SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

Photo –गीता-गोविंदम! रश्मिका-विजयच्या लग्न सोहळ्याची क्षणचित्रे

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. रश्मिकाने इंस्टाग्रामवर विजयसोबतचे काही गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला “पती” म्हटले आहे. या फोटोंसोबत, तिने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.

सामना 26 Feb 2026 7:59 pm

लग्नानंतर रश्मिकाने विजयसाठी लिहीली एक खास भावपूर्ण पोस्ट..

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. रश्मिकाने इंस्टाग्रामवर विजयसोबतचे काही गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला “पती” म्हटले आहे. या फोटोंसोबत, तिने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. रश्मिका आणि विजय यांनी चाहत्यांना एकमेकांना पती-पत्नी […]

सामना 26 Feb 2026 7:39 pm

कंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या, आदित्य ठाकरे यांची टीका

महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तसेचकंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. आज विधीमंडळ परिसरात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की,निवडणुकांनंतर राज्यात सकारात्मक आणि […]

सामना 26 Feb 2026 7:32 pm

‘हेरा फेरी 3’चित्रपट अडकला कायद्याच्या कचाट्यात, दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले…

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या आगामी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. परंतु आता मात्र या चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबुराव या तिघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मात्र वाट पाहावी लागणार आहे. ‘हेरा फेरी ३’ चे शूटिंग या वर्षी सुरू होणार नाही. परिणामी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि […]

सामना 26 Feb 2026 6:59 pm

Ratnagiri News –हाय अल्टीट्युड बलुनचे भाट्ये किनारी लाँचींग; हवामानाच्या दृष्टीने फोटोग्राफी होणार

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आज भाट्ये किनारी हाय अल्टीट्युड बलून प्रक्षेपित करण्यात आला. अशा उपक्रमांमधून ज्ञान घेऊन, विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून […]

सामना 26 Feb 2026 6:47 pm

एपस्टिन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे यांनी गुरुवारी राजीनामा दिला. अमेरिकन लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एपस्टिनच्या फाइल्समुळे जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रेंडे २०१७ मध्ये WEF चे सीईओ बनले. त्यांच्यावर एपस्टाईनसोबत तीन बिझनेस डिनरमध्ये सहभागी झाल्याचा आणि ईमेल आणि मेसेजद्वारे त्यांच्याशी संवाद […]

सामना 26 Feb 2026 6:29 pm

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल यांच्याकडून घोषणा

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. “सामान्य कुटुंबातून आलेल्या अजित पवारांनी आपल्या कार्यातून राज्य आणि देशात वेगळी ओळख निर्माण केली. 2023 मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाले होते, हे सांगताना मला कोणतीही अडचण नाही,” असे म्हणत पटेल यांनी त्यांच्या […]

सामना 26 Feb 2026 6:19 pm

Latur Crime News –अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेलं; आरोपी एका तासांत पोलिसांच्या ताब्यात

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न तिघांनी केला. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी आपल्या तत्परतेने उधळून लावला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासांत साफळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला असून पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी […]

सामना 26 Feb 2026 6:04 pm

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका, मणिपूर हिंसाचार चौकशी समितीला मोबदला न दिल्याने प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आदेश

मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली आहे. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला माहिती देण्यात आली की, मणिपूर हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला २०२३ पासून कोणतेही पैसे मिळालेले नाहीत. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या […]

सामना 26 Feb 2026 6:01 pm

11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 1 मार्च ऐवजी 29 मार्चला होणार

धाराशिव (प्रतिनिधी)- 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 1 मार्च ऐवजी 29 मार्चला पळसप तालुका धाराशिव येथे होणार आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी दिली. मराठवाड्याचे सुपुत्र शिक्षण महर्षी वसंतराव काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात येते. परंतु 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे हे संमेलन 1 मार्च 2026 रोजी घेण्याचे ठरले होते. साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी संयोजन समितीने पूर्ण केलेली होती. परंतु आ.विक्रम काळे यांच्या काकीचे निधन झाल्याने हे साहित्य संमेलन 29 मार्च 2026 रोजी रविवारी घेण्यात येणार आहे. या बदलाची मराठवाड्यातील सर्व साहित्यिक, रसिक तसेच काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या मराठवाड्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 5:43 pm

भूम तालुक्यातील 20 शाळांतील 125 मुलींना सायकलचे वाटप

भूम (प्रतिनिधी)- दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत व सेवा सेवक फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम तालुक्यातील 125 मुलींना सायकलिंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी भूम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप शाळू अध्यक्ष अलंप्रभु देवस्थान कमिटी, रमेश मस्कर संचालक अलंप्रभु देवस्थान कमिटी, सूर्यकांत साळुंखे विस्ताराधिकारी पंचायत समिती भूम, प्रमुख उपस्थिती विनोद सुरवसे जिल्हा समन्वयक सेवा सहयोग फाउंडेशन तथा श्रीराम केसकर जिल्हा प्रतिनिधी सेवा सहयोग फाउंडेशन हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तोडकरी यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ तर आभार प्रदर्शन विजय माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मोरे, अशोक बनसोडे, बालाजी गुंजाळ, बालाजी गिलबिले, फैजान काझी यांचे विशेष सहकार्य लाभले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 5:43 pm

सावंतवाडीत उद्यापासून मालवणी करंडक महोत्सव

पालकमंत्री नितेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:26 pm

IND Vs ZIM –करो या मरोची लढत! संजू सॅमसन सलामीला उतरणार? संघात दोन बदल होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये T20 World Cup 2026 मधील सुपर 8 ची महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून झिम्बाब्वेचा फडशा पाडण्यासाठी संघ मैदानात उतरेल. परंतू झिम्बाब्वेने बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारल्यामुळे त्यांना नमवन टीम इंडियासाठी तितकं सोप नसणार, हे नक्की. त्यामुळे चेन्नईमध्ये चाहत्यांना एक रंगतदार […]

सामना 26 Feb 2026 5:21 pm

DGCA चा हवाई प्रवाशांना दिलासा, ४८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया कापला जाणार नाही

डीजीसीएने लाखो हवाई प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. ४८ तासांच्या आत तुमचे विमान तिकीट रद्द केले तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. प्रवाशांच्या हितासाठी अधिक पारदर्शक होण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन नियमांनुसार नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ही सुविधा प्रदान करत आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि तिकिटांच्या परतफेडीत विलंब झाल्यामुळे डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. […]

सामना 26 Feb 2026 5:20 pm

Solapur Traffic : सोलापुरात लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी मंडईतच बसावे ; आयुक्तांचा आदेश

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे मंडईत थेट विक्रेत्यांशी संवाद साधले सोलापूर – शहरातील वाहतुकीची कोंडी होतं असून आणि बाजारपेठेत शिरत आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज ‘अॅक्शन मोड’ मध्ये येत लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांमुळे [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:11 pm

Vashi Fraud Case |वाशीतील तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून ६ जणांची १५ लाखांची फसवणूक

वाशीतील तरुणांची सरकारी नोकरीचा फसवणूक प्रकरण समोर वाशी -सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व त्यांना विश्वासात घेऊन सहा तरुणांची पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा वाशी पोलिसांत नोंद झाला आहे. पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील रहिवासी रईसोदिन (नबाब) हमीद काझी, संदीप चंद्रकांत चांदीएकर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:01 pm

महिनाभर दररोज गुळाचा चहा प्यायल्यास आपल्याला कोणते फायदे मिळतील

चहाचा फक्त उल्लेख केला की, चहा प्रेमींचा चेहरा खुलतो. हिंदुस्थानात चहाप्रेमींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच सकाळपासून ते अगदी रात्री झोपायच्या आधीही चहा पिणारे इथे पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का, साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिणे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. गुळात अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक […]

सामना 26 Feb 2026 4:56 pm

Solapur News |सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापतींची निवड २० मार्च पूर्वी होणार

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव सोलापूर -जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर निवडून आलेले सदस्य अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहाबाहेरच आहेत. राज्य शासनाने २० मार्च पूर्वी जि. प. अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:42 pm

Maharashtra Budget Session 2026 –शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा धुळफेक!

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्षाच्या वर काळ लोटून गेला. पण अद्याप शेतकरी कर्जमाफी झालेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शेतकरी कर्जमाफीबाबत विधान केलं आहे. कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण ही योग्य वेळ कधी येणार? हा प्रश्न […]

सामना 26 Feb 2026 4:38 pm

Satara District Hospital |सातारा जिल्हा रुग्णालयात व्हीलचेअर सुविधेसाठी रुग्ण नातेवाईकांवर अवलंबून

काही मदतनीस कर्मचारी उपकाराची भाषा वापरत असल्याची तक्रार सातारा -सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधांसाठीही नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णांना विविध विभागांमध्ये नेण्यासाठी व्हीलचेअरची सोय उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात ती ढकलण्यासाठी कर्मचारी पुढे येत नसल्याची [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:33 pm

उमरगा-लोहारा मतदारसंघातील विविध प्रलंबित मागण्यांकडेही आमदार स्वामी यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपुरुषांचा होणारा वारंवार अपमान यावर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले. मुंबई येथे विधानसभेत गुरूवारी (दि.26) राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित मागण्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. 2024-25 च्या हंगामातील अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी करत कुंभमेळ्याला सरकार 25000 कोटी रुपये उपलब्ध करू शकते तर शेतकऱ्यांसाठी भरीव निधी का नाही? अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतामधील माती, बंधारे, शेतरस्ते, पूल, जनावरे वाहून गेली. यावर उपाययोजना कधी करणार? असा सवालही त्यांनी केला. बेरोजगारी रोखण्याकरिता सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या? आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील अनेक सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट बँक सहकारी बँका, चिटफंड योजनांमार्फत झालेल्या फसवणुकीबाबत सरकार कारवाई करणार का? अशी फसवणूक होऊ नये म्हणून काय उपाययोजना राबविणार? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील योजना राज्यातला विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली योजना होती काय? त्यांच्या अकरा महिन्याच्या कालावधीनंतर युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. युवा प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे अभिवचन सरकारने दिले होते, ते केव्हा पूर्ण करणार? ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन दहा हजारावरून सतरा हजार करून ते नियमितपणे द्यावे. महिला परिचारिकांना मानधनाचा प्रसुती रजेचा पूर्ण लाभ द्यावा, या मागण्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सप्टेंबर 1993 मध्ये लातूर-धाराशिव जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये अनेक गावे उध्वस्त झाली. त्या गावांचे पुनर्वसन होऊन जवळपास 32 वर्षे पूर्ण झाली. त्या गावांची नव्याने पुनर्बांधणी करावी. त्या गावांचा पुनर्वसन आराखडा मंजूर करून सुविधा द्याव्यात. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे. त्यांची नव्याने पुनर्बांधणी व्हावी. अनेक शाळा चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या असून त्या मोडकळीस आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी धोकादायक स्थितीत या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शालांत परीक्षेनंतर राज्य सरकारमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दोन वेळा घेतली जाते, त्या धर्तीवर केंद्र सरकारच्या वतीने मार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देखील दोन वेळा घेण्याची शिफारस राज्याने केंद्राकडे करावी. 2019-20 मध्ये कोविडमुळे ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाला आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सरकारच्या वतीने शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत करावे. राज्य सरकारने महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा प्राप्त मंदिरे आणि स्मारकांसाठी भरून निधीची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात असलेल्या अनेक हेमाडपंथी महादेव मंदिरे आणि बारवांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा. स्पर्धेच्या युगात गावामधला विद्यार्थी मानसिकतेने ग्रस्त आहे. यावर डॉ.हेमलता बागला समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण मानसिक कल्याण धोरण 2025 स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना स्पर्धा तर कधी पालकांच्या अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचे देखील समुपदेशन करण्यासाठी विशेष धोरण आखण्यात यावे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 20 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रकानुसार उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी केवळ पन्नास पसंतीक्रम नोंदविता येतात. ही अट अतिशय जाचक आहे. मात्र पसंतीक्रमांच्या मर्यादेमुळे सर्व जिल्ह्यात या उमेदवारांना संधी उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी उमेदवार कायमस्वरूपी स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो. याकरता मर्यादित पसंतीक्रमाची अट रद्द करुन अमर्याद पसंतीक्रम देण्याची मुभा असावी, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत लावून धरली.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:33 pm

शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष हीच यशाची गुरुकिल्ली- अमोल जगदाळे

भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलने आठवी वर्गाच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत संपादन केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला होता. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला महापुरुषांच्या चरित्राचे पुस्तक भेट देण्यात आले. पालकांच्या सहमतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा पालक आयशा शेख तर प्रमुख अतिथी म्हणून पालक अमोल जगदाळे यांची निवड करण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रमे प्रथम चंदन अमोल जगदाळे. द्वितीय अदिती अर्जुन मदने, तृतीय निरंजन महादेव माळी व अदिती अंगद गुंजाळ, वैष्णवी विनोद शेळके, साठे प्राजक्ता नितीन, कुणाल वैभव सानप, कल्याणी सुनील मोरे, आदर्श बाजीराव खबुत्रे, युवराज त्रिंबक कांबळे, कुणाल नामदेव कांबळे, नगीना रहीम सय्यद ,आदित्य शिवाजी चोरमले, इबादुर रहेमान सरफराज शेख, स्वराज शिवाजी गुंजाळ, साबळे प्रगती रेवण यांनी यश संपादन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील मुख्याध्यापक तात्या कांबळे, काकासाहेब पवार, दयानंद पाटील, उत्रेश्वर पायघन, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ, प्रतिभा मुकटे, सुनील जाधवर, नितीन पवार, कैलास शिंदे, हरीश साठे, सागर आकोस्कर अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:33 pm

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमिटेड आणि भारत प्रेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून खरेदी केले जाते. घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्याकडून प्रति लिटर 2 रुपये 70 पैसे सवलत देते. मात्र, संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलती मध्ये 30 पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचे वर्षाकाठी 10 ते 12 कोटीची बचत होऊ लागली. तथापि, 3 रुपयांची सवलत मिळत असली, तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी 4 रुपये पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल 5 रुपये 50 पैसे सवलत मिळत आहे. इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया हे यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगून त्याच धर्तीवर एसटीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एक कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणे, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत, असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले. तसेच डिझेल खरेदीच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एसटी महामंडळावर सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. वर्षाकाठी डिझेल खरेदीवर सुमारे 3,400 कोटी रुपये खर्च होतात. लवकरच 8 हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च अंदाजे 4,700 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ 1 रुपयांची घट झाली, तरी वर्षाकाठी सुमारे 50 ते 55 कोटी रुपयांची बचत होऊ शकते आणि हा महामंडळासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो. एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. निविदा प्रक्रिया नियमांनुसार आणि निष्पक्षपणे राबवली जाईल, आणि एसटीच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:32 pm

प्रिन्स फायर वर्क्स तेरखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण संपन्न

वाशी (प्रतिनिधी)- बुधवारी(दि.25) रोजी मौ. तेरखेडा येथील प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्याच्या परिसरात NDRF team Pune व SDRF team धुळे यांच्यडूनअनेक वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती चे व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष तहसीलदार प्रकाश म्हेत्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून NDRF टीम पुणे चे प्रमुख कमांडर राहुलकुमार रघुवंश व SDRF टीम धुळेचे प्रमुख PSI शंकर उकंडे व येरमाळा पोलीस स्टेशनचे झख भालेराव हे होते. यामध्ये अगदी रक्तप्रवाह कसा रोखून ठेवायचा इथपासून ते जखमी पेशंट ला कसे पकडायचे आणि आहे त्या परिस्थिती मध्ये स्टेचर कसे तयार करायचे हेही प्रात्यक्षिक द्वारे दाखवण्यात आले.. तसेच गॅस आग विझवणे, अटॅक आल्यावर CPR कसा दयावा याचेही प्रशिक्षण देण्यात आहे.तसेच स्वतः ला भाजल्यावर स्वतः जमिनीवर झोपून कशा प्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न करायचा हेही प्रात्यक्षिक दाखवले. या प्रशिक्षणास कारखाना संघटनेचे अध्यक्ष फरीद पठाण सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण NDRF टीम व SDRF टीम यांनीही खूप सोप्या व उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षण दिले.यावेळी तेरखेडा व आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे 200 ते 250 कारखानदार व मजूर कामगार उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी तेरखेडा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी पालके,गायकवाड, सावंत,मस्के, सुप्रिया भोसले आणि अनुराधा देशमुख आणि मंडळाधिकारी तेरखेडा ढवारे तसेच महसूल सेवक खोत, आलम सय्यद व बळवंत यांनी महत्वाचे कार्य पार पाडले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:31 pm

दाऊतपुर येथे जल जीवन मिशन योजनेचे लोकार्पण : ग्रामस्थांच्या सहभागातूनपाणी व्यवस्थापनाचा नवा आदर्श

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे दाऊदपूर येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत “जल अर्पण” दिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम भालके,धाराशिवचे गट विकास अधिकारी कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) जि.प. धाराशिव, सुनील काटकर, कार्यकारी अभियंता (म.जि.प.) हेमंत नागदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व उपअभियंते तसेच कनिष्ठ अभियंते, जिल्ह्यातील सर्व शाखांचे अभियंते व टाटा अभियंते तसेच दास्तपूर गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योजनेच्या पायाभूत विहिरीजवळ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करून करण्यात आली. त्यानंतर जि.प.प्रशालेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींसह मुख्य रस्त्यावरून अभंगाचे गीत गात प्रभातफेरी काढण्यात आली.पुढे ही फेरी जि.प.आरोग्य केंद्राच्या प्रांगणात पोहोचली व कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. योजनेची प्रस्तावना व उद्दिष्टे कनिष्ठ अभियंता श्रीमती.अश्विनी साळवे यांनी स्पष्ट केली.या योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पायाभूत विहीर,आयव्ही विहीर,पंपिंग मशिनरी,क्लोरीन यंत्रणा, 795 मीटर उर्ध्ववाहिनी नलिका,3130 मीटर वितरण नलिका,125 घरगुती नळजोडण्या तसेच योजनेची माहिती दर्शविणारा नामफलक उभारण्यात आला आहे.योजनेची सर्व उपांगे पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेऊन योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.तसेच गावातील पाणी व स्वच्छता समितीतील 5 महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत किटचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. कटकधोंड (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी योजनेबाबत मार्गदर्शन करताना योजना हस्तांतरणानंतर तिची देखभाल ही सर्व ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पाण्याचा योग्य वापर करून संसाधन जपण्याचे आवाहन त्यांनी केले.गट विकास अधिकारी यांनीही योजना पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असून पाण्याचा जपून वापर करावा,असे मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच उपअभियंता श्री.स्वप्नील सुंदे आणि संबंधित कनिष्ठ अभियंता यांचे योजना गुणवत्तापूर्ण पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी गावच्या सरपंचांनी योजनेची माहिती देत भविष्यात योजनेची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल,असे आश्वासन दिले.योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करून उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:31 pm

आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाघोली येथे आफुच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक मोरे पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वाघोली शिवारातील शेत गट नं 149/1 मध्ये इसम नामे अजित जोतीराम सुरवसे, वय 36 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यानी त्याचे शेतात आफुच्या झाडाची लागवड केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले. स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास अफुच्या झाडाची लागवडी बाबत चौकशी केली असता त्यांने सदर शेतात आफुच्या झाडाची लागवड केल्याचे सागिंतले. सदर शेतातील 85 किलो 175 ग्रॅम वजनाचा अफु एकुण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेउन आफुची लागवड करणारे अजित सुरवसे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हाके, पोलीस हावलदार भिमराव ढगे, पोलीस अमंलदार आरसेवाड, चालक पोलीस अमंलदार बनाळे, महिला पोलीस अंमलदार जाधव यांचे पथकाने केली आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:30 pm

महालंगी येथे ‌‘जल जीवन मिशन‌’ अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनेचा जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे महाळंगी येथे ‌‘जल जीवन मिशन‌’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेनिमित्त जल अर्पण दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.तुकाराम भालके,गट विकास अधिकारी श्री.कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) श्री.सुनील कटकधोंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व वाप्कोस उपअभियंते व शाखा अभियंते,जिल्ह्यातील सर्व संबंधित अभियंते,तसेच महालंगी गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांच्या हस्ते कलश पूजनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सहभागातून गावातील मुख्य रस्त्यावर प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ‌‘जल जीवन मिशन‌’चे महत्त्व,“हर घर नल से जल” या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला. शाळेच्या प्रांगणातील कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून योजनेची माहिती सादर करण्यात आली.कनिष्ठ अभियंता श्रीमती श्रीमती.पवार यांनी योजनेचे उद्दिष्ट व कामांचा आढावा मांडला.योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पाझर विहीर,विंधन विहीर,पंपिंग यंत्रणा, 2742 मीटर उचल नळिका,35 हजार लिटर क्षमतेची उंच जलकुंभ टाकी,2568 मीटर वितरण नलिका व 92 घरगुती नळजोडण्या पूर्ण करण्यात आल्या.तसेच योजनेची माहिती दर्शविणारे नामफलक व सर्व उपांगांची कामे पूर्ण करून चाचणी घेतल्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात आली.गावातील पाणी व स्वच्छता समितीतील पाच महिलांना पाणी गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एफटीके किटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी योजनेचे हस्तांतरण ग्रामस्थांकडे करताना, योजनेची देखभाल ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.सन 2053 सालापर्यंतचा लोकसंख्येचा विचार करून योजना राबविण्यात आली असून पाण्याची शाश्वतता टिकवण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच गट विकास अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल संबंधित अधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंचांनी योजनेची योग्य देखभाल व दुरुस्तीचे आश्वासन देत उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:30 pm

पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

भुम (प्रतिनिधी)- दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे वाहनावरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी फाटा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाशी येथील रहिवासी समाधान भगवान पुणेकर वय 45 वर्षे हे त्यांची पत्नी मनीषा समाधान पुणेकर यांचे सह त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 25 जे 6651 वरून धाराशिव येथून वाशी येथे येत असताना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी फाटा येथून वाशीकडे वळत असताना समोरून वाहने येत असल्यामुळे ते रोडच्या बाजूला थांबले होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील मनीषा समाधान पुणेकर वय 40 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाता वेळी मालवाहू ट्रकने मनीषा पुणेकर यांना जवळपास 50 फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. तर यावेळी समाधान पुणेकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. उपचारासाठी त्यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचेंवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:29 pm

राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची भाटशिरपुरा प्राथमिक शाळेला भेट

कळंब (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री ‌‘माझी शाळा सुंदर शाळा‌’ अभियानांतर्गत लातूर शिक्षण विभागातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन सखोल पाहणी केली. निकषानुसार शाळेच्या सर्व बाबींचे परीक्षण करण्यात आले. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख तथा मूल्यांकन समितीचे प्रमुख शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली समितीने शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची क्षमताधिष्ठित प्रगती यांचा आढावा घेतला. समितीत विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे (पुणे), जिल्हा परिषद अकोला येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, सदस्य सचिव (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला) वरिष्ठ अधिव्याख्याता अंकुश ससाने तसेच नगरपरिषद वाशिमचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर मिटकरी यांचा समावेश होता. यावेळी धाराशिवचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळामाते, शिक्षण विस्तार अधिकारी किशोरी जोशी, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते. समितीने प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली. शाळेतील अद्ययावत सुविधा, स्वच्छ व सुबक परिसर, शैक्षणिक साहित्य, डिजिटल साधने आणि उपक्रमशील वातावरण पाहून समितीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख शरद गोसावी म्हणाले, “भाटशिरपुरा शाळा गेल्या तीन वर्षांपासून विभागात प्रथम क्रमांक मिळवत आहे. ”शाळेच्या गुणवत्तावृद्धीसाठी श्रीकांत तांबारे, सचिन तामाने, अमोल बाभळे, नागेंद्र होसाळे, कालींदा मुंडे, लिंबराज सुरवसे, राजभाऊ शिंदे, श्रीमती राजकन्या तोडकर, परमेश्वर वाघमोडे, गणपत तपिसे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. इयत्ता सातवीतील समृद्धी गायकवाड व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा गोविंदपुर केंद्रप्रमुख बाळकृष्ण तांबारे यांनी केले. सूत्रसंचालन आनम शेख, संध्या जाधव व प्रणाली खाते यांनी केले. तर आभार समृद्धी गायकवाड हिने मानले. शेवटी सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:29 pm

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करा- डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीच्या टप्प्यात असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा तसेच कांदा व विविध फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतात काढून वाळत टाकलेला हरभरा पाण्यात भिजला आहे. त्यामुळे दाण्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता निर्माण झाली असून बाजारभावावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. ज्वारीच्या कणसात पाणी शिरल्याने ती काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर गव्हाच्या उभ्या पिकालाही फटका बसला आहे. कांद्याच्या काढणीदरम्यान शेतात पाणी साचल्याने उत्पादनाचे नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यात रबी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके जोपासली होती. मात्र अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तलाठी व कृषी विभागामार्फत पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित व योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत जाहीर करून आर्थिक आधार द्यावा, अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडेल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:28 pm

सावरगावात भक्ती-शक्तीचा संगम

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलश मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा रविवारी शकडो माता-भगिनीं, शिवभक्त, गावातील विविध तरुण मंडळांच्या उपस्थित वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात उत्साहात साजरा झाला. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलश आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दरम्यान पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, माजी जि.प. सदस्य राजकुमार पाटील. माजी सरपंच रामेश्वर तोडकरी आणि शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन शिवआरती करण्यात आली. तदनंतर कलश आणि पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या भक्ती आणि शक्तीच्या या सुवर्णक्षणाने सावरगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमली होती. या अभूतपूर्व सोहळ्यात मुलींनी पारंपारिक साडी. मराठमोळे दागिने. नथ आणि कपाळावर चंद्रकोर परिधान केले होते या वेशभूषेतून मुलींनी स्वराज्य जननी माँ जिजाऊ, महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई याचे रूप सादर केले. मुलांनी धर्मवीर बाल संभाजी महाराज याच्यासह मावळ्यांची वेशभूषा परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. या परंपरा-प्रेरणा-सामाजिक एकतेच्या लोकोत्सवात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन भक्तीपूर्ण वातावरणात हा भव्य अभूतपूर्व सोहळा पार पाडला. सायंकाळी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भव्य पालखी सोहळ्याची सांगता झाली. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पालखी आणि श्री. विठ्ठल रुक्मिणी कलश मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, श्री.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:27 pm

जिल्हा परिषद शाळेस सीईओ डॉ. मैनाक घोष यांची भेट

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेस धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ डॉ. घोष यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, स्वच्छता, तसेच शाळेची एकूण प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. शाळेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाचे कौतुक करत भविष्यातही शाळेने अधिक प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून सदिच्छा दिल्या. या भेटीदरम्यान धाराशिव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी पिकवने, तुळजापूर गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, काटी केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमंत कदम, उपसरपंच धर्मराज शिंदे, ग्रामविकास अधिकारी भिमराव झाडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:27 pm

भोसले हायस्कूलमध्ये 108 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इ.5 वी 6वी 7वी च्या नुकत्याच घेण्यात आलेल्या घटक चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तब्बल 108 विद्यार्थ्यांचा स्कुल बॅग, पॅड, पेन पुष्प प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोरे, इ.7वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, इ.5 वी 6वी पर्यवेक्षक बालाजी गोरे, कलाध्यापक शेषनाथ वाघ, विज्ञान शिक्षक संजय वाघमारे, भारत गवळी यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांना अध्यापन करणारे शिक्षक, शिक्षिका संगिता शिंदे, एस.डी. गायकवाड, बीरगड, पी.पी. मैत्रे, दिपक केंगार, भरत नाडे, अमोल कस्तुरे आदि शिक्षक, शिक्षिकावृंद यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील सीईओ आदित्य पाटील, एओ साहेबराव देशमुख यांनी अभिनंदन केले. बक्षीस वितरण समारंभ यशस्वीतेसाठी सहशिक्षक कृष्णा माळी , क्रीडाशिक्षक सुनिल मोहिते सेवक महादेव काळे, प्रशांत जाधव यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचलन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:26 pm

धाराशिव कळंबचे लोकप्रिय आमदार कैलास पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम दैवत धारासूर मर्दीनी देवी मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह याठिकाणी चादर चढवण्यात आली आणि अन्नपूर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान हे उपक्रम करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, विधासभाअध्यक्ष शौकत शेख, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, अक्षय जोगदंड, सिध्देश्वर कोळी, युवासेना जिल्हा संघटक राणा बनसोडे, संभाजी सलगर, राम साळुंखे, उपशहर प्रमुख बंडु आदरकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल वाघ, राजाभाऊ पवार, युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, अल्पसंख्याक शहर प्रमुख मुजीब काझी, सतीश लोंढे, अजिंक्य राजेनिंबाळकर, अमित लाटे, मनोज पडवळ, बाळासाहेब वरुडकर, शहाजी पवार, पंकज पडवळ, विनोद केजकर, महेंद्र शिंदे, कालिदास शेरकर, बापू काकडे, कैफ तांबोळी, पंकज स्वामी, महेश उपासे, भैरु शेरकर, किशोर पवार, पिंटु आंबेकर, संदिप शिंदे, वैभव उंबरे, प्रविण केसकर, राकेश कचरे, सुनिल गायकवाड, महेश पोतदार, चेतन वाठवडे, सत्यजित पडवळ, संकेत माळाळे, रोहित कदम, सिद्धार्थ माळाळे, साबेर सय्यद, कलीम कुरेशी, बड्डू शेख आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:26 pm

अजित पवार यांच्या अपघातातील उर्वरित पुरावेही गोळा करणार, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आज पुण्यात सीआयडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या व्याप्तीबाबत सविस्तर माहिती दिली. सदर अकस्मित मृत्यूच्या तपासात तीन प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामानंद म्हणाले, “रॅश आणि निग्लिजंट अ‍ॅक्ट झाला का, हा तपासाचा एक भाग आहे. त्याचबरोबर कोणते गुन्हेगारी कृत्य घडले […]

सामना 26 Feb 2026 4:20 pm

माता न तू वैरिणी, सततच्या रडण्याला कंटाळून दोन महिन्यांच्या बाळाला आईने चुलीत टाकले

हैदराबादमध्ये मातृत्वाला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. बाळाच्या सतत रडण्याने संतापलेल्या मातेने दोन महिन्यांच्या मुलाला चुलीत टाकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी निर्दयी मातेविरोधात गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ रडू नये म्हणून महिलेने त्याच्या तोंडात कापड कोंबले होते आणि डोळ्यांना पट्टी बांधली होती. मुलाचे वडील नाईट […]

सामना 26 Feb 2026 4:20 pm

शैलेश तांबे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे आठ तालुकास्तरीय पुरस्कारही जाहीर ओटवणे प्रतिनिधी “मराठी भाषा गौरव दिनाचे” औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स का पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:14 pm

मळगाव वाचन मंदिरात उद्या मराठी भाषा गौरव दिन

न्हावेली /वार्ताहर कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव मध्ये शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.हा कार्यक्रम संध्याकाळी ३:३०वाजता आयोजित केला आहे ,या कार्यक्रमात काही वाचक, बालवाचक आपले सादरीकरण करणार आहेत.प्रमुख अतिथी मा. सौ.स्मिता नाईक(माजी मुख्याध्यापिका ,लेखिका)यांच्या उपस्थितीत आणि [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:07 pm

Sangli News |खाते तुमचे, सह्या दुसऱ्याच्या आणि पैसे तिसऱ्याचेच! पतसंस्थेचा अजब कारभार

सांगली मिरज तालुक्यातील समडोळी कर्मवीर बिगर शेती सहकारी पत संस्थेत आर्थिक घोटाळा सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी गावातील कर्मवीर बिगर शेती सहकारी पत संस्थामध्ये एक गंभीर आर्थिक घोटाळा समोर आला आहे. काही नागरिकांच्या खोट्या कागदपत्रांद्वारे आणि सह्या वापरून कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर लाखोंची कर्जे उचलली, पण त्यांचा परतावा [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:58 pm

पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथचा आजपासून शिमगोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी तालुक्यातील पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान,पाली – पाथरटचा वार्षिक शिमगोत्सव शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केले जाते. यामध्ये पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फेडणे यांसारखे धार्मिक कार्यक्रम आणि नमन आयोजित करण्यात आले आहे. पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानची शिमगोत्सव […]

सामना 26 Feb 2026 3:56 pm

Ratnagiri News –कोकणात काजू बोंडे प्रक्रिया उद्योगाअभावी वाया

रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योग कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलढाल करीत आहे. मात्र काजूवर प्रक्रिया होत असली तरी बोंडे प्रक्रियेअभावी वाया जात आहे. दरवर्षी प्रक्रिया उद्योगाच्या थापा मारल्या जातात. पण प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणाऱ्यांना मात्र सहकार्य मिळत नाही.या हंगामात काजू बी ला 150 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे, काजू प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आहे. […]

सामना 26 Feb 2026 3:54 pm

Sangli News |सांगली जिल्हा परिषद शाळा बिलांवरील लाचलुचपत; कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

सांगली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघड सांगली – जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती बिलांच्या मंजुरीसाठी ८८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग पंचायत समिती जत येथील कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) संजय भगवान सुतार (वय [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:52 pm

Kupwad Crime News |कुपवाडतील दत्तनगर परिसरात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चौघांनी तिघांवर प्राणघातक हल्ला कुपवाड – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून बामणोली हद्दीतील दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री चौघांनी मिळून तिघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:47 pm

धक्कादायक! शाळेच्या मैदानात खेळताना 9 वर्षीय विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत असून, राजस्थानमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील गोटन गावातील कस्बे येथे एका खासगी शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा खेळताना अचानक मृत्यू झाला. दिव्या राजेंद्र असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या […]

सामना 26 Feb 2026 3:41 pm

सौदी अरेबियाने 40 देशांतील चिकन अंड्यांवर का घातली बंदी, नेमकं काय घडलं?

सौदी अरेबियाने हिंदुस्थानसह 40 देशांमधून चिकन आणि अंडी यासह पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली. सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटी (SFDA) ने याबाबत एक आदेश जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि देशाच्या बाजारपेठेत अन्न सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळते. अहवालानुसार, जागतिक आरोग्य परिस्थितीनुसार ही यादी वेळोवेळी बदलली जाऊ शकते, […]

सामना 26 Feb 2026 3:40 pm

Satara News |सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि हरित उपक्रमामुळे साताऱ्याची वेगळी ओळख सातारा – पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सातारा नगरपालिकेने राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात पुणे विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पालिकेला तब्बल ६ कोटी [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:35 pm

तळाशिल बंधाऱ्याचे श्रेय हे गाव वाचवणाऱ्या राणे कुटूंबालाच

ग्रामस्थांनी मानले आभार ; उर्वरित मंजूर बंधाऱ्याचे कामही लवकर चालू करण्याची मागणी आचरा : प्रतिनिधी फोटो : परेश सावंत चारी बाजूंनी पाण्याने वेढलेल्या तळाशिल भागाला संकटमोचन खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे हेच ठरत आले आहेत. सध्या झालेला संरक्षक बंधारा, तळाशिल भागात आलेला रस्ता ही राणेंचीच कृपा असून लवकरच उर्वरित संरक्षक बंधारा [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:21 pm

Satara News : सातारा जिल्हा परिषद आवारातील कारंज्यातून पाण्याचा अपव्यय; योग्य नियोजनाची मागणी

‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतच पाण्याचा अपव्यय उघड सातारा– ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना सातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. कारंज्यातील पाणी सतत वाहून जात असल्याने पाणी संवर्धनाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:16 pm

Satara Crime News |सातारा मेढा रस्त्यावर गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकास अटक

सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाक्यावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला सातारा– सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:09 pm

केरळ उच्च न्यायालयाकडून ‘द केरळ स्टोरी २’च्या प्रदर्शनाला स्थगिती

केरळ स्टोरी २ चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने वादग्रस्त चित्रपट ‘केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनावर १५ दिवसांची अंतरिम स्थगिती जारी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राला आव्हान देणारी […]

सामना 26 Feb 2026 3:08 pm

व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रोहित पवार यांची मागणी

दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अहवालाचा आधार घेत आम्ही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी पदाधिकारी आणि समर्थकांसह ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, काहींनी “मुंबईत एफआयआर दाखल करता येणार नाही” अशी हरकत घेतल्याने तक्रार स्वीकारली […]

सामना 26 Feb 2026 3:07 pm

हर्षद मेहताला आदर्श मानत आयडीएफसी फर्स्ट बँकेत झाला ५९० कोटी रुपयांचा घोटाळा, चार आरोपींना अटक

चंदिगड येथील आयडीएफसी फर्स्ट बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आता संबंधितांना अटक करण्यात आली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेतील सरकारी खात्यांमध्ये ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार आरोपींना अटक केली. सरकारी खात्यांशी संबंधित ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, ऋषभ ऋषी, अभय, स्वाती आणि अभिषेक यांना अटक केली आहे. हे सर्व पैसे सरकारी खात्यात परत […]

सामना 26 Feb 2026 2:53 pm

Bombay High Court Nagpur Bench |आता निवडणुका नाहीत, सरपंचच प्रशासक; मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा निर्णय;

विद्यमान सरपंचांकडे प्रशासकीय सूत्रे ( विजय जाधव – गोडोली ) नागपूर –महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तात्काळ न घेता प्रशासक नियुक्ती करण्यास मान्यता देणारा महत्त्वपूर्ण आदेश [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:50 pm

Pratapgad News|आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

प्रतापगड जवळील घाटात संशयास्पद मृत्यू प्रतापगड :आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:42 pm

महापौरांच्या हातात 1 कोटीचं घड्याळ? व्हायरल फोटोने चर्चेला उधाण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत रितू तावडे यांच्या हातातल्या घडाळ्यावर फोकस करण्यात आले आहे. त्या घडाळ्याची किंमत तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. रितू तावडे यांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स कंपनीचे आहे. यल्लो गोल्ड रोलेक्स डेटोन लाईट डायल असे त्या घडाळ्याचे नाव […]

सामना 26 Feb 2026 2:26 pm

​Ajra Taluka |आजरा हे ‘कोकणाचे प्रवेशद्वार’राहणार का? रस्ता रुंदीकरणात १३ वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात; वृक्षप्रेमींचा लढा तीव्र

आजरा तालुक्यात रस्ता रुंदीकरणामुळे १३ पुरातन वटवृक्ष धोक्यात आजरा – निसर्गसंपन्न आजरा तालुक्याची ओळख ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ अशी आहे, मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही ओळखच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हलकर्णी, वाटंगी, चितळे धनगरवाडा या रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाटंगी फाटा ते महागाव दरम्यान असलेले १३ [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:25 pm

Gokul Milk Union Election |‘गोकुळ’निवडणुकीची प्रक्रिया सुरू

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीची अधिकृत घोषणा कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगात आणल्या आहेत. ८ मे २०२६ पर्यंत सभासद म्हणून पात्र असलेल्या [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:17 pm

Kolhapur News |कोल्हापूर येथे संरक्षित ‘पाकड’ माशाची विक्री ; वन विभागाची धडक कारवाई

फुलेवाडीतील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा; दुर्मीळ मासा जप्त कोल्हापूर -करवीर वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, वनक्षेत्रपाल, करवीर यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर-फुलेवाडी रिंग रोडवरील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी” येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान, या ठिकाणी डा संरक्षित मासा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. या [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:01 pm

Kolhapur News |कोल्हापूर ए. एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील फरार संचालक सांगलीत अटक

संतोष कुंभार एलसीबीच्या जाळ्यात कोल्हापूर -ए. एस. ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स एलएलपीची उपकंपनी असलेल्या ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड प्रकरणातील फरार संचालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मंगळवार, दि. २४ रोजी सांगलीतून अटक केली. संतोष नंदकुमार कुंभार (वय ४१, रा. [...]

तरुण भारत 26 Feb 2026 1:50 pm

Kolhapur News |वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ६ बकरी ठार ; नागाव ता. हातकणंगले येथील घटना..!

नागाव येथे वन्यप्राण्यांचा हल्ला; सहा कोकरे ठार पुलाची शिरोली -वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव ता. हातकणंगले येथील अनिल पुजारी या मेंढपाळाची ६ बकरी ठार. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हि घटना मंगळवारी घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागांव येथील मेंढपाळ अनिल पुजारी, [...]

तरुण भारत 26 Feb 2026 1:38 pm

केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येणार नाही, हत्येच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता

केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत फौजदारी गुन्ह्यांतीलदोषत्वासंबंधी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हत्येच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या दोघांचीउच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने 2018 मध्ये दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाचा हा आदेश न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने रद्द […]

सामना 26 Feb 2026 1:31 pm

पनवेल-कर्जत लोकल सेवा वर्षाखेरीपर्यंत सुरू होणार, नवीन उपनगरी रेल्वे मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार आहे. वर्षाखेरीपर्यंत पनवेल ते कर्जत स्थानकांदरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग खुला होऊन या मार्गावर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये मार्ग सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात […]

सामना 26 Feb 2026 1:11 pm

BMC Budget 2026 –राज्य सरकारने शिक्षण विभागाचे सात हजार कोटी लवकरात लवकर द्यावे, अंकित प्रभू यांची मागणी

मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डल्ला मारण्याचा भाजपचा डाव बुधवारी अर्थसंकल्पातून उघडकीस आला. त्यावरुन शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधारी भाजपला घेरले असतानाच आता पालिका शिक्षण विभागाच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला आहे. महापालिका शिक्षण विभागाचे सात हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत. सरकारने ही कोट्यवधीची थकबाकी पालिका शिक्षण विभागाला लवकरात लवकर द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक […]

सामना 26 Feb 2026 12:38 pm

मेधा सोमय्या प्रकरणात संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश महेश जाधव यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. नेमके प्रकरण काय? मीरा-भाईंदर पालिकेतील शौचालये बांधकामातील 3 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळय़ाचे वृत्त दै. ‘सामना’ने एप्रिल 2022 मध्ये […]

सामना 26 Feb 2026 12:36 pm

अजित पवारांच्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सर्वात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे –संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची पोलीस अधिकाऱयांसोबत बाचाबाची झाली. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना राज्य सरकार, VSR कंपनी, DGCA वर जोरदार टीका केली. ”अजित पवारांच्या […]

सामना 26 Feb 2026 12:33 pm

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकले विवाहबंधनात, उदयपूरमध्ये रंगला शाही सोहळा

साऊथ सिनेसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर गुरुवारी विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपूरमधील निसर्गरम्य अरावली पर्वत रांगांमध्ये असलेल्या ‘आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोस’मध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडला. सकाळी हिंदू परंपरेनुसार आणि वैदिक मंत्रोच्चारात या दोघांनी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला. यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत विजयने रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्र […]

सामना 26 Feb 2026 12:32 pm

Chhattisgarh Encounter –विजापूरमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून दोन माओवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत सुरक्षा दलांनी दोन माओवाद्यांचा खात्मा केला. परिसरात सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू आहे. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी सांगितले. इंद्रावती नदीच्या काठावरील घनदाट जंगलात […]

सामना 26 Feb 2026 12:28 pm

संतोष देशमुख हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयाने दणका दिलेला आहे. या हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

सामना 26 Feb 2026 12:10 pm

मोगरा चांगला बहरावा म्हणून…हे करून पहा

मोगऱ्याचे रोप बहरावे म्हणून काही उपाय करता येतील. मातीतली बुरशी कमी करण्यासाठी आपण त्यात चमचाभर हळद घालू शकता. केळीची साले उन्हात सुकवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करा. ती खत म्हणून कुंडीत घाला. मोगऱ्याला फुले येण्यासाठी त्याला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यासाठी रोपाला किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवा. […]

सामना 26 Feb 2026 10:30 am

सोने तीन दिवसांत पाच हजारांनी महागले

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात 582 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोने प्रति तोळा 1 लाख 59 हजार 823 रुपये झाले असून सोने अवघ्या तीन दिवसांत पाच हजार रुपयांनी महाग झाले आहे, तर सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातसुद्धा भरमसाट वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज 6 हजार 455 रुपयांनी वाढ […]

सामना 26 Feb 2026 10:29 am

नालासोपाऱ्यातील नाळा तलावाला जलपर्णीचा वेढा, दूषित पाण्यामुळे मासे मृत

नालासोपारा प्रभाग 13 मधील नाळा येथील तलावाला धार्मिक महत्त्व असून येथील गणेश घाटावर पूर्वापार गणेश विसर्जन केले जाते. मात्र सध्या तलाव प्रदूषित झाला आहे. तलावातील पाण्याला जलपर्णीच्या विळख्यात पडला आहे. संपूर्ण पाणी दूषित झाले असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत. तलावाच्या काठी नागरी वस्ती असल्यामुळे दूषित पाण्याची व मेलेल्या मासळीची सर्वत्र दुर्गंध पसरल्याने नागरिकांच्या […]

सामना 26 Feb 2026 10:27 am

लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत काडीमोड, घटस्फोट घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल!

दोन कुटुंबे एकत्र येत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणे म्हणजे आयुष्यभराचे सोबती असल्याचे मानले जात होते, परंतु आता अनेक जोडपी लग्नाच्या अवघ्या काही वर्षांमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. घटस्फोटाचा दर हा अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. घटस्फोट मागणाऱया महिला या 25 ते 34 वयोगटातील असून 40 टक्के प्रकरणांमध्ये लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत […]

सामना 26 Feb 2026 10:25 am

उपसंचालकाकडे पैशांची खाण, घरातून चार कोटींची रोकड जप्त

ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये अँटी करप्शनने केलेल्या कारवाईत एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात पैशांचे घबाड सापडले आहे. कटक विभागातील खाणीचे उपसंचालक पदावर असलेले देबब्रत मोहंती यांना एका परवानाधारक कोळसा वेंडरकडून 30 हजारांची लाच घेताना पकडले. या कारवाईनंतर त्यांच्या भुवनेश्वर येथील घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या घरातून तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड सापडली. लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकाच वेळी […]

सामना 26 Feb 2026 10:23 am

17 शाळांना जोडणारा रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’, शहापूर –वाशाळा –कसारा रस्ता खड्ड्यात गेला

माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणाऱ्या वाशाळा ते कसारा रस्त्याची अधिकारी, ठेकेदाराच्या मिलीभगतमुळे चाळण झाली आहे. परिसरातील 17 शाळांना जोडणाऱ्या नागमोडी व चढ-उतार असलेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. शहापूर तालुक्यातील हा रस्ता तब्बल 17 शाळांना जोडतो. नादुरुस्त रस्त्यामुळे विद्यार्थी व […]

सामना 26 Feb 2026 10:20 am

न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा धडा सरन्यायाधीशांना खटकला, न्यायालयाला बदनाम करण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या नव्या पुस्तकात ‘न्यायपालिकेत भ्रष्टाचार’ हा धडा समाविष्ट केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एनसीईआरटीचे कान उपटले. न्यायपालिकेची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही. कायदा आपले काम करेल. झालेल्या या प्रकरणात न्यायालय स्वतः कारवाई करण्याचा […]

सामना 26 Feb 2026 10:19 am

लोकलमध्ये केस ओढत महिलांची तरुणीला मारहाण; जबरदस्तीने खाली ढकलले

लोकलमध्ये एका तरुणीला काही महिला प्रवाशांनी केस ओढत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला असून व्हिडीओमध्ये संबंधित महिलांनी तरुणीचे केस ओढत तिला मारहाण केली तसेच जबरदस्तीने डब्यातून खाली ढकलून दिले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न […]

सामना 26 Feb 2026 10:18 am

परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अंबरनाथमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला आहे. या कारवाईत कॉल सेंटरच्या मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रुद्र टेक आयटी सर्व्हिस असे या बनावट कॉल सेंटरचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल […]

सामना 26 Feb 2026 10:18 am

30 हजार पगार अन् 40 लाखांचे कर्ज, जेन्झी पिढी अडकतेय कर्जाच्या कचाट्यात!

आजच्या काळात युवा पिढी म्हणजे जेन्झी कमाई तर चांगली करतेय, पण त्याचबरोबर त्यांचा खर्चही वेगाने वाढत चाललाय. सिबील आणि युनिफाईड फिनटेक फोरम यांच्या एका रिपोर्टमधून याबाबतची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या रिपोर्टनुसार जर कोणी जेन्झी 30 हजार रुपये महिना पगार घेत असेल तर त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज आहे. बंगळुरू, दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठय़ा शहरांत […]

सामना 26 Feb 2026 10:14 am

बेकायदा ‘युसूफ हाईट्स’ची गोपनीय फाईल केडीएमसीतून गायब

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील अभिलेखा कक्षातून कल्याणमधील बेकायदा ‘युसूफ हाईट्स’ इमारतीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची गोपनीय फाईल चोरीला गेली आहे. या फाईलला पाय कसे काय फुटले? ही फाईल कुणी उडवली याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. या धक्कादायक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलीस तक्रारीनंतर फॉरेन्सिक पथकाकडून या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. कल्याणमधील बेकायदा ‘युसूफ हाईट्स’च्या फाईलमध्ये […]

सामना 26 Feb 2026 10:07 am

तारापूरच्या ‘विनायक केमेक्स’मध्ये वायुगळती, सुदैवाने जीवितहानी टळली

औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये आज पुन्हा एकदा वायू गळती झाली. ‘विनायक केमेक्स’ या कंपनीमधून दुपारी दीडच्या सुमारास क्लोरीनची वायुगळती झाली असून उग्र वासामुळे कामगार अक्षरशः घुसमटले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपत्कालीन यंत्रणेने धाव घेऊन दीड तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान क्लोरीनच्या गळतीमुळे एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तारापूर एमआयडीसीतील […]

सामना 26 Feb 2026 10:06 am

विना प्रिस्क्रिप्शन गर्भधारणा इंजेक्शन्सची विक्री; विठ्ठलवाडीच्या मेडिकलवर छापा, एकाला अटक

बेकायदा सरोगसी कांडात आज कल्याणच्या विठ्ठलवाडीतून एका मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. दलाल महिलांच्या सांगण्यावरून मेडिकल चालक सुमित सोनकांबळे हा खुलेआम गर्भधारणेची इंजेक्शन्स देत होता. त्यामुळे अंडाशय तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या पाचवर गेली असून सुमितप्रमाणेच डॉक्टरांच्या संमतीशिवाय औषधे देणारे अन्य मेडिकल चालकही लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. दरम्यान अटक केलेल्या महिलांच्या खात्यावर महिन्याला लाखो […]

सामना 26 Feb 2026 10:04 am

आयडीएफसी बँक घोटाळा; पाच अटकेत

हरियाणातील आयडीएफसी बँकेतील 590 कोटींच्या घोटाळा प्रकरणी अँटी करप्शन ब्यूरोने माजी मॅनेजर रिभव ऋषिसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा अँटी करप्शन ब्यूरोने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिभव ऋषि, अभिषेक सिंगला, अभय व स्वाती यांचा समावेश आहे. तर अन्य एका आरोपीची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे.

सामना 26 Feb 2026 10:00 am

असं झालं तर…गृहकर्ज पूर्णपणे संपले…

गृहकर्ज (होम लोन) संपले की, आपण सुटकेचा निःश्वास टाकतो, पण लक्षात घ्या की गृहकर्ज फेडल्यानंतर काही गोष्टी करणे खूप आवश्यक असते. त्या टाळू नका. मूळ कागदपत्रे परत घ्या ः बँकेकडे ठेवलेली घराची मूळ कागदपत्रे (उदा. सेल डीड, टायटल डीड, पॉवर ऑफ अटर्नी) परत घ्या आणि ती व्यवस्थित तपासा. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घ्या ः बँक […]

सामना 26 Feb 2026 10:00 am

शुभवार्ता…रेल्वेत 11 हजार जागा भरणार!

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱया तरुणांसाठी शुभवार्ता आहे. रेल्वेने ‘असिस्टंट लोको पायलट’ (एएलपी)च्या 11,127 रिक्त पदांच्या मेगाभरतीला हिरवा कंदील दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने या भर्ती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली असून, लवकरच रेल्वे भरती बोर्डाकडून सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरती मोहिमेंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा ‘दक्षिण […]

सामना 26 Feb 2026 9:57 am

देशविदेश –उद्या, परवा उत्तर भारतात पावसाचा अंदाज

उत्तर भारतातील डोंगराळ भागात शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 27 आणि 28 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागात गेल्या तीन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. पिथौरागड जिह्यातील पंचाचुली क्षेत्रासह अनेक ठिकाणी हलक्या पद्धतीची बर्फवृष्टी झाली आहे. केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये वेगवान वाऱयासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदमान – निकोबारमध्ये मध्यम […]

सामना 26 Feb 2026 9:32 am

लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही, पुश टू टॉक बटण

मुंबई लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुश टू टॉक बटण उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर पोलीस अंमलदार, एमएसएफ व होमगार्ड यांची प्लॅटफॉर्मवर ड्युटी नेमली आहे. महिलांच्या डब्याजवळ, प्लॅटफॉर्मवर व स्टेशन परिसरात आवश्यकतेनुसार बंदोबस्त ठेवण्यात येतो तसेच रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत महिलांच्या प्रत्येक डब्यात गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी तैनात ठेवण्यात […]

सामना 26 Feb 2026 8:53 am

ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांची 170 कोटींची बिले थकली, केंद्राने थकवला राज्याचा निधी

राज्यातील, खास करून गडचिरोली, बुलडाणा, ठाणे जिह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची 170 कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. केंद्राकडून निधी आल्यावर थकीत रक्कम वितरित करण्यात येईल, असे आश्वासन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत दिले. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची थकीत रक्कम देण्याबाबत […]

सामना 26 Feb 2026 8:46 am

किडनी रॅकेटमधील आरोपींना मोक्का लावण्याच्या हालचाली, गृहराज्य मंत्र्यांची माहिती

चंद्रपूर जिह्यातील शेतकऱ्याने सावकरी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या घटनेची व्यापक चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी आज आज विधानसभेत दिली. चंद्रपूर जिह्यातील नागभिड तालुक्यातील मिंथूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांनी कर्जाच्या विळख्यात ओढून […]

सामना 26 Feb 2026 8:44 am

महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळणार, कायदा बनवण्यासाठी समिती नेमणार

मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान आमदारांनी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालाची माहिती घेऊन अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. विधानसभेत जितेंद्र आव्हाड, हेमंत ओगले, अमित देशमुख, रोहित पवार आदी सदस्यांनी विधानसभा राज्यातील कन्या जननदर आणि एक हजार […]

सामना 26 Feb 2026 8:37 am

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न प्राधान्याने सोडवा!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ञ वकिलांची समिती नेमली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र हा प्रश्न अजून सुटलेला नाही. तो प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी आज शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. शिवाय क्रीडा सुविधांसाठी सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आवश्यक सूचना देण्याची मागणीही नार्वेकर यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार मिलिंद […]

सामना 26 Feb 2026 8:35 am