले आहेत. स्क्रीनची ब्ल्यू लाइट त्याच्या बाहुल्यांमध्ये रिफ्लेक्ट होत आहे. जरी ट्रेनच्या हालचालीमुळे त्याची वेस्टिब्युलर सिस्टीम (आतील कानाचा समतोल आणि जागेची समज) सक्रिय व्हायला हवी होती, पण ही डिजिटल एकाग्रता त्याच्या शारीरिक वास्तवाला ‘म्यूट’ करून टाकते. त्याचा मेंदू एक मोठा सेन्सरी मिसमॅच सहन करत आहे- शरीर तर ट्रेनचे धक्के अनुभवत आहे, पण डोळे स्थिर आणि सपाट कार्टून जग पाहत आहेत. नातेवाइकांसाठी राहुल एक ‘ड्रीम चाइल्ड’ आहे. एक काकू म्हणाल्या, ‘पाहा किती शांत आहे, आईला अजिबात त्रास देत नाही.’ होय, वरवर पाहणाऱ्यांसाठी तो ‘वेल बिहेव’ मुलगा आहे, परंतु एखाद्या डेव्हलपमेंटल स्पेशालिस्टसाठी तो आपल्या नैसर्गिक विकासात शांत अडथळा सहन करत असतो. ते हा शांत अडथळा पाहू शकत नाहीत. त्यांना हे समजत नाही की त्याची ‘आज्ञाधारकता’ ही वास्तवात न्यूरोलॉजिकल दबावाची स्थिती आहे. जोपर्यंत स्नॅक्स वाढले जातील आणि शेवटी फोन काढला जाईल, तोपर्यंत राहुलचा मेंदू थकून गेलेला असेल. हे शोधाशोध केल्यामुळे नाही, तर हजारो चमकणाऱ्या चित्रांना प्रोसेस करण्याच्या दबावामुळे होते. तर चालत्या ट्रेनमध्ये त्याचा शारीरिक विकास, जसे की चालणे, समतोल राखणे आणि संवाद साधण्याची गरज थांबलेली असते. ही कथा सांगते की भारतात मुलांना वेळेपूर्वीच मोबाइल देणे हा एक ‘शांत अडथळा’ आहे. हा अतिशय उघडपणे नुकसान पोहोचवत नाही, तर शांतपणे मेंदू घडवणाऱ्या क्षणांना हिरावून घेतो. एका वर्षाच्या मुलासाठी तर पुठ्ठ्याचा डबाच स्पेसशिप, चमचा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि आजी-आजोबांच्या खिशात ठेवलेली प्रत्येक गोष्ट जग समजून घेण्याचे माध्यम असते. आजी-आजोबांचा चेहराच त्याचे संपूर्ण जग असते. यांच्याऐवजी जेव्हा आपण त्याच्या हातात पाच इंचाची स्क्रीन देतो, तेव्हा काही मिनिटांच्या शांतीच्या मोबदल्यात संपूर्ण आयुष्यातील कॉग्निटिव्ह आणि शारीरिक क्षमतांचा सौदा करतो. क्लिनिकमध्ये 1 ते 5 वर्षांची अशी अनेक मुले येत आहेत, जी कमी बोलतात, आय कॉन्टॅक्ट टाळतात आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण अनुभवतात. कदाचित हा गरजेपेक्षा जास्त स्क्रीन एक्सपोजरचा परिणाम असावा. फंडा हा आहे की - जर तुमचे 1 ते 5 वर्षांचे बाळ असेल तर त्याचे जग पाच इंचांच्या स्क्रीनपुरते मर्यादित करू नका.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:दक्षता बाळगण्याचे हे युग, पण संशय बाळगू नका
जीवनात ऊर्जा कमी करणाऱ्या घटकांत संशय एक असतो. तुम्हीअधिकाधिक संशयी स्वभावाचे होत असाल तर तो एक मानसिकआजार आहे. संशय हा मानवी स्वभाव आहे. यावर मात करण्यासाठीईश्वराचे चरित्र ऐकावे. गरुडाला काकभूशुंडी यांनी एक कथा सांगितली आहे. परिणामाबद्दल विचारले असता गरुड म्हणतो, ‘गयउ मोर संदेहसुनेउँ सकल रघुपति चरित, भयउ राम पद नेह तव प्रसाद बायस तिलक।’अर्थात माझ्या शंका दूर झाल्या आहेत. रघुपतीच्या सर्व कथाऐकल्यानंतर मी भगवान रामाच्या चरणांशी आसक्त झालो आहे. हे काकशिरोमणी, तुमच्या कृपेने मी भगवान रामाच्या चरणांच्या प्रेमात पडलोआहे. ते म्हणतात, शंका दूर झाल्या. तुमच्या कृपेने.’ कृपा’ हा शब्दआपल्याला खात्री देतो की आपण कृपापात्र होतो, कृतज्ञता, सद्भावनेनेभरलेला असतो. तेव्हा मुक्त होतो. दक्षतेची गरज असलेले हे युग. परंतुसंशय बाळगून वागू नका. तुम्ही तुमच्याच लोकांवर शंका घेऊ लागलाततर जीवन नरक बनते.
पलकी शर्मा यांचा कॉलम:युद्ध पश्चिम आशियात सुरू आणि जिंकतायत पुतीन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे भू-राजकीयपरिणाम वाढत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातवारंवार क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. आखातीप्रदेशातील तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले आहे.महत्त्वाच्या सागरी मार्गांवर तेल जहाजे अडकलीआहेत. जगभरातील देश ऊर्जा पुरवठ्यातील संभाव्यव्यत्ययांसाठी तयारी करत आहेत. अमेरिकेचे मित्र राष्ट्रेअशा संघर्षात नाहक अडकली जात आहेत. वास्तविकत्यांना युद्ध टाळायचे होते. या सर्व गोंधळात, एक प्रश्न उपस्थित होतो : या युद्धातव्लादिमीर पुतीन एकमेव विजेते असतील का? पुतीनयांनी अमेरिका-इस्रायली आक्रमकतेवर टीका केलीआहे. त्यांनी आधीच इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्याशीही बोलून मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. यामुळे युरोपीयदेश खूप अस्वस्थ झाले आहेत. ते म्हणतात की यायुद्धाचा एकमेव फायदा पुतीन यांना होणार आहे - आणि प्रत्यक्षात त्यांचा युक्तिवाद योग्य आहे. पहिले कारण म्हणजे या युद्धाने युक्रेनवरून जगाचे लक्ष वळवलेआहे. आता पुतीन यांच्यावर लढाई थांबवण्याचाकोणताही मोठा दबाव नाही. अगदी नियोजित शांतताचर्चा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिवायपुतीन यांच्या भातात एक नवीन बाण आहे: अमेरिकाइराणवर हल्ला करू शकते तर ते रशियाला युक्रेनवरहल्ला करू नये असे कसे सांगू शकतात? दुसरे कारणम्हणजे या युद्धामुळे रशियाचे ऊर्जा उत्पन्न वाढत आहे.आखाती तेल आणि वायू कमी होत आहेत. रशियनऊर्जेची मागणी वाढली आहे. अमेरिका रशियन वायूआणि तेलावरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे.पुतीन या संकटाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. पुतीनम्हणतात की ते युरोपला ऊर्जा विकण्यास तयार आहेत.परंतु युरोपीय देशांनी दीर्घकालीन सहकार्याची हमी द्यावीही त्याची अट असेल. काही युरोपीय देशांनीही याकल्पनेला पाठिंबा दिला आहे. उदाहरणार्थ- हंगेरीरशियन ऊर्जेवरील निर्बंध उठवण्याची मागणी करतआहे. हा त्यांना संकटावरील उपाय वाटतो. पणदीर्घकालीन चित्र अधिक गुंतागुंतीचे आहे. रशियापश्चिम आशिया अमेरिकेच्या वर्चस्वाखाली पाहूइच्छित नाही. ते या प्रदेशात आपली पकड कायम ठेवूइच्छितात . 2024 च्या अखेरीस बशर अल-असद यांनासीरियन अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर ही एकपकड सैल झाली होती. 2015 मध्ये पुतीन यांनी सीरियनगृहयुद्धात हस्तक्षेप केला होता. असद यांना जवळपासएक दशक सत्तेत ठेवले. त्या बदल्यात रशियाने पश्चिमआशियात एक धोरणात्मक पाय रोवले. परंतु आता तेसंपले आहे. येथे इराणची भूमिका येते. अलिकडच्यावर्षांत रशियाने तेहरानमधील राजवटीशी आपले संबंधअधिक दृढ केले आहेत. युक्रेनियन युद्ध सुरूझाल्यानंतर इराणने रशियन सैन्याला शाहिद आत्मघातीड्रोन पुरवले. रशियाने या ड्रोनचे स्थानिक उत्पादनकरण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. ते रशियाच्यालष्करी कारवायांचा कणा बनले आहेत. गेल्या वर्षीचरशियाने युक्रेनवर असे 50 हजारांहून अधिक ड्रोनडागले होते. पण पुतीन त्याच प्रकारे प्रत्युत्तर देतीलअशी शक्यता कमी दिसते. क्रेमलिन म्हणते की इराणनेलष्करी मदत मागितली नाही. तसे केले तरी रशिया मदतकरेल अशी शक्यता नाही, कारण त्याला स्वतःचे युद्धहीलढायचे आहे. तथापि, पुतीन इतर मार्गांनी मदत करूशकतात. म्हणजे गुप्तचर यंत्रणेद्वारे. अमेरिकनअधिकाऱ्यांनुसार रशिया इराणला प्रमुख लक्ष्ये, रडारआणि संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणांबद्दल माहिती पुरवतआहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पुतीन अमेरिका आणिइराणमधील पूल म्हणून काम करू शकतात. त्यांचे ट्रम्पआणि इराणी राजवटीशी जवळचे संबंध आहेत. म्हणूनदोन्ही बाजूंना मार्ग हवा असेल तर पुतीन ते घडवूनआणू शकतात. सध्या कोणीही ती भूमिका बजावूशकत नाही. ट्रम्प चिनी लोकांवर विश्वास ठेवत नाहीतआणि इराण युरोपीय लोकांवर विश्वास नाही. आखातीदेश स्वतः या संघर्षात अडकले आहेत आणि भारतानेमध्यस्थी त रस दाखवलेला नाही. अशा प्रकारे सर्वपर्याय जवळपास केवळ रशियावर अवलंबून आहेत.आणि अर्थातच हे परोपकारी पाऊल ठरणार नाही. पुतीनयांनी ट्रम्प यांच्यासाठी तणाव कमी करण्याचा मार्गमोकळा केल्यास त्यांना त्या बदल्यात काहीतरी मिळूशकते - कदाचित युक्रेन मुद्द्यावर सवलत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) इराण युद्धामुळे युक्रेनवरून जगाचे लक्षवळले आहे. युद्ध थांबवण्यासाठी पुतीनयांच्यावर आता कोणताही मोठा दबावनाही. नियोजित शांतता चर्चा देखील पुढेढकलण्यात आल्या. शिवाय युद्धामुळेरशियाचे ऊर्जा उत्पन्नही वाढत आहे.
शशी थरूर यांचा कॉलम:‘प्रहार''मुळे सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय बळकट होईल
गेल्या महिन्यात गृह मंत्रालयाने देशाची पहिली अधिकृत दहशतवादविरोधी रणनीती प्रसिद्ध केली होती. ‘प्रहार''नावाचा हा महत्त्वाचा दस्तऐवज खंडित आणि प्रतिक्रियाशील सुरक्षा व्यवस्थेला सुसंगत संरचनेत रूपांतरित करण्याच्या दृष्टिकोनाची रूपरेषा देणारा आहे. भारताच्या सुरक्षा संस्थांना एक सामायिक प्लेबुक प्रदानकरणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारत जवळपास साडेतीन दशकांपासून दहशतवादाविरुद्ध लढत आहे. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत संघाविरुद्धच्या मुजाहिदीन मोहिमांच्या यशाने प्रेरित झालेल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध हीच रणनीती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याची सुरुवात झाली. जम्मू आणि काश्मीरमधील सीमापारच्या बंडखोरींपासून ते डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी आणि अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या जागतिक नेटवर्कपर्यंत दहशतवादाविरुद्ध भारताचा अनुभव इतर कोणत्याही देशांपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण व दीर्घकालीन राहिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारताने स्थानिक लष्करी प्रतिसाद, यूएपीएसारख् या विशेष कायदेशीर साधनांद्वारे आणि विविध एजन्सींमधील स्वतंत्र प्रक्रियांद्वारे दहशतवादाला तोंड दिले आहे. इंटेलिजेंस ब्युरोपासून ते राज्यस्तरीय दहशतवाद विरोधीपथकेपर्यंत संबंधित एजन्सी बहुतेकदा एका बाजूला कामकरत असत आणि माहितीची देवाण घेवाण अनेकदा हल्ल्यानंतरच होते. यामुळे अशी व्यवस्था निर्माण झाली.ती समन्वित सुरक्षा चौकट प्रदान करण्याऐवजी शून्य-सहिष्णुता वक्तृत्वापुरती मर्यादित होती. ‘प्रहार’चे उद्दिष्ट या प्रतिक्रियाशील आणि विखुरलेल्या दृष्टिकोनाची जागा एका समग्र दृष्टिकोनाने घेण्याचे आहे.ते देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील एकता आणि समन्वय मजबूत करते. परदेशी निरीक्षकांना हे नोकरशाहीची केवळ एक साधी पुनर्रचना वाटू शकते. परंतु 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट, 2001 मध्ये संसदेवर हल्ला व 2008मध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसारख्या दुर्घटना घडलेल्या देशात सुरक्षा धोरणांपेक्षा धोका वेगानेविकसित झाला आहे हे उशिरा मान्य केले जाते. ‘प्रहार’संकट-प्रतिसाद मॉडेलऐवजी प्रतिबंध-प्रथम मॉडेलवर काम करते. संकट येण्यापासून रोखण्यावर लक्ष केंद्रित करते. ते बुद्धिमत्ता-आधारित कृतीवर भर देते वमल्टी-एजन्सी सेंटराला रिअल-टाइम डेटा-एकात्मताप्रणालीच्या केंद्रस्थानी ठेवते. गुप्तचर यंत्रणेवरील संयुक्तकार्य दलासह एमएसीची भूमिका केंद्रीकृत करून याधोरणाचे उद्दिष्ट गुंतवणुकीच्या युनिट्सना कामकरण्याची प्रवृत्ती दूर करणे आणि राज्य पोलिस आणिकेंद्रीय एजन्सी एका समन्वित आदेशाखाली कामकरतात याची खात्री करणे आहे.‘प्रहार’ ड्रोन-आधारित घुसखोरी आणि संप्रेषण एन्क्रिप्शनसारख्या आधुनिक धोक्यांना देखील स्पष्टपणे संबोधित करते. संघटितगुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कमधील संबंध ओळखते. प्राथमिक अहवालांपासून ते अंतिम खटल्यापर्यंत तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर तज्ञांचा समावेश करण्याची तरतूद यात आहे, जेणेकरून कायद्याचे राज्य केवळ घोषणा न राहता प्रक्रियात्मक त्रुटींमुळे उच्च-प्रोफाइल संशयितांना जबाबदारीतून सुटूनये याची खात्री करण्याचे साधन बनेल. हा दृष्टिकोनसमस्येच्या मूळ कारणांना देखील संबोधित करतो. मानवीहक्कांवर भर देण्यावरून हे मान्य होते की कठोर आणि दडपशाहीचे उपाय कधीकधी दहशतवादाला खतपाणी घालू शकतात. शिवाय हा दस्तऐवज डिजिटल कट्टरपंथी करणाच्या वाढत्या धोक्याला देखील संबोधित करतो, विशेषतः डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्सआणि ड्रोन सारख्या तंत्रज्ञानासह एकत्रित केले जाते. तरीही ‘प्रहार’च्या यशासाठी 30 राज्य पोलिस दलांचे सहकार्य आवश्यक आहे. पैकी बरेच कमी संसाधने असलेले, तांत्रिकदृष्ट्या मागास आणि स्थानिक राजकारणाच्या प्रभावाखाली आहेत. या राज्यांमध्ये दहशतवादविरोधी यंत्रणांचे मानकीकरण करण्यासाठी प्रशिक्षण व पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आवश्यक असेल. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) पूर्वी भारताच्या सुरक्षा धोरणांमध्ये गोपनीय कागदपत्रे दडवली जात. परंतु केंद्र सरकारने ‘प्रहार'' दस्तऐवज उघडपणे सामायिक करून नागरिक आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांच्याबद्दलची आपली वचन बद्धता दाखवून दिली.
एन. रघुरामन यांचा कॉलम:हृदयस्पर्शी कथा सांगितल्या गेल्या नाही तर हृदयद्रावक घटना घडत राहतील
मी शालेय जीवनात दयाळू शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाढलो. शिवाय प्रौढ झाल्यावरही मी त्यांच्या दयाळूपणाच्या कथा ऐकल्या आहेत. ‘द लेटर्स इन द ड्रॉवर’ ही अशीच एक कहाणी आहे. वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या पंधरा दिवसांनी अरुण त्यांच्या खोलीत गेला. कारण नातेवाइकांची ये-जा वाढली होती. खोलीत जुन्या कागदाचा वास येत होता. खिडकीच्या जवळील डेस्कवर वर्षानुवर्षे उत्तरपत्रिका तपासल्याचे शाईचे डाग होते. जुने शैक्षणिक गोषवारे एका कोपऱ्यात पडले होते. दुसऱ्या कोपऱ्यात न वापरलेल्या वह्या पडल्या होत्या. 40 वर्षांचा दिवा बाहेरून फिकट दिसत होता. पण त्याचा प्रकाश तेजस्वी होता. अरुण त्याच्या वडिलांचा शिक्षक म्हणून असलेल्या कारकिर्दीचा विचार करू लागला. त्याने टेबल खालचा ड्रॉवर उघडला. त्यात फिकट लाल धाग्याने बांधलेल्या लिफाफ्यांचे एक बंडल होते. त्याने उत्सुकतेने धागा उघडला आणि पहिले पत्र वाचले. हस्ताक्षर थोडेसे गोंधळलेले होते. पण ते मनापासून लिहिले होते- “आदरणीय सर, तुम्हाला कदाचित मी आठवत नसेन. नववीत दोनदा गणितात नापास झाला होतो. मी तोच मुलगा आहे. तेव्हा मी शाळा सोडून माझ्या काकांच्या दुकानात काम करण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही आमच्या घरी आलात आणि माझ्या आईला सांगितले की एक अपयश जीवनाला ठरवू शकत नाही. आज मी अभियंता आहे. परंतु मला निराशा वाटते तेव्हा तुम्ही सांगितलेली ही गोष्ट आठवते. ’ अरुण क्षणभर थांबला. मग त्याने रात्रभर प्रत्येक पत्र उघडण्यात आणि वाचण्यात घालवली. दुसऱ्या पत्रात त्याचे वडील एका विद्यार्थिनीच्या वडिलांना समजावण्यासाठी कसे पायी गेले याचे वर्णन त्याने वाचले. तिसऱ्या पत्रात कुटुंबातील कठीण काळात त्यांनी शाळेची फी कशी भरण्याची ऑफर दिली याचेही वर्णन केले आहे. या शेकडो पत्रांनी त्याच्या वडिलांचे उत्तम जीवन समोर आले. त्या दिवशी अरुणला एक धडा मिळाला. त्याला जाणवले की खरा वारसा संपत्ती, पदाचा किंवा सार्वजनिक मान्यतेवरुन मोजला जात नाही. खरे तर तो याच्या मागे धावत होता. शांतपणे आपला वेळ, सहानुभूती आणि विश्वास इतरांना देतात. अशा लोकांचा प्रभाव सर्वात स्थिर असतो. इतरांपेक्षा आपल्याला उंचावर नेले जाते तेव्हा महत्त्वाकांक्षेचा व्यापक उद्देश पूर्ण होत नाही. एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा वारसा म्हणजे संपत्ती किंवा पद नाही तर एखाद्यामध्ये आपले जीवन महत्त्वाचे आहे, असा विश्वास निर्माण करणे यालाच महत्त्व आहे. मला ही कहाणी जालंधर ‘भास्कर’मध्ये नववीच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेले ह्रदयद्रावक पत्र वाचताना आठवली. मी भुविकाबद्दल हृदयद्रावक बातमी वाचली. तिला पीनट बटर खूप आवडायचे. गेल्या शनिवारी ती तिच्या शेवटच्या प्रवासाला निघाली होती. तेव्हा तिची आई पीनट बटरचा एक बॉक्स घेऊन आली आणि तिला ते खायला घालताना म्हणाली, हळूहळू घे. शेवटचे .” हे शब्द ऐकून तिथे कुणीही अश्रू रोखू शकले नाही. आई पीनट बटरचा बॉक्स स्मशानभूमीत घेऊन जात असताना संपूर्ण जालंधर शहर रडले. जणू काही भुविका कधीही तिच्या आवडत्या पदार्थाची मागणी करू शकते. यापूर्वी 14 वर्षांची मुलगी सीसीटीव्हीमध्ये एकटी चालताना दिसली होती व काही मिनिटांनंतर ती एका उच्च-सुरक्षा निवासी संकुलात मृत आढळली. पोलिस या रहस्यमय प्रकरणाचा तपास संशयास्पद आत्महत्या म्हणून करत आहेत, तर कुटुंबीय याला हत्या म्हणत आहेत. मुलीच्या टेनिस प्रशिक्षकाला तिच्या टेनिस किटमध्ये एक सुसाइड नोट सापडल्याचे वृत्त आहे. त्यात लिहिले होते, “मी विज्ञान आणि गणितात नापास झाले. मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. अलविदा.’ दुर्दैवाने समाजाने एका नवोदित लॉन टेनिस खेळाडूला गमावले. तिने सलग दोन वर्षे विभागीय स्तरावर कांस्यपदक जिंकले होते. कुटुंबाने त्यांची लाडकी मुलगी गमावली. फंडा असा की मुलांना एक गोष्ट नक्की सांगा. यशस्वी जीवनाचे मोजमाप एखाद्या व्यक्तीने किती कामगिरी किंवा गुण मिळवले यावरून नव्हे तर तो जगाला काय देतो यावरून होत असते. उदाहरणार्थ- अरुणच्या वडिलांनी समाजाला दिले तसे.
प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी:सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
अनादिकाला पासून मनुष्याची ही जिज्ञासा आहे की सत्य काय आहे? ज्यावेळेस पासून माणसाने विचार करणे आरंभ केले त्यावेळेस पासून त्याच्या मनात हाच एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की सत्य काय आहे? वास्तविकता काय आहे? तत्व काय आहे? सर्वसाधारणपणे सत्य म्हणजे खरे इतकेच आपण जाणतो. परंतु मात्र कथन अभिव्यक्ती तेवढेच सत्य नसून संपूर्ण सत्य स्वरूप व्यापक आणि विराट असते. कोणत्याही व्यक्तीची समज, ज्ञान आणि अभिव्यक्ती क्षमता परिपूर्ण नसते. वास्तविकत: आपली इंद्रिय क्षमता, ग्रहण शक्ती, तर्कबुद्धी, विचारक्षमता, वाणी, भाषा ही अपूर्ण असते म्हणून ती संपूर्ण सत्याच्या व्यक्ततेमध्ये एका वेळी सक्षम नसते. म्हणूनच आपले जाणण्याचे साधनं अपूर्ण असतील तर समजण्याची क्रिया ही मात्र आमची आंशिक सत्य असते आणि त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. महत्त्वाचे सूत्र आहे : सहप्रतीपक्ष पदार्थ हा एकत्व नसतो. तो अनेक प्रकारे व्यक्त केला जाऊ शकतो. प्रत्येक पदार्थांमध्ये परस्पर विरोधी तत्वही विद्यमान असतात. उदाहरणार्थ उजेड आहे तर अंधकारही असतो. अंधकार नष्ट होऊन उजेड त्याच ठिकाणाहून येतो. सुख आणि दुःख आहे. आपण दुःखाचा अनुभव करतो परंतु तेच दुःख जाऊन त्याच ठिकाणी परत सुखाचा अनुभव होतो. ऊन सावली आहे. ऊन जाते आणि त्याच ठिकाणी सावली येते. विचार-अविचार ही असतो. एक विचार जातो त्याच ठिकाणी दुसरा विचार येतो. या सर्व विद्यमानता एकाच जागी असतात. म्हणून एकाचे अस्तित्व जाऊन दुसरा प्रगट होतो. तो इतर दुरून कुठूनही येत नाही तो त्याच ठिकाणी असतो. मात्र हे जाणण्याच्या बुद्धीचा अविष्कार व्हायला हवा. विरोधी तत्वांचे सह-अस्तित्व असते हे जाणल्यानंतर कसल्याही प्रकारचा अन्यत्वभाव उरत नाही. जसे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपले एक मत बनलेले असते. त्याचप्रमाणे अन्य व्यक्तीचेही स्वतःचे मत असते. वस्तूच्या विराट स्वरूपाची जाणीव होऊन अन्य मताचा आदर केला तर परस्पर विरोधी भाव नष्ट होतात. हत्ती आणि अंध व्यक्ती खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावाच्या बाहेर एक हत्ती आला. गावातील फारशा लोकांनी हत्ती पाहिलेला नव्हता. हत्ती पाहायला जाण्यासाठी गावाच्या बाहेर गर्दी होऊ लागली. आपणही हत्ती पाहून यावे असे प्रत्येकाला वाटू लागले. हत्ती पाहून आलेले लोक गावात येऊन परस्पर चर्चा करू लागले. याच गावामध्ये काही अंध व्यक्ती होते. हत्ती कसा असतो आहे हे जाणून घ्यावे असे त्यांनाही वाटू लागले. आपसात योजना आखून गावातील अंध व्यक्ती हत्ती जाणून घेण्यासाठी गेले. सर्व अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे याचा अंदाज मनामध्ये बांधत होते. आणि आता ते आपसात बोलू लागले. त्यापैकी ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श करून पाहिला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श करून जाणवला तो अंध व्यक्ती हत्ती खांबासारखा आहे असे म्हणू लागला. ज्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला तो व्यक्ती हत्ती झाडू सारखा आहे असे आग्रहाने सांगू लागला. एका अंध व्यक्तीने हत्तीच्या कानाला स्पर्श केला आणि तो आपले मत ठामपणे मांडू लागला की हत्ती सुपा सारखा आहे. हत्ती विषयी हत्ती कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी सर्व अंध व्यक्ती एकमेकांशी आता जोरजोरात बोलू लागले. प्रत्येक जण म्हणत होता की माझेच म्हणणे बरोबर आहे, मी म्हणतो तसाच हत्ती आहे. काही वेळाने त्यांच्या विवादाचे रूपांतर परस्पर भांडणांमध्ये झाले. प्रत्येक अंध व्यक्ती आपल्या मताचा दुराग्रह करू लागला. याचवेळी त्यांच्या बाजूने एक सुशिक्षित समजदार व्यक्ती जात होता. त्याने पाहिले की काही अंध व्यक्ती हत्तीच्या स्वरूपाविषयी आपसात भांडत आहेत, तो जवळ आला त्यांनी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि त्यांना एका बाजूला घेऊन गेला. विवाद करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी स्पष्टीकरण दिले की तुमचे सर्वांचे म्हणणे बरोबर आहे. कोणीही चुकीचा नाही. परंतु तुम्ही हत्तीच्या एका अवयवाला स्पर्श केलेला आहे, आणि हत्ती केवळ त्याच स्वरूपाचा आहे असा आग्रह करत आहात. तुम्ही सर्वजण जे म्हणत आहात ते सर्व मिळून हत्तीचे पूर्ण अवयव होतात. आणि त्या सर्वांचा मिळून एक हत्ती होतो. त्या व्यक्तीच्या संबोधनानंतर सर्व अंध व्यक्तींच्या लक्षात आले की आपल्या सर्वांचं म्हणणं बरोबर आहे परंतु आपला समन्वय नसल्यामुळे वाद विवाद होत आहेत. आपण समजदारीची भूमिका घेतली आणि दुसऱ्याच्या मताचा आदर केला तर आपले आपसात वाद होणार नाहीत असा बोध घेऊन सर्वजण शांततेने गावात परतले. इतरांच्या मताचा आदर या गोष्टीवरून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की आपले मत मांडत असताना दुसऱ्याच्या मताचा आदर केला पाहिजे. आणि केवळ आपलेच मत ग्राह्य असावे असा दूराग्रह नसावा. कारण सत्य एकांगी नसते, ते अनेक अंगी असते. त्यापैकी सर्व अंग खरे असतात. कोणते एकच अंग खरे आहे आणि दुसरी बाजू खरी नाही हा दुराग्रह कामाचा नसतो. सत्य असीम आहे , भाषेला सीमा आहे, अभिव्यक्ती त्याहून कमकुवत असते. प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि प्राप्य शक्तीने व्यक्त होत असतो. पाण्याने अर्धवट भरलेला ग्लास : एखादा ग्लास अर्धा भरलेला आहे हे खरे, तसेच तो अर्धा रिकामा आहे हेही खरेच. ग्लास काचेचा आहे किंवा स्टीलचा आहे हेही चुकीचे नाही. ग्लास टेबलावर आहे किंवा जमिनीवर आहे हेही सत्यच. ग्लासमध्ये अर्धे पाणी आणि अर्धी हवा आहे हे सत्यही नाकारता येणार नाही. म्हणून सत्य अनेकांगी आहे, एकांगी नाही. हेच खरे. असाच अर्थबोध आपणास घ्यावयाचा आहे. दुराग्रह नको आपण ज्यावेळी केवळ आपल्याच विचारांचा आग्रह करतो त्यावेळी तो दुराग्रह बनत असतो. केवळ आपल्याच दृष्टिकोनाचा आग्रह न बाळगता दुसऱ्याने व्यक्त केलेल्या विचारातही काही तथ्य असेल असे मत असावे. याचाच अर्थ इतरांच्या विचाराबद्दल सहिष्णू बनणे. परस्पर वाद विवाद न होऊ देण्यासाठी वैचारिक सहिष्णुता खूप महत्त्वाची असते. आपल्या स्वतःच्या भावनांवरती आपले नियंत्रण असावे. इतरांच्या विचारांना समजण्याचा प्रयत्न असावा. प्रत्येकाने स्वतःच्या गर्व आणि अहंकाराला महत्त्व दिले तर कुटुंबात, समाजात आणि जगामध्ये शांतीपूर्ण सह-अस्तित्व आणि स्थिरता नांदू शकत नाही. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक परिसर, छत्रपती संभाजीनगर)

29 C