संगमनेर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर! 18 पैकी 10 जागेवर महिला देणार लढत
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने दिवाळीआधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून नुकत्याच नगरपालिका आणि नगर परिषदेचे सोडतीचे आरक्षण जाहीर झाले आहे. शहरातील नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयात सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीचे आरक्षण काढण्यात आले. पंचायत समितीच्या सोडतीचे आरक्षण नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाताने चिठ्ठ्या […]
रत्नागिरी पंचायत समितीचे 20 गणांचे आरक्षण जाहीर
रत्नागिरी पंचायत समितीच्या 20 गणांसाठी आज लोकनेते शामराव पेजे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये दहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले.त्यामध्ये नाणीज गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण- करबुडे,कोतवडे,साखरतर,खेडशी,केळ्ये,कुवांरबाव,नाचणे,गोळप सर्वसाधारण महिला- वाटद,कळझोंडी,नेवरे,झाडगाव म्युन्सिपल हद्दीबाहेर,भाट्ये,गावखडी नागारिकांचा मागास प्रवर्ग – हरचिरी,पावस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- खालगांव,हातखंबा,कर्ला अनुसूचित जाती महिला- नाणीज
Miraj : पायाप्पाचीवाडीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
कार-दुचाकी अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही मिरज : मिरज तालुक्यातील पायाप्पाचीवाडी येथे नेरज–एरंडोली–सलगरे रस्त्यावर भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे नागेश भंडारे हा दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत भंडारे यांनी मिरज पायाप्पाचीवाडी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. [...]
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांची आरक्षण सोडत; शिंदे गटात गेलेल्यांचे आरक्षण सोडतीत पत्ते कट
रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या 56 गटांची आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. २८ जिल्हापरिषद गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वाटद गट अनुसूचित जाती महिला, हातखंबा गट अनुसूचित जाती आणि हर्णे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. अपेक्षित आरक्षण पडल्याने काही इच्छुकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र काहींच्या पदरी निराशा आली.शिंदे गटात गेलेल्या अनेकांचे आरक्षण सोडतीत पत्ते […]
TVK Vijay Rally Stampede –विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची CBI चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती जे.के महेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असून ही समिती सीबीआयचा तपास पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडेल यावर लक्ष […]
Halsiddhnath Yatra 2025 : हालसिद्धनाथ यात्रेची पालखी सोहळ्याने सांगता..!
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्लीतील हालसिद्धनाथ यात्रेची उत्साहात सांगता म्हाकवे : कर्नाटक–महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी–कुर्ली (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरु असणाऱ्या या यात्रेत नाथांचे [...]
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कवी चंदनशिवे यांचे व्याख्यान संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमनगर येथे शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांचे दलित चळवळीतील योगदान आणि बंद पडलेली चळवळ याविषयी व्याख्यान संपन्न झाले. यावेळी उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चार दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सायंकाळी प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांनी दलित चळवळीतील योगदान आणि बंद पडलेली चळवळ या विषयावर उपस्थितांना व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक कमलाकर बनसोडे, धनंजय वाघमारे, अनिल बनसोडे, मिलींद डावरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी केले. तर आभार सुभाष सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास झेंडे, अविनाश शिंगाडे, सुमित चिलवंत, प्रसेजनजित शिंगाडे, यशवंत शिंगाडे, जितेंद्र बनसोडे, महेंद्र जेटीथोर, दिलीप सोनवणे, बंटी शिंगाडे, संतोष वाघमारे, विकी नाईकवाडी, प्रमोद ढवळे, प्रशांत कांबळे, सम्राट कांबळे, सम्राट वाघमारे, विजय उंबरे, प्रवीण सोनवणे, रणजित माळाळे, यश माळाळे, उमेश खंदारे, सुरेश देवकुळे, बापू साबळे, सारिपुत शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास भीमनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवैध मद्य विरोधी जिल्हा भरात 21 छापे
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.11 ऑक्टोबर रोजी अवैध मद्य विरोधी 21 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 770 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 467 लि. गावठी दारु, 257 सिंधी ताडी अम्ली द्रव व 197 देशी विदेशी दारुच्या बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1 लाख 30 हजार 250 रूपये आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 21 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत. 1) भुम पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) गिताबाई रमेश काळे, वय 40 वर्षे या 08.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) राणी धनाजी काळे, वय 30 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता. भुम धाराशिव या 08.45 वा. सु. आपल्या राहत्या घराचे बाजूस 130 गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2) उमरगा पथकाने 8 ठिकाणी छापे टाकले. यात आरोपी नामे- दत्ता गंगाराम थोरात, वय 66 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे 11.20 वा. सु. शिवाजी चौक गुंजोटी येथे गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) चांदु सुभाष शिंदे, वय 23 वर्षे, रा. याकतपुर रोड औसा ह.मु. बिरुदेव मंदीर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 10.30 वा. सु. त्रिकोळी जाणारे रोड शेजारी 200 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव प्लॉस्टिकचे बॅरेल सह अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 3) नितीन लक्ष्मण माने, वय 42 वर्षे, रा. चिंचोली ज. ता. उमरगा जि. धाराशिव हे 12.20 वा. सु.हॉटेल प्रभातच्या पाठीमागे मोकळ्या जागेत 45 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 4) नामदेव रमेश तेलंग, वय 35 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.40 वा. सु.आपल्या राहत्या घराचे बाजूस 12 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 5) मारुती बाबुराव पवार, वय 34 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.00 वा. सु.माडज गावातील प्रेमनाथ महाराजाच्या मंदीराकडे जाणारे रोडच्या बाजूला 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 6) खासीम मकबुल लदाफ, वय 36 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा. ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु.हॉटेल प्रभातच्या पाठीमागे मोकळ्या जागेत 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 7) शिवराज गोविंद कांबळे, वय 45 वर्षे, रा. गौतमनगर उमरगा. ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.20 वा. सु.भाजी मार्केट येथील पत्र्याचे शेड शेजारी उमरगा येथे पाठीमागे मोकळ्या जागेत 55 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 8) निर्मला सुग्रीव चव्हाण, वय 61 वर्षे, रा. जकेकुरवाडी तांडा. ता. उमरगा जि. धाराशिव या 19.10 वा. सु.जकेकुरवाडी तांडा येथे 27 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 3) आनंदनगर पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) सारिका दशरथ राठोड, वय 28 वर्षे, या 19.30 वा. सु. शिंगोली तांडा मधील शुभमचिकनचे दुकानाजवळ देशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) सविता भगवान पवार, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी सांजा ता. जि. धाराशिव या 18.00 वा. सु. पारधी पिढी सांजा येथे 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. 4)धाराशिव ग्रामीण पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात अंबेजवळगे ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) कृष्णा रामा चांदणे, वय 49 वर्षे,हे 10.35 वा. सु. कौडगाव येथील बेडकीनाल्यावरील पुलाजवळ देशी विदेशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 1) भिमराव भगवान गोफणे, वय 45 वर्षे, हे 11.45 वा. सु. गुंजेवाडी ते भानसगाव जाणारे रोडवर भानसगाव चौक लगत देशी विदेशी दारुच्या 51 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. 5)लोहारा पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) नागनाथ मारुती सोनटक्के, कानेगाव ते आरणी जाणारे रोडलगत जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे 2)देवानंद संगापृपा ढगे, वय 36 वर्षे, रा. पेठसांगवी ता. उमरगा धाराशिव हे 11.50 वा. सु. पेठसांगवी गावातील भिमनगर मध्ये 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 6)स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यात टाकळी ता. परंडा ह.मु. बाणगंगा साखर कारखाना परीसर ईडा ता. भुम जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) आशाबाई मोहन पवार, वय 40 वर्षे, या 12.45 वा. सु. हॉटेल रायबाचे समोर रोडचे बाजूला पत्र्याचे शेडसमोर ईडा येथे 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळतिश्रीत रासायनिक द्रव व 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 2)बल्लु बिच्छवा काळे, वय 55 वर्षे, रा. पारधी पिढी तेर ता. जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. पारधी पिढी तेर येथील असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये 190 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 3)रमेश देवराव पवार, वय 51 वर्षे, रा. पारधी पिढी तेर ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. पारधी पिढी तेर येथील असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 4)रणजित दत्तात्रय गाताडे, वय 26 वर्षे, रा. रांजनगाव ता. गंगापूर जि.छ. संभाजीनगर ह.मु. मुगाव ता. परंडा जि. धाराशिव हे 15.45 वा. सु. सोनारी ते अंबी जाणारे रोडवरील हॉटेल भैरवनाथ चे बाजूला देशी विदेशी दारुच्या 47 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 6) धाराशिव शहर पो ठाण्याचे पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) कुणाल अनिल पवार, वय 30 वर्षे, हे 18.45 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 45 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
जेवणानंतर चिमूटभर हा पदार्थ पचनासाठी सर्वात उत्तम, वाचा
जेवणानंतर आपण प्रत्येकजण काही ना काही चघळतो. खासकरून जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बडीशेप खातात. बडीशेप ही केवळ मुखशुद्धीसाठी नव्हे तर, आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप […]
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा
धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित केली आहे. या बैठकीत 1 मे 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोजना) सन 2025-26 चा माहे सप्टेंबर 2025 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल.तसेच पालकमंत्री सरनाईक यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येईल. स्थगिती उठणार का? राजकीय कुरघुडीमुळे गेल्या अडीच वर्षापासून विकास निधीसह अन्य निधीवर भाजप ने मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आदेश आणाला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी काही दिवसापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील, ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या सोबत आमची बैठक झाली असून, आमदार पाटील यांचे समाधान झाले आहे. त्यामुळे लवकरच स्थगिती उठेल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु विकास निधीवरील स्थगिती अद्याप उठली नसल्याचे सुत्रांने सांगितले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही सीएम कार्यालयाकडून विकास निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही पत्र व आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरास जिल्ह्यातील रस्त्यासह अन्य विकास कामे ठप्प आहेत. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत चालू वर्षातील विकास निधी संदर्भात आढावा घेणार असल्याचे समजते.
31 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक,संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 31 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक असून,या ठेवींचा परतावा मिळवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी एकूण 1 लक्ष 43 हजार 969 खातेदारांना आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक भारतीय स्टेट बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे,अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार,सलग 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात.तथापि,अशा ठेवींचे खातेदार आपल्या ठेवी परत मिळविण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क राखून असतात.ठेवींचा परतावा मिळवण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँक शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत केवायसी सादर करणे गरजेचे आहे. या विशेष मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे,ग्राहक भेटी आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार असून,खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक चिन्मय दास यांनी केले आहे.
Kolhapur : दोन दिवसात सव्वालाख भाविक अंबाबाई चरणी..!
भाविकांनी यात्रीनिवास तर वाहनांनी वाहनतळे हाऊसफुल्ल कोल्हापूर : अवघ्या आठच दिवसांवर दीपावली येऊन ठेपली आहे. सर्वत्र खरेदीचा माहोलही तयार झाला आहे. गेली दोन दिवस मिळालेल्या शासकीय सुट्टीचे औचित्य साधून हजारो करवीरकर दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. अनेक जण खरेदी करत करत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाताना दिसत होते. या भाविकांच्या गर्दीत [...]
Kolhapur : किरकोळ कारणातून शेजाऱ्यास बांबूने मारहाण ; शाहूपुरी पोलिसात नोंद
किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात कोल्हापूर : किरकोळ कारणातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्यास बांबूने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी दिलीप वामन कवडे (वय ४७ रा. सदर बाजार) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल साळोखे (रा. सदर बाजार) गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार (११ ऑक्टोबर) रोजी सकाळी सदर बाजार येथील [...]
Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये पार्सल डिलिव्हरी बॉयचा कंपनीला गंडा !
कोल्हापूरमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडून कंपनीची ₹2.06 लाखांची फसवणूक. कोल्हापूर : नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्सल मागवून त्यातील वस्तू आपल्याकडे ठेवून कंपनीला रिकामे बॉक्स रिटर्न करणाऱ्या ऑनलाईन कंपनीच्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.या दोघांनी मिळून २ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. [...]
Kolhapur : कोल्हापुरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद !
दुरुस्ती कामांमुळे कोल्हापूरकरांना पाण्याची टंचाई कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेचा चौथा पंप दुरुस्ती व नियमित देखभाल दुरुस्तीचे करण्यात येणार आहे. यामुळे सोमवारी व मंगळवारी शहरात पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीमध्ये साळोखेनगर ११०० मिमी मुख्य वितरण नलिकेवरील व्हॉल्व्ड बसविण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या [...]
अमेरिकेतील संकट बिकट होणार, वाढत्या कर्जाचा अर्थव्यवस्थेला धोका; अब्जाधीश गुंतवणूकदारांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनसह जगभरातील देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना त्यांचा देश अत्यंत अडचणीत आहे. अमेरिकेतील संकट बिकट होणार असून वाढत्या कर्जाचा अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील वाढत्या कर्जाच्या आकडेवारीचा हवाला देत अनेक विश्लेषक आणि प्रमुख गुंतवणूकदारांनी याबाबत दावा केला आहे. अब्जाधीश गुंतवणूकदार रे डालिओ यांनी आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल […]
ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या वादातून हाडोळती येथे तुंबळ हाणामारी, एकाची बोटे तुटली
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. या हाणामारीत एका व्यक्तीला बऱ्याच जणांनी अमानुषपणे मारहाण केली. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर यांनी तातडीने […]
हिंदुत्वासाठी त्यांच्या घरातला एक तरी कधी आत गेला आहे का? शिवसेना शहरप्रमुख किरण काळेंचा सवाल
अहिल्यानगर शहरातील हिंदू युवकांची वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी दिशाभूल सुरू आहे. त्यांच्या हातात लाठ्या, काठ्या दिल्या जात आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार देण्याऐवजी तरुणांना तुरुंगात जाण्यासाठी भडकाऊ वक्तव्य करत चिथावणी दिली जात आहे. आपल्यातले दोन-चार आत गेले तर काही फरक पडत नाही, असं म्हणणाऱ्यांच्या घरातला एक तरी कधी हिंदुत्वासाठी आत गेलाय का? असा […]
मुंबईतील वरळी भागामध्ये ‘नेहरू सायन्स सेंटर’ आहे. याजवळ उभारण्यात आलेल्या मेट्रो स्थानकाला फक्त ‘सायन्स सेंटर’ नाव दिल्याने राजकारण तापले आहे. काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. नेहरू या नावाची अॅलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते नाव वगळून या मेट्रो स्थानकाचे नाव केवळ सायन्स सेंटर असे ठेवले. भाजपने नेहरू नावाचा धसका घेतला आहे, अशी टीका काँग्रेस नेते […]
अलीकडेच राजापूर तालुक्यातील सागवे-कातळी किनाऱ्यावर घडलेले शिसे चोरी प्रकरण आणि परप्रांतीय बोटींवरील खलाशांना झालेला दारू पुरवठा या दोन गंभीर घटनांनी सागरी सुरक्षेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अल्पावधीतच प्रभावी कारवाई करून आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र प्रश्न असा आहे किनाऱ्यावर २४ तास गस्त घालणारे सागरी सुरक्षा रक्षक नेमके काय […]
मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा
मूग डाळ सर्व वयोगटासाठी पौष्टिक अन्न आहे. ही डाळ केवळ आपल्या शरीराचे पोषण करत नाही तर, हृदय, मन आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. आपल्याकडे पाककृतींमध्ये मूग डाळीचे विशेष स्थान आहे. ही डाळ केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील मानली जाते. खिचडी असो, डाळ-भात असो किंवा आरोग्यदायी नाश्ता असो, मूग डाळ अगदी योग्य पर्याय […]
सायबर गुन्हेगारीत बेंगळूर पहिल्या क्रमांकावर
देशातदररोजसुमारे7 हजारसायबरगुन्ह्यांच्यातक्रारीदाखल: 2021 पासूनसंख्येतलक्षणीयरित्यावाढ बेंगळूर : देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये बेंगळूर पहिल्या क्रमांकावर आहे. ही चिंतेची बाब आहे. देशात दररोज सुमारे 7,000 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. 2021 पासून ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यापैकी सुमारे 85 टक्के सायबर तक्रारी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या माहितीनुसार, [...]
बेंगळूर चलो कार्यक्रमात आमदार मुनिरत्न यांचा गोंधळ
बेंगळूर : उपमुख्यमंत्री तथा बेंगळूर शहरविकास मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेंगळूर चलो कार्यक्रमात भाजप आमदार मुनिरत्न यांनी गोंधळ घातल्याचा प्रसंग रविवारी घडला. शनिवारपासून लालबागमध्ये बेंगळूर चलो कार्यक्रमाला सुरुवात करून उपमुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकांकडून त्यांच्या समस्यांबद्दल निवेदन स्वीकारले होते. रविवारी सकाळी मत्तीकेरेच्या जे. पी. पार्कमध्ये नागरिकांकडून निवेदन स्वीकारत असताना स्थानिक आमदार मुनिरत्न यांनी आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रण [...]
मुख्यमंत्र्यांकडून आज मंत्र्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन
सर्वमंत्र्यांनाविश्वासातघेण्याचाप्रयत्न बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी सोमवारी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उत्सुकताही निर्माण झाली आहे. राज्यात कोणतेही राजकीय बदल बिहार विधानसभा निवडणुकीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस होतील, हे स्पष्ट झाले आहे. मंत्र्यांना विश्वासात घेण्यासह भविष्यात राजकीय [...]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही
आमदारबसनगौडापाटील: विशिष्टसमुदायालाखूशकरण्यासाठीप्रियांकखर्गेयांचेविधान बेंगळूर : जगातील कोणतीही शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू शकत नाही. संघाचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही, असे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी स्पष्ट केले. रविवारी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रियांका खर्गे यांनी संघावर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ही मूर्खपणाची बाब आहे. जवाहरलाल नेहरु यांच्यापासून आतापर्यंत सर्वांनी [...]
गुळाचा चहा करताना खराब होतो, मग घ्या ही खबरदारी
हिवाळा असो किंवा पावसाळा एक कप गरम चहा प्रत्येकाचा मूड ताजा करतो. पण साखरेऐवजी गुळ घातला तर त्याची चव आणि आरोग्य फायदे दुप्पट होतात. बदलत्या ऋतूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा पिणे हा एक उत्तम मार्ग आहे. गुळात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपल्या शरीराला आतून मजबूती मिळते. सर्दी आणि […]
गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको, रोहित पवार यांचा मिंध्यांना टोला
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सध्या मिंधे गटाचे रविंद्र धंगेकर हे सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना भाजपसोबत वाद न घालण्याची समज दिली आहे. कोणत्याही कारणावरून महायुतीत वाद नको असे त्यांनी धंगेकरांना सांगितले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मिंध्यांना टोला लगावला आहे. ”महायुतीत […]
कणकवली पंचायत समिती सदस्यपदांचे आरक्षण जाहीर; 16 पैकी 8 गण महिलांसाठी राखीव
निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसली कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आरक्षण सोडत काढण्यात आली. 16 गणांपैकी 8 गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या गणांपैकी जानवली गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट झाले असून नव्यांना संधी प्राप्त झाली आहे. कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद हे ना.मा.प्र. महिलेसाठी […]
बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी वरदान का मानले जाते, वाचा सविस्तर
निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळा सुरु होताच आपल्याला बाजारात बेलफळ दिसू लागते. आपल्या आरोग्यासाठी हे बेल फळ फार उपयुक्त मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात अनेक फळे आपल्याला बाजारामध्ये दिसतात. ही फळे आपली पचनसंस्था सुधारतात आणि शरीराला थंडावा देतात. असेच एक फळ म्हणजे बेलफळ. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी […]
रामाच्या जबानीत मंत्र्यांचा उल्लेख नव्हताच
पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी केले स्पष्ट : मंत्र्यांच्यानावाच्याउल्लेखाचातपासकरणार पणजी : रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा पोलिस कसून तपास करीत आहे. 2 ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकर यांची जबानी नोंद करण्यात आली आहे, त्यात कुणाही राजकारण्याच्या नावाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. मात्र नंतर गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाल्यावर काणकोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. [...]
मुख्यमंत्री खालच्या पातळीवर कधीच जाऊ शकत नाहीत!
त्यांच्यातमाणुसकीठासूनभरलीय: रमेशतवडकर पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा संशय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर व्यक्त करणे म्हणजे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न आहे. कारण रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात कोणत्याही मंत्र्यांचे नाव घेतले नव्हते. तरीही आता त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे नाव घेऊन केवळ जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम केले आहे, असे [...]
हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी : आप
पणजी : सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकरवर झालेल्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी आपने केली आहे. काणकोणकरने या प्रकरणात मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे. सरकारच्या नियंत्रणाखालील पोलीस याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे न्यायालयीन [...]
मंत्रीपद स्वीकारल्यापासून माझे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे मला पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळायचे आहे, असे विधान केंद्रीय मंत्री आणि केरळच्या त्रिशूर मतदारसंघातील खासदार सुरेश गोपी यांनी केले आहे. रविवारी कन्नूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश गोपी यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली.
बोरी पुलावरील वाहतूक कोंडीमुळे ‘त्या’ अर्जदारांची परीक्षा हुकली
मडगाव केंद्रावर चाळीस उमेदवार पोचले उशिरा परीक्षेला बसण्याची संधी पुन्हा द्यावी फोंडा : बोरी पुलाच्या दुऊस्तीकामामुळे रविवारी सकाळी झालेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पुलाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात लागलेल्या वाहनांच्या रांगा याचा फटका कर्मचारी भरती आयोग अंतर्गत मडगाव येथे लेखी परीक्षेला गेलेल्या फोंडा तालुक्यातील बऱ्याच उमेदवारांना बसला. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने विनवण्या कऊनही त्यांना आतमध्ये [...]
बाणस्तारी अपघातप्रकरणी आजपासून सुनावणी
आपचेअमितपालेकरयांच्यासहसातआरोपी पणजी : बाणस्तारी पुलावर 6 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी तब्बल 26 महिन्यानंतर आज सोमवारपासून फोंडा न्यायालयात सुनावणी सुऊ होत आहे. तिघा जणांच्या मृत्यूसाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी परेश सावर्डेकर, आपचे प्रमुख अमित पालेकर यांच्यासह सात आरोपींची नावे जाहीर केली आहेत. बाणस्तारी पुलावर झालेल्या या अपघातात चार कार आणि दोन मोटारसायकलींचा समावेश [...]
कारची धडक बसून सिक्युरिटी गार्डचा मृत्यू
पार्किंगमधूनवाहनबाहेरकाढतानाअपघात: कारचालविणाऱ्यामहिलेविरुद्धएफआयआर बेळगाव : अपार्टमेंटमधील पार्किंगमधून कार बाहेर काढताना सिक्युरिटी गार्डला धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी न्यू गुड्सशेड रोड परिसरात ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. नागेश शट्टुप्पा देवजी (वय 56) राहणार माळी गल्ली असे त्या दुर्दैवी गार्डचे नाव आहे. रविवार दि. 12 ऑक्टोबर [...]
बहीण-भावाचा चेकडॅममध्ये बुडून मृत्यू
रामदुर्गतालुक्यातीलउदपुडीयेथेअंघोळीसाठीगेलेअसतादुर्घटना वार्ताहर/रामदुर्ग अंघोळ करण्यासाठी चेकडॅममध्ये उतरलेल्या बहीण-भावाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे. उदपुडी येथील इरण्णा सिद्धप्पा सिरसंगी (वय 13) व गुरव्वा सिद्धप्पा सिरसंगी (वय 11) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, इरण्णा व गुरव्वा ही दोन्ही भावंडे गावातील हणमंतगौडा पाटील यांच्या जमिनीमध्ये [...]
राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका सेवेसाठी अयोग्य
817 पैकी377 सुस्थितीततर440 खराबअवस्थेत: राज्यसरकारनेलक्षदेण्याचीगरज बेळगाव : आपत्कालिन रुग्णसेवेत आरोग्य कवच योजनेंतर्गत असलेल्या 108 रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका निष्क्रिय असून, रुग्णसेवेसाठी त्या अयोग्य असल्याचे समजते. राज्यात आरोग्य कवच योजनेंतर्गत 817 रुग्णवाहिका आहेत. यापैकी केवळ 377 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. 440 रुग्णवाहिका या जीर्ण झाल्या असून, यापैकी 50 टक्के रुग्णवाहिका या अत्यंत [...]
सुळेभावी येथील चोरी प्रकरणी नात्यातील अल्पवयीनाला अटक
दुपारीघरातीलमाणसेझोपल्याचेपाहूनदागिन्यांचीचोरी बेळगाव : बाजार गल्ली, सुळेभावी येथे शुक्रवारी झालेल्या चोरी प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी छडा लावला आहे. एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याच्याजवळून 3 लाख 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी घरातील मंडळी घरात असतानाच तिजोरीतील 61 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी मारिहाळ [...]
कन्नड संघटनेच्या म्होरक्याची पुन्हा बेताल वक्तव्ये
मराठीबोलायचेअसेलतरमहाराष्ट्रातनिघूनजा: हाभाषिकभेदनाहीका? मराठीभाषिकांचासवाल बेळगाव : बेळगावमधील भाषिक वाद उकरून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनेच्या म्होरक्याने रविवारी पुन्हा एकदा बेताल वक्तव्ये केली. ‘मराठी बोलायचे असेल तर महाराष्ट्रात निघून जा, जाण्याचा खर्च आम्ही करू’, तसेच ‘काळा दिन पाळणाऱ्यांना सोडू नका’ अशी चिथावणीखोर वक्तव्ये करून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एरवी भाषिक वादातून मराठी भाषिकांवर कारवाई करणारा [...]
जनरेटरच्या घरघरीमुळे घरे बांधकामांनाही घरघर
ओसी-सीसीसक्तीमुळेवीजअन्पाण्याचीकमतरता, बांधकामव्यवसायावरहीसंक्रांत बेळगाव : वीज व पाणी कनेक्शनसाठी बांधकामांना सीसी व ओसी सक्तीचे करण्यात आले आहेत. परंतु, बेळगावमध्ये अनेक भूखंड बाँडवर खरेदी करण्यात आले असल्याने त्यांना वीज व पाणी कनेक्शन मिळत नसल्याने बांधकाम ठप्प आहे. यामुळे घरमालकांना जनरेटरच्या साहाय्याने हजारो रुपये खर्च करून बांधकाम सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यातून योग्य तोडगा काढून वीजमीटर [...]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिमाखदार पथसंचलन
शिस्त, एकतावदेशभक्तीचेदर्शन, शहरवासीयांकडूनफुलांचीउधळण बेळगाव : जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगाव शाखेतर्फे रविवारी शहरात शानदार असे पथसंचलन करण्यात आले. शिस्त, एकता आणि देशभक्तीचे दर्शन शहरवासीयांना घडविण्यात आले. पथसंचलनाच्या स्वागतासाठी रांगोळ्या तसेच स्वागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांची उधळण करत स्वयंसेवकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर्षीचे शताब्दी वर्ष असल्याने मोठ्या संख्येने [...]
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेडिमेड किल्ले-मावळे खरेदीसाठी दाखल
बेळगाव : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील मुले किल्ला बनवण्यासाठी धावपळ करत आहेत. दिवाळी जवळ आली की मुले किल्ले बनवण्यासाठी मग्न होतात. पण वाढत्या शहरीकरणामुळे तसेच किल्ला बनवण्यासाठी माती मिळवणे मुलांना अवघड होत आहे. बाजारपेठेत विविध आकाराचे किल्ले व मावळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दिवाळी हा सण मुलांसाठी एक पर्वणीच असते. तसेच हा सण सर्वांसाठी [...]
बेळगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांना प्राधान्य देऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भविष्यात हीच शिक्षणसंस्था दिव्याप्रमाणे उजळत राहील. सरकार आणि जनता यांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कोळवी (ता. गोकाक) येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. [...]
नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीत अरविंद पाटील यांचे वर्चस्व
सर्व13 हीजागांवरएकहातीविजय: नंदगडयेथेविजयोत्सवसाजरा,आजखानापुरातविजयोत्सव वार्ताहर/नंदगड येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या दि. 12 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 पैकी दहा जागांवर प्रत्येकी एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने दहा जण बिनविरोध निवडून आले होते. रविवारी तीन जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये तिन्हीही जागा अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेच जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नंदगड मार्केटिंग सोसायटीवर [...]
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ आणण्यात येणार आहेत. वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात सध्या २० वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी जागा आहे. या प्रकल्पातर्गत आतापर्यंत कोयना प्रकल्पात १ आणि चांदोली परिसरात २ असे ३ पट्टेरी वाघ ट्रॅप झाले आहेत. चौथा वाघ कोकणपट्ट्यात आढळून येतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात स्थित […]
मतदार यादीतील घोटाळे, ईव्हीएम-निवडणूक यंत्रणेतील भ्रष्टाचार, भाजपची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्र आवाज उठवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. याच संदर्भात मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असून हे अराजकीय शिष्टमंडळ असल्याचे ते म्हणाले.
मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतेचा बोजवारा
सीबीटीप्रशासनानेगांभीर्यानेलक्षदेण्याचीमागणी: स्वच्छताकर्मचाऱ्यांच्यानियुक्तीचीआवश्यकता बेळगाव : स्मार्टसिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. मात्र बसस्थानकात अस्वच्छता व मोकाट जनावरांचा वावर प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच भटक्मया कुत्र्यांचा वावरही नित्याचाच झाला असून, संपूर्ण बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, बसस्थानकातील कचरा डेपोही हाऊसफुल झाला आहे. यामुळे [...]
मुंबई गोवा महामार्गावरील वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष, 16 वर्षांत केवळ 20 टक्केच वृक्ष लागवड
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना 100 ते 200 वर्षांपूर्वीच्या वड आणि पिंपळ यासह जांभूळ, आकेशिया अशा सावली देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या 16 वर्षांत चौपदरीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले असताना वृक्ष लागवडीचा वेग 20 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील प्रवास हा भकास झाला […]
सीबीटी मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर कचरा
बेळगाव : शहरात स्मार्टसिटी अंतर्गत अनेक कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत असून, यादृष्टीने कार्य होत आहे. मात्र मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या (सीबीटी) रस्त्यावरील दुभाजकावर फळभाजांचा कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे अस्वच्छता पसरली असून दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत असून, यावर आळा घालणे गरजेचे आहे. कायमस्वरुपी तोडगा काढण्याची [...]
मालवाहतुकीतून नैर्त्रुत्य रेल्वेची रेकॉर्ड ब्रेक कमाई
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने मालवाहतुकीद्वारे उत्पन्नात कमालीची वाढ केली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 4.17 लाख टन साहित्याची वाहतूक केली असून यातून 427 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 36 टक्क्यांनी महसूल वाढल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रवासी वाहतुकीद्वारे 14 लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून 282 कोटी रुपये महसूल जमा [...]
महानगरपालिकेचेदुर्लक्ष: पथदीपखुलेकरण्याचीमागणी बेळगाव : शहरातील पथदीप झाडे तसेच वेलींनी वेढले गेले आहेत. त्यामुळे डेकोरेटिव्ह पथदीप केवळ नावापुरतेच राहिल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पथदीपांवर वेली वाढल्या आहेत. यामुळे काँग्रेस रोड येथील पथदीप खुले करावे, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे. काही वर्षांपूर्वी गोगटे सर्कल ते उद्यमबागपर्यंत डेकोरेटिव्ह पथदीप बसविले. यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली. परंतु [...]
Pennsylvania introduced a major financial relief program in 2025 that directly benefits both homeowners and renters. Through the Property Tax/Rent Rebate (PTRR) Program, eligible residents can now receive up to $1,000 in rebates. This program is designed to ease the financial pressure of housing costs, particularly for seniors, widows, widowers, and individuals with disabilities. The The post New $1,000 Property Tax Rebate Announced For Pennsylvania Homeonwers and Renters, Check PTRR Eligibility and Schedule appeared first on MPC News .
विविध संस्थांमध्ये ठेवीदारांची फसवणूक
आर्थिकसंकटओढवल्यानेपोलीसआयुक्तांनानिवेदन बेळगाव : शहरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी व गुंतवणूकदारांनी विविध संस्थांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्यांना परतावा मिळाला नसून, ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर सुजित मुळगुंद, राजेश टोपण्णावर, सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कन्नड साहित्य भवनमध्ये ठेवीदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पोलीस आयुक्त भूषण [...]
निवडणुकीआधी लालू प्रसाद यादव यांना धक्का, IRCTC घोटाळ्याप्रकरणी आरोप निश्चित
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी व बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यावर सोमवारी दिल्लीतील राउज एवेन्यू विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. या तिघांवरही फसवणूक, भ्रष्टाचार असे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आयआरसीटीसीच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा केल्याचे निदर्शनास […]
वडगाव-येळ्ळूर शिवारात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
बेळगाव : हातातोंडाशी आलेल्या भात पिकांवर करपा रोग पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वडगाव, अनगोळ, येळ्ळूर शिवारामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. वडगाव, अनगोळ, येळ्ळूर या शिवारात उत्तम प्रतीचे बासमती भाताचे पीक होते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच भात पिकाचे मोठे नुकसान झाले. [...]
माजी आमदार अरविंद पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड
खानापूर : संपूर्ण जिल्ह्याचे तसेच राज्यस्तरावरील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे चर्चेची ठरलेली बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खानापूर तालुक्यातून संचालक म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यांची रविवारी बिनविरोध निवड जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी बिनविरोध निवडीचा विजयोत्सव खानापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षापासून डीसीसी बँकेचे संचालक म्हणून तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी [...]
स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही; निराश झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खदखद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत स्वतःचेच घोडे पुढे दामटत होते. मात्र, त्यांना नोबल मिळाले नसल्याने ते निराश झाले आहेत. यातून त्यांनी जगाची चिंता वाढवणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लादला आहे. तसेच या नैराश्यातूनच त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही. मी स्वर्गात जाणार […]
बेकिनकेरे महालक्ष्मी देवीची यात्रा 3 ते 11 फेब्रुवारी 2026 मध्ये भरविण्याचा निर्णय
बैठकीतयात्रेच्यातयारीसंदर्भातचर्चा वार्ताहर /उचगाव बेकिनकेरे गावची जागृत ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 मध्ये भरविण्याचा निर्णय लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीने ठरविले असून, यासंदर्भात रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून लक्ष्मी देवीच्या मूर्तीला रंगकाम तसेच रथ बनविणे, मंडप डेकोरेशन, या [...]
वृत्तसंस्था/लंडन इंग्लंडमधील झालेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांच्या क्रिकेट महोत्सव टी-10 क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद भारत ब्रिस्टन संघाने पटकाविताना अंतिम सामन्यात पाकिस्तान ब्रिस्टलियन्सचा 15 धावानी पराभव केला. बेळगावच्या अमेय भातकांडेने अष्टपैलू कामगिरी करत ‘सामनावीर’ पुरस्कार पटकाविला. हिंटनचार्टर हाऊस क्रिकेट क्लबच्या मैदानावरती झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत ब्रिस्टल संघाने 10 षटकात 3 गडी बाद 105 धावा केल्या. त्यात [...]
मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराचे पाणी, उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात
मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराच्या काळ्याकुट्ट पाण्याचा पुरवठा होत असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या फेसाळलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दूषित पाण्यामुळे उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. पालिकेने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी उत्तनवासीयांनी केली आहे. भाईंदर पश्चिमेतील उत्तनच्या पाली बंदर […]
जव्हारमध्ये तीन महिन्यांपासून लसीकरण बंद; परिचारिका नसल्याने बालके, गर्भवतींचा जीव धोक्यात
जव्हार शहर नगर परिषद हद्दीतील १२ अंगणवाडी केंद्रांवर गर्भवती माता आणि बालकांना होणारे नियमित लसीकरण तसेच आरोग्य तपासणीचे काम परिचारिका नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आदिवासी बहुल भागातील महिलांचे व बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण बंद असल्याने गर्भवती माता आणि बालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर […]
खुल्या बुद्धिबळ स्पर्धा चषकाचे अनावरण
बेळगाव : सतीश जारकीहोळी खुल्या बुध्दिबळ स्पर्धा चषकाचे अनावरण खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते शनिवारी झाले. सतीश जारकीहोळी फैंडेशनतर्फे गोवावेसमधील महावीर भवनात ही स्पर्धा 25 व 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे गेल्या तीन वर्षांमध्ये या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत असल्याने यामध्ये नामवंत स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी [...]
पालेकर अकादमी, युनियन जिमखाना विजयी
संजीवनीचषकक्रिकेटस्पर्धा बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित संजीवनी चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांत जिमखाना संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 8 गड्यांनी तर प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने आनंद अकादमीचा 75 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मोहित कुंभार व संचिता नाईक यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत झालेल्या [...]
बेळगाव : हुबळी येथे झालेल्या सार्वजनीक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 58 किलो वजनी गटात कडोलीच्या प्रगती पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. प्रगतीला प्रशिक्षक सदानंद मलशेट्टी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे मुख्याधापकांचे प्रोत्साहन लाभत आहे.
दिवाळी चार दिवसांवर आली असताना पुणे बाजार समितीमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदान रखडवला गेल्याची चर्चा बाजार समितीत आहेत. काही ठराविक कर्मचारी निकषात बसत नसल्याने त्यांना निकषात बसवण्यासाठी सानुग्रह अनुदान नियमातच बदल करण्याच्या हालचाली बाजार समितीने सुरू केल्या आहेत. यामुळे यापूर्वी निकषात बसले नाहीत म्हणून सानुग्रह अनुदानापासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त केली […]
विषारी कफ सिरप प्रकरण –श्रीसन फार्माच्या 7 ठिकाणांवर ईडीने केली छापेमारी
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 20 मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर सिरप बनवणाऱ्या कंपनी श्रीसान फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता तामिळनाडूची श्रीसन फार्मा कंपनी ईडीच्या रडारवर आहे. सोमवारी ईडीने श्रीसन फार्माशी जोडलेल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. […]
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; शेअर बाजारावर संकट, जागतिक स्टॉक मार्केट कोसळले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री चीनवर 100 टक्के टॅरिफ लादत असल्याची घोषणा केली. चीननेही अमेरिकेला सडतोड उत्तर देत आम्ही हरणार नाही, लढणार असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोन देशातील व्यापार युद्ध चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींची परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी […]
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले
पूर्णा तालुक्यातील आडगाव (सुगाव) येथील एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घडली. मयत शेतकऱ्याचे नाव रामराव किशनराव पिडगे (५० वर्ष, रा. आडगाव (सुगाव) असे असून त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पूर्णा येथील बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यात मोठ्या […]
हजारो कोटींच्या संपत्तीचे मालक असणारे हिंदुस्थानी वंशाचे मलेशियन उद्योजक आणि पेट्रा ग्रुपचे अध्यक्ष विनोद शेखर यांच्यावर लंडनमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला. यात त्यांच्या छाती आणि मांडीला दुखापत झाली आहे. विनोद शेखर यांची पत्नी विंनी येप यांनी दुर्गावतार धारण करत हल्लेखोरांना भिडल्या, यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. विनोद […]
देश विदेश – 22 दिवस उलटले…झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत सिंगापूरकडून कोणतीही माहिती नाही
प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत 22 दिवस उलटूनही आसाम पोलिसांना अद्याप सिंगापूरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. हिंदुस्थान सरकारने सिंगापूरकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाची माहिती मागितली आहे, असे सीआयडीचे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी सांगितले. झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. सिंगापूरमधील सीआयडीने घटनेच्या वेळी नौकेवर उपस्थित असलेल्या 11 […]
देशात स्लो ट्रॅव्हेलचा ट्रेंड, तीन कोटी पर्यटकांचा परदेश दौरा; अबू धाबी-व्हिएतनामला पसंती
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम डेटा कम्पेंडियम अहवालानुसार, हिंदुस्थानात थांबून प्रवास करण्याचा ट्रेंड आला आहे. कमी वेळात अनेक ठिकाणी भेट देण्याऐवजी पर्यटक आता एका विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ घालवत आहेत, जेणेकरून त्यांना स्थानिक जीवन, संस्कृती आणि अनुभवांचा चांगला अनुभव घेता येईल. अहवालातून असे दिसून आले आहे की, 2024 मध्ये 3.09 कोटी हिंदुस्थानी परदेशात गेले आणि […]
राज्य सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेत २२ सप्टेंबर रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली. या विरोधात देवस्थानचे न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्तांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिल्याने खंडपीठाने या प्रकरणात ‘जैसे थे’ आदेश दिले. या आदेशामुळे गैरसमजुतीतून विश्वस्त आणि प्रशासकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली कार्यकारी समिती कारभार […]
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) रविवारी एअर इंडियाला सर्व बोईंग 787 विमानांमधील रॅम एअर टर्बाइन (आरएटी) च्या तपासणीचे पुन्हा निर्देश दिले आहेत. एअर इंडियाच्या दोन बोईंग 787 विमानांमधील अलीकडच्या तांत्रिक घटना आणि फेडरेशन ऑफ इंडियन पायलटने (एफआयपी) एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांना ग्राऊंडिंग करण्याची मागणी केल्यानंतर डीजीसीएने हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विमानांचे […]
सावधान…महामंदी येणार, सोने-चांदीच तारणार; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा
‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी अनेकदा सोने-चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात सोने-चांदी आणि बिटकॉइन हेच सर्वसामान्यांचा आणि अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असतील, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी जगात महामंदी येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. तसेच या काळात सोने-चांदीच आपल्याला तारणार असल्याने त्यांनी […]
आता यूपीआयने एका क्लिकवर शाळेची फी भरता येणार
शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांना एक पत्र जारी केले आहे. या पत्रात शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटी, सीबीएसई, केंद्रीय विद्यालय स्कूल, आणि एनव्हीएससारख्या शैक्षणिक संस्थांना फी भरण्यासाठी यूपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. फी भरण्यासाठी शाळांमध्ये रांगा लागणार नाही. तसेच शाळा प्रशासन […]
देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन दिल्ली राज्यात आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाचे सरासरी वेतन 1077 रुपये आहे, पण औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेली राज्ये यापेक्षा पुढे आहेत. दिल्लीचे सरासरी दैनंदिन वेतन हे 1346 रुपये इतके आहे. याच्या खालोखाल कर्नाटक (1296 रुपये) आणि महाराष्ट्र (1231 रुपये) असे दैनंदिनी वेतन आहे. दिल्ली ही गुरुग्राम आणि नोएडाच्या […]
‘मना’चे श्लोक नवीन नावासह 16 ऑक्टोबरला पुनर्प्रदर्शित
वादातसापडलेला ‘मना’चे श्लोक हा चित्रपट आता नवीन नावासह 16 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा मराठी चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला आणि पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून खेळ बंद पाडण्यात आले. […]
5 जीनंतर आता 6 जीचा धमाका! एआयआधारित तंत्रज्ञान, मोठी फाईल अवघ्या काही सेकंदांत डाऊनलोड होणार
हिंदुस्थानात आता 5 जीनंतर 6 जीचा धमाका होणार आहे. 6 जीची चाचणी 2028 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये एआयची भूमिका महत्त्वाची असेल. दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जी चाचणी दोन वर्षांनंतर सुरू होईल. एआय तंत्रज्ञान अधिक प्रगत असेल, पण या सेवेसाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. सध्या एआयचा जमाना आहे. अनेक […]
भाज्यांची आवक घटली…हिरवी मिरची, सिमला मिरची, आले, फ्लॉवर महागले
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती. आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, आले, फ्लॉवर, गाजरच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्वप्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि.१२) राज्याच्या […]
चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रॅफिक जाम, 80 लाख गाड्या एकाच जागी अडकल्या
नुकतीच चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रफिक जाम होण्याची घटना घडली. 36 लेनचा महामार्ग असूनही तब्बल 80 लाख गाड्या एकाच ठिकाणी अडकून पडल्या होत्या. विशेष म्हणजे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. त्या एक इंचही पुढे सरकत नव्हत्या. त्यातील अनेक वाहने तर 24 तास जागची हलू शकली नाहीत. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये […]
संशयातून प्रियकराकडून प्रेयसीचा चाकूने वार करून खून
दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवत असल्याच्या संशयातून प्रियकरानेच चाकू आणि लोखंडी पानाने वार करून प्रेयसीचा निघृण खून केला. ही घटना वाकड काळाखडक येथील अॅ बिअस लॉजमध्ये शनिवारी (दि. ११) दुपारी घडली. या प्रकारानंतर आरोपी प्रियकराने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. मेरी मल्लेश तेलगू (वय २६, रा. देहूरोड) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. दिलावर सिंग […]
महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक-एक योजना बंद करण्याचा किंवा थंड बस्त्यात टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. आनंदाचा शिधा योजना निधी अभावी बंद झाल्यानंतर आता फडणवीस सरकारने ‘माझी सुंदर शाळा’ योजना बंद केल्याचे वृत्त आहे. […]
दिवाळी फराळ- लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लाडू. लाडू करताना अनेकदा पाक नीट न झाल्याने, लाडवांची चव बिघडते. लाडू करताना पाक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पाकात थोडीही चूक झाली तर, मग लाडू करणे हे महाकठीण काम होते. लाडू करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. लाडू करताना पाक ओळखण्याची कला असते. ही […]
हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार आहेत. अभिजीत बॅनर्जी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूटमध्ये काम करतात. पत्नी एस्थर डुफ्लो यांच्यासह ते लवकरच झुरिच विद्यापीठात काम करण्यासाठी जाणार आहेत. बॅनर्जी दांपत्यांच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यामागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा हात असल्याची चर्चा आहे. झुरिच विद्यापीठात अर्थशास्त्रासाठी एक नवीन केंद्र स्थापन […]
अवजड वाहनांच्या रूपात फिरतोय काळ, दहा महिन्यात 117 अपघातांत 119 बळी
हिंजवडी आयटी पार्कमध्ये भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने औद्योगिक परिसरातील अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डम्पर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. चालू वर्षातील १ जानेवारी ते १० ऑक्टोबर या […]
बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
‘तो आणखी किती चिमुकल्यांचे जीव घेणार, एकतर बिबट्याचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्हाला मारून टाका,’ हा संताप व्यक्त केला आहे बिबटप्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर, दौंड यासह अन्य भागांतील स्थानिकांनी. शिवन्या शैलेश बेंबे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. आजोबा अरुण बोंबे यांना घरातून पाणी आणण्यासाठी ही चिमुरडी गेली होती. शिवन्या शैलेश बोंबे […]
दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा
दिवाळी म्हटल्यावर घरी गोडा धोडाचे नानाविध पदार्थ तयार होतात. परंतु हे पदार्थ आपण नीट न साठवल्यामुळे, पदार्थ लवकर खराब होण्याची भीती असते. गोड पदार्थ पाणी लागल्यामुळे अनेकदा पटकन खराब होतात. म्हणूनच गोड पदार्थ साठवणे ही सुद्धा एक कला आहे. गोड पदार्थ साठवताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, […]
…तर युक्रेनला लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्षेपणास्त्र देणार; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्का ऑगस्ट महिन्यात अलास्का येथे भेट झाली होती. या भेटीत रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अडीच-तीन वर्षापासून सुरू असलेल्या युद्धावर तोडगा निघेल अशी शक्यता होती. मात्र तसे काहीही होताना दिसत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट रशियाला धमकी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध […]
दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा
दिवाळी आणि मिठाई हे नातं खूप वर्षांपासून दृढ आहे. परंतु दिवाळीत मात्र अनेकदा आपण मिठाईतील भेसळीमुळे त्रस्त असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यासही धोका असतो. भेसळयुक्त मिठाई ही अनेकदा विषारी असते त्यामुळे आपल्या जीवालाही धोका असतो. चांगल्या आणि भेसळयुक्त मिठाईमध्ये फरक कसा करायचा हे ओळखणे खूप गरजेचे आहे. भेसळयुक्त मिठाई अनेकदा आपल्याला चांगल्या पॅकिंगमध्ये मिळते. […]