अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धांमुळे आखाती आणि अरब देशांमध्ये तणाव वाढला आहे. तसेच या देशात इराणने क्षेपणास्त्र डागली आहेत. त्यामुळे जगातील सर्वात जास्त उड्डाणे होणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून दुबई विमानतळ अधिकाऱ्यांनी दुबई […]
दिल्लीच्या कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांच्यासह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे […]
नैतिक भ्याडपणाचे प्रदर्शन, पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर जयराम रमेश यांची टीका
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावर तीव्र टीका केली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया नोंदवली. जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी इस्रायल दौऱ्याचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला चढवला. मागील काही महिन्यांपासून […]
देशात येत्या १ एप्रिल २०२६ पासून २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) विक्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, हे पेट्रोल RON 95 या उच्च श्रेणीतील गुणवत्तेचे असणार आहे. काय आहे सरकारचा निर्णय? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता सर्व पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या […]
इराण आणि इस्रायल युद्धात कोणता देश कोणाच्या सोबत आहे, जागतिक नेत्यांनी काय म्हटले?
इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त एअरस्ट्राइकनंतर मिडल ईस्टमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही बहरीन, अबू धाबी, दुबई आणि रियाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांवर प्रतिहल्ला केल्याने जगभरातील नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून संपूर्ण जग दोन गटांत विभागले गेल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन करत इराणच्या जनतेला […]
इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षणमंत्री आणि रिव्हलोशनरी गार्ड कमांडर ठार; रॉयटर्सचे वृत्त
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर जनरल मोहम्मद पाकपूर आणि इराणी संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह हे शनिवारी सकाळी इराणमध्ये इस्रायली हल्ल्यात मारले गेले, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, पाकपूर, नासिरजादेह आणि इराणच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. शनिवारी सकाळच्या हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणी अधिकारी आणि लष्करी […]
इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठ हादरली; कच्च्या तेलाच्या किमतीत भडका, शेअर बाजार कोसळला
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमती, शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या दरांवर झाला असून हिंदुस्थानी बाजारपेठेतही मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय […]
इराणच्या लष्करप्रमुखांना हल्ल्यात ठार केले; इस्रायलचा खळबळजनक दावा
इराणचे लष्करप्रमुख अमीर हतामी यांना इस्रायलच्या हल्लात ठार करण्यात आले आहे,असा खळबळजनक दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या लष्करी रणनीतीतील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी ते एक होते. अमीर हतामी यांना जून २०२५ मध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्त केले होते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने खळबळजनक दावा केला आहे. […]
मुंबईतील अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांवरून अनिल परब आक्रमक; ‘टास्क फोर्स’नेमण्याची विधान परिषदेत मागणी
मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले. “पुढच्या तीन महिन्यांत विशेष टास्क फोर्स नेमून प्रत्येक वस्तीची झाडाझडती घ्या आणि घुसखोरांना बाहेर काढा, अन्यथा पुढच्या अधिवेशनात आम्हाला पोलीस आणि महापालिकेचे दरपत्रक जाहीर करावे लागेल,” असा इशारा अनिल […]
8th Pay Commission – 50 टक्के महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट करा; सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी
आठव्या वेतन आयोगाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवरील महागाईचा भार कमी करण्यासाठी आणखी एक मोठी मागणी करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्स (एफएनपीओ) ने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांना एक पत्र पाठवले आहे. एफएनपीओने सरकारकडे महागाई भत्त्याच्या (डीए) 50 टक्के मूळ वेतनात विलीन करण्याची मागणी केली आहे. […]
देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील हिंदुस्थान वेगळा आहे. संविधानाला अभिप्रेत हिंदुस्थान निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा, स्पृश्य-अस्पृश्यता माननारा मनुवादी विचार भाजपाचा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. […]
अजित पवार यांचे विमान झाडाला धडकलं, 22 पानांचा प्राथमिक अहवाल आला समोर
अजित पवार यांच्या विमान अपघातास एक महिना पूर्ण होत असताना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेचा 22 पानी प्राथमिक तपास अहवाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अपघातासंदर्भातील काही महत्त्वाची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, अपघातावेळी विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2 […]
दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानावर मूलभूत सोयीसुविधांचा प्रचंड वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. या मैदानांवर स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने खेळाडू आणि नागरिकांची मोठी कुचंबणा होत असून, या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. विधान […]
Israel Iran War –इराणमध्ये मिनाबमधील शाळेवर हवाई हल्ला, 36 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पश्चिम आशियातील तणाव आता शिगेला पोहोचला असून इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये एकामागून एक झालेल्या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या कारवाईला इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून, इराणच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या युद्धाच्या भीषणतेत एक धक्कादायक […]
सदगुरू यज्ञेश्वर ( वेडे महाराज ) यांच्या पुण्यतिथी निमित्त उज्जैयिनी पिठ जगदगुरूंची उपस्थिती
परंडा (प्रतिनिधी)-येथील सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज ) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त सदगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पुण्य नगरीमध्ये येथे उज्जैयीनी सधर्म पीठ (कर्नाटक ) जगदगुरु यांची उपस्थिती लाभणार असून अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, संगीतमय शिवपाठ, किर्तन भजन,रथोत्सव,धर्मसभा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. परंपरे प्रमाणे येथील भोत्रा रोड मठात वेडे महाराज यांची २२६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. यात बुधवार दि ४ मार्च २०२६ ते शनिवार ७ मार्च २०२६ या कालावधीत विविध भक्तीमय कार्यक्रम होणार असून यात ४ ते ६ मार्च दरम्यान किर्तन भजन शिवपाठ महाप्रसाद जागर तर दि ७ मार्च शनिवार रोजी पुण्यतिथी दिवशी सकाळी ८ ते ११ श्री श्री श्री १००८ जगदगुरु सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैयिनी सधर्म (कर्नाटक ) यांचा भव्य दिव्य रथोत्सव छत्रपती शिवाजी चौक( कोर्ट) ते वेडे महाराज मठ भोत्रा रोड पर्यंत होणार आहे .व नंतर धर्मसभा होणार आहे. सकाळी आठ वाजता गुरुगादीस रुद्राभिषेक बिल्वार्चन महापुजा व महाप्रसाद होणार आहे. या अभुतपुर्व सोहळ्यासाठी श्री वेदांताचार्य मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज (वेळापुर), सिध्दलिंग राज गुरु शिवाचार्य महाराज (शिंगणापूर), डॉ निळकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा), वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज (वसमत), प्रभुदेव शिवाचार्य महाराज (माढा), वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज (मानुर), महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज(रायपाटण), आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाजतील तमाम भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसाराचा लाभ घ्यावा असे आवाहन परंडा शहर व ग्रामस्थ शिष्य परिवार वर्ग यांनी केले आहे.
गवळी गल्लीत माय मराठीला वंदन करून गौरव दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले व मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणले गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी मातृभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मंडळाच्या वतीने यावेळी मराठी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मंडळाने दहा बाय दहाच्या आकाराचे डिजिटल पोस्टर बनवून गणेशाच्या या मंडळाच्या रंगमंचकावर उभे करून सर्वांनी पाहून मराठी गौरव दिनाचे महत्त्व यातून पाहायला मिळाले या पोस्टर मध्ये मराठी भाषे चे सखोल व मजबूत पायाभूत लिखाण, मराठी माणसाने केलेले पुस्तके ,संतांनी मराठी मधून लिहिलेले ग्रंथ ,विविध समाज सुधारक ने लिहिलेले ग्रंथ,छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले मराठी बद्दलची आत्मीयता या पोस्टर मधून दाखवण्यात आलेली आहे .या पोस्टर मध्ये मराठीतील मुळाक्षरे ही एक वेगळ्या व आगळ्या आकर्षक पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेला वंदन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची मराठमोला वेशभूषा, व लाल भगव् यारंगाच्या टोप्या घालून मराठी भाषेचे महत्व हजारो वर्षापासून जपली गेलेली भाषा आहे यातून आपले ज्ञान, विज्ञान व संस्कृती पारंपारिक परंपरेने जपली आहे अभिजात दर्जामुळे देश व विदेश पातळीवर महत्व वाढत आहे . ताशा व ढोल यांच्या आवाजाने निनादाने मराठी भाषेला वंदन केले मराठी भाषेची अस्मिता व प्राचीनता व संस्कार व संस्कृती असणाऱ्या या भाषेचे महत्त्व मंडळाच्या लहान थोर सदस्यांनी विनम्रपणे वंदन करण्यात आले यावेळी प्राध्यापक गजानन गवळी, विद्या साखरे, विश्वास दळवी, वरून साळुंखे ,सुरवसे, मल्हार साखरे ,पाळणे, शिंदे, लाल्या चवडके, गोट्या, युवराज हूच्चे, शुभम जानगवळी, काशिनाथ दिवटे व भालचंद्र हुच्चे इत्यादीने आपले मराठी भाषेचे महत्व कमी न होता कसे जोपासना व वाढविणे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे की आजच्या काळाची गरज आहे असे व्यक्त केले मंडळ विविध क्षेत्रात व विविध उपक्रमामध्ये समाज प्रबोधन व समाजहित, जनजागृती सेवा भावाने कार्यरत आहे .गेली 64 वर्षापासून मंडळांनी समाज प्रबोधनातून अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार , जुलूम ,जातिभेद धर्मभेद यास स्थान न देता निर्भय भारत अखंड भारत उद्देशाने कार्य करीत आले आहे यावेळी सर्वांचे आभार राजकुमार दिवटे यांनी मा मानले. श्री गणेश व श्री तुळजाभवानी मातेची आरती व पूजाविधि व पेढे वाटून कार्यक्रम संपन्न झाला .
एअर इंडियाने आखाती देशांकडे जाणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. एअर इंडियाने आखाती देशात जाणारी सर्व उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा करत प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे आखाती देशात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांना […]
अवैध गावठी कट्टा जप्त, स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नववर्षाच्या पुर्वसंध्ये निमीत्त अवैध धंदे करणारे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसम यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके व पथक गस्त करीत तुळजापूर येथे आल्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, धाराशिव आरोपी नामे विनोद उर्फ लाल्या बंडु हुच्चे-गवळी रा. तुळजापूर याच्याकडे गावठी कट्टा असून तो बुलेट मोटरसायकल सह सध्याहडको मैदान तुळजापूर येथे मैदानात थांबलेला असुन अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने दि.27.02.2026 रोजी 21.50 वा. सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे नमूद आरोपी हडको मैदानात थांबलेला दिसला पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव विनोद उर्फ लाल्या बंडु हुच्चे-गवळी, वय 21 वर्षे, रा. आर्या चौक, तुळजापूर जि. धाराशिव असे सागिंतले. त्यास नमुद मिळालेल्या माहिती बद्दल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतील असता त्याचे ताब्यात कंबरेला खवलेला एक गावठी कट्टा व त्याचे चेंबरमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले. पोलिसांनी पंचनामा करून नमूद गावठी कट्टा एकुण 25,500 किंमतीचा सह एक रॉयल इनफिल्डळाटर कंपनीची बुलेट क्र एमएच25 बीडी असा एकुण 2,60,500 किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीच्या विरोधात पोस्टे तुळजापूर कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा पुढील कारवाई कामी पोस्टे तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोह निंबाळकर, पोह जाधवर, पोह चव्हाण, पोह शिंदे, पोह राठोड पोना जाधवर, चापोह अरब, चापोकॉ दहीहंडे यांनी केली आहे.
बालकांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे विचार घ्यावेत - प्रा. श्यामसुंदर डोके
भुम (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी (ता.भूम) येथे शनिवारी वेताळ स्वामी मंदिरात कर्मवीर व्याख्यानमाला समारोप कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी बोलताना प्रा.शामसुंदर डोके म्हणाले की, कर्मवीर मामासाहेब यांचे जीवन व कार्य विशद केले. त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या मंत्राचा जीवनभर मंत्र जपला व शिक्षणाची गंगा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे बार्शी परिसर व धाराशिव जिल्हयात पोहोचवली म्हणून च आज वाशी येथे महाविद्यालय 1972 मध्ये उभे राहिले असे विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पांडुरंग आहेर यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय क्षीरसागर होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रोटे,विठ्ठल आहेर, हरिदास आहेर, शिशुपाल साळुंके,दादासाहेब साळुंके, लक्ष्मण आहेर , रुपाली गवळी, सविता गिरी, रजनी आहेर ,अंगणवाडी सेविका राजश्री चव्हाण, सविता जालन, आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन सोमनाथ तौर यांनी केले तर आभार संघमित्र लोखंडे यांनी मानले.
विज्ञानात तत्त्व महत्त्वाचे- संतोष राऊत
भुम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व परीक्षक विज्ञान शिक्षक संतोष राऊत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच फीत कापून अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रस्ताविकात विज्ञान शिक्षक उत्तरेश्वर पायघन यांनी विज्ञान दिन का साजरा केला जातो ? याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शाळेतील 24 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी मनोगतात अतिथी म्हणाले की, “ विद्यार्थ्यांनी कोणताही प्रयोग करत असताना त्यातील तत्त्व समजून घेतले पाहिजे .सी व्ही रामन यांनी पाण्याचा वा आकाशाचा रंग निळा का आहे ?यामागील तत्त्व समजून घेतले व ते 28फेब्रुवारी 1928 रोजी सादर केले . यालाच 1930 सालचे विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. “ असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते .कार्यक्रमाला काकासाहेब पवार,दयानंद पाटील, उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी , राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ ,प्रतिभा मुकटे मॅडम , सुनील जाधवर ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे ,सागर आकोस्कर ,अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.
सावंतवाडीत १४, १५ मार्च रोजी वैश्य वाणी प्रिमिअर लीग
हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन सावंतवाडी : प्रतिनिधी हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून वैश्य वाणी प्रिमिअर लीगचे आयोजन १४ व १५ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी दिली. सावंतवाडी शहर मर्यादीत ही क्रिकेट स्पर्धा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्यावतीने या क्रिकेट लीगच आयोजन करण्यात [...]
Anthropic AI तंत्रज्ञानाचा वापर करू नका, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश
ज्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आणि जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली, त्या Anthropic या कंपनी आणि अमेरिकन सरकारमध्ये मोठा वाद उभा राहिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी सर्व संघीय शासकीय विभागांना अॅन्थ्रोपिकच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर न करण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे कंपनीने स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत […]
ट्रम्प बोलतात तेच मोदी करत आहेत, देश विकण्याचे काम करत आहेत, मल्लिकार्जुन खरगेंची टीका
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. बरनाला येथे आयोजित ‘काँग्रेस मजदूर महारॅली’मध्ये बोलताना खरगे यांनी मोदींची तुलना ट्रम्प यांच्या धोरणांशी केली. मोदी सरकार देशाला पुन्हा गुलामीच्या गर्तेत ढकलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘सरेंडर मोदी’ असा करत म्हटले की, पंतप्रधान आज […]
परीक्षेला आलेली मुले रस्त्यावर, ब्रिजखाली, फुटपाथवर झोपतात; आदित्य ठाकरे यांनी वेधले लक्ष
राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुण उमेदवारांची होणारी प्रचंड गैरसोय आणि दुरवस्थेचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या विषयावर आक्रमक भाषण करत सरकारचे लक्ष वेधले. आदित्य ठाकरे यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, “वसई विरार, मीरा भाईंदरजवळ पोलीस आयुक्तालय येथे जी परीक्षा द्यायला मुले […]
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी काकीनाडा जिल्ह्यातील समरलाकोटा विभागातील वेट्टलापलेम-जी. […]
8 लाख रूपयांचे अफुचे झाडे जप्त
भुम (प्रतिनिधी)- पखरुड ता. भूम शिवारात अफूच्या शेतीवर वाशी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 58 किलो ओला अफू जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे 8 लाख 77 हजार रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भुम तालुक्यातील पाखरुड शिवारात अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या अफूची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीलायक माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. मोठ्या फौजफाट्यासह धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, घोडके, आणि पोलीस उपनिरीक्षक भाळे यांच्यासह अंमलदार बोरकर, मलंगनेर, लाटे, खैरे, खारगे, मिसाळ, कोरडे, आणि चौघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी शासकीय पंच, कार्यकारी दंडाधिकारी, वजन मापे संचालक, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. जप्त केलेला मुद्देमाल: छाप्यादरम्यान अशोक चव्हाण (गट क्र. 8) यांच्या शेतातून 36 किलो अफूची झाडे किंमत 5,40,000/-) राजेंद्र चव्हाण (गट क्र. 12): 18 किलो अफूची झाडे (किंमत 2,70,000/-) धोंडिबा चव्हाण: 4.5 किलो अफूची झाडे (किंमत 67,000/-) जागेवरच पंचनामा आणि अटकेची कारवाई फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत सर्व मालाचे वजन करून, व्हिडिओ चित्रीकरणासह कायदेशीर जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाशी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माहीम येथील अदानी समूहाच्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होणारी धूळ आणि तेथील कंत्राटदाराची दादागिरी यावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार महेश सावंत यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडत, या संपूर्ण प्रकरणाची शासनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. महेश सावंत यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, माहीम परिसरात […]
बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार
धाराशिव (प्रतिनिधी)- 32 वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.27) ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) ही दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पायी चालत तुळजापूरकडे जात होती. त्यावेळी तिच्या गावातीलच एका तरुणाने “चल, तुला तुळजापूर येथे सोडतो,” असे सांगून विश्वास संपादन केला आणि तिला मोटरसायकलवर बसवून घेतले. मात्र, तुळजापूरकडे न नेता आरोपीने तिला एका शेतात, ज्वारीच्या पिकामध्ये नेले. तेथे आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत, तिचे तोंड दाबून ठेवले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडित महिला प्रतिकार करू शकली नाही. आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ तामलवाडी पोलीस ठाणे गाठून प्रथम खबर दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए) आणि शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचे ‘मिशन भाजी मार्केट’
संपुर्ण परिसर होणार चकाचक ; व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार तत्परतेने कार्यवाही मालवण : प्रतिनिधी स्वच्छ सुंदर मालवण शहर हाच ध्यास आणि हाच श्वास घेऊन मालवण नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण या ‘ऑन ड्युटी 24 तास’ कार्यरत आहेत. आता त्यांनी मिशन भाजी मार्केट यावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम [...]
इस्रायलने शनिवारी ऑपरेशन शील्ड ऑफ जूडाद्वारे इराणवर हल्ला केला. त्यात इराणी राष्ट्रपती निवास आणि इराणी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य केले गेले. या कारवाईचे नाव ज्यू इतिहास आणि धार्मिक चिन्हांशी जोडले गेले आहे, जे सुरक्षा आणि शक्तीचे प्रतीक आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी सध्या तेहरानमध्ये नाहीत. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. इस्रायलने या कारवाईला […]
इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, युद्धाच्या या छायेखाली इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तेथील काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हृदयद्रावक व्हिडीओ जारी केला आहे. “आम्हाला माहित नाही पुढे काय होईल,” अशा शब्दांत आपल्या मनातील भीती व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी सरकारकडे तातडीने […]
Sangli News : विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे : पाटील
राजारामबापू पाटील माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार मांगले : इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जाते.सन २०२५-२६ मध्ये राजारामबापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या विद्यालयातील ४४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शाळेच्यावतीने [...]
सिंधुदुर्गचा यावर्षीचा नाट्य महोत्सव वेंगुर्लेत ; सांस्कृतिक मंत्र्यांचा हिरवा कंदील
मनीष दळवींची माहिती ; सावंतवाडीतील मालवणी करंडक महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य केंद्र उभे राहण्यासाठी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा नाट्य महोत्सव वेंगुर्ल्यात घेण्यास त्यांनी हिरवा कंदील दिला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.सावंतवाडी [...]
अमेरिकेसोबत करारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे डेथ वॉरंट निघाले, राहुल गांधी यांचा जोरदार घणाघात
अमेरिकेसोबतच्या कथित आर्थिक व्यवहारांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषी, लघु-मध्यम उद्योग, डेटा सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी “मोठे वादळ येणार आहे” असा इशारा दिला. कृषी क्षेत्रावर परिणामाचा इशारा राहुल गांधी म्हणाले की, सर्वप्रथम कृषी क्षेत्राचे दरवाजे उघडले गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे […]
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महिला मेळावा व आरोग्य शिबिर संपन्न
मुरुम (प्रतिनिधी)-श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे व्हंताळ येथे महिला मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. कार्यक्रमास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती जयश्रीताई सगर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब पाटील, डॉ बनसोडे सर, डॉ. कुलकर्णी सर, श्रीमती डॉ. कोकाटे मॅडम तसेच मिलिंद पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला मेळाव्यात डॉ पार्वती सावंत यांनी महिलांचे आरोग्य, पोषण, रक्ताल्पता, स्वच्छता, माता-बाल संगोपन, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली. उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन करत नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. गरजू महिलांना औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. भारत शेळके, डॉ अनिल देशमुख, डॉ रंजना चोचंडे, प्रा ज्योती जोगदाबगे, महिला प्राध्यापक, ग्रामस्त महिला, शिबिरार्थी विद्यार्थिनी, स्वानसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रेम चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिबिरार्थी विद्यार्थिनी अमृता मुगळे हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून भविष्यातही असे समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
मालवण समुद्रात पोलिसांच्या गस्ती नौकेला जलसमाधी
मालवण /प्रतिनिधी मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या या गस्ती नौकेवरील सर्वांनी सुखरूप किनारा गाठला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस नेपोलियन नावाची पोलिसांची गस्ती नौका गस्त [...]
प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
मुरुम (प्रतिनिधी)- प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रयोगशाळेचे उद्घघाटन व सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य उल्हास घुरघुरेसर व श्री शाळू सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्याध्यापक कोंढारे सर पर्यवेक्षक परसाळगे सर श्री श्री महामुनी सर श्री राठोड सर,श्री शिवशरण तांबडे सर श्री चंद्रशेखर कोराळे सर, श्री संतोष बिंदगे सर, श्री चव्हाण सर श्री स्वामी सर, श्री प्रशांत मुरूमकर सर, कु.अनिशा फुगटे मॅडम कु.आरती कोराळे मॅडम, सौ.सपाटे मॅडम, सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. 28 फेब्रुवारी हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1928 मध्ये सर सी.व्ही. रमण यांनी रामन इफेक्ट या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या दिवशी देशभरात वैज्ञानिक जागृती आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वेगवेगळे विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रेया बालाजी भोसले,समीक्षा संजय शेळके,आस्था अशोक गोडबोले, अर्निया विजयकुमार शेळके, अरशिया पटेल ,बुशरा शेख, मीरा मुळे,धनश्री राठोड, संस्कृती टेकाळे,सुकृती मुदकन्ना, शुभ्रा मुदकन्ना, समृद्धी खुणे, मेघना कटारे, काव्या फिरंगे, तन्वी चव्हाण, श्रावणी वाकळे, समीक्षा शेळके,श्रद्धा येवले,धनश्री राठोड, साक्षी मुदकन्ना, अनन्या महिंद्रकर, रोहन धुमाळ,अथर्व कोरे,शशिकांत भोसले,सम्यक सुतके,महेश चिलोबा,प्रणव वाघ, श्लोक झुरळे,सोमनाथ सुरवसे, मयंक मिणीयार,प्रशांत शेंडगे, रितेश दुर्गे,अब्दुल मकानदार, आरुष भोसगे,युवराज वाकळे, गणेश खुणे,कपिल हिरेमठ,प्रथमेश जिडगे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. अनिशा फुगटे मॅडम श्रीमती स्वामी मॅडम,कोराळे मॅडम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु,आस्था अशोक गोडबोले यांनी केले आभार श्रेया बालाजी भोसले यांनी मानले.
सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेना महायुतीने सावंत गटाला बाजूला ठेवून सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीत फुट पडण्याच्या आणि काही सदस्य वेगळे होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून शिवसेनेचे बहुसंख्य सदस्य भाजपासोबत उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचा गट महायुतीपासून दूर राहिल्याने राजकीय समीकरणात वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप या महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचे समर्थक असलेले आठ जिल्हा परिषद सदस्य स्वतंत्र गटात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. दुसरीकडे शिवसेनेचे इतर सात सदस्य मात्र भाजपसोबत कायम राहिले असून त्यांनी महायुतीवरील विश्वास कायम ठेवला आहे. दरम्यान, आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, आणि मल्हार पाटील देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर महायुतीतील बहुतांश सदस्य एकत्र असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामविकास विभागाने चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्हा प्रशासनाने दिनांक 13 मार्च 2026 रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या घडीला भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6, सावंत गट वगळून शिवसेनेचे 7 आणि 2 अपक्ष असे एकूण 34 सदस्य महायुतीच्या बाजूने असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत असून अध्यक्षपदावर महायुतीचाच उमेदवार विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे. अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चनाताई पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत संभाव्य उमेदवारांबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी महायुतीकडून सर्वसंमतीने उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) पक्षाला जिल्हा परिषदेत 7 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 3 जागांवर यश मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) पुरस्कृत एक अपक्ष सदस्य देखील निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकूण 11 जागा झाल्या आहेत. आता सावंत गट देखील विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता असल्याने विरोधकांची संख्या वाढणार असून जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. सावंत गट वेगळा राहिल्यानंतरही महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा आणि उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा असणार आहे.
संवेदनशील मन असेल तर साहित्य लिहिता येते- प्रा. राजा जगताप
धाराशिव (प्रतिनिधी)- आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच साहित्याचे वाचन अफाट करावे व आपल्या परिसरात एखादी कोणतीही घटना घडत असेल तर तिच्याकडे एका संवेदनशील मनातून पाहावे व त्यावर विचार करावा आणि लिहिते व्हावे. संवेदनशील मन असेल तर साहित्य लिहिता येते असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मराठी विभाग प्रमुख प्रा.राजा जगताप यांनी केले आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य प्रो.छाया दापके होत्या. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की, कुसुमाग्रज यांनी विपुल प्रमाणात काव्य लेखन केल्याने व त्यांच्या कवितेने मराठी माणसांच्या मनावर गारुड घातले होते. त्यांची स्वतंञ्य देवतेची विनवणी ही कविता मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली होती. अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ. छाया दापके म्हणाल्या की, वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेने देशाभिमान जागृत केला व त्यांची कविता मराठी माणसाच्या मनावर सतत हुकूमत गाजवत आलेली आहे. यावेळी मराठी विभागाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील लेखक लेखिका यांच्या कवितेचे विद्यार्थ्यांना संकलन करायला लावून गुलमोहर भीतीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रकाशन प्र. प्राचार्य प्रा.डॉ.संदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी प्रा. डॉ. वैशाली बोबडे यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार मराठी विभागाचे प्रा सुशेन जाधवर यांनी मानले. यावेळी देडे, प्रा.सुवर्णा गेंगजे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा धाराशिव तर्फे दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी निरंतर परिचर्या प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी रित्या आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप अधिष्ठाता उज्वला गवळी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी परिचर्या व्यवसायामध्ये निरंतर प्रशिक्षण या संकल्पनेचे प्रकर्षाने स्वागत केले व रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याकरिता या कार्यशाळेचा सर्व परिचारिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर सुधारीत कौशल्ये, तंत्रज्ञान व नवीन उपचार पद्धती विकसित करण्याकरिता अशा कार्यशाळांची सातत्याने गरज असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष कान,नाक,घसा विभागप्रमुख डॉ.सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी संघटनेचा ऐतिहासिक प्रवास आणि परिचारिकांच्या समस्या व मागण्या यामध्ये संघटनेची ठोस भूमिका विशद केली. सदर कार्यशाळेला स्त्री रुग्णालय धाराशिवच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता डॉ. प्रवीण डुमणे व जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका सुमित्रा गोरे या उपस्थित होत्या. “परिचर्या व्यवसायातील संवाद कौशल्य“ विषयावरील आयोजित कार्यशाळेस जिल्हाभरातून शासकीय कंत्राटी व खाजगी आरोग्य संस्थांतील तब्बल जवळपास 500 परिचारिकांनी हजेरी नोंदवली. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य सहसचिव जयश्री हेंडगे, राज्य उपाध्यक्ष सुनील कुंटे, धाराशिव शाखेच्या अध्यक्ष मीना सूर्यवंशी, उपाध्यक्ष गोविंद शेळके, शाखा सचिव रेखा मुळे, सहसचिव नीता मोरे, खजिनदार मीनाक्षी गुळवे, सहखजिनदार रंजना राठोड आणि शैलजा कोल्हाळ यांनी अथक प्रयत्न केले.
मराठी भाषा गौरव दिन जिल्हा परिषद शाळा पार्डी येथे उत्साहात साजरा
वाशी (प्रतिनिधी)- मराठी भाषा गौरव दिन जि.प.प्रा.शा.पार्डी येथे उत्साहात साजरा कराज्यात आला.त्यानिमित्त विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारीत स्वतःचे लिखाण केले.ते एकत्रीत करून अंतरंग सजावट,मलपृषठ,मुखपृष्ठ सजावट करुन पुस्तक स्वरुपात हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. आपणही पुस्तकातील लेखकाप्रमाणे धडे, कविता लिहू शकतो अर्थात लेखन करु शकतो हा आत्मविश्वास या हस्तलिखितामुळे विद्यार्थ्यांमधे रुजला. आपलंच पुस्तक ही भावनाच,हा अनुभवच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील लेखनाच्या पहिल्या पायरीवर नकळतच पोहोचवून गेला. हस्तलिखित हा एक असा सर्वव्यापी उपक्रम आहे की ज्यामधे स्पर्धा नसते, पहिला दुसरा नंबर नसतो त्यामुळे कधीच कोणत्याही सृपर्धेत सहभागी न होनारे विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होतात. यानिमित्ताने मराठी भाषेची थोरवी सांगणारे सुमधूर गीते गायली व ऐकली. वि.वा.शिरवाडकरांसह इतर कांही कवि, लेखक व त्यांचे साहित्य या संदर्भाने विद्यार्थ्यांनी माहिती संकलित करून सादर केली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम नागटिळक यांच्यासह उर्मिला भोसले- कावळे,बापूराव कात्रे ,राणी येवले, गंगासागर आखाडे,वैभव सोनवणे यांनी प्रयत्न केले.
क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
धाराशिव (प्रतिनिधी)- क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयित लोकांची तपासणी करणे व निदान झालेल्या क्षयरुग्णांना तात्काळ औषधोपचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे तसेच मृत्यू झालेल्या क्षयरुग्णांचे डेथ ऑडिट करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित टीबी डेथ Surveillance आणि Response समिती,टीबी फोरम तसेच टीबी कॉमोरबिडिटी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत सर्व Key Population ची एक्स-रे तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून पूर्णपणे बरे करावे.सन 2026 साठी जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी 432 ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या आहेत.हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पुढील महिन्यात 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ वाटप करावयाचे असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.
पांगरदरवाडी शाळेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; अनियमित कारभारावर संताप,
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरदरवाडी मधील शैक्षणिक गुणवत्ता व अनियमित कारभाराबाबत आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी अचानक धडक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. भेटीदरम्यान आढळलेल्या प्रकारांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी केलेल्या लेखी तक्रारीत काही शिक्षक वर्गावर नियमित न जाता कार्यालयात बसून मोबाईल वापरणे, विना रजा गैरहजर राहणे, परस्पर रजा ॲडजस्ट करणे, तसेच शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून अस्वच्छता पसरवणे अशा प्रकारांचा उल्लेख केला होता. प्रत्यक्ष पाहणीत हजेरी पत्रकात खाडाखोड झाल्याचेही निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी संबंधित शिक्षकांची खरडपट्टी काढली. दरम्यान, प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक करत, “चुकी करणाऱ्यांवर कारवाई होईल; पण चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे राहील,” असेही सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी पिकवणे, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख कल्याण बेताळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम शेळके, उपसरपंच सोमनाथ शिंदे, किरण शिंदे, गणेश गायकवाड यांच्यासह पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलंबनाची मागणी शाळेच्या अनियमित कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संबंधित तीन शिक्षकांविरोधात आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. श्रीराम शेळके, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, पांगरदरवाडी
दीपक नगर तांडा ग्रामपंचायतकडून इतिवृत्ताची प्रत देण्यास टाळाटाळ, कारवाईची मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील दीपक नगर तांडा येथील ग्रामपंचायतीकडून सन 2022 ते 2025 या कालावधीतील प्रोसीडिंग नक्कल, कृती आराखडा व ग्रामसभेच्या इतिवृत्तांच्या प्रती देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत राठोड राजपाल काशिनाथ यांनी मा. गटविकास अधिकारी वर्ग1, पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कागदपत्रांसाठी मागील एक महिन्यापासून वारंवार लेखी अर्ज करूनही सरपंच व ग्रामसेवक कोणताही ठोस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागणीप्रमाणे अर्ज दाखल करूनही आजपर्यंत एकही कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसून महिन्यातून केवळ एकदाच येतात, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे गावातील नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत कामकाजात पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त करत संबंधित अधिकारी व सरपंच यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, तसेच मागणी केलेली सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे पंचायत समिती प्रशासन कशा प्रकारे दखल घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय वेबिनार उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील रसायनशास्त्र विभाग व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वैश्विक मार्ग: परदेशात अभ्यास, संशोधन आणि करिअरच्या संधी” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नामदेव एस. तोगरे संस्थापक आणि प्रमुख, शैक्षणिक उपक्रम, भारत, पोस्टडॉक्टरल फेलो, पेनसिल्व्हेनिया, यूएसए, यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. आपल्या सविस्तर सादरीकरणात त्यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधन क्षेत्रातील नवीन प्रवाह, शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कौशल्ये व जागतिक करिअरच्या संधी याबाबत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक माहिती दिली. डॉ. तोगरे यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक नियोजन, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या पद्धती, संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा, तसेच संवादकौशल्य व संशोधनवृत्ती विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षण घेण्याबाबत उत्सुकता व आत्मविश्वास निर्माण झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी आपल्या स्वागतपर मनोगतातून विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी, संशोधनाची आवड जोपासावी व नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. पाहुण्यांची ओळख डॉ. संभाजी धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन वेबिनारचे संयोजक डॉ. मंगेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेबिनारचे आयोजक डॉ. गोविंद साळुंके यांनी केले. आयोजन समितीमध्ये प्रा. एस. जे. खोचरे, डॉ. व्ही. ए. गायकवाड व डॉ. एस. टी. धुमाळ यांनी सहकार्य केले. या वेबिनारला विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
डांबरीकरण न झाल्यास रास्ता रोको करणार
ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकामला इशारा ; म्हापण- वेंगुर्ले रस्त्याची दूरवस्था म्हापण / प्रतिनिधी सागरी महामार्गावरील म्हापण ते वेंगुर्ले दरम्यान अतिशय खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण १० मार्च पासून सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाथा मडवळ व सहकाऱ्यांना देऊन आंदोलन करू नका अशी विनंती केल्याने १ मार्च रोजी जाहीर केलेले [...]
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर रशियाने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले आहे. रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचे खरे रंग दाखवले आहेत. स्वतःला शांतीदूत म्हणवणाऱ्या ट्रम्प यांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. रशियांच्या या प्रतिक्रियेनंतर जागतिक तणाव आणखी […]
1 मार्च पासून बदलणार ‘हे’ 5 नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! वाचा सविस्तर…
उद्यापासून म्हणजेच 1 मार्च 2026 पासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल होणार आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरचे दर, रेल्वेचे नियम, बँकिंग आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत नवीन बदल होतील. तुम्ही वेळेत या बदलांची माहिती घेतली नाही तर, तुमच्या बजेटवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. प्रवास, स्वयंपाकघर आणि मोबाईल वापराशी संबंधित या नियमांमुळे तुमची […]
Israel Iran News –हिंदुस्थानी दुतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायजरी जारी
इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणमधील 30 ठिकाणांवर भीषण हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने तातडीने पावले उचलत इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हिंदुस्थानी दुतावासाने जारी केलेल्या या ॲडव्हायजरीनुसार, सध्याची सुरक्षा स्थिती पाहता सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच […]
Sangli News : राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाची आज गटनेता निवड
गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड होण्याची शक्यता सांगली : राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या जि.प. गटनेत्याच्या निवडीसाठी आणि गट नोंदणीसाठी पक्षाच्या सदस्यांची आज मिरज येथे बैठक होणार आहे. गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाचे सहा सदस्य निवडून आले आहेत. बैठकीसाठी नवनिर्वाचित सदस्यांसह पक्ष जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, माजी खासदार संजयकाका [...]
सौदी, कतार, यूएई ते बहरीन…इराणचा जबरदस्त पलटवार, अमेरिकेच्या 7 लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांची बरसात
इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने केलेल्या हल्ल्यामुळे इराण चवताळून उठला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवण्याचा विडा उचलला असून जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सात लष्करी तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून स्फोटांच्या आवाजाने अक्षरश: थरकाप उडत आहे. व्हिडीओ क्षेपणास्त्राचा स्फोट आणि त्या […]
इराणचे क्षेपणास्त्रे आणि नौदल उद्ध्वस्त करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इराणवर शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिकेने हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. अमेरिकेने इराणमध्ये मोठ्या लढाऊ कारवाया सुरू केल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘ट्रुथ सोशल’वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी सांगितले की, या लष्करी मोहिमांचा उद्देश अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करणे आणि इराणी शासनाकडून निर्माण होणारे धोके संपवणे हा […]
तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच राजपाल यादवची मुंबईतील इवेंटला हजेरी, अक्षय कुमारसोबत दिसला
चेक बाउन्स प्रकरणारणामुळे गेल्या काही दिवसांपासून राजपाल यादव हेडलाइन्समध्ये झळकत होते. या प्रकरणावरून राजपाल यादवला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पहिल्यांदाच मुंबईतील एका इवेंटमध्ये दिसून आला. त्याने पापाराझींसमोर हसत हसत पोज दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजपाल यादवसाठी गेले काही वर्षे खूप कठीण काळ गेला आहे. चेक बाउन्स […]
तृणमूल काँग्रेसने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी चार नावांची घोषणा केली आहे. यातील एक नाव ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांचे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेनका गुरुस्वामी यांना उमेदवारी जाहीर करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्या निवडून आल्यास देशातील पहिल्या LGBTQ राज्यसभा खासदार ठरतील. मेनका गुरुस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील एक ख्यातनाम ज्येष्ठ वकील आहेत. हिंदुस्थान समलैंगिकतेला […]
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकेने हवाई आणि समुद्रमार्गे इराणवर हल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्था आणि लष्करी प्रतिष्ठानांसह 30 ठिकाणी हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, ते कोणत्याही किंमतीत इराणला अणुशक्ती बनू देणार नाहीत. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलसह […]
न्हावेलीत १० मार्चला मोफत नेत्र ,ह्रदयरोग शिबिर
न्हावेली /वार्ताहर डॉ.राणे हॉस्पिटल ॲड मेडिकल रिसर्च सेंटर डॉ.गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंगळवार १० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत न्हावेली ग्रामपंचायत कार्यालय येथे कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी व ह्रदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत विदेशी तरुणीशी गैरवर्तन, फोटोसाठी पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल
मुंबईमध्ये एका विदेशी तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. इनेस फारिया असे या विदेशी तरुणीचे नाव असून या महिलेने सोशल मीडियावर घडलेला प्रकार शेअर केला आहे. यामध्ये असे दिसते की, दोन तरुणांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिचा तब्बल 15 मिनिटे पाठलाग केला. तिने वारंवार नकार देऊनही हे तरुण ऐकत नसल्याने अखेर तरुणीला त्यांना ढकलून दूर […]
उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या रविवारी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने महत्त्वाच्या मार्गांवर नियोजित मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 या वेळेत चर्चगेट ते बांद्रा स्थानकादरम्यान अप […]
Gold Silver Rate –सोने-चांदीच्या दरात चढउतार सुरुच; जाणून घ्या आजचे दर…
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. जागतिक अनिश्चितता, अमेरिकन टॅरिफ पॉलिसी आणि इतर घटक बाजारपेठेत सतत बदल घडवत आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनेचांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर सोने-चांदीचे दर दबावाखाली आहेत. अजूनही ते त्यांच्या उच्चांकापासून कमी किमतीत मिळत आहे. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीत सोने-चांदीचे दर पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातूल […]
Ranji Trophy Final –इतिहास घडला! कर्नाटकला नमवून जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच ‘रणजी’चॅम्पियन!!
जम्मू-कश्मीरच्या संघाने रणजी करंडक 2025-26 च्या अंतिम सामन्यात आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव करून इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरने 66 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. शुभम पुंडीर याला प्लेअर ऑफ मॅच, तर आकिब नबीला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर […]
सावधान! रत्नागिरीत आता नियम मोडणाऱ्यांची खैर नाही; RTO कडे दाखल झाली आधुनिक ‘MTES’यंत्रणा!
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना आता वाहतुकीचे नियम पाळणे अधिक गरजेचे झाले आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी रत्नागिरी आरटीओ विभाग आता ‘हायटेक’ झाला आहे. काय आहे ही नवीन यंत्रणा? (MTES System) आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या स्पीड गनपेक्षा अधिक प्रगत अशी MTES यंत्रणा आता आरटीओच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ही यंत्रणा थेट रडारला कनेक्ट [...]
सत्यवती नाईक –आरोसकर यांचे निधन
सोनुर्ली – सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील सत्यवती भास्कर नाईक – आरोसकर (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध बागायतदार कै भास्कर नाईक – आरोसकर यांच्या त्या पत्नी होत तर प्रगतशील बागायतदार श्रीहरी उर्फ बाळा नाईक आणि विलास नाईक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात त दोन मुलगे, दोन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
दाणोली साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव ५ मार्चला
दाणोलीत विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन ओटवणे प्रतिनिधी कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा गुरूवार ५ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट [...]
Sangli News : जन्म-मृत्यू नोंदणीच्या निकालासाठी पाच हजाराची लाच
विट्यात प्रांत कार्यालयातील लघुलेखकाला अटक सांगली: जन्म-मृत्यू नोंदणीच्या पाच प्रकरणांच्या निकालासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लघुलेखकाला अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी विटा येथे ही कारवाई करण्यात आली. लाच घेताना अटक करण्यात आलेल्या लघुलेखकाचे नाव रमेश आण्णा शिंदे असे आहे. तक्रारदाराने पाच अर्जांच्या निकालासाठी शिंदे यांनी प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे पाच हजार [...]
हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा आगामी सामना म्हणजे ‘क्वार्टर फायनल’च आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवला, तर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा होईल. मात्र, पराभव झाल्यास गाशा गुंडाळावा लागेल. अशातच आता चाहत्यांच्या नजरा मैदानातील खेळापेक्षा आकाशाकडे जास्त लागल्या आहेत. पाऊस या सामन्यात खोडा घालणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. […]
Kolhapur News : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्रिक
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत स्पर्धा कोल्हापूर: येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील ११ संघ सहभागी झाले होते. या विजयी संघात अथर्व शिंदे, हेत छाभैय्या, तनिष्क यादव, मितेश पटेल, मेहुल पटेल यांचा समावेश आहे. [...]
कुनो अभयारण्यात नवे पाहुणे दाखल, आणखी नऊ चित्त्यांचे आगमन
मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आफ्रिकेतील बोत्सवाना येथून तब्बल 12 तासांचा प्रदीर्घ विमान प्रवास करून 9 नवे चित्ते हिंदुस्थानात सुखरूप पोहोचले आहेत. या चित्त्यांना विशेष हेलिकॉप्टरद्वारे कूनो येथे आणण्यात आले असून सध्या त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नव्या आगमनामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या 39 वरून आता […]
होळी 2 की 3 मार्चला; जाणून घ्या शास्त्र काय सांगते?
>> योगेश जोशी यंदाची होळी खूप महत्त्वाची मानली जात आहे. यंदा पोर्णिमा 2 आणि 3 मार्च रोजी आली आहे. तसेच यंदा होळीच्या वेळी चंद्रग्रहणही आले आहे. त्यामुळे होलिका दहन 2 मार्च रोजी करायचे की 3 मार्च रोजी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आता याबाबत शास्त्रात होलिका दहनाबाबत सांगितलेले नियम आणि होळीकादहन नेमके 2 की 3 […]
आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, माजी आयपीएस अधिकारी राजीव कुमार, आमदार मेनका गोस्वामी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कोयल मल्लिक यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सामाजिक आणि राजकीय […]
Ajara News : आजरा आठवडा बाजारात सुरमईचा दर १४०० पार
माशांची आवक मोठी होऊनही दर चढे आजरा : येथील शुक्रवारच्या आठवडे बाजारात सुरमईचा दर प्रति किलो १४०० रुपयांच्या पार झाला आहे. तर इतर माशांचे दरही वाढल्याचे चित्र दिसून आले. कोकणातून आजरा मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची आवक होते. आजरा ही सभोवतालच्या ५० खेड्यांची मुख्य बाजारपेठ आहे. शुक्रवारी आजरा आठवडा बाजारात खेडेगावातून बाजारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी [...]
मुंबईतील चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात एका पुनर्विकासाधीन इमारतीचे काम सुरू असताना भीषण अपघात झाला आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे. या अपघातात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगरमधील इमारत क्रमांक 36 च्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू होते. शुक्रवारी हे […]
न्यायालयाच्या देखरेखीखाली ड्रग्जची विल्हेवाट
मुख्यमंत्रीसावंतयांचीमाहिती: 2037 पर्यंतगोवाराज्यहोणारड्रग्जमुक्त पणजी : गोव्यात अमलीपदार्थांची पाळेमुळे खणून काढताना पोलिस, अमलीपदार्थ विरोधी विभाग यांचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. गोव्यात अनेक घटनांमधून अमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त करण्यात येतो. ह्या ड्रग्जचे पुढे काय केले जाते, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. परंतु गोव्यात जप्त करण्यात आलेला ड्रग्ज फक्त ताब्यात घेतला जात नाही, तर त्याची कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मुंबई उच्च [...]
पंजाबमधील पटियाला येथील राजीव गांधी राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव विद्यापीठाच्या नावातून काढून टाकण्याची शिफारस केली आहे. प्रस्तावानुसार, विद्यापीठाचे नवीन नाव फक्त “राष्ट्रीय कायदा विद्यापीठ” असे असणार आहे. या निर्णयाला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. जयशंकर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितले की हा प्रस्ताव शैक्षणिक परिषदेने मंजूर केला आहे […]
डीजीसीआयकडून बेंगळूरमध्ये करचुकवेगिरीचा पर्दाफाश
सुमारे 593 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक : एकाला अटक : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बेळगाव : वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय) बेळगाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 593 कोटी रुपयांचा बनावट बिल फसवणुकीचा पर्दाफाश केला. बेंगळूरमधील स्टार टॅक्स कन्सल्टंटशी संबंधित जागांवर शोधमोहीम राबवून बनावट इन्पुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी मोहम्मद सैफुल्लाह याला [...]
बैलूर येथे घरफोडी; सात तोळे सोने लंपास
70 हजाराचीरोकडहीलांबविली: ग्रामस्थांच्यासतर्कतेमुळेएकचोरटापोलिसांच्याताब्यात वार्ताहर/बैलूर बैलूर ता. खानापूर येथील गावाबाहेरील पिंपळ वाड्यावर वास्तव्यास असणाऱ्या नामदेव तुकाराम कणपुंबकर यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी चोरी करत सात तोळे सोने व रोख 70 हजाराची रक्कम लांबवली. कणकुंबकर कुटुंबीयांच्या व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्यास पकडण्यात यश आले. मात्र दोघेजण सात तोळे सोने व रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. नामदेव कणपुंबकर [...]
विविध मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांनादिलेनिवेदन: राज्यसरकारचेदुर्लक्षहोतअसल्याचाआरोप बेळगाव : राज्यातील आशा कार्यकर्त्यांच्या प्रलंबित मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. आशा कामगार संघटनेच्यावतीने (एआययूटीयूसी) आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी राज्यभरात आशा कार्यकर्त्यांनी आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले. बेळगावमध्येही मोठ्या प्रमाणात आशा कार्यकर्त्यांनी सरदार्स ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी [...]
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असून अजितदादांच्या संशयास्पद मृत्युवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार […]
इंडिगो पाठोपाठ आता स्टार एअरचीही बेळगाव-मुंबई विमानसेवा
खासदारजगदीशशेट्टरयांच्यापाठपुराव्यालायश बेळगाव : इंडिगो पाठोपाठ स्टार एअरनेही 29 मार्चपासून बेळगाव-मुंबई विमानसेवेसाठी बुकिंग केले आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा स्टार एअरने पुन्हा सुरू केली आहे. याबाबत विमानतळ प्राधिकारणाकडे अधिकृत माहिती नसली तरी स्टार एअरने आपल्या वेबसाईटवरून बुकिंग सुरू केले आहे. सकाळी 7.20 वा. बेळगावहून मुंबईच्या दिशेने विमान रवाना होणार असूनसकाळी 8.25 वा. मुंबई येथे [...]
Kolhapur Crime News :दुचाकीमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
८० हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर : शहरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा, एक मोपेड, दोन हजार रुपये, दोन मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कुणाल किरण सांगवडेकर (वय २५, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव), भूषण रंगराव पाटील (वय २२, रा. पोवार कॉलनी, पाचगाव [...]
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 केंद्रांवर परीक्षा
बारावीचीअंतिमपरीक्षाआजपासून: केंद्रावरकडकबंदोबस्त बेळगाव : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवार दि. 28 फेब्रुवारीपासून अंतिम परीक्षेला सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांनी तणावाखाली न जाता अभ्यासपूर्व प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, असे आवाहन पदवीपूर्व शिक्षणा विभागासह प्राध्यापकांनी केली आहे. शनिवारपासून परीक्षा असल्याने शुक्रवारी परीक्षा केंद्रांवर क्रमांक घालण्याची धावपळ सुरू होती. पहिल्या दिवशी कन्नड विषयाचा [...]
साऊथ इंडस्ट्रिचा सुपरस्टार अभिनेता थलपती विजयच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. थलपती विजयच्या आगामी चित्रपट ‘जन नायगन’ च्या प्रदर्शनापूर्वीच त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच त्याच्या वर्क लाईफसोबतच आता पर्सनल लाईमध्ये वादळ येणार आहे. विजय याच्या पत्नीने त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या न्यायहक्कासाठी तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या वृत्ताने चाहत्यांना […]
महाराष्ट्राने सीमाप्रश्न सोडविण्याची संधी तीनदा दवडली!
पुणेयेथील‘लेखक-वाचकसंवाद’ सत्रातडॉ. किरणठाकुरयांचीखंत: सीमाभागराजकीयमहत्त्वाकांक्षेचाठरलाबळी पुणे : भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार सीमाभागाचा प्रश्न सुटला असता; परंतु महाराष्ट्र सीमावासियांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी तीनवेळा सीमाप्रश्न सोडविण्याची संधी दवडली, अशी खंत ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी येथे व्यक्त केली. ‘पुणे पुस्तक महोत्सव’, नीलकंठ प्रकाशन [...]
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी इम्तियाज जलील यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करत 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. एका भाषणादरम्यान जलील यांनी सोमय्या यांचा उल्लेख ‘तोतला’ असा केल्याचा आरोप करत, यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा […]
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लोकमान्य’तर्फे रक्तदान शिबिर
रक्तदात्यांचाउत्स्फूर्तप्रतिसाद बेळगाव : मराठीभाषागौरवदिनाचेऔचित्यसाधूनलोकमान्यमल्टिपर्पजको-ऑप सोसायटीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला लोकमान्य सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसह बेळगावमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने यांच्यासह लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल [...]
कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य ग्रंथालयाला भेट
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाल ग्रंथालयाला शुक्रवारी भेट दिली. ग्रंथालयाच्यावतीने शाळेतील मुलांना वाचनाची गोडी लागावी. तसेच ज्ञानात भर पडावी. यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घ्ण्यात आले. लोकमान्य सोसायटीच्यावतीने या ठिकाणी ‘उबंटू’ हा चित्रपट दाखविण्यात आला.बालग्रंथालयाच्यावतीने छाया सुतार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात [...]
लोककल्प फौंडेशनतर्पे कणकुंबी येथे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
बेळगाव : लोककल्पफौंडेशनतर्फेनेत्रदर्शनसुपरस्पेशालिटीआयहॉस्पिटल(डॉ. अग्रवालआयहॉस्पिटल युनिट) यांच्या सहकार्याने कणकुंबी येथील रुग्णाची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. अवधुत वाघळे यांनी केली. नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार यावेळी उपस्थित होते. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात [...]
मोठी बातमी –इस्रायलचा इराणवर हल्ला; तेहरानमध्ये स्फोट, हवाई हल्ल्याचे सायरन वाजण्यास सुरुवात
इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले असून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून देशभर आणीबाणी घोषित केली आहे. बातमी अपडेट होत आहे…
बायपास संदर्भात शेतकऱ्यांनी पुन्हा मांडली कैफियत
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : बेकायदेशीर भू संपादन केल्याचा आरोप : न्यायालयाचे स्पष्ट निर्देश येईपर्यंत बायपासचे काम थांबवण्याची शेतकरी वर्गाची मागणी बेळगाव : हलगा – मच्छे बायपास संदर्भात न्यायालयाचे निर्देश काय आहेत ते वकिलांच्या माध्यमातून यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहेत. न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे देखील निदर्शनास आणून देण्यात आले आहे. बायपास रस्ता बेकायदेशीर असून [...]
सार्वजनिक ठिकाणी दारू ढोसणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम
शहर-तालुक्यातछापे, 17 जणताब्यात बेळगाव : गांजाबरोबरच आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्धही बेळगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बेळगाव शहर व तालुक्यात मोहीम राबवून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. खडेबाजार, उद्यमबाग, कॅम्प, टिळकवाडी, शहापूर, हिरेबागेवाडी, काकती, एपीएमसी, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मद्यपीविरुद्ध [...]
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची कारवाई सुरूच
बेळगाव : रस्त्याच्या कडेला कचरा टाकून ब्लॅकस्पॉट तयार करणे, व्यापार परवाना न घेणे, परवान्याचे नूतनीकरण न करणे यासह इतर प्रकारे मनपाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शुक्रवारीदेखील महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. सातत्याने सुरू असलेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक आणि कम्युनिटी मोबीलायझरकडून शहर व [...]

27 C